मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लाल बहादुर शास्त्री जयंती......

_मनश्री_ ·

In reply to by माम्लेदारचा पन्खा

_मनश्री_ गुरुवार, 10/02/2014 - 15:45
शाप कि दुर्दैव ते माहीत नाही पण हे मात्र खरय कि २ ऑक्टोबर म्हणजे गांधी एवढंच सगळ्यांच्या लक्षात रहात . लाल बहादूर शास्त्रींची जयंती बरेच जण विसरतात

नानासाहेब नेफळे गुरुवार, 10/02/2014 - 19:42
लालबहादूर शास्त्री आणि त्यांचे राजकिय गुरु महात्मा गांधी यांची जयंती एकाच दिवशी यावी हाच एक विलक्षण योगायोग आहे, शास्त्रीजींनी साधेपणा सत्शीलता अभ्यासुवृत्ती हे गुण त्यांचे गुरु व प्रेरणास्थान महात्मा गांधीँकडून घेतले होते. शास्त्रीजींना अभिवादन.

अत्रन्गि पाउस Fri, 10/03/2014 - 14:26
कोणेतहे गृहस्थ ? आपले पंतप्रधान होते का ? पण आडनाव तर 'शास्त्री' आहे ... ब्राम्हण? अरेरे ... पण अभिवादन कशाला ? गणित येत होते का त्यांना नाही म्हणजे १ कोटी म्हणजे किती हे माहित होते त्यांना ? नाही ?? बरे मग निर्लज्ज पणे खुर्चीला चिटकून राहणे ? ते हि नाही ? अरे काय हा अध:पात ... बरे झाले फार वेळ टिकले नाहीत ... काय झाला असते कि देशाचे... ह्म्म्म

पैसा Fri, 10/03/2014 - 14:39
साधेपणा, देशभक्ती आणि प्रामाणिकपणा
अगदी यथार्थ वर्णन आहे! या महान नेत्याला विनम्र अभिवादन!

एस Fri, 10/03/2014 - 14:40
देशाच्या एका दुर्लक्षित शिल्पकाराला विनम्र अभिवादन! तुमचा प्रामाणिकपणा आणि तो पाळायला लागणारे धैर्य उच्चतम कोटीचे होते.

In reply to by माम्लेदारचा पन्खा

_मनश्री_ गुरुवार, 10/02/2014 - 15:45
शाप कि दुर्दैव ते माहीत नाही पण हे मात्र खरय कि २ ऑक्टोबर म्हणजे गांधी एवढंच सगळ्यांच्या लक्षात रहात . लाल बहादूर शास्त्रींची जयंती बरेच जण विसरतात

नानासाहेब नेफळे गुरुवार, 10/02/2014 - 19:42
लालबहादूर शास्त्री आणि त्यांचे राजकिय गुरु महात्मा गांधी यांची जयंती एकाच दिवशी यावी हाच एक विलक्षण योगायोग आहे, शास्त्रीजींनी साधेपणा सत्शीलता अभ्यासुवृत्ती हे गुण त्यांचे गुरु व प्रेरणास्थान महात्मा गांधीँकडून घेतले होते. शास्त्रीजींना अभिवादन.

अत्रन्गि पाउस Fri, 10/03/2014 - 14:26
कोणेतहे गृहस्थ ? आपले पंतप्रधान होते का ? पण आडनाव तर 'शास्त्री' आहे ... ब्राम्हण? अरेरे ... पण अभिवादन कशाला ? गणित येत होते का त्यांना नाही म्हणजे १ कोटी म्हणजे किती हे माहित होते त्यांना ? नाही ?? बरे मग निर्लज्ज पणे खुर्चीला चिटकून राहणे ? ते हि नाही ? अरे काय हा अध:पात ... बरे झाले फार वेळ टिकले नाहीत ... काय झाला असते कि देशाचे... ह्म्म्म

पैसा Fri, 10/03/2014 - 14:39
साधेपणा, देशभक्ती आणि प्रामाणिकपणा
अगदी यथार्थ वर्णन आहे! या महान नेत्याला विनम्र अभिवादन!

एस Fri, 10/03/2014 - 14:40
देशाच्या एका दुर्लक्षित शिल्पकाराला विनम्र अभिवादन! तुमचा प्रामाणिकपणा आणि तो पाळायला लागणारे धैर्य उच्चतम कोटीचे होते.
लेखनविषय:
लेखनप्रकार
laal bahadur shastri आज भारताचे द्वितीय पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांची १०९ वी जयंती त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन पंडित नेहरुंच्या मृत्यूनंतर लाल बहादुर शास्त्री यांना त्यांच्या स्वच्छ प्रतिमेमुळे पंतप्रधान पद दिल गेल लाल बहादुर शास्त्री ९ जून १९६४ ते ११ जानेवारी १९६६ म्हणजे मृत्युपर्यन्त जवळ जवळ अठरा महीने ते पंतप्रधान पदी होते त्यांच्या साधेपणा, देशभक्ती आणि प्रामाणिकपणा यासाठी त्यांना 1966 मध्ये मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात

गांधीबाबा,त्याची अहिंसा आणी आपण ?

बाबा पाटील ·

मृत्युन्जय गुरुवार, 10/02/2014 - 13:25
दुर्देव आहे ज्या गांधीमुळे तुम्ही रक्ताचा एकही थेंब न सांडता सहज सत्तांतर करु शकता, तेच जर या देशात हुकुमशाही असती तर..... गांधी महान खरे पण स्वातंत्र्य त्यांच्यामुळे मिळाले असे मानणे हा प्रचंड मोठा मुर्खपणा आहे. आमच्या रियल इस्टेट मधले चार टगे समोर उभे राहिले व त्यांनी कारण नसताना आया बहिणीवरुन शिव्या दिल्या तरी मान खाली घालुन जाणारी पांढरपेशी जमात, यात चूक पांढरपेशा जमातीची नसून रियल एस्टेट मधल्या त्या हरामखोर टग्यांचा आहे याकडे का दुर्लक्ष करता. आयाबहिणीं वरुन शिव्या देउन दादागिरी करणारे बहुधा आभाळातुन टपकलेले असतात. अरे तुमच्या मालकीच्या जागेत फुटभर रस्ता काढण्याचाही हा देशातल्या सरकारला अधिकार नाही, खरे की काय? ऐकावे ते नवलच.

In reply to by मृत्युन्जय

देशाला स्वातंत्र्य दुसर्‍या महायुद्धामुळे त्याने ब्रिटीश साम्राज्य मानसिक व आर्थिक दृष्ट्या खचले, त्याने मिळाले , गांधी व सुभाष ह्यांनी योग्य वेळी आपापल्या मार्गाने योग्य वेळ साधून ब्रिटीश साम्राज्यावर हल्ला चढवला , सरत शेवटी सत्तेचे लोणी नेहरू व जीना खाऊन तृप्त झाले. जीना ह्यांच्या डायरेक्ट ऍक्शन ह्या बार्बारिक कृत्याच्या हाकेला गांधी व त्यांची अहिंसा साफ विफल झाली , अल्पसंख्याक गटाने हिंसेच्या जोरावर बहुसंख्य समूहावर हा विजय मिळवला. अरे ला कारे पहिल्याच वेळी म्हणणारा नेता त्यावेळी भारतात गांधी एवढे राजकीय महात्म्य राखून नव्हता. पाकिस्तान झाल्यावर ह्यांची सत्तेची जागेची भूक भागेल अशी सुतराम शक्यता त्यावेळी त्यांच्या कृत्यातून दिसत नव्हती तेव्हा पाकिस्तानला संमती देण्यात काहीही अर्थ नव्हता. पूर्वी गुजरात मध्ये २००२ पर्यंत साठीचे रोग जसे आलटून पालटून वर्षाआड येतात तश्या दंगली व्हायच्या , मात्र २००२ नंतर एकही दंगल आजतागायत झाली नाही , १९९२ नंतर मुंबईत झाली नाही , कारण अरे ला कारे तो पर्यंत कोणी म्हटले नव्हते दंगलीत सामान्य माणूस भरडला जातो म्हणून त्या होऊ नये असे वाटते. दुर्दैवाने युपी मध्ये त्या नियमित स्वरुपात होतात. ज्या देशाल शोले सिनेमा आजही लोकप्रिय टिकवून आहे तेथे हिंसा ही अहिंसेवर अनेकदा विजय मिळवतांना आपण वृत्त पत्रातून नित्यनियमाने वाचत असतो.

In reply to by निनाद मुक्काम …

उदयन Fri, 10/03/2014 - 13:48
इतके विनोदी लिहित जाउ नका.. दंगल झाल्यात परंतु मिडीयाने दाखवल्या नाहीत काही दिवसांपुर्वी वडोदरा पेटलेले कुठे वाचले आहेत का सांगा जरा इतका लाळघोटेपणा करु नये

In reply to by उदयन

इरसाल Sat, 10/04/2014 - 12:49
बीबीसी हिंदीवर न्युज आली होती फोटोंसहीत. आणी हो वडोदरा पेटलेले बिटलेले काही नव्हते हां ! मुळात दोन घटना घडल्या त्या काळात. एक मुस्लिम वि. मुस्लिम दुसरी मुस्लिम वि. हिन्दु डिटेल्स हव्यातर त्यापन देतो.उगाच रक्त नका हो जाळु स्वतःच.

अनुप ढेरे गुरुवार, 10/02/2014 - 13:37
तुमचे विचार पटण्यासारखे आहेत. पण अहिंसेची महती सांगताना तुम्ही स्वतःकडे बंदूक असल्याचा उल्लेख केला आहे. ते रोचक वाटलं. ज्यासाठी तुम्ही बंदूक ठेवली आहे ते प्रॉब्लेम्स अहिंसेने सुटणार नाहीत असं तुम्हाला वाटलं का?

बाबा पाटील गुरुवार, 10/02/2014 - 13:45
मग काय रक्तरंजित क्रांती करायची होती,देश म्हणजे काय ? अथवा हा भारत देश याची तरी सिंधुपासुन कन्याकुमारीपर्यंत जाणिव होती का. गांधींनी देश स्वतंत्रच नाही तर एकत्र आणला,एका झेंड्या खाली आणला अन्यथा इथले राजे महाराजे, संस्थानिक यांनी काय काय केले असते याचा विचार करा गांधीबाबाने सामान्य माणसाला एक आत्मविश्वास दिला,तो खुल्या दिलाने मैदानात उतरला,स्त्रिया,शेतकरी,कामगार असे सगळेच लढ्यात उतरले, हे फक्त अहिंसेच्या मुळे,अन्यथा १८५७ लाच देश स्वतंत्र झाला असता नाही का ? ज्यात इंग्रजांइतकेच अत्याचार बंडवाल्यांनी केले. शस्त्र हाती असलेल्या जमावाला भान नसत सायबा,एक जुनी म्हण आहे क्रांती तिचीच पिल्ले खाते,याचा अनुभव भारतातही नक्कीच आला असता, असा आला देखिल,पण मर्यादित स्वरुपात होता. अभ्यास वाढवा हो.

In reply to by बाबा पाटील

मृत्युन्जय Fri, 10/03/2014 - 12:46
सन्मानाने देश परत मिळवण्याचा एकमेव मार्ग सशस्त्र लढ्याचा होता. गांधींचे देशाच्या स्वातंत्र्य ल\ढ्यातील योगदान नाकारु पाहणारा मुर्ख असेल. तसेच स्वातंत्र्य त्यांच्यामुळे मिळाले असे म्हणणेही मुर्खपणाचे आहे. इंग्रजांनी गांधीजींना ५ दशके भीक घातली नाही. त्यापुढेही घातली नसती. परंतु दुसर्‍या महायुद्धानंतर त्यांना इतके देश सांभाळणे अवघड होउन बसले. शिवाय भारतात लुटायला फार काही उरले नव्हते. होते ते पुरते लुटुन झाले होते. बाकी लुटण्यासाठी स्वातंत्र्य देउनही सनदशीर मार्ग अस्तित्वात होते. शिवाय दूसरर्‍या महायुद्धानंतर अमेरिकेने इंग्लंडवर त्यांच्या अधिपत्याखालील देशांना विशेषतः भारताला स्वातंत्र्य देण्याबाबत प्रचंड दबाव आणला. तसे केले असते तरच स्वतःची लोकशाहीचे संवर्धक म्हणून प्रौढी मिरवता आली असती. नाहितर ते आणी हिटलर एकाचा तराजूत गेले असते. दूसरर्‍या महायुद्धानंतर इंग्लंड बेचिराखच झाला होता. एकावेळेस स्वदेश आणी दूरवरची संस्थाने यावर अंमल ठेवणे त्यांना आर्थैकदृष्ट्या शक्य नव्हते. या सर्व कारणांंमुळे त्यांनी भारताला स्वातंत्र्य दिले. देशाला एकत्र आणणे आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राज्य करु शकतील अश्या लोकांची मोट बांधणे याचे श्रेय नि:संशयपणे गांधीजींचे. दुसर्‍याला अभ्यास वाढवा असे सांगण्यापुर्वी स्वतः एवढा अभ्यास कराच पाटील. शस्त्र हाती असलेल्या जमावाला भान नसत सायबा शस्त्र हाती असलेल्या एकेकट्या माणसाला तरी भान असते का की शस्त्राची गर्मी अंगात गुर्मी आणते?

In reply to by मृत्युन्जय

काउबॉय Fri, 10/10/2014 - 11:51
पण ब्रिटन एव्हडा कमकुवत झाला होता तर सशस्त्र लढाच का उभारला गेला नाही ? तसेच गांधी अस्तित्वात आले नसते तरीही महायुध्दानंतर ब्रिटनवर स्वातंत्र्य देण्याचा दबाव आला असता काय ? (मग एकुणच स्वातंत्र्य लढयातिलांचे स्वतंत्रतेत प्रत्यक्ष प्रभावी योगदान हा वेगळाच विषय उपस्थित होतो) - प्रामाणिक उहापोह अपेक्षित.

प्रतापराव गुरुवार, 10/02/2014 - 17:02
बाबा पाटील लेख अत्यंत आवडला. वास्तविक जीवनात नेभळटा सारखे जगणारे लोकच अहिंसेला शिव्या घालतात.भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात सर्वात मोठे योगदान हे गांधीजीन्चेच होते. जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटीश सर्कार्विरुद्धात सशस्त्र लढा आपण कुठल्या आधारावर करणार होतो.जे नेते हिंसेच्या बाजूने होते त्यांना लोकांची सहानभूती होती मात्र लोकशक्ती कधीच त्यांच्या मागे उभी राहिली नाही. गांधीजींनी जो अहिंसेचा जादुई वापर केला त्यानेच सारा देश त्यांच्या पाठीशी उभा राहिला प्रत्येकाला गांधीजींच्या आंदोलनामुळे आपण हि स्वातंत्र्य लढ्याचा एक भाग आहोत हे अनुभवता आले.

In reply to by आजानुकर्ण

प्रतापराव गुरुवार, 10/02/2014 - 17:44
पण गांधीजींच्या लेखात सावरकरांना ओढून ताणून का आणले जातेय ते कळत नाही. उद्या सावरकरांचे राष्ट्रकार्य ह्यावर लेख लिहला तर दुसरा म्हणेल कोलू ओढला ते ठीक आहे पण ते भगतसिहाप्रमाणे देशासाठी शहीद का झाले नाही.ह्या गोष्टीला काही अर्थ आहे का?

In reply to by प्रतापराव

मृत्युन्जय गुरुवार, 10/02/2014 - 17:47
लोकांना इतके कळायला लागले तर काय घ्या. सगळीकडे जमेल तशी घाण करुन ठेवायची आणि मग मोदींचे स्वच्छ भारत आंदोलन अयशस्वी झाले असे ओरडत सुटायचे.

In reply to by मृत्युन्जय

आजानुकर्ण गुरुवार, 10/02/2014 - 18:03
हो मात्र गांधीजयंतीला गांधींमुळे स्वातंत्र्य मिळाले हा मूर्खपणा आहे एवढे ओरडत सुटायचे म्हणजे लोकांना जरा कळायला लागेल.

In reply to by आजानुकर्ण

मृत्युन्जय Fri, 10/03/2014 - 12:32
किमान गांधीजयंतीच्या धाग्यावर सावरकरांच्या नावाने ओकार्‍या नाही काढल्या तरी लोकांना कळायला लागेल. धागा गांधींबद्दल आहे तर त्यांच्याबद्दल बोला. त्यांना महान म्हटलेले तुम्हाला दिसले नाही. एखाद्याने गांधींवर काही टीका केली की लगेच लोकांना सावरकरांच्या नावाने ओकार्‍या का काढावाश्या वाटतात कोण जाणए? ते सुद्धा सावरकरांचा धाग्यात किंवा प्रतिसादात कुठेही उल्लेखही केलेला नसताना. असो. विजयादशमीच्या शुभेच्छा.

In reply to by मृत्युन्जय

आजानुकर्ण Fri, 10/03/2014 - 15:15
महाशय, या धाग्यावर गांधींना स्वातंत्र्याचे श्रेय देणे हा मूर्खपणा असल्याचा सर्वात पहिला प्रतिसाद तुमचा आहे. (थोडक्यात सुरुवात कोणी केली?) नंतर सावरकरांच्या नावाने ओकाऱ्या निघणार आहेत याचे स्वप्न पडले होते की काय? गांधींनी कोलू ओढला का या शब्दात सावरकरांची ओकारी कुठे दिसली? कोलू या शब्दावर सावरकरांचा कॉपीराईट आहे काय? सावरकर वगळता इतर कोणी कोलू ओढला नाही वाट्टं!

In reply to by आजानुकर्ण

मृत्युन्जय Fri, 10/03/2014 - 16:02
मी गांधींच्या धाग्यावर गांधींचे महानपण मान्य करुन योग्य त्या गोष्टीबद्दल प्रतिसाद दिला नव्हता, कोलू आणी सावरकरांचा काय संबंध असे तोंड वर करुन विचारणे म्हणजे सौ चूहे खाकर..... कोणी गांधींवर टीका केली की सावरकरांवर पण टीका होणारच असे गृहीत का धरले पाहिजे म्हणे. असो. सावरकरांच्या नावाने तुम्ही ओकार्‍या काढल्या असे मी तरी कुठे म्हणालो आहे? तुम्हाला काय स्वप्न पदले काय?

In reply to by आजानुकर्ण

आनन्दा Tue, 10/07/2014 - 17:35
हो मात्र गांधीजयंतीला गांधींमुळे स्वातंत्र्य मिळाले हा मूर्खपणा आहे एवढे ओरडत सुटायचे म्हणजे लोकांना जरा कळायला लागेल.
मधला केवळ हा शब्द खाल्लात काय हो? ड्राय डे चा एव्हढा परिणाम? केवळ गांधींमुळे स्वातंत्र्य मिळाले हा मूर्खपणा आहे

In reply to by प्रतापराव

असंका गुरुवार, 10/02/2014 - 17:49
काहीच अर्थ नाही. अशी तुलना होऊच शकत नाही. (असं म्हणायची ही जागा नाही खरं, पण एकदम चपखल उदाहरण दिलंत!)

In reply to by प्रतापराव

शिद गुरुवार, 10/02/2014 - 18:05
पण गांधीजींच्या लेखात सावरकरांना ओढून ताणून का आणले जातेय ते कळत नाही.
१००% सहमत. तसेच "पण सावरकरांच्या लेखात गांधीजींना ओढून ताणून का आणले जातेय ते कळत नाही" हे सुद्धा लागू होतंय.

असंका गुरुवार, 10/02/2014 - 17:13
एवढं रोखठोक लिहिताल, तर धाग्यावर प्रतिक्रिया द्यायला कोण थांबेल? त्यात आणि फारच थोडक्यात आटोपतं घेतलंत. अजुन लिहा....

जरा विषयांतर होईल पण खरे तर मला जे वाटते ते चर्चा सत्रात एक धागा काढून आपले मत मांडावे असे मला वाटते पण ह्या विषयावर आज चर्चा नको , असे मला वाटते. पण ओझरता उल्लेख करतांना असे म्हणतो , क्रांतिकारक असो किंवा गांधी ह्यांचा इंग्रजांशी लढा योग्य होता का त्याचवेळी गाडगे महाराज , फुले , आंबेडकर , रानडे , कर्वे पिता पुत्र हे समाजात आपल्या परीने समाजात सुधारणा आणत होते. हजारो वर्ष चालत आलेल्या अनेक रूढी व परंपरा कधी कायदा करून तर कधी लोकांचे मत परिवर्तन करून समाजात आणत होते, सुशिक्षित समाज मिळालेले स्वातंत्र्य अधिक सक्षमतेने भोगू शकतो.

In reply to by निनाद मुक्काम …

असंका गुरुवार, 10/02/2014 - 18:07
जरा विषयांतर होईल पण खरे तर मला जे वाटते ते चर्चा सत्रात एक धागा काढून आपले मत मांडावे असे मला वाटते पण ह्या विषयावर आज चर्चा नको , असे मला वाटते.
अर्थ काय घ्यायचा ह्याचा? (तो जोक आठवला..किती वेळा वाटते! सरळ मिक्सरमधून काढावे?)

In reply to by असंका

गांधींच्या धाग्यावर मृत्युंजय ह्यांच्या संपूर्ण प्रतिसादाला मी सहमत होईल अशी पुसटशी शंका सुध्धा माझ्या मनाला काळ परवा पर्यंत शिवली नव्हती पण आज ह्या प्रतिसादाला सहमत आह फक्त त्यात थोडी भर घालू इच्छितो. दुसर्या महायुद्धाचे फलित म्हणजे ब्रिटन मध्ये मजूर पक्षांची पहिल्यांदा सत्ता , आणि त्यांच्या जाहीरनाम्यात पूर्वीच भारताला स्वातंत्र्य देण्याचे म्हटले होते , दुसरा मुद्दा म्हणजे नुसती अमेरिका नाही तर रशिया सुद्धा वसाहतीवादाच्या विरोधात इंग्लंड वर दबाव आणला. ह्या तिन्ही देशाच्या प्रमुखांची युद्धानंतर च्या बैठकीत ह्या मुद्यांवर जोर दिला त्यामागे काही प्रमुख कारण माझ्या मते वेगळे होते. मला असते वाटते की दुसर्या महायुद्धाचे फलित म्हणजे जागतिक पटलावर रशिया व अमेरिकेचा उदय ह्यात अमेरिकेला बाजारपेठ तर रशियाला आपली विचारसरणी जगावर लागायची होती किंबहुना अमेरिकाला जग आपल्या विचारसरणीत रानागावयाचे होते जर वसाहती देशांनी आपल्या वसाहती कायम ठेवल्या असत्या तर फ्रेंच व इंग्रज ह्यांनी दुसर्या महायुद्धाचे नुकसान वसाहतींच्या कडून वाट्टेल त्या मार्गाने भरून काढून परत आपले वर्चस्व गाजविण्याचा प्रयत्न केला असता दुसरा मुद्दा असा कि वसाहतीत इंग्रज व फ्रेंच लोकांनी असमतोल व्यापारी कायदे कायम ठेवले असते व अमेरिकेला आपले उत्पादन विकणे अशक्य झाले असते , सगळ्यात महत्वाचे म्हणजे युरोपवर पर्यायाने जगावर त्यांची पकड सैल झाली असती , ज्या दिवशी भारत इंग्रजांच्या हातातून निसटला तसे ब्रिटीश राजकीय सामर्थ्याला जगाच्या अवकाशात ग्रहण लागले ,आज ब्रिटन ची ओळख जगात अमेरिकन पोलिटीकल बीच अशी आहे , अवांतर पोलिटीकल बीच हा केजीबी च्या शब्दकोशातील आवडता व महत्वाचा शब्द आहे , त्यांच्या अनुषंगाने एक लेख लिहिण्याचा मानस आहे पाहूया कधी वेळ मिळतो ते . बाकी त्यांची एक पिढी नष्ट झाल्याने त्यांच्या लोकांची मानसिकता पार ढासळली होती , जगात अधिकारी म्हणून ज्यास ते नाखूष होते कारण येथे त्यांनी युद्धात सर्वस्व गमावले होते. अश्यावेळी लोहा गरम हे , मार दो हातोडा हाय ठाकूर च्या डायलॉग प्रमाणे गांधी ह्यांनी चळवळ उभारून मौका देख के चौकां मारला.पण ह्यात खरी सिक्सर मारली ती त्यांच्या अनुयायांनी सत्तेचा गोळा मटकावला व गांधीना मोडीत काढण्याचा प्रयत्न झाला , गांधीचे आपल्याच अनुयायांच्या विरोधात उपोषण केलेले पाहून ह्या लोकांनी कधीतरी मानाने गांधीवाद समजून आत्मसात केला होता का ह्यांची शंका येते , गांधीच्या समोर मोठी झालेली इंदू ने पुढे राजकारणात केलेले राडाकरण पाहता गांधी कुठेतरी अनुयायी घडविण्यात कमी पडले की मुद्दलात म्हणजे त्यांचे विचारच पराकोटीचे नैतिक व वास्तवाशी विसंगत होते म्हणून बदलत्या कालखंडात ते लोकांत जीरपले नाही.

In reply to by असंका

@अर्थ काय घ्यायचा ह्याचा? ह्याचा अर्थी सोपा आहे तुम्हाला नक्की काय आठवले हे मला माहिती नाही ह्या धाग्याचा विषय वेगळा आहे , व मला जो विषय अभिप्रेत आहे त्या बद्द्ल एकेकाळी समाजात चर्चा झालेली आहे. टिळक विरुद्ध आगरकर असा वाद पूर्वी गाजला होता ह्यात आजची परिस्थिती व अजूनही अर्ध्याहून जास्त भारताचे १८ व्या शतकातील सामाजिक जीवन पाहता आगरकरांचे विचार मला अधिक महत्त्वाचे वाटतात.

बाबा पाटील गुरुवार, 10/02/2014 - 18:42
बादरायण संबध जोडु नका,माझ्या वैद्यकिय व्यवसायाचा माझ्या इतर गोष्टींशी काही संबध नाही, बाहेरच्या जगातल्या गोष्टी मी कुठल्याही परिस्थितीत दवाखाण्याच्या व घराच्या उंबर्‍याबाहेरच ठेवुन जातो, येथे मी माझ्या कुठल्याही व्यवसायाचा उल्लेख केला नसताना तुम्ही तो का जोडताय हे कळत नाहिये. संपादक मंडळींना विनंती कृपया रेवतीताईंचा वरिल प्रतिसाद उडवावा अन्यथा माझा धागाच काढुन टाकावा.

रेवती गुरुवार, 10/02/2014 - 19:06
काही हरकत नाही. संमंला वाटल्यास किंवा आपल्याला अस्वस्थता आली असल्यास माझा प्रतिसाद नक्कीच उडायला हवा. तुम्हाला त्रास देण्याचा हेतू नाही, पण वाचक म्हणून आमच्या मनात प्रतिमा असते ते तरी आपल्याला समजेल अशी आशा! तुमच्या वैद्यकीय ज्ञानाचा मला आदर आहे.

श्रीगुरुजी गुरुवार, 10/02/2014 - 20:42
>>> अरे तुमच्या मालकीच्या जागेत फुटभर रस्ता काढण्याचाही हा देशातल्या सरकारला अधिकार नाही, येथे तुम्ही कितीही वरिष्ठ नेता अथवा अधिकार्‍याला कोर्टात खेचु शकता,खरच स्वतःच्या आंतरात्म्याला साक्षि ठेवुन सांगा हा पंचातला गांधीबाबा नसता तर हे शक्य झाले असते. नक्कीच शक्य झाले असते.

अवतार Fri, 10/03/2014 - 01:10
हो. कदाचित शक्य झाले असते. इथे मूळ मुद्दा हा आहे की स्वातंत्र्य हे कोणाही एका व्यक्ती किंवा संघटनेमुळे मिळाले नसून या देशातील सर्व सामान्य जनतेच्या संघटित लढ्यातून मिळाले आहे. गांधींचे राजकीय महात्म्य हेच की त्यांनी हे सर्वात आधी ओळखले. १८५७ च्या लढ्यात प्रथमच हिंदू आणि मुस्लिम विरुद्ध ब्रिटीश अशी परिस्थिती निर्माण झाली. म्हणूनच १८५७ नंतर ब्रिटिशांनी जाणीवपूर्वक जनतेची हिंदू-मुस्लिम अशी विभागणी करायला सुरुवात केली. त्यातूनच मुस्लिमांना झुकते माप देणे, मुस्लिम राजकीय नेतृत्वाला पद्धतशीरपणे पुढे आणणे हे ब्रिटिशांचे सत्ता टिकविण्याचे सूत्र होते. हिंदू आणि मुस्लिम विरुद्ध ब्रिटीश हे समीकरण बदलून ब्रिटीश आणि मुस्लिम विरुद्ध हिंदू असे करणे हा त्यामागील प्रमुख उद्देश होता. साधारणत: विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून कॉंग्रेसच्या नेत्यांना हे समीकरण बदलण्याची गरज वाटू लागली. त्यातूनच पुढे ब्रिटीश तुम्हाला जे देतील त्यापेक्षा अधिक आम्ही देऊ ही कॉंग्रेसच्या राजकारणाची दिशा राहिली. १९१५ मध्ये कॉंग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात लोकमान्य टिळकांच्या अध्यक्षतेखाली झालेला लखनौ करार ही त्याचीच परिणती होय. ह्या सर्व घडामोडी चालू असतांना गांधींचा भारतीय राजकारणात धड प्रवेश देखील झाला नव्हता. गांधींनी टिळकांच्या आणखी दोन पावले पुढे जाऊन मुस्लिमांच्या खिलाफत आंदोलनाचे नेतृत्वच खेचून आणले. ह्यात मानवता कमी आणि राजकीय शहाणपणाचा भाग अधिक होता. गांधींच्या मुस्लिम अनुनयाची ही पार्श्वभूमी आहे. दुसरे महायुद्ध सुरु होणार हे साधारणत: १९३७ सालीच कॉंग्रेसच्या नेतृत्वाला कळून चुकले होते. त्यात अमेरिका युद्धात उतरली की जर्मनी-जपानचा पराभव निश्चित होणार हे कॉंग्रेसच्या नेतृत्वाचे अनुमान होते. शेवटी महायुद्ध हे केवळ सैन्याच्या बळावर लढले जात नाही. त्यापाठी युद्धसामुग्रीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणे आणि प्रचंड मोठी प्रचार यंत्रणा राबवणे ह्या गोष्टींचा भक्कम आधार असावा लागतो. अमेरिका ब्रिटीशांच्या बाजूनेच युद्धात उतरणार हे स्पष्ट होते. ह्यामुळेच दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांना पाठींबा जाहीर करणे कॉंग्रेसच्या नेतृत्वाला भाग होते. अर्थातच त्या बदल्यात स्वातंत्र्य जाहीर करणे ही अट कॉंग्रेसने ब्रिटिशांना घातली. १९४२ मधे क्रिप्स मिशनच्या अपयशानंतर (ज्याचे वर्णन गांधी-नेहरू यांनी "पोस्ट डेटेड चेक" असे केले.) "चले जाव" आंदोलन कॉंग्रेसने सुरु केले. हे आंदोलन जरी अपयशी ठरले तरी कॉंग्रेसच्या नेत्यांच्या इशाऱ्यावर देशात आणीबाणीची परिस्थिती निर्माण होऊ शकते हे ब्रिटीशांच्या लक्षात आले. केवळ मुस्लिम लीगला हाताशी धरून कॉंग्रेसच्या तोंडाला पाने पुसता येणार नाहीत हे ब्रिटिशांना त्या आंदोलनातून जाणवले. शेवटी फाळणी झाली. पण ती मुस्लिम लीग आणि ब्रिटीश ह्यांना हवी तशी न होता कॉंग्रेसला हवी तशी करावी लागली. "सुईच्या अग्रावर मावेल इतकी भूमीही देणार नाही" ह्या दुर्योधनाच्या अट्टाहासापायी हस्तिनापूरचे काय झाले हे सर्वांना माहित आहेच. "राष्ट्र किंवा भूमी" ह्यातून एकाची निवड करायची वेळ आली तर राष्ट्र टिकवणे हे अधिक महत्वाचे असते हे शिवाजी महाराजांना १६६५ मध्ये कळले होते, आंबेडकरांना देखील १९४० मधेच कळले होते. एकविसाव्या शतकातील पिढ्यांना ते कळावे एवढीच माफक अपेक्षा आहे. धन्यवाद.

