user

व्युत्पत्ती

काही शब्दांची व्युत्पत्ती

सदर लेखन संपादित करून जितके शक्य होईल तितके शुद्धलेखन सुधारले आहे.
-शुद्धलेखनाचा आग्रह असणारा मिपा संपादक.

काही भारतीय शब्दांची मला लक्षात आलेली व्युत्पत्ती वर येथे चर्चा करण्याचा मानस आहे, मला जे वाटते आहे ते कदाचित चूक असू शकेल तरी यावर जर कोणी जास्त प्रकाश टाकू शकले तर हवे आहे.

१. जपान ला गेल्यावर सुरवातीला जे शब्द शिकलो त्यात पान (Pan) हा शब्द होता, त्याचा अर्थ पांव! (Bread). एकतर मी शाकाहारी असल्याने पांवावर जास्तच भर होता आणि शब्द आपल्या पांव च्या जवळ असल्याने लवकर लक्षात राहिला. थोडा विचार केल्यावर लक्षात आले की मराठी पांव (पा वर अनुस्वार आहे. ) चे रोमन लिपीत Panv किंवा Paanv होऊ शकेल, आणि मराठी पांव आणि जपानी पान यांची व्युत्पत्ती कोणतातरी एकच शब्द असू शकेल. पुढे असे कळाले की ब्रेड जपान मध्ये पोर्तुगीज लोकांनी आणला. आणि "पांव" आणि पान हे शब्द एकाच म्हणजे "pa~o" या शब्दावरून आले आहेत. आहे की नही गंमत एकमेकांपासून हजारो मैलावर असलेल्या दोन पूर्णपणे भिन्न भाषा बोलणार्‍या देशात असे सारखे उधार शब्द आहेत.

२. इंडोनेशियात आल्या आल्या एक पाटी सारखी समोर येत होती, "सलामत नाताल डॅन ताहून बारू! " (मेरी ख्रिसमस अँड न्यू इयर! ) सलामत नाताल लगेच समजले कारण नाताळ शब्द. पण त्यामुळे विचारांना चालना मिळाली, ह्या नाताल आणि नाताळ शब्दांची व्युत्पत्ती शोधून काढायची! इतक्या दूरच्या देशात, जो धर्म मूळचा त्या त्या देशातील नाही त्यासाठी इतके साधर्म्य असलेले शब्द कसे काय निर्माण झाले असावेत? आता इंटरनेट मुळे यावेळी शोध सोपा गेला! दोन्ही शब्द खरेतर खुद्द युरोप मध्ये ख्रिसमस साठी जो शब्द आधी वापरला जात होता त्या "Nativity" या शब्दावरून आला आहे! "church of the Nativity -bethelhem " येसू ख्रिस्ता चा जन्म बेथेलहेम येथे झाला होता. nativity म्हणजे Birth. जन्माचा सोहळा म्हणून नाताळ!

३. गिरजाघर - चर्च साठी हिंदी शब्द, गेरीजा (Gerija) चर्च साठी बहासा शब्द! या शब्दाची व्युत्पत्ती मात्र मला अजून सापडली नाही. कोणीतरी मदत करा!

सावध ऐका (मागल्या) हाका!

पदार्थाची चव लिहून सांगता येत नाही, तो अनुभवाचा भाग आहे, तद्वतः इंदूरी हाकांचे विश्व हा खास अनुभवाचाच भाग आहे. आता लेखाची सुरवातच खाद्यपदार्थाच्या शब्दाने व्हावी हा खास इंदुरी असल्याचा अपरिहार्य नि अटळ परिणाम आहे. पण तो अट्टल खवय्या असल्याची साक्षही आहे. इंदुरात आल्यावरही इथल्या हाकांमध्ये भिजले नाहीत नि त्या हाका तुमच्या जिभेत भिजल्या नाहीत, तर तुम्ही 'इंदौरकर' कधीच होऊ शकणार नाही. इथल्या भय्याचा उच्चार तुम्ही कोणत्या वेळी, कोणासमोर नि कसा करता यावरही तुम्ही इंदौरी आहात की नाही हे ठरते. सबब, यापुढे कधीही इंदूरला आल्यास हा दिलेला गृहपाठ केल्याशिवाय येऊ नये असा खास सल्ला दिल्याशिवाय रहावत नाही.

आता हेच पहा ना. एरवी भाऊ असा सरळ सोपा नि साधा अर्थ असलेल्या भय्या या हिंदीभाषक शब्दाचे 'नवनिर्माण' झाल्याचे आपण पहातो आहोतच. भय्या या संबोधनात 'बिहार' नि 'उत्तर प्रदेश'च सामावल्याचे दिसते. पण मध्य देशी आल्यानंतर मात्र भय्यात किती विश्व सामावले आहे, याचा अंदाज येतो.

