विडंबन

सांगू काय, सांगू काय?

( "एका माणसाची दाढी केवढी लांब सांगू काय ...." या एका बालगीताच्या चालीवर खालील विडंबनात्मक कवीता वाचावी. वरील बालगीत फाउंटेन कंपनीच्या च्या एका बालगीतांच्या व्हि‌. सी. डी. मध्ये आहे. ते 'यु ट्युब' वर शोधले तरी मिळू शकेल. दैनंदिन जीवनातील, राजकारणातील विविध ठिकाणी विरोधाभास दिसतो, त्यावर उपहासात्मक कविता मी लिहीली आहे.)

एका मॉडेलची वस्त्रे केवढी छोटी, सांगू काय ?

सांगू काय, सांगू काय, सांगू काय ?

एवढी छोटी, एवढी छोटी की,

रॅंपवर चालतांना गळून जाय....

सांगू काय, सांगू काय, सांगू काय ?
---

एका चॅनेलची बातमी इतकी खरी, सांगू काय?

सांगू काय, सांगू काय, सांगू काय ?

इतकी खरी, इतकी खरी की,

राजा हरीश्चंद्रही लाजून जाय ...

सांगू काय, सांगू काय, सांगू काय ?

---
एका क्रिकेटपटूच्या खेळाची महती, इतकी मोठी सांगू काय?

सांगू काय, सांगू काय, सांगू काय ?

इतकी मोठी, इतकी मोठी की...

अनेक अभिनेत्रींशी त्याची काडी जोडून, मोडून जाय ...

सांगू काय, सांगू काय, सांगू काय ?
---

एका चित्रपटाचे गाणे एवढे आक्षेपार्ह सांगू काय?

सांगू काय, सांगू काय, सांगू काय ?

एवढी आक्षेपार्ह एवढी आक्षेपार्ह की,

सगळीकडे जाळपोळच होवून जाय ...

सांगू काय, सांगू काय, सांगू काय ?
---

एका अभिनेतत्रीचा फोटो एवढा अश्लील सांगू काय?

सांगू काय, सांगू काय, सांगू काय ?

एवढा अश्लील एवढा अश्लील की,

सगळीकडे वर्तमानपत्रात पुन्हा पुन्हा छापला जाय ...

सांगू काय, सांगू काय, सांगू काय ?
---

एका शहरातील रस्त्यावरचे खड्डे इतके मोठे सांगू काय?

सांगू काय, सांगू काय, सांगू काय?

इतके मोठे, इतके मोठे की,

एखादा माणूस त्यात सहजच मावून जाय....
---

शहरांतील खड्ड्यांबाबत सरकार एवढे उदासीन सांगू काय?

सांगू काय, सांगू काय, सांगू काय?

एवढे उदासीन , एवढे उदासीन की,

'लीटमस पेपरच' रागा रागाने लाल होवून जाय....

---
एका मॉडेलच्या चपला केवढया उंच, सांगू काय ?

सांगू काय, सांगू काय, सांगू काय ?

एवढ्या उंच, एवढ्या उंच की,

रॅंपवर चालतांना मॉडेलच पडून जाय....

सांगू काय, सांगू काय, सांगू काय ?

----

खरडवाद...

मागच्या अनुभवावरून
ठरवलं होते,
आता पुन्हा नाही...
वाचन मात्र आहे हे असच राहायचं...
पण हा काथ्याकूट!
हे धागे!
हा खरडवाद!!
करतात निश्चयाला दुबळे
कदाचित आता सगळे नीट होईल...
पुन्हा एकदा
बडवला कळफलक
खरडून टाकल्या एक दोन खरडी
एक नवी सुरवात...
एक नवा खरडवाद...

केशवसुमार

आमची प्रेरणा

(आज अचानक गाठ पडे)

सक्काळी सक्काळी ग्रासस्टांझाजचे अफलातून इडंबन, त्यावरच्या मुसुंच्या एक्सपर्ट कमेंट्स आणि मग मिभोकाकांचे नाडी शब्द न आणता करायच्या विडंबनाचे आव्हान असा तीनकलमी मसुदा पुढे असल्यावर देरी किस बात की? Wink

आज अचानक गाठ पडे

भलत्या वेळी भलती खेळी
असता तन भलतीच कडे

बोटे वळता सहज कुठेतरि
एकाएकी गाठ पुढे

नसता मनिमानसी कसा हा
अवचित मेला टाका भिडे

दचकुनि जागत धाव नीजेतच
भरभर कपडेपट उघडे

निसटुन जाई लघुशंका क्षण
सदा बरी ती चेन गडे!

