हे ठिकाण

कोल्हापुर

रोजच्या कामातून मित्रानो ,थोडा वेळ काढूया
एखाद्या वीकेंड ला कोल्हापूर ला जाऊया

रंकाळ्यावरचा मस्त वेळ
एकदम झक्कास टी टाइम भेळ
पुन्हा एकदा खाऊया
एखाद्या वीकेंड ला कोल्हापूर ला जाऊया

युनिवर्सिटीताली सुखद संध्याकाळ
पन्हाळ्यातली प्रसन्न सकाळ
पुन्हा एकदा पाहूया
एखाद्या वीकेंड ला कोल्हापूर ला जाऊया

मिसळेचा जेवढा झटका
माणुसकीची तेवढीच गोडी
पुन्हा एकदा चाखूया
एखाद्या वीकेंड ला कोल्हापूर ला जाऊया

कट्ट्यावरची मस्ती
खासबाग ची कुस्ती
पुन्हा एकदा खेळूया
एखाद्या वीकेंड ला कोल्हापूर ला जाऊया
-के गा

रेवती संपादकपदी विराजमान..

राम राम मिपाकरहो,

कळवण्यास आनंद वाटतो की आपल्याच एक मिपाकर सभासद आणि हितचिंतक सौ रेवती यांना मिपाचे संपादक बहाल करण्याचे आम्ही ठरवले आहे व तसे ते केले आहे..

मिपावरील इतर संपादकांप्रमाणेच रेवती यादेखील आपली संपादकीय जिम्मेदारी व्यवस्थित सांभाळतील असा आम्हाला विश्वास आहे.

अर्थात, आमच्या एखाद्-दोन देवगडी शेलक्या शिव्याकडे त्यांनी इतर संपादकांप्रमाणेच दुर्लक्ष करावे, इतकीच लिबर्टी आम्हाला मिपाचे मालक म्हणून हवी आहे. ती त्यांनी द्यावी अशी नम्र विनंती..Smile

बाकी संपादकीय कामात आमची ढवळाढवळ नाही व नसेल..

त्याचप्रमाणे मिपाच्या संपादक मंडळात अन्यही काही कमीअधिक फेरफार करण्याचे आम्ही ठरवले आहे व ते लौकरच करू आणि संपादकांची अद्ययावत यादी मिपाकरांकरता येथे सादर करू..

असो,

रेवती यांना मिपाचे संपादकपद पूर्ण जबाबदारीने सांभाळण्याकरता अनेकानेक शुभेच्छा..

तात्या.

शिवसेनेचा गुन्हा काय?

सर्वप्रथम मी येथे हे नमुद करु इच्छितो कि मी शिवसेना ह्या पक्षाचा समर्थक/सदस्य वगैरे नाहि.
गेले काहि दिवस हवतर काहि महिनेच म्हणा,शिवसेनेवर चहुबाजुने हल्ले होताना दिसतात.
प्रसारमाध्यमे त्यातहि हिंदि/इंग्रजी माध्यमे,इतर राजकीय पक्ष,काहि मराठी वृत्तपत्रे,आयबीन नेटवर्कच्या सर्व वृत्तवाहिन्या
वगैरे मंडळि शिवसेनेच्या हात धुवुन पाठिशी लागल्याचे चित्र दिसतेय.
मुद्दा महाराष्ट्राच्या विकासाचा असो,मुंबईतील मराठी माणसाचा असो,हिंदुत्वाचा असो वा मराठीचा असो ह्या सर्वाच्या अधोगतीला
शिवसेनाच जबाबदार आहे असा सुर ही मंडळि लावत असतात.
निखिल वागळे,हेमंत देसाई,राजदीप सरदेसाई,प्रताब आसबे,राजीव खांडेकर,राजु परुळेकर, कुमार केतकर ह्यांसारखी मंडळी अगदि इमान इतबारे
शिवसेनेला लक्ष करताना आढळतात.हिंदि मिडिया तर इतर काहि बातम्या देण्यासाठी नसतील तर शिवसेना वगैरे विषय काढून बसतात.
त्यातल्या त्यात आयबीएन नेटवर्कच्या वृत्तवाहिन्यांनी शिवसेनेला संपविण्याची सुपारीच घेतलीय की काय असा
संशय येतो.परवाच्या आयबिएन लोकमत वाहिनीवरील ग्रेट भेट ह्या कार्यक्रमात देखिल श्री.पुष्पा भावे ह्यांनि असाच सुर लावला होता.
अर्थात शिवसेनेच्या काहि चुका निश्चितच असल्या पाहिजेत परंतु महारष्ट्रातला कुठलाच पक्ष धुतलेल्या तांदळासारखा स्वच्छ नाहि हे वास्तवाचे भान ह्या मंडळींना
नसावे का?
गेल्या साठ वर्षात जेमतेम ५ वर्षेच सत्तेत असणा-या ह्या पक्षाने महाराष्ट्राचे असे काय घोडे मारले आहे की ह्या पक्षाला ह्या सर्व टिकेला तोंड द्यावे लागत आहे?
राहुल गांधी व शाहरुख खान ह्यांच्याबद्दल शिवसेनेने घेतलेल्या भुमिकेबद्दल आपल्याला काय वाटते हे देखील वाचायला आवडेल.

