धोरण

गुरु- एक मार्गदर्षक

आज गुरुपौर्णिमा........... तेव्हा प्रथम माझ्या गुरुंना आणि श्रध्दा स्थनांना मी नमन करते.
प्रत्येक झण आपल्या जिवनात कोणाला तरी आदर्श मानुन पुढे चालत असतो. कोणी देवाला, कोणी गुरुला, कोणी एखद्या महान व्यक्तिला तर कोणि स्वतालाच. पण जीवनात सगळ्यांनाच मार्गदर्शनाची गरज असतेच. माझे आई-वडिलच माझे खरे गुरु आहेत . ज्यांनी मला या जगात 'जगण ' शिकवला. पण एकदा माझ्या एका गुरुनी मला एक गोष्ट शिकवली जी मझ्यावर खुप परिणाम करुन गेली ती मी तुमाला सांगते...........
मी शाळेत असतांना वर्गात एकदा 'सकाळी उठल्यावर प्रथम काय कराव....???' यावर चर्चा रंगली. प्रत्येक जण आपले मत मांडत होतं.
' प्रथम देवाच दर्शन (देवघरात जाउन)घ्याव' .
'कराग्रे वसते लक्ष्मी म्हणाव'.
'आईचा चेहेरा बघावा'.
'सरळ बथरुम मधे जाउन चेहेरा धुवावा'.
असे एक ना अनेक विचार मांडले जात होते. आमचा हा गों धळ ऐकुन आमच्या शिक्षिका वर्गात आल्या. आमचा चर्चेचा विषय ऐकुन त्या हसल्या व म्हणाल्या ,'आता मी माझ मत सांगु.' आम्ही सगळे त्यांच्या कडे बघु लागलो. त्या म्हणाल्या,
''सकाळी उठुन प्रथम आरशा समोर उभ रहाव, आपला 'अवतार' नीट करावा' , स्वताला नीत बघुन घ्याव न मग तुम्ही देवाच नाव घ्याव.''
आम्ही विचारल अस का....????? देवाचा किंवा आईचा चेहरा सोडुन स्वताचा चेहरा का बघावा.....??
तर त्या म्हणाल्या,'' आपला एखादा दिवस वाइट गेला ना की आपण सर्वप्रथम नकळ्त त्या व्यक्तिला दोष देतो ज्याचा चेहरा आपण सकाळी उठुन बघतो. बिचार्‍या त्या व्यक्तिचा काय दोष तुमचा दिवस वाईट गेल्यास. तेव्हा सकाळी उठुन स्वताचाच चेहेरा बघणे चांगले ना कारण आपल्या कर्माला आपणच जबाब्दार असतो. दुसरा कारण म्हणजे आपण जर आपला चेहेरा नीट करुन गेलो तर दुसर्‍यांना 'एक प्रसन्न चेहेरा' बघीतल्याचा आनंद होतो. आणि तिसरा म्हणजे तुमचा व्यस्थितपणा दिसतो'.
एवढा सांगुन त्याअ वर्गातुन निघुन गेल्या. पण त्यांचे वाक्य माझ्या मनातुन कधीच निघणार नाहीत. एका छोट्याश्या उदाहरणात त्या मला जगण्याचा एक नविन पैलु शिकवुन गेल्या.

मिपाकरांच्या माहितीकरता...

मिपाकरांच्या माहितीकरता -

मिपावरील सध्याच्या कार्यकारी मंडळात काही बदल केले आहेत. काही नावे कमी केली आहेत तर काही नव्याने घातली आहेत. सध्या या कार्यकारी मंडळातील मंडळी खालीलप्रमाणे आहेत.

चतुरंग,
केशवसुमार,
धोंडोपंत,
विकास,
नीलकांत,
प्रा डॉ दिलिप बिरुटे
प्रियाली
विसोबा खेचर.