-चतुरंग

नाडि वाचुनी अति मी दमले, थकले रे शशिकांता!

करुण रस म्हटलं आहे, पण तो फारच पाणचट तर्रीसारखा वाटतो. हे काव्य बरोबर साधण्यासाठी उद्विग्नता, विमनस्कता, थकवा, हातबल्य असे अनेक रस मला माझ्या आत्म्यातून पिळून काढून त्यात घालावे लागले. (गदिमांच्या प्रतिभेला वंदन करून. त्यांच्या ताजमहालाला वीट लावण्याचं धार्ष्ट्य केवळ नाडीकथांचा वीट आल्यामुळेच झालं. मूळ कविता खाली दिलेली आहे)

नाडि वाचुनी अति मी दमले, थकले रे शशिकांता! || ध्रु ||

निलाजरेपण कटी नेसुनी, निसुगपणाचा शेला
महर्षिस्तुतीचे कुंडल कानी, स्थितप्रज्ञा भालाला
नाडीजय-शतधाग्यांचा मज, कंठी फास लावीता || १ ||

अर्धांगाचा शाप कुणाला, प्रभुदर्शन दासनला
पूजाविधिची ऐकुन पथ्ये, पुत्रप्राप्ती कोणाला
नाडी पॅकेट ठो ठो करुनी, नक्षलांस पळवीता || २ ||

श्रद्धेच्या तू घेता गिरक्या, अंधपणा की आला
तर्काचा तुज तोल कळेना, कान बंद तू केला
संस्थाळांच्या इंद्रायणि तू, ओकशी नाडीगाथा || ३ ||

षष्ठाब्जांच्या जिवनक्रमाचा, इतिहास लिहिलेला
खरडता या ताडपत्रिला, हात कुणाचा दुखला?
किति मोठा हा ज्ञानकोष जो जालाला नमवीता? || ४ ||

उत्तर देऊनि 'बिका'ट प्रश्नी, मुख्य प्रश्न नुत्तरला
विज्ञानाचा 'प्रकाश' का घ्या, जर 'तात्या' पाठीला
'तुका म्हणे' मी हात टेकले, 'राघव'शरणही येता || ५ ||

मूळ कविता

नाच नाचुनी अति मी दमले थकले रे नंदलाला ! || ध्रु ||

निलाजरेपण कटिस नेसले, निसुगपणाचा शेला
आत्मस्तुतीचे कुंडल कानी, गर्व जडविला भाला
उपभोगांच्या शतकमलांची, कंठि घातली माला || १ ||

विषयवासना वाजे वीणा, अतृप्ती दे ताला
अनय अनीती नूपुर पायी, कुसंगती करताला
लोभ प्रलोभन नाणी फेकी, मजवर आला-गेला || २ ||

स्वतःभोवती घेता गिरक्या, अंधपणा की आला
तालाचा मज तोल कळेना, सादहि गोठुन गेला
अंधारी मी उभी आंधळी, जीव जीवना भ्याला || ३ ||

))तुझ्या रेशमी केसांनी((

संदर्भ: विजूभाऊचा हा मूळ धागा: http://www.misalpav.com/node/11426#comment-182034

रेशमी केसात तुझ्या जीव माझा गुंतला
धुंद या काळ्या बटा, अन प्राण घेई मोगरा

का आता गमजा करी? तारका नभातल्या
भेटीत पहिल्याच तुझ्या, चंद्रमाही लाजला

सोडू कसा हा नाद मी, सांग तू माझ्या फुला,
प्रेमात तुझ्या भारावलो, सूर ऐसा लागला

होतो खुळा, आहे खुळा, भान न त्याचे मला
जादू भरले नैन तुझे हे, ठेवती न माझा मला,

कळले मला ग प्रेम ते, उमजले का सांग तुला,
जेव्हा तुझ्या हातास अलगद, हात माझा स्पर्शला

(....पुन्हा पुन्हा!)

