मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ज्योतिष

ओंकाराची नाडीपरिक्षा

प्रकाश घाटपांडे ·

हा लेख वाचूनही नाडीवर विश्वास ठेवणारे असतील तर त्यांना अंधश्रद्ध म्हणावं नाही तर काय म्हणावं? राजेश

In reply to by राजेश घासकडवी

आता काय म्हणायचं तुम्हाला? अगदीच अवैज्ञानिक ब्वॉ तुम्ही... किती नीट आणी वैज्ञानिक पद्धतीने भविष्य सांगितले जाते बघा... आणि तुमच्यासारखे लोक त्यात खोट काढत बसता. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

मी फक्त एक प्रश्न विचारला. त्याचं एका ओळीत इतकं समर्पक उत्तर देऊन तुम्ही माझं तोंड बंद करण्याची गरज होती का? राजेश

चक्रमकैलास 03/04/2010 - 18:22
घाटपांडे साहेब्,तुम्ही नाडीवाल्यान्ची नाडी ढीली करून त्यांची चड्डी काढली आहे...!!! --नसूनही असलेला चक्रम कैलास...!!

In reply to by चक्रमकैलास

नितिन थत्ते 03/04/2010 - 22:00
आणि चड्डी काढून ** आवळल्या आहेत. तरी बरे. त्यांनी दोन केंद्रांचा अनुभव सांगितला आहे. नाहीतर ओकांनी "त्या विशिष्ट नाडीकेंद्रावर असे होत असेल" अशी सारवासारव केली असती. नितिन थत्ते (शु सुधारक संपादकांना सूचना : माझ्या लेखनात शुद्धलेखनाच्या चुका आढळल्यास ते दुरुस्त केले जावे. माझी हरकत नाही. मात्र ते दुरुस्त केल्या जाऊ नये)

In reply to by नितिन थत्ते

नाहीतर ओकांनी "त्या विशिष्ट नाडीकेंद्रावर असे होत असेल" अशी सारवासारव केली असती.
तसेही बोध अंधश्रध्देचा मधे ओकांनीच ज्या पट्टीत जातकाची नांवे कोरलेली नाहीत त्या बद्दल माझी नाडी भविष्याची मते लागू नाहीत असे पृ.१३९ वर सांगितले आहे. त्यामुळे नाडीपट्टीत नाव कोरुन आलेले नसेल तर त्यांच युक्तिवाद अशा नाड्यांना लागु होत नाहीत. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

नंदू 03/04/2010 - 21:43
ओक साहेबांच्या नाडी शास्त्राला जवळ जवळ सर्वच जण विरोध करताहेत आणि या विरोधकांच्या bandwagon मध्ये फलज्योतिषवाले देखिल सामिल आहेत. हे फलज्योतिष तरी शास्त्र आहे का? शास्त्राचा मूळ निकष म्हणजे कुठलीही गोष्ट ही नियमां मध्ये अथवा सूत्रांमध्ये बांधलेली असावी आणि repeatable असावी. उदाहरणार्थ झाडावरुन पडणारं सफरचंद हे प्रत्येकवेळी खालीच पडणार. मलातरी दोन्ही थोतांडच वाटतात. नंदू

तिमा 04/04/2010 - 10:27
प्रत्येकाचे आयुष्य हा एक विधात्याच्या कथेवर बेतलेला सिनेमा आहे. त्यामुळे तो जसा दिसेल तसा बघावा. आधीच पुढची स्टोरी जाणण्याचा प्रयत्न करु नये. त्यामुळे नाडी, फलज्योतिष हे खरे असेल वा थोतांड. आपले विधिलिखित आपण बदलू शकत नाही तर कशाला हा खटाटोप ? हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

In reply to by तिमा

आपले विधिलिखित आपण बदलू शकत नाही तर कशाला हा खटाटोप ? अगदी मनातलं बोललात...! बाकी श्री घाटपांडे विरुद्ध ओक...वैचारिक सामने रंगतदार होत आहेत. थांबवू नका चालू ठेवा...! :) -दिलीप बिरुटे [काठावर बसलेला]

पाषाणभेद 04/04/2010 - 10:58
फलज्योतिषाचा विषय काढून उगाचच मुख्य चर्चा भरकटू देवू नका. फलज्योतिष (?) साठी वेगळा धागा आधीच निघालेला असेल. बाकी नाडीवाल्यांनी आता त्याच्या नाड्या आवळून वरती विज्ञानाचा पट्टा आवळावा. घाटपांडे काकांचा प्रयत्न स्पृहणीय आहे. आता हे नाडीवाले नाडी पहायला येणार्‍यांना "तुम्ही नाडी सोडून विवस्त्र नाडी पहायला यावे" असे म्हणायला सुरूवात करतील बघा. किमानपक्षी त्यांची झडती तरी होईल किंवा आमच्या महर्षींना हे मान्य नाही असे म्हणतील. हे एक पोट भरण्याचे साधन आहे हे का मान्य करत नाही. The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी|| महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद शके १५६३

>> बाकी श्री घाटपांडे विरुद्ध ओक...वैचारिक सामने रंगतदार होत आहेत सहमत...सामना निश्चितच रंगला आहे श्री घाटपांडे यांनी 'पाट' काढला आहे...आता 'पलटी' होते का 'चितपट ' :? पै. नाडीरत्न: आवळे-सोडे

jaypal 04/04/2010 - 22:59
*************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

शशिकांत ओक 05/04/2010 - 15:16
ओकाची नाडी ग्रंथ परीक्षा ?
नुकताच ओंकार पाटलांच्या नाडी परीक्षेचा लेख पुन्हा वाचनात आला. खरेतर यावर त्यांच्या लेखातील फोलपणा दाखवून देणारा लेख मी पुर्वीच प्रकाशित केला आहे. तरीही काही नव्या वाचक लोकांच्या समाधानासाठी खालील विचार व्यक्त करत आहे. ओंकारांनी नाडी ग्रंथांना खोटे ठरवायला काय परीक्षा केली ? १) तांबरमच्या नाडीकेंद्रात जाऊन एक टेप रेकॉरेडर लपवून नाडी पट्टीच्या अगदी पहिल्या विचारणेपासून रेकॉर्ड केलेले संभाषण लेखाच्या रुपात सादर केले. २) त्या विचारणेतून मिळालेल्या माहितीतील माहितीच पुन्हा आपणांस एका विशिष्ठ ताडपट्टीतून आली आहे असे भासवून सांगण्यात आले, असा त्यांचा दावा आहे. ३) शिवाय गिंडीतील एका केंद्रातील माहितीतून त्यांना नाडीग्रंथांबद्दल काय वाटले ते त्यांनी शेवटी सादर केले आपल्या लेखात ओंकारांनी वाचकांना काय काय उल्लेखले नाही * नाडी वाचकाबरोबर झालेले सर्व संभाषण 'चोरून' टेप करायची काही गरज नव्हती. कारण त्यांच्या टेबलावर टेप रेकॉर्डर सदैव असतोच. तोच त्यांना पहिल्यापासून चालू ठेवायला विनंती करून टेपरेकॉर्डिंगचे काम करता आले असते का नाही? * त्यांना त्यांची पट्टी सापडली म्हटल्यावर त्यांच्यासाठीचा ताडपट्टीतून लिहून आलेला मजकूर एका ४० पानी वही दिला होता का नाही?. * त्यानंतर एक भाषांतर केलेली टेपही नंतर दिली गेली होती की नाही?. त्या टेपमधील मजकुरात, पट्टी शोधायला विचारलेल्या प्रश्नातून मिळालेल्या माहिती शिवाय आणखी काय माहिती पट्टीतून आली हे जाणता आले असते की नाही?. * ओंकारांनी जो नाडीग्रंथाना खोटे ठरवण्यासाठीचा पुरावा मिळवला होता, त्याची शहानिशा तेथल्या तेथेच करून पहाता आली असती कि नाही? ओकांना प्रत्यक्ष समोर असताना देखील भेटण्याचे टाळावे असा त्यांच्या सल्लागारांचा मानस असल्याने टाळले गेले की नाही? * आता जे ओंकारांनी केले ते ओकांनी केले काय़? * हो. असे संपुर्ण टेप ओकांनी अनेकदा केले होते. नव्हे तो त्यांचा आग्रह असे. नंतर त्यातील फोलपणा लक्षात आल्यावर ते टेप नंतर इतर कामाला वापरले गेले. जे शोधकार्य ओंकारांनी केले नाही वा फक्त करावे असे सुचवले ते ओकांना केले काय? 1. होय. नाडीपट्टीतील मजकूर वहीत उतरवून घेतला गेल्याची प्रत्यक्ष खात्री झाल्यावर ती वही त्याच व अन्य नाडीकेंद्रातील इतर अनेक वाचकांकडून वाचवून घेतली गेला. त्यांनी तो जशाचा तसा वाचून दाखवला. 2. त्यातऱ्हेच्या अनेक लिखित वह्या नंतर अनेक नाडी ग्रंथांशी मुळीच संबंध नसलेल्या तमिळजाणकारांना दाखवून त्याचे भाषांतर करून घेतले. 3. नाडी केंद्रचालकांच्या सहकार्याने नाडीग्रंथ पट्ट्यांच्या फोटोतून दिसणारा मजकूर व वहीतील मजकूर यांची खात्री केली. 4. नाडीपट्ट्यात जन्मकालच्या ग्रहपरिस्थिचे वर्णन खरोखर कसे केलेले असते का ? अंगठ्यांच्या ठशांचे वर्णन कसे दिलेले असते का? आदीचे पुरावे शोधले गेले. 5. आपल्याकडून माहिती काढून तीच आपल्याला सांगितली जाते हे वरवर तसे 'दिसत' असले तरी तसे नाही कारण नाडी वाचक ताडपट्टीतील मजकूर वहीत लिहून घेऊन 'वाचत' असतो. तो ती पट्टीतून 'वाचतोय' का आधीची मिळवलेली माहिती लक्षात ठेऊन 'सांगतोय' याची पक्की खात्री न करताच फक्त एका व्यक्तीच्या एका ताडपट्टी शोधाच्या ' टेपच्या अनुभवावरून नाडी ग्रंथांना खोटे ठरवण्यात अपप्रचार जास्त व शोधाची तळमळ कमी असे चित्र प्रकट होते. 6. ओंकारांच्या लेखातील मुख्य मुद्याला तो खरा आहे असे मानून हवाईदलातील काही लोकांच्या समावेत एकदा एक प्रात्यक्षिक केले गेले. ओकांनी ते सर्व प्रश्न एका मागून एक (हिंदीतून) वाचले. काहींना त्यातील उत्तरे लिहून नोंद करायला सांगितली तर काहींना नुसतीच आठवणीत ठेवायला सांगितली. त्यातील आलेला निष्कर्ष असा होता - सतत प्रश्नांचा भडिमार करून कोणत्या प्रश्नाला नक्की हो व कोणत्याला नाही म्हटले गेले यातून विचारून मिळवलेली माहिती इतक्या अचुकपणे नुसती लक्षात ठेऊन पुन्हा सांगणे शक्य नाही. तो संपुर्ण प्रात्यक्षिकाचा पुरावा व त्यांच्या विवेचनातून ओंकार वाचकांची दिशाभूल कशी न कळत वा कळत करतात, हे ओकांनी "बोध अंधश्रद्धेचा" पुस्तकातील लेखातून सादर केला आहे. 7. त्यामुळे हा लेख फक्त वाचकांना त्यांनी काढलेल्या निश्कर्षांवर विचार करायला जरूर उद्युक्त करतो. मात्र प्रत्यक्षात नाडी पट्ट्या्वरील शोधकार्य न केले गेल्याने तसा निरुपद्रवी वाटतो आहे. 8. ओंकारांनी कूटलिपीची ढाल करून ही नावे ताडपट्टीत आहेत असे सांगायचा 'गोलमाल करायला' वाव आहे म्हणून भांडारकर सारख्या प्राच्यसंस्थेतील तज्ञांकरवी त्याची तपासणी व्हावी. तशी ती ओकांनी चेन्नईतील प्राच्य संस्थाकेंद्रातून केली आहे. एका फोटोतील 'शशिकांत' हे नाव कसे कोरून लिहिलेले आहे याचे प्रात्यक्षिक सादर केले आहे. धनंजय व हैयोहैयैयोंनी त्यावर आपले सकारात्मक मत नोंदले आहे. 9. हैयोहैयैयोंनी तमिळकुटलिपीवर आधारित लेखातून नाडीपट्टयातील लिपीचा उलगडा करता येतो. ती नाडीवाचकांच्या व्यतिरिक्त ही वाचायला येईल असे सुचवले आहे. ओकांनी त्यांना सवडीने कूटलिपीवर मराठी वाचकांसाठी मिपावरून जास्त प्रकाश टाकावा असे आवाहन केले आहे. 10. ओंकारांनी काही मजकूर, शब्द, नोकरी-व्यवसाय वा अन्य सध्याच्या प्रचलित नवे शब्द संस्कृत मधून आहेत असे भासवून ग्राहकाला प्रभावित केले जात असावे, असा नाडीशब्दांचा एक शब्दकोश तयार करण्याची सुरवात झाली आहे. नाडीतील शंभर तमिळ शब्दांचा एका नमुना कोश २००७साली इन्स्टियुट ऑफ एशियन स्टडीजचे डायरेक्टर ड़ॉ.जी.जॉन सॅमियएल यांच्या हस्ते वितरित केला गेला. 11. ओंकारांनी नाडी ग्रंथात व्यक्तीच्या जन्मदिनांकाचे, जन्मकाळच्या ग्रहस्थितीचे वर्णन नसावे असा त्यांनी कयास बांधला. तो तसा असतो हे सोदाहरण दाखवून देण्यासाठी १७ डिसंबर२००९च्या कथनातील भाग मिपावर सादर केला गेला आहे. यावरून सुज्ञ वाचकांनी योग्य तो निष्कर्ष काढावा ही विनंती. नाडी ग्रंथावरील अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/ शशिकांत

In reply to by शशिकांत ओक

नितिन थत्ते 05/04/2010 - 22:37
प्रतिसाद वाचून ह ह पु वा. >>१. होय. नाडीपट्टीतील मजकूर वहीत उतरवून घेतला गेल्याची प्रत्यक्ष खात्री झाल्यावर ती वही त्याच व अन्य नाडीकेंद्रातील इतर अनेक वाचकांकडून वाचवून घेतली गेला. त्यांनी तो जशाचा तसा वाचून दाखवला. नाडीपट्टीतील मजकूरच वहीत लिहिला आहे का? याची शहानिशा दहा लोकांकडून (नाडीकेंद्रा बाहेरच्या) करून घ्यायला हवी होती. >>2. त्यातऱ्हेच्या अनेक लिखित वह्या नंतर अनेक नाडी ग्रंथांशी मुळीच संबंध नसलेल्या तमिळजाणकारांना दाखवून त्याचे भाषांतर करून घेतले. पुन्हा वह्यांचे भाषांतर कशाला? त्या वह्यांमध्ये नाडीपट्टीवरचा मजकूरच होता हे कोण तपासणार? >>3. नाडी केंद्रचालकांच्या सहकार्याने नाडीग्रंथ पट्ट्यांच्या फोटोतून दिसणारा मजकूर व वहीतील मजकूर यांची खात्री केली. ओके. पण नाडीपट्ट्या प्रत्यक्ष पाहिल्या का? >>4. नाडीपट्ट्यात जन्मकालच्या ग्रहपरिस्थिचे वर्णन खरोखर कसे केलेले असते का ? अंगठ्यांच्या ठशांचे वर्णन कसे दिलेले असते का? आदीचे पुरावे शोधले गेले. कसे शोधले? >>5. आपल्याकडून माहिती काढून तीच आपल्याला सांगितली जाते हे वरवर तसे 'दिसत' असले तरी तसे नाही कारण नाडी वाचक ताडपट्टीतील मजकूर वहीत लिहून घेऊन 'वाचत' असतो. तो ती पट्टीतून 'वाचतोय' का आधीची मिळवलेली माहिती लक्षात ठेऊन 'सांगतोय' याची पक्की खात्री न करताच फक्त एका व्यक्तीच्या एका ताडपट्टी शोधाच्या ' टेपच्या अनुभवावरून नाडी ग्रंथांना खोटे ठरवण्यात अपप्रचार जास्त व शोधाची तळमळ कमी असे चित्र प्रकट होते. जेव्हा आपणच दिलेल्या माहितीव्यतिरिक्त काहीही माहिती मिळाली नाही असे दिसते तेव्हा आणखी काय समजायचे? एक अनुभव नसून दोन अनुभव आहेत. >>6. ओंकारांच्या लेखातील मुख्य मुद्याला तो खरा आहे असे मानून हवाईदलातील काही लोकांच्या समावेत एकदा एक प्रात्यक्षिक केले गेले. ओकांनी ते सर्व प्रश्न एका मागून एक (हिंदीतून) वाचले. काहींना त्यातील उत्तरे लिहून नोंद करायला सांगितली तर काहींना नुसतीच आठवणीत ठेवायला सांगितली. त्यातील आलेला निष्कर्ष असा होता - सतत प्रश्नांचा भडिमार करून कोणत्या प्रश्नाला नक्की हो व कोणत्याला नाही म्हटले गेले यातून विचारून मिळवलेली माहिती इतक्या अचुकपणे नुसती लक्षात ठेऊन पुन्हा सांगणे शक्य नाही. तो संपुर्ण प्रात्यक्षिकाचा पुरावा व त्यांच्या विवेचनातून ओंकार वाचकांची दिशाभूल कशी न कळत वा कळत करतात, हे ओकांनी "बोध अंधश्रद्धेचा" पुस्तकातील लेखातून सादर केला आहे. सर्वसामान्य लोकांना लक्षात ठेवता येणे आणि विशिष्ट प्रकारे ट्रेन झालेल्याला लक्षात राहणे हे वेगळे नाही का? जसे हॉटेलातल्या कोणत्या टेबलावरील कोणत्या व्यक्तीने कायकाय ऑर्डर दिली त्यातले काय काय देऊन झाले आणि काय राहिले हे वेटरच्या लक्षात राहते. तुम्हाला एखादे दिवशी असे हॉटेलात सोडले तर तुमच्या ते लक्षात राहणार नाही. म्हणजे ते लक्षात ठेवता येत नाही असे नाही. >>7. त्यामुळे हा लेख फक्त वाचकांना त्यांनी काढलेल्या निश्कर्षांवर विचार करायला जरूर उद्युक्त करतो. मात्र प्रत्यक्षात नाडी पट्ट्या्वरील शोधकार्य न केले गेल्याने तसा निरुपद्रवी वाटतो आहे. तुम्हाला ते नाडीपट्टीवाले पट्ट्या दाखवायला तयार असतात असे दिसते. म्हणून तुम्हाला सहकार्य करण्याचे आवाहन केले असता तुम्ही ते नाकारल्याचे स्मरते. >>8. ओंकारांनी कूटलिपीची ढाल करून ही नावे ताडपट्टीत आहेत असे सांगायचा 'गोलमाल करायला' वाव आहे म्हणून भांडारकर सारख्या प्राच्यसंस्थेतील तज्ञांकरवी त्याची तपासणी व्हावी. तशी ती ओकांनी चेन्नईतील प्राच्य संस्थाकेंद्रातून केली आहे. एका फोटोतील 'शशिकांत' हे नाव कसे कोरून लिहिलेले आहे याचे प्रात्यक्षिक सादर केले आहे. धनंजय व हैयोहैयैयोंनी त्यावर आपले सकारात्मक मत नोंदले आहे. फोटोत शशिकांत लिहिलेल्या पट्टीवरील मजकूर हजारो वर्षांपूर्वी कोरलेला होता की त्याच वेळी (ओकांना पट्टी दाखवण्यापूर्वी ) कोरला होता हे ओकांनी कसे तपासले? >>9. हैयोहैयैयोंनी तमिळकुटलिपीवर आधारित लेखातून नाडीपट्टयातील लिपीचा उलगडा करता येतो. ती नाडीवाचकांच्या व्यतिरिक्त ही वाचायला येईल असे सुचवले आहे. ओकांनी त्यांना सवडीने कूटलिपीवर मराठी वाचकांसाठी मिपावरून जास्त प्रकाश टाकावा असे आवाहन केले आहे. >>10. ओंकारांनी काही मजकूर, शब्द, नोकरी-व्यवसाय वा अन्य सध्याच्या प्रचलित नवे शब्द संस्कृत मधून आहेत असे भासवून ग्राहकाला प्रभावित केले जात असावे, असा नाडीशब्दांचा एक शब्दकोश तयार करण्याची सुरवात झाली आहे. नाडीतील शंभर तमिळ शब्दांचा एका नमुना कोश २००७साली इन्स्टियुट ऑफ एशियन स्टडीजचे डायरेक्टर ड़ॉ.जी.जॉन सॅमियएल यांच्या हस्ते वितरित केला गेला. हा मुद्दा काय हे कळले नाही. >>11. ओंकारांनी नाडी ग्रंथात व्यक्तीच्या जन्मदिनांकाचे, जन्मकाळच्या ग्रहस्थितीचे वर्णन नसावे असा त्यांनी कयास बांधला. तो तसा असतो हे सोदाहरण दाखवून देण्यासाठी १७ डिसंबर२००९च्या कथनातील भाग मिपावर सादर केला गेला आहे. हे पुन्हा वाचून पाहीन. >>यावरून सुज्ञ वाचकांनी योग्य तो निष्कर्ष काढावा ही विनंती. असेच म्हणतो. नितिन थत्ते (शु सुधारक संपादकांना सूचना : माझ्या लेखनात शुद्धलेखनाच्या चुका आढळल्यास ते दुरुस्त केले जावे. माझी हरकत नाही. मात्र ते दुरुस्त केल्या जाऊ नये)

चित्रगुप्त 05/04/2010 - 18:29
मिपा वर नाडीसंबंधी उलटसुलट चर्चा व एकमेकांवर गरळ ओकत राहणे, यातून काहीही साध्य होणार नाही. नाडीसंबंधाने अरुंधती यांनी सुचवलेले मुद्दे जरी योग्य असले, तरी तश्या प्रकारचा अभ्यास मुळात हा सर्व बनवाबनवीचा प्रकार नाही, हे (मिपाकरांनी विविध नाडीकेंद्रांना स्वतः भेटी देऊन तेथील संभाषण टेप करून) सिद्ध झाले, तरच करणे योग्य व गरजेचे असेल. या विषयी मिपा सदस्यांना खालील प्रमाणे कार्य करता यावे: १. यात प्रत्यक्ष सहभागी होऊ शकत असलेल्या सदस्यांची यादी (संपर्क क्रमांक व गावाचे नाव यासह) बनवणे. २. त्याप्रमाणे कोणकोणत्या नाडीकेंद्रांना भेट देणे सोयीचे होईल, याची यादी बनवणे (तिथले पत्ते, फोन, फी, वगैरे माहितीसह). यात श्री. ओकांचे सहकार्य मोलाचे आहे. ३. जे सदस्य स्वतः नाडीकेंद्रांना भेट देऊ शकत नाहीत, परंतु काही सहभाग देउ शकतात, त्यांनी ते काय करू शकतात, हे कळवावे. उदाहरणार्थ टेप रेकॊर्डर्स ची वा वाहनाची सोय करणे, गरज असल्यास आर्थिक भार उचलणे, नाडी केन्द्रांना फोन करणे, एकंदरीत या प्रकल्पाचे नियोजन, को-ऒर्डीनेशन करणे, वगैरे. ४. नाडी वाचनाचे वेळी व्हिडियो शूटिंग व ऒडियो रेकॊर्डिंग करणे शक्य आहे का, नाडी केन्द्रवाले तसे करू देतील का, हे श्री. ओक यांनी सांगावे. ते तसे करू देत नसल्यास गुप्तपणे करणे भाग आहे. श्री. ओकांनी उल्लेख केलेला केन्द्रवाल्यांचा टेपरेकॊर्डर हा नाडी वाचनाचे वेळी सुरू केला जात असेल. त्यापूर्वी पट्टी शोधताना विचारल्या जाणा‍र्‍या प्रश्नांचे व जातकाने दिलेल्या उत्तरांचे रेकॊर्डिंग केले जाते का (जसे श्री ओंकार पाटील यांनी केले आहे), हे श्री ओक यांनी स्पष्ट केलेले नाही. आपल्या संशोधनाचे दॄष्टीने, तेच जास्त महत्वाचे आहे. ५. त्यानंतर प्रत्यक्ष नाडीकेंद्रांना भेटी देऊन आपापल्या पट्ट्या काढवून त्या संपूर्ण प्रसंगाचे रेकॊर्डिंग करणे. यात काही जातकांना तुमची पट्टी मिळत नाही, असे सांगितले जाईल, तरीही काय संभाषण झाले, याची नोंद करावी. ६. आपण या प्रकाराची चिकित्सकपणे तपासणी करायला आलेलो आहोत, असे नाडीकेंद्र वाल्यांना वाटले, तर ते तुमची पट्टी मिळत नाही, असे सांगून वाटेला लावतील, अशी बरीच शक्यता वाटते, तरी आपण खरोखरच संकटात सापडलेले आहोत, व पट्टीत पापक्षालनार्थ सांगून येणारी धार्मिक कॄत्ये करण्यास उत्सुक आहोत, असा अविर्भाव असावा. हल्ली मिळणारे अगदी लहान, खिश्यात पेन सारखे अडकवता येणारे रेकॉर्डर्स खूपच सोयिस्कर पडतील. मुख्य म्हणजे यात डिजिटल फ़ाईल्स च्या स्वरूपात रेकॉर्डिंग होत असल्याने ते मिपावर सर्वांना ऐकता येइल. सहज सुचलेले मुद्दे वर लिहिले आहेत, सर्वच मिपाकर अतिशय सूज्ञ, बुद्धिमान व कर्तबगार असल्याने या विषयी अजून जास्त चांगले नियोजन करून प्रत्यक्ष कार्यास सुरुवात करता येईल.

In reply to by चित्रगुप्त

घटं भिंद्यात, पटं छिंद्यात, कुर्यातरासभरोहणं, येनकेनप्रकारेण, प्रसिध्द: पुरुषो भवेत। आम्ही पुण्यात हे प्रकरण १९९४ पासुन पहात आहोत. त्यावेळी नाडी केंद्रे पुण्यात नव्हती. माध्यमातुन या प्रकरणाचा बराच गवगवा झाला होता. खरतर मिपाचा नाडी आखाडा होउ नये असे आम्हाला वाटत असल्याने फारसा प्रतिसादा आम्ही देत नाही/ नव्हतो. तरी पण नवीन आलेल्या लोकांसाठी काही बाबी. यात पुनरावृत्तीचा दोष/ गुण आहे. या मुळे या विषयाला विनाकारण प्रसिद्धी मिळत आहे हे माहित असुन देखील हे आम्ही लिहित आहोत. कारण यातुन काही श्रद्धाळु लोकांचा नकळत बळी जाईल. आमचा प्रयोग आम्ही या विषयावर पत्रकार परिषद घेउन एक आवाहन केले होते ते येणे प्रमाणे
पाच हजार वर्षापूर्वी अगस्त्य ऋषिंनी लिहिले आहे असे सांगितले जाणाऱ्या नाडी भविष्याचा पडताळा घेण्याचा प्रयोग
फलज्योतिष चिकित्सा मंडळ हे फलज्योतिषाची चिकित्सा करणाऱ्या मंडळींचा एक अनौपचारिक ग्रुप आहे. मंडळातर्फे नाडी भविष्य या ज्योतिष पध्दतीचा अभ्यासप्रकल्प जनहितार्थ हाती घेण्यात आला आहे. या विषयाच्या अनुषंगाने सर्व वाचन साहित्य मंडळाकडे विनामूल्य उपलब्ध आहे.या विषयावरील लोकांचे विविध अनुभव व मते जाणून घेण्याकरिता मंडळाने दि. १-४-२००१ रोजी खुल्या गप्पांचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात पूर्वदूषितग्रह न बाळगता सत्यासत्यता तपासावी असा सूर होता. उपलब्ध माहितीनुसार गेल्या एक वर्षात दक्षिणेकडून आलेली अशी चार केंद्रे पुण्यात कार्यान्वित झाली आहेत. तेथील माहितीपत्रकानुसार अंगठयाचा ठसा वा पत्रिकेवरुन नाडी पटटी शोधून व्यक्तीचे नांव, आईवडिलांचे नांव, पति/पत्नी, व्यवसाय, भावंड, संतती इ. खुलासा केला जातो. प्रत्यक्षात संबंधिताने अंगठयाचा ठसा दिल्यावर त्याच्याकडूनच अनेक प्रश्न विचारुन ही माहिती काढून घेतली जाते याची आम्ही खात्री केली आहे. नाडी पट्टीतील मजकुर हा कूट तामिळ लिपीत असतो असे तेथे सांगितले जाते. त्यावरुन ते हिंदीत प्रश्न विचारतात. नाडीपट्टी शोधण्यासाठी असे प्रश्न विचारावे लागतात असे नाडीवाचक सांगतात. सर्वांच्याच पटटया सापडतात असे नाही असे नाडी केन्द्राने अगोदरच सांगितले आहे. पट्टी सापडल्यास वाचनाचे रूपये तीनशे आकारले जातात. आम्ही असे म्हणतो की, पोलीस खात्याच्या अंगुलीमुद्रा तज्ज्ञांच्या मते अंगठयाचा प्रत्येक व्यक्तिचा ठसा हा 'युनिक` असतो. त्या ठशाचे पॅरामिटर्स पुन्हा कधीही रिपीट होत नाही. तसे नसते तर अंगुलीमुद्राशास्त्र केव्हाच मोडीत निघाले असते. चोर सोडून संन्याशाला फाशी बसली असती. मग व्यक्तीचे नांव आणि ठसा हे दोन्ही पॅरामीटर्स अन्य कुणातरी व्यक्तीचे बाबत जुळतील अशी शक्यताच नाही हे ठामपणे म्हणता येते. मग या दोन पॅरामीटर्सच्या आधारे त्यांना व्यक्तीची पट्टी निश्चित करण्यासाठी कुठलीच अडचण येता कामा नये. तरीही पटटी हुडकून काढण्यासाठी सोपे पडावे म्हणून हे दोन घटक कमी आहेत असे घटकाभर मानू. जन्मसाल व पित्याचे नांव हे अजून क्ल्यू देउ. स्वत:चे नांव व ठसा या 'नेसेसरी कण्डीशन` झाल्या. अंगठयाचा ठसा, स्वत:चे नांव, पित्याचे नांव व जन्मसाल या 'सफिशंट कण्डीशन` झाल्या. असे करत करत व्यक्तीच्या ठशाबरोबर व्यक्तीचे नांव, व्यक्तीचे जन्मसाल, महिना, आठवडा, व्यक्तीच्या आईचे नांव, वडिलांचे नाव, पती/ पत्नीचे नांव, स्वत:चा व्यवसाय, शिक्षण, भावंडाची माहिती, संततीची माहिती तयार देउ व मोअर दॅन सफिशंट या कण्डीशनपाशी येवून ठेपू. याआधारे आम्ही नाडी केन्द्राला खालील प्रयोग सुचवला आहे. मंडळाचे सदस्य मा. श्री. रिसबूड यांनी नाडी केन्द्राला एक रजिस्टर्ड पत्र पाठविले असून त्यात संशोधनासाठी हा प्रयोग करण्याचे आवाहन केले आहे. त्यात असे म्हटले आहे की, आम्ही आपणास जन्मतारीख व वेळ सोडून वरील सर्व माहिती देउ. सोबत सील केलेली कुंडली देउ. ठसा व माहितीवरून नाडीपटटीतील कुंडली केंद्राने शोधावी. ती जर सील केलेल्या कुंडलीशी जुळली तर आपल्या नेहमीच्या फीच्या दुप्पट फी आम्ही देउ. पत्राला त्यांनी लेखी उत्तर दिले नाही. परंतु रिसबूडांनी फोनवर विचारणा केली असता आपण हा प्रयोग दि.१३ एप्रिल २००१ रोजी सायंकाळी पाच वाजता करु असे तोंडी सांगितले आहे. या पत्रकाद्वारे मंडळ पत्रकारांना असे आवाहन करिते की, त्यांनी सदर प्रयोगाचे वेळी प्रत्यक्ष उपस्थित रहावे प्रसंगी स्वत:च्या अंगठयाचा ठसा देउन कुंडली शोधण्यास नाडी केन्द्रास उद्युक्त करावे व नाडी भविष्याची सत्यासत्यता पडताळून जनतेसमोर आणावी. त्यासाठी पत्रकारांना पत्रकार भवन येथून नाडीकेंद्रापर्यंत नेण्याआणण्याची सोय फलज्योतिष चिकित्सा मंडळातर्फे करण्यात येत आहे. तरी सर्वांनी दि.१३.४.२००१ रोजी सायं. ५.०० वा. पत्रकार भवन, नवी पेठ, या ठिकाणी उपस्थित रहावे. ============================================================= वरील प्रयोगाला पत्रकार आले नाहीत. पण आम्ही दोन तीन लोक सोबत घेउन सिंहगड रोड च्या नाडीकेंद्रात ठरल्याप्रमाणे गेलो. प्रत्यक्ष प्रयोगात तुमची माहिती तुमच्या जवळच ठेवा आम्हाला तिची गरज नाही असे सांगून तुमचे फक्त ठसे आम्ही घेतो असे सांगितले. आम्ही तिघांचेही ठसे त्याला दिले. आता पट्टी सापडेपर्यंत थांबा असे त्याने आम्हाला सांगितले. दरम्यानच्या काळात मुंबईहून आलेल्या एका दांपत्याची नाडीपट्टीही सापडली व नाडीवाचनही झाले. अर्ध्या तासानंतर तुम्हा तिघांच्याही नाडी पट्टया या केंद्रात नाहीत. आम्ही त्या मद्रासवरुन मागवून घेउ व तुम्हाला फोन करु असे सांगून आम्हास वाटेला लावले. त्यानंतर आजतागायत अनेकदा फोन करुनही आमच्या पट्टया सापडल्या नाहीत यावरुन सूज्ञ वाचक काय ते समजून घेतील. त्याअगोदर एकदा माझी पत्नी मंजिरी ता. २३-२-२००१ रोजी श्री रिसबूड व श्री प्रकाश पेंडसे यांच्या समवेत पुण्यातल्या नाडी-केंद्रात गेली. तिने तिच्या अंगठयाचा ठसा, पूर्ण नाव व जन्मतारीख सांगितली पण जन्मवेळ मात्र माहीत नाही असे सांगितले. काही काळानतंर ज्योतिष्याने नाडी-बंडलातली एकेक पट्टी भराभर उलटत तिला बरेच प्रश्न विचारले. तिची रास धनू आहे हे दरम्यानच्या काळात तिच्या जन्मतारखेवरून पंचांगातून त्याने काढले असावे, म्हणून एक पट्टी समोर धरून व तिच्यात वाचल्यासारखे करून त्याने तिला विचारले की तुमची रास धनू आहे का ? मंजिरी म्हणाली की तिला माहीत नाही. श्री. रिसबूड शेजारीच बसले होते, त्यांनी त्याला विचारले की पट्टीवर धनू रास लिहिली आहे काय ? तो होय म्हणाला. त्यावर रिसबुडांनी म्हटले की मग त्या पट्टीत लग्न कोणते लिहिले आहे ते सांगा. तो जरासा घुटमळला व म्हणाला की ते आत्ता कळणार नाही, वो तो बाद मे आयेगा. आणखी काही प्रश्न विचारून झाल्यावर त्याने सांगितले की तुमची पट्टी सापडत नाही. हा त्याचा हुकुमी एक्का होता. पट्टी सापडत नाही असे म्हटले की खेळ खलास. पट्टी सापडली असे म्हणायची सोय नव्हती कारण जन्मवेळ दिलेली नसल्यामुळे लग्न-रास काढता येत नव्हती, ती काय सांगायची हा पेच त्याला पडला असता. त्यातून त्याने अशी सुटका करून घेतली. एक नाडीज्योतिषी भोंदु निघाला म्हणुन सर्व तसेच असतात काय? असे म्हणुन एक नाडीचक्र किंवा चरक चालु होतो. अनुभव घेण्या अगोदर तर्कबुद्धीच्या पातळीवर् दावे तपासता येतात. कै. रिसबुडांविषयी माहिती माधव रिसबुड एक कठोर फलज्योतिष चिकित्सक प्रकाश घाटपांडे

