अनुभव

रंगपंचमी (उत्तरार्ध)

(पात्र व घटना काल्पनीक)

रफ़िक शेख आले खरे, पण रातच्याला वशाट जास्त झाल्याने आणि सकाळीच "समाधान" चा कटींग मारल्याने त्यांना जरा अवळून आलं. आल्या आल्या ते लागलीच निघून गेले. सेनावाल्यांनी एकमेकांकडे "ह्यांनी दाखवली आपली ...." अशा थाटात पाहिलं, आणि "आयला महाराष्ट्रात एकच मर्द" अस म्हणून मा.शि.बा.ठां. ना एकदा मनातल्या मनात नमन केलं. "माझा लढा ... विठ्ठल ... **डवे (ब?)..." असही काहीतरी पुटपुटले. चिखलात पाय पडून बाजूचं पाणी जस गढूळ व्हाव, तशी गढूळता क्शणभर पसरली. खर कारण"समाधान" हे होतं हा भाग वेगळाच.

इकडे "आळेकर टावर" मधून पोट्टी जमत होती. र्हावल्या पन आला. नाश्ता करून. आज कसेरंग खेळयचे हे त्याने आधीच ठरवलेल होत. तसे खीशात ३०-३५ रुपयांचे रंग आणले होते.२ दिवसापुर्वीच त्याने कटींग केली होती. केसं कलर पण केली होती थोडी. २ महिन्यांपुर्वी इशल्या बरोबर जिम स्टार्ट करून थोडी बॉडीबिल्डिंग केली होती. गेल्या वेळी पोरांनी उचलून हौदात टाकला होता त्याला ... य धूतला होता !! यंदा तो सावध होता. आजचे कपडे पन आधीच ठरवलेले होते.बॉडी दिसेल याची काळजी त्याने घेतली होती. फ़ुल्ल आवरून आला होता तो.(पावडर पण लावली होती थोडी).

तेवढ्यात मागून त्याची आई आली आणि आपल्या निरमा आणि नारळाच्या काथ्यांनी भांडी घासून खरखरीत झालेल्या हाताने र्हावल्याला फाडदिशी ओढली. त्याचे कान गरम झाले.
"पयला घरी चल ह्यंद्र्या .... इचकट कार्ट .... सणावारी भांडण करतय"
"हात्तीच्यायला कसली वोढली ... लय बेक्कार .. ह्यॆ ह्यॆ ह्यॆ" .. कोणीतरी आपले reflexes दाखवले.आणखी ४-५ पोट्टी हसली. र्हावल्या ला आयशी चा लय राग आला.
"दद्या ला सांग ... आईवरून शिवी दिली त्याने मला" .... दादा .. सख्खा भाऊ !!

इतक्यात इकडे रंगपंचमीचा एकच गलका उडाला. धडाक्यात सगळ्यांनी एकमेकांना रंगवायला सुरुवातकेली. सर्वांच्या मनात "मी पन आन्नाला लावनार ... आ !" अशी प्रेमभावना दाटली. प्रत्येक कार्यकर्ता आन्नाच्या गालावर दोन रंगीत बोटं फिरवून क्रुत:क्रुत्य होत होता. आन्ना पण नवरदेवाचा हळदीचा कार्यक्रम असावा तसा सगळी कौतुकं करून घेत होता (आयला यडपट !!). वरतुन बायको पहात होती. नव-याच्या कर्त्रुत्वाने तिचा ऊर भरून आला. आईचा कंठ उगाचच दाटला. "बाप पडला पन पोरगा नाव काढनार" .. अस तर त्या मायेला वाटल नसेलना !! सत्या ने रंग लावल्यावर अन्ना ने त्याला मिठी मारली. सत्या पुन्हा लाडात. पिच्या ला खुपलं हे, पण त्यानेदु:ख गिळून टाकल. आन्ना नंतर दोन काची ची दोन बोट त्याने Mercedes (बरं एस्टीम ... खूश ??)ला पण लावली. इशल्या-गन्या गॆंग ने नेहेमी प्रमाणे अक्रस्ताळेपणा आणि अगाचोरपणा सुरू केला. शेट्टी रंगल्यावर फ़ार ओंगळ दिसत होता (च्ययला आपण बरे दिऊन काय दिवे लावले ... किमान त्याची .. असो.)

... तर रंगपंचमी थाटात साजरी झाली.

(समाप्त)

रंगपंचमी @ ७९/ब पर्वती (पूर्वार्ध)

(पात्र आणि घटना काल्पनीक.)

योगायोगाने रंगपंचमी ला पुण्यात होतो. मित्रपरिवार कामात व्यस्त असल्याने रंग खेळता आले नाहित.(आणि दुर्दैवाने मैत्रिण परिवार नाही आम्हाला ... असो) तर मी आणि किटू घराच्या चौकटीत (balcony)गप्पा मारत होतो.अचानक रस्त्यावर गर्दी जमली.
मा. श्री. इलासआण्णा तावरे साहेब(माजी युवक क्वांग्रेस अध्यक्श, पुने शहर, सध्या राष्ट्रवादित, फ़ुल पावरबाज) आपल्या पांड-या शुभ्र mercedes (म्हणजे आहे 2nd hand एस्टीमच, पण ते आणि त्यांची भक्त मंडळी समजतात. उगाचच कोणच्या भावना कशला दुखवा. ज्या दिवशी गाडी पहिल्यांदा गल्लीत आली, पिच्या (आन्ना चा डावा हात .... शी !!!) ने साष्टांग नमन घातला होता. आई शप्पथ !!) मधुन जणू त्यांच्या स्वागतासाठी १०० पत्रकार camera घेउन वाट बघत आहेत अशा थाटात अवतरले. एकदम रिन सफ़ेदी वाल्या कुर्त्या पायजम्यात. पन स्वागतासठी पिच्या शिवाय कोनीच नस्ल्याने थोडे हिरमुसले. त्यांचा हा चेहेरा पिच्याच्याने बघवला नाही. पिच्याने शिट्टीमारली आनि नव-तरून मंडलाचे कार्यकर्ते जे रंगपंचमी च्या तयारीत गुंतले होते ते हजर झाले. आन्नाचा चेहेरा खुलला. थोडा लाल पन झाला.आन्नाने अपुलकी ने पिचु आनि विकि ला मिठी मारली. त्यांना पन थ्वडा भाव वाढल्या सारखं वाटल. मग चालताना त्यांची कोपरं मागे गेली आणिछाती २ इंच पुढे आली आणि ती झुलवत ते रंगपंचमीच्या set वर गेले. चालतानी आन्ना ने खांद्यावर हात ठेवल्याने सत्या पन थ्वडा लाडातआला.

