मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माझी दिवाळी

संपादक मंडळ ·

रेवती 02/11/2013 - 00:19
मी फुलबाज्या आणि भुईनळा की झाड असे काहीतरी म्हणायचे ते मिस करतीये. बाकी ते आवाजी फटाके आवडायचे नाहीत. एक दोनदा माझ्या नव्या कपड्यांना पेटत्या उदबत्तीने भोके पडली होती. दिवाळीचा फराळ दिवाळीत खायला फारशी मजा येत नसे. दिवाळी संपल्यानंतर जी उरलेली सुट्टी असेल त्यात लायब्ररीतून आणलेले (बाल)साहित्य वाचताना करंज्या, चिरोटे खाणे, त्यातले सारण, पिठीसाखर सांडल्यावर ते सगळे साफसूफ करणे हे आठवत आहे. ;) चिवड्यावर दही घालून खाणे, चकलीबरोबर दही, लोणी. असे करीत असे. चार घरचा आलेला फराळ कसा संपवावा हा प्रश्न पडायचा. मग सकाळी दूध पिताना आई आम्हाला सक्तीने मूठ मूठ शंकरपाळे संपवायला भाग पाडायची. आत्याकडे दिवाळीनंतर मिसळ करून त्यात शेव चिवडे घालून ते संपवण्याचा चंग बांधला जायचा (तरी ते उरायचेच). आता बहुतेक उरलेला फराळ संपवण्याच्या युक्त्या असा धागा सुरु करावा लागेल.

In reply to by रेवती

पैसा 02/11/2013 - 01:27
मी भलत्याच विवंचनेत आहे. कामवाली पोरगी गावी जाणार, मग ती तेलातुपाची भांडी कोण घासणार म्हणून यावर्षी मी फराळ ४ दिवस आधीच तयार केला पण लहान किचनमधे लपवणे शक्य झाले नाही. आणि आताच डब्यांचा तळ दिसू लागला आहे. उद्या सकाळी आमच्यापुरता फराळ आहे पण आणखी कोणी आले तर पोहे देऊन भागवावे लागेल अशी लक्षणे आहेत!

In reply to by पैसा

रेवती 02/11/2013 - 04:48
हा हा हा. हो मीही तेच करणार आहे. आतापरेंत तीन चार जणींचे फोन येऊन गेलेत. त्यांच्याकडे दिवाळी म्हणजे फक्त लक्षुमी पूजन असते. मग महाराष्ट्रीय फराळाला कधी बोलावतेस म्हणून! आता काय सांगू? म्हटले नंतर बोलावते. सगळे मिळून पाच डबे त्यांचे माझ्याकडे आहेत. त्याच डब्यात घालून दिलास फराळ तरी चालेल म्हणतायत. म्हटलं नको, तुम्ही येऊन जा आणि डबे रिकामेच न्या आता!

दिवाळी म्हटले की आवाजाचे फटाके, नवीन कपडे , दिवाळी पहाट आमचा तरुणाई ने ओथंबलेला डोंबिवलीचा फडके रोड तेथे यथेच्च भटकून झाले की मित्रांकडे फराळ अनेक सांस्कृतिक कार्यक्रम , सुंगधी उटणे, मोती साबण दिवाळी अंक अश्या अनेक आठवणी मनात पिंगा घालतात , शाळा सोडून कॉलेजात गेलो तरी नियमितपणे आमचा १० अ चा बहुतेक सर्व वर्ग फड्केवर भेटायचा. आता अर्ध्याहून जास्त जगातील विविध खंडात विखुरले गेले आहोत तेव्हा एखादा वर्ग मित्र न चुकता आजही फड्केवर येतो चतुर भ्रमणध्वनीवर त्याच्याशी गप्पा मारतात मग फडकेवरील आखो देखा हाल पाहता येतो. अनिवासी असल्याने भारताशी ,आपल्या आप्त स्वकीय , मित्रांची , जाम आठवण येते , मग मी मिपावर येतो , आभसी जगतातील माझ्या मिपाकरांना भेटतो , मग जरा बरे वाटते.