कधी कधी प्रेरणा एखादीच कविता असते पण काहीवेळा कवितेसोबतच इतरही धाग्यांचा दंगा एवढा भरपूर असतो की समजत नाही नेमकी प्रेरणा कोणती...जाऊ दे प्रेरणेची काळजी 'मंगेशाला'! Wink

वाळलाच तो चुना लावतो पुन्हा पुन्हा
जर्द पान लाल हे चघळतो पुन्हा पुन्हा

चांदणी दिली कुणी लेखनास ठाव ना
लेख मग उगाच का हरवतो पुन्हा पुन्हा

लेख काव्य पाडले मी लगेच ऑर्कुटी
का मिपाकरांवरी मी भेकतो पुन्हा पुन्हा

माज ही जुनाच शिरजोर आज मी पुन्हा
लोक हुच्च पेटती पोळतो कुला पुन्हा

हां...कबूल उंटचाल जन्मजात लाभली
मालकास मी थुका लावतो पुन्हा पुन्हा

तोंड पाडुनी उभे काव्य मजपुढे सदा
'रंग'तेच खाज ही खरडतो पुन्हा पुन्हा

चतुरंग

जातो म्हणतोस.....

जातो म्हणतोस..हरकत नाही
एक पेग पेऊन जा

चपला घालतोस..हरकत नाही
एक जोडा खाऊन जा

नियम मोडतोस..हरकत नाही
एक फटका खाऊन जा

रडतो आहेस..हरकत नाही
एक रुमाल घेऊन जा

पुन्हा येतोस..हरकत नाही
एक डायपर घेऊन ये

पुन्हा लिहितोस??..हरकत नाही
कोणी मारल्यावर रडु नकोस

मिसळचाट पाहिजे..हरकत नाही
खायला घातल्यावर ओकु नकोस

काय्..लाल झाली..हरकत नाही
पुन्हा मी काय करतोस विचारु नकोस

एक चोरलेली कविता.

(मिपादिन?: नवेच आहे शत्रू नव्यांचे!! प्रस्थापित नाहीत.)

डिस्क्लेमर्सः
१. कृपया ह. घेणे नाहितर जोडे तयार आहेत.
१.अ. कुणाचे जोडे तयार आहेत हे विचारू नये, अपमान होईल.
२. सदर विडंबन हे विरंगुळा म्हणून लिहीले आहे. वरचे दोन शब्द काही लोकांच्या नजरेआड जाण्याची शक्यता आहे म्हणून हे ही लिहीले आहे.
२.अ. प्रेरणा ... लिहायलाच हवी का? बरं, वाङ्मयचौर्याचा आळ नको, ही घ्या.
३. नीरजाकडून एक कल्पना (न विचारता) उधारीवर आणली आहे, तिचे आभार.
४. सदर विडंबन आम्हाला आव्हान देणार्‍या श्री.श्री. राजेशबाबा पूजावाले घासकडवी यांना सादर समर्पण!

साल २११०

गणेशचतुर्थी हा जागतिक मिपा दिन म्हणून जगभरात साजरा केला जातोय.

विविध फतव्यांच्या चर्चा होताहेत. प्रस्थापितांविरुद्ध जास्तीत जास्त बोलले म्हणजे मिपा दिन खऱ्या साजरा झाला असे समजले जात आहे. पण, प्रस्थापित हे नव्यांचे कधीच शत्रू नव्हते, नाहीत आणि यापुढेही नसणार आहेत.

नव्यांचे खरे शत्रू नवे(पण)च असते.

नव्यांचे एकमेकांतील नातेसंबंध बघितल्यास असे दिसून येते की, नवे-नवे, नवे-संपादक, नवे-मालक... याप्रकारची नाती सगळ्यात बदनाम नाती आहेत. टोकाच्या शत्रूत्त्वाची नाती आहेत.

धागे लिहून संपादन सांभाळणाऱ्या संपादकाला "समजून न घेणारा" हा नवाच असतो. प्रस्थापित किंवा टारझन नाही.

हा जर प्रस्थापित-नव्या सदस्यांचा वाद मानला, तर मग मालक-प्रस्थापितांचे ही एकमेकांशी का पटत नाही? ते तर एकाच काळातले आहेत.