हळु हळु गर्दी वाढू लागली. "ऒ अंत्या .... हिकड कसा काय !!! अ गन्या ... यड्या ... हा हा हा ... लय भारी यड्याआ.... फ़ुल्ल खेळ्नार यड्या .... आयला ह्यो बघ .... ह्या ह्या ह्या" अशा संवादांनी गल्ली गजबजू लागली. पांडरा शर्ट-प्यांट, काळे चकचकीत बूट,लठ्ठ बोटांमधे जाड अंगठ्या, गळ्यात "पच्चास तोला" माळा, काळा ग्वागल, भारदस्त काळ्या जाड मिशा अशा वेशात राजू शेट्टी (काळा कभिन्न रंग, ४'९" उंची, पोट पुढे, बायको मात्र त्यामनाने ... असो ... ) हे व्यक्तिमत्व फोन वर बोलत प्रकट झालं. गर्दितुन मग तो मुद्दाम गर्दिपासून लांब गेला. फोन वर कोनाला तरी ४ शब्द (!@@#%#**$@) सुनावले आनि गर्दित परत आला. त्याचे ४ शब्द ऐकून सत्या आनी आंत्या ला ल्हई कवतीक वाटलं.

तेवढ्यात रफ़ीक शेख आले आनि लोकांना सर्व-धर्म-समभावाच्या ओका-या होऊ लागल्या. क्वांग्रेस मधून मनसेत जाणार होते पन अन्ना ने ओढून आनलं त्यांना हिकडं. काही दिवसांपुर्वीच शिवसेनेतुन switch मारलेल्यांना काही हे पटल नाही. पन पक्शशिस्तिपरमाने त्यांने शेखांना मिठी मारली आनी रंगपंचमी + ईद च्या शुभेच्छा दिल्या. शेखांनी पेशल मटन बिर्यानी चं अश्वासन दिल्यावर मात्र त्यन्च्या तोंडाला पानी सुटलं आनि त्यांनी एक आवंढा गिळला.

(क्रमशः)

हा लेख/या पुढील लेख आमच्या अनुदिनी वर देखील वाचू शकता.

http://koustubhkulkarni.blogspot.com/

(पुढील आणि इतर लेख लवकरच इथे देखील प्रसिद्ध केले जातील.)

नाणेपुराण

नुकतेच मटामध्ये भारत सरकारच्या टांकसाळीची जाहिरात पाहिली की, "पहिल्या स्वातंत्र्य युद्धाची १५० वर्षे" च्या स्मृतीत १०० रू ची नाणी इच्छुकांना विकण्यासाठी नोंदणी सुरू आहे. त्यांच्या संकेतस्थळावरही अशीच काही १०० रुपयांची नाणी उपलब्ध आहेत. अर्थात ही नाणी चलनात नसतील हे ही त्यांनी नमूद केले आहे. मी ती नाणी घेण्याची शक्यता नाही. पण ते वाचून मी पाहिलेली वेगवेगळी नाणी व त्यांचे वापर डोळ्यासमोर येऊन गेले.

नुकतेच चलनात आलेले नवीन नाणे म्हणजे ५ रू चे स्टीलचे नाणे. ५० पैशाच्या नाण्यासारखेच वाटणारे. त्यामुळे ५० पैसे समजून ५ रू जाण्याची शक्यता जास्त म्हणून भरपूर लोकांनी सरकारकडे ते नाणे बदलण्याची विनंती केली असे वाचले होते. असा प्रकार आधीही झाला होता जेव्हा २ रू चे स्टीलचे नवीन नाणे काढले होते. मीही १ रू समजूनच ते एकाला देणार होतो. पण तेवढ्यात लक्षात आले, आणि जमा करून ठेवले. आणखी मागे जावे तर १ रू, ५० पैसे, २५ पैसे व १० पैशाची स्टीलची नाणी चलनात आली होती. नाण्यांचे ते सर्व प्रकार दिसतात घरी आताही. स्टीलच्या नाण्यांचे एक बरे आहे ती लोहचुंबकाला चिकटतात त्यामुळे एखाद्या लोहचुंबकावर भरपूर सुट्टे पैसे साठवून ठेवता येतात.

कधी काळी जुनी नाणी जमा करायचाही छंद लागला होता. पण जास्त काळ टिकला नाही. असो, जे छंदिष्ट आहेत ते बरोबर करतात जमा. इतिहासकालीन नाणी, वेगवेगळ्या देशांची नाणी आणि काय काय?
लहानपणी माझ्या आईने ५ पैशाची भरपूर नाणी जमा केली होती. त्यांचे एक जहाज बनवायचे होते म्हणून. पण ते ही काही झाले नाही. वेळेवर ती चलनात काढून टाकली म्हणून बरे, नाहीतर नुकसान झाले असते. ते झाले जुने. २/३ वर्षांपुर्वी मला सवय लागली होती, ऑफिसमधून घरी आल्यावर खिशातील नाणी ड्रॉवर मध्ये टाकायची. मग कधी वेळेवर उपयोगी पडायची.मी माझ्या बहिणीलाही सांगितले होते, 'पाहिजे तेव्हा काढून घे, पण किती जमा झाले मोजायचे नाही.' नंतर मुंबईबाहेर असल्याने त्यात खंड पडला. पण तो घरातील ड्रॉवरमध्ये नाणी जमा होण्यात. मी जिथे रहायचो तिथे हे सुट्टे पैसे एकत्र ठेवणे सुरूच होते. आता २ महिन्यांपुर्वी जेव्हा साफसफाई करताना पूर्ण ड्रॉवर रिकामे केले तेव्हा पाहिले भरपूर नाणी जमा झाली होती, १०० ते ११० रुपये. पण त्यातही थोडे नुकसान हे की २५ पैशांची नाणीही आहेत जी आता कोणी घेत नाही. जरी रिझर्व बँकेने बंद नाही केलीत, (हो, छापणे बंद केले) तरी लोकांनी ती बाद केलीत चलनातून. मधेच ऐकले होते की , बेस्ट चे वाहक घेतात ती नाणी. बघेन प्रयत्न करून.
ह्यावरून आठवले, माझ्यासारखेच किती लोकांनी घरी नाणी जमा करून ठेवली असतील. ज्यातील काही नाण्यांचा उपयोग आता होत नसेल. त्यामुळे आपले व सोबत देशाचेही नुकसान झालेच. तरी ह्यावर मार्ग आहे की बँकेने ती नाणी परत घेतली तर हे टळू शकेल. पण जी नाणी आपण देवाच्या नावाने नदीत/विहिरीत टाकतो ते पैसे तर गेल्यातच जमा आहेत. काही वर्षांपुर्वी त्याबद्दल ही पेपरमध्ये लेख वाचला होता. आधीच नास्तिक त्यात हा लेख वाचल्याने, दुसर्‍यांना नदीत पैसे टाकायला परावृत्त करू लागलो Wink

