मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

फ्रॅन्केनस्टाइन

प्रचेतस ·

टर्मीनेटर Tue, 01/06/2026 - 10:02
चित्रपट परिचय आवडला 👍
ह्या कथेवर असंख्य वेगवेगळे चित्रपट निघाले,
त्यातले काही पाहिले आहेत आणि एक अनुवादीत कादंबरी वाचली आहे. सध्या 'मनी हाईस्ट' चा दुसरा सिझन बघायला घेतलाय. नेटफ्लिक्स वरचा नवा 'फ्रॅन्केनस्टाइन' चांगला आहे म्हणताय तर आज मनी हाईस्टचे दोनेक एपिसोड कमी बघुन हा चित्रपट बघतो आणि मग अभिप्राय देतो.

In reply to by टर्मीनेटर

टर्मीनेटर गुरुवार, 01/08/2026 - 10:55
काल रात्री बघितला, आधी पाहिलेल्यांपेक्षा हा जास्ती चांगला वाटला. चित्रपटाच्या 'व्हिक्टर्स टेल' ह्या पहिल्या अध्यायापेक्षा 'द क्रिएचर्स टेल' हा दुसरा अध्याय मला जास्ती आवडला! एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातला कालखंड, त्याकाळची वेशभूषा, केशभूषा अशा गोष्टी योग्यप्रकारे दाखवण्यावर मेहनत घेतलेली दिसते. अवांतर: व्हिक्टरच्या प्रयोगशाळेची इमारत (टॉवर) बघून मागे चित्रगुप्त काकांनी 'मोकलाया दाहि दिश्या' ह्या मिपावरच्या अजरामर कवितेसाठी तयार केलेले 'रमलचित्र' आठवले 😀

In reply to by टर्मीनेटर

प्रचेतस गुरुवार, 01/08/2026 - 19:38
क्रिचर्स टेल भारीच आहे. पण मला व्हिक्टर्स टेल मधला शेवटचा भाग जास्त आवडला जेव्हा व्हिक्टर कॅसलला आग लावतो आणि तो जीव जीवाच्या आकांताने व्हिक्टर व्हिक्टर ओरडतो आणि त्याने त्याचे क्षणिक परिवर्तन होते.

In reply to by प्रचेतस

टर्मीनेटर Sat, 01/10/2026 - 12:10
सहमत आहे. एकंदरीत चित्रपटाचा इम्पॅक्ट चांगलाच आहे, पण दुसरा अध्याय जास्त भावला. आणि हो, तुम्ही लेखात लिहिलंय,
"ह्या कथेवर असंख्य वेगवेगळे चित्रपट निघाले, ह्यातले सर्वात प्रसिद्ध म्हणजे १९३१ सालचा 'फ्रॅन्केनस्टाईन' आणि १९३५ सालचा 'ब्राईड ऑफ फ्रॅन्केनस्टाईन' मात्र हे दोन्ही चित्रपट पाहिले नाहीत."
हे दोन्ही चित्रपट मी पण पाहिले नाहीयेत आणि इतके जुने चित्रपट आता पाहू शकण्याची 'शून्य' शक्यता असल्याने ह्या नव्या आणि सर्वात जुन्यात काय फरक आहे हे समजून घेण्यासाठी विकिपीडियाला भेट दिली असता बरीच माहिती मिळाली, त्यातली खालील माहिती रोचक वाटली... 'The film was banned in China due to falling under the category of "superstitious films" as a result of its "strangeness" and unscientific elements.' आणि हे वाचल्यावर लहानपणी वाचलेल्या फास्टर फेणेच्या कुठल्यातरी एका पुस्तकातले हे गाणे आठवले एकदम. "लाल चीन की पिली चमडी मन का काला रंग... अजीब इनका ढंग रे भैया अजीब इनका ढंग..." (गाण्याचे हे आठवणारे बोल बरोबर आहेत का आणि हे कुठल्या पुस्तकात होते हे सांगेल का कोणी?)

In reply to by टर्मीनेटर

सिरुसेरि Tue, 01/13/2026 - 18:04
हे गाणे "फास्टर फेणेचा रणरंग" या पुस्तकातले आहे . या प्रतिसादामुळे फाफे , भारा , चिनि माका या वाचन खुणा परत आठवल्या . "फ्रॅन्केस्टाईन" हा चित्रपट या आधी १९९५ साली वेगळ्या कलाकारांसह प्रदर्शित झाला होता . त्यामधे रॉबर्ट डी निरो या अभिनेत्याने मुख्य भुमिका केली होती .

In reply to by सिरुसेरि

गवि Tue, 01/13/2026 - 18:17
+१ आणि त्याच्या पुढे : "इनके पीछे खंग" असे ती पोरे जोडतात. नेफा भागात खंग म्हणजे गेंडा असे असावे. - (फक्त) जुने(च) सर्व नीट आठवणारा गवि

In reply to by गवि

टर्मीनेटर Wed, 01/14/2026 - 08:14
"इनके पीछे खंग"/ नेफा भागात खंग म्हणजे गेंडा असे असावे.
अच्छा 👍
(फक्त) जुने(च) सर्व नीट आठवणारा
मला पण हल्ली मिपावर आल्यावर खूप जुन्या जुन्या गोष्टी आठवतात आणि मन भूतकाळात रमते...

Bhakti Tue, 01/06/2026 - 10:45
एक प्रश्न आहे. व्हिक्टर वेगवेगळ्या मृत व्यक्तींचे वेगवेगळे अवयव घेऊन नवीन शरीर का बनवतो.एकच मृत शरीर का वापरत नाही?

In reply to by Bhakti

प्रचेतस Tue, 01/06/2026 - 13:34
सतत प्रयोग करत राहून, चुकांपासून शिकत जाऊन वेगवेगळे सर्वोत्तम अवयव वापरुन एका जीवाची निर्मिती करण्याच्या वेडाने तो पछाडलेला असतो.

In reply to by प्रचेतस

Bhakti Tue, 01/06/2026 - 14:38
अच्छा +१
परंतु त्याच्यात जीव आल्यावर त्याच्या भयानक रुपामुळे व्हिक्टर त्याला स्वीकारत नाही आणि आपली निर्मिती नष्ट करण्यासाठी
आपल्याच निर्मितीला व्हिक्टर समजण्याआधी नाकारतो,इथेच शोकान्तिका सुरु होते.

तर, चित्रपट आवडला. एका बापाकडून अपेक्षित प्रेम मिळालं नाही, असा व्हीक्टर आणि त्याच्याकडूनच आपल्या अहंकारासाठी एका 'अनाथ' अमानवी जीव तयार केला पण जेव्हा पालकत्वाची जवाबदारी येते तेव्हा पळ काढणारा व्हीक्टर आणि दोघांच्याही वाट्याला आलेली शोकांतिका अशा भावभावनांचा भन्नाट चित्रपट आहे. आवडला. जुने किल्ले, अंधार, वादळी हवामान, गूढ वातावरण आणि ती प्रेतं कराकरा कापणे. च्यायला, लै ताण झाला. पण पाहिला. सुंदर एलीझाबेथ सगळं भारी. नव्या तंत्रज्ञानाने माणूस एक नवा माणूस तयार करेल अगदी दुसरा माणूस पण आपण त्याला सांभाळू शकू का असाही एक विचार मनात आला. प्रेम, तिरस्कार, सूड या भावना त्या यंत्रात भरल्या नंतर तो माणूस म्हणून आपल्याशी कसा वागेल असा प्रश्नच हा चित्रपट आपल्यापुढे निर्माण करतो. डेल टारो भावभावनांची गुंतागुंत उभा करण्यात कमालीचा यशस्वी ठरला असे वाटले. वल्ली उर्फ प्रचेतस यांनी चांगला सिनेमा सुचवला समस्त मिपापरिवाराच्या वतीने शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात येत आहे. धन्यवाद. ;) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गवि Fri, 01/09/2026 - 13:37
पुष्पगुच्छ
स्पेलिंग चुकले काय ? पूस्प्गूच्च म्हणायचे आहे का ?

In reply to by गवि

मिपा भाषेत 'पूस्प्गूच्च' देण्यात येत आहे. बाकी स्वभावाचं उन्नीस बीस असू शकेल पण लेखन म्हणजे प्रचेतस यांचं नंबर एक असतं. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टर्मीनेटर Sat, 01/10/2026 - 12:33
जुने किल्ले, अंधार, वादळी हवामान, गूढ वातावरण आणि ती प्रेतं कराकरा कापणे. च्यायला, लै ताण झाला.
खरं आहे 😀 'ती' दृष्ये बघण्याच्या आधी कत्तलखानाछाप परिसरातील व्हिक्टरचे घर, जनावरांच्या रक्ताने माखलेला रस्ता आणि आजुबाजुच्या दुकानांमध्ये कापुन टांगलेले जनावरांचे मांस अशा गोष्टी दाखवुन डेल टारो प्रेक्षकांच्या मनाची पुर्वतयारी करुन घेतो ह्यातुन त्याचे दिग्दर्शकीय कौशल्य देखील दिसुन येते!

In reply to by टर्मीनेटर

योग्य अमानवीय जीव तयार करायला योग्य माणसांची निवड करतांना भाजीपाल्यासारखं निरखून घेणे आणि खटाखट फासावर लटकावणे, तडफडायला लावणे लैच क्रूर. दिग्दर्शकीय कौशल्य खरंच कमाल आहे. आता संत तुकाराम वगैरे चित्रपट पाहणे आले त्याशिवाय या सिनेमाचे कोमल मनावर पडलेले ओरखडे जाणार नाहीत. वल्ली उर्फ प्रचेतस हळव्या मनाच्या माणसांचा विचार न करता सिनेमा बघायला लावतो. अशा सिनेमांची ओळख टाकताना, डिस्क्लेमवर वगैरे टाकायला पाहिजेत. दिवसेंदिवस लोक माणूसकी शुन्य होत चालले आहेत, संवेदना नावाची गोष्ट काही राहिलीच नाही. :( -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गवि Sat, 01/10/2026 - 13:39
परखड प्रतिसाद आवडला. आपला मित्र असला म्हणून काय झाले? बीभत्स आणि अघोरी ते बीभत्स आणि अघोरीच. असते म्हणा एकेकाची आवड. बाकी स्वभाव बरा आहे याच्याशी सहमत आहे.

In reply to by गवि

प्रचेतस Sat, 01/10/2026 - 15:14
तुम्ही दोघेही जीवश्चकंठश्च मित्र म्हणजे एकमेकांचे बहिश्चर प्राणच जणू. एक आला की दुसरा तिथे लगेच येतोच. त्यातही मिपावर इतकी वर्षे दोघेही मुरलेले असूनही दोघांच्याही मनात अजूनही कोमल भावना आहेत हे पाहून आनंद झाला. जय विरुनंतर तुम्ही दोघेच. तुम्हा दोघांचे हे अद्वैत मोठेविलक्षण आहे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टर्मीनेटर Sat, 01/10/2026 - 13:52
आता संत तुकाराम वगैरे चित्रपट पाहणे आले त्याशिवाय या सिनेमाचे कोमल मनावर पडलेले ओरखडे जाणार नाहीत.
कोमल मनावर पडलेले ओरखडे घालवण्यासाठी मी "श्यामची आई" ११ वेळा बघायचा विचार करत होतो... त्यानेही हँगओव्हर नाही उतरला तर आता तुमच्या सुचवणीप्रमाणे 'सुधारित उतारा' म्हणुन 'संत तुकाराम' पण बघावा म्हणतो 😀

कांदा लिंबू Sun, 01/11/2026 - 20:55
कॉलेज जीवनात Frankenstein कादंबरी पहिल्यांदा वाचली होती, नंतर ही काही वेळा वाचण्यात आली. परीक्षा छान लिहिले आहे; सिनेमा पाहून पुन्हा इथे लिहीन. Frankenstein (2025)

Bhakti गुरुवार, 01/22/2026 - 20:55
Key Nominations for Frankenstein (2026 Oscars): Best Picture Best Adapted Screenplay: Guillermo del Toro Best Supporting Actor: Jacob Elordi (The Creature) Best Cinematography: Dan Laustsen Best Costume Design: Kate Hawley Best Makeup & Hairstyling Best Production Design: Tamara Deverell Best Sound Best Original Score: Alexandre Desplat

टर्मीनेटर Tue, 01/06/2026 - 10:02
चित्रपट परिचय आवडला 👍
ह्या कथेवर असंख्य वेगवेगळे चित्रपट निघाले,
त्यातले काही पाहिले आहेत आणि एक अनुवादीत कादंबरी वाचली आहे. सध्या 'मनी हाईस्ट' चा दुसरा सिझन बघायला घेतलाय. नेटफ्लिक्स वरचा नवा 'फ्रॅन्केनस्टाइन' चांगला आहे म्हणताय तर आज मनी हाईस्टचे दोनेक एपिसोड कमी बघुन हा चित्रपट बघतो आणि मग अभिप्राय देतो.

In reply to by टर्मीनेटर

टर्मीनेटर गुरुवार, 01/08/2026 - 10:55
काल रात्री बघितला, आधी पाहिलेल्यांपेक्षा हा जास्ती चांगला वाटला. चित्रपटाच्या 'व्हिक्टर्स टेल' ह्या पहिल्या अध्यायापेक्षा 'द क्रिएचर्स टेल' हा दुसरा अध्याय मला जास्ती आवडला! एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातला कालखंड, त्याकाळची वेशभूषा, केशभूषा अशा गोष्टी योग्यप्रकारे दाखवण्यावर मेहनत घेतलेली दिसते. अवांतर: व्हिक्टरच्या प्रयोगशाळेची इमारत (टॉवर) बघून मागे चित्रगुप्त काकांनी 'मोकलाया दाहि दिश्या' ह्या मिपावरच्या अजरामर कवितेसाठी तयार केलेले 'रमलचित्र' आठवले 😀

In reply to by टर्मीनेटर

प्रचेतस गुरुवार, 01/08/2026 - 19:38
क्रिचर्स टेल भारीच आहे. पण मला व्हिक्टर्स टेल मधला शेवटचा भाग जास्त आवडला जेव्हा व्हिक्टर कॅसलला आग लावतो आणि तो जीव जीवाच्या आकांताने व्हिक्टर व्हिक्टर ओरडतो आणि त्याने त्याचे क्षणिक परिवर्तन होते.

