मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(मातीचे पाय - मोकलाया वर्जन)

गड्डा झब्बू ·

एखाद्या कवितेला विनोदी करायचं असेल तर मोकलाया मोल्ड फिट आणि हिट आहे. :) सं - दी - प

एखाद्या कवितेला विनोदी करायचं असेल तर मोकलाया मोल्ड फिट आणि हिट आहे. :) सं - दी - प
काव्यरस
प्रेर्ना - मातीचे पाय पयन स्प्र्शुन अले ते हत मलले होते लक्क उमग्ले तेवहा ते पय मतिचे होते मि केवल पहत होतो पयन्च्य खल्चि धुल ति ललतस लववि हे एकच मथि खुल मि इथ्वर पहुन अलो पौल्खुना विर्नर्या अधि कुन्वत, मगुन कप्ति विकत हस्नर्या अत पुन्ह चलवे पुधे, कि परत फिर्वे? सोस न-लयक पयन्चे पुसुन अव्घे तकवे? प्रेमल श्ब्दन्चि ओल मनत र्झिपत नहि व्हवे नत्मस्त्क पयहि दिसत नहि ते सरेच निगुन गेले जे पय दरवे सुच्ले मतिचे पत मत्कट मगे मज्यसह उर्ले टंकनीक चमनगोटा दाढिमिशि श्निवार ०८/०७/२०२३

(बार हो)

प्रसाद गोडबोले ·

अभ्या.. 22/03/2018 - 16:00
जब्बरदस्तच. . बादवे हा व्हाटसप कंपू ट्रेड मार्क का आहे म्हणे? कसले ट्रेडिंग करता आपण?

नाखु 22/03/2018 - 20:09
सांप्रदायिक काव्य दिसते आहे शिलकीतला बाकीचा साक्षीदार नाखु

अभ्या.. 22/03/2018 - 16:00
जब्बरदस्तच. . बादवे हा व्हाटसप कंपू ट्रेड मार्क का आहे म्हणे? कसले ट्रेडिंग करता आपण?

नाखु 22/03/2018 - 20:09
सांप्रदायिक काव्य दिसते आहे शिलकीतला बाकीचा साक्षीदार नाखु
लेखनविषय:
प्रेरणा : यारहो ... दादाश्रींची विनम्र माफी मागुन ..... अर्ज़ किया है .... ह्या उन्हाचा जोर आहे वाढलेला यारहो शोधुया नजदीक साधा एक बियर बार हो ड्रॉट ज्या त्या ब्रॅन्ड्ची तिथलीच बॉटल चांगली पण अता चालेल काही फक्त असु दे गार हो मागवा चकली चना अन हाफ चीकन तंदुरी कावळ्यांना भूक आहे लागलेली फार हो ती म्हणाली सोड तू जमणार नाही आपले दावले "जमवून" मग "ठरवून" वारंवार हो एकदा केसांस वेडे मोकळे सोडून बघ नेत्रसुख असती गडे हे झाकले उभार* हो कोण तो चु$@ भिकारी पेग अर्धा सांडतो वाटते होईल ह्याचा आज युनुस वकार हो माँक कुठला? कोण मल्ल्या?

मी अभंगाची तुक्याच्या एक पंक्ती जाहलो!

सत्यजित... ·

रुपी 20/06/2017 - 00:58
छान रचना. फक्त या पंक्तींचा अर्थ बाकी रचनेत संदर्भ मला समजला नाही.. "मी लपंडावात माझे राज्य केले खालसा मीच पहिली,मीच दुसरी,मीच तिसरी जाहलो!"

सत्यजित... 21/06/2017 - 00:14
'काफिया' अर्थात गझलेच्या शेरांतील 'यमक' साधणारा शब्द! उदा.नवीन,दीन,लीन,मलीन ई. काफियांचा विचार केला असता,यांत एक समान स्वरचिन्ह (अलामत),'ई'+ न =ईन असा एकसमान उच्चार होतो आहे! थोडक्यात, काफियांमध्ये केवळ अलामतच यमक साधत असते,ते स्वर-काफिये! ('अ'कारान्त स्वरकाफिया मात्र गझलेत वापरत नाहीत!) उदा.वरील रचनेतील, वारी,पंक्ती,ओवी ई. काफियांमध्ये, केवळ शेवटचा 'ई' हा स्वरच यमक साधतो आहे!

सत्यजित... 21/06/2017 - 00:22
धन्यवाद रुपी,प्राची अश्विनी! रुपी यांनी उल्लेखिलेल्या शेराबद्दल... गझलेचा प्रत्येक शेर स्वतंत्रपणे वाचला जावा असे अपेक्षित असले तरीही,वरील शेर,ईतर शेरांनी साधलेल्या एका समेस तोडतो आहे असे मलाही वाटलेले! हा शेर या गझलेत देवू नये असाच विचार होता,मात्र गझल पोस्ट करताना,तो खोडायचा राहून गेला!

प्रत्यक्ष तुका ना मी पाहिला होता ना ऐकला होता मात्र विष्णुपंत पागनीसांचा 'संत तुकाराम' मी पाहिला होता 'प्रत्यक्षाहुनी प्रतिमा सुंदर' या वचनाचा अर्थ तेव्हाच मी जाणिला होता

रुपी 20/06/2017 - 00:58
छान रचना. फक्त या पंक्तींचा अर्थ बाकी रचनेत संदर्भ मला समजला नाही.. "मी लपंडावात माझे राज्य केले खालसा मीच पहिली,मीच दुसरी,मीच तिसरी जाहलो!"

