माहिती
अंकानाम वामतो गति:
प्रेषक, शरद, Sat, 18/05/2013 - 12:05अंकानाम वामतो गति:
" उर्दू-फारसी-अरबी ." या धाग्यावर लिहीतांना श्री. बॅटमन लिहीतात "अक्षरन अक्षर उजवीकडून डावीकडे लावत जायचे. आता यात अजून एक मजा अशी, की उर्दू-फारशी-अरबी लिहीतांना आकडे मात्र डावीकडून उजवीकडे लिहतात...भारतीय पद्धत ढापल्यामुळे
श्री. इस्पिकचा एक्का ... हा एक मोठा पुरावा असे म्हणतात व त्यावर परत
श्री. बॅटमन +११११११११११११११ असा मोठा पाठिंबा देतात.
आता खरी गम्मत पहा. प्राचीन भारतात आकडे उजवीकडून डावीकडे लिहीत, आज आपण लिहिते त्याच्या बरोबर उलटे.
व्यायामाचे प्रकार
प्रेषक, वेल्लाभट, Sat, 11/05/2013 - 12:51व्यायाम हा एकंदरितच आजकालचा `हॉट टॉपिक' आहे. तरूण आहात, तर तारुण्य खुलवण्यासाठी व्यायाम; मध्यमवयीन आहात, तर तारुण्य टिकवण्यासाठी व्यायाम; वृद्ध आहात, तर फिट राहण्यासाठी किंवा, पाय, गुडघे, पाठ दुखू लागली आहे, म्हणून व्यायाम; श्रीमंत आहात, मग शो-ऑफ साठी व्यायाम; गरीब आहात, तर मग असाही काबाडकष्ट करून व्यायामच; अभिनेता/अभिनेत्री व्हायचंय, तर इंडस्ट्री ट्रेंड आणि डिमांड म्हणून व्यायाम; लग्नेच्छुक आहात, तर लग्न पटकन जमावं म्हणून छान दिसण्यासाठी व्यायाम; रोज व्यायाम, अधून मधून व्यायाम, कुणी सांगितलं म्हणून व्यायाम, आपल्याला वाटलं म्हणून व्यायाम...
असुर कोण ? (२)
प्रेषक, शरद, Thu, 09/05/2013 - 17:08पर्शियन, अरबी, फारसी इ भाषा आणि प्राचीन लिप्या
प्रेषक, वल्ली, Thu, 09/05/2013 - 11:33पारशांचा धर्मग्रंथ अवेस्तात असुरांना अहुर असे म्हणलेय. पर्शियन भाषेत 'स' नसल्याने त्याचा उच्चार 'ह' असा होतो उदा. सप्तसिंधू चा उल्लेख हप्तहिंदू वगैरे. आणि त्यात देवांना शत्रू म्हणून दाखवलेय असे कुठेतरी वाचले होते.
असिरीया हा पर्शियन साम्राज्यातलाच प्रदेश.
असुर कोण (१) या धाग्यावरील भाषा आणि लिपीच्या संदर्भातील प्रतिसाद या धाग्यात हलविले आहेत. - संपादक मंडळ
असुर कोण ? (१)
प्रेषक, शरद, Thu, 09/05/2013 - 08:16पंचम पुरीवाला.. एक श्रद्धास्थान..!
प्रेषक, विसोबा खेचर, Fri, 03/05/2013 - 15:10मुंबैचा पंचम पुरीवाला. पंचम पुरीवाला हे एक हॉटेल आहे..परंतु खुद्द मालक मात्र त्याला पुरीचं दुकान असं म्हणतो..
बोरीबंदर स्थानकासमोरच बजारगेट स्ट्रीटच्या तोंडाशी हा पंचम पुरीवाला गेली दीडशेहून अधिक वर्ष उभा आहे..
अतिशय साध्या पद्धतीनं सजवलेलं साधंसुधं हॉटेल. लाकडी बाकं..अगदी प्रसन्न वातावरण. प्यायला थंडगार पाणी. प्रत्येक टेबलावर लिंबूमिरच्यांचा एक मोठा वाडगा ठेवलेला..!