एरवी आपल्याकडे अपरिचित, अल्पपरिचित मंडळींना हाक मारण्यासाठी काका, मामा, दादा, भाऊ, अप्पा, अण्णा, ताई, काकू, मावशी, मामी या शब्दांची रास आहे. अगदीच गेला बाजार 'अहो, शूक शूक तुम्ही तुम्ही' यानेही काम भागते. पण भय्यासारखा सर्वव्यापी शब्द मात्र आपल्याकडे नाही. दादा, भाऊमध्ये ती सर नाही. याउलट भय्यांत किती छटा लपल्यात म्हणून सांगू? नुसती हाक म्हणून, आदर म्हणून, नातं आड आलं म्हणून, नातं आड यावं म्हणून, नुसता 'आड' आला म्हणून हा शब्द बाहेर पडतोच. पण राग-चीड-द्वेष- हिणविणे या आणि अशा अनेक भावनांत बुडूनही हा शब्द तोंडातून 'फुटतो'. पण या शब्दांतल्या भावनांचा अदमास त्याचे उच्चारण समजून कळल्याशिवाय तुम्ही इंदौरात रूळलात असे म्हणताच येणार नाही, महाराजा.

आता तुम्ही इथल्या कुठल्याही चांगल्या-चुंगल्या दुकानात खरेदीला गेलात तर हाच शब्द 'भय्या, जरा वो कपडा दे ना'. म्हणून सोज्वळ रूप धारण करतो. रस्त्यावरच्या पोहेवाल्याकडे, पाणीपुरीच्या ठेलेवाल्याकडे, गल्लीत आलेल्या तरकारीवाल्याकडे नि पानटपरीत राजेशाही थाटात बसलेल्या पानवाल्याकडे हाच शब्द विठ्ठलाला 'विठू' म्हणावे अशा लयदार पद्धतीने 'भिया' असा प्रेमळ होतो. इथल्या ब्ल्यू लाईन बसमध्ये बसून कुठे चालले असलात की त्यातला 'भय्याही' प्रेमळ असतो. पण बस 'नगरसेवा' (खासगी वाहतुकदाराची) असेल तर मग त्यातल्या तिकीटफाडू पंटरच्या तोंडून आपला उच्चार 'भियाव, जरा खिसको ना' असा भ्यावणारा झाल्यास भिऊन जायचे कारण नाही. ही इंदूरी त्र्यागाची 'भियाव' आवृत्ती असते. पण ती इतक्यावरच थांबत नाही. भर ट्रॅफीकमध्ये कुणी धडक मारल्यानंतर झालेल्या भांडणातही हा 'भिया'च कामी येतो. 'भिया, गाडी चला रिया या क्या कर रिया था? या वाक्यासरशी दोन भियातले भांडण पुढे कितीही काळ रंगू शकते. रस्त्यात चालता-चालता किंवा चालवता चालवता तुमचा 'ओ भिया हटो ना' असा उद्धार झाल्याशिवाय तुम्ही इंदुरात असल्याचा फिल अजिबात येणार नाही. शब्द साधा 'भिया' असला तरी त्याच्या उच्चारणाची न्यारी ढब तो 'फिल' नक्कीच देईल.

नात्या-गोत्यातही भय्या असतोच. पण अनेकदा नाती निर्माण करताना तो गोत्यातही आणतो. समवयस्क मुलाला हाक मारताना नाव घेऊन पुढे भय्या लावण्याची ही प्रथा अनेक पोरीबाळींसाठी सोयीची ठरत असली तरी त्या 'भय्या'चा मात्र 'वडा' होतो. पण वय वाढल्याचं अनुक्रमे तुमचे डोईवरचे केस 'दिसत नसल्यासारखे' झाल्यास वा ते पांढर्‍या रंगाला पर्याय ठरल्याचे वाटताक्षणी तुम्ही 'भाईसाब' म्हणून 'कन्व्हर्ट' होता ते तुमचं तुम्हालाही कधी कळत नाही. भाई या खास हिंदी शब्दाची मुंबई आवृत्ती इथे वापरात नाही, पण त्याचा मूळ अर्थ पकडूनही हा शब्द केवळ नातेनिदर्शक एवढाच उरला आहे. गेला बाजार अगदीच सार्वजनिक कार्यक्रमात आदरार्थी उच्चार म्हणून 'भाई प्रवीणजी', 'भाई दिलीपजी' असे ऐकायला येते. पण तो शब्द जपून ठेवायचा म्हणूनच. बाकी काही नाही.

समवयस्क विवाहित महिला आपल्याकडे वहिनी असतात, इकडे त्यांचे कन्वर्जन 'भाभी' किंवा 'भाभीजीं' मध्ये होत असले तरी त्याहीपेक्षा 'बेहेनजी' ही खास इथली साद ऐकण्यासारखी असते. बायकांचे कपडे विकणार्‍या दुकानात याचा वापर बराच होतो. पण त्यातही गिर्‍हाईक गटवायचे या भावनेने पेटलेला दुकानदार 'दिदी दिदी' म्हणूनही रूंजी घालत बसतो. पण हल्ली त्याही पलीकडे 'मेडम' हा शब्द रूळलाय. विशेषतः सहकारी किंवा अनोळखी महिलांसाठी. सायकलवरून जाणाराही समोर स्कूटी घेऊन जाणार्‍या महिलेला 'मेडम, जरा हटो', किंवा गाडी ठोकल्यास, 'ओ मेडम केसे गाडी चला रही हो', म्हणून पुकारा करेल. काही ठिकाणी या 'मेडम'च्या पुढे 'जी' जोडून भिजलेला आदर दर्शवला जाईल. लिखित भाषेत ही मेडम 'मैडम' अशी अंमळ वाकल्यासारखी दिसते.

