मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिपा रांगोळी स्पर्धा २०१३

संपादक मंडळ ·

मदनबाण 03/11/2013 - 00:55
स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपण किंवा आपल्या नजिकच्या नातेवाईकांनी काढलेल्या रांगोळीचे छायाचित्र मिपावर या धाग्याच्या प्रतिक्रियांमधे चिकटवावे. कलाकाराचे नाव द्यावे. स्पर्धेतील रांगोळ्या या शेजार्‍यांनी काढलेल्या नकोत हा धागा आत्ता पाहिला ! पण या अटींमुळे तसेही मला या स्पर्धेत भाग घेता आले नसते.

ही म्हणतेय, रांगोळी कोणती काढू ? जरा लिंका द्या राव रांगोळीच्या. पाचबोटाची बिटाची चालेल. आता सुरु झाली म्हणजे सायंकाळपर्यंत होईल आमचीही रांगोळी. :) -दिलीप बिरुटे (रांगोळीची आवड असलेला)

In reply to by पाषाणभेद

पाषाणभेद 03/11/2013 - 21:29
नाही म्हणजे "प्रिण्ट आउट जमिनीवर चीकटवतो. हातानेच काढतो" वैगेरेपण आहे म्हणून विचारले हो. बाकी काही नाही. मजेत.

In reply to by अभ्या..

पैसा 04/11/2013 - 09:17
परीक्षक मिपाकर असल्याने याचे उत्तर पण त्यानी द्यावे. एक सामान्य सदस्य म्हणून माझे मत असे की रांगोळी डिझाईन डिजिटल असायला हरकत नै पण त्यात रांगोळीचे रंग/धान्य्/फुले असे काहीतरी भरून मगच ती खरी रांगोळी होईल. नाहीतर साधे चित्र्/स्टिकर राहील.

In reply to by पैसा

अभ्या.. 04/11/2013 - 15:05
एक अतिसामान्य सदस्य या नात्याने माझ्यापण शंका आहेत हो. ;) नुसती रांगोळी (दगडाची पूड, पांढरी वा रंगीत) हे माध्यम म्हणून धरले तर धान्य, फुले हे कशाला? मग कागदाचे तुकडे पण वापरता येईल किंवा अजून काही पण. नुसते पारंपारिक आकार वा परंपरा म्हणले तर मग रांगोळी प्रदर्शनातले ९९ टक्के प्रवेशिका बाद होतील. जमीनीवर पसरलेले डिझाइन म्हणले तर गालिचा सुध्दा चालेल. सुताची रांगोळी म्हणून. मग आम्ही कम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन मध्ये काढून तिचा प्रींटाऊट जमिनीवर ठेवला तर काय बिघडले? कला बघणार का तंत्र की परंपरा की केवळ चान चान इमेज चढवलीय इथे ते पाहणार?

In reply to by अभ्या..

पैसा 04/11/2013 - 15:22
रंगांऐवजी धान्य, फुलं हे पूर्वीपासून वापरतात. खरे तर बटन्स, टिकल्या अशा बारीक वस्तू पण वापरतात. पण बेसिक हे की आऊटलाईन शिरगोळ्याच्या रांगोळीची आणि त्यात भरलेले माध्यम. जमिनीवर पसरलेले डिझाईन म्हणून कास्मिरी गालिचा चालणार नाही. पण जमिनीवर रांगोळीने डिझाईन काढून सुताचे धागे त्यात भरले तरी ती रांगोळी ठरेल.

In reply to by पैसा

पाषाणभेद 05/11/2013 - 05:46
हस्तकला व यंत्रधिष्ठीत कला हा कला सादरीकरणाच्या दोन प्रचलित पद्धती मानल्या गेलेल्या आहेत. गायन (मौखिक कला सादरीकरण) कलेत साथसंगत करणारा आपले वाद्यवादन कोठे थांबवायचे हे गायक कलाकाराच्या इशार्‍यावर समजू शकतो. तसा तुमचा आवाजाची साथ देणारा कॉम्पुटर किंवा इलेक्टृऑनीक वाद्य (थोडक्यात कुणा ऑपरेटरवीना वाजणारे वाद्य) थांबू शकणार नाही. रांगोळी रेखाटणे हे पुर्णपणे त्या त्या व्यक्तीच्या शारिरीक, मानसिक क्रियेद्वारे घडणारी प्रक्रिया असते. कुणी म्हणेल की हेच आम्ही कॉम्पुटरवरही शारिरीक, मानसिक क्रियेद्वारेच करतो. पण यात यंत्र हे सादरीकरणाचे एक माध्यम आहे. त्या यंत्राशिवाय तुम्ही हवेत रंगांचे, चिमटीतील रांगोळीचे प्रोग्राम फेकू शकत नाही किंवा हवेत फोटोशॉप उघडू शकत नाही किंवा कागदावर छपाई करू शकत नाही. बस बाकी काही नाही. मजेत.

मृत्युन्जय 03/11/2013 - 21:26
कुणी किती रांगोळ्या स्पर्धेसाठी पाठवाव्यात याचा काही नियम दिसत नाही आहे. त्यामुळे खालील धाग्यावरच्या आईच्या सगळ्याच रांगोळ्या स्पर्धेसाठी पाठवाव्यात असा विचार होता. ;) http://misalpav.com/node/14927 पण मग विचार बदलुन या दिवाळीसाठी मातोश्रींनी काढलेल्या एका रांगोळीचे ३ फोटो आणि अर्धांगाने काढलेल्या एका रांगोळीचे फोटो डकवतो आहे :) आईने काढलेली रांगोळी laxmi1 Laxmi 2 Laxmi 3 अर्धांगाने काढलेली रांगोळी diwali

माशा 03/11/2013 - 23:39
मदत पान बघितले.त्यात जी सुचना लिहिली आहे - >> मिपावर येऊन प्रतिसादाच्या Insert/ edit Image या बटणावर क्लिकुन तेथे URL चा पत्ता पेस्टवावा. हवी असलेली साईझ द्यावी. >> Insert/ edit Image कुठेच दिसत नाहीये.कृपया मदत करा.

In reply to by माशा

पैसा 03/11/2013 - 23:52
प्रतिसाद द्या विषयः Comment * यानंतर एका ओळीत छोटे छोटे १४ चौकोन आहेत, त्यात ९ वा चौकोन आहे, त्यावर क्लिक केले की Insert picture ची छोटी विंडो दिसेल.

माशा 04/11/2013 - 00:44
आजच लक्ष्मीसमोर ही रांगोळी काढली आहे.स्पर्धेसाठी पहिल्यांदाच रांगोळी पाठवत आहे.पुर्वी शाळा कॉलेजात असताना खूप रांगोळ्या काढल्या.दुर्दैवाने त्याचे फोटोच काढले गेले नाहीत.१५,२० वर्षांच्या गॅपने मोठी रांगोळी काढत होते. त्यामुळे मनात धाकधुक होती. मिपाकारांना कशी वाटते याची उत्सुकता आहे. आज या स्पर्धेच्या निमित्ताने जुन्या आठवणी जाग्या झाल्या. मिपा ला धन्यवाद. Madhavi's

In reply to by पैसा

सांगून पाहतो. मला वाटतं ही रांगोळी आज काही पुसल्या जाणार नाही. येता जाता मलाच कै तरी आयड्या करावी लागेल. :) -दिलीप बिरुटॅ

In reply to by सानिकास्वप्निल

आय माय सॉरी पण लाकडी जमिनीवर रांगोळी म्हणजे केळीच्या पानावरून पाटावर साग्रसंगित पंगतीत पीझझा आणि हक्का न्यूडल खाण्यात येत आहे अस दृष्य डोळ्या समोर तरळूंन मॉनिटर हळवा झाला !!! :) कृ ह घ्या !!

In reply to by माझीही शॅम्पेन

तुमचा मॉनिटर जरा जास्तंच हळवा आहे... जमिनीवर रांगोळी काढली हे महत्वाचे (मग ती लाकडी, दगडी किंवा ग्रेनाईट फ्लोरींग असो). इथे परदेशात बिल्डिंगच्या कॉरीडोअरमध्ये गालिचा असतो गेरु सारवून रांगोळी काढता येत नाही त्यामुळे घरातचं जमेल तशी रांगोळी काढावी लागते. असो तुम्ही पण कृ ह घ्या !!!!

In reply to by केदार-मिसळपाव

हा हा हा ... तस नाही , आम्हाला डोक्यनुसार आम्ही एक उपाय केला होता आसमदिकाण्नी एक 1M X 1M चा लाकडाचा प्लाइ गेरु सारख्या रंगात रंगवीला होता , माझी आई घरात (हिटर गरम हवे मध्ये) बसून रांगोळी काढत असे , मग ती आम्ही बाहेर थंडीत ठेवायचो ... :) आणि तोच फन्डा आता भारतात वापरतो फक्त बदल म्हणून आई A/Cत रांगोळी काढते :) असो तुमच्या पा-कृ प्रमाणेच रांगोळ्या छानच आहेत

किलमाऊस्की 05/11/2013 - 02:41
मला खूप आवडतं रांगोळी काढायला. भारताबाहेर असल्याने यावर्षी कार्ड्बोर्ड्वर साधी 'कोलम' काढलीय. :-( या रांगोळ्या नियमात बसत नसल्याने स्पर्धेसाठी नाहीत. --------------------------------------------------------------------------------------------- हि यावर्षी कार्डबोर्ड्वर काढलेली 'कोलम' https://lh5.googleusercontent.com/-w3w9OyYWCGk/UngLeQRW0uI/AAAAAAAABpk/GJN0pX2K-bA/w611-h505-no/IMG_20131103_180800.jpg या दोन वर्षापूर्वी काढलेल्या : https://lh4.googleusercontent.com/QTNYN8SEPTL56u8Dpb0L49lDIATYFRx6z3ncBCUMWM0=w518-h505-no https://lh4.googleusercontent.com/-d7sW0_3ijLs/UngLYkaqV8I/AAAAAAAABpE/3dl55PLjau4/w960-h500-no/rang2.jpg

In reply to by ह भ प

किलमाऊस्की 07/11/2013 - 03:02
कार्डबोर्ड्वरच्या 'कोलम' बद्दल जमल्यास विस्तृतपणे सांगा..
विशेष काही नाही केलंय. घरात कार्पेट आणि पॅतियोमधे रांगोळी काढायची तर बाहेर धो-धो पाऊस आणि सोसाट्याचा वारा. त्यातून आमच्या भागात फारसे भारतीय नसल्याने रांगोळी सहज उपलब्ध नाही. यावर उपाय म्हणून मातीच्या रंगाचा कार्ड्बोर्ड पेपर आणला. साधा क्राफ्ट पेपरही चालेल. आणि त्यावर दक्षिण भारतीय 'कोलम' प्रकारतली रांगोळी काढतात तशी पांढर्‍या क्राफ्ट पेनने साधीशीच रांगोळी काढली. आम्ही रोज संध्याकाळी कार्ड्बोर्ड बाहेर ठेवतो. आणि त्यावर पणत्या. :-) अधिक माहीतीसाठी ही लिंक बघा. अवांतर - जाता जाता हा घरी बनवलेला कंदील : https://lh3.googleusercontent.com/-85mNYeWvnto/Unq1H2HDl3I/AAAAAAAABp8/kY3zt6WxblU/w379-h505-no/IMG_20131102_205924.jpg

In reply to by केदार-मिसळपाव

जेनी... 08/11/2013 - 23:46
क्या ब्बात है केदार काका ! सुप्पर्लाइक रांगोळी रंग भरणार्याचे नाव कळेल का ?? अगदीच सुरेख भर्लेत रंग चिमटीतुन बोटांच्या सुटत असते रांगोळी रंगबिरंगि रंगांनी सजत असते रांगोळी !!! अंगणातल्या दिव्याभोवती फिरत असते रांगोळी मनातल्या उत्साहाला फुलवत असते रांगोळी !!!

Mrunalini 06/11/2013 - 16:20
वा काय मस्त रांगोळ्या काढल्या आहेत सगळ्यांनी... माझ्याकडे इथे रांगोळी आणि रंग काहिच नाही... पण अत्ताच वरती वाचले.. मिठ वापरुन काढलेली रांगोळी... आयडियाची भन्नाट कल्पना आवडली. :)

मदनबाण 03/11/2013 - 00:55
स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपण किंवा आपल्या नजिकच्या नातेवाईकांनी काढलेल्या रांगोळीचे छायाचित्र मिपावर या धाग्याच्या प्रतिक्रियांमधे चिकटवावे. कलाकाराचे नाव द्यावे. स्पर्धेतील रांगोळ्या या शेजार्‍यांनी काढलेल्या नकोत हा धागा आत्ता पाहिला ! पण या अटींमुळे तसेही मला या स्पर्धेत भाग घेता आले नसते.

ही म्हणतेय, रांगोळी कोणती काढू ? जरा लिंका द्या राव रांगोळीच्या. पाचबोटाची बिटाची चालेल. आता सुरु झाली म्हणजे सायंकाळपर्यंत होईल आमचीही रांगोळी. :) -दिलीप बिरुटे (रांगोळीची आवड असलेला)

In reply to by पाषाणभेद

पाषाणभेद 03/11/2013 - 21:29
नाही म्हणजे "प्रिण्ट आउट जमिनीवर चीकटवतो. हातानेच काढतो" वैगेरेपण आहे म्हणून विचारले हो. बाकी काही नाही. मजेत.

In reply to by अभ्या..

पैसा 04/11/2013 - 09:17
परीक्षक मिपाकर असल्याने याचे उत्तर पण त्यानी द्यावे. एक सामान्य सदस्य म्हणून माझे मत असे की रांगोळी डिझाईन डिजिटल असायला हरकत नै पण त्यात रांगोळीचे रंग/धान्य्/फुले असे काहीतरी भरून मगच ती खरी रांगोळी होईल. नाहीतर साधे चित्र्/स्टिकर राहील.

In reply to by पैसा

अभ्या.. 04/11/2013 - 15:05
एक अतिसामान्य सदस्य या नात्याने माझ्यापण शंका आहेत हो. ;) नुसती रांगोळी (दगडाची पूड, पांढरी वा रंगीत) हे माध्यम म्हणून धरले तर धान्य, फुले हे कशाला? मग कागदाचे तुकडे पण वापरता येईल किंवा अजून काही पण. नुसते पारंपारिक आकार वा परंपरा म्हणले तर मग रांगोळी प्रदर्शनातले ९९ टक्के प्रवेशिका बाद होतील. जमीनीवर पसरलेले डिझाइन म्हणले तर गालिचा सुध्दा चालेल. सुताची रांगोळी म्हणून. मग आम्ही कम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन मध्ये काढून तिचा प्रींटाऊट जमिनीवर ठेवला तर काय बिघडले? कला बघणार का तंत्र की परंपरा की केवळ चान चान इमेज चढवलीय इथे ते पाहणार?

In reply to by अभ्या..

पैसा 04/11/2013 - 15:22
रंगांऐवजी धान्य, फुलं हे पूर्वीपासून वापरतात. खरे तर बटन्स, टिकल्या अशा बारीक वस्तू पण वापरतात. पण बेसिक हे की आऊटलाईन शिरगोळ्याच्या रांगोळीची आणि त्यात भरलेले माध्यम. जमिनीवर पसरलेले डिझाईन म्हणून कास्मिरी गालिचा चालणार नाही. पण जमिनीवर रांगोळीने डिझाईन काढून सुताचे धागे त्यात भरले तरी ती रांगोळी ठरेल.

In reply to by पैसा

पाषाणभेद 05/11/2013 - 05:46
हस्तकला व यंत्रधिष्ठीत कला हा कला सादरीकरणाच्या दोन प्रचलित पद्धती मानल्या गेलेल्या आहेत. गायन (मौखिक कला सादरीकरण) कलेत साथसंगत करणारा आपले वाद्यवादन कोठे थांबवायचे हे गायक कलाकाराच्या इशार्‍यावर समजू शकतो. तसा तुमचा आवाजाची साथ देणारा कॉम्पुटर किंवा इलेक्टृऑनीक वाद्य (थोडक्यात कुणा ऑपरेटरवीना वाजणारे वाद्य) थांबू शकणार नाही. रांगोळी रेखाटणे हे पुर्णपणे त्या त्या व्यक्तीच्या शारिरीक, मानसिक क्रियेद्वारे घडणारी प्रक्रिया असते. कुणी म्हणेल की हेच आम्ही कॉम्पुटरवरही शारिरीक, मानसिक क्रियेद्वारेच करतो. पण यात यंत्र हे सादरीकरणाचे एक माध्यम आहे. त्या यंत्राशिवाय तुम्ही हवेत रंगांचे, चिमटीतील रांगोळीचे प्रोग्राम फेकू शकत नाही किंवा हवेत फोटोशॉप उघडू शकत नाही किंवा कागदावर छपाई करू शकत नाही. बस बाकी काही नाही. मजेत.

