मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रतिसाद

माझी दिवाळी

संपादक मंडळ ·

रेवती 02/11/2013 - 00:19
मी फुलबाज्या आणि भुईनळा की झाड असे काहीतरी म्हणायचे ते मिस करतीये. बाकी ते आवाजी फटाके आवडायचे नाहीत. एक दोनदा माझ्या नव्या कपड्यांना पेटत्या उदबत्तीने भोके पडली होती. दिवाळीचा फराळ दिवाळीत खायला फारशी मजा येत नसे. दिवाळी संपल्यानंतर जी उरलेली सुट्टी असेल त्यात लायब्ररीतून आणलेले (बाल)साहित्य वाचताना करंज्या, चिरोटे खाणे, त्यातले सारण, पिठीसाखर सांडल्यावर ते सगळे साफसूफ करणे हे आठवत आहे. ;) चिवड्यावर दही घालून खाणे, चकलीबरोबर दही, लोणी. असे करीत असे. चार घरचा आलेला फराळ कसा संपवावा हा प्रश्न पडायचा. मग सकाळी दूध पिताना आई आम्हाला सक्तीने मूठ मूठ शंकरपाळे संपवायला भाग पाडायची. आत्याकडे दिवाळीनंतर मिसळ करून त्यात शेव चिवडे घालून ते संपवण्याचा चंग बांधला जायचा (तरी ते उरायचेच). आता बहुतेक उरलेला फराळ संपवण्याच्या युक्त्या असा धागा सुरु करावा लागेल.

In reply to by रेवती

पैसा 02/11/2013 - 01:27
मी भलत्याच विवंचनेत आहे. कामवाली पोरगी गावी जाणार, मग ती तेलातुपाची भांडी कोण घासणार म्हणून यावर्षी मी फराळ ४ दिवस आधीच तयार केला पण लहान किचनमधे लपवणे शक्य झाले नाही. आणि आताच डब्यांचा तळ दिसू लागला आहे. उद्या सकाळी आमच्यापुरता फराळ आहे पण आणखी कोणी आले तर पोहे देऊन भागवावे लागेल अशी लक्षणे आहेत!

In reply to by पैसा

रेवती 02/11/2013 - 04:48
हा हा हा. हो मीही तेच करणार आहे. आतापरेंत तीन चार जणींचे फोन येऊन गेलेत. त्यांच्याकडे दिवाळी म्हणजे फक्त लक्षुमी पूजन असते. मग महाराष्ट्रीय फराळाला कधी बोलावतेस म्हणून! आता काय सांगू? म्हटले नंतर बोलावते. सगळे मिळून पाच डबे त्यांचे माझ्याकडे आहेत. त्याच डब्यात घालून दिलास फराळ तरी चालेल म्हणतायत. म्हटलं नको, तुम्ही येऊन जा आणि डबे रिकामेच न्या आता!

दिवाळी म्हटले की आवाजाचे फटाके, नवीन कपडे , दिवाळी पहाट आमचा तरुणाई ने ओथंबलेला डोंबिवलीचा फडके रोड तेथे यथेच्च भटकून झाले की मित्रांकडे फराळ अनेक सांस्कृतिक कार्यक्रम , सुंगधी उटणे, मोती साबण दिवाळी अंक अश्या अनेक आठवणी मनात पिंगा घालतात , शाळा सोडून कॉलेजात गेलो तरी नियमितपणे आमचा १० अ चा बहुतेक सर्व वर्ग फड्केवर भेटायचा. आता अर्ध्याहून जास्त जगातील विविध खंडात विखुरले गेले आहोत तेव्हा एखादा वर्ग मित्र न चुकता आजही फड्केवर येतो चतुर भ्रमणध्वनीवर त्याच्याशी गप्पा मारतात मग फडकेवरील आखो देखा हाल पाहता येतो. अनिवासी असल्याने भारताशी ,आपल्या आप्त स्वकीय , मित्रांची , जाम आठवण येते , मग मी मिपावर येतो , आभसी जगतातील माझ्या मिपाकरांना भेटतो , मग जरा बरे वाटते.

अनन्न्या 03/11/2013 - 19:51
लहानपणी आम्ही जवळपासची सारी मुले दिवाळीच्या आदल्या रात्री पत्ते कुटत असू. खेडेगाव असल्याने आजूबाजूला भरपूर मोकळी जागा होती. आमच्या घराशेजारी एका काकांचे घर होते, ते भिक्षुकी करायचे. आणि त्यांना संक्रातीला मिळालेली सुगडे ते बाहेर झाडाखाली रचून ठेवायचे. रात्री आम्ही मुले ती सुगडे पळवून आणत असू. दोन वाजले की त्यात ठेवून त्यांच्याच घराबाहेर मोठे बॉम्ब वाजवत असू. त्यांचा मुलगाही यात सामिल असे. ते उठून बाहेर येऊन, कोण रे तो? असे विचारे पर्यंत आम्ही पत्ते पुन्हा सुरू करत असू. हे दरवर्षी करत असूनही त्यानी कधी सुगडांची जागा बदलली नाही, किंवा फटाके लावणारे शोधले नाहीत. रात्रभर हे सगळे उद्योग करून चार वाजता आपापल्या घरी जायचे. आंघोळी आटोपून, रांगोळ्या काढून, फराळ करायचा आणि जे गुडूप झोपायचे ते थेट दुपारच्या चहाला उठायचे. दिवाळीच्या दिवशी सकाळी नारळाच्या दुधात उटणे कालवले जायचे. नवीन कपडे दर दिवाळीला मिळायचे नाहीत, पण तांब्यात निखारे भरून त्याने असलेल्या त्यातल्या त्यात बय्रा ड्रेसला इस्त्री करून घालतानाही खूप मजा वाटे. फराळात जास्त पदार्थ नव्ह्ते. घरचे पोहे, करंजी, कडबोळी, रव्याचे लाडू आणि कणकेचे शंकरपाळे! दिवाळीच्या दिवशी गूळ पातळ करून त्यात ओले खोबरे घालून त्यात घरचे जाड पोहे भिजवून ते मिक्स करायचे. एक वाफ काढून हे गरमागरम पोहे केळीच्या पानावर साजूक तूप घालून खाणे म्हणजे अहाहा!!! फटाके मोजूनच असायचे. ते तुळशीच्या लग्नापर्यंत पुरवावे लागत. तुळशीच्या लग्नाला तुळशी वृंदावन चुना, हळद आणि पिंजरीच्या ठिपक्यांनी सजवायचे. सकाळी आई तिला पिवळे कापड गुडाळायची, हिरव्या बांगड्या घालायची. ऊस मामा म्हणून उभा करायचा. करा-दिवा मात्र आम्ही बहिणी घेऊन उभ्या रहात असू. बाबा एकटेच मुलाकडचे! लग्नानंतर सगळ्यांना फराळ दिला जायचा. मस्त होती ती दिवाळी!!

In reply to by अनन्न्या

पैसा 03/11/2013 - 21:38
दिवाळीची सुटी ही निव्वळ पत्ते खेळण्यासाठीच असायची. त्यात तो गृहपाठ नावाचा छळ असायचा पण कोणाला फिकीर होती त्याची!

पाषाणभेद 03/11/2013 - 21:53
मला माझ्या लहाणपणाची दिवाळी अजूनही आठवते. मी हिंदू, माझी आई पारशी, वडील मुस्लीम, बहीण क्रिस्चन, भाऊ बंगाली, चुलत भावंड काश्मिरी- पंजाबी असल्याने लहाणपणाच्या दिवाळीसणात सर्व भारत आमच्या घरी जमला असे वाटत असे. मिठाई, फटाके यांची रेलचेल असायची. आताशा दिवाळीत मी घरी नसते. गेल्या दोन दिवाळींच्या वेळी मी सिंगापूर अन स्वित्सर्लंड येथे शाहिद अन रनबीर सोबत शुटींगमध्ये बिझी होते. येत्या दिवाळीत माझा 'Blind Game - ऐ सनम तुझपे मेरे दिल आ गया' हा चित्रपट रिलीज होतो आहे. माझ्यासाठी ते दिवाळी गिफ्टच आहे. सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या शुभेच्छा! - करूना कर्पूर (शब्दांकन - पाषाणभेद)

रेवती 02/11/2013 - 00:19
मी फुलबाज्या आणि भुईनळा की झाड असे काहीतरी म्हणायचे ते मिस करतीये. बाकी ते आवाजी फटाके आवडायचे नाहीत. एक दोनदा माझ्या नव्या कपड्यांना पेटत्या उदबत्तीने भोके पडली होती. दिवाळीचा फराळ दिवाळीत खायला फारशी मजा येत नसे. दिवाळी संपल्यानंतर जी उरलेली सुट्टी असेल त्यात लायब्ररीतून आणलेले (बाल)साहित्य वाचताना करंज्या, चिरोटे खाणे, त्यातले सारण, पिठीसाखर सांडल्यावर ते सगळे साफसूफ करणे हे आठवत आहे. ;) चिवड्यावर दही घालून खाणे, चकलीबरोबर दही, लोणी. असे करीत असे. चार घरचा आलेला फराळ कसा संपवावा हा प्रश्न पडायचा. मग सकाळी दूध पिताना आई आम्हाला सक्तीने मूठ मूठ शंकरपाळे संपवायला भाग पाडायची. आत्याकडे दिवाळीनंतर मिसळ करून त्यात शेव चिवडे घालून ते संपवण्याचा चंग बांधला जायचा (तरी ते उरायचेच). आता बहुतेक उरलेला फराळ संपवण्याच्या युक्त्या असा धागा सुरु करावा लागेल.

In reply to by रेवती

पैसा 02/11/2013 - 01:27
मी भलत्याच विवंचनेत आहे. कामवाली पोरगी गावी जाणार, मग ती तेलातुपाची भांडी कोण घासणार म्हणून यावर्षी मी फराळ ४ दिवस आधीच तयार केला पण लहान किचनमधे लपवणे शक्य झाले नाही. आणि आताच डब्यांचा तळ दिसू लागला आहे. उद्या सकाळी आमच्यापुरता फराळ आहे पण आणखी कोणी आले तर पोहे देऊन भागवावे लागेल अशी लक्षणे आहेत!

In reply to by पैसा

रेवती 02/11/2013 - 04:48
हा हा हा. हो मीही तेच करणार आहे. आतापरेंत तीन चार जणींचे फोन येऊन गेलेत. त्यांच्याकडे दिवाळी म्हणजे फक्त लक्षुमी पूजन असते. मग महाराष्ट्रीय फराळाला कधी बोलावतेस म्हणून! आता काय सांगू? म्हटले नंतर बोलावते. सगळे मिळून पाच डबे त्यांचे माझ्याकडे आहेत. त्याच डब्यात घालून दिलास फराळ तरी चालेल म्हणतायत. म्हटलं नको, तुम्ही येऊन जा आणि डबे रिकामेच न्या आता!

दिवाळी म्हटले की आवाजाचे फटाके, नवीन कपडे , दिवाळी पहाट आमचा तरुणाई ने ओथंबलेला डोंबिवलीचा फडके रोड तेथे यथेच्च भटकून झाले की मित्रांकडे फराळ अनेक सांस्कृतिक कार्यक्रम , सुंगधी उटणे, मोती साबण दिवाळी अंक अश्या अनेक आठवणी मनात पिंगा घालतात , शाळा सोडून कॉलेजात गेलो तरी नियमितपणे आमचा १० अ चा बहुतेक सर्व वर्ग फड्केवर भेटायचा. आता अर्ध्याहून जास्त जगातील विविध खंडात विखुरले गेले आहोत तेव्हा एखादा वर्ग मित्र न चुकता आजही फड्केवर येतो चतुर भ्रमणध्वनीवर त्याच्याशी गप्पा मारतात मग फडकेवरील आखो देखा हाल पाहता येतो. अनिवासी असल्याने भारताशी ,आपल्या आप्त स्वकीय , मित्रांची , जाम आठवण येते , मग मी मिपावर येतो , आभसी जगतातील माझ्या मिपाकरांना भेटतो , मग जरा बरे वाटते.

अनन्न्या 03/11/2013 - 19:51
लहानपणी आम्ही जवळपासची सारी मुले दिवाळीच्या आदल्या रात्री पत्ते कुटत असू. खेडेगाव असल्याने आजूबाजूला भरपूर मोकळी जागा होती. आमच्या घराशेजारी एका काकांचे घर होते, ते भिक्षुकी करायचे. आणि त्यांना संक्रातीला मिळालेली सुगडे ते बाहेर झाडाखाली रचून ठेवायचे. रात्री आम्ही मुले ती सुगडे पळवून आणत असू. दोन वाजले की त्यात ठेवून त्यांच्याच घराबाहेर मोठे बॉम्ब वाजवत असू. त्यांचा मुलगाही यात सामिल असे. ते उठून बाहेर येऊन, कोण रे तो? असे विचारे पर्यंत आम्ही पत्ते पुन्हा सुरू करत असू. हे दरवर्षी करत असूनही त्यानी कधी सुगडांची जागा बदलली नाही, किंवा फटाके लावणारे शोधले नाहीत. रात्रभर हे सगळे उद्योग करून चार वाजता आपापल्या घरी जायचे. आंघोळी आटोपून, रांगोळ्या काढून, फराळ करायचा आणि जे गुडूप झोपायचे ते थेट दुपारच्या चहाला उठायचे. दिवाळीच्या दिवशी सकाळी नारळाच्या दुधात उटणे कालवले जायचे. नवीन कपडे दर दिवाळीला मिळायचे नाहीत, पण तांब्यात निखारे भरून त्याने असलेल्या त्यातल्या त्यात बय्रा ड्रेसला इस्त्री करून घालतानाही खूप मजा वाटे. फराळात जास्त पदार्थ नव्ह्ते. घरचे पोहे, करंजी, कडबोळी, रव्याचे लाडू आणि कणकेचे शंकरपाळे! दिवाळीच्या दिवशी गूळ पातळ करून त्यात ओले खोबरे घालून त्यात घरचे जाड पोहे भिजवून ते मिक्स करायचे. एक वाफ काढून हे गरमागरम पोहे केळीच्या पानावर साजूक तूप घालून खाणे म्हणजे अहाहा!!! फटाके मोजूनच असायचे. ते तुळशीच्या लग्नापर्यंत पुरवावे लागत. तुळशीच्या लग्नाला तुळशी वृंदावन चुना, हळद आणि पिंजरीच्या ठिपक्यांनी सजवायचे. सकाळी आई तिला पिवळे कापड गुडाळायची, हिरव्या बांगड्या घालायची. ऊस मामा म्हणून उभा करायचा. करा-दिवा मात्र आम्ही बहिणी घेऊन उभ्या रहात असू. बाबा एकटेच मुलाकडचे! लग्नानंतर सगळ्यांना फराळ दिला जायचा. मस्त होती ती दिवाळी!!

In reply to by अनन्न्या

पैसा 03/11/2013 - 21:38
दिवाळीची सुटी ही निव्वळ पत्ते खेळण्यासाठीच असायची. त्यात तो गृहपाठ नावाचा छळ असायचा पण कोणाला फिकीर होती त्याची!

पाषाणभेद 03/11/2013 - 21:53
मला माझ्या लहाणपणाची दिवाळी अजूनही आठवते. मी हिंदू, माझी आई पारशी, वडील मुस्लीम, बहीण क्रिस्चन, भाऊ बंगाली, चुलत भावंड काश्मिरी- पंजाबी असल्याने लहाणपणाच्या दिवाळीसणात सर्व भारत आमच्या घरी जमला असे वाटत असे. मिठाई, फटाके यांची रेलचेल असायची. आताशा दिवाळीत मी घरी नसते. गेल्या दोन दिवाळींच्या वेळी मी सिंगापूर अन स्वित्सर्लंड येथे शाहिद अन रनबीर सोबत शुटींगमध्ये बिझी होते. येत्या दिवाळीत माझा 'Blind Game - ऐ सनम तुझपे मेरे दिल आ गया' हा चित्रपट रिलीज होतो आहे. माझ्यासाठी ते दिवाळी गिफ्टच आहे. सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या शुभेच्छा! - करूना कर्पूर (शब्दांकन - पाषाणभेद)
नमस्कार मिपाकरहो, दिपावली अभिष्टचिंतन! कोणताही सण आला की आपण तो साजरा करताना आई काय करत असे किंवा आज्जी कसे करत असे ते आठवून, त्यांना विचारून, पुस्तकात वाचून त्या पद्धती आचरणात आणायचा प्रयत्न करतो. काहीवेळा सगळे साग्रसंगीत करायला जमते तर कधी गोष्टी शास्त्रापुरत्या कराव्या लागतात. दिवाळी हा आपल्यकडील मोठा सण समजला जातो. चार दिवस आपापले वैशिष्ठ्य टिकवून असतात. वाईट वृत्तीचा नाश करण्यापासून ते लक्ष्मीच्या पुजेपर्यंत तर सासरच्या नातेवाईकांपासून माहेरच्या नातेवाईकांची भेट घडवत हा सण आठवणींच्या सुखाची उबदार शाल मनावर अलगदपणे सोडून पुढील वर्षाची वाट पहायला लावतो.

शेवटचा तुकडा..

गवि ·

कांदा लिंबू 12/03/2026 - 19:45
छान हळुवार असं मनावर कथानक उमटत जातंय असं वाटलं. मानवी भावभावनांना, त्यांच्या अबोल अभिव्यक्तीला सीमा नाही असं काहीसं जाणवलं.

मिसळपाव 12/03/2026 - 21:02
समुद्र न थांबणं, जतिनचा प्रॉब्लेम नीटसा कळला नाही. पण डझन्ट मॅटर. लिखाण सुरेख आहे. नेमक्या शब्दात बरंच काही सांगितलंय. सुरुवातीची पानं वाचून मतकरींची 'जौळ' कादंबरी आठवली.

प्रचेतस 13/03/2026 - 07:21
कथा आवडली, शाल, लाईटहाऊस, समुद्र ही प्रतीकं सुरेखरीत्या वापरली आहेत. मिपावर ललितलेखनाचा दुष्काळ जाणवतो पण तुम्ही एक उत्तम कथा लिहून तो दूर केला आहे.

मुलगी नवर्‍यामधे वडील शोधते,मुलगा आई शोधतो सासू सुने बरोबर स्वतःला शोधते आणी मग सगळा गुंडांवर वाढतो. मानवी स्वभाव. बाकी कथा ,कथानक आणी पात्रे आसपास प्रचूर संखेत दिसतात. कथा आवडली हे वेगळे सांगायला नको.

मुलगी नवर्‍यामधे वडील शोधते,मुलगा आई शोधतो सासू सुने मधे स्वतःला शोधते आणी मग सगळा गुंतडां वाढतो. मानवी स्वभाव. बाकी कथा ,कथानक आणी पात्रे आसपास प्रचूर संखेत दिसतात. कथा आवडली हे वेगळे सांगायला नको.

सोत्रि 13/03/2026 - 14:51
गवी, काळजाला भिडेल असं लिहीतोस! - (गवीपंखा) सोकाजी

अभ्या.. 13/03/2026 - 16:40
व्वा, गविराज व्व्वा. शेवटाचा तुकडा म्हणून गविराज काही एआय एक्पिरिमेन्ट करतेत का काय वाटलं शीर्षक वाचून. . क्लासिक लेखनाचा असा अनुभव दिला की.... मान गये. आंदोहाऊर.

गविजी, कथा खूप आवडली,. लहान लहान वाक्यांनी जतिनचा टेम्पो मस्त बिल्डप होतोय पण कधी कधी त्या टेम्पोला देखील थोडा ठेहराव हवा असं वाटलं. काही वाक्ये खूप खास आहेत. अगदी टिपिकल संवाद देखील अगदी काळजीपूर्वक पेरलेले जाणवले आणि त्यामुळे एकून लेखन आणि त्याचा फ्लो खूप खरा उतरला आहे असे वाटत राहते. मस्त गविजी! - एक गविफॅन

मंत्री 14/03/2026 - 16:55
फारच आवडली कथा. इतकी की रोमातून बाहेर पडून प्रतिसाद द्यायला भाग पाडलं तुमच्या लेखनाने. जियो !

श्वेता२४ 14/03/2026 - 18:20
तुमच्या लिखाणाची चाहती आहेच. पण ही कथा अपूर्णत्वातही पूर्णत्वाचा अनुभव देणारी कथा आहे.. लौकिक अर्थाने कथेचा शेवट असा होत नसला तरीही कथा वाचल्या नंतर पूर्ण समाधान मिळाल्याची अनुभूती मिळते... अल्कोहोलिक मनुष्य एकदम मरत नाही. तो अधेमधे सुधारतो, पुन्हा आजारी पडतो आणि आसपासच्या सर्वांना आजारी करतो. हे वाक्य काळजाला भिडले अगदी!!

सौंदाळा 16/03/2026 - 10:49
आईशप्पथ गवि काय लिहिले आहे, खुप दिवसांनी!! आशा नर्सिंग होम, परत परत चालू बंद होणारा लाईट हाऊसमधला दिवा, समुद्राचा पझलमधला तुकडा, शालीची 'त्रिकोणी' घडी सगळच चपखल.

In reply to by पद्मजा५०

गवि 16/04/2026 - 21:55

व्यनि मागेच वाचून उत्तरही दिले होते आणि त्यानंतर व्यनि सुविधा बंद झाली आहे. ती आता परत सुरु होणार नाही. व्यनिमधे मी हे सांगितले, आणि परत अन्य एका धाग्यावर देखील पुन्हा सांगितले आहे. की मी वैयक्तिक ईमेल किंवा अन्य मार्गाने ऑनलाइन जगतात संपर्क करणे prefer करत नाही. तोच प्रतिसाद पुन्हा खाली पेस्ट करतोय. तुम्ही अभिप्राय किंवा अन्य काही मत प्रतिसाद किंवा काही जे असेल ते इथेच सांगावे. ते जाहीर सांगता येत नसेल तर क्षमस्व. वाचनाबद्दल धन्यवाद. आणखी एक गमतीने सांगतो. नुसतेच काहीतरी बोलायचे आहे, सांगायचे आहे असा सस्पेन्स फारसा मनोरंजक नाही. माझा प्रतिसाद परत एकदा आणि शेवटचा पेस्ट करतो आहे. "

 

नमस्कार. वैयक्तिक संपर्क (व्यक्तिगत ईमेल किंवा अन्य मार्गाने मी as a online policy) prefer करत नाही. कथेबद्दल काही मत किंवा प्रतिसाद असेल तर तो धाग्यावर किंवा इथे द्यावा. ती कथा पूर्ण काल्पनिक आहे. कोणत्याही व्यक्तीशी त्या कथानकाचा किंवा पात्रांचा काही संबंध नाही. त्यात कोणताही वास्तविक मानसिक आजार किंवा उपचार यांचे वर्णन नसून एक संपूर्ण कल्पनेचा विस्तार आहे. त्याचे रसग्रहण किंवा अन्य काही अनुकूल प्रतिकूल मत असेल तर ते धाग्यावर किंवा इथे द्यावे अशी विनंती. धन्यवाद. पुन्हा एकदा धन्यवाद."

In reply to by पद्मजा५०

गवि 17/04/2026 - 15:13

अवश्य पाठवा. आनंदच आहे. हीच माझी , म्हणजे लेखकाची जाहीर परवानगी समजा. वेगळी परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. लेखकाचे नाव म्हणून मिसळपाव टोपण नाव, गवि (गगन विहारी) हेच रहावे. मानधनाची मला अपेक्षा नाही. अंक मी विकत घेऊन वाचेन. कथा पूर्ण काल्पनिक आहे आणि कोणाशीही त्याचे साम्य हा योगायोग मानावा. अशी ओळ अंकात शेवटी टाकल्यास बरे होईल. मुख्य म्हणजे आपले आभार. वाचून आवडली आणि कुठेतरी पुढे रेकमेंड करावीशी वाटली हे खूप छान आहे. धन्यवाद. वाचत रहा.

कांदा लिंबू 12/03/2026 - 19:45
छान हळुवार असं मनावर कथानक उमटत जातंय असं वाटलं. मानवी भावभावनांना, त्यांच्या अबोल अभिव्यक्तीला सीमा नाही असं काहीसं जाणवलं.

मिसळपाव 12/03/2026 - 21:02
समुद्र न थांबणं, जतिनचा प्रॉब्लेम नीटसा कळला नाही. पण डझन्ट मॅटर. लिखाण सुरेख आहे. नेमक्या शब्दात बरंच काही सांगितलंय. सुरुवातीची पानं वाचून मतकरींची 'जौळ' कादंबरी आठवली.

प्रचेतस 13/03/2026 - 07:21
कथा आवडली, शाल, लाईटहाऊस, समुद्र ही प्रतीकं सुरेखरीत्या वापरली आहेत. मिपावर ललितलेखनाचा दुष्काळ जाणवतो पण तुम्ही एक उत्तम कथा लिहून तो दूर केला आहे.

मुलगी नवर्‍यामधे वडील शोधते,मुलगा आई शोधतो सासू सुने बरोबर स्वतःला शोधते आणी मग सगळा गुंडांवर वाढतो. मानवी स्वभाव. बाकी कथा ,कथानक आणी पात्रे आसपास प्रचूर संखेत दिसतात. कथा आवडली हे वेगळे सांगायला नको.

मुलगी नवर्‍यामधे वडील शोधते,मुलगा आई शोधतो सासू सुने मधे स्वतःला शोधते आणी मग सगळा गुंतडां वाढतो. मानवी स्वभाव. बाकी कथा ,कथानक आणी पात्रे आसपास प्रचूर संखेत दिसतात. कथा आवडली हे वेगळे सांगायला नको.

सोत्रि 13/03/2026 - 14:51
गवी, काळजाला भिडेल असं लिहीतोस! - (गवीपंखा) सोकाजी

अभ्या.. 13/03/2026 - 16:40
व्वा, गविराज व्व्वा. शेवटाचा तुकडा म्हणून गविराज काही एआय एक्पिरिमेन्ट करतेत का काय वाटलं शीर्षक वाचून. . क्लासिक लेखनाचा असा अनुभव दिला की.... मान गये. आंदोहाऊर.

गविजी, कथा खूप आवडली,. लहान लहान वाक्यांनी जतिनचा टेम्पो मस्त बिल्डप होतोय पण कधी कधी त्या टेम्पोला देखील थोडा ठेहराव हवा असं वाटलं. काही वाक्ये खूप खास आहेत. अगदी टिपिकल संवाद देखील अगदी काळजीपूर्वक पेरलेले जाणवले आणि त्यामुळे एकून लेखन आणि त्याचा फ्लो खूप खरा उतरला आहे असे वाटत राहते. मस्त गविजी! - एक गविफॅन

मंत्री 14/03/2026 - 16:55
फारच आवडली कथा. इतकी की रोमातून बाहेर पडून प्रतिसाद द्यायला भाग पाडलं तुमच्या लेखनाने. जियो !

श्वेता२४ 14/03/2026 - 18:20
तुमच्या लिखाणाची चाहती आहेच. पण ही कथा अपूर्णत्वातही पूर्णत्वाचा अनुभव देणारी कथा आहे.. लौकिक अर्थाने कथेचा शेवट असा होत नसला तरीही कथा वाचल्या नंतर पूर्ण समाधान मिळाल्याची अनुभूती मिळते... अल्कोहोलिक मनुष्य एकदम मरत नाही. तो अधेमधे सुधारतो, पुन्हा आजारी पडतो आणि आसपासच्या सर्वांना आजारी करतो. हे वाक्य काळजाला भिडले अगदी!!

सौंदाळा 16/03/2026 - 10:49
आईशप्पथ गवि काय लिहिले आहे, खुप दिवसांनी!! आशा नर्सिंग होम, परत परत चालू बंद होणारा लाईट हाऊसमधला दिवा, समुद्राचा पझलमधला तुकडा, शालीची 'त्रिकोणी' घडी सगळच चपखल.

In reply to by पद्मजा५०

गवि 16/04/2026 - 21:55

व्यनि मागेच वाचून उत्तरही दिले होते आणि त्यानंतर व्यनि सुविधा बंद झाली आहे. ती आता परत सुरु होणार नाही. व्यनिमधे मी हे सांगितले, आणि परत अन्य एका धाग्यावर देखील पुन्हा सांगितले आहे. की मी वैयक्तिक ईमेल किंवा अन्य मार्गाने ऑनलाइन जगतात संपर्क करणे prefer करत नाही. तोच प्रतिसाद पुन्हा खाली पेस्ट करतोय. तुम्ही अभिप्राय किंवा अन्य काही मत प्रतिसाद किंवा काही जे असेल ते इथेच सांगावे. ते जाहीर सांगता येत नसेल तर क्षमस्व. वाचनाबद्दल धन्यवाद. आणखी एक गमतीने सांगतो. नुसतेच काहीतरी बोलायचे आहे, सांगायचे आहे असा सस्पेन्स फारसा मनोरंजक नाही. माझा प्रतिसाद परत एकदा आणि शेवटचा पेस्ट करतो आहे. "

 

नमस्कार. वैयक्तिक संपर्क (व्यक्तिगत ईमेल किंवा अन्य मार्गाने मी as a online policy) prefer करत नाही. कथेबद्दल काही मत किंवा प्रतिसाद असेल तर तो धाग्यावर किंवा इथे द्यावा. ती कथा पूर्ण काल्पनिक आहे. कोणत्याही व्यक्तीशी त्या कथानकाचा किंवा पात्रांचा काही संबंध नाही. त्यात कोणताही वास्तविक मानसिक आजार किंवा उपचार यांचे वर्णन नसून एक संपूर्ण कल्पनेचा विस्तार आहे. त्याचे रसग्रहण किंवा अन्य काही अनुकूल प्रतिकूल मत असेल तर ते धाग्यावर किंवा इथे द्यावे अशी विनंती. धन्यवाद. पुन्हा एकदा धन्यवाद."

In reply to by पद्मजा५०

गवि 17/04/2026 - 15:13

अवश्य पाठवा. आनंदच आहे. हीच माझी , म्हणजे लेखकाची जाहीर परवानगी समजा. वेगळी परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. लेखकाचे नाव म्हणून मिसळपाव टोपण नाव, गवि (गगन विहारी) हेच रहावे. मानधनाची मला अपेक्षा नाही. अंक मी विकत घेऊन वाचेन. कथा पूर्ण काल्पनिक आहे आणि कोणाशीही त्याचे साम्य हा योगायोग मानावा. अशी ओळ अंकात शेवटी टाकल्यास बरे होईल. मुख्य म्हणजे आपले आभार. वाचून आवडली आणि कुठेतरी पुढे रेकमेंड करावीशी वाटली हे खूप छान आहे. धन्यवाद. वाचत रहा.

जतिन साधा माणूस आहे.  खूप शांत माणूस आहे. कुणाच्या अध्यात ना मध्यात. असं सागरदर्शन हाऊसिंग सोसायटीत राहणारे बरेच लोक म्हणायचे.  शांततेचा तळ किती खोल असतो याची जाणीव किंवा पर्वा वर वर पोहणाऱ्यांना नसते. त्याला एकटा मात्र कोणी म्हणत नव्हते. एकटे असण्यात एक काहीतरी अस्वस्थता, दुःख वगैरे असतं. गेलाबाजार उदास खिन्न चेहरा तरी असतो.  पण जतिनच्या आतमध्ये आता काहीच उरलं नव्हतं. त्यामुळे खिन्नताही दिसत नव्हती. त्याला एकटा तरी कसं म्हणायचं?  लोकांना काही अंदाज येणं शक्य नव्हतं.

शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..

आजी ·
हल्लीची काही मुलं परीक्षेत शतप्रतिशत म्हणजे शंभरपैकी शंभर मार्कस् मिळवतात. काहीजण तर शंभर टक्क्यांपेक्षा जास्त मार्कस् मिळवतात म्हणे.. कसे कोण जाणे.. हे सर्व माझ्यासारख्या आजी, आजोबा झालेल्या व्यक्तीला अचंबित करणारे असलं तरी ते वास्तव आहे. मी जेव्हा शाळेत जात होते तेव्हा मला कोणत्याही विषयात शत प्रतिशत गुण मिळाले असं फारसं आठवत नाही. तसं म्हटलं तर माझे भाषा विषय उत्तम होते. संस्कृत मध्ये मला दोन, तीन वेळा खरंच शत प्रतिशत गुण मिळालेही होते. पण फक्त आणि फक्त संस्कृतमध्येच.. आमच्या वेळी.. काय सांगू? ३५ टक्क्यांना पासिंग होतं. ७० टक्के मिळाले की डिस्टिंक्शन.

"गाॅसिपिंग" याने की "कुचाळक्या"..

आजी ·

हे काय बरोबर नाही आजी!!स्वतः बद्दल गॉसिप किवा तोंडावर बोलण्यात काय मजा बुवा? आम्ही तर हापिसात गॉसिप करायलाच जातो. कामे तर काय २४ तास चालुच असतात. त्यामुळे २ जण जमले की तिसर्‍याबद्दल गॉसिप होणारच. गॉसिप हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि आम्ही तो मिळवणारच. आणि हो!! मी पयला!!

विजुभाऊ 26/02/2026 - 15:27
सिक्स झीरो हे पण गॉसिपच होते की. अख्ख्या पाकिस्तान देशाने त्यावर विश्वास ठेवला. मुंबईतील तेरावा बॉम्ब्स्फोठ हे देखील त्यातले. जाणत्या राजाने म्हंझ्टले म्हणून सगल्यानी कितीतरी वर्षे विश्वास ठेवला. बंद खोलीतले वचन यावर देखील लोकानी विश्वास ठेवला.

सुबोध खरे 26/02/2026 - 18:37
माझा एक साधा विचार आहे. लोक आपल्या पाठीमागे बोलत असतील याचा अर्थच आपण त्यांच्या पुढे आहोत. आपण शांत राहावे आणि मजा पाहत राहावी. बाकी लोकांबद्दल गॉसिप (कुचाळक्या) करण्यात मला फारशी मजा येत नाही. यामुळंच मी जालावर सुद्धा माझ्या मूळ नावानेच वावरतो आणि माझा कोणताही डू आय डी नाही किंवा माझा कोणताही कंपू मध्ये समावेश झालेला नाही बायकांना गॉसिप करण्यात जास्त रस असतो असे माझे निरीक्षण आहे.( एकंदर बायका जास्त बोलतात त्यामुळेही असेल)

In reply to by अनन्त अवधुत

इतर कुठलेही सामाजिक प्राणी (कळपात राहणारे) कुचाळक्या करत नाहीत. तर बिन्दास गॉसिप करा.
इन फॅक्ट माणसाच्या माकडापासुन झालेल्या उत्क्रांतीत ह्या गॉसिपचा मोठा वाटा आहे असे मिपावरच्याच एका लेखात वाचले होते. म्हणज मनुष्य तसा सामाजिक प्राणी होताच पण दोघांनी तिसर्याबद्दल बोलण्याच्या ह्या (अव ?)गुणामुळे सध्याचा प्रगत मनुष्य झाला.

गामा पैलवान 26/02/2026 - 21:14
आजी,
अगदी एक धोबी सीतामाईबद्दल बोलला तेव्हापासून हे चालत आले आहे.
क्या बात है. बघा, वाल्मीकीय रामायणांत नसलेला धोबी कसा घुसवला अफवाखोरांनी. बाकी, गुळगुळीत मायापुरी वगैरे मासिके राहिली. ती खास गॉसिपवरंच चालतात. गॉसिपसाठी म्हणून बॉलीवूडी लोकं खोटी लफडीही रंगवतात. काय ती ढोंगं आन काय ते थोतांड....! आ.न., -गा.पै.

मदनबाण 27/02/2026 - 13:03
पक्षी जीव आणि गाॅसिपिंग ! डेटा कसा भराभर ट्रान्सफर केला जातो... अगं तुला समजला का? , अगं तुला कळलं का ? असे एक पक्षी जीव दुसर्‍या पक्षी जीवाला विचारतो... मग दुसरा पक्षी अगदी आपल्याला काय माहित नाही किंवा काय कळलं नाहीये असा चेहरा करुन अगदी आवडीने डेटा रिसिव्ह करायला सुरुवात करतो. :))) कोणाचं कोणा बरोबर सूत जुळलयं, इमूक तमुक भेटली होती, कोणाला कोणा बरोबर कुठे बघितले, कोणाचा कितवा महिना! इ इइ.... सगळं कसं इकडुन तिकडे ट्रान्सफर केलं जात. पक्षी जीव जितके एका दिवसात बोलत असतील तितके पारधी एक महिन्यात तरी बोलतील का ? याचीच मला शंका वाटते. जाता जाता: पक्षी जीव आणि सीक्रेट :- कोणाला बोलू नकोस, कोणाला सांगणार नाहीस ना ? असे बोलुन एक पक्षी जीव दुसर्‍या पक्षी जीवाला सीक्रेट डेटा ट्रान्सफर करतो. पण कोणाला बोलू नकोस किंवा सांगू नकोस हे शब्दच पाखरांना सातत्याने ट्रिगर करत राहतो, मग ज्या पक्षाला सीक्रेट डेटा ट्रान्सफर झाला आहे त्याला हाच डेटा ट्रान्सफर करण्याची "उर्मी" निर्माण होत राहते... मग परत हा जीव दुसर्‍या पक्षी जीवाला भेटतो तेव्हा... कोणाला बोलू नकोस, कोणाला सांगणार नाहीस ना ? :))) शेवटी मग पक्षाची सिस्टीम स्टेबल होते आणि जेवललं अन्न नीट पचतं! :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Karma Video Song (Hindi) - Kantara Chapter 1

आजी 08/03/2026 - 10:09
माझ्या स्नेही जनांचे मनापासून आभार मानते. माझ्या "गाॅसिपिंग याने की कुचाळक्या" या लेखाची एक हजाराहून अधिक वाचने झाली. प्रतिक्रिया निवडक, मोजक्या होत्या पण दर्जेदार आणि मनःपूर्वक दिलेल्या होत्या. त्या वाचून आनंद वाटला. तुमचा स्नेह मला लाभतो आणि मला नवीन काही लिहायला स्फूर्ती मिळते. सर्वांना या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

हे काय बरोबर नाही आजी!!स्वतः बद्दल गॉसिप किवा तोंडावर बोलण्यात काय मजा बुवा? आम्ही तर हापिसात गॉसिप करायलाच जातो. कामे तर काय २४ तास चालुच असतात. त्यामुळे २ जण जमले की तिसर्‍याबद्दल गॉसिप होणारच. गॉसिप हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि आम्ही तो मिळवणारच. आणि हो!! मी पयला!!

विजुभाऊ 26/02/2026 - 15:27
सिक्स झीरो हे पण गॉसिपच होते की. अख्ख्या पाकिस्तान देशाने त्यावर विश्वास ठेवला. मुंबईतील तेरावा बॉम्ब्स्फोठ हे देखील त्यातले. जाणत्या राजाने म्हंझ्टले म्हणून सगल्यानी कितीतरी वर्षे विश्वास ठेवला. बंद खोलीतले वचन यावर देखील लोकानी विश्वास ठेवला.

सुबोध खरे 26/02/2026 - 18:37
माझा एक साधा विचार आहे. लोक आपल्या पाठीमागे बोलत असतील याचा अर्थच आपण त्यांच्या पुढे आहोत. आपण शांत राहावे आणि मजा पाहत राहावी. बाकी लोकांबद्दल गॉसिप (कुचाळक्या) करण्यात मला फारशी मजा येत नाही. यामुळंच मी जालावर सुद्धा माझ्या मूळ नावानेच वावरतो आणि माझा कोणताही डू आय डी नाही किंवा माझा कोणताही कंपू मध्ये समावेश झालेला नाही बायकांना गॉसिप करण्यात जास्त रस असतो असे माझे निरीक्षण आहे.( एकंदर बायका जास्त बोलतात त्यामुळेही असेल)

In reply to by अनन्त अवधुत

इतर कुठलेही सामाजिक प्राणी (कळपात राहणारे) कुचाळक्या करत नाहीत. तर बिन्दास गॉसिप करा.
इन फॅक्ट माणसाच्या माकडापासुन झालेल्या उत्क्रांतीत ह्या गॉसिपचा मोठा वाटा आहे असे मिपावरच्याच एका लेखात वाचले होते. म्हणज मनुष्य तसा सामाजिक प्राणी होताच पण दोघांनी तिसर्याबद्दल बोलण्याच्या ह्या (अव ?)गुणामुळे सध्याचा प्रगत मनुष्य झाला.

गामा पैलवान 26/02/2026 - 21:14
आजी,
अगदी एक धोबी सीतामाईबद्दल बोलला तेव्हापासून हे चालत आले आहे.
क्या बात है. बघा, वाल्मीकीय रामायणांत नसलेला धोबी कसा घुसवला अफवाखोरांनी. बाकी, गुळगुळीत मायापुरी वगैरे मासिके राहिली. ती खास गॉसिपवरंच चालतात. गॉसिपसाठी म्हणून बॉलीवूडी लोकं खोटी लफडीही रंगवतात. काय ती ढोंगं आन काय ते थोतांड....! आ.न., -गा.पै.

मदनबाण 27/02/2026 - 13:03
पक्षी जीव आणि गाॅसिपिंग ! डेटा कसा भराभर ट्रान्सफर केला जातो... अगं तुला समजला का? , अगं तुला कळलं का ? असे एक पक्षी जीव दुसर्‍या पक्षी जीवाला विचारतो... मग दुसरा पक्षी अगदी आपल्याला काय माहित नाही किंवा काय कळलं नाहीये असा चेहरा करुन अगदी आवडीने डेटा रिसिव्ह करायला सुरुवात करतो. :))) कोणाचं कोणा बरोबर सूत जुळलयं, इमूक तमुक भेटली होती, कोणाला कोणा बरोबर कुठे बघितले, कोणाचा कितवा महिना! इ इइ.... सगळं कसं इकडुन तिकडे ट्रान्सफर केलं जात. पक्षी जीव जितके एका दिवसात बोलत असतील तितके पारधी एक महिन्यात तरी बोलतील का ? याचीच मला शंका वाटते. जाता जाता: पक्षी जीव आणि सीक्रेट :- कोणाला बोलू नकोस, कोणाला सांगणार नाहीस ना ? असे बोलुन एक पक्षी जीव दुसर्‍या पक्षी जीवाला सीक्रेट डेटा ट्रान्सफर करतो. पण कोणाला बोलू नकोस किंवा सांगू नकोस हे शब्दच पाखरांना सातत्याने ट्रिगर करत राहतो, मग ज्या पक्षाला सीक्रेट डेटा ट्रान्सफर झाला आहे त्याला हाच डेटा ट्रान्सफर करण्याची "उर्मी" निर्माण होत राहते... मग परत हा जीव दुसर्‍या पक्षी जीवाला भेटतो तेव्हा... कोणाला बोलू नकोस, कोणाला सांगणार नाहीस ना ? :))) शेवटी मग पक्षाची सिस्टीम स्टेबल होते आणि जेवललं अन्न नीट पचतं! :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Karma Video Song (Hindi) - Kantara Chapter 1

आजी 08/03/2026 - 10:09
माझ्या स्नेही जनांचे मनापासून आभार मानते. माझ्या "गाॅसिपिंग याने की कुचाळक्या" या लेखाची एक हजाराहून अधिक वाचने झाली. प्रतिक्रिया निवडक, मोजक्या होत्या पण दर्जेदार आणि मनःपूर्वक दिलेल्या होत्या. त्या वाचून आनंद वाटला. तुमचा स्नेह मला लाभतो आणि मला नवीन काही लिहायला स्फूर्ती मिळते. सर्वांना या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
गॉसिपिंग उर्फ कुचाळक्या सर्वजण करतात. आपण सगळ्यांनी ते केलंय. लहान मुलं ,स्त्रिया, पुरुष, तरुण ,म्हातारे सगळेजण गॉसिपिंग करतात. गॉसिपिंग करण्यासाठी अट फक्त एकच. ज्याच्याबद्दल किंवा जिच्याबद्दल गाॅसिपिंग करायचं ती व्यक्ती तिथे हजर असता कामा नये. अर्थात कुणीतरी एक चहाडखोर असतोच बरं का आणि तो त्या व्यक्तीपर्यंत ही निंदा नालस्ती, टवाळकी लगबगीने पोहोचवतोच. काही पठ्ठे तर दोन्हींकडेही गाॅसिपिंग करतात आणि दोघांनाही एकमेकांच्या बातम्या पोहोचवतात. गॉसिपिंग फक्त दोघेजण किंवा अनेकजण एकत्र जमून देखील करतात. ते प्रत्यक्ष बोलून किंवा व्हॉट्सॲपवर सांकेतिक भाषेत किंवा फोनवरून देखील चालतं.

सी पी बेरार सर्किट

गवि ·

कंजूस 18/02/2026 - 16:09
आमचे बाबा बोलताना म्हणायचे आज 'बीबीला' जावं लागणार आहे. आपली 'जीआइपी'. तिकडे जास्ती {लोकल} गाड्या असतात. बीबी... म्हणजे Bombay, Baroda and Central India Railway (BB&CI) त्यांचे लघुरूप BB. आताची वेस्टर्न रेल्वे. जीआइपी...Great Indian Peninsula Railway. आताची सेंट्रल रेल्वे.

विजुभाऊ 18/02/2026 - 16:54
सी पी म्हणजे सेन्ट्रल प्रोव्हिन्स ( ज्याला आपण आज मध्य प्रदेश म्हणतो) आणि यु पी म्हणजे युनायटेट प्रोव्हिन्स अशी नावे होती. बेरार म्हणजे वर्‍हाड

गवि 18/02/2026 - 17:03
ब्रिटिशांनी भारत सोडल्यावर भारतातल्या लोकांना ब्रिटनचं नागरिकत्व घेण्याचा चॉईस देणं अशक्यच होतं कारण भारतातल्या लहान राज्याइतका त्यांचा देश होता. पण गोवा हे राज्य (पोर्तुगीज काळात) आकाराने लहान होतं. ते सोडून जाताना आणि त्यानंतर पोर्तुगालने गोवा राज्यात १९६० सालापूर्वी जन्म झाल्याचा पुरावा सादर करणाऱ्या गोव्याच्या नागरिकांना पोर्तुगालचं नागरिकत्व देऊ केलं होतं. अनेकांनी शाळा सोडल्याचे दाखले सादर करून, आणि कदाचित नसलेले तयार करून देखील, ते नागरिकत्व घेतलं आणि युरोपात स्थायिक झाले. मी असे काही लोक बघितले आहेत.