मिपावर टाकल्या जाणार्‍या लेखांमध्ये व प्रतिसादांमध्ये गरज वाटल्यास योग्य ते बदल करण्याचा, किंवा वेळप्रसंगी ते संपूर्ण लेखनच काढून टाकण्याचा या मंडळींना पूर्ण अधिकार आहे. तसेच सभासदांना काही तांत्रिक अडचण आल्यास (उदा चित्र टाकणे वगैरे,) तर सभासद मंडळी या कार्यकारी मंडळापैकी कुणाही सदस्याला पोष्टकार्ड अथवा खरड लिहून कळवू शकतात.

धन्यवाद.

पांडेकर आजी..

लोकहो... खरंतर व्यक्तीचित्र लिहिणे हा माझा प्रांत नव्हे.. पण मिपाचे मालक आणि माझे चांगले मित्र असलेले श्रीयुत तात्या अभ्यंकर यांच्याकडून स्फूर्ती घेऊन आणि श्रीकृष्ण सामंत सर यांनी लिहिलेली व्यक्तीचित्रं वाचून मलाही असं वाटलं की आपणही एखादं व्यक्तीचित्र लिहावं. तर हे माझं पहिलं वहिलं व्यक्तीचित्र भाईकाकांच्या चरणी अर्पण करून मी मिपाच्या वाचकांसमोर ठेवत आहे. गोड वाटेल अशी आशा आहे.. मीठाचा खडा लागल्यास सांभाळून घ्या.

