बातमी

या नालायकांना अटकाव कसा करायचा

रायगडाला जेव्हा लाज येते...
महराष्ट्र टाइम्स मधली ही बातमी वाचुन डोके तापले. ह्या नालायकांना अटकाव कसा करायचा?
दोन वर्षांपुर्वी मला राजगड्लाही हाच अनिभव आला होता.

गूगल मॅप व गूगल अर्थ मध्ये काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश विवादास्पद

गूगल मॅपवर सहज पहाताना लक्षात आले की काश्मीरचा काही भाग आणि अरुणाचल प्रदेश तुटक रेषेने दाखवले आहेत. दुसरा असा तुटक रेषेचा प्रदेश आहे तो गाझा पट्टीचा. 'गूगल अर्थ'वरपण हे प्रदेश लाल रेघेने दाखवले आहेत. ह्याचा अर्थ होतो काश्मीरचा काही भाग आणि अरुणाचल प्रदेश भारतात नाहीत.
आपण याबाबतीत काय करु शकतो? काय केले पाहिजे. केवळ राज्यकर्त्यांना शिव्याशाप देउन चालेल का?
निदान गूगल कंपनीकडे निषेध नोंदवता येइल का? जाणकारांनी आपले मत मांडावे.

साक्षात परमेश्वरही...

आज इ-सकाळवर खालील बातमी वाचली (संक्षिप्त स्वरूपः)

साक्षात परमेश्वरही या देशाला वाचवू शकत नाही

नवी दिल्ली, ता. ५ - या देशाला आता साक्षात परमेश्वरही वाचवू शकत नाही, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने आपला संताप व्यक्त केला.
सरकारी निवासस्थानात बेकायदा राहणाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्यास सरकारने नकार दिल्याने न्यायालय संतप्त झाले आहे. या प्रकरणी कायद्यात दुरुस्ती न करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असल्याचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अमरिंदर शरण यांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर ""कारकुनाने दिलेल्या मताला आव्हान देण्याचीही धमक या सरकारमध्ये नाही. आम्ही या सरकारला कंटाळलो आहोत'' अशा शब्दांत न्यायमूर्ती बी. एन. आगरवाल व जी. एस. सिंघवी यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, ""साक्षात परमेश्वर जरी या देशात अवतरला, तरी तो या देशाला बदलू शकत नाही. आपल्या देशाचे चारित्र्य संपुष्टात आले आहे. आम्ही आता निराश झालो आहोत. ...

...गुन्हे करणाऱ्यांना शासन करण्याची धमक सरकारमध्ये नाही, असेही न्यायालयाने फटकारले.
_________

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमुर्तींकडून अशा तर्‍हेची भाषा वाचून दुहेरी अस्वस्थता आली. (१) न्याय संस्थापण हतबल झालेली दिसते (२) न्यायसंस्थेकडून असे शब्द वापरले जाणे आणि स्पष्ट ताशेरे दिलेले जाहीरपणे दिसणे....

त्या व्यतिरीक्त ज्या संदर्भात हे वक्तव्य आहे त्या संदर्भात सामान्य माणसाचे काय होते ते पहा...जर एखादा बँकेचा घरासाठीचा हप्ता देण्याचा राहीला तर बॅंका काय करतात/करू शकतात...

एक चांगला पायंडा

प्राध्यापक जयंत नारळीकरांनी सुरू केलेली "आयुका" ही संस्था सगळ्यांनाच किमान ऐकूनतरी माहित असेल. तिथे खगोलशास्त्राचा अभ्यास चालतो हेही सुज्ञास सांगणे न लगे. तुम्हाला असं वाटत असेल की मी पुन्हा काहीतरी खगोलशास्त्राबद्दल लिहिणार असेन. नाही, या वेळेस मला वेगळ्याच विषयाकडे मिपाकरांचं लक्ष वेधून घ्यायचं आहे. आणि का प्रश्न आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा असावा असं मला वाटतं.

