टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
तंत्र
संगणक उद् बोध
प्रेषक अरुण मनोहर ( शनी, ०५/१०/२००८ - १३:२८) .श्री गणेशायः नमः
नारद म्हणे नर्ड मुनीवर
शंका अजाणांच्या करा दूर
सोपे करून सांगा सत्वर
संगणकाचे गूढ
नारदा भक्तीभावे श्रवण कर
संगणक महान अवतार
आला कराया जगाचा उद्धार
नर्ड म्हणे सांगी जनास रे
वसतो साता समुद्रापार
बाल फाटक ऋषी थोर
उघडली विश्वात घरोघर
सुक्षमृदू गवाक्षे
संगणकी गवाक्षामधून
घडते विश्वाचे दर्शन
शोधुन काढी महाज्ञान
गुगल ऋषींच्या कृपेने
उघडी गवाक्षे एकामागे एक
वेगळे रूप धरी प्रत्येक
करी कामे झणी कित्येक
मानव जणू बहुमेंदूंचा
जे मूढ आधाशी होती
अमाप खिडक्या उघडती
खचीत संगणका लोळवती
कोसती फाटक ऋषीला फुका
जगी पसरले संगणक जाल
जोडून महामार्ग विशाल
ज्ञानसरीता वाहे खळखळ
माहीतीचा महापूर
जालात वेचीता ज्ञानकणांते
भेट देता अनोळखी स्थळाते
राही सदैव सावधान चित्ते
विषाणू कवच घालोनी
जालात माजले विषकांड
किडे विषाणू अंदाधुंद
करीती संगणका जेरबंद
कवचास छेद पाडोनी
जरी कधी विषाणू अघोर
संगणका करीती बेजार
विषाणू मारक मात्रा तत्पर
तव मेंदूत भरावी
नारद म्हणे नर्ड मुनीवर
ऐकोनी संगणक विचार
प्रश्न छळती मजला फार
संगणकाचे गूढ कैसे?
नर्डमुनी करीती विवेचन
संगणक तर्कशक्ती महान
आत्मा करी तार्कीक विवेचन
अब्ज अब्ज कार्ये पळभरी
स्मरणकेंद्रे सक्षम फार
तर्ककेंद्रा पुरविती तत्पर
माहितीचा प्रवाह घनघोर
विसरती ना कधी
चक्र फिरे संगणक अंतरी
लिहीलेले तयाच्या कायेवरी
वाचती अंगुली झरझरी
महाज्ञान साचवले
विचार मांडतो पटलावर
वाचितो मुद्रीते भरभर
पाहतो टंकलिखीत अक्षर
उंदराने चुचकारीता
मिसळपाव भक्षीती
आपसात वाटीती
कोणा मिरच्याही झोंबीती
जालात चरता चरता
ऐसा संगणक महाज्ञानी
कथीयले नारदा नर्ड मुनी
विश्वक्रांती आणि घडवुनी
समजोनी घे रहस्य पै
ॐ शांती: शांती: शांती:
गटवार तात्काळ चर्चा अर्थातच चॅटींग.
प्रेषक कलंत्री ( सोम, ०५/०५/२००८ - १८:२५) .मिसळपाव या संकेतस्थळाने अनेक विषयात आघाडी घेतली आहे. तात्काळ आणि तात्काळीक चर्चा म्हणजेच चॅटींग असे एक शिरपेच मिसळपाव वर असावा असे मला वाटते.
खरडवही मध्ये एकास एक अशी चर्चा होते आणि ती इतरांना पाहता / वाचता येते.
व्यक्तिगत निरोप ( पोस्टहापिस) हे दोघातील संवादाचे चांगले रुप आहे.
काथ्याकूट, जनातलं, मनातलं हे संकेतस्थळावरचं दिर्घवेळ आणि स्थायी असणारे रुप आहे.
प्रस्तावित चॅटींग मध्ये एखाद्या वर्तमानपत्राचा दुवा, राजकिय बातम्या, काही शिफारसी इत्यादी चर्चीले जाऊ शकतात आणि दुसर्यादिवशी लगेच पुसलेही जाऊ शकतात.
बाकी माझ्या मांडणीत काही त्रुटी आहेत त्या विश्वकर्म्याशी अथवा सरंपचसाहेबाशी बोलतोच बोलतो.
या शब्दाला मिसळपाववाले काही झणझणीत शब्द सुचवतील अशी अपेक्षा आहे.