In reply to by अवतार

अर्धवटराव Fri, 10/03/2014 - 04:07
गांधीजींच्या प्रत्येक कृतीमागे राजकीय शहाणपण होते हे निश्चित. मराठेशाही बुडाली आणि राज्यकर्ते वि. राज्यकर्ते असा संघर्ष ब्रिटीशांविरुद्ध पेटण्याची शक्यता निमाली. त्यानंतर पब्लीक वि. ब्रिटीश अशाच संघर्षाची शक्यता होती व त्यात धार्मीक रंग येणे स्वाभावीक होते. ब्रिटीशांनी याच पद्धतीने मध्यपूर्वेत बरच राजकारण केलें होतं. काहि बाबतीत मतभेद. दुसर्‍या महायुद्धाची कल्पना प्रत्यक्ष इंग्लंडला देखील नव्हती, हिटलरला देखील नव्हती. अमेरीका युद्धात उतरेल कि नाहि याची शाश्वती बराच काळ खुद्द चर्चील साहेबांना नव्हती. . काँग्रेसला तशी असण्याची शक्यता फार कमि आहे. जर्मनीने रशीयावर आक्रमण करण्यापुर्वी महायुद्धात जर्मनीचा पराभव होईल असे कुणालाच वाटत नव्हते. फ्रान्स पडल्यानंतर युद्ध फार काळ चालायची देखील आशा नव्हती. मांडवलीचा स्कोप खुप वेळपर्यंत होता. त्यामुळे युद्धात ब्रिटीशांचा विजय हा केवळ छाप-काट्याचा विषय होता, ते कन्फर्म नव्हतं. काँग्रेसचं "चले जाव" वगैरे सुभाष बाबुंच्या पराक्रमाला घाबरुन सुरु झालं. सुभाष बाबु जर खरच दिल्लीला धडकले असते तर संपूर्ण देश, काँग्रेस सहीत, त्यांच्या मागे गेला असता व नेहरुंना हात चोळणे आणि गांधीजींना आशिर्वाद देण्यापलिकडे काहिच ऑप्शन नसता. कदाचीत त्यानंतर फाळणी देखील झाली नसती, आणि झाली असती तरी गांधीजी+नेहरु कंपू+मुस्लीम लीग विरुद्ध सुभाष कंपू अशा संघर्षातुन झाली असती. स्वातंत्र्य लढ्याला हे हिंसक-अहिंसकतेचं माप का लावतात हेच मला कळत नाहि. हिंसा या शब्दाऐवजी "सशस्त्र सैन्य पद्धतीने" असं म्हणायला हवं. ते प्रॅक्टीकली शक्य होतं काय? तर उत्तर आहे "होय". किंबहुना तेच प्रॅक्टीकली शक्य होतं आणि तोच एकमेव ऑप्शन होता. अन्यथा आज जे अण्णा हजारेंचं झालं तेच ब्रिटीशांनी गांधीजींचं केलं असतं आणि गांधीजींच्या पश्चात त्यांच्या तोलामोलाचा कुणीच नेता नसल्यामुळे त्यामार्गाची स्वातंत्र्याची चळवळ केवळ औपचारीकता म्हणुन उरली असती. गांधीजींनी, काँग्रेसने संपूर्ण भारताला स्वातंत्र्य नावाची काहि चिजवस्तु असते व त्याकरता आपल्या शत्रुशी म्हणजेच ब्रिटीशांशी संघर्ष करायला लागणार हे पटवुन दिलं (कि ब्रिटीशांनीच ते तसं पटवु दिलं ??? ). तो गोवर्धन उचलायला प्रत्येकाने आपापली काठी लावण्याची प्रेरणा गांधीजींनीच मजबुत केली. पण अ‍ॅक्च्युअल गोवर्धन त्या काठ्यांनी उचललेला गेला नाहि. त्या संपूर्ण चित्रातुन हवेत विरुन जावा तसा खरा श्रीकृष्ण गायब झाला/करण्यात आला. असो.

In reply to by अर्धवटराव

अवतार Fri, 10/03/2014 - 15:58
सुभाषबाबूंचे महत्व अमान्य करण्याचा नतद्रष्टपणा मी करणार नाही. नेहरू की सुभाष यापैकी मला सुभाषच अधिक आवडतात. पण प्रत्यक्षात घडलेल्या ऐतिहासिक घटना हे वारंवार सिध्द करतात की तत्कालीन आंतरराष्ट्रीय राजकारणाचे विश्लेषण करण्यात नेहरू हे सुभाष यांच्यापेक्षा अधिक यशस्वी झाले. अर्थात दुसऱ्या महायुद्धाची कल्पना सुभाषना देखील आली होतीच. म्हणूनच त्याच वेळी ब्रिटिशांना कोंडीत पकडण्याची विनंती ते वारंवार गांधीजींना करत होते. दुसऱ्या महायुद्धाची कल्पना इंग्लंडच्या नेतृत्वाला फार पूर्वीच आलेली होती. हिटलरने चेकोस्लोव्हाकिया गिळून टाकतांना इंग्लंड आणि फ्रांस यांनी चेकोस्लोव्हाकियाला दिलेले मदतीचे वचन सोयीस्करपणे विसरणे आणि जर्मनीच्या विरोधात दुसरी आघाडी उघडा या स्टालिनच्या हाकेला वाटण्याच्या अक्षता लावणे ह्या गोष्टी योगायोगाने घडलेल्या नाहीत. त्याचमुळे स्टालिनला अखेर जर्मनीबरोबर २३ ऑगस्ट १९३९ मध्ये अनाक्रमण करार करावा लागला. १० मार्च १९३९ ला स्टालिनचे भाषण झाले. त्यात त्याने पुढील उद्गार काढले आहेत.
पश्चिमेकडील दोस्त हे जर्मनीला जास्त जास्त पूर्वेकडे ढकलत आहेत. काही होत नाही, कर आक्रमण असे सांगत त्यांनी जर्मनीला सांगितलेले दिसते की काही करून बोल्शेविकांशी युद्ध सुरु कर.
३ सप्टेंबर १९३९ पासून इंग्लंड आणि फ्रांस ह्यांनी जर्मनी विरोधात युद्धाची घोषणा केली खरी. पण पुढच्या पंधरा दिवसांत एक गोळीही जर्मनी विरोधात झाडली गेली नाही. अखेर ह्या युद्धाला बैठे युद्ध असे म्हटले जाऊ लागले. पोलंड पडल्यानंतर ३ आठवड्यांनी इंग्लंडचे ४ डिव्हिजन सैन्य फ्रांस मध्ये आले होते. पुढचा दीड महिना हे सैन्य एकाच जागी बसून होते. ९ डिसेंबरला या सैन्यातील एक कोर्पोरल टेहळणी करतांना जर्मनांनी मारला. हाच फ्रान्समध्ये मरण पावलेला पहिला ब्रिटीश सैनिक! २६ डिव्हिजन जर्मन सैन्याविरुद्ध ११० डिव्हिजन सैन्य दोस्त राष्ट्रे जर्मनीच्या पिछाडीवर धाडू शकली असती तर जर्मनीचा युद्ध बनाव त्यावेळीच कोसळला असता, अशी कबुली खुद्द जर्मन अधिकाऱ्यांनी न्युरेम्बर्ग खटल्यात दिली होती.
सुभाष बाबु जर खरच दिल्लीला धडकले असते तर संपूर्ण देश, काँग्रेस सहीत, त्यांच्या मागे गेला असता.
हाच पराक्रम सुभाष हे कॉंग्रेसमध्ये असतांना देखील करू शकत होते. गांधींच्या विरोधात कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक त्यांनी जिंकली होती. पण तसे घडलेले नाही. गांधी की सुभाष असा प्रश्न आला तेव्हा बहुसंख्य कॉंग्रेस गांधींच्या मागे होती. नेहरू देखील गांधींच्या प्रत्येक निर्णयाशी सहमत नव्हते. पण गांधींच्या विरोधी जाऊन स्वत:चे राजकीय अस्तित्व टिकवता येणे कठीण आहे हे त्यांना कळले होते. सशत्र सैन्य १८५७ च्या उठावात देखील उपलब्ध होते. कानपूर येथे नाना साहेब यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटीश स्त्रिया-मुलांची निर्घृण कत्तल देखील झाली होती.पण त्यानंतरही ब्रिटीश साम्राज्य ढासळले नाही. कारण ब्रिटीश साम्राज्यवादाविरोधात लढण्याची गरज आहे हे इथल्या सामान्य जनतेपुढे मांडण्यातच आले नाही. ते सर्वप्रथम गांधींनी मांडले. कॉंग्रेस ही केवळ दिल्ली आणि मुंबई येथील अधिवेशन इतकीच मर्यादित न राहता भारताच्या खेड्यापाड्यांत गांधीमुळेच पोचली. भारत हा सात लाख खेड्यांचा देश आहे आणि त्या खेड्यांतील जनतेचा राजकारणात सक्रिय सहभाग असणे आवश्यक आहे, हे सूत्र ओळखून ते पक्के धरून ठेवणे हे गांधीजींच्या राजकारणाचे मर्म आहे. अधिवेशन आणि वाटाघाटी यांच्या पुढे जाऊन स्वातंत्र्याची चळवळ निर्माण होणे आवश्यक आहे देशभरातील जनतेला संघटित करून एकाच वेळी रस्त्यावर उतरवणे गरजेचे आहे हे गांधींनी प्रथम जाणले ह्यातच त्यांचे महात्म्य आहे. समजा गांधी नसते तर जनतेच्या असंतोषाचे प्रकटन करणारे इतर कोणीतरी नेतृत्व पुढे आले असतेच. ते नेतृत्व वैयक्तिक दृष्ट्या गांधींच्या तोलामोलाचे असले असते का हा प्रश्न निराळा. शेवटी गांधी हा एक माणूसच होता आणि त्या माणसाच्या चुका देखील स्पष्टपणे मांडल्याच पाहिजेत. पण त्यादेखील वास्तवाच्या आधारावरच मांडायला हव्यात. गांधींचे राजकीय आडाखे अनेकदा चुकलेले आहेत. पण सामान्य जनतेला वारंवार प्रत्यक्ष कृतीचा कार्यक्रम देऊन गांधींनी जितक्या वेळा रस्त्यावर उतरवले त्याच्या एक दशांशही जागृती इतर कोणतेही नेतृत्व करू शकले नाही हे देखील वास्तव आहे.

In reply to by अवतार

अर्धवटराव Fri, 10/03/2014 - 19:18
एक 'बैठे' युद्ध, युरोपीय युद्ध, ते ही जर्मन वि. रशीया असं होणार याची कल्पना सर्वांना येत होती. पण ब्रिटीशांची प्रचंड कोंडी होणारं महायुद्ध होणार असं कुणालाच वाटलं नव्हतं. तेजोंच्या हाती जपानी सत्ता येत पावेतो अमेरीका देखील या युद्धात उतरेल असं कोणाला वाटत नव्हतं. काँग्रेसचं तत्कालीन आंतरराष्ट्रीय राजकारण युरोपात भारताविषयी सहानुभूती निर्माण करण्या इतपतच होतं, इंग्लंडची कोंडी करणारं नव्हे. त्यामुळे नेहरुंचं याबाबतीतलं कर्तुत्व काय हे मला तरी माहित नाहि. आंतरराष्ट्रीय पातळीवर इंग्लंडची कोंडी करणारा प्रॅक्टीकल डाव सुभाषबाबु खेळले, नेहरु नाहि. स्वातंत्र्य मिळाल्यावर देखील नेहरुंनी काय मोठी आंतरराष्ट्रीय समजदारी दाखवली मला माहित नाहि. सुभाषबाबु भारताबाहेर पडायचं एक कारण हे ही होतं कि त्यांना अपेक्षीत असं भव्य समर भारतात उभं राहु शकत नव्हतं ... त्याला गांधीजींची संमतीच नव्हती. पुढे कधितरी असं भव्य आंदोलन होईल याची खात्री सुभाषबाबुंना असती तर ते कदाचीत भारतातच राहाते. सुभाषबाबुंनी काँग्रेस गांधीजींच्या पंखाखालुन पुष्कळसं मोकळं केलं होतं. पुढे इंग्रजांविरुद्ध सुभाषबाबु निर्णायक लढा देताना जनता गांधीजींप्रमाणे हायबर्नेट राहाण्यापेक्षा सुभाषबाबुंच्या मागे उभी राहिली असती. गांधींचा आदर, प्रभाव कमि होता म्हणुन नाहि, पण जनता आंदोलनाला तयार होतच होती. १८५७ आणि महायुद्धाची सशस्त्र क्रांतीची तुलना करताच येत नाहि. २०व्या शतकात लढा देणारी जनता होती सांस्थानीक नव्हे. गांधीजींनी सामान्य जनतेला स्वातंत्र्य लढ्याला उभं केलं हे निर्वीवाद. गांधीजींचा मार्ग अत्यंत माणुसकीचा होता/आहे हे ही खरं. पण तो मार्ग एखाद्या देशाची घडी बसवणारा मार्ग आहे, स्वातंत्र्यप्राप्तीचा नाहि... इंग्रजांसारख्या कावेबाज राष्ट्राशी लढताना तर अजीबात नाहि.

In reply to by अर्धवटराव

बाबा पाटील Fri, 10/03/2014 - 19:39
इंग्रजांनी भारतीय उद्योग धंद्याची पुर्ण वाट लावली होती, शस्त्र परवाना कायदा होता, युद्धे सक्षम शस्त्रांवर लढली जातात्,दगड गोट्यांनी नाही. भारतीयांच्या मालकीचा कुठला शस्त्र कारखाणा होया,कुठले हवाइदळ ,पायदळ अथवा आरमार होते, युद्ध खेळण्याकरिता कुठली साधन सामुग्री होती. च्यायला वस्तुस्थितीचा थोडा तरी विचार करा राव,जपान पडल आणी आझाद हिंद फौज पराभुत झाली,युद्ध खेळायला अर्थव्यवस्था मजबुत लागते, इंग्रजांच्या विरोधात भारतीयांची काय अर्थव्यवस्था होती, १५० वर्षाच्या कालखंडात इंग्रजांनी तुम्हाला काय शिल्लक ठेवले होते.अबे स्वतंत्र झाल्यावर पहिला प्रश्न उपासमारीचा होता की या कोट्यावधींच्या तोंडात घास कुठुन भरवायचा. साधा हिशोब सांगा तुम्ही नोकरी करता आहात्,तुमची चिल्ली पिली तुमच्यावरच अवलंबुन आहेत आणी अचानक तुमची नोकरी गेली,त्याच वेळी तुमची कोनाबरोबर तरी जागेच्या वादावरुन जोरदार भांडण झाल तर तुम्ही काय कराल ? तुमची जागा त्याने बळकावलीय्,तुम्ही स्वबळाचा वापर करणार पण त्या साठीच पैस्याच पाठबळ कुठुन आणाल. उपाशी पोटी राहुन युद्ध जिंकता येत नाही.आणी शस्त्र बळाखेरीज तर कधीच नाही,त्यावेळी चर्चा आणी अहिंसा हे दोनच पर्याय शिल्लक होते आणी गांधी बाबाने ते अमलात आणले.

In reply to by बाबा पाटील

अर्धवटराव Fri, 10/03/2014 - 20:22
भारत वि. इंग्रज लढा प्रॅक्टीकली अशक्य तरी (वाटत) होता. गांधीमार्गाने मुद्दलात 'स्वातंत्र्य लढा' हि शक्यताच निकालात निघते. जगाच्या पाठीवर जि काहि स्वातंत्र्ययुद्धे झाली त्यांची मूळ परिस्थिती भारतासारखीच होती. त्यातुन मार्ग काढुन कढा उभारणे हे त्या त्या एक्सपर्ट लोकांचं काम आहे. आपल्याला त्यात विजयाच्या शक्यता न दिसणं स्वाभावीक आहे. आपल्याला मंगळयानाचं प्लॅनींग देखील अशक्य वाटेल... कारण सरळ आहे... इट्स नॉट अवर डोमेन. गांधीबाबाने उपलब्ध परिस्थीत शक्य तो मार्ग पत्करला यात त्यांचं शहाणपण निर्वीवाद आहे. पण त्यामार्गाने स्वातंत्र्य मिळालं, मिळु शकलं असतं... आय डोण्ट थींक सो. आणि त्यामुळे गांधीजींची महानता तिळभर तरी कमि होते... आय डोण्ट थिंक सो दॅट इदर.

In reply to by अर्धवटराव

अवतार Fri, 10/03/2014 - 22:55
प्रश्न निव्वळ गांधींच्या महानतेचा नसून गांधी आणि कॉंग्रेस नेतृत्वाने जे काही केले ते का केले हे समजून घेण्याचा आहे. १९४२ च्या चले जाव आंदोलनात कॉंग्रेसच्या सर्व नेत्यांना ब्रिटिशांनी तुरुंगात टाकले. त्यानंतर देखील जनतेने काही काळ जमेल त्या मार्गाने हे आंदोलन चालूच ठेवले होते. महात्मा गांधी की जय ह्या घोषणा देऊन हातबॉम्ब फेकले जात होते. ब्रिटीशांच्या लाठीमार आणि गोळीबाराला न जुमानता जनता रस्त्यावर उतरू लागली होती. ही परिस्थिती अचानक निर्माण होत नाही. त्यासाठी पद्धतशीर मार्गाने वर्षानुवर्षे जनतेला लढ्यासाठी तयार करावे लागते. गांधींचा उदय झाला तेव्हा शस्त्रे तर सोडाच जनता ब्रिटीश राज्याला उघड विरोध करायलाही तयार नव्हती. सशस्त्र क्रांतीत यशाची आठ आणे खात्री असेल तर उरलेल्या आठ आण्यांची शक्यता पडताळून पाहता येते हे टिळकांचे शब्द आहेत. ही खात्री त्यांना वाटत नव्हती म्हणूनच त्यांनी तो मार्ग टाळला. ही आठ आणे खात्री निर्माण करण्याचे श्रेय गांधींचे आहे. ही बदलती राजकीय परिस्थिती ओळखण्याएवढे ब्रिटीश चाणाक्ष होते. तुटेपर्यंत ताणून धरण्यापेक्षा आधीच सन्मानजनक माघार घेणे हे त्यांच्या हिताचे होते. शिवाय माघार घेताना भारताची स्वत:च्या भू-राजकीय धोरणाप्रमाणे फाळणी करणे हे देखील त्यांचे लक्ष्य होते. सशस्त्र संघर्षातून ना कॉंग्रेस, ना ब्रिटीश, ना मुस्लिम लीगचा फायदा होता. कारण त्या संघर्षाचे परिणाम नेमके काय होतील हे कोणीच सांगू शकत नव्हते. म्हणूनच या सर्वच पक्षांना इप्सित ध्येय गाठण्यासाठी स्थिर आणि शांततेच्या मार्गानेच सत्तांतर अपेक्षित होते. मात्र शांततेच्या मार्गाने हवे तसे पाकिस्तान मिळणार नाही हे लक्षात आल्यावरच मुस्लिम बहुल भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर दंगली सुरु झाल्या. तरीही दोन तुकड्यांत विभागलेले पाकिस्तानच त्यांना स्वीकारावे लागले. हिंसा किंवा अहिंसा हा दुय्यम प्रश्न होता. त्या लढ्यातून कोणाच्या हाती काय लागणार हा खरा प्रश्न होता. स्वातंत्र्य नेमके कशासाठी मिळवायचे हा महत्वाचा प्रश्न होता. भारत हे पाच हजार वर्षांची परंपरा असलेले राष्ट्र आहे हे वाक्य नेहरूंनी वापरले आहे. हे राष्ट्र टिकवण्यासाठी जे काही करावे लागले ते कॉंग्रेसच्या नेतृत्वाने केले. आझाद हिंद सेना आणि सुभाष ह्यांचे शौर्य आणि त्याग वादातीत आहेत. पण ह्या सर्व राजकीय वास्तवाच्या आधारावर त्यांची वाटचाल चालू होती असे म्हणणे धाडसाचे ठरेल. गांधी आणि कॉंग्रेस नेतृत्वाचे श्रेय मान्य करणे हे त्यांच्या व्यक्तीपूजेसाठी नसून त्या काळातील राजकीय वास्तव समजून घेण्यासाठी महत्वाचे आहे. एनीवे, लेट्स अग्री टू डिसअग्री !

In reply to by अवतार

अर्धवटराव Sat, 10/04/2014 - 00:44
१९४२ च्या चले जाव आंदोलनात ... गांधींचा उदय झाला तेव्हा शस्त्रे तर सोडाच जनता ब्रिटीश राज्याला उघड विरोध करायलाही तयार नव्हती.
१९४२ चं आंदोलन गांधीजींची/काँग्रेसची स्वातंत्र्यप्राप्तीप्रित्यर्थ फायनल अशी स्वयंभू कृती होती का हाच मला पहिला डाऊट आहे. आणि तसं ते असेल तरी गांधी मार्गाच्या इतर आंदोलनांप्रमाणे त्याचीही परिणीती पेल्यातलं वादळ शमण्यात झाली. त्यापेक्षा वेगळं काहि घडणं अशक्यच होतं. गांधींनी आणि काँग्रेसने ते आंदोलन सुरु केलं ते इंग्रजांचा युद्धात अडकलेला पाय आणि सुभाषबाबुंना मिळणारा प्रचंड पाठिंबा या पार्श्वभूमीवर.
सशस्त्र क्रांतीत यशाची आठ आणे खात्री असेल तर उरलेल्या आठ आण्यांची शक्यता पडताळून पाहता येते हे टिळकांचे शब्द आहेत.
अर्थात. भारताची स्वतःची अशी सशस्त्र क्रांती सुभाषबाबुंच्या काळी देखील प्रॅक्टीकली फार अवघड होती (प्राप्त साधनांचा धांडोळा घेतल्यास जवळपास अशक्य) मग टिळकांच्या काळची तर बातच सोडा. स्वतः सुभाषबाबु देखील गांधीमार्गाचेच मरेपर्यंत अनुकरण करायला सज्ज होते. महायुद्ध झाले नसते तर सुभाषबाबुंनी स्वबळावर (थँक्स टु युती अ‍ॅण्ड आघाडी फॉर धीस वंडरफुल शब्द) सशस्त्र क्रांतीचा मार्ग पत्करला असता असं खात्रीने म्हणता येत नाहि.
ही आठ आणे खात्री निर्माण करण्याचे श्रेय गांधींचे आहे. ही बदलती राजकीय परिस्थिती ओळखण्याएवढे ब्रिटीश चाणाक्ष होते. तुटेपर्यंत ताणून धरण्यापेक्षा आधीच सन्मानजनक माघार घेणे हे त्यांच्या हिताचे होते.
गांधीजींनी हि आठ आणे खात्री निर्माण केली हे निर्वीवाद. पण त्याचं श्रेय जातं महायुद्धाला. अन्यथा पुढील ५०-७५ वर्षं इंग्रज जागचा हालला नसता. या ५० वर्षात नॉर्थ इस्ट, द्रवीड, हैद्राबाद (ते तसंही "भारतात" नव्हतच), अवध, काश्मीर, पाकिस्तान (पूर्व-पश्चिम) कदाचीत पंजाब देखील, आणि उर्वरीत असा भारताचा राजकीय नकाशा तयार झाला असता... अगदी सांसदीय मार्गाने. तोपर्यंत गांधी अगोदरच निजधामाला गेलेले असते व दुसरा गांधी निर्माण व्हायचे चान्सेस फार म्हणजे फारच कमि होते. गांधींच्या कुठल्याच अनुयायात साबरमती किंवा सेवाग्राम पिठाची जबाबदारी घेण्याचं कौशल्य नव्हतं. त्यांचे वन ऑफ द सर्वोत्तम शिष्य जे सुभाषबाबु, परिस्थिती येताच गांधी मार्गाला त्यागायला तयार होते मग इतरांच्या मानसीक घडणीची काय कथा.
त्या लढ्यातून कोणाच्या हाती काय लागणार हा खरा प्रश्न होता. स्वातंत्र्य नेमके कशासाठी मिळवायचे हा महत्वाचा प्रश्न होता. भारत हे पाच हजार वर्षांची परंपरा असलेले राष्ट्र आहे हे वाक्य नेहरूंनी वापरले आहे. हे राष्ट्र टिकवण्यासाठी जे काही करावे लागले ते कॉंग्रेसच्या नेतृत्वाने केले.
काँग्रेसने डेफीनेटली जे करायचं ते केलच. पण काँग्रेस म्हणजे गांधीमार्ग नव्हे. जो मार्ग सुभाषबाबुंनी पत्करला, पुरेशी शक्यता जाणवताच तोच मार्ग काँग्रेसने पत्करला असता. देशकारणाचे जे मोस्ट इंपोर्ट्ण्ट घटक, संसद-न्यायव्यवस्था-नागरी प्रशासन-पोलीस-सैन्य, त्यातल्या सांसदीय घटकाची पायाभरणी काँग्रेसने केलीच. व मार्ग कुठलाही असो, तशी पायाभरणी करावीच लागणार होती. नो एस्केप. सशस्त्र क्रांतीनंतर सुभाषबाबुंना देखील असलीच व्यवस्था अपेक्षीत होती.
आझाद हिंद सेना आणि सुभाष ह्यांचे शौर्य आणि त्याग वादातीत आहेत. पण ह्या सर्व राजकीय वास्तवाच्या आधारावर त्यांची वाटचाल चालू होती असे म्हणणे धाडसाचे ठरेल.
तत्कालीन परिस्थीती लक्षात घेता सुभाषबाबुंची वाटचाल गांधीजी आणि कंपूपेक्षा जास्त प्रॅक्टीकल होती हा माझा कयास. किंबहुना कुणी अशी कॉन्स्पीरसी थेअरी काढली कि सुभाषबाबुंनी बाहेरुन सैन्य आणावे व गांधीजींनी आतुन आंदोलन करावे असाच प्लॅन होता, तर मला त्यात फार हास्यास्पद काहि वाटणार नाहि. महायुद्ध होऊन इंग्रज कमजोर झाले नसते आणि तरी ४०च्या दशकात गांधीमार्गाचे पुनर्संपादन झाले नसते तर ट्रॅडीशनल गांधीमार्ग स्वातंत्र्याचे आंदोलन पुढे नेण्यात असमर्थ होता असं मला वाटते.
गांधी आणि कॉंग्रेस नेतृत्वाचे श्रेय मान्य करणे हे त्यांच्या व्यक्तीपूजेसाठी नसून त्या काळातील राजकीय वास्तव समजून घेण्यासाठी महत्वाचे आहे.
सेम फॉर सुभाषबाबु. असो.

In reply to by अवतार

बाबा पाटील Fri, 10/03/2014 - 12:06
१९१५ मध्ये कॉंग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात लोकमान्य टिळकांच्या अध्यक्षतेखाली झालेला लखनौ करार ही त्याचीच परिणती होय. आजच्या सगळ्या गोंधळाचे मुळ याच तर ठिकाणी आहे.त्याचबरोब १९०६ लॉर्ड मिंटोने मुस्लिम लिगला दिलेले प्रोत्साहन किंवा त्याच्यात पुढाकाराने तिची स्थापना झाली व इथुनच भारतीय समाजात प्रचंड दरी पडु लागली.दुर्देवान टिळकांसह तत्कालिन पुढार्‍यांना ही परिस्थिती हाताळता आली नाही असेच म्हणावे लागेल.गांधी बाबा तर त्यानंतर फार उशिरा जवळ जवळ १५ वर्षांनी राष्ट्रिय राजकारणात आले.तोपर्यंत समाज प्रग्लभ नव्हाता,कारण मुंबई प्रांत ,बंगाल ,पंजाब व काही प्रमाणात मद्रास प्रांत सोडला तर राजकिय नेतृत्व फारसे पुढे आले नाही.किंवा चळवळ ही फारसी पुढे नव्हती. बुद्धीवादी सोडले तर तळागाळातला समाज देखिल फारसा पुढे नव्हता.गांधींनी सर्व प्रथम हा दिन दलित वर्ग,स्त्रिया शेतकरी कामगार चळवळित आणले,हिच तर त्यांची महती,हा एकुनात भित्रा समाज फक्त अहिंसेच्याच धोरणाने पुढे येवु शकत होता,सशस्त्र क्रांतीने नाही. क्रांतीकारक चळवळ सुद्धा कुठे मागे न्हवती पण १०३० नंतर त्यांचे नेतृत्व संपले,तसेल समाजातुन त्याला सक्रिय पाठिंबा बिल्कुल मिळाला नाही.लोक काँग्रेसच्या मागे उभे राहिले.सुभाष बाबुंना फारच मर्यादित यश मिळाले.इथे एक गोष्ट लक्षात घ्या, नेताजींची आझाद हिंद फौज ही ब्रिटिश सैन्यातुन फुटुन बाहेर पडलेली फौज नव्हती,तर जपान्यांना शरण आलेल्या सैन्याची रासबिहारींनी तयार केलेले सैन्य संघटन होते,ज्याचे नेतृत्व सुभाषबाबुंनी स्विकारले,त्याने जनतेत आत्मविष्वास नक्की आला पण हे सैन्य अपयशी ठरले. मात्र चलेजाव चळवळीचा परिणामस्वरुप जेंव्हा तलवार युद्धनौकेवर बंड झाले,व सरहद्द प्रांतात ब्रिटीश-भारतिय सैन्याने आंदोलकांवर गोळिबार करण्यास नकार दिला तेंव्हा मात्र ब्रिटिशांची पायाखालची वाळु सरकली होती. हा सर्व परिणाम १८८५ पासुन १९४२ पर्यंत सुरु असलेल्या चळवळिंचा होता.यात १९२० नंतर गांधीयुगाने सर्वात प्रखर संघर्ष केला होता. दोन चार अधिकार्‍यांना ठार करुन स्वातंत्र मिळत नाही हो,नाहीतर पंजाब/कश्मिर्/आसाम/नागालँड कधीच स्वतंत्र झाले असते,स्वातंत्र्याकरिता लोकचळवळ बनावी लागते आणी ती गांधीबाबाच्या नेतॄत्वात भारतात झाली.या एकाच कारणास्त्व त्यांना श्रेय नक्कीच द्यायला हवे.