In reply to by प्रचेतस

टर्मीनेटर Sat, 01/10/2026 - 12:10
सहमत आहे. एकंदरीत चित्रपटाचा इम्पॅक्ट चांगलाच आहे, पण दुसरा अध्याय जास्त भावला. आणि हो, तुम्ही लेखात लिहिलंय,
"ह्या कथेवर असंख्य वेगवेगळे चित्रपट निघाले, ह्यातले सर्वात प्रसिद्ध म्हणजे १९३१ सालचा 'फ्रॅन्केनस्टाईन' आणि १९३५ सालचा 'ब्राईड ऑफ फ्रॅन्केनस्टाईन' मात्र हे दोन्ही चित्रपट पाहिले नाहीत."
हे दोन्ही चित्रपट मी पण पाहिले नाहीयेत आणि इतके जुने चित्रपट आता पाहू शकण्याची 'शून्य' शक्यता असल्याने ह्या नव्या आणि सर्वात जुन्यात काय फरक आहे हे समजून घेण्यासाठी विकिपीडियाला भेट दिली असता बरीच माहिती मिळाली, त्यातली खालील माहिती रोचक वाटली... 'The film was banned in China due to falling under the category of "superstitious films" as a result of its "strangeness" and unscientific elements.' आणि हे वाचल्यावर लहानपणी वाचलेल्या फास्टर फेणेच्या कुठल्यातरी एका पुस्तकातले हे गाणे आठवले एकदम. "लाल चीन की पिली चमडी मन का काला रंग... अजीब इनका ढंग रे भैया अजीब इनका ढंग..." (गाण्याचे हे आठवणारे बोल बरोबर आहेत का आणि हे कुठल्या पुस्तकात होते हे सांगेल का कोणी?)

In reply to by टर्मीनेटर

सिरुसेरि Tue, 01/13/2026 - 18:04
हे गाणे "फास्टर फेणेचा रणरंग" या पुस्तकातले आहे . या प्रतिसादामुळे फाफे , भारा , चिनि माका या वाचन खुणा परत आठवल्या . "फ्रॅन्केस्टाईन" हा चित्रपट या आधी १९९५ साली वेगळ्या कलाकारांसह प्रदर्शित झाला होता . त्यामधे रॉबर्ट डी निरो या अभिनेत्याने मुख्य भुमिका केली होती .

In reply to by सिरुसेरि

गवि Tue, 01/13/2026 - 18:17
+१ आणि त्याच्या पुढे : "इनके पीछे खंग" असे ती पोरे जोडतात. नेफा भागात खंग म्हणजे गेंडा असे असावे. - (फक्त) जुने(च) सर्व नीट आठवणारा गवि

In reply to by गवि

टर्मीनेटर Wed, 01/14/2026 - 08:14
"इनके पीछे खंग"/ नेफा भागात खंग म्हणजे गेंडा असे असावे.
अच्छा 👍
(फक्त) जुने(च) सर्व नीट आठवणारा
मला पण हल्ली मिपावर आल्यावर खूप जुन्या जुन्या गोष्टी आठवतात आणि मन भूतकाळात रमते...

Bhakti Tue, 01/06/2026 - 10:45
एक प्रश्न आहे. व्हिक्टर वेगवेगळ्या मृत व्यक्तींचे वेगवेगळे अवयव घेऊन नवीन शरीर का बनवतो.एकच मृत शरीर का वापरत नाही?

In reply to by Bhakti

प्रचेतस Tue, 01/06/2026 - 13:34
सतत प्रयोग करत राहून, चुकांपासून शिकत जाऊन वेगवेगळे सर्वोत्तम अवयव वापरुन एका जीवाची निर्मिती करण्याच्या वेडाने तो पछाडलेला असतो.

In reply to by प्रचेतस

Bhakti Tue, 01/06/2026 - 14:38
अच्छा +१
परंतु त्याच्यात जीव आल्यावर त्याच्या भयानक रुपामुळे व्हिक्टर त्याला स्वीकारत नाही आणि आपली निर्मिती नष्ट करण्यासाठी
आपल्याच निर्मितीला व्हिक्टर समजण्याआधी नाकारतो,इथेच शोकान्तिका सुरु होते.

तर, चित्रपट आवडला. एका बापाकडून अपेक्षित प्रेम मिळालं नाही, असा व्हीक्टर आणि त्याच्याकडूनच आपल्या अहंकारासाठी एका 'अनाथ' अमानवी जीव तयार केला पण जेव्हा पालकत्वाची जवाबदारी येते तेव्हा पळ काढणारा व्हीक्टर आणि दोघांच्याही वाट्याला आलेली शोकांतिका अशा भावभावनांचा भन्नाट चित्रपट आहे. आवडला. जुने किल्ले, अंधार, वादळी हवामान, गूढ वातावरण आणि ती प्रेतं कराकरा कापणे. च्यायला, लै ताण झाला. पण पाहिला. सुंदर एलीझाबेथ सगळं भारी. नव्या तंत्रज्ञानाने माणूस एक नवा माणूस तयार करेल अगदी दुसरा माणूस पण आपण त्याला सांभाळू शकू का असाही एक विचार मनात आला. प्रेम, तिरस्कार, सूड या भावना त्या यंत्रात भरल्या नंतर तो माणूस म्हणून आपल्याशी कसा वागेल असा प्रश्नच हा चित्रपट आपल्यापुढे निर्माण करतो. डेल टारो भावभावनांची गुंतागुंत उभा करण्यात कमालीचा यशस्वी ठरला असे वाटले. वल्ली उर्फ प्रचेतस यांनी चांगला सिनेमा सुचवला समस्त मिपापरिवाराच्या वतीने शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात येत आहे. धन्यवाद. ;) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गवि Fri, 01/09/2026 - 13:37
पुष्पगुच्छ
स्पेलिंग चुकले काय ? पूस्प्गूच्च म्हणायचे आहे का ?

In reply to by गवि

मिपा भाषेत 'पूस्प्गूच्च' देण्यात येत आहे. बाकी स्वभावाचं उन्नीस बीस असू शकेल पण लेखन म्हणजे प्रचेतस यांचं नंबर एक असतं. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टर्मीनेटर Sat, 01/10/2026 - 12:33
जुने किल्ले, अंधार, वादळी हवामान, गूढ वातावरण आणि ती प्रेतं कराकरा कापणे. च्यायला, लै ताण झाला.
खरं आहे 😀 'ती' दृष्ये बघण्याच्या आधी कत्तलखानाछाप परिसरातील व्हिक्टरचे घर, जनावरांच्या रक्ताने माखलेला रस्ता आणि आजुबाजुच्या दुकानांमध्ये कापुन टांगलेले जनावरांचे मांस अशा गोष्टी दाखवुन डेल टारो प्रेक्षकांच्या मनाची पुर्वतयारी करुन घेतो ह्यातुन त्याचे दिग्दर्शकीय कौशल्य देखील दिसुन येते!

In reply to by टर्मीनेटर

योग्य अमानवीय जीव तयार करायला योग्य माणसांची निवड करतांना भाजीपाल्यासारखं निरखून घेणे आणि खटाखट फासावर लटकावणे, तडफडायला लावणे लैच क्रूर. दिग्दर्शकीय कौशल्य खरंच कमाल आहे. आता संत तुकाराम वगैरे चित्रपट पाहणे आले त्याशिवाय या सिनेमाचे कोमल मनावर पडलेले ओरखडे जाणार नाहीत. वल्ली उर्फ प्रचेतस हळव्या मनाच्या माणसांचा विचार न करता सिनेमा बघायला लावतो. अशा सिनेमांची ओळख टाकताना, डिस्क्लेमवर वगैरे टाकायला पाहिजेत. दिवसेंदिवस लोक माणूसकी शुन्य होत चालले आहेत, संवेदना नावाची गोष्ट काही राहिलीच नाही. :( -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गवि Sat, 01/10/2026 - 13:39
परखड प्रतिसाद आवडला. आपला मित्र असला म्हणून काय झाले? बीभत्स आणि अघोरी ते बीभत्स आणि अघोरीच. असते म्हणा एकेकाची आवड. बाकी स्वभाव बरा आहे याच्याशी सहमत आहे.

In reply to by गवि

प्रचेतस Sat, 01/10/2026 - 15:14
तुम्ही दोघेही जीवश्चकंठश्च मित्र म्हणजे एकमेकांचे बहिश्चर प्राणच जणू. एक आला की दुसरा तिथे लगेच येतोच. त्यातही मिपावर इतकी वर्षे दोघेही मुरलेले असूनही दोघांच्याही मनात अजूनही कोमल भावना आहेत हे पाहून आनंद झाला. जय विरुनंतर तुम्ही दोघेच. तुम्हा दोघांचे हे अद्वैत मोठेविलक्षण आहे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टर्मीनेटर Sat, 01/10/2026 - 13:52
आता संत तुकाराम वगैरे चित्रपट पाहणे आले त्याशिवाय या सिनेमाचे कोमल मनावर पडलेले ओरखडे जाणार नाहीत.
कोमल मनावर पडलेले ओरखडे घालवण्यासाठी मी "श्यामची आई" ११ वेळा बघायचा विचार करत होतो... त्यानेही हँगओव्हर नाही उतरला तर आता तुमच्या सुचवणीप्रमाणे 'सुधारित उतारा' म्हणुन 'संत तुकाराम' पण बघावा म्हणतो 😀

कांदा लिंबू Sun, 01/11/2026 - 20:55
कॉलेज जीवनात Frankenstein कादंबरी पहिल्यांदा वाचली होती, नंतर ही काही वेळा वाचण्यात आली. परीक्षा छान लिहिले आहे; सिनेमा पाहून पुन्हा इथे लिहीन. Frankenstein (2025)

Bhakti गुरुवार, 01/22/2026 - 20:55
Key Nominations for Frankenstein (2026 Oscars): Best Picture Best Adapted Screenplay: Guillermo del Toro Best Supporting Actor: Jacob Elordi (The Creature) Best Cinematography: Dan Laustsen Best Costume Design: Kate Hawley Best Makeup & Hairstyling Best Production Design: Tamara Deverell Best Sound Best Original Score: Alexandre Desplat
लेखनविषय:
लेखनप्रकार
a मेरी शेलीची एकमेव कादंबरी असलेली 'फ्रॅन्केनस्टाईन ऑर द मॉडर्न प्रोमेथियस' ही कादंबरी खरं तर फार पूर्वीच वाचली होती. व्हिक्टोरियन गॉथिक काळात घडले गेलेले कथानक अतिशय जबरदस्त होते. खरे ब्रॅम स्ट्रोकरची ड्रॅक्युला आणि शेलीची फ्रॅन्केनस्टाईन आजही जागतिक साहित्यात अभिजात म्हणून गणल्या जातात. खरं तर भयकादंबर्‍यांना असा दर्जा मिळणे हे भाग्याचेच.

गावाची ख्याती

विजुभाऊ ·

सौन्दर्य गुरुवार, 09/25/2025 - 00:05
खूप वर्षांपूर्वी सिमला-कुलु-मनालीच्या ट्रीपला निघालो होतो. आम्ही एकूण चार कुटुंबे, एकूण सदस्य १५ -१६ जण होतो. ट्रीपच्या दरम्यान अनेक लहान - मोठ्या ढाब्यांवर जेवलो, कित्येक वेळा प्रत्येकाने वेगवेगळी ऑर्डर दिली, परुंतु पैसे देताना तोंडी घेतलेली ऑर्डर, ढाब्यावरचा मुलगा तोंडीच गल्ल्यावरच्या माणसाला सांगायचा व आश्चर्य म्हणजे कधीच आमच्याकडून जास्त पैसे, अगदी चुकीने देखील घेतले गेले नाहीत . हीच कथा मध्यप्रदेशची. राजस्थानची टूर मात्र फारच त्रासदायक ठरली होती, पावलो पावली फसवेगिरी अनुभवास आली.

सौन्दर्य गुरुवार, 09/25/2025 - 00:05
खूप वर्षांपूर्वी सिमला-कुलु-मनालीच्या ट्रीपला निघालो होतो. आम्ही एकूण चार कुटुंबे, एकूण सदस्य १५ -१६ जण होतो. ट्रीपच्या दरम्यान अनेक लहान - मोठ्या ढाब्यांवर जेवलो, कित्येक वेळा प्रत्येकाने वेगवेगळी ऑर्डर दिली, परुंतु पैसे देताना तोंडी घेतलेली ऑर्डर, ढाब्यावरचा मुलगा तोंडीच गल्ल्यावरच्या माणसाला सांगायचा व आश्चर्य म्हणजे कधीच आमच्याकडून जास्त पैसे, अगदी चुकीने देखील घेतले गेले नाहीत . हीच कथा मध्यप्रदेशची. राजस्थानची टूर मात्र फारच त्रासदायक ठरली होती, पावलो पावली फसवेगिरी अनुभवास आली.
लेखनविषय:
लेखनप्रकार
परवा इथे विले पार्ल्यात गाण्यातल्या मित्रासोबत एका रजवाडी चहाच्या दुकानात चहा प्यायलो. सोबत काही बिस्किटे ही खाल्ली.

मित्रमंडळांची नावे

विजुभाऊ ·

विजुभाऊ Mon, 09/15/2025 - 18:37
अहमदनगरला एक बोर्ड पाहिला होता " अचानक तरुण मंडळ" वाचून खूप हसलो होतो. कदचित ज्या तरुणाना आपण तरुण झाल्याची जाणीव अचानक झाली असेल असे तरुण यात असतील यावरून एक शेर आठवला जवां होने लगे जब वो तो हमसे कर लिया परदा हया यकलख़्त आई और शबाब आहिस्ता आहिस्ता

पुण्यात "प्रतिष्ठाण" चे पेव फुटले आहे. गोल्डन ग्रुप, वाय एस ग्रुप, एस पी ग्रुप वगैरे आहेतच. गोल्डन बॉईज, यंग सर्कल वगैरेही दिसतात. पण प्रतिष्ठाण म्हटले की कसे भारदस्त वाटते. काहीतरी मोठे समाजकार्य करतोय वगैरेसे वाटुन रस्ते अडवायला, मोठयाने डी जे लावायला, मोकळीक मिळते. त्यात अजुन पिवळे , निळे, भगवे झेंडे लावले की झालेच. मग कोणी आक्षेप घ्यायलाच येत नाही आणि आलाच तर........

