टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
विचार
लिटल बॉय नावाच्या एका एकांकिकेचे परीक्षण
प्रेषक भडकमकर मास्तर ( मंगळ, ०५/१३/२००८ - १६:०६) .आधी थोडक्यात जशी आठवते तशी गोष्ट लिहितो.
तीन मुलगे, दोन मुली एकाच कॊलेजातले, जर्नालिझम करणारे ... त्यातले आदि आणि ऋता प्रेमात पडलेले...ते दोघे आधी स्टेजवर दिसतात..ऋता कुठेतरी दूरगावी प्रोजेक्ट साठी निघालेली आहे... त्यांचे इतर मित्र नंतर येतात, त्यांच्या गप्पा, मोबाईल, अलेक पदमसीचे ऐकलेले लेक्चर वगैरे...त्याचे क्लिपिंग मोबाईलवरून ब्लूटूथ ऑन करून दुसर्याला देणे असे चालू असते.... पुढच्या दृश्यात असे कळते की आदिने त्याची आणि ऋताची एक तो तिच्यावर जबरदस्ती करत असतानाची व्हिडिओ क्लिप तिच्या नकळत मोबाईलवरती शूट केली होती आणि त्याच्या निष्काळजीपणामुळे ती क्लिप मोबाईलमधून सगळीकडे पसरलेली आहे.... लहान पोरांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वजण (विकृत ) आनंदात ती क्लिप पाहत आहेत...या काळात आदिचे मित्र त्याला शिव्या घालून सोडून जातात....एक मैत्रिण फ़क्त ( का कोण जाणे ) त्याला समजून घ्या असे म्हणते. मग ऋता बाहेरगावाहून येते , तिला समजते , ती धैर्याने परिस्थितीशी सामना करते, रडारड करत नाही.... फ़क्त आदिला एकदा विचारेन म्हणते की तू असे का केलेस?... मग आदि शेवटी तिच्यासमोर म्हणतो, की मी सरेंडर करेन., माझी चूक झाली...ती निघून जाते आणि हा रडत राहतो तेव्हा नाटक संपते.
ही एकांकिका मी पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत पाहिली....त्यानंतर २००७ सालच्या अनेक स्पर्धांमध्ये या एकांकिकेने पहिली / दुसरी पारितोषिके मिळवली..
अभिनय वगैरे करणारी मंडळी चांगली होती, प्रयोग शिस्तशीर छान होता, नेपथ्य प्रकाशयोजना मस्त.. पण पाहताना सतत अस्वस्थ वाटत होते... गोष्ट अपूर्ण राहिली आहे असे वाटत होते.
१. आता हा पोरगा आपल्या गर्लफ़्रेंडवर फ़ोर्स करणार , तिच्या नकळत त्याचे चित्रीकरण करणार आणि वर निष्काळजीपणे ते स्प्रेड होऊ देणार , आणि शेवटी सहानुभूतीची अपेक्षा करत राहणार..( रडणार, मित्र सोडून गेल्यामुळे कसा त्याच्यावर अन्याय झालाय असा अभिनय दाखवणार)
या असल्या क्रिमिनल माणसाला कसली सहानुभूती देता ? त्याची लायकी फ़टकावून काढून पोलीसात द्यायचीच आहे.....
____ म्हणजे त्यांना लग्नापूर्वी संबंध ठेवायचे आहेत की नाही, त्याचे चित्रीकरण करून दोघांनी एकत्र पहायची त्यांची सवय आहे की नाही हा त्यांच्या सेक्शुअल प्रेफ़रंसेस चा वैयक्तिक भाग झाला....
पण संवादातून असे स्पष्ट कळते की जबरदस्तीने आणि तिच्या नकळत त्याने हे सारे केले आहे. या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या .... मग हे दोन स्पष्ट मोठे गुन्हे झाले...
२. मला तर ही एका पर्वर्ट बलात्कार्याची गोष्ट वाटली.... जो कांगावा करतोय की चुकून क्लिप स्प्रेड झाली, मी खरंतर ती क्लिप माझ्यासाठी बनवली होती..... आता या मुख्य पात्राला सहानुभूती देणारी पुढची सगळी गोष्ट ( बिचार्याला सगळे मित्र बोलून सोडून चालले रे..) पाहून मला वाटत राहिले, की बाबा आम्हाला आता कळणार आहे की याने चूक केलेली नाही, काहीतरी गैरसमज होता वगैरे... तसले काही घडत नाही...
मग असल्या ट्रीट्मेंट ने आम्हाला इतका वेळ कशाला येडा बनवले?
