मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एक वाद्य, तीन पिढ्या आणि दोन संगीतसंस्कृतीचे सीमोल्लंघन

सुधीर कांदळकर ·

गवि 17/11/2025 - 08:42
पण संगीतातून व्यक्त होणारी भावना मात्र भाषिक मर्यादा पार करून एका व्यक्तीकडून दुसर्या व्यक्तीकडे पोहोचू शकते. बोलायची भाषा वेगळी असेल तर माणसे दुरावू शकतात. संगीत मात्र वेगवेगळ्या भाषा बोलणार्यांना एकत्र आणून आनंद देऊं शकते.
लाख बोललात. लेख उत्तम.

स्वधर्म 17/11/2025 - 21:29
ओळख करून दिलीत, त्याबद्दल आभार. कानाला गोड वाटतं म्हणून ऐकायचा आनंद जर समजा एकपट असेल, तर समजून ऐकण्याचा आनंद पाचपट असतो. नक्की निवांत ऐकणार.

प्रतिसादकांस अनेक अनेक धन्यवाद. १. कंजूससाहेब, युयुत्सु धन्यवाद. २. जशी गाण्यातली एखादी सुरावट आपल्याला आवडून जाते तसेच लिखित मजकुरातले एखादे वाक्य देखील आपल्याला आवडून जाते. धन्यवाद. ३. स्वधर्मः
कानाला गोड वाटतं म्हणून ऐकायचा आनंद जर समजा एकपट असेल, तर समजून ऐकण्याचा आनंद पाचपट असतो. नक्की निवांत ऐकणार.
अगदी खरे. धन्यवाद. ४. @ रामे: छान. आवडले. धन्यवाद.

१. @ संगीतप्रेमी वाचकांसाठी: साप्ताहिक सकाळ चा संगीत विशेषांक आला आहे. २. @ गवि: जशी गाण्यातली एखादी सुरावट आपल्याला आवडून जाते तसेच लिखित मजकुरातले एखादे वाक्य देखील आपल्याला आवडून जाते. धन्यवाद. वर @ कोण ते लिहायला विसरलो. क्षमस्व.

गवि 17/11/2025 - 08:42
पण संगीतातून व्यक्त होणारी भावना मात्र भाषिक मर्यादा पार करून एका व्यक्तीकडून दुसर्या व्यक्तीकडे पोहोचू शकते. बोलायची भाषा वेगळी असेल तर माणसे दुरावू शकतात. संगीत मात्र वेगवेगळ्या भाषा बोलणार्यांना एकत्र आणून आनंद देऊं शकते.
लाख बोललात. लेख उत्तम.

स्वधर्म 17/11/2025 - 21:29
ओळख करून दिलीत, त्याबद्दल आभार. कानाला गोड वाटतं म्हणून ऐकायचा आनंद जर समजा एकपट असेल, तर समजून ऐकण्याचा आनंद पाचपट असतो. नक्की निवांत ऐकणार.

प्रतिसादकांस अनेक अनेक धन्यवाद. १. कंजूससाहेब, युयुत्सु धन्यवाद. २. जशी गाण्यातली एखादी सुरावट आपल्याला आवडून जाते तसेच लिखित मजकुरातले एखादे वाक्य देखील आपल्याला आवडून जाते. धन्यवाद. ३. स्वधर्मः
कानाला गोड वाटतं म्हणून ऐकायचा आनंद जर समजा एकपट असेल, तर समजून ऐकण्याचा आनंद पाचपट असतो. नक्की निवांत ऐकणार.
अगदी खरे. धन्यवाद. ४. @ रामे: छान. आवडले. धन्यवाद.

१. @ संगीतप्रेमी वाचकांसाठी: साप्ताहिक सकाळ चा संगीत विशेषांक आला आहे. २. @ गवि: जशी गाण्यातली एखादी सुरावट आपल्याला आवडून जाते तसेच लिखित मजकुरातले एखादे वाक्य देखील आपल्याला आवडून जाते. धन्यवाद. वर @ कोण ते लिहायला विसरलो. क्षमस्व.
लेखनविषय:
लेखनप्रकार
नोव्हेंबर आला कीं थंडीची चाहूल लागते आणि चित्तवृत्तीला बहर येतो. पर्यटन, परिषदा, प्रदर्शने, महोत्सव, संगीत समारोह वगैरेंच्या आठवणी मनांत रुंजी घालूं लागतात. वयानुसार फारसे कुठे जाणेयेणे होत नाहीं. आधुनिक तंत्रज्ञानाने संगणक, महाजाल, यू-ट्यूब वगैरे साधनांचा सुंदर नजराणा दिला आणि आकाश ठेंगणे झाले. जाणेयेणे नगण्य झाले तरी महाजालावरची मुशाफरी मात्र अगदी आरामखुर्चीत बसून पण करतां येते. लांबलचक घनघोर पावसाळ्यात चुकला फकीर मशिदीत तसा चुकला सुधीर यू-ट्यूबवर सापडायला लागला. वाट फुटेल तिथें फिरतांना अचानक एखादे अप्रतिम निसर्गदृश्य दिसावे तसे कधीकधी अनमोल रत्नें कानीं पडतात.

घरबसल्या यू-ट्यूबवर संगीत दिवाळी पहाट २०२५

सुधीर कांदळकर ·

In reply to by स्वधर्म

सन्जोप राव 19/10/2025 - 07:20
अर्थातच खूप आवडल्याने. रस्म-ए-उलफत इथे आहेच https://www.youtube.com/watch?v=Nyhp5OK1ltQ&list=RDNyhp5OK1ltQ&start_radio=1 मदनमोहन यांच्या गाण्यांच्या कार्यक्रमाचे 'हमलोग' ने सादर केलेले दोन्ही भाग शांतपणे ऐकावेत. विभावरीचा शालीन स्वर, विक्रमचा संयत तबला आणि प्रसाद गोंदकरची सतार.. हा कार्यक्रम मी समक्ष पाहिला होता. त्याची आठवण अजून मनात ताजी आहे. https://www.youtube.com/watch?v=RO5RBUZ84a0&list=RDRO5RBUZ84a0&start_radio=1 https://www.youtube.com/watch?v=_XJ4k8WSEZg&list=RD_XJ4k8WSEZg&start_radio=1

कंजूस 19/10/2025 - 00:30
संध्याकाळी ऐकले विडिओ. रस्म-ए-उलफत ...>> नेमका हा व्हिडिओ अनअ‍ॅव्हेलेबल असे दाखवत आहे...>> वाचून परत तपासला ( EDGE browser) . दिसत आहे. पण सर्व गाणी महिला गायिकांची आहेत. मला गाण्यातलं( शास्त्रीय) कळत नाही पण देवांश भाटे याचं गाणं आवडतं. घेई छंद मकरंद https://youtu.be/Uy9gIMDyvSY?si=XxvrQ9ESbCVLLAgA आणि हे राम रंगी रंगले मन https://youtu.be/bKID432rfcA?si=7ueAHk8y8ItQAztn कुहू कुहू.... https://youtu.be/lWhnp5ggdz0?si=9mW4ocPlnfYThKC6 तर कधीतरी एखादी छोटी मुलगी AGT कार्यक्रमात चमकून जाते. Pranyaska Mishra. उत्स्फूर्त. https://youtu.be/zzwraaoppt0?si=cXe_978-SKxKfPFi ( थोडे अवांतर झाले.)

ओळख करून दिली नसती तर लतादीदी च गात आहेत असेच वाटले असते. अप्रतिम. नटभैरव आणी मधुवंती ची वेगळ्या प्रकाराची प्रस्तुती आवडली. जसे ऐकत जाईन तसा प्रतिसाद जरूर देईन. धन्यवाद.

In reply to by स्वधर्म

सन्जोप राव 19/10/2025 - 07:20
अर्थातच खूप आवडल्याने. रस्म-ए-उलफत इथे आहेच https://www.youtube.com/watch?v=Nyhp5OK1ltQ&list=RDNyhp5OK1ltQ&start_radio=1 मदनमोहन यांच्या गाण्यांच्या कार्यक्रमाचे 'हमलोग' ने सादर केलेले दोन्ही भाग शांतपणे ऐकावेत. विभावरीचा शालीन स्वर, विक्रमचा संयत तबला आणि प्रसाद गोंदकरची सतार.. हा कार्यक्रम मी समक्ष पाहिला होता. त्याची आठवण अजून मनात ताजी आहे. https://www.youtube.com/watch?v=RO5RBUZ84a0&list=RDRO5RBUZ84a0&start_radio=1 https://www.youtube.com/watch?v=_XJ4k8WSEZg&list=RD_XJ4k8WSEZg&start_radio=1

कंजूस 19/10/2025 - 00:30
संध्याकाळी ऐकले विडिओ. रस्म-ए-उलफत ...>> नेमका हा व्हिडिओ अनअ‍ॅव्हेलेबल असे दाखवत आहे...>> वाचून परत तपासला ( EDGE browser) . दिसत आहे. पण सर्व गाणी महिला गायिकांची आहेत. मला गाण्यातलं( शास्त्रीय) कळत नाही पण देवांश भाटे याचं गाणं आवडतं. घेई छंद मकरंद https://youtu.be/Uy9gIMDyvSY?si=XxvrQ9ESbCVLLAgA आणि हे राम रंगी रंगले मन https://youtu.be/bKID432rfcA?si=7ueAHk8y8ItQAztn कुहू कुहू.... https://youtu.be/lWhnp5ggdz0?si=9mW4ocPlnfYThKC6 तर कधीतरी एखादी छोटी मुलगी AGT कार्यक्रमात चमकून जाते. Pranyaska Mishra. उत्स्फूर्त. https://youtu.be/zzwraaoppt0?si=cXe_978-SKxKfPFi ( थोडे अवांतर झाले.)

ओळख करून दिली नसती तर लतादीदी च गात आहेत असेच वाटले असते. अप्रतिम. नटभैरव आणी मधुवंती ची वेगळ्या प्रकाराची प्रस्तुती आवडली. जसे ऐकत जाईन तसा प्रतिसाद जरूर देईन. धन्यवाद.
लेखनविषय:
लेखनप्रकार
बर्याच रसिकांना दिवाळी पहाट संगीत मैफिलीने साजरी करणे आवडते. जर कोणत्याही कारणाने अशा रसिकांना मैफिलीला जाणे शक्य झाले नसेल अशांसाठी काही दुवे खाली देतो आहे. शास्त्रीय संगीतासाठी एक दुवा तर सुगम संगीतासाठी काही दुवे देतो अहे. रसिकांना यातून काहीतरी नवे सुंदर असे अवसेल अशी आशा आहे. शास्त्रीय संगीत गायन जुगलबंदी : डॉ.

'किशोर‘स्वरातील ‘साहेबा‘चे गाणे

हेमंतकुमार ·

सौन्दर्य 05/09/2025 - 22:57
हिंदी चित्रपट सृष्टीने आयुष्यातील प्रत्येक प्रसंगासाठी शेकडो गाणी दिली आहेत. 'बार बार दिन ये आये ' हे असेच वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे गाणे. पूर्वी २६ जानेवारी किंवा १५ ऑगस्ट ह्या दिवशी 'मेरे देश की धरती' लागले नाही असा दिवस विरळा. त्या शिवाय लग्न, प्रेम, प्रेमभंग, रक्षाबंधन, गणेशोत्सव, गोकुळाष्टमी, दिवाळी, दसरा, ईद, जन्म, मरण इत्यादी प्रत्येक प्रसंगाला अनुरूप गाणी आहेतच. विषय/प्रसंग सांगा - गाणी हजर होतील.

आलो आलो 10/09/2025 - 23:43
अगदि अगदि …३र्या पेग नम्तर तर्र हेच गाने आठवते म्हाँजे ठल्लक शब्द नाही आले ओठांबाहेर तरी षारिरिक आव (मनीचा भाव) तर्र नक्कीच अस्साच असतो .

सौन्दर्य 05/09/2025 - 22:57
हिंदी चित्रपट सृष्टीने आयुष्यातील प्रत्येक प्रसंगासाठी शेकडो गाणी दिली आहेत. 'बार बार दिन ये आये ' हे असेच वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे गाणे. पूर्वी २६ जानेवारी किंवा १५ ऑगस्ट ह्या दिवशी 'मेरे देश की धरती' लागले नाही असा दिवस विरळा. त्या शिवाय लग्न, प्रेम, प्रेमभंग, रक्षाबंधन, गणेशोत्सव, गोकुळाष्टमी, दिवाळी, दसरा, ईद, जन्म, मरण इत्यादी प्रत्येक प्रसंगाला अनुरूप गाणी आहेतच. विषय/प्रसंग सांगा - गाणी हजर होतील.

आलो आलो 10/09/2025 - 23:43
अगदि अगदि …३र्या पेग नम्तर तर्र हेच गाने आठवते म्हाँजे ठल्लक शब्द नाही आले ओठांबाहेर तरी षारिरिक आव (मनीचा भाव) तर्र नक्कीच अस्साच असतो .
लेखनविषय:
लेखनप्रकार
हिंदी चित्रपटांमधील काही गाणी अजरामर आहेत. ती कितीही जुनी झाली तरी ताजीतवानीच राहतात आणि रसिकांना कायमच भुरळ घालतात. किशोरकुमार हे चित्रसृष्टीमधील एक आघाडीचे गायक. अनेक प्रकारांमधली गाणी गाण्यात त्यांचा हातखंडा होता. अनेक गायकांबाबत रसिकांच्या विशिष्ट आवडीनिवडी असतात. तरी पण किशोरकुमारने गायलेली कुठली ना कुठली गीते प्रत्येक गानरसिकाला आवडतातच. असेच एक गाजलेले गाणे म्हणजे सगिना चित्रपटातील साला मैं तो साहब बन गया. . . या गाण्याने गतवर्षी आपली पन्नाशी पूर्ण केलेली असल्यामुळे त्याची ही आठवण आणि त्यानिमित्ताने संबंधित मूळ चित्रपटाचा हा अल्प परिचय.

रॉय ३ - ग्लेशियरचं गाव

किल्लेदार ·

Bhakti 24/07/2025 - 15:12
सतत हळूहळू सरकणाऱ्या हिमनदीवरच्या आईस वॉक टूरचा मार्गही यामुळे नेहमी बदलत असतो आणि या धोक्यामुळे काटेकोर पूर्वनियोजन अत्यावश्यक असतं.
नवीनच समजलं,खुपचं वेगळा अनुभव असणार.

भन्नाट प्रचि आणी वर्णनही. उर्वरित आयुष्यात जायला मिळेल किंवा नाही पण पुनर्जन्म पेंग्वीन(भलते सलते राजकीय अर्थ काढू नये) झालो तर किती मज्जा येईल. लेख आवडलाच.

गोरगावलेकर 24/07/2025 - 15:41
स्वप्नवत आहे हे सर्व . शब्दांकन आणि अप्रतिम फोटोंमुळे भटकंती अगदी जिवंत झालीय. वर्णन वाचताना जणू आपणही त्या मोहक निसर्गात फिरतोय, असे वाटते. खरोखरच उत्कृष्ट लेखन आणि अनुभव!

अप्रतिम निसर्ग आणि प्रचि. निशब्द किल्लेदार साहेब धन्यवाद . _/\_

श्वेता२४ 26/07/2025 - 13:04
तुमचे भटकंतीचे वर्णन एखादी कादंबरी वाचतोय असे वाटते. खूप छान लिहीता तुम्ही. आणी फोटो तर निव्वळ अप्रतीम. बघु इथे जायचा योग येतो का ते.

सौंदाळा 28/07/2025 - 10:42
अप्रतिम असे कॉकटेल (सुंदर वर्णन + अप्रतिम फोटो) असलेले लेख वाचले की मिसळपाववर आल्याचे सार्थक झाले असं वाटतं. छापील माध्यमात असे लेख वाचणे किंवा नुसते फोटो बघणे यात ही मज्जा नाही. क्रमशः बघून जीव भांड्यात पडला पुभाप्र

लेखतील चित्रे बघुन या ठिकाणाला भेट द्यायलाच पाहीजे असे वाटायला लागलेय. सर्व छायाचित्रे सुंदर्च पण सहाणेवरचे मॅश पोटॅटो, आईस्क्रीमचा फोटो आणि कॉरदेरो असादोर बघुन तोंपासु लिहिते रहा!!

वेगळा निसर्ग. शब्दचित्र छान रेखाटले आहे. प्रकाशचित्रांबद्दल काय बोलावे? तीही सुंदर आणि उत्कृष्टच. पेसो म्हटल्यावर जुने वेस्टर्न सिनेमे डोळ्यांसमोर येतात. एका सिनेमात फ्रॅन्को नीरो त्याला पकडून देणार्याला पोलीस ५००० पेसोचे बक्षीस लावले आहे अशा अर्थाचे पोस्टर रस्त्यावर पाहातो. त्यावर तो खडूने आणखी पाचदहा शून्ये काढून किंमत वाढवतो. वरील प्रकाशचित्रांची किंमत अशीच वाढवावीशी वाटते. एल कलाफाते प्रकाशपाटीचे चित्र आणि रेलिंग लावलेल्या पाण्याकाठीच्या मातीतल्या सज्जाचे वरून घेतलेले दृश्य फारच आवडले. धन्यवाद.

अमीबा 31/07/2025 - 04:11
प्रवासवर्णन आणि छायाचित्रे, दोन्ही अतिसुंदर! एक शंका - स्थानिक भाषा येत नसताना भाषान्तरासाठी चॅटजीपीटी वा तत्सम अँप कितपत उपयोगी येऊ शकतात, याबद्दल आपण पडताळणी केली होती काय?

किल्लेदार 01/08/2025 - 18:13
मी गुगल ट्रान्सलेट ॲप फोन मधे टाकून घेऊन गेलो होतो. बऱ्यापैकी फायदा झाला. माणूस समोर असेल तर ठीक आहे पण कुठे फोन करायचा असेल तर भयंकर पंचाईत होते. एअरपोर्ट वरून हॉटेल ला फोन केला होता तेव्हा एसी मधेही घाम फुटला होता.

ग्लेशियरच्या गावाची सफर घडवून आणल्याबद्दल धन्यवाद. वातावरण आणि खाद्यसंस्कृती पाहता जाण्याची इच्छा तर नाही, पण लेख आणि चित्रांनी हा निसर्ग पुरेपूर अनुभवता आला.

Bhakti 24/07/2025 - 15:12
सतत हळूहळू सरकणाऱ्या हिमनदीवरच्या आईस वॉक टूरचा मार्गही यामुळे नेहमी बदलत असतो आणि या धोक्यामुळे काटेकोर पूर्वनियोजन अत्यावश्यक असतं.
नवीनच समजलं,खुपचं वेगळा अनुभव असणार.

भन्नाट प्रचि आणी वर्णनही. उर्वरित आयुष्यात जायला मिळेल किंवा नाही पण पुनर्जन्म पेंग्वीन(भलते सलते राजकीय अर्थ काढू नये) झालो तर किती मज्जा येईल. लेख आवडलाच.

गोरगावलेकर 24/07/2025 - 15:41
स्वप्नवत आहे हे सर्व . शब्दांकन आणि अप्रतिम फोटोंमुळे भटकंती अगदी जिवंत झालीय. वर्णन वाचताना जणू आपणही त्या मोहक निसर्गात फिरतोय, असे वाटते. खरोखरच उत्कृष्ट लेखन आणि अनुभव!

अप्रतिम निसर्ग आणि प्रचि. निशब्द किल्लेदार साहेब धन्यवाद . _/\_

श्वेता२४ 26/07/2025 - 13:04
तुमचे भटकंतीचे वर्णन एखादी कादंबरी वाचतोय असे वाटते. खूप छान लिहीता तुम्ही. आणी फोटो तर निव्वळ अप्रतीम. बघु इथे जायचा योग येतो का ते.

सौंदाळा 28/07/2025 - 10:42
अप्रतिम असे कॉकटेल (सुंदर वर्णन + अप्रतिम फोटो) असलेले लेख वाचले की मिसळपाववर आल्याचे सार्थक झाले असं वाटतं. छापील माध्यमात असे लेख वाचणे किंवा नुसते फोटो बघणे यात ही मज्जा नाही. क्रमशः बघून जीव भांड्यात पडला पुभाप्र

लेखतील चित्रे बघुन या ठिकाणाला भेट द्यायलाच पाहीजे असे वाटायला लागलेय. सर्व छायाचित्रे सुंदर्च पण सहाणेवरचे मॅश पोटॅटो, आईस्क्रीमचा फोटो आणि कॉरदेरो असादोर बघुन तोंपासु लिहिते रहा!!

वेगळा निसर्ग. शब्दचित्र छान रेखाटले आहे. प्रकाशचित्रांबद्दल काय बोलावे? तीही सुंदर आणि उत्कृष्टच. पेसो म्हटल्यावर जुने वेस्टर्न सिनेमे डोळ्यांसमोर येतात. एका सिनेमात फ्रॅन्को नीरो त्याला पकडून देणार्याला पोलीस ५००० पेसोचे बक्षीस लावले आहे अशा अर्थाचे पोस्टर रस्त्यावर पाहातो. त्यावर तो खडूने आणखी पाचदहा शून्ये काढून किंमत वाढवतो. वरील प्रकाशचित्रांची किंमत अशीच वाढवावीशी वाटते. एल कलाफाते प्रकाशपाटीचे चित्र आणि रेलिंग लावलेल्या पाण्याकाठीच्या मातीतल्या सज्जाचे वरून घेतलेले दृश्य फारच आवडले. धन्यवाद.

अमीबा 31/07/2025 - 04:11
प्रवासवर्णन आणि छायाचित्रे, दोन्ही अतिसुंदर! एक शंका - स्थानिक भाषा येत नसताना भाषान्तरासाठी चॅटजीपीटी वा तत्सम अँप कितपत उपयोगी येऊ शकतात, याबद्दल आपण पडताळणी केली होती काय?

किल्लेदार 01/08/2025 - 18:13
मी गुगल ट्रान्सलेट ॲप फोन मधे टाकून घेऊन गेलो होतो. बऱ्यापैकी फायदा झाला. माणूस समोर असेल तर ठीक आहे पण कुठे फोन करायचा असेल तर भयंकर पंचाईत होते. एअरपोर्ट वरून हॉटेल ला फोन केला होता तेव्हा एसी मधेही घाम फुटला होता.

ग्लेशियरच्या गावाची सफर घडवून आणल्याबद्दल धन्यवाद. वातावरण आणि खाद्यसंस्कृती पाहता जाण्याची इच्छा तर नाही, पण लेख आणि चित्रांनी हा निसर्ग पुरेपूर अनुभवता आला.
लेखनविषय:
लेखनप्रकार
रॉय !!! रॉय २ - सेरो तोरे फार फार पूर्वीची गोष्ट…पातागोनियाच्या विशाल डोंगराळ मुलुखात, अँडीज पर्वतांच्या सावलीत, अनेक आदिम जमाती नांदायच्या. त्यातल्याच तव्हेलचे जमातीच्या सरदाराला एक मुलगी होती, कलाफाते. अत्यंत रूपवान असलेल्या कलाफातेचं दुसऱ्या जमातीतल्या एका तरुणावर मन जडलं. हे आंतर-जमातीय प्रेम पोरीच्या बापाला काही मान्य नव्हतं. आपली लेक त्या तरुणाचा हात धरून पळून जाऊ नये म्हणून त्यानं रागाच्या भरात जादूनं तिचं एका काटेरी झुडुपात रूपांतर केलं.

भारतीय संगीतातली साथसंगत आणि कांही अनोखे प्रयोग

सुधीर कांदळकर ·

लेख वाचताना माझ्या मनातही असाच विचार आला की लेखकाने कुठल्या धुदींत हा लेख लिहीला असावा? कमीत कमी तीन चार वेळातही वाचला पाहिजे. वाचताना पं जयतिर्थ मेवूंडी आणी कौशीकी यानी गायलेले "बाजे रे मुरलिया" गाणे आठवले. गाण्याच्या आगोदर मेवूंडी व कौशिकी यांचा संवाद मनाला भुरळ घालतो. तसे हे गाणे पंडित भीमसेन जोशी व लता मंगेशकर यांनी अजरामर करून ठेवले आहे . मेवूंडी,कौशिक यांच्या जोडीने तेव्हढ्याच ताकदीने पेलले आहे. https://youtu.be/DwvWvjszKas?si=_3WbFcaosKOXZC7b धन्यवाद. गागाण्यातले काही कळत नाही पण कानाला गोड वाटते म्हणून जीवाला ओढ लागते.

मारवा 15/06/2025 - 09:08
सुधीरजी भारतीय संगीतावरील तुमचे उत्कट प्रेम जाणवते. तुम्ही दिलेले दुवे पण मेजवानी आहेत. मी कौशिकीपेक्षा त्यांच्या वडिलांचा अजॉय चक्रवर्ती यांचा फॅन आहे. जगजितसिंग सुद्धा कौशिकी प्रमाणे नेहमीच त्यांच्या सहकलाकारांना मानाची वागणूक देत असत. या गायकांचं हे वेगळेपणं उठून दिसतं. लेखाचा विषय साथ सांगत आहे तरीही ध्रुपद गायक उदय भवाळकर यांचा हा दरबारी तुम्ही ऐकलाय का ? https://youtu.be/gBHZmbyyynU?si=GZWRS5FW2K500_Dj अतीव सुंदर असा आहे.

सुंदर लेख ! कौशिकी चक्रवर्ती माझ्या आवडत्या गायिका आहेत. मी पहिल्यांदा युट्यूबवर त्यांच्याच ध्वनिफिती पाहिल्या. त्यांच्या वडीलांच्या नंतर. दोन्ही अतिशय उत्तम गायक आहेत. या निमित्ताने सारेगामा लिटील चॅप्स मधून पुढे आलेली बाल गायिका आर्या आंबेकर हिने गायलेलेलं "सहेला रे" आठवलं. वयाच्या मानाने चांगले गायलयं.

In reply to by कर्नलतपस्वी

हे गाणेच मुळी स्वतंत्र लेखाचा विषय आहे. फार कमी गायक हे गाणे गातात आणि त्यातही अपेक्षित उंची गाठू शकतात. पं. भीमसेन जोशी यांसारख्या कलाकारांनी हे गाणे वेगळ्याच उंचीवर नेउन ठेवले आहे. एकदम घरगुती वाटणार्‍या कार्यक्रमात आर्या आंबेकरने गायलेले हे गाणे पहा. साथीला असणारे कलाकारही दिग्गज आहेत. तबल्यावर भरत कामत, पेटीवर तन्मय देवचके आणि टाळ वादन करणारे माउली टाकळकर सुद्धा. https://www.youtube.com/watch?v=UeQtfXbs8gc बाकी लेखाबद्दल काय बोलावे? बर्‍याच दिवसांनी मिपावर असा तब्येतीत लिहिलेला लेख (ए आय वगैरे कुबड्या न वापरता) बघितला आणि भरुन आले. असे अभ्यासपूर्ण लेख वाचणे हीच आमच्यासारख्या कानसेनांना मेजवानी. लिहित रहा.

सर्व प्रतिसादकांस अनेक, अनेक धन्यवाद. दुवे ऐकून प्रतिसाद देणे यासाठी भरपूर निवांतपणाची जरूरी आहे. @विजूभाऊ: धन्यवाद विजूभाऊ. @कर्नल तपस्वी: लता-भीमसेन यांच्या बाजे मुरलिया ने मलाही वेड लावलेले आहे. अधूनमधून पुन्हां पुन्हां ऐकतो. कौशिकी-मेवुंडिचे आजच ऐकले, आवडले. दुव्याबद्दल धन्यवाद. @मारवा: भवाळकरांचे गायन आवडले. अनुष्का शंकर एकदा ऐकले दुसर्‍यांदा ऐकतांना ऐकता ऐकता इन्टरनेट गेले. सेकंदागणिक नियोजन असलेल्या कार्यक्रमातली वादनाची शिस्त आणि सफाईचे कौतुक वाटते. दुसरी आणि शेवटची थीम जास्त आवडल्या. दोन्ही दुव्यांबद्दल धन्यवाद. @धमु: धन्यवाद.

सर्व प्रतिसादकांस अनेक, अनेक धन्यवाद. दुवे ऐकून प्रतिसाद देणे यासाठी भरपूर निवांतपणाची जरूरी आहे. @विजूभाऊ: धन्यवाद विजूभाऊ. @कर्नल तपस्वी: लता-भीमसेन यांच्या बाजे मुरलिया ने मलाही वेड लावलेले आहे. अधूनमधून पुन्हां पुन्हां ऐकतो. कौशिकी-मेवुंडिचे आजच ऐकले, आवडले. दुव्याबद्दल धन्यवाद. @मारवा: भवाळकरांचे गायन आवडले. अनुष्का शंकर एकदा ऐकले दुसर्‍यांदा ऐकतांना ऐकता ऐकता इन्टरनेट गेले. सेकंदागणिक नियोजन असलेल्या कार्यक्रमातली वादनाची शिस्त आणि सफाईचे कौतुक वाटते. दुसरी आणि शेवटची थीम जास्त आवडल्या. दोन्ही दुव्यांबद्दल धन्यवाद. @धमु: धन्यवाद.

विजुभाऊ 15/06/2025 - 21:46
ऐकताना आपनी श्रीमंती कित्येक पटीने वाढलेली असते. फक्त ऐकताना हेडफोन किंवा मोठ्या स्पीकरवर ऐका. आसपासचा विसर पडतो. बासरी आणि मृदुंगही आनंदात भर घालतात

सुक्या 16/06/2025 - 00:14
सुंदर लेख. आसे लेख मिपा वर यायला हवे. जगजित सिंह, पं झाजिर हुसैन, पं हरीप्रसाद चौरासिया यांचे गायन / वादन प्रत्यक्ष अनुभवनाची संधी मिळाली असल्याने मैफिली चे वातावरण अनुभवले आहे. पं हरीप्रसाद चौरासिया यांच्या कार्यक्रमात तर ते बासरी वाजवत असताना लोक ईतके मंत्रमुग्ध झाले की त्यांचे वादन संपले तरी सारा हॉल स्तब्ध बसुन राहीला ... मग स्वतः हरीप्रसाद चौरासिया यांनी सांगीतले की या रागाचे वादन संपले आहे. मग कुठे लोक भानावर आली नी टाळ्या वाजवत राहीली. नवीन पीढी ची नव्या दमाचे वादक / गायक आता दिसायला लागले आहेत. वारसा चालवत आहेत. मला आवडलेल्या अभंगापैकी हा एक. विश्वजित बोरवण्कर. https://www.youtube.com/watch?app=desktop&v=o8vEdhKHMms&t=0s

वेढा वेढा रे बोरवणकरांनी अप्रतिम गायले आहे. अनेक वेळा ऐकले तरी गोडी अवीट. मंजुषा कुलकर्णी पाटील अशीच उभरती कलाकार. मास्टर कृष्णराव आणी राम मराठे यांनी गायलेला "परब्रह्म निष्काम तो हा",नामदेवांचा अभंग अतिशय सुंदर गायला आहे. https://youtu.be/BeZS_9du3Og?si=HK80SgeOYLOMx3LP बादवे, वेढा वेढा वर राजकिय विडंबन मिसळपाव वर आहे कदाचित आवडेल. ज्याहीरात केली. https://misalpav.com/node/51141

In reply to by कर्नलतपस्वी

सुक्या 16/06/2025 - 08:39
तुमचा बेतुक्याचे चऱ्हाट कसा काय सुटला बॉ? आज वाचली कवीता :). जुणी असली तरी अगदी समयोचित कविता होती ... भारतीय संगीतकारांची अजुन एक जमेची बाजु म्हणजे त्यांचा रियाज. रियाज करुन करुन त्यांच्ये सुर / ताल ईतके घट्ट झालेले असतात की समोर त्यांना कागद लागतच नाही. पं झाकीर हुसेन, कमला रमानाथ व जयन्ति कुमारेश यांची मैफील बघायला मी सहकुटूंब गेलो असता, दोन तास तिन्ही संगीतकारांनी कुठलाही स्कोर न बघता अप्रतीम पर्फॉर्मन्स दिला त्याचे माझ्या मुलीला खुप अप्रुप वाटले होते. अजुन गंम्म्त म्हणजे सारा कार्यक्रम झाल्यावर, तिघेही स्टेज वरुन निघुन गेले. लोक मात्र तसेच उभे राहुन जवळ्पास १० मिनिटे टाळ्या वाजवत होते. ते पाहुन पं. झकिर हुसेन दोन्ही कलाकारंसोबत परत स्टेज वर आले व त्यांनी १५ मिनिटे अजुन एक अप्रतिम राग सादर केला. केवळ अप्रतीम.

युयुत्सु 16/06/2025 - 18:19
कौशिकी चक्रवर्ती या बाईंबद्दल इतकं उत्कटेने लिहीलेले वाचून मला भडभडून आलं. यांच्या पुण्यात प्रवेशबंदी आणि गायनबंदी घालावी अशा मताचा मी आहे.

In reply to by युयुत्सु

विजुभाऊ 17/06/2025 - 09:56
प्रत्येकाची आवडनिवड असू शकते वेगळी. आता एखाद्याला जर अमरीशपुरीने म्हंटलेला राग दरबारी कानडा आवडत असेल आणि त्यापुढे इतर सर्व फिक्के ,इतर कोणी गावू ऐकू नये असे वाटत असेल तर काय बोलावे . पण एव्हरी वन हॅज राइट टू गो राँग....... या वचनावर ठाम विश्वास ठेवून चालतोय अजूनही. असो.

In reply to by विजुभाऊ

युयुत्सु 17/06/2025 - 10:16
हो, हो नक्कीच! प्रत्येक पुस्तकाला त्याचा वाचक भेटला पाहिजे आणि प्रत्येक गायकाला त्याचा श्रोता मिळायलाच हवा! पण पुण्याच्या गायनसंस्कृतीला विटाळणारे कलाकार वेशीबाहेर असावेत.

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे 18/06/2025 - 10:29
प्रत्येकाचे मत हे घड्याळासारखे असते. प्रत्येकाला वाटते कि आपलेच घड्याळ बरोबर. त्यातून काही लोकांचा नुसता असा विश्वास नसतो कि आपलेच घड्याळ बरोबर आहे. तर इतरांचे घड्याळ चूकच आहे.

