मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

महिला दिन: काही कविता

विवेकपटाईत ·
लेखनविषय:
या कविता महिला दिवससाठी लिहल्या होत्या. पण सौला हॉस्पिटल मध्ये अॅडमिट करावे लागले होते. आता ती ठीक आहे. त्यामुळे कविता टंकायला आज फुरसत मिळाली.

गालावरी लाली नभाची.

Deepak Pawar ·
लेखनविषय:
गालावरी लाली नभाची ओठावरी मधाळ शब्द या काजळी केसात तुझिया माझे गुंतले प्रारब्ध. घेती चुंबन सागर लाटा वाळूवरच्या पाऊल खुणा स्पर्श करण्या पिसाट वारा हा येई धावत पुन्हा पुन्हा पाहून तुजला या नभाचे तारे अता हे झाले बेधुंद. तू असता बघ बहर फुलांना तू नसताना विराण जसे माझ्या क्षणा क्षणा वरती आता तुझे उमटले ठसे वाटे मला आता तुझीया सहवासात अपार आनंद. काचवटी ही तुझी कंकणे खणखण करुनी गाती गाणे शुध्द रुपेरी तुझी पैंजणे सूर छेडूनी करी दिवाणे येथे तुला मी पाहुनी आता का होतोसे निशब्द. https://youtu.be/W8HVgfbmvvU

काही आठवणी शब्दांत अडकतात… ❤️ | Marathi Kavita | Truptis Kavita

तृप्ति २३ ·

अभ्या.. 18/01/2026 - 18:52
अहाहा, काही आठवणी शून्य प्रतिसादाच्या, काही आठवणी व्हाटासपाच्या रोमँटिक शायरीच्या, काही आठवणी प्राडॉच्या हळवेपणाच्या तर काही त्यांच्या खिल्ली उडवायच्या...... . वेल्कम अ‍ॅन्ड थॅन्क्स फॉर युट्युब चॅनेल इन्व्हिटेशन. कवितेइतकेच थुकरट आणि निरागस आहे ते. (कसे जमते हे दोन्ही एकाचवेळी)

कंजूस 18/01/2026 - 20:00
आठवणी खूप आहेत जुन्या पण त्या सांगता येतात फक्त गप्पांचा अड्डा जमल्यावर. तर गेल्या बारा वर्षांतील फोटोंच्या रूपात छानपैकी बंदिस्त होऊन मोबाईलात किंवा मेमरी कार्डात पडलेल्या. कुणी भेटल्यास विचारतो दाखवू का त्यातल्या पन्नास? तर उत्तर येते माझ्याच पाहा अगोदर शंभर.

कांदा लिंबू 19/01/2026 - 09:50
सदर काव्यात्म लिखाणातील आशयाच्या व्यामिश्रतेचा आवाका हा केवळ आठवणींच्या परिप्रेक्ष्यापुरताच मर्यादित नसून तो चेहरा ते हसू अश्या दीर्घ पटलावर दृग्गोचर झालेला आहे असे या लिखाणाचे व्यासंगीक दृष्टीने परिक्षण केले असता आढळून येते. मिपासारख्या "मिसळपाव" असे मसालेदार विशेषनाम धारण केलेल्या तरीही लेखनाशयाच्या दृष्टीने अगदीच यःकिंचित अशा संस्थळावर, एखाद्या खानावळीत आचाऱ्याने त्याच्या झारीतून अनिवार जिलब्या पाडत राहाव्यात तसे लेखरूपी धागे आणि प्रतिसाद पाडत राहणाऱ्या कःपदार्थ मिपाकरांच्या लेखनप्रसवाशी सदर उत्तुंग उंचीच्या काव्यशिखराशी तुलना केली असता भांगेत तुळस उगवल्याचा किंवा माळरानावर अंकुर फुटल्याचा आल्हाददायक अनुभव साक्षेपी रसिकाला आल्याशिवाय राहणार नाही. ग्रीष्म-वैशाखाच्या काहिलीमुळे जशी धुक्यात गारठलेली शरद पहाट दुर्मिळ व्हावी तसेच आजकालच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तडाख्यात असे उच्च प्रतिभेचे अनवट लेखन दुर्मिळ झाले आहे. योग्य शब्दांची अचूक निवड, आवेशहीन निवेदनाचा तरल ओघ, आठवणविषयाचे तरल तरीही हृद्य असे शब्द-चित्रण आणि कृष्णार्जुनमैत्रीसम भावना-अभिव्यक्ती रूपकातून मांडलेले आशयघन विचार अशा या बांधीव काव्य-लिखाणाचे आज वाचन करण्याची आज मिपाच्या निमित्ताने सुसंधी प्राप्त झाली हा सुवर्णकांचन योगच म्हणावा लागेल. - (कला साहित्य काव्य समीक्षक) कांदा लिंबू

अभ्या.. 18/01/2026 - 18:52
अहाहा, काही आठवणी शून्य प्रतिसादाच्या, काही आठवणी व्हाटासपाच्या रोमँटिक शायरीच्या, काही आठवणी प्राडॉच्या हळवेपणाच्या तर काही त्यांच्या खिल्ली उडवायच्या...... . वेल्कम अ‍ॅन्ड थॅन्क्स फॉर युट्युब चॅनेल इन्व्हिटेशन. कवितेइतकेच थुकरट आणि निरागस आहे ते. (कसे जमते हे दोन्ही एकाचवेळी)

कंजूस 18/01/2026 - 20:00
आठवणी खूप आहेत जुन्या पण त्या सांगता येतात फक्त गप्पांचा अड्डा जमल्यावर. तर गेल्या बारा वर्षांतील फोटोंच्या रूपात छानपैकी बंदिस्त होऊन मोबाईलात किंवा मेमरी कार्डात पडलेल्या. कुणी भेटल्यास विचारतो दाखवू का त्यातल्या पन्नास? तर उत्तर येते माझ्याच पाहा अगोदर शंभर.

