user

सल्ला

दुबई ला जाताय..जरा जपून

काल एक ढकलपत्रातून अस कळल की कोणाच्या तरि मित्राला खसखस बाळगल्या बद्दल दुबई मध्ये २० वर्षाच्या कारावासाची शिक्षा झाली.
लहानपणी आम्ही चार आण्याची खसखस...................फसफस...अस काहितरी गाण म्हणायचो. खसखस अनारश्यात खाल्ल्याचे आठवते. म्हणजे आता दिवाळी ला फराळ करुन प्रवास केला तर तुरुंगाची हवा खावी लागेल. ही बातमी बघा http://www.boddunan.com/forums/11-general-discussions/70531-a-very-very-...
थोड गुगल करुन पाहील, बातमी मध्ये तथ्य आहे असे वाटते. http://news.bbc.co.uk/2/hi/uk_news/7234786.stm . बहुतेक ढकलपत्र जुनं असाव. आत्ता पुन्हा फिरू लागल आहे.

खसखस ने जेट लॉग जातो हे नवीनच कळल. त्यापासून अफीम कशी बनवतात तेही पाहिल पाहिजे.

खरतर परदेशात प्रवास करताना कोणताही खाद्यपदार्थ बाळगु नये. देशी लोक कधी सुधारणार माहीत नाही. खसखस नाही खाल्ली तर काय फरक पडणार आहे काय माहित. हेच कडिपत्ता, ओवा, ई. ना लागु होत.

बुलबुल तरंग - माहिती हवी आहे

सद्या मी बॅंजो किंवा बुलबुलतरंग नावाचे एक वाद्य शिकत आहे (फक्त सातशे रूपयात ब्रॅण्ड न्यू पीस मिळाला). आजकालच्या ढ्याण-ढ्याण संगीतात हे गोड, नाजूक आवाजाचे वाद्य अगदी तुरळक प्रमाणात दिसते - हे वाद्य मरत चालले आहे असे म्हटले तरी चालेल; पण शिकायला फार सोपे असते (सा रे ग म प ध नी काही तासांत शिकता येते) इंटरनेटवर शोधून पाहिले, पण एकच साईट सापडली - त्यावर बाळबोध धडे नाहीत.
मिसळपाववर हे वाद्य वाजवणारे, त्याबद्दल मार्गदर्शन करू शकणारे कुणी आहे का??
याबद्दल पुस्तके इ. उपलब्ध असल्याचे माहित असल्यास तेही कृपया सांगावे.

तू तर नागीण!

