त्यागी गजानना तुझ्या शौर्याला शतशः नमन
चैतत्न्याने प्रफुल्लित करणार्या
सृष्टी आणि प्रकृतीच्या
रक्षाबंधनाच्या
कर्तव्याला पाळण्यासाठी
साक्षात रुद्राच्या
रौद्ररुपाला झेलणार्या
त्यागी गजानना तुझ्या शौर्याला
आमचे शतशः नमन असो.
चैतत्न्याने प्रफुल्लित करणार्या
सृष्टी आणि प्रकृतीच्या
रक्षाबंधनाच्या
कर्तव्याला पाळण्यासाठी
साक्षात रुद्राच्या
रौद्ररुपाला झेलणार्या
त्यागी गजानना तुझ्या शौर्याला
आमचे शतशः नमन असो.
नकोच ते युद्ध नको
नकोच ते मृत्यू नको
सहन न होणार्या वेदना
नकोच नको
पैशापायी जायी पैसा
युद्धापायी भरडते जनता
भावनेला घालती गोळी
"युद्धच हवे" बोलतो वर नेता
रणभुमीवर कुणी मारतो कुणी मरतो
बाप, मुलगा, नवरा, भाऊ जातो
घर दार कोसळूनी होते सुने
नशीबी राही केवळ वाट पहाणे
जमावात बातमी युद्धाची ऐकता
विरश्री संचारून अंगी हाताच्या मुठी वळतसे
परी कुणी एकच घरचा धारातिर्थी पडता
युद्ध नको, युद्ध नकोच शब्द वदनी येतसे
- पाषाणभेद
०२/०३/२०२२
कर्नाटकची राजधानी बंगळुरुमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची शुक्रवार १७/१२/२०२१ रोजी विटंबना करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
नका उखडू पुतळे आदर्शाचे
जे आम्हा पुजनीय असती
नका विटंबवू आदर्श आमचे
जे आमच्या हृदयात वसती
हे पुतळे नेहमीचे साधे नाहीत
अगदीच लेचेपेचे नाहीत
ते जीवंत जरी नसले तरीही
कार्य त्यांचे तळपत राहील
पुतळे जरी नष्ट केले
आदर्श नष्ट होत नसतात
त्यांच्या येथल्या असण्याने
तुम्ही येथे राहत असतात
- पाषाणभेद
२०/१२/२०२१
पाना फुलांवरूनी, फिरतो कधी जरासा?
शायरीचा मम मनाला, यत्किंचित गन्ध नाही!
शब्दांवरी जरासा, आहे लोभ मनाचा
सहसा तसा तयांना, मी हात लावत नाही!
अर्थास प्राप्त होता,शब्दास जाग यावी
ऐश्या प्रभावितेची,मी साक्ष मागत नाही!
मी सहजतेचा प्रवासी,असतो तिच्याचपाशी
रचनेत हाव रचितेची ,अशीही मनात नाही!
जावे तिच्या कुशीशी,घेऊन ऊब यावे
सहजता माऊली ही, असते मनात माझी!
भेटेन मात्र आता, पुन्हा कधी? कसाही?
ही वाट मात्र माझी,नेहमीचीच नाही!
अतृप्त...
