जीवनमान
मैत्रीणे भरली पोकळी!
आशाबाई ,वय ६० आणि त्यांचे यजमान वय ६५ दोघेच गावाकडे राहत होते.यजमानांनी निवृत्तीनंतर गावाकडे बंगला बांधला होता.पहाटे उठावे,गावकडे शेतात जावे,आशाबाईनी सुग्रास जेवण बनवावे,रात्री लख्ख ताऱ्यात ईश्वराचे ध्यान करता निजावे.इतके सुंदर त्यांचे जीवन गेली दोन वर्षे चालू होते. खत आणायला यजमान तालुक्याला दुचाकीवर गेले होते.पण काळाने घात केला.काकांच्या दुचाकीला अपघात झाला आणि त्यातच काकाचं निधन झालं.आशाबाई तर सैरभैर झाल्या होत्या.रात्ररात्र त्यांना झोप येईना .मुलगा अमेरिकेत शिकायला होता.अजून तीन वर्ष त्याचे क्षिक्षण चालू राहणार होते.तेव्हा आशाबाईना गावकडे एकटीलाच राहावे लागणार होते.
क्रेडीट कार्ड
मी विजुभाउंची समस्या आणि प्रतिसाद वाचत असताना लक्षात आलं की अनेकांना क्रेडीट कार्ड वापरणं सोयीचं वाटत नाही वा जोखमीचं वाटतं. अर्थात तो मूळ विषय नसल्याने मी जरा सविस्तर लिहिण्यासाठी हा लेख लिहायचं ठरवलं.
क्रेडीट कार्डवरील व्यवहार कँन्सल करण्याबाबत मदत हवी आहे.
मी सहसा क्रेडिट कार्ड वापरत नाही. अगदीच अडचणीत हाताशी असावे इतपतच वापर करतो.
कार्ड घेतले त्या वेळेस कार्ड प्रोटेक्षन सर्व्हिस साठी ( सी पी पी आसिस्टन्स) रु.१६९९/- चे एक पॅकेज घेतले होते. यात कार्डचा विमा अपेक्षीत होता.
कालांतराने लक्षात आले की आपला कार्डचा वापर फारच खुपच कमी आहे.
या सर्व्हिस बद्दल मी विसरूनही गेलो होतो. गेल्या वर्षी सी पी पी ची रक्कम कार्डावर डेबीट झाल्यावर ती सर्व्हीस आपण वापरतोय हे लक्षात आले.
यंदा त्या सर्वीसबद्दल मला एक फोन आला.
त्या फोनवरच्या माणसाला मला ही सर्वीस नको आहे असे साम्गितले.
डोक्याला शॉट [सप्तमी]
पुर्वपिठिका
भडकलेल्या तपास अधिकाऱ्यांनी माझ्या खाजगी पर्णकुटीचा नाजुक दरवाजा दयाच्या मदतीशिवाय सहजपणे तोडला आणी आत घुसुन मला व बुसाबाला खेचुन एकमेकांपासुन वेगळे केले त्यावेळी आमची तीन दिवस आणि तीन रात्रींसाठी लागलेली अखंड रूदन समाधी भंग पावली!
विठ्ठल नाम
अभंगाची गोडी
चिपळाची जोडी
विठ्ठल नाम माळी
भक्ती फुले भाबडी...
अगम्य भिंती तोडी
शरीर झोला सांडी
चराचर चैतन्य बहू
मना सुख जोडी...
वेल वाढती वाकडी
शोधे आधार बापुडी
नाही बांडगुळ हे जाण
तू बांध नामाची झोपडी...
वाट पाहून थकली
येईल मोक्ष कावडी
रोज रोज का मग
डोळ्यांत सूर्य बुडी...
-भक्ती
स्वप्नं
आज सकाळी अजून दोन फेरीवाले येऊन गेलेत, स्वप्नं विकायला. आठवड्यातले चौथे फेरीवाले. या सगळ्या फेरीवाल्यांना माझा पत्ता कोण देतंय याचा शोध घेतला पाहिजे. आजकाल प्रमाणाबाहेर वाढलेत. स्वप्नं तशी बरी होती, ताजी नव्हती. पण आजकाल ताजं स्वप्नं मिळतंय कुठे म्हणा. सगळी शिळीच, नवेपणाचा लेप चढवलेली, नवीन रंग किंवा सुगंधाचा फवारा मारलेली. आणि क्वचित कधी ताजं स्वप्नं आलंच बघण्यात तर लगेच मनात शंका दाटून येतात, ते विकणारा फसवत नाही कशावरून? एकंदर काय, स्वप्नांचा व्यवहार दिवसेंदिवस कठीणच होत चाललाय. डोळ्यात तेल घालून चिकित्सा करावी लागते. नाहीतर पदरचा वेळ खर्च केल्यावर लक्षात येतं फसवणूक झाली म्हणून.
असेहि एक विलगीकरण
अलिबाग या मुख्य शहरापासून आमचे गाव साधारण 20 किलोमीटर आहे. तसेच मांडवा जेट्टी पासून तीन-चार किलोमीटर अंतरावर एका कोपर्यात सासवणे गाव वसलेले आहे. आमच्या गावाला आणि आजूबाजूच्या गावांना सुंदर असा समुद्रकिनारा लाभलेला आहे. या अशा समुद्रकिनारी पूर्वी स्थानिकांच्या वाडी, बाग घर होती याठिकाणी आता श्रीमंत लोकांनी जागा विकत घेऊन स्वतःचे बंगले बांधले आहेत व सुट्टीच्या दिवशी त्यांचे तिकडे येणे-जाणे होते तसेच अधूनमधून पार्ट्या होत असतात. या श्रीमंत लोकांमध्ये क्रिकेटर, फिल्मी दुनियेशी संबंधित लोक, तसेच मोठे उद्योगपती सामील आहेत.
पूर्ण लोकडोऊन मध्ये सरकारी कर्मचारी काय करतात ?
पूर्ण लोकडोऊन मध्ये सरकारी कर्मचारी काय करतात ?
मी स्वतः आयटी मधला ,wfh आणि झोमॅटो एवढंच केले लोकडोऊन मध्ये ,कंपन्या पण बदलल्या
पण सरकारी लोक काय करत असतील ?
पगार तर चालूच असणार
सगळे घरी बसून पगार तर घेत नाहीत ना ?
पोलीस वाल्यांचे समजू शकतो त्यांना उलटे एक्सट्रा ड्युटी
शिक्षक लोक ह्यांना पण कोरोना ड्युटी पण बाकी ?
अपघात - एका नव्या ट्रकचा
आज सुरेवारसिंग ट्रकलोड घेवून मध्यप्रदेशातल्या सतना या गावी जायचे होते. नवी मुंबई ते सतना या प्रवासासाठी त्याने मनाची तयारी काल दुपारीच केली होती. साधारण चार दिवसाचा एकूण प्रवास होणार होता. इकडून काहीतरी केमीकल फिल्टर प्लांटचे मशिनरी घेवून तिकडे एका फॅक्टरीत अनलोड करायचे अन तिकडून इंदूरपर्यंत अनलोड येवून इंदूर जवळच्या पिथमपूरहून बजाज टेंम्पोमधून सामान घेवून ते चाकणला उतरवून परत नवी मुंबई. त्याच्या अनुभवाने एखादा दिवस जास्तच लागणार होता हे त्याला जाणवले होते.