"तू तर एक जातिवंत नागीण निघालीस. मला तुझा सर्पस्वभाव नव्याने कळला..
काल तुझी माझी भेट झाली, कदाचित शेवटचीच. या आधीही आपण भेटलोच की. पण कालची भेट बहुदा अखेरचीच ठरणार होती तर..
तत्पूर्वी व्हायचं असं की, तू माझ्या अंगणात यायचीस. मनमोहकशा सळसळत्या मदमस्त चालीत. कधी अवचित, तर कधी ठरवून. त्या तुझ्या नव्या नव्हाळीच्या सावळ्या रुपावर, मनोवेधक गोड शब्दांनी लपलपणाऱ्‍या जिव्हेच्या करामतीवर मी पटकन भाळलो. तुझी आकर्षक बांधणी, मुळचीच तंग धाटणी अन् अंगाची आकर्षक वेढणी मला वेडावून जायची. वाटायचं चला आपणही आता कात टाकावी, तुझ्या निकट जावं, सळसळावं, खेळावं. मीही मग तसा वागू लागलो की तुझ्या डोळ्यांतून अनामिक प्रीत ओसंडायची, जिभेवर प्रेमाचे गोड अमृत यायचे.
तू नागीण असली तरी तुझ्या त्या गहिऱ्‍या नेत्रांत विखार नसायचा की व्यवहार. तू एक मस्तमौला बनून माझ्या शाब्दिक पुंगीपुढे मनसोक्त डोलायचीस. मला वाटायचं आता काम झालंच समजा. बेशक तुला अंजारावं, गोंजारावं, तुझ्याशी सर्पक्रिडा करावी, त्रिवेणीच्या आसनात पहुडावं- रात्रभर, निपचित अन् तृप्तेतेची निद्रा घेत. अशी कितीतरी हवीहवीशी स्वप्ने मी माझ्या पेटाऱ्‍यात वळवळत कूस बदलतांना पाहिली होती...
काल तू भेटलीस तेव्हा तुझा रागरंग वेगळाच जाणवला. तरीही मी तुला हात लावण्यास उद्युक्त झालो ते केवळ तुझ्या प्रेमळ वार्तालापाच्या आधारेच. परंतु हाय रे कर्म माझे, तू फणकन् फणा उगारलास. मी मागे सरकलो.
अशाप्रकारे तू चारपाच जणांना अधू केल्याचं तेव्हा मला सांगून टाकलं. 'पुन्हा माझ्या वाटेला जाऊ नका' असं अप्रत्यक्षपणे सुनावलं. मी हात मागे घेतला. माझी शाब्दिक पुंगी गुंडाळली. तेव्हा तू फणा काढून माझ्याकडे अविश्वासू नजरेने पाहत होतीस. तुझ्या डोळ्यांत प्रेमाचा लवलेश नव्हता, होता फक्त अंगार! त्यात तुझी तरी काय चूक म्हणा. तुला अनेकांनी छळलेलं, गैरफायदा घेऊन पिळलेलं. हे तूच एका भेटीत मोकळ्या मनाने सांगितलं नव्हतंस? एकाने तर म्हणे आपल्या रुपाचं, समृद्धतेचं गारुड तुझ्यावर टाकून तुला काही काळ आपल्या पेटाऱ्‍यात खेळवलेलं. तेच अशाश्वत जिणं तुला नको वाटलं असावं म्हणूनच तू पलटवार केलास. मला वाटलं तू माझ्याशी मनसोक्त जुळशील, मला तुझ्या प्रेमरंगात घोळशील. पण झालं भलतंच. तू जातिवंत नागीण निघालीस. नशीब माझं तू मला कडाडून डंख केला नाहीस. नाहीतर मी कोणाला तोंड दाखवू शकलो असतो?
मला माझी जागा दाखवून तू निघालीस.. तुझ्या नेहमीच्या मोहक सळाळत्या चालीत. तेव्हा तुला तुझ्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देणं इतकंच काय ते मी करु शकत होतो. मागे वळून तू त्या शुभेच्छांचा स्विकार केलास.. नेहमीच्या तुझ्या लोभस स्मितरेषेने. आणि तू झुडपाआड दिसेनाशी झालीस.. कायमची दुरावलीस.. लांबवर गेलीस.. आता तू पुन्हा माझ्या अंगणात दिसणार नाहीस, फिरकणार नाहीस म्हणून दुःख होतंय. परंतु जातांना एकच सांगून जायचं होतंस की तुझं खरं रूप कोणतं प्रीतीचं गाणं गात डोलणं की फणा काढून फुत्कारणं?"

तर मित्रांनो एकंदर ही अशी सर्पकथा आहे. बहुतेक वेळा घडते. नागिणी आपल्या पुंगीवर डोलल्याचा अभिनय करतात, आपलंच खातात, पितात अन् जेव्हा पेटाऱ्‍यात घेण्यासाठी आपण मोठ्या विश्वासाने त्यांना हात लावू जातो, तेव्हा कडाडून फुत्कारत आपला मूळ स्वभाव दाखवतात. तेव्हा कोणत्या नागिणीसाठी पुंगी वाजवायची,कोणत्या नाही की आपल्याच पेटाऱ्‍यात आपल्या नागिणीशी खेळत रहायचं हे आधीच ठरवावं. आजकालच्या प्रेमळ भासणाऱ्‍या सर्पिणीसुद्धा भल्याभल्या गारुड्यांना नादी लावून त्यांची लुंगी फेडून कधी पुंगी कापून नेतील याचा नेम राहिलेला नाही बघा...

निद्रेची चिरफाड

निद्रादेवीची कुंडली मांडून तिला समजून घेणं फारसं अवघड नाहिये. ती आपल्यावर का बरे रुसलीये याचीही उत्तरे मग शोधता येतात. पूर्वीची माणसं उशाला दगड घेऊनही प्रगाढ झोपत असत असे म्हणतात. याउलट आजच्या सिमेंटच्या जंगलात दगड सापडणे दुरापास्त झाल्यामुळे की काय कोण जाणे, माणसांना मऊ उशा अंगाखाली घेऊनही 'म्हणावी तशी' झोप लागत नसते. किंबहुना अशी तक्रार नेहमी कानावर येते. त्यामुळेच निद्रेची चिरफाड करण्याचे योजिले आहे.

