टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
मत
आत्मा....
प्रेषक ऐका दाजीबा ( शनी, ०८/०९/२००८ - ००:१२) .काही शास्त्रज्ञ छातीठोकपणे सांगतात की आत्मा नावाचा प्रकार नक्कीच अस्तित्वात आहे. असंही ऐकण्यात आहे की काही शास्त्रज्ञांनी एकदा या प्रकाराचा सोक्षमोक्ष लावण्याचं ठरवलं. एक अतिवृद्ध माणूस जो की काही मिनिटांनी मरणार हे निश्चित आहे, त्याला एका काचेच्या खोलीत बंद केले. मुंगी सुद्धा आत जाणार नाही याची दक्षता घेण्यात आली. काही मिनिटांनंतर जेव्हा तो वृद्ध मेला, तेव्हा काचेला तडा गेला. आणि आत्मा त्यातून निघून गेला.
माणूस जेव्हा मरतो तेव्हा असं म्हटलं जातं की तो आपल्याला सोडून गेला. जर तो देह म्हणजेच तो माणूस असेल तर तो कोठे गेला? देह तर तिथेच आहे. मग सोडून कोण गेला? हाच तो आत्मा! तुम्हाला काय वाटतं?
रुद्ध प्रतिभा चतुरस्र वाहू दे
प्रेषक धनंजय ( शुक्र, ०८/०८/२००८ - २२:४७) .रंगांची चतुरस्र फेक जमते, काव्ये म्हणे चेष्टिता -
का तो फक्त विडंबने करि कवी? प्याला मधूचा रिता!
निवृत्तीत सुमार - काव्यप्रतिभा याची रुळा सोडते!
जैशी का अनिरुद्ध होत स्रवते, वाटा नव्या शोधते.
("विडंबकाची कात चढवल्यानंतरही उत्तम कवींच्या प्रतिभेच्या प्रसवास मुळीच निरोध होत नाही," असे काही लोकांचे मत आहे. मिसळपावावरील दोन सिद्धहस्त कवींची उदाहरणे लक्षात घेता हे मत मला पटत नाही.)
दहशत वाद्यान्चे उपकार (?)
प्रेषक मानव ( शनी, ०८/०२/२००८ - ०१:०५) .दहशतवादि निर निरळ्या मार्गाने जिवित हानि करतात,कधि हे कधि ते !
पण हे उपकारकच वाटावे अशि परिस्थिति आहे !
आजुबाजुला पाहिल कि हे जानवते
सन्जय दत्तला पाहन्यासाठि ५००० गर्दि जमते,फाल्तु नाच गान्यान्च्या कार्यक्रमाला लाखाने एसएमएस जातात्,पानि मिळत नाहि पन गल्लो गल्लि वाइन शोप उघडलि जात आहेत्,सरकार वाचवल्याबद्दल पन्तप्रधान गुन्डाना नमस्कार घालतात्,आम्च्या सारखे पुने मुम्बैकर हा एव्ढाच भारत आहे अस समजतात ! आनि भारताने प्रगति केलि अस सानगतात !
आमच्या कितितरि बहिणि अजुन त्यान्च आयुष्य चुलिपुढेच घालवत आहेत,मोकळा श्वास कशाला म्हनतात त्याना माहित नाहि
ति गान्धि ,फुले ,आम्बेडकर्,टिळक सारखि मन्डळी जन्मायचिच बन्द झालि का हो?
आता उरलेत आमच्यासारखे भुक्कड !
मग हे मेले काय आनि जगले काय ? काय फरक पडतो ?
उलट हे दहशतवादि या भारतावर उपकारच करत आहेत हि पिलावळ समपवुन
हे लिहिन्याचि वेळ माझ्यावर यावि यातच माझा पराभव आहे एक भारतिय म्हनुन
ऒलिम्पिक आणि भारत : अपेक्षा क्षमता आणि तारतम्य...
प्रेषक भडकमकर मास्तर ( शुक्र, ०८/०१/२००८ - १८:१०) .ऒलिंपिक जवळ आलं की वर्तमानपत्रांतून आणि टी व्ही वरून एक विचित्र प्रकारचं मार्केटिंग सुरू होतं, अपेक्षा वाढवणारं बाजारीकरण..आपल्या संघाच्या खेळाडूंना शुभेच्छा देणं, त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा करणं मी समजू शकतो, पण पदकांची अपेक्षा / पदकांची अपेक्षा असं किती म्हणत राहणार ? ( चांगली कामगिरी करणं म्हणजे केवळ सुवर्णपदक आणि सुवर्णपदकच मिळवणं असे नव्हे हे जेव्हा सर्वांना समजेल तो सुदिन.)..
