बुरा न मानो होली है! (एक Holy लेखण!)

लेखनप्रकार
ढिश-क्लेमर:- वाचकांना शीघ्र फलप्राप्ती व्हावी म्हणून (व आज होळी असल्यामुळेही..) सदर प्र-संग थोडा रंगवून टाकलेला आहे,मूळ रंगासह! ह्याची दखल घ्यावी. त्या:- खुरुजीईईईईईई.. मी:- खाय? (आपलं ते हे..)काय? त्या:- तुमचा नंबर द्या ना...प्लल्लल्लीईईईईईईज!!! मी:- कृपया लाडीकपणे बोलू नका! त्या:- हही हही हही ही.. गुरुजी तुमचा नंबर मिळेल का? मी:- कशाला ? (ब्याद टळावी म्हणून!) आपण माझ्या क्लायंट नाही! त्या:- बरं! हितेच एक सांगाल का- (प्लिईईईईज!) मी:- विचारा! (प्लेड!) त्या:- माझ्या ना घरी एक इव्हेंट करायचाय(फुलटॉस!) मी:- काय मॅनेजमेंट करू? (सिक्स) त्या:- हु हु हु हु हु हु!

(कितनी राते....)

पेरणा अर्थात http://misalpav.com/node/46163

कितनी राते....

१. तू हलकट पणे म्हणालास, खुर्चीपेक्षा खालीच बसू की आरामात.. मी म्हणालो तूच बस भाड्या, तुला माहीत आहे, मला खाली बसता येत नाही! पण त्या वेळेला तुझी ती कुत्सित नजर बघून मला मन कित्ती आवरावं लागलं माहितीय तुला? म्हणे "आरामात बसू"! २. म्हातारा संन्यासीच होता ना की अजून काही? अख्खा खंबा संपवलास तू हावरटासारखा. (सत्य घटनेवर आधारीत..... शंका असेल त्यांनी आमंत्रण देऊन प्रत्यक्ष खात्री करून घ्यावी ) मला वाटलं कसला दळीद्री आहेस तू ... पण नंतर लक्षात आले की मागच्या पार्टीची वसूली करत होतास कुत्र्या! ३.

(डबा)

पेरणा अर्थातच

(डबा)

आज पहाटे तो लवकर उठला डबा उचलून धावत सूटला लायनीताल्या लोकांना ढकलून दिले दार जोराने बडवले आताल्याला लवकर बाहेर बोलावले जराही वेळ नाही असे सांगितले आतले प्रकरण कुल वाटले हालचालीच्या आवाजावरून मंद भासले मनोमन स्वप्न रचले वाटे आत गेल्यावर कोणी तरी म्हणावे "अरे बाबा सावकाश आवर , होल वावर इज आवर" आजची कथा अशी झाली ज्याची बीजे त्याने कालच पेरली काल त्याच्या खास मित्राने बढती मिळाल्याचे सांगितले बास ते एक कारणच झाले त्याच्याकडून पार्टी मागायचे दुपारचे जेवण बाहेर घ्यावे मस्तपैकी चिकन हाणावे

फेंगशुई,कासव आणि चिरंजीव

लेखनविषय:
लेखनप्रकार
D mart मध्ये खरेदी करत असताना चिरंजीवांची भुणभुण सुरू होती. त्याला एक काचेचे पारदर्शक रंगाचे कासव आवडले होते. ते त्याला खेळायला हवे होते. मी पाहिले, त्या ठिकाणी फेंगशुईच्या अनेक वस्तू ठेवल्या होत्या. त्यातच ते कासवपण होते. मी नाक मुरडूनच तिथून पुढे निघून गेले. माझा अश्या गोष्टींवर विश्वास नाही मात्र नवरोबांचा आहे. घरी आल्यावर सामान भरून ठेवताना पाहते तो काय! चक्क ते कासव सामानाच्या पिशवीत दिसले. मग लक्षात आले,हा उद्योग चिरंजीव आणि त्याच्या पप्पांचा आहे. दोघांनी मला नकळत खरेदी करून ते घरी आणले होते. मग दोन दिवस ते कासव कुठे ठेवायचे यावर बापलेकांत वाद सुरू होता.

(पप्पूबाळा)

पेरणा अर्थातच स्वतःची अक्कल इवलीशी दुसऱ्याकडे ही असे थोडीशी हे मान्यच नाही तयासी काय म्हणावे या वृत्तीसी पप्पूबाळा मम्मा मॅडम मुग गिळीती बडवून कापाळास घेती पाहूनी तव मंदमती जी तुझ्या खानदानाची महती पप्पूबाळा कैसी खांग्रेसची प्रगती कैसा खांग्रेसचा नाश केवळ असे दैवदूर्विलास त्याचे दु:ख असे कोणास? पप्पूबाळा दुराग्रही,अहंकार ग्रस्त जनतेस करुनी त्रस्त ज्ञान स्वतःचे पाजळतोस का विदुषकासम वागतोस?

