मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट

आकाश खोत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
राजस्थानच्या ट्रिपचा शेवटचा दिवस उजाडला. आज आमचं संध्याकाळचं विमान होतं. आम्ही सिटी पॅलेसच्याच भागात मुक्कामी होतो. त्या भागात थोडी पायी भटकंती करून आलो. आधी गणगौर घाटावर गेलो. गणगौर म्हणजे शिव गौरी. हे या घाटाचं नाव आहे, हा एक सणसुद्धा आहे, आणि त्या दिवशी करायचा एक पारंपरिक नृत्यखेळाचा प्रकारसुद्धा आहे. मुन्नाभाई मध्ये लक्की सिंगचा एक डायलॉग आहे. त्याला अधिकारी विचारतो २० मजल्याची परवानगी असताना इमारत २५ मजल्यांची कशी बनवलीस? तो म्हणतो "बनते बनते बन गयी यार!!".

कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...

मार्गी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
✪ होमसिक झाल्याची भावना! ✪ रामगंगेच्या किनार्‍याने घाट वाटेचा प्रवास ✪ विवेकानंदांचं अलमोडा आणि नीम करोली बाबांचं कैंची धाम! ✪ तीन बाजूंने पर्वत आणि दूरवर सपाट जमीन ✪ काठगोदाम- लाकडं नेण्यासाठी ब्रिटीशांनी बांधलेलं स्टेशन ✪ दक्षिण भारत सायकल प्रवासाची उत्सुकता ११ डिसेंबरच्या पहाटे सत्गड़वरून निघालो! ठीक साडेपाच वाजता जीप आली. भर अंधारात प्रवास सुरू झाला! सत्गड़ला नातेवाईकांसोबत दिवस छान गेले. छान भेटी झाल्या. हिमालय, तिथली गावं आणि लोक! आणि अर्थातच तिथलं ट्रेकिंग आणि आकाश दर्शन! पण आता निघायची वेळ झाली. निघताना फाssर होमसिक वाटतंय! पहाटेचा अंधारातला परिसर!

कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ७: नितांत सुंदर ध्वज मंदिर ट्रेक

मार्गी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
✪ ध्वज मंदिराची रमणीय पायवाट ✪ धुक्याचा समुद्र आणि पर्वतांची रांग ✪ उतरताना नवीन वाटेचा अनुभव ✪ गावातल्या लोकांसोबत संवाद ✪ सत्गड़मधून आकाश दर्शनाची शेवटची रात्र ✪ पहाड़ाचा निरोप घेण्याचा कठिण प्रसंग १० डिसेंबर! सत्गड़! अगदी स्वप्नातलं टुमदार गाव! रात्रीप्रमाणेच पहाटेही आकाश सुंदर आहे! पहाटे सप्तर्षी पूर्ण उगवून किंचित पश्चिमेला झुकलेलेही दिसत आहेत! आज सत्गड़मधला शेवटचा दिवस. आज दुपारी भाचा- आदित्य शाळेतून आल्यावर त्याच्यासोबत ध्वज मंदिराचा ट्रेक करणार आहे. पण सकाळीसुद्धा फिरावसं वाटलं. सत्गड़मध्ये कुठेही फिरताना ट्रेकिंग होतंच!

राजस्थानची रोजनिशी : ६ : हल्दी घाटी, नाथद्वारा

आकाश खोत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आजचा दिवस उदयपुरच्या बाहेर भटकण्यासाठी ठेवला होता. सर्वप्रथम सज्जनगड म्हणजेच मॉन्सून पॅलेसला जायचं होतं. सज्जनगड म्हटलं कि आपल्या साताऱ्याचा सज्जनगड डोळ्यासमोर येतो. इथला सज्जनगड तसाच शहराबाहेर उंचावर आहे. तिथुन जवळ टेकड्या व्ह्यू पॉईंट्स प्रसिद्ध आहेत. तिकडे जाण्याआधीच आमच्या ड्रायव्हरला दुसऱ्या ड्रायव्हर कडुन समजलं कि आज सज्जनगड बंद होता. त्याने आणखी २-३ जणांना विचारून खात्री करण्याचा प्रयत्न केला. शहराबाहेर असल्यामुळे तिकडे जाण्या येण्यात वेळ घालवण्याची जोखीम नको म्हणुन आम्ही सुरुवात शहरातल्याच सहेलियोंकी बारी नावाच्या ठिकाणापासुन केली.

