लेख

"जसा व्याप तसा संताप!"

"हे तिचं संभाषण ऐकून मी थक्कच झालो.मनात म्हणालो,
"आपण प्रकृती बद्दल इतका गंभीर विचार कधीच केला नाही. Anorexia चा कधी विचारच आला नाही.कुणीसं म्हटलंय,
"जसा व्याप तसा संताप!"
हेच खरं"

रघूवीर देशपांडे आमचे जुने शेजारी.त्यांच्या मुली आता मोठया झाल्या.त्यात त्यांची मोठी मुलगी,अंजना म्हणजेच आता सौ. रंजना रमाकांत रणदीवे जिला आम्ही गंमतीत,
"अंरंरर"
म्हणायचो ती आता दोन मुलांची आई झाली आहे.ती दोन मुलांची आई झाली तरी अजून तिची तब्यत ठेवून आहे.तशीच किडकीडीत,पण सतेज चेहर्‍याची,चुटपुटीत आणि सदैव एनर्जीने भरलेली अजूनही असते.आणि हे असण्याचं कारण तिची लहानपणची मैत्रिण शोभा.

मला जेव्हा कळलं,तेव्हा तिला एकदा मुद्दाम अर्थात कुतहलाने विचारलं,
"ह्या वयात सुद्धा तू अशी तब्यत ठेवून कशी आहेस?"
हे ऐकून ती मला म्हणाली,
"ह्या सर्वाचा कारण माझी जीवश्च कंटश्च मैत्रिण शोभा.मला आठवतं शोभा त्यावेळी आरशात पण बघायला घृणा करायची. अगदी निष्ठुरपणे ती आपलीच चामडी ओढायची आणि चिमटे घ्यायची,जणू प्रत्येक वेळी असं करून तिच्या शरिरावरच्या कमतरताना शिक्षाच करायची. तिचे हात आणि पाय ह्या असल्या आघाताने चट्टे आलेले दिसायचे.शोभा नेहमीच दुर्मुखलेली
दिसायची,आणि त्याबाबत तिला काही वाटतही नव्हतं.

रखरखत्या आणि दमट उन्हाळ्यात सुद्धा ती स्वेटर चढवायची आणि थरथरण्याचा अविर्भाव करून त्यातच काही विशेष केल्याच्या आनंदात असायची.सहजगत्या माझ्या मनात आलेल्या तिच्या बद्दलच्या हेव्याची आणि तिच्या त्या कमजोर सौंदर्याच्या कौतुकाची मला आठवण यायची.तिचे ते किडकीडीत शरिर,आणि फ्फु केल्यास वार्‍यावर उडून जाण्याईतप
असलेल्या त्या शरिराची कल्पना येतायेताच, ती त्याग करून काय मिळवीत आहे याचं गांभिर्य लक्षात यायचं."

मी अंजनाला म्हणालो,
"हे तिने कसं आचारणात आणलं?"

त्यावर माहिती देत म्हणाली,
"सुरवातीला ती तांदळाची पेज,किंवा तत्सम सुपं घ्यायची.मग जरा वरच्या थराचं लंघन करायला लागली.नंतर नियमाने चुर्ण घ्यायची. मग दिवसातून सफरचंदासारखं एखादं फळ खायची.कधी कधी अर्ध सफरचंद खायची. शेवटी तिची सर्व खाण्यावरची इच्छाच मेली. आम्ही तिच्या मैत्रीणी,तिला सुरवातीला काहीच बोलत नव्हतो.त्यावेळी आम्ही सर्व एकशिवडी प्रकृती ठेवण्यात वेड लागल्या सारखे मनात ठेवून- डायटींग करणं- हे आमच्या आयुष्याचं ब्रिद वाक्य असायचं.असं करताना काही खाण्याच्या गोष्टीचा त्याग करायला कसलीच सीमा नव्हती.
त्यामुळे शोभाची वागणूक पाहून तिला स्वारस्य न दाखवणं म्हणजे एक तर्‍हेने तिच्या आनंदाला आणि तिच्या स्वपनाना तिलांजली दिल्यासरखं होत होतं,आणि चूपचाप बसणं म्हणजे तिच्यावरच्या प्रेमाची परिसीमा दाखवणं असं होत होतं.

मी अंजनाला म्हणालो,
"तुम्हा मुलींना ’शेवग्याच्या शेंगेसारखी’ आपली प्रकृती ठेवण्याचं एका ठरावीक वयात एक प्रकारचं वेडंच असतं नाही काय?"
अंजना म्हणते,
"त्या वयात प्रत्येक मुलगी कुठचा तरी एक दिवस जागी होवून स्वतः दिसते त्या आपल्या शरिराकडे पाहून कष्टी मनाने जागृत होत असते. आमच्या सारख्या अतिजागृत मुलींसाठी हा दिवस जरा लवकरच उगवतो,आणि येणार्‍या प्रत्येक पहाटेला रेंगाळत ठेवतो.

परंतु,मी मला Anorexia-म्हणजेच स्थुल होण्याच्या भितीने आहाराकडे दुर्लक्ष करणं- होवू दिला नाही.कदाचीत मी खंबीर मनाची असेन किंवा नसेन.कारण शोभा आमच्या सर्वांत अतिशय खंबीर असावी.ती तिच्या शरिराच्या सांगाड्यात सर्व काही दोषविरहीत कोरून ठेवलं आहे असं समजत असावी.तिच्या शरिराचं वजन प्रत्येक पौंडाने कमी होण्यात तिला आपलं भविष्य लपलेलं आहे असं वाटायचं.काय पण भविष्य म्हणायचं?.

तिच्या वडीलानी तिला शेवटी नर्सिंग होम मधे नेवून परत आणल्यावर ती जरा निरोगी दिसू लागली.पण बरीच मानसिक रुग्ण दिसू लागली.तिला पुन्हा नर्सिंग होम मधे न जाता ह्या रोगावर घरी बसून आणि घरच्या लोकांच्या आणि मित्रमैत्रिणींच्या उपदेशावरून उपचार करायचा होता.
इतरांप्रमाणे मी पण थोडी साशंक होते.तिला परत नर्सिंग होम मधे नेल्यावर मी काही विषेश विरोध दाखवला नाही.ती घरी राहून बरं होणं पसंत करीत होती पण आमचा कुणाचा त्यावर विश्वास नव्हता.आम्ही ती आशा केव्हाच सोडली होती.
मी माझ्या मनात समजूत करून घेत होते की कदाचीत डॉक्टर आणि मनोवैज्ञानीकांकडून तिच्यावर- आमच्या संगतीत राहण्यापेक्षा- जास्त चांगले उपचार होणार.पण खरं सांगयचं तर कुणाचीच तिच्या रोगावर मात करण्याची एखादी शक्कल लढवण्याची हिम्मत झाली नाही आणि तिच्या येवू घातलेल्या मृत्युशी झुंज द्दयायला हिम्मत झाली नाही.मी तिला माझ्या
दृष्टीतून आणि मनातून काढायला बघत होते.मी तिच्यावर पाणी सोडलं होतं.मी तिच्यावरचा विश्वास सोडला होता.तिच्या मनाची क्षमता आणि तिची इच्छाशक्ति ह्या दोन्ही बद्दल मी साशंक होते.

माझ्या लक्षात आलं नाही की प्रत्येक व्यक्ति इतकी स्वतंत्र असते आणि डॉक्टर काही जादूगार नसतात.मला वाटतं तिने पण तसंच समजून तो नाद सोडला आणि शेवटी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

तेव्हा सांगायचा मतितार्थ असा की शोभा सारखी एक टोकाची भुमिका न घेता मी सुद्दृढ, सशक्त राहून माझ्या शरिरावर प्रेम करू लागले.

कोणत्याही परिस्थितीत प्रेम म्हणजेच, श्रद्धा असणं आणि विश्वास असणं.कधीही हताश न होणं म्हणजेच प्रेम.अगदी संकटाची पराकाष्टा झाली असतानाही इच्छा-शक्ति घालवू न देणं आणि मनुष्याच्या बदलकरून घेण्याच्या क्षमतेचा संशय पण मनात न आणणं म्हणजेच प्रेम.मला वाटतं प्रत्येक व्यक्तिने विनाअट प्रेमात असावं"

हे तिचं संभाषण ऐकून मी थक्कच झालो.मनात म्हणालो,
"मी प्रकृती बद्दल इतका गंभीर विचार कधीच केला नाही.Anorexia चा कधी विचारच आला नाही.कुणीसं म्हटलंय ना ,
"जसा व्याप तसा संताप!’"
हेच खरं.

श्रीकृष्ण सामंत

कोचर्‍याची लिलू

दुपारी अकराची वेळ असावी.मी चर्चगेट वरून फौन्टनच्या दिशेने जात होतो. वाटेत हायकोर्टच्या फुटपाथकडे वळलो असेन,एकदम एक व्यक्ती अचानक सामोरी आली.
"अरे तू मला ओळखलं नाहीस? मी लिलू कोचरेकर"
असं म्हणून ती ज्यावेळी हंसली,त्याबरोबर मला तिची ओळख पटली.तिच्या अंगातला काळा कोट आणि ती गळ्यातली सफेद वकली कॉलर,हातातली ब्रिफकेस बघून मी तिला म्हाणालो,
"अगं तू वकील केव्हां झालीस ?"
"असं काय तुला माहितच नाही काय ? मी आता गेली दहा वर्ष हायकोर्टमधे केसीस चालवते"
असं ती मला म्हणाली.