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

प्रतिष्ठान एकेठिकाणी असेच काहीतरी अमुक तमुक प्रतिष्ठान असे लिहिले होते . तेही इंग्रजीत , त्यात योगायोगाने जागा कमी पडल्याने काही अक्षरे वर काही खाली असे लिहिले होते. P Ratishthan. "रतिस्थान"... ते वाचून एकदम LOL झाले . =))))

मीही `अचानक` लिहायला आलो होतो जे अबा यांनी आधीच लिहिले आहे. परंतु नंतर त्याच्या पुढच्या वर्षी `अचानक आणि भयानक मित्र मंडळ` असे बघितले होते.

In reply to by सिरुसेरि

अभ्या.. Tue, 09/16/2025 - 17:30
स्टार टेक्सास गविराज येतेत आता. त्यांची सांगली, लै लै चांगली. . पीटीएम (पाटाकडील तालीम मंडळ) म्हणजे कोल्हापूरचे बायेर्न आहे. पीटीएमची जर्सी अंगावर दुनिया घेतो शिंगावर.

In reply to by अभ्या..

रामचंद्र Tue, 09/16/2025 - 18:38
पीटीएम (पाटाकडील तालीम मंडळ), टीटीएम (तटाकडील तालीम मंडळ), केटीएम (खंडोबा तालीम मंडळ), टीएमटीएम (तुकाराम माळी तरुण मंडळ)... सर्व कोल्हापूर!

In reply to by अभ्या..

गवि Wed, 09/17/2025 - 12:16
स्टार टेक्सास गविराज येतेत आता.
तुमने पुकारा और.. आलोच. टेक्सास ओली भेळ. वाह.. मुंबईचे लोक भेळ बनवण्यात एकदम कंडम. चपटे भाजक्या पोह्यासारखे ते कुरमुरे आणि मुख्यतः शेव. फरसाण नाही.. पापडी नाही. मजा नाही. पण सांगली चांगली असली तरी आमची फारशी नव्हे. काही काळ तिथे उष्टे सांडले हे खरे आहे. पण तसे खूप इतर गावांत देखील सांडले. आमचे मूळ ठिकाण आणि ऋणानुबंध कोंकणाशी... तिकडे मित्र मंडळ प्रस्थ मी असेपर्यंत तरी जाणवले नव्हते.

In reply to by श्वेता२४

संजय पाटिल Wed, 10/08/2025 - 15:00
हो! माफ करा पण आजच बघितला प्रतिसाद. नाईक वाड्याजवळ घर आमचं... नरसोबा कट्टा... पण सध्या कोल्हापूरला असतो. आपण पण इचलकरंजी कर का?

In reply to by विजुभाऊ

धुळ्यातही चौकांना खुंट असे नाव आहे, किसन बत्तीवाला खुंट असे एक चौकाचे नाव आहे. कुणाला तरी विचारले होते खुंट हा काय प्रकार तर कळले की चौकात मोकळ्या जागेत जनावरे बांधली जायची त्यांचे खुंट तिथे होत्र म्हणून!

अनन्त्_यात्री गुरुवार, 09/18/2025 - 11:38
वॉशिंग मशीन भाजपेयी + सिंचन घोटाळी राष्ट्रवादी + खोकेसेना यांत विखुरलेल्या माझ्या काही मित्रांना एकत्र करून सर्व धर्मीय सण - समारंभ धूम धडाक्यात साजरे करण्याच्या सद् हेतूने दसऱ्याला "तीन तिगाडा मित्र मंडळ" स्थापन करीत आहे. सर्वांनी समारंभाला यायचं हं. ("हो - बहिरा डी जे मंडळाचा" डी जे अभ्यागतांच्या स्वागतासाठी त्या ठिकाणी ठेवलाय)

निमी Sat, 10/25/2025 - 10:30
कोल्हापुरात एके ठिकाणी गुगली नीट पत्ता सांगेना म्हणून पत्ता विचारायला गाडीतून खाली उतरले.. पत्ता विचारल्यावर सहज बेकरीचे नाव वाचले..ते होते 'अदृश्य बेकरी!'

विजुभाऊ Mon, 09/15/2025 - 18:37
अहमदनगरला एक बोर्ड पाहिला होता " अचानक तरुण मंडळ" वाचून खूप हसलो होतो. कदचित ज्या तरुणाना आपण तरुण झाल्याची जाणीव अचानक झाली असेल असे तरुण यात असतील यावरून एक शेर आठवला जवां होने लगे जब वो तो हमसे कर लिया परदा हया यकलख़्त आई और शबाब आहिस्ता आहिस्ता

पुण्यात "प्रतिष्ठाण" चे पेव फुटले आहे. गोल्डन ग्रुप, वाय एस ग्रुप, एस पी ग्रुप वगैरे आहेतच. गोल्डन बॉईज, यंग सर्कल वगैरेही दिसतात. पण प्रतिष्ठाण म्हटले की कसे भारदस्त वाटते. काहीतरी मोठे समाजकार्य करतोय वगैरेसे वाटुन रस्ते अडवायला, मोठयाने डी जे लावायला, मोकळीक मिळते. त्यात अजुन पिवळे , निळे, भगवे झेंडे लावले की झालेच. मग कोणी आक्षेप घ्यायलाच येत नाही आणि आलाच तर........

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

प्रतिष्ठान एकेठिकाणी असेच काहीतरी अमुक तमुक प्रतिष्ठान असे लिहिले होते . तेही इंग्रजीत , त्यात योगायोगाने जागा कमी पडल्याने काही अक्षरे वर काही खाली असे लिहिले होते. P Ratishthan. "रतिस्थान"... ते वाचून एकदम LOL झाले . =))))

मीही `अचानक` लिहायला आलो होतो जे अबा यांनी आधीच लिहिले आहे. परंतु नंतर त्याच्या पुढच्या वर्षी `अचानक आणि भयानक मित्र मंडळ` असे बघितले होते.

In reply to by सिरुसेरि

अभ्या.. Tue, 09/16/2025 - 17:30
स्टार टेक्सास गविराज येतेत आता. त्यांची सांगली, लै लै चांगली. . पीटीएम (पाटाकडील तालीम मंडळ) म्हणजे कोल्हापूरचे बायेर्न आहे. पीटीएमची जर्सी अंगावर दुनिया घेतो शिंगावर.

In reply to by अभ्या..

रामचंद्र Tue, 09/16/2025 - 18:38
पीटीएम (पाटाकडील तालीम मंडळ), टीटीएम (तटाकडील तालीम मंडळ), केटीएम (खंडोबा तालीम मंडळ), टीएमटीएम (तुकाराम माळी तरुण मंडळ)... सर्व कोल्हापूर!

In reply to by अभ्या..

गवि Wed, 09/17/2025 - 12:16
स्टार टेक्सास गविराज येतेत आता.
तुमने पुकारा और.. आलोच. टेक्सास ओली भेळ. वाह.. मुंबईचे लोक भेळ बनवण्यात एकदम कंडम. चपटे भाजक्या पोह्यासारखे ते कुरमुरे आणि मुख्यतः शेव. फरसाण नाही.. पापडी नाही. मजा नाही. पण सांगली चांगली असली तरी आमची फारशी नव्हे. काही काळ तिथे उष्टे सांडले हे खरे आहे. पण तसे खूप इतर गावांत देखील सांडले. आमचे मूळ ठिकाण आणि ऋणानुबंध कोंकणाशी... तिकडे मित्र मंडळ प्रस्थ मी असेपर्यंत तरी जाणवले नव्हते.

In reply to by श्वेता२४

संजय पाटिल Wed, 10/08/2025 - 15:00
हो! माफ करा पण आजच बघितला प्रतिसाद. नाईक वाड्याजवळ घर आमचं... नरसोबा कट्टा... पण सध्या कोल्हापूरला असतो. आपण पण इचलकरंजी कर का?

In reply to by विजुभाऊ

धुळ्यातही चौकांना खुंट असे नाव आहे, किसन बत्तीवाला खुंट असे एक चौकाचे नाव आहे. कुणाला तरी विचारले होते खुंट हा काय प्रकार तर कळले की चौकात मोकळ्या जागेत जनावरे बांधली जायची त्यांचे खुंट तिथे होत्र म्हणून!

अनन्त्_यात्री गुरुवार, 09/18/2025 - 11:38
वॉशिंग मशीन भाजपेयी + सिंचन घोटाळी राष्ट्रवादी + खोकेसेना यांत विखुरलेल्या माझ्या काही मित्रांना एकत्र करून सर्व धर्मीय सण - समारंभ धूम धडाक्यात साजरे करण्याच्या सद् हेतूने दसऱ्याला "तीन तिगाडा मित्र मंडळ" स्थापन करीत आहे. सर्वांनी समारंभाला यायचं हं. ("हो - बहिरा डी जे मंडळाचा" डी जे अभ्यागतांच्या स्वागतासाठी त्या ठिकाणी ठेवलाय)

निमी Sat, 10/25/2025 - 10:30
कोल्हापुरात एके ठिकाणी गुगली नीट पत्ता सांगेना म्हणून पत्ता विचारायला गाडीतून खाली उतरले.. पत्ता विचारल्यावर सहज बेकरीचे नाव वाचले..ते होते 'अदृश्य बेकरी!'
लेखनविषय:
लेखनप्रकार
ख फ वर एक मजेदार चर्चा वाचली. चर्चेची सुरवात अ बा नी सुरू मग गवि नी त्यात भर टाकली. त्यातली गम्मत इथे कळावी आणि त्या गमतीत आणखी भर पडावी म्हणून हा धागा. पुढचे शब्द गविं आहेत. मित्रमंडळांची नावे हा रोचक विषय आहे. माझ्या कॉलेज जीवनात, म्हणजे तीसेक वर्षे मागे जा.. तेव्हा रक्तपात, युद्ध, संघर्ष याला खूप सन्मान होता. संग्राम मित्र मंडळ, झुंजार मित्र मंडळ, क्रांती तरुण मंडळ, फायटर, तलवार, ... एका ठिकाणी तर ब्लड ग्रुप असे नाव वाचले होते.

हिंदी, काका कालेलकर आणि ३ वर्षे

माहितगार ·

तिता Tue, 07/08/2025 - 12:08
गांधींची मते १०० वर्षांपेक्षा जास्त जुनी आहेत. भारताची software मधील भरारी English येत असल्यामुळेच झाली. English ही आपली strength आहे आणि आपण ती टिकवली पाहिजे. हिंदीचा भारतात नक्कीच उपयोग आहे. पण त्यासाठी पहिलीपासून शाळेत शिकवण्याची गरज नाही. दैनंदिन वापराची बोलता आली म्हणजे खूप आहे. रच्याकने, हिंदी चित्रपटांनी हिंदीचा जेव्हढा प्रसार केला आहे तेव्हढा इतर कुणीही करू शकले नाहीत. हे leverage करता येईल का?

माहितगार Tue, 07/08/2025 - 12:48
काळाचेच म्हणावयाचे झाल्यास, दोन वेगवेगळ्या भाषा व्यवहार करणार्‍या व्यक्ती स्वत:च्याच भाषातून संवाद साधत राहतील इतपत रिअल टाईम अनुवाद तंत्रज्ञान पुढे गेले आहे. त्यामुळे भाषा विवादांचे आजचे मुद्दे बहुधा अजून दहा वीस वर्षात मागे पडावयास हरकत नाही. परभाषी व्यवहार यंत्र माध्यमातून कानावर पडता पडताच जास्त वेळा उपयोग करत राहील्यास, काही महिन्यांपेक्षा अधिक काळ रहाणारी परभाषी व्यक्ती स्थानिक भाषा सहज अवगत करू लागतील किंवा त्याच्या अगदी विरुद्ध घडेल ते यणारा काळच सांगू शकेल. पण मुदलात या धागा लेखाचा उद्देश एक्सप्लेन करण्यात मी कुठे तरी कमी पडलो. समजा उपजिविका निमीत्ताने एक मराठी माणूस पश्चिम बंगाल मध्ये स्थायिक झाला आणि एक बंगाली माणूस महाराष्ट्रात स्थायिक झाला दोघेही परराज्यातील संवादासाठी प्रवासी म्हणून तात्पुरत्या काळात हिंदी वापरतील तर ठिक आहे. पण उदर निर्वाहासाठी स्थायिक परराज्यात स्थायिक होत आहेत हिंदी आल्यामुळे अडत नाही पण एकुण भारतीय संस्कृतीतही पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र यांना आपापली स्वतंत्र सांस्कृतिक ओळख आहे जी स्थानिक भाषेच्या माध्यमातून विकसीत झालेली असते. स्थानिक भाषाच आली नाही तर स्थानिक संस्कृतीशी तुम्ही तुटलेले रहाणार. स्थानिक संस्कृतीशी तुटलेल्यांची संख्या अधिक झाली तर स्थानिक बहुसंख्या पासून परभाषी समुदाय दुर रहाणार एकमेकांचे दृष्टीकोणांचे बारकावे नीट समजणार नाहीत त्या शिवाय स्थानिक भाषा न शिकता परभाषीयांची लोक संख्या वाढतच गेली आपली भाषिक संस्कृती नामशेष होईल का या बद्दलची असुरक्षीतता वाढत जाते आणि हि असुरक्षीतता भाषिक तंत्रज्ञानाच्या बळावर किती भरून काढता येईल हे नेमके सांगणे तुर्तास तरी शक्य नसावे.

In reply to by माहितगार

माहितगार Tue, 07/08/2025 - 12:58
जरासा कमी पडलो असेन २ गांधी जुने झाले तरी भारतातील भाषा विषयक अधिकृत संसदीय आणि शासकीय धोरणांवरचा त्यांचा ऐतिहासिक परिणाम नाकारता येत नाही आणि त्या हिंदी धोरणाची सहमती गैर हिंदी भाषी राज्यात करणार्‍या काका कालेलकरांचे योगदानही कमी मोजता येत नाही. ह्या लेखाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील लोकांनी हिंदीचा प्रचार केला ही चूक झाली का? हा ही नाही. काका कालेलकरांनी परभाषिय व्यक्तीने दुसर्‍या भाषीय प्रदेशात स्थायिक होताना साधारणपणे तीनेक वर्षात स्थानिक भाषा आत्मसात करावी हे म्हटले आणि ३ वर्षात स्थानिक भाषा आत्मसात करणे आणि करावयास लावणे या वर फोकस असेल तर भाषिक विवाद आपोआपच कमी होईल.

