टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
मांडणी
युके कट्टा....
प्रेषक ब्रिटिश टिंगी ( गुरू, ०८/०७/२००८ - ०२:०५) .नमस्कार मंडळी,
मागे काही दिवसांपुर्वी मिपाचे इस्ट-कोस्ट अन् जर्मनीत बॅक टु बॅक कट्टे झाले. त्याच धरतीवर युकेतही (परत एकदा) कट्टा भरवावा अशी अस्मादिकांना इच्छा झाली.
त्यातच भर म्हणुन की काय, मिपाचे 'निवृत्त' विडंबनाचार्य केशवसुमार यांचेही या महिन्यात युकेत आगमन होत आहे.
हा त्रिवेणी (का द्विवेणी) संगम साधत युकेत कट्टा भरविणे आणि उत्सुक असणार्या सभासदांबरोबर या कट्ट्याची पुर्वतयारी करणे या करिता हा सगळा प्रपंच!
असो, केसुशेठ दिनांक २३ ऑगस्ट रोजी 'मोकळे' असल्याने कट्टा याच दिवशी भरवण्याचा मानस आहे.
तरी इच्छुकांनी अधिक माहिती करिता मला अथवा केशवसुमारांना व्यनि करणे.....
सहभागी होणारे सभासद मला भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करु शकतात.
माझा भ्रमणध्वनी क्र. -> ०७९१८७२२२५६
निवेदन संपले!
- (ब्रिटिश) टिंग्या 
संयोजक,
युके मिपा कट्टा क्र. २
गूगल मॅप व गूगल अर्थ मध्ये काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश विवादास्पद
प्रेषक अनिकेत केदारी ( बुध, ०८/०६/२००८ - १३:४१) .गूगल मॅपवर सहज पहाताना लक्षात आले की काश्मीरचा काही भाग आणि अरुणाचल प्रदेश तुटक रेषेने दाखवले आहेत. दुसरा असा तुटक रेषेचा प्रदेश आहे तो गाझा पट्टीचा. 'गूगल अर्थ'वरपण हे प्रदेश लाल रेघेने दाखवले आहेत. ह्याचा अर्थ होतो काश्मीरचा काही भाग आणि अरुणाचल प्रदेश भारतात नाहीत.
आपण याबाबतीत काय करु शकतो? काय केले पाहिजे. केवळ राज्यकर्त्यांना शिव्याशाप देउन चालेल का?
निदान गूगल कंपनीकडे निषेध नोंदवता येइल का? जाणकारांनी आपले मत मांडावे.
शुभेच्छा!!
प्रेषक प्राजु ( शनी, ०८/०२/२००८ - २३:४४) .माझ्या सगळ्या मिपा कुटुंबातील मित्र आणि मैत्रीणींना मैत्रीदिनाच्या हार्दीक शुभेच्छा! आपली मैत्री अशीच वृद्धींगत होत राहो हीच ईशचरणी प्रार्थना!!!

गंध अलौकिक याचा
क्षणभंगूर जीवन जरी
शुभ्र पाकळ्या कोमल
नाजूक नाभी शेंदरी
छंद समर्पाणाचा आगळा
वेड्याने त्या जोपासताना
मातीलाही गंध दिला
फांदीवरूनी ओघळताना
मैत्री व्हावी ऐसी
जिवाला जीव देणारी
जीवन ऐसे सार्थ व्हावे
पारिजात फुला परी...
- प्राजु
मी कशी आहे ते मलाच सांगता येत नाही...
प्रेषक संकेता ( शुक्र, ०८/०१/२००८ - १२:३०) .मी कशी आहे ते मलाच सांगता येत नाही...
कधी मी वारयाची झुलूक असते
तर कधी बेफाम वारा असते
कधी मी पावसाची हलकी सर असते
तर कधी समुद्रची लाट असते
कधी मी डोलनारे कणिस असते
तर कधी खम्बिर तरु असते
कधी मी शांत नदी असते
तर कधी भिरभिर्नारे फूलपाखरू असते
मी तो सुर आहे
जो मनाला दिलासा देतो,
तर कधी हुरहुर लावतो
बस आणि काय सांगू
सगलच लिहिता येत नाही
म्हनून म्हणते
मी कशी आहे ते मलाच सांगता येत नाही...