कोचर्‍याला माझ्या वहिनीच्या माहेरचे शेजारी कोचरेकर त्यांची ही मुलगी होती. लहानपणी मी वहिनीबरोबर तिच्या माहेरी जात असे.
तिथून माझी ह्या कोचरेकर मंडळीशी ओळख होती.
"ये रे माझ्या घरी कधीतरी week end ला"
लिलू म्हणाली.
"पुढच्याच week end ला ये,Father's day आहे नाही का? "
मी हो म्हटलं आणि मी तिला
"बरंय"
म्हणून पुढच्या कामाला गेलो.

ती गिरगांवात राहात होती.तिने मला तिचा पत्ता पण दिला.त्या दिवशी मी जेव्हा तिच्या घरी गेलो तेव्हा घरी तिची मुलगी होती.नवरा फिरतीवर दिल्लीला गेला होता.
लिलूने अनंताश्रमातून दुपारच्या जेवणाची order दिली होती.मला काय आवडतं ते तिला माहित होतं. तिसऱ्याचं सुकं,बांगड्याचं तिखलं, पापलेटची आमटी, तळलेली सरंग्याची कापं, आणि लाल सोलाची सोलकढी एव्ह्यडे जिन्नस होते.भात मात्र घरीच केला होता,मला मास्यांचं जेवण असताना भात खूप लागतो हे पण तिच्या लक्षात होतं.
"सगळं जेवण तयार आहे ,दोन वाजता जेवूया"
ती म्हणाली.
आणि कप,कप चहावर आमच्या जुन्या आठवणी काढून गजाली (गोष्टी) चालू झाल्या.
"आईवडील कसे आहेत ?"
हया माझ्या प्रश्नावर तिनेच सुरवात केली, ती संपेपर्यंत जेवण केव्हा झालं आणि बाहेर अंधार केव्हां झाला हे आम्हाला कळलंच नाही.
माझ्या प्रश्नाचे उत्तर देताना ती बोलत होती, आणि मी फक्त ऐकत होतो.
Father's day असल्याने तिने वडिलांचाच विषय चालू केला.

"माझ्या पन्नासाव्या जन्मदिवशी माझ्या वडिलानी मला एक अजोड किंमतीची भेट देउन ते गेले.ते त्याच दिवशी वारले रे"
त्यांच्या मरणशैयेवरून मला ते माझ्या आयुष्याचा एक अनमोल धडा शिकवून गेले.त्यांच्या ८६ व्या जन्मदिवसाच्या तीन आठवडे आधी त्यांना रक्ताचा कॅन्सर झाल्याचं डॉक्टरनी आम्हाला सांगितलं.तीन आठवड्यानंतर ते गेले.आता पर्यंतच्या आयुष्याच्या वागण्याच्या त्यांच्या पद्धतीनुसार, ह्याही गोष्टीचा जणू ताबा घेउन त्यांच्या ईच्छेप्रमाणे ते गेले.
उरलेल्या आम्हा सर्वांच्या ईच्छेप्रमाणे ते घरीच गेले.
त्या प्रसंगी मी माझ्या आईवडीलांच्या खोलीत बसले असता त्यांच्या उभ्या आयुष्याचा मागोवा घेत असल्याचे जाणवून किती कणखर आणि किती यशस्वी त्यांचं आयुष्य होतं, हे मी त्यांचं मुल म्हणून माझ्या लक्षांत आलं.

माझ्या वडिलानी आपल्या बायकोची आणि आम्हा तीन मुलांची काळजी घेण्यासाठी तत्परतेने प्रयत्न करीत असताना, इतर सगळ्या जवळच्याना दुखवलं होतं. त्यांचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी, त्यांच्या खोलीत दुखावलेल्या जवळच्यांची लागलेली रीघ बघून, जणू विमान अपघात होवून खाली पडलेल्या सांगाड्याकडे पहात असलेल्या, वाचलेल्यापैकी प्रवाशासारखी माझी दैना झाली होती.

माझे वडील एक नामांकीत लेखक,असून माझे डोळे दिपून जातील एव्हडे चातुर्यवान,अत्यंत दयाळू आणि बुद्धिमान असून सुद्धा त्यांच्यात एक खोट होती, हे मला कित्येक वर्षापासून माहीत होतं.त्यानी त्यांच्या नेहमीच्या हताश मनस्थीतून निर्माण
होण्याऱ्या उद्वेगावर-म्हणजे रागावर- कसलीच डॉक्टरी मदत घेतली नाही.त्याना असं मदत घे म्हणून निक्षून सांगण्याचं कुणालाही धारीष्ट झालं नाही किंवा,
"वेळीच मदत घ्या अथवा कुटुंबाला मुकाल"
असंही सांगण्याचं धारिष्ट झालं नाही.

त्यांच्या मृत्युशय्येवरून त्यांनी मला जी गोष्ट शिकवली ती ते वडीलधारक असूनही शिकू शकले नाहीत. कुटुंबियांशी प्रेमळपणे राहायचं असेल तर स्वतःच्या तृटीशी आणि स्वतःच्या चुकांशी दोन हात केल्याविना गत्यंतर नाही." हे त्यांना वेळीच समजलं नाही.

हे सर्व ऐकत असता चवदार मासे केव्हा फस्त झाले हे कळलंच नाही.जेवण संपल्यावर हात धूऊन उठल्यावर लिलूने सर्व आवरून घेउन मसालेदार पान माझ्या हातात आणून दिलं.मासे खाल्यावर मला पान लागतं ते पण तिला आठवलं.
"मी माझ्या वडिलावर अत्यंत प्रेम केलं.मी सहा वर्षाची असताना पहिली गोष्ट लिहीली कारण ते माझे गुरू होते म्हणून.मी भावंडात शेंडेफळ असल्याने बरेच वेळा मला त्यानी फुरसद दिली,विनोदी वृत्तीने राहीले आणि बुद्धिपुरस्सर धडे दिले, हे सर्व ते माझ्या मोठ्या भावंडाना देउ शकले नाहीत.

आमच्या घराल्या ह्या पद्धतीला "कोकणी वृती "असं गमंतीने म्हटलं जाई.माझ्या वडीलांच्या रागाचे वादळ शांत झाल्यावर, आमची आई आश्वासन देउन म्हणायची,
"मी खात्रीने सांगते ते रागाबरोबर बोलले जरी, तरी त्यांचं तुमच्यावर अत्यंत प्रेम आहे"
एकदा त्यांचा आरडाओरडीचा ओघ कमी कमी झाला की ते मंद्र्सप्तकात आपला आवाज आणून हळू हळू पश्चातापाने दिलासा देत देत पुन्हा असं न होण्याचा जणू आश्वासानच देत असत. खूप वर्षानंतर मला समज येउन खरं वाटू लागलं की, माझे वडील एक उपचार न झालेले रागीष्टविकारी असून, त्यांचा अविचारी राग आणि चांगली मनसथिती ह्याचं दोलायमान आमच्या आईच्या आणि आम्हा तीन मुलांच्या मनस्थितिच्या, चलबिचलते मुळे चाळण व्हायची,आणि त्यांच्या अनिश्चीत रागीटपणामुळे ती स्थिती मनासिक धक्क्यात परिवर्तीत व्हायची."

दुपारचे चार वाजले.लिलूने आपली कथा जरा आवरती घेउन मला म्हणाली,
"तू खरोखरच बोर झाला असणार,मी थोडा चहा करते"
असे म्हणून ती चहा करायला गेली,आणि मला पण बाथरूममधे जाउन fresh व्हायची संधी मिळाली.

चहाचा कप पुढे करीत ती म्हणाली,
"मी कुठे थांबली होते?हां,हां लक्षात आलं "
असं म्हणून मी उत्तर देण्यापुर्वीच तिने पुढे सुरवात केली.
" रागीष्टविकारी" असे मी त्याना मघाशी म्हणाले त्याचा अर्थ ते जसा एखादा, रागाच्याभारात violent होवून खिडक्यांच्या कांचा फोडतो तसं काहिही करीत नव्हते.
एखादी माझ्या वडीलांसारखी व्यक्ति- जिच्या वागण्याची परिणीती, रोजच्या अडचणी आणि हताश परिस्थिती पाहून, उद्बेग करण्यात आणि माथेफीरू होण्यात आपोआप होत असते,तेव्हा अशा व्यक्तिला मनोवैज्ञानीक "dry drunks" अशा सज्ञेत वर्णन करतात पुष्कळदा बाहेरच्या जगात असे लोक आपला राग आणि चीडखोरपणा आवरून घेतात,परंतु घरच्या चार भिंतीत मात्र ते उचंबळून येतात.उलट अर्थी माझे वडील खऱ्या संकटकाळी क्वचीतच तोंडाळपणा करीत. पण ते केव्हा फिरतील हे आम्हा घरच्या मंडळीना सांगणं कठीण व्हायचं.
अगदी जसं एखाद्दया दारू पिणाऱ्याच्या घरच्या मंडळीना, सामोरं केव्हा जावं लागेल हे समजत नाही तसं.आणि म्हणून घरचे आम्ही सतत नवीन संकटाचं तुफान न येण्यासाठी सतर्क राहून त्याना चिडायला होईल असं कारण देत नसू.
आमच्या घरात आम्ही चलबीचल स्थितित असणं हे आम्ही ओघानेच शिकलो होतो.जस जशी मी वयाने वाढत गेले तस तशी ह्या संवयीतून, सुटका करण्यासाठी मी माझ्या असल्या स्वभावाच्या वडीलांबद्दल ठार प्रामाणिक असायची.त्यामुळे त्यांच्या तावडीतून सुटका झाली तरी, त्यांच्या रागीष्टपणामुळे संकटाला तोंड द्दयायला मी असमर्थ झाली. आणि हे सगळं त्या तीन आठवडे त्यांच्या मृत्युशैयेवर असताना माझ्या त्यांच्या सहवासात राहीलेल्या अनुभवाच्या सत्यतेची जाणीव होई तोपर्यंत असमर्थ होते.