In reply to by गवि

चावटमेला 18/02/2026 - 17:17
हो. ह्यांतील बरेचसे लोक hospitality धंद्यांत आहेत. लंडन मध्ये ,विशेषतः हिथ्रो विमानतळाजवळील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स मधे बव्हंशी मॅनेजर, वेटर हे गोवन पाहिले आहेत जे पोर्तुगाल चे नागरिकत्व घेवून आले आहेत. कदाचित इंग्रजी वरील प्रभुत्वामुळे त्यांना ह्या नोकर्‍या सहज मिळत असाव्यात. शिवाय ह्या धंद्यांत पंजाबी विरुद्ध गोवन लॉबीचे राजकारण जोरात चालते असे एका housemate कडून ऐकले. खेदाची बाब म्हणजे भारतात वाढून, शिकून सुद्धा ह्या लोकांना भारताबाबत काडीचेही ममत्व नाही. आम्ही भारतीय नाही तर गोवन आहोत असे अगदी ठासून सांगतात.

In reply to by गवि

खटपट्या 18/02/2026 - 21:34
१९६० च्या आधी जन्म, ही अट अजुनही आहे का? कारण माझा एक मित्र, जो १९६० च्या नंतर जन्माला आला आहे त्याने पोर्तूगाल चे नागरीकत्व घेतले आहे. त्याचा जन्म गोव्याचा.

In reply to by खटपट्या

चावटमेला 18/02/2026 - 22:07
कंपनीतील एका सहकार्‍याच्या मते जर आई-वडील किंवा आजी-आजोबा ह्यांच्यापैकी कुणीही पोर्तुगीज अमदानीतील गोव्यात जन्मले असेल तर काही कागदपत्रांची पूर्तता करून पोर्तुगीज नागरिकत्व मिळू शकते. त्याच्या बायकोला मिळाले. मी एक यूट्युब विडिओ पाहिला होता त्यानुसार दरवर्षी भारतीय नागरिकत्वाचा त्याग करण्यात गोव्याचा नंबर पहिला आहे, अगदी पंजाब आणि गुजरातच्याही आधी. असो, उगाच चांगला धागा भरकटू नये म्हणून आवरते घेतो.

चावटमेला 18/02/2026 - 17:07
मी शाळेत असताना २५ राज्ये आणि ७ केंद्रशासित प्रदेश होते. पुढे उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगड, आणि काही वर्षांनी तेलंगाणा अशी चार राज्यांची भर पडली. अलीकडेच जम्मू-काश्मीर व लडाख हे दोन नवीन केंद्रशासित प्रदेश झाले, आणि दमण-दीव आणि दादरा-नगर हवेली चे एकत्रीकरण करून एकच केंद्रशासित प्रदेश केला.

In reply to by चावटमेला

गवि 18/02/2026 - 17:12
त्या दादरा नगर हवेलीची पण एक गंमत आहे. त्या प्रदेशाच्या मध्येच, सर्व बाजूंनी "दादरा नगर हवेली"ने वेढलेला असा एक भाग आहे जो प्रत्यक्षात गुजरात राज्यात येतो. नकाशा पाहिल्यास स्पष्ट होईल. असे अन्यत्र कुठे भारतात पाहिले नाही.

In reply to by गवि

त्या प्रदेशाच्या मध्येच, सर्व बाजूंनी "दादरा नगर हवेली"ने वेढलेला असा एक भाग आहे जो प्रत्यक्षात गुजरात राज्यात येतो. नकाशा पाहिल्यास स्पष्ट होईल. असे अन्यत्र कुठे भारतात पाहिले नाही.
हे माहित नव्हते. आताच नकाशात बघितले- मेघवाल हे त्या ठिकाणाचे नाव. विकिपीडीया म्हणत आहे की जानेवारी २०२२ मध्ये मेघवालचे दादरा-नगरहवेलीमध्ये विलीनकरण करायचा निर्णय घेतला होता पण त्याचे पुढे काही झाले नाही. पूर्वी दिव-दमण आणि दादरा-नगरहवेली हे दोन वेगळे केंद्रशासित प्रदेश होते. पण या दोन त्यामानाने लहान असलेल्या प्रदेशांसाठी स्वतंत्र प्रशासन चालवायचा खर्च जास्त होता म्हणून त्या दोन्हींचा मिळून एकच केंद्रशासित प्रदेश जानेवारी २०२० मध्ये करण्यात आला. गुजरातमध्ये कागदावर दारूबंदी आहे त्यामुळे हॉटेलांमध्ये वगैरे दारू मिळत नाही. (जुगाड करून घरी दारूची व्यवस्था करता येते पण अधिकृतपणे बाहेर मिळत नाही). त्यामुळे गुजरातचे बरेच लोक या ठिकाणी दारू प्यायला म्हणून जातात :)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

चेतन 19/02/2026 - 12:54
केरळमध्ये माहे नावाचे एक गाव आहे जे पांडिचेरीचा भाग आहे. याचे कारण हा फ्रेन्च वसाहतिचा भाग होता. तो अजुनही स्वस्त दारुसाठि तसाच ठेवला असावा.

सौंदाळा 18/02/2026 - 17:27
हे पहिल्यांदाच ऐकले रच्याकने सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथील महाविद्यालये पण मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत यायची वाटतं पुर्वी.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

गवि 18/02/2026 - 17:50
कॉलेजे अजूनही मुंबई विद्यापीठाखालीच येतात. रत्नागिरीत त्यांचे उपकेंद्र पण आहे. दहावी बारावी मात्र पापुमं कोल्हापूर डिव्हिजनखाली येत असावी. पुन्हा चुभुदेघे..

In reply to by गवि

पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगरे, रागगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ह्या ७ जिल्ह्यातील महाविद्यालये मुंबई विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येतात. दहावी, बारावी साठी पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगरे, रागगड ह्या जिल्ह्यात मुंबई विभाग आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग ह्या जिल्ह्यांसाठी कोल्हापूर विभाग आहे.

अरे वा. मस्त विषय. मला इतिहासाची आवड आहे आणि निदान नकाशा उघडून बघितला नाही तर इतिहास समजणार नाही असे मला तरी वाटते त्यामुळे भूगोलातील इतर संकल्पना (भूखंडमंच/ टुंड्रा प्रदेश वगैरे अजिबात आवडत नसल्या तरी) नकाशा बघायला खूप आवडते. त्यामुळे जमेल तितकी भर टाकेन. पाँडेचेरी (आताचे पुद्दुचेरी) या केंद्रशासित प्रदेशातील पाँडेचेरी शहर चेन्नईच्या दक्षिणेला आहे. पण त्याबरोबरच त्या केंद्रशासित प्रदेशात इतर काही प्रदेश आहेत ते पाँडेचेरीला संलग्न नाहीत. ते प्रदेश आहेत- यानम (जे आंध्र प्रदेशात पाँडेचेरीचे एन्क्लेव्ह आहे), कराईकल (जे तामिळनाडूत पाँडेचेरीचे एन्क्लेव्ह आहे) आणि माहे (जे केरळमध्ये पाँडेचेरीचे इन्क्लेव्ह आहे). ही तीनही ठिकाणे लहान बंदरांची ठिकाणे आहेत. भारतात युरोपिअनांचे राज्य स्थापित झाले त्यावेळेस बंदरांवर नियंत्रण असणे व्यापाराच्या दृष्टीने महत्वाचे होते. त्या दृष्टीने फ्रेंचांनी ही तीन ठिकाणे ताब्यात घेतली असावीत. कलकत्त्याजवळ चंद्रनगर म्हणून एक ठिकाण आहे. ते पण फ्रेंचांच्या ताब्यात होते. १९५० मध्ये तिथे सार्वमत घेतले गेले आणि ते ठिकाण भारतात विलीन झाले. जसे पाँडेचेरीमध्ये यानम, माहे, कराईकल ही ठिकाणे लांब आहेत त्याप्रमाणेच गोव्यापासून दिव आणि दमण ही ठिकाणे पण बरीच लांब- गुजरातजवळ आहेत. पण ती ठिकाणे पोर्तुगीजांच्या ताब्यात होती त्यामुळे १९६१ मध्ये गोवा मुक्ती झाली तेव्हा गोवा-दिव-दमण हा केंद्रशासित प्रदेश झाला. सीपी-बेरार म्हणजे सेंट्रल प्रॉव्हिन्स आणि बेरार. बेरार म्हणजे विदर्भाचा पश्चिम भाग. विदर्भाचा पूर्वेकडचा भाग मध्य भारत या राज्यात होता तर पश्चिमेकडचा भाग सीपी-बेरारमध्ये. १९५६ मध्ये मध्य प्रदेश राज्य स्थापन झाले तेव्हा सीपी-बेरारमधील बेरार म्हणजे पश्चिम विदर्भ आणि मध्य भारतात असलेला पूर्व विदर्भ (नागपूर वगैरे) मुंबई प्रांतात सामील केले गेले. उरलेले सीपी, मध्य भारत तसेच विंध्य भारत आणि भोपाळ ही राज्ये एकत्र करून मध्य प्रदेश हे राज्य निर्माण करण्यात आले. आता कर्नाटकात बॉम्बे कर्नाटक आणि हैद्राबाद कर्नाटक हे भाग दिसतात. ते कुठून आले? तर १९५६ मध्ये राज्य पुनर्रचना झाली तेव्हा हैद्राबाद राज्यातील तेलंगण आंध्र प्रदेशात विलीन करण्यात आले आणि उरलेला भाग- गुलबर्गा, रायचूर, यादगीर वगैरे कर्नाटकात (तेव्हाच्या म्हैसूर राज्यात) विलीन करण्यात आला- तो हैद्राबाद कर्नाटक. तसेच मुंबई राज्यातून उत्तर कन्नड जिल्हा (कारवार वगैरे) तसेच बेळगाव वगैरे भाग कर्नाटकात विलीन करण्यात आला- तो बॉम्बे कर्नाटक. लिहिण्यासारखे बरेच काही आहे. नंतर कधीतरी लिहेन.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

गवि 18/02/2026 - 17:58
याचेच एक एस्क्स्टेंशन म्हणता येईल ते म्हणजे, मी कुठेतरी वाचल्याचं आठवतं, कदाचित इथेच मिपावर, की नेदरलँड (डच) आणि त्याहूनही विशेष म्हणजे डेन्मार्क हा देश देखील भारतातल्या काही भागावर राज्य करत होता. तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल किंवा बंगालमधले छोटे भूभाग.

In reply to by गवि

याचेच एक एस्क्स्टेंशन म्हणता येईल ते म्हणजे, मी कुठेतरी वाचल्याचं आठवतं, कदाचित इथेच मिपावर, की नेदरलँड (डच) आणि त्याहूनही विशेष म्हणजे डेन्मार्क हा देश देखील भारतातल्या काही भागावर राज्य करत होता. तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल किंवा बंगालमधले छोटे भूभाग.
हो डचांचे कोचीन आणि क्विलॉन (आताचे कनन्नोर) या केरळमधील भागांवर तसेच नागापट्टणम या तामिळनाडूतील बंदराच्या शहरावर नियंत्रण होते. आजही कोचीनमध्ये एक डच पॅलेस आहे. पण नंतर डचांनी भारतापेक्षा मसाल्याच्या पदार्थांसाठी अधिक प्रसिध्द अशा इंडोनेशिया आणि श्रीलंकेतील काही भागांवर लक्ष केंद्रीत केले आणि भारतात ते राहिले नाहीत. शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती तेव्हा महाराजांनी मागितलेली खंडणी देऊन डचांनी त्यांची सुरतमधील वखार वाचवली होती. डॅनिश लोकांचे अंदमानवर नियंत्रण होते. १८६८ मध्ये ते ब्रिटिशांनी अंदमानवर नियंत्रण मिळवले. कौन बनेगा करोडपती मध्ये पहिला ५ कोटी मिळवलेला बिहारचा एक होता त्याला ५ कोटींसाठी अंदमान कोणाच्या ताब्यात होते हा प्रश्न होता. त्याने डॅनिश लोकांच्या हे उत्तर दिले होते. त्यानंतर आंतरजालावर शोधाशोध करून हे समजले. जर पोर्तुगीजांनी ब्रिटिशांना मुंबई बेट हुंड्यात भेट म्हणून दिले नसते तर कदाचित मुंबई पण पोर्तुगीजांच्या ताब्यात राहिले असते. इतिहासात जर-तरला काहीही अर्थ नसतो पण त्या एका निर्णयामुळे सगळे काही किती बदलले. ब्रिटिशांच्या ताब्यात गेल्यामुळे शहरात व्यापार-शिक्षण यांचा बराच विकास झाला. नाहीतर पोर्तुगीजांच्या ताब्यात असते तर गोव्याप्रमाणे स्वस्त दारू मिळणारे ठिकाण हीच मुंबईची ओळख राहिली असती का?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

आणि मुंबईची तुंबई झाली, मुंबई महाराष्ट्रात आहे पण मुबईत महाराष्ट्र नाही वगैरे गोष्टींपासून आमचा बचाव झाला असता. सुबोधजी खरे साहेब सुशेगात होऊन 'चील' म्हंटले असते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सुबोध खरे 19/02/2026 - 09:47
क्विलॉन (आताचे कनन्नोर) तपशिलात त्रुटी क्विलॉन म्हणजे कोल्लम हे कोची च्या दक्षिणेस आहे तर कनन्नोर म्हणजे आताचे कण्णूर हे कोची च्या उत्तरेस आहे

In reply to by चंद्रसूर्यकुमार

जर ब्रिटिशांनी अंदमानवर नियंत्रण मिळवले नसते आणि ते डॅनिश लोकांच्या ताब्यातच राहिले असते तर आज भारताचा भाग असले असते का?

In reply to by अनामिक सदस्य

झाले असते. फ्रेंच आणि पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेली ठिकाणे नंतरच्या काळात भारतात सामील झालीच. तसेच कधीना कधी अंदमानचेही झाले असते.

स्वधर्म 18/02/2026 - 18:11
आजही भारतातील विमानांच्या बॉडीवर व्ही टी - नंबर लिहिलेला असतो. व्हीटी म्हणजे व्हिक्टोरिया टेरिटरी आहे असे समजले होते. इंग्रजांचे राज्य जाऊन किती वर्षे झाली, पण आपण आपल्या विमानांना अजून व्हीटी असे नोंदवतो हे समजायला कठीण आहे.

In reply to by स्वधर्म

गवि 19/02/2026 - 09:47
VT बदलले पाहिजे हे तात्विकदृष्ट्या रास्त पण रजिस्ट्रेशन बदलणे आणि इतक्या प्रचंड संख्येने असलेल्या विमानांचे, टप्प्याटप्प्याने, हे प्रचंड किचकट आणि खर्चिक काम आहे. त्यातही ही फक्त नंबर प्लेट किंवा शेपट्या नव्याने रंगवण्यापुरती साधी प्रक्रिया नसून असंख्य ठिकाणी त्याची तांत्रिक एन्ट्री देखील असते. त्यात विमान वाहतुकीची वेळापत्रक दृष्टीने महाप्रचंड उलथापालथ होऊ शकते. ही खूप जुन्या काळापासून जागतिक पातळीवर एस्टॅब्लिश झालेली पद्धत बदलून BH किंवा तत्सम बदल करणे वाटते तितके सोपे नाही. म्हणून ते तहकूब आहे. VT याच अक्षरांचा भारतीय इतिहासातील गौरवास्पद असा फुल फॉर्म शोधणे हा अधिक स्मार्ट उपाय ठरेल. उदा. BMC, बॉम्बे शब्द बदलला तरी बृहन्मुंबई वापरून शॉर्टफॉर्म तसाच ठेवता येतो तत्सम. किंवा VJTI सारखं. व्हिक्टोरिया ज्युबिली ऐवजी वीरमाता जिजाबाई.

स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिश भारतात ब्रिटिशांच्या अंमलाखाली प्रदेश होता आणि संस्थानेही होती. १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले ते ब्रिटिश भारताला. त्यानंतर एकेक करून संस्थाने भारतात विलीन झाली. पंजाबमधील अशा संस्थानांचे १९४८ मध्ये पेप्सू म्हणून राज्य स्थापन केले गेले होते. पेप्सू म्हणजे पतियाळा अ‍ॅन्ड ईस्ट पंजाब स्टेट्स युनियन. त्या राज्याची राजधानी पतियाळा होती. पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग त्या पतियाळाच्या संस्थानिकांच्या कुटुंबातील. म्हणजे स्वातंत्र्यानंतर पंजाब, हिमाचल प्रदेश आणि पेप्सू ही राज्ये होती. खालील नकाशात दिसेल की त्यावेळेस पेप्सू आणि हिमाचल प्रदेश हे एकसलग भाग नव्हते तसेच पेप्सूमध्येही पंजाबचा एक भाग 'एन्क्लेव्ह' म्हणून होता. Punjab (नकाशाचा संदर्भः विकीपीडीया) मग नंतरच्या काळात पेप्सू पंजाबमध्ये विलीन करण्यात आले आणि काही भाग हिमाचलमध्ये विलीन करण्यात आला. त्यानंतर इंदिरा गांधींनी १९६६ मध्ये पंजाबमधून हरियाणा हे राज्य वेगळे केले.

रेल्वेचे एकुण १८ झोन आहेत. त्यान्ची नावे खालीलप्रमाणे १. मध्य रेल्वे (CR): मुंबई २. पश्चिम रेल्वे (WR): मुंबई ३. उत्तर रेल्वे (NR): दिल्ली ४. दक्षिण रेल्वे (SR): चेन्नई ५. पूर्व रेल्वे (ER): कोलकाता ६. दक्षिण पूर्व रेल्वे (SER): कोलकाता ७. उत्तर पूर्व रेल्वे (NER): गोरखपूर ८. ईशान्य सीमा रेल्वे (NFR): गुवाहाटी ९. दक्षिण मध्य रेल्वे (SCR): सिकंदराबाद १०. पूर्व मध्य रेल्वे (ECR): हाजीपूर ११. उत्तर पश्चिम रेल्वे (NWR): जयपूर १२. दक्षिण पश्चिम रेल्वे (SWR): हुबळी १३. उत्तर मध्य रेल्वे (NCR): अलाहाबाद (प्रयागराज) १४. पश्चिम मध्य रेल्वे (WCR): जबलपूर १५. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR): बिलासपूर १६. पूर्व किनारी रेल्वे (ECoR): भुवनेश्वर १७. कोलकाता मेट्रो (MR): कोलकाता १८. दक्षिण कोस्ट रेल्वे (SCoR): विशाखापट्टणम (१८ वा झोन) ह्यातील मध्य रेल्वे हा झोन पाहिला तर मुखालय मुंबई (छ्त्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) हा झोन महाराष्ट्राचा बराचसा भाग, कर्नाटकचा उत्तर पूर्व भाग आणि मध्य प्रदेशचा दक्षिण भाग व्यापतो. त्यातही चर्चगेट ते बडोदा/वडोदरा हा मार्ग पश्चिम रेल्वेच्या अखत्यारीत. मराठवाड्यातला काही भाग दक्षिण मध्य रेल्वेच्या ताब्यात. कोकण रेल्वेची हद्द सुरु होते रोहा (जिल्हा रायगड) ह्या स्थानकानंतर. ठाणे जिल्ह्यातील उत्तरकोकणाचा भाग पश्चिम रेल्वेत, मुंबई ते रोहा (पनवेल मार्गे) मध्य रेल्वेत आणि रोहा नंतर कोकण रेल्वे. कागदावरील महसुली जिल्हे, राज्ये आणि रेल्वेची हद्द ह्या एकमेकांशी सुसंगत नसणाऱ्या गोष्टी आहेत. तुघलकाबाद हे स्थान भौगोलिकदृष्ट्या दिल्लीजवळ, आजूबाजूला सगळीकडे उत्तर रेल्वेचे साम्राज्य, पण तुघलकाबाद मधील विद्युत लोको शेड हि पश्चिम मध्य रेल्वे (मुख्यालय: जबलपूर) ह्यांच्या अख्यतारीत.

In reply to by अनिकेत वैद्य

एकतर रेल्वे हे राज्य आणि केंद्र या दोन्ही सूचींत न ठेवता फक्त केंद्र सूचीत आहे त्यामुळे राज्यांना आपल्या राज्यांतर्गत रेल्वे मार्ग विकसित करता येत नाहीत. असे का मला ठाऊक नाही. एकूण भारतीय रेल्वे ही प्रचंड अकार्यक्षम, अजागळ आणि जनतेच्या प्रचंड गैरसोयीची गोष्ट आहे. ती मॉडर्नाईज करणे एवढे विलंब लावणारे प्रकरण आहे की बस्स. डेक्कन भागात रेल्वेचे जाळे अजिबात पसलेले नाही याला केवळ भूगोल कारणीभूत आहे का?

सुबोध खरे 18/02/2026 - 20:04
आमच्या लहानपणी कोकणातील जिल्हे म्हणजे मुंबई आणि ठाकुर असे होते म्हणजे ठाणे कुलाबा आणि रत्नागिरी. १९७८ च्या आसपास रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन करून सिंधुदुर्ग जिल्हा वेगळा करायचे ठरले तेंव्हा हे कोकणचे जिल्हे "ठाकुरसि" होणार होते म्हणजे ठाणे कुलाबा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग . पण श्री अंतुले यांनी तेवढ्यात मखलाशी करून कुलाबा जिल्ह्याचे नामकरण रायगड केले त्यामुळे हे ठारारसि झाले ठाणे कुलाबा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आणि आता पालघर जिल्हा वेगळा होऊन पाठारारसि झालंय

स्वातंत्र्यानंतरचे मद्रास राज्य म्हणजे एक अजब प्रकार होता. आताच्या कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्हा (मंगलोर वगैरे), सध्याच्या केरळमधील उत्तरेकडील मलबार भाग (कासारगोड, कोझिकोडे, मल्लापुरम वगैरे), कन्याकुमारी वगळता सध्याचे पूर्ण तामिळनाडू राज्य आणि तेलंगण वगळता सध्याचा आंध्र प्रदेश एवढा मोठा भाग त्या राज्यात येत होता. सध्या केरळमध्ये असलेले मध्य भागातील कोचीन आणि दक्षिण भागातील त्रावणकोर (तिरूवनंतपुरम वगैरे) यांचे कोचीन-त्रावणकोर हे वेगळे राज्य होते. सध्या कर्नाटकात असलेले कूर्ग हे सुंदर ठिकाण वेगळे राज्य होते. तर सध्या कर्नाटकात असलेला उत्तर कन्नड जिल्हा (कारवार वगैरे) आणि बेळगाव वगैरे उत्तर पश्चिमेकडील भाग मुंबई राज्यात होते. तर कर्नाटकात उत्तर पूर्वेकडील गुलबर्गा, बीदर, रायचूर आणि बेल्लारी सुध्दा हे भाग हैद्राबाद राज्यात होते. सध्या कर्नाटकात असलेले इतर भाग त्यावेळेस म्हैसूर राज्यात होते. १२ वर्षांपूर्वी तेलंगणची स्थापना होण्यापूर्वी दक्षिण भारतात चार (आणि आता पाच) राज्ये दिसतात त्यापेक्षा पूर्ण दक्षिण भारताचा भूगोल पूर्ण वेगळा होता हे आणि मद्रास राज्य किती विलक्षण गुंतागुंतीचे होते हे पुढील नकाशावरून समजेलच. Madras पोट्टी श्रीरामूलूंचा उपोषणात मृत्यू झाल्यानंतर १९५३ मध्ये मद्रास राज्यातील तेलुगु भाषिक भाग वेगळा करून आंध्र प्रदेश हे राज्य स्थापन करण्यात आले. त्यात कोस्टल आंध्र (विजयवाडा, विशाखापट्टणम वगैरे) आणि रायलसीमा (नेल्लोर, कडप्पा, कुर्नूल वगैरे) भागांचा समावेश केला गेला. तेव्हा आंध्र प्रदेशची राजधानी होती कुर्नूल. वर म्हटल्याप्रमाणे कन्याकुमारी त्यावेळेस मद्रास राज्यात नव्हते तर ते कोचीन-त्रावणकोर या राज्यात होते. त्या राज्यात मल्याळम भाषा प्रमुख होती तर कन्याकुमारी होते तामिळ भाषिक. म्हणून कन्याकुमारीचे तामिळचे प्रभुत्व असलेल्या मद्रास राज्यात विलीनीकरण करावे म्हणून कन्याकुमारीत निदर्शने झाली. ही गोष्ट १९५५ मधील. १९५२ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसविरोधात लढणारे दोन प्रमुख समाजवादी पक्ष होते- जयप्रकाश नारायणांचा समाजवादी पक्ष आणि आचार्य कॄपलानींचा किसान मजदूर प्रजा पक्ष. दोन्ही पक्षांनी बर्‍यापैकी मते घेतली पण काँग्रेसविरोधी मते विभागली गेल्याने त्यांना निवडणुक जिंकणे सोडाच जागाही बर्‍याच कमी मिळाल्या. म्हणून १९५२ मध्ये निवडणुक संपल्यावर या दोन पक्षांचे विलीनीकरण झाले आणि प्रजा समाजवादी पक्ष हा पक्ष निर्माण झाला. त्यावेळेस कोचीन-त्रावणकोरचे मुख्यमंत्री होते या प्रजा समाजवादी पक्षाचे वासुदेवन नायर (बहुदा). तर कन्याकुमारीचे मद्रास राज्यात विलीनीकरण व्हावे म्हणून जी निदर्शने झाली होती त्यावर या वासुदेवन नायर यांच्या सरकारने गोळीबार केला आणि त्यात काही लोक मारले गेले. मग आपल्याच लोकांवर आपले सरकार गोळीबार कसा करू शकते या मुद्द्यावरून राम मनोहर लोहिया या प्रजा समाजवादी पक्षातून बाहेर पडले आणि त्यांनी स्वतःचा संयुक्त समाजवादी पक्ष स्थापन केला. समाजवादी परिवारात पडलेल्या शेकडो फुटींपैकी ही पहिली फूट होती. त्यानंतर १९५६ मध्ये राज्य पुनर्रचना झाली त्यात बरेच बदल केले गेले. एक तर मद्रास राज्यातून मलबार जिल्हा वेगळा करण्यात आला आणि तो मलबार जिल्हा तसेच कोचीन-त्रावणकोर राज्य यांचे विलीनीकरण झाले आणि नवे केरळ हे राज्य बनले. त्याचवेळेस कन्याकुमारीला मद्रास राज्यात जोडण्यात आले. तसेच मुंबई राज्यातील उत्तर कन्नड जिल्हा, बेळगाव वगैरे भाग, हैद्राबाद राज्यातील तेलंगण हा तेलुगू भाषिक भाग वगळता गुलबर्गा, रायचूर वगैरे भाग, कूर्ग यांचे म्हैसूर राज्यात विलीनीकरण करण्यात आले. आता आपण ज्याला कर्नाटक म्हणतो त्याला तेव्हा म्हैसूर राज्य म्हणायचे. कर्नाटक हे नाव १९७० च्या दशकात दिले गेले. त्याप्रमाणेच हैद्राबाद राज्यातील तेलंगण आंध्र प्रदेशात विलीन करून राज्याची नवी राजधानी झाली हैद्राबाद. आणि हे सगळे भाग जाऊन उरलेला भाग राहिला मद्रास राज्यात. त्या राज्याचे नाव १९७० च्या दशकात तामिळनाडू असे केले गेले.

गवि 18/02/2026 - 20:59
काही कायदे देखील पूर्ण राज्य कव्हर न करता एका विशिष्ट भागापुरते लागू होतात. बॉम्बे टेनन्सी ॲक्ट हा पूर्वी मुंबई, महाराष्ट्रातला काही भाग आणि गुजरातचा काही भाग, या एरियात लागू होता. बॉम्बे प्रॉव्हिन्स म्हणत असत, त्या भागात बहुधा. आताही तो गुजरातमध्ये वेगळ्या नावाने लागू आहे. महाराष्ट्रात या कायद्यात मुंबई आणि काही जिल्हे त्यात कव्हर होतात. पश्चिम, उत्तर महाराष्ट्र आणि कोंकण. मराठवाडा आणि विदर्भाला तो लागू होत नाही. वकिलांनी खात्री करून द्यावी.

मनो 18/02/2026 - 21:21
गवि, मुळात उत्तर आणि दक्षिण असे कोकणचे दोनच भाग ब्रिटिश राज्यात होते. त्यांचा उगम त्याहूनही मागे म्हणजे इसवी १५५० सुमारास आहे. नगरच्या निजामशाहीच्या ताब्यात असणारे कोकण याला मोगल निजामशाही तळकोकण म्हणत. त्यात मुंबई, चौल, जंजिरा, अलिबाग इत्यादी सर्व भाग येई. दुसरा भाग म्हणजे आदिलशाही तळकोकण. त्यात तुम्ही म्हणता तो सर्व भाग येई, थेट गोव्याच्या पलीकडे कारवार पर्यंत. शहाजहान बादशहाने निजामशाही घेतली आणि औरंगझेबाने आदिलशाही, यात पन्नास वर्षे मध्ये गेली. हा भाग असा दोन तुकड्यात विभाजित होण्याचाही आधी आणि काही काळ नंतरही यात छोटी छोटी स्वतंत्र राज्ये होती. भौगोलिक दुर्गमतेमुळे ऐन मुसलमानी बहामनी राज्यातही ती कशीबशी टिकून राहिली. सूर्यराव सुर्वे, चंद्रराव मोरे, पालवणीचे दळवी, वेंगुर्ला आणि वाडीचे सावंत भोसले, यांची मुळे याहूनही खोलवर जातात. यांच्यावर आपली सत्ता बसवण्यासाठी बहामनी महमूद गवान इत्यादी लोकांनी कोकणात स्वाऱ्याही केल्या. विशाळगडचा दर्गा मला वाटते असल्याच एक आक्रमकाचा आहे. मुळात शिवाजी महाराजांचे आणि मोगलांचे वैर होण्याचे आद्य कारण म्हणजे निजामशाही तळकोकण, कारण यातील कल्याण, रायरी हा जुना निजामशाही तळकोकणाचा भाग निजामशाहीचे नवे मालक मोगलांना मिळायला हवा, परंतु आदिलशाही आणि मोगल यांच्या भांडणात शिवाजी महाराज हा भाग आपल्या राज्यात सामील करून बसले होते. कोकणचे भौगोलिक दुर्गमत्व आणि व्यापारी महत्त्व लक्षात घेऊन महाराजांनी आपल्या राज्यात सामील केलेला हा पहिला प्रदेश. तुमच्या भूगोलात इतका मोठा इतिहास दडलेला आहे!

In reply to by मनो

गामा पैलवान 18/02/2026 - 23:29
मनो, भूगोलातल्या इतिहासावरनं आठवलं की शंभूपुत्र शाहूमहाराज आपलं राज्य जेफनापट्टण म्हणजे आजचा जाफना इथवर मानीत असंत. तसं असेल तर ते मोठं रोचक तथ्य ठरावं. आ.न., -गा.पै.

In reply to by प्रचेतस

रूमशान म्हणजे रोम किंवा सिरिया असे दोन्ही प्रदेश हे होऊ शकतात. पण भारतीयांना इस्तंबूल हेच युरोपातले मोठे शहर वाटत होते का? कुणीतरी मला मागे रूमशान इस्तंबूलच असे सांगितले होते त्यामुळे माझा गोंधळ झाला. विषय होता की शिवशंभू नंतर तेव्हड्या प्रचंड महत्त्वाकांक्षेचे त्या घरात कुणी जन्मले नाही असा. तेव्हा शाहू महाराजांना इस्तंबूल देखील जिंकून घ्यायचे होते असे कुणीतरी मला सांगितले. रेडिट वर की कोरा वर ते आठवत नाही.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

प्रचेतस 19/02/2026 - 12:29
इस्तंबूलला कुंस्तुंतुनिया (बायझन्टाईन साम्राज्यातले कॉस्न्टेन्टिनोपल) असेही इकडे म्हटले जात असे. मराठेशाही किंबहुना मुघलकाळात देखील तुर्कीचे ऑटोमन साम्राज्य बलाढ्य होते. इतके की मुघल बादशहांना सुद्धा आपल्या बादशहापदासाठी तुर्की खलिफाची मान्यता असणे भाग्याचे आणि जरुरीचे वाटत असे.

In reply to by प्रचेतस

अजून एक विषय मला तुम्हाला विचारायचा आहे की जुन्या भारतीयांची भौगोलिक समज काय होती उर्वरीत जगाबद्दल? म्हणजे त्यांना मंगोलिया चीन बद्दल माहीत होते का? मराठे मादागास्कर वगैरे पर्यंत गेले होते असे अलीकडे समोर येत आहे. मात्र तेव्हा भारतीयांची युरोपबद्दल काय समज होती. सिकंदर तर खूपच पूर्वी येऊन गेला त्यामुळे भारतीयांना ग्रीस वगैरे प्रदेश ऐकून तरी ठाऊक असणार आहेत. पण त्यांनी त्यांच्या प्रवासाबद्दल सांगितलेच असेल ना. अतिशय अद्भुत साइट आहे ही. जगातील जवळजवळ लाखाहून अधिक ऐतिहासिक नकाशे डिजिटल केले आहेत! https://www.davidrumsey.com/ १५५४ च्या आसपासचा Pirî Reis याचा एक अटलास माझा absolute favorite आहे! त्या वेळेस या माणसाचे एकुण भौगोलिक ज्ञान पाहून मी चाटच पडलो होतो त्याने एवढा प्रचंड अ‍ॅक्युरेट नकाशा बनवला होता तेही अनेक नकाशांचे आणि लोकांचे ज्ञान गोळा करून.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

प्रचेतस 19/02/2026 - 12:47
अगदी मौर्यकाळापासून ग्रीकांशी व्यापार होत असे. अलेक्झांडरमुळे इंडो बॅक्ट्रियन राज्ये इकडे होतीच. सेल्युकस निकेटरची मुलगी चंद्रगुप्ताला पत्नी म्हणून दिलेली होती. मात्र प्रवासी भारतीयांना लिहिण्याची सवय नसल्यामुळे त्यांचे वृत्तांत फारसे उपलब्ध नाहीत. मात्र पेरीप्लस ऑफ एरिथ्रियन सी मध्ये त्याबद्द्ल विपुल प्रमाणात आलेले आहे. रोमन इतिहासकार प्लिनीने तर भारतीय आयातीच्या बदल्यात रोमनांच्या सुवर्णनाण्यांचा ओघ भारतात वाहात असल्याबद्द्ल चिंता व्यक्त केली होती. बाकी मंगोलिया, चीन्बद्द्ल तर पूर्वीपासून माहिती होतेच. चीनशी बराच व्यापार होता. मंगोल टोळीवाल्यांनी तर जवळपास १/४ भूभागावर राज्य केले. चोळांनी इंडोनेशिया, मलेशिया इत्यादींशी आपल्या सीमा भिडवल्या होत्या. तर छत्रपती शिवाजीमहाराजांच्या आरमाराची दहशत खुद्द मस्कतच्या अरबांनी घेतली होती (यावर आजच मिपाकर बॅटमॅनने एक लेख लिहिला आहे) मात्र आपल्या प्रवाश्यांनी केलेली परदेशातील प्रवासांची वर्णने फारशी नाहीत.
अतिशय अद्भुत साइट आहे ही. जगातील जवळजवळ लाखाहून अधिक ऐतिहासिक नकाशे डिजिटल केले आहेत!
याबद्द्ल धन्यवाद. सवडीने बघावे अशीच साईट आहे.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

दोहो बाजुन व्यापार चालू असल्याने आपल्याला आणी युरोपियनांना एकमेकांविषयी भरपुर माहीती होती. भृगकच्छ, शुर्पारक, कलीयान, माहीम, चेउल (सेमुल्ला) ही प्रमुख बंदरे. यातून सर्वदुर व्यापारी संपर्क असल्याने भौगोलीक माहीतिचीही देवाण घेवाण होत असणारच... (रॉटरडॅम इथल्या नावीक संग्रहात एका कार्टोग्राफरने १६१९ मधे काढलेला कोकणचा नकाशा ठेवलाय तिथे ही बंदरे स्पष्ट दाखवली माझ्याकडे त्याचा फोटो आहे पण मोबाईल मधे आहे. इथे कसा द्यायचा माहीत नाही)

१. पश्चिम महाराष्ट्र पश्चिमेला नाही. २. मध्य महाराष्ट्र म्हणजे मराठवाडा की नगर? ३. खानदेश नेमका कुठे आहे? आणि नाशिक पश्चिम महाराष्ट्रात घ्यावे का? ४. माणदेश आणि पश्चिम वेगळा करायचा का? ५. मावळ नेमका भाग कुठला? ६. मराठवाडा नेमका कळतो मात्र बेरार म्हणजेच वर्‍हाड कुठून सुरू होतो आणि कुठे संपतो? ७. कोकण हा त्याच्या अगदी डिस्टिंक्ट भौगोलिक रचनेमुळे वेगळा दिसतो. परंतु मुंबैला कोकण मानावे का? बाकी तळ कोकण आनि सह्यप्रदेश ही ही एक भानगड आहे. ८. कोल्हापूर, सांगली यांना दक्षिण महाराष्ट्र का म्हणत नाहीत? की बेळगाव आणि त्या भागाला म्हणायचे? ९. कारवार बिदर वगैरे हे अलभ्य मराठी प्रदेश यांना काय म्हणावं?

In reply to by हणमंतअण्णा शंक…

म्हणजे नेमके काय? माझ्या मते, घाट उतरल्यावर जो तुलनेने समतल प्रदेश लागतो त्याला तळकोकण म्हणतात. का दक्षिण कोकणाला तळकोकण म्हणतात?

In reply to by हणमंतअण्णा शंक…

गवि 18/02/2026 - 23:49
मला वाटते कोंकणातील कोअर भाग. म्हणजे रायगडच्या दक्षिणेचा, याला म्हणत असावेत. किंवा ते कोंकण जे घाटांच्या उताराच्याही खाली समुद्रसपाटीवर प्रॉपर वसलेलं आहे, ते.. असाही अर्थ असू शकेल. उदा. आंबाघाट येथील गावे, साखरपा येईपर्यंत तळकोकणात मोजत नसतील पण रत्नागिरी, दापोली, गुहागर, देवगड, कुणकेश्वर हे त्यात येत असेल. नेमके माहीत नाही तिकडे लहानपण गेले असले तरी. मी त्याचा अर्थ कुडाळ देवगड सावंतवाडी असा घेत आलोय.

In reply to by गवि

इथे डोंगर आणि टेकड्या संपून बर्‍यापैकी समुद्रसपाटीचा किंवा थोडा उंच पठारी प्रदेश सुरु होतो म्हणून याला तळकोकण म्हणत असावेत कारण घाट उतरल्यावर आपण तळावरच जाणार.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

खटपट्या 19/02/2026 - 01:30
पालघर पासुन गोव्याच्या सिमेपर्यंत कोकण आहे, तळकोकण म्हणजे दक्षिणेकडचे कोकण - चिपळूण पासून खाली तळकोकण म्हणण्यास हरकत नाही, पण तळकोकणाची काही सिमा नाही. जसे साउथ मुंबई. पश्चिम महाराष्ट्राबाबत नेहमीच गोंधळ आहे. कारण खरे तर महाराष्ट्राच्या पष्चिमेला कोकण येतो पण त्यास पश्चिम महाराष्ट्र म्हणत नाहीत. असो

In reply to by हणमंतअण्णा शंक…

विजुभाऊ 19/02/2026 - 10:40
जावळीत जावळी नावाचे गावच नाहिय्ये, दुसरे म्हणजे पुणे शहर हे हवेली तालुक्यात येते. डेक्कन मात्र भांबुर्डेमधे यते

In reply to by विजुभाऊ

प्रचेतस 19/02/2026 - 11:34
जावळी हे नाव गावावरुन नव्हे तर तेथील घनदाट जंगलावरुन आले आहे. झाडांची इतकी दाटी जशी झाडांची जाळीच जणू ते जावळी.

In reply to by विजुभाऊ

आहे. महाबळेश्वर पायथ्याच्या दरे खोर्‍यात जावळी गाव आहे. कुंभरोशी वरुन दरे कडे जाताना रस्त्यावर हे गाव आहे. पुर्वी एक असेल पण सध्या दोन वाड्या आहेत. थोरली जावळी आणी वरची जावळी. यातल्या वरच्या जावळीत मोर्‍यांच्या वाड्याचे अवशेष आहेत. मी ही दोन्ही गावे आनी वाड्याचे अवशेष बघीतले आहेत.

In reply to by स्वच्छंदी_मनोज

थोरली जावळी आणी वरची जावळी. यातल्या वरच्या जावळीत मोर्‍यांच्या वाड्याचे अवशेष आहेत. मी ही दोन्ही गावे आनी वाड्याचे अवशेष बघीतले आहेत.
मोर्‍यांच्या वाड्याचे अवशेष आहेत का? हे विचारायचे कारण म्हणजे एक गोष्ट आठवली. शाळेत असताना आमची सहल प्रतापगड आणि शिवथरघळ येथे गेली होती. तेव्हा शिवथरघळीहून एक दिवस सकाळी 'आपल्याला चंद्रराव मोर्‍यांचा वाडा बघायला जायचे आहे' म्हणून आम्हाला नेले. डोंगरावरून बराच वेळ चालत गेल्यावरही वाड्याचा पत्ता नव्हता. शेवटी एके ठिकाणी गेल्यावर- इथे चंद्रराव मोर्‍यांचा वाडा होता अशी आमची बोळवण केली गेली. प्रत्यक्षात तिथे काहीही नव्हते- नुसते गवत होते. एक दगडही नव्हता. बहुदा आमच्या बरोबर आलेल्या शिक्षकांनाही तो वाडा नक्की कुठे होता हे माहिती नसावे त्यामुळे आम्हाला नुसतेच चालत नेले आणि आपण रस्ता चुकलो किंवा आपल्याला माहित नाही हे मान्य करायचे नसेल म्हणून कदाचित 'इथे वाडा होता' असे काहीतरी सांगून आम्हाला पिटाळून लावले असावे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

शिवथर इथुन थोडे वरच्या बाजुला सह्याद्रीच्या अगदी पायथ्याला चेरावडी म्हणून गाव आहे (१.५ किमी). त्या गावाच्या पुढे अगदी डोंगर तळात मोर्‍यांचा वाडा आहे... अगदी आत जंगलात असल्याने चटकन सापडत नाही आणी आता फक्त काहीच अवशेष उरलेत. सह्यमाथ्यावरच्या कुंड गावातून खाली खुटे नावाची घाटवाट उतरते तेव्हा ह्या वाड्यावरुन वाट जाते. अम्ही खुटे घाट वाट ट्रेक केलेला तेव्हा हा वाडा बघीतलेला.. तसा अजुन एक मोर्‍यांचा वाडा आहे.. कोयना धरण क्षेत्रात उचाट नावाचे एक गाव आहे त्या गावाच्या पुढे निरपजी म्हणून मोर्‍यांचे कुलदैवत आणी देवराई आहे, तिथेही मोर्‍यांचा वाड्याचे अवशेष आहेत...

In reply to by हणमंतअण्णा शंक…

प्रचेतस 19/02/2026 - 11:30
५. मावळ नेमका भाग कुठला?
मावळाचा प्राचीन उल्लेख कार्ले येथील शिलालेखात मामाड असा आलाय. तर ह्या प्रदेशाला त्याकाळात 'मामलाहार' म्हणत. मावळ म्हणजे रूढार्थाने मावळतीकडचा म्हणजे पश्चिमेकडचा प्रदेश. इकडील नद्यांच्या खोर्‍यांवरुन त्या त्या मावळाला विशिष्ट नावे पडली. पवनेच्या खोर्‍यातील पवन मावळ, आंद्रेच्या खोर्‍यातील आंदर मावळ तर कसबे नाणे गावाभोवतालचे नाणेमावळ.
६. मराठवाडा नेमका कळतो मात्र बेरार म्हणजेच वर्‍हाड कुठून सुरू होतो आणि कुठे संपतो?
बेरार म्हणजे सर्वसाधारणपणे अमरावती, वर्धा, नागपूर. बहमनी साम्राज्याची पाच छकले होऊन अहमदनगरची निजामशाही, बिदरची बरीदशाही, विजापूरची आदिलशाही, गोवळाकोंड्याची कुत्बशाही आणि बेरारची इमादशाही अशा पाच सल्तनती स्थापन झाल्या. इमादशाहाची राजधानी एलिचपूर (आजचे अचलपूर). विस्ताराने जरी मोठं असलं तरी ह्यांचे सैनिकी सामर्थ्य तुलनेने कमी होते पण नरनाळा, गाविलगड असे बलाढ्य किल्ले त्यांच्या आधिपत्याखाली होते.
कोकण हा त्याच्या अगदी डिस्टिंक्ट भौगोलिक रचनेमुळे वेगळा दिसतो. परंतु मुंबैला कोकण मानावे का? बाकी तळ कोकण आनि सह्यप्रदेश ही ही एक भानगड आहे.
कोंकणाचे पूर्वीचे नाव म्हणजे अपरान्त. पहिल्या शतकातला परकीय प्रवासी स्ट्राबो कोंकणाचा उल्लेख 'कोनियकोई' असा करतो. कोंकणाची व्युत्त्पत्ती तशी नीट लागत नाही मात्र कोण म्हणे डोंगरमाथा व रेणुकादेवीचे इकडील नाव कुंकुणा अशा नावावरुन कोंकण नाव आले असे मानले जाते. मध्ययुगात लाट (दक्षिण गुजरात), शूर्पारक (आजचे नालासोपारा), अष्टागर (अक्षी, नागाव, किहिम वगैरे प्रदेश) आणि त्या खालचे कोंकण व तदनंतर गोमंतक असे मानले जात असे. तळकोकण मात्र चिपळूणपासून पुढे हे सहज मानता यावे.

In reply to by प्रचेतस

सुबोध खरे 19/02/2026 - 12:06
तळकोकण म्हणजे सध्याचा सिंधुदुर्ग जिल्हा. येथे मालवणी भाषा हि जास्त बोलली जाते. रत्नागिरी जिल्हा हा पूर्ण डोंगराळ आहे . पोलादपूर सोडल्यावर कशेडी घाट चालू होतो तेथे रत्नागिरी जिल्हा चालू होतो तेथपासून हा जिल्हा बराचसा डोंगर आणि माथ्यावरील सडा असाच दिसतो ते खारे पाटण पर्यंत . तेथून सिंधुदुर्ग जिल्हा चालू होतो त्यातील बराचसा भाग हा सपाटीचा आहे. हा महाराष्ट्रात कोकणच्या नकाशात दक्षिणेकडचा तळाकडचा भाग म्हणून याला तळकोकण म्हणतात. रत्नागिरी लांजा राजापूर हा भाग सहसा तळकोकणात धरला जात नाही. येथे संगमेश्वरी बोली ( मराठीची एक बोली) बोलली जाते.

