मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

इराण : डोंगरी भिवरलीचं अधर्मयुद्ध

गामा पैलवान ·

चेतन 18/03/2026 - 18:30
इराण युद्धाच्या भोवऱ्यात फिरणारे झिगझॅग शब्द अचानक भडकतात आणि मग थंड होतात, जिथे धूर बोलतो आणि शांतता ओरडते, तिथे कागदी रणांगणावर उडणारे अक्षरांचे तुकडे बोंबलतात विचित्र तालात. मिसाईलसारखे वाक्ये आकाशात झेप घेतात आणि मग पावसासारखी कोसळतात अर्थहीन ढगांत, जिथे इतिहास स्वतःलाच विसरतो आणि नकाशे पळून जातात पावलांच्या मागे. 2026 च्या गूढ इराण युद्धात अचानक Donald Trump चे नाव धुरकट ढगातून तरंगत येते, जणू काही शब्दांचा वेडावाकडा तारा आकाशात अडकलेला. त्याच्या सावल्या वाक्यांवर पडतात आणि अक्षरे क्षणभर सरळ उभी राहतात, पण लगेच पुन्हा गोंधळात नाचू लागतात. Israel च्या दिशेने वळलेले वारे अचानक रंग बदलतात, जिथे नकाशे स्वतःला पुन्हा रेखाटतात आणि सीमारेषा कुजबुजतात गुपिते. Strait of Hormuz च्या पाण्यात तरंगणारे विचार लाटांसोबत उलटसुलट होतात, जहाजे स्वप्नांच्या जाळ्यात अडकतात, आणि दिशाहीन कंपास हसतात. ड्रोनचे तुटक गाणे आकाशात भिरभिरते, रंगीबेरंगी निःशब्द प्रश्न फेकते, आणि जमिनीवर पडलेली उत्तरे कर्कश हसतात. शहरे झोपतात जागी राहून, लोकांच्या सावल्या वेगळ्याच दिशेने चालतात, आणि वेळ सापासारखी स्वतःभोवती गुंडाळते. वाक्यांचे सैनिक सरळ चालत नाहीत—ते गोल गोल फिरतात, एकमेकांवर आदळतात आणि हवेत विरघळतात. या विचित्र कथानकात बातम्यांचे ढग गोड, कडू आणि बुळबुळीत होतात, जिथे सत्य आणि खोटं दोन्ही हरवून बसतात. शेवटी उरतो फक्त गोंधळाचा प्रतिध्वनी—थरथरणारा, भिरभिरणारा, आणि पुन्हा नव्याने जन्म घेणारा. :-) साभार चॅटजीपीटी.

निनाद 19/03/2026 - 07:20
तुम्ही म्हटल्याप्रमाणे नादिर शाहचे साम्राज्य अल्पकाळ टिकले, पण त्याचे महत्त्व केवळ वर्षांवरून ठरवता येत नाही. नादिर शाहला "शिया नेपोलियन" म्हटले जाते. सफावी घराण्याचा अंत झाल्यानंतर आणि झंड/काजार येण्यापूर्वी त्याने इराणला विखुरण्यापासून वाचवले होते. विशेष म्हणजे, त्याने मुघलांकडून कोहिनूर आणि मयूर सिंहासन नेले, ज्यामुळे इराणची आर्थिक स्थिती काही काळ कमालीची सुधारली होती. आगा मोहम्मद खान काजार चा उपस्थित केलेला मुद्दा की तो झंड राजकन्येचा मुलगा होता, हे अधिकृत इतिहासात लपवले जाते. कारण काजार राजांनी आपली तुर्की ओळख अधिक मांडण्याचा प्रयत्न केला. -- अरब आक्रमणापूर्वी इराणवर सासनी घराण्याचे राज्य होते. मात्र, दीर्घकाळ चाललेल्या बायझेंटाईन-सासानियन युद्धांमुळे दोन्ही साम्राज्ये आर्थिक आणि लष्करीदृष्ट्या थकली होती. अंतर्गत बंडाळ्या आणि सततचे कर यामुळे सामान्य जनताही सत्ताधाऱ्यांवर नाराज होती. खलिफा उमर यांच्या काळात इराणवर आक्रमणे सुरू झाली. कादिसियाची लढाई आणि निहावंदची लढाई या दोन लढायांनी सासनी सत्तेचा कणा मोडला. उमय्याद काळात अरबांनी इराणवर कडक नियंत्रण ठेवले. प्रशासकीय भाषा 'पर्शियन' ऐवजी 'अरबी' करण्यात आली. जे पर्शियन लोक इस्लाम स्वीकारत, त्यांना 'मावली' म्हटले जाई. त्यांना अरबांच्या बरोबरीने अधिकार मिळत नसत, ज्यामुळे पर्शियन लोकांमध्ये असंतोष वाढला. उमय्याद राजवटीविरुद्ध झालेल्या उठावात इराणच्या अबू मुस्लिम खुरासानी यांनी मोठी भूमिका बजावली. या क्रांतीनंतर उमय्याद सत्ता जाऊन अब्बासी सत्ता आली. अरबांनी इराण जिंकला खरा, पण सांस्कृतिकदृष्ट्या इराणनेच अरबांना जिंकले असे म्हणतात. -- चंगेज खान आणि हलाकु खान यांनी इराणची खरी वाताहत केली! निशापूर, मर्व, हेरात आणि समरकंद यांसारखी वैभवशाली शहरे त्याने अक्षरशः जमिनीदोस्त केली. चंगेज खानच्या मृत्यूनंतर काही दशकांनी त्याचा नातू हलाकु खान आला. हलाकुचे सर्वात मोठे 'लक्ष्य' म्हणजे बगदाद. तेव्हा बगदाद हे अब्बासी खलिफा मुस्तसिम याचे केंद्र होते. हा अब्बासी स्वतःला संपूर्ण मुस्लिम जगाचा आध्यात्मिक प्रमुख मानत असे. खलिफाने शरण येण्यास नकार दिल्यावर हलाकुने बगदादला वेढा घातला आणि शहराचा पाडाव केला. यानंतर हलाकू ने जी मुसलमानांची कत्तल झाली ती इतिहासातील सर्वात भीषण कत्तलींपैकी एक मानली जाते. हलाकुने खलिफाला एका गालिच्यात गुंडाळून त्याच्यावरून घोडे धावण्यास लावले आणि त्याला मारून टाकले. यासह ५०० वर्षांची अब्बासी खिलाफत अधिकृतपणे संपली. हलाकु क्रूर होता पण त्याने मराघे येथे त्या काळातील सर्वात मोठी खगोलशास्त्रीय वेधशाळा बांधली होती. हलाकु खान - त्याचे मुख्य उद्दिष्ट पश्चिम आशियातील उरलेली मुस्लिम सत्ता संपवणे हे होते. हेच कार्य आज अमेरिका करते आहे असे तुम्हाला म्हणायचे आहे का?

चेतन 18/03/2026 - 18:30
इराण युद्धाच्या भोवऱ्यात फिरणारे झिगझॅग शब्द अचानक भडकतात आणि मग थंड होतात, जिथे धूर बोलतो आणि शांतता ओरडते, तिथे कागदी रणांगणावर उडणारे अक्षरांचे तुकडे बोंबलतात विचित्र तालात. मिसाईलसारखे वाक्ये आकाशात झेप घेतात आणि मग पावसासारखी कोसळतात अर्थहीन ढगांत, जिथे इतिहास स्वतःलाच विसरतो आणि नकाशे पळून जातात पावलांच्या मागे. 2026 च्या गूढ इराण युद्धात अचानक Donald Trump चे नाव धुरकट ढगातून तरंगत येते, जणू काही शब्दांचा वेडावाकडा तारा आकाशात अडकलेला. त्याच्या सावल्या वाक्यांवर पडतात आणि अक्षरे क्षणभर सरळ उभी राहतात, पण लगेच पुन्हा गोंधळात नाचू लागतात. Israel च्या दिशेने वळलेले वारे अचानक रंग बदलतात, जिथे नकाशे स्वतःला पुन्हा रेखाटतात आणि सीमारेषा कुजबुजतात गुपिते. Strait of Hormuz च्या पाण्यात तरंगणारे विचार लाटांसोबत उलटसुलट होतात, जहाजे स्वप्नांच्या जाळ्यात अडकतात, आणि दिशाहीन कंपास हसतात. ड्रोनचे तुटक गाणे आकाशात भिरभिरते, रंगीबेरंगी निःशब्द प्रश्न फेकते, आणि जमिनीवर पडलेली उत्तरे कर्कश हसतात. शहरे झोपतात जागी राहून, लोकांच्या सावल्या वेगळ्याच दिशेने चालतात, आणि वेळ सापासारखी स्वतःभोवती गुंडाळते. वाक्यांचे सैनिक सरळ चालत नाहीत—ते गोल गोल फिरतात, एकमेकांवर आदळतात आणि हवेत विरघळतात. या विचित्र कथानकात बातम्यांचे ढग गोड, कडू आणि बुळबुळीत होतात, जिथे सत्य आणि खोटं दोन्ही हरवून बसतात. शेवटी उरतो फक्त गोंधळाचा प्रतिध्वनी—थरथरणारा, भिरभिरणारा, आणि पुन्हा नव्याने जन्म घेणारा. :-) साभार चॅटजीपीटी.

निनाद 19/03/2026 - 07:20
तुम्ही म्हटल्याप्रमाणे नादिर शाहचे साम्राज्य अल्पकाळ टिकले, पण त्याचे महत्त्व केवळ वर्षांवरून ठरवता येत नाही. नादिर शाहला "शिया नेपोलियन" म्हटले जाते. सफावी घराण्याचा अंत झाल्यानंतर आणि झंड/काजार येण्यापूर्वी त्याने इराणला विखुरण्यापासून वाचवले होते. विशेष म्हणजे, त्याने मुघलांकडून कोहिनूर आणि मयूर सिंहासन नेले, ज्यामुळे इराणची आर्थिक स्थिती काही काळ कमालीची सुधारली होती. आगा मोहम्मद खान काजार चा उपस्थित केलेला मुद्दा की तो झंड राजकन्येचा मुलगा होता, हे अधिकृत इतिहासात लपवले जाते. कारण काजार राजांनी आपली तुर्की ओळख अधिक मांडण्याचा प्रयत्न केला. -- अरब आक्रमणापूर्वी इराणवर सासनी घराण्याचे राज्य होते. मात्र, दीर्घकाळ चाललेल्या बायझेंटाईन-सासानियन युद्धांमुळे दोन्ही साम्राज्ये आर्थिक आणि लष्करीदृष्ट्या थकली होती. अंतर्गत बंडाळ्या आणि सततचे कर यामुळे सामान्य जनताही सत्ताधाऱ्यांवर नाराज होती. खलिफा उमर यांच्या काळात इराणवर आक्रमणे सुरू झाली. कादिसियाची लढाई आणि निहावंदची लढाई या दोन लढायांनी सासनी सत्तेचा कणा मोडला. उमय्याद काळात अरबांनी इराणवर कडक नियंत्रण ठेवले. प्रशासकीय भाषा 'पर्शियन' ऐवजी 'अरबी' करण्यात आली. जे पर्शियन लोक इस्लाम स्वीकारत, त्यांना 'मावली' म्हटले जाई. त्यांना अरबांच्या बरोबरीने अधिकार मिळत नसत, ज्यामुळे पर्शियन लोकांमध्ये असंतोष वाढला. उमय्याद राजवटीविरुद्ध झालेल्या उठावात इराणच्या अबू मुस्लिम खुरासानी यांनी मोठी भूमिका बजावली. या क्रांतीनंतर उमय्याद सत्ता जाऊन अब्बासी सत्ता आली. अरबांनी इराण जिंकला खरा, पण सांस्कृतिकदृष्ट्या इराणनेच अरबांना जिंकले असे म्हणतात. -- चंगेज खान आणि हलाकु खान यांनी इराणची खरी वाताहत केली! निशापूर, मर्व, हेरात आणि समरकंद यांसारखी वैभवशाली शहरे त्याने अक्षरशः जमिनीदोस्त केली. चंगेज खानच्या मृत्यूनंतर काही दशकांनी त्याचा नातू हलाकु खान आला. हलाकुचे सर्वात मोठे 'लक्ष्य' म्हणजे बगदाद. तेव्हा बगदाद हे अब्बासी खलिफा मुस्तसिम याचे केंद्र होते. हा अब्बासी स्वतःला संपूर्ण मुस्लिम जगाचा आध्यात्मिक प्रमुख मानत असे. खलिफाने शरण येण्यास नकार दिल्यावर हलाकुने बगदादला वेढा घातला आणि शहराचा पाडाव केला. यानंतर हलाकू ने जी मुसलमानांची कत्तल झाली ती इतिहासातील सर्वात भीषण कत्तलींपैकी एक मानली जाते. हलाकुने खलिफाला एका गालिच्यात गुंडाळून त्याच्यावरून घोडे धावण्यास लावले आणि त्याला मारून टाकले. यासह ५०० वर्षांची अब्बासी खिलाफत अधिकृतपणे संपली. हलाकु क्रूर होता पण त्याने मराघे येथे त्या काळातील सर्वात मोठी खगोलशास्त्रीय वेधशाळा बांधली होती. हलाकु खान - त्याचे मुख्य उद्दिष्ट पश्चिम आशियातील उरलेली मुस्लिम सत्ता संपवणे हे होते. हेच कार्य आज अमेरिका करते आहे असे तुम्हाला म्हणायचे आहे का?
लेखनविषय:
लेखनप्रकार
लोकहो, म्हंटलं इराणवर एक लेख व्हायला हवा. सध्या त्याच्या विरोधात अमेरिका व इस्रायल यांचं युद्ध चालू आहे. तर इराणचा इतिहासाचा व आजच्या परिस्थितीचा धावता आढावा घ्यावा असा बेत आहे. तर सुरुवात कुठनं करायची? म्हंटलं नुकताच अली खामेनेई मेलाय तर त्याच्यापासनं लेख सुरू करूया. हा इसम शियांचा प्रमुख होता असा दावा आहे. क्याथलिकांचा पोप असतो तसा. मग हा पॅट्रिस लुमुंबा नामे नास्तिक कम्युनिस्ट विद्यापीठात काय झक मारायला गेला होता का? नाही. मुळीच नाही. तो तिथे कम्युनिस्ट क्रांती भक्कम करणं शिकायला गेला होता. होय, इ.स. १९७९ ची खोमेनीची इराणातली धार्मिक क्रांती कम्युनिस्ट ढाच्यावर आधारित आहे.

‘नेक्सस’ युवाल नोव्हा हरारी(ऐसी अक्ष्ररे-४०)

Bhakti ·
लेखनविषय:
‘नेक्सस’ युवाल नोव्हा हरारी 1 युवाल नोव्हा हरारी हा असा इतिहासकार आहे की, जो केवळ इतिहासात रमायला शिकवत नाही, तर इतिहासाने माणसाचे जीवन कसे बदलत गेले हे पाहायला शिकवतो.

धूम्राक्ष, मानवीय इच्छा पूर्ण करणारा दैत्य

विवेकपटाईत ·

कॉमी 07/02/2026 - 13:11
टॉल्किन साहेबांचे एक पुस्तक नुकतेच (मृत्यूपश्चात) प्रकाशित झाले - The Bovadium Fragments ह्यात गाड्या व्हीलन आहेत.
As scholars pour over fragments unearthed from the archeological site at Bovadium, a handful of documents written in two languages reveal the secrets of this ancient place, which have lain buried for centuries. Evidently once upon a time a Daemon arose in nearby Vaccipratum, who by his cunning devised abominable machines, which he called Motores. The people of Bovadium first became enamoured of these machines, but soon became their slaves; and as the roads were gridlocked and the city polluted by their fumes, the end of Bovadium was nigh.

कॉमी 07/02/2026 - 13:11
टॉल्किन साहेबांचे एक पुस्तक नुकतेच (मृत्यूपश्चात) प्रकाशित झाले - The Bovadium Fragments ह्यात गाड्या व्हीलन आहेत.
As scholars pour over fragments unearthed from the archeological site at Bovadium, a handful of documents written in two languages reveal the secrets of this ancient place, which have lain buried for centuries. Evidently once upon a time a Daemon arose in nearby Vaccipratum, who by his cunning devised abominable machines, which he called Motores. The people of Bovadium first became enamoured of these machines, but soon became their slaves; and as the roads were gridlocked and the city polluted by their fumes, the end of Bovadium was nigh.
लेखनविषय:
लेखनप्रकार
मानव ऋषीने दगड घासून अग्नी प्रज्वलित केला. अग्नीला प्रसन्न करण्यासाठी प्रार्थना केली “हे अग्नी, सुख-समृद्धी दे, शत्रूंवर विजय मिळवून दे.” त्याने उच्चारले: “अग्नये स्वाहा. इदं अग्नये इदं न मम.” तेवढ्यात हवनकुंडातून एक धुरकट अशरीरी आकृती प्रकट झाली. हात जोडून उभी. ती म्हणाली, “मी धूम्राक्ष, अग्निपुत्र. धूर हेच माझं भोजन. मानवाच्या इच्छा पूर्ण करणं, हाच माझा धर्म.” ऋषीने मधमाश्यांच्या पोळ्याचं मध मागितलं. धूम्राक्षने धूर निर्माण केला, मधमाश्या निघून गेल्या. ऋषीला खोकला आला, पण मधुर मध चाखायला मिळाला.

"बौद्ध मूर्तीशास्त्र"

Bhakti ·

कंजूस 30/01/2026 - 17:24
बरीच माहिती गोळा केली आहे. शाळेत असताना ' गौतमाला बोधी वृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले आणि तो बुद्ध झाला' हे वाचलेले. पण कोणते ज्ञान हे काही कुणी सांगायला तयार नव्हते. बुद्ध आणि त्याचा धम्म - बाबासाहेबांचं हे पुस्तक वाचल्यावर कळलं.

गामा पैलवान 31/01/2026 - 00:05
भक्ती, कृपया या वाक्यातले कृबुसंस्करण उलगडावे :
ती डाळिंबाशी संबंधित आहे, जी तिला मुलांऐवजी खाण्यास शिकवली जात असे.
याचा अर्थ का होतो ? बाकी, इतके देव प्रचलित असतील तर बौद्ध हा नास्तिक पंथ का मानला जातो? याचं कारण असंय की, तो वेदांचे आधिपत्य नाकारतो. नास्तिक हा शब्द देवांचे अस्तित्व नाकारण्याशी संबंधित नाही. वेदांचे आधिपत्य नाकारले तरी वेद हेच मूळ श्रुती आहेत असं बौद्ध मानतात. आ.न., -गा.पै.

Bhakti 31/01/2026 - 11:30
ती डाळिंबाशी संबंधित आहे, जी तिला मुलांऐवजी खाण्यास शिकवली जात असे.
हरिती हिची कथा हरिती स्वतःच्या अनेक मुलांच्या उदरनिर्वाहासाठी इतरांची मुले चोरून खात असे .दुखी पालकांनी बुद्धांकडे तक्रार केली. बुद्धांनी हरितीला धडा शिकवण्यासाठी तिच्या सर्वात लाडक्या मुलाला पिंगलला लपवून ठेवले .मूल न सापडल्याने ती व्याकुळ झाली. बुद्धांनी तिला जाणीव करून दिली की, हजारो मुले असूनही एका मुलासाठी तुला इतके दुःख होत आहे, तर ज्यांची एकमेव मुले तू खाल्लीस, त्यांना किती दुःख झाले असेल?आपली चूक लक्षात आल्यावर हरितीने माफी मागितली आणि बुद्धांची अनुयायी बनली. ती मुलांची संरक्षक देवी म्हणून पूजली जाऊ लागली. पण तरीही तिला मांसभक्षणाची आठवण होई.रक्तप्राशन करावे वाटे तेव्हा रक्ताप्रमाणेच लाल रंगाचा ज्याचा रस ते डाळींबाचे दाणे त्याचा रस हे रक्ताचे रूपक होऊन ही तृषा शमवत.
याचं कारण असंय की, तो वेदांचे आधिपत्य नाकारतो.
>ज्याला वेदांत समजले तो कधीच म्हणणार नाही की बुद्धांनी वेदांना नाकारले.बुद्धांनी वेदांभोवती पसरलेल्या अहंकारला नाकारले आहे. वेदांतातला अद्वैत आणि बौद्ध शिकवणीतला निर्वाण जो जाणतो तो अशा अहंकारात कधीच फसणार नाही
.
इतके देव प्रचलित असतील तर बौद्ध हा नास्तिक पंथ का मानला जातो? स्वतः बुद्धांनी याला विरोध केला.पण मनात अनुयायांनी हा पसार वाढवला हे वरती मी स्पष्टच लिहिले आहे की !