अतिशय सुरेख गरमगरम पुर्या. पानात पडलेली छान गरमगरम फुगलेली पुरी हळूच फोडावी अन् बोटाला वाफेचा चटका बसावा याहून अधिक सुंदर ते काय?!
आज हुतात्मा प्रफुल्लचंद्र चाकीचा १०५ वा हौतात्म्यदिन
प्रेषक, सर्वसाक्षी, Thu, 02/05/2013 - 13:44आज दिनांक २ मे, आज हुतात्मा प्रफ़ुल्लचंद्र चाकीचा १०५ वा हौतात्म्यदिन.
प्रफुल्ल चाकीचा जन्म पूर्व बंगालच्या बगुडा जिल्ह्यातील रंगपूर गावचा. पितृछत्र बालपणीच हरवलेला प्रफ़ुल्लचंद्र शालेय जीवनात देशकार्याकडे आकर्षित झाला आणि त्याला शाळेतून काढून टाकण्यात आले. पुढे क्रांतिकारकांशी ओळख होऊन प्रफुल्ल बरिंद्रनाथ व अरविंद घोष यांच्या ’युगांतर’ मध्ये सामील झाला. आपले आयुष्य त्याने देशाला वाहायचे ठरविले होते.
अॅलर्जी कशी टाळावी?
प्रेषक, प्यारे१, Sun, 28/04/2013 - 21:32सध्या सहा महिन्यापासून मुख्यत्वे डाळ, पनीर, पालक, शेंगदाणे, काजू, असे पदार्थ खाल्ले की किंवा इतर वेळी देखील नि/अथवा नायलॉन ची गादी वापरल्यावर अंगावर कुठेही गांधीलमाशी चावल्यावर, सुरवंट लागल्यावर खाज सुटून सूज येते तशी सूज येते आहे. अर्धा तास राहते नि जाते.
हाताची बोटे सुजतात. एक दोन वेळा खांद्याजवळ साधारण छोट्या वाटी एवढं वर्तुळ सूज आली होती.
आठ दिवस गोळ्या खाऊन २ वेळा कमी झालं. गोळ्या संपल्या की पुन्हा सुरु. (जास्त गोळ्या खाऊन भविष्यात हाडं ठिसूळ होण्याचा संभव आहे असं ऐकिव आहे)
काय क्रावं ब्रं? मिपाकर काही उपाय सुचवतील का?
अगदी सोपी 'फिटनेस टेस्ट'
प्रेषक, चित्रगुप्त, Sun, 28/04/2013 - 13:56कुणालाही, केंव्हाही, कुठेही पटकन करता येइल, अशी ही फिटनेस टेस्ट:
खाली (जमिनीवर) बूड टेकवून बसायचे, आणि कुठेही हात न टेकता, कसलाही आधार न घेता उठून सरळ उभे रहायचे.
बस, एवढीच ही टेस्ट आहे. ही अगदी साधी क्रिया देखील कित्येकांना जमत नाही, असे दिसून येते. याची कारणे खालील पैकी असू शकतातः
१. लठ्ठपणा, फाजील वजन.
२. पाठीचा कणा आणि गुडघे कमकुवत असणे.
३. स्नायूंमधे पुरेशी शक्ती नसणे
४. उदरपटल पुरेसे कार्यक्षम नसणे (उपायः कपालभाती प्राणायाम).
या सर्वांवर उपाय म्हणजे योग्य आहार आणि व्यायाम.
वाचनातून नजरेत आणि मनात उतरलेला "रारंग ढांग"
प्रेषक, कोमल, Tue, 23/04/2013 - 23:21नुकतचं रारंग ढांग वाचनात आलं. आणि प्रभाकर पेंढारकरांची कथा मनाला भिडली, नुसती भिडलीच नाही तर खूप दिवस मनात घर करून होती.
लेफ्टनंट विश्वनाथ मेहेंदळे, याच्या भोवती फिरणारी हि कथा मानवी भावभावना, निसर्गाचा स्वच्छंदीपणा , आणि आर्मी असे अनेक पैलू उलगड नेते आणि शेवटपर्यंत वाचकाला गुंतवून ठेवते.