सुरेखा..
प्रेषक प्राजु ( बुध, ०७/३०/२००८ - २३:२२) ."वयनी, स्वयंपाक काय काय करायची सांगा लवकर?"
साधारण सकाळी ९.३० च्या दरम्यान अशी विचारणा झाली की ओळखावं सुरेखा बाई आलेल्या आहेत. ही आमची सुरेखा म्हणजे कर्नाटक आणि कोल्हापूर(कोल्लापूर) याचं एक अजब मिश्रण आहे. आडनावने म्हणजे जातीने ही ९६ कुळी बरं का. पण आवाजाचा हेल सगळा कर्नाटकी आणि त्यातही विशेष म्हणजे लिंग, वचन हे सगळं धाब्यावर बसवून मराठी बोलणार. अशिक्षित, अडाणी. मध्ये मध्ये इंग्रजीचा खून पाडणारी.
मी कॉलेजात असताना आमच्या बंगल्याच्या बांधकामाच्या कामावर वॉचमन म्हणून ही आणि तिचा नवरा रहात होते. घर बांधून झालं .पण वॉचमनची टपरी तशीच होती. आम्ही फेब्रुवारी मध्ये त्या घरात रहायला गेलो. तेव्हा तिचा मुलगा शाळेत होता. त्यामुळे तिने आईला विनंती केली की, याची वार्षिक परिक्षा होईपर्यंत मी इथे रहाते .. तो पर्यंत तुमच्या घरचं काम करते. काम म्हणजे धुणं-भांडी, केर्-फरशी, बाकी आवरा आवर आणि स्वयंपाक .. आईनेही मान्य केलं. आणि २ महिने राहते म्हणून राहिलेली ही सुरेखा आमच्या कुटुंबाचा घटक झाली. तिच्यासाठी बंगल्याच्या बाहेर एक छोटीशी खोली वजा आउट हाऊस बांधून घेतलं. सकाळी अंगण झाडून घेण्यापासून हीचं काम सुरू होई. घरातल्या प्राणीमात्रांना सुद्धा तिची पट्कन सवय झाली. कर्नाटकची असल्याने भाकरी अशा काही सुंदर करते की, वरचा आणि खालचा पापुद्रा यांची जाडी एकच असते. तिला ब्राह्मणी पद्धतीने पोळ्या आणि भाज्या करयाला आईने शिकवल्या. खूप लवकर शिकली. आमच्या घरी स्वयंपाक करता करता आणखी १-२ ठिकाणची स्वयंपाकाचि तिनम कामं धरली. काळासावला रंग, शिडशिडीत बांधा आणि डोक्यावर पदर घेऊन तो कमरेशी खोचलेला अशा अवतारात बाई साहेब निघतात.
हिचे किस्से धमाल असतात. एकदा सगळीकडचे दिवे गेले होते. घरात अंधार होता. पण आमच्या घराच्या मागे चालेल्या बांधकामावर लाईट दिसत होते. आजीने विचारलं, "अगं सुरेखा, लाईट फक्त आपल्या घरीच गेलेत का? फ्युज वगैर नाही ना उडाला? कारण मागे लाईट आहे..." " न्हाई वं... जन्ड्रटल हाय तिथं.." सुरेखा म्हणाली. आजी म्हणाली, "काय आहे तिथं?".."जन्ड्रटल वं.. ते लावत्यात की लाई गेल्यावर"... सुरेखा समजावून देऊ लागली. " अच्छा.. जनरेटर होय..! बर बरं.." आजी म्हणाली. "हां बघा ते जन्ड्रटल हाय" सुरेखाने पुस्ती जोडली. हा प्रसंग आम्ही आठवून आठवून हसत होतो.
