मुक्तक

दुसरी संधी

परवा रात्री पडल्यापडल्या झोपायच्या काही क्षण आधी सरलेल्या वर्षांचा आढावा मनात नकळत घेतला जात होता. सतत बदलत असणार्‍या आपल्या आयुष्यातल्या चढउताराकडे पाहताना प्रश्न पडत होता : बापरे , तोच का मी हा ? हेही झाले आपल्याबाबतीत , नाही का ? "कहां कहां से गुजर गये" या सारखे विचार येत होते. सर्वच गोष्टी काही काळवंडून टाकणार्‍या नव्हत्या. काही आनंदाचे क्षण होते , काही चिमूटभर यशाचे , काही रोमांचक प्रसंगही.

झोप लागता लागता एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवली : "लाईफ इज ऑल अबाऊट सेकंड चान्सेस" - अर्थात "दुसर्‍यांदा मिळणारी संधी हाच तुमच्या आमच्या आयुष्याचा स्थायिभाव आहे". "दुसरी संधी' हा प्रकार नसता तर आयुष्य वैराण झाले असते , खुंटलेच असते म्हणाना !

कॉलेजच्या एका महत्त्वाच्या परीक्षेमधे नेमके असे आणि इतके गुण मिळाले की ज्यामुळे , एका महत्त्वाच्या ठिकाणाचा प्रवेश शून्य मार्कांनी हुकला. होय, १ नव्हे , तर शून्य ! त्याचे झाले असे की, वेटींग लिस्टवरच्या दुसर्‍या मुलाला माझ्याइतकेच गुण होते आणि नेमके मला काही "अवांतर" विषयामधे कमी गुण असल्याने प्रवेश त्याला मिळाला ! त्या प्रसंगी आपल्या भविष्याबद्दल आलेली डोळ्यासमोरची अंधेरी आठवते. आणि आठवते त्यानंतरचे वर्षही, जेव्हा परत खूप अभ्यास करून , त्याच परीक्षेला बसून , पूर्वीपेक्षा खूप जास्त गुण मिळवून, प्रवेश मिळवला. परीक्षा द्यायची "दुसरी संधी" नसती तर ?

अशी आणखीही उदाहरणे आहेत. जी ए कुलकर्णींनी लिहिलेल्या एका दंतकथेमधल्या साम्राज्याचे घोषवाक्य असते : "पडेन , पण पडून रहाणार नाही !"

थोडक्यात , बर्‍याचदा आयुष्य आपल्याला रस्ते , दरवाजे बंद करते. पण तेच आयुष्य दुसर्‍यांदा प्रयत्न करायलाही संधी देतेसुद्धा !

दुर्दैवी ते, की ज्याना "सेकंड चान्स" मिळत नाही. "वन स्ट्राईक अँड दे आर आउट ! गॉन फॉरेव्हर ! " आणि करंटे ते की ज्याना दुसरी काय , डझनावारी संधी मिळतात , आणि ते काहीही न करता राहातात.

मित्रमैत्रीणींनो , तुम्हालाही आयुष्याने केव्हातरी पराभूत केले असेल, आणि "दुसरी संधी" मिळवून तुम्ही पुन्हा उठून, पुन्हा प्रयत्न करून त्यावर मात मिळवली असेल. त्याबद्दल जरूर लिहा. माझी खात्री आहे की आपल्या सर्वाना त्याबद्दल वाचायला नक्की आवडेल.

व्योमक्षेमं वहाम्यहम्

'मिपा' च्या वाचकांना 'प्रेमाची गोष्ट' वर लिहिलेले आवडले, म्हणून अजुन एक प्रायोगिक नाटक पाहिले होते, त्यावरचे लिखाण पाठवत आहे.

आमची प्रायोगिक नाटकांची आवड तशी खूप जुनी. अगदी छबिलदास चळवळीपासून. त्यामुळे ,प्रायोगिक नाटक लागले की पाय तिथे आपोआप वळणारच! कधी फजितीही होते, सगळं डोक्यावरुन जातं. मग डोक्याला ताप. ह्याला विचार, त्याला विचार, असं चालतं, आपण इतके निर्बुद्ध कसे असे वाटून स्वतःचाच राग येतो. तरी पुढली वारी काही चुकत नाही. दहा नाटके डोक्यावरुन गेली तरी चालेल, पण एखादंच असं आनंद देऊन जातं की बस! 'अमृता सुभाष' , ही एक अत्यंत हुशार अभिनेत्री! तिचे 'साठेचं काय करायचं ' हे पाहून आम्ही फारच खुष झालो होतो. म्हणून तिचे नांव पाहिल्यावर लगेचच तिकीटे काढली. " छोट्याशा सुट्टीत"!! परत एक बाऊन्सर! मग ठरवलं, आपल्याला जे समजलंय ते लिहून काढायचं. कोणीतरी असेलच की ज्ञानी. तोच करेल निरुपण.
उत्तरा या अल्ट्रामॉडर्न नटीबरोबर कार्तिक हा गरीब बिच्चारा कुक (बोटीवरचा स्वैपाकी) लग्नाशिवायच रहात असतो. तो बोटीवर जेंव्हा काम नसेल तेंव्हा घरी तिची सर्व कामे तसेच चहा, कॉफी वगैरे करत असतो. एकदाच भजी केलेली आठवतात. अबोल व गरीब स्वभावाचा असल्यामुळे उत्तराचा वरचढपणा, स्वच्छंदी वागणे, हिशोबी स्वभाव वगैरे सर्व सहन करत असतो. सायरस हा उत्तराचा बालमित्र अमेरिकेहून येणार असे उत्तराच्या चित्कारण्यावरुन कळते. उत्तरा तिच्या स्टायलीत खूष होते. प्रत्यक्षांत सायरस 'व्योम' ला पण घेऊन येतो. सायरस पारशी असल्यामुळे इंग्रजीतच बोलतो. सायरस आणि उत्तराला काय करु आणि काय नको असे झालेले असते. त्यामुळे ती दोघं 'च्यो च्वीट' असं म्हणून एकमेकांचे सारखे गालगुच्चे घेत असतात. कार्तिक हा लग्नाचा नवरा नसल्यामुळे त्याच्या उपस्थितीतच सगळी मजा मजा चालू असते. पहिल्या भेटीचा जोष उतरल्यानंतर सायरस अचानक मी व्योमशी लग्न करणार आहे असे सांगून उपस्थित मॉडर्न लोकांना धक्का देतो, उत्तराला तर चक्क ठसका लागतो! पण क्षणार्धात सावरुन (आपण मॉडर्न असल्याचे आठवताच) सर्वजण त्या गोssड (प्रेक्षकांच्या मते नव्हे) झिपर्‍या व्योमचे लाड करु लागतात. व्योम नुसताच लाजत असतो तर सायरसची स्थिती तर "औषध व्योम 'गे' मजला" अशी झालेली असते. नाटकाच्याच संबंधात आहे म्हणून सांगतो, लहानपणी ' तो शंकर तुम्हा सुखकर होवो' ही नांदी ऐकल्यावर आम्हाला अशीच भलती शंका आली होती, पण आजोबांना विचारण्याची हिंमत नव्हती.
अचानक उत्तरा आणि सायरस गांवाला जायचे ठरवतात. उत्तरा ही स्त्रीच असल्यामुळे व्योम निर्धास्त असावा. पण तरी तो 'बोअर' व्हायला लागतो. घरांत फक्त कार्तिकच! मग काय करणार ? तो कार्तिकशी गप्पा मारु लागतो. कार्तिकही त्याची आस्थेने चौकशी करतो. नाटक संपेपर्यंत या दोन जोड्यांमधे किती परम्युटेशन्स-कॉंबिनेशन्स होऊ शकतील याचा मी मनातल्या मनात आढावा घेतला. पण बहुतेक कार्तिक व्योमकडे केवळ पितृप्रेमानेच बघत असावा असे पुढील संभाषणावरुन वाटले.
उत्तरा व सायरस परत येतात. पण दोघांच्या दारु पार्ट्या व पिऊन आऊट होणे यामुळे कार्तिक व व्योम समदु:खी होतात. उत्तरा ही जरुरीपेक्षा जास्तच उन्मादात वावरत असते. सायरस व्योमशी भांडायला लागतो. प्रेक्षकांना फार टेन्शन येऊ नये म्हणून मधेमधे उत्तराच्या विनोदी मुलाखती होतात. उत्तरा स्त्रीमुक्ती व व्यवहार यांचा तोल चांगलाच सांभाळत असते. तिला एक मोलकरणीचा रोल मिळालेला असतो हे कळते पण त्याची प्रॅक्टिस ती नाटक चालू असतानाच मधेमधे का करत असते ते शेवटपर्यंत कळले नाही.
एकंदरीत नाटककाराला काय संदेश द्यायचा असेल ? सुखी होण्याचे रुढ मार्ग टाळून आडवाटेला गेलेली ही मंडळी परत मुख्य प्रवाहात येऊ पहात असतात का ? की कार्तिकच्या म्हणण्याप्रमाणे जीवन हे आपण समजतो त्यापेक्षा वेगळंच असतं आणि ते प्रत्येकाने आपल्या अनुभवातून शोधायचं असतं ? का ही येणार्‍या युगाची चाहूल आहे ?
आमच्यासारख्या मतिमंद प्रेक्षकांच्या आवाक्याबाहेरचं आहे हे सगळं.

