टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
बालकथा
पंतांच्या पगडीचे प्रवासवर्णन
प्रेषक पुष्कर ( शुक्र, ०७/११/२००८ - १८:३४) .परवा पुराण-प्रसिद्ध पखवाज पंडित पुरोहित पंतांची पिवळी पगडी पुरंदरच्या पंधराशेव्या पायरीवरून पुण्यात पर्वतीच्या पाचव्या पायरीपाशी पर्णकुटीपासून पंधरा पावलांवर पहुडलेल्या पंकजच्या पोटावर पटकन पडली. पगडी पडलेली पाहताच पंत पुरंदरच्या पायथ्याशी पोलिसठाण्यात पळाले. पुरंदरच्या पोलिसांनी पंतांना पुण्याच्या पोलिसांकडे पाठवले.
पंत पुण्यात पोहोचताच पोलिसांवर पेटले. पंत पेटल्यामुळे पोलिस पटकन पर्वतीकडे पळाले. पांढर्या पोषाखातल्या पोलिसांना पाहून पंकज पर्वतीच्या पलिकडे पळाला. पोलिसांनी पंकजचा पिच्छा पुरवला.
पळता पळता पंकज पाण्याच्या पाँडमध्ये पडला. पंतांनीच पाण्यात पोहून पंकजला पकडले. पिवळी पगडी पण पकडली. पोलिसांनी पंकजला पोलिसठाण्याकडे पिटाळले. पकडणारा पोलिस पदपथावर पाय पसरून पडला. पोलिस पडलेला पाहून पंकज पाठीवर पांघरूण पांघरून पळाला.
पंतांनी पुरंदरला पोहोचताच पगडीत पंकजचे पैशांचे पाकिट पाहिले. पाकिटातले पुष्कळ पैसे पंतांनी पनवेलला पुत्राला पोस्टाने पाठवले. पंतांच्या पाजी पुत्राने पैशांच्या प्राप्तीतून पोटात पंजाबी पदार्थ पचवले.
पंतांना परमेश्वरच पावला!
-( पटकथा - पुष्कर)
हैदराबाद येथे झालेले मराठी बालनाट्य : 'राजकन्येची बाहुली'
प्रेषक विसुनाना ( शुक्र, ०६/२७/२००८ - १४:०८) .हैदराबाद येथील रंगधारा नाट्यसंस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या मराठी बालनाट्य प्रशिक्षण शिबिराचा सांगता समारंभ पोट्टी श्रीरामलु तेलुगु युनिव्हर्सिटीच्या एन्.टी. रामाराव कलामंदिरात दि. २२ जून २००८ रोजी संपन्न झाला. यावेळी 'राजकन्येची बाहुली' हे बालनाट्य आणि 'ओले,ओले, टीव्ही बोले' हे लघुनाट्य सादर करण्यात आले. दोन्ही बालनाट्ये अत्यंत उत्कृष्टरित्या सादर झाली. वेळोवेळी हशा आणि टाळ्या यांच्या गजराने प्रेक्षकांनी त्यांची पसंती जाहीर केली.
'राजकन्येची बाहुली' : एक दृष्टीक्षेप
महाराजा श्रीवल्लभ एक शक्तीशाली सम्राट.
त्याची एकुलती एक मुलगी प्रभावती एक आईविना पोरकी राजकन्या आहे. तिचं सारं भावविश्व तिच्या लाडक्या बाहुलीभोवती गुंफलेले आहे.
राजा श्रीवल्लभाचा शत्रू राजा विक्रम! श्रीवल्लभाकडून वेळोवेळी युद्धात हरल्यामुळे विक्रम राजा राजकन्या प्रभावतीला पळवून ठार करण्याचा कट रचतो आणि त्याचे दोन मारेकरी प्रभावतीला पकडण्यासाठी सोडतो. ही बातमी ऐकून चिंताक्रांत झालेला श्रीवल्लभ आपल्या प्रधानाला आणि सेनापतीला राजकन्येला शूर आणि विद्वान बनवण्याचा हुकूम देतो.
परंतु आपल्या बाहुलीशी खेळण्यात रममाण झालेली राजकन्या काहीही शिकण्यास नकार देते.
ना राजकारण!
ना लढाई!
ना संगीत!
ना इतिहास!
त्यावर श्रीवल्लभ ती बाहुली घनदाट जंगलात फेकून देण्याचा हुकूम देतो. बाहुलीसाठी वेडी झालेली राजकन्या राजवाड्यातून पळून जाते आणि जंगलात जाऊन बाहुली शोधून काढते.
ही बातमी कळालेले विक्रम राजाचे मारेकरी तिचा माग काढत जंगलात पोहोचतात.
घाबरलेली राजकन्या जंगलात सैरावैरा पळत सुटते.
जंगलात धोंड्या, पांड्या आणि रुपा ही तीन निडर आदिवासी भावंडे राजकन्येला भेटतात आणि तिच्याशी मैत्री करतात.
त्यांच्यामुळे ती आपल्या कोषातून बाहेर पडते आणि तीही धीट बनते. राजकन्या रूपाला आपला मुकुट आणि दागदागिने भेट म्हणून देते. रूपा आता जणू राजकन्याच भासू लागते.
इतक्यात मारेकरी पोचतात आणि राजकन्या समजून रुपालाच पकडतात.
प्रत्यक्ष मारेकरी समोर आल्यावर ही सर्व मुले मिळून त्यांना तोंड देतात.
परंतु त्यांची मात्रा चालत नाही. मारेकरी आपला डाव साधणार इतक्यात राजा श्रीवल्लभ आपल्या सेनेसह तेथे पोहोचतो आणि मारेकर्यांना अटक करतो.
राजा श्रीवल्लभ धोंड्या, पांड्या आणि रुपाला दत्तक घेऊन धोंड्याला राजा बनवण्याचा मनसुबा जाहीर करतो. पण धोंड्या त्याला नकार देतो. राजकन्याही राजाला सांगते, "मी मुलगी असले तरी शूर आहे. ही फेकून दिली मी बाहुली. आता मी सर्वांना दाखवून देईन की मी तुमच्यापेक्षाही शूर आणि हुशार आहे."
या बालनाट्यात अगदी पाच वर्षे वयापासून १३ वर्षे वयापर्यंतच्या लहानग्यांनी भाग घेतला. मुळात मराठी अस्खलितपणे न बोलू शकणारी ही मुले जेंव्हा रंगमंचावर आपल्या भूमिका साकारत होती तेंव्हा अगदी कसलेल्या कलाकारांचा आभास होत होता. या बालनाट्यात कोठेही कुजबुज्या (प्रॉम्प्टर) ची गरज लागली नाही.
स्त्रीशिक्षणाच्या ढोबळ विषयाबरोबरच 'कर्तव्यासाठी आपल्या आवडत्या गोष्टींचा त्याग करावा लागतो' हा सूक्ष्म संदेशही या बालनाट्याच्या माध्यमातून मुलांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न झाला. लेखक श्री. विजय शिंदे यांचे कसब असे की निखळ विनोदी आणि करमणूकप्रधान अशा या बालनाट्यात लपलेला संदेश देण्यासाठी कोठेही त्यांनी बटबटीत, प्रचारकी थाटाचे, लहान मुलांच्या तोंडी न शोभणारे संवाद वापरले नाहीत.
या बालनाट्याचे दिग्दर्शन श्री. विजय नाईक यांनी केले. शिबिराचे संकल्पक श्री. प्रकाश फडणीस यांचेही या कामी मोलाचे सहकार्य लाभले. शिबिर समन्वयक सौ. अर्चना फडके यांनी सर्व कलाकारांची काळजी घेतली. नेपथ्य आणि कपडेपट सौ. सुवर्णा नाईक यांनी तर पार्श्वसंगीत श्री. माधव चौसाळकर यांनी सांभाळले. प्रकाश योजना प्रा.श्री. भास्कर शेवाळकर यांची होती. विशेष म्हणजे सर्व बालकलाकारांनी शिबिरात या सर्व तांत्रिक बाबी समजावून घेऊन त्यात सहभागही घेतला होता.
या कार्यक्रमात रंगधारेचे अध्यक्ष, हैदराबाद युनिव्हर्सिटीचे माजी नाट्यशास्त्र विभाग प्रमुख आणि ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. भास्कर शेवाळकर यांच्या हस्ते बालनाट्य शिबिरात सहभागी झालेल्या बालकलाकारांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन रंगधारेचे कार्यवाह श्री. अनंत कुलकर्णी यांनी केले.
या कार्यक्रमास प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. अंदाजे तीनशे बैठकक्षमतेचे हे छोटेखानी नाट्यगृह पूर्ण भरले होते.