३. मग एखाद्या बलात्कार्याची गोष्ट नसते का? असू शकते, पण इतक्या सहानुभूतीचे कारण काय?
उलट ऎंटी हीरो चे सिनेमे असतात त्यांचा आलेख वाईट कृत्य, कारणमीमांसा आणि शिक्षा असाच असतो... तसंही इथे कुठे दिसत नाही... उलट ती दुसरी मैत्रीण सोडून जाणार्या मित्रांना " अरे त्याला समजून घ्या " स्टाईलचा सूर लावते तेव्हा डोके चक्रावते.
४. जर्नालिझम शिकणारी स्ट्रॊंग मुलगी ऋता आदिला शेवटी सोडून जाते.... ती एवढी सक्षम असती तर तो संबंध ठेवायला जबरदस्ती करतो हे एवढेच कारण त्याला सोडायला पुरेसे नाही का? त्यासाठी क्लिप पसरायची वाट कशाला पहायला पाहिजे?
५. बरं एवढा नीच माणूस आहे तो तर मग त्याला त्या प्रमाणात वाईट्ट्ट्ट्ट्ट्ट्टट्ट शिक्षा तरी मिळायला हवी की नको? ते ही नाही...तो रडत राहतो आणि नाटक संपते.म्हणजे नाटकाचा प्रिमाईस / वन लाईन स्टोरी काय तर बलात्कार करा, क्लिप काढा पण स्प्रेड होऊ देऊ नका नाहीतर मित्र सोडून जातील ...
या माझ्या शंकांबद्दल मी त्या नाटकाच्या टीममध्ये असलेल्या एका मुलीशी जालावर चर्चा केली... , त्यात तिचे म्हणणे असे होते की आदिने एक छोटीशी चूक केली आहे, तो वाईट नाही..आणि ती स्वत:साठी बनवलेली क्लिप स्प्रेड झाली हे चुकले, मग त्याचा मोठा गुन्हा झाला, त्याची तो पोलिसांना सरेंडर करून शिक्षा भोगणारच आहे......
मी उडालोच..तो वाईट नाही? स्वत: एक मुलगी असूनही प्रेयसीवरती जबरदस्तीने संबंध ठेवून नकळत क्लिप काढणारा माणूस ( प्रत्यक्ष आयुष्यात आपला बॊय्फ़्रेंड असो किंवा जानी दोस्त असो), नीच प्रवृत्तीचा आहे हे तिला जाणवू नये? . तिलाच काय माझ्याबरोबर एकांकिका पाहणाया बर्याचशा लोकांना हे जाणवलेच नाही.... परीक्षकांनीही या एकांकिकेला भरपूर बक्षिसे दिली...
कॊलेजची पोरे तर या एकांकिकेने भारावून वगैरे गेली होती...
अहो नाही हो, लग्नपूर्व संबंध किंवा मोबाईलवरती क्लिपा काढणे यावर आमचा आक्षेप नाहीच आहे, ( हा ज्याच्या त्याच्या प्राधान्यक्रमाचा वैयक्तिक प्रश्न आहे) पण तुमच्या जोडीदाराच्या परवानगीने हे उद्योग नको का करायला? साधी गोष्ट आहे ...नाहीतर मग हा सरळ बलात्काराचा गुन्हा ( आणि सायबर क्राईम) ठरतो..
खरं सांगतो, मी ज्या ज्या कॉलेजियन्स ना या एकांकिकेबद्दल विचारले, ते लोक बॉयफ़्रेंड गर्लफ़्रेंड मंडळींनी एकमेकांच्या क्लिप्स मोबाईलवरून तयार करणे या संकल्पनेला इतके सरावलेले वाटले, की मला आधी भीती वाटली आणि मग माझे फ़ार वय झाले आहे असे वाटले.... उद्या कॊलेजच्या रंगमंचावर बलात्काराचे कौतुक करणारी आणि जस्टिफ़ाय करणारी नाटके दिसली तर नवल वाटायला नको, असा टिपिकल वय झाल्याची जाणीव करून देणारा विचार मनात आला खरा...( आजची तरूण मुले म्हणजे ना.......).. ( अरे बापरे, माझा प्रवीण दवणे झाला की काय?या विचाराने अजून भीती वाटली.. )
नाटक म्हणजे नुसते अभिनय आणि नेपथ्य प्रकाश असे असते का ? त्यातला विचार कोणापर्यंत कसा पोचतो हेही महत्त्वाचे आहे....
असो...
पुण्यातल्या लोकांपैकी इथे पाहिले का हो कोणी हे नाटक?