एक स्वप्न प्रवास.(२)

या पूर्वीचा दुवा http://misalpav.com/node/1699
प्रिय ऍन
मागचा अनुभव जमेस धरुन यावेळी समुद्र मार्गेच् प्रवास करावा असे ठरवले.
जरा लवकरच् संध्याकाळी झोपलो. "अर्धविझल्या उदबत्त्या . रक्त गाभुळली वटवाघळे आणि उप्पीटम" हे पुस्तक सोबत होतेच्. औषधाच्या दुकानातुन प्रिस्क्रिशनवर खप होणारे हे एकमेव बिगर वैद्यकिय पुस्तक. बहुतेक डॉक्टर हे पुस्तक रोग्याना भूल देण्यासाठी चांगले भूलक( ट्रन्क्विलायझर)म्हणुन वापरतात. मला ते माझ्या सहकार्यांकडुन वाढदिवस नसतानाही वाढदिवसाची सप्रेम भेट् असे स्केचपेनने लिहुन दिले गेले होते. "त्यामुळे निदान थोडावेळ का होइना हा खवीस प्रोजेक्ट मॅनेजर सारखा छळणार नाही." हे वाक्य मात्र पेन्सिलीने लिहुन खोडले होते..
असो. काय म्हणत होतो मी .हां संध्याकाळी जरा लवकरच् झोपलो . "अर्धविझल्या उदबत्त्या . रक्त गाभुळली वटवाघळे आणि उप्पीटम" पुस्तकाच्या पहिल्या पानावरच्या तिस-या ओळीतच् मी गारद झालो आणि गाढ झोपलो.
हवाई प्रवासाचा मागचा अनुभव गाठीशी होता. शिवाय हल्ली विमानाने प्रवास ही एक अनिश्चीत् गोष्ट झाली आहे.विमानतळावर जाताना रस्त्यात ट्रॆफ़िक ज्याम असते आणि विमान तळावर ही ट्रॆफ़िक ज्याम असते.
मी ऐकले की हल्ली या ट्रॆफ़िक ज्याम मुळे लोक मुम्बई विमानतळावर हवेतच् ऑफ़िसच्या मिटींग्स् घेतात.मागे एकदाकुठल्याशा कम्पनीने भागधराकांची वार्षीक सभा ही अशीच् हवेत घेतली होती अशी एक् बातमी सबसे तेज वाहीनी ने दिली होती. वेगवेगळ्या देशांत काम करणारे अधिकारी एका विमानातच चक्क त्यांची विमाने ; पंखावरुन चालुन जाउन ओलांडुन एकत्र आले होते. खरे खोटे कोण जाणे.पण सबसे तेज बातमी होती त्या दिवशी मुम्बई विमानतळावर ट्रॆफ़िक होताच एवढा ज्याम.जिकडे तिकडे विमानेच् विमाने होती. जमिनीवर हवेत विमानेच् विमाने होती. इन्डीगो , गो एअर वेज आणि स्पाईस जेट या तीन विमान कम्पन्यानी हवेत विमाने हवेत पंख एकमेकाना जोडुन पंखावरुन प्रवाशाना चालत हवेतच इतर विमानात जाता येईल अशी सेवा देउ केली.अशा रीतीने जर्मनी जपान आणि अमेरिका येथील अधिकारी भारतातल्या अधिकार्‍याना भेटले.मिटींग्स् घेतल्या. चर्चा केल्या आणि विमानांच्या पंखावरुन पुन्हा एकदा चालत जाउन स्वत:चे विमान गाठले.
भारतातेली बहुराष्त्ट्रिय कंपनी टाटा बेन्झ् च्या सहकार्याने अतीमहत्वाच्या अधिकार्‍यांसाठी एक पंखाची जोडी आणि हवाई छत्री विकसीत करण्यच्या विचारात आहे असेही ऐकावात आहे.
असो तर काय म्हणत होतो मी. हां थंड हवेत कुडकुडत पंखावरुन चालण्याची कोणतीही जोखीम मी घेणार नव्हतो.मी समुद्र मार्गे जायचे ठरवले.
खवळलेल्या समुद्रातुन आगबोटीने प्रवास करणे हे ही काही कमी जोखमीचे नसते. म्हणुन मी सरळ पाणबुडीचे तिकीट बूक केले.
पाणबुडी गेट वे ऒफ़ इंडीया पासुन निघणार होणार होती.पाणबुडी थोड्या खोल पाण्यात उभी केली होती. आम्हाला पाणबूडी पर्यन्त् पोहुन जावे लागेल असे सांगण्यात आले.
काही उत्साही विरानी तेथे जाण्यासाठी अक्कल चालवुन एक नवी शक्कल शोधुन काढली. त्यानी त्यांच्या ब्यागा पाण्यावर टाकल्या आणि ब्यागांवर बसुन तरंगतच ते तेथे पोहोचले खरे .पण पाणबूडी समुद्रतळावर उभी होती. पाण्यावरुन ती दिसत नव्हती.
जहाज कम्पनीने त्या लोकाना पाण्यात बुडण्यासाठी मदत केली.मी पाणबूडी उभी होती तेथे गेलो.पाणबूडीत बसलो. सगळ्या सीट भरल्या होत्या. मला खीडकी जवळची जागा मिळाली. सगळे लोक व्यस्थीत बसले हे पाहिल्यावर पायलट ने पाणबूडी सुरु केली. एक छोटासा धक्का बसला आणि पाणबोडीने वेग घेतला.
ती आता मुम्बै कोचीन दक्शिण श्रीलंका कलकत्ता म्यानमार, जावा( खुर्द आणि बुद्रुक) सुमात्रा मार्गे मलशिया ला जाणार होती.