In reply to by Bhakti

Bhakti 31/01/2026 - 11:36
पण मनात अनुयायांनी हा पसार वाढवला ऐवजी असे वाचा... पण मुळात अनुयायांनी हा (मुर्ती,कर्मकाण्ड) पसारा वाढवला.

In reply to by Bhakti

गामा पैलवान 01/02/2026 - 15:26
भक्ती, माझ्या मते गौतमबुद्ध स्वत: वेदांविषयी आदर बाळगून आहे. मात्र त्याच्या अनुयायांच्या बाबतीत असं ठामपणे म्हणता येईल का? मी साशंक आहे. बाकी, बुद्धाने स्वत:हून कसल्याही तत्त्वज्ञानाचा प्रचार वा प्रसार केला नाही. पहिला बौद्ध तत्त्वज्ञ नागार्जुन होऊन गेला. तो बुद्धाच्या नंतर तीनचारशे वर्षांनी जन्मला होता. यावरून बौद्ध हा वेगळा धर्म न मानता पारंपरिक भारतीय पंथ मानला पाहिजे. कुठल्याही पारंपरिक भारतीय पंथात दैवते शिरतात तशीच यांतही शिरली. वैविध्यपूर्ण दैवते हा भारतीय जनमानसाचा अविष्कार आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

सोत्रि 01/02/2026 - 20:54
गामाजी,
गौतमबुद्ध स्वत: वेदांविषयी आदर बाळगून आहे.
हे जरा डिटेलमधे एक्सप्लेन कराल का?
बुद्धाने स्वत:हून कसल्याही तत्त्वज्ञानाचा प्रचार वा प्रसार केला नाही. बौद्ध हा वेगळा धर्म न मानता पारंपरिक भारतीय पंथ मानला पाहिजे
बुद्धाने वयाच्या ३५ -८० वर्षांपर्यंत त्याच्या शिकवणीचा त्याच्या प्रवचनांमधून (discourses) तो जिथे जिथे गेला तिथे तिथे प्रसार केला. त्याच प्रवचनांचं डॅाक्युमेंटेशन पुढे त्रिपीटकात केलं गेलं, त्याचा पश्चात. बुद्धाने कोणताही धर्म स्थापन केला नाही, धर्म (धम्म) ह्या शब्दाची योग्य व्याख्या त्याने विषद केली त्याच्या शिकवणूकीतून (प्रवचनांमधून), तसेच कोणताही पंथही त्याने स्थापन केली नाही. त्याच्या ध्यानप्रणालीची अनुपासना करणाऱ्या साधकांच्या समूहाला संघ म्हणतात पण त्यात कसलंही कर्मकांड नसल्याने, गुरू आणि गादी (उत्तराधिकारी) नसल्याने, कोणत्याही विशिष्ट जाती, धर्म किंवा विचारसरणीच्या लोकांसाठी मर्यादित नसल्याने तो पंथ नाही. - (अभ्यासू) सोकाजी

In reply to by सोत्रि

गामा पैलवान 02/02/2026 - 02:43
सोत्रि,
हे जरा डिटेलमधे एक्सप्लेन कराल का?
माझी माहिती मर्यादित आहे. पण तेव्हढ्यावर निष्कर्ष काढता येतो. जर बुद्ध वेदांविषयी आदर बाळगून नसेल तर तसं स्पष्ट म्हंटलं असतं त्यानं. बाकी माझं ढोबळ विधान स्पष्ट करावयास गुग्गुळाचार्य आहेतंच : https://www.google.com/search?q=buddha+respected+vedas खरंतर तुम्हालाच याविषयी सखोल जाण आहे. बौद्ध हा पंथ नसेल तर महायान, हीनयान वगैरे काय म्हणावेत? संप्रदाय म्हणावेत का? माझी माहिती अत्यंत मर्यादित असल्याने मला हा प्रश्न पडला आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

सोत्रि 02/02/2026 - 14:02
गामाजी, ते ढोबळ विधान आहे असे म्हणता आहात तर ते तिथेच सोडून देवूयात. महायान, थेरवाद (हीनयान), वज्रयान, नवयान हे सगळे संप्रदाय म्हणता येतील कारण गटांची स्वतःची वेगळी तत्वज्ञानात्मक मांडणी आहे जरी मूळ आधारस्तंभ 'बुद्ध, धम्म आणि संघ' हेच आहेत. - (अभ्यासू) सोकाजी

In reply to by Bhakti

सोत्रि 02/02/2026 - 14:46
ज्याला वेदांत समजले तो कधीच म्हणणार नाही की बुद्धांनी वेदांना नाकारले.बुद्धांनी वेदांभोवती पसरलेल्या अहंकारला नाकारले आहे.
काय आहे वेदांत जो समजावतो की बुद्धांनी वेदांना नाकारले नाही? - (जिज्ञासू) सोकाजी

In reply to by सोत्रि

Bhakti 02/02/2026 - 16:48
सुत्त निपत ८४६- ना वेदगु दिठथिया ना मुतिया सा मनामेति नही तन्मयोसो…. जो वेद जाणतो त्याला खोटा अहंकार येत नाही. तो ऐकीव गोष्टी आणि भ्रमांचा परिणाम करत नाही.
वेदांतातला अद्वैत आणि बौद्ध शिकवणीतला निर्वाण जो जाणतो तो अशा अहंकारात कधीच फसणार नाही

In reply to by Bhakti

सोत्रि 02/02/2026 - 18:37
भक्ती, वेदगु शब्दात वेद आलेलं असलं तरी त्यात अभिप्रेत असलेला अर्थ ४ वेदांचा वेद नाही. त्याची फोड आणि अर्थ पाली भाषेत आणि त्रिपिटकाच्या परिप्रेक्षात खालीलप्रमाणे: वेद म्हणजे सर्वोच्च ज्ञान अणि गु म्हणजे प्राप्त केलेला. बुद्धाला प्राप्त झालेलं ज्ञान ह्याचा बेस वेदना (संवेदना) आहे, सतीपट्ठाण सुत्तात ह्याचे सविस्तर विष्लेषण आहे. त्यानुसार वेदना पर करून सत्यापर्यंत पोहोचलेला म्हणजे वेदगु. वेद जाणणारा म्हणजे वेदगु हे शब्दसाधर्म्यामुळे झालेलं अशुद्ध भाषांतर आहे. मूळ प्रश्न होता, काय आहे वेदांत जो समजावतो की बुद्धांनी वेदांना नाकारले नाही? त्याचं उत्तर मिळालं नाही. तसेच नविन मुद्दा आला ह्या प्रतिसादात, वेदांतातला अद्वैत आणि बौद्ध शिकवणीतला निर्वाण. हे दोन्ही एकच आहे का? आणि त्या दोन्हीच्या परिप्रेक्षात अहंकार म्हणजे तुम्हाला नेमकं काय अभिप्रेत आहे? - (जिज्ञासू) सोकाजी

In reply to by सोत्रि

कॉमी 02/02/2026 - 19:06
मग ते इतर संदर्भ वेदांचेच होते हे तरी कसे समजले ? तीन वेद जाणणारा हा हे इतर तीन विद्या जाणणारा नसेल कशावरून ? त्रिपिटक जर तीन आहेत तर इतर विद्या सुद्धा तीन शाखांमध्ये विभागलेल्या असू शकतात.

कॉमी 01/02/2026 - 09:44
बुध्दाने वेदाचे अधिपत्य नाकारले. बुद्धकाळात किंवा सर्वात जुन्या पाली लिखित साहित्यात वेदांचा उल्लेख आहे का ? बुद्ध वेदांबद्ल स्पष्टपणे बोलताना कुठेही आहे का ?

In reply to by कॉमी

सोत्रि 01/02/2026 - 21:20
पाली त्रिपिटकामध्ये (सर्वात जुने बौद्ध साहित्य) वेदांचा आणि तत्कालीन वैदिक परंपरेचा अत्यंत स्पष्ट आणि सविस्तर उल्लेख आढळतो. बुद्ध केवळ वेदांबद्दल बोललेच नाहीत, तर त्यांनी त्या काळातील वैदिक कर्मकांडांची आणि तत्त्वज्ञानाची तर्कशुद्ध चिकित्साही केली आहे. पाली साहित्यात वेदांना 'तेविज्ज' (त्रिवेद) असे म्हटले आहे. बुद्धांच्या काळात प्रामुख्याने तीनच वेद प्रचलित होते: ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेद. (अथर्ववेदाला नंतरच्या काळात वेदाचा दर्जा मिळाला). अनेक सुत्तांमध्ये बुद्धाने वेदांवर आणि त्यांच्या अधिकारावर भाष्य केले आहे. त्यापैकी काही प्रमुख संदर्भ: तेविज्ज सुत्त (दीघ निकाय): हे सर्वात महत्त्वाचे सुत्त आहे. यात दोन ब्राह्मण बुद्धांकडे येऊन विचारतात की, "कोणता वेद मार्ग खरा आहे?" बुद्ध त्यांना विचारतो की, "ज्या वेदांचे तुम्ही पठण करता, त्या मंत्रांच्या ऋषींनी कधी ब्रह्मदेवाला प्रत्यक्ष पाहिले होते का?" जेव्हा उत्तर 'नाही' येते, तेव्हा बुद्ध सांगतात की, ज्यांनी स्वतः पाहिलेले नाही अशांच्या परंपरेचे आंधळेपणाने पालन करणे म्हणजे "आंधळ्यांच्या रांगेसारखे" (अंधवेणु) आहे, जिथे पुढच्याला दिसत नाही आणि मागच्यालाही नाही. अस्सलायन सुत्त (मज्झिम निकाय): यामध्ये बुद्ध वेदांवर आधारित 'चातुर्वर्ण्य' व्यवस्थेला आव्हान देतो. तो म्हणतो की, निसर्गात सर्व माणसे समान आहेत आणि श्रेष्ठत्व हे जन्मावरून (किंवा वेदांच्या ज्ञानावरून) नसून ते कर्मावरून ठरते. सुत्त निपात (ब्राह्मणधम्म सुत्त): यात बुद्ध सांगतो की, प्राचीन ऋषी हे चारित्र्यसंपन्न होते, पण नंतरच्या काळात वेदांच्या नावाखाली प्राण्यांचे बळी देणे आणि कर्मकांड करणे सुरू झाले, जे चुकीचे आहे. - (अभ्यासू) सोकाजी

प्रचेतस 01/02/2026 - 09:57
लेख खूपच संक्षिप्त वाटला, नव्हे आहेही. बौद्ध मूर्तीशास्त्र म्हटलं की जरा अधिक उपापोह हवा होता. मूर्ती ओळखण्याची प्रमुख साधने म्हणजे मुद्रा, लांच्छन, वृक्ष. ह्यांचे अधिक वर्णन फोटोसहित हवे होते. गौतम बुद्ध म्हणजे शाक्यमुनी, भविष्यातील बुद्ध मैत्रेय ह्यांचा उल्लेख कुठे दिसला नाही. हे सर्व मानुषी बुद्ध. त्यांच्या आधीचे विपश्यी, शिखी, विश्वभू, क्रकुच्छन्द, कनकमुनी, काश्यप ह्यांचा उल्लेखही आवश्यक होता. परत बौद्ध मूर्तीकलेत गांधारकला अधिक सुप्रसिद्ध आहे. त्याचा आढावा घ्यायला हवा होता. बाकी वेरुळ येथे महायान आणि वज्रयान परंपरेतील अनोखी शिल्पे पाहायला मिळतात. जिज्ञासूंना मानुषी बौद्ध, ध्यानी बुद्ध, स्त्री बोधीसत्व, तारा, महामायुरी, पद्मपाणी, वज्रपाणी, जंभाल, हरिती, रक्तअवलोकितेश्वर, सुजाता, मैत्रेय अशी अनोखी शिल्पे पाहायची असतील तर जरुर तेथे जाऊन ती पाहावीत.

In reply to by प्रचेतस

कंजूस 01/02/2026 - 20:18
यावर एक यूट्यूबवर मालिकाच काढावी. म्हणजे व्हिडिओंची लिंक दिली की झाले काम. वेरुळच्या लेण्यांवरही मालिका असावी. एकदा सगळे फोटो जमा करायचे आणि ते जोडायचे स्लाईडशोमध्ये आणि त्याला मागून नंतर आवाज द्यायचा.

In reply to by प्रचेतस

Bhakti 02/02/2026 - 16:58
अर्थात हे सर्व अभ्यासक्रमात सांगितले.पण उणेपुरे सात दिवस(साधारण ११ तास ) त्यात इतकेच आकलन झाले.बाकी बोधिसत्वचा काहीतरी विशिष्ट क्रम आहे ,जो मला नीट समाजाला नाही ...हे मी वरती लिहिलेच आहे.
रक्तअवलोकितेश्वर,
वेरुळंंमधील बौद्ध शिल्प त्याकाळात नैसर्गिक रंगाने रंगवले होते .अगदी बौद्ध पुस्तकांत सांगितल्याप्रमाणे!परंतु कालाच्या प्रवाहात ते रंग नाहीसे झालं.रंगीत शिल्प तेव्हा किती सुंदर दिसत असतील.गांधार ,मथुरा शैली अजून फरक थोडा थोडा समाजात आहे .शैव ,वैष्णव अभ्यासक्रमातही तशा मूर्तीशैली फरक सांगितला जायचा.

In reply to by प्रचेतस

लेखन संक्षीप्त असलं तरी, लेखिकेने सुरुवातीलाच लिहिले होते की, 'चारो तरफ ज्ञान बट रहा है, जहाँ से मिले लपेट लो' आपल्याला जितके उमजले तितके लिहिणे ही चांगली गोष्ट आहे. आता उहापोह म्हटलं की जाणकारांनी लिहिले पाहिजे. जसे की, धाग्याच्या निमित्ताने सोत्रि यांनी अनुषांगिक अशी उत्तम माहिती भरली आहे. आपल्यासारखा जाणकारांनी अशा धाग्यात भर घातली पाहिजे. असे धागे समृद्ध होतात असे वाटते. बौद्ध धर्मातील हिनयान (थेरवाद) आणि महायान या दोन प्रमुख पंथांमध्ये तत्त्वज्ञानासोबतच मूर्तीशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत मूलभूत आणि रंजक फरकआहेच. या फरकांचा उगम बुद्धत्वाकडे पाहण्याच्या त्यांच्या दृष्टिकोनातून होतो. आणि मग तशी सविस्तर मांडणी केली पाहिजे असे वाटते. हीनयान यात बुद्ध एक मानवी महापुरुष आणि मार्गदर्शक मानले गेले. सुरुवातीच्या काळात बुद्धांना मानवी रूपात दाखवणे वर्ज्य होते. त्यांच्या उपस्थितीसाठी पदकमल, धम्मचक्र, बोधिवृक्ष किंवा रिकामे आसन वापरले जात होते. साधी आणि संयमित कला स्तूप वगैरे. महायान यात, बुद्धांना मानवी रूपात आणि भव्य स्वरूपात पूजले जाते. यामध्ये विविध मुद्रा (उदा. भूस्पर्श, अभय, ध्यान) अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. महायानमध्ये अवलोकितेश्वर, मंजुश्री, तारा, वज्रपाणी अशा अनेक बोधिसत्वांच्या अलंकारिक आणि विविध आयुधे धारण केलेल्या मूर्ती आढळतात. अत्यंत सुशोभित, दागिने, मुकुट आणि भव्यता असलेली कला. बुद्धाच्या काळात मूर्ती शक्य नव्हते तर पहिली मूर्ती केव्हा आली त्याबद्दल असे म्हटल्या जाते की, बुद्धाची पहिली मानवी मूर्ती ग्रीक-बौद्ध कलाशैलीतून निर्माण झाली. जेव्हा ग्रीक लोक भारताच्या संपर्कात आले, तेव्हा त्यांच्याकडे त्यांच्या देवांना मानवी रूपात कोरण्याची जुनी परंपरा होती. ग्रीक मूर्तिकारांनी बुद्धाला मानवी शरीर दिले, ज्याला त्यांनी 'अपोलियन बुद्ध ' असे म्हटले. अल्फ्रेड फुशे यांची ही कल्पना आहे, अर्थात ही सर्व गांधार शैली. उदा. केस भारतीय परंपरेत बुद्धाचे केस मुंडण केलेले किंवा कुरळे दाखवले जातात, पण अपोलोनियन बुद्धामध्ये ते ग्रीक शैलीतील लाटांसारखे आणि वरच्या बाजूला बांधलेले असतात. चेहरा अत्यंत रेखीव, सरळ तीक्ष्ण नाक आणि अंडाकृती चेहरा असतो, जो हुबेहूब ग्रीक शिल्पांसारखा दिसतो. बुद्धाने परिधान केलेले 'चीवर' (वस्त्र) हे साध्या कापडासारखे नसून ग्रीक 'टोगा' जाड असे असते. असे असले तरी, बुद्धाची मूर्ती ही गांधार शैलीची 'मथुरा शैली' ची यावर अभ्यासकात वाद आहेत. खालील संदर्भ पुस्तके जाणकारांनी वाचून सविस्तर लिहावे असे वाटले. संदर्भ ः १. अल्फ्रेड फूशेचं 'आर्ट ग्रेको-बौद्धिक दु गांधार' फ्रेंचभाषेतील पुस्तक भाषेत असलं तरी, गांधार कलेतील मूर्तीशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी यातील चित्रे आणि विश्लेषण जागतिक स्तरावर प्रमाण मानले जाते. २, 'बुद्धाची पहिली मानवी मूर्ती' आणि ती तयार होण्यामागची प्रक्रिया यावर सविस्तर निबंध.

टर्मीनेटर 02/02/2026 - 18:54
एकतर विषय एकदम फालतू... म्हणजे काही ठराविक लोकांसाठी रसाचा असू शकेल... त्यात ज्यांना ह्या फालतू विषयात रस असेल त्यांच्या प्रश्नांना नेमके उत्तर देता येत नसेल तर काय उपयोग आहे असल्या फालतू विषयांचा?
अर्थात हे सर्व अभ्यासक्रमात सांगितले.पण उणेपुरे सात दिवस(साधारण ११ तास ) त्यात इतकेच आकलन झाले.
हे उत्तर समाधानकारक ठरेल का? तुमच्या लिखाणाला कमी किंवा निरर्थक ठरवायचा कोणताही हेतू नाही, पण मिपावर खूप व्यासंगी लोकं आहेत, उगाच तुम्हाला उस्फूर्त लेखन करता म्हणुन हरभऱ्याच्या झाडावर चढवणाऱ्या लोकांच्या नादी लागून असले लेखन इथे करू नका असे सांगावेसे वाटत आहे!

In reply to by टर्मीनेटर

अभ्या.. 02/02/2026 - 19:41
परफेक्ट..... ab .
मिपावर खूप व्यासंगी लोकं आहेत, उगाच तुम्हाला उस्फूर्त लेखन करता म्हणुन हरभऱ्याच्या झाडावर चढवणाऱ्या लोकांच्या नादी लागून असले लेखन इथे करू नका असे सांगावेसे वाटत आहे!
अनुभव काय? ........ ;) बाहुबलीला लै अनुभव आहे त्याला विचारयला पाहिजे..

सोत्रि 02/02/2026 - 19:47
असले लेखन इथे करू नका असे सांगावेसे वाटत आहे!
टर्मीनेटर, लेखाच्या विस्कळीत मांडणीबद्दल तुमच्याशी १००% सहमत आहे. त्याबद्दल दुमत नाही. (गीतारहस्य ह्या मालिकेतही विस्कळीत मांडणीमुळे चांगला विषय वाया गेला होता हे माझं वैयक्तिक मत आहे.) पण त्यामुळे एकदम लेखन करू नका असं सुचवणं, तेही विषय फालतू आहे असे एकदम जजमेंटल होऊन, ये बात कुछ हजम नही हुइ! - (जजमेंटल नसलेला) सोकाजी

In reply to by सोत्रि

कॉमी 02/02/2026 - 19:50
सहमत. अगदी नाउमेद न करता तितक्याच ठामपणे हेच म्हणणे मांडणे शक्य होते.