तर ती निद्रादेवी एकटी नसून त्या दोन जुळ्या बहिणी असतात. भिन्न स्वभावाच्या, विरोधी आचरणाच्या. रात्रभर त्या फेर धरुन कधी झिम्मा, कधी लपाछपी तर कधी खोखो खेळतात. एकीनं व्यक्ति झोपवली की दुसरी त्या व्यक्तिला उठवण्याचा, जागते ठेवण्याचा प्रयत्न करते.
एकीचं नाव शांता. ती नावाप्रमाणेच शांत झोपेचं वरदान देते. तिला शास्त्रीय परिभाषेत नॉनरैपीड आय मूव्हमेंट स्लीप (नॉनरेम) म्हणायचं.
तर दुसरीला रैपीड आय मूव्हमेंट स्लीप (रेम) अर्थात परखड भाषेत 'चळमुंगळी' म्हणायचं. ही बयाच फार त्रासदायक असते. हीच व्यक्तिला 'जागते रहो'ची साद घालीत सतावते.
नॉनरेम निद्रेच्या १, २, ३, ४ अशा उत्तरोत्तर गडद होणाऱ्‍या प्रत्येकी ९० मिनिटांच्या पायऱ्‍या असतात. म्हणजे शांतेची चौथी स्टेज ही प्रगाढ वा साखरझोप असते. वाढत्या टप्प्याप्रमाणे चौथ्या स्टेजला एकदम परब्रह्म समाधीच लागते, इतकी की काही कोवळ्या नवजात बालकांना किंवा मृत्युशय्येवरील वयस्कांना याचवेळी स्वर्गाची द्वारे खुली होतात! हू नाही की चू नाही, डायरेक्ट मुक्तीच. अशा 'शांते'चं गुणवर्णन करावं तितकं कमीच.
असो.
तर या नॉनरेमच्या चारही स्टेजमध्ये हटकून व्यत्यय आणते ती रेमनिद्रा. ती साधारणतः ५ ते ३० मिनिटे (व्यक्तिपरत्वे) प्रत्येकाला सतावते. याच काळात डोळे गरागरा फिरुन व्यक्ति चाळवली जाते. रेम मध्ये पडलेली वाईट स्वप्ने दिवसाही आठवून भिववतात. हीच चळमुंगळी बया उत्तेजित करुन पुरुषांचे कपडे ओले करण्याचं धारिष्ट्य दाखवते. हिच्यामुळेच व्यक्ति झोपेत बावचळतात. एकंदर हिचं वर्तनच हानिकारक. आणि म्हणूनच जेव्हा या बयेचा ताल बेताल होतो (३० मिनिटांपेक्षा अधिक) तेव्हा आपल्याला नीटशी झोप लागत नसते, आपण अनिद्रेची तक्रार करतो.

आता वाचकांच्या लक्षात आलंच असेल की कसेही करुन या 'चळमुंगळी'चा बंदोबस्त केला की 'शांता' नक्की भेटणार.
तेव्हा रेमचा कार्यकाल कमी करणं हेच शांतेला प्राप्त करण्याचं प्रभावी सूत्र ठरतं. याकामी पुढील औषधे तज्ञांच्या सल्ल्याने घेतल्यास फायदा होतो-
१) बार्बीच्युरेट्स- फिनोबार्बीटोन, अमायलोबार्बीटोन इ.
२) बेंझोडायझेपाईन्स- डायझेपाम, फ्लूराझेपाम, लोराझेपाम, अल्प्राझोलँम इ. (हेच जास्त वापरले जातात व फायदेशीर ठरतात.)
३) अल्कोहोल- सर्व प्रकार! (पण योग्य प्रमाणात.)
४) अल्डीहाईडस्- पँराल्डीहाईड इ.
५) इथिनामेट
६) इतर- अँटीहिस्टामिन्स (कोडीन- कोरेक्स, सायपॉन इ.),स्कोपोलँमाईन.

नवीन आलेले औषध- झोपीक्लोन (नावपण काय भारी बघा- झोपेचा क्लोन!) सर्वात प्रभावी व सवय लागणार नाही असे आहे.
मात्र यातील कोणतेही औषध तीन आठवड्यापेक्षा जास्त दिवस घेऊ नये.

