विनोद

माझा विनोद वाचणार का?

महाराष्ट्रातील वीस dam पाहीलेल्या माणसाला काय म्हणाल?
उत्तर :- तुम्ही द्या

पकाऊ जोक्स ... (लोकग्रहास्तव नवा धागा)

नमस्कार लोक्स ... प्राजू तैंनी सुरू केलेला धागा अंमळ तुंबलाय आणि त्यामुळे विनोबा आपले डोक्यावरचे केस ऊपटून राहिलेत ..
त्यांच्या साठी .. नविन धागा सुरू करत आहे होओओओओओओओओओ

तर ज्याला कोणाला आपले पाचकळ , पुचाट , फालतू , भंगार, केस ऊपटायला लावणारे विनोद खरडायचे असतिल तर फळा मोकळा आहे ...

हाही फळा तुंबेल अशी आशा करतो ..

केस ऊपटायला लावणारा एक विनोद (खन्ना नाही .. मेहरा .... तोपण केस ऊपटायला लावत असे) माझ्या कडुन ....

राजे शिकारीला चाललेत .. घोड्यावर बसलेत ...
तगडक तगडक तगडक तगडक तगडक तगडक
तगडक तगडक तगडक तगडक तगडक तगडक
तगडक तगडक तगडक तगडक तगडक तगडक
तगडक तगडक तगडक तगडक तगडक तगडक
तगडक तगडक तगडक तगडक तगडक तगडक
तगडक तगडक तगडक तगडक तगडक तगडक
तगडक तगडक तगडक तगडक तगडक तगडक
तगडक तगडक तगडक तगडक तगडक तगडक
राजे शिकारी हून परत आले... घोडा पार्क केला आणि सरळ शौचकंपू (हेच ना ? सर्किट सर प्लिज करेक्ट मी) मधे पळाले...

असो .. आपले डोके दुखले असेलच .. घ्या बदला मग !! असाच एक बकवास जोक टाकून

कार्यालय

कार्यालय

इथे पहायला मिळतील नमुने एकाहून एक भारी
फरार झाले अधिकारी मोकाट कर्मचारी

कुणालाही राहिलं नाही कुंणाचंही भय
काम कोणी करत नाही तरी कार्यालय

- विनोद इंगळे

बहरला पारिजात दारी फुलें का पडती शेजारी?

अमिताभ बच्चनाक मालवणीतून फुक्कटचो सल्लो.
बाबारे,
कुणी तरी म्हटला हा,
"सूर्याकडून एक शिकूक होयां संध्याकाळ झाली रे झाली, की आपण अस्थाक गेलेला बरां."

तुझ्यापेक्षा मी मोठो आसंय (फक्त वय्यान रे!),माकां वाटतां मी तुका चार उपदेशाच्यो गोष्टी सांगितलंय तर तां गैर होवूंचा नाय.नायतरी माझ्यासारख्या मालवणी माणसाक विचारल्याशिवाय कोणाक उपदेश करण्याची उपजतच खाजच असतां म्हणा. माणूस निष्कारण उपदेश करूंक लागलो की समजुक होया हेका म्हातारपण इला.म्हातारपण इल्याचे आणखीन काय काय खुणो आसत म्हणा. पु.ल.नी म्हणजे आमच्या पु.ल.देशपांड्यानी रे, नाय काय सांगितला,सकाळी उठल्यावर गुढगे दुखणत नाय असां झाला की समजुचा आपण खंवाचलो( म्हणजे मेलो रे!) तशीच आणखी एक खूण कोणी तरी सांगितली आसा.
जर कोण तुमच्याकडून उपदेश घेवचो बंद झालो की समजुचा म्हातारपण इला.आणि जर कां कोणी म्हणालो हो उपदेश अमक्या अमक्याकडून मिळालो असतो! की समजुचां तो म्हातारो आतां हयात नाय.
तू माझो शेजारी.जुहु चौपाटीवर सकाळीच फिरांक जाताना तुझ्या बंगल्यावरून जावचा लागा.तुका बागेत काम करताना हज्जारवेळां बघीतलंय.झाले आतां तेका खूप दिवस म्हणा.आता तूं माका ओळखूचस नाय.

