कथा
रतीब
उन्हाळ्याची सुट्टी लागल्यापासून शांताच एक काम हलक झाल होत, ते म्हणजे चंद्रीला चरायला नेण. दिगूने मोठ्या उत्साहाने ते काम अंगावर घेतलं होत. रोज दुपारी त्याचा मित्रांबरोबर कधी विटी दाण्डुचा डाव रंगत होता तर कधी पत्त्याचा. खेळ संपले की मग कैर्या, चिंचा पाडण, त्या मीठ लावून खाण आणि मग विहिरीत डुंबत बसण असा त्याचा उद्योग सुरु असे. संध्याकाळ झाली कि तो चंद्रीला घरी घेऊन येई. तोपर्यंत शांता कधी घर सारवून घेई, तर कधी दळण नीट करून ठेवायची. कधी बायका वाळवण करायला बोलवायच्या मग त्यांना जाऊन मदत करायची.
"नोकरी" - एक चित्रपट
(प्रस्तुत प्रसंग आणि सर्व पात्रे ही पूर्णपणे काल्पनिक आहेत. त्याचा कोणत्याही जिवंत वा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. तसा आढळून आल्यास तो एकमात्र योगायोग समजावा)….
"नोकरी"
विश्वास वासावरचा
आमची पेरणा
अर्थात शब्दानुज यांची क्षमा मागुन....
रोज पुन्हापुन्हा तो ढुसक्या सोडतो
समोरचा नाईलाजाने नाकावर हात दाबतो
हजारो वर्षांपासुन तो त्या सोडतो
आणि दिवसभर पोट दाबून कळा सोसतो
खरेतर प्रत्येकाच्या शरीरातून ती बाहेर पडत असते
पण काहिंचे अस्तित्व नुसत्या वासावरुन ओळखता येते
पवनाच्या रुपातुन तो बाहेर पडतो
पोटाबरचे प्रेशर थोडेसे हलके करुन जातो
प्रत्येक श्वासातुन तो नाकात घुसू पहातो
श्वासाशिवाय थोड्या वेळानंतर जीव घुसमटतो
झोपलेले नशिब
आटपाटनगरात एक कोळी रहायचा. रोज सकाळी उठुन मासे पागायला जायचा. जे काय मासे मिळायचे ते बायकोच्या ताब्यात देउन दुपारी आराम करायचा, पोराशी खेळायचा. बायको काही मासे घरासाठी ठेवुन उरलेले विकायची, घरी येतांना टोपल्यात बाजार भरुन आणायची.
मी नाही बोलणार जा.............
अवनी आज प्रचंड घुश्श्यात होती. घरी आल्या आल्या तिने सोफ्यावर दफ्तर आपटलं आणि तडक वर आपल्या खोलीत निघून गेली. ज्योती किचनमधुन बाहेर पाणी घेउन येईपर्यंत वरुन धाडकन दरवाजा आपटल्याचा आवाज आला. तिला आजच हे प्रकरण थोड विचित्रच वाटलं. सहसा अवनी अस कधी वागायची नाही. हा थोड़ी हट्टी होती, ती तर सगळीच मुलं ह्या वयात असतात पण इतरांप्रमाणे अवनी कधी आततायीपणा करायची नाही. आईविना पोर म्हणून ती तिच्या आजीची ज़रा जास्तच लाडकी होती एव्हढंच. पण बाक़ी अवनी होती अगदी गोड आणि लाघवी. पूर्वी दंगा करून घर डोक्यावर घेणारी अवनी मम्मा गेल्यापासून मात्र थोडी बदलली होती.
साधु हास्यानंद 2
आणि ते पुढे म्हणाले, ' जो जन्माला येतो त्याला दुःख हे येते पण जगात आनंद ही तेवढाच आहे , मग आपण दुःखाच्या मागे का धावतो. भुतकाळातील आनंदी क्षण विसरतो, दुःखाचे क्षण मात्र लक्षात ठेवतो. आशा स्थितीत जर वर्तमानात राहीले तर त्याचा परिणाम भविष्यातील जीवनावर होतो. जर तुम्ही त्याच ठिकाणी आनंदाचे क्षण आठवले तर त्याचा परिणाम तुमच्या वर्तमान जीवनावर होईल, आणि सहाजिकच तुमचा भविष्यकाळ सुदंर आसेल, '
हे ऐकल्यावर सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसु लागला.
एक "टवाळ" संध्याकाळ
बर्याचं दिवसांपासुन व्हॉट्स अॅप गृप वरती किमान ३००० वेळा कट्टा करायच्या गोष्टी चाललेल्या होत्या. गेले २-३ आठवडे हो-ना-हो-ना करता करता शेवटी काल मोदक, मी, कपिलमुनी आणि अनाहितांचा लाडोबा असे चार जणांचा कट्टा ठरला. त्याचा एक वृत्तांत लिहायचा एक माफक प्रयत्न. कट्ट्याचं आयोजनं करतानाचं माझ्याकडुन एक मोठी चुक झाली ती म्हणजे वल्लींना फोन करायचा राहुन गेला :( (वल्ली मनापासुन सॉरी!! ). अन्या दातार कोल्हापुरला गेल्यानी आणि गुर्जीं फुलराणीच्या शोधात मार्केट यार्डामधे असल्यानी येउ शकले नाहीत. ;)
साधु हास्यानंद 1
एक गाव होते.नाव होते आनंदपुर.गाव लहान होते पण गावचे लोक खुप आनंदी आसे. त्याचे एकच कारण होते ते म्हणजे त्या गावात एक साधु बाबा राहत. त्याचे नाव त्याच्या स्वभावा नुसार पडले होते. त्याचे नाव होते साधु हास्यानंद . लोक त्याना हासरे बाबा नावाने ओळखत.
गावातील जवळ जवळ सर्वच लोक त्याचा सल्ला घेत. त्यामुळे गावातील लोकांवर त्याचा प्रभाव पडलेला दिसत.
सत्यकथा .. अध्याय १ आणि २
..................................................अध्याय पहिला......................................................................
नैमिष नावाचं एक अरण्य होतं. इथे शौनक आणि इतर अनेक ऋषी महर्षी जगत्कारण आणि जगत कल्याणाविषयी चिंतन, अभ्यास, साधना करत असत. एक दिवस त्यांच्यात वाद घडला. आणि सत्य या गोष्टीबद्दल बरीच मतमतांरे झाली. शेवटी खरा निर्णय करण्यासाठी ते सर्व सूत महर्षींकडे गेले. तेंव्हा त्यांच्यात व सूतात झालेला संवाद म्हणजेच हि सत्याची- सत्य कथा होय. ती आपणा सर्वांनी आता ऐकूया.