त्यानंतर एकदा, तिचा मोठा मुलगा जो कर्नाटकात कुठेतरी नुकताच ओफिसबॉय म्हणून नोकरीला लागला. तो हिला आणि धाकट्या भावाला भेटायला म्हणून आला. पहिला पगार झाला होता. तेव्हा भावाला घेऊन सिनेमाला गेला , त्याला कपडे आणले नवे, हिला साडी घेतली. त्यावेळि हिचा आनंद गगनात मावत नव्हता. मलाही खूप बरं वाटलं. तिच्या त्या मुलाने एका संध्याकाळी येताना कोण्या गाड्यावरून चिकन ६५ आणले घरी. ही संध्याकाळच्या स्वयंपाकाला घरी आली. आईने विचारलं, " तुझा झाला का स्वयंपाक?" तर म्हणाली, " पक्या (प्रकाश .. तो मोठा मुलगा), आज येताना चिट्टीफाय घ्यून आला हाय नव्हं. ते खाल्लो आताच.. आता पक्त्(फक्त) बाकरी(भाकरी) करनार २ आणि सकाळचा बात (भात) बी हाय तसाच. काय जास्त न्हाइ करायच आज" . आईने विचारलं," काय आणलं प्रकाशनं??" तर पुन्हा म्हणाली," चिट्टीफाय".. "काय??" आईने विचारलं. "अवं चिट्टीफाय वं.. ते चिकनचं असतयं नव्हं का..." सुरेखा समजावू लागली. "अच्छा.. चिकन ६५.. बर बर" आईला समजलं.
एकदा घरातले केर काढत होती. पलंगाच्या खालून केरसूणी फिरवल्यानंतर कसलं तरी छोटं कागदी पाकिट बाहेर आलं. आई म्हणाली," ते काय आलं बघ गं जरा बाहेर.." तिने ते उघडलं. म्हणाली ," निगूटी हाय त्यात". अईचं लक्ष नव्हतं. तिनं विचारलं ," कसली गूटी?".. "आवं.. निगूटी.. निगूटी" सुरेखाने सांगितलं. आईला काही समजेना. ती च्या जवळ गेली आणि पाहिलं. "अगं... निगेटिव्ह होय.. काय सुरेखा काय बोलतिस तू?" "त्येच सांगत व्हुतो न्हवं का निगूटी हाय म्हनून" सुरेखाचं उत्तर. "हम्म .. चुकलं बाई.. निगूटीच आहे ती." आईने नाद सोडून दिला.
आमच्या घरी तेव्हा एक मांजराचं लहान पिलू आणलं होतं. अजून नविन होतं ते आमच्या घराला. त्यामुळे कधी कधी ते पलंगाखाली त्याचे सगळे कार्यक्रम आटोपायचं. अशीच सुरेखा एकदा केर काढत होती. आणि तिला पलंगाच्या खाली काहीतरी पडलेलं दिसलं. ती नीरखून बघत असतानाच तिथे बाबा आले. म्हणाले, "काय गं अशी काय बघती आहेस?" "त्ये बघा तिथं कोपर्यात काय हाय?" सुरेखा म्हणाली. बाबा म्हणाले ,'खाली जाऊन बघ पलंगाच्या काय आहे ते.. मांजराने घाण केली असेल तर कागदावर घेऊन काढून टाक.""बर" म्हणत ती पलंगाखाली गेली. बाबांनी विचारलं," काय आहे गं?" तर म्हणाली," बू हाय बू"..बाबांना ऐकायला आलं "गू".. "काय??? काढून टाक मग. कगद देऊ का तुला?" बाबा म्हणाले. "अवं.. ते नव्हं.. बू हाय बू" सुरेखा. "अगं.. मग काढून टाक ना.. बघत काय बसली आहेस?".. इति बाबा. "आवं दादा, बू हाय ह्यो बू" असं म्हणत ती पलंगाच्या बाहेर आली. तिच्या हातात.. एका भेटवस्तूला सजावटीसाठी लावलेला सॅटीनच्या रिबिनचा बो(बू) होता. तो खाली पडला होता. तो बो बघून बाबांना हसावं की रडावं हे कळेना.. आमची मात्र हसून हसून पार वाट लागली.