In reply to by सोत्रि

टर्मीनेटर 03/02/2026 - 00:26
पण त्यामुळे एकदम लेखन करू नका असं सुचवणं, तेही विषय फालतू आहे असे एकदम जजमेंटल होऊन, ये बात कुछ हजम नही हुइ!
सोकाजीनाना... आपला मिपा परिवार खूप मोठा आहे आणि त्यात आपली काही हक्काची माणसे आहेत. भक्ती ताई त्या हक्काच्या माणसांपैकीच आहेत. माझा प्रतिसाद थोडा (थोडा काय जास्तच) रुड वगैरे वाटला असेल, पण फार काही स्पष्टीकरण न देता एवढेच सांगतो "समझने वाले समझ गये हैं, ना समझे... ना समझे वो 'खिलाडी' हैं" 😀

गामा पैलवान 02/02/2026 - 21:19
सोत्रि,
वेदांतातला अद्वैत आणि बौद्ध शिकवणीतला निर्वाण. हे दोन्ही एकच आहे का?
प्रश्न अतिशय रोचक आहे. निर्वाणाची अद्वैतासोबत तुलना होऊ शकते का असाही एक उपप्रश्न पडतो. शिवाय पुनर्जन्माचाही प्रश्न आहेच. अद्वैत साधेपर्यंत आत्मा पुनर्जन्म घेत राहतो ( वा मायेमुळे घ्यावा लागतो ). तर मग निर्वाण साधेपर्यंत पुनर्जन्म कोण घेतं? आ.न., -गा.पै.

कंजूस 02/02/2026 - 21:41
मी नाही त्यातला. लेख आवडला म्हणतो. नवअभ्यासकांना नवीन विषयात प्रश्न पडतात. त्यांना हुरुप येतो. त्याची उत्तरे देण्याचा कुणी प्रयत्न करतो. मलाही बुद्ध समजला नाही आणि गीताही नाही. पुस्तके वाचतो. त्यात कुणी काय लिहिले ते सांगतो. दोन्ही विषय गहन आहेत. पण श्रद्धा अती थोर आहे. त्यावर जग चालते. ख्रिश्चन लोक ( फादर) तुकारामाच्या साहित्याचा अभ्यास करतात. कारण तुकाराम अतिशय सोप्या भाषेत लोकांना मर्म सांगतात. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले.... पंडीत लोक फुटपट्टी घेऊन जातात अनुनयी श्रद्धा.

In reply to by कंजूस

Bhakti 02/02/2026 - 21:57
हो ना कंकाका, माझा हेतू कायमच स्वछ असतो.मिपावर लेख द्यायला आवडयचं, फार " व्यासंगी " लोकांचे मत समजतात. पण पूर्ण अभ्यासू असल्याशिवाय लेख कशाला इथे द्यायचे.?? मी जर अभ्यासक असते तर कशाला लेख लिहिले असते?? "पुस्तकच लिहिले नसते का??" पण एकंदरीत अभ्यासक नसल्यास इथे लिहू नये, हा मोठा धडा आज इथे मिळाला. आपलं चेपूच बरं, नॉन अभ्यासाकांना! उरलो आता वाचनापुरते!!!

In reply to by Bhakti

गामा पैलवान 02/02/2026 - 23:57
भक्ती, पांघरा गेंड्याची कातडी आणि लिहा हो बेधडक. एक ठेच लागली तर वाचनमात्र होताय! काय म्हणावं तुम्हांस. उघडं पडायची वेळ आली तेव्हा मी कसा बघा ढोबळमानाने मोघम मार्ग पत्करला. मध्यममार्ग म्हणतात तो हाच तर नव्हे? आ.न., -गा.पै.

In reply to by Bhakti

कंजूस 03/02/2026 - 04:22
कालच्या प्रतिसादात एक वाक्य मी लिहिलं होतं पण ते नंतर गाळलं होतं. आणि तसंच झालं. यापुढे " Bhakti लेखन करणार नाही." आणि तेच तिने लिहिलंय.

लेखन करीत राहा. लोक टीका करीत राहतात. लेखनात यंव नाही, लेखनात त्यंव नाही, हे असं सगळं चालायचंचं. आपल्याला वाटतं लिहायचं तरी नक्की लिहा. कोणताही प्रस्थापित अभ्यासक-लेखक हा पहिल्यांदा नवलेखकच असतो, तेव्हा आपण नवलेखक आहोत असे समजून लिहीत राहावे. शुभेच्छा. -दिलीप बिरुटे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टर्मीनेटर 03/02/2026 - 10:17
भक्तीताई टिकेला घाबरून पळ काढणाऱ्यांतल्या नाहीत हो सर, त्या 'स्ट्रॉंग वुमन' आहेत. आणि 'त्या' प्रतिसादाचा रोख नक्की कशाकडे आहे हे समजण्या एवढ्या 'स्मार्ट' देखील आहेत. त्यामुळे चिंता नसावी, त्या लिहित्या रहातील ह्याची खात्री बाळगा!

In reply to by टर्मीनेटर

अभ्या.. 03/02/2026 - 19:18
तुमचे पर्सनल व्हॅल्युएशन तुमच्यापाशी, इथे मिपावर लिहू नका असे सुचवणेच चुकीचे आहे. लेखकाने कीती स्मार्ट आणि स्ट्राँग राहायचे ते लेखकाने स्वतः ठरवायचे, कुणी लिहू नका म्हणले तर त्यातून काय अर्थ निघतो हे बघण्याआधी "तू कोण सांगणार?" हे विचारावे अशीच माझीतर अपेक्षा आहे. अर्थात कित्येक पटाईत लेखकांनी काहीही लिहिण्यापेक्क्षा काही लिहूच नये अशी सर्वसामान्य अपेक्षा असताना तिकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष्य करुन भक्तीताईसारख्या मिपाधर्म सांभाळणार्‍या अस्सल मिपाकर लेखिकेला इथे लिहू नको असे सांगणे खरेच दुर्दैवी आहे. टर्मीभाऊंची मनातली सच्छील इच्छा समजत असली आणि त्यांचा प्रांजळ स्वभाव कळत असला तरी......... टर्मीनेटर तुम्हारा इधर चुक्याच....

कंजूस 03/02/2026 - 10:38
टीका केल्याने / झाल्याने बरेच नवलेखक येथून पळाले आहेत. आपलं लेखन डायरीत लिहून ठेवलं तर कुणीच वाचणार नाहीये, त्यापेक्षा इकडे चार राडपाण्याचे शिंतोडे उडवून घेतल्याने बरे वाटते .[ दाग अच्छे हैं. किंवा कार्यक्रम पाहा साडे माडे शिंतोडे.]

In reply to by कंजूस

Bhakti 03/02/2026 - 11:50
आपलं लेखन डायरीत लिहून ठेवलं तर कुणीच वाचणार नाहीये, त्यापेक्षा इकडे चार राडपाण्याचे शिंतोडे उडवून घेतल्याने बरे वाटते .[ दाग अच्छे हैं. किंवा कार्यक्रम पाहा साडे माडे शिंतोडे.]
एकदम बरोब्बर काका, हाच सरळ स्वच्छ हेतू असतो सोशल मीडियावर लिहिताना. पण दरवेळी आपल्यालाच आत्मपरीक्षण करायची वेळ येत असेल तर... जरा थांबलंच पाहिजे,बदलायला पाहिजे हॆ जाणवत आहे.

तरी पुन्हा सांगतो. मिपावर(किवा कुठल्याही सोमिवर) व्यक्त होण्याआधी "फाट्यावर मारणे" हा मुख्य गुण अंगी बाणवुन घ्यावा लागतो. ज्ञानोबांनी सांगितलेच आहे " जे की राजहंसाचे चालणे........" पूर्ण ओवी आठवत नाही पण म्हणुन कावळ्याने चालुच नये की काय? असे काहीसे.

गोरगावलेकर 03/02/2026 - 13:24
भक्ती ताई, मिपावर सल्ला देण्या इतका माझा अभ्यास नाही . तरीही सांगते, निराश होऊ नका. टर्मीनेटर यांनी पूर्वी कोणाच्या तरी काश्मीर भटकंतीबद्दल असाच एक संक्षिप्त प्रतिसाद दिला होता तो बऱ्याच जणांना रुचला नव्हता. पण नंतर त्यांनी त्यामागचा हेतू स्पष्ट केला तेव्हा तो बहुतेकांना आणि मुख्य म्हणजे ज्याला उद्देशून लिहिला होता त्यालाही पटला. असाच एक प्रतिसाद माझ्या लेखातील फोटोंबद्दलही होता. नंतर माझ्या पुढील लेखात सुधारणा झाल्याबद्दल त्यांनी कौतुकही केले. तेव्हा त्यांच्या स्पष्ट बोलण्यात निश्चितच काही चांगला हेतू असेल. लिहिते रहा.

गवि 03/02/2026 - 13:37
लिहीत रहा पण रँडम असंख्य विषयांवर वरवर लिहिण्याऐवजी आपल्याला आतून प्रचंड उर्मी येईल तेव्हा जे काही मनातून येईल ते लिहा. ते नेहमीच चांगलं असेल. लोकांना ते आवडेल आणि एखाद दुसऱ्याला नाही आवडलं तरी ते पटलं नाही या स्वरूपात असेल. जर आत्मपरीक्षण करण्याची गरज जाणवली असेल तर ते मोठं यश आहे. तुटक किंवा कडवट होऊन आता लेखनच थांबवते असं म्हणण्यात अर्थ नाही. याची कारणे दोन: १. मनातून ते पटत नसतं. नुसतं म्हणायला म्हटलेलं असतं. २. खरंच लिहिणं बंद केलं तर जगाला काही फारसा फरक पडत नसतो. आपण विस्मरणात विलीन होऊन जातो. तर लिहिण्याची गरज आपल्याला आहे हे मान्य करून "आता थांबले पाहिजे" वगैरे असे कोणतेही जाहीरनामे करणे आवश्यक नाही. लोकांसाठी आपण लिहीतो. पूर्ण स्वांत सुखाय लिहिणे हा भ्रम आहे. लोकांपुढे आपण ठेवतो तेच मुळात त्यांना आवडेल अशा अपेक्षेने. त्यांना त्यातून आनंद मिळाला पाहिजे. जशी रेसिपी तसंच हे. मग ते चेक न करता, अशुद्ध (भाषा अशुद्ध नव्हे, लेखन टंकन), शब्दांची आगगाडी, सुरुवात कुठून झाली आणि शेवट कुठे होतोय त्याचे भान टाळून असे लिहीले तर लोकांना ते वाचताना आनंद कसा मिळेल ! ? अर्थ, भावार्थ हे पुढचे पुढे राहिले. तेव्हा लिहिणे थांबवू नका. विचार करा. आणि अभ्यासोनि प्रकटा. प्रचू, लिहित बरोबर की लिहीत?

प्रचेतस 03/02/2026 - 14:46
लिहिणे थांबवण्याचे काहीच कारण नाही, उलट आपण वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करता, त्यावर लिहिण्याचा प्रयत्न करता हे कौतुकास्पदच आहे. मुळात असे विषय जरा अवघड. मूर्तीशास्त्र किंवा तत्त्वज्ञान अशा विषयांवर लिहिणे सोपे नव्हेच. एकवेळ हिंदू मूर्तीशास्त्र तुलनेने सोपे आहे, लक्षणे स्पष्ट असतात, तत्त्वज्ञान समजणेही बऱ्याच साधनांमुळे काहीसे साध्य होते मात्र बुद्ध किंवा जैन तत्त्वज्ञाने अथवा मूर्तीतील फरक समजणे सोपे नाही, अतिशय कमी किंवा अस्पष्ट लक्षणे असतात, साधनेही अत्यंत मर्यादित असतात. लिहिताना काही गडबड होणे किंवा सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरे देता न येणे हे साहजिक आहे पण म्हणून अभ्यास सोडायचा नाही किंवा लिहिणेही सोडायचे नाही. उलट प्रतिसादांतून अधिकाधिक माहिती मिळत जाते हा फायदाच.

कंजूस 03/02/2026 - 14:56
सर्वात उत्तम म्हणजे निरीक्षणं नोंदवणे किंवा फोटो देणे. मग अभ्यासक त्यामागचे रहस्य सांगत जातात. माझ्याकडे बुद्धाच्या भारतातील लेणी लेख इमारती स्तूप किंवा संबंधित गोष्टींवर पर्यटन माहिती आहे ती मी इथे एका वेगळ्या लेखात देईन म्हणतो. माहिती मला विविध प्रदर्शनातील पत्रकांतून मिळाली आहे. काॅपिराईटचा प्रश्न नाहीये. फक्त अडचण काय की काही माहिती पत्रके फार मोठ्या साईजची आहेत. त्यांचा एक मोठा फोटो काढून पाहतो. कुणाला उत्साह आणि आवड असल्यास उपयोगी पडेल.

Bhakti 03/02/2026 - 17:48
योगायोगाने हॆ आजच दिसले.. 1 तुमच्या सर्वांच्या आपुलकीपूर्ण प्रतिसादने खरंच भारवले आहे_/\_ माझं पुस्तकांवर, शब्दांवर खूप प्रेम आहे त्यामुळे मी लिहिणं थांबवण शक्यच नाही पण काही काळं ब्रेक योग्य ठरेल.भेटू लवकरच!

कंजूस 30/01/2026 - 17:24
बरीच माहिती गोळा केली आहे. शाळेत असताना ' गौतमाला बोधी वृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले आणि तो बुद्ध झाला' हे वाचलेले. पण कोणते ज्ञान हे काही कुणी सांगायला तयार नव्हते. बुद्ध आणि त्याचा धम्म - बाबासाहेबांचं हे पुस्तक वाचल्यावर कळलं.

गामा पैलवान 31/01/2026 - 00:05
भक्ती, कृपया या वाक्यातले कृबुसंस्करण उलगडावे :
ती डाळिंबाशी संबंधित आहे, जी तिला मुलांऐवजी खाण्यास शिकवली जात असे.
याचा अर्थ का होतो ? बाकी, इतके देव प्रचलित असतील तर बौद्ध हा नास्तिक पंथ का मानला जातो? याचं कारण असंय की, तो वेदांचे आधिपत्य नाकारतो. नास्तिक हा शब्द देवांचे अस्तित्व नाकारण्याशी संबंधित नाही. वेदांचे आधिपत्य नाकारले तरी वेद हेच मूळ श्रुती आहेत असं बौद्ध मानतात. आ.न., -गा.पै.

Bhakti 31/01/2026 - 11:30
ती डाळिंबाशी संबंधित आहे, जी तिला मुलांऐवजी खाण्यास शिकवली जात असे.
हरिती हिची कथा हरिती स्वतःच्या अनेक मुलांच्या उदरनिर्वाहासाठी इतरांची मुले चोरून खात असे .दुखी पालकांनी बुद्धांकडे तक्रार केली. बुद्धांनी हरितीला धडा शिकवण्यासाठी तिच्या सर्वात लाडक्या मुलाला पिंगलला लपवून ठेवले .मूल न सापडल्याने ती व्याकुळ झाली. बुद्धांनी तिला जाणीव करून दिली की, हजारो मुले असूनही एका मुलासाठी तुला इतके दुःख होत आहे, तर ज्यांची एकमेव मुले तू खाल्लीस, त्यांना किती दुःख झाले असेल?आपली चूक लक्षात आल्यावर हरितीने माफी मागितली आणि बुद्धांची अनुयायी बनली. ती मुलांची संरक्षक देवी म्हणून पूजली जाऊ लागली. पण तरीही तिला मांसभक्षणाची आठवण होई.रक्तप्राशन करावे वाटे तेव्हा रक्ताप्रमाणेच लाल रंगाचा ज्याचा रस ते डाळींबाचे दाणे त्याचा रस हे रक्ताचे रूपक होऊन ही तृषा शमवत.
याचं कारण असंय की, तो वेदांचे आधिपत्य नाकारतो.
>ज्याला वेदांत समजले तो कधीच म्हणणार नाही की बुद्धांनी वेदांना नाकारले.बुद्धांनी वेदांभोवती पसरलेल्या अहंकारला नाकारले आहे. वेदांतातला अद्वैत आणि बौद्ध शिकवणीतला निर्वाण जो जाणतो तो अशा अहंकारात कधीच फसणार नाही
.
इतके देव प्रचलित असतील तर बौद्ध हा नास्तिक पंथ का मानला जातो? स्वतः बुद्धांनी याला विरोध केला.पण मनात अनुयायांनी हा पसार वाढवला हे वरती मी स्पष्टच लिहिले आहे की !

In reply to by Bhakti

Bhakti 31/01/2026 - 11:36
पण मनात अनुयायांनी हा पसार वाढवला ऐवजी असे वाचा... पण मुळात अनुयायांनी हा (मुर्ती,कर्मकाण्ड) पसारा वाढवला.

In reply to by Bhakti

गामा पैलवान 01/02/2026 - 15:26
भक्ती, माझ्या मते गौतमबुद्ध स्वत: वेदांविषयी आदर बाळगून आहे. मात्र त्याच्या अनुयायांच्या बाबतीत असं ठामपणे म्हणता येईल का? मी साशंक आहे. बाकी, बुद्धाने स्वत:हून कसल्याही तत्त्वज्ञानाचा प्रचार वा प्रसार केला नाही. पहिला बौद्ध तत्त्वज्ञ नागार्जुन होऊन गेला. तो बुद्धाच्या नंतर तीनचारशे वर्षांनी जन्मला होता. यावरून बौद्ध हा वेगळा धर्म न मानता पारंपरिक भारतीय पंथ मानला पाहिजे. कुठल्याही पारंपरिक भारतीय पंथात दैवते शिरतात तशीच यांतही शिरली. वैविध्यपूर्ण दैवते हा भारतीय जनमानसाचा अविष्कार आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

सोत्रि 01/02/2026 - 20:54
गामाजी,
गौतमबुद्ध स्वत: वेदांविषयी आदर बाळगून आहे.
हे जरा डिटेलमधे एक्सप्लेन कराल का?
बुद्धाने स्वत:हून कसल्याही तत्त्वज्ञानाचा प्रचार वा प्रसार केला नाही. बौद्ध हा वेगळा धर्म न मानता पारंपरिक भारतीय पंथ मानला पाहिजे
बुद्धाने वयाच्या ३५ -८० वर्षांपर्यंत त्याच्या शिकवणीचा त्याच्या प्रवचनांमधून (discourses) तो जिथे जिथे गेला तिथे तिथे प्रसार केला. त्याच प्रवचनांचं डॅाक्युमेंटेशन पुढे त्रिपीटकात केलं गेलं, त्याचा पश्चात. बुद्धाने कोणताही धर्म स्थापन केला नाही, धर्म (धम्म) ह्या शब्दाची योग्य व्याख्या त्याने विषद केली त्याच्या शिकवणूकीतून (प्रवचनांमधून), तसेच कोणताही पंथही त्याने स्थापन केली नाही. त्याच्या ध्यानप्रणालीची अनुपासना करणाऱ्या साधकांच्या समूहाला संघ म्हणतात पण त्यात कसलंही कर्मकांड नसल्याने, गुरू आणि गादी (उत्तराधिकारी) नसल्याने, कोणत्याही विशिष्ट जाती, धर्म किंवा विचारसरणीच्या लोकांसाठी मर्यादित नसल्याने तो पंथ नाही. - (अभ्यासू) सोकाजी

In reply to by सोत्रि

गामा पैलवान 02/02/2026 - 02:43
सोत्रि,
हे जरा डिटेलमधे एक्सप्लेन कराल का?
माझी माहिती मर्यादित आहे. पण तेव्हढ्यावर निष्कर्ष काढता येतो. जर बुद्ध वेदांविषयी आदर बाळगून नसेल तर तसं स्पष्ट म्हंटलं असतं त्यानं. बाकी माझं ढोबळ विधान स्पष्ट करावयास गुग्गुळाचार्य आहेतंच : https://www.google.com/search?q=buddha+respected+vedas खरंतर तुम्हालाच याविषयी सखोल जाण आहे. बौद्ध हा पंथ नसेल तर महायान, हीनयान वगैरे काय म्हणावेत? संप्रदाय म्हणावेत का? माझी माहिती अत्यंत मर्यादित असल्याने मला हा प्रश्न पडला आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

सोत्रि 02/02/2026 - 14:02
गामाजी, ते ढोबळ विधान आहे असे म्हणता आहात तर ते तिथेच सोडून देवूयात. महायान, थेरवाद (हीनयान), वज्रयान, नवयान हे सगळे संप्रदाय म्हणता येतील कारण गटांची स्वतःची वेगळी तत्वज्ञानात्मक मांडणी आहे जरी मूळ आधारस्तंभ 'बुद्ध, धम्म आणि संघ' हेच आहेत. - (अभ्यासू) सोकाजी