सत्यजित... 21/06/2017 - 00:14
'काफिया' अर्थात गझलेच्या शेरांतील 'यमक' साधणारा शब्द! उदा.नवीन,दीन,लीन,मलीन ई. काफियांचा विचार केला असता,यांत एक समान स्वरचिन्ह (अलामत),'ई'+ न =ईन असा एकसमान उच्चार होतो आहे! थोडक्यात, काफियांमध्ये केवळ अलामतच यमक साधत असते,ते स्वर-काफिये! ('अ'कारान्त स्वरकाफिया मात्र गझलेत वापरत नाहीत!) उदा.वरील रचनेतील, वारी,पंक्ती,ओवी ई. काफियांमध्ये, केवळ शेवटचा 'ई' हा स्वरच यमक साधतो आहे!

सत्यजित... 21/06/2017 - 00:22
धन्यवाद रुपी,प्राची अश्विनी! रुपी यांनी उल्लेखिलेल्या शेराबद्दल... गझलेचा प्रत्येक शेर स्वतंत्रपणे वाचला जावा असे अपेक्षित असले तरीही,वरील शेर,ईतर शेरांनी साधलेल्या एका समेस तोडतो आहे असे मलाही वाटलेले! हा शेर या गझलेत देवू नये असाच विचार होता,मात्र गझल पोस्ट करताना,तो खोडायचा राहून गेला!

प्रत्यक्ष तुका ना मी पाहिला होता ना ऐकला होता मात्र विष्णुपंत पागनीसांचा 'संत तुकाराम' मी पाहिला होता 'प्रत्यक्षाहुनी प्रतिमा सुंदर' या वचनाचा अर्थ तेव्हाच मी जाणिला होता
लेखनविषय:
मी न दोहा जाहलो वा मी न ओवी जाहलो मी अभंगाची तुक्याच्या एक पंक्ती जाहलो! मी जरी आलो न पायी दर्शनालाही तुझ्या मीच विठ्ठल,मीच रखुमा,मीच वारी जाहलो!

अँड व्हॉट दे सेड ? हॅप्पी न्यू यीअर !! ; ओह मिपाकर हॅप्पी न्यू यीअर !! बरं का ! हॅप्पी न्यू यीअर !!

माहितगार ·
क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग स्वप्नात झाले होते पटाईत आमचे (पटाईतांची पटाईतपणे माफी मागून!) पंतप्रधान मोदींचे सचीव !! :) क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग त्यांनी विचारले गेले वर्ष भर काय केले ? ओबामां फोनु आला डू यु नो अँड व्हॉट दे सेड ? हॅप्पी न्यू यीअर !! ओह मिपाकरांना आमचा निरोप द्या ओह मिपाकर हॅप्पी न्यू यीअर !!

पायजमा

जव्हेरगंज ·

धन्य झाले मिपा, दिवस हा असाही उगवला फडताळ्यातल्या पैठणीचा पायजमा झाला! मस्त झालेय विडंबन!! पायजम्याच्या चटेरी पट्ट्यांनो आज्ज्याला माझा"ही" साष्टांग सांगा ____/\____

गावरान 02/10/2015 - 03:31
तुमच्या माहितीकरता मूळ कविता पैठणी फडताळात एक गाठोडे आहे;त्याच्या तळाशी अगदी खाली जीथे आहेत जुने कपडे, कुंच्या,टोपडी शेले शाली त्यातच आहे घडी करुन जपून ठेवलेली एक पैठणी नारळी पदर,जरी चौकडी,रंग तीचा सुंदर धानी माझी आजी लग्नामध्ये ही पैठणी नेसली होती पडली होती सार्यांच्या पाया हाच पदर धरुन हाती पैठणीनी अवती भवती दरवळणारा सूक्ष्म वास, ओळखीची…अनोळखीची…….जाणीव ग़ूढ आहे त्यास धुप..कापूर….उद्बत्यातून ल जळत गेले कीती श्रावण पैठणीने या जपले एक तन एक मन… खस-हीन्यात माखली बोटे पैठणीला केंव्हा पुसली शेवंतीची, चमेलीची आरास पदरा आडुन हसली वर्षामागून वर्षे गेली,संसाराचा स्राव झाला, नवा कोरा कडक पोत एक मऊपणा ल्याला पैठणीच्या घडीघडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले अहेवपणी मरण आले,माझ्या आजीचे सोने झाले कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवटाळून मऊ-रेशमी स्पर्शामधे आजी भेटते मला जवळून मधली वर्षे गळून पडतात,काळपटाचा जुळतो धागा पैठ्नीच्या चोक्ध्यानो आजीला माझे कुशल सांगा……

धन्य झाले मिपा, दिवस हा असाही उगवला फडताळ्यातल्या पैठणीचा पायजमा झाला! मस्त झालेय विडंबन!! पायजम्याच्या चटेरी पट्ट्यांनो आज्ज्याला माझा"ही" साष्टांग सांगा ____/\____