आपल्याकडचे 'काका-काकू' इकडे 'अंकल-आंटी' म्हणून उरलेत. त्यामुळे थोड्या मोठ्या पुरूषांना अंकल नि बायकांना आंटी असा सर्रास उच्चार आहे. त्यामुळेच की काय कुणीही 'सोळावं वरिस' ओलांडलेली कन्या अस्मादिकांच्या माथ्यापर्यंत रूंदावलेल्या विस्तीर्ण भालप्रदेशाकडे पाहून 'अंकल' म्हणते तेव्हा तोपर्यंत अभिमानाने उंचावलेले मोजके चार केसही मान टाकतात. पण कधी तरी वाहतुकीच्या भर गर्दीत कॉलेज कन्यकांचा अडसर होत असला की 'आंटी, बाजू हटो' म्हणून कधीचा तरी सूड कुठे तरी नि केव्हा तरी अखेर उगविण्याची संधी मिळते. उगाचच 'आंटी' संबोधून समोरचीच्या चेहर्‍यावरचे बदलते भाव पाहून, त्याला अजिबात भाव न देण्याइतकी इंदौरची नवी पिढी सोकावलीय. पण तरीही 'आंटी मत कहो ना, असा लाडीक स्वर सहसा कुठे ऐकल्याचे आठवत नाही. एकुणात सध्या या अंकल नि आंटीचा आख्ख्या इंदौरमध्ये उच्छाद आहे.

दुकानदारी भाषेतले काही शब्दही खास आहेत. आपला माणूस इथे 'अपना आदमी' होतो, पण त्याहीपेक्षा 'अपना बंदा आएगा, सम्हलके लेना' हा उल्लेख खास इथला आहे. हा 'बंदा रूपया' इथल्या व्यावसायिक कट्ट्यावर टण्णकन आवाजानिशी आदळला नाही, तरच नवल. मग त्याच धरतीवर कधी कधी 'मुलींचा' उल्लेखही चक्क 'बंदी' असाही होऊन जातो. एखाद्या 'चाय'च्या 'गुमटी'वर गेल्यास तिथल्या 'पिंट्या'ला 'बालक' होतो. 'ए बालक, इधर आ' अशी हाक आपसूक निघून जाते.

आणि हो, इकडे आलात तर महाराष्ट्रातली मराठी शब्दांचे हिंदी भाषांतर करून बोलण्याची सवय सोडून दिलेलीच बरी. एरवी मराठी धाटणीचेच भाषांतरीत हिंदी रेटून नेऊन बोलण्याच्या मराठी सवयीला असाच योगायोगाने चाप बसला. आमचा एक मित्र खरेदीसाठी कपडा बाजारात गेला. खरेदी करता करता त्याने 'काका' या मराठी शब्दाचं भाषांतर करून 'चाचा, कुछ किमत कम करो' असं फर्मान सोडलं. झालं. समोरच्या दुकानदाराचं टाळकं सणकलं. चाचा? संतापून तो म्हणाला? मै क्या चाचा दिखता हूँ' इकडे मित्र गार. त्याला कळेचना. हा का चिडला ते? दुकानदाराचा संताप गळणे सुरूच, ' आपने दुकान नहीं देखी? महावीरजी का फोटो नही देखा? बाकी सारे जैन मुनियोंके फोटो नहीं देखें' तरीही मित्राचा डोक्यात काही शिरेचना. त्याने विचारलेच, लेकिन मैने गलत क्या कहा? तोपर्यंत त्या दुकानदाराला अंदाज आलेला की 'बेणं' बाहेरचं दिसतंय. तो म्हणाला, भाईसाब, यहॉं चाचा मतलब मुसलमान आदमी को बोलते है. मै जैन हूँ. समझे? मित्राच्या ज्ञानात भर पडली. शिवाय नको तिथे संबोधनांचे भाषांतर करणे टाळा हा धडा मिळाला.

हे झाले हिंदी बांधवांचे. आपल्या मराठमोळ्या मंडळींही 'सावध ऐका पुढल्या हाका' अशीच आहेत. इथल्या मराठी बांधवांची हिंदीवगुंठीत मराठी नात्यांची संबोधने जणू सराफ्यातल्या रसोत्पादीत जिलेबीचा थाट घेऊन तोंडातून टपकतात. आणि मग 'काका, मावशी के लिए मेसेज है', काकू आपको आईने हल्दीकुंकू के लिए बुलाया है'. 'मामा, तुम मामी को लेकर आओ, मैं आजी के साथ हूँ ही हिंदीच्या पुडीतली मराठी संबोधने ऐकायलाही मजा येते.

आताशा ही संबोधने आमच्याही 'कानवळणी' पडलीत. या संबोधनातली वळणेही आता जाणवू लागली आहेत नि त्याला प्रत्त्युतर करण्याची भाषाही आडवळणाने का होईना समजू लागली आहे. म्हणूनच रस्त्यावर सवयीप्रमाणे मध्येच गाडी घालून रस्ता तयार करण्याची खास इंदौरी प्रथा पाळणारा गाडीस्वार आला, की 'ए भिया, गाडी चला रिया, या हवाई ज्यहाज', अशी इंदौरी भाषा तोंडातून बाहेर पडल्याशिवाय चैन पडत नाही.

