मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शेवटचा तुकडा..

गवि ·

कांदा लिंबू 12/03/2026 - 19:45
छान हळुवार असं मनावर कथानक उमटत जातंय असं वाटलं. मानवी भावभावनांना, त्यांच्या अबोल अभिव्यक्तीला सीमा नाही असं काहीसं जाणवलं.

मिसळपाव 12/03/2026 - 21:02
समुद्र न थांबणं, जतिनचा प्रॉब्लेम नीटसा कळला नाही. पण डझन्ट मॅटर. लिखाण सुरेख आहे. नेमक्या शब्दात बरंच काही सांगितलंय. सुरुवातीची पानं वाचून मतकरींची 'जौळ' कादंबरी आठवली.

प्रचेतस 13/03/2026 - 07:21
कथा आवडली, शाल, लाईटहाऊस, समुद्र ही प्रतीकं सुरेखरीत्या वापरली आहेत. मिपावर ललितलेखनाचा दुष्काळ जाणवतो पण तुम्ही एक उत्तम कथा लिहून तो दूर केला आहे.

मुलगी नवर्‍यामधे वडील शोधते,मुलगा आई शोधतो सासू सुने बरोबर स्वतःला शोधते आणी मग सगळा गुंडांवर वाढतो. मानवी स्वभाव. बाकी कथा ,कथानक आणी पात्रे आसपास प्रचूर संखेत दिसतात. कथा आवडली हे वेगळे सांगायला नको.

मुलगी नवर्‍यामधे वडील शोधते,मुलगा आई शोधतो सासू सुने मधे स्वतःला शोधते आणी मग सगळा गुंतडां वाढतो. मानवी स्वभाव. बाकी कथा ,कथानक आणी पात्रे आसपास प्रचूर संखेत दिसतात. कथा आवडली हे वेगळे सांगायला नको.

सोत्रि 13/03/2026 - 14:51
गवी, काळजाला भिडेल असं लिहीतोस! - (गवीपंखा) सोकाजी

अभ्या.. 13/03/2026 - 16:40
व्वा, गविराज व्व्वा. शेवटाचा तुकडा म्हणून गविराज काही एआय एक्पिरिमेन्ट करतेत का काय वाटलं शीर्षक वाचून. . क्लासिक लेखनाचा असा अनुभव दिला की.... मान गये. आंदोहाऊर.

गविजी, कथा खूप आवडली,. लहान लहान वाक्यांनी जतिनचा टेम्पो मस्त बिल्डप होतोय पण कधी कधी त्या टेम्पोला देखील थोडा ठेहराव हवा असं वाटलं. काही वाक्ये खूप खास आहेत. अगदी टिपिकल संवाद देखील अगदी काळजीपूर्वक पेरलेले जाणवले आणि त्यामुळे एकून लेखन आणि त्याचा फ्लो खूप खरा उतरला आहे असे वाटत राहते. मस्त गविजी! - एक गविफॅन

मंत्री 14/03/2026 - 16:55
फारच आवडली कथा. इतकी की रोमातून बाहेर पडून प्रतिसाद द्यायला भाग पाडलं तुमच्या लेखनाने. जियो !

श्वेता२४ 14/03/2026 - 18:20
तुमच्या लिखाणाची चाहती आहेच. पण ही कथा अपूर्णत्वातही पूर्णत्वाचा अनुभव देणारी कथा आहे.. लौकिक अर्थाने कथेचा शेवट असा होत नसला तरीही कथा वाचल्या नंतर पूर्ण समाधान मिळाल्याची अनुभूती मिळते... अल्कोहोलिक मनुष्य एकदम मरत नाही. तो अधेमधे सुधारतो, पुन्हा आजारी पडतो आणि आसपासच्या सर्वांना आजारी करतो. हे वाक्य काळजाला भिडले अगदी!!

सौंदाळा 16/03/2026 - 10:49
आईशप्पथ गवि काय लिहिले आहे, खुप दिवसांनी!! आशा नर्सिंग होम, परत परत चालू बंद होणारा लाईट हाऊसमधला दिवा, समुद्राचा पझलमधला तुकडा, शालीची 'त्रिकोणी' घडी सगळच चपखल.

In reply to by पद्मजा५०

गवि 16/04/2026 - 21:55

व्यनि मागेच वाचून उत्तरही दिले होते आणि त्यानंतर व्यनि सुविधा बंद झाली आहे. ती आता परत सुरु होणार नाही. व्यनिमधे मी हे सांगितले, आणि परत अन्य एका धाग्यावर देखील पुन्हा सांगितले आहे. की मी वैयक्तिक ईमेल किंवा अन्य मार्गाने ऑनलाइन जगतात संपर्क करणे prefer करत नाही. तोच प्रतिसाद पुन्हा खाली पेस्ट करतोय. तुम्ही अभिप्राय किंवा अन्य काही मत प्रतिसाद किंवा काही जे असेल ते इथेच सांगावे. ते जाहीर सांगता येत नसेल तर क्षमस्व. वाचनाबद्दल धन्यवाद. आणखी एक गमतीने सांगतो. नुसतेच काहीतरी बोलायचे आहे, सांगायचे आहे असा सस्पेन्स फारसा मनोरंजक नाही. माझा प्रतिसाद परत एकदा आणि शेवटचा पेस्ट करतो आहे. "

 

नमस्कार. वैयक्तिक संपर्क (व्यक्तिगत ईमेल किंवा अन्य मार्गाने मी as a online policy) prefer करत नाही. कथेबद्दल काही मत किंवा प्रतिसाद असेल तर तो धाग्यावर किंवा इथे द्यावा. ती कथा पूर्ण काल्पनिक आहे. कोणत्याही व्यक्तीशी त्या कथानकाचा किंवा पात्रांचा काही संबंध नाही. त्यात कोणताही वास्तविक मानसिक आजार किंवा उपचार यांचे वर्णन नसून एक संपूर्ण कल्पनेचा विस्तार आहे. त्याचे रसग्रहण किंवा अन्य काही अनुकूल प्रतिकूल मत असेल तर ते धाग्यावर किंवा इथे द्यावे अशी विनंती. धन्यवाद. पुन्हा एकदा धन्यवाद."

In reply to by पद्मजा५०

गवि 17/04/2026 - 15:13

अवश्य पाठवा. आनंदच आहे. हीच माझी , म्हणजे लेखकाची जाहीर परवानगी समजा. वेगळी परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. लेखकाचे नाव म्हणून मिसळपाव टोपण नाव, गवि (गगन विहारी) हेच रहावे. मानधनाची मला अपेक्षा नाही. अंक मी विकत घेऊन वाचेन. कथा पूर्ण काल्पनिक आहे आणि कोणाशीही त्याचे साम्य हा योगायोग मानावा. अशी ओळ अंकात शेवटी टाकल्यास बरे होईल. मुख्य म्हणजे आपले आभार. वाचून आवडली आणि कुठेतरी पुढे रेकमेंड करावीशी वाटली हे खूप छान आहे. धन्यवाद. वाचत रहा.

कांदा लिंबू 12/03/2026 - 19:45
छान हळुवार असं मनावर कथानक उमटत जातंय असं वाटलं. मानवी भावभावनांना, त्यांच्या अबोल अभिव्यक्तीला सीमा नाही असं काहीसं जाणवलं.

मिसळपाव 12/03/2026 - 21:02
समुद्र न थांबणं, जतिनचा प्रॉब्लेम नीटसा कळला नाही. पण डझन्ट मॅटर. लिखाण सुरेख आहे. नेमक्या शब्दात बरंच काही सांगितलंय. सुरुवातीची पानं वाचून मतकरींची 'जौळ' कादंबरी आठवली.

प्रचेतस 13/03/2026 - 07:21
कथा आवडली, शाल, लाईटहाऊस, समुद्र ही प्रतीकं सुरेखरीत्या वापरली आहेत. मिपावर ललितलेखनाचा दुष्काळ जाणवतो पण तुम्ही एक उत्तम कथा लिहून तो दूर केला आहे.

मुलगी नवर्‍यामधे वडील शोधते,मुलगा आई शोधतो सासू सुने बरोबर स्वतःला शोधते आणी मग सगळा गुंडांवर वाढतो. मानवी स्वभाव. बाकी कथा ,कथानक आणी पात्रे आसपास प्रचूर संखेत दिसतात. कथा आवडली हे वेगळे सांगायला नको.

मुलगी नवर्‍यामधे वडील शोधते,मुलगा आई शोधतो सासू सुने मधे स्वतःला शोधते आणी मग सगळा गुंतडां वाढतो. मानवी स्वभाव. बाकी कथा ,कथानक आणी पात्रे आसपास प्रचूर संखेत दिसतात. कथा आवडली हे वेगळे सांगायला नको.

सोत्रि 13/03/2026 - 14:51
गवी, काळजाला भिडेल असं लिहीतोस! - (गवीपंखा) सोकाजी

अभ्या.. 13/03/2026 - 16:40
व्वा, गविराज व्व्वा. शेवटाचा तुकडा म्हणून गविराज काही एआय एक्पिरिमेन्ट करतेत का काय वाटलं शीर्षक वाचून. . क्लासिक लेखनाचा असा अनुभव दिला की.... मान गये. आंदोहाऊर.

गविजी, कथा खूप आवडली,. लहान लहान वाक्यांनी जतिनचा टेम्पो मस्त बिल्डप होतोय पण कधी कधी त्या टेम्पोला देखील थोडा ठेहराव हवा असं वाटलं. काही वाक्ये खूप खास आहेत. अगदी टिपिकल संवाद देखील अगदी काळजीपूर्वक पेरलेले जाणवले आणि त्यामुळे एकून लेखन आणि त्याचा फ्लो खूप खरा उतरला आहे असे वाटत राहते. मस्त गविजी! - एक गविफॅन

मंत्री 14/03/2026 - 16:55
फारच आवडली कथा. इतकी की रोमातून बाहेर पडून प्रतिसाद द्यायला भाग पाडलं तुमच्या लेखनाने. जियो !

श्वेता२४ 14/03/2026 - 18:20
तुमच्या लिखाणाची चाहती आहेच. पण ही कथा अपूर्णत्वातही पूर्णत्वाचा अनुभव देणारी कथा आहे.. लौकिक अर्थाने कथेचा शेवट असा होत नसला तरीही कथा वाचल्या नंतर पूर्ण समाधान मिळाल्याची अनुभूती मिळते... अल्कोहोलिक मनुष्य एकदम मरत नाही. तो अधेमधे सुधारतो, पुन्हा आजारी पडतो आणि आसपासच्या सर्वांना आजारी करतो. हे वाक्य काळजाला भिडले अगदी!!

सौंदाळा 16/03/2026 - 10:49
आईशप्पथ गवि काय लिहिले आहे, खुप दिवसांनी!! आशा नर्सिंग होम, परत परत चालू बंद होणारा लाईट हाऊसमधला दिवा, समुद्राचा पझलमधला तुकडा, शालीची 'त्रिकोणी' घडी सगळच चपखल.

In reply to by पद्मजा५०

गवि 16/04/2026 - 21:55

व्यनि मागेच वाचून उत्तरही दिले होते आणि त्यानंतर व्यनि सुविधा बंद झाली आहे. ती आता परत सुरु होणार नाही. व्यनिमधे मी हे सांगितले, आणि परत अन्य एका धाग्यावर देखील पुन्हा सांगितले आहे. की मी वैयक्तिक ईमेल किंवा अन्य मार्गाने ऑनलाइन जगतात संपर्क करणे prefer करत नाही. तोच प्रतिसाद पुन्हा खाली पेस्ट करतोय. तुम्ही अभिप्राय किंवा अन्य काही मत प्रतिसाद किंवा काही जे असेल ते इथेच सांगावे. ते जाहीर सांगता येत नसेल तर क्षमस्व. वाचनाबद्दल धन्यवाद. आणखी एक गमतीने सांगतो. नुसतेच काहीतरी बोलायचे आहे, सांगायचे आहे असा सस्पेन्स फारसा मनोरंजक नाही. माझा प्रतिसाद परत एकदा आणि शेवटचा पेस्ट करतो आहे. "

 

नमस्कार. वैयक्तिक संपर्क (व्यक्तिगत ईमेल किंवा अन्य मार्गाने मी as a online policy) prefer करत नाही. कथेबद्दल काही मत किंवा प्रतिसाद असेल तर तो धाग्यावर किंवा इथे द्यावा. ती कथा पूर्ण काल्पनिक आहे. कोणत्याही व्यक्तीशी त्या कथानकाचा किंवा पात्रांचा काही संबंध नाही. त्यात कोणताही वास्तविक मानसिक आजार किंवा उपचार यांचे वर्णन नसून एक संपूर्ण कल्पनेचा विस्तार आहे. त्याचे रसग्रहण किंवा अन्य काही अनुकूल प्रतिकूल मत असेल तर ते धाग्यावर किंवा इथे द्यावे अशी विनंती. धन्यवाद. पुन्हा एकदा धन्यवाद."

In reply to by पद्मजा५०

गवि 17/04/2026 - 15:13

अवश्य पाठवा. आनंदच आहे. हीच माझी , म्हणजे लेखकाची जाहीर परवानगी समजा. वेगळी परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. लेखकाचे नाव म्हणून मिसळपाव टोपण नाव, गवि (गगन विहारी) हेच रहावे. मानधनाची मला अपेक्षा नाही. अंक मी विकत घेऊन वाचेन. कथा पूर्ण काल्पनिक आहे आणि कोणाशीही त्याचे साम्य हा योगायोग मानावा. अशी ओळ अंकात शेवटी टाकल्यास बरे होईल. मुख्य म्हणजे आपले आभार. वाचून आवडली आणि कुठेतरी पुढे रेकमेंड करावीशी वाटली हे खूप छान आहे. धन्यवाद. वाचत रहा.

जतिन साधा माणूस आहे.  खूप शांत माणूस आहे. कुणाच्या अध्यात ना मध्यात. असं सागरदर्शन हाऊसिंग सोसायटीत राहणारे बरेच लोक म्हणायचे.  शांततेचा तळ किती खोल असतो याची जाणीव किंवा पर्वा वर वर पोहणाऱ्यांना नसते. त्याला एकटा मात्र कोणी म्हणत नव्हते. एकटे असण्यात एक काहीतरी अस्वस्थता, दुःख वगैरे असतं. गेलाबाजार उदास खिन्न चेहरा तरी असतो.  पण जतिनच्या आतमध्ये आता काहीच उरलं नव्हतं. त्यामुळे खिन्नताही दिसत नव्हती. त्याला एकटा तरी कसं म्हणायचं?  लोकांना काही अंदाज येणं शक्य नव्हतं.

शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..

आजी ·
हल्लीची काही मुलं परीक्षेत शतप्रतिशत म्हणजे शंभरपैकी शंभर मार्कस् मिळवतात. काहीजण तर शंभर टक्क्यांपेक्षा जास्त मार्कस् मिळवतात म्हणे.. कसे कोण जाणे.. हे सर्व माझ्यासारख्या आजी, आजोबा झालेल्या व्यक्तीला अचंबित करणारे असलं तरी ते वास्तव आहे. मी जेव्हा शाळेत जात होते तेव्हा मला कोणत्याही विषयात शत प्रतिशत गुण मिळाले असं फारसं आठवत नाही. तसं म्हटलं तर माझे भाषा विषय उत्तम होते. संस्कृत मध्ये मला दोन, तीन वेळा खरंच शत प्रतिशत गुण मिळालेही होते. पण फक्त आणि फक्त संस्कृतमध्येच.. आमच्या वेळी.. काय सांगू? ३५ टक्क्यांना पासिंग होतं. ७० टक्के मिळाले की डिस्टिंक्शन.

"गाॅसिपिंग" याने की "कुचाळक्या"..

आजी ·

हे काय बरोबर नाही आजी!!स्वतः बद्दल गॉसिप किवा तोंडावर बोलण्यात काय मजा बुवा? आम्ही तर हापिसात गॉसिप करायलाच जातो. कामे तर काय २४ तास चालुच असतात. त्यामुळे २ जण जमले की तिसर्‍याबद्दल गॉसिप होणारच. गॉसिप हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि आम्ही तो मिळवणारच. आणि हो!! मी पयला!!

विजुभाऊ 26/02/2026 - 15:27
सिक्स झीरो हे पण गॉसिपच होते की. अख्ख्या पाकिस्तान देशाने त्यावर विश्वास ठेवला. मुंबईतील तेरावा बॉम्ब्स्फोठ हे देखील त्यातले. जाणत्या राजाने म्हंझ्टले म्हणून सगल्यानी कितीतरी वर्षे विश्वास ठेवला. बंद खोलीतले वचन यावर देखील लोकानी विश्वास ठेवला.

सुबोध खरे 26/02/2026 - 18:37
माझा एक साधा विचार आहे. लोक आपल्या पाठीमागे बोलत असतील याचा अर्थच आपण त्यांच्या पुढे आहोत. आपण शांत राहावे आणि मजा पाहत राहावी. बाकी लोकांबद्दल गॉसिप (कुचाळक्या) करण्यात मला फारशी मजा येत नाही. यामुळंच मी जालावर सुद्धा माझ्या मूळ नावानेच वावरतो आणि माझा कोणताही डू आय डी नाही किंवा माझा कोणताही कंपू मध्ये समावेश झालेला नाही बायकांना गॉसिप करण्यात जास्त रस असतो असे माझे निरीक्षण आहे.( एकंदर बायका जास्त बोलतात त्यामुळेही असेल)

In reply to by अनन्त अवधुत

इतर कुठलेही सामाजिक प्राणी (कळपात राहणारे) कुचाळक्या करत नाहीत. तर बिन्दास गॉसिप करा.
इन फॅक्ट माणसाच्या माकडापासुन झालेल्या उत्क्रांतीत ह्या गॉसिपचा मोठा वाटा आहे असे मिपावरच्याच एका लेखात वाचले होते. म्हणज मनुष्य तसा सामाजिक प्राणी होताच पण दोघांनी तिसर्याबद्दल बोलण्याच्या ह्या (अव ?)गुणामुळे सध्याचा प्रगत मनुष्य झाला.

गामा पैलवान 26/02/2026 - 21:14
आजी,
अगदी एक धोबी सीतामाईबद्दल बोलला तेव्हापासून हे चालत आले आहे.
क्या बात है. बघा, वाल्मीकीय रामायणांत नसलेला धोबी कसा घुसवला अफवाखोरांनी. बाकी, गुळगुळीत मायापुरी वगैरे मासिके राहिली. ती खास गॉसिपवरंच चालतात. गॉसिपसाठी म्हणून बॉलीवूडी लोकं खोटी लफडीही रंगवतात. काय ती ढोंगं आन काय ते थोतांड....! आ.न., -गा.पै.

मदनबाण 27/02/2026 - 13:03
पक्षी जीव आणि गाॅसिपिंग ! डेटा कसा भराभर ट्रान्सफर केला जातो... अगं तुला समजला का? , अगं तुला कळलं का ? असे एक पक्षी जीव दुसर्‍या पक्षी जीवाला विचारतो... मग दुसरा पक्षी अगदी आपल्याला काय माहित नाही किंवा काय कळलं नाहीये असा चेहरा करुन अगदी आवडीने डेटा रिसिव्ह करायला सुरुवात करतो. :))) कोणाचं कोणा बरोबर सूत जुळलयं, इमूक तमुक भेटली होती, कोणाला कोणा बरोबर कुठे बघितले, कोणाचा कितवा महिना! इ इइ.... सगळं कसं इकडुन तिकडे ट्रान्सफर केलं जात. पक्षी जीव जितके एका दिवसात बोलत असतील तितके पारधी एक महिन्यात तरी बोलतील का ? याचीच मला शंका वाटते. जाता जाता: पक्षी जीव आणि सीक्रेट :- कोणाला बोलू नकोस, कोणाला सांगणार नाहीस ना ? असे बोलुन एक पक्षी जीव दुसर्‍या पक्षी जीवाला सीक्रेट डेटा ट्रान्सफर करतो. पण कोणाला बोलू नकोस किंवा सांगू नकोस हे शब्दच पाखरांना सातत्याने ट्रिगर करत राहतो, मग ज्या पक्षाला सीक्रेट डेटा ट्रान्सफर झाला आहे त्याला हाच डेटा ट्रान्सफर करण्याची "उर्मी" निर्माण होत राहते... मग परत हा जीव दुसर्‍या पक्षी जीवाला भेटतो तेव्हा... कोणाला बोलू नकोस, कोणाला सांगणार नाहीस ना ? :))) शेवटी मग पक्षाची सिस्टीम स्टेबल होते आणि जेवललं अन्न नीट पचतं! :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Karma Video Song (Hindi) - Kantara Chapter 1

आजी 08/03/2026 - 10:09
माझ्या स्नेही जनांचे मनापासून आभार मानते. माझ्या "गाॅसिपिंग याने की कुचाळक्या" या लेखाची एक हजाराहून अधिक वाचने झाली. प्रतिक्रिया निवडक, मोजक्या होत्या पण दर्जेदार आणि मनःपूर्वक दिलेल्या होत्या. त्या वाचून आनंद वाटला. तुमचा स्नेह मला लाभतो आणि मला नवीन काही लिहायला स्फूर्ती मिळते. सर्वांना या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

हे काय बरोबर नाही आजी!!स्वतः बद्दल गॉसिप किवा तोंडावर बोलण्यात काय मजा बुवा? आम्ही तर हापिसात गॉसिप करायलाच जातो. कामे तर काय २४ तास चालुच असतात. त्यामुळे २ जण जमले की तिसर्‍याबद्दल गॉसिप होणारच. गॉसिप हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि आम्ही तो मिळवणारच. आणि हो!! मी पयला!!

विजुभाऊ 26/02/2026 - 15:27
सिक्स झीरो हे पण गॉसिपच होते की. अख्ख्या पाकिस्तान देशाने त्यावर विश्वास ठेवला. मुंबईतील तेरावा बॉम्ब्स्फोठ हे देखील त्यातले. जाणत्या राजाने म्हंझ्टले म्हणून सगल्यानी कितीतरी वर्षे विश्वास ठेवला. बंद खोलीतले वचन यावर देखील लोकानी विश्वास ठेवला.

सुबोध खरे 26/02/2026 - 18:37
माझा एक साधा विचार आहे. लोक आपल्या पाठीमागे बोलत असतील याचा अर्थच आपण त्यांच्या पुढे आहोत. आपण शांत राहावे आणि मजा पाहत राहावी. बाकी लोकांबद्दल गॉसिप (कुचाळक्या) करण्यात मला फारशी मजा येत नाही. यामुळंच मी जालावर सुद्धा माझ्या मूळ नावानेच वावरतो आणि माझा कोणताही डू आय डी नाही किंवा माझा कोणताही कंपू मध्ये समावेश झालेला नाही बायकांना गॉसिप करण्यात जास्त रस असतो असे माझे निरीक्षण आहे.( एकंदर बायका जास्त बोलतात त्यामुळेही असेल)

In reply to by अनन्त अवधुत

इतर कुठलेही सामाजिक प्राणी (कळपात राहणारे) कुचाळक्या करत नाहीत. तर बिन्दास गॉसिप करा.
इन फॅक्ट माणसाच्या माकडापासुन झालेल्या उत्क्रांतीत ह्या गॉसिपचा मोठा वाटा आहे असे मिपावरच्याच एका लेखात वाचले होते. म्हणज मनुष्य तसा सामाजिक प्राणी होताच पण दोघांनी तिसर्याबद्दल बोलण्याच्या ह्या (अव ?)गुणामुळे सध्याचा प्रगत मनुष्य झाला.