आता 'निद्रानाश' चर्चेला घेऊयात...
निद्रानाश अर्थात निद्रादेवीची अवकृपा म्हणजे व्यवस्थित झोप न लागणे, जागता पहारा सुरु राहणे, रात्रभर स्वप्नेच पडणे, मांजर-कुत्र्यासारखी क्षणिक डुलक्यांची माळ लागणे, डोळे उघडे असल्याप्रमाणे टक्क दिसत राहणे इ. लक्षणे ही निद्रानाशाची- इन्सोम्नियाची असतात.
हा दोन प्रकारचा-
(१)साधा निद्रानाश-
(३ दिवस ते ३ आठवड्यांपेक्षा कमी)-
यामध्ये झोपेची वेळ घटणे, भयंकर स्वप्नांची रात्र असणे, सकाळी ताजेतवाने न वाटणे अशी लक्षणे आढळतात.
याची संभाव्य कारणे पुढीलप्रमाणे-
१.जीवनमानातील बदलामुळे (नोकरी, व्यवसाय, हवापाणी, प्रदेश बदलणे) आलेले ताण, तणाव.
२.जीवनातील आर्थिक, सामाजिक अस्थिरता, बेरोजगारी.
३.पूर्वेकडून पश्चिमेकडे किँवा उलट जगप्रवास करणे, उदा. पर्यटक, वैमानिक इ.
४.शारीरिक कारणे- वेदना, अस्थमा, ज्वर किँवा आजाराचे औदासिन्य.
५.मानसिक कारणे- विरह, वियोग यांमुळे आलेली उदासिनता.
६.औषधांमुळे निद्रानाश- १)उत्तेजके- एफेड्रीन, कॅफीन (कॉफी)
२)भुकेसाठीची औषधे- व्हायट्यझाईम्स, एन्झाईम्स
३)नाक चोंदणे कमी करणारी औषधे- फेनिलेफ्रीन, फेनिलप्रोपीलॅमाईन
४)मनोविकारावरील काही औषधे
५)क्लोरोक्विन, मेट्रोनिडॅझोल, फ्लुरोक्युनोलोन्स.
म्हणून वरील सर्व कारणे टाळली असता शांतेचे धनी होता येते.
या साध्या निद्रानाशाचेच आणखी दोन उपप्रकार देता येतील-
१.प्राथमिक निद्रानाश-
हा बहुतेक वेळा खूपच तात्पुरत्या कालावधीचा असतो. पुढील पथ्ये व नियम आचरणात आणले तर नक्कीच निद्रादेवी प्रसन्न होईल-
1.दिवसाची झोप टाळावी.
2.झोपण्यापूर्वी काही तास घाम येईपर्यँत व्यायाम करावा.
3.झोप लागलेली असतांनाच लवंडावे, उगाच आढे मोजीत निजू नये.
4.शयनमंच फक्त त्याच 'कामा'साठी वापरावा, तिथेच जेवणे, टीव्ही पाहणे टाळावे.
5.तंबाखूजन्य पदार्थ, कॉफी वर्ज्य.
6.मानसिक ताण देणाऱ्‍या गोष्टी झोपेच्या वेळी करुच नयेत.
२.वयोमानानुरुप येणारा निद्रानाश-
याचा त्रास बहुतांश वृद्धांना हमखास होतो. जसे आपले वय वाढते तशी चळमुंगळी (रेम) झोपही वयात येऊन छळू लागते. तिचा कार्यकाल बऱ्‍यापैकी वाढत जातो. यावर थोडी बहुत मात करण्यासाठी पुढील उपाय योजावेत-
1.संध्याकाळनंतर पाणीच पिऊ नये म्हणजे वारंवार उठावे लागणार नाही.
2.कोणाला वाटते ग्लासभर दूधाने झोप येईल. परंतु दूधातील ट्रिप्टोफॅन मुळे झोप लवकर येत नसते.
3.स्नायूशैथिल्याचा प्रयोग उपयुक्त.
4.योगोपचार फायदेशीर ठरतात, उदा. शवासन.