कलाकार नेहमीच्या वेषात प्रेक्षकांना अभिवादन करताना -
लोकाग्रहास्तव याच बालनाट्यांचे प्रयोग लवकरच करण्याचे रंगधारेने ठरवले आहे.
रंगधारा , द थिएटर स्ट्रीम, हैदराबाद निर्मित
बालनाट्य
राजकन्येची बाहुली
लेखन : श्री. विजय शिंदे
दिग्दर्शन : श्री. विजय नाईक
समन्वय : सौ. अर्चना फडके
संकल्पना : श्री. प्रकाश फडणीस
नेपथ्य आणि वेशभूषा : सौ. सुवर्णा नाईक आणि सौ.अर्चना फडके
प्रकाशयोजना : श्री. भास्कर शेवाळकर
संगीत : श्री. माधव चौसाळकर
विशेष साहाय्य : श्री. अनंत कुलकर्णी
भूमिका आणि कलावंत
(प्रवेशानुसार)
राजा श्रीवल्लभ : चि. चैतन्य ठाकुर
राजकन्या प्रभावती : कु. ऐश्वर्या गोखले
गायन शिक्षिका : कु. अक्षदा अवधुत
इतिहास शिक्षिका : कु. संपदा जोशी
सदर बालनाट्याचे चलच्चित्रण लवकरच जालावर उपलब्ध होईल.
अमराठी मुलखात अस्सल मराठी बालनाट्य
प्रेषक विसुनाना ( मंगळ, ०६/१०/२००८ - ०३:१२) .हैदराबाद:
येथील 'रंगधारा' या नाट्यसंस्थेच्या वतीने दि. १२ मे २००८ पासून बालनाट्य प्रशिक्षण शिबिर सुरू आहे. यात भाग घेणारी सर्व मुले अमराठी शाळेत शिकतात. त्यांना मराठी नीटसे बोलताही येत नाही. कारण घराबाहेर (क्वचित घरातही) असलेले अमराठी वातावरण. (मराठी वाचण्याची तर बातच सोडा. ) परंतु तरीही ती ८ ते १३ वर्षे वयाची मुले एक अस्सल मराठी बालनाट्य सादर करणार आहेत. ते आहे -"राजकन्येची बाहुली". धमाल विनोदी असे हे बालनाट्य पूर्णपणे बालकलाकार सादर करत असून नाटकाचे नेपथ्य, वेशभूषा यातही त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
या बालनाट्याचे मराठी भाषेच्या दृष्टीने वैशिष्ट्य म्हणजे यात संस्कृतप्रचुर मराठी बोलीबरोबरच ग्रामीण मराठी बोलीतीलही संवाद आहेत. केवळ स्मरणशक्ती आणि अभिनयक्षमतेच्या जोरावर सर्व बालकलाकार हे संवाद अस्खलितपणे म्हणू शकतात. इतकेच नव्हे तर त्यांचा शाब्दिक अर्थ आणि भावार्थही त्यांना पूर्ण समजू लागला आहे हे त्यांच्या सहज अभिनयातून स्पष्ट होते.
बालनाट्य प्रशिक्षणावेळी उपस्थित असणारे एक पुणे येथून आलेले पाहुणे प्रेक्षक उद्गारले की "अरे, मला तर पुण्यात असल्याचाच भास होत आहे. " यातच या शिबिराचे यश दिसते.
रविवार दि. २२ जून २००८ रोजी सायंकाळी साडे सहा वाजता हैदराबाद येथील पोट्टी श्रीरामलू तेलुगू युनिव्हर्सिटीच्या नंदमूरी तारक (एन. टी.) रामाराव कलामंदिरात या बालनाट्याचा प्रयोग होणार आहे. आपल्यापैकी कोणी जर हैदराबादमध्ये असतील तर त्यांनी (आपल्या बालगोपाळांसह) या प्रयोगाला अगत्याने उपस्थित राहावे आणि बालकलाकारांना प्रोत्साहन द्यावे ही आग्रहाची विनंती.
याच बालनाट्याचे येथील मराठी बालप्रेक्षकांच्यात मराठी भाषा आणि मराठी नाटक यांचे आकर्षण निर्माण करण्यासाठी आणखी प्रयोग सादर कऱण्याची 'रंगधारा' संस्थेची मनिषा आहे.
राजकन्येची बाहुली
लेखक : श्री. विजय शिंदे
कलाकारः चि. यश फडके, चि. आदित्य परळीकर, कु. सुगंधा जोशी, चि. चैतन्य ठाकूर, कु. पर्णवी फडके, कु. ऐश्वर्या गोखले, कु. अक्षदा अवधूत, कु.संपदा जोशी , चि. निखील नाईक, चि. ऋषभ सोमण, चि. सोहम चौसाळकर, कु. ईशा फडके, चि. अजित जोशी
प्रयोगाच्या अधिक माहितीसाठी श्री. प्रकाश फडणीस (हैदराबाद भ्रमणध्वनी ९९४८५ ८८५१२) यांच्याशी संपर्क साधावा.
(वि. सु. : मर्यादित आसनसंख्येमुळे रसिकांची होऊ शकणारी गैरसोय टाळण्यासाठी लवकरात लवकर संपर्क साधावा ही विनंती.)
बालवाडीतल्या पुस्तकाच्या शोधात...
प्रेषक मनस्वी ( शुक्र, ०५/१६/२००८ - १७:३४) .मी जेव्हा बालवाडीत होते... साधारण २०-२५ वर्षांपूर्वी...
तेव्हा १ लहान मुलांसाठीचे पुस्तक होते माझ्याकडे, पाठपुस्तक नव्हे!
त्यात लहान मुलांसाठी गोष्टी होत्या. पुसट पुसट आठवतायत. त्यान १ बदकाची गोष्ट होती. बदकाचे लाकडी घर - त्याला १ गोल खिडकी - त्यात ते पिवळे बदक - आणि पाऊस पडतो का काय अशी ती गोष्ट होती. नीट आठवत नाहीये. दुसर्या गोष्टीत बिस्किटे तयार करणार्या मुलीची होती. त्यात मुलीचे, तिच्या आईचे की मावशीचे, बिस्किटे की डोनट की त्यासदृश काहीतरी, गव्हांकूर यांचेही चित्र होते.
वेगळ्या प्रांतातील अनुवादीत कथा असतात तसे काहीसे होते.
मी त्या पुस्तकाच्या शोधात आहे.
कोणाला आठवतेय का हे पुस्तक? कुठे मिळेल माहितीये का?
एखादी जुनी वस्तू खूप वर्षांनी पाहिली की त्यावेळच्या सगळ्या स्मृती उजळून निघतात...
वाघाची मावशी
प्रेषक निनाद ( गुरू, ०५/१५/२००८ - ०५:४२) .बाल कविता
वाघाची मावशी
वाघाची मावशी, ए मनी मावशी
वाघाला आण ना घरी एके दिवशी
तुझं की नाही बाळा, काहीतरीच बाई,
वाघ काही इथं या गावात रहातगावात!
मग कुठे? लांबलांबच्या तिथे
तिथे म्हणजे कुठे? लांबलांबच्या जंगलात!
जंगलात जायची तुला वाटते ना गं भीती?
छे रे बाळा! आता मी थकले आहे किती?
उंदिरमामा दिसताच जातेस कशी पळत?
तू लहान आहेस बाळा, तुला एव्हढं नाही कळत
कळत नाही म्हणून तर थापा मारतेस अशी?
म्हणे मी जंगलातल्या वाघोबाची मावशी
शर्थ झाली बाई! तुला खोटं वाटतं का रे?
वाघाची आई माझी बहीण आहे बरे!
भेटायला तिला तू का नाही जात?
जंगल आहे दाट, तिथं सापडत नाही वाट
अंधार म्हणतो मी अंधार म्हणतो मी
त्यात जरा अलिकडं दिसतं मला कमी
बरं का रे बाळा,
जंगलातल्या वाघोबाची सूरु असेल शाळा
सूट्टी लागली ना, की मग आणीन मी घरी
नसत्या उठा ठेवी याला काय बाई तरी!
कवी
- अज्ञात(किंवा तूर्तास माहीती नाही!)
----------------------------
ही कविता लहान मुलांना आवडते.
कविता चालीत, ठेक्यात म्हणायला खूप मजा येते!
(तात्या कदाचित संगितही लावू शकतील.)
पण येथे ऑडियो फाईल लोड करण्याची सोय नाही, त्यामुळे चाल ऐकवायची, कशी हा प्रश्न आहेच.
मात्र याचे कवी कोण आहेत, हे माहीती नाही. कुणाला माहीत असेल तर द्या,
शिवाय ही कुठे प्रसिध्द वगैरे झाली आहे का हे ही माहीत नाही. पण मला तरी मिळाली नाही.
