चित्रपट

निळसर छटा अपरिहार्य...

कित्येकदा आपल्या आयुष्यातल्या अभावांची आपल्याला जाणच नसते. दुखऱ्या नसेला स्पर्श होईस्तोवर आपल्याला इथंही दुखतं आहे, हे समजतच नसतं. त्या दुखण्याला आपल्या असण्यात सामावून घेत निमूट विनातक्रार वाट चालत असतो आपण. एखादं वळण मात्र असं येतं, की सगळ्या सगळ्या गाळलेल्या जागा चरचरून समोर उभ्या ठाकतात. वाट अडवतात. प्रश्न विचारतात. तिथून पुढचं आयुष्य साधं-सोपं-सरधोपट उरत नाही मग. वाट तर उरतेच, पण सोबत दरेक पावलापाशी एक लख्ख बोचही उरते. दुखावते. सुखावतेही.

या जागांचं ऋणी असावं की शाप द्यावेत त्यांना? हा ज्याच्या त्याचा निर्णय. आपापल्या वकुबानं आणि जबाबदारीनं घेण्याचा.

अशाच एका वळणाची गोष्ट सांगतो ’मिस्टर ऍण्ड मिसेस अय्यर’.म्हटलं तर ती एक सरळसोट प्रेमकथा आहे - जाहिरातीत म्हटलं आहे तशी विध्वंसाच्या इत्यादी पार्श्वभूमीवरची. आणि तुम्हांला दिसलंच, तर असं एक वळण - जे आपल्यापैकी कुणालाही गाफील गाठू शकतंच.

एखाच्या शांत-निवांत तळ्यासारखं सावलीला पहुडलेलं सुखी आयुष्य तिचं. सुसंस्कृत तमिळ ब्राह्मणाचं धार्मिक कुटुंब, उच्चशिक्षण, स्वजातीत लग्न, काळजी घेणारं सासर, ल्हानगं लेकरू - सगळं कसं चित्रासारखं. कुठे कसला उणिवेचा डाग नाही. माहेरच्या एका मुक्कामानंतर लेकाला घेऊन सासरी निघालेली ती. एकटीच. लांबचा प्रवास. आईबापांनी कुण्या एका फोटोग्राफरची तोंडओळख काढून त्याला तिला जुजबी मदत करायची विनंती केलेली. अर्धा प्रवास तसं सगळं योजल्यासारखं नीट पार पडतंही. तसंच होतं, तर तिला तिच्या त्या सहप्रवाश्याचं नावही कळतं ना. आयुष्य तसंच विनाओरखड्याचं निवांत चालू राहतं. कसल्याही खळबळीविना. पण तसं व्हायचं नसलेलं.

मधेच बस थांबते आणि गावात दंगली पेटल्याचं कळतं. रस्ता बंद. कर्फ्यू लागलेला. माथेफिरूंच्या झुंडी मोकाट सुटलेल्या. बसमधून बाहेर पडणंही धोक्याचं. अशात तिचा सहप्रवासी तिला सांगतो - 'मला जावं लागेल. मी - मी मुस्लिम आहे.' अरे देवा! मी पाणी प्यायले त्याच्या हातचं. आता? बुडाला की माझा धर्म... ही तिची पहिली प्रतिक्रिया. त्याच्यापासून तिरस्कारानं दूर सरकण्यात झालेली. पण बसमधल्या एका म्हाताऱ्या मुस्लिम जोडप्याला ओढून नेताना पाहून ती हबकते, की सोबतीच्या आशेनं का होईना - तिच्यातली माणुसकी डोकं वर काढते कुणाला ठाऊक. 'नाव काय तुमचं?' या एका हिंदू माथेफिरूनं दरडावून विचारलेल्या प्रश्नाला तिच्या तोंडून अभावित उत्तर जातं - 'अय्यर. मिस्टर ऍण्ड मिसेस अय्यर.'

आता सगळेच संदर्भ बदललेले.

इथवर अपर्णा सेननं आपल्याला बसमधल्या इतर अनेक प्रवाश्यांची ओझरती ओळख करून दिलेली. काही उत्साही तरुण मंडळी. रोमॆण्टिक. काही बाटल्या आणि पत्ते घेऊन मजा करणारे सद्गृहस्थ. काही फाळणीत पोळून निघालेले शीख व्यापारी. काही हनीमूनर्स. आणि ते मुस्लिम आजी-आजोबांचं जोडपंही. सगळीच माणसं. थोडी काळी. थोडी पांढरी. तुमच्याआमच्यासारखीच. ती तशी नसती, तर त्या ज्यू तरुणानं 'ते - ते मुस्लिम आहेत' असं म्हणून त्या म्हाताऱ्या जोडप्याचा बळी का चढवला असता? पण त्यालाही स्वत:च्या जिवाची चिंता आहेच. त्याबद्दल त्याला दोषी ठरवणारे आपण कोण? आपल्यावर अशी वेळ आली, तर आपण नक्की कसे वागू हे छातीठोकपणे सांगता यायचं नाहीच आपल्याला...

असे अनेक संमिश्र संदर्भ पेरले गेलेले. असल्या विद्वेषी हिंस्रपणाला आपल्या रुटीनचा एक भाग बनवून टाकणारे वृत्तपत्रीय मथळे या ना त्या निमित्तानं दाखवत राहते अपर्णा सेन. कुठे मासिकाचं एखादं पान, कुठे चिक्कीला गुंडाळून आलेला बातमीचा तुकडा. बसबाहेर सापडलेली त्या मुस्लिम म्हाताऱ्याची कवळी. मुद्दाम पाहिले नाहीत, तर लक्षातही येऊ नयेत, पण असावेत सगळीकडेच...

या संदर्भांच्या पार्श्वभूमीवर एका प्रवासापुरते एकत्र आलेले ते दोघं. कर्फ्यू. धुमसती दंगल. प्रवास अशक्यच. हातात लहान मूल. राहायला जागा नाही कुठेच. त्याची सोबत-मदत तर हवी आहे, थोडी त्याच्या जिवाचीही चिंता आहे. पण तो मुस्लिम आहे म्हणून होणारी अभावित चिडचिडही. कुठून यात येऊन पडलो, असा थोडा बालिश वैतागही. तो मात्र शांत. आतून संतापानं-असुरक्षिततेनं धुमसणारा. पण तिच्या मूलपणाची जाणीव असणारा. बिनबोलता तिला जपणारा. त्याच्यातला कलावंत एकीकडे या सगळ्यातलं वाहतं जीवन टिपतो आहे. अस्वस्थ होतो आहे. बसमधे काढलेल्या त्या रात्रीनंतर तो कॅमेरा घेऊन बाहेर पडतो, तेव्हा त्यानं टिपलेल्या फ्रेम्स आयुष्याचं हे संमिश्र रुपडं अबोलपणे दाखवत राहतात. नदीच्या पाण्यातली म्हाताऱ्याच्या चष्म्याची तुटकी केस. थकून चाकावर डोकं टेकून झोपलेला ट्रक ड्रायव्हर. गाडीच्या आरश्यात पाहून मिशी कातरणारे कुणी एक सद्‌गृहस्थ. खोळंबलेली रहदारी. वाहतं पाणी. कोवळं ऊन. अव्याहत.

आता मिस्टर अय्यर यांना नाव निभावणं भाग आहे. औटघटकेच्या या लेकराची नि बायकोची जबाबदारीही.

आता त्यांच्यात घडतं ते काहीसं कवितेच्या प्रदेशातलं.

फॉरेस्ट बंगलोमधली ताजीतवानी संध्याकाळ. भोवताली पसरलेलं जंगल. उन्हातलं जंगल टिपणारा तो आणि त्याच्यावर विश्वासून मोकळी-ढाकळी झालेली ती. त्याच्या कॅमेऱ्याला डोळे लावून ऊन निरखणारी तिची एक निरागस मुद्रा त्यानं टिपलेली. आणि मग अशा अनेक मुद्रा तिच्या. हसऱ्या. संकोची. लटक्या रागातल्या... त्याच्या कॅमेऱ्यात बंद.
दिवसा गावात परतून तिनं सुखरूप असल्याचा घरी केलेला फोन आणि बसमॅनेजर म्हणून फोनवर अभिनय करायची त्याला केलेली विनंती.
'आम्हांला सांगा नं कसं जमलं तुमचं लग्न...' या कोवळ्या पोरींच्या उत्सुक प्रश्नावर त्यांच्यात पसरलेली अवघडलेली शांतता. आणि ओठांवर लाजवट स्मित खेळवत तिनं दिलेलं उत्तर. चकित तो. पण तिचं उत्तर निभावत किर्र जंगलातल्या मधुचंद्राचे तुटक तपशील देणारा.
ठिबकत्या दवाचा आवाज ऐकत संध्याकाळी बंगलोच्या व्हरांड्यात त्या दोघांनी मारलेल्या गप्पा. दंगलीच्या त्याच्या भयचकित आठवणी आणि हिंदू स्त्रियांच्या भालप्रदेशावरच्या रक्तबिंदूचं त्याला असलेलं अनाकलनीय आकर्षणही.
दोघांनी मिळून कॅमेऱ्यात पकडलेली स्वप्नील हरणं. आणि त्याच कॅमेऱ्याच्या भिंगातून हतबलपणे निरखलेला कुण्या अभागी दंगलग्रस्ताचा जाता जीवही.
रक्ताच्या त्या चिळकांडीनं आणि माणसाच्या इतक्या सहजस्वस्त मरणानं मुळापासून ढवळून निघालेली ती. त्याच्या मिठीत विसावलेली. त्याचा हात घट्ट धरून झोपी जाणारी.

