( जेव्हा खूप खूप पाऊस पडेल ना )
( प्राचीताई माफ करशील ना ग? )
( प्राचीताई माफ करशील ना ग? )
कवी बिचारा
मेटाकुटीने
कविता पाडत असतो
शाई ओली
असताना हा
टपली मारून जातो
वसुदेवाच्या
मनी जशी
कंसाची दहशत होती
तसे मिपा-कवि
विडंबनाचा
कंस बघुनी हादरती
कवितारतिच्या
विनयाचा हा
भंग त्वरेने करतो
शीघ्रकवित्वा
याच्या बघुनी
मनोमनी मी जळतो
हात जोडुनी
हतप्रभ कवि हा
दारी तुझिया उभा
दयावंत हो
पैजारा तू
आवर निर्दय प्रतिभा
विडंबनाच्या
वावटळीतुनी
कविता माझी सुटावी
ज्ञानोबांनी
पैजाराला
सज्जड तंबी द्यावी
कवि एका जनार्दनी श्री गुरुदत्ताचा भक्त जाणा ।
श्री गणपती देवी पार्वती महादेव
वीष्णू ब्रह्मा आदी देवतांचे नमन म्हणा।
सर्वांना आपलेसेकरी हिंदूधर्माच्या सकारत्मक
भगव्या उत्क्रांती कळसाचा उद्घोषम्हणा।
जयदेव जयदेव जय श्री ख्रिसमसट्री देवा ।
आरती ओवाळितां नुरली भवचिंता। जयदेव।।धृ।।
विवीधगुणात्मक ख्रिसमसट्री देव हा जाणा। सगुणी अवतार वनस्पतीलोकीचा राणा।
राम भेटी मुग्ध म्हणे जये हनुमाना । गुरुवर्य येशुयोगीबोले त्रिमुर्तीअनेकदेवाद्वैत सर्वाठायी जाणा।
जयदेव जयदेव जय श्री ख्रिसमसट्री देवा । आरती ओवाळितां नुरली भवचिंता। जयदेव।।धृ।।
(* कविता जेंडर न्यूट्रल वाचावी)
कमिटेड टू हूम
कमिटेड टू व्हॉट
पुरोगामी पुरोगामी
कितीसा पुरोगामी आहेस ?
तुझ्यासाठी
आपले कुणीच नाही
तूला तू त्यांचा आहेस असे वाटते
तेही फसवे नसते का ?
आपल्यातल्या आपल्यांचा
होऊ शकला नाहीस
त्यांचाही होऊन रहाणे
खरेच जमेल का तूला ?
आणि तूही कुणाचाच नाहीस
हेच खरे नसते का ?
त्यागी आहेस
हे बरे आहे एका अर्थाने
आपल्या अंगच्या वस्त्रांचाही
त्यागकरुन त्या तपस्वी मुनींप्रमाणे
जंगलात जाऊन कायमचा
एकांतवास अनुभवून पहाशील का ?
लाल करा ओ , माझी लाल करा
येता जाता लाल करा
पुसा मला तुम्ही येता जाता
पुसूनि पुरते हाल करा ,
लाल करा ओ लाल करा
येता जाता लाल करा
भजा मज तुम्ही भाई दादा
तुमचाच राहीन , हा पक्का वादा
गॉड बोलुनी बेहाल करा
लाल करा ओ माझी लाल करा
येता जाता लाल करा
समजू नका मज ऐरागैरा
नीट बघून घ्या माझा चेहरा
या गोंडस, लोभस मित्रासाठी
प्रेमाची पखाल करा
लाल करा ओ माझी लाल करा
येता जाता लाल करा
नका कटू कधी बोलत जाऊ
बनेन मग मी शंभू न शाहू
मी स्वप्न पाहत नाही
कारण , मला ते पडत नाही
नेहेमी ठरवतो आज झोपल्यावर स्वप्न बघायचे
काहीतरी वेगळंच बनायचे
मी पडतो , लकटतो त्या पलंगावर
विचार हाच असतो , कि आज स्वप्न बघायचे
डोळे काही मिटत नसतात
स्वप्न कुठले बघायचे नि कसे ?