कांदा लिंबू 19/01/2026 - 09:50
सदर काव्यात्म लिखाणातील आशयाच्या व्यामिश्रतेचा आवाका हा केवळ आठवणींच्या परिप्रेक्ष्यापुरताच मर्यादित नसून तो चेहरा ते हसू अश्या दीर्घ पटलावर दृग्गोचर झालेला आहे असे या लिखाणाचे व्यासंगीक दृष्टीने परिक्षण केले असता आढळून येते. मिपासारख्या "मिसळपाव" असे मसालेदार विशेषनाम धारण केलेल्या तरीही लेखनाशयाच्या दृष्टीने अगदीच यःकिंचित अशा संस्थळावर, एखाद्या खानावळीत आचाऱ्याने त्याच्या झारीतून अनिवार जिलब्या पाडत राहाव्यात तसे लेखरूपी धागे आणि प्रतिसाद पाडत राहणाऱ्या कःपदार्थ मिपाकरांच्या लेखनप्रसवाशी सदर उत्तुंग उंचीच्या काव्यशिखराशी तुलना केली असता भांगेत तुळस उगवल्याचा किंवा माळरानावर अंकुर फुटल्याचा आल्हाददायक अनुभव साक्षेपी रसिकाला आल्याशिवाय राहणार नाही. ग्रीष्म-वैशाखाच्या काहिलीमुळे जशी धुक्यात गारठलेली शरद पहाट दुर्मिळ व्हावी तसेच आजकालच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तडाख्यात असे उच्च प्रतिभेचे अनवट लेखन दुर्मिळ झाले आहे. योग्य शब्दांची अचूक निवड, आवेशहीन निवेदनाचा तरल ओघ, आठवणविषयाचे तरल तरीही हृद्य असे शब्द-चित्रण आणि कृष्णार्जुनमैत्रीसम भावना-अभिव्यक्ती रूपकातून मांडलेले आशयघन विचार अशा या बांधीव काव्य-लिखाणाचे आज वाचन करण्याची आज मिपाच्या निमित्ताने सुसंधी प्राप्त झाली हा सुवर्णकांचन योगच म्हणावा लागेल. - (कला साहित्य काव्य समीक्षक) कांदा लिंबू
आठवणी आठव्याला गेलं की खरंच खूप आठवणी आठवतात काही आठवणी गाण्यांमध्ये रमतात तर काही शब्दांमध्ये अडकतात काही आठवणी चेहऱ्यावर उगाच हसू आणतात तर काही आठवणी उगाच मनास छळू पाहतात काही आठवणी पुन्हा आठवणी मध्ये गुंतवतात तर काही आठवणी आठवणींचा गुंता सोडवू पाहतात काही आठवणी आयुष्य सुंदर बनवतात तर काही आठवणी आयुष्य जगायला शिकवतात. ही कविता तुमच्या हृदयाला स्पर्श करून जाईल. ❤️ व्हिडिओला LIKE, SHARE आणि SUBSCRIBE करायला विसरू नका! Written By: Trupti S. Tilloo https://www.youtube.com/@truptiskavita

ओलसर क्षण...

निशांत_खाडे ·
लेखनविषय:
पावसाची सुरुवात नेहमीच अनाहूत असते — नवे नभ, जुना ओळखीचा ओलसर वास घेऊन येणारा वारा, अन् अवचित उगम पावलेली नवीन आठवण, जशी एखादी शब्दावाचून उमजलेली कविता, जी वाचली नाही, पण आत कुठेतरी कायमची ठसलेली आहे. पावसाचा स्पर्श म्हणजे केवळ थेंबांचा ओलावा नव्हे — तर काळाचा एक अतिसूक्ष्म आविष्कार. काही वेळा वाटतं, जसे तिच्या अस्तित्वाच्या सीमारेषा पाण्यात विरघळल्या आहेत, ज्याचा अर्थ अजूनही टिकून आहे, माझ्या आत खोल दडलेला. तीही तशीच भासायची — क्षणागणिक, जणू एखादी अंतर्मुख लय, स्वतःच्या विचारांत गुंतलेली. कधी खळखळून हसायची अन् त्या हसण्यात क्षण कानू स्थिर, स्तब्ध व्हायचे त्या स्थिर क्षणांच्या काही आठवणी

अरेबिक समुद्र ते हिंदी महासागर: जागतिक भाषा प्रेम

माहितगार ·

In reply to by माहितगार

साधा उपाय आहे... भाजपला शिव्या द्या, विशेषत: फडणवीस कसे अयोग्य आहेत ते लिहा. ह्याच्या उलट केलेत तरी चालेल.