In reply to by Bhakti

सोत्रि 02/02/2026 - 14:46
ज्याला वेदांत समजले तो कधीच म्हणणार नाही की बुद्धांनी वेदांना नाकारले.बुद्धांनी वेदांभोवती पसरलेल्या अहंकारला नाकारले आहे.
काय आहे वेदांत जो समजावतो की बुद्धांनी वेदांना नाकारले नाही? - (जिज्ञासू) सोकाजी

In reply to by सोत्रि

Bhakti 02/02/2026 - 16:48
सुत्त निपत ८४६- ना वेदगु दिठथिया ना मुतिया सा मनामेति नही तन्मयोसो…. जो वेद जाणतो त्याला खोटा अहंकार येत नाही. तो ऐकीव गोष्टी आणि भ्रमांचा परिणाम करत नाही.
वेदांतातला अद्वैत आणि बौद्ध शिकवणीतला निर्वाण जो जाणतो तो अशा अहंकारात कधीच फसणार नाही

In reply to by Bhakti

सोत्रि 02/02/2026 - 18:37
भक्ती, वेदगु शब्दात वेद आलेलं असलं तरी त्यात अभिप्रेत असलेला अर्थ ४ वेदांचा वेद नाही. त्याची फोड आणि अर्थ पाली भाषेत आणि त्रिपिटकाच्या परिप्रेक्षात खालीलप्रमाणे: वेद म्हणजे सर्वोच्च ज्ञान अणि गु म्हणजे प्राप्त केलेला. बुद्धाला प्राप्त झालेलं ज्ञान ह्याचा बेस वेदना (संवेदना) आहे, सतीपट्ठाण सुत्तात ह्याचे सविस्तर विष्लेषण आहे. त्यानुसार वेदना पर करून सत्यापर्यंत पोहोचलेला म्हणजे वेदगु. वेद जाणणारा म्हणजे वेदगु हे शब्दसाधर्म्यामुळे झालेलं अशुद्ध भाषांतर आहे. मूळ प्रश्न होता, काय आहे वेदांत जो समजावतो की बुद्धांनी वेदांना नाकारले नाही? त्याचं उत्तर मिळालं नाही. तसेच नविन मुद्दा आला ह्या प्रतिसादात, वेदांतातला अद्वैत आणि बौद्ध शिकवणीतला निर्वाण. हे दोन्ही एकच आहे का? आणि त्या दोन्हीच्या परिप्रेक्षात अहंकार म्हणजे तुम्हाला नेमकं काय अभिप्रेत आहे? - (जिज्ञासू) सोकाजी

In reply to by सोत्रि

कॉमी 02/02/2026 - 19:06
मग ते इतर संदर्भ वेदांचेच होते हे तरी कसे समजले ? तीन वेद जाणणारा हा हे इतर तीन विद्या जाणणारा नसेल कशावरून ? त्रिपिटक जर तीन आहेत तर इतर विद्या सुद्धा तीन शाखांमध्ये विभागलेल्या असू शकतात.

कॉमी 01/02/2026 - 09:44
बुध्दाने वेदाचे अधिपत्य नाकारले. बुद्धकाळात किंवा सर्वात जुन्या पाली लिखित साहित्यात वेदांचा उल्लेख आहे का ? बुद्ध वेदांबद्ल स्पष्टपणे बोलताना कुठेही आहे का ?

In reply to by कॉमी

सोत्रि 01/02/2026 - 21:20
पाली त्रिपिटकामध्ये (सर्वात जुने बौद्ध साहित्य) वेदांचा आणि तत्कालीन वैदिक परंपरेचा अत्यंत स्पष्ट आणि सविस्तर उल्लेख आढळतो. बुद्ध केवळ वेदांबद्दल बोललेच नाहीत, तर त्यांनी त्या काळातील वैदिक कर्मकांडांची आणि तत्त्वज्ञानाची तर्कशुद्ध चिकित्साही केली आहे. पाली साहित्यात वेदांना 'तेविज्ज' (त्रिवेद) असे म्हटले आहे. बुद्धांच्या काळात प्रामुख्याने तीनच वेद प्रचलित होते: ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेद. (अथर्ववेदाला नंतरच्या काळात वेदाचा दर्जा मिळाला). अनेक सुत्तांमध्ये बुद्धाने वेदांवर आणि त्यांच्या अधिकारावर भाष्य केले आहे. त्यापैकी काही प्रमुख संदर्भ: तेविज्ज सुत्त (दीघ निकाय): हे सर्वात महत्त्वाचे सुत्त आहे. यात दोन ब्राह्मण बुद्धांकडे येऊन विचारतात की, "कोणता वेद मार्ग खरा आहे?" बुद्ध त्यांना विचारतो की, "ज्या वेदांचे तुम्ही पठण करता, त्या मंत्रांच्या ऋषींनी कधी ब्रह्मदेवाला प्रत्यक्ष पाहिले होते का?" जेव्हा उत्तर 'नाही' येते, तेव्हा बुद्ध सांगतात की, ज्यांनी स्वतः पाहिलेले नाही अशांच्या परंपरेचे आंधळेपणाने पालन करणे म्हणजे "आंधळ्यांच्या रांगेसारखे" (अंधवेणु) आहे, जिथे पुढच्याला दिसत नाही आणि मागच्यालाही नाही. अस्सलायन सुत्त (मज्झिम निकाय): यामध्ये बुद्ध वेदांवर आधारित 'चातुर्वर्ण्य' व्यवस्थेला आव्हान देतो. तो म्हणतो की, निसर्गात सर्व माणसे समान आहेत आणि श्रेष्ठत्व हे जन्मावरून (किंवा वेदांच्या ज्ञानावरून) नसून ते कर्मावरून ठरते. सुत्त निपात (ब्राह्मणधम्म सुत्त): यात बुद्ध सांगतो की, प्राचीन ऋषी हे चारित्र्यसंपन्न होते, पण नंतरच्या काळात वेदांच्या नावाखाली प्राण्यांचे बळी देणे आणि कर्मकांड करणे सुरू झाले, जे चुकीचे आहे. - (अभ्यासू) सोकाजी

प्रचेतस 01/02/2026 - 09:57
लेख खूपच संक्षिप्त वाटला, नव्हे आहेही. बौद्ध मूर्तीशास्त्र म्हटलं की जरा अधिक उपापोह हवा होता. मूर्ती ओळखण्याची प्रमुख साधने म्हणजे मुद्रा, लांच्छन, वृक्ष. ह्यांचे अधिक वर्णन फोटोसहित हवे होते. गौतम बुद्ध म्हणजे शाक्यमुनी, भविष्यातील बुद्ध मैत्रेय ह्यांचा उल्लेख कुठे दिसला नाही. हे सर्व मानुषी बुद्ध. त्यांच्या आधीचे विपश्यी, शिखी, विश्वभू, क्रकुच्छन्द, कनकमुनी, काश्यप ह्यांचा उल्लेखही आवश्यक होता. परत बौद्ध मूर्तीकलेत गांधारकला अधिक सुप्रसिद्ध आहे. त्याचा आढावा घ्यायला हवा होता. बाकी वेरुळ येथे महायान आणि वज्रयान परंपरेतील अनोखी शिल्पे पाहायला मिळतात. जिज्ञासूंना मानुषी बौद्ध, ध्यानी बुद्ध, स्त्री बोधीसत्व, तारा, महामायुरी, पद्मपाणी, वज्रपाणी, जंभाल, हरिती, रक्तअवलोकितेश्वर, सुजाता, मैत्रेय अशी अनोखी शिल्पे पाहायची असतील तर जरुर तेथे जाऊन ती पाहावीत.

In reply to by प्रचेतस

कंजूस 01/02/2026 - 20:18
यावर एक यूट्यूबवर मालिकाच काढावी. म्हणजे व्हिडिओंची लिंक दिली की झाले काम. वेरुळच्या लेण्यांवरही मालिका असावी. एकदा सगळे फोटो जमा करायचे आणि ते जोडायचे स्लाईडशोमध्ये आणि त्याला मागून नंतर आवाज द्यायचा.

In reply to by प्रचेतस

Bhakti 02/02/2026 - 16:58
अर्थात हे सर्व अभ्यासक्रमात सांगितले.पण उणेपुरे सात दिवस(साधारण ११ तास ) त्यात इतकेच आकलन झाले.बाकी बोधिसत्वचा काहीतरी विशिष्ट क्रम आहे ,जो मला नीट समाजाला नाही ...हे मी वरती लिहिलेच आहे.
रक्तअवलोकितेश्वर,
वेरुळंंमधील बौद्ध शिल्प त्याकाळात नैसर्गिक रंगाने रंगवले होते .अगदी बौद्ध पुस्तकांत सांगितल्याप्रमाणे!परंतु कालाच्या प्रवाहात ते रंग नाहीसे झालं.रंगीत शिल्प तेव्हा किती सुंदर दिसत असतील.गांधार ,मथुरा शैली अजून फरक थोडा थोडा समाजात आहे .शैव ,वैष्णव अभ्यासक्रमातही तशा मूर्तीशैली फरक सांगितला जायचा.

In reply to by प्रचेतस

लेखन संक्षीप्त असलं तरी, लेखिकेने सुरुवातीलाच लिहिले होते की, 'चारो तरफ ज्ञान बट रहा है, जहाँ से मिले लपेट लो' आपल्याला जितके उमजले तितके लिहिणे ही चांगली गोष्ट आहे. आता उहापोह म्हटलं की जाणकारांनी लिहिले पाहिजे. जसे की, धाग्याच्या निमित्ताने सोत्रि यांनी अनुषांगिक अशी उत्तम माहिती भरली आहे. आपल्यासारखा जाणकारांनी अशा धाग्यात भर घातली पाहिजे. असे धागे समृद्ध होतात असे वाटते. बौद्ध धर्मातील हिनयान (थेरवाद) आणि महायान या दोन प्रमुख पंथांमध्ये तत्त्वज्ञानासोबतच मूर्तीशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत मूलभूत आणि रंजक फरकआहेच. या फरकांचा उगम बुद्धत्वाकडे पाहण्याच्या त्यांच्या दृष्टिकोनातून होतो. आणि मग तशी सविस्तर मांडणी केली पाहिजे असे वाटते. हीनयान यात बुद्ध एक मानवी महापुरुष आणि मार्गदर्शक मानले गेले. सुरुवातीच्या काळात बुद्धांना मानवी रूपात दाखवणे वर्ज्य होते. त्यांच्या उपस्थितीसाठी पदकमल, धम्मचक्र, बोधिवृक्ष किंवा रिकामे आसन वापरले जात होते. साधी आणि संयमित कला स्तूप वगैरे. महायान यात, बुद्धांना मानवी रूपात आणि भव्य स्वरूपात पूजले जाते. यामध्ये विविध मुद्रा (उदा. भूस्पर्श, अभय, ध्यान) अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. महायानमध्ये अवलोकितेश्वर, मंजुश्री, तारा, वज्रपाणी अशा अनेक बोधिसत्वांच्या अलंकारिक आणि विविध आयुधे धारण केलेल्या मूर्ती आढळतात. अत्यंत सुशोभित, दागिने, मुकुट आणि भव्यता असलेली कला. बुद्धाच्या काळात मूर्ती शक्य नव्हते तर पहिली मूर्ती केव्हा आली त्याबद्दल असे म्हटल्या जाते की, बुद्धाची पहिली मानवी मूर्ती ग्रीक-बौद्ध कलाशैलीतून निर्माण झाली. जेव्हा ग्रीक लोक भारताच्या संपर्कात आले, तेव्हा त्यांच्याकडे त्यांच्या देवांना मानवी रूपात कोरण्याची जुनी परंपरा होती. ग्रीक मूर्तिकारांनी बुद्धाला मानवी शरीर दिले, ज्याला त्यांनी 'अपोलियन बुद्ध ' असे म्हटले. अल्फ्रेड फुशे यांची ही कल्पना आहे, अर्थात ही सर्व गांधार शैली. उदा. केस भारतीय परंपरेत बुद्धाचे केस मुंडण केलेले किंवा कुरळे दाखवले जातात, पण अपोलोनियन बुद्धामध्ये ते ग्रीक शैलीतील लाटांसारखे आणि वरच्या बाजूला बांधलेले असतात. चेहरा अत्यंत रेखीव, सरळ तीक्ष्ण नाक आणि अंडाकृती चेहरा असतो, जो हुबेहूब ग्रीक शिल्पांसारखा दिसतो. बुद्धाने परिधान केलेले 'चीवर' (वस्त्र) हे साध्या कापडासारखे नसून ग्रीक 'टोगा' जाड असे असते. असे असले तरी, बुद्धाची मूर्ती ही गांधार शैलीची 'मथुरा शैली' ची यावर अभ्यासकात वाद आहेत. खालील संदर्भ पुस्तके जाणकारांनी वाचून सविस्तर लिहावे असे वाटले. संदर्भ ः १. अल्फ्रेड फूशेचं 'आर्ट ग्रेको-बौद्धिक दु गांधार' फ्रेंचभाषेतील पुस्तक भाषेत असलं तरी, गांधार कलेतील मूर्तीशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी यातील चित्रे आणि विश्लेषण जागतिक स्तरावर प्रमाण मानले जाते. २, 'बुद्धाची पहिली मानवी मूर्ती' आणि ती तयार होण्यामागची प्रक्रिया यावर सविस्तर निबंध.

टर्मीनेटर 02/02/2026 - 18:54
एकतर विषय एकदम फालतू... म्हणजे काही ठराविक लोकांसाठी रसाचा असू शकेल... त्यात ज्यांना ह्या फालतू विषयात रस असेल त्यांच्या प्रश्नांना नेमके उत्तर देता येत नसेल तर काय उपयोग आहे असल्या फालतू विषयांचा?
अर्थात हे सर्व अभ्यासक्रमात सांगितले.पण उणेपुरे सात दिवस(साधारण ११ तास ) त्यात इतकेच आकलन झाले.
हे उत्तर समाधानकारक ठरेल का? तुमच्या लिखाणाला कमी किंवा निरर्थक ठरवायचा कोणताही हेतू नाही, पण मिपावर खूप व्यासंगी लोकं आहेत, उगाच तुम्हाला उस्फूर्त लेखन करता म्हणुन हरभऱ्याच्या झाडावर चढवणाऱ्या लोकांच्या नादी लागून असले लेखन इथे करू नका असे सांगावेसे वाटत आहे!

In reply to by टर्मीनेटर

अभ्या.. 02/02/2026 - 19:41
परफेक्ट..... ab .
मिपावर खूप व्यासंगी लोकं आहेत, उगाच तुम्हाला उस्फूर्त लेखन करता म्हणुन हरभऱ्याच्या झाडावर चढवणाऱ्या लोकांच्या नादी लागून असले लेखन इथे करू नका असे सांगावेसे वाटत आहे!
अनुभव काय? ........ ;) बाहुबलीला लै अनुभव आहे त्याला विचारयला पाहिजे..

सोत्रि 02/02/2026 - 19:47
असले लेखन इथे करू नका असे सांगावेसे वाटत आहे!
टर्मीनेटर, लेखाच्या विस्कळीत मांडणीबद्दल तुमच्याशी १००% सहमत आहे. त्याबद्दल दुमत नाही. (गीतारहस्य ह्या मालिकेतही विस्कळीत मांडणीमुळे चांगला विषय वाया गेला होता हे माझं वैयक्तिक मत आहे.) पण त्यामुळे एकदम लेखन करू नका असं सुचवणं, तेही विषय फालतू आहे असे एकदम जजमेंटल होऊन, ये बात कुछ हजम नही हुइ! - (जजमेंटल नसलेला) सोकाजी

In reply to by सोत्रि

कॉमी 02/02/2026 - 19:50
सहमत. अगदी नाउमेद न करता तितक्याच ठामपणे हेच म्हणणे मांडणे शक्य होते.

In reply to by सोत्रि

टर्मीनेटर 03/02/2026 - 00:26
पण त्यामुळे एकदम लेखन करू नका असं सुचवणं, तेही विषय फालतू आहे असे एकदम जजमेंटल होऊन, ये बात कुछ हजम नही हुइ!
सोकाजीनाना... आपला मिपा परिवार खूप मोठा आहे आणि त्यात आपली काही हक्काची माणसे आहेत. भक्ती ताई त्या हक्काच्या माणसांपैकीच आहेत. माझा प्रतिसाद थोडा (थोडा काय जास्तच) रुड वगैरे वाटला असेल, पण फार काही स्पष्टीकरण न देता एवढेच सांगतो "समझने वाले समझ गये हैं, ना समझे... ना समझे वो 'खिलाडी' हैं" 😀

गामा पैलवान 02/02/2026 - 21:19
सोत्रि,
वेदांतातला अद्वैत आणि बौद्ध शिकवणीतला निर्वाण. हे दोन्ही एकच आहे का?
प्रश्न अतिशय रोचक आहे. निर्वाणाची अद्वैतासोबत तुलना होऊ शकते का असाही एक उपप्रश्न पडतो. शिवाय पुनर्जन्माचाही प्रश्न आहेच. अद्वैत साधेपर्यंत आत्मा पुनर्जन्म घेत राहतो ( वा मायेमुळे घ्यावा लागतो ). तर मग निर्वाण साधेपर्यंत पुनर्जन्म कोण घेतं? आ.न., -गा.पै.

कंजूस 02/02/2026 - 21:41
मी नाही त्यातला. लेख आवडला म्हणतो. नवअभ्यासकांना नवीन विषयात प्रश्न पडतात. त्यांना हुरुप येतो. त्याची उत्तरे देण्याचा कुणी प्रयत्न करतो. मलाही बुद्ध समजला नाही आणि गीताही नाही. पुस्तके वाचतो. त्यात कुणी काय लिहिले ते सांगतो. दोन्ही विषय गहन आहेत. पण श्रद्धा अती थोर आहे. त्यावर जग चालते. ख्रिश्चन लोक ( फादर) तुकारामाच्या साहित्याचा अभ्यास करतात. कारण तुकाराम अतिशय सोप्या भाषेत लोकांना मर्म सांगतात. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले.... पंडीत लोक फुटपट्टी घेऊन जातात अनुनयी श्रद्धा.

In reply to by कंजूस

Bhakti 02/02/2026 - 21:57
हो ना कंकाका, माझा हेतू कायमच स्वछ असतो.मिपावर लेख द्यायला आवडयचं, फार " व्यासंगी " लोकांचे मत समजतात. पण पूर्ण अभ्यासू असल्याशिवाय लेख कशाला इथे द्यायचे.?? मी जर अभ्यासक असते तर कशाला लेख लिहिले असते?? "पुस्तकच लिहिले नसते का??" पण एकंदरीत अभ्यासक नसल्यास इथे लिहू नये, हा मोठा धडा आज इथे मिळाला. आपलं चेपूच बरं, नॉन अभ्यासाकांना! उरलो आता वाचनापुरते!!!

In reply to by Bhakti

गामा पैलवान 02/02/2026 - 23:57
भक्ती, पांघरा गेंड्याची कातडी आणि लिहा हो बेधडक. एक ठेच लागली तर वाचनमात्र होताय! काय म्हणावं तुम्हांस. उघडं पडायची वेळ आली तेव्हा मी कसा बघा ढोबळमानाने मोघम मार्ग पत्करला. मध्यममार्ग म्हणतात तो हाच तर नव्हे? आ.न., -गा.पै.

In reply to by Bhakti

कंजूस 03/02/2026 - 04:22
कालच्या प्रतिसादात एक वाक्य मी लिहिलं होतं पण ते नंतर गाळलं होतं. आणि तसंच झालं. यापुढे " Bhakti लेखन करणार नाही." आणि तेच तिने लिहिलंय.

लेखन करीत राहा. लोक टीका करीत राहतात. लेखनात यंव नाही, लेखनात त्यंव नाही, हे असं सगळं चालायचंचं. आपल्याला वाटतं लिहायचं तरी नक्की लिहा. कोणताही प्रस्थापित अभ्यासक-लेखक हा पहिल्यांदा नवलेखकच असतो, तेव्हा आपण नवलेखक आहोत असे समजून लिहीत राहावे. शुभेच्छा. -दिलीप बिरुटे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टर्मीनेटर 03/02/2026 - 10:17
भक्तीताई टिकेला घाबरून पळ काढणाऱ्यांतल्या नाहीत हो सर, त्या 'स्ट्रॉंग वुमन' आहेत. आणि 'त्या' प्रतिसादाचा रोख नक्की कशाकडे आहे हे समजण्या एवढ्या 'स्मार्ट' देखील आहेत. त्यामुळे चिंता नसावी, त्या लिहित्या रहातील ह्याची खात्री बाळगा!