माझ्या थोड्याश्याच जवळच्यानी त्यांच्या डोळ्यानी टीपलेले त्या प्रसंगाचे सत्य जणू, मला सांगत होते की उपचार न झालेला ह्या माझ्या वडीलांच्या रागीष्ट विकाराने, घरातल्या ईतर सर्वांवर भावनीक आघात नव्हे तर शारिरीक आघात सुद्धा होऊन, त्या सर्वांच्या मनाला लूळं करून टाकलं आहे.

आमची आई, माझ्या वडीलांची विश्वासू पत्नी होती,मानसिक आघाताच्या ओझ्याखाली झालेल्या मूळ कारणानी, आतापावेतो अगणित शारिरीक विकृत्यानी अंथरूणाला खिळली होती.तिच्या जवळ जवळ पुऱ्या तरूण वयातलं जीवन तिने त्यांचा सततचा चीडचीडेपणा आणि बोंबाटून टाकलेल्या, आवाजाची ओरड आणि टिका झेलीत घालवलं होतं.हे दृश्य अचल असायचं.

मानहानीची तिच्यावर खैरात करून झाल्यावर, आपल्या कमकुवतेची ते तिला कबुली देत,दयेचा आणि भेटींचा जणू पाऊस पाडीत,आई त्यांना चुचकारून समजावी आणि मोठया मनाने समजून घेई.हिच त्यांची एकमेकावर प्रेम करण्याची रीत असायची."

लिलूच्या लक्षात आलं की sweet dish म्हणून तिने ताजे बेसनचे लाडू माझ्यासाठी केले होते मला हे लाडू आवडतात हे पण तिच्या आठवणीत होतं.
"अरे मी माझी ही कर्मकथा सांगता सांगता बेसनचे ताजे लाडू तुझ्यासाठी केलेत ते द्दयायला विसरले बघ.कप कप चहापण करते"
असं म्हणून ती आत गेली,माझी स्थिती "आंधळा मागतो....." अशी झाली.जरा पाय मोकळे करण्यासाठी तोवर उठून गॅलरीत fresh हवा घेण्यासाठी म्हणून गेलो.

गरम गरम चहा आणि पिवळे जर्द बेसनचे चार लाडू घेऊन लिलू बाहेर आली.आणि पुढ्चं कथानक तिने चालू केलं.
" वय वाढत जाता जाता माझ्या आईचे स्नायू आणि पोट जणू गाठावलेलं होतं.डॉक्टर म्हणाले, stress मुळे तिने हळू हळू मृत्युची वाट धरली आहे.
माझा भाऊ पण मधुमेयाने आणि parkinson disease मुळे अपंगावस्तेत होता.परंतु,मला जे आठवतं त्यानुसार तो भावनिक अपंग होता आणि स्वतःबद्दल आत्मविश्वास गमवल्यामुळे पंगु झाला होता.जर का जीवन हे एक lottery आहे असं समजलं,तर माझ्या भावाजवळ बक्षिस न मिळणारं तिकीट होतं असं समजायला हरकत नाही.
माझा भाऊ माझ्या वडीलांची स्वप्नपुर्ती करायला असमर्थ ठरला.त्यांचं त्याच्यावर खूप प्रेम होतं.पण प्रेमाचा त्यांचा अर्थ सतत एखाद्दयाच्यामागे लागणं!
असा होता असावा. आणि त्यामुळे त्याचा शेवट स्वतःला कमी लेखण्यात झाला.त्याचं कधी लग्न झालं नाही, नाही तो आयुष्यात काही बनू शकला,आणि शेवटी वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी, एक अपंग म्हणून एका नर्सिंग होममधे जीवन कंठीत होता.

माझ्या भावाच्या तुलनेत माझी मोठी बहिण त्यामानाने एक सुखी जीवन जगत होती.पण त्याचं कारण ती माझ्या वडीलांपासून दूर होती. जवळ जवळ तिचे त्यांच्याशी संबंधच तुटले होते.त्यामुळे त्यांच्या शेवटच्या दिवसात तिन मुलांपैकी एकच मुल (मी) त्यांच्या जवळ हजर होतं.

जसजसे माझे वडील अगणित मानसिक आणि शारिरीक वेदनेतून मृत्युच्या दिशेने प्रवासास लागले होते,तसतसं माझ्या मनात वरचेवर डोकावणारा एक विचार उचल खात होता.तो म्हणजे हा त्यांचा दुःखित अंत, स्वतःच्या आणि इतरांच्या जीविताला निष्फळ करून आणि हानी देऊन, जात असताना माझ्या वडीलाना वेळीच उपचार मिळाले असते, तर हे स्रर्व टाळता आलं असतं.

अगदी अलिकडे अलिकडे समाजाने दारू पिणाऱ्या व्यसनी व्यक्तिंची जोरात पसरणारी समस्या असल्याचे स्विकारून, ती त्यालाच नाही तर त्याच्या कुटुंबियाना पण खाईत लोटू शकते, असे मत केलं आहे.आणि त्या व्यक्तिला उपचार करून बरं करता येतं हे पण मानलं आहे. त्याशिवाय संस्था पण अस्तितवात आहेत, की ज्या ह्या समस्येचा अभ्यास करून कुटुंबे दोन हात करून कसं सईसलामत सोडवणूक करून घ्यायचं हे पण शिकली आहेत,परंतु रागीष्टपणाच्या विकारावर असले काही उपाय अजून प्राप्त झालेले नाहीत.उलट हा रागीष्टपणा म्हणजे एक व्यक्तिगत स्वाभाविक दर्गूण आहे, असं समजून उघड पणे बाजूला सारून, त्याची परिणीती अन्यायात होत असावी, अशा निष्कर्षाला आणलं आहे.

खूप उशीर झाल्याने मी लिलूची रजा घेतली,पण
" उरलेली तुझी कथा ऐकण्यास पुढच्या आठवड्यात नक्की येतो"
असे आश्वासन देऊन मी तिला हिरमुसली करून जात आहे हे लक्षात आल्यावर
"तुझ्या कथेचा शेवट कसा झाला आणि यातून काही तरी चांगलं नक्कीच ऐकायला मिळणार"
असा आशावाद ठेवून मी घरी परतलो.

पुढच्या weekend ला मी तिला फोन करून सांगितलं की मी संध्याकाळी चहाच्यावेळी येईन.आणि त्याप्रमाणे मी तिला भेटलो.मला पाहून तिचा चेहरा खूपच आनंदी दिसला. कदाचित माझ्या येण्याने तिला मी आनंदी करू शकलो ह्याने मला फार बरं वाटलं.

इकड्च्या तिकडच्या गप्पा झाल्यावर,ती मुळ पदावर आली.मला म्हणाली,
" शाब्दिक मार जखमेच्या खूणा दाखवित नाही.झालेले नुकसान अद्रुश्य असतं.जर का शारिरीक नुकसान झालं नसेल तर डॉक्टरपण मुद्दाम म्हणून लक्ष घालीत नाहीत,जोपर्यंत रुग्ण त्याची मदत मागत नाही तोपर्यंत. खूपदा मी आणि माझी आई माझ्या वडीलाना तपासून घ्या म्हणून मागे लागत असू,पण त्यानी कधीही त्या म्हणण्याला भिक घातली नाही.

एकदा आमच्या डॉक्टरने आम्हाला असं सांगितलं की आमच्या आईची प्रकृती दिवसे दिवस खालावत जाण्याचे कारण मुख्यतः आमच्या वडीलांचा तिच्यावर होणारा शाब्दिक अत्याचार हा आहे.आणि जेव्हा आम्ही त्यांना, वडीलाना उपचार देण्याची विनंती केली,त्यावर त्यानी हा उतार वयातला प्रॉब्लेम असून ते स्वतः त्यांच्याकडे तपासायला आल्याशिवाय उपचार करणे शक्य होणार नाही असं म्हणाले.

गेल्या वर्षभरात मी मनोवैदज्ञानीक तज्ञाना भेटून वडीलाना उपचार देण्याचा प्रयत्न केला.हा काही बरा होणार नाही असा विकार नाही असं बऱ्याच तज्ञाचं मत होतं.शब्दिक अत्याचार हा शारिरीक अत्याचारापेक्षा गंभीर असून त्याचे दूरवर परिणाम होतात."

परत एकदा चहा करण्याच्या कारणानी लिलू उठली आणि तो घेउन, आल्यावर पुढे म्हणाली ते मला खूपच धक्कादायक वाटलं.
"माझे वडील निर्वतल्या नंतर तीन महिन्यानी माझी आई गेली.मी इच्छित होते की निदान ते गेल्यानंतर तरी शाब्दिक अत्याचाराविना ती उरलेले आयुष्य आनंदात घालविल, हे माझे फक्त मनोरथच ठरले."
६३ वर्षांचं त्या दोघांचं आयुष्य एकमेकाशी कमालीचं गुंतलेलं होतं.अगदी तसंच माझ्या भावाचं भविष्य पण.
माझ्या वडीलांच्या पहिल्या डेथ ऍनिव्हर्सरी नंतर अवघ्या पांच दिवसानी माझा भाऊ गेला.
माझ्या वडीलानी त्यांच्या पश्चात एक संपन्न पायंडा मला ठेऊन गेले.असल्या धड्यांचं भांडार की जे माझ्या अर्ध्या उरलेल्या आयुष्यासाठी उपयोगी पडावं.