याचेच विचार मनात घोळत असतात
हळूहळू झापड यायला लागते
डोळे जड होत जातात , निद्रादेवी प्रसन्न होते
मिट्ट काळोख , कसलीही आठवण नाही , कसलीच साठवण नाही
डोळे उघडतात , पण तोंडावर पाणी शिंपडून
पुन्हा एक तासभर पलंगावर तस्साच पडून राहतो
दोन भिकारी भीक मागती
पुलाखाली करिती वस्ती
नेहेमी नेहेमी करुन याचना
भुलवी फसवी पांथस्थांना
एके दिवशी सांज वेळी
अशीच होती रीती झोळी
कोसुनी त्या चंद्रमौळी
करिती याचना भरण्या झोळी
धूर प्रकटला, डोळे दिपले
शिवशंभोने दर्शन दिधले
दोघांसी तीन अंडे दिले
इच्छा धरुनी फोड तयासी
इप्सित मिळेल त्वरित तुम्हांसी
दोघेही ते खुश जाहले
परतीच्या प्रवासा निघाले
दोघांच्याही दोन वेगळ्या वाटा
जाण्यापूर्वी गळाभेटा
वर्षानंतर भेटू पुन्हा आपण
देऊ यथेच्छ एकमेका आलिंगन
तिच्या आवडीनिवडीसाठीच
मी मैत्रीलाच गहाण ठेवलं
ते बोलावयाचे नेहेमी मजला
यायला सांगायचे नाक्यावर
एकही धड वाटत नव्हता तिला
एकेकाचं हळूहळू शिरकाण करून टाकलं
शिकाऱ्यावानी माग काढत होती माझा
नजरेत असावं म्हणून समोरच मचाण बांधून टाकलं
त्यांना खबर पोहोचताच याची
सुटकेसाठी त्यांनी जीवाचं रान करून टाकलं
लग्नाआधीच तिच्याविरुद्ध माझं कान भरून टाकलं
चंडी रूप धारण करून मग तिनं
सर्वांचंच पायताण करून टाकलं
प्रत्येक चीअर्सबरोबर एकेक थेम्ब सर्वानी ओवाळून टाकला
एक कागद कस्पटासम, रद्दीमध्ये फरपटला
जसा जीव हा आप्तांमधुनी, गर्दीमध्ये भरकटला
एक कागद कस्पटासम ||धृ ।।
एक बालक हाती घेई,
मायेने मग आकार देई,
बनता त्याचे जहाज हवाई, उंच तया उडविला ।। १ ।।
उंच विहरता मन स्वच्छंदी,
हीन भासली भुतल रद्दी,
वाटे मनासी खाशी शक्ती, दैवचि अर्पि मजला ।। २ ।।
वाटे त्यासी उंच उडावे
वादळ वारे यांसी भिडावे
कांबीटाचा कणा देउनी, पतंग सुंदर केला ।। ३ ।।
इतकी उंची तये गाठली
साद मनीची नभी आटली
ढील देण्या जाता बालक, मांजा संपून गेला ।। ४ ।।
काही करण्या उरले नसता । आपली पाटी कोरी असता ।
काही बकांची ध्यानस्थ स्तब्धता । मत्स्यमारीकारणे ।।
दिसता कोणीही नवखा । लबाड साधिती मोका ।
त्याची बुडवती नौका । लागलीच ।।
पाडावी भोके यथेच्छ । भाषा तरी वापरावी स्वच्छ ।
भासवावे तयाते तुच्छ । आत्मक्लेशे ।।
कवीचे उडवावे शिरस्त्राण । मागाहुनि करावे शिरकाण ।
मनसोक्त मारावे पादत्राण । कवितेवरी ।।
आपण गाडिले कुठे झेंडे । आपल्या कापसा किती बोंडे ।
सगळे विसरून फेकती अंडे । अशावेळी ।।
अशाने होते तरी काय । कवी हतोत्साही होऊन जाय ।
परि अंतरी लागते हाय । कायमची ।।