टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
वाद
नविन विनोद सदरा बाबत
प्रेषक सुबक ठेन्गनी ( मंगळ, ०८/०५/२००८ - १९:५०) .नविन विनोद सदरा बाबत
मगाशि आलेल्या विनोदावर वर्तमान पत्रातला विनोद म्हनुन टिका केलि गेलि
आणि नन्तर ते पान गायब केले..
त्यावर लोकानि टिका केल्या...
मला वाटते प्रत्येक विनोद कुठे ना कुठे वाचलेला असतो..
ज्यानि टिका केल्या त्यानि पण विनोद सादर केले आहेत...ते त्यानि कुठे ना कुठे वाचलेले असतिल..
कि त्यानि आपल्या सुपिक डोक्यातुन आलेले विनोद सादर केले ?
तर हे असे का केले याचे उत्तर मिलावे....
आपलि हि वेब साइट लोक मनोरजनासाठि आहे.. हेतु साध्य व्हावा हि अपेक्श्या
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
सज्ञान मुली व बायकांबद्द्ल ठिक आहे हो! पण अल्पवयीन मुलांचे काय?
प्रेषक क्रिष्णा ( सोम, ०८/०४/२००८ - १४:४३) .मिनल ताईंनी बायकांच्या सिगारेट दारु बद्दल लिहले होते, त्याच संदर्भाने आणखी काही.
अगदी परवाचीच गोष्ट, सदाशिव पेठेतील भावे हायस्कुलच्या बाजुने चाललो होतो.
एक अगदी १२/१३ वर्षचा मुलगा ऐटित धुर सोडत होता.
आणि गुटखा तर जणु सर्वमान्यच झालाय.
एवढ्या छोट्या वयात हि सगळी व्यसन योग्य आहेत काय?
आपण काहीच करु शकत नाही?
याला पायबंद बसावा असे मला वाटते.
आपल्याला काय वाटते?
क्रिष्णा
(जनसामान्य)
ग्रहण
प्रेषक पार्टनर ( शुक्र, ०८/०१/२००८ - १८:५३) .ग्रहणात का खाऊ नये याची शास्त्रीय माहिती कुठे मिळेल ? मुळात त्याला तसा शास्त्रीय आधार आहे का ?
आज एकाने मला ग्रहण आणि आपल्या रूढींबद्द्ल विचारलं.. मी जमेल तसं पाळतोय , माझा विश्वास आहे पण माझ्याकडे ठोस असं उत्तरच नाहिये. काही वर्षांपूर्वी मी एका धार्मिक पुस्तकात वाचलेलं पण आत्ता माझ्याकडे ते पुस्तकही नाही आणि मला तशी माहिती जालावर मिळतही नाहिये. याबद्द्ल अधिक माहिती कोणी देऊ शकेल का ? ( link वगैरे असेल तर जरूर द्या.). आणि हो, तुम्हाला काय वाटतं ?
नावाउलट वागणारा
- पार्टनर
बिडी काडी व्यसनमुक्ती
प्रेषक विकास ( गुरू, ०७/२४/२००८ - २०:३६) .मुलींच्या सिगरेटी ओढण्यावरून / दारू पिण्यावरून चर्चा चालू आहे.
पण आत्ताच वाचल्याप्रमाणे बिल गेट्स आणि न्यू यॉर्क शहराचा महापौर मायकेल ब्लूमबर्ग या दोघांनी मिळून $५०० मिलियन्स हे विकसनशील राष्ट्रातील लोकांमधून सिगरेटचे व्यसन जाण्यासाठी गुंतवायचे ठरवले आहे. बिल अँड मिलेंडा गेट्स फाउंडेशन त्यासाठी $१२५ मिलियन्स देत आहेत तर ब्लुमबर्ग (स्वतः माजी स्मोकर)ने $२५० मिलीयन्स आता आणि आधीत $१२५ मिलियन्स देण्याचे जाहीर केले आहे.
त्यांना हे काम विशेष करून भारत आणि चीन मधे करायचे आहे. त्यात त्यांना भारताकडून जास्त अपेक्षा आहेत कारण चीन मधे सरकारच सिगरेटी तयार करते
त्यामुळे किती शिकवता येईल यावर मर्यादा आहेत.
तर माझा प्रश्न असा:
ते पैसे देऊन प्रचार करायला मदत आहेत पण तुम्ही त्यात काय मदत करू शकाल?