राजस्थानची रोजनिशी : ५ : चित्तोडगड, उदयपूर सिटी पॅलेस

आकाश खोत ·

अरे वा. मस्तच. उदयपूर आणि चित्तोडगड एकदम मस्त भाग आहे. चित्तोडगडवर मात्र काही ठिकाणी काही मंदिरांच्या तिथे जाऊ देत नाहीत ते बघून घालमेल होते. तिथे जाऊ देत नाहीत कारण अल्लादिन खिलजी किंवा तत्सम हरामखोरांनी त्या मंदिरांमध्ये तोडफोड केलेली आहे अशा ठिकाणी जाऊ देत नाहीत. राजस्थानात जाण्यापूर्वी तिथल्या राजपूत राजांचा इतिहास माहिती करून घ्यायला हवा होता असे जाणवले. आपल्याला फार तर राणा प्रतापविषयी थोडीफार माहिती असते. पण राजपूत राजघराण्यातील राणा प्रताप हा शेवटचा स्वतंत्र बाण्याचा राजा होता. नंतरच्या राजांनी मुघलांपुढे नांगी टाकली आणि मग शिवाजी महाराजांविरूध्द यश मिळावे म्हणून शतचंडी यज्ञ करणारे मिर्झाराजे जयसिंग असले गुलाम निपजले. बाप्पा रावळपासून राणा प्रतापपर्यंत ३०-४० राजे तरी झाले. त्याविषयी काहीच माहिती नव्हती त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी गाईड सांगत होते किंवा संग्रहालयांमध्ये लिहिले होते ते काहीच समजले नाही. बाकी उदयपूरवरून चित्तोडगडला जाताना चित्तोडगड शहरात प्रवेश करतानाच एक गुड्डुभाई कचोरीवाला म्हणून आहे. त्याच्याकडील कांदा कचोरी खूप प्रसिध्द असते. kachori kachori उदयपूर-चित्तोडगड रस्त्यावर बाजूला शेतांमध्ये नीलगाई दिसतात. उदयपूरला जाऊन सात वर्षे झाली. त्यावेळेस विरासत हा शो बहुदा चालू झाला नसावा. तेव्हा नावही ऐकले नव्हते. पण गणगोर घाटावर धरोहर म्हणून राजस्थानी लोकनृत्ये, कठपुतली वगैरेंचा एक शो बघितला होता. तो खूपच आवडला. आम्ही त्या गणगोर घाटाजवळच पिचोलाच्या जवळपास एका छोटेखानी हॉटेलात राहिलो होतो. तिथे पिचोलावर एक लहानसा ब्रिज होता आणि त्या ब्रिजच्या पलीकडचा भाग एकदम मस्त होता. तिथे गोव्याची आठवण व्हावी असे छोटे कॅफे होते. तिथेच आमराई म्हणून एक मस्त रेस्टॉरंट आहे. तिकडचे जेवण मस्त होते. एकंदरीत राजस्थानी खाणे खूपच आवडले. दालभाटी-चुर्मा तर खूपच सुंदर. आम्ही राहिलो होतो त्या हॉटेलात गच्चीवर सकाळी नाश्ता असायचा. तो पण छान होता. तो सगळा परिसर होता छान पण सगळे सरकारी कायदेकानू आणि नियम धाब्यावर बसवून सगळा कारभार चालला होता असे वाटले. समजा चुकूनमाकून तिथे आग वगैरे लागली असती तर कसलीच व्यवस्था तिथे होती असे वाटत नाही. आम्ही गेलो होतो ते १० जानेवारीच्या आसपास. मस्त गुलाबी थंडी तिथे होती. ती थंडी मुंबईतून गेलेल्यांना त्रास होईल अशी होती. त्यापेक्षा जानेवारीचा शेवट/फेब्रुवारी पहिला आठवडा हा अधिक योग्य काळ असेल असे वाटले. सिटी पॅलेसजवळच एक व्हिन्टेज कार म्युझिअम होते. तिथे मोठ्या उत्साहाने गेलो खरे पण तिथे गेल्यावर निराशा झाली. जुन्या २०-२५ गाड्या असतील आणि त्यासाठी सात वर्षांपूर्वी प्रत्येकाचे साडेतीनशे रूपये तिकिट होते. ते कै च्या कै वाटले. तसेच जगमंदिरमध्ये राहायच्या खोल्या आहेत. बायकोला असे कुठे गेल्यावर उचकापाचकी करून त्या खोल्या बघायची खूप हौस आहे. त्याप्रमाणे एक खोली बघितली. ती खोली ठिकठाकच होती. इतकी काही असामान्य नव्हती. त्या खोलीचे दर किती तर दिवसाला ३६ हजार रूपये. म्हटले बोंबला. प्रियांका चोप्रा वगैरे लोक तिथे येऊन लग्न करून जातात म्हणून सगळेच दर वाढले आहेत की काय कल्पना नाही. एकूण उदयपूर आणि चित्तोडगड मस्तच आहे. कधीनाकधी सगळ्यांनी बघावा असा तो भाग आहे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