आयुकामधे आत्ता विश्वरचनाशास्त्राबद्दल एक कॉन्फरन्स सुरु आहे. त्यासाठी एकूण मिळून जवळजवळ १५० लोक तरी पुण्यात येऊन जातील. यात अनेक परदेशी पाहुणेही आहेत. या सर्व खगोलशास्त्रज्ञांसाठी शुक्रवारी संध्याकाळी काही सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. कालच श्रीमती प्राची (आडनाव विसरले, ढोबळे का काहीतरी) यांच्या गझल गायनाचा कार्यक्रम झाला. माझ्यासारख्या औरंगजेबांना विचाराल तर कार्यक्रम उत्तम झाला. पण विषेश सांगण्यासारखी गोष्ट ही की श्रीमती प्राची आणि त्यांचे तबला आणि पेटी वाजवणारे दोन साथीदार यांना पुष्पगुच्छ दिला नाही तर एक-एक छोटं रोपटं देण्यात आलं. "झाडे लावा, झाडे जगवा" असे बोर्ड्स कितीतरी ठिकाणी दिसतात. पण अशा पद्धतीनं त्याचं आचरण फार वेळा दिसत नाही. फुलं काय आत्तापर्यंत कोमेजलीही असती, पण ती रोपटी या कलाकारांना खगोलशास्त्राची आणि शास्त्रज्ञांची आठवण नक्की देतील ... आम्ही विश्वाच्या पसाय्राचा, उत्पत्तीचा अभ्यास करत असलो तरी आमचे पाय जमिनीवरच आहेत हे सांगणारी ती रोपं.

ही कल्पना कोणाची ते विचारायचं मला तेव्हा सुचलं नाही, पण ज्यांनी कोणी ही कल्पना सुचवली, आणि अंमलातही आणली त्यांचं मला फार कौतुक वाटलं. आणि त्यांचं जाहीर अभिनंदन करावंसं वाटलं म्हणून हा उद्योग!

(वसुंधराप्रेमी) यमी

सलोनी लायब्ररी (वाचनालय) ची दुसरी शाखा...

नमस्कार,
सर्व मिपाकरांना सांगण्यास मला आनंद होतो आहे की आपल्या सलोनी लायब्ररीची दुसरी शाखा या महीन्यापासून
ठाणे (पूर्व) कोपरी येथे सुरु होत आहे.
आपली पहीली शाखा सुरु झाल्याला या दसर्याला ३ वर्ष होतील आणि आजपर्यत आपल्या लायब्ररीला हजार लोकांनी भेट
दिली आहे, आणि आज लायब्ररीचे सहाशे सभासद आहेत.
आम्ही लायब्ररी चालू करताना आम्हाला घरच्या लोकांकडून तसेच बाहेरच्या लोकांकडून फार विरोध झाला सगळे आम्हाला
सांगत होते की अरे तुम्हाला गुंतवणूक करायची आहे तर झटपट व लवकर पैसा मिळेल अशा धंदयामद्ये करा.
लायब्ररी कशाला टाकता त्यात तुम्ही यशस्वी होणार नाही. लोकांना आजकाल पुस्तके वाचायला वेळ मिळत नाही
मनोरंजनाची एवढी साधनं असताना कोण पूस्तकांमध्ये आपला वेळ फुकट घालवेल, तसंच मुलं देखील टीव्ही वरच्या
कार्टून नेटवर्क वर रमलेले असतात. मुलांना वाचनाची आवड फारशी नाही असेच नकारात्मक उद्गगार येत होते म्हणून
आम्ही लायब्ररी चालू करताना हा विचार केला की लोक आपल्या कडे येऊ शकत नाहीत
तर आपण त्यांच्याकडे जाऊ आणि त्यांची वाचनाची आवड जोपासू आणि अशाप्रकारे "सलोनी सर्क्युलेटींग लायब्ररी"
"फ्री होम डिलीवरी" चा जन्म झाला. आणि आज लायब्ररीला तीन वर्ष पुर्ण व्हायला दोन महीने अवकाश असताना दुसर्या
शाखेची उभारणी झाली या आनंदात तुम्हाला सगळ्यांना सामील करावेसे वाटले म्हणून हा लेख लिहीला.
आपल्या लायब्ररीची काही छायाचित्रे :
लायब्ररी चे उदघाटन श्वास चित्रपटाच्या लेखिका "माधवी घारपुरे" ह्यांच्या हस्ते झाले

ती बाजुला डावीकडे चष्मेवाली आहे ना ती माझी मैत्रिण कल्पना (लायब्ररीयन)

लायब्ररीचा मोठा फलक.

आणि ही मी प्रगती.

निरागस

इथल्या स्थनिक दैनिकात वाचलेली हि बातमी.....

नाताळच्या दरम्यान बरीच स्नता ()(उत्तर द्रुव) साठी लहानग्यानी लिहिलेली पत्रे पोश्तात जमा होतात.
एक पत्र असे होते........

Dear God
Heaven
We don't have money. Dad is jobless and mama is sick.
Please send us 500$ so that we can celebrate Christmus.
Yours,
John

पोश्ट-मास्तरने ते पत्र रोटरी क्लब कडे पाठवले. रोटरी क्लबने John च्या कुटुमअबाला ४००$ भेट म्हणून दिले.
काहि दिवस्ननी आणखी एक पत्र पोस्तात दाखल झाले...