अनन्न्या 03/11/2013 - 19:51
लहानपणी आम्ही जवळपासची सारी मुले दिवाळीच्या आदल्या रात्री पत्ते कुटत असू. खेडेगाव असल्याने आजूबाजूला भरपूर मोकळी जागा होती. आमच्या घराशेजारी एका काकांचे घर होते, ते भिक्षुकी करायचे. आणि त्यांना संक्रातीला मिळालेली सुगडे ते बाहेर झाडाखाली रचून ठेवायचे. रात्री आम्ही मुले ती सुगडे पळवून आणत असू. दोन वाजले की त्यात ठेवून त्यांच्याच घराबाहेर मोठे बॉम्ब वाजवत असू. त्यांचा मुलगाही यात सामिल असे. ते उठून बाहेर येऊन, कोण रे तो? असे विचारे पर्यंत आम्ही पत्ते पुन्हा सुरू करत असू. हे दरवर्षी करत असूनही त्यानी कधी सुगडांची जागा बदलली नाही, किंवा फटाके लावणारे शोधले नाहीत. रात्रभर हे सगळे उद्योग करून चार वाजता आपापल्या घरी जायचे. आंघोळी आटोपून, रांगोळ्या काढून, फराळ करायचा आणि जे गुडूप झोपायचे ते थेट दुपारच्या चहाला उठायचे. दिवाळीच्या दिवशी सकाळी नारळाच्या दुधात उटणे कालवले जायचे. नवीन कपडे दर दिवाळीला मिळायचे नाहीत, पण तांब्यात निखारे भरून त्याने असलेल्या त्यातल्या त्यात बय्रा ड्रेसला इस्त्री करून घालतानाही खूप मजा वाटे. फराळात जास्त पदार्थ नव्ह्ते. घरचे पोहे, करंजी, कडबोळी, रव्याचे लाडू आणि कणकेचे शंकरपाळे! दिवाळीच्या दिवशी गूळ पातळ करून त्यात ओले खोबरे घालून त्यात घरचे जाड पोहे भिजवून ते मिक्स करायचे. एक वाफ काढून हे गरमागरम पोहे केळीच्या पानावर साजूक तूप घालून खाणे म्हणजे अहाहा!!! फटाके मोजूनच असायचे. ते तुळशीच्या लग्नापर्यंत पुरवावे लागत. तुळशीच्या लग्नाला तुळशी वृंदावन चुना, हळद आणि पिंजरीच्या ठिपक्यांनी सजवायचे. सकाळी आई तिला पिवळे कापड गुडाळायची, हिरव्या बांगड्या घालायची. ऊस मामा म्हणून उभा करायचा. करा-दिवा मात्र आम्ही बहिणी घेऊन उभ्या रहात असू. बाबा एकटेच मुलाकडचे! लग्नानंतर सगळ्यांना फराळ दिला जायचा. मस्त होती ती दिवाळी!!

In reply to by अनन्न्या

पैसा 03/11/2013 - 21:38
दिवाळीची सुटी ही निव्वळ पत्ते खेळण्यासाठीच असायची. त्यात तो गृहपाठ नावाचा छळ असायचा पण कोणाला फिकीर होती त्याची!

पाषाणभेद 03/11/2013 - 21:53
मला माझ्या लहाणपणाची दिवाळी अजूनही आठवते. मी हिंदू, माझी आई पारशी, वडील मुस्लीम, बहीण क्रिस्चन, भाऊ बंगाली, चुलत भावंड काश्मिरी- पंजाबी असल्याने लहाणपणाच्या दिवाळीसणात सर्व भारत आमच्या घरी जमला असे वाटत असे. मिठाई, फटाके यांची रेलचेल असायची. आताशा दिवाळीत मी घरी नसते. गेल्या दोन दिवाळींच्या वेळी मी सिंगापूर अन स्वित्सर्लंड येथे शाहिद अन रनबीर सोबत शुटींगमध्ये बिझी होते. येत्या दिवाळीत माझा 'Blind Game - ऐ सनम तुझपे मेरे दिल आ गया' हा चित्रपट रिलीज होतो आहे. माझ्यासाठी ते दिवाळी गिफ्टच आहे. सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या शुभेच्छा! - करूना कर्पूर (शब्दांकन - पाषाणभेद)