In reply to by बाबा पाटील

काउबॉय Fri, 10/03/2014 - 14:43
तेथील स्वच्छता ही तेथे राहणाऱ्या लोकांमुळे आहे, त्यांच्या सवयीमुळे आहे
क्या बात...! गांधिना स्वातंत्र्याचे क्रेडिट न देणे हे अजूनही गुलामी मानसिकता आणि लोकशाही प्रणालीवर अविश्वास असण्याचे द्योतक आहे हे शिरोमनींना क्ळेल तो सुदिन. आले मोठे अहिंसेचे टीकाकार. डॉक तुम्ही अगदी मर्मावर बोट ठेवलय. विषयाला हात घातल्याबद्दल आपले मन:पूर्वक अभिनंदन.

In reply to by काउबॉय

काउबॉय Fri, 10/03/2014 - 14:46
दोन चार अधिकार्यांना ठार करुन स्वातंत्र मिळत नाही हो,नाहीतर पंजाब/कश्मिर्/आसाम/नागालँड कधीच स्वतंत्र झाले असते,स्वातंत्र्याकरिता लोकचळवळ बनावी लागते आणी ती गांधीबाबाच्या नेतॄत्वात भारतात झाली.
क्या बात...! गांधिना स्वातंत्र्याचे क्रेडिट न देणे हे अजूनही गुलामी मानसिकता आणि लोकशाही प्रणालीवर अविश्वास असण्याचे द्योतक आहे हे शिरोमनींना क्ळेल तो सुदिन. आले मोठे अहिंसेचे टीकाकार. डॉक तुम्ही अगदी मर्मावर बोट ठेवलय. विषयाला हात घातल्याबद्दल आपले मन:पूर्वक अभिनंदन.

In reply to by अवतार

@. एकविसाव्या शतकातील पिढ्यांना ते कळावे एवढीच माफक अपेक्षा आहे.>>> प्रचंड टाळ्या !!!! अवतार बाबा की जय!!!

काळा पहाड Fri, 10/03/2014 - 01:30
माझ्या ६ वर्षाच्या लेकीला कळत की बापाचे पिस्तुल हातात घेताना ते पुर्ण रिकामे आहे की नाही हे विचारुनच त्याला हात लावावा
हे खरंच असेल तर काळजी वाटते. जर चुकून तुम्ही तिला सांगितलं की ते रिकामं आहे आणि तसं ते नसेल तर? लहान मुलांना अशा गोष्टी चुकूनही हाताला लागू देवू नयेत ही कळकळीची विनंती. तुम्ही तर हे तुमच्या संमतीनं होतंय असं सांगताय. दुसरं असं की शस्त्र हाताळायला लायसन्सरुपी कायदा आहे असा माझा समज आहे. तसं असेल तर गांधीजींच्या धाग्यावरच तुम्ही कायदा मोडल्याचं कबूल करताय. बाकी काहीही असो, तुमची मुलगी ही तुमची जबाबदारी असल्यानं तुम्ही या सूचनेचा गांभीर्यानं विचार करावा ही पुन्हा विनंती.
माझ्या वैद्यकिय व्यवसायाचा माझ्या इतर गोष्टींशी काही संबध नाही
रेवती ताईंच्या मुद्द्याशी मी सहमत आहे. डॉक्टर हा पेशा शस्त्र धारण न करणार्‍यांचा आहे. तुमची भाषा आणि तुमचं वर्तन त्या पेशाशी साजेसं हवं. पेशंट हा डॉक्टरला देव समजतो (निदान माझी तरी डॉक्टरांकडे जाताना तशीच भावना असते). बाकी तुमची मर्जी.

In reply to by काळा पहाड

बाबा पाटील Fri, 10/03/2014 - 12:35
डॉक्टरने फक्त वैद्यकिच करावी असा काही नियम आहे का ? माझी पुण्यापासुन ४० किमीवर शेती आहे, त्यामुळे मला बर्‍याचदा रात्री १० नंतर ओपिडी संपली की गावी जावे लागते, आजपर्यंत दोन वेळा तरी एका नाल्याजवळ माझी गाडी दगड टाकुन अडवण्याचा प्रयत्न झाला होता नशिबाने दोन्ही वेळेस माझ्याकडे बोलेरो असल्याने सरळ चारीत गाडी घालुन मला निघुन जाता आले,आमच्या भागातले चोर्/ दरोडेखोर काही गांधीवादी नाहित ते प्रथम दगडांचा मारा करतात नंतर जवळ आले की कटावण्या आणी तलावारींचे वार होतात्,इतक्या लवकर मरायची माझी तरी मानसिक तयारी नाही.पोलिस काही प्रत्येक ठिकाणी पोहचु शकत नाहीत,शेतघरही गावापासुन अडिच ते तिन किमी आहे,अशा वेळेस संरक्षणास दुसरा काहीही उपाय नसतो,आमच्या रानातल्या वस्ती च्या आसपास ७/८ घरे आहेत प्रत्येक घरात , दोन तीन कुत्री, व परवानाधारक शस्त्रे आहेत्,उस बागायताचा परिसर असल्याने त्याला काहीही पर्याय नाही. दुसरी गोष्ट माझे इतरही काही व्यवसाय असल्याने बहुतेक मिटिंग अथवा भेट मी रात्री १० नंतर ठेवतो,रात्री घरी पोहचन्याचा वेळ कधीच फिक्स नसतो,त्यामुळे शस्त्र जवळ ठेवण्याशिवाय पर्याय नाही. मी पेशंटशी कसा बोलतो कसा वागतो हे पाहण्यासाठी कृपा करुन तुम्ही माझ्या ओपीडीत भेट द्या,म्हणजे तुमच्या लक्षात येइल. बाकी राहिल माझ्या लेकीच,ते पिल्लु स्टेट लेव्हल कराटे खेळतय्,ती शरिर व मनाने माझ्यापेक्षाही स्थिर आहे,मी जर तिच्या पासुन हे लपवुन ठेवल तर बालस्वभावानुसार ती नक्की ते पाहण्याचा प्रयत्न करनार्,त्यापेक्षा ते तिला हँडल कस करायच ते दाखवुन त्याच धोके समजावलेले कधीही चांगलेच ना.शिवाय ते फेकुन मारल तरी त्यातुन मिस फायर होणार नाही हे माहिती आहे, रेग्युलर शुटर सोडुन ते कुनालाही फायर करन शक्य नाही,त्यासाठी फार सराव लागतो. किंवा दुर्देवाने कधी वेळ आलीच तर ते कस वापराव हे माहिती पाहिजे ना. फुकट शहिद होण्याची मला तरी हौस नाही. आणी असही काही वर्षांनी तिलाच हे सगळे उद्योग पहायचेत्,आत्ता पासुनच तिची मानसिक तयारी झाली तर पुढे अडचन होत नाही,किंवा काही अडत नाही. मी तिला बहुतेक सगळे गड किल्ले फिरुन आणलेत्,शिवाजी आणी कृश्न नुसता भिनलाय तिच्यात, तिच्या प्रत्येक टुर्नामेंटला मी तिच्याबरोबर फिरत असतो.

बाबा पाटील Fri, 10/03/2014 - 12:48
विषय गांधीबाबा आहे,बाबा पाटील नाही माझी एव्हडीच माहिती हवी असेल सगळे येवुन भेटा शेतावर जावु, चार पाच कोंबड्या कापु,दणकुन खा प्या आणी निवांत माझे रामायण एका.

In reply to by मुक्त विहारि

बाबा पाटील Sat, 10/04/2014 - 11:13
अगदी लांब जायचे नसेल तर इथे वाघोली जवळ एक निसर्ग म्हणुन ढाबा आहे , गावरान कोंबडी,रस्सा + सुक्क बरोबर सुकट व ज्वारीची अथवा बाजरीची भाकरी,एक नंबर जेवन असत. कधी बसताय सांगा,कोंबड्या माझ्याकडुन.

In reply to by बाबा पाटील

अर्धवटराव Sat, 10/04/2014 - 23:21
च्यामारी.. उगाच त्या पवित्र अहिंसावादी आत्म्याला धाग्यावर धागे अन् हज्जार बायटी प्रतिसाद देऊन त्रास देण्यापरिस असलं काहि खाय-प्यायचं विंट्रेष्टींग बोलाना राव.

In reply to by अर्धवटराव

मुक्त विहारि Sun, 10/05/2014 - 08:28
कुणीही येवो अन कुणीही जावो, आपले पोट आपल्यालाच भरायचे आहे. असो, कट्ट्यासाठी हार्दिक निमंत्रण.... बाद्वे, इतर मिपाकर गांधीवादावर चर्चा करत असतांना, दुसर्‍या मिपाकरांचा पक्षी-तीर्थ कट्टा ठरला देखील.ह्यालाच म्हणतात खरी मिपाशाही.

प्रभाकर पेठकर Fri, 10/03/2014 - 13:06
बापुने दिलेला अंहिसेच्या मंत्राला प्रत्यक्षातले अहिंसकच जास्त शिव्या घालताना दिसतात, आज जे जे गांधीच्या अंहिसेच्या आंदिलनाला शिव्या घालताना दिसतायेत त्यातिल किती जणांनी प्रत्यक्ष शस्त्र हातात धरले आहे,किंवा सशस्त्र आंदोलनाच्या बाता मारणार्‍यांपैकी कितीजणांनी आपल्या आजुबाजुला अथवा स्वतःवर होणार्‍या अन्यायाविरुद्ध स्वतः सशस्त्र प्रतिकार केला आहे. धाग्याच्या पहिल्याच वाक्यावर विचार करून करून मी ह्या निष्कर्षाप्रत आलो आहे की चित्रपट, फोटोग्राफी, राजकारण, कविता, अध्यात्म, इतिहास हे आणि इतर अनेक विषय माझ्यासाठी चर्चा करण्यासाठी बाद झाले आहेत. कारण ह्या पैकी कुठल्याच विषयात मला प्रत्यक्ष अनुभव कांही नाहीए. त्यामुळे काहीच बोलत नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

दशानन Fri, 10/03/2014 - 21:56
>>>धाग्याच्या पहिल्याच वाक्यावर विचार करून करून मी ह्या निष्कर्षाप्रत आलो आहे की चित्रपट, फोटोग्राफी, राजकारण, कविता, अध्यात्म, इतिहास हे आणि इतर अनेक विषय माझ्यासाठी चर्चा करण्यासाठी बाद झाले आहेत. एवढेच, नाही तर मला असे वाटू लागले आहे, मी कुठल्याच लायकिचा नाही व मी आता या पुढे, लेखणी, किबोर्ड हातात धरू पण नये ;)

धडपड्या Fri, 10/03/2014 - 13:45
स्वयत्तता आणि स्वातंत्र, ह्या वेगवेगळ्या टर्मस् आहेत का? कारण गांधी आधी स्वायत्तता मागत होते, नंतर त्यांनी क्रांतिकारकांना पाहून संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली, असे बरेच उल्लेख वाचण्यात आलेत... हे खरे आहे का?

बाबा पाटील Fri, 10/03/2014 - 19:02
स्वायत्तता - म्हणजे मर्यादित स्वातंत्र, यात चलन, परराष्ट्र्,व संरक्षण ही खाती जेत्या राष्ट्राकडेच असतात व इतर खाती वसाहतीकडे असतात्,किंवा यालाच वसाहतीचे स्वातंत्र असेही म्हणतात,१९३५ च्या कायद्याने बर्‍यापैकी वसाहतीच्या स्वातंत्र्याकडे वाटचाल चालु होती,तर स्वातंत्र म्हणजे निरंकुश/ निर्विवाद सत्ता. म्हणजेच सध्याचा भारत देश. अभ्यासकांनी यावर अधिक प्रकाश टाकावा.

श्रीगुरुजी Sat, 10/04/2014 - 13:55
>>> काहीही म्हणा मित्रांनो,बापुने दिलेला अंहिसेच्या मंत्राला प्रत्यक्षातले अहिंसकच जास्त शिव्या घालताना दिसतात, बापूंच्या अहिंसेचे समर्थन करणारेच शस्त्रास्त्रे बाळगून हिंसा करताना दिसतात. >>> आमच्या रियल इस्टेट मधले चार टगे समोर उभे राहिले व त्यांनी कारण नसताना आया बहिणीवरुन शिव्या दिल्या तरी मान खाली घालुन जाणारी पांढरपेशी जमात,गांधींना शिव्या घालण्यात मात्र सगळ्यात पुढे असते. तुमच्यासारखा बापूंचा समर्थक पिस्तुल का वापरतो? टगे आडवे आले तर अहिंसक मार्गाने त्यांचे हृदयपरीवर्तन करायचे, त्यांचा मार्ग चुकला हे त्यांना प्रेमाने समजावून सांगायचे, हृदयपरीवर्तन होईपर्यंत उपोषण करायचे, मौन पाळायचे, निषेध करायचा ... पण त्यासाठी शस्त्र कशाला जवळ हवे?

बाबा पाटील Sat, 10/04/2014 - 14:06
वरती आख्खा उतारा त्याच्या स्पष्टीकरणात घातला आहे जरा वाचायचे कष्ट घ्या आणी परत परत फिरुन भोपळे चौकात येवु नका.

बाबा पाटील Sat, 10/04/2014 - 18:39
हे तर आमच्या पिताश्रींनाही पटत नव्हत हो, हळु हळु त्यांना काही गोष्टी लक्षात आल्यावर मात्र ते खंबिर मागे उभे राहिले. जाउ द्या ना आपला धागा गांधी बाबावर आहे माझ्यावर नाही.

In reply to by बाबा पाटील

श्रीगुरुजी Sat, 10/04/2014 - 20:44
बरोबर आहे. धागा गांधीजींवर आहे, तुमच्यावर नाही. परंतु तुम्ही गांधींजींच्या मार्गाचे समर्थन करताकरता स्वतःकडे स्वसंरक्षणार्थ शस्त्र आहे असं लिहिलंत आणि ते जरा विसंगत वाटलं, म्हणून प्रतिसाद दिला. बाकी काही नाही. उलट स्वसंरक्षणार्थ शस्त्र बाळगण्याचे धाडस तुमच्याकडे आहे आणि आम्हाला शस्त्र बाळगण्याचे धाडस स्वप्नात सुद्धा होणार नाही हेही तितकंच खरं.

बोका-ए-आझम Sun, 10/05/2014 - 10:39
स्वातंत्र्य कोणामुळे मिळाले हा प्रश्नच चुकीचा आहे.प्रत्येक घटकाचा - गांधीजी,सुभाषबाबू यांसारख्या नेत्यांपासून ते तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत प्रत्येकाने त्यात सहभाग घेतलेला आहे. स्वातंत्र्याचां मक्ता आपल्या राजकीय स्वार्थासाठी काँग्रेसला हवा होता म्हणून त्यांनी गांधींच्या नावाचा वापर केला आणि अशी परिस्थिती निर्माण केली की आज जर गांधी असते तर त्यांनी काँग्रेसवर अब्रूनुकसानीचा दावा केला असता!

पिवळा डांबिस Sun, 10/05/2014 - 11:28
प्रती श्री. बाबा पाटील, या धाग्यावर मध्ये पडणार नव्हतो, कारण गांधीजीची माणूस म्हणुन वा नेता म्हणून गौरवी व्यक्त करणारे व्होकल सभासद या संस्थळावर अल्पमतात आहेत... परंतु, त्याहुनही स्वतः शस्त्र धारण करणारे, आणि त्यानुसार येणार्‍या जबाबदार्‍या समजणारे, त्यामुळे येणारा आत्मविश्वास समजू शकणारे सभासद हे त्याहूनही कमी (अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच!) आहेत. अनुभवावीण फुकाची वाफ दवडणारेच अधिक!! त्यामुळे माणसाच्या व्यवसायाचा त्याच्या शस्त्रधारणतेशी संबंध नसतो. माणसाला त्याच्या व्यवसायाव्यतिरिक्त अन्य आयुष्य असतं याच्याशी पूर्णतः सहमत!!!

सुधीर Sun, 10/05/2014 - 13:03
महात्मा गांधी कुरुंदकरांच्या लेखणीतून हा कुरुंदकरांच्या शिवरात्र या पुस्तकातल्या पहिल्या भागाचा सारांश अलिकडेच लिहिला. गेले ५ दिवस बाहेरगावी होतो म्हणून मिपावर २ ऑक्टोबरला प्रकाशित करू शकलो नाही. या लेखातले काही प्रतिसाद वाचनीय वाटले.

In reply to by बाबा पाटील

सुधीर Mon, 10/06/2014 - 14:36
धन्यवाद डॉक्टर. सदर विचार कुरुंदकरांचे आहेत (शिवरात्र मधले) मी फक्त ते थोडक्यात मांडले आहेत. आणि या पुस्तकावर अतृप्तआत्मा यांनी सुंदर सारांश आधीच लिहिला आहे. http://www.misalpav.com/node/20754

प्रसाद१९७१ Mon, 10/06/2014 - 11:19
मला हा बेसिक प्रश्न पडतो कायम की भारतातल्या सर्व सामान्य जनतेला १९४७ पूर्वी स्वातंत्र्य नव्हते का? माझ्या मते आत्ता जेव्हडे स्वातंत्र्य आहे सर्व सामान्य माणसास तेव्हडे स्वातंत्र्य १९४७ पूर्वी पण होते. खरे तर वैचारिक दृष्ट्या

In reply to by प्रसाद१९७१

प्रसाद१९७१ Mon, 10/06/2014 - 11:23
मला हा बेसिक प्रश्न पडतो कायम की भारतातल्या सर्व सामान्य जनतेला १९४७ पूर्वी स्वातंत्र्य नव्हते का? माझ्या मते आत्ता जेव्हडे स्वातंत्र्य आहे सर्व सामान्य माणसास , तेव्हडे स्वातंत्र्य १९४७ पूर्वी पण होते ( कदाचित जास्तच असेल ). १९०० सालाच्या आधीपासुन च निवड्णुका होउन नगरपालिका होत होती, नंतर राज्य विधी मंडळ पण झाले, नंतर संसद पण होती. कायदे समान होते, शिक्षण, नोकरी करण्यात काही अटकाव नव्हता. जमिन विकत घेण्यात, व्यवसाय चालू करण्यात काही बंधने नव्हती. नक्की स्वातंत्र्य नव्हते म्हणजे काय प्रॉब्लेम होता? ( सामान्य माणसाच्या दृष्टीने )

In reply to by प्रसाद१९७१

सुधीर Mon, 10/06/2014 - 23:13
मला हा बेसिक प्रश्न पडतो कायम की भारतातल्या सर्व सामान्य जनतेला १९४७ पूर्वी स्वातंत्र्य नव्हते का? या प्रश्नाचे उत्तर देण्याची सध्यातरी माझ्यात कुवत नाही. पण या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कुरुंदकरांच्या जागर मध्ये मिळेल अशी आशा आहे. धर्म, त्यानुसार आलेल्या परंपरा,(कालपरिवर्तनामुळे आणि) परंपरेमुळे होणारे अन्याय, शोषितांची मानसिकता, अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याकरता लागणारी मानसिकता, क्रांतीच्या तत्वज्ञानाचा मूलभूत गाभा, मार्क्सवाद, गांधीवाद अशा विषयांवर विवेचन करणा-या "गांधी एक चिंतन" या लेखात मिळतील.

भारतात बरीच संस्थानं चालू होती, इंग्रज स्वार्थासाठी त्यांच्या मनमानीकडे काहिसे दुर्लक्ष करायचे .खर्या अर्थाने स्वातंत्र्य नव्हते.

In reply to by नानासाहेब नेफळे

प्रसाद१९७१ Mon, 10/06/2014 - 12:42
ठीक आहे, मी संस्थाने नसलेल्या, इंग्रज अधिपत्याखालच्या भारता बद्दल बोलतोय. अशी २-३ तरी उदाहरणे आहेत का की ज्यात सामान्य माणसाला स्वातंत्र्य नव्हते असे म्हणता येइल १९४७ च्या आधी. जी काही थोडी बंधने होती ती १९१० नंतर कमी कमी होत चालली होती.

ऋषिकेश Mon, 10/06/2014 - 15:31
वा वा! (इथेच जरा उचकपाचक करून) बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार जन्तेच्या त्याच नेत्याबद्दलच्या बदललेल्या भावना यावर कोणीतरी अभ्यासपूर्ण लेख लिहावा असे सुचवतो :P (तुच लिहि असे म्हणणार्‍यांस आगाऊ क्षमस्व!)

In reply to by ऋषिकेश

बाबा पाटील Mon, 10/06/2014 - 19:12
तात्याला बोलवा,त्यांच्या इतक परखड कोनी नाही लिहु शकत्,हा प्राणी ब्लड बॉर्न शिवसैनिक आहे त्यामुळे भक्तांना अंमळ जुलाब लागु शकतात्,पण मत फार परखड असतात.

मृत्युन्जय गुरुवार, 10/02/2014 - 13:25
दुर्देव आहे ज्या गांधीमुळे तुम्ही रक्ताचा एकही थेंब न सांडता सहज सत्तांतर करु शकता, तेच जर या देशात हुकुमशाही असती तर..... गांधी महान खरे पण स्वातंत्र्य त्यांच्यामुळे मिळाले असे मानणे हा प्रचंड मोठा मुर्खपणा आहे. आमच्या रियल इस्टेट मधले चार टगे समोर उभे राहिले व त्यांनी कारण नसताना आया बहिणीवरुन शिव्या दिल्या तरी मान खाली घालुन जाणारी पांढरपेशी जमात, यात चूक पांढरपेशा जमातीची नसून रियल एस्टेट मधल्या त्या हरामखोर टग्यांचा आहे याकडे का दुर्लक्ष करता. आयाबहिणीं वरुन शिव्या देउन दादागिरी करणारे बहुधा आभाळातुन टपकलेले असतात. अरे तुमच्या मालकीच्या जागेत फुटभर रस्ता काढण्याचाही हा देशातल्या सरकारला अधिकार नाही, खरे की काय? ऐकावे ते नवलच.

In reply to by मृत्युन्जय

देशाला स्वातंत्र्य दुसर्‍या महायुद्धामुळे त्याने ब्रिटीश साम्राज्य मानसिक व आर्थिक दृष्ट्या खचले, त्याने मिळाले , गांधी व सुभाष ह्यांनी योग्य वेळी आपापल्या मार्गाने योग्य वेळ साधून ब्रिटीश साम्राज्यावर हल्ला चढवला , सरत शेवटी सत्तेचे लोणी नेहरू व जीना खाऊन तृप्त झाले. जीना ह्यांच्या डायरेक्ट ऍक्शन ह्या बार्बारिक कृत्याच्या हाकेला गांधी व त्यांची अहिंसा साफ विफल झाली , अल्पसंख्याक गटाने हिंसेच्या जोरावर बहुसंख्य समूहावर हा विजय मिळवला. अरे ला कारे पहिल्याच वेळी म्हणणारा नेता त्यावेळी भारतात गांधी एवढे राजकीय महात्म्य राखून नव्हता. पाकिस्तान झाल्यावर ह्यांची सत्तेची जागेची भूक भागेल अशी सुतराम शक्यता त्यावेळी त्यांच्या कृत्यातून दिसत नव्हती तेव्हा पाकिस्तानला संमती देण्यात काहीही अर्थ नव्हता. पूर्वी गुजरात मध्ये २००२ पर्यंत साठीचे रोग जसे आलटून पालटून वर्षाआड येतात तश्या दंगली व्हायच्या , मात्र २००२ नंतर एकही दंगल आजतागायत झाली नाही , १९९२ नंतर मुंबईत झाली नाही , कारण अरे ला कारे तो पर्यंत कोणी म्हटले नव्हते दंगलीत सामान्य माणूस भरडला जातो म्हणून त्या होऊ नये असे वाटते. दुर्दैवाने युपी मध्ये त्या नियमित स्वरुपात होतात. ज्या देशाल शोले सिनेमा आजही लोकप्रिय टिकवून आहे तेथे हिंसा ही अहिंसेवर अनेकदा विजय मिळवतांना आपण वृत्त पत्रातून नित्यनियमाने वाचत असतो.

In reply to by निनाद मुक्काम …

उदयन Fri, 10/03/2014 - 13:48
इतके विनोदी लिहित जाउ नका.. दंगल झाल्यात परंतु मिडीयाने दाखवल्या नाहीत काही दिवसांपुर्वी वडोदरा पेटलेले कुठे वाचले आहेत का सांगा जरा इतका लाळघोटेपणा करु नये

In reply to by उदयन

इरसाल Sat, 10/04/2014 - 12:49
बीबीसी हिंदीवर न्युज आली होती फोटोंसहीत. आणी हो वडोदरा पेटलेले बिटलेले काही नव्हते हां ! मुळात दोन घटना घडल्या त्या काळात. एक मुस्लिम वि. मुस्लिम दुसरी मुस्लिम वि. हिन्दु डिटेल्स हव्यातर त्यापन देतो.उगाच रक्त नका हो जाळु स्वतःच.

अनुप ढेरे गुरुवार, 10/02/2014 - 13:37
तुमचे विचार पटण्यासारखे आहेत. पण अहिंसेची महती सांगताना तुम्ही स्वतःकडे बंदूक असल्याचा उल्लेख केला आहे. ते रोचक वाटलं. ज्यासाठी तुम्ही बंदूक ठेवली आहे ते प्रॉब्लेम्स अहिंसेने सुटणार नाहीत असं तुम्हाला वाटलं का?

बाबा पाटील गुरुवार, 10/02/2014 - 13:45
मग काय रक्तरंजित क्रांती करायची होती,देश म्हणजे काय ? अथवा हा भारत देश याची तरी सिंधुपासुन कन्याकुमारीपर्यंत जाणिव होती का. गांधींनी देश स्वतंत्रच नाही तर एकत्र आणला,एका झेंड्या खाली आणला अन्यथा इथले राजे महाराजे, संस्थानिक यांनी काय काय केले असते याचा विचार करा गांधीबाबाने सामान्य माणसाला एक आत्मविश्वास दिला,तो खुल्या दिलाने मैदानात उतरला,स्त्रिया,शेतकरी,कामगार असे सगळेच लढ्यात उतरले, हे फक्त अहिंसेच्या मुळे,अन्यथा १८५७ लाच देश स्वतंत्र झाला असता नाही का ? ज्यात इंग्रजांइतकेच अत्याचार बंडवाल्यांनी केले. शस्त्र हाती असलेल्या जमावाला भान नसत सायबा,एक जुनी म्हण आहे क्रांती तिचीच पिल्ले खाते,याचा अनुभव भारतातही नक्कीच आला असता, असा आला देखिल,पण मर्यादित स्वरुपात होता. अभ्यास वाढवा हो.

In reply to by बाबा पाटील

मृत्युन्जय Fri, 10/03/2014 - 12:46
सन्मानाने देश परत मिळवण्याचा एकमेव मार्ग सशस्त्र लढ्याचा होता. गांधींचे देशाच्या स्वातंत्र्य ल\ढ्यातील योगदान नाकारु पाहणारा मुर्ख असेल. तसेच स्वातंत्र्य त्यांच्यामुळे मिळाले असे म्हणणेही मुर्खपणाचे आहे. इंग्रजांनी गांधीजींना ५ दशके भीक घातली नाही. त्यापुढेही घातली नसती. परंतु दुसर्‍या महायुद्धानंतर त्यांना इतके देश सांभाळणे अवघड होउन बसले. शिवाय भारतात लुटायला फार काही उरले नव्हते. होते ते पुरते लुटुन झाले होते. बाकी लुटण्यासाठी स्वातंत्र्य देउनही सनदशीर मार्ग अस्तित्वात होते. शिवाय दूसरर्‍या महायुद्धानंतर अमेरिकेने इंग्लंडवर त्यांच्या अधिपत्याखालील देशांना विशेषतः भारताला स्वातंत्र्य देण्याबाबत प्रचंड दबाव आणला. तसे केले असते तरच स्वतःची लोकशाहीचे संवर्धक म्हणून प्रौढी मिरवता आली असती. नाहितर ते आणी हिटलर एकाचा तराजूत गेले असते. दूसरर्‍या महायुद्धानंतर इंग्लंड बेचिराखच झाला होता. एकावेळेस स्वदेश आणी दूरवरची संस्थाने यावर अंमल ठेवणे त्यांना आर्थैकदृष्ट्या शक्य नव्हते. या सर्व कारणांंमुळे त्यांनी भारताला स्वातंत्र्य दिले. देशाला एकत्र आणणे आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राज्य करु शकतील अश्या लोकांची मोट बांधणे याचे श्रेय नि:संशयपणे गांधीजींचे. दुसर्‍याला अभ्यास वाढवा असे सांगण्यापुर्वी स्वतः एवढा अभ्यास कराच पाटील. शस्त्र हाती असलेल्या जमावाला भान नसत सायबा शस्त्र हाती असलेल्या एकेकट्या माणसाला तरी भान असते का की शस्त्राची गर्मी अंगात गुर्मी आणते?

In reply to by मृत्युन्जय

काउबॉय Fri, 10/10/2014 - 11:51
पण ब्रिटन एव्हडा कमकुवत झाला होता तर सशस्त्र लढाच का उभारला गेला नाही ? तसेच गांधी अस्तित्वात आले नसते तरीही महायुध्दानंतर ब्रिटनवर स्वातंत्र्य देण्याचा दबाव आला असता काय ? (मग एकुणच स्वातंत्र्य लढयातिलांचे स्वतंत्रतेत प्रत्यक्ष प्रभावी योगदान हा वेगळाच विषय उपस्थित होतो) - प्रामाणिक उहापोह अपेक्षित.

प्रतापराव गुरुवार, 10/02/2014 - 17:02
बाबा पाटील लेख अत्यंत आवडला. वास्तविक जीवनात नेभळटा सारखे जगणारे लोकच अहिंसेला शिव्या घालतात.भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात सर्वात मोठे योगदान हे गांधीजीन्चेच होते. जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटीश सर्कार्विरुद्धात सशस्त्र लढा आपण कुठल्या आधारावर करणार होतो.जे नेते हिंसेच्या बाजूने होते त्यांना लोकांची सहानभूती होती मात्र लोकशक्ती कधीच त्यांच्या मागे उभी राहिली नाही. गांधीजींनी जो अहिंसेचा जादुई वापर केला त्यानेच सारा देश त्यांच्या पाठीशी उभा राहिला प्रत्येकाला गांधीजींच्या आंदोलनामुळे आपण हि स्वातंत्र्य लढ्याचा एक भाग आहोत हे अनुभवता आले.