त्या रात्री अपर्णा सेनचा कॅमेरा त्या दोघांच्या निरागस जवळिकीचे तपशील चितारतो. ती फक्त एक भ्यालेली लहानशी मुलगी आहे. आणि तो तिचा सखा. बस. रात्र सरते. उमलत्या सकाळीसोबत तिला जाग येते आणि कॅमेरा हलकेच मागे येतो. क्लोज अप्स पुसले जातात आणि आपल्याला एक दूरस्थ चित्र दिसत जातं. आता पदरा-कुंकवाचं भान असलेली एक विवाहित स्त्री आहे ती. आरश्यापाशी जाऊन केस नीटनेटके करताना हलकेच टिकली आरश्याला चिकटवून थोडी सैलावते ती फक्त. लहानसं दृश हे, पण किती किती संदर्भ जागे करून जाणारं... तिच्या चौकटीतल्या विवाहित आयुष्याचे आणि त्याला मोहवणाऱ्या त्या कुंकवाच्या आकर्षणांचे...

परतीचा प्रवास सुरळीत सुरू. 'आता कुठे जाणार मग?' वरवर सहजपणा दाखवत तिनं त्याला केलेली पृच्छा. आणि त्यानं कुठल्याश्या जंगलाचं नाव सांगितल्यावर 'एकटाच जाणारेस?' हा स्वत:च्याही नकळत तिच्या तोंडून बाहेर पडलेला नाईलाज प्रश्न.
इथवर सगळं स्वप्नील-धूसर. पण तो तिच्या नजरेत नजर गुंतवून थेट उत्तर देतो - 'तू येणार नसलीस, तर एकटाच.'
हसत हसत रेषेपल्याड राखलेले सगळे सगळे बंध एकाएकी कधी नव्हे इतके निकट आलेले.
तिच्या 'मीनाक्षां'चा त्यानं हलकेच बोटांनी गिरवलेला आकार. त्यानं उष्टावलेलं पाणी तिनं सहज पिणं. सोबतीचा जवळ येणारा शेवट जाणवून त्याच्या खांद्यावर विसावणं. अंतरं मिटलेली आहेत आणि नाहीतही...

तिच्याकडे सहज पाठ फिरवून चालता होतो तो.
वळण संपलेलं.
त्यानं कॅमेर्‍यात टिपलेला हा प्रवास मात्र तिच्या मुठीत दिल्यावाचून राहवत नाहीच त्याला.
त्यावर भरल्या नजरेनं तिनं 'मिस्टर अय्यर'ना दिलेला निरोप आणि तिच्या नजरेत धूसरलेली त्याची पाठ.
अपर्णा सेनचा कॅमेरा आता स्थिरावतो तो त्याच्या खऱ्या नावाच्या पाटीवर.
प्रवासापुरतं घेतलेलं नाव संपलं. वळणही संपलं.

त्याचे पडसाद मात्र अभंग उरतील. त्या दोघांच्याच नाही, आपल्याही आयुष्यात. विषाची चव चाखली आहे आता ओठांनी. निळसर छटा अपरिहार्य...

दीर्घ ते लघु(कथा) चित्रपट

मी आतापर्यंत ऐकलेल्या हिंदी सिनेमाच्या नावांत ’मां’ हे सर्वांत लहान व ’जल बिन मछली नृत्य बिन बिजली’ हे सर्वांत मोठे नाव आहे. यात ’मां’ नावाचे ३ सिनेमे येऊन गेले. ’जल बिन मछली नृत्य बिन बिजली’ एकच( ह्या नावाचा सिनेमा पुन्हा बनविणार कोण आणि पाहणार कोण आज काल Wink ) नंतरही मोठ्या नावाचे सिनेमे येऊन गेले उदा. ’पाप को जलाकर राख कर दूंगा’, ’जुल्म को जला दुंगा’ वगैरे. ते काही जास्त चालले नाहीत. पण नंतर ’हम आपके हैं कौन’, ’दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हे जरा मोठ्या नावाचे सिनेमे आले जे भरपूर चालले. त्यामुळे तेव्हाही जरा मोठ्या नावाचे सिनेमे काढायची लाट आली. गेल्या काही वर्षांत लहान दोन अक्षरी नावाचेही भरपूर सिनेमे येत गेले. सध्या तर इंग्रजी नावाच्या हिंदी सिनेमांचेही चलन आहे.

तरीही ह्या सर्वात ’हम आपके हैं कौन’, ’दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ जास्त लक्षात राहतात. नुसते चांगले आणि लांब नावाचे सिनेमे म्हणून नव्हे, तर त्यांच्या लांबीमुळे सुद्धा. हिंदी (व मराठीही) सिनेमाची लांबी साधारणत: २:३० तास असते व इंग्रजी सिनेमे १:३० ते २:०० तासांचे असायचे. पण ह्याला अपवाद असणारे हे दोन सिनेमे. हम आपके हैं कौन - ३:४५ तास, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे - ३:१५ तास. आणखी काही अपवाद म्हणजे संगम (४ तास), शोले (३:३० तास) व लगान(३:४५). मुख्य म्हणजे हे सर्व सिनेमे तुफान चाललेत. पण म्हणून प्रत्येकाने मोठ्या लांबीचे सिनेमे बनविण्याचा प्रघात नाही आला.

आणखी एक प्रकार जो इंग्रजी सिनेमांतून आला. सिक्वेल. सिनेमाचा पुढील भाग काढणे. ’नगीना-निगाहें’, ’वास्तव-हथियार’, ’स्टाईल-एक्सक्यूज मी’. नुकतेच आलेले ’हेराफेरी- फिर हेराफेरी’ आणि ’सरकार-सरकार राज’. मी ऐकल्याप्रमाणे एन चंद्राने ’स्टाईल-एक्सक्यूज मी’ सोबत तिसरा सिनेमा काढणार आहेत. तसेच ’फिर हेराफेरी’ ही शेवटी असा अडकवून ठेवला आहे की त्यातून पुढे कथा चालू करू शकतात. २००२ मध्ये आलेल्या ’आंखे’चे ही दोन शेवट आहेत. जेणेकरून अर्धवट ठेवलेल्या प्रसंगापासून पुढील सिनेमा चालू करता येईल.

तरी आता लहान लांबीचे सिनेमे बनविणे हे ही जरा फॅशनमध्ये आहे.१:३० तास ते २ तासाचे. तरी हे सर्व एकाच कथेची लांबी होती हो. त्यात मग नवीन प्रकाराची भर घातली राम गोपाल वर्माने. सिनेमा ’डरना मना हैं’. ह्यात वापरल्या सहा कथा. तीन कथालेखक, एक दिग्दर्शक. मग त्याला छेद दिला त्यानेच. ’डरना जरूरी है’. सहा कथा, सात दिग्दर्शक. पण त्या प्रकारातही जास्त कोणी हात मारायचा प्रयत्न नाही केला. ह्यामागचे कारण बहुधा असेल की ते चालले नाहीत. तरी ह्याच प्रकारात मागील वर्षी आला ’दस कहानियां’. १०-१२ मिनिटांच्या कथा. हा सिनेमा मी परवा पाहिला टीव्ही वर. पूर्ण नाही पहायला मिळाला. पण एक फायदा आहे. वेगवेगळ्या कथा असल्याने पुन्हा पाहताना कुठल्याही कथेपासून सुरूवात करू शकतो. Wink

असो, हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे आज एका वाहिनीवर नवीन हिंदी सिनेमाची माहिती पाहिली. ’मुंबई कटींग’ नावाचा नवीन सिनेमा येणार आहे. त्यात ११ लघुकथा आहेत. ११ दिग्दर्शक. जवळपास १० मिनिटांची एक कथा, म्हणजे ११० मिनिटे म्हटले तर चित्रपटगृहात जास्तीत जास्त २ तास.

चला पाहूया, हा सिनेमा काय बदल घडवून आणतो ते.