"वयनी..... " अशी किनर्‍या आवाजात म्हणजे अगदि स्पष्ट सांगायचं तर जुन्या मराठी तमाशापटातून मावशीचं काम करणारे कै. गणपत पाटील यांच्यासारख्या आवाजात हाक ऐकू आली की आई म्हणते पांडेकर आजी आल्या. अशिक्षित, अडाणी बाई. अतिशय प्रेमळ. तिचं तिच्या बागेवर पोटच्या मुलासारखं प्रेम. नवरा म्हणजे मुलखाचा चिकट होता असं आजीच स्वतः सांगते. तिला मुलगाही होता.. बिचारा आजारी पडला पण त्या विक्षिप्त नवर्‍याने उपचारासाठी खर्च नाही केला म्हणून दगावला. तेव्हापासून नवर्‍याबद्दल मन कलूषित झालेलं , पण जुने संस्कार .. त्यामुळे नवर्‍यासोबतच उरलेलं आयुष्य घालवीत होती. नवरा पोलिस खात्यात जमादार होता. त्यामुळे कोल्हापूरतील राजारामपुरी पोलिस स्टेशन मध्ये ओळख आहे बाईची. काळा सावळा रंग , डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा तो ही मामांचा म्हणजे तिच्या नवर्‍याचा होता, ती तो आता वापरते., आणि डोक्याची चांदी झालेली. अशी ही आजी. त्या मामांनी संपूर्ण आयुष्यात एक चांगलं काम केलं ते म्हणजे ४ लहान लहान खोल्यांचं का होईना पण साधारण ३००० स्क्वे. फूटच्या प्लॉटवर स्वतःचं घर बांधलं. घराच्या आवारात आजीनी लावलेली झाडं म्हणजे पायरी आंबा, लिंबू, शेवगा, पेरू, चिकू, जाई, जुई, मोगरा, गुलाब, २ प्रकारच्या जास्वंदी. झाडांवर अतिशय माया. तिच्या सोबतीला म्हणजे ती बॉबी कुत्री आणि माय-लेकरं असलेली वेगवेगळ्या डोळ्यांची मांजरं..
हे प्राणीही जणू आजी एकटी आहे तिला आपल्याशिवाय कोणी नाही हे जाणूनच असल्यासारखे...
आंब्याच्या सिझन मध्ये मोठाले येणारे पायरी आंबे राखायला बाई, दिवसरात्र बागेत बसून असते. २ खोल्यांमध्ये बिर्‍हाड ठेवल्याने सोबतही होते आणि मामांच्या तुटपुंज्या पेन्शन शिवाय मिळकतही होते थोडिफार.
गॅस ला नंबर नोंदवायचा असेल किंवा काही बँकेची कागदपत्र समजावून घ्यायची असतील तर हळू हळू धिम्या गतीने चालत चालत आजी येते आणि आईकडून किंवा घरी जे कोणी असेल त्याच्याकडून वाचून किंवा फोन लावून घेते. एक मात्र, तिची ही जी काहि कामं आम्ही करतो त्याच्या बदल्यात ती झाडाचे आंबे, लिंबं, शेवग्याच्या शेंगा आणून देते. सगळ्या जगाला ती तिच्या बागेत येणारी फळ विकते पण आमच्याकडून एक पैसाही नाही घेत. मी कधी गेले कोल्हापूरला तर मला आवडते म्हणून शेवग्याच्या शेंगांची तिखट, खमंग भाजीही करून आणून देते. यामध्ये कोणताही दिखाऊपणा नाही . पण झाडांबद्दलचं प्रेम आणि अभिमान अपार.
"आजी, शेवग्याच्या शेंगाची भाजी मस्तच झाली आहे .."
" मग! हुनारचं की, माझ्या झाडाच्या शेंगा हैत.. लई दळदार.. त्या बाजारच्या नव्हत, चवळीवानी!!" असं चिरक्या आवाजत पण ठसक्यात उत्तर मिळेल .
या बाईचं उत्पन्नाचं साधन म्हणजे, मामांची पेन्शन, येणारं घरभाडं आणि आंबे, लिंबं, शेंगा, पेरू... श्रावणात जाई-जुई, मोगर्‍याची फुलं विकून मिळणारि रक्कम. कॉलनीतली लोकं सुद्धा त्या बाईला जपतात.. बाजरातून शेवगा, पेरू आणून खाण्यापेक्षा आजीकडूनच घेतात. भलेही स्वत:च्या बंगल्यातल्या बागेतून टोपलीभर फुले निघू देत पण सत्यनारायण, मंगळागौरी, आणि गणपतीच्या पूजेला घरोघरि फुलं येतात ती आजीच्या बागेतली. त्यामुळे तिचा तिच्या झाडांबद्दलचा अभिमानही द्विगुणीत होतो आणि मग म्हणते..