पाणबुडी आता ताशी ४० समुद्री मैल अशा स्थिर वेगाने जात होती.भोवतलचे पाणी स्थिर होते. आणि आसपास समुद्रात झाडी दाट होती..अनेक प्रकारच्या पाणवनस्पती आणि मासे दिसत होते.देवमासे, ऒक्टोपस वगैरे येताना जाताना दिसत होते.पायलट नकशा बरहुकुम चालला होता. रस्त्यात दिशा/ अंतर दर्शक् खुणा होत्या त्यामुळे आम्हाला अंतर कळत होते. अचानक एक जोरदार धक्का बसला. माझ्या हातातली कॊफ़ी ;कप हेंदकळल्यामुळे शर्टावर सांडली. समुद्रात एक मोठा खड्डा होता. खड्डा कसला दरीच म्हणाना.. पाणबुडी त्यावर तरंगायला हवी होती पण बसलेल्या जोरदार धक्क्याने पाणबूडीचे एक इन्जीन बिघडले.सर्वानाच काळजी वाटु लागली.
पायलट ने दुसरे इन्जीन चालु करायाचा बराच प्रयत्न केला.पण ते शांतच राहीले. आता पाणबुडी केवळ एकाच इन्जीनावर धावत होती.
आम्ही कोठेतरी म्यानम्यारच्या आसपास असु. पाणबूडी आता खोल पाण्यात होती.आम्हाला स्पॆनिश पद्धतीचे जेवण देण्यात आले. चिज पिझ्झा,आणि डेझर्ट्स्.
खिडकी बाहेर ची दुनिया आता बदलली होती. पिर्‍हाना, छोटे शार्क समुद्री, कासवे अवती भोवती दिसत होते.तुमच्या डोक्यावरुन मासे पोहोताना पाहणे हा अनुभव काही वेगळाच असतो.
पाणबूडी आनखी काही वेळ अशीच जात राहीली.काहीतरी कारण झाले आणि दुसरे इन्जीनही बंद पडले.पाणबूडी थोडावेळ तशीच पुढे जात राहीली आणि थोड्या वेलानन्तर तीची गती पूर्ण थांबली.
पायलट् ने इन्जीन दुरुस्तीसाठी खोलले. एव्हाना पाणबूडी पुढे जायची थांबली आणि ती आता पुढे जाण्याऐवजी खाली खाली जाउ लागली.समुद्रतळावर जाउन ती स्थिरावाली.
सगळ्यांनाच खूप काळजी वाटु लागली थोडे खाट खूट् करुन झाल्यावर पायलट ने कोणी चांगला मेक्यानीक आहे का इथे अशी विचारणा केली.
आमच्यात आय सर्जन , हार्ट सर्जन , ओरॆकल सर्टीफ़ाईड प्रोफ़ेशनल , एस् ए पी सर्टीफ़ाईड, जावा प्रोफ़ेशनल्स्, नेटवर्क ऎडमिनिस्टर असे बरेच सगळे होते पण कोणीही साधा मेकॆनीक नव्हता.गाडीत पेट्रोलकुठे भरायचे याउपर कोणाचा इन्जीनाशी दूरान्वये ही संबंध आला नव्हता. पत्येक जण उपाय सांगत होता. ऒइल पहा , \टेप डेक बिघडला असेल, टायर पंचर असेल, बंद करुन पुन्हा चालु करा अशा अनेक सूचना येत होत्या. खरेतर पाणबूडीत "खिडक्या" ही ऒपरटींग सीस्टीम बसवल्यापासुन असेच् व्हायचे. ती कधीही बंद पडायची. कोणीतरी खाली उतरुन पाणबूडीला धक्का मारुया आणि पायलट त्या धक्क्यावर पाणबूडी स्टार्ट् करेल अशीही एक सूचना पुढे आली.बस असती तर ही सूचन योग्य होती पण पाणबूडी साठी अयोग्य होती.
काहीनी दुसरे वाहन बोलावुन आपली पाणबूडी त्याने ओढुन न्यावी अशी सूचना केली. पण आसपास समुद्रात कोणतेच वाहन बोट दिसेना.....
मी माझी केबिन ब्याग उघडली. प्रवासत काहीतरी चाळा असावा म्हणुन घेतलेल्या बबल गम च्या पाकिटावर माझी नजर पडली. एक कल्पना सुचली.
प्रत्येकाने बबलगम चे फ़ुगे करावेत मी सूचना केली.भडकमकर क्लासेस च्या विद्यार्थ्यानी बबल कसे फ़ुगवावे असे शॊर्ट् कोर्स तेथेच् सुरु केले. लोकाना बबल गमचे फ़ुगे कसे करावे ते शिकवले..
प्रत्येकाने माझ्या सूचनेवर विश्वास ठेउन बबलगम चे फ़ुगे फ़ुगवायला सुरुवात केली. साधारण ३०० फ़ुगे झाले. लोक थकले . गाल दुखताहेत अशी तक्रार करु लागले.त्यावर एकाने सदाशिव पेठेत " येथे गाल दाबुन मिळतील" अशी पाटी पाहिल्याचे सांगितले. लोकानी बबलगम चे फ़ुगे फ़ुगवणे चालुच ठेवले. ३५० वा फ़ुगा फ़ुगवला गेला आणि पाणबूडी जराशी हलली. ४००व्या फ़ुग्यानन्तर आता वरवर येऊ लागली. फ़ुगे फ़ुगवणे चालुच् ठेवले.पाणबूडी आता पूर्ण समुद्रसपाटीवर तरंगु लागली. एक भलेमोठे व्यापारी जहाज आमच्याच दिशेने येत होते.आम्ही त्याच्या मार्गात होतो.व्यापारी जहाजाने आम्हाला इशारा देण्यासाठी भोंगा वाजवला.जहाज जवळ येत चालले .भोंग्याचा आवज जवळ येउ लागला......पों...........पों....... पों.........