आमच्या इंदौरी झाल्याचा आणखी काय पुरावा द्यायला हवा काय? चला भय्या, थांबतो आता, सराफ्यात जाईन म्हणतो.

अर्थपूर्ण, महत्वपूर्ण वगैरे

आपल्याला एकादी गोष्ट अर्थपूर्ण, महत्वपूर्ण वाटत असते, पण इतराना वाटत नाही...आपल्याला स्वतःलाच त्याच गोष्टी कालान्तराने तश्या वाटेनाश्या होतात.....
तर हे अर्थपूर्ण, महत्वपूर्ण वगैरे वाटणे म्हणजे काय गौडबन्गाल आहे बुवा?

खालील वाक्ये बघा :

१. पिकासो हा विसाव्या शतकातिल महत्वाचा चित्रकार होय...
२. मी पुष्कळ पैसा कमावला, पण त्याला काही अर्थ नाही......
३. तब्येत ठणठणीत असणे महत्वाचे.....
४. बाबारे, त्या पोरीच्या मागे लागण्यात काय अर्थ आहे, त्यापेक्षा .....
५. मला त्यावेळी त्या गोष्टीच महत्व कळल नाही, पण आता पस्तावा होतो.....
६. या पुस्तकातला ( वा सिनेमातला वगैरे ) अमूक भाग महत्वाचा अहे........
७. आपल्या आयुष्यात खरोखर महत्वाचे काय आहे, हे जाणून घेणे महत्वाचे, त्यातूनच जीवन अर्थपूर्ण करता येइल.....
८. पैसा महत्वाचा, असे मानून त्याने एवढा पैसा मिळवला, पण आता तो अन्थरुणाला खिळून आहे, मग त्या पैश्याला काय अर्थ राहिला?......
९. आपल्याला सगळीकडे महत्व मिळावे, असे त्याला वाटत असते, त्याशिवाय त्याला कशातच अर्थ वाटत नही....
.........असो.......तर यावर काय म्हणता मण्डळी?

पुरावा मिळाल्याशिवाय नाडी ग्रंथांवर माझा विश्वास बसणार नाही.

दुर्दैवाने तुमची नाडीवर जितकी ठाम श्रद्धा आहे तितकाच माझा अविश्वास अवैज्ञानिक सत्यावर आहे. तेव्हा तुम्ही कितीही जेरीला आणलंत तरी मला पुरावा मिळाल्याशिवाय माझा विश्वास बसणार नाही.

राजेश घासकडवी जी आता कसे बोललात... मग आपले व माझे पटेल...
जर सत्यनिष्ठेने पुरावा मिळवाल तर मग बदलाल की नाही का तरी ही नाहीच...
मी पुराव्यानेच नाडी ग्रंथांना अवैज्ञानिक, थोतांड, खोटे ठरवायचा चंग बांधून गेलो...
पुराव्यासाठी जंग जंग पछाडून तमिळींना हाताशी धरून, इंडॉलॉजीच्या ताडपत्रांच्या तज्ञांनी पारखून जे ठरवले, समजले. त्याला ठोकरून मी प्रचलित विज्ञानाला कवटाळून बसलो तर ती सत्याशी प्रतारणा होईल असे वाटून लेखणी हातात घेतली...
आपण ही या शोधाच्या वाटेने चला. मग जे सापडेल त्यावर मत ठरवा. नुसतेच विज्ञानाच्या पुस्तकी तर्कांच्या खांद्यावर बसून जर बोलणार असाल
तर मग आपले पटणार नाही...

शब्दार्थ हवा आहे.

नमस्कार.

मला कोणी "वितांशक" या शब्दाचा अर्थ सांगू शकेल का? जमल्यास व्युत्पत्तीसुद्धा द्यावी.

अगत्यार जीव नाडी (पुर्वरंग) भाग १

अगत्यार जीव नाडी (पुर्वरंग) भाग १
"

"माझा असल्या गोष्टींवर विश्वास नाही. मी देवाला मानत नाही. या नाडी ग्रंथ भविष्यावर तर माझा बिलकुल विश्वास नाही. तरीही तुमच्या महर्षींची कसोटी घ्यावी व जमलेच तर माझ्या समस्येचे निराकरण करावे म्हणून मी इथे आलो आहे."

तमिळनाडू राज्याची राजधानी आहे चेन्नई उर्फ मद्रास. तमिळ संस्कृतीची देखील ती राजधानी आहे असे म्हटले तर फार अतिशयोक्ती होणार नाही. त्या ठिकाणी वडपळणी उपनगर आहे. पूर्वी फार लोकप्रिय, बालपणातील आठवणींचे "चांदोबा" हे मुलांचे मासिकाचे प्रकाशन, याच भागातील कार्यालयातून अनेक वर्षांपासून होत असे. तो प्रभाग नाडी भविष्यासाठी ही असाच लोकप्रिय आहे.