मराठी अभ्यास परिषद संकेतस्थळ
प्रेषक आजानुकर्ण ( शुक्र, ०५/०२/२००८ - ०९:१८) .- मराठीचा सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रयत्न करणे.
- लोकव्यवहारात मराठीचा वापर होण्यासाठी प्रचार करणे.
- ज्ञानव्यवहारात मराठीला प्रतिष्ठा प्राप्त करून देणे.
- मराठी भाषकांच्या भाषिक गरजा पूर्ण करणे
या उद्दिष्टांसाठी काम करीत असलेल्या 'मराठी अभ्यास परिषदेच्या' संकेतस्थळाचे काल मंगल महाराष्ट्रदिनी उद्घाटन झाले. सन्माननीय मिसळपाव सदस्य श्री. चित्तर यांनी या संकेतस्थळाची रचना केलेली आहे.
संकेतस्थळाचा दुवा: http://www.marathiabhyasparishad.com/
आंतरजालावर मराठी भाषेच्या प्रचाराच्या व प्रसाराच्या दृष्टीने हे आणखी एक नवे पाऊल ठरावे असे वाटते!
परिषदेतर्फे 'मराठी अभ्यास परिषद पत्रिका : भाषा आणि जीवन' त्रैमासिक १९८३ पासून नियमितपणे प्रकाशित होते.
ह्या नियतकालिकाला महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार (१९९५) प्राप्त झाला आहे. मराठी ज्ञानक्षेत्रात प्रतिष्ठा लाभलेल्या हे त्रैमासिक भाषेला वाहिलेले एकमेव नियतकालिक आहे.
भाषाविषयक सैद्धांतिक विचारविमर्श, भाषांतरित साहित्याची चिकित्सा, भाषा आणि जीवन यांतील अनेकपदरी संबंधांची निरीक्षणे आणि त्यावरील भाष्य यासोबतच अनेक चुरचुरीत सदरे मासिकात वाचायला मिळतात.
संकेतस्थळाच्या माध्यमातून मासिकात पूर्वप्रसिद्धी मिळालेले काही निवडक लेख पुनर्प्रकाशित करण्यात येतील.
या संकेतस्थळाला अवश्य भेट द्यावी. आपल्या मित्रमंडळींनाही अवश्य सांगावे.
काही सूचना, प्रतिक्रिया, अभिप्राय असल्यास अवश्य कळवावेत. ही विनंती.
अनुस्वार ....
प्रेषक उदय ४२ ( सोम, ०४/२८/२००८ - २०:५८) .शब्दावर अनुस्वार कसा द्यावा?कुणी सान्गेल का?
भगीरथाचे वारस!
प्रेषक प्रमोदकाका ( शुक्र, ०४/२५/२००८ - ०९:५९) .पाणी म्हणजेच जीवन असे आपण म्हणतो. पण आपल्याला मिळणारे पाणी कुठून येते? कसे येते? वगैरे प्रश्न आपल्याला कधी पडलेत काय? पडले असल्यास त्याची माहिती आपण कधी मिळवण्याचा प्रयत्न केलाय काय? काही अपवाद सोडल्यास आपण एकूण सगळेच जण त्याबद्दल फारसा विचार कधी करत नाही हेच खरे; मग पाण्याचा अभाव, म्हणून पडणारा दुष्काळ, दुष्काळपीडित लोक, त्यांच्यासाठी रोजगार हमी योजना वगैरे सारखी चालणारी सरकारी कामे वगैरेबाबत आपण कधी विचार करत असू असेही वाटत नाही. ह्याला कारण म्हणजे शहरी भागात न जाणवणारी पाण्याची टंचाई. त्याच्या उलट परिस्थिती खेड्यापाड्यात असते. विशेषतः उन्हाळ्यात, नदी, नाले, ओढे आटलेले असतात आणि मग तिथल्या आया-बायांना मैलोन-मैल पाण्यासाठी भटकावं लागतं; हे सगळे आपण वृत्तपत्रात वाचत असतो पण तरी त्याची म्हणावी तशी धग आपल्याला जाणवत नाही हेच खरे. अधेमधे कधी जलवाहिनी दुरुस्तीसाठी अथवा तलावात पाण्याचा साठा कमी आहे म्हणून काही टक्के पाणी कपात वगैरेची घोषणा महानगरपालिकेकडून झाली की आपल्याला त्याची तीव्रता कळते पण ती तेव्हढ्यापुरतीच असते.