.पों...........पों....... पों...पों...........पों....... पों..पीप् पीप् क्रॆम्....ढिं..ठाण.ट्रीट् ट्रीट् बिल्डींसमोरचा रस्ता ट्रॆफ़िक तुम्बला होता. रिक्शा ट्रक टेम्पो बस बैल गाड्या जीप. बहुतेक सगल्या प्रकारच्या गाड्या त्यात होत्या.प्रयेक् वाहन पूर्ण ताकदीनिशी हॊर्न वाजवत होते.त्या गोंगाटाने मी खडबडुन जागा झालो.........
पुढच्या वेळेस् तुझ्या स्वप्नात येण्यासाठी मला आता काहीतरी वेगळाच मार्ग वापरायला हवा
बघु. हा तुझ्या स्वप्नात जाण्यासाठीचा प्रवास आज कसा पूर्ण करता येतोय ते.

तुझा मित्र विजुभाऊ व्हिक्टर......

(इथे क्रमश: संपले)........

एक स्वप्न प्रवास.....

एक स्वप्न प्रवास.
प्रिय ऍन
आज सन्ध्याकाळी आपण च्याट वर् बोललो त्याप्रमाणे मला सुद्धा तुला भेटायची उत्सुकता होतीच
स्वप्नात का होईना आपण् दोघे भेटणार हीच एक भन्नाट कल्पना. त्यासाठी मी रात्रीचे जेवण् अंमळ लवकरच् केले.उत्तम शान्त् ज़ोप लागावी यासाठे अंथरुण वगैरे तयारी करुन ठेवली. माझ्या रूम च्या दारावर् " डू नॊट डिस्टर्ब" अशी कागदावर लिहुन पाटीही लावुन ठेवली.तुला भेटायचे म्हणुन एक छान सा टी शर्ट् चढवला आणि तडक बेडवर अंथरुणात गेलो.
डोळे घट्ट मिटुन घेतले. तरी पण् मनात विचारांचे काहुर माजले होते.एकामागोमाग गोळीसारख्या वेगानी येणाया विचारांच्या वाहतुकीने मन खरोखर गजबले होते. हा गजबजाट मी कसाबसा शान्त् केला.
झोप् अजुनही माझ्यापासुन बरीच लांब होती. मी झोपे ला "लौकर् ये आतुरतेने.वाट पहातोय" असा एस् एम् एस् केला. झोपे ने मला लगेच् रीप्लाय केलाकी ती नेहमीच्याच् वेळेत येईल. दाबा करुन तीला माझी विनन्ती मान्य करायला लावली. तीने मला ती येईपर्यन्त् टी व्ही वर सर्वात् रटाळ कार्यक्रम लावुन ठेव म्हणुन सांगितले.मी महागुरु ची मते ऐकत् बसलो.ती चांगली वाटु लागली म्हणुन अवन्तीका मालीका लावली.
झोप् जरा जवळ् आली होती.यावेळेस् तीनेच् मला फ़ोन केला आणि म्हणाली की एकाचा अर्जन्ट् कॊल आला म्हणुन तीला यायला जरा उशीर होईल. झोपेने मला सर्वात् कंटाळवाणे पुस्तक् वाचायला सांगितले.मी "अर्धविझल्या उदबत्त्या . रक्त गाभुळली वटवाघळे आणि उप्पीटम" ही कथा वाचायला घेतली. वाचता वाचता मी झोपी गेलो......
या इतके ताजेतवाने मला यापूर्वी कधीच वाटले नव्हते. तुझ्याकडे येण्यासाठी मी घरातुन बाहेर पडलो. समोरुन येणाया टॆक्सी ला हात केला. आणि विमान तळाकडे निघालो.एअरपोर्ट् कडे वळणार एवढ्यात मला माझा क्लायन्ट् दिसला.तो माझ्याकडेच् निघाला होता..प्रोजेक्ट् मधल्या फ़ायनन्स च्या कोन्फ़िगरेशन् संदर्भात त्याला काही शन्का होत्या.त्या त्वरीत सोडवल्या जाणे महत्वाचे होते .ग्राहक देवो भव असे म्हणत मी त्याचे म्हणणे ऐकुन घ्यायलाच हवे होते. खरे तर त्यासाठी आमचा फ़ायनन्स मोड्युल चा कन्सल्टन्ट् आवश्यक होता.. आम्ही दोघे ही फ़ायनन्स मोड्युल च्या कन्सल्टन्ट् कडे गेलो.त्याला यासाठी कम्पनी ऒडीटर शी बोलायचे होते. त्याने त्वरीत ऒडीटर ला बोलावले. ऒडीटर अगदी बटन दाबल्या प्रमाणे विचार करायाचा अवकाश; ;त्वरीत अवतीर्ण झाला. यावेळी तो नाईट गाउन मधे होता, मी त्याला ओळखलेच नाही. ऑडीटर ही व्यक्ती नाईटगाउन मधे असु शकते . ऑडेटरला हसता येते. हाच एक आश्चर्याचा धक्का होता.
नेहमी प्रमाणे जोरदार चर्चा झाली. प्रत्येकजण् तोच मुद्दा ठासुन वेगवेगळ्या शब्दात सांगत होता.
जेंव्हा प्रत्येकाचे मुद्दे लिहुन झाले तेंव्हा मी ब्यागेत लपवलेली जादुची छडी काढली आणि कागदावरुन फ़िरवली त्यामुळे प्रत्येकाचे मुद्दे आता एकसारखेच दिसु लागले. अशारितीने सर्वांचे एकमत झाले. आणि मीटींग खूपच यशस्वी झाली.
मी आसपास पाहीले. ज्या टेक्सीत मी बसलो होतो ती आता एअरपोर्ट् जवळच ट्रॆफ़िक जाम मधे अडकली होती. मागे पुढे आजुबाजुला कुठेच् हालायला जागा नव्हती.मी ड्रायव्हरला टॆक्सी थेट विमानतळावर घ्यायला सांगितली. टॆक्सी हवेत झेपावली आणि एकदम थेट् विमानतळावर धावपटीवर उतरली.यासाठी टॆक्सीवाल्याने एकही पैसा जास्त मागितला नाही. मी सुखावलो पण थोड्याच वेळात मला माझे क्रेडीट कार्ड् १० डॉलर ने हलके झाल्याचे जाणवले.
प्लॆटफ़ोर्मवर विमान सुटण्याच्या तयरीतच् होते. मी धावत जाउन विमान पकडले.आत जाउन पाहीले तर ते खचाखच भरले होते. उभे रहायला सुद्धा जागा नव्हती.काही जण तर विमानाच्या टपावर पण बसायला तयार होते.पायलट ने मला त्याची सीट देउ केली. मी नको म्हणालो पण आम्ही दोघे अर्धे अर्धे त्या सीट वर बसलो.
विमानाने टेक ऒफ़्फ़् केले. समोर चे दृष्य बदलले.छोटी छोटी घरे , डोंगर मागे पडु लागले. छान् निळे क्शितीज दिसु लागले . वर आकाश् खाली अथांग निळा समुद्र.विमान आता भू मध्य समुद्रावरुन उडत होते. अचानक विमानची गती थांबली कोनीतरी (रेल्वे ची ओढतात तशी) विमानची चेन ओढली होती. एका प्यासेन्जराचा लॆपटॊप् खीडकीतुन खाली समुद्रात पडला होता.
पायलट ने विमान समुद्रसपाटीजवळ खाली आणले.लॆपटॊप् लाटांवर तरंगत् होता. काही छोटे मासे त्यावर एक्सेल वापरुन ३७ चा पाढा पाठ करत बसले होते. लॆपटॊप् विमानात घेतला गेला.पायलट ने विमान पुन्हा उंचावर नेले. आता विमान सरळ पेनांग विमानतळावर उतरले.
मी विमानातुन बाहेर आलो. कस्टम अधिकर्याने मला पासपोर्ट मगितला. या सगळ्या गडबदीत मी पासपोर्ट् विसरलो होतो.
त्या अधिकार्याने मला एका बाजुला उभे राहण्यास सांगितले.माझ्या बरोबर् आणखी दोन जण होते. पण ते मलेशियन विमान प्राधिकरणाचे कर्माचारी होते. मी त्याना सांगुन पाहीले पण् काही उपयोग झाला नाही.उलट त्यानी मला परत जायला सांगितले.
मी माझे तुझ्या स्वप्नात आजच येणे किती गरजचे आहे हे त्याना पटवुन सांगितले.त्यातल्या एकाला माझी दया आली असावी. त्याने मला दहा उठाबशा काढायला सांगितले.आणि सोडुन दिले. बरे झाले त्याने ३९ चा पाढा विचारला नाही मी त्याला तसे विचारले सुद्धा त्यावर् अतो म्हणालाकी तो त्यालाच येत नव्हत.
एअरपोर्ट वर फ़ार न रेंगालता मी बाहेर येउन सरळ् टॆक्सी केली.
तुझ्या घराजवळ उतरलो. दारावर "वेलकम" ची सुन्दर पाटी लावली होती.मी दार ठोठावले .दार म्हणाले "बेल आहे ना? मग दार कशाला वाजवता. मी बेल चे बटण दाबले कर्रर्रर्रर्रर्र-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------कर्रर्रर्रर्रर्र घड्याळात गजर वाजत होता.
त्यानेच मला जाग आली. सकाळचे सहा वाजत होते.
बघु. हा तुझ्या स्वप्नात जाण्यासाठीचा प्रवास आज कसा पूर्ण करता येतोय ते.
तुझा मित्र विजुभाऊ व्हिक्टर......
(क्रमश:)