"माझ्या मोगर्‍या वानी मोगरा कुट्टं मिळायचा न्हाई. परवा, शेजारची सुजा आल्ती.. ५० रूप्पयची फुलं घ्यून गेली बगा.." त्यावेळी तिच्या चेहर्‍यावरून आनंद ओसंडून वहात असतो.
मध्येच एकदा आजी अशीच आली घरी.. " वयनी...... हैसा काय??"
"या आजी.. आई नाहिये.. या ना बसा जरा" .. मी
"ताई, कुटं गेली आई, येनार हायका लवकर??" .. आजी
"येईल १० मिनीटात. बसा तरी." .. मी
हा संवाद होईपर्यंत आजी जेमतेम बंगल्याचं गेट उघडून आत आलेलि असते. तिला चालायला खूप वेळ लागतो.. वयोमाना प्रमाणे येते तिच्या गतीने. मग ती आत येईपर्यंत मी स्वयंपाकघरातून पाणी पिऊन येते. आजी आत येते, नेहमीच्या ठरलेल्या दाराजवळच असणार्‍या खुर्चीजवळ बसते. याचं कारण, दाराजवळच्या खुर्चीतून तिला तिच्या घराकडे लक्ष ठेवता येतं खास करून आंब्याच्या किंवा पेरूच्या सिझनमध्ये. कारण घराच्या मागे असणार्‍या झोपडपट्टितली मुलं ताबडतोब येतात दगडं मारायला. आणि एखादा दिसलाच आंब्यावर किंव पेरूवर दगड मारणारा.. तर.. टिपेच्या चिरक्या स्वरातून ती त्याला शिवी हाणते.. बिचार्‍याला आजी कुठून ओरडते आहे ते दिसतही नाही, आवाज मात्र ऐकू येत असतो. बिचारा इकडं तिकडं बघत निघून जातो.
आजी बसते, काठी ठवते.. मग एकदम म्हणते.."इवडी इवडी झालित आता.. ३-४ दिवसांत पिकली की, आनून देतो हां"
"काय इवडी इवडी झालित आजी? काय आणून देताय??" मी.
"अगं बाई माजे, पिरू गं... इवडी झाल्येत.. आता पिकतील छान.. देतो आनून".. 'इवडी' असं अंगठा आणि इंडेक्स (मराठी??) बोट दाखवत आजी म्हणते.
"हो, पण आजी मी विकत घेणार पेरू.. असेच नकोत मला" मी..
" न्हाइ गं बाई.. माजी प्वोर हायस.. म्हायेरी आलियास.. विकत नक गं बाई.." आवाजात जास्तीत जास्त मार्दव आणून आणि व्याकुळ होत आजी म्हणते.
मला तिचं मन मोडवत नाही. मी 'बर' म्हणते.
तिला कधीतरी औषधं, बिस्किट आणून हवी असली तर येऊन सांगते "ताई, तू भाइर गेलिस तर माजी इवडी औषदं आनि ती मारिची मिळत्यात तसली बिस्किटं बी आनशील ??" पैसे पुढे करते. मी घेत नाही. "आजी, अहो आहेत पैसे.."
"नगं.. हे घ्यून जा. " हातात कोंबते पैसे. मिही फारशी खसखस न करता ते घेते कारण त्यातून तिचा मला स्वाभिमान दिसतो. माझ्या पैशानी औषधं आणायची.. बस्स! इतरांचं काही देणं नको.. हीच भावना.
या बाईचं मला आश्चर्य वाटतं.. काहीही होऊदे... पण तिचं कुत्र, तिची मांजरं.. आणि तिची बाग... या बद्दलचा तिचा अभिमान हा सतत असतो बोलण्यातून. दुसरा विषय म्हणून नाही.
या आजीची एक लकब आहे. ती खुर्चित बसली ना तरी डाविकडे उजवीकडे अशी डुलत असते. बहुदा तिच्या उतरत्या वयामुळे होत असावं.. जशी डॉ. श्रीराम लागूंची मान हलते तशी आजी खांद्याच्या रेषेत डुलत असते.
"बरं.. मी यू का आता?" आजी
" का हो बसा ना.." मी
" नगं.. राधा आणि सखी ( मांजरी आणि तिचं ते पिलू) येतील हितं हुडकत.. जातो आता" आजी. खरंच बरं का मंडळी, एकदा हि राधा आणि सखी आल्या होत्या आजीच्या मागोमग आणि आजी उठेपर्यंत कंपाऊंड वॉलवर बसून होत्या.
आजी उठते तिच्या त्या विटक्या, तळ झिजलेल्या स्लिपर्स चढवते, काठी घेते आणि निघते. मी उठून आत येते आणि जवळ जवळ १० मिनिटांनी फाटकाचा आवाज होतो.. आजी आता कुठे गेटच्या बाहेर पडलेली असते हळूहळू तिच्या चालीने..
दुसरे दिवशी पुन्हा चिरक्या आवाजात हाक ऐकू येते.. "वयनी.. हैसा काय??"