In reply to by टर्मीनेटर

अभ्या.. 03/02/2026 - 19:18
तुमचे पर्सनल व्हॅल्युएशन तुमच्यापाशी, इथे मिपावर लिहू नका असे सुचवणेच चुकीचे आहे. लेखकाने कीती स्मार्ट आणि स्ट्राँग राहायचे ते लेखकाने स्वतः ठरवायचे, कुणी लिहू नका म्हणले तर त्यातून काय अर्थ निघतो हे बघण्याआधी "तू कोण सांगणार?" हे विचारावे अशीच माझीतर अपेक्षा आहे. अर्थात कित्येक पटाईत लेखकांनी काहीही लिहिण्यापेक्क्षा काही लिहूच नये अशी सर्वसामान्य अपेक्षा असताना तिकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष्य करुन भक्तीताईसारख्या मिपाधर्म सांभाळणार्‍या अस्सल मिपाकर लेखिकेला इथे लिहू नको असे सांगणे खरेच दुर्दैवी आहे. टर्मीभाऊंची मनातली सच्छील इच्छा समजत असली आणि त्यांचा प्रांजळ स्वभाव कळत असला तरी......... टर्मीनेटर तुम्हारा इधर चुक्याच....

कंजूस 03/02/2026 - 10:38
टीका केल्याने / झाल्याने बरेच नवलेखक येथून पळाले आहेत. आपलं लेखन डायरीत लिहून ठेवलं तर कुणीच वाचणार नाहीये, त्यापेक्षा इकडे चार राडपाण्याचे शिंतोडे उडवून घेतल्याने बरे वाटते .[ दाग अच्छे हैं. किंवा कार्यक्रम पाहा साडे माडे शिंतोडे.]

In reply to by कंजूस

Bhakti 03/02/2026 - 11:50
आपलं लेखन डायरीत लिहून ठेवलं तर कुणीच वाचणार नाहीये, त्यापेक्षा इकडे चार राडपाण्याचे शिंतोडे उडवून घेतल्याने बरे वाटते .[ दाग अच्छे हैं. किंवा कार्यक्रम पाहा साडे माडे शिंतोडे.]
एकदम बरोब्बर काका, हाच सरळ स्वच्छ हेतू असतो सोशल मीडियावर लिहिताना. पण दरवेळी आपल्यालाच आत्मपरीक्षण करायची वेळ येत असेल तर... जरा थांबलंच पाहिजे,बदलायला पाहिजे हॆ जाणवत आहे.

तरी पुन्हा सांगतो. मिपावर(किवा कुठल्याही सोमिवर) व्यक्त होण्याआधी "फाट्यावर मारणे" हा मुख्य गुण अंगी बाणवुन घ्यावा लागतो. ज्ञानोबांनी सांगितलेच आहे " जे की राजहंसाचे चालणे........" पूर्ण ओवी आठवत नाही पण म्हणुन कावळ्याने चालुच नये की काय? असे काहीसे.

गोरगावलेकर 03/02/2026 - 13:24
भक्ती ताई, मिपावर सल्ला देण्या इतका माझा अभ्यास नाही . तरीही सांगते, निराश होऊ नका. टर्मीनेटर यांनी पूर्वी कोणाच्या तरी काश्मीर भटकंतीबद्दल असाच एक संक्षिप्त प्रतिसाद दिला होता तो बऱ्याच जणांना रुचला नव्हता. पण नंतर त्यांनी त्यामागचा हेतू स्पष्ट केला तेव्हा तो बहुतेकांना आणि मुख्य म्हणजे ज्याला उद्देशून लिहिला होता त्यालाही पटला. असाच एक प्रतिसाद माझ्या लेखातील फोटोंबद्दलही होता. नंतर माझ्या पुढील लेखात सुधारणा झाल्याबद्दल त्यांनी कौतुकही केले. तेव्हा त्यांच्या स्पष्ट बोलण्यात निश्चितच काही चांगला हेतू असेल. लिहिते रहा.

गवि 03/02/2026 - 13:37
लिहीत रहा पण रँडम असंख्य विषयांवर वरवर लिहिण्याऐवजी आपल्याला आतून प्रचंड उर्मी येईल तेव्हा जे काही मनातून येईल ते लिहा. ते नेहमीच चांगलं असेल. लोकांना ते आवडेल आणि एखाद दुसऱ्याला नाही आवडलं तरी ते पटलं नाही या स्वरूपात असेल. जर आत्मपरीक्षण करण्याची गरज जाणवली असेल तर ते मोठं यश आहे. तुटक किंवा कडवट होऊन आता लेखनच थांबवते असं म्हणण्यात अर्थ नाही. याची कारणे दोन: १. मनातून ते पटत नसतं. नुसतं म्हणायला म्हटलेलं असतं. २. खरंच लिहिणं बंद केलं तर जगाला काही फारसा फरक पडत नसतो. आपण विस्मरणात विलीन होऊन जातो. तर लिहिण्याची गरज आपल्याला आहे हे मान्य करून "आता थांबले पाहिजे" वगैरे असे कोणतेही जाहीरनामे करणे आवश्यक नाही. लोकांसाठी आपण लिहीतो. पूर्ण स्वांत सुखाय लिहिणे हा भ्रम आहे. लोकांपुढे आपण ठेवतो तेच मुळात त्यांना आवडेल अशा अपेक्षेने. त्यांना त्यातून आनंद मिळाला पाहिजे. जशी रेसिपी तसंच हे. मग ते चेक न करता, अशुद्ध (भाषा अशुद्ध नव्हे, लेखन टंकन), शब्दांची आगगाडी, सुरुवात कुठून झाली आणि शेवट कुठे होतोय त्याचे भान टाळून असे लिहीले तर लोकांना ते वाचताना आनंद कसा मिळेल ! ? अर्थ, भावार्थ हे पुढचे पुढे राहिले. तेव्हा लिहिणे थांबवू नका. विचार करा. आणि अभ्यासोनि प्रकटा. प्रचू, लिहित बरोबर की लिहीत?

प्रचेतस 03/02/2026 - 14:46
लिहिणे थांबवण्याचे काहीच कारण नाही, उलट आपण वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करता, त्यावर लिहिण्याचा प्रयत्न करता हे कौतुकास्पदच आहे. मुळात असे विषय जरा अवघड. मूर्तीशास्त्र किंवा तत्त्वज्ञान अशा विषयांवर लिहिणे सोपे नव्हेच. एकवेळ हिंदू मूर्तीशास्त्र तुलनेने सोपे आहे, लक्षणे स्पष्ट असतात, तत्त्वज्ञान समजणेही बऱ्याच साधनांमुळे काहीसे साध्य होते मात्र बुद्ध किंवा जैन तत्त्वज्ञाने अथवा मूर्तीतील फरक समजणे सोपे नाही, अतिशय कमी किंवा अस्पष्ट लक्षणे असतात, साधनेही अत्यंत मर्यादित असतात. लिहिताना काही गडबड होणे किंवा सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरे देता न येणे हे साहजिक आहे पण म्हणून अभ्यास सोडायचा नाही किंवा लिहिणेही सोडायचे नाही. उलट प्रतिसादांतून अधिकाधिक माहिती मिळत जाते हा फायदाच.

कंजूस 03/02/2026 - 14:56
सर्वात उत्तम म्हणजे निरीक्षणं नोंदवणे किंवा फोटो देणे. मग अभ्यासक त्यामागचे रहस्य सांगत जातात. माझ्याकडे बुद्धाच्या भारतातील लेणी लेख इमारती स्तूप किंवा संबंधित गोष्टींवर पर्यटन माहिती आहे ती मी इथे एका वेगळ्या लेखात देईन म्हणतो. माहिती मला विविध प्रदर्शनातील पत्रकांतून मिळाली आहे. काॅपिराईटचा प्रश्न नाहीये. फक्त अडचण काय की काही माहिती पत्रके फार मोठ्या साईजची आहेत. त्यांचा एक मोठा फोटो काढून पाहतो. कुणाला उत्साह आणि आवड असल्यास उपयोगी पडेल.

Bhakti 03/02/2026 - 17:48
योगायोगाने हॆ आजच दिसले.. 1 तुमच्या सर्वांच्या आपुलकीपूर्ण प्रतिसादने खरंच भारवले आहे_/\_ माझं पुस्तकांवर, शब्दांवर खूप प्रेम आहे त्यामुळे मी लिहिणं थांबवण शक्यच नाही पण काही काळं ब्रेक योग्य ठरेल.भेटू लवकरच!
लेखनविषय:
सर्वांना वाटेल की मी अतीच सिनेमे पाहते काय(कोणाला आपल्याबद्दल काही वाटलं तरी आपण बदलू नाही ,हा बेसिक नियम मान्यच असेल ..:)) तर मी माझ्या क्षेत्राशिवाय अजूनही काही विशेष पाहत असते.मुळात अज्ञानी राहायला आवडत नाही.३ इडियट मधल्या रांचोचा एक डायलॉग मला फार रिलेट होतो,कायमच...

कुंपण

रांचो ·
लेखनप्रकार
खडकवाडीची वस्ती गावाच्या बाहेर नव्हती. ती गावातच होती—पण जिथे रस्ता अचानक अरुंद होतो, तिथे, एका अदृश्य रेषेच्या पलीकडे. इथे सकाळ कोंबड्याच्या आरवण्याने सुरू न होता रिकाम्या हंड्यांच्या आवाजाने होत असे. भांडी एकमेकांवर आपटल्यासारखा आवाज हा पाणी भरण्याचा नव्हे, तर दिवस सुरू झाल्याची खूण देणारा होता. वस्तीकरता एक हौद आणि गावासाठी एक विहीर—अशी पिढ्यान्‌पिढ्यांची रचना होती. ती आता इतकी सवयीची झाली होती की कुणालाच ती प्रश्न वाटत नव्हती. लक्ष्मी रोज पहाटे चारला उठायची. घरात पाणी उरलं नसेल, तर तिला राग येत नसे. राग करण्याची सवयच नव्हती. हंडे आतून धुऊन ठेवायचे.

सैरभैर डायरी - २.३

कपिलमुनी ·

टर्मीनेटर 13/01/2026 - 13:48
मजा आ रहेला हैं भाय... 👍 बाल्याचा सीन वाचून 'बात हैं कमाल अपून की जिंदगी के खेल में' ह्या गाण्यातले खालील कडवे (2:25 to 2:45) आणि 'नाक्यावरचे' (तुमच्या भाषेत 'कट्ट्यावरचे') दिवस आठवले 😀
लफडा झगडा हो गया तो हो गया रे डर हैं क्या घोडा रखके खोपडी में ठोक दे फिकर हैं क्या... ज्यादा से ज्यादा क्या होगा रे? सजा मिलेगी या प्यारे छुट जायेंगे बेल में... सजा मिलेगी या प्यारे छुट जायेंगे बेल में...
BTW... क्रमश: लिवायला विसरले, की डायरीचा 'धी एन्ड' केल्यांव मुनीवर्य???

गवि 13/01/2026 - 14:09
हाही भाग आवडला. वेगळ्या जगाची ओळख. रामदास काकांची एक सीरिज आठवली. त्यांनी ती अर्धीच सोडली होती असे स्मरते. तिचा एरिया थोडा वेगळा होता. पण अशीच उत्कंठा वाढवणारी. पुभाप्र.

टर्मीनेटर 13/01/2026 - 13:48
मजा आ रहेला हैं भाय... 👍 बाल्याचा सीन वाचून 'बात हैं कमाल अपून की जिंदगी के खेल में' ह्या गाण्यातले खालील कडवे (2:25 to 2:45) आणि 'नाक्यावरचे' (तुमच्या भाषेत 'कट्ट्यावरचे') दिवस आठवले 😀
लफडा झगडा हो गया तो हो गया रे डर हैं क्या घोडा रखके खोपडी में ठोक दे फिकर हैं क्या... ज्यादा से ज्यादा क्या होगा रे? सजा मिलेगी या प्यारे छुट जायेंगे बेल में... सजा मिलेगी या प्यारे छुट जायेंगे बेल में...
BTW... क्रमश: लिवायला विसरले, की डायरीचा 'धी एन्ड' केल्यांव मुनीवर्य???

गवि 13/01/2026 - 14:09
हाही भाग आवडला. वेगळ्या जगाची ओळख. रामदास काकांची एक सीरिज आठवली. त्यांनी ती अर्धीच सोडली होती असे स्मरते. तिचा एरिया थोडा वेगळा होता. पण अशीच उत्कंठा वाढवणारी. पुभाप्र.
लेखनप्रकार
२.१ २.२ "मामू गाडी बाहेरवाली साईटला घे, देखते है ,क्या बताया भाईंने पोलिस को "उस्मानने थंड आवाजात सांगितले. २.३ उस्मान माझ्याकडे आणि मी त्याच्याकडे बघत अंदाज घेत होतो. पलीकडे डोकावून मामूला बोललो, "जातीवर आलास भाडखाऊ ! याला सोड तुलाच पहिला धरणार मी !" मामूला एकदम जिवाला लागले. "२ मिनिट बोलायचा भाउ , बाकी काही नाही, दीदीचा रीश्तेदार लागतो " पण मामूने गाडी साईटऐवजी कट्ट्याकडे घेतली.त्यालापण माहिती होते, कट्ट्यासोबत पंगा घेतला तर नंतर गावात पळवून मारतील..

इतिहासाची दुरुस्ती

युयुत्सु ·

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे 03/01/2026 - 11:33
मी म्हणजे मी म्हणजे मी म्हणजे मीच जाता जाता -- आपले आरवणे ऐकण्यासाठीच सूर्य उगवतो असे समजणारे कोंबडे जगात कमी नाहीत

गामा पैलवान 31/12/2025 - 18:31
युयुत्सु, इतिहास बदलणे म्हणजे नेमकं काय ? माझ्या मते आज घटकेस असं समीकरण मांडता यावं : इतिहास = तथ्ये + दृष्टीकोन तथ्यांविषयी साधारणत: अभ्यासकांत एकमत असतं. परंतु दृष्टीकोन मात्र प्रत्येकाचा वेगळा असतो. किंबहुना 'पिंडे पिंडे मतिर्भिन्न' या न्यायाने तसा तो असावाच लागतो. जसजशी ऐतिहासिक साधनांची उपलब्धता वाढते तसतशी वेगवेगळी तथ्ये नव्याने उदयास येऊ शकतात. त्यानुसार दृष्टीकोन ठीकठाक करणे तर्कसंगत ठरावे. तर तुमच्या मते इतिहास बदलणे म्हणजे नेमकं काय ? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

युयुत्सु 31/12/2025 - 19:42
श्री० गा०पै० नवी तथ्ये सांगायला हरकत नाही,पण ती कोणत्या पद्धतीने सांगितली जातात, तसेच त्याचा भविष्यातले प्रश्न सोडविण्यासाठी उपयोग होतो का की कालबाह्य गोष्टींची पुनर्स्थापना एव्हढेच साध्य होते? हा मुद्दा आहे...

In reply to by युयुत्सु

गामा पैलवान 01/01/2026 - 00:09
युयुत्सु, नेमक्या याच कारणासाठी स्वत:चा दृष्टीकोन स्वत:च विकसित केलेला बरा पडतो. बाकी, एखादी कालबाह्य गोष्ट पुनर्स्थापित केल्याचं काही उदाहरण मिळेल काय? धन्यवाद! आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

युयुत्सु 01/01/2026 - 08:40
अनेक उदाहरणे देता येतील- ० २०२४ च्या निवडणूकीच्या वेळेला जो उन्माद बाहेर पडला त्यावेळेला अनेक कालबाह्य गोष्टींची पुनर्स्थापना करायचा प्रयत्न केला गेला - त्यात सर्वात संतापजनक म्ह० मुलीना शिकवू नका कारण त्यामुळे मुलांची लग्ने होत नाहीत. ० गोत्र, कन्यादान - या कालबाह्य, निरर्थक आणि अपमानकारक संकल्पनांचे उदात्तीकरण आणि पुरस्कार ० मनुस्मृती - https://www.youtube.com/shorts/b_K3wXnorGw ० बागेश्वर तत्सम बाबा-बुवांचे दरबार बघा. तिथे चालणारे 'मार्गदर्शन' पुरेसे आहे

In reply to by युयुत्सु

गामा पैलवान 01/01/2026 - 19:54
युयुत्सु, मुली जात्याच अनुलोमी ( = hypergamous ) असतात. स्वत:पेक्षा जास्त शिकलेला वा अधिक उत्पन्न असलेला मुलगाच पती म्हणून हवा असतो. मग लग्नाला उशीर होणारंच. गोत्र म्हणाल तर ती पद्धती हा य गुणसूत्र सांभाळून ठेवायचा एक प्रयत्न आहे : https://www.misalpav.com/comment/1001787#comment-1001787 कन्यादान भावनिक प्रश्न आहे. या तीन उदाहरणांचा इतिहासाच्या ( = राजकीय सत्ताकेंद्राच्या ) अभ्यासाशी थेट संबंध नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

युयुत्सु 01/01/2026 - 21:02
श्री० गा०पै० गोत्राची पोलखोल माझ्या या लेखात विस्तृत्पणे केली आहे. यात अजुन ही कुणी चूक काढलेली नाही https://www.misalpav.com/node/52684

In reply to by गामा पैलवान

युयुत्सु 02/01/2026 - 21:25
हा हा हा! गोत्र पद्धतीमध्ये असंख्य चुका आहेत. मुख्य म्हणजे काहीही सिद्ध झालेले नाही. गोत्राला कायद्याने मान्यता नाही आणि मिळणार नाही. मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो- - एक गोत्र म्हणजे एक मूळ्पुरुष. म्हणजे त्या गोत्रातले सर्वाचे वाय-डीएनए एकच असायला हवे. मग समान गोत्रांचे उदा घेऊ उदा अत्रि गोत्राच्या पुरुषामध्ये एकच हॅप्लोग्रुप असायला हवा (एकापेक्षा एकही अधिक हॅप्लोग्रुप एका गोत्रात चालणार नाही). तेव्हढे तुम्ही मला सिद्ध करून दाखवा किंवा सिद्ध केलेले दाखवा. माझ्याकडून ५००१ररू (रू पाच हजार एक) जाहीर इनाम! - किमेरीझम बद्दल लिहीलेला लेख वाचला असेलच. वरील इनाम मिळवल्यास तुम्हाला अधिक प्रश्न विचारेन. उदा० सगोत्र बद्दल केल्या जाणार्‍या अडाणी प्रचाराबद्द्ल...

In reply to by युयुत्सु

गामा पैलवान 02/01/2026 - 21:40
युयुत्सु, हॅप्लोग्रुप का बरं समान हवेत? हॅप्लोग्रुप रोगाचे वाहक आहेत का? या संबंधी त्रोटक माहिती उपलब्ध आहे. माझ्या मते यावर अधिक संशोधन होणं आवश्यक आहे. जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत सरसकटपणे गोत्रास अंधविश्वास मानणं कितपत उचित ? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

युयुत्सु 02/01/2026 - 21:50
हॅप्लोग्रुप का बरं समान हवेत? एखाद्या जोडप्याला मुले होतात तेव्हा आईकडून एम टी डिएनए आणि पित्याकडून य डिएनए मिळते. पुरुषवंशात वाय डिएनए समान असते अशी धारणा आहे. पण तसे नसते. एम टी डिएनए आणि वाय डिएनए च्या रचनेनुसार केलेल्या वर्गीकरणाला हॅप्लोग्रुप असे नाव आहे. ज्यांची संख्या बरीच आहे.

In reply to by गामा पैलवान

कंजूस 03/01/2026 - 13:29
इतिहास बदलणे...... इतिहास आहे तिथेच आहे. फक्त त्यातली कोणती प्रकरणे शालेय पाठ्यपुस्तकांत अंतर्भूत करायची किती पानांचा मजकूर घ्यायचा हे बदलले आहे.( म्हणजे हे पूर्वीपासून चालूच आहे.) ( अवांतर - भाषेसाठी कोणत्या लेखकांचे कोणत्या लेखनातून धडे घ्यायचे हे बदलत असते तसे.)