जहाल नेत्याचे अंतरंग

जहाल नेते भाषणे करुन लोकांची माथी भडकवत असतात. पण त्यांच्या मनांत वेगळेच असते. बाकी कवितेतच वाचा.

समतेचा टिळा
लावून सर्वांशी खेळा
स्वतःला मात्र वगळा ॥
आश्वासने मोहात मिसळा
स्वप्नांचा फुलवा मळा
प्रत्यक्ष मदत मात्र टाळा
नुसताच वाजवा खुळखुळा ॥
शिव्यांनी जाळा
टीकेने डागाळा
स्वतःला मात्र संभाळा ॥
जातपात उगाळा
काढा बाहेर कोथळा
भावनांशी खेळा
वाहू द्या जखम भळभळा ॥
पण काढला जर कोणी गळा
तर म्हणावे बाळा ऽ ऽ
तुझ्यासाठीच सोसतोय या कळा ॥

माझा वधु शोध

मला काहि अनुभव आहे वधु शोध करताना.

१. खुप वेळा रीजेक्त झालो. उन्चि मुळे . माझी उन्ची ६ फूट आहे. मरठि मुलि सर्व साधारण पणे ६.३ च्या असतात.
२. ऐक मुल्गी मीळाली, पण तीला सोमरस प्याय्चि सवय होती. आणी, मी असले काहि पीत नाही. तीला तर लग्ना नन्तर सुद्या मिन्त्रा बरोबर फिरायचे होते.

अजुन बरेच कहि आहे, पण लिहु कि नको शन्का आहे.

अंतर

कितीक हळवे…. कितीक सुंदर
किती शहाणे अपुले अंतर

आत्ताच ह्या गाण्याच्या ओळी ऐकल्या…..अगदी आत पर्यंत भिनत गेल्या. दोघांमधले हे अंतर कितीवेळा असे शहाणे असते….!! कधी हे अंतर अगदी आरपार छेदून जातं तर कधी युगं लोटून जातात पण पार करता येत नाही. कधी हे अंतर ..अंतर वाटतंच नाही. इतकी दोघं एकमेकांच्या जवळ येतात. एकदा ही जवळीक साधली की मात्र बाकीचे फार दूर वाटायला लागतात. कधी एकमेकांच्या जवळ पोचायला सुद्धा कोणी तरी बांधून दिलेल्या पुलाची….सेतूची गरज लागते. कित्येकदा तो बांधून दिलेला पूल मोडकळीस येतो….. त्याला गोंदण-शिंपण करुन नेटका करता करता जीव मेटाकुटीला येतो. सगळी धडपड त्या सेतूच्या डागडुजीसाठी. पण ती डागडुजी करताना ती पलीकडली व्यक्ती कितीतरी दूर निघून गेलेली असते. मग पुन्हा धडपड त्या कशाबशा सावरलेल्या पुलावरुन तोल सांभाळत "त्या"च्याजवळ पोचायची.