आकाश खोत 04/03/2026 - 13:07
धन्यवाद. खरं आहे. इतिहासाबद्दल थोडी माहिती आधी असेल तर ती जागा बघण्यात आणखी रस येतो.  इतिहास माझा आवडीचा विषय आहे, त्यामुळे अगदी सखोल नाही तरी थोडी थोडी माहिती ऐकण्यात वाचण्यात आलेली लक्षात राहते. दुसरं म्हणजे एखादी जागा पाहुन आल्यावर माझ्या डोक्यात तो विषय घोळत राहतो त्यामुळे त्यासंदर्भात आल्यावरही थोडं वाचन करतो. आता इंटरनेटमुळे हे अगदी सुलभ आहे. त्यामुळे आपापल्या आवडीप्रमाणे आधी किंवा नंतर आपण जागेची आणि इतिहासाची थोडी अधिक माहिती घेऊ शकतो. 

अरे वा. मस्तच. उदयपूर आणि चित्तोडगड एकदम मस्त भाग आहे. चित्तोडगडवर मात्र काही ठिकाणी काही मंदिरांच्या तिथे जाऊ देत नाहीत ते बघून घालमेल होते. तिथे जाऊ देत नाहीत कारण अल्लादिन खिलजी किंवा तत्सम हरामखोरांनी त्या मंदिरांमध्ये तोडफोड केलेली आहे अशा ठिकाणी जाऊ देत नाहीत. राजस्थानात जाण्यापूर्वी तिथल्या राजपूत राजांचा इतिहास माहिती करून घ्यायला हवा होता असे जाणवले. आपल्याला फार तर राणा प्रतापविषयी थोडीफार माहिती असते. पण राजपूत राजघराण्यातील राणा प्रताप हा शेवटचा स्वतंत्र बाण्याचा राजा होता. नंतरच्या राजांनी मुघलांपुढे नांगी टाकली आणि मग शिवाजी महाराजांविरूध्द यश मिळावे म्हणून शतचंडी यज्ञ करणारे मिर्झाराजे जयसिंग असले गुलाम निपजले. बाप्पा रावळपासून राणा प्रतापपर्यंत ३०-४० राजे तरी झाले. त्याविषयी काहीच माहिती नव्हती त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी गाईड सांगत होते किंवा संग्रहालयांमध्ये लिहिले होते ते काहीच समजले नाही. बाकी उदयपूरवरून चित्तोडगडला जाताना चित्तोडगड शहरात प्रवेश करतानाच एक गुड्डुभाई कचोरीवाला म्हणून आहे. त्याच्याकडील कांदा कचोरी खूप प्रसिध्द असते. kachori kachori उदयपूर-चित्तोडगड रस्त्यावर बाजूला शेतांमध्ये नीलगाई दिसतात. उदयपूरला जाऊन सात वर्षे झाली. त्यावेळेस विरासत हा शो बहुदा चालू झाला नसावा. तेव्हा नावही ऐकले नव्हते. पण गणगोर घाटावर धरोहर म्हणून राजस्थानी लोकनृत्ये, कठपुतली वगैरेंचा एक शो बघितला होता. तो खूपच आवडला. आम्ही त्या गणगोर घाटाजवळच पिचोलाच्या जवळपास एका छोटेखानी हॉटेलात राहिलो होतो. तिथे पिचोलावर एक लहानसा ब्रिज होता आणि त्या ब्रिजच्या पलीकडचा भाग एकदम मस्त होता. तिथे गोव्याची आठवण व्हावी असे छोटे कॅफे होते. तिथेच आमराई म्हणून एक मस्त रेस्टॉरंट आहे. तिकडचे जेवण मस्त होते. एकंदरीत राजस्थानी खाणे खूपच आवडले. दालभाटी-चुर्मा तर खूपच सुंदर. आम्ही राहिलो होतो त्या हॉटेलात गच्चीवर सकाळी नाश्ता असायचा. तो पण छान