युयुत्सु 31/12/2025 - 18:55
संघ आणि भाजपा हे सतत इंग्रजांनी केलेल्या भारतीय इतिहासाच्या विकृतीकरणाचे दळण दळत असतात. पण ते याच वेळेला नेहेरूच्या कर्तृत्वाचं विकृतीकरण, पश्चिमेच्या ज्ञानाचे विकृतीकरण करत असतात. नथुरामने गांधीना मारले नसते तर गांधी इतके मोठे झाले नसते आणि सावरकर वि नेहेरू हा वाद पण निर्माण झाला नसता. माणसाना मारल्याने सहानुभूतीने मिळून ती जास्त मोठी होतात.

विवेकपटाईत 12/01/2026 - 11:28
अमर अकबर एन्थनीचे वडिलांचे नाव किशन लाल आहे, हे सांगणे म्हणजे इतिहासाची दुरूस्ती नाही, सत्य सांगणे आहे. बाकी भारतात इतिहासावर गेल्या 200 वर्षांत शेकडो संशोधन झाले आहे. शेकडो जागांवर पुरातत्व विभाग , विभिन्न विश्वविद्यालय आणि अनेक राष्ट्रीय आणि अंतराष्ट्रीय संस्थांनी जारो वर्ष जुना इतिहास खोदला आहे. पण तो संकलित करण्याचा प्रयत्न कुणीही केला नाही आणि त्यावर निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न ही झाला नाही. बहुधा राजकीय दृष्ट्या वोट बॅंकशी संबंध नसल्याने राजनीतिक दृष्ट्या फायदेशीर नसावा. काही दिवसांपूर्वी आचार्य बाळकृष्ण यांना कुणी प्रश्न विचारला होता. world herbal encyclopedia (१०९ खंड 125000 जवळपास पाने) पूर्ण झाल्यावर पुढे काय. त्यांनी उत्तर दिले आपल्या देशात प्रत्येक भागात हजारों वर्ष जुना माणसांचा इतिहास आहे. त्यावर झालेल्या सर्व संशोधन आम्ही एका जागी एकत्र करतो आहे. काही वर्षांत हे कार्य निश्चित पूर्ण होईल. भारताचा माहीत नसलेला सर्वांसमोर येईल. (एक कोटीच्या जवळ पांडुलीपीं पानांचे डिजिटल करण्याचे काम ही आता पर्यन्त झाले आहे) बाकी माझे मत - अधिकान्श पुरोगामी आणि मानसिक दृष्ट्या गुलामांना खरा इतिहास पचणार नाही.

In reply to by विवेकपटाईत

युयुत्सु 13/01/2026 - 09:03
श्री० पटाईत अमर अकबर एन्थनीचे वडिलांचे नाव किशन लाल आहे, हे सांगणे म्हणजे इतिहासाची दुरूस्ती नाही, सत्य सांगणे आहे. किशन लाल ने प्रजा वाढविण्याशिवाय जर काही पराक्रम आयुष्यात केला नसेल तर त्याचं नाव कशाला घ्यायचे? इतिहास दुरुस्त करण्याने भविष्य घडत नाही.

माझे वडील संघात जायचे आणि मी ही जावे म्हणुन आग्रही असायचे. ते २००५ मध्ये गेले. परवा जुनी कपाटे आवरताना माझ्या वडीलांचा लंगोट सापडला. त्यात नागपूरचे रेल्वे तिकीट होते. ते बघताना माझ्या अंगावर शहारे आले. पण वडीलांनी नागपूरला/रेशीमबागेला भेट दिली होती हे मला कधीच का सांगीतले नाही, हा प्रश्न सतावत राहिला. ईत्यादी ईत्यादी...

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे 03/01/2026 - 11:33
मी म्हणजे मी म्हणजे मी म्हणजे मीच जाता जाता -- आपले आरवणे ऐकण्यासाठीच सूर्य उगवतो असे समजणारे कोंबडे जगात कमी नाहीत

गामा पैलवान 31/12/2025 - 18:31
युयुत्सु, इतिहास बदलणे म्हणजे नेमकं काय ? माझ्या मते आज घटकेस असं समीकरण मांडता यावं : इतिहास = तथ्ये + दृष्टीकोन तथ्यांविषयी साधारणत: अभ्यासकांत एकमत असतं. परंतु दृष्टीकोन मात्र प्रत्येकाचा वेगळा असतो. किंबहुना 'पिंडे पिंडे मतिर्भिन्न' या न्यायाने तसा तो असावाच लागतो. जसजशी ऐतिहासिक साधनांची उपलब्धता वाढते तसतशी वेगवेगळी तथ्ये नव्याने उदयास येऊ शकतात. त्यानुसार दृष्टीकोन ठीकठाक करणे तर्कसंगत ठरावे. तर तुमच्या मते इतिहास बदलणे म्हणजे नेमकं काय ? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

युयुत्सु 31/12/2025 - 19:42
श्री० गा०पै० नवी तथ्ये सांगायला हरकत नाही,पण ती कोणत्या पद्धतीने सांगितली जातात, तसेच त्याचा भविष्यातले प्रश्न सोडविण्यासाठी उपयोग होतो का की कालबाह्य गोष्टींची पुनर्स्थापना एव्हढेच साध्य होते? हा मुद्दा आहे...

In reply to by युयुत्सु

गामा पैलवान 01/01/2026 - 00:09
युयुत्सु, नेमक्या याच कारणासाठी स्वत:चा दृष्टीकोन स्वत:च विकसित केलेला बरा पडतो. बाकी, एखादी कालबाह्य गोष्ट पुनर्स्थापित केल्याचं काही उदाहरण मिळेल काय? धन्यवाद! आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

युयुत्सु 01/01/2026 - 08:40
अनेक उदाहरणे देता येतील- ० २०२४ च्या निवडणूकीच्या वेळेला जो उन्माद बाहेर पडला त्यावेळेला अनेक कालबाह्य गोष्टींची पुनर्स्थापना करायचा प्रयत्न केला गेला - त्यात सर्वात संतापजनक म्ह० मुलीना शिकवू नका कारण त्यामुळे मुलांची लग्ने होत नाहीत. ० गोत्र, कन्यादान - या कालबाह्य, निरर्थक आणि अपमानकारक संकल्पनांचे उदात्तीकरण आणि पुरस्कार ० मनुस्मृती - https://www.youtube.com/shorts/b_K3wXnorGw ० बागेश्वर तत्सम बाबा-बुवांचे दरबार बघा. तिथे चालणारे 'मार्गदर्शन' पुरेसे आहे

In reply to by युयुत्सु

गामा पैलवान 01/01/2026 - 19:54
युयुत्सु, मुली जात्याच अनुलोमी ( = hypergamous ) असतात. स्वत:पेक्षा जास्त शिकलेला वा अधिक उत्पन्न असलेला मुलगाच पती म्हणून हवा असतो. मग लग्नाला उशीर होणारंच. गोत्र म्हणाल तर ती पद्धती हा य गुणसूत्र सांभाळून ठेवायचा एक प्रयत्न आहे : https://www.misalpav.com/comment/1001787#comment-1001787 कन्यादान भावनिक प्रश्न आहे. या तीन उदाहरणांचा इतिहासाच्या ( = राजकीय सत्ताकेंद्राच्या ) अभ्यासाशी थेट संबंध नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

युयुत्सु 01/01/2026 - 21:02
श्री० गा०पै० गोत्राची पोलखोल माझ्या या लेखात विस्तृत्पणे केली आहे. यात अजुन ही कुणी चूक काढलेली नाही https://www.misalpav.com/node/52684

In reply to by गामा पैलवान

युयुत्सु 02/01/2026 - 21:25
हा हा हा! गोत्र पद्धतीमध्ये असंख्य चुका आहेत. मुख्य म्हणजे काहीही सिद्ध झालेले नाही. गोत्राला कायद्याने मान्यता नाही आणि मिळणार नाही. मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो- - एक गोत्र म्हणजे एक मूळ्पुरुष. म्हणजे त्या गोत्रातले सर्वाचे वाय-डीएनए एकच असायला हवे. मग समान गोत्रांचे उदा घेऊ उदा अत्रि गोत्राच्या पुरुषामध्ये एकच हॅप्लोग्रुप असायला हवा (एकापेक्षा एकही अधिक हॅप्लोग्रुप एका गोत्रात चालणार नाही). तेव्हढे तुम्ही मला सिद्ध करून दाखवा किंवा सिद्ध केलेले दाखवा. माझ्याकडून ५००१ररू (रू पाच हजार एक) जाहीर इनाम! - किमेरीझम बद्दल लिहीलेला लेख वाचला असेलच. वरील इनाम मिळवल्यास तुम्हाला अधिक प्रश्न विचारेन. उदा० सगोत्र बद्दल केल्या जाणार्‍या अडाणी प्रचाराबद्द्ल...

In reply to by युयुत्सु

गामा पैलवान 02/01/2026 - 21:40
युयुत्सु, हॅप्लोग्रुप का बरं समान हवेत? हॅप्लोग्रुप रोगाचे वाहक आहेत का? या संबंधी त्रोटक माहिती उपलब्ध आहे. माझ्या मते यावर अधिक संशोधन होणं आवश्यक आहे. जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत सरसकटपणे गोत्रास अंधविश्वास मानणं कितपत उचित ? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

युयुत्सु 02/01/2026 - 21:50
हॅप्लोग्रुप का बरं समान हवेत? एखाद्या जोडप्याला मुले होतात तेव्हा आईकडून एम टी डिएनए आणि पित्याकडून य डिएनए मिळते. पुरुषवंशात वाय डिएनए समान असते अशी धारणा आहे. पण तसे नसते. एम टी डिएनए आणि वाय डिएनए च्या रचनेनुसार केलेल्या वर्गीकरणाला हॅप्लोग्रुप असे नाव आहे. ज्यांची संख्या बरीच आहे.

In reply to by गामा पैलवान

कंजूस 03/01/2026 - 13:29
इतिहास बदलणे...... इतिहास आहे तिथेच आहे. फक्त त्यातली कोणती प्रकरणे शालेय पाठ्यपुस्तकांत अंतर्भूत करायची किती पानांचा मजकूर घ्यायचा हे बदलले आहे.( म्हणजे हे पूर्वीपासून चालूच आहे.) ( अवांतर - भाषेसाठी कोणत्या लेखकांचे कोणत्या लेखनातून धडे घ्यायचे हे बदलत असते तसे.)

युयुत्सु 31/12/2025 - 18:55
संघ आणि भाजपा हे सतत इंग्रजांनी केलेल्या भारतीय इतिहासाच्या विकृतीकरणाचे दळण दळत असतात. पण ते याच वेळेला नेहेरूच्या कर्तृत्वाचं विकृतीकरण, पश्चिमेच्या ज्ञानाचे विकृतीकरण करत असतात. नथुरामने गांधीना मारले नसते तर गांधी इतके मोठे झाले नसते आणि सावरकर वि नेहेरू हा वाद पण निर्माण झाला नसता. माणसाना मारल्याने सहानुभूतीने मिळून ती जास्त मोठी होतात.

विवेकपटाईत 12/01/2026 - 11:28
अमर अकबर एन्थनीचे वडिलांचे नाव किशन लाल आहे, हे सांगणे म्हणजे इतिहासाची दुरूस्ती नाही, सत्य सांगणे आहे. बाकी भारतात इतिहासावर गेल्या 200 वर्षांत शेकडो संशोधन झाले आहे. शेकडो जागांवर पुरातत्व विभाग , विभिन्न विश्वविद्यालय आणि अनेक राष्ट्रीय आणि अंतराष्ट्रीय संस्थांनी जारो वर्ष जुना इतिहास खोदला आहे. पण तो संकलित करण्याचा प्रयत्न कुणीही केला नाही आणि त्यावर निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न ही झाला नाही. बहुधा राजकीय दृष्ट्या वोट बॅंकशी संबंध नसल्याने राजनीतिक दृष्ट्या फायदेशीर नसावा. काही दिवसांपूर्वी आचार्य बाळकृष्ण यांना कुणी प्रश्न विचारला होता. world herbal encyclopedia (१०९ खंड 125000 जवळपास पाने) पूर्ण झाल्यावर पुढे काय. त्यांनी उत्तर दिले आपल्या देशात प्रत्येक भागात हजारों वर्ष जुना माणसांचा इतिहास आहे. त्यावर झालेल्या सर्व संशोधन आम्ही एका जागी एकत्र करतो आहे. काही वर्षांत हे कार्य निश्चित पूर्ण होईल. भारताचा माहीत नसलेला सर्वांसमोर येईल. (एक कोटीच्या जवळ पांडुलीपीं पानांचे डिजिटल करण्याचे काम ही आता पर्यन्त झाले आहे) बाकी माझे मत - अधिकान्श पुरोगामी आणि मानसिक दृष्ट्या गुलामांना खरा इतिहास पचणार नाही.

In reply to by विवेकपटाईत

युयुत्सु 13/01/2026 - 09:03
श्री० पटाईत अमर अकबर एन्थनीचे वडिलांचे नाव किशन लाल आहे, हे सांगणे म्हणजे इतिहासाची दुरूस्ती नाही, सत्य सांगणे आहे. किशन लाल ने प्रजा वाढविण्याशिवाय जर काही पराक्रम आयुष्यात केला नसेल तर त्याचं नाव कशाला घ्यायचे? इतिहास दुरुस्त करण्याने भविष्य घडत नाही.

माझे वडील संघात जायचे आणि मी ही जावे म्हणुन आग्रही असायचे. ते २००५ मध्ये गेले. परवा जुनी कपाटे आवरताना माझ्या वडीलांचा लंगोट सापडला. त्यात नागपूरचे रेल्वे तिकीट होते. ते बघताना माझ्या अंगावर शहारे आले. पण वडीलांनी नागपूरला/रेशीमबागेला भेट दिली होती हे मला कधीच का सांगीतले नाही, हा प्रश्न सतावत राहिला. ईत्यादी ईत्यादी...
लेखनविषय:
लेखनप्रकार
 इतिहासाची दुरुस्ती ========== - राजीव उपाध्ये इतिहासाची दुरुस्ती करण्याचा सध्या एक मोठ्ठा खटाटोप चालला आहे. भारताचा सध्याचा आकार आणि भविष्यात निर्माण होणारे प्रश्न लक्षात घेतले तर या उद्योगाने काय साधलं जाईल असा प्रश्न पडतो. एका मित्राने पंतप्रधानांचे सल्लागार संजीव सन्याल यांची एक मुलाखत पाठवली https://youtu.be/u0TV6h2v2qE?si=CRL_8aLnKo01b5Oi). संजीव संन्याल रेशीमबागेतील विद्वानांपेक्षा बरेच सुसह्य आहेत. मुलाखातीचा बहुतेक भाग भारतीय इतिहासाच्या विकृतीकरणाबद्दल आहे. ही मुलाखत बघताना वरील प्रश्न पडला. एक उदा० देतो.

पर्व -भैरप्पा लिखित महाकादंबरी (ऐसी अक्षरे -३७)

Bhakti ·

प्रचेतस 30/12/2025 - 12:11
उत्तम परिचय. 'पर्व' वाचलेली आहेच, संग्रहीही आहे. मात्र भैरप्पांची असूनही मला ती तितकीशी नाही आवडली. कदाचित मूळ संहिता अनेकदा वाचल्याने रामायण किंवा महाभारत ह्यावर आधारीत कादंबर्‍या वाचायला मला आवडत नाहीत. मात्र भैरप्पांची ही कादंबरी खूप वेगळी आहे. 'युगंधर' मध्ये शिवाजी सावतांनी कशी श्रीकृष्णचरित्राची वाट लावली आहे तसे न करता भैरप्पा ह्यांनी एक नवाच दृष्टीकोन दिला आहे.

In reply to by प्रचेतस

Bhakti 30/12/2025 - 14:27
मूळ संहिता अनेकदा वाचल्याने रामायण किंवा महाभारत ह्यावर आधारीत कादंबर्‍या वाचायला मला आवडत नाहीत.
अगदी प्रत्यक्ष सुर्य जवळ असताना काजवा कसा खुणावेल :) माझ्यासारख्या सन्थ वाचकाला मुळ महाभारत वाचायला अजुन किमान ६-७ वर्षे तयारी करावी लागेल.'युगंधर',युगान्त,आणि आता अर्जुन ,द्रौपदी अशीही पुस्तके येतात ती वाचायची इच्छा कधीच होत नाही..पण भैरप्पा यान्चि इतकी उत्तम कादम्बरी अजुन लोकप्रिय व्हायला पाहिजे ती तितकी झाली नाही.

In reply to by प्रचेतस

मूळ संहिता अनेकदा वाचल्याने रामायण किंवा महाभारत ह्यावर आधारीत कादंबर्‍या वाचायला मला आवडत नाहीत.
सहमत आहे. मी सुद्धा मुळ ग्रंथ पहिले वाचले आणि नंतर त्यावरील टीका (म्हणजे इतर पुस्तके).

In reply to by कांदा लिंबू

Bhakti 31/12/2025 - 21:19
आवरण वाचली आहे.खुपच अभ्यासपूर्ण कादंबरी आहे,तशीच करूण घटनांनी भरलेली आहे. पहिल्या ४ वर्षांतच या कादंबरीच्या ३४ आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या, जो भारतीय कादंबरीविश्वात एक महत्त्वाचा विक्रम मानला जातो.

प्रचेतस 30/12/2025 - 12:11
उत्तम परिचय. 'पर्व' वाचलेली आहेच, संग्रहीही आहे. मात्र भैरप्पांची असूनही मला ती तितकीशी नाही आवडली. कदाचित मूळ संहिता अनेकदा वाचल्याने रामायण किंवा महाभारत ह्यावर आधारीत कादंबर्‍या वाचायला मला आवडत नाहीत. मात्र भैरप्पांची ही कादंबरी खूप वेगळी आहे. 'युगंधर' मध्ये शिवाजी सावतांनी कशी श्रीकृष्णचरित्राची वाट लावली आहे तसे न करता भैरप्पा ह्यांनी एक नवाच दृष्टीकोन दिला आहे.

In reply to by प्रचेतस

Bhakti 30/12/2025 - 14:27
मूळ संहिता अनेकदा वाचल्याने रामायण किंवा महाभारत ह्यावर आधारीत कादंबर्‍या वाचायला मला आवडत नाहीत.
अगदी प्रत्यक्ष सुर्य जवळ असताना काजवा कसा खुणावेल :) माझ्यासारख्या सन्थ वाचकाला मुळ महाभारत वाचायला अजुन किमान ६-७ वर्षे तयारी करावी लागेल.'युगंधर',युगान्त,आणि आता अर्जुन ,द्रौपदी अशीही पुस्तके येतात ती वाचायची इच्छा कधीच होत नाही..पण भैरप्पा यान्चि इतकी उत्तम कादम्बरी अजुन लोकप्रिय व्हायला पाहिजे ती तितकी झाली नाही.

In reply to by प्रचेतस

मूळ संहिता अनेकदा वाचल्याने रामायण किंवा महाभारत ह्यावर आधारीत कादंबर्‍या वाचायला मला आवडत नाहीत.
सहमत आहे. मी सुद्धा मुळ ग्रंथ पहिले वाचले आणि नंतर त्यावरील टीका (म्हणजे इतर पुस्तके).

In reply to by कांदा लिंबू

Bhakti 31/12/2025 - 21:19
आवरण वाचली आहे.खुपच अभ्यासपूर्ण कादंबरी आहे,तशीच करूण घटनांनी भरलेली आहे. पहिल्या ४ वर्षांतच या कादंबरीच्या ३४ आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या, जो भारतीय कादंबरीविश्वात एक महत्त्वाचा विक्रम मानला जातो.
लेखनविषय:
पर्व 1 मूळ कन्नडमध्ये १९७९ साली प्रकाशित झालेली दिग्गज लेखक डॉ. एस. एल. #भैरप्पा यांची महाकादंबरी 'पर्व' साहित्यातील एक मैलाचा दगड आहे.उमा कुलकर्णी यांनी ती मराठीत भाषांतरीत केली आहे.

दलितांना शिक्षणापासून कुणी वंचित ठेवले होते.

विवेकपटाईत ·

युयुत्सु 30/11/2025 - 09:16
जन्माने सर्व शूद्र असतात म्हणजे जन्माने कोणीही ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य नसतो; सर्वजण सामान्य मानव म्हणून जन्म घेतात.> मग शंकराचार्यांसारखे हिंदू धर्माचार्य, हिंदू कायदा आणि संघासारखी संघटना यावर ठाम आणि कडक भूमिका का घेत नाही.