- स्वतः ओढत असलात तर थांबवून
- स्वतः ओढत असलात/नसलात तरी स्वतः (जर ओढत असाल तर) आणि आपल्या आप्तेष्टांना / आजूबाजूच्यांना त्याच्या गैरपरीणामांबद्दल सांगून ओढायचे थांबवून
- पुढच्या पिढीस आत्तापासून त्यातील धोक्याचे शिक्षण देउन
- का हू केअर्स!?
समाजशिक्षण महत्वाचे असते पण ते करण्याची जबाबदारी केवळ सेवाभावी संस्था आणि सरकारचीच नसते तर ती "वर्ड ऑफ माउथ"ने पण जास्त होऊ शकते.
१६
प्रेषक अवन ( मंगळ, ०७/२२/२००८ - १९:२४) .१६
हे काय आहे?
हा सरकारला टिकून राहण्यासाठी हवा असलेला कोणताही आकडा नाही किंवा गझलांमधली "बाली उमर" नाही.
तर आजपासून १६दिवसांनी चीन मध्ये ऑलिंपिक सुरू होणार आहे. चीन मध्ये प्रथमच एक आंतरराष्ट्रीय सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे या स्पर्धेकडे सगळ्या जगाचे लक्ष लागून राहिले आहे.
चीन १९८४ मध्ये पहिल्यांदा ऑलिंपिक सामील झाला. त्यावेळी चीनने ३२ पदके मिळवली. तर मागच्या २००४च्या ऑलिंपिक मध्ये, ६३ पदके मिळवून दुसरे स्थान पटकावले. २० वर्षातली ही चीनची कामगिरी.
या उलट भारताची स्थिती आहे. २००४ मध्ये १, २००० मध्ये १ पदक.
याचे कारण काय आपल्याला काय वाटते?
समाजात क्रिकेट शिवायच्या खेळाबद्दलची असलेली अनास्था? खेळांमध्ये ही राजकारणी लोकांची ढवळाढवळ?
दुवा: उत्तर शोधायचे असेल तर google मध्ये "Indian Olympic Association" शोधून पहा
सट्टाशाही
प्रेषक विकास ( सोम, ०७/२१/२००८ - १६:५०) .सध्या भारतात विश्वासदर्शक ठरावाच्या नावाखाली जे काही चालले आहे ते पहाता आपली सर्वात मोठी "सट्टाशाही" आहे असे दुर्दैवाने म्हणावेसे वाटते. खालील बातम्या वाचताना अथवा जे काही चालले आहे ते पहाताना आपल्याला काय वाटते? परिस्थिती बदलता येईल का हे असेच चालणार म्हणत गप्प बसण्याला पर्याय नाही? सामान्य माणसाला यात काय करता येईल - एकट्याने अथवा एकत्रीत?
संदर्भः महाराष्ट्र टाइम्स
सरकार जिंकलं तर या एक रुपयाला वर दिलेल्या किंमतीनुसार भाव मिळेल. पण सरकार पडलं तर बुकींना प्रत्येक रुपयावर दोन रुपये मोजावे लागतील. दिवसेंवदिवस सट्टा बाजार गरम होत चालला आहे. आत्तापर्यंत सट्टाबाजारात ८५० कोटी लावण्यात आले आहेत. बुकिंच्या म्हणण्यानुसार २२ जुलैपर्यंत हा आकडा ३ हजार कोटी रुपयांपर्यंत जाईल.
- रेंगे-पाटीलांना उचललं कुणी?
- स्पीकरपद न सोडल्याने सोमनाथदांवर लाल खफा
इत्यादी...
माझ्या टोपण नावामागचे कारण
प्रेषक सखाराम_गटणे™ ( मंगळ, ०६/२४/२००८ - २३:०५) .आपण येथे टोपण नावाने वावरतो. ते आपण स्व खुशीने घेतलेले आहे. ते नाव घेण्यापाठीमागे ऐक कारण आहे. ते कदाचीत ऐक प्रकारचे आकर्षण असु शकेल.
म्हणजे, मी लहान पणा पासुन जवळ पास पुस्तकी किडा. लहान पणी रॉबीन हुड, टारझन, अरेबियन नाईटस, रुस्तम आणि सोहराब (ह्या कथेचा शेवट वाचुन मी लहान असताना रड्लोय.), फास्टर फेणे, पुलं आणी खुप सारी पुस्तके वाचली.
