user

चारोळ्या

केव्हा तरी पहाटे..

असंच एकदा मित्रमैत्रिणींबरोबर गप्पा मारताना एका मैत्रिणीने केव्हा तरी पहाटे हे गाणं म्हटलं...तर त्यावरून एका मैत्रिणीला याच गाण्यासाठी काही ओळी सुचल्या. मग त्यानंतर सगळ्यांनाच हा फीवर चढला...हे माझेही काही प्रयत्न -

ही कडवी चालीत बसत नसली तरीही त्यातील भावार्थ गाण्याला अनुरूप असा आहे

या शांतशा क्षणांनी मागितली साथही कुणाची
ती साथ मागताना ही रात सरून गेली..

शब्द माझे भिजताना सजवून रात्र गेली
हे शब्द वेदनांचे सुचवून रात्र गेली..

बघा तुम्हालाही अजून काही सुचतंय का?

महा विडंबन स्पर्धा

आत्ताच एका चर्चेत एक महावाक्य वाचलं आणि लक्षात आलं की हा तर समस्त विडंबकांसाठी अफलातून कच्चा माल आहे. तेव्हा म्हंटलं आपणंच एक मिपावर छोटीशी स्पर्धा आयोजित करु.

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

ह्या धाग्यावर जो ह्या महावाक्याचे सर्वात दर्जेदार बिडंबन करुन दाखवले त्याला ह्या आठवड्याचा बिडंबक पुरस्कार देण्यासाठी मी स्वतः सरपंचाकडे शिफारस करेन.

तर लोकहो येउद्यात एक से एक विडंबने.

मित्रार्थ

मैत्रीदिनाशी मैत्री करा,

मैत्रीशी मैत्र धरा!

मित्रांच्या हृदयात घर करा,

मैत्रीच्या शब्दार्थाला सर करा!

अघटीत

सूर्य गारठला, चंद्र विझला

जेव्हा माणसाने माणुसकीचा बळी दिला...

तारे हरपले, अवकाश संपले,

जेव्हा प्रेम हृदयाला सोडून गेले...

पुन्हा एकदा

पुन्हा एकदा

आज पुन्हा एकदा
चींब पावसात भिजुन घेतल
तेवढच ओझ्या मनाला
हलक करुन टाकल

मनमुराद रडाव वाटत
ज्वालामुखि होऊन फुटाव वाटत
जळेल सारी वस्ती म्हणुन
ठसका काढुन उठाव लागत

मग काय?
आज पुन्हा एकदा
चींब पावसात भिजुन घेतल
तेवढच ओझ्या मनाला
हलक करुन टाकल

fsdfs

चार ओळी मनापासुन...

दूर कोठेतरी कोण तो छेडी मारवा
साद आर्त घालुनी आठवितो प्रियेला
ओढ वेडी का अशी लागते जीवाला
चांदण्यांच्या फेरयात चंद्र शोधतो कुणाला??

४ चारोळ्या

आताशा डोळ्यात
आषाढमेघ येऊन वसलाय
मनात मात्र माझ्या
वैशाखवणवा पेटलाय

*********
तुझी जागा मनामध्ये
अपुरीच राहिली
फुल खुडलेल्या देठाला का
कधी पुन्हा कळी आली?

*********
प्रत्येकाच्या कपाळी म्हणे
भाग्य लिहिलेलं असतं
आठ्या पाडून म्हणूनच ते
चुरगळायचं नसतं

*********
माणसे तशीच राहतात
युग फक्त सरते
महाभारतातली द्रौपदी
कलियुगातही झुरते

सुरेश नायर

https://sites.google.com/site/surmalhar/

मन.....

मूसळधार पावसात.....
अंग चिंब चिंब भिजले
भिजलेल्या अंगातील.....
मन मात्र तहाणलेलेच राहीले.

~ स्पंदन ~

!! चारोळ्या !!

हा आमचा एक प्रयत्न... आवडला तर सांगा, नाही आवड्ला तरी सांगा..

तुझी आठवण येते तेव्हा
तु दिलेली प्रेमपत्रे वाचत बसतो
तु येणार नाहीस माहित असतं
डोळे पुसुन मग स्वतःवरच हसतो..

*******************

चिमण्याची चिमणी कुठेतरी हरविली
चिमणा व्याकुळतेने तडफड्ला
चिमणी शोधुनही नाही मिळाली
मग चिमण्यानेही प्राण सोडला..

आपला मराठमोळा

आठवण

एकही क्षण नाही जेव्हा
तिची आठवण येत नसेल,
असा एकतरी क्षण असेल
जेव्हा ती मला आठवत असेल

Syndicate content
Scroll to Top