पहिला पाउस

पहिला पाउस .. शीघ्र कविता'

रिमझिम धून ...आभाळ भरुनं (मूळ कवीची माफी मागून )
आला गार वारा सरताना फाल्गुन

अशा एका सांजवेळी सरी ओसर ओसर
पावसाच्या थेम्बालाही मग फुटतो पाझर

थेंब थेंबाला मिळतो ,मग वारा मंद होतो
क्षणापुर्वीचा पाउस क्षणामध्ये बंद होतो...

कधी अक्राळ गर्जना कधी धरा चिंब चिंब
रस्त्यामध्ये मधोमध एक भिजणारा खांब

उना वारयासंगे मग पुन्हा प्रकाश प्रकाश
फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश (मूळ कवीची माफी मागून )

-के गा

MISALPAV CHAT

मागील काही दिवस मला लेखकांशी व्यक्तिगत बोलायचे आहे असे त्यांचा प्रतिक्रियेमध्ये दर्शवले असता, चुकीचा समज करून घेण्यात आला.
मला वाटत मिपा वरही ऑर्कुट प्रमाणे गप्पा करण्याची सोय असावी. कारण त्यामुळे लेखकाच्या लेखनाबद्दल आणखी जाणून घेता येते. त्याचा व्यक्तिमत्वाचा कानोसा घेता येतो. त्याची विचारसरणी कळते. आणि सर्वात महत्वाची गोष्ट तो लेख त्याच व्यक्ती ने लिहिला आहे कि नाही याची देखील प्रचीती येते, ह्याने नवोदित लेखकांना मदतच होईल असे मला तरी वाटते.
जर वाचक सहमत असतील तर नक्कीच प्रतिक्रिया द्याव्यात.

तात्या एक सुचवायचे आहे .
राग मानून घेऊ नका
बाकी संकेतस्थळांच्या तुलनेने आपला हस्तक्षेप संपादक म्हणून इथे जास्त असतो ह्याने लोकांना तुम्हाला बाकी काही काम धंधा नसावा,तुम्ही रिकामटेकडे आहात असे वाटते, जे खरे नाही हे मला माहित आहे आणि आपल्याच संकेतस्थळावर आपलेच वेळोवेळी वस्त्रहरण केले जाते [मी ही चुकून केले होते] . जरा काळजी घ्या.

MANGESH PAWASKAR

अस्वच्छते बद्दल चे लेख मिपावर धडाक्यात प्रसिद्ध होत आहेत त्यात आणखी एकाची भर........

we ve 6.300 garbage collection points in the mumbai and its suburbs. as per ma knowledge ...
all we Citizens, committees in the suburbs are all rooting for better garbage disposal systems in mumbai .
now what?

आज काल कच-या बद्दलचे व अस्वच्छते बद्दल चे लेख मिपावर धडाक्यात प्रसिद्ध होत आहेत त्यात आणखी एकाची भर.........

सत्यस्तिथी सांगतो मी म्हणायला तर मुंबई मध्ये राहतो ( maximum tax payers city ). व वेळेत आपला कर भरतो.
पण सुविधेच्या नावाखाली ह्या गैरसोयी.......