बरे, नाण्यांचा इतर उपयोग काय?
सर्वात पहिले समोर दिसते ते नाणे उडविणे. TOSS अर्थात नाणेफेकीत कोणाचा कौल लागतो ते पाहण्यासाठी. शोलेमधील ते प्रसिद्ध नाणे सर्वांना माहित असेलच. किंवा मग अंदाज अपना अपना मधील "चित मैं जिता, पट तू हारा". ह्यातील चित म्हणजे छापा की काटा? Head की Tails? आधी बरे होते, छापा की काटा ठरवण्याकरीता नाण्याची किंमत अर्थात आकडे लिहिले ते काटा व अशोकस्तंभाचे चिन्ह असलेला भाग म्हणजे छापा. पण नंतर ती स्टीलची नाणी आल्यानंतर ते बदलून गेले. पण नंतर कधी छाप काट करण्याकरता काय वापरले आठवत नाही.

तसेच दिव्यात वात नीट रहावी म्हणूनही सर्वात पहिले आपण खिशातील नाणेच बाहेर काढतो.

इतर नाण्यांबद्दल आता नक्की अंदाज नाही, पण १ रुपयाचे नाणे भलतेच उपयोगात आणले गेले सगळीकडे. सार्वजनिक टेलिफोन, वजन करायचे यंत्र, भेट देण्याची पाकिटे. बरं, ह्यातील भेट देण्याच्या पाकिटात १ रूपयाचे नाणे चिकटवून ठेवणे गेल्या ४/५ वर्षात चालू झाले असेल पण टेलिफोन मध्ये ह्याचा वापर फार जुना आहे. अर्थात त्या यंत्रांना हे कळत नसेल की टाकण्यात आलेले नाणे हे खरोखरीचे नाणेच आहे की लोखंडाचा तुकडा, म्हणून तर एक रुपयासारख्या एखाद्या लोखंडाच्या चकतीचा वापरही करण्यात येत होता. किंवा मग खरोखरीच एक रुपयाच्या नाण्याला छिद्र पाडून त्याला दोरा बांधून ते त्या यंत्रात टाकायचे व आतील खटका पडला की ते नाणे परत वर ओढून घ्यायचे असले प्रकार ही लोकांनी केल्याचे मी ऐकले आहे.

अरे हो, आणखी आठवले. माझी फजीतीच म्हणा. लहानपणी वजन करायच्या यंत्रात मी सहज गंमत म्हणून २५ पैशाचे नाणे टाकले ते तिकिट देणार्‍या वाटीत परत आले. मग मी ५० पैशाचे नाणे टाकले. ते ही परत आले. उचापतीत मग मी खिशातील २ रुपयाचे नाणे टाकले तर त्या नालायक यंत्राने ते नाणे आत घेतले. Sad तेव्हा केलेले वजन २ रुपयांना पडले. त्यामुळे माझे वजन कमी झाले होते का ते आठवत नाही. पण खिशातील पैशांचे वजन असेही कमी होऊ शकते हे कळले Big Grin
आता तर वजन/उंची/ तसेच वजन-उंची ह्यांचा समतोल आहे की नाही ते सांगणारे (Body Mass Index) यंत्रही आले आहे, जे मागते ५ रुपयांचे नाणे. ह्यावर काही मी तसे करून पाहणार नाही Wink

गेल्या दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मित्राकडे गेलो होतो तिथे त्यांनी घरातील ठराविक नाणी पूजेत ठेवण्यास काढली होती. त्यात मी कधी न ऐकलेले १० रू चे नाणे पाहिले. बहुधा हे नाणे ही चलनात आले नव्हते.

असो, माझे नाणेपुराण एवढेच.

रिझर्व बँकेच्या ह्या संकेतस्थळावर भारतीय गणराज्यातील नाण्यांची यादी आहे. त्यात हे १० रुपयाचे नाणे नाही. तसेच १२/१५ वर्षांपुर्वी काढलेली ५ रुपयांची नाणी ही त्यात नाहीत. कोणास आठवतेय का ते नाणे? मोठ्या आकाराचे व मागे श्रीमती इंदिरा गांधीचे चित्र असलेले? तसेच आणि काही नाणी माहीत आहेत का जी रिझर्व बँकेच्या संकेतस्थळावरही नमूद नाहीत?

कथाकाराची कैफियत!

अलिकडेच मिपावर 'अब्दुल खान' लिहीलं. चार भागात विखुरलेलं असूनही वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला. प्रत्येक भागाची शेकडो वाचनं झाल्याची नोंद झाली. मिपावरच्या मित्रमैत्रिणींनी अगदी हातचं काही न राखता मनापासून कौतुक केलं. खूप खूप बरं वाटलं. काही वाचकांनी 'क्रमशः' बद्द्ल गोड तक्रारीही केल्या. पण त्या पुढचं वाचायच्या उत्सुकतेपोटी असल्याने त्याचं काही वाटलं नाही. एका नवोदित ललित लेखकाला सुरवातीच्या लिखाणालाच अशी शाबासकीची थाप पाठीवर पडली की त्याला किती हुरूप येतो हे शब्दांत मांडता येण्याजोगं नाही.

एकदा असाच, मला वाटतं तिसरा की चवथा भाग लिहीत होतो. विचारांची लिंक अगदी मस्त लागली होती. झराझरा पुढची वाक्यं सुचत होती. डोक्यातल्या विचारांचा पाठलाग करतांना टाईप करत असलेली बोटं थकत होती....

आणि इतक्यात आमचे चिरंजीव जवळ आले,

"डॅडी, व्हेन कॅन वुई गो फॉर स्विमिंग?"

