काथ्याकूट
पहलगाम अतिरेकी हल्ला ते जातिगत जनगणना - सरकारची संदिग्ध कोलांटीउडी
केंद्र सरकारचे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सरकार आता जातिगत जनगणना होणार असल्याची मोठी घोषणा केली आणि देशात एकच गदारोळ माजला आहे. सत्ताधारी पक्ष व त्यांची मातृसंस्था रा.स्व. संघ यांचे जातिगत जनगणनेला नेहमीच छुपा विरोध राहिलेला आहे. त्यामुळेच बटेंगे तो कटेंगे वगैरे घोषणा दिल्या होत्या. काँग्रेस गेल्या तीन वर्षांपासून जी मागणी करत होती ती केंद्र सरकारने अखेर तेच पाऊल उचलले आहे.
ताज्या घडामोडी- मे २०२५
आधीच्या भागात ४००+ प्रतिसाद झाले म्हणून आणि मे २०२५ चा महिना सुरू व्हायला आणखी साडेचार तासच (मोजून २७० मिनिटे) बाकी आहेत तेव्हा ताज्या घडामोडींचा नवा धागा सुरू करत आहे.
लोकप्रिय गायक अभिजीत सावंत २ मे रोजी 'जिची चाल तुरू तुरू' हे लोकप्रिय गाणे म्हटलेला अल्बम रिलीज करणार आहे. ते गाणे जुन्याच चालीत असेल की रिमिक्स असेल ही चर्चा अभिजीत सावंतच्या चाहत्यांमध्ये रंगली आहे.
पाकिस्तान आणि पाणी पुरवठ्या बद्दल माहीत मिळू शकेल ?
सगळ्यात मुख्य प्रश्न
१) कारगिल ,पुलवामा ते काल प्रत्यक वेळी पाकिस्तान चा पाणी पुरवठा बंद करतात ,मग ते पाणी परत चालू कोण करते ? तेव्हा मीडिया झोपलेला असतो का ?
२) पाकिस्तान ला पाणी पुरवठा काश्मीर मधून वाहणाऱ्या नद्या सोडून अजून तिथून होत नाही का ?
३) जर चीन ने त्यांच्या नंद्याचे पाणी भारताला बंद केले तर ? तसेच दोन्ही कडे जल फुगवटा निर्माण होण्याची शकयता ?
भारतातल्या पाकिस्तान प्रेमी लोकांचे काय करायचे ?
नोंद :- कृपया बाकी माहिती टाकू नये , त्यासाठी बाकी धागे आहेत
मुद्दा एवढाच कि. आत्ता दहशत वाद्यांनी हल्ला केला .ह्यात भारताने पाकिस्तन चे सर्व व्हिसा रद्द केले ,
ह्यात मेडिकल पेशंट पण आहेत
पण एक जण म्हणत होता त्यांची चूक काय ? ( माझ्याकडे व्हात्सअँप स्क्रीन शॉट आहेत )
पहलगामचा हल्ला आणि इस्लाम
नुकतेच काश्मीरमध्ये काही पर्यटक फिरायला गेले असता तिथे टी आर एफ या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांनी त्या पर्यटकांना त्यांचा धर्म विचारला. ते मुस्लिम सोडून अन्य धर्माचे लोक आहेत हे समजल्यानंतर अगदी जवळून बेछुट गोळीबार केला आणि त्यात २८ जण मृत पावले. त्या मृतात्म्यांना श्रद्धांजली. _/\_
सोने एक लाखावर...
काल २२ एप्रिल २०२५ रोजी सोन्याने एक लाख रुपयांचा टप्पा गाठला. जून २०२४ मध्ये सोने सत्तर हजार होते, तेंव्हा, वर्षभरात सोने एक लाखाचा टप्पा ओलांडेल असे अंदाज मी वर्तवला होता. सोने आता एक लाखावर गेले आहे. अर्थात आज ते थोडेसे उतरले आहे.
सोन्याच्या किमतींबाबतीतील काही वैयक्तिक, सार्वजनिक टप्पे सांगतो -
आपली मातृभाषा मराठी जिवंत राहण्यासाठी आपण काय काय करू शकतो?
२०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून महराष्ट्रात पहिलीपासून ३ भाषा सक्तीने अभ्यासक्रमात टाकलेल्या आहेत. दुर्दैवाने त्यात हिंदीचा पूर्णपणे अनावश्यक समावेश केला आहे.
मराठी भाषेला रोजगार उन्मुख करण्याची गरज.
जी भाषा रोजगार, धन दौलत आणि समाजिक प्रतिष्ठा मिळवून देते ती भाषा लोक शिकतात. जेंव्हा दिल्लीत 11वी बोर्ड होते. तेंव्हा 8वी बोर्डची परीक्षा दिल्या नंतर विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील अधिकान्श विद्यार्थी हिन्दी विषय घ्यायचे नाही. विज्ञान घेणारे फक्त आंग्ल भाषा शिकायचे. वाणिज्य वाले अधिकान्श विद्यार्थी जास्त मार्क्स मिळतात म्हणून संस्कृत भाषा घायचे. उरलेले आमच्या सारखे हिन्दी हा विषय घ्यायचे.
