विचार

विचारवंत म्हणजे नक्की कोण?

विचारवंत म्हणजे नक्की कोण?
मागे एकदा "तेंडुलकरांना" असा प्रश्न कोणितरी विचारल्याचे स्मरणात आहे.
त्यावर त्यांचे उत्तर काय होते हे आता आठवत नाही.(कोणी ह्याबाबत त्यांच्या उत्तराचा दुवा दिला तर बरे होईल)
परंतु आजकालचा एकंदर कल पाहता
"विचारवंत" असण्यासाठी (तथाकथित) धर्मनिरपेक्षवादी (त्यातही अल्पसंख्यांक समाजाची बाजु घेणारे) वा अल्पसंख्यांक समाजाचे असणे आवश्यक आहे का?
उदा.तिस्ता सेटलवाड,जावेद अख्तर, मेधा पाटकर, वगैरे वगैरे....

मुत्सद्दि.

लोकशिक्षण ही गुरुकिल्ली

लोकशिक्षण ही गुरुकिकिल्ली

सांडपाण्याच्या व्यवस्थापनाला पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय महत्व आहे. अमेरिकेसारख्या देशातही ही समस्या आहे. समरव्हील या शहरात त्या दृष्टीने अभ्यास करण्यात आल. भारतातही या प्रश्नी खुप काही करणे शकय आहे फक्त त्यासाठी लोकशिक्षण सर्वात महत्वाचे आहे. ....... पुढे वाचा

हा दैनिक सकाळ दि. ८ मार्च २०१० च्या पुणे आवृत्तीत लेख वाचल्यावर लिखाण ओळखीचे वाटायला लागले. पण हे विठ्ठल देशपांडे कोण बाबा? हे नक्कीच विकास देशपांडे असणार त्यातुन शहर बॊस्टन म्हणल्यावर नक्कीच सकाळ ने काहितरी नावात चुक केली आहे असे वाटू लागले. पण नावात काय आहे?
मंडळी हे विठठल देशपांडे म्हणजेच आपले मिपाकर आडव्या उभ्यारेषा नसलेले विकास. उत्तम लेख सकाळने प्रिंट मिडियातील जागर मधे टाकल्या बद्दल दैनिक सकाळ चे आभार .

संकेतस्थळे आणि खाजगी मालकी - एक मुक्तविचार

सध्या दुसर्‍या एका धाग्याच्या निमित्ताने (पुन्हा) हा प्रश्न ऐरणीवर आला आहे त्यासंदर्भाने बर्‍याच दिवसांपासून मनात आलेले विचार शब्दबद्ध करतोय, सगळ्यांचा वैचरिक सहभाग अपेक्षित आहे, कृपया वैयक्तिक टीकेऐवजी मुद्द्यांना प्राधान्य देणे.

माणूस संकेतस्थळ का काढतो ? ह्या प्रश्नाचे उत्तर मला आधी वाटलं - माणसाची आदिम प्रेरणा "मला काही सांगायचय" ही असावी. पण नंतर थोडा विचार केला असता असे लक्षात आले की 'मला जे सांगायचय' त्यासाठी इतर 'फुकट' अनेक पर्याय उपलब्ध आहेत जसे की ब्लॉग, दुसरी संकेतस्थळे. मग स्वतःचे संकेतस्थळ असावे ही प्रेरणा नेमकी कशामुळे ?
आत्तापर्यंतचा इतिहास बघितला तर संकेतस्थळांची 'वृत्तपत्रांशी' तुलना करता येइल.
१) 'स्वतःच्या विचारांचा (अनिर्बंध वा मुक्त) प्रसार' किंवा
२) 'दुसर्‍यांच्या विचारांचा विरोध' ह्यासाठी स्वतःचे वृत्तपत्र असावे ह्याच विचारांनी अनेकांनी वृत्तपत्रे चालू केली किंवा विकत घेतली. पुढे त्यात जाहिराती हा मुद्दाही समाविष्ट झाला पण तसे बघितले तर तोसुद्धा मुद्दा क्र. १) मधे बसू शकेल. हाच नियम संकेतस्थळांनाही लागू पडतो.

हा विचार कॄतीत आणण्यामागच्या प्रेरणाही वेगवेगळ्या असू शकतात. इतर संकेतस्थळांच्या धोरणांविषयी, तिथल्या सदस्यांविषयी, सुविधांविषयी, विषयांबद्दल - नापसंती ही एक प्रमुख प्रेरणा. त्याचबरोबर 'ही गोष्ट तुम्ही करता त्यापेक्षा (वेगळी, चांगली) करता येउ शकेल हे दाखवून देण्याची जिद्द किंवा नुसतीच 'स्वयं शिक्षणाची आच' (अर्थात ही फार दुर्मिळ). पण कारण कुठलेही असूदे, संकेतस्थळ उभारण्या / चालवण्या साठी पदरमोड करण्याची तयारी, (तांत्रिक किंवा समविचारी) सहकार्‍यांची जमवाजमव, सुरुवातीला तरी एक निश्चित धोरण वा उद्दिष्ट अशा अनेक गोष्टींची गरज असते.