पूर्वी ओम उलगनाथन त्यांच्या ईरटै जीवनाडीचे अदभूत वाचन या भागातील एका मंदिरापाशी करत असत. त्याचे अनुभव, पत्ता माझ्या हिंदी मराठी पुस्तकात आहेत. आता सध्या अगत्यार किंवा (अगस्त्य) जीव नाडीचे वाचन श्री.हनुमत दासन या भागातील करत असतात. त्यांच्या जीव नाडीवाचनात आलेले काही अनुभव, किस्से "दिनतंती" नावाच्या तमिळ साप्ताहिकातून वेळोवेळी प्रसिद्ध होत असतात. त्याचे स्वैर भाषांतर श्री.विश्वनाथ गोपी करतात. मराठी वाचकांना त्यातील काही अनुभवांची ओळख करून देणे हा य़ा लेखाचा उद्देश आहे. त्या अनुरोधाने नाडी ग्रंथ भविष्याची सामान्य ओळख करून देऊन नाडी लेखनकर्त्या महर्षींचा भविष्य लेखनामागील उद्देश स्पष्ट करण्याचे कार्यही घडेल.

नाडी ग्रंथ भविष्य ही संज्ञा आता मराठी लोकांना गेल्या १०-१५ वर्षांच्या काळात थोडीफार परिचित झालेली आहे. दक्षिण भारतात तमिळ भाषेत ताडपत्रावर कूट लिपितून कोरलेले भविष्य आता महाराष्ट्रातील अनेक शहरात पहायला उपलब्ध आहे. रामायण, महाभारत, भागवत या धार्मिक ग्रंथांतून सामान्यपणे उल्लेखलेल्या अनेक महर्षींच्या नावाने या नाडी ग्रंथ भविष्य ताडपट्या उपलब्ध आहेत. त्यापैकी अगस्त्य, महाशिव, कौशिक म्हणजेच विश्वामित्र, वसिष्ठ, शुक, भृगु, काक भुजंदर (भुशुंडी) आदि महर्षींची नावे असलेल्या नाड्या सध्या जास्त प्रचलित आहेत.

ज्यांना नाडी ग्रंथ भविष्याची काहीच माहिती नाही त्यांच्या सोईसाठी थोडक्यात असे सांगता येईल की या महर्षींनी आपल्या प्रज्ञाचक्षूंच्या सामर्थ्यावर अनेकांचे जीवनपट पाहिले व आपल्या निर्देशनाखाली शिष्यगणांकडून त्याची काटेकोरपणे नोंद केली व अनंत काळपर्यंत मानवाला उपयोगी पडणाऱ्या नाडी ग्रंथ भविष्याची निर्मिती केली.

नाडी ग्रंथ भविष्य पहाण्यासाठी पुरुषांना उजव्या व स्रियांना डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा त्यावरील सर्व रेषा ठळक व व्यवस्थित दिसतील अशा बेताने उमटवून द्यावा लागतो. त्या रेषांच्या ठेवणीवरून महर्षींनी १०८ विभाग पाडलेले आहेत. नाडीकेंद्रात त्यापैकी उपलब्ध पट्यांशी त्या ठशांना पडताळून त्यांच्याशी जुळणाऱ्या पट्यांचे पॅकेट आणले जाते. नंतर त्यातील एकएक पट्टीतील थोडा थोडा मजकूर वाचून तो जातकाच्या माहितीशी जुळतो का, ते पाहिले जाते. बऱ्याच न जुळणाऱ्या पट्या बादकरून शेवटी एक अशी पट्टी येते की त्यातील सर्व माहिती जातकाशी तंतोतंत जुळते. उदाहरणार्थ स्वतः नाव, आई-वडिलांचे, पती-पत्नीचे नाव, जन्मतारीख, वार, महिना, साल, व त्यावेळची आकाशस्थ ग्रहांची स्थिती, शिक्षण. नोकरी-व्यवसाय, भावाबहिणींची, मुलाबाळांची संख्या व अशी काही माहिती जी केवळ त्याच व्यक्तीला ताडता येऊ शकते. त्यानंतर जेंव्हा व्यक्ती आपणहून मान्य करते की पट्टीतील सर्व माहिती १००टक्के जुळते आहे. तेंव्हाच त्या पट्टीतील कूट तमिळ लिपितील मजकूर एका ४० पानी वहीत सध्याच्या तमिल भाषेत उतरवला जातो. त्यावरून भाषांतरकाराच्या मदतीने एकएक वाक्याचा सावकाश अर्थ लाऊन ते सर्व एका ऑडिओ कॅसेटमधे रेकॉर्ड करून मग ती वही व कॅसेट ग्राहकाला सुपुर्त केली जाते व मग मेहनताना पूजारुम मधील शिव-पार्वतीच्या, महर्षींच्या फोटो समोर ठेवायला सुचवले जाते.