कधी हे अंतर हवंहवंसं वाटतं. थोडी दूरिया भी नजदीकिया लाती है असं म्हणतात ना…..! अंतर हे असतंच पण ते किती असावं म्हणजे ते शहाणं म्हणता येईल….! जेव्हा तो अनोळखी असतो तेव्हाचं अंतर….. जेव्हा तो थोडा कळायला लागतो तेव्हाचं अंतर….. जेव्हा तो आपला होतो तेव्हाचं अंतर ……जेव्हा तो कळूनही कळला नाहीये हे जाणवल्यानंतरचं अंतर…. तो जवळ असूनही ते फ़क्त एका कुशीचं जीवघेणं अंतर….. !!

तसं म्हटलं तर आपण सगळे हे अंतरच पार करत असतो. सगळी धडपड ह्या अंतरासाठीच तर असते. वेगवेगळ्या नात्यातल्या अंतरामधले वेगवेगळे पूल सतत बांधत असतो, त्याची डागडुजी करत असतो तर कधी स्वत:च्याच हाताने तो मोडून सुद्धा टाकत असतो. कधी काही पूल तुटत असतात तर कधी नवे सेतू तयार होत असतात. कधी पडझड तर कधी नवी उभारी. पण त्या प्रत्येक पडलेल्या पुलाची एक तरी वीट असतेच जपून ठेवलेली नव्या पुलाच्या उभारणीसाठी. त्या पडझडीतून वाचलेली एक तरी अशी भिंत असतेच तडा न गेलेली. ती कायमच तयार असते नव्या बांधासाठी. कदाचित त्या भिंतीचाच आसरा शोधत असतो एखादा नवा पूल…….!!

कधी एक अंतर पार केल्यावर असं लक्षात येतं की हे अंतर पार करायच्या नादात आपण बाकी अंतरं फ़ारच वाढवलीयेत. फारच ताणल्या गेलेत बाकीच्या पुलांचे दोर……!! तो ताण सैल करायला जावा तर जवळचा असलेला तो दूर जाणार….! कधी हा सगळाच ताण असह्य होतो….!! सगळी अंतरं राखून तोल सांभाळत जाणं प्रत्येकालाच शक्य होत नाही. काही मात्र मज्जेने जो भेटेल त्याला आपल्याशी बांधून ठेवून चालू शकतो…..चक्क गाणी गुणगुणत….! त्यांच्यात कसलंतरी जबरी संमोहन असतं जे सगळ्यांना त्याच्याशी चुंबकासारखं बांधून ठेवतं. मग धडपड सुरु रहाते ती बाकीच्यांची……त्याच्यासोबत चालत रहाण्याची. हे असं जगता यायला हवं….!! म्हणजे पूलही बांधायला नकोत…. त्याची डागडुजीही करायला नको.

अंतर अपुले असे निरंतर
जरा हसावे.. जरा रुसावे
कधी ओलावा कधी दुरावा
शोधत जावे… गवसत जावे

जीए

जी. ए. यांचे 'पिंगळावेळ' व काजळमाया' हे दोन कथासंग्रह मी पहिल्यांदा वाचले तेंव्हा मनांत जे घडले त्यातून हे मुक्तक स्फुरले. त्यासाठी त्यांचे शब्द उसने घ्यावे लागले. त्यानंतर त्यांचे संपूर्ण लेखन वाचण्याची एक ओढच लागली.

जीएंच्या कथा वाचून
माझ्याही मनाचे वेटोळे
उलगडू लागले
सप्तपाताळात पुरलेल्या
इच्छास्वामींच्या कवट्यांचे
आकर्ण हास्य दिसू लागले
वेदनागुहांच्या कट्टर अंधारात
दुःखाचे कंगोरे घासू लागले
दैवाने मिळालेले खुशजीभ
जीवनही अळणी वाटू लागले
सत्याच्या शोधात आपणही एक
यात्रिक व्हावेसे वाटू लागले
पिंगळावेळेच्या वाचनाने
काजळमायेचे डोह खुणावु लागले !!