हे कार्टं अगदी अमेरिकन होत चाललंय. त्याला सगळं मराठीबिराठी येतं, अगदी स्तोत्र आणि श्लोकांसकट! पण आईबापांशी मराठीतून बोलेल तर शपथ!! भारतातून आजी-आजोबा किंवा इतर नातेवाईक आले, अथवा आम्ही मुंबईला गेलो तर सगळ्यांशी व्यवस्थित मराठी बोलतो, पण आईबापांशी? रामा शिवा गोविंदा!!

"ए गपरे! मी काम करतोय!" आमचा द्वैभाषिक संवाद सुरू झाला...
"बट ऑल यू आर डूईंग इस रायटींग इन मराठी" स्क्रीनकडे नजर टाकत तो म्हणाला.
"तेच! मी मराठी कथा लिहीतोय!"
"कथा मीन्स स्टोरी? व्हाय?"
"मला मिसळ-पावच्या साईटवर द्यायची आहे"

तो थोडा थांबला. काहीतरी डोक्यात चालू होतं. मग पुन्हा विचारतो कसा,

"डॅडी, कॅन आय आस्क यू अ क्वेश्चन?"
"आता नाही, मग! आता मी लिहीतोय, दिसत नाही का?"
"बट इट इज रिलेटेड टू धिस..."
"बोला.."
"प्रॉमिस मी, यू वोन्ट गेट अँग्री..."
"हं..."

"इज धिस जस्ट युवर मिड्-लाईफ क्रायसिस ऑर हॅव यू गॉन कंप्लीटली इन्सेन?"

मी त्याच्याकडे बघतच राहिलो. काय बोलावं तेच मला सुचेना. इतक्यात पाठीमागून आवाज आला...

"हा, हा, हा, हा, हा!!!'

बघतो तर माझ्याबरोबर आयुष्य घालवण्याचं वचन दिलेली ती दुष्ट स्त्री पाठीमागे उभी राहून खदाखदा हसत होती...

"वा, वा, क्या बात है!! बडे मियां तो बडे मियां, छोटे मियां सुभानल्ला!!" ती आनंदातिशयाने चीत्कारली!!

"नुसत्या मिपावर मिळणार्‍या शाबासक्यांनी फुशारून जाऊ नकोस! खरा लेखक असशील तर हाही अनुभव मिपावर लिहीशील!!" तिने खिजवलं.

फक्त तिची जिरवण्यासाठी ही गोष्ट प्रामाणिकपणे आणि अत्यंत दु:ख्खद अंतःकरणाने इथे लिहीत आहे...

सालं, पिकतं तिथे विकत नाही हेच खरं!!

रंगीत मिरच्या - रेसिपी सुचवाल ?

परवाच एका परिचितांनी एक रन्गीत पाकीट दिले...भेट म्हणून. Mixed hot chilli peppers असे त्यावर लिहीले होते. ह्य पाकीटामधे रंगीबेरंगी , जरा जाडसर आणि लांबट आकाराच्या ३५-४० मिरच्या होत्या. लाल , केशरी, पिवळा, हिरवा, पोपटी असे विविध रंग बघून रंगवेड्या माझ्या छोटीला तर त्या लगेच खेळायला हव्या होत्या.

Hot peppers

खरच; ह्या मिरच्या चवीने hot असल्या तरी त्यांना cool मिरची म्हणावे असेच सही रंग होते त्यांचे.
काही खाद्य पदार्थ बनवण्यापेक्षा टेबल वर सजवून नुसतेच त्यान्चे रंग न्याहळ्त बसावे असे वाटत होते. पण काहीतरी करायलाच हवे होते. नाहीतर फ्रीज मधे ठेवूनही काही दिवसांनी खराब झाल्या असत्या. परिचितांनी सान्गितले की ते ह्यान्ची भजी करतात आणि ती फारच छान लागतात. मी ही तेच करयचे ठरवले.
आख्ख्या मिरच्या उभी चिर पाडून आत किंचितसे मीठ भरुन भिजवलेल्या डाळीच्या पीठात बुडवून भजी केली. भजी दिसत छान होती आणि चवीला तर अहाहा ! मस्त च लागत होती. (अर्थात मला भजी च्या प्रत्येक घासाबरोबर पाणी प्यावे लागत होते. पण तरीही भजी enjoy केली. ) मला लाल मिरची सर्वात जास्त तिखट वाटली.. हिरवी तळल्यावर बरीच mild वाटली.
mirchi pakoda

ज्याना तिखटजाळ पदार्थांन्ची आवड आहे त्यांना जरुर आवडतील ह्या मिरच्या.
अजून मिरच्या बर्याच शिल्लक आहेत. नवरॅने सुचवले की ग्रील वर भाजून मग लिंबू , मीठ घालून त्याची चटणी कर.

ईथल्या हौशी बल्ल्वाचार्यांना आणि पाककला निपूण सख्यांना अजून काही ह्या मिरच्यांचे पदार्थ सुचतायेत का? काही वेगळा चविष्ट पदार्थ बनवता येइल का?
-- ईश्वरी

hot peppers

लग्न लवकर जमण्यासाठी थोडे इंग्रजी आलेच पाहिजे....

(प्रस्तावना : लग्न ही एखाद्या व्यक्तीच्या, कुटुंबाच्या आणि समाजाच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट असते. त्यात कळत नकळतच काही आशय निर्माण होत जातात. या सामाजिक अभिसरण प्रक्रियेत भाषा हा कसा प्रभावशाली भाग बनत आहे यासाठी अनुभवजन्य प्रसंगातून घेतलेला हा मागोवा.)

ही गोष्ट अंदाजे २५/३० वर्षांपूर्वीची घडलेली आहे. आमच्या मामा आणि मावश्यांचे एक बरे मोठे असे कुटुंब होते. ( त्यातले बरेचसे काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत. ) तर अश्याच एका सुट्टीमध्ये माझी सर्व भावंडे, मी आणि माझी आई माझ्या मामाकडे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मामाकडे गेलो होतो. मामा आणि माझ्या ५ मावश्या अश्याच गप्पागोष्टी करत होते. अनेक विषयावर चर्चा होत असताना आम्ही लहान मुले अवतींभोवती खेळत होतो आणि अधेमध्ये मोठ्यांच्या गप्पाही ऐकत होतो.