कुंडलीतील बारा स्थाने व्यक्तीच्या जीवनातील महत्वाच्या अंगांचा विचार करतात. त्याच धर्तीवर लग्न स्थानाच्या भविष्याला जनरल किंवा पहिल्या नंबरचे कांडम असे म्हटले जाते. त्यात सर्व स्थानांचे त्रोटक भविष्य कथन केले जाते. एखाद्याला कोणा एका विशिष्ठ स्थानाचे जास्त भविष्य जाणून घ्यायचे असेल तर उदा. विवाह विषयक ७ नंबरचे, नोकरीसाठी १० नंबरचे कांड काढून त्यातून विशेष माहिती मिळवता येते. नाडी ग्रंथ भविष्याचा पाया पुनर्जन्म व कर्मविपाक सिद्धांतावर आधारित आहे. त्यामुळे पुर्वजन्मातील पाप-पुण्यांच्या कमीजास्त प्रमाणात व्यक्तीला विविध मंदिरांना भेटी तेथे पुजा-अर्चना, अन्न-वस्त्र-जलदान, अपंगांना मदत करण्याला सुचवलेले असते. शिवाय जपसाधनाही सुचवली जाते. सध्याच्या धामधुमीच्या जीवनरहाटीत तो जप करण्याचा भार आपण नाडी केंद्राला सांगून करवून घेता येतो. त्याच्यासाठी वेगळा मेहनताना घेतला जातो.

हा झाला नाडी भविष्य जाणण्याचा सामान्य प्रकार. या शिवाय जीव नाडी असा एक विशेष नाडीचा एक प्रकार आहे. त्यात महर्षींशी आपण सद्यपरिस्थितीत आपल्या समस्या कथनकरून, त्यावर सल्ला-विचार विनिमय करून त्यातून वाट शोधू शकतो. सामान्य नाडी पट्टीतील मजकूर वाचून त्याचे भाषांतर करून सांगताना अनेकदा तात्कालिक समस्यांवर महर्षी काही भाष्य करताना दिसत नाहीत. त्यामुळे अनेकांचा विरस होतो. नाडी ग्रंथ भविष्याबद्दल नाही नाही त्या शंका येऊ लागतात. जीवनाडीतून अशा समस्यांचे-शंकांचे समाधान होते. असो.
अगत्यार जीव नाडीचे अनुभव भाग २ मधे वाचा...

स्वैर अनुवादक – विंग कमांडर (नि) शशिकांत ओक. मोः ०९८८१९०१०४९.

तुमच्या गावाचे नाव काय?

तुम्ही खेडेगावात राहत असाल, शहरी असाल. तुम्ही राहता त्या गावाचे नाव घ्या, किंवा तुम्हाला माहित असलेल्या कोणत्याही गावाचे (किंवा गावांची नावे) नाव घ्या. त्या गावांची नावे कशी पडली असतील असा प्रश्न कधी तुम्हाला पडलाय? तुम्ही त्यावर विचार करून ते नाव का ठेवलेय असा कधी विचार केलाय? नक्कीच केला असणार.
मी तर बुवा गावाचे नाव कसे पडले असेल त्याचा विचार करतो.
उदाहरणच द्यायचे झाले तर:
पिंपळगाव. गावात (पुर्वी) पिंपळाची झाडे जास्त.
वडगाव : गावात (पुर्वी) वडाची झाडे जास्त होती. (आता कसली झाडे जास्त?)
हे झाले आपले सरळसोट नावे असलेली गावे. पण काही गावांची नावे इरसाल असतात. ती नावे पुर्वीच्या लोकांनी कशी ठेवली असतील? त्या नावांचा इतिहास आपल्याला माहित नसतो. तसा इतिहास कोणी लिहीलेलादेखील नसतो. कर्णोपकर्णी आपल्याला त्या त्या गावांच्या कथा सांगीतल्या जातात. आपण त्या ऐकतोही. असल्याच इतिहास नसलेल्या गावांच्या नावाबाबतीत आपल्याला काही कल्पना लढवता येतात का? आपल्या गावाच्या नावामागे काही इतिहास लपलेला आहे का?
तुम्ही काही कल्पना लढवून त्या गावाचा इतिहास सांगू शकता का?

जशी सातारा गावाची माझी कल्पना:
सातारा : सात तारा किंवा तारां सहित (एक गाव होते. त्या ठिकाणी एक माणूस सात तारांची विणा वाजवायचा. एके दिवशी त्याच्या विणेत एक तार कमी दिसली. तो विणा वाजवणार कसा? तो तार शोधता शोधता वेडा झाला. म्हणून गावाचे नाव सातारा पडले.)

मी काही गावांची नावे देतो. तसे नाव रुढ होण्यामागची माझी कल्पना अशी:

गावाचे नाव नावाची पार्श्वभूमी
भुत्याणे (ओझर मिग जवळचे गाव): गावात भुते राहत असतील.
दात्याणे(ओझर मिग जवळचे गाव): गावातली लोकं दात विचकवत हसत असतील.