कचरा - मी रहात असलेल्या सोसायटीच्या गेटवरच कच-याचा भला मोठा ढीग आज काल दिसू लागला आहे. यासंबंधी मी विचारणा केली असता मला डम्पिंग ग्राउंड नसल्याची माहिती मिळाली. खर तर त्या जागेवर टोलेजंग इमारती बांधण्याची घाई बिल्डर्सना व अनुषंगाने त्याची परवानगी देण्याची घाई महानगरपालिकेला झाली आहे.
काल रात्री अरेना मधून घरी येत असताना. माझी कार सोसायटीच्या गेट जवळ अडवण्यात आली.
म्हणाले मनसे चे आंदोलन चालू आहे. व तो सगळा कचरा मेन सोसायटी च्या रस्त्यावरच अंथरण्यात आला. नंतर आमच्या बिल्डिंग मध्ये रहात असलेले झवेरी काकांच्या मध्यस्ती मुळे कुठे कार सोसायटीमध्ये येऊ शकली.
सांगायचा मुद्दा हा की मुंबईकर सर्वात जास्त रेवेन्यु मिळवून देतो, जो regular tax payer आहे त्याला सुविधा नाहीत. बाकी परत परत युपी बिहारींचे चंदन उगाळीत बसण्यात मलाही स्वारस्य नाही.

आताच हे लिहिताना आमच्या बंधूंनी सांगितले की म न पा ने १६ करोड ची जागा डम्पिंग ग्राउंड म्हणून हस्तगत केली आहे, पण त्याला तिथल्या राहणाऱ्या महापौरांचा विरोध आहे. आता हे डम्पिंग ग्राउंड साकारण्यास किती वेळ जाईल देव जाणे.

आम्ही काय करणार ??

मंगेश पावसकर
mgccmangeshpaw@gmail.com

आई आहे तर मी आहे.........

दुर्गे दुर्घटभारी तुझवीण संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी....

स्त्री ची क्षत्रू स्त्रीच असते हे खरे असले तरी स्त्री शृंगार पुरुषासाठीच करते, म्हणून त्यावर आक्षेप घेणे चुकीचे आहे, आमच्या वोर्क अरेना मध्येही अशाच सुंदर क्याजुअल वस्त्रे परिधान केलेल्या ललना (फ्रेंड्स ) येतात आम्ही त्यांचाशी फ्लर्ट ही करतो. पण मुक्तपणे, स्वैर, त्यानाही दुखावत नाही. परत कॅफेटेरिया मध्ये एकत्रच लंच घेतो. दोन स्त्रियांचा भांडणात त्यांचा बहुतेक वेळा विषय स्वतःचा पुरूषच असतो. आई असेल तर मुलासाठी, बहिण असेल तर भावासाठी, प्रेयसी असेल तर प्रियकरासाठी, पत्नी असेल तर पतीसाठी एकंदरीत स्त्री हि दिव्यासाठी (पुरुष ) स्वतःला अखंड जाळून घेणारी वातच म्हणावी लागेल.
आरक्षणासारखी चिंधी स्त्रियांपुढे ढकलून राजनीती तर चालली आहेच पण खाजगी नोकरदार वर्गात स्त्रियांचे प्रमाण लक्षात घेता व त्यांची कर्तुत्व क्षमता पाहून त्यांना त्याची गरज नाही असे दिसून येते. माझ्या कुठल्याही योग्य पावलाला माझ्या आईचा खंबीर पाठींबा असतो म्हणून मला माझ्या कार्यावर आत्मविश्वास असतो.
थोडक्यात काय आई आहे तर मी आहे.

दुर्गे दुर्घटभारी तुझवीण संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी....

वादाचा रबर..............

अनेक वाचकांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे वादाचा रबर हा ओढल्याने बळावतो ही नक्कीच खरी गोष्ट आहे. वाचकांचा आधारामुळे व काल सकाळी तात्यांबरोबर झालेल्या सामंजस्यपूर्ण वार्तालापामुळे हा चिघळलेला वाद संपुष्टात आला आहे. मी माझे काव्य,व्यंग तसेच प्रसंग लेखन या पुढेही मिपावरच समर्पित करणार आहे.
अनेक गोष्टी बद्दल सल्लामसलत करत असताना दस्तुरखुद्द तात्यासाहेबांनी लेखन करा वाचा व प्रतिक्रिया देत रहा व संपर्कात राहा असे प्रेमाने सांगितले, अगदी मित्रासारखे अर्थात त्यांचा दैनंदिन कारभाराची मला जाणीव होतीच. दिवसागणिक शेकडो लेखांची पडताळणी, त्याचा प्रतिक्रिया व त्याचे मेंटेनेंस करणे म्हणजे खायचे काम नाही. या क्षेत्रात मी असल्या मुळे ते मी समजू शकलो.
माझ्या लेखनामुळे कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची नक्कीच काळजी घेईन. तरीही मला आपल्या मौलिक प्रतिक्रिया नेहमीच मिळतील अशी आशा बाळगतो, तात्यासाहेब व मिपा सदस्यांचा पाठींबा सदैव राहू दे. हिच प्रार्थना.