अरुंधती 05/04/2010 - 19:18
अन्य काही मुद्दे : १] प्राप्तीकरविषयक अटी, हिशेब, पावत्या, करभरणी इ. इ. पूर्तता नाडीग्रंथवाचक करतात काय? की करचुकवेगिरी करतात? २] नाडीग्रंथातील स्वतःची पट्टी बघायला आलेला व फी भरून नाडीपट्टी वाचन करवून घेणारा माणूस भारतीय ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत येतात काय? ३] माहिती अधिकाराखाली ह्या सर्व व्यवसायाची पाळेमुळे खणून काढणे अशक्य आहे काय? ४] त्यांच्या 'उपाया'मध्ये जारण, मारण नसते तर मंत्र, तंत्र, उपचार, यंत्र इ. गोष्टी असतात ह्याकडे आपण लक्ष दिले आहेत काय? ५] नाडीवाचनाचा जर ''प्लासिबो'' इफेक्ट येणार असेल व त्याने वाचन करवून घेणार्‍यास मानसिक फायदा होणार असेल तर त्याला 'सायको थेरपी' म्हणावे काय? अरुंधती http://iravatik.blogspot.com/

In reply to by अरुंधती

(अंध) श्रद्धेपुढे वरील सर्व प्रश्न व्यर्थ असतात. अगतिक माणसांना दिलासा हवा असतो. तो नाडीतुन मिळतो. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

अरुंधती 06/04/2010 - 14:03
जर असे म्हणत असाल तर मग मुद्देच संपले.... अंधश्रध्दा ही अनादि कालापासून चालत आली आहे.... अनादी कालापर्यंत चालत राहील. कदाचित स्वरूप बदलेल, संकल्पना बदलतील पण अंधश्रध्दा चालूच.... मग असे असेल तर कशापायी तिचे निर्मूलन करण्याचा ध्यास? राहू देत लोकांना अज्ञानाच्या खाईत? उपस्थित केलेल्या प्रश्नांना वा मुद्द्यांना केवळ ' श्रध्देपुढे सर्व प्रश्न व्यर्थ असतात' म्हणून तुम्ही बगल देऊ शकत नाही. एखाद्या गोष्टीचा सर्व बाजूंनी विचार करावाच लागतो. अन्यथा तुम्ही त्या संदर्भात करत असलेले कार्य अपुरे राहते. एकीकडे तुम्ही नाडीग्रंथ थोतांड आहे ही भाषा करत आहात, लोकांना अंधश्रध्देपासून परावृत्त करायचे म्हणत आहात, तर त्याच वेळी कायद्याच्या क्षेत्रात राहूनही तुम्ही असे कसे म्हणू शकता? प्राप्तिकरविषयक, ग्राहक संरक्षण विषयक तसेच माहिती अधिकारातून पुढे आलेल्या माहिती विषयक मी विचारलेल्या प्रश्नांना कृपया उत्तरे द्यावीत ही नम्र विनंती. आपल्याकडे त्याविषयी माहिती नसल्यास कृपया तसे कळवावे. अरुंधती http://iravatik.blogspot.com/

In reply to by अरुंधती

अरूंधतीताई, माझ्या मते प्रकाशकाकांचा प्रतिसाद हा नाडीकेंद्रं कशी चालतात किंवा कराच्या कचाट्यातून सुटत असतील तर का, अशा प्रश्नांच्या रोखाने होता. "श्रध्देपुढे सर्व प्रश्न व्यर्थ असतात" याचा रोख बहुदा नाडीसमर्थकांकडे असावा, नाडीबाबत अश्रद्ध किंवा साशंक लोकांकडे नाही. अदिती

In reply to by अरुंधती

तुम्ही मांडलेले मुद्दे सुजाण ग्राहकासाठी लागू आहेत. अगतिक भक्तांसाठी नाहीत. नाडीकडे वळणारे कदाचित अगतिक ग्राहक असतील, पण जर त्यांना चमत्काराची 'खात्री' देऊन भक्त बनवलं तर मग हे प्रश्न मिटतात. सुजाण ग्राहकांची नाडी बहुधा सापडत नसावी. प्रकाशकाकांसाठी प्रश्न - देशातली अगतिकता कमी केली तर अंधश्रद्धा कमी होईल का? (अगतिकता - प्रश्न, दु:खं आहेत, उपाय नाहीत ही स्थिती. ती कमी करणं म्हणजे दु:खांची काही मुळं - गरीबी, रोगराई, अपत्यमृत्यू, नैराश्य, अशिक्षितता, अन्याय कमी करणं, व उपाय वाढवणं म्हणजे स्वातंत्र्यं, संधी, समृद्धी वाढवणं...) याबाबत तुमची मतं जाणून घ्यायला आवडेल. राजेश

In reply to by राजेश घासकडवी

देशातली अगतिकता कमी केली तर अंधश्रद्धा कमी होईल का?
सरकारी नोकरांचे पगार वाढवले तर भ्रष्टाचार कमी होईल का? इतकाच अवघड आहे. अज्ञानातुन निर्माण होणार्‍या अंधश्रद्धा या प्रबोधन ज्ञानप्रसार यातुन कमी होतील ही पण अगतिकतेतुन निर्माण होणार्‍या अंधश्रद्धाचे काय? हा प्रश्न आहेच. मूळात श्रद्धा अंधश्रद्धा मधील सीमारेषा पुसट आहे. आमच्या मते प्रत्येक श्रद्धा ही अंधच असते. अंधश्रद्धा म्हणणे म्हणजे पिवळा पितांबर म्हणल्यासारखे आहे. श्रद्धांचे उपयुक्तता मुल्य किती व उपद्रवी मुल्य किती व कोणास? हा खरा प्रश्न आहे. तरी पण अगतिकता कमी झाली तर अंधश्रद्धांची किमान तीव्रता तर कमी होईल. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

अरुंधती 06/04/2010 - 15:58
आमच्या मते प्रत्येक श्रद्धा ही अंधच असते>> मग माणुसकीवरच्या, ईमानदारीवरच्या, नेकी, चांगुलपणा, सत्यावरच्या श्रध्देबद्दलही तसेच म्हणाल काय? देशाबद्दलच्या श्रध्दाभावाविषयीही असेच म्हणाल काय? श्रध्दाविषयक अंधश्रध्दा? अरुंधती http://iravatik.blogspot.com/

In reply to by अरुंधती

श्रद्धा -अंधश्रद्धा यांचा विचार करताना खरा प्रश्न येतो ते विधायक अथवा विघातक श्रद्धा याचा. ज्या श्रद्धा बाळगल्याने समाजाचे काही नुकसान होत नाही अशा श्रद्धा बाळगल्यास त्यास हरकत नसते. (अर्थात तात्विक पातळीवर वाद-संवाद घडताना त्याला देखील हरकत असते असे मात्र आढळते). धनलालसेने नरबळी, नवसापोटी प्राणीहत्या, धार्मिक श्रद्धेतुन केलेले शोषण या विघातक श्रद्धेपोटी घडलेल्या गोष्टी मात्र समाजाला मागे नेणार्‍या असतात. सश्रद्ध माणुस म्हणेल कि माझी देवावर श्रद्धा आहे.देवाला वाईट गोष्टी आवडत नाही म्हणुन मी ते करणार नाही. अश्रद्ध / नास्तिक म्हणेल वाईट गोष्टी करणे माझ्या विवेकात बसत नाही म्हणून मी ते करणार नाही. दोन्ही लोकांनी केलेली / न केलेली कृती एकच असु शकते. काही माहिती अंनिस व धर्मश्रद्धा आम्हीच खरे धर्मश्रद्धा हा नरेंद्र दाभोलकरांचा लेख इथेच वाचा
या पुर्वी या विषयावर् प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे उपक्रमावर झालेल्या काही चर्चा
१) धर्म देवाने निर्माण केला काय?
२) विवेकवाद
३) विज्ञानाबाबत माझी पुर्वपीठिका
४) विचार आणि चमत्कार
५) श्रद्धेचे मार्केटिंग
६) नवा ब्रिटिश कायदा प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

अरुंधती 06/04/2010 - 17:11
श्रद्धा -अंधश्रद्धा यांचा विचार करताना खरा प्रश्न येतो ते विधायक अथवा विघातक श्रद्धा याचा. ज्या श्रद्धा बाळगल्याने समाजाचे काही नुकसान होत नाही अशा श्रद्धा बाळगल्यास त्यास हरकत नसते. (अर्थात तात्विक पातळीवर वाद-संवाद घडताना त्याला देखील हरकत असते असे मात्र आढळते) >> ही हरकत कोणाची? भारतीय संविधानाची? कायद्याची? की अजून कोणाची? हे नुकसान/ फायदा कोण ठरवणार? जनता? अंनिस? कायदा? सरकार? कोण? तात्विक वादात मी नुकसान हा फायदा कसा व फायदा हे नुकसान कसे हे सिध्द करू शकते. कारण ते सापेक्ष आहेत. पण ह्या नुकसान/ फायद्याची कायदेसंमत काही व्याख्या आहे काय? की केवळ त्याला तर्काचीच पुष्टी? जर फायदा-नुकसानीचीच भाषा करायची तर ते भौतिक, शारीरिक, मानसिक, आर्थिक, आध्यात्मिक....नक्की कोणत्या पातळीवरील नुकसान/ फायदा? ज्या श्रध्दा/ अंधश्रध्दा कायद्याने असंमत आहेत, गैर आहेत त्यांवर थेट कायदेशीर कारवाई करता येतेच की! मग त्यासाठी वेगळे प्रबोधन कितपत उचित आहे? फक्त अमुक अमुक गोष्ट ही कायद्याने गैर आहे, त्यात भाग घेतल्यास तुम्हाला कायदेशीर शिक्षा होऊ शकते एवढा प्रसार पुरेसा नाही काय? आणि जिथे जिथे शोषण होत आहे, गैरफायदा घेतला जात आहे तिथे तिथे सप्रमाण तसे सिध्द केल्यास कायदा काहीच करू शकत नाही का ? अरुंधती http://iravatik.blogspot.com/

In reply to by अरुंधती

१] प्राप्तीकरविषयक अटी, हिशेब, पावत्या, करभरणी इ. इ. पूर्तता नाडीग्रंथवाचक करतात काय? की करचुकवेगिरी करतात?
आमच्या माहितीप्रमाणे नाही. करचुकवेगिरी करत असावेत.
२] नाडीग्रंथातील स्वतःची पट्टी बघायला आलेला व फी भरून नाडीपट्टी वाचन करवून घेणारा माणूस भारतीय ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत येतात काय?
आमच्या माहितीप्रमाणे नाही. कायद्यातील तज्ञ अधिक उत्तरे देउ शकतील.
३] माहिती अधिकाराखाली ह्या सर्व व्यवसायाची पाळेमुळे खणून काढणे अशक्य आहे काय?
आमच्या माहितीप्रमाणे माहिती अधिकार येथे लागु होत नाही.
४] त्यांच्या 'उपाया'मध्ये जारण, मारण नसते तर मंत्र, तंत्र, उपचार, यंत्र इ. गोष्टी असतात ह्याकडे आपण लक्ष दिले आहेत काय?
आमच्या कुवतीप्रमाणे दिले आहे म्हणुनच परिहार दीक्षाकांडम मधे त्याचा अंतर्भाव आहे. खरा धंदा तिथेच असतो.एकदा का भय निर्माण केले कि तो पुजा विधि परिहार करायला तयार होतो.
५] नाडीवाचनाचा जर ''प्लासिबो'' इफेक्ट येणार असेल व त्याने वाचन करवून घेणार्‍यास मानसिक फायदा होणार असेल तर त्याला 'सायको थेरपी' म्हणावे काय?
होय. श्रद्धा मानसिक बळ देते. श्रद्धा - अंधश्रद्धा काथ्याकुट चालुच आहेत. फायद्या बरोबर तोटा झालेले लोक पण आहेतच.
उपस्थित केलेल्या प्रश्नांना वा मुद्द्यांना केवळ ' श्रध्देपुढे सर्व प्रश्न व्यर्थ असतात' म्हणून तुम्ही बगल देऊ शकत नाही. एखाद्या गोष्टीचा सर्व बाजूंनी विचार करावाच लागतो. अन्यथा तुम्ही त्या संदर्भात करत असलेले कार्य अपुरे राहते.
श्रद्धाळू माणुस चिकित्सेच्या भानगडीत पडत नाही. आमच्या मते अडचणीत असलेल्या माणसाला वरील प्रश्न पडत नाहीत. अंधश्रद्धा निर्मुलन होईल असे माझे मत नाही. आमचा केवळ जागृती / प्रबोधन करण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. तो अपुरा असणार आहे याची जाणीव अम्हाला आहे, जगात बहुसंख्य लोक श्रद्धाळु आहेत संशयवादी लोकांची संख्या अत्यल्प आहे. आपला जालावरील सदस्यत्वाचा कालावधी पहाता आपल्याला यात रुची व उत्साह असल्यानेच आपण हे प्रश्न विचारीत आहात हे आम्हाला माहित आहे. आम्ही पुरवलेले दुवे हे आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे देतीलच असे नाही. कदाचित यातुन आपल्याला नवे प्रश्न पडतील. त्यांचे स्वागत आहे. जमल्यास उत्तरे देण्याचा प्रयत्न करु प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

टारझन 06/04/2010 - 16:44
प्रतिसाद पाहुन (वाचुन नव्हे) भोवळ आली .. (शुद्धीत येत) ... च्यायला पब्लिकचा वेळ जात नाहीये काय ? काय हो घाटपांडे काका ? काय हो थत्ते काका ? ओकांचं ठिकाय ..त्यांचा फुलटाईम बिजनेस आहे .. :)

In reply to by टारझन

नितिन थत्ते 06/04/2010 - 18:43
घाटपांडेकाकांचाबी फुलटाईम आहे. आम्हाला उगाच खाज म्हणून. पूर्वी खराट्याने खाजवायचो. आता नाडीने. :) नितिन थत्ते (शु सुधारक संपादकांना सूचना : माझ्या लेखनात शुद्धलेखनाच्या चुका आढळल्यास ते दुरुस्त केले जावे. माझी हरकत नाही. मात्र ते दुरुस्त केल्या जाऊ नये)

संजा 06/04/2010 - 17:04
माननीय ओक साहेबांनी लीहीलेले ईतके अभ्यासपुर्ण लेख न वाचता केवळ टींगलटवाळी करण्याचे काही सिनीयर सदस्यांचे चाललेले ऊद्योग पहाता मन दुखावले. ओक साहेबांचा प्रतीसाद सर्व समर्पक आहे. संजा.

कवितानागेश 06/04/2010 - 20:51
माझ्या मते BSNL काकांनी वापरलेली पद्धत अत्यंत 'अवैज्ञानिक' आहे. (स्वैपाक्पाण्यातून थोडा वेळ मिळाला तर मीपण अशी लांबलचक प्रश्नोत्तरे लिहून काढेन;) कुठलाही प्रयोग करताना निदान १०० बिंदू घ्यावेत! इथे फक्त १च आहे, तोदेखील स्वतःचा = biased! यांच्या विरुद्ध अनुभव असणारेही अनेक 'बिंदू' सापडतील, ( माझ्याकडे ३, ओकांकडे ५००-६००), त्यांचे काय? (माझ्या माहितीतल्या एका MD डॉक्टरला तिच्या १८व्या वर्षीच तिची डिग्री आणि तिच्या नवऱ्याचे पूर्ण नाव सांगितले होते.) शिवाय ते लोक जे काही सांगतील, त्या माहितीचे स्वतः, इतर नातेवाईक, भूत, वर्तमान, भविष्य अशी वर्गवारी करून त्यातील किती टक्के माहिती बरोबर आली याची 'खरी' नोंद करावी. आम्ही घरातलेच ३ जण एका नाडीकेंद्रात गेले असताना, त्यानी फक्त अंगठ्याचे ठसे घेतले, नंबर्स दिले, नाव कधीही विचारले नाही! आम्हाला भविष्य सांगणारे बुवा, हिंदी नीट येत असल्याने, फार प्रश्नांच्या भानगडीत पडले नाहीत. १० दिवसांनी फोन करायला सांगितला, तेंवा देखील आधी स्वतःचे नाव विचारले नाही. ४-५ पत्त्यांपैकी कुठली जुळते, ते पाहण्यासाठी फक्त आई आणि वडलांच्या नावातील अक्षरांची संख्या विचारली! त्यांनी माझ्या आईला पहिला प्रश्न विचारला, तुमच्या आईची २ नावे आहेत का? हो म्हटल्यावर विचारले, १ दोन अक्षरी आणि १ चार अक्षरी आहे का? हो म्हटल्यावर दोन्हीही नावे त्यांनीच सांगितली, तीसुद्धा बरोबर. यावरून त्यांनी ४-५ पैकी १ पट्टी 'फायनल' केली.त्यानंतर बुवा: वडिलांचे नाव ३ अक्षरी आहे का? आई: नाही. ४ अक्षरी. बुवा: नाही. ३ अक्षरीच आहे. पहिले जोडाक्षर आहे. आई: ( कपाळावर आठ्या!) ( मनात: आगाउच आहे हा बुवा!) बुवा: पहिले अक्षर त, न, म आहे का? आई: हो . न. बुवा: ३ अक्षरीच नाव आहे. आई: (जास्त आठ्या) मी: ( मध्येच तोंड खुपसून) दुसरे अक्षर काय? बुवा: दुसरे स, तिसरे ह . मी: बरोबर आहे. नृसिंह ! गम्मत म्हणजे, आम्ही सगळे आजोबांचे नाव नरसिंह असे सांगतो, आजोबा स्वतः मात्र, 'नृसिंह' असेच सांगायचे व लिहायचे. थोडक्यात बुवांना /महर्षी ना जास्त नीट माहिती होती आमच्यापेक्षा ! पुढे.. बुवा: तुम्ही ८ भाऊ बहिणी, ४ भाऊ ४ बहिणी. आई: ( आठ्या!) नाही. बुवा: १ भाऊ गेला. आई: ( मनात: कशाला रे मेल्या अभद्र बोलतोस!) नाही. बुवा: तुमच्या आईची ८ बाळंतपणे झाली आहेत असे इथे लिहिलेय. आई: खरेच की. (first son was still born!) बुवा: तुम्हाला भावाबहिणींची खूप मदत आहे.. .....etc. etc. आई: होय.होय........ ------------------------- सांगायचा मुद्दा हा, कि आपली स्वतःचीच स्वतःबद्दलची माहिती काही वेळेस कमी पडते. कदाचित BSNL काकांच्या बाबतीतही असे झाले असेल, तेंव्हा उत्सुक व्यक्तींनी ती नीट घेऊन मगच प्रयोग करायला जावे. आम्हाला भविष्य सांगणारे बुवा, हिंदी नीट येत असल्याने, फार प्रश्नांच्या भानगडीत पडले नाहीत. त्यामुळे 'भविष्यकथन' मिळवणे सोपे झाले. त्यांनी जो काही भूतकाळ आणि वर्तमान सांगितला तो तिघांच्याही बाबतीतला अगदी खरा ठरला, भविष्य काल आईच ७० %, दादाचा ७० % आणि माझा ( माझ्या 'अक्कलहुशारीने'!!? ) ५० % इतकाच खरा ठरला. त्यांनी १५ वर्षांनी परत याल, मग पुढचे वाचन करता येईल, आत्ता 'आज्ञा' नाही असे सांगितले. याचा मात्र मला खूप राग आला! मला स्वतःला तरी कुठेच फसवाफसवी जाणवली नाही पण फी खूप घेतात असे मात्र वाटले. आधीच अडचणीत असलेले लोक भविष्य बघायला येतात, त्यांच्याकडून पुन्हा २-४ हजार रुपये घेऊन व तितक्याच रुपयांच्या पूजा-अर्चा सांगून त्यांना अजून अडचणीत टाकणे योग्य नाही असे मला प्रामाणिकपणे वाटते. इथे सगळ्याच गोष्टी लिहिणे आत्ता शक्य नाही. पण मी मारलेला १ स्टंट मात्र त्यांनी मला सांगितला. तो फक्त माझ्या एका मैत्रिणीला माहित होता, आणि त्यांनी मला, 'तू 'असे असे' केलास का बाळा, म्हणून प्रश्न विचारला असता तर मी सरळ 'अजिबात नाही' म्हणून खोटे सांगून मोकळी झाले असते. पण एकदा पट्टीची खात्री झाल्यानंतर त्यानी एकही प्रश्न विचारला नाही, declare करायला सुरुवात केली. आता मी बिनधास्त सांगते, कि मला नाही नाही ते जीवावरचे खेळ करायची सवय आहे, आणि त्यातून मी सहीसलामत वाचते!! ( ४ पायांवर,अलगद, माउसारखी!) हे तिकडे कसे काय लिहून आले कुणास ठाऊक? थोडक्यात मी नाडी शास्त्राला थोतांड म्हणण्याचा करंटेपणा कधीच करणार नाही. पण पुन्हा ना जाण्याचा नक्कीच करेन! कारण हे लोक पैशाचा अति हव्यास करून आणी हिंदी, इंग्लिश, भाषा नीट ना शिकून त्यांच्याच हातात असलेल्या एक अत्यंत उपयोगी शास्त्राचे नुकसान करत आहेत. ============ माउ

In reply to by कवितानागेश

धनंजय 07/04/2010 - 01:46
फक्त १च आहे, तोदेखील स्वतःचा = biased!
म्हणजे "स्वतः अनुभव घेऊन बघा" असे पुन्हापुन्हा सांगितले जाते, त्याचे काय म्हणायचे? ;-)

In reply to by कवितानागेश

तुमच्याशी कोणी अनोळखी व्यक्तीने गप्पा मारल्या? अशासाठी विचारतोय की नाडीचं माहीत नाही, पण अनेक 'बुवा' ही युक्ती वापरतात. अमेरिकेतल्या काही अशाच 'अंतर्ज्ञानी' माणसांचे खेळ स्केप्टिक सोसायटीने उघडकीला आणलेले आहेत. त्यात साधारण जादू अशी असते की बुवा स्टेजवर उभा असतो. त्याचा कार्यक्रम बघायला शेकडो लोक जमलेले असतात. तो एके ठिकाणी बोट दाखवतो आणि म्हणतो 'तुम्ही, निळ्या ड्रेसमधल्या - तुमची आई अत्यवस्थ आहे म्हणून तुम्ही आल्या आहात. अलाबामाहून, इतक्या लांबून आलात, पण तुमची फेरी व्यर्थ नाही जाणार. देवाचा तुम्हाला आशीर्वाद आहे असं त्याने मला सांगितलंय..' तो याहूनही अधिक माहिती सांगतो. असं अनेकांना करतो. ही सगळी माहिती लोक सभागृहात येण्यापूर्वी रजिस्ट्रेशनच्या लायनीत असताना त्याचे साथीदार गप्पा मारत मारत माहिती काढून घेतात, व त्याला ती बाई कुठे बसलेली आहे हे आधी सांगतात... राजेश

In reply to by राजेश घासकडवी

असेच प्रयोग हे नंदीबैलवाला देखील करतो. शंभराची नोट कुणाच्या जवळ आहे असे नंदीला विचारतो? ज्याच्या खिशात शंभराची नोट आहे अशा व्यक्ति जवळ तो बैल उभा रहातो. जादुचे अनेक प्रयोग थक्क करणारे असतात.आपण ती जादुगारची कला मानतो. तेच प्रयोग बाबा बुवांनी केले तर ती सिद्धी! भोळी भाबडी जनता अलगद जाळ्यात अडकते.काही माणसांचा अदभुत गुढ गोष्टींकडे विश्वास ठेवण्याचा कल असतो. पुल देशपांडे नशिब मधे या विषयी काय म्हणतात ते पहा http://faljyotishachikitsa.blogspot.com/2008/09/blog-post.html अशाच प्रकारांविषयी १९३५ साली पुण्यात रा. ज गोखले यांनी एक पुस्तक लिहिल आहे. त्याचे नांव लोकभ्रम हे पुस्तक आमच्या फलज्योतिष चिकित्सा मंडळाच्या ई ग्रंथालयात आहे. डोकावुन पहा हे दुर्मीळ पुस्तक वाचायला मिळेल. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

In reply to by राजेश घासकडवी

कवितानागेश 07/04/2010 - 18:08
तुमच्याशी कोणी अनोळखी व्यक्तीने गप्पा मारल्या? ...>>>>>>>>>>> अजीबात नाही. मी 'कोण' हे त्या बुवा लोकाना महितच नव्हते, अनोळखी माणूस माझ्यासारख्या 'यःकश्चित' मुलिच्या मागावर सोड्णार कसे? आनि अनोळखी माणसाला मी माझ्या वडीलान्चे, आजोबान्चे, आनि आजीची नावे कशाला सान्गेन? त्या लोकानी फक्त अन्ग्ठ्याचा ठसा आनी ज न्मतारिख घेतली. आणी जन्मतारखेवरुन, नक्शत्रावरुन फार तर आमच्या नावाचे पहिले अक्शर ओळखता येइल. त्यानी आमची नावे एकदाही विचारली नहीत, योग्य पट्टी सापडल्यावर, पट्टीत वाचून 'सान्गितली.' ... ============ माउ

अरुंधती 07/04/2010 - 16:26
१ किंवा २ व्यक्तींच्या नाडीपट्टी पाहून फक्त त्यावरून काढलेले निष्कर्ष तोटके व त्रुटीपूर्ण आहेत. नाडीपट्टी हुडकून काढताना जे प्रश्न विचारले गेले [उदा आई-वडील हयात, भावंडे इ.इ.] हे व त्यांची उत्तरे नाडीवाचकाने रेकॉर्ड केली होती काय? जर तसे नसले तर सुमारे १५० पेक्षा जास्त प्रश्नांची उत्तरे त्यांनी कशी ''लक्षात'' ठेवली ह्या गूढ-रहस्याबद्दल त्यांचा सत्कारच करावा लागेल! [मला समोरच्या व्यक्तीचे नाव ती व्यक्ती नवीन असेल तर १५ मिनिटांनी लक्षातही राहात नाही... आणि इथे आई-बापाचे नाव, भावंडांची संख्या - लिंग - विवाहित्/अविवाहित, मृत्/जिवंत, जातकाचे नाव - वय - जन्मतारीख-साल, शिक्षण, विवाहित्/अविवाहित, व्यवसाय, पत्नीचे नाव, शिक्षण, व्यवसाय/नोकरी, अपत्ये, संख्या, लिंग, राहते घर, इस्टेट, जमीन-जुमला, कोर्ट कचेरी इ. इ. इ. सर्व तपशील एका झटक्यात लक्षात ठेवले म्हणताय?] आहे बुव्वा! कोठे आहेत ते नाडीवाचक? त्यांचे जरा पाय धरावे म्हणते मी! :-) नाडीपट्ट्यांचे ओंकार पाटील यांच्या नाडीवरून काढलेले निष्कर्ष संपूर्ण नाडीग्रंथांवर अन्यायकारक वाटतात. केवळ एका नाडीपट्टीवरून तुम्ही हजारो लोकांच्या नाडीपट्टीत आलेले कथन खोटे ठरवणार? त्यासाठी, सप्रमाण सिध्द करण्यासाठी नमुना म्हणून किमान ५० ते १०० नाडीपट्ट्यांचे, त्यांतील किती टक्केवारी भविष्य/भूत्/वर्तमान हे बरोबर्/चूक निघाले इत्यादी सरासरी/आलेख काढलात तर त्या आकडेवारीने आपल्या वक्तव्यास पुष्टी येईल. अन्यथा चमत्कृतीपूर्ण कथाकथनासारखेच आपले निष्कर्षही एकाच व्यक्तीच्या नाडीपट्टीसाठी लागू होतात असे सखेद म्हणावे लागेल. श्रद्धा -अंधश्रद्धा यांचा विचार करताना खरा प्रश्न येतो ते विधायक अथवा विघातक श्रद्धा याचा. ज्या श्रद्धा बाळगल्याने समाजाचे काही नुकसान होत नाही अशा श्रद्धा बाळगल्यास त्यास हरकत नसते. (अर्थात तात्विक पातळीवर वाद-संवाद घडताना त्याला देखील हरकत असते असे मात्र आढळते) >> ही हरकत कोणाची? भारतीय संविधानाची? कायद्याची? की अजून कोणाची? हे नुकसान/ फायदा कोण ठरवणार? जनता? अंनिस? कायदा? सरकार? कोण? तात्विक वादात मी नुकसान हा फायदा कसा व फायदा हे नुकसान कसे हे सिध्द करू शकते. कारण ते सापेक्ष आहेत. पण ह्या नुकसान/ फायद्याची कायदेसंमत काही व्याख्या आहे काय? की केवळ त्याला तर्काचीच पुष्टी? जर फायदा-नुकसानीचीच भाषा करायची तर ते भौतिक, शारीरिक, मानसिक, आर्थिक, आध्यात्मिक....नक्की कोणत्या पातळीवरील नुकसान/ फायदा? ज्या श्रध्दा/ अंधश्रध्दा कायद्याने असंमत आहेत, गैर आहेत त्यांवर थेट कायदेशीर कारवाई करता येतेच की! मग त्यासाठी वेगळे प्रबोधन कितपत उचित आहे? फक्त अमुक अमुक गोष्ट ही कायद्याने गैर आहे, त्यात भाग घेतल्यास तुम्हाला कायदेशीर शिक्षा होऊ शकते एवढा प्रसार पुरेसा नाही काय? आणि जिथे जिथे शोषण होत आहे, गैरफायदा घेतला जात आहे तिथे तिथे सप्रमाण तसे सिध्द केल्यास कायदा काहीच करू शकत नाही का ? अरुंधती http://iravatik.blogspot.com/

चित्रगुप्त 07/04/2010 - 18:24
अनेक वर्षांपूर्वी तांबरम मधील नाडीकेंद्रात श्री. ओक यांना आमची नाडी सापडली होती.... त्यावेळी आम्ही तेथे हजर नसल्याने पट्टी शोधताना कोणकोणती माहिती दिली गेली, हे ठाऊक नाही. त्यात जी नावे "लिहून" आली होती, त्यात आईचे नाव चूक होते (आईचे व पत्नी चे नाव एकच आले होते) पट्टीत भूतकाळ व भविष्य काळ काहीही लिहिलेला नव्हता. पूर्वजन्मीच्या पापकॄत्यांमुळे या जन्मी त्रास, बदनामी होईल, वगैरे होते. त्यासाठी परिहार व दीक्षा कांडम वेगळी फी भरून काढवावे लागणार होते, ते आम्ही केले नाही. याशिवाय ज्ञान-कांडम काढवले होते, त्यातील मजकूर पोरकट होता, थक्क होण्यासारखे काहीही सांगितले गेले नव्हते. यासाठी घेतली गेलेली फी त्या काळच्या मानाने खूपच जास्त वाटली होती. या गोष्टीला फार वर्षे झाली..... ती वही व कॅसेट (यात पट्टी शोधतानाची प्रश्नोत्तरे नव्हती) सापडल्यास मिपावर देऊच.