होता. तो सगळा परिसर होता छान पण सगळे सरकारी कायदेकानू आणि नियम धाब्यावर बसवून सगळा कारभार चालला होता असे वाटले. समजा चुकूनमाकून तिथे आग वगैरे लागली असती तर कसलीच व्यवस्था तिथे होती असे वाटत नाही. आम्ही गेलो होतो ते १० जानेवारीच्या आसपास. मस्त गुलाबी थंडी तिथे होती. ती थंडी मुंबईतून गेलेल्यांना त्रास होईल अशी होती. त्यापेक्षा जानेवारीचा शेवट/फेब्रुवारी पहिला आठवडा हा अधिक योग्य काळ असेल असे वाटले. सिटी पॅलेसजवळच एक व्हिन्टेज कार म्युझिअम होते. तिथे मोठ्या उत्साहाने गेलो खरे पण तिथे गेल्यावर निराशा झाली. जुन्या २०-२५ गाड्या असतील आणि त्यासाठी सात वर्षांपूर्वी प्रत्येकाचे साडेतीनशे रूपये तिकिट होते. ते कै च्या कै वाटले. तसेच जगमंदिरमध्ये राहायच्या खोल्या आहेत. बायकोला असे कुठे गेल्यावर उचकापाचकी करून त्या खोल्या बघायची खूप हौस आहे. त्याप्रमाणे एक खोली बघितली. ती खोली ठिकठाकच होती. इतकी काही असामान्य नव्हती. त्या खोलीचे दर किती तर दिवसाला ३६ हजार रूपये. म्हटले बोंबला. प्रियांका चोप्रा वगैरे लोक तिथे येऊन लग्न करून जातात म्हणून सगळेच दर वाढले आहेत की काय कल्पना नाही. एकूण उदयपूर आणि चित्तोडगड मस्तच आहे. कधीनाकधी सगळ्यांनी बघावा असा तो भाग आहे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

आकाश खोत 04/03/2026 - 13:07
धन्यवाद. खरं आहे. इतिहासाबद्दल थोडी माहिती आधी असेल तर ती जागा बघण्यात आणखी रस येतो.  इतिहास माझा आवडीचा विषय आहे, त्यामुळे अगदी सखोल नाही तरी थोडी थोडी माहिती ऐकण्यात वाचण्यात आलेली लक्षात राहते. दुसरं म्हणजे एखादी जागा पाहुन आल्यावर माझ्या डोक्यात तो विषय घोळत राहतो त्यामुळे त्यासंदर्भात आल्यावरही थोडं वाचन करतो. आता इंटरनेटमुळे हे अगदी सुलभ आहे. त्यामुळे आपापल्या आवडीप्रमाणे आधी किंवा नंतर आपण जागेची आणि इतिहासाची थोडी अधिक माहिती घेऊ शकतो. 
लेखनविषय:
लेखनप्रकार
काल संध्याकाळी आम्ही जयपूरहून चित्तोडगडला ट्रेन ने आलो होतो. रात्री इथेच मुक्काम केला आणि आज चित्तोडगढ दर्शन करायचे होते. त्यानंतर इथूनच उदयपूरला जाऊन तिथे उरलेला दिवस जमेल ते पहायचे आणि पुढचे दोन दिवस उदयपूर मध्येच राहायचे होते. उदयपूरमध्ये उदयपूर शहरासोबतच थोडे बाहेर असलेले जवळपासची काही ठिकाणं आम्हाला बघायची होती. लांब लांब फिरायचे असल्यामुळे कॅब सोयीची पडेल असा विचार करून आम्ही चितोडगडहूनच तीन दिवस कॅब ठरवली. मराठी पर्यटक चित्तोडगडमध्ये रात्री आम्ही जिथे जेवण केले तिथल्या मालकाने मी मराठी आहे हे ओळखले, आणि पुण्याचे का म्हणुन जुजबी गप्पा मारल्या.