मंगेश पावसकर

(नमस्कार वाचकहो, आणि श्री. मनमोहन सिंग)

नमस्कार वाचकहो, आणि श्री. मनमोहन सिंग

मागील लेखनात वाचकांस आधीच अवगत केल्याप्रमाणे आपल्या महान देशातल्या रस्त्यांवर रहदारी सुरळीत चालवण्याच्या नावाखाली हुकूमशाही चालू आहे. मी गाडी चालवत असताना माझ्या पुढच्या गाडीला हिरवा सिग्नल होता व तिला तसेच पुढे जाऊ देण्यात आले. मात्र मी तिथपर्यंत पोचताच दुष्ट सिग्नल लाल झाला. मी या माझ्याविरुद्धच्या कूटनीतीला न जुमानता तसाच पुढे गेलो तर पोलिसांनी मला पकडले व दंड केला. या अत्याचाराबद्दल मी रस्तोरस्ती बोंब ठोकल्याबद्दल काही नागरिकांनीही त्यांचे कान किटल्याची तक्रार केली. मी पोलिसांकडे या अन्यायाविरुद्ध तक्रार केली तर मला तुरुंगात टाकण्याची धमकी देण्यात आली आहे.

माझ्या मागील अर्जावर हि प्रतिक्रिया दिली ---

पण मला वाटत कि काही माणस विशेषत: आपले पोलिस अधिकाराचा गैर फायदा घेऊ पाहत आहेत.

"वाहतुकीचे नियम पाळणे हा इथला कायदा आहे"

असे बजावण्यात आले.

अगदी खरे! नेहमी असेच बजावण्यात येईल..

हि यांची भाषा !!

हीच भाषा यापुढेही राहील!

मला क्षमा असावी पण पोलिसांनी माझी माफी मागितल्या खेरीज

शहराचे पोलिस/नगरसेवक/मंत्री कुणाचीही माफी मागणे लागत नाहीत व कुणालाही कुठलेही स्पष्टीकरण देणे लागत नाहीत/ देणार नाहीत!

मी या पुढे सायकल चालवण्याशिवाय कुठचेही वाहन या शहरात चालवणार नाही.

इथे काय चालवायचे आणि काय नाही, ही पूर्णत: आपली मर्जी आहे!

व माझ्यावरचा अन्याय मोठ्ठ्याने कर्ण्यावर ओरडून जनतेला सांगेन.

पोलिस/नगरसेवक/मंत्री यांच्या विषयी आपले काहीही म्हणणे असल्यास ते कृपया योग्य मार्गाने मांडावे. जमल्यास उत्तर दिले जाईल..!

जर अजून दंगामस्ती करून लोकांना आवाज करून उपद्रव केलात तर, आवश्यक वाटल्यास तुमचे लायसन्स जप्त होईल अगर तुम्हाला तुरुंगात टाकले जाईल याची नोंद घ्यावी..
फौजदार

»

असो
अशा कुटनीती व अरेरावीच्या अशा असभ्य भाषेला मी यत्किंचित ही भीक घालीत नाही आणि घालणार ही नाही.
हा देश म्हणजे माझी आई आहे, आणि तो देश, त्यातील शहरं व रस्ते यावर जसा त्यांचा तसाच माझा हि हक्क आहे.
तुम्ही माझे लायसन्स जप्त केले तर मी काय गाडी चालवणे सोडून देईन का?................................................ मी दुस-या शहरात जाऊन बेदरकारपणे गाड्या हाकेन.
हे यांचे माझ्या बरोबरचे वर्तन मी लोकांच्या समोर आणणे हेच मी या वेळी करीत आहे. या साठी माझे लायसन रद्द करीत असतील तर करावे, खुशाल करावे.
तरीही माननीय श्री मनमोहन सिंग साहेब यांनी मला पुन्हा मायेने मार्गदर्शन करावे अशी विनंती मी त्यांचा वयाला मान देऊन करीत आहे. मी माझ्या मोठ्यान बरोबर सल्लामसलत करण्यास व यांची मर्जी संपाद्ण्यास सदैव तयार आहे. मी वाट पहात आहे ती तुमच्या सकारात्मक प्रतिक्रियेची
........
तुम्ही उद्धट ठरवलेला
ड्रंकेश गाडीचालनकर

