बनलो असतो दादा, मज साहेब भेटला नाही
पेरणा सांगायलाच पाहिजे का?
पेरणा सांगायलाच पाहिजे का?
(मिपा बंद असताना मिपाला चरफडत खूप शिव्या दिल्या. अर्थात प्रेमाने! मग शनिवारी रात्री हे विडंबन सुचले आणि खफवर सोमवारी मिपा परत आल्यावर टाकले. तिथल्या आमच्या हितचिंतकांनी -कोण म्हणाले रे कंपू कंपू ते! - वा वा! वा वा! बोर्डावर पण टाकून बाकीच्यांनाही छळा, असे आम्हांस भरीला पाडल्याने - दू दू कुठले - खफवरच्या पुरात वाहून गेलेली आमची रचना महत्प्रयासाने वर काढली आणि इथे डकवायचे धारिष्ट्य करत आहे... नमनाचे तेल संपले...!)
प्रेमात, युद्धात आणि विडंबनात सारे काही क्षम्य असते असे मानून खालील भेळ तिखट मानून घेणे -
('खरे' कवी यांची माफी मागून...)
मित्रहो, मिपावर सुंदर कवितांचा एवढा पाउस पडतो आहे की सारे वातावरणच बदलले. त्यातच संमं ने पण छायाचित्रकलास्पर्धेचा विषयपण पाउस निवडला आणि मग हे कवी लोक जास्तच पेटले. आमची प्रकृती थोडी नाजुकच. या बदललेल्या वातावरणाचा नाही म्हटले तरी परिणाम होतोच.
काल रात्री शेवटी विडंबनारीष्ट घेउन झोपावे लागले. तेव्हा कुठे सकाळी मोकळे मोकळे वाटले.
फ्रेश झाल्यावर ठरवले की चला पावसाळ्यात थोडी रंगपंचमी खेळूया...
आम्ही पाडलेल्या चकल्या चावायच्या आधी त्या चकल्यांमधले खरे पीठ कोणाचे आहे ते बघावे आणि मग आमच्या चकलीचा आस्वाद घ्यावा...
जशी मिकाची सई मिकाची लाडकी आहे तशी आमची सई सुध्दा आम्हाला बेहद्द आवडते.
मिकाची कविता वाचल्यावर आम्हाला आमच्या सईची आठवण आली अणि मग तिच्या बद्दल चार ओळी खरडल्याशिवाय रहावले नाही.
आमची पेरणा
अर्थात शब्दानुज यांची क्षमा मागुन....
रोज पुन्हापुन्हा तो ढुसक्या सोडतो
समोरचा नाईलाजाने नाकावर हात दाबतो
हजारो वर्षांपासुन तो त्या सोडतो
आणि दिवसभर पोट दाबून कळा सोसतो
खरेतर प्रत्येकाच्या शरीरातून ती बाहेर पडत असते
पण काहिंचे अस्तित्व नुसत्या वासावरुन ओळखता येते
पवनाच्या रुपातुन तो बाहेर पडतो
पोटाबरचे प्रेशर थोडेसे हलके करुन जातो
प्रत्येक श्वासातुन तो नाकात घुसू पहातो
श्वासाशिवाय थोड्या वेळानंतर जीव घुसमटतो
माझ्यासाठी ठेवलेल्या पिंडाकडे पहात, मी हटवाद्या सारखा बसलो होतो,
जाताजाता तिला अडकवल्या शिवाय, मी पिंडाला मुळी शिवणारच नव्हतो,
तिच्या एका निर्दय नकारा मूळे, मी हे जग सोडले, हे सर्वांना ठाउक होते,
तेव्हा मी अगतिक होतो, आता तिलाही तसेच झालेले मला पहायचे होते,
बर्याच शपथा घेतल्या आणि घालल्या गेल्या, मी कशालाही बधलो नाही,
आजूबाजूचे कावळेही प्रचंड दबाव टाकत होते, पण मी जागचा हललो नाही,
मला खात्री वाटत होती, अजुन थोडेसे ताणले, की ती नक्की येईल,
या जन्मी जरी नाही जमले, तरी पुढच्या जन्मीचे वचन नक्की देईल,
पेर्णा - https://www.youtube.com/watch?v=mz4bTkh9elg
इशेश ईणंती - गुर्जी (http://www.misalpav.com/comment/685412#comment-685412)
आमच्या गुर्जींनी (इथे कानाच्या पाळीला हात लावण्यात आलेला आहे) तांबिय संस्थानाच्या मठाधिपतीची वस्त्रे तूर्तास बाजूस ठेउन इतर कार्ये हाती घेतल्यानंतर प्रथमच जाहीर ईणंती केल्याने हे ईडंबन लिल्हे आहे
अवधूत गुप्ते यांची माफी मागून…
----------------------------------------------------------
एका महान कवितेवर तितकेच टुकार विडंबन... मंडळी गोड माणुन घ्या.
स्मायली जीवन माझे ताजे...स्मायली जीवन माझे!
प्रेरणा
जेपी म्हणे' गा मिपादेशी | या लिखाणाची ऐशीतेशी,
बेहतर आहे एका लेखाशी| पण लिहीणार नाही.
खड्यात जावो ही लिखाई| आपल्याच्याने होणार नाही.
समोर सारे हुशार बेणे|विजींनीयर डागटर ऐणे,
काखे वही,हाती पेन| डायरी माझ्या लिहीण.
पण हा कुठला कंपुपणा| आपसात चर्चा कुदवती.
या लोकांना नाही उद्योग |गायब झाले सगळे लोग.
लेंकानो लिहाना रोज |वाचुन तेच तेच बोर झालो.
लिखाई का असते सोपी| रोज कळफळक बडवती ,
कित्येक लेकाचे आयटी | मेगाबायटी प्रतिसाद देती,