मग चांगली कामगिरी म्हणजे काय ? माझ्या मते स्वत:च्याच उत्तम कामगिरीवर मात करत राहणं आणि ऒलिंपिकसारख्या मोठ्या मंचावरती स्वत:चा बेस्ट परफ़ॊर्मन्स देत राहणं , निदान भारतीय विक्रम मोडत राहणं.. ही अपेक्षा मी करतो....आणि इतपत अपेक्षाच योग्य आहे.
क्षमता :
१९९८ मध्ये इंडिया टुडेमध्ये भारतीय खेळाडूंच्या जागतिक कामगिरीविषयक एक तुलनात्मक लेख आला होता...त्यात बर्याच क्रीडाप्रकारातली भारतीय विक्रम आणि जागतिक विक्रम अशी तुलना केलेली होती...
http://www.india-today.com/itoday/29061998/cover.html
या लेखात कोणताही ब्लेम गेम नव्हता तर केवळ वस्तुस्थिती दर्शवली होती.... मी हा लेख वाचून खचलोच... म्हणजे शारिरीक ताकद आणि दमसास या बाबतीत आपण प्रचंड मागे आणि ज्या गोष्टी अत्याधुनिक तंत्रद्न्यान वापरून शिकायच्या , त्या बाबतीत आणि ट्रेनिन्ग सुविधेतही आपण मागे.... कसे पदक विजेते तयार होणार ?
Throwers eat the same food runners do at the sai centres, only they're allowed a larger quantity. Sports drinks too, unlike water which often merely quenches thirst, reintroduce vital supplements in the body. In the US, Leander would undergo tests merely to measure his sodium loss. Then Dr Michael Bergeron of the Department of Exercise Science, University of Massachussetts, instructed him on his sweat rate (litres/hour) and therefore how much he must replenish. In India, hockey players drink from a tap in the field.
आता काही लोक म्हणतील ध्यानचंद हेच टॆप वॊटर पिऊन खेळायचा ना ? पण अहो असा अद्भुत माणूस शतकात एखादा होतो... सगळ्यांकडून तीच अपेक्षा कशी ठेवता येईल?
टीव्हीवाले वृत्तवाहिन्यांचे पत्रकार काहीही बोलत,दाखवत असतात, त्यांच्याकडून अपेक्षा ठेवण्यात मतलब नाही पण वृत्तपत्रांचे पत्रकार तरी निदान तारतम्याने लिहितील असं मला वाटत असे.... पण तसे नाही...
काही क्रीडावृत्तपत्रकार भारतातले रेकॊर्ड होल्डर जगात पस्तिसाव्या, चोपन्नाव्या , विसाव्या वगैरे क्रमांकावर आहेत तरी त्यांच्याकडून पद्क अपेक्षतात... मग ती अंजली भागवत असो, अंजू जॊर्ज असो, साईना नेहवाल असो किंवा वीरधवल खाडे....( वर हे आणि की " मग? आम्ही अपेक्षा करणारच.. आमच्या कराच्या पैशातून स्पोर्ट्स मिनिस्ट्री त्यांचा खर्च करते ..." )....आता याला ऒप्टिमिस्टिक राहणं असं ते समजत असावेत.... अशांना ऒलिम्पिक झालं की अपेक्षाभंगाचा मोठा धक्का वगैरे बसतो.... मग हेच पत्रकार "... एक सव्वा अब्ज लोकसंख्येच्या खंडप्राय देशामध्ये दोन तीन पदके मिळू नयेत ? ..." वगैरे लेख पाडण्यात मग्न होतात...
आता या पॆटर्नचाच कंटाळा आलाय अगदी...
आता पहा, वीरधवल पदक मिळवणार पदक मिळवणार , त्याला कशी जनतेने मदत केली म्हणून तो इथवर येऊ शकला... तोच एक ऒलिम्पिकची आशा असले लेख वर्तमानपत्रातून पडायला लागतील, तो मेहेनतीने खेळेल.... चांगली कामगिरीही करेल पण पदक मिळाले नाही म्हणून सामान्य नागरिक त्याला शिव्याही घालेल....पण म्हणून ऒलिम्पिकनंतर त्यातूनच वीरधवल आणि साईना सारख्या खेळाडूंना कारकीर्दीच्या सुरुवातीलाच किती वैफ़ल्य येत असेल...