संकेतस्थळे आणि खाजगी मालकी - एक मुक्तविचार

सध्या दुसर्‍या एका धाग्याच्या निमित्ताने (पुन्हा) हा प्रश्न ऐरणीवर आला आहे त्यासंदर्भाने बर्‍याच दिवसांपासून मनात आलेले विचार शब्दबद्ध करतोय, सगळ्यांचा वैचरिक सहभाग अपेक्षित आहे, कृपया वैयक्तिक टीकेऐवजी मुद्द्यांना प्राधान्य देणे.

माणूस संकेतस्थळ का काढतो ? ह्या प्रश्नाचे उत्तर मला आधी वाटलं - माणसाची आदिम प्रेरणा "मला काही सांगायचय" ही असावी. पण नंतर थोडा विचार केला असता असे लक्षात आले की 'मला जे सांगायचय' त्यासाठी इतर 'फुकट' अनेक पर्याय उपलब्ध आहेत जसे की ब्लॉग, दुसरी संकेतस्थळे. मग स्वतःचे संकेतस्थळ असावे ही प्रेरणा नेमकी कशामुळे ?
आत्तापर्यंतचा इतिहास बघितला तर संकेतस्थळांची 'वृत्तपत्रांशी' तुलना करता येइल.
१) 'स्वतःच्या विचारांचा (अनिर्बंध वा मुक्त) प्रसार' किंवा
२) 'दुसर्‍यांच्या विचारांचा विरोध' ह्यासाठी स्वतःचे वृत्तपत्र असावे ह्याच विचारांनी अनेकांनी वृत्तपत्रे चालू केली किंवा विकत घेतली. पुढे त्यात जाहिराती हा मुद्दाही समाविष्ट झाला पण तसे बघितले तर तोसुद्धा मुद्दा क्र. १) मधे बसू शकेल. हाच नियम संकेतस्थळांनाही लागू पडतो.

हा विचार कॄतीत आणण्यामागच्या प्रेरणाही वेगवेगळ्या असू शकतात. इतर संकेतस्थळांच्या धोरणांविषयी, तिथल्या सदस्यांविषयी, सुविधांविषयी, विषयांबद्दल - नापसंती ही एक प्रमुख प्रेरणा. त्याचबरोबर 'ही गोष्ट तुम्ही करता त्यापेक्षा (वेगळी, चांगली) करता येउ शकेल हे दाखवून देण्याची जिद्द किंवा नुसतीच 'स्वयं शिक्षणाची आच' (अर्थात ही फार दुर्मिळ). पण कारण कुठलेही असूदे, संकेतस्थळ उभारण्या / चालवण्या साठी पदरमोड करण्याची तयारी, (तांत्रिक किंवा समविचारी) सहकार्‍यांची जमवाजमव, सुरुवातीला तरी एक निश्चित धोरण वा उद्दिष्ट अशा अनेक गोष्टींची गरज असते.

आता संकेतस्थळ चालू केले आहेच तर मुख्यत्वे 'वाचकवर्ग' आणि नंतर सहभागी 'लेखक वर्ग' हवाच. मग ह्या दोन्ही वर्गांना त्यांचे संकेतस्थळावरचे वावरणे सोपे व्हावे म्हणून अधिकाधिक सुविधा पुरविणे - प्रसंगी (पैशाची, वेळाची, ज्ञानाची) पदरमोड करुन. ह्यातून वाचक / लेखक वाढीस लागले की संकेतस्थळाची 'क्षमता' गरजेप्रमाणे वाढवणे त्यासाठी परत पदरमोड. असे करुन संकेतस्थळ भरभराटीस येते.

