पुलंचं ,पुढारी पाहिजे
आमच्या कोल्हापूरात सध्या महापालिकेच्या निवडणुका चालू आहेत. माहोल मस्त
रंगलाय.८१ जागा साठी निदान ५००/६००जण रिंगणात आहेत .प्रत्येकाला पुढारी व्हायचंय.
बहुतेकाना ,जनतेचं हीत ,शहराचा विकास ,सोई ,सुविधा मध्ये स्वारस्य नसतं .कांही लाख ते
कोटी च्या,खर्चाच्या तयारीनं ऊमेदवार मैदानात ऊतरतात ते जनतेचा पान्हा फुटलाय म्हणून
नव्हे किंवा पैसा ऊतु चाललाय म्हणूनहि नव्हे,ती असते गुंतवणूक ,थोडं फार प्रकाश झोतात
राहायची हौस आणि जमलंच तर थोडं कामहि करायचं इत्यादी इ . अनेक हेतू मनात धरून केलेली
चळवळ. कोणतीहि स्थानिक संस्था त्याला अपवाद नाही.असो.