आता संकेतस्थळ चालू केले आहेच तर मुख्यत्वे 'वाचकवर्ग' आणि नंतर सहभागी 'लेखक वर्ग' हवाच. मग ह्या दोन्ही वर्गांना त्यांचे संकेतस्थळावरचे वावरणे सोपे व्हावे म्हणून अधिकाधिक सुविधा पुरविणे - प्रसंगी (पैशाची, वेळाची, ज्ञानाची) पदरमोड करुन. ह्यातून वाचक / लेखक वाढीस लागले की संकेतस्थळाची 'क्षमता' गरजेप्रमाणे वाढवणे त्यासाठी परत पदरमोड. असे करुन संकेतस्थळ भरभराटीस येते.

आता 'असतिल शिते तेथे जमतिल भुते' - किंवा 'कट्ट्यावर जमणारे कट्टेकरी' किंवा 'विचारांची देवाण घेवाण करु इच्छिणारी मंडळी' - कुठल्याही कारणाने का असेना मंडळी जमणारच - आणि ती जमावितच असाच चालकांचा उद्देश तेव्हा हे योग्यच. पण जसजशी लोकं वाढायला लागतात तेव्हाच 'दुसर्‍या' विचारांची लोक, मत्सरग्रस्त, निव्वळ मजा बघणारे, बाजूने भांडणारे, भांडण लावणारे असे अनेक लोक गोळा होतात. हेही साहजिकच.

आणि तेव्हाच खरी कसोटी लागते चालकांची. ही खाजगी मालमत्ता खरीच, त्याबाबत दुमत होण्याचे कोणाचे काहीच कारण नाही. आणि खाजगी पणाबरोबरच तो खाजगीपणा जपण्याचे काही नियमही. नियम पाळण्याची जबाबदारी सदस्यांची, ते नियम बनवून, उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी चालकांची आणि नियमांचे पालन करवून घेण्याची जबाबदारी प्रशासकांची/संपादकांची. आता ह्यात पारदर्शकता नसली, समन्वयाचा अभाव असला किंवा एकाला एक न्याय आणि दुसर्‍याला दुसराच असे प्रकार असले की गडबड होणारच.

मालकी खाजगी - त्यामुळे नियम ठरविण्याचे स्वातंत्र्यही आणि ते बदलण्याचेही. त्याचमुळे "चपला", "आहे हे असे आहे" असे प्रतिसाद येणे अगदी साहजिकच. तसच वेळोवेळी स्पष्ट केल्याप्रमाणे 'चालेल तेवढे दिवस चालेल नाहीतर बंद करुन टाकीन तिच्यामायला" हेही परिचयाचे. पण ह्याच वेळी "मिपाकरांमुळेच मिपा आहे..सर्व मिपाकरांचे मनापासून आभार.." अशा प्रतिसादांमुळे गोंधळ उडतो.

इथले मालक पूर्वीपासून दुसर्‍या एका संकेतस्थळाचे नियमित, चांगले लिखाणकर्ते सदस्य, स्वत्: संगीततज्ज्ञ म्हणता येईल इथपर्यंत शास्त्रीय संगितात गती असलेले, बर्‍याच वेळेला दिसलेली उत्तम विनोद बुद्धी शिवाय व्यक्तिचित्रातून दिसणारी निरिक्षणशक्ती आणि वेगवेगळ्या कट्ट्यांतून कानावर पडल्याप्रमाणे माणस जोडण्याची क्षमताही.
पूर्वोक्त संकेतस्थळांचे जाचक नियम न पटल्यामुळे बाहेर पडून जिद्दिने, पदरमोड करुन नविन संकेतस्थळाची उभारणी आणि ते नावारुपाला आणून दाखविण्याची कला, क्षमता अंगी.
अशा सर्व पार्श्वभूमीवर 'अशी परिस्थिती का यावी' हे माझ्या आकलनाबाहेरचे.
मालकांनी नुकतेच एका जाहिर कार्यक्रमात 'मिपाचे' प्रतिनिधित्त्व केले, माझ्या अल्प माहिती नुसार ते ह्या संकेतस्थळाचे प्रवर्तक आहेत म्हणूनच त्यांना सहभागी व्हायची संधी मिळाली (नुसते ब्लॉगलेखक म्हणून नव्हे) आणि त्याच बरोबर त्यांनी सदस्यांचे जाहिर आभारही मानले आहेत.