In reply to by चित्रगुप्त

पूर्वजन्मीच्या पापकॄत्यांमुळे या जन्मी त्रास, बदनामी होईल, वगैरे होते. त्यासाठी परिहार व दीक्षा कांडम वेगळी फी भरून काढवावे लागणार होते, ते आम्ही केले नाही.
१)आपल्या अनुपस्थितीत पट्टी निघाली होती. खरी भानगड / शोषण हे परिहार कांडम मधे असते. आपल्याकडच्या नारायण नागबली व त्रिपिंडी श्राद्ध सारखे. मागचे हिशेब चुकते करु . आत्ता ज्या अडचणी येताहेत त्या माग्चे हिशेब राहिल्याने येताहेत. परिहार करुन ते चुकते करा म्हणजे पुढे अडचण येणार नाही असा काहीसा प्रकार. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

हा लेख वाचूनही नाडीवर विश्वास ठेवणारे असतील तर त्यांना अंधश्रद्ध म्हणावं नाही तर काय म्हणावं? राजेश

In reply to by राजेश घासकडवी

आता काय म्हणायचं तुम्हाला? अगदीच अवैज्ञानिक ब्वॉ तुम्ही... किती नीट आणी वैज्ञानिक पद्धतीने भविष्य सांगितले जाते बघा... आणि तुमच्यासारखे लोक त्यात खोट काढत बसता. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

मी फक्त एक प्रश्न विचारला. त्याचं एका ओळीत इतकं समर्पक उत्तर देऊन तुम्ही माझं तोंड बंद करण्याची गरज होती का? राजेश

चक्रमकैलास 03/04/2010 - 18:22
घाटपांडे साहेब्,तुम्ही नाडीवाल्यान्ची नाडी ढीली करून त्यांची चड्डी काढली आहे...!!! --नसूनही असलेला चक्रम कैलास...!!

In reply to by चक्रमकैलास

नितिन थत्ते 03/04/2010 - 22:00
आणि चड्डी काढून ** आवळल्या आहेत. तरी बरे. त्यांनी दोन केंद्रांचा अनुभव सांगितला आहे. नाहीतर ओकांनी "त्या विशिष्ट नाडीकेंद्रावर असे होत असेल" अशी सारवासारव केली असती. नितिन थत्ते (शु सुधारक संपादकांना सूचना : माझ्या लेखनात शुद्धलेखनाच्या चुका आढळल्यास ते दुरुस्त केले जावे. माझी हरकत नाही. मात्र ते दुरुस्त केल्या जाऊ नये)

In reply to by नितिन थत्ते

नाहीतर ओकांनी "त्या विशिष्ट नाडीकेंद्रावर असे होत असेल" अशी सारवासारव केली असती.
तसेही बोध अंधश्रध्देचा मधे ओकांनीच ज्या पट्टीत जातकाची नांवे कोरलेली नाहीत त्या बद्दल माझी नाडी भविष्याची मते लागू नाहीत असे पृ.१३९ वर सांगितले आहे. त्यामुळे नाडीपट्टीत नाव कोरुन आलेले नसेल तर त्यांच युक्तिवाद अशा नाड्यांना लागु होत नाहीत. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

नंदू 03/04/2010 - 21:43
ओक साहेबांच्या नाडी शास्त्राला जवळ जवळ सर्वच जण विरोध करताहेत आणि या विरोधकांच्या bandwagon मध्ये फलज्योतिषवाले देखिल सामिल आहेत. हे फलज्योतिष तरी शास्त्र आहे का? शास्त्राचा मूळ निकष म्हणजे कुठलीही गोष्ट ही नियमां मध्ये अथवा सूत्रांमध्ये बांधलेली असावी आणि repeatable असावी. उदाहरणार्थ झाडावरुन पडणारं सफरचंद हे प्रत्येकवेळी खालीच पडणार. मलातरी दोन्ही थोतांडच वाटतात. नंदू

तिमा 04/04/2010 - 10:27
प्रत्येकाचे आयुष्य हा एक विधात्याच्या कथेवर बेतलेला सिनेमा आहे. त्यामुळे तो जसा दिसेल तसा बघावा. आधीच पुढची स्टोरी जाणण्याचा प्रयत्न करु नये. त्यामुळे नाडी, फलज्योतिष हे खरे असेल वा थोतांड. आपले विधिलिखित आपण बदलू शकत नाही तर कशाला हा खटाटोप ? हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

In reply to by तिमा

आपले विधिलिखित आपण बदलू शकत नाही तर कशाला हा खटाटोप ? अगदी मनातलं बोललात...! बाकी श्री घाटपांडे विरुद्ध ओक...वैचारिक सामने रंगतदार होत आहेत. थांबवू नका चालू ठेवा...! :) -दिलीप बिरुटे [काठावर बसलेला]

पाषाणभेद 04/04/2010 - 10:58
फलज्योतिषाचा विषय काढून उगाचच मुख्य चर्चा भरकटू देवू नका. फलज्योतिष (?) साठी वेगळा धागा आधीच निघालेला असेल. बाकी नाडीवाल्यांनी आता त्याच्या नाड्या आवळून वरती विज्ञानाचा पट्टा आवळावा. घाटपांडे काकांचा प्रयत्न स्पृहणीय आहे. आता हे नाडीवाले नाडी पहायला येणार्‍यांना "तुम्ही नाडी सोडून विवस्त्र नाडी पहायला यावे" असे म्हणायला सुरूवात करतील बघा. किमानपक्षी त्यांची झडती तरी होईल किंवा आमच्या महर्षींना हे मान्य नाही असे म्हणतील. हे एक पोट भरण्याचे साधन आहे हे का मान्य करत नाही. The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी|| महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद शके १५६३

>> बाकी श्री घाटपांडे विरुद्ध ओक...वैचारिक सामने रंगतदार होत आहेत सहमत...सामना निश्चितच रंगला आहे श्री घाटपांडे यांनी 'पाट' काढला आहे...आता 'पलटी' होते का 'चितपट ' :? पै. नाडीरत्न: आवळे-सोडे

jaypal 04/04/2010 - 22:59
*************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

शशिकांत ओक 05/04/2010 - 15:16
ओकाची नाडी ग्रंथ परीक्षा ?
नुकताच ओंकार पाटलांच्या नाडी परीक्षेचा लेख पुन्हा वाचनात आला. खरेतर यावर त्यांच्या लेखातील फोलपणा दाखवून देणारा लेख मी पुर्वीच प्रकाशित केला आहे. तरीही काही नव्या वाचक लोकांच्या समाधानासाठी खालील विचार व्यक्त करत आहे. ओंकारांनी नाडी ग्रंथांना खोटे ठरवायला काय परीक्षा केली ? १) तांबरमच्या नाडीकेंद्रात जाऊन एक टेप रेकॉरेडर लपवून नाडी पट्टीच्या अगदी पहिल्या विचारणेपासून रेकॉर्ड केलेले संभाषण लेखाच्या रुपात सादर केले. २) त्या विचारणेतून मिळालेल्या माहितीतील माहितीच पुन्हा आपणांस एका विशिष्ठ ताडपट्टीतून आली आहे असे भासवून सांगण्यात आले, असा त्यांचा दावा आहे. ३) शिवाय गिंडीतील एका केंद्रातील माहितीतून त्यांना नाडीग्रंथांबद्दल काय वाटले ते त्यांनी शेवटी सादर केले आपल्या लेखात ओंकारांनी वाचकांना काय काय उल्लेखले नाही * नाडी वाचकाबरोबर झालेले सर्व संभाषण 'चोरून' टेप करायची काही गरज नव्हती. कारण त्यांच्या टेबलावर टेप रेकॉर्डर सदैव असतोच. तोच त्यांना पहिल्यापासून चालू ठेवायला विनंती करून टेपरेकॉर्डिंगचे काम करता आले असते का नाही? * त्यांना त्यांची पट्टी सापडली म्हटल्यावर त्यांच्यासाठीचा ताडपट्टीतून लिहून आलेला मजकूर एका ४० पानी वही दिला होता का नाही?. * त्यानंतर एक भाषांतर केलेली टेपही नंतर दिली गेली होती की नाही?. त्या टेपमधील मजकुरात, पट्टी शोधायला विचारलेल्या प्रश्नातून मिळालेल्या माहिती शिवाय आणखी काय माहिती पट्टीतून आली हे जाणता आले असते की नाही?. * ओंकारांनी जो नाडीग्रंथाना खोटे ठरवण्यासाठीचा पुरावा मिळवला होता, त्याची शहानिशा तेथल्या तेथेच करून पहाता आली असती कि नाही? ओकांना प्रत्यक्ष समोर असताना देखील भेटण्याचे टाळावे असा त्यांच्या सल्लागारांचा मानस असल्याने टाळले गेले की नाही? * आता जे ओंकारांनी केले ते ओकांनी केले काय़? * हो. असे संपुर्ण टेप ओकांनी अनेकदा केले होते. नव्हे तो त्यांचा आग्रह असे. नंतर त्यातील फोलपणा लक्षात आल्यावर ते टेप नंतर इतर कामाला वापरले गेले. जे शोधकार्य ओंकारांनी केले नाही वा फक्त करावे असे सुचवले ते ओकांना केले काय? 1. होय. नाडीपट्टीतील मजकूर वहीत उतरवून घेतला गेल्याची प्रत्यक्ष खात्री झाल्यावर ती वही त्याच व अन्य नाडीकेंद्रातील इतर अनेक वाचकांकडून वाचवून घेतली गेला. त्यांनी तो जशाचा तसा वाचून दाखवला. 2. त्यातऱ्हेच्या अनेक लिखित वह्या नंतर अनेक नाडी ग्रंथांशी मुळीच संबंध नसलेल्या तमिळजाणकारांना दाखवून त्याचे भाषांतर करून घेतले. 3. नाडी केंद्रचालकांच्या सहकार्याने नाडीग्रंथ पट्ट्यांच्या फोटोतून दिसणारा मजकूर व वहीतील मजकूर यांची खात्री केली. 4. नाडीपट्ट्यात जन्मकालच्या ग्रहपरिस्थिचे वर्णन खरोखर कसे केलेले असते का ? अंगठ्यांच्या ठशांचे वर्णन कसे दिलेले असते का? आदीचे पुरावे शोधले गेले. 5. आपल्याकडून माहिती काढून तीच आपल्याला सांगितली जाते हे वरवर तसे 'दिसत' असले तरी तसे नाही कारण नाडी वाचक ताडपट्टीतील मजकूर वहीत लिहून घेऊन 'वाचत' असतो. तो ती पट्टीतून 'वाचतोय' का आधीची मिळवलेली माहिती लक्षात ठेऊन 'सांगतोय' याची पक्की खात्री न करताच फक्त एका व्यक्तीच्या एका ताडपट्टी शोधाच्या ' टेपच्या अनुभवावरून नाडी ग्रंथांना खोटे ठरवण्यात अपप्रचार जास्त व शोधाची तळमळ कमी असे चित्र प्रकट होते. 6. ओंकारांच्या लेखातील मुख्य मुद्याला तो खरा आहे असे मानून हवाईदलातील काही लोकांच्या समावेत एकदा एक प्रात्यक्षिक केले गेले. ओकांनी ते सर्व प्रश्न एका मागून एक (हिंदीतून) वाचले. काहींना त्यातील उत्तरे लिहून नोंद करायला सांगितली तर काहींना नुसतीच आठवणीत ठेवायला सांगितली. त्यातील आलेला निष्कर्ष असा होता - सतत प्रश्नांचा भडिमार करून कोणत्या प्रश्नाला नक्की हो व कोणत्याला नाही म्हटले गेले यातून विचारून मिळवलेली माहिती इतक्या अचुकपणे नुसती लक्षात ठेऊन पुन्हा सांगणे शक्य नाही. तो संपुर्ण प्रात्यक्षिकाचा पुरावा व त्यांच्या विवेचनातून ओंकार वाचकांची दिशाभूल कशी न कळत वा कळत करतात, हे ओकांनी "बोध अंधश्रद्धेचा" पुस्तकातील लेखातून सादर केला आहे. 7. त्यामुळे हा लेख फक्त वाचकांना त्यांनी काढलेल्या निश्कर्षांवर विचार करायला जरूर उद्युक्त करतो. मात्र प्रत्यक्षात नाडी पट्ट्या्वरील शोधकार्य न केले गेल्याने तसा निरुपद्रवी वाटतो आहे. 8. ओंकारांनी कूटलिपीची ढाल करून ही नावे ताडपट्टीत आहेत असे सांगायचा 'गोलमाल करायला' वाव आहे म्हणून भांडारकर सारख्या प्राच्यसंस्थेतील तज्ञांकरवी त्याची तपासणी व्हावी. तशी ती ओकांनी चेन्नईतील प्राच्य संस्थाकेंद्रातून केली आहे. एका फोटोतील 'शशिकांत' हे नाव कसे कोरून लिहिलेले आहे याचे प्रात्यक्षिक सादर केले आहे. धनंजय व हैयोहैयैयोंनी त्यावर आपले सकारात्मक मत नोंदले आहे. 9. हैयोहैयैयोंनी तमिळकुटलिपीवर आधारित लेखातून नाडीपट्टयातील लिपीचा उलगडा करता येतो. ती नाडीवाचकांच्या व्यतिरिक्त ही वाचायला येईल असे सुचवले आहे. ओकांनी त्यांना सवडीने कूटलिपीवर मराठी वाचकांसाठी मिपावरून जास्त प्रकाश टाकावा असे आवाहन केले आहे. 10. ओंकारांनी काही मजकूर, शब्द, नोकरी-व्यवसाय वा अन्य सध्याच्या प्रचलित नवे शब्द संस्कृत मधून आहेत असे भासवून ग्राहकाला प्रभावित केले जात असावे, असा नाडीशब्दांचा एक शब्दकोश तयार करण्याची सुरवात झाली आहे. नाडीतील शंभर तमिळ शब्दांचा एका नमुना कोश २००७साली इन्स्टियुट ऑफ एशियन स्टडीजचे डायरेक्टर ड़ॉ.जी.जॉन सॅमियएल यांच्या हस्ते वितरित केला गेला. 11. ओंकारांनी नाडी ग्रंथात व्यक्तीच्या जन्मदिनांकाचे, जन्मकाळच्या ग्रहस्थितीचे वर्णन नसावे असा त्यांनी कयास बांधला. तो तसा असतो हे सोदाहरण दाखवून देण्यासाठी १७ डिसंबर२००९च्या कथनातील भाग मिपावर सादर केला गेला आहे. यावरून सुज्ञ वाचकांनी योग्य तो निष्कर्ष काढावा ही विनंती. नाडी ग्रंथावरील अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/ शशिकांत

In reply to by शशिकांत ओक

नितिन थत्ते 05/04/2010 - 22:37
प्रतिसाद वाचून ह ह पु वा. >>१. होय. नाडीपट्टीतील मजकूर वहीत उतरवून घेतला गेल्याची प्रत्यक्ष खात्री झाल्यावर ती वही त्याच व अन्य नाडीकेंद्रातील इतर अनेक वाचकांकडून वाचवून घेतली गेला. त्यांनी तो जशाचा तसा वाचून दाखवला. नाडीपट्टीतील मजकूरच वहीत लिहिला आहे का? याची शहानिशा दहा लोकांकडून (नाडीकेंद्रा बाहेरच्या) करून घ्यायला हवी होती. >>2. त्यातऱ्हेच्या अनेक लिखित वह्या नंतर अनेक नाडी ग्रंथांशी मुळीच संबंध नसलेल्या तमिळजाणकारांना दाखवून त्याचे भाषांतर करून घेतले. पुन्हा वह्यांचे भाषांतर कशाला? त्या वह्यांमध्ये नाडीपट्टीवरचा मजकूरच होता हे कोण तपासणार? >>3. नाडी केंद्रचालकांच्या सहकार्याने नाडीग्रंथ पट्ट्यांच्या फोटोतून दिसणारा मजकूर व वहीतील मजकूर यांची खात्री केली. ओके. पण नाडीपट्ट्या प्रत्यक्ष पाहिल्या का? >>4. नाडीपट्ट्यात जन्मकालच्या ग्रहपरिस्थिचे वर्णन खरोखर कसे केलेले असते का ? अंगठ्यांच्या ठशांचे वर्णन कसे दिलेले असते का? आदीचे पुरावे शोधले गेले. कसे शोधले? >>5. आपल्याकडून माहिती काढून तीच आपल्याला सांगितली जाते हे वरवर तसे 'दिसत' असले तरी तसे नाही कारण नाडी वाचक ताडपट्टीतील मजकूर वहीत लिहून घेऊन 'वाचत' असतो. तो ती पट्टीतून 'वाचतोय' का आधीची मिळवलेली माहिती लक्षात ठेऊन 'सांगतोय' याची पक्की खात्री न करताच फक्त एका व्यक्तीच्या एका ताडपट्टी शोधाच्या ' टेपच्या अनुभवावरून नाडी ग्रंथांना खोटे ठरवण्यात अपप्रचार जास्त व शोधाची तळमळ कमी असे चित्र प्रकट होते. जेव्हा आपणच दिलेल्या माहितीव्यतिरिक्त काहीही माहिती मिळाली नाही असे दिसते तेव्हा आणखी काय समजायचे? एक अनुभव नसून दोन अनुभव आहेत. >>6. ओंकारांच्या लेखातील मुख्य मुद्याला तो खरा आहे असे मानून हवाईदलातील काही लोकांच्या समावेत एकदा एक प्रात्यक्षिक केले गेले. ओकांनी ते सर्व प्रश्न एका मागून एक (हिंदीतून) वाचले. काहींना त्यातील उत्तरे लिहून नोंद करायला सांगितली तर काहींना नुसतीच आठवणीत ठेवायला सांगितली. त्यातील आलेला निष्कर्ष असा होता - सतत प्रश्नांचा भडिमार करून कोणत्या प्रश्नाला नक्की हो व कोणत्याला नाही म्हटले गेले यातून विचारून मिळवलेली माहिती इतक्या अचुकपणे नुसती लक्षात ठेऊन पुन्हा सांगणे शक्य नाही. तो संपुर्ण प्रात्यक्षिकाचा पुरावा व त्यांच्या विवेचनातून ओंकार वाचकांची दिशाभूल कशी न कळत वा कळत करतात, हे ओकांनी "बोध अंधश्रद्धेचा" पुस्तकातील लेखातून सादर केला आहे. सर्वसामान्य लोकांना लक्षात ठेवता येणे आणि विशिष्ट प्रकारे ट्रेन झालेल्याला लक्षात राहणे हे वेगळे नाही का? जसे हॉटेलातल्या कोणत्या टेबलावरील कोणत्या व्यक्तीने कायकाय ऑर्डर दिली त्यातले काय काय देऊन झाले आणि काय राहिले हे वेटरच्या लक्षात राहते. तुम्हाला एखादे दिवशी असे हॉटेलात सोडले तर तुमच्या ते लक्षात राहणार नाही. म्हणजे ते लक्षात ठेवता येत नाही असे नाही. >>7. त्यामुळे हा लेख फक्त वाचकांना त्यांनी काढलेल्या निश्कर्षांवर विचार करायला जरूर उद्युक्त करतो. मात्र प्रत्यक्षात नाडी पट्ट्या्वरील शोधकार्य न केले गेल्याने तसा निरुपद्रवी वाटतो आहे. तुम्हाला ते नाडीपट्टीवाले पट्ट्या दाखवायला तयार असतात असे दिसते. म्हणून तुम्हाला सहकार्य करण्याचे आवाहन केले असता तुम्ही ते नाकारल्याचे स्मरते. >>8. ओंकारांनी कूटलिपीची ढाल करून ही नावे ताडपट्टीत आहेत असे सांगायचा 'गोलमाल करायला' वाव आहे म्हणून भांडारकर सारख्या प्राच्यसंस्थेतील तज्ञांकरवी त्याची तपासणी व्हावी. तशी ती ओकांनी चेन्नईतील प्राच्य संस्थाकेंद्रातून केली आहे. एका फोटोतील 'शशिकांत' हे नाव कसे कोरून लिहिलेले आहे याचे प्रात्यक्षिक सादर केले आहे. धनंजय व हैयोहैयैयोंनी त्यावर आपले सकारात्मक मत नोंदले आहे. फोटोत शशिकांत लिहिलेल्या पट्टीवरील मजकूर हजारो वर्षांपूर्वी कोरलेला होता की त्याच वेळी (ओकांना पट्टी दाखवण्यापूर्वी ) कोरला होता हे ओकांनी कसे तपासले? >>9. हैयोहैयैयोंनी तमिळकुटलिपीवर आधारित लेखातून नाडीपट्टयातील लिपीचा उलगडा करता येतो. ती नाडीवाचकांच्या व्यतिरिक्त ही वाचायला येईल असे सुचवले आहे. ओकांनी त्यांना सवडीने कूटलिपीवर मराठी वाचकांसाठी मिपावरून जास्त प्रकाश टाकावा असे आवाहन केले आहे. >>10. ओंकारांनी काही मजकूर, शब्द, नोकरी-व्यवसाय वा अन्य सध्याच्या प्रचलित नवे शब्द संस्कृत मधून आहेत असे भासवून ग्राहकाला प्रभावित केले जात असावे, असा नाडीशब्दांचा एक शब्दकोश तयार करण्याची सुरवात झाली आहे. नाडीतील शंभर तमिळ शब्दांचा एका नमुना कोश २००७साली इन्स्टियुट ऑफ एशियन स्टडीजचे डायरेक्टर ड़ॉ.जी.जॉन सॅमियएल यांच्या हस्ते वितरित केला गेला. हा मुद्दा काय हे कळले नाही. >>11. ओंकारांनी नाडी ग्रंथात व्यक्तीच्या जन्मदिनांकाचे, जन्मकाळच्या ग्रहस्थितीचे वर्णन नसावे असा त्यांनी कयास बांधला. तो तसा असतो हे सोदाहरण दाखवून देण्यासाठी १७ डिसंबर२००९च्या कथनातील भाग मिपावर सादर केला गेला आहे. हे पुन्हा वाचून पाहीन. >>यावरून सुज्ञ वाचकांनी योग्य तो निष्कर्ष काढावा ही विनंती. असेच म्हणतो. नितिन थत्ते (शु सुधारक संपादकांना सूचना : माझ्या लेखनात शुद्धलेखनाच्या चुका आढळल्यास ते दुरुस्त केले जावे. माझी हरकत नाही. मात्र ते दुरुस्त केल्या जाऊ नये)

चित्रगुप्त 05/04/2010 - 18:29
मिपा वर नाडीसंबंधी उलटसुलट चर्चा व एकमेकांवर गरळ ओकत राहणे, यातून काहीही साध्य होणार नाही. नाडीसंबंधाने अरुंधती यांनी सुचवलेले मुद्दे जरी योग्य असले, तरी तश्या प्रकारचा अभ्यास मुळात हा सर्व बनवाबनवीचा प्रकार नाही, हे (मिपाकरांनी विविध नाडीकेंद्रांना स्वतः भेटी देऊन तेथील संभाषण टेप करून) सिद्ध झाले, तरच करणे योग्य व गरजेचे असेल. या विषयी मिपा सदस्यांना खालील प्रमाणे कार्य करता यावे: १. यात प्रत्यक्ष सहभागी होऊ शकत असलेल्या सदस्यांची यादी (संपर्क क्रमांक व गावाचे नाव यासह) बनवणे. २. त्याप्रमाणे कोणकोणत्या नाडीकेंद्रांना भेट देणे सोयीचे होईल, याची यादी बनवणे (तिथले पत्ते, फोन, फी, वगैरे माहितीसह). यात श्री. ओकांचे सहकार्य मोलाचे आहे. ३. जे सदस्य स्वतः नाडीकेंद्रांना भेट देऊ शकत नाहीत, परंतु काही सहभाग देउ शकतात, त्यांनी ते काय करू शकतात, हे कळवावे. उदाहरणार्थ टेप रेकॊर्डर्स ची वा वाहनाची सोय करणे, गरज असल्यास आर्थिक भार उचलणे, नाडी केन्द्रांना फोन करणे, एकंदरीत या प्रकल्पाचे नियोजन, को-ऒर्डीनेशन करणे, वगैरे. ४. नाडी वाचनाचे वेळी व्हिडियो शूटिंग व ऒडियो रेकॊर्डिंग करणे शक्य आहे का, नाडी केन्द्रवाले तसे करू देतील का, हे श्री. ओक यांनी सांगावे. ते तसे करू देत नसल्यास गुप्तपणे करणे भाग आहे. श्री. ओकांनी उल्लेख केलेला केन्द्रवाल्यांचा टेपरेकॊर्डर हा नाडी वाचनाचे वेळी सुरू केला जात असेल. त्यापूर्वी पट्टी शोधताना विचारल्या जाणा‍र्‍या प्रश्नांचे व जातकाने दिलेल्या उत्तरांचे रेकॊर्डिंग केले जाते का (जसे श्री ओंकार पाटील यांनी केले आहे), हे श्री ओक यांनी स्पष्ट केलेले नाही. आपल्या संशोधनाचे दॄष्टीने, तेच जास्त महत्वाचे आहे. ५. त्यानंतर प्रत्यक्ष नाडीकेंद्रांना भेटी देऊन आपापल्या पट्ट्या काढवून त्या संपूर्ण प्रसंगाचे रेकॊर्डिंग करणे. यात काही जातकांना तुमची पट्टी मिळत नाही, असे सांगितले जाईल, तरीही काय संभाषण झाले, याची नोंद करावी. ६. आपण या प्रकाराची चिकित्सकपणे तपासणी करायला आलेलो आहोत, असे नाडीकेंद्र वाल्यांना वाटले, तर ते तुमची पट्टी मिळत नाही, असे सांगून वाटेला लावतील, अशी बरीच शक्यता वाटते, तरी आपण खरोखरच संकटात सापडलेले आहोत, व पट्टीत पापक्षालनार्थ सांगून येणारी धार्मिक कॄत्ये करण्यास उत्सुक आहोत, असा अविर्भाव असावा. हल्ली मिळणारे अगदी लहान, खिश्यात पेन सारखे अडकवता येणारे रेकॉर्डर्स खूपच सोयिस्कर पडतील. मुख्य म्हणजे यात डिजिटल फ़ाईल्स च्या स्वरूपात रेकॉर्डिंग होत असल्याने ते मिपावर सर्वांना ऐकता येइल. सहज सुचलेले मुद्दे वर लिहिले आहेत, सर्वच मिपाकर अतिशय सूज्ञ, बुद्धिमान व कर्तबगार असल्याने या विषयी अजून जास्त चांगले नियोजन करून प्रत्यक्ष कार्यास सुरुवात करता येईल.