अनेक विषयाच्या गप्पा चालल्या होत्या आणि त्यातच मामाच्या मुलीच्या वरसंशोधनाचा विषय निघाला. मामाने सध्या काय अडचणी आहेत आणि तुमचे लग्न कसे लवकर जमले इत्यादी इत्यादी सांगितले. बोलता बोलता मामा म्हटला, की आता मुलाकडचे लोकं पूर्वीसारखे फक्त घरदारच बघत नाही. सध्या मुली बघण्याचे वेड चालू आहेना! आपल्या रंजनाला मी सांगितले आहे की मुलाकडचे काही प्रश्न विचारतात ना, तेव्हा एखादा इंग्रजी शब्द नक्कीच वापरत जा. इंग्रजी शब्द वापरला ना, की मुलगी एकदम शिकल्यासारखी वाटते. ते वाक्य ऐकून सर्व मावश्यांनी आणि आईने मान डोलावली आणि खरेच सांगतो आहे हा असा आविर्भाव व्यक्त केला.मी तर लहानच होतो पण माझे आईकडे लक्ष गेले. आईनेही मान डोलावली आणि माझे लक्ष नकळतच तिच्या डोळ्याकडे गेले त्यात मी एक काहीतरी पराभवाची, न्यूनगंडांची आणि कसल्यातरी भीतीची भावना बघितल्यासारखी जाणीव मला झाली. इतक्या वर्षानतरही मला माझ्या आईचे ते डोळे आठवतात.

आजपर्यंत मला कधी कधी मामाचा राग यायचा पण आज हा लेख लिहिताना मला मामाचे खरेच कौतुक वाटते. मामा खरेच द्रष्टा होता हे निर्विवाद पणे मान्य करावेसे वाटते. कालाच्या ओघात काय बदल होणार आहे आणि त्याचा आपल्या लाभासाठी कसा जास्तीत जास्त फायदा उचलायचा यात वाईट ते काय? शेवटी आपल्या मुलांचे भले व्हावे असे कोणत्या पालकांना वाटणार नाही? लग्न ही खरोखरच आपला स्तर बदलवण्याची सूवर्णसंधीच आहे असे समजा हवे तर.

माझ्या मामाला ३०/३५ वर्षापूर्वी एखाद्याला अल्पभेटीत परकीय भाषेचे साह्य घेऊन कसे प्रभावित करायचे हे समजले होते.

आज मी बघत असतो अनेक मराठी भाषक इंग्रजीमध्ये लग्नपत्रिका घेऊन येतात. अनेक लग्नामध्ये अमुक अमुक वेडस् अमुक अमुक असे फुलांनी सजवलेलेच असते, लग्नाच्या गाडीवर सर्रास बदामाचे चित्र आणि लोव्ह असे लिहिले असते.

भाषा आपल्या सांकृतिक जीवनात कशी ढवळाढवळ करत असते ना?

पुढच्या महिन्यात मी मामाला ( वय ८३) भेटणार आणि त्याच्या द्रष्टत्वाबद्दल कौतुक किंवा काय असेल त्या माझ्या भावनाही सांगणार आहे. शेवटी तो काळाच्या खरेच पुढे होता हे मान्य करायला काय हरकत आहे?

मराठी शिकलेला नवरा नको गं बाई....

(या मेच्या सुट्टीमध्ये गावाकडे गेलो असताना हा किस्सा घडला. )

आमच्या गावाकडे असणाऱ्या एका मित्राच्या बायकोने तिच्या उपवर आणि सुशिक्षित मुलीसाठी काही मुले पाहण्यासाठी मला सांगितले, त्याप्रमाणे मी तिला तसे आश्वासन दिले आणि ही गोष्ट अश्याच गप्पागोष्टीत माझ्या एका मित्राला सांगितली. माझ्या त्या मित्राने मला विचारले की तुला त्या मुलीबद्दल काय माहीत आहे, यावर मी नकारार्थी उत्तर दिले. त्याने दुसरा प्रश्न विचारला की आपल्या गावामध्ये अश्या कामासाठी मदत करणारे असतील का नसतील. मी त्यावर उत्तर दिले की अर्थातच आपले गाव छोटे आहे आणि त्यामुळे कोणी मदत करणार नाही असा विचारही माझ्या मनात येत नाही.

मग त्याने एक उसासा घेतला आणि सांगितले," अरे, ती मुलगी फारच अगोचर आहे. तिला आम्ही काही स्थळे दाखविली, परंतु तिने काही चांगल्या स्थळांना तिने सरळ सरळ नकार दिला, कारण माहीत आहे, की मुलगा मराठी माध्यमात शिकलेला आहे. आता मला सांग तिच्या साठी आम्ही काय इंग्लंडहून नवरा शोधायचा का?, मराठी माध्यमाच्या मुलांना काय धाड भरली आहे? दुर्दैवाने तिची आई पण तिला भरीस टाकत असते." मी जास्त न बोलता अल्पोपहार आणि चहा घेऊन गाशा गुंडाळला.

घरी आलो आणि खरेच मी विचारमग्न झालो. लग्नाच्या मुली शक्यतो खेडे टाळतात हे आपणा सर्वांना माहीत असेलच, पण आता मराठी शिकलेला नवरा नको असे म्हणणे म्हणजे फारच झाले, बरे इंग्रजीमध्ये शिकलेला नवरा काय आणि मराठीमध्ये शिकलेला नवरा काय? शेवटी संसार करताना तडजोडीची भाषाच शिकावे लागते.

कदाचित त्या मुलीला आणि त्याही पलिकडे तिच्या आईला आयुष्याच्या शाळेत बरेच शिकायचे आहे हेच खरे.

पुरोगामी!(एक छोटिशी गोष्ट)

"आई-बाबा फारच मागं लागले आहेत.रोज रोज मागे लागुन नवीन नवीन स्थळं दाखवतात.
साला लग्न मला करायचय्,पण घाइ ह्यांनाच आहे. मी ही ह्यांच्या दबावाला बळी पडलो तर नावाचा सुधीर साठे नाही .
आपण आपल्या मर्जीनच पोरगी पाहणार.
साला रोज रोज तिथुन इतक्या लांबुन भारतातुन फोन करतात आणि विषय काय्,तर "काय ठरवलस्?कधी पहायची?"
छ्या. ह्यांचा फोन असा खाली ठेवला नाही ,तोच लक्ष लॅपटॉपच्या
(चल संगणक्=लॅपटॉप?) स्क्रीन कडे(स्क्रीन=पडदा?) गेलं. फुकटात ढीगभर साय मिळाल्यावर एखाद्या बोक्याला होइल,
तशा आनंदाने येक आवंढा गिळुन,मोठ्ठे डोळे करुन बसलो चटिंगला.
" सुधीर वैतागुन सांगत होता.