वहिंनीच्या बांगड्या - चित्रपट भाग - ६

भाग १ - http://www.misalpav.com/node/1834
भाग २ - http://www.misalpav.com/node/1895
भाग ३ - http://www.misalpav.com/node/2127
भाग ४ - http://www.misalpav.com/node/2207
भाग ५ - http://www.misalpav.com/node/2619
------------------------------------------------------------------------
प्रसंग ३:
ऐडमिशन च्या रांगेत मुले मुली उभी होती. डान्या आपली गैग घेउन सध्यांकाळ्च्या चहा पाण्याला नवीन गिर्हाईक बघत होते.
इतक्यात त्यांना आपला हिरो मदनबाण दिसला, अंगात फिकट निळ्या रगांचा शर्ट आणि राखाडी रगांची पैट होती. शर्टाच्या बाह्या फोल्ड केल्या होत्या. हातात सर्टीफिकेट्ची फाईल गच्च धरली होती. कोणताही क्लास न लावता, मिळालेल्या डिसटींशन चा अभीमान चेहर्याबर होता.
मदनबाण जीवनशिक्षण चे ऐडमिशन पुर्ण करुन मदनबाण आपल्या वर्गाकडे वळला.
(जीवनशिक्षण: हा नवीन अभ्यासकम, संत तात्याबा शिक्षण संस्थेत चालु करण्यात आला आहे. यात तुम्हाला सर्व प्रकारचे शिक्षण मिळु शकते. म्हणजे लहान मुलांचे संगोपन (प्रा.समस्त स्त्री वर्ग) ते मयताची तयारी कशी करावी (प्रा. कंदीलकुमार आम्बोळी). हल्ली (आवडत्या) मुलीला कशे पटवावे? याचे पण वर्ग (प्रा. ताईतवाले पिवळा डांबिस) चालु केले आहेत असे ऐकुन आहे. विजयादशमी पर्यंत प्रवेश चालु आहे, क्रुपया इच्छुकांनी प्रवेश घ्यावा. )
------------------------------------------------------------------------------------------------
प्रसंग ४:
महामहीत संरपच जीवनशिक्षणाच्या वर्गावर आपले अनुभवाने आलेले ज्ञान विद्याथ्यांना देत होते.
वर्गात, डान्या आणी त्याची गैग आली होती. हल्ली 'सर्कीट' नावाचा विद्यार्थी ह्या वर्गात आला होता. ह्या विद्यार्थी काहीतरी अगम्य भाषेत बोलायचा, त्यामुळे नवीन विद्यार्थ्यांची गोची व्हायची. हा विद्यार्थी मास्तरांना काही केल्या ऐकत नव्हता. नको त्या वेळी नको त्या शंका विचारणे हा ह्याचा स्वभावधर्म होता. मधये काही तरी 'शोंचकुपावर' पी. ऐच डी चा प्रयत्न चालु केला होता. 'शोंचकुपावर' म्हणजे 'शोंचकुपावर' स्वतः बसुन नव्हे. हल्ली मदनबाण व लावण्यसुंदरी (जवॉ दिलों की धडकन) शुभ्रा आले होते. हे दोन नवीन विद्यार्थी होते, जरा ह्या नवीन वातावरणात बाबचळुन जात होते.
शेवटी वर्ग संपल्यावर ­
प्रश्नोत्तरी चालु झाली.
------------------------------------------------------------------------
वर्ग झाल्या, जरा श्रम परीहारा साठी डान्याने आपली गैगसकट आप्ल्या तळाकडे कुच केली.
डान्याचा तळ, ब्रहमचारी रावणाच्या डोंगरात होता. काही गड्बड झाली की पळुन जायला सोपा पडतो. डान्याने आल्याआल्या आपल्या हेलीकोप्टर कडे ऐक नजर टाकली. कालच डान्या, हेलीकोप्टर च्या पंख्यात अडकुन पडला होता आणि त्यामुळे हेलीकोप्टर चा पंखा मोडला होता.
येथे डान्याने सगळा माल आणुन ठेवला होता.
आल्या आल्या डॉन ने, आपल्या सोना (डार्लिंग) ला हाक मारली.
'सोना, जा माझ्या मित्र-मडळीच्या खायची-प्यायची'व्यवस्था कर' - डोन्या.
'हो, रे माझ्या डोनुड्या, सोनुडया' - सोना.
इकडे आपसात, प्रेमवर्षाव चालु झाला. त्यामुळे, शेवटी इतरांनी आपली तोंडे दुसरीकडे वळवली. डॉन ला कोण सांगणार शेवटी ????
'तुला, भेटायला कोणीतरी आले आहे, मी त्यांना खालच्या खोलीत बसवले आहे' - सोना
'तुम्ही, खाउन-पिउन घ्या, मी आलोच, कोण आले आहे, मला भेटायला ते पाहुन' - डोन
डोन गेल्यावर, लोकांनी सवयी प्रमाणे आपल्या हाताने जेवण काढले आणि सुरवात केली.
डांबिस काकांनी आपल्या दुकानातील नवीन द्र्व्याचा सैंपल आणला होता.
धम्या, सगळ्यांना आग्रह करुन करुन ते द्रव देत होता, 'शेजार्याच्या लग्नात, सुनेला जपण्या सारखे'
शेवटी, बिनपट्ट्याच्या मुलांच्यात निघणारा विषय निघाला.
'काय, नवीन रंगीत कोणी आले आहे का कालेजात? - पिडा.
'काय, पिडाकाका, तुझा गळ्यात पट्टा आहे ना?, कशाला इकडे तिकडे पहाताय, आमच्या होतकरु धडाडीच्या तरुणांना संधी द्या' - खविस.
'अरे, आम्ही तुमच्यासाठीच म्हणतोय' - पिडा
इतक्यात डोन परत आला.
मित्र हो, लवकर आट्पा, आपल्याला कामगिरीवर निघायचे आहे. - डोन.
------------------------------------------------------------------------------------------------
संरपच दिवसभराचे काम आटपुन दमुन-भागुन आपल्या घरी पोचले होते. आल्या आल्या अनुष्काबाईंनी आपल्या नाजुक गोर्यापान हाताने संरपचांच्या गळ्याचा टाय काढला. घरातुन आणुन पाणी दिले आणि चहा ठेवला.
'अहो, कसा काय होता आजचा दिवस' - अनुष्काबाईंनी आपल्या नवर्याची आपुलकीने चौकशी केली.
'वैताग आलाय ह्या कामाचा, त्या सर्कीट नावाच्या विद्याथ्याने उच्छाद मांडलाय' - सरपचांनी आपली व्यथा मांडली.
'अहो, चालयचेच, आपण जास्त त्रास करुन घ्यायचा नाही. हळु हळु होतील शांत ते. हल्ली त्यांचात चंद्राचा-शुक्राचा लहरीपणा आणि शनीचा कडकपणा आलाय. होइल हळु हळु बदल, ग्रहमान सुधारेले की.' - अनुष्कावहीनी.
'देव करो आणि असेच होवो' - सरपंचनी आपले डोळे मिटुन घेतले.
'नाही तर असे करा, त्यांना क्लासचा मोनीटर करा, ऐकदा गळ्यात ओंड्का आडकवला की आपोआप सुधारतील. ' - अनुष्कावहीनी आपले व्यवहारज्ञान दाखवले.
'बर, ते जाउद्या, आजचा बेत काय?' - सरपंच
'मी, आम्रखंड आणुन ठेवलयं, पुर्या करायच्या राहीलेत.' अनुष्कावहीनी
अनुष्कावहीनी - 'तुम्ही पुर्या करा, मी तो पर्यंत 'चार दिवस नवर्याचे, बाकीचे बायकोचे' हे महीलामंडळात नाटक बघायला जाते.'
सरपचांची हो-ना ऐकणाच्या आधीच अनुष्कावहीनी आपली बैगलोरवाली मैत्रीण यशोधरा बरोबर पळाल्या.
अनुष्कावहीनी लग्न करण्याआधीच सरपचांना काही अटी सांगीतल्या होत्या, अर्धे जेवण बनवणे आणि दिवसातुन १० ओळी शुदध्लेखन अशा होत्या. सरपचांनी सुदधा, प्रेमात वेडी झालेली लोक करतात तेच केलं शेवटी. त्यामुळे आता त्यांना आता, संध्याकाळचे जेवण बनवल्यावर, १० ओळी सुदलेखन लिहावे लागते.
------------------------------------------------------------------------------------------------
मदनबाण जेव्हा पासुन शुभ्राला ला पाहीले होते, तेव्हापासुन त्याचे कशातही लक्ष लागत नव्हते. 'जळी स्थळी काष्टी पाषाणी', शुभ्राच दिसत होती'. तीचे ते फिकत गुलाबी ओठ, हसल्यावर गालावर दिसणारा रक्तीमा, हळुच वार्याच्या झुळकीबरोबर डोलणारी केसाची बट, ह्यांनी त्याला वेड करुन टाकले होते. त्याला कशाचेही भान नव्हते, सकाळी, दात घासायची आठ्वन नव्हती, तर कधी कधी, महाविद्यालयात जाताना, उलटा शर्ट सुदधा घालुन जात. त्यामुळे, त्याला आजु-बाजुची काही टवार पोर त्रास देत. पण काय करणार, प्रेमात पडल्यावर त्याला जगाचे देखील भान नव्हते.
म्हणुन त्याने आता, गावातील प्रेमप्रकरण तज्ञ 'पिवळा डांबीस काका' सल्ला घ्यायचे ठरवले. आणि, दुसरे कोणी नंबर लावायच्या आधी लाईन ऐंगेज करुन टाकायचा विचार केला.
------------------------------------------------------------------------------------------------
पुढील भागांत पाहुया:
१. डान्याची गैग कोणत्या मोहीमेवर जाणार आहे?
२. पिडा काका, नक्की कोणता सल्ला मदनबाण ला देणार?