बाबारे,(अशी सुरवात केल्यावर समजुक होयां,काय तरी उपदेश ऐकूचो लागतलो.)
"आयुष्य कमी किंवा जास्त ह्या काय नशिबावर अवलंबून नसता,आपल्या लाईफ स्टाईलवर असतां अशी माझी धारणा आसा.

तू हल्ली ज्यावेळी ६३ वर्षाचो होतस त्यावेळी तुका कसलो तरी आजार इलो होतो.६३ वयावर ३६ वर्षाचो असल्यासारख्या करून कामा करीत रव्हल्यास कसा चलताला बाबा?समजा, एखादी बाई ४१ वर्षाची आसा तिनां १४ वर्षाची स्वतःक समजून जर का बॉलीवूड डान्स केलो तर तेचे काय परिणाम होतले?.(तू बॉलिवूडचो राजो, तेव्हां तुका तां समजूक कठीण नाय म्हणा) असो प्रश्न मी माझ्या एका डॉक्टर मित्राक विचारलंय.तो काय म्हणालो माहित आसां?
तो हंसत हंसत म्हणालो,
"जास्त काही होणार नाही फक्त गुढगे,युट्रस,किंवा आंतडे डीसलोकेट होईल.ताबडतोब त्याचे परिणाम दिसतीलही,न दिसल्यास कांही काळजी नाही उतार वयावर ते सर्व निमुटपणे दिसायला लागतील एव्हडंच."
४२ वर्षावर तुका नाय काय, जीवघेणो अपघात झालेलो,तेचे परिणाम आता तुका भोवतत.२४ वर्षाच्या तरुण मुलासारखो तूं फायटींग करूचो शॉट करताना, पुनीत नावाच्या नटान तुका शुटींगमधे बुक्को मारण्याचो सीन केलो आणि तू तो टाळण्यासाठी उडी मारलंस आणि मग टेबलाचो कोपरो तुझ्या पोटांत गेलो आणि तुझां आंतडा आतुन दुखावला वगैरे वगैरे.आठवतां मां, तुका? त्यावेळां त्यामानान, तूं तरुण होतंस लवकर बरो झालंस आणि कामांक पण लागलंस.

खूप कचोऱ्यो खाल्लंस म्हणून तुझ्या पोटांत दुखतां म्हणून हल्लीच्या आजारात डॉक्टरास सांगून तू बघलंय,पण माझ्या मनात पाल चुकचुकली.तुझो तो जुनो आजार आतां तुका ह्या वयात त्रास देवूक लागलो असतोलो असां माझ्या मनात इला.आणि तांच तुकां डॉक्टरान सांगलां नाय रे?
"देवा असां नको होवू देत रे" असां आम्ही मनात म्हटलां विचार पायजेतर कुंदाक माझ्या बायलेक रे!
अरे राजा,तुका लिलावतीत नेल्यावर तां इतक्या अपसेट झालां कि रात्री तेच्या स्वपनात तुझी जया आयली आणि म्हणता कशी, "त्या आजारात आणि ह्या आजारात मी ह्याला बरं वाटावं म्हणून ह्याच्यासाठी किती व्रते केली, ह्याच्यावर ओवाळून दानधर्म केले,सिद्धीविनायक मंदिरात जावून किती एकादक्षीणा केल्या.मी त्याला सांगत असते "अरे,प्रकृती सांभाळून काम कर,पण माझा त्याला राग येतो"

मी जां काय ऐकला तां आता तुका सांगतंय.
तू म्हणे शंभर कोटी रुपये खंय तरी गुंतवलंस आणि एक कंपनी काढलंस,आणि हातोहात तुका लोकांनी फसवलां म्हणून मी ऐकलां.आपल्यासारख्याच सगळां जग आसां, असा समजून तू तेंच्यावर विश्वास ठेवून वागलंस,लोकांचो पैसो तो, मग तेंचो पैसो फेडूक नको काय? ते फेडून टाकण्यासाठी तू झटून मेहनत घेतलंस.
जया सांगी होती,"फिजा,दिदार आणि कल हो न हो मधे माका ह्या वयात काम करुक लागला.फिजात तर माका बुरखो घालून काम करुक लागला."