हिचे किस्से फार मजेदार आहेत. आईने एकदा गाजर हलवा केला होता. तो दूधात आटवत ठेवला होता. आईला स्पॉन्डीलाटिस असल्याने तिला फार वेळ हलवता येईना. तिने सुरेखाला सांगितलं "सुरेखा, हलवा हलव जरा आणि दूध आटलं की गॅस बंद कर" ती मन लावून ते करू लागली. दूध आटलं, हलवा झाला. तिने गॅस बंद केला आणि आईला म्हणाली,"ह्ये हलवं जालं बगा... आता काय करायचं??" हिला लिंग, वचन कधी समजणार देव जाणे. अतिशय प्रेमळ, माया लवणारी ही सुरेखा पूर्ण दिवस राबत असते. मोठा मुलगा आता बेंगलोरला कोणत्यातरी मोठ्या कंपनीत शिपाइ म्हणून काम करतो. धाकटा मुलगा रिक्षा चालवतो. त्याने हिला मोबाईल घेऊन दिला आहे. पण फक्त फोन घ्यायचं बटण कुठलं आणि बंद करायचं बटण कुठलं याशिवाय त्या मोबाईल बद्दल काही माहीती नाही हिला. माझ्या बाळंतपणाच्या वेळी, बाळंतीणीला चिकनचं सूप चांगलं असतं म्हणून रोज करून द्यायची. लेकाला माझ्याही खूप माया लावली तिने. तिच्या घरी थालिपिठ केलं की आवर्जून माझ्यासाठी घेऊन येते किंवा, मला तिच्या खोलीत बोलावून खायला लावते. कोल्हापूरि चिकन करावं तर ते सुरेखाने. पांढरा - तांबडा रस्सा तिच्या हातचा खाल्ला की बस्स! कोणत्याही हॉटेलमध्ये मिळणार नाही इतका सुंदर करते.
आईकडून, पुरणपोळ्या, गूळाच्या पोळ्या, रव्याचे लाडू, उकडीचे मोदक शिकली. मी मात्र आईकडे गेले की, "सुरेखा, मस्तपैकी चिकन , तांबडा-पांढरा रस्सा आणि भाकरी कर गं उद्या." अशी फर्माइश करते आणि माझी ही फर्माइश ऐकली की तिच्या चेहर्यावरून आनंद ओसंडून वहात असतो. आणि मग दुसरे दिवशी सकाळी ९.३० च्या दरम्यान आवाज येतो ,"वयनी, आज चिकन करायची व्हवं का.. मग आनायला पैसं देता का?".. सुरेखा तयारीला लागलेली असते.
- प्राजु
महासमर्थ : "नानासाहेब धर्मधिकारी."
प्रेषक रमा पेशवे ( मंगळ, ०७/१५/२००८ - १२:४९) ."दासबोधाच्या" निरुपणाद्वारे समाजजागॄति करणार्या आणि तळागाळातील अशिक्षित लोकान्पर्यन्त सु-सन्स्कारान्चे बीज रोवणार्या , समर्थ व्यासपीठावरील महासमर्थ "नानासाहेब धर्माधिकारी" यान्ना आदरपूर्वक भावन्जली.....
जय जय रघुवीर समर्थ!!!
पांडेकर आजी..
प्रेषक प्राजु ( मंगळ, ०७/१५/२००८ - ०९:१७) .लोकहो... खरंतर व्यक्तीचित्र लिहिणे हा माझा प्रांत नव्हे.. पण मिपाचे मालक आणि माझे चांगले मित्र असलेले श्रीयुत तात्या अभ्यंकर यांच्याकडून स्फूर्ती घेऊन आणि श्रीकृष्ण सामंत सर यांनी लिहिलेली व्यक्तीचित्रं वाचून मलाही असं वाटलं की आपणही एखादं व्यक्तीचित्र लिहावं. तर हे माझं पहिलं वहिलं व्यक्तीचित्र भाईकाकांच्या चरणी अर्पण करून मी मिपाच्या वाचकांसमोर ठेवत आहे. गोड वाटेल अशी आशा आहे.. मीठाचा खडा लागल्यास सांभाळून घ्या.