असे असताना, (हे) संकेतस्थळ काढण्यामागची पूर्वीची उद्दिष्ट्ये काय होती, त्यांच्यात काही बदल झाला आहे का? निर्माण केलेले संकेतस्थळ त्या उद्दिष्ट्यपूर्तीच्या मार्गावर आहे का? नसेल तर कसे आणता येईल, प्रशासानात पारदर्शकतपाकशी आणता / वाढविता येईल, वगैरे वगैरे बाबींचा उहापोह करण्यासाठी हा लेख प्रपंच.


(टीपः मी नियमित लेखक नसलो तरी नियमित वाचक आहे आणि हा लेख संस्थळाचे बदलते स्वरुप जाणवले म्हणून लिहिला आहे, उडविला गेला, संपादित झाला तरी हरकत नाही, मला माझी जी मते आहेत ती व्यक्त कराविशी वाटली म्हणून केली एवढेच...)

वसई पेटली......

नैसर्गिक दृष्ट्या समृध्द असणार्‍या ,अतिशय सुरेख अश्या वसई-विरार महानगरपालीकेतून ५३ गावे वगळावी यासाठी तेथील आमदार विवेक पंडित यांनी बेमुदत उपोषण केले.त्यांचे उपोषण मोडून काढण्यासाठी ५ मार्चला पोलीसांनी ज्या पध्द्तीने बळाचा वापर केला.स्रिया,वृध्द,लहान मुले,तरुण मुले ,मुली यांवर घरात घुसून बघाणार्‍यालाही चीड यावी असा अमानुषपणे लाठीमार केला,त्याचा निषेध करायलाच हवा.दुरचित्रवाणी वाहिन्यांवरून लाठीमाराचे दृष्य पाहताना इतिहासात वाचलेल्या इंग्रज सरकारच्या जुलुमाची आठवण झाली.एखादे आंदोलन चिरडण्यासाठी पोलीस ज्या पध्द्तीने वागतात ते लोकशाहीला धरून आहे का?असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी लाठीमार प्रकाराबद्दल चौकशीचे आदेश दिले आहेत.जे कोण पोलीस अधिकारी दोषी असतील त्यांना सजाही होईल.पण पोलीसांच्या परीणामी राज्यसरकारच्या दहशतीची झळ बसलेले वसईकर पुन्हा उठू शकतील का?मूळ प्रश्न असा आहे की लोकांनी आंदोलन करावे असे निर्णय सरकार घेतेच कशी.

असा काव्यप्रकार मराठीभाषेमध्ये अस्तित्त्वांत आहे काय? - भाग २

असा काव्यप्रकार मराठीभाषेमध्ये अस्तित्त्वांत आहे काय? - भाग २

वाचकमित्रहो,

नमस्कार! वणक्कम! वन्दनम! "असा काव्यप्रकार मराठीभाषेमध्ये अस्तित्त्वांत आहे काय? - भाग १" ह्या स्फुटास मिळालेला भरघोस प्रतिसाद, आणि त्यासह वाचकांनी पाठविलेल्या खरडी, व्यनि, आणि जीमेलावरील प्रेमळ विनंतींस मान देवून मी त्याच मालिकेतले हे दुसरे स्फुट आपणांसमोर मांडण्याचे धार्ष्ट्य करित आहे. कृपया गोड मानून घेणे.

तमिळ - जागतिक पातळीवर ’अभिजातभाषा’ म्हणून गौरविली गेलेली ही भाषा. मराठीभाषिकांच्या दृष्टीतून पाहावयाचे झाल्यास; मराठीभाषकांच्या समोर तमिऴभाषा ही संपूर्णत: अनाकलनीय आणि काहीशी चमत्कारिक अशी अवतीर्ण होते. तौलनिक भाषाभ्यास हा दोन्हीही भाषकांसाठी साहित्याचा परमानंद लुटता येण्याचे एक साधन होय. मराठीभाषकास ह्या भाषेच्या व्याकरणनियमांची / काव्यशास्त्रीय नियमांची थोडी तोंडओळख करून दिल्यास, ह्यातील चमत्कृती संपुष्टात येवून ती शिकण्यात गोडी वाटू लागू शकेल असे वाटते.

---

’उपक्रम दिवाळी अंक २००९ मध्ये लेख लिहाल काय’ अशी विचारणा करणारा व्यनि जेंव्हा आला, साधारण त्याचवेळी येथे मिसळपावावर श्री. तात्यांनी मुखपृष्ठावर दिल हैं छोटासा ह्या गीताबद्दल लिहिले होते. ते असे -