राजस्थानची रोजनिशी : ४ : पत्रिका गेट, अल्बर्ट हॉल, इसरलाट

आकाश खोत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
जयपुरमध्ये ऐतिहासिक स्थळे तर बरीच आहेत, पण जी गेल्या काही वर्षात बांधली गेली आणि अल्पावधीत लोकप्रिय झाली अशीसुद्धा काही ठिकाणे आहेत.. पत्रिका गेट, तोरण गेट, वर्ल्ड ट्रेड पार्क, मसाला चौक इ. यापैकी वर्ल्ड ट्रेड पार्क तर आपल्याकडच्या कुठल्याही आयटी पार्क सारखं ग्लास फसाड असलेलं मोठं आर्थिक केंद्र आहे. तिथेच मॉल आणि फूडकोर्ट अशाही गोष्टी आहेत. अशा गोष्टी नसलेल्या भागातुन, किंवा निमशहरी आणि ग्रामीण भागातुन आलेल्या पर्यटकांसाठी तेसुद्धा एक जरूर जाऊन यावं असं आकर्षण असेल. आम्हाला फारसं नावीन्य न वाटल्यामुळे आम्ही ते टाळलं.

राजस्थानची रोजनिशी : ३ : आमेर, नाहरगड

आकाश खोत ·

पर्णिका 16/03/2026 - 02:17
मस्त भटकंती अन सुरेख वर्णन ! आम्ही बरेच वर्षांपूर्वी पिंक सिटीला भेट दिली होती, आमेरगढ फारच आवडला होता... तिथे रात्री laser show असतो, ऐतिहासिक माहिती देणारा तो शो अगदी must watch होता.

पर्णिका 16/03/2026 - 02:17
मस्त भटकंती अन सुरेख वर्णन ! आम्ही बरेच वर्षांपूर्वी पिंक सिटीला भेट दिली होती, आमेरगढ फारच आवडला होता... तिथे रात्री laser show असतो, ऐतिहासिक माहिती देणारा तो शो अगदी must watch होता.
लेखनविषय:
लेखनप्रकार
आजच्या दिवशी आम्हाला जयपूरच्या थोड्या बाहेरच्या बाजूला असलेल्या काही जागा करायच्या असल्यामुळे आम्ही एक कॅब दिवसभरासाठी ठरवली. आमेर जयपुरच्या राजांची आधीची राजधानी म्हणजे आमेर इथून जवळच आहे. इथे जागा आणि पाण्याची कमतरता भासायला लागल्यावर जयपूर शहर वसवण्यात आले. त्याच भागात आमेर, जयगड, नाहरगड असे तीन किल्ले आणि आणखी छोटे मोठे पॉईंट आहेत. राजवंशाच्या अनेक पिढ्या आमेर इथुनच राज्य चालत होते. याचे दुसरे एक नाव अंबेर सुद्धा आहे. त्याचे स्पेलिंग Amber असे होत असल्यामुळे ते इंग्रजी शब्द अँबर असे उच्चारले जाते. मला आधी ते फक्त इंग्रजांनी अपभ्रष्ट केलेले नाव वाटत होते.

कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ६: मुन्सियारीतला ट्रेक आणि थरारक जीप प्रवास

मार्गी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
✪ पायवाटेवरची सुंदर भ्रमंती ✪ काटक बनवणारी पहाड़ी जीवनशैली ✪ एकमेकांना धरून राहणारी साधी माणसं ✪ पर्वत कितने ऊँचे कितने गहरे होते हैं! ✪ पहाड़ाची नानाविध रूपं! ✪ सत्गड़ची रमणीय संध्याकाळ ९ डिसेंबरची पहाट! मुन्सियारी आकाश दर्शनाचं शेवटचं सत्र! डोळे भरून आकाश बघितलं. चंद्र प्रकाशात चमकणारी पंचा चुलीची शिखरं मन भरून बघितली! थंडीचाही भरपूर आनंद घेतला! उजाडल्यावर टेलिस्कोप पॅक केला. चहाचा पहिला राउंड झाल्यावर आवरून भटकायला निघालो. कोवळं ऊन अंगावर घेताना मस्त वाटतंय. काल गावात थोडं फिरलो होतो तेव्हा एक जागा सुंदर दिसली होती. त्या भागात अजून पुढे फिरेन.

राजस्थानची रोजनिशी : २ : सिटी पॅलेस, जंतर मंतर, हवा महल

आकाश खोत ·

आकाश खोत 04/03/2026 - 13:07
धन्यवाद. खरं आहे. इतिहासाबद्दल थोडी माहिती आधी असेल तर ती जागा बघण्यात आणखी रस येतो.  इतिहास माझा आवडीचा विषय आहे, त्यामुळे अगदी सखोल नाही तरी थोडी थोडी माहिती ऐकण्यात वाचण्यात आलेली लक्षात राहते. दुसरं म्हणजे एखादी जागा पाहुन आल्यावर माझ्या डोक्यात तो विषय घोळत राहतो त्यामुळे त्यासंदर्भात आल्यावरही थोडं वाचन करतो. आता इंटरनेटमुळे हे अगदी सुलभ आहे. त्यामुळे आपापल्या आवडीप्रमाणे आधी किंवा नंतर आपण जागेची आणि इतिहासाची थोडी अधिक माहिती घेऊ शकतो. 

आकाश खोत 04/03/2026 - 13:07
धन्यवाद. खरं आहे. इतिहासाबद्दल थोडी माहिती आधी असेल तर ती जागा बघण्यात आणखी रस येतो.  इतिहास माझा आवडीचा विषय आहे, त्यामुळे अगदी सखोल नाही तरी थोडी थोडी माहिती ऐकण्यात वाचण्यात आलेली लक्षात राहते. दुसरं म्हणजे एखादी जागा पाहुन आल्यावर माझ्या डोक्यात तो विषय घोळत राहतो त्यामुळे त्यासंदर्भात आल्यावरही थोडं वाचन करतो. आता इंटरनेटमुळे हे अगदी सुलभ आहे. त्यामुळे आपापल्या आवडीप्रमाणे आधी किंवा नंतर आपण जागेची आणि इतिहासाची थोडी अधिक माहिती घेऊ शकतो. 
लेखनविषय:
लेखनप्रकार
जयपूरमधल्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात पेटपुजेने झाली. त्याला खरं तर महापूजा म्हणता येईल. प्याज कचोरी जयपुर ला प्याज कचोरी प्रसिद्ध आहे. रावत मिष्ठान्न भांडार, लक्ष्मी मिष्ठान्न भांडार अशी त्यासाठी प्रसिद्ध नावे आहेत. दोन्ही ठिकाणी खाण्याचा आम्हाला योग जुळुन आला. त्यापैकी माझ्या जयपूरलाच राहणाऱ्या सहकाऱ्याने रावतचे विशेष कौतुक केले. त्यानेच असंही सुचवलं की तिथे अगदी जाऊन खाण्याची गरज नाही, कारण तिथे प्रचंड गर्दी असते, तो स्वतः हल्ली पार्सल मागवुनच खातो. तर आम्ही आमच्या एअर-बीएनबीच्या पत्त्यावर सकाळी त्या कचोऱ्या आणि समोसे स्विगीमार्फत मागवले.