( ... मला जाणवते ते इतर कोणालाही आक्षेपार्ह वाटत नाही हे पाहून माझी सुरुवातीला फ़ार चिडचिड झाली , अजूनही आश्चर्य वाटते..त्यामुळेच हे एवढे लेखन..)...
१० मे १८५७
प्रेषक राजे ( रवी, ०५/११/२००८ - २२:५९) .१० मे १८५७ !
काही महीन्यांच्या धावपळी नंतर तात्या टोपे व इतर क्रांतीका-यांनी ३० मे चा दिवस ठरवला होता बंडाचा ! विदेशी राज्यकर्ते खदेडून बाहेर काढण्यासाठी.
पण प्रचंड सामाजिक तनाव व मंगळ पांडे मुळे कानुपुर छावणीत झालेल्या उठावामुळे तात्यांना आंदोलन ठरलेल्या दिवसापेक्षा आधीच चालू करावे लागले.. व त्याची सुरवात कानपूर तथा सुरत छावणी पासूनच झाली सर्वांनी मिळूनबहाद्दुर शहा जफर ला बादशहा मानला व तात्या टोपे ह्यांच्या हाताखाली सर्व उत्तर भारत एक होऊन इंग्रजाच्या विरुध्द पहिले स्वातंत्र्य बिगूल फुकले...
ह्या दिवसाला व त्या क्रांती कार्याला गेल्या १० मे ला १५० वर्ष पुर्ण झाली !
सर्व क्रांतीका-यांना माझे नम्र अभिवादन !
जे माहीत आहेत त्यांना व जे माहीत नाही त्यांना लाख लाख नमन !
बहाद्दुर शहा जफर च्याच शायरीने यातना काय व कश्या होत्या ह्याचे उत्तर मिळते.
"ईतना बदनसीब है जफर.
दफन के लिए,
दो गज जमीं भी ना मिली,
कु-ए-यार में "
मदर्स डे अर्थात मात्रुदिन
प्रेषक ईश्वरी ( रवी, ०५/११/२००८ - १३:२७) .आज ११ मे २००८ ..मदर्स डे अर्थात मात्रुदिन. अमेरिकामध्ये मे महिन्याच्या दुसर् या रविवारी मदर्स डे साजरा केला जातो. मदर्स डे हा अमेरिकन डे असला तरी हल्ली जगभर साजरा केला जातो.
आई रोजच आपल्यासाठी खूप काही करत असते. आपल्यासाठी तिळतिळ झीजत असते. मुलं कितीही मोठी झाली आणि त्यानाहि मुलं झाली तरी तिचं आईपण कधीच संपत नाही. एखादा दिवस असा हवा की, तिच्यासाठी आपल्याला काही करता येईल. ...तिला खास वाटेल असे काहीतरी. या भावनेतून मदर्स डे साजरा केला जाऊ लागला. पाश्चांत्यांचे अन्धानुअकरण नको पण मदर्स डे मागचा उद्देश अतिशय चान्गला असल्याने आपणही तो साजरा करायला काही हरकत नाही.
सकाळी आईच्या आधी उठून आपण तिच्यासाठी तिच्या आवडीची न्याहरी बनवू शकतो. तिच्या आवडीच्या फुलांचा गुच्छ तिला भेट देऊ शकतो. आपल्या व्यस्त कामाच्या वेळापत्रकातून थोडासा वेळ काढुन तिच्याशी मस्त गप्पा मारु शकतो. तिला आवड असेल तर नाटकाला वा सिनेमाला नेऊ श़कतो. तिच्यापासून लाम्ब असलो तर तिला छानसे पत्र लिहू शकतो.
काहींना वाटेल की मात्रुदिन हा वेगळा असा का साजरा व्हायला हवा...आईवरील प्रेम , तिच्या मायेची जाणीव रोजच व्यक्त व्हायला हवी.
ते ही बरोबर आहे . पण तरीही आजच्या धकाधकीच्या , तणावाच्या ,धावपळीच्या जीवनात तिने आपल्यासाठी केलेली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक त्याग सहजपणे नजरेआड केला जाऊ शकतो, आईला सगळ चालतं म्हणुन काही गोष्टी ग्रुहीत धरल्या जाऊ शकतात. आईची काही ईच्छा असेल, तिला काहीतरी वेगळं करावंसं वाटत असेल हे आपल्या गावीहि नसतं. हे सर्व टाळून तिला स्पेशल फील व्हाव यासाठी आजच्या मात्रुदिनाचा उद्देश.