In reply to by युयुत्सु

विवेकपटाईत 04/12/2025 - 08:11
संघाशी या लेखाचा काहीही संबंध नाही. ब्रिटिशांनी भारतीयांना आणि दलितांना शिक्षणापासून वंचित केले हा या लेखाचा सार आहे. बाकी देशात संविधानानुसार कायदे आहे. भूमिकेबाबत म्हणाल तर काँग्रेस, काम्रेड बहुजन वादी संस्थांना याबाबत विचारावे त्यांची भूमिका काय आहे. कारण यांनी दलितांचा उपयोग फक्त राजनीतीसाठी केला आहे दलितांसाठी कोणतेही ठोस काम केलेले नाही. संघाचे म्हणाल तर संघ कधीच जात-पाच मानत नाही. सेवा भारती सारख्या संस्थांचे हजारो प्रकल्प आज दलित वस्तीत चालतात. त हजारो शाळा त्यात शिकणारे अधिकांश मागासवर्गीय वनवासी इत्यादी असतात. हजारो एकल शाळा ते चालवतात. दलित आणि आदिवासी राष्ट्रपती त्यांनी देशाला दिला आहे.

In reply to by युयुत्सु

विवेकपटाईत 04/12/2025 - 08:00
या प्रश्नाचे उत्तर सविधान रचणाऱ्यांना विचारा. बाकी हा लेख ब्रिटिश अधिकाऱ्यांचा सर्वे पर आधारित आहे.

युयुत्सु 30/11/2025 - 09:20
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या अहवालांनुसार (मुख्यतः विलियम अॅडमच्या १८३५-३८ च्या बंगाल-बिहार सर्वे आणि जी. डब्ल्यू. लिटनरच्या १८८२ च्या पंजाब सर्वे) आणि धर्मपाल यांच्या "द ब्यूटीफुल ट्री" पुस्तकात (१९८३) यांचा आधार घेऊन, बंगाल आणि बिहारमध्ये सुमारे १,००,००० गुरुकुल किंवा देशी पाठशाळा अस्तित्वात होत्या (प्रत्येक गावात किमान एक, एकूण १,५०,०००+ गावांप्रमाणे) तर पंजाबमध्ये लिटनरनुसार ५,०००+ पाठशाळा होत्या, ज्यात शूद्र व अन्य जातींचे बहुमत (७०%+) होते. प्री-कोलोनियल काळात भारताची जनसंख्या बघता आणि प्रत्येक गावांत एक गुरुकुल असल्याने जवळपास गांवतील सर्वांना प्राथमिक शिक्षण निश्चित मिळत असेल. मग अचानक असे काय झाले की शूद्र समाज शिक्षणापासून वंचित झाला.
या पाठशाळामध्ये किती शूद्रांना शिक्षण दिले गेले याची पण आकडेवारी द्या!

In reply to by युयुत्सु

युयुत्सु 01/12/2025 - 09:21
थापेबाजीचा कहर ज्यात शूद्र व अन्य जातींचे बहुमत (७०%+) होते कोणत्याही पाठशाळेत मुंज झाल्याशिवाय वेदाध्ययन करू दिले जात नाही. जर शूद्रांना जानव्याचा अधिकारच नव्हता (सं० "शूद्र पूर्वी कोण होते?" -बाबासाहेब आंबेडकर) तर त्यांना प्रवेश देणार्‍या या पाठशाळा कोणत्या? मला लहानपणी शाळेत असताना सस्वर वेदपठण ऐकायला खुप आवडायचे (तसे ते अजुनही आवडते). त्यामुळे मला ते शिकायची खुप इच्छा होती. त्यामुळे माझ्या वडिलांनी पुण्यात काही पाठशाळांमध्ये चवकशी केली होती. पण प्रत्येक ठिकाणी माझी मुंज झाली नाही म्हणून मला नाकारले गेले. सांगायचे तात्पर्य वेदाध्यनासाठी उपनयन संस्कार अनिवार्य होता.

In reply to by कॉमी

वाव! व्हॉट ए ग्रेट थिंकिंग! आणी आपण लोकांनी धर्म का सोडला ह्याबद्दल आश्चर्य व्यक्त करत राहतो!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

गामा पैलवान 01/12/2025 - 02:33
अमरेंद्र बाहुबली, शंकराचार्यांनी वेद ऐकणाऱ्या शूद्राच्या कानांत उकळलेले शिसे ओता वगैरे काहीही म्हंटलेलं नाही. फार काय, कुठल्याही हिंदू धर्मग्रंथात अशी बकवास आज्ञा नाही. चेंगीजखानाने ख्वाराझमीच्या कोण्या एका राजाला जिंकल्यावर त्याच्या कानांत व डोळ्यांत वितळलेली चांदी ओतली होती. याव्यतिरिक्त मला काहीही वास्तविक संदर्भ सापडला नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

कॉमी 01/12/2025 - 09:04
https://www.wisdomlib.org/hinduism/book/brahma-sutras-thibaut/d/doc63776.html The Śūdras are not qualified for that reason also that Smṛti prohibits their hearing the Veda, their studying the Veda, and their understanding and performing Vedic matters. The prohibition of hearing the Veda is conveyed by the following passages: 'The ears of him who hears the Veda are to be filled with (molten) lead and lac,' and 'For a Śūdra is (like) a cemetery, therefore (the Veda) is not to be read in the vicinity of a Śūdra.' From this latter passage the prohibition of studying the Veda results at once; for how should he study Scripture in whose vicinity it is not even to be read? There is, moreover, an express prohibition (of the Śūdras studying the Veda). 'His tongue is to be slit if he pronounces it; his body is to be cut through if he preserves it.' The prohibitions of hearing and studying the Veda already imply the prohibition of the knowledge and performance of Vedic matters; there are, however, express prohibitions also, such as 'he is not to impart knowledge to the Śūdra,' and 'to the twice-born belong study, sacrifice, and the bestowal of gifts.'--From those Śūdras, however, who, like Vidura and 'the religious hunter,' acquire knowledge in consequence of the after effects of former deeds, the fruit of their knowledge cannot be withheld, since knowledge in all cases brings about its fruit. Smṛti, moreover, declares that all the four castes are qualified for acquiring the knowledge of the itihāsas and purāṇas; compare the passage, 'He is to teach the four castes' (Mahābh.).--It remains, however, a settled point that they do not possess any such qualification with regard to the Veda.

In reply to by कॉमी

गामा पैलवान 02/12/2025 - 00:59
कॉमी, इंग्रजी आमदानीत असल्या पुस्तकांची पैशापासरी पैदास व्हायची. याला कसलाही आधार नाही. गौतम ऋषींनी लिहिलेलं ( वा संकलित केलेलं ) बौधायन धर्मसूत्रात असली काहीशी आज्ञा आहे म्हणून दावा केला जातो. संदर्भ : https://archive.org/details/in.ernet.dli.2015.429882/page/n181/mode/2up मात्र ही आज्ञा भारतात कुठेही अंमलांत आणल्याचं ऐकिवात नाही. फार काय, शिसे वितळवायचं कुठलंही सर्वतोमुखी तंत्र प्राचीन हिंदूंना अवगत नव्हतं. हा इंग्रजी आमदानीत केलेला घुसडग्रंथी कारभार आहे. असाच दावा इस्लामच्या बाबतीत कुठल्याश्या हादिथीचा हवाला देऊन केला जातो. म्हणजेच ही आधुनिक काळातली फेकाफेक आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

युयुत्सु 02/12/2025 - 16:23
श्री० गा०पै० युक्तीवादाकरता श्री० कॉमी यानी दिलेला संदर्भ निरर्थक आहे असे आपण मान्य करू या. पण तुम्हाला आदि शंकराचार्यांच्या ’चर्पटपञ्जरिका’ या स्तोत्राची गोष्ट माहित असेल अशी अपेक्षा आहे. वयाच्या कोणत्याही अवस्थेत जसे जमेल तसे, काही ना काही शिकत राहील्याने मेंदूचा र्‍हास कमी होतो आणि स्मृतीभ्रंशासारखे विकार कमी व्हायची शक्यता निर्माण होते, असे आधुनिक विज्ञान सांगते (हे पण वेदात कुठेना कुठे सांगितलेले असेलच). त्यामुळे गंगेच्या घाटावर व्याकरणसूत्रांची घोकंपट्टी करणार्‍या वृद्धाला शंकराचार्यांनी उत्तेजन न देता ’भज गोविंदं’ सारखा सल्ला दिला हे काही योग्य केले नाही. वयाच्या पञ्चाहत्तरीनंतर पीएच्डीसाठी नाव नोंदवून नंतर ती पूर्ण केलेल्यांच्या बातम्या जेव्हा वाचायला मिळतात तेव्हा आणि त्यात शंकराचार्य त्रिकाल ज्ञानी असल्यामुळेया गोष्टीचे गांभीर्य जास्त वाढते. व्यक्तीच्या अंगभूत गुणांच्या विकासाला जेव्हा समाजाकडून जेव्हा चुकीच्या कल्पनांचा आधार घेऊन अडथळे निर्माण केले जातात तेव्हा तो समा्ज पूर्ण क्षमतेने विकास पावणार कसा? श्री० पटाईत यांच्याकडून यांच्याकडून या चर्चेला मुद्देसूद उत्तर मिळेल असे वाट्त नाही. ते नेहेमी प्रमाणे ’हास्यास्पद’ हे लेबल लावून हात झटकणार हे निश्चित...

In reply to by कॉमी

विवेकपटाईत 04/12/2025 - 08:22
उपनिषद गीता आणि मनुस्मृति अनुसार जन्मतः सर्वशुद्र असतात शिक्षणानंतर क्रमानुसार त्याची जात ठरते. वरील उदाहरण शास्त्र झालेली भेसळ आहे. वास्तविक प्रमाण नाही. ब्रिटिश सर्वेनुसारच मलाबाग जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षण जे पूर्णपणे संस्कृत मध्ये होते 70% विद्यार्थी हे शुद्ध होते. वर्धमान जिल्ह्यात सहा शिक्षक तर चांडाल जातीचे होते. स्पष्ट आहे प्रत्यक्षात सर्वांना शिक्षणाचा अधिकार होता आणि तो दिला जात होता. आजही आर्य समाज तर प्रस्थापित गुरुकुलांमध्ये सर्व जातीचे विद्यार्थी वेदांचे शिक्षण घेतात. यादव जातीचे रामदेव बाबा सर्वांना माहीतच आहे. जन्मानुसार कुल आणि श्रेष्ठ मानणारी लोक त्या काळातील होते आजही होते. आपल्या देशातील अधिकार राजनीती दल ही याच आधारावर देशाचे नेतृत्व करण्याची इच्छा ठेवतात.

In reply to by कॉमी

दुसरा प्रश्न : दलितांनी किंवा शूद्रांनी वेदमंत्र ऐकले अस्ते किंवा त्यांचे अध्ययन केले अस्ते तर त्यांचा काय झा*चा फायदा झाला असता? जे रोजच्या जगण्यासाठी धडपडत होते (तेव्हा जवळपास सगळेच) त्यांना मेटाफिजिकल उत्तरे मिळून काय फरक पडला असता असे मला वाटत नाही.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

कॉमी 02/12/2025 - 20:22
आज ज्याला आपण शिक्षण म्हणतो ते वेदमंत्र नव्हेत. वेदांच्या संहितांत मेटाफिजिकल उत्तरे ही नसावीत. ती वेदांतात अर्थात उपनिषदात आहेत असे ऐकले आहे. वेदांच्या संहितेत निव्वळ देवांची कवतिके आणि यज्ञ करताना म्हणायचे मंत्र आहेत. आणि शंकराचार्यांचा रोख सुद्धा तिथेच आहे असा अंदाज आहे. शूद्रांना यज्ञ करण्यास परवानगी नसावी. खाखोशंजा.

In reply to by कॉमी

रूप कल्पून तेव्हाच्या शि़क्षणव्यवस्थेतल्या जातीय चूका काढणे मला पटतच नाही. तेव्हा एखादा ब्राह्मण म्हणाला असता मला चप्पल शिवायला शिकवा तेव्हा चांभारांनी त्याला शि़क्षण दिले असते का? मला या सगळ्या जातिउदग्माच्या थेअरीचा भयानक कंटाळा यायला लागला आहे.

आता शिक्षण सगळ्यांना उपलब्ध आहे. वेदकाळात शुद्राना शिक्षण दिले किवां नाही? समजा नाही दिले मग आता कुणाला जबाबदार धरणार.....हे असले विषय म्हणजे खाजवून खरूज काढणे आहे. बरेचजण आपापली गरळ ओकतील आणी काही XXभागवतील. काही डिफेंड करतील पण शेवटी ढाक के तीन पात... ज्या गोष्टी घडून गेल्या त्या ,UNDO,REDO करता येत नाहीत फक्त याद्वारे विष पसरवले जाते. आता सर्वांना शिक्षण उपलब्ध आहे. बरेच आगडे,पिछडे,दलित समाजाचा प्रत्येक घटक याचा फायदा घेऊन आपली पुढील पिढीचे भविष्य उज्ज्वल करत आहे. असले विषय मिपावर आणू नयेत असे मी म्हणणारा कोण पण याचा खरच काही उपयोग आहे का?यातून काही सकारात्मक निष्पन्न होणार आहे का याचा विचार करावा. तसेही ,समाजात जाती,धर्म यावरून वातावरण आगोदरच दुषित झालेले आहे. त्याचा फटका सर्वांनाच बसत आहे. ब्रिटीशांचा एजंडा दुसरा होता ,ते आपले उखळ पांढरे करून गेले . आपण मात्र आजुनही मेकाले बाबाला शिव्या घालतोय. पंच्याहत्तर वर्ष झाले बदला की शिक्षण पद्धती ,कोणी अडकाठी केलीय, पण नाही मुडदा जळत राहीला तरच डोंबाचे महत्व.... बाकी तुमचे चालू द्या.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 03/12/2025 - 11:27
असले विषय मिपावर आणू नयेत असे मी म्हणणारा कोण पण याचा खरच काही उपयोग आहे का?यातून काही सकारात्मक निष्पन्न होणार आहे का याचा विचार करावा.
आणि जात ,धर्म ,वर्ण यावरची इथलीच काय सोमिवर कुठेही चर्चा वाचली की ही केवळ जळजळ बाहेर पडतेय हे समजते.मुळात संशोधकांनी,अभ्यासकांनी यावर इतकं अभ्यासपूर्ण लिहिलंय की आपल्यासारख्या सामान्यांनी यावर अशी चर्चेची गरचज नाही.अशा चर्चा false positive वाटतात.

दलितांना शिक्षणापासून कुणी वंचित ठेवले होते. अर्थातच मनुवाद्यांनी! मनुवाद संपवण्यासाठी नेहरू, गांधी, आंबेडकर, फुले, शाहू, साने गुरुजी, प्रबोधनकार, पवार, ठाकरे, काँग्रेस असंख्य लोक झटले नी झटताहेत! पण संघरूपाने मनुवाद जिवंत ठेवल्या जातोय! मनुवाद्यांना जोपर्यंत मुळापासून ठेचल्या जात नाही तो पर्यंत ही विषवल्ली जिवंत राहील. दलित शिक्षणापासून वंचित राहू द्यायचे नसतील तर मनुवादाचा प्रसार करणारे ठेचले पाहिजेत!

कपिलमुनी 30/11/2025 - 23:17
शिक्षण सर्वांना होते असे व्यास वगैरे चे नाव घेऊन लिहिता मग कर्णाचे काय ? शोणाचे काय ? त्याआधी रामायणातल्या शंबूकाचे काय ? थियरी आणि प्रॅक्टिकल मध्ये फरक आहे आणि अपवाद म्हणजे नियम नव्हेत.. समाजात एखादा आंतरजातीय विवाह होत असेल तर त्याकाळी याला मान्यता होती असे म्हणणे चुकीचे असते

रामचंद्र 01/12/2025 - 01:19
खरं तर मंत्रानं जर काम होतं तर यंत्राचं कामच काय? सरकारने आता सर्व अभियांत्रिकीवर आधारित उद्योगधंदे बंद करून सत्ययुगातील तंत्रज्ञानाचाच वापर करायला हवा. आधुनिक वैद्यकीय शास्त्र त्यागून मुळ्या, काढे, भस्म, चाटणाधारित आर्यवैद्यकीय चिकित्सापद्धतीचा वापर अनिवार्य केला पाहिजे. पाश्चिमात्य तंत्रज्ञानावर पूर्णपणे बहिष्कार टाकून पूर्णतः सनातन जीवनपद्धतीचा अंगीकार केला पाहिजे. हे अजून होताना दिसत नाही यासाठी विद्यमान नेतृत्वाचा निषेध करावा तितका कमीच!

In reply to by रामचंद्र

विषयच संपला. बाय द वे, गोबरसंस्कृती कशी श्रेष्ठ होती यासाठी काही पटाईत लोक रात्रंदिवस त्यावर दळन आणत असतात. प्राचीन ते सर्वश्रेष्ठच होतं, असे काही ते असतं. अशा त्या श्रेष्ठ संस्कृतीचं काम आजच्या काळात तोच विचार आद्य महापुरुष पुढे घेऊन जात आहे, अशी ती मांडणी पडद्याआडून करायची असते. आणि मग पुन्हा लॉर्ड मेकॉलेची शिक्षण पद्धतीने पारंपरिक ज्ञान आणि संस्कृतीकडे कसं दुर्लक्ष केलं. पूर्वीची शिक्षणपद्धती कशी सर्वसमावेशक होती वगैरे सुरु असतं. अर्थात, पूर्वीची शिक्षण पद्धती एका विशिष्ट सामाजिक आणि धार्मिक चौकटीत बांधलेली असल्यामुळे सर्वसमावेशक नव्हती, यात आता काही नवं राहिलेलं नाही बाकी चालू द्या. -दिलीप बिरुटे

सुक्या 01/12/2025 - 05:05
कुणी कुणाला शिक्षणापासून कुणी वंचित ठेवले, किंवा शिक्षण कसे सर्वांना उपलब्ध होते ह्या १०० / २०० वर्षापुर्वीच्या बाता आजमितीला करण्यात काहीही हशील नाहीये. माझ्या किंवा माझ्या बापाच्या काळापासुन शिक्षण सर्वांना उपलब्ध आहे. फलाणा जातीचा आहे म्हणुन तुला शिक्षण घेता येणार नाही असे कुठेही घडल्याचे ऐकीवात नाही. जातीवादाची उतरंड बर्‍यापैकी मोडली आहे. त्यामुळे हा विषय कीतीही चघळला तरी त्यातुन काहीही निष्पंन्न होणार नाही.

युयुत्सु 01/12/2025 - 08:48
अवांतर हा दुवा स्वतंत्र चर्चा विषय होऊ शकतो का हे ठरवता येत नव्हते म्हणून इथेच शेअर करतोय. Everyday Habits That Reveal a Low IQ (Backed by Psychology) https://www.youtube.com/watch?v=-vVOOB3Bglk ही मंदबुद्धीत्वाची लक्षणे (Low IQ) एखाद्या मोठ्या समूहात/संघटनेत सापडली तर तो योगायोग अजिबात मानू नये.

पुर्वीचं सगळं चान चान होतं म्हणणारे आणि मनुस्मुतीचे दहन करणारे या दोघांनाही मनोरंजन मुल्याच्या बाबतीत मी १०० पै़की ११० गुण देतो.

युयुत्सु 30/11/2025 - 09:16
जन्माने सर्व शूद्र असतात म्हणजे जन्माने कोणीही ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य नसतो; सर्वजण सामान्य मानव म्हणून जन्म घेतात.> मग शंकराचार्यांसारखे हिंदू धर्माचार्य, हिंदू कायदा आणि संघासारखी संघटना यावर ठाम आणि कडक भूमिका का घेत नाही.

In reply to by युयुत्सु

विवेकपटाईत 04/12/2025 - 08:11
संघाशी या लेखाचा काहीही संबंध नाही. ब्रिटिशांनी भारतीयांना आणि दलितांना शिक्षणापासून वंचित केले हा या लेखाचा सार आहे. बाकी देशात संविधानानुसार कायदे आहे. भूमिकेबाबत म्हणाल तर काँग्रेस, काम्रेड बहुजन वादी संस्थांना याबाबत विचारावे त्यांची भूमिका काय आहे. कारण यांनी दलितांचा उपयोग फक्त राजनीतीसाठी केला आहे दलितांसाठी कोणतेही ठोस काम केलेले नाही. संघाचे म्हणाल तर संघ कधीच जात-पाच मानत नाही. सेवा भारती सारख्या संस्थांचे हजारो प्रकल्प आज दलित वस्तीत चालतात. त हजारो शाळा त्यात शिकणारे अधिकांश मागासवर्गीय वनवासी इत्यादी असतात. हजारो एकल शाळा ते चालवतात. दलित आणि आदिवासी राष्ट्रपती त्यांनी देशाला दिला आहे.

