मत
व्यायामाचे प्रकार
प्रेषक, वेल्लाभट, Sat, 11/05/2013 - 12:51व्यायाम हा एकंदरितच आजकालचा `हॉट टॉपिक' आहे. तरूण आहात, तर तारुण्य खुलवण्यासाठी व्यायाम; मध्यमवयीन आहात, तर तारुण्य टिकवण्यासाठी व्यायाम; वृद्ध आहात, तर फिट राहण्यासाठी किंवा, पाय, गुडघे, पाठ दुखू लागली आहे, म्हणून व्यायाम; श्रीमंत आहात, मग शो-ऑफ साठी व्यायाम; गरीब आहात, तर मग असाही काबाडकष्ट करून व्यायामच; अभिनेता/अभिनेत्री व्हायचंय, तर इंडस्ट्री ट्रेंड आणि डिमांड म्हणून व्यायाम; लग्नेच्छुक आहात, तर लग्न पटकन जमावं म्हणून छान दिसण्यासाठी व्यायाम; रोज व्यायाम, अधून मधून व्यायाम, कुणी सांगितलं म्हणून व्यायाम, आपल्याला वाटलं म्हणून व्यायाम...
पर्शियन, अरबी, फारसी इ भाषा आणि प्राचीन लिप्या
प्रेषक, वल्ली, Thu, 09/05/2013 - 11:33पारशांचा धर्मग्रंथ अवेस्तात असुरांना अहुर असे म्हणलेय. पर्शियन भाषेत 'स' नसल्याने त्याचा उच्चार 'ह' असा होतो उदा. सप्तसिंधू चा उल्लेख हप्तहिंदू वगैरे. आणि त्यात देवांना शत्रू म्हणून दाखवलेय असे कुठेतरी वाचले होते.
असिरीया हा पर्शियन साम्राज्यातलाच प्रदेश.
असुर कोण (१) या धाग्यावरील भाषा आणि लिपीच्या संदर्भातील प्रतिसाद या धाग्यात हलविले आहेत. - संपादक मंडळ
आपला भारताचा पंतप्रधान पाकिस्तानी होऊ शकतो का ?
प्रेषक, nandan, Tue, 07/05/2013 - 19:40माझ्या मनात खूप दिवसापासून एक प्रश्न घोळत आहे
…
आपला भारताचा पंतप्रधान पाकिस्तानी होऊ शकतो का ?
मला वाटते कि आपल्या ह्या गुळमुळ आणी अति सामान्य राष्ट्राप्रेमामुळे आपल्या भारतात काहीही होऊ शकते.
पहा हे असे होईल…
उद्या सानिया मिर्झाला मुलगा झाला आणि ही बाई २० वर्षानी तलाक देऊन इंडिया मध्ये आली आणि हिचा मुलगा लोकाल एलेक्शन मध्ये उभा राहिला … कालांतराने जर हा हैदराबाद मध्ये एमलअे म्हणून निवडून आला.
आणी कदाचित हाच पंतप्रधान म्हणून देखील निवडला जाऊ शकेल. जिथे एका राज्यापलीकडे कोणी ओळखत न्हव्ते त्या देवे गोडला पंतप्रधान केले ना वेळ आल्यावर ….
(जयपूर घटनेच्या निमित्ताने) अपघातग्रस्तांना मदत मिळावी यासाठी काय करता येईल?
प्रेषक, Pearl, Fri, 03/05/2013 - 20:31जयपूरला भर गर्दीच्या रस्त्यावर अपघात झाला. एक अख्खं कुटूंब अपघातात सापडलं.
जयपूर अपघात
पती, छोटा मुलगा जखमी तर पत्नी आणि ६ महिन्याचं बाळं अत्यवस्थ. बाजूने रहदारी चालूच आहे. जखमी माणूस मदतीची याचना करतो आहे, आणि कोणीच मदतीला येत नाही अरेरे मदतीसाठी थांबत नाही.