@विजूभाऊ: ऐकण्यासाठी हेडफोन वा होम थिएटर हवेच. धन्यवाद. @ सुक्या: बोरवणकर उत्कृष्टच. धन्यवाद. @ कर्नल तपस्वी: मंजुषाताईंचे गाणे प्रत्यक्ष देखील ऐकले आहे. परब्रह्म ... छान. @मूकवाचकः धन्यवाद.

@अनिंद्यः आपल्या शब्दपारखी नजरेची तारीफ करावी तेवढी थोडीच. अन्यत्र प्रशंसिलेला मोदवर्तमान हा शब्दहीआठवतो आहे. धन्यवाद.

मा. साहित्य संपादक यांस, या लेखातल्या कांही भागामुळे काही मिपाकरांच्या भावना दुखावलेल्या आहेत. यामागील कारण मला तरी अज्ञात आहे. तरी कांही मिपकरांच्या तीव्र भावना लक्षांत घेऊन हा संपूर्ण लेख डिलीट करावा ही नम्र विनंती. सुधीर कांदळकर

In reply to by सुधीर कांदळकर

मारवा 17/06/2025 - 21:51
सुधीरजी माझ्यासारख्या अनेकांच्या भावना हबलेख वाचून सुखावल्या देखील आहेत. त्यामुळे हा लेख राहू द्यावा. प्रत्येकाचे एकमत व्हावे ही अपेक्षाच चुकीची आहे. लेख कुठलाही असो उडविण्याची गरजच नाही. लेख हा व्हिडिओ सारखा आढळत नसतो तो वाचणे न वाचणे किंवा वाचून सोडून देणे हे ज्याच्या त्याच्या हातात आहे.

मिपाकरांच्या भावना दुखावलेल्या आहेत. यामागील कारण मला तरी अज्ञात आहे. आपण लक्ष देऊ नका. तुम्ही तुमचे काम केले. गाढवाला गुळाची चव नसते त्यात गुळाचा काय दोष.? जसा गुळ आपला गोडाचा गुणधर्म सोडत नाही तसेच आपणही लिहीत रहा. अशाच सुंदर लेखाच्या प्रतिक्षेत असलेला कानसेन.

विजुभाऊ 17/06/2025 - 17:00
मिपाकरांच्या भावना दुखावलेल्या आहेत. यामागील कारण मला तरी अज्ञात आहे. नेहमीप्रमाणे ते कारण त्यानाही अज्ञातच असते. काळजी करू नका. तुमचे लिखाण मस्त आहे. सौंदर्यचा आस्वाद घेण्याच्या प्रत्येकाची तर्‍हा वेगळी असते. सुंदरीच्या गालावरच्या तीळाला, गालबोट म्हणणारे महाभाग सर्वत्र असतात.

काय संतुलित प्रतिसाद, आगदी तुकोबारायांचा अभंग आठवतो. घासावा शब्द, तासावा शब्द, तोलावा शब्द बोलण्या आधी. मला कधी जमेल हे माहीत नाही.

मूकवाचक 17/06/2025 - 23:04
कौशिकी चक्रवर्ती या पं. अजय चक्रवर्ती यांची पतियाळा घराण्याची परंपरा पुढे चालवत आहेत. पतियाळा घराणे म्हणजेच उस्ताद बडे गुलाम अली असे एक समीकरण देखील रसिकांच्या मनात पक्के ठसलेले आहे. घरंदाज गायकीबद्दल कित्येक दशकांपूर्वी एक पुस्तक वाचले होते. त्याचा सारांश आजही लक्षात आहे. तपशील थोडाफार चुकू शकेल, पण त्यातले विश्लेषण साधारणपणे असे आहे: किराणा घराणे स्वरप्रधान - सूर गया तो सिर गया, ताल गया तो बाल गया अशी या घराण्याची पहचान काही लोक करून देतात. आग्रा घराणे लयकारी प्रधान - ताल आणि लयीत 'जहांबाज' असलेले गायक अशी या घराण्याची ओळख आहे. ग्वाल्हेर घराण्यात स्वर आणि ताल दोन्हींना समतोल महत्व आहे, पण गायकी बरीच सरधोपट किंवा सुगम आहे. जयपूर घराण्यात स्वर आणि ताल यांचा बुद्धीप्रधान, काहीसा समजायला क्लिष्ट पण सौंदर्यप्रधान असा मिलाफ आहे. ही चार प्रमुख घराण्यांची खासियत. या पुस्तकात पतियाळा घराण्याच्या गायकीबद्दलचे मतप्रदर्शन साधारण या धर्तीवर आहे - गायकीमधली 'तयारी' या बाबतीत पतियाळा घराण्याची बरोबरी करायला कुणीही धजावणार नाही. विलक्षण तयारी बरोबरच गायकीतले सगळे प्रकार (शास्त्रीय, उपशास्त्रीय, लोकसंगीत वगैरे) तितक्याच समर्थपणे पेलणे हे काम देखील प्राधान्याने पतियाळा घराण्यातल्या गायकांनीच केलेले आहे. चमत्कृतीप्रधान गाण्याकडे कल असल्याने, काही वेळा या चमत्कृतींचा अनाठायी वापर केल्याने गाण्यातून रसनिर्मिती होत नाही, भाव निर्मिती होत नाही असा आक्षेप पतियाळा घराण्याच्या गायकांवर पूर्वापार होत आलेला आहे. कौशिकी चक्रवर्ती यांचा आणि त्यांच्या टीकाकारांचा जन्म होण्यापूर्वीपासून अशी टीका होत आलेली आहे. त्यात नवीन असे काहीच नाही. पतियाळा घराण्याचा एकही गायक अशा टीकेने विचलीत झालेला नाही. या गायकांनी आपल्या तयारी, कल्पकता आणि रसिकांचे प्रेम या जोरावर मैफिली गाजवलेल्या आहेत, पद्म पुरस्कार वगैरेंना गवसणी घातलेली आहे. आजचे शास्त्रीय संगीत म्हणजेच ख्याल (विचार) गायकी. यात व्यक्तिपरत्वे भिन्नता असणारच. वानगीदाखल सांगायचे तर गानसरस्वती किशोरी आमोणकर यांनी गायकीतून 'सरगम' हा प्रकार वर्ज्य मानलेला होता, तर डॉ. प्रभा अत्रे 'सरगम' विषयी कित्येक तास भरभरून बोलू शकतील इतके त्यांचे सरगम वर प्रेम होते, व्यासंग होता. तेव्हा थोडा साक्षेप बाळगत विचार केला, तर टोकाचे मतप्रदर्शन करण्याची गरज उरणार नाही. पण यातही व्यक्तिपरत्वे भिन्नता असायचीच. असो.

सुबोध खरे 18/06/2025 - 10:41
@सुधीर कांदळकर आपण लेख अप्रतिम लिहिला आहे. यातील अनेक कलाकारांचे गायन मी प्रत्यक्ष ऐकले आहे. मला संगीतात काहीही कळत नाही राग ओळखता येत नाही परंतु शास्त्रीय संगीत तीन चार तास सलग ऐकू शकतो इतकं आवडतं. उपशास्त्रीय संगीत नाट्यसंगीत हे जास्त आवडतं. अर्थात आपण लिहिलंय तसं उत्कटपणे लिहिणं सुद्द्धा जमत नाही. आपण लिहीत रहा. काही विघ्न संतोषी लोक सर्वत्र असतातच. आता औरंगजेब ९० वर्षे जगला म्हणजे त्याचे वंशज पण बरेच असणार. तुम्ही त्यांच्या कडे दुर्लक्ष करा. आणि लिहीते राहा

धन्यवाद. मारवा, सुक्या, कर्नल तपस्वी, विजूभाऊ, मूकवाचक, डॉ. खरेसाहेब, सर्वांना अनेक अनेक धन्यवाद. आता सत्तरीपार गेल्यानंतर मला आयुष्यात आणखी काहीही कमवायचे नाही. जरी रक्तदाब हृदय सारे सामान्य असले तरी आता मानसिकदृष्ट्या माझ्यात काहीही फायटिंग स्पिरीट राहिलेले नाही. आयुष्यातले उरलेले दिवस मस्त मनोरंजनात घालवायचे एवढाच उद्योग आहे. अभिजात शास्त्रीय संगीताच्या संस्कृतीत नम्रता, सौजन्य या गोष्टींना सर्वांत वरचे स्थान आहे. उच्च स्थानी पोहोचलेल्या एखाद्या गायक्/वादक मान्यवराला जर आपण एखाद्या नवोदित कलाकाराबद्दल मत विचारले तर माझ्यापेक्षा चांगला गातो/गाते किंवा वाजवतो/वाजवते असे विनम्र उत्तर मिळते हा माझा अनुभव आहे. एखाद्या मान्यवराच्या एखाद्या मैफिलीला आपण गेलों आणि त्याच शहरात जर एकदोन दिवसातच दुसया मैफिलीला गेलो आणि त्या मान्यवर कलाकाराची आपल्यावर नजर पडलीच तर परवाच्या मैफिलीला पण आपण होतांत ना? अशी चौकशी केली जाते. असा सामान्य रसिकाचाही आदर ठेवणार्‍या संस्कृतीत असे काही घडते याचा मला सध्या फार मोठा धक्का बसला आहे. द्वेषाधिष्ठित विचारसरणी पाहून मन नक्कीच उद्विग्न होते. पण चालायचेच. कालाय तस्मै नम:. आपणा सर्वांसारखी तसेच इतर बहुसंख्य मिपाकरांसारखी चांगली माणसे अजून आहेत म्हणून जग चालले आहे यावर माझा विश्वास आहे. पुन्हां एकदा धन्यवाद देतो आणि संगीतातली आणखी सौंदर्यस्थळे शोधायला लागतों.

In reply to by सुधीर कांदळकर

सुबोध खरे 18/06/2025 - 18:30
जाऊ द्या हो आपले आरवणे ऐकण्यासाठीच सूर्य उगवतो असे समजणारे अहंमन्य कोंबडे जगात कमी आहेत का? आणि आज आपण आरवलो नाही म्हणजे सूर्योदय झालाच नाही असे ठासून सांगणारे कोंबडे सुद्धा बरेच आहेत. कुठे जीवाला त्रास करून घेताय?

In reply to by सुधीर कांदळकर

कांदळकरजी, आपले मवाळ प्रतिसाद वाचून पुरूषोत्तम दारव्हेकरांचे कट्यार मधली नाट्यगीते आठवली.. खां साहेब राजगायक बनल्यावर पंडितजींच्या घरात पाय ठेवताच म्हणतात,"या भवनातील मवाळ हळवे सूर,जाऊ द्यात ". भार्गवराम अचरेकरांचे, घेई छंद मकरंद, प्रिय हा मिलींद ",याचा ताणा बाणा खां साहेब आपल्या शैलीत पेश करतात. वसंतराव, भारगवराम,बकुल पंडीत,फैय्याज, प्रकाश घांग्रेकर, इनामदार असे दिग्गजांकडून सादरीकरण, प्रत्यक्ष ऐकण्याचा अमृतानुभव.. फाट्यावर मारा व लिहीते रहा. सत्तरीत मी पण आहे पण आजही विचारले ",हाऊ इज जोश",तर अपसूक निघते "यस्स सर". तुकोबाराय अशा लोकांसाठी सांगतात, , तुका म्हणे ऐशा नरा मोजून माराव्या पैजारा

विजुभाऊ 19/06/2025 - 09:04
सुधीरजी इतका चांगला लेख लिहीलात. सर्वसामान्य माणसांना जी गोष्ट चांगलीवाटते ती गोष्ट समिक्षकांना वाइट वाटू शकते. त्या बद्दल त्या समिक्षकांत दुमत कधीच नसते. कावीळ झालेल्याला जग पिवळे दिसते पन म्हणून ते तसे प्रत्यक्षात नसते. (माझ्या एका वचनावर गाढ विश्वास आहे " एव्हरी वन हॅज राईट टी गो राँग " ) कोणीतरी म्हणाले आहे की मोनालीसाच्या चित्रातल्या हास्याचे गूढ म्हणजे तीला बद्धकोष्ठ झाला होता. म्हणणाराला लोकांनी फाट्यावर मारत चित्राचे सौंदर्य महत्वाचे मानले. असो. तुम्ही असेच आणखी काही संगीत क्षण शेअर करा. मजा येईल.

Bhakti 19/06/2025 - 10:58
नादमय सुंदर लेख आहे. सध्या अवचिता परिमळूचे निरूपणासह पारायण सुरु आहे. अवांतर स्वगत Sapphire चे पण पारायण निराळेच ;)

@रामे : धन्यवाद राजेंद्रजी. भाग्यदा लक्ष्मी बारम्मा भीमसेनजींचे ऐकले होते. एकदां बेळगांव ते व्हाया यल्लापूर कारवार या प्रवासात बस सकाळी सहासाडेसहाला मस्तीकट्टा या गांवात चहासाठी थांबली होती. नुकतेच फटफटत होते. जवळच्या मंदिरात लाऊड स्पीकरच्या कर्ण्यावर हे गाणे लागले होते. पाठोपाठ कन्नड भाषेतली संतवाणी आपल्यास चालीवर भीमसेन लताच्या आवाजात सुरू झाली होती. तो अनुभव विसरूंच शकत नाही. तुमच्या प्रतिसादाने ही आठवण ताजी केली. अनेक, अनेक, धन्यवाद. आर्याचे आजच ऐकले. आवडले. @ मूकवाचकः आपण विविध घराण्यांतल्या गायनशैलीच्या विषयींच्या वाचनाचा तपशील दिला आहे. तो मी वाचलेला मला आठवतो आहे. बहुधा कुमारांचे गुरुबंधु चंद्रशेखर रेळे यांच्या 'कुमार माझा सखा' या पुस्तकात. वसंतराव देशपांडे खास पंजाब घराण्याच्या गायनशैलीचा अभ्यास करण्यासाठी लाहोरला जाऊन आले असा त्यांनी एका मैफिलीत उल्लेख केल्याचे आठवते. रेळेंचे पुस्तक वाचले तेव्हां आणखी एक सुंदर, संस्मरणीय पुस्तक वाचले होते. आपल्या मनांत ठेवा म्हणून जपून ठेवावे असे. दत्ता मारुलकर यांचे 'अंतर्यामी सूर गवसला'. हे खळेकाकांवर आहे. अनेक आठवणी जागविल्यात अनेक अनेक धन्यवाद. @भक्ती: धन्यवाद भक्तीताई. @विजूभाऊ, कर्नल तपस्वी, डॉ. सुबोध खरेसाहेब : पुन्हा एकदां धन्यवाद.

लेख वाचताना माझ्या मनातही असाच विचार आला की लेखकाने कुठल्या धुदींत हा लेख लिहीला असावा? कमीत कमी तीन चार वेळातही वाचला पाहिजे. वाचताना पं जयतिर्थ मेवूंडी आणी कौशीकी यानी गायलेले "बाजे रे मुरलिया" गाणे आठवले. गाण्याच्या आगोदर मेवूंडी व कौशिकी यांचा संवाद मनाला भुरळ घालतो. तसे हे गाणे पंडित भीमसेन जोशी व लता मंगेशकर यांनी अजरामर करून ठेवले आहे . मेवूंडी,कौशिक यांच्या जोडीने तेव्हढ्याच ताकदीने पेलले आहे. https://youtu.be/DwvWvjszKas?si=_3WbFcaosKOXZC7b धन्यवाद. गागाण्यातले काही कळत नाही पण कानाला गोड वाटते म्हणून जीवाला ओढ लागते.

मारवा 15/06/2025 - 09:08
सुधीरजी भारतीय संगीतावरील तुमचे उत्कट प्रेम जाणवते. तुम्ही दिलेले दुवे पण मेजवानी आहेत. मी कौशिकीपेक्षा त्यांच्या वडिलांचा अजॉय चक्रवर्ती यांचा फॅन आहे. जगजितसिंग सुद्धा कौशिकी प्रमाणे नेहमीच त्यांच्या सहकलाकारांना मानाची वागणूक देत असत. या गायकांचं हे वेगळेपणं उठून दिसतं. लेखाचा विषय साथ सांगत आहे तरीही ध्रुपद गायक उदय भवाळकर यांचा हा दरबारी तुम्ही ऐकलाय का ? https://youtu.be/gBHZmbyyynU?si=GZWRS5FW2K500_Dj अतीव सुंदर असा आहे.

सुंदर लेख ! कौशिकी चक्रवर्ती माझ्या आवडत्या गायिका आहेत. मी पहिल्यांदा युट्यूबवर त्यांच्याच ध्वनिफिती पाहिल्या. त्यांच्या वडीलांच्या नंतर. दोन्ही अतिशय उत्तम गायक आहेत. या निमित्ताने सारेगामा लिटील चॅप्स मधून पुढे आलेली बाल गायिका आर्या आंबेकर हिने गायलेलेलं "सहेला रे" आठवलं. वयाच्या मानाने चांगले गायलयं.

In reply to by कर्नलतपस्वी

हे गाणेच मुळी स्वतंत्र लेखाचा विषय आहे. फार कमी गायक हे गाणे गातात आणि त्यातही अपेक्षित उंची गाठू शकतात. पं. भीमसेन जोशी यांसारख्या कलाकारांनी हे गाणे वेगळ्याच उंचीवर नेउन ठेवले आहे. एकदम घरगुती वाटणार्‍या कार्यक्रमात आर्या आंबेकरने गायलेले हे गाणे पहा. साथीला असणारे कलाकारही दिग्गज आहेत. तबल्यावर भरत कामत, पेटीवर तन्मय देवचके आणि टाळ वादन करणारे माउली टाकळकर सुद्धा. https://www.youtube.com/watch?v=UeQtfXbs8gc बाकी लेखाबद्दल काय बोलावे? बर्‍याच दिवसांनी मिपावर असा तब्येतीत लिहिलेला लेख (ए आय वगैरे कुबड्या न वापरता) बघितला आणि भरुन आले. असे अभ्यासपूर्ण लेख वाचणे हीच आमच्यासारख्या कानसेनांना मेजवानी. लिहित रहा.

सर्व प्रतिसादकांस अनेक, अनेक धन्यवाद. दुवे ऐकून प्रतिसाद देणे यासाठी भरपूर निवांतपणाची जरूरी आहे. @विजूभाऊ: धन्यवाद विजूभाऊ. @कर्नल तपस्वी: लता-भीमसेन यांच्या बाजे मुरलिया ने मलाही वेड लावलेले आहे. अधूनमधून पुन्हां पुन्हां ऐकतो. कौशिकी-मेवुंडिचे आजच ऐकले, आवडले. दुव्याबद्दल धन्यवाद. @मारवा: भवाळकरांचे गायन आवडले. अनुष्का शंकर एकदा ऐकले दुसर्‍यांदा ऐकतांना ऐकता ऐकता इन्टरनेट गेले. सेकंदागणिक नियोजन असलेल्या कार्यक्रमातली वादनाची शिस्त आणि सफाईचे कौतुक वाटते. दुसरी आणि शेवटची थीम जास्त आवडल्या. दोन्ही दुव्यांबद्दल धन्यवाद. @धमु: धन्यवाद.

सर्व प्रतिसादकांस अनेक, अनेक धन्यवाद. दुवे ऐकून प्रतिसाद देणे यासाठी भरपूर निवांतपणाची जरूरी आहे. @विजूभाऊ: धन्यवाद विजूभाऊ. @कर्नल तपस्वी: लता-भीमसेन यांच्या बाजे मुरलिया ने मलाही वेड लावलेले आहे. अधूनमधून पुन्हां पुन्हां ऐकतो. कौशिकी-मेवुंडिचे आजच ऐकले, आवडले. दुव्याबद्दल धन्यवाद. @मारवा: भवाळकरांचे गायन आवडले. अनुष्का शंकर एकदा ऐकले दुसर्‍यांदा ऐकतांना ऐकता ऐकता इन्टरनेट गेले. सेकंदागणिक नियोजन असलेल्या कार्यक्रमातली वादनाची शिस्त आणि सफाईचे कौतुक वाटते. दुसरी आणि शेवटची थीम जास्त आवडल्या. दोन्ही दुव्यांबद्दल धन्यवाद. @धमु: धन्यवाद.

विजुभाऊ 15/06/2025 - 21:46
ऐकताना आपनी श्रीमंती कित्येक पटीने वाढलेली असते. फक्त ऐकताना हेडफोन किंवा मोठ्या स्पीकरवर ऐका. आसपासचा विसर पडतो. बासरी आणि मृदुंगही आनंदात भर घालतात

सुक्या 16/06/2025 - 00:14
सुंदर लेख. आसे लेख मिपा वर यायला हवे. जगजित सिंह, पं झाजिर हुसैन, पं हरीप्रसाद चौरासिया यांचे गायन / वादन प्रत्यक्ष अनुभवनाची संधी मिळाली असल्याने मैफिली चे वातावरण अनुभवले आहे. पं हरीप्रसाद चौरासिया यांच्या कार्यक्रमात तर ते बासरी वाजवत असताना लोक ईतके मंत्रमुग्ध झाले की त्यांचे वादन संपले तरी सारा हॉल स्तब्ध बसुन राहीला ... मग स्वतः हरीप्रसाद चौरासिया यांनी सांगीतले की या रागाचे वादन संपले आहे. मग कुठे लोक भानावर आली नी टाळ्या वाजवत राहीली. नवीन पीढी ची नव्या दमाचे वादक / गायक आता दिसायला लागले आहेत. वारसा चालवत आहेत. मला आवडलेल्या अभंगापैकी हा एक. विश्वजित बोरवण्कर. https://www.youtube.com/watch?app=desktop&v=o8vEdhKHMms&t=0s

वेढा वेढा रे बोरवणकरांनी अप्रतिम गायले आहे. अनेक वेळा ऐकले तरी गोडी अवीट. मंजुषा कुलकर्णी पाटील अशीच उभरती कलाकार. मास्टर कृष्णराव आणी राम मराठे यांनी गायलेला "परब्रह्म निष्काम तो हा",नामदेवांचा अभंग अतिशय सुंदर गायला आहे. https://youtu.be/BeZS_9du3Og?si=HK80SgeOYLOMx3LP बादवे, वेढा वेढा वर राजकिय विडंबन मिसळपाव वर आहे कदाचित आवडेल. ज्याहीरात केली. https://misalpav.com/node/51141

In reply to by कर्नलतपस्वी

सुक्या 16/06/2025 - 08:39
तुमचा बेतुक्याचे चऱ्हाट कसा काय सुटला बॉ? आज वाचली कवीता :). जुणी असली तरी अगदी समयोचित कविता होती ... भारतीय संगीतकारांची अजुन एक जमेची बाजु म्हणजे त्यांचा रियाज. रियाज करुन करुन त्यांच्ये सुर / ताल ईतके घट्ट झालेले असतात की समोर त्यांना कागद लागतच नाही. पं झाकीर हुसेन, कमला रमानाथ व जयन्ति कुमारेश यांची मैफील बघायला मी सहकुटूंब गेलो असता, दोन तास तिन्ही संगीतकारांनी कुठलाही स्कोर न बघता अप्रतीम पर्फॉर्मन्स दिला त्याचे माझ्या मुलीला खुप अप्रुप वाटले होते. अजुन गंम्म्त म्हणजे सारा कार्यक्रम झाल्यावर, तिघेही स्टेज वरुन निघुन गेले. लोक मात्र तसेच उभे राहुन जवळ्पास १० मिनिटे टाळ्या वाजवत होते. ते पाहुन पं. झकिर हुसेन दोन्ही कलाकारंसोबत परत स्टेज वर आले व त्यांनी १५ मिनिटे अजुन एक अप्रतिम राग सादर केला. केवळ अप्रतीम.

युयुत्सु 16/06/2025 - 18:19
कौशिकी चक्रवर्ती या बाईंबद्दल इतकं उत्कटेने लिहीलेले वाचून मला भडभडून आलं. यांच्या पुण्यात प्रवेशबंदी आणि गायनबंदी घालावी अशा मताचा मी आहे.

In reply to by युयुत्सु

विजुभाऊ 17/06/2025 - 09:56
प्रत्येकाची आवडनिवड असू शकते वेगळी. आता एखाद्याला जर अमरीशपुरीने म्हंटलेला राग दरबारी कानडा आवडत असेल आणि त्यापुढे इतर सर्व फिक्के ,इतर कोणी गावू ऐकू नये असे वाटत असेल तर काय बोलावे . पण एव्हरी वन हॅज राइट टू गो राँग....... या वचनावर ठाम विश्वास ठेवून चालतोय अजूनही. असो.

In reply to by विजुभाऊ

युयुत्सु 17/06/2025 - 10:16
हो, हो नक्कीच! प्रत्येक पुस्तकाला त्याचा वाचक भेटला पाहिजे आणि प्रत्येक गायकाला त्याचा श्रोता मिळायलाच हवा! पण पुण्याच्या गायनसंस्कृतीला विटाळणारे कलाकार वेशीबाहेर असावेत.

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे 18/06/2025 - 10:29
प्रत्येकाचे मत हे घड्याळासारखे असते. प्रत्येकाला वाटते कि आपलेच घड्याळ बरोबर. त्यातून काही लोकांचा नुसता असा विश्वास नसतो कि आपलेच घड्याळ बरोबर आहे. तर इतरांचे घड्याळ चूकच आहे.

@विजूभाऊ: ऐकण्यासाठी हेडफोन वा होम थिएटर हवेच. धन्यवाद. @ सुक्या: बोरवणकर उत्कृष्टच. धन्यवाद. @ कर्नल तपस्वी: मंजुषाताईंचे गाणे प्रत्यक्ष देखील ऐकले आहे. परब्रह्म ... छान. @मूकवाचकः धन्यवाद.

@अनिंद्यः आपल्या शब्दपारखी नजरेची तारीफ करावी तेवढी थोडीच. अन्यत्र प्रशंसिलेला मोदवर्तमान हा शब्दहीआठवतो आहे. धन्यवाद.

मा. साहित्य संपादक यांस, या लेखातल्या कांही भागामुळे काही मिपाकरांच्या भावना दुखावलेल्या आहेत. यामागील कारण मला तरी अज्ञात आहे. तरी कांही मिपकरांच्या तीव्र भावना लक्षांत घेऊन हा संपूर्ण लेख डिलीट करावा ही नम्र विनंती. सुधीर कांदळकर

In reply to by सुधीर कांदळकर

मारवा 17/06/2025 - 21:51
सुधीरजी माझ्यासारख्या अनेकांच्या भावना हबलेख वाचून सुखावल्या देखील आहेत. त्यामुळे हा लेख राहू द्यावा. प्रत्येकाचे एकमत व्हावे ही अपेक्षाच चुकीची आहे. लेख कुठलाही असो उडविण्याची गरजच नाही. लेख हा व्हिडिओ सारखा आढळत नसतो तो वाचणे न वाचणे किंवा वाचून सोडून देणे हे ज्याच्या त्याच्या हातात आहे.

मिपाकरांच्या भावना दुखावलेल्या आहेत. यामागील कारण मला तरी अज्ञात आहे. आपण लक्ष देऊ नका. तुम्ही तुमचे काम केले. गाढवाला गुळाची चव नसते त्यात गुळाचा काय दोष.? जसा गुळ आपला गोडाचा गुणधर्म सोडत नाही तसेच आपणही लिहीत रहा. अशाच सुंदर लेखाच्या प्रतिक्षेत असलेला कानसेन.

विजुभाऊ 17/06/2025 - 17:00
मिपाकरांच्या भावना दुखावलेल्या आहेत. यामागील कारण मला तरी अज्ञात आहे. नेहमीप्रमाणे ते कारण त्यानाही अज्ञातच असते. काळजी करू नका. तुमचे लिखाण मस्त आहे. सौंदर्यचा आस्वाद घेण्याच्या प्रत्येकाची तर्‍हा वेगळी असते. सुंदरीच्या गालावरच्या तीळाला, गालबोट म्हणणारे महाभाग सर्वत्र असतात.

काय संतुलित प्रतिसाद, आगदी तुकोबारायांचा अभंग आठवतो. घासावा शब्द, तासावा शब्द, तोलावा शब्द बोलण्या आधी. मला कधी जमेल हे माहीत नाही.

मूकवाचक 17/06/2025 - 23:04
कौशिकी चक्रवर्ती या पं. अजय चक्रवर्ती यांची पतियाळा घराण्याची परंपरा पुढे चालवत आहेत. पतियाळा घराणे म्हणजेच उस्ताद बडे गुलाम अली असे एक समीकरण देखील रसिकांच्या मनात पक्के ठसलेले आहे. घरंदाज गायकीबद्दल कित्येक दशकांपूर्वी एक पुस्तक वाचले होते. त्याचा सारांश आजही लक्षात आहे. तपशील थोडाफार चुकू शकेल, पण त्यातले विश्लेषण साधारणपणे असे आहे: किराणा घराणे स्वरप्रधान - सूर गया तो सिर गया, ताल गया तो बाल गया अशी या घराण्याची पहचान काही लोक करून देतात. आग्रा घराणे लयकारी प्रधान - ताल आणि लयीत 'जहांबाज' असलेले गायक अशी या घराण्याची ओळख आहे. ग्वाल्हेर घराण्यात स्वर आणि ताल दोन्हींना समतोल महत्व आहे, पण गायकी बरीच सरधोपट किंवा सुगम आहे. जयपूर घराण्यात स्वर आणि ताल यांचा बुद्धीप्रधान, काहीसा समजायला क्लिष्ट पण सौंदर्यप्रधान असा मिलाफ आहे. ही चार प्रमुख घराण्यांची खासियत. या पुस्तकात पतियाळा घराण्याच्या गायकीबद्दलचे मतप्रदर्शन साधारण या धर्तीवर आहे - गायकीमधली 'तयारी' या बाबतीत पतियाळा घराण्याची बरोबरी करायला कुणीही धजावणार नाही. विलक्षण तयारी बरोबरच गायकीतले सगळे प्रकार (शास्त्रीय, उपशास्त्रीय, लोकसंगीत वगैरे) तितक्याच समर्थपणे पेलणे हे काम देखील प्राधान्याने पतियाळा घराण्यातल्या गायकांनीच केलेले आहे. चमत्कृतीप्रधान गाण्याकडे कल असल्याने, काही वेळा या चमत्कृतींचा अनाठायी वापर केल्याने गाण्यातून रसनिर्मिती होत नाही, भाव निर्मिती होत नाही असा आक्षेप पतियाळा घराण्याच्या गायकांवर पूर्वापार होत आलेला आहे. कौशिकी चक्रवर्ती यांचा आणि त्यांच्या टीकाकारांचा जन्म होण्यापूर्वीपासून अशी टीका होत आलेली आहे. त्यात नवीन असे काहीच नाही. पतियाळा घराण्याचा एकही गायक अशा टीकेने विचलीत झालेला नाही. या गायकांनी आपल्या तयारी, कल्पकता आणि रसिकांचे प्रेम या जोरावर मैफिली गाजवलेल्या आहेत, पद्म पुरस्कार वगैरेंना गवसणी घातलेली आहे. आजचे शास्त्रीय संगीत म्हणजेच ख्याल (विचार) गायकी. यात व्यक्तिपरत्वे भिन्नता असणारच. वानगीदाखल सांगायचे तर गानसरस्वती किशोरी आमोणकर यांनी गायकीतून 'सरगम' हा प्रकार वर्ज्य मानलेला होता, तर डॉ. प्रभा अत्रे 'सरगम' विषयी कित्येक तास भरभरून बोलू शकतील इतके त्यांचे सरगम वर प्रेम होते, व्यासंग होता. तेव्हा थोडा साक्षेप बाळगत विचार केला, तर टोकाचे मतप्रदर्शन करण्याची गरज उरणार नाही. पण यातही व्यक्तिपरत्वे भिन्नता असायचीच. असो.

सुबोध खरे 18/06/2025 - 10:41
@सुधीर कांदळकर आपण लेख अप्रतिम लिहिला आहे. यातील अनेक कलाकारांचे गायन मी प्रत्यक्ष ऐकले आहे. मला संगीतात काहीही कळत नाही राग ओळखता येत नाही परंतु शास्त्रीय संगीत तीन चार तास सलग ऐकू शकतो इतकं आवडतं. उपशास्त्रीय संगीत नाट्यसंगीत हे जास्त आवडतं. अर्थात आपण लिहिलंय तसं उत्कटपणे लिहिणं सुद्द्धा जमत नाही. आपण लिहीत रहा. काही विघ्न संतोषी लोक सर्वत्र असतातच. आता औरंगजेब ९० वर्षे जगला म्हणजे त्याचे वंशज पण बरेच असणार. तुम्ही त्यांच्या कडे दुर्लक्ष करा. आणि लिहीते राहा

धन्यवाद. मारवा, सुक्या, कर्नल तपस्वी, विजूभाऊ, मूकवाचक, डॉ. खरेसाहेब, सर्वांना अनेक अनेक धन्यवाद. आता सत्तरीपार गेल्यानंतर मला आयुष्यात आणखी काहीही कमवायचे नाही. जरी रक्तदाब हृदय सारे सामान्य असले तरी आता मानसिकदृष्ट्या माझ्यात काहीही फायटिंग स्पिरीट राहिलेले नाही. आयुष्यातले उरलेले दिवस मस्त मनोरंजनात घालवायचे एवढाच उद्योग आहे. अभिजात शास्त्रीय संगीताच्या संस्कृतीत नम्रता, सौजन्य या गोष्टींना सर्वांत वरचे स्थान आहे. उच्च स्थानी पोहोचलेल्या एखाद्या गायक्/वादक मान्यवराला जर आपण एखाद्या नवोदित कलाकाराबद्दल मत विचारले तर माझ्यापेक्षा चांगला गातो/गाते किंवा वाजवतो/वाजवते असे विनम्र उत्तर मिळते हा माझा अनुभव आहे. एखाद्या मान्यवराच्या एखाद्या मैफिलीला आपण गेलों आणि त्याच शहरात जर एकदोन दिवसातच दुसया मैफिलीला गेलो आणि त्या मान्यवर कलाकाराची आपल्यावर नजर पडलीच तर परवाच्या मैफिलीला पण आपण होतांत ना? अशी चौकशी केली जाते. असा सामान्य रसिकाचाही आदर ठेवणार्‍या संस्कृतीत असे काही घडते याचा मला सध्या फार मोठा धक्का बसला आहे. द्वेषाधिष्ठित विचारसरणी पाहून मन नक्कीच उद्विग्न होते. पण चालायचेच. कालाय तस्मै नम:. आपणा सर्वांसारखी तसेच इतर बहुसंख्य मिपाकरांसारखी चांगली माणसे अजून आहेत म्हणून जग चालले आहे यावर माझा विश्वास आहे. पुन्हां एकदा धन्यवाद देतो आणि संगीतातली आणखी सौंदर्यस्थळे शोधायला लागतों.