In reply to by आजानुकर्ण

प्रतापराव गुरुवार, 10/02/2014 - 17:44
पण गांधीजींच्या लेखात सावरकरांना ओढून ताणून का आणले जातेय ते कळत नाही. उद्या सावरकरांचे राष्ट्रकार्य ह्यावर लेख लिहला तर दुसरा म्हणेल कोलू ओढला ते ठीक आहे पण ते भगतसिहाप्रमाणे देशासाठी शहीद का झाले नाही.ह्या गोष्टीला काही अर्थ आहे का?

In reply to by प्रतापराव

मृत्युन्जय गुरुवार, 10/02/2014 - 17:47
लोकांना इतके कळायला लागले तर काय घ्या. सगळीकडे जमेल तशी घाण करुन ठेवायची आणि मग मोदींचे स्वच्छ भारत आंदोलन अयशस्वी झाले असे ओरडत सुटायचे.

In reply to by मृत्युन्जय

आजानुकर्ण गुरुवार, 10/02/2014 - 18:03
हो मात्र गांधीजयंतीला गांधींमुळे स्वातंत्र्य मिळाले हा मूर्खपणा आहे एवढे ओरडत सुटायचे म्हणजे लोकांना जरा कळायला लागेल.

In reply to by आजानुकर्ण

मृत्युन्जय Fri, 10/03/2014 - 12:32
किमान गांधीजयंतीच्या धाग्यावर सावरकरांच्या नावाने ओकार्‍या नाही काढल्या तरी लोकांना कळायला लागेल. धागा गांधींबद्दल आहे तर त्यांच्याबद्दल बोला. त्यांना महान म्हटलेले तुम्हाला दिसले नाही. एखाद्याने गांधींवर काही टीका केली की लगेच लोकांना सावरकरांच्या नावाने ओकार्‍या का काढावाश्या वाटतात कोण जाणए? ते सुद्धा सावरकरांचा धाग्यात किंवा प्रतिसादात कुठेही उल्लेखही केलेला नसताना. असो. विजयादशमीच्या शुभेच्छा.

In reply to by मृत्युन्जय

आजानुकर्ण Fri, 10/03/2014 - 15:15
महाशय, या धाग्यावर गांधींना स्वातंत्र्याचे श्रेय देणे हा मूर्खपणा असल्याचा सर्वात पहिला प्रतिसाद तुमचा आहे. (थोडक्यात सुरुवात कोणी केली?) नंतर सावरकरांच्या नावाने ओकाऱ्या निघणार आहेत याचे स्वप्न पडले होते की काय? गांधींनी कोलू ओढला का या शब्दात सावरकरांची ओकारी कुठे दिसली? कोलू या शब्दावर सावरकरांचा कॉपीराईट आहे काय? सावरकर वगळता इतर कोणी कोलू ओढला नाही वाट्टं!

In reply to by आजानुकर्ण

मृत्युन्जय Fri, 10/03/2014 - 16:02
मी गांधींच्या धाग्यावर गांधींचे महानपण मान्य करुन योग्य त्या गोष्टीबद्दल प्रतिसाद दिला नव्हता, कोलू आणी सावरकरांचा काय संबंध असे तोंड वर करुन विचारणे म्हणजे सौ चूहे खाकर..... कोणी गांधींवर टीका केली की सावरकरांवर पण टीका होणारच असे गृहीत का धरले पाहिजे म्हणे. असो. सावरकरांच्या नावाने तुम्ही ओकार्‍या काढल्या असे मी तरी कुठे म्हणालो आहे? तुम्हाला काय स्वप्न पदले काय?

In reply to by आजानुकर्ण

आनन्दा Tue, 10/07/2014 - 17:35
हो मात्र गांधीजयंतीला गांधींमुळे स्वातंत्र्य मिळाले हा मूर्खपणा आहे एवढे ओरडत सुटायचे म्हणजे लोकांना जरा कळायला लागेल.
मधला केवळ हा शब्द खाल्लात काय हो? ड्राय डे चा एव्हढा परिणाम? केवळ गांधींमुळे स्वातंत्र्य मिळाले हा मूर्खपणा आहे

In reply to by प्रतापराव

असंका गुरुवार, 10/02/2014 - 17:49
काहीच अर्थ नाही. अशी तुलना होऊच शकत नाही. (असं म्हणायची ही जागा नाही खरं, पण एकदम चपखल उदाहरण दिलंत!)

In reply to by प्रतापराव

शिद गुरुवार, 10/02/2014 - 18:05
पण गांधीजींच्या लेखात सावरकरांना ओढून ताणून का आणले जातेय ते कळत नाही.
१००% सहमत. तसेच "पण सावरकरांच्या लेखात गांधीजींना ओढून ताणून का आणले जातेय ते कळत नाही" हे सुद्धा लागू होतंय.

असंका गुरुवार, 10/02/2014 - 17:13
एवढं रोखठोक लिहिताल, तर धाग्यावर प्रतिक्रिया द्यायला कोण थांबेल? त्यात आणि फारच थोडक्यात आटोपतं घेतलंत. अजुन लिहा....

जरा विषयांतर होईल पण खरे तर मला जे वाटते ते चर्चा सत्रात एक धागा काढून आपले मत मांडावे असे मला वाटते पण ह्या विषयावर आज चर्चा नको , असे मला वाटते. पण ओझरता उल्लेख करतांना असे म्हणतो , क्रांतिकारक असो किंवा गांधी ह्यांचा इंग्रजांशी लढा योग्य होता का त्याचवेळी गाडगे महाराज , फुले , आंबेडकर , रानडे , कर्वे पिता पुत्र हे समाजात आपल्या परीने समाजात सुधारणा आणत होते. हजारो वर्ष चालत आलेल्या अनेक रूढी व परंपरा कधी कायदा करून तर कधी लोकांचे मत परिवर्तन करून समाजात आणत होते, सुशिक्षित समाज मिळालेले स्वातंत्र्य अधिक सक्षमतेने भोगू शकतो.

In reply to by निनाद मुक्काम …

असंका गुरुवार, 10/02/2014 - 18:07
जरा विषयांतर होईल पण खरे तर मला जे वाटते ते चर्चा सत्रात एक धागा काढून आपले मत मांडावे असे मला वाटते पण ह्या विषयावर आज चर्चा नको , असे मला वाटते.
अर्थ काय घ्यायचा ह्याचा? (तो जोक आठवला..किती वेळा वाटते! सरळ मिक्सरमधून काढावे?)

In reply to by असंका

गांधींच्या धाग्यावर मृत्युंजय ह्यांच्या संपूर्ण प्रतिसादाला मी सहमत होईल अशी पुसटशी शंका सुध्धा माझ्या मनाला काळ परवा पर्यंत शिवली नव्हती पण आज ह्या प्रतिसादाला सहमत आह फक्त त्यात थोडी भर घालू इच्छितो. दुसर्या महायुद्धाचे फलित म्हणजे ब्रिटन मध्ये मजूर पक्षांची पहिल्यांदा सत्ता , आणि त्यांच्या जाहीरनाम्यात पूर्वीच भारताला स्वातंत्र्य देण्याचे म्हटले होते , दुसरा मुद्दा म्हणजे नुसती अमेरिका नाही तर रशिया सुद्धा वसाहतीवादाच्या विरोधात इंग्लंड वर दबाव आणला. ह्या तिन्ही देशाच्या प्रमुखांची युद्धानंतर च्या बैठकीत ह्या मुद्यांवर जोर दिला त्यामागे काही प्रमुख कारण माझ्या मते वेगळे होते. मला असते वाटते की दुसर्या महायुद्धाचे फलित म्हणजे जागतिक पटलावर रशिया व अमेरिकेचा उदय ह्यात अमेरिकेला बाजारपेठ तर रशियाला आपली विचारसरणी जगावर लागायची होती किंबहुना अमेरिकाला जग आपल्या विचारसरणीत रानागावयाचे होते जर वसाहती देशांनी आपल्या वसाहती कायम ठेवल्या असत्या तर फ्रेंच व इंग्रज ह्यांनी दुसर्या महायुद्धाचे नुकसान वसाहतींच्या कडून वाट्टेल त्या मार्गाने भरून काढून परत आपले वर्चस्व गाजविण्याचा प्रयत्न केला असता दुसरा मुद्दा असा कि वसाहतीत इंग्रज व फ्रेंच लोकांनी असमतोल व्यापारी कायदे कायम ठेवले असते व अमेरिकेला आपले उत्पादन विकणे अशक्य झाले असते , सगळ्यात महत्वाचे म्हणजे युरोपवर पर्यायाने जगावर त्यांची पकड सैल झाली असती , ज्या दिवशी भारत इंग्रजांच्या हातातून निसटला तसे ब्रिटीश राजकीय सामर्थ्याला जगाच्या अवकाशात ग्रहण लागले ,आज ब्रिटन ची ओळख जगात अमेरिकन पोलिटीकल बीच अशी आहे , अवांतर पोलिटीकल बीच हा केजीबी च्या शब्दकोशातील आवडता व महत्वाचा शब्द आहे , त्यांच्या अनुषंगाने एक लेख लिहिण्याचा मानस आहे पाहूया कधी वेळ मिळतो ते . बाकी त्यांची एक पिढी नष्ट झाल्याने त्यांच्या लोकांची मानसिकता पार ढासळली होती , जगात अधिकारी म्हणून ज्यास ते नाखूष होते कारण येथे त्यांनी युद्धात सर्वस्व गमावले होते. अश्यावेळी लोहा गरम हे , मार दो हातोडा हाय ठाकूर च्या डायलॉग प्रमाणे गांधी ह्यांनी चळवळ उभारून मौका देख के चौकां मारला.पण ह्यात खरी सिक्सर मारली ती त्यांच्या अनुयायांनी सत्तेचा गोळा मटकावला व गांधीना मोडीत काढण्याचा प्रयत्न झाला , गांधीचे आपल्याच अनुयायांच्या विरोधात उपोषण केलेले पाहून ह्या लोकांनी कधीतरी मानाने गांधीवाद समजून आत्मसात केला होता का ह्यांची शंका येते , गांधीच्या समोर मोठी झालेली इंदू ने पुढे राजकारणात केलेले राडाकरण पाहता गांधी कुठेतरी अनुयायी घडविण्यात कमी पडले की मुद्दलात म्हणजे त्यांचे विचारच पराकोटीचे नैतिक व वास्तवाशी विसंगत होते म्हणून बदलत्या कालखंडात ते लोकांत जीरपले नाही.

In reply to by असंका

@अर्थ काय घ्यायचा ह्याचा? ह्याचा अर्थी सोपा आहे तुम्हाला नक्की काय आठवले हे मला माहिती नाही ह्या धाग्याचा विषय वेगळा आहे , व मला जो विषय अभिप्रेत आहे त्या बद्द्ल एकेकाळी समाजात चर्चा झालेली आहे. टिळक विरुद्ध आगरकर असा वाद पूर्वी गाजला होता ह्यात आजची परिस्थिती व अजूनही अर्ध्याहून जास्त भारताचे १८ व्या शतकातील सामाजिक जीवन पाहता आगरकरांचे विचार मला अधिक महत्त्वाचे वाटतात.

बाबा पाटील गुरुवार, 10/02/2014 - 18:42
बादरायण संबध जोडु नका,माझ्या वैद्यकिय व्यवसायाचा माझ्या इतर गोष्टींशी काही संबध नाही, बाहेरच्या जगातल्या गोष्टी मी कुठल्याही परिस्थितीत दवाखाण्याच्या व घराच्या उंबर्‍याबाहेरच ठेवुन जातो, येथे मी माझ्या कुठल्याही व्यवसायाचा उल्लेख केला नसताना तुम्ही तो का जोडताय हे कळत नाहिये. संपादक मंडळींना विनंती कृपया रेवतीताईंचा वरिल प्रतिसाद उडवावा अन्यथा माझा धागाच काढुन टाकावा.

रेवती गुरुवार, 10/02/2014 - 19:06
काही हरकत नाही. संमंला वाटल्यास किंवा आपल्याला अस्वस्थता आली असल्यास माझा प्रतिसाद नक्कीच उडायला हवा. तुम्हाला त्रास देण्याचा हेतू नाही, पण वाचक म्हणून आमच्या मनात प्रतिमा असते ते तरी आपल्याला समजेल अशी आशा! तुमच्या वैद्यकीय ज्ञानाचा मला आदर आहे.

श्रीगुरुजी गुरुवार, 10/02/2014 - 20:42
>>> अरे तुमच्या मालकीच्या जागेत फुटभर रस्ता काढण्याचाही हा देशातल्या सरकारला अधिकार नाही, येथे तुम्ही कितीही वरिष्ठ नेता अथवा अधिकार्‍याला कोर्टात खेचु शकता,खरच स्वतःच्या आंतरात्म्याला साक्षि ठेवुन सांगा हा पंचातला गांधीबाबा नसता तर हे शक्य झाले असते. नक्कीच शक्य झाले असते.

अवतार Fri, 10/03/2014 - 01:10
हो. कदाचित शक्य झाले असते. इथे मूळ मुद्दा हा आहे की स्वातंत्र्य हे कोणाही एका व्यक्ती किंवा संघटनेमुळे मिळाले नसून या देशातील सर्व सामान्य जनतेच्या संघटित लढ्यातून मिळाले आहे. गांधींचे राजकीय महात्म्य हेच की त्यांनी हे सर्वात आधी ओळखले. १८५७ च्या लढ्यात प्रथमच हिंदू आणि मुस्लिम विरुद्ध ब्रिटीश अशी परिस्थिती निर्माण झाली. म्हणूनच १८५७ नंतर ब्रिटिशांनी जाणीवपूर्वक जनतेची हिंदू-मुस्लिम अशी विभागणी करायला सुरुवात केली. त्यातूनच मुस्लिमांना झुकते माप देणे, मुस्लिम राजकीय नेतृत्वाला पद्धतशीरपणे पुढे आणणे हे ब्रिटिशांचे सत्ता टिकविण्याचे सूत्र होते. हिंदू आणि मुस्लिम विरुद्ध ब्रिटीश हे समीकरण बदलून ब्रिटीश आणि मुस्लिम विरुद्ध हिंदू असे करणे हा त्यामागील प्रमुख उद्देश होता. साधारणत: विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून कॉंग्रेसच्या नेत्यांना हे समीकरण बदलण्याची गरज वाटू लागली. त्यातूनच पुढे ब्रिटीश तुम्हाला जे देतील त्यापेक्षा अधिक आम्ही देऊ ही कॉंग्रेसच्या राजकारणाची दिशा राहिली. १९१५ मध्ये कॉंग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात लोकमान्य टिळकांच्या अध्यक्षतेखाली झालेला लखनौ करार ही त्याचीच परिणती होय. ह्या सर्व घडामोडी चालू असतांना गांधींचा भारतीय राजकारणात धड प्रवेश देखील झाला नव्हता. गांधींनी टिळकांच्या आणखी दोन पावले पुढे जाऊन मुस्लिमांच्या खिलाफत आंदोलनाचे नेतृत्वच खेचून आणले. ह्यात मानवता कमी आणि राजकीय शहाणपणाचा भाग अधिक होता. गांधींच्या मुस्लिम अनुनयाची ही पार्श्वभूमी आहे. दुसरे महायुद्ध सुरु होणार हे साधारणत: १९३७ सालीच कॉंग्रेसच्या नेतृत्वाला कळून चुकले होते. त्यात अमेरिका युद्धात उतरली की जर्मनी-जपानचा पराभव निश्चित होणार हे कॉंग्रेसच्या नेतृत्वाचे अनुमान होते. शेवटी महायुद्ध हे केवळ सैन्याच्या बळावर लढले जात नाही. त्यापाठी युद्धसामुग्रीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणे आणि प्रचंड मोठी प्रचार यंत्रणा राबवणे ह्या गोष्टींचा भक्कम आधार असावा लागतो. अमेरिका ब्रिटीशांच्या बाजूनेच युद्धात उतरणार हे स्पष्ट होते. ह्यामुळेच दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांना पाठींबा जाहीर करणे कॉंग्रेसच्या नेतृत्वाला भाग होते. अर्थातच त्या बदल्यात स्वातंत्र्य जाहीर करणे ही अट कॉंग्रेसने ब्रिटिशांना घातली. १९४२ मधे क्रिप्स मिशनच्या अपयशानंतर (ज्याचे वर्णन गांधी-नेहरू यांनी "पोस्ट डेटेड चेक" असे केले.) "चले जाव" आंदोलन कॉंग्रेसने सुरु केले. हे आंदोलन जरी अपयशी ठरले तरी कॉंग्रेसच्या नेत्यांच्या इशाऱ्यावर देशात आणीबाणीची परिस्थिती निर्माण होऊ शकते हे ब्रिटीशांच्या लक्षात आले. केवळ मुस्लिम लीगला हाताशी धरून कॉंग्रेसच्या तोंडाला पाने पुसता येणार नाहीत हे ब्रिटिशांना त्या आंदोलनातून जाणवले. शेवटी फाळणी झाली. पण ती मुस्लिम लीग आणि ब्रिटीश ह्यांना हवी तशी न होता कॉंग्रेसला हवी तशी करावी लागली. "सुईच्या अग्रावर मावेल इतकी भूमीही देणार नाही" ह्या दुर्योधनाच्या अट्टाहासापायी हस्तिनापूरचे काय झाले हे सर्वांना माहित आहेच. "राष्ट्र किंवा भूमी" ह्यातून एकाची निवड करायची वेळ आली तर राष्ट्र टिकवणे हे अधिक महत्वाचे असते हे शिवाजी महाराजांना १६६५ मध्ये कळले होते, आंबेडकरांना देखील १९४० मधेच कळले होते. एकविसाव्या शतकातील पिढ्यांना ते कळावे एवढीच माफक अपेक्षा आहे. धन्यवाद.

In reply to by अवतार

अर्धवटराव Fri, 10/03/2014 - 04:07
गांधीजींच्या प्रत्येक कृतीमागे राजकीय शहाणपण होते हे निश्चित. मराठेशाही बुडाली आणि राज्यकर्ते वि. राज्यकर्ते असा संघर्ष ब्रिटीशांविरुद्ध पेटण्याची शक्यता निमाली. त्यानंतर पब्लीक वि. ब्रिटीश अशाच संघर्षाची शक्यता होती व त्यात धार्मीक रंग येणे स्वाभावीक होते. ब्रिटीशांनी याच पद्धतीने मध्यपूर्वेत बरच राजकारण केलें होतं. काहि बाबतीत मतभेद. दुसर्‍या महायुद्धाची कल्पना प्रत्यक्ष इंग्लंडला देखील नव्हती, हिटलरला देखील नव्हती. अमेरीका युद्धात उतरेल कि नाहि याची शाश्वती बराच काळ खुद्द चर्चील साहेबांना नव्हती. . काँग्रेसला तशी असण्याची शक्यता फार कमि आहे. जर्मनीने रशीयावर आक्रमण करण्यापुर्वी महायुद्धात जर्मनीचा पराभव होईल असे कुणालाच वाटत नव्हते. फ्रान्स पडल्यानंतर युद्ध फार काळ चालायची देखील आशा नव्हती. मांडवलीचा स्कोप खुप वेळपर्यंत होता. त्यामुळे युद्धात ब्रिटीशांचा विजय हा केवळ छाप-काट्याचा विषय होता, ते कन्फर्म नव्हतं. काँग्रेसचं "चले जाव" वगैरे सुभाष बाबुंच्या पराक्रमाला घाबरुन सुरु झालं. सुभाष बाबु जर खरच दिल्लीला धडकले असते तर संपूर्ण देश, काँग्रेस सहीत, त्यांच्या मागे गेला असता व नेहरुंना हात चोळणे आणि गांधीजींना आशिर्वाद देण्यापलिकडे काहिच ऑप्शन नसता. कदाचीत त्यानंतर फाळणी देखील झाली नसती, आणि झाली असती तरी गांधीजी+नेहरु कंपू+मुस्लीम लीग विरुद्ध सुभाष कंपू अशा संघर्षातुन झाली असती. स्वातंत्र्य लढ्याला हे हिंसक-अहिंसकतेचं माप का लावतात हेच मला कळत नाहि. हिंसा या शब्दाऐवजी "सशस्त्र सैन्य पद्धतीने" असं म्हणायला हवं. ते प्रॅक्टीकली शक्य होतं काय? तर उत्तर आहे "होय". किंबहुना तेच प्रॅक्टीकली शक्य होतं आणि तोच एकमेव ऑप्शन होता. अन्यथा आज जे अण्णा हजारेंचं झालं तेच ब्रिटीशांनी गांधीजींचं केलं असतं आणि गांधीजींच्या पश्चात त्यांच्या तोलामोलाचा कुणीच नेता नसल्यामुळे त्यामार्गाची स्वातंत्र्याची चळवळ केवळ औपचारीकता म्हणुन उरली असती. गांधीजींनी, काँग्रेसने संपूर्ण भारताला स्वातंत्र्य नावाची काहि चिजवस्तु असते व त्याकरता आपल्या शत्रुशी म्हणजेच ब्रिटीशांशी संघर्ष करायला लागणार हे पटवुन दिलं (कि ब्रिटीशांनीच ते तसं पटवु दिलं ??? ). तो गोवर्धन उचलायला प्रत्येकाने आपापली काठी लावण्याची प्रेरणा गांधीजींनीच मजबुत केली. पण अ‍ॅक्च्युअल गोवर्धन त्या काठ्यांनी उचललेला गेला नाहि. त्या संपूर्ण चित्रातुन हवेत विरुन जावा तसा खरा श्रीकृष्ण गायब झाला/करण्यात आला. असो.

In reply to by अर्धवटराव

अवतार Fri, 10/03/2014 - 15:58
सुभाषबाबूंचे महत्व अमान्य करण्याचा नतद्रष्टपणा मी करणार नाही. नेहरू की सुभाष यापैकी मला सुभाषच अधिक आवडतात. पण प्रत्यक्षात घडलेल्या ऐतिहासिक घटना हे वारंवार सिध्द करतात की तत्कालीन आंतरराष्ट्रीय राजकारणाचे विश्लेषण करण्यात नेहरू हे सुभाष यांच्यापेक्षा अधिक यशस्वी झाले. अर्थात दुसऱ्या महायुद्धाची कल्पना सुभाषना देखील आली होतीच. म्हणूनच त्याच वेळी ब्रिटिशांना कोंडीत पकडण्याची विनंती ते वारंवार गांधीजींना करत होते. दुसऱ्या महायुद्धाची कल्पना इंग्लंडच्या नेतृत्वाला फार पूर्वीच आलेली होती. हिटलरने चेकोस्लोव्हाकिया गिळून टाकतांना इंग्लंड आणि फ्रांस यांनी चेकोस्लोव्हाकियाला दिलेले मदतीचे वचन सोयीस्करपणे विसरणे आणि जर्मनीच्या विरोधात दुसरी आघाडी उघडा या स्टालिनच्या हाकेला वाटण्याच्या अक्षता लावणे ह्या गोष्टी योगायोगाने घडलेल्या नाहीत. त्याचमुळे स्टालिनला अखेर जर्मनीबरोबर २३ ऑगस्ट १९३९ मध्ये अनाक्रमण करार करावा लागला. १० मार्च १९३९ ला स्टालिनचे भाषण झाले. त्यात त्याने पुढील उद्गार काढले आहेत.
पश्चिमेकडील दोस्त हे जर्मनीला जास्त जास्त पूर्वेकडे ढकलत आहेत. काही होत नाही, कर आक्रमण असे सांगत त्यांनी जर्मनीला सांगितलेले दिसते की काही करून बोल्शेविकांशी युद्ध सुरु कर.
३ सप्टेंबर १९३९ पासून इंग्लंड आणि फ्रांस ह्यांनी जर्मनी विरोधात युद्धाची घोषणा केली खरी. पण पुढच्या पंधरा दिवसांत एक गोळीही जर्मनी विरोधात झाडली गेली नाही. अखेर ह्या युद्धाला बैठे युद्ध असे म्हटले जाऊ लागले. पोलंड पडल्यानंतर ३ आठवड्यांनी इंग्लंडचे ४ डिव्हिजन सैन्य फ्रांस मध्ये आले होते. पुढचा दीड महिना हे सैन्य एकाच जागी बसून होते. ९ डिसेंबरला या सैन्यातील एक कोर्पोरल टेहळणी करतांना जर्मनांनी मारला. हाच फ्रान्समध्ये मरण पावलेला पहिला ब्रिटीश सैनिक! २६ डिव्हिजन जर्मन सैन्याविरुद्ध ११० डिव्हिजन सैन्य दोस्त राष्ट्रे जर्मनीच्या पिछाडीवर धाडू शकली असती तर जर्मनीचा युद्ध बनाव त्यावेळीच कोसळला असता, अशी कबुली खुद्द जर्मन अधिकाऱ्यांनी न्युरेम्बर्ग खटल्यात दिली होती.
सुभाष बाबु जर खरच दिल्लीला धडकले असते तर संपूर्ण देश, काँग्रेस सहीत, त्यांच्या मागे गेला असता.
हाच पराक्रम सुभाष हे कॉंग्रेसमध्ये असतांना देखील करू शकत होते. गांधींच्या विरोधात कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक त्यांनी जिंकली होती. पण तसे घडलेले नाही. गांधी की सुभाष असा प्रश्न आला तेव्हा बहुसंख्य कॉंग्रेस गांधींच्या मागे होती. नेहरू देखील गांधींच्या प्रत्येक निर्णयाशी सहमत नव्हते. पण गांधींच्या विरोधी जाऊन स्वत:चे राजकीय अस्तित्व टिकवता येणे कठीण आहे हे त्यांना कळले होते. सशत्र सैन्य १८५७ च्या उठावात देखील उपलब्ध होते. कानपूर येथे नाना साहेब यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटीश स्त्रिया-मुलांची निर्घृण कत्तल देखील झाली होती.पण त्यानंतरही ब्रिटीश साम्राज्य ढासळले नाही. कारण ब्रिटीश साम्राज्यवादाविरोधात लढण्याची गरज आहे हे इथल्या सामान्य जनतेपुढे मांडण्यातच आले नाही. ते सर्वप्रथम गांधींनी मांडले. कॉंग्रेस ही केवळ दिल्ली आणि मुंबई येथील अधिवेशन इतकीच मर्यादित न राहता भारताच्या खेड्यापाड्यांत गांधीमुळेच पोचली. भारत हा सात लाख खेड्यांचा देश आहे आणि त्या खेड्यांतील जनतेचा राजकारणात सक्रिय सहभाग असणे आवश्यक आहे, हे सूत्र ओळखून ते पक्के धरून ठेवणे हे गांधीजींच्या राजकारणाचे मर्म आहे. अधिवेशन आणि वाटाघाटी यांच्या पुढे जाऊन स्वातंत्र्याची चळवळ निर्माण होणे आवश्यक आहे देशभरातील जनतेला संघटित करून एकाच वेळी रस्त्यावर उतरवणे गरजेचे आहे हे गांधींनी प्रथम जाणले ह्यातच त्यांचे महात्म्य आहे. समजा गांधी नसते तर जनतेच्या असंतोषाचे प्रकटन करणारे इतर कोणीतरी नेतृत्व पुढे आले असतेच. ते नेतृत्व वैयक्तिक दृष्ट्या गांधींच्या तोलामोलाचे असले असते का हा प्रश्न निराळा. शेवटी गांधी हा एक माणूसच होता आणि त्या माणसाच्या चुका देखील स्पष्टपणे मांडल्याच पाहिजेत. पण त्यादेखील वास्तवाच्या आधारावरच मांडायला हव्यात. गांधींचे राजकीय आडाखे अनेकदा चुकलेले आहेत. पण सामान्य जनतेला वारंवार प्रत्यक्ष कृतीचा कार्यक्रम देऊन गांधींनी जितक्या वेळा रस्त्यावर उतरवले त्याच्या एक दशांशही जागृती इतर कोणतेही नेतृत्व करू शकले नाही हे देखील वास्तव आहे.

In reply to by अवतार

अर्धवटराव Fri, 10/03/2014 - 19:18
एक 'बैठे' युद्ध, युरोपीय युद्ध, ते ही जर्मन वि. रशीया असं होणार याची कल्पना सर्वांना येत होती. पण ब्रिटीशांची प्रचंड कोंडी होणारं महायुद्ध होणार असं कुणालाच वाटलं नव्हतं. तेजोंच्या हाती जपानी सत्ता येत पावेतो अमेरीका देखील या युद्धात उतरेल असं कोणाला वाटत नव्हतं. काँग्रेसचं तत्कालीन आंतरराष्ट्रीय राजकारण युरोपात भारताविषयी सहानुभूती निर्माण करण्या इतपतच होतं, इंग्लंडची कोंडी करणारं नव्हे. त्यामुळे नेहरुंचं याबाबतीतलं कर्तुत्व काय हे मला तरी माहित नाहि. आंतरराष्ट्रीय पातळीवर इंग्लंडची कोंडी करणारा प्रॅक्टीकल डाव सुभाषबाबु खेळले, नेहरु नाहि. स्वातंत्र्य मिळाल्यावर देखील नेहरुंनी काय मोठी आंतरराष्ट्रीय समजदारी दाखवली मला माहित नाहि. सुभाषबाबु भारताबाहेर पडायचं एक कारण हे ही होतं कि त्यांना अपेक्षीत असं भव्य समर भारतात उभं राहु शकत नव्हतं ... त्याला गांधीजींची संमतीच नव्हती. पुढे कधितरी असं भव्य आंदोलन होईल याची खात्री सुभाषबाबुंना असती तर ते कदाचीत भारतातच राहाते. सुभाषबाबुंनी काँग्रेस गांधीजींच्या पंखाखालुन पुष्कळसं मोकळं केलं होतं. पुढे इंग्रजांविरुद्ध सुभाषबाबु निर्णायक लढा देताना जनता गांधीजींप्रमाणे हायबर्नेट राहाण्यापेक्षा सुभाषबाबुंच्या मागे उभी राहिली असती. गांधींचा आदर, प्रभाव कमि होता म्हणुन नाहि, पण जनता आंदोलनाला तयार होतच होती. १८५७ आणि महायुद्धाची सशस्त्र क्रांतीची तुलना करताच येत नाहि. २०व्या शतकात लढा देणारी जनता होती सांस्थानीक नव्हे. गांधीजींनी सामान्य जनतेला स्वातंत्र्य लढ्याला उभं केलं हे निर्वीवाद. गांधीजींचा मार्ग अत्यंत माणुसकीचा होता/आहे हे ही खरं. पण तो मार्ग एखाद्या देशाची घडी बसवणारा मार्ग आहे, स्वातंत्र्यप्राप्तीचा नाहि... इंग्रजांसारख्या कावेबाज राष्ट्राशी लढताना तर अजीबात नाहि.