गामा पैलवान 26/02/2026 - 21:14
आजी,
अगदी एक धोबी सीतामाईबद्दल बोलला तेव्हापासून हे चालत आले आहे.
क्या बात है. बघा, वाल्मीकीय रामायणांत नसलेला धोबी कसा घुसवला अफवाखोरांनी. बाकी, गुळगुळीत मायापुरी वगैरे मासिके राहिली. ती खास गॉसिपवरंच चालतात. गॉसिपसाठी म्हणून बॉलीवूडी लोकं खोटी लफडीही रंगवतात. काय ती ढोंगं आन काय ते थोतांड....! आ.न., -गा.पै.

मदनबाण 27/02/2026 - 13:03
पक्षी जीव आणि गाॅसिपिंग ! डेटा कसा भराभर ट्रान्सफर केला जातो... अगं तुला समजला का? , अगं तुला कळलं का ? असे एक पक्षी जीव दुसर्‍या पक्षी जीवाला विचारतो... मग दुसरा पक्षी अगदी आपल्याला काय माहित नाही किंवा काय कळलं नाहीये असा चेहरा करुन अगदी आवडीने डेटा रिसिव्ह करायला सुरुवात करतो. :))) कोणाचं कोणा बरोबर सूत जुळलयं, इमूक तमुक भेटली होती, कोणाला कोणा बरोबर कुठे बघितले, कोणाचा कितवा महिना! इ इइ.... सगळं कसं इकडुन तिकडे ट्रान्सफर केलं जात. पक्षी जीव जितके एका दिवसात बोलत असतील तितके पारधी एक महिन्यात तरी बोलतील का ? याचीच मला शंका वाटते. जाता जाता: पक्षी जीव आणि सीक्रेट :- कोणाला बोलू नकोस, कोणाला सांगणार नाहीस ना ? असे बोलुन एक पक्षी जीव दुसर्‍या पक्षी जीवाला सीक्रेट डेटा ट्रान्सफर करतो. पण कोणाला बोलू नकोस किंवा सांगू नकोस हे शब्दच पाखरांना सातत्याने ट्रिगर करत राहतो, मग ज्या पक्षाला सीक्रेट डेटा ट्रान्सफर झाला आहे त्याला हाच डेटा ट्रान्सफर करण्याची "उर्मी" निर्माण होत राहते... मग परत हा जीव दुसर्‍या पक्षी जीवाला भेटतो तेव्हा... कोणाला बोलू नकोस, कोणाला सांगणार नाहीस ना ? :))) शेवटी मग पक्षाची सिस्टीम स्टेबल होते आणि जेवललं अन्न नीट पचतं! :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Karma Video Song (Hindi) - Kantara Chapter 1

आजी 08/03/2026 - 10:09
माझ्या स्नेही जनांचे मनापासून आभार मानते. माझ्या "गाॅसिपिंग याने की कुचाळक्या" या लेखाची एक हजाराहून अधिक वाचने झाली. प्रतिक्रिया निवडक, मोजक्या होत्या पण दर्जेदार आणि मनःपूर्वक दिलेल्या होत्या. त्या वाचून आनंद वाटला. तुमचा स्नेह मला लाभतो आणि मला नवीन काही लिहायला स्फूर्ती मिळते. सर्वांना या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
गॉसिपिंग उर्फ कुचाळक्या सर्वजण करतात. आपण सगळ्यांनी ते केलंय. लहान मुलं ,स्त्रिया, पुरुष, तरुण ,म्हातारे सगळेजण गॉसिपिंग करतात. गॉसिपिंग करण्यासाठी अट फक्त एकच. ज्याच्याबद्दल किंवा जिच्याबद्दल गाॅसिपिंग करायचं ती व्यक्ती तिथे हजर असता कामा नये. अर्थात कुणीतरी एक चहाडखोर असतोच बरं का आणि तो त्या व्यक्तीपर्यंत ही निंदा नालस्ती, टवाळकी लगबगीने पोहोचवतोच. काही पठ्ठे तर दोन्हींकडेही गाॅसिपिंग करतात आणि दोघांनाही एकमेकांच्या बातम्या पोहोचवतात. गॉसिपिंग फक्त दोघेजण किंवा अनेकजण एकत्र जमून देखील करतात. ते प्रत्यक्ष बोलून किंवा व्हॉट्सॲपवर सांकेतिक भाषेत किंवा फोनवरून देखील चालतं.

नरो वा कुंजरो वा

चांदणे संदीप ·
पोटाची खळगी भरणे कारणी स्वार्थें, वैऱ्याची हो मनधरणी हसणे होईल पातक घोर भवती मूर्खांचा वाढेल जोर सत्य नित्य नको ओठी वाचेत मुग्धतेची पराकोटी आणि... मती निकामी होय तेधवा म्हणावे, नरो वा कुंजरो वा - संदीप भानुदास चांदणे

~ गंध धुंद ~

किल्लेदार ·

सुंदर सुगंधित लेख. परफ्युमची लहानपणापासूनच ऍलर्जी असल्याने कधीच फार वापरता येत नाही. मध्ये एकदा धीर करून एक बाटली आणली पण लगेच त्रास चालू झाला. तशीच पडून आहे कपाटात.

विजुभाऊ 07/11/2025 - 10:35
खल्ल्लास....... वाचूनच एकदम धुंद झालो. लै भारी लिहीलेय भाऊ. गंध , वाईन आणि स्कॉच मधे प्रायमरी नोट्स आणि सब नोट्स चे प्रकरण तसे क्लासेस साठीच असते. पानडी आणि व्हाईट रोझ हे आमच्यासाठी चे अस्सल देशी गंध. त्यानंतर कॉलेजात असताना कधीतरी इंटीमेट हे नाव ऐकन्यात आले. डीओ वगैरे प्रकार फारसे जमले नाहीत म्हणून आजमावले नाहीत. कधीतरी आणलेले आणि फक्त खास कार्यक्रम वगैरे साठी जपून ठेवलेले इंटिमेंट , सँडलवुड वगैरे चे फवारे कॉलेजवयीन चिरंजीवाने सढळ हाताने वापरून संपवले. मग ठरवले की फक्त फवारे न आणता अत्तरे च आणायची तेंव्हा पारिजात आणि सोनचाफा या गंधात अडकलो. एकदा बहारीन वरून येताना ओउध ( ऊद) आणले. पण तो वास उग्र ठरला. काही गंध आठवले तरी बर्‍याच जुन्या आठवणी जागृत होतात. हे मात्र खरे

Bhakti 07/11/2025 - 11:38
वाह! खुपच सुवासिक लेख आहे.फुलांचे सुगंधित परफ्यूम भारतात तरी अधिक प्रचलित आहेत.तेव्हा प्राणीजन्य गोष्टी यासाठी कशाप्रकारे वापरल्या जातात हे नव्यानेच समजलं.

किल्लेदार 08/11/2025 - 03:35
नचिकेत जवखेडकर- अरेरे. बाटली तशीच असेल तर मी येऊन घेऊन जातो :) कर्नलतपस्वी - हाहा...धन्यवाद. सिरुसेरि, Bhakti - धन्यवाद विजुभाऊ - उद जरा उग्र असतो खरा. मी एकच वापरला. Versache Oud Noir. मस्त आहे. अत्तरे चांगली असतात पण जरा एकसुरी असल्यामुळे थोडी बोअरिंग वाटतात.

प्रचेतस 10/11/2025 - 12:52
एकदम धुंद फुंद करणारा लेख. बाकी काही पर्फ्युम कितीही महागडे आणि भारी असले तरी आपल्याला आवडतील असे नव्हे. आपल्याला आवडणारा एखादाच मिळतो आणि आपण त्याचे पंखे होऊन जातो. मला आवडलेला आणि रुचत आलेला म्हणजे डियोर सॉवेज. तो एकदा वापरला पण इतका महागडा सतत वापरायला परवडणे शक्य नाही मग त्याचा क्लोन अजमलचा झील वापरतो. अजमल, अर्माफ ह्या दोन्ही प्रतिष्ठित कंपन्या महागडया पर्फ्युम्सचे उत्तम दर्जाचे क्लोन्स तयार करतात. अर्थात अजमल, अर्माफ वापरणेही तसे महागातच जाते ही गोष्ट वेगळी.

In reply to by प्रचेतस

सुबोध खरे 11/11/2025 - 11:37
सुगंधच नव्हे तर कोणतीही कला आपल्याला आवडेल तीच महत्त्वाची आहे उगाच ती महाग आहे किंवा जास्त लोकांना आवडते म्हणून आपण आवडून घ्यावे असे काहीही नाही. मुळात कला चित्रकला हस्तकला शिल्पकला गायन वादन सुगंध किंवा कपडा या गोष्टी आपल्या पंचेंद्रियांना आनंद देणाऱ्या असाव्यात. तुमचा पिंड नसेल तर उगाच खादीचे जाडे भरडे कपडे घालून कोणत्यातरी अगम्य चित्रकलेच्या प्रदर्शनात आपली अभिरुची उच्च आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करणारे असंख्य लोक आढळतात तसेच अरमानी किंवा गुच्ची चं "औ द तॊईलेत" केवळ महाग आहे म्हणून तुम्हाला आवडलं पाहिजे असं मुळीच नाही. आपण चार पैसे मिळवतो म्हणून आपल्याला भरपूर महाग सुगंध आवडेलच पाहिजे असे नव्हे. हि केवळ गतानुगतिकता आहे. आपल्याला नाट्यसंगीत आवडत असेल तर आवडत नसलेल्या कोणत्यातरी कंटेम्पररी गझल गायकाच्या कार्यक्रमाला १५००० रुपये देऊन निमंत्रितांच्या रांगेत जाण्याची आवश्यकता नाही. एके काळी कॉर्पोरेट जगात आपण सी इ ओ असलो तर आपल्या कडे काळं बेरं (BLACKBERRY) असलाच पाहिजे असा अलिखित नियम होता या गतानुगतिकतेते आजही असंख्य लोक दिसतात आणि उगाच तसाच असायला पाहजे म्हणून स्वतः;ला त्रास होत असताना सुद्धा अट्टाहासाने आपण कसं एन्जॉय करतो आहोत हे जगाला पटवून देण्याचा अट्टहास करताना आढळतात चालायचंच

किल्लेदार 11/11/2025 - 16:03
प्रचेतस - डियोर महागडा आहे खरा पण क्लोनही चांगले आहेत. सुबोध खरे - खरंय. उगाच महाग आहे म्हणून काहीही आवडून घेण्यात अर्थ नाही. पण पैसे टाकले की गुणवत्ता सहसा चांगली मिळते, अर्थात त्यालाही बरेच अपवाद आहेतच. खिशाला परवडत असेल, आवड असेल आणि खर्च केलेले पैसे वसूल होत असतील तर काहीच हरकत नाही पण उगाच हाईपच्या मागे लागण्यात अर्थ नाही. महागड्या ब्रँड च्या किंमतीत बराचसा भाग हाइपचा आणि ब्रॅण्डिंग चा असला तरी चांगला कच्चा माल वापरलेला असल्यामुळे ब्रँडेड प्रॉडक्ट वापरण्यातले समाधान आणि मजाही वेगळी असते.

गामा पैलवान 05/12/2025 - 00:49
किल्लेदार, लेख चांगलाच खुसखुशीत झालाय. गंधांची दुनिया अजब असते. लेखातल्या बऱ्याच गोष्टींशी नातेगत ( = रीलेट ) होऊ शकलो. विशेषत: सुगंधी पट्टीशी अगदी घट्टपणे ! ;-) आयुर्वेदांत नासिकेस मेंदूचे द्वार म्हंटलंय. म्हणूनंच गांधांमुळे स्मृती चटकन जागृत होत असाव्यात. आ.न., -गा.पै.

गवि 05/12/2025 - 08:37
लेख बेहद्द आवडला. शैली, कोटीबाजपणा, विस्तार .. सगळंच एकदम भारी. एखादा सुगंध आपल्याला टेलिपोर्ट करून विशिष्ट जागी, विशिष्ट जगात नेतो हे अगदी पटलं. पॅरिसमध्ये आणि युरोपात कुठल्या कुठल्या परफ्युमरीज फिरून बघितल्याचं आठवतं. फ्रॅगोनार्ड किंवा तत्सम एक नाव आठवतं. कागदाच्या पट्ट्यांवर फवारा आणि मग त्या खिशात घेऊन फिरणे वगैरे सर्व आठवले. मिट्टी परफ्यूम. भारी कंपनीचा घेतल्यास खरा शुद्ध मातीचा सुगंध मिळतो. बाकी ठिकाणी त्यात इतर कायकाय घातलेले असते.

परफ्यूम आवडतं, त्यामुळे लेख थेट भिडला. शैली भारी. खुसखुशीत आणि तितकेच भारी संदर्भ. सकाळ गंधीत झाली. खरं, म्हणजे लेखनाचं कौतुक करायला खूप पानभर लिहायला पाहिजे. इतका भारी लेख आहे. अतिशय सुंदर. लै म्हणजे लै आवडलं लेखन. भावना पोचल्या असतील. दै. लोकमतच्या दीपोत्सवात २०२५ यावेळी कन्नौजच्या अत्तरावर खूप सुंदर लेख आहे. दीडहजार वर्षापासून या कन्नौजला अत्तराचा गंध आहे, तेथील ग़टारांना अत्तराचा गंध आहे, इतके अत्तर तिकडे तयार होतं. कन्नौजवर फिर कभी बोलूया...........! -दिलीप बिरुटे

वेदांत 05/12/2025 - 12:46
खुप मस्त लेख झाला आहे. अत्तर / परफ्युम हा माझा खूप आवडता विषय.. अत्तर पासुन सुरू करता करता, आता आवडत्या परफ्युम्स ची पूर्ण बोटल मागावण्या पर्यंत मजल गेली आहे. Mancera Cedrat Boise हा तर माझ्या सर्वात आवडता परफ्यूम.. Creed Aventus च्या डीएनए चा क्लोन असला तरीही थोडा वेगळा आहे. कोणत्याही ऋतूमध्ये वापरता येतो आणि नेहमीच कॉम्प्लिमेंट्स मिळतात. Armaaf चा CDNI पण याच वाटेने जातो. सध्या मिडल ईस्टर्न परफ्युम्स पण चांगले येत आहेत , उदाहरण द्यायचे म्हटले तर Afnaan che 9PM, 9PM एलेक्सिर, सुप्रीमसी कलेक्टर एडिशन /नॉट ओन्ली इंटेन्स, लत्ताफा चे खामरा , खमराह कवाह इत्यादि. Silage & Longetivity बद्दल मिडल ईस्टर्न परफ्युम्स नेहमीच एक पाऊल पुढे.. सध्या हिवाळा चालू असल्याने फ्रेंच Avenue चे Liquid ब्राउन पण वापरून बघितले , ज्यांना गोडवासाचे पर्फुम्स आवडतात त्यांच्यासाठी हा खूप छान आहे, उन्हाळ्यासाठी स्वस्त आणि मस्त म्हणजे Rue Broca Theoreme perfume , या विषयाची कितीही माहिती घेत गेलो तरी, अजुन बरेच काही शिकायचे आहे असे नेहमीच वाटत रहाते..

टर्मीनेटर 05/12/2025 - 14:38
काय त्या 'शाब्दिक कोट्या', काय ती 'ओघवती लेखनशैली, आणि काय ते 'दर्दी' मंडळींचे प्रतिसाद... सगळंच एकदम जबरदस्त 👍 काहीसा उशिराने वाचनात आलेला हा 'सुगंधी' लेख प्रचंड आवडला आहे. अर्थात ही फक्त पोचपावती आहे, ह्यावर एक स्वतंत्र सविस्तर प्रतिसाद लिहावाच लागणार आहे!

किल्लेदार 12/12/2025 - 00:05
गामा पैलवान, गवि, प्रा.डॉ.दिलीप बिरुटे - खणखणीत प्रतिक्रियांबद्दल आभार. आपलेही काही अनुभव सांगा. वेदांत - धन्यवाद. Cedrat Boise Intense जास्त चांगला वाटला. OG जास्त टिकत नाही पण आहे चांगला. मिडल ईस्टर्न थोडे उग्र वाटतात म्हणून त्यांच्या वाट्याला अजून फार गेलो नाहीये. टर्मीनेटर - सविस्तर प्रतिसादाची वाट बघतो :). लेखात अजूनही बरंच काही राहून गेलं आहे. तुमच्या शैलीत लिहून काढा.

In reply to by किल्लेदार

टर्मीनेटर 13/12/2025 - 20:00
सविस्तर प्रतिसादाची वाट बघतो :)
येस सर... लक्षात आहे, पण हल्ली इथे आल्यावर संजय राउत काय, संजय आवटे काय अशा एक से एक दलिंदर लोकांनी प्रसवलेले भंकस विचार वाचण्यात काहीवेळ खर्ची पडतो आणि त्यामुळे हाताशी असलेला फावला वेळ कमी पडतो,. (सब गंदा है पर धंदा है ये... त्या लोकांचा, माझा नाही बर्का 😀) पण ते असो, वर मदनबाण साहेबांच्या प्रतिसादात ''Gucci Flora' ह्या माझ्या (कुठल्याही स्वरुपातील) आवडत्या फ्रॅग्रंसचा उल्लेख वाचला आणि रहावले नाही म्हणुन हा छोटासा प्रतिसाद प्रपंच!

In reply to by टर्मीनेटर

किल्लेदार 15/12/2025 - 21:16
निवडक खावं आणि निवडक वाचावं म्हणजे डोक्याचं आणि पोटाचं अपचन होत नाही.

मदनबाण 13/12/2025 - 11:16
सुगंधावर लिहलेला अत्यंत रचनात्मक लेख! माझा अगदी आवडता विषय ! अत्तर- परफ्युम आणि मग डिओ असा माझ्या आवडीचा क्रम आहे. सध्या Hawas Ice,Sauvage,Arabians Tonka,Gucci Flora, Musk Al Tahara अनुभवुन पहात आहे [ क्लोन व्हर्जन ]. तर डिओ मध्ये अजमल चे परफ्युम डिओ अनुभवणे सुरवात केली आहे. यात Aurum Wisal & Wisal Dhahab आणि Sacred Love आहे. याचा काँबो सेट मिळतो.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Kiliye Kiliye... | Lokah Chapter 1: Chandra |

In reply to by मदनबाण

मदनबाण 13/12/2025 - 13:48
एक दुवा द्यायचा राहुन गेला होता: How to Smell Rich: Perfume Hacks, Men vs Women & Lasting Tips - Abdulla Ajmal | FO387 Raj Shamani

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Kiliye Kiliye... | Lokah Chapter 1: Chandra |

In reply to by मदनबाण

किल्लेदार 15/12/2025 - 21:07
हो. बघितलाय हा. अजमल चा सगळा पैका उद प्लांटेशन मधून येतो. परफ्यूम त्याच्यासाठी चिरीमिरी आहे. हवास आईस घ्यायचा राहून गेला. हवास ट्रॉपिकल घेतला. चांगला आहे. Sauvage चांगला आहे पण खूपच कॉमन झाल्यामुळे थोडा कंटाळवाणा झाला.

In reply to by किल्लेदार

मदनबाण 18/12/2025 - 14:32
Sauvage चांगला आहे पण खूपच कॉमन झाल्यामुळे थोडा कंटाळवाणा झाला. मला क्लोन परफ्युम्स बद्धल काहीच माहित नव्हते आणि मी मुख्यत्वे अत्तर वापरण्यावरच बराच काळ भर दिला आहे. अचानक मला या क्लोन प्रकरा बद्धल कळले आणि मी बर्‍याच काळाने परफ्युवर परतलो. पारध्यां पेक्षा पक्षांचे नाक अधिक संवेदनाशील असते आणि त्यांना तीव्र गंध आवडत नाहीत त्यामुळे Sauvage आणि इतर ट्राय मारले. सध्या Black Opium अनुभवत आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- PASSO BEM SOLTO (SLOWED) : ATLXS

In reply to by मदनबाण

किल्लेदार 18/12/2025 - 18:28
पक्ष आणि पक्षी दोघांच्याही कधी नादी लागलो नाही त्यामुळे माझ्या नाकाला भावतो तो मला आवडतो. एक दोन परफ्यूम्स तर असे आहेत की पक्षी स्थलांतरच करतील. अंटोनियो पुइज कोरम, टेड लॅपिडस हे त्याच कॅटेगरी मध्ये येतात पण मधून मधून स्वतःसाठी वापरतो. एखादा जुना इंग्रजी चित्रपट किंवा सीरिज बघतांना हमखास उडवतो.

In reply to by किल्लेदार

मदनबाण 18/12/2025 - 21:11
हा.हा.हा... स्वतःला आवडणारे आणि आपण लावल्यामुळे आपल्या सकट दुसर्‍यांना आवडणारे अशी मी अगदी माझ्यासाठीची विभागणी केलेली आहे. तुम्ही म्हणता तसे मी देखील मला आवडणारे परफ्युम जे कदाचीत इतरांना आवडणार नाहीत वापरले आहेत. प्रदीर्घकाळ विविध सुंगध प्रकार वापरल्या नंतरी मी माझ्यात बदल केला, मी असे सुगंध टाळतो जे तीव्र गंधाचे असतील, कारण काही वेळा अश्या गंधाने इतरांचे [ आपल्या आजुबाजुचे ] डोके ठणकते आणि माझ्यामुळे कोणा इतर व्यक्तीस त्रास होऊ नये ही गोष्ट मला महत्वाची वाटली. माझ्या नोकरीत कामाच्या स्थळी सर्व वयातल्या पक्षांचे प्रमाण बर्‍यापैकी असते,त्यामुळे त्यांचे नाक अधिक संवेदनाशील असते हे मला अनुभवातुनच समजले. करोनाच्या आधी एका स्थळी काम करताना माझ्या आजुबाजुला जवळपास ७ पक्षी जीव होते आणि त्यांच्या गराड्यात मी एकटा... :))) साधारण एक आठवड्यात त्या सगळ्यांना हे समजलेले होते की हा काहीतरी भन्नाट लावुन येतो, दुसर्‍या आठवड्यात त्यांच्यावर पूर्णपणे प्रभाव झालेला होता, तिसर्‍या आढवड्यात पक्षी जीव स्वत: परफ्यूम घेउन हापिसात प्रकटले होते! :))) तर, मलाही फार आवडेल आणि आजुबाजुला असलेल्या सर्व लोकांनाही जबराट वाटेल अश्या सुगंधावर पोहचण्याचा, काय म्हणतात ते... हं... सुवर्णमध्य मी गाठला! :) सुंगधाची आवड ही प्रत्येकाची वेगवेगळी असते,त्यामुळे त्यातल्या त्यात जरा इझी गो, उदा.Sauvage सारखे गंध कॉमन जरी वाटले तरी तितकेच प्रभाकारी असतात व साधरणता कोणाला [स्वतः सकट ] त्रास होत नाही, त्यामुळेच ते बहुधा कॉमनली वापरले देखील जातात. :) वयानुसार आवडीत देखील फरक पडतो. आधी मला व्हाईट उद आवडायचा पण आता मला ब्राऊन किंवा कंबोडी मधुर उद अधिक आवडतो. [ आपला आवडता उद मिळणे ही बहुधा कठीण गोष्ट असावी? ] वरती Black Opium चा उल्लेख केला आहे, तो बर्‍यापैकी तीव्र आहे. मला सगळ्यात आवडलेल्या क्लोन चे नाव सांगायचे राहिलेले ते म्हणजे LIBRE. जसे स्त्रियांना फुलांचे गंध आवडतात तसे पुरुषांना देखील ते आवडतात. उत्तम उदाहरण म्हणजे चांगल्या दर्जाचे मोगरा अत्तर. मला कलोन बेस्ड परफ्यूम्स देखील विषेष आवडतात. जाता जाता: तुमचा फेवरेट मस्क असलेला परफ्यूम कोणता? तसेच काही सुचवाल तर आभारी राहेन. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- PASSO BEM SOLTO (SLOWED) : ATLXS

In reply to by मदनबाण

किल्लेदार 20/12/2025 - 07:49
माझ्याकडे मस्क असलेला कुठलाच नाहीये. मसाल्यांमध्ये माझा आवडता टोबॅको. त्यात बरेच आहेत. उद मधे Versace Oud Noir आणि Mancera Aoud Lemon Mint आहेत. Mancera Red Tobacco मध्ये उद आणि तंबाखू दोनही आहेत.