In reply to by सुधीर कांदळकर

सुबोध खरे 18/06/2025 - 18:30
जाऊ द्या हो आपले आरवणे ऐकण्यासाठीच सूर्य उगवतो असे समजणारे अहंमन्य कोंबडे जगात कमी आहेत का? आणि आज आपण आरवलो नाही म्हणजे सूर्योदय झालाच नाही असे ठासून सांगणारे कोंबडे सुद्धा बरेच आहेत. कुठे जीवाला त्रास करून घेताय?

In reply to by सुधीर कांदळकर

कांदळकरजी, आपले मवाळ प्रतिसाद वाचून पुरूषोत्तम दारव्हेकरांचे कट्यार मधली नाट्यगीते आठवली.. खां साहेब राजगायक बनल्यावर पंडितजींच्या घरात पाय ठेवताच म्हणतात,"या भवनातील मवाळ हळवे सूर,जाऊ द्यात ". भार्गवराम अचरेकरांचे, घेई छंद मकरंद, प्रिय हा मिलींद ",याचा ताणा बाणा खां साहेब आपल्या शैलीत पेश करतात. वसंतराव, भारगवराम,बकुल पंडीत,फैय्याज, प्रकाश घांग्रेकर, इनामदार असे दिग्गजांकडून सादरीकरण, प्रत्यक्ष ऐकण्याचा अमृतानुभव.. फाट्यावर मारा व लिहीते रहा. सत्तरीत मी पण आहे पण आजही विचारले ",हाऊ इज जोश",तर अपसूक निघते "यस्स सर". तुकोबाराय अशा लोकांसाठी सांगतात, , तुका म्हणे ऐशा नरा मोजून माराव्या पैजारा

विजुभाऊ 19/06/2025 - 09:04
सुधीरजी इतका चांगला लेख लिहीलात. सर्वसामान्य माणसांना जी गोष्ट चांगलीवाटते ती गोष्ट समिक्षकांना वाइट वाटू शकते. त्या बद्दल त्या समिक्षकांत दुमत कधीच नसते. कावीळ झालेल्याला जग पिवळे दिसते पन म्हणून ते तसे प्रत्यक्षात नसते. (माझ्या एका वचनावर गाढ विश्वास आहे " एव्हरी वन हॅज राईट टी गो राँग " ) कोणीतरी म्हणाले आहे की मोनालीसाच्या चित्रातल्या हास्याचे गूढ म्हणजे तीला बद्धकोष्ठ झाला होता. म्हणणाराला लोकांनी फाट्यावर मारत चित्राचे सौंदर्य महत्वाचे मानले. असो. तुम्ही असेच आणखी काही संगीत क्षण शेअर करा. मजा येईल.

Bhakti 19/06/2025 - 10:58
नादमय सुंदर लेख आहे. सध्या अवचिता परिमळूचे निरूपणासह पारायण सुरु आहे. अवांतर स्वगत Sapphire चे पण पारायण निराळेच ;)

@रामे : धन्यवाद राजेंद्रजी. भाग्यदा लक्ष्मी बारम्मा भीमसेनजींचे ऐकले होते. एकदां बेळगांव ते व्हाया यल्लापूर कारवार या प्रवासात बस सकाळी सहासाडेसहाला मस्तीकट्टा या गांवात चहासाठी थांबली होती. नुकतेच फटफटत होते. जवळच्या मंदिरात लाऊड स्पीकरच्या कर्ण्यावर हे गाणे लागले होते. पाठोपाठ कन्नड भाषेतली संतवाणी आपल्यास चालीवर भीमसेन लताच्या आवाजात सुरू झाली होती. तो अनुभव विसरूंच शकत नाही. तुमच्या प्रतिसादाने ही आठवण ताजी केली. अनेक, अनेक, धन्यवाद. आर्याचे आजच ऐकले. आवडले. @ मूकवाचकः आपण विविध घराण्यांतल्या गायनशैलीच्या विषयींच्या वाचनाचा तपशील दिला आहे. तो मी वाचलेला मला आठवतो आहे. बहुधा कुमारांचे गुरुबंधु चंद्रशेखर रेळे यांच्या 'कुमार माझा सखा' या पुस्तकात. वसंतराव देशपांडे खास पंजाब घराण्याच्या गायनशैलीचा अभ्यास करण्यासाठी लाहोरला जाऊन आले असा त्यांनी एका मैफिलीत उल्लेख केल्याचे आठवते. रेळेंचे पुस्तक वाचले तेव्हां आणखी एक सुंदर, संस्मरणीय पुस्तक वाचले होते. आपल्या मनांत ठेवा म्हणून जपून ठेवावे असे. दत्ता मारुलकर यांचे 'अंतर्यामी सूर गवसला'. हे खळेकाकांवर आहे. अनेक आठवणी जागविल्यात अनेक अनेक धन्यवाद. @भक्ती: धन्यवाद भक्तीताई. @विजूभाऊ, कर्नल तपस्वी, डॉ. सुबोध खरेसाहेब : पुन्हा एकदां धन्यवाद.
लेखनविषय:
लेखनप्रकार
भारतीय संगीत मैफ़िलीत प्रमुख कलाकाराबरोबर साथीचे कलाकार असतात हे आपल्याला ठाऊक आहे. जसे गायकाबरोबर तानपुरा, संवादिनी, व्हायोलीन, तबला इ.इ. सादरकर्त्या कलाकारांच्या एकमेकांना पूरक अशा केलेल्या साथसंगतीमुळे मैफ़िलीतील रसिकांना अनेक अपूर्व, अविस्मरणीय असे क्षण लाभतात. भारतीय संगीतातली साथसंगत हा या लेखातला पहिला मुद्दा. तानसेनाच्या काळातले भारतीय अभिजात शास्त्रीय संगीत हे स्वरप्रधान संगीत होते. इथे शब्द बापुडवाणे होत. संगीताच्या या दरबारात देखणे, रुबाबदार शब्द देखील गरीब बिचारे होऊन सेवकाच्या भूमिकेत जाऊन नतमस्तक होऊन जवळजवळ मूक होतात. परंतु आज जास्तीत जास्त रसिक हे सुगम संगीत ऐकतात.

गर्दी, चेंगराचेंगरी: कारणे, आकडेवारी आणि शास्त्रीय उपाय

माहितगार ·

माहितगार 06/06/2025 - 08:50
अशा लेखाची सर्व सेलीब्रीटी आणि कार्यक्रम व्यवस्थापकांनी दखल घेतल्यास छान होईल. या लेखात गर्दी होणार्‍या ठिकाणचे आग प्रतिबंधन आणि आतंकवादी पासून सुरक्षाचा अंतर्भाव लेखाची लांबी फारच वाढली असती म्हणून केला नाही पण ते महत्वाचे मुद्दे आहेत. आणखी एक मुद्दा राहीला तो म्हणजे मंडप आणि खुर्ची सप्लायर्स ते गेट किपर्सनाही या मुद्द्यांवर ट्रेन केले पाहीजे.

In reply to by युयुत्सु

माहितगार 06/06/2025 - 09:03
मला वाटते पोलीस ट्रेनींग स्कूलस मध्ये हा विषय असेलच पण तो अशा ट्रेनिंग स्कूल्सनी इव्हेंट मॅनेजमेन्ट स्कूलस व गर्दी होणार्‍या व्यवस्थापनांच्या व्यवपस्थाप्कांपर्यंत पोहोचवावयास हवे.

माहितगार 06/06/2025 - 08:56
नक्कीच, या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर माहिती खालीलप्रमाणे आहे. जर एखादी व्यक्ती गर्दीच्या ठिकाणी चेंगराचेंगरीच्या स्थितीत अडकली असेल, तर स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि अशावेळी सुरक्षा रक्षकांनी काय करावे, यासाठी काही महत्त्वपूर्ण उपाययोजना आहेत. ### **गर्दीत अडकल्यास व्यक्तीने स्वतःचा बचाव कसा करावा?** चेंगराचेंगरीच्या स्थितीत सापडल्यास शांत राहणे आणि योग्य उपाययोजना करणे जीवन वाचवू शकते. घाबरल्यास परिस्थिती आणखी बिघडू शकते. अशावेळी खालील गोष्टी करा: **१. कोणत्याही परिस्थितीत उभे राहण्याचा प्रयत्न करा:** चेंगराचेंगरीतील बहुतेक मृत्यू हे खाली पडल्यामुळे आणि लोकांच्या पायाखाली तुडवले गेल्यामुळे होतात. त्यामुळे तुमचा संपूर्ण जोर उभे राहण्यावर केंद्रित करा. **२. हात छातीजवळ ठेवा:** आपले हात छातीजवळ, एखाद्या बॉक्सरप्रमाणे ठेवा. यामुळे तुमच्या छातीला आणि फुफ्फुसांना श्वास घेण्यासाठी थोडी जागा मिळेल. गर्दीच्या दाबामुळे श्वास कोंडला जाण्याचा धोका यामुळे कमी होतो. **३. गर्दीच्या प्रवाहाबरोबर पुढे चला:** गर्दीच्या विरुद्ध दिशेने जाण्याचा किंवा तिला थांबवण्याचा प्रयत्न करू नका. यात तुमची प्रचंड ऊर्जा वाया जाईल आणि तुम्ही पडण्याचा धोका वाढेल. गर्दी ज्या दिशेने वाहत आहे, त्या दिशेने हळूहळू पुढे सरकत राहा. **४. बाजूला किंवा तिरके सरकण्याचा प्रयत्न करा:** गर्दीच्या प्रवाहाबरोबर वाहत असताना, सरळ पुढे जाण्याऐवजी हळूहळू तिरके किंवा बाजूला सरकत गर्दीच्या किनाऱ्यावर (edge) येण्याचा प्रयत्न करा. गर्दीच्या मधोमध दाब सर्वाधिक असतो. **५. भिंती, खांब आणि अडथळ्यांपासून दूर राहा:** भिंती, रेलिंग किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या अडथळ्यांजवळ दाब सर्वाधिक असतो आणि तिथे लोक चिरडले जाण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे अशा जागा टाळा. **६. तुमची ऊर्जा वाचवा:** विनाकारण ओरडण्यात किंवा आरडाओरड करण्यात तुमची शक्ती वाया घालवू नका. शांत राहा आणि तुमची ऊर्जा उभे राहण्यासाठी आणि सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी वापरा. इतरांशी संवाद साधायचा असेल तर शांतपणे आणि स्पष्टपणे बोला. **७. जर तुम्ही खाली पडलात तर:** जर तुम्ही सर्व प्रयत्न करूनही खाली पडलात, तर लगेच भ्रूणासारखी स्थिती (fetal position) घ्या. तुमचे गुडघे छातीजवळ ओढा आणि तुमचे हात डोक्यावर आणि मानेवर ठेवून त्यांचे रक्षण करा. यामुळे तुमच्या महत्त्वाच्या अवयवांचे संरक्षण होण्यास मदत होईल. --- ### **अशा परिस्थितीत द्वारपाल (Gatekeepers) आणि सुरक्षा रक्षकांची भूमिका** चेंगराचेंगरीच्या वेळी सुरक्षा रक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आणि निर्णायक असते. त्यांची त्वरित आणि योग्य कृती अनेकांचे प्राण वाचवू शकते. **१. गर्दीला बाहेर पडण्यासाठी मार्ग मोकळे करा:** त्यांचे पहिले आणि सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे गर्दीचा दाब कमी करणे. यासाठी सर्व आपत्कालीन आणि नियमित दरवाजे त्वरित उघडा. शक्य असल्यास, तात्पुरते बॅरिकेड्स किंवा अडथळे हटवून बाहेर पडण्यासाठी नवीन मार्ग तयार करा. **२. नवीन प्रवेश ताबडतोब थांबवा:** ज्या ठिकाणी चेंगराचेंगरी होत आहे, तिथे आणखी लोकांना येण्यापासून त्वरित थांबवा. मुख्य प्रवेशद्वार बंद करा किंवा लोकांना आत येण्यापासून रोखा. **३. शांत आणि स्पष्ट सूचना द्या:** ध्वनिक्षेपकाचा (Loudspeaker/PA System) वापर करून लोकांना शांत राहण्याचे आवाहन करा. "कृपया पुढे सरकत राहा", "डावीकडील गेट उघडे आहे", "शांत राहा, आम्ही मदत करत आहोत" अशा स्पष्ट आणि सकारात्मक सूचना द्या. "चेंगराचेंगरी" किंवा "पळापळ" असे शब्द वापरणे टाळा, कारण त्यामुळे भीती वाढू शकते. **४. उंच जागेवरून परिस्थितीवर लक्ष ठेवा:** शक्य असल्यास, उंच टॉवर किंवा सुरक्षित जागेवरून परिस्थितीचे निरीक्षण करा. यामुळे गर्दीचा दाब नेमका कुठे जास्त आहे आणि कोणत्या लोकांना मदतीची गरज आहे, हे समजण्यास मदत होते. **५. अडकलेल्या लोकांना बाहेर काढा:** जे लोक बॅरिकेड्स, रेलिंग किंवा भिंतीजवळ दाबले जात आहेत, त्यांना तातडीने बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. सुरक्षा रक्षकांनी एक साखळी तयार करून लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यास मदत करावी. **६. वैद्यकीय मदतीसाठी संपर्क साधा:** तात्काळ नियंत्रण कक्षाला (Control Room) माहिती देऊन रुग्णवाहिका (Ambulances) आणि प्रथमोपचार पथकांना पाचारण करा. **७. स्वतः सुरक्षित राहा:** मदतकार्य करताना सुरक्षा रक्षकांनी स्वतःला धोक्यात घालू नये. त्यांनी गर्दीच्या प्रवाहात अडकणार नाही याची काळजी घ्यावी, जेणेकरून ते इतरांना मदत करू शकतील. सुरक्षा रक्षकांचे योग्य प्रशिक्षण आणि अशा आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार केलेली एक प्रमाणित कार्यप्रणाली (Standard Operating Procedure - SOP) असणे अत्यंत आवश्यक आहे.

In reply to by माहितगार

माहितगार 06/06/2025 - 09:00
उपरोक्त जेमिनीबाबांचे उत्तर आहे. आम्ही गर्दीची स्थळे नेहमीच टाळण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्याचा प्रत्यक्ष अनुभव फारसा नाही, त्याबाबत गर्दीचा अनुभव घेणारेच अधिक नेमकेपणाने सांगू शकतील म्हणून आमचा उत्तरदायित्वास नकार लागू.

In reply to by माहितगार

माहितगार 06/06/2025 - 09:44
आत चेंगराचेंगरी चालू झाल्यास बाहेरून नवीन प्रवेश ताबडतोब थांबवा ही योग्यच सूचना आहे. पण आत प्रवेश न मिळणारी बेशीस्त मंडळी बाहेर पण तेवढीच चेंगरा चेंगरी करतात या बद्दल उपाय जेमिनी बाबूंना विचारावयाचे राहीले

In reply to by माहितगार

वरील उपाय बरेच चांगले आहेत. आपल्याकडे 'विशेष दिवस' आणि 'विशेष महिने' 'बाबा-बुवा' सत्संग वगैरे हे एक गर्दीचं मोठं कारण असतं. खरं तर ती गर्दी नसते तर लोकांचा आलेला महापूर असतो. वाटेल तिथे वाटेल तसं धावणारं पाणी त्याप्रमाणे माणसं धावतात गर्दी करतात. कालच्या चेंगराचेंगरीचे काही व्हीडीयो पाहात होतो माणसं एकमेकांच्या डोके खांद्यावर पाय देऊन चालत होते. आपला जीव वाचवतांना इतरांची काही अवस्था करुन सोडतो त्यावेळी जाणवत नसेल आपला जीव प्रथम या भावनेने गर्दी तुडवल्या जाते. महिला लहान मुले यात प्राणास मुकतात. आपल्याकडे अभ्यासक्रमात किंवा इतरवेळी कधीही गर्दीवर बोलल्या जात नाही. चर्चा होत नाही. सामाजिक संस्था अथवा सरकारं यासाठी जागरुकता करतांना दिसत नाही. फार आवश्यक विषय वाटत नाही. कधी तरी अशी अनावश्यक गर्दीह होते आणि घटना घडल्यावर त्यावर चर्चा होते. खरं तर, गर्दी टाळणे हाच सर्वात पहिला मोठा आणि महत्वाचा उपाय आहे. गर्दीत गेल्यावर गर्दीच्या विरोधात जायचं की प्रवाहासोबत जायचं यात गर्दीची कोंडी आणखी वाढत जाते. गर्दी फूटली पाहिजे. गर्दी इतरत्र पांगली पाहिजे यासाठी मोठ्या स्क्रीनवर अथवा सातत्याने उद्घोषणा करुन बाहेर पडण्याचे मार्ग दाखवले पाहिजेत. व्यवस्था ऐनवेळी कोलमडते तेव्हा त्यातील काही लोकांनी गर्दी मोकळी होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतही गर्दी झाली की, पोलिसांची वाट पाहिली जाते. तो पर्यंत वाटेल तशी वाहने वाटेल तिथे घुसवली जातात आणि वाहनांची कोंडी होते. हमरी तुमरी वाद आणि जीवावर बेतेल अशी भांडने. ब-याच वेळी कोणी तरी समजदार माणसं तरुण मुलं अशी गर्दी झाली की ट्राफीक नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतांना पाहिलं आहे. अशी दृश्य पाहिलं की बरं वाटतं. वाढत्या लोकसंखेवर गर्दीचा भार सोडून चालणार नाही. गर्दी आणि होणा-या दुर्दैवी घटना मोठा विषय आहे, सातत्याने त्यावर जमेल त्या माध्यमावर सकारात्मक लिहिते राहिलं पाहिजे. काहींचे जीव नक्की वाचेल असे वाटत राहते. -दिलीप बिरुटे

कंजूस 07/06/2025 - 10:42
श्रद्धेपुढे शास्त्र बाद होते. अगदी नियमांत बसून, शिस्तीने गोष्टी होत असल्या तरीही लागणारा वेळ पाहता त्यातील निरर्थकपणा पटवून घेण्याच्या मनस्थितीत लोक नसतील तर सगळी चर्चाच व्यर्थ आहे. उदाहरणार्थ प्रसिद्ध देवळांतील देवदर्शन. डोकेबाजपणे केलेले पर्यायही पटवून न घेण्याची वृत्ती....... कुंभमेळ्यातील आंघोळीसाठी पंपाने पाणी आणून एका ठिकाणी फवारले जाणे आणि भाविकांनी त्यातून जाणे . तरीही भाविकांना नदीतच आंघोळ करायची आहे. नियोजनाला फोलपणा - मोठ्या शहरांतील गर्दी टाळण्याचे उपाय सर्व बाद झाले आहेत. शहरातून मुख्य कामाची कार्यालये दुसरीकडे हलविणे अजूनही शक्य झाले नाही. मुंबईतील लोकल ट्रेन गर्दी. ...... त्यावर केलेले पर्याय --- आणखी रस्ते....आणखी मेट्रो...आणखी उड्डाणपूल सर्व बाद ठरले.

In reply to by कंजूस

माझ्या घराजवळून आठ दहा किलोमीटरहून बारमही गोदावरी नदी वाहते, पुढे जायकवाडी धरणाचे ब्याकवाटरही तुंबलेले असते. नगरपालिकेच्या ढीसाळ नियोजनामुळे पंधरा दिवसानंतर थेट तालुक्यात पाणी घरोघर येते. पण एकादशी आणि तत्सम महत्वाच्या वारी त्या गोदावरी नदीकाठी स्नानासाठी पवित्र दिवशी प्रचंड गर्दी होते. एखादे दोन जीवघेणे अपघातही घड़तात. नळाला येणारे पाणी तितकेच पवित्र किंबहुना अधिक फिल्टर असते त्यातही स्नान होऊ शकते पण गंगाडूबकीचं समाधान गंगेतच. लोकांची हे गर्दी... -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कंजूस 07/06/2025 - 13:04
पर्वकाळात तिर्थात स्नान ... यांचा आणि पुण्याचा हिशोब पौराणिक कथांमध्ये सांगून ठेवला आहे.घरामध्ये कुणालातरी यांचा अनुभव घ्यायची इच्छा असते. फार पूर्वी म्हणजे रेल्वे सुरू होण्याअगोदर काही शे भाविक चालत जाऊन तिकडे किती गर्दी करत असतील आणि आता सर्व वाहन सोयी झाल्यानंतर किती गर्दी होते यात खूपच अंतर आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. तर तुझी इच्छा पुरी करुया पण पर्वकाळाची अट सोड असं सांगायला हवे. आपण जाऊ तो पर्वकाळ हे पटवायला हवे.

In reply to by कंजूस

पण पर्वकाळाची अट सोड असं सांगायला हवे. आपण जाऊ तो पर्वकाळ हे पटवायला हवे.
आजच्या देव,धर्म प्रिय सरकारच्या काळात असे आधुनिक विचार सांगणे म्हणजे हे पुरोगामी आणि धर्मबुडव्या लोकांचे षडयंत्र ठरू शकते. त्यामुळे असा प्रयत्न करणे, लोकांना समजावून सांगणे महाकठीण काम झालं आहे. भला माणूस अशी रिस्क घेणार नाही. कोणत्या तरी पुराणात पर्वकाळातच गर्दी केली पाहिजे असे काही नाही, असे कोणी नवमतवादी शंकराचार्यांनी सांगितल्याशिवाय बदल शक्य नाही. किंवा भगवान श्रीकृष्ण यांनी जे काही मार्गदर्शन केले आहे त्या अशा कोणत्यातरी संस्कृत धार्मिक ग्रंथ अध्यायात पर्वकाळात गर्दी करु नये असे स्पष्ट म्हटलेले असुन भूतलावरील कोणतेही पाणी ( अटी लागू ) पवित्र असते असे सांगितल्याशिवाय ही गर्दी कमी होणार नाही. अर्थात थेट परिणाम दिसायला अजून पाच पन्नास वर्ष जावे लागतील, असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 07/06/2025 - 17:54
१) १७९६ साली डॉ. एडवर्ड जेनर ने व्हॅरिओला व्हायरस वर मात करत स्मॉल पॉक्स (उर्फ देवी) नावाच्या गंभीर त्वचा आजारावर लस काढली १९८० पर्यंत जगातून या व्हायरस साथींचे समूळ उच्चाटन करण्यात मानवाला यश मिळाले आणि देवी आजार होऊ नये म्हणून होणार्‍या अंधश्रद्धा आपोआपच मागे पडल्या. ग्रहण विषयक वैज्ञानिक जाणीव शिक्षणातून वाढत गेले तर तत्संबधी अंधश्रद्धा बर्‍यापैकी मागे पडल्या. काही अंधश्रद्धांच्या मागे असलेल्या संबधीत असुरक्षीतता मागे पडल्या की लोक आपोपाच बदलतात. बेसिकली फोकस रचनात्मक मार्गाने असुरक्षीतता कशा कमी करता येतील याकडे हवा. २) गर्दी आणि चेंगरा चेंगरी या साठी धर्माची किंवा अंधश्रद्धेचा संबंध निमीत्तमात्र आहे मूलभूत समस्या मानवी संस्कृतीतील बेशिस्तीची आहे. सध्या चर्चेत असलेल्या क्रिडा क्षेत्रातील चेंगरा चेंगरीत धार्मीक श्रद्धा अंधश्रद्धांचा काय संबंध आहे? समजा १०० कोटी भारतीयांनी स्विमींगपूल मध्ये विशीष्ट दिवशी विशीष्ष्ट वेळी स्नान करण्याची इच्छा प्रदर्शीत केली पण फर्स्ट कम फर्स्ट सर्व ने जेवढ्यांना जमेल तेवढ्यांनीच केले समस्या कुठे आहे ? समस्या बेशीस्तीतच नाही का?

काशीसी जावे नित्य वदावे.... असे स्थानमहात्म्य पूर्वापार समाज मनावर ठसवले आहे. कबीरदास आणी इतर संतांनी "मन चंगा तो कठौती मे गंगा",असे सांगून ही काही लोकांवर याचा परिणाम होत नाही. हे सर्वच धर्मामधे आहे. माझे एक वरिष्ठ सहकारी हज यात्रेतील स्टॅम्पेड मधे आपल्या धर्मपत्नीसह पैगंबरवासी झाले. डाॅक्टर होते. हा श्रद्धेचा भाग आहे पण या बरोबर सबुरी पण हवी तेव्हांच असले अपघात टळतील.

माहितगार 06/06/2025 - 08:50
अशा लेखाची सर्व सेलीब्रीटी आणि कार्यक्रम व्यवस्थापकांनी दखल घेतल्यास छान होईल. या लेखात गर्दी होणार्‍या ठिकाणचे आग प्रतिबंधन आणि आतंकवादी पासून सुरक्षाचा अंतर्भाव लेखाची लांबी फारच वाढली असती म्हणून केला नाही पण ते महत्वाचे मुद्दे आहेत. आणखी एक मुद्दा राहीला तो म्हणजे मंडप आणि खुर्ची सप्लायर्स ते गेट किपर्सनाही या मुद्द्यांवर ट्रेन केले पाहीजे.

In reply to by युयुत्सु

माहितगार 06/06/2025 - 09:03
मला वाटते पोलीस ट्रेनींग स्कूलस मध्ये हा विषय असेलच पण तो अशा ट्रेनिंग स्कूल्सनी इव्हेंट मॅनेजमेन्ट स्कूलस व गर्दी होणार्‍या व्यवस्थापनांच्या व्यवपस्थाप्कांपर्यंत पोहोचवावयास हवे.

माहितगार 06/06/2025 - 08:56
नक्कीच, या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर माहिती खालीलप्रमाणे आहे. जर एखादी व्यक्ती गर्दीच्या ठिकाणी चेंगराचेंगरीच्या स्थितीत अडकली असेल, तर स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि अशावेळी सुरक्षा रक्षकांनी काय करावे, यासाठी काही महत्त्वपूर्ण उपाययोजना आहेत. ### **गर्दीत अडकल्यास व्यक्तीने स्वतःचा बचाव कसा करावा?** चेंगराचेंगरीच्या स्थितीत सापडल्यास शांत राहणे आणि योग्य उपाययोजना करणे जीवन वाचवू शकते. घाबरल्यास परिस्थिती आणखी बिघडू शकते. अशावेळी खालील गोष्टी करा: **१. कोणत्याही परिस्थितीत उभे राहण्याचा प्रयत्न करा:** चेंगराचेंगरीतील बहुतेक मृत्यू हे खाली पडल्यामुळे आणि लोकांच्या पायाखाली तुडवले गेल्यामुळे होतात. त्यामुळे तुमचा संपूर्ण जोर उभे राहण्यावर केंद्रित करा. **२. हात छातीजवळ ठेवा:** आपले हात छातीजवळ, एखाद्या बॉक्सरप्रमाणे ठेवा. यामुळे तुमच्या छातीला आणि फुफ्फुसांना श्वास घेण्यासाठी थोडी जागा मिळेल. गर्दीच्या दाबामुळे श्वास कोंडला जाण्याचा धोका यामुळे कमी होतो. **३. गर्दीच्या प्रवाहाबरोबर पुढे चला:** गर्दीच्या विरुद्ध दिशेने जाण्याचा किंवा तिला थांबवण्याचा प्रयत्न करू नका. यात तुमची प्रचंड ऊर्जा वाया जाईल आणि तुम्ही पडण्याचा धोका वाढेल. गर्दी ज्या दिशेने वाहत आहे, त्या दिशेने हळूहळू पुढे सरकत राहा. **४. बाजूला किंवा तिरके सरकण्याचा प्रयत्न करा:** गर्दीच्या प्रवाहाबरोबर वाहत असताना, सरळ पुढे जाण्याऐवजी हळूहळू तिरके किंवा बाजूला सरकत गर्दीच्या किनाऱ्यावर (edge) येण्याचा प्रयत्न करा. गर्दीच्या मधोमध दाब सर्वाधिक असतो. **५. भिंती, खांब आणि अडथळ्यांपासून दूर राहा:** भिंती, रेलिंग किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या अडथळ्यांजवळ दाब सर्वाधिक असतो आणि तिथे लोक चिरडले जाण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे अशा जागा टाळा. **६. तुमची ऊर्जा वाचवा:** विनाकारण ओरडण्यात किंवा आरडाओरड करण्यात तुमची शक्ती वाया घालवू नका. शांत राहा आणि तुमची ऊर्जा उभे राहण्यासाठी आणि सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी वापरा. इतरांशी संवाद साधायचा असेल तर शांतपणे आणि स्पष्टपणे बोला. **७. जर तुम्ही खाली पडलात तर:** जर तुम्ही सर्व प्रयत्न करूनही खाली पडलात, तर लगेच भ्रूणासारखी स्थिती (fetal position) घ्या. तुमचे गुडघे छातीजवळ ओढा आणि तुमचे हात डोक्यावर आणि मानेवर ठेवून त्यांचे रक्षण करा. यामुळे तुमच्या महत्त्वाच्या अवयवांचे संरक्षण होण्यास मदत होईल. --- ### **अशा परिस्थितीत द्वारपाल (Gatekeepers) आणि सुरक्षा रक्षकांची भूमिका** चेंगराचेंगरीच्या वेळी सुरक्षा रक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आणि निर्णायक असते. त्यांची त्वरित आणि योग्य कृती अनेकांचे प्राण वाचवू शकते. **१. गर्दीला बाहेर पडण्यासाठी मार्ग मोकळे करा:** त्यांचे पहिले आणि सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे गर्दीचा दाब कमी करणे. यासाठी सर्व आपत्कालीन आणि नियमित दरवाजे त्वरित उघडा. शक्य असल्यास, तात्पुरते बॅरिकेड्स किंवा अडथळे हटवून बाहेर पडण्यासाठी नवीन मार्ग तयार करा. **२. नवीन प्रवेश ताबडतोब थांबवा:** ज्या ठिकाणी चेंगराचेंगरी होत आहे, तिथे आणखी लोकांना येण्यापासून त्वरित थांबवा. मुख्य प्रवेशद्वार बंद करा किंवा लोकांना आत येण्यापासून रोखा. **३. शांत आणि स्पष्ट सूचना द्या:** ध्वनिक्षेपकाचा (Loudspeaker/PA System) वापर करून लोकांना शांत राहण्याचे आवाहन करा. "कृपया पुढे सरकत राहा", "डावीकडील गेट उघडे आहे", "शांत राहा, आम्ही मदत करत आहोत" अशा स्पष्ट आणि सकारात्मक सूचना द्या. "चेंगराचेंगरी" किंवा "पळापळ" असे शब्द वापरणे टाळा, कारण त्यामुळे भीती वाढू शकते. **४. उंच जागेवरून परिस्थितीवर लक्ष ठेवा:** शक्य असल्यास, उंच टॉवर किंवा सुरक्षित जागेवरून परिस्थितीचे निरीक्षण करा. यामुळे गर्दीचा दाब नेमका कुठे जास्त आहे आणि कोणत्या लोकांना मदतीची गरज आहे, हे समजण्यास मदत होते. **५. अडकलेल्या लोकांना बाहेर काढा:** जे लोक बॅरिकेड्स, रेलिंग किंवा भिंतीजवळ दाबले जात आहेत, त्यांना तातडीने बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. सुरक्षा रक्षकांनी एक साखळी तयार करून लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यास मदत करावी. **६. वैद्यकीय मदतीसाठी संपर्क साधा:** तात्काळ नियंत्रण कक्षाला (Control Room) माहिती देऊन रुग्णवाहिका (Ambulances) आणि प्रथमोपचार पथकांना पाचारण करा. **७. स्वतः सुरक्षित राहा:** मदतकार्य करताना सुरक्षा रक्षकांनी स्वतःला धोक्यात घालू नये. त्यांनी गर्दीच्या प्रवाहात अडकणार नाही याची काळजी घ्यावी, जेणेकरून ते इतरांना मदत करू शकतील. सुरक्षा रक्षकांचे योग्य प्रशिक्षण आणि अशा आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार केलेली एक प्रमाणित कार्यप्रणाली (Standard Operating Procedure - SOP) असणे अत्यंत आवश्यक आहे.

In reply to by माहितगार

माहितगार 06/06/2025 - 09:00
उपरोक्त जेमिनीबाबांचे उत्तर आहे. आम्ही गर्दीची स्थळे नेहमीच टाळण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्याचा प्रत्यक्ष अनुभव फारसा नाही, त्याबाबत गर्दीचा अनुभव घेणारेच अधिक नेमकेपणाने सांगू शकतील म्हणून आमचा उत्तरदायित्वास नकार लागू.