राजस्थानची रोजनिशी : १ : गलताजी मंदिर आणि चोखी धानी

आकाश खोत ·

आकाश खोत 22/02/2026 - 18:08
मला हा लेख "भटकंती" सदरात टाकायचा होता, पण भटकंतीवर क्लिक केल्यावर "Access Denied" असा एरर आला. यासंदर्भात कोणाला काही माहित असल्यास सांगावे.

जुइ 23/02/2026 - 02:57
अशा ठिकाणी किती खर्च येऊ शकतो ही माहिती देत आहात हे चांगले केले. फोटो तेवढे अधिक टाकावेत.

मस्त सुरुवात!! पाचव्या प्रचि मधला तो महाल डोंगरातुन उगवुन बाहेर आल्यासारखा वाटतोय. :) मी मागच्या वर्षी सहकुटूंब राजस्थान ला गेलो होतो. पण आठाव्ड्यात पूर्ण होण्यासारखी ही जागा नाहीच. त्यामुळे जयपूर, जोधपूर करुन जैसलमेर केले आणि तिथुन दिल्ली आणि पुणे. त्यामुळे कुनो, उदयपूर ,नाथ द्वारा, चित्तोड गढ, माऊंट अबु सगळे राहीलेच आहे. चित्र भरपूर टाका आणि येउंद्या पटापट पुढचे भाग.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

आकाश खोत 24/02/2026 - 09:51
आम्ही तिथे ८ दिवस फिरलो तरीही भरपुर काही शिल्लक आहे. त्यामुळेच आम्हीही "कव्हर" करत सुटायची गडबड न करता जिथे जाऊ ते व्यवस्थित बघायचं ठरवुन फिरलो. 

आकाश खोत 22/02/2026 - 18:08
मला हा लेख "भटकंती" सदरात टाकायचा होता, पण भटकंतीवर क्लिक केल्यावर "Access Denied" असा एरर आला. यासंदर्भात कोणाला काही माहित असल्यास सांगावे.

जुइ 23/02/2026 - 02:57
अशा ठिकाणी किती खर्च येऊ शकतो ही माहिती देत आहात हे चांगले केले. फोटो तेवढे अधिक टाकावेत.

मस्त सुरुवात!! पाचव्या प्रचि मधला तो महाल डोंगरातुन उगवुन बाहेर आल्यासारखा वाटतोय. :) मी मागच्या वर्षी सहकुटूंब राजस्थान ला गेलो होतो. पण आठाव्ड्यात पूर्ण होण्यासारखी ही जागा नाहीच. त्यामुळे जयपूर, जोधपूर करुन जैसलमेर केले आणि तिथुन दिल्ली आणि पुणे. त्यामुळे कुनो, उदयपूर ,नाथ द्वारा, चित्तोड गढ, माऊंट अबु सगळे राहीलेच आहे. चित्र भरपूर टाका आणि येउंद्या पटापट पुढचे भाग.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

आकाश खोत 24/02/2026 - 09:51
आम्ही तिथे ८ दिवस फिरलो तरीही भरपुर काही शिल्लक आहे. त्यामुळेच आम्हीही "कव्हर" करत सुटायची गडबड न करता जिथे जाऊ ते व्यवस्थित बघायचं ठरवुन फिरलो. 
लेखनविषय:
लेखनप्रकार
२०२५ च्या दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आम्ही राजस्थानमध्ये फिरायला जाण्याचा बेत आखला होता. ऑगस्टमध्ये विमानाची तिकिटे काढली होती. लवकर काढून पैसे वाचवायचं ठरवलं तरी आज उद्या वीकेंडला करत करत ऑगस्ट म्हणजे सुद्धा उशिरच झाला हे तिकीटे काढताना लक्षात आले. पण आणखी किती उशीर करणार म्हणुन काढून टाकली. जाताना पुणे ते जयपूर थेट, आणि येताना उदयपूरहून दिल्ली मार्गे पुणे अशी तिकिटे होती. मी, माझी बायको माधवी आणि दोन लहान मुली, तिची मैत्रीण ऋचा, तिचा नवरा समीर, त्यांचा मुलगा, लहान मुलगी असे आठ जण सोबत होतो.