Dear God
Heaven
Thank you for money.
But next time please send money directly to us, as Rotary club's people had kept 100$ with themself.
Yours,
John

प्रकाश आणि मंदाकिनी आमटे यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर

आशिया खंडाचे नोबेल म्हणून ओळखला जाणारा रॅमन मॅगसेसे पुरस्कार डॉ. प्रकाश आणि मंदाकिनी आमटे यांना आज जाहीर झाला. बाबा आमटेंनाही हा पुरस्कार २३ वर्षांपूर्वी मिळाला होता. त्यांच्या कामाचा वारसा त्यांचा मुलगा आणि सून पुढे नेत आहेत, याचीच ही प्रतीकात्मक पावती म्हणावी लागेल.

मॅगसेसे पुरस्काराच्या संकेतस्थळावरील आमटे दांपत्याचा परिचय येथे वाचता येईल.

यानिमित्ताने आनंदवन आणि तिथल्या कामाबद्दल श्री. मिलिंद भांडारकर (सर्किट) यांनी अधिक लिहिले, तर मिपाकरांना वाचायला नक्कीच आवडेल.

दीर्घ ते लघु(कथा) चित्रपट

मी आतापर्यंत ऐकलेल्या हिंदी सिनेमाच्या नावांत ’मां’ हे सर्वांत लहान व ’जल बिन मछली नृत्य बिन बिजली’ हे सर्वांत मोठे नाव आहे. यात ’मां’ नावाचे ३ सिनेमे येऊन गेले. ’जल बिन मछली नृत्य बिन बिजली’ एकच( ह्या नावाचा सिनेमा पुन्हा बनविणार कोण आणि पाहणार कोण आज काल Wink ) नंतरही मोठ्या नावाचे सिनेमे येऊन गेले उदा. ’पाप को जलाकर राख कर दूंगा’, ’जुल्म को जला दुंगा’ वगैरे. ते काही जास्त चालले नाहीत. पण नंतर ’हम आपके हैं कौन’, ’दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हे जरा मोठ्या नावाचे सिनेमे आले जे भरपूर चालले. त्यामुळे तेव्हाही जरा मोठ्या नावाचे सिनेमे काढायची लाट आली. गेल्या काही वर्षांत लहान दोन अक्षरी नावाचेही भरपूर सिनेमे येत गेले. सध्या तर इंग्रजी नावाच्या हिंदी सिनेमांचेही चलन आहे.

तरीही ह्या सर्वात ’हम आपके हैं कौन’, ’दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ जास्त लक्षात राहतात. नुसते चांगले आणि लांब नावाचे सिनेमे म्हणून नव्हे, तर त्यांच्या लांबीमुळे सुद्धा. हिंदी (व मराठीही) सिनेमाची लांबी साधारणत: २:३० तास असते व इंग्रजी सिनेमे १:३० ते २:०० तासांचे असायचे. पण ह्याला अपवाद असणारे हे दोन सिनेमे. हम आपके हैं कौन - ३:४५ तास, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे - ३:१५ तास. आणखी काही अपवाद म्हणजे संगम (४ तास), शोले (३:३० तास) व लगान(३:४५). मुख्य म्हणजे हे सर्व सिनेमे तुफान चाललेत. पण म्हणून प्रत्येकाने मोठ्या लांबीचे सिनेमे बनविण्याचा प्रघात नाही आला.

आणखी एक प्रकार जो इंग्रजी सिनेमांतून आला. सिक्वेल. सिनेमाचा पुढील भाग काढणे. ’नगीना-निगाहें’, ’वास्तव-हथियार’, ’स्टाईल-एक्सक्यूज मी’. नुकतेच आलेले ’हेराफेरी- फिर हेराफेरी’ आणि ’सरकार-सरकार राज’. मी ऐकल्याप्रमाणे एन चंद्राने ’स्टाईल-एक्सक्यूज मी’ सोबत तिसरा सिनेमा काढणार आहेत. तसेच ’फिर हेराफेरी’ ही शेवटी असा अडकवून ठेवला आहे की त्यातून पुढे कथा चालू करू शकतात. २००२ मध्ये आलेल्या ’आंखे’चे ही दोन शेवट आहेत. जेणेकरून अर्धवट ठेवलेल्या प्रसंगापासून पुढील सिनेमा चालू करता येईल.