कांदा लिंबू 13/12/2025 - 18:01
व्वा! काय त्या 'शाब्दिक कोट्या', काय ती 'ओघवती लेखनशैली, आणि काय ते 'दर्दी' मंडळींचे प्रतिसाद... सगळंच एकदम जबरदस्त हेच मनात आले होते! मी काही सुगंधांचा जाणकार नाही, पण सुगंधांचा अत्याधिक चाहता मात्र आहे. पर्यटनाची आवड असल्याने जिथे जातो तिथून कोणते ना कोणते सुगंध घेऊनच घरी येतो. डियो कधी आवडले नाहीत, अल्कोहोल-बेस्ड परफ्यूम्स पूर्वी वापरायचो, आता फारसे वापरत नाही. माझी पहिली पसंती ऑइल-बेस्ड अत्तरांना. अगदी नेहमीच्या मोगऱ्यापासून ते सफेत ऊद ते कस्तुरी ते अजून काहीही, सर्व गंधांची अत्तरे मनाला वेड लावतात. त्याशिवाय गंध देणारे मूळ स्रोतही जसे ताजा मोगरा, ताजा किंवा सुकलेला सोनचाफा, दालचिनीची साल, विलायची, कॉफीच्या बिया, भीमसेनी कापूर, गवती चहाची पाने, पेट्रोल (हो!), गाईचे ताजे दूध, पिकलेला बंगनपल्ली आंबा... हेही आवडतात. छान लेख लिहिलाय किल्लेदार!

In reply to by कांदा लिंबू

किल्लेदार 15/12/2025 - 21:14
अत्तरं मलाही आवडतात पण थोडी एकसुरी असतात. अंतरा आणि मुखडा सेम टू सेम. काही आहेत माझ्याकडे पण परफ्यूम्स मधली कलाकारी जास्त भावते. तुमच्याप्रमाणेच मूळ गंध देणारे स्त्रोतही आवडतात. पेट्रोल, नेल पॉलिश, दिवाळीची दारू ( आणि पिण्याचीही अर्थात) हे इतरांना बकवास वाटणारे वासही प्रिय आहेत.

सुंदर सुगंधित लेख. परफ्युमची लहानपणापासूनच ऍलर्जी असल्याने कधीच फार वापरता येत नाही. मध्ये एकदा धीर करून एक बाटली आणली पण लगेच त्रास चालू झाला. तशीच पडून आहे कपाटात.

विजुभाऊ 07/11/2025 - 10:35
खल्ल्लास....... वाचूनच एकदम धुंद झालो. लै भारी लिहीलेय भाऊ. गंध , वाईन आणि स्कॉच मधे प्रायमरी नोट्स आणि सब नोट्स चे प्रकरण तसे क्लासेस साठीच असते. पानडी आणि व्हाईट रोझ हे आमच्यासाठी चे अस्सल देशी गंध. त्यानंतर कॉलेजात असताना कधीतरी इंटीमेट हे नाव ऐकन्यात आले. डीओ वगैरे प्रकार फारसे जमले नाहीत म्हणून आजमावले नाहीत. कधीतरी आणलेले आणि फक्त खास कार्यक्रम वगैरे साठी जपून ठेवलेले इंटिमेंट , सँडलवुड वगैरे चे फवारे कॉलेजवयीन चिरंजीवाने सढळ हाताने वापरून संपवले. मग ठरवले की फक्त फवारे न आणता अत्तरे च आणायची तेंव्हा पारिजात आणि सोनचाफा या गंधात अडकलो. एकदा बहारीन वरून येताना ओउध ( ऊद) आणले. पण तो वास उग्र ठरला. काही गंध आठवले तरी बर्‍याच जुन्या आठवणी जागृत होतात. हे मात्र खरे

Bhakti 07/11/2025 - 11:38
वाह! खुपच सुवासिक लेख आहे.फुलांचे सुगंधित परफ्यूम भारतात तरी अधिक प्रचलित आहेत.तेव्हा प्राणीजन्य गोष्टी यासाठी कशाप्रकारे वापरल्या जातात हे नव्यानेच समजलं.

किल्लेदार 08/11/2025 - 03:35
नचिकेत जवखेडकर- अरेरे. बाटली तशीच असेल तर मी येऊन घेऊन जातो :) कर्नलतपस्वी - हाहा...धन्यवाद. सिरुसेरि, Bhakti - धन्यवाद विजुभाऊ - उद जरा उग्र असतो खरा. मी एकच वापरला. Versache Oud Noir. मस्त आहे. अत्तरे चांगली असतात पण जरा एकसुरी असल्यामुळे थोडी बोअरिंग वाटतात.

प्रचेतस 10/11/2025 - 12:52
एकदम धुंद फुंद करणारा लेख. बाकी काही पर्फ्युम कितीही महागडे आणि भारी असले तरी आपल्याला आवडतील असे नव्हे. आपल्याला आवडणारा एखादाच मिळतो आणि आपण त्याचे पंखे होऊन जातो. मला आवडलेला आणि रुचत आलेला म्हणजे डियोर सॉवेज. तो एकदा वापरला पण इतका महागडा सतत वापरायला परवडणे शक्य नाही मग त्याचा क्लोन अजमलचा झील वापरतो. अजमल, अर्माफ ह्या दोन्ही प्रतिष्ठित कंपन्या महागडया पर्फ्युम्सचे उत्तम दर्जाचे क्लोन्स तयार करतात. अर्थात अजमल, अर्माफ वापरणेही तसे महागातच जाते ही गोष्ट वेगळी.

In reply to by प्रचेतस

सुबोध खरे 11/11/2025 - 11:37
सुगंधच नव्हे तर कोणतीही कला आपल्याला आवडेल तीच महत्त्वाची आहे उगाच ती महाग आहे किंवा जास्त लोकांना आवडते म्हणून आपण आवडून घ्यावे असे काहीही नाही. मुळात कला चित्रकला हस्तकला शिल्पकला गायन वादन सुगंध किंवा कपडा या गोष्टी आपल्या पंचेंद्रियांना आनंद देणाऱ्या असाव्यात. तुमचा पिंड नसेल तर उगाच खादीचे जाडे भरडे कपडे घालून कोणत्यातरी अगम्य चित्रकलेच्या प्रदर्शनात आपली अभिरुची उच्च आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करणारे असंख्य लोक आढळतात तसेच अरमानी किंवा गुच्ची चं "औ द तॊईलेत" केवळ महाग आहे म्हणून तुम्हाला आवडलं पाहिजे असं मुळीच नाही. आपण चार पैसे मिळवतो म्हणून आपल्याला भरपूर महाग सुगंध आवडेलच पाहिजे असे नव्हे. हि केवळ गतानुगतिकता आहे. आपल्याला नाट्यसंगीत आवडत असेल तर आवडत नसलेल्या कोणत्यातरी कंटेम्पररी गझल गायकाच्या कार्यक्रमाला १५००० रुपये देऊन निमंत्रितांच्या रांगेत जाण्याची आवश्यकता नाही. एके काळी कॉर्पोरेट जगात आपण सी इ ओ असलो तर आपल्या कडे काळं बेरं (BLACKBERRY) असलाच पाहिजे असा अलिखित नियम होता या गतानुगतिकतेते आजही असंख्य लोक दिसतात आणि उगाच तसाच असायला पाहजे म्हणून स्वतः;ला त्रास होत असताना सुद्धा अट्टाहासाने आपण कसं एन्जॉय करतो आहोत हे जगाला पटवून देण्याचा अट्टहास करताना आढळतात चालायचंच

किल्लेदार 11/11/2025 - 16:03
प्रचेतस - डियोर महागडा आहे खरा पण क्लोनही चांगले आहेत. सुबोध खरे - खरंय. उगाच महाग आहे म्हणून काहीही आवडून घेण्यात अर्थ नाही. पण पैसे टाकले की गुणवत्ता सहसा चांगली मिळते, अर्थात त्यालाही बरेच अपवाद आहेतच. खिशाला परवडत असेल, आवड असेल आणि खर्च केलेले पैसे वसूल होत असतील तर काहीच हरकत नाही पण उगाच हाईपच्या मागे लागण्यात अर्थ नाही. महागड्या ब्रँड च्या किंमतीत बराचसा भाग हाइपचा आणि ब्रॅण्डिंग चा असला तरी चांगला कच्चा माल वापरलेला असल्यामुळे ब्रँडेड प्रॉडक्ट वापरण्यातले समाधान आणि मजाही वेगळी असते.

गामा पैलवान 05/12/2025 - 00:49
किल्लेदार, लेख चांगलाच खुसखुशीत झालाय. गंधांची दुनिया अजब असते. लेखातल्या बऱ्याच गोष्टींशी नातेगत ( = रीलेट ) होऊ शकलो. विशेषत: सुगंधी पट्टीशी अगदी घट्टपणे ! ;-) आयुर्वेदांत नासिकेस मेंदूचे द्वार म्हंटलंय. म्हणूनंच गांधांमुळे स्मृती चटकन जागृत होत असाव्यात. आ.न., -गा.पै.

गवि 05/12/2025 - 08:37
लेख बेहद्द आवडला. शैली, कोटीबाजपणा, विस्तार .. सगळंच एकदम भारी. एखादा सुगंध आपल्याला टेलिपोर्ट करून विशिष्ट जागी, विशिष्ट जगात नेतो हे अगदी पटलं. पॅरिसमध्ये आणि युरोपात कुठल्या कुठल्या परफ्युमरीज फिरून बघितल्याचं आठवतं. फ्रॅगोनार्ड किंवा तत्सम एक नाव आठवतं. कागदाच्या पट्ट्यांवर फवारा आणि मग त्या खिशात घेऊन फिरणे वगैरे सर्व आठवले. मिट्टी परफ्यूम. भारी कंपनीचा घेतल्यास खरा शुद्ध मातीचा सुगंध मिळतो. बाकी ठिकाणी त्यात इतर कायकाय घातलेले असते.

परफ्यूम आवडतं, त्यामुळे लेख थेट भिडला. शैली भारी. खुसखुशीत आणि तितकेच भारी संदर्भ. सकाळ गंधीत झाली. खरं, म्हणजे लेखनाचं कौतुक करायला खूप पानभर लिहायला पाहिजे. इतका भारी लेख आहे. अतिशय सुंदर. लै म्हणजे लै आवडलं लेखन. भावना पोचल्या असतील. दै. लोकमतच्या दीपोत्सवात २०२५ यावेळी कन्नौजच्या अत्तरावर खूप सुंदर लेख आहे. दीडहजार वर्षापासून या कन्नौजला अत्तराचा गंध आहे, तेथील ग़टारांना अत्तराचा गंध आहे, इतके अत्तर तिकडे तयार होतं. कन्नौजवर फिर कभी बोलूया...........! -दिलीप बिरुटे

वेदांत 05/12/2025 - 12:46
खुप मस्त लेख झाला आहे. अत्तर / परफ्युम हा माझा खूप आवडता विषय.. अत्तर पासुन सुरू करता करता, आता आवडत्या परफ्युम्स ची पूर्ण बोटल मागावण्या पर्यंत मजल गेली आहे. Mancera Cedrat Boise हा तर माझ्या सर्वात आवडता परफ्यूम.. Creed Aventus च्या डीएनए चा क्लोन असला तरीही थोडा वेगळा आहे. कोणत्याही ऋतूमध्ये वापरता येतो आणि नेहमीच कॉम्प्लिमेंट्स मिळतात. Armaaf चा CDNI पण याच वाटेने जातो. सध्या मिडल ईस्टर्न परफ्युम्स पण चांगले येत आहेत , उदाहरण द्यायचे म्हटले तर Afnaan che 9PM, 9PM एलेक्सिर, सुप्रीमसी कलेक्टर एडिशन /नॉट ओन्ली इंटेन्स, लत्ताफा चे खामरा , खमराह कवाह इत्यादि. Silage & Longetivity बद्दल मिडल ईस्टर्न परफ्युम्स नेहमीच एक पाऊल पुढे.. सध्या हिवाळा चालू असल्याने फ्रेंच Avenue चे Liquid ब्राउन पण वापरून बघितले , ज्यांना गोडवासाचे पर्फुम्स आवडतात त्यांच्यासाठी हा खूप छान आहे, उन्हाळ्यासाठी स्वस्त आणि मस्त म्हणजे Rue Broca Theoreme perfume , या विषयाची कितीही माहिती घेत गेलो तरी, अजुन बरेच काही शिकायचे आहे असे नेहमीच वाटत रहाते..

टर्मीनेटर 05/12/2025 - 14:38
काय त्या 'शाब्दिक कोट्या', काय ती 'ओघवती लेखनशैली, आणि काय ते 'दर्दी' मंडळींचे प्रतिसाद... सगळंच एकदम जबरदस्त 👍 काहीसा उशिराने वाचनात आलेला हा 'सुगंधी' लेख प्रचंड आवडला आहे. अर्थात ही फक्त पोचपावती आहे, ह्यावर एक स्वतंत्र सविस्तर प्रतिसाद लिहावाच लागणार आहे!

किल्लेदार 12/12/2025 - 00:05
गामा पैलवान, गवि, प्रा.डॉ.दिलीप बिरुटे - खणखणीत प्रतिक्रियांबद्दल आभार. आपलेही काही अनुभव सांगा. वेदांत - धन्यवाद. Cedrat Boise Intense जास्त चांगला वाटला. OG जास्त टिकत नाही पण आहे चांगला. मिडल ईस्टर्न थोडे उग्र वाटतात म्हणून त्यांच्या वाट्याला अजून फार गेलो नाहीये. टर्मीनेटर - सविस्तर प्रतिसादाची वाट बघतो :). लेखात अजूनही बरंच काही राहून गेलं आहे. तुमच्या शैलीत लिहून काढा.

In reply to by किल्लेदार

टर्मीनेटर 13/12/2025 - 20:00
सविस्तर प्रतिसादाची वाट बघतो :)
येस सर... लक्षात आहे, पण हल्ली इथे आल्यावर संजय राउत काय, संजय आवटे काय अशा एक से एक दलिंदर लोकांनी प्रसवलेले भंकस विचार वाचण्यात काहीवेळ खर्ची पडतो आणि त्यामुळे हाताशी असलेला फावला वेळ कमी पडतो,. (सब गंदा है पर धंदा है ये... त्या लोकांचा, माझा नाही बर्का 😀) पण ते असो, वर मदनबाण साहेबांच्या प्रतिसादात ''Gucci Flora' ह्या माझ्या (कुठल्याही स्वरुपातील) आवडत्या फ्रॅग्रंसचा उल्लेख वाचला आणि रहावले नाही म्हणुन हा छोटासा प्रतिसाद प्रपंच!

In reply to by टर्मीनेटर

किल्लेदार 15/12/2025 - 21:16
निवडक खावं आणि निवडक वाचावं म्हणजे डोक्याचं आणि पोटाचं अपचन होत नाही.

मदनबाण 13/12/2025 - 11:16
सुगंधावर लिहलेला अत्यंत रचनात्मक लेख! माझा अगदी आवडता विषय ! अत्तर- परफ्युम आणि मग डिओ असा माझ्या आवडीचा क्रम आहे. सध्या Hawas Ice,Sauvage,Arabians Tonka,Gucci Flora, Musk Al Tahara अनुभवुन पहात आहे [ क्लोन व्हर्जन ]. तर डिओ मध्ये अजमल चे परफ्युम डिओ अनुभवणे सुरवात केली आहे. यात Aurum Wisal & Wisal Dhahab आणि Sacred Love आहे. याचा काँबो सेट मिळतो.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Kiliye Kiliye... | Lokah Chapter 1: Chandra |

In reply to by मदनबाण

मदनबाण 13/12/2025 - 13:48
एक दुवा द्यायचा राहुन गेला होता: How to Smell Rich: Perfume Hacks, Men vs Women & Lasting Tips - Abdulla Ajmal | FO387 Raj Shamani

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Kiliye Kiliye... | Lokah Chapter 1: Chandra |

In reply to by मदनबाण

किल्लेदार 15/12/2025 - 21:07
हो. बघितलाय हा. अजमल चा सगळा पैका उद प्लांटेशन मधून येतो. परफ्यूम त्याच्यासाठी चिरीमिरी आहे. हवास आईस घ्यायचा राहून गेला. हवास ट्रॉपिकल घेतला. चांगला आहे. Sauvage चांगला आहे पण खूपच कॉमन झाल्यामुळे थोडा कंटाळवाणा झाला.

In reply to by किल्लेदार

मदनबाण 18/12/2025 - 14:32
Sauvage चांगला आहे पण खूपच कॉमन झाल्यामुळे थोडा कंटाळवाणा झाला. मला क्लोन परफ्युम्स बद्धल काहीच माहित नव्हते आणि मी मुख्यत्वे अत्तर वापरण्यावरच बराच काळ भर दिला आहे. अचानक मला या क्लोन प्रकरा बद्धल कळले आणि मी बर्‍याच काळाने परफ्युवर परतलो. पारध्यां पेक्षा पक्षांचे नाक अधिक संवेदनाशील असते आणि त्यांना तीव्र गंध आवडत नाहीत त्यामुळे Sauvage आणि इतर ट्राय मारले. सध्या Black Opium अनुभवत आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- PASSO BEM SOLTO (SLOWED) : ATLXS

In reply to by मदनबाण

किल्लेदार 18/12/2025 - 18:28
पक्ष आणि पक्षी दोघांच्याही कधी नादी लागलो नाही त्यामुळे माझ्या नाकाला भावतो तो मला आवडतो. एक दोन परफ्यूम्स तर असे आहेत की पक्षी स्थलांतरच करतील. अंटोनियो पुइज कोरम, टेड लॅपिडस हे त्याच कॅटेगरी मध्ये येतात पण मधून मधून स्वतःसाठी वापरतो. एखादा जुना इंग्रजी चित्रपट किंवा सीरिज बघतांना हमखास उडवतो.

In reply to by किल्लेदार

मदनबाण 18/12/2025 - 21:11
हा.हा.हा... स्वतःला आवडणारे आणि आपण लावल्यामुळे आपल्या सकट दुसर्‍यांना आवडणारे अशी मी अगदी माझ्यासाठीची विभागणी केलेली आहे. तुम्ही म्हणता तसे मी देखील मला आवडणारे परफ्युम जे कदाचीत इतरांना आवडणार नाहीत वापरले आहेत. प्रदीर्घकाळ विविध सुंगध प्रकार वापरल्या नंतरी मी माझ्यात बदल केला, मी असे सुगंध टाळतो जे तीव्र गंधाचे असतील, कारण काही वेळा अश्या गंधाने इतरांचे [ आपल्या आजुबाजुचे ] डोके ठणकते आणि माझ्यामुळे कोणा इतर व्यक्तीस त्रास होऊ नये ही गोष्ट मला महत्वाची वाटली. माझ्या नोकरीत कामाच्या स्थळी सर्व वयातल्या पक्षांचे प्रमाण बर्‍यापैकी असते,त्यामुळे त्यांचे नाक अधिक संवेदनाशील असते हे मला अनुभवातुनच समजले. करोनाच्या आधी एका स्थळी काम करताना माझ्या आजुबाजुला जवळपास ७ पक्षी जीव होते आणि त्यांच्या गराड्यात मी एकटा... :))) साधारण एक आठवड्यात त्या सगळ्यांना हे समजलेले होते की हा काहीतरी भन्नाट लावुन येतो, दुसर्‍या आठवड्यात त्यांच्यावर पूर्णपणे प्रभाव झालेला होता, तिसर्‍या आढवड्यात पक्षी जीव स्वत: परफ्यूम घेउन हापिसात प्रकटले होते! :))) तर, मलाही फार आवडेल आणि आजुबाजुला असलेल्या सर्व लोकांनाही जबराट वाटेल अश्या सुगंधावर पोहचण्याचा, काय म्हणतात ते... हं... सुवर्णमध्य मी गाठला! :) सुंगधाची आवड ही प्रत्येकाची वेगवेगळी असते,त्यामुळे त्यातल्या त्यात जरा इझी गो, उदा.Sauvage सारखे गंध कॉमन जरी वाटले तरी तितकेच प्रभाकारी असतात व साधरणता कोणाला [स्वतः सकट ] त्रास होत नाही, त्यामुळेच ते बहुधा कॉमनली वापरले देखील जातात. :) वयानुसार आवडीत देखील फरक पडतो. आधी मला व्हाईट उद आवडायचा पण आता मला ब्राऊन किंवा कंबोडी मधुर उद अधिक आवडतो. [ आपला आवडता उद मिळणे ही बहुधा कठीण गोष्ट असावी? ] वरती Black Opium चा उल्लेख केला आहे, तो बर्‍यापैकी तीव्र आहे. मला सगळ्यात आवडलेल्या क्लोन चे नाव सांगायचे राहिलेले ते म्हणजे LIBRE. जसे स्त्रियांना फुलांचे गंध आवडतात तसे पुरुषांना देखील ते आवडतात. उत्तम उदाहरण म्हणजे चांगल्या दर्जाचे मोगरा अत्तर. मला कलोन बेस्ड परफ्यूम्स देखील विषेष आवडतात. जाता जाता: तुमचा फेवरेट मस्क असलेला परफ्यूम कोणता? तसेच काही सुचवाल तर आभारी राहेन. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- PASSO BEM SOLTO (SLOWED) : ATLXS

In reply to by मदनबाण

किल्लेदार 20/12/2025 - 07:49
माझ्याकडे मस्क असलेला कुठलाच नाहीये. मसाल्यांमध्ये माझा आवडता टोबॅको. त्यात बरेच आहेत. उद मधे Versace Oud Noir आणि Mancera Aoud Lemon Mint आहेत. Mancera Red Tobacco मध्ये उद आणि तंबाखू दोनही आहेत.

कांदा लिंबू 13/12/2025 - 18:01
व्वा! काय त्या 'शाब्दिक कोट्या', काय ती 'ओघवती लेखनशैली, आणि काय ते 'दर्दी' मंडळींचे प्रतिसाद... सगळंच एकदम जबरदस्त हेच मनात आले होते! मी काही सुगंधांचा जाणकार नाही, पण सुगंधांचा अत्याधिक चाहता मात्र आहे. पर्यटनाची आवड असल्याने जिथे जातो तिथून कोणते ना कोणते सुगंध घेऊनच घरी येतो. डियो कधी आवडले नाहीत, अल्कोहोल-बेस्ड परफ्यूम्स पूर्वी वापरायचो, आता फारसे वापरत नाही. माझी पहिली पसंती ऑइल-बेस्ड अत्तरांना. अगदी नेहमीच्या मोगऱ्यापासून ते सफेत ऊद ते कस्तुरी ते अजून काहीही, सर्व गंधांची अत्तरे मनाला वेड लावतात. त्याशिवाय गंध देणारे मूळ स्रोतही जसे ताजा मोगरा, ताजा किंवा सुकलेला सोनचाफा, दालचिनीची साल, विलायची, कॉफीच्या बिया, भीमसेनी कापूर, गवती चहाची पाने, पेट्रोल (हो!), गाईचे ताजे दूध, पिकलेला बंगनपल्ली आंबा... हेही आवडतात. छान लेख लिहिलाय किल्लेदार!