(२) तीव्र निद्रानाश-
३ आठवड्यांपेक्षा जास्त काळ झोप आली नसेल तर ट्रीटमेंटची नितांत गरज असते. या प्रकारात निद्रेचा नाश करण्याकामी कोणत्यातरी चिँतेचा पाश कारणीभूत ठरतो हे नक्की जरी असले तरी पुढील काही गोष्टीँमुळेही तीव्र निद्रानाश संभवतो- अतिऔदासिन्य, मनोविकार, तीव्र मानसिक ताण तणाव इ.
या प्रकारचा निद्रानाश मात्र तज्ञांकडूनच सोडवून घ्यावा लागतो.

सर्वांना 'शांता' लाभो...

कोलेस्टेरॉल कसे कमी करावे ?

सध्या माझे कोलेस्टेरॉल (LDL) फार वाढले आहे. simvastatin घेत आहे. एका चर्चेत वाचला कि एक मिसळपावकर फक्त diet वर कोलेस्टेरॉल कमी करतात. मला ति चर्चा सापडत नाहीये. ते मिसळपाव कर मला मदत करतील का?

born insomniac....! झोप हविये झोप....!

झोप नाही येत यार!
sometimes i feel like i am born insomniac!
बेड मध्ये जाण्याआधी असं वाटतं की आज तरी थोडा वेळ झोप लागेल्,,..पण नाही...सहज चुळबुळ म्हणुन घड्याळ पाहिलं जातं..रात्रीचे २-३० वाजलेले असतात...
असं वाटतं कि बराच वेळ गेला...आणि थोड्या वेळानी परत घड्याळ पाहिलं जातं ...२.१४...
का होतं आहे असं!
बरं दिवसा झोपावं तर कितीही प्रयत्न केला १५ मिनिटांपेक्षा जास्ती झोप लागतही नाही..
म्हणजे मला महिनोन महिने १-३ तास झोप पुरेशी होते आहे? is it so?
i need help friends!
असा निद्रानाश का होतो?
FYI..मी जास्ती विचारात असते/ चिंतेत असते( जाई आणि चिंता?????)
मग मी तो वेळ वाचण्यात्/गाणी ऐकण्यात तत्सम आवडते कार्यक्रम करण्यात घालवते.पण तरिही..असं का होतं? याचा विचार त्रास देत राहतो,
मित्रांनो,
प्लीज मदत करा..
झोप येण्यासाठी काय करावे?
प्लीज ...!

मैसूर

२ महिन्यापुर्वीच मैसूर - ऊटी ला जाउन आलो. तेव्हापसुन मनात होते की तिकडचे फोटु टाकावेत म्हणुन. पण मि पा वर इतकी उद्बोधक चर्चा चालु होती की उगा लोकांना डिस्टर्ब करावेसे वाटले नाही.

हा मैसूरचा प्रसिद्ध राजवाडा. ज्यानी राजस्थानमधले महाल पाहिले असतील त्यांना यात विशेष असे काही वाटणार नाही. पण राजवाडा छान जतन केलेला आहे. आणि इथली सर्वित्तम गोष्ट म्हणजे राजवाड्यातील तैलचित्रे. इतकी जिवंत तैलचित्रे मी आजवर इतर कोठेही पाहिलेली नाहीत. दुर्दैवाने आत कॅमेरा न्यायला बंदी आहे. त्यामुळे छायाचित्रण करता आले नाही. त्यामुळे राजवाड्याची फक्त बाहेरुनच छायाचित्रे काढुन समाधान मानावे लागले

वृंदावनचे पण फोटो टाकणार होतो पण का कोणास ठाऊक, २० वर्षांपुर्वी जे वृंदावन पाहिले होते ते हे नव्हेच असे वाटले. आता ती शान नाही उरली वृंदावनची. गणेशोत्सवात चिंचेच्या तालमीचे कारंजे पण त्याच तोडीचे असते. त्यामुळे असेल कदाचित पण काही विशेष नाही वाटले खरे.

वृंदावनने केलेली निराशा चक्क मैसूरचे प्राणिसंग्रहालय बघुन दुर झाली. आता झू बघुन खुष होण्याचे दिवस गेले खरे म्हणजे. माकड बघुन लहानपणी जे हसु यायचे ते पण येत नाही आता (मि पा ची कृपा. बरीच माकडे आहेत इथे. रोज आरसाही बघतो. त्याचाही परिणाम असेल कदाचित). पण मैसूर चा झू खरोखर अप्रतिम आहे. काही छायाचित्रे:

वरचा फोटो पुर्ण झूम लावुन काढलेला आहे. त्यामुळे क्लॅरिटी थोडी गंडली आहे.