१ ली पासून हिंदीसक्ती कशासाठी? महाराष्ट्राच्या हिंदीकरणाचा डाव?
सध्या महाराष्ट्रात, पहिलीपासून हिंदीची सक्ती करण्याचा भाजप सरकारने निर्णय घेतला आहे, ह्या विरोधात अनेक मराठी प्रेमी नी महाराष्ट्राचे हित चिंतनाऱ्या संघटना विरोधात उतरल्या आहेत!
-महाराष्ट्राचे हिंदीकरण करण्याचा भाजपचा डाव आहे का?
- उत्तर भारतीय फुगलेली लोकसंख्या महाराष्ट्रात आणून वसवण्यासाठी भाजप हे करतय का?
[स्वैर] वाळवी वि० बुरशी
उजव्या डाव्यांचा वर्णपट खुप मोठा आहे पण त्यातील उजवेपण नैसर्गिक आहे. बेल कर्व्हचे अस्तित्व विश्व व्यापी आहे. पूर्ण उजवे आणि पूर्ण डावे कदाचीत अपवाद असतील, नियम नसावेत.
ताज्या घडामोडी एप्रिल २०२५ (भाग २)
आधीच्या भागात ३०० पेक्षा जास्त प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे.
भारताचे राष्ट्रपतीपद दोनदा थोडक्यात हुकलेले अभिजीत बिचुकले यांनी आपली केशभूषा बदलली आहे. नव्या केशभूषेत ते असे दिसत आहेत-
संपादक
नवे प्रतिसाद हे नाव बदलून कृपया ताज्या घडामोडी हे करावे , म्हणजे काय होईल की नवे प्रतिसाद कोणी क्लिक करणार नाही. किंवा ताज्या घडामोडी वगैरे व्यर्थ धागे संपादीत करावेत आणि जिथल्या तिथे काढून टाकावेत.
सिप (SIP) चे मजेदार विज्ञापन
(विज्ञापन आणि माझ्या मनातील विचार)
काल टीव्ही वर आयपीएलचा सामना पाहत होतो. मध्येच एक विज्ञापन आले. एक दुकान दिसत होते. दुकानाच्या साईन बोर्ड वर झगमग लाईटिंग दिसत होती. दुकानासमोर उभे राहून एक तरुण मुलगी गोड आवाजात म्हणाली, मी नियमित सिप मध्ये गुंतवणूक करते.त्या गुंतवणूकीतून मी वडिलांसाठी ....
मी: वडिलांना दुकान टाकून दिले...
ती: नाही हो,
भाजप 'पुरेसा' हिंदुहितैषी पक्ष राहिलाय का?
वक्फ सुधारणा विधेयक संसदेत सादर झाले. इतकी मोठी जमीन हिंदूंच्या देशाची मालमत्ता. ती काँग्रेस नामक महापापी पक्षाने वक्फ नामक संघटनेला अशीच देऊन टाकली. बदल्यात मुस्लिमांच्या एकगठ्ठा मतांची बेजमी करुन घेतली. भाजप सत्तेत येताच वक्फवर उधळलेल्या जमीनी भाजप परत घेईल असे भाजपला मतदान करणार्या हिंदुत्ववादी मतदारांना वाटले. हिंदुत्ववादी मतदारांची संख्याही लक्षणीय आहे.
ताज्या घडामोडी एप्रील ते जून २०२५.
सर्व मिसळपावकर उर्फ़ मिपाकरास नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. मराठी नवीन वर्ष सर्वांना सुख, समाधान, समृद्धीचे जावो हीच विज्ञानेश्वरास प्रार्थना.
ताज्या घडामोडी । एप्रिल २०२५ । चैत्र १९४७
सर्व मिपाखरांना नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! हे वर्ष सर्वांना सुख, समाधान, समृद्धीचे जावो ही श्रीचरणी प्रार्थना.
राज्य नाट्य स्पर्धा आणि पारदर्शकता
राज्य नाट्य स्पर्धेच्या परिक्षकांचा परिचय का करून दिला जात नाही? परिक्षक कोण असणार आहेत हे कळवले जात नाही.
परिक्षकांचा नाट्यविषयक अनुभव आणि त्यांचे योगदान या बद्दल स्पर्धक संघाना काहीच माहीत नसते.
स्पर्धेचे निकाल काय निकषांवर लावणार आहेत हे ही माहीत नसते.
तसेच नाटक संपल्यावर कलाकारांना परिक्षकानी काही मार्गदर्शन , संवाद करावे ही देखील अपेक्षा असते.
रँडम स्वप्नांची कंडंम साखळी ..
तर वाचकहो, सदर लेखाचा लेखक (अस्मादिक ) ह्यांना जास्त सिरिअसली घेऊ नका ..
तुम्हाला वाटलं त्यांच्या (अस्मादिकांच्या) डोक्यावर काही परिणाम झालेला आहे तर तुम्ही या जगात एकटे नाही,
आणि अस्मादिकांच्या पण स्वतः बद्दल त्याच भावना आहेत,
त्यामुळे आम्हीच स्वतःला कधीच सिरिअसली घेत नाही.
सदर लेख केवळ मनोरंजन म्हणूनच वाचावा, कसलेही गर्भित अर्थ घेऊ नये.
- 1 of 369
- next ›