गावरान 02/10/2015 - 03:31
तुमच्या माहितीकरता मूळ कविता पैठणी फडताळात एक गाठोडे आहे;त्याच्या तळाशी अगदी खाली जीथे आहेत जुने कपडे, कुंच्या,टोपडी शेले शाली त्यातच आहे घडी करुन जपून ठेवलेली एक पैठणी नारळी पदर,जरी चौकडी,रंग तीचा सुंदर धानी माझी आजी लग्नामध्ये ही पैठणी नेसली होती पडली होती सार्यांच्या पाया हाच पदर धरुन हाती पैठणीनी अवती भवती दरवळणारा सूक्ष्म वास, ओळखीची…अनोळखीची…….जाणीव ग़ूढ आहे त्यास धुप..कापूर….उद्बत्यातून ल जळत गेले कीती श्रावण पैठणीने या जपले एक तन एक मन… खस-हीन्यात माखली बोटे पैठणीला केंव्हा पुसली शेवंतीची, चमेलीची आरास पदरा आडुन हसली वर्षामागून वर्षे गेली,संसाराचा स्राव झाला, नवा कोरा कडक पोत एक मऊपणा ल्याला पैठणीच्या घडीघडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले अहेवपणी मरण आले,माझ्या आजीचे सोने झाले कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवटाळून मऊ-रेशमी स्पर्शामधे आजी भेटते मला जवळून मधली वर्षे गळून पडतात,काळपटाचा जुळतो धागा पैठ्नीच्या चोक्ध्यानो आजीला माझे कुशल सांगा……
लेखनविषय:
(शाळेमध्ये असताना शांता शेळके यांची "पैठणी" खुपच आवडली होती. त्याचेच हे विडंबनामृत. लाभ घ्यावा. चुभुद्याघ्या) फडताळात एक गठुडं आहे, त्याच्या खाली अगदी तळाला जिथे आहेत् भरपुर चिंध्या मफलर चड्डी घोंगडं नाडा त्यातच आहे अस्ताव्यस्त बावरुन पसरलेला एक पायजमा चटेरीपटेरी फुलबॉटम रंग त्याचा काळपट भुरटा माझ्या आज्ज्याने लग्नामध्ये हा पायजमा घातला होता पडला होता सा-यांच्या पाया कमरेवर खेचत हाच पायजमा पायजमाच्या अवती भवती दरवळणारा उग्र वास जाणीवे नेणीवेची ओळख अजिबातच नाही त्यास चिकन मटन खेकड्यांतुन वरपत गेल्या किती गटारी पायजम्याने पाहीले ना शाकाहारी...

गंड मार्गदर्शन काव्य- मार्फत प्रेरणा दायी हम्मा (आम्ही प्रेरणा देतो :) )

माहितगार ·
कामधेनु दावणं सोडून केव्हाच गेली काळाच्या पडद्याआड गोठाही केव्हाच गेला न पळी राहिलीए ना पंचपात्र किणकीणाट होतो कधीतरी कुठे कुठे रिकामा किणकीणाट करणारे,तेवढेच त्यांच्या नावे नुसताच टाहो फोडणारे संपत आलेल्या किणकीणाटाला खणखणाट समजून अथवा भासवून उगाच खडे फोडतात कधी कधी शिळ्याकढीला ऊत आणून कधी सत्तेच्या आशेने कधी कल्पवृक्ष मिळवून देण्याच्या मृगजळी स्वप्नाने कधी कामधेनू आपल्याही गोठ्यातून निघून गेली या दु:खाने त्यांनी इतिहासाच्या अभिमानाची रेष जेवढी फुगवून दाखवीली बरोबरीस अन्यायाची रेष तेवढीच फुगवून दाखवतो पण मूळ रेषेत फुगवटा होता हे मी विसरूनच जातो. ते इतिहासात आहेत याचं रडगाण मी गातो पण

<विडंबनः नसतेच मिपा हे जेव्हा...>

एस ·

In reply to by नाखु

एस 05/08/2015 - 23:49
पण मिपा बंद असल्याचा एक तोटाही आहे. जेवताना मग त्या रटाळ मालिका झक मारून पहाव्या लागतात. एरवी मोबाईलमध्ये डोके खुपसून बसता येते ;-) अर्थात हा तोटा फक्त नवरे ह्या कॅटेगरीत मोडणार्‍या मिपाकरांनाच आहे! :-)

In reply to by अजया

एस 05/08/2015 - 12:01
नाव नका काढू हो त्या अभद्र जागेचं! पुणेकर नवर्‍यांची छळछावणी आहे ती. एकदा 'चला, तुमच्यासाठी एक टायपिन घेऊ' असे म्हणून ही मला घेऊन त्या जंजाळात शिरली. टायपिन का काय ते नाहीच मिळालं, पण दोनेक तासांनी हाश्शहुश्शः करत बाहेर पडलो तेव्हा माझ्या दोन्ही हातांत जड पिशव्या होत्या आणि टायपिनच काय, आख्खा थ्रीपीस सूट बुटांसकट आला असता इतका माझा खिसा हलका झाला होता.