- प्राजु

जातीधर्माविषयक लेखन - मिपाचे धोरण!

मिसळपाव डॉट कॉम (मिपा) या संकेतस्थळावर जात, पात, पंथ, धर्म या विषयाबाबत लेखन करण्यास/चर्चा करण्यास मिपा व्यवस्थापन आजपासून पूर्णपणे बंदी घालत आहे.

या चर्चांमधून काहीही निष्पन्न होत नाही, उलटपक्षी अशा लेखनातून/चर्चांमधून बर्‍याचदा सभासदांमध्ये एकमेकांच्या जातीधर्मावर आणि पर्यायाने एकमेकांवर वैयक्तिक पातळीवर उतरून चिखलफेक केली जाते. आणि त्यामुळे या संकेतस्थळाची शांतता भंग पावते असे मिपा व्यवस्थापनाला वाटते!

बर्‍याच सभासदांच्या तक्रारींवरून मिपा व्यवस्थापनाने हा निर्णय घेतलेला आहे.

मिपाच्या व्यवस्थापनाला सर्व जाती, घर्म, उपजाती, पोटजाती, व पंथांबद्दल आदर आहे!

तरी कृपया या पुढे कुणीही येथे या संदर्भात लेखन/चर्चा करू नये अशी मिपाच्या सर्व सन्माननीय सभासदांना कळकळीची विनंती. असे लेखन येथे आढळल्यास ते येथून काढून टाकले जाईल याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी!

सदर बंदी हा मिपाच्या धोरणाचा एक भाग समजावा व सर्वांनी सहकार्य करावे, ही विनंती!

-- जनरल डायर.

अणु करार भारतास अनुकुल की घातक ?

अणु करार भारतास अनुकुल की घातक?

आज काल आपण सर्वजण वरील विषयावर काही ना काही वाचतो किंवा एकतो आहे.
तर मित्रांनो चला तर आपण आपले मत ह्या विषयावर मांडु या जेणे करुन आपल्या सर्वांच्या माहीति मध्ये भर पडण्यास मदत होईल.

मि मा. तात्यांनाही विनंती करतो कि त्यांनी ही आपले अमुल्य मत मांडावे.

धन्यवाद.

देश हिताचा विचार करणारा (गमत्या)

काय करु

8> मला एक मुलगा आहे
आणी माझी अशी इच्छा आहे कि मी एक मुलगी अडॉपट करवी
क्रुपया मला सल्ला द्यावा

अपत्य दत्तक योजना : (अति)कच्चा आरंभिक आराखडा

ऋणनिर्देशः तात्या अभ्यंकर,विकास यांच्यातील संकेतस्थळाचे उपयोग याविषयीच्या चर्चेनंतर आणि तेथे दिलेल्या माझ्या प्रतिसादातील प्रस्तावित दोन योजनांपैकी अपत्य दत्तक योजनेचा (अति)कच्चा आरंभिक आराखडा येथे टंकित करत आहे. अशा विधायक कार्यासंबंधीची मूळ कल्पना पुढे आणल्याबदल तात्या आणि विकासरावांचे मनःपूर्वक आभार व हार्दिक अभिनंदन. तसेच या योजनेत सहभागी होण्याबद्दल स्वारस्य दाखवल्याबद्दल आणि सतत पाठपुरावा करून हा मुद्दा आज येथे टंकित स्वरूपात आणल्याबद्दल इनोबा व ऋषिकेश यांचे अनेक आभार.

अपत्य दत्तक योजना


योजनेचे उद्दिष्ट -

  1. सध्या अनाथालयांमध्ये वाढत असलेल्या अधिकधिक मुलांना पालक मिळवून देणे,त्यायोगे त्यांची सामाजिक व शैक्षणिक वाढ,भावनिक स्थिरता आणि कौटुंबिक अनुभव,त्यांचे न्यूनगंडनिवारण
  2. येनकेनप्रकारेण स्वापत्यसुखापासून वंचित राहिलेल्या,कुटुंब नियोजनासाठी तयारी करीत असलेल्या किंवा उत्सुक असलेल्या दांपत्यांस अपत्यसुखाचा आजीवन अनुभव मिळवून देणे

मिपाकरांचे जे कट्टे वेळोवेळी भरतात,तेथे होणार्‍या मौजमजेबरोबरच त्या वेळेचा आणि सदस्यांच्या उपस्थितीचा विधायक,समाजोपयोगी कार्यासाठी उपयोग झाल्यास उत्तम या मूळ कल्पनेतून मी ही योजना जन्माला घातली.असे कार्य करण्यासाठीची ही एकमेव योजना नसून एक पर्याय व एक सुरुवात आहे,असे समजूया.