रेवती 02/11/2013 - 00:19
मी फुलबाज्या आणि भुईनळा की झाड असे काहीतरी म्हणायचे ते मिस करतीये. बाकी ते आवाजी फटाके आवडायचे नाहीत. एक दोनदा माझ्या नव्या कपड्यांना पेटत्या उदबत्तीने भोके पडली होती. दिवाळीचा फराळ दिवाळीत खायला फारशी मजा येत नसे. दिवाळी संपल्यानंतर जी उरलेली सुट्टी असेल त्यात लायब्ररीतून आणलेले (बाल)साहित्य वाचताना करंज्या, चिरोटे खाणे, त्यातले सारण, पिठीसाखर सांडल्यावर ते सगळे साफसूफ करणे हे आठवत आहे. ;) चिवड्यावर दही घालून खाणे, चकलीबरोबर दही, लोणी. असे करीत असे. चार घरचा आलेला फराळ कसा संपवावा हा प्रश्न पडायचा. मग सकाळी दूध पिताना आई आम्हाला सक्तीने मूठ मूठ शंकरपाळे संपवायला भाग पाडायची. आत्याकडे दिवाळीनंतर मिसळ करून त्यात शेव चिवडे घालून ते संपवण्याचा चंग बांधला जायचा (तरी ते उरायचेच). आता बहुतेक उरलेला फराळ संपवण्याच्या युक्त्या असा धागा सुरु करावा लागेल.

In reply to by रेवती

पैसा 02/11/2013 - 01:27
मी भलत्याच विवंचनेत आहे. कामवाली पोरगी गावी जाणार, मग ती तेलातुपाची भांडी कोण घासणार म्हणून यावर्षी मी फराळ ४ दिवस आधीच तयार केला पण लहान किचनमधे लपवणे शक्य झाले नाही. आणि आताच डब्यांचा तळ दिसू लागला आहे. उद्या सकाळी आमच्यापुरता फराळ आहे पण आणखी कोणी आले तर पोहे देऊन भागवावे लागेल अशी लक्षणे आहेत!

In reply to by पैसा

रेवती 02/11/2013 - 04:48
हा हा हा. हो मीही तेच करणार आहे. आतापरेंत तीन चार जणींचे फोन येऊन गेलेत. त्यांच्याकडे दिवाळी म्हणजे फक्त लक्षुमी पूजन असते. मग महाराष्ट्रीय फराळाला कधी बोलावतेस म्हणून! आता काय सांगू? म्हटले नंतर बोलावते. सगळे मिळून पाच डबे त्यांचे माझ्याकडे आहेत. त्याच डब्यात घालून दिलास फराळ तरी चालेल म्हणतायत. म्हटलं नको, तुम्ही येऊन जा आणि डबे रिकामेच न्या आता!

दिवाळी म्हटले की आवाजाचे फटाके, नवीन कपडे , दिवाळी पहाट आमचा तरुणाई ने ओथंबलेला डोंबिवलीचा फडके रोड तेथे यथेच्च भटकून झाले की मित्रांकडे फराळ अनेक सांस्कृतिक कार्यक्रम , सुंगधी उटणे, मोती साबण दिवाळी अंक अश्या अनेक आठवणी मनात पिंगा घालतात , शाळा सोडून कॉलेजात गेलो तरी नियमितपणे आमचा १० अ चा बहुतेक सर्व वर्ग फड्केवर भेटायचा. आता अर्ध्याहून जास्त जगातील विविध खंडात विखुरले गेले आहोत तेव्हा एखादा वर्ग मित्र न चुकता आजही फड्केवर येतो चतुर भ्रमणध्वनीवर त्याच्याशी गप्पा मारतात मग फडकेवरील आखो देखा हाल पाहता येतो. अनिवासी असल्याने भारताशी ,आपल्या आप्त स्वकीय , मित्रांची , जाम आठवण येते , मग मी मिपावर येतो , आभसी जगतातील माझ्या मिपाकरांना भेटतो , मग जरा बरे वाटते.

