टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
सामुद्रिक
धोंडोपंतांचे हार्दिक अभिनंदन
प्रेषक नाना चेंगट ( सोम, ०८/११/२००८ - १२:२७) .वरुणराजाच्या कृपेने महाराष्ट्रावर जे दुष्काळाचे सावट आले होते ते आता बरेचसे दुर झाले असुन धरणे, तळी, विहीरी भरु लागले आहेत. बळीराजा केलेली पेरणी वाया जाणार नाही या आशेने सुखावला असुन काही ठिकाणी खरिपाला जरी नुकसान सोसावे लागत असेल तरी रब्बी हंगाम मात्र चांगला असेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. मध्यंतरी शेतक=याप्रमाणेच शहरी लोक सुद्धा हवालदिल झाले होते कारण पिण्याच्या पाण्याची समस्या उग्ररुप धारण करत होती.
नेहमी वेळेवर येणारा पाउस अचानक रुसला होता. त्याचे कारण समजत नव्हते.
अशावेळी धोंडोपंतानी त्यांच्या पाशी असलेले गुढ ज्ञान त्याचा योग्य वापर करुन कारण मिमांसा करुन दिलासा दिला की पाउस येणार. विवक्षित काल खंडानंतर पाउस नक्कीच येणार.
आम्ही धोंडोपंतानी सांगितल्यावर निश्चिंत झालो कारण आमचा जेवढा धोंडोपंतांवर विश्वास त्याहुन अधिक त्या गुढ ज्ञानावर .....
काही जणांनी नेहमी प्रमाणे पिचका-या मारल्या पण त्यांचे देव भले करो. ते समजत नाहीत की कोणत्या काळी काय करणे गरजेचे असते. असो.
धोंडोपंताना शुभेच्छा व असेच देवकार्य करण्या साठी त्यांना उदंड आयुष्य लाभो हि प्रार्थना
(के पी तज्ञ) नाना