बाबारे, सगळां देणां तू फेडलंस,त्यानंतर पैशाची तुझ्याकडे रीघ लागली.तू पब्लीक फीगर ना, मग तुका लोकांचा ऐकूक लागतलाच. पण लोक म्हणतत म्हणून भुरावून जावू नको बाबा.
"अमिताभजी तुम ऍक्टींग करो हम तुम्हारे सांथ है " असा लोक तुका सांगतत असा मी ऐकलां.पण तू तेंच्या नादाक लागू नको.काळजी घे तुझ्या प्रकृतीची.
बाबारे, म्हटहा ना "जग हे दिल्या घेतल्याचे,नाही कोण कुणाचे" तां काय खोटां नाय.शेवटी नुकसान कोणाचा तुझाच मां?अभिषेकचा आता लगीन झाला.नक्षत्रासारखी तुका सुन मिळाली. तू आजोबा पण होशीत.तुका काय कमी आसा रे?पैसो म्हटलो तर दाबून पैसो तुझ्याकडे आसा.आणि ह्या वयात पैशाची कितीशी गरज आसा.मनः शांती मिळाली म्हणजे झाला. तुका नाय असा वाटणां?
हे सगळे लोक तुझ्या मागे लागतत आणि तुका काय काय आयडीया देतत.पण तुझ्या आंगातले गुण ह्या लोकानी घेवूक नको काय?
आतां ह्याच बघ,माका आपलां दिसला तां सांगतय.तू हल्लीच्या आजारात लिलावती हॉस्प्रिट्लात होतंस.किती लोक घोळको करून तुझ्यासाठी बाहेर उभे असत.एकदाचो तू बरो झालंस. त्यावेळी हॉस्पिटलाच्या बाहेर किती तुफान गर्दी होती.तू दिशसीस म्हणून ताटकळंत उभे होते येव्हडे लोक.
तुझी जया तुझ्या नविन "जलसा" बंगल्यांत वाट बघत होती.लोकानी तू तिकडे जाशीस म्हणून तुझ्या दर्शनासाठी तिकडे धांव घेतली.काही लोकानी तु सिद्धीविनायक मंदिरात पहिल्यानदां जाशीस म्हणून तिकडे धांव घेतली.तू शिरडीक जाझीस म्हणून तिकडे धांव घेतली.पण तू काय केलंस,तू सरळ तुझ्या "प्रतिक्षा" बंगल्याकडे गेलंस.कारण तुका तुझ्या आवशीची आठवण आयली.ती तुझी वाट बघत असतली तू मातृभक्त किती आसस ह्या, ह्यां लोकांक काय माहीत रे?पण आचरणात कोण आणताहा या दिवसात? त्या बंगल्याकडे तुझ्या रखवालदारा शिवाय कोण चिटपांखरू पण नव्हता.बरो झालंस म्हणून सुरवातीक आवशीच्या पायावर डोक्या ठेवूक गेलस मां?पायावर डोक्या ठेवून नंतर तिना तुका जवळ घेतलां.त्या तुझ्या माऊलीक तुझ्या स्पर्शान निराळाच वाटलां.तुझ्या डोळ्यातली आंसवा तिना तिच्या कृश हातानी फुसत, तिना तुका आणखी जवळ घेतलां आणि तुझ्या कानात पुट्पुटून ती म्हणाली, "देवा माझा उरलेलां आयुष्य हेकांच दी" तां ऐकून तू किती सद्नदीत झालंस,आठवतां ना तुका?

एका खयंच्या तरी सिनेमात तू त्या शशी कपुराक विचारतंस ना?
"काय आसां तुझ्याकडे?
माझ्याकडे आसां तसो, बंगलो,गाडी,नोकर चाकर आसत?"
त्यावर तो तुका सांगता मां,
"माझी आओस आसा माझ्याकडे."
आणि तां ऐकून तू कसो त्या सिनमधे गप्प बसतंस.पण खरां सागू तुझ्या खऱ्या आयुष्यात तुका त्या प्रश्नाचां उत्तर असा देवूक होयां,
"बंगलो,गाडी,नोकर चाकर माझ्याकडे आसंतंच शिवाय माझी आओस पण माझ्याक्डे आसां."
असां म्हणून किती धन्य वाटत असताला तुका?.
आता तुझी आवस गेली,आमकां पण खूप वायट वाटलां.