In reply to by युयुत्सु

विवेकपटाईत 04/12/2025 - 08:00
या प्रश्नाचे उत्तर सविधान रचणाऱ्यांना विचारा. बाकी हा लेख ब्रिटिश अधिकाऱ्यांचा सर्वे पर आधारित आहे.

युयुत्सु 30/11/2025 - 09:20
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या अहवालांनुसार (मुख्यतः विलियम अॅडमच्या १८३५-३८ च्या बंगाल-बिहार सर्वे आणि जी. डब्ल्यू. लिटनरच्या १८८२ च्या पंजाब सर्वे) आणि धर्मपाल यांच्या "द ब्यूटीफुल ट्री" पुस्तकात (१९८३) यांचा आधार घेऊन, बंगाल आणि बिहारमध्ये सुमारे १,००,००० गुरुकुल किंवा देशी पाठशाळा अस्तित्वात होत्या (प्रत्येक गावात किमान एक, एकूण १,५०,०००+ गावांप्रमाणे) तर पंजाबमध्ये लिटनरनुसार ५,०००+ पाठशाळा होत्या, ज्यात शूद्र व अन्य जातींचे बहुमत (७०%+) होते. प्री-कोलोनियल काळात भारताची जनसंख्या बघता आणि प्रत्येक गावांत एक गुरुकुल असल्याने जवळपास गांवतील सर्वांना प्राथमिक शिक्षण निश्चित मिळत असेल. मग अचानक असे काय झाले की शूद्र समाज शिक्षणापासून वंचित झाला.
या पाठशाळामध्ये किती शूद्रांना शिक्षण दिले गेले याची पण आकडेवारी द्या!

In reply to by युयुत्सु

युयुत्सु 01/12/2025 - 09:21
थापेबाजीचा कहर ज्यात शूद्र व अन्य जातींचे बहुमत (७०%+) होते कोणत्याही पाठशाळेत मुंज झाल्याशिवाय वेदाध्ययन करू दिले जात नाही. जर शूद्रांना जानव्याचा अधिकारच नव्हता (सं० "शूद्र पूर्वी कोण होते?" -बाबासाहेब आंबेडकर) तर त्यांना प्रवेश देणार्‍या या पाठशाळा कोणत्या? मला लहानपणी शाळेत असताना सस्वर वेदपठण ऐकायला खुप आवडायचे (तसे ते अजुनही आवडते). त्यामुळे मला ते शिकायची खुप इच्छा होती. त्यामुळे माझ्या वडिलांनी पुण्यात काही पाठशाळांमध्ये चवकशी केली होती. पण प्रत्येक ठिकाणी माझी मुंज झाली नाही म्हणून मला नाकारले गेले. सांगायचे तात्पर्य वेदाध्यनासाठी उपनयन संस्कार अनिवार्य होता.

In reply to by कॉमी

वाव! व्हॉट ए ग्रेट थिंकिंग! आणी आपण लोकांनी धर्म का सोडला ह्याबद्दल आश्चर्य व्यक्त करत राहतो!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

गामा पैलवान 01/12/2025 - 02:33
अमरेंद्र बाहुबली, शंकराचार्यांनी वेद ऐकणाऱ्या शूद्राच्या कानांत उकळलेले शिसे ओता वगैरे काहीही म्हंटलेलं नाही. फार काय, कुठल्याही हिंदू धर्मग्रंथात अशी बकवास आज्ञा नाही. चेंगीजखानाने ख्वाराझमीच्या कोण्या एका राजाला जिंकल्यावर त्याच्या कानांत व डोळ्यांत वितळलेली चांदी ओतली होती. याव्यतिरिक्त मला काहीही वास्तविक संदर्भ सापडला नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

कॉमी 01/12/2025 - 09:04
https://www.wisdomlib.org/hinduism/book/brahma-sutras-thibaut/d/doc63776.html The Śūdras are not qualified for that reason also that Smṛti prohibits their hearing the Veda, their studying the Veda, and their understanding and performing Vedic matters. The prohibition of hearing the Veda is conveyed by the following passages: 'The ears of him who hears the Veda are to be filled with (molten) lead and lac,' and 'For a Śūdra is (like) a cemetery, therefore (the Veda) is not to be read in the vicinity of a Śūdra.' From this latter passage the prohibition of studying the Veda results at once; for how should he study Scripture in whose vicinity it is not even to be read? There is, moreover, an express prohibition (of the Śūdras studying the Veda). 'His tongue is to be slit if he pronounces it; his body is to be cut through if he preserves it.' The prohibitions of hearing and studying the Veda already imply the prohibition of the knowledge and performance of Vedic matters; there are, however, express prohibitions also, such as 'he is not to impart knowledge to the Śūdra,' and 'to the twice-born belong study, sacrifice, and the bestowal of gifts.'--From those Śūdras, however, who, like Vidura and 'the religious hunter,' acquire knowledge in consequence of the after effects of former deeds, the fruit of their knowledge cannot be withheld, since knowledge in all cases brings about its fruit. Smṛti, moreover, declares that all the four castes are qualified for acquiring the knowledge of the itihāsas and purāṇas; compare the passage, 'He is to teach the four castes' (Mahābh.).--It remains, however, a settled point that they do not possess any such qualification with regard to the Veda.

In reply to by कॉमी

गामा पैलवान 02/12/2025 - 00:59
कॉमी, इंग्रजी आमदानीत असल्या पुस्तकांची पैशापासरी पैदास व्हायची. याला कसलाही आधार नाही. गौतम ऋषींनी लिहिलेलं ( वा संकलित केलेलं ) बौधायन धर्मसूत्रात असली काहीशी आज्ञा आहे म्हणून दावा केला जातो. संदर्भ : https://archive.org/details/in.ernet.dli.2015.429882/page/n181/mode/2up मात्र ही आज्ञा भारतात कुठेही अंमलांत आणल्याचं ऐकिवात नाही. फार काय, शिसे वितळवायचं कुठलंही सर्वतोमुखी तंत्र प्राचीन हिंदूंना अवगत नव्हतं. हा इंग्रजी आमदानीत केलेला घुसडग्रंथी कारभार आहे. असाच दावा इस्लामच्या बाबतीत कुठल्याश्या हादिथीचा हवाला देऊन केला जातो. म्हणजेच ही आधुनिक काळातली फेकाफेक आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

युयुत्सु 02/12/2025 - 16:23
श्री० गा०पै० युक्तीवादाकरता श्री० कॉमी यानी दिलेला संदर्भ निरर्थक आहे असे आपण मान्य करू या. पण तुम्हाला आदि शंकराचार्यांच्या ’चर्पटपञ्जरिका’ या स्तोत्राची गोष्ट माहित असेल अशी अपेक्षा आहे. वयाच्या कोणत्याही अवस्थेत जसे जमेल तसे, काही ना काही शिकत राहील्याने मेंदूचा र्‍हास कमी होतो आणि स्मृतीभ्रंशासारखे विकार कमी व्हायची शक्यता निर्माण होते, असे आधुनिक विज्ञान सांगते (हे पण वेदात कुठेना कुठे सांगितलेले असेलच). त्यामुळे गंगेच्या घाटावर व्याकरणसूत्रांची घोकंपट्टी करणार्‍या वृद्धाला शंकराचार्यांनी उत्तेजन न देता ’भज गोविंदं’ सारखा सल्ला दिला हे काही योग्य केले नाही. वयाच्या पञ्चाहत्तरीनंतर पीएच्डीसाठी नाव नोंदवून नंतर ती पूर्ण केलेल्यांच्या बातम्या जेव्हा वाचायला मिळतात तेव्हा आणि त्यात शंकराचार्य त्रिकाल ज्ञानी असल्यामुळेया गोष्टीचे गांभीर्य जास्त वाढते. व्यक्तीच्या अंगभूत गुणांच्या विकासाला जेव्हा समाजाकडून जेव्हा चुकीच्या कल्पनांचा आधार घेऊन अडथळे निर्माण केले जातात तेव्हा तो समा्ज पूर्ण क्षमतेने विकास पावणार कसा? श्री० पटाईत यांच्याकडून यांच्याकडून या चर्चेला मुद्देसूद उत्तर मिळेल असे वाट्त नाही. ते नेहेमी प्रमाणे ’हास्यास्पद’ हे लेबल लावून हात झटकणार हे निश्चित...

In reply to by कॉमी

विवेकपटाईत 04/12/2025 - 08:22
उपनिषद गीता आणि मनुस्मृति अनुसार जन्मतः सर्वशुद्र असतात शिक्षणानंतर क्रमानुसार त्याची जात ठरते. वरील उदाहरण शास्त्र झालेली भेसळ आहे. वास्तविक प्रमाण नाही. ब्रिटिश सर्वेनुसारच मलाबाग जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षण जे पूर्णपणे संस्कृत मध्ये होते 70% विद्यार्थी हे शुद्ध होते. वर्धमान जिल्ह्यात सहा शिक्षक तर चांडाल जातीचे होते. स्पष्ट आहे प्रत्यक्षात सर्वांना शिक्षणाचा अधिकार होता आणि तो दिला जात होता. आजही आर्य समाज तर प्रस्थापित गुरुकुलांमध्ये सर्व जातीचे विद्यार्थी वेदांचे शिक्षण घेतात. यादव जातीचे रामदेव बाबा सर्वांना माहीतच आहे. जन्मानुसार कुल आणि श्रेष्ठ मानणारी लोक त्या काळातील होते आजही होते. आपल्या देशातील अधिकार राजनीती दल ही याच आधारावर देशाचे नेतृत्व करण्याची इच्छा ठेवतात.

In reply to by कॉमी

दुसरा प्रश्न : दलितांनी किंवा शूद्रांनी वेदमंत्र ऐकले अस्ते किंवा त्यांचे अध्ययन केले अस्ते तर त्यांचा काय झा*चा फायदा झाला असता? जे रोजच्या जगण्यासाठी धडपडत होते (तेव्हा जवळपास सगळेच) त्यांना मेटाफिजिकल उत्तरे मिळून काय फरक पडला असता असे मला वाटत नाही.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

कॉमी 02/12/2025 - 20:22
आज ज्याला आपण शिक्षण म्हणतो ते वेदमंत्र नव्हेत. वेदांच्या संहितांत मेटाफिजिकल उत्तरे ही नसावीत. ती वेदांतात अर्थात उपनिषदात आहेत असे ऐकले आहे. वेदांच्या संहितेत निव्वळ देवांची कवतिके आणि यज्ञ करताना म्हणायचे मंत्र आहेत. आणि शंकराचार्यांचा रोख सुद्धा तिथेच आहे असा अंदाज आहे. शूद्रांना यज्ञ करण्यास परवानगी नसावी. खाखोशंजा.

In reply to by कॉमी

रूप कल्पून तेव्हाच्या शि़क्षणव्यवस्थेतल्या जातीय चूका काढणे मला पटतच नाही. तेव्हा एखादा ब्राह्मण म्हणाला असता मला चप्पल शिवायला शिकवा तेव्हा चांभारांनी त्याला शि़क्षण दिले असते का? मला या सगळ्या जातिउदग्माच्या थेअरीचा भयानक कंटाळा यायला लागला आहे.

आता शिक्षण सगळ्यांना उपलब्ध आहे. वेदकाळात शुद्राना शिक्षण दिले किवां नाही? समजा नाही दिले मग आता कुणाला जबाबदार धरणार.....हे असले विषय म्हणजे खाजवून खरूज काढणे आहे. बरेचजण आपापली गरळ ओकतील आणी काही XXभागवतील. काही डिफेंड करतील पण शेवटी ढाक के तीन पात... ज्या गोष्टी घडून गेल्या त्या ,UNDO,REDO करता येत नाहीत फक्त याद्वारे विष पसरवले जाते. आता सर्वांना शिक्षण उपलब्ध आहे. बरेच आगडे,पिछडे,दलित समाजाचा प्रत्येक घटक याचा फायदा घेऊन आपली पुढील पिढीचे भविष्य उज्ज्वल करत आहे. असले विषय मिपावर आणू नयेत असे मी म्हणणारा कोण पण याचा खरच काही उपयोग आहे का?यातून काही सकारात्मक निष्पन्न होणार आहे का याचा विचार करावा. तसेही ,समाजात जाती,धर्म यावरून वातावरण आगोदरच दुषित झालेले आहे. त्याचा फटका सर्वांनाच बसत आहे. ब्रिटीशांचा एजंडा दुसरा होता ,ते आपले उखळ पांढरे करून गेले . आपण मात्र आजुनही मेकाले बाबाला शिव्या घालतोय. पंच्याहत्तर वर्ष झाले बदला की शिक्षण पद्धती ,कोणी अडकाठी केलीय, पण नाही मुडदा जळत राहीला तरच डोंबाचे महत्व.... बाकी तुमचे चालू द्या.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 03/12/2025 - 11:27
असले विषय मिपावर आणू नयेत असे मी म्हणणारा कोण पण याचा खरच काही उपयोग आहे का?यातून काही सकारात्मक निष्पन्न होणार आहे का याचा विचार करावा.
आणि जात ,धर्म ,वर्ण यावरची इथलीच काय सोमिवर कुठेही चर्चा वाचली की ही केवळ जळजळ बाहेर पडतेय हे समजते.मुळात संशोधकांनी,अभ्यासकांनी यावर इतकं अभ्यासपूर्ण लिहिलंय की आपल्यासारख्या सामान्यांनी यावर अशी चर्चेची गरचज नाही.अशा चर्चा false positive वाटतात.

दलितांना शिक्षणापासून कुणी वंचित ठेवले होते. अर्थातच मनुवाद्यांनी! मनुवाद संपवण्यासाठी नेहरू, गांधी, आंबेडकर, फुले, शाहू, साने गुरुजी, प्रबोधनकार, पवार, ठाकरे, काँग्रेस असंख्य लोक झटले नी झटताहेत! पण संघरूपाने मनुवाद जिवंत ठेवल्या जातोय! मनुवाद्यांना जोपर्यंत मुळापासून ठेचल्या जात नाही तो पर्यंत ही विषवल्ली जिवंत राहील. दलित शिक्षणापासून वंचित राहू द्यायचे नसतील तर मनुवादाचा प्रसार करणारे ठेचले पाहिजेत!

कपिलमुनी 30/11/2025 - 23:17
शिक्षण सर्वांना होते असे व्यास वगैरे चे नाव घेऊन लिहिता मग कर्णाचे काय ? शोणाचे काय ? त्याआधी रामायणातल्या शंबूकाचे काय ? थियरी आणि प्रॅक्टिकल मध्ये फरक आहे आणि अपवाद म्हणजे नियम नव्हेत.. समाजात एखादा आंतरजातीय विवाह होत असेल तर त्याकाळी याला मान्यता होती असे म्हणणे चुकीचे असते

रामचंद्र 01/12/2025 - 01:19
खरं तर मंत्रानं जर काम होतं तर यंत्राचं कामच काय? सरकारने आता सर्व अभियांत्रिकीवर आधारित उद्योगधंदे बंद करून सत्ययुगातील तंत्रज्ञानाचाच वापर करायला हवा. आधुनिक वैद्यकीय शास्त्र त्यागून मुळ्या, काढे, भस्म, चाटणाधारित आर्यवैद्यकीय चिकित्सापद्धतीचा वापर अनिवार्य केला पाहिजे. पाश्चिमात्य तंत्रज्ञानावर पूर्णपणे बहिष्कार टाकून पूर्णतः सनातन जीवनपद्धतीचा अंगीकार केला पाहिजे. हे अजून होताना दिसत नाही यासाठी विद्यमान नेतृत्वाचा निषेध करावा तितका कमीच!

In reply to by रामचंद्र

विषयच संपला. बाय द वे, गोबरसंस्कृती कशी श्रेष्ठ होती यासाठी काही पटाईत लोक रात्रंदिवस त्यावर दळन आणत असतात. प्राचीन ते सर्वश्रेष्ठच होतं, असे काही ते असतं. अशा त्या श्रेष्ठ संस्कृतीचं काम आजच्या काळात तोच विचार आद्य महापुरुष पुढे घेऊन जात आहे, अशी ती मांडणी पडद्याआडून करायची असते. आणि मग पुन्हा लॉर्ड मेकॉलेची शिक्षण पद्धतीने पारंपरिक ज्ञान आणि संस्कृतीकडे कसं दुर्लक्ष केलं. पूर्वीची शिक्षणपद्धती कशी सर्वसमावेशक होती वगैरे सुरु असतं. अर्थात, पूर्वीची शिक्षण पद्धती एका विशिष्ट सामाजिक आणि धार्मिक चौकटीत बांधलेली असल्यामुळे सर्वसमावेशक नव्हती, यात आता काही नवं राहिलेलं नाही बाकी चालू द्या. -दिलीप बिरुटे

सुक्या 01/12/2025 - 05:05
कुणी कुणाला शिक्षणापासून कुणी वंचित ठेवले, किंवा शिक्षण कसे सर्वांना उपलब्ध होते ह्या १०० / २०० वर्षापुर्वीच्या बाता आजमितीला करण्यात काहीही हशील नाहीये. माझ्या किंवा माझ्या बापाच्या काळापासुन शिक्षण सर्वांना उपलब्ध आहे. फलाणा जातीचा आहे म्हणुन तुला शिक्षण घेता येणार नाही असे कुठेही घडल्याचे ऐकीवात नाही. जातीवादाची उतरंड बर्‍यापैकी मोडली आहे. त्यामुळे हा विषय कीतीही चघळला तरी त्यातुन काहीही निष्पंन्न होणार नाही.

युयुत्सु 01/12/2025 - 08:48
अवांतर हा दुवा स्वतंत्र चर्चा विषय होऊ शकतो का हे ठरवता येत नव्हते म्हणून इथेच शेअर करतोय. Everyday Habits That Reveal a Low IQ (Backed by Psychology) https://www.youtube.com/watch?v=-vVOOB3Bglk ही मंदबुद्धीत्वाची लक्षणे (Low IQ) एखाद्या मोठ्या समूहात/संघटनेत सापडली तर तो योगायोग अजिबात मानू नये.

पुर्वीचं सगळं चान चान होतं म्हणणारे आणि मनुस्मुतीचे दहन करणारे या दोघांनाही मनोरंजन मुल्याच्या बाबतीत मी १०० पै़की ११० गुण देतो.
लेखनविषय:
लेखनप्रकार
ब्रिटिश येण्यापूर्वी आपल्या देशात स्त्रियांना आणि शूद्रांना शिक्षणाचा अधिकार नव्हता असा प्रचार ब्रिटीशांनी आणि स्वतंत्रता प्राप्ती नंतर ब्रिटिश धार्जिणी सरकारी तंत्राने ही सतत केला. त्यामागे समाजाला विभाजित करून फूट डालो राज करो हा राजनीतिक उद्देश्य ही होता. पण सत्य कितीही लपविले तरी लपून राहत नाही. आज एआयच्या काळात जुने संदर्भ शोधता येतात आणि सत्य समोर आणता येते. त्याच्याच संदर्भ घेऊन हा लेख उकेरला आहे. सुरुवात वैदिक काळापासून करतो.

आदिमाया (ऐसी अक्षरे -३४)

Bhakti ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
पुस्तक -आदिमाया लेखक -अशोक_राणा विषय-मातृदेवता आजही जिथे स्त्रीयांववर अमानुषता करणारा समाज अस्तित्वात आहे.तो मातृसत्ताक संस्कृतीची मूळे पूर्ण विसरला आहे. तो समाज सिंधू संस्कृतीतील मातृदेवतांचे उगम वाचायला,जाणून घ्यायला उत्सुक कसा असणार? पण ही सरसकटीकरण करणारी वाक्यं न मानता ज्यांना संस्कृती, संस्कृतीची रूपांतरणे जाणून घ्यायची इच्छा आहे त्यांनी हे पुस्तक एकदा तरी नक्की वाचावे. पुस्तकात आर्येतर पूर्व काळातील मातृगणांची ओळख करून देली आहे.