अर्थपूर्ण आशय असलेलं एका वेगळ्याच परंतु तेवढ्याच फ्रेश ढंगातलं गाणं. एखाद्या फुलपाखरासारखं सुंदर आणि तेवढंच हलकंफुलकं! गाण्याचे शब्द, चाल आणि गायकी तर उत्तमच परंतु या गाण्याला १०० पैकी १०० मार्क जर कुठे द्यायचे झाले तर ते चित्रीकरणाला आणि वाद्यवृंद संयोजनाला. वाद्यवृंद संयोजन आणि त्यातले फिलर्स तर केवळ अफलातून! एरवी गाणं शुद्ध गंधाराधिष्ठित, कानांना शुद्ध गंधाराचं अगदी भरपूर सुख देणारं परंतु 'चांद-तारोको छुनेकी आशा' नंतरच्या 'आसमानोमे उडनेकी आशा..' या ओळीतला शुद्ध मध्यम केवळ आश्चर्यकारक, अद्भूत परंतु तेवढाच आनंददायी! गायलंयही अगदी अल्लडपणे. म्हटलं तर स्वच्छंदपणे स्वत:शीच संवाद साधणारं आणि म्हटलं तर एखाद्याला एखादी गोष्ट अगदी छान समजून सांगावी तसं!

बादलोकी मै ओढू चुनरिया, अपनी चोटी मे बांध लूं दुनीया!

क्या केहेने! सुंदरच लिहिलं आहे गाणं. आणि बांधलंयही तेवढंच छान. चांदतार्‍यांना छुणार्‍या आणि आसमानात स्वच्छंद उडणार्‍या या गाण्याबद्दल रेहमानला सलाम..!

कदाचित वाचकांस ही माहिती नसेल; की हे गीत हे मूळ काव्यरूपांत असून ते ७० च्या दशकात लिहिले गेले होते. श्री. एम एस विश्वनाथन ह्यांनी ते तमिळ दूरदर्शनसाठी संगीतबद्धही केले होते. श्री. मणिरत्नम ह्यांस त्यांच्या नायिकेच्या भावनांचे प्रकटीकरण करण्यास ही कविता उत्कृष्ट वाटली आणि ह्या कारणाने ह्या कवितेचे चित्रपटगीतांत रूपांतर झाले. असो! एका बाजूस ’उपक्रम दिवाळी अंक २००९ चा व्यनि वाचतांना दुसर्‍या बाजूस मिसळपावावर श्री. तात्यांनी मुखपृष्ठावर सुंदरच लिहिलं आहे गाणं असे लिहिल्याचे पाहिले, आणि हिंदीत डब्ब केलेल्या रोजा चित्रपटातील चिन्न चिन्न आसै ह्या तमिळ गीताचा मराठी अर्थ आणि त्याचे काव्यात्मक रसग्रहण ह्या सार्‍यासंबंधी एकत्रितरीत्या लिहावे असा काहीसा विचार करून ह्याविषयी आतां लिहितो आहे...!

---

मूळ तमिऴ लिपीमध्ये देवनागरीमध्ये लिप्यंतरीत मराठीभाषेमध्ये भावार्थ
சின்ன சின்ன ஆசை चिऩ्ऩ चिऩ्ऩ आसै छोटी छोटी इच्छा
சிறகடிக்கும் ஆசை सिऱगडिक्कुम् आसै पंख फडफडविण्याची इच्छा
முத்து முத்து ஆசை मुत्तु मुत्तु आसै (मोत्यासारखी) छोटी छोटी इच्छा
முடிந்துவைத்த ஆசை मुडिन्दुवैत्त आसै (शिंपल्यात बंद मोत्यासारखी - आजवर) बंद करून ठेवलेली इच्छा
வெண்ணிலவு தொட்டு முத்தமிட ஆசை वॆण्णिलवु तॊट्टु मुत्तमिड आसै शुभ्र चंद्रम्यास स्पर्शून त्याचा मुका घेण्याची इच्छा
என்னையிந்த பூமி சுற்றிவர ஆசை ऎऩ्ऩै इन्द बूमि चुऱ्ऱिवर आसै सारे हे विश्व फिरून पाहाण्याची इच्छा
[[சின்ன சின்ன ஆசை]]... [[चिऩ्ऩ चिऩ्ऩ आसै]]... [[छोटी छोटी इच्छा]]...
மல்லிகைப்பூவாய் மாறிவிட ஆசை मल्लिगैप्पूवाय् माऱिविड आसै मोगर्‍याच्या फुलामध्ये परावर्तित होण्याची इच्छा
தென்றலைக் கண்டு மாலையிட ஆசை तॆऩ्ऱलैक् कण्डु मालैयिड आसै हवेच्या झुळुकीस पाहून, (तिच्या गळ्यात) माळा घालण्याची इच्छा
மேகங்களை எல்லாம் தொட்டு விட ஆசை मेहङ्गळै ऎल्लाम् तॊट्टु विड आसै सार्‍या ढगांना स्पर्शून सोडण्याची इच्छा
சோகங்களை எல்லாம் விட்டு விட ஆசை सोहङ्गळै ऎल्लाम् विट्टु विड आसै सार्‍या दु:खांना सोडून टाकण्याची इच्छा
கார்குழலில் உலகைக் கட்டி விட ஆசை कार्गुऴलिल् उलहैक् कट्टि विड आसै केशरचनेमध्ये सार्‍या जगतास बांधून घेण्याची इच्छा
[[சின்ன சின்ன ஆசை]] [[चिऩ्ऩ चिऩ्ऩ आसै]]... [[छोटी छोटी इच्छा]]...
சேற்று வயலாடி நாற்று நட ஆசை सेऱ्ऱु वयलाडि नाऱ्ऱु नड आसै चिखलामध्ये पायांचे ठसे उमटवित सोडत चालण्याची इच्छा
மீன் பிடித்து மீன்டும் ஆற்றில் விட ஆசை मीऩ् पिडित्तु मीण्डुम् आऱ्ऱिल् विड आसै मासोळीस पकडून पुन्हा पाण्यात सोडून देण्याची इच्छा
வானவில்லைக் கொஞ்சம் உடுத்திக்கொள்ள ஆசை वाऩविल्लैक् कॊञ्चम् उडुत्तिक्कॊळ्ळ आसै इंद्रधनु परिधान करण्याची इच्छा
பனித்துளிக்குள் நானும் படுத்துக்கொள்ள ஆசை पनित्तुळिक्कुळ् नाऩुम् पडुत्तुक्कॊळ्ळ आसै दवबिंदुंच्या आतमध्ये निजण्याची इच्छा
சித்திரத்தின் மேலே சேலை கட்ட ஆசை सित्तिरत्तिऩ् मेले सेलै कट्ट आसै भित्तिचित्रास साडी नेसविण्याची इच्छा
[[சின்ன சின்ன ஆசை]]... [[चिऩ्ऩ चिऩ्ऩ आसै]]... [[छोटी छोटी इच्छा]]...