माझी आई माझ्यापासून हजारो मैल लाम्ब असल्याने मी तिला फोनवरूनच शुभेच्छा देणार आहे. तुम्ही काय करणार आहात किन्वा काय केले हे वाचायला जरूर आवडेल.
मीपावरील सर्व मातांना आणि समस्त मीपाकरांच्या माताना मात्रुदिनाबद्दल हार्दिक शुभेच्छा !!!
-- ईश्वरी
आमार बांगला सोनार बांगला
प्रेषक भोचक ( शनी, ०५/१०/२००८ - १४:४८) .मराठी अस्मितेबद्दल सध्या बरेच काही ऐकू येत आहे. राज ठाकरे यांनी तर तो आपला राजकीय अजेंडा ठरवला आहे. बाकीचे पक्षही यात (आपल्या परीने) उतरले आहेत. मराठी मन मात्र या विषयावर विभागले गेल्यासारखे दिसते. वर्तमानपत्रातील प्रतिक्रिया, ब्लॉग्ज यावरून ते दिसतेय. पण बंगाली लोकांचा भाषाभिमान याविषयी एक चांगला लेख येथे वाचला. मला तो आवडला आणि पटलाही.
http://marathi.webdunia.com/miscellaneous/special08/mumbai/0805/10/10805...
शाकाहार :- काही नवीन पैलु
प्रेषक मन ( शनी, ०५/१०/२००८ - ०५:२५) .मित्रहो,
जीवाची हत्या करणे वाइट,म्हणुन मांसाहार वाइट आणी म्हणुनच तो अयोग्य.शाकाहार तेव्हढा चांगला.
ह्यातील माझं काहीही म्हणणं नाही.
मी मानवी शरीर,प्रकृती ह्यासाठी स्वाभावीक अन्न कुठलं आहे, ते शोधतोय.
मुळात, बहुतांश सर्व सस्तन प्राणी आणी पक्षी ह्यांचे प्रामुख्याने शाकाहारी आणि मांसाहारी असे वर्गीकरण करता येते.
जे प्रामुख्याने वनस्पती खातात, ते शाकाहारी.
जे प्रामुख्याने इतर वनस्पतींशिवाय इतर सजीव(प्राणी,पक्षी )भक्ष्य म्हणुन खातात(स्वजातीतील् सुद्धा) ते मांसाहारी.
माझे काही तर्क, निरिक्षण आणि वाचनातील् काही भागानुसार मानवी शरीरा बद्दल हे विचारः-
१.एकाच प्रवर्गातील किंवा परीवारातील(स्पेसीज् किंवा फ्यामिली) प्राण्यांचा आहार समान/मिळताजुळता/साम्य असलेला असतो.
जसे घोडा आणि झेब्रा हे एकाच प्रवर्गातील प्राणी.
त्यांच्या शरीरात विलक्षण साम्य आहे.म्हणुन त्यांच्या आहारातही साम्य आहे.
दोघेही हिरवळ चरतात,त्यावर् जगु शकतात.
आता डोळ्यासमोर चित्र आणा की मांजर् उंदीर् पकडते आहे.
दुसरे चित्रः- चित्ता किंवा वाघ ससा पकडत आहेत.
काही साम्य दिसलं? दुसर्या चित्रात उंदीर(भक्ष्य) मोठा झाला आणि बनला ससा
तसेच भक्षक ही मोठा झाला आणि मनी मावशी चा बनला वाघोबा.
बरोबर? कारण हे दिसत की वाघ/चित्ता आणि मनी माउ हे एकाच म्हणजे मार्जार प्रवर्गातील असल्याने त्यांच्या
आहारात हे साम्य आहे.
अगदि त्याच प्रमाणे माणुस हा "ग्रेटर एप्स" ह्या प्रवर्गात मोडतो.(प्रवर्ग नामातील् चु.भु.द्या.घ्या. बायो लॉजी सोडुन काही युगे उलटली आहेत. )
त्यांतील प्राणी कोण? तर् ओरँग उटांग,चिंपांझी,गोरिला वगैरे.
ह्यांचे मुख्य अन्न ते काय? तर् काही प्रमाणात् झाडपाला आणि उरवरीत फळे, काही प्रमाणात धान्य कण सुद्धा.
ह्यानुसार, मानवाचा आहार् काय हवा?
२.मांसाहारी प्राण्यांची शरीर रचना वैशिष्ट्य म्हणजे अति तीक्ष्ण दात जबड्याच्या समोरील भागात् असतात.(थोडेफार् ड्रॅक्युलासारखेच,भयावह) उदाहरणः- कुत्रा,वाघ,लांडगा.