In reply to by अर्धवटराव

बाबा पाटील Fri, 10/03/2014 - 19:39
इंग्रजांनी भारतीय उद्योग धंद्याची पुर्ण वाट लावली होती, शस्त्र परवाना कायदा होता, युद्धे सक्षम शस्त्रांवर लढली जातात्,दगड गोट्यांनी नाही. भारतीयांच्या मालकीचा कुठला शस्त्र कारखाणा होया,कुठले हवाइदळ ,पायदळ अथवा आरमार होते, युद्ध खेळण्याकरिता कुठली साधन सामुग्री होती. च्यायला वस्तुस्थितीचा थोडा तरी विचार करा राव,जपान पडल आणी आझाद हिंद फौज पराभुत झाली,युद्ध खेळायला अर्थव्यवस्था मजबुत लागते, इंग्रजांच्या विरोधात भारतीयांची काय अर्थव्यवस्था होती, १५० वर्षाच्या कालखंडात इंग्रजांनी तुम्हाला काय शिल्लक ठेवले होते.अबे स्वतंत्र झाल्यावर पहिला प्रश्न उपासमारीचा होता की या कोट्यावधींच्या तोंडात घास कुठुन भरवायचा. साधा हिशोब सांगा तुम्ही नोकरी करता आहात्,तुमची चिल्ली पिली तुमच्यावरच अवलंबुन आहेत आणी अचानक तुमची नोकरी गेली,त्याच वेळी तुमची कोनाबरोबर तरी जागेच्या वादावरुन जोरदार भांडण झाल तर तुम्ही काय कराल ? तुमची जागा त्याने बळकावलीय्,तुम्ही स्वबळाचा वापर करणार पण त्या साठीच पैस्याच पाठबळ कुठुन आणाल. उपाशी पोटी राहुन युद्ध जिंकता येत नाही.आणी शस्त्र बळाखेरीज तर कधीच नाही,त्यावेळी चर्चा आणी अहिंसा हे दोनच पर्याय शिल्लक होते आणी गांधी बाबाने ते अमलात आणले.

In reply to by बाबा पाटील

अर्धवटराव Fri, 10/03/2014 - 20:22
भारत वि. इंग्रज लढा प्रॅक्टीकली अशक्य तरी (वाटत) होता. गांधीमार्गाने मुद्दलात 'स्वातंत्र्य लढा' हि शक्यताच निकालात निघते. जगाच्या पाठीवर जि काहि स्वातंत्र्ययुद्धे झाली त्यांची मूळ परिस्थिती भारतासारखीच होती. त्यातुन मार्ग काढुन कढा उभारणे हे त्या त्या एक्सपर्ट लोकांचं काम आहे. आपल्याला त्यात विजयाच्या शक्यता न दिसणं स्वाभावीक आहे. आपल्याला मंगळयानाचं प्लॅनींग देखील अशक्य वाटेल... कारण सरळ आहे... इट्स नॉट अवर डोमेन. गांधीबाबाने उपलब्ध परिस्थीत शक्य तो मार्ग पत्करला यात त्यांचं शहाणपण निर्वीवाद आहे. पण त्यामार्गाने स्वातंत्र्य मिळालं, मिळु शकलं असतं... आय डोण्ट थींक सो. आणि त्यामुळे गांधीजींची महानता तिळभर तरी कमि होते... आय डोण्ट थिंक सो दॅट इदर.

In reply to by अर्धवटराव

अवतार Fri, 10/03/2014 - 22:55
प्रश्न निव्वळ गांधींच्या महानतेचा नसून गांधी आणि कॉंग्रेस नेतृत्वाने जे काही केले ते का केले हे समजून घेण्याचा आहे. १९४२ च्या चले जाव आंदोलनात कॉंग्रेसच्या सर्व नेत्यांना ब्रिटिशांनी तुरुंगात टाकले. त्यानंतर देखील जनतेने काही काळ जमेल त्या मार्गाने हे आंदोलन चालूच ठेवले होते. महात्मा गांधी की जय ह्या घोषणा देऊन हातबॉम्ब फेकले जात होते. ब्रिटीशांच्या लाठीमार आणि गोळीबाराला न जुमानता जनता रस्त्यावर उतरू लागली होती. ही परिस्थिती अचानक निर्माण होत नाही. त्यासाठी पद्धतशीर मार्गाने वर्षानुवर्षे जनतेला लढ्यासाठी तयार करावे लागते. गांधींचा उदय झाला तेव्हा शस्त्रे तर सोडाच जनता ब्रिटीश राज्याला उघड विरोध करायलाही तयार नव्हती. सशस्त्र क्रांतीत यशाची आठ आणे खात्री असेल तर उरलेल्या आठ आण्यांची शक्यता पडताळून पाहता येते हे टिळकांचे शब्द आहेत. ही खात्री त्यांना वाटत नव्हती म्हणूनच त्यांनी तो मार्ग टाळला. ही आठ आणे खात्री निर्माण करण्याचे श्रेय गांधींचे आहे. ही बदलती राजकीय परिस्थिती ओळखण्याएवढे ब्रिटीश चाणाक्ष होते. तुटेपर्यंत ताणून धरण्यापेक्षा आधीच सन्मानजनक माघार घेणे हे त्यांच्या हिताचे होते. शिवाय माघार घेताना भारताची स्वत:च्या भू-राजकीय धोरणाप्रमाणे फाळणी करणे हे देखील त्यांचे लक्ष्य होते. सशस्त्र संघर्षातून ना कॉंग्रेस, ना ब्रिटीश, ना मुस्लिम लीगचा फायदा होता. कारण त्या संघर्षाचे परिणाम नेमके काय होतील हे कोणीच सांगू शकत नव्हते. म्हणूनच या सर्वच पक्षांना इप्सित ध्येय गाठण्यासाठी स्थिर आणि शांततेच्या मार्गानेच सत्तांतर अपेक्षित होते. मात्र शांततेच्या मार्गाने हवे तसे पाकिस्तान मिळणार नाही हे लक्षात आल्यावरच मुस्लिम बहुल भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर दंगली सुरु झाल्या. तरीही दोन तुकड्यांत विभागलेले पाकिस्तानच त्यांना स्वीकारावे लागले. हिंसा किंवा अहिंसा हा दुय्यम प्रश्न होता. त्या लढ्यातून कोणाच्या हाती काय लागणार हा खरा प्रश्न होता. स्वातंत्र्य नेमके कशासाठी मिळवायचे हा महत्वाचा प्रश्न होता. भारत हे पाच हजार वर्षांची परंपरा असलेले राष्ट्र आहे हे वाक्य नेहरूंनी वापरले आहे. हे राष्ट्र टिकवण्यासाठी जे काही करावे लागले ते कॉंग्रेसच्या नेतृत्वाने केले. आझाद हिंद सेना आणि सुभाष ह्यांचे शौर्य आणि त्याग वादातीत आहेत. पण ह्या सर्व राजकीय वास्तवाच्या आधारावर त्यांची वाटचाल चालू होती असे म्हणणे धाडसाचे ठरेल. गांधी आणि कॉंग्रेस नेतृत्वाचे श्रेय मान्य करणे हे त्यांच्या व्यक्तीपूजेसाठी नसून त्या काळातील राजकीय वास्तव समजून घेण्यासाठी महत्वाचे आहे. एनीवे, लेट्स अग्री टू डिसअग्री !

In reply to by अवतार

अर्धवटराव Sat, 10/04/2014 - 00:44
१९४२ च्या चले जाव आंदोलनात ... गांधींचा उदय झाला तेव्हा शस्त्रे तर सोडाच जनता ब्रिटीश राज्याला उघड विरोध करायलाही तयार नव्हती.
१९४२ चं आंदोलन गांधीजींची/काँग्रेसची स्वातंत्र्यप्राप्तीप्रित्यर्थ फायनल अशी स्वयंभू कृती होती का हाच मला पहिला डाऊट आहे. आणि तसं ते असेल तरी गांधी मार्गाच्या इतर आंदोलनांप्रमाणे त्याचीही परिणीती पेल्यातलं वादळ शमण्यात झाली. त्यापेक्षा वेगळं काहि घडणं अशक्यच होतं. गांधींनी आणि काँग्रेसने ते आंदोलन सुरु केलं ते इंग्रजांचा युद्धात अडकलेला पाय आणि सुभाषबाबुंना मिळणारा प्रचंड पाठिंबा या पार्श्वभूमीवर.
सशस्त्र क्रांतीत यशाची आठ आणे खात्री असेल तर उरलेल्या आठ आण्यांची शक्यता पडताळून पाहता येते हे टिळकांचे शब्द आहेत.
अर्थात. भारताची स्वतःची अशी सशस्त्र क्रांती सुभाषबाबुंच्या काळी देखील प्रॅक्टीकली फार अवघड होती (प्राप्त साधनांचा धांडोळा घेतल्यास जवळपास अशक्य) मग टिळकांच्या काळची तर बातच सोडा. स्वतः सुभाषबाबु देखील गांधीमार्गाचेच मरेपर्यंत अनुकरण करायला सज्ज होते. महायुद्ध झाले नसते तर सुभाषबाबुंनी स्वबळावर (थँक्स टु युती अ‍ॅण्ड आघाडी फॉर धीस वंडरफुल शब्द) सशस्त्र क्रांतीचा मार्ग पत्करला असता असं खात्रीने म्हणता येत नाहि.
ही आठ आणे खात्री निर्माण करण्याचे श्रेय गांधींचे आहे. ही बदलती राजकीय परिस्थिती ओळखण्याएवढे ब्रिटीश चाणाक्ष होते. तुटेपर्यंत ताणून धरण्यापेक्षा आधीच सन्मानजनक माघार घेणे हे त्यांच्या हिताचे होते.
गांधीजींनी हि आठ आणे खात्री निर्माण केली हे निर्वीवाद. पण त्याचं श्रेय जातं महायुद्धाला. अन्यथा पुढील ५०-७५ वर्षं इंग्रज जागचा हालला नसता. या ५० वर्षात नॉर्थ इस्ट, द्रवीड, हैद्राबाद (ते तसंही "भारतात" नव्हतच), अवध, काश्मीर, पाकिस्तान (पूर्व-पश्चिम) कदाचीत पंजाब देखील, आणि उर्वरीत असा भारताचा राजकीय नकाशा तयार झाला असता... अगदी सांसदीय मार्गाने. तोपर्यंत गांधी अगोदरच निजधामाला गेलेले असते व दुसरा गांधी निर्माण व्हायचे चान्सेस फार म्हणजे फारच कमि होते. गांधींच्या कुठल्याच अनुयायात साबरमती किंवा सेवाग्राम पिठाची जबाबदारी घेण्याचं कौशल्य नव्हतं. त्यांचे वन ऑफ द सर्वोत्तम शिष्य जे सुभाषबाबु, परिस्थिती येताच गांधी मार्गाला त्यागायला तयार होते मग इतरांच्या मानसीक घडणीची काय कथा.
त्या लढ्यातून कोणाच्या हाती काय लागणार हा खरा प्रश्न होता. स्वातंत्र्य नेमके कशासाठी मिळवायचे हा महत्वाचा प्रश्न होता. भारत हे पाच हजार वर्षांची परंपरा असलेले राष्ट्र आहे हे वाक्य नेहरूंनी वापरले आहे. हे राष्ट्र टिकवण्यासाठी जे काही करावे लागले ते कॉंग्रेसच्या नेतृत्वाने केले.
काँग्रेसने डेफीनेटली जे करायचं ते केलच. पण काँग्रेस म्हणजे गांधीमार्ग नव्हे. जो मार्ग सुभाषबाबुंनी पत्करला, पुरेशी शक्यता जाणवताच तोच मार्ग काँग्रेसने पत्करला असता. देशकारणाचे जे मोस्ट इंपोर्ट्ण्ट घटक, संसद-न्यायव्यवस्था-नागरी प्रशासन-पोलीस-सैन्य, त्यातल्या सांसदीय घटकाची पायाभरणी काँग्रेसने केलीच. व मार्ग कुठलाही असो, तशी पायाभरणी करावीच लागणार होती. नो एस्केप. सशस्त्र क्रांतीनंतर सुभाषबाबुंना देखील असलीच व्यवस्था अपेक्षीत होती.
आझाद हिंद सेना आणि सुभाष ह्यांचे शौर्य आणि त्याग वादातीत आहेत. पण ह्या सर्व राजकीय वास्तवाच्या आधारावर त्यांची वाटचाल चालू होती असे म्हणणे धाडसाचे ठरेल.
तत्कालीन परिस्थीती लक्षात घेता सुभाषबाबुंची वाटचाल गांधीजी आणि कंपूपेक्षा जास्त प्रॅक्टीकल होती हा माझा कयास. किंबहुना कुणी अशी कॉन्स्पीरसी थेअरी काढली कि सुभाषबाबुंनी बाहेरुन सैन्य आणावे व गांधीजींनी आतुन आंदोलन करावे असाच प्लॅन होता, तर मला त्यात फार हास्यास्पद काहि वाटणार नाहि. महायुद्ध होऊन इंग्रज कमजोर झाले नसते आणि तरी ४०च्या दशकात गांधीमार्गाचे पुनर्संपादन झाले नसते तर ट्रॅडीशनल गांधीमार्ग स्वातंत्र्याचे आंदोलन पुढे नेण्यात असमर्थ होता असं मला वाटते.
गांधी आणि कॉंग्रेस नेतृत्वाचे श्रेय मान्य करणे हे त्यांच्या व्यक्तीपूजेसाठी नसून त्या काळातील राजकीय वास्तव समजून घेण्यासाठी महत्वाचे आहे.
सेम फॉर सुभाषबाबु. असो.

In reply to by अवतार

बाबा पाटील Fri, 10/03/2014 - 12:06
१९१५ मध्ये कॉंग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात लोकमान्य टिळकांच्या अध्यक्षतेखाली झालेला लखनौ करार ही त्याचीच परिणती होय. आजच्या सगळ्या गोंधळाचे मुळ याच तर ठिकाणी आहे.त्याचबरोब १९०६ लॉर्ड मिंटोने मुस्लिम लिगला दिलेले प्रोत्साहन किंवा त्याच्यात पुढाकाराने तिची स्थापना झाली व इथुनच भारतीय समाजात प्रचंड दरी पडु लागली.दुर्देवान टिळकांसह तत्कालिन पुढार्‍यांना ही परिस्थिती हाताळता आली नाही असेच म्हणावे लागेल.गांधी बाबा तर त्यानंतर फार उशिरा जवळ जवळ १५ वर्षांनी राष्ट्रिय राजकारणात आले.तोपर्यंत समाज प्रग्लभ नव्हाता,कारण मुंबई प्रांत ,बंगाल ,पंजाब व काही प्रमाणात मद्रास प्रांत सोडला तर राजकिय नेतृत्व फारसे पुढे आले नाही.किंवा चळवळ ही फारसी पुढे नव्हती. बुद्धीवादी सोडले तर तळागाळातला समाज देखिल फारसा पुढे नव्हता.गांधींनी सर्व प्रथम हा दिन दलित वर्ग,स्त्रिया शेतकरी कामगार चळवळित आणले,हिच तर त्यांची महती,हा एकुनात भित्रा समाज फक्त अहिंसेच्याच धोरणाने पुढे येवु शकत होता,सशस्त्र क्रांतीने नाही. क्रांतीकारक चळवळ सुद्धा कुठे मागे न्हवती पण १०३० नंतर त्यांचे नेतृत्व संपले,तसेल समाजातुन त्याला सक्रिय पाठिंबा बिल्कुल मिळाला नाही.लोक काँग्रेसच्या मागे उभे राहिले.सुभाष बाबुंना फारच मर्यादित यश मिळाले.इथे एक गोष्ट लक्षात घ्या, नेताजींची आझाद हिंद फौज ही ब्रिटिश सैन्यातुन फुटुन बाहेर पडलेली फौज नव्हती,तर जपान्यांना शरण आलेल्या सैन्याची रासबिहारींनी तयार केलेले सैन्य संघटन होते,ज्याचे नेतृत्व सुभाषबाबुंनी स्विकारले,त्याने जनतेत आत्मविष्वास नक्की आला पण हे सैन्य अपयशी ठरले. मात्र चलेजाव चळवळीचा परिणामस्वरुप जेंव्हा तलवार युद्धनौकेवर बंड झाले,व सरहद्द प्रांतात ब्रिटीश-भारतिय सैन्याने आंदोलकांवर गोळिबार करण्यास नकार दिला तेंव्हा मात्र ब्रिटिशांची पायाखालची वाळु सरकली होती. हा सर्व परिणाम १८८५ पासुन १९४२ पर्यंत सुरु असलेल्या चळवळिंचा होता.यात १९२० नंतर गांधीयुगाने सर्वात प्रखर संघर्ष केला होता. दोन चार अधिकार्‍यांना ठार करुन स्वातंत्र मिळत नाही हो,नाहीतर पंजाब/कश्मिर्/आसाम/नागालँड कधीच स्वतंत्र झाले असते,स्वातंत्र्याकरिता लोकचळवळ बनावी लागते आणी ती गांधीबाबाच्या नेतॄत्वात भारतात झाली.या एकाच कारणास्त्व त्यांना श्रेय नक्कीच द्यायला हवे.

In reply to by बाबा पाटील

काउबॉय Fri, 10/03/2014 - 14:43
तेथील स्वच्छता ही तेथे राहणाऱ्या लोकांमुळे आहे, त्यांच्या सवयीमुळे आहे
क्या बात...! गांधिना स्वातंत्र्याचे क्रेडिट न देणे हे अजूनही गुलामी मानसिकता आणि लोकशाही प्रणालीवर अविश्वास असण्याचे द्योतक आहे हे शिरोमनींना क्ळेल तो सुदिन. आले मोठे अहिंसेचे टीकाकार. डॉक तुम्ही अगदी मर्मावर बोट ठेवलय. विषयाला हात घातल्याबद्दल आपले मन:पूर्वक अभिनंदन.

In reply to by काउबॉय

काउबॉय Fri, 10/03/2014 - 14:46
दोन चार अधिकार्यांना ठार करुन स्वातंत्र मिळत नाही हो,नाहीतर पंजाब/कश्मिर्/आसाम/नागालँड कधीच स्वतंत्र झाले असते,स्वातंत्र्याकरिता लोकचळवळ बनावी लागते आणी ती गांधीबाबाच्या नेतॄत्वात भारतात झाली.
क्या बात...! गांधिना स्वातंत्र्याचे क्रेडिट न देणे हे अजूनही गुलामी मानसिकता आणि लोकशाही प्रणालीवर अविश्वास असण्याचे द्योतक आहे हे शिरोमनींना क्ळेल तो सुदिन. आले मोठे अहिंसेचे टीकाकार. डॉक तुम्ही अगदी मर्मावर बोट ठेवलय. विषयाला हात घातल्याबद्दल आपले मन:पूर्वक अभिनंदन.

In reply to by अवतार

@. एकविसाव्या शतकातील पिढ्यांना ते कळावे एवढीच माफक अपेक्षा आहे.>>> प्रचंड टाळ्या !!!! अवतार बाबा की जय!!!

काळा पहाड Fri, 10/03/2014 - 01:30
माझ्या ६ वर्षाच्या लेकीला कळत की बापाचे पिस्तुल हातात घेताना ते पुर्ण रिकामे आहे की नाही हे विचारुनच त्याला हात लावावा
हे खरंच असेल तर काळजी वाटते. जर चुकून तुम्ही तिला सांगितलं की ते रिकामं आहे आणि तसं ते नसेल तर? लहान मुलांना अशा गोष्टी चुकूनही हाताला लागू देवू नयेत ही कळकळीची विनंती. तुम्ही तर हे तुमच्या संमतीनं होतंय असं सांगताय. दुसरं असं की शस्त्र हाताळायला लायसन्सरुपी कायदा आहे असा माझा समज आहे. तसं असेल तर गांधीजींच्या धाग्यावरच तुम्ही कायदा मोडल्याचं कबूल करताय. बाकी काहीही असो, तुमची मुलगी ही तुमची जबाबदारी असल्यानं तुम्ही या सूचनेचा गांभीर्यानं विचार करावा ही पुन्हा विनंती.
माझ्या वैद्यकिय व्यवसायाचा माझ्या इतर गोष्टींशी काही संबध नाही
रेवती ताईंच्या मुद्द्याशी मी सहमत आहे. डॉक्टर हा पेशा शस्त्र धारण न करणार्‍यांचा आहे. तुमची भाषा आणि तुमचं वर्तन त्या पेशाशी साजेसं हवं. पेशंट हा डॉक्टरला देव समजतो (निदान माझी तरी डॉक्टरांकडे जाताना तशीच भावना असते). बाकी तुमची मर्जी.

In reply to by काळा पहाड

बाबा पाटील Fri, 10/03/2014 - 12:35
डॉक्टरने फक्त वैद्यकिच करावी असा काही नियम आहे का ? माझी पुण्यापासुन ४० किमीवर शेती आहे, त्यामुळे मला बर्‍याचदा रात्री १० नंतर ओपिडी संपली की गावी जावे लागते, आजपर्यंत दोन वेळा तरी एका नाल्याजवळ माझी गाडी दगड टाकुन अडवण्याचा प्रयत्न झाला होता नशिबाने दोन्ही वेळेस माझ्याकडे बोलेरो असल्याने सरळ चारीत गाडी घालुन मला निघुन जाता आले,आमच्या भागातले चोर्/ दरोडेखोर काही गांधीवादी नाहित ते प्रथम दगडांचा मारा करतात नंतर जवळ आले की कटावण्या आणी तलावारींचे वार होतात्,इतक्या लवकर मरायची माझी तरी मानसिक तयारी नाही.पोलिस काही प्रत्येक ठिकाणी पोहचु शकत नाहीत,शेतघरही गावापासुन अडिच ते तिन किमी आहे,अशा वेळेस संरक्षणास दुसरा काहीही उपाय नसतो,आमच्या रानातल्या वस्ती च्या आसपास ७/८ घरे आहेत प्रत्येक घरात , दोन तीन कुत्री, व परवानाधारक शस्त्रे आहेत्,उस बागायताचा परिसर असल्याने त्याला काहीही पर्याय नाही. दुसरी गोष्ट माझे इतरही काही व्यवसाय असल्याने बहुतेक मिटिंग अथवा भेट मी रात्री १० नंतर ठेवतो,रात्री घरी पोहचन्याचा वेळ कधीच फिक्स नसतो,त्यामुळे शस्त्र जवळ ठेवण्याशिवाय पर्याय नाही. मी पेशंटशी कसा बोलतो कसा वागतो हे पाहण्यासाठी कृपा करुन तुम्ही माझ्या ओपीडीत भेट द्या,म्हणजे तुमच्या लक्षात येइल. बाकी राहिल माझ्या लेकीच,ते पिल्लु स्टेट लेव्हल कराटे खेळतय्,ती शरिर व मनाने माझ्यापेक्षाही स्थिर आहे,मी जर तिच्या पासुन हे लपवुन ठेवल तर बालस्वभावानुसार ती नक्की ते पाहण्याचा प्रयत्न करनार्,त्यापेक्षा ते तिला हँडल कस करायच ते दाखवुन त्याच धोके समजावलेले कधीही चांगलेच ना.शिवाय ते फेकुन मारल तरी त्यातुन मिस फायर होणार नाही हे माहिती आहे, रेग्युलर शुटर सोडुन ते कुनालाही फायर करन शक्य नाही,त्यासाठी फार सराव लागतो. किंवा दुर्देवाने कधी वेळ आलीच तर ते कस वापराव हे माहिती पाहिजे ना. फुकट शहिद होण्याची मला तरी हौस नाही. आणी असही काही वर्षांनी तिलाच हे सगळे उद्योग पहायचेत्,आत्ता पासुनच तिची मानसिक तयारी झाली तर पुढे अडचन होत नाही,किंवा काही अडत नाही. मी तिला बहुतेक सगळे गड किल्ले फिरुन आणलेत्,शिवाजी आणी कृश्न नुसता भिनलाय तिच्यात, तिच्या प्रत्येक टुर्नामेंटला मी तिच्याबरोबर फिरत असतो.

बाबा पाटील Fri, 10/03/2014 - 12:48
विषय गांधीबाबा आहे,बाबा पाटील नाही माझी एव्हडीच माहिती हवी असेल सगळे येवुन भेटा शेतावर जावु, चार पाच कोंबड्या कापु,दणकुन खा प्या आणी निवांत माझे रामायण एका.

In reply to by मुक्त विहारि

बाबा पाटील Sat, 10/04/2014 - 11:13
अगदी लांब जायचे नसेल तर इथे वाघोली जवळ एक निसर्ग म्हणुन ढाबा आहे , गावरान कोंबडी,रस्सा + सुक्क बरोबर सुकट व ज्वारीची अथवा बाजरीची भाकरी,एक नंबर जेवन असत. कधी बसताय सांगा,कोंबड्या माझ्याकडुन.

In reply to by बाबा पाटील

अर्धवटराव Sat, 10/04/2014 - 23:21
च्यामारी.. उगाच त्या पवित्र अहिंसावादी आत्म्याला धाग्यावर धागे अन् हज्जार बायटी प्रतिसाद देऊन त्रास देण्यापरिस असलं काहि खाय-प्यायचं विंट्रेष्टींग बोलाना राव.

In reply to by अर्धवटराव

मुक्त विहारि Sun, 10/05/2014 - 08:28
कुणीही येवो अन कुणीही जावो, आपले पोट आपल्यालाच भरायचे आहे. असो, कट्ट्यासाठी हार्दिक निमंत्रण.... बाद्वे, इतर मिपाकर गांधीवादावर चर्चा करत असतांना, दुसर्‍या मिपाकरांचा पक्षी-तीर्थ कट्टा ठरला देखील.ह्यालाच म्हणतात खरी मिपाशाही.

प्रभाकर पेठकर Fri, 10/03/2014 - 13:06
बापुने दिलेला अंहिसेच्या मंत्राला प्रत्यक्षातले अहिंसकच जास्त शिव्या घालताना दिसतात, आज जे जे गांधीच्या अंहिसेच्या आंदिलनाला शिव्या घालताना दिसतायेत त्यातिल किती जणांनी प्रत्यक्ष शस्त्र हातात धरले आहे,किंवा सशस्त्र आंदोलनाच्या बाता मारणार्‍यांपैकी कितीजणांनी आपल्या आजुबाजुला अथवा स्वतःवर होणार्‍या अन्यायाविरुद्ध स्वतः सशस्त्र प्रतिकार केला आहे. धाग्याच्या पहिल्याच वाक्यावर विचार करून करून मी ह्या निष्कर्षाप्रत आलो आहे की चित्रपट, फोटोग्राफी, राजकारण, कविता, अध्यात्म, इतिहास हे आणि इतर अनेक विषय माझ्यासाठी चर्चा करण्यासाठी बाद झाले आहेत. कारण ह्या पैकी कुठल्याच विषयात मला प्रत्यक्ष अनुभव कांही नाहीए. त्यामुळे काहीच बोलत नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

दशानन Fri, 10/03/2014 - 21:56
>>>धाग्याच्या पहिल्याच वाक्यावर विचार करून करून मी ह्या निष्कर्षाप्रत आलो आहे की चित्रपट, फोटोग्राफी, राजकारण, कविता, अध्यात्म, इतिहास हे आणि इतर अनेक विषय माझ्यासाठी चर्चा करण्यासाठी बाद झाले आहेत. एवढेच, नाही तर मला असे वाटू लागले आहे, मी कुठल्याच लायकिचा नाही व मी आता या पुढे, लेखणी, किबोर्ड हातात धरू पण नये ;)

धडपड्या Fri, 10/03/2014 - 13:45
स्वयत्तता आणि स्वातंत्र, ह्या वेगवेगळ्या टर्मस् आहेत का? कारण गांधी आधी स्वायत्तता मागत होते, नंतर त्यांनी क्रांतिकारकांना पाहून संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली, असे बरेच उल्लेख वाचण्यात आलेत... हे खरे आहे का?

बाबा पाटील Fri, 10/03/2014 - 19:02
स्वायत्तता - म्हणजे मर्यादित स्वातंत्र, यात चलन, परराष्ट्र्,व संरक्षण ही खाती जेत्या राष्ट्राकडेच असतात व इतर खाती वसाहतीकडे असतात्,किंवा यालाच वसाहतीचे स्वातंत्र असेही म्हणतात,१९३५ च्या कायद्याने बर्‍यापैकी वसाहतीच्या स्वातंत्र्याकडे वाटचाल चालु होती,तर स्वातंत्र म्हणजे निरंकुश/ निर्विवाद सत्ता. म्हणजेच सध्याचा भारत देश. अभ्यासकांनी यावर अधिक प्रकाश टाकावा.

श्रीगुरुजी Sat, 10/04/2014 - 13:55
>>> काहीही म्हणा मित्रांनो,बापुने दिलेला अंहिसेच्या मंत्राला प्रत्यक्षातले अहिंसकच जास्त शिव्या घालताना दिसतात, बापूंच्या अहिंसेचे समर्थन करणारेच शस्त्रास्त्रे बाळगून हिंसा करताना दिसतात. >>> आमच्या रियल इस्टेट मधले चार टगे समोर उभे राहिले व त्यांनी कारण नसताना आया बहिणीवरुन शिव्या दिल्या तरी मान खाली घालुन जाणारी पांढरपेशी जमात,गांधींना शिव्या घालण्यात मात्र सगळ्यात पुढे असते. तुमच्यासारखा बापूंचा समर्थक पिस्तुल का वापरतो? टगे आडवे आले तर अहिंसक मार्गाने त्यांचे हृदयपरीवर्तन करायचे, त्यांचा मार्ग चुकला हे त्यांना प्रेमाने समजावून सांगायचे, हृदयपरीवर्तन होईपर्यंत उपोषण करायचे, मौन पाळायचे, निषेध करायचा ... पण त्यासाठी शस्त्र कशाला जवळ हवे?

बाबा पाटील Sat, 10/04/2014 - 14:06
वरती आख्खा उतारा त्याच्या स्पष्टीकरणात घातला आहे जरा वाचायचे कष्ट घ्या आणी परत परत फिरुन भोपळे चौकात येवु नका.

बाबा पाटील Sat, 10/04/2014 - 18:39
हे तर आमच्या पिताश्रींनाही पटत नव्हत हो, हळु हळु त्यांना काही गोष्टी लक्षात आल्यावर मात्र ते खंबिर मागे उभे राहिले. जाउ द्या ना आपला धागा गांधी बाबावर आहे माझ्यावर नाही.

In reply to by बाबा पाटील

श्रीगुरुजी Sat, 10/04/2014 - 20:44
बरोबर आहे. धागा गांधीजींवर आहे, तुमच्यावर नाही. परंतु तुम्ही गांधींजींच्या मार्गाचे समर्थन करताकरता स्वतःकडे स्वसंरक्षणार्थ शस्त्र आहे असं लिहिलंत आणि ते जरा विसंगत वाटलं, म्हणून प्रतिसाद दिला. बाकी काही नाही. उलट स्वसंरक्षणार्थ शस्त्र बाळगण्याचे धाडस तुमच्याकडे आहे आणि आम्हाला शस्त्र बाळगण्याचे धाडस स्वप्नात सुद्धा होणार नाही हेही तितकंच खरं.

