हे ठिकाण

आई आहे तर मी आहे.........

दुर्गे दुर्घटभारी तुझवीण संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी....

स्त्री ची क्षत्रू स्त्रीच असते हे खरे असले तरी स्त्री शृंगार पुरुषासाठीच करते, म्हणून त्यावर आक्षेप घेणे चुकीचे आहे, आमच्या वोर्क अरेना मध्येही अशाच सुंदर क्याजुअल वस्त्रे परिधान केलेल्या ललना (फ्रेंड्स ) येतात आम्ही त्यांचाशी फ्लर्ट ही करतो. पण मुक्तपणे, स्वैर, त्यानाही दुखावत नाही. परत कॅफेटेरिया मध्ये एकत्रच लंच घेतो. दोन स्त्रियांचा भांडणात त्यांचा बहुतेक वेळा विषय स्वतःचा पुरूषच असतो. आई असेल तर मुलासाठी, बहिण असेल तर भावासाठी, प्रेयसी असेल तर प्रियकरासाठी, पत्नी असेल तर पतीसाठी एकंदरीत स्त्री हि दिव्यासाठी (पुरुष ) स्वतःला अखंड जाळून घेणारी वातच म्हणावी लागेल.
आरक्षणासारखी चिंधी स्त्रियांपुढे ढकलून राजनीती तर चालली आहेच पण खाजगी नोकरदार वर्गात स्त्रियांचे प्रमाण लक्षात घेता व त्यांची कर्तुत्व क्षमता पाहून त्यांना त्याची गरज नाही असे दिसून येते. माझ्या कुठल्याही योग्य पावलाला माझ्या आईचा खंबीर पाठींबा असतो म्हणून मला माझ्या कार्यावर आत्मविश्वास असतो.
थोडक्यात काय आई आहे तर मी आहे.

दुर्गे दुर्घटभारी तुझवीण संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी....

वादाचा रबर..............

अनेक वाचकांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे वादाचा रबर हा ओढल्याने बळावतो ही नक्कीच खरी गोष्ट आहे. वाचकांचा आधारामुळे व काल सकाळी तात्यांबरोबर झालेल्या सामंजस्यपूर्ण वार्तालापामुळे हा चिघळलेला वाद संपुष्टात आला आहे. मी माझे काव्य,व्यंग तसेच प्रसंग लेखन या पुढेही मिपावरच समर्पित करणार आहे.
अनेक गोष्टी बद्दल सल्लामसलत करत असताना दस्तुरखुद्द तात्यासाहेबांनी लेखन करा वाचा व प्रतिक्रिया देत रहा व संपर्कात राहा असे प्रेमाने सांगितले, अगदी मित्रासारखे अर्थात त्यांचा दैनंदिन कारभाराची मला जाणीव होतीच. दिवसागणिक शेकडो लेखांची पडताळणी, त्याचा प्रतिक्रिया व त्याचे मेंटेनेंस करणे म्हणजे खायचे काम नाही. या क्षेत्रात मी असल्या मुळे ते मी समजू शकलो.
माझ्या लेखनामुळे कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची नक्कीच काळजी घेईन. तरीही मला आपल्या मौलिक प्रतिक्रिया नेहमीच मिळतील अशी आशा बाळगतो, तात्यासाहेब व मिपा सदस्यांचा पाठींबा सदैव राहू दे. हिच प्रार्थना.

मंगेश पावसकर

(नमस्कार वाचकहो, आणि श्री. मनमोहन सिंग)

नमस्कार वाचकहो, आणि श्री. मनमोहन सिंग

मागील लेखनात वाचकांस आधीच अवगत केल्याप्रमाणे आपल्या महान देशातल्या रस्त्यांवर रहदारी सुरळीत चालवण्याच्या नावाखाली हुकूमशाही चालू आहे. मी गाडी चालवत असताना माझ्या पुढच्या गाडीला हिरवा सिग्नल होता व तिला तसेच पुढे जाऊ देण्यात आले. मात्र मी तिथपर्यंत पोचताच दुष्ट सिग्नल लाल झाला. मी या माझ्याविरुद्धच्या कूटनीतीला न जुमानता तसाच पुढे गेलो तर पोलिसांनी मला पकडले व दंड केला. या अत्याचाराबद्दल मी रस्तोरस्ती बोंब ठोकल्याबद्दल काही नागरिकांनीही त्यांचे कान किटल्याची तक्रार केली. मी पोलिसांकडे या अन्यायाविरुद्ध तक्रार केली तर मला तुरुंगात टाकण्याची धमकी देण्यात आली आहे.