०====०====०====०====०====०====०====
यशाचे आता गा मंगल गान
विजय मिळाला, आनंद झाला,
यशाचे आता गा मंगल गान
बिगूल वाजला, रणभेरी वाजल्या,
समरगीत गावूनी घ्या तानेवरती तान ||धृ||
बलाढ्य असा तो शत्रू होता,
तोफा बंदूका शस्त्रसज्जता
फंद फितूरी किती करविली,
अंती आपणच ठरलो विजेता
विजयाचे गीत म्हणा आता, अन नर्तन करा बेभान ||१||
युद्धखोरपणा उगा नका दाखवू,
शत्रृ रणांगणी पाहून घेवू
युद्धभुमी प्रिय आम्हा वीरांस,
लढता लढता मरण पत्करू
शरणागती नसे कदापी, ध्वजासवे उंच करू आमची मान ||२||
- पाषाणभेद
२५/११/२०१९
देशभक्ति समुहगीत: भारतभूचे सुपुत्र आम्ही
भारतभूचे सुपुत्र आम्ही तिचीच आम्ही पूजा करू
अन तिचेच गावू गान
वंदन करुनी भारतभूला त्रिवार प्रणाम त्रिवार प्रणाम त्रिवार प्रणाम || धृ||
देशासाठी कितीक झटले
कितीक हुतात्मे अमर जाहले
स्मृती तयांची आज येतसे
स्वात्रंत्र्यासाठी लढले अन तयांनी त्यागले प्राण
त्रिवार प्रणाम त्रिवार प्रणाम त्रिवार प्रणाम ||१||
आमचं ठरलयं, संयुक्त महाराष्ट्रात बेळगाव उरलंय
चल उठ मराठी गड्या पुन्हा एकदा लढ लढा
बोल की आता आमचं ठरलयं
आमचं ठरलयं अन
संयुक्त महाराष्ट्रात बेळगाव उरलंय ||धृ||
नको कानडी सोन्याचा घास
लावील तो आम्हाला फास
किती मार आता सहन करायचा?
मुकाट अन्याय किती सोसायचा?
सरकारनं अपमानाचं जीणं केलंय
म्हणूनचं आमचं ठरलयं अन
संयुक्त महाराष्ट्रात बेळगाव उरलंय ||१||
जगदंबेच्या हातामधली शस्त्र शलाका विजयी होवो
रणचंडीचे स्मरण दुर्जना सदैव तुजला मनात होवो
ज्यांच्या हाती शस्त्र दुधारी त्यांचा बुद्धीभेद न होवो
नाही ज्यांच्या हाती काही त्यांचे घरटे सुखरुप होवो
आज निकामी शस्त्रे ज्यांची वृक्ष शमीचा त्यांना लाभो
सरुन जावो अज्ञाताचा काळ सुखाचा फिरुन येवो
सोन्याचा हा दिवस आजचा उजळ होऊ दे तुझ्या अंगणी
बलवानांचे मस्तक राज्ञी विनम्र होऊ दे तुझ्याच चरणी
दसऱ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
शिवकन्या
चाल :-
बीज अंकूरे अंकूरे (जिथे चालीत निमुट पणे बसणार नाही तिकडे दडपून कोंबा)
ही चाल जमली नाही तर "डोळे कशा साठी"च्या चालीत बसवा,
तेही नाही जमले तर "शुरा मी वंदीले"
ते ही नाही जमले तर "आज ब्लु है पानी पानी"
ते ही नाही जमले तर "अरुणी किरणी धरणी गगन झलके"
आणि ते ही नाही जमले तर नुसती वाचा.
(दुपारी)
तिच्या पायरवाची गाज,
त्याने दडपली छाती,
जैसे वीसमणी हातोड्याने
घाव घणाचे घालती,
स्वामी चरणी समर्पित
...
डोक्यातील उजेड कमीकमी होऊ लागला
वाचण्यातील साधेपणा संपू लागला
तेव्हा मी धागा काढण्याचा विचार करू लागतोच....
तर्कशुद्धीला ठेंगा, वायफळांचा मळा
आशयाची पातळी इतकी खोल
इतकी खोल....
कि आतला हेतूच दिसेनासा झाला !
धागा काढल्यावर चर्चा होईलच
हे मी तरी कशाच्या आधारावर ठरवले?
डोक्यातील उजेड संपताना, संपू द्यावा
उगाचच हसे होताना, होउ द्यावे
मुळातच धागा बदबदा काढू नये
वाचकांना कष्ट देऊ नयेत .....
इतकेच काय स्वधाग्याचीही वाट लावू नये