In reply to by प्रचेतस

ज्ञानसमृद्ध प्रतिसाद. धन्यवाद. याविषयी खरेतर स्वतंत्र लिहायला हवे की प्राचीन आणि मध्ययुगीन भारताची भागोलिक समज. आजकाल ऐतिहासिक चित्रपट दाखवतात तेव्हा शिवराय किंवा एखादा खान खलबते करत असताना टेबलवर चक्क त्यांच्यापुढे नकाशा वगैरे मांडलेला असतो आणि ते त्यात लाकडाचे घोडे वगैरे सरकवून स्ट्रॅटेजी हाकतात. तेव्हा मला प्रश्न पडायचा की यांना समुद्र कुठून कुठे आहे हे तरी कसे कळायचे. कारण कार्टोग्राफर ही एक अतिशय महत्त्वची गोष्ट असणार तेव्हा शिवरायांनी तशा माणसाला अतिशय उच्च पद दिले असेल इंदलकर सारखे.

याबरोबरच लहानपणी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाकेंद्र ओरोस बुद्रुक आहे. सिंधुदुर्गचे जिल्हाकेंद्र मालवण का नाही? ओरोस का निवडले? जिल्ह्यांना राजधान्या नसतात म्हणून आपल्या पंप्रंची चेष्टा झाली होती तेव्हा जाणवले आपल्या कडे सुद्धा जिल्ह्याच्या केंद्रांना शब्दच नाही आहे. राजधानी म्हणायला काही हरकत नाही. तरीही ओरोस कडे कुणाचे विषेश लक्ष जात नाही. आता तर तिथे मोठे सरकारी मेडिकल कॉलेज देखील आहे.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

नावाच्या गावात कलेक्टर ऑफिस आणि जिल्हा रुग्णालय सोडून काहीही नाही. हे गाव अजिबात वाढले नाही. कुडाळ बरेच मोठे झाले आहे असे दिसते. मालवण देखील बरेच मोठे आहे. मग या ओरोस मधे जाते तरी कोण? त्या जिल्हा रुग्णालयाचा काही उपयोग आहे का? कुणाच्या डोक्यात आले होते हे ओरोस चे?

In reply to by हणमंतअण्णा शंक…

ओरोसजवळून आता हातखंबा गोवा महामार्ग गेला आहे. याच गावाला स्वतःचे रेल्वे स्टेशन आहे. पश्चिमेला रेल्वे स्टेशन आणि पूर्वेला हायवे. त्यांच्या मधे एक गाव. या गावात जिल्हापरिषदेपासून सगळी जिल्ह्याची मुख्य ठिकाणे आहेत. या गावात 2021 ला सरकारी मेडिकल कॉलेज झाले आहे. याच गावाजवळ अजून एक मेडिकल कॉलेज आहे. या गावात एक मोठे तळे असून गावाला पाणी पुरवठा भरपूर आहे. या गावात एक इंजिनियरिंग कॉलेज आहे. हे गाव भविष्यात चांगले वाढू शकते त्यामुळे ओरोस या ठिकाणी गुंतवणूक करण्यास चांगला वाव आहे. इथे गुंठामंत्री होणे सध्या शक्य वाटते.

In reply to by गवि

ओरोस अगदी सेंटरला आहे. आधी वळणे वळणे म्हणून अंतर जास्त त्यात एका टोकाला केंद्र नको म्हणून निवडलेले दिसते. शिवाय लँड घेणे हा प्रोब्लेम इतर शहरात येतोय असे दिसतेय.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

सुबोध खरे 20/02/2026 - 12:04
माझ्या माहितीप्रमाणे ओरोस बुद्रुक या गावाला राजधानी बनवण्याचे कारण राजधानी बनवण्यावर असलेले वाद. यात कणकवली, मालवण कुडाळ आणि सावंतवाडी अशा चारही ठिकाणच्या स्थानिक नेत्यांना आपल्याच शहरात राजधानी हवी होती. यावर तोडगा म्हणून चारही ठिकाणच्या मध्यभागी असलेले आणि मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर आणि मुंबईत गोवा रेल्वे मार्गावर असलेले ओरोस बुद्रुक हे गाव निवडण्यात आले. मालवण आणि सावंतवाडी पासून दोन्ही (रस्ता आणि रेल्वे मार्ग) तसे लांबच होते शिवाय सरकारी कार्यालयांसाठी भरपूर जमीन हवी होती ती सुद्धा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होती. यामुळे ओरोस बुद्रुक हे गाव निवडले आणि मालवण जवळ असलेला समुद्रातील किल्ला सिंधुदुर्ग यावरुन गावाचे नाव सिंधुदुर्ग नगरी आणि जिल्ह्याचे नाव सिंधुदुर्ग ठेवण्यात आले. एकदा सरकारी कार्यालये आली कि शहर वसतेच. कारण जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस मुख्यालय, आर टी ओ, जिल्हा रुग्णालय, जिल्हा आणि सत्र न्यायालय अशी कार्यालये आली आणि त्याच्या अनुषंगाने पायाभूत सुविधा निर्माण झाल्या कि वस्ती होतेच

भारताचा नकाशा डोळ्यासमोर आणला तर बिहार आणि बंगाल यांना उत्तर भारतात का धरतात आणि मेघालय वगैरे यांना पूर्वेकडेची राज्ये न म्हणता इशान्येकडेची का म्हणतात हा गोंधळ मला नेहमी होतो.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

गवि 19/02/2026 - 00:04
यासदृश एक आणखी निरीक्षण माझंही आहे. अंदमान निकोबार बेटे ही सांस्कृतिक दृष्ट्या काही प्रमाणात ओरिजनल असली (उदा. आदिवासी) आणि तिथली आधुनिक संस्कृती ही भारतातल्या अनेक भागातल्या लोकांची संस्कृती- सरमिसळ असली, तरी अनेकदा व्यवहारात, नियोजनात, कंपन्या किंवा संस्थांच्या विभागीय वाटणीत, शाखांचे मुख्य ऑफिस कुठे, या दृष्टीने अंदमान हे चेन्नईपेक्षा कोलकत्याशी जास्त जोडलेलं दिसतं. अंदमानातून बाहेर पडलेले लोक कोलकात्यात चेन्नईपेक्षा जास्त दिसतात आणि सांस्कृतिकदृष्ट्या देखील पश्चिम बंगालशी अधिक जवळचे असतात. इतर कोणाचं निरीक्षण अगदी विरुद्ध देखील असू शकतं. माझ्याकडे मोठा विदा नाही.

स्पेनचे एक शहर आफ्रिका खंडात आहे- त्या शहराचे नाव आहे सेयुटा. सौदी अरेबियामध्ये इस्लामचा उदय झाल्यानंतर अरबांनी हल्ले सुरू केले. जॉर्डन-पॅलेस्टाईन ओलांडून ते आफ्रिका खंडाच्या उत्तर भागात घुसले. त्यातून ते आफ्रिका खंडाच्या पश्चिमेला असलेल्या मोरोक्कोपर्यंत पोचले. तिथून जिब्राल्टरचा समुद्र ओलांडला की स्पेन येते. ते स्पेनमध्येही घुसले. त्यांना स्पॅनिश लोक मूर म्हणायचे. त्या मुस्लिम आक्रमणाविरोधात स्पेनचे लोक जवळपास ५०० वर्षे लढत होते आणि त्यांनी १४९२ मध्ये मूरांना हाकलून दिले. १४१० मध्ये स्पेनमधील एका राजपुत्राने सध्या पोर्तुगाल आहे तो प्रदेश मुक्त केला आणि तिथे पोर्तुगाल या नव्या राज्याची स्थापना केली. त्यापूर्वी पोर्तुगाल असा वेगळा देश नव्हता. तिथे हेनरी म्हणून राजा होता. युरोपातून भारत आणि दक्षिणपूर्व आशियाबरोबर व्यापार चालायचा त्या व्यापार मार्गावर मुस्लिमांचे वर्चस्व होते तसेच कॉन्स्टॅन्टीनोपल (आताचे इस्तंबूल) मार्गे आलेला माल इटलीतील व्हेनिस आणि जिनोआमार्गे युरोपात जायचा तेव्हा त्या व्यापारावर इटालीयनांचेही वर्चस्व होते या गोष्टी स्पॅनिश आणि पोर्तुगीज ख्रिश्चनांना डाचत होत्या. त्यामुळे भारताकडे जायचा समुद्रीमार्ग शोधून काढायचे प्रयत्न त्या हेनरी राजाने सुरू केले. त्यामुळे त्याला हेनरी द नेव्हिगेटर असेही म्हणतात. त्यात धार्मिक अँगल पण होतात- मुस्लिमांचे वर्चस्व खिश्चनांना डाचत होते. त्यामुळे हेनरी द नेव्हिगेटरने युरोपिअन देशांनी केलेली पहिली समुद्र मोहिम काढली आणि सेयुटा या मोरोक्कोतील शहरावर नियंत्रण मिळवले. ही गोष्ट १४१५ ची. त्यानंतर १४८० मध्ये पोर्तुगाल आणि स्पेनचे एकीकरण झाले आणि सेयुटावर स्पॅनिशांचे नियंत्रण प्रस्थापित झाले. १५४० मध्ये परत पोर्तुगाल वेगळा झाला तरीही सेयुटावर स्पेनचे नियंत्रण कायम राहिले- आजही आहे. खालील नकाशात सेयुटा स्पेनच्या जवळ आहे हे दिसेल. Ceuta या नकाशावरून आणखी एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे भारताकडे जायचा समुद्रीमार्ग शोधायच्या उद्योगात पोर्तुगीज लोक पुढे का होते. त्याचे कारण पश्चिमेकडे अटलांटिकचा अ‍ॅक्सेस त्यांना जवळ होता आणि आफ्रिका खंडही जवळ होता. तीच गोष्ट स्पॅनिश लोकांची. त्यामानाने इंग्लंड बरेच लांब आहे. त्यामुळे भारतात युरोपिअनांनी हातपाय पसरायला सुरवात केली त्या काळात पोर्तुगीज दिसतील- मग फ्रेंच आणि शेवटी ब्रिटिश. त्याचे कारण या भूगोलात दडले आहे. त्यात इटालियन, ग्रीक आणि जर्मनांचे नावही दिसणार नाही. त्याचे कारणही हा नकाशा बघून समजेल. इटली आणि ग्रीसला अटलांटिकचा डायरेक्ट अ‍ॅक्सेसच नाही कारण भूमध्य समुद्र आणि आजूबाजूचे जमिन यातून जहाजे जाणार कुठून? जर्मनीला थोडासाच अटलांटिकचा अ‍ॅक्सेस आहे पण त्या भागात कदाचित चांगले बंदर असायला परिस्थिती अनुकूल नसावी. त्या तुलनेत डच लोक भारतात पोचले आणि इंडोनेशियातही पोचले. कारण नॉर्थ सी मधून त्यांना अटलांटिकचा अ‍ॅक्सेस आहे. तीच गोष्ट डेन्मार्कची. ते मर्यादित प्रमाणात का होईना भारतात पोचले. कारण त्यांना अटलांटिकचा अ‍ॅक्सेस होता. इतिहास वाचताना असा भूगोलही बघितल्यास अशा बर्‍याच गोष्टींचा उलगडा होतो.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

टिनटिन 19/02/2026 - 11:58
ह्या वरून आठवले , अब्दालीसारखा नदीचा उतार शोधत आमचा एक मित्र खडवलीच्या काळू नदीत घसरून पडला होता

खटपट्या 19/02/2026 - 01:33
ब्रिटीशांच्या काळातील मुंबै प्रोविन्स शोधत असताना तो फार मोठा होता असे ऐकले. नुकतेच कुठे तरी वाचले की ब्रिटीश मुंबई प्रोव्हिन्स हे ओमान पर्यन्त होते.

In reply to by खटपट्या

नौदल पश्चिम विभाग (मुख्यालय :मुंबई) ह्यांच्या अखत्यातातील भागात अजूनही बहुदा एकच पोलीस स्टेशन आहे. नौदलातील नागरी तक्रारांसाठी/गुन्ह्यांसाठी येथे गुन्हा नोंदवला जातो. त्याची हद्द गुजरात खंबात पासून अगदी केरळ, कन्याकुमारीपर्यंत आहे. नक्की नाव आणि संदर्भ आठवत नाहीये. मिळाले कि बाकी पोस्ट करतो.

कांदा लिंबू 19/02/2026 - 11:45
जिल्हाकेंद्र - जिल्हाकेंद्र / जिल्ह्याचे मुख्यालय / डिस्ट्रिक हेड क्वार्टर याला राजधानी हा शब्द सध्या अनपेक्षित वाटत असला तरी रुळल्यावर तो योग्य वाटेल असे वाटते. सामान्यतः जिल्ह्याचे नाव व त्या जिल्ह्याच्या राजधानीच्या गावाचे नाव हे एकाच असते. उदाहरण नांदेड या जिल्ह्याची राजधानी नांदेड या नावाच्या गावी (किंवा शहरात) आहे. तथापि, काही ठिकाणी जिल्ह्याचे नाव व त्या जिल्ह्याच्या राजधानीच्या गावाचे नाव ही दोन्ही वेगवेगळी असलेली दिसतात. महाराष्ट्रात रायगड हा बहुधा असा एकाच जिल्हा असावा ज्या जिल्ह्याच्या राजधानीचे नाव वेगळे, अलिबाग हे आहे. आंध्र प्रदेशात (सध्याचा तेलंगणा धरून) मात्र असे अनेक जिल्हे पूर्वी होते. मागच्या दहा-बारा वर्षांत जिल्ह्यांची विभाजने झाली व हा भूगोल काहीसा बदलला. २०१४ पूर्वीची स्थिती - जिल्हा -- राजधानी पूर्व गोदावरी -- काकिनाडा पश्चिम गोदावरी -- एलुरु कृष्णा -- मछलीपट्टणम मेदक -- संगारेड्डी प्रकाशम -- ओंगोल

In reply to by कांदा लिंबू

प्रकाशम -- ओंगोल
या प्रकाशम जिल्ह्याची नेहमी गंमत वाटते. प्रकाशम नावाचे कोणतेही गाव आहे असे वाटत नाही कारण त्या जिल्ह्याचे नाव आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री टी.पी.प्रकाशम यांच्या नावावरून दिले आहे. मुख्यमंत्र्याच्या नावावरून जिल्हा हा जरा गंमतीचाच प्रकार आहे. महाराष्ट्रात चव्हाण, पवार, नाईक किंवा फडणवीस नावाचा जिल्हा असेल तर कसे वाटेल? तसेच तिकडे केले आहे. उत्तर प्रदेशात मायावतींनी जिल्ह्यांचे नामकरण करून मूर्खपणाची परिसीमा गाठली होती. अमेठी जिल्ह्याचे नामकरण केले छत्रपती शाहूजी महाराज नगर. शाहू महाराजांच्या कामाविषयी आदर असला तरी शतकानुशतके असलेले एखाद्या ठिकाणाचे अमेठी हे नाव बदलून शाहूजी महाराज नगर करायचे? शाहू महाराजांचा कधी अमेठीशी संपर्क आला असेल असे वाटत नाही. मग अचानक अमेठी हे नाव बदलून शाहूजी महाराज नगर हे नाव देणे तसे विचित्रच वाटते. तीच गोष्ट अमरोहाची. अमरोहा जिल्ह्याचे नाव ज्योतिबा फुले नगर असे केले. मग यथावकाश ज्योतिबा फुले नगरचे लोकांनी जेपी नगर केले. अखिलेश मुख्यमंत्री झाल्यावर ही नावे बदलली पण समजा अशी नावे बदलली नसती तर जेपी नगर म्हणजे जयप्रकाश नारायणांच्या नावाने नाव दिले आहे असे कोणाला वाटले असते. असे ऐकले आहे की कोल्हापूरला शिवाजी महाराजांच्या नावाने विद्यापीठ स्थापन करायची वेळ आली तेव्हा यशवंतराव चव्हाणांनी शिवाजी विद्यापीठ असे सुटसुटीत नाव ठेवावे असा आग्रह धरला होता. त्याचे कारण वडोदर्‍याच्या महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटीचे एम.एस.युनिव्हर्सिटी झाले तसे कोल्हापूरमधील विद्यापीठाचे सी.एस.एम युनिव्हर्सिटी व्हायला नको- जसे युपीत जेपी नगर झाले. जिल्ह्याविषयी आणखी एक विचित्र गोष्ट म्हणजे सांगली जिल्ह्याची. सांगली जिल्ह्याचे मुख्यालय अर्थातच सांगली शहर आहे. पण सांगली जिल्ह्यात सांगली हा तालुकाच नाही. त्यामुळे सांगली जिल्ह्याचे मुख्यालय असलेले सांगली शहर येते मिरज तालुक्यात. असेही फार कुठे बघायला मिळत नसावे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

हे महानगर असले तरी ते हातकणंगले तालुक्यात येते. काही गावांचे नशीब फळफळते तसे आहे. इस्लामपूर आताचे ईश्वरपूर आणि वाळवा तालुका, खानापूर तालुका पण विटा मुख्य शहर असे अनेक. लहानपणी काका लोकांना मुली पाहायला जेव्हा सगळी फॅमिली जात असे तेव्हा पहिल्यांदा भूगोलाच्या पुस्तकात पाहिलेली गावे पाहता येत. वेगळेच फीलिंग असायचे. मी खूप हट्ट करून नवनीतचा अटलास विकत घेतला होता. तासनतास नकाशे पाहत घालवणे आणि ती गावे कशी असतील यांचे इमॅजिनेशन करणे खूप उत्तम टाइमपास. पहिल्यांदा कोल्हापूर पहिले तेव्हा तर भंजाळूनच गेलो होतो.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

अभ्या.. 22/02/2026 - 16:19
अजून एक गम्मत म्हणजे कोल्हापूर जिल्हा आणी सांगली जिल्हा ह्यांच्या सीमारेषेवर रेल्वे लाईनजवळ निमशिरगाव आणि तांदळगे हि दोन गावे आहेत. त्या छोट्याश्या स्टेशनला दोन्ही गावाची नावे आहेत पण निमशिरगाव चे इंग्लिश बरोबर आहे तांदळगे चे स्पेलिंगनुसार तमदलगे असे केलेले आहे आणि स्टेशनबोर्डवर तसेच देवनागरीत लिहिलेले आहे. कॉलेजला दररोज मिरज-कोल्हापूर-मिरज ट्रेनने प्रवास करताना ते तमदलगे असे कसे नांव म्हणून मजा वाटायची. m

In reply to by अभ्या..

गवि 22/02/2026 - 17:50
ऑ??? मी तर खरोखरच तमदलगे असंच आजतागायत समजत होतो. - (शिवाजी विद्यापिठाचा जुना विद्यार्थी) गवि ता.क. गूगल सर्च केली असता विकिपीडिया पानावर, लोकसत्ता आणि अन्य अनेक वृत्तपत्रांत तमदलगे असंच दिसतं आहे. आणि तांदळगे असं शोधू गेलं तर एकही निकाल आला नाही. म्हणजे मूळ नाव सर्वत्रच चुकीचं पसरलं असावं. तमदलगे हे नाव बसेसवर बघितल्याचं आठवतं आहे सांगली कोल्हापूरमध्ये असताना तीस वर्षांपूर्वी.

In reply to by गवि

अभ्या.. 22/02/2026 - 17:59
Locality Name : Tamdalage ( तांदलगे ) Taluka Name : Shirol District : Kolhapur State : Maharashtra Region : Desh or Paschim Maharashtra Division : Pune Language : Marathi and Kannada Current Time 05:55 PM Date: Sunday , Feb 22,2026 (IST) Time zone: IST (UTC+5:30) Elevation / Altitude: 550 meters. Above Seal level Telephone Code / Std Code: 02322 . मी खूप जणाना तांदळगे असेच म्हणताना ऐकलेले आहे.

In reply to by गवि

मी ही तमदलगे असेच नाव वाचले पाहिले ऐकले आहे. गोव्यात निदान कुंकळे माजोर्डे किंवा तशी नावे स्थानिकांच्या बोलण्यात तरी असतात मात्र बहुतेक बाहेरचे लेम करतात असे काहीसे कोल्हापुरात होईल असे वाटले नव्हते.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

मी ही तमदलगे असेच नाव वाचले पाहिले ऐकले आहे.
मी पण. माझी पहिली अस्थायी नोकरी कोल्हापुरात होती- २००२ मध्ये. तेव्हा विश्रामबागहून सकाळी सव्वाआठच्या सुमारास येणारी सातारा-कोल्हापूर पॅसेंजरने दररोज कोल्हापूरला जायचो. तेव्हा जयसिंगपूर आणि हातकणंगले या दोन स्टेशनच्या मध्ये निमशिरगाव-तमदलगे हे स्टेशन होते. ते एक बिना प्लॅटफॉर्मचे स्टेशन होते. नुसत्या दोन पाट्या त्यावेळेस त्या स्टेशनला होत्या. पहिली पाटी म्हणजे स्टेशन सुरू झाले आणि दुसरी पाटी म्हणजे स्टेशन संपले :) त्या स्टेशनवर ती पॅसेंजर थांबायची. तमदलगे हेच नाव त्या स्टेशनवर आणि पुढारी वगैरे स्थानिक पेपरांमध्येही वाचल्याचे चांगलेच आठवते. गुगल मॅपवर मराठीत तांदळगे हे नाव वाचल्यावर त्या नावाला तमदलगे हे एडिट सुचवले होते. पण गुगल मॅपने ते मान्य केले नाही. बाकी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील काहीकाही गावांची नावे अगदीच विचित्र आहेत. जाडर बोबलाद, कोंत्याव बोबलाद, माधळमुठी, गैबी कुडुत्री, येडे निपाणी, येडे मच्छिंद्र, यशवंंतराव चव्हाणांचे जन्मगाव देवराष्ट्रे, विठुरायाचीवाडी, दिघंची, बेळंकी, बेळुंडगी वगैरे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

रूढ नसलेली डबल बॅरल नावे ही सांगली जिल्ह्याची खासियत म्हणवी लागेल. १. येडे * २. कवठे * ३. ३२ शिराळा ४. म्हैसाळ (एम) ५. करोली (टी) ६. शिंदेवाडी (एच) ७. रामपूरवाडी (द्विरूक्ती) ८. अलकूड (एम) ९. अग्रण धुळगाव कर्नाटकी नावे : आमचे रावळगुंडवाडी, अचकनहळ्ळी

In reply to by हणमंतअण्णा शंक…

अभ्या.. 22/02/2026 - 20:27
जुन्या बार्शी लाईट रूटवर बार्शी ते कुर्डूवाडी दरम्यान चिंचगाव नावाचे गाव आहे. तेथील स्टेशन हे चिंक हिल नावाने आहे. ब्रिटिश काळापासूनच तसे नाव आहे स्टेशनचे. मध्यरेल्वेच्या अखत्यारीत येते. तेथे नॅरोगेज असताना स्टीम इंजिने पाणी भरायला थांबायची. बहुधा इथे आधी आरक्षी प्रशिक्षण केम्द्र ही होते. सध्याचे माहीत नाही. चिंक हिल हे अगदी नॉर्थवेस्ट किंवा कुर्ग भागात असल्यासारखे हे नाव चक्क पंढरपूर तालुक्यात कुर्डूवाडी जंक्शनजवळ आहे.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

हो असे कुठून जाताना कुठेतरी वाचलेल्या/ऐकलेल्या नावाच्या गावाची पाटी दिसणे हा एक मस्त अनुभव असतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाताना असा अनुभव अनेकदा येतो. काही काही टिपीकल कोकणी अडनावे असतात त्या लोकांचे मूळ गाव असलेली गावे दिसली की छान वाटले. पूर्वी झारापकर टेलरींग कॉलेज म्हणून एक मुंबईत होते. ते झाराप नावाचे गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. तीच गोष्ट वायंगणकर अडनावाच्या लोकांचे मूळ गाव- वायंगणी, वालावलकरांचे वालावली, आचरेकरांचे आचरे, मुणगेकरांचे मुणगे वगैरे. ही गावे नकाशात बघितली होती त्यापैकी काही गावांच्या नावाच्या पाट्या रस्त्यावरून जाताना बघितल्यावर छान वाटले होते. तीच गोष्ट गोव्यात- मयेकरांचे मये(म), बोरकरांचे बोरी(म), पोंभुर्पेकरांचे पोंभुर्पे, लोटलीकरांचे लोटली वगैरे. दक्षिण गोव्यात कांसावलीमधून दाबोळी विमानतळावर जाताना एक डॉ.लुई प्रोतो बार्बोझा रोड दिसला होता. डॉ.लुईस प्रोतो बार्बोझा हे १९९० मध्ये काही महिने गोव्याचे मुख्यमंत्री होते. ते मुख्यमंत्रीपदावरून दूर झाल्यानंतर त्यांचे नाव ऐकले ते थेट २०११ मध्ये त्यांचे निधन झाले तेव्हा. त्यांच्या नावाचा रोड तिथे पहिल्यांदा बघितल्यावर एकदम छान फिलींग आले. कदाचित ते त्या भागातील असावे. पण दरवेळेस अशी नावे वाचून छान फिलींग येते असे नाही. गुरगावमध्ये अशीच एकदा ध्यानीमनी नसताना शहिद रूपीन कट्याल मार्ग ही पाटी बघितली आणि कंदाहार विमान अपहरण प्रकरण आठवून विलक्षण कालवाकालव झाली. ते कंदाहार हायजॅकिंग प्रकरण, रूपीन कट्यालची गळा चिरून केलेली हत्या आणि त्याची पत्नी रचनाची त्यावेळेस काय अवस्था झाली असेल अशा काही गोष्टी निदान या जन्मात तरी विसरता येणार्‍यातील नाहीत. बहुदा रूपीन कट्यालचे घर त्या भागात कुठेतरी असावे. तसेच एकदा दिल्लीत जवाहरलाल नेहरू स्टेडिअम मेट्रो स्टेशनजवळ असाच शहिद अजय आहुजा मार्ग ही पाटी दिसली होती. कारगील युध्दात दुसर्‍या दिवशी आपली दोन विमाने पडली होती. त्यापैकी एका विमानाचा वैमानिक होता दिल्लीचा अजय आहुजा. बहुतेक तो दिल्लीत त्या भागात राहायला असावा.

कंजूस 19/02/2026 - 11:58
माझ्याकडे रेल्वेची बरीच पुस्तके आहेत आणि त्यांत भरमसाठ माहिती आहे. माथेरान रेल्वे साठीचा खर्च आजही जीजीभॉय यांनी केला होता. नंतर ती रेल्वे सेंट्रल रेल्वेकडे देण्यात आली. पण आताचे रेल्वे मंडळ ही माहिती त्यांच्या हिल रेल्वेमध्ये देत नाही.

तुमच्या आठवणींत असलेला भूगोल आणि इतिहास इथे मुक्तपणे मांडा. १९९८-९९ साली मी तिसरीत होतो. तेव्हा तिसरीच्या भूगोलात जिल्ह्याची माहिती शिकवली जायची आता शिकवतात का माहीत नाही, तर माझ्या पुस्तकातला धुळे जिल्ह्याचा नकाशा नी वर्गातील इतर मुलांच्या पुस्तकातील धुळे जिल्ह्याचा नकाशा ह्यात मोठा फरक होता, माझ्या पुस्तकातल धुळे जिल्हा भला मोठा होता, हे असे का झाले हे मला नंतर बऱ्याच वर्षांनी कळले, १९९८ साली, नंदुरबार जिल्हा धुळे जिल्ह्यातून वेगळा झाला होता भूगोलाची पुस्तके नवी आली होती, माझ्याकडे मात्र जूनच पुस्तक आल होत. माझे एक चुलत काका जे ९९-९९ व्या वर्षी २ वर्षाआधी गेले ते सांगायचे की जळगाव जिल्ह्यात ते रहायचे तेव्हा काहीही लफडे झाले नि इंग्रज मागे लागले की ते २०-२५ किमीवरील निजामाच्या राज्यात लोक पळून जायचे नि इंग्रज पोलिस काही करू शकायचे नाहीत.

कंजूस 18/02/2026 - 16:09
आमचे बाबा बोलताना म्हणायचे आज 'बीबीला' जावं लागणार आहे. आपली 'जीआइपी'. तिकडे जास्ती {लोकल} गाड्या असतात. बीबी... म्हणजे Bombay, Baroda and Central India Railway (BB&CI) त्यांचे लघुरूप BB. आताची वेस्टर्न रेल्वे. जीआइपी...Great Indian Peninsula Railway. आताची सेंट्रल रेल्वे.

विजुभाऊ 18/02/2026 - 16:54
सी पी म्हणजे सेन्ट्रल प्रोव्हिन्स ( ज्याला आपण आज मध्य प्रदेश म्हणतो) आणि यु पी म्हणजे युनायटेट प्रोव्हिन्स अशी नावे होती. बेरार म्हणजे वर्‍हाड

गवि 18/02/2026 - 17:03
ब्रिटिशांनी भारत सोडल्यावर भारतातल्या लोकांना ब्रिटनचं नागरिकत्व घेण्याचा चॉईस देणं अशक्यच होतं कारण भारतातल्या लहान राज्याइतका त्यांचा देश होता. पण गोवा हे राज्य (पोर्तुगीज काळात) आकाराने लहान होतं. ते सोडून जाताना आणि त्यानंतर पोर्तुगालने गोवा राज्यात १९६० सालापूर्वी जन्म झाल्याचा पुरावा सादर करणाऱ्या गोव्याच्या नागरिकांना पोर्तुगालचं नागरिकत्व देऊ केलं होतं. अनेकांनी शाळा सोडल्याचे दाखले सादर करून, आणि कदाचित नसलेले तयार करून देखील, ते नागरिकत्व घेतलं आणि युरोपात स्थायिक झाले. मी असे काही लोक बघितले आहेत.

In reply to by गवि

चावटमेला 18/02/2026 - 17:17
हो. ह्यांतील बरेचसे लोक hospitality धंद्यांत आहेत. लंडन मध्ये ,विशेषतः हिथ्रो विमानतळाजवळील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स मधे बव्हंशी मॅनेजर, वेटर हे गोवन पाहिले आहेत जे पोर्तुगाल चे नागरिकत्व घेवून आले आहेत. कदाचित इंग्रजी वरील प्रभुत्वामुळे त्यांना ह्या नोकर्‍या सहज मिळत असाव्यात. शिवाय ह्या धंद्यांत पंजाबी विरुद्ध गोवन लॉबीचे राजकारण जोरात चालते असे एका housemate कडून ऐकले. खेदाची बाब म्हणजे भारतात वाढून, शिकून सुद्धा ह्या लोकांना भारताबाबत काडीचेही ममत्व नाही. आम्ही भारतीय नाही तर गोवन आहोत असे अगदी ठासून सांगतात.

In reply to by गवि

खटपट्या 18/02/2026 - 21:34
१९६० च्या आधी जन्म, ही अट अजुनही आहे का? कारण माझा एक मित्र, जो १९६० च्या नंतर जन्माला आला आहे त्याने पोर्तूगाल चे नागरीकत्व घेतले आहे. त्याचा जन्म गोव्याचा.

In reply to by खटपट्या

चावटमेला 18/02/2026 - 22:07
कंपनीतील एका सहकार्‍याच्या मते जर आई-वडील किंवा आजी-आजोबा ह्यांच्यापैकी कुणीही पोर्तुगीज अमदानीतील गोव्यात जन्मले असेल तर काही कागदपत्रांची पूर्तता करून पोर्तुगीज नागरिकत्व मिळू शकते. त्याच्या बायकोला मिळाले. मी एक यूट्युब विडिओ पाहिला होता त्यानुसार दरवर्षी भारतीय नागरिकत्वाचा त्याग करण्यात गोव्याचा नंबर पहिला आहे, अगदी पंजाब आणि गुजरातच्याही आधी. असो, उगाच चांगला धागा भरकटू नये म्हणून आवरते घेतो.

चावटमेला 18/02/2026 - 17:07
मी शाळेत असताना २५ राज्ये आणि ७ केंद्रशासित प्रदेश होते. पुढे उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगड, आणि काही वर्षांनी तेलंगाणा अशी चार राज्यांची भर पडली. अलीकडेच जम्मू-काश्मीर व लडाख हे दोन नवीन केंद्रशासित प्रदेश झाले, आणि दमण-दीव आणि दादरा-नगर हवेली चे एकत्रीकरण करून एकच केंद्रशासित प्रदेश केला.

In reply to by चावटमेला

गवि 18/02/2026 - 17:12
त्या दादरा नगर हवेलीची पण एक गंमत आहे. त्या प्रदेशाच्या मध्येच, सर्व बाजूंनी "दादरा नगर हवेली"ने वेढलेला असा एक भाग आहे जो प्रत्यक्षात गुजरात राज्यात येतो. नकाशा पाहिल्यास स्पष्ट होईल. असे अन्यत्र कुठे भारतात पाहिले नाही.

In reply to by गवि

त्या प्रदेशाच्या मध्येच, सर्व बाजूंनी "दादरा नगर हवेली"ने वेढलेला असा एक भाग आहे जो प्रत्यक्षात गुजरात राज्यात येतो. नकाशा पाहिल्यास स्पष्ट होईल. असे अन्यत्र कुठे भारतात पाहिले नाही.
हे माहित नव्हते. आताच नकाशात बघितले- मेघवाल हे त्या ठिकाणाचे नाव. विकिपीडीया म्हणत आहे की जानेवारी २०२२ मध्ये मेघवालचे दादरा-नगरहवेलीमध्ये विलीनकरण करायचा निर्णय घेतला होता पण त्याचे पुढे काही झाले नाही. पूर्वी दिव-दमण आणि दादरा-नगरहवेली हे दोन वेगळे केंद्रशासित प्रदेश होते. पण या दोन त्यामानाने लहान असलेल्या प्रदेशांसाठी स्वतंत्र प्रशासन चालवायचा खर्च जास्त होता म्हणून त्या दोन्हींचा मिळून एकच केंद्रशासित प्रदेश जानेवारी २०२० मध्ये करण्यात आला. गुजरातमध्ये कागदावर दारूबंदी आहे त्यामुळे हॉटेलांमध्ये वगैरे दारू मिळत नाही. (जुगाड करून घरी दारूची व्यवस्था करता येते पण अधिकृतपणे बाहेर मिळत नाही). त्यामुळे गुजरातचे बरेच लोक या ठिकाणी दारू प्यायला म्हणून जातात :)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

चेतन 19/02/2026 - 12:54
केरळमध्ये माहे नावाचे एक गाव आहे जे पांडिचेरीचा भाग आहे. याचे कारण हा फ्रेन्च वसाहतिचा भाग होता. तो अजुनही स्वस्त दारुसाठि तसाच ठेवला असावा.

सौंदाळा 18/02/2026 - 17:27
हे पहिल्यांदाच ऐकले रच्याकने सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथील महाविद्यालये पण मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत यायची वाटतं पुर्वी.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

गवि 18/02/2026 - 17:50
कॉलेजे अजूनही मुंबई विद्यापीठाखालीच येतात. रत्नागिरीत त्यांचे उपकेंद्र पण आहे. दहावी बारावी मात्र पापुमं कोल्हापूर डिव्हिजनखाली येत असावी. पुन्हा चुभुदेघे..

In reply to by गवि

पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगरे, रागगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ह्या ७ जिल्ह्यातील महाविद्यालये मुंबई विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येतात. दहावी, बारावी साठी पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगरे, रागगड ह्या जिल्ह्यात मुंबई विभाग आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग ह्या जिल्ह्यांसाठी कोल्हापूर विभाग आहे.

अरे वा. मस्त विषय. मला इतिहासाची आवड आहे आणि निदान नकाशा उघडून बघितला नाही तर इतिहास समजणार नाही असे मला तरी वाटते त्यामुळे भूगोलातील इतर संकल्पना (भूखंडमंच/ टुंड्रा प्रदेश वगैरे अजिबात आवडत नसल्या तरी) नकाशा बघायला खूप आवडते. त्यामुळे जमेल तितकी भर टाकेन. पाँडेचेरी (आताचे पुद्दुचेरी) या केंद्रशासित प्रदेशातील पाँडेचेरी शहर चेन्नईच्या दक्षिणेला आहे. पण त्याबरोबरच त्या केंद्रशासित प्रदेशात इतर काही प्रदेश आहेत ते पाँडेचेरीला संलग्न नाहीत. ते प्रदेश आहेत- यानम (जे आंध्र प्रदेशात पाँडेचेरीचे एन्क्लेव्ह आहे), कराईकल (जे तामिळनाडूत पाँडेचेरीचे एन्क्लेव्ह आहे) आणि माहे (जे केरळमध्ये पाँडेचेरीचे इन्क्लेव्ह आहे). ही तीनही ठिकाणे लहान बंदरांची ठिकाणे आहेत. भारतात युरोपिअनांचे राज्य स्थापित झाले त्यावेळेस बंदरांवर नियंत्रण असणे व्यापाराच्या दृष्टीने महत्वाचे होते. त्या दृष्टीने फ्रेंचांनी ही तीन ठिकाणे ताब्यात घेतली असावीत. कलकत्त्याजवळ चंद्रनगर म्हणून एक ठिकाण आहे. ते पण फ्रेंचांच्या ताब्यात होते. १९५० मध्ये तिथे सार्वमत घेतले गेले आणि ते ठिकाण भारतात विलीन झाले. जसे पाँडेचेरीमध्ये यानम, माहे, कराईकल ही ठिकाणे लांब आहेत त्याप्रमाणेच गोव्यापासून दिव आणि दमण ही ठिकाणे पण बरीच लांब- गुजरातजवळ आहेत. पण ती ठिकाणे पोर्तुगीजांच्या ताब्यात होती त्यामुळे १९६१ मध्ये गोवा मुक्ती झाली तेव्हा गोवा-दिव-दमण हा केंद्रशासित प्रदेश झाला. सीपी-बेरार म्हणजे सेंट्रल प्रॉव्हिन्स आणि बेरार. बेरार म्हणजे विदर्भाचा पश्चिम भाग. विदर्भाचा पूर्वेकडचा भाग मध्य भारत या राज्यात होता तर पश्चिमेकडचा भाग सीपी-बेरारमध्ये. १९५६ मध्ये मध्य प्रदेश राज्य स्थापन झाले तेव्हा सीपी-बेरारमधील बेरार म्हणजे पश्चिम विदर्भ आणि मध्य भारतात असलेला पूर्व विदर्भ (नागपूर वगैरे) मुंबई प्रांतात सामील केले गेले. उरलेले सीपी, मध्य भारत तसेच विंध्य भारत आणि भोपाळ ही राज्ये एकत्र करून मध्य प्रदेश हे राज्य निर्माण करण्यात आले. आता कर्नाटकात बॉम्बे कर्नाटक आणि हैद्राबाद कर्नाटक हे भाग दिसतात. ते कुठून आले? तर १९५६ मध्ये राज्य पुनर्रचना झाली तेव्हा हैद्राबाद राज्यातील तेलंगण आंध्र प्रदेशात विलीन करण्यात आले आणि उरलेला भाग- गुलबर्गा, रायचूर, यादगीर वगैरे कर्नाटकात (तेव्हाच्या म्हैसूर राज्यात) विलीन करण्यात आला- तो हैद्राबाद कर्नाटक. तसेच मुंबई राज्यातून उत्तर कन्नड जिल्हा (कारवार वगैरे) तसेच बेळगाव वगैरे भाग कर्नाटकात विलीन करण्यात आला- तो बॉम्बे कर्नाटक. लिहिण्यासारखे बरेच काही आहे. नंतर कधीतरी लिहेन.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

गवि 18/02/2026 - 17:58
याचेच एक एस्क्स्टेंशन म्हणता येईल ते म्हणजे, मी कुठेतरी वाचल्याचं आठवतं, कदाचित इथेच मिपावर, की नेदरलँड (डच) आणि त्याहूनही विशेष म्हणजे डेन्मार्क हा देश देखील भारतातल्या काही भागावर राज्य करत होता. तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल किंवा बंगालमधले छोटे भूभाग.

In reply to by गवि

याचेच एक एस्क्स्टेंशन म्हणता येईल ते म्हणजे, मी कुठेतरी वाचल्याचं आठवतं, कदाचित इथेच मिपावर, की नेदरलँड (डच) आणि त्याहूनही विशेष म्हणजे डेन्मार्क हा देश देखील भारतातल्या काही भागावर राज्य करत होता. तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल किंवा बंगालमधले छोटे भूभाग.
हो डचांचे कोचीन आणि क्विलॉन (आताचे कनन्नोर) या केरळमधील भागांवर तसेच नागापट्टणम या तामिळनाडूतील बंदराच्या शहरावर नियंत्रण होते. आजही कोचीनमध्ये एक डच पॅलेस आहे. पण नंतर डचांनी भारतापेक्षा मसाल्याच्या पदार्थांसाठी अधिक प्रसिध्द अशा इंडोनेशिया आणि श्रीलंकेतील काही भागांवर लक्ष केंद्रीत केले आणि भारतात ते राहिले नाहीत. शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती तेव्हा महाराजांनी मागितलेली खंडणी देऊन डचांनी त्यांची सुरतमधील वखार वाचवली होती. डॅनिश लोकांचे अंदमानवर नियंत्रण होते. १८६८ मध्ये ते ब्रिटिशांनी अंदमानवर नियंत्रण मिळवले. कौन बनेगा करोडपती मध्ये पहिला ५ कोटी मिळवलेला बिहारचा एक होता त्याला ५ कोटींसाठी अंदमान कोणाच्या ताब्यात होते हा प्रश्न होता. त्याने डॅनिश लोकांच्या हे उत्तर दिले होते. त्यानंतर आंतरजालावर शोधाशोध करून हे समजले. जर पोर्तुगीजांनी ब्रिटिशांना मुंबई बेट हुंड्यात भेट म्हणून दिले नसते तर कदाचित मुंबई पण पोर्तुगीजांच्या ताब्यात राहिले असते. इतिहासात जर-तरला काहीही अर्थ नसतो पण त्या एका निर्णयामुळे सगळे काही किती बदलले. ब्रिटिशांच्या ताब्यात गेल्यामुळे शहरात व्यापार-शिक्षण यांचा बराच विकास झाला. नाहीतर पोर्तुगीजांच्या ताब्यात असते तर गोव्याप्रमाणे स्वस्त दारू मिळणारे ठिकाण हीच मुंबईची ओळख राहिली असती का?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

आणि मुंबईची तुंबई झाली, मुंबई महाराष्ट्रात आहे पण मुबईत महाराष्ट्र नाही वगैरे गोष्टींपासून आमचा बचाव झाला असता. सुबोधजी खरे साहेब सुशेगात होऊन 'चील' म्हंटले असते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सुबोध खरे 19/02/2026 - 09:47
क्विलॉन (आताचे कनन्नोर) तपशिलात त्रुटी क्विलॉन म्हणजे कोल्लम हे कोची च्या दक्षिणेस आहे तर कनन्नोर म्हणजे आताचे कण्णूर हे कोची च्या उत्तरेस आहे

In reply to by चंद्रसूर्यकुमार

जर ब्रिटिशांनी अंदमानवर नियंत्रण मिळवले नसते आणि ते डॅनिश लोकांच्या ताब्यातच राहिले असते तर आज भारताचा भाग असले असते का?

In reply to by अनामिक सदस्य

झाले असते. फ्रेंच आणि पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेली ठिकाणे नंतरच्या काळात भारतात सामील झालीच. तसेच कधीना कधी अंदमानचेही झाले असते.

स्वधर्म 18/02/2026 - 18:11
आजही भारतातील विमानांच्या बॉडीवर व्ही टी - नंबर लिहिलेला असतो. व्हीटी म्हणजे व्हिक्टोरिया टेरिटरी आहे असे समजले होते. इंग्रजांचे राज्य जाऊन किती वर्षे झाली, पण आपण आपल्या विमानांना अजून व्हीटी असे नोंदवतो हे समजायला कठीण आहे.

In reply to by स्वधर्म

गवि 19/02/2026 - 09:47
VT बदलले पाहिजे हे तात्विकदृष्ट्या रास्त पण रजिस्ट्रेशन बदलणे आणि इतक्या प्रचंड संख्येने असलेल्या विमानांचे, टप्प्याटप्प्याने, हे प्रचंड किचकट आणि खर्चिक काम आहे. त्यातही ही फक्त नंबर प्लेट किंवा शेपट्या नव्याने रंगवण्यापुरती साधी प्रक्रिया नसून असंख्य ठिकाणी त्याची तांत्रिक एन्ट्री देखील असते. त्यात विमान वाहतुकीची वेळापत्रक दृष्टीने महाप्रचंड उलथापालथ होऊ शकते. ही खूप जुन्या काळापासून जागतिक पातळीवर एस्टॅब्लिश झालेली पद्धत बदलून BH किंवा तत्सम बदल करणे वाटते तितके सोपे नाही. म्हणून ते तहकूब आहे. VT याच अक्षरांचा भारतीय इतिहासातील गौरवास्पद असा फुल फॉर्म शोधणे हा अधिक स्मार्ट उपाय ठरेल. उदा. BMC, बॉम्बे शब्द बदलला तरी बृहन्मुंबई वापरून शॉर्टफॉर्म तसाच ठेवता येतो तत्सम. किंवा VJTI सारखं. व्हिक्टोरिया ज्युबिली ऐवजी वीरमाता जिजाबाई.

स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिश भारतात ब्रिटिशांच्या अंमलाखाली प्रदेश होता आणि संस्थानेही होती. १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले ते ब्रिटिश भारताला. त्यानंतर एकेक करून संस्थाने भारतात विलीन झाली. पंजाबमधील अशा संस्थानांचे १९४८ मध्ये पेप्सू म्हणून राज्य स्थापन केले गेले होते. पेप्सू म्हणजे पतियाळा अ‍ॅन्ड ईस्ट पंजाब स्टेट्स युनियन. त्या राज्याची राजधानी पतियाळा होती. पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग त्या पतियाळाच्या संस्थानिकांच्या कुटुंबातील. म्हणजे स्वातंत्र्यानंतर पंजाब, हिमाचल प्रदेश आणि पेप्सू ही राज्ये होती. खालील नकाशात दिसेल की त्यावेळेस पेप्सू आणि हिमाचल प्रदेश हे एकसलग भाग नव्हते तसेच पेप्सूमध्येही पंजाबचा एक भाग 'एन्क्लेव्ह' म्हणून होता. Punjab (नकाशाचा संदर्भः विकीपीडीया) मग नंतरच्या काळात पेप्सू पंजाबमध्ये विलीन करण्यात आले आणि काही भाग हिमाचलमध्ये विलीन करण्यात आला. त्यानंतर इंदिरा गांधींनी १९६६ मध्ये पंजाबमधून हरियाणा हे राज्य वेगळे केले.