माझ्या मागील अर्जावर हि प्रतिक्रिया दिली ---

पण मला वाटत कि काही माणस विशेषत: आपले पोलिस अधिकाराचा गैर फायदा घेऊ पाहत आहेत.

"वाहतुकीचे नियम पाळणे हा इथला कायदा आहे"

असे बजावण्यात आले.

अगदी खरे! नेहमी असेच बजावण्यात येईल..

हि यांची भाषा !!

हीच भाषा यापुढेही राहील!

मला क्षमा असावी पण पोलिसांनी माझी माफी मागितल्या खेरीज

शहराचे पोलिस/नगरसेवक/मंत्री कुणाचीही माफी मागणे लागत नाहीत व कुणालाही कुठलेही स्पष्टीकरण देणे लागत नाहीत/ देणार नाहीत!

मी या पुढे सायकल चालवण्याशिवाय कुठचेही वाहन या शहरात चालवणार नाही.

इथे काय चालवायचे आणि काय नाही, ही पूर्णत: आपली मर्जी आहे!

व माझ्यावरचा अन्याय मोठ्ठ्याने कर्ण्यावर ओरडून जनतेला सांगेन.

पोलिस/नगरसेवक/मंत्री यांच्या विषयी आपले काहीही म्हणणे असल्यास ते कृपया योग्य मार्गाने मांडावे. जमल्यास उत्तर दिले जाईल..!

जर अजून दंगामस्ती करून लोकांना आवाज करून उपद्रव केलात तर, आवश्यक वाटल्यास तुमचे लायसन्स जप्त होईल अगर तुम्हाला तुरुंगात टाकले जाईल याची नोंद घ्यावी..
फौजदार

»

असो
अशा कुटनीती व अरेरावीच्या अशा असभ्य भाषेला मी यत्किंचित ही भीक घालीत नाही आणि घालणार ही नाही.
हा देश म्हणजे माझी आई आहे, आणि तो देश, त्यातील शहरं व रस्ते यावर जसा त्यांचा तसाच माझा हि हक्क आहे.
तुम्ही माझे लायसन्स जप्त केले तर मी काय गाडी चालवणे सोडून देईन का?................................................ मी दुस-या शहरात जाऊन बेदरकारपणे गाड्या हाकेन.
हे यांचे माझ्या बरोबरचे वर्तन मी लोकांच्या समोर आणणे हेच मी या वेळी करीत आहे. या साठी माझे लायसन रद्द करीत असतील तर करावे, खुशाल करावे.
तरीही माननीय श्री मनमोहन सिंग साहेब यांनी मला पुन्हा मायेने मार्गदर्शन करावे अशी विनंती मी त्यांचा वयाला मान देऊन करीत आहे. मी माझ्या मोठ्यान बरोबर सल्लामसलत करण्यास व यांची मर्जी संपाद्ण्यास सदैव तयार आहे. मी वाट पहात आहे ती तुमच्या सकारात्मक प्रतिक्रियेची
........
तुम्ही उद्धट ठरवलेला
ड्रंकेश गाडीचालनकर

संकेतस्थळे आणि खाजगी मालकी - एक मुक्तविचार

सध्या दुसर्‍या एका धाग्याच्या निमित्ताने (पुन्हा) हा प्रश्न ऐरणीवर आला आहे त्यासंदर्भाने बर्‍याच दिवसांपासून मनात आलेले विचार शब्दबद्ध करतोय, सगळ्यांचा वैचरिक सहभाग अपेक्षित आहे, कृपया वैयक्तिक टीकेऐवजी मुद्द्यांना प्राधान्य देणे.

माणूस संकेतस्थळ का काढतो ? ह्या प्रश्नाचे उत्तर मला आधी वाटलं - माणसाची आदिम प्रेरणा "मला काही सांगायचय" ही असावी. पण नंतर थोडा विचार केला असता असे लक्षात आले की 'मला जे सांगायचय' त्यासाठी इतर 'फुकट' अनेक पर्याय उपलब्ध आहेत जसे की ब्लॉग, दुसरी संकेतस्थळे. मग स्वतःचे संकेतस्थळ असावे ही प्रेरणा नेमकी कशामुळे ?
आत्तापर्यंतचा इतिहास बघितला तर संकेतस्थळांची 'वृत्तपत्रांशी' तुलना करता येइल.
१) 'स्वतःच्या विचारांचा (अनिर्बंध वा मुक्त) प्रसार' किंवा
२) 'दुसर्‍यांच्या विचारांचा विरोध' ह्यासाठी स्वतःचे वृत्तपत्र असावे ह्याच विचारांनी अनेकांनी वृत्तपत्रे चालू केली किंवा विकत घेतली. पुढे त्यात जाहिराती हा मुद्दाही समाविष्ट झाला पण तसे बघितले तर तोसुद्धा मुद्दा क्र. १) मधे बसू शकेल. हाच नियम संकेतस्थळांनाही लागू पडतो.