योजना कशी राबवावी,याबाबतच्या काही कल्पना पुढीलप्रमाणे -

  1. यापुढील मिपा कट्ट्याच्या वेळी अपत्य दत्तक देणार्‍या सामाजिक संस्था,स्थानिक अनाथालये यांचे संचालक,संबंधित पदाधिकारी किंवा कार्यकर्ते यांचे आटोपशीर माहितीपर व्याख्यान कट्ट्याचा अधिकृत कार्यक्रम म्हणून समाविष्ट केले जावे.
  2. अशा व्याख्यानात दत्तक दिलेघेतले जाण्यामागची सामाजिक गरज,दत्तक प्रक्रिया,आर्थिक बाजू,कायदेशीर बाबी यांबाबत समुपदेशन व्हावे.
  3. ही माहिती संग्रहित स्वरूपात रचून मिपावर संदर्भासाठी प्रसिद्ध केली जावी. मिपाच्या सदस्यांनी या माहितीचा मौखिक प्रसार करावा.
  4. विवाहोत्सुक उपवर तरुण-तरुणी तसेच नवविवाहित जोडपी आणि मूल दत्तक घेण्यास उत्सुक असणार्‍या जोडप्यांस या योजनेबद्दल माहिती द्यावी.संग्रहित माहिती त्यांच्यापर्यंत पोचेल,हे पहावे.
  5. स्वतः मूल दत्तक घेतलेल्या दांपत्यास भेटून त्यांचे मूल दत्तक घेतानाचे अनुभव,मुलाचे पालनपोषण - खाणेपिणे,दैनंदिन व्यवहार,शिक्षण,मौजमजा इ. - करतानाचे अनुभव म्हणजे आलेल्या अडचणी,त्यांच्या निवारणासाठी त्यांनी अनुसरलेले मार्ग इ. बाबत मुलाखतवजा कार्यक्रम कट्ट्याच्या वेळी करता येईल.त्यातून मिळालेल्या माहितीचा प्रसार वर सांगितल्याप्रमाणे करता येईल.

मी स्वतः सद्यस्थितीत या योजनेसाठी काय करू शकतो -

  1. जमेल तितक्या माहितीचा संग्रह आणि पुरवठा
  2. संबंधित संस्था व पदाधिकारी,कार्यकर्ते यांचे संपर्क पत्ते पुरविणे;गरज पडल्यास त्यांच्याशी स्वतः थेट संपर्क साधणे
  3. जी दांपत्ये दत्तकप्रक्रियेतून गेली आहेत,त्यांना त्यांचे अनुभव सांगण्यासाठी व माहिती देण्यासाठी आमंत्रित करणे - त्यांचे संपर्क पत्ते पुरविणे
  4. शक्य ती/शक्य तेवढी आर्थिक मदत
  5. या (अति)कच्च्या मसुद्यात वेळोवेळी,गरज पडेल तशी सुधारणा आणि तो राबवण्याबद्दलच्या अधिकाधिक उपयुक्त कल्पना व त्यांची अंमलबजावणी

या दृष्टीने पहिले पाऊल म्हणून मुंबईतील एका संस्थेचा व तिच्या संबंधित कार्यकर्त्याचा/पदाधिकार्‍याचा पत्ता येथे देत आहे -
वात्सल्य ट्रस्ट,मुंबई
प्लॉट क्र. १२८५,कांजुरमार्ग पोलीस स्थानकाजवळ
कांजुरमार्ग(पूर्व),मुंबई ४०००४२
फोन.: +९१ २२ २५७८ २९५८
+९१ २२ २५७९ ४७९८
संपर्कः श्री. ए. जी. दामले

श्री.दामलेंचा खाजगी संपर्क पत्ता - जसे त्यांचा भ्रमणध्वनी क्र.,विरोप पत्ता मिळवून येथे द्यायचा प्रयत्न यथावकाश करेनच.