वहिंनीच्या बांगड्या - चित्रपट भाग - ५

भाग १ - http://www.misalpav.com/node/1834
भाग २ - http://www.misalpav.com/node/1895
भाग ३ - http://www.misalpav.com/node/2127
भाग ४ - http://www.misalpav.com/node/2207

----------------------------
येथे श्री गजाननाच्या क्रुपेने आम्ही सादर करत आहोत,
मिपावर वात्रट मंडळीतर्फे, वात्रट माणसांसाठी, वात्रट लोकांनी बनवलेला वात्रट प्रेक्षकासाठी चित्रपट

वहिनींच्या बांगड्या

प्रमुख कलाकार:
सरपंच - चित्रपटातील भुमिका: 'जगाला फाट्यावर कसे मारावे' या विषयाचे प्राध्यापक.
अनुष्काताई (सगळ्यांच्या ताई, फक्त ऐकाच्या सोडुन): 'जगात सभ्यपणे कसे राहवे' याच्या प्राध्यपिका.
मदणबाणः नुकताच १० पास झालेला ऐक होतकरु मुलगा, सध्या महाविद्यालयात प्रवेशाच्या प्रतिक्षेत
शुभ्रा कानेटकर: नुकताच १० पास झालेली ऐक मस्त सुंदर मुलगी, सध्या महाविद्यालयात प्रवेशाच्या प्रतिक्षेत

डॉन आणि गैग - धमाल, आम्बोळी, कुंदन, कुबड्या खविस, वैताळ, इ.
विजुभाउ - गैग चे ब्रेन
पिडा: गैग चे हिसाब - किताब वाले
खास भुमिकेत आहेत, बिरुटेसर - प्राचार्य 'प्रेमसंगम' महाविद्यालय

इतर भुमिकेत आहेत आपले लाडके मिपाकर
--------------------------------------

प्रसंग पहीला:
सकाळचे १० वाजलेत, डॉन आपल्या बुलेटवरुन चहाच्या टपरीवर पोचलाय. टपरीवर आधीच धमाल, कुंदन, वैताळ येवुन चहा पित होते.
'काय रे, वाजवला काय त्याचा भेळवाल्याचा बाजा?' - डॉन
'साला, दिवसाला, ११०० - १२०० भेळी विकतोय आणि आम्हाला देत नाही, ऐका सोफ्ट्वेअर इजिंनीअर पेक्क्षा जास्त पैशे कमावतोय, आणि टैक्स पण नाही, त्याला सांग ऐक बादली पैसा आणुन द्यायला'
'सांगतले आहे, मी त्याला' - धमाल
'ह्या कु ख ने, ऐक त्याच्या पाठीत लाथ घालुन त्याला सोम्य समज दिली आहे' - कुंदन
'चांगले आहे, चांगले आहे, ते विजुभाउ कुठे दिसले नाहीत' - डॉन
'ते पहा, तेथे बसलेत ते' - धमाल्या.
'सापड्ले, सापड्ले' - विजुभाउ ऐकदम आंनदाने ओरड्ले.
'काय, झाले हो' - डॉन आणि त्याची गैंग ऐकदम ओरड्ली.
'सापड्ले, सापड्ले, ऐकदाचे सापड्ले, मिपावर नवीन आय. डी बनवायला मजबुत नाव सापडले' - विजुभाउ.
'विजुभाउ, आता हे उद्योग सोडा, लोक आता तुमच्या नावावर न खालेंल्या गोष्टीचे बिल फाडायला लागली आहेत' - आम्बोळी, आता मयत सोडुन इतर गोस्टीत सुध्दा लक्ष घालायला सुरवात केली होती.
पण हे ऐकायला विजुभौ होतेच कुठे, ते कधीच पळाले नवीन आय. डी बनवायला.
चला रे, आपण पण जरा नवीन पक्षी बघुन येउ - डोन्या, त्याबरोबर, गैग आत मध्ये महाविद्यालयात गेली.
-------------------------------------------------
प्रसंग दुसरा: शुभ्राचे घर
'हे बघ, मी सगळा अर्ज भरुन ठेवलाय, तु पैसे घेउन जा आणि महाविद्यालयात प्रवेश नक्की कर' - शुभ्राचे वडील
शुभ्रा कॉलेजात गेली.
'ह्या पोरटीला आभ्यास करायला नको, नको ते उद्योग करत फिरायला हवे, हिच्या नादाने म्हणे, शाळेतली ३ पोरे नापास झाली' शुभ्राच्या वडील तीच्या आईला सांगत होते. 'ह्या वर्षी महाविद्यलयात काय काय दिवे लावनार काय म्हाहीत?'
-------------------------------------------------

नोटापुराण

"अरे भैय्या, दुसरी नोट दो. यह नही चलेगी." "चल जायेगी साब, नही चली तो बाद में मुझे वापस कर देना."

मुंबईच काय, भारतातील बहुतेक शहरात चालणारा संवाद. कारण काय तर नोट बहुतेक वेळा थोडी फाटलेली असते, किंवा जुनी झालेली असते. आणि काय करणार? आपल्यालाच धास्ती असते की ती नोट जर दुसर्‍या कोणी घेतली नाही तर तेवढ्या रूपयांचा फटका बसायचा. ह्या आणि अशा आणखी इतर प्रकारात आपल्याला नोटांचे हाताळणे का चांगले ठेवावे हे कळते Smile काही वर्षांपूर्वी नागपूरात तर पूर्णपणे फाटलेल्या, जीर्ण होत चाललेल्या नोटाही वापरात ठेवल्या होत्या लोकांनी. ती नोट एका प्लॅस्टिकच्या पिशवीत टाकून त्यासोबत आपल्या नावाचा कागद ठेवायचे व झाल्या चलनी नोटा वापरण्यालायक.

ह्यावरूनच एक मार्मिक विनोद आठवला. एक कागद एका नोटेला म्हणाला, "तुझ्या आणि माझ्यात फरक काय? तू आणि मी दोघेही कागदाचेच तर आहोत." त्यावर नोट म्हणाली, "हो, पण मी आयुष्यात कधी कचर्‍याचा डबा नाही बघितला."
काय गंमत आहे ना? चलनी नोटांची किंमत कमी होत नाही ते असे.

बाकी नोटांचे काय हो, ते ही एक वचनपत्र असते ना? धनादेशाप्रमाणे. "मैं धारक को xx रूपये अदा करने का वचन देता हूं.", असे लिहून रिजर्व बँकेचे गव्हर्नर ग्वाही देतात की ह्या कागदाची ही किंमत आहे. अर्थात हे १ रू.च्या वरील नोटांकरीता असते. एक रुपयाच्या नोटेवर तशी ग्वाही नसते. खरे तर एक रुपयाच्या नोटेवर भारत सरकार लिहिले असून त्यावर अर्थखात्याच्या सचिवांची सही असते. इतर सर्व नोटांवर रिझर्व बँकेचे नाव असून त्यावर बँकेच्या गव्हर्नरची सही असते आणि त्याची हमी देते केंद्र सरकार (केंद्रीय सरकार द्वारा प्रत्याभूत/Guaranteed by the Central Government). आणि म्हणूनच एक रूपयाची नोट हे आपले खरे चलन म्हटले जाते असे ऐकले होते.

भारतात नोटा किती प्रकारच्या छापतात? त्याची माहिती येथे मिळेल. सध्या आपण १०, २०, ५०, १००, ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा वापरतो. १, २ व ५ रू. च्या नोटांची छपाई बंद झाली असली तरी त्या नोटा चलनातून बाद नाही झाल्यात अजून.
अरेच्च्या, काय हो? सरकारने/बँकानी सर्व जुन्या नोटा घेणे बंद केले नाही ना अजून. काही सांगता येत नाही बुवा. कधी काळी सरकारने १००० ते १०००० (५००० व १०००० च्या ही नोटा चलनात होत्या हे मला माहितच नव्हते)च्या नोटा काळाबाजार रोखण्यासाठी बंद केल्या होत्या. त्याप्रमाणे आताही बंद करू शकतात. तर, ह्या सर्व जुन्या नोटा बंद होण्याच्या आधी चलनात काढून, किंवा कमीत कमी बँकेत परत करून आपण आपले(आणि सरकारचेही) नुकसान कमी करू शकतो. बहुधा माझ्याकडे आहेत थोड्या जमविलेल्या नोटा. पाहतो, त्यात किती जुन्या नोटा आहेत ते.