मृत्युन्जय 03/11/2013 - 21:26
कुणी किती रांगोळ्या स्पर्धेसाठी पाठवाव्यात याचा काही नियम दिसत नाही आहे. त्यामुळे खालील धाग्यावरच्या आईच्या सगळ्याच रांगोळ्या स्पर्धेसाठी पाठवाव्यात असा विचार होता. ;) http://misalpav.com/node/14927 पण मग विचार बदलुन या दिवाळीसाठी मातोश्रींनी काढलेल्या एका रांगोळीचे ३ फोटो आणि अर्धांगाने काढलेल्या एका रांगोळीचे फोटो डकवतो आहे :) आईने काढलेली रांगोळी laxmi1 Laxmi 2 Laxmi 3 अर्धांगाने काढलेली रांगोळी diwali

माशा 03/11/2013 - 23:39
मदत पान बघितले.त्यात जी सुचना लिहिली आहे - >> मिपावर येऊन प्रतिसादाच्या Insert/ edit Image या बटणावर क्लिकुन तेथे URL चा पत्ता पेस्टवावा. हवी असलेली साईझ द्यावी. >> Insert/ edit Image कुठेच दिसत नाहीये.कृपया मदत करा.

In reply to by माशा

पैसा 03/11/2013 - 23:52
प्रतिसाद द्या विषयः Comment * यानंतर एका ओळीत छोटे छोटे १४ चौकोन आहेत, त्यात ९ वा चौकोन आहे, त्यावर क्लिक केले की Insert picture ची छोटी विंडो दिसेल.

माशा 04/11/2013 - 00:44
आजच लक्ष्मीसमोर ही रांगोळी काढली आहे.स्पर्धेसाठी पहिल्यांदाच रांगोळी पाठवत आहे.पुर्वी शाळा कॉलेजात असताना खूप रांगोळ्या काढल्या.दुर्दैवाने त्याचे फोटोच काढले गेले नाहीत.१५,२० वर्षांच्या गॅपने मोठी रांगोळी काढत होते. त्यामुळे मनात धाकधुक होती. मिपाकारांना कशी वाटते याची उत्सुकता आहे. आज या स्पर्धेच्या निमित्ताने जुन्या आठवणी जाग्या झाल्या. मिपा ला धन्यवाद. Madhavi's

In reply to by पैसा

सांगून पाहतो. मला वाटतं ही रांगोळी आज काही पुसल्या जाणार नाही. येता जाता मलाच कै तरी आयड्या करावी लागेल. :) -दिलीप बिरुटॅ

In reply to by सानिकास्वप्निल

आय माय सॉरी पण लाकडी जमिनीवर रांगोळी म्हणजे केळीच्या पानावरून पाटावर साग्रसंगित पंगतीत पीझझा आणि हक्का न्यूडल खाण्यात येत आहे अस दृष्य डोळ्या समोर तरळूंन मॉनिटर हळवा झाला !!! :) कृ ह घ्या !!

In reply to by माझीही शॅम्पेन

तुमचा मॉनिटर जरा जास्तंच हळवा आहे... जमिनीवर रांगोळी काढली हे महत्वाचे (मग ती लाकडी, दगडी किंवा ग्रेनाईट फ्लोरींग असो). इथे परदेशात बिल्डिंगच्या कॉरीडोअरमध्ये गालिचा असतो गेरु सारवून रांगोळी काढता येत नाही त्यामुळे घरातचं जमेल तशी रांगोळी काढावी लागते. असो तुम्ही पण कृ ह घ्या !!!!

In reply to by केदार-मिसळपाव

हा हा हा ... तस नाही , आम्हाला डोक्यनुसार आम्ही एक उपाय केला होता आसमदिकाण्नी एक 1M X 1M चा लाकडाचा प्लाइ गेरु सारख्या रंगात रंगवीला होता , माझी आई घरात (हिटर गरम हवे मध्ये) बसून रांगोळी काढत असे , मग ती आम्ही बाहेर थंडीत ठेवायचो ... :) आणि तोच फन्डा आता भारतात वापरतो फक्त बदल म्हणून आई A/Cत रांगोळी काढते :) असो तुमच्या पा-कृ प्रमाणेच रांगोळ्या छानच आहेत

किलमाऊस्की 05/11/2013 - 02:41
मला खूप आवडतं रांगोळी काढायला. भारताबाहेर असल्याने यावर्षी कार्ड्बोर्ड्वर साधी 'कोलम' काढलीय. :-( या रांगोळ्या नियमात बसत नसल्याने स्पर्धेसाठी नाहीत. --------------------------------------------------------------------------------------------- हि यावर्षी कार्डबोर्ड्वर काढलेली 'कोलम' https://lh5.googleusercontent.com/-w3w9OyYWCGk/UngLeQRW0uI/AAAAAAAABpk/GJN0pX2K-bA/w611-h505-no/IMG_20131103_180800.jpg या दोन वर्षापूर्वी काढलेल्या : https://lh4.googleusercontent.com/QTNYN8SEPTL56u8Dpb0L49lDIATYFRx6z3ncBCUMWM0=w518-h505-no https://lh4.googleusercontent.com/-d7sW0_3ijLs/UngLYkaqV8I/AAAAAAAABpE/3dl55PLjau4/w960-h500-no/rang2.jpg

In reply to by ह भ प

किलमाऊस्की 07/11/2013 - 03:02
कार्डबोर्ड्वरच्या 'कोलम' बद्दल जमल्यास विस्तृतपणे सांगा..
विशेष काही नाही केलंय. घरात कार्पेट आणि पॅतियोमधे रांगोळी काढायची तर बाहेर धो-धो पाऊस आणि सोसाट्याचा वारा. त्यातून आमच्या भागात फारसे भारतीय नसल्याने रांगोळी सहज उपलब्ध नाही. यावर उपाय म्हणून मातीच्या रंगाचा कार्ड्बोर्ड पेपर आणला. साधा क्राफ्ट पेपरही चालेल. आणि त्यावर दक्षिण भारतीय 'कोलम' प्रकारतली रांगोळी काढतात तशी पांढर्‍या क्राफ्ट पेनने साधीशीच रांगोळी काढली. आम्ही रोज संध्याकाळी कार्ड्बोर्ड बाहेर ठेवतो. आणि त्यावर पणत्या. :-) अधिक माहीतीसाठी ही लिंक बघा. अवांतर - जाता जाता हा घरी बनवलेला कंदील : https://lh3.googleusercontent.com/-85mNYeWvnto/Unq1H2HDl3I/AAAAAAAABp8/kY3zt6WxblU/w379-h505-no/IMG_20131102_205924.jpg

In reply to by केदार-मिसळपाव

जेनी... 08/11/2013 - 23:46
क्या ब्बात है केदार काका ! सुप्पर्लाइक रांगोळी रंग भरणार्याचे नाव कळेल का ?? अगदीच सुरेख भर्लेत रंग चिमटीतुन बोटांच्या सुटत असते रांगोळी रंगबिरंगि रंगांनी सजत असते रांगोळी !!! अंगणातल्या दिव्याभोवती फिरत असते रांगोळी मनातल्या उत्साहाला फुलवत असते रांगोळी !!!

Mrunalini 06/11/2013 - 16:20
वा काय मस्त रांगोळ्या काढल्या आहेत सगळ्यांनी... माझ्याकडे इथे रांगोळी आणि रंग काहिच नाही... पण अत्ताच वरती वाचले.. मिठ वापरुन काढलेली रांगोळी... आयडियाची भन्नाट कल्पना आवडली. :)
मंडळी, दिवाळी आणि रांगोळीचं अगदी जीवाभावाचं नातं आहे. लहानपणी रांगोळ्या काढण्यापासूनच सार्वजनिक चित्रकलेला सुरुवात होते. रोजच्या रोज तुळशीपाशी एखादं स्वस्तिक, दाराच्या उंबरठ्यावर गोपद्म, लक्ष्मीची पाऊले असे आईने काढताना आपण बघत आलोय तरी खरी गंमत दिवाळीला असते. त्यावेळी आपल्या चित्रकारीत खरेखुरे रंग भरता येतात. लहानपणी पोपट, मांजर, फुले काढण्यापासून सुरुवात होते. मोठे झाल्यावर ठिपक्यांची रांगोळी जमवण्यासाठी धडपड असते. समांतर ठिपके कोणत्याही फूटपट्टीशिवाय काढण्याचं कसब अंगी हवं, नाहीतर ठिपक्यांचे कागद ती सोय करतात. मग रांगोळीची रेघ नाजूक हवी, रंगसंगती उठावदार हवी असे सल्ले मिळतात.

माझी दिवाळी

संपादक मंडळ ·

रेवती 02/11/2013 - 00:19
मी फुलबाज्या आणि भुईनळा की झाड असे काहीतरी म्हणायचे ते मिस करतीये. बाकी ते आवाजी फटाके आवडायचे नाहीत. एक दोनदा माझ्या नव्या कपड्यांना पेटत्या उदबत्तीने भोके पडली होती. दिवाळीचा फराळ दिवाळीत खायला फारशी मजा येत नसे. दिवाळी संपल्यानंतर जी उरलेली सुट्टी असेल त्यात लायब्ररीतून आणलेले (बाल)साहित्य वाचताना करंज्या, चिरोटे खाणे, त्यातले सारण, पिठीसाखर सांडल्यावर ते सगळे साफसूफ करणे हे आठवत आहे. ;) चिवड्यावर दही घालून खाणे, चकलीबरोबर दही, लोणी. असे करीत असे. चार घरचा आलेला फराळ कसा संपवावा हा प्रश्न पडायचा. मग सकाळी दूध पिताना आई आम्हाला सक्तीने मूठ मूठ शंकरपाळे संपवायला भाग पाडायची. आत्याकडे दिवाळीनंतर मिसळ करून त्यात शेव चिवडे घालून ते संपवण्याचा चंग बांधला जायचा (तरी ते उरायचेच). आता बहुतेक उरलेला फराळ संपवण्याच्या युक्त्या असा धागा सुरु करावा लागेल.

In reply to by रेवती

पैसा 02/11/2013 - 01:27
मी भलत्याच विवंचनेत आहे. कामवाली पोरगी गावी जाणार, मग ती तेलातुपाची भांडी कोण घासणार म्हणून यावर्षी मी फराळ ४ दिवस आधीच तयार केला पण लहान किचनमधे लपवणे शक्य झाले नाही. आणि आताच डब्यांचा तळ दिसू लागला आहे. उद्या सकाळी आमच्यापुरता फराळ आहे पण आणखी कोणी आले तर पोहे देऊन भागवावे लागेल अशी लक्षणे आहेत!

In reply to by पैसा

रेवती 02/11/2013 - 04:48
हा हा हा. हो मीही तेच करणार आहे. आतापरेंत तीन चार जणींचे फोन येऊन गेलेत. त्यांच्याकडे दिवाळी म्हणजे फक्त लक्षुमी पूजन असते. मग महाराष्ट्रीय फराळाला कधी बोलावतेस म्हणून! आता काय सांगू? म्हटले नंतर बोलावते. सगळे मिळून पाच डबे त्यांचे माझ्याकडे आहेत. त्याच डब्यात घालून दिलास फराळ तरी चालेल म्हणतायत. म्हटलं नको, तुम्ही येऊन जा आणि डबे रिकामेच न्या आता!

दिवाळी म्हटले की आवाजाचे फटाके, नवीन कपडे , दिवाळी पहाट आमचा तरुणाई ने ओथंबलेला डोंबिवलीचा फडके रोड तेथे यथेच्च भटकून झाले की मित्रांकडे फराळ अनेक सांस्कृतिक कार्यक्रम , सुंगधी उटणे, मोती साबण दिवाळी अंक अश्या अनेक आठवणी मनात पिंगा घालतात , शाळा सोडून कॉलेजात गेलो तरी नियमितपणे आमचा १० अ चा बहुतेक सर्व वर्ग फड्केवर भेटायचा. आता अर्ध्याहून जास्त जगातील विविध खंडात विखुरले गेले आहोत तेव्हा एखादा वर्ग मित्र न चुकता आजही फड्केवर येतो चतुर भ्रमणध्वनीवर त्याच्याशी गप्पा मारतात मग फडकेवरील आखो देखा हाल पाहता येतो. अनिवासी असल्याने भारताशी ,आपल्या आप्त स्वकीय , मित्रांची , जाम आठवण येते , मग मी मिपावर येतो , आभसी जगतातील माझ्या मिपाकरांना भेटतो , मग जरा बरे वाटते.

अनन्न्या 03/11/2013 - 19:51
लहानपणी आम्ही जवळपासची सारी मुले दिवाळीच्या आदल्या रात्री पत्ते कुटत असू. खेडेगाव असल्याने आजूबाजूला भरपूर मोकळी जागा होती. आमच्या घराशेजारी एका काकांचे घर होते, ते भिक्षुकी करायचे. आणि त्यांना संक्रातीला मिळालेली सुगडे ते बाहेर झाडाखाली रचून ठेवायचे. रात्री आम्ही मुले ती सुगडे पळवून आणत असू. दोन वाजले की त्यात ठेवून त्यांच्याच घराबाहेर मोठे बॉम्ब वाजवत असू. त्यांचा मुलगाही यात सामिल असे. ते उठून बाहेर येऊन, कोण रे तो? असे विचारे पर्यंत आम्ही पत्ते पुन्हा सुरू करत असू. हे दरवर्षी करत असूनही त्यानी कधी सुगडांची जागा बदलली नाही, किंवा फटाके लावणारे शोधले नाहीत. रात्रभर हे सगळे उद्योग करून चार वाजता आपापल्या घरी जायचे. आंघोळी आटोपून, रांगोळ्या काढून, फराळ करायचा आणि जे गुडूप झोपायचे ते थेट दुपारच्या चहाला उठायचे. दिवाळीच्या दिवशी सकाळी नारळाच्या दुधात उटणे कालवले जायचे. नवीन कपडे दर दिवाळीला मिळायचे नाहीत, पण तांब्यात निखारे भरून त्याने असलेल्या त्यातल्या त्यात बय्रा ड्रेसला इस्त्री करून घालतानाही खूप मजा वाटे. फराळात जास्त पदार्थ नव्ह्ते. घरचे पोहे, करंजी, कडबोळी, रव्याचे लाडू आणि कणकेचे शंकरपाळे! दिवाळीच्या दिवशी गूळ पातळ करून त्यात ओले खोबरे घालून त्यात घरचे जाड पोहे भिजवून ते मिक्स करायचे. एक वाफ काढून हे गरमागरम पोहे केळीच्या पानावर साजूक तूप घालून खाणे म्हणजे अहाहा!!! फटाके मोजूनच असायचे. ते तुळशीच्या लग्नापर्यंत पुरवावे लागत. तुळशीच्या लग्नाला तुळशी वृंदावन चुना, हळद आणि पिंजरीच्या ठिपक्यांनी सजवायचे. सकाळी आई तिला पिवळे कापड गुडाळायची, हिरव्या बांगड्या घालायची. ऊस मामा म्हणून उभा करायचा. करा-दिवा मात्र आम्ही बहिणी घेऊन उभ्या रहात असू. बाबा एकटेच मुलाकडचे! लग्नानंतर सगळ्यांना फराळ दिला जायचा. मस्त होती ती दिवाळी!!

In reply to by अनन्न्या

पैसा 03/11/2013 - 21:38
दिवाळीची सुटी ही निव्वळ पत्ते खेळण्यासाठीच असायची. त्यात तो गृहपाठ नावाचा छळ असायचा पण कोणाला फिकीर होती त्याची!

पाषाणभेद 03/11/2013 - 21:53
मला माझ्या लहाणपणाची दिवाळी अजूनही आठवते. मी हिंदू, माझी आई पारशी, वडील मुस्लीम, बहीण क्रिस्चन, भाऊ बंगाली, चुलत भावंड काश्मिरी- पंजाबी असल्याने लहाणपणाच्या दिवाळीसणात सर्व भारत आमच्या घरी जमला असे वाटत असे. मिठाई, फटाके यांची रेलचेल असायची. आताशा दिवाळीत मी घरी नसते. गेल्या दोन दिवाळींच्या वेळी मी सिंगापूर अन स्वित्सर्लंड येथे शाहिद अन रनबीर सोबत शुटींगमध्ये बिझी होते. येत्या दिवाळीत माझा 'Blind Game - ऐ सनम तुझपे मेरे दिल आ गया' हा चित्रपट रिलीज होतो आहे. माझ्यासाठी ते दिवाळी गिफ्टच आहे. सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या शुभेच्छा! - करूना कर्पूर (शब्दांकन - पाषाणभेद)

रेवती 02/11/2013 - 00:19
मी फुलबाज्या आणि भुईनळा की झाड असे काहीतरी म्हणायचे ते मिस करतीये. बाकी ते आवाजी फटाके आवडायचे नाहीत. एक दोनदा माझ्या नव्या कपड्यांना पेटत्या उदबत्तीने भोके पडली होती. दिवाळीचा फराळ दिवाळीत खायला फारशी मजा येत नसे. दिवाळी संपल्यानंतर जी उरलेली सुट्टी असेल त्यात लायब्ररीतून आणलेले (बाल)साहित्य वाचताना करंज्या, चिरोटे खाणे, त्यातले सारण, पिठीसाखर सांडल्यावर ते सगळे साफसूफ करणे हे आठवत आहे. ;) चिवड्यावर दही घालून खाणे, चकलीबरोबर दही, लोणी. असे करीत असे. चार घरचा आलेला फराळ कसा संपवावा हा प्रश्न पडायचा. मग सकाळी दूध पिताना आई आम्हाला सक्तीने मूठ मूठ शंकरपाळे संपवायला भाग पाडायची. आत्याकडे दिवाळीनंतर मिसळ करून त्यात शेव चिवडे घालून ते संपवण्याचा चंग बांधला जायचा (तरी ते उरायचेच). आता बहुतेक उरलेला फराळ संपवण्याच्या युक्त्या असा धागा सुरु करावा लागेल.