आपल्या खेळाडूंचे जगातले क्रमांक ( रॆंकिंग या अर्थाने ) पाहिले तर पदक मिळवणे ( म्हणजेच पहिल्या तीनात क्रमांक पटकावणे ) जवळजवळ अशक्यच आहे असे कोणीही म्हणेल.... तरीही ९६ ला पेस, २००० ला मल्लेश्वरी आणि २००४ ला राजवर्धन राठोड यांनी पदके मिळवलीच ना... ही अत्यंत अद्भुत कामगिरी आहे आणि मला त्याबद्दल अत्यंत आदर आणि अभिमान आहे.... पण म्हणून मी आता रोज वर्तमानपत्रात लेख वाचतो की बॊक्सिंगकडून पदकाची अपेक्षा, कुस्तीत पदकाची अपेक्षा, बॆडमिंटनमध्ये पदकाची अपेक्षा हे सारं अंमळ भंपकपणाकडं झुकणारं... म्हणूनच म्हणतो, आपल्या संघाच्या खेळाडूंचे कौतुक केले पाहिजे , शाबासकी दिली पाहिजे पण त्यांच्याकडून तारतम्याने अपेक्षा ठेवली पाहिजे...
जाताजाता : काहीतरी चमत्कार होऊन या वेळी आपल्या ऒलिम्पिक टीमनं दहा बारा पदकं आणून माझेच दात माझ्याच घशात घातले तर मला आनंदच होईल हे वे सां न ल....
गणेशोत्सव
प्रेषक ऐका दाजीबा ( रवी, ०७/२७/२००८ - १९:१८) .टिळकांनी गणेशोत्सवाची स्थापना का केली? लोकांनी एकत्र यावे म्हणून. त्यांचा उद्देश साध्य झाला. लोक एकत्र आले. पण त्यांनी एकत्र येऊन काय केलं?
गणेशोत्सवाच्या निमित्ताने दहा दिवस जो तमाशा चालतो, त्याबद्दल हा ऊहापोह. काही मंडळं निदान दहा दिवसांत काही वेळा तरी भजनं लावतात. पण विसर्जनाच्या दिवशी मात्र कहर होतो. अक्षरश: दारु पिऊन, "कोई मेरे साथ कोई रात गुजारे..." सारख्या गीतांच्या तालावर हे तथाकथित "गणेशभक्त" नाचत असतात.
अरे, दारू पिऊन नाचायचंच आहे तर पब्ज मध्ये जा ना! त्यासाठी गणपतीची अशी विटंबना कशाला? खेदपूर्वक नमूद करावंसं वाटतं की टिळक जर आज हयात असते, तर त्यांनी आज गणेशोत्सव बंद केले असते!!
विनयभंग
प्रेषक शितल ( मंगळ, ०७/२२/२००८ - १७:५३) .विनयभंग
Assault or criminal force to woman with intent to outrage her modesty.
Whoever assaults or uses criminal force to any woman, intending to outrage or knowing it to be likely that he will thereby outrage her modesty, shall be punished with imprisonment of either description for a term which may extend to two years, or with fine, or with both.
भारतीय दंड विधान ३५४ नुसार विनयभंग म्हणजे काय?आणि त्याला कोणती शिक्षा आहे ?त्याबद्दलची कायद्याची परिभाषा अशी आहे...
विनयभंगः महिलेला लज्जा उप्तन्न होईल ह्या हेतुने केलेला अत्याचार व बळाचा बेकायदा वापर.
शिक्षा: जो कोणी ,जाणता अथवा अजाणता, महिलेवर अत्याचार करेल अथवा बेकायदेशीरपणे बळाचा वापर करुन असे वर्तन करेल त्याला अश्या कोणत्याही कृत्याबद्दल दोन वर्षांपर्यंत कैद अथवा दंड अथवा दोन्ही शिक्षा एकाच वेळी भोगाव्या लागतील.
विनयभंग! ह्या गोष्टीने स्त्रीच्या शरीराला जितक्या वेदना होत असतील त्यापेक्षा कितीतरी पटीने मनाला वेदना होतात.