तरी आता लहान लांबीचे सिनेमे बनविणे हे ही जरा फॅशनमध्ये आहे.१:३० तास ते २ तासाचे. तरी हे सर्व एकाच कथेची लांबी होती हो. त्यात मग नवीन प्रकाराची भर घातली राम गोपाल वर्माने. सिनेमा ’डरना मना हैं’. ह्यात वापरल्या सहा कथा. तीन कथालेखक, एक दिग्दर्शक. मग त्याला छेद दिला त्यानेच. ’डरना जरूरी है’. सहा कथा, सात दिग्दर्शक. पण त्या प्रकारातही जास्त कोणी हात मारायचा प्रयत्न नाही केला. ह्यामागचे कारण बहुधा असेल की ते चालले नाहीत. तरी ह्याच प्रकारात मागील वर्षी आला ’दस कहानियां’. १०-१२ मिनिटांच्या कथा. हा सिनेमा मी परवा पाहिला टीव्ही वर. पूर्ण नाही पहायला मिळाला. पण एक फायदा आहे. वेगवेगळ्या कथा असल्याने पुन्हा पाहताना कुठल्याही कथेपासून सुरूवात करू शकतो. Wink

असो, हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे आज एका वाहिनीवर नवीन हिंदी सिनेमाची माहिती पाहिली. ’मुंबई कटींग’ नावाचा नवीन सिनेमा येणार आहे. त्यात ११ लघुकथा आहेत. ११ दिग्दर्शक. जवळपास १० मिनिटांची एक कथा, म्हणजे ११० मिनिटे म्हटले तर चित्रपटगृहात जास्तीत जास्त २ तास.

चला पाहूया, हा सिनेमा काय बदल घडवून आणतो ते.

नरकयातना

देवगाव (ता. नगर) येथील या चिमुरडीच्या नशिबात पुन्हा आशेचे किरण खुलू शकतात; परंतु सुमारे एक लाख रुपयांच्या शस्त्रक्रियेनंतर. आर्थिक मदत मिळाली तरच या शस्त्रक्रिया होऊ शकतात. पैशांची जमवाजमव झाल्यानंतर पुण्यातील 'रुबी हॉल' मध्ये तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
तेथे डॉक्‍टरांनी दोन अवघड शस्त्रक्रिया करण्यास सांगितल्या. शस्त्रक्रिया झाल्या नाहीत, तर जिवाला धोका होऊ शकतो. समाजाने हातभार लावला, तर तिचे जीवन पुन्हा फुलू शकेल.

सकाळमध्ये ही बातमी वाचनात आली. लोक यथावकाश आपापल्या परीने मदतीचा हात देतीलच.
पण मनात एक प्रश्न उभा रहातो की अशा असहाय्य रुग्णांसाठी, अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया मोफत का नाही होउ शकत? का निधी उपलब्ध होईपर्यंत वाट पाहिली जाते? या ७-८ वर्षाच्या मुलीने जिला आपल्याला नक्की काय झाले आहे, निधी म्हणजे काय, तो कधी गोळा होईल, हे माहितही नसेल.
दात्यांना आवाहन करण्याचा हा मार्ग ठीक आहे, पण का असे इलाज अशा खरोखर गरजू रुग्णांवर तातडीने (/मोफत) केले जात नाहीत?

मला यातील पूर्ण ज्ञान नाही. जाणकारांनी कृपया विचार मांडावेत.

मिसळपाव आज पुणे मिरर मधे...

आज मिसळपाव बद्दल टाईम्स ऑफ इन्डीयाच्या पुणे मिरर या वर्तमानपत्रात बातमी आली आहे.
मिसळपावकरांनी बंगलुरूमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाबद्दल जी तात्काळचर्चा केली आणि त्याला बंगलुरूवासी मिपाकरांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्यात माहिती दिलेली आहे.
मिसळपावचा एक फोटो (स्नॅपशॉट) देऊन ५ नं पानावर ही बातमी आहे.

पुणे मिररचे स्वतंत्र संकेतस्थळ नसल्यामुळे बातमीचा मथळा देत आहे.

Potpourri of information
Misalpav.com is one the websites which has been pivotal in relaying news from the blast-torn cities of Bangalore and Ahmedabad.

बंगलुरूच्या बॉम्बस्फोटानंतरची परिस्थिती आणि त्याकाळात मिसळपाव वर घडलेल्या घडामोडींबद्दल त्यात माहिती दिली आहे. बातमीचा शेवटचा परिच्छेद खाली देत आहे.

Misalpav is an interactive platform in Marathi and was started by Tatya Abhyankar, who hails from Thane. There are many subjects and discussion platforms available on Misalpav.

नीलकांत