येथे, अन्न तोडणे हे मुख्य उद्दिष्ट् आहे, चर्वण नव्हे.
याउलट,शाकाहारी प्राण्यांकडे सहसा अशा दातांचा अभाव असतो.
त्यांचे दात असतात प्रामुख्याने "चर्वण" करण्यासाठी.जात्याच्या दोन दगडात जसे धान्य रगडले जाते,
त्याच प्रकारे अन्न हे ह्या प्राण्यांच्या रुंद पृष्ठभाग असणार्या दातात "रगडले" जाते.
नेमके असेच दात मानवाला आहेत,ते म्हणजे त्याच्या दाढा.
(जबड्याच्या आकारमानानुसार्, सर्वाधिक भुभागावर् हे दात पसरलेले आहेत.)
ह्यानुसार, मानवाचा आहार् काय हवा?
३.शाकाहारी प्राणी "चावुन" खातो. मांसाहारी प्राणी चावतो कमी,"गिळतो" जास्त.
("अन्न रगडण्याची " पुरेशी व्यवस्था नसल्याने)ह्या चावुन खाण्यादरम्यान, धाकाहारी प्राण्याच्या आहारात पुरेशी "लाळ"
मिसळली जाते.मांसाहारी प्राण्यात ही प्रक्रिया तेव्हढ्या प्रमाणात होत नाही.(जवल् जवळ् नगण्य.)
माणसाच्या लाळेचे अन्नात मिसळण्याशी गुणोत्तर काढले,तर् ते शाकाहारी प्राण्यांच्या अगदी निकट जाते.
४.ऍपेंडिक्स् हे नाव बर्याच लोकांनी(जवळपास् आपण सर्वांनीच) ऐकले असावे.
काय असते हे ऍपेंडिक्स?
तो आहे मानवी शरीरातील एक हल्ली वापर होत नसलेला भाग.
तो हिरव्या वनस्पती खाणार्या प्राण्यात कार्यरत् असतो.
त्याचे कार्य हेच की:- हरित वनस्पतीतील सेल्युलोज चे पचन करुन त्यातुनही उर्जा मिळवणे.
मानवी शरीरात हा भाग् कार्यरत् नसल्याने हरित भाग उर्जेसाठी वापरता येत् नाही आणि मग विष्ठेतुन बाहेर् टाकला जातो.
पण ह्या अवयवाची उपस्थिती हेच सुचित करते की मानवी शरीर तुर्तास शाकाहारास जवळचे आहे.
शाकाहारच ते प्रमुख्याने नीट पचवु शकते.
५.सहज प्रवृत्ती:-
एका (पाश्चात्त्य)विश्लेषकाचे निरिक्षण आहे ते असे........
तुम्ही एका नुकत्याच थोड्याशा मोठ्या झालेल्या वाघाच्या भुकेल्या बछड्यासमोर किंवा मांजरीच्या पिल्लासमोर एक
सफरचंद ठेवा आणि ठेवा एक छोटेसे जिवंत कोंबडीचे पिल्लु.
नैसर्गिक बुद्धिनुसार्, बछडे त्या पिलाला (भक्ष्य म्हणुन) मारुन खाइल, व सफरचंदाशी खेळत बसेल्.
आता तसेच सफरचंद आणि जिवंत कोंबडीचे पिल्लु एका निरागस , भुकेल्या ,(माणसाच्या)बालकाच्या समोर ठेवा.
बालक ते सफरचंद खाउन टाकेल आणि त्या पिलाशी खेळण्यात मग्न होइल.
बछडे सफरचंद् खायचा विचारही करणार् नाही.
बालक त्या पिलाला मारुन मग खाण्याचा विचारही करणार नाही.
ह्याचे कारण?नैसर्गिक वृत्ती,नैसर्गिक जाणीव किंवा उपजत् ज्ञान म्हणा हवं तर.
मग ह्या सगळ्या गोष्टी बर्याचशा हेच सुचवतात की शारिरिक दृष्ट्या मानवाला प्रामुख्याने
शाकाहार हाच सुटेबल् ठरतो.
तूम्हाला काय वाटतं?
वरील निरिक्षण,तर्क् आणि निष्कर्ष योग्य दिशेने जाताहेत, की त्यात कुठे काही विसंगती,तर्क् दोष आहे?