पण ह्या जगात सगळेच काही आपल्यासारखे आत्मकेंद्रित आयुष्य जगणारे नसतात. पाणी सद्या जितक्या प्रमाणात आपल्याला उपलब्ध आहे त्याचा जर योग्य पद्धतीने आपण वापर आणि वाटप नाही केले तर भविष्यात पाण्यावरून युद्धे होतील असा गर्भित इशारा काही तज्ञांनी दिलेला आहे हे आपण वाचलेही असेल. काही लोक नुसतेच इशारे देतात, पण काही लोक केवळ इशारे देऊन स्वस्थ बसत नाहीत तर त्यावर तोडगा शोधण्यासाठी अविरत धडपडतात. त्यासाठी आपले आयुष्यही पणाला लावतात. अशाच पैकी एक आहेत 'पाणी पंचायत' चे विलासराव साळुंखे.
मुळातच पाणी पंचायत हा काय प्रकार आहे हे जाणून घ्यायचे असेल तर मग आपल्याला विलासरावांचा सगळा जीवनप्रवास माहिती करून घ्यायला हवा. पाणी अडवा,पाणी जिरवा, पाणी साठवा आणि त्याचे समान वाटप करा... थोडक्यात..पाण्याचे सुयोग्य नियोजन करणे असा जणू मंत्रच आहे विलासरावांच्या कार्याचा. वर म्हटल्याप्रमाणे खेड्यापाड्यात उन्हाळ्यात पाण्यासाठी होणारी परवड पाहिली आणि मग विलासरावांचे विचारचक्र सुरू झाले. त्यातून मग ह्या समस्येचा त्यांनी कसून अभ्यास केला तेव्हा लक्षात आले की सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडूनही महाराष्ट्रातला कैक भाग हा दुष्काळग्रस्त आहे. पावसाचे पाणी नदी,नाले -ओढ्यांतून वाहत जाऊन समुद्राला मिळते हे त्याचे एक कारण. दुसरीकडे जिथे हे पाणी मोठमोठ्या धरणात साठवले जाते त्याचे काय होते? ह्या प्रश्नाचा पाठपुरावा केल्यावर लक्षात आले की सरकारी योजनेमुळे ही जी मोठमोठी धरणे बांधली गेली त्याचा जास्तीत जास्त फायदा हा त्या त्या ठिकाणच्या सधन शेतकर्यांनाच झालाय. त्यातूनच भरपूर पाणी लागणारे ऊसासारखे पीक घेतल्यामुळे इतर लोकांपर्यंत पाणी पोचतच नाही. धरणाच्या आसपास असणारे शेतकरीच त्या पाण्याचे लाभार्थी ठरतात आणि इतरजण पाण्याअभावी शेतीच करू शकत नाहीत. म्हणजे एका मर्यादित भागाचा विकास तर बाकी सर्व भकास!
दुष्काळ निवारणार्थ सरकारने हाती घेतलेली पाझर तलाव निर्माण वगैरेसारखी कामे कशी चालतात. त्यात काय फायदे/त्रुटी आहेत वगैरे गोष्टींचा साधकबाधक अभ्यास त्यांनी केला. ह्यातूनच काही धडा घेऊन विलासरावांनी आपली योजना तयार केली. त्यात जमेल तिथे पाणी अडवण्यासाठी छोटे छोटे बांध बांधणे,पाणी साठवण्यासाठी तलाव सदृश खड्डे खणणे,जेणेकरून पावसाचे जास्तीत जास्त पाणी अडवता येईल असे धोरण आखले. अडवलेले,साठवलेले पाणी मग सर्वांना समान वाटून देणे. कमी पाण्यात होणारी पिके घेणे ... हे सगळे कसे करायचे त्याबद्दल योजना आखल्या. हे सगळे एकट्याच्या बळावर करणे वाटते तितके सोपे नाही म्हणून स्थानिक लोकांशी बोलून,त्यांना ह्या गोष्टीचे महत्त्व पटवून त्यात सहभागी करून घेतले. अर्थात हे काम इतक्या सहजतेने झाले नाही. कारण जे आजवर शक्य झाले नाही असले स्वप्न दाखवणारा हा माणूस खरंच काही करून दाखवू शकेल काय? आणि त्यात त्याचा काय स्वार्थ दडलाय? असे काही प्राथमिक प्रश्न तिथल्या स्थानिकांना पडणे स्वाभाविकच होते. पण अडून राहण्याचा विलासरावांचा स्वभाव नसल्यामुळे जे आले त्यांना बरोबर घेऊन त्यांनी काम सुरू केले. ह्या संबंधीचा पहिला प्रयोग त्यांनी पुरंदर तालुक्यातील नायगाव ह्या दुष्काळी गावामध्ये केला. तो कमालीचा यशस्वी झाला.तिथे निर्माण झालेली हिरवीगार शेती, वनसंपदा पाहून जो तो त्या प्रकल्पाला भेट द्यायला येऊ लागला आणि मग ह्यातून पुढे सुरू झाली पुढची वाटचाल,पुढली चळवळ!