In reply to by रेवती

पैसा 02/11/2013 - 01:27
मी भलत्याच विवंचनेत आहे. कामवाली पोरगी गावी जाणार, मग ती तेलातुपाची भांडी कोण घासणार म्हणून यावर्षी मी फराळ ४ दिवस आधीच तयार केला पण लहान किचनमधे लपवणे शक्य झाले नाही. आणि आताच डब्यांचा तळ दिसू लागला आहे. उद्या सकाळी आमच्यापुरता फराळ आहे पण आणखी कोणी आले तर पोहे देऊन भागवावे लागेल अशी लक्षणे आहेत!

In reply to by पैसा

रेवती 02/11/2013 - 04:48
हा हा हा. हो मीही तेच करणार आहे. आतापरेंत तीन चार जणींचे फोन येऊन गेलेत. त्यांच्याकडे दिवाळी म्हणजे फक्त लक्षुमी पूजन असते. मग महाराष्ट्रीय फराळाला कधी बोलावतेस म्हणून! आता काय सांगू? म्हटले नंतर बोलावते. सगळे मिळून पाच डबे त्यांचे माझ्याकडे आहेत. त्याच डब्यात घालून दिलास फराळ तरी चालेल म्हणतायत. म्हटलं नको, तुम्ही येऊन जा आणि डबे रिकामेच न्या आता!

दिवाळी म्हटले की आवाजाचे फटाके, नवीन कपडे , दिवाळी पहाट आमचा तरुणाई ने ओथंबलेला डोंबिवलीचा फडके रोड तेथे यथेच्च भटकून झाले की मित्रांकडे फराळ अनेक सांस्कृतिक कार्यक्रम , सुंगधी उटणे, मोती साबण दिवाळी अंक अश्या अनेक आठवणी मनात पिंगा घालतात , शाळा सोडून कॉलेजात गेलो तरी नियमितपणे आमचा १० अ चा बहुतेक सर्व वर्ग फड्केवर भेटायचा. आता अर्ध्याहून जास्त जगातील विविध खंडात विखुरले गेले आहोत तेव्हा एखादा वर्ग मित्र न चुकता आजही फड्केवर येतो चतुर भ्रमणध्वनीवर त्याच्याशी गप्पा मारतात मग फडकेवरील आखो देखा हाल पाहता येतो. अनिवासी असल्याने भारताशी ,आपल्या आप्त स्वकीय , मित्रांची , जाम आठवण येते , मग मी मिपावर येतो , आभसी जगतातील माझ्या मिपाकरांना भेटतो , मग जरा बरे वाटते.

अनन्न्या 03/11/2013 - 19:51
लहानपणी आम्ही जवळपासची सारी मुले दिवाळीच्या आदल्या रात्री पत्ते कुटत असू. खेडेगाव असल्याने आजूबाजूला भरपूर मोकळी जागा होती. आमच्या घराशेजारी एका काकांचे घर होते, ते भिक्षुकी करायचे. आणि त्यांना संक्रातीला मिळालेली सुगडे ते बाहेर झाडाखाली रचून ठेवायचे. रात्री आम्ही मुले ती सुगडे पळवून आणत असू. दोन वाजले की त्यात ठेवून त्यांच्याच घराबाहेर मोठे बॉम्ब वाजवत असू. त्यांचा मुलगाही यात सामिल असे. ते उठून बाहेर येऊन, कोण रे तो? असे विचारे पर्यंत आम्ही पत्ते पुन्हा सुरू करत असू. हे दरवर्षी करत असूनही त्यानी कधी सुगडांची जागा बदलली नाही, किंवा फटाके लावणारे शोधले नाहीत. रात्रभर हे सगळे उद्योग करून चार वाजता आपापल्या घरी जायचे. आंघोळी आटोपून, रांगोळ्या काढून, फराळ करायचा आणि जे गुडूप झोपायचे ते थेट दुपारच्या चहाला उठायचे. दिवाळीच्या दिवशी सकाळी नारळाच्या दुधात उटणे कालवले जायचे. नवीन कपडे दर दिवाळीला मिळायचे नाहीत, पण तांब्यात निखारे भरून त्याने असलेल्या त्यातल्या त्यात बय्रा ड्रेसला इस्त्री करून घालतानाही खूप मजा वाटे. फराळात जास्त पदार्थ नव्ह्ते. घरचे पोहे, करंजी, कडबोळी, रव्याचे लाडू आणि कणकेचे शंकरपाळे! दिवाळीच्या दिवशी गूळ पातळ करून त्यात ओले खोबरे घालून त्यात घरचे जाड पोहे भिजवून ते मिक्स करायचे. एक वाफ काढून हे गरमागरम पोहे केळीच्या पानावर साजूक तूप घालून खाणे म्हणजे अहाहा!!! फटाके मोजूनच असायचे. ते तुळशीच्या लग्नापर्यंत पुरवावे लागत. तुळशीच्या लग्नाला तुळशी वृंदावन चुना, हळद आणि पिंजरीच्या ठिपक्यांनी सजवायचे. सकाळी आई तिला पिवळे कापड गुडाळायची, हिरव्या बांगड्या घालायची. ऊस मामा म्हणून उभा करायचा. करा-दिवा मात्र आम्ही बहिणी घेऊन उभ्या रहात असू. बाबा एकटेच मुलाकडचे! लग्नानंतर सगळ्यांना फराळ दिला जायचा. मस्त होती ती दिवाळी!!

In reply to by अनन्न्या

पैसा 03/11/2013 - 21:38
दिवाळीची सुटी ही निव्वळ पत्ते खेळण्यासाठीच असायची. त्यात तो गृहपाठ नावाचा छळ असायचा पण कोणाला फिकीर होती त्याची!

पाषाणभेद 03/11/2013 - 21:53
मला माझ्या लहाणपणाची दिवाळी अजूनही आठवते. मी हिंदू, माझी आई पारशी, वडील मुस्लीम, बहीण क्रिस्चन, भाऊ बंगाली, चुलत भावंड काश्मिरी- पंजाबी असल्याने लहाणपणाच्या दिवाळीसणात सर्व भारत आमच्या घरी जमला असे वाटत असे. मिठाई, फटाके यांची रेलचेल असायची. आताशा दिवाळीत मी घरी नसते. गेल्या दोन दिवाळींच्या वेळी मी सिंगापूर अन स्वित्सर्लंड येथे शाहिद अन रनबीर सोबत शुटींगमध्ये बिझी होते. येत्या दिवाळीत माझा 'Blind Game - ऐ सनम तुझपे मेरे दिल आ गया' हा चित्रपट रिलीज होतो आहे. माझ्यासाठी ते दिवाळी गिफ्टच आहे. सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या शुभेच्छा! - करूना कर्पूर (शब्दांकन - पाषाणभेद)
नमस्कार मिपाकरहो, दिपावली अभिष्टचिंतन! कोणताही सण आला की आपण तो साजरा करताना आई काय करत असे किंवा आज्जी कसे करत असे ते आठवून, त्यांना विचारून, पुस्तकात वाचून त्या पद्धती आचरणात आणायचा प्रयत्न करतो. काहीवेळा सगळे साग्रसंगीत करायला जमते तर कधी गोष्टी शास्त्रापुरत्या कराव्या लागतात. दिवाळी हा आपल्यकडील मोठा सण समजला जातो. चार दिवस आपापले वैशिष्ठ्य टिकवून असतात. वाईट वृत्तीचा नाश करण्यापासून ते लक्ष्मीच्या पुजेपर्यंत तर सासरच्या नातेवाईकांपासून माहेरच्या नातेवाईकांची भेट घडवत हा सण आठवणींच्या सुखाची उबदार शाल मनावर अलगदपणे सोडून पुढील वर्षाची वाट पहायला लावतो.

[ताज्या जिलब्या] आचरटपणा

युयुत्सु ·

In reply to by सुबोध खरे

कांदा लिंबू 20/01/2026 - 10:08
एखाद्या बालकाला पिपाणी मिळाली कि ती सारखी वाजवून प्रत्येकाला ते काव आणतं तसं झालंय. ठ्ठो! अचूक! Lol

In reply to by सुबोध खरे

कांदा लिंबू 20/01/2026 - 10:08
एखाद्या बालकाला पिपाणी मिळाली कि ती सारखी वाजवून प्रत्येकाला ते काव आणतं तसं झालंय. ठ्ठो! अचूक! Lol
लेखनविषय:
लेखनप्रकार
[ताज्या जिलब्या] आचरटपणा =============== -- राजीव उपाध्ये टीप - आजच्या जिलब्यांचा नैवेद्य श्री० चंद्रसूर्यकुमार यांना समर्पित करण्यात येत आहे. मानवी इतिहास अनेक अंगांनी अनेकांनी लिहिला आहे. पण आचरटपणाच्या अंगाने लिहीला गेला नसावा असा माझा अंदाज आहे. आचरटपणा म्हणजे अतार्किक गोष्टींवर ठाम विश्वास, योग्य काय अयोग्य काय याच्या मनमानी कल्पना इ० आचरट कल्पना कशामुळे जन्म घेत असाव्यात. सामुहिक रित्या मानवी मेंदूची क्षमता अचाट असली तरी व्यक्तीगत पातळीवर ती मर्यादितच असते.

माझ्या पुण्याचा माझा गणेशोत्सव

जे.पी.मॉर्गन ·

सुक्या 05/09/2025 - 21:34
"माझं पुणं" म्हणन्याईतपत पुण्यात निगुतीनं रहायला कधी मिळालेच नाही. पण पुण्याचा गणेशोत्सव मात्र अक्षरशः जगलो आहे. या लेखाच्या निमित्ताने पुन्हा जाउन आलो.

मस्त, सर्वच मनसोक्त उपभोगल्याने हल्ली कुठेच जात नाही. अर्थात जायची इच्छा असते पण एकतर कसबा पुनवडी पासून दूर हाडंपसरली आहेत. दुसरे ध्वनिप्रदूषण सहन होत नाही. बरेच वेळा महाराष्ट्राबाहेर गणपती उत्सव साजरा केल्याने त्या आठवणी वेगळ्या आहेत.

पण आत्ता अनंतचतुर्दशीच्या दिवशी एका कानाने काटा लगा आणि दुसर्‍या कानाने पैलवान आला गं पैलवान आला ऐकत आहे. तिसर्‍या कोणाच्या डीजेमुळे काचा हादरत आहेत आणि गाडी तर बिल्डिंगच्या बाहेर काढायची सोयच नाही. गाडी म्हणजे दुचाकी बरं का!! आणि गावात तर......... कॉलिंग अस्सल नदी अलीकडचे पुणेकर

चौथा कोनाडा 07/09/2025 - 14:36
व्वा .... सुंदर लिहिलंय ... लेखन वाचताना कातर व्ह्यायला झालं ! मी पुण्याचा नाही.. पण ४० वर्षांपुर्वी उपनगरात रहायला आलो .. अन पुणे संस्कृतीने आपलंस केलं ! हा प्रवास मी ही पाहिला , अनुभवला आहे. शेवटी जुनं ते सोंनं हेच खरं ! नव्यातील उपद्रवी गोष्टी दॄष्टीआड करायच्या अन नव्या आप्ल्याश्या .. हाच उपाय !

अभ्या.. 07/09/2025 - 17:14
सुंदर लिखाण पण.... उबग आलाय ह्या उत्सवाचा. तुमच्या म्हणण्याप्रमाणे अस्सल पुणेकराला काही सांगायची गरज नसते तशी काही ऐकून घेण्याचीही नसावीच. मूळ उद्देश वगैरे तर सोडून द्या, फक्त झुंडशाही, राजकारणी शक्तीप्रदर्शने, पैश्याचा प्रचंड चुराडा आणि सक्तीचे ध्वनीप्रदूषण, बाहतुकीचा बोजवारा, मोठमोठ्या विभूतींची नावे जोडत घेतेलेले व्हॅलिडेशन, नाही तसल्या प्रथा आणि कृतींना संस्कृतीचे आणि परंपरांचे गोंडस लेबल आणि तेच खरे असे सांगत सर्वत्र होत असणारा त्याचा मूर्ख प्रसार हे पाहता अशा उत्सवावर सुंदर शब्दात लिहिलेल्या निबंधाची कीव करावी की संताप तेच कळत नाही.

In reply to by अभ्या..

रामचंद्र 09/09/2025 - 00:02
फक्त झुंडशाही, राजकारणी शक्तीप्रदर्शने, पैश्याचा प्रचंड चुराडा आणि सक्तीचे ध्वनीप्रदूषण, बाहतुकीचा बोजवारा, मोठमोठ्या विभूतींची नावे जोडत घेतेलेले व्हॅलिडेशन, नाही तसल्या प्रथा आणि कृतींना संस्कृतीचे आणि परंपरांचे गोंडस लेबल आणि तेच खरे असे सांगत सर्वत्र होत असणारा त्याचा मूर्ख प्रसार> + दुसऱ्याला होणाऱ्या त्रासाबद्दल कमालीचा बेमुर्वतखोरपणा, समाजद्रोही सर्वपक्षीय राजकीय नेतृत्व आणि थंड आणि षंढ बहुतांश यंत्रणा...

हा लेख एक प्रवास आणी त्याच्या आठवणी आहेत. खर तर हा लेख भटकंतीत हलवायला हवा. "वन्स अप ऑन अ टाईम"असा सिंड्रोम असतो. यावर ना तो संताप व्यक्त करायची जरूर आहे ना ही किव करायची गरज. सद्यस्थितीत आपले म्हणणे तंतोतंत खरे आहे पण कोण काय करू शकतो. कानावर, डोळ्यावर,खिशावर,जुन्या संस्कारी मनावर योजनाबद्ध बलात्कार आहे. काहीच करू शकत नाही तर मग सहन करण्याशिवाय गत्यंतर नाही. बाकी जुनी नावे वाचून त्या काळात गेल्यासारखे जरूर वाटले.

एका दमात पुर्ण सिक्वेन्स सान्गित्लात "आहेस तिथून थोडा मागे चालत जा - आधी आमच्या ग्रामदैवत कसबा गणपतीच्या पायी डोकं ठेव आणि मग आमची ग्रामदेवता आई तांबडी जोगेश्वरीचं दर्शन घे. अजूनही पुणेकराच्या घरात कार्य निघतं तेव्हा पहिली निमंत्रणपत्रिका कसब्याच्या गणपतीला जाते आणि दुसरी तांबड्या जोगेश्वरीला. पलिकडेच भाऊसाहेब जावळे रंगारींचा राक्षसवध करणारा गणेश बघ. त्वष्टा कासारचं दर्शन घेऊन मग दलबीरे - तू गुरुजी तालमीचा मूषकावर स्वार गणपती आणि तुळशीबागेची भव्य गणेशमूर्ती बघ. "डॅडी" इमामभाई खान यांचा जगोबादादा तालीम गणपती बघून मंडईच्या शारदा - गजाननाचे आशीर्वाद घे आणि तिथेच बाबू गेनू मंडळाची मूर्ती बघून, जिलब्या मारुती मंडळाच्या अनुपम सात्विक गणेशमूर्तीसमोर नतमस्तक हो. तिथून काही अंतरावरच्या केसरीवाड्यात लोकमान्यांच्या गणेशाचं दर्शन घे. तुला दिसेल खरं पुणं."

मूळचा गिरगावकर नि कामानिमित्त पेठकर ( सदाशिव पेठ) नि निवासनिमित्त डोंबिवलीकर . त्यामुळे मुंबई नी पुणे दोन्ही कडील मजा अनुभवली आहे . पेठेतील गणपतींचे सुरेख वर्णन केलय . लेख आवडला, तरी यापैकी अनेक गणपती पाहायचे राहिले . निंबाळकर पेठचा यावर्षीचा जिवंत देखावा प्रेक्षणीय होता , शनिपारची द्वारका पाहायचे स्वप्न गर्दीच्या महापुरात वाहून गेले .