Close encounters of the third kind (एक पद्यकथा)
प्रेषक अरुण मनोहर ( शुक्र, ०५/०९/२००८ - १६:४१) .रात्री अचानक झोप उडाली
होती प्रखर झोतात खोली
होते काय नाही समजले
शुभ्र किरणांनी घट्ट बांधले
सरसर नेले वरती ओढून
दिले एका कक्षात टाकून
बघतो अघटीत काय जाहले
सभोवती बहु लोकची दिसले
धावलो बाजुला माणूस पाहुन
विचारण्या कोठे आलो आपण
नव्ह्ती भींत तरी अडकलो
त्याच्यापाशी नाही पोहोचलो
विचारले ओरडून मी त्याला
कसला आहे विचीत्र मामला
बहुदा त्याने नाही एकले
म्हणून मी निरखूनी पाहिले
खुर्चीवरती होता बसला
प्रकाश रज्जुने बांधला
हात दोन्ही उंचावलेले
दंडामधुनी रक्त खेचले
घाबरून मी पाही सगळे
चारी दिशा मानव पसरले
कोणी धावत्या पट्ट्यावरती
कोणी होते उलट लटकती
बाब अचानक कळली सारी
प्रयोगशाळा होती न्यारी
जाणण्या संपूर्ण मानुष
होते प्रयोग सुरू अमानुष
माझे काय? घाम फुटला
प्रश्न लगेच तो ही सुटला
खेचून बसवले खुर्चीवरती
टोप आवळला डोक्यावरती
मी ओरडलो सोडा मजला
मस्तकात आवाज उमटला
नको घाबरू देऊ सोडून
प्रयोगास आधी संपवुन
काय प्रयोग, का धरले मजला?
विचारले अदॄष्य जेलरला
त्याच क्षणी माथ्यात सणक
आवाजे फटकारला चाबुक
हातपाय ते कसे चालती
तुझ्या मेंदुच्या आद्न्येवरती
जाणल्यावरी सोडू तुजला
उपयोगही नाही आम्हाला
अमानुषांनो सोडा मजला
मी आहे मानव एक भला
नाही बांधील ह्या प्रयोगाला
नाही हा अधीकार तुम्हाला
करता असले क्रोधित ताडन
मनात बोले कुणी अमानव
मार्ग मानवानेच दाखवले
उंदरावरचे प्रयोग पाहिले
विद्न्यानाच्या प्रगती साठी
इकाटीनीच्या सुयशासाठी
क्षुद्र मानव उंदीर आमुचे
वापरले संकेतच तुमचे
करू पूर्ण अमुच्या कार्याला
पिंपात बुडवून टाकू तुम्हाला
इकाटीनीच्या तळघरात ढेर
पिंपात मेले ओल्या उंदीर
तळटीप "इकाटीनी" हजारो प्रकाशवर्षे दूरवरून आलेली जमात.
राजू परूळेकरांची मतं
प्रेषक रम्या ( गुरू, ०५/०८/२००८ - १७:२०) .राजू परूळेकरांचा लोकप्रभामधील लेख वाचून फार बरं वाटलं.
पण राजू परूळेकरांचा या विषयावरील हा एकमेव लेख नाही असं लक्षात आलं. राजू परुळेकरांनी एक वर्षापुर्वी हीच भूमिका मांडली होती.
हे लेख मिपाच्या वाचकांपर्यंत पोहोचावेत असं वाटलं.
या लेखांचे दुवे खालील प्रमाणे.
http://www.loksatta.com/lokprabha/20070216/good.htm
http://www.loksatta.com/lokprabha/20070323/good.htm
पण तात्या एकाच प्रकारचे लिखाण म्हणून हे उडवू नयेत ही विनंती. 
संयुक्त महाराष्ट्र निर्मितीत अमराठी योगदान
प्रेषक अजय ( बुध, ०५/०७/२००८ - १९:१८) .राज ठाकरेंनी मराठीचा कैवार घेऊन शिवाजी पार्कवर केलेल्या भाषणानंतर, अनेक मराठी प्रेमी शब्दांचे फुलोरे आणि भावनांचे अंगार ठिकठिकाणी लाह्यांसारखे फुलवताहेत. अमराठी माणसांना परप्रांतिय म्हणून वेगळी ओळख (?) दिली जात आहे.
पण, मराठी भाषकांच्या संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी परप्रांतीय (आजच्या भाषेत) म्हणवल्या जाणाऱ्यांनीही सक्रीय सहभाग घेतला होता. आपापल्या परिने बलिदानही दिले होते. याची माहिती सकाळ या वृत्तपत्राच्या वेबसाईटवर वाचायला मिळाली.....