बोका-ए-आझम Sun, 10/05/2014 - 10:39
स्वातंत्र्य कोणामुळे मिळाले हा प्रश्नच चुकीचा आहे.प्रत्येक घटकाचा - गांधीजी,सुभाषबाबू यांसारख्या नेत्यांपासून ते तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत प्रत्येकाने त्यात सहभाग घेतलेला आहे. स्वातंत्र्याचां मक्ता आपल्या राजकीय स्वार्थासाठी काँग्रेसला हवा होता म्हणून त्यांनी गांधींच्या नावाचा वापर केला आणि अशी परिस्थिती निर्माण केली की आज जर गांधी असते तर त्यांनी काँग्रेसवर अब्रूनुकसानीचा दावा केला असता!

पिवळा डांबिस Sun, 10/05/2014 - 11:28
प्रती श्री. बाबा पाटील, या धाग्यावर मध्ये पडणार नव्हतो, कारण गांधीजीची माणूस म्हणुन वा नेता म्हणून गौरवी व्यक्त करणारे व्होकल सभासद या संस्थळावर अल्पमतात आहेत... परंतु, त्याहुनही स्वतः शस्त्र धारण करणारे, आणि त्यानुसार येणार्‍या जबाबदार्‍या समजणारे, त्यामुळे येणारा आत्मविश्वास समजू शकणारे सभासद हे त्याहूनही कमी (अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच!) आहेत. अनुभवावीण फुकाची वाफ दवडणारेच अधिक!! त्यामुळे माणसाच्या व्यवसायाचा त्याच्या शस्त्रधारणतेशी संबंध नसतो. माणसाला त्याच्या व्यवसायाव्यतिरिक्त अन्य आयुष्य असतं याच्याशी पूर्णतः सहमत!!!

सुधीर Sun, 10/05/2014 - 13:03
महात्मा गांधी कुरुंदकरांच्या लेखणीतून हा कुरुंदकरांच्या शिवरात्र या पुस्तकातल्या पहिल्या भागाचा सारांश अलिकडेच लिहिला. गेले ५ दिवस बाहेरगावी होतो म्हणून मिपावर २ ऑक्टोबरला प्रकाशित करू शकलो नाही. या लेखातले काही प्रतिसाद वाचनीय वाटले.

In reply to by बाबा पाटील

सुधीर Mon, 10/06/2014 - 14:36
धन्यवाद डॉक्टर. सदर विचार कुरुंदकरांचे आहेत (शिवरात्र मधले) मी फक्त ते थोडक्यात मांडले आहेत. आणि या पुस्तकावर अतृप्तआत्मा यांनी सुंदर सारांश आधीच लिहिला आहे. http://www.misalpav.com/node/20754

प्रसाद१९७१ Mon, 10/06/2014 - 11:19
मला हा बेसिक प्रश्न पडतो कायम की भारतातल्या सर्व सामान्य जनतेला १९४७ पूर्वी स्वातंत्र्य नव्हते का? माझ्या मते आत्ता जेव्हडे स्वातंत्र्य आहे सर्व सामान्य माणसास तेव्हडे स्वातंत्र्य १९४७ पूर्वी पण होते. खरे तर वैचारिक दृष्ट्या

In reply to by प्रसाद१९७१

प्रसाद१९७१ Mon, 10/06/2014 - 11:23
मला हा बेसिक प्रश्न पडतो कायम की भारतातल्या सर्व सामान्य जनतेला १९४७ पूर्वी स्वातंत्र्य नव्हते का? माझ्या मते आत्ता जेव्हडे स्वातंत्र्य आहे सर्व सामान्य माणसास , तेव्हडे स्वातंत्र्य १९४७ पूर्वी पण होते ( कदाचित जास्तच असेल ). १९०० सालाच्या आधीपासुन च निवड्णुका होउन नगरपालिका होत होती, नंतर राज्य विधी मंडळ पण झाले, नंतर संसद पण होती. कायदे समान होते, शिक्षण, नोकरी करण्यात काही अटकाव नव्हता. जमिन विकत घेण्यात, व्यवसाय चालू करण्यात काही बंधने नव्हती. नक्की स्वातंत्र्य नव्हते म्हणजे काय प्रॉब्लेम होता? ( सामान्य माणसाच्या दृष्टीने )

In reply to by प्रसाद१९७१

सुधीर Mon, 10/06/2014 - 23:13
मला हा बेसिक प्रश्न पडतो कायम की भारतातल्या सर्व सामान्य जनतेला १९४७ पूर्वी स्वातंत्र्य नव्हते का? या प्रश्नाचे उत्तर देण्याची सध्यातरी माझ्यात कुवत नाही. पण या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कुरुंदकरांच्या जागर मध्ये मिळेल अशी आशा आहे. धर्म, त्यानुसार आलेल्या परंपरा,(कालपरिवर्तनामुळे आणि) परंपरेमुळे होणारे अन्याय, शोषितांची मानसिकता, अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याकरता लागणारी मानसिकता, क्रांतीच्या तत्वज्ञानाचा मूलभूत गाभा, मार्क्सवाद, गांधीवाद अशा विषयांवर विवेचन करणा-या "गांधी एक चिंतन" या लेखात मिळतील.

भारतात बरीच संस्थानं चालू होती, इंग्रज स्वार्थासाठी त्यांच्या मनमानीकडे काहिसे दुर्लक्ष करायचे .खर्या अर्थाने स्वातंत्र्य नव्हते.

In reply to by नानासाहेब नेफळे

प्रसाद१९७१ Mon, 10/06/2014 - 12:42
ठीक आहे, मी संस्थाने नसलेल्या, इंग्रज अधिपत्याखालच्या भारता बद्दल बोलतोय. अशी २-३ तरी उदाहरणे आहेत का की ज्यात सामान्य माणसाला स्वातंत्र्य नव्हते असे म्हणता येइल १९४७ च्या आधी. जी काही थोडी बंधने होती ती १९१० नंतर कमी कमी होत चालली होती.

ऋषिकेश Mon, 10/06/2014 - 15:31
वा वा! (इथेच जरा उचकपाचक करून) बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार जन्तेच्या त्याच नेत्याबद्दलच्या बदललेल्या भावना यावर कोणीतरी अभ्यासपूर्ण लेख लिहावा असे सुचवतो :P (तुच लिहि असे म्हणणार्‍यांस आगाऊ क्षमस्व!)

In reply to by ऋषिकेश

बाबा पाटील Mon, 10/06/2014 - 19:12
तात्याला बोलवा,त्यांच्या इतक परखड कोनी नाही लिहु शकत्,हा प्राणी ब्लड बॉर्न शिवसैनिक आहे त्यामुळे भक्तांना अंमळ जुलाब लागु शकतात्,पण मत फार परखड असतात.
गांधी....... काहीही म्हणा मित्रांनो,बापुने दिलेला अंहिसेच्या मंत्राला प्रत्यक्षातले अहिंसकच जास्त शिव्या घालताना दिसतात, आज जे जे गांधीच्या अंहिसेच्या आंदिलनाला शिव्या घालताना दिसतायेत त्यातिल किती जणांनी प्रत्यक्ष शस्त्र हातात धरले आहे,किंवा सशस्त्र आंदोलनाच्या बाता मारणार्‍यांपैकी कितीजणांनी आपल्या आजुबाजुला अथवा स्वतःवर होणार्‍या अन्यायाविरुद्ध स्वतः सशस्त्र प्रतिकार केला आहे. मला खरच गंमत वाटते,माझ्या ६ वर्षाच्या लेकीला कळत की बापाचे पिस्तुल हातात घेताना ते पुर्ण रिकामे आहे की नाही हे विचारुनच त्याला हात लावावा,मग या गाढवांना का कळत नाही की अशा गोष्टींचे तोटे किती आहेत,बंद

आईचा समभाव, वडीलांची तटस्थता न्याय्य निष्पक्षता यांच्या वरील पक्षपाताच्या टिकेचे आव्हान

माहितगार ·

अर्धवटराव गुरुवार, 10/02/2014 - 10:18
आपल्या चुका, स्वार्थ इ. त्यागुन नवीन सुरुवात करायला सामाजीक संकेत, औपचारीकता, पायंडे तयार करणं हे परंपरा स्थापनेमागिल महत्वाचं कारण. त्यांचं सतत इव्हॅल्युएशन आणि पुनरज्जीवन करत राहाणं हा एक उपाय या समस्येवर आहे. *श्रद्धा हा शब्द रुढार्थाने वापरला आहे. या धब्दाची माझी व्याख्या वेगळी आहे.

कवितानागेश Fri, 10/03/2014 - 11:11
लोक पूर्ण समाजाला 'कुटुंब' समजत नाहीत, आपसात दुही आहे, हाच खरा प्रॉब्लेम आहे. कशी काय लागायची शिस्त? अत्ता आलेले हेडमास्टर काहीतरी करु शकतील, अशी आशा आहेच. :)

In reply to by कवितानागेश

हेडमास्तर कशाला हवेत? लोकसंख्या नियंत्रणात आली आणि देशातलं राहाणीमान सुखद झालं की देशप्रेमाला आपोआप भरती येईल.

In reply to by नाव आडनाव

यावर आपलं नियंत्रण नाही. आपण आपल्याबाजूनं प्रश्न सोडवायला हातभार लावायला हवा आणि तेवढच आपल्या हातात आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

नाव आडनाव Fri, 10/03/2014 - 12:49
सर, तुम्ही म्हणताय ते बरोबरच आहे, पण काही ठरलेल्या मुद्यांवरुन पब्लिक ला कायमंच खालच्या पातळी वर चर्चा (?) करतांना बघितलं तर वाईट तर वाटतंच.

In reply to by नाव आडनाव

धाग्याची सुरुवात पाहा :
कौटूंबिक वातावरणात भावंडांच्या केव्हा न केव्हा आपापसात कुरबुरी होतच असतात.
धिस इज टू बी रिझॉल्व्ड.

काउबॉय Fri, 10/03/2014 - 14:26
याचा अभ्यास केला की सहज लक्षात येइल हे देशाबाबत का घडत नाही ते... कुटुंब ही मर्यादित (आकाराने लहान) व्यवस्था असते म्हणून ताण, प्रश्न, जबाबदारी, फायदे व कृतिंचे धडक परिणाम यासाठीची मर्यादा सामान्याच्या आवाक्यात राहते..... पण असे असुनही कुटुम्बे सातत्याने विभक्त होतच असतात आणि इतरही बाबी आहेत ज्याला आपण चहां कपातिल वादळे नक्कीच म्हणु शकत नाही.

अर्धवटराव गुरुवार, 10/02/2014 - 10:18
आपल्या चुका, स्वार्थ इ. त्यागुन नवीन सुरुवात करायला सामाजीक संकेत, औपचारीकता, पायंडे तयार करणं हे परंपरा स्थापनेमागिल महत्वाचं कारण. त्यांचं सतत इव्हॅल्युएशन आणि पुनरज्जीवन करत राहाणं हा एक उपाय या समस्येवर आहे. *श्रद्धा हा शब्द रुढार्थाने वापरला आहे. या धब्दाची माझी व्याख्या वेगळी आहे.

कवितानागेश Fri, 10/03/2014 - 11:11
लोक पूर्ण समाजाला 'कुटुंब' समजत नाहीत, आपसात दुही आहे, हाच खरा प्रॉब्लेम आहे. कशी काय लागायची शिस्त? अत्ता आलेले हेडमास्टर काहीतरी करु शकतील, अशी आशा आहेच. :)

In reply to by कवितानागेश

हेडमास्तर कशाला हवेत? लोकसंख्या नियंत्रणात आली आणि देशातलं राहाणीमान सुखद झालं की देशप्रेमाला आपोआप भरती येईल.

In reply to by नाव आडनाव

यावर आपलं नियंत्रण नाही. आपण आपल्याबाजूनं प्रश्न सोडवायला हातभार लावायला हवा आणि तेवढच आपल्या हातात आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

नाव आडनाव Fri, 10/03/2014 - 12:49
सर, तुम्ही म्हणताय ते बरोबरच आहे, पण काही ठरलेल्या मुद्यांवरुन पब्लिक ला कायमंच खालच्या पातळी वर चर्चा (?) करतांना बघितलं तर वाईट तर वाटतंच.

In reply to by नाव आडनाव

धाग्याची सुरुवात पाहा :
कौटूंबिक वातावरणात भावंडांच्या केव्हा न केव्हा आपापसात कुरबुरी होतच असतात.
धिस इज टू बी रिझॉल्व्ड.

काउबॉय Fri, 10/03/2014 - 14:26
याचा अभ्यास केला की सहज लक्षात येइल हे देशाबाबत का घडत नाही ते... कुटुंब ही मर्यादित (आकाराने लहान) व्यवस्था असते म्हणून ताण, प्रश्न, जबाबदारी, फायदे व कृतिंचे धडक परिणाम यासाठीची मर्यादा सामान्याच्या आवाक्यात राहते..... पण असे असुनही कुटुम्बे सातत्याने विभक्त होतच असतात आणि इतरही बाबी आहेत ज्याला आपण चहां कपातिल वादळे नक्कीच म्हणु शकत नाही.
कौटूंबिक वातावरणात भावंडांच्या केव्हा न केव्हा आपापसात कुरबुरी होतच असतात. एखाद्याची बाजू घेताना अगदी आईवडलांवरही त्यांच्या न्याय्य निष्पक्ष वागण्यावर विश्वास न ठेवता पक्षपाताचे आरोप होत असतात पण कौटूंबीक वातावरणातली हि छोटी चहाच्या कपातली वादळं बहुतांश वेळा विस्मृतीच्या आड जातात आणि स्मृतीत राहतात ते कौटूंबिक प्रेमाने भारलेले क्षण. पण जेव्हा आपण सामाजिक परिस्थितीकडे येतो ज्या व्यक्ती समभाव आणि निष्पक्षतेने वागू इच्छितात अथवा तटस्थता बाळगू इच्छितात त्यांना केवळ पक्षपाताच्याच आरोपांना सामोरे जावे लागत नाही तर आपल्याच मंडळींच्या निष्ठूरतेस सहनही करावे लागते.

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - ९

स्पार्टाकस ·

एस गुरुवार, 10/02/2014 - 13:10
पुन्हा पुन्हा त्याच त्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत नाही. पण अत्यंत उत्कंठेने वाचत आहे असे नमूद करतो. पुभाप्र.

एस गुरुवार, 10/02/2014 - 13:10
पुन्हा पुन्हा त्याच त्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत नाही. पण अत्यंत उत्कंठेने वाचत आहे असे नमूद करतो. पुभाप्र.
लेखनविषय:
लेखनप्रकार
बीची बेटावरुन पुढे निघाल्यावर ग्जो ने बॅरो सामुद्रधुनी गाठली. प्रचंड धुक्याने पुढचं काहीही दिसत नव्हतं. परंतु धुकं निवळल्यावर २६ ऑगस्टला पील खाडीच्या आसपासचे भूप्रदेश त्यांच्या दृष्टीस पडले. सकाळी ९ वाजता ग्जो फ्रँकलीन सामुद्रधुनीतील प्रेस्कॉट बेटाजवळ पोहोचलं असताना अ‍ॅमंडसेनने सहजच कंपासवर नजर टाकली आणि त्याला आश्चर्याचा धक्का बसला! कंपास बंद पडला होता! दिशादिग्दर्शनासाठी अत्यावश्यक असलेला कंपास बंद पडल्यावर आता एकच मार्ग होता...

गांधीजी महान का ?

सवंगडी ·

चित्रगुप्त गुरुवार, 10/02/2014 - 02:58
महात्मा गांधी नोटेवर का छापलेले आहेत?
"गांधी" या आडनावाची इतक्या प्रचंड प्रमाणावर, पिढ्यान-पिढ्या जाहिरात आणखी कशी होऊ शकणार?

In reply to by चित्रगुप्त

सवंगडी गुरुवार, 10/02/2014 - 08:27
चित्रगुप्त मला आपल्या प्रतिक्रियेवर हसू आले, आपल्याला हे गांधी आणि ते "गांधी " यात असणारा फरक माहिती नाही याचे आश्चर्य आहे.

In reply to by सवंगडी

चित्रगुप्त गुरुवार, 10/02/2014 - 18:59
जाहिरातीचा परिणाम हा विचार, तर्क, माहिती, चिकित्सकपणा वगैरेंमुळे होत नसतो, तसे असते तर सचिन अमूक पेय पितो, माधुरी तमूक साबण वापरते, असल्या जाहिराती केल्याच गेल्या नसत्या. प्रत्येक नोटेवर गांधींचे चित्र, ही गोष्ट "गांधी" = "महानता" "देशभक्ती" वगैरे समिकरणे मनात नकळत रुजवत असते. महात्मा गांधी > इंदिरा गांधी > राजीव गांधी > राहुल गांधी ... अशी अनेकांची समजूत आहे, अशी वस्तुस्थिती आहे.

In reply to by चित्रगुप्त

शशिकांत ओक Fri, 10/03/2014 - 01:31
आज कोणालाही विचारा महात्मा गांधी नोटेवर का छापलेले आहेत? याच कोणी समर्पक उत्तर देऊच शकणार नाही ! हां कदाचित ते सांगतील कि गांधीजी महात्मा होते म्हणून. पण मग ते नोटेवरच का छापले ?
सर्व साधारणपणे विविध देशाच्या नोटांवर त्यांच्या देशाच्या महान व्यक्तींचे स्मरण असावे असा भाव धरून अशी प्रथा पाळली जाते. त्यात त्या देशातील नेत्याचा, व्यक्तिमत्वाचा तो अपमान किवा लांगूलचालन असे दोन्ही अपेक्षित नाही... 'चलन' ही बिन पायानी चालणारी वस्तू आहे. ती किती वेळ आपण हातात किंवा आपल्या नावाने करून ठेवू शकतो त्यावर श्रीमंती- गरीबी अवलंबून असते. म्हणून त्याला चंचला म्हणतात... महात्मा गांधी काय किंवा काही काळाने अन्य नेते वा महान व्यक्तींचे दर्शन होत राहील होईल असे दिसते...

In reply to by शशिकांत ओक

चित्रगुप्त Fri, 10/03/2014 - 02:16
"देशाच्या महान व्यक्तींचे स्मरण" हा हेतु स्तुत्य असला, तरी फक्त आणि फक्त गांधीच का? या देशाच्या सहस्त्रावधी वर्षांच्या इतिहासात आणखी कुणी महान निपजलेच नाही का? आणि राजकारणी लोकंच महत्वाची का? लता मंगेशकर श्रेष्ठ गायिका का, तर म्हणे तिने नेहरुंच्या डोळ्यातून टिपे काढली...

अर्धवटराव गुरुवार, 10/02/2014 - 07:53
अहिंसक, सविनय, सत्याग्रही व ठाम आंदोलनाने प्रश्न सोडवता येतात हा विश्वास गांधिजींनी भारतीय जनमानसात रुजवला. स्वातंत्रोत्तर काळात कामगार असो वा सामान्य जनता, आपलं मत मांडायला याच मार्गाचा प्रथम वापर होतो. गांधीजींचं हे यश त्यांच्या अत्युच्य महानतेचं द्योतक आहे.

सस्नेह गुरुवार, 10/02/2014 - 07:54
यथोचित लेख. या महापुरुषाची महानता समजून घ्यायला तितकीच पात्रता लागते. ऐ~यागै~याचे काम नोहे !

विटेकर गुरुवार, 10/02/2014 - 09:46
आज त्यांच्या जयंतीबद्दल विनम्र आभिवादन !!! माझ्या मते गांधीजी अस्सल भारतीय आणि हिंदू होते आणि म्हणूनच ते प्रातःस्मरणीय आहेत. व्यक्ति स्खलनशील असते, चुका घड्तात, डोंगरा एवढ्या चुका होतात. जगात परिपूर्ण कोणीच नाही. तरी ही त्या सर्व चुकांसह गांधीजी माझ्यासाठी प्रातःस्मरणीयच आहेत. (त्याचे आणखी एक अगदी खाजगी कारण म्हणजे त्यांच्या बलिदानामुळे काँग्रेसच्या लोकांनी आमची घरे जाळली आणि ब्राहमणांना देशोधडीला लावले, त्यामुळे आमच्या बापजाद्यांनी गावे सोडली आणि म्हणून आमची प्रगती झाली. नाहीतरी आज ही आम्ही एकादष्ण्या आणि सत्यनारायणाच्या पूजा करत बसलो असतो.जाता जाता देखील महात्माजींनी आमचा फायदाच केला !) आणि आजच्या निमित्ताने, गांधीजींची सारे तत्वे आणि शिकवण मनापासून आचराणात आणणार्‍या रा. स्व. संघाच्या सर्व प्रचारक ( ज्यामध्ये मा. पंतप्रधान मोदी देखील आले ), कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांनाही विनम्र अभिवादन ! कसलाही अभिनिवेश न बाळगता गांधीजींच्या मार्गाने चालणारी पृथ्वीतलावरील ही कदाचित एकमेव संघटना असावी.

विटेकर गुरुवार, 10/02/2014 - 12:21
महात्माजीचे कोलाज स्वरुपात प्रतिमा मुखपृष्ठावर घेतल्याबद्दल सं म चे हार्दिक आणि मनःपूर्वक अभिनंदन ! आणि नेहरूंचा फोटो टाकल्याबद्दल सौम्य णिशेद. पंडितजीनी गांधी - विचारांची कत्तल केली , स्वदेशी - स्वावलंबन - ग्राम स्वराज्य -खादी- कुटीरोद्योग अशा मूलगामी भारतीय जीवनमूल्यांना तिलांजली दिली , विकासासाठी पाश्चिमात्य मॉडेल वापरले आणि विकासाच्या असमतोलाचा पाया घातला.

श्रीगुरुजी गुरुवार, 10/02/2014 - 13:19
>>> कारण गांधीजी 'व्यक्तिस्वातंत्र्याचे पुरस्कर्ते' होते, प्रत्येकाच्या व्यक्तिगत मताचा सन्मान करणारे होते. काय सांगताय? मग १९३९ मध्ये गांधीजी पुरस्कृत उमेदवाराचा सुभाषबाबूंविरूद्ध काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाल्यावर त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मताचा का सन्मान केला नाही?

नानासाहेब नेफळे गुरुवार, 10/02/2014 - 17:24
गांधीजी अनेक ठीकाणी तुरुंगवास भोगून आले होते,प्रत्येकाने त्याठिकाणच्या परिस्थीतीविषयी एकदा माहीती करुन घ्या. गांधीविचाराने कैदी आंदोलन करतील याभीतीने गांधीजींना एकांत अंधारकोठडीत बंद करायचे ,गांधीजी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी पुन्हा स्वातंत्र्यलढ्यात भाग घेऊ नये यासाठी त्यांना तुरुंगात यातना दिल्या जायच्या. तेलाचा घाणा ओढणे एक बात परंतू पाणी न देणे, कुणाशीही भेट नाकारणे, घामोळ्या येऊन त्रास व्हावा यासाठी गोणपाटाचे जाड कपडे घालायला देणे असे अनेक उपाय करुन गांधीजींचे नैतिक धाडस तोडण्याचे व त्यांच्याकडून माफीपत्र व हमीपत्र घेण्याचा प्रयत्न झाला. परंतु गांधींच्या देशभक्तीपूढे ब्रिटीशांनी गुडघे टेकले!

In reply to by नानासाहेब नेफळे

मृत्युन्जय गुरुवार, 10/02/2014 - 17:45
खरे आहे. याबाबत त्यांची तुलना राणा प्रताप बरोबरच करायला हवी. त्यानेही कधी अकबराची माफी नाही मागितली. त्याच्यानंतरच्या काळातल्या काही राजांनी मागितली. पण त्याने नाही मागितली. घामोळ्या येऊन त्रास व्हावा यासाठी गोणपाटाचे जाड कपडे घालायला देणे गांधीजी केवळ पंचा नेसायचे. त्यांना गोणपाटाचा पंचा दिला होता का? कृपया संदर्भ द्या.

In reply to by मृत्युन्जय

नानासाहेब नेफळे गुरुवार, 10/02/2014 - 18:02
तुरुंगात असताना कैद्यांचा पेहराव काही काळ गांधीजींना घालावा लागत होता.

In reply to by नानासाहेब नेफळे

विवेकपटाईत Fri, 10/03/2014 - 09:35
नानासाहेब, तेलाचा घाणा ओढणे एक बात परंतू पाणी न देणे, कुणाशीही भेट नाकारणे, घामोळ्या येऊन त्रास व्हावा यासाठी गोणपाटाचे जाड कपडे घालायला देणे असे अनेक उपाय माझ्या माहिती प्रमाणे अंदमानात सावरकराना असा त्रास दिला गेला. भारतातील जेलांमध्ये गांधी आणि इतर कोन्ग्रेस च्या नेत्यांना तरुण्गात त्रास दिला गेला नाही ऐकिवात नाही. पण कारावास करावासच असतो....बाकी ४० लाख भारतीय ब्रिटीश फौजेत असल्या मुळे आणि त्यातील २०-२५ लाखांना युद्धानंतर रिटायर्ड करणे भाग होते. भारतात युद्ध समान बनू लागले होते. भारतीय लोक सेनेत मोठ्यापदांवर पोहचले होते. त्या पैकी दिल्लीत कित्येकांशी मी स्वत: बोललेलो आहे. युद्ध संपल्यावर देशाला स्वतंत्रता दिली जाईल हे भारतीय अधिकाऱ्यांच्या गळ्यात उतरविल्या गेले होते. मोर्च्या वर त्यांना स्वतंत्र निर्णय घ्यायला प्रोत्साहित केल जात होत. अर्थात युद्धानंतर भारताला स्वतंत्रता देण्याशिवाय ब्रिटीशांजवळ काही मार्ग उरला नव्हता. गांधी आणि सरदार पटेल यांचे योगदान एकाच त्यांनी देशाची एकसंघता कायम ठेवली. आपण त्या साठी त्यांचे सदैव ऋणी राहणार अन्यथा ६०० तुकडे ही झाले असते.

In reply to by विवेकपटाईत

@विवेक पटाइत, सावरकरांविषयी मला विशेष माहीती नाही, पण बापूंविषयी मला ठाऊक आहे. त्यांना जेलमध्ये भयानक यातना सहन कराव्या लागल्या, परंतु त्याचे भांडवल करुन आपला एक पंथ तयार करण्याचा धुर्तपणा त्यांच्याकडे नव्हता.त्यामुळे त्यांच्या कारागृहातल्या दिवसांविषयी फारसे लिहले गेले नाही.

In reply to by नानासाहेब नेफळे

मृत्युन्जय Fri, 10/03/2014 - 12:52
सावरकरांविषयी मला विशेष माहीती नाही, ज्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती नाही त्यांच्याबद्दल्ल तोंड उचकटुन ज्या त्या धाग्यावर घाण करुन ठेउ नये ही नम्र विनंती.

In reply to by मृत्युन्जय

आँ! हे काय भलतेच !! मी कुठे काही लिहीले आहे सावरकरांविषयी? मला त्यांच्याविषयी काहीच माहिती नाही . काँग्रेस गाँधी वगैरेंचा माझा अभ्यास आहे, मी फक्त त्याविषयीच लिहीतो.

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी Fri, 10/03/2014 - 14:44
>>> त्यामुळे त्यांच्या कारागृहातल्या दिवसांविषयी फारसे लिहले गेले नाही. तुम्ही लिहा ना मग. त्यांचा कारागृहात कसा छळ झाला, त्यांना रोज कोलू ओढायला लागत होता, त्यांना गोणपाटाचे कपडे दिले जात होते याविषयी जनतेला समजावून सांगा. आणि ते असा छळ भोगत असताना इतर तथाकथित स्वातंत्र्यसैनिक कशी लुटुपुटीची स्थानबद्धता भोगत होते, त्यांना गाद्या-गिरद्या, लोड-तक्के, पंखा, टबबाथ इ. देऊन इंग्रज कसे त्यांचे लाड पुरवित होते याबद्दल पण लिहा.

जेपी गुरुवार, 10/02/2014 - 17:36
काय तो विनोदी प्रतिसाद. पण लगे रहो सचीन,राजु भारतीय, ग्रेेटथिंकर,फिलॉसॉफर गेल्यापासुन मला इथल्या चर्चेत रस राहिला नव्हता. पण तुमच्या मुळे पुन्हा चर्चा वाचावश्या वाटतात. लगे रहो.

गांधी ह्यांनी ज्यावेळी स्वदेशी मोहीम काढली ती तत्कालीन परिस्थितीला साजेशी होती. असमतोल विषम कायदे हे भारतीय उद्योगांना मारक व ब्रिटीश उद्योगांना पूरक होते , त्यांचे आर्थिक खच्चीकरण व स्वदेशी उद्योगांना उत्तेजन म्हणून ही योजना चांगली होती मात्र स्वातंत्र्य कालांतर जेव्हा भारतात आपले कायदे होते कर आकारणी आपल्या हातात होती तेव्हा परदेशी उद्योगांना भारतात परवानगी देऊन निकोप स्पर्ध्धा निर्माण करून ग्राहकाला समाजाला देशाला महसुल सुब्बता देता आली असती. उद्योगजगताला वेठीस ठेवण्यास अनेक कायदे करणारी पूर्वीची सरकारे व हि मोजकीच खाजगी उद्योग समूह कामगारांना पिळवणूक करून सरकारला वेठीस आणत होती. परकीय कंपन्यांना भारतात न येऊ देण्यात व गांधीजी ह्यांचे स्वदेशी धोरणांचा उलट अर्थाने फायदा घेण्यास त्यावेळचे खाजगी समूह तेवढेच आघाडीवर होते.

श्रीगुरुजी गुरुवार, 10/02/2014 - 19:40
संपादक मंडळास एक नम्र विनंती, गांधीजी, सावरकर इ. विषयांवर धागे निघाले की कोणीतरी काडी टाकणारा प्रतिसाद देतात व त्या खोडसाळ प्रतिसादाला प्रत्त्युत्तर दिले की भडका उडून इतर अनेक परस्परविरोधी प्रतिसाद येतात. शेवटी संपादक मंडळ त्यातले बरेचसे प्रतिसाद काढून टाकते. असे धागे काढण्यास संपूर्ण बंदी घालावी किंवा अशा धाग्यातील प्रतिसाद न उडविता तसेच ठेवावेत असे मला वाटते.