ओझर मिग (मिग विमान तयार करण्याचे): हे गाव ओझर च्या जवळ वसवले गेले.
ओझर: आता याला ओझर (तांबट) म्हणतात. वरील ओझर मिग चे हे मुळ गाव. पण आता ओळख होण्यासाठी तांबटांचे ओझर म्हणून नविन ओळख घ्यावी लागली या गावाला.
नाशिक: गावाच्या नावाचा इतिहास सांगायलाच पाहिजे का? Smile
पुणे: पुण्यनगरी
मुंबई: मुंबादेवी
दिल्ली: ???
पलासनेर / पळासनेर (इंदुरला जातांना लागते): - खरोखर गावाच्या आजुबाजूच्या जंगलात पळसाची झाडे खुप आहेत. बसमधूनही दिसतात. मी विचार करतो की गावाच्या नावात 'पळास' ठिक आहे, पण 'नेर' कुठून आले? अन बाकी नेर नावाचेही एक गाव आहे.
पांगराण: आजुबाजूला पांगरीचे रान आहे.
बारामती: बारा प्रकारच्या 'मती' असणारे गाव किंवा बारा प्रकारच्या मती असणार्‍या व्यक्तींचे गाव
लोणावळा: लोण्यासारखी 'स्मुथ' वळणे असणारे गाव (लोणावळ्याच्या आसपास बरीच 'स्मुथ' वळणे आहेत घाटात.)
कर्जत: कर्जात डुबलेली जनता
आजमगड: आजमाचा गड
कोयना: आब्यांची कोय सापडत नाही असे गाव
सांगली: पुलंनी म्हटल्याप्रमाणे 'चांगली' सांगली
बाणेर (पुणे): बाण मारेल तो गाव
धनकवडी : धन सापडणारी
हडपसर:---> हाडपसर----> हाड पसर
पिंप्री: ---> पिंपरी --> पिंपराचे झाड
चिंचवड: चिंचा व वडाची झाडे
घोरपडीगाव: घोरपड सापडणारे गाव.
खेड: गावाचे नावच खेड म्हणजेच खेडं आहे.
सासवड: वड पुजणारी सासू असलेलं गाव
राजगुरूनगर: हुतात्मा राजगुरू यांचे गाव

मेल्या, तुला रे काय कळतंय त्या माडी चुकलो नाडीग्रंथातलं?

श्री हैयो व अन्य नाडी ग्रंथ प्रेमी मित्र हो,

आपणास धनंजयांचे व्यक्तिमत्व त्यांच्या माहितीपुर्ण व सखोल प्रतिसादांमुळे फारच आदरणीय व जवळचे वाटते तसेच मलाही वाटते. त्यांनी त्यांच्या स्याद्वाद लेखातील एका प्रतिसादाला उद्देशून तुमच्याशी (श्री हैयोंशी) खरडवहीतून प्रतिसाद दिल्याचे आपण कळवल्याने मला त्यातील मजकुराला थोडी दखल देणे गरजेचे वाटले म्हणून...

खरे पाहता दोहोबाजूंच्या वितर्काचे जे मूळ, त्या प्रमाणांचे ओझे दोन्हीही बाजूस अधिकाधिक तुल्यबल होणे सहजशक्य असल्यास प्रात्यक्षिक करणे हे सुचविले जाते. तसेही, नाडिग्रंथांबद्दल नाडिविरोधकांनी निर्मिलेले अनेक वाद आहेत असे नाडिग्रंथांवर विश्वास ठेवणारे म्हणतांत. नाडिविरोधकांच्या ह्या संशयच्छेदसिद्धीसाठी शाब्दिक वादापेक्षा प्रात्यक्षिक सोपे ठरू शकेल, हेच मला सुचवायचे होते. एकास-एक प्रमाण नसले तर "सर्वथैव" अयोग्य असा माझा वादच नाही. आपला वितर्क कोठे अर्धवट होतो आहे, ते दाखवून देणे हाच माझा केवळ उद्देश आहे. असो.
आपल्या लेखनावरून काहीसा असा समज होतो की आपणाजवळील प्रमाण तेच आणि तेवढेच सत्य मानून वितर्क करणे योग्य असल्याचे आपणास सुचवायचे आहे. त्याहीउपर, आपला प्रात्यक्षिकास सर्वेथैव विरोध असल्याने, आपला वितर्क हा अर्धवट होतो आहे हे कदाचित आपण मान्य करणार नाही.

नाडीग्रंथांबाबत प्रात्यक्षिकाच्या प्रमाणाला विरोध करून सर्व नाडी विरोधक आपण वितर्क करत आहोत हे त्यांना पक्के माहित असूनही त्यांना तो करावा लागतो कारण त्यांचे सर्व तर्क शब्दप्रामाण्यावर आधारित आहेत. डॉ.नारळीकर काय, डॉ. दाभोलकर काय, फार काय येथे हिरीरीने लेखन करणारे श्री. प्रकाश घाटपांडेकाका काय किंवा मैत्रिणीच्या गप्पांतून नाडीला विनोदी म्हणणारी अदिती काय, बाकीचे सोडा या सर्वांचे तात्विक गुरू डॉ. अब्राहम कोऊर काय, सर्व एक जात असे घडत असावे असे जे म्हणतात, त्यांनी आपापले नाडी ग्रंथ पहावेत - कदाचित स्व. किंवा कै. डॉ.कोऊरांना सोडून अन्यांनी त्याची वही व कॅसेट व पट्टीचे पुरावे श्री. हैयोंच्या तमिळ लिपीज्ञानाचा लाभ घेण्यासाठी सादर करावेत त्यातून प्रत्यक्ष प्रमाणाची शहानिशी होईल.
त्यानंतर मग कोणीही आपणांस शीर्षकातील उल्लेखाने हिणवणार नाही. पहा पटतय का ते.