In reply to by मुक्त विहारि

आजकाल, मिसळपाव वर तुमच्या लेखनावर प्रतिसाद न येणे, लेखनाच्या धाग्याचे काश्मीर न होणे हे लेखन उत्तम असल्याचा पुरावा आणि शाबासकी मानायची वेळ आलेली आहे , काय म्हणता ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

पण सध्या मात्र व्यक्ती द्वेष आणि व्यक्ती पूजा जोरात आहे. पण त्यातही, "फडणवीस" मात्र दोघांचेही नावडते.... असो, आनंद आहे....

In reply to by मुक्त विहारि

एकदम खरं आहे .
फडणवीस
"महाराष्ट्र देशोधडीला लागला तरी टरबुज्या अणाजी पंत बामनी कावा करुन परत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला नाय पायजेल" हे वाक्य मी स्वतःच्या कानांनी ऐकले आहे! फुल्ल मजा आहे ह्या इथे =)))) कर्वे गोखलें आगरकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात सर्वच लोकं प्रचंड टोकाचे "पुरोगामी" आहेत हे धडाधडीत सत्य आहे ! घैसास केळकर ही नावे ऐकुन पहिला प्रश्न भिसे "कोण" असाच पडतो तुळजापुरच्या मंदिरातील पुजारीच ड्रग्जच्या व्यापारात आहेत हे कळाल्यावर पुजारी म्हणजे नक्की "कोण" असा प्रश्न पडतोच ! "शेटजी आणि भटजीच्या हातात राज्य देणार का " असे म्हणणारे "पुर्वी राजे पेशवाई द्यायचे , आता पेशवे राजे कोण ठरवतात" असे म्हणणारे किंवा "माझं हिंदुत्व हे शेंडी जानव्याचे हिंदुत्व नाही" असं म्हणणारे सगळ्यांना जातीय राजकारण, जातीय समीकरणं सर्व पुढार्‍यांना व्यवस्थित कळतात आणि वळताही आहेत , आणि त्यांना मते देणार्‍या मतदारांनाही ! जात नाही ती जात ! चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः। तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्।।4.13।। हे कळल्याचा मला मनापासुन फार आनंद होतो :)

In reply to by प्रसाद गोडबोले

तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्।। यातला कर्तार कुठल्या धम्माचा? भाषेची मिसळ झाल्याने निर्माण झालेली शंका..... हलकेच घ्या.

विवेकपटाईत 18/04/2025 - 18:19
उर्दू भाषा, नाजूक लाजरी, पर्शियन आणि अरेबिकची ती सुंदर कन्या. अमीर खुसरो ने खडी बोलीत रचना केल्या. पण दरबारी कवि असल्याने अरेबिक लिपि वापरली. अश्या रीतीने उर्दूचा जन्म झाला. खडी बोली हिन्दीची मानस कन्या उर्दू आहे. कालांतरात अरबी फारसी शब्दांचा वापर वाढू लागला. दरबारी लोकांच्या सोयी करता अमीर खुसरो ने खालीकबारी ज्यात प्रत्येक हिन्दी शब्दांचे , फारसी, तुर्की, अरेबिक अनुवाद चारोळी काव्य प्रकारचा माध्यमाने केला. एक पहेली उदा. फ़ारसी बोली आई ना। तुर्की ढूँढी पाई ना।। हिन्दी बोली आरसी आए। खुसरो कहें कोई न बताए।। उत्तर- आरसी (दर्पण, आइना)

In reply to by विवेकपटाईत

माहितगार 18/04/2025 - 20:25
सारे जहांसे लिहिणारा कवि कोणी होता नंतर तो पाकिस्तान प्रेमी झाला. खुसरोने आधी काय लिहील त्याची जी काही बोली असेल ते पण ध्येय काय अरेबिक म्हणून अरेबिक लिपी . पुढे तुम्ही काय म्हणताय ".. दरबारी लोकांच्या सोयी करता अमीर खुसरो ने खालीकबारी ज्यात प्रत्येक हिन्दी शब्दांचे , फारसी, तुर्की, अरेबिक अनुवाद चारोळी काव्य प्रकारचा माध्यमाने केला. " १) त्यांचे राज्यकर्ते दरबार फारसी, तुर्की, अरेबिक ला वाहिलेले होते आणि ते भारतात जन्मले म्हणून भारतीय होते आणि कथित भाषा संकर भारतातच झाला म्हणून उर्दु भारतीय! हो की नाही माझी कविता पण त्या संकराचीच तर दुहाई देते आहे. २) आपण हिंग्लिश आणि मिंग्लीशलाही भारतीयच म्हणतो की नाही नंतर त्यात हिंदी आणि मराठी शब्द नावापुरतेच उरले लिपी रोमन झाली आणि बहुसंख्य भारतीयांना नीट समजुन वाचता नाही आली तरी हिंग्लीशी आणि मिंग्लिशी भारतीयच रहाणार हो की नाही हक्कचे तो त्यांचा ३) कवितेत अरेबिक आणि फारसी लिपीचे तोंड भरून कौतुक राहुन गेले ते पुढच्या एखाद्या कवितेतून नक्की करूया

In reply to by माहितगार

माहितगार 18/04/2025 - 20:38
असंख्य वर्षांच्या पारतंत्र्यात अरेबिक आणि रोमन लिपीचे महत्व होते त्याच्या दहा अब्जपट तरी स्वातंत्र्यानंतर परकीय लिपींचे महत्व वाढलेच पाहीजे. जिथून भाकर मिळते तिकडे दंडवत सलाम करण्याशिवाय पर्याय नसतो अशी उक्ती सार्थच असते.