In reply to by श्रीगुरुजी

नानासाहेब नेफळे गुरुवार, 10/02/2014 - 20:54
श्रीगुरुजींशी सहमत! एकतर अशा धाग्यांवर बंदी घालावी किंवा सरळ वादविवाद व्हावेत! फार कष्टाने प्रतिसाद खरडायचे व परत येऊन बघितले तर प्रतिसाद गायब ,मुळात या धाग्यावरची चर्चा उद्बोधक चालू होती, इतके प्रतिसाद डीलीट करायचे कारण समजलेले नाही .बाकिच्या मराठी संस्थळांचे प्रशासन नेभळट आहे,त्यामानाने मिपाच्या नर्व्हज् स्ट्राँग आहेत व तोच मिपाचा युएसपी आहे, तो कायम ठेवावा, नाहीतर मिपाचे काही खरे नाही. (अजूनही या व आणखि एक गांधी धाग्याला कुलुप घालायची संधी आहे)

उदयन गुरुवार, 10/02/2014 - 20:01
गांधीजी महान यासाठी की त्यांच्यामुळे भारताला स्वातंत्र्य मि़ळाले जे स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करत होते अश्या सर्वांना महात्मा गांधीनी एकत्रित करुन चळवळीला एकीचे बळ दिले म्हणुनच भारताला सर्वांच्या एकीच्या बळामुळे स्वातंत्र्य मिळाले.

In reply to by उदयन

चित्रगुप्त गुरुवार, 10/02/2014 - 20:11
हिटलरासही महान म्हटले पाहिजे, ज्याच्यामुळे महायुद्ध होऊन त्यात ब्रिटिशांची शक्ती खच्ची होऊन त्यांना आपल्या वसाहतींमधून काढता पाय घेणे भाग पडले.

In reply to by चित्रगुप्त

कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 10/02/2014 - 21:33
+१ युद्धामुळे ब्रिटीश अर्थव्यवस्थेचे बारा वाजले होते. भारतासारखा पांढरा हत्ती पोसणे त्यांना जमणार नव्हतेच. त्यातुन क्रांतीकारकांनी खजिना लुटणे, महत्त्वाच्या अधिकार्‍यांचा वध करणे आदी गोष्टी चालु केल्या. त्यामुळे ब्रिटिश सरकारने भारताला स्वातंत्र्य दिले. बाकी "अंग्रेज चले गये, पिछे अपनी औलाद छोड गये" =))

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

नानासाहेब नेफळे गुरुवार, 10/02/2014 - 21:49
म्हणजे आद्यक्रांतिकारक फडके टीळक सावरकर यांच्यापेक्षाही भारताला स्वातंत्र्य देण्यात हिटलरचा वाटा अधिक आहे यावर हिंदुत्ववाद्यांचे एकमत आहे तर! ना गांधी ने ना विनायक ने ,आझादी दिलायी हिटलर ने असे वचनही उद्या प्रचलीत होईल.

In reply to by नानासाहेब नेफळे

कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 10/02/2014 - 22:19
नेफळे नाना, जरा अभ्यास वाढवा. माझं एक छोटसं काम करा, उद्या पाकिस्तान बॉर्डर वर जा, नो मॅन्स लँड वर उपोषणाला बसा. जर का तुमच्या उपोषणानी पाकिस्तान ला कळवळा आला आणि बिनशर्त अतिरेकी कारवाय थांबवल्या तर तुम्हाला म्हणाल तिथे पार्टी.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

नानासाहेब नेफळे गुरुवार, 10/02/2014 - 22:57
अच्छा! तिथे हजारो लाखो सैनिक एकमेकाकडे बंदुका रोखुन उभे आहेत, तीन युद्ध झालीत, सुटला काश्मीर प्रश्न?पाकिस्तानच्या मानसिकतेत फरक पडला? जर प्रचंड ताकद असेल तर जरुर सशस्त्र प्रतिकार करावा, पण जिथे (ब्रिटीशांपूढे) तुटपुंजी सैनिकी ताकद असते तिथे दंडाला फूकाच्या बेटकुळ्या काढल्याने फक्त प्रतिस्पर्ध्याचे मनोरंजन होते, बाकी काही नाही.

In reply to by नानासाहेब नेफळे

कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 10/02/2014 - 23:08
प्रश्ण तेव्हाच सुटतात जेव्हा ते सोडवायची ईच्छा असते. जर का आपण युद्ध करायचचं ठरवलं तर काश्मिर सेनाबळावर मिळवणं फारसं अवघड नाही. ते घोंगडं आजपर्यंतच्या सगळ्या सरकारनी भिजत ठेवलं आहे. कुठलही सरकार थेट युद्ध टाळत आहे ह्याचं कारण तुम्हाला गेल्या वर्षी शहीद स्मारकाला काय प्रकार घडला त्यावरुन ल़क्षात यायला हवा. थेट युद्धाबरोबर अंतर्गत बंडाळीला तोंड देणं सरकारला जड जाईल.
तिथे दंडाला फूकाच्या बेटकुळ्या काढल्याने फक्त प्रतिस्पर्ध्याचे मनोरंजन होते, बाकी काही नाही.
अगदी सहमत. उपोषण केल्यामुळे शत्रुला शष्प फरक पडत नाही.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

नानासाहेब नेफळे गुरुवार, 10/02/2014 - 23:41
अंतर्गत बंडाळी
आपले आवडते पंतप्रधान परमप्रतापी मोदीजींचे अंतर्गत बंडाळीविषयीचे मत वाचा,यावर आपले काय म्हणने आहे. http://www.thehindu.com/news/national/indian-muslims-will-fail-alqaeda-modi/article6460807.ece/ ( हिंदू हिंदूत्व याविषयी चर्चा करताना नाव तरी शोभेल असे घ्या !कॅप्टन जॅक स्पॅरो कशाला?)

In reply to by नानासाहेब नेफळे

दिलेल्या लिंक विषयी
मोदी एक उत्कृष्ट दर्जाचे राजकारणी आहेत.
( हिंदू हिंदूत्व याविषयी चर्चा करताना नाव तरी शोभेल असे घ्या !कॅप्टन जॅक स्पॅरो कशाला?)
मग काकासाहेब सापळे, बाईसाहेब फुरसुंगीकर, ग्रेट्स्टिंकर, थिकॉसॉफर अश्याच नावांना हिंदुत्वावर बोलायचा अधिकार आहे का काय?

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

काळा पहाड Fri, 10/03/2014 - 00:13
नेफळे नाना, जरा अभ्यास वाढवा. माझं एक छोटसं काम करा, उद्या पाकिस्तान बॉर्डर वर जा, नो मॅन्स लँड वर उपोषणाला बसा. जर का तुमच्या उपोषणानी पाकिस्तान ला कळवळा आला आणि बिनशर्त अतिरेकी कारवाय थांबवल्या तर तुम्हाला म्हणाल तिथे पार्टी.
कळ्ळं नाय ओ त्याला. आमाला कळ्ळं. निदान पाकिस्तानी वाले तरी ही बिनडोक डोकेदुखी कायमची घालवतील असं तुमाला म्हणायचंय.

In reply to by नानासाहेब नेफळे

चित्रगुप्त Fri, 10/03/2014 - 16:28
ना गांधी ने ना विनायक ने ,आझादी दिलायी हिटलर ने असे वचनही उद्या प्रचलीत होईल.
छे छे .. दे दी हमे आजादी बिना खड्ग बिना ढाल, साबरमती के संत तुने कर दिया कमाल ... हे गाणे लहानपणापासून कानावर टाकून टाकून पक्के चिरेबंदी करून टाकले गेलेले आहे.

भृशुंडी Fri, 10/03/2014 - 08:43
म्हणजे खरंच कंटाळा येत नाही का? देजावूचा बाप वाटेल असं चालू असतं. गांधींवरच्या आधीच्या चर्वितचर्वाणाला मिपावर कुठेतरी सन्माननीय आणि चट्कन दिसेल अशी जागा शोधायला हवी. म्हणजे अपघात वाचतील.

पैसा Fri, 10/03/2014 - 14:37
महात्मा गांधीजींना भावपूर्ण श्रद्धांजली! प्रत्येकाने इथे निरर्थक काथ्या कुटणे आणि उखाळ्यापाखाळ्या काढण्यापेक्षा आपापले कामाचे टेबल, घर आणि गल्ली मन लावून साफ करावी. ती गांधीजींना खरी श्रद्धांजली ठरेल.

In reply to by पैसा

आजानुकर्ण Fri, 10/03/2014 - 15:24
गांधी महान खरे पण स्वच्छता त्यांच्यामुळे होत असे असे मानणे हा प्रचंड मोठा मुर्खपणा आहे. गाडगेबाबांना श्रेय द्यायला हवे! (पण गांधी महान!!) आयाबहिणींना शिवी देऊन दादागिरी करणारे गल्लीत सापडतात ते स्वच्छता कशी करुन देतील?

In reply to by आजानुकर्ण

पैसा Fri, 10/03/2014 - 15:44
आपण दुसर्‍याकडे कशाला बघायचं? स्वतःला जेवढं करता येईल तेवढं करावं. कोणी अडवलंय! फक्त स्वच्छता असं नव्हे, गांधीजींच्या मार्गावरील जे जे म्हणून प्रत्येकाला जमेल ते करावंच! काहीच नाही तर शाब्दिक आणि वैचारिक हिंसा तरी करू नये! असत्य बोलू नये, महिलांबद्दल आदर दाखवा, भ्रष्ट मार्गाने पैसे मिळवू नये, गरजेहून जास्त संपत्ती गोळा करून ठेवू नये. यातलं काहीच जमणार नाही का? मग निदान घरदार आणि गल्ली तरी स्वच्छ ठेवा. कमीतकमी रस्त्यावर कचरा, घाण टाकू नका. एवढं तरी जमेल ना?

चित्रगुप्त गुरुवार, 10/02/2014 - 02:58
महात्मा गांधी नोटेवर का छापलेले आहेत?
"गांधी" या आडनावाची इतक्या प्रचंड प्रमाणावर, पिढ्यान-पिढ्या जाहिरात आणखी कशी होऊ शकणार?

In reply to by चित्रगुप्त

सवंगडी गुरुवार, 10/02/2014 - 08:27
चित्रगुप्त मला आपल्या प्रतिक्रियेवर हसू आले, आपल्याला हे गांधी आणि ते "गांधी " यात असणारा फरक माहिती नाही याचे आश्चर्य आहे.

In reply to by सवंगडी

चित्रगुप्त गुरुवार, 10/02/2014 - 18:59
जाहिरातीचा परिणाम हा विचार, तर्क, माहिती, चिकित्सकपणा वगैरेंमुळे होत नसतो, तसे असते तर सचिन अमूक पेय पितो, माधुरी तमूक साबण वापरते, असल्या जाहिराती केल्याच गेल्या नसत्या. प्रत्येक नोटेवर गांधींचे चित्र, ही गोष्ट "गांधी" = "महानता" "देशभक्ती" वगैरे समिकरणे मनात नकळत रुजवत असते. महात्मा गांधी > इंदिरा गांधी > राजीव गांधी > राहुल गांधी ... अशी अनेकांची समजूत आहे, अशी वस्तुस्थिती आहे.

In reply to by चित्रगुप्त

शशिकांत ओक Fri, 10/03/2014 - 01:31
आज कोणालाही विचारा महात्मा गांधी नोटेवर का छापलेले आहेत? याच कोणी समर्पक उत्तर देऊच शकणार नाही ! हां कदाचित ते सांगतील कि गांधीजी महात्मा होते म्हणून. पण मग ते नोटेवरच का छापले ?
सर्व साधारणपणे विविध देशाच्या नोटांवर त्यांच्या देशाच्या महान व्यक्तींचे स्मरण असावे असा भाव धरून अशी प्रथा पाळली जाते. त्यात त्या देशातील नेत्याचा, व्यक्तिमत्वाचा तो अपमान किवा लांगूलचालन असे दोन्ही अपेक्षित नाही... 'चलन' ही बिन पायानी चालणारी वस्तू आहे. ती किती वेळ आपण हातात किंवा आपल्या नावाने करून ठेवू शकतो त्यावर श्रीमंती- गरीबी अवलंबून असते. म्हणून त्याला चंचला म्हणतात... महात्मा गांधी काय किंवा काही काळाने अन्य नेते वा महान व्यक्तींचे दर्शन होत राहील होईल असे दिसते...

In reply to by शशिकांत ओक

चित्रगुप्त Fri, 10/03/2014 - 02:16
"देशाच्या महान व्यक्तींचे स्मरण" हा हेतु स्तुत्य असला, तरी फक्त आणि फक्त गांधीच का? या देशाच्या सहस्त्रावधी वर्षांच्या इतिहासात आणखी कुणी महान निपजलेच नाही का? आणि राजकारणी लोकंच महत्वाची का? लता मंगेशकर श्रेष्ठ गायिका का, तर म्हणे तिने नेहरुंच्या डोळ्यातून टिपे काढली...

अर्धवटराव गुरुवार, 10/02/2014 - 07:53
अहिंसक, सविनय, सत्याग्रही व ठाम आंदोलनाने प्रश्न सोडवता येतात हा विश्वास गांधिजींनी भारतीय जनमानसात रुजवला. स्वातंत्रोत्तर काळात कामगार असो वा सामान्य जनता, आपलं मत मांडायला याच मार्गाचा प्रथम वापर होतो. गांधीजींचं हे यश त्यांच्या अत्युच्य महानतेचं द्योतक आहे.

सस्नेह गुरुवार, 10/02/2014 - 07:54
यथोचित लेख. या महापुरुषाची महानता समजून घ्यायला तितकीच पात्रता लागते. ऐ~यागै~याचे काम नोहे !

विटेकर गुरुवार, 10/02/2014 - 09:46
आज त्यांच्या जयंतीबद्दल विनम्र आभिवादन !!! माझ्या मते गांधीजी अस्सल भारतीय आणि हिंदू होते आणि म्हणूनच ते प्रातःस्मरणीय आहेत. व्यक्ति स्खलनशील असते, चुका घड्तात, डोंगरा एवढ्या चुका होतात. जगात परिपूर्ण कोणीच नाही. तरी ही त्या सर्व चुकांसह गांधीजी माझ्यासाठी प्रातःस्मरणीयच आहेत. (त्याचे आणखी एक अगदी खाजगी कारण म्हणजे त्यांच्या बलिदानामुळे काँग्रेसच्या लोकांनी आमची घरे जाळली आणि ब्राहमणांना देशोधडीला लावले, त्यामुळे आमच्या बापजाद्यांनी गावे सोडली आणि म्हणून आमची प्रगती झाली. नाहीतरी आज ही आम्ही एकादष्ण्या आणि सत्यनारायणाच्या पूजा करत बसलो असतो.जाता जाता देखील महात्माजींनी आमचा फायदाच केला !) आणि आजच्या निमित्ताने, गांधीजींची सारे तत्वे आणि शिकवण मनापासून आचराणात आणणार्‍या रा. स्व. संघाच्या सर्व प्रचारक ( ज्यामध्ये मा. पंतप्रधान मोदी देखील आले ), कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांनाही विनम्र अभिवादन ! कसलाही अभिनिवेश न बाळगता गांधीजींच्या मार्गाने चालणारी पृथ्वीतलावरील ही कदाचित एकमेव संघटना असावी.

विटेकर गुरुवार, 10/02/2014 - 12:21
महात्माजीचे कोलाज स्वरुपात प्रतिमा मुखपृष्ठावर घेतल्याबद्दल सं म चे हार्दिक आणि मनःपूर्वक अभिनंदन ! आणि नेहरूंचा फोटो टाकल्याबद्दल सौम्य णिशेद. पंडितजीनी गांधी - विचारांची कत्तल केली , स्वदेशी - स्वावलंबन - ग्राम स्वराज्य -खादी- कुटीरोद्योग अशा मूलगामी भारतीय जीवनमूल्यांना तिलांजली दिली , विकासासाठी पाश्चिमात्य मॉडेल वापरले आणि विकासाच्या असमतोलाचा पाया घातला.

श्रीगुरुजी गुरुवार, 10/02/2014 - 13:19
>>> कारण गांधीजी 'व्यक्तिस्वातंत्र्याचे पुरस्कर्ते' होते, प्रत्येकाच्या व्यक्तिगत मताचा सन्मान करणारे होते. काय सांगताय? मग १९३९ मध्ये गांधीजी पुरस्कृत उमेदवाराचा सुभाषबाबूंविरूद्ध काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाल्यावर त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मताचा का सन्मान केला नाही?

नानासाहेब नेफळे गुरुवार, 10/02/2014 - 17:24
गांधीजी अनेक ठीकाणी तुरुंगवास भोगून आले होते,प्रत्येकाने त्याठिकाणच्या परिस्थीतीविषयी एकदा माहीती करुन घ्या. गांधीविचाराने कैदी आंदोलन करतील याभीतीने गांधीजींना एकांत अंधारकोठडीत बंद करायचे ,गांधीजी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी पुन्हा स्वातंत्र्यलढ्यात भाग घेऊ नये यासाठी त्यांना तुरुंगात यातना दिल्या जायच्या. तेलाचा घाणा ओढणे एक बात परंतू पाणी न देणे, कुणाशीही भेट नाकारणे, घामोळ्या येऊन त्रास व्हावा यासाठी गोणपाटाचे जाड कपडे घालायला देणे असे अनेक उपाय करुन गांधीजींचे नैतिक धाडस तोडण्याचे व त्यांच्याकडून माफीपत्र व हमीपत्र घेण्याचा प्रयत्न झाला. परंतु गांधींच्या देशभक्तीपूढे ब्रिटीशांनी गुडघे टेकले!

In reply to by नानासाहेब नेफळे

मृत्युन्जय गुरुवार, 10/02/2014 - 17:45
खरे आहे. याबाबत त्यांची तुलना राणा प्रताप बरोबरच करायला हवी. त्यानेही कधी अकबराची माफी नाही मागितली. त्याच्यानंतरच्या काळातल्या काही राजांनी मागितली. पण त्याने नाही मागितली. घामोळ्या येऊन त्रास व्हावा यासाठी गोणपाटाचे जाड कपडे घालायला देणे गांधीजी केवळ पंचा नेसायचे. त्यांना गोणपाटाचा पंचा दिला होता का? कृपया संदर्भ द्या.

In reply to by मृत्युन्जय

नानासाहेब नेफळे गुरुवार, 10/02/2014 - 18:02
तुरुंगात असताना कैद्यांचा पेहराव काही काळ गांधीजींना घालावा लागत होता.

In reply to by नानासाहेब नेफळे

विवेकपटाईत Fri, 10/03/2014 - 09:35
नानासाहेब, तेलाचा घाणा ओढणे एक बात परंतू पाणी न देणे, कुणाशीही भेट नाकारणे, घामोळ्या येऊन त्रास व्हावा यासाठी गोणपाटाचे जाड कपडे घालायला देणे असे अनेक उपाय माझ्या माहिती प्रमाणे अंदमानात सावरकराना असा त्रास दिला गेला. भारतातील जेलांमध्ये गांधी आणि इतर कोन्ग्रेस च्या नेत्यांना तरुण्गात त्रास दिला गेला नाही ऐकिवात नाही. पण कारावास करावासच असतो....बाकी ४० लाख भारतीय ब्रिटीश फौजेत असल्या मुळे आणि त्यातील २०-२५ लाखांना युद्धानंतर रिटायर्ड करणे भाग होते. भारतात युद्ध समान बनू लागले होते. भारतीय लोक सेनेत मोठ्यापदांवर पोहचले होते. त्या पैकी दिल्लीत कित्येकांशी मी स्वत: बोललेलो आहे. युद्ध संपल्यावर देशाला स्वतंत्रता दिली जाईल हे भारतीय अधिकाऱ्यांच्या गळ्यात उतरविल्या गेले होते. मोर्च्या वर त्यांना स्वतंत्र निर्णय घ्यायला प्रोत्साहित केल जात होत. अर्थात युद्धानंतर भारताला स्वतंत्रता देण्याशिवाय ब्रिटीशांजवळ काही मार्ग उरला नव्हता. गांधी आणि सरदार पटेल यांचे योगदान एकाच त्यांनी देशाची एकसंघता कायम ठेवली. आपण त्या साठी त्यांचे सदैव ऋणी राहणार अन्यथा ६०० तुकडे ही झाले असते.

In reply to by विवेकपटाईत

@विवेक पटाइत, सावरकरांविषयी मला विशेष माहीती नाही, पण बापूंविषयी मला ठाऊक आहे. त्यांना जेलमध्ये भयानक यातना सहन कराव्या लागल्या, परंतु त्याचे भांडवल करुन आपला एक पंथ तयार करण्याचा धुर्तपणा त्यांच्याकडे नव्हता.त्यामुळे त्यांच्या कारागृहातल्या दिवसांविषयी फारसे लिहले गेले नाही.

In reply to by नानासाहेब नेफळे

मृत्युन्जय Fri, 10/03/2014 - 12:52
सावरकरांविषयी मला विशेष माहीती नाही, ज्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती नाही त्यांच्याबद्दल्ल तोंड उचकटुन ज्या त्या धाग्यावर घाण करुन ठेउ नये ही नम्र विनंती.

In reply to by मृत्युन्जय

आँ! हे काय भलतेच !! मी कुठे काही लिहीले आहे सावरकरांविषयी? मला त्यांच्याविषयी काहीच माहिती नाही . काँग्रेस गाँधी वगैरेंचा माझा अभ्यास आहे, मी फक्त त्याविषयीच लिहीतो.

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी Fri, 10/03/2014 - 14:44
>>> त्यामुळे त्यांच्या कारागृहातल्या दिवसांविषयी फारसे लिहले गेले नाही. तुम्ही लिहा ना मग. त्यांचा कारागृहात कसा छळ झाला, त्यांना रोज कोलू ओढायला लागत होता, त्यांना गोणपाटाचे कपडे दिले जात होते याविषयी जनतेला समजावून सांगा. आणि ते असा छळ भोगत असताना इतर तथाकथित स्वातंत्र्यसैनिक कशी लुटुपुटीची स्थानबद्धता भोगत होते, त्यांना गाद्या-गिरद्या, लोड-तक्के, पंखा, टबबाथ इ. देऊन इंग्रज कसे त्यांचे लाड पुरवित होते याबद्दल पण लिहा.

जेपी गुरुवार, 10/02/2014 - 17:36
काय तो विनोदी प्रतिसाद. पण लगे रहो सचीन,राजु भारतीय, ग्रेेटथिंकर,फिलॉसॉफर गेल्यापासुन मला इथल्या चर्चेत रस राहिला नव्हता. पण तुमच्या मुळे पुन्हा चर्चा वाचावश्या वाटतात. लगे रहो.

गांधी ह्यांनी ज्यावेळी स्वदेशी मोहीम काढली ती तत्कालीन परिस्थितीला साजेशी होती. असमतोल विषम कायदे हे भारतीय उद्योगांना मारक व ब्रिटीश उद्योगांना पूरक होते , त्यांचे आर्थिक खच्चीकरण व स्वदेशी उद्योगांना उत्तेजन म्हणून ही योजना चांगली होती मात्र स्वातंत्र्य कालांतर जेव्हा भारतात आपले कायदे होते कर आकारणी आपल्या हातात होती तेव्हा परदेशी उद्योगांना भारतात परवानगी देऊन निकोप स्पर्ध्धा निर्माण करून ग्राहकाला समाजाला देशाला महसुल सुब्बता देता आली असती. उद्योगजगताला वेठीस ठेवण्यास अनेक कायदे करणारी पूर्वीची सरकारे व हि मोजकीच खाजगी उद्योग समूह कामगारांना पिळवणूक करून सरकारला वेठीस आणत होती. परकीय कंपन्यांना भारतात न येऊ देण्यात व गांधीजी ह्यांचे स्वदेशी धोरणांचा उलट अर्थाने फायदा घेण्यास त्यावेळचे खाजगी समूह तेवढेच आघाडीवर होते.

श्रीगुरुजी गुरुवार, 10/02/2014 - 19:40
संपादक मंडळास एक नम्र विनंती, गांधीजी, सावरकर इ. विषयांवर धागे निघाले की कोणीतरी काडी टाकणारा प्रतिसाद देतात व त्या खोडसाळ प्रतिसादाला प्रत्त्युत्तर दिले की भडका उडून इतर अनेक परस्परविरोधी प्रतिसाद येतात. शेवटी संपादक मंडळ त्यातले बरेचसे प्रतिसाद काढून टाकते. असे धागे काढण्यास संपूर्ण बंदी घालावी किंवा अशा धाग्यातील प्रतिसाद न उडविता तसेच ठेवावेत असे मला वाटते.

In reply to by श्रीगुरुजी

नानासाहेब नेफळे गुरुवार, 10/02/2014 - 20:54
श्रीगुरुजींशी सहमत! एकतर अशा धाग्यांवर बंदी घालावी किंवा सरळ वादविवाद व्हावेत! फार कष्टाने प्रतिसाद खरडायचे व परत येऊन बघितले तर प्रतिसाद गायब ,मुळात या धाग्यावरची चर्चा उद्बोधक चालू होती, इतके प्रतिसाद डीलीट करायचे कारण समजलेले नाही .बाकिच्या मराठी संस्थळांचे प्रशासन नेभळट आहे,त्यामानाने मिपाच्या नर्व्हज् स्ट्राँग आहेत व तोच मिपाचा युएसपी आहे, तो कायम ठेवावा, नाहीतर मिपाचे काही खरे नाही. (अजूनही या व आणखि एक गांधी धाग्याला कुलुप घालायची संधी आहे)

उदयन गुरुवार, 10/02/2014 - 20:01
गांधीजी महान यासाठी की त्यांच्यामुळे भारताला स्वातंत्र्य मि़ळाले जे स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करत होते अश्या सर्वांना महात्मा गांधीनी एकत्रित करुन चळवळीला एकीचे बळ दिले म्हणुनच भारताला सर्वांच्या एकीच्या बळामुळे स्वातंत्र्य मिळाले.

In reply to by उदयन

चित्रगुप्त गुरुवार, 10/02/2014 - 20:11
हिटलरासही महान म्हटले पाहिजे, ज्याच्यामुळे महायुद्ध होऊन त्यात ब्रिटिशांची शक्ती खच्ची होऊन त्यांना आपल्या वसाहतींमधून काढता पाय घेणे भाग पडले.

In reply to by चित्रगुप्त

कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 10/02/2014 - 21:33
+१ युद्धामुळे ब्रिटीश अर्थव्यवस्थेचे बारा वाजले होते. भारतासारखा पांढरा हत्ती पोसणे त्यांना जमणार नव्हतेच. त्यातुन क्रांतीकारकांनी खजिना लुटणे, महत्त्वाच्या अधिकार्‍यांचा वध करणे आदी गोष्टी चालु केल्या. त्यामुळे ब्रिटिश सरकारने भारताला स्वातंत्र्य दिले. बाकी "अंग्रेज चले गये, पिछे अपनी औलाद छोड गये" =))

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

नानासाहेब नेफळे गुरुवार, 10/02/2014 - 21:49
म्हणजे आद्यक्रांतिकारक फडके टीळक सावरकर यांच्यापेक्षाही भारताला स्वातंत्र्य देण्यात हिटलरचा वाटा अधिक आहे यावर हिंदुत्ववाद्यांचे एकमत आहे तर! ना गांधी ने ना विनायक ने ,आझादी दिलायी हिटलर ने असे वचनही उद्या प्रचलीत होईल.

In reply to by नानासाहेब नेफळे

कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 10/02/2014 - 22:19
नेफळे नाना, जरा अभ्यास वाढवा. माझं एक छोटसं काम करा, उद्या पाकिस्तान बॉर्डर वर जा, नो मॅन्स लँड वर उपोषणाला बसा. जर का तुमच्या उपोषणानी पाकिस्तान ला कळवळा आला आणि बिनशर्त अतिरेकी कारवाय थांबवल्या तर तुम्हाला म्हणाल तिथे पार्टी.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

नानासाहेब नेफळे गुरुवार, 10/02/2014 - 22:57
अच्छा! तिथे हजारो लाखो सैनिक एकमेकाकडे बंदुका रोखुन उभे आहेत, तीन युद्ध झालीत, सुटला काश्मीर प्रश्न?पाकिस्तानच्या मानसिकतेत फरक पडला? जर प्रचंड ताकद असेल तर जरुर सशस्त्र प्रतिकार करावा, पण जिथे (ब्रिटीशांपूढे) तुटपुंजी सैनिकी ताकद असते तिथे दंडाला फूकाच्या बेटकुळ्या काढल्याने फक्त प्रतिस्पर्ध्याचे मनोरंजन होते, बाकी काही नाही.

In reply to by नानासाहेब नेफळे

कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 10/02/2014 - 23:08
प्रश्ण तेव्हाच सुटतात जेव्हा ते सोडवायची ईच्छा असते. जर का आपण युद्ध करायचचं ठरवलं तर काश्मिर सेनाबळावर मिळवणं फारसं अवघड नाही. ते घोंगडं आजपर्यंतच्या सगळ्या सरकारनी भिजत ठेवलं आहे. कुठलही सरकार थेट युद्ध टाळत आहे ह्याचं कारण तुम्हाला गेल्या वर्षी शहीद स्मारकाला काय प्रकार घडला त्यावरुन ल़क्षात यायला हवा. थेट युद्धाबरोबर अंतर्गत बंडाळीला तोंड देणं सरकारला जड जाईल.
तिथे दंडाला फूकाच्या बेटकुळ्या काढल्याने फक्त प्रतिस्पर्ध्याचे मनोरंजन होते, बाकी काही नाही.
अगदी सहमत. उपोषण केल्यामुळे शत्रुला शष्प फरक पडत नाही.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

नानासाहेब नेफळे गुरुवार, 10/02/2014 - 23:41
अंतर्गत बंडाळी
आपले आवडते पंतप्रधान परमप्रतापी मोदीजींचे अंतर्गत बंडाळीविषयीचे मत वाचा,यावर आपले काय म्हणने आहे. http://www.thehindu.com/news/national/indian-muslims-will-fail-alqaeda-modi/article6460807.ece/ ( हिंदू हिंदूत्व याविषयी चर्चा करताना नाव तरी शोभेल असे घ्या !कॅप्टन जॅक स्पॅरो कशाला?)

In reply to by नानासाहेब नेफळे

दिलेल्या लिंक विषयी
मोदी एक उत्कृष्ट दर्जाचे राजकारणी आहेत.
( हिंदू हिंदूत्व याविषयी चर्चा करताना नाव तरी शोभेल असे घ्या !कॅप्टन जॅक स्पॅरो कशाला?)
मग काकासाहेब सापळे, बाईसाहेब फुरसुंगीकर, ग्रेट्स्टिंकर, थिकॉसॉफर अश्याच नावांना हिंदुत्वावर बोलायचा अधिकार आहे का काय?

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

काळा पहाड Fri, 10/03/2014 - 00:13
नेफळे नाना, जरा अभ्यास वाढवा. माझं एक छोटसं काम करा, उद्या पाकिस्तान बॉर्डर वर जा, नो मॅन्स लँड वर उपोषणाला बसा. जर का तुमच्या उपोषणानी पाकिस्तान ला कळवळा आला आणि बिनशर्त अतिरेकी कारवाय थांबवल्या तर तुम्हाला म्हणाल तिथे पार्टी.
कळ्ळं नाय ओ त्याला. आमाला कळ्ळं. निदान पाकिस्तानी वाले तरी ही बिनडोक डोकेदुखी कायमची घालवतील असं तुमाला म्हणायचंय.