---

तमिळभाषेमध्ये एक नियम. जोपर्यंत एखाद्या वाक्यात ’नाही’ असे म्हटले जात नाही, तोपर्यंत तेथे ’आहे’ असे गृहित धरले जाते.

उदा.

१. एन पेयर हैयो. - माझे नांव हैयो.
२. इदु तमिळमोळियिन नियमम. - हा तमिळभाषेचा नियम.
३. चिन्न चिन्न आसै. - छोटी छोटी इच्छा.

वरिल नियमानुसार प्रथम उदाहरणांत, जोपर्यंत एन पेयर हैयो ’इल्लै’ असे म्हटले जाणार नाही तोपर्यंत माझे नांव हैयो ’आहे’ असेच समजले जाते. दुसया उदाहरणांत जोपर्यंत हा तमिळभाषेचा नियम ’नाही’ असे म्हटले जाणार नाही तोपर्यंत हा तमिळभाषेचा नियम ’आहे’ असेच समजले जाते.

थोडक्यात कसे, की ’आहे’ असे निराळे सांगण्याची आवश्यकता शिल्लक नाही. हे भाषेचे वैशिष्ट्य आहे. काही पाश्चिमात्य भाषाभ्यासकांनी ह्या वैशिष्ट्यास तमिळ समाजाच्या ’दुर्दम्य आशावादाचे मूळ’ असे म्हटले आहे. हे गीत चित्रपटाची नायिका रोजा हिच्या दुर्दम्य आशावादाचे एक काव्यात्मक चित्रण ह्या रूपांत येते. तिला हव्या असलेल्या जवळजवळ सार्‍याच गोष्टी तिला मिळणे केवळ अशक्यप्राय असूनही ती इच्छा करते. काहीशी स्वप्नाळू मागणी असली तरीही एका विलक्षण आत्मविश्वासाने ती त्या गोष्टी मागते. इच्छा म्हटले की मार्ग येणारच!

---

कुठल्याही काव्यांतील यमकपूर्ति ही एक आवर्तन पूर्ण होण्याचा आनंद देवून जाते. सहसा इतरभाषी काव्यांमध्ये यमकपूर्ति ही चरणपूर्ति म्हणून येते. तमिळभाषेतही यमकपूर्ति ही चरणपूर्ति म्हणून येतेच, परंतु त्याशिवाय तमिळभाषेत आणखीही एक वैशिष्ट्य आहे. वाचकांनी वरील कवितेचे निरिक्षण केल्यास असे लक्षात येईल, की प्रत्येक ओळीची दुसर्‍या ओळीशी यमकपूर्ति होते आहे. काव्यातील झाडून प्रत्येक ओळीचा शेवटचा शब्द तो एकच आहे, तो म्हणजे ’आसै’. ह्या शब्दयोजनेमागे एक मुद्दा असा, की वाक्याच्या शेवटल्या शब्दावर एक साहजिक जोर येवून त्याचे महत्त्व अधोरेखित करणे; त्यातील अर्थपूर्ण आशयाकडे लक्ष वेधणे. तमिळ ईळम ची अनेक वीररसपूर्ण काव्ये आहेत, ज्यामध्ये आपणांस ही शब्दयोजना आढळून येईल. खरे पाहता ही शब्दयोजना ही वीररसपूर्ण काव्यांत वापरावयाची, परंतु येथे ती भावनाप्रधान गीतामध्ये वापरली गेली आहे - म्हणूनही श्री. तात्या म्हणतांत तसा एक ’फ्रेश ढंग’ येथे अनुभवण्यास मिळतो. एका अर्थाने ही काव्ये प्रासादिक होवून जातात. चित्रपटांतील नायिकाही केवळ एका विलक्षण आत्मविश्वासाच्या आणि दुर्दम्य आशावादाच्या जोरावर शेवटी तिच्या नवर्‍यास परत मिळवितेच नां? असो.