हा विचार कॄतीत आणण्यामागच्या प्रेरणाही वेगवेगळ्या असू शकतात. इतर संकेतस्थळांच्या धोरणांविषयी, तिथल्या सदस्यांविषयी, सुविधांविषयी, विषयांबद्दल - नापसंती ही एक प्रमुख प्रेरणा. त्याचबरोबर 'ही गोष्ट तुम्ही करता त्यापेक्षा (वेगळी, चांगली) करता येउ शकेल हे दाखवून देण्याची जिद्द किंवा नुसतीच 'स्वयं शिक्षणाची आच' (अर्थात ही फार दुर्मिळ). पण कारण कुठलेही असूदे, संकेतस्थळ उभारण्या / चालवण्या साठी पदरमोड करण्याची तयारी, (तांत्रिक किंवा समविचारी) सहकार्‍यांची जमवाजमव, सुरुवातीला तरी एक निश्चित धोरण वा उद्दिष्ट अशा अनेक गोष्टींची गरज असते.

आता संकेतस्थळ चालू केले आहेच तर मुख्यत्वे 'वाचकवर्ग' आणि नंतर सहभागी 'लेखक वर्ग' हवाच. मग ह्या दोन्ही वर्गांना त्यांचे संकेतस्थळावरचे वावरणे सोपे व्हावे म्हणून अधिकाधिक सुविधा पुरविणे - प्रसंगी (पैशाची, वेळाची, ज्ञानाची) पदरमोड करुन. ह्यातून वाचक / लेखक वाढीस लागले की संकेतस्थळाची 'क्षमता' गरजेप्रमाणे वाढवणे त्यासाठी परत पदरमोड. असे करुन संकेतस्थळ भरभराटीस येते.

आता 'असतिल शिते तेथे जमतिल भुते' - किंवा 'कट्ट्यावर जमणारे कट्टेकरी' किंवा 'विचारांची देवाण घेवाण करु इच्छिणारी मंडळी' - कुठल्याही कारणाने का असेना मंडळी जमणारच - आणि ती जमावितच असाच चालकांचा उद्देश तेव्हा हे योग्यच. पण जसजशी लोकं वाढायला लागतात तेव्हाच 'दुसर्‍या' विचारांची लोक, मत्सरग्रस्त, निव्वळ मजा बघणारे, बाजूने भांडणारे, भांडण लावणारे असे अनेक लोक गोळा होतात. हेही साहजिकच.

आणि तेव्हाच खरी कसोटी लागते चालकांची. ही खाजगी मालमत्ता खरीच, त्याबाबत दुमत होण्याचे कोणाचे काहीच कारण नाही. आणि खाजगी पणाबरोबरच तो खाजगीपणा जपण्याचे काही नियमही. नियम पाळण्याची जबाबदारी सदस्यांची, ते नियम बनवून, उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी चालकांची आणि नियमांचे पालन करवून घेण्याची जबाबदारी प्रशासकांची/संपादकांची. आता ह्यात पारदर्शकता नसली, समन्वयाचा अभाव असला किंवा एकाला एक न्याय आणि दुसर्‍याला दुसराच असे प्रकार असले की गडबड होणारच.

मालकी खाजगी - त्यामुळे नियम ठरविण्याचे स्वातंत्र्यही आणि ते बदलण्याचेही. त्याचमुळे "चपला", "आहे हे असे आहे" असे प्रतिसाद येणे अगदी साहजिकच. तसच वेळोवेळी स्पष्ट केल्याप्रमाणे 'चालेल तेवढे दिवस चालेल नाहीतर बंद करुन टाकीन तिच्यामायला" हेही परिचयाचे. पण ह्याच वेळी "मिपाकरांमुळेच मिपा आहे..सर्व मिपाकरांचे मनापासून आभार.." अशा प्रतिसादांमुळे गोंधळ उडतो.