"कूटलिपी - एक विचार" आणि "स्याद्वादा" या लेखांवरील विवेचनातून नाडी ग्रंथांवर प्रकाश

मित्र हो,
आणि श्री.हैयोहैयैयो, श्री.धनंजय यांना विशेषकरून,

मिसळपाव आंतरजालावर नाडीग्रंथांवर हेटाळणीच्या व चेष्टेच्या प्रतिक्रियांवरून वाचकांना ह्या विषयाची गंभीरता वाटत नसल्याचे लक्षात आले. म्हणून मध्यंतरी मी नाडी ग्रंथांवर विचार व्यक्त करायचे टाळत होतो. पण उपक्रम दिवाळी अंक २००९ मधील "कूटलिपी - एक विचार" या श्री. हैयोहैयैयो यांच्या अत्यंत अभ्यासपूर्ण लेखामुळे मला पुन्हा एकदा नाडीग्रंथांबद्दल विचार व्यक्त करावेसे वाटले. नाडी ग्रंथाच्या कूटलिपी बाबत याठिकाणी काही लेखन झाल्याने येथे चर्चेला ते लावत आहे.
श्री. धनंजय यांनी लिहिलेल्या स्याद्वादा वरच्या लेखाला मी प्रतिक्रिया लिहिली होती. - त्याप्रमाणे नाडीग्रंथांच्या पुर्ण अनुभवातून मिळालेल्या माहितीच्या आधाराने निष्कर्ष काढण्याची गरज मी माझ्या लेखनातून वेळोवेळी अधोरेखित करत आलो आहे. विचारवंतांनी यावर नाडी ग्रंथांची फक्त टिंगलटवाळीने दुर्लक्ष न करता विचार करावा ही नम्र विनंती मी केली होती. त्यावर विविध उदाहरणे देत शेवटी "प्रात्यक्षिकाचे सर्वतोपरी स्थान मला मान्यच आहे, याबाबतीत तुमच्याशी पुन्हा सहमती सांगतो" असे लिहून धनंजयांनी अनुभवाचे श्रेष्ठत्व हेच प्रमाण असल्याचे मान्य केले आहे.

एक अभ्यासक म्हणून धनंजय ह्यांच्या व्यक्तिमत्वाचे सर्वांना कुतुहल आहे. त्यांनी व्यक्त केलेली वैचारिकता, विद्वत्तापूर्ण टीका- टिप्पण्या जालावरील वाचकांना आपापली मते बनवायला, तपासून पहायला आणि सार्वजनिक मत बनवायला प्रवृत्त करतात. हे सर्व विदित आहे. श्री. हैयो ह्यांच्या लेखाच्या संबंधी त्यांनी नाडी ग्रंथांच्या पट्टयांची छायाचित्रे देता आली असती तर... असे म्हणून त्यांच्याकडे तशी मागणी केली आहे. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना हैयोंनी माझा (ओकांचा) उल्लेख करून नाडी ग्रंथांच्या पट्ट्यांचे फोटो किंवा स्कॅन त्यांना वा अन्य कोणालाही सहजासहजी मिळवणे अवघड असल्याचे म्हटले आहे.

श्री. हैयोहैयैयो यांच्या विविध लिपिशास्त्राच्या ज्ञानाचा उपयोग करून नाडी ग्रंथांच्या लिपीचा, मजकुराचा शोध घेता आला तर किती बहार येईल. असे वाटून मी त्यांना विनंती करतो की मी माझ्या बाजूने जी काही शोध साहित्याची मदत करता येणे शक्य असेल ती आनंदाने करीन. त्यांनी त्या शोधसाहित्याची फोड करून त्याचा अर्थ व माहिती वाचकांना प्रस्तूत करावी.

श्री. धनंजयांना विनंती, की त्यांनी नाडी ग्रंथलेखनावर अधिक प्रकाश पाडण्यासाठी मदत करावी तसेच ह्याबाबत अधिक काय करता येईल त्यावर त्यांची अभ्यासपूर्ण मते सुचवावीत.

या जालावरील उत्साही वाचकांना नाडीग्रंथाच्या सत्यतेची तपासणी करायला मी आवाहन करतो. त्यांनी त्यांच्या नाडीग्रंथांचे वाचन करावे व त्यांच्या नाडीपट्टीचे छायाचित्र मिळवून तेही लिपीतज्ञ श्री. हैयोहैयैयो यांना सादर करावे. त्यामुळे या विषयाला खऱ्या अर्थाने चालना मिळेल.
नाडी ग्रंथ प्रेमी - शशिकांत ओक

अपुर्णता, निमित्त, भोगवादी पात्रं आणि मिसळ-नोंदी.

अपुर्णता: पुर्ण आहोतच अश्या भावनेने जेव्हा मनुष्य वावरतो तेव्हाच तो अपुर्णता सिद्ध करत असतो.

निमित्तः जेव्हा गरज नसते तेव्हाही जे आपले अस्तित्व दाखवते ते निमित्त.

भोगः भोगायचंच म्हणल्यावर वाट्टेल ते भोगता येतं.

पात्रं: वरील पात्रं लेखकाच्या कल्पनेचा विलास आहेत वास्तव्याशी साम्य आढळल्यास दोष मराठी संकेतस्थळ या संकल्पनेला द्यावा.

मिसळ: वरील सगळ्यांची मिसळ चाखलीच पाहीजे असं नाही.

(क्रमशः)

Syndicate content
Scroll to Top