रेल्वेचे एकुण १८ झोन आहेत. त्यान्ची नावे खालीलप्रमाणे १. मध्य रेल्वे (CR): मुंबई २. पश्चिम रेल्वे (WR): मुंबई ३. उत्तर रेल्वे (NR): दिल्ली ४. दक्षिण रेल्वे (SR): चेन्नई ५. पूर्व रेल्वे (ER): कोलकाता ६. दक्षिण पूर्व रेल्वे (SER): कोलकाता ७. उत्तर पूर्व रेल्वे (NER): गोरखपूर ८. ईशान्य सीमा रेल्वे (NFR): गुवाहाटी ९. दक्षिण मध्य रेल्वे (SCR): सिकंदराबाद १०. पूर्व मध्य रेल्वे (ECR): हाजीपूर ११. उत्तर पश्चिम रेल्वे (NWR): जयपूर १२. दक्षिण पश्चिम रेल्वे (SWR): हुबळी १३. उत्तर मध्य रेल्वे (NCR): अलाहाबाद (प्रयागराज) १४. पश्चिम मध्य रेल्वे (WCR): जबलपूर १५. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR): बिलासपूर १६. पूर्व किनारी रेल्वे (ECoR): भुवनेश्वर १७. कोलकाता मेट्रो (MR): कोलकाता १८. दक्षिण कोस्ट रेल्वे (SCoR): विशाखापट्टणम (१८ वा झोन) ह्यातील मध्य रेल्वे हा झोन पाहिला तर मुखालय मुंबई (छ्त्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) हा झोन महाराष्ट्राचा बराचसा भाग, कर्नाटकचा उत्तर पूर्व भाग आणि मध्य प्रदेशचा दक्षिण भाग व्यापतो. त्यातही चर्चगेट ते बडोदा/वडोदरा हा मार्ग पश्चिम रेल्वेच्या अखत्यारीत. मराठवाड्यातला काही भाग दक्षिण मध्य रेल्वेच्या ताब्यात. कोकण रेल्वेची हद्द सुरु होते रोहा (जिल्हा रायगड) ह्या स्थानकानंतर. ठाणे जिल्ह्यातील उत्तरकोकणाचा भाग पश्चिम रेल्वेत, मुंबई ते रोहा (पनवेल मार्गे) मध्य रेल्वेत आणि रोहा नंतर कोकण रेल्वे. कागदावरील महसुली जिल्हे, राज्ये आणि रेल्वेची हद्द ह्या एकमेकांशी सुसंगत नसणाऱ्या गोष्टी आहेत. तुघलकाबाद हे स्थान भौगोलिकदृष्ट्या दिल्लीजवळ, आजूबाजूला सगळीकडे उत्तर रेल्वेचे साम्राज्य, पण तुघलकाबाद मधील विद्युत लोको शेड हि पश्चिम मध्य रेल्वे (मुख्यालय: जबलपूर) ह्यांच्या अख्यतारीत.

In reply to by अनिकेत वैद्य

एकतर रेल्वे हे राज्य आणि केंद्र या दोन्ही सूचींत न ठेवता फक्त केंद्र सूचीत आहे त्यामुळे राज्यांना आपल्या राज्यांतर्गत रेल्वे मार्ग विकसित करता येत नाहीत. असे का मला ठाऊक नाही. एकूण भारतीय रेल्वे ही प्रचंड अकार्यक्षम, अजागळ आणि जनतेच्या प्रचंड गैरसोयीची गोष्ट आहे. ती मॉडर्नाईज करणे एवढे विलंब लावणारे प्रकरण आहे की बस्स. डेक्कन भागात रेल्वेचे जाळे अजिबात पसलेले नाही याला केवळ भूगोल कारणीभूत आहे का?

सुबोध खरे 18/02/2026 - 20:04
आमच्या लहानपणी कोकणातील जिल्हे म्हणजे मुंबई आणि ठाकुर असे होते म्हणजे ठाणे कुलाबा आणि रत्नागिरी. १९७८ च्या आसपास रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन करून सिंधुदुर्ग जिल्हा वेगळा करायचे ठरले तेंव्हा हे कोकणचे जिल्हे "ठाकुरसि" होणार होते म्हणजे ठाणे कुलाबा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग . पण श्री अंतुले यांनी तेवढ्यात मखलाशी करून कुलाबा जिल्ह्याचे नामकरण रायगड केले त्यामुळे हे ठारारसि झाले ठाणे कुलाबा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आणि आता पालघर जिल्हा वेगळा होऊन पाठारारसि झालंय

स्वातंत्र्यानंतरचे मद्रास राज्य म्हणजे एक अजब प्रकार होता. आताच्या कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्हा (मंगलोर वगैरे), सध्याच्या केरळमधील उत्तरेकडील मलबार भाग (कासारगोड, कोझिकोडे, मल्लापुरम वगैरे), कन्याकुमारी वगळता सध्याचे पूर्ण तामिळनाडू राज्य आणि तेलंगण वगळता सध्याचा आंध्र प्रदेश एवढा मोठा भाग त्या राज्यात येत होता. सध्या केरळमध्ये असलेले मध्य भागातील कोचीन आणि दक्षिण भागातील त्रावणकोर (तिरूवनंतपुरम वगैरे) यांचे कोचीन-त्रावणकोर हे वेगळे राज्य होते. सध्या कर्नाटकात असलेले कूर्ग हे सुंदर ठिकाण वेगळे राज्य होते. तर सध्या कर्नाटकात असलेला उत्तर कन्नड जिल्हा (कारवार वगैरे) आणि बेळगाव वगैरे उत्तर पश्चिमेकडील भाग मुंबई राज्यात होते. तर कर्नाटकात उत्तर पूर्वेकडील गुलबर्गा, बीदर, रायचूर आणि बेल्लारी सुध्दा हे भाग हैद्राबाद राज्यात होते. सध्या कर्नाटकात असलेले इतर भाग त्यावेळेस म्हैसूर राज्यात होते. १२ वर्षांपूर्वी तेलंगणची स्थापना होण्यापूर्वी दक्षिण भारतात चार (आणि आता पाच) राज्ये दिसतात त्यापेक्षा पूर्ण दक्षिण भारताचा भूगोल पूर्ण वेगळा होता हे आणि मद्रास राज्य किती विलक्षण गुंतागुंतीचे होते हे पुढील नकाशावरून समजेलच. Madras पोट्टी श्रीरामूलूंचा उपोषणात मृत्यू झाल्यानंतर १९५३ मध्ये मद्रास राज्यातील तेलुगु भाषिक भाग वेगळा करून आंध्र प्रदेश हे राज्य स्थापन करण्यात आले. त्यात कोस्टल आंध्र (विजयवाडा, विशाखापट्टणम वगैरे) आणि रायलसीमा (नेल्लोर, कडप्पा, कुर्नूल वगैरे) भागांचा समावेश केला गेला. तेव्हा आंध्र प्रदेशची राजधानी होती कुर्नूल. वर म्हटल्याप्रमाणे कन्याकुमारी त्यावेळेस मद्रास राज्यात नव्हते तर ते कोचीन-त्रावणकोर या राज्यात होते. त्या राज्यात मल्याळम भाषा प्रमुख होती तर कन्याकुमारी होते तामिळ भाषिक. म्हणून कन्याकुमारीचे तामिळचे प्रभुत्व असलेल्या मद्रास राज्यात विलीनीकरण करावे म्हणून कन्याकुमारीत निदर्शने झाली. ही गोष्ट १९५५ मधील. १९५२ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसविरोधात लढणारे दोन प्रमुख समाजवादी पक्ष होते- जयप्रकाश नारायणांचा समाजवादी पक्ष आणि आचार्य कॄपलानींचा किसान मजदूर प्रजा पक्ष. दोन्ही पक्षांनी बर्‍यापैकी मते घेतली पण काँग्रेसविरोधी मते विभागली गेल्याने त्यांना निवडणुक जिंकणे सोडाच जागाही बर्‍याच कमी मिळाल्या. म्हणून १९५२ मध्ये निवडणुक संपल्यावर या दोन पक्षांचे विलीनीकरण झाले आणि प्रजा समाजवादी पक्ष हा पक्ष निर्माण झाला. त्यावेळेस कोचीन-त्रावणकोरचे मुख्यमंत्री होते या प्रजा समाजवादी पक्षाचे वासुदेवन नायर (बहुदा). तर कन्याकुमारीचे मद्रास राज्यात विलीनीकरण व्हावे म्हणून जी निदर्शने झाली होती त्यावर या वासुदेवन नायर यांच्या सरकारने गोळीबार केला आणि त्यात काही लोक मारले गेले. मग आपल्याच लोकांवर आपले सरकार गोळीबार कसा करू शकते या मुद्द्यावरून राम मनोहर लोहिया या प्रजा समाजवादी पक्षातून बाहेर पडले आणि त्यांनी स्वतःचा संयुक्त समाजवादी पक्ष स्थापन केला. समाजवादी परिवारात पडलेल्या शेकडो फुटींपैकी ही पहिली फूट होती. त्यानंतर १९५६ मध्ये राज्य पुनर्रचना झाली त्यात बरेच बदल केले गेले. एक तर मद्रास राज्यातून मलबार जिल्हा वेगळा करण्यात आला आणि तो मलबार जिल्हा तसेच कोचीन-त्रावणकोर राज्य यांचे विलीनीकरण झाले आणि नवे केरळ हे राज्य बनले. त्याचवेळेस कन्याकुमारीला मद्रास राज्यात जोडण्यात आले. तसेच मुंबई राज्यातील उत्तर कन्नड जिल्हा, बेळगाव वगैरे भाग, हैद्राबाद राज्यातील तेलंगण हा तेलुगू भाषिक भाग वगळता गुलबर्गा, रायचूर वगैरे भाग, कूर्ग यांचे म्हैसूर राज्यात विलीनीकरण करण्यात आले. आता आपण ज्याला कर्नाटक म्हणतो त्याला तेव्हा म्हैसूर राज्य म्हणायचे. कर्नाटक हे नाव १९७० च्या दशकात दिले गेले. त्याप्रमाणेच हैद्राबाद राज्यातील तेलंगण आंध्र प्रदेशात विलीन करून राज्याची नवी राजधानी झाली हैद्राबाद. आणि हे सगळे भाग जाऊन उरलेला भाग राहिला मद्रास राज्यात. त्या राज्याचे नाव १९७० च्या दशकात तामिळनाडू असे केले गेले.

गवि 18/02/2026 - 20:59
काही कायदे देखील पूर्ण राज्य कव्हर न करता एका विशिष्ट भागापुरते लागू होतात. बॉम्बे टेनन्सी ॲक्ट हा पूर्वी मुंबई, महाराष्ट्रातला काही भाग आणि गुजरातचा काही भाग, या एरियात लागू होता. बॉम्बे प्रॉव्हिन्स म्हणत असत, त्या भागात बहुधा. आताही तो गुजरातमध्ये वेगळ्या नावाने लागू आहे. महाराष्ट्रात या कायद्यात मुंबई आणि काही जिल्हे त्यात कव्हर होतात. पश्चिम, उत्तर महाराष्ट्र आणि कोंकण. मराठवाडा आणि विदर्भाला तो लागू होत नाही. वकिलांनी खात्री करून द्यावी.

मनो 18/02/2026 - 21:21
गवि, मुळात उत्तर आणि दक्षिण असे कोकणचे दोनच भाग ब्रिटिश राज्यात होते. त्यांचा उगम त्याहूनही मागे म्हणजे इसवी १५५० सुमारास आहे. नगरच्या निजामशाहीच्या ताब्यात असणारे कोकण याला मोगल निजामशाही तळकोकण म्हणत. त्यात मुंबई, चौल, जंजिरा, अलिबाग इत्यादी सर्व भाग येई. दुसरा भाग म्हणजे आदिलशाही तळकोकण. त्यात तुम्ही म्हणता तो सर्व भाग येई, थेट गोव्याच्या पलीकडे कारवार पर्यंत. शहाजहान बादशहाने निजामशाही घेतली आणि औरंगझेबाने आदिलशाही, यात पन्नास वर्षे मध्ये गेली. हा भाग असा दोन तुकड्यात विभाजित होण्याचाही आधी आणि काही काळ नंतरही यात छोटी छोटी स्वतंत्र राज्ये होती. भौगोलिक दुर्गमतेमुळे ऐन मुसलमानी बहामनी राज्यातही ती कशीबशी टिकून राहिली. सूर्यराव सुर्वे, चंद्रराव मोरे, पालवणीचे दळवी, वेंगुर्ला आणि वाडीचे सावंत भोसले, यांची मुळे याहूनही खोलवर जातात. यांच्यावर आपली सत्ता बसवण्यासाठी बहामनी महमूद गवान इत्यादी लोकांनी कोकणात स्वाऱ्याही केल्या. विशाळगडचा दर्गा मला वाटते असल्याच एक आक्रमकाचा आहे. मुळात शिवाजी महाराजांचे आणि मोगलांचे वैर होण्याचे आद्य कारण म्हणजे निजामशाही तळकोकण, कारण यातील कल्याण, रायरी हा जुना निजामशाही तळकोकणाचा भाग निजामशाहीचे नवे मालक मोगलांना मिळायला हवा, परंतु आदिलशाही आणि मोगल यांच्या भांडणात शिवाजी महाराज हा भाग आपल्या राज्यात सामील करून बसले होते. कोकणचे भौगोलिक दुर्गमत्व आणि व्यापारी महत्त्व लक्षात घेऊन महाराजांनी आपल्या राज्यात सामील केलेला हा पहिला प्रदेश. तुमच्या भूगोलात इतका मोठा इतिहास दडलेला आहे!

In reply to by मनो

गामा पैलवान 18/02/2026 - 23:29
मनो, भूगोलातल्या इतिहासावरनं आठवलं की शंभूपुत्र शाहूमहाराज आपलं राज्य जेफनापट्टण म्हणजे आजचा जाफना इथवर मानीत असंत. तसं असेल तर ते मोठं रोचक तथ्य ठरावं. आ.न., -गा.पै.

In reply to by प्रचेतस

रूमशान म्हणजे रोम किंवा सिरिया असे दोन्ही प्रदेश हे होऊ शकतात. पण भारतीयांना इस्तंबूल हेच युरोपातले मोठे शहर वाटत होते का? कुणीतरी मला मागे रूमशान इस्तंबूलच असे सांगितले होते त्यामुळे माझा गोंधळ झाला. विषय होता की शिवशंभू नंतर तेव्हड्या प्रचंड महत्त्वाकांक्षेचे त्या घरात कुणी जन्मले नाही असा. तेव्हा शाहू महाराजांना इस्तंबूल देखील जिंकून घ्यायचे होते असे कुणीतरी मला सांगितले. रेडिट वर की कोरा वर ते आठवत नाही.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

प्रचेतस 19/02/2026 - 12:29
इस्तंबूलला कुंस्तुंतुनिया (बायझन्टाईन साम्राज्यातले कॉस्न्टेन्टिनोपल) असेही इकडे म्हटले जात असे. मराठेशाही किंबहुना मुघलकाळात देखील तुर्कीचे ऑटोमन साम्राज्य बलाढ्य होते. इतके की मुघल बादशहांना सुद्धा आपल्या बादशहापदासाठी तुर्की खलिफाची मान्यता असणे भाग्याचे आणि जरुरीचे वाटत असे.

In reply to by प्रचेतस

अजून एक विषय मला तुम्हाला विचारायचा आहे की जुन्या भारतीयांची भौगोलिक समज काय होती उर्वरीत जगाबद्दल? म्हणजे त्यांना मंगोलिया चीन बद्दल माहीत होते का? मराठे मादागास्कर वगैरे पर्यंत गेले होते असे अलीकडे समोर येत आहे. मात्र तेव्हा भारतीयांची युरोपबद्दल काय समज होती. सिकंदर तर खूपच पूर्वी येऊन गेला त्यामुळे भारतीयांना ग्रीस वगैरे प्रदेश ऐकून तरी ठाऊक असणार आहेत. पण त्यांनी त्यांच्या प्रवासाबद्दल सांगितलेच असेल ना. अतिशय अद्भुत साइट आहे ही. जगातील जवळजवळ लाखाहून अधिक ऐतिहासिक नकाशे डिजिटल केले आहेत! https://www.davidrumsey.com/ १५५४ च्या आसपासचा Pirî Reis याचा एक अटलास माझा absolute favorite आहे! त्या वेळेस या माणसाचे एकुण भौगोलिक ज्ञान पाहून मी चाटच पडलो होतो त्याने एवढा प्रचंड अ‍ॅक्युरेट नकाशा बनवला होता तेही अनेक नकाशांचे आणि लोकांचे ज्ञान गोळा करून.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

प्रचेतस 19/02/2026 - 12:47
अगदी मौर्यकाळापासून ग्रीकांशी व्यापार होत असे. अलेक्झांडरमुळे इंडो बॅक्ट्रियन राज्ये इकडे होतीच. सेल्युकस निकेटरची मुलगी चंद्रगुप्ताला पत्नी म्हणून दिलेली होती. मात्र प्रवासी भारतीयांना लिहिण्याची सवय नसल्यामुळे त्यांचे वृत्तांत फारसे उपलब्ध नाहीत. मात्र पेरीप्लस ऑफ एरिथ्रियन सी मध्ये त्याबद्द्ल विपुल प्रमाणात आलेले आहे. रोमन इतिहासकार प्लिनीने तर भारतीय आयातीच्या बदल्यात रोमनांच्या सुवर्णनाण्यांचा ओघ भारतात वाहात असल्याबद्द्ल चिंता व्यक्त केली होती. बाकी मंगोलिया, चीन्बद्द्ल तर पूर्वीपासून माहिती होतेच. चीनशी बराच व्यापार होता. मंगोल टोळीवाल्यांनी तर जवळपास १/४ भूभागावर राज्य केले. चोळांनी इंडोनेशिया, मलेशिया इत्यादींशी आपल्या सीमा भिडवल्या होत्या. तर छत्रपती शिवाजीमहाराजांच्या आरमाराची दहशत खुद्द मस्कतच्या अरबांनी घेतली होती (यावर आजच मिपाकर बॅटमॅनने एक लेख लिहिला आहे) मात्र आपल्या प्रवाश्यांनी केलेली परदेशातील प्रवासांची वर्णने फारशी नाहीत.
अतिशय अद्भुत साइट आहे ही. जगातील जवळजवळ लाखाहून अधिक ऐतिहासिक नकाशे डिजिटल केले आहेत!
याबद्द्ल धन्यवाद. सवडीने बघावे अशीच साईट आहे.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

दोहो बाजुन व्यापार चालू असल्याने आपल्याला आणी युरोपियनांना एकमेकांविषयी भरपुर माहीती होती. भृगकच्छ, शुर्पारक, कलीयान, माहीम, चेउल (सेमुल्ला) ही प्रमुख बंदरे. यातून सर्वदुर व्यापारी संपर्क असल्याने भौगोलीक माहीतिचीही देवाण घेवाण होत असणारच... (रॉटरडॅम इथल्या नावीक संग्रहात एका कार्टोग्राफरने १६१९ मधे काढलेला कोकणचा नकाशा ठेवलाय तिथे ही बंदरे स्पष्ट दाखवली माझ्याकडे त्याचा फोटो आहे पण मोबाईल मधे आहे. इथे कसा द्यायचा माहीत नाही)

१. पश्चिम महाराष्ट्र पश्चिमेला नाही. २. मध्य महाराष्ट्र म्हणजे मराठवाडा की नगर? ३. खानदेश नेमका कुठे आहे? आणि नाशिक पश्चिम महाराष्ट्रात घ्यावे का? ४. माणदेश आणि पश्चिम वेगळा करायचा का? ५. मावळ नेमका भाग कुठला? ६. मराठवाडा नेमका कळतो मात्र बेरार म्हणजेच वर्‍हाड कुठून सुरू होतो आणि कुठे संपतो? ७. कोकण हा त्याच्या अगदी डिस्टिंक्ट भौगोलिक रचनेमुळे वेगळा दिसतो. परंतु मुंबैला कोकण मानावे का? बाकी तळ कोकण आनि सह्यप्रदेश ही ही एक भानगड आहे. ८. कोल्हापूर, सांगली यांना दक्षिण महाराष्ट्र का म्हणत नाहीत? की बेळगाव आणि त्या भागाला म्हणायचे? ९. कारवार बिदर वगैरे हे अलभ्य मराठी प्रदेश यांना काय म्हणावं?

In reply to by हणमंतअण्णा शंक…

म्हणजे नेमके काय? माझ्या मते, घाट उतरल्यावर जो तुलनेने समतल प्रदेश लागतो त्याला तळकोकण म्हणतात. का दक्षिण कोकणाला तळकोकण म्हणतात?

In reply to by हणमंतअण्णा शंक…

गवि 18/02/2026 - 23:49
मला वाटते कोंकणातील कोअर भाग. म्हणजे रायगडच्या दक्षिणेचा, याला म्हणत असावेत. किंवा ते कोंकण जे घाटांच्या उताराच्याही खाली समुद्रसपाटीवर प्रॉपर वसलेलं आहे, ते.. असाही अर्थ असू शकेल. उदा. आंबाघाट येथील गावे, साखरपा येईपर्यंत तळकोकणात मोजत नसतील पण रत्नागिरी, दापोली, गुहागर, देवगड, कुणकेश्वर हे त्यात येत असेल. नेमके माहीत नाही तिकडे लहानपण गेले असले तरी. मी त्याचा अर्थ कुडाळ देवगड सावंतवाडी असा घेत आलोय.

In reply to by गवि

इथे डोंगर आणि टेकड्या संपून बर्‍यापैकी समुद्रसपाटीचा किंवा थोडा उंच पठारी प्रदेश सुरु होतो म्हणून याला तळकोकण म्हणत असावेत कारण घाट उतरल्यावर आपण तळावरच जाणार.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

खटपट्या 19/02/2026 - 01:30
पालघर पासुन गोव्याच्या सिमेपर्यंत कोकण आहे, तळकोकण म्हणजे दक्षिणेकडचे कोकण - चिपळूण पासून खाली तळकोकण म्हणण्यास हरकत नाही, पण तळकोकणाची काही सिमा नाही. जसे साउथ मुंबई. पश्चिम महाराष्ट्राबाबत नेहमीच गोंधळ आहे. कारण खरे तर महाराष्ट्राच्या पष्चिमेला कोकण येतो पण त्यास पश्चिम महाराष्ट्र म्हणत नाहीत. असो

In reply to by हणमंतअण्णा शंक…

विजुभाऊ 19/02/2026 - 10:40
जावळीत जावळी नावाचे गावच नाहिय्ये, दुसरे म्हणजे पुणे शहर हे हवेली तालुक्यात येते. डेक्कन मात्र भांबुर्डेमधे यते

In reply to by विजुभाऊ

प्रचेतस 19/02/2026 - 11:34
जावळी हे नाव गावावरुन नव्हे तर तेथील घनदाट जंगलावरुन आले आहे. झाडांची इतकी दाटी जशी झाडांची जाळीच जणू ते जावळी.

In reply to by विजुभाऊ

आहे. महाबळेश्वर पायथ्याच्या दरे खोर्‍यात जावळी गाव आहे. कुंभरोशी वरुन दरे कडे जाताना रस्त्यावर हे गाव आहे. पुर्वी एक असेल पण सध्या दोन वाड्या आहेत. थोरली जावळी आणी वरची जावळी. यातल्या वरच्या जावळीत मोर्‍यांच्या वाड्याचे अवशेष आहेत. मी ही दोन्ही गावे आनी वाड्याचे अवशेष बघीतले आहेत.

In reply to by स्वच्छंदी_मनोज

थोरली जावळी आणी वरची जावळी. यातल्या वरच्या जावळीत मोर्‍यांच्या वाड्याचे अवशेष आहेत. मी ही दोन्ही गावे आनी वाड्याचे अवशेष बघीतले आहेत.
मोर्‍यांच्या वाड्याचे अवशेष आहेत का? हे विचारायचे कारण म्हणजे एक गोष्ट आठवली. शाळेत असताना आमची सहल प्रतापगड आणि शिवथरघळ येथे गेली होती. तेव्हा शिवथरघळीहून एक दिवस सकाळी 'आपल्याला चंद्रराव मोर्‍यांचा वाडा बघायला जायचे आहे' म्हणून आम्हाला नेले. डोंगरावरून बराच वेळ चालत गेल्यावरही वाड्याचा पत्ता नव्हता. शेवटी एके ठिकाणी गेल्यावर- इथे चंद्रराव मोर्‍यांचा वाडा होता अशी आमची बोळवण केली गेली. प्रत्यक्षात तिथे काहीही नव्हते- नुसते गवत होते. एक दगडही नव्हता. बहुदा आमच्या बरोबर आलेल्या शिक्षकांनाही तो वाडा नक्की कुठे होता हे माहिती नसावे त्यामुळे आम्हाला नुसतेच चालत नेले आणि आपण रस्ता चुकलो किंवा आपल्याला माहित नाही हे मान्य करायचे नसेल म्हणून कदाचित 'इथे वाडा होता' असे काहीतरी सांगून आम्हाला पिटाळून लावले असावे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

शिवथर इथुन थोडे वरच्या बाजुला सह्याद्रीच्या अगदी पायथ्याला चेरावडी म्हणून गाव आहे (१.५ किमी). त्या गावाच्या पुढे अगदी डोंगर तळात मोर्‍यांचा वाडा आहे... अगदी आत जंगलात असल्याने चटकन सापडत नाही आणी आता फक्त काहीच अवशेष उरलेत. सह्यमाथ्यावरच्या कुंड गावातून खाली खुटे नावाची घाटवाट उतरते तेव्हा ह्या वाड्यावरुन वाट जाते. अम्ही खुटे घाट वाट ट्रेक केलेला तेव्हा हा वाडा बघीतलेला.. तसा अजुन एक मोर्‍यांचा वाडा आहे.. कोयना धरण क्षेत्रात उचाट नावाचे एक गाव आहे त्या गावाच्या पुढे निरपजी म्हणून मोर्‍यांचे कुलदैवत आणी देवराई आहे, तिथेही मोर्‍यांचा वाड्याचे अवशेष आहेत...

In reply to by हणमंतअण्णा शंक…

प्रचेतस 19/02/2026 - 11:30
५. मावळ नेमका भाग कुठला?
मावळाचा प्राचीन उल्लेख कार्ले येथील शिलालेखात मामाड असा आलाय. तर ह्या प्रदेशाला त्याकाळात 'मामलाहार' म्हणत. मावळ म्हणजे रूढार्थाने मावळतीकडचा म्हणजे पश्चिमेकडचा प्रदेश. इकडील नद्यांच्या खोर्‍यांवरुन त्या त्या मावळाला विशिष्ट नावे पडली. पवनेच्या खोर्‍यातील पवन मावळ, आंद्रेच्या खोर्‍यातील आंदर मावळ तर कसबे नाणे गावाभोवतालचे नाणेमावळ.
६. मराठवाडा नेमका कळतो मात्र बेरार म्हणजेच वर्‍हाड कुठून सुरू होतो आणि कुठे संपतो?
बेरार म्हणजे सर्वसाधारणपणे अमरावती, वर्धा, नागपूर. बहमनी साम्राज्याची पाच छकले होऊन अहमदनगरची निजामशाही, बिदरची बरीदशाही, विजापूरची आदिलशाही, गोवळाकोंड्याची कुत्बशाही आणि बेरारची इमादशाही अशा पाच सल्तनती स्थापन झाल्या. इमादशाहाची राजधानी एलिचपूर (आजचे अचलपूर). विस्ताराने जरी मोठं असलं तरी ह्यांचे सैनिकी सामर्थ्य तुलनेने कमी होते पण नरनाळा, गाविलगड असे बलाढ्य किल्ले त्यांच्या आधिपत्याखाली होते.
कोकण हा त्याच्या अगदी डिस्टिंक्ट भौगोलिक रचनेमुळे वेगळा दिसतो. परंतु मुंबैला कोकण मानावे का? बाकी तळ कोकण आनि सह्यप्रदेश ही ही एक भानगड आहे.
कोंकणाचे पूर्वीचे नाव म्हणजे अपरान्त. पहिल्या शतकातला परकीय प्रवासी स्ट्राबो कोंकणाचा उल्लेख 'कोनियकोई' असा करतो. कोंकणाची व्युत्त्पत्ती तशी नीट लागत नाही मात्र कोण म्हणे डोंगरमाथा व रेणुकादेवीचे इकडील नाव कुंकुणा अशा नावावरुन कोंकण नाव आले असे मानले जाते. मध्ययुगात लाट (दक्षिण गुजरात), शूर्पारक (आजचे नालासोपारा), अष्टागर (अक्षी, नागाव, किहिम वगैरे प्रदेश) आणि त्या खालचे कोंकण व तदनंतर गोमंतक असे मानले जात असे. तळकोकण मात्र चिपळूणपासून पुढे हे सहज मानता यावे.

In reply to by प्रचेतस

सुबोध खरे 19/02/2026 - 12:06
तळकोकण म्हणजे सध्याचा सिंधुदुर्ग जिल्हा. येथे मालवणी भाषा हि जास्त बोलली जाते. रत्नागिरी जिल्हा हा पूर्ण डोंगराळ आहे . पोलादपूर सोडल्यावर कशेडी घाट चालू होतो तेथे रत्नागिरी जिल्हा चालू होतो तेथपासून हा जिल्हा बराचसा डोंगर आणि माथ्यावरील सडा असाच दिसतो ते खारे पाटण पर्यंत . तेथून सिंधुदुर्ग जिल्हा चालू होतो त्यातील बराचसा भाग हा सपाटीचा आहे. हा महाराष्ट्रात कोकणच्या नकाशात दक्षिणेकडचा तळाकडचा भाग म्हणून याला तळकोकण म्हणतात. रत्नागिरी लांजा राजापूर हा भाग सहसा तळकोकणात धरला जात नाही. येथे संगमेश्वरी बोली ( मराठीची एक बोली) बोलली जाते.

In reply to by प्रचेतस

ज्ञानसमृद्ध प्रतिसाद. धन्यवाद. याविषयी खरेतर स्वतंत्र लिहायला हवे की प्राचीन आणि मध्ययुगीन भारताची भागोलिक समज. आजकाल ऐतिहासिक चित्रपट दाखवतात तेव्हा शिवराय किंवा एखादा खान खलबते करत असताना टेबलवर चक्क त्यांच्यापुढे नकाशा वगैरे मांडलेला असतो आणि ते त्यात लाकडाचे घोडे वगैरे सरकवून स्ट्रॅटेजी हाकतात. तेव्हा मला प्रश्न पडायचा की यांना समुद्र कुठून कुठे आहे हे तरी कसे कळायचे. कारण कार्टोग्राफर ही एक अतिशय महत्त्वची गोष्ट असणार तेव्हा शिवरायांनी तशा माणसाला अतिशय उच्च पद दिले असेल इंदलकर सारखे.

याबरोबरच लहानपणी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाकेंद्र ओरोस बुद्रुक आहे. सिंधुदुर्गचे जिल्हाकेंद्र मालवण का नाही? ओरोस का निवडले? जिल्ह्यांना राजधान्या नसतात म्हणून आपल्या पंप्रंची चेष्टा झाली होती तेव्हा जाणवले आपल्या कडे सुद्धा जिल्ह्याच्या केंद्रांना शब्दच नाही आहे. राजधानी म्हणायला काही हरकत नाही. तरीही ओरोस कडे कुणाचे विषेश लक्ष जात नाही. आता तर तिथे मोठे सरकारी मेडिकल कॉलेज देखील आहे.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

नावाच्या गावात कलेक्टर ऑफिस आणि जिल्हा रुग्णालय सोडून काहीही नाही. हे गाव अजिबात वाढले नाही. कुडाळ बरेच मोठे झाले आहे असे दिसते. मालवण देखील बरेच मोठे आहे. मग या ओरोस मधे जाते तरी कोण? त्या जिल्हा रुग्णालयाचा काही उपयोग आहे का? कुणाच्या डोक्यात आले होते हे ओरोस चे?

In reply to by हणमंतअण्णा शंक…

ओरोसजवळून आता हातखंबा गोवा महामार्ग गेला आहे. याच गावाला स्वतःचे रेल्वे स्टेशन आहे. पश्चिमेला रेल्वे स्टेशन आणि पूर्वेला हायवे. त्यांच्या मधे एक गाव. या गावात जिल्हापरिषदेपासून सगळी जिल्ह्याची मुख्य ठिकाणे आहेत. या गावात 2021 ला सरकारी मेडिकल कॉलेज झाले आहे. याच गावाजवळ अजून एक मेडिकल कॉलेज आहे. या गावात एक मोठे तळे असून गावाला पाणी पुरवठा भरपूर आहे. या गावात एक इंजिनियरिंग कॉलेज आहे. हे गाव भविष्यात चांगले वाढू शकते त्यामुळे ओरोस या ठिकाणी गुंतवणूक करण्यास चांगला वाव आहे. इथे गुंठामंत्री होणे सध्या शक्य वाटते.

In reply to by गवि

ओरोस अगदी सेंटरला आहे. आधी वळणे वळणे म्हणून अंतर जास्त त्यात एका टोकाला केंद्र नको म्हणून निवडलेले दिसते. शिवाय लँड घेणे हा प्रोब्लेम इतर शहरात येतोय असे दिसतेय.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

सुबोध खरे 20/02/2026 - 12:04
माझ्या माहितीप्रमाणे ओरोस बुद्रुक या गावाला राजधानी बनवण्याचे कारण राजधानी बनवण्यावर असलेले वाद. यात कणकवली, मालवण कुडाळ आणि सावंतवाडी अशा चारही ठिकाणच्या स्थानिक नेत्यांना आपल्याच शहरात राजधानी हवी होती. यावर तोडगा म्हणून चारही ठिकाणच्या मध्यभागी असलेले आणि मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर आणि मुंबईत गोवा रेल्वे मार्गावर असलेले ओरोस बुद्रुक हे गाव निवडण्यात आले. मालवण आणि सावंतवाडी पासून दोन्ही (रस्ता आणि रेल्वे मार्ग) तसे लांबच होते शिवाय सरकारी कार्यालयांसाठी भरपूर जमीन हवी होती ती सुद्धा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होती. यामुळे ओरोस बुद्रुक हे गाव निवडले आणि मालवण जवळ असलेला समुद्रातील किल्ला सिंधुदुर्ग यावरुन गावाचे नाव सिंधुदुर्ग नगरी आणि जिल्ह्याचे नाव सिंधुदुर्ग ठेवण्यात आले. एकदा सरकारी कार्यालये आली कि शहर वसतेच. कारण जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस मुख्यालय, आर टी ओ, जिल्हा रुग्णालय, जिल्हा आणि सत्र न्यायालय अशी कार्यालये आली आणि त्याच्या अनुषंगाने पायाभूत सुविधा निर्माण झाल्या कि वस्ती होतेच

भारताचा नकाशा डोळ्यासमोर आणला तर बिहार आणि बंगाल यांना उत्तर भारतात का धरतात आणि मेघालय वगैरे यांना पूर्वेकडेची राज्ये न म्हणता इशान्येकडेची का म्हणतात हा गोंधळ मला नेहमी होतो.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

गवि 19/02/2026 - 00:04
यासदृश एक आणखी निरीक्षण माझंही आहे. अंदमान निकोबार बेटे ही सांस्कृतिक दृष्ट्या काही प्रमाणात ओरिजनल असली (उदा. आदिवासी) आणि तिथली आधुनिक संस्कृती ही भारतातल्या अनेक भागातल्या लोकांची संस्कृती- सरमिसळ असली, तरी अनेकदा व्यवहारात, नियोजनात, कंपन्या किंवा संस्थांच्या विभागीय वाटणीत, शाखांचे मुख्य ऑफिस कुठे, या दृष्टीने अंदमान हे चेन्नईपेक्षा कोलकत्याशी जास्त जोडलेलं दिसतं. अंदमानातून बाहेर पडलेले लोक कोलकात्यात चेन्नईपेक्षा जास्त दिसतात आणि सांस्कृतिकदृष्ट्या देखील पश्चिम बंगालशी अधिक जवळचे असतात. इतर कोणाचं निरीक्षण अगदी विरुद्ध देखील असू शकतं. माझ्याकडे मोठा विदा नाही.

स्पेनचे एक शहर आफ्रिका खंडात आहे- त्या शहराचे नाव आहे सेयुटा. सौदी अरेबियामध्ये इस्लामचा उदय झाल्यानंतर अरबांनी हल्ले सुरू केले. जॉर्डन-पॅलेस्टाईन ओलांडून ते आफ्रिका खंडाच्या उत्तर भागात घुसले. त्यातून ते आफ्रिका खंडाच्या पश्चिमेला असलेल्या मोरोक्कोपर्यंत पोचले. तिथून जिब्राल्टरचा समुद्र ओलांडला की स्पेन येते. ते स्पेनमध्येही घुसले. त्यांना स्पॅनिश लोक मूर म्हणायचे. त्या मुस्लिम आक्रमणाविरोधात स्पेनचे लोक जवळपास ५०० वर्षे लढत होते आणि त्यांनी १४९२ मध्ये मूरांना हाकलून दिले. १४१० मध्ये स्पेनमधील एका राजपुत्राने सध्या पोर्तुगाल आहे तो प्रदेश मुक्त केला आणि तिथे पोर्तुगाल या नव्या राज्याची स्थापना केली. त्यापूर्वी पोर्तुगाल असा वेगळा देश नव्हता. तिथे हेनरी म्हणून राजा होता. युरोपातून भारत आणि दक्षिणपूर्व आशियाबरोबर व्यापार चालायचा त्या व्यापार मार्गावर मुस्लिमांचे वर्चस्व होते तसेच कॉन्स्टॅन्टीनोपल (आताचे इस्तंबूल) मार्गे आलेला माल इटलीतील व्हेनिस आणि जिनोआमार्गे युरोपात जायचा तेव्हा त्या व्यापारावर इटालीयनांचेही वर्चस्व होते या गोष्टी स्पॅनिश आणि पोर्तुगीज ख्रिश्चनांना डाचत होत्या. त्यामुळे भारताकडे जायचा समुद्रीमार्ग शोधून काढायचे प्रयत्न त्या हेनरी राजाने सुरू केले. त्यामुळे त्याला हेनरी द नेव्हिगेटर असेही म्हणतात. त्यात धार्मिक अँगल पण होतात- मुस्लिमांचे वर्चस्व खिश्चनांना डाचत होते. त्यामुळे हेनरी द नेव्हिगेटरने युरोपिअन देशांनी केलेली पहिली समुद्र मोहिम काढली आणि सेयुटा या मोरोक्कोतील शहरावर नियंत्रण मिळवले. ही गोष्ट १४१५ ची. त्यानंतर १४८० मध्ये पोर्तुगाल आणि स्पेनचे एकीकरण झाले आणि सेयुटावर स्पॅनिशांचे नियंत्रण प्रस्थापित झाले. १५४० मध्ये परत पोर्तुगाल वेगळा झाला तरीही सेयुटावर स्पेनचे नियंत्रण कायम राहिले- आजही आहे. खालील नकाशात सेयुटा स्पेनच्या जवळ आहे हे दिसेल. Ceuta या नकाशावरून आणखी एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे भारताकडे जायचा समुद्रीमार्ग शोधायच्या उद्योगात पोर्तुगीज लोक पुढे का होते. त्याचे कारण पश्चिमेकडे अटलांटिकचा अ‍ॅक्सेस त्यांना जवळ होता आणि आफ्रिका खंडही जवळ होता. तीच गोष्ट स्पॅनिश लोकांची. त्यामानाने इंग्लंड बरेच लांब आहे. त्यामुळे भारतात युरोपिअनांनी हातपाय पसरायला सुरवात केली त्या काळात पोर्तुगीज दिसतील- मग फ्रेंच आणि शेवटी ब्रिटिश. त्याचे कारण या भूगोलात दडले आहे. त्यात इटालियन, ग्रीक आणि जर्मनांचे नावही दिसणार नाही. त्याचे कारणही हा नकाशा बघून समजेल. इटली आणि ग्रीसला अटलांटिकचा डायरेक्ट अ‍ॅक्सेसच नाही कारण भूमध्य समुद्र आणि आजूबाजूचे जमिन यातून जहाजे जाणार कुठून? जर्मनीला थोडासाच अटलांटिकचा अ‍ॅक्सेस आहे पण त्या भागात कदाचित चांगले बंदर असायला परिस्थिती अनुकूल नसावी. त्या तुलनेत डच लोक भारतात पोचले आणि इंडोनेशियातही पोचले. कारण नॉर्थ सी मधून त्यांना अटलांटिकचा अ‍ॅक्सेस आहे. तीच गोष्ट डेन्मार्कची. ते मर्यादित प्रमाणात का होईना भारतात पोचले. कारण त्यांना अटलांटिकचा अ‍ॅक्सेस होता. इतिहास वाचताना असा भूगोलही बघितल्यास अशा बर्‍याच गोष्टींचा उलगडा होतो.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

टिनटिन 19/02/2026 - 11:58
ह्या वरून आठवले , अब्दालीसारखा नदीचा उतार शोधत आमचा एक मित्र खडवलीच्या काळू नदीत घसरून पडला होता

खटपट्या 19/02/2026 - 01:33
ब्रिटीशांच्या काळातील मुंबै प्रोविन्स शोधत असताना तो फार मोठा होता असे ऐकले. नुकतेच कुठे तरी वाचले की ब्रिटीश मुंबई प्रोव्हिन्स हे ओमान पर्यन्त होते.

In reply to by खटपट्या

नौदल पश्चिम विभाग (मुख्यालय :मुंबई) ह्यांच्या अखत्यातातील भागात अजूनही बहुदा एकच पोलीस स्टेशन आहे. नौदलातील नागरी तक्रारांसाठी/गुन्ह्यांसाठी येथे गुन्हा नोंदवला जातो. त्याची हद्द गुजरात खंबात पासून अगदी केरळ, कन्याकुमारीपर्यंत आहे. नक्की नाव आणि संदर्भ आठवत नाहीये. मिळाले कि बाकी पोस्ट करतो.

कांदा लिंबू 19/02/2026 - 11:45
जिल्हाकेंद्र - जिल्हाकेंद्र / जिल्ह्याचे मुख्यालय / डिस्ट्रिक हेड क्वार्टर याला राजधानी हा शब्द सध्या अनपेक्षित वाटत असला तरी रुळल्यावर तो योग्य वाटेल असे वाटते. सामान्यतः जिल्ह्याचे नाव व त्या जिल्ह्याच्या राजधानीच्या गावाचे नाव हे एकाच असते. उदाहरण नांदेड या जिल्ह्याची राजधानी नांदेड या नावाच्या गावी (किंवा शहरात) आहे. तथापि, काही ठिकाणी जिल्ह्याचे नाव व त्या जिल्ह्याच्या राजधानीच्या गावाचे नाव ही दोन्ही वेगवेगळी असलेली दिसतात. महाराष्ट्रात रायगड हा बहुधा असा एकाच जिल्हा असावा ज्या जिल्ह्याच्या राजधानीचे नाव वेगळे, अलिबाग हे आहे. आंध्र प्रदेशात (सध्याचा तेलंगणा धरून) मात्र असे अनेक जिल्हे पूर्वी होते. मागच्या दहा-बारा वर्षांत जिल्ह्यांची विभाजने झाली व हा भूगोल काहीसा बदलला. २०१४ पूर्वीची स्थिती - जिल्हा -- राजधानी पूर्व गोदावरी -- काकिनाडा पश्चिम गोदावरी -- एलुरु कृष्णा -- मछलीपट्टणम मेदक -- संगारेड्डी प्रकाशम -- ओंगोल

In reply to by कांदा लिंबू

प्रकाशम -- ओंगोल
या प्रकाशम जिल्ह्याची नेहमी गंमत वाटते. प्रकाशम नावाचे कोणतेही गाव आहे असे वाटत नाही कारण त्या जिल्ह्याचे नाव आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री टी.पी.प्रकाशम यांच्या नावावरून दिले आहे. मुख्यमंत्र्याच्या नावावरून जिल्हा हा जरा गंमतीचाच प्रकार आहे. महाराष्ट्रात चव्हाण, पवार, नाईक किंवा फडणवीस नावाचा जिल्हा असेल तर कसे वाटेल? तसेच तिकडे केले आहे. उत्तर प्रदेशात मायावतींनी जिल्ह्यांचे नामकरण करून मूर्खपणाची परिसीमा गाठली होती. अमेठी जिल्ह्याचे नामकरण केले छत्रपती शाहूजी महाराज नगर. शाहू महाराजांच्या कामाविषयी आदर असला तरी शतकानुशतके असलेले एखाद्या ठिकाणाचे अमेठी हे नाव बदलून शाहूजी महाराज नगर करायचे? शाहू महाराजांचा कधी अमेठीशी संपर्क आला असेल असे वाटत नाही. मग अचानक अमेठी हे नाव बदलून शाहूजी महाराज नगर हे नाव देणे तसे विचित्रच वाटते. तीच गोष्ट अमरोहाची. अमरोहा जिल्ह्याचे नाव ज्योतिबा फुले नगर असे केले. मग यथावकाश ज्योतिबा फुले नगरचे लोकांनी जेपी नगर केले. अखिलेश मुख्यमंत्री झाल्यावर ही नावे बदलली पण समजा अशी नावे बदलली नसती तर जेपी नगर म्हणजे जयप्रकाश नारायणांच्या नावाने नाव दिले आहे असे कोणाला वाटले असते. असे ऐकले आहे की कोल्हापूरला शिवाजी महाराजांच्या नावाने विद्यापीठ स्थापन करायची वेळ आली तेव्हा यशवंतराव चव्हाणांनी शिवाजी विद्यापीठ असे सुटसुटीत नाव ठेवावे असा आग्रह धरला होता. त्याचे कारण वडोदर्‍याच्या महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटीचे एम.एस.युनिव्हर्सिटी झाले तसे कोल्हापूरमधील विद्यापीठाचे सी.एस.एम युनिव्हर्सिटी व्हायला नको- जसे युपीत जेपी नगर झाले. जिल्ह्याविषयी आणखी एक विचित्र गोष्ट म्हणजे सांगली जिल्ह्याची. सांगली जिल्ह्याचे मुख्यालय अर्थातच सांगली शहर आहे. पण सांगली जिल्ह्यात सांगली हा तालुकाच नाही. त्यामुळे सांगली जिल्ह्याचे मुख्यालय असलेले सांगली शहर येते मिरज तालुक्यात. असेही फार कुठे बघायला मिळत नसावे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

हे महानगर असले तरी ते हातकणंगले तालुक्यात येते. काही गावांचे नशीब फळफळते तसे आहे. इस्लामपूर आताचे ईश्वरपूर आणि वाळवा तालुका, खानापूर तालुका पण विटा मुख्य शहर असे अनेक. लहानपणी काका लोकांना मुली पाहायला जेव्हा सगळी फॅमिली जात असे तेव्हा पहिल्यांदा भूगोलाच्या पुस्तकात पाहिलेली गावे पाहता येत. वेगळेच फीलिंग असायचे. मी खूप हट्ट करून नवनीतचा अटलास विकत घेतला होता. तासनतास नकाशे पाहत घालवणे आणि ती गावे कशी असतील यांचे इमॅजिनेशन करणे खूप उत्तम टाइमपास. पहिल्यांदा कोल्हापूर पहिले तेव्हा तर भंजाळूनच गेलो होतो.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

अभ्या.. 22/02/2026 - 16:19
अजून एक गम्मत म्हणजे कोल्हापूर जिल्हा आणी सांगली जिल्हा ह्यांच्या सीमारेषेवर रेल्वे लाईनजवळ निमशिरगाव आणि तांदळगे हि दोन गावे आहेत. त्या छोट्याश्या स्टेशनला दोन्ही गावाची नावे आहेत पण निमशिरगाव चे इंग्लिश बरोबर आहे तांदळगे चे स्पेलिंगनुसार तमदलगे असे केलेले आहे आणि स्टेशनबोर्डवर तसेच देवनागरीत लिहिलेले आहे. कॉलेजला दररोज मिरज-कोल्हापूर-मिरज ट्रेनने प्रवास करताना ते तमदलगे असे कसे नांव म्हणून मजा वाटायची. m

In reply to by अभ्या..