इथले मालक पूर्वीपासून दुसर्‍या एका संकेतस्थळाचे नियमित, चांगले लिखाणकर्ते सदस्य, स्वत्: संगीततज्ज्ञ म्हणता येईल इथपर्यंत शास्त्रीय संगितात गती असलेले, बर्‍याच वेळेला दिसलेली उत्तम विनोद बुद्धी शिवाय व्यक्तिचित्रातून दिसणारी निरिक्षणशक्ती आणि वेगवेगळ्या कट्ट्यांतून कानावर पडल्याप्रमाणे माणस जोडण्याची क्षमताही.
पूर्वोक्त संकेतस्थळांचे जाचक नियम न पटल्यामुळे बाहेर पडून जिद्दिने, पदरमोड करुन नविन संकेतस्थळाची उभारणी आणि ते नावारुपाला आणून दाखविण्याची कला, क्षमता अंगी.
अशा सर्व पार्श्वभूमीवर 'अशी परिस्थिती का यावी' हे माझ्या आकलनाबाहेरचे.
मालकांनी नुकतेच एका जाहिर कार्यक्रमात 'मिपाचे' प्रतिनिधित्त्व केले, माझ्या अल्प माहिती नुसार ते ह्या संकेतस्थळाचे प्रवर्तक आहेत म्हणूनच त्यांना सहभागी व्हायची संधी मिळाली (नुसते ब्लॉगलेखक म्हणून नव्हे) आणि त्याच बरोबर त्यांनी सदस्यांचे जाहिर आभारही मानले आहेत.

असे असताना, (हे) संकेतस्थळ काढण्यामागची पूर्वीची उद्दिष्ट्ये काय होती, त्यांच्यात काही बदल झाला आहे का? निर्माण केलेले संकेतस्थळ त्या उद्दिष्ट्यपूर्तीच्या मार्गावर आहे का? नसेल तर कसे आणता येईल, प्रशासानात पारदर्शकतपाकशी आणता / वाढविता येईल, वगैरे वगैरे बाबींचा उहापोह करण्यासाठी हा लेख प्रपंच.


(टीपः मी नियमित लेखक नसलो तरी नियमित वाचक आहे आणि हा लेख संस्थळाचे बदलते स्वरुप जाणवले म्हणून लिहिला आहे, उडविला गेला, संपादित झाला तरी हरकत नाही, मला माझी जी मते आहेत ती व्यक्त कराविशी वाटली म्हणून केली एवढेच...)

नमस्कार वाचकहो, आणि श्री. विसोबाजी खेचर

नमस्कार वाचकहो, आणि श्री. विसोबाजी खेचर

मागील लेखनात वाचकांस आधीच अवगत केल्याप्रमाणे माझे लेख व सदस्यत्व दोन्ही रद्द करण्याची धमकी देण्यात आली आहे .

माझ्या मागील लेखावर जाळाच्या मालकांनी हि प्रतिक्रिया दिली ---

निवेदन..
Submitted by विसोबा खेचर on Sun, 03/07/2010 - 19:29.
पण मला वाटत कि काही माणस आपल्या संपादकीय अधिकाराचा गैर फायदा घेऊ पाहत आहेत.

अवघ्या दोन आठवड्याच्या कालावधीत बरेच कळले की राव आपल्याला!

असो, तरीही आपल्या वरील विधानाशी असहमत आहे.. मिपाच्या संपादकांवर माझा पूर्ण विश्वास आहे..

" हे पाहा बाबांनो, हे आहे हे असं आहे.. पटलं तर र्‍हावा इथं, नायतर आग्रह नाही...

तात्या."
असे बजावण्यात आले.

अगदी खरे! नेहमी असेच बजावण्यात येईल..

हि यांची भाषा !!

हीच भाषा यापुढेही राहील!

मला क्षमा असावी पण संपादकांनी माझी माफी मागितल्या खेरीज

मिपाचे मालक/व्यवस्थापक/संपादक कुणाचीही माफी मागणे लागत नाहीत व कुणालाही कुठलेही स्पष्टीकरण देणे लागत नाहीत/ देणार नाहीत! मिपा हे पूर्णत: खाजगी मालमत्तेचे संस्थळ आहे..

मी या पुढे विडंबन लेख लिहिण्याशिवाय माझे एक हि साहित्य या जालावर प्रकाशित करणार नाही.

इथे काय प्रकाशित करायचे आणि काय नाही, ही पूर्णत: आपली मर्जी आहे!

व तो मी तुम्हा वाचकांसमोर पुन्हा प्रकाशित करेन.