एखादो माका म्हणतलो, तुका काय करूंचा आसा.तो आपलां काय तां बघून घ्येत.पण खरां सांगू तुका मालवणी आम्ही असेच आसो.जरा फटकळ दिसलो ना तरी रसाळ फणसा सारखे.बाहेरून कांटेरी पण आतून रसाळ गऱ्या सारखे.तेव्हा तू काय मनांक लावून घेवू नकोस.
माझा मात्र काम सांगूचा.आणि तुझा ऐकूचा.

हेंचो अर्थ तू काहीच काम करु नकोस असा नाय.अरे,तुझ्यो काही तरी आयुष्यातल्यो आठवणी लिही,तुझा आत्मचरित्र लिही,उगवत्या कलाकारासाठी काही शिकण्यासारख्या लिही,आईवडीलांक तू किती आदर ठेवून वागतंस, त्याचे काही इतरांवर चांगले संस्कार होतीत असां काही तरी लिही, तुझ्या वडिलांसारख्यो काही कविता कर .तुका जरी अलोट पैसो तुझ्या मेहनतीन मिळालो तरी तो लोकांकडूनच मिळालो मां? त्यातलो थोडो पैसो तरी लोकांक ह्या ना त्या निमीत्तान परत केलंस तर गोरगरीब तुका नक्कीच मानतलो,आशिर्वाद देतलो,असा तुका नाय का वाटणां? थोडीशी गांधीगीरीपण करूची लागता.
तू तसा करुचंस नाय म्हणा, कारण पैसो कोणाक नको झालोसा?. पण एक सांगतंय राजकारणांत मात्र अजिबात पडूं नको बाबा! मोठ्यां मोठ्याक पश्चाताप झालेलो मी बघितलंय.तुकापण पुर्वीचो अनुभव आसां म्हणा.राजीव गांधीच्या वेळी रे!
ह्या वयांत "हेल्थ इज वेल्थ " असा काय म्हणतत नां तांच खरा.तू काय इतको म्हातारो झालंस नाय रे.पण बघ ज्या वयावर जां शोभतां तां करुक होयां नाय काय?ह्या वयावर आता लहान मुलांसारख्यो उडक्यो मारलंस तर तुका तां शोभताला काय? माकां सांग.
हल्लीच तुझ्या घरावर कोणी म्हणे बाटल्यो फेकल्यो,दगड मारले म्हणून ऐकलां,माकां काय राजकारण समजणां नाय बघ.जां समजणां नाय मां तेच्यावर विचारला नाय तरी सांगुचा असा आमका मालवणी लोकांक मुळचीच संवय आसा.आता एखादो मालवणी ह्या वाचून माझ्यावर चिडतोलो नक्की,पण मी तेची पर्वा करणंय नाय.खरां सांगूक हरकत कसली रे?

