टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
प्रेमकाव्य
सार्याच आठवणी आहेत अजून मनात ताज्या
प्रेषक फटू ( गुरू, ०७/२४/२००८ - १२:३८) .जरी बसणार नाही या गोष्टीवर विश्वास माझा
लाभणार नाही मला पुन्हा जरी सहवास तुझा
मनाची मात्र तयारी अजून होत नाही माझ्या
सार्याच आठवणी आहेत अजून मनात ताज्या
जेव्हा कुणी समोरून क्षणी निघून जातं माझ्या
जणू ती व्यक्ती तू असल्याचा भास होतो राजा
तुझी मुर्ती वसली आहे दोन्ही पापण्यांत माझ्या
सार्याच आठवणी आहेत अजून मनात ताज्या
असलो जरी मी अफाट दुनियेमध्ये मिसळलेला
आतून मात्र मी आहे पुर्ण हरवलेला अन एकला
या एकाकी जगामध्ये मला सोडून गेली तू राजा
सार्याच आठवणी आहेत अजून मनात ताज्या
जरी आजही होते पापण्यांची उघडझाप माझ्या
त्या पापण्यांवरची स्वप्नं तुझीच होती रे राजा
ती सारी स्वप्नं राज्य करतात क्षणांवर माझ्या
सार्याच आठवणी आहेत अजून मनात ताज्या
तुझ्या त्या सहवासाच्या निखळ चांदण्यात सखे
भान हरपून अगदी विसरून जात असे स्वत:ला
केव्हाच सरलेत ते दिवस,जाणवतंय मला आता
किती अभागी मी, मुकलोय त्या स्वर्गसुखाला
माझ्या विचारांमध्ये,वेदनांच्या या जाणिवांमध्ये
आताचा क्षण हा फारच भयाण वाटतो आहे मला
ते मैत्रीचं निखळ हास्य, प्रेमाचा नाजुक धागा
हरवलेलं प्रेम व्याकुळ करत आहे या कातरवेळेला
जरी बसणार नाही या गोष्टीवर विश्वास माझा
लाभणार नाही मला पुन्हा जरी सहवास तुझा
मनाची मात्र तयारी अजून होत नाही माझ्या
सार्याच आठवणी आहेत अजून मनात ताज्या
आठवणीत न हरवलेला,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
विठू सांगे...
प्रेषक प्राजु ( शुक्र, ०७/१८/२००८ - २०:०५) .आषाढाचा मास । दर्शनाची आस ।
होती तुझे भास । पांडुरंगा । ।
साठवावे नेत्री । भक्तीचिया गात्री ।
दिवसा नि रात्री । रूप तुझे । ।
खोवलेला शिरी । तुरा हा मंजिरी ।
वसतो पंढरी । विठू राया । ।
भिवरेच्या तिरी । उभा विटेवरी ।
कर कटेवरी । ठेवोनिया । ।
काळा नि सावळा । प्रेमाचा पुतळा ।
मनाचा निर्मळा । पांडुरंग । ।
नामयाचा घास । घेऊनिया खास ।
जागवली आस । भक्तीयोगे । ।
घेऊनी वळण । दळितो दळण ।
करितो राखण । जनाईचे । ।
तुकोबाचा भार । घेई शिरावर ।
परि गुन्हेगार । आवलीचा । ।
काय त्या म्हणावं ? देव की मानव ।
कोणाला कळाव ? गारूड ते । ।
श्रद्धा अंधश्रद्धा । फरक तो करा ।
परी कास धरा । प्रयत्नांची । ।
प्रयत्नाच्या अंती । ध्येयाची ती पूर्ती ।
करा श्रम भक्ती । विठू सांगे । ।
जाणा एक सर्व । विश्व हाच देव । ।
सांगे ज्ञानदेव । सकलांना । ।
प्राजू म्हणे ऐसे । विश्वाला जपावे ।
प्रयत्न करावे । ध्येयासाठी । ।
- प्राजु.
वरील काव्य वाचून प्राजुला विरक्ती आली आहे असा गैर समज करून घेऊ नये. काही ओव्या वाचता वाचता मला या ओळी सुचल्या.. म्हणून इथे लिहिल्या.
छचोर
प्रेषक बेसनलाडू ( शनी, ०७/१२/२००८ - ०४:४९) .पाऊस इतका छचोर आहे साला!
ओल्याचिंब केसांमधून रुळतो तुझ्या मानेवर
टपटपतो लाजलाजून,जमून भिवयांच्या पागोळ्यांवर
पडतो आम्ही दोघेही -पडली मल्हाराची थाप ढगांवर की
फरक फक्त इतकाच -
तो कोसळतो,मी ढासळतो
दुसर्या कुणी तुला भिजवलं असं
की माझं पाणी पाणी होतं
आणि लाजून लाजून तुझंही
मग काय! - पावसाला आणखी पाणी मिळतं,भिजवायला!