रॉबीन हुड पुस्तकासाठी मित्राच्या घरी इतके हेलपाटे मारले की आजुबाजुचे लोक माझ्या हेलपाट्यामागे भलताच संशय घेउ लागले. महाविद्यालयात असताना सुदधा पुस्तकांची आवड कमी झाली नाही. शेवटी पैसे पुरत नाहीत म्हणुन रद्दीच्या दुकानातुन पुस्तके आणुन वाचली. ऐकुन काय तर मला पुस्तकांची भयंकर आवड.
पुलं चे ज्या वेळी मी सखाराम गटणे वाचले त्या वेळी मला त्या व्यक्तीरेखे बद्द्ल ऐक जाणुन घ्यायची ईच्छ्या निर्माण झाली. ऐकदरच ते पुस्तकी बोलणे आणि शेवटचा विवाहाचा प्रसंग आम्ही हसुन हसुन घालवला. आपण ऐक प्रकारे त्याचे व्यक्तीमहत्व आपल्यात किंवा आपले त्याच्यात शोधण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे, शिवाजी राजे सगळ्यांना (काही अपवाद सोडुन)आवडतात, पण सगळे शिवाजी राजे होत नाहीत. मग आपण आपल्या घरातल्या कोनाचे तरी नाव शिवाजी म्हणुन ठेवतो.
ह्यामुळे मी 'सखाराम गटण' हे नाव घेतले.
आपण आपले टोपण नाव का घेतले ?
II राजे II,
धमाल मुलगा,
आनंदयात्री,
पिवळा डांबिस,
विसोबा खेचर,
इनोबा म्हणे
इ.
बोला आता.
तुमचे व्यक्तीमहत्व कसे काय त्या टोपण नावाशी संबधित आहे?
**** इंडीया-दी वन नेशन आणि धार्मीक, जातीय व प्रादेशिक अस्मिता ****
प्रेषक छोटा डॉन ( गुरू, ०६/१२/२००८ - ०२:३१) .ह्याचा त्रास पुढे कदाचित बाहेर राहणाया "मराठी माणसाला" होऊ शकतो ही शक्यता सध्या कुणीच जमेस धरत नाही....
आज परिस्थीती अशी आहे की ह्या "प्रादेशिक वादाला" बाजूला सारुन कुठलाही पक्ष "केंद्रात सत्तेची शिडी" चढू शकत नाही व त्यांना ह्या "प्रादेशिक पक्षांना" चुचकारावेच लागेल ...
अशीच परिस्थीती कायम राहिली तर आपण "इंडीया : दी वन नेशन " म्हणू शकतो का ???
आपण सध्या भारताच्या "मिशन २०-२०" च्या मोठ्या मोठ्या गप्पा मारत आहोत, भारताला एक विकसीत राष्ट्र बनवायचा वायदा करत आहे पण ह्या गोष्टी भारत हा " वन नेशन" झाल्याशिवाय शक्य नाहीत .... विकास म्हणजे काय ह्याचेच सध्या कंफ़्युजन [वा फ़ारफ़ार तर अद्न्यान म्हणू शकतो ] आहे. विकास भारताच्या सर्वसामान्य जनतेने विदेशी ब्रॆंडेड कपडे घालून एका विदेशी कारमधुन जाऊन एका मल्टिप्लेक्स मध्ये आपल्या "फ़ॆमीली" सोबत "बर्गर खात व कोकाकोला पित" सिनेमा बघणे नव्हे. मोठेमोठे मॊल्स उभारले, सॊफ़्टवेअर कंपन्या सुरु झाल्या, फ़ारीनच्या कार भारतात आल्या, मोबाईलचे रेट कमी झाले, पर्यटन स्वस्त झाले म्हणजे विकास झाला असे नव्हे ....विकास म्हणजे समुहातील प्रत्येक व्यक्तीच्या सर्जनशील शक्तींचा अविष्कार. ही प्रक्रीया आपल्या देशात चालू आहेच की, गेली ६०वर्षे यशस्वी पणे लोकशाही राबवून दाखवणारा, तंत्रद्न्यान व अन्नधान्याच्या बाबतील स्वयंपूर्ण, माउंट एव्हरेस्ट पासुन ते थेट अंटार्टीका व आता चांद्रस्वारी मोहीम आखणारा, एका वेळी १० उपग्रह यशस्वीपणे आकाशात सोडणारा, महापरम संगणक बनवणारा, माहिती तंत्रद्ब्यान क्षेत्रात एक महासत्ता असणारा, बाकीच्यानी नाही म्हतल्यावर स्वता:च्या दमावर अणूभट्टी उभारुन "पोखरणची अणूचाचणी" करणारा, वैश्विक शांतीचे धडे अख्ख्या जगाला देणारा, संगित आणि कलेची जगाला देणगी देणारा, देशाला "२०-२०" वर्ल्डकप जिंकून देणारा, बुद्धीबळ खेळाचा विशवविजेता असणारा असे कितीतरी चेहरे या विकासोन्मुख भारताचे आहेत. पण त्याच्याबरोबरच "जातीयतावाद, धार्मीक दुही, प्रादेशिक अस्मिता जोपासणारा", सामाजिक व आर्थीक विषमता व दुही असणारा, उपलब्ध सोईंच्या विरतणात एकांगी, दारिद्र्य, अद्न्यान, बेकारी, मुलभुत शिक्षणाची दुरावस्था , भ्रष्टाचार यांनी बुजबुजलेला, हेही भारताचे चेहरे. याला आपण "विकासोन्मुख वन नेशन" म्हणू शकतो का ?