माणुसकीचा झरा

प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्याला एकदा तरी माणसातच देवाचे रुप दिसते, आणि त्या क्षणा करिता तीच व्यक्ती आपल्यासाठी देव असते. त्या व्यक्तीला आपण कधीच विसरत नाही त्याच्यातील माणुसकीला आपला सलाम असतो. मी येथे माझे दोन अनुभव सा॑गणार आहे.
मी ला॑जा कोर्टात नोकरीला होते , हे गाव अतिशय लहान फारशा काही सुविधा नसलेले, माझा मुलगा २ महिन्याचा असतानाच मला परत ऑफीस जॉइन करावे लागले, तेथे मी, माझा मुलगा आणि त्याला सा॑भाळायला ठेवलेली एक मुलगी असे तीन जण राहत होतो, तो ७ महिन्याचा असेल तेव्हा एकदा तो आजारी पडला त्याला डिहायड्रेशन झाले, सुदैवाने माझी आई व बहिण कोल्हापूरहुन माझ्याकडे त्याच दिवशी दुपारी आल्या होत्या पण मी कोर्टात होते त्यामुळे मला त्या आल्याचे माहित नव्हते, महिन्याचा शेवट असल्यामुळे निकाल पुर्ण करण्याचे काम जोरात होते, स॑ध्याकाळी ८ न॑तर घरी गेल्यावर मला आईने सा॑गितले ह्याला काही पचत नाही आहे, आपण डॉक्टर कडे नेऊ, मग ९ ते ९.३० च्या दरम्यान आम्ही तेथील प्राथमिक आरोग्य के॑द्रात गेले (खाजगी दवाखाना एवढा वेळ उघडे नसत) तेव्हा, तेथील डॉक्टर बाहेर जेवायला गेल्याचे सा॑गितले, तेथे दोन छोटी बालकेही आली त्या॑नाही जण डिहायड्रेशनचा त्रास झालेला, डॉ. रात्री ११.३० वाजता दारु पिऊन नशेत आले, आणि जवळ्च्या दोन गोळ्या दिल्या व बाहेरची औषधे लिहुन दिली, आणि सकाळ पर्यत बरे नाहे वाटले तर रत्नागिरी ला न्या असे सा॑गितले, आता एवढ्या रात्री त्या छोट्याश्या गावात मेडिकलची दुकाने मोजुन २ ते ३ती ही एवढ्या रात्री उघडी असणे मुश्कील, दवाखान्याच्या समोरच पोलीस चौकी आहे, तेथे आम्ही तिघी गेलो, नाइट शिफ्टसाठी दोन पोलीस होते त्या॑ना सर्व हकिगत सा॑गितली, एका पोलीसाने गाडी काढली म्हणाला बसा आपण मेडिकलवाल्याचे घर शोधुन काढु आणि त्या॑ना दुकानत घेऊन जाऊन औषध द्यायला सा॑गु, मुलाची तब्येत नाजुक होत चाललेली, आई व बहिण माझ्या मुलाला घेऊन पोलीक चौकीत बसल्या , रात्रीचे १२.३० ते १ च्या दरम्यान आम्ही मेडिकलवाल्याचे घर शोधत होतो,आजु बाजुला शुकशुकाट फक्त हायवे वरुन येणार्‍या - जाणार्‍या गाड्याचे लाईट्स. शोधत शोधत एका मेडिकल वाल्याचे घर सापडले तर त्याच्या बायकोने सा॑गितले ते घरी नाहीत, मग तीच्या कडुन दुसर्‍या मेडिकलवाल्याचा घरचा पत्ता घेऊन त्याच्या घरी गेलो, त्याला पोलीसा॑नी आणि मी दोघा॑नीही विन॑ती केली तेव्हा मात्र त्याने आमच्या बरोबर येऊन दुकान उघडुन औषध दिले. मग कुठे जीवात जीव आला, मग त्या पोलीस काका॑नी आम्हाला घरा पर्यत सोडले, कारण आम्ही स्मशाना पलिकडे रहात होतो. दुसर्‍या दिवशी सकाळी आम्ही पहिल्या गाडीने कोल्हापुर गाठले. त्या पोलीस काका॑नी मला मद्त केली आणि त्या मेडिकलवाल्यानेही अपरात्री औषध दिल्यामुळेच माझा मुलगा आज मला पहायला मिळ्तो आहे. त्या दोघा॑ची ही मी आयुष्यभर ॠणी आहे.

सारे तुझ्यात आहे.....(७)

रोजचा दिवस काहीतरी नवीन काम घेऊन उजाडत होता. आता पुन्हा एकदा हॉलची चक्कर करायची होती. काय काय कुठे कुठे आहे……..कुठे कुठे ठेवायचं….काय काय सोयी आहेत….काय करवून घ्याव्या लागणार आहेत हे सगळं ठरवायचं होतं. तिथल्या डेकोरेटरशी बोलून सगळं फ़ायनल करायचं होतं. मी आणि अभिजीत दुपारी पोचलो. सगळं नीट बघून पक्कं केलं. तिथल्या लोकांनी सुद्धा फ़ारच उपयुक्त सल्ले दिले. तिकडून आम्ही फुलमंडईत गेलो. मनासारखं ते ही काम झालं. तो हॉलवरच गुच्छ पोचवणार होता.

बाकी बरीचशी बारीक सारीक खरेदी करुन आम्ही हेमंत बर्वेला भेटायल गेलो. कार्यक्रमाबद्दल त्याच्याशी सविस्तर चर्चा केली. कार्यक्रमाचं स्वरुप काय असावं…… कसं असावं…..त्याला त्यासाठी जी काय माहिती हवी होती ती पुरवली. आता मन थोडं शांत झालं होतं. बरीचशी कामं आटोपली होती. शिवाजी पार्कच्या उद्यान गणेशाचं दर्शन घेतलं…. तिथे आमचं मोठं पोस्टर आणि आमंत्रण पत्रिका लावली नंतर आमच्या टिव्ही वाल्या दोस्तांची भेट झाली. ह्यात प्रणेश जाधव होता. ही मुलं शिकता शिकता बरंच काही करतात. त्यांनीच ईटिव्ही वाल्यांशी बोलून आमचं आमंत्रण त्यांच्यापर्यंत पोचवलं. कितीतरी लोकांची आम्हाला मदत झाली. सहारा चॅनेल साठी प्रकाशचा मित्र पांडा आणि त्याची बायको मदतीला आले. झी २४ तास चं काम तुषार शेटे ने केलं. वर्तमान पत्राचं काम श्रीकांतजी आंब्रेंनी अतिशय आपलेपणाने केलं. त्याबद्दल आम्हाला मार्गदर्शन पण केलं. सगळ्यांचाच आपलेपणाचा, मोलाचा आणि प्रेमाचा वाटा होता आमच्या ह्या पूर्ण संकल्पात.

१७ तारीख उजाडली. मी आणि अभिजीतनं चार्ट पेपर्स वर आमच्या अल्बमचा जिवंत प्रवास रेखाटला. सोबत माझ्या काव्यरचना. सगळं सुबक रचून सजवलं. संपूर्ण दुपार त्यातच गेली. ते सगळे फ़ोटो बघताना आम्ही केलेल्या प्रवासातल्या गमती जमती आठवल्या….. मन पुन्हा एकदा ताजंतवानं झालं. आज आम्हाला अजून एक महत्वाचं काम करायचं होतं. आज वैशाली सामंत भेटणार होत्या. पण त्यांची भेट होऊ शकली नाही. पण त्यांचं आमंत्रण आणि सीडी मात्र आम्ही त्यांनी सांगितल्याप्रमाणे बझ-इन मधे पोचवली. तिथे सत्यजीत भेटले. पुन्हा एकदा रेकॉर्डिंगच्या सुखद आठवणींना उजाळा मिळाला. आम्ही खरंच खूप मज्जा केली होती. सत्यजीत आणि सौरभ सुद्धा अगदी मनापासून सगळ्यात सामील होते. त्यांनाही हे काम करण्यात खूप मज्जा आली असं ते बोलले……. खूप छान वाटलं.

तिकडून आम्ही माहिमला गेलो अभिजीत नार्वेकर आणि त्यांच्या पूर्ण गॅंगला आमंत्रण द्यायला. त्यांच्याशी पण घट्ट दोस्ती जमली होती. त्यांच्या नव्या कंपोझिशन्स आणि गप्पा करता करता मस्त वेळ गेला. घड्‍याळाकडे बघितल्यावर मात्र वेळेची जाणीव झाली.

