त्यागी गजानना तुझ्या शौर्याला शतशः नमन
चैतत्न्याने प्रफुल्लित करणार्या
सृष्टी आणि प्रकृतीच्या
रक्षाबंधनाच्या
कर्तव्याला पाळण्यासाठी
साक्षात रुद्राच्या
रौद्ररुपाला झेलणार्या
त्यागी गजानना तुझ्या शौर्याला
आमचे शतशः नमन असो.
चैतत्न्याने प्रफुल्लित करणार्या
सृष्टी आणि प्रकृतीच्या
रक्षाबंधनाच्या
कर्तव्याला पाळण्यासाठी
साक्षात रुद्राच्या
रौद्ररुपाला झेलणार्या
त्यागी गजानना तुझ्या शौर्याला
आमचे शतशः नमन असो.
वनस्पति उद्यानातून फेरफटका मारताना
माहितीची पाटी नसलेले झाड पाहून
साहित्यिक राजूमधील चौकश्याने विचारले
हे झाड कोणते?
त्याचा वनस्पती वैज्ञानिक मित्र म्हणाला
उष्णकटिबंधीय म्हणजेच ट्रॉपीकल!
(राजूने वेळ मारून नेणे कंसात जोडले)
वनस्पती वैज्ञानिक मित्राने
राजूची वसंत ऋतूवरील कविता
ऐकुन झाल्यावर
मोबाईलवर मराठी विकिपीडियावरचे
वसंत ऋतूचे पान उघडत राजूला विचारले
आठवतो आज पुन्हा
माझा गाव माझी माती
सारं काही सोडले मी
वितभर पोटासाठी.
बरसून येती मेघ
भिजूनिया जावे चिंब
ओंजळीत पावसाचे
झेलूनिया घ्यावे थेंब
घेवूनिया हाती काठी
जात होतो पोरं पोरं
माळावरी चरावया
घेऊनिया गुरं ढोरं.
रानपाखरांच्या जैसे
रानिवणी हिंडण्यात
किती आठवू ते दिस
मौज होती जगण्यात.
मग सरले ते दिस
हरवले बालपण
शहरात पोटासाठी
सुरू झाली वणवण.
उलटले दिस मास
किती काळ गेला पुढं
तरी मना अजूनही
आहे गवाचीच ओढ.
नुकतीच गणपतीपुळ्याला भटकंती झाली.आबां घाट उतरताना एका जागी थांबून निसर्गाचे रौद्र रूप न्याहळत असताना खडकावर घट्ट पाय रोऊन उभा असलेला एकाकी पर्णहीन वृक्ष लक्ष वेधून घेत होते.नक्की काय विचार करत असेल,पुन्हा पाने फुटतील का?किंवा कोणा लाकूड तोड्याच्या कुऱ्हाडीचे भक्ष होईल आसे अनेक विचार पिंगा घालू लागले. कदाचित आसे काहीतरी म्हणत असेल काय?
पर्णविहीन,रंगविहीन
सृजनाचे चक्र पहात
अमर्त्य मी एकला
नभ छत्री खाली उभा
वेळेवर पाऊस आला की येतात ते आनंदाश्रू.
मैत्री होती ढगाची
उंच उंच डोंगराशी
आंगचटीला आला
खोड्या करू लागला
म्हणून ......
टोचून टोचून डोंगर बोलला
भांडण झाल जोरात
म्हणून रडू आल ढगाला
धार लागली डोळ्याला
कट्टी घेऊन डोंगराशी
वसुधेच्या कुशीत घुसला
आसवांनी पुसलेले अश्रू बघून
मनाशीच हसला
मीत्राशीवाय करमेना
आई जवळ मन रमेना
लवकरच येतो म्हणून
डोंगराला भेटायला गेला
भेट झाली मीत्रांची
दोघा पण खुश झाले
अधंळी कोशीबिरीचा खेळ
पुन्हा खेळू लागले
उन्हाला कसा थांगपत्ता नाही
कसे झाकले नभाला धुक्याने
इथे अतृप्त सुर्य व्यक्त होतो
जराशा कवडश्यातूनी मुक्याने ............
प्रवासा पुन्हा हाक अस्तित्व देते
गंधीत मृदाचे तृणांचे शहारे
इथे स्पर्श ओला निळ्या सागराचा
गगनातूनी जणू थव्यांचे पहारे .............
इथे धुंद असते अशी शर्वरी की
कुठे चांदणे विरघळून जाते
किती बोलणे ते चमकत्या विजेचे
तुझे चालणे मात्र दरवळून जाते ..............
- किरण कुमार
झाडीत उठले पाखरांचे बोल
वारा पेरतो हिरव्या सुरांची ओल
पूर्व काठावर पाझरती सोनेरी कण
मुठीतला प्रकाश उधळीत आले लाल किरण
उतरली ऊन्हे नभाची उघडीत दारे
पिकात पसरलेल्या दवांचे झाले हिरे
धुक्यांच्या पुसून ओळी वृक्ष घेती आकार
खोप्यांतून उडाले चिमण्यांचे थवे चुकार
नवे रूप फुलवीत आली धरणी
हवेत झेपावले पक्षी मुखात घेऊन गाणी
युग प्रवाहीणी
-+-*-+-
समोर दिसत असलेलं भग्न राऊळ पाहताना जाणवतंय,
या तुझ्या काठावर कधीकाळी वसलं असेल एखादं छोटंसं गाव
अथवा एखादा शांत, एकांत आश्रम...
विसावला असेल इथे, अविरत काळप्रवाहात प्रवास करणारा मानव समुह
वा या अनंत प्रवासातुन मुक्तिकडे निघालेला कुणी तपस्वी
सिमेंटच्या जंगलात येण्याची नाही हौस
भरपूर पर्यटनाची मज नाही सोस
माणसा सोबत संघर्षात नाही मौज
भरपेट भोजन सुद्धा मिळत नाही रोज
सोसायटीत ओळखीचे कुणीच नाही
म्हाडात तर घर सुद्धा घ्यायचे नाही
नाशिक पाहण्यात तर मला रस नाही
माणसं भेटण्याचा मला आनंद नाही
हिंस्त्र तरी अन्न साखळीचा हिस्सा
जंगल हिरावून तुम्हीच दिला घुस्सा
वनक्षेत्र खालावले साखळी तुटली
आत्ता मात्र भूख सुद्धा प्रखर वाढली
बैसला फांदीवरी हा चिंब भिजुनी कावळा
मेघांपरी आभाळीच्या, रंग त्याचा सावळा.
तीक्ष्ण त्याची नजर आणि बुद्धी तर तिच्याहुनी,
ना धजे कोणी म्हणाया पक्षी दिसतो बावळा.
व्यर्थ शोधी भक्ष्य अपुले, ना फळेही दृष्टीला
निवडले जे झाड त्याने ते निघावे आवळा?
कर्ण जरी नसती, शिरी...आर्त काही घुमतसे
थांबला जो थेंब नयनी, काक अश्रू सावळा?
या अशा ओल्या दिनी काय भरवावे पिलां
आजही नाही कुणाचा पिंड पुजला राऊळा?
( मीटरमध्ये खूप चुका आहेत. पण बिचा-या कावळ्यावरची बिचारी कविता.. मानून घ्या. :))