राजकारण बरां नांय.मोठ्या मोठ्यानी हात टेकलेत बघ.होताचा नाय आणि नायचा होता करूंक येवंक होयां.गेंड्याचा कातडां आंगावर होया.ह्या बोटावरची थुकी त्या बोटावर करूक येवूक होयी.तां तुकां माकां जमुचा नाय.आपलो पिंड तसलो नाय.आणि बघ प्रत्येक काडीक दोन टोकां असतत.ह्या तुका सागूंक नको.तसाच प्रत्येक वादाक दोन बाजू असतत.दुसऱ्याचां म्हणणां पण बरोबर असू शकतां.
तुका माहीत आसां मा, मराठी लोकांक नाटकां खूप आवडतत,आणि त्यातल्यात्यात आमका मालवण्यांक तर खूपच आवडतत,मालवणीत धयकालो तर नाटकाचो उस्फुर्त प्रकार आसा. थोडा रामायण महाभारत माहित असलां म्हणजे झालां.मग अर्जुन रामायणात की राम महाभारतात होतो ही खरी माहिती असण्याची इतकी जरुरी नाय.फक्त नाटकाच्या मंचावर डायलॉग म्हटले म्हणजे झालां.तुका माहीत आसां त्यामुळे विनोद सुद्धा उत्पन्न होता तो.मछ्चींद्र कांबळी तुका म्हायत असतोलच.आता तो गेलो म्हणां नायतर तेना तुझ्या ह्या बाटल्या प्रकरणावर एक मालवणीत नाटक लिवला असतां
" बहरला पारीजात दारी,फुले कां पडती शेजारी?"
रुक्मिणी,भामिनोचो वाद तुका म्हायत आसां मां?श्रीकृष्णाक किती त्याच्या बाईलानी डोक्याक काणेर केलो तो?

आता जाता जाता एक शेवटचा सांगतय.आयुष्य एकदांच मिळतां ह्या काय तुकां सांगुक नको.तुझे जे जवळचे आसत ना त्यांच्या बरोबर जास्त वेळ घालंव.आणि तुका जोपर्यंत लोकां हवो हवोसो म्हणतत नां, तो पर्यंत तेंच्यातून आंग काढून घेतलेलां बरां असा माका वाटतां.आमच्या सुनील गावस्करान कसा केला.वेळीच बाजूक झालो. क्रिकेट मधून रे!.आमचो सुनील म्हणण्याचा कारण तो आमच्या वेंगुर्ल्याचो.उभ्यादाड्यांचो रे!
दुसरा म्हणजे अट्ट्ल बिहारीचा बघ.नावासारखे बाजपायजी आपल्या पणाशी अट्ट्ल आसत.आता परत पंतप्रधान होवूक मागणत नाय.अशी किती दाखले देवू मी तुका?
कुणी तरी म्हटलां बघ." सूर्यनारायणा कडून एक शिकूक होयां,संध्याकाळ झाली रे झाली, का आपला अस्ताक गेलेला बंरा"
होय नायतर, आपलां नांव रात्रीच्या भानगडीत नको बाबा!.
माझ्या अक्कलेप्रमाणे मी तुका सल्लो दिलंय.आता निर्णय का घेवचो तां तू बघ.
श्रीकृष्ण सामंत

पुण्यातील एक झकास आणि अर्थपूर्ण पाटी

परवाच पुण्यात जाऊन आलो आणि वैकुंठ स्मशानभूमीच्या प्रवेशद्वाराला लागून एक पाटी लिहिली होती :

वहातुकीचे नियम पाळा
(स्मशानभूमीच्या प्रवेशद्वाराकडे बाण दाखवून त्या बाणाखाली Smile
इकडे यायचे टाळा !
---------------पुणे वहातुक नियामक मंडळ----------
भन्नाट "डोकॅलिटी" पुणेकरांची !

अध्यक्षपदाची फिल्डिंग!

मराठी साहित्य संमेलन सान फ्रान्सिस्कोमधे होणार की नाही, हे अजून नक्की होत नसल्यानं भल्याभल्या कवी-साहित्यिकांच्या डोळ्याला डोळा नाही. महामंडळाचे पदाधिकारी- म्हण्जे कौतिकराव- गेल्या काही दिवसांपास्नं सदस्यांची यादी खिशात घेऊनच फिरतायत. ५१ जणांची नावं फायनल करून निमंत्रणाचा कागद त्यांच्याकडे पोहोचेपर्यंत कौतिकराव कुणालाच भेटणार नाहीत, असं महामंडळाचे भालदार-चोपदार सांगत सुटल्यानं साहित्यिक वर्तुळात खळबळ उडालीय. एक बरे झालेय. आम्च्या रत्नांग्रीकरांनी हा विशय लावून धरला, हे आम्हाला एकदम आवडले.