अनन्न्या 03/11/2013 - 19:51
लहानपणी आम्ही जवळपासची सारी मुले दिवाळीच्या आदल्या रात्री पत्ते कुटत असू. खेडेगाव असल्याने आजूबाजूला भरपूर मोकळी जागा होती. आमच्या घराशेजारी एका काकांचे घर होते, ते भिक्षुकी करायचे. आणि त्यांना संक्रातीला मिळालेली सुगडे ते बाहेर झाडाखाली रचून ठेवायचे. रात्री आम्ही मुले ती सुगडे पळवून आणत असू. दोन वाजले की त्यात ठेवून त्यांच्याच घराबाहेर मोठे बॉम्ब वाजवत असू. त्यांचा मुलगाही यात सामिल असे. ते उठून बाहेर येऊन, कोण रे तो? असे विचारे पर्यंत आम्ही पत्ते पुन्हा सुरू करत असू. हे दरवर्षी करत असूनही त्यानी कधी सुगडांची जागा बदलली नाही, किंवा फटाके लावणारे शोधले नाहीत. रात्रभर हे सगळे उद्योग करून चार वाजता आपापल्या घरी जायचे. आंघोळी आटोपून, रांगोळ्या काढून, फराळ करायचा आणि जे गुडूप झोपायचे ते थेट दुपारच्या चहाला उठायचे. दिवाळीच्या दिवशी सकाळी नारळाच्या दुधात उटणे कालवले जायचे. नवीन कपडे दर दिवाळीला मिळायचे नाहीत, पण तांब्यात निखारे भरून त्याने असलेल्या त्यातल्या त्यात बय्रा ड्रेसला इस्त्री करून घालतानाही खूप मजा वाटे. फराळात जास्त पदार्थ नव्ह्ते. घरचे पोहे, करंजी, कडबोळी, रव्याचे लाडू आणि कणकेचे शंकरपाळे! दिवाळीच्या दिवशी गूळ पातळ करून त्यात ओले खोबरे घालून त्यात घरचे जाड पोहे भिजवून ते मिक्स करायचे. एक वाफ काढून हे गरमागरम पोहे केळीच्या पानावर साजूक तूप घालून खाणे म्हणजे अहाहा!!! फटाके मोजूनच असायचे. ते तुळशीच्या लग्नापर्यंत पुरवावे लागत. तुळशीच्या लग्नाला तुळशी वृंदावन चुना, हळद आणि पिंजरीच्या ठिपक्यांनी सजवायचे. सकाळी आई तिला पिवळे कापड गुडाळायची, हिरव्या बांगड्या घालायची. ऊस मामा म्हणून उभा करायचा. करा-दिवा मात्र आम्ही बहिणी घेऊन उभ्या रहात असू. बाबा एकटेच मुलाकडचे! लग्नानंतर सगळ्यांना फराळ दिला जायचा. मस्त होती ती दिवाळी!!

In reply to by अनन्न्या

पैसा 03/11/2013 - 21:38
दिवाळीची सुटी ही निव्वळ पत्ते खेळण्यासाठीच असायची. त्यात तो गृहपाठ नावाचा छळ असायचा पण कोणाला फिकीर होती त्याची!

पाषाणभेद 03/11/2013 - 21:53
मला माझ्या लहाणपणाची दिवाळी अजूनही आठवते. मी हिंदू, माझी आई पारशी, वडील मुस्लीम, बहीण क्रिस्चन, भाऊ बंगाली, चुलत भावंड काश्मिरी- पंजाबी असल्याने लहाणपणाच्या दिवाळीसणात सर्व भारत आमच्या घरी जमला असे वाटत असे. मिठाई, फटाके यांची रेलचेल असायची. आताशा दिवाळीत मी घरी नसते. गेल्या दोन दिवाळींच्या वेळी मी सिंगापूर अन स्वित्सर्लंड येथे शाहिद अन रनबीर सोबत शुटींगमध्ये बिझी होते. येत्या दिवाळीत माझा 'Blind Game - ऐ सनम तुझपे मेरे दिल आ गया' हा चित्रपट रिलीज होतो आहे. माझ्यासाठी ते दिवाळी गिफ्टच आहे. सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या शुभेच्छा! - करूना कर्पूर (शब्दांकन - पाषाणभेद)
नमस्कार मिपाकरहो, दिपावली अभिष्टचिंतन! कोणताही सण आला की आपण तो साजरा करताना आई काय करत असे किंवा आज्जी कसे करत असे ते आठवून, त्यांना विचारून, पुस्तकात वाचून त्या पद्धती आचरणात आणायचा प्रयत्न करतो. काहीवेळा सगळे साग्रसंगीत करायला जमते तर कधी गोष्टी शास्त्रापुरत्या कराव्या लागतात. दिवाळी हा आपल्यकडील मोठा सण समजला जातो. चार दिवस आपापले वैशिष्ठ्य टिकवून असतात. वाईट वृत्तीचा नाश करण्यापासून ते लक्ष्मीच्या पुजेपर्यंत तर सासरच्या नातेवाईकांपासून माहेरच्या नातेवाईकांची भेट घडवत हा सण आठवणींच्या सुखाची उबदार शाल मनावर अलगदपणे सोडून पुढील वर्षाची वाट पहायला लावतो.