In reply to by माहितगार

साधा उपाय आहे... भाजपला शिव्या द्या, विशेषत: फडणवीस कसे अयोग्य आहेत ते लिहा. ह्याच्या उलट केलेत तरी चालेल.

In reply to by मुक्त विहारि

आजकाल, मिसळपाव वर तुमच्या लेखनावर प्रतिसाद न येणे, लेखनाच्या धाग्याचे काश्मीर न होणे हे लेखन उत्तम असल्याचा पुरावा आणि शाबासकी मानायची वेळ आलेली आहे , काय म्हणता ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

पण सध्या मात्र व्यक्ती द्वेष आणि व्यक्ती पूजा जोरात आहे. पण त्यातही, "फडणवीस" मात्र दोघांचेही नावडते.... असो, आनंद आहे....

In reply to by मुक्त विहारि

एकदम खरं आहे .
फडणवीस
"महाराष्ट्र देशोधडीला लागला तरी टरबुज्या अणाजी पंत बामनी कावा करुन परत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला नाय पायजेल" हे वाक्य मी स्वतःच्या कानांनी ऐकले आहे! फुल्ल मजा आहे ह्या इथे =)))) कर्वे गोखलें आगरकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात सर्वच लोकं प्रचंड टोकाचे "पुरोगामी" आहेत हे धडाधडीत सत्य आहे ! घैसास केळकर ही नावे ऐकुन पहिला प्रश्न भिसे "कोण" असाच पडतो तुळजापुरच्या मंदिरातील पुजारीच ड्रग्जच्या व्यापारात आहेत हे कळाल्यावर पुजारी म्हणजे नक्की "कोण" असा प्रश्न पडतोच ! "शेटजी आणि भटजीच्या हातात राज्य देणार का " असे म्हणणारे "पुर्वी राजे पेशवाई द्यायचे , आता पेशवे राजे कोण ठरवतात" असे म्हणणारे किंवा "माझं हिंदुत्व हे शेंडी जानव्याचे हिंदुत्व नाही" असं म्हणणारे सगळ्यांना जातीय राजकारण, जातीय समीकरणं सर्व पुढार्‍यांना व्यवस्थित कळतात आणि वळताही आहेत , आणि त्यांना मते देणार्‍या मतदारांनाही ! जात नाही ती जात ! चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः। तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्।।4.13।। हे कळल्याचा मला मनापासुन फार आनंद होतो :)

In reply to by प्रसाद गोडबोले

तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्।। यातला कर्तार कुठल्या धम्माचा? भाषेची मिसळ झाल्याने निर्माण झालेली शंका..... हलकेच घ्या.

विवेकपटाईत 18/04/2025 - 18:19
उर्दू भाषा, नाजूक लाजरी, पर्शियन आणि अरेबिकची ती सुंदर कन्या. अमीर खुसरो ने खडी बोलीत रचना केल्या. पण दरबारी कवि असल्याने अरेबिक लिपि वापरली. अश्या रीतीने उर्दूचा जन्म झाला. खडी बोली हिन्दीची मानस कन्या उर्दू आहे. कालांतरात अरबी फारसी शब्दांचा वापर वाढू लागला. दरबारी लोकांच्या सोयी करता अमीर खुसरो ने खालीकबारी ज्यात प्रत्येक हिन्दी शब्दांचे , फारसी, तुर्की, अरेबिक अनुवाद चारोळी काव्य प्रकारचा माध्यमाने केला. एक पहेली उदा. फ़ारसी बोली आई ना। तुर्की ढूँढी पाई ना।। हिन्दी बोली आरसी आए। खुसरो कहें कोई न बताए।। उत्तर- आरसी (दर्पण, आइना)

In reply to by विवेकपटाईत

माहितगार 18/04/2025 - 20:25
सारे जहांसे लिहिणारा कवि कोणी होता नंतर तो पाकिस्तान प्रेमी झाला. खुसरोने आधी काय लिहील त्याची जी काही बोली असेल ते पण ध्येय काय अरेबिक म्हणून अरेबिक लिपी . पुढे तुम्ही काय म्हणताय ".. दरबारी लोकांच्या सोयी करता अमीर खुसरो ने खालीकबारी ज्यात प्रत्येक हिन्दी शब्दांचे , फारसी, तुर्की, अरेबिक अनुवाद चारोळी काव्य प्रकारचा माध्यमाने केला. " १) त्यांचे राज्यकर्ते दरबार फारसी, तुर्की, अरेबिक ला वाहिलेले होते आणि ते भारतात जन्मले म्हणून भारतीय होते आणि कथित भाषा संकर भारतातच झाला म्हणून उर्दु भारतीय! हो की नाही माझी कविता पण त्या संकराचीच तर दुहाई देते आहे. २) आपण हिंग्लिश आणि मिंग्लीशलाही भारतीयच म्हणतो की नाही नंतर त्यात हिंदी आणि मराठी शब्द नावापुरतेच उरले लिपी रोमन झाली आणि बहुसंख्य भारतीयांना नीट समजुन वाचता नाही आली तरी हिंग्लीशी आणि मिंग्लिशी भारतीयच रहाणार हो की नाही हक्कचे तो त्यांचा ३) कवितेत अरेबिक आणि फारसी लिपीचे तोंड भरून कौतुक राहुन गेले ते पुढच्या एखाद्या कवितेतून नक्की करूया