In reply to by चित्रगुप्त

घटं भिंद्यात, पटं छिंद्यात, कुर्यातरासभरोहणं, येनकेनप्रकारेण, प्रसिध्द: पुरुषो भवेत। आम्ही पुण्यात हे प्रकरण १९९४ पासुन पहात आहोत. त्यावेळी नाडी केंद्रे पुण्यात नव्हती. माध्यमातुन या प्रकरणाचा बराच गवगवा झाला होता. खरतर मिपाचा नाडी आखाडा होउ नये असे आम्हाला वाटत असल्याने फारसा प्रतिसादा आम्ही देत नाही/ नव्हतो. तरी पण नवीन आलेल्या लोकांसाठी काही बाबी. यात पुनरावृत्तीचा दोष/ गुण आहे. या मुळे या विषयाला विनाकारण प्रसिद्धी मिळत आहे हे माहित असुन देखील हे आम्ही लिहित आहोत. कारण यातुन काही श्रद्धाळु लोकांचा नकळत बळी जाईल. आमचा प्रयोग आम्ही या विषयावर पत्रकार परिषद घेउन एक आवाहन केले होते ते येणे प्रमाणे
पाच हजार वर्षापूर्वी अगस्त्य ऋषिंनी लिहिले आहे असे सांगितले जाणाऱ्या नाडी भविष्याचा पडताळा घेण्याचा प्रयोग
फलज्योतिष चिकित्सा मंडळ हे फलज्योतिषाची चिकित्सा करणाऱ्या मंडळींचा एक अनौपचारिक ग्रुप आहे. मंडळातर्फे नाडी भविष्य या ज्योतिष पध्दतीचा अभ्यासप्रकल्प जनहितार्थ हाती घेण्यात आला आहे. या विषयाच्या अनुषंगाने सर्व वाचन साहित्य मंडळाकडे विनामूल्य उपलब्ध आहे.या विषयावरील लोकांचे विविध अनुभव व मते जाणून घेण्याकरिता मंडळाने दि. १-४-२००१ रोजी खुल्या गप्पांचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात पूर्वदूषितग्रह न बाळगता सत्यासत्यता तपासावी असा सूर होता. उपलब्ध माहितीनुसार गेल्या एक वर्षात दक्षिणेकडून आलेली अशी चार केंद्रे पुण्यात कार्यान्वित झाली आहेत. तेथील माहितीपत्रकानुसार अंगठयाचा ठसा वा पत्रिकेवरुन नाडी पटटी शोधून व्यक्तीचे नांव, आईवडिलांचे नांव, पति/पत्नी, व्यवसाय, भावंड, संतती इ. खुलासा केला जातो. प्रत्यक्षात संबंधिताने अंगठयाचा ठसा दिल्यावर त्याच्याकडूनच अनेक प्रश्न विचारुन ही माहिती काढून घेतली जाते याची आम्ही खात्री केली आहे. नाडी पट्टीतील मजकुर हा कूट तामिळ लिपीत असतो असे तेथे सांगितले जाते. त्यावरुन ते हिंदीत प्रश्न विचारतात. नाडीपट्टी शोधण्यासाठी असे प्रश्न विचारावे लागतात असे नाडीवाचक सांगतात. सर्वांच्याच पटटया सापडतात असे नाही असे नाडी केन्द्राने अगोदरच सांगितले आहे. पट्टी सापडल्यास वाचनाचे रूपये तीनशे आकारले जातात. आम्ही असे म्हणतो की, पोलीस खात्याच्या अंगुलीमुद्रा तज्ज्ञांच्या मते अंगठयाचा प्रत्येक व्यक्तिचा ठसा हा 'युनिक` असतो. त्या ठशाचे पॅरामिटर्स पुन्हा कधीही रिपीट होत नाही. तसे नसते तर अंगुलीमुद्राशास्त्र केव्हाच मोडीत निघाले असते. चोर सोडून संन्याशाला फाशी बसली असती. मग व्यक्तीचे नांव आणि ठसा हे दोन्ही पॅरामीटर्स अन्य कुणातरी व्यक्तीचे बाबत जुळतील अशी शक्यताच नाही हे ठामपणे म्हणता येते. मग या दोन पॅरामीटर्सच्या आधारे त्यांना व्यक्तीची पट्टी निश्चित करण्यासाठी कुठलीच अडचण येता कामा नये. तरीही पटटी हुडकून काढण्यासाठी सोपे पडावे म्हणून हे दोन घटक कमी आहेत असे घटकाभर मानू. जन्मसाल व पित्याचे नांव हे अजून क्ल्यू देउ. स्वत:चे नांव व ठसा या 'नेसेसरी कण्डीशन` झाल्या. अंगठयाचा ठसा, स्वत:चे नांव, पित्याचे नांव व जन्मसाल या 'सफिशंट कण्डीशन` झाल्या. असे करत करत व्यक्तीच्या ठशाबरोबर व्यक्तीचे नांव, व्यक्तीचे जन्मसाल, महिना, आठवडा, व्यक्तीच्या आईचे नांव, वडिलांचे नाव, पती/ पत्नीचे नांव, स्वत:चा व्यवसाय, शिक्षण, भावंडाची माहिती, संततीची माहिती तयार देउ व मोअर दॅन सफिशंट या कण्डीशनपाशी येवून ठेपू. याआधारे आम्ही नाडी केन्द्राला खालील प्रयोग सुचवला आहे. मंडळाचे सदस्य मा. श्री. रिसबूड यांनी नाडी केन्द्राला एक रजिस्टर्ड पत्र पाठविले असून त्यात संशोधनासाठी हा प्रयोग करण्याचे आवाहन केले आहे. त्यात असे म्हटले आहे की, आम्ही आपणास जन्मतारीख व वेळ सोडून वरील सर्व माहिती देउ. सोबत सील केलेली कुंडली देउ. ठसा व माहितीवरून नाडीपटटीतील कुंडली केंद्राने शोधावी. ती जर सील केलेल्या कुंडलीशी जुळली तर आपल्या नेहमीच्या फीच्या दुप्पट फी आम्ही देउ. पत्राला त्यांनी लेखी उत्तर दिले नाही. परंतु रिसबूडांनी फोनवर विचारणा केली असता आपण हा प्रयोग दि.१३ एप्रिल २००१ रोजी सायंकाळी पाच वाजता करु असे तोंडी सांगितले आहे. या पत्रकाद्वारे मंडळ पत्रकारांना असे आवाहन करिते की, त्यांनी सदर प्रयोगाचे वेळी प्रत्यक्ष उपस्थित रहावे प्रसंगी स्वत:च्या अंगठयाचा ठसा देउन कुंडली शोधण्यास नाडी केन्द्रास उद्युक्त करावे व नाडी भविष्याची सत्यासत्यता पडताळून जनतेसमोर आणावी. त्यासाठी पत्रकारांना पत्रकार भवन येथून नाडीकेंद्रापर्यंत नेण्याआणण्याची सोय फलज्योतिष चिकित्सा मंडळातर्फे करण्यात येत आहे. तरी सर्वांनी दि.१३.४.२००१ रोजी सायं. ५.०० वा. पत्रकार भवन, नवी पेठ, या ठिकाणी उपस्थित रहावे. ============================================================= वरील प्रयोगाला पत्रकार आले नाहीत. पण आम्ही दोन तीन लोक सोबत घेउन सिंहगड रोड च्या नाडीकेंद्रात ठरल्याप्रमाणे गेलो. प्रत्यक्ष प्रयोगात तुमची माहिती तुमच्या जवळच ठेवा आम्हाला तिची गरज नाही असे सांगून तुमचे फक्त ठसे आम्ही घेतो असे सांगितले. आम्ही तिघांचेही ठसे त्याला दिले. आता पट्टी सापडेपर्यंत थांबा असे त्याने आम्हाला सांगितले. दरम्यानच्या काळात मुंबईहून आलेल्या एका दांपत्याची नाडीपट्टीही सापडली व नाडीवाचनही झाले. अर्ध्या तासानंतर तुम्हा तिघांच्याही नाडी पट्टया या केंद्रात नाहीत. आम्ही त्या मद्रासवरुन मागवून घेउ व तुम्हाला फोन करु असे सांगून आम्हास वाटेला लावले. त्यानंतर आजतागायत अनेकदा फोन करुनही आमच्या पट्टया सापडल्या नाहीत यावरुन सूज्ञ वाचक काय ते समजून घेतील. त्याअगोदर एकदा माझी पत्नी मंजिरी ता. २३-२-२००१ रोजी श्री रिसबूड व श्री प्रकाश पेंडसे यांच्या समवेत पुण्यातल्या नाडी-केंद्रात गेली. तिने तिच्या अंगठयाचा ठसा, पूर्ण नाव व जन्मतारीख सांगितली पण जन्मवेळ मात्र माहीत नाही असे सांगितले. काही काळानतंर ज्योतिष्याने नाडी-बंडलातली एकेक पट्टी भराभर उलटत तिला बरेच प्रश्न विचारले. तिची रास धनू आहे हे दरम्यानच्या काळात तिच्या जन्मतारखेवरून पंचांगातून त्याने काढले असावे, म्हणून एक पट्टी समोर धरून व तिच्यात वाचल्यासारखे करून त्याने तिला विचारले की तुमची रास धनू आहे का ? मंजिरी म्हणाली की तिला माहीत नाही. श्री. रिसबूड शेजारीच बसले होते, त्यांनी त्याला विचारले की पट्टीवर धनू रास लिहिली आहे काय ? तो होय म्हणाला. त्यावर रिसबुडांनी म्हटले की मग त्या पट्टीत लग्न कोणते लिहिले आहे ते सांगा. तो जरासा घुटमळला व म्हणाला की ते आत्ता कळणार नाही, वो तो बाद मे आयेगा. आणखी काही प्रश्न विचारून झाल्यावर त्याने सांगितले की तुमची पट्टी सापडत नाही. हा त्याचा हुकुमी एक्का होता. पट्टी सापडत नाही असे म्हटले की खेळ खलास. पट्टी सापडली असे म्हणायची सोय नव्हती कारण जन्मवेळ दिलेली नसल्यामुळे लग्न-रास काढता येत नव्हती, ती काय सांगायची हा पेच त्याला पडला असता. त्यातून त्याने अशी सुटका करून घेतली. एक नाडीज्योतिषी भोंदु निघाला म्हणुन सर्व तसेच असतात काय? असे म्हणुन एक नाडीचक्र किंवा चरक चालु होतो. अनुभव घेण्या अगोदर तर्कबुद्धीच्या पातळीवर् दावे तपासता येतात. कै. रिसबुडांविषयी माहिती माधव रिसबुड एक कठोर फलज्योतिष चिकित्सक प्रकाश घाटपांडे

अरुंधती 05/04/2010 - 19:18
अन्य काही मुद्दे : १] प्राप्तीकरविषयक अटी, हिशेब, पावत्या, करभरणी इ. इ. पूर्तता नाडीग्रंथवाचक करतात काय? की करचुकवेगिरी करतात? २] नाडीग्रंथातील स्वतःची पट्टी बघायला आलेला व फी भरून नाडीपट्टी वाचन करवून घेणारा माणूस भारतीय ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत येतात काय? ३] माहिती अधिकाराखाली ह्या सर्व व्यवसायाची पाळेमुळे खणून काढणे अशक्य आहे काय? ४] त्यांच्या 'उपाया'मध्ये जारण, मारण नसते तर मंत्र, तंत्र, उपचार, यंत्र इ. गोष्टी असतात ह्याकडे आपण लक्ष दिले आहेत काय? ५] नाडीवाचनाचा जर ''प्लासिबो'' इफेक्ट येणार असेल व त्याने वाचन करवून घेणार्‍यास मानसिक फायदा होणार असेल तर त्याला 'सायको थेरपी' म्हणावे काय? अरुंधती http://iravatik.blogspot.com/

In reply to by अरुंधती

(अंध) श्रद्धेपुढे वरील सर्व प्रश्न व्यर्थ असतात. अगतिक माणसांना दिलासा हवा असतो. तो नाडीतुन मिळतो. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

अरुंधती 06/04/2010 - 14:03
जर असे म्हणत असाल तर मग मुद्देच संपले.... अंधश्रध्दा ही अनादि कालापासून चालत आली आहे.... अनादी कालापर्यंत चालत राहील. कदाचित स्वरूप बदलेल, संकल्पना बदलतील पण अंधश्रध्दा चालूच.... मग असे असेल तर कशापायी तिचे निर्मूलन करण्याचा ध्यास? राहू देत लोकांना अज्ञानाच्या खाईत? उपस्थित केलेल्या प्रश्नांना वा मुद्द्यांना केवळ ' श्रध्देपुढे सर्व प्रश्न व्यर्थ असतात' म्हणून तुम्ही बगल देऊ शकत नाही. एखाद्या गोष्टीचा सर्व बाजूंनी विचार करावाच लागतो. अन्यथा तुम्ही त्या संदर्भात करत असलेले कार्य अपुरे राहते. एकीकडे तुम्ही नाडीग्रंथ थोतांड आहे ही भाषा करत आहात, लोकांना अंधश्रध्देपासून परावृत्त करायचे म्हणत आहात, तर त्याच वेळी कायद्याच्या क्षेत्रात राहूनही तुम्ही असे कसे म्हणू शकता? प्राप्तिकरविषयक, ग्राहक संरक्षण विषयक तसेच माहिती अधिकारातून पुढे आलेल्या माहिती विषयक मी विचारलेल्या प्रश्नांना कृपया उत्तरे द्यावीत ही नम्र विनंती. आपल्याकडे त्याविषयी माहिती नसल्यास कृपया तसे कळवावे. अरुंधती http://iravatik.blogspot.com/

In reply to by अरुंधती

अरूंधतीताई, माझ्या मते प्रकाशकाकांचा प्रतिसाद हा नाडीकेंद्रं कशी चालतात किंवा कराच्या कचाट्यातून सुटत असतील तर का, अशा प्रश्नांच्या रोखाने होता. "श्रध्देपुढे सर्व प्रश्न व्यर्थ असतात" याचा रोख बहुदा नाडीसमर्थकांकडे असावा, नाडीबाबत अश्रद्ध किंवा साशंक लोकांकडे नाही. अदिती

In reply to by अरुंधती

तुम्ही मांडलेले मुद्दे सुजाण ग्राहकासाठी लागू आहेत. अगतिक भक्तांसाठी नाहीत. नाडीकडे वळणारे कदाचित अगतिक ग्राहक असतील, पण जर त्यांना चमत्काराची 'खात्री' देऊन भक्त बनवलं तर मग हे प्रश्न मिटतात. सुजाण ग्राहकांची नाडी बहुधा सापडत नसावी. प्रकाशकाकांसाठी प्रश्न - देशातली अगतिकता कमी केली तर अंधश्रद्धा कमी होईल का? (अगतिकता - प्रश्न, दु:खं आहेत, उपाय नाहीत ही स्थिती. ती कमी करणं म्हणजे दु:खांची काही मुळं - गरीबी, रोगराई, अपत्यमृत्यू, नैराश्य, अशिक्षितता, अन्याय कमी करणं, व उपाय वाढवणं म्हणजे स्वातंत्र्यं, संधी, समृद्धी वाढवणं...) याबाबत तुमची मतं जाणून घ्यायला आवडेल. राजेश

In reply to by राजेश घासकडवी

देशातली अगतिकता कमी केली तर अंधश्रद्धा कमी होईल का?
सरकारी नोकरांचे पगार वाढवले तर भ्रष्टाचार कमी होईल का? इतकाच अवघड आहे. अज्ञानातुन निर्माण होणार्‍या अंधश्रद्धा या प्रबोधन ज्ञानप्रसार यातुन कमी होतील ही पण अगतिकतेतुन निर्माण होणार्‍या अंधश्रद्धाचे काय? हा प्रश्न आहेच. मूळात श्रद्धा अंधश्रद्धा मधील सीमारेषा पुसट आहे. आमच्या मते प्रत्येक श्रद्धा ही अंधच असते. अंधश्रद्धा म्हणणे म्हणजे पिवळा पितांबर म्हणल्यासारखे आहे. श्रद्धांचे उपयुक्तता मुल्य किती व उपद्रवी मुल्य किती व कोणास? हा खरा प्रश्न आहे. तरी पण अगतिकता कमी झाली तर अंधश्रद्धांची किमान तीव्रता तर कमी होईल. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

अरुंधती 06/04/2010 - 15:58
आमच्या मते प्रत्येक श्रद्धा ही अंधच असते>> मग माणुसकीवरच्या, ईमानदारीवरच्या, नेकी, चांगुलपणा, सत्यावरच्या श्रध्देबद्दलही तसेच म्हणाल काय? देशाबद्दलच्या श्रध्दाभावाविषयीही असेच म्हणाल काय? श्रध्दाविषयक अंधश्रध्दा? अरुंधती http://iravatik.blogspot.com/

In reply to by अरुंधती

श्रद्धा -अंधश्रद्धा यांचा विचार करताना खरा प्रश्न येतो ते विधायक अथवा विघातक श्रद्धा याचा. ज्या श्रद्धा बाळगल्याने समाजाचे काही नुकसान होत नाही अशा श्रद्धा बाळगल्यास त्यास हरकत नसते. (अर्थात तात्विक पातळीवर वाद-संवाद घडताना त्याला देखील हरकत असते असे मात्र आढळते). धनलालसेने नरबळी, नवसापोटी प्राणीहत्या, धार्मिक श्रद्धेतुन केलेले शोषण या विघातक श्रद्धेपोटी घडलेल्या गोष्टी मात्र समाजाला मागे नेणार्‍या असतात. सश्रद्ध माणुस म्हणेल कि माझी देवावर श्रद्धा आहे.देवाला वाईट गोष्टी आवडत नाही म्हणुन मी ते करणार नाही. अश्रद्ध / नास्तिक म्हणेल वाईट गोष्टी करणे माझ्या विवेकात बसत नाही म्हणून मी ते करणार नाही. दोन्ही लोकांनी केलेली / न केलेली कृती एकच असु शकते. काही माहिती अंनिस व धर्मश्रद्धा आम्हीच खरे धर्मश्रद्धा हा नरेंद्र दाभोलकरांचा लेख इथेच वाचा
या पुर्वी या विषयावर् प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे उपक्रमावर झालेल्या काही चर्चा
१) धर्म देवाने निर्माण केला काय?
२) विवेकवाद
३) विज्ञानाबाबत माझी पुर्वपीठिका
४) विचार आणि चमत्कार
५) श्रद्धेचे मार्केटिंग
६) नवा ब्रिटिश कायदा प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

अरुंधती 06/04/2010 - 17:11
श्रद्धा -अंधश्रद्धा यांचा विचार करताना खरा प्रश्न येतो ते विधायक अथवा विघातक श्रद्धा याचा. ज्या श्रद्धा बाळगल्याने समाजाचे काही नुकसान होत नाही अशा श्रद्धा बाळगल्यास त्यास हरकत नसते. (अर्थात तात्विक पातळीवर वाद-संवाद घडताना त्याला देखील हरकत असते असे मात्र आढळते) >> ही हरकत कोणाची? भारतीय संविधानाची? कायद्याची? की अजून कोणाची? हे नुकसान/ फायदा कोण ठरवणार? जनता? अंनिस? कायदा? सरकार? कोण? तात्विक वादात मी नुकसान हा फायदा कसा व फायदा हे नुकसान कसे हे सिध्द करू शकते. कारण ते सापेक्ष आहेत. पण ह्या नुकसान/ फायद्याची कायदेसंमत काही व्याख्या आहे काय? की केवळ त्याला तर्काचीच पुष्टी? जर फायदा-नुकसानीचीच भाषा करायची तर ते भौतिक, शारीरिक, मानसिक, आर्थिक, आध्यात्मिक....नक्की कोणत्या पातळीवरील नुकसान/ फायदा? ज्या श्रध्दा/ अंधश्रध्दा कायद्याने असंमत आहेत, गैर आहेत त्यांवर थेट कायदेशीर कारवाई करता येतेच की! मग त्यासाठी वेगळे प्रबोधन कितपत उचित आहे? फक्त अमुक अमुक गोष्ट ही कायद्याने गैर आहे, त्यात भाग घेतल्यास तुम्हाला कायदेशीर शिक्षा होऊ शकते एवढा प्रसार पुरेसा नाही काय? आणि जिथे जिथे शोषण होत आहे, गैरफायदा घेतला जात आहे तिथे तिथे सप्रमाण तसे सिध्द केल्यास कायदा काहीच करू शकत नाही का ? अरुंधती http://iravatik.blogspot.com/

In reply to by अरुंधती

१] प्राप्तीकरविषयक अटी, हिशेब, पावत्या, करभरणी इ. इ. पूर्तता नाडीग्रंथवाचक करतात काय? की करचुकवेगिरी करतात?
आमच्या माहितीप्रमाणे नाही. करचुकवेगिरी करत असावेत.
२] नाडीग्रंथातील स्वतःची पट्टी बघायला आलेला व फी भरून नाडीपट्टी वाचन करवून घेणारा माणूस भारतीय ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत येतात काय?
आमच्या माहितीप्रमाणे नाही. कायद्यातील तज्ञ अधिक उत्तरे देउ शकतील.
३] माहिती अधिकाराखाली ह्या सर्व व्यवसायाची पाळेमुळे खणून काढणे अशक्य आहे काय?
आमच्या माहितीप्रमाणे माहिती अधिकार येथे लागु होत नाही.
४] त्यांच्या 'उपाया'मध्ये जारण, मारण नसते तर मंत्र, तंत्र, उपचार, यंत्र इ. गोष्टी असतात ह्याकडे आपण लक्ष दिले आहेत काय?
आमच्या कुवतीप्रमाणे दिले आहे म्हणुनच परिहार दीक्षाकांडम मधे त्याचा अंतर्भाव आहे. खरा धंदा तिथेच असतो.एकदा का भय निर्माण केले कि तो पुजा विधि परिहार करायला तयार होतो.
५] नाडीवाचनाचा जर ''प्लासिबो'' इफेक्ट येणार असेल व त्याने वाचन करवून घेणार्‍यास मानसिक फायदा होणार असेल तर त्याला 'सायको थेरपी' म्हणावे काय?
होय. श्रद्धा मानसिक बळ देते. श्रद्धा - अंधश्रद्धा काथ्याकुट चालुच आहेत. फायद्या बरोबर तोटा झालेले लोक पण आहेतच.
उपस्थित केलेल्या प्रश्नांना वा मुद्द्यांना केवळ ' श्रध्देपुढे सर्व प्रश्न व्यर्थ असतात' म्हणून तुम्ही बगल देऊ शकत नाही. एखाद्या गोष्टीचा सर्व बाजूंनी विचार करावाच लागतो. अन्यथा तुम्ही त्या संदर्भात करत असलेले कार्य अपुरे राहते.
श्रद्धाळू माणुस चिकित्सेच्या भानगडीत पडत नाही. आमच्या मते अडचणीत असलेल्या माणसाला वरील प्रश्न पडत नाहीत. अंधश्रद्धा निर्मुलन होईल असे माझे मत नाही. आमचा केवळ जागृती / प्रबोधन करण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. तो अपुरा असणार आहे याची जाणीव अम्हाला आहे, जगात बहुसंख्य लोक श्रद्धाळु आहेत संशयवादी लोकांची संख्या अत्यल्प आहे. आपला जालावरील सदस्यत्वाचा कालावधी पहाता आपल्याला यात रुची व उत्साह असल्यानेच आपण हे प्रश्न विचारीत आहात हे आम्हाला माहित आहे. आम्ही पुरवलेले दुवे हे आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे देतीलच असे नाही. कदाचित यातुन आपल्याला नवे प्रश्न पडतील. त्यांचे स्वागत आहे. जमल्यास उत्तरे देण्याचा प्रयत्न करु प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

टारझन 06/04/2010 - 16:44
प्रतिसाद पाहुन (वाचुन नव्हे) भोवळ आली .. (शुद्धीत येत) ... च्यायला पब्लिकचा वेळ जात नाहीये काय ? काय हो घाटपांडे काका ? काय हो थत्ते काका ? ओकांचं ठिकाय ..त्यांचा फुलटाईम बिजनेस आहे .. :)

In reply to by टारझन

नितिन थत्ते 06/04/2010 - 18:43
घाटपांडेकाकांचाबी फुलटाईम आहे. आम्हाला उगाच खाज म्हणून. पूर्वी खराट्याने खाजवायचो. आता नाडीने. :) नितिन थत्ते (शु सुधारक संपादकांना सूचना : माझ्या लेखनात शुद्धलेखनाच्या चुका आढळल्यास ते दुरुस्त केले जावे. माझी हरकत नाही. मात्र ते दुरुस्त केल्या जाऊ नये)

संजा 06/04/2010 - 17:04
माननीय ओक साहेबांनी लीहीलेले ईतके अभ्यासपुर्ण लेख न वाचता केवळ टींगलटवाळी करण्याचे काही सिनीयर सदस्यांचे चाललेले ऊद्योग पहाता मन दुखावले. ओक साहेबांचा प्रतीसाद सर्व समर्पक आहे. संजा.

कवितानागेश 06/04/2010 - 20:51
माझ्या मते BSNL काकांनी वापरलेली पद्धत अत्यंत 'अवैज्ञानिक' आहे. (स्वैपाक्पाण्यातून थोडा वेळ मिळाला तर मीपण अशी लांबलचक प्रश्नोत्तरे लिहून काढेन;) कुठलाही प्रयोग करताना निदान १०० बिंदू घ्यावेत! इथे फक्त १च आहे, तोदेखील स्वतःचा = biased! यांच्या विरुद्ध अनुभव असणारेही अनेक 'बिंदू' सापडतील, ( माझ्याकडे ३, ओकांकडे ५००-६००), त्यांचे काय? (माझ्या माहितीतल्या एका MD डॉक्टरला तिच्या १८व्या वर्षीच तिची डिग्री आणि तिच्या नवऱ्याचे पूर्ण नाव सांगितले होते.) शिवाय ते लोक जे काही सांगतील, त्या माहितीचे स्वतः, इतर नातेवाईक, भूत, वर्तमान, भविष्य अशी वर्गवारी करून त्यातील किती टक्के माहिती बरोबर आली याची 'खरी' नोंद करावी. आम्ही घरातलेच ३ जण एका नाडीकेंद्रात गेले असताना, त्यानी फक्त अंगठ्याचे ठसे घेतले, नंबर्स दिले, नाव कधीही विचारले नाही! आम्हाला भविष्य सांगणारे बुवा, हिंदी नीट येत असल्याने, फार प्रश्नांच्या भानगडीत पडले नाहीत. १० दिवसांनी फोन करायला सांगितला, तेंवा देखील आधी स्वतःचे नाव विचारले नाही. ४-५ पत्त्यांपैकी कुठली जुळते, ते पाहण्यासाठी फक्त आई आणि वडलांच्या नावातील अक्षरांची संख्या विचारली! त्यांनी माझ्या आईला पहिला प्रश्न विचारला, तुमच्या आईची २ नावे आहेत का? हो म्हटल्यावर विचारले, १ दोन अक्षरी आणि १ चार अक्षरी आहे का? हो म्हटल्यावर दोन्हीही नावे त्यांनीच सांगितली, तीसुद्धा बरोबर. यावरून त्यांनी ४-५ पैकी १ पट्टी 'फायनल' केली.त्यानंतर बुवा: वडिलांचे नाव ३ अक्षरी आहे का? आई: नाही. ४ अक्षरी. बुवा: नाही. ३ अक्षरीच आहे. पहिले जोडाक्षर आहे. आई: ( कपाळावर आठ्या!) ( मनात: आगाउच आहे हा बुवा!) बुवा: पहिले अक्षर त, न, म आहे का? आई: हो . न. बुवा: ३ अक्षरीच नाव आहे. आई: (जास्त आठ्या) मी: ( मध्येच तोंड खुपसून) दुसरे अक्षर काय? बुवा: दुसरे स, तिसरे ह . मी: बरोबर आहे. नृसिंह ! गम्मत म्हणजे, आम्ही सगळे आजोबांचे नाव नरसिंह असे सांगतो, आजोबा स्वतः मात्र, 'नृसिंह' असेच सांगायचे व लिहायचे. थोडक्यात बुवांना /महर्षी ना जास्त नीट माहिती होती आमच्यापेक्षा ! पुढे.. बुवा: तुम्ही ८ भाऊ बहिणी, ४ भाऊ ४ बहिणी. आई: ( आठ्या!) नाही. बुवा: १ भाऊ गेला. आई: ( मनात: कशाला रे मेल्या अभद्र बोलतोस!) नाही. बुवा: तुमच्या आईची ८ बाळंतपणे झाली आहेत असे इथे लिहिलेय. आई: खरेच की. (first son was still born!) बुवा: तुम्हाला भावाबहिणींची खूप मदत आहे.. .....etc. etc. आई: होय.होय........ ------------------------- सांगायचा मुद्दा हा, कि आपली स्वतःचीच स्वतःबद्दलची माहिती काही वेळेस कमी पडते. कदाचित BSNL काकांच्या बाबतीतही असे झाले असेल, तेंव्हा उत्सुक व्यक्तींनी ती नीट घेऊन मगच प्रयोग करायला जावे. आम्हाला भविष्य सांगणारे बुवा, हिंदी नीट येत असल्याने, फार प्रश्नांच्या भानगडीत पडले नाहीत. त्यामुळे 'भविष्यकथन' मिळवणे सोपे झाले. त्यांनी जो काही भूतकाळ आणि वर्तमान सांगितला तो तिघांच्याही बाबतीतला अगदी खरा ठरला, भविष्य काल आईच ७० %, दादाचा ७० % आणि माझा ( माझ्या 'अक्कलहुशारीने'!!? ) ५० % इतकाच खरा ठरला. त्यांनी १५ वर्षांनी परत याल, मग पुढचे वाचन करता येईल, आत्ता 'आज्ञा' नाही असे सांगितले. याचा मात्र मला खूप राग आला! मला स्वतःला तरी कुठेच फसवाफसवी जाणवली नाही पण फी खूप घेतात असे मात्र वाटले. आधीच अडचणीत असलेले लोक भविष्य बघायला येतात, त्यांच्याकडून पुन्हा २-४ हजार रुपये घेऊन व तितक्याच रुपयांच्या पूजा-अर्चा सांगून त्यांना अजून अडचणीत टाकणे योग्य नाही असे मला प्रामाणिकपणे वाटते. इथे सगळ्याच गोष्टी लिहिणे आत्ता शक्य नाही. पण मी मारलेला १ स्टंट मात्र त्यांनी मला सांगितला. तो फक्त माझ्या एका मैत्रिणीला माहित होता, आणि त्यांनी मला, 'तू 'असे असे' केलास का बाळा, म्हणून प्रश्न विचारला असता तर मी सरळ 'अजिबात नाही' म्हणून खोटे सांगून मोकळी झाले असते. पण एकदा पट्टीची खात्री झाल्यानंतर त्यानी एकही प्रश्न विचारला नाही, declare करायला सुरुवात केली. आता मी बिनधास्त सांगते, कि मला नाही नाही ते जीवावरचे खेळ करायची सवय आहे, आणि त्यातून मी सहीसलामत वाचते!! ( ४ पायांवर,अलगद, माउसारखी!) हे तिकडे कसे काय लिहून आले कुणास ठाऊक? थोडक्यात मी नाडी शास्त्राला थोतांड म्हणण्याचा करंटेपणा कधीच करणार नाही. पण पुन्हा ना जाण्याचा नक्कीच करेन! कारण हे लोक पैशाचा अति हव्यास करून आणी हिंदी, इंग्लिश, भाषा नीट ना शिकून त्यांच्याच हातात असलेल्या एक अत्यंत उपयोगी शास्त्राचे नुकसान करत आहेत. ============ माउ

In reply to by कवितानागेश

धनंजय 07/04/2010 - 01:46
फक्त १च आहे, तोदेखील स्वतःचा = biased!
म्हणजे "स्वतः अनुभव घेऊन बघा" असे पुन्हापुन्हा सांगितले जाते, त्याचे काय म्हणायचे? ;-)

In reply to by कवितानागेश

तुमच्याशी कोणी अनोळखी व्यक्तीने गप्पा मारल्या? अशासाठी विचारतोय की नाडीचं माहीत नाही, पण अनेक 'बुवा' ही युक्ती वापरतात. अमेरिकेतल्या काही अशाच 'अंतर्ज्ञानी' माणसांचे खेळ स्केप्टिक सोसायटीने उघडकीला आणलेले आहेत. त्यात साधारण जादू अशी असते की बुवा स्टेजवर उभा असतो. त्याचा कार्यक्रम बघायला शेकडो लोक जमलेले असतात. तो एके ठिकाणी बोट दाखवतो आणि म्हणतो 'तुम्ही, निळ्या ड्रेसमधल्या - तुमची आई अत्यवस्थ आहे म्हणून तुम्ही आल्या आहात. अलाबामाहून, इतक्या लांबून आलात, पण तुमची फेरी व्यर्थ नाही जाणार. देवाचा तुम्हाला आशीर्वाद आहे असं त्याने मला सांगितलंय..' तो याहूनही अधिक माहिती सांगतो. असं अनेकांना करतो. ही सगळी माहिती लोक सभागृहात येण्यापूर्वी रजिस्ट्रेशनच्या लायनीत असताना त्याचे साथीदार गप्पा मारत मारत माहिती काढून घेतात, व त्याला ती बाई कुठे बसलेली आहे हे आधी सांगतात... राजेश

In reply to by राजेश घासकडवी

असेच प्रयोग हे नंदीबैलवाला देखील करतो. शंभराची नोट कुणाच्या जवळ आहे असे नंदीला विचारतो? ज्याच्या खिशात शंभराची नोट आहे अशा व्यक्ति जवळ तो बैल उभा रहातो. जादुचे अनेक प्रयोग थक्क करणारे असतात.आपण ती जादुगारची कला मानतो. तेच प्रयोग बाबा बुवांनी केले तर ती सिद्धी! भोळी भाबडी जनता अलगद जाळ्यात अडकते.काही माणसांचा अदभुत गुढ गोष्टींकडे विश्वास ठेवण्याचा कल असतो. पुल देशपांडे नशिब मधे या विषयी काय म्हणतात ते पहा http://faljyotishachikitsa.blogspot.com/2008/09/blog-post.html अशाच प्रकारांविषयी १९३५ साली पुण्यात रा. ज गोखले यांनी एक पुस्तक लिहिल आहे. त्याचे नांव लोकभ्रम हे पुस्तक आमच्या फलज्योतिष चिकित्सा मंडळाच्या ई ग्रंथालयात आहे. डोकावुन पहा हे दुर्मीळ पुस्तक वाचायला मिळेल. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

In reply to by राजेश घासकडवी

कवितानागेश 07/04/2010 - 18:08
तुमच्याशी कोणी अनोळखी व्यक्तीने गप्पा मारल्या? ...>>>>>>>>>>> अजीबात नाही. मी 'कोण' हे त्या बुवा लोकाना महितच नव्हते, अनोळखी माणूस माझ्यासारख्या 'यःकश्चित' मुलिच्या मागावर सोड्णार कसे? आनि अनोळखी माणसाला मी माझ्या वडीलान्चे, आजोबान्चे, आनि आजीची नावे कशाला सान्गेन? त्या लोकानी फक्त अन्ग्ठ्याचा ठसा आनी ज न्मतारिख घेतली. आणी जन्मतारखेवरुन, नक्शत्रावरुन फार तर आमच्या नावाचे पहिले अक्शर ओळखता येइल. त्यानी आमची नावे एकदाही विचारली नहीत, योग्य पट्टी सापडल्यावर, पट्टीत वाचून 'सान्गितली.' ... ============ माउ

अरुंधती 07/04/2010 - 16:26
१ किंवा २ व्यक्तींच्या नाडीपट्टी पाहून फक्त त्यावरून काढलेले निष्कर्ष तोटके व त्रुटीपूर्ण आहेत. नाडीपट्टी हुडकून काढताना जे प्रश्न विचारले गेले [उदा आई-वडील हयात, भावंडे इ.इ.] हे व त्यांची उत्तरे नाडीवाचकाने रेकॉर्ड केली होती काय? जर तसे नसले तर सुमारे १५० पेक्षा जास्त प्रश्नांची उत्तरे त्यांनी कशी ''लक्षात'' ठेवली ह्या गूढ-रहस्याबद्दल त्यांचा सत्कारच करावा लागेल! [मला समोरच्या व्यक्तीचे नाव ती व्यक्ती नवीन असेल तर १५ मिनिटांनी लक्षातही राहात नाही... आणि इथे आई-बापाचे नाव, भावंडांची संख्या - लिंग - विवाहित्/अविवाहित, मृत्/जिवंत, जातकाचे नाव - वय - जन्मतारीख-साल, शिक्षण, विवाहित्/अविवाहित, व्यवसाय, पत्नीचे नाव, शिक्षण, व्यवसाय/नोकरी, अपत्ये, संख्या, लिंग, राहते घर, इस्टेट, जमीन-जुमला, कोर्ट कचेरी इ. इ. इ. सर्व तपशील एका झटक्यात लक्षात ठेवले म्हणताय?] आहे बुव्वा! कोठे आहेत ते नाडीवाचक? त्यांचे जरा पाय धरावे म्हणते मी! :-) नाडीपट्ट्यांचे ओंकार पाटील यांच्या नाडीवरून काढलेले निष्कर्ष संपूर्ण नाडीग्रंथांवर अन्यायकारक वाटतात. केवळ एका नाडीपट्टीवरून तुम्ही हजारो लोकांच्या नाडीपट्टीत आलेले कथन खोटे ठरवणार? त्यासाठी, सप्रमाण सिध्द करण्यासाठी नमुना म्हणून किमान ५० ते १०० नाडीपट्ट्यांचे, त्यांतील किती टक्केवारी भविष्य/भूत्/वर्तमान हे बरोबर्/चूक निघाले इत्यादी सरासरी/आलेख काढलात तर त्या आकडेवारीने आपल्या वक्तव्यास पुष्टी येईल. अन्यथा चमत्कृतीपूर्ण कथाकथनासारखेच आपले निष्कर्षही एकाच व्यक्तीच्या नाडीपट्टीसाठी लागू होतात असे सखेद म्हणावे लागेल. श्रद्धा -अंधश्रद्धा यांचा विचार करताना खरा प्रश्न येतो ते विधायक अथवा विघातक श्रद्धा याचा. ज्या श्रद्धा बाळगल्याने समाजाचे काही नुकसान होत नाही अशा श्रद्धा बाळगल्यास त्यास हरकत नसते. (अर्थात तात्विक पातळीवर वाद-संवाद घडताना त्याला देखील हरकत असते असे मात्र आढळते) >> ही हरकत कोणाची? भारतीय संविधानाची? कायद्याची? की अजून कोणाची? हे नुकसान/ फायदा कोण ठरवणार? जनता? अंनिस? कायदा? सरकार? कोण? तात्विक वादात मी नुकसान हा फायदा कसा व फायदा हे नुकसान कसे हे सिध्द करू शकते. कारण ते सापेक्ष आहेत. पण ह्या नुकसान/ फायद्याची कायदेसंमत काही व्याख्या आहे काय? की केवळ त्याला तर्काचीच पुष्टी? जर फायदा-नुकसानीचीच भाषा करायची तर ते भौतिक, शारीरिक, मानसिक, आर्थिक, आध्यात्मिक....नक्की कोणत्या पातळीवरील नुकसान/ फायदा? ज्या श्रध्दा/ अंधश्रध्दा कायद्याने असंमत आहेत, गैर आहेत त्यांवर थेट कायदेशीर कारवाई करता येतेच की! मग त्यासाठी वेगळे प्रबोधन कितपत उचित आहे? फक्त अमुक अमुक गोष्ट ही कायद्याने गैर आहे, त्यात भाग घेतल्यास तुम्हाला कायदेशीर शिक्षा होऊ शकते एवढा प्रसार पुरेसा नाही काय? आणि जिथे जिथे शोषण होत आहे, गैरफायदा घेतला जात आहे तिथे तिथे सप्रमाण तसे सिध्द केल्यास कायदा काहीच करू शकत नाही का ? अरुंधती http://iravatik.blogspot.com/

चित्रगुप्त 07/04/2010 - 18:24
अनेक वर्षांपूर्वी तांबरम मधील नाडीकेंद्रात श्री. ओक यांना आमची नाडी सापडली होती.... त्यावेळी आम्ही तेथे हजर नसल्याने पट्टी शोधताना कोणकोणती माहिती दिली गेली, हे ठाऊक नाही. त्यात जी नावे "लिहून" आली होती, त्यात आईचे नाव चूक होते (आईचे व पत्नी चे नाव एकच आले होते) पट्टीत भूतकाळ व भविष्य काळ काहीही लिहिलेला नव्हता. पूर्वजन्मीच्या पापकॄत्यांमुळे या जन्मी त्रास, बदनामी होईल, वगैरे होते. त्यासाठी परिहार व दीक्षा कांडम वेगळी फी भरून काढवावे लागणार होते, ते आम्ही केले नाही. याशिवाय ज्ञान-कांडम काढवले होते, त्यातील मजकूर पोरकट होता, थक्क होण्यासारखे काहीही सांगितले गेले नव्हते. यासाठी घेतली गेलेली फी त्या काळच्या मानाने खूपच जास्त वाटली होती. या गोष्टीला फार वर्षे झाली..... ती वही व कॅसेट (यात पट्टी शोधतानाची प्रश्नोत्तरे नव्हती) सापडल्यास मिपावर देऊच.