सुक्या 05/09/2025 - 21:34
"माझं पुणं" म्हणन्याईतपत पुण्यात निगुतीनं रहायला कधी मिळालेच नाही. पण पुण्याचा गणेशोत्सव मात्र अक्षरशः जगलो आहे. या लेखाच्या निमित्ताने पुन्हा जाउन आलो.

मस्त, सर्वच मनसोक्त उपभोगल्याने हल्ली कुठेच जात नाही. अर्थात जायची इच्छा असते पण एकतर कसबा पुनवडी पासून दूर हाडंपसरली आहेत. दुसरे ध्वनिप्रदूषण सहन होत नाही. बरेच वेळा महाराष्ट्राबाहेर गणपती उत्सव साजरा केल्याने त्या आठवणी वेगळ्या आहेत.

पण आत्ता अनंतचतुर्दशीच्या दिवशी एका कानाने काटा लगा आणि दुसर्‍या कानाने पैलवान आला गं पैलवान आला ऐकत आहे. तिसर्‍या कोणाच्या डीजेमुळे काचा हादरत आहेत आणि गाडी तर बिल्डिंगच्या बाहेर काढायची सोयच नाही. गाडी म्हणजे दुचाकी बरं का!! आणि गावात तर......... कॉलिंग अस्सल नदी अलीकडचे पुणेकर

चौथा कोनाडा 07/09/2025 - 14:36
व्वा .... सुंदर लिहिलंय ... लेखन वाचताना कातर व्ह्यायला झालं ! मी पुण्याचा नाही.. पण ४० वर्षांपुर्वी उपनगरात रहायला आलो .. अन पुणे संस्कृतीने आपलंस केलं ! हा प्रवास मी ही पाहिला , अनुभवला आहे. शेवटी जुनं ते सोंनं हेच खरं ! नव्यातील उपद्रवी गोष्टी दॄष्टीआड करायच्या अन नव्या आप्ल्याश्या .. हाच उपाय !

अभ्या.. 07/09/2025 - 17:14
सुंदर लिखाण पण.... उबग आलाय ह्या उत्सवाचा. तुमच्या म्हणण्याप्रमाणे अस्सल पुणेकराला काही सांगायची गरज नसते तशी काही ऐकून घेण्याचीही नसावीच. मूळ उद्देश वगैरे तर सोडून द्या, फक्त झुंडशाही, राजकारणी शक्तीप्रदर्शने, पैश्याचा प्रचंड चुराडा आणि सक्तीचे ध्वनीप्रदूषण, बाहतुकीचा बोजवारा, मोठमोठ्या विभूतींची नावे जोडत घेतेलेले व्हॅलिडेशन, नाही तसल्या प्रथा आणि कृतींना संस्कृतीचे आणि परंपरांचे गोंडस लेबल आणि तेच खरे असे सांगत सर्वत्र होत असणारा त्याचा मूर्ख प्रसार हे पाहता अशा उत्सवावर सुंदर शब्दात लिहिलेल्या निबंधाची कीव करावी की संताप तेच कळत नाही.

In reply to by अभ्या..

रामचंद्र 09/09/2025 - 00:02
फक्त झुंडशाही, राजकारणी शक्तीप्रदर्शने, पैश्याचा प्रचंड चुराडा आणि सक्तीचे ध्वनीप्रदूषण, बाहतुकीचा बोजवारा, मोठमोठ्या विभूतींची नावे जोडत घेतेलेले व्हॅलिडेशन, नाही तसल्या प्रथा आणि कृतींना संस्कृतीचे आणि परंपरांचे गोंडस लेबल आणि तेच खरे असे सांगत सर्वत्र होत असणारा त्याचा मूर्ख प्रसार> + दुसऱ्याला होणाऱ्या त्रासाबद्दल कमालीचा बेमुर्वतखोरपणा, समाजद्रोही सर्वपक्षीय राजकीय नेतृत्व आणि थंड आणि षंढ बहुतांश यंत्रणा...

हा लेख एक प्रवास आणी त्याच्या आठवणी आहेत. खर तर हा लेख भटकंतीत हलवायला हवा. "वन्स अप ऑन अ टाईम"असा सिंड्रोम असतो. यावर ना तो संताप व्यक्त करायची जरूर आहे ना ही किव करायची गरज. सद्यस्थितीत आपले म्हणणे तंतोतंत खरे आहे पण कोण काय करू शकतो. कानावर, डोळ्यावर,खिशावर,जुन्या संस्कारी मनावर योजनाबद्ध बलात्कार आहे. काहीच करू शकत नाही तर मग सहन करण्याशिवाय गत्यंतर नाही. बाकी जुनी नावे वाचून त्या काळात गेल्यासारखे जरूर वाटले.

एका दमात पुर्ण सिक्वेन्स सान्गित्लात "आहेस तिथून थोडा मागे चालत जा - आधी आमच्या ग्रामदैवत कसबा गणपतीच्या पायी डोकं ठेव आणि मग आमची ग्रामदेवता आई तांबडी जोगेश्वरीचं दर्शन घे. अजूनही पुणेकराच्या घरात कार्य निघतं तेव्हा पहिली निमंत्रणपत्रिका कसब्याच्या गणपतीला जाते आणि दुसरी तांबड्या जोगेश्वरीला. पलिकडेच भाऊसाहेब जावळे रंगारींचा राक्षसवध करणारा गणेश बघ. त्वष्टा कासारचं दर्शन घेऊन मग दलबीरे - तू गुरुजी तालमीचा मूषकावर स्वार गणपती आणि तुळशीबागेची भव्य गणेशमूर्ती बघ. "डॅडी" इमामभाई खान यांचा जगोबादादा तालीम गणपती बघून मंडईच्या शारदा - गजाननाचे आशीर्वाद घे आणि तिथेच बाबू गेनू मंडळाची मूर्ती बघून, जिलब्या मारुती मंडळाच्या अनुपम सात्विक गणेशमूर्तीसमोर नतमस्तक हो. तिथून काही अंतरावरच्या केसरीवाड्यात लोकमान्यांच्या गणेशाचं दर्शन घे. तुला दिसेल खरं पुणं."

मूळचा गिरगावकर नि कामानिमित्त पेठकर ( सदाशिव पेठ) नि निवासनिमित्त डोंबिवलीकर . त्यामुळे मुंबई नी पुणे दोन्ही कडील मजा अनुभवली आहे . पेठेतील गणपतींचे सुरेख वर्णन केलय . लेख आवडला, तरी यापैकी अनेक गणपती पाहायचे राहिले . निंबाळकर पेठचा यावर्षीचा जिवंत देखावा प्रेक्षणीय होता , शनिपारची द्वारका पाहायचे स्वप्न गर्दीच्या महापुरात वाहून गेले .
सात- आठ वर्षांपूर्वीची गोष्ट. गणपतीचे दिवस होते. एरवी पुण्यात असताना कधी घरी गणपती बसवले नाहीत; पण दिल्लीत पांडे, गुप्ता, अरोडा, ब्रार, यादव, खान, मोइत्रा, रेड्डी, अय्यर अशा शेजार्‍यांच्या आग्रहामुळे दाही दिवस रोज घरी गणपतीची तबला - पेटी - ढोलकच्या साथीत जोरदार आरती व्ह्यायची. रोज एका घरातून बाप्पांसाठी प्रसाद यायचा. आमच्या घरी गेल्या दोन पिढ्यांत बनले नसतील इतके उकडीचे मोदक त्या एका आठवड्यात बनवले गेले होते. एकंदर धमाल होती. पण पुण्यातला गणेशोत्सव अर्थातच मिस करत होतो. असाच एक दिवस लवकर निघायच्या तयारीत असतानाच ऑफिसच्या डेस्कवरचा फोन वाजला. Long ring म्हणजे बाहेरचा फोन.

मानस- अनंतकोटीब्रम्हांडनायक

आर्या१२३ ·

अंहं ही कथा काही भावली नाही. महत्वाचे कारण म्हणजे ह्या कथेत असलेले spiritual materialism. नामस्मरणाने चमत्कार होतो, पेशंट तीन महिन्याने शुद्धीवर येतो, वैकुंठ , परलोक वगैरे सगळं spiritual materialism आहे. त्याचा उपयोग अत्यंत प्राथमिक स्तरावरील साधकांसाठी आहे. त्यांना त्या ओढीने का होईना अध्यात्माची ओढ लागते. एरव्ही " जाणत्या" साधकांसाठी हे सारं फारच हास्यास्पद आहे. मुळात कोणीतरी आपल्या पापपुण्याचा, आपल्या नामस्मरणाचा हिशेब ठेवत आहेत ही संकल्पनाच हास्यास्पद आहे. ते 13 कोटी जप वगैरे फार अलीकडे आले. बस एकवार , मोजून एकदा समजून घेतले एक " राम" हे नाम , फक्त एकदा, बस इतके "पुरेसे" आहे. हा तुकोबांचा अभंग पहा : राम म्हणता रामचि होईजे।पदी बैसोन पदवी घेईजे ।।१।। ऐसे सुख वचनी आहे।विश्वासे अनुभव पाहे ।।धृ।। रामरसाचिया चवी।आन रस रुचती केवी ।।३।। तुका म्हणे चाखोनि सांगे ।मज अनुभव आहे अंगे ।।४।। तस्मात् हे सारं आध्यात्मिक भौतिकवाद इहवाद बाजूला सारून एकदा "राम" म्हणा , "समजून" म्हणा. बस. इतके पुरेसे आहे. त्यानंतर व्हायचे ते होऊ दे देह जावो अथवा राहो। पांडुरंगीं दृढ भावो ।। काय फरक पडतो !! जे होतंय ते, जे झालं ते आणि जे जे काही होईल ते सर्वच रामाची इच्छा !!

आपापला दृष्टिकोन. लेखकाने ही कथा काल्पनिक आहे असे लिहीले आहे. आध्यात्म, परमार्थ वैगेरेच्या भानगडीत मी पडत नाही. स्वधर्मानुसार समोर येणारे कर्म करणे एवढेच समजते. तसे माझे पणजोबा,पणजी व आजोबा दत्तसंप्रदायातील अनुग्रहीत अधीकारी होते पण नात्याच्या पलिकडे काही नाही. एक कथा म्हणून आवडली.

आर्या१२३ 28/07/2025 - 12:48
नामस्मरणाने चमत्कार होतो, पेशंट तीन महिन्याने शुद्धीवर येतो, वैकुंठ , परलोक वगैरे सगळं spiritual materialism आहे. त्याचा उपयोग अत्यंत प्राथमिक स्तरावरील साधकांसाठी आहे. त्यांना त्या ओढीने का होईना अध्यात्माची ओढ लागते. एरव्ही " जाणत्या" साधकांसाठी हे सारं फारच हास्यास्पद आहे. प्रगो, हे अवास्तव नाही. साधकांनी सांगितलेले अनुभव आहे. माझ्या मैत्रिणीच्या सासुबाई शेवटी शेवटी तीन महिने कोमात होत्या. आणि तरी त्यांची बोटे माळ फिरवल्यासारखी हलत होती. मुळात कोणीतरी आपल्या पापपुण्याचा, आपल्या नामस्मरणाचा हिशेब ठेवत आहेत ही संकल्पनाच हास्यास्पद आहे. ते 13 कोटी जप वगैरे फार अलीकडे आले. नामस्मरणाचा हिशोब वैगेरे हे आकडे द्यावे म्हणुन मी लिहीले आहे, निव्वळ आपला जप प्रापंचिक मागणे पुर्ण करण्यात कसा खर्च होतो हे सांगण्यासाठी. आणि हे मनाचे नाही तर श्री बापुसाहेब मराठे यांच्या पुस्तकात येउन गेले आहे. बाकी तेरा कोटी जपाबद्दल म्हणशील तर महाराजांच्या चरित्रात उल्लेख आहे. महाराजांनी स्वतःच त्यांच्या काही शिष्यांना तेरा कोटीचा संकल्प करण्यास सांगितले होते. काहींना साडे तीन कोटीचा करण्यास सांगितले.

In reply to by आर्या१२३

म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावतो. अशा आध्यात्मिक इहवादी कथा , आख्यायिकांमुळे नास्तिक निधर्मी, धर्म विध्वसंक लोकांचे फावते , अन् त्यांना टीका करायला फट मिळते अन् गंभीर विषयाचे हसे उडवले जाते. मी तुम्हाला सांगतो - नामस्मरणाचा भौतिक , इहवादी जगात शून्य उपयोग होणार आहे असे, आणून आणि कळूनही जो केवळ प्रेमाने नामस्मरण करेल त्याला निमिषार्धात "लाभ" झाल्याशिवाय राहणार नाही !. रामाचे नाव घेऊन त्याला घर गाडी बायका पोरं वगैरे मागणे म्हणजे सोनाराच्या दुकानात जाऊन कोथिंबीरची जुडी मागण्यासारखं आहे. त्यामुळे समर्थांचे जे मागणे आहे ते च आपले मागणे आहे - " मागणेची निरसे जेणे l ऐसे देगा रामराया ll " नामाचा महिमा अगाध आहे , त्याला शुल्लक प्रापंचिक उपभोग प्राप्त करून घ्यायचा उपाय असे रूप यायला नको. नामाचे साध्य ही अवस्था आहे - देहींच विदेह होणें । करून कांहींच न करणें । जीवन्मुक्तांचीं लक्षणें । जीवन्मुक्त जाणती ॥ ३३॥ राम

In reply to by प्रसाद गोडबोले

अशा आध्यात्मिक इहवादी कथा , आख्यायिकांमुळे नास्तिक निधर्मी, धर्म विध्वसंक लोकांचे फावते , अन् त्यांना टीका करायला फट मिळते अन् गंभीर विषयाचे हसे उडवले जाते. प्रगो यांचे म्हणणे पटते की अशा प्रकारच्या लेखातून टीकाकारांना संधी मिळते. मी तुम्हाला सांगतो - नामस्मरणाचा भौतिक , इहवादी जगात शून्य उपयोग होणार आहे असे, आणून आणि कळूनही जो केवळ प्रेमाने नामस्मरण करेल त्याला निमिषार्धात "लाभ" झाल्याशिवाय राहणार नाही !. हे परस्पर विरोधी विधान वाटते. प्रगो यांनी थोडा प्रकाश टाकावा. विवेक पटाईत सो. बरोबर सहमत. नामस्मरणाचे साधन सामान्य प्रापंचिक माणसांसाठी व त्यातूनच अध्यात्मिक प्रगती साधून घेण्याची संधी संतानी सांगीतली आहे. मला नामस्मरण सर्वात सोपे व सहजसाध्य साधन वाटते. आगदी देशाच्या सीमेवर पहारा देत असताना सुद्धा हे सर्वांगसुंदर साधन उपलब्ध असते. नामस्मरणाचे महत्त्व सर्व संतानी सांगीतले आहे. काही उदाहरणार्थ माऊलींचा हरिपाठ बर्‍याच लोकांच्या नित्यवचनात असतो. माऊली म्हणतात किती तीर्थक्षेत्रे फिरली पण नामस्मरण नसेल तरी ती यात्रा फलद्रूप होणार नाही एवढी नामस्मरणाची महती सांगीतली आहे. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्‍त नाही नामी तरी ते व्‍यर्थ॥ नामासी विन्‍मूख तो नर पापीया । हरीविण धावया न पवे कोणी॥ पुराण प्रसीध्‍द बोलीले वाल्‍मीक । नामे तिन्‍ही लोक उध्‍दरती॥ जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात, नाम घेता उठाउठी, होय संसाराची तुटी || धृ || ऐस लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी मिठी || १ || नामपरते साधन नाही, जे तू करिसी आणिक काही || २ || हाकरोनो सांगे तुका, नाम घेता राहो नका || ३ || संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांचा अभंगही हेच सांगतो. पाहतां साधन विठ्ठलकीर्तन । भक्तसंजीवन आत्माराम ॥ १ ॥ विठ्ठल सधर भिवरा तें नीर । नाम निरंतर केशवाचें ॥ २ ॥ शिवसुरवर चिंतिती सुस्वर । कीर्तनविचार पंढरीसी ॥ ३ ॥ निवृत्ति कीर्तन दिननिशीं ध्यान । मनाचें उन्मन इये रूपीं ॥ ४ ॥ उघडें स्वरूप प्रत्येक्षाचें दीप । नाम घेतां पाप हरे जना ॥ १ ॥ तें रूप विनट विठ्ठल सकळ । सेवा दिनकाळ पंढरीयेसी ॥ २ ॥ रजतमें दूरी नामाची माधुरी । निशाणी एकसरी रामकृष्ण ॥ ३॥ भवाब्धितारक नावाडा विवेक । पुंडलिक देख सेवितसे ॥ ४ ॥ विश्व हें तारिलें नामचि पिकलें । केशवी रंगलें मन हेतु ॥ ५ ॥ निवृत्ति विठ्ठल सेवितु सकळ । दिनकाळफळ आत्माराम ॥ ६ ॥ परब्रह्नाचे नाम घेतले तर सगऴी पापे नष्ट होतात. केशव नामाच्या साधनेत मन रंगले की विश्व तरले जाते हा नामाचा महिमा आहे. निवृत्तिनाथ म्हणतात ह्या रात्रंदिवस केलेल्या नामाच्या साधनेने मला जगत आत्माराम स्वरुपात दिसले. सांप्रत कथेमधे जो नामस्मरणाचा जो हिशोब मांडला आहे तो काही पटत नाही व कुठल्याच संतानी सांगीतला नसावा. चुकभुल देणे घेणे. कथा काल्पनिक आहे असे बोलून कथावास्तूपासून लेखक दुर जाऊन शकत नाही.