वरच्या फोटोतला मिपाकर कोण हे ज्याचे त्याने ठरवावे Wink

लहानपणापसुन मैसूरचे सर्वात मोठे आकर्षण होते महिषासुराचा पुतळा. त्याचा हा पुतळा बघुन अंमळ थोडी निराशाच झाली. माझ्या कल्पनेतला हा पुतळा चांगला ५० -१०० फूट उंच आणि १०-१२ फूट रुंद होता. प्रत्यक्ष पुतळा बघुन पुतळ्याचा बोन्साय बघितल्यासारखा वाटला. माझ्या बरोबर असलेल्य मित्रांची पण थोड्याफार फरकाने अशीच निराशा झाली. तरी "तु अजुन थोडा जाड असला असतास तर असाच दिसला असतास" असे म्हणुन मित्राने त्यातल्या त्यात त्याचे मानसिक समाधान साधुन घेतलेच

हेच ते चामुंडा देवीचे सुप्रसिद्ध मंदीर

मैसूर मध्ये आमचे सर्वात जास्त निराशा केली मैसूर मसाला डोश्याने. मैसूर मसाला डोसा हवा असे म्हणालो की लोक आमच्याकडे फार विचित्र नजरेने पाहायचे. हा डोसा पुण्याच्या शेट्ट्यांनी चक्क मैसूरच्या नावावर खपवला आहे. शेवटी या डोश्यावर तडजोड केली. डोसा होता मात्र अप्रतिम

बाकी उटी भाग -२ मध्ये.

नको ते सल्ले हवेत.

नमस्कार्,नमस्कार...........

माझ्या लेखांची काही दीवसांपासुन फार चिरफाड होत आहे.५ फुटात पोहणारे,पकवे हॅकर,पकाउ विडंबन करणारे काही लोक कारणीभुत आहेत,त्यांना एकच सांगेन की हा विरोध म्हणजे आमच्या प्रगतीच्या मार्गातील अपेक्षित अडथळे आहेत.महात्मा फुलेंना दगडे मारणारे होतेच की.

असो,तर आज आम्ही काहीतरी (नेहमीसारखेच) क्रांतीकारक्,मार्गदर्शनपर लिहणार आहोत..
मला एक scrap आला,मी तीन-चार महीन्यांपुर्वी जो एक प्रतिसद पाठवला होता,त्याचे उत्तर होते ते.त्यात मी तुला contact वगैरे सारखे फालतु लिहले होते.मला ती व्यक्ती लगेच contact करेल अस काहीतरी करायचे आहे.
ती व्यक्ती आमची लहनपणीची मैत्रीण.कुठे,कस ते लिहले तर आमचे लहानपणीचे मित्र,जे ई.जालावर सारखे झक मारत असतात,ते आमच्य नावाने बोटे मोडतील...........असो.तर ह्या मैत्रीणीचे नावच मला एवढे आवडते की काय सांगु.तिलाही आम्ही खुप आवडायचो.तसे आम्ही मुळातच हुशार व.......................असो.
तर आम्ही कधी ग्रुपमधे बसलेलो असताना,तिच्याशी नजर मिळाली की ती मस्त हसुन दाखवायची.मग माझ्या डोळ्यासमोर दाट धुकं पसरायचे व मला आम्ही दोघे कुठेतरी हातात हात घालुन बसलेले दीसायचो.पण मी कधी तिला सांगितले नाही..........परत असो.आज believe it or not तिचा प्रतिसाद म्हणजे मला तिचे म्हणने तब्बल ८-९ वर्षांनी त्या keyboardच्या मदतीने लिहलेल्या त्या चार ओळीत कळले.तिने मला आठवले,हा हा what a feeling!!

तर मला त्या scrapला असे उत्तर द्यायचे आहे की,की तिने माझा फोन नंबर मागितलाच पाहीजे.मी १००% टक्के खोटे बोलायलाही तयार आहे.कदाचित तेच करणार आहे,पण एकदम sure shot काहीतरी सुचत नाहीये.
अजुन काय बोलु व्हा सुरु!