आता मुद्दा निघालाच आहे तर सुरूवातीला थोडे मोठ्या नोटांविषयी.
सध्याच्या काळात मोठ्या म्हणजे ५०० व १००० च्या नोटा. फार पुर्वी ५०, १०० ची नोटही मोठी मानली जात होती. तर त्यांचा फायदा हा की कमी नोटांमध्ये जास्त पैसे खिशात/बॅगेत/कपाटात राहू शकतात. पँटच्या खिशातील चोरकप्प्यातही. तसे आजकाल तर ५०० व १००० च्या नोटा सहज मिळतात. पण आधी तसे नव्हते. कॉलेज मध्ये असताना माझ्या मित्राने त्याच्या एका नातेवाईकांचा अनुभव सांगितला होता. त्यावेळी ५०० च्या नोटा एवढ्या प्रचलित नव्हत्या. त्यांना दीड लाख रूपये घेऊन मोटारसायकलवर एका गावातून दुसर्‍या गावात जायचे होते. त्यांना तशी धास्ती वाटत होतीच. त्यामुळे एका बँकेत जाऊन त्यांनी मॅनेजरला आपली अडचण सांगितली व ५०० च्या नोटांची ३ बंडले घेऊन एक खिशात व दोन पायांच्या मोजात दोन अशी बंडले ठेऊन थोड्या कमी भीतीत प्रवास केला.
काही वर्षांपुर्वी हर्षद मेहतानी सांगितल्याप्रमाणे त्याने नरसिंह रावांना जे १ करोड रुपये एका सूटकेस मध्ये दिले ते ५० आणि १०० च्या नोटांमध्ये होते. त्यावेळी ५०० व १००० च्या नोटा असत्या तर ती बॅग किती लहान झाली असती नाही? Wink
खरे तर सर्व नोटांवर जुन्या नोटांवर अशोकस्तंभाच्या खाली ’सत्यमेव जयते’ लिहिलेले असायचे. पण मी पाहिलेल्या काही ५० व बहुधा १०० च्या नोटांवर फक्त अशोकस्तंभ होते, सत्यमेव जयते नाही. ह्याच ५० व १०० च्या नोटा हर्षद मेहतानी वापरल्या होत्या का?
आता सर्व नोटांवर महात्मा गांधींचे चित्र असते. मला नेहमी प्रश्न पडायचा फक्त महात्मा गांधीच का हो? बाकी नेते का नाहीत? पण आता वाटते ते ही बरे आहे नाहीतर पुन्हा आमच्या नेत्याचे चित्र ठेवा म्हणून लोक आंदोलन करतील. आणि पुन्हा आपले नुकसान. पण एक वाईट वाटते, की मग एक ५०० किंवा १००० रूपयांच्या नोटेचा उल्लेख 'एक गांधी खर्चावा लागेल' असा लोक करतात. निदान आधी १०० रू.च्या नोटेला हरी पत्ती किंवा हिरवी नोट म्हणायचे. त्यावरून खर्च जास्त आहे हा अंदाज यायचा.

बरं, ह्या मोठ्या नोटा वापरायचे म्हणजे ज्या अडचणी येतात त्या पहा.
मोठ्या नोटा असल्या तर त्यांचे आकारमान लहान होते. म्हणून मोठी रक्कम बाळगताना असतानाची धास्ती वगळून इतर पाहूया.
सर्वात पहिली अडचण म्हणजे.. आठवा, तबू व ॠषी कपूरचा 'पहला पहला प्यार' सिनेमा. तबू नेहमी ५०० ची नोट समोर करत असते. त्यामुळे नेहमी ॠषी कपूरलाच पैसे भरावे लागतात. तसेच संजीव कुमारचा कुठलासा सिनेमा होता, त्यातही त्याच्याकडे सुट्टे नसल्याने नायिकेला प्रत्येक ठिकाणी पैसे भरावे लागतात. हाच प्रसंग मग फिर हेराफेरी ह्या सिनेमातही उचलला होता.
हं, तर पहिली अडचण सुट्टे पैसे मिळण्याची. त्यामुळे मी आपला बाजारात जाताना बहुतेक वेळा सुट्टे किंवा वेगळ्या शब्दांत म्हणायचे तर १० ते १०० रू.च्या नोटा ठेवतो. ५०० किंवा १००० ची नोट दिसली की लोक विचारतात, "सुट्टे नाहीत का हो?". आधी हीच गत १०० च्या नोटेची होती. रिक्षा वाल्यांना ५० किंवा १०० ची नोट दिली तर हीच अडचण. मग त्या नोटेचे सुट्टे करण्याकरीता खटपट. कोणीच सुट्टे नाही देत म्हटले तर मग नाइलाजाने काहीतरी खरेदी करावे लागते. पण काही लोकांना जास्त खटपट करावी लागत नाही. मी बहुधा अकरावीत असेन तेव्हाची गोष्ट. एका किराणा मालाच्या दुकानात मी काहीतरी खरेदी करायला गेलो होतो. तसे ते आमचे नेहमीचे दुकान. आमच्या कॉलनीत बहुतेकांच्या घरी त्याच दुकानातून सामान यायचे. पण मी जास्त कधी अशा मोठ्या नोटांचा प्रश्न त्यांना पडू दिला नाही. तर, तिथे माझ्या शेजारी राहणारा एक मुलगा आला. त्याने २ रुपयाची काही वस्तू घेतली. दुकानदाराला ५०० ची नोट देऊ का विचारले आणि त्या दुकानदाराने त्याला ४९८ रूपये परत केले. त्यावेळी मला त्याचे आश्चर्य वाटले होते. तरीही मी कधी तेवढा प्रयत्न नाही केला. असो, मी तर बहुतेक वेळा रिक्षा मध्ये बसल्यावर लगेच विचारतो, की बाबारे तुझ्याकडे १०० रू.चे सुट्टे असतील ना? उगाच नंतर मला (व काही वेळा त्यालाही अडचण) नको.
तसे म्हणायला गेलो तर लहान नोटा वापरताना उलट परिस्थिती ही असते. खिशात सुट्टे असले की लवकर संपतात, आणि त्यांचा हिशोबही लागत नाही. हॉस्टेलमध्ये असताना ह्याची पहिल्यांदा प्रचिती आली. १०० ची नोट असली की आपण विचार करतो की ही नोट मोडायची गरज नाही. जेवढे पैसे आहेत त्यात भागवून घेऊ. त्यामुळे पैसेही जास्त खर्च होत नाहीत. एकदा का ही नोट मोडली की मग उरलेले पैसे ही लवकर संपतील. म्हणून बँकेतून, किंवा इतरांकडून पैसे घेताना सांगायचो की, 'मला १० च्या नोटा देऊ नका. ५०/१०० च्या द्या.'

(माझी) दुसरी अडचण. खिशातील पाकिटात ह्या नोटा ठेवायचे म्हणजे तेवढे मोठे पाकिट पाहिजे. त्यामुळे नवीन पाकिट घेताना ५०० (व आता १०००) ची नोट ठेवून बघतो. आधी नाणी ठेवायला जागा (कप्पा) आहे का तेही बघायचो. पण नंतर नाण्यांमुळे पाकिटही जाड आणि जड वाटायला लागले तर तो नाद सोडून दिला. आजकाल तर पाकिट घेताना हे ही बघतो की ह्यात क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड ठेवायलाही किती जागा आहे.
तुम्ही म्हणाल की "नेहमी नोट मावेल असे पाकिट का घ्यायचे? नोट घडी करून ठेवायची ना मग?" अहो, पण जर नोट न दुमडताच चांगली ठेवता येत असेल तर का नाही? खरे तर आधी आम्हाला एक सवय होती, बाजारात जाताना आईने पैसे दिले की त्या नोटेची मस्त घडी पाडायचो. का ते माहित नाही. पण हळू हळू पण तेव्हा लवकरच ती सवय सुटली. बरे झाले सुटली ते. नाही तर उगाच आता अपराध्यासारखे वाटायचे की सरकार एवढे सांगते आहे की नोटा खराब नका करू आणि आपण सर्रास त्या कशाही वापरतो.

तिसरी आणि मोठी अडचण आहे ती फक्त माझी किंवा तुमची अशी एकट्या दुकट्याची नाही तर सर्वांचीच म्हणजे जनतेची,बँकांची तसेच सरकारची ही आहे. ती म्हणजे नकली नोटा. नुसते देशाबाहेरील काही लोक नाही तर भारतातील अंतर्गत शत्रूही नकली नोटा बाजारात आणून गोंधळ घालण्याच्या व स्वत:च्या फायद्याच्या प्रयत्नात असतात. त्यामुळे मोठ्या नोटा घेताना लोक पडताळून पाहतात.
भरपूर लोक तर ती नोट कोणी दिली त्याचा फोन नंबर नोटेवर लिहून ठेवतात. तरी बरे, आता नोटा लवकर गहाळ होऊ नयेत म्हणून रिझर्व बँकेनेच नोटांवर लिहिणे, स्टॅपलरच्या पिना वापरणे ह्यावर बंदी घातली आहे. नाहीतर बहुतेक नोटांवर टेलिफोन डायरी झाली असती Smile ठाण्याला पासपोर्ट कार्यालयाजवळ जे महाराष्ट्र वीज वितरणाचे कार्यालय आहे तिथे तळ मजल्यावर बिल वसूली केंद्र आहे. तिथे मी सूचना वाचली होती की "५०० च्या नोटेवर ग्राहकाने आपला दूरध्वनी क्रमांक लिहून ठेवावा". स्वत: सरकारचीच खाती ह्याचे पालन करत नसेल तर काय म्हणावे.