-निनाद
>>>कवी
- अज्ञात(किंवा तूर्तास माहीती नाही!)
मात्र याचे कवी कोण आहेत, हे माहीती नाही. कुणाला माहीत असेल तर द्या,
शिवाय ही कुठे प्रसिध्द वगैरे झाली आहे का हे ही माहीत नाही. पण मला तरी मिळाली नाही. <<<
मिपाच्या धोरणांचा आदर केल्याबद्दल अनेक धन्यवाद! 
हे लेखन मिपावर राहण्यास आमची हरकत नाही परंतु मिपावर मिपाबाह्य व्यक्तिंचे लेखन वरचेवर प्रकाशित करण्यास आमची नक्कीच हरकत असेल याचीही कृपया नोंद घ्यावी...
जनरल डायर.
ध मु चे लग्न(३)
प्रेषक विजुभाऊ ( बुध, ०४/३०/२००८ - १०:०९) .या पूर्वीचे भाग http://misalpav.com/node/1545
http://misalpav.com/node/1624 पासुन पुढे
यावेळेसची डिस्क्लेमर : या लेखातली पात्रे जरी खरी असली तरी प्रसंग काल्पनीक आहेत्. ही पात्रे तुम्हाला भविष्यात कधीतरी भेटली आणि लेखात् लिहिल्याप्रमाणे वागली तर तो निव्वळ योगायोग आहे असे समजावे. उगीचच लेखकाची निरीक्शण शक्ती जब्बरदस्त् आहे अशी दूषणे देऊ नयेत्
\-------------------------------------------------------------------------------------------------\
वरदा , मनस्वी , स्वाती , प्राजु उत्साहाने पुढे सरसावल्या. धमु चे लग्न ठरले याचा त्याना आनन्द् झाला होता त्या पेक्षा कित्येक पटीने जास्त आनन्द् धमु च्या आळीत रहाणार्या असंख्य आया बहीणीना झाला होता. निदान त्यामुळे का होईना आळीत एक कार्य होणार होते. मनस्वी ने धमु ची लग्न पत्रिका लिहायला घेतली.
आमचे येथे श्री कृपे करुन आमचे सुसदस्य.......
अगं अगोदर गणपतीचे नाव लिही. त्या नन्तर लिही कार्य सिद्धीस नेण्यास आई जगदम्बा समर्थ आहे.कोलबेर् काकानी त्यांच्या खास आवाजात् आदेश् दिला.
आणि जेजुरीचा खन्डोबा राहीला की. मनस्वी ने प्रत्येकाच्या म्हणण्यानुसार एकेक् देवतेचा पत्रीकेत् समावेश् केला. अशा जवळ जवळ सत्तवीस देवतांची नावे झल्यावर् मनस्वी चा कागद् पूर्ण भरुन गेला तिला आता यापुढे पत्रिकेत् इतर मजकूर् कोठे लिहायचा हा प्रश्न पडला.
माझे ऐक् आता.ही सगळी नावे राहु देत सुवर्णमयी तिला समजावत म्हणाली "आकाशात पतितम तोयम यथा गच्छती सागरात. सर्व देवं नमस्कारम केशवम् प्रति गछ्चती.या न्यायाने फ़क्त् केशवाय नम: एवढेच् लिही.
मी तेच् म्हणत होतो. सगळ्या कवितांचा शेवट विडंबनानेच् होतो म्हणुन मी विडंबनेच् करतो डायरेक्ट केशवसुमार तीला दुजोरा देत म्हणाला.फ़क्त् ते शुद्ध प्रमाण मराठीत लिहा नाहीतर निलकांत ऒब्जेक्शन् घेईल्.
हा अन् खाली लिहा बरका की ...
आमच्या धमु काकाच्या लग्नाला यायच्य बल का.
आपले छोटी टिंगी , छत्रपती , विवेकग , विवेकवी, ध्रुव ,वेदश्री आणि छोटी ताई
---------------------------------------------------------------------------------------------------------
अरे तु पत्रिका दाखवुन घे ना दोघांच्या. धोंडोपंत् चांगल्या बघतात् पत्रिका. बघा हो धोंडोपंत् पत्रिका पिवळा डांबीस धमु चा पडलेला चेहेरा उचलुन् म्हणाले.
अहो जरा प्रोब्लेम आहे एक नाड् येतेय धमु एकदम् सिरीयस् होत म्हणाला.
"हे बघ् आपण् मराठीत बोलतो म्हणुन हा प्रॊब्लेम येतो. तू साहेबाची भाषा बोल त्यामुळे हे प्रोब्लेम येत् नाहीत" शीतल.
म्हणजे? मला नाही कळाले?धमाल मुलगा बुचकळ्यात पडला. इंग्रजी बोलल्याने हा प्रॊब्लेम कसा सुटेल?
"हे बघ्; तु प्रथम् एक नाड येतेय हे वाक्य साहेबाच्या भाषेत सांग बरे". शीतल." आपल्याला येणारी समस्या योग्य शब्दात मांडावी मग ती सुटु शकते"
"माय लेस् इज् वन"बरोबर?धमाल ने शीतल कडे पाहीले.
बरोबर. व्याकरण द्रुष्ट्या वाक्य बरोबर् आहे.यात वन हे विषेशण आहे ते कर्मा बद्दल विषेश माहीती सांगते. शीतल.
"अग तू काय् त्याचा क्लास घेते आहेस् की काय".पिवळा डांबीस काका रागाने लालपिवळे खरे तर लाल झाले होते "तो विचारतोय काय् अन् तू सांगतेस् काय?"
"पत्रिका नाड सगळे झूट् आहे" झकासराव् 'दिण्हले गहिल्ले तत्थ मरहट्टे' अस जप करता करता मधुनच् ओरडले. "तू तसला काही विचार करु नकोस. सरळ लग्न कर. नाड जुळण्यापेक्शा मने जुळणे महत्वाचे".
-------------------------------------------------------------------------------------------------------- .
काय रे धम्या ने एकुणच् कसे काय जमवले असेल रे पोरगी पटवायचे ? मदनबाण ला ही एकच शंका राहुन राहुन सतावत होती.
मला सुद्धा तेच वाट्ते? भोचक ने दुजोरा दिला.
धमाल मुलाला आपण् विचारु का ते.
अरे मी पण् त्याला तेच् विचारले.
"मग काय् म्हणाला तो" भोचक त्याचा मुदा जोरकस पणे मांडत होता "हे बरोबर नाय ज्येष्ठानी नवोदीताना आपल्या अनुभवाचा फ़ायदा करुन दिला नाही तर काय् उपयोग त्या अनुभवाचा"
"मी पण् त्याला तेच् सांगितले तर् म्हणतो कसा तुला रे काय करायचे आहे ते टिंग्या. छोटी टिंगी असे नाव असले म्हणुन काय् झाले आमाला काही विचारायचा हक्क नाही काय? मी प्राजुचे लोणचे चांगले आहे य अर्थाने लाळ् लाळ लाल लाळ म्हणालो तर् ते पेठकर काका मला छोटी टिंगी नाव सार्थ केलेस् असे म्हणाले." छोटी टिंगी डोळे पुसत म्हणाला.
"मी धमु ला म्हणालो सुद्धा की तु लग्न कसे काय जमवलेस् हे मला सांगितले तर मी "वा वी प्र" अर्थात् वारंवार विचारले जाणारे प्रश्न या दुव्यावर् फ़ोटोसहीत ते पोष्ट् करेन्".आकडीने कैर्या पाडणारा मदनबाण म्हणाला.
---------------------------------------------------------------------------------------------------------
धमाल मुलाच्या लग्नामुळे इव्हेन्ट् मॆनेजमेन्ट् ची एक आयती सन्धी उपलब्ध झाली हे ओळखुन भडकमकर् क्लासेस् ने त्यांच्या इव्हेन्ट् मॆनेजमेन्ट् कोर्सच्या जहीरातीत "कोर्सेस प्रत्यक्श प्रॆक्टिकल सहीत" अशी एक् नवीन ओळ वाढवली.त्यानी धमाल मुलाला तू अजिबात काळजी करु नकोस् तुझ्या लग्नात माझी ५० मुले असतील म्हणुन आश्वास्न दिले.
"५० मुले?....भडकमकर काका तुम्ही नक्की काय काम करता?? चि. धमाल ने निरागस प्रश्न विचारला.