गवि 22/02/2026 - 17:50
ऑ??? मी तर खरोखरच तमदलगे असंच आजतागायत समजत होतो. - (शिवाजी विद्यापिठाचा जुना विद्यार्थी) गवि ता.क. गूगल सर्च केली असता विकिपीडिया पानावर, लोकसत्ता आणि अन्य अनेक वृत्तपत्रांत तमदलगे असंच दिसतं आहे. आणि तांदळगे असं शोधू गेलं तर एकही निकाल आला नाही. म्हणजे मूळ नाव सर्वत्रच चुकीचं पसरलं असावं. तमदलगे हे नाव बसेसवर बघितल्याचं आठवतं आहे सांगली कोल्हापूरमध्ये असताना तीस वर्षांपूर्वी.

In reply to by गवि

अभ्या.. 22/02/2026 - 17:59
Locality Name : Tamdalage ( तांदलगे ) Taluka Name : Shirol District : Kolhapur State : Maharashtra Region : Desh or Paschim Maharashtra Division : Pune Language : Marathi and Kannada Current Time 05:55 PM Date: Sunday , Feb 22,2026 (IST) Time zone: IST (UTC+5:30) Elevation / Altitude: 550 meters. Above Seal level Telephone Code / Std Code: 02322 . मी खूप जणाना तांदळगे असेच म्हणताना ऐकलेले आहे.

In reply to by गवि

मी ही तमदलगे असेच नाव वाचले पाहिले ऐकले आहे. गोव्यात निदान कुंकळे माजोर्डे किंवा तशी नावे स्थानिकांच्या बोलण्यात तरी असतात मात्र बहुतेक बाहेरचे लेम करतात असे काहीसे कोल्हापुरात होईल असे वाटले नव्हते.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

मी ही तमदलगे असेच नाव वाचले पाहिले ऐकले आहे.
मी पण. माझी पहिली अस्थायी नोकरी कोल्हापुरात होती- २००२ मध्ये. तेव्हा विश्रामबागहून सकाळी सव्वाआठच्या सुमारास येणारी सातारा-कोल्हापूर पॅसेंजरने दररोज कोल्हापूरला जायचो. तेव्हा जयसिंगपूर आणि हातकणंगले या दोन स्टेशनच्या मध्ये निमशिरगाव-तमदलगे हे स्टेशन होते. ते एक बिना प्लॅटफॉर्मचे स्टेशन होते. नुसत्या दोन पाट्या त्यावेळेस त्या स्टेशनला होत्या. पहिली पाटी म्हणजे स्टेशन सुरू झाले आणि दुसरी पाटी म्हणजे स्टेशन संपले :) त्या स्टेशनवर ती पॅसेंजर थांबायची. तमदलगे हेच नाव त्या स्टेशनवर आणि पुढारी वगैरे स्थानिक पेपरांमध्येही वाचल्याचे चांगलेच आठवते. गुगल मॅपवर मराठीत तांदळगे हे नाव वाचल्यावर त्या नावाला तमदलगे हे एडिट सुचवले होते. पण गुगल मॅपने ते मान्य केले नाही. बाकी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील काहीकाही गावांची नावे अगदीच विचित्र आहेत. जाडर बोबलाद, कोंत्याव बोबलाद, माधळमुठी, गैबी कुडुत्री, येडे निपाणी, येडे मच्छिंद्र, यशवंंतराव चव्हाणांचे जन्मगाव देवराष्ट्रे, विठुरायाचीवाडी, दिघंची, बेळंकी, बेळुंडगी वगैरे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

रूढ नसलेली डबल बॅरल नावे ही सांगली जिल्ह्याची खासियत म्हणवी लागेल. १. येडे * २. कवठे * ३. ३२ शिराळा ४. म्हैसाळ (एम) ५. करोली (टी) ६. शिंदेवाडी (एच) ७. रामपूरवाडी (द्विरूक्ती) ८. अलकूड (एम) ९. अग्रण धुळगाव कर्नाटकी नावे : आमचे रावळगुंडवाडी, अचकनहळ्ळी

In reply to by हणमंतअण्णा शंक…

अभ्या.. 22/02/2026 - 20:27
जुन्या बार्शी लाईट रूटवर बार्शी ते कुर्डूवाडी दरम्यान चिंचगाव नावाचे गाव आहे. तेथील स्टेशन हे चिंक हिल नावाने आहे. ब्रिटिश काळापासूनच तसे नाव आहे स्टेशनचे. मध्यरेल्वेच्या अखत्यारीत येते. तेथे नॅरोगेज असताना स्टीम इंजिने पाणी भरायला थांबायची. बहुधा इथे आधी आरक्षी प्रशिक्षण केम्द्र ही होते. सध्याचे माहीत नाही. चिंक हिल हे अगदी नॉर्थवेस्ट किंवा कुर्ग भागात असल्यासारखे हे नाव चक्क पंढरपूर तालुक्यात कुर्डूवाडी जंक्शनजवळ आहे.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

हो असे कुठून जाताना कुठेतरी वाचलेल्या/ऐकलेल्या नावाच्या गावाची पाटी दिसणे हा एक मस्त अनुभव असतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाताना असा अनुभव अनेकदा येतो. काही काही टिपीकल कोकणी अडनावे असतात त्या लोकांचे मूळ गाव असलेली गावे दिसली की छान वाटले. पूर्वी झारापकर टेलरींग कॉलेज म्हणून एक मुंबईत होते. ते झाराप नावाचे गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. तीच गोष्ट वायंगणकर अडनावाच्या लोकांचे मूळ गाव- वायंगणी, वालावलकरांचे वालावली, आचरेकरांचे आचरे, मुणगेकरांचे मुणगे वगैरे. ही गावे नकाशात बघितली होती त्यापैकी काही गावांच्या नावाच्या पाट्या रस्त्यावरून जाताना बघितल्यावर छान वाटले होते. तीच गोष्ट गोव्यात- मयेकरांचे मये(म), बोरकरांचे बोरी(म), पोंभुर्पेकरांचे पोंभुर्पे, लोटलीकरांचे लोटली वगैरे. दक्षिण गोव्यात कांसावलीमधून दाबोळी विमानतळावर जाताना एक डॉ.लुई प्रोतो बार्बोझा रोड दिसला होता. डॉ.लुईस प्रोतो बार्बोझा हे १९९० मध्ये काही महिने गोव्याचे मुख्यमंत्री होते. ते मुख्यमंत्रीपदावरून दूर झाल्यानंतर त्यांचे नाव ऐकले ते थेट २०११ मध्ये त्यांचे निधन झाले तेव्हा. त्यांच्या नावाचा रोड तिथे पहिल्यांदा बघितल्यावर एकदम छान फिलींग आले. कदाचित ते त्या भागातील असावे. पण दरवेळेस अशी नावे वाचून छान फिलींग येते असे नाही. गुरगावमध्ये अशीच एकदा ध्यानीमनी नसताना शहिद रूपीन कट्याल मार्ग ही पाटी बघितली आणि कंदाहार विमान अपहरण प्रकरण आठवून विलक्षण कालवाकालव झाली. ते कंदाहार हायजॅकिंग प्रकरण, रूपीन कट्यालची गळा चिरून केलेली हत्या आणि त्याची पत्नी रचनाची त्यावेळेस काय अवस्था झाली असेल अशा काही गोष्टी निदान या जन्मात तरी विसरता येणार्‍यातील नाहीत. बहुदा रूपीन कट्यालचे घर त्या भागात कुठेतरी असावे. तसेच एकदा दिल्लीत जवाहरलाल नेहरू स्टेडिअम मेट्रो स्टेशनजवळ असाच शहिद अजय आहुजा मार्ग ही पाटी दिसली होती. कारगील युध्दात दुसर्‍या दिवशी आपली दोन विमाने पडली होती. त्यापैकी एका विमानाचा वैमानिक होता दिल्लीचा अजय आहुजा. बहुतेक तो दिल्लीत त्या भागात राहायला असावा.

कंजूस 19/02/2026 - 11:58
माझ्याकडे रेल्वेची बरीच पुस्तके आहेत आणि त्यांत भरमसाठ माहिती आहे. माथेरान रेल्वे साठीचा खर्च आजही जीजीभॉय यांनी केला होता. नंतर ती रेल्वे सेंट्रल रेल्वेकडे देण्यात आली. पण आताचे रेल्वे मंडळ ही माहिती त्यांच्या हिल रेल्वेमध्ये देत नाही.

तुमच्या आठवणींत असलेला भूगोल आणि इतिहास इथे मुक्तपणे मांडा. १९९८-९९ साली मी तिसरीत होतो. तेव्हा तिसरीच्या भूगोलात जिल्ह्याची माहिती शिकवली जायची आता शिकवतात का माहीत नाही, तर माझ्या पुस्तकातला धुळे जिल्ह्याचा नकाशा नी वर्गातील इतर मुलांच्या पुस्तकातील धुळे जिल्ह्याचा नकाशा ह्यात मोठा फरक होता, माझ्या पुस्तकातल धुळे जिल्हा भला मोठा होता, हे असे का झाले हे मला नंतर बऱ्याच वर्षांनी कळले, १९९८ साली, नंदुरबार जिल्हा धुळे जिल्ह्यातून वेगळा झाला होता भूगोलाची पुस्तके नवी आली होती, माझ्याकडे मात्र जूनच पुस्तक आल होत. माझे एक चुलत काका जे ९९-९९ व्या वर्षी २ वर्षाआधी गेले ते सांगायचे की जळगाव जिल्ह्यात ते रहायचे तेव्हा काहीही लफडे झाले नि इंग्रज मागे लागले की ते २०-२५ किमीवरील निजामाच्या राज्यात लोक पळून जायचे नि इंग्रज पोलिस काही करू शकायचे नाहीत.
आज अचानक माझ्या लहानपणीचा भूगोल आठवला. आमचा रत्नागिरी जिल्हा तेव्हा, .. तेव्हा म्हणजे १९७० आणि १९८० च्या दरम्यान,.. पार गोव्याला जाऊन टेकला होता. देवगड हापूस आणि रत्नागिरी हापूस हे एकाच जिल्ह्यातले होते. भूगोलाच्या "आपला जिल्हा" शिकवणाऱ्या एका शालेय वर्षात आमचा रत्नागिरी जिल्हा म्हणजे नकाशातला एक लांबलचक उभट पट्टा होता. सिंधुदुर्ग जिल्हा झाला आणि तळकोंकण अशी वेगळी आयडेंटिटी गडद झाली. माझ्या रम्य बालपणी आम्ही रोज शाळेत पोचताच प्रार्थना म्हणण्यापूर्वी "प्रतिज्ञा" म्हणायचो.

मंगळावरील मुरुमातील मुंग्यांचा मुरांबा.

गवि ·

कंजूस 16/01/2026 - 17:36
डोकेबाज पाककला. शुक्रावरील शेवाळाची उसळ*>> घावणे म्हणायचे आहे का? शुक्र ढगांत हरवलेला असतो.

युयुत्सु 16/01/2026 - 17:44
अनेक वर्षांपूर्वी पुण्यात य० गो० जोशी 'प्रसाद' नावाचे मासिक चालवत असत. त्यात एकदा "फोलकटांचा चिवडा" अशी पाकृ प्रसिद्ध झाली होती आणि बरीच गाजली होती. तसंच पंचतत्रातला एक श्लोक याच धर्तीवर आहे - यस्य कस्य तरोर्मूलं येनकेनापि मर्दितं| यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति|| तातपर्य- वेदांत (वि० अ थर्व वेदात अशा पाकृ भरपूर सापडायची शक्यता आहे)

In reply to by टर्मीनेटर

गवि 16/01/2026 - 17:58
हा हा हा... पण तिथल्या थंडीत ती लगेच गार होते. "गुरु"वरच्या गुळवेलीचा गुळांबा टाकायचे मनात होते. पण त्यामुळे जायंट ग्यास होतो म्हणतात. म्हणून तेही टाळले.

कंजूस 16/01/2026 - 17:36
डोकेबाज पाककला. शुक्रावरील शेवाळाची उसळ*>> घावणे म्हणायचे आहे का? शुक्र ढगांत हरवलेला असतो.

युयुत्सु 16/01/2026 - 17:44
अनेक वर्षांपूर्वी पुण्यात य० गो० जोशी 'प्रसाद' नावाचे मासिक चालवत असत. त्यात एकदा "फोलकटांचा चिवडा" अशी पाकृ प्रसिद्ध झाली होती आणि बरीच गाजली होती. तसंच पंचतत्रातला एक श्लोक याच धर्तीवर आहे - यस्य कस्य तरोर्मूलं येनकेनापि मर्दितं| यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति|| तातपर्य- वेदांत (वि० अ थर्व वेदात अशा पाकृ भरपूर सापडायची शक्यता आहे)

In reply to by टर्मीनेटर

गवि 16/01/2026 - 17:58
हा हा हा... पण तिथल्या थंडीत ती लगेच गार होते. "गुरु"वरच्या गुळवेलीचा गुळांबा टाकायचे मनात होते. पण त्यामुळे जायंट ग्यास होतो म्हणतात. म्हणून तेही टाळले.
**मंगळावरील मुरुमातील मुंग्यांचा मुरांबा : एक प्राचीन-आधुनिक-वैज्ञानिक पाककृती** --- कालच घरच्या मागच्या अगण्णात मुंग्यांची रांगा दिसली आणि मन भूतकाळात गेल. माझ्या लहानपणी आमच्या गावी लाल मुंग्यांची दिसत असत. आमची आत्या त्या मुंग्यांची चविष्ट चटणी बनवत असे. मी विचार केला की आपण मानवजातीच्या विकासासाठी भविष्यकालात इतर ग्रहांवर देखिल खाता येऊ असा मुरंबा का बनवू नये.

निशानची (हिंदी सिनेमा)

मन ·

कपिलमुनी 05/01/2026 - 14:32
माबो वर याबद्दल वाचले होते . अनुराग कश्यप आवडता दिग्दर्शक आहे . त्यामुळे चित्रपट सलग पाहिला (भाग १- भाग २ ). कथेत नाट्यमयता नाहीये किंवा दिग्दर्शक ती दाखावायला कमी पडला आहे असे माझे मत आहे . चित्रपट चांगला असून मनोरंजक झालेला नाही. आवडले काय ? वास्तववादी पात्रे आहेत , सामान्य माणसे आणि त्यांच्या बाजूला घडणार्‍या गुन्हेगारी घटना दाखवलेल्या आहेत . घरात जरी गुन्हेगार असला तर लोक सहसा त्याला टाळतात , दुसरा मार्ग पत्करतात . हे व्यव्स्थोत दाखवले आहे . वासेपूर आणि निशांची यामध्ये इथेच फरक आहे , पात्रांची मानसिकता वेगळी आहे त्यामुळे चित्रपटाचा ट्रीट्मेंट आणि परीणाम वेगळा आहे. अनुरागने हा बॅलन्स ठेवला हे आवडले.

स्वताची रेश मोठी करायला, दुसर्याची खोडू नये म्हणतात. महिला पात्रे दणकट दाखवताना पुरुश पात्र एकतर बावळट तरी किन्वा नालायाक तरी दाखवाची गरज का वाटावी? "ह्यात कधी कधी साधंसरळ असणारं पुरुष पात्र अवघड परिस्थितीत बिचकतं. गांगरतं. महिला मात्र त्या प्रसंगाला भिडते. असे प्रसंग मजेशीर आहेतच." एखाद्या महिलेची फजिती दाखवली असती, किन्वा ती अवघड परिस्थितीत बिचकते गांगरते असे दाखवले असते तर ते पण असेच मजेशीर वाटले असते? (तसे दाखवले नसते हा भाग अलाहिदा) माध्यमान्मधील महिलान्च्या प्रतिमेबद्दल बरेच बोलले गेले आणि बोलले जातय ही. आणि बोलले जावेही, त्याबद्दल काही म्हणणे नाही. पण मग माध्यमान्मधील पुरुशान्च्या प्रतिमेबद्दल पण थोडा विचार करावा.

कपिलमुनी 05/01/2026 - 14:32
माबो वर याबद्दल वाचले होते . अनुराग कश्यप आवडता दिग्दर्शक आहे . त्यामुळे चित्रपट सलग पाहिला (भाग १- भाग २ ). कथेत नाट्यमयता नाहीये किंवा दिग्दर्शक ती दाखावायला कमी पडला आहे असे माझे मत आहे . चित्रपट चांगला असून मनोरंजक झालेला नाही. आवडले काय ? वास्तववादी पात्रे आहेत , सामान्य माणसे आणि त्यांच्या बाजूला घडणार्‍या गुन्हेगारी घटना दाखवलेल्या आहेत . घरात जरी गुन्हेगार असला तर लोक सहसा त्याला टाळतात , दुसरा मार्ग पत्करतात . हे व्यव्स्थोत दाखवले आहे . वासेपूर आणि निशांची यामध्ये इथेच फरक आहे , पात्रांची मानसिकता वेगळी आहे त्यामुळे चित्रपटाचा ट्रीट्मेंट आणि परीणाम वेगळा आहे. अनुरागने हा बॅलन्स ठेवला हे आवडले.

स्वताची रेश मोठी करायला, दुसर्याची खोडू नये म्हणतात. महिला पात्रे दणकट दाखवताना पुरुश पात्र एकतर बावळट तरी किन्वा नालायाक तरी दाखवाची गरज का वाटावी? "ह्यात कधी कधी साधंसरळ असणारं पुरुष पात्र अवघड परिस्थितीत बिचकतं. गांगरतं. महिला मात्र त्या प्रसंगाला भिडते. असे प्रसंग मजेशीर आहेतच." एखाद्या महिलेची फजिती दाखवली असती, किन्वा ती अवघड परिस्थितीत बिचकते गांगरते असे दाखवले असते तर ते पण असेच मजेशीर वाटले असते? (तसे दाखवले नसते हा भाग अलाहिदा) माध्यमान्मधील महिलान्च्या प्रतिमेबद्दल बरेच बोलले गेले आणि बोलले जातय ही. आणि बोलले जावेही, त्याबद्दल काही म्हणणे नाही. पण मग माध्यमान्मधील पुरुशान्च्या प्रतिमेबद्दल पण थोडा विचार करावा.
‘निशानची’ (अर्थ : नेमबाज, बंदुकबाज, sniper) ह्या सिनेमाचे दोन्ही भाग आवडले. सिनेमाचा विषय एका पैलवान असणाऱ्या वडिलांच्या संशयास्पद मृत्यूनंतर कुटुंबाची झालेली स्थिती, त्या परिस्थितीला दोन भिन्न स्वभावाच्या जुळ्या भावांनी आणि नेमबाजीमध्ये तरुणपणी निपुण असणाऱ्या,  पदकविजेत्या त्यांच्या आईने दिलेलं तोंड, त्यानंतर उलगडत जाणाऱ्या घटना, नवीनच माहिती होत गेलेले धागेदोरे आणि दरम्यान वाढत गेलेली गुंतागुंत असा काहीसा सांगता येईल. अनुराग कश्यपच्या इतर काही सिनेमांप्रमाणेच ह्यातही महिला पात्रे निव्वळ पूरक भूमिका म्हणून, सोबत असायला हवीत म्हणून अशी असण्यापलीकडे आहेत.

छोटीसी बात, गोईंग डाऊन आणि येरूडकर..- किंडल बुक्स..

गवि ·

सोत्रि 03/12/2025 - 14:52
किंडल अनलिमिटेडवर लगेच डाउनलोड करून टाकले. संध्याकाळी हापिसच काम संपल की वाचून संपवणार आज!! छोटीसी बात... - (गवीपंखा) सोकाजी

कंजूस 03/12/2025 - 15:38
गगन विहारी सर, माझ्या नावाला स्मरून पुस्तकाचं सांपल वाचलं. गोष्ट एकदम फ्लाइट फास्ट आहे. नायकाचं सुंदरींवर बारिक लक्ष आहे. असू द्या. तरुणांना आवडतील कथा.

टर्मीनेटर 03/12/2025 - 15:53
मला UPI आणि credit card दोन्ही वरून पेमेंट करताना समस्या येत आहे त्यामूळे डाउनलोड करता येत नाहीये... ;( काय कारण असावे? मी सेव्ह कार्ड ऑप्शन सिलेक्ट करत नाही हे कारण असावे काय?

In reply to by टर्मीनेटर

गवि 03/12/2025 - 16:16
UPI मध्ये तर सरळच प्रक्रिया आहे. त्यात सेव्ह काही करावे लागत नाहीच. किंडल किंवा अमेझॉन मोबाईल ॲपमध्ये मात्र थेट कोणतेही किंडल संबंधित पेमेंट केले किंवा घेतले जात नाही. काहीतरी पॉलिसी आहे. वेब ब्राउझरवर किंडल किंवा अमेझॉन वेबसाईट ओपन करूनच ते करावं लागतं.

In reply to by गवि

टर्मीनेटर 03/12/2025 - 16:24
येस सर... मी तुम्ही दिलेल्या amazon च्या लिंक वरूनच प्रयत्न करत होतो... फक्त ज्या फोन वरून UPI पेमेंट करण्याचा प्रयत्न केला त्यात माझे UPI अकाउंट नाही पण मला ज्यावर ते आहे त्यावर पेमेंट रिक्वेस्ट आली नाही... म्हणून क्रेडिट कार्ड वरून पेमेंट करण्याचा प्रयत्न केला पण ते ही प्रोसेस होत नाहिये... आता थोड्या वेळानी घरी पोचल्यावर वेब ब्राउझर वरून प्रयत्न करतो...

In reply to by गवि

टर्मीनेटर 03/12/2025 - 17:08
"प्रयत्ने वाळूचे कण रगडीता" काय काय गळे... वगैरे म्हणतात ना... त्यावर विश्वास आहे 😀 त्यामुळे प्रयत्न करत रहाणे हे माझे इतिकर्तव्यच आहे हो...

In reply to by गवि

टर्मीनेटर 03/12/2025 - 17:24
माझ्यासारख्या अत्यंत सोज्वळ माणसाचा अतिशय "सात्विक' प्रतिसादही अश्लील वगैरे वाटत असेल तर पुढे काय बोलायचे? भलाई का जमानाच नहीं रहा सेठ 😀

In reply to by टर्मीनेटर

टर्मीनेटर 03/12/2025 - 19:44
वेब ब्राउझर वर पेमेंट झालं हो गवि शेठ... आता वाचतो.... (वाचतो कसला मजा घेतो... तुमचे लेखन वाचणे हा कायमच मजेदार अनुभव असतो 😍)

गविंचे पुस्तक खरेदी करतो. या वीकेंडला वाचून अभिप्राय देखिल कळवतो. - एक गविफॅन (गवि मिसळपाववर नसतील तर माझीही पावले इथे वळणार नाहीत. एवढे गवि आणि मिसळपाव यांचे माझ्या मनात साटेलोटे आहे. कोणत्याही प्रतिसादावरुन गवि एक मायाळू, केअरिंग, समंजस आणि ऐकुन घेणारे पण नेमकं, महत्वाचे, क्वचित तीक्ष्ण, शक्यतो आबदार पुढच्याला न दुखावता, बोलणारे, तरिही ऐसपैस आणि रिलॅक्स्ड व्यक्ती वाटतात. अशी माणसे क्रियेटिव्ह असतील तर मला अशा माणसांचा स्नेह खूप भावतो हवाहवासा वाटतो. त्यांचा जर कुणी पॅट्रोनस प्राणी असेल तर तो हत्ती असे वाटते. (त्याच्या शांत समंजस पवित्र वृत्तीमुळे) ) आणि गवि चा लाँग फॉर्म गगन विहारी आहे हे मला पहिल्यांदा कळले. गविजी, वाचेन, सांगेन. खूप धन्यवाद.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

त्यांचा जर कुणी पॅट्रोनस प्राणी असेल तर तो हत्ती असे वाटते.
चुक. डॉगेश भाई त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.

In reply to by धर्मराजमुटके

पॅट्रोनस हे वृत्ती आणि प्रकृतिवर ठरत असतो त्यांना चॉइस नाही तो आपोआप निवडला जातो. मला तरी ते डॉगेश भाऊ नाही वाटत.

गवि 03/12/2025 - 18:34
ताजा कलम. खालील लेख लिहून एक दिवस व्हायच्या आतच विमान अपघातांच्या कहाण्या ऊर्फ एअर क्रॅशेस, या लेखांचं पुस्तक "गोईंग डाऊन" हेही किंडलवर आलं आहे. अनेक वाचक गेली काही वर्षे या लेखांचं काय झालं असं विचारत होते. आता ते पुन्हा सर्वांना वाचायला किंडलवर प्रकाशित झाले आहेत. लिंक https://amzn.in/d/fmxMFvV B

In reply to by गवि

गविजी हे पुस्तक छापायला कुणीही तयार झाले असते. तुम्ही प्रयत्न केले का तसे? (अजून एक म्हणजे चॅटजीपीटी आणि इतर मंडळी यांचा चित्रांचा सेन्स पूर्ण गंडला आहे, वरील मुखपृष्ट अजून आकर्षक करता आले असते. तुम्ही इथे एक स्पर्धा घ्यायला हवी होती, अभ्याभाऊ, मी, चित्रगुप्त इत्यादींनी हात/ प्रॉम्प्ट आजमावून पाहिला असता)

In reply to by हणमंतअण्णा शंक…

गवि 03/12/2025 - 21:06
धन्यवाद अण्णा..
वरील मुखपृष्ट अजून आकर्षक करता आले असते. तुम्ही इथे एक स्पर्धा घ्यायला हवी होती, अभ्याभाऊ, मी, चित्रगुप्त इत्यादींनी हात/ प्रॉम्प्ट आजमावून पाहिला असता
खरं आहे. आता यापुढील भाग येईलच. तेव्हा इथून आयडियाज घेईन. डन..

गामा पैलवान 04/12/2025 - 04:37
गवि, तुमची लेखणी सिद्धहस्त आहे याचा अनुभव इथे घेतलाय. आता परत एकता पुस्तक वाचून घेईन. आ.न., -गा.पै.

गवि 04/12/2025 - 05:36
@ राजेंद्र मेहेंदळे @ कंकाका @ डॉ कुमारेक काका @ धर्मराजमुटके @ कर्नल तपस्वी @ प्रा डॉ सर @ आन गा पै प्रत्येकाला खूप खूप धन्यवाद.. स्वतंत्र प्रतिसाद देऊन धागा पुन्हा पुन्हा वर आणणे होऊ नये म्हणून एकत्रच.. _/\_

अकिलिज 05/12/2025 - 21:36
एका सिद्धहस्त लेखकाने आपले पुस्तक प्रकाशित करावे ही खरंतर आमच्यासारख्या वाचनकर्त्यासाठी मोठी गोष्ट आहे. पण त्यांचा नम्रपणा पहा. छोटीसी बात म्हणून सोडून दिली. गवि गवि, किती शिकण्यासारखे आहे तुमच्याकडून. हणमंतअण्णा शंकरांच्या मताशी बाडीस.

दोन्ही पुस्तकांच्या प्रकाशनाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन, गवि. अ‍ॅमेझॉनवरुन दोन्ही विकत घेतली आहेत. पुनर्वाचनाचा आनंद घेतो.

In reply to by गवि

प्रथम मला वाटले की माझा अ‍ॅमेझॉनचा नो-रश रिवॉर्डमुळे मला शुन्य डॉलरला मिळाले आहे. परंतु नो रश रिवॉर्डचे मूल्य पूर्वीइतकेच आहे. दोन्ही पुस्तकं विनामुल्य उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद!!

गवि 05/12/2025 - 23:39
आज आणि उद्या हे पुस्तक पूर्ण मोफत, शून्य किंमतीत घेता येईल असे केले आहे. पुस्तक आवडलं तर इतरांना शिफारस करणे, परीक्षण करणे, रेटिंग देणे वगैरे मार्गांनी पुस्तकाच्या प्रसारात मदत करावी अशी मिपाकरांना विनंती.

In reply to by गवि

कंजूस 06/12/2025 - 05:24
दोन्ही पुस्तकं किंडलवर घेतली, ॲपच्या लायब्रीत आली. वाचून प्रतिसाद लिहितो तिकडे. विमान, बोट किंवा रेल्वेमध्ये कामानिमित्त संबंध आलेले मराठी लोक बरेच असतील परंतू ते आवर्जून मराठीमध्ये तांत्रिक माहिती लिहीत नाहीत. तुम्ही इकडे मिसळपाव साईटवर लिहीत होतात ते मिसळपावचे वाचक वाचत होते. परंतू आता तुम्ही ही पुस्तके किंडलवर आणल्याने जगात सर्व ठिकाणी पोहोचतील. आभार.

कंजूस 06/12/2025 - 15:02
छोटीसी बात वाचले. पहिल्या दोन कथा मानसिक आघात आणि विरहावर आहेत. एरपोर्टचे वातावरण बरोबर पकडले आहे. पण विरह धक्का आहे. दुसऱ्या कथेत दारूच्या नशेत विरहदु:ख विसरू पाहणारा तरूण आहे. तिसरी 'आज' ही कथा चॅटिंग करण्याच्या व्यसनात अडकलेल्या मुलांची आहे. आभासी जग खरे वाटणारी पिढी आहे. चौथी कथा ही कौटुंबिक प्रेम आणि सुखदुःखाची आहे. पाचवी कथा 'तुलपा' ही एक गूढ गोष्टीत रमलेल्या नायकाची आहे. शेवटची बी.पी.ओ. ही याच प्रकारच्या सॉफ्टवेअर सर्विस देणाऱ्या उद्योगातील वातावरण, त्रास मांडते. त्यातील कर्मचाऱ्यांचे स्वभाव , आवडनिवड आणि अपेक्षा उलगडत जातात. एअरपोर्ट असो वा बी.पी.ओ. गविंनी निरीक्षणांचा कथांमध्ये चांगला उपयोग करून घेतला आहे. शिवाय कथा चटपटीत ठेवून कोणताही संदेश न देता करमणूक केली आहे.

In reply to by कंजूस

गवि 07/12/2025 - 11:42
कंकाका, "गोईंग डाऊन" या पुस्तकाला तुम्ही अमेझॉन पेजवर दिलेला सुंदर अभिप्राय वाचून मनापासून आनंद झाला. विमान अपघातांच्या मीमांसेत सर्व क्षेत्रातल्या वाचकांनी रस दाखवावा, समजून घ्यावं, आणि तांत्रिक गोष्टी सोप्या भाषेत पोचाव्या यासाठीच हे पुस्तक लिहीलं.. खूप आभारी आहे !

गवि 07/12/2025 - 11:29
धन्यवाद वाचकहो ! अमेझॉन डॉट इन, संपूर्ण किंडल कलेक्शनमध्ये: गोईंग डाऊन – Travel Writing मध्ये #2 रँक गोईंग डाऊन – Hot New Releases मध्ये #1 स्थान छोटीसी बात – Fiction (Suburban Literature) मध्ये #7 रँक विक्री किंवा मानधन यांच्यावर ही रँक अवलंबून नाही. वाचकांच्या प्रतिसादावर आहे. त्यामुळे वाचकांचे ऋण पुन्हा एकदा मानतो.

पूर्ण वाचले आणि अर्थातच आवडले. लगे रहो!! काही कथा (पॅन अ‍ॅम/के एल एम ची) एअर क्रॅश इन्वेस्टिगेशनमध्ये मालिकेत बघितल्या होत्या ते आठवले. मधेच "सली" या नितांतसुंदर चित्रपटाची आठवणही झाली. अवांतर-टॉम हॅन्क्स तसाही फॉरेस्ट गंप मुळे आवडतोच. त्यावर एकदा लिहायचे आहे. बघुया.

गवि 10/12/2025 - 08:27
तिसरं किंडल बुक आता आलं आहे. यातली शीर्षक कथा मौज प्रकाशनाच्या मौज दिवाळी अंकात प्रकाशित झाली होती. जी आता केवळ या पुस्तकातच वाचायला मिळेल. इतर अनेक कथा मिपावर आधी आलेल्या आहेत. पण तरीही ज्यांना शक्य आहे त्यांनी हेही पुस्तक किंडलवर वाचावं, संग्रही ठेवावं किंवा किंडल अनलिमिटेडवर विनामूल्य वाचावं. माझी एक विनंती आहे.. की ज्यांना शक्य आहे त्यांनी या पुस्तकाला अमेझॉनवर रेटिंग देऊन (तारांकित करून) आणि रिव्ह्यू लिहून या पुस्तकाला जगभर पोचवण्यासाठी मदत करावी. एटीएम गार्ड, येरूडकर तुम्हाला भेटायला आलाय. लिंक: https://amzn.in/d/fln7d4w C अमेझॉन Book overview: हे पुस्तक तसं तर कथा सांगणारं आहे. पण त्याहूनही जास्त.. या पुस्तकात तुमच्या आमच्या गल्लीबोळातलं आयुष्य कागदावर तसंच, न लाजता, न लपता उतरलेलं आहे. हे सर्व वाचताना तुम्ही कधी मुसळधार पावसाचं पाणी भरत चाललेल्या एटीएम रूममध्ये नाईट शिफ्टवर असलेल्या येरुडकरला भेटाल.. तर कधी आईसक्रीमवाल्या "गंदे अंकल"च्या नजरेतून त्या निरागस पोरीच्या मनात शिराल. कधी "चिनू"च्या विंडोज ९८ च्या स्क्रीनवर चमकणारे याहू मेसेंजर, जिओसिटीज आणि देसीबाबा यांच्या आठवणी.. आणि ते किर्र वाजणारं १२८ केबीपीएस मोडेम तुम्हाला स्वतःच्याच त्या दिवसांत ओढून नेतील. कधी एमआरआय मशीनच्या बोगद्यात, धाड धाड वाजणाऱ्या आवाजात, आपल्याच मनातले शब्द ऐकू येतील. व्हिएतनामच्या "बा ना" हिल्समधे धुक्यात हरवलेला तो सोनेरी पूल.. आणि ती फॅमिली.. आणि.. असाच एक केळकर नावाचा पोरगा.. अर्धवट प्रेमात पडलेला.. शिवराळ पण मनातून मनाशी बोलणारा. वाचा आणि बघा काही जुळते का तार..

गवि 18/12/2025 - 12:06
एक डिसेंबर ते पंधरा डिसेंबर या पंधरा दिवसांत एकूण २७३४ किंडल पेजेस वाचन या तीन पुस्तकांचे मिळून झाले. यापैकी छोटीसी बात : १६०० पाने, छोटीसी बात: ८९० पाने आणि येरूडकर: २४१ पाने असे साधारणपणे आकडे आहेत. वाचकांचे सहस्र आभार. गेले दोन दिवस मात्र अचानक वाचने शून्यावर आली आहे. त्यामुळे हिरमोड झाला. प्रत्येक पुस्तक बेस्टसेलर रँकमधे वर होते पण ते काळानुसार अजून काही काळ तरी वाचनात रहावे आणि लाखो पुस्तकांच्या गठ्ठ्यात कायमचे गाडले जाऊ नये यासाठी सर्वांना विनंती अशी, की ज्यांनी हे पुस्तक अद्याप वाचले नसेल त्यांनी अवश्य वाचण्याचा प्रयत्न करावा. काही वाचकांनी कौतुक करणारे रिव्ह्यू आणि रेटिंग दिली आहेत. ज्यांना शक्य आहे त्यांनी हेही करावे. पुन्हा एकदा सर्व वाचक आणि प्रतिसादकर्ते आणि अभिप्राय, तारांकन देणारे यांच्याबद्दल कृतज्ञता..

सोत्रि 03/12/2025 - 14:52
किंडल अनलिमिटेडवर लगेच डाउनलोड करून टाकले. संध्याकाळी हापिसच काम संपल की वाचून संपवणार आज!! छोटीसी बात... - (गवीपंखा) सोकाजी

कंजूस 03/12/2025 - 15:38
गगन विहारी सर, माझ्या नावाला स्मरून पुस्तकाचं सांपल वाचलं. गोष्ट एकदम फ्लाइट फास्ट आहे. नायकाचं सुंदरींवर बारिक लक्ष आहे. असू द्या. तरुणांना आवडतील कथा.

टर्मीनेटर 03/12/2025 - 15:53
मला UPI आणि credit card दोन्ही वरून पेमेंट करताना समस्या येत आहे त्यामूळे डाउनलोड करता येत नाहीये... ;( काय कारण असावे? मी सेव्ह कार्ड ऑप्शन सिलेक्ट करत नाही हे कारण असावे काय?

In reply to by टर्मीनेटर

गवि 03/12/2025 - 16:16
UPI मध्ये तर सरळच प्रक्रिया आहे. त्यात सेव्ह काही करावे लागत नाहीच. किंडल किंवा अमेझॉन मोबाईल ॲपमध्ये मात्र थेट कोणतेही किंडल संबंधित पेमेंट केले किंवा घेतले जात नाही. काहीतरी पॉलिसी आहे. वेब ब्राउझरवर किंडल किंवा अमेझॉन वेबसाईट ओपन करूनच ते करावं लागतं.

In reply to by गवि

टर्मीनेटर 03/12/2025 - 16:24
येस सर... मी तुम्ही दिलेल्या amazon च्या लिंक वरूनच प्रयत्न करत होतो... फक्त ज्या फोन वरून UPI पेमेंट करण्याचा प्रयत्न केला त्यात माझे UPI अकाउंट नाही पण मला ज्यावर ते आहे त्यावर पेमेंट रिक्वेस्ट आली नाही... म्हणून क्रेडिट कार्ड वरून पेमेंट करण्याचा प्रयत्न केला पण ते ही प्रोसेस होत नाहिये... आता थोड्या वेळानी घरी पोचल्यावर वेब ब्राउझर वरून प्रयत्न करतो...

In reply to by गवि

टर्मीनेटर 03/12/2025 - 17:08
"प्रयत्ने वाळूचे कण रगडीता" काय काय गळे... वगैरे म्हणतात ना... त्यावर विश्वास आहे 😀 त्यामुळे प्रयत्न करत रहाणे हे माझे इतिकर्तव्यच आहे हो...

In reply to by गवि

टर्मीनेटर 03/12/2025 - 17:24
माझ्यासारख्या अत्यंत सोज्वळ माणसाचा अतिशय "सात्विक' प्रतिसादही अश्लील वगैरे वाटत असेल तर पुढे काय बोलायचे? भलाई का जमानाच नहीं रहा सेठ 😀

In reply to by टर्मीनेटर

टर्मीनेटर 03/12/2025 - 19:44
वेब ब्राउझर वर पेमेंट झालं हो गवि शेठ... आता वाचतो.... (वाचतो कसला मजा घेतो... तुमचे लेखन वाचणे हा कायमच मजेदार अनुभव असतो 😍)

गविंचे पुस्तक खरेदी करतो. या वीकेंडला वाचून अभिप्राय देखिल कळवतो. - एक गविफॅन (गवि मिसळपाववर नसतील तर माझीही पावले इथे वळणार नाहीत. एवढे गवि आणि मिसळपाव यांचे माझ्या मनात साटेलोटे आहे. कोणत्याही प्रतिसादावरुन गवि एक मायाळू, केअरिंग, समंजस आणि ऐकुन घेणारे पण नेमकं, महत्वाचे, क्वचित तीक्ष्ण, शक्यतो आबदार पुढच्याला न दुखावता, बोलणारे, तरिही ऐसपैस आणि रिलॅक्स्ड व्यक्ती वाटतात. अशी माणसे क्रियेटिव्ह असतील तर मला अशा माणसांचा स्नेह खूप भावतो हवाहवासा वाटतो. त्यांचा जर कुणी पॅट्रोनस प्राणी असेल तर तो हत्ती असे वाटते. (त्याच्या शांत समंजस पवित्र वृत्तीमुळे) ) आणि गवि चा लाँग फॉर्म गगन विहारी आहे हे मला पहिल्यांदा कळले. गविजी, वाचेन, सांगेन. खूप धन्यवाद.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

त्यांचा जर कुणी पॅट्रोनस प्राणी असेल तर तो हत्ती असे वाटते.
चुक. डॉगेश भाई त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.

In reply to by धर्मराजमुटके

पॅट्रोनस हे वृत्ती आणि प्रकृतिवर ठरत असतो त्यांना चॉइस नाही तो आपोआप निवडला जातो. मला तरी ते डॉगेश भाऊ नाही वाटत.

गवि 03/12/2025 - 18:34
ताजा कलम. खालील लेख लिहून एक दिवस व्हायच्या आतच विमान अपघातांच्या कहाण्या ऊर्फ एअर क्रॅशेस, या लेखांचं पुस्तक "गोईंग डाऊन" हेही किंडलवर आलं आहे. अनेक वाचक गेली काही वर्षे या लेखांचं काय झालं असं विचारत होते. आता ते पुन्हा सर्वांना वाचायला किंडलवर प्रकाशित झाले आहेत. लिंक https://amzn.in/d/fmxMFvV B

In reply to by गवि

गविजी हे पुस्तक छापायला कुणीही तयार झाले असते. तुम्ही प्रयत्न केले का तसे? (अजून एक म्हणजे चॅटजीपीटी आणि इतर मंडळी यांचा चित्रांचा सेन्स पूर्ण गंडला आहे, वरील मुखपृष्ट अजून आकर्षक करता आले असते. तुम्ही इथे एक स्पर्धा घ्यायला हवी होती, अभ्याभाऊ, मी, चित्रगुप्त इत्यादींनी हात/ प्रॉम्प्ट आजमावून पाहिला असता)

In reply to by हणमंतअण्णा शंक…

गवि 03/12/2025 - 21:06
धन्यवाद अण्णा..
वरील मुखपृष्ट अजून आकर्षक करता आले असते. तुम्ही इथे एक स्पर्धा घ्यायला हवी होती, अभ्याभाऊ, मी, चित्रगुप्त इत्यादींनी हात/ प्रॉम्प्ट आजमावून पाहिला असता
खरं आहे. आता यापुढील भाग येईलच. तेव्हा इथून आयडियाज घेईन. डन..

गामा पैलवान 04/12/2025 - 04:37
गवि, तुमची लेखणी सिद्धहस्त आहे याचा अनुभव इथे घेतलाय. आता परत एकता पुस्तक वाचून घेईन. आ.न., -गा.पै.

गवि 04/12/2025 - 05:36
@ राजेंद्र मेहेंदळे @ कंकाका @ डॉ कुमारेक काका @ धर्मराजमुटके @ कर्नल तपस्वी @ प्रा डॉ सर @ आन गा पै प्रत्येकाला खूप खूप धन्यवाद.. स्वतंत्र प्रतिसाद देऊन धागा पुन्हा पुन्हा वर आणणे होऊ नये म्हणून एकत्रच.. _/\_

अकिलिज 05/12/2025 - 21:36
एका सिद्धहस्त लेखकाने आपले पुस्तक प्रकाशित करावे ही खरंतर आमच्यासारख्या वाचनकर्त्यासाठी मोठी गोष्ट आहे. पण त्यांचा नम्रपणा पहा. छोटीसी बात म्हणून सोडून दिली. गवि गवि, किती शिकण्यासारखे आहे तुमच्याकडून. हणमंतअण्णा शंकरांच्या मताशी बाडीस.

दोन्ही पुस्तकांच्या प्रकाशनाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन, गवि. अ‍ॅमेझॉनवरुन दोन्ही विकत घेतली आहेत. पुनर्वाचनाचा आनंद घेतो.

In reply to by गवि

प्रथम मला वाटले की माझा अ‍ॅमेझॉनचा नो-रश रिवॉर्डमुळे मला शुन्य डॉलरला मिळाले आहे. परंतु नो रश रिवॉर्डचे मूल्य पूर्वीइतकेच आहे. दोन्ही पुस्तकं विनामुल्य उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद!!

गवि 05/12/2025 - 23:39
आज आणि उद्या हे पुस्तक पूर्ण मोफत, शून्य किंमतीत घेता येईल असे केले आहे. पुस्तक आवडलं तर इतरांना शिफारस करणे, परीक्षण करणे, रेटिंग देणे वगैरे मार्गांनी पुस्तकाच्या प्रसारात मदत करावी अशी मिपाकरांना विनंती.

In reply to by गवि

कंजूस 06/12/2025 - 05:24
दोन्ही पुस्तकं किंडलवर घेतली, ॲपच्या लायब्रीत आली. वाचून प्रतिसाद लिहितो तिकडे. विमान, बोट किंवा रेल्वेमध्ये कामानिमित्त संबंध आलेले मराठी लोक बरेच असतील परंतू ते आवर्जून मराठीमध्ये तांत्रिक माहिती लिहीत नाहीत. तुम्ही इकडे मिसळपाव साईटवर लिहीत होतात ते मिसळपावचे वाचक वाचत होते. परंतू आता तुम्ही ही पुस्तके किंडलवर आणल्याने जगात सर्व ठिकाणी पोहोचतील. आभार.