In reply to by कर्नलतपस्वी

हे परस्पर विरोधी विधान वाटते. प्रगो यांनी थोडा प्रकाश टाकावा
जरा जास्त सोपीकरण करून - थिअरी अर्थात ज्ञानयोग सहजसाध्य नाही, पूर्वजन्मीचे पुण्य असेल तरच तात्काळ उमगणारा आहे. प्रॅक्टिकल अर्थात कर्मयोग थकवणारा आहे. जेरीस आणणारा आहे. राजयोग सामान्य गृहस्थ प्रापंचिकाना सहजसाध्य नाही. मग सामान्य माणसाने करायचं काय तर म्हणून भगवंताने भक्तीयोग सांगितला जो की ह्या तिन्हीनचा समुच्चायात्मक आहे. तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च। मय्यर्पितमनोबुद्धिर्मामेवैष्यस्यसंशयम्।। नामस्मरण ही नवविधाभक्ती मार्गातील तिसरी भक्ती. पण गोंदवलेकर महाराज म्हणाले तसे तुम्ही 9 कोस लांब राहणाऱ्या माणसाला भेटायला निघालात अन् तो तुम्हाला 3 कोसावरच भेटला तर पुढचे 6 कोस त्याच्याच सोबत गेले काय की न गेले काय , काहीही फरक पडत नाही. म्हणून नाम श्रेष्ठ. नाम देव आणि ज्ञान ही देव. पण नामदेव सुलभ आहे, ज्ञानदेव कठीण आहे पण सर्वोच्च आहे ! जैसा दीपें दीपु लाविजे, तेथ आदील कोण हें नोळखिजे। तैसा सर्वस्वें जो मज भजे, तो मीची होऊनि ठाके ॥ मी जो निमिषार्धात लाभ होईल म्हणालो , तो "लाभ" हा आहे ! हेचि जाण भक्तीचे फळ ! जेणे तुटे संसार मूळ ! निःसंग आणि निर्मळ ! आत्मा होईजे स्वये !! श्रीराम !! - समर्थ रामदास स्वामी. आता ही आभाळाएवढी मोठी गोष्ट सोडून कुठे अन् कशाला उगाच देवाला थातूरमातूर गोष्टी मागत बसायचे !! इत्यलम राम

In reply to by प्रसाद गोडबोले

आता ही आभाळाएवढी मोठी गोष्ट सोडून कुठे अन् कशाला उगाच देवाला थातूरमातूर गोष्टी मागत बसायचे !! शंभर टक्के सहमत. देव म्हणजे काय रेशन दुकानदार आहे काय?कार्डावरील युनिट बघून साखर वाटप करणारा. इथे मला कवी संदीप खरे यांच्या कवितेतल्या ओळी आठवतात. मी आस्तिक मोजत पुण्या‌ईची खोली, नवसांची ठेवून लाच लावतो बोली, तो मुळात येतो इच्छा अर्पून सार्‍या अन धन्यवाद देवाचे घेवून जातो.

मारवा 29/07/2025 - 05:25
अवघड आहे. कंदमुळे खाऊन एक लंगोट घालून (याचीही काय गरज म्हणा) बरे necessities सांभाळून संपूर्ण आयुष्य पूर्ण ताकद लावून नामस्मरण करणे हेच जीवनाचे सर्वस्व सार्थक फलित मानल्यास असे आयुष्य जगणाऱ्या समजा अशांची संख्या करोडोने झाली तर अशा अप्रगत रानटी समाजाचे जे चित्र डोळ्यासमोर उभे राहते ते भयावह आहे कुठलाही विकास नाही प्रगती नाही आनंद नाही सुविधा नाही भाव नाही भावना नाही केवळ नाम केवळ नाम अवघड आहे हेच करायचे तर मेंदूचा आणि इतर अवयवाचा उपयोग तरी काय केवळ मुखाने वाजत राहिले तरी खूप आहे. कल्पना करा 140 करोड सर्व शांत बसलेले आहेत सर्व चक्र कोरोना काळा सारखे थांबलेले आहे. सर्वत्र केवळ नामस्मरणाचा हुंकार अवघड आहे आण

In reply to by मारवा

विवेकपटाईत 29/07/2025 - 10:52
नामस्मरण करता करता पुरुषार्थ ही करता येतो. नामस्मरण हे सांसारिक माणसांसाठी आहे. हिमालयात साधू संत मानसिक आध्यात्मिक शक्ती प्राप्त करणे साठी तपस्या करतात.

In reply to by मारवा

Bhakti 29/07/2025 - 15:03
ज्यांना अध्यात्मिक उन्नती मिळवायची आहे त्यांना भक्तिमार्ग ही सहज वाट आहे.त्यातील नामस्मरण ही एक साधना आहे.परंतू शास्त्रात हे स्पष्ट आहे की ज्ञानमार्ग हा परब्रह्म एकरूपतेचा सर्व श्रेष्ठ मार्ग आहे.या मार्गाकडे सर्वांना वळवण्याचे काम ज्ञानी लोकांचे आहे.परंतू यासाठी भक्तिमार्गातील जणांना कमी लेखने योग्य नाही,जो पर्यंत आपल्याला त्रास नाही तो पर्यंत त्यांना त्यांच्या मार्गाने जाण्यास बंदी नाही.

In reply to by Bhakti

चूक
ज्ञानमार्ग हा परब्रह्म एकरूपतेचा सर्व श्रेष्ठ मार्ग आहे
चूक. श्रेयो हि ज्ञानमभ्यासाज्ज्ञानाद्ध्यानं विशिष्यते | ध्यानात्कर्मफलत्यागस्त्यागाच्छान्तिरनन्तरम् ||

In reply to by प्रसाद गोडबोले

अभ्यासाहूनि गहन । पार्था मग ज्ञान । ज्ञानापासोनि ध्यान । विशेषिजे ॥ १४१ ॥ मग कर्मफलत्यागु । तो ध्यानापासोनि चांगु । त्यागाहूनि भोगु । शांतिसुखाचा ॥ १४२ ॥

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti 30/07/2025 - 10:33
पण कर्मयोग लगेच समजत नाही त्यासाठी ज्ञान व्हावं लागत वा भक्ति करत 'कृष्णार्पणमस्तु' करत निष्काम कर्मयोग साधावा लागतो.दोघांची तुलना करत इथे श्रेष्ठ सांगत आहे. निष्काम कर्मयोग हे बुद्धीगम्य व्हायला हे दोन्ही आहेत ना.पण नामस्मरणाने हा कर्मयोग मिळवण्यात काहीच आनंद मला वाटतं नाही हं !

श्वेता२४ 29/07/2025 - 14:57
त्यामुळे केवळ करमणुक म्हणून पाहणे गरजेचे. बाकी वास्तव व अवास्तव गोष्टींची छान मिसळ आहे. चांगला प्रयत्न. लिहीत राहा.

स्वधर्म 29/07/2025 - 16:16
खरे तर या कथेवर अजिबात प्रतिसाद लिहिणार नव्हतो. पण वरती काही जणांनी लिहिल्याने मला धाडस (होय धाडसच) करावेसे वाटले. आपल्या श्र्ध्देला धक्का लावण्याची आजिबात इच्छा नाही, त्यामुळे आधीच क्षमा असावी. कृपया पटले नाही तर सोडून द्या. आपण ही काल्पनिक कथा म्हणून लिहिली असली तरी त्यातून आपल्या अत्यंत श्रध्दावान अंतःकरणाचे दर्शन घडते. आपल्यासारखे अनेक सश्रध्द नातेवाईक स्वामी समर्थांचे भक्त झालेले आहेत. त्यांना काही समजावणे आता शक्य नाही व योग्यही वाटत नाही. पण ज्या अर्थी आपण कथा लिहिताय त्या अर्थी आपल्याकडे विचार करण्याची किमान शक्ती अजून असावी असे वाटून आपणांस भानावर या अशी विनंती करावीशी वाटत आहे. >>रोज एक तास जप याप्रमाणे १० वर्ष जप झाला आहे. तो जवळजवळ १ कोटी ८०,०००. त्यातला खरा मनापासून केलेला ७३लाख ८० हजार . १५ लक्ष मुलाचा ऍक्सीडेन्ट झाला, मुलगा आय सी यु मध्ये होता तेव्हा खर्च झाला, २३ लक्ष नवऱ्याचा जीव वाचावा म्हणून लागले. स्वतःच्या मालकीचा फ्लॅट व्हावा म्हणून सद्गुरूंपाशी मागणे केले होते तेव्हा १७ लक्ष खर्च झाला. नवऱ्याची कोर्ट केस जिंकावी म्हणून महाराजांना केलेले मागणे यात १४ लक्ष जप खर्च झाला. मुलाला योग्य ठिकाणी ऍडमिशन मिळावी म्हणून मागणे मागितले त्यात २ लक्ष जप खर्च झाला. राहता राहिला २लक्ष ८०,००० जप. यातला १ लक्ष ७७००० हजार जप हा मनापासून झाला आहे. हे म्हणजे एखाद्या गल्लीच्या कोपर्‍यावरच्या सोनाराच्या भीशी योजनेसारखे वाटत आहे. स्वतः च्या मालकीचा फ्लॅट जर नामस्मरण मोजून घेता येतो असे मानणे हे आपल्या श्रध्देशी सुसंगत असेलही, पण काबाडकष्ट करून, प्रामाणिकपणे पैसे साठवून फ्लॅट घेणार्‍या तमाम सरळमार्गी पण स्वामी समर्थांवर श्रध्दा नसलेल्या लोकांचा घोर अपमान आहे. तसेच काहीही अपराध करा (कोर्ट केस का ते सांगितले नाही) पण जप केला तर सुटाल असे म्हणणे हा कदाचित स्वामींचाही अपमानच आहे की काय असे वाटते. कोणी तरी म्हटले आहे, की देव जर केवळ नामस्मरणाने प्रसन्न होत असेल तर त्याच्यासारखा आत्मस्तुतीची आस असणार कोत्या मनाचा दुसरा कोणी नाही. देव किंवा साधू नामाचा असा सौदा करतात असे म्हणणे हा त्यांचाच अपमान नाही का?

आर्या१२३ 29/07/2025 - 17:42
पण काबाडकष्ट करून, प्रामाणिकपणे पैसे साठवून फ्लॅट घेणार्‍या तमाम सरळमार्गी पण स्वामी समर्थांवर श्रध्दा नसलेल्या लोकांचा घोर अपमान आहे. लेखातील वाक्यांचा असा विपरीत अर्थ निघत असल्यास क्षमा करा. लेखाचा हेतु हा नव्ह्ता. खरे तर आपले नामस्मरण कुठे खर्च होते हे स्वतःच स्वतःला जोखण्याचा हा प्रयत्न होता. अनेक वर्ष नाम घेउनही नाम सखोल का जात नाही? नामाचा परिणाम वृत्तीबदल, चित्तशुद्धी का होत नाही? या प्रश्नांची ही स्वत:च स्वतःला दिलेली उत्तरे होती. ती त्या बाडधारी व्यक्तीच्या मुखातुन घालण्यात आली असे म्हणा हवे तर. हे सुचण्यासाठी , वर सांगितल्याप्रमाणे श्रीमहाराजांचे ज्येष्ठ शिष्य श्री ल ग मराठे उर्फ बापुसाहेब मराठे यांच्याविषयीची एक गोष्ट कारणीभुत झाली, एवढेच म्हणेन इथे. नाम हे कुठल्या कारणासाठी न घेता, किंवा प्रपंच स्थीर व्हावा यासाठी न घेता केवळ नामासाठी नाम घ्यावे असे महाराज म्हणतात. हे सांगायच, होत इतकेच. ,अवघड आहे. कंदमुळे खाऊन एक लंगोट घालून (याचीही काय गरज म्हणा) बरे necessities सांभाळून संपूर्ण आयुष्य पूर्ण ताकद लावून नामस्मरण करणे हेच जीवनाचे सर्वस्व सार्थक फलित मानल्यासअसे आयुष्य जगणाऱ्या समजा अशांची संख्या करोडोने झाली तर अशा अप्रगत रानटी समाजाचे जे चित्र डोळ्यासमोर उभे राहते ते नामस्मरणासारखा दुसरा सोपा मार्ग नाही. ते प्रपंचात राहुनही करता येते. बर, याला काही कर्मकाण्डाची गरज नाही. सोवळे ओवळे नाही. गाडीत, प्रवासात, चप्पल घालुन, न घालता, माळ हातात न घेता, कसेही करता येते. त्यासाठी लंगोट लावुन वनात जायची गरज नाही. काहीवेळा स्तोत्र म्हणायला सुद्धा शुचिर्भुतता लागते. त्याची इथे गरज पडत नाही. बाकी, नामाने काय मिळते, काय साध्य होते हे नाम घेतल्याशिवाय कळणार नाही.

अनेक सश्रध्द नातेवाईक स्वामी समर्थांचे भक्त झालेले आहेत. त्यांना काही समजावणे आता शक्य नाही व योग्यही वाटत नाही. आपला प्रतिसाद चुकीचा नाही. पोटतिडीक साफ दिसत आहे. आमच्या एका नातेवाईकांनी आपल्या मुलाला बारावी नंतर लोणावळ्यात कुठल्यातरी आश्रमात शिकायला पाठवले. (नाव सांगणे उचित नाही) मी म्हणत होतो पुढील शिक्षणाचे काय तर म्हणाले याला आगोदरच तीथे पाठवायला हवे होते. ऊशीर झाला. मी कपाळावर हात मारून घेतला. दोन तीन वर्षानंतर काढून घेतले कसाबसा पदवीधर झाला. इकडे तिकडे नोकरी करत आयुष्य घालवत आहे. जवळचा असल्याने वाईट वाटते. दुसरी एक अशीच केस, स्वामी भक्त,खुप लोकांची अर्थिक फसवणूक केली. वारंवार सुचना देऊन,अर्थिक संकटातून बाहेर काढल्यानंतर ही सुधारत नाही. त्यामुळे सर्व नातेवाईकांनी संबध तोडले. आता ज्यांना फसवले त्याचां ससेमिरा चुकवण्यासाठी गावोगाव भटकत असतो .(अर्थात स्वांमीचा काही दोष नाही. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीमागे आहे या स्वामींच्या आशिरवचनाचा चुकीचा अर्थ घेतला.) श्रद्धे बरोबर सबुरी आणी स्वधर्मानुसार कर्म हे ही हवे.

In reply to by कर्नलतपस्वी

स्वधर्म 29/07/2025 - 19:28
या कथेत पण दहा वर्षे नियमितपणे जप करणार्‍या स्त्रीचा नवरा करोनात अकाली गेला ज्याच्या मागे कोर्ट कचेरीचा त्रास होता. तिच्या मुलाचा आय सी यूत ठेवण्याएवढा गंभीर अपघात झाला. स्वत: तिला ५५ व्या वर्षी 'नुसते फॅन साफ करताना स्टूलावरून पडण्याचे निमित्त झाले आणि डोक्याच्या मागच्या भागाला जबरदस्त दुखापत' झाली. तेही गुरूपौर्णिमेच्या आधल्या दिवशी. शिवाय तीन महिने ज्युपीटरचे आय सी यूचे बील म्हणजे... ज्यांना त्याची कल्पना आहे तेच जाणोत अशा दवाखान्याचे बील किती असते ते. दहा वषे मनापासून जप करून इतके सारे दुर्दैव वाट्याला आले. तरी पण श्रध्दावानांना इथे 'नामाचा महिमा'च दिसणार. म्हणून म्हणालो, जे लोक पूर्णपणे अतिश्रध्देच्या आहारी गेले आहेत, त्यांना काही समजावणे आता शक्य नाही व योग्यही वाटत नाही. तुंम्ही समजून घेतल्याबद्दल धन्यवाद.