In reply to by माहितगार

माहितगार 18/04/2025 - 20:38
असंख्य वर्षांच्या पारतंत्र्यात अरेबिक आणि रोमन लिपीचे महत्व होते त्याच्या दहा अब्जपट तरी स्वातंत्र्यानंतर परकीय लिपींचे महत्व वाढलेच पाहीजे. जिथून भाकर मिळते तिकडे दंडवत सलाम करण्याशिवाय पर्याय नसतो अशी उक्ती सार्थच असते.
लेखनविषय:
नक्कीच, पर्शियन आणि उर्दू भाषेतील प्रेमाची भावना दर्शवणारी कविता खालीलप्रमाणे: **पर्शियन आणि अरेबिक प्रेम:** पर्शियन भाषा, जणू सुंदर युवती, अरेबिक तरुणावर तिचे मन मोहित. मोहक अदा, नजाकत खास, प्रेमाचा रंग, जणू गुलाबाचा सुवास. **उर्दू, पर्शियन आणि अरेबिकची सुंदर कन्या:** उर्दू भाषा, नाजूक लाजरी, पर्शियन आणि अरेबिकची ती सुंदर कन्या. शब्दांची जादू, भावनांचा खेळ, सौंदर्याची खाण, जणू मोत्यांचा मेळ. **उर्दू आणि हिंदी प्रेम:** अशा सुंदर उर्दूचं, हिंदी तरुणावर मन भाळले. प्रेमाची कहाणी, जणू गोडते खेळ. शब्दांची गुंफण, रंगांची उधळण, दोन भाषांचं, हे अनोखं मिलन. **भाषा आरती** जय पर्शियन माता, सुंद

मी आणि तू (प्रणय कविता)

OBAMA80 ·
लेखनविषय:
रेखीव भृकुटी तुझ्या ललाटी मी चंद्रकोर सुबक नेटकी वसतो तुझ्या मृगनयनी मी गोड आनंदाश्रू मिलनी रसरशीत तुज गोड ओठात मी ऐन मोरपिशी यौवनात रेशमी तुझ्या धुंद श्वासात मी जन्मतो नव्याने सतत शिंपूनी लाली तुझ्या गाली मी विणतो तारूण्य मलमली मन माझे तुझ्या पावली जसा नाद नाजूक पैंजणी गुंफूनी गजरा तव कुंतलात मी रंगवितो बेधुंद रात गुंतूनी तुझ्या मादक यौवनी मी चेतवतो प्रणय अनादी पोर्णिमेचा चन्द्र मी आणि शुक्राची तू ग चांदणी

चकलीची भाजणी

कर्नलतपस्वी ·

कंजूस 17/10/2024 - 09:14
वाह. सांसारिक चकली आवडली. (मला वाटलं की काही राजकीय चकली भाजणीचे विडंबन आहे काय.)

प्रचेतस 17/10/2024 - 10:06
भाजणी चांगली भाजल्यामुळे चकली एकदम खुसखुशीत झालेली आहे.

मला वाटली पाककृतीच आहे.
उतारवयात सुद्धा जवळ घ्यावंसं वाटतं प्रेम आणी माया एकत्र अनुभवास वाटतं
हे राम काळजी घ्या. रस्त्याने सुंदर महिला, युवती दिसल्यास आपण आपलं खाली मान घालून नाकासमोर चालायचं. उतार वयात प्रेमा आणि माया यांच्यापासून दूर राहीलं पाहिजे. (हलकेच घ्या साहेब) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

परतीच्या पावसाचा न्यारा ढंग एकाच सरीत भिजवतो अंग श्रावणातल्या बुरबूरी पेक्षा परतीचा पाऊस बरा नवशिक्या पेक्षा अनुभवी खरा हलकेच घ्या.

एक वयस्कर जिल्बी पाडली आहे. शृंगार, अश्लील, प्रेम, व तत्सम शब्दांत खुपच पातळ सीमारेषा आहे. सीमारेषेव,परिणीती व वयस्क वाचक वर्ग यांचे भान ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. सर्व प्रतिसादक, वाचकांचे मनापासून आभार.

कंजूस 17/10/2024 - 09:14
वाह. सांसारिक चकली आवडली. (मला वाटलं की काही राजकीय चकली भाजणीचे विडंबन आहे काय.)

प्रचेतस 17/10/2024 - 10:06
भाजणी चांगली भाजल्यामुळे चकली एकदम खुसखुशीत झालेली आहे.