In reply to by कांदा लिंबू

किल्लेदार 15/12/2025 - 21:14
अत्तरं मलाही आवडतात पण थोडी एकसुरी असतात. अंतरा आणि मुखडा सेम टू सेम. काही आहेत माझ्याकडे पण परफ्यूम्स मधली कलाकारी जास्त भावते. तुमच्याप्रमाणेच मूळ गंध देणारे स्त्रोतही आवडतात. पेट्रोल, नेल पॉलिश, दिवाळीची दारू ( आणि पिण्याचीही अर्थात) हे इतरांना बकवास वाटणारे वासही प्रिय आहेत.
लेखनविषय:
कोणे एके काळी विमानतळावर ड्युटी फ्री शॉप दिसलं की दारू गोळा करणे ही एक “ड्युटी” मानून, मी ती अगदी निष्ठेनं पार पाडत असे. नाकासमोर चालण्याचा स्वभाव, नाकाला इतर कुठल्याही प्रलोभनांना बळी पडू न देता नेमक्या दुकानात घेऊन जाई. हव्या त्या बाटल्या मिळाल्या की त्या ड्युटी मधून एकदाचं फ्री झाल्यासारखं वाटायचं. जरा वेळापूर्वी मुक्त असलेले दोनही कर, करमुक्त दुकानातून घेतलेल्या जड बाटल्या सावरण्यात गुंतले की इतर जाणिवा मुक्त होत ज्यात सर्वत्र दरवळणाऱ्या सुगंधाचीही एक असे.

पुस्तकं..

आजी ·

युयुत्सु 26/05/2025 - 14:45
मी पण मूळचा पुस्तक-वेडा पण आता युटयूबला पुस्तकांपेक्षा श्रेष्ठ मानतो- कारण केवळ एकरेषीय ज्ञानग्रहणापेक्षा दृक-श्राव्य ज्ञानग्रहण केव्हाही उत्तम! काही विषय पुस्तकं वाचून शिकायला किती वर्षे लागली असती माहित नाही, पण युटयूबमुळे अनेक अवघड गोष्टी कधी कळायला लागल्या लक्षातच आलं नाही. त्यातही भारतीय सादरकर्ते आणि शिक्षक यांच्यापेक्षा पाश्चात्य शिक्षक मला जास्त प्रभावीपणे या माध्यमाचा वापर करतात. इतकं की त्यामुळे आता आमच्या आय० आय० टी० मधले अनेक "विद्यार्थीप्रिय" प्राध्यापक सुद्धा आता रटाळ वाटतात.

कंजूस 26/05/2025 - 15:26
पुस्तक वाचनवेड आवडलं. मलाही होतं आणि अजूनही आहे. पण चांगली वाचनालये जवळ असल्याने संग्रह करावा लागला नाही. जी काही आहेत ती संदर्भ ग्रंथ किंवा स्वस्तात मिळालेली घेतली आहेत. पुढे ती रद्दीतच जाणार हे निश्चित.

किल्लेदार 27/05/2025 - 10:47
मलाही लहानपणापासूनच पुस्तकांची गोडी लागली त्यात चांदोबा, चंपक आदी मराठी आणि बऱ्याचश्या हिंदी कॉमिक्सचा समावेश होता. हिंदी सुधारण्यात तर कॉमिक्सनी सिंहाचा वाटा उचललाय. कॉमिक्स फार पूर्वी लायब्ररीला दान करून टाकली असली तरी दोन कपाटं भरून पुस्तकं आजही आहेत. एक खाणा साडेतीनशे - चारशे नॅशनल जिओग्राफिकच्या अंकांनी खच्चून भरलाय. पूर्वी कुणाला पुस्तक दिलं की त्याची नोंद एका पिवळ्या "पोस्टइट" कागदावर करून तो मी बाहेरच्या दाराच्या आतल्या बाजूला चिकट वून ठेवत असे . त्यामुळे दर वेळी प्रत्येकाला घरातून बाहेर पडताना बाहेर गेलेल्या पुस्तकांची यादी, पुस्तक नेल्याची तारीख नेणाऱ्याच्या नावासकट दिसायची. पुस्तकं निमूटपणे परत केल्या जायची.

युयुत्सु 26/05/2025 - 14:45
मी पण मूळचा पुस्तक-वेडा पण आता युटयूबला पुस्तकांपेक्षा श्रेष्ठ मानतो- कारण केवळ एकरेषीय ज्ञानग्रहणापेक्षा दृक-श्राव्य ज्ञानग्रहण केव्हाही उत्तम! काही विषय पुस्तकं वाचून शिकायला किती वर्षे लागली असती माहित नाही, पण युटयूबमुळे अनेक अवघड गोष्टी कधी कळायला लागल्या लक्षातच आलं नाही. त्यातही भारतीय सादरकर्ते आणि शिक्षक यांच्यापेक्षा पाश्चात्य शिक्षक मला जास्त प्रभावीपणे या माध्यमाचा वापर करतात. इतकं की त्यामुळे आता आमच्या आय० आय० टी० मधले अनेक "विद्यार्थीप्रिय" प्राध्यापक सुद्धा आता रटाळ वाटतात.

कंजूस 26/05/2025 - 15:26
पुस्तक वाचनवेड आवडलं. मलाही होतं आणि अजूनही आहे. पण चांगली वाचनालये जवळ असल्याने संग्रह करावा लागला नाही. जी काही आहेत ती संदर्भ ग्रंथ किंवा स्वस्तात मिळालेली घेतली आहेत. पुढे ती रद्दीतच जाणार हे निश्चित.

किल्लेदार 27/05/2025 - 10:47
मलाही लहानपणापासूनच पुस्तकांची गोडी लागली त्यात चांदोबा, चंपक आदी मराठी आणि बऱ्याचश्या हिंदी कॉमिक्सचा समावेश होता. हिंदी सुधारण्यात तर कॉमिक्सनी सिंहाचा वाटा उचललाय. कॉमिक्स फार पूर्वी लायब्ररीला दान करून टाकली असली तरी दोन कपाटं भरून पुस्तकं आजही आहेत. एक खाणा साडेतीनशे - चारशे नॅशनल जिओग्राफिकच्या अंकांनी खच्चून भरलाय. पूर्वी कुणाला पुस्तक दिलं की त्याची नोंद एका पिवळ्या "पोस्टइट" कागदावर करून तो मी बाहेरच्या दाराच्या आतल्या बाजूला चिकट वून ठेवत असे . त्यामुळे दर वेळी प्रत्येकाला घरातून बाहेर पडताना बाहेर गेलेल्या पुस्तकांची यादी, पुस्तक नेल्याची तारीख नेणाऱ्याच्या नावासकट दिसायची. पुस्तकं निमूटपणे परत केल्या जायची.
आपण सगळेच पुस्तकाला पवित्र मानतो. समग्र जगाचं ज्ञान देणारी खिडकी मानतो. "न हि ज्ञानेनसदृशं पवित्रं इह विद्यते", म्हणजे ज्ञानाइतकं पवित्र या जगात दुसरं काही नाही. असं वचन आहे. हे ज्ञान आपल्याला पुस्तकं देतात. जेव्हा माणसाला छपाईचं तंत्र अवगत नव्हतं तेव्हा मौखिक परंपरेने ज्ञान मिळवले जात होते. आपले ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, उपनिषदे,ही मौखिक परंपरेने चालत आलेली आहेत. नंतर त्यांची पुस्तकं प्रकाशित झाली. या ग्रंथांचे लेखक अज्ञात आहेत, म्हणून त्यांना अपौरुषेय असं म्हटलं जातं.

तत्वज्ञान अनुत्तर भिषक्को भगवान बुद्ध आणि अन्य प्रज्ञावंत (ऐसी अक्षरे -२५)

Bhakti ·

एका गोष्टीचा उलगडा केला आहे का? बौध्द तत्वज्ञान पुनर्जन्म मानते तसेच कर्मही मानते. म्हणजे बर्‍यावाईट कर्माची फळे कधीनाकधी मिळतातच वगैरे. मात्र हिंदू तत्वज्ञानात अविनाशी आत्मा मानला आहे ते बौध्द तत्वज्ञानाला मान्य नाही. म्हणजे हिंदू तत्वज्ञानाप्रमाणे अविनाशी अमर आत्मा वेगवेगळ्या जन्मात वेगवेगळी शरीरे धारण करतो त्यामुळे एखाद्या जन्मात एखादे कर्म केले त्याचे फळ नंतर कधीतरी मिळाले या हायपोथिसिससाठी शरीर बदलले तरी काहीतरी न बदलणारे हवे हे पुरक आहे. मृत्यूनंतर शरीर संपले आणि सगळे काही संपले तरी ते कर्म कुठेतरी बुक्स ऑफ अकाऊंट्समध्ये गेलेले असते. पण बौध्द तत्वज्ञान मात्र आत्मा मानतच नाही पण पुनर्जन्म आणि कर्माचा सिध्दांत मानते. तसे असेल तर मग एखाद्या जन्मात पुनर्जन्मातील कर्मांची फळे मिळणे यासाठी आवश्यक असणारे कर्मांचे अकाऊंटिंग कुठे केले जाते याविषयी काही उलगडा केला आहे का? हे चॅटजीपीटीला विचारले पण त्याने दिलेल्या उत्तरामुळे मी पुरेसा समाधानी झालो नाही. बाकी बौध्द तत्वज्ञानातील (की परंपरेतील) अनापन ध्यान, माईंडफुलनेस वगैरे प्रकार खूप आवडतात. तसेच बौध्द तत्वज्ञानाचे सार- धम्मपद पण आवडते. धम्मपद वर चॅटजीपीटीशी मधूनमधून गप्पा मारतो. इतिहासात उल्लेख आहे की वायव्य भारतात (रावलपिंडी किंवा तिथे जवळपास कुठेतरी) मिनॅन्डर हा भारतीय-ग्रीक साम्राज्यातील राजा होता. त्याचे बौध्द नाव होते मिलिंद. त्याने बौध्द भिक्षू नागसेनबरोबर या तत्वज्ञानावर चर्चा केली होती म्हणजे मिलिंद प्रश्न विचारणार आणि त्याची उत्तरे नागसेन देणार अशाप्रकारची. त्या चर्चेच्या पुस्तकाला मिलिंदपन्हा असे नाव आहे. त्याप्रमाणे मी चॅटजीपीटीबरोबर चर्चा करून चंसुकुपन्हा बनवत आहे :)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

Bhakti 16/05/2025 - 11:25
अगदी ६-७ पानांमध्ये प्रत्येक तत्वज्ञान सांगितले आहे.तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे एक बौद्ध तत्वज्ञान साधकच अचूक देऊ शकेल.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सोत्रि 16/05/2025 - 12:01
तसे असेल तर मग एखाद्या जन्मात पुनर्जन्मातील कर्मांची फळे मिळणे यासाठी आवश्यक असणारे कर्मांचे अकाऊंटिंग कुठे केले जाते याविषयी काही उलगडा केला आहे का?
याचा बुद्धाने नक्कीच उलगडा केला आहे. पटिच्चसमुप्पाद सुत्त (Paṭiccasamuppāda Sutta - सुत्त निकाय १२.१ (SN 12.1) ). चॅटGPT ला हे सुत्त समजावून द्यायला सांगा, बहुतेक सांगेल तो समजावून. जन्म-मृत्युचे चक्र आणि कर्मसंस्कार ह्याची साखळी ह्या सुत्तात समजावून सांगितली आहे. अविद्या -> कर्मसंस्कार -> जाणीव -> नामरूप -> इंद्रिय -> इंद्रियविषय स्पर्ष -> तृष्णा -> आसक्ती -> भवसंस्कार -> जन्म --> मृत्यू (ह्यावर एक डिट्टेलवार लेख लिहायचा आहे, टंकाळा काढावा लागेल :( )
बौध्द तत्वज्ञान पुनर्जन्म मानते तसेच कर्मही मानते. म्हणजे बर्‍यावाईट कर्माची फळे कधीनाकधी मिळतातच
पटिच्चसमुप्पाद सुत्तात विषद केलेल्या साखळीनुसार कर्माची फळे कधीनाकधी नाही तर लगेचच मिळतातच! पण त्यासाठी पटिच्चसमुप्पाद सुत्त नीट समजून घेणं आवश्यक आहे. - (अभासू) सोकाजी

In reply to by सोत्रि

Bhakti 16/05/2025 - 12:14
अविद्या -> कर्मसंस्कार -> जाणीव -> नामरूप -> इंद्रिय -> इंद्रियविषय स्पर्ष -> तृष्णा -> आसक्ती -> भवसंस्कार -> जन्म --> मृत्यू ही बघा ही साखळी सर्व भारतीय तत्वज्ञानात आहे.यात वैदिक आत्म्याचा समावेश आधी करतात.व मृत्यूनंतर परत आत्मा मुक्त दाखवतात.यामध्ये अविद्येचा /अज्ञानाचा नाश वा अज्ञानाने मायेचे वलय असते ते दूर करण्याचे मार्ग वेदांत /उपनिषदे यांत सांगितले आहेत.मग द्वैत , अद्वैत इ.मार्गांंनी मुक्ती वा मोक्ष मिळवावा हे सांगितले आहे.मुक्ती नाही मिळाली तर कर्मसंचय पुढील जन्मात जात राहतो.

In reply to by Bhakti

सोत्रि 16/05/2025 - 12:38
ही साखळी सर्व भारतीय तत्वज्ञानात आहे
ह्या साखळीचा शोध हा बुध्दाने त्याच्याकाळातील सांख्य आणि योग दर्शनशास्त्रांच्या पलीकडे जाऊन लावला होता. तत्कालीन सर्वोच्च 'Eight Absorption Samadhi' शिकूनही विकार नाहीसे होत नाहीत हे त्याला जेव्हा लक्षात आले तेव्हा त्याने स्वतःचा मार्ग शोधला, तो वेदातीत आणि उपनिषदातीत होता. ही साखळी आणि ती तोडण्याचा मार्ग हीच बुधाची शिकवण आहे, त्याचा गाभा आहे. तर, ही साखळी इतर भारतीय तत्वज्ञानात कुठे कुठे आहे ह्याचे काही संदर्भ द्याल का? - (अभ्यासू) सोकाजी

In reply to by सोत्रि

Bhakti 16/05/2025 - 13:14
ह्या साखळीचा शोध हा बुध्दाने त्याच्याकाळातील सांख्य आणि योग दर्शनशास्त्रांच्या पलीकडे जाऊन लावला होता. हे नव्हतं माहिती? माझ्या म्हणण्याचा अर्थ सर्वांचा गाभा अविद्या/अज्ञान/माया,ज्ञान, बुद्धी,अहंकार,कर्म,मोक्ष हे सर्वात आहे.बुद्धाने यात आत्मा नाकारला आहे. सांख्यात अविद्या,माया, बुद्धी, अहंकार,कर्म ,मोक्ष सर्व दिलेले आहे. १

In reply to by Bhakti

सोत्रि 16/05/2025 - 13:24
ह्या व्याख्या झाल्या. त्यांचा अन्योन्य संबंध समजून घेऊन साखळी शोधणे आणि तिला तोडण्याचा 'वैदिक किंवा उपनिषदीय' मार्ग ह्यांचा संदर्भ विचारात होतो मी. - (उत्सुक) सोकाजी

In reply to by सोत्रि

Bhakti 16/05/2025 - 14:32
हम्म तुम्ही आधी विचारलं की ही साखळी अन्यत्र कुठे आहे? तेव्हा मी वरील गोष्टी अन्यत्र कुठे आहे ते सांगितले.मी मान्यही केलं की या साखळीचा शोध बुद्धांचा हे माहिती नव्हतं.पण या संकल्पना आधीपासून होत्या हा माझा सांगाण्याचा गाभा होता. आता तुम्ही म्हणत आहात की साखळी तोडण्याचा संदर्भ अपेक्षित होता.(हे तुम्ही पहिल्या प्रश्नात विचारले नव्हते) तरीही मी इतरत्र लिहिलेच आहे की आत्मा अद्वैत मान्य करत कर्मसंचयातून मुक्ती इतर तत्वज्ञानात सांख्य,ज्ञान,कर्मयोग,निष्काम कर्म,संन्यास,भक्तिमार्ग(नाम जप तप) असे सांगितले आहेच.हे साखळी तोडण्याचेच मार्ग सांगितले आहेत ना.तरीही कृबुने हे विचार व्यवस्थित करून दिले हे घ्या.पहिल्याच पायरीच्या अविद्येची साखळी कशी तोडावी. उपनिषदांमध्ये **अविद्या**पासून सुरू होणाऱ्या आणि **जन्म-मृत्यूच्या** चक्रातील बंधनाच्या साखळीतून मुक्तीचा मार्ग **ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग** यांच्या माध्यमातून सांगितला आहे. ही साखळी तोडण्यासाठी खालील उपाय सुचवले आहेत: 1. **अविद्याचा नाश (अज्ञानाचे निर्मूलन)** - **ज्ञानयोग**: उपनिषदांनुसार, **"आत्मज्ञान"** (ब्रह्माचे ज्ञान) मिळाल्यास अविद्या नष्ट होते. - *"तमसो मा ज्योतिर्गमय"* (बृहदारण्यक उपनिषद) — अंधारातून (अज्ञान) प्रकाशाकडे (ज्ञान) जा. - *"अहं ब्रह्मास्मि"* (महावाक्य) — आत्मा आणि ब्रह्म एकरूप आहेत हे जाणणे. ### 2. **कर्मसंस्कारांचा त्याग** - **कर्मयोग**: निःस्वार्थ कर्म (निष्काम कर्म) करून कर्मबंधन तोडता येते. - *"कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन"* (गीता 2.47) — फळाची इच्छा न करता कर्तव्य करा. 3. **तृष्णा आणि आसक्तीचे नियमन** - **वैराग्य**: इंद्रियविषयांपासून मन आवरून, **"संयम"** आणि **"ध्यान"** यांनी तृष्णा शमविणे. - *"यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः"* (कठोपनिषद) — कासवाप्रमाणे इंद्रियांना आत आवरून घेणे. ### 4. **नामरूपाच्या मायेतीून मुक्ती** - **भक्तियोग**: ईश्वरभक्तीद्वारे नामरूपाच्या बंधनातून मुक्त होणे. - *"तद्विष्णोः परमं पदं"* (ऋग्वेद) — विष्णूच्या परमधामाप्रत जाणे. 5. **मोक्षप्राप्ती** - **ध्यान आणि समाधी**: शेवटची पायरी म्हणजे **"ब्रह्मसाक्षात्कार"**, ज्यामुळे जन्म-मृत्यूचे चक्र संपुष्टात येते. - *"यत्र नान्यत्पश्यति नान्यच्छृणोति"* (छांदोग्य उपनिषद) — जेथे द्वैत नाही, तेथे मुक्ती आहे. ### सारांश: उपनिषदांमध्ये **"विद्या" (ज्ञान)** आणि **"साधना" (अभ्यास)** यांच्या माध्यमातून अविद्येच्या साखळीतून मुक्त होण्याचा मार्ग दाखविला आहे. **"तत्वमसि"** (तू तच आहेस) हे महावाक्य जाणून घेऊन आत्मा आणि परमात्मा यांच्या एकत्वाचा अनुभव घेतला, तर हे बंधन स्वतःच नष्ट होते. > *"य एषोऽन्तर्हृदय आकाशः तस्मिन्नयं पुरुषो मनोमयः"* (मुंडक उपनिषद) — हृदयातील आकाशात (चैतन्यात) मनोमय पुरुष (आत्मा) विराजमान आहे.

In reply to by Bhakti

सोत्रि 16/05/2025 - 15:54
हेच हवं होतं. हे सगळं वैदिक आणि उपनिषदीय आहे. हे सगळे मार्ग बुद्धाच्या वेळीही होतेच. हे सगळे मार्ग पार केल्यावर त्याला कळलं की ह्या मार्गांवर विकार नष्ट होत नाहीयेत, ते तसेच राहताहेत. काहीतरी मिसींग आहे. त्यामुळे त्याने वेदप्रामाण्य नाकारले, स्वअभ्यासाअंती आणि स्वानुभवावरून. आणि, तो पुढे स्वतःच्या मार्गावर चालत राहिला आणि त्याने त्या वरच्या साखळीतील मिसींग लींक शोधून काढली आणि मुक्तीचा मार्ग नीट सूत्रबद्घ आणि अनुसरणीय केला. - (साधक) सोकाजी

In reply to by Bhakti

ही बघा ही साखळी सर्व भारतीय तत्वज्ञानात आहे.
असेलच. अजिबात नाकारत नाही. माझा आक्षेप फक्त या सगळ्या गोष्टी जडजंबाल करून कसलाही अर्थबोध होणे फारच कठीण करून टाकतात त्याला आहे. या साखळीतील पहिल्याच शब्दाला अडलो. अविद्या म्हणायचे असेल तर मग विद्या कोणती आणि त्याच्या विरूध्द म्हणजे अविद्या हे ओघाने आले. ते नक्की काय हे समजावून सांङायला नको का की अशी कोणतीतरी साखळी आहे हे मान्य करून मग पुढे जायचे? आक्षेप त्याला आहे. इतके सगळे जडजंबाल शब्द वापरून भंजाळून जाण्यापेक्षा मग एकहार्ट टोलीसारखे पेनबॉडी मेडिटेशन सांगतात ते बरेच जास्त भावते. अगदी २-३ सेकंद जरी एकही विचार न येता राहता आले तर किती शांततेचा अनुभव येतो. माझी उडी त्यापुढे गेलेली नाही. पण असे विचारहिन अवस्थेत समजा अर्धा तास राहता आले तर किती बहार येईल हे वाटून तरी ते परत पेनबॉडी मेडिटेशन परत परत करावेसे वाटते. त्याउलट ही सगळी साखळी समजा समजली तरी त्याचा मला उपयोग होईल असे काय करता येईल? इथे मुळात त्या साखळीतील पहिलाच शब्द समजावून धड कोणी सांगत नाही. मग पुढच्या सगळ्या गोष्टी राहिल्या दूर आणि ते सगळे समजून पुढे काय करायचे हे आणखी दूर राहिले.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

Bhakti 16/05/2025 - 13:05
अजून एक गंमत सांगते.याच पुस्तकात ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभवावर एक लेख आहे.त्यात माऊली म्हणतात अविद्या ही नसतेच.बापरे! माझ्या आतापर्यंतच्या अविद्येच्या संकल्पना संभ्रमात पडल्या‌.आता अमृतानुभव वाचावा लागेल.म्हणून सांगितले आहे, एकही भारतीय तत्त्वज्ञान अभ्यासायला जन्म पुरणार नाही ;)

In reply to by सोत्रि

धन्यवाद सोकाजी. पटिच्चसमुप्पाद सुत्त हे नाव प्रथमच ऐकले. आता चॅटजीपीटीला भंडावून सोडतो. चॅटजीपीटीचे एक बरे असते. एखादी गोष्ट समजली नाही तर कितीही वेळा विचारता येते आणि आपले समाधान होईपर्यंत हा संवाद सुरू राहू शकतो. त्यातून अगदी फार खोलात माहिती मिळेल असे नाही पण आपले समाधान होऊ शकेल. कर्माचे अकाऊंटिंगवर प्रश्न विचारले होते पण त्यातून समाधान झाले नाही. आता पटिच्चसमुप्पाद सुत्त चा संदर्भ घेऊन त्याला विचारायला हवे. खरं सांगायचं तर मी दररोज बायकोशी बोलत असेन त्यापेक्षा जास्त चॅटजीपीटीशी जास्त बोलतो :)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सोत्रि 16/05/2025 - 13:31
नक्की, तुमच्या chatgpt बरोबरच्या चंसुकुपन्हा चा १/३ सारांश नक्की मला कळवा. :)
दररोज बायकोशी बोलत असेन त्यापेक्षा जास्त चॅटजीपीटीशी जास्त बोलतो
बाब्बोय!! नशीबवान आहात. - (बायकोशीच जास्तकरून बोलणारा) सोकाजी