कंजूस 06/12/2025 - 15:02
छोटीसी बात वाचले. पहिल्या दोन कथा मानसिक आघात आणि विरहावर आहेत. एरपोर्टचे वातावरण बरोबर पकडले आहे. पण विरह धक्का आहे. दुसऱ्या कथेत दारूच्या नशेत विरहदु:ख विसरू पाहणारा तरूण आहे. तिसरी 'आज' ही कथा चॅटिंग करण्याच्या व्यसनात अडकलेल्या मुलांची आहे. आभासी जग खरे वाटणारी पिढी आहे. चौथी कथा ही कौटुंबिक प्रेम आणि सुखदुःखाची आहे. पाचवी कथा 'तुलपा' ही एक गूढ गोष्टीत रमलेल्या नायकाची आहे. शेवटची बी.पी.ओ. ही याच प्रकारच्या सॉफ्टवेअर सर्विस देणाऱ्या उद्योगातील वातावरण, त्रास मांडते. त्यातील कर्मचाऱ्यांचे स्वभाव , आवडनिवड आणि अपेक्षा उलगडत जातात. एअरपोर्ट असो वा बी.पी.ओ. गविंनी निरीक्षणांचा कथांमध्ये चांगला उपयोग करून घेतला आहे. शिवाय कथा चटपटीत ठेवून कोणताही संदेश न देता करमणूक केली आहे.

In reply to by कंजूस

गवि 07/12/2025 - 11:42
कंकाका, "गोईंग डाऊन" या पुस्तकाला तुम्ही अमेझॉन पेजवर दिलेला सुंदर अभिप्राय वाचून मनापासून आनंद झाला. विमान अपघातांच्या मीमांसेत सर्व क्षेत्रातल्या वाचकांनी रस दाखवावा, समजून घ्यावं, आणि तांत्रिक गोष्टी सोप्या भाषेत पोचाव्या यासाठीच हे पुस्तक लिहीलं.. खूप आभारी आहे !

गवि 07/12/2025 - 11:29
धन्यवाद वाचकहो ! अमेझॉन डॉट इन, संपूर्ण किंडल कलेक्शनमध्ये: गोईंग डाऊन – Travel Writing मध्ये #2 रँक गोईंग डाऊन – Hot New Releases मध्ये #1 स्थान छोटीसी बात – Fiction (Suburban Literature) मध्ये #7 रँक विक्री किंवा मानधन यांच्यावर ही रँक अवलंबून नाही. वाचकांच्या प्रतिसादावर आहे. त्यामुळे वाचकांचे ऋण पुन्हा एकदा मानतो.

पूर्ण वाचले आणि अर्थातच आवडले. लगे रहो!! काही कथा (पॅन अ‍ॅम/के एल एम ची) एअर क्रॅश इन्वेस्टिगेशनमध्ये मालिकेत बघितल्या होत्या ते आठवले. मधेच "सली" या नितांतसुंदर चित्रपटाची आठवणही झाली. अवांतर-टॉम हॅन्क्स तसाही फॉरेस्ट गंप मुळे आवडतोच. त्यावर एकदा लिहायचे आहे. बघुया.

गवि 10/12/2025 - 08:27
तिसरं किंडल बुक आता आलं आहे. यातली शीर्षक कथा मौज प्रकाशनाच्या मौज दिवाळी अंकात प्रकाशित झाली होती. जी आता केवळ या पुस्तकातच वाचायला मिळेल. इतर अनेक कथा मिपावर आधी आलेल्या आहेत. पण तरीही ज्यांना शक्य आहे त्यांनी हेही पुस्तक किंडलवर वाचावं, संग्रही ठेवावं किंवा किंडल अनलिमिटेडवर विनामूल्य वाचावं. माझी एक विनंती आहे.. की ज्यांना शक्य आहे त्यांनी या पुस्तकाला अमेझॉनवर रेटिंग देऊन (तारांकित करून) आणि रिव्ह्यू लिहून या पुस्तकाला जगभर पोचवण्यासाठी मदत करावी. एटीएम गार्ड, येरूडकर तुम्हाला भेटायला आलाय. लिंक: https://amzn.in/d/fln7d4w C अमेझॉन Book overview: हे पुस्तक तसं तर कथा सांगणारं आहे. पण त्याहूनही जास्त.. या पुस्तकात तुमच्या आमच्या गल्लीबोळातलं आयुष्य कागदावर तसंच, न लाजता, न लपता उतरलेलं आहे. हे सर्व वाचताना तुम्ही कधी मुसळधार पावसाचं पाणी भरत चाललेल्या एटीएम रूममध्ये नाईट शिफ्टवर असलेल्या येरुडकरला भेटाल.. तर कधी आईसक्रीमवाल्या "गंदे अंकल"च्या नजरेतून त्या निरागस पोरीच्या मनात शिराल. कधी "चिनू"च्या विंडोज ९८ च्या स्क्रीनवर चमकणारे याहू मेसेंजर, जिओसिटीज आणि देसीबाबा यांच्या आठवणी.. आणि ते किर्र वाजणारं १२८ केबीपीएस मोडेम तुम्हाला स्वतःच्याच त्या दिवसांत ओढून नेतील. कधी एमआरआय मशीनच्या बोगद्यात, धाड धाड वाजणाऱ्या आवाजात, आपल्याच मनातले शब्द ऐकू येतील. व्हिएतनामच्या "बा ना" हिल्समधे धुक्यात हरवलेला तो सोनेरी पूल.. आणि ती फॅमिली.. आणि.. असाच एक केळकर नावाचा पोरगा.. अर्धवट प्रेमात पडलेला.. शिवराळ पण मनातून मनाशी बोलणारा. वाचा आणि बघा काही जुळते का तार..

गवि 18/12/2025 - 12:06
एक डिसेंबर ते पंधरा डिसेंबर या पंधरा दिवसांत एकूण २७३४ किंडल पेजेस वाचन या तीन पुस्तकांचे मिळून झाले. यापैकी छोटीसी बात : १६०० पाने, छोटीसी बात: ८९० पाने आणि येरूडकर: २४१ पाने असे साधारणपणे आकडे आहेत. वाचकांचे सहस्र आभार. गेले दोन दिवस मात्र अचानक वाचने शून्यावर आली आहे. त्यामुळे हिरमोड झाला. प्रत्येक पुस्तक बेस्टसेलर रँकमधे वर होते पण ते काळानुसार अजून काही काळ तरी वाचनात रहावे आणि लाखो पुस्तकांच्या गठ्ठ्यात कायमचे गाडले जाऊ नये यासाठी सर्वांना विनंती अशी, की ज्यांनी हे पुस्तक अद्याप वाचले नसेल त्यांनी अवश्य वाचण्याचा प्रयत्न करावा. काही वाचकांनी कौतुक करणारे रिव्ह्यू आणि रेटिंग दिली आहेत. ज्यांना शक्य आहे त्यांनी हेही करावे. पुन्हा एकदा सर्व वाचक आणि प्रतिसादकर्ते आणि अभिप्राय, तारांकन देणारे यांच्याबद्दल कृतज्ञता..
तिसरं किंडल बुक आता आलं आहे. यातली शीर्षक कथा मौज प्रकाशनाच्या मौज दिवाळी अंकात प्रकाशित झाली होती. जी आता केवळ या पुस्तकातच वाचायला मिळेल. इतर अनेक कथा मिपावर आधी आलेल्या आहेत. पण तरीही ज्यांना शक्य आहे त्यांनी हेही पुस्तक किंडलवर वाचावं, संग्रही ठेवावं किंवा किंडल अनलिमिटेडवर विनामूल्य वाचावं. माझी एक विनंती आहे.. की ज्यांना शक्य आहे त्यांनी या पुस्तकाला अमेझॉनवर रेटिंग देऊन (तारांकित करून) आणि रिव्ह्यू लिहून या पुस्तकाला जगभर पोचवण्यासाठी मदत करावी. रिव्ह्यू किंवा मत अगदी दोन चार ओळींत लिहीलंत तरी चालेल.

निसर्ग आणि माणूसपणाच्या कविता- प्रहरांच्या अक्षरनोंदी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·

कंजूस 29/10/2025 - 21:58
चांगला परिचय. >> सर्वात महत्वाचं म्हणजे जवळ जवळ चाळीस पेक्षा अधिक कविता या विविध वृत्तबद्ध रचना आहेत, त्या अधिक वाचनीय झाल्या आहेत. मुक्तछंदातील कविताही तितक्याच सुंदर आहेत. >> - नेमकं.

अभ्या.. 29/10/2025 - 22:08
अरे वा. अभिनंदन दिपाली वहिनी. अनोखी भेट. . मला तर मराठी ठाकूर म्हणाले की मिपा बल्लव गणपा हाच आठवतो ;)

गवि 29/10/2025 - 22:20
उत्तम परिचय. त्यांच्या कविता नेहमीच लयबद्ध आणि गेयता असलेल्या .. नेहमीच आवडतात.

मी-दिपाली 30/10/2025 - 09:26
धन्यवाद प्रा. डॉ. Dilip Birute सर! आपण माझ्या काव्यसंग्रहाची इतकी आवर्जून आणि आस्थेने दखल घेतलीत त्याबद्दल मनापासून आभार! यामधून आपलीही कवितेविषयी, साहित्याविषयी असणारी बांधिलकी, जाणीव आणि जाण दिसून आली. पुस्तक योग्य हाती गेल्याचं समाधान किती महत्त्वाचं आहे, ते या निमित्ताने समजलं. _/\_

परिचय करुन दिलेल्या काव्यसंग्रहाच्या कवींनीही दखल घ्यावी, दाद द्यावी ही गोष्ट लिहित्या-बोलत्या वाचकांसाठी तशी आनंदायी गोष्ट असते. मी-दीपाली आपण दखल घेतली, दाद दिली आभार. खरं तर, कविता वाचत गेलो, थांबत गेलो वाचत गेलो आणि जे उत्स्फूर्तपणे वाटलं ते लिहूनही टाकलं. खरं, तर अजून खूप काही लिहिता येईल अशा त्या प्रहरांच्या अक्षर नोंदी आहेत. धाग्यातही लिहिले होते की अनेक नोंदी सुटल्या. एक वाचक मित्र म्हणाले सर, थेट शांताबाई शेळके, इंदिरा संत यांची आठवण केली असे म्हणालात तर ते अधिक स्पष्ट करता येईल का ? मग आम्ही बोलत बसलो. निसर्ग पाहुन कोणाच्याही मनामधे प्रेम, आपूलकी निर्माण व्हावी. रंग, गंधात रमून जावे हा माणसाचा तसा नैसर्गिक स्वभाव आहे. माणूस घडतो, व्यक्तीमत्वविकास होतो. पाना-फुलांशी बोलायला जवळ जवळ सर्वांना आवडतं. निसर्गाची ओढ माणसाला जन्मजात असते. निसर्गात कोणास प्रियकर दिसतो, कोणास आई दिसते, कोणास मित्र दिसतो, मैत्रीण दिसते आणि आपला संवाद सुरु होतो. अशाच नोंदी प्रहरांच्या अक्षरनोंदीत दिसतात. कविता वाचतांना, इंदिराबाईंची आठवण व्हावी त्याचं कारण आसे की, त्यांचंही बालपण खेड्यात गेलं. बालपणापासून त्यांना निसर्गसहवास लाभला. शाळा आणि महाविद्यालयीन शिक्षण घेता घेताही त्यांचा निसर्ग संवाद सुरुच होता. आणि ते त्यांचं जीवनच बनून गेले. जुन्या काळी ओव्या आणि निसर्ग, गाणी हा जवळ जवळ जुन्या कुटुंबाचा भागच होता. निसर्गाशी संवास सुरु झालं की ते गाणं होतं. त्यांची एक 'कसे हासू' नावाची कविता आहे.
अंगणात जाई जुई हस तसे बिनमोल मन जाई खोलखोल झुळु झुळू येई वारा पाने फुले हालवीत मन पर्री थरारत.
साधा पाना फुलांना जागवणा-या वा-यांनी सुद्धा कवयित्रीचं मन थरारून जातं. साधी सोपी रचना असते आशय मात्र खोलवर जाणारा असतो. 'मन जाई खोल खोल' असा तो संवाद सुरु असतो. अशा अनेक त्यांच्या कविता आहेत. दीपाली ठाकूर यांचाही निसर्गाशी असाच स्नेह आणि संवाद आहे. त्यांची कविता त्याच वळणांची आहे, दीपाली ठाकूर म्हणतात-
वाट पाहती मिटून पाकळ्या जरा कोणत्या दिशेस तो असे रंगसोयरा पान पान आर्त सांगते ऋतूस संहिता साजि-या क्षणात जागल्या दिठी जुन्या व्यथा ( पुन्हा पुन्हा )
'पाकळ्या मिटून असतात, म्हणजे त्या वाट पाहात असतात' हे कोणाला सुचतं ? निसर्गप्रतिमा हे या कवितेंची वैशिष्ट्ये आहेत. असा तो सारखा निसर्ग संबंध काव्यसंग्रहात दिसून येतो. निसर्गाशी एकरुप झालेली ती कविता. अशा त्या गप्पा रंगल्या. निसर्गातील तरलेतेने आलेला अनुभव व्यक्त करण्याची पद्धती, निसर्गातील घटनांची संवेदनशीलता ही केवळ कवयित्रीपुरते मर्यादित राहात नाही. निसर्गकविता कवीची राहात नाही तर, तो निसर्ग अनुभव वाचक, समीक्षक, यांनाही तितकाच उत्कटतेने येतो हे त्यांच्या कवितांचे वैशिष्ट्ये आहे, श्रीमंती आहे. मिपाकर, वाचक, प्रतिसाद देणा-या सर्वांचे मनापासून -दिलीप बिरुटे

कंजूस 29/10/2025 - 21:58
चांगला परिचय. >> सर्वात महत्वाचं म्हणजे जवळ जवळ चाळीस पेक्षा अधिक कविता या विविध वृत्तबद्ध रचना आहेत, त्या अधिक वाचनीय झाल्या आहेत. मुक्तछंदातील कविताही तितक्याच सुंदर आहेत. >> - नेमकं.

अभ्या.. 29/10/2025 - 22:08
अरे वा. अभिनंदन दिपाली वहिनी. अनोखी भेट. . मला तर मराठी ठाकूर म्हणाले की मिपा बल्लव गणपा हाच आठवतो ;)

गवि 29/10/2025 - 22:20
उत्तम परिचय. त्यांच्या कविता नेहमीच लयबद्ध आणि गेयता असलेल्या .. नेहमीच आवडतात.

मी-दिपाली 30/10/2025 - 09:26
धन्यवाद प्रा. डॉ. Dilip Birute सर! आपण माझ्या काव्यसंग्रहाची इतकी आवर्जून आणि आस्थेने दखल घेतलीत त्याबद्दल मनापासून आभार! यामधून आपलीही कवितेविषयी, साहित्याविषयी असणारी बांधिलकी, जाणीव आणि जाण दिसून आली. पुस्तक योग्य हाती गेल्याचं समाधान किती महत्त्वाचं आहे, ते या निमित्ताने समजलं. _/\_

परिचय करुन दिलेल्या काव्यसंग्रहाच्या कवींनीही दखल घ्यावी, दाद द्यावी ही गोष्ट लिहित्या-बोलत्या वाचकांसाठी तशी आनंदायी गोष्ट असते. मी-दीपाली आपण दखल घेतली, दाद दिली आभार. खरं तर, कविता वाचत गेलो, थांबत गेलो वाचत गेलो आणि जे उत्स्फूर्तपणे वाटलं ते लिहूनही टाकलं. खरं, तर अजून खूप काही लिहिता येईल अशा त्या प्रहरांच्या अक्षर नोंदी आहेत. धाग्यातही लिहिले होते की अनेक नोंदी सुटल्या. एक वाचक मित्र म्हणाले सर, थेट शांताबाई शेळके, इंदिरा संत यांची आठवण केली असे म्हणालात तर ते अधिक स्पष्ट करता येईल का ? मग आम्ही बोलत बसलो. निसर्ग पाहुन कोणाच्याही मनामधे प्रेम, आपूलकी निर्माण व्हावी. रंग, गंधात रमून जावे हा माणसाचा तसा नैसर्गिक स्वभाव आहे. माणूस घडतो, व्यक्तीमत्वविकास होतो. पाना-फुलांशी बोलायला जवळ जवळ सर्वांना आवडतं. निसर्गाची ओढ माणसाला जन्मजात असते. निसर्गात कोणास प्रियकर दिसतो, कोणास आई दिसते, कोणास मित्र दिसतो, मैत्रीण दिसते आणि आपला संवाद सुरु होतो. अशाच नोंदी प्रहरांच्या अक्षरनोंदीत दिसतात. कविता वाचतांना, इंदिराबाईंची आठवण व्हावी त्याचं कारण आसे की, त्यांचंही बालपण खेड्यात गेलं. बालपणापासून त्यांना निसर्गसहवास लाभला. शाळा आणि महाविद्यालयीन शिक्षण घेता घेताही त्यांचा निसर्ग संवाद सुरुच होता. आणि ते त्यांचं जीवनच बनून गेले. जुन्या काळी ओव्या आणि निसर्ग, गाणी हा जवळ जवळ जुन्या कुटुंबाचा भागच होता. निसर्गाशी संवास सुरु झालं की ते गाणं होतं. त्यांची एक 'कसे हासू' नावाची कविता आहे.
अंगणात जाई जुई हस तसे बिनमोल मन जाई खोलखोल झुळु झुळू येई वारा पाने फुले हालवीत मन पर्री थरारत.
साधा पाना फुलांना जागवणा-या वा-यांनी सुद्धा कवयित्रीचं मन थरारून जातं. साधी सोपी रचना असते आशय मात्र खोलवर जाणारा असतो. 'मन जाई खोल खोल' असा तो संवाद सुरु असतो. अशा अनेक त्यांच्या कविता आहेत. दीपाली ठाकूर यांचाही निसर्गाशी असाच स्नेह आणि संवाद आहे. त्यांची कविता त्याच वळणांची आहे, दीपाली ठाकूर म्हणतात-
वाट पाहती मिटून पाकळ्या जरा कोणत्या दिशेस तो असे रंगसोयरा पान पान आर्त सांगते ऋतूस संहिता साजि-या क्षणात जागल्या दिठी जुन्या व्यथा ( पुन्हा पुन्हा )
'पाकळ्या मिटून असतात, म्हणजे त्या वाट पाहात असतात' हे कोणाला सुचतं ? निसर्गप्रतिमा हे या कवितेंची वैशिष्ट्ये आहेत. असा तो सारखा निसर्ग संबंध काव्यसंग्रहात दिसून येतो. निसर्गाशी एकरुप झालेली ती कविता. अशा त्या गप्पा रंगल्या. निसर्गातील तरलेतेने आलेला अनुभव व्यक्त करण्याची पद्धती, निसर्गातील घटनांची संवेदनशीलता ही केवळ कवयित्रीपुरते मर्यादित राहात नाही. निसर्गकविता कवीची राहात नाही तर, तो निसर्ग अनुभव वाचक, समीक्षक, यांनाही तितकाच उत्कटतेने येतो हे त्यांच्या कवितांचे वैशिष्ट्ये आहे, श्रीमंती आहे. मिपाकर, वाचक, प्रतिसाद देणा-या सर्वांचे मनापासून -दिलीप बिरुटे

‘प्रहरांच्या अक्षरनोंदी’ या आपल्या मिपाकर मी-दिपाली उर्फ दीपाली ठाकूर यांच्या पहिल्या-वहिल्या कवितासंग्रहाचं नुकतंच प्रकाशन झालं. दीपाली ठाकूर या विज्ञान शाखेच्या प्राध्यापिका आहेत. दीपाली ठाकूर या आंतरजालावर प्रसिद्ध आहेत आणि त्यांच्या नावाची चर्चा झाली ती त्यांच्या 'बहावा' या कवितेमुळे. फेसबुक, इन्स्टाग्राम, मराठी संकेतस्थळे, ब्लॉग यावर त्यांची ही कविता झळकली आणि त्यानंतर त्यांची ही कविता कोणीतरी कॉपीपेस्ट वाल्याने 'इंदिरा संत' यांच्या नावाने पुढे ढकलली.

चालु घडामोडी- ऑक्टोबर/ नोव्हेंबर -२५

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·

विजुभाऊ 13/10/2025 - 11:53
नव्या घडामोडीत राज उद्धवर एकत्र येणार अशा बातम्या येताहेत. पण ते एकत्र येऊन काय होणार आहे हेच कळत नाही. वर्तमानपत्राना बातम्या दाखवता येतील इतकेच. उद्धवनी कितीही जाहीर केले तरी राज मात्र कोणत्याच बातमीवर मत प्रकट नाहियेत. उबाठांच्या पक्षाचे प्रतोद मात्र रोज वेगवेगळ्या विषयावर कुणी न विचारताच मतप्रदर्शन करत आहेत

In reply to by विजुभाऊ

राज-उद्धव एकत्र आले पाहिजेत. महाराष्ट्राने आता इतके बदल पाहिले आहेत की त्याची काही मर्यादा राहिली नाही. तेव्हा, हाही बदल महाराष्ट्राने एकदा पाहुनच घ्यावा. स्व.बाळासाहेबांनी उद्धव ऐवजी राज यांचीच तेव्हा निवड करायला पाहिजे होती असे मला कायम वाटले आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शाम भागवत 14/10/2025 - 14:47
राज-उद्धव एकत्र आले पाहिजेत.
मलाही असेच मनापासून वाटते. तसे झाले तरच ठाकरे ब्रँडमधे धुगधुगी शिल्लक राहील व शिंदेंकडे सैनिकांचा ओघ वाढून शिंदे आणखीन बळकट होणार नाहीत. भाजपाला महाराष्ट्रात स्वबळावर सरकार जोपर्यंत आणता येत नाही व जोपर्यंत शरद पवार राजकारणात आहेत, तोपर्यंत तरी उध्दवजी, राजजी व अजित पवार राजकारणात शिल्लक राहिलेच पाहिजेत. :) शरद पवार असेपर्यंत तरी वरील तिघांना मोदी अभय देणारच. :) आणि शरद पवारांचे सर्व डावपेच ओळखून ते उधळून लावण्याची क्षमता असणारे देवाभाऊ मुमं म्हणून राहणारच. एकदाका शरद पवारांनी राजकारण संन्यास घेतला की देवाभाऊंना त्यांची इच्छा असो वा नसो, दिल्लीच्या राजकारणात जायलाच लागेल.

In reply to by शाम भागवत

एकदाका शरद पवारांनी राजकारण संन्यास घेतला की देवाभाऊंना त्यांची इच्छा असो वा नसो, दिल्लीच्या राजकारणात जायलाच लागेल.
शरद पवार साहेब राजकारणातुन संन्यास घेतील हे दिवास्वप्न (देवास्वप्न :) ) आहे. ठाकरे बंधुंचा इगोच इतका मोठा आहे कि त्यापुढे त्यांना बाकीचे पक्षासंबंधित राज्यासंबंधित असलेले फायदे दिसतच नाहीत. जरी दोन्ही बंधु एकत्र आले तर ते दोन्ही पक्षांसाठी एक मोठे अराजक ठरेल असे वाटते.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभ्या.. 16/10/2025 - 16:54
राज-उद्धव एकत्र आले पाहिजेत.
भारी निरागस काड्या टाकता हां सर. परफेक्ट ठासलेल्या चिलिमी धुमसू लागतात लगेच.

In reply to by सुबोध खरे

मतदारांचा भ्रमनिरास झालयावर आता युती करून काही होईल असे वाटत नाही. . निवडणूक आयिगाने भाजपला मदत न करता प्रामाणिक निवडणूक घेतल्या तर नक्की होईल.

राज आणि उद्धव दोघेही आळसी आहेत. ऐन निवडणुकीतही दोन नाहीतर तीन सभा घेतेत. शक्यतो एकच. त्यामुळे एकत्र आले तरी फारसा काही फरक पडणार नाही.

तेव्हा, लक्षात आलं की, महसुल अधिकारी पंचनामे करीत आहेत पण, नुकसान भरपाई देण्याच्या अटी इतक्या आहेत की, भरपाई नको पण कागदपत्रे आवरा अशी वेळ आहे.
सगळीकडे हीच समस्या आहे. जवळचा एक नातलग अश्या अधिकारी पदावर कार्यरत आहे. त्याच्या म्हणण्यानुसार काम केले अथवा नाही केले तरी संबंधित अधिकार्यावर कारवाई करणे हे नित्याचेच झाले आहे. म्हणजे अश्या अटी पुर्या करताना वरुन प्रेशर येते कि अटी शिथिल करा व कालांतराने त्याच शिथिल केलेल्या अटींमुळे संबंधित अधिकारी अडचणीत येतो.

सौन्दर्य 14/10/2025 - 18:39
अफगाणातील तालिबान सरकारला दिलेले समर्थन तसेच त्यांच्या बरोबरची मैत्री घातक ठरणार आहे. 'शत्रूचा शत्रू तो आपला मित्र' हे ऐकायला कितीही गोड वाटत असले तरी काही बाबतीत त्याला अपवाद हा असतोच.

In reply to by सौन्दर्य

सुबोध खरे 14/10/2025 - 19:12
तो शुद्ध व्यापार आहे. अफगाणिस्तान बेचिराख झाला आहे त्याची पुनर्बांधणी होईल तेंव्हा तेथे आपल्या अनेक कंपन्यांना कंत्राटे मिळू शकतील याशिवाय तेथे असलेला दुर्मिळ खनिजांचा खजिना हा एक फार महत्त्वाचा भाग आहे Afghanistan possesses significant deposits of rare earth minerals like lanthanum, cerium, and neodymium, along with other valuable minerals such as lithium, cobalt, and niobium. These resources are crucial for modern technologies, but their extraction has been hindered by political instability, security issues, and lack of infrastructure. The Helmand province is known to have some of the most important deposits. चीन वरील अवलंबित्व कमी करण्याच्या दृष्टीने हा एक फार मोठा आधार ठरू शकतो. अमेरिका अफगान युद्धात आणि कोव्हीड मध्ये भारताने मोठ्या प्रमाणावर मानवतावादी मदत केली आहे याबद्दल अफघाण लोक कृतज्ञ आहेत. याशिवाय अगोदर रशिया आणि नंतर अमेरिकेशी युद्ध केल्यामुळे अफघाण लोकांचा या दोघांवर अजिबात विश्वास नाही. तेथील खनिज उत्खननासाठी त्यातनं तंत्रज्ञान हवेच आहे जे भारताजवळ आहे शिवाय स्वस्त आहे हेलमंड प्रांतात असलेली हि खनीजे चाबहार या इराणच्या जवळच्या बंदरातून (होर्मूझ च्या समुद्रधुनीच्या पूर्वेकडून) आपल्याला हि खनिजे आणणे फार सोपे आहे अशा स्थितीत चीनने शिरकाव करण्याच्या अगोदर भारत जर आपल्या पूर्वपुण्याईचा उपयोग करून घेत असेल तर त्यात काय चूक आहे? (First-mover advantage) अफगाण लोकांना भारताबददल बरीच आत्मीयता आहे हा एक अजून फायदा. जगाच्या इतिहासात कोणताही देश आपला कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो.

In reply to by सुबोध खरे

स्वधर्म 14/10/2025 - 20:03
>> अशा स्थितीत चीनने शिरकाव करण्याच्या अगोदर भारत जर आपल्या पूर्वपुण्याईचा उपयोग करून घेत असेल तर त्यात काय चूक आहे? (First-mover advantage) अफगाणिस्तान - चीन व्यापार चीनक्डून आयातः ९६२ मिलियन डॉलर्स चीनला निर्यातः ६३.९ मिलियन डॉलर्स अफगाणिस्तान - भारत व्यापार भारताकडून आयातः '--' (बहुधा किरकोळ असावी, त्यामुळे दिलेली नाही भारताला निर्यातः ६६७ मिलियन डॉलर्स याचा अर्थ चीनचा अफगाणिस्तानशी व्यापार आपल्यापेक्षा खूपच जास्त असून अफगाणिस्तान चीनकडून जेवढ्या वस्तू आयात करतो, त्याच्या जवळ्पासही भारताकडून काही घेत नाही परंतु भारताला चीनपेक्षा १० पटीहून अधिक निर्यात करतो. हे खूपच विषम चित्र आहे. त्यामुळे आपल्याला फर्स्ट मूव्ह वगैरे काहीही फायदा नाही. चीनबरोबरचा त्यांचा व्यापार आपल्यापेक्षा १० पट जास्ती आहे. शिवाय ते आपले ग्राहक नसून आपण त्यांचे ग्राहक आहोत. अशा परिस्थितीत त्यांनी आपल्याला खूष ठेवायला हवे. अफगाणिस्तानची एवढी दाढी कुरवाळण्याची काय गरज आहे? समर्थन म्हणजे काहीही केले तरी सरकारचे समर्थन करायचेच, हे अजब आहे.

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे 14/10/2025 - 21:50
Based on recent reports in October 2025, Afghanistan is actively inviting India to invest in and import several minerals, including critical resources like copper, lithium, and rare-earth minerals. While past exports have been limited due to instability, these new developments signal Afghanistan's desire to significantly expand its mineral trade with India.

In reply to by स्वधर्म

सुबोध खरे 14/10/2025 - 22:05
https://youtu.be/HKR9ZzlOGDc?si=SXGJlpaocTjHtPrJ https://www.oneindia.com/international/afghanistan-invites-india-to-invest-in-1-trillion-mineral-sector-agriculture-and-sports-7886989.html https://www.news18.com/world/afghanistan-sees-new-delhi-as-close-friend-invites-indian-firms-for-mining-ops-taliban-fm-muttaqi-ws-kl-9626920.html

In reply to by सुबोध खरे

स्वधर्म 15/10/2025 - 15:00
चीनबरोबरचे अफगाणीस्तानचे व्यापारी संबंध भारतापेक्षा निश्चितच जास्त आहेत असा माझा मुद्दा होता. त्यावर तुंम्ही दिलेल्या दुव्यांमध्ये चीनच्या तुलनेत भारताला फर्स्ट मूव्ह अ‍ॅडव्हान्टेज मिळेल असे काहीही आढळले नाही. बाकी त्यांनाही आपली तितकीच गरज आहे. आपण ग्राहक म्हणून तालिबानला वाकवूच शकतो. त्यांचे ऐकून महिला वार्ताहरांना प्रवेशबंदी करण्याचा मध्ययुगीन मागासपणा करण्याची काही एक गरज नव्हती. त्यांच्या देशात गेल्यावर जर त्यांचे कायदे आपल्याला पाळावे लागत असतील तर आपल्या देशात आल्यावर त्यांना आपले कायदे पाळायलाच पाहिजेत. हे सरकार का सगळ्यांसमोर सरपटतंय काही कळत नाही. खनिजे वगैरे म्हटलं की दुखणं कुठलं आहे त्याचा थोडा अंदाज येतो खरा.

In reply to by स्वधर्म

अभ्या.. 15/10/2025 - 16:10
हे सरकार का सगळ्यांसमोर सरपटतंय काही कळत नाही. खनिजे वगैरे म्हटलं की दुखणं कुठलं आहे त्याचा थोडा अंदाज येतो खरा. त्यातल्या त्यात २००१ साली तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींनी "तालिबान्यांकडून बामियानच्या बुध्दमूर्तीच्या नाशामुळे" मानवतेच्या आवाजासाठी तत्कालीन कित्येक सरकारांना आणि युनायटेड नेशन्स ला आवाहन केलेले होते, मोदी आणि योगीकडून ज्या तालिबानी कृत्याची निर्भत्सना कित्येक वेळी केली गेली आहे त्याच घटनेचे बुध्द मूर्ती विनाशानंतरचे पेन्टींग पार्श्वभूमीवर लावणे ह्यात तालिबानचा कोणता गौरव घेऊन ते भारतात आले आहेत हेच स्पष्ट होते. नॉर्मल भेट ठिकच आहे पण महिला पत्रकारांना प्रवेश नाकारणे आणि मुद्दामून तेच पेंटींग घेऊन येणे (कारण ते भारतात कुणी दिले असेल त्यांना तर अधिक गंभीर आहे) आणि त्याचे प्रदर्शन करणे हेच तालिबानच्या हेतूमधील खोच आणि आपल्या सरकारचे सरपटणे दाखवते. बाकी सौदीचा देवबंदींना पतपुरवठा थांबल्यापासून ते आता सौदीचा पाकिस्तानसोबतचा संयुक्त सुरक्षा करार आणी तालिबानचा भारतासोबतचा करार, पाकिस्तानचे चीनसोबतचे भारतावरच्या अक्रमणातले सहाय्य आणि ज्या रशिया अमेरिकेने अफगाणी दगडांवर डॉके फोडून घेतलेले आहे त्या रशिया अमेरिकेचे भारतासंबधात बदलेलेले संबध हा प्रवास रोचक आहे.

In reply to by स्वधर्म

सुबोध खरे 15/10/2025 - 18:44
त्यांचे ऐकून महिला वार्ताहरांना प्रवेशबंदी करण्याचा मध्ययुगीन मागासपणा करण्याची काही एक गरज नव्हती. त्यांच्या देशात गेल्यावर जर त्यांचे कायदे आपल्याला पाळावे लागत असतील तर आपल्या देशात आल्यावर त्यांना आपले कायदे पाळायलाच पाहिजेत. पूर्वग्रह असला कि मूलभूत गोष्टींचा विसर पडतो त्याचे हे उत्तम उदाहरण आहे. परराष्टीर्य वकिलातीवर त्या देशाचा कायदा चालत नाही हे मूलभूत तत्व आहे. विकिलीक्स वाला ज्युलियन असांजे हा लंडन मध्ये सात वर्षे इक्वेडोर देशाच्या वकिलातीत राहत होता. तेथे ब्रिटनचा कायदा चालत नाही. तेंव्हा अफगाणिस्तानच्या वकिलातीत पत्रकार परिषद घेताना आपला कायदा तेथे चालत नाही हे आपण लक्षात घ्या. मुळात हि पत्रकार परिषद अफगाण वकिलातीने घेतली होती आणि त्यात आपल्या परराष्ट्र खात्याचा सहभाग नव्हता. त्याचे राजकारण काँग्रेसच्या राजकारण्यांनी केले यात नवल नाही. कारण इथे मिपा वर सुद्धा मूलभूत माहिती न घेता तोंड सोडणारे लोक कमी नाहीत मग सामान्य लोकांची काय कथा? सरकारबद्दल कमालीचा द्वेष असला तरी परराष्ट्र धोरण, लष्कराबाबत किंवा इसरो अणुऊर्जा इत्यादीसाठी घेतलेली दूरगामी धोरणे एका रात्रीत बदलत नाहीत. काँग्रेसचे सरकार असते तरी येथे तालिबान बरोबर संबंध प्रस्थापित करण्याच्या दृष्टीनेच प्रयत्न केले गेले असते याबद्दल मला शंका नाही. जर १९७१ मध्ये युद्ध लष्कराने लढले असले तरी त्याचे श्रेय श्रीमती इंदिरा गांधी यांना च दिले जाते तद्वत आज ऑपरेशन सिंदूर चे श्रेय श्री मोदी यांनाच मिळणार आहे मग आपण कितीही आदळ आपट किंवा चिडचिड करा.

In reply to by सुबोध खरे

अभ्या.. 16/10/2025 - 12:40
परराष्टीर्य वकिलातीवर त्या देशाचा कायदा चालत नाही हे मूलभूत तत्व आहे. तेंव्हा अफगाणिस्तानच्या वकिलातीत पत्रकार परिषद घेताना आपला कायदा तेथे चालत नाही हे आपण लक्षात घ्या. मुळात हि पत्रकार परिषद अफगाण वकिलातीने घेतली होती आणि त्यात आपल्या परराष्ट्र खात्याचा सहभाग नव्हता.
. काहीही काय फेकताय? मूळ अधिकृत वकिलात असली तर तेथे ती इम्म्युनिटी आणि स्वातंत्र्य. भारताने २०२१ लाच अफगाणिस्तानातली वकालत बंद केली आणि सगळे डिप्लोमॅट्स, विद्यार्थी, जमेल तेवढे नागरिक परत आणले. परत ह्या महिन्यात ती चालू केलेली आहे पण अद्याप तालिबान सरकारला अधिकृतता दिलेली नाहीये. अफगाणिस्तानची भारतातली एम्बसी २०१५ ला उद्घाटन झाले. जमीन १९५६ ला घेतलेली होती. ऑगस्ट २०२१: तालिबान पुन्हा सत्तेत आल्यानंतर, नवी दिल्लीतील अफगाण दूतावास हा बहिष्कृत प्रजासत्ताक सरकारमधील राजदूतांच्या नियंत्रणाखाली कार्यरत राहिला. बहुतेक आंतरराष्ट्रीय समुदायाप्रमाणे भारतानेही तालिबान प्रशासनाला मान्यता दिली नाही. नोव्हेंबर २०२३: नवी दिल्लीतील दूतावास कायमचा बंद झाला. माजी सरकारच्या राजदूतांनी भारत सरकारकडून पाठिंबा नसणे आणि तालिबानचा दबाव हे बंद करण्याचे कारण असल्याचे सांगितले. २०२४-२०२५: तालिबान नियंत्रण आणि पुन्हा सुरू होण्याची शक्यता शोधत आहे २०२४: तालिबान प्रशासनाने मुंबईतील अफगाण दूतावासात एक वाणिज्य दूत नियुक्त केला, ज्यामुळे भारतात त्यांची वाढती राजदूतीय उपस्थिती दिसून आली. मुंबई आणि हैदराबादमधील अफगाणिस्तानचे वाणिज्य दूतावास मर्यादित सेवांसह कार्यरत राहिले. ऑक्टोबर २०२५: तालिबानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी आणि भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यातील ऐतिहासिक बैठकीनंतर, दोन्ही देशांनी पूर्ण राजदूतीय दूतावास पुन्हा सुरू करण्यास सहमती दर्शविली. दूतावास पुन्हा सुरू करण्यासाठी तालिबान राजदूत आता नवी दिल्लीत येण्याची अपेक्षा आहे . मग कुठली आलीय इम्म्युनिटी? . सध्या रशिया हे एकमेव राष्ट्र आहे कि ज्यानी तालिबान सरकारला अधिकृतता बहाल केली आहे. बाकी सर्वानी कंडीशनल अ‍ॅक्सेस आणि काही बोलणी चालू आहेत. . म्हणजे ही कुठली पध्दत की घराचे अ‍ॅग्रीमेंट करायला घरात बोलवायचे आणि अद्याप काही व्यवहार न होता त्याला मालकी बहाल करुन चाव्या सोपवायच्या, नवीन मालकांने पण स्वतःच्या नेमप्लेटसहीत, पेंटींग्स लावून घर सजवायचे तेही मालकाचा अपमान करुन आणी जुन्या मालकाच्या पाळीव लोकांनी त्याचा घरमालक म्ह्णणून अधिकारच आहे असा उदोउदो करायचा. सरपटणे ह्यालाच म्हणतात. जळजळीला ओवा चालतो, पाठीचा कणाच मोडला की सरपटावेच लागते.

In reply to by अभ्या..

स्वधर्म 16/10/2025 - 17:08
अभ्या, तुंम्ही लिहिलेले मुद्दे १००% टक्के बरोबर आहेत. त्यामुळे या प्रकारच्या वागणुकीस सरपटणे असेच म्हणावे लागेल. पहिले असे की, भारताने अजून इस्लामिक इमिरेट ऑफ अफगाणिस्तान या तालिबान नियंत्रित सरकारला अधिकृत मान्यताच दिलेली नाही. भारताने अजूनही वकालतीची मालकी इस्लामिक रिपब्लीक ऑफ तालिबान या पूर्वीच्या सरकारकडून तालिबान सरकारकडे वर्ग केलेलीच नाही. Taliban representatives claim full control over the embassy, although India has not officially transferred authority to Taliban-appointed diplomats. दुसरे असे की पंतप्रधान भारतात कधीही खुली पत्रकार परिषद घेत नाहीत, पण अमेरिकेत गेल्यावर त्यांना तिथले नियम पाळावेच लागलेले आहेत. त्यामुळे टेलिप्रॉम्प्टर वापरून का असेना, तिथल्या नॉन-गोदी मिडीया समोर त्यांना खुल्या पत्रकार परिषदेत प्रश्नांना उत्तरे द्यावीच लागतात. (त्यात काय होते हा मुद्दा वेगळा). त्यामुळे भारतात आल्यावर तालिबानींना इथले नियम पाळले पाहिजेत. तिसरे असे की, अफगाणिस्तान पेक्षा भारत हा जवळजवळ सर्व दृष्टीने विकसित, बलवान व मोठा आहे. तरीही आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर का कच खावी?

In reply to by अभ्या..

सुबोध खरे 16/10/2025 - 18:21
सरपटणे ह्यालाच म्हणतात. मुळात हि पत्रकार परिषद अफगाण वकिलातीने घेतली होती आणि त्यात आपल्या परराष्ट्र खात्याचा सहभाग नव्हता. हे वाचलंच नाहीये म्हणून अशी जळजळ होते आहे. चालू द्या.

In reply to by सुबोध खरे

अभ्या.. 16/10/2025 - 19:22
मुळात हि पत्रकार परिषद अफगाण वकिलातीने घेतली होती आणि त्यात आपल्या परराष्ट्र खात्याचा सहभाग नव्हता.
लोकांची जळजळ तपासण्यातली तुमची तळमळ समजू शकतो पण हे बघा. टाइम म्हणतेय : संयुक्त राष्ट्रांच्या निर्बंध यादीत असलेले मुत्ताकी यांना गेल्या गुरुवारी आठवडाभराच्या भारत भेटीसाठी प्रवास सूट मिळवावी लागली. भारताने त्यांना अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री म्हणून संबोधले, त्यांना दिल्लीतील अफगाण दूतावासाच्या परिसरात पत्रकार परिषदा घेण्याची परवानगी दिली, जिथे अजूनही मागील पाश्चात्य समर्थित अफगाण सरकारचे अधिकारी काम करतात आणि त्यांचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना त्यांच्यासोबत व्यासपीठावर बसवले. . बोलावले कुणी? भारत सरकारने.. त्यांना अफगाणचे परराष्ट्र मंत्री म्हणून भारतात दर्जा कुणी दिला? भारत सरकारने.. अफगाण दूतावासाच्या परिसरात पत्रकार परिषदा घेण्याची परवानगी कुणी दिली? भारत सरकारने.. दूतावासात अजूनही जुन्या अफगाणी सरकारच्या लोकांना कुणी ठेवलेय? भारत सरकारने.. दूतावास चालू करण्याची बोलणी अद्याप चालू असताना दूतावास वापरण्याची परवानगी कुणी दिली? तालिबान आणि भारत सरकारने.. मुंबईतले अफगाणी कॉन्सुलेट तालिबान चालवते आणि हैदराबादमधले कॉन्सुलेट जुने अफगाण रिपब्लिक असा कॉन्फ्लिक्ट असतानाही तो क्लीअर करणे सोडून करार मदार, चर्चा घडवून आणल्या कुणी? भारत सरकारने.. प्रेस कॉन्फरन्स मध्ये अफगाणिस्तानचा झेंडा न लावता तालिबानचा झेंडा लावून कॉन्फरन्स घ्यायची परवानगी कुणी दिली? तालिबान भारत सरकारने.. . तालिबानने भारताचा उपयोग करुन लेजिटमसी मिळवायचा प्रयत्न केलेला आहे हे स्पष्ट दिसत असताना एका प्रेस कॉन्फरन्स मधल्या चुकीसाठी परराष्ट्र खात्याला पर्यायाने मोदी सरकारला क्लीन चीट देण्यासाठी इतक्या कोलांट्या उड्या मारणे म्हणजे खरी भक्ती. धन्य हो...........

In reply to by सुबोध खरे

आग्या१९९० 16/10/2025 - 20:45
भारतातील पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना न बोलावणे ही एक तांत्रिक बाब होती असे तालिबानी मंत्र्यांनी खुलासा केला. त्यात त्यांनी दूतावासाचा उल्लेख केला नाही ह्यात सर्व काही आले. इकडे काहीजण उगाचच समर्थन करत आहेत. त्या पत्रकार परिषदेवर पुरुष पत्रकार निषेध म्हणून बहिष्कार घालू शकत होते किंवा तालिबानी मंत्र्यांना जाब विचारू शकले असते. परंतु पुरुष पत्रकार " सर तनसे जुदाला " घाबरले असावेत.

In reply to by सुबोध खरे

स्वधर्म 16/10/2025 - 17:28
तुंम्ही चीनच्या तुलनेत आपल्याला फर्स्ट मूव्ह अ‍ॅडव्हांटेज मिळेल हा मुद्दा मांडला होता. त्यावर मी तसे का नाही हे सांगणारे उत्तर दिले होते. आता आपण तो मुद्दा सोडून फक्त महिलांच्या पत्रकारपरिषदेतील प्रवेश बंदीचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे फर्स्ट मूव्हचा मुद्दा बरोबर नव्हता हे मान्य केले असे समजायला हरकत नाही. बाकी रेअर अर्थ खनिजांबाबत जे व्यापार युध्द सुरू आहे त्यात हा एक व्हिडिओ पाहिला. Trade war explained: The rare earth metals China dominates and US needsया क्षेत्रात उत्पादक म्हणून भारताचे नांव आहे पण अफगाणिस्तानचे नांवही नाही. त्यामुळे तालीबानचे लाड करण्यामागे तुंम्ही म्हणता तसा शुध्द व्यापार आहे या तुमच्या (एन डी टी व्ही च्या?) मतावर विश्वास ठेवणे कठीण आहे. काही उद्योगपतींना मिळू शकणारी तिथली कंत्राटे हा मुद्दा आणि तालीबान्यांची सरबराई यात काही संबंध आहे का?