In reply to by माहितगार

माहितगार 06/06/2025 - 09:44
आत चेंगराचेंगरी चालू झाल्यास बाहेरून नवीन प्रवेश ताबडतोब थांबवा ही योग्यच सूचना आहे. पण आत प्रवेश न मिळणारी बेशीस्त मंडळी बाहेर पण तेवढीच चेंगरा चेंगरी करतात या बद्दल उपाय जेमिनी बाबूंना विचारावयाचे राहीले

In reply to by माहितगार

वरील उपाय बरेच चांगले आहेत. आपल्याकडे 'विशेष दिवस' आणि 'विशेष महिने' 'बाबा-बुवा' सत्संग वगैरे हे एक गर्दीचं मोठं कारण असतं. खरं तर ती गर्दी नसते तर लोकांचा आलेला महापूर असतो. वाटेल तिथे वाटेल तसं धावणारं पाणी त्याप्रमाणे माणसं धावतात गर्दी करतात. कालच्या चेंगराचेंगरीचे काही व्हीडीयो पाहात होतो माणसं एकमेकांच्या डोके खांद्यावर पाय देऊन चालत होते. आपला जीव वाचवतांना इतरांची काही अवस्था करुन सोडतो त्यावेळी जाणवत नसेल आपला जीव प्रथम या भावनेने गर्दी तुडवल्या जाते. महिला लहान मुले यात प्राणास मुकतात. आपल्याकडे अभ्यासक्रमात किंवा इतरवेळी कधीही गर्दीवर बोलल्या जात नाही. चर्चा होत नाही. सामाजिक संस्था अथवा सरकारं यासाठी जागरुकता करतांना दिसत नाही. फार आवश्यक विषय वाटत नाही. कधी तरी अशी अनावश्यक गर्दीह होते आणि घटना घडल्यावर त्यावर चर्चा होते. खरं तर, गर्दी टाळणे हाच सर्वात पहिला मोठा आणि महत्वाचा उपाय आहे. गर्दीत गेल्यावर गर्दीच्या विरोधात जायचं की प्रवाहासोबत जायचं यात गर्दीची कोंडी आणखी वाढत जाते. गर्दी फूटली पाहिजे. गर्दी इतरत्र पांगली पाहिजे यासाठी मोठ्या स्क्रीनवर अथवा सातत्याने उद्घोषणा करुन बाहेर पडण्याचे मार्ग दाखवले पाहिजेत. व्यवस्था ऐनवेळी कोलमडते तेव्हा त्यातील काही लोकांनी गर्दी मोकळी होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतही गर्दी झाली की, पोलिसांची वाट पाहिली जाते. तो पर्यंत वाटेल तशी वाहने वाटेल तिथे घुसवली जातात आणि वाहनांची कोंडी होते. हमरी तुमरी वाद आणि जीवावर बेतेल अशी भांडने. ब-याच वेळी कोणी तरी समजदार माणसं तरुण मुलं अशी गर्दी झाली की ट्राफीक नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतांना पाहिलं आहे. अशी दृश्य पाहिलं की बरं वाटतं. वाढत्या लोकसंखेवर गर्दीचा भार सोडून चालणार नाही. गर्दी आणि होणा-या दुर्दैवी घटना मोठा विषय आहे, सातत्याने त्यावर जमेल त्या माध्यमावर सकारात्मक लिहिते राहिलं पाहिजे. काहींचे जीव नक्की वाचेल असे वाटत राहते. -दिलीप बिरुटे

कंजूस 07/06/2025 - 10:42
श्रद्धेपुढे शास्त्र बाद होते. अगदी नियमांत बसून, शिस्तीने गोष्टी होत असल्या तरीही लागणारा वेळ पाहता त्यातील निरर्थकपणा पटवून घेण्याच्या मनस्थितीत लोक नसतील तर सगळी चर्चाच व्यर्थ आहे. उदाहरणार्थ प्रसिद्ध देवळांतील देवदर्शन. डोकेबाजपणे केलेले पर्यायही पटवून न घेण्याची वृत्ती....... कुंभमेळ्यातील आंघोळीसाठी पंपाने पाणी आणून एका ठिकाणी फवारले जाणे आणि भाविकांनी त्यातून जाणे . तरीही भाविकांना नदीतच आंघोळ करायची आहे. नियोजनाला फोलपणा - मोठ्या शहरांतील गर्दी टाळण्याचे उपाय सर्व बाद झाले आहेत. शहरातून मुख्य कामाची कार्यालये दुसरीकडे हलविणे अजूनही शक्य झाले नाही. मुंबईतील लोकल ट्रेन गर्दी. ...... त्यावर केलेले पर्याय --- आणखी रस्ते....आणखी मेट्रो...आणखी उड्डाणपूल सर्व बाद ठरले.

In reply to by कंजूस

माझ्या घराजवळून आठ दहा किलोमीटरहून बारमही गोदावरी नदी वाहते, पुढे जायकवाडी धरणाचे ब्याकवाटरही तुंबलेले असते. नगरपालिकेच्या ढीसाळ नियोजनामुळे पंधरा दिवसानंतर थेट तालुक्यात पाणी घरोघर येते. पण एकादशी आणि तत्सम महत्वाच्या वारी त्या गोदावरी नदीकाठी स्नानासाठी पवित्र दिवशी प्रचंड गर्दी होते. एखादे दोन जीवघेणे अपघातही घड़तात. नळाला येणारे पाणी तितकेच पवित्र किंबहुना अधिक फिल्टर असते त्यातही स्नान होऊ शकते पण गंगाडूबकीचं समाधान गंगेतच. लोकांची हे गर्दी... -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कंजूस 07/06/2025 - 13:04
पर्वकाळात तिर्थात स्नान ... यांचा आणि पुण्याचा हिशोब पौराणिक कथांमध्ये सांगून ठेवला आहे.घरामध्ये कुणालातरी यांचा अनुभव घ्यायची इच्छा असते. फार पूर्वी म्हणजे रेल्वे सुरू होण्याअगोदर काही शे भाविक चालत जाऊन तिकडे किती गर्दी करत असतील आणि आता सर्व वाहन सोयी झाल्यानंतर किती गर्दी होते यात खूपच अंतर आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. तर तुझी इच्छा पुरी करुया पण पर्वकाळाची अट सोड असं सांगायला हवे. आपण जाऊ तो पर्वकाळ हे पटवायला हवे.

In reply to by कंजूस

पण पर्वकाळाची अट सोड असं सांगायला हवे. आपण जाऊ तो पर्वकाळ हे पटवायला हवे.
आजच्या देव,धर्म प्रिय सरकारच्या काळात असे आधुनिक विचार सांगणे म्हणजे हे पुरोगामी आणि धर्मबुडव्या लोकांचे षडयंत्र ठरू शकते. त्यामुळे असा प्रयत्न करणे, लोकांना समजावून सांगणे महाकठीण काम झालं आहे. भला माणूस अशी रिस्क घेणार नाही. कोणत्या तरी पुराणात पर्वकाळातच गर्दी केली पाहिजे असे काही नाही, असे कोणी नवमतवादी शंकराचार्यांनी सांगितल्याशिवाय बदल शक्य नाही. किंवा भगवान श्रीकृष्ण यांनी जे काही मार्गदर्शन केले आहे त्या अशा कोणत्यातरी संस्कृत धार्मिक ग्रंथ अध्यायात पर्वकाळात गर्दी करु नये असे स्पष्ट म्हटलेले असुन भूतलावरील कोणतेही पाणी ( अटी लागू ) पवित्र असते असे सांगितल्याशिवाय ही गर्दी कमी होणार नाही. अर्थात थेट परिणाम दिसायला अजून पाच पन्नास वर्ष जावे लागतील, असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 07/06/2025 - 17:54
१) १७९६ साली डॉ. एडवर्ड जेनर ने व्हॅरिओला व्हायरस वर मात करत स्मॉल पॉक्स (उर्फ देवी) नावाच्या गंभीर त्वचा आजारावर लस काढली १९८० पर्यंत जगातून या व्हायरस साथींचे समूळ उच्चाटन करण्यात मानवाला यश मिळाले आणि देवी आजार होऊ नये म्हणून होणार्‍या अंधश्रद्धा आपोआपच मागे पडल्या. ग्रहण विषयक वैज्ञानिक जाणीव शिक्षणातून वाढत गेले तर तत्संबधी अंधश्रद्धा बर्‍यापैकी मागे पडल्या. काही अंधश्रद्धांच्या मागे असलेल्या संबधीत असुरक्षीतता मागे पडल्या की लोक आपोपाच बदलतात. बेसिकली फोकस रचनात्मक मार्गाने असुरक्षीतता कशा कमी करता येतील याकडे हवा. २) गर्दी आणि चेंगरा चेंगरी या साठी धर्माची किंवा अंधश्रद्धेचा संबंध निमीत्तमात्र आहे मूलभूत समस्या मानवी संस्कृतीतील बेशिस्तीची आहे. सध्या चर्चेत असलेल्या क्रिडा क्षेत्रातील चेंगरा चेंगरीत धार्मीक श्रद्धा अंधश्रद्धांचा काय संबंध आहे? समजा १०० कोटी भारतीयांनी स्विमींगपूल मध्ये विशीष्ट दिवशी विशीष्ष्ट वेळी स्नान करण्याची इच्छा प्रदर्शीत केली पण फर्स्ट कम फर्स्ट सर्व ने जेवढ्यांना जमेल तेवढ्यांनीच केले समस्या कुठे आहे ? समस्या बेशीस्तीतच नाही का?

काशीसी जावे नित्य वदावे.... असे स्थानमहात्म्य पूर्वापार समाज मनावर ठसवले आहे. कबीरदास आणी इतर संतांनी "मन चंगा तो कठौती मे गंगा",असे सांगून ही काही लोकांवर याचा परिणाम होत नाही. हे सर्वच धर्मामधे आहे. माझे एक वरिष्ठ सहकारी हज यात्रेतील स्टॅम्पेड मधे आपल्या धर्मपत्नीसह पैगंबरवासी झाले. डाॅक्टर होते. हा श्रद्धेचा भाग आहे पण या बरोबर सबुरी पण हवी तेव्हांच असले अपघात टळतील.
लेखनप्रकार
प्रेर्ना चर्चा विजयोत्सवाला गालबोट - प्रा. डॉ. दिलीप बिरुटे आरसीबीचा हा विजय साजरा करण्यासाठी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर कर्नाटक सरकारने संघाच्या सत्काराचा कार्यक्रमदेखील आयोजित केला होता. पण या कार्यक्रमाला चेंगराचेंगरीचं गालबोट लागले. अकरा जणांना आपल्या जीवाला नाहक मुकावं लागलं दुर्दैवी घटना. आपल्याकडे गर्दी आणि गर्दीचं नियोजन ही मोठी समस्या आहे. नियोजन नसल्यामुळे लोक वाटेल तसे जमेल तिथे गर्दी करतात. लोक ऐकत नाही आणि नियोजन कोलमडतं.

पुष्पा २: द रूल् - संक्षिप्त ओळख वगैरे

वामन देशमुख ·

कंजूस 20/12/2024 - 17:59
एकच फार्मुला असतो कारण तोच पाहायला प्रेक्षक येतात. या मसाल्यातले बरेच चित्रपट निघत असावेत. तसे दोन आम्ही मागच्या वर्षी तमिळनाडू सहलीत बसमध्येच पाहिले होते. प्रवासात पाहण्यासाठी आणि भाषा न कळली तरी चालतात असे. हिंदीचे चित्रपट पाहायचे म्हटले तर फक्त हेराफेरी. कुठूनही केव्हाही केव्हाही भाग प्रवासात पाहिला तरी मजा.

In reply to by कंजूस

टर्मीनेटर 20/12/2024 - 18:48
हिंदीचे चित्रपट पाहायचे म्हटले तर फक्त हेराफेरी. कुठूनही केव्हाही केव्हाही भाग प्रवासात पाहिला तरी मजा.
कंकाका हिंदीत हेराफेरी१,२, 'अंदाज अपना अपना', धमाल, मुन्नाभाई १,२ आणि जुन्यात 'जाने भी दो यांरो' हे चित्रपट कधीही आणि कुठूनही बघितले तरी कंटाळा येत नाही 😀 बाकी द्येशमुखरावांनी 'संक्षिप्त' नावाखाली एका भव्यदिव्य चित्रपटाचा जो अत्यंत त्रोटक परिचय करून दिला आहे त्यासाठी त्यांचा त्रिवारच नाही तर पंच-षष्ठ वार निषेध... पुढल्या प्रतिसादांतून आम्हा 'पुष्पा' प्रेमिंची बाजू मांडतो!

चित्रगुप्त 20/12/2024 - 18:44
कालच दोन्ही मुलगे, सुना, अर्धांगिनी वगैरे मशारनिल्हे चित्रपट बघून आले. मी गेलो नव्हतो. आल्यावर मुलगा म्हणाला की तुम्ही आला असता तर पहिल्या पंधरा मिनिटातच उठून घरी आला असता. .

In reply to by चित्रगुप्त

टर्मीनेटर 20/12/2024 - 18:59
अक्षरशः खरे आहे... पहिली जवळपास १३-१३.५ मिनिटे हा चित्रपट पाहताना आपण चुकून क्रिश ४, ५, ६ वगैरे किंवा मार्वल वाल्यांचा कुठला सिनेमा बघायला तर आलो नाही ना हा प्रश्न पडतो! पण ते सगळं स्वप्नात घडल्याचे बघितल्यावर पुढचा चित्रपट पाहण्यासाठी ऊर्जा मिळते आणि ती शेवटपर्यंत कायम राहते... अर्थात सुरुवातीचा तो विलक्षण सीन आणि सगळीच गाणी वगळली असती तर चित्रपटाची लांबी आणि बजेट बऱ्यापैकी कमी झाले असते असे माझे मत! बाकी चित्रपट मजेदार आहे... आपल्याला बुद्धी आहे की नाही हे तपासण्यासाठी जे लोकं चित्रपट पहायला जात असतील त्यांनी मात्र ह्या चित्रपटापासून दूर राहावे!

चौथा कोनाडा 20/12/2024 - 19:04
श्रीवल्ली (रश्मिका मादन्ना),
रश्मिका मादक अण्णा म्हणायचे आहे का ? हा .... हा .... हा .... :) रश्मिका मंदाण्णा असं नाव आहे तिचं ... अशी अण्णा वाली बरीच नावं असतात तिकडं ! सिनेमाचे तिकिटदर कमी झाले की पुष्पा-२ पाहण्यात येईल असा घरचा आदेश आहे.

In reply to by चौथा कोनाडा

टर्मीनेटर 20/12/2024 - 19:10
सिनेमाचे तिकिटदर कमी झाले की पुष्पा-२ पाहण्यात येईल असा घरचा आदेश आहे.
हरकत नाही... पण चित्रपट शौकीन असाल तर हा Wild fire चित्रपट मोठ्या पडद्यावरच बघा अशी विनंती!

In reply to by टर्मीनेटर

वामन देशमुख 20/12/2024 - 20:37
सिनेमाचे तिकिटदर कमी झाले की पुष्पा-२ पाहण्यात येईल असा घरचा आदेश आहे.
आम्हीही पहिल्या दिवशी तिकिटे जास्त होती म्हणून पाहीला नाही. खरंतर त्या शोला अपघातानेच गेलो. आमच्या अहोंना आणि त्यांच्या मैत्रिणींना मिळून हा सिनेमा तेलुगुत १३ डिसेम्बर ला पाहायचा होता. त्यांच्यासाठी तिकीट मी बुक केले ते चुकून हिंदीचे. ते लोक घरून निघायच्या वेळी ते लक्षात आले. मग त्यांनी बेत रद्द करून, आम्ही म्हणजे मी, अहो, अपत्ये आणि आई असे पाच जण गेलो. तिसऱ्या दिवशी १५ डिसेम्बर रोजी मी आणि माझे मित्र असे संध्याकाळी मस्त टुल्ल होऊन रात्रीच्या शोला गेलो. परत येताना पुन्हा टुल्ल होऊन, जेवण करून घरी दोन वाजता परतलो. घरी आल्यावर झोप येत नव्हती म्हणून पुन्हा पुष्पा १ ओटीटीवर पाहीला. पहाटे साडेपाचला झोपी गेलो.
... हा Wild fire चित्रपट मोठ्या पडद्यावरच बघा अशी विनंती!
अगदी अगदी! "पुष्पा अंटे फायर कादू, पुष्पा अंटे वाइल्ड फायर !" आणि मग दाढीवर दोन्ही उलटे हात फिरवणे हे पाहण्याची मजा मोठ्या पडद्यावरच आहे.

वामन देशमुख 20/12/2024 - 20:58
विशेषतः सणवार, उत्सव वगैरे बाबतीत आंध्र-तेलंगणा संस्कृती खूपच वैविध्यपूर्ण आहे. वीसपंचवीस तोळे सोन्याचे दागिने सहजच घालणाऱ्या स्त्रियांचा रुबाब, मोगरा-अबोली-गजरे माळलेल्या तरुणींची लगबग, हाफ साडी नेसलेल्या मुलींची धावपळ, रामराजचे पांढरेशुभ्र शर्ट-पंचा नेसलेल्या पुरुषांचा दरारा, नाना वेष धारण केलेल्या कलाकारांची विविध पारंपारीक रुपे, सात्विक तेजस्वी पंडित लोकांचे शास्त्रशुद्ध मंत्रोच्चार... आंब्याची तोरणे, नारळे, हळद, कुंकू, अक्षता, फळे, फुले यांची रेलचेल... पुष्पा २ (आणि इतरही अनेक सिनेमांतून) हे सर्व आणि अजूनही बरेच काही सविस्तर पाहायला मिळते. --- अवांतर: हे आवडणाऱ्या लोकांनी विशेषतः नवरात्रात तेलंगणात आणि संक्रांतीला आंध्रात पर्यटन करायला हवे. कधी योग आला तर एखाद्या देवळाच्या ध्वजस्तंभ पायाभरणी कार्यक्रमाला हजेरी लावायला हवी.

सौन्दर्य 21/12/2024 - 04:18
कालच ओटीपीवर हा सिनेमा पाहिला, मुद्दाम हाच पाहायचा अस काही नव्हतं, समोर आला आणि पहिला इतकंच . पूर्वीच्या सिनेमात हिरो सुरवातीला कितीही वाईट असला तरी शेवटी तो सुधरतो असे दाखवले जायचे जे प्रेक्षकांना भावायचं, आता गुन्हेगारीचे उदात्तीकरण लोकांना आवडतं हे बघून आपण म्हातारे होत चाललो आहोत हे जाणवले. चालायचंच , कालाय तस्मे नमः

Madhugandha 25/12/2024 - 08:25
चित्रपट म्हणजे समाजाचा आरसा . आता खलनायक नायक म्हणून समोर येत आहे आणि पोलीस खलनायक दाखवला गेला आहे. अॅनिमल चित्रपट आठवतो आहे का? म्हणजेच समाजात खलनायक प्रवृत्ती वाढत आहे, आणि वाढतच जाणार

टर्मीनेटर 25/12/2024 - 15:53
१ - 'पुष्पा: द राईज' - जगभरातील एकूण ढोबळ कमाई = ३९३.५० कोटी रुपये! "पुष्पा नाम सुनकर फ्लॉवर समझे क्या? फ्लॉवर नहीं... फायर हैं" 🙂 २ - 'पुष्पा: द रुल' - ५ डिसेंबरला प्रदर्शित झाल्यापासून काल (२४ डिसेंबर) पर्यंतची २० दिवसांतली चित्रपटाची भारतातील ढोबळ कमाई = १०८९.८५ कोटी रुपये! "पुष्पा फ्लॉवर नहीं... वाइल्ड फायर हैं" 😘 आणि, जगभरातील एकूण ढोबळ कमाई = १६२५.३१ कोटी रुपये! "पुष्पा को नॅशनल खिलाडी समझे क्या?... इंटरनॅशनल हैं" 😍 ३ - 'पुष्पा: द रॅम्पेज' - हा (आगामी) तिसरा भाग पहिल्या दोन भागांप्रमाणे व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी होईल कि नाही हे पुढे कळेलच, पण तो बघायची प्रचंड उत्सुकता मात्र लागून राहिली आहे! दुसऱ्या भागासाठी तब्बल तीन वर्षे वाट पाहावी लागली... तिसऱ्या भागासाठी तरी फार प्रतीक्षा करावी लागू नये ही अपेक्षा 😎 अवांतर: रविवारी 'मुफासा: द लायन किंग' पाहिला, खूप आवडला... करमणूकीच्या दृष्टीने वर्षाखेर * चांगली झाली 👌 २० डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या ह्या सुंदर अ‍ॅनिमेटेड चित्रपटाला भरघोस प्रतिसाद देत त्याच दिवशी प्रदर्शित झालेल्या 'वनवास' हा उत्कर्ष शर्मा आणि नाना पाटेकर ह्यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या भावनाप्रधान चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे पाहिल्यावर 'चित्रपट माध्यम' आणि त्यातल्या 'मनोरंजन मुल्या' कडे पाहण्याचा भारतीय प्रेक्षकांचा दृष्टिकोन सकारात्मकरित्या बदलत असल्याची सुखद जाणीव झाली 👍 २०२४ च्या नोव्हेंबर आणि डिसेंबर ह्या शेवटच्या दोन महिन्यात 'सिंघम अगेन' आणि 'भूल भुलैया ३' ह्या दोन ट्रिक्वेल चित्रपटांनी अनुक्रमे साफ निराशा आणि थोडेफार मनोरंजन केले, तर 'ग्लॅडिएटर २', 'मोआना २', 'पुष्पा: द रुल' आणि 'मुफासा: द लायन किंग' अशा अनुक्रमे तीन सिक्वेल आणि एका प्रिक्वेलने झकास करमणूक केली! २०२५ ह्या येत्या वर्षात अनेक चांगले करमणूकप्रधान चित्रपट रसिकांना पहायला मिळोत अशी मनोरंजनाच्या देवाकडे प्रार्थना 🙏 (*आज प्रदर्शित झालेला 'बेबी जॉन' हा हिंदी चित्रपट २०१६ च्या 'थेरी' ह्या तामिळ चित्रपटाचा रिमेक असुन तो पुर्वीच पाहुन झाला आहे हे एक कारण आणि वरुण धवन आणि किर्ती सुरेश हे दोन्ही कलवंत आवडत नाहीत हे दुसरे कारण असल्याने बेबी जॉन बघण्यात रस नाही त्यामुळे नविन चित्रपट बघण्याच्या दृष्टीने माझ्यासाठी हे वर्ष संपले आहे.)

वामन देशमुख 05/02/2025 - 09:15
जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात, अधिकची दृश्ये वाढवून पुष्पा २: द रूल् (रिलौडेड् वर्जन्) पुन्हा प्रदर्शित झाला. सिनेमा आता पाउणेतीन तासांचा झालाय. नवीन वर्जन् सगळ्याच मोठ्या शहरांतील थेटरात अजूनही सुरुच आहे असे दिसते. मागच्या आठवड्यात तो नेटफ्लिक्सवरही प्रदर्शित झालाय.

कंजूस 20/12/2024 - 17:59
एकच फार्मुला असतो कारण तोच पाहायला प्रेक्षक येतात. या मसाल्यातले बरेच चित्रपट निघत असावेत. तसे दोन आम्ही मागच्या वर्षी तमिळनाडू सहलीत बसमध्येच पाहिले होते. प्रवासात पाहण्यासाठी आणि भाषा न कळली तरी चालतात असे. हिंदीचे चित्रपट पाहायचे म्हटले तर फक्त हेराफेरी. कुठूनही केव्हाही केव्हाही भाग प्रवासात पाहिला तरी मजा.

In reply to by कंजूस

टर्मीनेटर 20/12/2024 - 18:48
हिंदीचे चित्रपट पाहायचे म्हटले तर फक्त हेराफेरी. कुठूनही केव्हाही केव्हाही भाग प्रवासात पाहिला तरी मजा.
कंकाका हिंदीत हेराफेरी१,२, 'अंदाज अपना अपना', धमाल, मुन्नाभाई १,२ आणि जुन्यात 'जाने भी दो यांरो' हे चित्रपट कधीही आणि कुठूनही बघितले तरी कंटाळा येत नाही 😀 बाकी द्येशमुखरावांनी 'संक्षिप्त' नावाखाली एका भव्यदिव्य चित्रपटाचा जो अत्यंत त्रोटक परिचय करून दिला आहे त्यासाठी त्यांचा त्रिवारच नाही तर पंच-षष्ठ वार निषेध... पुढल्या प्रतिसादांतून आम्हा 'पुष्पा' प्रेमिंची बाजू मांडतो!

चित्रगुप्त 20/12/2024 - 18:44
कालच दोन्ही मुलगे, सुना, अर्धांगिनी वगैरे मशारनिल्हे चित्रपट बघून आले. मी गेलो नव्हतो. आल्यावर मुलगा म्हणाला की तुम्ही आला असता तर पहिल्या पंधरा मिनिटातच उठून घरी आला असता. .

In reply to by चित्रगुप्त

टर्मीनेटर 20/12/2024 - 18:59
अक्षरशः खरे आहे... पहिली जवळपास १३-१३.५ मिनिटे हा चित्रपट पाहताना आपण चुकून क्रिश ४, ५, ६ वगैरे किंवा मार्वल वाल्यांचा कुठला सिनेमा बघायला तर आलो नाही ना हा प्रश्न पडतो! पण ते सगळं स्वप्नात घडल्याचे बघितल्यावर पुढचा चित्रपट पाहण्यासाठी ऊर्जा मिळते आणि ती शेवटपर्यंत कायम राहते... अर्थात सुरुवातीचा तो विलक्षण सीन आणि सगळीच गाणी वगळली असती तर चित्रपटाची लांबी आणि बजेट बऱ्यापैकी कमी झाले असते असे माझे मत! बाकी चित्रपट मजेदार आहे... आपल्याला बुद्धी आहे की नाही हे तपासण्यासाठी जे लोकं चित्रपट पहायला जात असतील त्यांनी मात्र ह्या चित्रपटापासून दूर राहावे!

चौथा कोनाडा 20/12/2024 - 19:04
श्रीवल्ली (रश्मिका मादन्ना),
रश्मिका मादक अण्णा म्हणायचे आहे का ? हा .... हा .... हा .... :) रश्मिका मंदाण्णा असं नाव आहे तिचं ... अशी अण्णा वाली बरीच नावं असतात तिकडं ! सिनेमाचे तिकिटदर कमी झाले की पुष्पा-२ पाहण्यात येईल असा घरचा आदेश आहे.

In reply to by चौथा कोनाडा

टर्मीनेटर 20/12/2024 - 19:10
सिनेमाचे तिकिटदर कमी झाले की पुष्पा-२ पाहण्यात येईल असा घरचा आदेश आहे.
हरकत नाही... पण चित्रपट शौकीन असाल तर हा Wild fire चित्रपट मोठ्या पडद्यावरच बघा अशी विनंती!

In reply to by टर्मीनेटर

वामन देशमुख 20/12/2024 - 20:37
सिनेमाचे तिकिटदर कमी झाले की पुष्पा-२ पाहण्यात येईल असा घरचा आदेश आहे.
आम्हीही पहिल्या दिवशी तिकिटे जास्त होती म्हणून पाहीला नाही. खरंतर त्या शोला अपघातानेच गेलो. आमच्या अहोंना आणि त्यांच्या मैत्रिणींना मिळून हा सिनेमा तेलुगुत १३ डिसेम्बर ला पाहायचा होता. त्यांच्यासाठी तिकीट मी बुक केले ते चुकून हिंदीचे. ते लोक घरून निघायच्या वेळी ते लक्षात आले. मग त्यांनी बेत रद्द करून, आम्ही म्हणजे मी, अहो, अपत्ये आणि आई असे पाच जण गेलो. तिसऱ्या दिवशी १५ डिसेम्बर रोजी मी आणि माझे मित्र असे संध्याकाळी मस्त टुल्ल होऊन रात्रीच्या शोला गेलो. परत येताना पुन्हा टुल्ल होऊन, जेवण करून घरी दोन वाजता परतलो. घरी आल्यावर झोप येत नव्हती म्हणून पुन्हा पुष्पा १ ओटीटीवर पाहीला. पहाटे साडेपाचला झोपी गेलो.
... हा Wild fire चित्रपट मोठ्या पडद्यावरच बघा अशी विनंती!
अगदी अगदी! "पुष्पा अंटे फायर कादू, पुष्पा अंटे वाइल्ड फायर !" आणि मग दाढीवर दोन्ही उलटे हात फिरवणे हे पाहण्याची मजा मोठ्या पडद्यावरच आहे.

वामन देशमुख 20/12/2024 - 20:58
विशेषतः सणवार, उत्सव वगैरे बाबतीत आंध्र-तेलंगणा संस्कृती खूपच वैविध्यपूर्ण आहे. वीसपंचवीस तोळे सोन्याचे दागिने सहजच घालणाऱ्या स्त्रियांचा रुबाब, मोगरा-अबोली-गजरे माळलेल्या तरुणींची लगबग, हाफ साडी नेसलेल्या मुलींची धावपळ, रामराजचे पांढरेशुभ्र शर्ट-पंचा नेसलेल्या पुरुषांचा दरारा, नाना वेष धारण केलेल्या कलाकारांची विविध पारंपारीक रुपे, सात्विक तेजस्वी पंडित लोकांचे शास्त्रशुद्ध मंत्रोच्चार... आंब्याची तोरणे, नारळे, हळद, कुंकू, अक्षता, फळे, फुले यांची रेलचेल... पुष्पा २ (आणि इतरही अनेक सिनेमांतून) हे सर्व आणि अजूनही बरेच काही सविस्तर पाहायला मिळते. --- अवांतर: हे आवडणाऱ्या लोकांनी विशेषतः नवरात्रात तेलंगणात आणि संक्रांतीला आंध्रात पर्यटन करायला हवे. कधी योग आला तर एखाद्या देवळाच्या ध्वजस्तंभ पायाभरणी कार्यक्रमाला हजेरी लावायला हवी.

सौन्दर्य 21/12/2024 - 04:18
कालच ओटीपीवर हा सिनेमा पाहिला, मुद्दाम हाच पाहायचा अस काही नव्हतं, समोर आला आणि पहिला इतकंच . पूर्वीच्या सिनेमात हिरो सुरवातीला कितीही वाईट असला तरी शेवटी तो सुधरतो असे दाखवले जायचे जे प्रेक्षकांना भावायचं, आता गुन्हेगारीचे उदात्तीकरण लोकांना आवडतं हे बघून आपण म्हातारे होत चाललो आहोत हे जाणवले. चालायचंच , कालाय तस्मे नमः

Madhugandha 25/12/2024 - 08:25
चित्रपट म्हणजे समाजाचा आरसा . आता खलनायक नायक म्हणून समोर येत आहे आणि पोलीस खलनायक दाखवला गेला आहे. अॅनिमल चित्रपट आठवतो आहे का? म्हणजेच समाजात खलनायक प्रवृत्ती वाढत आहे, आणि वाढतच जाणार

टर्मीनेटर 25/12/2024 - 15:53
१ - 'पुष्पा: द राईज' - जगभरातील एकूण ढोबळ कमाई = ३९३.५० कोटी रुपये! "पुष्पा नाम सुनकर फ्लॉवर समझे क्या? फ्लॉवर नहीं... फायर हैं" 🙂 २ - 'पुष्पा: द रुल' - ५ डिसेंबरला प्रदर्शित झाल्यापासून काल (२४ डिसेंबर) पर्यंतची २० दिवसांतली चित्रपटाची भारतातील ढोबळ कमाई = १०८९.८५ कोटी रुपये! "पुष्पा फ्लॉवर नहीं... वाइल्ड फायर हैं" 😘 आणि, जगभरातील एकूण ढोबळ कमाई = १६२५.३१ कोटी रुपये! "पुष्पा को नॅशनल खिलाडी समझे क्या?... इंटरनॅशनल हैं" 😍 ३ - 'पुष्पा: द रॅम्पेज' - हा (आगामी) तिसरा भाग पहिल्या दोन भागांप्रमाणे व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी होईल कि नाही हे पुढे कळेलच, पण तो बघायची प्रचंड उत्सुकता मात्र लागून राहिली आहे! दुसऱ्या भागासाठी तब्बल तीन वर्षे वाट पाहावी लागली... तिसऱ्या भागासाठी तरी फार प्रतीक्षा करावी लागू नये ही अपेक्षा 😎 अवांतर: रविवारी 'मुफासा: द लायन किंग' पाहिला, खूप आवडला... करमणूकीच्या दृष्टीने वर्षाखेर * चांगली झाली 👌 २० डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या ह्या सुंदर अ‍ॅनिमेटेड चित्रपटाला भरघोस प्रतिसाद देत त्याच दिवशी प्रदर्शित झालेल्या 'वनवास' हा उत्कर्ष शर्मा आणि नाना पाटेकर ह्यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या भावनाप्रधान चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे पाहिल्यावर 'चित्रपट माध्यम' आणि त्यातल्या 'मनोरंजन मुल्या' कडे पाहण्याचा भारतीय प्रेक्षकांचा दृष्टिकोन सकारात्मकरित्या बदलत असल्याची सुखद जाणीव झाली 👍 २०२४ च्या नोव्हेंबर आणि डिसेंबर ह्या शेवटच्या दोन महिन्यात 'सिंघम अगेन' आणि 'भूल भुलैया ३' ह्या दोन ट्रिक्वेल चित्रपटांनी अनुक्रमे साफ निराशा आणि थोडेफार मनोरंजन केले, तर 'ग्लॅडिएटर २', 'मोआना २', 'पुष्पा: द रुल' आणि 'मुफासा: द लायन किंग' अशा अनुक्रमे तीन सिक्वेल आणि एका प्रिक्वेलने झकास करमणूक केली! २०२५ ह्या येत्या वर्षात अनेक चांगले करमणूकप्रधान चित्रपट रसिकांना पहायला मिळोत अशी मनोरंजनाच्या देवाकडे प्रार्थना 🙏 (*आज प्रदर्शित झालेला 'बेबी जॉन' हा हिंदी चित्रपट २०१६ च्या 'थेरी' ह्या तामिळ चित्रपटाचा रिमेक असुन तो पुर्वीच पाहुन झाला आहे हे एक कारण आणि वरुण धवन आणि किर्ती सुरेश हे दोन्ही कलवंत आवडत नाहीत हे दुसरे कारण असल्याने बेबी जॉन बघण्यात रस नाही त्यामुळे नविन चित्रपट बघण्याच्या दृष्टीने माझ्यासाठी हे वर्ष संपले आहे.)

वामन देशमुख 05/02/2025 - 09:15
जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात, अधिकची दृश्ये वाढवून पुष्पा २: द रूल् (रिलौडेड् वर्जन्) पुन्हा प्रदर्शित झाला. सिनेमा आता पाउणेतीन तासांचा झालाय. नवीन वर्जन् सगळ्याच मोठ्या शहरांतील थेटरात अजूनही सुरुच आहे असे दिसते. मागच्या आठवड्यात तो नेटफ्लिक्सवरही प्रदर्शित झालाय.
एकाच आठवड्यात हा सिनेमा मी दोनदा पाहीला. पहिल्यांदा कुटुंबीयांसमवेत हिंदीत एका थेटरात; चार दिवसांनी मित्रांसमवेत तेलुगूत दुसऱ्या एका थेटरात. पुष्पा १: द राइज् आवडलेला होताच. पुष्पा २: द रूल् अधिकच आवडला. इतर कोणत्याही लोकप्रिय तेलुगु सिनेमातल्यासारखाच या सिनेमातही प्रचंड मसाला आहे.