In reply to by एस

@नाव नका काढू हो त्या अभद्र जागेचं! >>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif मागे माझ्या येका कोकणातल्या भटजी मित्राला "बायकोला घेऊन कुठे जाऊ?" असं विचारल्यावर मी त्याला सदर अभद्र जागी नाव न सांगता पाठवला. त्यांनतर पुण्याला तो एकटाच येऊ लागला! http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif

पैसा 05/08/2015 - 09:34
लै भारी! मिपा बंद असलं की माझी पण बरीच कामे हातावेगळी होतात! =))

प्यारे१ 05/08/2015 - 12:42
अवांतर: तुळशीबाग चा नेमका काय इतिहास आहे? पूर्वी कधीतरी खरंच तुळस असायच्या काय? राममंदीर आहे त्या आजूबाजुला खरंच तशी बाग़ असण्याची शक्यता आहे. पुणं जेव्हा वाटीभर होतं तेव्हा तशी परिस्थिती असेल कदाचित. आजचं हे दरिद्री(ही जळजळ नाही. उगा 20 रुपयांची वस्तू घ्यायला 50 रुपये खर्चून जायचं आणि 500 च्या टाकाऊ वस्तू घेऊन यायचं यात काय लॉजिक आहे) रूप कधीपासून आलं तिथं? इतिहास अभ्यासकांनी ज़रा आमाला माहिती देऊन उपकृत करावे. बाकी लोक सुरूर फाट्यावर!

In reply to by नाखु

एस 05/08/2015 - 23:49
पण मिपा बंद असल्याचा एक तोटाही आहे. जेवताना मग त्या रटाळ मालिका झक मारून पहाव्या लागतात. एरवी मोबाईलमध्ये डोके खुपसून बसता येते ;-) अर्थात हा तोटा फक्त नवरे ह्या कॅटेगरीत मोडणार्‍या मिपाकरांनाच आहे! :-)

In reply to by अजया

एस 05/08/2015 - 12:01
नाव नका काढू हो त्या अभद्र जागेचं! पुणेकर नवर्‍यांची छळछावणी आहे ती. एकदा 'चला, तुमच्यासाठी एक टायपिन घेऊ' असे म्हणून ही मला घेऊन त्या जंजाळात शिरली. टायपिन का काय ते नाहीच मिळालं, पण दोनेक तासांनी हाश्शहुश्शः करत बाहेर पडलो तेव्हा माझ्या दोन्ही हातांत जड पिशव्या होत्या आणि टायपिनच काय, आख्खा थ्रीपीस सूट बुटांसकट आला असता इतका माझा खिसा हलका झाला होता.

In reply to by एस

@नाव नका काढू हो त्या अभद्र जागेचं! >>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif मागे माझ्या येका कोकणातल्या भटजी मित्राला "बायकोला घेऊन कुठे जाऊ?" असं विचारल्यावर मी त्याला सदर अभद्र जागी नाव न सांगता पाठवला. त्यांनतर पुण्याला तो एकटाच येऊ लागला! http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif

पैसा 05/08/2015 - 09:34
लै भारी! मिपा बंद असलं की माझी पण बरीच कामे हातावेगळी होतात! =))

प्यारे१ 05/08/2015 - 12:42
अवांतर: तुळशीबाग चा नेमका काय इतिहास आहे? पूर्वी कधीतरी खरंच तुळस असायच्या काय? राममंदीर आहे त्या आजूबाजुला खरंच तशी बाग़ असण्याची शक्यता आहे. पुणं जेव्हा वाटीभर होतं तेव्हा तशी परिस्थिती असेल कदाचित. आजचं हे दरिद्री(ही जळजळ नाही. उगा 20 रुपयांची वस्तू घ्यायला 50 रुपये खर्चून जायचं आणि 500 च्या टाकाऊ वस्तू घेऊन यायचं यात काय लॉजिक आहे) रूप कधीपासून आलं तिथं? इतिहास अभ्यासकांनी ज़रा आमाला माहिती देऊन उपकृत करावे. बाकी लोक सुरूर फाट्यावर!
(मिपा बंद असताना मिपाला चरफडत खूप शिव्या दिल्या. अर्थात प्रेमाने! मग शनिवारी रात्री हे विडंबन सुचले आणि खफवर सोमवारी मिपा परत आल्यावर टाकले. तिथल्या आमच्या हितचिंतकांनी -कोण म्हणाले रे कंपू कंपू ते! - वा वा! वा वा! बोर्डावर पण टाकून बाकीच्यांनाही छळा, असे आम्हांस भरीला पाडल्याने - दू दू कुठले - खफवरच्या पुरात वाहून गेलेली आमची रचना महत्प्रयासाने वर काढली आणि इथे डकवायचे धारिष्ट्य करत आहे...

<पतंग>

राजेश घासकडवी ·

In reply to by प्रभाकर पेठकर

नवीन ओळख??? काय पेठकर काका, गुड ओल्ड डेजमध्ये चतुरंग, केशवसुमार वगैरे लोक शेकड्यांनी विडंबनं पाडायचे. कविता पडली नि पाच मिनिटांत विडंबन पडलं, अशा आख्यायिका कट्ट्यांवर रंगवून रंगवून सांगितल्या जायच्या. एकमेकांच्यात विडंबन कुस्त्या लागत. २०१० सालचं आठवतं. कोणीतरी एक 'रूळ' नावाची कविता टाकली होती. त्यावर मग चूळ, मूळ, गूळ, खूळ वगैरे विडंबनांची मालिका लागली होती. सगळ्यांनी ती एंजॉय केली न केली असेल. पण हे प्रकार नवीन निश्चित नाहीत. विडंबनं ही मिपाच्या परंपरेची अविभाज्य भाग आहेत. कोणाला कशाचा खेद होईल ते सांगता येत नाही, तेव्हा सखेद वगैरे म्हणायला हरकत नाही. पण तेवढं वाक्य बदलून असं करा... 'मिपा - एक विडंबन संस्थळ'...... अशी ओळख पूर्वीपासूनच सखेद स्विकारलेली आहे.