In reply to by स्वधर्म

मारवा 29/07/2025 - 20:55
नवऱ्याची केस जिंकली आता विरोधी जो होता त्याने किंवा त्याच्या बायकोने नामस्मरणाचा घडा काउंटर करून भरला असता तर मग महाराजांनी निकालच रोखून धरला असता का ? बरे दोघांचे 10 लाख 10 लाख झाले मग टाय केला असता का ? सर्वात रोचक बाब बघा महाराजांना न्याय्य काय याची चाड नाही. नामस्मरण किती झाले हे नवऱ्याने जरी काही गैर वर्तन केले असले तरी त्याहूनही महत्वाचे आहे. नामस्मरण हे त्याला त्या गैरकृत्याला अधिकृत करून घेईल. नवऱ्यावर कितीही गंभीर गुन्हा असो. हे ही सोडा जे मन केवळ मोजदाद करत आहे ते किती अस्थिर आहे. मानस सरोवराची कल्पना केली समजा तर त्यावर किती तरंग उमटत आहेत. यात पलायनवाद आहे याला spiritual bypassing म्हणतात. हे निरर्थक बिनडोक आवर्तन सातत्याने करून स्वतःला स्वतःच्या नैसर्गिक संवेदनांना बधिर करून घेणं आहे. अशी बधिर झालेली व्यक्ती जीवन सन्मुख राहू शकते का ? कुणाच्या सुख दुःखात भाव भावनेत समरस होऊ शकते का ? असे बधिर असे अस्थिर मोजदाद करणारे भयभीत मन जीवनाला सकारात्मक सोडा मूलभूत प्रतिसाद देण्यास सक्षम असते का ? Can it appreciate life ?

In reply to by मारवा

मूकवाचक 29/07/2025 - 21:34
मुखी भगवंताचे नाम । हाती प्रपंचाचे काम । ऐसा जोडा मनी राम । सद्गुरू शिष्याचे भोग टाळीत नाहीत, पण भोग भोगत असताना ते त्यांचे समाधान टिकवतात. नामावरची निष्ठा कसे काम करते, हे निष्ठेने नाम घेणाऱ्यालाच कळते. व्यवहारातील कामे करण्यासाठी कर्तव्याचे स्मरण हवे आणि समाधानी वृत्तीत जगण्यासाठी कर्तव्यात भगवंताचे स्मरण हवे. आपल्या सोबत सदैव भगवंत आहे असे वाटणे हेच खरे अनुसंधान होय. स्वतःला सुधारण्याऐवजी आपण जगाची सुधारणा करायला जातो हेच आपले चुकते. परमार्थी माणसाने दैन्यवाणे राहायचे कारण नाही, पैसा असेल तर रोज त्याने श्रीखंड पुरी खावी, पण उद्या उपवास पडला तर मात्र आजच्या पक्वान्नाची आठवण होता कामा नये. नाम घेणाऱ्याला सत्कर्मे टाळू म्हणून टाळता येणार नाहीत. नाम मुखी आले की सत्कर्मे हातून आपोआप घडू लागतात. आपल्या प्रत्येक कर्माचा साक्षी राम आहे असे समजून वागावे, म्हणजे दुष्कर्मे हातून घडणार नाहीत. बाकी असो ...

कथा म्हणून आवडली. अति सर्वत्र वर्जयेत् ! माझ्यासाठी नामस्मरण ही मन रिकामे असताना आपण फालतू विचार, चिंता करत बसतो तेव्हा करण्याची गोष्ट आहे. सगळा प्रपंच आणि पुरुषार्थ सोडून करण्याची गोष्ट नक्कीच नाही. उगीच विचारांच्या लूप्स मध्ये मन जायला लागलं की नामस्मरण ध्यानवत कार्य करते, मोजणी कधी केली नाही पण आजपर्यंत :)

अंहं ही कथा काही भावली नाही. महत्वाचे कारण म्हणजे ह्या कथेत असलेले spiritual materialism. नामस्मरणाने चमत्कार होतो, पेशंट तीन महिन्याने शुद्धीवर येतो, वैकुंठ , परलोक वगैरे सगळं spiritual materialism आहे. त्याचा उपयोग अत्यंत प्राथमिक स्तरावरील साधकांसाठी आहे. त्यांना त्या ओढीने का होईना अध्यात्माची ओढ लागते. एरव्ही " जाणत्या" साधकांसाठी हे सारं फारच हास्यास्पद आहे. मुळात कोणीतरी आपल्या पापपुण्याचा, आपल्या नामस्मरणाचा हिशेब ठेवत आहेत ही संकल्पनाच हास्यास्पद आहे. ते 13 कोटी जप वगैरे फार अलीकडे आले. बस एकवार , मोजून एकदा समजून घेतले एक " राम" हे नाम , फक्त एकदा, बस इतके "पुरेसे" आहे. हा तुकोबांचा अभंग पहा : राम म्हणता रामचि होईजे।पदी बैसोन पदवी घेईजे ।।१।। ऐसे सुख वचनी आहे।विश्वासे अनुभव पाहे ।।धृ।। रामरसाचिया चवी।आन रस रुचती केवी ।।३।। तुका म्हणे चाखोनि सांगे ।मज अनुभव आहे अंगे ।।४।। तस्मात् हे सारं आध्यात्मिक भौतिकवाद इहवाद बाजूला सारून एकदा "राम" म्हणा , "समजून" म्हणा. बस. इतके पुरेसे आहे. त्यानंतर व्हायचे ते होऊ दे देह जावो अथवा राहो। पांडुरंगीं दृढ भावो ।। काय फरक पडतो !! जे होतंय ते, जे झालं ते आणि जे जे काही होईल ते सर्वच रामाची इच्छा !!

आपापला दृष्टिकोन. लेखकाने ही कथा काल्पनिक आहे असे लिहीले आहे. आध्यात्म, परमार्थ वैगेरेच्या भानगडीत मी पडत नाही. स्वधर्मानुसार समोर येणारे कर्म करणे एवढेच समजते. तसे माझे पणजोबा,पणजी व आजोबा दत्तसंप्रदायातील अनुग्रहीत अधीकारी होते पण नात्याच्या पलिकडे काही नाही. एक कथा म्हणून आवडली.

आर्या१२३ 28/07/2025 - 12:48
नामस्मरणाने चमत्कार होतो, पेशंट तीन महिन्याने शुद्धीवर येतो, वैकुंठ , परलोक वगैरे सगळं spiritual materialism आहे. त्याचा उपयोग अत्यंत प्राथमिक स्तरावरील साधकांसाठी आहे. त्यांना त्या ओढीने का होईना अध्यात्माची ओढ लागते. एरव्ही " जाणत्या" साधकांसाठी हे सारं फारच हास्यास्पद आहे. प्रगो, हे अवास्तव नाही. साधकांनी सांगितलेले अनुभव आहे. माझ्या मैत्रिणीच्या सासुबाई शेवटी शेवटी तीन महिने कोमात होत्या. आणि तरी त्यांची बोटे माळ फिरवल्यासारखी हलत होती. मुळात कोणीतरी आपल्या पापपुण्याचा, आपल्या नामस्मरणाचा हिशेब ठेवत आहेत ही संकल्पनाच हास्यास्पद आहे. ते 13 कोटी जप वगैरे फार अलीकडे आले. नामस्मरणाचा हिशोब वैगेरे हे आकडे द्यावे म्हणुन मी लिहीले आहे, निव्वळ आपला जप प्रापंचिक मागणे पुर्ण करण्यात कसा खर्च होतो हे सांगण्यासाठी. आणि हे मनाचे नाही तर श्री बापुसाहेब मराठे यांच्या पुस्तकात येउन गेले आहे. बाकी तेरा कोटी जपाबद्दल म्हणशील तर महाराजांच्या चरित्रात उल्लेख आहे. महाराजांनी स्वतःच त्यांच्या काही शिष्यांना तेरा कोटीचा संकल्प करण्यास सांगितले होते. काहींना साडे तीन कोटीचा करण्यास सांगितले.

In reply to by आर्या१२३

म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावतो. अशा आध्यात्मिक इहवादी कथा , आख्यायिकांमुळे नास्तिक निधर्मी, धर्म विध्वसंक लोकांचे फावते , अन् त्यांना टीका करायला फट मिळते अन् गंभीर विषयाचे हसे उडवले जाते. मी तुम्हाला सांगतो - नामस्मरणाचा भौतिक , इहवादी जगात शून्य उपयोग होणार आहे असे, आणून आणि कळूनही जो केवळ प्रेमाने नामस्मरण करेल त्याला निमिषार्धात "लाभ" झाल्याशिवाय राहणार नाही !. रामाचे नाव घेऊन त्याला घर गाडी बायका पोरं वगैरे मागणे म्हणजे सोनाराच्या दुकानात जाऊन कोथिंबीरची जुडी मागण्यासारखं आहे. त्यामुळे समर्थांचे जे मागणे आहे ते च आपले मागणे आहे - " मागणेची निरसे जेणे l ऐसे देगा रामराया ll " नामाचा महिमा अगाध आहे , त्याला शुल्लक प्रापंचिक उपभोग प्राप्त करून घ्यायचा उपाय असे रूप यायला नको. नामाचे साध्य ही अवस्था आहे - देहींच विदेह होणें । करून कांहींच न करणें । जीवन्मुक्तांचीं लक्षणें । जीवन्मुक्त जाणती ॥ ३३॥ राम

In reply to by प्रसाद गोडबोले

अशा आध्यात्मिक इहवादी कथा , आख्यायिकांमुळे नास्तिक निधर्मी, धर्म विध्वसंक लोकांचे फावते , अन् त्यांना टीका करायला फट मिळते अन् गंभीर विषयाचे हसे उडवले जाते. प्रगो यांचे म्हणणे पटते की अशा प्रकारच्या लेखातून टीकाकारांना संधी मिळते. मी तुम्हाला सांगतो - नामस्मरणाचा भौतिक , इहवादी जगात शून्य उपयोग होणार आहे असे, आणून आणि कळूनही जो केवळ प्रेमाने नामस्मरण करेल त्याला निमिषार्धात "लाभ" झाल्याशिवाय राहणार नाही !. हे परस्पर विरोधी विधान वाटते. प्रगो यांनी थोडा प्रकाश टाकावा. विवेक पटाईत सो. बरोबर सहमत. नामस्मरणाचे साधन सामान्य प्रापंचिक माणसांसाठी व त्यातूनच अध्यात्मिक प्रगती साधून घेण्याची संधी संतानी सांगीतली आहे. मला नामस्मरण सर्वात सोपे व सहजसाध्य साधन वाटते. आगदी देशाच्या सीमेवर पहारा देत असताना सुद्धा हे सर्वांगसुंदर साधन उपलब्ध असते. नामस्मरणाचे महत्त्व सर्व संतानी सांगीतले आहे. काही उदाहरणार्थ माऊलींचा हरिपाठ बर्‍याच लोकांच्या नित्यवचनात असतो. माऊली म्हणतात किती तीर्थक्षेत्रे फिरली पण नामस्मरण नसेल तरी ती यात्रा फलद्रूप होणार नाही एवढी नामस्मरणाची महती सांगीतली आहे. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्‍त नाही नामी तरी ते व्‍यर्थ॥ नामासी विन्‍मूख तो नर पापीया । हरीविण धावया न पवे कोणी॥ पुराण प्रसीध्‍द बोलीले वाल्‍मीक । नामे तिन्‍ही लोक उध्‍दरती॥ जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात, नाम घेता उठाउठी, होय संसाराची तुटी || धृ || ऐस लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी मिठी || १ || नामपरते साधन नाही, जे तू करिसी आणिक काही || २ || हाकरोनो सांगे तुका, नाम घेता राहो नका || ३ || संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांचा अभंगही हेच सांगतो. पाहतां साधन विठ्ठलकीर्तन । भक्तसंजीवन आत्माराम ॥ १ ॥ विठ्ठल सधर भिवरा तें नीर । नाम निरंतर केशवाचें ॥ २ ॥ शिवसुरवर चिंतिती सुस्वर । कीर्तनविचार पंढरीसी ॥ ३ ॥ निवृत्ति कीर्तन दिननिशीं ध्यान । मनाचें उन्मन इये रूपीं ॥ ४ ॥ उघडें स्वरूप प्रत्येक्षाचें दीप । नाम घेतां पाप हरे जना ॥ १ ॥ तें रूप विनट विठ्ठल सकळ । सेवा दिनकाळ पंढरीयेसी ॥ २ ॥ रजतमें दूरी नामाची माधुरी । निशाणी एकसरी रामकृष्ण ॥ ३॥ भवाब्धितारक नावाडा विवेक । पुंडलिक देख सेवितसे ॥ ४ ॥ विश्व हें तारिलें नामचि पिकलें । केशवी रंगलें मन हेतु ॥ ५ ॥ निवृत्ति विठ्ठल सेवितु सकळ । दिनकाळफळ आत्माराम ॥ ६ ॥ परब्रह्नाचे नाम घेतले तर सगऴी पापे नष्ट होतात. केशव नामाच्या साधनेत मन रंगले की विश्व तरले जाते हा नामाचा महिमा आहे. निवृत्तिनाथ म्हणतात ह्या रात्रंदिवस केलेल्या नामाच्या साधनेने मला जगत आत्माराम स्वरुपात दिसले. सांप्रत कथेमधे जो नामस्मरणाचा जो हिशोब मांडला आहे तो काही पटत नाही व कुठल्याच संतानी सांगीतला नसावा. चुकभुल देणे घेणे. कथा काल्पनिक आहे असे बोलून कथावास्तूपासून लेखक दुर जाऊन शकत नाही.

In reply to by कर्नलतपस्वी

हे परस्पर विरोधी विधान वाटते. प्रगो यांनी थोडा प्रकाश टाकावा
जरा जास्त सोपीकरण करून - थिअरी अर्थात ज्ञानयोग सहजसाध्य नाही, पूर्वजन्मीचे पुण्य असेल तरच तात्काळ उमगणारा आहे. प्रॅक्टिकल अर्थात कर्मयोग थकवणारा आहे. जेरीस आणणारा आहे. राजयोग सामान्य गृहस्थ प्रापंचिकाना सहजसाध्य नाही. मग सामान्य माणसाने करायचं काय तर म्हणून भगवंताने भक्तीयोग सांगितला जो की ह्या तिन्हीनचा समुच्चायात्मक आहे. तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च। मय्यर्पितमनोबुद्धिर्मामेवैष्यस्यसंशयम्।। नामस्मरण ही नवविधाभक्ती मार्गातील तिसरी भक्ती. पण गोंदवलेकर महाराज म्हणाले तसे तुम्ही 9 कोस लांब राहणाऱ्या माणसाला भेटायला निघालात अन् तो तुम्हाला 3 कोसावरच भेटला तर पुढचे 6 कोस त्याच्याच सोबत गेले काय की न गेले काय , काहीही फरक पडत नाही. म्हणून नाम श्रेष्ठ. नाम देव आणि ज्ञान ही देव. पण नामदेव सुलभ आहे, ज्ञानदेव कठीण आहे पण सर्वोच्च आहे ! जैसा दीपें दीपु लाविजे, तेथ आदील कोण हें नोळखिजे। तैसा सर्वस्वें जो मज भजे, तो मीची होऊनि ठाके ॥ मी जो निमिषार्धात लाभ होईल म्हणालो , तो "लाभ" हा आहे ! हेचि जाण भक्तीचे फळ ! जेणे तुटे संसार मूळ ! निःसंग आणि निर्मळ ! आत्मा होईजे स्वये !! श्रीराम !! - समर्थ रामदास स्वामी. आता ही आभाळाएवढी मोठी गोष्ट सोडून कुठे अन् कशाला उगाच देवाला थातूरमातूर गोष्टी मागत बसायचे !! इत्यलम राम

In reply to by प्रसाद गोडबोले

आता ही आभाळाएवढी मोठी गोष्ट सोडून कुठे अन् कशाला उगाच देवाला थातूरमातूर गोष्टी मागत बसायचे !! शंभर टक्के सहमत. देव म्हणजे काय रेशन दुकानदार आहे काय?कार्डावरील युनिट बघून साखर वाटप करणारा. इथे मला कवी संदीप खरे यांच्या कवितेतल्या ओळी आठवतात. मी आस्तिक मोजत पुण्या‌ईची खोली, नवसांची ठेवून लाच लावतो बोली, तो मुळात येतो इच्छा अर्पून सार्‍या अन धन्यवाद देवाचे घेवून जातो.

मारवा 29/07/2025 - 05:25
अवघड आहे. कंदमुळे खाऊन एक लंगोट घालून (याचीही काय गरज म्हणा) बरे necessities सांभाळून संपूर्ण आयुष्य पूर्ण ताकद लावून नामस्मरण करणे हेच जीवनाचे सर्वस्व सार्थक फलित मानल्यास असे आयुष्य जगणाऱ्या समजा अशांची संख्या करोडोने झाली तर अशा अप्रगत रानटी समाजाचे जे चित्र डोळ्यासमोर उभे राहते ते भयावह आहे कुठलाही विकास नाही प्रगती नाही आनंद नाही सुविधा नाही भाव नाही भावना नाही केवळ नाम केवळ नाम अवघड आहे हेच करायचे तर मेंदूचा आणि इतर अवयवाचा उपयोग तरी काय केवळ मुखाने वाजत राहिले तरी खूप आहे. कल्पना करा 140 करोड सर्व शांत बसलेले आहेत सर्व चक्र कोरोना काळा सारखे थांबलेले आहे. सर्वत्र केवळ नामस्मरणाचा हुंकार अवघड आहे आण

In reply to by मारवा

विवेकपटाईत 29/07/2025 - 10:52
नामस्मरण करता करता पुरुषार्थ ही करता येतो. नामस्मरण हे सांसारिक माणसांसाठी आहे. हिमालयात साधू संत मानसिक आध्यात्मिक शक्ती प्राप्त करणे साठी तपस्या करतात.