---

तर प्रश्न असा, की; असा काव्यप्रकार मराठीभाषेमध्ये अस्तित्त्वांत आहे काय?

---

मराठी माणूस म्हणजे अशिक्षित, दारूबाज, आळशी, गावठी ???............... का???

नमस्कार मित्रहो,

आमच्या ऑफिस मध्ये घडलेला एक प्रसंग सांगतो.
हल्लीच मी माझे टी. वाय. पूर्ण केले व नोकरीच्या शोधात होतो, एका प्रतिष्ठित कंपनीमध्ये जॉबला हि लागलो, पण ट्रेनिंग च्या वेळी आम्हाला इंग्रजी व्याकरण, गणिती, यु . के एस्सेंट विषय होते. एका फिमेल ट्रेनर चा असा समज होता (अर्थात गैरसमज) कि मराठी मुले वर्नाक बोलतात,
तिने तसे बोलून हि दाखवले. सगळ्या उमेदवारांना एक पेसेज दिला व वाचायला सांगितले, आमच्या पैकी माझ्यासकट ब-याच मराठी मुलांनी तो पेसेज ऑफिशियली यु. के . असेंट मध्ये वाचून दाखवला व तिचा गैरसमज दूर केला. पण इतर मुलांनी १-२ जण वगळता कुणाहि अमराठीस तो धड वाचता हि आला नाही .
मला सांगायचे आहे कि इतर लोकांनी मराठी माणूस म्हणजे अशिक्षित, दारूबाज, आळशी, गावठी का ठरवलेला आहे ?
कामवाली बाई मराठीच का असते?
मराठी नवरा दारू पिऊन आपल्या बायकोला मारहाण करतो हे प्रत्येक हिंदी व दुर्दैवाने मराठी सिरिअल्स मध्ये का दाखवले जाते?
मराठी माणूस इंग्रजीत अक्षम आहे असे का भासवले जाते?
एम एन सी फर्म मध्ये मारवाडी,जैन, गुजराती मराठी माणसाकडे तिरक्या नजरेने का बघतात?
विधर्भात शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करतो. पण हिंदी न्यूज चानेलचे संपादक प्रभू चावला, आमचे माननीय कृषी मंत्री त्याला दारूबाज आळशी का म्हणतात?

जर उत्तर सापडेल तर जरूर कळवा!!

मला मराठी असल्याचा मनापासून गर्व वाटतो !!

जय भवानी ............. जय शिवाजी.........

जय भवानी जय शिवाजी........................
निश्चयाचा महा मेरु ,
बहुत जनांसी आधारु,
अखंड स्थितीचा निर्धारु,
श्रीमंत योगी
.........
यशवंत,कीर्तिवंत,
सामर्थ्यवंत,वरदवंत,
पुण्यवंत,नीतिवंत,

जाणता राजा
श्री शिव प्रभुंना मानाचा मुजरा.........