पण चेहर्‍यावरचे भाव आता जरा छान झाले. तो म्हणला...
" ती हां तीच स्पृहा. वर्ग सखी.,राष्ट्रिय पातळीवर ऍथलीट म्हणुन मान्यता पावलेली.
वर्गात मुलिंशी बोलायला कधिच फारसं जमलं नाही.
पण तिचं मोकळं ढाकळं वागणं,सहज मिक्स्-अप होणं जाम आवडायचं.
तिचे बर्‍याचदा वर्तमान पत्रातुन बक्षिसं घेतानाचे वगैरे फोटो येत. तेही छान वाटायचे.
शिवाय कुणशिही बोलताना ती लागलिच बोलतं व्हायची, बोलतं कराय्ची.
एखादा जोक आवडला तर पटकन टाळीहि द्याय्ची.(म्हणुन मी जोक मारायचे अनेक अयशस्वी प्रयत्न पण केले.)

आता नाही म्हटलं तरी ,तिच्या स्वभावानुसार मिळता जुळता जॉब मिळाला होता.एच आर चा,अगदि नुकतीच ऑफर आली होती.
आणि खेळणही अजुन चालुच होतं.
चॅटिंगलाही मला तिचा हाच स्वभाव आवडायचा.वेब कॅम तर सगळेच वापरतात्,पण ही अगदि मॉडेर्न स्टाइल मध्ये घरी
ज्या ड्रेस वर असायची,त्यावरच चॅटींग करायची.उगिच "काकु"बाईं सारखं नाही.
सदैव आपली ती बर्म्युडा येक असायची अंगावर आणि स्लीव लेस पांढरा शुभ्र टी-शर्ट.
आणी अंग काठी निव्वळ शिड शिडित्,ऍथलीटची,स्वभावात मोकळेपणा.तजेलदार सावळा रंग.
मी तर भारतीय "शारापोवा"च म्हणेन तिला ,तिच्या टवटवीत पणावरुन.
बर्रेच दिवस अशा ऑन लाइन गप्पा चालायच्या.
अगदि "गांगुली म्हातारा झालाय की द्रवीड " इथ पासुन ते अगदि कॉलेज मधल्या दिवसांबद्दल.
किंचित खेचाखेची चालायची आणि थोडाफार चावटपणा आणि चावटगप्पा सुद्धा.
वाटलं "अहा..काय सही आहे ही जोडीदार म्हणुन्.किती मोकळी आहे. हिच्या सोबत राहणं म्हंजे दिवस भर गप्पा,मन मोकळेपणा
आणी शिवाय कुठलीही फालतु बंधनं नाहित. " ही मिळाली तर काय होइल्,मी स्वप्नातच इमले बांधुन पाहिले,
त्या "काकु" स्टाइल वाल्या नवर्‍या सोबत फिरतानाही हातात हात घालायला घाबरतात रस्त्यावर.ही असेल तर
गळ्यात गळे घालुन हिंडेन.पण आता कुणास ठाउक आई-बाबा कुठलं लचांड पाहणारेत माझ्यासाठी."

एवढ्यात आईचा फोन आला.तिकडुन आवाजः- "अरे ऐकतोस का ,मुलगी मिळाली रे त्या शादी डॉट कॉम वर तुला हवी तशी.
फोटोत सुंदर दिसतेय, कालच बोलले तिच्याशी . तुझ्याच कॉलेजची दिसतीय. नॅशनल ऍथलीट,फोटो आणि माहिती मेल केलिये तुला.
आता तु असं कर की.."
आई एवढ बोलेपर्यंत मोबाइल झाला डिसचार्ज्,फोन झाला कट.
पण पण....
"नॅशनल ऍथलीट्,माझ्याच कॉलेजची...म्हण्जे..स्पृहा तर नै?"
डोक्यात शंका आली आणि लगेच जाउन मेल पाहिला.
तो...तोच फोटो.स्पृहाच ती.

म्हणजे आता हिच्या सोबत जन्मभर रहाय्ला मिळणार तर.
आणि तीनं मग सांगितलं का नाही चॅट वर आपल्याला की आपलच नाव तिला""स्थळ" म्हणुन आलय्,
गम्मत करायची,फिरकी घ्यायची म्हणुन असं केल तिनं?

"
पण ..पण ..एक मिनिट्..हे काय होतय?
मी तिला होकार कसा देइन?
हे हे सगळं ठरायच्या किती तरी आधि पासुन ही अशी बाह्या आणि तंगड्या उघड्या सोडुन बसते वेब कॅम समोर.
म्हण्जे, ही शहाणी,ज्याच्याशी फारशी कॉलेजातील धड पुर्ण ओळखही नाही त्याच्या समोर एवढी मोकळी राहते.
मग प्रत्यक्ष तिला भेटणार्‍या लोकांसमोर कशी असेल?
छे ..हे असलं मला मुळीच आवडणार नाही माझ्या बायकोनं केलेलं.
अस कुणाशीही एकदम सलगीनं वागलेलं.
बायको आहे, तर बायको सारखं वागावं उगिच डोक्यावर बसु नये.
मी देइन ना मोकळीक, पण एका मर्यादेतच.अस दुसर्‍या पुरुषांशी इतकं कस बोलवतं हिला...
छ्या...
असल्या कॅरेक्टरची बायको नकोच आपल्याला.
त्या पेक्षा नकारच कळवतो तिला.
"

सुधीर "नकार" कळवायला जाउ लागला फोन कडे.
त्याचे (स्वतःला पुरोगामी म्हणवणार्‍याचे)हे " सु विचार " ऐकुन मी तसाही थोडासा चकित झालो होतो.
(माझं आश्चर्य आवरुन ) त्याला मी म्हटलं "स्थळ चांगल आहे -नाही मी काहिच म्हणणार नाही.ते तुलाच माहितिए.
पण एवढं नक्की,की तु नकार दिलास तरीही तुझ्यापेक्षा कैक पट चांगली स्थळं तिला मिळतील."
तु आता फक्त ह्या विषयाबद्दल मौन धारण केलस तरी हे लग्न होणार नाही.एखाद -दोन दिवसात होकार येइलच इतर
ठिकाणंहुन तिला,मग चालेल का तुला?"

सुटकेचा नि: श्वास टाकत सुधीर खाली बसला . "मला लग्न नाहिच करायचं असल्या कॅरेक्टर वालिशी"
असं काहिसं पुट्पुट्ला आणि पुन्हा हावरट नजरेनं चॅटींग ची विंडो मोठी करुन "मोकळ्या" विचारांच्या
गप्पा मारु लागला,
इतरांच्या होणार्‍या बायकांशी!!
त्यांच्या मोकळेपणा बद्दल तो फारच आग्रही होता.!!!