तसेच प्रस्थापित हे नव्यांकडे टार्गेट म्हणून बघतात अशी ओरड केली जाते. ते खरे नाही. नवेच बऱ्याच अंशी याला जबाबदार आहे. धागा क्षेत्रात लेख लिहीताना नवेपणाच्या आधारे नवे आपले एकोळी धागे पाडून टाकतात, प्रतिसाद पदरी पाडून घेतात. खरडफळ्यावरचे प्रस्थापितसुद्धा लाजतील अशा खरडी नवे एकमेकांना आणि धागे मुख्य पानावर लिहीत असतात.

नवेच स्वत:ला अशा पद्धतीने पेश करत आहेत की प्रस्थापितांचा दृष्टीकोन हा टवाळीचाच राहील!!

प्रतिसाद मिळतात म्हणून नवेच एकोळी धागे टाकतात, निरर्थक खरडी टाकतात. त्यांना नको असेल तर ते असे टवाळखोर धागे नाकारू शकतात. असे टवाळ्खोर प्रतिसाद थांबवायचे असतील तर कोणत्याच नव्या-जुन्याने अशी प्रलोभने/धागे/खरडी नाकारल्या पाहिजेत. नाहितर याला दुटप्पीपणा किंवा दांभिकपणा म्हणावे लागेल. कारण आपल्याला वाटेल तसे स्वैर वागायचे आणि काही झाले की प्रस्थापित आणि कंपूबाजीला दोष देवून मोकळे.

आणि प्रत्येक क्षेत्रात प्रस्थापितांच्या बरोबरीने समानता पाहिजे आणि आरक्षण पाहिजे. समानता पाहिजे असेल तर मग नवे आहेत हे बोलायला कशाला हवे? कारण फतव्यांबाबतही असमानता आहे. सगळे फतवे आवडीच्यांच बाजूने आहेत.

फतव्यांमुळे आजकाल असे झाले आहे की, एखादा कंपूत विचारी आणि टवाळ सगळेच लिहीणारे, तर एखाद्या कंपूबाहेरच्या एखाद्याचे बरेच प्रतिसाद गायब. प्रतिसाद उडवताना संपादकांनी हा विचार जरूर करावा.

मिपादिनानिमित्त नव्यांनी प्रस्थापितांचा विचार करावा आणि प्रस्थापितांवरचा अन्याय दूर करावा.

(नमस्कार वाचकहो, आणि श्री. मनमोहन सिंग)

नमस्कार वाचकहो, आणि श्री. मनमोहन सिंग

मागील लेखनात वाचकांस आधीच अवगत केल्याप्रमाणे आपल्या महान देशातल्या रस्त्यांवर रहदारी सुरळीत चालवण्याच्या नावाखाली हुकूमशाही चालू आहे. मी गाडी चालवत असताना माझ्या पुढच्या गाडीला हिरवा सिग्नल होता व तिला तसेच पुढे जाऊ देण्यात आले. मात्र मी तिथपर्यंत पोचताच दुष्ट सिग्नल लाल झाला. मी या माझ्याविरुद्धच्या कूटनीतीला न जुमानता तसाच पुढे गेलो तर पोलिसांनी मला पकडले व दंड केला. या अत्याचाराबद्दल मी रस्तोरस्ती बोंब ठोकल्याबद्दल काही नागरिकांनीही त्यांचे कान किटल्याची तक्रार केली. मी पोलिसांकडे या अन्यायाविरुद्ध तक्रार केली तर मला तुरुंगात टाकण्याची धमकी देण्यात आली आहे.

माझ्या मागील अर्जावर हि प्रतिक्रिया दिली ---

पण मला वाटत कि काही माणस विशेषत: आपले पोलिस अधिकाराचा गैर फायदा घेऊ पाहत आहेत.

"वाहतुकीचे नियम पाळणे हा इथला कायदा आहे"

असे बजावण्यात आले.

अगदी खरे! नेहमी असेच बजावण्यात येईल..

हि यांची भाषा !!

हीच भाषा यापुढेही राहील!

मला क्षमा असावी पण पोलिसांनी माझी माफी मागितल्या खेरीज

शहराचे पोलिस/नगरसेवक/मंत्री कुणाचीही माफी मागणे लागत नाहीत व कुणालाही कुठलेही स्पष्टीकरण देणे लागत नाहीत/ देणार नाहीत!

मी या पुढे सायकल चालवण्याशिवाय कुठचेही वाहन या शहरात चालवणार नाही.