भारतीय समाजात स्त्रीयांना सतावणार्या अनेक त्रासांपैकी एक त्रास म्हणजे विनयभंग. स्त्री, मग ती समाजातील अगदी उच्चभ्रू स्तरातील असो वा अगदी तळागाळातील असो, काही पुरूषांच्या विकृत प्रवृत्तीचा त्रास हा स्त्रीयांना होतच असतो. स्त्रीयांच्या भाषेत बोलायचे झाले तर पुरूषांच्या अश्लिल प्रवृत्तीचा आणि शेर्यांचा त्रास स्त्रीयांना सदैव सहन करावा लागत असतो.
कधीकधी कोर्टात विनयभंगाच्या केसेस दाखल होत असतात, पण त्यातही विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे की, कैक स्त्रीया आपली बदनामी नको म्हणुन केसेस दाखल ही करत नसतील, किंवा साधी पोलीसात तक्रारही देत नसतील. पण वस्तुस्थिती अशी आहे की थोड्याफार फरकाने अनेक स्त्रीयांना कधीना कधी कमी जास्त प्रमाणात ह्या गोष्टीला सामोरे जावे लागतेच .
असे म्हणतात की स्त्रीयांना स्पर्शाचे (चांगल्या/ वाईट हेतु )ज्ञान उपजतच असते. मुलगी जेव्हा बाल अवस्थेतून तारूण्यात पदार्पण करू लागते तेव्हा काही पुरूषांचा विकृत स्पर्श, नजर यांची जाणीव तिला निसर्गाकडूनच देणगीच्या स्वरूपात मिळत असते असे वाटते. अशा वेळी तिला परपुरूषा इतकाच धोका तिच्या जवळच्या नातलगांकडूनही असतो. ज्याच्या अंगाखांद्यावर लहानपणी खेळलो असतो अशा लोकांचा वयात आल्यावर सहेतुक स्पर्श कळतो. मनात लज्जा उत्पन्न होईल असे शब्द वापरल्याने मुलीच्या मनाची कुंचबणा होते. जर घरी मोकळे वातावरण नसेल तर ती बोलू ही शकत नाही आणि मनात त्या व्यक्ती विषयी घृणा निर्माण होते. कधी कधी मनात असंख्य विचार येतात, पुरूषांकडे पाहण्याची प्रवृत्ती बदलते. स्वत: बद्दल अपराधी भावना निर्माण होते . कोवळ्या वयात विनयभंगाचा अनुभव आल्यास मुलींच्या मनाची अवस्था अशी होते आणि त्या मनातल्या मनात कुढत बसतात.
आज अनेक ठिकाणी रात्रंदिवस स्त्री आणि पुरूष एकत्र काम करतात. स्त्रीयांना कधी सहकार्यांच्या तर कधी साहेबाच्या विकृत प्रवृतीला समोरे जावे लागते, त्यावेळी कामातील लक्ष कमी होणे, सदैव मन अस्वस्थ असणे वगैरे अनुभव येत असतात.
एखाद्या बसमध्ये, ट्रेन मध्ये , बस स्टॉपवर, जेथे जेथे सार्वजनिक ठिकाणे आहेत तेथे छुप्या प्रमाणात कोणत्या ना कोणत्या स्त्रीचा विनयभंग होत असतो. आज काही स्त्रीया ह्या विरोधी आवाज उठवतात पण त्यांचे प्रमाण खुप कमी आहे, कारण किती ही झाले तरी लाज हा प्रकार स्त्रीला जीवाहुन प्रिय असतो. समजा एखाद्या स्त्रीने ह्या विनयभंगा विरूध्द पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार नोदंविली तरी तिला इतक्या लज्जास्पद प्रश्नानां सामोरे जावे लागते कि तेथेच तिचा निम्मा धीर खचतो. पुढे ती केस कोर्टात उभी राहिली तर उरलेल्या लाजेच्या चिंध्या त्या बचाव पक्षाचा वकिल काढतो. साक्षीदार असला तर ठीक ,पण असून ही तो फितुर झाला तर ती स्त्री लढा हरते. ह्याचमुळे दुस-या एखाद्या स्त्रीला अशाच गोष्टीसाठी लढा देऊन काही उपयोग होईल असे वाटत नाही आणि ती तो अन्याय मुक पणाने सहन करते.
माझ्या पाहण्यातील कोर्टातील एक केस सांगते जी खुप वर्ष चालली होती.