वर्षापूर्वी मी आईवडीलांच्या खोलीत बसले असताना एक संपल्क करायचा ठरवला. काही लागेल ते लागो ह्या पुढे असा प्रकार माझ्या पिढीत किंवा माझ्या नंतरच्या पिढीत तरी रीपीट होऊ नये.गेलं अख्खं वर्ष मी आमच्या या कुटुंबात आलेल्या ह्या चमत्कारीत पर्वा बद्दल खूप विचार करून मी अशा निर्णयाला आली, की असल्या पर्वाने जर सर्वांना त्रास होत असेल तर
ताबडतोब डॉक्टरी उपचार केल्याशिवाय तरणोपाय नाही.एकदा एका मनोवैज्ञानीकाला माझ्या आई,वडिल आणि भावाचे फोटो दाखवले ते पाहून तो पटकन म्हणाला,
" ह्यांच्या कुणाच्याच तोंडावर हंसं नाही. ते सर्व दिसतात depressed,depressed आणि depressed."

आता पर्यंत तिची ही सर्व कथा निपूटपणे एकून घेत असता कुठेही तिला अटकळ केली नाही,हे लक्षात आल्यावर लिलू मला म्हणाली,
" हे सर्व ऐकून तुझ्या मनात एखादा प्रश्न आला असेलच अशी मी अपेक्षा करते."
त्यावर मी म्हणालो हो,
"मला एकच प्रश्न आहे आणि तो म्हणजे झालं ते झालं आता पुढे काय? "
हे ऐकून तिला खूपच गहिवरून आलं.
डोळ्यात पाणी आणून म्हणाली,
" मी मेल्यावर माझ्या कुटुंबाचा आलबम पाहून निराळीच गोष्ट लक्षात आली पाहीजे, ती अशी की माझी मुलगी त्या आलबमची पाने परतताना त्यातून, हे लक्षात यायला हवं की माझ्या मुलीने एक खंबीर आणि आनंदायी जीवन भोगलं आणि फोटोत आमच्या स्रर्वांच्या चेहऱ्यावर हंसं,हंसं अणि हंसंच दिसावं"

हे तिचे शेवटचे उद्गार ऐकून झाल्यावर मी उठलो आणि
विषष्ण न होता आनंदी मनाने तिचा निरोप घेतला.

श्रीकृष्ण सामंत

कमकुवतपणा ही पण एक प्रकारची शक्तिच असते

"हे सर्व ऐकून झाल्यावर माझ्या मनात आलं की हिनें आपल्या उद्देशाला किती वाहून घेतलं आहे.नवल नाही की ती मला म्हणाली "मला माझा जॉब आवडतो म्हणून."

आमच्या बिल्डिंगच्या अगदी वरच्या माळ्यावर एक चतर्जी म्हणून बंगाली कुटुंब राहत होतं.राहत होतं म्हणण्याचं कारण बरेच वर्षानी ते आपलं घर सोडून कलकत्यात राहायला गेलं.पण इतकी वर्ष मुंबईत राहिल्याने त्यांच्या सर्व मुलाना मराठी अगदी अस्खलीत येत होतं.कदाचीत हे मुळचे बंगाली आहेत असं सांगणं पण जरा कठीण झालं असतं. त्यांच्या कुटुंबातली शंतनु आणि शर्मिला ही पहिल्यापासून स्मार्ट वाटायची.इकडच्या शाळेत सुद्धा त्यांचा वरचा नंबर असायचा.त्या पैकी शर्मिला जरा जास्त हुषार होती.पण कमनशिबाने तिला कॉलेज मधे त्यावर्षी चांगले मार्कस न मिळाल्याने तिचा मेडिकलला जाण्याचा चान्स हूकला.पण ती डगमगली नाही.तिला लोकांची सेवा करण्याचं प्रथम पासून वेड होतं.

डॉक्टर नाही तर नाही निदान नर्स होऊन आपली इच्छा पुरी करायची तिने जिद्द ठेवली आणि कलकत्याच्या एका नावाजलेल्या नर्सिंग इनस्टीट्युट मधून चागले मार्कस घेऊन उतीर्ण झाली.आणि नंतर खासगीत नर्सिंगचं कामं घेऊ लागली.
असाच मी एकदा ऑफिसच्या कामासाठी कलकत्याला गेलो असतां मला रस्त्यातच भेटली.मला आपल्या अपार्टमेंट मधे घेऊन गेली.जेवायचा आग्रह करीत होती पण मी काही जेवायला राहिलो नाही.पण म्हणालो चहाच्या कपावर आपण गप्पा मारूया.तुझं सेवावृत्तीचं काम कसं चाललंय असा मी तिला प्रश्न केल्यावर ती सांगू लागली,

"बर्‍याच अशा माझ्या मैत्रिणी अलिकडेच कॉलेज मधून ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडल्या आहेत.कोण ना कोण तरी मला एखाद दिवशी फोन करून आपल्या नविन जॉब बद्दल कुरकुर करून बोलत असते.सांगतात की त्यांच मन कसं रमत नाही त्या जॉबवर,त्याना हवं असलेलं काम कसं मिळत नाही. किंवा हव असलेलं यश त्यांना कसं मिळू शकत नाही. त्यांच भाषण ऐकून माझ मनोरंजन होत.मला वाटतं मैत्रिणी अशा साठीच असतात.

पण ह्या मुळे मला सुद्धा माझ्या कामाचा आढावा घेता येतो.
मी नर्स असल्याने दोन मतिमंद असलेल्या बायकांची सेवा करण्याचं काम करते.बोलताना त्या ओरडून बोलतात.आणि कधी कधी संतापी होऊन त्याचे परिणाम न समजण्यासारखे वागतात.
स्वतः आंघोळ करू शकत नाहित.त्याना अन्न स्वतः शिजवता येत नाही.कधी कधी त्यांची वागणूक अशी असते की त्याना एकदम हलता येत नसल्याने जाग्यावरून आरडाओरड करतात तर कधीकधी उठून एकदम मारायाला येतात.
रोज मी त्यांच्या घरी जाऊन त्यांना हव्या असलेल्या कामात मदत करीत असते.आंघोळ घालणं,त्याना कपडे घालणं, त्यांच्या साठी जेवण करून त्यांना भरवणं,त्यांना साफ करणं,त्याना बाथरूम मधे नेणं सकाळी त्या उठल्या पासून रात्री झोपे पर्यंत ही सर्व कामं करावी लागतात.

कधी कधी काही कारण नसतानाही -त्यांचे मी कपडे बदलत असताना- माझे केस उपटण्याचा प्रयत्न करतात.कधी कधी समोर ठवलेलं जेवण भिरकावून देतात.कधी कधी तर काही कारण नसतानाही अंगावर थुंकतात.

पण गंमत म्हणजे मला हा जॉब आवाडतो.मला माहित आहे की मी अजून तरूण असून मला खूप काही शिकायचं आहे. पण मी माणसात असलेल्या हतबलते वर विश्वास ठेवते. त्याचाच अर्थ असा होईल की आपल्याला दुसर्‍या माणसांची आवश्यकता आहे.
मला वाटतं असं काही जरूरीचं नाही की समाजाने ज्या गोष्टीला यशस्वी म्हटलं आहे त्याच गोष्टी यशस्वी आहेत. आपल्याला खरं काय हवं असतं की आपल्या सभोवताली जे लोक आहेत त्यानी भाग घेण्यात,हतबलांची उर्जितावस्था करण्यात,ऐकून घेण्यात,लक्ष देऊन आपली वेळ आणि उदिष्टे वापरली पाहिजेत.कुणी एखाद्दा मोठ्या कंपनीचा सि.ई.ओ असो किंवा एखादी पाच मुलांची आई असो.मला त्यात काहिही फरक पडत नाही.कुणीही परिस्थितीने संपुर्ण नसतो,त्या दृष्टीने काहीसा हतबलच असतो.एकमेकासाठीही तसाच असतो.

मी ज्या बायकांची सेवा करीत असते,त्यांच एक बरं आहे की त्यांच्या गरजा त्यानी पुर्णपणे विशद केल्या आहेत.कपडे घालायला ज्या ठिकाणी पांच मिनीटे घ्यावीत त्या ठिकाणी त्याना तासन तास लागतात.पण त्यांची ही कमतरता उदाहरण म्हणून ठिक आहे.तेवढं काही ते हतबल नसतात.त्यांच्या बरोबर राहून "कपडे काढा,कपडे घाला"हा उपदव्याप जरी दिसला तरी त्यांना त्यात काय पर्याय आहे ते दिसून येण्यात फायदा होतो.