पाटेश्वर

पाटेश्वर
सातारा शहरापसुन केवळ १०किमी असलेले ठिकाण.
पुण्यातुन सकाळी सकाळी बाहेर पडल्यास संध्याकाळच्या चहाला परत येता येईल अश्या या ठिकाणाला १ तारखेला भेट दिली. मिपा वरच्याच विजुभाऊंचे आभार मानतो त्यांनी ह्या जागेची भरपूर माहिती दिल्याबद्दल.
पाटेश्वरच्या या भेटीचा फोटोरुपी वृतांत

सकाळी सकाळी खंबाटकी घाटातुन मस्त सुर्योदय बघीतला.
suryodaya

सुर्योदय बघीतल्यानंतर थेट पाटेश्वर गाठले. पाटेश्वरला जाण्यासाठी सातार्‍यापासुन ४ किमी असलेल्या देंगावला जाणे. येथुन कोणालाही विचारले पाटेश्वर कुठे की आपल्याला रस्ता मिळेल. गाडी लावल्यानंतर साधारण १५-२० मि. चालल्यावर आपलयाला दगडी पायर्‍या लागतात. येथेच गणेशाचे रिद्धी - सिद्धी बरोबरचे एक शिल्प आहे.

असेच थोडे पुढे गेल्यावर आपण पाटेश्वर मंदिराच्या आवारात पोचतो.

मंदिराच्या बाहेरच एक गोविंद स्वामींचा मठ आहे. या आवारतच एक सुंदर फुललेला गुलमोहर या मोसमात लालेलाल दिसतो.

gulamohar

येथुन वरच्या बाजुला गेल्यास पाटेश्वराचे मुख्य मंदिर व खाली नंदीचे मंदिर आहे. आम्ही आधी वरच्या बाजुला असलेल्या पाटेश्वराच्या मुख्य मंदिराकडे गेलो. वाटेत जागोजागी अनेक वेगवेगळी शिवलिंगे दिसतात.

shivalinga

गर्द झाडीतुन सुरेख दगडी पायर्‍यांवरून वर गेल्यावर मुख्य मंदिराची दगडी भिंत लागते. या भिंतीत बाहेर दोन कोनाडे आहेत. एका कोनाड्यात एक मोठे शिवलिंग तर दुसर्‍या कोनाड्यात मारुतीची मुर्ती आहे. शेजारीच एक उभी मनुष्य अवतारातील गरुडाचे शिल्प आपले लक्ष नक्की वेधणार.

garuda

दोन कोनाड्यांच्या मधल्या भागातुन एक दरवाजा आत जातो व आपल्याला पाटेश्वरापुढील नंदी व त्याच्यावरील सुरेख मंडप दिसतो. या नंदीवरची नक्षी सुरेख आहे. मुख्य म्हणजे पाटेश्वर हे तसे आतापर्यंत दुर्लक्षीत राहील्याने मंदिरामधील सर्व मुर्ती, शिल्पे सुस्थितीत आहेत. नंदीच्या पायांजवळच शंकराच्या विवाहसोहळ्याचे एक छोटे शिल्प कोरलेले आहे.

nandi

shankarVivaha

पाटेश्वर मांदिराच्या आवारातच दोन बाजुंना दोन मंदिरे आहेत. एक १८ हाताच्या महिषासुरमर्दिनीचे
Mahishasuramardini

तर दुसरे मला ओळखता आलेले नाही (कोणाला माहित असल्यास जरूर सांगा).

पाटेश्वराच्या मुख्य शिवलिंगाचे फोटो मला काढता नाही आले. याच मुख्य मंदिरात स्त्री रुपातील गणपती, शेषधारी विष्णू यांच्याही मुर्ती आहेत. मुख्य मंदिराच्या आवाराजवळच कार्तिक स्वामींचे देखील मंदिर आहे. थोडे वर गेल्यावर मंदिराचा पुर्ण परिसरही दिसतो.

Pateshwar

आल्या रस्त्याने परत खाली जाऊन मगासच्या मठाजवळून डावीकडे गेल्यावर काही गुहा लागतात. एका गुहेत भलेमोठे शिवलिंग व विष्णूचे दशावतार कोरलेले आहेत. दशावतार सोडुन अजून दोन अवतार आहेत. कुठले ते मला कळले नाही जाणकारांनी मदत करावी.

dashavatar1

dashavatar2

dashavatar3

dashavatar4

याच गुहांजवळ नंदिचे मंदीर आहे. या मंदिराचे विशेष म्हणजे, मनुष्यरुपातला नंदी मी प्रथमच बघीतला. या नंदीच्या मनुष्य रुपाला ७ हात आहेत. का ते मला अजिबात कळले नाही.

nandi

nandi1

हे मंदिर व येथील आगळी वेगळी शिल्पे बघताना खरोखरच नवल वाटते. सातारा, पुणे अश्या जवळ राहाणार्‍या लोकांनी आवर्जून जावे असे अत्यंत कमी गर्दीचे ठिकाण जरूर बघा.

-
ध्रुव
टीपः वरील सर्व माहिती अत्यंत त्रोटक असून काही चूका आढळल्यास जरूर सांगा व माहितीत भर घाला.

प्रेमाची गोष्ट

कांही वर्षांपूर्वी "प्रेमाची गोष्ट" हे नाटक आलं होतं. लागू आणि निळु फुले ही नांवे पहाताच आम्ही ग्रुपने ते बघायला गेलो. पण नाटक फार वरच्या पातळीवरचे असल्यामुळे आमच्या डोक्यावरुन गेले .दोन दिवस अस्वस्थपणाने काढले मग ठरवलं, जसं दिसलं तसं लिहून काढायचं, कोणी जाणकार सांगेल समजावून! पण कसलं काय हो, अजून कोणी भेटलं नाही. तर वाचाच त्याबद्दल......

प्रेमाची गोष्ट म्हणजे कॉय ?