In reply to by स्वधर्म

शाम भागवत 16/10/2025 - 18:16
आपली संरक्षण सिध्दता तेल विहीरी उत्खननातून स्वयंपूर्णता, देशी विमानांचे इंजिन या गोष्टी पूर्ण होईपर्यंत म्हणजे अंदाजे २०२९ पर्यंत तालाबानशी मर्यादित चुंबाचुंबी करायला काहीच हरकत नाही. मला वाटते आपल्या अस्तनीतले निखारे शोधण्यासाठी तालीबानचा उपयोग आपण करून घेतला पाहिजे. :)

In reply to by स्वधर्म

सुबोध खरे 16/10/2025 - 18:29
भारताकडून आयातः '--' (बहुधा किरकोळ असावी, त्यामुळे दिलेली नाही India Exports to Afghanistan was US$333.52 Million during 2024 Based on recent reports in October 2025, Afghanistan is actively inviting India to invest in and import several minerals, including critical resources like copper, lithium, and rare-earth minerals. हे हि वाचलं नाही Beijing could be skeptical of partnering on ventures with the Taliban given ongoing instability, however, and may focus on other regions. Khan pointed out that China has been burned before, having previously tried to invest in a copper project that later stalled. https://edition.cnn.com/2021/08/18/business/afghanistan-lithium-rare-earths-mining हे हि वाचलं नाही बाकी आपल्या परराष्ट्र, संरक्षण आणि उद्योग खात्यातील तज्ज्ञ लोकांपेक्षा मिपा वर जास्त हुशार आणि सर्व ज्ञानी लोक आहेत हे पाहून डोळे पाणावले

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे 16/10/2025 - 18:48
चीन अफगाणिस्तानात गुंतवणूक करण्यास उत्सुक नसण्याची करणे याला कृत्रिम बुद्धिमत्तेने दिलेले उत्तर Despite initial expectations, China has not made large-scale investments in Afghanistan due to major obstacles, especially ongoing security risks, contractual disputes, and the country's severe instability. Beijing is prioritizing security along its border and seeking to protect existing investments, adopting a cautious "wait-and-see" approach. Security concerns are the primary reason for China's reluctance to invest, as Afghanistan remains a volatile environment for foreign operations and personnel. Persistent terrorism: The presence and activity of militant groups, particularly Islamic State–Khorasan Province (ISKP), pose a significant threat. ISKP has demonstrated its capability and intent by directly targeting Chinese interests, including an attack on a Kabul guest house in 2022. Xinjiang security: China's main security interest is preventing the East Turkestan Islamic Movement (ETIM), a Uyghur militant group, from using Afghanistan as a base to foment separatist activities in its neighboring Xinjiang province. While the Taliban has made some efforts to relocate these militants, China remains concerned. Regional instability: Attacks on Chinese personnel and projects in neighboring Pakistan, often conducted by groups with ties to Afghanistan like the Tehreek-i-Taliban Pakistan (TTP), have heightened China's fears about regional instability. Beyond security, foreign investment is heavily deterred by Afghanistan's weak economic and political environment. Contractual disputes: Chinese companies have faced major setbacks on projects. In June 2025, the Taliban terminated a $540 million oil deal with a Chinese firm, accusing it of failing to deliver on promised investments and infrastructure projects. Dysfunctional governance: With the Taliban's limited managerial and administrative experience, investors face a lack of reliable regulations and clear legal frameworks. The collapse of a major oil deal suggests that the Taliban is not always a reliable business partner. Lack of infrastructure: Poor infrastructure, inadequate energy supply, and an undeveloped legal and banking system further complicate large-scale investment.

In reply to by सुबोध खरे

सौन्दर्य 16/10/2025 - 00:41
खरे साहेब, राजकारणातही कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नसतो असे म्हंटले जाते. तरी देखील तालिबानचे कायदे, त्यांची इतर वर्तणूक पाहता अशा लोकांशी मैत्री ही आज ना उद्या अंगाशी येणारच. स्व:ताच्या देशाचा फायदा, इतर देशांना लांब ठेवणे, खनिजे वगैरे कितीही आकर्षक वाटले तरी देखील ही एक अभद्र युती ठरेल व पुढेमागे आपल्या देशासाठी घातक ठरेल.

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे 14/10/2025 - 21:52
Beijing could be skeptical of partnering on ventures with the Taliban given ongoing instability, however, and may focus on other regions. Khan pointed out that China has been burned before, having previously tried to invest in a copper project that later stalled. “I believe they will prioritize other emerging/frontier geographies well before Taliban-led Afghanistan,” said RK Equity partner Howard Klein, who advises investors on lithium.

In reply to by सुबोध खरे

चौथा कोनाडा 14/10/2025 - 22:48
महत्वाची आणि रोचक माहिती.... तालीबानने जुन्या अफगाणीस्थानची धोरणे अवलंबली तर १९८० च्या वेळेचे मैत्रीपर्व पुनर्जिवित होऊ शकते !

तळीबान बरोबर आपण चर्चा चालू केली ती योग्यच आहे. हे आगोदरच करायला पाहिजे होत. त्यांना इतर मदतीबरोबरच सरक्षण साहित्याची मदत पण करायला पाहिजे.

In reply to by रात्रीचे चांदणे

अफगाणिस्तान आणि तत्कालीन ब्रिटिश भारतामधील ब्रिटिशांनी आखलेली ड्युरंड लाईन पठाणांना अजिबात मान्य नाही. त्या सीमारेषेच्या दोन्ही बाजूंना जर पठाण राहात असतील तर ती कृत्रिम सीमारेषा नको असेच पठाणांना वाटते- म्हणजेच खैबर पख्तुनवा प्रांत आपलाच असे अफगाणिस्तानातील पठाणांना वाटते. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये मतभेदांचे हे कारण पूर्वीपासून होते. अफगाणिस्तान आपल्या नियंत्रणात ठेवता येईल म्हणून पाकिस्तानने तालिबानची निर्मिती केली पण त्याचवेळेस अफगाणिस्तानातील पठाणांनाही खैबर पख्तुनवा हवा आहे हे ते विसरले बहुतेक. अमेरिकेकडून पैसे खायला मिळतील म्हणून ९/११ नंतर मुशर्रफने अमेरिकेला मदत केली आणि त्यातून तालिबानवर हल्ले करायला पाकिस्तान हा बेस मिळाला तेव्हापासूनच तालिबानचे पाकिस्तानशी संबंध बिघडायला सुरवात झाली. एकीकडे अमेरिकेकडून पैसे खायचे आणि दुसरीकडे ओसामाला लपवून ठेवायचे हा पण डबल गेम पाकिस्तानने खेळला. काहीही असले तरी अफगाणिस्तानातील तालिबानची सत्ता उखडली गेली आणि त्याला पाकिस्तानने मदत केली हे पठाण विसरू शकले नसावेत. त्यात तात्यांना काबूलचा बगराम हवाईतळ हवा आहे. त्यांना खूष करायला म्हणून मुनीरने थेट काबूलवर हवाई हल्ले केले. ही गोष्ट तालिबान कसे सहन करतील? ही आपल्याला उत्तम संधी आहे. त्याचा फायदा आपण उठवायला पाहिजे. तालिबान म्हणत असतील की काश्मीरवर भारताचा हक्क आहे तर आपण पण खैबर पख्तुनवावर अफगाणिस्तानचा अधिकार मान्य करावा. आयजीच्या जीवावर बायजी उदार होऊन पेशावर आणि तो प्रदेश अफगाणिस्तानचा आहे हे आम्हाला मान्य आहे असे म्हटले (म्हणजे उघडपणे म्हटले नाही तरी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात भांडणे लावून द्यायला काही केले) तर आपल्या बापाचे काय जाणार आहे? पाकिस्तानात पठाण लोक नुसते खैबर पख्तुनवामध्येच आहेत असे नाही तर इतर भागाताही पसरले आहेत. ते पठाण आणि पंजाबी वर्चस्व असलेली पाकिस्तानी व्यवस्था यांच्यात भांडणे लागून दोघे एकमेकांना मारत असतील तर ते आपल्यासाठी चांगलेच आहे ना? काहीही असले तरी तालिबान हा आपला दीर्घकालीन मित्र वगैरे होणे अशक्य आहे. पाकड्यांना ठोकायला म्हणून ही तात्पुरती व्यवस्था आहे. त्याच पठाणांच्या टोळधाडींनी भारतात शेकडो वर्षे नंगानाच चालवला होता हे आपण विसरू शकणार नाही/विसरू नये. एकदम आयडिअल परिस्थिती होईल की एकमेकांना मारताना पाकिस्तान आणि तालिबान दोघेही संपून गेले तर. तसे होणे जरा कठीणच आहे. पण पठाण आणि पंजाबी एकमेकांशी अनिश्चित काळ भांडत राहिले तर ते आपल्यासाठी चांगले होईल. पठाणांनी वर्षानुवर्षे संघर्ष यापूर्वी अनेकदा चालू ठेवला आहे- ब्रिटिश, रशियन आणि अमेरिकनांविरोधात. तसाच पाकड्यांविरोधात पण चालू ठेऊ देत. कदाचित पुढील काही वर्षात पाकिस्तानचे तुकडे पडतील. काहीही झाले तरी त्या पठाणी टोळधाडींच्या मध्ये कमकुवत का होईना कोणतातरी प्रदेश त्या पाकिस्तानच्या तुकड्याच्या निमित्ताने हवा.

Afaganistan is connected to POK & it is likely that India is aiming to make use of older silk route to reach Europe. This is way more cheaper than existing Suez Cancal Route and beneficial for Afganistan as well. Hence Indian Army mentioning that Pakistan will have its Geography changeद & Taliban mentioning 'POK is integral part of India' may not be a coincidence.

विजुभाऊ 15/10/2025 - 12:04
अफगाणीस्तानशी मैत्री ही शत्रु चा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने आहे. दुसरे हे की अफगाणिस्थानमधे इन्फ्रास्ट्रक्चर उभे करण्यासाठी भारतीय कम्पन्याना व्यवसाय मिळू शकतो. पाकिस्थानला जर शह द्यायचा असेल / चाप लावायचा असेल तर भारताला इराण आणि अफगाणीस्थान सोबत मैत्रीसंबन्ध ठेवणे गरजेचे आहे

कंजूस 15/10/2025 - 19:53
तालिबान आणि भारत चर्चा ....... भेटीमागचं कारण काय असेल? १.पत्रकार परिषदेत दोन तीन महिलाही होत्या हे चानेलवाले दाखवत होते. महिलांबाबत उदार धोरण अवलंबत आहोत हे दाखवायचे आहे का? २. अफगाण सरकारची अमेरिकेतील संपत्ती गोठवली गेली आहे ती सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतील का? ३. भारतीय गुंतवणुकदारांची बरीच गुंतवणूक बुडीत झाली आहे त्याबद्दल प्रयत्न? काय सांगता येईल?

In reply to by कपिलमुनी

सुबोध खरे 16/10/2025 - 10:49
इतका द्वेष आणि इतकी जळजळ? कोण सनातनी आज अशा राजकारणात आहेत जे असे स्त्रियांना पायाचे बोट जरी दिसले तरी सार्वजनिक रित्या फटके मारण्याचे समर्थन करत आहेत? केवळ रा स्व संघाचा द्वेष म्हणून हिंदुत्ववाद्यांना सनातनी म्हणून त्यांची तालिबानशी तुलना करायची आज शरिया लागू करा म्हणणारे मुस्लिम नेते निदान ५० % असतील. जरा काही झाले कि इस्लाम खतरे मे है म्हणणारे नेते सहज दिसतात त्यांच्याबद्दल बोलायची तुमच्यात हिम्मत नाही. कारण सर तन से जुदा होण्याची भीती. भेकडपणा आणि दांभिकपणा हि फुरोगामिनची खासियतच आहे इस देश के कितने भी तुकडे हो जाये हम किसी को अपने मझहब से खिलवाड करने नही देंगे म्हणणारा समाजवादी पार्टीचा अबू आझमी तुम्हालाइंडी गठबंधनात चालतो? किंवा १५ मिनिटे पोलीस दूर करा मग आम्ही काय करतो ते दाखवून देऊ म्हणणारा असदुद्दीन ओवेसी तुम्हाला जवळचा वाटतो. किती हे अध:पतन

In reply to by सुबोध खरे

समाजवादी पार्टीचा अबू आझमी तुम्हालाइंडी गठबंधनात चालतो? किंवा १५ मिनिटे पोलीस दूर करा मग आम्ही काय करतो ते दाखवून देऊ म्हणणारा असदुद्दीन ओवेसी तुम्हाला जवळचा वाटतो. उठ सूठ कुणाच्याही मागे इडी लावून त्रास देणाऱ्या भाजपने ह्या दोघांच्या मागे कधी इडी लावली आहे का? काय कारण असावे? सारखीच विचारसरणी आहे म्हणून? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणी तालिबान ह्यांच्या विचारसरणीत काहीही फरक नाही. संघाने कधीही मनुस्मृतीला विरोध केलेला नाही. संघाचा मनुस्मृतीला छुपा पाठिंबा आहे, मनुस्मृतीत स्त्रियांबद्दल काय लिहिले आहे माहीत करा! तालिबानी नी संघ/भाजप ह्यांची विचारसरणी एकसारखी आहे, नाहीतर महिलांचे शोषण करनारे कुलदीप सेंगर, ब्रिजभूषण सिंह ह्यांचे समर्थन सोशल मीडियावर अंधभक्ताना समर्थन करावे लागले नसते तसेच मोदी सरकारनेही त्याना वाचवायचे आटोकाट प्रयत्न केले नसते! तेव्हा भाजप/ संघ हा महिलाविरोधी नाही, मध्ययुगीन मानसिकता भाजपेयींचो नाही ह्याचे खोटे समर्थन बंद करा!

In reply to by सुबोध खरे

सुक्या 16/10/2025 - 11:21
जौ द्या हो. ह्यामुळेच आजकाल धाग्यावर कुणी फिरकत नाही. ह्यांची एकच टेप लागलेली असते. वरुन २/३ होयबा आहेत तळी उचलायला ..

In reply to by सुबोध खरे

शाम भागवत 16/10/2025 - 12:40
संघाला विरोध करण्याची (अपयशी) पध्दत १०० वर्षानंतरही चालू ठेवण्याचा ठाम निर्धार खरोखरच कौतुकास्पद आहे. ही केविलवाणी धडपड आहे असे कोणी म्हणेल. पण मी त्याला दुर्दम्य आशावाद समजतो. :)))

In reply to by शाम भागवत

मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार असे म्हणत एका तथाकथित पक्षाचे तीन पिढ्या दुकान चालले. तसेच आहे हे. संघाला विरोध करत करत अनेकांची चार पिढ्यांच्या पोटापाण्याची सोय झाली आहे- आणि कदाचित आणखी पिढ्यांच्या पोटापाण्याचीही सोय होईल.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

त्यांच्या प्रयत्नांमुळेच मुंबई महाराष्ट्रापासून तुटली नसेल! चिंता करू नका! त्यांच्या पुढच्या पिढ्याही नाही तुटू देणार! पहिलीपासून हिंदी लाडा किंवा मराठी संपवायचा कितीही प्रयत्न केला तरीही!

In reply to by सुबोध खरे

कपिलमुनी 16/10/2025 - 21:34
याची यादी करू का ? किती पवित्र करून घेतलेत ? उगा सोवळेपणाचा आव आणायचं.. मी नाय त्यातली न कडी लावा आतली

In reply to by कपिलमुनी

विवेकपटाईत 18/10/2025 - 15:42
तोपर्यंत भाजप सत्तेत आहे तोपर्यंत स्त्रियांना स्वातंत्र्य आहे. सर्वात स्वतंत्र विचारांची मुख्यमंत्र्याची पत्नी महाराष्ट्राच्या मामी आहे. केरळमध्ये अनेक भागात मुलींना शाळेत पडद्याच्या मागे बसावे लागते. मुस्लिम स्त्रियांवर अत्याचाराचे समर्थन करणाऱ्या कायद्याला सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांनी समर्थन दिले होते हा इतिहास आहे. बाकी भाजप गेल्यावर अनेक राज्यातील अनेक जिल्ह्यात शरिया कायदा निश्चित लागू होणार.

In reply to by कंजूस

गांधीनगरच्या अक्षरधाम मंदिरात सर्व पत्ता गुजराती नी इंग्रजीतच आहेत, हिंदीला त्यांनी लाथाडले आहे. काय कारण असेल?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

रामचंद्र 16/10/2025 - 22:08
तिथे महाराष्ट्रातल्यासारखे कोणी हिंदी (राष्ट्रभाषा!) समर्थक दिसत नाहीत, फडणवीसांसारखे? खरं तर या बाबतीत देशभर एकच धोरण हवं.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे (आरएसएस) रस्त्यांवर संचलन तसेच शिक्षणसंस्थांसह सार्वजनिक व सरकारी ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यावर नियंत्रण आणण्यासाठी नियम लागू करण्याचा निर्णय काँग्रेसशासित कर्नाटक सरकारने गुरुवारी घेतला. अशाप्रकारे संघाच्या कार्यक्रमांवर नियंत्रण आणणारे कर्नाटक हे पहिले राज्य ठरणार आहे.
कर्नाटक सरकारच्या या निर्णयाची चर्चा व्हायला पाहिजे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कॉमी 17/10/2025 - 14:05
जोवर लोकांचा समूह इतरांना हानी किंवा उपद्रव न पोहोचवता एकत्र येऊन काहीही करत असेल तर त्यावर बंदी घाणे चुकीचे वाटले.

In reply to by कॉमी

जोवर लोकांचा समूह इतरांना हानी किंवा उपद्रव न पोहोचवता
शांतते पत्रयात्रा, संचलन, सकाळच्या वेळी मोकळ्या मैदानात व्यायामाचे धडे असे असेल तर बंदी कोणी घालणार नाही, असे वाटते. संघ दक्ष-आरम, वाले इतके सरळ असतील आणि आहेत असे वाटते का ? तसे ते नाहीत. संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते पूर्वी घरोघरी जाऊन तरुणांना भेटून सकाळी मैदानावर व्यायामासाठी एकत्र करायचे, मग बौद्धिकं वगैरेचं हळुहळु निमंत्रण द्यायचे. संघटन आणि धर्माभिमान उभा करता करता कट्टरवादी विचारांच्या गोळ्या देऊन त्याची बुद्धी भ्रष्ट करुन आपल्या गोटात कायम राहील इतकी ती तजवीज असायची. आता माध्यमांमु़ळे लोक घरीच व्यायाम करतात. मैदानावरही आपलं स्वतंत्र फिरणे आणि व्यायाम करतांना अनेक तरुण दिसतात. आता तरूणांना गोळा करुन सकाळी मैदानावर आनण्याचा स्कोप दिसेना, तेव्हा आता तरुणांना आकर्षित करण्यासाठी शाळा महाविद्यालयाबाहेर यांनी आपली दुकाने थाटायला सुरुवात केली आहे. 'ज्वॉइन अस' च्या पाट्या घेऊन हे शाळा-महाविद्यालयाच्या बाहेर हे 'दक्ष' दिसू लागले आहेत. तरुणांना गळाला लावायचे प्रयत्न सुरु झाले आहेत. आज हे येतील उद्या आणखी कोणीतरी येतील. संघटन करण्याच्या नावाखाली ही द्वेषाची केंद्रे उभारण्याचा प्रयत्न आहे, म्हणून अशा कृत्यांना आळा घालणे गरजेचे आहे असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शाम भागवत 19/10/2025 - 11:02
तो आळा कसा घालणार हा प्रश्न आहे. त्यासाठी काय करणार? मिपावर सातत्याने याबाबत लिहील्याने संघ कमी होताना दिसत नाहीये. नवीन काही उपक्रम सुरू केला पाहिजे. त्यासाठी पूर्णवेळ वाहून घेतलेले कार्यकर्ते तयार करायला पाहिजेत. तसं काहीच होताना दिसत नाहीये.

In reply to by शाम भागवत

आग्या१९९० 19/10/2025 - 12:12
ज्या संघटनेचा पाया द्वेष आणि राजकीय हितसंबंधांवर उभा आहे, तिला शतकभरानंतरही गांधीच्या विचारांचा नाश करणे शक्य झालेले नाही — हे त्यांचे सर्वात मोठे अपयशच आहे. इतिहासाने दाखवले की हिंसा तात्पुरती यशस्वी वाटू शकते, परंतु अहिंसेच्या नैतिकतेसमोर तिचा पराभव होतो. धर्माच्या नावाखाली केलेले राजकारण लोकांमध्ये तणाव निर्माण करू शकते, समाजकारणाचे खरे काम, समतेवर आणि न्यायावर आधारित असते, हे संघाच्या धोरणांत सापडत नाही. त्यामुळे जातीय विभाजनच संघाला आतून संपवेल.

In reply to by आग्या१९९०

शाम भागवत 19/10/2025 - 12:56
देश स्वतंत्र झाल्यावर गांधीजींनी पहिला विचार मांडला होता की, आता कॉंग्रेसची गरद नाही. यास्तव त्याचे विसर्जन केले पाहिजे. हा विचार तरी पूर्णत्वास जाताना दिसतोय बॉ. ;)

In reply to by शाम भागवत

आग्या१९९० 19/10/2025 - 13:24
देश स्वतंत्र झाल्यावर गांधीजींनी पहिला विचार मांडला होता की, आता कॉंग्रेसची गरद नाही. यास्तव त्याचे विसर्जन केले पाहिजे. तेच तर म्हणतोय मी. गांधीजींचे विचार नष्ट करत नाहीत, उलट त्याचे पालनच करत आहेत. गांधीजींना मारले नसते तर गांधीजींनीच काँग्रेस विसर्जित केली असती. एकतर हत्येचे पातक माथी घेतले , आणि काँग्रेस संपवण्याचे उद्दिष्ट साधण्यात ऊर्जा घालवत बसले. गांधीजींचे विचार कसे नष्ट होणार ह्याचीच आयुष्यभर चिंता.

In reply to by शाम भागवत

आग्या१९९० 19/10/2025 - 15:16
एखाद्याला नष्ट करून त्याच्याच विचारांचे पालन करणे म्हणजे वैचारिक दिवाळखोरी. संघाच्या विचारांनी काहीही नवनिर्मिती केली नाही हा इतिहास आहे. संघ स्थापनेचा उद्देश हा राजकीय नव्हता तर कशाला एखाद्या राजकीय पक्षाचे निर्मूलन करण्याचा उद्योग करायचा? विचारात काही सुस्पष्टता?

In reply to by शाम भागवत

अभ्या.. 19/10/2025 - 19:19
अरे, तुम्हाला वेगळे मेल येते की काय? आम्हाला आले मेल एका मोठ्ठ्या दिव्याच्या फोटो बरोबर. त्यात हा निरोप आलाय वरून. . तुम्हाला काय आला मेल? घरातील मुला नातवंडांना , लहानांना आवर्जून संघ शाखांत पाठवा. संघाला गरज आहे.....

In reply to by अभ्या..

शाम भागवत 19/10/2025 - 20:35
:) संघाला आमची गरज आहे? काहीही. आम्हाला संघाची गरज आहे. २०१४ पासून छान चाललंय. यश मिळत राहिले आहे त्यामुळे निवडलेला रस्ता बरोबर आहे याची खात्री पटलीय. २०२४ ला थोडे अपयश आले. त्याबरोबर कोणावर दोषारोप न करता चुका सुधारल्या. परत यश मिळायला लागलंय. तुम्हीपण तुमची लढायची पध्दत बदललेली नसल्याने बिहार निवडणूकांत यश मिळणार हे नक्की आहे. तुमची विचार करण्याची व संघाला विरोध करण्याची पध्दत न बदलल्याबद्दल धन्यवाद. असंच महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधे लढा. म्हणजे तिथेही भाजपाचा विजय नक्की.

In reply to by शाम भागवत

रामचंद्र 25/10/2025 - 21:36
या वस्तुस्थितीकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने विरोधकांचेच नुकसान होत आहे. याउलट संघपरिवारातील विविध पातळ्यांवरील घटक बदलत्या परिस्थितीचा अंदाज घेत सतत जागरूक आणि कार्यरत आहेत.

In reply to by रामचंद्र

अभ्या.. 26/10/2025 - 00:03
वस्तुस्थितीचे सध्या सोडा वस्तूंवर पण एक सांगा प्लिज. काही जन्मापूर्वी तुम्ही संजय हस्तिनापूरकर होतात का हो? . नाही, म्हणजे दोन्ही साइड चे सर्व दृश्य अगदी रणनीती, खलबते सर्व काही स्पष्ट दिसते, कळते.. सलाम तुमच्या दूरदृष्टीला. तुमच्या हस्तिनापूर नरेसाना पण नमस्ते केलाय म्हणून सांगा.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टीपीके 17/10/2025 - 14:53
चला या गोबर युगात कुठेतरी लोकशाही जिवंत आहे, या साठी कर्नाटक सरकार चे अभिनंदनच केले पाहिजे. फक्त काँग्रेसच लोकशाही आणि संविधानाचे संरक्षण करू शकते, १९५१, १९७५, असे अनेक दाखले आहेत त्या साठी. चला आपण त्यांचे हात अधिक बळकट करूया.

In reply to by टीपीके

NiluMP 17/10/2025 - 20:40
स्वतःचे सैन्य, संविधान असताना ही काश्मिरी पंडितांना काश्मीर सोडून का पाळावे लागले. खड्यात घाला अशी वोटेबँक लोकशाही जर छत्रपती शिवाजी महाराज्याचे स्वराज असले असते तर तेव्हा आणि आताही अशी हिम्मत कोणी करू शकेल का ?

In reply to by NiluMP

अभ्या.. 17/10/2025 - 22:29
जर छत्रपती शिवाजी महाराज्याचे स्वराज असले असते तर
मग काय करावे म्हणता? महाराजांना बोलावतांय परत? व्होटबँक खड्ड्यात घालायची म्हणजे काय करायचे? आणि घातलीच तर त्यानंतर काय करायचे?

In reply to by अभ्या..

NiluMP 21/10/2025 - 13:15
जोपर्यंत वोटबँक लोकशाही आहे तोपर्यंत झोपडपट्या, घराणेशाही, सरकारी भ्रष्टाचार, धार्मिक, जातीनिहाय आरक्षण, अनुदान यातून आपली सुटका नाही आणि लोकशाही हे जिहादी मानसिकता वाल्यांसाठी नवीन शस्त्र झाले आहे (उदा. लंडन) आपल्या देशात प्रयोग सुरु झाले आहेत पण हिंदू व नेते जोपर्यंत माझ्या घरापर्यंत येत नाही तोपर्यन्त झोपलेला (एक्स-मुस्लिम त्यांना जागे करण्याचा थोडा प्रयन्त करत आहे ) आहे म्हणून मलातरी RSS आवडते. अब्रामाहिक धर्मवाल्याचं लक्ष एकच आहे संपूर्ण धरती त्याची व्हावी (चीन आणि नॉर्थ कोरिया त्याचं स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही. :-) दोन्ही देशांत लोकशाही नाही.) मी माझा वार्डातल्या वार्ड आणि पोलीस ऑफिसरला निवडून देत नाही मग नेत्यांना का निवडून द्यावे. निवडणूक सोडून इतर पद्धत शोधून काढावी आणि देश एकाद्या कॉर्पोरेट कंपनी प्रमाणे चालवावा परफॉर्म वर पेरिश. आम्ही पाच वर्ष काहीही करू शकत नाही. ज्या नेत्यांना कोणत्या वार्डात, सोसाटीत आपले मतदार आहेत याची माहिती असते त्यांना तेथे कोणते काळे धंदे चालतात याची माहित नसते असं मलातरी वाटत नाही. ज्या वार्डात नवीन झोपडट्टी बनेल तर त्या वार्डातील नगरसेवक, वार्ड, पोलीस ऑफिसर बरखास्त करावे.

In reply to by NiluMP

शाम भागवत 18/10/2025 - 08:21
२०१४ च्या लोकसभा निवडणूकीपासून मुस्लीम व्होट बँकेची ऐशी की तैशी व्हायला सुरवात झालीच आहे हो. २०२४ ला या व्होट बँकेने पूर्ण ताकदीने उसळी मारली होती. भाजपा गाफिल व संघ उदासीन राहूनही मोदींना काही हटवता आले नव्हते. भाजपाला हरविण्याचा एक मार्ग सापडल्याच्या आनंदात सर्व भाजप विरोधक होते. पण बांगला देशातील सत्तांतर व तेथे हिंदूवर झालेले अत्याचार यामुळे विरोधकांना सापडलेला मार्ग पूर्णपणे खिळखिळा झालाय. आता मुस्लीम व्होट बँकेत मुस्लिमांच्या सहाय्यानेच खिंडार पडायला सुरवात झाली आहे. सोबतीला समान नागरी कायदा व एनआरसी आहेच. मुख्य म्हणजे भारतीय मुस्लिमांत ७५ टक्के मुस्लिमांना या ना त्याकारणाने पाकिस्तानचे प्रेम असते. पण पाकिस्तानचे जसे तुकडे पडायला लागतील तसतसं हे प्रेम ओसरत जाईल. तेंव्हां २०२९ पर्यंत मोदी व संघ विरोधक गाफील असलेले बरे. संघ बदलला नसल्याचे त्यांना वाटत राहाणे हेच फायद्याचे आहे. म्हणजे ते द्वेषमूलक टिका करण्यातच धन्यता मानत राहून संघविरोधात प्रत्यक्ष कार्य करायचे विसरून जातील.:) सध्यातरी मोदींना पर्याय म्हणून राहूल, ममता, अखिलेष, शरद पवार वगैरेंना जनता निवडेल असं वाटत नाहीये.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विवेकपटाईत 18/10/2025 - 15:48
रस्त्यावर पथसंचलन करण्याबाबत नियम न्यायालयात टिकणार नाही. सार्वजनिक जागेत बिना ध्वज लावता शाखा लागेल. फुटबॉल खेळायला बंदी लागू होत नाही. 1975 च्या इमर्जन्सी मध्येही शाखा अशाच लागत होत्या.

फक्त अफगाणिस्तानच नाही तर भारताने बऱ्याच देशांबरोबरचे संबंध तोडायला पाहिजे. अमेरिका : इराक, सिरिया इत्यादी देश उध्वस्थ केले. हिशोबच केला तर कमीत कमी लाखो जीव तरी घेतले असतील ह्या देशाने. अफगाणिस्तान सोडता सोडता केवळ संशयामुळे एका कुटुंबावर बॉम्ब फेक केली होती. इंग्लंड : अमेरिकेच्या प्रत्येक पापात सहभागी असणारा देश. रशीया : भारताला मदत केली म्हणून कांय झालं. ना लोकशाही ना इतर देशांच्या सिमेचा सन्मान. सौदी : ह्या देशात महिलांचा सन्मान कमी होतो. चीन : जागतिक कायदे हा देश मनात नाही. वरून गलवान वगैरे भागात खोड्या आतातच. अशी बरीच यादी करता येईल. भारताने geopolitics का कांय त्या भानगडीत न पडता एकेका देशानंबरोबकरचे संबंध तोडायला पाहिजे. इस्राएल ने आपल्याला बऱ्याच कठीण प्रसंगात मदत जरी केली असली तरी त्याच्यापासून आपण दूर राहायला पाहिजे. जवळ जवळ पासष्ट हजार लोकांची कत्तल केली. सर्व गुण संपन्न देश शोधायला पाहिजे आणि मगच वकिलात इत्यादी गोष्टी केल्या पाहिजे. पृथ्वी वर असा कोणता देश मिळाला तर ठीक नाही तर पर ग्राहवार शोध घेतला पाहिजे.

In reply to by कंजूस

कंजूस काका, भाजपच्या आयटी सेलने सात वर्षापूर्वी राहुल गांधी यांना बदनाम करण्याचे जे काही असत्याचे प्रयोग केले त्यातलाच तो एक भाग होता. बघा हा व्हीडीयो. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे 21/10/2025 - 17:15
व्हिडीओ तील शेवटचं वाक्य एकदा परत नीट ऐकून घ्या! जे बिल रा गा मोदींना चिकटवणार होता ते त्यालाच चिकटलं! हा माणूस बेताल बडबड करत असल्यामुळे लोकांना हे तो बोलू शकतो हे सहज पटलं सुद्धा! शेवटी पप्पू तो पप्पू च राहणार! त्याच्यात काही लोकांना देशाचं भविष्य दिसतं त्यांच्या अकलेची कीव करावी का त्यांच्या मूर्खपणा ला हसावं हे कळत नाही!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कंजूस 21/10/2025 - 18:34
पाहिला विडिओ. राहुलला असं म्हणायचं असेल की आलू की फसल लेने वाले किसान सोना कमा सकते हैंl

स्वधर्म 22/10/2025 - 02:59
नाशिकच्या आयटीआय मध्ये पौरोहित्याचा कोर्स सुरू होत आहे. कुंभमेळा येऊ घातलाय तेंव्हा पुरोहितांची कमतरता भासणार म्हणून शासनाने आधीच तयारी सुरू केली आहे असे भाजपाचे प्रवक्ते म्हणत आहेत. पण तिथले महंत मात्र या गोष्टीला विरोध करत आहेत. त्यांनी दोन रोचक मते मांडली आहेतः १. त्यांना व सध्याची पुरोहित संघटना, धर्मातील ज्ञानी लोक वगैरे आहेत त्यांना न विचारता हे केले जात आहे. २. सर्व समाजातील लोक फक्त ब्राम्हणाला सहज दक्षिणा देतात. इतर समाजाचा पुरोहित असेल तर त्याला यात अडचण येईल. आता शासन कसा मार्ग काढेल ते पहायला लागेल.

विजुभाऊ 13/10/2025 - 11:53
नव्या घडामोडीत राज उद्धवर एकत्र येणार अशा बातम्या येताहेत. पण ते एकत्र येऊन काय होणार आहे हेच कळत नाही. वर्तमानपत्राना बातम्या दाखवता येतील इतकेच. उद्धवनी कितीही जाहीर केले तरी राज मात्र कोणत्याच बातमीवर मत प्रकट नाहियेत. उबाठांच्या पक्षाचे प्रतोद मात्र रोज वेगवेगळ्या विषयावर कुणी न विचारताच मतप्रदर्शन करत आहेत

In reply to by विजुभाऊ

राज-उद्धव एकत्र आले पाहिजेत. महाराष्ट्राने आता इतके बदल पाहिले आहेत की त्याची काही मर्यादा राहिली नाही. तेव्हा, हाही बदल महाराष्ट्राने एकदा पाहुनच घ्यावा. स्व.बाळासाहेबांनी उद्धव ऐवजी राज यांचीच तेव्हा निवड करायला पाहिजे होती असे मला कायम वाटले आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शाम भागवत 14/10/2025 - 14:47
राज-उद्धव एकत्र आले पाहिजेत.
मलाही असेच मनापासून वाटते. तसे झाले तरच ठाकरे ब्रँडमधे धुगधुगी शिल्लक राहील व शिंदेंकडे सैनिकांचा ओघ वाढून शिंदे आणखीन बळकट होणार नाहीत. भाजपाला महाराष्ट्रात स्वबळावर सरकार जोपर्यंत आणता येत नाही व जोपर्यंत शरद पवार राजकारणात आहेत, तोपर्यंत तरी उध्दवजी, राजजी व अजित पवार राजकारणात शिल्लक राहिलेच पाहिजेत. :) शरद पवार असेपर्यंत तरी वरील तिघांना मोदी अभय देणारच. :) आणि शरद पवारांचे सर्व डावपेच ओळखून ते उधळून लावण्याची क्षमता असणारे देवाभाऊ मुमं म्हणून राहणारच. एकदाका शरद पवारांनी राजकारण संन्यास घेतला की देवाभाऊंना त्यांची इच्छा असो वा नसो, दिल्लीच्या राजकारणात जायलाच लागेल.

In reply to by शाम भागवत

एकदाका शरद पवारांनी राजकारण संन्यास घेतला की देवाभाऊंना त्यांची इच्छा असो वा नसो, दिल्लीच्या राजकारणात जायलाच लागेल.
शरद पवार साहेब राजकारणातुन संन्यास घेतील हे दिवास्वप्न (देवास्वप्न :) ) आहे. ठाकरे बंधुंचा इगोच इतका मोठा आहे कि त्यापुढे त्यांना बाकीचे पक्षासंबंधित राज्यासंबंधित असलेले फायदे दिसतच नाहीत. जरी दोन्ही बंधु एकत्र आले तर ते दोन्ही पक्षांसाठी एक मोठे अराजक ठरेल असे वाटते.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभ्या.. 16/10/2025 - 16:54
राज-उद्धव एकत्र आले पाहिजेत.
भारी निरागस काड्या टाकता हां सर. परफेक्ट ठासलेल्या चिलिमी धुमसू लागतात लगेच.

In reply to by सुबोध खरे

मतदारांचा भ्रमनिरास झालयावर आता युती करून काही होईल असे वाटत नाही. . निवडणूक आयिगाने भाजपला मदत न करता प्रामाणिक निवडणूक घेतल्या तर नक्की होईल.

राज आणि उद्धव दोघेही आळसी आहेत. ऐन निवडणुकीतही दोन नाहीतर तीन सभा घेतेत. शक्यतो एकच. त्यामुळे एकत्र आले तरी फारसा काही फरक पडणार नाही.

तेव्हा, लक्षात आलं की, महसुल अधिकारी पंचनामे करीत आहेत पण, नुकसान भरपाई देण्याच्या अटी इतक्या आहेत की, भरपाई नको पण कागदपत्रे आवरा अशी वेळ आहे.
सगळीकडे हीच समस्या आहे. जवळचा एक नातलग अश्या अधिकारी पदावर कार्यरत आहे. त्याच्या म्हणण्यानुसार काम केले अथवा नाही केले तरी संबंधित अधिकार्यावर कारवाई करणे हे नित्याचेच झाले आहे. म्हणजे अश्या अटी पुर्या करताना वरुन प्रेशर येते कि अटी शिथिल करा व कालांतराने त्याच शिथिल केलेल्या अटींमुळे संबंधित अधिकारी अडचणीत येतो.

सौन्दर्य 14/10/2025 - 18:39
अफगाणातील तालिबान सरकारला दिलेले समर्थन तसेच त्यांच्या बरोबरची मैत्री घातक ठरणार आहे. 'शत्रूचा शत्रू तो आपला मित्र' हे ऐकायला कितीही गोड वाटत असले तरी काही बाबतीत त्याला अपवाद हा असतोच.

In reply to by सौन्दर्य

सुबोध खरे 14/10/2025 - 19:12
तो शुद्ध व्यापार आहे. अफगाणिस्तान बेचिराख झाला आहे त्याची पुनर्बांधणी होईल तेंव्हा तेथे आपल्या अनेक कंपन्यांना कंत्राटे मिळू शकतील याशिवाय तेथे असलेला दुर्मिळ खनिजांचा खजिना हा एक फार महत्त्वाचा भाग आहे Afghanistan possesses significant deposits of rare earth minerals like lanthanum, cerium, and neodymium, along with other valuable minerals such as lithium, cobalt, and niobium. These resources are crucial for modern technologies, but their extraction has been hindered by political instability, security issues, and lack of infrastructure. The Helmand province is known to have some of the most important deposits. चीन वरील अवलंबित्व कमी करण्याच्या दृष्टीने हा एक फार मोठा आधार ठरू शकतो. अमेरिका अफगान युद्धात आणि कोव्हीड मध्ये भारताने मोठ्या प्रमाणावर मानवतावादी मदत केली आहे याबद्दल अफघाण लोक कृतज्ञ आहेत. याशिवाय अगोदर रशिया आणि नंतर अमेरिकेशी युद्ध केल्यामुळे अफघाण लोकांचा या दोघांवर अजिबात विश्वास नाही. तेथील खनिज उत्खननासाठी त्यातनं तंत्रज्ञान हवेच आहे जे भारताजवळ आहे शिवाय स्वस्त आहे हेलमंड प्रांतात असलेली हि खनीजे चाबहार या इराणच्या जवळच्या बंदरातून (होर्मूझ च्या समुद्रधुनीच्या पूर्वेकडून) आपल्याला हि खनिजे आणणे फार सोपे आहे अशा स्थितीत चीनने शिरकाव करण्याच्या अगोदर भारत जर आपल्या पूर्वपुण्याईचा उपयोग करून घेत असेल तर त्यात काय चूक आहे? (First-mover advantage) अफगाण लोकांना भारताबददल बरीच आत्मीयता आहे हा एक अजून फायदा. जगाच्या इतिहासात कोणताही देश आपला कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो.

In reply to by सुबोध खरे

स्वधर्म 14/10/2025 - 20:03
>> अशा स्थितीत चीनने शिरकाव करण्याच्या अगोदर भारत जर आपल्या पूर्वपुण्याईचा उपयोग करून घेत असेल तर त्यात काय चूक आहे? (First-mover advantage) अफगाणिस्तान - चीन व्यापार चीनक्डून आयातः ९६२ मिलियन डॉलर्स चीनला निर्यातः ६३.९ मिलियन डॉलर्स अफगाणिस्तान - भारत व्यापार भारताकडून आयातः '--' (बहुधा किरकोळ असावी, त्यामुळे दिलेली नाही भारताला निर्यातः ६६७ मिलियन डॉलर्स याचा अर्थ चीनचा अफगाणिस्तानशी व्यापार आपल्यापेक्षा खूपच जास्त असून अफगाणिस्तान चीनकडून जेवढ्या वस्तू आयात करतो, त्याच्या जवळ्पासही भारताकडून काही घेत नाही परंतु भारताला चीनपेक्षा १० पटीहून अधिक निर्यात करतो. हे खूपच विषम चित्र आहे. त्यामुळे आपल्याला फर्स्ट मूव्ह वगैरे काहीही फायदा नाही. चीनबरोबरचा त्यांचा व्यापार आपल्यापेक्षा १० पट जास्ती आहे. शिवाय ते आपले ग्राहक नसून आपण त्यांचे ग्राहक आहोत. अशा परिस्थितीत त्यांनी आपल्याला खूष ठेवायला हवे. अफगाणिस्तानची एवढी दाढी कुरवाळण्याची काय गरज आहे? समर्थन म्हणजे काहीही केले तरी सरकारचे समर्थन करायचेच, हे अजब आहे.

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे 14/10/2025 - 21:50
Based on recent reports in October 2025, Afghanistan is actively inviting India to invest in and import several minerals, including critical resources like copper, lithium, and rare-earth minerals. While past exports have been limited due to instability, these new developments signal Afghanistan's desire to significantly expand its mineral trade with India.

In reply to by स्वधर्म

सुबोध खरे 14/10/2025 - 22:05
https://youtu.be/HKR9ZzlOGDc?si=SXGJlpaocTjHtPrJ https://www.oneindia.com/international/afghanistan-invites-india-to-invest-in-1-trillion-mineral-sector-agriculture-and-sports-7886989.html https://www.news18.com/world/afghanistan-sees-new-delhi-as-close-friend-invites-indian-firms-for-mining-ops-taliban-fm-muttaqi-ws-kl-9626920.html

In reply to by सुबोध खरे

स्वधर्म 15/10/2025 - 15:00
चीनबरोबरचे अफगाणीस्तानचे व्यापारी संबंध भारतापेक्षा निश्चितच जास्त आहेत असा माझा मुद्दा होता. त्यावर तुंम्ही दिलेल्या दुव्यांमध्ये चीनच्या तुलनेत भारताला फर्स्ट मूव्ह अ‍ॅडव्हान्टेज मिळेल असे काहीही आढळले नाही. बाकी त्यांनाही आपली तितकीच गरज आहे. आपण ग्राहक म्हणून तालिबानला वाकवूच शकतो. त्यांचे ऐकून महिला वार्ताहरांना प्रवेशबंदी करण्याचा मध्ययुगीन मागासपणा करण्याची काही एक गरज नव्हती. त्यांच्या देशात गेल्यावर जर त्यांचे कायदे आपल्याला पाळावे लागत असतील तर आपल्या देशात आल्यावर त्यांना आपले कायदे पाळायलाच पाहिजेत. हे सरकार का सगळ्यांसमोर सरपटतंय काही कळत नाही. खनिजे वगैरे म्हटलं की दुखणं कुठलं आहे त्याचा थोडा अंदाज येतो खरा.

In reply to by स्वधर्म

अभ्या.. 15/10/2025 - 16:10
हे सरकार का सगळ्यांसमोर सरपटतंय काही कळत नाही. खनिजे वगैरे म्हटलं की दुखणं कुठलं आहे त्याचा थोडा अंदाज येतो खरा. त्यातल्या त्यात २००१ साली तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींनी "तालिबान्यांकडून बामियानच्या बुध्दमूर्तीच्या नाशामुळे" मानवतेच्या आवाजासाठी तत्कालीन कित्येक सरकारांना आणि युनायटेड नेशन्स ला आवाहन केलेले होते, मोदी आणि योगीकडून ज्या तालिबानी कृत्याची निर्भत्सना कित्येक वेळी केली गेली आहे त्याच घटनेचे बुध्द मूर्ती विनाशानंतरचे पेन्टींग पार्श्वभूमीवर लावणे ह्यात तालिबानचा कोणता गौरव घेऊन ते भारतात आले आहेत हेच स्पष्ट होते. नॉर्मल भेट ठिकच आहे पण महिला पत्रकारांना प्रवेश नाकारणे आणि मुद्दामून तेच पेंटींग घेऊन येणे (कारण ते भारतात कुणी दिले असेल त्यांना तर अधिक गंभीर आहे) आणि त्याचे प्रदर्शन करणे हेच तालिबानच्या हेतूमधील खोच आणि आपल्या सरकारचे सरपटणे दाखवते. बाकी सौदीचा देवबंदींना पतपुरवठा थांबल्यापासून ते आता सौदीचा पाकिस्तानसोबतचा संयुक्त सुरक्षा करार आणी तालिबानचा भारतासोबतचा करार, पाकिस्तानचे चीनसोबतचे भारतावरच्या अक्रमणातले सहाय्य आणि ज्या रशिया अमेरिकेने अफगाणी दगडांवर डॉके फोडून घेतलेले आहे त्या रशिया अमेरिकेचे भारतासंबधात बदलेलेले संबध हा प्रवास रोचक आहे.