या संस्थेतून दत्तक घेतले गेलेल्या एका मुलीला मी स्वतःच्या अंगाखांद्यावर खेळवले आहे.त्यामुळे दत्तक घेतले गेल्यानंतर अशी मुले,पालक,त्यांच्यातले रुजू लागलेले नाते,येणार्‍या समस्या इ. बद्दल स्वानुभव आहे.त्यावरून हा प्रकल्प अधिक यशस्वी करण्यासाठी काय काय करावे लागेल,याचा अंदाज येतो आहे आणि त्यासंबंधी प्रकल्पाच्या माध्यमातून काय करता येईल,याचाही विचार चालू आहे. माझी स्वतःची मावसमावसबहीण या क्षेत्रात स्वयंसेवा करते व ती या संस्थेशी संबंधित आहे.तिचा संपर्क पत्ता दुर्दैवाने सध्या माझ्याकडे नसला तरी यथावकाश तोही मिळवायचा प्रयत्न करीन,जेणेकरून जमेल तसे तिच्याशी एखाद्या कट्ट्यादरम्यान किंवा इतरही वेळी शक्य असेल तेव्हा बोलता येईल.

ऋषिकेश यांनी पुण्यातील 'अपना घर' या अशाच एका संस्थेबद्दल माझ्याशी बोलणी केली होती.तसेच लहान मुलांची दत्तकप्रक्रिया तुलनेने सुलभ असते;पण कळू लागलेल्या वयातील मुले दत्तक दिलीघेतली जाण्यात प्रामुख्याने काठिण्य असते,असे सांगितले होते.ऋषिकेश,तुम्ही व इनोबांनी मिळून अपना घर बद्दल अधिक माहिती,संपर्क मिळवल्यास व तिच्याशी संबंधित पदधिकारी व कार्यकर्त्यांचे वर नमूद केल्याप्रमाणे आटोपशीर व्याख्यान एखाद्या कट्ट्यादरम्यान किंवा इतर वेळी अनौपचारीकपणे आयोजित केल्यास मदत होऊ शकेल.

हा मसुदा परिपूर्ण तसेच अंतिम नाही,याची नम्र जाणीव आहे.तेव्हा त्यात मोलाची भर घालण्यासाठी व सूचना आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कोणत्याही मदतीतून मिपाच्या सौजन्यातून हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी,प्रोत्साहन व मार्गदर्शनासाठी सर्व मिपाकरांचे स्वागतच आहे.

धन्यवाद.

(उपक्रमी)बेसनलाडू

वाचा वादग्रस्त अणुकराराचा मसुदा

वाचा वादग्रस्त अणुकराराचा मसुदा

http://images.photogallery.indiatimes.com/photo.cms?msid=3217937

हा करार देशासाठी महत्वाचा आहे. आपले मत सुद्धा आपण द्याल तर बर होइल.

मी पण आताच वाचायला सुरवात करतो आहे.

अणुकराराचे योग्य 'मार्केटिंग' झाले नाही: http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3216577.cms
अणुकराराच्या कच्च्या मसुद्याची भाषा संदिग्ध: http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3219281.cms
अणुकराराला दाखवा केराची टोपली: http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3224969.cms

सकाळः
देशाला फसविणारे सरकार पडायलाच हवे: http://esakal.com/esakal/07122008/SpecialnewsBFF8958BA2.htm

सारांश

असा आहे आयएइएला पाठवलेला कच्चा मसुदा: http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3216859.cms

"मिसळ"णारी कोण कोण??? - इस्ट कोस्ट मध्ये??