In reply to by चित्रगुप्त

पूर्वजन्मीच्या पापकॄत्यांमुळे या जन्मी त्रास, बदनामी होईल, वगैरे होते. त्यासाठी परिहार व दीक्षा कांडम वेगळी फी भरून काढवावे लागणार होते, ते आम्ही केले नाही.
१)आपल्या अनुपस्थितीत पट्टी निघाली होती. खरी भानगड / शोषण हे परिहार कांडम मधे असते. आपल्याकडच्या नारायण नागबली व त्रिपिंडी श्राद्ध सारखे. मागचे हिशेब चुकते करु . आत्ता ज्या अडचणी येताहेत त्या माग्चे हिशेब राहिल्याने येताहेत. परिहार करुन ते चुकते करा म्हणजे पुढे अडचण येणार नाही असा काहीसा प्रकार. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
मिसळपाववर सध्या नाडीचे प्रस्थ वाढत आहे. वेळोवेळी त्याचा प्रतिवाद केला आहे. वाद प्रतिवाद चालुच असतात. आम्ही ज्या ओंकार पाटील यांचा संदर्भ दिला होता तो लेख संपुर्णपणे टंकणे शक्य नसल्याने तो पीडीएफ स्वरुपातील आमच्या फलज्योतिष चिकित्सा मंडळाच्या डिजिटल ग्रंथालयातील प्राचीन ज्योतिषाचे तीन तेरा या पुस्तकात आहे .तेवढ्याच लेखाचा संदर्भ खाली देत आहे. श्री. ओंकार पाटील हे एक बीएसएनएल मधील अधिकारी आहेत.

दक्षिण भारतातल्या नाडी केंद्रवाल्यावर कोर्टात फिर्याद

शशिकांत ओक ·

मला तरी आपण भोळसट वगैरे वाटत नाहीत. प्रसिद्धीसाठी हे लिहीत असाल असेही वाटत नाही. महर्षींनी आदेश दिलेला आहे या जाणीवेतून आपण हे लिहीत असणार. आपले स्वत:चेच शरीर कसे चालते, मन कसे चालते हेही आपल्याला नीट समजत नाही, अशा वेळी या जगात आपल्याला समजू शकतील अशाच घटना घडल्या पाहिजेत असे वाटणे चुकीचेच आहे. या ठिकाणी आपली / आपल्या या लेखनाची होत असलेली टवाळी पाहिली आहे. तरी देखील ज्या क्षमाशील वृत्तीने तुम्ही त्याला संयत उत्तरे देता, त्यावरून आपली महर्षींच्या ठायी असलेली श्रद्धा ही अनुभवांवर आधारीत आहे हे लक्षात येते. लिहीत रहावे ही विनंती. आळश्यांचा राजा

भूंगा 03/04/2010 - 12:50
श्री. ओक विज्ञानाधारित विचारसरणीच योग्य ही पण एक अंधश्रद्धाच नव्हे काय? विज्ञानाचे आजचे ठोकताळे कालांतरानें बदलणे वा चुकीचे ठरणे होतेच की नाही? आमचे एक शिक्षक सांगायचे की आपण फारतर ४ मितींबद्द्ल विचार करू शकतो वा पाहू शकतो, जर आपल्याला ५/६/७ वा अनण्त मिती मधले दिसू शकले तर हे जे दिसत आहे त्यापेक्षा फारच वेगळे दिसू शकेल. तसेच विज्ञानानुसार "१००%" अस्तित्वातच नाही. त्यामुळे अंनिस वाले ज्या विज्ञानाच्या आधारावर श्रद्धेला आव्हान देत आहेत त्यात माझ्या मते कांहीच अर्थ नाही. भुंगा

In reply to by भूंगा

शशिकांत ओक 03/04/2010 - 17:04
विज्ञानाधारित विचारसरणीच योग्य ही पण एक अंधश्रद्धाच नव्हे काय?
होय. प्राचार्य गळतगे त्यांना वैज्ञानिक अंधश्रद्धा म्हणतात.वाचा. त्यांचा ग्रंथ विज्ञान आणि चमत्कार नाडी ग्रंथावरील अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/ शशिकांत

मला तरी आपण भोळसट वगैरे वाटत नाहीत. प्रसिद्धीसाठी हे लिहीत असाल असेही वाटत नाही. महर्षींनी आदेश दिलेला आहे या जाणीवेतून आपण हे लिहीत असणार. आपले स्वत:चेच शरीर कसे चालते, मन कसे चालते हेही आपल्याला नीट समजत नाही, अशा वेळी या जगात आपल्याला समजू शकतील अशाच घटना घडल्या पाहिजेत असे वाटणे चुकीचेच आहे. या ठिकाणी आपली / आपल्या या लेखनाची होत असलेली टवाळी पाहिली आहे. तरी देखील ज्या क्षमाशील वृत्तीने तुम्ही त्याला संयत उत्तरे देता, त्यावरून आपली महर्षींच्या ठायी असलेली श्रद्धा ही अनुभवांवर आधारीत आहे हे लक्षात येते. लिहीत रहावे ही विनंती. आळश्यांचा राजा

भूंगा 03/04/2010 - 12:50
श्री. ओक विज्ञानाधारित विचारसरणीच योग्य ही पण एक अंधश्रद्धाच नव्हे काय? विज्ञानाचे आजचे ठोकताळे कालांतरानें बदलणे वा चुकीचे ठरणे होतेच की नाही? आमचे एक शिक्षक सांगायचे की आपण फारतर ४ मितींबद्द्ल विचार करू शकतो वा पाहू शकतो, जर आपल्याला ५/६/७ वा अनण्त मिती मधले दिसू शकले तर हे जे दिसत आहे त्यापेक्षा फारच वेगळे दिसू शकेल. तसेच विज्ञानानुसार "१००%" अस्तित्वातच नाही. त्यामुळे अंनिस वाले ज्या विज्ञानाच्या आधारावर श्रद्धेला आव्हान देत आहेत त्यात माझ्या मते कांहीच अर्थ नाही. भुंगा

In reply to by भूंगा

शशिकांत ओक 03/04/2010 - 17:04
विज्ञानाधारित विचारसरणीच योग्य ही पण एक अंधश्रद्धाच नव्हे काय?
होय. प्राचार्य गळतगे त्यांना वैज्ञानिक अंधश्रद्धा म्हणतात.वाचा. त्यांचा ग्रंथ विज्ञान आणि चमत्कार नाडी ग्रंथावरील अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/ शशिकांत
ना़डीग्रंथांवरील अभिनव विलक्षण किस्से क्रमांक ३ भाग - १ --
किस्सा ३१ मार्चचा - दक्षिण भारतातल्या नाडी केंद्रवाल्यावर कोर्टात फिर्याद .
एका शंकराच्या मंदिरात उद्या जाऊन दोन दीप लावावेत. त्यानंतर अपेक्षित व्यक्ती वाटेत भेटतील.
गोपुराची वेस ओलांडताना एकदम लक्षात आले.

ननाडीग्रंथांवरील अभिनव विलक्षण किस्से २ - भाग दुसरा -किस्सा श्रीनगरच्या ३१ मार्चचा

शशिकांत ओक ·

शशिकांत ओक 31/03/2010 - 20:15
ओक नवसिद्धांताचा प्रवर्तक? छे नक्की नाही
{प्रियालींच्या धनंजयांना अन्यत्र ठिकाणी विचारलेल्या प्रश्नाला - की}... नाडीग्रंथांची भलावण करणारे कोणत्या क्याटेगरीत {भ्रमसेन की ठकसेन}येतील? स्वतःशी प्रामाणिक, (नव)कल्पना पटवून देणारे - यांत आले तरीही त्यांना भ्रमसेन म्हणता येईल का?
{धनंजय म्हणतात} ...विचारलेल्या उदाहरणाबद्दल थेट उत्तर मात्र देण्याचे मी टाळत आहे. परंतु वरील दिलेल्या सामान्यनियमानुसार उदाहरणाचे वर्गीकरण करणे सुस्पष्ट आहे, असे मला वाटते. {कदाचित हैयोहैयैयोंच्या अनुषंगाने} या विवक्षित उदाहरणाच्या बाबतीत माझे इतके लिहून झालेले आहे, की आणखी काही लिहिण्यासाठी उरलेले नाही. पूर्वीचे दुवे देण्यावेगळे मी काही करू शकणार नाही, क्षमस्व. या उदाहरणाच्या संदर्भात पटवण्यासाठी काय आवश्यक आहे? याबाबत मला जमेल तितके थेट आणि विस्ताराने स्पष्ट करूनही (प्रात्यक्षिकासाठी भूमी तयार करणे) त्यातून असा निष्कर्ष काढला जातो : ...धनंजयांना म्हणणे आहे की 'प्रत्यक्ष माझ्यासाठी नाही' असे आपण जाहिर करता आणि त्यातून आपण अनुभव घेणार नाही ही भूमिका स्पष्ट करता. ह्याचे एकमेव कारण त्यातील 'भविष्य' हा शब्द असावा. तो शब्द त्यात नसतां, तर एक अभ्यासक ह्या नात्याने आपण अशी ताठर भूमिका घेतली नसती..... ज्या अर्थी विस्ताराने काही सांगून मला अभिप्रेत नसलेला अर्थ निघतो त्या अर्थी याबाबतीत या संवादक-जोडीत काहीही पटवण्यात मी अयशस्वी आहे.. ..
{कंस माझे} माझे (ओकांचे) धनंजयांच्या संदर्भातील म्हणणे असे की - ते मला व मी त्यांना पटवण्यात अयशस्वी आहे. हे मला मान्य नाही आणि हे मत इतर सभासदांना ही लागू पडत आहे. असे एकंदरीत इथले अन्य ठिकाणचे आपले व इतरांचे प्रतिसाद वाचून वाटते. नाडीग्रंथांबाबत मी "नवसिद्धांताचा प्रवर्तक" नाही. मी कुठलाही वैज्ञानिक सिद्धांत -हायपोथिसिस - मांडल्याचा दावा केलेला नाही.ती माझी पात्रता नाही. 'प्रवर्तक' मानायचे असेल तर नाडी ग्रंथकर्ते महर्षींनाच मानावे लागेल. कारण नाडीवाचक शास्त्री देखील नाडीग्रंथांच्या वाचनापलिकडे नाडीग्रंथांचे कर्तेपण घेऊ शकत नाहीत. मी किंवा नाडी वाचक त्या ग्रंथांचे मुळ लेखक नाहीत. आपल्या बाबतीतील मत की आपण अनुभव घेणार नाही ही भूमिका स्पष्ट करता. ह्याचे एकमेव कारण त्यातील 'भविष्य' हा शब्द असावा. तो शब्द त्यात नसतां, तर एक अभ्यासक ह्या नात्याने आपण अशी ताठर भूमिका घेतली नसती. नाडी ग्रंथांवरील माझे विचार वा लेख वाचणाऱ्या इतर शेकडो सभासदांना अशी नम्र विनंती आहे की नाडीग्रंथांकरिता मला मध्यवर्ती न मानता त्यांच्या मुळलेखकांना केंद्रस्थानी मानलेत आणि (त्यातील भविष्य हा शब्द तूर्तास टाळला) तर कदाचित माझ्या व नाडीग्रंथांबाबतचा आपल्या सर्वांचा दृष्टीकोन निवळेल. नाडी विरोधक वा नाडी ग्रंथांना सहानुभूती दर्शवणारे असे विभाग पाडून 'भौतिकविज्ञान विरुद्ध ओक" असे न मानता पुर्वग्रह न ठेवता साहचर्याने अनुभव घेऊ या. पाहू या. असा माझ्या सर्व कथनाचा गाभा आहे. भागाच्या वाचकांसाठी प्रतिक्रिया परत टाकली आहे. पुन्हा वाचणाऱ्यासाठी क्षमस्व. नाडीग्रंथांवर अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/ शशिकांत

शशिकांत ओक 31/03/2010 - 20:15
ओक नवसिद्धांताचा प्रवर्तक? छे नक्की नाही
{प्रियालींच्या धनंजयांना अन्यत्र ठिकाणी विचारलेल्या प्रश्नाला - की}... नाडीग्रंथांची भलावण करणारे कोणत्या क्याटेगरीत {भ्रमसेन की ठकसेन}येतील? स्वतःशी प्रामाणिक, (नव)कल्पना पटवून देणारे - यांत आले तरीही त्यांना भ्रमसेन म्हणता येईल का?
{धनंजय म्हणतात} ...विचारलेल्या उदाहरणाबद्दल थेट उत्तर मात्र देण्याचे मी टाळत आहे. परंतु वरील दिलेल्या सामान्यनियमानुसार उदाहरणाचे वर्गीकरण करणे सुस्पष्ट आहे, असे मला वाटते. {कदाचित हैयोहैयैयोंच्या अनुषंगाने} या विवक्षित उदाहरणाच्या बाबतीत माझे इतके लिहून झालेले आहे, की आणखी काही लिहिण्यासाठी उरलेले नाही. पूर्वीचे दुवे देण्यावेगळे मी काही करू शकणार नाही, क्षमस्व. या उदाहरणाच्या संदर्भात पटवण्यासाठी काय आवश्यक आहे? याबाबत मला जमेल तितके थेट आणि विस्ताराने स्पष्ट करूनही (प्रात्यक्षिकासाठी भूमी तयार करणे) त्यातून असा निष्कर्ष काढला जातो : ...धनंजयांना म्हणणे आहे की 'प्रत्यक्ष माझ्यासाठी नाही' असे आपण जाहिर करता आणि त्यातून आपण अनुभव घेणार नाही ही भूमिका स्पष्ट करता. ह्याचे एकमेव कारण त्यातील 'भविष्य' हा शब्द असावा. तो शब्द त्यात नसतां, तर एक अभ्यासक ह्या नात्याने आपण अशी ताठर भूमिका घेतली नसती..... ज्या अर्थी विस्ताराने काही सांगून मला अभिप्रेत नसलेला अर्थ निघतो त्या अर्थी याबाबतीत या संवादक-जोडीत काहीही पटवण्यात मी अयशस्वी आहे.. ..
{कंस माझे} माझे (ओकांचे) धनंजयांच्या संदर्भातील म्हणणे असे की - ते मला व मी त्यांना पटवण्यात अयशस्वी आहे. हे मला मान्य नाही आणि हे मत इतर सभासदांना ही लागू पडत आहे. असे एकंदरीत इथले अन्य ठिकाणचे आपले व इतरांचे प्रतिसाद वाचून वाटते. नाडीग्रंथांबाबत मी "नवसिद्धांताचा प्रवर्तक" नाही. मी कुठलाही वैज्ञानिक सिद्धांत -हायपोथिसिस - मांडल्याचा दावा केलेला नाही.ती माझी पात्रता नाही. 'प्रवर्तक' मानायचे असेल तर नाडी ग्रंथकर्ते महर्षींनाच मानावे लागेल. कारण नाडीवाचक शास्त्री देखील नाडीग्रंथांच्या वाचनापलिकडे नाडीग्रंथांचे कर्तेपण घेऊ शकत नाहीत. मी किंवा नाडी वाचक त्या ग्रंथांचे मुळ लेखक नाहीत. आपल्या बाबतीतील मत की आपण अनुभव घेणार नाही ही भूमिका स्पष्ट करता. ह्याचे एकमेव कारण त्यातील 'भविष्य' हा शब्द असावा. तो शब्द त्यात नसतां, तर एक अभ्यासक ह्या नात्याने आपण अशी ताठर भूमिका घेतली नसती. नाडी ग्रंथांवरील माझे विचार वा लेख वाचणाऱ्या इतर शेकडो सभासदांना अशी नम्र विनंती आहे की नाडीग्रंथांकरिता मला मध्यवर्ती न मानता त्यांच्या मुळलेखकांना केंद्रस्थानी मानलेत आणि (त्यातील भविष्य हा शब्द तूर्तास टाळला) तर कदाचित माझ्या व नाडीग्रंथांबाबतचा आपल्या सर्वांचा दृष्टीकोन निवळेल. नाडी विरोधक वा नाडी ग्रंथांना सहानुभूती दर्शवणारे असे विभाग पाडून 'भौतिकविज्ञान विरुद्ध ओक" असे न मानता पुर्वग्रह न ठेवता साहचर्याने अनुभव घेऊ या. पाहू या. असा माझ्या सर्व कथनाचा गाभा आहे. भागाच्या वाचकांसाठी प्रतिक्रिया परत टाकली आहे. पुन्हा वाचणाऱ्यासाठी क्षमस्व. नाडीग्रंथांवर अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/ शशिकांत
3

नाडीग्रंथांवरील अभिनव विलक्षण किस्से २ - किस्सा श्रीनगरच्या ३१ मार्चचा

शशिकांत ओक ·

चेतन 31/03/2010 - 12:43
79 वाचने प्रतिक्रिया नाही :S बहुतेक वाचकांनी नाड्या आवळलेल्या दिसत्यात. क्रमशः पुढे चालू.... हे पुढे चालु आहे असे वाचावे... ;) चालु द्या... अवांतरः बहुतेक आज मी प्रतिसाद देणार हे नाडिग्रंथात लिहल असाव :? (काय चालु आहे)

सुनील 31/03/2010 - 14:36
आत्तापावेतो तरी नाडीचा उल्लेख आलेला नाही! किस्सा वाचनीय. पुढे नाडीचा उल्लेख आल्यावर वेगळी प्रतिक्रिया देईनच! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

शशिकांत ओक 31/03/2010 - 19:52
ओक नवसिद्धांताचा प्रवर्तक? छे नक्की नाही
{प्रियालींच्या धनंजयांना अन्यत्र ठिकाणी विचारलेल्या प्रश्नाला - की}... नाडीग्रंथांची भलावण करणारे कोणत्या क्याटेगरीत {भ्रमसेन की ठकसेन}येतील? स्वतःशी प्रामाणिक, (नव)कल्पना पटवून देणारे - यांत आले तरीही त्यांना भ्रमसेन म्हणता येईल का?
{धनंजय म्हणतात} ...विचारलेल्या उदाहरणाबद्दल थेट उत्तर मात्र देण्याचे मी टाळत आहे. परंतु वरील दिलेल्या सामान्यनियमानुसार उदाहरणाचे वर्गीकरण करणे सुस्पष्ट आहे, असे मला वाटते. {कदाचित हैयोहैयैयोंच्या अनुषंगाने} या विवक्षित उदाहरणाच्या बाबतीत माझे इतके लिहून झालेले आहे, की आणखी काही लिहिण्यासाठी उरलेले नाही. पूर्वीचे दुवे देण्यावेगळे मी काही करू शकणार नाही, क्षमस्व. या उदाहरणाच्या संदर्भात पटवण्यासाठी काय आवश्यक आहे? याबाबत मला जमेल तितके थेट आणि विस्ताराने स्पष्ट करूनही (प्रात्यक्षिकासाठी भूमी तयार करणे) त्यातून असा निष्कर्ष काढला जातो : ...धनंजयांना म्हणणे आहे की 'प्रत्यक्ष माझ्यासाठी नाही' असे आपण जाहिर करता आणि त्यातून आपण अनुभव घेणार नाही ही भूमिका स्पष्ट करता. ह्याचे एकमेव कारण त्यातील 'भविष्य' हा शब्द असावा. तो शब्द त्यात नसतां, तर एक अभ्यासक ह्या नात्याने आपण अशी ताठर भूमिका घेतली नसती..... ज्या अर्थी विस्ताराने काही सांगून मला अभिप्रेत नसलेला अर्थ निघतो त्या अर्थी याबाबतीत या संवादक-जोडीत काहीही पटवण्यात मी अयशस्वी आहे..
.. {कंस माझे} माझे (ओकांचे) धनंजयांच्या संदर्भातील म्हणणे असे की - ते मला व मी त्यांना पटवण्यात अयशस्वी आहे. हे मला मान्य नाही आणि हे मत इतर सभासदांना ही लागू पडत आहे. असे एकंदरीत इथले अन्य ठिकाणचे आपले व इतरांचे प्रतिसाद वाचून वाटते. नाडीग्रंथांबाबत मी "नवसिद्धांताचा प्रवर्तक" नाही. मी कुठलाही वैज्ञानिक सिद्धांत -हायपोथिसिस - मांडल्याचा दावा केलेला नाही.ती माझी पात्रता नाही. 'प्रवर्तक' मानायचे असेल तर नाडी ग्रंथकर्ते महर्षींनाच मानावे लागेल. कारण नाडीवाचक शास्त्री देखील नाडीग्रंथांच्या वाचनापलिकडे नाडीग्रंथांचे कर्तेपण घेऊ शकत नाहीत. मी किंवा नाडी वाचक त्या ग्रंथांचे मुळ लेखक नाहीत. आपल्या बाबतीतील मत की आपण अनुभव घेणार नाही ही भूमिका स्पष्ट करता. ह्याचे एकमेव कारण त्यातील 'भविष्य' हा शब्द असावा. तो शब्द त्यात नसतां, तर एक अभ्यासक ह्या नात्याने आपण अशी ताठर भूमिका घेतली नसती. नाडी ग्रंथांवरील माझे विचार वा लेख वाचणाऱ्या इतर शेकडो सभासदांना अशी नम्र विनंती आहे की नाडीग्रंथांकरिता मला मध्यवर्ती न मानता त्यांच्या मुळलेखकांना केंद्रस्थानी मानलेत आणि (त्यातील भविष्य हा शब्द तूर्तास टाळला) तर कदाचित माझ्या व नाडीग्रंथांबाबतचा आपल्या सर्वांचा दृष्टीकोन निवळेल. नाडी विरोधक वा नाडी ग्रंथांना सहानुभूती दर्शवणारे असे विभाग पाडून 'भौतिकविज्ञान विरुद्ध ओक" असे न मानता पुर्वग्रह न ठेवता साहचर्याने अनुभव घेऊ या. पाहू या. असा माझ्या सर्व कथनाचा गाभा आहे. नाडीग्रंथांवर अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/ शशिकांत

चेतन 31/03/2010 - 12:43
79 वाचने प्रतिक्रिया नाही :S बहुतेक वाचकांनी नाड्या आवळलेल्या दिसत्यात. क्रमशः पुढे चालू.... हे पुढे चालु आहे असे वाचावे... ;) चालु द्या... अवांतरः बहुतेक आज मी प्रतिसाद देणार हे नाडिग्रंथात लिहल असाव :? (काय चालु आहे)

सुनील 31/03/2010 - 14:36
आत्तापावेतो तरी नाडीचा उल्लेख आलेला नाही! किस्सा वाचनीय. पुढे नाडीचा उल्लेख आल्यावर वेगळी प्रतिक्रिया देईनच! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

शशिकांत ओक 31/03/2010 - 19:52
ओक नवसिद्धांताचा प्रवर्तक? छे नक्की नाही
{प्रियालींच्या धनंजयांना अन्यत्र ठिकाणी विचारलेल्या प्रश्नाला - की}... नाडीग्रंथांची भलावण करणारे कोणत्या क्याटेगरीत {भ्रमसेन की ठकसेन}येतील? स्वतःशी प्रामाणिक, (नव)कल्पना पटवून देणारे - यांत आले तरीही त्यांना भ्रमसेन म्हणता येईल का?
{धनंजय म्हणतात} ...विचारलेल्या उदाहरणाबद्दल थेट उत्तर मात्र देण्याचे मी टाळत आहे. परंतु वरील दिलेल्या सामान्यनियमानुसार उदाहरणाचे वर्गीकरण करणे सुस्पष्ट आहे, असे मला वाटते. {कदाचित हैयोहैयैयोंच्या अनुषंगाने} या विवक्षित उदाहरणाच्या बाबतीत माझे इतके लिहून झालेले आहे, की आणखी काही लिहिण्यासाठी उरलेले नाही. पूर्वीचे दुवे देण्यावेगळे मी काही करू शकणार नाही, क्षमस्व. या उदाहरणाच्या संदर्भात पटवण्यासाठी काय आवश्यक आहे? याबाबत मला जमेल तितके थेट आणि विस्ताराने स्पष्ट करूनही (प्रात्यक्षिकासाठी भूमी तयार करणे) त्यातून असा निष्कर्ष काढला जातो : ...धनंजयांना म्हणणे आहे की 'प्रत्यक्ष माझ्यासाठी नाही' असे आपण जाहिर करता आणि त्यातून आपण अनुभव घेणार नाही ही भूमिका स्पष्ट करता. ह्याचे एकमेव कारण त्यातील 'भविष्य' हा शब्द असावा. तो शब्द त्यात नसतां, तर एक अभ्यासक ह्या नात्याने आपण अशी ताठर भूमिका घेतली नसती..... ज्या अर्थी विस्ताराने काही सांगून मला अभिप्रेत नसलेला अर्थ निघतो त्या अर्थी याबाबतीत या संवादक-जोडीत काहीही पटवण्यात मी अयशस्वी आहे..
.. {कंस माझे} माझे (ओकांचे) धनंजयांच्या संदर्भातील म्हणणे असे की - ते मला व मी त्यांना पटवण्यात अयशस्वी आहे. हे मला मान्य नाही आणि हे मत इतर सभासदांना ही लागू पडत आहे. असे एकंदरीत इथले अन्य ठिकाणचे आपले व इतरांचे प्रतिसाद वाचून वाटते. नाडीग्रंथांबाबत मी "नवसिद्धांताचा प्रवर्तक" नाही. मी कुठलाही वैज्ञानिक सिद्धांत -हायपोथिसिस - मांडल्याचा दावा केलेला नाही.ती माझी पात्रता नाही. 'प्रवर्तक' मानायचे असेल तर नाडी ग्रंथकर्ते महर्षींनाच मानावे लागेल. कारण नाडीवाचक शास्त्री देखील नाडीग्रंथांच्या वाचनापलिकडे नाडीग्रंथांचे कर्तेपण घेऊ शकत नाहीत. मी किंवा नाडी वाचक त्या ग्रंथांचे मुळ लेखक नाहीत. आपल्या बाबतीतील मत की आपण अनुभव घेणार नाही ही भूमिका स्पष्ट करता. ह्याचे एकमेव कारण त्यातील 'भविष्य' हा शब्द असावा. तो शब्द त्यात नसतां, तर एक अभ्यासक ह्या नात्याने आपण अशी ताठर भूमिका घेतली नसती. नाडी ग्रंथांवरील माझे विचार वा लेख वाचणाऱ्या इतर शेकडो सभासदांना अशी नम्र विनंती आहे की नाडीग्रंथांकरिता मला मध्यवर्ती न मानता त्यांच्या मुळलेखकांना केंद्रस्थानी मानलेत आणि (त्यातील भविष्य हा शब्द तूर्तास टाळला) तर कदाचित माझ्या व नाडीग्रंथांबाबतचा आपल्या सर्वांचा दृष्टीकोन निवळेल. नाडी विरोधक वा नाडी ग्रंथांना सहानुभूती दर्शवणारे असे विभाग पाडून 'भौतिकविज्ञान विरुद्ध ओक" असे न मानता पुर्वग्रह न ठेवता साहचर्याने अनुभव घेऊ या. पाहू या. असा माझ्या सर्व कथनाचा गाभा आहे. नाडीग्रंथांवर अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/ शशिकांत
3

अगत्यार जीव नाडी कथा भाग ६वा

शशिकांत ओक ·

In reply to by चित्रगुप्त

शशिकांत ओक 27/03/2010 - 19:16
अगत्यार किंवा (अगस्त्य) जीव नाडीचे वाचन श्री.हनुमत दासन वडपळणी भागातील केंद्रातून करत असतात. त्यांच्या जीव नाडीवाचनात आलेले काही अनुभव, किस्से "दिनतंती" नावाच्या तमिळ साप्ताहिकातून वेळोवेळी प्रसिद्ध होत असतात. त्याचे स्वैर भाषांतर श्री.विश्वनाथ गोपी करतात. मराठी वाचकांना त्यातील काही अनुभवांची ओळख करून देणे हा य़ा लेखाचा उद्देश आहे. त्या अनुरोधाने नाडी ग्रंथ भविष्याची सामान्य ओळख करून देऊन नाडी लेखनकर्त्या महर्षींचा भविष्य लेखनामागील उद्देश स्पष्ट करण्याचे कार्यही घडेल. नाडीग्रंथांवर अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/ शशिकांत

II विकास II 27/03/2010 - 17:45
>>वाचकांची इच्छा असेल तर थक्क करणारी आणखी कथने सादर करता येतील. येउद्या अजुन, वाचतो आहे. ---- प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.