"वयनी..... " अशी किनर्या आवाजात म्हणजे अगदि स्पष्ट सांगायचं तर जुन्या मराठी तमाशापटातून मावशीचं काम करणारे कै. गणपत पाटील यांच्यासारख्या आवाजात हाक ऐकू आली की आई म्हणते पांडेकर आजी आल्या. अशिक्षित, अडाणी बाई. अतिशय प्रेमळ. तिचं तिच्या बागेवर पोटच्या मुलासारखं प्रेम. नवरा म्हणजे मुलखाचा चिकट होता असं आजीच स्वतः सांगते. तिला मुलगाही होता.. बिचारा आजारी पडला पण त्या विक्षिप्त नवर्याने उपचारासाठी खर्च नाही केला म्हणून दगावला. तेव्हापासून नवर्याबद्दल मन कलूषित झालेलं , पण जुने संस्कार .. त्यामुळे नवर्यासोबतच उरलेलं आयुष्य घालवीत होती. नवरा पोलिस खात्यात जमादार होता. त्यामुळे कोल्हापूरतील राजारामपुरी पोलिस स्टेशन मध्ये ओळख आहे बाईची. काळा सावळा रंग , डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा तो ही मामांचा म्हणजे तिच्या नवर्याचा होता, ती तो आता वापरते., आणि डोक्याची चांदी झालेली. अशी ही आजी. त्या मामांनी संपूर्ण आयुष्यात एक चांगलं काम केलं ते म्हणजे ४ लहान लहान खोल्यांचं का होईना पण साधारण ३००० स्क्वे. फूटच्या प्लॉटवर स्वतःचं घर बांधलं. घराच्या आवारात आजीनी लावलेली झाडं म्हणजे पायरी आंबा, लिंबू, शेवगा, पेरू, चिकू, जाई, जुई, मोगरा, गुलाब, २ प्रकारच्या जास्वंदी. झाडांवर अतिशय माया. तिच्या सोबतीला म्हणजे ती बॉबी कुत्री आणि माय-लेकरं असलेली वेगवेगळ्या डोळ्यांची मांजरं..
हे प्राणीही जणू आजी एकटी आहे तिला आपल्याशिवाय कोणी नाही हे जाणूनच असल्यासारखे...
आंब्याच्या सिझन मध्ये मोठाले येणारे पायरी आंबे राखायला बाई, दिवसरात्र बागेत बसून असते. २ खोल्यांमध्ये बिर्हाड ठेवल्याने सोबतही होते आणि मामांच्या तुटपुंज्या पेन्शन शिवाय मिळकतही होते थोडिफार.
गॅस ला नंबर नोंदवायचा असेल किंवा काही बँकेची कागदपत्र समजावून घ्यायची असतील तर हळू हळू धिम्या गतीने चालत चालत आजी येते आणि आईकडून किंवा घरी जे कोणी असेल त्याच्याकडून वाचून किंवा फोन लावून घेते. एक मात्र, तिची ही जी काहि कामं आम्ही करतो त्याच्या बदल्यात ती झाडाचे आंबे, लिंबं, शेवग्याच्या शेंगा आणून देते. सगळ्या जगाला ती तिच्या बागेत येणारी फळ विकते पण आमच्याकडून एक पैसाही नाही घेत. मी कधी गेले कोल्हापूरला तर मला आवडते म्हणून शेवग्याच्या शेंगांची तिखट, खमंग भाजीही करून आणून देते. यामध्ये कोणताही दिखाऊपणा नाही . पण झाडांबद्दलचं प्रेम आणि अभिमान अपार.
"आजी, शेवग्याच्या शेंगाची भाजी मस्तच झाली आहे .."
" मग! हुनारचं की, माझ्या झाडाच्या शेंगा हैत.. लई दळदार.. त्या बाजारच्या नव्हत, चवळीवानी!!" असं चिरक्या आवाजत पण ठसक्यात उत्तर मिळेल .