In reply to by मारवा

Bhakti 29/07/2025 - 15:03
ज्यांना अध्यात्मिक उन्नती मिळवायची आहे त्यांना भक्तिमार्ग ही सहज वाट आहे.त्यातील नामस्मरण ही एक साधना आहे.परंतू शास्त्रात हे स्पष्ट आहे की ज्ञानमार्ग हा परब्रह्म एकरूपतेचा सर्व श्रेष्ठ मार्ग आहे.या मार्गाकडे सर्वांना वळवण्याचे काम ज्ञानी लोकांचे आहे.परंतू यासाठी भक्तिमार्गातील जणांना कमी लेखने योग्य नाही,जो पर्यंत आपल्याला त्रास नाही तो पर्यंत त्यांना त्यांच्या मार्गाने जाण्यास बंदी नाही.

In reply to by Bhakti

चूक
ज्ञानमार्ग हा परब्रह्म एकरूपतेचा सर्व श्रेष्ठ मार्ग आहे
चूक. श्रेयो हि ज्ञानमभ्यासाज्ज्ञानाद्ध्यानं विशिष्यते | ध्यानात्कर्मफलत्यागस्त्यागाच्छान्तिरनन्तरम् ||

In reply to by प्रसाद गोडबोले

अभ्यासाहूनि गहन । पार्था मग ज्ञान । ज्ञानापासोनि ध्यान । विशेषिजे ॥ १४१ ॥ मग कर्मफलत्यागु । तो ध्यानापासोनि चांगु । त्यागाहूनि भोगु । शांतिसुखाचा ॥ १४२ ॥

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti 30/07/2025 - 10:33
पण कर्मयोग लगेच समजत नाही त्यासाठी ज्ञान व्हावं लागत वा भक्ति करत 'कृष्णार्पणमस्तु' करत निष्काम कर्मयोग साधावा लागतो.दोघांची तुलना करत इथे श्रेष्ठ सांगत आहे. निष्काम कर्मयोग हे बुद्धीगम्य व्हायला हे दोन्ही आहेत ना.पण नामस्मरणाने हा कर्मयोग मिळवण्यात काहीच आनंद मला वाटतं नाही हं !

श्वेता२४ 29/07/2025 - 14:57
त्यामुळे केवळ करमणुक म्हणून पाहणे गरजेचे. बाकी वास्तव व अवास्तव गोष्टींची छान मिसळ आहे. चांगला प्रयत्न. लिहीत राहा.

स्वधर्म 29/07/2025 - 16:16
खरे तर या कथेवर अजिबात प्रतिसाद लिहिणार नव्हतो. पण वरती काही जणांनी लिहिल्याने मला धाडस (होय धाडसच) करावेसे वाटले. आपल्या श्र्ध्देला धक्का लावण्याची आजिबात इच्छा नाही, त्यामुळे आधीच क्षमा असावी. कृपया पटले नाही तर सोडून द्या. आपण ही काल्पनिक कथा म्हणून लिहिली असली तरी त्यातून आपल्या अत्यंत श्रध्दावान अंतःकरणाचे दर्शन घडते. आपल्यासारखे अनेक सश्रध्द नातेवाईक स्वामी समर्थांचे भक्त झालेले आहेत. त्यांना काही समजावणे आता शक्य नाही व योग्यही वाटत नाही. पण ज्या अर्थी आपण कथा लिहिताय त्या अर्थी आपल्याकडे विचार करण्याची किमान शक्ती अजून असावी असे वाटून आपणांस भानावर या अशी विनंती करावीशी वाटत आहे. >>रोज एक तास जप याप्रमाणे १० वर्ष जप झाला आहे. तो जवळजवळ १ कोटी ८०,०००. त्यातला खरा मनापासून केलेला ७३लाख ८० हजार . १५ लक्ष मुलाचा ऍक्सीडेन्ट झाला, मुलगा आय सी यु मध्ये होता तेव्हा खर्च झाला, २३ लक्ष नवऱ्याचा जीव वाचावा म्हणून लागले. स्वतःच्या मालकीचा फ्लॅट व्हावा म्हणून सद्गुरूंपाशी मागणे केले होते तेव्हा १७ लक्ष खर्च झाला. नवऱ्याची कोर्ट केस जिंकावी म्हणून महाराजांना केलेले मागणे यात १४ लक्ष जप खर्च झाला. मुलाला योग्य ठिकाणी ऍडमिशन मिळावी म्हणून मागणे मागितले त्यात २ लक्ष जप खर्च झाला. राहता राहिला २लक्ष ८०,००० जप. यातला १ लक्ष ७७००० हजार जप हा मनापासून झाला आहे. हे म्हणजे एखाद्या गल्लीच्या कोपर्‍यावरच्या सोनाराच्या भीशी योजनेसारखे वाटत आहे. स्वतः च्या मालकीचा फ्लॅट जर नामस्मरण मोजून घेता येतो असे मानणे हे आपल्या श्रध्देशी सुसंगत असेलही, पण काबाडकष्ट करून, प्रामाणिकपणे पैसे साठवून फ्लॅट घेणार्‍या तमाम सरळमार्गी पण स्वामी समर्थांवर श्रध्दा नसलेल्या लोकांचा घोर अपमान आहे. तसेच काहीही अपराध करा (कोर्ट केस का ते सांगितले नाही) पण जप केला तर सुटाल असे म्हणणे हा कदाचित स्वामींचाही अपमानच आहे की काय असे वाटते. कोणी तरी म्हटले आहे, की देव जर केवळ नामस्मरणाने प्रसन्न होत असेल तर त्याच्यासारखा आत्मस्तुतीची आस असणार कोत्या मनाचा दुसरा कोणी नाही. देव किंवा साधू नामाचा असा सौदा करतात असे म्हणणे हा त्यांचाच अपमान नाही का?

आर्या१२३ 29/07/2025 - 17:42
पण काबाडकष्ट करून, प्रामाणिकपणे पैसे साठवून फ्लॅट घेणार्‍या तमाम सरळमार्गी पण स्वामी समर्थांवर श्रध्दा नसलेल्या लोकांचा घोर अपमान आहे. लेखातील वाक्यांचा असा विपरीत अर्थ निघत असल्यास क्षमा करा. लेखाचा हेतु हा नव्ह्ता. खरे तर आपले नामस्मरण कुठे खर्च होते हे स्वतःच स्वतःला जोखण्याचा हा प्रयत्न होता. अनेक वर्ष नाम घेउनही नाम सखोल का जात नाही? नामाचा परिणाम वृत्तीबदल, चित्तशुद्धी का होत नाही? या प्रश्नांची ही स्वत:च स्वतःला दिलेली उत्तरे होती. ती त्या बाडधारी व्यक्तीच्या मुखातुन घालण्यात आली असे म्हणा हवे तर. हे सुचण्यासाठी , वर सांगितल्याप्रमाणे श्रीमहाराजांचे ज्येष्ठ शिष्य श्री ल ग मराठे उर्फ बापुसाहेब मराठे यांच्याविषयीची एक गोष्ट कारणीभुत झाली, एवढेच म्हणेन इथे. नाम हे कुठल्या कारणासाठी न घेता, किंवा प्रपंच स्थीर व्हावा यासाठी न घेता केवळ नामासाठी नाम घ्यावे असे महाराज म्हणतात. हे सांगायच, होत इतकेच. ,अवघड आहे. कंदमुळे खाऊन एक लंगोट घालून (याचीही काय गरज म्हणा) बरे necessities सांभाळून संपूर्ण आयुष्य पूर्ण ताकद लावून नामस्मरण करणे हेच जीवनाचे सर्वस्व सार्थक फलित मानल्यासअसे आयुष्य जगणाऱ्या समजा अशांची संख्या करोडोने झाली तर अशा अप्रगत रानटी समाजाचे जे चित्र डोळ्यासमोर उभे राहते ते नामस्मरणासारखा दुसरा सोपा मार्ग नाही. ते प्रपंचात राहुनही करता येते. बर, याला काही कर्मकाण्डाची गरज नाही. सोवळे ओवळे नाही. गाडीत, प्रवासात, चप्पल घालुन, न घालता, माळ हातात न घेता, कसेही करता येते. त्यासाठी लंगोट लावुन वनात जायची गरज नाही. काहीवेळा स्तोत्र म्हणायला सुद्धा शुचिर्भुतता लागते. त्याची इथे गरज पडत नाही. बाकी, नामाने काय मिळते, काय साध्य होते हे नाम घेतल्याशिवाय कळणार नाही.

अनेक सश्रध्द नातेवाईक स्वामी समर्थांचे भक्त झालेले आहेत. त्यांना काही समजावणे आता शक्य नाही व योग्यही वाटत नाही. आपला प्रतिसाद चुकीचा नाही. पोटतिडीक साफ दिसत आहे. आमच्या एका नातेवाईकांनी आपल्या मुलाला बारावी नंतर लोणावळ्यात कुठल्यातरी आश्रमात शिकायला पाठवले. (नाव सांगणे उचित नाही) मी म्हणत होतो पुढील शिक्षणाचे काय तर म्हणाले याला आगोदरच तीथे पाठवायला हवे होते. ऊशीर झाला. मी कपाळावर हात मारून घेतला. दोन तीन वर्षानंतर काढून घेतले कसाबसा पदवीधर झाला. इकडे तिकडे नोकरी करत आयुष्य घालवत आहे. जवळचा असल्याने वाईट वाटते. दुसरी एक अशीच केस, स्वामी भक्त,खुप लोकांची अर्थिक फसवणूक केली. वारंवार सुचना देऊन,अर्थिक संकटातून बाहेर काढल्यानंतर ही सुधारत नाही. त्यामुळे सर्व नातेवाईकांनी संबध तोडले. आता ज्यांना फसवले त्याचां ससेमिरा चुकवण्यासाठी गावोगाव भटकत असतो .(अर्थात स्वांमीचा काही दोष नाही. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीमागे आहे या स्वामींच्या आशिरवचनाचा चुकीचा अर्थ घेतला.) श्रद्धे बरोबर सबुरी आणी स्वधर्मानुसार कर्म हे ही हवे.

In reply to by कर्नलतपस्वी

स्वधर्म 29/07/2025 - 19:28
या कथेत पण दहा वर्षे नियमितपणे जप करणार्‍या स्त्रीचा नवरा करोनात अकाली गेला ज्याच्या मागे कोर्ट कचेरीचा त्रास होता. तिच्या मुलाचा आय सी यूत ठेवण्याएवढा गंभीर अपघात झाला. स्वत: तिला ५५ व्या वर्षी 'नुसते फॅन साफ करताना स्टूलावरून पडण्याचे निमित्त झाले आणि डोक्याच्या मागच्या भागाला जबरदस्त दुखापत' झाली. तेही गुरूपौर्णिमेच्या आधल्या दिवशी. शिवाय तीन महिने ज्युपीटरचे आय सी यूचे बील म्हणजे... ज्यांना त्याची कल्पना आहे तेच जाणोत अशा दवाखान्याचे बील किती असते ते. दहा वषे मनापासून जप करून इतके सारे दुर्दैव वाट्याला आले. तरी पण श्रध्दावानांना इथे 'नामाचा महिमा'च दिसणार. म्हणून म्हणालो, जे लोक पूर्णपणे अतिश्रध्देच्या आहारी गेले आहेत, त्यांना काही समजावणे आता शक्य नाही व योग्यही वाटत नाही. तुंम्ही समजून घेतल्याबद्दल धन्यवाद.

In reply to by स्वधर्म

मारवा 29/07/2025 - 20:55
नवऱ्याची केस जिंकली आता विरोधी जो होता त्याने किंवा त्याच्या बायकोने नामस्मरणाचा घडा काउंटर करून भरला असता तर मग महाराजांनी निकालच रोखून धरला असता का ? बरे दोघांचे 10 लाख 10 लाख झाले मग टाय केला असता का ? सर्वात रोचक बाब बघा महाराजांना न्याय्य काय याची चाड नाही. नामस्मरण किती झाले हे नवऱ्याने जरी काही गैर वर्तन केले असले तरी त्याहूनही महत्वाचे आहे. नामस्मरण हे त्याला त्या गैरकृत्याला अधिकृत करून घेईल. नवऱ्यावर कितीही गंभीर गुन्हा असो. हे ही सोडा जे मन केवळ मोजदाद करत आहे ते किती अस्थिर आहे. मानस सरोवराची कल्पना केली समजा तर त्यावर किती तरंग उमटत आहेत. यात पलायनवाद आहे याला spiritual bypassing म्हणतात. हे निरर्थक बिनडोक आवर्तन सातत्याने करून स्वतःला स्वतःच्या नैसर्गिक संवेदनांना बधिर करून घेणं आहे. अशी बधिर झालेली व्यक्ती जीवन सन्मुख राहू शकते का ? कुणाच्या सुख दुःखात भाव भावनेत समरस होऊ शकते का ? असे बधिर असे अस्थिर मोजदाद करणारे भयभीत मन जीवनाला सकारात्मक सोडा मूलभूत प्रतिसाद देण्यास सक्षम असते का ? Can it appreciate life ?

In reply to by मारवा

मूकवाचक 29/07/2025 - 21:34
मुखी भगवंताचे नाम । हाती प्रपंचाचे काम । ऐसा जोडा मनी राम । सद्गुरू शिष्याचे भोग टाळीत नाहीत, पण भोग भोगत असताना ते त्यांचे समाधान टिकवतात. नामावरची निष्ठा कसे काम करते, हे निष्ठेने नाम घेणाऱ्यालाच कळते. व्यवहारातील कामे करण्यासाठी कर्तव्याचे स्मरण हवे आणि समाधानी वृत्तीत जगण्यासाठी कर्तव्यात भगवंताचे स्मरण हवे. आपल्या सोबत सदैव भगवंत आहे असे वाटणे हेच खरे अनुसंधान होय. स्वतःला सुधारण्याऐवजी आपण जगाची सुधारणा करायला जातो हेच आपले चुकते. परमार्थी माणसाने दैन्यवाणे राहायचे कारण नाही, पैसा असेल तर रोज त्याने श्रीखंड पुरी खावी, पण उद्या उपवास पडला तर मात्र आजच्या पक्वान्नाची आठवण होता कामा नये. नाम घेणाऱ्याला सत्कर्मे टाळू म्हणून टाळता येणार नाहीत. नाम मुखी आले की सत्कर्मे हातून आपोआप घडू लागतात. आपल्या प्रत्येक कर्माचा साक्षी राम आहे असे समजून वागावे, म्हणजे दुष्कर्मे हातून घडणार नाहीत. बाकी असो ...

कथा म्हणून आवडली. अति सर्वत्र वर्जयेत् ! माझ्यासाठी नामस्मरण ही मन रिकामे असताना आपण फालतू विचार, चिंता करत बसतो तेव्हा करण्याची गोष्ट आहे. सगळा प्रपंच आणि पुरुषार्थ सोडून करण्याची गोष्ट नक्कीच नाही. उगीच विचारांच्या लूप्स मध्ये मन जायला लागलं की नामस्मरण ध्यानवत कार्य करते, मोजणी कधी केली नाही पण आजपर्यंत :)
लेखनविषय:
मानस- अनंतकोटीब्रम्हांडनायक "हे पहा, आम्हाला अशी माहिती मिळाली आहे, की तुम्हाला चुकून इथे आणले गेले. त्यावेळी तुमच्या पत्रिकेतील आणि आकाशातील ग्रहयोग जुळून आला होता आणि अतिगंड योग होता. पण नुकतेच तुमचे गुरु प.पु. श्री गोंदवलेकर महाराज यांनी शिफारस केल्यावरून वैकुंठातून श्रीरामांचा निरोप आला आहे की हा जीव चांगला आहे, आणि अजून नामस्मरण करू शकतो. यास्तव तुम्हाला परत पृथ्वीवर पाठवण्यात येणार आहे. " परलोकातील मोठ्या दालनात सिंहासनाधिष्ठित व्यक्तीने तिला जवळ बोलावून सांगितले. ती सुन्न होऊन ऐकत होती. हॉस्पिटलमध्ये त्या कुठल्याश्या क्षणी घेतलेल्या नुसत्या नामाचा हा परिणाम होता तर!