जेव्हडे म्हणून माझे माहितीतले लोक आहेत त्यांच्याकडे पाहिल्यावर दिसतं की त्याना जे काम जमत नाही ते पाहून त्यांनाच खूप लाजल्या सारखं होतं.त्याना ती एक कमतरता वाटते आणि जड अंतःकरण करून ते गोंधळलेले दिसतात. पण आमच्या ह्या पिढीत प्रचार केलेला असतो की यश संपादणं म्हणजेच तृप्ति मिळवणं आणि हे सतत आमच्या मेदूवर आघात केल्यासारखं केलेलं असतं.तसंच दुसरा आघात म्हणजे जर का तुम्ही स्वतःहून काम करू शकला नाही किंवा तुम्ही स्वतः तेव्हडे स्मार्ट नसाल किंवा तुम्ही स्वतः काम करायला समर्थ नसाल तर मग तुम्ही नालायक ठरता.
आता पर्यंत माझ्या जीवनात जे लक्षात ठेवण्यासारखे क्षण आले ते मी किती वेळां यशस्वी झालो हे नसून उलट ज्या ज्या वेळी मी माझ्याच मनात म्हणाले असेन
"मी मेले" ,"मला मदत करील का कुणी"
किंवा
"मला एखाद्दा मैत्रिणीची जरूरी आहे"
अशा प्रकारच्या क्षणाच्या वेळी मी माझीहून मला आधार घेते,मी माझ्याहून मला एक आकार आणण्याचा प्रयत्न करते, तेच क्षण जे मला मदतीची अपेक्षा करायला लावतात ते मला एक देणगी वाटू लागतात.
मला ह्या मतिमंद बायकांचे आभार मानले पाहिजेत. मदत करणं आणि मदतीची अपेक्षा पण करणं ह्यातला आनंद आम्ही शोधून काढला.मला वाटतं कधी कधी आमचा कमकुवतपणा ही पण आमची एक प्रकारची शक्तिच आहे.
हे सर्व ऐकून झाल्यावर माझ्या मनात आलं की हिनें आपल्या उद्देशाला किती वाहून घेतलं आहे.नवल नाही की ती मला म्हणाली "मला माझा जॉब आवडतो."
तिची रजा घेऊन मी खाली उतरलो.

श्रीकृष्ण सामंत

उलगता बाजार

"सामावून घेण्यावर माझा विश्वास वृद्धिंगत झाल्याने मला वाटू लागलं की मी आणि माझी आई येईल त्या प्रसंगातून मार्ग काढून जीवंत रहाण्याची धडपड करूंच."

मी आणि माझी आई संध्याकाळच्या उलगत्या बाजारात जाऊन आमची घरासाठी रोज लागणारी खरेदी करतो.उलगत्या बाजारात जाऊन खरेदी करण्याचा फायदा असा की सकाळ पासून आलेले विक्रिकर-लोकं सध्याकाळी अगदी थकून जातात.आणि उरली सुरलेली भाजी,फूलं,फळं कमी किंमतीत किंवा वाटे काढून विकून टाकतात.फळं थोडी जास्त पिकतात,भाजीचा ताजेपणा कमी होतो,आणि फूलं तर बरिच कोमेजलेली असतात.ही फूलं देवाला वाहिली तरी त्याचं त्याला काहिच वाटणार नाही असं मनात येतं.आमच्या परिस्थितीचा कुणावरही ठपका ठेवता येत नसल्याने,
"काय करणार? ही परिस्थिती यायला तूच कारण आहेस मग तुला ताजी टवटवीत फूलं वाढत्या भावात सकाळीच आणून तुझ्या पुजेला कशी वहायला आम्हाला परवडणार. अशी तर अशी मानून घे देवा"
असं मनातल्या मनात पूजा करताना आईच्या तोंडून हळूवार आलेले उद्गार ऐकून तिची आणि त्या देवाची मला दया यायची.

यापूर्वी साकाळीच उठून दरखोरी करून ताज्या ताज्या गोष्टी खरेदी करून आणण्याचे आमचे दिवस सध्या तरी संपले होते.
आम्ही खेडेगावात राहत असल्याने आमच्या सारख्या जेमतेम परिस्थिती असलेल्या लोकाना ह्याचा खूपच फायदा होतो.

ह्या उलगत्या बाजारात खरेदी करण्यातही काही त्रुटी दिसून येतात.अगदी कठिण गोष्ट म्हणजे इतक्या स्वस्तात विक्रिकर विकायला तयार होत असताना इच्छा असूनही तुटपुंज्या पैशात सर्व खरेदी करण्याचा हव्यास कसा पूरा करायाचा असं हळहळून मनात यायचं.
"आणखी थोडे पैसे कमी दे वाटलंतर"
किंवा,
"आता पैसे नसतील तर उद्दा दे जमलं तर"
असं म्हणून तो माल गळ्यात टाकण्याच्या उद्देशाने नव्हे तर आमच्या परिस्थितीची किंव येऊन त्याने काढलेले उद्गार काळजाला भिडून जायचे.आम्हाला नाही जमलं तर आमच्या मागे उभे असलेले आमच्या सारख्याच परिस्थितीचे लोक
"तुम्ही नसाल घेत तर सांगून टाका आम्हाला तरी घेऊ देत"
असं कदाचित मनात म्हणत असतील,किंवा तो विक्रिकर आपल्या मनात म्हणत असेल,
"तुम्हाला नसेल घ्यायचं तर बाजूल व्हा त्याना तरी घेऊं द्दा असं जणू मनात म्हणत असेल"
असं उगाचच माझ्या मनात येऊन मन कष्टी व्हायचं.
आणि त्याही पेक्षा मन कष्टी व्हायचं की जेव्हां ते आमच्या चेहर्‍याकडे बघून आमच्या निर्णयाची क्षणभर वाट बघायचे.माझी आई कदाचित तसा माझ्या सारखा विचार करितही नसेल किंवा कदाचित तसाच विचार करूनही चेहर्‍यावर दाखवतही नसावी.बिचारी आई.

"काल घेतलेल्या वस्तू अजून आहेत आमच्याकडे"
असं सांगून एकदाचा पळ काढावा इथून असं वाटायचं.
त्या संध्याकाळच्या उलगत्या बाजारात खरेदी करायला मला खरंच कसंसंच वाटायचं.
एखाद्या माझ्या वर्गातल्या सुखवस्थु मैत्रिणीने माझ्या बाजूने जाताना मला पाहिलं असेल ह्या मरणाच्या भितीने मी चूर होऊन जायची.
एकदा मी माझ्या आईला माझी ही भिती सांगितली.तिच्या डोळ्यात आलेलं पाणी बघून तिच्या नाराजीला मी कारण झाले ह्याचंच दुःख मला जास्त झालं.कधीकधी सकारण सुद्धा मला तिच्या बरोबर खरेदीला जाता आलं नाही तरी माझ्यामुळे तिच्या नकळत भावना दुखावल्या जातात ह्याचा विचार येऊन मी हताश व्हायची.
आणि यासाठीच मी सामावून घेण्याच्या क्ल्पनेला घट्ट पकडून धरायला लागली. कशातही सामावून घेणं म्हणजेच आगे बढो असा संदेश माझं मन मला देऊ लागलं.
सामावून घेण्याच्या ह्या वृत्तिमुळे दुसर्‍यापेक्षा आपली परिस्थिती निराळी आहे याची मला लाज वाटण्यापासून सुटका झाली.दुसर्‍या कसल्याही प्रसंगात अशी वेळ आली की मला तो संध्याकाळचा उलगता बाजार आठवतो.
त्याचं कारण सध्या आमचे असे दिवस आले असतील पण तेही दिवस काही कायमचे नसावेत.सामावून घेण्यावर माझा विश्वास वृद्धिंगत झाल्याने मला वाटू लागलं की मी आणि माझी आई येईल त्या प्रसंगातून मार्ग काढून जीवंत रहाण्याची धडपड करूंच."

एकदा वासंतीला मी भेटलो असतां,
"कसं चाललं आहे?"
असं विचारल्यावर मला हे सर्व तिने सांगितलं

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

मानसिक भितीने ग्रासलेला गुरुनाथ

"बाहेर पडल्यावर वाईट गोष्टीना पण तोंड द्यावं लागतं.पण माझा विश्वास आहे की न जाण्याने याचाही पेक्षा वाईट गोष्टीना सामोरं जावं लागतं"

मी एकदा माझी कार रिपेअर करण्यासाठी एका कारखान्यात टाकली होती.मोटर कारखान्याच्या मालकाने मला एक भली मोठी लिस्ट दिली आणि म्हणाला,
"ह्या लिस्ट मधले पार्टस तुम्ही अमूक अमूक दुकानातून आणा.हे पार्टस स्पेशल आहेत आणि आम्ही ते ठेवत नाही."
ती लिस्ट घेवून मी त्या दुकानाच्या पत्त्यावर दुकानात गेलो.दुकानाच्या कॅबिन मधून आतून येणारा आवाज जरा परिचयाचा वाटला.म्हणून कौन्टरवरच्या त्या माणसाकडे जरा चौकशी केली की ते कोण बोलत आहेत.तो म्हणाला,
"ते आमचे मालक गुरुनाथ आजगावकर"
माझ्या चटकन लक्षात आलं की हा आपला आजगावचा गुरू तर नसेल, म्हणून मी माझं कार्ड देऊन त्या माणसाला सांगितलं की,
" एव्हडं माझं कार्ड देऊन ये तुझ्या मालकाला आणि मला भेटायचं आहे म्हणून सांग."
लगेचंच ते कार्ड वाचून तो मालक बाहेर आला आणि मला बघून त्याने मला ओळखलं.मला त्याच्या कॅबिनमधे हात धरून घेऊन गेला.लंचची वेळ होती मला म्हणाला,
"मस्तपैकी मासे आणि चिकनचं जेवण अनंताश्रमातून मागवतो आपण जेवूया आणि बोलूया."
इकडचे तिकडचे विषय झाल्यावर मी जुन्या आठवणी काढून त्याच्याशी बोलायला सुरवात केली.बरीच वर्ष झाली मी त्याला भेटलो नव्हतो.पण लहानपणाच्या त्याच्या काही विक्षीप्त संवयी मी विसरलो नव्हतो.गुरू बरेच वेळा घराबाहेर पडतच नव्हता.त्याला नेहमी कसली तरी भिती वाटायची.हे लक्षात येऊन मी त्याला म्हणालो,
"तू त्या संवयीतून बाहेर कसा पडलास?"
गुरू पण अगदी अंतःकरणा पासून माझ्याशी बोलू लागला,