"तुझ्या लग्नाचा इव्हेन्ट मॆनेज करायला माझ्या क्लास मधले विद्यार्थी म्हणतोय मी" धमाल मुलाचा निरागसपणा भडकमकर् सरांच्या लक्षात् आला."हवे तर् तुझ्या लग्नाचा पोषाख सुद्धा मॆनेज करुयात आपण एखाद्या कपड्याच्या नव्या शोरूम मधुन स्पॊन्सर करुन. नाहीतरी ती शेरवानी तू लग्नानन्तर् पुन्हा कधी वापरणार नाहीस"
"ओ काका असे काय करताय शेरवानी नाही चालणार" मनस्वी त्यांच्या बोलण्यावर नाराजी व्यक्त् करत म्हणाली." नवरदेव कसा राजासारखा दिसायला हवा त्याला छान सुरुवार, आंगरखा अन् रुबाबदार मावळी पगडी असा पोषाख करायला लावा त्या दिवशी..कसा रुबाबदार नवरा मुलगा दिसेल.नवरी त्याच्याकडे पाहुन हरखुन जाईल छान मुरका मारुन लाजेल पाहिल्यावर."
"आणि उलटे झाले तर?" धमाल मुलाच्या डोक्यात शाळेत केलेल्या ऐतिहासीक नाटकातला मावळा भालदार चोपदार आठवला. कमरेला तलवार,अंगरखा, सुरवार, मोजडी, आणि डोक्यावर् रुबाबदार मावळी पगडी घातलेला नवरदेव तोंडात बोट घालुन लाजतोय हे दृष्य त्याला दिसायला लागले.
"ए नको ऐतिहासीक नको.मला शेरवानी चालेल" धमाल मुलगा.
"अरे पण् तुला ती पुन्हा नन्तर् वापरता येणार नाही. ऒफ़िसात काय शेरवानी घलुन जाणार आहेस का? "इती मनस्वी. "कपडे कसे कुठेही रोज वापरता यावेत असे कर".
"कुठेही,कसेही आणि रोज वापरता यावेत असे कपडे? म्हणजे मी काय फ़क्त बनियन् चड्डी घेउ असे म्हणायचे आहे का तुला"धमाल मुलगा मनस्वीच्या सूचनानी वैतागुन गेला होता.
"तुला त्या चड्डी च्या चेन ला कुलुप घालुन ठेवावे लागेल. डांबीस काका म्हणत होते की नवरदेवाचे बूट पळवुन लपवतात तशी त्या लोकांत नवरदेवाची चड्डी लपवायची पद्धत् आहे."
----------------------------------------------------------------------------------------------------------
"ए आपण् धमु च्या लग्नात भेण्ड्या खेळुया ग" प्राजु उत्साहाने म्हणाली
"प्लाजु ताई...आदनावांच्या नाहीतर नावांच्या भेंड्या चालतील? छोटी टिंगी म्हणाला" ते केवद शोप्पं हाहे. कोण्त्याही गावाचे नाव घ्यायचे आणि त्याला कर जोडायचे आमी ईयत्ता "पहीली ब" अशेच् कलायचो. त्या मुलाना काय् कलायच्यच नाय. काय नाय शापदलले तल फ़ळांच्या नावापुढे कर जोडायचे आंबेकर चिंचकर केळकर बोरकर पेरुकर सफ़रचंदकर. मी तर एकदा "ढेकर" हे आडनाव म्हणुन सांगितले होते. स्सुद्धा
"त्या पेक्श आपण् असे करुया का आपण् पकाऊ कोडी खेळुयात" वेदश्री पुढे येत् म्हणली.
"ए आपण् तो आयटम काही खास कामासाठी राखुन ठेवलाय" इती प्राजु " लग्नाच्या वेळी कोणी फ़ार दंगा करायला लागला,त्रास द्यायला लागला;की त्याला कोडी ऐकवायचे ठरले आहे.
"मग आपण् उखाणे घेउ. नावे घेउ यात मज्जा येईल"
"काय बाई माझ्या मनतलं बोललीस तू"
"आता मी नाव घेते माझे नाव प्रियाली" दोन तासापूर्वीच मिपा वर लॊग इन् केलेली कोणी एक बोलली.
" तू प्रियाली काय मग माझे नाव म्रुदुला"प्रियाली हातातल्या बांगड्या मागे करत पुढे सरसावत म्हणाली.
"ए बायानो का असे भांडताय.उखाणे तुम्हाला आठवत नसतीलतर मी सांगतो" शेवती त्या दोघींमध्य तात्याना मध्यस्थी करावी लागली."उखाणे कसे मस्त् घ्या लाजत लाजत घेतलेला उखाणा हा म्हातर्या नवरानवरीला सुद्धा गालावर लाली आणतो.
"माझे पण नाव घ्या हो त्यात" बर्याच दिवसानी उगवलेला ठणठनपाळ नकी काय चाललेय याचा अंदाज न घेताच काही तरी बोलायचे म्हणुन बोलला.
त्यावर त्याला दोघीतीघीनी चांगला टोकला.
"मी सांगते चांगला उखाणा" धनश्री पुढे आली " गुलाबाचे फ़ूल हळुहळु उकलले......गुलाबाचे फ़ूल हळुहळु उकलले..... गुलाबाचे फ़ूल हळुहळु उकलले....पुढे काय यमक् जुळवु रे केश्या"
"गुलाबाचे फ़ूल हळुहळु उकलले........... -- रावाना डुकराने ढकलले" हे चालेल का?".बराच वेळ काहीही न बोललेला केशवसुमार एकच वाक्य बोलला.
--------------------------------------------------------------------------------------------------------
जेवणात काय् मेन्यु ठेवायचा?
ते स्वाती ला विचार
कोणत्या स्वातीला.
कोणत्याही स्वातीला विचार सारखेच होईल ते.
विजुभाऊना सांगु नकोस् नाहीतर ते फ़क्त् आंब्याच्याच् डिशेस् सांगतील कदाचित् तळलेले आंबे चहात बुडवुन खायचे अशी काहीतरी नवी जगावेगळी डिश सांगतील. धमाल मुलाने त्याना मिपा वरचा सुगरण्या म्हणुन शेफ़ारुन ठेवले आहे.
आपण् शेज्वान् राईस करुयात, पांढरा रस्सा , श्रीखंड् ,कोम्बिनेत्सिओन् पास्टा,
शिकरण, बाजरीची भाकरी , वडा पाव,
विजुभाऊ तुम्ही सांगा हो काय करायचे
"फाफडा, ढोकळा, खमण , हांडवो , उंधियो , खाखरा , ढेबरा, फजितो, थेपला, खांडवी, ओसामण "विजुभाऊनी त्यांची लिस्ट् सांगितली..
"माझे काही चुकले का ?रागावुन शिव्या कशाला देताय" आपल्याकडुन काहीतरी चुकले असावे असे वाटुन मनस्वी वरमली
"अग त्या शिव्या नाहीत ते गुजराती पदार्थ आहेत्" विजुभाऊ.
मॆन्गो सूफ़्ले, मार्बल केक् ,पुरण् पोळी , आलू पराठा ...एकेक् करत् पदार्थांचे लिस्ट् वाढतच् होती
"सुत्तरफेणी पण ठेवा" हे वाक्य ऐकल्यावर् कोपयातुन जोरात आवाज आला "खुळे की काय? लग्नात जेवणात फेणी ठेवायला हे लग्न काय गोयंकार किरिस्तावाचे वाटले की काय तुम्हाला?"लोकानी चमकुन पाहीले पिवळो डाम्बीस् काका हाताने तोंड झाकुन आडुन बोलत् होता.
जेवणात् खाण्याचे पदार्थांची लिस्ट् बनवायचे जबाबदारी पेठकर काका ,स्वाती राजेश् आणि स्वाती दिनेश यानी घेतल्यामुळे सगळे कसे आता निर्धास्त् होते.
-------------------------------------------------------------------------------------------------------
छोटा डॊन आणि आनदयात्री धमाल च्या बायकोच्या मैत्रीणींविषयी रोज काही न काही तरी नवी माहीती गोळा करायच्या खटपटीत होते.प्रत्येक् नव्या माहीती नुसार ते सेण्ट् बूट् शर्ट् ब्रेसलेट् अशा एकेक् नव्या वस्तु खरेदी करत होते.
धमुकाकाच्या लग्नात जोरात नाचायचे म्हणुन छोटी टिंगी ने भडकमकर ऎकॆडमी मध्ये लग्नात् नाचावे / नाचवावे कसे हा डान्सचा क्लास लावल होता फोटो काढायचे म्हणुन मदनबाण् ने नवा कोर्रा कॆमेरा बूक् केला होता.
ईनोबा ने धमुच्या लग्नाला बाअरामतिचा काकांचे स्वागत असो. असे बॆनर् छापयला दिले होते.
धमाल मुलगा ज्याची उत्कंठेने वाट पहात होता तो ८ जुलै उजाडला........तुतारी सरसावली नटुन थटुन ऐटीत मिरवत वर्हाडी वरातीत चालु लागले. लागली छोटा डॊन ने वरातीत नाचायला पोज घेतली.. .ब्यान्ड्च्या ढोलावर पहीली थाप पडली ढम ढम ढम ढम........