काका कालेलकरांनी परभाषिय व्यक्तीने दुसर्‍या भाषीय प्रदेशात स्थायिक होताना साधारणपणे तीनेक वर्षात स्थानिक भाषा आत्मसात करावी हे म्हटले
आत्मसात कशी करायची? समजा मी खाजगी कंपनीत अभियंता म्हणून आंध्रप्रदेशातील 'विजयवाडा' येथे बदली होऊन आले आहे. आता ९-६ ह्या वेळेत काम केल्यावर मी संस्ध्याकाळी तेलुगुच्या शिकवण्या लावायच्या? त्याच्या खर्चाची नोंद कोणाच्या नावावर? समजा ऑन्लाईन प्रयत्न केला तर मग सराव कोणाबरोबर करायचा? स्थानिक लोकांचा ईगो सुखावण्याकरिता हे सगळे उपद्व्याप करायचे. मग एखादे तेलुगु वाक्य म्हंटले की आजुबाजुचे लोक टाळ्या वाजवणार. जे सध्या महाराष्ट्रात होते. अमराठी माणूस मराठी अडखळत बोलला की स्थानिकांचा ईगो सुखावतो."मला भाषा येत नाही" असे प्रामाणिक उत्तर दिले की लोकांना राग येतो. सरकारी कचेर्यात, एल आय सी/एस बी आय. मध्ये असे क्लासेस घेतले जातात असे ऐकले आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माहितगार Wed, 07/09/2025 - 14:18
आता ९-६ ह्या वेळेत काम केल्यावर मी संस्ध्याकाळी तेलुगुच्या शिकवण्या लावायच्या? त्याच्या खर्चाची नोंद कोणाच्या नावावर?

तिता Tue, 07/08/2025 - 12:08
गांधींची मते १०० वर्षांपेक्षा जास्त जुनी आहेत. भारताची software मधील भरारी English येत असल्यामुळेच झाली. English ही आपली strength आहे आणि आपण ती टिकवली पाहिजे. हिंदीचा भारतात नक्कीच उपयोग आहे. पण त्यासाठी पहिलीपासून शाळेत शिकवण्याची गरज नाही. दैनंदिन वापराची बोलता आली म्हणजे खूप आहे. रच्याकने, हिंदी चित्रपटांनी हिंदीचा जेव्हढा प्रसार केला आहे तेव्हढा इतर कुणीही करू शकले नाहीत. हे leverage करता येईल का?

माहितगार Tue, 07/08/2025 - 12:48
काळाचेच म्हणावयाचे झाल्यास, दोन वेगवेगळ्या भाषा व्यवहार करणार्‍या व्यक्ती स्वत:च्याच भाषातून संवाद साधत राहतील इतपत रिअल टाईम अनुवाद तंत्रज्ञान पुढे गेले आहे. त्यामुळे भाषा विवादांचे आजचे मुद्दे बहुधा अजून दहा वीस वर्षात मागे पडावयास हरकत नाही. परभाषी व्यवहार यंत्र माध्यमातून कानावर पडता पडताच जास्त वेळा उपयोग करत राहील्यास, काही महिन्यांपेक्षा अधिक काळ रहाणारी परभाषी व्यक्ती स्थानिक भाषा सहज अवगत करू लागतील किंवा त्याच्या अगदी विरुद्ध घडेल ते यणारा काळच सांगू शकेल. पण मुदलात या धागा लेखाचा उद्देश एक्सप्लेन करण्यात मी कुठे तरी कमी पडलो. समजा उपजिविका निमीत्ताने एक मराठी माणूस पश्चिम बंगाल मध्ये स्थायिक झाला आणि एक बंगाली माणूस महाराष्ट्रात स्थायिक झाला दोघेही परराज्यातील संवादासाठी प्रवासी म्हणून तात्पुरत्या काळात हिंदी वापरतील तर ठिक आहे. पण उदर निर्वाहासाठी स्थायिक परराज्यात स्थायिक होत आहेत हिंदी आल्यामुळे अडत नाही पण एकुण भारतीय संस्कृतीतही पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र यांना आपापली स्वतंत्र सांस्कृतिक ओळख आहे जी स्थानिक भाषेच्या माध्यमातून विकसीत झालेली असते. स्थानिक भाषाच आली नाही तर स्थानिक संस्कृतीशी तुम्ही तुटलेले रहाणार. स्थानिक संस्कृतीशी तुटलेल्यांची संख्या अधिक झाली तर स्थानिक बहुसंख्या पासून परभाषी समुदाय दुर रहाणार एकमेकांचे दृष्टीकोणांचे बारकावे नीट समजणार नाहीत त्या शिवाय स्थानिक भाषा न शिकता परभाषीयांची लोक संख्या वाढतच गेली आपली भाषिक संस्कृती नामशेष होईल का या बद्दलची असुरक्षीतता वाढत जाते आणि हि असुरक्षीतता भाषिक तंत्रज्ञानाच्या बळावर किती भरून काढता येईल हे नेमके सांगणे तुर्तास तरी शक्य नसावे.

In reply to by माहितगार

माहितगार Tue, 07/08/2025 - 12:58
जरासा कमी पडलो असेन २ गांधी जुने झाले तरी भारतातील भाषा विषयक अधिकृत संसदीय आणि शासकीय धोरणांवरचा त्यांचा ऐतिहासिक परिणाम नाकारता येत नाही आणि त्या हिंदी धोरणाची सहमती गैर हिंदी भाषी राज्यात करणार्‍या काका कालेलकरांचे योगदानही कमी मोजता येत नाही. ह्या लेखाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील लोकांनी हिंदीचा प्रचार केला ही चूक झाली का? हा ही नाही. काका कालेलकरांनी परभाषिय व्यक्तीने दुसर्‍या भाषीय प्रदेशात स्थायिक होताना साधारणपणे तीनेक वर्षात स्थानिक भाषा आत्मसात करावी हे म्हटले आणि ३ वर्षात स्थानिक भाषा आत्मसात करणे आणि करावयास लावणे या वर फोकस असेल तर भाषिक विवाद आपोआपच कमी होईल.

काका कालेलकरांनी परभाषिय व्यक्तीने दुसर्‍या भाषीय प्रदेशात स्थायिक होताना साधारणपणे तीनेक वर्षात स्थानिक भाषा आत्मसात करावी हे म्हटले
आत्मसात कशी करायची? समजा मी खाजगी कंपनीत अभियंता म्हणून आंध्रप्रदेशातील 'विजयवाडा' येथे बदली होऊन आले आहे. आता ९-६ ह्या वेळेत काम केल्यावर मी संस्ध्याकाळी तेलुगुच्या शिकवण्या लावायच्या? त्याच्या खर्चाची नोंद कोणाच्या नावावर? समजा ऑन्लाईन प्रयत्न केला तर मग सराव कोणाबरोबर करायचा? स्थानिक लोकांचा ईगो सुखावण्याकरिता हे सगळे उपद्व्याप करायचे. मग एखादे तेलुगु वाक्य म्हंटले की आजुबाजुचे लोक टाळ्या वाजवणार. जे सध्या महाराष्ट्रात होते. अमराठी माणूस मराठी अडखळत बोलला की स्थानिकांचा ईगो सुखावतो."मला भाषा येत नाही" असे प्रामाणिक उत्तर दिले की लोकांना राग येतो. सरकारी कचेर्यात, एल आय सी/एस बी आय. मध्ये असे क्लासेस घेतले जातात असे ऐकले आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माहितगार Wed, 07/09/2025 - 14:18
आता ९-६ ह्या वेळेत काम केल्यावर मी संस्ध्याकाळी तेलुगुच्या शिकवण्या लावायच्या? त्याच्या खर्चाची नोंद कोणाच्या नावावर?
लेखनप्रकार
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींच्या तोंडावर मराठी-हिंदी वाद रंगवत खळ-खट्याक नाट्य चालु असल्याचे बातम्यांच्या हेडलाईन्स मधून दिसते. त्या बातम्या असोत का मिपावरील संबंधीत धागा असो मी उघडण्याचे कष्ट यावेळी अद्याप तरी घेतले नाहीत. चार सहा नगरसेवकांना निवडून आणण्या पलिकडे अशा चहाच्या पेल्यातल्या वादळा पलिकडे मराठी लोकांमध्ये गांभीर्य किती आणि तोंड देखले पणा किती ह्या बद्दल कमी बोलावे तेवढेच बरे. असो. असो माझं टोपणनाव माहितगार, योग्य वेळी योग्य माहिती उपलब्ध करण्याचा प्रयास करावा हे माझे काम.

शाळेचा पहिला दिवस...

कर्नलतपस्वी ·
उन्हाळ्याची सुट्टी संपली. शाळा सुरू झाल्या. वसंत ऋतूत जशी पालवी फुटते ,आनंदाचे वातावरण निर्माण होते तसाच उत्साह, उर्जा शाळेतल्या मुला मुलीं मधे असतो. आई बापाची लगबग,तगमग, व मुलांचा उत्साह बघताना काही पंक्ती सुचल्या.मोठी मुले आपापल्या मित्रांबरोबर पुनर्भेटीचा आनंद घेत होते तर पहिल्यांदाच जाणारी,छोटी आई बापाला बिलगुन होती. एकामागोमाग शाळेच्या बसेस आल्या,चौकात येवून थांबल्या. मुले आई-वडील पांगले. आपापल्या मुलांना बस मधे बसवले. सुचना थांबत नव्हत्या. बस भरली. ड्रायव्हरने निर्विकार पणे बस मार्गस्थ केली. आई-वडील आपापल्या घोळक्यात सामील झाले.

गर्दी, चेंगराचेंगरी: कारणे, आकडेवारी आणि शास्त्रीय उपाय

माहितगार ·

माहितगार Fri, 06/06/2025 - 08:50
अशा लेखाची सर्व सेलीब्रीटी आणि कार्यक्रम व्यवस्थापकांनी दखल घेतल्यास छान होईल. या लेखात गर्दी होणार्‍या ठिकाणचे आग प्रतिबंधन आणि आतंकवादी पासून सुरक्षाचा अंतर्भाव लेखाची लांबी फारच वाढली असती म्हणून केला नाही पण ते महत्वाचे मुद्दे आहेत. आणखी एक मुद्दा राहीला तो म्हणजे मंडप आणि खुर्ची सप्लायर्स ते गेट किपर्सनाही या मुद्द्यांवर ट्रेन केले पाहीजे.

In reply to by युयुत्सु

माहितगार Fri, 06/06/2025 - 09:03
मला वाटते पोलीस ट्रेनींग स्कूलस मध्ये हा विषय असेलच पण तो अशा ट्रेनिंग स्कूल्सनी इव्हेंट मॅनेजमेन्ट स्कूलस व गर्दी होणार्‍या व्यवस्थापनांच्या व्यवपस्थाप्कांपर्यंत पोहोचवावयास हवे.

माहितगार Fri, 06/06/2025 - 08:56
नक्कीच, या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर माहिती खालीलप्रमाणे आहे. जर एखादी व्यक्ती गर्दीच्या ठिकाणी चेंगराचेंगरीच्या स्थितीत अडकली असेल, तर स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि अशावेळी सुरक्षा रक्षकांनी काय करावे, यासाठी काही महत्त्वपूर्ण उपाययोजना आहेत. ### **गर्दीत अडकल्यास व्यक्तीने स्वतःचा बचाव कसा करावा?** चेंगराचेंगरीच्या स्थितीत सापडल्यास शांत राहणे आणि योग्य उपाययोजना करणे जीवन वाचवू शकते. घाबरल्यास परिस्थिती आणखी बिघडू शकते. अशावेळी खालील गोष्टी करा: **१. कोणत्याही परिस्थितीत उभे राहण्याचा प्रयत्न करा:** चेंगराचेंगरीतील बहुतेक मृत्यू हे खाली पडल्यामुळे आणि लोकांच्या पायाखाली तुडवले गेल्यामुळे होतात. त्यामुळे तुमचा संपूर्ण जोर उभे राहण्यावर केंद्रित करा. **२. हात छातीजवळ ठेवा:** आपले हात छातीजवळ, एखाद्या बॉक्सरप्रमाणे ठेवा. यामुळे तुमच्या छातीला आणि फुफ्फुसांना श्वास घेण्यासाठी थोडी जागा मिळेल. गर्दीच्या दाबामुळे श्वास कोंडला जाण्याचा धोका यामुळे कमी होतो. **३. गर्दीच्या प्रवाहाबरोबर पुढे चला:** गर्दीच्या विरुद्ध दिशेने जाण्याचा किंवा तिला थांबवण्याचा प्रयत्न करू नका. यात तुमची प्रचंड ऊर्जा वाया जाईल आणि तुम्ही पडण्याचा धोका वाढेल. गर्दी ज्या दिशेने वाहत आहे, त्या दिशेने हळूहळू पुढे सरकत राहा. **४. बाजूला किंवा तिरके सरकण्याचा प्रयत्न करा:** गर्दीच्या प्रवाहाबरोबर वाहत असताना, सरळ पुढे जाण्याऐवजी हळूहळू तिरके किंवा बाजूला सरकत गर्दीच्या किनाऱ्यावर (edge) येण्याचा प्रयत्न करा. गर्दीच्या मधोमध दाब सर्वाधिक असतो. **५. भिंती, खांब आणि अडथळ्यांपासून दूर राहा:** भिंती, रेलिंग किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या अडथळ्यांजवळ दाब सर्वाधिक असतो आणि तिथे लोक चिरडले जाण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे अशा जागा टाळा. **६. तुमची ऊर्जा वाचवा:** विनाकारण ओरडण्यात किंवा आरडाओरड करण्यात तुमची शक्ती वाया घालवू नका. शांत राहा आणि तुमची ऊर्जा उभे राहण्यासाठी आणि सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी वापरा. इतरांशी संवाद साधायचा असेल तर शांतपणे आणि स्पष्टपणे बोला. **७. जर तुम्ही खाली पडलात तर:** जर तुम्ही सर्व प्रयत्न करूनही खाली पडलात, तर लगेच भ्रूणासारखी स्थिती (fetal position) घ्या. तुमचे गुडघे छातीजवळ ओढा आणि तुमचे हात डोक्यावर आणि मानेवर ठेवून त्यांचे रक्षण करा. यामुळे तुमच्या महत्त्वाच्या अवयवांचे संरक्षण होण्यास मदत होईल. --- ### **अशा परिस्थितीत द्वारपाल (Gatekeepers) आणि सुरक्षा रक्षकांची भूमिका** चेंगराचेंगरीच्या वेळी सुरक्षा रक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आणि निर्णायक असते. त्यांची त्वरित आणि योग्य कृती अनेकांचे प्राण वाचवू शकते. **१. गर्दीला बाहेर पडण्यासाठी मार्ग मोकळे करा:** त्यांचे पहिले आणि सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे गर्दीचा दाब कमी करणे. यासाठी सर्व आपत्कालीन आणि नियमित दरवाजे त्वरित उघडा. शक्य असल्यास, तात्पुरते बॅरिकेड्स किंवा अडथळे हटवून बाहेर पडण्यासाठी नवीन मार्ग तयार करा. **२. नवीन प्रवेश ताबडतोब थांबवा:** ज्या ठिकाणी चेंगराचेंगरी होत आहे, तिथे आणखी लोकांना येण्यापासून त्वरित थांबवा. मुख्य प्रवेशद्वार बंद करा किंवा लोकांना आत येण्यापासून रोखा. **३. शांत आणि स्पष्ट सूचना द्या:** ध्वनिक्षेपकाचा (Loudspeaker/PA System) वापर करून लोकांना शांत राहण्याचे आवाहन करा. "कृपया पुढे सरकत राहा", "डावीकडील गेट उघडे आहे", "शांत राहा, आम्ही मदत करत आहोत" अशा स्पष्ट आणि सकारात्मक सूचना द्या. "चेंगराचेंगरी" किंवा "पळापळ" असे शब्द वापरणे टाळा, कारण त्यामुळे भीती वाढू शकते. **४. उंच जागेवरून परिस्थितीवर लक्ष ठेवा:** शक्य असल्यास, उंच टॉवर किंवा सुरक्षित जागेवरून परिस्थितीचे निरीक्षण करा. यामुळे गर्दीचा दाब नेमका कुठे जास्त आहे आणि कोणत्या लोकांना मदतीची गरज आहे, हे समजण्यास मदत होते. **५. अडकलेल्या लोकांना बाहेर काढा:** जे लोक बॅरिकेड्स, रेलिंग किंवा भिंतीजवळ दाबले जात आहेत, त्यांना तातडीने बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. सुरक्षा रक्षकांनी एक साखळी तयार करून लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यास मदत करावी. **६. वैद्यकीय मदतीसाठी संपर्क साधा:** तात्काळ नियंत्रण कक्षाला (Control Room) माहिती देऊन रुग्णवाहिका (Ambulances) आणि प्रथमोपचार पथकांना पाचारण करा. **७. स्वतः सुरक्षित राहा:** मदतकार्य करताना सुरक्षा रक्षकांनी स्वतःला धोक्यात घालू नये. त्यांनी गर्दीच्या प्रवाहात अडकणार नाही याची काळजी घ्यावी, जेणेकरून ते इतरांना मदत करू शकतील. सुरक्षा रक्षकांचे योग्य प्रशिक्षण आणि अशा आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार केलेली एक प्रमाणित कार्यप्रणाली (Standard Operating Procedure - SOP) असणे अत्यंत आवश्यक आहे.