आजच्या मराठी-परप्रांतिय वादाच्या पार्श्वभूमीवर त्यातील संदर्भ नक्कीच महत्त्वाचे आहेत. आपणा सर्वांच्या विचार मंथनासाठी
http://www.esakal.com/esakal/05012008/Maha_DinB377984A0E.htm
(मिपा वर बाहेरील संकेतस्थळांचे दुवे देऊ नये, ही आदेशवजा सुचना असूनही त्याचा भंग करीत आहे. त्याबद्दल मनापासून दिलगिरी. आजच्या संदर्भात ते महत्त्वाचे असल्यामुळे सर्वांनी वाचावे असे वाटते...... म्हणून)
पुरोगामी!(एक छोटिशी गोष्ट)
प्रेषक मन ( बुध, ०५/०७/२००८ - ०५:०९) ."आई-बाबा फारच मागं लागले आहेत.रोज रोज मागे लागुन नवीन नवीन स्थळं दाखवतात.
साला लग्न मला करायचय्,पण घाइ ह्यांनाच आहे. मी ही ह्यांच्या दबावाला बळी पडलो तर नावाचा सुधीर साठे नाही .
आपण आपल्या मर्जीनच पोरगी पाहणार.
साला रोज रोज तिथुन इतक्या लांबुन भारतातुन फोन करतात आणि विषय काय्,तर "काय ठरवलस्?कधी पहायची?"
छ्या. ह्यांचा फोन असा खाली ठेवला नाही ,तोच लक्ष लॅपटॉपच्या
(चल संगणक्=लॅपटॉप?) स्क्रीन कडे(स्क्रीन=पडदा?) गेलं. फुकटात ढीगभर साय मिळाल्यावर एखाद्या बोक्याला होइल,
तशा आनंदाने येक आवंढा गिळुन,मोठ्ठे डोळे करुन बसलो चटिंगला.
" सुधीर वैतागुन सांगत होता.
पण चेहर्यावरचे भाव आता जरा छान झाले. तो म्हणला...
" ती हां तीच स्पृहा. वर्ग सखी.,राष्ट्रिय पातळीवर ऍथलीट म्हणुन मान्यता पावलेली.
वर्गात मुलिंशी बोलायला कधिच फारसं जमलं नाही.
पण तिचं मोकळं ढाकळं वागणं,सहज मिक्स्-अप होणं जाम आवडायचं.
तिचे बर्याचदा वर्तमान पत्रातुन बक्षिसं घेतानाचे वगैरे फोटो येत. तेही छान वाटायचे.
शिवाय कुणशिही बोलताना ती लागलिच बोलतं व्हायची, बोलतं कराय्ची.
एखादा जोक आवडला तर पटकन टाळीहि द्याय्ची.(म्हणुन मी जोक मारायचे अनेक अयशस्वी प्रयत्न पण केले.)
आता नाही म्हटलं तरी ,तिच्या स्वभावानुसार मिळता जुळता जॉब मिळाला होता.एच आर चा,अगदि नुकतीच ऑफर आली होती.
आणि खेळणही अजुन चालुच होतं.
चॅटिंगलाही मला तिचा हाच स्वभाव आवडायचा.वेब कॅम तर सगळेच वापरतात्,पण ही अगदि मॉडेर्न स्टाइल मध्ये घरी
ज्या ड्रेस वर असायची,त्यावरच चॅटींग करायची.उगिच "काकु"बाईं सारखं नाही.
सदैव आपली ती बर्म्युडा येक असायची अंगावर आणि स्लीव लेस पांढरा शुभ्र टी-शर्ट.
आणी अंग काठी निव्वळ शिड शिडित्,ऍथलीटची,स्वभावात मोकळेपणा.तजेलदार सावळा रंग.
मी तर भारतीय "शारापोवा"च म्हणेन तिला ,तिच्या टवटवीत पणावरुन.
बर्रेच दिवस अशा ऑन लाइन गप्पा चालायच्या.
अगदि "गांगुली म्हातारा झालाय की द्रवीड " इथ पासुन ते अगदि कॉलेज मधल्या दिवसांबद्दल.
किंचित खेचाखेची चालायची आणि थोडाफार चावटपणा आणि चावटगप्पा सुद्धा.
वाटलं "अहा..काय सही आहे ही जोडीदार म्हणुन्.किती मोकळी आहे. हिच्या सोबत राहणं म्हंजे दिवस भर गप्पा,मन मोकळेपणा
आणी शिवाय कुठलीही फालतु बंधनं नाहित. " ही मिळाली तर काय होइल्,मी स्वप्नातच इमले बांधुन पाहिले,
त्या "काकु" स्टाइल वाल्या नवर्या सोबत फिरतानाही हातात हात घालायला घाबरतात रस्त्यावर.ही असेल तर
गळ्यात गळे घालुन हिंडेन.पण आता कुणास ठाउक आई-बाबा कुठलं लचांड पाहणारेत माझ्यासाठी."