एक शाळकरी मुलगी होती . एके दिवशी तीची शाळा सुटल्यावर ती घरी गेली आणि घरातून पैसे घेऊन ५० पैशाची पेप्सी मिळते ते आणायला दुकानात गेली. पुढच्या खोलीत दुकान आणि मागच्या खोलीत मकान असा एकूण तिथला प्रकार होता. दुकानदाराने त्या मुलीला आत बोलावले आणि म्हणाला की, " आतल्या खोलीत फ्रीज मध्ये पेप्सी आहे तेव्हा तुच आत जाऊन स्वतःच्या हाताने घे."
ती शाळकरी मुलगी असल्याने तिच्या डोक्यात फारसे काही वेगळे आले नाही (दुकानदाराचा मुलगा आणि बायको गावी गेले होते ) . ही संधी साधून त्याने तिचा विनयभंग केला पण पुढच्या गोष्टी होण्यापासून ती थोडक्यात बचावली, आणि घाबरून पळत घरी आली. मात्र त्यावेळी तिने हे कुणालाच घरी सांगितले नाही. तिच्या रोजच्या वर्तनात मात्र अमुलाग्र बदल झाला होता (मी केस हिस्ट्री आठवुन सांगत आहे, कारण निकाल इतक्या वर्षानी आमच्या कारकिर्दीत दिला गेला असल्याने लक्षात आहे ). तिची भेदरलेली नजर, तिचे विक्षिप्त वागणे, शाळेला न जाणे, आणि कोणत्याही परपुरूषासमोर न येणे हे लवकरच तिच्या घरच्यांच्या लक्षात आले. तिला त्या बाबतीत तिच्या आईने विश्वासात घेऊन जेव्हा विचारले तेव्हा घडलेली गोष्ट उघडकीस आली. मग पोलीसात तक्रार, कोर्ट केस, साक्षीदार, ह्या सगळ्यातुन निकाल लागायला ७/८ वर्ष गेली तो पर्यत ती मुलगी लग्नाला आली होती तरी कोर्टात केस चालु होती. शेवटी सबळ पुराव्या अभावी आणि साक्षीदार कोणी नसल्याने तो आरोपी निर्दोष सुटला. पण त्या पुरूषाच्या विकृत प्रवृतीमुळे त्या मुलीच्या मनावर झालेला आघात ,तसेच तिच्या घरातील लोकांना झालेला मानसिक त्रास हा कधीच न विसरता येणारा अनुभव आहे.
म्हणून मला असे वाटते की,कायद्यात अशी तरतुद हवी होती की ज्यायोगे विनयभंगाच्या केस मध्ये साक्षीदार आणि कागदी घोडे यांचे महत्व कमी असावे आणि अशा प्रकारच्या पीडित स्त्रीची साक्ष महत्वाची ठरवावी म्हणजे आरोपीला शिक्षा मिळण्यास आणि समाजात ह्या गोष्टीचे प्रमाण कमी होण्यास नक्कीच मदत होईल.
मिपाचा ट्रॅफिक जॅम..! :)
प्रेषक विसोबा खेचर ( सोम, ०७/१४/२००८ - १६:१५) .राम राम मंडळी,
दिवसेंदिवस मिपावर नवीन लेख आणि प्रतिक्रिया यांचा ट्रॅफिक जॅम होत आहे. अनेक मंडळी अत्यंत आवडीने व मिपावरील प्रेमाखातर इथे भरभरून लिहीत आहेत, चांगलं लिहीत आहेत ही अत्यंत समाधानाची गोष्ट आहे. परंतु हा ओघ इतका भरभर आहे की वाचायला टाईमच भेटत नाय! 
कामधंद्यापायी टाईमच भेटत नाय हे एक, आणि सवडीने वाचू म्हटलं तर नवीन लेख आणि प्रतिक्रियांचा ट्रॅफिक अजूनच जॅमच होत रहातो! 
तर मंडळी, तूर्तास आमच्यापुढे असा प्रश्न आहे की या ट्रॅफिक जॅमचं करयचं काय? एवढं सगळं वाचायचं कधी अन् केव्हा? 
कुणी काही उपाय सुचवेल का? 
आपला,
(मिपा पोलिसांच्या वाहतुक शाखेचा) हवालदार तात्या. 
ता क - सदर चर्चाप्रस्ताव हा विरंगुळा सदरातला आहे. माझी मुख्य तक्रार मिपावरील ट्रॅफिक ही नसून मला ते सर्व वाचायला वेळ मिळत नाही अशी व इतकीच आहे!