"मला नंतर असं वाटू लागलंय,की संधी येण्याची वाट न पहाता ती मिळवण्यासाठी प्रयत्न करीत रहावं.
हे शिकायला मिळालं मला माझ्या पुर्वीच्या भित,भित राहण्याच्या वृत्तिने.
मी अगदी लहान असताना सर्व गोष्टीची मला नेहमी भितीच वाटायची.उंच जिन्याच्या वर जाऊन चढून बसणं,छोट्या,छोट्या झुरळांना पहाणं वगैरे.आठ वर्षाचा असताना,मला माझ्या मोठ्या भावाबरोबर सार्वजनीक गणपति पहाण्यासाठी सुद्धा जायला भिती वाटायची.एका वर्षी एका मोठ्या सार्वजनीक गणपतिच्या विसर्जनाच्यावेळी माझा मोठा भाऊ अगदी समुद्रावर गेला होता.पण मी मात्र घरीच बसून होतो. मला भिती वाटायची की मी कदाचित त्या गर्दीत हरवून जाईन,कदाचित दंगा होऊन पोलिसांचा लाठिमार होईल,मलाच पकडतील वगैरे.
विसर्जनाच्या मजेचा आनंद घेण्याऐवजी मी माझा आत्मविश्वास गमवून बसलो होतो.
ह्या भितीमुळे मी सुरक्षित मार्ग जास्त अंगिकारला तो म्हणजे माझं शाळेत जाण्याचा मार्ग,त्यानंतर पुढे टेकनिकल संस्थेमधे पुढचं शिक्षण घेण्याचा मार्ग आणि त्यानंतर एका मोटार तयार करण्याच्या कारखान्यात मिळालेली नोकरी करण्याचा मार्ग हे सर्व मार्ग मला जरा सुरक्षित वाटत.सहा एक वर्ष या व्यवसायात राहून नंतर कंटाळा येऊ लागला.त्यातून माझी एक नविन भिती जन्माला आली. कारखानातल्या इतर कामगारासारखं आपण पण थकलेला,करपलेला आणि वेळेपूर्वीच म्हातरपण आलेला होऊ की काय असं सारखं वाटू लागलं.
मी ह्यातून बाहेर पडायचं ठरवलं.नाहितर पुन्हा जिन्याच्या वर चढून जाण्याच्या भितीची पुन्हा आठवण आणून खालच्याच पायरीवर बसून राहण्याची पाळी आणावी लागेल,गणपतिच्या विसर्जनाला जाण्याची भिती पुन्हा येईल.
त्यासाठी मी एक मोटरपार्टस विकण्याचं दुकान काढायाचं ठरवलं.त्याकरता यशस्वी बिझीनेस कसा करावा यावर पुस्तकं वाचायला सुरवात केली.हे करत असताना मला आयुष्यात कोणत्या अतिदुःखद प्रसंगाला तोंड द्दावं लागलं याचे विचार मनात येऊ लागले.आपल्या अठेठेचाळीस वर्षावर माझी आई अतिदुर्धर आजाराने मला कशी सोडून गेली हा प्रसंग आठवून त्या प्रसंगाची आणि माझ्या नव्या बिझिनेसमधे मी ठोकर खाल्ली तर त्या प्रसंगाची मी तुलना करून किती दुःख होईल याचा विचार करू लागलो.
हजार रुपये खिशात ठेऊन मी एका घाऊक मोटरपार्टस विकणार्‍या दुकानाच्या मालकाला फोन करून पाहिलं.माझं आश्चर्य म्हणजे त्याने मला सहकार्य द्दायचं कबूल केलं.आणि तिथून सुरवात झाली.

धंद्याच्या प्रगतीचा जिना चढून जाणं तितकं सोपं नव्हतं.एकदा मी चांगली मोठी ऑर्डर घालवून बसलो.जुनी भिती पुन्हा प्रवेश करू लागली.पण माझ्या आईच्या प्रसंगाची आठवण आणि त्या कारखान्यातल्या नोकरीची आठवण काढून त्या प्रगतीच्या जिनाच्या पायर्‍यावर चढून जाण्याची मनस्थिती आणू शकलो.
काही मिळवून दाखवणं हे काही यश मिळवणं असं नाही.प्रत्येक वेळी मी भितीच्या चकरातून बाहेर पडत असे त्या त्या वेळी जिंको न जिंको मी यशस्वी होत असे.इकडे तिकडे थोडीफर नुकसानी होतही असेल पण म्हणून मी नव्वद वर्षाच्या वृद्धाला शेवटी वाटावं की आपण तसं काहीच आयुष्यात केलं नाही म्हणून त्याने हताश व्हायच्या स्थितीला जावं तसा मी गेलो नाही.
बाहेर पडल्यावर वाईट गोष्टीना पण तोंड द्यावं लागतं.पण माझा विश्वास आहे की न जाण्याने याचाही पेक्षा वाईट गोष्टीना सामोरं जावं लागतं"

हे ऐकून झाल्यावर मी त्याला म्हणालो,
"मग आता तुझं कसं चाललं आहे?"
ह्या धंद्दावर तुझा चांगलाच जम बसलेला दिसतो मला."
गुरूनाथ म्हणाला,
"आता मी पुर्वीचा राहिलो नाही.माझ्या वाचनात एक पुस्तक आलं,विषय होता,
"माणसाच्या अंगात उपजत कला असतात"
त्या पुस्तकात त्या कला एखाद्दाने कशा वापरायच्या- ज्या त्याला मुळात माहितही नसतील-ह्याची सुंदर माहिती दिली होती.ते पुस्तक वाचून मी माझं स्वतःचं आत्मपरिक्षण केलं.मला स्वतःला खूपच आत्मविश्वास वाढल्या सारखं वाटूं लागलं.आणि नंतर मी मागे वळून कधीच बघीतलं नाही."
मला हवं असलेलं सामान गुरुनाथने त्याच्या नोकराकरवी त्या कारखान्यात अगोदरच पाठवून दिलं होतं.आणि त्यामुळे मला त्याची ही कथा ऐकायला वेळ मिळाला.
त्याच्या दुकानातून बाहेर पडल्यावर माझ्या मनात विचार आला.की एखादी व्यक्ति करियर मधे वर यायला त्याला कोणतं कारण कारणीभूत होईल हे सांगणं कठिण आहे.

श्रीकृष्ण सामंत

प्रत्येक गोष्टीला पर्याय असतो.

त्या दिवशी मी दिल्ली एअरपोर्टवर फ्लाइट चुकली म्हणून निवांत दुसरी फ्लाइट मिळेपर्यंत वेळ काढत बसलो होतो.माझी एक खूर्ची सोडून दुसर्‍या खूर्चीवर-व्हिलचेअरवर- एक सदगृहस्थ बसले होते.सायंटिफिक जगतात ते विषेश नावाजलेले होते.त्यांची विषेश गोष्ट अशी होती की त्यांना स्नायू हळू हळू क्षीण होण्याचा एक व्याधी झाला होता.तरीपण ते आपल्या कामात नेहमी व्यग्र असायचे.त्यांच्या बाजूला एक गृहस्थ बसून ते जे काही बोलत होते ते तो लिहून घेत होता.
लेट फ्लाइट बद्दल आमचा विषय निघाला आणि दोन तास इथं बसून राहण्याला पर्याय नव्हता.मीच त्यांच्याशी जास्त जवळीक आणून त्यांची चौकशी करू लागलो होतो.
त्यांची ही परिस्थिती पाहून मीच त्यांना प्रश्न केला की ते हे सर्व कसं मॅनेज करू शकतात.
त्यावर ते मला म्हणाले,
"मला नेहमीच वाटतं की मला पर्याय पहाण्याची क्षमता आहे.हरकत नाही मी काय करीत असेन,हरकत नाही मी कुठे असेन,हरकत नाही मी कसल्या प्रसंगातून जात असेन,पण मला पर्याय पहाण्याची क्षमता आहे.

आज मी कुणाची तरी मदत घेऊन माझ्या मनात आलेले विचार त्याच्या कडून लिहून काढण्याचा प्रयत्न करीत आहे.ह्या पूर्वी माझं आयुष्य हजारो कागदाच्या फोली घेऊन त्यावर काही ना काही तरी लिहिण्यात गेलं होतं.परंतु आता मला बोटात पेन धरून कागदावर खरडण्यासाठी ती बोटं वापरता येत नाहीत.

मला अशा प्रकारचा व्याधी झाला आहे,की हा व्याधी हळू हळू माझे एकएक शरिरातले स्नायू निकामी करून शेवटी माझ्या शरिरातले असतील ते स्नायू निकामी करणार आहे. सरते शेवटी मी सरकू शकणार नाही,बोलू शकणार नाही,आणि शेवटी श्वास पण घेऊ शकणार नाही.आत्ताच मी दुसर्‍यानवर अवलंबून आहे.म्हणून मी रोज माझ्या पर्याया विषयी तपासणी करीत असतो.