मला वाटली पाककृतीच आहे.
उतारवयात सुद्धा जवळ घ्यावंसं वाटतं प्रेम आणी माया एकत्र अनुभवास वाटतं
हे राम काळजी घ्या. रस्त्याने सुंदर महिला, युवती दिसल्यास आपण आपलं खाली मान घालून नाकासमोर चालायचं. उतार वयात प्रेमा आणि माया यांच्यापासून दूर राहीलं पाहिजे. (हलकेच घ्या साहेब) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

परतीच्या पावसाचा न्यारा ढंग एकाच सरीत भिजवतो अंग श्रावणातल्या बुरबूरी पेक्षा परतीचा पाऊस बरा नवशिक्या पेक्षा अनुभवी खरा हलकेच घ्या.

एक वयस्कर जिल्बी पाडली आहे. शृंगार, अश्लील, प्रेम, व तत्सम शब्दांत खुपच पातळ सीमारेषा आहे. सीमारेषेव,परिणीती व वयस्क वाचक वर्ग यांचे भान ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. सर्व प्रतिसादक, वाचकांचे मनापासून आभार.
उतारवयात सुद्धा जवळ घ्यावंसं वाटतं प्रेम आणी माया एकत्र अनुभवास वाटतं निश्चिंतता, मिठीत तीच्या मजला वाटते बायको माझी मज आयुर्विम्या सम भासते वेणी,थोडी साखर पेरणी एव्हढाच हप्ता बसतो पाॅलिसी मॅच्युरिटीचा आनंद ,वेगळाच असतो काय सांगू तुम्हांला आनंदाचे डोही आनंद तरंग जेंव्हा बनतो उडन खटोला, बेतुक्याचा पलंग. -बेतुक्याची गवळण.

तृषा

Bhakti ·
चमचमणारी चांदणी मला व्हायचीच नाही, काळ्याकुट्ट रात्री ती चंद्राशिवाय एकटीच झुरत राहते... पहाटेची उषा मला व्हायचीच नाही विखुरलेल्या किरणांनी सूर्य हट्टाने तिला होरपळतो... रंगीत फुलपाखरू मला व्हायचेच नाही कोमल फुलाला नकळतही टोचून बढेजाव मिरवायचा नाही... मला व्हायचंय नदी...सरिता... खळखळ मधूर नादात अस्तित्व माझं जपतं तुझ्या कुशीत शिरणार आहे नदी-समुद्राच्या मिलनात तू माझा समुद्र होशील ना.. तिथे तृषा विरेल बहरेल अंतरंग गहिरे -भक्ती

( वर्दी )

कर्नलतपस्वी ·
काव्यरस
अर्धोन्मीलित डोळे, स्वप्नांची गर्दी झाली "ती",येत आहे याची अवचित वर्दी आली हृदयात प्रेम वारू, फुरफूरू लागला होता मनात प्रेम ज्वर माझ्या,दाटू लागला होता वाजे डोक्यात प्रेमघंटा,फुटती प्रितीचे धुमारे पडे मन अंगणात,आठवांचा प्राजक्त सडा रे झाले तप्त श्वास माझे,गात्रे सुखावून गेली पहाटफुटणी मनीचा,अंधार विझवून गेली नयनात श्रावण धारां,अंगी कडाडते विज उरी दाटल्या प्रमादांचे सांगीन तीला मी गुज नाद पैजंणाचा कानी येता,जागला प्रेम दर्दी उघडता नयन, तया कळाले , उफ्फ sssssss की "ती",.........सर्दी होती.

नवी ईमारतीतील अडगळ निवारण

माहितगार ·

मुक्तछंदाच्या रचनेवर अजुन काम करणे आवश्यक आहे. उत्तरदायित्वास नकार लागू हे यायला पाहिजे होतं ना. बाकी प्रयत्न उत्तम आहे. येत राहा आणि लिहिते राहा. बरेच दिवस झाले बोलणे नाही. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 19/03/2024 - 11:15
युट्यूब च्यानल चालू करण्याचा मनोदय आहे. आपल्यासाठी आनंदाची गोष्ट एका नास्तिक साहित्यिक महोदयांच्या मुलाखतीने सुरवात करण्याचा मनोदय आहे. त्यासाठी उत्तरदायित्वास नकार लागू अद्ययावत करुन मग वापरेन. पण तुमच्यासारखे मनमोकळे पणाने टिका स्विकारणारे भेटले की उत्तरदायित्वास नकार लागू लिहिण्याची गरज कमी होते :) याच विषय मालीकेत आणखी एखाद दुसरी कविता एखादा लेखही लिहिण्याचा मनोदय आहे. आणि तुम्हाला मुलाखतीसाठी कॉल करण्याचेही मनात घोळत आहे. :) प्रतिसादासाठी अनेक आभार.