पाऊस इतका छचोर आहे साला!
पहिली भेट
प्रेषक अनंतसागर ( शुक्र, ०७/११/२००८ - २१:१६) .सायंकाळी कातरवेळी
प्रेमज्योत मनी पाझळली
परतीच्या त्या रस्त्यावरती
माझी सोबतीन मला भेटली.
मी होतो उधान धुंदीत
चर्या तिची गंभीर निवांत.
प्रवासात त्या मला लाभली
क्षणभर तिची अनमोल साथ.
न राहून ती मज संगे बोलली
प्रेमकळी मन्मनी खुलली.
होतो कधी अनोळखी आम्ही
दाट मैत्री आता जाहली.
आता आमुच्या गप्पा रंगल्या
खळ्या तिच्या गालावर खुलल्या.
पाहताना तिचे गोड रुप ते
प्रेम कविता मनी उमलल्या.
निरोप देता झालो बैचेन
विरहाने दुभंगले मन.
आपण भेटू पुन्हा लवकर
असे तिने मला दिले वचन.
कुणास ठाऊक..?
प्रेषक स्नेहश्री ( शुक्र, ०७/०४/२००८ - १७:४५) .मिपाच्या या धोरणानुसारयेथील साहित्य काढून टाकण्यात आलेले आहे. स्नेहश्री यांनी मिपाचे धोरण समजून घेऊन त्याचा आदर राखल्याबद्दल मिपा त्यांचे आभारी आहे!
--जनरल डायर.
बीबी का मकबरा
प्रेषक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ( शुक्र, ०६/०६/२००८ - १०:००) .नमस्कार, आम्हाला आमच्या ऐतिहासिक औरंगाबाद शहराचं फार कौतुक. प्रत्येकाला प्रत्येकाच्या शहरात अभिमान वाटावा अशा काही कलाकृती सतत आनंद देत असतात. ताजमहालाची प्रतिकृती असलेला बीबी का मकबरा त्या पैकी एक.
या महालात औरंगजेबाची पत्नी राबिया दुर्रानीची कबर आहे. ही कबर औरंगजेबाच्याच काळात बांधलेली आहे असे म्हणतात. परंतु ही प्रतिकृती मलिकाच्या मुलाने आजम शाहने १६७९ इ.स. मध्ये आपल्या आइच्या स्मरणार्थ बनविली आहे. आगर्याचा ताजमहाल संगमरवरी दगडाचा बनवलेला आहे तर ,मकबरा हा पांढर्या मातीपासुन बनविलेला आहे. एका भव्य दरवाजातून प्रवेश केल्यावर प्रवेशदारात मोठा पाण्याचा हौद आहे. त्यात डोलणारी कमळांची फुले लक्ष वेधुन घेतात. त्यानंतर पुढे कारंजे आणि दोन्ही बाजूने दगडी रस्ता आहे. दोन्ही बाजुने सरुची वृक्ष लावलेली आहेत. बीबीच्या मकबर्याची भव्यता आणि सौंदर्य डोळ्यात साठवण्याच मोह कोणासही व्हावा. मकबरा एक भव्य ओट्यावर बांधलेला आहे. मकबर्यात मधोमध बेगम राबियाची कबर आहे. पुर्वी थेट तिथे जाता येत होते आता तो भाग प्रवेशासाठी बंद केला आहे. कबरीच्या चारही बाजुने संगमरवरी जाळ्या बसवल्या आहेत. कबरीची रचना करतांना वरील छतांच्या खिडक्यांची अशी रचना केलेली आहे की त्या कबरीवर दिवसा सुर्याची किरणे आणि रात्री चंद्र प्रकाश त्या कबरीवर पडतो. मकबर्याचा घुमट संगमरवरी दगडाचा बनलेला आहे. भव्य ओट्यावर चारही बाजुने दोन ताळी मिनार बांधलेले आहेत. कधी काळी मिनारावर जाता येत होते. पण लोकांनी इहलोकाची यात्रा संपवण्यासाठी या जागेची निवड केल्यामुळे हा रस्ता कायमचा बंद करण्यात आलेला आहे. औरंगजेब व त्याची बेगम यांच्या वापरात येणार्या काही वस्तु भांडे, वस्त्र, लाकडी वस्तू या संग्रहात ठेवलेले आहे. पण हे संग्राहलय सुद्धा बंद करण्यात आलेले आहे. आजुबाजुच्या वीट भट्ट्यांमुळे संगमरवरी वास्तु काळी पडत आहे. त्याला रंगकाम देण्याचे काम सतत चालले असते. औरंगाबाद शहरात किमान बावन्न दरवाजे अजुनही येणार्या जाणार्याचे स्वागत करुन गतकाळाची आठवण देत असतात.