ह्या व्याधी बरोबर दिवस काढणं म्हणजे जणू कोर्टातल्या साक्षीच्या पिंजर्‍यात उभं राहून कोर्टाला माझ्याच विषयी मला काय माहित आहे ते सांगणं.मी कसा दिसतो,मी कसा वागतो,मी जगाशी कसा रदबद्ली करतो आणि हे सर्व आता झपाट्याने बदलत चाललं आहे.तरीपण ह्या बद्दला बरोबर मला अजून पर्याय पहाण्याची क्षमता आहे.
ज्यावेळी मी कागदावर लिहू शकत नाही हे मला कळलं,त्याचवेळी कुणा दुसर्‍याची मर्जी संपादून त्याच्याकडून लिहून घेण्याची खडतर खटपट मला करावी लागणार आहे हे ही समजलं.पण गंमत म्हणजे ह्या पद्धतीने मी पूर्वी पेक्षा जास्त लेखन करू लागलो.

आणि जास्त क्रियाशील पातळीवर रोज माझा पर्याय पहाताना मी कसा जगणार आहे? हे न पहाता, जर का मी जगलो तर?ह्या पर्यायावर आधार घेऊ लागलो आहे. माझ्यावर कुठल्याच प्रकारचा धार्मिक बंधनाचा पगडा नाही की जेणे करून मला आयुष्यरेषे बद्दल अमुकच तर्‍हेने विचार करावा लागणार आहे. आणि ह्या माझ्या व्याधीला त्यामुळे तिच्या मर्जीप्रमाणे काय करायचं हे करायला मुभा मिळणार नाही. आणि अगदी इथेच मला माझ्या पर्याय पहाण्याच्या क्षमतेचा खरा अर्थ मिळतो. ही व्याधी ही जणू मला फाशिची शिक्षाच आहे अशा दृष्टीने तिच्याकडे मी पहातो.किंवा ही व्याधी मला मी खरा कोण आहे हे पडताळण्यासाठी मिळणारं आमंत्रण समजतो.

कोर्टातल्या पिंजर्‍यातल्या साक्षिदारालासुद्धा त्याच्या बद्दलची मुलभूत दृष्टी बदलता येत नाही. मग माझी तरी माझ्या विषयी दृष्टी काय असणार? असला काही तरी विचार मी रोज मनात आणून शिकत असतो.आणि आता पर्यंत मी बर्‍याच विषेश गोष्टी शोधून काढल्या आहेत.पण ह्यातली एक गोष्ट इतर गोष्टीमधे जरा वरचढ आहे.माझ्या मधेच मी एक गोष्ट शोधून काढली आहे आणि ती अशी की आता मला माझ्यातच काळजी करणं आणि करून घेणं हे चांगलच कळायला लागलं आहे.
हा व्याधी होण्यापूर्वीच्या माझ्या आयुष्यात जेव्हडं मला माहित नव्हतं त्याहिपेक्षा जास्त आता मला माहित झालं आहे.

मी पूर्वी एव्हडा स्वतंत्र आणि स्वतःची खासगी ठेवायचो,तो मी आता आजूबाजूच्या मित्र आणि परिवारांकडे एव्हडा मोकळा झालो आहे की ते सर्व माझ्या जीवनाचा हिस्सा झाले आहेत.पूर्वी हे असं होणं मला महाकठीण होतं.मला वाटायचं की ह्या व्याधीच्या मगरमिठीत राहण्याशिवाय मला तरणोपाय राहिला नसून, खडतर आयुष्य काढणं आणि एकाकी राहण्याला पर्याय नाही. त्याऐवजी आता वाटतं नेहमीच पर्याय पहाण्याचा मला मार्ग मिळाला आहे, मला आता इतर शक्यतांचा वापर करता येईल. आणि आता ज्या गोष्टीला मी कटकट किंवा नकोशी म्हणायचो त्याच गोष्टीने माझं जीवन अविट गोडीने सुखद केलं आहे.ते तसं पूर्वी होतच पण आता मी तसं पहाण्याच्या पर्यायाची निवड केली आहे. ही गोडीच मला जणू ठसाकावून सांगते की मला कसलाही पर्याय पहाण्याची क्षमता आहे."

हे त्या गृहस्थांचं संभाषण ऐकून मी थक्कच झालो.आणि आयुष्यात पर्याय पहाण्याच्या त्यांचा विचार पाहून नविन काही तरी शिकलो.

श्रीकृष्ण सामंत

पन्नास टक्के थेअरी

नरगुंदकरांचा मुलगा खूप वर्षानी मला भेटला.त्याचे आईवडील त्याच्याचकडे हल्ली राहायला गेले होते.म्हणून मी त्यांना भेटायला गेलो होतो.घरी गेल्यावर चहापाणी झाल्यावर काही गप्पागोष्टी झाल्या.बोलता बोलता त्यांचा मुलगा म्हणाला,
"मला चांगलच लक्षात आलं की नंतर येणार्‍या सर्व चांगल्या गोष्टी सहजच होऊन गेलेल्या वाईट गोष्टीवर मात करतात.
वाईट गोष्ट सर्वसाधारण चांगल्या गोष्टीपेक्षां जास्त काळ टिकून राहूच शकत नाहीत.शांती आणि भरभराटीचा मी चहाता आहे.
मी "पन्नास टक्के थेअरी" मानतो.अर्धाअधीक वेळ घटना सर्वसाधाराण गोष्टीपेक्षा चांगल्या असतात.आणि अर्ध्याअधीक वेळा त्या वाईट असतात.मला वाटतं जीवन हा एक लंबकाचा झोका आहे. सर्वसाधारण गोष्ट कळायला वेळ जावा लागतो आणि अनुभव मिळवावा लागतो.आणि त्यानेच मला भविष्यातल्या येवू घातलेल्या आश्चर्यांचं आकलन होतं.
आपण जर का एक यादी केली तर असं दिसून येईल.
मला मरण येणार आहे.माझ्या आजीआजोबांच्या,जवळच्या मित्राच्या,प्रेमळ बॉसच्या,आणि माझ्या प्रेमळ कुत्र्याच्या निर्वतण्याच्या प्रसंगाला, मी तोंड दिलं आहे.ह्यातले कांही प्रसंग खूपच धक्कादायक होते.आणि काही रेंगाळलेले आणि दुःखदायी होते.ह्या सर्व वाईट गोष्टी एकदम खालच्या पातळीवर ठेवता येतात.
दुसरे वरच्या पातळीवर ठेवता येतील असे मुद्दे म्हणजे,
आपल्याला आवडेल त्या व्यक्तिशी लग्न होणं.मुल होणं आणि त्या मुलाचा बाबा म्हणून त्याच्यासाठी केलेल्या गोष्टी.उदा.त्याच्या बरोबर बॅट-बॉलने खेळणं,त्याच्या बरोबर पोहायला जाणं,कीड-मुंगीकडे पण दयाळू अंतःकरणाने पहाण्याची त्याची वृत्ति पाहून त्याच कौतूक करणं.पत्याचे बंगले बनविण्याची त्याची कल्पनाशक्ति आणि अंगातली कला पाहून आनंदी होणं.
पण मधल्या वेळात जीवनाचं विखुरलेल असंही कुरण असतं जिथे वाईट आणि चांगल्या गोष्टी आलटून पालटून कसरत करीत असतात.ती माझी "पन्नास टक्के थेअरी" इथे माझ्या उपयोगी येते.
अता हेच बघा माझा एक मित्र कोकणात शेती करतो.पावसाचा अंदाज घेऊन त्याने एकदा भाताची पेरणी थोडी अगोदरच केली.त्या वर्षी पाऊस थोडा उशिरा आला.आणि त्याला परत पेरणी करावी लागली.त्याची मेहनत फुकट गेल्याबद्दल त्याला जरा वाईट वाटलं.पण त्यावेळेला मोठा दुष्काळ आला होता.त्याने त्याच्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहिला होता.पण त्याची खात्री होती की असे दुष्काळ नेहमीच येत नाहीत.माझ्या त्या "पन्नास टक्केच्या थेअरीची" मदत झाली.दुसर्‍या पावसाळ्यात त्या दुष्काळाची कसर निघाली.त्या वर्षी भरपूर भाताचं पिक आलं.आणि दिवस तसेच राहत नाहीत हे सिद्ध झालं."
हे सर्व ऐकून मी त्याला म्हणालो,
"ही तुझी पन्नास टक्के थिअरी प्रत्येकाला उमेद ठेवून जीवन जगण्यासंबंधी एक प्रकारचा संदेशच देते नाही काय?"
त्यावर तो एव्हडंच म्हणाला,
"मला तरी त्याचा फायदा होतो."

श्रीकृष्ण सामंत

बाजीरावांची टोलेबाजी :५: टिळक, आम्हाला क्षमा करा!

टिळक, आम्हाला क्षमा करा!