In reply to by राजेश घासकडवी

प्यारे१ 16/10/2014 - 02:47
+१. ह्या प्रतिसादापुरता गुर्जींशी सहमत आहे. बाकी हल्ली पेठकरसाहेब 'काका' लोकांसारखे का प्रतिसाद द्यायाला लागलेत कुणास ठाऊक. :-/

In reply to by प्यारे१

खरं आहे प्रशांत. अरे! मिपानेच अकाली 'काकात्व' बहाल केलं आहे. आता 'तुज आहे तुजपाशी' मधल्या 'आचार्यां'सारखी अवस्था झाली आहे.

In reply to by राजेश घासकडवी

पूर्वीच्या काळी सहनशक्ती जास्त होती. कारण विडंबन प्रकार नव्याने सुरु झाला होता. मधल्या काळात आता हे खूप झालं अशी भावना निर्माण झाली तरीही सहनशक्ती आटली नव्हती. आता सहनशक्ति आटली आहे असे जाणवते आहे. शिवाय, अकारण वादविवाद, स्कोर सेटलिंग, 'मी'पणा आणि कंपूबाजगिरी फारच वाढीला लागल्याकारणाने सहन तरी कुठे कुठे आणि किती करायचं असा प्रश्न पडतो आहे. पूर्वीच्या काळी ललित लेखन, माहितीपर लेखन, पाककृती अधिक असायचं. मन गुंतवायला आणि न रुचणार्‍या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला भरपूर साहित्यिक क्षेत्र मिपावर उपलब्ध होतं. पण आता तशी परिस्थिती आहे का? माझा त्रागा हा आज कालचा नाही. गेली कांही वर्षे अवलोकन करून ह्या मानसिक परिस्थितीला आलो आहे. रुचणारं लेखन अजिबात नसतं असं मी म्हणणार नाही पण ते क्षेत्र आटत चाललं आहे. कोणी म्हणेल 'मग येऊ नका मिपावर, उघडू नका न रुचणारे धागे.' तर ते खरं आहे. तसे करण्याचे स्वातंत्र्य नक्कीच आहे. वाचनमात्र राहावं की 'ऐसी अक्षरे', 'मनोगत' वर जावं ह्यावर विचार चालू आहे. मिपाशी भावनिक संबंध गुंतल्यामुळे चटकन निर्णय होत नाहिये. मिपावरही विधायक बदल होतील अशी वेडी आशा मनी बाळगुन आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

मदनबाण 16/10/2014 - 12:25
वाचनमात्र राहावं की 'ऐसी अक्षरे', 'मनोगत' वर जावं ह्यावर विचार चालू आहे. मिपाशी भावनिक संबंध गुंतल्यामुळे चटकन निर्णय होत नाहिये. काकाश्री आपण इथेच रहावे ! पल्याडकडे सरळ लिहणारी, इकडे वाकडेपणा करतात हे आपण २घांनीही गेल्या काही दिवसांपूर्वी अनुभवले आहे. { ह्यांना म्हणजे वाकडे लिहणार्‍यांना तिकडे कोणी हिंग लावुन विचारत नाही आणि मग इकडे जाहिरात मोड ऑन करुन येतात. शेवटी निर्लज्य आहेत ते.} त्यामुळे तिकडे जाउन तुमचे मन रमेल असे वाटत असेल तर तो गैरसमज आहे. तुमचे मत तुम्हाला मुक्तपणे व्यक्त करण्याचा अधिकार आहे.बिनधास्त लिहा आणि बिनधास्त रहा.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण

In reply to by प्रभाकर पेठकर

यशोधरा 16/10/2014 - 12:42
> वाचनमात्र राहावं की 'ऐसी अक्षरे', 'मनोगत' वर जावं ह्यावर विचार चालू आहे. >> अर्रे काका, काय हे! कुठेही जायचं वगैरे नाही हां. वाचनमात्र रहावं आणि आवडत नसतील त्या धाग्यांवर फारसं जाऊ नका. बाकी बाणाने सांगितलं आहे त्याच्याशी सहमत.