सहज सुचलं म्हणून _ २०२६

कंजूस ·

निनाद 19/03/2026 - 08:54
पासकी या गुगल पासवर्ड मॅनेजरशी सिंक असेल ना? फोन हरवला असेल, तर तुम्ही तुमच्या गुगल आयडीने दुसऱ्या कोणत्याही लॅपटॉप, किंवा जुन्या फोनवरून लॉगिन करून चालू शकेल. क्लाउड सिंकिंगमुळे तुमच्या सर्व पासकी आपोआप दुसऱ्या फोन वर मिळतील. अकाउंट लॉक होत नाही. पास्वर्ड पण कुठे जात नाही. पण फोअन हरवला असेल तर अँड्रॉइडसाठी 'फाइंड माय डिव्हाइस वरून लॉक करा. अनोळखी व्यक्तीला तुमच्या बायोमेट्रिक्सशिवाय किंवा फोनच्या पिनशिवाय त्या पासकीचा वापर करता येणार नाही. दुसर्‍या फोन वरून सेटिंग्जमध्ये जाऊन हरवलेल्या फोनशी संबंधित असलेली जुनी पासकी कायमची काढून टाकायची.

निनाद 19/03/2026 - 08:54
पासकी या गुगल पासवर्ड मॅनेजरशी सिंक असेल ना? फोन हरवला असेल, तर तुम्ही तुमच्या गुगल आयडीने दुसऱ्या कोणत्याही लॅपटॉप, किंवा जुन्या फोनवरून लॉगिन करून चालू शकेल. क्लाउड सिंकिंगमुळे तुमच्या सर्व पासकी आपोआप दुसऱ्या फोन वर मिळतील. अकाउंट लॉक होत नाही. पास्वर्ड पण कुठे जात नाही. पण फोअन हरवला असेल तर अँड्रॉइडसाठी 'फाइंड माय डिव्हाइस वरून लॉक करा. अनोळखी व्यक्तीला तुमच्या बायोमेट्रिक्सशिवाय किंवा फोनच्या पिनशिवाय त्या पासकीचा वापर करता येणार नाही. दुसर्‍या फोन वरून सेटिंग्जमध्ये जाऊन हरवलेल्या फोनशी संबंधित असलेली जुनी पासकी कायमची काढून टाकायची.
मागील धागा ( https://www.misalpav.com/node/52636 )जुना झाल्याने आणि खूप मोठा झाल्याने हा नवीन धागा काढत आहे. राजकीय विषय सोडून इतर विषयांसाठी. ----------------------------- एक नवीन प्रश्न . PASSKEY विरुद्ध PASSWORD १. विविध साईटस किंवा इमेलसाठी login करताना username , password टाकावे लागू नये म्हणून passkey वापरण्याची पद्धत दोन वर्षांपूर्वी आणण्यात आली. २. एकच password सर्व साईटसना ठेवणे धोक्याचे आहे असं डिजिटल सुरक्षितता जाणणारे सांगतात. एवढे password बनवून लक्षात कसे ठेवायचे? ३. एकच password लक्षात ठेवा आणि तो password vault साठी वापरा. त्यात सर्व इतर passwords ठेवा सांगतात.

दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव २: बंगलोर ते मलावली ९३ किमी

मार्गी ·

निनाद 17/03/2026 - 09:00
छान अजून खुलवता आले असते. शारिरीक, मानसिक आंदोलने आणि त्यांच्याशी झगडा यायला हवा होता. निसर्गाचे वर्णन अजून हवे. सायकल कशी चालली, काय काय घडत होते. हे सर्व आले की वाचकाला अजून सुंदर अनुभव मिळतो...