आणि एक आहे हो, बहुतेक लोक ही नोट दिसली की पडताळून पाहण्याकरीता प्रकाशात धरून पाहतात. सर्वांनाच त्यात किती कळते ही शंका आहे. मला एवढे माहित होते की जुन्या नोटांमध्ये एक चांदीची तार असायची, ती नोटेत आहे की नाही हे लोक पहायचे. तसे ती तार काढण्याचे प्रकार बहुतेक लोक करायचे. मी ही १ २ वेळा तसा सफल प्रयत्न केला आहे (लहानपणी. उगाच आता माझ्यावर संशय नको). शासनाला किंवा लोकांना फसविण्याकरीता नाही, तर असे करता येते का ते पाहण्यासाठी. ती नोट व तार मी सांभाळून ठेवली होती, आता नाही मिळत Sad. पण आता तेही नाही. सरकारने तशी तार ठेवलीच नाही. पण एक ’RBI भारत’ लिहिलेली चांदीची वेगळीच चपटी तार गूंफून ठेवली आहे.

हं, तर ही खरी नोट कशी ओळखायची? त्याकरीताही सरकारने माहितीपत्रके काढली आहेत. आता एवढे सर्व आपण नेहमीच पडताळून पाहत नाही. मला माहित असलेल्या गोष्टी म्हणजे ती चांदीची तार, नोटेच्या डाव्या बाजूला असलेले त्रिकोण, चौकोन. त्या भूमीतीय आकृत्या थोड्याशा उंच राहतील अशा छापल्या असतात. जेणेकरून दृष्टीने अधू असलेल्या लोकांना त्या आकारांच्या स्पर्शाने ती नोट कोणती आहे ते ओळखता येईल. मी दादर-ठाणे लोकल मध्ये एका अंध पुस्तक विक्रेत्याची नोट कोणती आहे ते ओळखण्याची वेगळीच कला पाहिली. त्याने ह्या आकारांचा उपयोग केला की नाही माहित नाही पण त्याने नोटेची लांबी-रूंदी मोजून ती नोट १० ची आहे की २० ची ते पडताळले होते.
माझ्या एका मित्राने नकली नोट ओळखायची एक शक्कल लढविली. खरे तर तसे काही नव्हते पण उगाच गंमत म्हणून. काय तर, ती नोट गोळा केल्यासारखी केली व टेबलावर आपटली. उचलून म्हणाला "चष्मा फुटला असेल तर ही नकली नोट आहे, नाहीतर असली नोट."
गंमती करायला तर तशा भरपूर आहेत. ते नाही का, एखादी नोट दोरा बांधून ठेवून रस्त्यावर ठेवायची. कोणी ती उचलायला गेले तर तो दोर्‍याने ती नोट ओढायची वगैरे वगैरे.

आता नोट नेमकी कशी छापतात ते मला माहित नाही. पण सिनेमात तर हे लोक नकली नोटा छापण्याकरीता उसाचा रस काढायच्या यंत्रासारखे यंत्र किंवा मग लोखंडी ठसा वापरतात. आपला हिरो मग त्या ठशाची विल्हेवाट लावण्याकरीता मारामारीही करतो.
ह्यावरून आठवले. एक माणूस नकली नोटा छापत असतो. तो एकदा १५ रू. नोट छापतो. पण नंतर त्याला कळते की १५ रू. ची नोट काही चलनात नाही. तरीही तो प्रयत्न करतो. एका पानवाल्याकडे जातो. त्याला म्हणतो ’मला १५ रू.नोटेचे सुट्टे पाहिजे आहे.’ पानवाला म्हणतो, ’सुट्टे मिळतील पण मी एक रूपया कमी देईन.’ हा माणूस विचार करतो, '१४ तर १४ रू. नोट तर चालते आहे.' तो म्हणतो ’दे मला १४ रू.’ तर पानवाला त्याला ७ रू च्या दोन नोटा परत करतो.

बरं, नोटा सांभाळून ठेवणे हे ही एक वेगळेच काम. आधी तर मला सवय होती की नोटा वरच्या खिशात ठेवायचो. अर्थात १०० च्या वगैरे नाही पण ५, १० , २० च्या. खरं तर दहावी/ बारावी पर्यंत तेव्हा एवढ्या मोठ्या नोटा जवळ बाळगायचोच नाही Wink जर नेमके माहित असेल ह्यांची गरज आहे तरच. एकदा लोकलमधून कॉलेजला जात होतो. तेव्हा दरवाज्यात लटकून उभा होतो. पाहतो तर बाजूच्या माणसाने अलगदपणे बोटांनी माझ्या खिशातील नोटा काढायचा प्रयत्न केला होता. माझ्या नेमके लक्षात आले आणि मी त्याच्यावर रागावलो.
तसेच काही वेळा खिशात नोटा राहिल्या तर त्या शर्ट पँट सोबत धुवायलाही जातात. आधी हाताने कपडे धुतले तर त्या नोटेची पार वाट लागून जायची. आता तसे नाही. धुलाई यंत्रामध्ये कपडे धुताना जर नोट राहीलीच तर ती फक्त ओली होते, थोडीशी खराब होते. मग बाहेर काढून ती सुकवायची. किंवा मग इस्त्री करायची. नोटेला इस्त्री केली की किती मस्त कडक होते ना ती Smile. अर्थात त्याला नवीन कोर्‍या नोटेची सर नसते तो भाग वेगळा.
आणखी थोडे वेगळे प्रकार म्हणजे, नोट पुस्तकात ठेवायची सवय. त्यामुळे भरपूर वेळा एखाद्याला पुस्तक दिले तर त्या नोटा सोबत जाण्याची भीती. माझ्या एका मैत्रीणीने तर एकदा घरातील रद्दी कागदे फाडताना एका वहीतील दहा रूपयांची नोटही चूकून फाडली होती. Sad त्यामुळे मग मी नोटा फक्त खिशातील पाकीटात ठेवणे सुरू केले. तरी आता पुन्हा खिशात पैसे ठेवायला लागलोय. बदलायला पाहिजे ती सवय. Plain Face

तुम्ही नोटा घेतल्यावर कशा प्रकारे मोजता हो? डाव्या हातात बंडल पकडून उजव्या हाताच्या अंगठा व मधल्या बोटाने एक एक नोट वेगळी करून डाव्या हाताच्या अंगठा व तर्जनीने डाव्या हातात घेत मोजायची की डाव्या हातात पूर्ण बंडल पकडून एक एक नोट उजव्या हातात हस्तांतरीत करायची? की आणि काही? काहीही असो, सर्वच पद्धतीत नेमक्या नोटा मोजताना दमछाक होतेच. काही वेळा नोटा चिकटलेल्या असल्यामुळे गोंधळ होऊन जास्त नोट जाण्याची भीती. अशा परिस्थितीत आपल्याला एखादी नोट जास्त आली की खूष व्हायचे आणि आपल्या हातून एखादी नोट जास्त गेली की दु:खी व्हायचे. आपण नेहमी बँकेतून नोटा घेताना नीट मोजून घेतोच. एकदा आम्हाला दहाच्या नोटांच्या बंडलात २ नोटा जास्त आल्या. आम्ही लगेच त्या रोखपालाला सांगितले. नाहीतर काय हो? आपल्याला एखादी नोट कमी आली की आपण लगेच तक्रार करतो, मग त्यांनी चुकून जास्त नोटा दिल्या तर सांगायला नको? आता तरी बँकांकडे नोटा मोजायचे यंत्र आले आहे. त्यामुळे ह्यातील चुका नगण्य झाल्या आहेत. नगण्य ह्याकरीता म्हणालो कारण मी स्वत: ह्या यंत्रांनीही एखादी नोट कमी मोजल्याचे पाहिले आहे. त्यामुळे एटीएम मशीनमधून एखादी नोट जास्त मिळाल्याचे (५०० किंवा १००० हं, कारण आजकाल ह्याच नोटा जास्त मिळतात एटीएम मधून) स्वप्नही आपण पाहू शकतो.

असो, माझे नोटापुराण एवढेच. पण पुन्हा कोणी समारंभात नोटांचा हार बनवून किंवा दहीहंडी वगैरे ठिकाणी नोटा लटकावून ठेवत असेल तर तक्रार करण्यासोबत हे नोटापुराण त्याला ऐकवायचे ही विसरू नका. Wink

तसेच आमचे नाणेपुराण येथे वाचता येईल.

(हाच लेख माझ्या अनुदिनीवरही वाचता येईल)

कंहाभारत आणि सरकार राज

मी मिसळपाववर नवा आहे आणि थोडाफार लिहायचा प्रयत्न करणार आहे. काही चुका झाल्या तर निदर्शनास आणून देऊन योग्य मार्गदर्शन करावे.