सहज सुचलं म्हणून

कंजूस ·

चित्रगुप्त 22/12/2024 - 05:35
येत्या फेब्रुवारी ११-२० मी पुण्यात मुक्कामास असेन, त्या दरम्यान कट्टा करुया का ? (फक्त १६ तारीख सोडून. त्या दिवशी एका लग्नात उपस्थिती लावयची आहे)

In reply to by चित्रगुप्त

सध्या आमचे भ्रमण फक्त ६ फूट बाय ३ फूट इतपतच मर्यादित असल्याने, माझ्या घरीच कट्टा करू शकतो.

In reply to by मुक्त विहारि

काळजी घ्या मुवि. हाडाचे दुखणे म्हणजे वेळखाऊ दुखणे असते. काहीही झाले तरी मुळातले दुखणे आणि मग फिजिओथेरपी वगैरे प्रकार मिळून अडीच-तीन महिने जातातच. मी पण तो अनुभव घेतला आहे. पण त्या काळात मिपावर पूर्णवेळ पडीक राहून वेळेचा सदुपयोग केला होता :)

Bhakti 22/12/2024 - 21:15
पुणे बुक फेस्टिवल २०२४ अ आ १४ डिसेंबरपासून सुरू झालेल्या पुणे बुक फेस्टिवलचा आज २२ डिसेंबर शेवटचा दिवस होता.कामाचं आठवडा नियोजन पूर्ण फुल्ल असल्याने आजचाच दिवस या फेस्टिव्हलमध्ये येण्यासाठी मिळाला.खरोखर पुस्तक प्रेमींसाठी ही एक अनोखी पंढरी फर्ग्युसन महाविद्यालयात अवतरली होती.जवळपास २५० पेक्षा अधिक प्रकाशकांचे बुक स्टॉल येथे उपलब्ध होते.फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश करताच पुस्तक वाचण्यात मग्न अनेक भव्य प्रतिकृती ठराविक अंतरावर होत्या.पुस्तकांच्या आकाराच्या प्रतिकृतींची सजावट मार्गावर होती.अंम्पी थिअटरात अनेक कार्यक्रमांचीही रेलचेल होती.पुढे सर्वप्रथम भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पुस्तकरूपी "संविधान प्रतिकृती ९.९४ मीटर जिचा गिनीज बुक मध्ये समावेश करण्यात आला आहे, ती पाहिली.मग त्या भव्य प्रांगणात आलो जिथे फेस्टिव्हल भरले होते.इथे पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस यांचे आउटलेट छायाचित्रं काढण्यासाठी होते. आत गेल्यावर अनेक प्रसिद्ध प्रकाशनाची पुस्तके पाहून खूप आनंद झाला.इतकी पुस्तक पाहून कोणती घेऊ कोणती नको असं झालं. पहिल्याच पुस्तकाच्या स्टॉलवर पुस्तक पाहत चाळत होते.दुसऱ्या ठिकाणी हेच ,वेळेचे बंधन नसल्याने माझा नवरा आणि मुलगी मला टाटा करून पुढे निघून गेले.अनेक पुस्तकं जी नगरात पाहायलाही मिळत नाही ती जवळपास सर्वच पाहिली.इंग्रजी पुस्तकेही बरीच होती,तिथे गर्दीही भरपूर होती.मी प्रामुख्याने गीतारहस्य(लोकमान्य टिळक) पुस्त,पैशाचे मानसशास्त्र(मराठी , इंग्रजी दोन्ही भाषेत घेतले),हस्ताचा पाऊस(माडगूळकर),ज्ञानदेवा तिथे समाधी(राहूल देशपांडे), संस्कृती (इरावती कर्वे) , बिझिनेस महाराजा इत्यादी पुस्तके घेतली.थोड्या वेळाने लेकीची परत भेट झाली .तीला देखील पुस्तकांची गोडी निर्माण व्हावी म्हणून मुद्दामाहून आणले होते.ते सफलही झाले कारण घरी असलेली अनेक पुस्तके तिने ओळखून "आई हे आपल्या घरी हे पुस्तक आहे" असं सांगितलं :).रा.चि.ढेरे, कुरुंदकर ,इरावती कर्वे अशा अनेक आवडत्या लेखकांची सर्व अज्ञात पुस्तकेही पाहायला मिळाली.इथे सातवाहन गाथा सप्तशती पाहायला मिळाले.पण आता खुप उशीर झाला होता १२-४ असा वेळ इथे होते.एक तरी लेखक भेटतील अशी आशा होती पण ते घडलं नाही. फर्ग्युसन महाविद्यालय पाहत फिरत बाहेर आले.बाप लेकीने आधीच पोटोबा फुल्ल केला होता.जवळच वैशाली,वाडेश्वर आहे हे माहिती होतं.पण खूप दमलो होतो समोर ' रौनक' पावभाजी होती तिथेच गेलो.मस्त झाडांच्या सावलीत टेबल होते.पुण्यातलं पहिले १९६७ साली पावभाजीचे हे रेस्तराँ आहे असं तिथे लिहिले होते.पुण्याची पावभाजी तिखट नसणार म्हणून त्यांना तिखट द्या असं मुद्दामहूनच सांगितले.खुपच सुंदर सजवलेली (प्रेझेंटेशन)पावभाजी आणि बरोबर तिखट लसूण आलं सरबरीत चटणी,तिखटातला चिरलेला कांदा बरोबर आला.इतकी छान सर्व्हिस पाहून छान वाटलं.पुण्यात गोष्टींची 'गुणवत्ता' हाच महत्त्वाचा निकष परत दिसला.एफसी रोडवर जरा फेर फाटका मारून परत घरी निघालो. ई उ क च थ

In reply to by Bhakti

रामचंद्र 23/12/2024 - 22:05
वाचन ही शांत वातावरणात चालणारी प्रक्रिया आहे याचे थोडेसुद्धा भान आयोजकांना नसावे याचे वाईट वाटले. संध्याकाळच्या वेळेस तिथं जावं तर तिथंच चाललेल्या संगीताच्या कार्यक्रमामुळं कानठळ्या बसत होत्या. अर्थात एकंदरीतच आयोजनाच्या बाबतीत उत्सवी वातावरणात वाचनसंस्कृतीचे भान ठेवून शांत वातावरण, डोळ्याला त्रासदायक होणारा प्रखर प्रकाश टाळणे अशा गोष्टींची अपेक्षा करणं जरा जास्तच होतं याची पुरेशी जाणीव झाली आहे. बाकी हिंदी पुस्तकांच्या तसेच मराठवाड्यातल्या, तितकेसे प्रसिद्ध नसलेल्या स्टॉलवरही वेगळी, वाचनीय पुस्तकं पहायला मिळाली याचा आनंद आहे.

In reply to by Bhakti

Bhakti 21/03/2025 - 22:45
वाचाल तर आनंदी होणार अ सकाळ पुस्तक महोत्सव २०२५, अहिल्यानगर. पुणे बुक फेस्टिवलच्या धर्तीवर अगदी भव्य नाही पण बरेचसे मोठे , चांगली पुस्तके असणारे पुस्तक महोत्सव नगरमध्ये २१-२४ मार्च दरम्यान भरले आहे.पुढचे काही दिवस व्यस्त असल्यामुळे आजच फेरफटका मारला. नेहमीप्रमाणे पुस्तकाच्या दुकानात,प्रदर्शनात मला वेळेचे भान उरत नाही.तेव्हा तू एकटीच जा असं घरून सांगण्यात आले,फक्त मोबाईलची बॅटरी संपायच्या आधी घरी ये असंही सुनावण्यात आले. लोकप्रिय साहित्यिकांची पुस्तके ऑनलाईन सहज मिळतातं पण अशा प्रदर्शनात नवे पुस्तक समजतात.पुस्तकांना हातात घेऊन,पाने चाळत, अनुक्रमणिका पाहत ते पुस्तक घेणं निराळं सुखच असते. कादंबरी मी वाचनालयातून मिळालेल्या पुस्तकांतून वाचते. तेव्हा संस्कृती, अध्यात्मिक, वैज्ञानिक, समाजजीवन, निसर्ग,इतिहास,भटकंती विषयांची पुस्तके घेण्याकडे कल असतो. तरीही आनंद नाडकर्णी, ग्रेस, अच्युत गोडबोले,जयवंत दळवी,नरहर कुरुंदकर,नरेंद्र दाभोळकर यांची काही पुस्तके हेरुन ठेवली आहेत,लवकरच घेईन. मी घेतलेली अनवट पुस्तके- १.येई परतुनी ज्ञानेश्वरा' आज मला नवीन लेखक समजले डॉ.रा.श्री.मोरवंचीकर डॉ. रा. श्री. मोरवंचीकर आजही ज्ञानदानाच्या पवित्र कार्यात अखंड नंदादीपासम तेवत आहेत. त्यांनी 'येई परतुनी ज्ञानेश्वरा' हा मराठी लोकमानसाच्या जिव्हाळ्याचा ग्रंथ अध्यायनिहाय अनेक अंगांनी उलगडला आहे. त्यातील सचित्र ओव्यांचे मार्मिकपणे केलेले निरूपण पाहून त्यांच्या ज्ञानेश्वरांप्रती असलेल्या उत्कट प्रेमाचा अनुभव दिसतो. २.निसर्गायण दुसरे नव्याने समजलेले लेखक निसर्ग आणि विकास अभ्यासक दिलीप कुलकर्णी . पर्यावरणाची समस्या ही अशा प्रकारे बाह्य निसर्गातील असली, तरी तिचं मूळ आहे आपल्या मनोवृत्तीत -आपल्या विचारांत. आपली भोगवादी वृत्ती, हाव, आक्रमकता ही या समस्येला कारणीभूत आहे आणि केवळ ही एकच नव्हे, तर शस्त्रस्पर्धा, दुर्बलांवरचे अत्याचार, गुन्हेगारी, व्यसनाधीनता, मानसिक तणाव, स्वैराचार अशा अनेक समस्या त्याच मनोवृत्तीमुळे आपल्यासमोर उभ्या ठाकल्या आहेत.आधुनिक पाश्चात्त्य विज्ञान आणि प्राचीन पौर्वात्य तत्त्वज्ञान यांच्या आधारे या बदलाची दिशा शोधणारं हे पुस्तक. ३. थर्ड ॲंगल हे छोटेखानी पुस्तक हटके विषयावर म्हणजे ' थिअरॉटिकल मित्राने प्रॅक्टिकल क्लबमध्ये केलेली भाषणे एक वैचारिक अनोखा अनुभव आहे. मनाची नित्य नाव पुस्तकाच्या पानांनी वल्हवली जातात मग आयुष्याचा भवसिंधु सहज तरुन जातो ज्ञान सागराची ओढ अजुनच सहज पूर्ण होते... -भक्ती

कंजूस 23/12/2024 - 06:56
अरे वा! पुस्तक प्रदर्शन गाजलं. आता दरवर्षी होईल. तुमच्या मुलीसाठी पर्वणीच. ( आउटलेट छायाचित्रं काढण्यासाठी होते.= कटाउटस) फार पूर्वी मुंबईत (आझाद मैदान) आणि दिल्लीत ( प्रगती मैदान) येथे मोठे पुस्तक प्रदर्शन आलटून पालटून एक वर्षाआड होत असे. नंतर मुंबईतील बंदच झाले. मग छत्रपती टर्मिनस जवळचा खाजगी बुक स्टॉल आशिष दरवर्षी प्रदर्शन भरवून लागला सुंदराबाई हॉलमध्ये. पण मराठी पुस्तके नसत ( ती साहित्य संमेलनांत अधिक). अक्षर वाङमय यांनी काही वर्षे प्रदर्शने भरवली. माझ्या दृष्टीने पुस्तकं चाळायला मिळणे महत्त्वाचे कारण विकत घेत नाही. विकत आणून नंतर करायचे काय हा प्रश्न असतो. तरी भाषा शिकण्यासाठीची पुस्तके घेतो ती संग्रही आणि संदर्भासाठी कायम लागतात. स्थानिक नगरवाचनालयात काही वाचायला मिळतात. पण मोठी बाडं कधीच येत नाहीत. स्थानिक प्रकाशकांनी एक होऊन एक कायमची तारीख किंवा आठवडा प्रदर्शन भरवण्यासाठी निश्चित केला तर वाचकांच्या कायम लक्षात राहील. उदाहरणार्थ डिसेंबरचा दुसरा आठवडा.

In reply to by कंजूस

Bhakti 23/12/2024 - 08:15
सॉरी,माझी भयानक डिक्शनरी ;) =)(कटआऊट)
माझ्या दृष्टीने पुस्तकं चाळायला मिळणे महत्त्वाचे कारण विकत घेत नाही. विकत आणून नंतर करायचे काय हा प्रश्न असतो. तरी भाषा शिकण्यासाठीची पुस्तके घेतो ती संग्रही आणि संदर्भासाठी कायम लागतात.
खरं आहे,अशा मोठ्या प्रदर्शनात खुप पुस्तकं पाहायला ,चाळायला मिळतात हे महत्त्वाचे.माझा पुस्तक घेण्यासाठी हव्यास होता त्यामुळे बजेट संपल्यावर पुस्तक फक्त पाहण्याचं ऑड वाटू लागले.पुढच्यावेळी जरा याबाबत सतर्क राहीन ;) होय लेकीसाठी हळूहळू एम एच १२ केंद्रबिंदू (पर्वणी) तयार करणार आहे!

In reply to by Bhakti

हे पुस्तकं खरेदी करण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. आणि डोंबिवली हे केंद्रस्थानी असल्याने, डोंबिवली येथे उत्तम पुस्तके मिळतात.

In reply to by मुक्त विहारि

बुकगंगा,अक्षरधारा,ॲमेझोन सारख्या संस्थळावर पुस्तके स्वस्त आणी घरपोच येतात. मागील वर्षापेक्षा या वर्षी अधिक चांगले प्रदर्शन होते.

In reply to by श्रीरंग_जोशी

अरेरे. उशीर झाला. पहिला प्याला बर्‍याच वर्षांपूर्वी पिऊन झाला आहे :(

In reply to by श्रीरंग_जोशी

होळी, वजा तीस तापमान. शेवटचा प्याला मार्च १९९९,प्रसंग मारूती आठशे पहिली चार चाकी घेतली. व्यसनाधीन झालो का ?नाही, प्रत्येकाच्या इच्छाशक्ती वर आवलंबून. दारू पिली पाहीजे असे काही नाही. पण अती परिचयात अवाज्ञा तद्वत दारूला डोक्यावर चढवून नये. अर्थात माझे मत.

In reply to by कर्नलतपस्वी

कंजूस 23/12/2024 - 12:21
बरोबर. रोज थोडी थोडी घरीच घ्यावी म्हणजे त्यातली गंमत सामान्य होते. आणि कधी प्रसंगाप्रमाणे जे पितात भरपूर तसं होत नाही. कितीही कोणतेही दारूचे ब्रांड आले तरी बेसिकली अल्कोहोल अमुक टक्के यापलिकडे काही नाही. तांदुळाचेही तसेच आहे पंधरा रुपये ते सातशे पन्नास रुपये किलोचा असो त्यांचे पोषणमूल्य समानच असते. सगळे पॉलिश केलेलेच असतात. हातसडीचे कुठे मिळतात?

In reply to by कंजूस

ये इंतजार गलत है के शाम हो जाये जो हो सके तो अभी दौर-ए-जाम हो जाये मुझ जैसे रिंद को भी तूने हश्र मे या रब बुला लीया है तो, कुछ इंतजाम हो जाये हुई महँगी बहत ही शराब, के थोड़ी-थोड़ी पिया करो पियो लेकिन रखो हिसाब, के थोड़ी-थोड़ी पिया करो

In reply to by कर्नलतपस्वी

कौन कहता, अंगुर की बेटी गलत है अंगुरके दामाद को बस इसकी लत है इसके साथ कुछ गम गलत करता है तो बेरहम जमाने क्या जाता है,अगर... वो उसके साथ कुछ पल बिताता है

In reply to by श्रीरंग_जोशी

कंजूस 23/12/2024 - 12:23
सर्व विषे कमी प्रमाणात औषधेच असतात. अगदी तंबाखू, चहा, अफू,अर्सेनिक सुद्धा.

कंजूस 23/12/2024 - 12:39
आशिष बुक स्टॉल छत्रपती टर्मिनस जवळचा खाजगी बुक स्टॉल आशिष दरवर्षी प्रदर्शन भरवू लागला सुंदराबाई हॉलमध्ये. यांच्या पुस्तक प्रदर्शनात भेटी दिल्यावर एक लक्षात आलं की यामध्ये पुस्तके कोण घेतो. इंटिरिअर डेकोरेशनचा व्यवसाय करणारे मुंबईत बरेच आहेत. ते इकडे फिरतात. भरपूर रंगीत चित्र असलेली जाडजूड पुस्तके तिथे निम्म्या किंमतीत असतात. ती त्यांना हवी असतात नवनवीन फर्निचरच्या डिझाइनसाठी. शिवाय गार्डनिंग लेआउटचीही असतात. आर्किटेक्ट नाही पुस्तके लागतात. मोठ्या बास्केट घेऊन फिरतात आणि भराभर पुस्तके उचलतात. तरुण मुलं मुली इंग्रजी कादंबऱ्या विकत घेतात. काही महिला कुकींगची पुस्तके बघतात. आपण जी मराठी साहित्यातील कवितासंग्रह, कादंबऱ्या विकत घेतो त्याचा आनंद आठ दिवसांत संपतो. इतिहास,भाषा यांचे अभ्यासक पुस्तके घेतात ती त्यांच्या कामाची असतात. पण मग असा विचार येईल की वाचकांनी पुस्तके विकत घ्यावीत का? वाचनालयांनी घ्यावीत. म्हणजे महिन्याच्या फीमध्ये साहित्य वाचता येईल.

In reply to by कंजूस

विना अनुदानित, वाचनालये आता ओस पडत चालली आहेत. डोंबिवली येथे एक फ्रेंड्स लायब्ररी सोडली तर बरीचशी वाचनालये बंद पडली आहेत. मानपाडा रोड वरील ३ वाचनालये, डोंबिवली पश्चिम येथील एक वाचनालय, midc मधील एक वाचनालय, ही काही ठळक उदाहरणे. रामनगर मधील एक वाचनालय आणि P ,& T मधील एक वाचनालय, फ्रेंड्स लायब्ररीच्या सहयोगाने चालतात. त्यापेक्षा पण भयावह स्थिती, अभ्यासक्रमा व्यतिरिक्त , पुस्तक विक्रेत्यांची आहे.... कालाय तस्मै नमः....

कंजूस 27/12/2024 - 06:03
गोवा पर्यटन/ कोकण/समुद्री पर्यटन गोरगावलेकर यांनी केलेल्या गोवा पर्यटनाचे धागे येत आहेत. त्यांचे अनुभव लिहित आहेत. तिसऱ्या भागात हिवाळी सहल, दक्षिण गोवा :भाग 3 : बटरफ्लाय बीच आणि लोलये-पैंगिण चे वेताळ गोवा आणि कोकण यांच्या पर्यटनाची तुलना फायदे तोटे यांची प्रतिसादांतून चर्चा फारच वाढली. ती इकडे करता येईल. धाग्यातली चर्चा इथे कॉपी पेस्ट करताही येईल पण तो त्या प्रतिसादकर्त्या लेखकांचा अधिकार आहे. मीही पूर्वी गोव्यावर एक धागा काढला होता ते आठवले. माझा समुद्र पर्यटन, खाणे पिणे वगैरेंचा आनंद फारच संकुचित आहे. तरी एकदा गोवा काय आहे म्हणून पाहण्यासाठी गेलो होतो. परतताना कुडाळहून( कोकण) आलो. एसटीचाच प्रवास त्यामुळे जमेल तेवढे पाहिले. गोव्याच्या पर्यटनाबद्दल ऐकले वाचलेले भारतातले आणि परदेशी पर्यटक इथे येतात. आनंद घेतात आणि पुन्हापुन्हा येतात. गर्दी वाढली की ट्रेनची तिकिटे मिळत नाहीत. विमान आणि हॉटेल्सचे भाडी दर वाढतात. परवडण्याच्या पलिकडे जातात. तरीही पसंती असते. कोकण ( महाराष्ट्रातला) याबद्दल श्री.ना. पेंडसे किंवा जयवंत दळवी किंवा इतर लेखकांच्या कथा कादंबऱ्यांतून मराठी वाचकांना माहीत झालेला असतो. तो खरंच कसा आहे हे पहाण्यासाठी ठाणे,रायगड, सिंधुदुर्ग जिल्हेसोडून उर्वरित महाराष्ट्रातील दूरच्या ठिकाणांहून पर्यटक येतात. त्यात किहीम, अलिबाग, श्रीवर्धन,हर्णे मुरुड, रत्नागिरी परिसर, देवगड, मालवण, देवबाग ही ठिकाणे येतात. कोकण आणि गोव्याप्रमाणेच कर्नाटकातील २६० किमी किनारपट्टीवरही कारवार,गोकर्ण, मुर्डेश्वर, उडुपी, मंगळुरू ही ठिकाणं आहेत. तीही पाहिली. हॉटेल्स(राहाणे आणि खाणे शाकाहारी तसेच मासाहारी), बसप्रवास यादृष्टीने फारच चांगल्या सोयी आहेत. शिवाय किनारपट्टीसोडून वरती घाट चढून गेल्यावरही अनेक सुंदर ठिकाणी जाता येतं. मार्चपर्यंत वाहणारे धबधबे आहेत. इथल्या लोकांना पर्यटक येण्याची सवय आहे. त्यांचा त्रास वाटत नाही . तुसडेपणा नाही. मला कर्नाटक पर्यटन फार आवडले आणि पुन्हा जावेसे वाटते. किनारे स्वच्छ चांगले आहेतच शिवाय नद्याही बारमाही पाणी वाहणाऱ्या आणि अतिशय स्वच्छ पाण्याच्या आहेत. नदीकिनारी जी धार्मिक स्थळे आहेत ती निसर्गसौंदर्याने अधिकच चांगली वाटतात. सह्याद्रीचा सुंदर निसर्ग पाहावा तर इथेच. उडुपी आणि मंगळुरू येथे समुद्र पर्यटन आणि मत्स्याहारही खूप प्रचलित आहे.

In reply to by कंजूस

गवि 27/12/2024 - 08:33
https://www.youtube.com/embed/Jhsq0fdiEq0 गोवा पर्यटन मंत्री यांची मुलाखत. ही सोशल मीडियावर सर्वत्र सुरू झालेली चर्चा हा चुकीच्या (चायनीज) आकडेवारीवर आधारित एक प्रोपागांडा आहे असे त्यांचे म्हणणे त्यांनी इथे मांडले आहे.

In reply to by कंजूस

गोरगावलेकर 27/12/2024 - 12:16
गोरगावलेकर यांनी केलेल्या गोवा पर्यटनाचे धागे येत आहेत. त्यांचे अनुभव लिहित आहेत. धाग्याच्या पहिल्या भागात आम्ही मडगाव स्टेशन ते कोलवा बीच पर्यंत प्रवास केला होता . स्टेशनच्या बाहेरच प्रीपेड टॅक्सी मिळाली . टॅक्सिवाल्यांचा कथित मुजोरपणा दिसला नाही . दुसऱ्या भागात कोलवा ते पाळोळे पर्यंत प्रवास केला . पर्यटन स्थळे बघत जात आम्ही जवळपास पूर्ण दिवस घेतला व त्यात पाच - पंचवीस किमी अंतर जास्त झाले त्याचे वाढीव पैसेही दिले . किती खर्च येतो हे कळावे इतकाच लिहिण्यामागचा उद्देश . आज कुठल्या शहरात स्विफ्ट डिझायरचे संपूर्ण दिवसासाठी ३ १ ० ० /- रुपये भाडे असेल ? ड्रायव्हरचा पगार , गाडीची देखभाल दुरुस्ती, इंधन खर्च जाऊन मालकाच्या हातात कितीसे पैसे जातील ? कोला बीचला जातांना अगदी ओबड धोबड रस्त्यावरून गाडी गेली . स्वत : ची गाडी नेतांनाही विचार करावा लागेल असा रस्ता . कुठलीही कुरकुर न करता शक्य होतील ती ठिकाणे दाखवली . येथेही गाडीवाल्यांचा कथित मुजोरपणा दिसला नाही .

In reply to by गोरगावलेकर

गवि 27/12/2024 - 13:15
मुजोर म्हणजे बोलण्यात अशा अर्थाने नसावं. पण अतिरिक्त मनाला येईल तितके पैसे मागणे हे अनेकदा घडते. पूर्ण दिवसाचे ३१०० इतकेच घेतले असतील तर तुम्हाला नशिबाने चांगले डील आणि व्यक्ती लाभली. एरवी कोपऱ्यावर सोडून यायचे सहाशे (हे उदाहरण मे २०२४ मधलं, ऑफ सिझन काळ. अंतर दोन ते तीन किमी. पार्किंग नसल्याने टॅक्सी मागवावी लागली होती.). नुसती चौकशी केली होती तेव्हा, दाभोळी एअरपोर्ट ते अगोंद वन वे नुसते ड्रॉप करण्याचे ऑफ सिझन २००० आणि सिझन मध्ये ३५०० ते ४०००. तुलनेसाठी असे पाहा की मुंबईहून गोव्याचे विमान तिकीट देखील कधी कधी याहून कमी असते. वार्का ते काबो द राम किल्ला आणि परत इतक्या अंतराचे हॉटेलशी संलग्न टॅक्सीवाल्यांनी सुमारे आठ वर्षांपूर्वी तीन हजार घेतले आणि वरून टिप मागितली. वाटेत कुठे थांबायला देखील तयार नव्हता. नव्वद टक्के वेळा मुंबईपासून स्वत:ची कारच घेऊन जाणे किंवा एअरपोर्टवर उतरताच पूर्ण मुक्कामाइतकी सेल्फ ड्राईव्ह कार घेणे हे दोन उपाय करून ही समस्या आता सोडवली आहे. बाय द वे, गोव्यातील स्थानिक लोक कोंकणी भाषेच्या सवयीनुसार एकेरीत अरेतुरे करत बोलतात आणि त्या स्टाईल मुळे काही वेळा बाहेरील लोकांना ते अशिष्ट उद्धट उगीचच वाटू शकतात.

In reply to by गवि

कंजूस 27/12/2024 - 14:58
सहमत. खाजगी वाहनाशिवाय तसेच भाड्याच्या वाहनाशिवाय जमेल तेवढे फिरणे आणि आनंद मानणे हेच आमचे ध्येय असते. त्यामुळे काही त्रास /संताप होत नाही. शेअरिंग साठी कुणाला तयार करणेही नाही. म्हणजे अगदीच घरी कॉटवर पाय हलवत गप्पा मारण्यापेक्षा चार ठिकाणं पाहाणे बरे या रुळावर आमची गाडी सुसाट धावते. शिवाय खरेदी करायची नाही हे ठरवूनच टाकले आहे. आमचा गाईड लोनली प्लानेट पुस्तक " India travel survival kit " - Tony Wheeler and others.

In reply to by गवि

टर्मीनेटर 29/12/2024 - 13:08
"पूर्ण दिवसाचे ३१०० इतकेच घेतले असतील तर तुम्हाला नशिबाने चांगले डील आणि व्यक्ती लाभली."
काशिनाथ नाडकर्णी : "तो कोकणांतला असला पाहिजे अंऽऽऽ..." कोचरेकर मास्तर : "पाहिलंत? पाहिलंत... माणुसकी नाही.. नाही म्हणतात ना?... ही घ्या माणुसकी! प्रवासात काय अनुभव येतील सांगता येत नाही. वास्तविक असल्या ह्या लोकांचे जाहीर सत्कारच करायला पाहिजेत. त्याचे नाव, नंबर वगैरे आपण टिपून घ्यायला पाहिजे होता नाही का..."
"एरवी कोपऱ्यावर सोडून यायचे सहाशे (हे उदाहरण मे २०२४ मधलं, ऑफ सिझन काळ. अंतर दोन ते तीन किमी. पार्किंग नसल्याने टॅक्सी मागवावी लागली होती.). नुसती चौकशी केली होती तेव्हा, दाभोळी एअरपोर्ट ते अगोंद वन वे नुसते ड्रॉप करण्याचे ऑफ सिझन २००० आणि सिझन मध्ये ३५०० ते ४०००."
सोकाजीनाना त्रिलोकेकर : "ए नाडकर्णी, बघ... बघ! बघ लेका तुझा कोकणातला व्हिक्टोरिया (टॅक्सी) वाला... " काशिनाथ नाडकर्णी : "तो कोकणांतला असणंच शक्य नांयऽऽऽ... अहो तो कोकणात व्हिक्टोरिया (टॅक्सी) चालवायला शिकणार कुठून मला सांगा बघू आंऽऽऽ... कायत्तरी काय? आमच्या कोकणातले म्हणजे सगळे बैल..." 😀 भ्रमण मंडळ - बटाट्याची चाळ गोव्याला असंख्य वेळा जाउनही तिथल्या सार्वजनीक वाहतुक व्यवस्थेचा आणि टॅक्सीवाल्यांचा मला फारसा अनुभव नाही. ह्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात दोना पावला येथील मुक्काम असलेल्या 'इंटरनॅशनल सेंटर गोवा (ICG)' येथुन त्यांच्याचतर्फे संध्याकाळी तिथुन सुमारे सात किमी अंतरावर असलेल्या कॅसिनो पर्यंत जाउन मध्यरात्री तिथुन परतण्यासाठी घेतलेल्या टॅक्सी सेवेसाठी त्या टॅक्सीवाल्याने (आधीच बोलणी केल्याप्रमाणे) संध्याकाळी जाताना ड्रॉप साठी ३०० रुपये आणि मध्यरात्री तिथुन निघताना फोन करुन बोलवल्यावर पिक-अपसाठीचे ५०० रुपये असे जाउन-येउन एकुण ८०० रुपये घेतले होते. मध्य्ररात्री १:३० च्या नंतर फोन करुनही तो सांगीतल्याप्रमाणे परत न्यायला आला होता हे विषेश! असो, मिपाकरांना त्याठिकाणी आलेले टॅक्सीवाल्यांचे वेगवेगळे, बरे-वाईट अनुभव वाचुन माहितीत भर पडत आहे 👍

In reply to by गोरगावलेकर

विमानतळावरून आपल्या हॉटेलवर किंवा आपल्या हॉटेलवरून विमानतळावर जायचे असेल तर टॅक्सीवाल्यांचे अवाच्या सवा दर आहेत याचा मला तरी अनुभव आला नव्हता. आम्ही गोवा विमानतळापासून सगळ्यात लांब राहिलो होतो अगोंद आणि पाटणेला. दोन्ही ठिकाणी जायला विमानतळाहून १८०० रूपयात प्रीपेड टॅक्सी मिळाली होती. अर्थात ही अनुक्रमे २०१७ आणि २०१८ ची गोष्ट. सध्याचे दर किती हे माहित नाही. मात्र दोन्ही ठिकाणे दाबोळी विमानतळाहून साधारण ६०-६५ किलोमीटर अंतरावर आहेत. अंतर ध्यानात घेता तो दर अवाजवी जास्त आहे असे वाटले नव्हते. विमानतळावर समजा प्रीपेड टॅक्सी असते आणि त्यांना ठरवून दिलेले दर आहेत तितकेच घ्यावे लागतात. पण परतीच्या प्रवासात हॉटेलवरून विमानतळावर जातानाही टॅक्सीवाल्याने तेवढेच पैसे घेतले होते. अगोंदहून परत येताना आमचे विमान रात्रीचे होते त्यामुळे दाबोळी विमानतळावर रात्री साडेनऊच्या सुमारास पोचलो होतो. त्या वेळेस विमानतळावरून भाडी मिळत असतील की नाही शंकाच आहे कारण त्यावेळेनंतर फार विमाने येत नाहीत. तरीही त्याने जास्त पैसे घेतले नव्हते. टॅक्सीवाले अवाच्या सवा दर लावतात ते हॉटेलबाहेर साईटसिईंगला जाणार्‍यांकडून. वारकामध्ये आम्ही उतरलो होतो वारकाला आमच्या हॉटेलच्या बाहेर पर्यटकांसाठी म्हणून एक टॅक्सी स्टॅन्ड होता. तिथून मडगाव फार तर १०-१२ किलोमीटरवर होते. काजू आणि बेबिंका अशा गोष्टी घ्यायला मडगावला जायचे होते तेव्हा हॉटेलबाहेरील टॅक्सीवाल्यांनी जाऊन येऊन २७०० रूपये सांगितले होते. आणि ही गोष्ट २०१२ ची होती म्हणजे आणखी जुनी. ही अक्षरशः लूट होती. मला वाटते तिथे जास्त गोरे पर्यटक येतात आणि परदेशी पर्यटकांना अवाच्या सवा दर लाऊन लुटणे हा प्रकार नाही म्हटले तरी सगळीकडे होतोच. जर ते गोरे पर्यटक असे वाढीव दर द्यायला तयार होत असतील तर टॅक्सीवाल्यांना बहुदा आम्हा भारतीय पर्यटकांची गरज नसावी. त्यामुळे यायचे असेल तर या दरात या नाहीतर येऊ नका असा त्यांचा दृष्टीकोन होता.

गेल्या काही महिन्यांपासून माझी पत्नी सौरभ बोथरा यांच्या ऑनलाइन योगासन वर्गांना उपस्थिती लावत आहे. मी देखील महिन्याभरापासून सुरुवात केली आहे. शीर्षकात जरी केवळ योग असले तरी, योगासनांखेरीज, इतर कार्डिओ व श्वसनाचे व्यायाम, प्राणायम व थोडेफार ध्यान यांचाही या वर्गांत अंतर्भाव असतो. रोज युट्युब लाइव्ह द्वारे भाप्रवे नुसार सकाळ व संध्याकाळी हे वर्ग चालतात. सूचना सहजपणे समजतील अशा असतात व स्क्रीनवर पाहून आपण ते व्यायामप्रकार करू शकतो. ६ जानेवारीपासून तीन आठवडे या वर्गांचा नि:शुल्क लाभ घेता येईल - त्यासाठीचा दुवा. या वर्गांना काही दिवस उपस्थिती लावल्यावर, असे वर्ग आपल्याला काही वर्षे अगोदर का नाही मिळाले अशी भावना आमच्यासह बहुतेकांच्या मनात निर्माण झाली आहे / होत असते.