In reply to by प्रभाकर पेठकर

पूर्वीच्या काळी सहनशक्ती जास्त होती..... आता सहनशक्ति आटली आहे असे जाणवते आहे.
हे वाचून मला मोदींचे पर्यावरणाबाबतचे विचार आठवले 'आजकाल पोरंसुद्धा पर्यावरणाचा विचार करतात. चांगलंच आहे. पण असं बघा, पूर्वी तरुणपणी लोकांना उकाडा सहन व्हायचा. आता वय झाल्यावर होत नाही. म्हणून लोकं म्हणतात पर्यावरण बदललं! पर्यावरण नाही बदलत, आपण बदललो आहोत!' मोदींचा किस्सा हलक्यानेच घ्यावा. गंभीरपणे बोलायचं झालं तर आपल्यात झालेला असा बदल प्रांजळपणे कबूल करणं ही घेण्यासारखी गोष्ट आहे. कधीकधी एखाद्या गोष्टीचा ओव्हरडोस होतो. मग चांगल्या गोष्टींमध्ये आनंद घेऊन वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याऐवजी वाईट गोष्टी जास्त खुपतात, आणि चांगल्या गोष्टींमध्ये तोचतोचपणा जाणवतो. थंडीतून उबदार घरात आल्याबरोब्बर ऊब छान वाटते. पण बराच वेळ बसलं की ऊब नेहमीची होते, आणि आत्तापर्यंत न जाणवलेला कोंदटपणा जाणवतो - तसं काहीसं. मग थोड्या मोकळ्या हवेत जाऊन यावंसं वाटतं. त्यावर जर कोणी म्हणालं 'कायरे, थंडीत तर कुडकुडत होतास, आणि ऊब छान वाटली म्हणालास. आता बरोब्बर उलटं कसं म्हणतोस?' यात अर्थातच विसंगती नाही हे आपल्याला समजू शकतं. तेव्हा लहान तोंडी मोठा घास घेऊन म्हणेन, मिपा नको, ऐसी नको, मनोगत-मायबोली नको. काही काळ संस्थळाच्या वातावरणातून थोडे बाहेर पडून वेगळी हवा छातीत भरून या. मग ऊब हवीशी वाटेल तेव्हा या परत.

In reply to by असंका

बॅटमॅन 16/10/2014 - 15:26
या शब्दाचा सध्याचा रूढ अर्थः एखादी डॉमिनेटिंग स्वभावाची बाई. मूळ अर्थः ढाल+गज = निशाणाचा हत्ती/हत्तीण. ढाल = निशाण. दोहोंचा काही संबंध तरी आहे का? आहे. त्याची कथा येणेप्रमाणे. पेशव्यांच्या पदरी एक हत्तीण होती. तिचे नाव भवानी. ती ढालगज होती. असा हत्ती वा हत्तीण अन्य कशालाही जुंपायचा/ची नाही, असा प्राचीन शिरस्ता होता. एकदा पेशव्यांच्या कुठल्याश्या स्वारीत वाटेत एक अवघड घाट लागला. सगळे लष्कर जाऊ लागले. शेकडो बैलजोड्या एका तोफेला जुंपलेल्या होत्या. घाट जरा चढा असल्याने तोफ ओढता ओढता बैलांच्या तोंडाला फेस आला. तिथेच घाटात एक इंग्रजही बसला होता. त्याने फौजेतील लोकांचे संभाषण ऐकले. लोक म्हणत होते की हे काय खरं नाही. भवानी हत्तिणीलाही आता तोफेला जुंपली पाहिजे तरच तोफ घाटाच्या पार होईल. ते ऐकताक्षणी जणू आशय समजल्यागत भवानीने जवळच्या झाडाची फांदी सोंडेने मुरगाळून सोंडेत घट्ट पकडली, आणि बैलांना सपासप फटके द्यायला सुरुवात केली. बैल बिचारे घाबरून तोफ नीट ओढू लागले आणि वेळ निभावली. हा किस्सा त्या इंग्रजाने लिहूनही ठेवलेला आहे. वरील माहिती गजकथा नामक सदरात वाचल्याचे आठवते. निनाद बेडेकरांकडून हा किस्सा ऐकला आहे. शहानिशा अजून केलेली नाही. पण टेक्निकली असे होणे अशक्य तर वाटत नाही. असो. मोल्सवर्त डिक्शनरीतही रूढ अर्थ दिलेला आहे. http://dsalsrv02.uchicago.edu/cgi-bin/romadict.pl?query=%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A4%9C&display=utf8&table=molesworth

In reply to by प्रभाकर पेठकर

नवीन ओळख??? काय पेठकर काका, गुड ओल्ड डेजमध्ये चतुरंग, केशवसुमार वगैरे लोक शेकड्यांनी विडंबनं पाडायचे. कविता पडली नि पाच मिनिटांत विडंबन पडलं, अशा आख्यायिका कट्ट्यांवर रंगवून रंगवून सांगितल्या जायच्या. एकमेकांच्यात विडंबन कुस्त्या लागत. २०१० सालचं आठवतं. कोणीतरी एक 'रूळ' नावाची कविता टाकली होती. त्यावर मग चूळ, मूळ, गूळ, खूळ वगैरे विडंबनांची मालिका लागली होती. सगळ्यांनी ती एंजॉय केली न केली असेल. पण हे प्रकार नवीन निश्चित नाहीत. विडंबनं ही मिपाच्या परंपरेची अविभाज्य भाग आहेत. कोणाला कशाचा खेद होईल ते सांगता येत नाही, तेव्हा सखेद वगैरे म्हणायला हरकत नाही. पण तेवढं वाक्य बदलून असं करा... 'मिपा - एक विडंबन संस्थळ'...... अशी ओळख पूर्वीपासूनच सखेद स्विकारलेली आहे.

In reply to by राजेश घासकडवी

प्यारे१ 16/10/2014 - 02:47
+१. ह्या प्रतिसादापुरता गुर्जींशी सहमत आहे. बाकी हल्ली पेठकरसाहेब 'काका' लोकांसारखे का प्रतिसाद द्यायाला लागलेत कुणास ठाऊक. :-/

In reply to by प्यारे१

खरं आहे प्रशांत. अरे! मिपानेच अकाली 'काकात्व' बहाल केलं आहे. आता 'तुज आहे तुजपाशी' मधल्या 'आचार्यां'सारखी अवस्था झाली आहे.