In reply to by माहितगार

माहितगार Fri, 06/06/2025 - 09:00
उपरोक्त जेमिनीबाबांचे उत्तर आहे. आम्ही गर्दीची स्थळे नेहमीच टाळण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्याचा प्रत्यक्ष अनुभव फारसा नाही, त्याबाबत गर्दीचा अनुभव घेणारेच अधिक नेमकेपणाने सांगू शकतील म्हणून आमचा उत्तरदायित्वास नकार लागू.

In reply to by माहितगार

माहितगार Fri, 06/06/2025 - 09:44
आत चेंगराचेंगरी चालू झाल्यास बाहेरून नवीन प्रवेश ताबडतोब थांबवा ही योग्यच सूचना आहे. पण आत प्रवेश न मिळणारी बेशीस्त मंडळी बाहेर पण तेवढीच चेंगरा चेंगरी करतात या बद्दल उपाय जेमिनी बाबूंना विचारावयाचे राहीले

In reply to by माहितगार

वरील उपाय बरेच चांगले आहेत. आपल्याकडे 'विशेष दिवस' आणि 'विशेष महिने' 'बाबा-बुवा' सत्संग वगैरे हे एक गर्दीचं मोठं कारण असतं. खरं तर ती गर्दी नसते तर लोकांचा आलेला महापूर असतो. वाटेल तिथे वाटेल तसं धावणारं पाणी त्याप्रमाणे माणसं धावतात गर्दी करतात. कालच्या चेंगराचेंगरीचे काही व्हीडीयो पाहात होतो माणसं एकमेकांच्या डोके खांद्यावर पाय देऊन चालत होते. आपला जीव वाचवतांना इतरांची काही अवस्था करुन सोडतो त्यावेळी जाणवत नसेल आपला जीव प्रथम या भावनेने गर्दी तुडवल्या जाते. महिला लहान मुले यात प्राणास मुकतात. आपल्याकडे अभ्यासक्रमात किंवा इतरवेळी कधीही गर्दीवर बोलल्या जात नाही. चर्चा होत नाही. सामाजिक संस्था अथवा सरकारं यासाठी जागरुकता करतांना दिसत नाही. फार आवश्यक विषय वाटत नाही. कधी तरी अशी अनावश्यक गर्दीह होते आणि घटना घडल्यावर त्यावर चर्चा होते. खरं तर, गर्दी टाळणे हाच सर्वात पहिला मोठा आणि महत्वाचा उपाय आहे. गर्दीत गेल्यावर गर्दीच्या विरोधात जायचं की प्रवाहासोबत जायचं यात गर्दीची कोंडी आणखी वाढत जाते. गर्दी फूटली पाहिजे. गर्दी इतरत्र पांगली पाहिजे यासाठी मोठ्या स्क्रीनवर अथवा सातत्याने उद्घोषणा करुन बाहेर पडण्याचे मार्ग दाखवले पाहिजेत. व्यवस्था ऐनवेळी कोलमडते तेव्हा त्यातील काही लोकांनी गर्दी मोकळी होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतही गर्दी झाली की, पोलिसांची वाट पाहिली जाते. तो पर्यंत वाटेल तशी वाहने वाटेल तिथे घुसवली जातात आणि वाहनांची कोंडी होते. हमरी तुमरी वाद आणि जीवावर बेतेल अशी भांडने. ब-याच वेळी कोणी तरी समजदार माणसं तरुण मुलं अशी गर्दी झाली की ट्राफीक नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतांना पाहिलं आहे. अशी दृश्य पाहिलं की बरं वाटतं. वाढत्या लोकसंखेवर गर्दीचा भार सोडून चालणार नाही. गर्दी आणि होणा-या दुर्दैवी घटना मोठा विषय आहे, सातत्याने त्यावर जमेल त्या माध्यमावर सकारात्मक लिहिते राहिलं पाहिजे. काहींचे जीव नक्की वाचेल असे वाटत राहते. -दिलीप बिरुटे

कंजूस Sat, 06/07/2025 - 10:42
श्रद्धेपुढे शास्त्र बाद होते. अगदी नियमांत बसून, शिस्तीने गोष्टी होत असल्या तरीही लागणारा वेळ पाहता त्यातील निरर्थकपणा पटवून घेण्याच्या मनस्थितीत लोक नसतील तर सगळी चर्चाच व्यर्थ आहे. उदाहरणार्थ प्रसिद्ध देवळांतील देवदर्शन. डोकेबाजपणे केलेले पर्यायही पटवून न घेण्याची वृत्ती....... कुंभमेळ्यातील आंघोळीसाठी पंपाने पाणी आणून एका ठिकाणी फवारले जाणे आणि भाविकांनी त्यातून जाणे . तरीही भाविकांना नदीतच आंघोळ करायची आहे. नियोजनाला फोलपणा - मोठ्या शहरांतील गर्दी टाळण्याचे उपाय सर्व बाद झाले आहेत. शहरातून मुख्य कामाची कार्यालये दुसरीकडे हलविणे अजूनही शक्य झाले नाही. मुंबईतील लोकल ट्रेन गर्दी. ...... त्यावर केलेले पर्याय --- आणखी रस्ते....आणखी मेट्रो...आणखी उड्डाणपूल सर्व बाद ठरले.

In reply to by कंजूस

माझ्या घराजवळून आठ दहा किलोमीटरहून बारमही गोदावरी नदी वाहते, पुढे जायकवाडी धरणाचे ब्याकवाटरही तुंबलेले असते. नगरपालिकेच्या ढीसाळ नियोजनामुळे पंधरा दिवसानंतर थेट तालुक्यात पाणी घरोघर येते. पण एकादशी आणि तत्सम महत्वाच्या वारी त्या गोदावरी नदीकाठी स्नानासाठी पवित्र दिवशी प्रचंड गर्दी होते. एखादे दोन जीवघेणे अपघातही घड़तात. नळाला येणारे पाणी तितकेच पवित्र किंबहुना अधिक फिल्टर असते त्यातही स्नान होऊ शकते पण गंगाडूबकीचं समाधान गंगेतच. लोकांची हे गर्दी... -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कंजूस Sat, 06/07/2025 - 13:04
पर्वकाळात तिर्थात स्नान ... यांचा आणि पुण्याचा हिशोब पौराणिक कथांमध्ये सांगून ठेवला आहे.घरामध्ये कुणालातरी यांचा अनुभव घ्यायची इच्छा असते. फार पूर्वी म्हणजे रेल्वे सुरू होण्याअगोदर काही शे भाविक चालत जाऊन तिकडे किती गर्दी करत असतील आणि आता सर्व वाहन सोयी झाल्यानंतर किती गर्दी होते यात खूपच अंतर आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. तर तुझी इच्छा पुरी करुया पण पर्वकाळाची अट सोड असं सांगायला हवे. आपण जाऊ तो पर्वकाळ हे पटवायला हवे.

In reply to by कंजूस

पण पर्वकाळाची अट सोड असं सांगायला हवे. आपण जाऊ तो पर्वकाळ हे पटवायला हवे.
आजच्या देव,धर्म प्रिय सरकारच्या काळात असे आधुनिक विचार सांगणे म्हणजे हे पुरोगामी आणि धर्मबुडव्या लोकांचे षडयंत्र ठरू शकते. त्यामुळे असा प्रयत्न करणे, लोकांना समजावून सांगणे महाकठीण काम झालं आहे. भला माणूस अशी रिस्क घेणार नाही. कोणत्या तरी पुराणात पर्वकाळातच गर्दी केली पाहिजे असे काही नाही, असे कोणी नवमतवादी शंकराचार्यांनी सांगितल्याशिवाय बदल शक्य नाही. किंवा भगवान श्रीकृष्ण यांनी जे काही मार्गदर्शन केले आहे त्या अशा कोणत्यातरी संस्कृत धार्मिक ग्रंथ अध्यायात पर्वकाळात गर्दी करु नये असे स्पष्ट म्हटलेले असुन भूतलावरील कोणतेही पाणी ( अटी लागू ) पवित्र असते असे सांगितल्याशिवाय ही गर्दी कमी होणार नाही. अर्थात थेट परिणाम दिसायला अजून पाच पन्नास वर्ष जावे लागतील, असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार Sat, 06/07/2025 - 17:54
१) १७९६ साली डॉ. एडवर्ड जेनर ने व्हॅरिओला व्हायरस वर मात करत स्मॉल पॉक्स (उर्फ देवी) नावाच्या गंभीर त्वचा आजारावर लस काढली १९८० पर्यंत जगातून या व्हायरस साथींचे समूळ उच्चाटन करण्यात मानवाला यश मिळाले आणि देवी आजार होऊ नये म्हणून होणार्‍या अंधश्रद्धा आपोआपच मागे पडल्या. ग्रहण विषयक वैज्ञानिक जाणीव शिक्षणातून वाढत गेले तर तत्संबधी अंधश्रद्धा बर्‍यापैकी मागे पडल्या. काही अंधश्रद्धांच्या मागे असलेल्या संबधीत असुरक्षीतता मागे पडल्या की लोक आपोपाच बदलतात. बेसिकली फोकस रचनात्मक मार्गाने असुरक्षीतता कशा कमी करता येतील याकडे हवा. २) गर्दी आणि चेंगरा चेंगरी या साठी धर्माची किंवा अंधश्रद्धेचा संबंध निमीत्तमात्र आहे मूलभूत समस्या मानवी संस्कृतीतील बेशिस्तीची आहे. सध्या चर्चेत असलेल्या क्रिडा क्षेत्रातील चेंगरा चेंगरीत धार्मीक श्रद्धा अंधश्रद्धांचा काय संबंध आहे? समजा १०० कोटी भारतीयांनी स्विमींगपूल मध्ये विशीष्ट दिवशी विशीष्ष्ट वेळी स्नान करण्याची इच्छा प्रदर्शीत केली पण फर्स्ट कम फर्स्ट सर्व ने जेवढ्यांना जमेल तेवढ्यांनीच केले समस्या कुठे आहे ? समस्या बेशीस्तीतच नाही का?

कर्नलतपस्वी Sat, 06/07/2025 - 12:53
काशीसी जावे नित्य वदावे.... असे स्थानमहात्म्य पूर्वापार समाज मनावर ठसवले आहे. कबीरदास आणी इतर संतांनी "मन चंगा तो कठौती मे गंगा",असे सांगून ही काही लोकांवर याचा परिणाम होत नाही. हे सर्वच धर्मामधे आहे. माझे एक वरिष्ठ सहकारी हज यात्रेतील स्टॅम्पेड मधे आपल्या धर्मपत्नीसह पैगंबरवासी झाले. डाॅक्टर होते. हा श्रद्धेचा भाग आहे पण या बरोबर सबुरी पण हवी तेव्हांच असले अपघात टळतील.