मिपा व्यवस्थापन/मालक/संपादक यांच्या विषयी आपले काहीही म्हणणे असल्यास ते कृपया tatya7@gmail.com या पत्त्यावर विरोपपत्र पाठवून कळवावे. जमल्यास उत्तर दिले जाईल..!

या स्वरुपाचा कोणताही धागा यापुढे इथे लिहिल्यास तो उडवून लावला जाईल, त्याचप्रमाणे आवश्यक वाटल्यास धागाप्रवर्तकाचे सभासदत्वदेखील गोठवण्यात येईल अथवा रद्द केले जाईल याची नोंद घ्यावी..

त्याचप्रमाणे ही चर्चा आता येथेच थांबवण्यात येत आहे तेव्हा कृपया कुणीही प्रतिसाद देऊ नयेत अन्यथा ते अप्रकाशित केले जातील अथवा काढून टाकले जातील याचीही कृपया नोंद घ्यावी...

धन्यवाद,

तात्या अभ्यंकर,
मालक, मिसळपाव डॉट कॉम.

»

असो
अशा कुटनीती व अरेरावीच्या अशा असभ्य भाषेला मी यत्किंचित ही भीक घालीत नाही आणि घालणार ही नाही.
मराठी माझी आई आहे, आणि मराठी भाषा, कला, संस्कृती यावर जसा त्यांचा तसाच माझा हि हक्क आहे.
तुम्ही माझी सदस्यत्वता गोठवाल तर मी काय लेखन सोडून देईन का?................................................ मी दुस-या जालावर माझे साहित्य प्रकाशित करेन.
हे यांचे माझ्या बरोबरचे वर्तन मी लोकांच्या समोर आणणे हेच मी या वेळी करीत आहे. या साठी माझी सदस्यत्वता रद्द करीत असतील तर करावी, खुशाल करावी.
तरीही माननीय विसोबा खेचर साहेब यांनी मला पुन्हा मायेने मार्गदर्शन करावे अशी विनंती मी त्यांचा वयाला मान देऊन करीत आहे. मी माझ्या मोठ्यान बरोबर सल्लामसलत करण्यास व यांची मर्जी संपाद्ण्यास सदैव तयार आहे. मी वाट पहात आहे ती तुमच्या सकारात्मक प्रतिक्रियेची
........
तुम्ही उद्धट ठरवलेला
मंगेश पावसकर

हे पाहा बाबांनो, हे आहे हे असं आहे.. पटलं तर र्‍हावा इथं, नायतर आग्रह नाही...

आपले लेखन आपल्या मित्रांना व खोलवाचकांपर्यंत पोहोचविण्याकरिता मिसळपाव हे अतिशय सुंदर जाल आहे. पण मला वाटत कि काही माणस आपल्या संपादकीय अधिकाराचा गैर फायदा घेऊ पाहत आहेत. नव्या लेखकांना काही चांगले शिकवून शहाणे करण्यापेक्षा त्यांचा बुडत्याचा पाय आणखी खोलात ढकलला जातोय. वर अरेरावी ची भाषा हि वापरली जात आहे. मी माझ्या मागील संपादित केलेल्या लेखनाचे एडीट केल्याचे कारण विचारले असता मला सरळ " हे पाहा बाबांनो, हे आहे हे असं आहे.. पटलं तर र्‍हावा इथं, नायतर आग्रह नाही...

तात्या."
असे बजावण्यात आले.
हि यांची भाषा !!
वाचकांना मी आधीच सांगू इच्छितो हा माझा लेख लगेच एडीट किंवा जाला वरून काढला जाऊ शकतो. नव्यांची वाट लावून जुन्या लोकांमध्ये भेद भाव करू पाहणाऱ्या अशा खेचरांना माझा कोपरापासून नमस्कार. मला क्षमा असावी पण संपादकांनी माझी माफी मागितल्या खेरीज मी या पुढे विडंबन लेख लिहिण्याशिवाय माझे एक हि साहित्य या जालावर प्रकाशित करणार नाही.
मला माहित आहे कि यांना गरज नाही पण याच निमित्ताने त्यांचा पक्षपातीपणा समोर येईल. व तो मी तुम्हा वाचकांसमोर पुन्हा प्रकाशित करेन.
बाकी वाचकहो चूक भूल माफ.