आता 'असतिल शिते तेथे जमतिल भुते' - किंवा 'कट्ट्यावर जमणारे कट्टेकरी' किंवा 'विचारांची देवाण घेवाण करु इच्छिणारी मंडळी' - कुठल्याही कारणाने का असेना मंडळी जमणारच - आणि ती जमावितच असाच चालकांचा उद्देश तेव्हा हे योग्यच. पण जसजशी लोकं वाढायला लागतात तेव्हाच 'दुसर्‍या' विचारांची लोक, मत्सरग्रस्त, निव्वळ मजा बघणारे, बाजूने भांडणारे, भांडण लावणारे असे अनेक लोक गोळा होतात. हेही साहजिकच.

आणि तेव्हाच खरी कसोटी लागते चालकांची. ही खाजगी मालमत्ता खरीच, त्याबाबत दुमत होण्याचे कोणाचे काहीच कारण नाही. आणि खाजगी पणाबरोबरच तो खाजगीपणा जपण्याचे काही नियमही. नियम पाळण्याची जबाबदारी सदस्यांची, ते नियम बनवून, उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी चालकांची आणि नियमांचे पालन करवून घेण्याची जबाबदारी प्रशासकांची/संपादकांची. आता ह्यात पारदर्शकता नसली, समन्वयाचा अभाव असला किंवा एकाला एक न्याय आणि दुसर्‍याला दुसराच असे प्रकार असले की गडबड होणारच.

मालकी खाजगी - त्यामुळे नियम ठरविण्याचे स्वातंत्र्यही आणि ते बदलण्याचेही. त्याचमुळे "चपला", "आहे हे असे आहे" असे प्रतिसाद येणे अगदी साहजिकच. तसच वेळोवेळी स्पष्ट केल्याप्रमाणे 'चालेल तेवढे दिवस चालेल नाहीतर बंद करुन टाकीन तिच्यामायला" हेही परिचयाचे. पण ह्याच वेळी "मिपाकरांमुळेच मिपा आहे..सर्व मिपाकरांचे मनापासून आभार.." अशा प्रतिसादांमुळे गोंधळ उडतो.

इथले मालक पूर्वीपासून दुसर्‍या एका संकेतस्थळाचे नियमित, चांगले लिखाणकर्ते सदस्य, स्वत्: संगीततज्ज्ञ म्हणता येईल इथपर्यंत शास्त्रीय संगितात गती असलेले, बर्‍याच वेळेला दिसलेली उत्तम विनोद बुद्धी शिवाय व्यक्तिचित्रातून दिसणारी निरिक्षणशक्ती आणि वेगवेगळ्या कट्ट्यांतून कानावर पडल्याप्रमाणे माणस जोडण्याची क्षमताही.
पूर्वोक्त संकेतस्थळांचे जाचक नियम न पटल्यामुळे बाहेर पडून जिद्दिने, पदरमोड करुन नविन संकेतस्थळाची उभारणी आणि ते नावारुपाला आणून दाखविण्याची कला, क्षमता अंगी.
अशा सर्व पार्श्वभूमीवर 'अशी परिस्थिती का यावी' हे माझ्या आकलनाबाहेरचे.
मालकांनी नुकतेच एका जाहिर कार्यक्रमात 'मिपाचे' प्रतिनिधित्त्व केले, माझ्या अल्प माहिती नुसार ते ह्या संकेतस्थळाचे प्रवर्तक आहेत म्हणूनच त्यांना सहभागी व्हायची संधी मिळाली (नुसते ब्लॉगलेखक म्हणून नव्हे) आणि त्याच बरोबर त्यांनी सदस्यांचे जाहिर आभारही मानले आहेत.

असे असताना, (हे) संकेतस्थळ काढण्यामागची पूर्वीची उद्दिष्ट्ये काय होती, त्यांच्यात काही बदल झाला आहे का? निर्माण केलेले संकेतस्थळ त्या उद्दिष्ट्यपूर्तीच्या मार्गावर आहे का? नसेल तर कसे आणता येईल, प्रशासानात पारदर्शकतपाकशी आणता / वाढविता येईल, वगैरे वगैरे बाबींचा उहापोह करण्यासाठी हा लेख प्रपंच.


(टीपः मी नियमित लेखक नसलो तरी नियमित वाचक आहे आणि हा लेख संस्थळाचे बदलते स्वरुप जाणवले म्हणून लिहिला आहे, उडविला गेला, संपादित झाला तरी हरकत नाही, मला माझी जी मते आहेत ती व्यक्त कराविशी वाटली म्हणून केली एवढेच...)