वरील प्रस्तावातील "अनेक मंडळी अत्यंत आवडीने व मिपावरील प्रेमाखातर इथे भरभरून लिहीत आहेत, चांगलं लिहीत आहेत ही अत्यंत समाधानाची गोष्ट आहे" हे वाक्य कृपया लक्षात घ्यावे ही साधी अपेक्षा! 
बदल तर घडतोय...
प्रेषक स्वाती फडणीस ( सोम, ०७/१४/२००८ - ११:२६) .
टीक-टॉक
टीक-टॉक
टीक-टॉक
ठांग!
लोलक,
जागच्या जागी फिरतोय!
लेफ्ट-राइट
लेफ्ट-राइट
लेफ्ट-राइट
ठक्काक!
मानव,
जागच्या जागीच चालतोय!
ठांग!.
ठांग!!..
ठांग!!!...
तरी ..बदल तर घडतोय...
मुंगीच्या पावलानं..कासवाच्या गतीनं!
अखंड,
अविरत...
अथक!!
बदल तर घडतोच आहे...
क्षणा क्षणाला..कणा कणाने,
वाढणार्या एव्हरेस्ट प्रमाणे!
क्षणा क्षणाला..थेंबा थेंबाने,
वितळणार्या हिमाद्री प्रमाणे!
एक पाऊल पुढे..एक पाऊल मागे,
दोन पाउले पुढे..एक पाऊल मागे!
एक पाऊल पुढे..दोन पाउले मागे...
पुढे..
मागे..
जिथल्या तिथे!
जिथल्या तिथे..
मागे..
पुढे!!!
काळ कधीचा चालतोय!
पुढे.
पुढे..
पुढे...
इथे असा, तिथे तसा!!
बदल तर घडतोय..
एकाच वेळी..
मागे-पुढे..करत-सरत,
कधी थांबल्या सारखा वाटतोय!
तरी..बदल तर घडतोय...
उच्चतम उधाण बिंदूला स्पर्शून,
समुद्र पुन्हा पुन्हा आहोटतोय!
तरी रेषे रेषेने जलधी वाढतोय!!
बदल तर घडतोय...
डंपर डंपर गारबेज खाली,
सागर तळ झाकला जातोय!
पर्यावरण वादाचा आवाजही गुंजतोय!!
बदल तर घडतोय...
कधी मखरात,
कधी मक्त्यात!
आई
बाई
ताई
सई
म्हणत
रुपा रूपाला बघतोय...
दोन हात
दोन पाय
एक डोकं असलेला..
माणसा सारखा प्राणी,
कधी माणूसही वाटतोय!
बदल तर घडतोय...
बदल तर घडतोय...
======================
स्वाती फडणीस .............. १६-०६-२००८
डॉ. राजेश तलवार तुरुंगात सेवा देणार.....!
प्रेषक केशवराव ( शनी, ०७/१२/२००८ - १५:४१) . नुकतेच जालावर वाचले कि, डॉ. रजेश तलवार दासना तुरुंगात दंय रुग्णांना सेवा देणार.
ज्या माणसावर आपल्याच मुलीच्या खूनाचा आरोप आला होता , आणि आता सीबीआय त्याला 'काहि पुरावा नाही ' म्हणुन ५० दिवसांनी सोडून देते , तोच माणूस आता त्याच तुरुंगात कैद्यांना दंत सेवा देण्याची ईछ्चा प्रकट करतो. त्याला सलाम !
माझी कविता
प्रेषक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ( शुक्र, ०७/०४/२००८ - २२:३१) .प्रयत्नही करुनही जमत नाही कविता
तेव्हा होणारा वैचारिक मनस्ताप
माझ्या अहंकाराला डिवचतो.
ही अस्वस्थता कोसळत जाते,
तिन्ही सांजेला.
धुक्यात लपेटलेल्या रस्त्यावरुन
कवितेला बिलगुन चालतांना
कोणताच विचार मला सुचत नाही.
ऐनिलिसिस करता येत नाही
गुदमरलेल्या श्वासांचा.
आभाळ भरुन आल्यावर
मी डोकावून पाहतो,
निर्वासित वेदनांच्या गोंगाटात
दारावरुन परत फिरलेल्या शब्दांसहीत,
माझी कविता एकाकी असते.