नोंद : लेख जरा जास्तच फालतु झाला आहे,मिपा संपादकांनी थोडा धीर धरावा,कींवा लेख संपादीत करावा पण आम्हाला उत्तर मिळेपर्यंत लेख ईथे ठेवावा.

आपले आवडते वुत्तपत्र व काही सुझाव.

सुझाव???????

असो...नमस्कार्,नमस्कार.......

आम्ही आजच पेपरवाल्या अण्णाला 'कल से ये न्युजपेपर बंद करना है" अस सांगितल.त्याने "ठीक है,फीर कोनसा पेपर लोगे?' हा अपेक्षित प्रश्न विचारला.
मी विचार तर नव्हता केला म्हणून "बाद मे बताता हुं,१५ तारीख तक यही पेपर देना" अस सांगितल.
तर मला एक मराठी व एक ईंग्लिश असे दोन पेपर रोजच्या वाचनात आणायचे आहेत.बाहेर जाउन DNA,Mumbai-Mirror व Mid-Day आणला,त्यात ,Mumbai-Mirror आवडला पण फार मर्यादीत असतो.बाकी काही लिखाण छान होतं.आपण कोणता ईंग्रजी पेपर सुचवाल?तो आपल्याला का आवडतो हेही सांगा.पेपरात नोकरी(आम्हाला हाय बर्का!)),शिक्षण व विज्ञान ह्या विषयावर अलग विभाग असावा ही अपेक्षा.तेव्हा क्रुपया एखादा चांगला ईंग्रजी पेपर सुचवावा.

आणि आता मराठी पेपराबद्दल.आम्ही आमचा आत्ताचा पेपर खुप काळापासुन वाचत आहोत.अगदी नाक मुरडत,त्याच्या नावाने बोंबा मारत वाचला पण ह्याने कुणाचाच फायदा नसुन आमचेच नुकसान आहे हे कळल्यावर त्याला आता ड्च्चु देत आहोत.
तेव्हा एखादा चांगला मराठी पेपर हातोहात सुचवुन टाका.त्यात आठवड्यातुन २-४ वेळा कथा व तत्सम साहीत्य छापुन यावं ही अपेक्षा आहे.ह्या बाबतीत सकाळ व लोकमत चांगले असावेत कारण मी ते मोबाईलवर वाचतो(कधीतरी).

तेव्हा आपण आपला फु़कटचा वेळ निरर्थक प्रतिक्रीया देण्यात न घालवता,काहीतरी भल्याचं काम करावं ही माफक अपेक्षा ठेउन आपला निरोप घेतो.

जय हींद!!!

नोंद : माझे गेल्या २-३ दीवसात(आजही) काही लेख व प्रतिसाद उडाले,मी कारण नेहमीप्रमाणे नाही विचारले(विचारुन फायदा व्हायचा तेव्हाही नाही विचारलं).पण असा लेख आधी प्रकाशित झाला आहे ह्या कारणाने हा लेख उडवु नये ही विनंती.
आणि एखाद्या सदस्याला माझ्या उगाच बावळटासारखं लिहण्याचा राग आल्या असल्यास आमच्या चुकांवर हसत पांघरुण घालावं ही ईच्छा!

Ph.d मुंबई/पुणे,माहीती हवी आहे.

'अनुभवींनी मदत करावी' हा लेख लिहला होता.त्याबद्दल एवढच सांगतो की मी त्या रात्री सांगितल्याप्रमाणे धुडगुस घातलाच!!
नाही,नकार नाही आला,एक वेगळे कारण होतं.आणि त्याच्या दुस-या दीवशीही लय म्हण्जी लय पिली.आनंदात व दु:खातही.आनंद Ph.d करायला मिळणार ह्याचा व दु:ख first class ५ मार्कांसाठी गेल्याचं!
अजुन एक कारण होत्,ते जास्त खाजगी आहे.........असो.

मला पुणे व मुंबई university ची Ph.d ला प्रवेश मिळवण्याची प्रक्रीया,प्रवेश परीक्षेत येणा-या प्रश्नांचे स्वरुप्,त्या परीक्षेसाठी अवश्यक पुस्तके व इतर सर्व अटी वगैरे माहीती करायच्या आहेत.

इथले बरेचसे पुण्याचे/मुंबईचे आहेत व माहीतीगार आहेत,त्यांनी मार्गदर्शन करावे.

Thank you in advance!

Syndicate content
Scroll to Top