मंडळी हे जितक्या सहजतेने लिहिले तितके सहज झालेले नाही. ही चळवळ पुढे कशी गेली, त्याला किती यश आले,सरकारने ह्या असल्या प्रयोगांना किती आणि कसे साहाय्य केले अथवा नाही. त्या त्या वेळच्या सत्ताधार्यांनी, विशेषतः लोकनेते म्हणून गाजलेल्यांनी कसा/किती प्रतिसाद दिला, लोकांनी ह्या चळवळीला किती उचलून धरले,विरोध केला हे सर्व जाणून घ्यायचे असेल तर मुळातूनच "भगीरथाचे वारस" हे वीणा गवाणकर लिखित पाणी पंचायतच्या विलासराव साळुख्यांच्या कार्यासंबंधीचे सचित्र कथन वाचायला हवेय.
पेश्याने विद्युत अभियंता असणारे विलासराव एक यशस्वी उद्योजक म्हणून प्रसिद्ध होते. परंतु आधी काही दिवस आपला व्यवसाय सांभाळून आणि नंतर आपली पत्नी आणि विश्वासू सहकारी यांच्यावर उद्योगाची जबाबदारी सोपवून पूर्णपणे त्यांनी ह्या कार्याला वाहून घेतले आणि हे करतानाच देह ठेवला.त्यांची ही कहाणी मुळातूनच वाचण्यासारखी आहे.
भगीरथाचे वारस
लेखिका: वीणा गवाणकर
राजहंस प्रकाशन,पुणे.
किंमत १६०रू.
मैत्री म्हणजे कांय?
प्रेषक उदय सप्रे ( सोम, ०४/२१/२००८ - ०९:१९) .मैत्री म्हणजे कांय?
समज तुला तहान लागली आहे.
समोर पाणी नाहिये , यावेळी मीही तुझ्यासोबत नाहिये.
अशा वेळी समजा तुझी तहान शमलीच , तर खुशाल समज की , मला तुझ्या घशाची कोरड जाणवली आहे आणि ती
मी माझ्याकडे ओढून घेतली आहे !
मैत्री म्हणजे कुणीतरी , कुणाची तरी ,
ओढून घेतलेली तहान आहे.
ते नातंच इतकं महान आहे , की ,
त्याला मैत्री हे शिर्षक खूपच लहान आहे !
मैत्री म्हणजे मला जाणवलेला
तुझ्या घशाचा कोरडा आहे !
ज्याला हे समजलं तो शांत आहे ,
इतरांचा मात्र मैत्रीच्या नावाने ओरडा आहे !
इंटरनेट ट्रेडींग
प्रेषक अभियंता ( शुक्र, ०४/११/२००८ - १५:५७) .सध्या इंटरनेट वर अशा अनेक साईट्स आहेत ज्यांच्यावर अनेक वस्तु विक्रीस ठेवलेल्या असतात. (उदा. रेडिफ, ईबे वगैरे). यासंबंधी मला पडलेले काही प्रश्न खाली लिहिले आहेत. त्यांची उत्तरे मला येथे मिळतील अशी आशा वाटते.
१] जर क्रेडीट कार्ड नसेल तर वस्तु विकत घेता येतात का? डेबीट कार्ड चालते का?
२] वस्तुच्या गॅरंटीबद्दल काय खात्री?
३] वस्तु घरी पोहोचेपर्यंत जर काही इजा झाली तर जबाबदार कोण? कंपनी रिप्लेसमेंट देते का?
उत्तर शोधायचे आहे!