भुर्जपत्र ते वेबपेज

भुर्जपत्र ते वेबपेज हा साहित्यप्रवास उलगडणारा कार्यक्रम नुकताच पुण्यात संमेलन पुर्व संमेलनात झाला. किरण ठाकुर यांनी प्रास्ताविक केले. डॊ सतिश देसाई यांनी एकुण कार्यक्रमाची रुपरेषा व संकल्पना सांगितली. परिसंवादाला प्रसिद्ध लेखक अनिल अवचट, मराठी अंकाचे ई संपादक व कवि महेश घाटपांडे, साहित्यक व समन्वयक मिलिंद जोशी, पत्रकारिता क्षेत्रातील माजी संपादिका साप्ताहिक सकाळ श्रीमती संध्या टांकसाळे, वृत्तपत्र विद्या विभागाच्या प्रमुख उज्वला बर्वे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मराठी ब्लॊगर व स्टार माझाचे सहा. निर्माते प्रसन्न जोशी यांनी केले. अनिल अवचटांनी आपला संगणक प्रवास सांगितला. ब्लॊगिंग च्या माध्यमातुन अनेक तरुण लोकांच्या पर्यंत पोहोचता आले. त्यांच्या पुस्तकाचे उत्तम परिचय ऒर्कुट कम्युनिटीवर झाले. ही नव्या युगाची देणगी असल्याचे त्यांनी नमुद केले. महेश घाटपांडे यांनी आम्ही म्रराठी हा अंक वेबसाईट स्वरुपात प्रथम आणल्यावर सुरवातीच्या काळात त्याला प्रतिसाद मिळाला नाही परंतु त्यानंतर जसा या तंत्रज्ञानाचा प्रसार झाला तसे संकेतस्थळाला भेट देणार्‍या लोकांची संख्या प्रचंड वाढल्याचे सांगितले. मिलिंद जोशींनी देहबोली ते भुर्जापत्राचा प्रवास कथन केला. पारंपारिक साहित्यातील जड शब्दांना कंटाळलेल्या लोकांना हा नवीन पर्याय मिळाल्याने साहित्यातील मक्तेदारी कमी होण्यात उपयोग झाल्याचे सांगितले. संध्या टांकसाळे यांनी या माध्यमामुळे वाचकांना आपले प्रतिसाद लगेच देता आले. यामुळे एखाद्या लेखावर प्रतिक्रिया एकदम शंभरात पोहोचल्याने हा लक्षणीय फरक दिसल्याचे सांगितले. उज्वला बर्वे यांनी आत्ताच्या पत्रकारितेतल्या माध्यमाला एक साचा असतो तो अभ्यासक्रमात शिकवला जातो. तशा प्रकारचे बंधन या इंटरनेटवरील माध्यमाला नसल्याने वेगळ्या प्रशिक्षणाची गरज आहे असे वाटत नसल्याचे सांगितले.

कार्यक्रम रंगत दार झाला. इंटरनेटवरच्या मराठी जगतात मराठीची मोडतोड होते असे म्हटले तर ती आताच्या माध्यमात देखील होते वाहिन्यांच्या माध्यमातुन पाहुण्यांचे 'अंगवस्त्र' हार श्रीफळ देउन सत्कार होतो हा किस्सा मिलिंद जोशींनी सांगितला. वर्तमान पत्रातील बातमीत 'भांगेत शेंदुर' भरला जातो. याचा किस्सा उज्वला बर्वे यांनी सांगितला. या नवीन माध्यमाच्या स्पर्धेत आशय व गुणवत्त्ता बाबत मापदंड लावायचे झाल्यास ते नवीनच ठरवावे लागतील. नेट वरील संगणकीय मराठीच्या प्रगतीसाठी लीना मेहेंदळे या प्रशासकीय अधिकारी असलेल्या ब्लॊगर नी बहुमोल कामगिरी केली आहे याची नोंद चर्चेत घेण्यात आली. उपक्रम सारख्या मराठी संकेतस्थळावर चांगले उपक्रम चालतात तसेच मायबोली या जुन्या मराठी संकेतस्थळाची दखल घेतली गेली. नवीन येणार्‍या तंत्रज्ञानासोबत लेखन कसे बदलत जाते याचाही परामर्श घेतला. ब्लॊगिंग कसे असावे याबाबत महेश घाट्पांडे म्हणाले कि अमुक शैली असावी अमुक असु नये असे म्हणता येणार नाही वाचकांनी आवडले नाही तर वाचु नये.

कार्यक्रमात माध्यमाईटस या पत्रकारांनी एकत्र येउन केलेल्या गटातर्फे श्री गणेश पुराणिक हे रानडे इनिस्टीट्युट चे माजी पत्रकार विद्यार्थी व सध्या मुंबई महापालिकेत जनसंपर्क अधिकारी म्हणुन काम करणारे ब्लॉगर यांनी ब्लॉगिंग मराठीसंकेतस्थळ यावर सदीप व सविस्तर माहिती दिली. अनिल अवचटांच्या हस्ते औरंगाबादचे दांपत्य अंजली कुलकर्णी व मकरंद कुलकर्णी यांच्या साहित्य संपदा डॊट कॊम दुवा या संकेत स्थळाचे उदघाटन झाले.लेखक, प्रकाशक यांनी या नवीन माध्यमाचा उपयोग करावा असे आवाहन कुलकर्णी यांनी केले मराठी मंडळी डॊट कॊम या मराठी ब्लॊगर्स कम्युनिटीच्या रात्री १० वाजुन ३ मिनिटांनी प्रस्थापित होणार्‍या संकेत स्थळाचे उदघाट्न पण याच कार्यक्रमात अनिल अवचटांच्या मुखी करण्यात आले. विक्रांत देशमुख यांनी पुण्यात झालेल्या ब्लॊगर्स मेळाव्याबद्दल माहिती दिली. नेहमी प्रमाणे जालमित्रांसाठी कार्यक्रमाचे ध्वनीमुद्रण आम्ही केले आहे. ऐका हो ऐका!