माहितगार Fri, 06/06/2025 - 08:50
अशा लेखाची सर्व सेलीब्रीटी आणि कार्यक्रम व्यवस्थापकांनी दखल घेतल्यास छान होईल. या लेखात गर्दी होणार्‍या ठिकाणचे आग प्रतिबंधन आणि आतंकवादी पासून सुरक्षाचा अंतर्भाव लेखाची लांबी फारच वाढली असती म्हणून केला नाही पण ते महत्वाचे मुद्दे आहेत. आणखी एक मुद्दा राहीला तो म्हणजे मंडप आणि खुर्ची सप्लायर्स ते गेट किपर्सनाही या मुद्द्यांवर ट्रेन केले पाहीजे.

In reply to by युयुत्सु

माहितगार Fri, 06/06/2025 - 09:03
मला वाटते पोलीस ट्रेनींग स्कूलस मध्ये हा विषय असेलच पण तो अशा ट्रेनिंग स्कूल्सनी इव्हेंट मॅनेजमेन्ट स्कूलस व गर्दी होणार्‍या व्यवस्थापनांच्या व्यवपस्थाप्कांपर्यंत पोहोचवावयास हवे.

माहितगार Fri, 06/06/2025 - 08:56
नक्कीच, या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर माहिती खालीलप्रमाणे आहे. जर एखादी व्यक्ती गर्दीच्या ठिकाणी चेंगराचेंगरीच्या स्थितीत अडकली असेल, तर स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि अशावेळी सुरक्षा रक्षकांनी काय करावे, यासाठी काही महत्त्वपूर्ण उपाययोजना आहेत. ### **गर्दीत अडकल्यास व्यक्तीने स्वतःचा बचाव कसा करावा?** चेंगराचेंगरीच्या स्थितीत सापडल्यास शांत राहणे आणि योग्य उपाययोजना करणे जीवन वाचवू शकते. घाबरल्यास परिस्थिती आणखी बिघडू शकते. अशावेळी खालील गोष्टी करा: **१. कोणत्याही परिस्थितीत उभे राहण्याचा प्रयत्न करा:** चेंगराचेंगरीतील बहुतेक मृत्यू हे खाली पडल्यामुळे आणि लोकांच्या पायाखाली तुडवले गेल्यामुळे होतात. त्यामुळे तुमचा संपूर्ण जोर उभे राहण्यावर केंद्रित करा. **२. हात छातीजवळ ठेवा:** आपले हात छातीजवळ, एखाद्या बॉक्सरप्रमाणे ठेवा. यामुळे तुमच्या छातीला आणि फुफ्फुसांना श्वास घेण्यासाठी थोडी जागा मिळेल. गर्दीच्या दाबामुळे श्वास कोंडला जाण्याचा धोका यामुळे कमी होतो. **३. गर्दीच्या प्रवाहाबरोबर पुढे चला:** गर्दीच्या विरुद्ध दिशेने जाण्याचा किंवा तिला थांबवण्याचा प्रयत्न करू नका. यात तुमची प्रचंड ऊर्जा वाया जाईल आणि तुम्ही पडण्याचा धोका वाढेल. गर्दी ज्या दिशेने वाहत आहे, त्या दिशेने हळूहळू पुढे सरकत राहा. **४. बाजूला किंवा तिरके सरकण्याचा प्रयत्न करा:** गर्दीच्या प्रवाहाबरोबर वाहत असताना, सरळ पुढे जाण्याऐवजी हळूहळू तिरके किंवा बाजूला सरकत गर्दीच्या किनाऱ्यावर (edge) येण्याचा प्रयत्न करा. गर्दीच्या मधोमध दाब सर्वाधिक असतो. **५. भिंती, खांब आणि अडथळ्यांपासून दूर राहा:** भिंती, रेलिंग किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या अडथळ्यांजवळ दाब सर्वाधिक असतो आणि तिथे लोक चिरडले जाण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे अशा जागा टाळा. **६. तुमची ऊर्जा वाचवा:** विनाकारण ओरडण्यात किंवा आरडाओरड करण्यात तुमची शक्ती वाया घालवू नका. शांत राहा आणि तुमची ऊर्जा उभे राहण्यासाठी आणि सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी वापरा. इतरांशी संवाद साधायचा असेल तर शांतपणे आणि स्पष्टपणे बोला. **७. जर तुम्ही खाली पडलात तर:** जर तुम्ही सर्व प्रयत्न करूनही खाली पडलात, तर लगेच भ्रूणासारखी स्थिती (fetal position) घ्या. तुमचे गुडघे छातीजवळ ओढा आणि तुमचे हात डोक्यावर आणि मानेवर ठेवून त्यांचे रक्षण करा. यामुळे तुमच्या महत्त्वाच्या अवयवांचे संरक्षण होण्यास मदत होईल. --- ### **अशा परिस्थितीत द्वारपाल (Gatekeepers) आणि सुरक्षा रक्षकांची भूमिका** चेंगराचेंगरीच्या वेळी सुरक्षा रक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आणि निर्णायक असते. त्यांची त्वरित आणि योग्य कृती अनेकांचे प्राण वाचवू शकते. **१. गर्दीला बाहेर पडण्यासाठी मार्ग मोकळे करा:** त्यांचे पहिले आणि सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे गर्दीचा दाब कमी करणे. यासाठी सर्व आपत्कालीन आणि नियमित दरवाजे त्वरित उघडा. शक्य असल्यास, तात्पुरते बॅरिकेड्स किंवा अडथळे हटवून बाहेर पडण्यासाठी नवीन मार्ग तयार करा. **२. नवीन प्रवेश ताबडतोब थांबवा:** ज्या ठिकाणी चेंगराचेंगरी होत आहे, तिथे आणखी लोकांना येण्यापासून त्वरित थांबवा. मुख्य प्रवेशद्वार बंद करा किंवा लोकांना आत येण्यापासून रोखा. **३. शांत आणि स्पष्ट सूचना द्या:** ध्वनिक्षेपकाचा (Loudspeaker/PA System) वापर करून लोकांना शांत राहण्याचे आवाहन करा. "कृपया पुढे सरकत राहा", "डावीकडील गेट उघडे आहे", "शांत राहा, आम्ही मदत करत आहोत" अशा स्पष्ट आणि सकारात्मक सूचना द्या. "चेंगराचेंगरी" किंवा "पळापळ" असे शब्द वापरणे टाळा, कारण त्यामुळे भीती वाढू शकते. **४. उंच जागेवरून परिस्थितीवर लक्ष ठेवा:** शक्य असल्यास, उंच टॉवर किंवा सुरक्षित जागेवरून परिस्थितीचे निरीक्षण करा. यामुळे गर्दीचा दाब नेमका कुठे जास्त आहे आणि कोणत्या लोकांना मदतीची गरज आहे, हे समजण्यास मदत होते. **५. अडकलेल्या लोकांना बाहेर काढा:** जे लोक बॅरिकेड्स, रेलिंग किंवा भिंतीजवळ दाबले जात आहेत, त्यांना तातडीने बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. सुरक्षा रक्षकांनी एक साखळी तयार करून लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यास मदत करावी. **६. वैद्यकीय मदतीसाठी संपर्क साधा:** तात्काळ नियंत्रण कक्षाला (Control Room) माहिती देऊन रुग्णवाहिका (Ambulances) आणि प्रथमोपचार पथकांना पाचारण करा. **७. स्वतः सुरक्षित राहा:** मदतकार्य करताना सुरक्षा रक्षकांनी स्वतःला धोक्यात घालू नये. त्यांनी गर्दीच्या प्रवाहात अडकणार नाही याची काळजी घ्यावी, जेणेकरून ते इतरांना मदत करू शकतील. सुरक्षा रक्षकांचे योग्य प्रशिक्षण आणि अशा आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार केलेली एक प्रमाणित कार्यप्रणाली (Standard Operating Procedure - SOP) असणे अत्यंत आवश्यक आहे.

In reply to by माहितगार

माहितगार Fri, 06/06/2025 - 09:00
उपरोक्त जेमिनीबाबांचे उत्तर आहे. आम्ही गर्दीची स्थळे नेहमीच टाळण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्याचा प्रत्यक्ष अनुभव फारसा नाही, त्याबाबत गर्दीचा अनुभव घेणारेच अधिक नेमकेपणाने सांगू शकतील म्हणून आमचा उत्तरदायित्वास नकार लागू.

In reply to by माहितगार

माहितगार Fri, 06/06/2025 - 09:44
आत चेंगराचेंगरी चालू झाल्यास बाहेरून नवीन प्रवेश ताबडतोब थांबवा ही योग्यच सूचना आहे. पण आत प्रवेश न मिळणारी बेशीस्त मंडळी बाहेर पण तेवढीच चेंगरा चेंगरी करतात या बद्दल उपाय जेमिनी बाबूंना विचारावयाचे राहीले

In reply to by माहितगार

वरील उपाय बरेच चांगले आहेत. आपल्याकडे 'विशेष दिवस' आणि 'विशेष महिने' 'बाबा-बुवा' सत्संग वगैरे हे एक गर्दीचं मोठं कारण असतं. खरं तर ती गर्दी नसते तर लोकांचा आलेला महापूर असतो. वाटेल तिथे वाटेल तसं धावणारं पाणी त्याप्रमाणे माणसं धावतात गर्दी करतात. कालच्या चेंगराचेंगरीचे काही व्हीडीयो पाहात होतो माणसं एकमेकांच्या डोके खांद्यावर पाय देऊन चालत होते. आपला जीव वाचवतांना इतरांची काही अवस्था करुन सोडतो त्यावेळी जाणवत नसेल आपला जीव प्रथम या भावनेने गर्दी तुडवल्या जाते. महिला लहान मुले यात प्राणास मुकतात. आपल्याकडे अभ्यासक्रमात किंवा इतरवेळी कधीही गर्दीवर बोलल्या जात नाही. चर्चा होत नाही. सामाजिक संस्था अथवा सरकारं यासाठी जागरुकता करतांना दिसत नाही. फार आवश्यक विषय वाटत नाही. कधी तरी अशी अनावश्यक गर्दीह होते आणि घटना घडल्यावर त्यावर चर्चा होते. खरं तर, गर्दी टाळणे हाच सर्वात पहिला मोठा आणि महत्वाचा उपाय आहे. गर्दीत गेल्यावर गर्दीच्या विरोधात जायचं की प्रवाहासोबत जायचं यात गर्दीची कोंडी आणखी वाढत जाते. गर्दी फूटली पाहिजे. गर्दी इतरत्र पांगली पाहिजे यासाठी मोठ्या स्क्रीनवर अथवा सातत्याने उद्घोषणा करुन बाहेर पडण्याचे मार्ग दाखवले पाहिजेत. व्यवस्था ऐनवेळी कोलमडते तेव्हा त्यातील काही लोकांनी गर्दी मोकळी होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतही गर्दी झाली की, पोलिसांची वाट पाहिली जाते. तो पर्यंत वाटेल तशी वाहने वाटेल तिथे घुसवली जातात आणि वाहनांची कोंडी होते. हमरी तुमरी वाद आणि जीवावर बेतेल अशी भांडने. ब-याच वेळी कोणी तरी समजदार माणसं तरुण मुलं अशी गर्दी झाली की ट्राफीक नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतांना पाहिलं आहे. अशी दृश्य पाहिलं की बरं वाटतं. वाढत्या लोकसंखेवर गर्दीचा भार सोडून चालणार नाही. गर्दी आणि होणा-या दुर्दैवी घटना मोठा विषय आहे, सातत्याने त्यावर जमेल त्या माध्यमावर सकारात्मक लिहिते राहिलं पाहिजे. काहींचे जीव नक्की वाचेल असे वाटत राहते. -दिलीप बिरुटे

कंजूस Sat, 06/07/2025 - 10:42
श्रद्धेपुढे शास्त्र बाद होते. अगदी नियमांत बसून, शिस्तीने गोष्टी होत असल्या तरीही लागणारा वेळ पाहता त्यातील निरर्थकपणा पटवून घेण्याच्या मनस्थितीत लोक नसतील तर सगळी चर्चाच व्यर्थ आहे. उदाहरणार्थ प्रसिद्ध देवळांतील देवदर्शन. डोकेबाजपणे केलेले पर्यायही पटवून न घेण्याची वृत्ती....... कुंभमेळ्यातील आंघोळीसाठी पंपाने पाणी आणून एका ठिकाणी फवारले जाणे आणि भाविकांनी त्यातून जाणे . तरीही भाविकांना नदीतच आंघोळ करायची आहे. नियोजनाला फोलपणा - मोठ्या शहरांतील गर्दी टाळण्याचे उपाय सर्व बाद झाले आहेत. शहरातून मुख्य कामाची कार्यालये दुसरीकडे हलविणे अजूनही शक्य झाले नाही. मुंबईतील लोकल ट्रेन गर्दी. ...... त्यावर केलेले पर्याय --- आणखी रस्ते....आणखी मेट्रो...आणखी उड्डाणपूल सर्व बाद ठरले.

In reply to by कंजूस

माझ्या घराजवळून आठ दहा किलोमीटरहून बारमही गोदावरी नदी वाहते, पुढे जायकवाडी धरणाचे ब्याकवाटरही तुंबलेले असते. नगरपालिकेच्या ढीसाळ नियोजनामुळे पंधरा दिवसानंतर थेट तालुक्यात पाणी घरोघर येते. पण एकादशी आणि तत्सम महत्वाच्या वारी त्या गोदावरी नदीकाठी स्नानासाठी पवित्र दिवशी प्रचंड गर्दी होते. एखादे दोन जीवघेणे अपघातही घड़तात. नळाला येणारे पाणी तितकेच पवित्र किंबहुना अधिक फिल्टर असते त्यातही स्नान होऊ शकते पण गंगाडूबकीचं समाधान गंगेतच. लोकांची हे गर्दी... -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कंजूस Sat, 06/07/2025 - 13:04
पर्वकाळात तिर्थात स्नान ... यांचा आणि पुण्याचा हिशोब पौराणिक कथांमध्ये सांगून ठेवला आहे.घरामध्ये कुणालातरी यांचा अनुभव घ्यायची इच्छा असते. फार पूर्वी म्हणजे रेल्वे सुरू होण्याअगोदर काही शे भाविक चालत जाऊन तिकडे किती गर्दी करत असतील आणि आता सर्व वाहन सोयी झाल्यानंतर किती गर्दी होते यात खूपच अंतर आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. तर तुझी इच्छा पुरी करुया पण पर्वकाळाची अट सोड असं सांगायला हवे. आपण जाऊ तो पर्वकाळ हे पटवायला हवे.