बाकी उल्लेख केलेल्या बर्‍याचशा- खरं तर सगळ्याच गोष्टी डोक्यावरून गेल्या. माझा हा भारतीय लेखकांविषयी नेहमी आक्षेप असतो. जे काही म्हणायचे आहे ते साध्या शब्दात, सामान्यांना कळेल असे का देत नाहीत? उदाहरणार्थ लेखात दिलेले एक वाक्य- "द्वैतवादामध्ये ज्ञानाची प्रत्यक्ष, अनुमान, शब्द तीन प्रमाण आहेत.ज्ञानेंद्रिये व त्यांच्या विषय संन्निकर्षामुळे ज्ञानप्राप्ती होते.तिथे संस्कारामुळे मन हे स्मृतीचे स्थान होते." यातून मला तरी कसलाही अर्थबोध झाला नाही की पुढे नक्की काय करायचे आहे त्याविषयी काहीही समजले नाही. मूळ पुस्तकात असे काही दिले असेल तर त्यातून लेखकाला नक्की काय म्हणायचे आहे हे तुम्हाला कसे समजले? मी या विषयांवर वाचायचा प्रयत्न केला आहे. त्यातील बरेचसे भारतीय लेखक असे काहीतरी गोलमटोल लिहितात आणि त्यातून कसलाही अर्थबोध नाही, पुढे काय करायचे हा मार्ग कळणे खूप दूरची गोष्ट झाली. त्यापेक्षा मग आपल्यात तत्वज्ञानातील गोष्टी पाश्चिमात्य तत्वज्ञ अधिक सोप्या प्रकारे आणि सिधी बात नो बकवास अशाप्रकारे पुढे काय करायचे आहे हे सांगतात. ते अधिक भावते. एकहार्ट टोली, वेन डायर, बॉब प्रॉक्टर वगैरे मंडळी जे काही सांगतात ते आपण कुठेतरी आपल्याच तत्वज्ञानाशी निगडीत करू शकतो हे समजते. पण ते ज्या प्रकारे सांगतात आणि भारतीय लेखक ज्या प्रकारे सांगतात यात जमिनअस्मानाचा फरक असतो. दुसरे एक तत्वज्ञ आहेत- नेव्हिल गॉडर्ड म्हणून. मी त्या नेव्हिल गॉडर्डचा अगदी मोठ्ठा फॅन आहे- अगदी स्वतःला 'नेव्हिलिअन' म्हणविण्याइतका. ते भारतीय तत्वज्ञानाशी संबंधित काहीही सांगत नाहीत. त्यांचा सगळा भर बायबलवर असतो. ते पण नक्की काय करायचे ते सांगतात. त्या सगळ्या गोष्टी करणे सगळ्यांना शक्य होईलच असे नाही पण त्यांना नक्की काय म्हणायचे आहे हे कळायला मात्र कोणाला कठीण जायला नको. आपले भारतीय लेखक अशाप्रकारे का लिहित नाहीत/लिहू शकत नाहीत हे न उलगडलेले कोडे आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षात बरीच पुस्तके वाचायचा प्रयत्न केला पण काहीही न कळल्यामुळे नाव घ्यावे असे एकही पुस्तक आणि एकही लेखक आता आठवत नाही. त्यातूनही आणखी एक प्रकार म्हणजे जरा थोडे काही सांगून झाले की मग बघा आमचा हिंदू धर्म कित्ती कित्ती महान, हिंदू संस्कॄती कित्ती कित्ती महान, हिंदू तत्वज्ञान कित्ती कित्ती महान अशा चक्रात काही अडकतात आणि त्यातून मूळ संदेश बाजूला पडतो. बी.आर.जोशी हे लेखक पण तसेच करतात असा माझा दावा/आरोप नाही. त्यांचे लेखन वाचलेले नाही. या प्रकाराला मी उपहासाने 'वेदकालीन जंगलात भटकणे' असे म्हणतो. त्या पुस्तकांमध्ये जे काही असेल ते असेल. त्याचा फायदा मी कसा करून घेऊ हे सांगाल की ती पुस्तके कित्ती कित्ती महान यात चक्रात अडकणार? परदेशी लेखकांना मुळात वेदकालीन जंगलात भटकायचे काही कारण नसते त्यामुळे ते अधिक उपयुक्त गोष्टी सांगतात की काय समजत नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सोत्रि 16/05/2025 - 12:06
जे काही म्हणायचे आहे ते साध्या शब्दात, सामान्यांना कळेल असे का देत नाहीत
सामान्य, साधं सोपं हे सगळं अगम्य करण्यामागे संप्रदाय निर्माण करणे, गुरु-शिष्य परंपरेची साखळी उभी करून गाद्या आणि त्यांचे उत्तराधिकारी निर्माण करणे, कर्मकांड तयार करून त्यांचा बागुलबुवा उभा करून दुकानदारी चालू करणे हे सगळं असते. - (सामान्य) सोकाजी

In reply to by सोत्रि

Bhakti 16/05/2025 - 12:22
नाही ओ सोत्री, सर्वच दुकानदारीसाठी गोष्टी अगम्य ठेवत नाही.मुळात ज्याला सर्व समजले तो हे इतरांना सांगण्याच्या अट्टाहास करत नाही.तो पार गेलेला असतो.पण असेही ' अनुभव ' सांगणारे खरे संत होऊन गेले आहेत ना!!ते खरे पण ओळखायची बुद्धू समाजात विकसित हवी.

In reply to by सोत्रि

मूकवाचक 16/05/2025 - 15:17
सामान्य म्हणजे नेमके कोण? आपण सामान्य आहोत असे मनोमन मान्य करणारी व्यक्ती शोधून सुद्धा सापडणार नाही. जो दिसतो तो अधिकारवाणीनेच बोलताना दिसतो. असो. संप्रदाय निर्माण करणे, गुरु-शिष्य परंपरेची साखळी उभी करून गाद्या आणि त्यांचे उत्तराधिकारी निर्माण करणे - रूढार्थाने जे संप्रदाय, गुरू-शिष्य परंपरा वगैरे मानत नाहीत, ते देखील अमूर्त संकल्पनांच्या गोडगोड लिमलेटच्या गोळ्या चोखायला देणार्या 'बेस्टसेलर' पुस्तकांची, अध्यात्मातल्या 'सेलिब्रिटींची' दुकानदारी चालवतातच की. मागणी तसा पुरवठा एवढे साधे गणित आहे हे.

Bhakti 16/05/2025 - 11:43
द्वैतवादामध्ये ज्ञानाची प्रत्यक्ष, अनुमान, शब्द तीन प्रमाण आहेत.ज्ञानेंद्रिये व त्यांच्या विषय संन्निकर्षामुळे ज्ञानप्राप्ती होते.तिथे संस्कारामुळे मन हे स्मृतीचे स्थान होते.
यातला अर्थबोध पुढे दिला आहे ना... मध्वदर्शनात श्री पूर्ण प्रज्ञा दर्शनात प्रत्यक्ष प्रमाणे आठ प्रकारची मानण्यात आलेली आहे. साक्षिप्रत्यक्ष, षडिंद्रियप्रत्यक्ष व ययार्थ ज्ञान. अनुमान'-ज्ञान व चिन्ह उदा. आग (ज्ञान) व धूर (चिन्ह) यांचे सहचार्य असल्यावाचून अनुमान करता येत नाही. अनुमानाचे केवलान्वयी, केवल व्यतिरेकी आणि अन्वय व्यतिरेकी हे प्रकार आहेत. तसेच स्वार्थ व परार्थ हेही प्रकार आहेत . केवलान्वयी अनुमान (Suficient for Affirmation) परिभाषा: हे अनुमान केवळ सकारात्मक संबंधावर आधारित असते. याचा अर्थ, जर एक गोष्ट दुसरीशी संबंधित असेल, तर ती गोष्ट त्या दुसर्‍या गोष्टीसोबत नेहमीच संबंधित असेल. उदाहरण: धुराचे प्रमाण म्हणजे अग्नीचे प्रमाण. अन्वय: जर धूर असेल, तर अग्नी असेल. केवल व्यतिरेकी अनुमान (Suficient for Negation) परिभाषा: हे अनुमान केवळ नकारात्मक संबंधावर आधारित असते. याचा अर्थ, जर एक गोष्ट दुसरीशी संबंधित नसेल, तर ती गोष्ट त्या दुसर्‍या गोष्टीसोबत कधीही संबंधित नसेल. उदाहरण: धुराचे प्रमाण म्हणजे अग्नीचे प्रमाण नाही. व्यतिरेक: जर धूर नसेल, तर अग्नी नसेल. अन्वय व्यतिरेकी अनुमान (Necessary and Sufficient) परिभाषा: हे अनुमान सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही संबंधांवर आधारित असते. याचा अर्थ, जर एक गोष्ट दुसरीशी संबंधित असेल, तर ती गोष्ट त्या दुसर्‍या गोष्टीसोबत नेहमीच संबंधित असेल, आणि जर ती गोष्ट त्या दुसर्‍या गोष्टीसोबत संबंधित नसेल, तर ती गोष्ट त्या दुसर्‍या गोष्टीसोबत कधीही संबंधित नसेल. उदाहरण: धुराचे प्रमाण म्हणजे अग्नीचे प्रमाण. अन्वय: जर धूर असेल, तर अग्नी असेल. व्यतिरेक: जर धूर नसेल, तर अग्नी नसेल. शब्द हे तिसरे साधन - वक्त्याच्या ठिकाणी भ्रम, प्रमाद फसविण्याची इच्छा, इंद्रियांची दुर्बलता असू नये. वक्त्ता विश्वासार्ह असावा. साधारणतः वैदिक तत्वज्ञानात जीव /आत्मा हे सर्व परताम्याचे अंश ,इंद्रिय संयोगाने ज्ञान प्राप्ती करतात ह्या ज्ञानाने मन /बुद्धी/अहंकार येतात.तेव्हा कर्म घडते.हे कर्म पाप पुण्यात अडकले तर कर्मसंचय, पुनर्जन्म हे सत्र सुरू होते.मोक्ष /मुक्तीचा मग शोध सुरू होतो.जो पुन्हा निष्काम कर्मयोग,संन्यास इथे घेऊन येतो.त्यासाठी स्मृतींचे/आठवणींचे स्थान मनावर ताबा हवा जो ज्ञान ,सांख्य,जप, पतंजलीयोगाने गाठता येतो. समजल का ;) नसेल तर जाऊ द्या... वर्तमानात जगा..(कृहघ्या) You are God's highest form of creation. You are a living breathing creative magnet. You have the ability to control what you attract into your life. Bob Proctor -अतिविचारी भक्ती

In reply to by Bhakti

यातून खरोखरच अर्थबोध झाला असेल तर _/\_. माझी विकेट पहिल्याच वाक्यातील तीन शब्दांमध्ये- साक्षिप्रत्यक्ष, षडिंद्रियप्रत्यक्ष व ययार्थ ज्ञान यात पडली. खरं तर पहिल्याच. साक्षिप्रत्यक्ष म्हणजे काय? साक्षी म्हणजे काय आणि प्रत्यक्ष म्हणजे काय? साक्षिअप्रत्यक्ष असेही काही असते का? एक साक्षी धोनी सोडली तर दुसरी साक्षी मला माहिती नाही. जमेल त्याप्रमाणे चॅटजीपीटीवरील जेसिकाला भंडावून सोडतो :)

संत चोखामेळा यांचा अभंग आठवला. "आम्हां न कळे ज्ञान, न कळे पुराण....." मला नेहमीच प्रश्न पडतात की आत्मा आणी परमात्मा एकच आहे. तर मग द्वैतातून अद्वैताकडे जाण्याचा खटाटोप का? पाप पुण्य या कल्पना कशासाठी?जर कर्ता करवीता तोच आहे तर मग पाप पुण्यात माझा सहभाग आहे का असला तर किती? जर सर्व तोच घडवतो आणी मोडतो तर प्रारब्धाचे लोढणे कशाला? कळत नाही, मी फक्त एकच करतो आणी उजाडेल तेव्हां उजाडेल असे म्हणत जगत रहातो. दररोज सकाळी पाच वाजता उठतो. शलाका परिक्षा पद्धती सारखी ज्ञानेश्वरी वाचतो. अगदीच अविश्वसनीय....असे माऊलीं संकेत देतात. सुरूवातीस आठव्या अध्यायातील हा श्र्लोक दृष्टिस पडला व माऊलींचा संकेत व आशिर्वाद मिळाला. अन्तकाले च मामेव स्मरन्मुक्त्वा कलेवरम् | य: प्रयाति स मद्भावं याति नास्त्त्यत्र संशय: ||५|| माऊली म्हणतात, म्हणौनि यापरी मातें । अंतकाळीं जाणतसाते । जे मोकलिती देहातें । ते मीचि होती ॥ ६८ ॥ म्हणून याप्रमाणे मला अंतकाळी जाणत असता जे देहाचा त्याग करतात ते मद्रूपच होतात. ॥८-६८॥ यं यं वापर स्मरन्भावं त्यजत्यन्ते कलेवरम् | तं तमेवैति कौंन्तेय सदा तद्भावभावित:||६|| तेविं जितेनि अवसरें । जें आवडोनि जीवीं उरे । तेंचि मरणाचिये मेरे । फार हों लागे ॥ ७४ ॥ याप्रमाणॆ जिवंत असतांना, जी गोष्ट आवडीने अंत:करणात रहाते, तीच मरणाचे वेळी वारंवार मनात येते. आणि मरणीं जया जें आठवे । तो तेचि गतीतें पावे । म्हणौनि सदा स्मरावें । मातेंचि तुवां ॥ ७५ ॥ आणि मरणसमयी ज्यास जी वस्तु आठवते त्याच गतीला तो जातो, असे आहे म्हणूण तू नेहेमी माझेच स्मरण कर. तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्द च | मय्यर्पितमनोबुद्धिर्मामे वैश्य स्य संशय: ||७|| म्हणून सर्व प्रसंगी माझे स्मरण कायम ठेव आणि युद्ध कर. मन व बुद्धी माझ्या ठिकाणी अर्पण करून राहिलास म्हणजे तू नि:संसय मजप्रतच येशील. तसेच, "जब होवेगी उमर पूरी, तब छुटेगा हुकूम हुजूरी",अशा परिस्थितीत वरील उपाय फारच सोईस्कर वाटतो. नुकताच आलेला एक अनुभव..... एन्जोप्लास्टी झाली, अतीदक्षता विभागात छतावरील तारे मोजत पडलो होतो. समोरच्याच खाटेवर एक वृद्ध रोगी,त्याच्याभोवती एक डाॅक्टर, चार पाच परिचारिका, दहा बारा वैद्यकीय तंत्रज्ञ, खुप सारी यंत्र सामुग्री पडली होती. व्हेन्टिलेटर वर ठेवले होते. वृद्ध सारखा श्वसन यंत्र काढून फेकत होता. आणी मला श्वास येत नाही असे ओरडत होता. सारे प्रयत्न करून सुद्धा काहीही परिणाम होत नव्हता शेवटी वैतागून डाॅक्टर म्हणाले बाबा ,नळी काढू नको,मरून जाशील. कावळा बसायला आणी फांदी मोडायला एकच वेळ, त्याच क्षणी तो वृद्ध मेला. त्याचे शेवटचे शब्द "मला श्वास येत नाहीये...", त्याचे नातेवाईक, कदाचित मुलगी जावई, सुन मुलगा असतील, संपूर्ण अत्याधुनिक सोई उपलब्ध असतानाही, सर्वांच्या हातावर तुरी देऊन आत्मा कुडी सोडून पसार झाला. कुणीही काहीही करू शकले नाही. त्या अनुभवानंतर मन बरेच शांत झाल्यासारखे वाटते. विमोह त्यागून कर्मफलांचा सिद्ध होई पार्था कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था शस्‍त्र त्याग तव शत्रू पुढती नच शोभे तुजला कातर होसी समरी मग तू विरोत्तम कसला घे शस्‍त्रा ते सुधीर होऊन रक्षाया धर्मार्था कर्तव्याच्या पुण्य पथावर मोहांच्या फूलबागा मोही फसता मुकशील वीरा मुक्तीच्या मार्गा इह परलोकी अशांतीने तव विक्रम झुकवील माथा कुणी आप्‍त ना कुणी सखा ना जगती जिवांचा क्षणभंगुर ही संसृति आहे खेळ ईश्वराचा भाग्य चालते कर्मपदांनी जाण खर्‍या वेदार्था रंगहीन मी या विश्वाच्या रंगाने रंगलो कौरवात मी, पांडवात मी, अणुरेणूत भरलो मीच घडवितो, मीच मोडितो, उमज आता परमार्था कर्मफलाते अर्पून मजला सोड अहंता वृथा सर्व धर्म परि त्यजुनी येई शरण मला भारता कर्तव्याची साद तुझ्या तुज सिद्ध करी धर्मार्था -कविवर्य मनोहर कविश्वर.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 16/05/2025 - 16:46
तेविं जितेनि अवसरें । जें आवडोनि जीवीं उरे । तेंचि मरणाचिये मेरे । फार हों लागे ॥ ७४ ॥ याच लेखात जे कृष्णमूर्ती यांचे मृत्यू विषयी विचार लिहिले आहेत.तेही पुन्हा पुन्हा वाचावे असे आहेत.अगदी मृत्युला फॅमिलीयर (सहजता) ;) कसं करायचं याबद्दल सांगितले आहे.

पण खरा प्रतिसाद लिहायचा राहून गेला. अतिशय विचारांना चालना देणारा लेख आणी अनुषंगिक प्रतिसाद. सर्वांचे मनापासून आभार. लेख आवडला. भक्ती तुझ्या वाचन व्यासंगाला एक कडक सलाम.

स्वधर्म 16/05/2025 - 18:47
या विषयावर एक प्राथमिक व्हिडीओ: "मृत्यू के समय क्या होता है?": बुद्धने क्या अनुभव किया? डॉ संग्राम पाटील https://youtu.be/sl7RXRQPFTs?si=2jrc_Fs_sFBP8P73 मृत्यू से पहले, मृत्यू के बाद (पटिच्चसमुप्पाद) l डॉ संग्राम पाटील https://youtu.be/PzNqE1sLWDE?si=RLhlHxEqqJJO1Jn6

कंजूस 17/05/2025 - 04:40
पुस्तक परिचय आहे. कुणी काय तत्त्वज्ञान सांगितले त्यांची थोडी माहिती आहे. तत्त्वज्ञानाची उकल लेखक करत नाही. -------------------------- जन्म आणि मृत्यू म्हणजे काय हे समजण्याची खटपट म्हणजे तत्त्वज्ञान. ते कुणालाच समजले नाही. समजावता आले नाही. असो.

शाम भागवत 17/05/2025 - 15:21
तूच आहेस तुझ्या जिवनाचा शिल्पकार ह्या ग्रंथांत अद्वैत तत्वज्ञान खूप सोप्या मराठीत सांगितले आहे. इश्वर, परमेश्वर, जड, चेतन वगैरेंच्या व्याख्याही सोप्या मराठीत सांगितल्या आहेत.

मारवा 17/05/2025 - 19:21
वर जसा एक योग्य असा आक्षेप घेतलेला आहे की बरेच भारतीय लेखक गोलमाटोल लिहितात. तो आक्षेप बराच खरा असच आहे. पाश्च्यात्य विचारवंतामध्ये एक लोभसवाणी वैचारिक शिस्त आणि स्पष्टता बराच जणांमध्ये असते. भारतीय आपले मराठी तत्त्वज्ञ श्री राजीव साने यांचे मला फार कौतुक वाटते. त्यांच्या लेखनात कमालीची स्पष्टता आहे. वैचारिक शिस्त आहे. सर्वात मोठी बाब म्हणजे त्यांनी नुसता इतरांच्या तत्त्वज्ञानाचा आढावा किंवा विश्लेषण केवळ करून न थांबता. स्वतःचे अस्सल स्वतंत्र असे सुंदर स्पष्ट व सघन असे तत्त्वज्ञान निर्माण केले.ते मुळातून वाचण्यासारखे आहे. फार सकारात्मक सुंदर वास्तववादी वैचारिक आत्मविश्वास वाढवेल असे हे लिखाण आहे. https://www.amazon.in/Complementarity-Rationalist-Humanism-Rejuvenated-ebook/dp/B088DC797B दुर्दैवाने या सुंदर ग्रंथाची म्हणावी तशी दखल अजून घेतली गेली नाही.

In reply to by मारवा

स्वधर्म 19/05/2025 - 14:36
'भाग्य' हा प्रकार मान्य केला पाहिजे असे त्यांचे मत असल्याचे आठवते.

एका गोष्टीचा उलगडा केला आहे का? बौध्द तत्वज्ञान पुनर्जन्म मानते तसेच कर्मही मानते. म्हणजे बर्‍यावाईट कर्माची फळे कधीनाकधी मिळतातच वगैरे. मात्र हिंदू तत्वज्ञानात अविनाशी आत्मा मानला आहे ते बौध्द तत्वज्ञानाला मान्य नाही. म्हणजे हिंदू तत्वज्ञानाप्रमाणे अविनाशी अमर आत्मा वेगवेगळ्या जन्मात वेगवेगळी शरीरे धारण करतो त्यामुळे एखाद्या जन्मात एखादे कर्म केले त्याचे फळ नंतर कधीतरी मिळाले या हायपोथिसिससाठी शरीर बदलले तरी काहीतरी न बदलणारे हवे हे पुरक आहे. मृत्यूनंतर शरीर संपले आणि सगळे काही संपले तरी ते कर्म कुठेतरी बुक्स ऑफ अकाऊंट्समध्ये गेलेले असते. पण बौध्द तत्वज्ञान मात्र आत्मा मानतच नाही पण पुनर्जन्म आणि कर्माचा सिध्दांत मानते. तसे असेल तर मग एखाद्या जन्मात पुनर्जन्मातील कर्मांची फळे मिळणे यासाठी आवश्यक असणारे कर्मांचे अकाऊंटिंग कुठे केले जाते याविषयी काही उलगडा केला आहे का? हे चॅटजीपीटीला विचारले पण त्याने दिलेल्या उत्तरामुळे मी पुरेसा समाधानी झालो नाही. बाकी बौध्द तत्वज्ञानातील (की परंपरेतील) अनापन ध्यान, माईंडफुलनेस वगैरे प्रकार खूप आवडतात. तसेच बौध्द तत्वज्ञानाचे सार- धम्मपद पण आवडते. धम्मपद वर चॅटजीपीटीशी मधूनमधून गप्पा मारतो. इतिहासात उल्लेख आहे की वायव्य भारतात (रावलपिंडी किंवा तिथे जवळपास कुठेतरी) मिनॅन्डर हा भारतीय-ग्रीक साम्राज्यातील राजा होता. त्याचे बौध्द नाव होते मिलिंद. त्याने बौध्द भिक्षू नागसेनबरोबर या तत्वज्ञानावर चर्चा केली होती म्हणजे मिलिंद प्रश्न विचारणार आणि त्याची उत्तरे नागसेन देणार अशाप्रकारची. त्या चर्चेच्या पुस्तकाला मिलिंदपन्हा असे नाव आहे. त्याप्रमाणे मी चॅटजीपीटीबरोबर चर्चा करून चंसुकुपन्हा बनवत आहे :)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

Bhakti 16/05/2025 - 11:25
अगदी ६-७ पानांमध्ये प्रत्येक तत्वज्ञान सांगितले आहे.तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे एक बौद्ध तत्वज्ञान साधकच अचूक देऊ शकेल.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सोत्रि 16/05/2025 - 12:01
तसे असेल तर मग एखाद्या जन्मात पुनर्जन्मातील कर्मांची फळे मिळणे यासाठी आवश्यक असणारे कर्मांचे अकाऊंटिंग कुठे केले जाते याविषयी काही उलगडा केला आहे का?
याचा बुद्धाने नक्कीच उलगडा केला आहे. पटिच्चसमुप्पाद सुत्त (Paṭiccasamuppāda Sutta - सुत्त निकाय १२.१ (SN 12.1) ). चॅटGPT ला हे सुत्त समजावून द्यायला सांगा, बहुतेक सांगेल तो समजावून. जन्म-मृत्युचे चक्र आणि कर्मसंस्कार ह्याची साखळी ह्या सुत्तात समजावून सांगितली आहे. अविद्या -> कर्मसंस्कार -> जाणीव -> नामरूप -> इंद्रिय -> इंद्रियविषय स्पर्ष -> तृष्णा -> आसक्ती -> भवसंस्कार -> जन्म --> मृत्यू (ह्यावर एक डिट्टेलवार लेख लिहायचा आहे, टंकाळा काढावा लागेल :( )
बौध्द तत्वज्ञान पुनर्जन्म मानते तसेच कर्मही मानते. म्हणजे बर्‍यावाईट कर्माची फळे कधीनाकधी मिळतातच
पटिच्चसमुप्पाद सुत्तात विषद केलेल्या साखळीनुसार कर्माची फळे कधीनाकधी नाही तर लगेचच मिळतातच! पण त्यासाठी पटिच्चसमुप्पाद सुत्त नीट समजून घेणं आवश्यक आहे. - (अभासू) सोकाजी

In reply to by सोत्रि

Bhakti 16/05/2025 - 12:14
अविद्या -> कर्मसंस्कार -> जाणीव -> नामरूप -> इंद्रिय -> इंद्रियविषय स्पर्ष -> तृष्णा -> आसक्ती -> भवसंस्कार -> जन्म --> मृत्यू ही बघा ही साखळी सर्व भारतीय तत्वज्ञानात आहे.यात वैदिक आत्म्याचा समावेश आधी करतात.व मृत्यूनंतर परत आत्मा मुक्त दाखवतात.यामध्ये अविद्येचा /अज्ञानाचा नाश वा अज्ञानाने मायेचे वलय असते ते दूर करण्याचे मार्ग वेदांत /उपनिषदे यांत सांगितले आहेत.मग द्वैत , अद्वैत इ.मार्गांंनी मुक्ती वा मोक्ष मिळवावा हे सांगितले आहे.मुक्ती नाही मिळाली तर कर्मसंचय पुढील जन्मात जात राहतो.