संदीपची हुषारी

लेखनविषय:
लेखनप्रकार
"राष्ट्रीय खो खो स्पर्धेसाठी विद्यानिकेतनत हायस्कूल मधील संदीप सर्जेराव कवडे या विद्यार्थ्याची निवड" अशी पेपरमधील बातमी वाचून सर्जेरावांना आपल्या मुलाचा अभिमान वाटला. "मी साखर कारखान्यावर जावून येतो ग. वेळ लागेल. जेवणाची वाट पाहू नको. गोविंदाला टॅक्टर घेवून डिझेल भरायला पाठवून दे. पैसे टेबलावर काढून ठेवलेत", सर्जेराव सकाळच्या कामाचे नियोजन करत आपल्या बायकोला सुचना देत होते. पिंपळदचे सर्जेराव कवडे मोठी आसामी होती. ते प्रतिथयश प्रयोगशील शेतकरी तर होतेच पण सोबतच त्यांचा तालूक्याच्या एमआयडीसीतल्या जागेत एक जॉबवर्कचा कारखानाही होता. सकाळपासून त्यांच्याकडे कामाची रीघ असे.

ना देवेंद्र देव इथे , ना उद्धव आहे साव

ना देवेंद्र देव इथे ना उद्धव आहे साव आजही बळीराजा भीक मागतो पण , त्याला काडीचा नाही भाव संगीत खुर्ची चालू झाली पवार वाजवतायत बिगुल हरेक पठ्ठ्या मग्रूर इथे पण आपलीच बत्ती गुल किती बघावं , काय बघावं कळत नाही काहीच जो तो आम्हाला नाग वाटतो आपला वाली कुणी नाहीच का लावला डाग नखाला ? डोक्याची झालीय भेळ कोण बसणार खुर्चीवरती यातच चाललाय वेळ लाज बाळगा जरा मनाची पुरे हि शोभायात्रा लोकप्रतिनिधी निवडून दिलेयत कि वेड्यांची भरलीय जत्रा कुणीही बसावे , काही करावे आता मेलेय माझे मन डाग पुन्हा कधी लावणार नाही हा करतोय आज मी पण सिद्धेश्वर विलास पाटणकर

लहानांसाठी गोष्ट: पावसाचा ढग

लेखनप्रकार
पावसाचा देव आहे इंद्र. इंद्राकडे पाऊस पाडणारे अनेक सरदार असतात. ते सरदार पृथ्वीवर पाऊस पाडत असतात. हे सरदार म्हणजे मोठे मोठे काळे ढग असतात. ते पाणी साठवतात आणि पाऊस पृथ्वीवर पाडतात. एकदा एका ढगाला इंद्राने पृथ्वीवर पाऊस पाडण्यासाठी पाठवले. पण तो ढग पाऊस न पाडता एका राज्याच्या मैदानावरील मुलांचा खेळ बघण्यात रमून गेला. ही गोष्ट इंद्राला समजल्यावर त्याने त्या ढगाला पाण्याचा ढग न राहण्याचा शाप दिला. आता त्या ढगात पाणी साठून राहू शकत नव्हते. तो ढग पाण्याविना पांढरा दिसू लागला. मग त्याला त्याच्या वागण्याचा पश्चाताप झाला. त्याने इंद्राची माफी मागीतली.

धो धो धो की भं भं भं ( भाग १)

लेखनविषय:
लेखनप्रकार
राजपुत्र आणि प्रधानपुत्र खूप जिवलग मित्र असतात. दोघेही शूरवीर असतात. दोघांनाच दूर दूर जंगलात शिकारीला जाण्याचा छंद असतो. एकदा असेच ते दोघे अरण्यात शिकारीसाठी जातात, बरेच प्रयत्न करुनही शिकार मिळत नाही. ते असेच घनदाट जंगलात पुढे जात राहतात. शिकार केल्याशिवाय परत यायचं नाही म्हणून चार पाच दिवस झाले तरी तिकडेच मुक्काम करतात. झाडांची फळे खाऊन, झऱ्याचं पाणी पिऊन तहान भूक भागवतात. पाचव्या दिवशी ते एका तळ्याकाठी येतात. तळ्याकाठी त्यांना एक अतिशय सुंदर, लावण्यवती तरुणी दिसते. तिच्या हातात एक लाल असतो. त्या लालमधून लालसर प्रकाश बाहेर पडत होता.

वाई-मंत्र

लेखनप्रकार
(चेपुवर पूर्वप्रकाशित. सातारा जिल्ह्यातल्या वाई सारख्या टुमदार गावात गेलेलं बालपण शब्दांकित करण्याचा छोटासा प्रयत्न.) मंडळी , "वाईमंत्र" ही लेखमाला माझ्या आवाक्यातील आठवणींनुसार लिहिली आहे. आमच्या बालवाडी ते ४थीच्या शाळेचा व्हॉट्सअ‍ॅप गृप निमित्त ठरला आणि आठवणींची एक मालिकाच बनत गेली. ती एकत्र करुन इथे पोस्ट करतोय. कदाचित इतरांनाही त्यांच्या लहानपणीचा प्रवास आठवेल. वाईमंत्र-१ 'वाई' - हा शब्दच जणू एखाद्या मंत्रासारखा. आणि आपण सगळे भाग्यवान की आपल्याला कोणाला तो वेगळा शिकायची गरजच नाही, तो आपल्याला जन्मत:च येतो :) तर अश्या ह्या वाई मधलं १९८० चं दशक.
Subscribe to बालकथा