यातील बहुतेक प्रश्न सोडवायचे असतील व भारताला "एक आंतरराष्ट्रीय महासत्ता " बनवायचे असेल तर गरज आहे ती भारतीय जनतेने " वुई, दी वन नेशन" म्हणून उभे राहण्याची !!!
मिपावरच्या मान्यवर व अभ्यासु जनांचे "इंडीया-दी वन नेशन आणि धार्मीक, जातीय व प्रादेशिक अस्मिता" याबद्दल काय मत आहे जाणून घ्यायला मला आवडेल ...
(आसपास)
प्रेषक चतुरंग ( शुक्र, ०५/३०/२००८ - ०३:४२) .सुंदर 'खयाली पुलाव' पकवणार्या संजोपरावांचा हा असा 'आसपास' वावर बघून आम्हाला काही कळेनासे झाले की हे असे अचानक का व्हावे? आणि त्या स्तंभितावस्थेतच विडंबन आमच्या 'आसपास' भटकून गेले! 
ओढा खाली, पाडा त्याला, बोलत काही बाही
सूर वेगळे, नवी तुतारी जरी वाजवू पाही
जरा वेगळी टपरी दिसता पोटभरुन हासले
मिसळ निघाली जहाल आणिक सारक होऊन बसले!
सांजसकाळी जाऊ लागल्या कानोसा घेण्यात
मग्नच असती कोणी येथे कुजबुज ती करण्यात
दात विचकुनी, किचकिच करुनी घसे कसे बसले
मिसळ निघाली जहाल आणिक सारक होऊन बसले!
नमोगताला शरण जाउनी घाली की साकडे
जालावरचे वैर असे की शेपुट ते वाकडे
विडंबलेले काव्य पाहुनी सोगे का सुटले?
मिसळ निघाली जहाल आणिक सारक होऊन बसले!
नकाच फेकू गुलाल, किंवा घालू पायघड्या,
असेल मैत्री खरिखुरी तरि नजरा का वाकड्या?
दुज्या सुरांचे, स्वागत येथे, वर्ज नसे कुठले
मिसळ निघाली जहाल आणिक सारक होऊन बसले!
जालावरती रंग निराळे, दोन असे तर दोन तसे
पूर्वसुरींचे आळवुनी स्वर काव्य नासले असे कसे
मेंढरातल्या लांडग्यास मग रट्टे की बसले
मिसळ निघाली जहाल आणिक सारक होऊन बसले!
चतुरंग
निर्लज्ज गृहमंत्री
प्रेषक अन्या दातार ( गुरू, ०५/२९/२००८ - ०२:३३) .आपल्या माननीय गृहमंत्र्यांनी काय अकलेचे तारे तोडले आहेत ते बघाच. हा नक्की कुठल्या देशाचा गृहमंत्री आहे तेच कळत नाही. खालील दुवा वाचा.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3078229.cms
हे राजनेते सत्तेने इतके लाचार झाले आहेत की ते ज्यांच्यासाठी राबणे अपेक्षित आहे ते काम करतच नाहीएत असे दिसते.