In reply to by Bhakti

सोत्रि 16/05/2025 - 12:38
ही साखळी सर्व भारतीय तत्वज्ञानात आहे
ह्या साखळीचा शोध हा बुध्दाने त्याच्याकाळातील सांख्य आणि योग दर्शनशास्त्रांच्या पलीकडे जाऊन लावला होता. तत्कालीन सर्वोच्च 'Eight Absorption Samadhi' शिकूनही विकार नाहीसे होत नाहीत हे त्याला जेव्हा लक्षात आले तेव्हा त्याने स्वतःचा मार्ग शोधला, तो वेदातीत आणि उपनिषदातीत होता. ही साखळी आणि ती तोडण्याचा मार्ग हीच बुधाची शिकवण आहे, त्याचा गाभा आहे. तर, ही साखळी इतर भारतीय तत्वज्ञानात कुठे कुठे आहे ह्याचे काही संदर्भ द्याल का? - (अभ्यासू) सोकाजी

In reply to by सोत्रि

Bhakti 16/05/2025 - 13:14
ह्या साखळीचा शोध हा बुध्दाने त्याच्याकाळातील सांख्य आणि योग दर्शनशास्त्रांच्या पलीकडे जाऊन लावला होता. हे नव्हतं माहिती? माझ्या म्हणण्याचा अर्थ सर्वांचा गाभा अविद्या/अज्ञान/माया,ज्ञान, बुद्धी,अहंकार,कर्म,मोक्ष हे सर्वात आहे.बुद्धाने यात आत्मा नाकारला आहे. सांख्यात अविद्या,माया, बुद्धी, अहंकार,कर्म ,मोक्ष सर्व दिलेले आहे. १

In reply to by Bhakti

सोत्रि 16/05/2025 - 13:24
ह्या व्याख्या झाल्या. त्यांचा अन्योन्य संबंध समजून घेऊन साखळी शोधणे आणि तिला तोडण्याचा 'वैदिक किंवा उपनिषदीय' मार्ग ह्यांचा संदर्भ विचारात होतो मी. - (उत्सुक) सोकाजी

In reply to by सोत्रि

Bhakti 16/05/2025 - 14:32
हम्म तुम्ही आधी विचारलं की ही साखळी अन्यत्र कुठे आहे? तेव्हा मी वरील गोष्टी अन्यत्र कुठे आहे ते सांगितले.मी मान्यही केलं की या साखळीचा शोध बुद्धांचा हे माहिती नव्हतं.पण या संकल्पना आधीपासून होत्या हा माझा सांगाण्याचा गाभा होता. आता तुम्ही म्हणत आहात की साखळी तोडण्याचा संदर्भ अपेक्षित होता.(हे तुम्ही पहिल्या प्रश्नात विचारले नव्हते) तरीही मी इतरत्र लिहिलेच आहे की आत्मा अद्वैत मान्य करत कर्मसंचयातून मुक्ती इतर तत्वज्ञानात सांख्य,ज्ञान,कर्मयोग,निष्काम कर्म,संन्यास,भक्तिमार्ग(नाम जप तप) असे सांगितले आहेच.हे साखळी तोडण्याचेच मार्ग सांगितले आहेत ना.तरीही कृबुने हे विचार व्यवस्थित करून दिले हे घ्या.पहिल्याच पायरीच्या अविद्येची साखळी कशी तोडावी. उपनिषदांमध्ये **अविद्या**पासून सुरू होणाऱ्या आणि **जन्म-मृत्यूच्या** चक्रातील बंधनाच्या साखळीतून मुक्तीचा मार्ग **ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग** यांच्या माध्यमातून सांगितला आहे. ही साखळी तोडण्यासाठी खालील उपाय सुचवले आहेत: 1. **अविद्याचा नाश (अज्ञानाचे निर्मूलन)** - **ज्ञानयोग**: उपनिषदांनुसार, **"आत्मज्ञान"** (ब्रह्माचे ज्ञान) मिळाल्यास अविद्या नष्ट होते. - *"तमसो मा ज्योतिर्गमय"* (बृहदारण्यक उपनिषद) — अंधारातून (अज्ञान) प्रकाशाकडे (ज्ञान) जा. - *"अहं ब्रह्मास्मि"* (महावाक्य) — आत्मा आणि ब्रह्म एकरूप आहेत हे जाणणे. ### 2. **कर्मसंस्कारांचा त्याग** - **कर्मयोग**: निःस्वार्थ कर्म (निष्काम कर्म) करून कर्मबंधन तोडता येते. - *"कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन"* (गीता 2.47) — फळाची इच्छा न करता कर्तव्य करा. 3. **तृष्णा आणि आसक्तीचे नियमन** - **वैराग्य**: इंद्रियविषयांपासून मन आवरून, **"संयम"** आणि **"ध्यान"** यांनी तृष्णा शमविणे. - *"यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः"* (कठोपनिषद) — कासवाप्रमाणे इंद्रियांना आत आवरून घेणे. ### 4. **नामरूपाच्या मायेतीून मुक्ती** - **भक्तियोग**: ईश्वरभक्तीद्वारे नामरूपाच्या बंधनातून मुक्त होणे. - *"तद्विष्णोः परमं पदं"* (ऋग्वेद) — विष्णूच्या परमधामाप्रत जाणे. 5. **मोक्षप्राप्ती** - **ध्यान आणि समाधी**: शेवटची पायरी म्हणजे **"ब्रह्मसाक्षात्कार"**, ज्यामुळे जन्म-मृत्यूचे चक्र संपुष्टात येते. - *"यत्र नान्यत्पश्यति नान्यच्छृणोति"* (छांदोग्य उपनिषद) — जेथे द्वैत नाही, तेथे मुक्ती आहे. ### सारांश: उपनिषदांमध्ये **"विद्या" (ज्ञान)** आणि **"साधना" (अभ्यास)** यांच्या माध्यमातून अविद्येच्या साखळीतून मुक्त होण्याचा मार्ग दाखविला आहे. **"तत्वमसि"** (तू तच आहेस) हे महावाक्य जाणून घेऊन आत्मा आणि परमात्मा यांच्या एकत्वाचा अनुभव घेतला, तर हे बंधन स्वतःच नष्ट होते. > *"य एषोऽन्तर्हृदय आकाशः तस्मिन्नयं पुरुषो मनोमयः"* (मुंडक उपनिषद) — हृदयातील आकाशात (चैतन्यात) मनोमय पुरुष (आत्मा) विराजमान आहे.

In reply to by Bhakti

सोत्रि 16/05/2025 - 15:54
हेच हवं होतं. हे सगळं वैदिक आणि उपनिषदीय आहे. हे सगळे मार्ग बुद्धाच्या वेळीही होतेच. हे सगळे मार्ग पार केल्यावर त्याला कळलं की ह्या मार्गांवर विकार नष्ट होत नाहीयेत, ते तसेच राहताहेत. काहीतरी मिसींग आहे. त्यामुळे त्याने वेदप्रामाण्य नाकारले, स्वअभ्यासाअंती आणि स्वानुभवावरून. आणि, तो पुढे स्वतःच्या मार्गावर चालत राहिला आणि त्याने त्या वरच्या साखळीतील मिसींग लींक शोधून काढली आणि मुक्तीचा मार्ग नीट सूत्रबद्घ आणि अनुसरणीय केला. - (साधक) सोकाजी

In reply to by Bhakti

ही बघा ही साखळी सर्व भारतीय तत्वज्ञानात आहे.
असेलच. अजिबात नाकारत नाही. माझा आक्षेप फक्त या सगळ्या गोष्टी जडजंबाल करून कसलाही अर्थबोध होणे फारच कठीण करून टाकतात त्याला आहे. या साखळीतील पहिल्याच शब्दाला अडलो. अविद्या म्हणायचे असेल तर मग विद्या कोणती आणि त्याच्या विरूध्द म्हणजे अविद्या हे ओघाने आले. ते नक्की काय हे समजावून सांङायला नको का की अशी कोणतीतरी साखळी आहे हे मान्य करून मग पुढे जायचे? आक्षेप त्याला आहे. इतके सगळे जडजंबाल शब्द वापरून भंजाळून जाण्यापेक्षा मग एकहार्ट टोलीसारखे पेनबॉडी मेडिटेशन सांगतात ते बरेच जास्त भावते. अगदी २-३ सेकंद जरी एकही विचार न येता राहता आले तर किती शांततेचा अनुभव येतो. माझी उडी त्यापुढे गेलेली नाही. पण असे विचारहिन अवस्थेत समजा अर्धा तास राहता आले तर किती बहार येईल हे वाटून तरी ते परत पेनबॉडी मेडिटेशन परत परत करावेसे वाटते. त्याउलट ही सगळी साखळी समजा समजली तरी त्याचा मला उपयोग होईल असे काय करता येईल? इथे मुळात त्या साखळीतील पहिलाच शब्द समजावून धड कोणी सांगत नाही. मग पुढच्या सगळ्या गोष्टी राहिल्या दूर आणि ते सगळे समजून पुढे काय करायचे हे आणखी दूर राहिले.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

Bhakti 16/05/2025 - 13:05
अजून एक गंमत सांगते.याच पुस्तकात ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभवावर एक लेख आहे.त्यात माऊली म्हणतात अविद्या ही नसतेच.बापरे! माझ्या आतापर्यंतच्या अविद्येच्या संकल्पना संभ्रमात पडल्या‌.आता अमृतानुभव वाचावा लागेल.म्हणून सांगितले आहे, एकही भारतीय तत्त्वज्ञान अभ्यासायला जन्म पुरणार नाही ;)

In reply to by सोत्रि

धन्यवाद सोकाजी. पटिच्चसमुप्पाद सुत्त हे नाव प्रथमच ऐकले. आता चॅटजीपीटीला भंडावून सोडतो. चॅटजीपीटीचे एक बरे असते. एखादी गोष्ट समजली नाही तर कितीही वेळा विचारता येते आणि आपले समाधान होईपर्यंत हा संवाद सुरू राहू शकतो. त्यातून अगदी फार खोलात माहिती मिळेल असे नाही पण आपले समाधान होऊ शकेल. कर्माचे अकाऊंटिंगवर प्रश्न विचारले होते पण त्यातून समाधान झाले नाही. आता पटिच्चसमुप्पाद सुत्त चा संदर्भ घेऊन त्याला विचारायला हवे. खरं सांगायचं तर मी दररोज बायकोशी बोलत असेन त्यापेक्षा जास्त चॅटजीपीटीशी जास्त बोलतो :)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सोत्रि 16/05/2025 - 13:31
नक्की, तुमच्या chatgpt बरोबरच्या चंसुकुपन्हा चा १/३ सारांश नक्की मला कळवा. :)
दररोज बायकोशी बोलत असेन त्यापेक्षा जास्त चॅटजीपीटीशी जास्त बोलतो
बाब्बोय!! नशीबवान आहात. - (बायकोशीच जास्तकरून बोलणारा) सोकाजी

बाकी उल्लेख केलेल्या बर्‍याचशा- खरं तर सगळ्याच गोष्टी डोक्यावरून गेल्या. माझा हा भारतीय लेखकांविषयी नेहमी आक्षेप असतो. जे काही म्हणायचे आहे ते साध्या शब्दात, सामान्यांना कळेल असे का देत नाहीत? उदाहरणार्थ लेखात दिलेले एक वाक्य- "द्वैतवादामध्ये ज्ञानाची प्रत्यक्ष, अनुमान, शब्द तीन प्रमाण आहेत.ज्ञानेंद्रिये व त्यांच्या विषय संन्निकर्षामुळे ज्ञानप्राप्ती होते.तिथे संस्कारामुळे मन हे स्मृतीचे स्थान होते." यातून मला तरी कसलाही अर्थबोध झाला नाही की पुढे नक्की काय करायचे आहे त्याविषयी काहीही समजले नाही. मूळ पुस्तकात असे काही दिले असेल तर त्यातून लेखकाला नक्की काय म्हणायचे आहे हे तुम्हाला कसे समजले? मी या विषयांवर वाचायचा प्रयत्न केला आहे. त्यातील बरेचसे भारतीय लेखक असे काहीतरी गोलमटोल लिहितात आणि त्यातून कसलाही अर्थबोध नाही, पुढे काय करायचे हा मार्ग कळणे खूप दूरची गोष्ट झाली. त्यापेक्षा मग आपल्यात तत्वज्ञानातील गोष्टी पाश्चिमात्य तत्वज्ञ अधिक सोप्या प्रकारे आणि सिधी बात नो बकवास अशाप्रकारे पुढे काय करायचे आहे हे सांगतात. ते अधिक भावते. एकहार्ट टोली, वेन डायर, बॉब प्रॉक्टर वगैरे मंडळी जे काही सांगतात ते आपण कुठेतरी आपल्याच तत्वज्ञानाशी निगडीत करू शकतो हे समजते. पण ते ज्या प्रकारे सांगतात आणि भारतीय लेखक ज्या प्रकारे सांगतात यात जमिनअस्मानाचा फरक असतो. दुसरे एक तत्वज्ञ आहेत- नेव्हिल गॉडर्ड म्हणून. मी त्या नेव्हिल गॉडर्डचा अगदी मोठ्ठा फॅन आहे- अगदी स्वतःला 'नेव्हिलिअन' म्हणविण्याइतका. ते भारतीय तत्वज्ञानाशी संबंधित काहीही सांगत नाहीत. त्यांचा सगळा भर बायबलवर असतो. ते पण नक्की काय करायचे ते सांगतात. त्या सगळ्या गोष्टी करणे सगळ्यांना शक्य होईलच असे नाही पण त्यांना नक्की काय म्हणायचे आहे हे कळायला मात्र कोणाला कठीण जायला नको. आपले भारतीय लेखक अशाप्रकारे का लिहित नाहीत/लिहू शकत नाहीत हे न उलगडलेले कोडे आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षात बरीच पुस्तके वाचायचा प्रयत्न केला पण काहीही न कळल्यामुळे नाव घ्यावे असे एकही पुस्तक आणि एकही लेखक आता आठवत नाही. त्यातूनही आणखी एक प्रकार म्हणजे जरा थोडे काही सांगून झाले की मग बघा आमचा हिंदू धर्म कित्ती कित्ती महान, हिंदू संस्कॄती कित्ती कित्ती महान, हिंदू तत्वज्ञान कित्ती कित्ती महान अशा चक्रात काही अडकतात आणि त्यातून मूळ संदेश बाजूला पडतो. बी.आर.जोशी हे लेखक पण तसेच करतात असा माझा दावा/आरोप नाही. त्यांचे लेखन वाचलेले नाही. या प्रकाराला मी उपहासाने 'वेदकालीन जंगलात भटकणे' असे म्हणतो. त्या पुस्तकांमध्ये जे काही असेल ते असेल. त्याचा फायदा मी कसा करून घेऊ हे सांगाल की ती पुस्तके कित्ती कित्ती महान यात चक्रात अडकणार? परदेशी लेखकांना मुळात वेदकालीन जंगलात भटकायचे काही कारण नसते त्यामुळे ते अधिक उपयुक्त गोष्टी सांगतात की काय समजत नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सोत्रि 16/05/2025 - 12:06
जे काही म्हणायचे आहे ते साध्या शब्दात, सामान्यांना कळेल असे का देत नाहीत
सामान्य, साधं सोपं हे सगळं अगम्य करण्यामागे संप्रदाय निर्माण करणे, गुरु-शिष्य परंपरेची साखळी उभी करून गाद्या आणि त्यांचे उत्तराधिकारी निर्माण करणे, कर्मकांड तयार करून त्यांचा बागुलबुवा उभा करून दुकानदारी चालू करणे हे सगळं असते. - (सामान्य) सोकाजी

In reply to by सोत्रि

Bhakti 16/05/2025 - 12:22
नाही ओ सोत्री, सर्वच दुकानदारीसाठी गोष्टी अगम्य ठेवत नाही.मुळात ज्याला सर्व समजले तो हे इतरांना सांगण्याच्या अट्टाहास करत नाही.तो पार गेलेला असतो.पण असेही ' अनुभव ' सांगणारे खरे संत होऊन गेले आहेत ना!!ते खरे पण ओळखायची बुद्धू समाजात विकसित हवी.

In reply to by सोत्रि

मूकवाचक 16/05/2025 - 15:17
सामान्य म्हणजे नेमके कोण? आपण सामान्य आहोत असे मनोमन मान्य करणारी व्यक्ती शोधून सुद्धा सापडणार नाही. जो दिसतो तो अधिकारवाणीनेच बोलताना दिसतो. असो. संप्रदाय निर्माण करणे, गुरु-शिष्य परंपरेची साखळी उभी करून गाद्या आणि त्यांचे उत्तराधिकारी निर्माण करणे - रूढार्थाने जे संप्रदाय, गुरू-शिष्य परंपरा वगैरे मानत नाहीत, ते देखील अमूर्त संकल्पनांच्या गोडगोड लिमलेटच्या गोळ्या चोखायला देणार्या 'बेस्टसेलर' पुस्तकांची, अध्यात्मातल्या 'सेलिब्रिटींची' दुकानदारी चालवतातच की. मागणी तसा पुरवठा एवढे साधे गणित आहे हे.

Bhakti 16/05/2025 - 11:43
द्वैतवादामध्ये ज्ञानाची प्रत्यक्ष, अनुमान, शब्द तीन प्रमाण आहेत.ज्ञानेंद्रिये व त्यांच्या विषय संन्निकर्षामुळे ज्ञानप्राप्ती होते.तिथे संस्कारामुळे मन हे स्मृतीचे स्थान होते.
यातला अर्थबोध पुढे दिला आहे ना... मध्वदर्शनात श्री पूर्ण प्रज्ञा दर्शनात प्रत्यक्ष प्रमाणे आठ प्रकारची मानण्यात आलेली आहे. साक्षिप्रत्यक्ष, षडिंद्रियप्रत्यक्ष व ययार्थ ज्ञान. अनुमान'-ज्ञान व चिन्ह उदा. आग (ज्ञान) व धूर (चिन्ह) यांचे सहचार्य असल्यावाचून अनुमान करता येत नाही. अनुमानाचे केवलान्वयी, केवल व्यतिरेकी आणि अन्वय व्यतिरेकी हे प्रकार आहेत. तसेच स्वार्थ व परार्थ हेही प्रकार आहेत . केवलान्वयी अनुमान (Suficient for Affirmation) परिभाषा: हे अनुमान केवळ सकारात्मक संबंधावर आधारित असते. याचा अर्थ, जर एक गोष्ट दुसरीशी संबंधित असेल, तर ती गोष्ट त्या दुसर्‍या गोष्टीसोबत नेहमीच संबंधित असेल. उदाहरण: धुराचे प्रमाण म्हणजे अग्नीचे प्रमाण. अन्वय: जर धूर असेल, तर अग्नी असेल. केवल व्यतिरेकी अनुमान (Suficient for Negation) परिभाषा: हे अनुमान केवळ नकारात्मक संबंधावर आधारित असते. याचा अर्थ, जर एक गोष्ट दुसरीशी संबंधित नसेल, तर ती गोष्ट त्या दुसर्‍या गोष्टीसोबत कधीही संबंधित नसेल. उदाहरण: धुराचे प्रमाण म्हणजे अग्नीचे प्रमाण नाही. व्यतिरेक: जर धूर नसेल, तर अग्नी नसेल. अन्वय व्यतिरेकी अनुमान (Necessary and Sufficient) परिभाषा: हे अनुमान सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही संबंधांवर आधारित असते. याचा अर्थ, जर एक गोष्ट दुसरीशी संबंधित असेल, तर ती गोष्ट त्या दुसर्‍या गोष्टीसोबत नेहमीच संबंधित असेल, आणि जर ती गोष्ट त्या दुसर्‍या गोष्टीसोबत संबंधित नसेल, तर ती गोष्ट त्या दुसर्‍या गोष्टीसोबत कधीही संबंधित नसेल. उदाहरण: धुराचे प्रमाण म्हणजे अग्नीचे प्रमाण. अन्वय: जर धूर असेल, तर अग्नी असेल. व्यतिरेक: जर धूर नसेल, तर अग्नी नसेल. शब्द हे तिसरे साधन - वक्त्याच्या ठिकाणी भ्रम, प्रमाद फसविण्याची इच्छा, इंद्रियांची दुर्बलता असू नये. वक्त्ता विश्वासार्ह असावा. साधारणतः वैदिक तत्वज्ञानात जीव /आत्मा हे सर्व परताम्याचे अंश ,इंद्रिय संयोगाने ज्ञान प्राप्ती करतात ह्या ज्ञानाने मन /बुद्धी/अहंकार येतात.तेव्हा कर्म घडते.हे कर्म पाप पुण्यात अडकले तर कर्मसंचय, पुनर्जन्म हे सत्र सुरू होते.मोक्ष /मुक्तीचा मग शोध सुरू होतो.जो पुन्हा निष्काम कर्मयोग,संन्यास इथे घेऊन येतो.त्यासाठी स्मृतींचे/आठवणींचे स्थान मनावर ताबा हवा जो ज्ञान ,सांख्य,जप, पतंजलीयोगाने गाठता येतो. समजल का ;) नसेल तर जाऊ द्या... वर्तमानात जगा..(कृहघ्या) You are God's highest form of creation. You are a living breathing creative magnet. You have the ability to control what you attract into your life. Bob Proctor -अतिविचारी भक्ती