पाषाणभेद 17/03/2026 - 10:02
छान प्रवासवर्णन असल्या प्रवासात वाहनांची (सायकल, मोटरसायकल, चारचाकी इत्यादी) काळजी, देखभाल कशी करायची, काय काय सुट्टे भाग बरोबर ठेवावे इत्यादी बाबत खूप कमी लेखन दिसते. त्यात भर घातली, वेगळा धागा काढला तर बरे होईल. अशा सर्वांनी असे प्रयत्न करावे.

निनाद 17/03/2026 - 09:00
छान अजून खुलवता आले असते. शारिरीक, मानसिक आंदोलने आणि त्यांच्याशी झगडा यायला हवा होता. निसर्गाचे वर्णन अजून हवे. सायकल कशी चालली, काय काय घडत होते. हे सर्व आले की वाचकाला अजून सुंदर अनुभव मिळतो...

पाषाणभेद 17/03/2026 - 10:02
छान प्रवासवर्णन असल्या प्रवासात वाहनांची (सायकल, मोटरसायकल, चारचाकी इत्यादी) काळजी, देखभाल कशी करायची, काय काय सुट्टे भाग बरोबर ठेवावे इत्यादी बाबत खूप कमी लेखन दिसते. त्यात भर घातली, वेगळा धागा काढला तर बरे होईल. अशा सर्वांनी असे प्रयत्न करावे.
✪ वन्य परिसरातून सायकल प्रवास ✪ कर्नाटकमधील शांत रस्ते आणि छोटी गावं! ✪ “अरे ओ सांबा" जिथे घडलं असेल असे डोंगर ✪ ननगे स्वल्पा कन्नडा गोत्तू ✪ स्वीडनमधील सायकल मित्रासोबत भेट ✪ सूर्य नमस्काराची सप्त नमस्कार आवृत्ती ✪ Well began is half done! नमस्कार. जानेवारीमधल्या सायकल प्रवासाचे अनुभव शेअर करत आहे. १२ जानेवारी! विवेकानंद जयंती! बंगलोर जवळच्या एस-व्यासामधला शांत परिसर! काल आकाश ढगाळ होतं, पण पहाटे तारे दिसत आहेत. काल रात्री बर्‍यापैकी झोप झाली आणि सकाळी फ्रेश वाटतंय. एस- व्यासामधले वरिष्ठ अधिकारी श्री. अमित सिंह आणि निरामयचे श्री धनंजय इंचेकर ह्यांची भेट घेऊन निघालो.

दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना

मार्गी ·
✪ १३ योग केंद्रांमध्ये भेट आणि संवाद ✪ “निरामयचा" जानेवारीमध्ये पूर्ण झालेला सायकल यात्रा उपक्रम ✪ बंगलोर- उटी- ईशा आदि योगी- केरळ- कन्याकुमारी- रामेश्वरम- चेन्नै ✪ प्रचंड मोठे घाट, भितीदायक उतार आणि बेटावरचा प्रवास ✪ सुरूवातीला पुण्यातल्या चिन्मय विभूतीमध्ये भेट ✪ १८६१+ किलोमीटर अंतर आणि सायकलने दिलेली साथ ✪ निसर्ग- तीर्थयात्रा आणि अविश्वसनीय भारत ✪ सर्वांबद्दल कृतज्ञता आणि धन्यवादाची भावना नमस्कार. गेल्या जानेवारीमध्ये दक्षिण भारतात "आरोग्यासाठी योग" हा विषय घेऊन १८६१ किलोमीटर सोलो सायकल प्रवास केला होता. परभणीच्या निरामय योग प्रसार व संशोधन केंद्राचा हा उपक्रम होता.

शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..

आजी ·
हल्लीची काही मुलं परीक्षेत शतप्रतिशत म्हणजे शंभरपैकी शंभर मार्कस् मिळवतात. काहीजण तर शंभर टक्क्यांपेक्षा जास्त मार्कस् मिळवतात म्हणे.. कसे कोण जाणे.. हे सर्व माझ्यासारख्या आजी, आजोबा झालेल्या व्यक्तीला अचंबित करणारे असलं तरी ते वास्तव आहे. मी जेव्हा शाळेत जात होते तेव्हा मला कोणत्याही विषयात शत प्रतिशत गुण मिळाले असं फारसं आठवत नाही. तसं म्हटलं तर माझे भाषा विषय उत्तम होते. संस्कृत मध्ये मला दोन, तीन वेळा खरंच शत प्रतिशत गुण मिळालेही होते. पण फक्त आणि फक्त संस्कृतमध्येच.. आमच्या वेळी.. काय सांगू? ३५ टक्क्यांना पासिंग होतं. ७० टक्के मिळाले की डिस्टिंक्शन.

कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...

मार्गी ·
✪ होमसिक झाल्याची भावना! ✪ रामगंगेच्या किनार्‍याने घाट वाटेचा प्रवास ✪ विवेकानंदांचं अलमोडा आणि नीम करोली बाबांचं कैंची धाम! ✪ तीन बाजूंने पर्वत आणि दूरवर सपाट जमीन ✪ काठगोदाम- लाकडं नेण्यासाठी ब्रिटीशांनी बांधलेलं स्टेशन ✪ दक्षिण भारत सायकल प्रवासाची उत्सुकता ११ डिसेंबरच्या पहाटे सत्गड़वरून निघालो! ठीक साडेपाच वाजता जीप आली. भर अंधारात प्रवास सुरू झाला! सत्गड़ला नातेवाईकांसोबत दिवस छान गेले. छान भेटी झाल्या. हिमालय, तिथली गावं आणि लोक! आणि अर्थातच तिथलं ट्रेकिंग आणि आकाश दर्शन! पण आता निघायची वेळ झाली. निघताना फाssर होमसिक वाटतंय! पहाटेचा अंधारातला परिसर!

कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ७: नितांत सुंदर ध्वज मंदिर ट्रेक

मार्गी ·
✪ ध्वज मंदिराची रमणीय पायवाट ✪ धुक्याचा समुद्र आणि पर्वतांची रांग ✪ उतरताना नवीन वाटेचा अनुभव ✪ गावातल्या लोकांसोबत संवाद ✪ सत्गड़मधून आकाश दर्शनाची शेवटची रात्र ✪ पहाड़ाचा निरोप घेण्याचा कठिण प्रसंग १० डिसेंबर! सत्गड़! अगदी स्वप्नातलं टुमदार गाव! रात्रीप्रमाणेच पहाटेही आकाश सुंदर आहे! पहाटे सप्तर्षी पूर्ण उगवून किंचित पश्चिमेला झुकलेलेही दिसत आहेत! आज सत्गड़मधला शेवटचा दिवस. आज दुपारी भाचा- आदित्य शाळेतून आल्यावर त्याच्यासोबत ध्वज मंदिराचा ट्रेक करणार आहे. पण सकाळीसुद्धा फिरावसं वाटलं. सत्गड़मध्ये कुठेही फिरताना ट्रेकिंग होतंच!

एका रेषेत सहा ग्रह?

मार्गी ·

कंजूस 28/02/2026 - 12:03
माझा आवडता छंद होता तो आता सोडावा लागला. आकाश पाहायचं कुठून हा मोठा प्रश्न पडला आहे. जवळच्या आणि चांगल्या जागांवरही लखलखाट झाला आहे. तुम्ही कुठून पाहता?

सागर 07/03/2026 - 02:36
आकाशात सध्या काही स्पष्ट दिसणार्‍या ग्रहांसोबत पूर्ण चन्द्राचे देखील दर्शन होळी पौर्णिमेच्या (दुसर्‍या दिवशी) जास्त छान झाले.

मार्गी 07/03/2026 - 11:33
वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद! @ कंजूस जी, शहरापासून ४०-५० किमी लांब गेल्यावर मिळतं चांगलं आकाश. पुण्याच्या बाहेर असलेल्या फार्म हाऊसेसवरून किंवा कधी अशा इतर ठिकाणी गेल्यावर दिसतं. क्वचित शहरातूनही स्वच्छ आकाश असतं. @सागर जी, हो! ग्रहणही दिसलं थोडा वेळ.

कंजूस 28/02/2026 - 12:03
माझा आवडता छंद होता तो आता सोडावा लागला. आकाश पाहायचं कुठून हा मोठा प्रश्न पडला आहे. जवळच्या आणि चांगल्या जागांवरही लखलखाट झाला आहे. तुम्ही कुठून पाहता?