पुरातत्व खात्याने जर इमारतींची काळजी घेतली नाही तर आजुबाजुच्या वीटभट्ट्यामुळे ही सुंदर शिल्प काळाचे पडद्याआड जातील असे मात्र राहुन राहुन वाटते.




आता काय करायच॑ ?
प्रेषक पिस्तुल्या ( सोम, ०५/१९/२००८ - १८:१३) . आता काय करयच॑ ?
आता काय करायच॑?
तिला भेटायला जायच॑
पण तिन॑ नाही म्हणायच॑,
तिन॑ दुसय्रा बरोबर फिरयच॑
मग आपण कशाला मरायच॑
आता काय करायच॑?
तिने कालेजला जायच॑
पहिल्या बे॑चवर बसायच॑
आपण शुक शुक करायच॑
पण तिन॑ नाही बघायच॑
आता काय करायच॑?
तिला हॉटेलमध्ये न्यायच॑
तिच॑ दिल जि॑कण्यासाठी
तिच॑ बिल भरायच॑
तिन॑ खोट॑ thanks म्हणायच॑
आता काय करायच॑?
तिला लव्हर शिप मागायची
तिन॑ मात्र राखी बा॑धायची
याला काय म्हणायच॑
नशीब बेकार म्हणायच॑
आता काय करायच॑?
आता दुसरीला शोधायच॑
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
फक्त ती सुखात राहायला हवी...
प्रेषक फटू ( शुक्र, ०५/१६/२००८ - ०९:३९) .त्याने मला विचारलं की
खरच आवडते ती तुला ?
जेव्हा तू एकटाच असतो
वेड लावते का जिवाला ?
मी हलकेच हसलो तेव्हा
अन् उत्तर दिलं मी त्याला
अरे, माझा प्रत्येक श्वास
तिच्यासाठी आसुसलेला
अरे मग तू विचार ना तिला
त्याने अनाहूत सल्ला दीला
का वाट पाहतो रे तू संधीची
करुनच टाक एकदा फैसला
थोडासा हळवा झालो तेव्हा
आवाजही थोडा ओला झाला
म्हटलं, अस नसतं रे मित्रा
इथे जीव तिच्यात गुंतलेला
अगदी असंच काही नाही मित्रा
की ती माझी सखी व्हायला हवी
जगाच्या पाठीवर कुठेही राहो
फक्त ती सुखात राहायला हवी
(बर्याच दिवसानी मिसळपाव वर आलेला...)
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
नाते ना 'ते' राहीले
प्रेषक भ्रमर ( शुक्र, ०५/०९/२००८ - २१:३२) . माझी ही कविता जवळपास एक वर्षापूर्वी लिहीली होती. कवितेचा वरील विषय लोकसत्ताच्या 'चतुरा' या मासिकाने
दिला होता व त्यावरुन मला ही कविता सुचली होती. परंतू दिरंगाई केल्याने कविता पाठविली नाही. बिचारी माझ्या वहीत
अशीच पडुन होती. मिसळपावमुळे तिला प्रकाशात येता आले.
कविता लिहिण्याआधी तिची थोडी पार्श्वभूमी सांगणे आवश्यक वाटते. या कवितेची नायिका एक प्रेमविवाह झालेली
स्री असुन तिने आपल्या आईवडीलांच्या इच्छेविरुध्द हे लग्न्न केलेले आहे.
नाते तुझे नि माझे
असे जन्मोजन्मीचे
प्रिया तुझ्यासवेच मला
या जन्मी रमायचे
घरदार सोडुनी आले
मायेस पारखी झाले
परि तुझ्यासंगती सख्या
रममाण संसारी झाले
बोचरे बोल दुनियेचे
झेलुनी पुढे चालायचे
माता, पिता, बंधुभगिनी
आठवुनी नाही रडायचे
झाली बरीच जगती
आबाळ या जीवाची
स्फुंदुनी सांगू कशी मी
मातेस मी दुरीची
सुखदु:खाची जरी छाया
ओलांडीत मी चालले
या जन्मीच्या तव गाठीला
आज एक तप पुर्ण झाले
मज का वाटे कुणास ठावूक
का मनात माझ्या आले
तुच सांग ना प्रिया खरे का?
नाते ना 'ते' राहिले.....