In reply to by Bhakti

यातून खरोखरच अर्थबोध झाला असेल तर _/\_. माझी विकेट पहिल्याच वाक्यातील तीन शब्दांमध्ये- साक्षिप्रत्यक्ष, षडिंद्रियप्रत्यक्ष व ययार्थ ज्ञान यात पडली. खरं तर पहिल्याच. साक्षिप्रत्यक्ष म्हणजे काय? साक्षी म्हणजे काय आणि प्रत्यक्ष म्हणजे काय? साक्षिअप्रत्यक्ष असेही काही असते का? एक साक्षी धोनी सोडली तर दुसरी साक्षी मला माहिती नाही. जमेल त्याप्रमाणे चॅटजीपीटीवरील जेसिकाला भंडावून सोडतो :)

संत चोखामेळा यांचा अभंग आठवला. "आम्हां न कळे ज्ञान, न कळे पुराण....." मला नेहमीच प्रश्न पडतात की आत्मा आणी परमात्मा एकच आहे. तर मग द्वैतातून अद्वैताकडे जाण्याचा खटाटोप का? पाप पुण्य या कल्पना कशासाठी?जर कर्ता करवीता तोच आहे तर मग पाप पुण्यात माझा सहभाग आहे का असला तर किती? जर सर्व तोच घडवतो आणी मोडतो तर प्रारब्धाचे लोढणे कशाला? कळत नाही, मी फक्त एकच करतो आणी उजाडेल तेव्हां उजाडेल असे म्हणत जगत रहातो. दररोज सकाळी पाच वाजता उठतो. शलाका परिक्षा पद्धती सारखी ज्ञानेश्वरी वाचतो. अगदीच अविश्वसनीय....असे माऊलीं संकेत देतात. सुरूवातीस आठव्या अध्यायातील हा श्र्लोक दृष्टिस पडला व माऊलींचा संकेत व आशिर्वाद मिळाला. अन्तकाले च मामेव स्मरन्मुक्त्वा कलेवरम् | य: प्रयाति स मद्भावं याति नास्त्त्यत्र संशय: ||५|| माऊली म्हणतात, म्हणौनि यापरी मातें । अंतकाळीं जाणतसाते । जे मोकलिती देहातें । ते मीचि होती ॥ ६८ ॥ म्हणून याप्रमाणे मला अंतकाळी जाणत असता जे देहाचा त्याग करतात ते मद्रूपच होतात. ॥८-६८॥ यं यं वापर स्मरन्भावं त्यजत्यन्ते कलेवरम् | तं तमेवैति कौंन्तेय सदा तद्भावभावित:||६|| तेविं जितेनि अवसरें । जें आवडोनि जीवीं उरे । तेंचि मरणाचिये मेरे । फार हों लागे ॥ ७४ ॥ याप्रमाणॆ जिवंत असतांना, जी गोष्ट आवडीने अंत:करणात रहाते, तीच मरणाचे वेळी वारंवार मनात येते. आणि मरणीं जया जें आठवे । तो तेचि गतीतें पावे । म्हणौनि सदा स्मरावें । मातेंचि तुवां ॥ ७५ ॥ आणि मरणसमयी ज्यास जी वस्तु आठवते त्याच गतीला तो जातो, असे आहे म्हणूण तू नेहेमी माझेच स्मरण कर. तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्द च | मय्यर्पितमनोबुद्धिर्मामे वैश्य स्य संशय: ||७|| म्हणून सर्व प्रसंगी माझे स्मरण कायम ठेव आणि युद्ध कर. मन व बुद्धी माझ्या ठिकाणी अर्पण करून राहिलास म्हणजे तू नि:संसय मजप्रतच येशील. तसेच, "जब होवेगी उमर पूरी, तब छुटेगा हुकूम हुजूरी",अशा परिस्थितीत वरील उपाय फारच सोईस्कर वाटतो. नुकताच आलेला एक अनुभव..... एन्जोप्लास्टी झाली, अतीदक्षता विभागात छतावरील तारे मोजत पडलो होतो. समोरच्याच खाटेवर एक वृद्ध रोगी,त्याच्याभोवती एक डाॅक्टर, चार पाच परिचारिका, दहा बारा वैद्यकीय तंत्रज्ञ, खुप सारी यंत्र सामुग्री पडली होती. व्हेन्टिलेटर वर ठेवले होते. वृद्ध सारखा श्वसन यंत्र काढून फेकत होता. आणी मला श्वास येत नाही असे ओरडत होता. सारे प्रयत्न करून सुद्धा काहीही परिणाम होत नव्हता शेवटी वैतागून डाॅक्टर म्हणाले बाबा ,नळी काढू नको,मरून जाशील. कावळा बसायला आणी फांदी मोडायला एकच वेळ, त्याच क्षणी तो वृद्ध मेला. त्याचे शेवटचे शब्द "मला श्वास येत नाहीये...", त्याचे नातेवाईक, कदाचित मुलगी जावई, सुन मुलगा असतील, संपूर्ण अत्याधुनिक सोई उपलब्ध असतानाही, सर्वांच्या हातावर तुरी देऊन आत्मा कुडी सोडून पसार झाला. कुणीही काहीही करू शकले नाही. त्या अनुभवानंतर मन बरेच शांत झाल्यासारखे वाटते. विमोह त्यागून कर्मफलांचा सिद्ध होई पार्था कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था शस्‍त्र त्याग तव शत्रू पुढती नच शोभे तुजला कातर होसी समरी मग तू विरोत्तम कसला घे शस्‍त्रा ते सुधीर होऊन रक्षाया धर्मार्था कर्तव्याच्या पुण्य पथावर मोहांच्या फूलबागा मोही फसता मुकशील वीरा मुक्तीच्या मार्गा इह परलोकी अशांतीने तव विक्रम झुकवील माथा कुणी आप्‍त ना कुणी सखा ना जगती जिवांचा क्षणभंगुर ही संसृति आहे खेळ ईश्वराचा भाग्य चालते कर्मपदांनी जाण खर्‍या वेदार्था रंगहीन मी या विश्वाच्या रंगाने रंगलो कौरवात मी, पांडवात मी, अणुरेणूत भरलो मीच घडवितो, मीच मोडितो, उमज आता परमार्था कर्मफलाते अर्पून मजला सोड अहंता वृथा सर्व धर्म परि त्यजुनी येई शरण मला भारता कर्तव्याची साद तुझ्या तुज सिद्ध करी धर्मार्था -कविवर्य मनोहर कविश्वर.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 16/05/2025 - 16:46
तेविं जितेनि अवसरें । जें आवडोनि जीवीं उरे । तेंचि मरणाचिये मेरे । फार हों लागे ॥ ७४ ॥ याच लेखात जे कृष्णमूर्ती यांचे मृत्यू विषयी विचार लिहिले आहेत.तेही पुन्हा पुन्हा वाचावे असे आहेत.अगदी मृत्युला फॅमिलीयर (सहजता) ;) कसं करायचं याबद्दल सांगितले आहे.

पण खरा प्रतिसाद लिहायचा राहून गेला. अतिशय विचारांना चालना देणारा लेख आणी अनुषंगिक प्रतिसाद. सर्वांचे मनापासून आभार. लेख आवडला. भक्ती तुझ्या वाचन व्यासंगाला एक कडक सलाम.

स्वधर्म 16/05/2025 - 18:47
या विषयावर एक प्राथमिक व्हिडीओ: "मृत्यू के समय क्या होता है?": बुद्धने क्या अनुभव किया? डॉ संग्राम पाटील https://youtu.be/sl7RXRQPFTs?si=2jrc_Fs_sFBP8P73 मृत्यू से पहले, मृत्यू के बाद (पटिच्चसमुप्पाद) l डॉ संग्राम पाटील https://youtu.be/PzNqE1sLWDE?si=RLhlHxEqqJJO1Jn6

कंजूस 17/05/2025 - 04:40
पुस्तक परिचय आहे. कुणी काय तत्त्वज्ञान सांगितले त्यांची थोडी माहिती आहे. तत्त्वज्ञानाची उकल लेखक करत नाही. -------------------------- जन्म आणि मृत्यू म्हणजे काय हे समजण्याची खटपट म्हणजे तत्त्वज्ञान. ते कुणालाच समजले नाही. समजावता आले नाही. असो.

शाम भागवत 17/05/2025 - 15:21
तूच आहेस तुझ्या जिवनाचा शिल्पकार ह्या ग्रंथांत अद्वैत तत्वज्ञान खूप सोप्या मराठीत सांगितले आहे. इश्वर, परमेश्वर, जड, चेतन वगैरेंच्या व्याख्याही सोप्या मराठीत सांगितल्या आहेत.

मारवा 17/05/2025 - 19:21
वर जसा एक योग्य असा आक्षेप घेतलेला आहे की बरेच भारतीय लेखक गोलमाटोल लिहितात. तो आक्षेप बराच खरा असच आहे. पाश्च्यात्य विचारवंतामध्ये एक लोभसवाणी वैचारिक शिस्त आणि स्पष्टता बराच जणांमध्ये असते. भारतीय आपले मराठी तत्त्वज्ञ श्री राजीव साने यांचे मला फार कौतुक वाटते. त्यांच्या लेखनात कमालीची स्पष्टता आहे. वैचारिक शिस्त आहे. सर्वात मोठी बाब म्हणजे त्यांनी नुसता इतरांच्या तत्त्वज्ञानाचा आढावा किंवा विश्लेषण केवळ करून न थांबता. स्वतःचे अस्सल स्वतंत्र असे सुंदर स्पष्ट व सघन असे तत्त्वज्ञान निर्माण केले.ते मुळातून वाचण्यासारखे आहे. फार सकारात्मक सुंदर वास्तववादी वैचारिक आत्मविश्वास वाढवेल असे हे लिखाण आहे. https://www.amazon.in/Complementarity-Rationalist-Humanism-Rejuvenated-ebook/dp/B088DC797B दुर्दैवाने या सुंदर ग्रंथाची म्हणावी तशी दखल अजून घेतली गेली नाही.

In reply to by मारवा

स्वधर्म 19/05/2025 - 14:36
'भाग्य' हा प्रकार मान्य केला पाहिजे असे त्यांचे मत असल्याचे आठवते.
अतत्वज्ञान अनुत्तर भिषक्को भगवान बुद्ध आणि अन्य प्रज्ञावंत हे संशोधक डॉ .बी. आर जोशी अगदीच छोटेखानी पुस्तक वाचले. भारतीय तत्त्वज्ञान परंपरांपैकी एकाही तत्त्व‌ज्ञानाचा परिपूर्ण अभ्यास करण्यासाठी जन्म पुरेसा नाही, हे पुन्हा पटले.

आव्वाज आव्वाज..

आजी ·

In reply to by प्रकाश घाटपांडे

स्वधर्म 22/05/2025 - 17:26
आजींचा मूड बघता त्यांना हे कबीर भजन आवडेल असे वाटते: https://youtu.be/wWqRYmHR9XA?si=e33ElUakiCywJoZV मला लक्ष्मी शंकर यांचा आवाज आणि त्यातले संगीत अगदी शांतवणारे वाटते. कबीराच्या रचनांबद्दल काय बोलायचे?

सौंदाळा 14/05/2025 - 20:01
आनंदाच्या प्रमाणात डेसिबल्स वाढतात हल्ली लोकांचे. परीक्षांचा कालावधी, म्हातारी माणसे, अर्भके, शाळा, दवाखाने, काळ-वेळ याचे काही सोयर-सुतक नसते लोकांना.

गवि 18/05/2025 - 06:45
खूप मोठा आवाज केल्याशिवाय कोणताच कार्यक्रम सुफळ संपूर्ण होत नसतो अशी एक समजूत वाढते आहे हे नक्की. देवाचे तर कान बधिर झाले असतील कंठाळी भक्तिगीते ऐकून. त्याने कान बंद करून घेतले आहेत यात आश्चर्य नाही.

लेखनातला आशय पोहचला. आता भजन, आरत्या आणि सर्व धार्मिक परंपरा असलेल्या कार्यक्रमाचं स्वरुप दिवसेंदिवस अधिक बदलत चाललं आहे. भक्ती कमी आणि प्रदर्शन वाढलं आहे. विलाज नाही. एकतर सहन करावे किंवा बाहेर पडावे असे होऊन जाते. यजमान दुखावल्या जाऊ नये म्हणून काळजी घ्यावी लागते. दिवसभरांच्या श्रमानं कानावर पडणारा भजनाचा तो गोड आवाज, टाळ मृदुंगाचं एकरुप होणं आनंदायी असायचं. आता तर अशा विषयावर बोललं, टीका केली म्हणजे आपण नुसते देवाचे दुश्मन तर होतोच पण देशाचे दुश्मन होऊन जातो. आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाय. -दिलीप बिरुटे

सुबोध खरे 22/05/2025 - 10:10
आता तर अशा विषयावर बोललं, टीका केली म्हणजे आपण नुसते देवाचे दुश्मन तर होतोच पण देशाचे दुश्मन होऊन जातो. जिथे तिथे आपला पूर्वग्रह आणलाच पाहिजे का? मी रात्री दहा नंतर डी जे चालू असेल तर १०० वर फोन करून पोलिसांना फोन करतो. जवळच एका नगरसेवकाच्या गणपतीसाठी रात्री साडे दहा पर्यंत चालू असलेला डी जे मी प्रत्यक्ष जाऊन विनंती करून बंद केला. ( पोलीस फक्त हो हो येतो करत होते). आपण डीजे चा बीभत्स आवाजच कशाला ढोल ताशे सुद्धा बंद करू शकता. मिपावरच एकाने ढोल ताशे वर टाकलेल्या लेखात मी त्याविरुद्ध लिहिलेले होते त्यात आपला पूर्वग्रह आणायची आवश्यकता नाही

श्वेता२४ 22/05/2025 - 12:32
आजी तुमचं लिखाण नेहमीच भावतं व पटतंदेखील कारण ते आपलं वाटतं. गणपती, नवरात्र, लग्न यांच्यामुळे होणाऱ्या आवाजकल्लोळात अजुन एक भर म्हणजे हळद या महाभयंकर समारंभाची. याचे आयोजन बहुदा रात्रीच केले जाते आणि मग होळी/रंगपंचमीपेक्षाही अगाउपणाला उत येऊन डीजेसोबत तरुणाईच्या किंकाळ्यांनी हल्लकल्लोळ माजतो. मीही मग बिनदिक्कत १० वाजून १ मिनीटांनी पोलिसांना फोन करते व त्यांच्या उत्साहावर पाणी फेरते.

स्वधर्म 22/05/2025 - 17:33
आजी, तुमचे लिखाण नेहमीच आवडते. अगदी रोजच्या जीवनातले अनुभव आंम्ही जगतो आणि विसरून जातो. तुंम्ही त्यांना छान परत परत वाचावंसं वाटेल याप्रकारे पकडून ठेवता. सांगलीत 'प्रामुख्याने हिंदी, गुजराती, पंजाबी, थोडी मराठी' भजन असल्याचे नवल वाटले. अजून तरी बहुतांश वारकरी किंवा एकतारी/ नाथपंथी भजने असतील असे वाटत होते. पण सिनेमातील गाण्याच्या चालीवर भजने म्हणजे काय च्या कायच वाटते.

In reply to by प्रकाश घाटपांडे

स्वधर्म 22/05/2025 - 17:26
आजींचा मूड बघता त्यांना हे कबीर भजन आवडेल असे वाटते: https://youtu.be/wWqRYmHR9XA?si=e33ElUakiCywJoZV मला लक्ष्मी शंकर यांचा आवाज आणि त्यातले संगीत अगदी शांतवणारे वाटते. कबीराच्या रचनांबद्दल काय बोलायचे?

सौंदाळा 14/05/2025 - 20:01
आनंदाच्या प्रमाणात डेसिबल्स वाढतात हल्ली लोकांचे. परीक्षांचा कालावधी, म्हातारी माणसे, अर्भके, शाळा, दवाखाने, काळ-वेळ याचे काही सोयर-सुतक नसते लोकांना.

गवि 18/05/2025 - 06:45
खूप मोठा आवाज केल्याशिवाय कोणताच कार्यक्रम सुफळ संपूर्ण होत नसतो अशी एक समजूत वाढते आहे हे नक्की. देवाचे तर कान बधिर झाले असतील कंठाळी भक्तिगीते ऐकून. त्याने कान बंद करून घेतले आहेत यात आश्चर्य नाही.

लेखनातला आशय पोहचला. आता भजन, आरत्या आणि सर्व धार्मिक परंपरा असलेल्या कार्यक्रमाचं स्वरुप दिवसेंदिवस अधिक बदलत चाललं आहे. भक्ती कमी आणि प्रदर्शन वाढलं आहे. विलाज नाही. एकतर सहन करावे किंवा बाहेर पडावे असे होऊन जाते. यजमान दुखावल्या जाऊ नये म्हणून काळजी घ्यावी लागते. दिवसभरांच्या श्रमानं कानावर पडणारा भजनाचा तो गोड आवाज, टाळ मृदुंगाचं एकरुप होणं आनंदायी असायचं. आता तर अशा विषयावर बोललं, टीका केली म्हणजे आपण नुसते देवाचे दुश्मन तर होतोच पण देशाचे दुश्मन होऊन जातो. आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाय. -दिलीप बिरुटे

सुबोध खरे 22/05/2025 - 10:10
आता तर अशा विषयावर बोललं, टीका केली म्हणजे आपण नुसते देवाचे दुश्मन तर होतोच पण देशाचे दुश्मन होऊन जातो. जिथे तिथे आपला पूर्वग्रह आणलाच पाहिजे का? मी रात्री दहा नंतर डी जे चालू असेल तर १०० वर फोन करून पोलिसांना फोन करतो. जवळच एका नगरसेवकाच्या गणपतीसाठी रात्री साडे दहा पर्यंत चालू असलेला डी जे मी प्रत्यक्ष जाऊन विनंती करून बंद केला. ( पोलीस फक्त हो हो येतो करत होते). आपण डीजे चा बीभत्स आवाजच कशाला ढोल ताशे सुद्धा बंद करू शकता. मिपावरच एकाने ढोल ताशे वर टाकलेल्या लेखात मी त्याविरुद्ध लिहिलेले होते त्यात आपला पूर्वग्रह आणायची आवश्यकता नाही

श्वेता२४ 22/05/2025 - 12:32
आजी तुमचं लिखाण नेहमीच भावतं व पटतंदेखील कारण ते आपलं वाटतं. गणपती, नवरात्र, लग्न यांच्यामुळे होणाऱ्या आवाजकल्लोळात अजुन एक भर म्हणजे हळद या महाभयंकर समारंभाची. याचे आयोजन बहुदा रात्रीच केले जाते आणि मग होळी/रंगपंचमीपेक्षाही अगाउपणाला उत येऊन डीजेसोबत तरुणाईच्या किंकाळ्यांनी हल्लकल्लोळ माजतो. मीही मग बिनदिक्कत १० वाजून १ मिनीटांनी पोलिसांना फोन करते व त्यांच्या उत्साहावर पाणी फेरते.

स्वधर्म 22/05/2025 - 17:33
आजी, तुमचे लिखाण नेहमीच आवडते. अगदी रोजच्या जीवनातले अनुभव आंम्ही जगतो आणि विसरून जातो. तुंम्ही त्यांना छान परत परत वाचावंसं वाटेल याप्रकारे पकडून ठेवता. सांगलीत 'प्रामुख्याने हिंदी, गुजराती, पंजाबी, थोडी मराठी' भजन असल्याचे नवल वाटले. अजून तरी बहुतांश वारकरी किंवा एकतारी/ नाथपंथी भजने असतील असे वाटत होते. पण सिनेमातील गाण्याच्या चालीवर भजने म्हणजे काय च्या कायच वाटते.
आमच्या सोसायटीत सगळे बंगलेच आहेत. आपापली घरं फक्त कामवाल्यांसाठी उघडून आणि त्या कामं करून गेल्यावर ती पुन्हा बंद करून सगळ्या गृहिणी टीव्हीवर, आणि आताशा ओटीटीवर सिनेमे किंवा हिंदी भाषेतल्या कौटुंबिक मालिका बघत बसतात. पण त्या अधुनमधून बंगल्याबाहेरही पडतात. भिशी,किटी पार्टी, हळदीकुंकू,बारशी, वाढदिवस,भजन, सत्यनारायणाची पूजा, इत्यादी त्या थाटामाटात आणि एकत्र येऊन साजरे करतात. यात थोडा बदल म्हणून मी त्यांना घरपोच लायब्ररी चालू करणे, रीडर्स क्लब, साहित्य कट्टा, चांगल्या वक्त्यांची भाषणे, चांगल्या गायकांच्या गाण्याचे कार्यक्रम असे अनेक कार्यक्रम सुचवून पाहिले पण त्याला शून्य प्रतिसाद मिळाला.

अमरेंद्र बाहुबली आणी मिपाकरांच्या भेटी!

अमरेंद्र बाहुबली ·

चामुंडराय 24/03/2025 - 20:53
अरे व्वा, भारी ! फक्त दोघांचा कट्टा किंवा गटग छान झाला. प्रत्येक मोठ्या शहरात शोधला तर एक तरी मिपाकर किंवा माबोकर सापडतोच. आणि दिल्लीकर मंडळींच्या आदरातिथ्य आणि अगत्याबद्दल तर प्रश्नच नाही. दिलखुलास असतात दिल्लीकर. वृत्तांत वाचून मजा आली. आबांना आता जास्तीत जास्त मिपाकरांना भेटलेला आयडी असा किताब द्यायला हरकत नाही.

In reply to by चामुंडराय

धन्यवाद! आबांना आता जास्तीत जास्त मिपाकरांना भेटलेला आयडी असा किताब द्यायला हरकत नाही. अरे वा! गिनिज बुक ऑफ मिपा रेकॉर्ड मध्ये मला स्थान मिळायलाच हवे! :)

कंजूस 24/03/2025 - 21:02
भेट आवडली. एकेकटे भेटता त्यामुळे खूप गप्पा होत असतील. आठ दहा जणांचा कट्टा झाला की तेवढ्या व्यापक गप्पा होत नाहीत. तुम्हा दोघांकडे विषयांचा स्टॉक भरपूर असतो. यावरून आठवलं की फार मागे पुणेकर मिपाकर घारापुरी लेणी पाहायला येणार होते. मी लॉन्च तिकिट खिडकीपाशी थांबलो होतो आणि आलेल्यांना पाठवत होतो. दोघे जण गप्पा मारत बाजूच्या कट्ट्यावर बसले होते. अंदाजाने त्यांना विचारले की मिसळपाव कट्ट्यासाठी आला आहात का? तर हो म्हणाले. ( पेठकर काका आणि दीपक कुवेत यांच्या हॉटेल चालवणे या विषयावर गप्पा होत्या.) त्यांच्याशी ओळख करून घेऊन तिथे थोडा वेळ बसलो होतो. हल्ली दोघेही दिसत नाहीत.