मंगेश पावसकर

मी नेहमी माझ्या स्टाइल ने लिहितो................एवढंच

तात्या , माझा लेख वैयक्तिक टीका करत असेल तर कृपया फक्त त्यांचे नाव काढून टाकले असते तर बरे झाले असते, मी नेहमी माझ्या स्टाइल ने लिहितो. कधी कुणाचे अंधानुकरण करत नाही माझ्या लेखांवर माझे नाव घेऊन टीका करणार्यांवर तुम्ही काय कारवाई कराल ते मला जाणून घ्यायचे आहे असो मला माहित नव्हते कि मिपा वर नवीन व जुन्या खाते धारकांवर भेद-भाव केला जातो. आपले जाल म्हणून आपणास तटस्थ मानत आलो.

घोर निराशा झाली

या पुढे असली वादंगीत सदरे मिपावर आढळणार नाहीत याची खात्री बाळगावी.

मंगेश पावसकर

या सारख्या लोकांचा हलकटपणा काल दिसून आला.........

काल तात्यांचा सल्ला ऐकून बरे वाटले. काही लोकांना शहाणपणा दाखवण्यासाठी संधी हवी असते ती मी उपलब्ध करून दिली, माझ्या एका लेखाने माझ्या ध्यानी मनी नसलेलं जे वादळ निर्माण केलं ( करण्यात आलं ). त्या मुळे माझी आत्मिक कोंडी झाली.

माझ्या साहित्यावर लक्ष देऊन आपला व माझा वेळ व्यर्थ घालवण्यापेक्षा स्वत चांगले व लोकांना पटतील असे लेख लिहावेत. व आपली अक्कल हुशारी दाखवावी, टीका करणे सोपे असते. पण ती टीका सदर संपूर्ण वाचून त्याचे अवलोकन करून करावी

जय हिंद जय महाराष्ट्र !

व्यक्तिगत शेरे असलेला काही भाग संपादित..
आता हा वाद थांबवण्यात येत आहे..
--संपादक.

समर्थांना पत्र

ओम नमो गजानना | आणि समर्था तुम्ही सुद्धा ||
ऐकुनी घ्या भगवंता | या पाप्या चे बोल ||

करू कशी सुरवात | नं कळे मला मनात ||
ना शिरता अति खोलात | करितो दहा श्लोकी शेवट ||

ऐकिला का ऐसा देश | सर्व धर्मांचा चालतो पाश ||
अभिमानाचा नाही लवलेश | लाज वाटते सांगाया || (समर्थांना हे सांगण्यास मला लाज वाटते.. या अर्थाने )

ऐकिला का ऐसा नेता | सेवा करी जनाची येत जाता ||
लोकविचार करितो केंव्हा || येता वेळ निवडणुकीची |

ऐकिली का ऐसी सत्ता | मिळतो पक्ष बदलण्याचा भत्ता ||
आज समता उद्या ममता | परवाचे काय सांगावे ||

ऐकिला का ऐसा रोग | कारण जायचे भोग ||
फसले ज्यात नाना लोग | सांगा तो कोणता ||

करी मत्सर दुसर्याचा | जप इकडे रामाचा||
पुण्याचा साठ फुकाचा | पाप तिकडे वाहिले ||

मूर्ख लक्षणे अजुनी जना | हि तर होती प्रस्तावना||
सुचतील जैसी माझिया मना| रोज सांगेन तुम्हासी ||

घेऊ नका देवा आता अवतार | घेतला तर होईल अविचार ||
जसा जाहला सावरकर | आणि सुभाष चंद्राचा || (ज्यांचे कार्य लोकांना कळलेच नाही असे हे थोर नेते म्हणून आता अवतार घेऊ नका असे देवा चरणी सांगणे )

सर्व मुर्खालाक्षाने या केदारासी | असुनी हे संगे तुम्हासी||
पहा काय गती कलियुगाची | समावितो हे चर्र्हाट ||

( हे श्लोक्र रुपी काव्य १६ वर्ष जुने आहे .. ६वीत असतानाचे ) चू भू दे घे Smile

श्वास

कधी मी उरतो ,कधी मी पुरतो
एकमेव मी कधी न भुलतो
साथ माझी रे जन्मापासुनी
मी संपता जीव ना उरतो

कधी उश्वास नधी निश्वास
नावं माझी अनेक
हृदयाशी मैत्री माझी
फक्त श्वास म्हणूनच नेक

कधी शरीर, कधी काया
जेथे मी तेथे माया
क्षणार्धात मी सोडूनी जाता
नाती गोती सर्वही वाया

काळ मी आज मी
सुरवात मी शेवट मी
अनादी मी अनंत मी
दिव्यासारखा तेवत मी
दिव्यासारखा तेवत मी