संमेलनाच्या व्यासपीठावर राजकारणी मंडळी नकोत, असा मातब्बर साहित्यिकांचा जुना आग्रह होता. सान्फ्रान्सिस्कोत संमेलन भरले, तर कदाचित आता त्यांना बरे वाटेल. पण हे विषयांतर झाले. संमेलनाच्या निमित्ताने आपली बाजू कुठेतरी झुकती हवी, म्हणून आम्ही आतापासूनच कानोसा घ्यायला सुरुवात केलीये. सान्फ्रान्सिस्को संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी कुणीच उभे राहू नये, असाही एक नवा सूर ऐकू येतोय. परवा, अमेरीकन एम्बसीच्या बाहेरच्या रांगेत पहाटेपहाटेपास्नं थांबलेल्यांकडे मी संशयानं पाहात होतो. काहीजण अगदी साळसूद्पणानं हातातल्या प्लास्टिकच्या पिशव्या सांभाळत आपल्याला कुणी पाहात तर नाही ना, अशा भीतीनं माना वळवून ताटकळत उभे होते. एका अनिरुद्धबापूंसारख्या मिश्या असलेल्या कवीनं मला बघून मान फिरवली, तेव्हा सान्फ्रान्सिस्कोला जाण्यासाठीची पूर्वतयारी का,असं मी ओरडून विचारल्यावर कसचंकसचं म्हणत त्यानं विषय बदलला आणि तुम्ही इकडं कुठं म्हणत मलाच गुगली टाकल्यावर मलाही काही सुचेच ना. कुणीच अध्यक्षपदाला उभं राहात नसेल, तर आपला फॊर्म भरून टाकायला काय हरकत आहे, असा विचार आल्यावर मी पण आधी व्हिसाची तयारी करू या म्हणून धावाधाव सुरु केली होती. हो, नाहीतर, अध्यक्षपदावर बीनविरोध निवड झाली, तरी व्हिसा नाकारला गेला, तर खाली मान घालून रत्नांग्रीला जायची पाळी यायची. तसे नको म्हणून, आधी व्हिसाची तयारी करा, असं बायकोनं सांगितल्यावर मी तिच्यावर भलाताच खूश झालो होतो. पण अध्यक्ष व्हायचं तर काहीतरी साहित्यिक कामगिरी नको का, असं तिनं विचारल्यावर जरासा हिरमुसलो, तोवर तिनच माझ्यापुढं मुलीची गेल्या वर्शीची वही धरली आणि डोळ्यांनीच, `वाचा' म्हणून खुणावलं. तर मी वही हातात घेउन पहिलच पान उघडलं तर मुलीच्या टीचरांनी मारलेला लालभडक शेरा डोळ्यापुढे नाचायला लगल्यानं जराशी अंधारी आल्यासारखं होऊन मी आंगठा ओठाशी नेत खुणेनंच पाणी आणायला सांगितल्यांवर बायको फणकारत आतच गेली. मग मात्र मी ओर्डून पाणी मागितल, तेव्हा हसत पुढे येउन तिनं वहीचं शेवटचं पान उघडल, तर एकेक ओळ मोकळी सोडून चारचार ओळींवर काहीतरी लिहिलेलं दिसलं. मी खुणेनंच `काय', म्हणून बायकोला विचारल, तर, तुमच्या अध्यक्शपदाची तयारी, असं सांगत ती खदाखदा हसायलाच लागली. या चारोळ्या आहेत असं तिनं सांगितल्यावर मी भलताच खुश झालो, आणि कवतिकानं तिच्याकडं बघितल्यावर ती लाजून स्वैपाकघरातच पळाली. पण संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी तुझ्या चारोळ्या चालतील का, असं विचारल्यावर, महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी चालतात ना बायकोच्या चारोळ्या, असा बिनतोड सवाल तिनंच मला केल्यावर मी गप्प बसलो, आणि व्हिसाच्या तयारीला लागलो. पण अजूनही, वाटतंय की, यंदा नकोच तसं. बायकोच्या चारोळ्यांच्या भांडवलावर आपण पुढच्या वर्शी महामंडळाच्या अध्यक्षपदाला उभं राहू, यंदा फक्त व्हिसा असला, तरी अध्यक्षपद मिळेल,..
सान्फ्रासिस्कोचं जमलं नाही, तर यंदा कुठल्या तरी संमेलनात आपली हजेरी लावायचीच असं मी पक्कं ठरवलंय. रत्नाग्रीत काय आपली डाळ शिजायची नाही. एवढ्या वादानंतर, बायकोच्या कवितांवर तिथे अढ्यक्षपद मिळेल, असं वाटत नसल्यामुळे, विद्वेषी संमेलनाचापण मी मागोवा घेतोय. यंदा मराठी साहित्य संमेलन बे एरियात होणार असल्यामुळे, विद्वेषींचं संमेलन मुंबईत्ल्या बॆक्बे एरियात होणार असं कानावर येतय. महामंडळाची पुढची संमेलनंपण आता जगाच्या पाठीवर कुठेही होणार, हे नक्की झालंय. विंदांच्या सूचनेचा आदर राखण्यासाठी, दक्षिण आणि उत्तर ध्रुवावर संमेलन भरवता येईल किंवा कसे, याची पाहाणी करण्याकरता महामंडळाचा एक प्रतिनिधी तिकडे जाणार आहे, असंही कानावर आलंय.
पुढच्या वर्षीचं संमेलन नागासाकीला भरवा, असं तिथल्या मराठी बांधवांनी सुचवलंय... विद्वेषींचं पुढचं संमेलन, साकीनाक्यात भरणार आहे. अध्यक्शपदासाठी आतापासूनच फिल्डिंग लावणार आहे आपण. इथे, नाहीतर तिथे...