In reply to by माहितगार

>>>> ट्यूब च्यानल चालू करण्याचा मनोदय आहे. अरे वाह ! शुभेच्छा. >>>> आपल्यासाठी आनंदाची गोष्ट एका नास्तिक साहित्यिक महोदयांच्या मुलाखतीने सुरवात करण्याचा मनोदय आहे. हा हा ! किती छान. देर आये दुरुस्त आये. ;) >>> तुमच्यासारखे मनमोकळे पणाने टिका स्विकारणारे भेटले की उत्तरदायित्वास नकार लागू लिहिण्याची गरज कमी होते :) आपल्या कौतुकाबद्दल आभारी आहे. :) >>> आणि तुम्हाला मुलाखतीसाठी कॉल करण्याचेही मनात घोळत आहे. आपल्यासाठी कधीही उपलब्ध आहे. सध्या निवडणुकीच्या कामात झोनल ऑफिसर म्हणून व्यग्र आहे,तितका अपवाद सोडला तर मी आहेच. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टर्मीनेटर 20/03/2024 - 10:39
सध्या निवडणुकीच्या कामात झोनल ऑफिसर म्हणून व्यग्र आहे
प्रा.डॅा. ह्या कामाच्या अनूभवांवर आधारीत एक माहितीपूर्ण लेख लवकरंच येऊ द्यात, त्यातून जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीतली निवडणूक प्रक्रीया समजायला मदत होईल. माझ्या भाउजींना ‘एक्स्पेंडीचर मॅनेजमेंट’ची ड्यूटी लागली आहे. आचार संहिता लागू झाल्या पासून सूरू झालेले हे काम निकाल लागल्यानंतरही सुमारे महिनाभर चालू रहाणार आहे. ह्या प्रक्रियेची जी माहिती त्यांच्याकडून मिळत आहे ती खूप रोचक आहे. तुम्ही लेख लिहिलात तर त्यावर काही रंजक माहिती शेअर करता येईल…

In reply to by टर्मीनेटर

आम्ही आचारसंहिता लागण्याच्या एक दीड महीना अगोदर पासून निवडणुकीच्या कामात आहोत. पुढे ते निवडणूक निकाल कामापर्यन्त ते चाललेले असते. आता निवडणुकी आचारसंहितेमुळे काहीही लिहिता येणार नाही. पण निवडणुकीनंतर लिहीन. केंद्राध्यक्ष होतो तेव्हा निवडणुकीतील कामाबद्दल कुठे तरी प्रतिसादात लिहिले आहे, कुठे ते आठवत नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by माहितगार

अहिरावण 20/03/2024 - 09:50
मुलाखत घेणारा आणि देणारा दोघांना पांढरा टी शर्ट असावा. तो जितका धुवट आणि दंड दाखवणारा तितका चांगला.

In reply to by माहितगार

एकदा एके सरकारी ठिकाणी खूप जंगली झाडी होती. पण, झाडे तोडायला परवानगी नसल्याने, झाडे तोडून, जागा मोकळी करता येत न्हवती. त्यामुळे, सरकारी नोकरांची पंचाईत झाली. ते नोकर एका बुजुर्क, राजकारणी व्यक्तीला भेटायला गेले.. त्यांचा सल्ला खालील देतो.. .... झाडे कापणे हे अयोग्य आहे. आमच्या गावात पण कुणीही झाडे कापत नाहीत किंवा मोरचूदाचे पाणी झाडाला देत नाहीत. कर्मचाऱ्यांनी योग्य तो बोध घेतला. काही महिन्यांतच, झाडे मरून गेली.. -----

भागो 20/03/2024 - 06:44
>>हि कविता वाचल्यावर कुणीतरी म्हणेलच आताशा माणूस चंद्रावर जातो चंद्रावर कुठे हिरवळीची अडगळ असेते का? हा शास्त्रीय स्पर्श आवडला आहे.

In reply to by भागो

माहितगार 20/03/2024 - 09:05
>>हा शास्त्रीय स्पर्श आवडला आहे. प्रतिसाद वाचून कवितेच्या काँटेक्स्ट मध्ये 'शास्त्रीयता' या शब्दाची गंमत वाटली. :) प्रतिसादासाठी अनेक आभार.

वामन देशमुख 20/03/2024 - 16:06
कवितेचा आशय, पात्रांची निवड, शब्दांची योजना, शेवट आवडले. अजून येऊ द्या.

मुक्तछंदातल्या कविता शक्यतो आवडत नाहीत पण ही जराशी कविवर्य पाडगांवकरांच्या मोरू कवितासंग्रहात बसेल अशा धाटणीची वाटली म्हणूनच आवडली. लिहित रहा, आम्ही वाचत राहू . सं - दी - प

मुक्तछंदाच्या रचनेवर अजुन काम करणे आवश्यक आहे. उत्तरदायित्वास नकार लागू हे यायला पाहिजे होतं ना. बाकी प्रयत्न उत्तम आहे. येत राहा आणि लिहिते राहा. बरेच दिवस झाले बोलणे नाही. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 19/03/2024 - 11:15
युट्यूब च्यानल चालू करण्याचा मनोदय आहे. आपल्यासाठी आनंदाची गोष्ट एका नास्तिक साहित्यिक महोदयांच्या मुलाखतीने सुरवात करण्याचा मनोदय आहे. त्यासाठी उत्तरदायित्वास नकार लागू अद्ययावत करुन मग वापरेन. पण तुमच्यासारखे मनमोकळे पणाने टिका स्विकारणारे भेटले की उत्तरदायित्वास नकार लागू लिहिण्याची गरज कमी होते :) याच विषय मालीकेत आणखी एखाद दुसरी कविता एखादा लेखही लिहिण्याचा मनोदय आहे. आणि तुम्हाला मुलाखतीसाठी कॉल करण्याचेही मनात घोळत आहे. :) प्रतिसादासाठी अनेक आभार.

