वावर
स्वप्नपूर्तीचा दुसरा दिवस!
खंडाळ्याच्या घाटासाठी...
आणि मुंबईत धावले वाफेचे इंजिन...
मुंबईतील बोरीबंदर ते ठाणेदरम्यान आशिया खंडातील पहिली प्रवासी रेल्वेगाडी धावली 16 एप्रिल 1853 रोजी. त्या ऐतिहासिक घटनेचे आता 170 वे वर्षे सुरू झाले आहे. यंदाच्या 170व्या वर्षाच्या निमित्ताने 20 वर्षांपूर्वीच्या आठवणी जाग्या झाल्या. त्यावेळी भारतीय रेल्वेचे 150वे वर्ष सुरू झाले होते. त्या निमित्ताने 16 एप्रिल 2002 रोजी मुंबईत एका वेगळ्याच घटनेचे साक्षीदर होण्यासाठी लाखो मुंबईकरांनी बोरीबंदर ते ठाणेदरम्यानच्या लोहमार्गांच्या दुतर्फा, जिथे जागा मिळेल तिथे गर्दी केली होती. अगदी 16 एप्रिल 1853 ला केली होती तशीच.
विनिपेग डायरीज
जवळपास १६ -१७ तासांच्या विमान प्रवासानंतर कॅलगरी एअरपोर्टवर पुढच्या विमानाची वाट बघत बसलो होतो. मागचे ७-८ दिवस फारच धावपळीत गेले होते. या आधीही परदेश प्रवास केला होता , त्यामुळे त्याचे नावीन्य नव्हते. परंतु एखाद्या देशात दीर्घ काळ राहण्याचा हा पहिलाच अनुभव असणार होता. मुंबईहून निघाल्यापासून झोप नीट न झाल्याने थकवाही जाणवत होता. पुढच्या विमानाला चांगला ३-४ तासांचा वेळ असल्याने लाउंजमधला एक निवांत कोपरा बघून बसलो.सामान आजूबाजूला ठेवले आणि स्टॉल वरून कॉफी घेऊन आलो. कॉईन फोनवरून एक दोन जणांना फोन करायचा प्रयत्न केला पण ते काही जमले नाही.त्यामुळे निवांत कॉफी पीत बसलो.
एका (शैक्षणिक) सहलीची सांगता
महाविद्यालयाची अधिकृत सहल गेल्याच महिन्यात झाली. माथेरानला. बरोबर प्राध्यापक, प्राध्यापिका आणि विद्यार्थिनीसुद्धा. धमाल आली. या सहलीच्या गमती जमती वेगळ्या. चमचमीत तर्रीदार मिसळ नेहेमीच खातो, पण कधीतरी घरी आईने केलेल्या मटकीच्या उसळीत फ़रसाण, कांदा घालुन लिंबू पिळुन ती मिसळ घरच्यांबरोबर खाण्यात एक वेग्ळी मजा असते, तशी. असो. विषयांतर नको, त्या सहलीचा वृतांत पुन्हा कधीतरी.
गाव
अगदी साधं गाव होतं ते. लोकसंख्या कशीबशी २०००. गावात कुणी जास्त शिकलेलं नव्हतं, साहजिकच पन्नासेक पोरं तेव्हढी जवळच्या शहरात कामगार म्हणून राहायची. बाकी बराचसा गाव मळ्यांमध्ये राहायला गेलेला. मळ्यात प्यायला विहीरीचं पाणी होतं अन् आकडे टाकायला लायटीची तार पण. गावात शंभरेक घरं अजूनही होती. झेड. पी. च्या शाळेच्या पाच खोल्या (बालवाडी + चौथी) पोरांच्या शिक्षणासाठी कमी आणि लग्नाची बुंदी ठेवायला जास्त कामी येत. पाच वर्षांपूर्वी शिक्षण विभागाने एक नवीन खोली बांधून दिली - संगणक प्रशिक्षणासाठी. त्यात एक भारी टी.व्ही. पण आहे असं काहीजण सांगायचे. विजेची जोडणी नाही म्हणून त्या खोलीला टाळं आहे.
९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक, ३/४/५ डिसेंबर २०२१, आणि १५ वे विद्रोही साहित्य संमेलन, नाशिक, ४/५ डिसेंबर २०२१ मधील छायाचित्रे
९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक, ३/४/५ डिसेंबर २०२१, आणि १५ वे विद्रोही साहित्य संमेलन, नाशिक, ४/५ डिसेंबर २०२१ मधील छायाचित्रे
९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक, ३/४/५ डिसेंबर २०२१
लालपरी काही रम्य आठवणी
सध्याचे संप आणि त्यातील राजकारण जरा बाजूल ठेवून महाराष्ट्राच्या एस टी चाय रम्य आठवणीना उजाळा देणे हा या दहंग्यामागचाच शुद्ध हेतू आहे
कृपया सहकार्य करावे
- याआधी सातारा स्थानक आणि ठेवील कँटीन बद्दल लिहिले आहेच , पुण्यातल्या किंवा कोहापुरातल्या स्ट्यांड पेक्षा शुद्ध या त्यामानाने छोटी असलेली गावात असा भारी स्टॅन्ड कसा काय हे कळायचं नाही ! मुंबईत तर एस तो चा स्टॅन्ड असा कुठे आहे हे कुतूहल होते ... नंतर कळले मुख्यालय कुठे ते.. तिथे गेल्यावर असा विचार आला कि एस ती ने मुंबई नागपूर किंवा इंदूर कोण जात असेल का? मुंबई कोहापूर सुद्धा फार लांबचा प्रवास वाटायचा
क्रेडीट कार्ड
मी विजुभाउंची समस्या आणि प्रतिसाद वाचत असताना लक्षात आलं की अनेकांना क्रेडीट कार्ड वापरणं सोयीचं वाटत नाही वा जोखमीचं वाटतं. अर्थात तो मूळ विषय नसल्याने मी जरा सविस्तर लिहिण्यासाठी हा लेख लिहायचं ठरवलं.