In reply to by राजेश घासकडवी

पूर्वीच्या काळी सहनशक्ती जास्त होती. कारण विडंबन प्रकार नव्याने सुरु झाला होता. मधल्या काळात आता हे खूप झालं अशी भावना निर्माण झाली तरीही सहनशक्ती आटली नव्हती. आता सहनशक्ति आटली आहे असे जाणवते आहे. शिवाय, अकारण वादविवाद, स्कोर सेटलिंग, 'मी'पणा आणि कंपूबाजगिरी फारच वाढीला लागल्याकारणाने सहन तरी कुठे कुठे आणि किती करायचं असा प्रश्न पडतो आहे. पूर्वीच्या काळी ललित लेखन, माहितीपर लेखन, पाककृती अधिक असायचं. मन गुंतवायला आणि न रुचणार्‍या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला भरपूर साहित्यिक क्षेत्र मिपावर उपलब्ध होतं. पण आता तशी परिस्थिती आहे का? माझा त्रागा हा आज कालचा नाही. गेली कांही वर्षे अवलोकन करून ह्या मानसिक परिस्थितीला आलो आहे. रुचणारं लेखन अजिबात नसतं असं मी म्हणणार नाही पण ते क्षेत्र आटत चाललं आहे. कोणी म्हणेल 'मग येऊ नका मिपावर, उघडू नका न रुचणारे धागे.' तर ते खरं आहे. तसे करण्याचे स्वातंत्र्य नक्कीच आहे. वाचनमात्र राहावं की 'ऐसी अक्षरे', 'मनोगत' वर जावं ह्यावर विचार चालू आहे. मिपाशी भावनिक संबंध गुंतल्यामुळे चटकन निर्णय होत नाहिये. मिपावरही विधायक बदल होतील अशी वेडी आशा मनी बाळगुन आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

मदनबाण 16/10/2014 - 12:25
वाचनमात्र राहावं की 'ऐसी अक्षरे', 'मनोगत' वर जावं ह्यावर विचार चालू आहे. मिपाशी भावनिक संबंध गुंतल्यामुळे चटकन निर्णय होत नाहिये. काकाश्री आपण इथेच रहावे ! पल्याडकडे सरळ लिहणारी, इकडे वाकडेपणा करतात हे आपण २घांनीही गेल्या काही दिवसांपूर्वी अनुभवले आहे. { ह्यांना म्हणजे वाकडे लिहणार्‍यांना तिकडे कोणी हिंग लावुन विचारत नाही आणि मग इकडे जाहिरात मोड ऑन करुन येतात. शेवटी निर्लज्य आहेत ते.} त्यामुळे तिकडे जाउन तुमचे मन रमेल असे वाटत असेल तर तो गैरसमज आहे. तुमचे मत तुम्हाला मुक्तपणे व्यक्त करण्याचा अधिकार आहे.बिनधास्त लिहा आणि बिनधास्त रहा.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण

In reply to by प्रभाकर पेठकर

यशोधरा 16/10/2014 - 12:42
> वाचनमात्र राहावं की 'ऐसी अक्षरे', 'मनोगत' वर जावं ह्यावर विचार चालू आहे. >> अर्रे काका, काय हे! कुठेही जायचं वगैरे नाही हां. वाचनमात्र रहावं आणि आवडत नसतील त्या धाग्यांवर फारसं जाऊ नका. बाकी बाणाने सांगितलं आहे त्याच्याशी सहमत.

In reply to by प्रभाकर पेठकर

पूर्वीच्या काळी सहनशक्ती जास्त होती..... आता सहनशक्ति आटली आहे असे जाणवते आहे.
हे वाचून मला मोदींचे पर्यावरणाबाबतचे विचार आठवले 'आजकाल पोरंसुद्धा पर्यावरणाचा विचार करतात. चांगलंच आहे. पण असं बघा, पूर्वी तरुणपणी लोकांना उकाडा सहन व्हायचा. आता वय झाल्यावर होत नाही. म्हणून लोकं म्हणतात पर्यावरण बदललं! पर्यावरण नाही बदलत, आपण बदललो आहोत!' मोदींचा किस्सा हलक्यानेच घ्यावा. गंभीरपणे बोलायचं झालं तर आपल्यात झालेला असा बदल प्रांजळपणे कबूल करणं ही घेण्यासारखी गोष्ट आहे. कधीकधी एखाद्या गोष्टीचा ओव्हरडोस होतो. मग चांगल्या गोष्टींमध्ये आनंद घेऊन वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याऐवजी वाईट गोष्टी जास्त खुपतात, आणि चांगल्या गोष्टींमध्ये तोचतोचपणा जाणवतो. थंडीतून उबदार घरात आल्याबरोब्बर ऊब छान वाटते. पण बराच वेळ बसलं की ऊब नेहमीची होते, आणि आत्तापर्यंत न जाणवलेला कोंदटपणा जाणवतो - तसं काहीसं. मग थोड्या मोकळ्या हवेत जाऊन यावंसं वाटतं. त्यावर जर कोणी म्हणालं 'कायरे, थंडीत तर कुडकुडत होतास, आणि ऊब छान वाटली म्हणालास. आता बरोब्बर उलटं कसं म्हणतोस?' यात अर्थातच विसंगती नाही हे आपल्याला समजू शकतं. तेव्हा लहान तोंडी मोठा घास घेऊन म्हणेन, मिपा नको, ऐसी नको, मनोगत-मायबोली नको. काही काळ संस्थळाच्या वातावरणातून थोडे बाहेर पडून वेगळी हवा छातीत भरून या. मग ऊब हवीशी वाटेल तेव्हा या परत.