वायुसेनेतील आठवणी – भाग ४ "शब्दांपलीकडली शपथ – कॉपल पांडे"

शशिकांत ओक ·
लेखनविषय:
लेखनप्रकार

वायुसेनेतील आठवणी – भाग ४

"शब्दांपलीकडली शपथ – कॉपल पांडे" "सर, आर यू द नेफ्यू ऑफ कॅप्टन पी.एन. ओक? हू वॉज इन आझाद हिंद फौज विथ नेताजी सुभाषचंद्र बोस?" (“सर, तुम्ही कॅप्टन ओक यांचे पुतणे आहात का? जे नेताजींसोबत आझाद हिंद फौजेत होते?”) "यू नेव्हर मेंशनड टू मी व्हाईल इन पुणे! इट्स डन डील… आय विल गो टू कॅप्टन ओक सर टू सॅल्युट हिम!" (“तुम्ही हे पुण्यात असताना कधी सांगितलंच नाही!

वायुसेनेतील आठवणी – कॉपल पांडे

शशिकांत ओक ·

एका प्रेरणादायी व्यक्तिमत्त्चाची ओळख करून देणार्‍या अनुभवकथनमालिकेची उत्तम सुरुवात. धन्यवाद ओक साहेब. पुभाप्र.

गवि 13/05/2025 - 14:57
पुढील भागाची उत्सुकता. मीही साधारण त्याच काळात पुणे विमानतळावर सिव्हिल एअरलाइनमधे नोकरी करत होतो. रोजच्या रोज दोन वेळा, अगदी रविवार धरून रोज, त्या ATC टॉवरमध्ये फ्लाईट प्लॅन फाईल करायला आणि ADC वगैरे क्रमांक मिळवायला मला जावे लागे. माझी बाईक घेऊन मी त्या सुखोई, जागवार विमानांच्या अगदी जवळून एप्रन एरिया ओलांडून टॉवरमधे जात असे. एरवी ही विमाने दुरून देखील बघायला मिळणे दुरापास्त. त्या आवारात हेल्मेट अत्यावश्यक होते आणि एन्ट्री पास. टॉवरमध्ये वरती प्रत्यक्ष कंट्रोलवर फ्लाईट लेफ्टनंट, विंग कमांडर असे, बहुधा वयाने बरेच सिनियर असे अधिकारी असत. एक शिडी खाली उतरून पोटमजला होता, त्यात कॉपल लेव्हलचा कर्मचारी फ्लाईट प्लॅनच्याच कामासाठी बसलेला असे. त्या सर्वांशी फार चांगली मैत्री झाली होती. कॉपल कनोजिया हा अत्यंत सुस्वभावी आणि स्नेहपूर्ण स्वभावाचा अधिकारी तिथे नेहमी असायचा. त्याच्याशी गप्पा रंगत असत. मुळात फार थोड्या सिव्हिल सर्विस लोकांना एअरफोर्स स्टेशनमधे इतक्या आत जाण्याचे भाग्य लाभते. पुणे, गोवा अशा एअरफोर्स विमानतळावरच ते शक्य आहे. एअरपोर्ट फी, चार्जेस या निमित्ताने अकाऊंट विभागात आणि मेटार (हवामान रिपोर्ट) साठी हवामान विभागात देखील जाणे येणे असे. तिथेही बहुतांश लोक सार्जंट आणि कॉपल असत. लेखाच्या निमित्ताने या आठवणी जाग्या झाल्या. धन्यवाद.

सौंदाळा 14/05/2025 - 19:57
छानच लिहिले आहे. कॉपल पांडे सारखे निस्वार्थी लोक विरळाच. पुभाप्र

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

शशिकांत ओक 15/05/2025 - 16:34
धन्यवाद धाग्यावर प्रतिसादाबद्दल. आपण म्हणता ते बरोबर आहे. कॉपल पांडे सारखे लोक विरळा असतात. म्हणून ते लक्षात राहतात.

शशिकांत ओक 24/05/2025 - 00:13
नमस्कार, 'वायुसेनेतील आठवणी – कॉर्पल पांडे' या लेखमालेचा पहिला भाग वाचून खूप आनंद झाला. विंग कमांडर शशिकांत ओक (नि.) यांनी मांडलेली ही प्रस्तावना आणि पहिला भाग वाचकांना खिळवून ठेवतो. या भागाचे रसग्रहण खालीलप्रमाणे: प्रस्तावना: एका असामान्य व्यक्तिमत्त्वाचे दर्शन प्रस्तावना वाचकाला कॉर्पल पांडे नावाच्या एका अद्वितीय व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देते. पांडे हे केवळ एक वायुसैनिक नसून, ते एक देशभक्त, कवी मनाचे चित्रकार, माणुसकीची जाण असलेले आणि निष्ठावान कार्यकर्ते असल्याचे लेखक सांगतात. 'एकात एक व्यक्तिमत्त्वे लपलेला जीनियस' ही उपमा त्यांची बहुआयामी व्यक्तिमत्त्व दर्शवते. लेखकाने पांडे यांच्याकडून घेतलेली मदत आणि त्या मदतीचे 'सोने' झाल्याचे नमूद करून, त्यांच्या कार्यक्षमतेवर आणि निष्ठेवर प्रकाश टाकला आहे. ही लेखमाला केवळ आठवणी नसून, एका सैनिकाच्या आदर्शांचा दस्तऐवज आहे आणि त्यातून वाचकांनी प्रेरणा घ्यावी, अशी लेखकाची सदिच्छा आहे. ही प्रस्तावना वाचकांच्या मनात कॉर्पल पांडे यांच्याविषयी उत्सुकता निर्माण करते आणि पुढील भागांची प्रतीक्षा करण्यास प्रवृत्त करते. पांडे यांनी माणुसकीची खरी व्याख्या समजावून सांगितली. रक्ताच्या नात्यापलीकडे जाऊन, केवळ माणूस म्हणून दुसऱ्या माणसाच्या वेदनेशी एकरूप होण्याची त्यांची ही भावना लेखकाला निशब्द करते. "रस्त्यावर आणि ढिगाऱ्याखाली शेकडो मृत आणि जखमी लोक होते – ती पण माझ्यासारखीच माणसंच होती. ते माझे नातेवाईक नव्हते का?" या विचारामुळे लेखकाच्या डोळ्यांत पाणी येते. पांडे यांचा निर्भीडपणा, सेवाभाव आणि करुणा स्पष्ट दिसते. शेवटी, पांडे यांनी १५ दिवसांची रजा घेतल्याचे, मित्रांकडून पैसे उधार घेतल्याचे आणि कॅमेरा सोबत घेऊन मदतीसाठी पूर्णपणे तयार असल्याचे सांगितले. लेखकाने त्यांना पुढच्या बचाव विमानात पाठवण्यासाठी कॅप्टनशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण कथानकात एक अनपेक्षित ट्विस्ट आहे: "पण तसे घडणार नव्हते!" यामुळे पुढील भागाबद्दलची उत्सुकता अधिक वाढते. एकंदरीत, हा भाग कॉर्पल पांडे यांच्या कलात्मकता, नम्रता, शिस्त, आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्यांची अद्वितीय माणुसकी आणि सेवावृत्ती अधोरेखित करतो. विंग कमांडर ओक यांनी अत्यंत प्रभावीपणे कॉर्पल पांडे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा पहिला पैलू उलगडला आहे. वरील रसग्रहण जेमिनी विद्याधर यांनी केले आहे.

एका प्रेरणादायी व्यक्तिमत्त्चाची ओळख करून देणार्‍या अनुभवकथनमालिकेची उत्तम सुरुवात. धन्यवाद ओक साहेब. पुभाप्र.

गवि 13/05/2025 - 14:57
पुढील भागाची उत्सुकता. मीही साधारण त्याच काळात पुणे विमानतळावर सिव्हिल एअरलाइनमधे नोकरी करत होतो. रोजच्या रोज दोन वेळा, अगदी रविवार धरून रोज, त्या ATC टॉवरमध्ये फ्लाईट प्लॅन फाईल करायला आणि ADC वगैरे क्रमांक मिळवायला मला जावे लागे. माझी बाईक घेऊन मी त्या सुखोई, जागवार विमानांच्या अगदी जवळून एप्रन एरिया ओलांडून टॉवरमधे जात असे. एरवी ही विमाने दुरून देखील बघायला मिळणे दुरापास्त. त्या आवारात हेल्मेट अत्यावश्यक होते आणि एन्ट्री पास. टॉवरमध्ये वरती प्रत्यक्ष कंट्रोलवर फ्लाईट लेफ्टनंट, विंग कमांडर असे, बहुधा वयाने बरेच सिनियर असे अधिकारी असत. एक शिडी खाली उतरून पोटमजला होता, त्यात कॉपल लेव्हलचा कर्मचारी फ्लाईट प्लॅनच्याच कामासाठी बसलेला असे. त्या सर्वांशी फार चांगली मैत्री झाली होती. कॉपल कनोजिया हा अत्यंत सुस्वभावी आणि स्नेहपूर्ण स्वभावाचा अधिकारी तिथे नेहमी असायचा. त्याच्याशी गप्पा रंगत असत. मुळात फार थोड्या सिव्हिल सर्विस लोकांना एअरफोर्स स्टेशनमधे इतक्या आत जाण्याचे भाग्य लाभते. पुणे, गोवा अशा एअरफोर्स विमानतळावरच ते शक्य आहे. एअरपोर्ट फी, चार्जेस या निमित्ताने अकाऊंट विभागात आणि मेटार (हवामान रिपोर्ट) साठी हवामान विभागात देखील जाणे येणे असे. तिथेही बहुतांश लोक सार्जंट आणि कॉपल असत. लेखाच्या निमित्ताने या आठवणी जाग्या झाल्या. धन्यवाद.

सौंदाळा 14/05/2025 - 19:57
छानच लिहिले आहे. कॉपल पांडे सारखे निस्वार्थी लोक विरळाच. पुभाप्र

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

शशिकांत ओक 15/05/2025 - 16:34
धन्यवाद धाग्यावर प्रतिसादाबद्दल. आपण म्हणता ते बरोबर आहे. कॉपल पांडे सारखे लोक विरळा असतात. म्हणून ते लक्षात राहतात.

शशिकांत ओक 24/05/2025 - 00:13
नमस्कार, 'वायुसेनेतील आठवणी – कॉर्पल पांडे' या लेखमालेचा पहिला भाग वाचून खूप आनंद झाला. विंग कमांडर शशिकांत ओक (नि.) यांनी मांडलेली ही प्रस्तावना आणि पहिला भाग वाचकांना खिळवून ठेवतो. या भागाचे रसग्रहण खालीलप्रमाणे: प्रस्तावना: एका असामान्य व्यक्तिमत्त्वाचे दर्शन प्रस्तावना वाचकाला कॉर्पल पांडे नावाच्या एका अद्वितीय व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देते. पांडे हे केवळ एक वायुसैनिक नसून, ते एक देशभक्त, कवी मनाचे चित्रकार, माणुसकीची जाण असलेले आणि निष्ठावान कार्यकर्ते असल्याचे लेखक सांगतात. 'एकात एक व्यक्तिमत्त्वे लपलेला जीनियस' ही उपमा त्यांची बहुआयामी व्यक्तिमत्त्व दर्शवते. लेखकाने पांडे यांच्याकडून घेतलेली मदत आणि त्या मदतीचे 'सोने' झाल्याचे नमूद करून, त्यांच्या कार्यक्षमतेवर आणि निष्ठेवर प्रकाश टाकला आहे. ही लेखमाला केवळ आठवणी नसून, एका सैनिकाच्या आदर्शांचा दस्तऐवज आहे आणि त्यातून वाचकांनी प्रेरणा घ्यावी, अशी लेखकाची सदिच्छा आहे. ही प्रस्तावना वाचकांच्या मनात कॉर्पल पांडे यांच्याविषयी उत्सुकता निर्माण करते आणि पुढील भागांची प्रतीक्षा करण्यास प्रवृत्त करते. पांडे यांनी माणुसकीची खरी व्याख्या समजावून सांगितली. रक्ताच्या नात्यापलीकडे जाऊन, केवळ माणूस म्हणून दुसऱ्या माणसाच्या वेदनेशी एकरूप होण्याची त्यांची ही भावना लेखकाला निशब्द करते. "रस्त्यावर आणि ढिगाऱ्याखाली शेकडो मृत आणि जखमी लोक होते – ती पण माझ्यासारखीच माणसंच होती. ते माझे नातेवाईक नव्हते का?" या विचारामुळे लेखकाच्या डोळ्यांत पाणी येते. पांडे यांचा निर्भीडपणा, सेवाभाव आणि करुणा स्पष्ट दिसते. शेवटी, पांडे यांनी १५ दिवसांची रजा घेतल्याचे, मित्रांकडून पैसे उधार घेतल्याचे आणि कॅमेरा सोबत घेऊन मदतीसाठी पूर्णपणे तयार असल्याचे सांगितले. लेखकाने त्यांना पुढच्या बचाव विमानात पाठवण्यासाठी कॅप्टनशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण कथानकात एक अनपेक्षित ट्विस्ट आहे: "पण तसे घडणार नव्हते!" यामुळे पुढील भागाबद्दलची उत्सुकता अधिक वाढते. एकंदरीत, हा भाग कॉर्पल पांडे यांच्या कलात्मकता, नम्रता, शिस्त, आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्यांची अद्वितीय माणुसकी आणि सेवावृत्ती अधोरेखित करतो. विंग कमांडर ओक यांनी अत्यंत प्रभावीपणे कॉर्पल पांडे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा पहिला पैलू उलगडला आहे. वरील रसग्रहण जेमिनी विद्याधर यांनी केले आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वायुसेनेतील आठवणी – कॉपल पांडे

प्रस्तावना कॉर्पल पांडे — ह्या नावामागे केवळ एक वायुसैनिक नव्हे, तर एक सच्चा देशभक्त, एक कवी मनाचा चित्रकार, माणुसकीची जाण असलेला निष्ठावान कार्यकर्ता, अशी एकात एक व्यक्तिमत्त्वे लपलेला जीनियस आहे. माझ्या हवाई दलातील काळात मदतीचा हात मागितला. दिलेल्या मदतीचे त्याने सोने केले. त्यांच्या आठवणी आजही हृदयात ताज्या आहेत.

एक आधुनिक सत्यनारायण कथा

माहितगार ·
सत्यनारायण कथेचे अधिक आधुनिक व्यवस्थापन तत्त्वांवर आधारित पुनर्सादरीकरण खालीलप्रमाणे: १. पहिला अध्याय - ग्राहक केंद्रितता, नेटवर्किंग आणि निरंतर सुधारणा: अरुण नावाचा एक तरुण उद्योजक होता, जो पारंपरिक फर्निचर व्यवसायात नवनवीन प्रयोग करत होता. त्याला त्याच्या व्यवसायात वाढ हवी होती. एक दिवस त्याला, मार्गदर्शन करणारे एक अनुभवी व्यावसायिक, विनय भेटले. विनयने त्याला सत्यनारायण व्रताचे महत्त्व सांगितले, पण त्यासोबतच आधुनिक व्यवस्थापन तत्त्वेही सांगितली.

निफा वायनरी - नाशिक

vcdatrange ·
ज्योत्स्ना आणि अशोक या उच्चशिक्षित शेतकरी जोडप्याची भेट मनाला अन पोटाला देखील आनंद देणारी ठरली. नाशिक निफाड रस्त्यावर पिंपळस रामाचे या गावी सुरवडे परिवाराची निफा वायनरी हे कौटुंबिक युनिट आहे. स्वतःच्या शेतात स्वतः पिकवलेल्या द्राक्षापासून स्वतःच वाइन बनवायची आणि या छोटेखानी फार्म कम आउटलेट मध्ये उपलब्ध करून द्यायची DIY हा अशोकाचा मंत्र. अगदी वेब पेज देखील त्याने स्वतःच बनवलय. दक्षिण ध्रुवावर जाऊन आलेल्या अशोक सोबत निवांत गप्पा झाल्या. स्व विनायकदादा पाटील या समान धाग्याने सुरू झालेल्या गप्पा Sustainable Solution या समवायि विषयात सहजी रमल्या.

इतरांच्या कठीण काळात त्यांची सावली होणारे सोबती

मार्गी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
✪ The more you sweat in peace, the less you bleed in war! ✪ शिक्षण ही जशी शिक्षक- विद्यार्थी अशी दुतर्फा प्रक्रिया आहे तशी आरोग्यसुद्धा आहे ✪ अवघड प्रश्नांवर भाष्य करून उत्तरांचा मागोवा घेणारं पुस्तक ✪ गंभीर विषय पण अनौपचारिक, unpredictable शैली व विनोदाचा शिडकावा ✪ स्वत:ला अनेक प्रश्न विचारण्याची गरज ✪ “व्यक्त होण्याचं" आणि संवादाचं महत्त्व- बोलने से सब होगा ✪ स्वत:साठीचा वेळ- me time बद्दल अपराधभाव सोडून देण्याची गरज ✪ केवळ रुग्णांचेच सोबती नाही तर सर्वांचे व स्वत:चेही सोबती होण्याची दिशा ✪ प्रत्येकाने सजग व्हावं अशी एक छोटी चेकलिस्ट नमस्कार.