जनातलं नाही फक्त मनातलं................

मैत्री
प्रेषक गुपचुप
हे वाचले(अर्धपण नाही) व लिहायचे नव्हते तरी लिहतो आहे........का लिहतोय,लिहुन काय भेटेल माहीती नाही.
माझा लाईफमधे पहीला व 'एकचं तो' असा एक मित्र होता.हो होता...NOW HE IS HISTORY......हे लिहताना अंगावर काटा आला....f***.F***....F****...........

त्याला एका अपघातात डोळ्यांसमोर जाताना पाहील.....Bullsssss**
आता कळतेय त्याची कींमत.....आता सर्व तोंडावर गोंडा फीरवणारे आहेत....तो साला कधी मनाला लागेल असं बोललाच नाही की त्याचे बोलणे मी मनाला लावुन घेत नव्हतो माहीती नाही....
मला डोक्यामागचे केस जोरात हाताने ओढावसे वाटत होते हे लिहताना.पण Operation झालेय,तेथे टाके आहेत.
साला कूठ्ली मुलगी पण येवढी आठवली नसती व आठ्वतही नाही.
आमची जोडी खुपजणाच्यां डोळ्यात खुपायची...पण ते कुत्रे कधी समोरुन भुकले नाहीत.
तो एक आधार होता.तो होता तेव्हा सर्व Tension, दु:ख ह्यांना ****** असे कुठेपण पाठवायचो.......आत छोटीशी गोष्ट पण मला फाट्यावर मारुन जाते.हसत सर्व विसरायचो..............विसरायला नशा पण मदत करायची.....
मनाने अधु झालोय...तो जाऊन ७-८ वर्ष झाली.पहीली ४-५ काढली मनाच्या ताकतीवर.त्यानंतरची भारी पडतायत.....
त्याने बेशुद्ध पडायच्या आगोदर "तुला लागले नाही ना?" असे दोघांना वीचारले व स्वतः कधीच उठ्ला नाही काही उत्तर एकायला.

आता बरं वाटतंय...................हे लिहल म्हणुन नाही.एक गाणं एकत एकत त्याचे विचार दाटले होते ते विरळ झाले म्हणुन..थोड्यावेळेसाठी.........
हे सांगायचय : मित्र जवळ आहे तेव्हाच त्याची कींमत ओळखा.

मीपावरील एक व्यक्ती मला व्यक्तीश: ओळखते,हा लेख वाचल्यानंतर 'तो मीच' अस वाटल तर येथे कुठल्याही व्यक्तिच्या नावाचा उल्लेख करु नये (हे नंतर लक्षात आलं म्हणुन आता लिहतोय)

एक शेर

फार वर्षांपूर्वी वाचलेला जावेद अख्तर यांचा शेर काल परत वाचनात आला -

कभी जो ख्वाब था ...... वोह पा लिया है
मगर जो खो गई ....... वोह चीज क्या थी

आणि मनाला परत एकदा चटका बसला. अर्धा पेला रिकामा की भरलेला यचे द्वंद्व मनात परत एकदा सुरु झाले. स्वतः घेतलेल्या निर्णयांचा मन परत आढावा घेऊ लागलं, जाब विचारू लागलं.
माझंच असं होतं की सगळ्यांच की मिळालेली गोष्ट नगण्य वाटते अणि हरवलेली मोलाची?

रॉबर्ट फ्रॉस्ट देखील असच काहीसं तर नाही म्हणत ना पुढील ओळींत -
टू रोड्स दायव्हर्जड इन अ यलो वुड
अ‍ॅड सॉरी आय कूड नॉट ट्रॅव्हल बोथ
.
आय टुक द वन लेस ट्रॅव्हलड बाय
अ‍ॅड दॅट हॅस मेड ऑल द डिफरन्स

हा "डिफरन्स" प्रत्येकाच्या मनात उचल खातो का? जर मी तो दुसरा रस्ता घेतला असता तर कदाचित आज .......हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो का? कसं समजवायचं मनाला?

मगर जो खो गई ....... वोह चीज क्या थी ... किती समर्पक वर्णन आहे त्या हरवलेल्या गोष्टीचं.

मग ते करीअरच्या मागे लागून मुलीचं बालपण हरवलेल्या आईची खंत असेल कदाचित, कदाचित आपल्या प्रेमिकेपुढे भावना व्यक्त न करू शकल्याने प्रेम अव्यक्तच राहीलेल्या प्रेमीचे दु:ख असेल तर कधी परदेशातून वेळेवर घरी जऊ न शकल्याने वडीलांना शेवटच्या क्षणी नभेटू शकलेल्या मुलीचे अश्रू असतील.
शेवटीम्हणतात ना सुखाला एक चेहेरा असतो तर दु:खाला अनेक.