-------------------------------------------------------------------------------------------------------
ठण् ठण ठण् ठण घडाळ्याने मोजुन् बारा टोले दिले................
दुपारी मध्यानीसच् भल्या पहाटे धमाल् मुलगा उठला. "जब् जागो तब् सवेरा " या स्वामी आत्मप्रबोधानन्द् यांच्या उक्ती नुसार शनिवारी विकान्त उजवुन् रात्री झोपुन रवीवारी दुपारी ३ वाजता उठला तरी तो त्याला सकाळ् म्हणत असे त्या मानाने दुपारी बारा म्हणजे भली पहाटच होती...हां तर काय म्हणत् होततो मी; हां! पहाट झाली .धमु उठला.नाईलाजाने ईर्षाद म्हणत् त्याने ब्रशावर् पेष्ट् चढवुन् दातावर टेकवली. खसाखसा चेहेरा वगैरे धुतला.एक धूम्र शलका शिलगावुन झुरका मारला.ठ्यॊ करुन ठसका लागला आणि त्याचा मेंदू आत्ताच पडलेल्या गोड स्वप्नाच्या विचारातुन बाहेर आला.
(समाप्त्)
ध मु चे लग्न(२)
प्रेषक विजुभाऊ ( मंगळ, ०४/२९/२००८ - ०९:५१) .या पूर्वीचे भाग http://misalpav.com/node/1545 पासुन पुढे
यावेळेसची डिस्क्लेमर : या लेखातली पात्रे जरी खरी असली तरी प्रसंग काल्पनीक आहेत्. ही पात्रे तुम्हाला भविष्यात कधीतरी भेटली आणि लेखात् लिहिल्याप्रमाणे वागली तर तो निव्वळ योगायोग आहे असे समजावे. उगीचच लेखकाची निरीक्शण शक्ती जब्बरदस्त् आहे अशी दूषणे देऊ नयेत्
संत तात्याबा महाराज्; आश्रमात दुपारची झोप घेत अर्रर्रर्र चुकले समाधी घेत होते.छोटा डॊन ने दारावरची घंटा बडवली.त्या आवाजनेच त्यांची समाधी भंग पावली .डोळे किलकिले करुन त्यानी पाहीले दारात् असा भक्तांचा समुदाय पाहीला .मग पुन्हा डोळे मिटुन घेतले.आपण् समाधिस्त आहोत् हे जणु त्याना भक्तांच्या मनवर ठसवायचे होते.ये वत्स धमाल्या ; ये छोट्या डॊन्या ,मिटल्या डोळ्यानीच संत् तात्याबा वदले. या गोष्टीने उदय सप्रे फ़ारच प्रभावित झाला.ये बाळ् तू कशासाठी आला आहेस् ते मला ठाऊक आहे. लग्नाचा विचार महात् घोळतोय आणि त्याची तयारी कशी करावी हे उमजत् नाही. बरोबर् उदयोस्तु उदयोस्तु म्हणत उदय् सप्रे ने लोटांगण् घातले.संत तात्याबा काही न विचारता देखिल् मनातले ओळखतात हा तर् कलीयुगातला चमत्कार.तो ईनोबच्या कानाशी कुजबजला. इनोबाला माहीत् होते की ते सगळे धमाल्याच्या खरडवहीतून संत तात्याबानीअगोदरच् वाचुन ठेवले होते.
तात्या मला सल्ला द्या.धमाल मुलगा तात्याना म्हणाला; मला सुचत् नाही.
काय् सल्ला देवु.लग्न कर म्हणुन? की करु नको म्हणुन?
मला तसा सल्ला नको आहे. मला लग्न करायचे आहे?धमाल मुलगा
"मग कर् की तुला कोणी आडवले आहे? तात्याचिया सेवका वक्र को्ण पाहे असा सर्व जालमंडळी कोण आहे ?
संत तात्याबा महाराज गरजले. मी सरपंचाकडुन त्याचे प्रतिसादच रद्द करुन टाकतो.
तसे नाही महाराज सेवकास लग्न कसे करावे याचे मार्ग दर्शन् करावे.
मग वत्सा तू चुकीच्या जागी आला आहेस. त्या बाबतीत आम्ही मार्गदर्शन् करणे योग्य नव्हे..हवे तर् तू बसल्या जागी दुपारी जेवणानन्तर् समाधी कशी लावावी किंवा सिंगल् माल्ट् की आणखी दुसरी कोणती , पापलेट चांगले की सुरमाई याचे मार्गदर्शन् माग ते मी तुला देतो.या जन्मी आनन्द् कसा घ्यावयाचा याचे मार्गदर्शन् मी देतो.
लग्न कसे करावे यासाठी तु माझा सखा संत् महंत श्री श्री श्री पिवळा डांबीस १००८ यां कडे जा ते तुला मार्गदर्शन् करतील. तसेच ते घरात बायकोला आणी बाजारात भाविणीला डोळा कसा घालावा याचे सा़क्शात्कारासहीत मार्गदर्शन करतात लग्न कसे करायचे या प्रश्ना सोबत ते दुसरे मार्गदर्शन् बोनस् म्हणुन करतात.
--------------------------------------------------------------------------------------------
फेठकर काकानी झारा घेउन वडे शेजवान चा पहीला घाणा बाहेर काढला. कालच्या शिल्लक नूड्ल्स चे काय करावे हा विचार करत असताना त्याना हा पदार्थ सुचला होता.या पदार्थाचा प्रयोग कोणावर् करावा या विचारातच् असतानाच् दारावरची घंटा घणणली. पेठकर काकानी दार उघडले.दारात दारात प्रा.डॊ. दिलीप बिरुटे उभे होते. ये ये रे दिलीप् अगदी वेळेवर आलास तू.मी शिर्यात चारोळी टाकावी की बदाम हा विचार करत होतो आणि तू आलास.
चारोळी अजिबात् नको ते तसले र् ला ट् जुळवलेले प्रकार् रटा रटा शिजवायच्या ही लायकीचे नसतात.
तद मातय त्या चारोळी वाल्यानी आम्हा गझल वाल्यांच्या नाकत् दम आणलाय. त्या भगिनीभोग्याना हे असेच अनुल्लेखाने मारायला हवे.वस्तुत: ते मातृगमनी समिक्षक् वर् त्याना साथ देतात. दिलीप बिरुटेंच्या जिभेवर डबल सरस्वती नाचत होती. सुसंकृतच बोलायचे हे ठरवल्यावर् ते शिव्या ही संस्कृत मधे द्यायचे .आम्ही कष्टाने हदय द्रवून वीस पंचवीस् ओळी लिहुन एक गझल लिहायची आणि त्यानी चार ओळीत त्याच् भावना व्यक्त करायच्या? हे चालणार नाही. या असल्या चारोळी लिहिणार्या नगरवधुसूताना ठेचलच् पाहीजे
तुला "रांडेच्या"हा च शब्द वापरायचा आहे ना दिलीप? पेठरकाकाना "नगरवधुसूत" हा संस्कृत् शब्द् प्रथम दर्शनी कळलाच नाही.
-----------------------------------------------------------------------------------------------
धमाल मुलाने लग्न करायचा विचार बोलुन दाखवल्यामुळे भडकमकर् क्लासेस मध्ये छो. डॊन्या ने "पळुन जाउन लग्न......एक मोलाचे मार्गदर्शन्" हे शिबीर तात्काळ् जॊईन केले होते.
शिबीरात् पहीला धडा पळावे कसे याचे प्रात्यक्शिक होते त्याची प्रॆक्टीस म्हणुन रोज चार किलोमीटर् पळावे लागत् होते. छोटा डॊन ला याचे काही वाटत नव्हते पण् प्रश्न होता तो त्याचा अंगरक्शक शार्प् शूटर् "आम्बोळी" चा (पिस्तुलाची एकही गोळी न झाडता हा केवळ कन्दील लावुन कोणाचाही गेम करायचा) त्याला ही छोटा डॊन च्या मागोमाग रोज पळावे लागत होते.त्याच्या मते "एक वेळ लोटा घेउन पळणे सोपे पण कन्दील घेउन पळायचे म्हणजे चेष्टा आहे काय राव्". रोज पळुन पळुन आम्बोळीचे पाय दुखत होते .त्यामुळे तो येता जाता सदाशीव पेठेत "येथे पाय चेपुन मिळतील" ही पाटी शोधतअसायचा. छोटा डॊन ने हा कोर्स लावला हे धमाल मुला पासुन लपवुन ठेवले होते.
------------------------------------------------------------------------------------------------
काय रे अजानुकर्णा ही नवी भानगड काय् काढलीस्?छोटी टींगी हातातले घड्याळ् लावत् म्हणाला. कसली भानगड?