हास्यतुकडे-२

बोलणारा (उघड): साहेब आपल्या रेश्मा मॅडम आज येणार नाहीत असा त्यांचा फोन आला होता.

ऐकणारा (मनात): (कशी येणार? काल संध्याकळीच तर तिला जोश्याबरोबर बागेत रेडहॅंड पकडले होते.)

बोलणारा (उघड): साहेब त्या सुंदर बाई आपल्या ऑफिसमध्ये का आल्या होत्या?

ऐकणारा (मनात): (तुला कशाला पाहिजेत नसत्या चांभारचौकशा?)

बोलणारा (उघड): साहेब देवाच्या कृपेने एकदाचा माझा मुलगा पास झाला.

ऐकणारा (मनात): (मग काय गावभर पेढे वाटू?)

बोलणारा (उघड): साहेब आज मी नवीन मोटरसायकल विकत घेतली.

ऐकणारा (मनात): (बाकीचे काय फुकट घेतात की काय शिंच्या?)

बोलणारा (उघड): साहेब ५ वर्षे झाली. आता तरी माझे प्रमोशन करा की.

ऐकणारा (मनात): (लेका तुझं प्रमोशन म्हणजे माझी जागा आहे. ती तुला कशी देऊ?)

हास्यतुकडे - १

स्वगत म्हणजे मनातल्या मनात

विवाहाची निमंत्रण पत्रिका आल्यावर आपण हळुच "अहेर आणू नये" हे वाक्य बघतो बघतो व सर्वांनी फुकट जेवण हादडायला जायचं असं मनात ठरवतो, तश्यागत.

ऐकणारा समोरच्याचे खोटेच कौतुक करत असतो. पण मनातल्या मनात काय म्हणतो ते पुढे पाहाच.

बोलणारा (उघड): (आनंदाने) साहेब पेढे घ्या. ८ वर्षांनी पोर झालं. मुलगा झाला साहेब.

ऐकणारा (मनात): (मग एवढी वर्षे काय करत होतास?)

बोलणारा (उघड): साहेब ही माझी पत्नी सोनाली.

ऐकणारा (मनात): (मग एवढे दिवस तुझ्याबरोबर फिरत होती ती कोण?)

बोलणारा (उघड): साहेब मुलगा १०वी च्या बोर्डात पाचवा आला.

ऐकणारा (मनात): (तो शेवटी का येईना मला काय करायचे आहे?)

बोलणारा (उघड): विवाहाचे निमंत्रण द्यायला आलोय. सरोजशी लग्न ठरलंय.

ऐकणारा (मनात): (च्यायला, एवढे दिवस तर ती दिन्या बरोबर फिरत होती.)