In reply to by श्रीरंग_जोशी

कंजूस 29/12/2024 - 04:00
ती साईट पाहिली. नोंदणी केली नाही. उपक्रम आणि ओनलाइन आहे हे बरे. काही शाळांत योगासने शिकवतात बहुतेक. आमच्या शाळेत शिकवली होती. पाचवी पासूनच . लहानपणी केली नाही तरी चालतात. कारण तेव्हा वाढते तरुण वय असते. पण नंतर कधी करायची झाल्यास छोट्या पुस्तिका विकत मिळतात त्या पाहिल्या की काही सोपी रोज करण्याची आसने दहा बारा आहेत ती करता येतात. चीनमध्ये तिथल्या बागांत ( parks) ६०+, ८५+ वयोगटातील नागरिकांसाठी काही त्यांच्या पद्धतींचे व्यायाम प्रकार करणारे करवून घेणारे गट असतात. त्यांचे काही विडिओ मी मागे पाहिले होते ( dwtv channel documentaries बहुतेक.) त्यांचे व्यायाम प्रकारही खूप चांगले वाटले. विशेषतः शरीराची रोजची हालचाल करण्यासाठीचे ते सराव आहेत. वरील दोन वयोगटांच्या वयाप्रमाणे हालचालींचा वेग वेगळा दिसला. इकडच्या काही बाबा लोकांचे योग प्रकार मला काही आवडले नाहीत. अतिरंजीत वाटले. ....... वजन कमी करणे/ हालचालींसाठी सराव/ रोग नियंत्रण/ मानसिक समाधान शांती यांपैकी एक किंवा सर्व असा काही झोल योगासनांमध्ये घालण्याचा खटाटोप दिसतो हे माझे मत.

Bhakti 29/12/2024 - 14:44
हरारीची मुलाखत रणवीरने घेतली.हरारी माझा आवडता विचारवंत आहे.तो भारतात नेक्सास' पुस्तक प्रकाशित करण्यासाठी आला होता.तेव्हा अनेकांना त्याच्याबरोबर मुलाखती घेतल्या. १. https://youtu.be/eNVtYPgJ6b0?si=3VfqDjCcx6_lYjk2 २. https://youtu.be/6x4UgHI7qbk?si=_Iz_eP9HF7SYH-ZM दुसरी मुलाखत अजून ऐकायची आहे. पहिली मुलाखत रणवीरने घेतली आहे.AI हा हरारीचा १० वर्षांपूर्वी पासूनचा विषय आहे.जो AI वर वरचढ होईल तोच पुढच्या काळात जगावर राज्य करणारे.इथे रशिया,ट्रम्प यांचा वर्चस्ववादी भूमिकेचा त्याने चांगला समाचार घेतला आहे.अमेरिकासारख्या बलाढ्य देशाने,लीडरने जगाच्या शांततेचा विचार आधी केला पाहिजे तरच माणूसकी टिकेल असं त्यांचं म्हणणं आहे.रणवीरचा शो म्हटला की तो स्पिरिच्युलिटीवर समोरच्याला बोलायला लावणारच हे ठरलेलं आहे 😀 त्यात हरारी विपश्यनेचा साधक आहे. पण हरारी म्हणतो कोणीही कोणाला दोन ,तीन तास ध्यानाला बसा हे म्हणणं सोपं आहे.पण पंधरा मिनिटे तरी केवळ स्वतःच्या आता बाहेर जाण्याऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित करा.इतर कोणताच विचार डोक्यात आणायचा नाही,हे सांगितले तर कोणालाच हे फारसं जमणार नाही.यासाठी खुप तयारीच हवी.मेडिटेशन कसं करायचं, कोणतं करायचं हे ज्याचं त्यालाच ठरवू द्या.उगाच मेंढ्याचा कळप करण्यात अर्थ नाही. युद्ध करावं की नाही याबाबत त्याचं मत मला गोलगोल वाटलं,आधी तो म्हणाला मिलिटरी वर ५०% हून अधिक खर्च चिंताजनक आहे नंतर म्हणाला इस्राएल आणि भारताने ज्या चुका रोमन व मुस्लिम+ब्रिटिश आक्रमणाच्या काळात सैन्य ताकद वाढवण्यावर भर देतात केली ती त्यांना आता करणे अजिबात परवडणारं नाही👏

In reply to by Bhakti

कंजूस 29/12/2024 - 15:53
मराठी किंवा कुणीही. आंतरराष्ट्रीय मते राजकीय/ सामाजिक / धार्मिक ही नेहमी ती व्यक्ती कोणत्या डोक्यातली आहे त्याप्रमाणे एकांगीच असतात. विरुद्ध गटाचा साधा उल्लेखही नसतो. तर काहींची प्रसिद्ध केलेली व्यक्तव्ये त्यांच्या देशाच्या राजकीय दडपणाखालीही असतात.

कंजूस 31/12/2024 - 20:43
पहिला काचेचा पूल काल कन्याकुमारी, तमिळनाडू इथे असलेल्या विवेकानंद स्मारक आणि तिरुवल्लूवर पुतळा या दोन ठिकाणांमध्ये काचेचा पूल उभारला त्याचे उद्घाटन झाले. hindustan times बातमी

कंजूस 03/01/2025 - 11:27
खरडफळ्यावर विषय निघाला म्हणून......... गुजरातचे सुंदर समुद्र किनारे आणि पर्यटन. फार प्रचलित नाही तरीही थोडक्यात... गुजरातध्ये {सूरतजवळच्या} हजिरा येथे आणि जामनगर येथे दोन मोठे रासायनिक प्रकल्प ( भारतीय कंपन्या, रिलायन्स) अगोदरच आहेत. सूरतजवळच्या दहेज बंदरातून - घोघा पलिकडे जाऊन भावनगरला काही जण जातात. धार्मिक पर्यटन. दीवचा किनारा पर्यटनासाठी आहे. तिथून वेरावळ - सोमनाथ आहे. पण धार्मिक महत्त्व आणि मासेमारी. दमणचा किनारा काळा आहे. मासेमारी बोटींच्या डिझेलमुळे. जवळचा परिसर दारूबार आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स मार्केटसाठी पूर्वी प्रसिद्ध होता. आता त्याचे महत्त्व उरले नाही. तरीही दमण- वापी- दादरा नगरहवेली- खानवेल ( गार्डन्स) अशी सहल होऊ शकते. द्वारका पोरबंदर समुद्र -धार्मिक पर्यटन अंकलेश्वर/अंकलेसर भरूच हे नर्मदा पर्यटनामुळे चर्चेत असते. गुजरात - महाराष्ट्र सीमेजवळचे डहाणू आणि बोर्डी येथे हॉटेल्स खूप आहेत. डहाणू-जव्हार- त्र्यंबकेश्वर -नाशिक - सापूतारा असाही सहल प्लान होऊ शकतो. गुजरात समुद्र किनारे थंडीतच ठीक. गरमा फार असतो. काही ठिकाणी रात्री चमकणाऱ्या लाटा दिसतात. मुंबई पुणे पर्यटकांसाठी कोकण, गोवा, कर्नाटक समुद्रच बरा.

In reply to by कंजूस

गवि 03/01/2025 - 14:19
दमण- वापी- दादरा नगरहवेली- खानवेल ( गार्डन्स) अशी सहल होऊ शकते.
दमण किनारे घाणेरडे. केमिकल आणि वास. अस्वच्छ. हल्ली काही भाग बांधून चौपाटी केली आहे असे ऐकले पण एकूण समुद्र घाण. खूप इंडस्ट्रीज. सिल्वासा कंटाळवाणे. सर्वसाधारण लहान शहर. उन्हाळ्यात तर अगदी नदी देखील कोरडी. तिथली वाटेतली लायन सफारी केविलवाणी. सापुतारा वगैरे हिल स्टेशन हा अधिक चांगला ऑप्शन आहे त्यापेक्षा.

In reply to by प्रचेतस

गवि 03/01/2025 - 15:50
आधी मद्य पिऊन मग कोणत्याही मार्केटमध्ये फिरायला मजाच येते. किंबहुना काळ्या समुद्रावर फिरायला देखील मजाच येते. :))

In reply to by प्रचेतस

गवि 03/01/2025 - 16:00
तुमच्या इतका जोरकस, प्रगाढ, वादळी, पावसाळी, ओलाकंच, इंटेंस अनुभव नसला तरी प्रवासाचा अंमळ थोडासा अनुभव आहे इतकंच..

In reply to by प्रचेतस

गवि 03/01/2025 - 16:09
सळसळत्या वाऱ्याने एखादा प्राजक्त थरथरावा आणि खालून जाणाऱ्या आपल्या तापल्या अंगावर गार दवबिंदूंचा पडलेला पाऊस हृदयाचे मधलेच चार ठोके चोरून जावा तशी अवस्था झालेली दिसते त्या आठवणींनी.

In reply to by गवि

प्रचेतस 03/01/2025 - 17:24
हो ना. अगदीच मोरपिशी अवस्था. बाकी तुमचे अनुभवही ह्याबाबतीत दांडगेच असणार म्हणा हे तुमच्या तरल शब्दांनी सहजच स्पष्ट होते.

In reply to by गवि

टर्मीनेटर 03/01/2025 - 16:55
वरच्या वाक्यात
"आधी मद्य पिऊन मग कोणत्याही मार्केटमध्ये फिरायला मजाच येते."
असे 'कोणत्याही मार्केटमध्ये' हे दोन शब्द ठळक करायचे राहुन गेले काय 😀 नीळा, हिरवा, पिवळा, तांबडाच काय पण 'मृत' समुद्रही जर कौतुकास पात्र ठरत असतील तर बिचाऱ्या 'काळ्या' समुद्राने असे काय कोणाचे घोडे मारले आहे? ('काळ्याशार' गोष्टीही आकर्षक असु शकतात 😉) तेव्हा घ्यावी की त्याच्यावरही फिरायची मजा 😂 बाकी 'काळ्या' वरुन सहज सुचलं म्हणून... काला रे सइयां काला रे तन काला रे मन काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी काला रे सइयां काला रे तन् काला रे मन काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी बैरी कोल् कोल् कोल् छीने तोल तोल तोल बैरी कोल् कोल् छीने तोल तोल तोल छत आँगन चार दिवारी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी कोल् बाज़ारी सइयां करते जी कोल् बाज़ारी काली मिटटी कुत्ता काला काला बिलकुल सुर्मे वाला काला कौवा हौवा काला काली मिटटी कुत्ता काला काला बिलकुल सुर्मे वाला काला कौवा हौवा काला काला बादल गिरने वाला काला मोती गिरने वाला काला झंडा डण्डा कला काला बटवा पैसा काला काली आँखों जैसा काला काली अग्नि काली गर्मी सूरज काला काला बीघा और गज काला काली हाथी हाथी काला काला बैरी कोल् कोल् कोल् छीने तोल तोल तोल बैरी कोल् कोल् छीने होल से टोल रंग पानी और पिचकारी सइयां करते जी पिया करते जी सइयां करते पिया करते जी काला रे सइयां काला रे तन काला रे मन्न काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी काला रे सइयां काला रे तन काला रे मन्न काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी. स्नेहा खानवलकर ह्या गुणी संगीत दिग्दर्शिकेने संगीतबद्ध केलेल्या 'गँग्स ऑफ वासेपूर २' मधल्या काला रे ह्या गाण्यात गीतकार वरुण ग्रोवर ह्यांनी इतक्या काळ्या गोष्टींचा उल्लेख केलाय, पण बिचारा 'काळा समुद्र' मात्र त्यात घ्यायचा राहून गेला बघा... 😎

In reply to by गवि

कंजूस 03/01/2025 - 14:46
खरंतर गुजरातला समुद्र पर्यटनाला जाऊच नये. औद्योगिकरणावर गुजरातने खूप भर दिला. नवसारीपासून पुढे वरती. मुंबई बाजारपेठ जवळ पडते. सापुतारा जरी महाराष्ट्रातील पर्यटकांना आवडत असले ( नाशिक जवळ) तरी गुजरातींना आवडत नाही. त्यांचे आवडते माथेरान महाबळेश्वर पाचगणी. मुंबई पुण्याला जवळची ठिकाणं पाहून झाल्यावर जरा बदल म्हणून दुसरीकडे काही आहे का याची चाचपणी करतात. पालघरच्य पश्चिमेला दहा किमीवर केळवे माहिम किनारा आहे. पालघर -मनोर - विक्रमगड- जव्हार- त्र्यंबकेश्वर - नाशिक या वाटेवर हल्ली 'गोवर्धन इको विलेज' मिनी वृंदावन ( इस्कॉनवाल्यांचं) हल्ली लोकप्रिय होत आहे. या मार्गावर बरीच रिसॉर्ट झाली आहेत. जव्हार मोखाडा भागातील वारली चित्रकला कमी होत आहे किंवा बाजारू होत आहे असं ऐकून आहे. सहलीच्या आराखड्यात/ मार्गावर चार पाच ठिकाणे असणे फायद्याचं ठरतं . एखादं नाही आवडलं कुणाला तर दुसरं सहल यशस्वी करतं.

In reply to by कंजूस

गवि 03/01/2025 - 15:54
केळवे किनारा तर लोकांनी घाणीने कचऱ्याने भरून टाकलेला दिसला. अगदी गेल्या वर्षात काही बदल झाला असेल तर माहीत नाही. लोक तिथे पिकनिक सारखा कार्यक्रम करून, बसून खाऊन प्लास्टिक प्लेट्स, खरकटे, उर्वरित अन्न असे सर्व जागीच टाकून उठत होते. किनाऱ्यावर हागणदारी होती. पार्किंग शुल्क किंवा तत्सम शुल्क वगैरे वसुली अवश्य होत होती पण स्वच्छतेच्या दृष्टीने काही दिसले नाही. पेड टॉयलेट होते. तेही अस्वच्छ. आपले सामान्य नागरिक देखील एकूण स्वच्छतेचा सेन्स कमी असलेले आहेत असेच वाटते सगळीकडे.

In reply to by गवि

कंजूस 03/01/2025 - 16:24
हं. नवीन अपडेट्स लक्षात ठेवायला हवेत. बाकी प्रचेतसकुमार चांगल्या जागा शोधतात. पण काहीच उघड करतात. BNHS वालेही चांगल्या जागा सांगत सुटत नाहीत. फेसबुकाच्या भिंती भरल्या की लोंढे तिकडेच जातात. राजमाची, कास पठार, सांधण, हरिहर.

टर्मीनेटर 03/01/2025 - 17:47
आपल्या सर्वांच्या माहितीतले मिपाकर लेखक 'कुमार१' हे काही कामानिमित्त मुंबईला येणार आहेत. त्या निमित्ताने सोमवार दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी ६ नंतर भायखळा येथे एक मिपा कट्टा करण्याचे ठरत आहे. सोमवारचा, म्हणजे कामकाजाचा दिवस असल्याने फार लांबुन कोणी येऊ शकणार नाहीत ह्याची कल्पना असल्यामुळे 'कट्ट्यासाठी' वेगळा धागा वगैरे काढलेला नाही, परंतु भायखळा परिसरात किंवा मुंबई उपनगरांत रहाणारे कोणी मिपाकर येऊ शकत असतील तर त्यांचे सहर्ष स्वागत आहे. (केवळ एकमेकांची सदिच्छा भेट आणि गप्पा-टप्पांचा कार्यक्रम एवढाच ह्या कट्ट्याचा मुळ उद्देश आहे 😀)

In reply to by टर्मीनेटर

कंजूस 03/01/2025 - 18:16
मुंबईत मिपाकर मोजून तीन चारच असतील. आणि त्यातून राणीबाग फुले प्रदर्शनाचे निमित्त साधले तर उत्तम.

In reply to by कंजूस

विजुभाऊ 05/01/2025 - 15:09
मुंबईत ( ठाणे डोंबिवली धरुन) किमान तीस एक मिपाकर सहज असतील. रामदास , शँपेन , क्लिंटन, प्रभू मास्तर , साक्षी , ज्योति अळवणी , मदनबाण असे बरेच आहेत.

In reply to by टर्मीनेटर

Bhakti 04/01/2025 - 11:34
कुमार १ आता मिपावर का लिहित नाही.त्यांना नक्की सांगा की तुमचे अभ्यासपूर्ण लेख मिपावर देत जा.

In reply to by टर्मीनेटर

Nitin Palkar 06/01/2025 - 08:18
या कट्ट्याला येतो असे कुमार१ यांना बोललो होतो. अचानक महत्वाचे काम निघाल्यामुळे येऊ शकत नाही. लवकरच पुन्हा असा योग येवो.

Bhakti 04/01/2025 - 11:43
आणि आजोबा परत जिवंत झाले! ;) लाखातून एखादा व्यक्ती इतका नशीबवान असू शकतो.हार्ट ॲटॅकमुळे मृत घोषित केलेल्या आजोबांचे शव रूग्णवाहिकेतून घरी नेताना रस्त्यावरील खड्ड्यांच्या धक्क्यामुळे आजोबांचे ह्रदय पुन्हा चालू झाले असावे.कारण नातवाला नंतर त्यांच्या हाताच्या बोटांची हालचाल दिसली.मग पुढील उपचाराला परत दुसऱ्या दवाखान्यात नेले.तर आजोबांच्या ह्रदयाचे ठोके दिसले. देव तारी त्याला कोण मारी... https://youtu.be/Y5Ap-dknaww?si=Ezn1IIWLjspCJ5Sl

In reply to by Bhakti

चौथा कोनाडा 05/01/2025 - 20:10
या घटनेची नोंद घेत महाराष्ट्राच्या आरोग्य खात्याने सदर खड्ड्याचे मोजमाप करून तशाच प्रकारचे खड्डे विविध रस्त्यांवर पाडण्याचे नियोजन केलेले आहे. या खड्डा इफेक्टमुळे सीपीआर ची प्रोसिजर कालबाह्य होऊ शकते असे माझी आरोग्य सचिव माननीय डॉक्टर चंगावडकर श्रीपाद यांनी प्रतिपादित केले ! या नियोजित खड्ड्यांच्या कंत्राटांवरून आत्ताच वाद सुरू झालाय ! राजकीय नेते श्री अमुक प्रमुख यांनी या कंत्राटात बावीस कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. आणि या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे केली.

कंजूस 05/01/2025 - 10:24
माथेरानमध्ये पर्यटक घोड्यावर बसून जात आहेत, काही जण मिनी ट्रेन पाहात आहेत, माकडे पर्यटकांच्या खाऊच्या पिशव्या हिसकावून घेत आहेत अशा माहितीवर Chatgpt ने काढलेलं चित्र.image थोड्या चुका आहेत, अर्धवट कापली गेली आहेत दृष्य. तरी ठीकच.

कंजूस 24/02/2025 - 00:28
उन्हाळी भटकंती. काल एक भटकंती केली. खंडाळा घाटासाठी रेल्वे जिथून पळसधरी स्टेशनानंतर वर चढते त्या पहिल्या डोंगरात आहे सोनगिरी. ( मुंबईतील तरुण नवख्या ट्रेकरांचा पावसाळ्यातला आवडता ट्रेक. आणखी एक सोंडाई डोंगर माथेरानच्या चौक पाॅइंटच्या खाली आहे.) उन्हाळा सुरू झाला आहे, रान वाळले आहे तरी दुपारी बारा ते पाच तळापासून माथ्यापर्यंत (५०० मिटर्स) अतोनात डास होते. शांतपणे बसून डबासुद्धा खाता आला नाही. या उलट मागचाच डोंगर राजमाचीचा. तिथे कधीच कुठेही डास नसतात. हे असं का?

कंजूस 12/03/2025 - 10:38
वेरूळ दहाव्या लेण्यात किरणोत्सव..... लोकसत्ता बातमी. https://youtu.be/2xX1I0EUcNk?si=Q7AHHpInuRYAN6Zc असा दिसत असला तरी त्यासाठी लेण्या तशा बांधलेल्या नसाव्यात. वेरूळ लेण्या बहुशा पश्चिमाभिमुख आहेत त्यामुळे दुपारी वर्षातून दोनवेळा किरण आतापर्यंत येत असणारच. आपली देवळं मुद्दामहून पूर्वाभिमुख बांधतात. काही पश्चिम दिशेला तोंड करून. तसं लेण्यांचं नाही. बौद्ध भिक्कुंना पावसाळ्यात विश्रांतीसाठी विहार आणि लेणी आणि चैत्य बांधण्यात ( खोदण्यात) आले होते. मूळ उद्देश हा होता.

कंजूस 12/03/2025 - 10:56
विमान परत फिरवणे.... मागच्या आठवड्यात एक शिकागो ते दिल्ली विमान टॉयलेट्स तुंबल्याने परत शिकागोला नेले. https://youtu.be/ZQemz_Enpxc?si=w1SuHw86alXZ6IiW उड्डाणाचे फक्त चार तास उरले होते. मग वाटेत कुठे emergency landing या कामासाठी मिळत नसावेत का? किंवा ते देश अशि सर्विस देत नसतील?

कंजूस 19/03/2025 - 18:32
माथेरान कालपासून बंद. टॅक्सी, इ रिक्षा आणि घोडे वाले संपावर. कारण काय तर म्हणे पर्यटकांची फसवणूक करणारे विडिओ यूट्यूबवर आले. खरं कारण ... खाजगी वाहनाने येणारे पर्यटक वाढले आणि ते दस्तुरी नाक्यावरून शटल टॉय ट्रेन किंवा इ रिक्षांनी माथेरानच्या बाजार पर्यंत जातात. ते आठवड्यात कोणत्याही दिवशी येऊन जातात. हमाल, हॉटेल्स आणि घोडेवाल्यांचा धंधा जोरात चालतो. इ रिक्षा दहा आहेत. फक्त सुट्ट्या लागल्यावर येणारे पर्यटकच टॅक्सी घेतात. एकूण काय तर २७० टॅक्सी वाल्यांना धंधा मिळत नाही पण पर्यटक खूप येतात. नेरळ ते दस्तुरी नाका जाणारी एसटी मिनीबस ( पंचवीस रुपयांत) हीसुद्धा पोटदुखी आहे. फसवणूक टॅक्सीवालेच करतात. खाजगी कार्यालयांना " आमच्या टॅक्सी नेच जा असा हेका धरतात किंवा पाचशे रुपये द्या असा दम भरतात. काही शहाणे टॅक्सी वाल्यांनी मात्र पन्नास रु सीटने धंधा सुरू ठेवला आहे. ( अधिकृत भाडे शंभर रु प्रती प्रवासी असे चारांचे चारशे रुपये घेतात. किंवा पूर्ण टॅक्सी खिडकीवर जाऊन बुक केल्यास ३६० रुपये लागतात. आता प्रश्न असा आहे की टॅक्सीवाले आठवड्याच्या इतर दिवशी ओला/ उबेर/ वगैरेंनी संबंध का ठेवत नाहीत. कारण या साईट्स " मारुती इको" वाहन नको सांगतात. सर्व माथेरान टॅक्स्या याच प्रकारच्या आहेत.

In reply to by कंजूस

चौथा कोनाडा 20/03/2025 - 20:29
खासगी करण : वरच्या पातळीवर अदानी- अंबानी खालच्या पातळी छोटेआका, बडेआका अणि अन असे कार्यकर्ते म्हणवणारे खंडणीकार्यकर्ते

वामन देशमुख 21/03/2025 - 13:10
माझा कालचा WhatsApp Status SohalLalTeaTime #LifeIsFunWithFriends&SohanlalTea ☕
एका जिवलगाचा प्रतिसाद -
चहा आणी आणी ते सुद्धा संध्याकाळी 7 नंतर! उन लागलं की काय वामन तुला ? काळजी घे बाबा.
माझे उत्तर - हमारे तेलंगाणा के लोओंका मालूम नै तुमारकू? सुब्बे उट्टे जब से रात को सोने तलक कब्बी बी चायाँ पीने कू रेडीच रैतें। कल क्या वा मालूम? हमारे संजय बावा होर उनके इनो आये थे हमारे इधर म्हाराष्ट्रा सें । फिर Abits कु जाने के प्लानाँ बनायें। तो मैं बोलूं, चलो बावा, कैसे बी उदर जारैं । तो व्हांपे सोहनलाल की चाय भोत सईं रैती, दूर दूर से लोआं आते पीनेकू। पीते, तुम्म? तो उनो बोले, तुम इत्ता बोलरे तो कैकु नै पीते वामन राव? फिर हम, हमारे इनो, बावा, बावा के इनो ऐसे चार जणां गए चायाँ पीनेकू। अब तुमारकू तो मालूमिच हैं, वो चायाँ वायाँ पीने के शौकां तो अपुन नै पालते। फिर वो तीन जणां चायाँ पिए। भोत अच्चे है चायाँ बोले। बोलके मई स्टेटसां लगायूँ।

वामन देशमुख 30/04/2025 - 10:55
अक्षय्य तृतीयेनिमित्त घराजवळच्या श्री वेंकटेश्वर स्वामी (बालाजी) मंदिरात सपत्नीक गेलो होतो. घरी आंब्याची पाने-झेंडूची फुले यांची तोरणे, देवांना ताजे हार,फुले, यथासांग पूजा, विशेष नैवेद्य हे झाले. गोडधोड जेवण आहे. श्री कृपेने प्रसन्न वाटते आहे. गोविंदा गोविंदा गोऽविंदा!

In reply to by कंजूस

वामन देशमुख 30/04/2025 - 15:56
मेहकरचा बालाजी?
मी हैदराबादला राहतो. घराजवळच्या (आम्ही लोकांनी बांधलेल्या) देवळात गेलो होतो.‌ यापूर्वी मेहकरच्या बालाजी मंदिरात गेलेलो आहे.‌ तेथील बालाजीची मूर्ती खूप उंच आहे. बहुधा भारतभरातील सर्वात उंच मूर्ती असावी.

वामन देशमुख 09/05/2025 - 13:44
श्रीगुरुजी हा आइडी बॅन केल्याबद्दल मी तीव्र निषेध व्यक्त करतो. ज्या मोजक्या मिपाखरांमुळे मिसळपाववर वाचक येतात त्यांच्यापैकी एक हे श्रीगुरुजी होते.‌ हे लिहिण्याचा अधिकार मला आहे व हे लिहिल्यामुळे माझाच आइडी बॅन होणार नाही ही अपेक्षा. जय हिंद. --- हे मी खरडफळ्यावरही लिहिलं होतं; कायमची नोंद राहावी म्हणून इथे पुन्हा लिहीत आहे.

In reply to by वामन देशमुख

मारवा 09/05/2025 - 13:54
श्रीगुरुजी हे अनेकवेळा अभ्यासपूर्ण संदर्भासहित मांडणीणकरात होते हे खरे आहे. काहीवेळा मतभेद असले तरी जेबकी स्वाभाविक आहे तरी त्यांची एकूण मांडणी व चर्चेला योगदान चांगलेच होते यात शंका नाही अनेकदा माहीत नसलेले संदर्भ त्यांच्यामुळे माहिती होत होते. मात्र वामनराव त्यांची भाषेची मर्यादा भंगलेली होती असेही दिसून येते. त्यासाठी त्यांना समज देऊन संधी द्यायला हवी होती असेच अमरेंद्र बाहुबली यांना देखील संधिं द्यायाला हवी होती. असे उत्साहाने हिरीरीने चर्चा करणारे गेले तर त्याचे मला तरी नक्कीच वाईट वाटतें

चित्रगुप्त 22/12/2024 - 05:35
येत्या फेब्रुवारी ११-२० मी पुण्यात मुक्कामास असेन, त्या दरम्यान कट्टा करुया का ? (फक्त १६ तारीख सोडून. त्या दिवशी एका लग्नात उपस्थिती लावयची आहे)

In reply to by चित्रगुप्त

सध्या आमचे भ्रमण फक्त ६ फूट बाय ३ फूट इतपतच मर्यादित असल्याने, माझ्या घरीच कट्टा करू शकतो.

In reply to by मुक्त विहारि

काळजी घ्या मुवि. हाडाचे दुखणे म्हणजे वेळखाऊ दुखणे असते. काहीही झाले तरी मुळातले दुखणे आणि मग फिजिओथेरपी वगैरे प्रकार मिळून अडीच-तीन महिने जातातच. मी पण तो अनुभव घेतला आहे. पण त्या काळात मिपावर पूर्णवेळ पडीक राहून वेळेचा सदुपयोग केला होता :)

Bhakti 22/12/2024 - 21:15
पुणे बुक फेस्टिवल २०२४ अ आ १४ डिसेंबरपासून सुरू झालेल्या पुणे बुक फेस्टिवलचा आज २२ डिसेंबर शेवटचा दिवस होता.कामाचं आठवडा नियोजन पूर्ण फुल्ल असल्याने आजचाच दिवस या फेस्टिव्हलमध्ये येण्यासाठी मिळाला.खरोखर पुस्तक प्रेमींसाठी ही एक अनोखी पंढरी फर्ग्युसन महाविद्यालयात अवतरली होती.जवळपास २५० पेक्षा अधिक प्रकाशकांचे बुक स्टॉल येथे उपलब्ध होते.फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश करताच पुस्तक वाचण्यात मग्न अनेक भव्य प्रतिकृती ठराविक अंतरावर होत्या.पुस्तकांच्या आकाराच्या प्रतिकृतींची सजावट मार्गावर होती.अंम्पी थिअटरात अनेक कार्यक्रमांचीही रेलचेल होती.पुढे सर्वप्रथम भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पुस्तकरूपी "संविधान प्रतिकृती ९.९४ मीटर जिचा गिनीज बुक मध्ये समावेश करण्यात आला आहे, ती पाहिली.मग त्या भव्य प्रांगणात आलो जिथे फेस्टिव्हल भरले होते.इथे पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस यांचे आउटलेट छायाचित्रं काढण्यासाठी होते. आत गेल्यावर अनेक प्रसिद्ध प्रकाशनाची पुस्तके पाहून खूप आनंद झाला.इतकी पुस्तक पाहून कोणती घेऊ कोणती नको असं झालं. पहिल्याच पुस्तकाच्या स्टॉलवर पुस्तक पाहत चाळत होते.दुसऱ्या ठिकाणी हेच ,वेळेचे बंधन नसल्याने माझा नवरा आणि मुलगी मला टाटा करून पुढे निघून गेले.अनेक पुस्तकं जी नगरात पाहायलाही मिळत नाही ती जवळपास सर्वच पाहिली.इंग्रजी पुस्तकेही बरीच होती,तिथे गर्दीही भरपूर होती.मी प्रामुख्याने गीतारहस्य(लोकमान्य टिळक) पुस्त,पैशाचे मानसशास्त्र(मराठी , इंग्रजी दोन्ही भाषेत घेतले),हस्ताचा पाऊस(माडगूळकर),ज्ञानदेवा तिथे समाधी(राहूल देशपांडे), संस्कृती (इरावती कर्वे) , बिझिनेस महाराजा इत्यादी पुस्तके घेतली.थोड्या वेळाने लेकीची परत भेट झाली .तीला देखील पुस्तकांची गोडी निर्माण व्हावी म्हणून मुद्दामाहून आणले होते.ते सफलही झाले कारण घरी असलेली अनेक पुस्तके तिने ओळखून "आई हे आपल्या घरी हे पुस्तक आहे" असं सांगितलं :).रा.चि.ढेरे, कुरुंदकर ,इरावती कर्वे अशा अनेक आवडत्या लेखकांची सर्व अज्ञात पुस्तकेही पाहायला मिळाली.इथे सातवाहन गाथा सप्तशती पाहायला मिळाले.पण आता खुप उशीर झाला होता १२-४ असा वेळ इथे होते.एक तरी लेखक भेटतील अशी आशा होती पण ते घडलं नाही. फर्ग्युसन महाविद्यालय पाहत फिरत बाहेर आले.बाप लेकीने आधीच पोटोबा फुल्ल केला होता.जवळच वैशाली,वाडेश्वर आहे हे माहिती होतं.पण खूप दमलो होतो समोर ' रौनक' पावभाजी होती तिथेच गेलो.मस्त झाडांच्या सावलीत टेबल होते.पुण्यातलं पहिले १९६७ साली पावभाजीचे हे रेस्तराँ आहे असं तिथे लिहिले होते.पुण्याची पावभाजी तिखट नसणार म्हणून त्यांना तिखट द्या असं मुद्दामहूनच सांगितले.खुपच सुंदर सजवलेली (प्रेझेंटेशन)पावभाजी आणि बरोबर तिखट लसूण आलं सरबरीत चटणी,तिखटातला चिरलेला कांदा बरोबर आला.इतकी छान सर्व्हिस पाहून छान वाटलं.पुण्यात गोष्टींची 'गुणवत्ता' हाच महत्त्वाचा निकष परत दिसला.एफसी रोडवर जरा फेर फाटका मारून परत घरी निघालो. ई उ क च थ

In reply to by Bhakti

रामचंद्र 23/12/2024 - 22:05
वाचन ही शांत वातावरणात चालणारी प्रक्रिया आहे याचे थोडेसुद्धा भान आयोजकांना नसावे याचे वाईट वाटले. संध्याकाळच्या वेळेस तिथं जावं तर तिथंच चाललेल्या संगीताच्या कार्यक्रमामुळं कानठळ्या बसत होत्या. अर्थात एकंदरीतच आयोजनाच्या बाबतीत उत्सवी वातावरणात वाचनसंस्कृतीचे भान ठेवून शांत वातावरण, डोळ्याला त्रासदायक होणारा प्रखर प्रकाश टाळणे अशा गोष्टींची अपेक्षा करणं जरा जास्तच होतं याची पुरेशी जाणीव झाली आहे. बाकी हिंदी पुस्तकांच्या तसेच मराठवाड्यातल्या, तितकेसे प्रसिद्ध नसलेल्या स्टॉलवरही वेगळी, वाचनीय पुस्तकं पहायला मिळाली याचा आनंद आहे.