तीच रे जा जरा त्या आर्यला विचार त्याला काल डॊक्टरानी नवीन औषध् दिलय् त्यामुळे म्हणे सगले लोक चांगलेच् दिसतात्
रे देवा...! कुणा डॉक्टर/वैद्याला असा पेशंट देऊ नकोस.ह्या रुग्णाला माफ कर त्याला कळत नाहीए की काय चांगले आणि काय वाईट आहे ते.
पण् तु असा का म्हणतोस?का म्हणजे? का म्हणु नको? तु काल आजारी होतास सकाळी साफ़ व्हावी या साठी तुला मी सुमार केतकरांचे अग्र लेख वाचुन दाखवले. परीणाम् काय झाला?
आज तू राजकारण् की गजकरण यावर् चार भागात् लेख लिहिलासच ना?
"ते सोड मला सांग की धमाल मुला ने लग्न कोठे करावे? अजानुकर्ण.
"हा ज्याच्या त्याचा वैयक्तीक प्रश्न आहे" छोटी टींगी.
"हे जाला वरचे सर्वात् विनोदी उत्तर आहे". अजानुकर्ण नुकतेच वाचलेले वाक्य त्वेशाने म्हणाला "आपल्याला एखादी जबाबदारी टाळायची असली की लोक हे असे बोलतात. त्यामुळेच आपली लोकसंख्या वाढते आणि त्यामुळेच् अन्नधान्य समस्या निर्माण् होते त्यासाठी आपण् सर्वानी शाकाहार अंगीकारलाच् पाहीजे.विचार... विचार प. पू भाईश्री ऐशवर्या राय भौ यांचे मौलीक विचार ऐक जरा. ते म्हणतात की विचारलेल्या प्रत्येक प्रश्नावर् तुला काहीतरी मत असलच पाहीजे. तुझा त्याचा सम्बंध् असला नसला तरीसुद्धा".
---------------------------------------------------------------------------------------------------
ए सांगा की लग्न कुठे करु मी. जागा सुचवा ना.धमाल मुलाला ईराक इराण युद्धापेक्शाही आता ही चिंता अधीक महत्वाची वाटत होती.
हे बघ् जागा कोणतीही असली तरी ती लोकाना यायला आणी जायला ही सोयीस्कर हवी डॊ प्रसाद् दाढे म्हणाले.
डॊ दाढे; साहेब मी एक विचारु का? इनोबा आता कोणता बॊम्ब् टाकणार हा अंदाज न आल्याने आनदयात्री अर्धा झाला.
विचार ना रे ईनोबा.....डॊ दाढेना आपल्याला कोणीतरी शन्का विचारली याचाच् आनन्द् झाला होता.
डॊक्टर साहेब मला सांगा "महाराष्ट्रात् मिसळ् कोठे मिळते" आणि "पुण्यात् भेळ् चांगली कोठे मिळते" यादोन्हीपैकी कोणत्या संशोधनाबद्दल तुम्हाला डॊक्टरेट् मिळाली हो?
ए ईनोबा जरा ऐक की मी लग्न कोठे करु ते सांग की.
"मला वाटते की पुणे सोड तु दुसरीकडे कोठेतरी लग्न कर तुमच्या पुण्यात् दुपारी दोन वाजता मिसळ्सुद्धा कोठे मिळत नाही". इती मदनबाण."सरळ् ठाण्याला ये"
"तू असे कर तू आळंदीत लग्न कर.तेथे भडकमकर क्लासेसच्या विद्यार्थ्याना स्पेशल् डिस्काऊंट् मिळतो.शिवाय दोन लग्नावर एक बारसे फ़्री अशी लेटेस्ट स्कीम आहे.
दोन लग्नावर तीसरे लग्न केले तर अर्ध्या चार्जेस मध्ये".आनन्द यात्री कडे पुण्यातल्या प्रत्येक कार्यलायतल्या स्कीमसची अद्ययावत् माहीती होती..
"अरे पण् मी घरातल्या सगळ्यांच्या परवानगीने लग्न करतोय" धमाल मुलगा."आळंदी कशाला"? शिवाय मला लग्नाला माझ्या बारामतीच्या काकाना पण बोलवायचे आहे.
"बारामतीचे काका येणार आहेत्?" ईनोबाला उत्साह आला. "मग आपण सगळ्या कार्यकर्त्यांचे फ़लक लाऊ या की".
तेवढ्यात् कोणाचा तरी मोबाईल वाजला. साक्शात मोबाईल वर आदेश् आला होता लग्न थाटामाटात् धुमधडाक्यात् मिपा च्या हसत्या खेळत्या अंगणातच होऊ देत.
या आदेशासरशी वरदा , मनस्वी , स्वाती , प्राजु धमाल मुलाच्या लग्नाच्या बाकी गोष्टी ठरवण्यासाठी उत्साहाने पुढे सरसावल्या.
( क्रमश:)
या पूर्वीचा भाग http://misalpav.com/node/1545
संवाद
प्रेषक हेरंब ( रवी, ०४/२७/२००८ - १०:०७) .
: - भटो भटो
: - ओ
: - कुठे गेला होता ?
: - प्रवेश घ्यायला
: - मिळाला ?
: - नाही.
: - का ?
: - कोटा आडवा आला
: - बरं झालं, आम्ही खातो गरे, तुम्ही खा आठळ्या!
: - आठळ्याही तुम्हीच खा, मी जातो 'तिकडे'.
: - भटो भटो
: - ओ
: - कधी आला ?
: - परवाच
: - काय आणलं ?
: - चॉकलेटं
: - उभी कापू का आडवी ?
: - नका कापू, तुमच्यासाठीच आणलीयेत.
: - मजा आहे ना तिकडे ?
: - मजा नाहीये, पण सजा पण नाही.
: - भटो भटो
: - ओ
: - कुठे गेला होता ?
: - 'तिकडे', मुलाकडे.
: - काय केलेत तिकडे ?
: - नेहेमीचेच, आराम केला, फिरलो, मुलं सांभाळली.
: - मग पुढे काय ?
: - त्यांत काय ? सहा महिने इकडे, सहा महिने तिकडे!
: - मजा आहे बुवा
: - मजा कसली ? सजा आहे सजा!
ध मु चे लग्न
प्रेषक विजुभाऊ ( मंगळ, ०४/२२/२००८ - १०:४४) .डिस्क्लेमरः लेखनातील पात्रे प्रत्यक्षातील असली तरी प्रसंग पूर्ण काल्पनिक आहेत, हे कळायला काही आईन्स्टाईनची बुद्धीमत्ता नको. लिखाणाच्या सोयीसाठी काही ज्येष्ठांचे उल्लेख एकेरी करावे लागले आहेत, त्याबद्दल क्षमस्व.इथे वयाचा, ज्ञानाचा, सत्तेचा कसलाही मुलाहिजा राखला जाण्याची अपेक्षा करू नये. कुणी थट्टा केली तर आपल्या पगडीच्या झिरमिळ्या गळून पडतील असं वाटणार्यांना अगोदरच ही सावधगिरीची सूचना!!
)
यासाठी "बेस" म्हणून "मिपा" वर लिहले गेले साहित्य तसेच त्याला पडलेले प्रतिसाद हा मसाला कच्चा माल म्हणून वापरण्यात आले आहेत तरी कोणी आमच्यावर "साहित्यचोरीचा आळ" घेऊ नये, तसे झाल्यास त्या निषेघांच्या खलित्यास केराची टोपली दाखवण्यात येईल असे आम्ही नमूद करू ईच्छितो .... :छोटा डॊन काका च्या हुकुमवरून्.
ठण् ठण ठण् ठण घडाळ्याने मोजुन् बारा टोले दिले................
दुपारी मध्यानीसच् भल्या पहाटे धमाल् मुलगा उठला. "जब् जागो तब् सवेरा " या स्वामी आत्मप्रबोधानन्द् यांच्या उक्ती नुसार शनिवारी विकान्त उजवुन् रात्री झोपुन रवीवारी दुपारी ३ वाजता उठला तरी तो त्याला सकाळ् म्हणत असे त्या मानाने दुपारी बारा म्हणजे भली पहाटच होती...हां तर काय म्हणत् होततो मी; हां! पहाट झाली .धमु उठला.नाईलाजाने ईर्षाद म्हणत् त्याने ब्रशावर् पेष्ट् चढवुन् दातावर टेकवली. खसाखसा चेहेरा वगैरे धुतला.एक धूम्र शलका शिलगावुन झुरका मारला.ठ्यॊ करुन ठसका लागला आणि त्याचा मेंदू जागृत् झाला. त्याच्या मित्रांच्या मते तो हल्ली जर्रा जास्तच् झुरत् होता.