बोलणारा (उघड): साहेब बढती मिळाली. उद्या पार्टी ठेवली आहे.

ऐकणारा (मनात): (एवढी वर्षे चमचेगिरी केली त्याचा फायदा झाला म्हणायचा.)

बोलणारा (उघड): ही माझी बायको, पल्लवी.

ऐकणारा (मनात): (या माकडाला मस्त चिकणी बायको मिळाली, मज्जा आहे साल्याची.)

बोलणारा (उघड): हे फोटोंचे अल्बम्स पाहत बसा.

ऐकणारा (मनात): (आग लाव त्या अल्बम्सना, वैताग साला.)

माझ्या टोपण नावामागचे कारण

आपण येथे टोपण नावाने वावरतो. ते आपण स्व खुशीने घेतलेले आहे. ते नाव घेण्यापाठीमागे ऐक कारण आहे. ते कदाचीत ऐक प्रकारचे आकर्षण असु शकेल.

म्हणजे, मी लहान पणा पासुन जवळ पास पुस्तकी किडा. लहान पणी रॉबीन हुड, टारझन, अरेबियन नाईटस, रुस्तम आणि सोहराब (ह्या कथेचा शेवट वाचुन मी लहान असताना रड्लोय.), फास्टर फेणे, पुलं आणी खुप सारी पुस्तके वाचली.
रॉबीन हुड पुस्तकासाठी मित्राच्या घरी इतके हेलपाटे मारले की आजुबाजुचे लोक माझ्या हेलपाट्यामागे भलताच संशय घेउ लागले. महाविद्यालयात असताना सुदधा पुस्तकांची आवड कमी झाली नाही. शेवटी पैसे पुरत नाहीत म्हणुन रद्दीच्या दुकानातुन पुस्तके आणुन वाचली. ऐकुन काय तर मला पुस्तकांची भयंकर आवड.

पुलं चे ज्या वेळी मी सखाराम गटणे वाचले त्या वेळी मला त्या व्यक्तीरेखे बद्द्ल ऐक जाणुन घ्यायची ईच्छ्या निर्माण झाली. ऐकदरच ते पुस्तकी बोलणे आणि शेवटचा विवाहाचा प्रसंग आम्ही हसुन हसुन घालवला. आपण ऐक प्रकारे त्याचे व्यक्तीमहत्व आपल्यात किंवा आपले त्याच्यात शोधण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे, शिवाजी राजे सगळ्यांना (काही अपवाद सोडुन)आवडतात, पण सगळे शिवाजी राजे होत नाहीत. मग आपण आपल्या घरातल्या कोनाचे तरी नाव शिवाजी म्हणुन ठेवतो.

ह्यामुळे मी 'सखाराम गटण' हे नाव घेतले.

आपण आपले टोपण नाव का घेतले ?

II राजे II,
धमाल मुलगा,
आनंदयात्री,
पिवळा डांबिस,
विसोबा खेचर,
इनोबा म्हणे
इ.

बोला आता.
तुमचे व्यक्तीमहत्व कसे काय त्या टोपण नावाशी संबधित आहे?

आणखी काही पी. जे.

प्राजुताईनी सुरु केलेली पी. जे. ची साखळी बरीच लांबल्याने आणखी काही पी. जे. इथे देत आहे.

१. कुलकर्णी, कुलकर्णी आणि कुलकर्णी असोसिएटस या कंपनीत फोन येतो -
हॅलो, कुलकर्णी आहेत काय?
-> ना।ही, मुंबईला गेले आहेत.
हॅलो, कुलकर्णी आहेत काय?
-> सॉरी, नाशिकला गेले आहेत.
हॅलो, कुलकर्णी आहेत काय?
-> बोलतोय !

२. एका मल्टीप्लेक्स थिएटरमधे स्क्रीन १ ला 'डर' हा चित्रपट असेल तर स्क्रीन २ ला कोणता चित्रपट असेल ?

--> सोप्प आहे ! 'जीत' हा चित्रपट असेल कारण
डर के आगे जीत है !

सचीन जी!!