आज १ ऑगस्ट. लोकमान्य टिळक पुण्यतिथी. शाळाशाळातून वक्तृत्त्व स्पर्धा होतील. सगळे बालवक्ते टिळकांनी बालपणी निबंधात संत हा शब्द तीनप्रकारे कसा लिहिला, शिक्षकांनी एक शब्द बरोबर धरून बाकी दोन चूक धरताच सगळेच शब्द बरोबर धरण्याचा हट्ट टिळकांनी कसा धरला त्याची गोष्ट सांगतील. त्याच बरोबर वर्गात मुलांनी शेंगा खाल्ल्या आणि फोलपटे तेथेच टाकली. पण चूक कुणीच कबूल करेना. मग शिक्षकांनी सगळ्या मुलांना छड्या मारायला सुरवात केली. पण टिळकांनी बाणेदारपणे 'मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी हात पुढे करणार नाही' असे सांगितले होते ती गोष्ट सांगतील. वर्षानुवर्षे हेच चालत आले आहे. हल्ली वक्तृत्त्व स्पर्धा वगैरे तरी होतात की नाही कुणास ठाऊक. पण मुलांचं टिळकांबद्दलचं ज्ञान इथंच आणि एवढ्यावरच संपतं.
टिळक, तुमच्या वर्गातल्या काही मुलांनी पुढं स्वातंत्र्य मिळाल्यावर खूपच शेंगा खाल्ल्या आणि फोलपटे सार्‍या देशभर टाकली. पण त्यांना छड्या मारण्याचे धारिष्ट्य एकाही 'सरां'ना झाले नाही. ही मुलेही भलतीच बाणेदार. त्यांनीही छड्या खायला हात कधीच पुढे केला नसता. त्यांचे हात लाच घेण्यासाठी पुढे झालेले लाखो लोकांनी टीव्हीवर पाहिले. ही मुले आता लोकसभेत, विधानसभेत दंगामस्ती करतात. घटनेचे, संसदेचे पावित्र्य नष्ट करतात. पण त्यानाही कुठलेच सर छड्या मारू शकत नाहीत. संत वगैरे शब्दांची तर आता सगळ्यांनाच ऍलर्जी आहे. कुठल्याच प्रकाराने हा शब्दच लिहिला जाणार नाही याची काळजी सगळेजण घेतात. प्रश्नपत्रिकेतून सतांच्याबद्दल वेडेवाकडे उतारे छापले जातात. यांना कुणी छड्या मारायच्या?
तुम्ही स्वातंत्र्यासाठी मंडालेच्या तुरुंगात शिक्षा भोगलीत. आताचे नेते भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन झालेल्या शिक्षा पंचतारांकित इस्पितळातून उपभोगतात. नंतर निर्लज्जपणे समाजात वावरतात. तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांचे समर्थक त्यांचे स्वागत करतात. सत्कार करतात. सुवासिनी त्यांना पंचारत्या ओवाळतात. त्यांचे सरकारातले स्थानही अढळ असते. कुणालाही खेद नाही, खंत नाही. यांना छड्या कुणी मारायच्या?
तुमचा 'केसरी' गर्जणारा होता. आताची सारी वृत्तपत्रे कुणा ना कुणाच्या ताटाखालची मांजरे झाली आहेत. मंत्री, शिक्षणसम्राट, उद्योगपती यांच्या वाढदिवसाच्या पुरवण्य़ा छापून जाहिरातींची साय ओरपण्यात मग्न आहेत. बातम्या छापायलाही पैसे आणि दाबायलाही पैसे. 'पाची बोटे तुपात' अशी वृत्तपत्रांची चैन, चंगळ आहे. अशा तुपाने बुळबुळीत झालेल्या संपादकीय हातांना लेखणीसुद्धा नीट धरता येत नाही. टीकेचे आसूड वगैरे कसे धरणार? अग्रलेखांची परंपरा मोडीत निघाली आहे. तेवढ्या ताकदीचे संपादकही आता दुर्मिळ झालेत. पेपर रंगीत झालेत, स्वस्त झालेत. पण जनतेचा आवाज त्यांतून उठेनासा झाला आहे. 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?' हा प्रश्न आजही पडतो. पण तो लोकांना. वृत्तपत्रांना त्याचे काहीही देणेघेणे नाही. 'सरकारच्या जाहिराती ठिकाणावर आहेत काय?' एवढीच त्यांना काळजी.
परवा काही एका संदर्भासाठी एका प्रसिद्ध वाचनालयाच्या अध्यात्म, तत्त्वज्ञान विभागात 'गीतारहस्य' शोधत होतो. मिळता मिळेना. मग ग्रंथपालाला विचारले. त्याने 'रहस्यकथा' विभागात शोधायला सांगितले. नेमके मिळाले. पण बर्‍याच वर्षात कुणीही हात न लावल्याने खूप धूळ साठली होती त्याच्यावर. ही आमच्या अनास्थेची, सांस्कृतिक-सामाजिक र्‍हासाची आणि धुळीला मिळत चाललेल्या नीतीमूल्यांची धूळ होती. ती झटकण्याचे धाडस मला झाले नाही. टिळक, आम्हाला क्षमा करा.

-बाजीराव

(दै. तरुण भारत, बेळगाव मध्ये दि. ०१.०८.२००६ रोजी पूर्वप्रकाशित.)

गाडी अड्डा

सकाळी उठून घराच्या पडवीच्या पायरीवर बसलो होतो.
दोन हातावर जबड्याचा खालचा भाग टेकून,हाताचे कोपर गुढ्घ्या जवळ मांडीचा आधार घेवून, दोन्ही पायाचे तळवे खालच्या पायरीवर ठेवून, विचार करीत बसलो असताना, मारुतीच्या देवळाच्या दिशेने घुंघुराचा मंजूळ आवाज कानावर पडत असताना,
त्या सकाळ्च्या शांत वेळी ते सप्तसूर खूपच श्रवणीय वाटायचे.

नक्कीच बेळगांवहून बैलगाड्या येवू लागल्या असणार,आणि तीस ते चाळीस गाड्यांची एकच ताफा दिसणार,त्या ऊंच ऊंच धिप्पाड पांढऱ्या बैलांच्या जोड्या,सरळ लांबच लांब लाल पिवळी अणकुचीदार त्यांची दोन दोन शिंगे,एक एक शिंगावर ओवलेले छोटे छोटे घुंघरु,प्रत्येक बैलाच्या गळ्यात दुपदरी मोठ्या घुंघरांची लोंबत्या माळा, कधी कधी आंबोली घाटात चिक्कार थंडी पडत असल्याने बैलाना थंडी वाजूनये म्हणून त्याच्या पाठीवर घातलेली रंगीत गोणपाटाची शाल,बैलांच्या मानेवर आधार घेवून T आकाराच्या त्या जूंवमधल्या दांडीवर गाडीला जोडल्या जाणार्‍या टोकावर बैठक मारून बसलेला तो बेळगांवचा घाटी "पावणा (पाहूणा) " पाहून मजा यायची. पावणा गाडीतून खाली उतरला की लांब लचक झब्बा वरून असल्यामुळे कमरेखाली काय घातलं आहे हे पहाण्याची काही जरूरी वाटत नसायची,डोक्याला मुंडासं,आणि खांद्दयावर बैलाला मारण्याचा चाबूक एव्हडाच त्याचा पेहराव.

जरा मोठ्याने ओरडून जणू जुनीच ओळख आहे असा अविर्भाव करून
"काय पावणं गाडीत काय आणलंत?"
असा नेहमीचाच प्रश्न विचारल्यावर नेहमीच मिळणार्‍या उत्तराचे अपेक्षीत शब्द कानावार यायचे
"गुळ आनि ऊंस आनलं बघा! "
नंतर एक दोन पासून तीस चाळीस पर्यंत बैलाच्या गाड्या मोजायच्या.शेवट्च्या गाडीच्या "पावण्याला" तोच प्रश्न विचारल्यावर तेच उत्तर यायचं.
अशी ही रांग सरळ बाजाराच्या दिशेने जात रहायची आणि त्यानंतर गुंडू जोश्यांच्या किंवा टांककारांच्या किंवा बागायतकरांच्या वखारी जवळ येवून थांबायची.
ह्या लोकांचे दलाल, बरोबर तो तो माल त्या त्या वखारीत नेवून उतरायचे. त्यात घाटावरून आणलेल्या गुळाच्या ढेपी,घाटावरचा ऊंस,गुरांसाठी उंसाची चिपाड घालून वैरणमिश्रीत पेंडींचे मोठे मोठे तुकडे,बटाट्याची पोती,घाटावरचा कांदा,शेंगदाण्याची पोती वगैरे,वगैरे. अर्थात एव्हढा माल उतरून घ्यायला बराच वेळ जायचा.मधल्या वेळात आमचे हे घाटावरचे पाहूणे दुपारची वेळ बाजारातल्या तेंडुलकरांच्या "हाटलातून" उसळ पाव,कांद्दयाची भजी आणि चहा घेवून माल उतरून, रिकाम्या झालेल्या गाड्या, द्लाल सांगतील तिथे नेवून, परत कोकणातून घाटावर जाणारा माल भरण्यासाठी नेत असत.माल भरत असताना बैलाना चारा आणि वैरण देवून त्यांची आपल्या सारखी दुपारची पोटपुजा करून घेत.

कोकणातून जाणारा माल म्हणजे केरसुण्या,सुपे, रवळ्या,सुकी मासळी, आंबसोलं, फणस,फुले,काही गाड्यातून जळावू लाकडे,सावंतवाडीहून जाणारे लहान मुलांचे लाकडी खेळ,कोकणातला ऊंस वगैरे माल भरून घ्यायचे. दुपार ऊलगता ऊलगता मासळी बाजारातून संध्याकाळच्या जेवणासाठी "उकडे तांदूळ,मिठमिरची सुकी