प्रेषक ॐकार ( सोम, ०३/३१/२००८ - ०१:३१) .ओशो रजनिश यांच्या संत कबीरांवरील प्रवचनांचे भाषांतर वाचण्याचा योग आला. त्यात ओशोंनी पुढील दाखला दिला आहे -
एकदा चार बायका एक प्रसिद्ध सूफी संताकडे ज्ञानप्राप्तीकराता जातात आणि त्याने गुरू बनावे अशी विनवणी करतात. त्यांना त्याच्याकडून ज्ञान म्हणजे काय हे समजून घ्याअय्चे असते. परंतु सूफी संत मात्र तयार होत नाही. त्या बायका तश्याच दाराशी भुकेल्या तहानलेल्या बसून राहतात. अखेर त्याला त्यांची दया येते. तो त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवतो. परीक्षेत उत्तीर्ण होणार्या स्त्रीला शिष्या करून घेण्यास तो तयार होतो. तो प्रत्येकीला एकेकटीला एक प्रश्न विचारतो - "समजा तू ) ती स्त्री) आणि ५० पुरुष एका जहाजावर आहात. ते जहाज वादळात फुटले आणि तुम्ही सगळे एका निर्जन बेटावर येऊन पोहोचलात. त्या ५० पुरुषांपासून तू स्वतःला वाचवायला काय उपाय करशील?"
पहिली स्त्री कुमारिका. तिला ह्या कल्पनेनेच भीती वाटते. ती म्हणते - मी पोहत पोहत खोल समुद्रात जाईन आणि अखेर मरेन. मेले तरी बेहेत्तर पण त्या पुरुषांसोबत राहणार नाही.
तो संत तिला परत पाठवून देतो.
दुसरी स्त्री विवाहित. ती विचार करते आणि म्हणते - मी त्यातल्या सर्वात बलवान पुरुषाशी लग्न करेन, म्हणजे बाकी पुरुषांपासून माझे तोच संरक्षण करेल.
तो संत तिलाही परत पाठवून देतो.
तिसरी असते वेश्या - ती म्हणते - ह्यात मूळात समस्या आहेच कुठे. बचावाचा प्रश्नच कुठे येतो?
तो संत तिलाही परत पाठवून देतो.
चौथी विचार करते. थोड्या वेळाने म्हणते - मला ठाऊक नाही. ह्याबबतीत मी अज्ञानी आहे.
तो संत तिला आपली शिष्या म्हणून पत्करतो.
---
पहिल्या स्त्रीने आत्महत्या हा मर्ग निवडला. आत्महत्या हा कोणत्याच समस्येवरचा तोडगा नाही. दुसर्या स्त्रीने तिच्या अनुभवातून सर्वात बलवान पुरुष निवडण्याचा मार्ग सांगितला. पण एकटा बलवान पुरुष बाकी ४९ पुरुष एकत्र आले तर त्यांच्याशी दोन हात करू शकणार नाही. तिसर्या स्त्रीला तर ही समस्याच वाटत नाही. जे काही चालले आहे ते आलबेल आहे असे तिला तिचे अनुभव पटवून देत होते. ह्या सर्वांनी आपपल्या कुवतीनुसार उत्तरे शोधली होती. त्यांच्यामते त्या ज्ञानी होत्या. चौथ्या स्त्रीला मात्र आपले अज्ञान उमगले. ज्याला आपले अज्ञान उमगते त्यालाच ज्ञानाचा मार्ग दाखवता येतो. ज्याला अखेर स्वतःचे ज्ञान होते त्याला स्वत्व विसरता येते. ह्याला अद्वैत म्हणा.
संदर्भ -
पुस्तक - आलं ज्ञानाचं तुफान ( भाषांतरित)
- कबीरांच्या वचनांवर प्रवचने
ओशो रजनीश
ऑपेरा ब्राउजर
प्रेषक गंधार ( बुध, ०३/२६/२००८ - २२:२९) .गमभन फक्त इन्टरनेट एक्स्प्लोरर सपोर्ट करतो का? मला मिपावर ऑपेरा ब्राऊजरमध्ये टाईप करायला (अगदी लॉगिन करतानाही) बर्याच अडचणी येतात. वाचायला मात्र काही अडचण नाही. कोणाला याबाबत काही माहिती आहे का?
संकेतस्थळ उघडण्यास अडचण ?
प्रेषक सरपंच ( सोम, ०२/२५/२००८ - १२:४५) .नमस्कार,
काही सदस्यांना संकेतस्थळ उघड्यास अडचण येते आहे. ही अडचण नेमकीकाय आहे ते सांगता येईल का?
त्या सोबत तुमची OS आणि ब्राऊजरची आवृत्ती सुध्दा द्या. काही संदेश येत असेलतर तोही द्या.
मोझीला फायरफॉक्स वर अशी काही अडचण आहे का ?