१८ तारीख…..अवी आणि अद्वैत सकाळी ४ वाजता मुंबईत पोचले. त्या लोकांना काय काय सांगू आणि काय नको असं झालं होतं. मी आणि अर्चना प्रचंड एक्साईटेड आणि प्रकाश तितकेच शांतपणे सगळे प्लॅन्स समजावून सांगत होते. दुस-या दिवशी सगळी नागपूरची मंडळी पोचणार होती. माझी लेक अदिती, माझ्या दोघी नणंदा, त्यांचे नवरे, मुलं……. २० ला भाऊ आणि वहिनी. अगदी लग्नघर वाटत होतं अर्चना-प्रकाशचं घर. आम्ही बाकीही सगळी व्यवस्था अगदी चोख ठेवली होती. सकाळच्या नाश्त्यापासून तर रात्रीच्या जेवणापर्यंत, मधलं खाणं……… सगळं आंग्रे बाईंना करायला सांगितलं होतं. त्यामुळे किचन मधे जायची कुणालाच गरज नव्हती. सगळे मिळून फ़क्त मज्जा करायची होती.

१९ ला सगळी मंडळी पोचली……. हास्यकल्लोळात फ़क्त छप्पर उडायचं राहिलं. जेवणं झाल्यावर आम्ही हॉलवर जायला निघालो…. थोडीशी कामं पण बाकी होती. हॉलच्या तयारीवर शेवटला हात फ़िरवला. आमचं बॅनर अगदी दिमाखात झळकत होतं दादर-माटुंगा कल्चरल सेंटरवर. आता खरंच खूप समाधान वाटत होतं.

घरी आल्यावर पुन्हा एकदा चेक लिस्टवर नजर फ़िरवली. सगळ्यांना कामं वाटून दिली. प्रत्येकाला सगळं सामान दाखवून दिलं. रात्री मात्र अजिबात डोळ्याला डोळा लागला नाही.

२० तारीख. The D’Day पटापटा सगळं आटोपलं. नाश्ता, आंघोळी, जेवणं…. दुपारी साडे-तीनला घरातून सगळे निघालो. हॉलवर बरीचशी तयारी झालेली दिसत होती. होता होता स्टेज सजलं. आमचीही सजावट सुरु होती. एकीकडे गणपतीचा फ़ोटो, समई, तेल , वाती, मेणबत्ती…….. दुसरीकडे पुष्पगुच्छ, गिफ़्ट्स, ट्रे, पाणी ही तयारी. सभागृहात आमचे फ़ोटो, पोस्टर, सीडी विक्रीचा स्टॉल, चहा, पाणी. मग आमची तयारी.

हळुहळु लोक यायला सुरवात झाली. सगळ्यात पहिले प्रसन्न शेंबेकर येऊन भेटून गेला. नागपूरला जायच्या आधी तो अगदी आवर्जून भेटून गेला. सुरवात तर छान झाली होती. माझा सगळा मित्रपरिवार, अभिजीत, त्याचे आई-बाबा…. सगळ्यांचा उत्साह अगदी ऊतू जात होता. साऊंड वाले, फ़ोटो, व्हिडिओ शूटिंगवाले आपापली जागा घेऊन सज्ज होते. वैशाली सामंत सगळ्यात पहिले आल्या. मग पाठोपाठ देवकी ताई पंडित, अशोक पत्की आणि स्वप्निल बांदोडकर आणि त्यांच्या पत्नी. फ़ाऊंटन म्युझिक कंपनीचे कांतिभाई ओस्वाल अविनाश खर्शीकरांसोबत आले. प्रशांत लळीत आमच्या विनंतीवरुन अशोक पत्कींना आणायला प्रकाश सोबत गेला होता. संदेश, अभिजीत, प्रशांत आपापल्या पत्नीसोबत आले होते. मनिष कुळकर्णी आमच्या अल्बमचा मुख्य वादक, सत्यजीत, सौरभ… ह्यांची उपस्थिती मनाला खूप आनंद देत होती. सगळा गोतावळा बघून अगदी भरुन येत होतं.

हेमंतने सगळ्या उपस्थितांचं स्वागत केलं. अभिजीतने आपल्या गोड आवाजात गणेश वंदना म्हणून कार्यक्रमाला पवित्र सुरवात केली. त्यानंतर कार्यक्रम सुरु झाला. माझ्या एका प्रचंड मोठ्‍या, महत्वाकांक्षी स्वप्नाचं हे मूर्त स्वरुप होतं. गप्पागोष्टींच्या स्वरुपात कार्यक्रम पुढे सरकत होता. स्वप्निल चं “आभास चांदण्याचा” हे गाणं एक वेगळीच वातावरण निर्मिती करुन गेलं. त्यापाठोपाठ वैशाली सामंत आणि देवकीताईंचे सूरही आपापलं साम्राज्य गाजवून गेलेत. सीडी प्रकाशनाची वेळ झाली. अशोकजींनी आपल्या शुभहस्ते सीडीचं प्रकाशन केलं. त्यावेळी आईची खूप आठवण आली. ती तिच्या तब्येतीमुळे येऊ शकली नव्हती. आज तिला, बाबांना किती आनंद झाला असता….!!

सीडीचं प्रकाशन झाल्यावर सगळ्या वादक, तंत्रज्ञ आणि मदतनीसांचा अशोक पत्कींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अशोकजींनी सीडीबद्दल गौरवोद्गार काढले. माझ्या, अभिजीत च्या कामाची प्रशंसा केली आणि शुभेच्छा दिल्यात. वैशाली, देवकी ताई, स्वप्निल …सगळ्यांनीच संपूर्णं प्रोजेक्टची तारीफ़ केली….. अगदी धन्य धन्य वाटलं. कांतिभाईंचे विशेष आभार मानण्यात आले. त्यांनीही सगळीच गाणी आवडल्यामुळे ही सीडी आपल्या बॅनरखाली प्रकाशित करायचा विचार केल्याचं सांगितलं.

शेवटी माईक माझ्या हातात आला. आभारप्रदर्शनाचं काम करायला मी उभी राहिले. माईक हातात घेतल्यावर फ़क्त त्या दोन मिनिटात मी सगळा प्रवास मनात पुन्हा एकवार करुन आले. मनात खूप आठवणी दाटल्या होत्या. ह्या प्रकल्पात मला ज्या ज्या लोकांची मदत झाली…… त्या त्या लोकांचे मनापासून आभार मानले आणि कार्यक्रम संपला. एका स्वप्नाच्या परिपूर्णतेपर्यंतच्या प्रवासाची आज सांगता झाली होती.

सगळे लोक भेटायला आले. शुभेच्छा आणि कौतुकाचा वर्षाव आम्ही सगळे झेलत होतो……तॄप्त होत होतो. हा प्रवासाचा अंत नक्कीच नव्हता…… आता कुठे प्रवासाला सुरवात झाली होती