In reply to by Bhakti

Bhakti 21/03/2025 - 22:45
वाचाल तर आनंदी होणार अ सकाळ पुस्तक महोत्सव २०२५, अहिल्यानगर. पुणे बुक फेस्टिवलच्या धर्तीवर अगदी भव्य नाही पण बरेचसे मोठे , चांगली पुस्तके असणारे पुस्तक महोत्सव नगरमध्ये २१-२४ मार्च दरम्यान भरले आहे.पुढचे काही दिवस व्यस्त असल्यामुळे आजच फेरफटका मारला. नेहमीप्रमाणे पुस्तकाच्या दुकानात,प्रदर्शनात मला वेळेचे भान उरत नाही.तेव्हा तू एकटीच जा असं घरून सांगण्यात आले,फक्त मोबाईलची बॅटरी संपायच्या आधी घरी ये असंही सुनावण्यात आले. लोकप्रिय साहित्यिकांची पुस्तके ऑनलाईन सहज मिळतातं पण अशा प्रदर्शनात नवे पुस्तक समजतात.पुस्तकांना हातात घेऊन,पाने चाळत, अनुक्रमणिका पाहत ते पुस्तक घेणं निराळं सुखच असते. कादंबरी मी वाचनालयातून मिळालेल्या पुस्तकांतून वाचते. तेव्हा संस्कृती, अध्यात्मिक, वैज्ञानिक, समाजजीवन, निसर्ग,इतिहास,भटकंती विषयांची पुस्तके घेण्याकडे कल असतो. तरीही आनंद नाडकर्णी, ग्रेस, अच्युत गोडबोले,जयवंत दळवी,नरहर कुरुंदकर,नरेंद्र दाभोळकर यांची काही पुस्तके हेरुन ठेवली आहेत,लवकरच घेईन. मी घेतलेली अनवट पुस्तके- १.येई परतुनी ज्ञानेश्वरा' आज मला नवीन लेखक समजले डॉ.रा.श्री.मोरवंचीकर डॉ. रा. श्री. मोरवंचीकर आजही ज्ञानदानाच्या पवित्र कार्यात अखंड नंदादीपासम तेवत आहेत. त्यांनी 'येई परतुनी ज्ञानेश्वरा' हा मराठी लोकमानसाच्या जिव्हाळ्याचा ग्रंथ अध्यायनिहाय अनेक अंगांनी उलगडला आहे. त्यातील सचित्र ओव्यांचे मार्मिकपणे केलेले निरूपण पाहून त्यांच्या ज्ञानेश्वरांप्रती असलेल्या उत्कट प्रेमाचा अनुभव दिसतो. २.निसर्गायण दुसरे नव्याने समजलेले लेखक निसर्ग आणि विकास अभ्यासक दिलीप कुलकर्णी . पर्यावरणाची समस्या ही अशा प्रकारे बाह्य निसर्गातील असली, तरी तिचं मूळ आहे आपल्या मनोवृत्तीत -आपल्या विचारांत. आपली भोगवादी वृत्ती, हाव, आक्रमकता ही या समस्येला कारणीभूत आहे आणि केवळ ही एकच नव्हे, तर शस्त्रस्पर्धा, दुर्बलांवरचे अत्याचार, गुन्हेगारी, व्यसनाधीनता, मानसिक तणाव, स्वैराचार अशा अनेक समस्या त्याच मनोवृत्तीमुळे आपल्यासमोर उभ्या ठाकल्या आहेत.आधुनिक पाश्चात्त्य विज्ञान आणि प्राचीन पौर्वात्य तत्त्वज्ञान यांच्या आधारे या बदलाची दिशा शोधणारं हे पुस्तक. ३. थर्ड ॲंगल हे छोटेखानी पुस्तक हटके विषयावर म्हणजे ' थिअरॉटिकल मित्राने प्रॅक्टिकल क्लबमध्ये केलेली भाषणे एक वैचारिक अनोखा अनुभव आहे. मनाची नित्य नाव पुस्तकाच्या पानांनी वल्हवली जातात मग आयुष्याचा भवसिंधु सहज तरुन जातो ज्ञान सागराची ओढ अजुनच सहज पूर्ण होते... -भक्ती

कंजूस 23/12/2024 - 06:56
अरे वा! पुस्तक प्रदर्शन गाजलं. आता दरवर्षी होईल. तुमच्या मुलीसाठी पर्वणीच. ( आउटलेट छायाचित्रं काढण्यासाठी होते.= कटाउटस) फार पूर्वी मुंबईत (आझाद मैदान) आणि दिल्लीत ( प्रगती मैदान) येथे मोठे पुस्तक प्रदर्शन आलटून पालटून एक वर्षाआड होत असे. नंतर मुंबईतील बंदच झाले. मग छत्रपती टर्मिनस जवळचा खाजगी बुक स्टॉल आशिष दरवर्षी प्रदर्शन भरवून लागला सुंदराबाई हॉलमध्ये. पण मराठी पुस्तके नसत ( ती साहित्य संमेलनांत अधिक). अक्षर वाङमय यांनी काही वर्षे प्रदर्शने भरवली. माझ्या दृष्टीने पुस्तकं चाळायला मिळणे महत्त्वाचे कारण विकत घेत नाही. विकत आणून नंतर करायचे काय हा प्रश्न असतो. तरी भाषा शिकण्यासाठीची पुस्तके घेतो ती संग्रही आणि संदर्भासाठी कायम लागतात. स्थानिक नगरवाचनालयात काही वाचायला मिळतात. पण मोठी बाडं कधीच येत नाहीत. स्थानिक प्रकाशकांनी एक होऊन एक कायमची तारीख किंवा आठवडा प्रदर्शन भरवण्यासाठी निश्चित केला तर वाचकांच्या कायम लक्षात राहील. उदाहरणार्थ डिसेंबरचा दुसरा आठवडा.

In reply to by कंजूस

Bhakti 23/12/2024 - 08:15
सॉरी,माझी भयानक डिक्शनरी ;) =)(कटआऊट)
माझ्या दृष्टीने पुस्तकं चाळायला मिळणे महत्त्वाचे कारण विकत घेत नाही. विकत आणून नंतर करायचे काय हा प्रश्न असतो. तरी भाषा शिकण्यासाठीची पुस्तके घेतो ती संग्रही आणि संदर्भासाठी कायम लागतात.
खरं आहे,अशा मोठ्या प्रदर्शनात खुप पुस्तकं पाहायला ,चाळायला मिळतात हे महत्त्वाचे.माझा पुस्तक घेण्यासाठी हव्यास होता त्यामुळे बजेट संपल्यावर पुस्तक फक्त पाहण्याचं ऑड वाटू लागले.पुढच्यावेळी जरा याबाबत सतर्क राहीन ;) होय लेकीसाठी हळूहळू एम एच १२ केंद्रबिंदू (पर्वणी) तयार करणार आहे!

In reply to by Bhakti

हे पुस्तकं खरेदी करण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. आणि डोंबिवली हे केंद्रस्थानी असल्याने, डोंबिवली येथे उत्तम पुस्तके मिळतात.

In reply to by मुक्त विहारि

बुकगंगा,अक्षरधारा,ॲमेझोन सारख्या संस्थळावर पुस्तके स्वस्त आणी घरपोच येतात. मागील वर्षापेक्षा या वर्षी अधिक चांगले प्रदर्शन होते.

In reply to by श्रीरंग_जोशी

अरेरे. उशीर झाला. पहिला प्याला बर्‍याच वर्षांपूर्वी पिऊन झाला आहे :(

In reply to by श्रीरंग_जोशी

होळी, वजा तीस तापमान. शेवटचा प्याला मार्च १९९९,प्रसंग मारूती आठशे पहिली चार चाकी घेतली. व्यसनाधीन झालो का ?नाही, प्रत्येकाच्या इच्छाशक्ती वर आवलंबून. दारू पिली पाहीजे असे काही नाही. पण अती परिचयात अवाज्ञा तद्वत दारूला डोक्यावर चढवून नये. अर्थात माझे मत.

In reply to by कर्नलतपस्वी

कंजूस 23/12/2024 - 12:21
बरोबर. रोज थोडी थोडी घरीच घ्यावी म्हणजे त्यातली गंमत सामान्य होते. आणि कधी प्रसंगाप्रमाणे जे पितात भरपूर तसं होत नाही. कितीही कोणतेही दारूचे ब्रांड आले तरी बेसिकली अल्कोहोल अमुक टक्के यापलिकडे काही नाही. तांदुळाचेही तसेच आहे पंधरा रुपये ते सातशे पन्नास रुपये किलोचा असो त्यांचे पोषणमूल्य समानच असते. सगळे पॉलिश केलेलेच असतात. हातसडीचे कुठे मिळतात?

In reply to by कंजूस

ये इंतजार गलत है के शाम हो जाये जो हो सके तो अभी दौर-ए-जाम हो जाये मुझ जैसे रिंद को भी तूने हश्र मे या रब बुला लीया है तो, कुछ इंतजाम हो जाये हुई महँगी बहत ही शराब, के थोड़ी-थोड़ी पिया करो पियो लेकिन रखो हिसाब, के थोड़ी-थोड़ी पिया करो

In reply to by कर्नलतपस्वी

कौन कहता, अंगुर की बेटी गलत है अंगुरके दामाद को बस इसकी लत है इसके साथ कुछ गम गलत करता है तो बेरहम जमाने क्या जाता है,अगर... वो उसके साथ कुछ पल बिताता है

In reply to by श्रीरंग_जोशी

कंजूस 23/12/2024 - 12:23
सर्व विषे कमी प्रमाणात औषधेच असतात. अगदी तंबाखू, चहा, अफू,अर्सेनिक सुद्धा.

कंजूस 23/12/2024 - 12:39
आशिष बुक स्टॉल छत्रपती टर्मिनस जवळचा खाजगी बुक स्टॉल आशिष दरवर्षी प्रदर्शन भरवू लागला सुंदराबाई हॉलमध्ये. यांच्या पुस्तक प्रदर्शनात भेटी दिल्यावर एक लक्षात आलं की यामध्ये पुस्तके कोण घेतो. इंटिरिअर डेकोरेशनचा व्यवसाय करणारे मुंबईत बरेच आहेत. ते इकडे फिरतात. भरपूर रंगीत चित्र असलेली जाडजूड पुस्तके तिथे निम्म्या किंमतीत असतात. ती त्यांना हवी असतात नवनवीन फर्निचरच्या डिझाइनसाठी. शिवाय गार्डनिंग लेआउटचीही असतात. आर्किटेक्ट नाही पुस्तके लागतात. मोठ्या बास्केट घेऊन फिरतात आणि भराभर पुस्तके उचलतात. तरुण मुलं मुली इंग्रजी कादंबऱ्या विकत घेतात. काही महिला कुकींगची पुस्तके बघतात. आपण जी मराठी साहित्यातील कवितासंग्रह, कादंबऱ्या विकत घेतो त्याचा आनंद आठ दिवसांत संपतो. इतिहास,भाषा यांचे अभ्यासक पुस्तके घेतात ती त्यांच्या कामाची असतात. पण मग असा विचार येईल की वाचकांनी पुस्तके विकत घ्यावीत का? वाचनालयांनी घ्यावीत. म्हणजे महिन्याच्या फीमध्ये साहित्य वाचता येईल.

In reply to by कंजूस

विना अनुदानित, वाचनालये आता ओस पडत चालली आहेत. डोंबिवली येथे एक फ्रेंड्स लायब्ररी सोडली तर बरीचशी वाचनालये बंद पडली आहेत. मानपाडा रोड वरील ३ वाचनालये, डोंबिवली पश्चिम येथील एक वाचनालय, midc मधील एक वाचनालय, ही काही ठळक उदाहरणे. रामनगर मधील एक वाचनालय आणि P ,& T मधील एक वाचनालय, फ्रेंड्स लायब्ररीच्या सहयोगाने चालतात. त्यापेक्षा पण भयावह स्थिती, अभ्यासक्रमा व्यतिरिक्त , पुस्तक विक्रेत्यांची आहे.... कालाय तस्मै नमः....

कंजूस 27/12/2024 - 06:03
गोवा पर्यटन/ कोकण/समुद्री पर्यटन गोरगावलेकर यांनी केलेल्या गोवा पर्यटनाचे धागे येत आहेत. त्यांचे अनुभव लिहित आहेत. तिसऱ्या भागात हिवाळी सहल, दक्षिण गोवा :भाग 3 : बटरफ्लाय बीच आणि लोलये-पैंगिण चे वेताळ गोवा आणि कोकण यांच्या पर्यटनाची तुलना फायदे तोटे यांची प्रतिसादांतून चर्चा फारच वाढली. ती इकडे करता येईल. धाग्यातली चर्चा इथे कॉपी पेस्ट करताही येईल पण तो त्या प्रतिसादकर्त्या लेखकांचा अधिकार आहे. मीही पूर्वी गोव्यावर एक धागा काढला होता ते आठवले. माझा समुद्र पर्यटन, खाणे पिणे वगैरेंचा आनंद फारच संकुचित आहे. तरी एकदा गोवा काय आहे म्हणून पाहण्यासाठी गेलो होतो. परतताना कुडाळहून( कोकण) आलो. एसटीचाच प्रवास त्यामुळे जमेल तेवढे पाहिले. गोव्याच्या पर्यटनाबद्दल ऐकले वाचलेले भारतातले आणि परदेशी पर्यटक इथे येतात. आनंद घेतात आणि पुन्हापुन्हा येतात. गर्दी वाढली की ट्रेनची तिकिटे मिळत नाहीत. विमान आणि हॉटेल्सचे भाडी दर वाढतात. परवडण्याच्या पलिकडे जातात. तरीही पसंती असते. कोकण ( महाराष्ट्रातला) याबद्दल श्री.ना. पेंडसे किंवा जयवंत दळवी किंवा इतर लेखकांच्या कथा कादंबऱ्यांतून मराठी वाचकांना माहीत झालेला असतो. तो खरंच कसा आहे हे पहाण्यासाठी ठाणे,रायगड, सिंधुदुर्ग जिल्हेसोडून उर्वरित महाराष्ट्रातील दूरच्या ठिकाणांहून पर्यटक येतात. त्यात किहीम, अलिबाग, श्रीवर्धन,हर्णे मुरुड, रत्नागिरी परिसर, देवगड, मालवण, देवबाग ही ठिकाणे येतात. कोकण आणि गोव्याप्रमाणेच कर्नाटकातील २६० किमी किनारपट्टीवरही कारवार,गोकर्ण, मुर्डेश्वर, उडुपी, मंगळुरू ही ठिकाणं आहेत. तीही पाहिली. हॉटेल्स(राहाणे आणि खाणे शाकाहारी तसेच मासाहारी), बसप्रवास यादृष्टीने फारच चांगल्या सोयी आहेत. शिवाय किनारपट्टीसोडून वरती घाट चढून गेल्यावरही अनेक सुंदर ठिकाणी जाता येतं. मार्चपर्यंत वाहणारे धबधबे आहेत. इथल्या लोकांना पर्यटक येण्याची सवय आहे. त्यांचा त्रास वाटत नाही . तुसडेपणा नाही. मला कर्नाटक पर्यटन फार आवडले आणि पुन्हा जावेसे वाटते. किनारे स्वच्छ चांगले आहेतच शिवाय नद्याही बारमाही पाणी वाहणाऱ्या आणि अतिशय स्वच्छ पाण्याच्या आहेत. नदीकिनारी जी धार्मिक स्थळे आहेत ती निसर्गसौंदर्याने अधिकच चांगली वाटतात. सह्याद्रीचा सुंदर निसर्ग पाहावा तर इथेच. उडुपी आणि मंगळुरू येथे समुद्र पर्यटन आणि मत्स्याहारही खूप प्रचलित आहे.

In reply to by कंजूस

गवि 27/12/2024 - 08:33
https://www.youtube.com/embed/Jhsq0fdiEq0 गोवा पर्यटन मंत्री यांची मुलाखत. ही सोशल मीडियावर सर्वत्र सुरू झालेली चर्चा हा चुकीच्या (चायनीज) आकडेवारीवर आधारित एक प्रोपागांडा आहे असे त्यांचे म्हणणे त्यांनी इथे मांडले आहे.

In reply to by कंजूस

गोरगावलेकर 27/12/2024 - 12:16
गोरगावलेकर यांनी केलेल्या गोवा पर्यटनाचे धागे येत आहेत. त्यांचे अनुभव लिहित आहेत. धाग्याच्या पहिल्या भागात आम्ही मडगाव स्टेशन ते कोलवा बीच पर्यंत प्रवास केला होता . स्टेशनच्या बाहेरच प्रीपेड टॅक्सी मिळाली . टॅक्सिवाल्यांचा कथित मुजोरपणा दिसला नाही . दुसऱ्या भागात कोलवा ते पाळोळे पर्यंत प्रवास केला . पर्यटन स्थळे बघत जात आम्ही जवळपास पूर्ण दिवस घेतला व त्यात पाच - पंचवीस किमी अंतर जास्त झाले त्याचे वाढीव पैसेही दिले . किती खर्च येतो हे कळावे इतकाच लिहिण्यामागचा उद्देश . आज कुठल्या शहरात स्विफ्ट डिझायरचे संपूर्ण दिवसासाठी ३ १ ० ० /- रुपये भाडे असेल ? ड्रायव्हरचा पगार , गाडीची देखभाल दुरुस्ती, इंधन खर्च जाऊन मालकाच्या हातात कितीसे पैसे जातील ? कोला बीचला जातांना अगदी ओबड धोबड रस्त्यावरून गाडी गेली . स्वत : ची गाडी नेतांनाही विचार करावा लागेल असा रस्ता . कुठलीही कुरकुर न करता शक्य होतील ती ठिकाणे दाखवली . येथेही गाडीवाल्यांचा कथित मुजोरपणा दिसला नाही .

In reply to by गोरगावलेकर

गवि 27/12/2024 - 13:15
मुजोर म्हणजे बोलण्यात अशा अर्थाने नसावं. पण अतिरिक्त मनाला येईल तितके पैसे मागणे हे अनेकदा घडते. पूर्ण दिवसाचे ३१०० इतकेच घेतले असतील तर तुम्हाला नशिबाने चांगले डील आणि व्यक्ती लाभली. एरवी कोपऱ्यावर सोडून यायचे सहाशे (हे उदाहरण मे २०२४ मधलं, ऑफ सिझन काळ. अंतर दोन ते तीन किमी. पार्किंग नसल्याने टॅक्सी मागवावी लागली होती.). नुसती चौकशी केली होती तेव्हा, दाभोळी एअरपोर्ट ते अगोंद वन वे नुसते ड्रॉप करण्याचे ऑफ सिझन २००० आणि सिझन मध्ये ३५०० ते ४०००. तुलनेसाठी असे पाहा की मुंबईहून गोव्याचे विमान तिकीट देखील कधी कधी याहून कमी असते. वार्का ते काबो द राम किल्ला आणि परत इतक्या अंतराचे हॉटेलशी संलग्न टॅक्सीवाल्यांनी सुमारे आठ वर्षांपूर्वी तीन हजार घेतले आणि वरून टिप मागितली. वाटेत कुठे थांबायला देखील तयार नव्हता. नव्वद टक्के वेळा मुंबईपासून स्वत:ची कारच घेऊन जाणे किंवा एअरपोर्टवर उतरताच पूर्ण मुक्कामाइतकी सेल्फ ड्राईव्ह कार घेणे हे दोन उपाय करून ही समस्या आता सोडवली आहे. बाय द वे, गोव्यातील स्थानिक लोक कोंकणी भाषेच्या सवयीनुसार एकेरीत अरेतुरे करत बोलतात आणि त्या स्टाईल मुळे काही वेळा बाहेरील लोकांना ते अशिष्ट उद्धट उगीचच वाटू शकतात.

In reply to by गवि

कंजूस 27/12/2024 - 14:58
सहमत. खाजगी वाहनाशिवाय तसेच भाड्याच्या वाहनाशिवाय जमेल तेवढे फिरणे आणि आनंद मानणे हेच आमचे ध्येय असते. त्यामुळे काही त्रास /संताप होत नाही. शेअरिंग साठी कुणाला तयार करणेही नाही. म्हणजे अगदीच घरी कॉटवर पाय हलवत गप्पा मारण्यापेक्षा चार ठिकाणं पाहाणे बरे या रुळावर आमची गाडी सुसाट धावते. शिवाय खरेदी करायची नाही हे ठरवूनच टाकले आहे. आमचा गाईड लोनली प्लानेट पुस्तक " India travel survival kit " - Tony Wheeler and others.

In reply to by गवि

टर्मीनेटर 29/12/2024 - 13:08
"पूर्ण दिवसाचे ३१०० इतकेच घेतले असतील तर तुम्हाला नशिबाने चांगले डील आणि व्यक्ती लाभली."
काशिनाथ नाडकर्णी : "तो कोकणांतला असला पाहिजे अंऽऽऽ..." कोचरेकर मास्तर : "पाहिलंत? पाहिलंत... माणुसकी नाही.. नाही म्हणतात ना?... ही घ्या माणुसकी! प्रवासात काय अनुभव येतील सांगता येत नाही. वास्तविक असल्या ह्या लोकांचे जाहीर सत्कारच करायला पाहिजेत. त्याचे नाव, नंबर वगैरे आपण टिपून घ्यायला पाहिजे होता नाही का..."
"एरवी कोपऱ्यावर सोडून यायचे सहाशे (हे उदाहरण मे २०२४ मधलं, ऑफ सिझन काळ. अंतर दोन ते तीन किमी. पार्किंग नसल्याने टॅक्सी मागवावी लागली होती.). नुसती चौकशी केली होती तेव्हा, दाभोळी एअरपोर्ट ते अगोंद वन वे नुसते ड्रॉप करण्याचे ऑफ सिझन २००० आणि सिझन मध्ये ३५०० ते ४०००."
सोकाजीनाना त्रिलोकेकर : "ए नाडकर्णी, बघ... बघ! बघ लेका तुझा कोकणातला व्हिक्टोरिया (टॅक्सी) वाला... " काशिनाथ नाडकर्णी : "तो कोकणांतला असणंच शक्य नांयऽऽऽ... अहो तो कोकणात व्हिक्टोरिया (टॅक्सी) चालवायला शिकणार कुठून मला सांगा बघू आंऽऽऽ... कायत्तरी काय? आमच्या कोकणातले म्हणजे सगळे बैल..." 😀 भ्रमण मंडळ - बटाट्याची चाळ गोव्याला असंख्य वेळा जाउनही तिथल्या सार्वजनीक वाहतुक व्यवस्थेचा आणि टॅक्सीवाल्यांचा मला फारसा अनुभव नाही. ह्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात दोना पावला येथील मुक्काम असलेल्या 'इंटरनॅशनल सेंटर गोवा (ICG)' येथुन त्यांच्याचतर्फे संध्याकाळी तिथुन सुमारे सात किमी अंतरावर असलेल्या कॅसिनो पर्यंत जाउन मध्यरात्री तिथुन परतण्यासाठी घेतलेल्या टॅक्सी सेवेसाठी त्या टॅक्सीवाल्याने (आधीच बोलणी केल्याप्रमाणे) संध्याकाळी जाताना ड्रॉप साठी ३०० रुपये आणि मध्यरात्री तिथुन निघताना फोन करुन बोलवल्यावर पिक-अपसाठीचे ५०० रुपये असे जाउन-येउन एकुण ८०० रुपये घेतले होते. मध्य्ररात्री १:३० च्या नंतर फोन करुनही तो सांगीतल्याप्रमाणे परत न्यायला आला होता हे विषेश! असो, मिपाकरांना त्याठिकाणी आलेले टॅक्सीवाल्यांचे वेगवेगळे, बरे-वाईट अनुभव वाचुन माहितीत भर पडत आहे 👍

In reply to by गोरगावलेकर

विमानतळावरून आपल्या हॉटेलवर किंवा आपल्या हॉटेलवरून विमानतळावर जायचे असेल तर टॅक्सीवाल्यांचे अवाच्या सवा दर आहेत याचा मला तरी अनुभव आला नव्हता. आम्ही गोवा विमानतळापासून सगळ्यात लांब राहिलो होतो अगोंद आणि पाटणेला. दोन्ही ठिकाणी जायला विमानतळाहून १८०० रूपयात प्रीपेड टॅक्सी मिळाली होती. अर्थात ही अनुक्रमे २०१७ आणि २०१८ ची गोष्ट. सध्याचे दर किती हे माहित नाही. मात्र दोन्ही ठिकाणे दाबोळी विमानतळाहून साधारण ६०-६५ किलोमीटर अंतरावर आहेत. अंतर ध्यानात घेता तो दर अवाजवी जास्त आहे असे वाटले नव्हते. विमानतळावर समजा प्रीपेड टॅक्सी असते आणि त्यांना ठरवून दिलेले दर आहेत तितकेच घ्यावे लागतात. पण परतीच्या प्रवासात हॉटेलवरून विमानतळावर जातानाही टॅक्सीवाल्याने तेवढेच पैसे घेतले होते. अगोंदहून परत येताना आमचे विमान रात्रीचे होते त्यामुळे दाबोळी विमानतळावर रात्री साडेनऊच्या सुमारास पोचलो होतो. त्या वेळेस विमानतळावरून भाडी मिळत असतील की नाही शंकाच आहे कारण त्यावेळेनंतर फार विमाने येत नाहीत. तरीही त्याने जास्त पैसे घेतले नव्हते. टॅक्सीवाले अवाच्या सवा दर लावतात ते हॉटेलबाहेर साईटसिईंगला जाणार्‍यांकडून. वारकामध्ये आम्ही उतरलो होतो वारकाला आमच्या हॉटेलच्या बाहेर पर्यटकांसाठी म्हणून एक टॅक्सी स्टॅन्ड होता. तिथून मडगाव फार तर १०-१२ किलोमीटरवर होते. काजू आणि बेबिंका अशा गोष्टी घ्यायला मडगावला जायचे होते तेव्हा हॉटेलबाहेरील टॅक्सीवाल्यांनी जाऊन येऊन २७०० रूपये सांगितले होते. आणि ही गोष्ट २०१२ ची होती म्हणजे आणखी जुनी. ही अक्षरशः लूट होती. मला वाटते तिथे जास्त गोरे पर्यटक येतात आणि परदेशी पर्यटकांना अवाच्या सवा दर लाऊन लुटणे हा प्रकार नाही म्हटले तरी सगळीकडे होतोच. जर ते गोरे पर्यटक असे वाढीव दर द्यायला तयार होत असतील तर टॅक्सीवाल्यांना बहुदा आम्हा भारतीय पर्यटकांची गरज नसावी. त्यामुळे यायचे असेल तर या दरात या नाहीतर येऊ नका असा त्यांचा दृष्टीकोन होता.

गेल्या काही महिन्यांपासून माझी पत्नी सौरभ बोथरा यांच्या ऑनलाइन योगासन वर्गांना उपस्थिती लावत आहे. मी देखील महिन्याभरापासून सुरुवात केली आहे. शीर्षकात जरी केवळ योग असले तरी, योगासनांखेरीज, इतर कार्डिओ व श्वसनाचे व्यायाम, प्राणायम व थोडेफार ध्यान यांचाही या वर्गांत अंतर्भाव असतो. रोज युट्युब लाइव्ह द्वारे भाप्रवे नुसार सकाळ व संध्याकाळी हे वर्ग चालतात. सूचना सहजपणे समजतील अशा असतात व स्क्रीनवर पाहून आपण ते व्यायामप्रकार करू शकतो. ६ जानेवारीपासून तीन आठवडे या वर्गांचा नि:शुल्क लाभ घेता येईल - त्यासाठीचा दुवा. या वर्गांना काही दिवस उपस्थिती लावल्यावर, असे वर्ग आपल्याला काही वर्षे अगोदर का नाही मिळाले अशी भावना आमच्यासह बहुतेकांच्या मनात निर्माण झाली आहे / होत असते.

In reply to by श्रीरंग_जोशी

कंजूस 29/12/2024 - 04:00
ती साईट पाहिली. नोंदणी केली नाही. उपक्रम आणि ओनलाइन आहे हे बरे. काही शाळांत योगासने शिकवतात बहुतेक. आमच्या शाळेत शिकवली होती. पाचवी पासूनच . लहानपणी केली नाही तरी चालतात. कारण तेव्हा वाढते तरुण वय असते. पण नंतर कधी करायची झाल्यास छोट्या पुस्तिका विकत मिळतात त्या पाहिल्या की काही सोपी रोज करण्याची आसने दहा बारा आहेत ती करता येतात. चीनमध्ये तिथल्या बागांत ( parks) ६०+, ८५+ वयोगटातील नागरिकांसाठी काही त्यांच्या पद्धतींचे व्यायाम प्रकार करणारे करवून घेणारे गट असतात. त्यांचे काही विडिओ मी मागे पाहिले होते ( dwtv channel documentaries बहुतेक.) त्यांचे व्यायाम प्रकारही खूप चांगले वाटले. विशेषतः शरीराची रोजची हालचाल करण्यासाठीचे ते सराव आहेत. वरील दोन वयोगटांच्या वयाप्रमाणे हालचालींचा वेग वेगळा दिसला. इकडच्या काही बाबा लोकांचे योग प्रकार मला काही आवडले नाहीत. अतिरंजीत वाटले. ....... वजन कमी करणे/ हालचालींसाठी सराव/ रोग नियंत्रण/ मानसिक समाधान शांती यांपैकी एक किंवा सर्व असा काही झोल योगासनांमध्ये घालण्याचा खटाटोप दिसतो हे माझे मत.

Bhakti 29/12/2024 - 14:44
हरारीची मुलाखत रणवीरने घेतली.हरारी माझा आवडता विचारवंत आहे.तो भारतात नेक्सास' पुस्तक प्रकाशित करण्यासाठी आला होता.तेव्हा अनेकांना त्याच्याबरोबर मुलाखती घेतल्या. १. https://youtu.be/eNVtYPgJ6b0?si=3VfqDjCcx6_lYjk2 २. https://youtu.be/6x4UgHI7qbk?si=_Iz_eP9HF7SYH-ZM दुसरी मुलाखत अजून ऐकायची आहे. पहिली मुलाखत रणवीरने घेतली आहे.AI हा हरारीचा १० वर्षांपूर्वी पासूनचा विषय आहे.जो AI वर वरचढ होईल तोच पुढच्या काळात जगावर राज्य करणारे.इथे रशिया,ट्रम्प यांचा वर्चस्ववादी भूमिकेचा त्याने चांगला समाचार घेतला आहे.अमेरिकासारख्या बलाढ्य देशाने,लीडरने जगाच्या शांततेचा विचार आधी केला पाहिजे तरच माणूसकी टिकेल असं त्यांचं म्हणणं आहे.रणवीरचा शो म्हटला की तो स्पिरिच्युलिटीवर समोरच्याला बोलायला लावणारच हे ठरलेलं आहे 😀 त्यात हरारी विपश्यनेचा साधक आहे. पण हरारी म्हणतो कोणीही कोणाला दोन ,तीन तास ध्यानाला बसा हे म्हणणं सोपं आहे.पण पंधरा मिनिटे तरी केवळ स्वतःच्या आता बाहेर जाण्याऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित करा.इतर कोणताच विचार डोक्यात आणायचा नाही,हे सांगितले तर कोणालाच हे फारसं जमणार नाही.यासाठी खुप तयारीच हवी.मेडिटेशन कसं करायचं, कोणतं करायचं हे ज्याचं त्यालाच ठरवू द्या.उगाच मेंढ्याचा कळप करण्यात अर्थ नाही. युद्ध करावं की नाही याबाबत त्याचं मत मला गोलगोल वाटलं,आधी तो म्हणाला मिलिटरी वर ५०% हून अधिक खर्च चिंताजनक आहे नंतर म्हणाला इस्राएल आणि भारताने ज्या चुका रोमन व मुस्लिम+ब्रिटिश आक्रमणाच्या काळात सैन्य ताकद वाढवण्यावर भर देतात केली ती त्यांना आता करणे अजिबात परवडणारं नाही👏

In reply to by Bhakti

कंजूस 29/12/2024 - 15:53
मराठी किंवा कुणीही. आंतरराष्ट्रीय मते राजकीय/ सामाजिक / धार्मिक ही नेहमी ती व्यक्ती कोणत्या डोक्यातली आहे त्याप्रमाणे एकांगीच असतात. विरुद्ध गटाचा साधा उल्लेखही नसतो. तर काहींची प्रसिद्ध केलेली व्यक्तव्ये त्यांच्या देशाच्या राजकीय दडपणाखालीही असतात.

कंजूस 31/12/2024 - 20:43
पहिला काचेचा पूल काल कन्याकुमारी, तमिळनाडू इथे असलेल्या विवेकानंद स्मारक आणि तिरुवल्लूवर पुतळा या दोन ठिकाणांमध्ये काचेचा पूल उभारला त्याचे उद्घाटन झाले. hindustan times बातमी

कंजूस 03/01/2025 - 11:27
खरडफळ्यावर विषय निघाला म्हणून......... गुजरातचे सुंदर समुद्र किनारे आणि पर्यटन. फार प्रचलित नाही तरीही थोडक्यात... गुजरातध्ये {सूरतजवळच्या} हजिरा येथे आणि जामनगर येथे दोन मोठे रासायनिक प्रकल्प ( भारतीय कंपन्या, रिलायन्स) अगोदरच आहेत. सूरतजवळच्या दहेज बंदरातून - घोघा पलिकडे जाऊन भावनगरला काही जण जातात. धार्मिक पर्यटन. दीवचा किनारा पर्यटनासाठी आहे. तिथून वेरावळ - सोमनाथ आहे. पण धार्मिक महत्त्व आणि मासेमारी. दमणचा किनारा काळा आहे. मासेमारी बोटींच्या डिझेलमुळे. जवळचा परिसर दारूबार आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स मार्केटसाठी पूर्वी प्रसिद्ध होता. आता त्याचे महत्त्व उरले नाही. तरीही दमण- वापी- दादरा नगरहवेली- खानवेल ( गार्डन्स) अशी सहल होऊ शकते. द्वारका पोरबंदर समुद्र -धार्मिक पर्यटन अंकलेश्वर/अंकलेसर भरूच हे नर्मदा पर्यटनामुळे चर्चेत असते. गुजरात - महाराष्ट्र सीमेजवळचे डहाणू आणि बोर्डी येथे हॉटेल्स खूप आहेत. डहाणू-जव्हार- त्र्यंबकेश्वर -नाशिक - सापूतारा असाही सहल प्लान होऊ शकतो. गुजरात समुद्र किनारे थंडीतच ठीक. गरमा फार असतो. काही ठिकाणी रात्री चमकणाऱ्या लाटा दिसतात. मुंबई पुणे पर्यटकांसाठी कोकण, गोवा, कर्नाटक समुद्रच बरा.