काल देवदत्त यांनी लिहिलेला पौराणिक कथांवरील लेख वाचला आणि youtube वर नव्याने सुरू झालेलं महाभारत (की कंहाभारत म्हणावं? ) पाहिलं. या मालिकेच्या दिग्दर्शकानं सरकार राजच्या रामूकडून ट्रेनिंग घेतलेलं दिसतंय. तसेच शिवाजी नागरे हे दररोज नवी लुंगी वापरत असल्याने त्यांच्या वापरलेल्या काळ्या लुंग्यांपासून कंहाभारतातल्या सगळ्याच पात्रांचे कपडे बनवलेत असा माझा ठाम विश्वास आहे. सगळ्यांना काळे कपडे घालायला लावण्यामागे दुसरे काही कारण असू शकते असं मला वाटत नाही. सरकारराज चा दुसरा प्रभाव म्हणजे मालिकाभर पसरलेला अंधार अन वेगवेगळ्या angles मधून दाखवलेले न दिसणारे पात्रांचे चेहरे. मालिका बघताना घरातले दिवे लावण्याची प्रेक्षकांनी दक्षता घ्यावी. तसेच "गोविंदा गोविंदा" नाही पण तसेच काहीसे कोरस मधले कर्कश पार्श्वसंगीत म्हणून वापरले आहे. द्रौपदीच्या भूमिकेतील नटी अभिनयाच्या नावाखाली नुसती चिरकत/किंचाळत होती. आणि बाकी सगळ्यांचा अभिनयसुद्धा अगदीच सुमार. तुम्ही पहिली का हि मालिका, तुम्हाला बघून असेच काही वाटले का?

अखेर धमाल्याचं 'वाजवा रे वाजवा' वाजलं! :)

तर मंडळी,

आज सकाळीच शिवाजीनगर स्टेशण (भें.. शुलेची ऐशीतैशी!) व परिसरात 'मुंबईहून कुणीतरी बडी असामी येणार आहे बॉ!' अशी लोकांची चर्चा चालली होती. कारण डॉक्टर दाढे आणि पेठकर आपापल्या गाड्या घेऊन महामहीम तात्यासाहेब अभ्यंकरांना प्रेमाने उतरवून घ्यायला आले होते. हां, आता आपण आपलं स्वत:ला महामहीम वगैरे म्हणून घ्यायचं, अहो पण कसला आलाय डोंबलाचा महामहीम? या दीडदमडीच्या तात्याला त्या शिवाजीनगगर फलाटावरचं कुत्रंदेखील ओळखत नव्हतं! Smile

तर ते असो.. !

ठरल्याप्रमाणे पेठकरशेठ, तात्या अन् डॉ प्रसाद दाढे काटा किर्र् मध्ये मिसळ खायला गेले. मिसळ बाकी खरोखरंच फसकिल्लास होती. मिसळीचे पैशे पेठकरशेठने दिल्यामुळे ती अजूनच फसकिल्लास लागली! म्हणतात ना, फुक्कट ते पौष्टिक आणि फुकट तिथे बापट! Smile

त्यानंतर मला आणि प्रसादला पेठकरशेठ त्यांच्या घरी घेऊन गेले. तिथे पेठकर वहिनींनी फर्मास चाय पाजून आमचं आदारातिथ्य केलं! आमच्या पेठकरवहिनी म्हणजे खरंच अगदी साधी अन् सोज्वळ बाई हो! मी तर नेहमी एक स्वगत म्हणत असतो ते आत्ताही म्हणून घेतो,

"आमच्या डांबिस प्रभाकरला एवढी साधी अन् सोज्वळ बायको मिळाली तरी कशी? गेल्या जन्मी गंगेच्या कुठल्या किनार्‍यावर एका पायावर उभं राहून तप केलं होतन देव जाणे!" Smile

तर ते असो...!

पेठकरांकडचं चहापाणी झाल्यावर आमची वरात मग धम्याच्या लग्नाच्या हॉलकडे वळली.

मिपावर गेले अनेक दिवस गाजत असलेलं धम्याचं लग्न अखेर थाटामाटात पार पडलं! आम्हा काही मिपाकरांच्या उपस्थितीमुळे त्या लग्नाला विशेष शोभा आली हे वेगळे सांगायला नको! (साला इथेही आमचीच लाल!) Wink

त्या लग्नाचा सचित्र वृत्तांत आम्ही येथे देत आहोत. हलकटसुमारांच्या, सॉरी, केशवसुमारांच्या या काथ्याकुटात यात्रीने हायलाईटस् दिलेच आहेत. सबब आता आम्ही येथे थोडसं विवेचन करून चित्रे देत आहोत....

१) धमाल्याला कुणीतरी लग्नाला आणत आहे! बहुतेक मुलीकडचे कुणीतरी असावेत. बळीचा बकरा हार-मुंडासं-मुंडावळ्या बांधून दिसतोय पाहा कसा! Smile

२) रुखवत! मला त्यातली ती बैलाची जोडी असलेली बैलगाडी फार म्हणजे फारच आवडली बुवा! मस्तच होती...! Smile

३) लग्नाला उपस्थित मिपाकर! (चेहेर्‍यावरून कोण सर्वात अधिक हलकट आहे ते ओळखा पाहू! पण जाऊ दे! नकाच चुकीचे अंदाज बांधू! आम्ही सगळे एकाच माळेचे मणी आहोत!) Smile

डावीकडून - आनंदयात्री (याची हेयरष्टाईल आपल्याला जाम आवडली बॉ!), डॉ दाढे (एक सज्जन दंतवैद्य. आज मला पुण्यात एशी गाडीतनं फिरवल्याबद्दल तर फारच सज्जन अन् भला माणूस! Smile, फौजदारसाहेब नीलकांत, इनोबा, टकल्या विजूभाऊ, इंटिलिजंट (म्हणजे स्वत:ला तसं समजणारा!) मनीष, मास्तर, मिपावर वाट चुकलेला एक नमोगती चित्तोबा, पेठकरशेठ, हककट अन् बाईलवेडा कोकणी तात्या, आणि भाईकाकांचा सख्या गटणे!

४) आम्हा मिकाकरांसोबत पेठकर वहिनी. प्रभाकर पेठकर मिपावर ज्या छान छान पाकृ टाकतात, त्या वास्तविक त्यांच्या असतात. पेठकर मात्र मधल्यामध्ये भाव खाऊन जातात! Smile

५ अ) श्री व सौ पेठकर, कुमार तात्या अभ्यंकर, व सखाराम गटणे - लक्ष्मी-नारायणाच्या जोड्यासमवेत ष्टेजवर!
धमाल्या, लेका हा फोटू जपून ठेव हो. अजून काही वर्षांनंतर लोक आश्चर्याने विचारतील, "अरे वा! तुमच्या लग्नाला साक्षात तात्या अभ्यंकर आले होते? तुम्ही कित्ती कित्ती लकी! Smile

ब) यात डॉ दाढ्यांच्या शेजारी डोमकावळा उभा आहे! छत्रपतीही दिसतोय! Smile

६) तेवढ्यात त्या हॉलमधली एक पुणेरी पाटी विजूभाऊंनी टिपली! Smile

७) वदनी कवळ घेता, नाम घ्या श्रीहरीचे! आम्रखण्ड, गुलाबजामून, पुर्‍या, टोमॅटो सूप, मटकीची उसळ असा फर्मास बेत होता!

८) मंडळी जेवायला बसली आहेत! Smile

९) आणि हा लाष्ट फोटू.. सखाराम गटणे आणि तात्या अभ्यंकर.

बराय तर!

आपला,
(वृत्तांतकार) तात्या अभ्यंकर.

एका गोष्टीची गोष्ट...( नाट्यलेखनतंत्राबद्दल थोडंसं) भाग तिसरा : संघर्ष

एका गोष्टीची गोष्ट...( नाट्यलेखनतंत्राबद्दल थोडंसं) ... भाग पहिला. प्रिमाईस
एका गोष्टीची गोष्ट...( नाट्यलेखनतंत्राबद्दल थोडंसं) ... भाग दुसरा : प्रमुख व्यक्तिरेखा
एका गोष्टीची गोष्ट...( नाट्यलेखनतंत्राबद्दल थोडंसं) भाग तिसरा : संघर्ष

आता एक गोष्ट बघू...
एक मुलगा सकाळी उठून शाळेत जातो , त्याचा रिझल्ट कळतो, त्याला शाळेत पहिला आल्याबद्दल बक्षीस मिळतं आणि तो आनंदानं घरी येतो.

ओके..गोष्ट बरी आहे, पण मला त्यातून का मजा येत नाही?
त्यात अजिबात संघर्ष नाही...
शाळेत पहिला आला नाही तर काय होईल ते कळत नाही...
व्हॉट इज ऍट स्टेक? काय पणाला लागलंय?