नंदू 27/03/2010 - 19:22
ही ष्टोरी पण लई ब्येष्ट. तुमच्या प्रतिभेला सलाम...!! अजुन येउद्या. नाडीकथा प्रेमी, नंदू When rape is inevitable, enjoy it.

शशिकांत ओक 27/03/2010 - 19:10
--- सनल एडामारुकु यांचा एका टीव्ही चॅनेलवर ज्योतिषांची परीक्षा घेण्याचा कार्यक्रम झाला होता. त्यावर अन्य ठिकाणी उत्पन्न धाग्या वर काही प्रतिक्रिया आल्या. पैकी एक होती...
तिकडे करड्या अक्षरातल्या साहेबांची यथेच्छ थट्टा चालू आहे. (मालक त्यांना चावी मारतात). पण त्यांचे दळण चालू असते. नवीन नवीन सुरस आणि चमत्कारिक गोष्टींचे.
.... प्रियालींनी तेथे आपले मत प्रदर्शित केले की .... केवळ हिप्नोटिझममुळे (जसा) हा पुनर्जन्म आहे असे सिद्ध होत नाही असे वाटते. त्यासाठी केस बाय केस अधिक संशोधन करावे लागेल. ही केस पर्सनॅलिटी डिसऑर्डरची आहे का हे तपासणेही योग्य ठरेल. मुख्य म्हणजे केवळ एका तज्ज्ञाच्या तपासणीवरून निष्कर्ष काढणे घाईचे वाटते आणि तसेही, असे प्रयोग सिद्धतेची पातळी कधीच गाठत नाहीत कारण मग हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न बनतो. विश्वास ठेवणारे लहानशा प्रयोगावरून ठेवतील आणि न ठेवणारे अनेक प्रयोगांनंतरही ठेवणार नाहीत. अशा प्रयोगांत खुसपटे काढून दोन्ही बाजू आपापले मुद्दे रेटत राहतात. तेव्हा, आपल्याला पटत असल्यास विश्वास ठेवावा हेच खरे. त्या पुढे लिहितात... अशाच प्रकारचा (पुनर्जन्माचा - कंस माझे) किस्सा उत्तरा हुद्दार यांचा होता. पक्ष आणि प्रतिपक्ष यांनी इतके ढोबळ मुद्दे मांडले की मूळ व्यक्तिची त्यात उगीच होरपळ झाली असावी असे वाटते. या केसमध्येही मुद्दे खोडून काढणारे स्वतः उठून काहीच संशोधन करत नव्हते परंतु आपली श्रद्धा अबाधित राखण्यासाठी "छट! असे काही घडतच नाही." असे म्हटले की झाले. प्रियालींचे त्या धाग्याच्या बाबतचे मत नाडी ग्रंथांना ही तितकेच चपखलपणे फिट होते. म्हणून ते ओढून इथे डकवले आहे. जसे प्रा. उत्तरा हुद्दारांच्या क्लासिक पुनर्जन्माच्या केसमधे मुद्दे खोडून काढणारे (बुद्धिवादी) स्वतः उठून काहीच संशोधन करत नव्हते मात्र (आपली नाडी ग्रंथांवरील)श्रद्धा अबाधित राखण्यासाठी "छट! असे काही घडतच नाही." असे म्हटले की झाले. असे मत झाडून मोकळे होतात.
करड्या अक्षरातल्या (विंग कमांडर)साहेबांनी कोणत्याही संस्थेचे / व्यक्तीचे आव्हान घेतल्याचे माझ्या ऐकण्यात अगर वाचनात नाहि (खर्रेखुर्रे बरं का त्यांच्याच गोष्टीतले नव्हे ;) ) असल्यास निकाल जाणण्यास उत्सुक आहे
साहेबांनी अंनिसला आव्हान देण्याचा वा घेण्याचा प्रश्न पुर्वी नव्हता व आज ही नाही. नाडी ग्रंथ थोतांड आहेत असे म्हणणाऱ्यांनी ते कसे थोतांड आहेत हे सिद्ध करायचे आहे. त्यांनी आधी जे पुरावे सादर केले होते त्यांना समर्पक उत्तरे देऊन ते सर्व आक्षेप खोटे व बिनबुडाचे असल्याने तो निकाल नाडी ग्रंथांच्या बाजूने आधीच लागला आहे. आता त्याला संबंधित लोक दुर्लक्षुन टाळतात "छट! असे काही घडतच नाही." असे मत झाडून मोकळे होतात वा तेच तेच जुने आक्षेप उगाळत बसतात इतकेच. संदर्भासाठी वाचा - नाडीग्रंथ भविष्याने केला अंनिसचा पराभव - उर्फ बोध अंध श्रद्धेचा हा ग्रंथ. प्रियालींचा हा प्रतिसाद नाडीला उद्देशून नसला तरी तो नाडीग्रंथांना ही तितकाच लागू ठरतो म्हणून वापरला. मिपा मालकांचा उल्लेख आला म्हणून इथे डकवला इतकेच. नाडीग्रंथांवर अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/ शशिकांत

In reply to by शशिकांत ओक

नितिन थत्ते 28/03/2010 - 10:11
लोकांना करड्या अक्षरातील साहेब म्हणजे काहीच कळणार नाही म्हणून हा संदर्भ. नितिन थत्ते (शु सुधारक संपादकांना सूचना : माझ्या लेखनात शुद्धलेखनाच्या चुका आढळल्यास ते दुरुस्त केले जावे. माझी हरकत नाही. मात्र ते दुरुस्त केल्या जाऊ नये)

संजा 27/03/2010 - 20:07
माननीय शशीकांत ओक साहेब, आपला लेख वाचला आणि खरच भारावुन गेलो. आपणास प्रार्थना आहे की कोणत्याही टीके कडे दुर्लक्श करून लीहीत रहा त्यामूळे आम्हासारख्याच्या ज्ञानात खुप चांगली भर पडेल. पूढील लेखासाठी शुभेच्छा. संजा

विसोबा खेचर 28/03/2010 - 09:34
ओक साहेब जिंदाबाद.. ओकसाहेब, तुम्ही तुमच्या नाड्यांनी सार्‍या विरोधकांचे गळे साफ आवळलेत! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

तिमा 28/03/2010 - 16:54
नाडीच काय, अशा अनेक पंथाचे लोक आपल्या प्रसिध्दीसाठी अशा कथा प्रसूत करतच असतात. त्यावर विश्वास ठेवायचा का नाही हा तुमच्या स्वतःच्या बुध्दीवर तुमचा विश्वास आहे की नाही यावर अवलंबून आहे. तोपर्यंत नाडी, धागे, कफन्या यांनी तुमचे गळे आवळून घ्यावे! आ बैल मुझे मार! हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

In reply to by तिमा

संजा 29/03/2010 - 14:53
अनेक पंथाचे लोक आपल्या प्रसिध्दीसाठी अशा कथा प्रसूत करतच असतात अपप्रचारी व अविवेकी विधान. ज्यांना विश्वास ठेवायचा आहे ते ठेवतीलच यात शंका नाही. इतरांच्या योग्यते बाबत आपण शंका न घेणे ऊचित ठरेल. संजा

ऋषिकेश 28/03/2010 - 11:20
वाचकांची इच्छा असेल तर थक्क करणारी आणखी कथने सादर करता येतील.
माझी अजिबात इच्छा नाहि. अश्या अफवा पसरविण्यासाठी मिसळपावचा दुरूपयोग होऊ नये असे वाटते. ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

In reply to by ऋषिकेश

तिमा 28/03/2010 - 16:59
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा. इथे दुसर्‍यांच्या अफवांची जाहिरात करुन मिळेल. हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

तिमा 28/03/2010 - 16:56
तात्या, अफवा हा शब्द अफू वरुन आला आहे का ? हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

चित्रगुप्त 28/03/2010 - 17:22
अगदी नवीन वाचकांसाठी नाडी विषयी प्राथमिक माहिती आपल्या मायभाषेत द्यावीत, असे वाटते. उदाहरणार्थः १. नाडी म्हणजे काय? याचे किती प्रकार आहेत? २. भारतात कुठकुठे उपलब्ध आहेत? ३. प्राचीन ग्रंथ, वेद, पुराणे, महाभारत वगैरेत याबद्दल काय उल्लेख आहेत? ४. भारताबाहेरील इतर संस्कृतींमध्ये याप्रकारचे काही ग्रंथ आहेत का? कोणते? ५. जगातील प्रत्येक व्यक्तीची नाडी पट्टी असते का? नसल्यास कुणाकुणाच्या असतात? ६. कुंडली द्वारे सांगितले जाणारे भविष्य आणि नाडी द्वारे सांगितले जाणारे भविष्य, यात कोणते फरक वा साम्ये असतात?

In reply to by बहिरुपी

शशिकांत ओक 18/06/2014 - 20:29
अनेक धागे उपस्थित आहेत ते धुंडाळावेत या क्लिपमधून प्राथमिक माहिती समजून घेता येईल. पुर्वाचे धागे सापडत नसतील तर नंतर देता येतील.

मीनल 28/03/2010 - 18:53
मी वाचते आहे. पण स्वतः अनुभव घेतल्यावर विश्वास ठेवयचा की नाही ती मी ठरवेन. अनुभव घ्यायला आवडेल. मजा म्हणून नाही किंवा खरे खोटे पडताळून पहाण्यासाठी ही नाही. तर गत/भविष्यजन्मा विषयी जाणून घेण्यासाठी. माग एक दोन वेळा गतजन्मा विषयी स्वप्म पडली होती. मी ती स्वप्नच मानते तरी हे ती लक्षात मात्र अचूक राहिली आहेत. मीनल. http://myurmee.blogspot.com/

शशिकांत ओक 18/06/2014 - 00:35
नातेवाईकांच्या संमतीने ते ऑपरेशन यशस्वी झाले. आता ती हळूहळू पुर्ण बरी झाली आहे. तेच सांगायला आलेय की अगत्यारांचे शब्द अगदी सत्य ठरले.' त्या गेल्या.... सर्व ऐकून दासनी जीव नाडी वाचायला सुरवात केली. त्यात मजकूर होता... ‘अरे, मी एक वेळ दुःखाच्या काळात आवेगाने कोणी कोणी मला दूषणे देतात. झटपट बरे वाटणारे काही उपाय मी सुचवले नाहीत तर रागावतात, रुसतात, अशा लोकांचे वागणे समजू शकतो. कारण त्यांच्या मनस्थितीचा तो भाग असतो.’ ‘पण मी तुला क्षमा करु शकत नाही. कारण अजूनही तुझ्या मनात मी जे म्हणतो ते कसे शक्य आहे या शंकेची पाल चुकचुकते? आज इतक्या काळानंतर तू असे कसे समजतोस? मी तर तुला माझा पुत्र मानतो आणि तू माझ्यावर अविश्वास दाखवतोस?.... लक्षात ठेव आज पासून २७ दिवस हे वाचन बंद राहील. ताडपट्टीतील मजकूर तुझ्यापासून अदृष्य राहील. ... जर कार्तिकेयाच्या सहा मंदिरांतील (अरिपाडई वीडू - मुरुगेशाची सहा घरे) ज्या माझ्या मूर्ती स्थापित आहेत त्या प्रत्येकांना १०८ वेळा साष्टांग नमस्कार घालून आला नाहीस तर मी तुला पुन्हा भेटणार नाही. मी या ताडपट्ट्यातून कायमचा अदृष्य झालेला असेन…’ या शब्दात दासनना अगत्यारांनी शिक्षा सुनावली. मात्र त्यामुळे हनुमान दासनांचा श्रद्धाभाव व्दिगुणित झाला. सांगितलेल्या मंदिरात त्यांनी १०८ साष्टांग नमस्कार घालून कान पकडून क्षमायाचना केली. पुढे २७ दिवसांनी ताडपत्रातील मजकूर पुन्हा दृष्टीला पडू लागला. तो आज तागायत चालू आहे....
कथन थक्क करणारे असेले तरी सा. तांदळेची केस वरील धाग्याच्या बाबतीतील नाडी ग्रंथावर आधारित नाही.( सा तादळे च्या भेटीच्या अनेक महिन्यांच्या अंतरालाने माझी नाडी ग्रंथांची ओळख झाली)हनुमत दासन जींना त्या कथनात महर्षींचा रोष ओढवून घ्यावा लागला होता. शिवाय किडनीचे ऑपरेशन करून पेशंट बरा झाला दैवी उपायांनी नाही...

In reply to by चित्रगुप्त

शशिकांत ओक 27/03/2010 - 19:16
अगत्यार किंवा (अगस्त्य) जीव नाडीचे वाचन श्री.हनुमत दासन वडपळणी भागातील केंद्रातून करत असतात. त्यांच्या जीव नाडीवाचनात आलेले काही अनुभव, किस्से "दिनतंती" नावाच्या तमिळ साप्ताहिकातून वेळोवेळी प्रसिद्ध होत असतात. त्याचे स्वैर भाषांतर श्री.विश्वनाथ गोपी करतात. मराठी वाचकांना त्यातील काही अनुभवांची ओळख करून देणे हा य़ा लेखाचा उद्देश आहे. त्या अनुरोधाने नाडी ग्रंथ भविष्याची सामान्य ओळख करून देऊन नाडी लेखनकर्त्या महर्षींचा भविष्य लेखनामागील उद्देश स्पष्ट करण्याचे कार्यही घडेल. नाडीग्रंथांवर अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/ शशिकांत

II विकास II 27/03/2010 - 17:45
>>वाचकांची इच्छा असेल तर थक्क करणारी आणखी कथने सादर करता येतील. येउद्या अजुन, वाचतो आहे. ---- प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.

नंदू 27/03/2010 - 19:22
ही ष्टोरी पण लई ब्येष्ट. तुमच्या प्रतिभेला सलाम...!! अजुन येउद्या. नाडीकथा प्रेमी, नंदू When rape is inevitable, enjoy it.

शशिकांत ओक 27/03/2010 - 19:10
--- सनल एडामारुकु यांचा एका टीव्ही चॅनेलवर ज्योतिषांची परीक्षा घेण्याचा कार्यक्रम झाला होता. त्यावर अन्य ठिकाणी उत्पन्न धाग्या वर काही प्रतिक्रिया आल्या. पैकी एक होती...
तिकडे करड्या अक्षरातल्या साहेबांची यथेच्छ थट्टा चालू आहे. (मालक त्यांना चावी मारतात). पण त्यांचे दळण चालू असते. नवीन नवीन सुरस आणि चमत्कारिक गोष्टींचे.
.... प्रियालींनी तेथे आपले मत प्रदर्शित केले की .... केवळ हिप्नोटिझममुळे (जसा) हा पुनर्जन्म आहे असे सिद्ध होत नाही असे वाटते. त्यासाठी केस बाय केस अधिक संशोधन करावे लागेल. ही केस पर्सनॅलिटी डिसऑर्डरची आहे का हे तपासणेही योग्य ठरेल. मुख्य म्हणजे केवळ एका तज्ज्ञाच्या तपासणीवरून निष्कर्ष काढणे घाईचे वाटते आणि तसेही, असे प्रयोग सिद्धतेची पातळी कधीच गाठत नाहीत कारण मग हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न बनतो. विश्वास ठेवणारे लहानशा प्रयोगावरून ठेवतील आणि न ठेवणारे अनेक प्रयोगांनंतरही ठेवणार नाहीत. अशा प्रयोगांत खुसपटे काढून दोन्ही बाजू आपापले मुद्दे रेटत राहतात. तेव्हा, आपल्याला पटत असल्यास विश्वास ठेवावा हेच खरे. त्या पुढे लिहितात... अशाच प्रकारचा (पुनर्जन्माचा - कंस माझे) किस्सा उत्तरा हुद्दार यांचा होता. पक्ष आणि प्रतिपक्ष यांनी इतके ढोबळ मुद्दे मांडले की मूळ व्यक्तिची त्यात उगीच होरपळ झाली असावी असे वाटते. या केसमध्येही मुद्दे खोडून काढणारे स्वतः उठून काहीच संशोधन करत नव्हते परंतु आपली श्रद्धा अबाधित राखण्यासाठी "छट! असे काही घडतच नाही." असे म्हटले की झाले. प्रियालींचे त्या धाग्याच्या बाबतचे मत नाडी ग्रंथांना ही तितकेच चपखलपणे फिट होते. म्हणून ते ओढून इथे डकवले आहे. जसे प्रा. उत्तरा हुद्दारांच्या क्लासिक पुनर्जन्माच्या केसमधे मुद्दे खोडून काढणारे (बुद्धिवादी) स्वतः उठून काहीच संशोधन करत नव्हते मात्र (आपली नाडी ग्रंथांवरील)श्रद्धा अबाधित राखण्यासाठी "छट! असे काही घडतच नाही." असे म्हटले की झाले. असे मत झाडून मोकळे होतात.
करड्या अक्षरातल्या (विंग कमांडर)साहेबांनी कोणत्याही संस्थेचे / व्यक्तीचे आव्हान घेतल्याचे माझ्या ऐकण्यात अगर वाचनात नाहि (खर्रेखुर्रे बरं का त्यांच्याच गोष्टीतले नव्हे ;) ) असल्यास निकाल जाणण्यास उत्सुक आहे
साहेबांनी अंनिसला आव्हान देण्याचा वा घेण्याचा प्रश्न पुर्वी नव्हता व आज ही नाही. नाडी ग्रंथ थोतांड आहेत असे म्हणणाऱ्यांनी ते कसे थोतांड आहेत हे सिद्ध करायचे आहे. त्यांनी आधी जे पुरावे सादर केले होते त्यांना समर्पक उत्तरे देऊन ते सर्व आक्षेप खोटे व बिनबुडाचे असल्याने तो निकाल नाडी ग्रंथांच्या बाजूने आधीच लागला आहे. आता त्याला संबंधित लोक दुर्लक्षुन टाळतात "छट! असे काही घडतच नाही." असे मत झाडून मोकळे होतात वा तेच तेच जुने आक्षेप उगाळत बसतात इतकेच. संदर्भासाठी वाचा - नाडीग्रंथ भविष्याने केला अंनिसचा पराभव - उर्फ बोध अंध श्रद्धेचा हा ग्रंथ. प्रियालींचा हा प्रतिसाद नाडीला उद्देशून नसला तरी तो नाडीग्रंथांना ही तितकाच लागू ठरतो म्हणून वापरला. मिपा मालकांचा उल्लेख आला म्हणून इथे डकवला इतकेच. नाडीग्रंथांवर अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/ शशिकांत

In reply to by शशिकांत ओक

नितिन थत्ते 28/03/2010 - 10:11
लोकांना करड्या अक्षरातील साहेब म्हणजे काहीच कळणार नाही म्हणून हा संदर्भ. नितिन थत्ते (शु सुधारक संपादकांना सूचना : माझ्या लेखनात शुद्धलेखनाच्या चुका आढळल्यास ते दुरुस्त केले जावे. माझी हरकत नाही. मात्र ते दुरुस्त केल्या जाऊ नये)

संजा 27/03/2010 - 20:07
माननीय शशीकांत ओक साहेब, आपला लेख वाचला आणि खरच भारावुन गेलो. आपणास प्रार्थना आहे की कोणत्याही टीके कडे दुर्लक्श करून लीहीत रहा त्यामूळे आम्हासारख्याच्या ज्ञानात खुप चांगली भर पडेल. पूढील लेखासाठी शुभेच्छा. संजा

विसोबा खेचर 28/03/2010 - 09:34
ओक साहेब जिंदाबाद.. ओकसाहेब, तुम्ही तुमच्या नाड्यांनी सार्‍या विरोधकांचे गळे साफ आवळलेत! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

तिमा 28/03/2010 - 16:54
नाडीच काय, अशा अनेक पंथाचे लोक आपल्या प्रसिध्दीसाठी अशा कथा प्रसूत करतच असतात. त्यावर विश्वास ठेवायचा का नाही हा तुमच्या स्वतःच्या बुध्दीवर तुमचा विश्वास आहे की नाही यावर अवलंबून आहे. तोपर्यंत नाडी, धागे, कफन्या यांनी तुमचे गळे आवळून घ्यावे! आ बैल मुझे मार! हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

In reply to by तिमा

संजा 29/03/2010 - 14:53
अनेक पंथाचे लोक आपल्या प्रसिध्दीसाठी अशा कथा प्रसूत करतच असतात अपप्रचारी व अविवेकी विधान. ज्यांना विश्वास ठेवायचा आहे ते ठेवतीलच यात शंका नाही. इतरांच्या योग्यते बाबत आपण शंका न घेणे ऊचित ठरेल. संजा

ऋषिकेश 28/03/2010 - 11:20
वाचकांची इच्छा असेल तर थक्क करणारी आणखी कथने सादर करता येतील.
माझी अजिबात इच्छा नाहि. अश्या अफवा पसरविण्यासाठी मिसळपावचा दुरूपयोग होऊ नये असे वाटते. ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

In reply to by ऋषिकेश

तिमा 28/03/2010 - 16:59
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा. इथे दुसर्‍यांच्या अफवांची जाहिरात करुन मिळेल. हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

तिमा 28/03/2010 - 16:56
तात्या, अफवा हा शब्द अफू वरुन आला आहे का ? हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

चित्रगुप्त 28/03/2010 - 17:22
अगदी नवीन वाचकांसाठी नाडी विषयी प्राथमिक माहिती आपल्या मायभाषेत द्यावीत, असे वाटते. उदाहरणार्थः १. नाडी म्हणजे काय? याचे किती प्रकार आहेत? २. भारतात कुठकुठे उपलब्ध आहेत? ३. प्राचीन ग्रंथ, वेद, पुराणे, महाभारत वगैरेत याबद्दल काय उल्लेख आहेत? ४. भारताबाहेरील इतर संस्कृतींमध्ये याप्रकारचे काही ग्रंथ आहेत का? कोणते? ५. जगातील प्रत्येक व्यक्तीची नाडी पट्टी असते का? नसल्यास कुणाकुणाच्या असतात? ६. कुंडली द्वारे सांगितले जाणारे भविष्य आणि नाडी द्वारे सांगितले जाणारे भविष्य, यात कोणते फरक वा साम्ये असतात?

In reply to by बहिरुपी

शशिकांत ओक 18/06/2014 - 20:29
अनेक धागे उपस्थित आहेत ते धुंडाळावेत या क्लिपमधून प्राथमिक माहिती समजून घेता येईल. पुर्वाचे धागे सापडत नसतील तर नंतर देता येतील.

मीनल 28/03/2010 - 18:53
मी वाचते आहे. पण स्वतः अनुभव घेतल्यावर विश्वास ठेवयचा की नाही ती मी ठरवेन. अनुभव घ्यायला आवडेल. मजा म्हणून नाही किंवा खरे खोटे पडताळून पहाण्यासाठी ही नाही. तर गत/भविष्यजन्मा विषयी जाणून घेण्यासाठी. माग एक दोन वेळा गतजन्मा विषयी स्वप्म पडली होती. मी ती स्वप्नच मानते तरी हे ती लक्षात मात्र अचूक राहिली आहेत. मीनल. http://myurmee.blogspot.com/

शशिकांत ओक 18/06/2014 - 00:35
नातेवाईकांच्या संमतीने ते ऑपरेशन यशस्वी झाले. आता ती हळूहळू पुर्ण बरी झाली आहे. तेच सांगायला आलेय की अगत्यारांचे शब्द अगदी सत्य ठरले.' त्या गेल्या.... सर्व ऐकून दासनी जीव नाडी वाचायला सुरवात केली. त्यात मजकूर होता... ‘अरे, मी एक वेळ दुःखाच्या काळात आवेगाने कोणी कोणी मला दूषणे देतात. झटपट बरे वाटणारे काही उपाय मी सुचवले नाहीत तर रागावतात, रुसतात, अशा लोकांचे वागणे समजू शकतो. कारण त्यांच्या मनस्थितीचा तो भाग असतो.’ ‘पण मी तुला क्षमा करु शकत नाही. कारण अजूनही तुझ्या मनात मी जे म्हणतो ते कसे शक्य आहे या शंकेची पाल चुकचुकते? आज इतक्या काळानंतर तू असे कसे समजतोस? मी तर तुला माझा पुत्र मानतो आणि तू माझ्यावर अविश्वास दाखवतोस?.... लक्षात ठेव आज पासून २७ दिवस हे वाचन बंद राहील. ताडपट्टीतील मजकूर तुझ्यापासून अदृष्य राहील. ... जर कार्तिकेयाच्या सहा मंदिरांतील (अरिपाडई वीडू - मुरुगेशाची सहा घरे) ज्या माझ्या मूर्ती स्थापित आहेत त्या प्रत्येकांना १०८ वेळा साष्टांग नमस्कार घालून आला नाहीस तर मी तुला पुन्हा भेटणार नाही. मी या ताडपट्ट्यातून कायमचा अदृष्य झालेला असेन…’ या शब्दात दासनना अगत्यारांनी शिक्षा सुनावली. मात्र त्यामुळे हनुमान दासनांचा श्रद्धाभाव व्दिगुणित झाला. सांगितलेल्या मंदिरात त्यांनी १०८ साष्टांग नमस्कार घालून कान पकडून क्षमायाचना केली. पुढे २७ दिवसांनी ताडपत्रातील मजकूर पुन्हा दृष्टीला पडू लागला. तो आज तागायत चालू आहे....
कथन थक्क करणारे असेले तरी सा. तांदळेची केस वरील धाग्याच्या बाबतीतील नाडी ग्रंथावर आधारित नाही.( सा तादळे च्या भेटीच्या अनेक महिन्यांच्या अंतरालाने माझी नाडी ग्रंथांची ओळख झाली)हनुमत दासन जींना त्या कथनात महर्षींचा रोष ओढवून घ्यावा लागला होता. शिवाय किडनीचे ऑपरेशन करून पेशंट बरा झाला दैवी उपायांनी नाही...
3

अगत्यार जीव नाडी भाग ५ वा ....कहाणी एका पुर्वजन्मातील भावाबहिणीची....

शशिकांत ओक ·

In reply to by चतुरंग

प्रमोद देव 25/03/2010 - 11:33
चांदोबा किंवा इंद्रजाल कॉमिक्समधील कथा वाटतेय. ओकसाहेब...खरंच सांगतो...सिनेमा काढा ह्या कथांवर...’कोट्या’धीश व्हाल. :) त्या सिनेमात ’दूर्वासांचा’ काही रोल असेल तर मला द्या....गेला बाजार अगस्तिही चालतील....नुसतं रागवायचंच असतं ना! मस्त जमेल मला. ;)

खादाड_बोका 25/03/2010 - 02:35
ह्याला म्हणतात "सौ सुनार की तो एक लुहार की". तुमच्या हया शिणेमाचा येण्ड भयाणक आहे हो. =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) मला तर स्वप्नातही नाडी दिसते....

हा प्रश्न मी अगदी गांभीर्याने विचारतोय.... मला या जन्मी तरी कोणी सख्खी बहीण व भाऊ नाही (ज्याचे मला अतीव दुख आहे ) पण निदान या नाहीतर पुढल्या जन्मीतरी आपल्याला कोणी भाऊ / बहीण असेल की नाही? ते या नाडी वरून (या जन्मात) कळू शकते का? -- (आशावादी) इंटरनेट प्रेमी

नंदू 25/03/2010 - 10:20
छान. कथा आवडली, हिंदी सिनेमा साठी चांगलं मटेरियल आहे. नंदू

चक्रमकैलास 25/03/2010 - 10:48
ही कथा वाचून...आधी चक्रम होतो,आता चक्रमादित्य झालोय...!!! आणखी एक....,माझ्या चड्डी ची नाडि कालपासून मिळत नाहीये...सापडेल का..?? (नाडीरहित)..चक्रम कैलास...

In reply to by चक्रमकैलास

पाषाणभेद 25/03/2010 - 12:10
मस्त भयकथा आहे. पण शेवटी राजा विक्रमने आपला हट्ट पुढे चालूच ठेवला का? पुढील भागाच्या प्रतिक्षेत आहे. चांदोबाच्या इतरही कथा येथे द्याव्यात जेणे करून आम्हा बालकांच्या पालकांचे पैसे वाचतील. The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी|| महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद शके १५६३

विजुभाऊ 25/03/2010 - 11:06
अती झाले अन अजीर्ण झाले....्याच्याही पार पुढे पोचलीय ही नाडीची केस मेहेरबानी करून आता या विषयावर लिहिणे थांबवावे

In reply to by विजुभाऊ

कवटी 25/03/2010 - 11:28
जपान लाईफ(८) एक स्वप्न प्रवास (११) एप्रील फळ (१०) प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते (६) असा पराक्रम गाठीशी असणार्‍या विजुभौनी ५व्या भागात हाय खावी हे काही बरोबर नाही. कवटी

चिरोटा 25/03/2010 - 11:15
कथा आवडली.विश्वास ठेवणे जड जातेय. (नाडी)भेंडी P = NP

चित्रगुप्त 25/03/2010 - 13:23
हे घ्या आणखी काही दुवे : http://www.manirajan.com/ http://www.findyourfate.com/indianastro/nadi.jsp http://wilfglobal.com/index.php?p=0 http://www.indianetzone.com/2/nadi_shastra.htm http://www.kagabujandar.org/english_Sre_Bhaaskharamaharishi.html http://www.premasagarlight.com/english.htm http://www.telegraphindia.com/1080906/jsp/jharkhand/story_9795578.jsp

संजा 25/03/2010 - 14:11
माननीय शशीकांत ओक साहेब, आपला लेख वाचला आणि खरच भारावुन गेलो. तत्परतेने तुमचे आधीचे लेख आधाश्यासारखे वाचून काढले. आपल्या अभ्यासाला तोड नाही. ईतक्या अभ्यासू आणि ज्ञानात भर टाकणार्‍या लेखांवर हलक्या दर्जाचे, टींगल टवाळी करणारे प्रतीसाद देणार्‍यांची कीव आली. आपणास प्रार्थना आहे की कोणत्याही टीके कडे दुर्लक्श करून लीहीत रहा. पूढील लेखासाठी शुभेच्छा. संजा

>>त्याने आपल्या संपत्तीतील काही वाटा तिला दिला ..... पुढे चालू... 8} :''( :''( :''( :''( :''( :''( :''( :''( :''( :''( :''( :''( नको 'तात्या देवा' अंत आता पाहु..... जळी स्थळी काष्ठी 'नाडी' दिसे

कवटी 25/03/2010 - 17:59
उद्या कोणी असल्या नाडीचा संदर्भ देउन तात्याबरोबरच्या मागच्या जन्मातले नाते सिद्ध केले तर तात्याभौ मिपाचे मालकी हक्क शेअर करतील काय? कवटी

चित्रगुप्त 25/03/2010 - 19:01
पुष्कळ वर्षांपूर्वी आमची पण नाडी काढली गेली होती....अर्थात त्यावेळी तिथे आम्ही खुद्द तिथे हजर नव्हतो.... त्यामुळे कितपत माहिती दिली गेली होती, हे ठाऊक नाही. नाडीत काय लिहून आले होते, ते आता स्मरत नाही, पण ती वही आणि क्यासेट हुडकून लवकरच लिहू.

In reply to by चित्रगुप्त

चतुरंग 25/03/2010 - 20:04
सगळ्यांच्या नाड्यांचा हिशोब ठेवणार्‍या साक्षात 'चित्रगुप्ताचीही' नाडी असावी हा चमत्काराचा परमोच्चबिंदूच म्हणायला हवा! ;) (नाडीलुप्त)चतुरंग

वेताळ 25/03/2010 - 20:19
अजुनही अश्याच चमत्कारीक कथा येवु द्या. ह्या कथेमुळे नाडीला नावे ठेवणार्‍याना सद् बुध्दी मिळेल. वेताळ

चित्रगुप्त 25/03/2010 - 22:07
अहो, आमची गेल्या हजारो वर्षांची अजब, अनोखी, दिलकश दास्तान सर्वांना सांगायला आम्ही आतुर आहोत, पण कामापायी (खरंतर आळसापायी) सर्व एकदम लिहुन काढणं जमेना झालंय....तरी प्रयत्न करत आहोत....