एवढ्यात आईचा फोन आला.तिकडुन आवाजः- "अरे ऐकतोस का ,मुलगी मिळाली रे त्या शादी डॉट कॉम वर तुला हवी तशी.
फोटोत सुंदर दिसतेय, कालच बोलले तिच्याशी . तुझ्याच कॉलेजची दिसतीय. नॅशनल ऍथलीट,फोटो आणि माहिती मेल केलिये तुला.
आता तु असं कर की.."
आई एवढ बोलेपर्यंत मोबाइल झाला डिसचार्ज्,फोन झाला कट.
पण पण....
"नॅशनल ऍथलीट्,माझ्याच कॉलेजची...म्हण्जे..स्पृहा तर नै?"
डोक्यात शंका आली आणि लगेच जाउन मेल पाहिला.
तो...तोच फोटो.स्पृहाच ती.
म्हणजे आता हिच्या सोबत जन्मभर रहाय्ला मिळणार तर.
आणि तीनं मग सांगितलं का नाही चॅट वर आपल्याला की आपलच नाव तिला""स्थळ" म्हणुन आलय्,
गम्मत करायची,फिरकी घ्यायची म्हणुन असं केल तिनं?
"
पण ..पण ..एक मिनिट्..हे काय होतय?
मी तिला होकार कसा देइन?
हे हे सगळं ठरायच्या किती तरी आधि पासुन ही अशी बाह्या आणि तंगड्या उघड्या सोडुन बसते वेब कॅम समोर.
म्हण्जे, ही शहाणी,ज्याच्याशी फारशी कॉलेजातील धड पुर्ण ओळखही नाही त्याच्या समोर एवढी मोकळी राहते.
मग प्रत्यक्ष तिला भेटणार्या लोकांसमोर कशी असेल?
छे ..हे असलं मला मुळीच आवडणार नाही माझ्या बायकोनं केलेलं.
अस कुणाशीही एकदम सलगीनं वागलेलं.
बायको आहे, तर बायको सारखं वागावं उगिच डोक्यावर बसु नये.
मी देइन ना मोकळीक, पण एका मर्यादेतच.अस दुसर्या पुरुषांशी इतकं कस बोलवतं हिला...
छ्या...
असल्या कॅरेक्टरची बायको नकोच आपल्याला.
त्या पेक्षा नकारच कळवतो तिला.
"
सुधीर "नकार" कळवायला जाउ लागला फोन कडे.
त्याचे (स्वतःला पुरोगामी म्हणवणार्याचे)हे " सु विचार " ऐकुन मी तसाही थोडासा चकित झालो होतो.
(माझं आश्चर्य आवरुन ) त्याला मी म्हटलं "स्थळ चांगल आहे -नाही मी काहिच म्हणणार नाही.ते तुलाच माहितिए.
पण एवढं नक्की,की तु नकार दिलास तरीही तुझ्यापेक्षा कैक पट चांगली स्थळं तिला मिळतील."
तु आता फक्त ह्या विषयाबद्दल मौन धारण केलस तरी हे लग्न होणार नाही.एखाद -दोन दिवसात होकार येइलच इतर
ठिकाणंहुन तिला,मग चालेल का तुला?"
सुटकेचा नि: श्वास टाकत सुधीर खाली बसला . "मला लग्न नाहिच करायचं असल्या कॅरेक्टर वालिशी"
असं काहिसं पुट्पुट्ला आणि पुन्हा हावरट नजरेनं चॅटींग ची विंडो मोठी करुन "मोकळ्या" विचारांच्या
गप्पा मारु लागला,
इतरांच्या होणार्या बायकांशी!!
त्यांच्या मोकळेपणा बद्दल तो फारच आग्रही होता.!!!
मत
प्रेषक कालिन्दी ( बुध, ०५/०७/२००८ - ०१:१४) .नमस्कार मन्ड्ळी,
मी इथे नविन आहे. मराठीत लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे.
मी या पूर्वीही मीपा वाचत होते. पण सद्स्य नव्हते.
मीपा छान आहे. त्यात वाद्च नाही. पण एक गोष्ट वाचताना लक्ष्क्षात आली कि इथे नवीन पेकी कोणी प्रतिक्रिया टाकली की जुने लोक ती सरळ उडवून लावतात किन्वा सरळ ignore करतात . आणी जुन्याना मात्र support kartat.
त्यामुळे इथे लिखाण करु नये अशी भिती वाटत रहाते.