या बाईचं उत्पन्नाचं साधन म्हणजे, मामांची पेन्शन, येणारं घरभाडं आणि आंबे, लिंबं, शेंगा, पेरू... श्रावणात जाई-जुई, मोगर्याची फुलं विकून मिळणारि रक्कम. कॉलनीतली लोकं सुद्धा त्या बाईला जपतात.. बाजरातून शेवगा, पेरू आणून खाण्यापेक्षा आजीकडूनच घेतात. भलेही स्वत:च्या बंगल्यातल्या बागेतून टोपलीभर फुले निघू देत पण सत्यनारायण, मंगळागौरी, आणि गणपतीच्या पूजेला घरोघरि फुलं येतात ती आजीच्या बागेतली. त्यामुळे तिचा तिच्या झाडांबद्दलचा अभिमानही द्विगुणीत होतो आणि मग म्हणते..
"माझ्या मोगर्या वानी मोगरा कुट्टं मिळायचा न्हाई. परवा, शेजारची सुजा आल्ती.. ५० रूप्पयची फुलं घ्यून गेली बगा.." त्यावेळी तिच्या चेहर्यावरून आनंद ओसंडून वहात असतो.
मध्येच एकदा आजी अशीच आली घरी.. " वयनी...... हैसा काय??"
"या आजी.. आई नाहिये.. या ना बसा जरा" .. मी
"ताई, कुटं गेली आई, येनार हायका लवकर??" .. आजी
"येईल १० मिनीटात. बसा तरी." .. मी
हा संवाद होईपर्यंत आजी जेमतेम बंगल्याचं गेट उघडून आत आलेलि असते. तिला चालायला खूप वेळ लागतो.. वयोमाना प्रमाणे येते तिच्या गतीने. मग ती आत येईपर्यंत मी स्वयंपाकघरातून पाणी पिऊन येते. आजी आत येते, नेहमीच्या ठरलेल्या दाराजवळच असणार्या खुर्चीजवळ बसते. याचं कारण, दाराजवळच्या खुर्चीतून तिला तिच्या घराकडे लक्ष ठेवता येतं खास करून आंब्याच्या किंवा पेरूच्या सिझनमध्ये. कारण घराच्या मागे असणार्या झोपडपट्टितली मुलं ताबडतोब येतात दगडं मारायला. आणि एखादा दिसलाच आंब्यावर किंव पेरूवर दगड मारणारा.. तर.. टिपेच्या चिरक्या स्वरातून ती त्याला शिवी हाणते.. बिचार्याला आजी कुठून ओरडते आहे ते दिसतही नाही, आवाज मात्र ऐकू येत असतो. बिचारा इकडं तिकडं बघत निघून जातो.
आजी बसते, काठी ठवते.. मग एकदम म्हणते.."इवडी इवडी झालित आता.. ३-४ दिवसांत पिकली की, आनून देतो हां"
"काय इवडी इवडी झालित आजी? काय आणून देताय??" मी.
"अगं बाई माजे, पिरू गं... इवडी झाल्येत.. आता पिकतील छान.. देतो आनून".. 'इवडी' असं अंगठा आणि इंडेक्स (मराठी??) बोट दाखवत आजी म्हणते.
"हो, पण आजी मी विकत घेणार पेरू.. असेच नकोत मला" मी..
" न्हाइ गं बाई.. माजी प्वोर हायस.. म्हायेरी आलियास.. विकत नक गं बाई.." आवाजात जास्तीत जास्त मार्दव आणून आणि व्याकुळ होत आजी म्हणते.
मला तिचं मन मोडवत नाही. मी 'बर' म्हणते.
तिला कधीतरी औषधं, बिस्किट आणून हवी असली तर येऊन सांगते "ताई, तू भाइर गेलिस तर माजी इवडी औषदं आनि ती मारिची मिळत्यात तसली बिस्किटं बी आनशील ??" पैसे पुढे करते. मी घेत नाही. "आजी, अहो आहेत पैसे.."
"नगं.. हे घ्यून जा. " हातात कोंबते पैसे. मिही फारशी खसखस न करता ते घेते कारण त्यातून तिचा मला स्वाभिमान दिसतो. माझ्या पैशानी औषधं आणायची.. बस्स! इतरांचं काही देणं नको.. हीच भावना.