In reply to by चतुरंग

प्रमोद देव 25/03/2010 - 11:33
चांदोबा किंवा इंद्रजाल कॉमिक्समधील कथा वाटतेय. ओकसाहेब...खरंच सांगतो...सिनेमा काढा ह्या कथांवर...’कोट्या’धीश व्हाल. :) त्या सिनेमात ’दूर्वासांचा’ काही रोल असेल तर मला द्या....गेला बाजार अगस्तिही चालतील....नुसतं रागवायचंच असतं ना! मस्त जमेल मला. ;)

खादाड_बोका 25/03/2010 - 02:35
ह्याला म्हणतात "सौ सुनार की तो एक लुहार की". तुमच्या हया शिणेमाचा येण्ड भयाणक आहे हो. =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) मला तर स्वप्नातही नाडी दिसते....

हा प्रश्न मी अगदी गांभीर्याने विचारतोय.... मला या जन्मी तरी कोणी सख्खी बहीण व भाऊ नाही (ज्याचे मला अतीव दुख आहे ) पण निदान या नाहीतर पुढल्या जन्मीतरी आपल्याला कोणी भाऊ / बहीण असेल की नाही? ते या नाडी वरून (या जन्मात) कळू शकते का? -- (आशावादी) इंटरनेट प्रेमी

नंदू 25/03/2010 - 10:20
छान. कथा आवडली, हिंदी सिनेमा साठी चांगलं मटेरियल आहे. नंदू

चक्रमकैलास 25/03/2010 - 10:48
ही कथा वाचून...आधी चक्रम होतो,आता चक्रमादित्य झालोय...!!! आणखी एक....,माझ्या चड्डी ची नाडि कालपासून मिळत नाहीये...सापडेल का..?? (नाडीरहित)..चक्रम कैलास...

In reply to by चक्रमकैलास

पाषाणभेद 25/03/2010 - 12:10
मस्त भयकथा आहे. पण शेवटी राजा विक्रमने आपला हट्ट पुढे चालूच ठेवला का? पुढील भागाच्या प्रतिक्षेत आहे. चांदोबाच्या इतरही कथा येथे द्याव्यात जेणे करून आम्हा बालकांच्या पालकांचे पैसे वाचतील. The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी|| महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद शके १५६३

विजुभाऊ 25/03/2010 - 11:06
अती झाले अन अजीर्ण झाले....्याच्याही पार पुढे पोचलीय ही नाडीची केस मेहेरबानी करून आता या विषयावर लिहिणे थांबवावे

In reply to by विजुभाऊ

कवटी 25/03/2010 - 11:28
जपान लाईफ(८) एक स्वप्न प्रवास (११) एप्रील फळ (१०) प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते (६) असा पराक्रम गाठीशी असणार्‍या विजुभौनी ५व्या भागात हाय खावी हे काही बरोबर नाही. कवटी

चिरोटा 25/03/2010 - 11:15
कथा आवडली.विश्वास ठेवणे जड जातेय. (नाडी)भेंडी P = NP

चित्रगुप्त 25/03/2010 - 13:23
हे घ्या आणखी काही दुवे : http://www.manirajan.com/ http://www.findyourfate.com/indianastro/nadi.jsp http://wilfglobal.com/index.php?p=0 http://www.indianetzone.com/2/nadi_shastra.htm http://www.kagabujandar.org/english_Sre_Bhaaskharamaharishi.html http://www.premasagarlight.com/english.htm http://www.telegraphindia.com/1080906/jsp/jharkhand/story_9795578.jsp

संजा 25/03/2010 - 14:11
माननीय शशीकांत ओक साहेब, आपला लेख वाचला आणि खरच भारावुन गेलो. तत्परतेने तुमचे आधीचे लेख आधाश्यासारखे वाचून काढले. आपल्या अभ्यासाला तोड नाही. ईतक्या अभ्यासू आणि ज्ञानात भर टाकणार्‍या लेखांवर हलक्या दर्जाचे, टींगल टवाळी करणारे प्रतीसाद देणार्‍यांची कीव आली. आपणास प्रार्थना आहे की कोणत्याही टीके कडे दुर्लक्श करून लीहीत रहा. पूढील लेखासाठी शुभेच्छा. संजा

>>त्याने आपल्या संपत्तीतील काही वाटा तिला दिला ..... पुढे चालू... 8} :''( :''( :''( :''( :''( :''( :''( :''( :''( :''( :''( :''( नको 'तात्या देवा' अंत आता पाहु..... जळी स्थळी काष्ठी 'नाडी' दिसे

कवटी 25/03/2010 - 17:59
उद्या कोणी असल्या नाडीचा संदर्भ देउन तात्याबरोबरच्या मागच्या जन्मातले नाते सिद्ध केले तर तात्याभौ मिपाचे मालकी हक्क शेअर करतील काय? कवटी

चित्रगुप्त 25/03/2010 - 19:01
पुष्कळ वर्षांपूर्वी आमची पण नाडी काढली गेली होती....अर्थात त्यावेळी तिथे आम्ही खुद्द तिथे हजर नव्हतो.... त्यामुळे कितपत माहिती दिली गेली होती, हे ठाऊक नाही. नाडीत काय लिहून आले होते, ते आता स्मरत नाही, पण ती वही आणि क्यासेट हुडकून लवकरच लिहू.

In reply to by चित्रगुप्त

चतुरंग 25/03/2010 - 20:04
सगळ्यांच्या नाड्यांचा हिशोब ठेवणार्‍या साक्षात 'चित्रगुप्ताचीही' नाडी असावी हा चमत्काराचा परमोच्चबिंदूच म्हणायला हवा! ;) (नाडीलुप्त)चतुरंग

वेताळ 25/03/2010 - 20:19
अजुनही अश्याच चमत्कारीक कथा येवु द्या. ह्या कथेमुळे नाडीला नावे ठेवणार्‍याना सद् बुध्दी मिळेल. वेताळ

चित्रगुप्त 25/03/2010 - 22:07
अहो, आमची गेल्या हजारो वर्षांची अजब, अनोखी, दिलकश दास्तान सर्वांना सांगायला आम्ही आतुर आहोत, पण कामापायी (खरंतर आळसापायी) सर्व एकदम लिहुन काढणं जमेना झालंय....तरी प्रयत्न करत आहोत....
3

आज जरा मूड आहे व वेळ ही..

शशिकांत ओक ·

टारझन 16/03/2010 - 15:37
तु ऐक सत्य ना$$$रायणा$$ची कथा .. तु ऐक सत्य ना$$$रायणा$$ची कथा ... - (मुडी) टारझन

Nile 16/03/2010 - 15:51
बोंबला, कोण वाचणार पुन्हा तेच?पुन्हा पुन्हा तेच तेच टंकायचा कंटाळा कसा येत नाही? का नाडीच टंकुन देते?

योगी९०० 16/03/2010 - 16:21
काही काळानंतर या महाशयांना नाडीत सांगितल्या प्रमाणे अपघात झाला. फ्रॅक्चर झालेला हात गळ्यात आडकवलेल्या अवस्थेत सर्वांना दाखवत भेटेल त्याला तो सांगत सुटायचा की 'नाड़ी भविष्य देखा के नही? पोस्टींग होने से पहले जरूर देख लो। बाद में यहा आना हो या ना हो।" म्हणजे युद्धाला जाण्याअगोदर प्रत्येकाने आपपली नाडी बघून जावे का? परवा हैदराबाद्च्या विमान अपघातात दगावलेल्या पायलटने नाडीपरीक्षा करून घ्यायला हवी होती असे उगीच वाटले. आपल्या सरकारने पुन्हा धावाधाव करून ढीगाने पुरावे वाजत गाजत दिले की म्हणायचे, 'छे छे यात काहीच दम नाही. आणखी हवेत'! पुराव्याच्या ढिगाला नाडी बांधा..लगेच सगळे प्रश्न सुटतील. (ओकसाहेब..इथे मला नाडीवाल्यांची चेष्टा करायचा उद्देश नाही (कारण अनुभव नाही)..पण जे जे आत्तापर्यंत वाचले ते काही पचनी पडले नाही). खादाडमाऊ

'नाडी' विषय आला रे आला की हहपुवा होते.[काहीच विश्वास नाही म्हणून] पण आपल्या आवडत्या विषयाशी एकरुप होऊन त्याचे महत्त्व वाचकावर बिंबवत राहण्याबाबत [ न आवडले तरी] आपल्याला तोड नाही. पुढील अनुभवांच्या प्रतिक्षेत. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हर्षद आनंदी 17/03/2010 - 06:53
असेच म्हणतो. आपल्याला समजले नाही, अथवा विश्वास नाही म्हणुन चेष्टा करणारे खुप भेटतील, तो मानवी स्वभावच आहे. पण म्हणुन तुम्ही लिहिणे थांबवु नका. तुमचे अनुभव, इतरांचे अनुभव लिहित रहा!! दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||

नाडीकथनं अशा रंगतदार भेटींसाठी फोन येतात, हा फायदा तुम्ही आधीच सांगितला असता तर इतक्या लोकांनी विरोध केला नसता असं वाटतं. राजेश

In reply to by राजेश घासकडवी

=)) =)) =)) पूजाची(पूजेची) नाडी असेल का? ;-) (पळा आता, ओक आणि/किंवा घासकडवींचा बडगा यायच्या आत!) अदिती

पाषाणभेद 17/03/2010 - 08:56
नाडी रिमोटली पाहता येते का? (हे एकदम सिरीअसली आहे हं.) आम्ही व्हॉलेंटीअर्स तयार आहोत. तसे असेल तर तुम्ही ते पहाणे सुरू करा अन लोकांच्या तोंडाला नाडीने बांधा. नाहितर पोपटकडे भविष्य पहाणे अन नाडी पहाणे सारखेच समजावे लागेल. बाकी नाडी अनूभव येवू द्या. चार घटका करमणूक तरी होईल. (त्याच त्या बातम्या, (लेख), जाहीराती बघून मेंदू शिणलाय.) The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी|| महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद शके १५६३

In reply to by पाषाणभेद

महेश हतोळकर 17/03/2010 - 11:06
विसरा. आता पर्यंत मी २-३ वेळा हाच प्रश्न विचारला आहे. हो - नाही लांबची गोष्ट, उत्तरच येत नाही. परत विचारतो. "मी ठसे फॅक्स किंवा कुरीयरने पाठवून देईन. नाडी मिळेल का?"

आनंद 17/03/2010 - 09:19
भारतीय हवाइ दलातली नाडी बघुन , देवावरचा विश्वास वाढला.

राघव 17/03/2010 - 15:01
ओकसाहेब, तुम्हाला काही समजावून घ्यायचेच नाही तर आम्हीच सांगणारे मूर्ख ठरतो. राह्यलं. यापुढे काही सांगणार नाही ब्वॉ. चालू देत तुमचे. राघव

टारझन 16/03/2010 - 15:37
तु ऐक सत्य ना$$$रायणा$$ची कथा .. तु ऐक सत्य ना$$$रायणा$$ची कथा ... - (मुडी) टारझन

Nile 16/03/2010 - 15:51
बोंबला, कोण वाचणार पुन्हा तेच?पुन्हा पुन्हा तेच तेच टंकायचा कंटाळा कसा येत नाही? का नाडीच टंकुन देते?

योगी९०० 16/03/2010 - 16:21
काही काळानंतर या महाशयांना नाडीत सांगितल्या प्रमाणे अपघात झाला. फ्रॅक्चर झालेला हात गळ्यात आडकवलेल्या अवस्थेत सर्वांना दाखवत भेटेल त्याला तो सांगत सुटायचा की 'नाड़ी भविष्य देखा के नही? पोस्टींग होने से पहले जरूर देख लो। बाद में यहा आना हो या ना हो।" म्हणजे युद्धाला जाण्याअगोदर प्रत्येकाने आपपली नाडी बघून जावे का? परवा हैदराबाद्च्या विमान अपघातात दगावलेल्या पायलटने नाडीपरीक्षा करून घ्यायला हवी होती असे उगीच वाटले. आपल्या सरकारने पुन्हा धावाधाव करून ढीगाने पुरावे वाजत गाजत दिले की म्हणायचे, 'छे छे यात काहीच दम नाही. आणखी हवेत'! पुराव्याच्या ढिगाला नाडी बांधा..लगेच सगळे प्रश्न सुटतील. (ओकसाहेब..इथे मला नाडीवाल्यांची चेष्टा करायचा उद्देश नाही (कारण अनुभव नाही)..पण जे जे आत्तापर्यंत वाचले ते काही पचनी पडले नाही). खादाडमाऊ

'नाडी' विषय आला रे आला की हहपुवा होते.[काहीच विश्वास नाही म्हणून] पण आपल्या आवडत्या विषयाशी एकरुप होऊन त्याचे महत्त्व वाचकावर बिंबवत राहण्याबाबत [ न आवडले तरी] आपल्याला तोड नाही. पुढील अनुभवांच्या प्रतिक्षेत. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हर्षद आनंदी 17/03/2010 - 06:53
असेच म्हणतो. आपल्याला समजले नाही, अथवा विश्वास नाही म्हणुन चेष्टा करणारे खुप भेटतील, तो मानवी स्वभावच आहे. पण म्हणुन तुम्ही लिहिणे थांबवु नका. तुमचे अनुभव, इतरांचे अनुभव लिहित रहा!! दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||

नाडीकथनं अशा रंगतदार भेटींसाठी फोन येतात, हा फायदा तुम्ही आधीच सांगितला असता तर इतक्या लोकांनी विरोध केला नसता असं वाटतं. राजेश

In reply to by राजेश घासकडवी

=)) =)) =)) पूजाची(पूजेची) नाडी असेल का? ;-) (पळा आता, ओक आणि/किंवा घासकडवींचा बडगा यायच्या आत!) अदिती

पाषाणभेद 17/03/2010 - 08:56
नाडी रिमोटली पाहता येते का? (हे एकदम सिरीअसली आहे हं.) आम्ही व्हॉलेंटीअर्स तयार आहोत. तसे असेल तर तुम्ही ते पहाणे सुरू करा अन लोकांच्या तोंडाला नाडीने बांधा. नाहितर पोपटकडे भविष्य पहाणे अन नाडी पहाणे सारखेच समजावे लागेल. बाकी नाडी अनूभव येवू द्या. चार घटका करमणूक तरी होईल. (त्याच त्या बातम्या, (लेख), जाहीराती बघून मेंदू शिणलाय.) The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी|| महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद शके १५६३

In reply to by पाषाणभेद

महेश हतोळकर 17/03/2010 - 11:06
विसरा. आता पर्यंत मी २-३ वेळा हाच प्रश्न विचारला आहे. हो - नाही लांबची गोष्ट, उत्तरच येत नाही. परत विचारतो. "मी ठसे फॅक्स किंवा कुरीयरने पाठवून देईन. नाडी मिळेल का?"

आनंद 17/03/2010 - 09:19
भारतीय हवाइ दलातली नाडी बघुन , देवावरचा विश्वास वाढला.

राघव 17/03/2010 - 15:01
ओकसाहेब, तुम्हाला काही समजावून घ्यायचेच नाही तर आम्हीच सांगणारे मूर्ख ठरतो. राह्यलं. यापुढे काही सांगणार नाही ब्वॉ. चालू देत तुमचे. राघव
मित्र हो, आज जरा मूड ही आहे व वेळ ही.
एकदा मंजुळ आवाजाच्या एक बाई म्हणाल्या, "काहो तुमच्या सोईची रात्री ९ नंतरची वेळ तुम्ही ठेवलित भेटायची पण आम्ही नंतर परत जायचे कसे?"
पुर्वी एकदा एकांनी प्रश्न कांडममधील माझ्या लेखांवर छद्मीपणे लिहून पृच्छा केली होती की जेव्हा तुम्ही अगदी specific प्रश्न विचारलात जसे की, 'माझी पुढची बदली कोठे होइल'? त्यावेळी मात्र नाडी वाचकांने किंवा महर्षींच्या नावाखाली सोईस्कररित्या हे उत्तर देण्याचे टाळले.

नाडीग्रंथांवरील अभिनव विलक्षण किस्से १

शशिकांत ओक ·

JAGOMOHANPYARE 10/03/2010 - 21:42
अजबच.. *************************** प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

विसोबा खेचर 10/03/2010 - 22:46
सहज आणलेल्या ताडपट्टीतील एका अज्ञात व्यक्तीच्या नाडी पट्टीवाचनाची निघालेली ती अचुक तारीख निघते काय!
ओके, तारीख अचूक निघाली.. पण पुढे काय? येत्या महिन्याभरातल्या प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक सेकंदाला माझ्या आयुष्यात काय होणार आहे आणि गेली ४० वर्ष माझ्या आयुष्यात काय काय, घडलं आहे हे जर पर्फेक्ट सांगू शकलात तर मानलं तुमच्या नाडीशास्त्राला आणि नाडीपट्टीला! अन्यथा, नाडीशास्त्र आणि नाडीपट्टी हा सर्व केवळ अन् केवळ बकवास आहे असंच म्हणावं लागेल! बोला ओक साहेब, घेताय चायलेंज? तात्या.

In reply to by विसोबा खेचर

रामपुरी 11/03/2010 - 01:51
कसलं चॅलेंज घेउन बसलात? त्या मोहनन ची बेरीज वजाबाकी तयार आहे एवढाच त्याचा अर्थ. त्याने उलट गणित करून सगळ्याना मस्त गंडवलं. :) :) :) पुण्यातल्या नाडीवाल्याना आपण चॅलेंज दिला होता पण त्यानी शेपुट घातली. लोकाना चु.... बनवायचे धंदे आहेत झालं. "६ अब्ज लोकांच्या नाड्या कुठं ठेवल्या आहेत?" एवढ्या साध्या प्रश्नाचं उत्तर ओक देतात का विचारा मग चॅलेंज द्या.

In reply to by विसोबा खेचर

तिमा 11/03/2010 - 18:03
अहो, २०१२ बद्दल काही आहे का या नाडीग्रंथात ? कारण ते खरे असेल तर त्यानंतर कोणाच्याही कुठल्याच नाड्या शिल्लक रहाणार नाहीत! (अगदी लेंग्याच्या सुध्दा!) हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

शशिकांत ओक 10/03/2010 - 23:33
बोला ओक साहेब, घेताय चॅलेंज?
तात्या, आपण नाडी ग्रंथांना चॅलेज करताय. मला नाही. हे म्हणजे कोणी पॅरिसला जाऊन एफेल टॉवर पाहून आला व म्हणाला की असा असा भव्य लोखंडी मनोरा मी पाहून आलोय. तर इथे घर बसल्या मला इथे तो मनोरा दाखवता का? घेताय चॅलेंज? असे म्हटल्यासारखे झाले. तो मनोरा प्रत्यक्ष पहायचा तर तुम्हाला पॅरिसला जायला हवे. म्हणून नाडीच्या विषयावर मी म्हणतोय की मला नाडी ग्रंथांचे आलेले अनुभव असे असे आहेत. आपणाला ते सत्यनारायणाच्या कथेप्रमाणे भाकड किंवा अतिरंजित वाटत असतील तर आपण प्रत्यक्ष अनुभव घ्यावा. नाडी ग्रंथांचे अवलोकन करावे व आपला अनुभव सांगा. त्यात आपले दैनंदिन कथन येईल का नाही हे आपणच तपासून पहा. आपणास माझ्याप्रमाणेच अदभूत अनुभव येतील असा माझा दावा नाही. मी आत्ता पर्यंत काय करतोय. फक्त डोळसपणे नाडी ग्रंथांचे अनुभव घेत आहे. नाडी महर्षी कोणी माझे काका मामा नाहीत का नाडी शास्त्री मला नाडी ग्रंथांच्या सेवेबद्दल काही मानधन देत नाहीत. आत्ता पर्यंत आलेल्या अनुभवांमुळे महर्षींच्या कार्याला श्रद्धापुर्वक वंदन करावेसे वाटले तर त्यात लाज कसली? नाडीग्रंथांवर अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/ शशिकांत

In reply to by शशिकांत ओक

विसोबा खेचर 10/03/2010 - 23:49
नाडी महर्षी कोणी माझे काका मामा नाहीत का नाडी शास्त्री मला नाडी ग्रंथांच्या सेवेबद्दल काही मानधन देत नाहीत. आत्ता पर्यंत आलेल्या अनुभवांमुळे महर्षींच्या कार्याला श्रद्धापुर्वक वंदन करावेसे वाटले तर त्यात लाज कसली?
ओक्के...! ओकसाहेब, खुलासा पटला! स्वगत: साला या शश्या ओकवर मला रागावताच येत नाही, ना त्याच्याशी काही वाद घालता येत! म्हणजे म्हटलं तर घालता येईल पण आपण साला या शश्या ओकचे फ्यॅनच आहोत...:) असो, नाडीदेवींचा विजय असो.. ओकसाहेब, अजूनही येऊ द्या असे काही अनुभव! आपला, (फ्यॅन) तात्या.

मिसळभोक्ता 11/03/2010 - 04:48
मेष लग्नम तेथे शुकिरन व मंगल, माडत्तील (वृषभेत) सुर्य, मिधुनम्मत्तिल पुधम् (बुध), कर्काटकात्तील अरसन(गुरु), सिम्मत्तील राघूम् (राहू) व शनी, कन्नीत्तिल तिंगल (चंद्र), कुंबमत्तिल केतुम. संपादकांनो, इतके सगळे अपशब्द अद्यापही मिसळपावावर आहेत ! सर्व संपादकांनी आत्मशोध करावा. कन्नीतिल तिंगल सारखी घाणेरडी शिवी मिसळपावावर पाहून मला व्यक्तिशः मिसळपावाचा सदस्य असल्याची लाज वाटते. (कोणरे तो ? लाजेचा लज्जागौरीशी संबंध नाही !) -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

In reply to by मिसळभोक्ता

शुचि 11/03/2010 - 06:24
मला "कुंबमत्तिल" फार उत्तान शब्द वाटतोय..... लवकर संपादीत करावा अशी विनंती. (ह. घे.) *********************************** खुद फूल ने भी होंठ किये अपने नीमवा (अर्धवट उघडलेले) चोरी तमाम रंग की तितली के सर ना जाये - परवीन शाकीर

मिपावरील नवीन वाचकांसाठी नाडीचिकित्साकांडाचे अवशेष नाडी इतिहास मोठा आहे बरका एक झलक
http://www.misalpav.com/node/9218
http://www.misalpav.com/node/9219
http://www.misalpav.com/node/9231
http://www.misalpav.com/node/3607 बाकी ओकसाहेब डहाणुकर कॉलनीत आला होतात तर मी तिथेच राहतो. आला असतात तर (इतर) विषयावर तरी गप्पा मारल्या असत्या. आपण आमची प्रेरणा आहात. आमचा पत्ता आपल्याला माहित आहेच. अवांतर- ओकसाहेब एकदम दिलखुलास माणुस आहे बरका. आम्ही आता नाडी च नाही तर बिडी काडी ताडी माडी सोडलय. तस शास्त्रापुरतीच कधी कधी बियर घेतो प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

शशिकांत ओक 11/03/2010 - 11:17
नाडी महर्षीच विरोधकांचे प्रेरणास्थान आहेत काही लोक बिडीच्या काडीवर जाता जाता नाडीला आग लाऊन जातात. चिकित्सा - चिरफा़ड - असे मोठे शब्दयोजून करून मोठा तीर मारल्याचा आव आणतात. नंतर आपण त्या गावचेही नाही असा आव आणून, दोन्ही डगरींवर हात राखून इतरांची मजा पहात बसतात. असल्यांकडून शोध काम दूर मात्र लोकांच्या मनांत संशय आणण्याचे काम तत्परतेने होते. अशा लोकांसाठी देखील नाडी महर्षी प्रेरणास्थान आहेत. नाडी पट्टीत व्यक्तीचे नाव कोरून कसे आलेले असते ते वाचून मिपाकरांसाठी हैयों व धनंजय यांनी आपला प्रतिसाद सविस्तरपणे नोंदवून दिला असल्याने निदान येथे तरी नाडीपट्ट्यात तमिळ भाषेतून लेखन कार्य केलेले आहे की नाही. हे आणखी सिद्ध करायची गरज आता उरलेली नाही. ज्यांना नाडी ग्रंथांचे अस्तित्व तत्वतःमान्य नाही - कारण त्यांना नाडीग्रंथातील जो मजकूर असतो तो पडताळून पहाण्यासारखा असतो व त्यातील माहिती खरी आहे असे प्रांजळपणे मान्य करावे लागेल अशी वस्तुस्थिती आहे, असे मान्य केले तर त्यांच्या पुर्व निर्धारित तत्वज्ञानाचा पाया ढासळतो असा पक्का निर्णय आहे - त्यांच्या करता वाद वा समजावण्याची गरज काय? नाही त्यांना मान्य करवत तर नाही. पण कोणी पुर्वग्रह सोडून, निर्मल मनाने नाडी ग्रंथांतील मजकुराचे, अर्थाचे अस्तित्व शोधून पाहू इच्छित असतील तर अशांसाठी माझे लेखन प्रेरणादाय़ी व्हावे. नाडीग्रंथांवर अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/ शशिकांत

In reply to by शशिकांत ओक

ओकसाहेब, मी आणि मिपावरील अजून एक सदस्या, हे नाडी प्रकरण काय आहे हे पडताळून बघण्यासाठी उत्सुक आहोत. तरी त्यासाठी काय करावे लागेल ते सांगावे. पुण्यात कुठे जावे लागेल? किती खर्च येईल? नाडी बघण्याआधी स्वतःची काय आणि किती वैयक्तिक माहिती द्यावी लागेल? नाडी वाचनाला किती दिवस लागतील? फक्त भूतकाळच सांगितला जातो की भविष्यकाळही सांगितला जाईल? किती तपशीलात जाऊन सांगितले जाईल? नाडीवाचन खरे ठरले नाही तर पैसे परत मिळतील का? कृपया, कळवणे. वाट बघत आहोत. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

कवितानागेश 11/03/2010 - 19:21
अर्थात नाडीग्रन्थाबद्दल.. आपण फक्त आपल्या हाताच्या अन्गठ्याचा ठसा द्यायचा असतो, त्यापलिकडे आपली कुठलीही माहिती ते घेत नाहीत. वाद घालण्यापेक्शा जाऊन आपापली पट्टी वाचून घ्या... ............... जास्त मजा येते! ============ माउ

In reply to by कवितानागेश

jaypal 11/03/2010 - 21:10
मारुतीच्या बेंबित बोट घालुन बघा कस मस्त वाटत !!! तश्यातल प्रकार वटतो *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

शशिकांत ओक 11/03/2010 - 23:57
बिपिन कार्यकर्ते बिपिन आणि अन्य नाडी उत्सुक मित्र हो, आपणाला नाडी केंद्रांचे पत्ते द्यायला मला शक्य आहे पण ते या ठिकाणी दिले तर जाहिरात बाजीचा आरोप होईल असे वाटून मी असे सुचवतो की आपण नाडी ग्रंथ भविष्य पुस्तक वाचावे. नितीन प्रकाशन,पुणे. किं ५०. त्यात पुण्याच्या केंद्रांचे पत्ते व अन्य माहिती आहे. आपण पुण्यात आहात तर आपण प्रत्यक्ष जाऊन पाहिले तर बरे. मी आपणांला किंवा कोणाला अमुक केंद्रात जा असे सुचवत नाही. आपणाला सोईचे वाटेल तसे पहावे. फीज ३०ते ६२५ च्या मधे विविध केंद्रांत आहे. ती तशी का वा अन्य आपल्या विचारणा आपण त्यांच्या कडून समजून घेतलेल्या बऱ्या. तमिळजाणकाराला बरोबर न्यावे. म्हणजे नाडी पट्टीतील नावे शोधायला मदत होईल. केंद्राला फोटो काढून देण्यास विनंती करावी. त्याची कॉपी नंतर उपयोगाला येईल.वही देणार का विचारावे. काही कारणांनी ते देत नसतील तर देणाऱ्या केंद्रात जावे. काही कारणानी पट्टी सापडत नसेल तर दुसऱ्या केंद्रात जाऊन सापडेपर्यंत शोध घ्यावा. आपणांस आणखी एक विनंती आहे की नाडी केंद्रात पट्टीचा शोध होण्या आधी महर्षींना प्रार्थना करावी आम्ही आपली परीक्षा घ्यायला आलेलो नाही. आपले आशीर्वाद मिळावेत यासाठी व पुढील आयुष्यासाठी काही मार्गदर्शन मिळावे म्हणून आलो आहे. कृपा करावी. हार व फुले घालता आली व दीप दर्शवता आला तर चांगले. आपला अनुभव कळवावा. आपण केंद्रात असताना प्रत्यक्ष भेटता आले तर आवडेल. नाडीग्रंथांवर अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/ शशिकांत

वाटाड्या... 12/03/2010 - 00:48
श्री. ओक, एक शंका..विरोध नाही..(कारण स्वानुभव नाही)..पण हे त्याने प्रत्यक्ष सांगितले आहे माझ्या मनचे नाही हे नमुद करु इच्छितो... माझा एक मित्र जो माझा एक मित्र कोथरुडच्या नाडीग्रंथ केंद्राचा चांगलाच पंखा होता. बराच त्रासातही होता हे नक्की. शेवटी लग्नकार्यासाठी ४-५ वेळा गेलाही त्या केंद्रात. एकुण ४००० रु. खर्च केले. तिरुपतीलाही जाणार होता.(त्यांनी सांगितले म्हणुन) गेला का नाही ते कळ्ळं नाही. त्याला सांगितले गेलेले की त्याची बायको पुण्यापासुन २०० किमी च्या अंतरामधील असेल. (खोटं ठरलं). त्याची बायको पुण्यापासुन ४०० किमीवरील निघाली. बायकोचं नाव 'क' अक्षरापासुन असेल..(खोटं ठरलं).बायकोचं नाव 'स' अक्षरापासुन आहे. एक वर्षाच्या आत लग्न होइल...(खोटं ठरलं). लग्न १.५ वर्षांनी झालं. अश्या गोष्टींमुळे विश्वास बसत नाही लोकांचा.... - वा

देशावर मोठं संकट आलंय, त्या ताड़पट्टीत नाड़ीपट्टीत कोरोना कधी येईल आणि कधी जाईल असे दिसते का ? जाणकार अभ्यासकांच्या प्रतीक्षेत. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रचेतस 28/04/2020 - 11:38
अहो जिथं करोनाने देवाला देखील कोंडून ठेवले तिथे त्यास नाडीपट्टीला नाड्या बांधून ठेवणे काय अवघड.

शशिकांत ओक 28/04/2020 - 11:53
जाणकार अभ्यासकांच्या प्रतीक्षेत.
खिल्ली न उडवता अभ्यास करावा अशी इच्छा असेल त्यांनी माझ्याशी वैयक्तिक संपर्क साधावा. नाडीग्रंथ प्रेमींच्या ग्रुपवर महर्षींच्या आदेशातून काय मार्ग दर्शन केले आहे ते समजून घेता येईल.

In reply to by शशिकांत ओक

प्रश्न देश हिताचा आहे, आणि सार्वजनिक माहितीचाही आहे. तेव्हा व्यक्तीगत संपर्कापेक्षा खरंच असे काही स्पष्ट चिन्हे, लक्षणे नाडीपट्टीच्या अभ्यासकांना आढळत असतील तर सांगावीत. जसे, काही ज्योतिष मित्रांशीही या विषयावर सहज चर्चा करीत असतो. एक अशी तारीख त्यांच्याही भाकितातून स्पष्ट होतांना दिसत नाही पण ते त्यांच्या परिने लोक थट्टा करो की गंभीरपणे घेवोत माहिती सांगण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करीत असतात. नाडीपट्टीवाल्यांची याबाबतीत काय भाकिते आहेत ते जाहिरीपणे सांगायला हरकत नसावी, लोक काय म्हणतील त्याचा काय विचार करायचा. माझाही अशा कोणत्या पट्टीबीटीवर विश्वास नाहीच पण पारंपरिक पद्धती काय संबंध लावतात, शोधतात. ते सांगायला हवे, असे वाटते. इतरवेळी लोकांच्या भूत भविष्याची तंतोतंत माहिती सांगणार्‍यांनी आता देशहिताच्यावेळी तरी मागे हटू नये असे वाटते. बाकी, बघा तुमची इच्छा. आम्ही तर लॉकडावूनमधे घरात वैज्ञानिकदृष्टीकोन आणि शोधाकडे तसेही डोळे लावून बसलोच आहोत. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अजून त्यांना सापडल नसाव. नाहीतर एव्हाना त्यांनी ते दिले असते. बर्‍याच वर्षांनी हा धागा वर आलाय.