In reply to by कंजूस

गवि 03/01/2025 - 14:19
दमण- वापी- दादरा नगरहवेली- खानवेल ( गार्डन्स) अशी सहल होऊ शकते.
दमण किनारे घाणेरडे. केमिकल आणि वास. अस्वच्छ. हल्ली काही भाग बांधून चौपाटी केली आहे असे ऐकले पण एकूण समुद्र घाण. खूप इंडस्ट्रीज. सिल्वासा कंटाळवाणे. सर्वसाधारण लहान शहर. उन्हाळ्यात तर अगदी नदी देखील कोरडी. तिथली वाटेतली लायन सफारी केविलवाणी. सापुतारा वगैरे हिल स्टेशन हा अधिक चांगला ऑप्शन आहे त्यापेक्षा.

In reply to by प्रचेतस

गवि 03/01/2025 - 15:50
आधी मद्य पिऊन मग कोणत्याही मार्केटमध्ये फिरायला मजाच येते. किंबहुना काळ्या समुद्रावर फिरायला देखील मजाच येते. :))

In reply to by प्रचेतस

गवि 03/01/2025 - 16:00
तुमच्या इतका जोरकस, प्रगाढ, वादळी, पावसाळी, ओलाकंच, इंटेंस अनुभव नसला तरी प्रवासाचा अंमळ थोडासा अनुभव आहे इतकंच..

In reply to by प्रचेतस

गवि 03/01/2025 - 16:09
सळसळत्या वाऱ्याने एखादा प्राजक्त थरथरावा आणि खालून जाणाऱ्या आपल्या तापल्या अंगावर गार दवबिंदूंचा पडलेला पाऊस हृदयाचे मधलेच चार ठोके चोरून जावा तशी अवस्था झालेली दिसते त्या आठवणींनी.

In reply to by गवि

प्रचेतस 03/01/2025 - 17:24
हो ना. अगदीच मोरपिशी अवस्था. बाकी तुमचे अनुभवही ह्याबाबतीत दांडगेच असणार म्हणा हे तुमच्या तरल शब्दांनी सहजच स्पष्ट होते.

In reply to by गवि

टर्मीनेटर 03/01/2025 - 16:55
वरच्या वाक्यात
"आधी मद्य पिऊन मग कोणत्याही मार्केटमध्ये फिरायला मजाच येते."
असे 'कोणत्याही मार्केटमध्ये' हे दोन शब्द ठळक करायचे राहुन गेले काय 😀 नीळा, हिरवा, पिवळा, तांबडाच काय पण 'मृत' समुद्रही जर कौतुकास पात्र ठरत असतील तर बिचाऱ्या 'काळ्या' समुद्राने असे काय कोणाचे घोडे मारले आहे? ('काळ्याशार' गोष्टीही आकर्षक असु शकतात 😉) तेव्हा घ्यावी की त्याच्यावरही फिरायची मजा 😂 बाकी 'काळ्या' वरुन सहज सुचलं म्हणून... काला रे सइयां काला रे तन काला रे मन काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी काला रे सइयां काला रे तन् काला रे मन काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी बैरी कोल् कोल् कोल् छीने तोल तोल तोल बैरी कोल् कोल् छीने तोल तोल तोल छत आँगन चार दिवारी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी कोल् बाज़ारी सइयां करते जी कोल् बाज़ारी काली मिटटी कुत्ता काला काला बिलकुल सुर्मे वाला काला कौवा हौवा काला काली मिटटी कुत्ता काला काला बिलकुल सुर्मे वाला काला कौवा हौवा काला काला बादल गिरने वाला काला मोती गिरने वाला काला झंडा डण्डा कला काला बटवा पैसा काला काली आँखों जैसा काला काली अग्नि काली गर्मी सूरज काला काला बीघा और गज काला काली हाथी हाथी काला काला बैरी कोल् कोल् कोल् छीने तोल तोल तोल बैरी कोल् कोल् छीने होल से टोल रंग पानी और पिचकारी सइयां करते जी पिया करते जी सइयां करते पिया करते जी काला रे सइयां काला रे तन काला रे मन्न काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी काला रे सइयां काला रे तन काला रे मन्न काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी. स्नेहा खानवलकर ह्या गुणी संगीत दिग्दर्शिकेने संगीतबद्ध केलेल्या 'गँग्स ऑफ वासेपूर २' मधल्या काला रे ह्या गाण्यात गीतकार वरुण ग्रोवर ह्यांनी इतक्या काळ्या गोष्टींचा उल्लेख केलाय, पण बिचारा 'काळा समुद्र' मात्र त्यात घ्यायचा राहून गेला बघा... 😎

In reply to by गवि

कंजूस 03/01/2025 - 14:46
खरंतर गुजरातला समुद्र पर्यटनाला जाऊच नये. औद्योगिकरणावर गुजरातने खूप भर दिला. नवसारीपासून पुढे वरती. मुंबई बाजारपेठ जवळ पडते. सापुतारा जरी महाराष्ट्रातील पर्यटकांना आवडत असले ( नाशिक जवळ) तरी गुजरातींना आवडत नाही. त्यांचे आवडते माथेरान महाबळेश्वर पाचगणी. मुंबई पुण्याला जवळची ठिकाणं पाहून झाल्यावर जरा बदल म्हणून दुसरीकडे काही आहे का याची चाचपणी करतात. पालघरच्य पश्चिमेला दहा किमीवर केळवे माहिम किनारा आहे. पालघर -मनोर - विक्रमगड- जव्हार- त्र्यंबकेश्वर - नाशिक या वाटेवर हल्ली 'गोवर्धन इको विलेज' मिनी वृंदावन ( इस्कॉनवाल्यांचं) हल्ली लोकप्रिय होत आहे. या मार्गावर बरीच रिसॉर्ट झाली आहेत. जव्हार मोखाडा भागातील वारली चित्रकला कमी होत आहे किंवा बाजारू होत आहे असं ऐकून आहे. सहलीच्या आराखड्यात/ मार्गावर चार पाच ठिकाणे असणे फायद्याचं ठरतं . एखादं नाही आवडलं कुणाला तर दुसरं सहल यशस्वी करतं.

In reply to by कंजूस

गवि 03/01/2025 - 15:54
केळवे किनारा तर लोकांनी घाणीने कचऱ्याने भरून टाकलेला दिसला. अगदी गेल्या वर्षात काही बदल झाला असेल तर माहीत नाही. लोक तिथे पिकनिक सारखा कार्यक्रम करून, बसून खाऊन प्लास्टिक प्लेट्स, खरकटे, उर्वरित अन्न असे सर्व जागीच टाकून उठत होते. किनाऱ्यावर हागणदारी होती. पार्किंग शुल्क किंवा तत्सम शुल्क वगैरे वसुली अवश्य होत होती पण स्वच्छतेच्या दृष्टीने काही दिसले नाही. पेड टॉयलेट होते. तेही अस्वच्छ. आपले सामान्य नागरिक देखील एकूण स्वच्छतेचा सेन्स कमी असलेले आहेत असेच वाटते सगळीकडे.

In reply to by गवि

कंजूस 03/01/2025 - 16:24
हं. नवीन अपडेट्स लक्षात ठेवायला हवेत. बाकी प्रचेतसकुमार चांगल्या जागा शोधतात. पण काहीच उघड करतात. BNHS वालेही चांगल्या जागा सांगत सुटत नाहीत. फेसबुकाच्या भिंती भरल्या की लोंढे तिकडेच जातात. राजमाची, कास पठार, सांधण, हरिहर.

टर्मीनेटर 03/01/2025 - 17:47
आपल्या सर्वांच्या माहितीतले मिपाकर लेखक 'कुमार१' हे काही कामानिमित्त मुंबईला येणार आहेत. त्या निमित्ताने सोमवार दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी ६ नंतर भायखळा येथे एक मिपा कट्टा करण्याचे ठरत आहे. सोमवारचा, म्हणजे कामकाजाचा दिवस असल्याने फार लांबुन कोणी येऊ शकणार नाहीत ह्याची कल्पना असल्यामुळे 'कट्ट्यासाठी' वेगळा धागा वगैरे काढलेला नाही, परंतु भायखळा परिसरात किंवा मुंबई उपनगरांत रहाणारे कोणी मिपाकर येऊ शकत असतील तर त्यांचे सहर्ष स्वागत आहे. (केवळ एकमेकांची सदिच्छा भेट आणि गप्पा-टप्पांचा कार्यक्रम एवढाच ह्या कट्ट्याचा मुळ उद्देश आहे 😀)

In reply to by टर्मीनेटर

कंजूस 03/01/2025 - 18:16
मुंबईत मिपाकर मोजून तीन चारच असतील. आणि त्यातून राणीबाग फुले प्रदर्शनाचे निमित्त साधले तर उत्तम.

In reply to by कंजूस

विजुभाऊ 05/01/2025 - 15:09
मुंबईत ( ठाणे डोंबिवली धरुन) किमान तीस एक मिपाकर सहज असतील. रामदास , शँपेन , क्लिंटन, प्रभू मास्तर , साक्षी , ज्योति अळवणी , मदनबाण असे बरेच आहेत.

In reply to by टर्मीनेटर

Bhakti 04/01/2025 - 11:34
कुमार १ आता मिपावर का लिहित नाही.त्यांना नक्की सांगा की तुमचे अभ्यासपूर्ण लेख मिपावर देत जा.

In reply to by टर्मीनेटर

Nitin Palkar 06/01/2025 - 08:18
या कट्ट्याला येतो असे कुमार१ यांना बोललो होतो. अचानक महत्वाचे काम निघाल्यामुळे येऊ शकत नाही. लवकरच पुन्हा असा योग येवो.

Bhakti 04/01/2025 - 11:43
आणि आजोबा परत जिवंत झाले! ;) लाखातून एखादा व्यक्ती इतका नशीबवान असू शकतो.हार्ट ॲटॅकमुळे मृत घोषित केलेल्या आजोबांचे शव रूग्णवाहिकेतून घरी नेताना रस्त्यावरील खड्ड्यांच्या धक्क्यामुळे आजोबांचे ह्रदय पुन्हा चालू झाले असावे.कारण नातवाला नंतर त्यांच्या हाताच्या बोटांची हालचाल दिसली.मग पुढील उपचाराला परत दुसऱ्या दवाखान्यात नेले.तर आजोबांच्या ह्रदयाचे ठोके दिसले. देव तारी त्याला कोण मारी... https://youtu.be/Y5Ap-dknaww?si=Ezn1IIWLjspCJ5Sl

In reply to by Bhakti

चौथा कोनाडा 05/01/2025 - 20:10
या घटनेची नोंद घेत महाराष्ट्राच्या आरोग्य खात्याने सदर खड्ड्याचे मोजमाप करून तशाच प्रकारचे खड्डे विविध रस्त्यांवर पाडण्याचे नियोजन केलेले आहे. या खड्डा इफेक्टमुळे सीपीआर ची प्रोसिजर कालबाह्य होऊ शकते असे माझी आरोग्य सचिव माननीय डॉक्टर चंगावडकर श्रीपाद यांनी प्रतिपादित केले ! या नियोजित खड्ड्यांच्या कंत्राटांवरून आत्ताच वाद सुरू झालाय ! राजकीय नेते श्री अमुक प्रमुख यांनी या कंत्राटात बावीस कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. आणि या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे केली.

कंजूस 05/01/2025 - 10:24
माथेरानमध्ये पर्यटक घोड्यावर बसून जात आहेत, काही जण मिनी ट्रेन पाहात आहेत, माकडे पर्यटकांच्या खाऊच्या पिशव्या हिसकावून घेत आहेत अशा माहितीवर Chatgpt ने काढलेलं चित्र.image थोड्या चुका आहेत, अर्धवट कापली गेली आहेत दृष्य. तरी ठीकच.

कंजूस 24/02/2025 - 00:28
उन्हाळी भटकंती. काल एक भटकंती केली. खंडाळा घाटासाठी रेल्वे जिथून पळसधरी स्टेशनानंतर वर चढते त्या पहिल्या डोंगरात आहे सोनगिरी. ( मुंबईतील तरुण नवख्या ट्रेकरांचा पावसाळ्यातला आवडता ट्रेक. आणखी एक सोंडाई डोंगर माथेरानच्या चौक पाॅइंटच्या खाली आहे.) उन्हाळा सुरू झाला आहे, रान वाळले आहे तरी दुपारी बारा ते पाच तळापासून माथ्यापर्यंत (५०० मिटर्स) अतोनात डास होते. शांतपणे बसून डबासुद्धा खाता आला नाही. या उलट मागचाच डोंगर राजमाचीचा. तिथे कधीच कुठेही डास नसतात. हे असं का?

कंजूस 12/03/2025 - 10:38
वेरूळ दहाव्या लेण्यात किरणोत्सव..... लोकसत्ता बातमी. https://youtu.be/2xX1I0EUcNk?si=Q7AHHpInuRYAN6Zc असा दिसत असला तरी त्यासाठी लेण्या तशा बांधलेल्या नसाव्यात. वेरूळ लेण्या बहुशा पश्चिमाभिमुख आहेत त्यामुळे दुपारी वर्षातून दोनवेळा किरण आतापर्यंत येत असणारच. आपली देवळं मुद्दामहून पूर्वाभिमुख बांधतात. काही पश्चिम दिशेला तोंड करून. तसं लेण्यांचं नाही. बौद्ध भिक्कुंना पावसाळ्यात विश्रांतीसाठी विहार आणि लेणी आणि चैत्य बांधण्यात ( खोदण्यात) आले होते. मूळ उद्देश हा होता.

कंजूस 12/03/2025 - 10:56
विमान परत फिरवणे.... मागच्या आठवड्यात एक शिकागो ते दिल्ली विमान टॉयलेट्स तुंबल्याने परत शिकागोला नेले. https://youtu.be/ZQemz_Enpxc?si=w1SuHw86alXZ6IiW उड्डाणाचे फक्त चार तास उरले होते. मग वाटेत कुठे emergency landing या कामासाठी मिळत नसावेत का? किंवा ते देश अशि सर्विस देत नसतील?

कंजूस 19/03/2025 - 18:32
माथेरान कालपासून बंद. टॅक्सी, इ रिक्षा आणि घोडे वाले संपावर. कारण काय तर म्हणे पर्यटकांची फसवणूक करणारे विडिओ यूट्यूबवर आले. खरं कारण ... खाजगी वाहनाने येणारे पर्यटक वाढले आणि ते दस्तुरी नाक्यावरून शटल टॉय ट्रेन किंवा इ रिक्षांनी माथेरानच्या बाजार पर्यंत जातात. ते आठवड्यात कोणत्याही दिवशी येऊन जातात. हमाल, हॉटेल्स आणि घोडेवाल्यांचा धंधा जोरात चालतो. इ रिक्षा दहा आहेत. फक्त सुट्ट्या लागल्यावर येणारे पर्यटकच टॅक्सी घेतात. एकूण काय तर २७० टॅक्सी वाल्यांना धंधा मिळत नाही पण पर्यटक खूप येतात. नेरळ ते दस्तुरी नाका जाणारी एसटी मिनीबस ( पंचवीस रुपयांत) हीसुद्धा पोटदुखी आहे. फसवणूक टॅक्सीवालेच करतात. खाजगी कार्यालयांना " आमच्या टॅक्सी नेच जा असा हेका धरतात किंवा पाचशे रुपये द्या असा दम भरतात. काही शहाणे टॅक्सी वाल्यांनी मात्र पन्नास रु सीटने धंधा सुरू ठेवला आहे. ( अधिकृत भाडे शंभर रु प्रती प्रवासी असे चारांचे चारशे रुपये घेतात. किंवा पूर्ण टॅक्सी खिडकीवर जाऊन बुक केल्यास ३६० रुपये लागतात. आता प्रश्न असा आहे की टॅक्सीवाले आठवड्याच्या इतर दिवशी ओला/ उबेर/ वगैरेंनी संबंध का ठेवत नाहीत. कारण या साईट्स " मारुती इको" वाहन नको सांगतात. सर्व माथेरान टॅक्स्या याच प्रकारच्या आहेत.

In reply to by कंजूस

चौथा कोनाडा 20/03/2025 - 20:29
खासगी करण : वरच्या पातळीवर अदानी- अंबानी खालच्या पातळी छोटेआका, बडेआका अणि अन असे कार्यकर्ते म्हणवणारे खंडणीकार्यकर्ते

वामन देशमुख 21/03/2025 - 13:10
माझा कालचा WhatsApp Status SohalLalTeaTime #LifeIsFunWithFriends&SohanlalTea ☕
एका जिवलगाचा प्रतिसाद -
चहा आणी आणी ते सुद्धा संध्याकाळी 7 नंतर! उन लागलं की काय वामन तुला ? काळजी घे बाबा.
माझे उत्तर - हमारे तेलंगाणा के लोओंका मालूम नै तुमारकू? सुब्बे उट्टे जब से रात को सोने तलक कब्बी बी चायाँ पीने कू रेडीच रैतें। कल क्या वा मालूम? हमारे संजय बावा होर उनके इनो आये थे हमारे इधर म्हाराष्ट्रा सें । फिर Abits कु जाने के प्लानाँ बनायें। तो मैं बोलूं, चलो बावा, कैसे बी उदर जारैं । तो व्हांपे सोहनलाल की चाय भोत सईं रैती, दूर दूर से लोआं आते पीनेकू। पीते, तुम्म? तो उनो बोले, तुम इत्ता बोलरे तो कैकु नै पीते वामन राव? फिर हम, हमारे इनो, बावा, बावा के इनो ऐसे चार जणां गए चायाँ पीनेकू। अब तुमारकू तो मालूमिच हैं, वो चायाँ वायाँ पीने के शौकां तो अपुन नै पालते। फिर वो तीन जणां चायाँ पिए। भोत अच्चे है चायाँ बोले। बोलके मई स्टेटसां लगायूँ।

वामन देशमुख 30/04/2025 - 10:55
अक्षय्य तृतीयेनिमित्त घराजवळच्या श्री वेंकटेश्वर स्वामी (बालाजी) मंदिरात सपत्नीक गेलो होतो. घरी आंब्याची पाने-झेंडूची फुले यांची तोरणे, देवांना ताजे हार,फुले, यथासांग पूजा, विशेष नैवेद्य हे झाले. गोडधोड जेवण आहे. श्री कृपेने प्रसन्न वाटते आहे. गोविंदा गोविंदा गोऽविंदा!

In reply to by कंजूस

वामन देशमुख 30/04/2025 - 15:56
मेहकरचा बालाजी?
मी हैदराबादला राहतो. घराजवळच्या (आम्ही लोकांनी बांधलेल्या) देवळात गेलो होतो.‌ यापूर्वी मेहकरच्या बालाजी मंदिरात गेलेलो आहे.‌ तेथील बालाजीची मूर्ती खूप उंच आहे. बहुधा भारतभरातील सर्वात उंच मूर्ती असावी.

वामन देशमुख 09/05/2025 - 13:44
श्रीगुरुजी हा आइडी बॅन केल्याबद्दल मी तीव्र निषेध व्यक्त करतो. ज्या मोजक्या मिपाखरांमुळे मिसळपाववर वाचक येतात त्यांच्यापैकी एक हे श्रीगुरुजी होते.‌ हे लिहिण्याचा अधिकार मला आहे व हे लिहिल्यामुळे माझाच आइडी बॅन होणार नाही ही अपेक्षा. जय हिंद. --- हे मी खरडफळ्यावरही लिहिलं होतं; कायमची नोंद राहावी म्हणून इथे पुन्हा लिहीत आहे.

In reply to by वामन देशमुख

मारवा 09/05/2025 - 13:54
श्रीगुरुजी हे अनेकवेळा अभ्यासपूर्ण संदर्भासहित मांडणीणकरात होते हे खरे आहे. काहीवेळा मतभेद असले तरी जेबकी स्वाभाविक आहे तरी त्यांची एकूण मांडणी व चर्चेला योगदान चांगलेच होते यात शंका नाही अनेकदा माहीत नसलेले संदर्भ त्यांच्यामुळे माहिती होत होते. मात्र वामनराव त्यांची भाषेची मर्यादा भंगलेली होती असेही दिसून येते. त्यासाठी त्यांना समज देऊन संधी द्यायला हवी होती असेच अमरेंद्र बाहुबली यांना देखील संधिं द्यायाला हवी होती. असे उत्साहाने हिरीरीने चर्चा करणारे गेले तर त्याचे मला तरी नक्कीच वाईट वाटतें
सहज सुचलं म्हणून ( राजकारणसोडून छोट्या चर्चांसाठी) इतिहास, पुस्तकं, पाककला आणि इतर विषयांची चर्चा खरडफळ्यावर होते आणि मोठमोठे माहितीपर प्रतिसाद खरडफळा साफ झाल्यावर गायब होतात. तर तसे होऊ नये म्हणून हा धागा सुरू करत आहे. * आमच्या इथे एक पेपर आणि मासिके वाचनाचा एक मिनी ज्येष्ठ नागरिक कट्टा ( म्हणजे दोन बाकडी , कडाप्पा फरशी टाकून) सुरू झाला होता. परवा तिकडे एक पाटी वाचली आणि पुण्यात असल्यासारखं वाटलं. 'ज्येष्ठ नागरिक कट्टा' पाटीखाली 'राजकारण चर्चेसाठी नाही' असं लिहिलं होतं. हसू आलं. तर हा आपला धागाही राजकारण चर्चेसाठी नकोच असं ठरवलं. बघू असा चालतो.

उस्ताद झाकीर हुसेन. एक आठवण

नीलकंठ देशमुख ·

अनुभव कथन आवडले... ध्यानी मनी नसताना अचानक आपले आराध्य दैवत समोर आले की मन सैरभैर होतेच. निळू फुले, यांच्या बाबतीत हा अनुभव घेतला आहे.

चौथा कोनाडा 19/12/2024 - 20:07
लातूरला त्यांचे तबलावादन सुरु असताना अचानक वीज गेली.पण तबल्यावरची बोटे थांबली नाहीत‌. मेणबत्त्या लावल्या गेल्या.मेणबत्त्यांच्या प्रकाशात उजळलेल्या मंचावर झाकीर भाई,त्यांचा तबला, त्यावर थिरकणारी त्यांची बोटे हे दृश्य, त्यांनी तेव्हा निर्माण केलेल्या ताल विश्वाएवढेच किंबहुना त्याहून जास्त परिणाम करुन गेले.ते आज ही डोळ्यासमोर दिसत आहे.
अ ति श य सुंदर अनुभव !

अनुभव कथन आवडले... ध्यानी मनी नसताना अचानक आपले आराध्य दैवत समोर आले की मन सैरभैर होतेच. निळू फुले, यांच्या बाबतीत हा अनुभव घेतला आहे.

चौथा कोनाडा 19/12/2024 - 20:07
लातूरला त्यांचे तबलावादन सुरु असताना अचानक वीज गेली.पण तबल्यावरची बोटे थांबली नाहीत‌. मेणबत्त्या लावल्या गेल्या.मेणबत्त्यांच्या प्रकाशात उजळलेल्या मंचावर झाकीर भाई,त्यांचा तबला, त्यावर थिरकणारी त्यांची बोटे हे दृश्य, त्यांनी तेव्हा निर्माण केलेल्या ताल विश्वाएवढेच किंबहुना त्याहून जास्त परिणाम करुन गेले.ते आज ही डोळ्यासमोर दिसत आहे.
अ ति श य सुंदर अनुभव !
लेखनविषय:
लेखनप्रकार
उस्ताद झाकीर हुसेन.   अंदाजे चाळीस वर्षांपूर्वी  झाकीर हुसेन यांना सवाई गंधर्व संगीत महोत्सवात पहिल्यांदा पाहिले.अत्यंत आकर्षक  व्यक्तीमत्व असलेले झाकीर म्हणजे प्रचंड उत्साह ,आणि चैतन्य.ते मंचावर  एकटे येत नसत .त्यांचा श्वासच जणू असलेला 'जीवलग 'तबला' दोन्ही हातात असे. त्यांच्या साठी ती निर्जीव वस्तू नव्हती.ते होते त्यांचे आराध्य दैवत! झाकीर भाई येण्याची घोषणा होताच टाळ्यांचा कडकडाट सुरू होई तो थांबतच नसे.त्या स्वागताचा स्विकार करताना तेही श्रोत्यांना अभिवादन करत मंचावरच्या त्यांच्या अस्तित्वाने सगळे वातावरण भारून जात असे.

उस्ताद झाकिर हुसेन - भावपूर्ण श्रद्धांजली

मूकवाचक ·

समयोचित लेख!! आपण भाग्यवान आहोत की अशा कलावंतांना पाहायचा ऐकायचा योग आला. लेखात दिलेल्या लिंक बघता बघता हरवुन गेलो. नकळत डोळे पाणावले. ईश्वर झाकीरभाईंच्या आत्म्यास शांती देवो. बाकी युट्युबच्या माध्यमातुन ते जिवंत आहेतच.

समयोचित लेख...! आपण स्वत: काही तबला वादनातले एक्सपर्ट नसतो पण कानाला तो सुखद वाटणारा तो नाद, ताल अहाहा...! आपल्या जादुई हातांनी तबल्यावर ती वळवळणारी बोटं, एखाद्या मैफिलीत जुगलबंदीतला दैवी अद्भुत ताल-नाद निर्माण करणारा 'जादूगार' पाहिला की एकच दाद येते वाह उस्ताद वाह.... तबल्यावरची थाप खरंच 'शांत' झाली. तबला मूक झाला. भावपूर्ण श्रद्धांजली. -दिलीप बिरुटे

चौथा कोनाडा 18/12/2024 - 10:26
सुंदर संकलन ! कधीही या धाग्यावर येऊन उस्ताद झाकिर हुसेन यांचे तबलावादनाचा ताल कानात साठवून ठेवावा ! उस्ताद झाकिर हुसेन यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

किसन शिंदे 19/12/2024 - 12:00
‘बजे सरगम हर तरफ से गुंजे उठकर देश राग’ असं एक गाणं यायचं लहानपणी दूरदर्शन वर, त्यामध्ये अनेक दिग्गज त्यांची संगीत वाद्ये वाजवताना दिसायचे, त्यामध्ये सर्वप्रथम उस्ताद झाकीर हुसेन आणि त्यांचे वडील उस्ताद अल्लारखा यांचे अफलातून तबला वादन पाहिले होते. उस्ताद झाकीर यांच्याशी झालेला माझा तो पहिला परिचय होता. त्यानंतर ताज चहाच्या जाहिरातीत “अरे वाह उस्ताद नही, वाह ताज बोलीये” म्हणत अगदी चपळतेने तबल्यावर आपली बोटे थिरकवणारे उस्ताद झाकीर हुसैन आणखी आवडत गेले. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या परंपरेतली संतूर, बासरी अथवा सितार अशी कुठलीही वाद्ये असोत त्यांच्या जर जोडीने तबला नसेल तर ती मैफल मला कायम अर्धवट वाटत आलीय. अगदी तसेच पंडित शिवकुमार शर्मा यांचे संतूर, पंडित हरिप्रसाद चौरसिया यांची बासरी किंवा पंडित रवीशंकर शर्मा यांची सितार ही कायम उस्ताद झाकीर हुसैन यांच्या तबल्याच्या जोडीनेच ऐकल्याने काहीतरी परिपूर्ण ऐकल्याचे समाधान वाटत आलेय. त्यातही शिवकुमार शर्मा आणि झाकीर हुसैन यांची जुगलबंदी ऐकणे म्हणजे माझ्यासाठी कायम पर्वणी राहत आलीय. गेली जवळपास २५ वर्षे किंवा त्याहून अधिक सितार, संतूर, बासरी आणि तबला ही वाद्ये आणि ती वाजवणारे भारतीय शास्त्रीय संगीतातली ही धुरंदर लोक माझ्यासाठी कायम जवळची आणि आपली वाटत राहिली आहेत. याच प्रेमापोटी उस्ताद झाकीर हुसैन यांचे तबला वादन प्रत्यक्षात ऐकण्याचा योग दोन तीनदा जुळून आला, त्यातून एक कलाकार म्हणून आणि त्याहीपेक्षा एक माणूस म्हणून त्यांना पाहिल्यानंतर त्यांच्याबद्दल असलेला आदर आणखीच दुणावला. यापूर्वी शिवकुमार शर्मा यांच्या जाण्यामुळे जशी हुरहूर लागलेली, अगदी तशीच हुरहूर उस्ताद झाकीर हुसैन यांच्या जाण्याने वाटत आहे. या दोन्ही दिग्गजांच्या नसण्याने एक मोठी पोकळी निर्माण झालीय. तिथे वर स्वर्गात या दोन्ही जिवलग मित्रांची छान जुगलबंदी जमली असेल एव्हाना.

अभ्यासपूर्ण लेख. झाकीर भाई तबलावादक म्हणून जेवढे श्रेष्ठ होते तेवढेच माणूस म्हणून पण महान होते.जमिनीवर पाय असलेला,नम्रपणा अंगी असलेला,इतरां विषयी आदर असणारा,वाद्याला दैवत समजणारा.अशी माणसे जाताना इतरांना हळवे करून जातात.

समयोचित लेख!! आपण भाग्यवान आहोत की अशा कलावंतांना पाहायचा ऐकायचा योग आला. लेखात दिलेल्या लिंक बघता बघता हरवुन गेलो. नकळत डोळे पाणावले. ईश्वर झाकीरभाईंच्या आत्म्यास शांती देवो. बाकी युट्युबच्या माध्यमातुन ते जिवंत आहेतच.

समयोचित लेख...! आपण स्वत: काही तबला वादनातले एक्सपर्ट नसतो पण कानाला तो सुखद वाटणारा तो नाद, ताल अहाहा...! आपल्या जादुई हातांनी तबल्यावर ती वळवळणारी बोटं, एखाद्या मैफिलीत जुगलबंदीतला दैवी अद्भुत ताल-नाद निर्माण करणारा 'जादूगार' पाहिला की एकच दाद येते वाह उस्ताद वाह.... तबल्यावरची थाप खरंच 'शांत' झाली. तबला मूक झाला. भावपूर्ण श्रद्धांजली. -दिलीप बिरुटे

चौथा कोनाडा 18/12/2024 - 10:26
सुंदर संकलन ! कधीही या धाग्यावर येऊन उस्ताद झाकिर हुसेन यांचे तबलावादनाचा ताल कानात साठवून ठेवावा ! उस्ताद झाकिर हुसेन यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

किसन शिंदे 19/12/2024 - 12:00
‘बजे सरगम हर तरफ से गुंजे उठकर देश राग’ असं एक गाणं यायचं लहानपणी दूरदर्शन वर, त्यामध्ये अनेक दिग्गज त्यांची संगीत वाद्ये वाजवताना दिसायचे, त्यामध्ये सर्वप्रथम उस्ताद झाकीर हुसेन आणि त्यांचे वडील उस्ताद अल्लारखा यांचे अफलातून तबला वादन पाहिले होते. उस्ताद झाकीर यांच्याशी झालेला माझा तो पहिला परिचय होता. त्यानंतर ताज चहाच्या जाहिरातीत “अरे वाह उस्ताद नही, वाह ताज बोलीये” म्हणत अगदी चपळतेने तबल्यावर आपली बोटे थिरकवणारे उस्ताद झाकीर हुसैन आणखी आवडत गेले. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या परंपरेतली संतूर, बासरी अथवा सितार अशी कुठलीही वाद्ये असोत त्यांच्या जर जोडीने तबला नसेल तर ती मैफल मला कायम अर्धवट वाटत आलीय. अगदी तसेच पंडित शिवकुमार शर्मा यांचे संतूर, पंडित हरिप्रसाद चौरसिया यांची बासरी किंवा पंडित रवीशंकर शर्मा यांची सितार ही कायम उस्ताद झाकीर हुसैन यांच्या तबल्याच्या जोडीनेच ऐकल्याने काहीतरी परिपूर्ण ऐकल्याचे समाधान वाटत आलेय. त्यातही शिवकुमार शर्मा आणि झाकीर हुसैन यांची जुगलबंदी ऐकणे म्हणजे माझ्यासाठी कायम पर्वणी राहत आलीय. गेली जवळपास २५ वर्षे किंवा त्याहून अधिक सितार, संतूर, बासरी आणि तबला ही वाद्ये आणि ती वाजवणारे भारतीय शास्त्रीय संगीतातली ही धुरंदर लोक माझ्यासाठी कायम जवळची आणि आपली वाटत राहिली आहेत. याच प्रेमापोटी उस्ताद झाकीर हुसैन यांचे तबला वादन प्रत्यक्षात ऐकण्याचा योग दोन तीनदा जुळून आला, त्यातून एक कलाकार म्हणून आणि त्याहीपेक्षा एक माणूस म्हणून त्यांना पाहिल्यानंतर त्यांच्याबद्दल असलेला आदर आणखीच दुणावला. यापूर्वी शिवकुमार शर्मा यांच्या जाण्यामुळे जशी हुरहूर लागलेली, अगदी तशीच हुरहूर उस्ताद झाकीर हुसैन यांच्या जाण्याने वाटत आहे. या दोन्ही दिग्गजांच्या नसण्याने एक मोठी पोकळी निर्माण झालीय. तिथे वर स्वर्गात या दोन्ही जिवलग मित्रांची छान जुगलबंदी जमली असेल एव्हाना.

अभ्यासपूर्ण लेख. झाकीर भाई तबलावादक म्हणून जेवढे श्रेष्ठ होते तेवढेच माणूस म्हणून पण महान होते.जमिनीवर पाय असलेला,नम्रपणा अंगी असलेला,इतरां विषयी आदर असणारा,वाद्याला दैवत समजणारा.अशी माणसे जाताना इतरांना हळवे करून जातात.
लेखनविषय:
लेखनप्रकार
उस्ताद झाकिर हुसेन यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना त्यांच्याविषयी नेमके काय लिहावे याचा विचार करत होतो. युट्युबवरच्या काही चित्रफितींचा क्रमबद्ध वापर करत उस्तादजींच्या अष्टपैलू तबलावादनाचा आढावा घ्यावा असे वाटले. त्या दिशेने केलेला हा प्रयत्न. एकल तबला वादनः उस्ताद झाकिर हुसेन यांचे एकल तबलावादन ऐकताना वादनाची सुरूवात ज्या पेशकार या प्रकाराने होते, त्यात दिसणारी त्यांची कल्पकत बेजोड होती.