या बाईचं मला आश्चर्य वाटतं.. काहीही होऊदे... पण तिचं कुत्र, तिची मांजरं.. आणि तिची बाग... या बद्दलचा तिचा अभिमान हा सतत असतो बोलण्यातून. दुसरा विषय म्हणून नाही.
या आजीची एक लकब आहे. ती खुर्चित बसली ना तरी डाविकडे उजवीकडे अशी डुलत असते. बहुदा तिच्या उतरत्या वयामुळे होत असावं.. जशी डॉ. श्रीराम लागूंची मान हलते तशी आजी खांद्याच्या रेषेत डुलत असते.
"बरं.. मी यू का आता?" आजी
" का हो बसा ना.." मी
" नगं.. राधा आणि सखी ( मांजरी आणि तिचं ते पिलू) येतील हितं हुडकत.. जातो आता" आजी. खरंच बरं का मंडळी, एकदा हि राधा आणि सखी आल्या होत्या आजीच्या मागोमग आणि आजी उठेपर्यंत कंपाऊंड वॉलवर बसून होत्या.
आजी उठते तिच्या त्या विटक्या, तळ झिजलेल्या स्लिपर्स चढवते, काठी घेते आणि निघते. मी उठून आत येते आणि जवळ जवळ १० मिनिटांनी फाटकाचा आवाज होतो.. आजी आता कुठे गेटच्या बाहेर पडलेली असते हळूहळू तिच्या चालीने..
दुसरे दिवशी पुन्हा चिरक्या आवाजात हाक ऐकू येते.. "वयनी.. हैसा काय??"
- प्राजु
'नवी मुंबई' दर्शन
प्रेषक अमोल केळकर ( सोम, ०७/१४/२००८ - १६:४०) .नवी मुंबई दर्शन -
आधुनिक शतकातील सुनियोजीत शहर म्हणुन उदयास येत असलेली 'नवी मुंबई '. जुन्या मुंबईतील अनेक प्रेक्षणीय ठिकानांना आपण नेहमीच भेट देतो. मात्र नवी मुंबईतील ठिकाणे आपल्याला फारशी माहित नाहीत. यातील काही ठिकाणांची चित्रमय माहिती.
------------------------------------------------------------------------
मुंबईहुन नवी मुंबईत यायचे झाल्यास सायन - पनवेल महामार्गावरुन , मानखुर्द नंतर येणारा खाडी पुल ओलांडुन आपण नवी मुंबईच्या आर्थिक राजधानी 'वाशीत' प्रवेश करतो ( तस मुलुंड - ऐरोली खाडीपुलावरुन ही नवी मुंबईत येता येते. अहो ! हो ! तोच तो ' कहो ना प्यार हे 'मधला पुल जेथे पहिल्या हॄतिक रोशना जलसमाधी मिळते. )

-------------------------------------------------------------------------
वाशी रेल्वे स्टेशन - आधुनिक रेल्वे स्थानक. दोन्ही बाजुला प्लॅटफॉर्म हे नवी मुंबईतील सर्व स्टेशानांचे वैशिष्ठ. तसेच मुंबईतील अन्य स्टेशनांपेक्षा स्वच्छ स्टेशन्स आहेत. ( प्लॅटफॉर्म वर हॉटेल नसल्याने) . नवी मुंबई महानगर पालिकेची स्वतःची परिवहनसेवा अजुनही बाल्यावस्थेतच आहे. ( एकाच ठिकाणी जाणार्या एन एन एम टी . आणि बेस्ट च्या एक्दम बसेस आल्या तर लोक बेस्ट ला प्राधान्य देतात. तरी पी.म्.टी पेक्षा सर्वीस बरी आहे )

------------------------------------------------------------------------
वाशी -बेलापुर पाम बिच मार्ग - मरिन ड्राईव्ह ऑफ नवी मुंबई असे ज्याचे वर्णन करता येईल तो हा पाम बिच मार्ग. दुर्दैवाने वहान चालकांच्या बेजबाबदार वृत्तीमुळे अपघाताचे प्रमाण खुप आहे. एका बाजुला उंचच्या उंच टॉवर्स आणी दुसर्या बाजुला तिवराची जंगले असे येथील द्रुश्य असते.