इथे काय चालवायचे आणि काय नाही, ही पूर्णत: आपली मर्जी आहे!

व माझ्यावरचा अन्याय मोठ्ठ्याने कर्ण्यावर ओरडून जनतेला सांगेन.

पोलिस/नगरसेवक/मंत्री यांच्या विषयी आपले काहीही म्हणणे असल्यास ते कृपया योग्य मार्गाने मांडावे. जमल्यास उत्तर दिले जाईल..!

जर अजून दंगामस्ती करून लोकांना आवाज करून उपद्रव केलात तर, आवश्यक वाटल्यास तुमचे लायसन्स जप्त होईल अगर तुम्हाला तुरुंगात टाकले जाईल याची नोंद घ्यावी..
फौजदार

»

असो
अशा कुटनीती व अरेरावीच्या अशा असभ्य भाषेला मी यत्किंचित ही भीक घालीत नाही आणि घालणार ही नाही.
हा देश म्हणजे माझी आई आहे, आणि तो देश, त्यातील शहरं व रस्ते यावर जसा त्यांचा तसाच माझा हि हक्क आहे.
तुम्ही माझे लायसन्स जप्त केले तर मी काय गाडी चालवणे सोडून देईन का?................................................ मी दुस-या शहरात जाऊन बेदरकारपणे गाड्या हाकेन.
हे यांचे माझ्या बरोबरचे वर्तन मी लोकांच्या समोर आणणे हेच मी या वेळी करीत आहे. या साठी माझे लायसन रद्द करीत असतील तर करावे, खुशाल करावे.
तरीही माननीय श्री मनमोहन सिंग साहेब यांनी मला पुन्हा मायेने मार्गदर्शन करावे अशी विनंती मी त्यांचा वयाला मान देऊन करीत आहे. मी माझ्या मोठ्यान बरोबर सल्लामसलत करण्यास व यांची मर्जी संपाद्ण्यास सदैव तयार आहे. मी वाट पहात आहे ती तुमच्या सकारात्मक प्रतिक्रियेची
........
तुम्ही उद्धट ठरवलेला
ड्रंकेश गाडीचालनकर

मराठी माणूस म्हणजे अशिक्षित, दारूबाज, आळशी, गावठी ???............... का???

नमस्कार मित्रहो,

आमच्या ऑफिस मध्ये घडलेला एक प्रसंग सांगतो.
हल्लीच मी माझे टी. वाय. पूर्ण केले व नोकरीच्या शोधात होतो, एका प्रतिष्ठित कंपनीमध्ये जॉबला हि लागलो, पण ट्रेनिंग च्या वेळी आम्हाला इंग्रजी व्याकरण, गणिती, यु . के एस्सेंट विषय होते. एका फिमेल ट्रेनर चा असा समज होता (अर्थात गैरसमज) कि मराठी मुले वर्नाक बोलतात,
तिने तसे बोलून हि दाखवले. सगळ्या उमेदवारांना एक पेसेज दिला व वाचायला सांगितले, आमच्या पैकी माझ्यासकट ब-याच मराठी मुलांनी तो पेसेज ऑफिशियली यु. के . असेंट मध्ये वाचून दाखवला व तिचा गैरसमज दूर केला. पण इतर मुलांनी १-२ जण वगळता कुणाहि अमराठीस तो धड वाचता हि आला नाही .
मला सांगायचे आहे कि इतर लोकांनी मराठी माणूस म्हणजे अशिक्षित, दारूबाज, आळशी, गावठी का ठरवलेला आहे ?
कामवाली बाई मराठीच का असते?
मराठी नवरा दारू पिऊन आपल्या बायकोला मारहाण करतो हे प्रत्येक हिंदी व दुर्दैवाने मराठी सिरिअल्स मध्ये का दाखवले जाते?
मराठी माणूस इंग्रजीत अक्षम आहे असे का भासवले जाते?
एम एन सी फर्म मध्ये मारवाडी,जैन, गुजराती मराठी माणसाकडे तिरक्या नजरेने का बघतात?
विधर्भात शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करतो. पण हिंदी न्यूज चानेलचे संपादक प्रभू चावला, आमचे माननीय कृषी मंत्री त्याला दारूबाज आळशी का म्हणतात?

जर उत्तर सापडेल तर जरूर कळवा!!

मला मराठी असल्याचा मनापासून गर्व वाटतो !!