ग्रेट भेट, योगायोगाने मिपाकर गणेश पांडे ह्यांची भेट झाली. झालं असकी हैदराबादेत कुठे फिरायचे असा प्लान मी काल विचारला होता. मग कर्नल साहेबांच्या सल्ल्याप्रमाणे मी कुठेही फिरायला न जाता १० वाजेपर्यंत ताणून द्यायची ठरवले. पण सकाळी ९ पर्यंतच झोपू शकलो. आवरून ९:४५ पर्यंत हाटेलात नाश्ता करायला गेलो गणेश सरांचा व्हॉट्सअप मॅसेज होता लोकेशनसह, जवळ असेल तर भेटू. गुगल मॅप उघडलं तर काय आश्चर्य? ह्या अफाट पसरलेल्या निजामाच्या जुन्या राजधानीत गणेश साहेब माझ्यापासून अवघे २५० मीटर वर होते, काल येताना मला गेटवर कारंजे असलेली नी विद्युतरोषणाईने झगमगणारी सुंदर इमारती असलेली सोसायटी दिसली होती त्यातच गणेश सर राहत होते, मग फोनफोनी करुन नाश्ता अर्धाच सोडून निघालो कारण मिपाकर नाश्ता चहा केल्याशिवाय सोडत नाही ह्याचा मला दांडगा अनुभव आहे. गणेश पांडें गेट वर न्यायला आले होते मग त्यांची नेत्रदीपक सोसायटी पाहत घरी पोहोचलो आणी मग दीड तास गप्पात कसे गेले कळालेच नाही, योगायोगाने त्यांचे वडिलही होते हैदराबादेत असा अस्सल रांगडा मराठी पेहराव पाहून मला खूप आनंद झाला, गावाकडची माणसेच संस्कृती जपतात हे पुन्हा एकदा दिसले. त्यांच्याशीही भरपूर गप्पा मारल्या. ते घड्याळ रिपिअरिंग ची कामे करायचे जुन्या काळात ह्यावरून मला नरेंद्र जाधवांचे “आमचा बाप आणी आम्ही” हे पुस्तक आठवले. गणेश पांडे सरानी देखील नरेंद्र जाधवांसारखी उत्तुंग झेप घेतलीय. त्यांचा दांडगा पुस्तक संग्रहदेखील पाहिला, आजचा दिवस सार्थकी लागला, मिपाकर अमरेंद्र बाहुबली ह्यांच्या मिपाकरांच्या भेटी घेण्यात शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला.

अबा,कुप्रसिद्ध असलात तरी प्रसिद्धच आहात. आता कु का सु ते इतरांनाच ठरवू द्यात. मस्त वृतांत. कुठल्याही मिपाकराची भेट ही दोन अनोळखी फौजींच्या भेटी सारखीच असते. आम्हां फौजींना ओळख लागत नाही. तसेच मिपाकरांनाही असा माझाही अनुभव आहे. फक्त कळाले की मग तो वर्षानुवर्ष ओळखीचा असल्या सारखेच वाटते.

सौन्दर्य 24/03/2025 - 23:14
सर्व प्रथम आपणा दोघांना प्रत्यक्ष्य (फोटोत का होईना ) भेटून आनंद झाला. माझ्या दुर्दैवाने मी आजपर्यत एकाही मिपाकराला भेटू शकलो नाही. नावाला जर चेहऱ्याची जोड असली की आपुलकी जरा जास्तच वाढते असा माझा अनुभव आहे. मी अमेरिकेत ह्युस्टनला असतो पण पुढच्या वर्षी भारत भेटीला यायची इच्छा आहे, त्यावेळी मिपावर पोस्ट टाकीनच व जमेल तितक्या मिपाकरांना भेटीन.

अरे आणखी एक मिपाकर राहिले, त्याना भेटलोय पण यादीत टाकायचे विसरलो. अमरेंद्र बाहुबली आणि भेटलेले मिपाकर मी ह्या मिपाकरांना कट्ट्याव्यतिरिक्त प्रत्यक्ष भेटलोय: १) श्रीगुरुजी - पुणे २) गणेश गोळे - भोसरी ३) पाषाणभेद - नाशिक ४) सचिन जाधव - नाशिक ५) कुळदादा - नागपूर ६) कर्नल तपस्वी - पुणे ७) राजेंद्र मेहंदळे - पन्हाळगड ते विशाळगड पायी ट्रेक दरम्यान ८) डॉ. दाते - मंचर ९) सस्नेह - इचलकरंजी १०) दुर्गविहारी - कराड ११) प्रकाश घाटपांडे - पुणे १२) श्री. हार्डीकर - पुणे १३) डॉ. दातरंगे - नाशिक १४) भक्तिताई - अहमदनगर १५) रामचंद्र कुळकर्णी - पुणे १६) चित्रगुप्त काका - महू, इंदोर १७) गणेश पांडे - हैदराबाद १८) कौस्तुभ पोंक्षे - पुणे १९) विवेक पटाईत - दिल्ली २०) तुषार कामोद, नाशिक. ऐकून २० झाले.

विवेकपटाईत 25/03/2025 - 07:51
शाळांची सुट्टी असल्याने नातवंडे घरी आली होती. त्यामुळे पाच सहा दिवसांपासून लेपटॉप वर बसलो नव्हतो. पण मोबाइल वर आलेल्या ईमेल वर बाहुबलींचा निरोप मिळाला. त्यांचाशी संपर्क साधला. ते मेरठ इथे होते. आमच्या 22 व्या माल्याचा फ्लॅट मधून नाकाच्या रेषेत मेरठ हाइवे जास्तीस्जास्त एक किलोमीटर दूर असला तरी समोर नोयेडा अथॉरिटीचा मोठा पार्क आणि नंतर एक गाव असल्याने सहज दिसतो. सोमवारी बाहुबली साडे दहा वाजता घरी आले. त्यांची शरीर यष्टी बाहुबली सारखीच आहे. स्वभाव ही अत्यंत प्रेमळ आहे. त्यांच्या जवळ वेळ कमी होता. टॅक्सी खाली थांबलेली होती. घरगुती चर्चा झाल्या. आम्ही मीपाववर असलेल्या एकाही धाग्यावर चर्चा केली नाही. फक्त प्रधानमंत्री कार्यालयाचे काम काय असते यावर दोन किंवा चार मिनिट त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. सौ ने पोहे केले आणि सोबत अनारसे. (सौ. आणि ला ही आवडत असल्याने आमच्या घरी अनरस्याचे पीठ सौ. करून फ्रीज मध्ये ठेवते). त्यांना घर दाखविताना मेरठ हाइवे ही दाखविण्याचा प्रयत्न केला पण वारा चालत नसल्याने आ नि आकाशातील प्रदूषण मुळे स्पष्ट दिसला नाही. आज तर प्रदूषण आणिक जास्त आहे. पण बाहुबली समोर प्रदूषणाचा उल्लेख केला नाही. तसे ही एनसीआर मध्ये पावसाळा आणि संक्रांती ते होळी वारे चालतात फक्त तेंव्हाच प्रदूषण कमी असते. उन्हाळ्यात जेंव्हा लू चालते तेंव्हा वार्‍या सोबत धूळ ही भरपूर असते. त्या मुळे प्रदूषण ही भरपूर असते. बाकी अर्धा-पाऊण तास घरी थांबले असले तरी त्यांची दिल्ली भेटीची आठवण नेहमीच राहील.

सस्नेह 26/03/2025 - 21:11
वाह.. पटाईत काका जुने अन जाणते मिपाकर ! वृत्तांत छान रसभरीत वर्णन.. स्नेहा

जुइ 27/03/2025 - 22:07
विवेकपटाईत काका आणि तुमच्या भेटीचे वर्णन छान! तुम्ही आवर्जून मिपाकराना भेटत राहतात याचे कौतुक वाटते!.

पटाईट साहेब दिसायला भारी आहेत. चेहरा पट्टीवरुन माणूस चांगला, गोड वगैरे आणि प्रेमळ वगैरे वाटतात, तसे असतीलही. आता विचार आणि दळणाच्या बाबतीत थोडं गाय,गोबर, कबर वगैरे आहेत पण एवढं तेवढं चालायचंच. आबा आणि पटाईट हे जालावर विचारांच्या बाबतीत एकदम शेवटची टोकं असे असूनही भेटी-गाठी झाल्या, चहा-पान झालं. हे पाहुन वाचून छान आणि आनंद वाटला. मिपा संस्थापक तात्या म्हणायचा आमचं भांडण आचा-याशी त्याच्या जिल्बीशी नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चौथा कोनाडा 28/03/2025 - 14:02
"पटाईट " असं वाचून खुर्चीतच टाईट होऊन बसलो. प-टाईट असं लिहून काय स्लेष साधला आहे कोण जाणे ! टेक इट हलकेली, प्राडॉ आणि विवेकपटाईत जी ! :-)

In reply to by चौथा कोनाडा

टेक इट हलकेली, प्राडॉ आणि विवेकपटाईत जी !
ट चा अनुप्रासिक वापर पाहुन मी चुकुन वरील वाक्य टेक इट हलकटली, प्राडॉ आणि विवेकपटाईत जी ! असे वाचले.!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विवेकपटाईत 28/03/2025 - 16:44
तुलसीदास म्हणतात "जाकी रही भावना जैसी, प्रभु मूरत देखि तीन तैसी"। ज्याच्या डोक्यात जे भरलेले असेल तेच दिसणार.

In reply to by विवेकपटाईत

व्यायामासाठी शाखेत सॉरी आपलं कोणत्या ग्राउंडवर जाता की नाही ? आपल्या चेह-यावरील तकाकी पाहता व्यायाम, प्राणायम याची आवड़ दिसते. ;) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विवेकपटाईत 02/04/2025 - 10:21
आम्ही (नया बाजारातील मराठी मुले आणि रेल्वे कोलोंनीतील) सुट्ट्यांच्या दिवशी कंपनी बागेत (आता काळाच्या ओघात नष्ट झाली) क्रिकेट खेळायचो तिथे शाखा ही लगायची. मोठा भाऊ शाखेत जात असे अर्थात वयाच्या 18 व्या वर्षापर्यंत. त्यामुळे आमचे संबंध हिन्दी चीनी भाई भाई सारखे झाले होते. मी घरात इंदिरा गांधींचा मोठे चित्र लाऊन ठेवले होते. बाकी माझे विचार महाविद्वान प्रधानमंत्री ज्यांच्या सोबत अनेक परदेसी दौरे ही केले, काळात बदलले. बाकी मला व्यायामाची आवड कधीच नव्हती आणि वेळ ही मिळत नव्हता.

In reply to by रामचंद्र

सुबोध खरे 02/04/2025 - 20:10
छे छे अशा लेखनाने येथे अनेकांची मूळव्याध, बद्धकोष्ठ, जुना खोकला, मस्तकशूळ सर्व परत नव्याने उपटेल. २०२४ च्या जखमा अजून भळभळत आहेत.

. आज पुन्हा एकदा मिपाकर रामचंद्रकाका ह्यांची भेट घेतली! भरपूर गप्पा नी चहा- निरा - चहा असा बेत झाला! काकांच्या मदतीमुळे एक मोठे कार्य तडीस गेले. ह्याबद्दल काकांचे आभार!

चामुंडराय 24/03/2025 - 20:53
अरे व्वा, भारी ! फक्त दोघांचा कट्टा किंवा गटग छान झाला. प्रत्येक मोठ्या शहरात शोधला तर एक तरी मिपाकर किंवा माबोकर सापडतोच. आणि दिल्लीकर मंडळींच्या आदरातिथ्य आणि अगत्याबद्दल तर प्रश्नच नाही. दिलखुलास असतात दिल्लीकर. वृत्तांत वाचून मजा आली. आबांना आता जास्तीत जास्त मिपाकरांना भेटलेला आयडी असा किताब द्यायला हरकत नाही.

In reply to by चामुंडराय

धन्यवाद! आबांना आता जास्तीत जास्त मिपाकरांना भेटलेला आयडी असा किताब द्यायला हरकत नाही. अरे वा! गिनिज बुक ऑफ मिपा रेकॉर्ड मध्ये मला स्थान मिळायलाच हवे! :)

कंजूस 24/03/2025 - 21:02
भेट आवडली. एकेकटे भेटता त्यामुळे खूप गप्पा होत असतील. आठ दहा जणांचा कट्टा झाला की तेवढ्या व्यापक गप्पा होत नाहीत. तुम्हा दोघांकडे विषयांचा स्टॉक भरपूर असतो. यावरून आठवलं की फार मागे पुणेकर मिपाकर घारापुरी लेणी पाहायला येणार होते. मी लॉन्च तिकिट खिडकीपाशी थांबलो होतो आणि आलेल्यांना पाठवत होतो. दोघे जण गप्पा मारत बाजूच्या कट्ट्यावर बसले होते. अंदाजाने त्यांना विचारले की मिसळपाव कट्ट्यासाठी आला आहात का? तर हो म्हणाले. ( पेठकर काका आणि दीपक कुवेत यांच्या हॉटेल चालवणे या विषयावर गप्पा होत्या.) त्यांच्याशी ओळख करून घेऊन तिथे थोडा वेळ बसलो होतो. हल्ली दोघेही दिसत नाहीत.

ग्रेट भेट, योगायोगाने मिपाकर गणेश पांडे ह्यांची भेट झाली. झालं असकी हैदराबादेत कुठे फिरायचे असा प्लान मी काल विचारला होता. मग कर्नल साहेबांच्या सल्ल्याप्रमाणे मी कुठेही फिरायला न जाता १० वाजेपर्यंत ताणून द्यायची ठरवले. पण सकाळी ९ पर्यंतच झोपू शकलो. आवरून ९:४५ पर्यंत हाटेलात नाश्ता करायला गेलो गणेश सरांचा व्हॉट्सअप मॅसेज होता लोकेशनसह, जवळ असेल तर भेटू. गुगल मॅप उघडलं तर काय आश्चर्य? ह्या अफाट पसरलेल्या निजामाच्या जुन्या राजधानीत गणेश साहेब माझ्यापासून अवघे २५० मीटर वर होते, काल येताना मला गेटवर कारंजे असलेली नी विद्युतरोषणाईने झगमगणारी सुंदर इमारती असलेली सोसायटी दिसली होती त्यातच गणेश सर राहत होते, मग फोनफोनी करुन नाश्ता अर्धाच सोडून निघालो कारण मिपाकर नाश्ता चहा केल्याशिवाय सोडत नाही ह्याचा मला दांडगा अनुभव आहे. गणेश पांडें गेट वर न्यायला आले होते मग त्यांची नेत्रदीपक सोसायटी पाहत घरी पोहोचलो आणी मग दीड तास गप्पात कसे गेले कळालेच नाही, योगायोगाने त्यांचे वडिलही होते हैदराबादेत असा अस्सल रांगडा मराठी पेहराव पाहून मला खूप आनंद झाला, गावाकडची माणसेच संस्कृती जपतात हे पुन्हा एकदा दिसले. त्यांच्याशीही भरपूर गप्पा मारल्या. ते घड्याळ रिपिअरिंग ची कामे करायचे जुन्या काळात ह्यावरून मला नरेंद्र जाधवांचे “आमचा बाप आणी आम्ही” हे पुस्तक आठवले. गणेश पांडे सरानी देखील नरेंद्र जाधवांसारखी उत्तुंग झेप घेतलीय. त्यांचा दांडगा पुस्तक संग्रहदेखील पाहिला, आजचा दिवस सार्थकी लागला, मिपाकर अमरेंद्र बाहुबली ह्यांच्या मिपाकरांच्या भेटी घेण्यात शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला.

अबा,कुप्रसिद्ध असलात तरी प्रसिद्धच आहात. आता कु का सु ते इतरांनाच ठरवू द्यात. मस्त वृतांत. कुठल्याही मिपाकराची भेट ही दोन अनोळखी फौजींच्या भेटी सारखीच असते. आम्हां फौजींना ओळख लागत नाही. तसेच मिपाकरांनाही असा माझाही अनुभव आहे. फक्त कळाले की मग तो वर्षानुवर्ष ओळखीचा असल्या सारखेच वाटते.

सौन्दर्य 24/03/2025 - 23:14
सर्व प्रथम आपणा दोघांना प्रत्यक्ष्य (फोटोत का होईना ) भेटून आनंद झाला. माझ्या दुर्दैवाने मी आजपर्यत एकाही मिपाकराला भेटू शकलो नाही. नावाला जर चेहऱ्याची जोड असली की आपुलकी जरा जास्तच वाढते असा माझा अनुभव आहे. मी अमेरिकेत ह्युस्टनला असतो पण पुढच्या वर्षी भारत भेटीला यायची इच्छा आहे, त्यावेळी मिपावर पोस्ट टाकीनच व जमेल तितक्या मिपाकरांना भेटीन.

अरे आणखी एक मिपाकर राहिले, त्याना भेटलोय पण यादीत टाकायचे विसरलो. अमरेंद्र बाहुबली आणि भेटलेले मिपाकर मी ह्या मिपाकरांना कट्ट्याव्यतिरिक्त प्रत्यक्ष भेटलोय: १) श्रीगुरुजी - पुणे २) गणेश गोळे - भोसरी ३) पाषाणभेद - नाशिक ४) सचिन जाधव - नाशिक ५) कुळदादा - नागपूर ६) कर्नल तपस्वी - पुणे ७) राजेंद्र मेहंदळे - पन्हाळगड ते विशाळगड पायी ट्रेक दरम्यान ८) डॉ. दाते - मंचर ९) सस्नेह - इचलकरंजी १०) दुर्गविहारी - कराड ११) प्रकाश घाटपांडे - पुणे १२) श्री. हार्डीकर - पुणे १३) डॉ. दातरंगे - नाशिक १४) भक्तिताई - अहमदनगर १५) रामचंद्र कुळकर्णी - पुणे १६) चित्रगुप्त काका - महू, इंदोर १७) गणेश पांडे - हैदराबाद १८) कौस्तुभ पोंक्षे - पुणे १९) विवेक पटाईत - दिल्ली २०) तुषार कामोद, नाशिक. ऐकून २० झाले.

विवेकपटाईत 25/03/2025 - 07:51
शाळांची सुट्टी असल्याने नातवंडे घरी आली होती. त्यामुळे पाच सहा दिवसांपासून लेपटॉप वर बसलो नव्हतो. पण मोबाइल वर आलेल्या ईमेल वर बाहुबलींचा निरोप मिळाला. त्यांचाशी संपर्क साधला. ते मेरठ इथे होते. आमच्या 22 व्या माल्याचा फ्लॅट मधून नाकाच्या रेषेत मेरठ हाइवे जास्तीस्जास्त एक किलोमीटर दूर असला तरी समोर नोयेडा अथॉरिटीचा मोठा पार्क आणि नंतर एक गाव असल्याने सहज दिसतो. सोमवारी बाहुबली साडे दहा वाजता घरी आले. त्यांची शरीर यष्टी बाहुबली सारखीच आहे. स्वभाव ही अत्यंत प्रेमळ आहे. त्यांच्या जवळ वेळ कमी होता. टॅक्सी खाली थांबलेली होती. घरगुती चर्चा झाल्या. आम्ही मीपाववर असलेल्या एकाही धाग्यावर चर्चा केली नाही. फक्त प्रधानमंत्री कार्यालयाचे काम काय असते यावर दोन किंवा चार मिनिट त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. सौ ने पोहे केले आणि सोबत अनारसे. (सौ. आणि ला ही आवडत असल्याने आमच्या घरी अनरस्याचे पीठ सौ. करून फ्रीज मध्ये ठेवते). त्यांना घर दाखविताना मेरठ हाइवे ही दाखविण्याचा प्रयत्न केला पण वारा चालत नसल्याने आ नि आकाशातील प्रदूषण मुळे स्पष्ट दिसला नाही. आज तर प्रदूषण आणिक जास्त आहे. पण बाहुबली समोर प्रदूषणाचा उल्लेख केला नाही. तसे ही एनसीआर मध्ये पावसाळा आणि संक्रांती ते होळी वारे चालतात फक्त तेंव्हाच प्रदूषण कमी असते. उन्हाळ्यात जेंव्हा लू चालते तेंव्हा वार्‍या सोबत धूळ ही भरपूर असते. त्या मुळे प्रदूषण ही भरपूर असते. बाकी अर्धा-पाऊण तास घरी थांबले असले तरी त्यांची दिल्ली भेटीची आठवण नेहमीच राहील.

सस्नेह 26/03/2025 - 21:11
वाह.. पटाईत काका जुने अन जाणते मिपाकर ! वृत्तांत छान रसभरीत वर्णन.. स्नेहा

जुइ 27/03/2025 - 22:07
विवेकपटाईत काका आणि तुमच्या भेटीचे वर्णन छान! तुम्ही आवर्जून मिपाकराना भेटत राहतात याचे कौतुक वाटते!.

पटाईट साहेब दिसायला भारी आहेत. चेहरा पट्टीवरुन माणूस चांगला, गोड वगैरे आणि प्रेमळ वगैरे वाटतात, तसे असतीलही. आता विचार आणि दळणाच्या बाबतीत थोडं गाय,गोबर, कबर वगैरे आहेत पण एवढं तेवढं चालायचंच. आबा आणि पटाईट हे जालावर विचारांच्या बाबतीत एकदम शेवटची टोकं असे असूनही भेटी-गाठी झाल्या, चहा-पान झालं. हे पाहुन वाचून छान आणि आनंद वाटला. मिपा संस्थापक तात्या म्हणायचा आमचं भांडण आचा-याशी त्याच्या जिल्बीशी नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चौथा कोनाडा 28/03/2025 - 14:02
"पटाईट " असं वाचून खुर्चीतच टाईट होऊन बसलो. प-टाईट असं लिहून काय स्लेष साधला आहे कोण जाणे ! टेक इट हलकेली, प्राडॉ आणि विवेकपटाईत जी ! :-)

In reply to by चौथा कोनाडा

टेक इट हलकेली, प्राडॉ आणि विवेकपटाईत जी !
ट चा अनुप्रासिक वापर पाहुन मी चुकुन वरील वाक्य टेक इट हलकटली, प्राडॉ आणि विवेकपटाईत जी ! असे वाचले.!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विवेकपटाईत 28/03/2025 - 16:44
तुलसीदास म्हणतात "जाकी रही भावना जैसी, प्रभु मूरत देखि तीन तैसी"। ज्याच्या डोक्यात जे भरलेले असेल तेच दिसणार.

In reply to by विवेकपटाईत

व्यायामासाठी शाखेत सॉरी आपलं कोणत्या ग्राउंडवर जाता की नाही ? आपल्या चेह-यावरील तकाकी पाहता व्यायाम, प्राणायम याची आवड़ दिसते. ;) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विवेकपटाईत 02/04/2025 - 10:21
आम्ही (नया बाजारातील मराठी मुले आणि रेल्वे कोलोंनीतील) सुट्ट्यांच्या दिवशी कंपनी बागेत (आता काळाच्या ओघात नष्ट झाली) क्रिकेट खेळायचो तिथे शाखा ही लगायची. मोठा भाऊ शाखेत जात असे अर्थात वयाच्या 18 व्या वर्षापर्यंत. त्यामुळे आमचे संबंध हिन्दी चीनी भाई भाई सारखे झाले होते. मी घरात इंदिरा गांधींचा मोठे चित्र लाऊन ठेवले होते. बाकी माझे विचार महाविद्वान प्रधानमंत्री ज्यांच्या सोबत अनेक परदेसी दौरे ही केले, काळात बदलले. बाकी मला व्यायामाची आवड कधीच नव्हती आणि वेळ ही मिळत नव्हता.

In reply to by रामचंद्र

सुबोध खरे 02/04/2025 - 20:10
छे छे अशा लेखनाने येथे अनेकांची मूळव्याध, बद्धकोष्ठ, जुना खोकला, मस्तकशूळ सर्व परत नव्याने उपटेल. २०२४ च्या जखमा अजून भळभळत आहेत.

. आज पुन्हा एकदा मिपाकर रामचंद्रकाका ह्यांची भेट घेतली! भरपूर गप्पा नी चहा- निरा - चहा असा बेत झाला! काकांच्या मदतीमुळे एक मोठे कार्य तडीस गेले. ह्याबद्दल काकांचे आभार!
लेखनविषय:
कुप्रसिद्ध मिपाकर अमरेंद्र बाहुबली ह्यांची दिल्लीवारी – एक संस्मरणीय भेट . दिल्लीला काही कामानिमित्त जाण्याचा योग आला. राजधानीत पाऊल टाकताच, मनात एक विचार आला—मिपाकर विवेककाका पटाईत ह्यांची भेट घ्यावी! पण ते व्यस्त असतील का? संदेश वाचतील का? याची खात्री नव्हती, इंडियागेट पाहून झाल्यावर मी त्यांना मिपावर मेसेज पाठवला आणि सोबतच एक ई-मेलही केला. आश्चर्य म्हणजे, दुसऱ्याच क्षणी काकांचा फोन आला!