नमस्कार मंडळी,
आता जरा उन्हाळा मस्त चालू झाला आहेच इथे... तर आपणही जबरदस्त मिसळकट्टा भरवू. काय म्हणता?? इस्ट कोस्ट ला कोण कोण आहे?? छोट्या डॉनची बहीण शोभाव्या अशा वरदाबाई कट्टा भरवायचं पिल्लू सोडून आता स्वतःच 'जमणे अवघड आहे असे सांगताहेत." तेव्हा आता ही जबाबदारी आपण सगळे मिळून घेऊ.. कसं?? इस्ट कोस्ट ला मी, शितल, संदीप चित्रे, चतुरंग.. आणखी कोण कोण आहे?? केव्हा जमूया, कुठे जमूया?? कोणाच्या घरी की एखाद्या बीच वरच जमायचं?? इस्ट कोस्ट वाले तुम्हाला काय वाटतं? सगळ्यांचं मत घेऊन निर्णय घेऊ? घरी जमायचं असेल तर सगळ्यांसाठी कोल्हापूरी मिसळ मी करण्याची जबाबदारी घेते?? काय गं शितल.. तू करशील ना मदत?

- प्राजु

तुमचं मत काय?

नमस्कार मित्रांनो,

आपण सगळे रोज मिसळपाव वर येते असतो आणि आता मिसळपाव व त्यावरील मंडळींना आपल्या भावविश्वात एक वेगळे स्थान प्राप्त झालेले आहे असं मला वाटतं. रोज येथे यायंच, वाचायचं, मैत्री करायची.. कधी कधी कुणालातरी चावायचं... असं काही तरी करण्यासाठी आपण रोज मिसळपाव वर येत असतो.

खरं तर येथे म्हणजे मिसळपाव वर अनेक लोक असे आहेत की जे इतर कुठल्याही मराठी संकेतस्थळावर या आधी सदस्य नव्हते. तर काही लोक मात्र इतर संकेतस्थळावर खुप पुर्वीपासून वावरत आहेत. खूप वर्षांपासून ही जूणी मंडळी इतर कुठल्याही संकेतस्थळावर वावरत असली तर त्यांच्या भावविश्वात त्या संकेतस्थळाबद्दल आदर असने किंवा ममत्व असने साहजिकच आहे. यात कुणालाच काही अडचण असण्याचे कारण नाही.

मात्र मिसळपाववर वारंवार इतर कुठल्यातरी संकेतस्थळाचा कायम बरा किंवा वाईट उल्लेख करणे हे कितपत योग्य आहे? या जुण्या लोकांच्या प्रत्येक चर्चेत तोच एक कायम संदर्भ असेल तर 'हे जरा अतीच होतंय' असं नाही वाटत?

आम्ही नव्याने मिपाकर बनलेल्या लोकांना ह्या अर्धवट संदर्भांचा माग घेण्यासाठी इतरत्र जावे लागते, शोधा शोध करावे लागते आणि शेवटी हातात काय येतं तर " अरे हे दोघे या आधीही भांडलेली आहेत की !" असा काहीसा संदर्भ.

मराठीत खुप कमीच संकेतस्थळे आहेत. त्यामुळे त्यांचा संदर्भ येणे साहजिक आहे. मात्र आलेला संदर्भ किमान काही वेळा तरी निकोप असावा...! आणि आला तरी ह्याचर्चेत येथे मिसळपाववर काहीच संदर्भ नाही असा नसावा, असं वाटतं.

खरंच मिसळपाववर अश्या अन्य कुठल्याही संकेतस्थळाचा बरा किंवा वाईट संदर्भ जवळपास प्रत्येकच चर्चेत देणे योग्य आहे का?

ह्यामुळे नव्या सदस्यांना त्रास होत नाही का?

जुणी मंडळी थोर आहेत हे मान्य. म्हणून नव्यांनी कायम त्यांच्याचर्चा वाचत त्यांची वाटचाल शोधत रहावे अशी अपेक्षा आहे काय?

तुमचं मत काय?

नीलकांत