एका दुसर्‍या मुलाने खूप स्पर्धा निर्माण केली आहे आणि पहिला नंबर येणार्‍या मुलाला दिल्लीला विज्ञान प्रदर्शनात थेट जायला मिळणार आहे...
किंवा त्याला वडिलांनी कबूल केलं आहे की पहिला आलास तर या वर्षी सगळे सिंगापूरला जाऊ.
किंवा तो नेहमी पहिला येतो पण या परीक्षेच्या वेळी त्याचे वडील खूप आजारी होते आणि त्याने पहिलं यावं अशी त्यांची शेवटची इच्छा होती...ते त्याला पूर्ण करायलाच हवी..
ही झाली प्रेरणा...ध्येय म्हणजे नातेसंबंध टिकवणे,स्वाभिमान जपणे ...अडचणी म्हणजे तीव्र स्पर्धा, वडील आजारी, पेपर अवघड निघणे वगैरे...पहिला नंबर आणणे ही झाली कृती...
______________________

कोणत्याही गोष्टीसाठी सर्वात महत्त्वाचा भाग... संघर्ष नसला तर कोणतीही गोष्ट रटाळ, कंटाळवाणी होणार..
उदा.
i] एखादं पात्र गरज नसताना, कोणीही विचारलं नसताना त्याच्या आयुष्याबद्दल माहिती देत राहतं..
ii]स्थलकाल, इतिहास, निसर्ग याबद्दल अति माहिती देणं.. लेखकाचं जास्त संशोधन झालं असलं की त्याला ते सारं गोष्टीत आणावंसं वाटतं.
iii]गरज नसताना नवनवीन पात्रं फ़क्त विनोदनिर्मितीसाठी आणली जातात, अशाचा जाम कंटाळा येतो.

या चुका कशा सुधाराव्यात?
i]पात्रांची माहितीसुद्धा संघर्षातूनच मिळावी. ( उदा.एखादं पात्र आरोप करतंय, प्रश्न विचारतंय आणि दुसरं पात्र काहीतरी लपवालपवी करतंय, त्यातून होणार्या संघर्षातून पात्रांची माहिती मिळावी)..
ii]वाचकाला किंवा प्रेक्षकाला समोर घडणार्या घटनांसंदर्भातच रिलेव्हंट माहिती अपेक्षित असते, उगाच ऐतिहासिक , नसर्गिक गोष्टींच्या खोलात शिरण्याची गरज नाही.
iii]पात्रांची संख्या मर्यादित असूद्या., एखाद्या प्रसंगामुळे / दृश्यामुळे / व्यक्तिरेखांमुळे मुख्य पात्रांच्या नातेसंबंधांमध्ये काहीही बदल होत नसेल, तर मुख्य थीमशी संबंधित नसलेले अनावश्यक प्रसंग सरळ निर्दयपणे कापून टाकलेले उत्तम.

संघर्षाचे काही प्रकार

आंतरिक संघर्ष : इच्छा, हक्क आणि कर्तव्य यासंदर्भात
मनातलाच बर्यावाईटाचा संघर्ष
बर्याचदा हा संस्कारासंदर्भात असतो.
बाह्य संघर्ष : व्यक्ती आणि नातेसंबंधातला संघर्ष
पठडीतला हीरो आणि व्हिलन यांच्यातला संघर्ष

समाजामधले इतर संघर्ष : व्यावसायिक / राजकीय / जातीय / धार्मिक
___________________________________________________
आणखी एक वेगळ्या प्रकारचे वर्गीकरण मी ऐकले ..त्यावरून माझ्या आवडत्या सिनेमामधली थेट उदाहरणेच देतो..

१. शक्ती... ..दिलिपकुमार आणि अमिताभ यांच्यात आंतरिक संघर्ष ...वडील आणि मुलगा दोघे प्रोटॆगनिस्टच पण त्यांच्यातला संघर्ष अधिक गडद. आणि बाह्य संघर्ष तो (अमिताभ + दिलिपकुमार) आणि अमरीश पुरी यांच्यात. इथे अमरीश ऎंटागनिस्ट...साधारणपणे ऎंटागनिस्ट बाह्य संघर्षाचे कारण असतो..आणि अमिताभच्या मनातले द्वंद्व म्हणजे अंतर्गत आंतरिक संघर्ष...!!?

. सरफ़रोश : पोलीस ऒफ़िसर आणि आतिरेकी यांच्यातला बाह्य संघर्ष पण अजय राठोड आणि सलीम यांच्यातला आंतरिक संघर्ष
...आणि या आतिरेकी कटाचा सूत्रधार अजय राठोडच्या ओळखीचा पाकिस्तानी गायक असणं, ही वाढती गुंतागुंत आणि शेवटी याला मारू की नको असा अजय राठोडचा अंतर्गत आंतरिक संघर्ष !!!?

३. मला अजिबात न आवडलेला सिनेमा ... मैं प्रेम की दीवानी हूं... ( हाहाहाहाहा) .....
राजश्री फ़िल्म्स च्या साधारणपणे सगळ्याच फ़िल्म्समध्ये संघर्षच आधी खूप कमी... सगळं गोग्गोड... बरं असलाच तर कोणीतरी आजारी पडतं, अपघात होतो,पत्र उशीरा मिळतं आणि गैरसमज होतो असला नियतीवर आधारलेला योगायोगी बाह्य संघर्ष... त्यात अगदीच दम नसतो असं माझं वैयक्तिक मत.

४. काही आंतरधर्मीय विवाहाचे सिनेमे... यात पोरांचे आई-बाप अगदी ऎंटागनिस्ट दाखवले जातात बर्‍याचदा... मग त्यामुळे तेच बाह्य संघर्ष आहेत असे वाटायला लागते, मग शेवटी ते यांना माफ़ वगैरे करतात हे पचनी पडत नाही... त्यासाठी आधीच आईबापांचा विरोध हा आंतरिक संघर्ष मानला पाहिजे , आणि सामाजिक परिस्थितीचा त्यांच्यावरचा दबाव हा बाह्य संघर्ष..

संघर्ष कसा वाढवावा?

नुसतंच टोमणे मारणं, किरकिर करत भांडणं म्हणजे संघर्ष नव्हे..त्यातून काहीही बदल घडत नाही. प्रोटॆगोनिस्टच्या अडचणी व संकटं वाढवत नेणारा, त्याला अधिकाधिक संकटात पाडणारा संघर्ष हवा.त्यासाठी व्यक्तिरेखांवर दबाव वाढत जायला हवा..

काय पणाला लागलंय? ध्येय गाठलं नाही तर काय संकट येणार आहे हे ठरणं महत्त्वाचं..

आयुष्य, प्रेम, संपत्ती, आरोग्य, स्वाभिमान जेव्हा यावरच संकट कोसळतं तेव्हा मग मुख्य पात्र निकराने झगडतं... आपलं ( प्रेमाईसनं ठरवलेलं ) ध्येय गाठण्यासाठी अविश्रांत मेहनत करतं...
आणि या संघर्षातूनच त्याच्यात मोठा बदल घडतो आणि त्यातूनच ते पात्र धडा शिकतं... ( हेच ते तात्पर्य / कथाबीज)

हीरोला अधिकाधिक अडचणीत आणण्यासाठी मुख्य गोष्टीमध्ये काही उपकथानकं ( सबप्लॊट्स) तयार करता येतात.
परंतु ही उपकथानकं मुख्य गोष्टीला विरोध करणारी किंवा पाठिंबा देणारी किंवा त्यासाठी वाचकाला तयार करणारी म्हणजेच संबंधित हवीत.. उदा. खूनी शोधायच्या कथेत डिटेक्टिव्ह हीरो खुनी स्त्रीच्या प्रेमात पडला की गुंतागुंत झालीच.

संघर्ष वाढवण्यासाठी आवश्यक असलेले प्लॊट मोटिव्हेटर्स.
सूड, संकट,पाठलाग, द्वेष,प्रेम,दु:ख, वियोग, बंडखोरी, फ़सवणूक,स्वार्थत्याग, छळ, स्पर्धा, संशोधन,महत्त्वाकांक्षा, सर्व्हायव्हल.

प्रेरणा ध्येय अडचणी कृती

संघर्ष गडद करण्यासाठी प्रेरणा ध्येय अडचणी कृती या गोष्टी सतत चढत्या भाजणीने घडाव्या लागतात.

आता हे एक वाक्य बघू... (सुनील शेट्टी / सनी देओल यांच्या सिनेमात नेहमी असणारी परिस्थिती)
आपल्या वडिलांवरील चोरीचा आळ घालवण्यासाठी अर्जुनला एका साक्षीदाराला घेऊन न्यायालयात वेळेवर पोचणं आवश्यक आहे, हे माहित असल्याने राणाठाकूर आपल्या गुंडांना अर्जुनला अडवायला पाठवतो, अर्जुनला हे आधीच कळल्याने तो त्यातल्या काहींना गुंगारा देतो आणि न्यायालयाबाहेर उरलेल्यांशी तुफ़ान हाणामारी करून साक्षीदाराला न्यायालयात वेळेत पोचवतो आणि वडिलांना वाचवतो... .

आता या वाक्याचे तुकडे पाडू...

प्रेरणा : वडिलांवरील चोरीचा आळ घालवण्यासाठी
ध्येय : साक्षीदाराला घेऊन न्यायालयात वेळेवर पोचणं आवश्यक
अडचणी : गुंडांना अर्जुनला अडवायला पाठवतो
कृती : गुंगारा आणि हाणामारी

motivation goal obstacles action या गोष्टी योग्य क्रमाने घडत राहिल्या की व्यक्तिरेखासुद्धा फ़ुलतात, संघर्ष उत्कर्षबिंदूला पोचतो...

वळु