हातावर हात
प्रेषक, वेल्लाभट, Fri, 03/05/2013 - 14:31सरबजीत.
सोडला म्हणायचं की सुटला म्हणायचं ते कळत नाही. गेली अनेक वर्ष काहीही चूक नसताना तो (ना)पाक हैवानांचे अत्याचार सहन करत होता. आपण कल्पनाही करू शकत नाही की त्याच्यावर काय प्रसंग ओढवले असतील. पाकांनी त्याला मृत्यू दिला म्हणजे एक प्रकारे 'सोडला'च. कारण आणखी असे किती महिने किती वर्ष त्यावर अत्याचार होत राहिले असते याचा नेम नाही. आणि मेला, म्हणून तो सुटलाच. एकीकडे अत्याचार सहन करायचे आणि दुसरीकडे आपला देश आपल्यासाठी, आपल्याबरोबर इथे अडकलेल्या ५४ पेक्षा जास्त युद्धकैद्यांसाठी काहीही.... करत नाही, या गोष्टीपायी मनस्ताप भोगायचा; यापेक्षा मरण बेहत्तर, असा त्यानेही विचार केला असेल.
"दाखवणे" आणि फॉर्मल कपडे
प्रेषक, शिल्पा ब, Sat, 20/04/2013 - 09:39एक दुष्टचक्र
प्रेषक, खटपट्या, Thu, 18/04/2013 - 23:28आधी अनधीकृत बान्धकामाना प्रोत्साहन द्यायचे, त्यात सर्वानी पैसे खायचे. स्वताची वोट बॅन्क बनवायची. बान्धकाम पडले की अधीकार्यान्च्या नावाने गळा काढायचा. बान्धकाम पाडायला विरोध करायचा, बन्द पुकारायचा, कर भरणार्यान्च्या मालमत्तेचे नुकसान करायचे. क्लस्टर डेवलप्मेन्ट्चा पर्याय (?) समोर ठेवायचा, ज्यामुळे परत यान्चाच फायदा, कारण हेच बिल्डर.
जनतेला आमदार / राज्यकर्ते कीती दिवस फ्सवणार आहेत ???
७२ मिनिटांचा हिशोब - पुरुष जनहित मे जारी.
प्रेषक, तुमचा अभिषेक, Thu, 18/04/2013 - 20:50सरंजामशाही संपली आहे का?
प्रेषक, शैलेंद्रसिंह, Wed, 10/04/2013 - 20:43महाराष्ट्र पुरोगामी आहे असं म्हणायची पद्धत आहे. शाहु-फ़ुले-आंबेडकर प्रभुतींची नावे घेतली, शिवरायांचा जयजयकार केला की आपोआपच पुरोगामी विचारसरणीचे पाईक होता येते. अशा ह्या महाराष्ट्रात भूमाफ़िया निर्माण व्हायला लागले तेव्हा वाटायचं की महाराष्ट्राची अवस्था वाईट होत चाललेली आहे. पण हा प्रकार खुप जुना असल्याचं आजच एका धक्कादायक बातमीमुळे कळालं.
तारे तोडण्याची स्पर्धा
प्रेषक, गिरीजा, Tue, 09/04/2013 - 18:03नुकत्याच एका सत्तेतल्या प्रसिध्द नेत्याने दुष्काळाविषयी अश्लाघ्य विधाने करुन तारे तोडले नंतर लाईट जाण्याविषयीही तारे तोडले , मग त्याला उत्तर म्हणुन दुसर्या नेत्याने तारे तोडले .
एकुणच राजकीय लोकांची ही तारे तोडण्याची स्पर्धा फार जुनी आहे असे नुकतेच एकाने कळवले ...." ब्रेड्बटर परवडत नाही तर केक खावा " असे कोणतरी फ्रान्सची राणी भुकेल्या गरीब जनतेला म्हणाली होती म्हणे .
असो तर तारे तोडण्याच्या स्पर्धेतील स्पर्धकांच्या वाक्यांचे हे कलेक्षन !