In reply to by कंजूस

पण पर्वकाळाची अट सोड असं सांगायला हवे. आपण जाऊ तो पर्वकाळ हे पटवायला हवे.
आजच्या देव,धर्म प्रिय सरकारच्या काळात असे आधुनिक विचार सांगणे म्हणजे हे पुरोगामी आणि धर्मबुडव्या लोकांचे षडयंत्र ठरू शकते. त्यामुळे असा प्रयत्न करणे, लोकांना समजावून सांगणे महाकठीण काम झालं आहे. भला माणूस अशी रिस्क घेणार नाही. कोणत्या तरी पुराणात पर्वकाळातच गर्दी केली पाहिजे असे काही नाही, असे कोणी नवमतवादी शंकराचार्यांनी सांगितल्याशिवाय बदल शक्य नाही. किंवा भगवान श्रीकृष्ण यांनी जे काही मार्गदर्शन केले आहे त्या अशा कोणत्यातरी संस्कृत धार्मिक ग्रंथ अध्यायात पर्वकाळात गर्दी करु नये असे स्पष्ट म्हटलेले असुन भूतलावरील कोणतेही पाणी ( अटी लागू ) पवित्र असते असे सांगितल्याशिवाय ही गर्दी कमी होणार नाही. अर्थात थेट परिणाम दिसायला अजून पाच पन्नास वर्ष जावे लागतील, असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार Sat, 06/07/2025 - 17:54
१) १७९६ साली डॉ. एडवर्ड जेनर ने व्हॅरिओला व्हायरस वर मात करत स्मॉल पॉक्स (उर्फ देवी) नावाच्या गंभीर त्वचा आजारावर लस काढली १९८० पर्यंत जगातून या व्हायरस साथींचे समूळ उच्चाटन करण्यात मानवाला यश मिळाले आणि देवी आजार होऊ नये म्हणून होणार्‍या अंधश्रद्धा आपोआपच मागे पडल्या. ग्रहण विषयक वैज्ञानिक जाणीव शिक्षणातून वाढत गेले तर तत्संबधी अंधश्रद्धा बर्‍यापैकी मागे पडल्या. काही अंधश्रद्धांच्या मागे असलेल्या संबधीत असुरक्षीतता मागे पडल्या की लोक आपोपाच बदलतात. बेसिकली फोकस रचनात्मक मार्गाने असुरक्षीतता कशा कमी करता येतील याकडे हवा. २) गर्दी आणि चेंगरा चेंगरी या साठी धर्माची किंवा अंधश्रद्धेचा संबंध निमीत्तमात्र आहे मूलभूत समस्या मानवी संस्कृतीतील बेशिस्तीची आहे. सध्या चर्चेत असलेल्या क्रिडा क्षेत्रातील चेंगरा चेंगरीत धार्मीक श्रद्धा अंधश्रद्धांचा काय संबंध आहे? समजा १०० कोटी भारतीयांनी स्विमींगपूल मध्ये विशीष्ट दिवशी विशीष्ष्ट वेळी स्नान करण्याची इच्छा प्रदर्शीत केली पण फर्स्ट कम फर्स्ट सर्व ने जेवढ्यांना जमेल तेवढ्यांनीच केले समस्या कुठे आहे ? समस्या बेशीस्तीतच नाही का?

कर्नलतपस्वी Sat, 06/07/2025 - 12:53
काशीसी जावे नित्य वदावे.... असे स्थानमहात्म्य पूर्वापार समाज मनावर ठसवले आहे. कबीरदास आणी इतर संतांनी "मन चंगा तो कठौती मे गंगा",असे सांगून ही काही लोकांवर याचा परिणाम होत नाही. हे सर्वच धर्मामधे आहे. माझे एक वरिष्ठ सहकारी हज यात्रेतील स्टॅम्पेड मधे आपल्या धर्मपत्नीसह पैगंबरवासी झाले. डाॅक्टर होते. हा श्रद्धेचा भाग आहे पण या बरोबर सबुरी पण हवी तेव्हांच असले अपघात टळतील.
लेखनप्रकार
प्रेर्ना चर्चा विजयोत्सवाला गालबोट - प्रा. डॉ. दिलीप बिरुटे आरसीबीचा हा विजय साजरा करण्यासाठी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर कर्नाटक सरकारने संघाच्या सत्काराचा कार्यक्रमदेखील आयोजित केला होता. पण या कार्यक्रमाला चेंगराचेंगरीचं गालबोट लागले. अकरा जणांना आपल्या जीवाला नाहक मुकावं लागलं दुर्दैवी घटना. आपल्याकडे गर्दी आणि गर्दीचं नियोजन ही मोठी समस्या आहे. नियोजन नसल्यामुळे लोक वाटेल तसे जमेल तिथे गर्दी करतात. लोक ऐकत नाही आणि नियोजन कोलमडतं.

जर्द पिवळी विजार

वामन देशमुख ·
जर्द पिवळी विजार, तीतून द्वार ठोठावत आलेले आतड्यांतुनी साठलेले पोटी आवळून धरलेले संधी मिळाली नाही तेंव्हा आडोशाला बसण्याची जे त्याज्य ते त्याग करूनी मोकलाया दाही दिश्यांची आधी असं झालं नाही कधी पिवळं झालं नाही त्या कातर वेळी मात्र रोखून धरणं झालं नाही मग जनाची ना मनाची कसली लाज कुणाची निसर्ग-हाकेला ओ देऊन क्लांत शांत होण्याची - (साधी सुती विजार घालणारा) द्येस्मुक् राव्

'मिसळपाव' चा गदारोळ

माहितगार ·

चित्रगुप्त Wed, 04/16/2025 - 11:33
उत्स्फूर्त कवनाची सर एआय-निर्मितीला नाही , हे पुन्हा पुन्हा सिद्ध होते आहे. आता शार्दूलविक्रिडीत, भुजंगप्रयात, मालिनी इत्यादि वृत्तांमधे एआयला कविता रचण्याचे फर्मान देऊन बघा बरे. जेमिनीमुनीकुमार संस्करण दुसरें याचा नेमके नाव काय आहे ? दुवा द्यावा.

In reply to by चित्रगुप्त

Bhakti Wed, 04/16/2025 - 12:12
आता शार्दूलविक्रिडीत, भुजंगप्रयात, मालिनी इत्यादि वृत्तांमधे एआयला कविता रचण्याचे फर्मान देऊन बघा बरे.

In reply to by चित्रगुप्त

माहितगार Wed, 04/16/2025 - 13:28
खरय एआयला अद्याप बरंच काही जमत नाहीए आणि जमत नाही आहे जेवढे दिवस जमले नाही तेवढेच एका अर्थानी चांगले आहे. जरावेळापुर्वी धार्मिक काव्य लिहीण्याची आज्ञा जमली नाहीतर एआअयला आठवडाभर ट्रान्सलितेरल ओर्गचा अभ्यास कर मग आठवड्याभरानंतर प्रॉम्प्ट पुन्हा देतो म्हटले. शार्दूलविक्रिडीत, भुजंगप्रयात, मालिनी इत्यादि वृत्तांमधे एआयला कविता रचण्याचे फर्मान देऊन बघा बरे. हे नक्की बघतो माझ्या वृत्तात न बसणार्‍या जुन्या कविता एआयला वृत्तात बसवता येतील का हे एक एक वृत्त वापरून सराव घेऊन बघावे लागेल.

In reply to by माहितगार

चित्रगुप्त Wed, 04/16/2025 - 13:51
जेमिनीला बाळ गंगाधर टिळकांवर कविता लिहीण्याचे फर्मान दिल्यावर आधी खालीलप्रमाणे आले: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक सिंहापरी गर्जना, 'स्वराज्य हा जन्मसिद्ध हक्क' देशासाठी लढले ते, निष्ठावंत अन ध्येयासक्त. गणेशोत्सवाचा केला, लोकमंगल सोहळा जागृत केली जनशक्ती, पेटवला स्वातंत्र्याचा ज्वाळा. 'केसरी' गर्जला त्यांचा, भेदक वाणीचा तो वक्ता ब्रिटिशांच्या सत्तेला, दाखवला त्यांनी धाक खरोखरचा. मंडालेच्या तुरुंगातही, लेखणी त्यांची तळपली 'गीतारहस्या'तून ज्ञानाची, अमृतधारा अवतरली. ध्येयवेड्या त्या वीराला, शत शत प्रणाम आमचा स्वतंत्र भारताच्या इतिहासावर, अमिट ठसा त्यांचा. ----------------------------------------------- नंतर शा.वि. मधे लिहायला सांगितल्यावर खालील आले: Okay, here's the rewritten poem in the 'Shardulvikridit' meter: शार्दूलविक्रीडित वृत्त सिंहास्यें गर्जती 'स्वराज्य मम जन्मसिद्ध अधिकार' देशास्तव झुंजले सदा, ध्येयधुनी जगीं पेटवी फार. गणेशोत्सव लोकांसाठीं, मंगल सोहळा रम्य केला जागृत जन झाले सारे, स्वातंत्र्याचा वणवा चेतला. 'केसरी' गर्जला त्यांचा, भेदक वाणीचा वक्ता थोर ब्रिटिशांच्या सत्तेला, दाखविला धाक खरा कठोर. मंडालेच्या बंदींतहि, लेखणी तळपे ज्ञानोज्ज्वाला 'गीतारहस्य' अमृताची, वर्षिली धारा दिव्य त्याला. ध्येयासक्त विरा नमो, शत शत प्रणाम असोत अर्पिले स्वतंत्र भारताच्या यशांत, अमरत्व तयांनीं मिळविले.

In reply to by चित्रगुप्त

माहितगार Wed, 04/16/2025 - 17:29
विशेषतः शार्दूलविक्रीडित वृत्त छान वाचनीय झाली आहे. पण मी आज एक धार्मीक काव्य रचनेची जेमिनीला विनंती केली. तेवढी जमली नाही. एका प्रॉम्प्टवर रेन्डरींगचा अर्थ केवळ इमेज घेतला नाही तर आजीबात रिलिव्हंट नसलेली एका मॉडेलची इमेज प्रोड्युस केली. मग थोड्यावेळाने प्रयत्न सोडून दिले. पुन्हा मुड लागेल तेव्हा करेन .

In reply to by श्रीगुरुजी

चित्रगुप्त Wed, 04/16/2025 - 13:26
अवश्य लिहा, जात्यावर बसले की ओवी सुचेल, लिहायला बसले की मूड लागेल. लेखाची वाट बघत आहे.

In reply to by चित्रगुप्त

श्वेता२४ Wed, 04/16/2025 - 16:10
जात्यावर बसले की ओवी सुचेल, लिहायला बसले की मूड लागेल. काका तुमच्या मोनालिसाच्या गूढ स्मिताच्या कहाणीची वाट बघत आहे.

In reply to by श्वेता२४

श्रीगुरुजी Wed, 04/16/2025 - 16:26
मी पण. काका लवकरात लवकर लिहून पूर्ण करा. मोनालिसाला भेटून याच महिन्यात एक वर्ष झालं. तुम्ही लेख पूर्ण केला की पुनर्भेटीचा आनंद मिळेल.

In reply to by श्वेता२४

चित्रगुप्त Wed, 04/16/2025 - 16:50
मोनालिसाचा पुढला/अंतिम भाग लिहीण्याची माझी पण इच्छा आहे पण काही ना काही व्यावहारिक अडचणींमुळे सुरुवात होत नाहीये. तरी मिपाकरांच्या प्रेमळ आग्रहामुळे लिहायला बळ मिळेल.

चित्रगुप्त Wed, 04/16/2025 - 11:33
उत्स्फूर्त कवनाची सर एआय-निर्मितीला नाही , हे पुन्हा पुन्हा सिद्ध होते आहे. आता शार्दूलविक्रिडीत, भुजंगप्रयात, मालिनी इत्यादि वृत्तांमधे एआयला कविता रचण्याचे फर्मान देऊन बघा बरे. जेमिनीमुनीकुमार संस्करण दुसरें याचा नेमके नाव काय आहे ? दुवा द्यावा.

In reply to by चित्रगुप्त

Bhakti Wed, 04/16/2025 - 12:12
आता शार्दूलविक्रिडीत, भुजंगप्रयात, मालिनी इत्यादि वृत्तांमधे एआयला कविता रचण्याचे फर्मान देऊन बघा बरे.

In reply to by चित्रगुप्त

माहितगार Wed, 04/16/2025 - 13:28
खरय एआयला अद्याप बरंच काही जमत नाहीए आणि जमत नाही आहे जेवढे दिवस जमले नाही तेवढेच एका अर्थानी चांगले आहे. जरावेळापुर्वी धार्मिक काव्य लिहीण्याची आज्ञा जमली नाहीतर एआअयला आठवडाभर ट्रान्सलितेरल ओर्गचा अभ्यास कर मग आठवड्याभरानंतर प्रॉम्प्ट पुन्हा देतो म्हटले. शार्दूलविक्रिडीत, भुजंगप्रयात, मालिनी इत्यादि वृत्तांमधे एआयला कविता रचण्याचे फर्मान देऊन बघा बरे. हे नक्की बघतो माझ्या वृत्तात न बसणार्‍या जुन्या कविता एआयला वृत्तात बसवता येतील का हे एक एक वृत्त वापरून सराव घेऊन बघावे लागेल.