काहीतरी करायलाच हवे. धमु स्वत:शीच् म्हणाला. डॊन्या, इनोबा , आन्द्या यासगळ्यांचे बिचार घेउन झाले होते.कोण काय म्हणत् होते कोण काय म्हणत होते.त्यांचे बरोबर होते . लग्न तर करायलाच् हवे होते. प्रश्न होता की कसे आणि कुठे. स्वारगेट् , नेहरु स्टेडीयम, शान्ग्रीला गार्डन ,स्वीकारपासुन् ते अगदी सिंहगड् रोडवरचे कार्यालय सगळेच् काय काय सूचना देत होते.सगळ्यांचे बरोबर् होते पण् यात गोची एकच् होती ती म्हणजे यातल्या कोणालाही लग्नाचा प्रत्यक्ष अनुभव नव्हता.
आपण् असे करु यात का. भडकमकरसर सध्या गाईडन्स देतात् त्यांच्या कडे जाउया का? कधी नव्हे तो झंप्या वेळेवेर् योग्य ते बोलला.डॊन्याला तो काय बोलला त्या बद्दल् आक्शेप् नव्हता पण हे वाक्य झम्प्या का बोलला तु बोलु शकत् नव्हतास का असे रागावुन् त्याने ईनोबा कडे पाहीले.ईनोबा नेहमीप्रमाणे नाठाळाच्या माथी काय हाणायचे या गहन् विचारत् गढला होता.धमु असा हवालदील् होऊ नकोस्आम्ही आहोत ना आंद्या धमु ला समजावत् म्हणाला.तुझा प्रॊब्लेम् काय् आहे?
"काय येडं आहे रे हे" छोटा डॊन् आनन्दयात्री वर उचकत म्हणाला"हिकडे सगळे रामायण् झाले तरी हे विचारतय् की रामाची सीता कोण"?
मी सांगते रामाची सीता कोण ते.मनस्वी मध्येच् त्याचे बोलणे तोडत् म्हणाली ."रामाची सीता सिन्डी क्राफ़र्ड् बरोबर् की नाही धमु"
"धमु नकाना म्हणु" धमाल मुलगा कळवळुन म्हणाला.इथे माझ्या जिवनमरणाचा प्रश्न चाललाय् आणि तुम्हाला सिन्डी क्राफ़र्ड् सुचतेय्"
"ती तुझा प्रश्न सोडवणारे का रे धमु"?मनस्वी पुन्हा एकदा त्याला धमु म्हणायचे नाही हे पुन्हा एकदा विसरुनच् म्हणाली.
मी काय म्हणतो आपण त्या भडक् मकर सरांकडे जाउया. बघु तर् ते काय सल्ला देतात्.माझ्या मैत्रीणीला त्यांच्या "ईन्टरव्ह्यु देणे.... एक् जीव घेणे" या मार्गदर्शन् शिबीरात मस्त् मार्गदर्शन् दिले होते त्यानी." मनस्वी म्हणाली.
"मग् मिळाली का तीला नोकरी" विवेकग ने न रहावुन् विचारले "हा बघ् हा बघ् एक तर् रोज येत् नाही आणि अशे ऐन् वेळीला कै च्या कै प्रश्न विचारतो":इनोबा " ते भडक मकर् सर् म्हणजे काय वाटले तुला? ऒ ! ते असले तसले क्लासेस् घेत् नाहीत् ते इन्टेर्व्ह्यु कसे द्यायचे;पत्रकाराना कसे ताटकळत् ठेवायचे बोलताना मधे मधे पॊजेस कसे घ्यायचे ?किती घ्यायचे ?आपल्या इन्टेर्व्ह्यु मध्ये वादग्रस्त् विधाने कशी पेरायची हे नव्या नटाना शिकवत असतात् तुला काय वाटले नोकरी कशी मिळवावी याचे इन्टेर्व्ह्यु ?"
आपण् असे करु यात् आपण् कट्ट्यावर् जाउ या तिथे काहीतरी मार्गदर्शन् मिळेल्..
----------------------------------------------------------------------------
इकडे कट्ट्यावर्.....
बेसनलाडवाने बाटलीतला सोनेरी रंगाचा द्रवपदार्थ अंदाजानेच एका ग्लासमध्ये ओतला. ग्लास डोळ्याशी आणून त्यातुन पलिकडे पहात अंदाज घेतला आणि पुन्हा उगीच होय की नाही अशी मान हलवत् म्हणाला नाही रे केशवा एवढी काही पिवळी वाटत् नाही. तुझी लिव्हर् फ़क्कड् काम् करतेय्. त्या डॊक्टर् ला अक्कल् नाही उगाच् म्हणतो कावीळ् झाली म्हणुन खरे सांगतो तुझी लघवी तेवढी काही पिवळी नाही. तळकट् वगैरे तू तसाही खात् नाहीस्. उगाच् आता पथ्यबिथ्ये पाळु नकोस्.
हो रे मला ही आता तसेच् वाटु लागले आहे. तो तात्या तिकडे सध्या नव्या लोकांना दीक्शा देतोय् जोरात् सिंगल् माल्ट् वगैरे ची आणि आपण् या इथे या "छद्मी शेवाळ् ;वटवाघूळ् आणि दक्षीण लेबनॊन् मधल्या चिचुन्द्र्या" असल्या भिकार् चर्चा करत् बसलोय. चित्तर् तुला काय् वाटतेय् आपण् काय् करावे या परिस्थितीत्?
ऒ काय् म्हणालास्? मला ही भिकार् सावकार् खेळत् बसायचा कंटाळा आलाय्.हल्ली तर् पान हा शब्द् ऐकला तरी कंटाळा येतो. जेवणाचे पान् घ्या म्हणाले कोणी तरी भूक् संपते.चित्तर् म्हणाला.पाककृती ला काय् रीस्पॊन्स द्यायचा हेच् कळत नाही. आयला लोक काय च्या काय् चहा आणि पापडावर लिहितात्.
मला तर् सध्या जोरात् भूक् लागते. सध्या प्रत्येकजण पाककृत्या खरडत् असतो.. शिवाय् तात्या त्याची चित्रे पण् देतो . जाम् भूक् लागते.
आणि सध्या चर्चा महाचर्चा अतिमहाचर्चा यापेक्शा "खाद्य पदार्थ" यालाच् जास्त् प्रतिसाद् मिळतो. "खयाली पुलाव" चांगला खपतो. आपण द्यायचो त्यासारखे "जिंकले जिंकले तोडलत् हो तुम्ही" असले प्रतिसाद् आता जवळ् जवळ् ब्यानच् झालेत.
आता मला सांग सन्जोप् मी तीन भागात् "चिघळलेल्या जखमा ,विरघळले बेडुक् आणि विरलेले प्रतिसाद् यावर् जब्बरदस्त् लेख् लिहिले काय झाले रे त्याचे तीस वाचने आणि पाच् प्रतिसाद् तेही दोन तुझे एक् मी त्याचे दिलेले स्पष्टीकरण आनि दोन "माझे तसेच् मत" असले. त्यापेक्शा केशवच्या "मी आता विडम्बन् करणार नाही" त्याला बरे प्रतिसाद् मिळाले. विडम्बनापेक्शाहीयाला जास्त् प्रतिसाद्.
मी तर आता विडम्बन कविता करण्यापेक्शा "मी आता विडम्बन् करणार नाही (१) , "मी आता विडम्बन् करणार नाही" (२)" असेच् लिहीयचे ठरवले आहे ईति:केशवसुमार.
नाहीतर "काय जेवलात" असले तरी सुरु करतो. निदान डोक्याला तरी ताप नाही. "जेन्जारलेली झुरळे, रक्तगाभुळलेले बेडुक आणि उपटसुम्भ्" यापेक्शा "काय जेवलात् " याची वाचने जास्त् होतात
---------------------------------------------------------------------------
सुवर्णमयी आणि ऐश्वर्या राय यांचे वेगळेच् बोलणे चालले होते.
"मी काय म्हणते आपण जालावर् कोण काय काय लिहीतात् त्यात् पुरुष किती. बायका किती आणि बायकांची नावे घेतलेले पुरुष किती हे शोधायलाच् हवे:" सुवर्णमयी
"तुम्हाला काय् म्हणायचे आहे नक्की सांगा" ’ऐश्वर्या राय "मी पुरुष् आहे की स्त्री याचा माझ्या लिखाणाशी काय सम्बन्ध्":ऐश्वर्या राय
आहे पुरुष लेखाकाना स्त्री ने जालावर् काही टीका केली की ती सहन होत नाही.कुठे कुठे जायचे जाला मध्ये हे त्याना कळत् नाही":सुवर्णमयी.