---------------------------------------------------------------------
डी. वाय. पाटिल स्टेडिअम- नेरुळ मधे असलेले हे स्टेडिअम सायन -पनवेल हायवेला लागुनच आहे आय.पी.ल मॅचेस मुळे माहित झालेले हे एक नवीन स्टेडिअम . धावपट्टी करण्यासाठी खास अफ्रिकेतुन माती आणली होती.

------------------------------------------------------------------------
नेरुळचे बालाजी मंदीर : तिरुपती बालाजी संस्थानाचे हे एक प्रसिध्द झालेले मंदिर. नेरुळ स्टेशनापासुन अगदी जवळ आहे. थोड्या उंचावर असणार्या या मंदिरातुन अजुबाजुचा परिसर छान दिसतो.

------------------------------------------------------------------------
पारसिक हिल बेलापुर - डोंगराच्या कुशीत वसलेले बेलापुर/ कोकण भवन / सि. बी.डी. या सर्व नावानी ओळखळे जाते. महानगरपालिका, कोकण रेले, सिडको, रायगड भवन इ अनेक प्रशासकीय ऑफिसेस येथे आहेत. बेलापुर किल्ला, पार्सिक हिल ही प्रसिध्द ठिकाणे.
पार्सिक हिल वरुन दिसणारे खाडीचे द्रुश्य.
--------------------------------------------------------------------------
खारघर - नवी मुंबईतील सगळ्यात सुनियोजीत शहर. स्वच्छ , रुंद रस्ते, टोलेजंग इमारती निसर्गाचे सानिध्य हे येथिल वैशिष्ठ. उत्सव चौक, शिल्प चौक, पांडवकडा ही येथील काही प्रसिध्द पावत असलेली ठिकाणे. नवी मुंबईचा होणारा विमानतळ येथुन जवळच होत असल्याने जागेचे भाव गगनाला भिडलेले आहेत.
खारघर

शिल्प चौक

उत्सव चौक



पांडव कडा

मुंबई पेक्षा जरा थोडासा निवांतपणा , निसर्गाचे सानिध्य, मोठे रस्ते, कमी वाहतुक कोंडी यामुळे या भागात येणार्यांची संख्या वाढु लागली आहे ( आणी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मराठी टक्का ही जाणवण्याइतपत चांगला आहे ).
तेंव्हा आता अगामी काळात मुंबई बरोबरच नवी मुबई दर्शन ही येणार्या पाहुण्यांसाठी आवश्यक गोष्ट ठरणार आहे.
शिलालेख : अर्थ लावण्यास मदत ...
प्रेषक छोटा डॉन ( रवी, ०७/१३/२००८ - १५:४६) .मला आमच्या गावात असलेल्या एका "गोपाळकॄष्णाच्या मंदिराच्या भिंतीवर" व त्याखाली असलेल्या एका पुलाच्या भिंतीवर काही "शिलालेख" दिसले.
त्याचा अर्थ जाणुन घेण्याची उत्सुकता असल्याने आम्ही तेथेच काही ठिकाणी चौकशी केली पण ती "लिपी वाचण्यास व त्याचा अर्थ" सांगण्यास समर्थ अशी व्यक्ती मला सापडली नाही.
मिपाच्या टॅलेंटचा वापर करुन घेण्यासाठी मी व माझ्या मित्राने त्याचे काही "फोटो" काढले आहेत.
ते आता खाली "चिटकवतो " आहे.
कॄपया त्याचा अभ्यास करुन मला त्याचा अर्थ लावण्यास मदत करावी ....
कॄपया पहा आणि बघा काही उमजते का ?
आपल्या इथल्या "प्रियालीताई, विजुभाऊ, मुक्तसुनीत, चतुरंग, तात्या, विकासराव " सारख्या जाणकार लोकांची मदत हवी आहे ....
शिलालेख : ३
सौजन्य : गजानन गुरव, पंढरपुर


