अदभूत शास्त्र
ज्योतिष हा व्यवसाय आपल्या भारतात चांगलाच फोफावला आहे. जनतेला ज्योतिष ह्या अदभूत विद्येमुळे आपल्या आयुष्यात काय काय घटना घडणार आहेत ह्याची खडान्खडा माहिती होते. काही अप्रिय घटना घडणार असेल तर ग्रहांची शांती करता येते. आपली आपल्या समाजाची भविष्यकाळातील स्तिथी जनतेला ज्योतिष विद्येमुळे कळते. भविष्यात होणारे आजार, मिळणार असणारी नोकरी ह्या बाबत आधीच सारे कळते. त्यामुळे मनुष्याचे जीवन सुखी बनवण्यात हे शास्त्र अग्रेसर आहे.