-----------------------------------------------------------------------------
"मला खरेच् कळत् नाहिये की काय करायचे?" धमाल मुलगा "इकडे आबा म्हणतात् की मी एवढा बाप असताना तु लग्नाची काळजी कशाला करतोस् आणि ते तारीख पण् ठरवत् नाहीत्."
"आपण् असे करुयात का? आपण लोकांचा कौल घेउ या" छोटा डॊन काहीतरी सांगु लागला"
"त्याने काय होईल्? धमाल मुलगा
त्याने निदान लोकांकडुन आपल्याला चार पाच् नवे पर्याय मिळतील"छोटा डॊन
आणि तसे पर्याय न मिळता लोकांनी चर्चा भलतीकडे नेली तर? धमाल मुलगा "उगाच ह घ्या ह ह पो दु ह ह पु वा असले प्रतिसाद् मिळाले तर्?"
त्याची तू काळजी करु नकोस् .मी पुण्याचे पेशव्याना याची काळजी घेण्यास सांगितले आहे
"मी काय म्हणतो" उदय सप्रे एकदम् उत्साहाने म्हणाला
"बोल आता तूच् राहीला होतास.बोल बोल वाघ पिंजयात सापडे बायका मुले मारती खडे" छोटा डॊन.
"ए याला सांग की मी काहीही बोललो की हा मला प्रत्येक वेळी मधे मधे आडवतो" उदय सप्रे रडवेला चेहेरा करत् म्हणाला.
"बोल रे तू त्या डॊन्याचे येवढे मनावर् घेउ नकोस.तसे पाहीले तर त्याचे चूक् नाहीये आत्ता. पण तू बोल" धमाल मुलगा उदय ला शांत करत् बोलला.
"पण् त्याने मला पुन्हा अडवले तर?"उदय सप्रे.
"तो आता आडवणार नाही"धमाल मुलगा
"कशावरुन म्हणतोस्"उदय सप्रे.
"त्याची सिग्नेचर वाच त्यात् स्पष्ट् लिहीली आहे की त्याची कोठेही इतरत्र शाखा नाही" धमाल मुलगा
" मग ठीक आहे" उदय सप्रे.
"आता बोल ना " धमाल मुलगा.
"आपण संत तात्याकाम जाबाली ना विचारुया"उदय सप्रे. "त्यानी सध्या दीक्षे चे क्लासेस् काढले आहेत ते शिष्याना दीक्शा देण्या अगोदर सिंगल माल्ट् देउन पावन् करुन घेतात्."
"चला चला आपण लगेच् जाउयात" ईनोबाला धमाल मुला पेक्शाही जास्त घाई झाली होती "अन धमाल मुलाच्या लग्नाचे विचारु त्याना"
सगळे लगोलग संत तात्याबा महाराजांच्या त्वरेने आश्रमाकडे निघाले.
( क्रमश:)
पहीला उतारा
प्रेषक ऍडीजोशी ( बुध, ०१/०९/२००८ - १७:०७) .नमस्कार मीत्रहो,
आजच ह्या अद्भुत जगात मी अवितर्ण झालोय. आणी मझ्या कडून पहीली भेट म्हणून हे िनबंध देत आहे. हे लीखाण काही िदवसांपुर्वी घडलेले आहे. लहान मुलांच्या मेंदुत डोकव्ण्याचा हा मझा छोटासा प्रयत्न. मधे इंटर्नेट वर ह्या संधर्भात एक नीबंध झाला होता. तोच वीचर थोडा खेचला आहे.
आप्ला,
स्वयंभू
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
म्हैस
मला आधी वटायाचं भैय्या दूध देतो. पण नंतर कळलं की दूध देणारा खरा प्राणी म्हैस आहे. भैय्या फक्त दूध वाटतो. मी आजीला वीचारलं की म्ह्शीच्या पोटात दूध कोण ओततं ? तर ती देवाला नमस्कार करुन म्हणाली, "काय सांगू बाबा, देवाची करणी, आणी नाराळात पाणी." म्हणजे जसं नारळात पाणी येतं, तसंच म्ह्शीच्या पोटात दूध येतं. पण मी अजुन तरी नारळाच्या झाडा सारखे म्हशीचं झाड़ कुठे पाहीलं नाही.
माझ्या शाळेत पाचवीत शीकणार्या बंड्या दादाचा ह्यावर विश्वास नाही. तो म्हाणाला," म्हैस जन्माला येताना तीच्या पोटात मील्क पावड्र असते. मग ती पाणी पीते आणी दूध देते. बंड्या दादाने अजून पण काही काही शोध लावले आहेत. तो म्हण्तो," मासे समुद्रात शू करतात म्हणून समुद्रचे पाणी खारट आहे. आणी असं अजून बरंच काही काही.
शेजार्च्या गोर्यांची सुमी ताई लग्न होउन गेली होती. ती परत आली तेव्हा तिचा पोट खुप सुज्लं होतं. म्हणून तीला डॉक्टर कड़े घेऊन गेले. तर ती येताना तीच्या सर्खंच एक गुटगुटीत बाळ घेऊन आली. मी तीला वीचारलं," बाळ कुठुन आलं?" तर ती म्हानाली पोटातुन! मी गडबडून आजीला वीचारलं," तीच्या पोटात बाळ कुठुन आलं?" तर ती देवाला नमस्कार करुन म्हणाली, "काय सांगू बाबा, देवाची करणी, आणी नाराळात पाणी."
सुमी ताई पण नारळ आहे हे मला माहिती नव्हतं. पण ती शाळेत असताना एकदा तीचा दादा तिल म्हैस म्हाणाला तेव्हां ती त्याच्यावर मांजरी सारखी फीस्कराली. मंाजर खूप मउ असते. ती सारखी म्याव म्याव करते आणी भय्याने आमच्यासाठी दीलेलं दूध पीते. मंाजरीला दूध आवडतं मला मंाजर आवडते.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कट्टा
बंदुकीला गावठी भाषेत कट्टा म्हणतात. त्याचा उपयोग रस्त्याच्या कडेला उभा रहून चोरी करायला करतात. चोरी करणा वाइट. पण चांगला आनी वाईट ह्या संकल्पना मनासने बनाव्ल्या आहेत असा कोनी तरी थोरी मुनी सान्गून गेले. मुनी फार हुशार असत. आज काल ची हुशार मूला कट्ट्यावर वर उभ राहून टवालाक्य करतात. टवाळा आवडे िवनोद असे रामदास स्वामी म्हणून गेले. पण कोणता विनोद? खन्ना, मेहरा की काम्बळी ते नाही सांगीतलं. काम्बळी शेत्कार्याचे ठंडी पासून संरक्षण करते. ठंडी धगातून येते. धगाचा नल उघडला की पाऊस पडतो. नल ही एक अजब गोष्ट वस्तु आहे. नालाचा मुख्य उपयोग पाणी यावं म्हणून असतो. पण चळीतल्या नालाचा उपयोग शोभेची वस्तु म्हणून अथवा वस्तु तन्गायला खूंटी म्हणून करतात. अभ्यास करताना खुन्तिला शेंदी बंधाली की जोप येत नही. शेजर्च्या शेंडे काकू माला शाळेतून येताना रोज एक गोळी देतात. मी त्यांचा लड़का आहे. कािलया गब्बर चा लड़का होता म्हणून तो त्याला म्हानाला,"अब गोली खा". खतना आवाज करु नये असा बाबा म्हान्तात. मज़े बाबा शहाणे आहेत. ते घरी आले की कुनाशीही बोलत नाहीत. फक्त मधुनाच "हीक" असा आवाज कधातात. बाबांच्या बाबान्ना अजोबा म्हान्तात. पण आजोबा त्यांच्या बाबान्ना बाबाच म्हान्तात. काल मी झोपलो असताना अजोबा म्हानाले,"गाढवा सारखा लोळू नकोस." पण दुसर्या कुणा सारखा लोळ हे नाही संगीतले. आजोबंाचा भूगोल कच्चा आहे. गाढव लोलत नही, लाथा झाडत. झाडाला आम्बे लागतात. आम्ब्याला हीन्दीत आम म्हणतात. िहन्दी आपली राष्ट्र भाषा आहे. गांधीजी आपले राष्ट्र पीता होते. पण त्यांची मत्रू भाषा गुजराती होती. गुजराती मुली सुंदर असतात. त्यात्ल्या अर्ध्यांचा नाव शीतल असता. शीतल म्हणजे ठंडा. पण अमीर खान म्हान्तो ठंडा मतलब कोका कोला. कोला प्याय्ल्याने पोतातले जन्त मरतात. जन्त होणे चांगले नाही. माझी आई चांगली आहे. जय िहंद. जय महाराष्ट्र.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
नाडी
नाडी दोनही मनगटान्वर असते. तशीच ती चड़्डीलाही असते. नाडी मुळे चड़्डी जाग