In reply to by माहितगार

चित्रगुप्त Wed, 04/16/2025 - 13:51
जेमिनीला बाळ गंगाधर टिळकांवर कविता लिहीण्याचे फर्मान दिल्यावर आधी खालीलप्रमाणे आले: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक सिंहापरी गर्जना, 'स्वराज्य हा जन्मसिद्ध हक्क' देशासाठी लढले ते, निष्ठावंत अन ध्येयासक्त. गणेशोत्सवाचा केला, लोकमंगल सोहळा जागृत केली जनशक्ती, पेटवला स्वातंत्र्याचा ज्वाळा. 'केसरी' गर्जला त्यांचा, भेदक वाणीचा तो वक्ता ब्रिटिशांच्या सत्तेला, दाखवला त्यांनी धाक खरोखरचा. मंडालेच्या तुरुंगातही, लेखणी त्यांची तळपली 'गीतारहस्या'तून ज्ञानाची, अमृतधारा अवतरली. ध्येयवेड्या त्या वीराला, शत शत प्रणाम आमचा स्वतंत्र भारताच्या इतिहासावर, अमिट ठसा त्यांचा. ----------------------------------------------- नंतर शा.वि. मधे लिहायला सांगितल्यावर खालील आले: Okay, here's the rewritten poem in the 'Shardulvikridit' meter: शार्दूलविक्रीडित वृत्त सिंहास्यें गर्जती 'स्वराज्य मम जन्मसिद्ध अधिकार' देशास्तव झुंजले सदा, ध्येयधुनी जगीं पेटवी फार. गणेशोत्सव लोकांसाठीं, मंगल सोहळा रम्य केला जागृत जन झाले सारे, स्वातंत्र्याचा वणवा चेतला. 'केसरी' गर्जला त्यांचा, भेदक वाणीचा वक्ता थोर ब्रिटिशांच्या सत्तेला, दाखविला धाक खरा कठोर. मंडालेच्या बंदींतहि, लेखणी तळपे ज्ञानोज्ज्वाला 'गीतारहस्य' अमृताची, वर्षिली धारा दिव्य त्याला. ध्येयासक्त विरा नमो, शत शत प्रणाम असोत अर्पिले स्वतंत्र भारताच्या यशांत, अमरत्व तयांनीं मिळविले.

In reply to by चित्रगुप्त

माहितगार Wed, 04/16/2025 - 17:29
विशेषतः शार्दूलविक्रीडित वृत्त छान वाचनीय झाली आहे. पण मी आज एक धार्मीक काव्य रचनेची जेमिनीला विनंती केली. तेवढी जमली नाही. एका प्रॉम्प्टवर रेन्डरींगचा अर्थ केवळ इमेज घेतला नाही तर आजीबात रिलिव्हंट नसलेली एका मॉडेलची इमेज प्रोड्युस केली. मग थोड्यावेळाने प्रयत्न सोडून दिले. पुन्हा मुड लागेल तेव्हा करेन .

In reply to by श्रीगुरुजी

चित्रगुप्त Wed, 04/16/2025 - 13:26
अवश्य लिहा, जात्यावर बसले की ओवी सुचेल, लिहायला बसले की मूड लागेल. लेखाची वाट बघत आहे.

In reply to by चित्रगुप्त

श्वेता२४ Wed, 04/16/2025 - 16:10
जात्यावर बसले की ओवी सुचेल, लिहायला बसले की मूड लागेल. काका तुमच्या मोनालिसाच्या गूढ स्मिताच्या कहाणीची वाट बघत आहे.

In reply to by श्वेता२४

श्रीगुरुजी Wed, 04/16/2025 - 16:26
मी पण. काका लवकरात लवकर लिहून पूर्ण करा. मोनालिसाला भेटून याच महिन्यात एक वर्ष झालं. तुम्ही लेख पूर्ण केला की पुनर्भेटीचा आनंद मिळेल.

In reply to by श्वेता२४

चित्रगुप्त Wed, 04/16/2025 - 16:50
मोनालिसाचा पुढला/अंतिम भाग लिहीण्याची माझी पण इच्छा आहे पण काही ना काही व्यावहारिक अडचणींमुळे सुरुवात होत नाहीये. तरी मिपाकरांच्या प्रेमळ आग्रहामुळे लिहायला बळ मिळेल.
नक्कीच, दिलेल्या तीन लिंकमधील माहितीच्या आधारे एक कविता तयार करण्याचा प्रयत्न मी करत आहे. **कविता:** **शीर्षक: 'मिसळपाव' चा गदारोळ** चार भिडू डावे, उजवेही चार, कुंपणाच्या वर, दोन भिडू फार. भिडू भिडतात, त्वेषे परस्परा, मौज ही इतरा, फुकटची जरा. राजकारणाच्या व्यतिरिक्त काही, घडतची नाही, देशात ह्याही. ऐसा आविर्भाव, भिडू बाळगती, आता झाले अती, हौस फिटे किती. अवांछित मजकूर, डोळे फिरवतो, दुर्लक्ष करणे, उपाय ठरतो. मिसळपाव चा रस्ता, वळणावळणाचा, वाद-विवाद, विषय नानाच. बातमी ताजी, चर्चा नवी, मतमतांतरे, इथे दाटली जगी. 'मिसळपाव' चा थाट, न्यारा असा, प्रत्येकाचा आवाज, इथे घुमतो दाही दिशा. पण, हे भिडू,

नववधू प्रिया मी..

सर्वसाक्षी ·

सर्वसाक्षी Sun, 03/09/2025 - 00:37
निघण्यापूर्वी विजाचा आणि स्त्रियांचा निरोप घेतला कृपया विजाचा आणि सरिताचा असे वाचावे. ( स्वयंसुधारणेचा प्रताप)

विजुभाऊ Mon, 03/10/2025 - 11:10
हे अशी मंडळी असतात काही. अगदी कोत्या मनाची. आयुष्यात आलेल्या संधीचा उपयोग करून बरोअब्बर वेळेवर इतराना त्रास द्यायची हौस भागवून घेतात

सौंदाळा Mon, 03/10/2025 - 12:56
काहीतरी भन्नाट वाचायला मिळेल म्हणून उत्सुकता होती पण वहिनीने वाट लावली सगळ्याची. असो लेख छान झालाय. पण समजा ब्लॉकची चावी मिळाली असती तर काय 'सजावट' करायचा विचार होता हे पण सांगून टाका.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

विजुभाऊ Mon, 03/10/2025 - 15:12
साक्षी भाऊ लिहीते झाले ते महत्वाचे. साक्षी भाऊ फोटो चांगले काढतात कॅमेर्याने . आता एखादे फोटो सेशन येऊद्या...... निसर्गाचे

चौथा कोनाडा Mon, 03/17/2025 - 13:00
साक्षीभाऊंनी त्या काळची नवविवाहित जोडप्यांची अस्सल समस्या कुशलतेने मांडलीय. त्या वेळचा पतिपत्नी रोमान्स हा जोडप्याचा रोमान्स नसून कौटुंबिक रोमान्स असायचा .... आहे त्यात जोडप्याने अ‍ॅडजेस्ट करत यातुन एकांत शोधत नातं दृढ करायचं. आम्ही पण यातून तावून सुलाखून गेलोय.. यशस्वी झालोय ! साक्षीभाऊ अश्या कहाण्या येउंद्या आजून !

श्वेता२४ Mon, 03/17/2025 - 15:54
वहीनीची कृती कुचकेपणाची होती यात काही वाद नाही. पण त्यामागे तीला यात पराकोटीची तडजोड करावी लागलेली असणार असे दिसते. स्वताच्या लग्नात दोन्ही भाऊ सोबत राहत नसतानाही नवीन फ्लॅट घ्यायचा 'समजुतदारपणा' दाखविणाऱ्या विजूने दादा-वहीनीच्या प्रायव्हसी बाबत कोणताही समजूतदारपणा भूतकाळात दाखविेलेला दिसत नाही. त्याचाच वचपा वहीनीने काढलेला दिसतो. माझ्या माझ्या एका मित्राने लग्न झाल्यानंतर हनिमूनला जाण्याचे नियोजन केले होते. त्याच्या घरात त्याच्या वहिनीने असाच दंगा केला. त्यांच्या घरात लग्न झाल्यानंतर असे फिरायला जाण्याची पद्धत नव्हती. त्यामुळे लग्नानंतर लगेचच त्याच्या मोठ्या भावाला कोणीही फिरायला जाऊ दिले नाही. लग्नानंतर महिन्यांनी त्याचा भाऊ वहिनीला घेऊन तिच्या माहेरी गेला आणि तिथून ते गुपचूप फिरायला गेले होते. त्यामुळे त्याच्या वहिनीने लग्नानंतर माझ्या मित्राने हनिमूनला जाऊ नये असा पवित्रा घेतला. माझा मित्र त्याच्या आई-वडिलांचा अत्यंत लाडका होता. ३-४ वर्षाच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले असल्यामुळे आई-वडीलही आता नव्या गोष्टी स्वीकारू लागले होते. त्यामुळे मित्राच्या हनिमूनला त्यांचा विरोध नव्हता. मित्राने हे मला सांगताच मी त्यांला हेच म्हणले की ज्यावेळी तुझ्या भावाच्या हनिमूनची गोष्ट होती त्यावेळी त्या दोघांनी हनिमूनला जावे याबाबत तू काय स्टॅन्ड घेतला होतास? त्यावर तो म्हणाला की मी काहीच बोललो नाही. घरचे सगळेच त्या विरोधात होते. त्यामुळे आई-बाबांना मी कसा विरोध करणार? त्यावर मी त्याला म्हणले तू काही इतका लहान नक्कीच नव्हतास की याबाबत एक भूमिका घेऊ शकशील. तू तुझ्या आई-वडिलांचे मत बदलायला हवे होतेस. कमीत कमी दादा वहिनी च्या बाजूने बोलला असतास तर आज वहिनीने इतका विरोध केला नसता.....

सर्वसाक्षी Sun, 03/09/2025 - 00:37
निघण्यापूर्वी विजाचा आणि स्त्रियांचा निरोप घेतला कृपया विजाचा आणि सरिताचा असे वाचावे. ( स्वयंसुधारणेचा प्रताप)

विजुभाऊ Mon, 03/10/2025 - 11:10
हे अशी मंडळी असतात काही. अगदी कोत्या मनाची. आयुष्यात आलेल्या संधीचा उपयोग करून बरोअब्बर वेळेवर इतराना त्रास द्यायची हौस भागवून घेतात

सौंदाळा Mon, 03/10/2025 - 12:56
काहीतरी भन्नाट वाचायला मिळेल म्हणून उत्सुकता होती पण वहिनीने वाट लावली सगळ्याची. असो लेख छान झालाय. पण समजा ब्लॉकची चावी मिळाली असती तर काय 'सजावट' करायचा विचार होता हे पण सांगून टाका.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

विजुभाऊ Mon, 03/10/2025 - 15:12
साक्षी भाऊ लिहीते झाले ते महत्वाचे. साक्षी भाऊ फोटो चांगले काढतात कॅमेर्याने . आता एखादे फोटो सेशन येऊद्या...... निसर्गाचे

चौथा कोनाडा Mon, 03/17/2025 - 13:00
साक्षीभाऊंनी त्या काळची नवविवाहित जोडप्यांची अस्सल समस्या कुशलतेने मांडलीय. त्या वेळचा पतिपत्नी रोमान्स हा जोडप्याचा रोमान्स नसून कौटुंबिक रोमान्स असायचा .... आहे त्यात जोडप्याने अ‍ॅडजेस्ट करत यातुन एकांत शोधत नातं दृढ करायचं. आम्ही पण यातून तावून सुलाखून गेलोय.. यशस्वी झालोय ! साक्षीभाऊ अश्या कहाण्या येउंद्या आजून !

श्वेता२४ Mon, 03/17/2025 - 15:54
वहीनीची कृती कुचकेपणाची होती यात काही वाद नाही. पण त्यामागे तीला यात पराकोटीची तडजोड करावी लागलेली असणार असे दिसते. स्वताच्या लग्नात दोन्ही भाऊ सोबत राहत नसतानाही नवीन फ्लॅट घ्यायचा 'समजुतदारपणा' दाखविणाऱ्या विजूने दादा-वहीनीच्या प्रायव्हसी बाबत कोणताही समजूतदारपणा भूतकाळात दाखविेलेला दिसत नाही. त्याचाच वचपा वहीनीने काढलेला दिसतो. माझ्या माझ्या एका मित्राने लग्न झाल्यानंतर हनिमूनला जाण्याचे नियोजन केले होते. त्याच्या घरात त्याच्या वहिनीने असाच दंगा केला. त्यांच्या घरात लग्न झाल्यानंतर असे फिरायला जाण्याची पद्धत नव्हती. त्यामुळे लग्नानंतर लगेचच त्याच्या मोठ्या भावाला कोणीही फिरायला जाऊ दिले नाही. लग्नानंतर महिन्यांनी त्याचा भाऊ वहिनीला घेऊन तिच्या माहेरी गेला आणि तिथून ते गुपचूप फिरायला गेले होते. त्यामुळे त्याच्या वहिनीने लग्नानंतर माझ्या मित्राने हनिमूनला जाऊ नये असा पवित्रा घेतला. माझा मित्र त्याच्या आई-वडिलांचा अत्यंत लाडका होता. ३-४ वर्षाच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले असल्यामुळे आई-वडीलही आता नव्या गोष्टी स्वीकारू लागले होते. त्यामुळे मित्राच्या हनिमूनला त्यांचा विरोध नव्हता. मित्राने हे मला सांगताच मी त्यांला हेच म्हणले की ज्यावेळी तुझ्या भावाच्या हनिमूनची गोष्ट होती त्यावेळी त्या दोघांनी हनिमूनला जावे याबाबत तू काय स्टॅन्ड घेतला होतास? त्यावर तो म्हणाला की मी काहीच बोललो नाही. घरचे सगळेच त्या विरोधात होते. त्यामुळे आई-बाबांना मी कसा विरोध करणार? त्यावर मी त्याला म्हणले तू काही इतका लहान नक्कीच नव्हतास की याबाबत एक भूमिका घेऊ शकशील. तू तुझ्या आई-वडिलांचे मत बदलायला हवे होतेस. कमीत कमी दादा वहिनी च्या बाजूने बोलला असतास तर आज वहिनीने इतका विरोध केला नसता.....
लेखनप्रकार
साधारण पस्तीस वर्षे झाली असतील या गोष्टीला विजा लग्न ठरल्याची बातमी घेऊन आला. आमच्या मित्रपरिवारामध्ये सर्वात लहान. गेल्या पाचेक वर्षात एकेक करून जवळपास सगळ्यांची लग्न होऊन गेली होती. नेहमी प्रमाणे सर्वांनी मुलगी कोण कुठली काय करते अशी सरबत्ती केली. वर पार्टीची मागणी होतीच. सगळ्यांनाच हुरूप आला, एक नवा कार्यक्रम मिळाला. त्या काळात इव्हेंट मॅनेजमेंट वगैरे सबकुछ मित्र मंडळी सांभाळायची. सर्वांचं एकमेकांच्या घरी जाणं येणं होतं सर्वांचे आईवडील आपल्या मुलांच्या मित्रांना घरचेच समजायचे. लग्न पार पडणं ही सामूहिक जबाबदारी असायची आणि ती हौसेने पार पाडली जायची.