के.बी. साठे, बी.सी. साठे आणि तात्या पाटील हे तिघे कॉलेजातले जिवलग मित्र. नाटकांत अभिप्रेत असलेल्या काळात, कोणालाच आपल्या जातीची लाज वाटत नसावी, किंवा ते तिघे खिलाडु वृत्तीचे असावेत. कारण ते एकमेकांना केबी म्हणजे कोब्रा, बीसी म्हणजे बॅकवर्ड अशा हांका मारत असतात. त्याच न्यायाने पाटलांना एस एम नांव का नाही ठेवले ? त्यांच्यात केबी जास्त हुशार असतो(योगायोगाने). त्याच्या कल्पना जगावेगळ्या असतात. एका मुसलमान मुलीबरोबर त्याचे अयशस्वी प्रेमप्रकरण असते. बाकीच्या दोघांना या केबीबद्दल प्रचंड कौतुक असते. या केबीला आपण लागू म्हटले तरी चालेल.
केबी मोठा सी. ए. होऊन लंडनलाच जातो बाकी दोघे गांवातच रहातात. मीना(मुस्लिम मुलगी) न्यायाधीश होते.

२५ - ३० वर्षांनंतर एक दिवस अचानक केबी गांवांत परततो, तो थेट भैरोबाच्या माळावर! तिथे त्याची आणि मीनाची शेवटची भेट झालेली असते. त्याचे स्वगत संपवून तो जातो. नंतर बीसी त्याच्या मुलीबरोबर लंगडत तिथे येतो आणि केबीच्या आठवणी काढतो. पण मुलीला मस्त भूक लागलेली असल्यामुळे ती त्याला कॅन्टीन मधे ओढून नेते. मग एक तरुण मुलगा जॉगिंग करत येतो, त्याला तिथे एक चिटोरा सापडतो त्यावर "म्हणजे काय?" असे लिहिलेले असते. ते वाचून तो अस्वस्थ होतो आणि इकडेतिकडे दगड भिरकावून पळून जातो. त्यानंतर तिथेच येऊन मीना आपली स्वगतें म्हणते. तिलाही तोच चिटोरा दिसतो. या सर्वांची स्वगतें नीट कान देऊन ऐकावी लागतात.
पुढचा सीन् एकदम रद्दीच्या दुकानांत! तिथे तात्या आणि जॉगिंग करणारा जग्या दिसतात. तात्याची तब्येत बरी दिसत नाही. दोघे एकच डॉयलॉग दोनतीनदा म्हणतात. जग्या कामाला गेल्यावर तिथे केबी येतो. तात्या आणि केबी कडकडून भेटतात 'सामना' नंतर बर्‍याच दिवसांनी भेटल्यामुळे तात्या(निळुभाऊ) केबीला बर्‍याच चापट्या मारुन घेतात. त्यांच्या संभाषणातून बीसीच्या मुलीप्रमाणेच तात्याचा मुलगाही राजकारणांत आहे हे कळते.
बीसीच्या घरी तो लंगडत का होता याचे कोडे प्रेक्षकांना उलगडते तोच तिथे केबी येतो. मग तोच आरडाओरडा, मिठ्या आणि गालगुच्चे! तेवढ्यांत बीसीची मुलगी येऊन तीही या जल्लोषांत सामील होते. तिला इथेही मस्त चहा करुन प्यावासा वाटत असतो. तेवढ्यांत बीसी 'रिझर्वेशनचा' उल्लेख करुन एक 'पीजे' करतो. बीसीची मुलगी हुषार दाखवायची असावी ,कारण तिचे नांव प्रज्ञा असते. तिला जातीयतेची इतकी अलर्जी असते की मूळाक्षरांच्या तक्त्यांतला भटजीतला 'भ' आणि यज्ञातला 'ज्ञ' सुध्धा तिला आक्षेपार्ह वाटत असतो. यासाठी तिला कांहीतरी ठोस उपाय हवा असतो. आंतरजातीय विवाहावर कायद्याचे शिक्कामोर्तब घेऊन त्याचा प्रसार करायचा तिचा बेत असतो. त्यासाठी केबीला घेऊन ती मीना न्यायाधीशांना भेटायला जाते, पण केबीला बघितल्याबरोबर न्यायाधीशांची तब्येत अचानक बिघडते आणि प्रज्ञाला केबी व मीनाचे रहस्य कळते.
जग्याच्या मदतीने तिला काहीतरी ठोस करुन दाखवायचे असते. पण जग्याला आम्लपित्त आणि तिला सायनसचा त्रास असल्यामुळे ते फारसे कांही करु शकत नाहीत.
आत्तापर्यंत सर्वांना काही ना काही रोग असल्याचे लक्षांत आल्यामुळे या केबीला पण काही रोग आहे का याचा ते तपास करु लागतात. पण केबी मात्र आपण ठणठणीत असल्याचे सांगून आपले कोरे मेडिकल रिपोर्ट भैरोबाच्या माळावर विखरुन ठेवतो व बायकामुले वाट पहातील असे खोटेच सांगून तिथून सटकतो.
शेवटी एकदाचे केबी आणि मीना भैरोबाच्या माळावर भेटतात. देऊळ व कबरीच्या जवळ बसतात, गप्पा मारतात, नाचतात सुद्धा!! मधेच एकदम गंभीर विषयांवर चर्चा करतात. केबी तिला, हिंदु-मुस्लिम संस्कृतीवर तिने अभ्यास केल्याचे इतक्यावेळा सांगतो की प्रेक्षकांबरोबर तिलाही ते खरे वाटू लागते!
गंभीर चर्चा चालू होते आणि त्यांत यज्ञातल्या 'ज्ञ' चा उल्लेख आल्याबरोबर मीनाला एकदम साक्षात्कार होतो. त्यावरुन तिला हिंदु-मुस्लिमांमधे ज्ञानाची देवाणघेवाण झालीच नसल्याचे आठवते. मग केबी ज्ञान म्हणजे कॉय ? असा मूलभूत प्रश्र्न "लागवी" आवाजांत विचारतो इतक्या गहन् प्रश्नावर विचारमंथन केल्यामुळे दोघांना हार्ट ऍटॅक येतो आणि ज्ञानाच्या शोधांत दोघेही परलोकी जातात!
मधल्या काळांत एका बिल्डरने ती जागा विकत घेऊन तिथले देऊळ व कबर हटवायचे ठरवलेले असते.
ते काम उरकण्यासाठी तो माणसांना आणि तात्याला घेऊन येतो. पण हे दोघे नेमके तिथेच मेल्यामुळे त्याचा व्यवहार घाट्यात जातो आणि त्याचक्षणी नाटक संपल्यामुळे प्रेक्षकांनाही(कांही सन्मानननीय अपवाद वगळतां) आपण अनुक्रमें ७०, ५०, ४० व २५ रुपयांना बुडल्याचे कमीअधिक दुःख होते!!!