शशिकांत ओक 28/04/2020 - 19:59
कोणत्या पट्टीबीटीवर विश्वास नाहीच पण पारंपरिक पद्धती काय संबंध लावतात, शोधतात. ते सांगायला हवे, असे वाटते.
ज्यांचा पट्टीवर विश्वास नाही त्यांना उठाठेव करायची काय? तरीही करायची असेल तर माझ्याशी संपर्क साधावा. महर्षींच्या वाणीचे वाचन काय आहे ते ज्यांना कदर आहे तिथे सांगितले तर त्याला महत्व. बाकीच्या कोणाला काय वाटेल तो त्यांचा प्रश्न आहे... मला विचारून भरीला पाडायची गरज नाही...

In reply to by शशिकांत ओक

ज्यांचा पट्टीवर विश्वास नाही त्यांना उठाठेव करायची काय?
माझा विश्वास नसूत देत हो, पण आपण इतरांचा विश्वास बसेल अशी गोष्ट सांगायला काय हरकत आहे. आपल्याकडे उत्तर नाही असं माझं स्पष्ट मत असलं तरीही माणूस संकटसमयी सर्व अंगारेधुपारे करुन पाहतो, तसे आपल्याकडे काही नाडीकथनात काही भाकित असेल तर माझा किंवा इतर वाचकांचाही विश्वास बसला असता, असे वाटले. विश्वासापेक्षा सध्याचा जीवघेणा प्रश्न सुटला तर कोणाही भारतीयाला आनंदच होईल .
तरीही करायची असेल तर माझ्याशी संपर्क साधावा.
संपर्काची भानगड कशाला ? असेल काही काय सांगायचं तर ते इथेही सांगू शकाल. आदरणीय महर्षींचं काय वाचन आहे, ते इथेही निवांतपणे समजून सांगता येऊ शकेल. बाकी, आपणास भरीस घालत नाही. आपण माझ्या प्रतिसादांकडे दुर्लक्ष करु शकता. आपणास ते स्वातंत्र्य आहेच, पण धागा इथे जाहीर असल्यामुळे प्रश्न विचारावा वाटला. शक्यता अशी वाटून गेली की काय सांगावे वर मूळ धाग्यातल्या एखाद्या ताडपत्रात- नाडीपट्टीत दोन मार्चला २०२० ला कोरोनाचा पहिला रुग्ण भारतात आढळेल आणि शेवटचा रुग्ण २१ जूनला संपवून भारत देश कोरोनामुक्त होईल असे असेल तर, पट्टीत प्रश्नाचे उत्तर असले तर बरे होईल असे वाटले ....:) -दिलीप बिरुटे

In reply to by शशिकांत ओक

सुबोध खरे 29/04/2020 - 19:47
यावर मला नाना पाटेकरांचा एक संवाद आठवतो जर आपण लिपस्टिक लावून नट्टा पट्टा करून खिडकीत बसला तर खालून जाणार्याने शिट्टी मारली किंवा शुकशुक केले तर चिडू नये. सार्वजनिक जालावर तुम्ही एखादे विधान केले तर त्याचे विश्लेषण आणि समर्थन करण्याची जबादारी तुमच्यावर येते. उद्या मी जर सार्वजनिक जालावर विधान केले कि उंटिणीच्या दुधात, लेंडीपिंपळीचा रस आणि काटेरिंगणीचा अष्टमांश काढा घालून प्यायला तर आपल्याला करोना विषाणूचा संसर्ग होणारच नाही किंवा कर्करोगा पासून १०० % मुक्तता होईल तर त्याचे पुरावे देणे हि माझी जबाबदारी असेल. तेंव्हा असे म्हणता येणार नाही कि तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही यात पडूच नये.

Prajakta२१ 28/04/2020 - 21:48
मी माझ्या मैत्रिणीसोबत कोथरूड वनाझ कॉर्नर च्या एका नाडी ज्योतिष केंद्रात गेले होते (२०१४) दक्षिण भारतीय लोक ते चालवत होते एका फ्लॅट मध्ये खूप गर्दी असायची माझ्या मैत्रिणीला त्यांनी जे जे विचारले ते जुळून आले असे तिने सांगितले (एका वेळेस आत एकाच जातक असतो दुसऱ्याला प्रवेश नसतो) तिला समाधानकारक अनुभव आला होता तेव्हा त्यावेळच्या अनुभवावरून आणि एकंदर नाडीपट्टी ज्योतिष हे पूर्णपणे वैयक्तिक ज्योतिषाचा प्रकार वाटते ते जरी चांगले असले तरी सामूहिक भविष्यकथनासाठी एप्लिकेबल नाही असे एकंदर त्याच्या माहितीवरून वाटते प्रत्येक व्यक्तीची नाडीपट्टी असते ह्यातच स्पष्ट होते कि फलज्योतिषाप्रमाणे सामाजिक राजकीय भाकितांसाठी ते लागू नाही सध्याची हि समस्या सामूहिक आरोग्य,सामाजिक,आर्थिक आणि थोडी राजकीय आहे त्याला पारंपरिक फलज्योतिष तसेच मेदिनीय ज्योतिष उत्तर देऊ शकेल असे वाटते मेदिनीय ज्योतिषात भूभागाच्या माणसाप्रमाणेच पत्रिका बनवून गोचर ग्रहभ्रमणाचे त्या देशावर होणारे परिणाम वर्तवले जातात उदा. अमेरिकेची मिथुन रास आहे सध्या मिथुनच्या अष्टमात ग्रहांची गर्दी आहे अष्टमस्थान-मृत्यूस्थान म्हणून सध्या अमेरिका फारच त्रासातून जात आहे पण आत्ता लाभात आलेला सूर्य अमेरिकेला साह्य करेल असे वाटतेय भारताची मकर रास आहे मकर राशीत सध्या तीन ग्रह आहेत फलस्वरूप भारताची प्रतिमा उजळण्याचे chances आहेत (ते कुठले भावेश आहेत ह्यावर अवलंबून)

Prajakta२१ 29/04/2020 - 16:11
देशाचा स्वातंत्र्य दिन आणि वेळ हि त्याची जन्म स्थिती धरून पत्रिका बनवतात भारत १५/०८/१९४७ त्यादिवशी चन्द्र मकरेत म्हणून भारताची मकर रास असे जे स्वतंत्रच आहेत त्यांची घटना किंवा संसद कधी अस्तित्वात आली ती तारीख धरून तो एक भूभाग एकसंध देश कधी बनला तेव्हापासून (ती तारीख)

JAGOMOHANPYARE 10/03/2010 - 21:42
अजबच.. *************************** प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

विसोबा खेचर 10/03/2010 - 22:46
सहज आणलेल्या ताडपट्टीतील एका अज्ञात व्यक्तीच्या नाडी पट्टीवाचनाची निघालेली ती अचुक तारीख निघते काय!
ओके, तारीख अचूक निघाली.. पण पुढे काय? येत्या महिन्याभरातल्या प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक सेकंदाला माझ्या आयुष्यात काय होणार आहे आणि गेली ४० वर्ष माझ्या आयुष्यात काय काय, घडलं आहे हे जर पर्फेक्ट सांगू शकलात तर मानलं तुमच्या नाडीशास्त्राला आणि नाडीपट्टीला! अन्यथा, नाडीशास्त्र आणि नाडीपट्टी हा सर्व केवळ अन् केवळ बकवास आहे असंच म्हणावं लागेल! बोला ओक साहेब, घेताय चायलेंज? तात्या.

In reply to by विसोबा खेचर

रामपुरी 11/03/2010 - 01:51
कसलं चॅलेंज घेउन बसलात? त्या मोहनन ची बेरीज वजाबाकी तयार आहे एवढाच त्याचा अर्थ. त्याने उलट गणित करून सगळ्याना मस्त गंडवलं. :) :) :) पुण्यातल्या नाडीवाल्याना आपण चॅलेंज दिला होता पण त्यानी शेपुट घातली. लोकाना चु.... बनवायचे धंदे आहेत झालं. "६ अब्ज लोकांच्या नाड्या कुठं ठेवल्या आहेत?" एवढ्या साध्या प्रश्नाचं उत्तर ओक देतात का विचारा मग चॅलेंज द्या.

In reply to by विसोबा खेचर

तिमा 11/03/2010 - 18:03
अहो, २०१२ बद्दल काही आहे का या नाडीग्रंथात ? कारण ते खरे असेल तर त्यानंतर कोणाच्याही कुठल्याच नाड्या शिल्लक रहाणार नाहीत! (अगदी लेंग्याच्या सुध्दा!) हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

शशिकांत ओक 10/03/2010 - 23:33
बोला ओक साहेब, घेताय चॅलेंज?
तात्या, आपण नाडी ग्रंथांना चॅलेज करताय. मला नाही. हे म्हणजे कोणी पॅरिसला जाऊन एफेल टॉवर पाहून आला व म्हणाला की असा असा भव्य लोखंडी मनोरा मी पाहून आलोय. तर इथे घर बसल्या मला इथे तो मनोरा दाखवता का? घेताय चॅलेंज? असे म्हटल्यासारखे झाले. तो मनोरा प्रत्यक्ष पहायचा तर तुम्हाला पॅरिसला जायला हवे. म्हणून नाडीच्या विषयावर मी म्हणतोय की मला नाडी ग्रंथांचे आलेले अनुभव असे असे आहेत. आपणाला ते सत्यनारायणाच्या कथेप्रमाणे भाकड किंवा अतिरंजित वाटत असतील तर आपण प्रत्यक्ष अनुभव घ्यावा. नाडी ग्रंथांचे अवलोकन करावे व आपला अनुभव सांगा. त्यात आपले दैनंदिन कथन येईल का नाही हे आपणच तपासून पहा. आपणास माझ्याप्रमाणेच अदभूत अनुभव येतील असा माझा दावा नाही. मी आत्ता पर्यंत काय करतोय. फक्त डोळसपणे नाडी ग्रंथांचे अनुभव घेत आहे. नाडी महर्षी कोणी माझे काका मामा नाहीत का नाडी शास्त्री मला नाडी ग्रंथांच्या सेवेबद्दल काही मानधन देत नाहीत. आत्ता पर्यंत आलेल्या अनुभवांमुळे महर्षींच्या कार्याला श्रद्धापुर्वक वंदन करावेसे वाटले तर त्यात लाज कसली? नाडीग्रंथांवर अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/ शशिकांत

In reply to by शशिकांत ओक

विसोबा खेचर 10/03/2010 - 23:49
नाडी महर्षी कोणी माझे काका मामा नाहीत का नाडी शास्त्री मला नाडी ग्रंथांच्या सेवेबद्दल काही मानधन देत नाहीत. आत्ता पर्यंत आलेल्या अनुभवांमुळे महर्षींच्या कार्याला श्रद्धापुर्वक वंदन करावेसे वाटले तर त्यात लाज कसली?
ओक्के...! ओकसाहेब, खुलासा पटला! स्वगत: साला या शश्या ओकवर मला रागावताच येत नाही, ना त्याच्याशी काही वाद घालता येत! म्हणजे म्हटलं तर घालता येईल पण आपण साला या शश्या ओकचे फ्यॅनच आहोत...:) असो, नाडीदेवींचा विजय असो.. ओकसाहेब, अजूनही येऊ द्या असे काही अनुभव! आपला, (फ्यॅन) तात्या.

मिसळभोक्ता 11/03/2010 - 04:48
मेष लग्नम तेथे शुकिरन व मंगल, माडत्तील (वृषभेत) सुर्य, मिधुनम्मत्तिल पुधम् (बुध), कर्काटकात्तील अरसन(गुरु), सिम्मत्तील राघूम् (राहू) व शनी, कन्नीत्तिल तिंगल (चंद्र), कुंबमत्तिल केतुम. संपादकांनो, इतके सगळे अपशब्द अद्यापही मिसळपावावर आहेत ! सर्व संपादकांनी आत्मशोध करावा. कन्नीतिल तिंगल सारखी घाणेरडी शिवी मिसळपावावर पाहून मला व्यक्तिशः मिसळपावाचा सदस्य असल्याची लाज वाटते. (कोणरे तो ? लाजेचा लज्जागौरीशी संबंध नाही !) -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

In reply to by मिसळभोक्ता

शुचि 11/03/2010 - 06:24
मला "कुंबमत्तिल" फार उत्तान शब्द वाटतोय..... लवकर संपादीत करावा अशी विनंती. (ह. घे.) *********************************** खुद फूल ने भी होंठ किये अपने नीमवा (अर्धवट उघडलेले) चोरी तमाम रंग की तितली के सर ना जाये - परवीन शाकीर

मिपावरील नवीन वाचकांसाठी नाडीचिकित्साकांडाचे अवशेष नाडी इतिहास मोठा आहे बरका एक झलक
http://www.misalpav.com/node/9218
http://www.misalpav.com/node/9219
http://www.misalpav.com/node/9231
http://www.misalpav.com/node/3607 बाकी ओकसाहेब डहाणुकर कॉलनीत आला होतात तर मी तिथेच राहतो. आला असतात तर (इतर) विषयावर तरी गप्पा मारल्या असत्या. आपण आमची प्रेरणा आहात. आमचा पत्ता आपल्याला माहित आहेच. अवांतर- ओकसाहेब एकदम दिलखुलास माणुस आहे बरका. आम्ही आता नाडी च नाही तर बिडी काडी ताडी माडी सोडलय. तस शास्त्रापुरतीच कधी कधी बियर घेतो प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

शशिकांत ओक 11/03/2010 - 11:17
नाडी महर्षीच विरोधकांचे प्रेरणास्थान आहेत काही लोक बिडीच्या काडीवर जाता जाता नाडीला आग लाऊन जातात. चिकित्सा - चिरफा़ड - असे मोठे शब्दयोजून करून मोठा तीर मारल्याचा आव आणतात. नंतर आपण त्या गावचेही नाही असा आव आणून, दोन्ही डगरींवर हात राखून इतरांची मजा पहात बसतात. असल्यांकडून शोध काम दूर मात्र लोकांच्या मनांत संशय आणण्याचे काम तत्परतेने होते. अशा लोकांसाठी देखील नाडी महर्षी प्रेरणास्थान आहेत. नाडी पट्टीत व्यक्तीचे नाव कोरून कसे आलेले असते ते वाचून मिपाकरांसाठी हैयों व धनंजय यांनी आपला प्रतिसाद सविस्तरपणे नोंदवून दिला असल्याने निदान येथे तरी नाडीपट्ट्यात तमिळ भाषेतून लेखन कार्य केलेले आहे की नाही. हे आणखी सिद्ध करायची गरज आता उरलेली नाही. ज्यांना नाडी ग्रंथांचे अस्तित्व तत्वतःमान्य नाही - कारण त्यांना नाडीग्रंथातील जो मजकूर असतो तो पडताळून पहाण्यासारखा असतो व त्यातील माहिती खरी आहे असे प्रांजळपणे मान्य करावे लागेल अशी वस्तुस्थिती आहे, असे मान्य केले तर त्यांच्या पुर्व निर्धारित तत्वज्ञानाचा पाया ढासळतो असा पक्का निर्णय आहे - त्यांच्या करता वाद वा समजावण्याची गरज काय? नाही त्यांना मान्य करवत तर नाही. पण कोणी पुर्वग्रह सोडून, निर्मल मनाने नाडी ग्रंथांतील मजकुराचे, अर्थाचे अस्तित्व शोधून पाहू इच्छित असतील तर अशांसाठी माझे लेखन प्रेरणादाय़ी व्हावे. नाडीग्रंथांवर अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/ शशिकांत

In reply to by शशिकांत ओक

ओकसाहेब, मी आणि मिपावरील अजून एक सदस्या, हे नाडी प्रकरण काय आहे हे पडताळून बघण्यासाठी उत्सुक आहोत. तरी त्यासाठी काय करावे लागेल ते सांगावे. पुण्यात कुठे जावे लागेल? किती खर्च येईल? नाडी बघण्याआधी स्वतःची काय आणि किती वैयक्तिक माहिती द्यावी लागेल? नाडी वाचनाला किती दिवस लागतील? फक्त भूतकाळच सांगितला जातो की भविष्यकाळही सांगितला जाईल? किती तपशीलात जाऊन सांगितले जाईल? नाडीवाचन खरे ठरले नाही तर पैसे परत मिळतील का? कृपया, कळवणे. वाट बघत आहोत. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

कवितानागेश 11/03/2010 - 19:21
अर्थात नाडीग्रन्थाबद्दल.. आपण फक्त आपल्या हाताच्या अन्गठ्याचा ठसा द्यायचा असतो, त्यापलिकडे आपली कुठलीही माहिती ते घेत नाहीत. वाद घालण्यापेक्शा जाऊन आपापली पट्टी वाचून घ्या... ............... जास्त मजा येते! ============ माउ

In reply to by कवितानागेश

jaypal 11/03/2010 - 21:10
मारुतीच्या बेंबित बोट घालुन बघा कस मस्त वाटत !!! तश्यातल प्रकार वटतो *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

शशिकांत ओक 11/03/2010 - 23:57
बिपिन कार्यकर्ते बिपिन आणि अन्य नाडी उत्सुक मित्र हो, आपणाला नाडी केंद्रांचे पत्ते द्यायला मला शक्य आहे पण ते या ठिकाणी दिले तर जाहिरात बाजीचा आरोप होईल असे वाटून मी असे सुचवतो की आपण नाडी ग्रंथ भविष्य पुस्तक वाचावे. नितीन प्रकाशन,पुणे. किं ५०. त्यात पुण्याच्या केंद्रांचे पत्ते व अन्य माहिती आहे. आपण पुण्यात आहात तर आपण प्रत्यक्ष जाऊन पाहिले तर बरे. मी आपणांला किंवा कोणाला अमुक केंद्रात जा असे सुचवत नाही. आपणाला सोईचे वाटेल तसे पहावे. फीज ३०ते ६२५ च्या मधे विविध केंद्रांत आहे. ती तशी का वा अन्य आपल्या विचारणा आपण त्यांच्या कडून समजून घेतलेल्या बऱ्या. तमिळजाणकाराला बरोबर न्यावे. म्हणजे नाडी पट्टीतील नावे शोधायला मदत होईल. केंद्राला फोटो काढून देण्यास विनंती करावी. त्याची कॉपी नंतर उपयोगाला येईल.वही देणार का विचारावे. काही कारणांनी ते देत नसतील तर देणाऱ्या केंद्रात जावे. काही कारणानी पट्टी सापडत नसेल तर दुसऱ्या केंद्रात जाऊन सापडेपर्यंत शोध घ्यावा. आपणांस आणखी एक विनंती आहे की नाडी केंद्रात पट्टीचा शोध होण्या आधी महर्षींना प्रार्थना करावी आम्ही आपली परीक्षा घ्यायला आलेलो नाही. आपले आशीर्वाद मिळावेत यासाठी व पुढील आयुष्यासाठी काही मार्गदर्शन मिळावे म्हणून आलो आहे. कृपा करावी. हार व फुले घालता आली व दीप दर्शवता आला तर चांगले. आपला अनुभव कळवावा. आपण केंद्रात असताना प्रत्यक्ष भेटता आले तर आवडेल. नाडीग्रंथांवर अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/ शशिकांत

वाटाड्या... 12/03/2010 - 00:48
श्री. ओक, एक शंका..विरोध नाही..(कारण स्वानुभव नाही)..पण हे त्याने प्रत्यक्ष सांगितले आहे माझ्या मनचे नाही हे नमुद करु इच्छितो... माझा एक मित्र जो माझा एक मित्र कोथरुडच्या नाडीग्रंथ केंद्राचा चांगलाच पंखा होता. बराच त्रासातही होता हे नक्की. शेवटी लग्नकार्यासाठी ४-५ वेळा गेलाही त्या केंद्रात. एकुण ४००० रु. खर्च केले. तिरुपतीलाही जाणार होता.(त्यांनी सांगितले म्हणुन) गेला का नाही ते कळ्ळं नाही. त्याला सांगितले गेलेले की त्याची बायको पुण्यापासुन २०० किमी च्या अंतरामधील असेल. (खोटं ठरलं). त्याची बायको पुण्यापासुन ४०० किमीवरील निघाली. बायकोचं नाव 'क' अक्षरापासुन असेल..(खोटं ठरलं).बायकोचं नाव 'स' अक्षरापासुन आहे. एक वर्षाच्या आत लग्न होइल...(खोटं ठरलं). लग्न १.५ वर्षांनी झालं. अश्या गोष्टींमुळे विश्वास बसत नाही लोकांचा.... - वा

देशावर मोठं संकट आलंय, त्या ताड़पट्टीत नाड़ीपट्टीत कोरोना कधी येईल आणि कधी जाईल असे दिसते का ? जाणकार अभ्यासकांच्या प्रतीक्षेत. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रचेतस 28/04/2020 - 11:38
अहो जिथं करोनाने देवाला देखील कोंडून ठेवले तिथे त्यास नाडीपट्टीला नाड्या बांधून ठेवणे काय अवघड.

शशिकांत ओक 28/04/2020 - 11:53
जाणकार अभ्यासकांच्या प्रतीक्षेत.
खिल्ली न उडवता अभ्यास करावा अशी इच्छा असेल त्यांनी माझ्याशी वैयक्तिक संपर्क साधावा. नाडीग्रंथ प्रेमींच्या ग्रुपवर महर्षींच्या आदेशातून काय मार्ग दर्शन केले आहे ते समजून घेता येईल.

In reply to by शशिकांत ओक

प्रश्न देश हिताचा आहे, आणि सार्वजनिक माहितीचाही आहे. तेव्हा व्यक्तीगत संपर्कापेक्षा खरंच असे काही स्पष्ट चिन्हे, लक्षणे नाडीपट्टीच्या अभ्यासकांना आढळत असतील तर सांगावीत. जसे, काही ज्योतिष मित्रांशीही या विषयावर सहज चर्चा करीत असतो. एक अशी तारीख त्यांच्याही भाकितातून स्पष्ट होतांना दिसत नाही पण ते त्यांच्या परिने लोक थट्टा करो की गंभीरपणे घेवोत माहिती सांगण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करीत असतात. नाडीपट्टीवाल्यांची याबाबतीत काय भाकिते आहेत ते जाहिरीपणे सांगायला हरकत नसावी, लोक काय म्हणतील त्याचा काय विचार करायचा. माझाही अशा कोणत्या पट्टीबीटीवर विश्वास नाहीच पण पारंपरिक पद्धती काय संबंध लावतात, शोधतात. ते सांगायला हवे, असे वाटते. इतरवेळी लोकांच्या भूत भविष्याची तंतोतंत माहिती सांगणार्‍यांनी आता देशहिताच्यावेळी तरी मागे हटू नये असे वाटते. बाकी, बघा तुमची इच्छा. आम्ही तर लॉकडावूनमधे घरात वैज्ञानिकदृष्टीकोन आणि शोधाकडे तसेही डोळे लावून बसलोच आहोत. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अजून त्यांना सापडल नसाव. नाहीतर एव्हाना त्यांनी ते दिले असते. बर्‍याच वर्षांनी हा धागा वर आलाय.

शशिकांत ओक 28/04/2020 - 19:59
कोणत्या पट्टीबीटीवर विश्वास नाहीच पण पारंपरिक पद्धती काय संबंध लावतात, शोधतात. ते सांगायला हवे, असे वाटते.
ज्यांचा पट्टीवर विश्वास नाही त्यांना उठाठेव करायची काय? तरीही करायची असेल तर माझ्याशी संपर्क साधावा. महर्षींच्या वाणीचे वाचन काय आहे ते ज्यांना कदर आहे तिथे सांगितले तर त्याला महत्व. बाकीच्या कोणाला काय वाटेल तो त्यांचा प्रश्न आहे... मला विचारून भरीला पाडायची गरज नाही...

In reply to by शशिकांत ओक

ज्यांचा पट्टीवर विश्वास नाही त्यांना उठाठेव करायची काय?
माझा विश्वास नसूत देत हो, पण आपण इतरांचा विश्वास बसेल अशी गोष्ट सांगायला काय हरकत आहे. आपल्याकडे उत्तर नाही असं माझं स्पष्ट मत असलं तरीही माणूस संकटसमयी सर्व अंगारेधुपारे करुन पाहतो, तसे आपल्याकडे काही नाडीकथनात काही भाकित असेल तर माझा किंवा इतर वाचकांचाही विश्वास बसला असता, असे वाटले. विश्वासापेक्षा सध्याचा जीवघेणा प्रश्न सुटला तर कोणाही भारतीयाला आनंदच होईल .
तरीही करायची असेल तर माझ्याशी संपर्क साधावा.
संपर्काची भानगड कशाला ? असेल काही काय सांगायचं तर ते इथेही सांगू शकाल. आदरणीय महर्षींचं काय वाचन आहे, ते इथेही निवांतपणे समजून सांगता येऊ शकेल. बाकी, आपणास भरीस घालत नाही. आपण माझ्या प्रतिसादांकडे दुर्लक्ष करु शकता. आपणास ते स्वातंत्र्य आहेच, पण धागा इथे जाहीर असल्यामुळे प्रश्न विचारावा वाटला. शक्यता अशी वाटून गेली की काय सांगावे वर मूळ धाग्यातल्या एखाद्या ताडपत्रात- नाडीपट्टीत दोन मार्चला २०२० ला कोरोनाचा पहिला रुग्ण भारतात आढळेल आणि शेवटचा रुग्ण २१ जूनला संपवून भारत देश कोरोनामुक्त होईल असे असेल तर, पट्टीत प्रश्नाचे उत्तर असले तर बरे होईल असे वाटले ....:) -दिलीप बिरुटे

In reply to by शशिकांत ओक

सुबोध खरे 29/04/2020 - 19:47
यावर मला नाना पाटेकरांचा एक संवाद आठवतो जर आपण लिपस्टिक लावून नट्टा पट्टा करून खिडकीत बसला तर खालून जाणार्याने शिट्टी मारली किंवा शुकशुक केले तर चिडू नये. सार्वजनिक जालावर तुम्ही एखादे विधान केले तर त्याचे विश्लेषण आणि समर्थन करण्याची जबादारी तुमच्यावर येते. उद्या मी जर सार्वजनिक जालावर विधान केले कि उंटिणीच्या दुधात, लेंडीपिंपळीचा रस आणि काटेरिंगणीचा अष्टमांश काढा घालून प्यायला तर आपल्याला करोना विषाणूचा संसर्ग होणारच नाही किंवा कर्करोगा पासून १०० % मुक्तता होईल तर त्याचे पुरावे देणे हि माझी जबाबदारी असेल. तेंव्हा असे म्हणता येणार नाही कि तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही यात पडूच नये.

Prajakta२१ 28/04/2020 - 21:48
मी माझ्या मैत्रिणीसोबत कोथरूड वनाझ कॉर्नर च्या एका नाडी ज्योतिष केंद्रात गेले होते (२०१४) दक्षिण भारतीय लोक ते चालवत होते एका फ्लॅट मध्ये खूप गर्दी असायची माझ्या मैत्रिणीला त्यांनी जे जे विचारले ते जुळून आले असे तिने सांगितले (एका वेळेस आत एकाच जातक असतो दुसऱ्याला प्रवेश नसतो) तिला समाधानकारक अनुभव आला होता तेव्हा त्यावेळच्या अनुभवावरून आणि एकंदर नाडीपट्टी ज्योतिष हे पूर्णपणे वैयक्तिक ज्योतिषाचा प्रकार वाटते ते जरी चांगले असले तरी सामूहिक भविष्यकथनासाठी एप्लिकेबल नाही असे एकंदर त्याच्या माहितीवरून वाटते प्रत्येक व्यक्तीची नाडीपट्टी असते ह्यातच स्पष्ट होते कि फलज्योतिषाप्रमाणे सामाजिक राजकीय भाकितांसाठी ते लागू नाही सध्याची हि समस्या सामूहिक आरोग्य,सामाजिक,आर्थिक आणि थोडी राजकीय आहे त्याला पारंपरिक फलज्योतिष तसेच मेदिनीय ज्योतिष उत्तर देऊ शकेल असे वाटते मेदिनीय ज्योतिषात भूभागाच्या माणसाप्रमाणेच पत्रिका बनवून गोचर ग्रहभ्रमणाचे त्या देशावर होणारे परिणाम वर्तवले जातात उदा. अमेरिकेची मिथुन रास आहे सध्या मिथुनच्या अष्टमात ग्रहांची गर्दी आहे अष्टमस्थान-मृत्यूस्थान म्हणून सध्या अमेरिका फारच त्रासातून जात आहे पण आत्ता लाभात आलेला सूर्य अमेरिकेला साह्य करेल असे वाटतेय भारताची मकर रास आहे मकर राशीत सध्या तीन ग्रह आहेत फलस्वरूप भारताची प्रतिमा उजळण्याचे chances आहेत (ते कुठले भावेश आहेत ह्यावर अवलंबून)

Prajakta२१ 29/04/2020 - 16:11
देशाचा स्वातंत्र्य दिन आणि वेळ हि त्याची जन्म स्थिती धरून पत्रिका बनवतात भारत १५/०८/१९४७ त्यादिवशी चन्द्र मकरेत म्हणून भारताची मकर रास असे जे स्वतंत्रच आहेत त्यांची घटना किंवा संसद कधी अस्तित्वात आली ती तारीख धरून तो एक भूभाग एकसंध देश कधी बनला तेव्हापासून (ती तारीख)
3

अगस्त्य जीव नाडी भाग ४...

शशिकांत ओक ·

प्रमोद देव 10/03/2010 - 19:55
ओकसाहेब,आपल्यासाठी महर्षींचा आदेश आहे की ह्या कथांवर आपण चित्रपट बनवावा,जेणेकरून लोकांच्यात नाडीशास्त्राबद्दल भक्तीभाव निर्माण होऊन आपल्याला आणि समस्त नाडी पंडीतांना उज्ज्वल भविष्यकाल प्राप्त होईल. :) मजा येतेय वाचायला. अजून येऊ द्या तुमच्या पोतडीतून..अद्भूत आणि सुरस कथा.

चतुरंग 10/03/2010 - 20:03
लहानपणी हरवलेला भाऊ एक गुंड, दुसरा पोलीस!! :D फुल टू विंटरेस्टिंग, येऊ दे अजून!! (खुद के साथ बातां : रंगा 'दीवारची' पटकथा अगस्त्य नाडीवरुन चोरली असावी की काय? काय हे चौर्यकर्म!! B) ) (नागीरेड्डींचा चांदोबा)चतुरंग

नितिन थत्ते 10/03/2010 - 20:38
बी ग्रेड हिंदी सिनेमाचीच आठवण येत्ये. कशानंतरही काहीही घडतंय. आणि सगळ्या घटना एकमेकांशी जुळण्याचे योगायोग तर त्या सिनेमांसारखेच. ओक साहेबांनी पटकथा लेखन चालू करावे. नितिन थत्ते

jaypal 10/03/2010 - 20:39
आमची बी नाडी दाखवुन घ्यावी म्हणतोय. कवा?,कुठ आणि कशी दाखवु? *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

टारझन 11/03/2010 - 01:00
आज आमच्या "भल्या मोठ्या बंदुकीचा" मुड नाही .. हॅहॅहॅ .. -(शिकार प्रेमी) गोळीकांत ठोक

प्रमोद देव 10/03/2010 - 19:55
ओकसाहेब,आपल्यासाठी महर्षींचा आदेश आहे की ह्या कथांवर आपण चित्रपट बनवावा,जेणेकरून लोकांच्यात नाडीशास्त्राबद्दल भक्तीभाव निर्माण होऊन आपल्याला आणि समस्त नाडी पंडीतांना उज्ज्वल भविष्यकाल प्राप्त होईल. :) मजा येतेय वाचायला. अजून येऊ द्या तुमच्या पोतडीतून..अद्भूत आणि सुरस कथा.

चतुरंग 10/03/2010 - 20:03
लहानपणी हरवलेला भाऊ एक गुंड, दुसरा पोलीस!! :D फुल टू विंटरेस्टिंग, येऊ दे अजून!! (खुद के साथ बातां : रंगा 'दीवारची' पटकथा अगस्त्य नाडीवरुन चोरली असावी की काय? काय हे चौर्यकर्म!! B) ) (नागीरेड्डींचा चांदोबा)चतुरंग

नितिन थत्ते 10/03/2010 - 20:38
बी ग्रेड हिंदी सिनेमाचीच आठवण येत्ये. कशानंतरही काहीही घडतंय. आणि सगळ्या घटना एकमेकांशी जुळण्याचे योगायोग तर त्या सिनेमांसारखेच. ओक साहेबांनी पटकथा लेखन चालू करावे. नितिन थत्ते

jaypal 10/03/2010 - 20:39
आमची बी नाडी दाखवुन घ्यावी म्हणतोय. कवा?,कुठ आणि कशी दाखवु? *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

टारझन 11/03/2010 - 01:00
आज आमच्या "भल्या मोठ्या बंदुकीचा" मुड नाही .. हॅहॅहॅ .. -(शिकार प्रेमी) गोळीकांत ठोक
3