In reply to by माहितगार

>>>> ट्यूब च्यानल चालू करण्याचा मनोदय आहे. अरे वाह ! शुभेच्छा. >>>> आपल्यासाठी आनंदाची गोष्ट एका नास्तिक साहित्यिक महोदयांच्या मुलाखतीने सुरवात करण्याचा मनोदय आहे. हा हा ! किती छान. देर आये दुरुस्त आये. ;) >>> तुमच्यासारखे मनमोकळे पणाने टिका स्विकारणारे भेटले की उत्तरदायित्वास नकार लागू लिहिण्याची गरज कमी होते :) आपल्या कौतुकाबद्दल आभारी आहे. :) >>> आणि तुम्हाला मुलाखतीसाठी कॉल करण्याचेही मनात घोळत आहे. आपल्यासाठी कधीही उपलब्ध आहे. सध्या निवडणुकीच्या कामात झोनल ऑफिसर म्हणून व्यग्र आहे,तितका अपवाद सोडला तर मी आहेच. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टर्मीनेटर 20/03/2024 - 10:39
सध्या निवडणुकीच्या कामात झोनल ऑफिसर म्हणून व्यग्र आहे
प्रा.डॅा. ह्या कामाच्या अनूभवांवर आधारीत एक माहितीपूर्ण लेख लवकरंच येऊ द्यात, त्यातून जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीतली निवडणूक प्रक्रीया समजायला मदत होईल. माझ्या भाउजींना ‘एक्स्पेंडीचर मॅनेजमेंट’ची ड्यूटी लागली आहे. आचार संहिता लागू झाल्या पासून सूरू झालेले हे काम निकाल लागल्यानंतरही सुमारे महिनाभर चालू रहाणार आहे. ह्या प्रक्रियेची जी माहिती त्यांच्याकडून मिळत आहे ती खूप रोचक आहे. तुम्ही लेख लिहिलात तर त्यावर काही रंजक माहिती शेअर करता येईल…

In reply to by टर्मीनेटर

आम्ही आचारसंहिता लागण्याच्या एक दीड महीना अगोदर पासून निवडणुकीच्या कामात आहोत. पुढे ते निवडणूक निकाल कामापर्यन्त ते चाललेले असते. आता निवडणुकी आचारसंहितेमुळे काहीही लिहिता येणार नाही. पण निवडणुकीनंतर लिहीन. केंद्राध्यक्ष होतो तेव्हा निवडणुकीतील कामाबद्दल कुठे तरी प्रतिसादात लिहिले आहे, कुठे ते आठवत नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by माहितगार

अहिरावण 20/03/2024 - 09:50
मुलाखत घेणारा आणि देणारा दोघांना पांढरा टी शर्ट असावा. तो जितका धुवट आणि दंड दाखवणारा तितका चांगला.

In reply to by माहितगार

एकदा एके सरकारी ठिकाणी खूप जंगली झाडी होती. पण, झाडे तोडायला परवानगी नसल्याने, झाडे तोडून, जागा मोकळी करता येत न्हवती. त्यामुळे, सरकारी नोकरांची पंचाईत झाली. ते नोकर एका बुजुर्क, राजकारणी व्यक्तीला भेटायला गेले.. त्यांचा सल्ला खालील देतो.. .... झाडे कापणे हे अयोग्य आहे. आमच्या गावात पण कुणीही झाडे कापत नाहीत किंवा मोरचूदाचे पाणी झाडाला देत नाहीत. कर्मचाऱ्यांनी योग्य तो बोध घेतला. काही महिन्यांतच, झाडे मरून गेली.. -----

भागो 20/03/2024 - 06:44
>>हि कविता वाचल्यावर कुणीतरी म्हणेलच आताशा माणूस चंद्रावर जातो चंद्रावर कुठे हिरवळीची अडगळ असेते का? हा शास्त्रीय स्पर्श आवडला आहे.

In reply to by भागो

माहितगार 20/03/2024 - 09:05
>>हा शास्त्रीय स्पर्श आवडला आहे. प्रतिसाद वाचून कवितेच्या काँटेक्स्ट मध्ये 'शास्त्रीयता' या शब्दाची गंमत वाटली. :) प्रतिसादासाठी अनेक आभार.

वामन देशमुख 20/03/2024 - 16:06
कवितेचा आशय, पात्रांची निवड, शब्दांची योजना, शेवट आवडले. अजून येऊ द्या.

मुक्तछंदातल्या कविता शक्यतो आवडत नाहीत पण ही जराशी कविवर्य पाडगांवकरांच्या मोरू कवितासंग्रहात बसेल अशा धाटणीची वाटली म्हणूनच आवडली. लिहित रहा, आम्ही वाचत राहू . सं - दी - प
दोन प्राध्यापक बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात. पहिल्या प्राध्यापकाने दुसर्‍या प्राध्यापकास कानात कुजबुजत विचारले नव्या ईमारतीच्या अवारातील जुने वड, पिंपळ, पारीजात, .......