In reply to by स्वधर्म

सुबोध खरे 15/10/2025 - 18:44
त्यांचे ऐकून महिला वार्ताहरांना प्रवेशबंदी करण्याचा मध्ययुगीन मागासपणा करण्याची काही एक गरज नव्हती. त्यांच्या देशात गेल्यावर जर त्यांचे कायदे आपल्याला पाळावे लागत असतील तर आपल्या देशात आल्यावर त्यांना आपले कायदे पाळायलाच पाहिजेत. पूर्वग्रह असला कि मूलभूत गोष्टींचा विसर पडतो त्याचे हे उत्तम उदाहरण आहे. परराष्टीर्य वकिलातीवर त्या देशाचा कायदा चालत नाही हे मूलभूत तत्व आहे. विकिलीक्स वाला ज्युलियन असांजे हा लंडन मध्ये सात वर्षे इक्वेडोर देशाच्या वकिलातीत राहत होता. तेथे ब्रिटनचा कायदा चालत नाही. तेंव्हा अफगाणिस्तानच्या वकिलातीत पत्रकार परिषद घेताना आपला कायदा तेथे चालत नाही हे आपण लक्षात घ्या. मुळात हि पत्रकार परिषद अफगाण वकिलातीने घेतली होती आणि त्यात आपल्या परराष्ट्र खात्याचा सहभाग नव्हता. त्याचे राजकारण काँग्रेसच्या राजकारण्यांनी केले यात नवल नाही. कारण इथे मिपा वर सुद्धा मूलभूत माहिती न घेता तोंड सोडणारे लोक कमी नाहीत मग सामान्य लोकांची काय कथा? सरकारबद्दल कमालीचा द्वेष असला तरी परराष्ट्र धोरण, लष्कराबाबत किंवा इसरो अणुऊर्जा इत्यादीसाठी घेतलेली दूरगामी धोरणे एका रात्रीत बदलत नाहीत. काँग्रेसचे सरकार असते तरी येथे तालिबान बरोबर संबंध प्रस्थापित करण्याच्या दृष्टीनेच प्रयत्न केले गेले असते याबद्दल मला शंका नाही. जर १९७१ मध्ये युद्ध लष्कराने लढले असले तरी त्याचे श्रेय श्रीमती इंदिरा गांधी यांना च दिले जाते तद्वत आज ऑपरेशन सिंदूर चे श्रेय श्री मोदी यांनाच मिळणार आहे मग आपण कितीही आदळ आपट किंवा चिडचिड करा.

In reply to by सुबोध खरे

अभ्या.. 16/10/2025 - 12:40
परराष्टीर्य वकिलातीवर त्या देशाचा कायदा चालत नाही हे मूलभूत तत्व आहे. तेंव्हा अफगाणिस्तानच्या वकिलातीत पत्रकार परिषद घेताना आपला कायदा तेथे चालत नाही हे आपण लक्षात घ्या. मुळात हि पत्रकार परिषद अफगाण वकिलातीने घेतली होती आणि त्यात आपल्या परराष्ट्र खात्याचा सहभाग नव्हता.
. काहीही काय फेकताय? मूळ अधिकृत वकिलात असली तर तेथे ती इम्म्युनिटी आणि स्वातंत्र्य. भारताने २०२१ लाच अफगाणिस्तानातली वकालत बंद केली आणि सगळे डिप्लोमॅट्स, विद्यार्थी, जमेल तेवढे नागरिक परत आणले. परत ह्या महिन्यात ती चालू केलेली आहे पण अद्याप तालिबान सरकारला अधिकृतता दिलेली नाहीये. अफगाणिस्तानची भारतातली एम्बसी २०१५ ला उद्घाटन झाले. जमीन १९५६ ला घेतलेली होती. ऑगस्ट २०२१: तालिबान पुन्हा सत्तेत आल्यानंतर, नवी दिल्लीतील अफगाण दूतावास हा बहिष्कृत प्रजासत्ताक सरकारमधील राजदूतांच्या नियंत्रणाखाली कार्यरत राहिला. बहुतेक आंतरराष्ट्रीय समुदायाप्रमाणे भारतानेही तालिबान प्रशासनाला मान्यता दिली नाही. नोव्हेंबर २०२३: नवी दिल्लीतील दूतावास कायमचा बंद झाला. माजी सरकारच्या राजदूतांनी भारत सरकारकडून पाठिंबा नसणे आणि तालिबानचा दबाव हे बंद करण्याचे कारण असल्याचे सांगितले. २०२४-२०२५: तालिबान नियंत्रण आणि पुन्हा सुरू होण्याची शक्यता शोधत आहे २०२४: तालिबान प्रशासनाने मुंबईतील अफगाण दूतावासात एक वाणिज्य दूत नियुक्त केला, ज्यामुळे भारतात त्यांची वाढती राजदूतीय उपस्थिती दिसून आली. मुंबई आणि हैदराबादमधील अफगाणिस्तानचे वाणिज्य दूतावास मर्यादित सेवांसह कार्यरत राहिले. ऑक्टोबर २०२५: तालिबानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी आणि भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यातील ऐतिहासिक बैठकीनंतर, दोन्ही देशांनी पूर्ण राजदूतीय दूतावास पुन्हा सुरू करण्यास सहमती दर्शविली. दूतावास पुन्हा सुरू करण्यासाठी तालिबान राजदूत आता नवी दिल्लीत येण्याची अपेक्षा आहे . मग कुठली आलीय इम्म्युनिटी? . सध्या रशिया हे एकमेव राष्ट्र आहे कि ज्यानी तालिबान सरकारला अधिकृतता बहाल केली आहे. बाकी सर्वानी कंडीशनल अ‍ॅक्सेस आणि काही बोलणी चालू आहेत. . म्हणजे ही कुठली पध्दत की घराचे अ‍ॅग्रीमेंट करायला घरात बोलवायचे आणि अद्याप काही व्यवहार न होता त्याला मालकी बहाल करुन चाव्या सोपवायच्या, नवीन मालकांने पण स्वतःच्या नेमप्लेटसहीत, पेंटींग्स लावून घर सजवायचे तेही मालकाचा अपमान करुन आणी जुन्या मालकाच्या पाळीव लोकांनी त्याचा घरमालक म्ह्णणून अधिकारच आहे असा उदोउदो करायचा. सरपटणे ह्यालाच म्हणतात. जळजळीला ओवा चालतो, पाठीचा कणाच मोडला की सरपटावेच लागते.

In reply to by अभ्या..

स्वधर्म 16/10/2025 - 17:08
अभ्या, तुंम्ही लिहिलेले मुद्दे १००% टक्के बरोबर आहेत. त्यामुळे या प्रकारच्या वागणुकीस सरपटणे असेच म्हणावे लागेल. पहिले असे की, भारताने अजून इस्लामिक इमिरेट ऑफ अफगाणिस्तान या तालिबान नियंत्रित सरकारला अधिकृत मान्यताच दिलेली नाही. भारताने अजूनही वकालतीची मालकी इस्लामिक रिपब्लीक ऑफ तालिबान या पूर्वीच्या सरकारकडून तालिबान सरकारकडे वर्ग केलेलीच नाही. Taliban representatives claim full control over the embassy, although India has not officially transferred authority to Taliban-appointed diplomats. दुसरे असे की पंतप्रधान भारतात कधीही खुली पत्रकार परिषद घेत नाहीत, पण अमेरिकेत गेल्यावर त्यांना तिथले नियम पाळावेच लागलेले आहेत. त्यामुळे टेलिप्रॉम्प्टर वापरून का असेना, तिथल्या नॉन-गोदी मिडीया समोर त्यांना खुल्या पत्रकार परिषदेत प्रश्नांना उत्तरे द्यावीच लागतात. (त्यात काय होते हा मुद्दा वेगळा). त्यामुळे भारतात आल्यावर तालिबानींना इथले नियम पाळले पाहिजेत. तिसरे असे की, अफगाणिस्तान पेक्षा भारत हा जवळजवळ सर्व दृष्टीने विकसित, बलवान व मोठा आहे. तरीही आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर का कच खावी?

In reply to by अभ्या..

सुबोध खरे 16/10/2025 - 18:21
सरपटणे ह्यालाच म्हणतात. मुळात हि पत्रकार परिषद अफगाण वकिलातीने घेतली होती आणि त्यात आपल्या परराष्ट्र खात्याचा सहभाग नव्हता. हे वाचलंच नाहीये म्हणून अशी जळजळ होते आहे. चालू द्या.

In reply to by सुबोध खरे

अभ्या.. 16/10/2025 - 19:22
मुळात हि पत्रकार परिषद अफगाण वकिलातीने घेतली होती आणि त्यात आपल्या परराष्ट्र खात्याचा सहभाग नव्हता.
लोकांची जळजळ तपासण्यातली तुमची तळमळ समजू शकतो पण हे बघा. टाइम म्हणतेय : संयुक्त राष्ट्रांच्या निर्बंध यादीत असलेले मुत्ताकी यांना गेल्या गुरुवारी आठवडाभराच्या भारत भेटीसाठी प्रवास सूट मिळवावी लागली. भारताने त्यांना अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री म्हणून संबोधले, त्यांना दिल्लीतील अफगाण दूतावासाच्या परिसरात पत्रकार परिषदा घेण्याची परवानगी दिली, जिथे अजूनही मागील पाश्चात्य समर्थित अफगाण सरकारचे अधिकारी काम करतात आणि त्यांचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना त्यांच्यासोबत व्यासपीठावर बसवले. . बोलावले कुणी? भारत सरकारने.. त्यांना अफगाणचे परराष्ट्र मंत्री म्हणून भारतात दर्जा कुणी दिला? भारत सरकारने.. अफगाण दूतावासाच्या परिसरात पत्रकार परिषदा घेण्याची परवानगी कुणी दिली? भारत सरकारने.. दूतावासात अजूनही जुन्या अफगाणी सरकारच्या लोकांना कुणी ठेवलेय? भारत सरकारने.. दूतावास चालू करण्याची बोलणी अद्याप चालू असताना दूतावास वापरण्याची परवानगी कुणी दिली? तालिबान आणि भारत सरकारने.. मुंबईतले अफगाणी कॉन्सुलेट तालिबान चालवते आणि हैदराबादमधले कॉन्सुलेट जुने अफगाण रिपब्लिक असा कॉन्फ्लिक्ट असतानाही तो क्लीअर करणे सोडून करार मदार, चर्चा घडवून आणल्या कुणी? भारत सरकारने.. प्रेस कॉन्फरन्स मध्ये अफगाणिस्तानचा झेंडा न लावता तालिबानचा झेंडा लावून कॉन्फरन्स घ्यायची परवानगी कुणी दिली? तालिबान भारत सरकारने.. . तालिबानने भारताचा उपयोग करुन लेजिटमसी मिळवायचा प्रयत्न केलेला आहे हे स्पष्ट दिसत असताना एका प्रेस कॉन्फरन्स मधल्या चुकीसाठी परराष्ट्र खात्याला पर्यायाने मोदी सरकारला क्लीन चीट देण्यासाठी इतक्या कोलांट्या उड्या मारणे म्हणजे खरी भक्ती. धन्य हो...........

In reply to by सुबोध खरे

आग्या१९९० 16/10/2025 - 20:45
भारतातील पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना न बोलावणे ही एक तांत्रिक बाब होती असे तालिबानी मंत्र्यांनी खुलासा केला. त्यात त्यांनी दूतावासाचा उल्लेख केला नाही ह्यात सर्व काही आले. इकडे काहीजण उगाचच समर्थन करत आहेत. त्या पत्रकार परिषदेवर पुरुष पत्रकार निषेध म्हणून बहिष्कार घालू शकत होते किंवा तालिबानी मंत्र्यांना जाब विचारू शकले असते. परंतु पुरुष पत्रकार " सर तनसे जुदाला " घाबरले असावेत.

In reply to by सुबोध खरे

स्वधर्म 16/10/2025 - 17:28
तुंम्ही चीनच्या तुलनेत आपल्याला फर्स्ट मूव्ह अ‍ॅडव्हांटेज मिळेल हा मुद्दा मांडला होता. त्यावर मी तसे का नाही हे सांगणारे उत्तर दिले होते. आता आपण तो मुद्दा सोडून फक्त महिलांच्या पत्रकारपरिषदेतील प्रवेश बंदीचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे फर्स्ट मूव्हचा मुद्दा बरोबर नव्हता हे मान्य केले असे समजायला हरकत नाही. बाकी रेअर अर्थ खनिजांबाबत जे व्यापार युध्द सुरू आहे त्यात हा एक व्हिडिओ पाहिला. Trade war explained: The rare earth metals China dominates and US needsया क्षेत्रात उत्पादक म्हणून भारताचे नांव आहे पण अफगाणिस्तानचे नांवही नाही. त्यामुळे तालीबानचे लाड करण्यामागे तुंम्ही म्हणता तसा शुध्द व्यापार आहे या तुमच्या (एन डी टी व्ही च्या?) मतावर विश्वास ठेवणे कठीण आहे. काही उद्योगपतींना मिळू शकणारी तिथली कंत्राटे हा मुद्दा आणि तालीबान्यांची सरबराई यात काही संबंध आहे का?

In reply to by स्वधर्म

शाम भागवत 16/10/2025 - 18:16
आपली संरक्षण सिध्दता तेल विहीरी उत्खननातून स्वयंपूर्णता, देशी विमानांचे इंजिन या गोष्टी पूर्ण होईपर्यंत म्हणजे अंदाजे २०२९ पर्यंत तालाबानशी मर्यादित चुंबाचुंबी करायला काहीच हरकत नाही. मला वाटते आपल्या अस्तनीतले निखारे शोधण्यासाठी तालीबानचा उपयोग आपण करून घेतला पाहिजे. :)

In reply to by स्वधर्म

सुबोध खरे 16/10/2025 - 18:29
भारताकडून आयातः '--' (बहुधा किरकोळ असावी, त्यामुळे दिलेली नाही India Exports to Afghanistan was US$333.52 Million during 2024 Based on recent reports in October 2025, Afghanistan is actively inviting India to invest in and import several minerals, including critical resources like copper, lithium, and rare-earth minerals. हे हि वाचलं नाही Beijing could be skeptical of partnering on ventures with the Taliban given ongoing instability, however, and may focus on other regions. Khan pointed out that China has been burned before, having previously tried to invest in a copper project that later stalled. https://edition.cnn.com/2021/08/18/business/afghanistan-lithium-rare-earths-mining हे हि वाचलं नाही बाकी आपल्या परराष्ट्र, संरक्षण आणि उद्योग खात्यातील तज्ज्ञ लोकांपेक्षा मिपा वर जास्त हुशार आणि सर्व ज्ञानी लोक आहेत हे पाहून डोळे पाणावले

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे 16/10/2025 - 18:48
चीन अफगाणिस्तानात गुंतवणूक करण्यास उत्सुक नसण्याची करणे याला कृत्रिम बुद्धिमत्तेने दिलेले उत्तर Despite initial expectations, China has not made large-scale investments in Afghanistan due to major obstacles, especially ongoing security risks, contractual disputes, and the country's severe instability. Beijing is prioritizing security along its border and seeking to protect existing investments, adopting a cautious "wait-and-see" approach. Security concerns are the primary reason for China's reluctance to invest, as Afghanistan remains a volatile environment for foreign operations and personnel. Persistent terrorism: The presence and activity of militant groups, particularly Islamic State–Khorasan Province (ISKP), pose a significant threat. ISKP has demonstrated its capability and intent by directly targeting Chinese interests, including an attack on a Kabul guest house in 2022. Xinjiang security: China's main security interest is preventing the East Turkestan Islamic Movement (ETIM), a Uyghur militant group, from using Afghanistan as a base to foment separatist activities in its neighboring Xinjiang province. While the Taliban has made some efforts to relocate these militants, China remains concerned. Regional instability: Attacks on Chinese personnel and projects in neighboring Pakistan, often conducted by groups with ties to Afghanistan like the Tehreek-i-Taliban Pakistan (TTP), have heightened China's fears about regional instability. Beyond security, foreign investment is heavily deterred by Afghanistan's weak economic and political environment. Contractual disputes: Chinese companies have faced major setbacks on projects. In June 2025, the Taliban terminated a $540 million oil deal with a Chinese firm, accusing it of failing to deliver on promised investments and infrastructure projects. Dysfunctional governance: With the Taliban's limited managerial and administrative experience, investors face a lack of reliable regulations and clear legal frameworks. The collapse of a major oil deal suggests that the Taliban is not always a reliable business partner. Lack of infrastructure: Poor infrastructure, inadequate energy supply, and an undeveloped legal and banking system further complicate large-scale investment.

In reply to by सुबोध खरे

सौन्दर्य 16/10/2025 - 00:41
खरे साहेब, राजकारणातही कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नसतो असे म्हंटले जाते. तरी देखील तालिबानचे कायदे, त्यांची इतर वर्तणूक पाहता अशा लोकांशी मैत्री ही आज ना उद्या अंगाशी येणारच. स्व:ताच्या देशाचा फायदा, इतर देशांना लांब ठेवणे, खनिजे वगैरे कितीही आकर्षक वाटले तरी देखील ही एक अभद्र युती ठरेल व पुढेमागे आपल्या देशासाठी घातक ठरेल.

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे 14/10/2025 - 21:52
Beijing could be skeptical of partnering on ventures with the Taliban given ongoing instability, however, and may focus on other regions. Khan pointed out that China has been burned before, having previously tried to invest in a copper project that later stalled. “I believe they will prioritize other emerging/frontier geographies well before Taliban-led Afghanistan,” said RK Equity partner Howard Klein, who advises investors on lithium.

In reply to by सुबोध खरे

चौथा कोनाडा 14/10/2025 - 22:48
महत्वाची आणि रोचक माहिती.... तालीबानने जुन्या अफगाणीस्थानची धोरणे अवलंबली तर १९८० च्या वेळेचे मैत्रीपर्व पुनर्जिवित होऊ शकते !

तळीबान बरोबर आपण चर्चा चालू केली ती योग्यच आहे. हे आगोदरच करायला पाहिजे होत. त्यांना इतर मदतीबरोबरच सरक्षण साहित्याची मदत पण करायला पाहिजे.

In reply to by रात्रीचे चांदणे

अफगाणिस्तान आणि तत्कालीन ब्रिटिश भारतामधील ब्रिटिशांनी आखलेली ड्युरंड लाईन पठाणांना अजिबात मान्य नाही. त्या सीमारेषेच्या दोन्ही बाजूंना जर पठाण राहात असतील तर ती कृत्रिम सीमारेषा नको असेच पठाणांना वाटते- म्हणजेच खैबर पख्तुनवा प्रांत आपलाच असे अफगाणिस्तानातील पठाणांना वाटते. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये मतभेदांचे हे कारण पूर्वीपासून होते. अफगाणिस्तान आपल्या नियंत्रणात ठेवता येईल म्हणून पाकिस्तानने तालिबानची निर्मिती केली पण त्याचवेळेस अफगाणिस्तानातील पठाणांनाही खैबर पख्तुनवा हवा आहे हे ते विसरले बहुतेक. अमेरिकेकडून पैसे खायला मिळतील म्हणून ९/११ नंतर मुशर्रफने अमेरिकेला मदत केली आणि त्यातून तालिबानवर हल्ले करायला पाकिस्तान हा बेस मिळाला तेव्हापासूनच तालिबानचे पाकिस्तानशी संबंध बिघडायला सुरवात झाली. एकीकडे अमेरिकेकडून पैसे खायचे आणि दुसरीकडे ओसामाला लपवून ठेवायचे हा पण डबल गेम पाकिस्तानने खेळला. काहीही असले तरी अफगाणिस्तानातील तालिबानची सत्ता उखडली गेली आणि त्याला पाकिस्तानने मदत केली हे पठाण विसरू शकले नसावेत. त्यात तात्यांना काबूलचा बगराम हवाईतळ हवा आहे. त्यांना खूष करायला म्हणून मुनीरने थेट काबूलवर हवाई हल्ले केले. ही गोष्ट तालिबान कसे सहन करतील? ही आपल्याला उत्तम संधी आहे. त्याचा फायदा आपण उठवायला पाहिजे. तालिबान म्हणत असतील की काश्मीरवर भारताचा हक्क आहे तर आपण पण खैबर पख्तुनवावर अफगाणिस्तानचा अधिकार मान्य करावा. आयजीच्या जीवावर बायजी उदार होऊन पेशावर आणि तो प्रदेश अफगाणिस्तानचा आहे हे आम्हाला मान्य आहे असे म्हटले (म्हणजे उघडपणे म्हटले नाही तरी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात भांडणे लावून द्यायला काही केले) तर आपल्या बापाचे काय जाणार आहे? पाकिस्तानात पठाण लोक नुसते खैबर पख्तुनवामध्येच आहेत असे नाही तर इतर भागाताही पसरले आहेत. ते पठाण आणि पंजाबी वर्चस्व असलेली पाकिस्तानी व्यवस्था यांच्यात भांडणे लागून दोघे एकमेकांना मारत असतील तर ते आपल्यासाठी चांगलेच आहे ना? काहीही असले तरी तालिबान हा आपला दीर्घकालीन मित्र वगैरे होणे अशक्य आहे. पाकड्यांना ठोकायला म्हणून ही तात्पुरती व्यवस्था आहे. त्याच पठाणांच्या टोळधाडींनी भारतात शेकडो वर्षे नंगानाच चालवला होता हे आपण विसरू शकणार नाही/विसरू नये. एकदम आयडिअल परिस्थिती होईल की एकमेकांना मारताना पाकिस्तान आणि तालिबान दोघेही संपून गेले तर. तसे होणे जरा कठीणच आहे. पण पठाण आणि पंजाबी एकमेकांशी अनिश्चित काळ भांडत राहिले तर ते आपल्यासाठी चांगले होईल. पठाणांनी वर्षानुवर्षे संघर्ष यापूर्वी अनेकदा चालू ठेवला आहे- ब्रिटिश, रशियन आणि अमेरिकनांविरोधात. तसाच पाकड्यांविरोधात पण चालू ठेऊ देत. कदाचित पुढील काही वर्षात पाकिस्तानचे तुकडे पडतील. काहीही झाले तरी त्या पठाणी टोळधाडींच्या मध्ये कमकुवत का होईना कोणतातरी प्रदेश त्या पाकिस्तानच्या तुकड्याच्या निमित्ताने हवा.

Afaganistan is connected to POK & it is likely that India is aiming to make use of older silk route to reach Europe. This is way more cheaper than existing Suez Cancal Route and beneficial for Afganistan as well. Hence Indian Army mentioning that Pakistan will have its Geography changeद & Taliban mentioning 'POK is integral part of India' may not be a coincidence.

विजुभाऊ 15/10/2025 - 12:04
अफगाणीस्तानशी मैत्री ही शत्रु चा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने आहे. दुसरे हे की अफगाणिस्थानमधे इन्फ्रास्ट्रक्चर उभे करण्यासाठी भारतीय कम्पन्याना व्यवसाय मिळू शकतो. पाकिस्थानला जर शह द्यायचा असेल / चाप लावायचा असेल तर भारताला इराण आणि अफगाणीस्थान सोबत मैत्रीसंबन्ध ठेवणे गरजेचे आहे

कंजूस 15/10/2025 - 19:53
तालिबान आणि भारत चर्चा ....... भेटीमागचं कारण काय असेल? १.पत्रकार परिषदेत दोन तीन महिलाही होत्या हे चानेलवाले दाखवत होते. महिलांबाबत उदार धोरण अवलंबत आहोत हे दाखवायचे आहे का? २. अफगाण सरकारची अमेरिकेतील संपत्ती गोठवली गेली आहे ती सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतील का? ३. भारतीय गुंतवणुकदारांची बरीच गुंतवणूक बुडीत झाली आहे त्याबद्दल प्रयत्न? काय सांगता येईल?

In reply to by कपिलमुनी

सुबोध खरे 16/10/2025 - 10:49
इतका द्वेष आणि इतकी जळजळ? कोण सनातनी आज अशा राजकारणात आहेत जे असे स्त्रियांना पायाचे बोट जरी दिसले तरी सार्वजनिक रित्या फटके मारण्याचे समर्थन करत आहेत? केवळ रा स्व संघाचा द्वेष म्हणून हिंदुत्ववाद्यांना सनातनी म्हणून त्यांची तालिबानशी तुलना करायची आज शरिया लागू करा म्हणणारे मुस्लिम नेते निदान ५० % असतील. जरा काही झाले कि इस्लाम खतरे मे है म्हणणारे नेते सहज दिसतात त्यांच्याबद्दल बोलायची तुमच्यात हिम्मत नाही. कारण सर तन से जुदा होण्याची भीती. भेकडपणा आणि दांभिकपणा हि फुरोगामिनची खासियतच आहे इस देश के कितने भी तुकडे हो जाये हम किसी को अपने मझहब से खिलवाड करने नही देंगे म्हणणारा समाजवादी पार्टीचा अबू आझमी तुम्हालाइंडी गठबंधनात चालतो? किंवा १५ मिनिटे पोलीस दूर करा मग आम्ही काय करतो ते दाखवून देऊ म्हणणारा असदुद्दीन ओवेसी तुम्हाला जवळचा वाटतो. किती हे अध:पतन

In reply to by सुबोध खरे

समाजवादी पार्टीचा अबू आझमी तुम्हालाइंडी गठबंधनात चालतो? किंवा १५ मिनिटे पोलीस दूर करा मग आम्ही काय करतो ते दाखवून देऊ म्हणणारा असदुद्दीन ओवेसी तुम्हाला जवळचा वाटतो. उठ सूठ कुणाच्याही मागे इडी लावून त्रास देणाऱ्या भाजपने ह्या दोघांच्या मागे कधी इडी लावली आहे का? काय कारण असावे? सारखीच विचारसरणी आहे म्हणून? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणी तालिबान ह्यांच्या विचारसरणीत काहीही फरक नाही. संघाने कधीही मनुस्मृतीला विरोध केलेला नाही. संघाचा मनुस्मृतीला छुपा पाठिंबा आहे, मनुस्मृतीत स्त्रियांबद्दल काय लिहिले आहे माहीत करा! तालिबानी नी संघ/भाजप ह्यांची विचारसरणी एकसारखी आहे, नाहीतर महिलांचे शोषण करनारे कुलदीप सेंगर, ब्रिजभूषण सिंह ह्यांचे समर्थन सोशल मीडियावर अंधभक्ताना समर्थन करावे लागले नसते तसेच मोदी सरकारनेही त्याना वाचवायचे आटोकाट प्रयत्न केले नसते! तेव्हा भाजप/ संघ हा महिलाविरोधी नाही, मध्ययुगीन मानसिकता भाजपेयींचो नाही ह्याचे खोटे समर्थन बंद करा!

In reply to by सुबोध खरे

सुक्या 16/10/2025 - 11:21
जौ द्या हो. ह्यामुळेच आजकाल धाग्यावर कुणी फिरकत नाही. ह्यांची एकच टेप लागलेली असते. वरुन २/३ होयबा आहेत तळी उचलायला ..

In reply to by सुबोध खरे

शाम भागवत 16/10/2025 - 12:40
संघाला विरोध करण्याची (अपयशी) पध्दत १०० वर्षानंतरही चालू ठेवण्याचा ठाम निर्धार खरोखरच कौतुकास्पद आहे. ही केविलवाणी धडपड आहे असे कोणी म्हणेल. पण मी त्याला दुर्दम्य आशावाद समजतो. :)))

In reply to by शाम भागवत

मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार असे म्हणत एका तथाकथित पक्षाचे तीन पिढ्या दुकान चालले. तसेच आहे हे. संघाला विरोध करत करत अनेकांची चार पिढ्यांच्या पोटापाण्याची सोय झाली आहे- आणि कदाचित आणखी पिढ्यांच्या पोटापाण्याचीही सोय होईल.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

त्यांच्या प्रयत्नांमुळेच मुंबई महाराष्ट्रापासून तुटली नसेल! चिंता करू नका! त्यांच्या पुढच्या पिढ्याही नाही तुटू देणार! पहिलीपासून हिंदी लाडा किंवा मराठी संपवायचा कितीही प्रयत्न केला तरीही!

In reply to by सुबोध खरे

कपिलमुनी 16/10/2025 - 21:34
याची यादी करू का ? किती पवित्र करून घेतलेत ? उगा सोवळेपणाचा आव आणायचं.. मी नाय त्यातली न कडी लावा आतली

In reply to by कपिलमुनी

विवेकपटाईत 18/10/2025 - 15:42
तोपर्यंत भाजप सत्तेत आहे तोपर्यंत स्त्रियांना स्वातंत्र्य आहे. सर्वात स्वतंत्र विचारांची मुख्यमंत्र्याची पत्नी महाराष्ट्राच्या मामी आहे. केरळमध्ये अनेक भागात मुलींना शाळेत पडद्याच्या मागे बसावे लागते. मुस्लिम स्त्रियांवर अत्याचाराचे समर्थन करणाऱ्या कायद्याला सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांनी समर्थन दिले होते हा इतिहास आहे. बाकी भाजप गेल्यावर अनेक राज्यातील अनेक जिल्ह्यात शरिया कायदा निश्चित लागू होणार.

In reply to by कंजूस

गांधीनगरच्या अक्षरधाम मंदिरात सर्व पत्ता गुजराती नी इंग्रजीतच आहेत, हिंदीला त्यांनी लाथाडले आहे. काय कारण असेल?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

रामचंद्र 16/10/2025 - 22:08
तिथे महाराष्ट्रातल्यासारखे कोणी हिंदी (राष्ट्रभाषा!) समर्थक दिसत नाहीत, फडणवीसांसारखे? खरं तर या बाबतीत देशभर एकच धोरण हवं.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे (आरएसएस) रस्त्यांवर संचलन तसेच शिक्षणसंस्थांसह सार्वजनिक व सरकारी ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यावर नियंत्रण आणण्यासाठी नियम लागू करण्याचा निर्णय काँग्रेसशासित कर्नाटक सरकारने गुरुवारी घेतला. अशाप्रकारे संघाच्या कार्यक्रमांवर नियंत्रण आणणारे कर्नाटक हे पहिले राज्य ठरणार आहे.
कर्नाटक सरकारच्या या निर्णयाची चर्चा व्हायला पाहिजे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कॉमी 17/10/2025 - 14:05
जोवर लोकांचा समूह इतरांना हानी किंवा उपद्रव न पोहोचवता एकत्र येऊन काहीही करत असेल तर त्यावर बंदी घाणे चुकीचे वाटले.

In reply to by कॉमी

जोवर लोकांचा समूह इतरांना हानी किंवा उपद्रव न पोहोचवता
शांतते पत्रयात्रा, संचलन, सकाळच्या वेळी मोकळ्या मैदानात व्यायामाचे धडे असे असेल तर बंदी कोणी घालणार नाही, असे वाटते. संघ दक्ष-आरम, वाले इतके सरळ असतील आणि आहेत असे वाटते का ? तसे ते नाहीत. संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते पूर्वी घरोघरी जाऊन तरुणांना भेटून सकाळी मैदानावर व्यायामासाठी एकत्र करायचे, मग बौद्धिकं वगैरेचं हळुहळु निमंत्रण द्यायचे. संघटन आणि धर्माभिमान उभा करता करता कट्टरवादी विचारांच्या गोळ्या देऊन त्याची बुद्धी भ्रष्ट करुन आपल्या गोटात कायम राहील इतकी ती तजवीज असायची. आता माध्यमांमु़ळे लोक घरीच व्यायाम करतात. मैदानावरही आपलं स्वतंत्र फिरणे आणि व्यायाम करतांना अनेक तरुण दिसतात. आता तरूणांना गोळा करुन सकाळी मैदानावर आनण्याचा स्कोप दिसेना, तेव्हा आता तरुणांना आकर्षित करण्यासाठी शाळा महाविद्यालयाबाहेर यांनी आपली दुकाने थाटायला सुरुवात केली आहे. 'ज्वॉइन अस' च्या पाट्या घेऊन हे शाळा-महाविद्यालयाच्या बाहेर हे 'दक्ष' दिसू लागले आहेत. तरुणांना गळाला लावायचे प्रयत्न सुरु झाले आहेत. आज हे येतील उद्या आणखी कोणीतरी येतील. संघटन करण्याच्या नावाखाली ही द्वेषाची केंद्रे उभारण्याचा प्रयत्न आहे, म्हणून अशा कृत्यांना आळा घालणे गरजेचे आहे असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शाम भागवत 19/10/2025 - 11:02
तो आळा कसा घालणार हा प्रश्न आहे. त्यासाठी काय करणार? मिपावर सातत्याने याबाबत लिहील्याने संघ कमी होताना दिसत नाहीये. नवीन काही उपक्रम सुरू केला पाहिजे. त्यासाठी पूर्णवेळ वाहून घेतलेले कार्यकर्ते तयार करायला पाहिजेत. तसं काहीच होताना दिसत नाहीये.

In reply to by शाम भागवत

आग्या१९९० 19/10/2025 - 12:12
ज्या संघटनेचा पाया द्वेष आणि राजकीय हितसंबंधांवर उभा आहे, तिला शतकभरानंतरही गांधीच्या विचारांचा नाश करणे शक्य झालेले नाही — हे त्यांचे सर्वात मोठे अपयशच आहे. इतिहासाने दाखवले की हिंसा तात्पुरती यशस्वी वाटू शकते, परंतु अहिंसेच्या नैतिकतेसमोर तिचा पराभव होतो. धर्माच्या नावाखाली केलेले राजकारण लोकांमध्ये तणाव निर्माण करू शकते, समाजकारणाचे खरे काम, समतेवर आणि न्यायावर आधारित असते, हे संघाच्या धोरणांत सापडत नाही. त्यामुळे जातीय विभाजनच संघाला आतून संपवेल.

In reply to by आग्या१९९०

शाम भागवत 19/10/2025 - 12:56
देश स्वतंत्र झाल्यावर गांधीजींनी पहिला विचार मांडला होता की, आता कॉंग्रेसची गरद नाही. यास्तव त्याचे विसर्जन केले पाहिजे. हा विचार तरी पूर्णत्वास जाताना दिसतोय बॉ. ;)

In reply to by शाम भागवत

आग्या१९९० 19/10/2025 - 13:24
देश स्वतंत्र झाल्यावर गांधीजींनी पहिला विचार मांडला होता की, आता कॉंग्रेसची गरद नाही. यास्तव त्याचे विसर्जन केले पाहिजे. तेच तर म्हणतोय मी. गांधीजींचे विचार नष्ट करत नाहीत, उलट त्याचे पालनच करत आहेत. गांधीजींना मारले नसते तर गांधीजींनीच काँग्रेस विसर्जित केली असती. एकतर हत्येचे पातक माथी घेतले , आणि काँग्रेस संपवण्याचे उद्दिष्ट साधण्यात ऊर्जा घालवत बसले. गांधीजींचे विचार कसे नष्ट होणार ह्याचीच आयुष्यभर चिंता.

In reply to by शाम भागवत

आग्या१९९० 19/10/2025 - 15:16
एखाद्याला नष्ट करून त्याच्याच विचारांचे पालन करणे म्हणजे वैचारिक दिवाळखोरी. संघाच्या विचारांनी काहीही नवनिर्मिती केली नाही हा इतिहास आहे. संघ स्थापनेचा उद्देश हा राजकीय नव्हता तर कशाला एखाद्या राजकीय पक्षाचे निर्मूलन करण्याचा उद्योग करायचा? विचारात काही सुस्पष्टता?

In reply to by शाम भागवत

अभ्या.. 19/10/2025 - 19:19
अरे, तुम्हाला वेगळे मेल येते की काय? आम्हाला आले मेल एका मोठ्ठ्या दिव्याच्या फोटो बरोबर. त्यात हा निरोप आलाय वरून. . तुम्हाला काय आला मेल? घरातील मुला नातवंडांना , लहानांना आवर्जून संघ शाखांत पाठवा. संघाला गरज आहे.....

In reply to by अभ्या..

शाम भागवत 19/10/2025 - 20:35
:) संघाला आमची गरज आहे? काहीही. आम्हाला संघाची गरज आहे. २०१४ पासून छान चाललंय. यश मिळत राहिले आहे त्यामुळे निवडलेला रस्ता बरोबर आहे याची खात्री पटलीय. २०२४ ला थोडे अपयश आले. त्याबरोबर कोणावर दोषारोप न करता चुका सुधारल्या. परत यश मिळायला लागलंय. तुम्हीपण तुमची लढायची पध्दत बदललेली नसल्याने बिहार निवडणूकांत यश मिळणार हे नक्की आहे. तुमची विचार करण्याची व संघाला विरोध करण्याची पध्दत न बदलल्याबद्दल धन्यवाद. असंच महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधे लढा. म्हणजे तिथेही भाजपाचा विजय नक्की.

In reply to by शाम भागवत

रामचंद्र 25/10/2025 - 21:36
या वस्तुस्थितीकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने विरोधकांचेच नुकसान होत आहे. याउलट संघपरिवारातील विविध पातळ्यांवरील घटक बदलत्या परिस्थितीचा अंदाज घेत सतत जागरूक आणि कार्यरत आहेत.

In reply to by रामचंद्र

अभ्या.. 26/10/2025 - 00:03
वस्तुस्थितीचे सध्या सोडा वस्तूंवर पण एक सांगा प्लिज. काही जन्मापूर्वी तुम्ही संजय हस्तिनापूरकर होतात का हो? . नाही, म्हणजे दोन्ही साइड चे सर्व दृश्य अगदी रणनीती, खलबते सर्व काही स्पष्ट दिसते, कळते.. सलाम तुमच्या दूरदृष्टीला. तुमच्या हस्तिनापूर नरेसाना पण नमस्ते केलाय म्हणून सांगा.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टीपीके 17/10/2025 - 14:53
चला या गोबर युगात कुठेतरी लोकशाही जिवंत आहे, या साठी कर्नाटक सरकार चे अभिनंदनच केले पाहिजे. फक्त काँग्रेसच लोकशाही आणि संविधानाचे संरक्षण करू शकते, १९५१, १९७५, असे अनेक दाखले आहेत त्या साठी. चला आपण त्यांचे हात अधिक बळकट करूया.

In reply to by टीपीके

NiluMP 17/10/2025 - 20:40
स्वतःचे सैन्य, संविधान असताना ही काश्मिरी पंडितांना काश्मीर सोडून का पाळावे लागले. खड्यात घाला अशी वोटेबँक लोकशाही जर छत्रपती शिवाजी महाराज्याचे स्वराज असले असते तर तेव्हा आणि आताही अशी हिम्मत कोणी करू शकेल का ?

In reply to by NiluMP

अभ्या.. 17/10/2025 - 22:29
जर छत्रपती शिवाजी महाराज्याचे स्वराज असले असते तर
मग काय करावे म्हणता? महाराजांना बोलावतांय परत? व्होटबँक खड्ड्यात घालायची म्हणजे काय करायचे? आणि घातलीच तर त्यानंतर काय करायचे?

In reply to by अभ्या..

NiluMP 21/10/2025 - 13:15
जोपर्यंत वोटबँक लोकशाही आहे तोपर्यंत झोपडपट्या, घराणेशाही, सरकारी भ्रष्टाचार, धार्मिक, जातीनिहाय आरक्षण, अनुदान यातून आपली सुटका नाही आणि लोकशाही हे जिहादी मानसिकता वाल्यांसाठी नवीन शस्त्र झाले आहे (उदा. लंडन) आपल्या देशात प्रयोग सुरु झाले आहेत पण हिंदू व नेते जोपर्यंत माझ्या घरापर्यंत येत नाही तोपर्यन्त झोपलेला (एक्स-मुस्लिम त्यांना जागे करण्याचा थोडा प्रयन्त करत आहे ) आहे म्हणून मलातरी RSS आवडते. अब्रामाहिक धर्मवाल्याचं लक्ष एकच आहे संपूर्ण धरती त्याची व्हावी (चीन आणि नॉर्थ कोरिया त्याचं स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही. :-) दोन्ही देशांत लोकशाही नाही.) मी माझा वार्डातल्या वार्ड आणि पोलीस ऑफिसरला निवडून देत नाही मग नेत्यांना का निवडून द्यावे. निवडणूक सोडून इतर पद्धत शोधून काढावी आणि देश एकाद्या कॉर्पोरेट कंपनी प्रमाणे चालवावा परफॉर्म वर पेरिश. आम्ही पाच वर्ष काहीही करू शकत नाही. ज्या नेत्यांना कोणत्या वार्डात, सोसाटीत आपले मतदार आहेत याची माहिती असते त्यांना तेथे कोणते काळे धंदे चालतात याची माहित नसते असं मलातरी वाटत नाही. ज्या वार्डात नवीन झोपडट्टी बनेल तर त्या वार्डातील नगरसेवक, वार्ड, पोलीस ऑफिसर बरखास्त करावे.

In reply to by NiluMP

शाम भागवत 18/10/2025 - 08:21
२०१४ च्या लोकसभा निवडणूकीपासून मुस्लीम व्होट बँकेची ऐशी की तैशी व्हायला सुरवात झालीच आहे हो. २०२४ ला या व्होट बँकेने पूर्ण ताकदीने उसळी मारली होती. भाजपा गाफिल व संघ उदासीन राहूनही मोदींना काही हटवता आले नव्हते. भाजपाला हरविण्याचा एक मार्ग सापडल्याच्या आनंदात सर्व भाजप विरोधक होते. पण बांगला देशातील सत्तांतर व तेथे हिंदूवर झालेले अत्याचार यामुळे विरोधकांना सापडलेला मार्ग पूर्णपणे खिळखिळा झालाय. आता मुस्लीम व्होट बँकेत मुस्लिमांच्या सहाय्यानेच खिंडार पडायला सुरवात झाली आहे. सोबतीला समान नागरी कायदा व एनआरसी आहेच. मुख्य म्हणजे भारतीय मुस्लिमांत ७५ टक्के मुस्लिमांना या ना त्याकारणाने पाकिस्तानचे प्रेम असते. पण पाकिस्तानचे जसे तुकडे पडायला लागतील तसतसं हे प्रेम ओसरत जाईल. तेंव्हां २०२९ पर्यंत मोदी व संघ विरोधक गाफील असलेले बरे. संघ बदलला नसल्याचे त्यांना वाटत राहाणे हेच फायद्याचे आहे. म्हणजे ते द्वेषमूलक टिका करण्यातच धन्यता मानत राहून संघविरोधात प्रत्यक्ष कार्य करायचे विसरून जातील.:) सध्यातरी मोदींना पर्याय म्हणून राहूल, ममता, अखिलेष, शरद पवार वगैरेंना जनता निवडेल असं वाटत नाहीये.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विवेकपटाईत 18/10/2025 - 15:48
रस्त्यावर पथसंचलन करण्याबाबत नियम न्यायालयात टिकणार नाही. सार्वजनिक जागेत बिना ध्वज लावता शाखा लागेल. फुटबॉल खेळायला बंदी लागू होत नाही. 1975 च्या इमर्जन्सी मध्येही शाखा अशाच लागत होत्या.

फक्त अफगाणिस्तानच नाही तर भारताने बऱ्याच देशांबरोबरचे संबंध तोडायला पाहिजे. अमेरिका : इराक, सिरिया इत्यादी देश उध्वस्थ केले. हिशोबच केला तर कमीत कमी लाखो जीव तरी घेतले असतील ह्या देशाने. अफगाणिस्तान सोडता सोडता केवळ संशयामुळे एका कुटुंबावर बॉम्ब फेक केली होती. इंग्लंड : अमेरिकेच्या प्रत्येक पापात सहभागी असणारा देश. रशीया : भारताला मदत केली म्हणून कांय झालं. ना लोकशाही ना इतर देशांच्या सिमेचा सन्मान. सौदी : ह्या देशात महिलांचा सन्मान कमी होतो. चीन : जागतिक कायदे हा देश मनात नाही. वरून गलवान वगैरे भागात खोड्या आतातच. अशी बरीच यादी करता येईल. भारताने geopolitics का कांय त्या भानगडीत न पडता एकेका देशानंबरोबकरचे संबंध तोडायला पाहिजे. इस्राएल ने आपल्याला बऱ्याच कठीण प्रसंगात मदत जरी केली असली तरी त्याच्यापासून आपण दूर राहायला पाहिजे. जवळ जवळ पासष्ट हजार लोकांची कत्तल केली. सर्व गुण संपन्न देश शोधायला पाहिजे आणि मगच वकिलात इत्यादी गोष्टी केल्या पाहिजे. पृथ्वी वर असा कोणता देश मिळाला तर ठीक नाही तर पर ग्राहवार शोध घेतला पाहिजे.

In reply to by कंजूस

कंजूस काका, भाजपच्या आयटी सेलने सात वर्षापूर्वी राहुल गांधी यांना बदनाम करण्याचे जे काही असत्याचे प्रयोग केले त्यातलाच तो एक भाग होता. बघा हा व्हीडीयो. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे 21/10/2025 - 17:15
व्हिडीओ तील शेवटचं वाक्य एकदा परत नीट ऐकून घ्या! जे बिल रा गा मोदींना चिकटवणार होता ते त्यालाच चिकटलं! हा माणूस बेताल बडबड करत असल्यामुळे लोकांना हे तो बोलू शकतो हे सहज पटलं सुद्धा! शेवटी पप्पू तो पप्पू च राहणार! त्याच्यात काही लोकांना देशाचं भविष्य दिसतं त्यांच्या अकलेची कीव करावी का त्यांच्या मूर्खपणा ला हसावं हे कळत नाही!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कंजूस 21/10/2025 - 18:34
पाहिला विडिओ. राहुलला असं म्हणायचं असेल की आलू की फसल लेने वाले किसान सोना कमा सकते हैंl

स्वधर्म 22/10/2025 - 02:59
नाशिकच्या आयटीआय मध्ये पौरोहित्याचा कोर्स सुरू होत आहे. कुंभमेळा येऊ घातलाय तेंव्हा पुरोहितांची कमतरता भासणार म्हणून शासनाने आधीच तयारी सुरू केली आहे असे भाजपाचे प्रवक्ते म्हणत आहेत. पण तिथले महंत मात्र या गोष्टीला विरोध करत आहेत. त्यांनी दोन रोचक मते मांडली आहेतः १. त्यांना व सध्याची पुरोहित संघटना, धर्मातील ज्ञानी लोक वगैरे आहेत त्यांना न विचारता हे केले जात आहे. २. सर्व समाजातील लोक फक्त ब्राम्हणाला सहज दक्षिणा देतात. इतर समाजाचा पुरोहित असेल तर त्याला यात अडचण येईल. आता शासन कसा मार्ग काढेल ते पहायला लागेल.
नमस्कार, पाऊस पडून गेला आहे. निसर्गाने हिरवा शालू नेसला आहे. सगळीकडे हिरेवेगार डोळ्याला सुखावणारे चित्र वाटावे असा निसर्ग नटला आहे. नद्या, आपला तीव्र आवेग आवरुन हळुहळु संथ गतीने रमत गमत वाहात आहेत. 'नदीला पुर आलेला, कशी येऊ कशी येऊ ?' असा प्रेमभावनेचा काळ आता सरला आहे. जीवन वास्तवावर आलं आहे, जगण्याची धावळपळ सुरु आहे. शाळा-महाविद्यालयांना सुट्या लागणार आहेत. मिपावर दिवाळी अंकाची लगबग सुरु आहे. मिपावर पाऊस-पाण्यामुळे ऑक्टोबरच्या चालू घडामोडीचा धागा दिसेना तेव्हा, कोणीच पुढाकार घेत नाही म्हटल्यावर गप्प राहील तो मिपाकर कसला म्हणून ऑक्टोबर नोव्हेंबरच्या चालू घडामोडीचा धागा.