सागर 07/03/2026 - 02:36
आकाशात सध्या काही स्पष्ट दिसणार्‍या ग्रहांसोबत पूर्ण चन्द्राचे देखील दर्शन होळी पौर्णिमेच्या (दुसर्‍या दिवशी) जास्त छान झाले.

मार्गी 07/03/2026 - 11:33
वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद! @ कंजूस जी, शहरापासून ४०-५० किमी लांब गेल्यावर मिळतं चांगलं आकाश. पुण्याच्या बाहेर असलेल्या फार्म हाऊसेसवरून किंवा कधी अशा इतर ठिकाणी गेल्यावर दिसतं. क्वचित शहरातूनही स्वच्छ आकाश असतं. @सागर जी, हो! ग्रहणही दिसलं थोडा वेळ.
✪ "प्लॅनेट परेडची" सत्य स्थिती ✪ आत्ताचे ग्रह कसे व कुठे बघता येतील? ✪ सूर्य मावळल्यानंतर तेजस्वी शुक्र दिसेल ✪ शुक्र, शनि व तेजस्वी गुरू हे तीन ग्रह सहजपणे बघता येतील ✪ पुढचे दोन- तीन दिवस नितांत स्वच्छ आकाश ✪ नितळ निळा रंग- आकाशाचा रंग निळा का असतो? ✪ ३ मार्चला चंद्रग्रहण- पण चंद्र उगवताना ग्रहण संपत असेल ✪ पायथागोरसचे प्रमेय आणि तमिळ गणितज्ञाचं निरीक्षण नमस्कार. गेले काही दिवस एका रेषेत सगळे ग्रह येणार अर्थात् "प्लॅनेट परेड" होणार अशा पोस्टस आल्या आहेत. ग्रहांची सद्यस्थिती कशी आहे व कुठले ग्रह कसे बघता येतील त्याबद्दल बोलण्याआधी थोडा विचार करूया.

कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ६: मुन्सियारीतला ट्रेक आणि थरारक जीप प्रवास

मार्गी ·
✪ पायवाटेवरची सुंदर भ्रमंती ✪ काटक बनवणारी पहाड़ी जीवनशैली ✪ एकमेकांना धरून राहणारी साधी माणसं ✪ पर्वत कितने ऊँचे कितने गहरे होते हैं! ✪ पहाड़ाची नानाविध रूपं! ✪ सत्गड़ची रमणीय संध्याकाळ ९ डिसेंबरची पहाट! मुन्सियारी आकाश दर्शनाचं शेवटचं सत्र! डोळे भरून आकाश बघितलं. चंद्र प्रकाशात चमकणारी पंचा चुलीची शिखरं मन भरून बघितली! थंडीचाही भरपूर आनंद घेतला! उजाडल्यावर टेलिस्कोप पॅक केला. चहाचा पहिला राउंड झाल्यावर आवरून भटकायला निघालो. कोवळं ऊन अंगावर घेताना मस्त वाटतंय. काल गावात थोडं फिरलो होतो तेव्हा एक जागा सुंदर दिसली होती. त्या भागात अजून पुढे फिरेन.

कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ५: मुन्सियारीतून केलेलं आकाश दर्शन

मार्गी ·
✪ अंध गायकासोबत विशेष भेट ✪ सप्तर्षी, स्वाती आणि पंचा-चुली! ✪ रात्रीच्या आकाशातली रंगांची उधळण आणि स्टार ट्रेल्स! ✪ अखेर चंद्रोदयाचा क्षण फोटोत घेता आला ✪ आकाशगंगेच्या पिठुर चांदण्याचा आनंद ✪ भयाण थंडीमध्ये चहाची ऊब! ७ डिसेंबरच्या पहाटे ४ वाजता उठलो. मुन्सियारीची भयाण थंडी! पण आकाशात काय काय दिसेल ही उत्सुकताही तेवढीच! हिंमत करून दार उघडून बाहेर आलो. अहा हा! काय विलक्षण दृश्य आहे! सप्तर्षी पूर्ण वर आलेले आहेत. आणि महाराष्ट्रातून दिसतात त्याहून ते जास्त उंचीवर दिसत आहेत! कारण अर्थातच मुन्सियारीचं उत्तरेकडचं स्थान. काल संध्याकाळी शर्मिष्ठा तारकासमूहसुद्धा बराच वर दिसत होता.