In reply to by असंका

बॅटमॅन 16/10/2014 - 15:26
या शब्दाचा सध्याचा रूढ अर्थः एखादी डॉमिनेटिंग स्वभावाची बाई. मूळ अर्थः ढाल+गज = निशाणाचा हत्ती/हत्तीण. ढाल = निशाण. दोहोंचा काही संबंध तरी आहे का? आहे. त्याची कथा येणेप्रमाणे. पेशव्यांच्या पदरी एक हत्तीण होती. तिचे नाव भवानी. ती ढालगज होती. असा हत्ती वा हत्तीण अन्य कशालाही जुंपायचा/ची नाही, असा प्राचीन शिरस्ता होता. एकदा पेशव्यांच्या कुठल्याश्या स्वारीत वाटेत एक अवघड घाट लागला. सगळे लष्कर जाऊ लागले. शेकडो बैलजोड्या एका तोफेला जुंपलेल्या होत्या. घाट जरा चढा असल्याने तोफ ओढता ओढता बैलांच्या तोंडाला फेस आला. तिथेच घाटात एक इंग्रजही बसला होता. त्याने फौजेतील लोकांचे संभाषण ऐकले. लोक म्हणत होते की हे काय खरं नाही. भवानी हत्तिणीलाही आता तोफेला जुंपली पाहिजे तरच तोफ घाटाच्या पार होईल. ते ऐकताक्षणी जणू आशय समजल्यागत भवानीने जवळच्या झाडाची फांदी सोंडेने मुरगाळून सोंडेत घट्ट पकडली, आणि बैलांना सपासप फटके द्यायला सुरुवात केली. बैल बिचारे घाबरून तोफ नीट ओढू लागले आणि वेळ निभावली. हा किस्सा त्या इंग्रजाने लिहूनही ठेवलेला आहे. वरील माहिती गजकथा नामक सदरात वाचल्याचे आठवते. निनाद बेडेकरांकडून हा किस्सा ऐकला आहे. शहानिशा अजून केलेली नाही. पण टेक्निकली असे होणे अशक्य तर वाटत नाही. असो. मोल्सवर्त डिक्शनरीतही रूढ अर्थ दिलेला आहे. http://dsalsrv02.uchicago.edu/cgi-bin/romadict.pl?query=%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A4%9C&display=utf8&table=molesworth
लेखनविषय:
प्राथमिक प्रेरणा - तवंग दुय्यम प्रेरणा - लवंग> माझा पतंग सतत हरवतो तुझ्या अभाळी . . पेच लावती ढगाढगात ढाले ढालगजांचे . . ढील देत मी फिरकी झपझप मांजा वाहतो . . मांजा कातर पडतो सैलसर केएलपीडी . . झाडा तारांत पतंग ढिगभर लटकलेले . . नवा पतंग उडेल लवकर नव्या अभाळी

दसरा

लाडू ·
काव्यरस
काल राती आकाशात, चांद दिसला हासरा कानी सांगून तो गेला,आला दसरा दसरा घरोघरी लाडू शिरा, गोडाधोडाचा पसारा परि तोंडहि आवरा, ठेवा नियम आहारा, आला दसरा दसरा परिक्षा आली तोंडावर, करा अभ्यासाचा जोर त्यात मास ऑक्टोबर, दगा देईल सत्वर पण अभ्यास विसरा, एक दिनच विसरा, आला दसरा दसरा गोष्ट आहे पुरातन, मोठा दसर्‍याचा मान, देती सोन्याचेहि पान! नाहि राहिलि ती शान, वर किंमत महान, देती आपट्याचे पान, देती फुकाचाच मान! येई दसरा दसरा, जाई दसरा दसरा, सर्वां करुनि हासरा, सणांच्याही या सणाला, करु मानाचा मुजरा! आला दसरा दसरा

'विठोबा'

drsunilahirrao ·

सोड गाभारा, अता घे वीट हाती झोड जी झोडायची माथी, विठोबा देहभर पाण्यात तरला जन्म देवा तू खरा निष्णात नावाडी, विठोबा ! खास...!!! -दिलीप बिरुटे

सोड गाभारा, अता घे वीट हाती झोड जी झोडायची माथी, विठोबा देहभर पाण्यात तरला जन्म देवा तू खरा निष्णात नावाडी, विठोबा ! खास...!!! -दिलीप बिरुटे
लेखनविषय:
काव्यरस
टीचभर ही भूक सांभाळी, विठोबा जन्मभर होतीच आषाढी, विठोबा मोजली कोणी अशी ही पापपुण्ये चांगला तू आण मापारी, विठोबा पारखोनी घे जरासे भक्त आता हे तुला विकतील व्यापारी, विठोबा शेवटी आलास ना गोत्यात तूही माणसे असतात थापाडी, विठोबा सोड गाभारा, अता घे वीट हाती झोड जी झोडायची माथी, विठोबा देहभर पाण्यात तरला जन्म देवा तू खरा निष्णात नावाडी, विठोबा ! डॉ.सुनील अहिरराव