In reply to by नानासाहेब नेफळे

चित्रगुप्त Fri, 10/03/2014 - 16:28
ना गांधी ने ना विनायक ने ,आझादी दिलायी हिटलर ने असे वचनही उद्या प्रचलीत होईल.
छे छे .. दे दी हमे आजादी बिना खड्ग बिना ढाल, साबरमती के संत तुने कर दिया कमाल ... हे गाणे लहानपणापासून कानावर टाकून टाकून पक्के चिरेबंदी करून टाकले गेलेले आहे.

भृशुंडी Fri, 10/03/2014 - 08:43
म्हणजे खरंच कंटाळा येत नाही का? देजावूचा बाप वाटेल असं चालू असतं. गांधींवरच्या आधीच्या चर्वितचर्वाणाला मिपावर कुठेतरी सन्माननीय आणि चट्कन दिसेल अशी जागा शोधायला हवी. म्हणजे अपघात वाचतील.

पैसा Fri, 10/03/2014 - 14:37
महात्मा गांधीजींना भावपूर्ण श्रद्धांजली! प्रत्येकाने इथे निरर्थक काथ्या कुटणे आणि उखाळ्यापाखाळ्या काढण्यापेक्षा आपापले कामाचे टेबल, घर आणि गल्ली मन लावून साफ करावी. ती गांधीजींना खरी श्रद्धांजली ठरेल.

In reply to by पैसा

आजानुकर्ण Fri, 10/03/2014 - 15:24
गांधी महान खरे पण स्वच्छता त्यांच्यामुळे होत असे असे मानणे हा प्रचंड मोठा मुर्खपणा आहे. गाडगेबाबांना श्रेय द्यायला हवे! (पण गांधी महान!!) आयाबहिणींना शिवी देऊन दादागिरी करणारे गल्लीत सापडतात ते स्वच्छता कशी करुन देतील?

In reply to by आजानुकर्ण

पैसा Fri, 10/03/2014 - 15:44
आपण दुसर्‍याकडे कशाला बघायचं? स्वतःला जेवढं करता येईल तेवढं करावं. कोणी अडवलंय! फक्त स्वच्छता असं नव्हे, गांधीजींच्या मार्गावरील जे जे म्हणून प्रत्येकाला जमेल ते करावंच! काहीच नाही तर शाब्दिक आणि वैचारिक हिंसा तरी करू नये! असत्य बोलू नये, महिलांबद्दल आदर दाखवा, भ्रष्ट मार्गाने पैसे मिळवू नये, गरजेहून जास्त संपत्ती गोळा करून ठेवू नये. यातलं काहीच जमणार नाही का? मग निदान घरदार आणि गल्ली तरी स्वच्छ ठेवा. कमीतकमी रस्त्यावर कचरा, घाण टाकू नका. एवढं तरी जमेल ना?
लेखनविषय:
लेखनप्रकार
आज कोणालाही विचारा महात्मा गांधी नोटेवर का छापलेले आहेत? याच कोणी समर्पक उत्तर देऊच शकणार नाही ! हां कदाचित ते सांगतील कि गांधीजी महात्मा होते म्हणून. पण मग ते नोटेवरच का छापले ?(मनात माझा प्रश्न-कि नोटेवर छापले मना-मनात का नाही ?) याचे मी माझ्या परीने शोधलेले उत्तर आज त्यांच्या जयंती निमित्त मांडतो आहे. खरेतर गांधीजींना नोटेवर छापणे हा त्यांचा अपमान आहे अस वाटतं आणि हाच त्या महापुरुषाचा पराभव पण आहे, आपण केलेला !

वरून दट्ट्या बसला की.... !

शशिकांत ओक ·

अमित खोजे गुरुवार, 10/02/2014 - 02:28
हवाई दलामध्ये किंवा एकंदरच संरक्षण खात्याची प्रवेश परीक्षा कशी असते याचे वर्णन मला मित्रांकडून ऐकायला मिळाले. त्यामध्ये विशेष जाणवले कि निवडणारे परीक्षक अशी मुले बघतात जी हुशार असतात, ग्रुप लीड वगैरे असतात, क्षणात निर्णय घेणारे असतात आणि मुख्य म्हणजे दिलेल्या ऑर्डर्स प्रश्न न करता पाळणाऱ्या असतात. परंतु जर एखाद्या जुन्या पद्धती मध्ये कुणाला बदल करावासा वाटत असेल (जसे तुम्हाला वाटले) तशी सूचनासुद्द्धा करू नये अशी वरिष्ठ अधिकाऱ्यांची अपेक्षा असते का? आपण संरक्षण खात्यात जावे असे मला मनापासून वाटत होते आणि लहानपणी ती संधी दडवल्याबद्दल मला वाईटही वाटे. परंतु आता मी स्वतः इंजिनिअर असल्याने प्रत्येक ठिकाणी 'का?' हा प्रश्न विचाराणे किती जरुरी आहे हे सुद्धा मला माहित आहे. तुमचा हा अनुभव आणि बाकी ऐकीव माहिती बघता असे वाटते कि संरक्षण खात्यात गेलो नाही तेच बरे झाले. 'यस्स स्सार नो स्सार' अजिबात जमले नसते बुवा आपल्याला. ऑफ कोर्स हे सर्व क्षेत्रात होते माहिती आहे परंतु संरक्षण खात्यात ती requirement आहे असे वाटते.

In reply to by अमित खोजे

शशिकांत ओक Fri, 10/03/2014 - 00:34
मित्रा, तुला हांजी हांजी करावी लागते असे अपेक्षित आहे असे वाटते. पण सेना दळ हे वरिष्ठाने सांगितले किंवा ऑर्डर दिली की जशीच्या तशी तत्परतेने पाळणे यालाच शिस्त असे म्हणतात. त्याला हांजी असे नाव न दिलेले चांगले... आपली कल्पना चांगली आहे असे प्रत्येकाला वाटते पण इतरांना सांगितली की त्यातील इफ अन बट कळून येतात. म्हणून तोंडच उघडू नये असे नाही. परेड करताना सावधान - विश्राम करताना न कळत शिपाई आज्ञा पाळायला शिकतात.असो.

असंका गुरुवार, 10/02/2014 - 12:50
वरून दट्ट्या बसला की असं का म्हणत आहात साहेब? 'वरचा दट्ट्या' म्हणण्याने असं वाटतं की, करायला पाहिजे असं एखादं काम केवळ दबावा अभावी होत नव्हतं. दबावाचा प्रश्नच नाहिये इथे. कालपर्यंत पैसे घेऊन अकाउंट उघडावे असा नियम होता. पैसे न घेता अकाउंट उघडा म्हणणे म्हणजे नियम मोडा असे म्हणणे झाले. असा निर्णय शाखा पातळीवर घेणे म्हणजे वरिष्ठांनी ठरवून दिलेल्या पद्धतीने काम न करणे. ज्या संस्थेत वरीष्ठांनी ठरवून दिलेल्या पद्धतीपेक्षा वेगळ्या पद्धतीने काम चालते, तिथे सहसा कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही असं दिसतं! बँकिंग हे असे क्षेत्र आहे, ज्याचे मुलभूत नियम काही'शे' वर्षांपासून बदललेले नाहीत! पुरेशा अभ्यासाशिवाय ज्यांनी ते बदलू बघितले, त्यांनी आपले हात पोळून घेतले! संपूर्ण संस्थेवर परीणाम करणारे निर्णय, संपूर्ण संस्थेची जबाबदारी घेऊ शकणार्‍या व्यक्तीनी घ्यावेत. वरिष्ठ पातळीवरून निर्णय घेतले जातात तेव्हा त्यांच्याकडे तेवढे अधिकार, आणि जबाबदारी असते. एखादा निर्णय चुकला, तर सुधारणा करण्याची किंवा नुकसान कमीत कमी ठेवण्याची क्षमता वरिष्ठांमध्ये असते. आता सरकारने म्हणजे- खुद्द बँकांच्या मालकानेच बॅंकांना सांगितलं की अशा अशा पद्धतीने माणशी एक अकाउंट उघडावे. तसा नियम तयार केला. मग पैसे न घेता अकाउंट उघडणे सुरु झाले! दट्ट्या कसला? (जास्तीत जास्त अकाउंट कमीत कमी दिवसात उघडण्याबाबत बोलत असताल, तर गोष्ट वेगळी!!) बाकी: प्रिअँबल मध्येच 'कर्ज द्यायची नाहीत' असं लिहायचा काय उद्देश होता?

शशिकांत ओक Fri, 10/03/2014 - 01:12
मित्रा,
दबावाचा प्रश्नच नाहिये इथे.
बँकिंग हे असे क्षेत्र आहे, ज्याचे मुलभूत नियम काही'शे' वर्षांपासून बदललेले नाहीत!
दट्ट्या कसला?
तुझ्या विचारणे काही उत्तरे आहेत - बँकिंग नियमात बदल केले गेलेले नाहीत. ते करायची जबाबदारी त्या क्षेत्रातील वरिष्ठांची आहे. शेवटी मोदींच्या हाती सत्ता आल्यावर त्यांनी हा बदल करायचा त्या वरिष्ठांवर दट्टया आणला म्हणून, आणि म्हणूनच फुकटात खाते उघडायचे धारिष्ठ्य त्यांच्या अंगी आले. आता एकदा कायदा किंवा नियमच बदलला की मग तो पाळायला दबावाचा प्रश्न उरत नाही. (
जास्तीत जास्त अकाउंट कमीत कमी दिवसात उघडण्याबाबत बोलत असताल, तर गोष्ट वेगळी!!
नक्कीच तोही दट्ट्या आहेतच. आता पहा ना प्रत्येकाने आज हातात झाडू पकडलेला पाहताना या धेंडांना कधीच हातात झाडू धरायची वेळ आली नव्हती त्यांच्यावर नमोंनी ती आणली असे मनात म्हणत वरकरणी तरी राजीखुशी हे अंग मेहनतचे काम कॅमेऱ्या समोर केलेले पाहिले... मोदी म्हणतील, म्हणतील पण मग बसतील गप्प असे वाटून अनेकांनी त्यात फार्स जादा असल्याचे मत जाहीर केले. पण मोंदींचे पाणी काही और आहे, हे हळ हळू कळेल. त्यांच्या पक्षातील वरिष्ठांची मस्त गठडी त्यांनी वळली आहे. तर इतरांची काय कथा?
प्रिअँबल मध्येच 'कर्ज द्यायची नाहीत' असं लिहायचा काय उद्देश होता?
बँकिग व्यवसाय कर्ज देण्याच्या पायावर उभा आहे. विमा हे सामाजिक सुरक्षेच्या अखत्यारित येते. शिवाय सैन्यातील विमा उतरवताना कर्ज देणे म्हणजेच बँकिंग - फायदा तो अभिप्रेत नाही. म्हणूनच तसे कर्ज दिले जाणार नाही असे लिहिले गेले होते.

अमित खोजे गुरुवार, 10/02/2014 - 02:28
हवाई दलामध्ये किंवा एकंदरच संरक्षण खात्याची प्रवेश परीक्षा कशी असते याचे वर्णन मला मित्रांकडून ऐकायला मिळाले. त्यामध्ये विशेष जाणवले कि निवडणारे परीक्षक अशी मुले बघतात जी हुशार असतात, ग्रुप लीड वगैरे असतात, क्षणात निर्णय घेणारे असतात आणि मुख्य म्हणजे दिलेल्या ऑर्डर्स प्रश्न न करता पाळणाऱ्या असतात. परंतु जर एखाद्या जुन्या पद्धती मध्ये कुणाला बदल करावासा वाटत असेल (जसे तुम्हाला वाटले) तशी सूचनासुद्द्धा करू नये अशी वरिष्ठ अधिकाऱ्यांची अपेक्षा असते का? आपण संरक्षण खात्यात जावे असे मला मनापासून वाटत होते आणि लहानपणी ती संधी दडवल्याबद्दल मला वाईटही वाटे. परंतु आता मी स्वतः इंजिनिअर असल्याने प्रत्येक ठिकाणी 'का?' हा प्रश्न विचाराणे किती जरुरी आहे हे सुद्धा मला माहित आहे. तुमचा हा अनुभव आणि बाकी ऐकीव माहिती बघता असे वाटते कि संरक्षण खात्यात गेलो नाही तेच बरे झाले. 'यस्स स्सार नो स्सार' अजिबात जमले नसते बुवा आपल्याला. ऑफ कोर्स हे सर्व क्षेत्रात होते माहिती आहे परंतु संरक्षण खात्यात ती requirement आहे असे वाटते.

In reply to by अमित खोजे

शशिकांत ओक Fri, 10/03/2014 - 00:34
मित्रा, तुला हांजी हांजी करावी लागते असे अपेक्षित आहे असे वाटते. पण सेना दळ हे वरिष्ठाने सांगितले किंवा ऑर्डर दिली की जशीच्या तशी तत्परतेने पाळणे यालाच शिस्त असे म्हणतात. त्याला हांजी असे नाव न दिलेले चांगले... आपली कल्पना चांगली आहे असे प्रत्येकाला वाटते पण इतरांना सांगितली की त्यातील इफ अन बट कळून येतात. म्हणून तोंडच उघडू नये असे नाही. परेड करताना सावधान - विश्राम करताना न कळत शिपाई आज्ञा पाळायला शिकतात.असो.

असंका गुरुवार, 10/02/2014 - 12:50
वरून दट्ट्या बसला की असं का म्हणत आहात साहेब? 'वरचा दट्ट्या' म्हणण्याने असं वाटतं की, करायला पाहिजे असं एखादं काम केवळ दबावा अभावी होत नव्हतं. दबावाचा प्रश्नच नाहिये इथे. कालपर्यंत पैसे घेऊन अकाउंट उघडावे असा नियम होता. पैसे न घेता अकाउंट उघडा म्हणणे म्हणजे नियम मोडा असे म्हणणे झाले. असा निर्णय शाखा पातळीवर घेणे म्हणजे वरिष्ठांनी ठरवून दिलेल्या पद्धतीने काम न करणे. ज्या संस्थेत वरीष्ठांनी ठरवून दिलेल्या पद्धतीपेक्षा वेगळ्या पद्धतीने काम चालते, तिथे सहसा कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही असं दिसतं! बँकिंग हे असे क्षेत्र आहे, ज्याचे मुलभूत नियम काही'शे' वर्षांपासून बदललेले नाहीत! पुरेशा अभ्यासाशिवाय ज्यांनी ते बदलू बघितले, त्यांनी आपले हात पोळून घेतले! संपूर्ण संस्थेवर परीणाम करणारे निर्णय, संपूर्ण संस्थेची जबाबदारी घेऊ शकणार्‍या व्यक्तीनी घ्यावेत. वरिष्ठ पातळीवरून निर्णय घेतले जातात तेव्हा त्यांच्याकडे तेवढे अधिकार, आणि जबाबदारी असते. एखादा निर्णय चुकला, तर सुधारणा करण्याची किंवा नुकसान कमीत कमी ठेवण्याची क्षमता वरिष्ठांमध्ये असते. आता सरकारने म्हणजे- खुद्द बँकांच्या मालकानेच बॅंकांना सांगितलं की अशा अशा पद्धतीने माणशी एक अकाउंट उघडावे. तसा नियम तयार केला. मग पैसे न घेता अकाउंट उघडणे सुरु झाले! दट्ट्या कसला? (जास्तीत जास्त अकाउंट कमीत कमी दिवसात उघडण्याबाबत बोलत असताल, तर गोष्ट वेगळी!!) बाकी: प्रिअँबल मध्येच 'कर्ज द्यायची नाहीत' असं लिहायचा काय उद्देश होता?

शशिकांत ओक Fri, 10/03/2014 - 01:12
मित्रा,
दबावाचा प्रश्नच नाहिये इथे.
बँकिंग हे असे क्षेत्र आहे, ज्याचे मुलभूत नियम काही'शे' वर्षांपासून बदललेले नाहीत!
दट्ट्या कसला?
तुझ्या विचारणे काही उत्तरे आहेत - बँकिंग नियमात बदल केले गेलेले नाहीत. ते करायची जबाबदारी त्या क्षेत्रातील वरिष्ठांची आहे. शेवटी मोदींच्या हाती सत्ता आल्यावर त्यांनी हा बदल करायचा त्या वरिष्ठांवर दट्टया आणला म्हणून, आणि म्हणूनच फुकटात खाते उघडायचे धारिष्ठ्य त्यांच्या अंगी आले. आता एकदा कायदा किंवा नियमच बदलला की मग तो पाळायला दबावाचा प्रश्न उरत नाही. (
जास्तीत जास्त अकाउंट कमीत कमी दिवसात उघडण्याबाबत बोलत असताल, तर गोष्ट वेगळी!!
नक्कीच तोही दट्ट्या आहेतच. आता पहा ना प्रत्येकाने आज हातात झाडू पकडलेला पाहताना या धेंडांना कधीच हातात झाडू धरायची वेळ आली नव्हती त्यांच्यावर नमोंनी ती आणली असे मनात म्हणत वरकरणी तरी राजीखुशी हे अंग मेहनतचे काम कॅमेऱ्या समोर केलेले पाहिले... मोदी म्हणतील, म्हणतील पण मग बसतील गप्प असे वाटून अनेकांनी त्यात फार्स जादा असल्याचे मत जाहीर केले. पण मोंदींचे पाणी काही और आहे, हे हळ हळू कळेल. त्यांच्या पक्षातील वरिष्ठांची मस्त गठडी त्यांनी वळली आहे. तर इतरांची काय कथा?
प्रिअँबल मध्येच 'कर्ज द्यायची नाहीत' असं लिहायचा काय उद्देश होता?
बँकिग व्यवसाय कर्ज देण्याच्या पायावर उभा आहे. विमा हे सामाजिक सुरक्षेच्या अखत्यारित येते. शिवाय सैन्यातील विमा उतरवताना कर्ज देणे म्हणजेच बँकिंग - फायदा तो अभिप्रेत नाही. म्हणूनच तसे कर्ज दिले जाणार नाही असे लिहिले गेले होते.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वरून दट्ट्या बसला की....

ग्राहक राजा

सुबोध खरे ·

अभिनंदन आणि सलाम तुमच्या पिताजिंचे. जरी 5-10 टक्के लोकांनी असा लढा देण्याची तयारी ठेवली तर विमा कंपन्यांचा अरेरावीला पुरेसा पायबंद बसेल.

शिद Wed, 10/01/2014 - 21:44
धन्यवाद डॉ. खरे, हि माहीती पोहचवल्याबद्दल. तुमच्या वडीलांचे विशेष कौतुक त्यांनी ह्या वयात देखील चिकाटी व संयमाने सगळी परीस्थिती स्वतः हाताळून स्वतःचा हक्क मिळवून घेतला. अवांतरः कोणाकडे मुंबई/ठाणे येथील ग्राहकमंचाचे पत्ता व संपर्क क्रमांक आहेत का?

दशानन Wed, 10/01/2014 - 21:48
अभिनंदन! ग्राहक न्यायलयात न्याय मिळतोच, हे पुन्हा अधोरेखित झाले. मी स्वतः एअरटेल व व्होडाफोनवर केस केली होती व सर्व रितसर कागदपत्रे माझ्या हाती असल्यामुळे त्यांना दंड देखील झाला होता.

In reply to by दशानन

सुबोध खरे Wed, 10/01/2014 - 22:44
दशानन साहेब आपण सुद्धा आपल्या खटल्या बद्दल सविस्तर लिहावे अशी आपल्याला विनंती आहे कारण मोबाइल कंपन्या बद्दल बर्याच लोकांच्या तक्रारी आहेत त्यांना काही मार्गदर्शन होईल

In reply to by सुबोध खरे

दशानन Wed, 10/01/2014 - 22:49
नक्कीच, एअरटेल ने ४G सुरु केले होते व पहिल्या काही ग्राहकांमध्ये मी देखील होतो. सविस्तर एक लेख लिहतो यावर, आपली / ग्राहकांची नेमकी काय फसवणूक ही लोक करतात.

धर्मराजमुटके Wed, 10/01/2014 - 22:38
अभिनंदन ! तुमच्या वडीलांचे आणि तुमचेदेखील. विशेषतः निकालाच्या प्रतीचा दुवा इथे उपलब्ध करुन दिल्याबद्दल. (मला न्यायालयीन कामकाजाच्या / लिखीत भाषेबद्दल अंमळ जास्तच कौतूक आहे.) मात्र ग्राहक राजा नाहीये हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. तो जर खरोखरच राजा असता तर त्याला न्याय मागायची वेळ आली नसती.

In reply to by धर्मराजमुटके

धर्मराजमुटके Wed, 10/01/2014 - 22:51
जेव्हा जेव्हा मला न्यायालयीन कामकाजात शब्दांच्या / व्याकरणाच्या / शुद्धलेखनाच्या / वाक्यरचनेच्या चुका आढळतात तेव्हा का कोण जाणे पण मला आनंद होतो. न्यायालयीन भाषा म्हणजे शब्दांचा एक प्रकारचा खेळ असतो. आपली वाक्यरचना चुकू नये म्हणून सगळ्या बाजूची मंडळी तोलूनमापून बोलत / लिहित असतात. उदाहरणार्थ खालील वाक्य पहा.
The Complainant has therefore, alleged that in spite of correspondence with the Opposite Parties the Opposite Parties did not pay or reimburse the remaining amount of Rs.40,520/- the copies of which are filed alongwith the complaint at Exh.‘6’ & ‘7’.
चुक शोधा आणि शाबासकी मिळवा. :) सुचना : जर दुव्यावर उपलब्ध करुन दिलेली प्रत न्यायालयाने दिलेलीच मुळ प्रत किंवा तिची डिजीटल ( मराठी ? ) प्रत नसेल तर मी माझे शब्द मागे घेत आहे.

In reply to by धर्मराजमुटके

सुबोध खरे Wed, 10/01/2014 - 22:56
Rs.40,520/-(**) the copies of which are filed alongwith the complaint at Exh.‘6’ & ‘7’. ( ** ) या ठिकाणी पूर्ण विराम हवा होता. कारण पुढचे वाक्य न्यायालयाचे आहे

In reply to by सुबोध खरे

दशानन Wed, 10/01/2014 - 22:51
बळीराजाची अवस्था तर अजून बिकट हो, पण ग्राहक जरा व्यवस्थितपणे वागला तर १००% निकाल त्यांच्या बाजूने लागू शकतात. पण ग्राहक चुका कुठे करतो? पक्के बील घेत नाही, केलेल्या पाठ-पुराव्याचे मुद्देसूद (वेळ, काळ, दिनांक, महिना) माहिती आपल्या जवळ ठेवत नाही व सर्वात महत्वाचे.. किरकोळ रक्कम आहे का भांडा म्हणून विषय सोडून देणे.. :(

भाते Wed, 10/01/2014 - 22:55
आंजावर शोध घेतल्यावर हि माहिती मिळाली. अर्थात हि माहिती अपुर्ण/जुनी असण्याची शक्यता आहे. खरेसाहेब, तुमच्या वडिलांच्या चिकाटीला सलाम आणि हि माहिती इथे दिल्यापध्दल धन्यवाद.

आयुर्हित Wed, 10/01/2014 - 23:13
मानले आपल्या वडिलांना व आपल्यालाही. पैशासाठी नव्हे तर "लोकांना आपल्या हक्काची जाणीव करून देणे" हाच मूळ महान उद्देश असल्यामुळे आपल्या वडिलांचे त्रिवार अभिनंदन व साष्टांग दंडवत. एक आदर्श उदाहरण त्यांनी सर्वांपुढे मांडले आहे. व हे मिपावर सर्वापुढे आणल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.

In reply to by रेवती

एस गुरुवार, 10/02/2014 - 12:56
आपल्या वडिलांनी या वयात इतक्या चिवटपणे लढा देऊन पुढच्या पिढीला आदर्श घालून दिलाय.
अगदी असेच म्हणतो. तुमच्या वडिलांना सलाम!

काउबॉय गुरुवार, 10/02/2014 - 00:48
पण निकाल बाजूने लागल्यामुळे मात्र आनंद व उत्साह निर्माण झाला. ग्राहक न्यायालये हक्कांचे रक्षण करण्यास सक्षम आहेत असाच मला अनुभव आहे. थोड़ा संयम हवा.

प्रभाकर पेठकर गुरुवार, 10/02/2014 - 01:22
वा! न्यायालयीन लढ्याविषयी माहिती दिल्यामुळे मनाला एक प्रकारचा हुरुप आला आहे. येऊ नये, पण दुर्दैवाने असा एखादा प्रसंग आयुष्यात आलाच तर, हा धागा लक्षात ठेवून आरपारचा लढा देईन.

चौकटराजा गुरुवार, 10/02/2014 - 06:07
खुल्या अर्थव्यवस्थेचा कणा जसा " नफ्याचे स्वातंत्र्य" हा आहे तसाच ग्राहकाना सर्रास गंडविण्याचे स्वातंत्र्य हा देखील आहे. आपण सर्वानी ही अर्थव्यवस्था नेस्तनाबूत केली पाहिजे .....आर्र्र पण मग आपला रशिया होईल. आपण सर्वानीच " रोश विरूद्ध अ‍ॅडम्स " हे पुस्तक जरूर वाचा.

अजया गुरुवार, 10/02/2014 - 08:08
डाॅक्टर तुमच्या वडिलांना दंडवत सांगा.न्यायालयीन कारवाई त्रासदायक होईल म्हणून माझ्या आईच्या अॅापरेशन संदर्भातली काहीशी अशीच केस, पैसे अक्कलखाती जमा करुन सोडुन दिलेले त्याची अाठवण झाली.

नाखु गुरुवार, 10/02/2014 - 08:51
जिद्द आणि चिकाटी बद्दल.
वर्तमानात नुसते साक्षर होणे पुरेसे नाही "सुशिक्षीत" होणे अनिवार्य आहे.

कंजूस गुरुवार, 10/02/2014 - 10:15
तुमचे अनुभव मांडलेत, धन्यवाद. धडा घेतला. माझाही न्यु इंडिआचा हेल्थ इंन्शु० २००१ पासून आहे मोतीबिंदूच्या भरपाईबद्दल काय अटी आहेत ते वाचायला हवे.

सर्वसाक्षी गुरुवार, 10/02/2014 - 12:32
अभिनंदन आणि आपल्या वडीलांना सादर वंदन. माझ्या बहिणीने व तिच्या पतीने अशाच निग्रहाने न्यायाल्याचा हुकुम धाब्यावर बसविणार्‍या एका मुजोर सरकारी अधिकार्‍याविरुद्ध 'न्यायालयाच्या अवमानाचा' दावा मुंबई उच्च न्यायालयात दाखल केला. न्या. अधिकारी व न्या. पटेल यांच्या न्यायालयात सुनावणीच्या वेळी त्या अधिकार्‍यावर संतप्त झालेल्या मा.न्यायाधिशांनी परखडपणे सुनावले की स्वतःला कायद्याहून मोठे आहोत असे समजणार्‍यांना सहा आकडी दंड का करु नये? दंडाची रक्क्म त्या विभागाकडुन नव्हे तर व्यक्तिशः त्या उन्मत्त अधिकार्‍याकडुनच वसूल केली जावी अशी शिफारस करणार असल्याचे मा. न्यायमूर्तींनी हा दावा योग्य असून तो दाखल करुन घेतला जात आहे असा निकाल देताना म्हटले.

In reply to by स्पा

जबरदस्त चिकाटी लागते न्यायालयात जाउन न्याय मिळवण्या साठी. विशेषतः एखाद्या सरकारी किंवा बड्या कंपनी विरुध्द लढताना. निकाल काय लागतो याची खटला लढवणार्‍या कर्मचार्‍यांना काहीच फिकीर नसते. खरे अजोबांना या सगळ्या प्रतिक्रीया नक्की वाचायला द्या. या निमीत्त मी रिलायन्स मोबाईल कंपनी विरुध्द लोकअदालतीपर्यंत केलेले भांडण आठवले. त्यांची अशीच जिरवली होती मी कोणत्याही वकीलाची मदत न घेता. पैजारबुवा,

पैसा Sun, 10/05/2014 - 16:13
तुमच्या वडिलांचे अभिनंदन! आम्ही लोक सहसा एवढी चिकाटी दाखवत नाही, त्यामुळे सतत अन्याय सहन करत असतो. अन्यायाला न्यायात कसे बदलून घ्यायचे याचे हे उत्तम उदाहरण घालून दिले आहे!

चिगो Sun, 10/05/2014 - 17:12
सलाम.. तुमच्या वडीलांच्या चिकाटीला, जिद्दीला..

पैसा Tue, 10/07/2014 - 22:38
माझ्या मुलीच्या मोटोरोला ई चा डिस्प्ले फुटला. ऑथोराईज्ड सर्व्हिस सेंटरला २३ ऑगस्टला दुरुस्तीसाठी दिला, तेव्हा त्यांनी मोटोरोला कंपनीकडे चौकशी करून १८०० रुपये एस्टिमेट लिहून दिले आणि २० दिवसांत फोन मिळेल म्हणून सांगितले. मी एक महिना वाट बघून फोन केला तर म्हणतात की डिस्प्लेची किंमत आता ४००० झाली. तेवढे पैसे भरा नाहीतर फोन परत घेऊन जावा. बरं म्हटलं आणि मोटोरोलाच्या चॅट सपोर्टला विचारले की किंमत कधी वाढली. ते म्हणाले की २० सप्टेंबरला. म्हटल्यावर माझं डोकं सटकलं. कंपनीला सगळे डिटेल्स ईमेल केले आणि उत्तराची अजून वाट बघत आहे. दरम्यान ८ दिवसांपूर्वी सर्व्हिस सेंटरचा फोन आला की तुम्ही अजून फोन नेला नाहीत. त्याला म्हटले, की मी फोन देऊन एक महिना झाला तरी तुम्ही काय झोपा काढत होता का? मी अ‍ॅडव्हान्स पैसे देत होते ते तुम्ही घेतले नाहीत. आता मला २३ ऑगस्टच्या रेटने डिस्प्ले दुरुस्त करून द्या नाहीतर मी कन्झ्युमर कोर्टात जाते. आणखी काही वाद न घालता तो बुवा म्हणाला, वरिष्ठांशी बोलतो. काल सकाळी त्याचा फोन आला की पुढच्या आठवड्यात फोन तयार होईल. दुरुस्तीसाठी फक्त १८०० रुपये द्या. काम झालं. कन्झ्युमर कोर्टाचं नाव घेतलं म्हणून हे चॅप्टर लोक सुतासारखे सरळ झाले. नाहीतर १८०० च्या डिस्प्लेचे माझ्याकडून ४००० काढून मधले खिशात घातले असते. सरळच आहे ना. ऑर्डर २४ ऑगस्टला दिली म्हणतात मग दर २० सप्टेंबरचा हा कोणता न्याय झाला? पण चेपलं तर चेपलं अशीच वृत्ती दिसते बरेचदा.

सुबोध खरे Wed, 10/08/2014 - 10:43
मोटोरोला ई चा डिस्प्ले चार हजार रुपयाचा आहे याला अर्थच नाही कारण तो फोनच ६००० चा आहे म्हणजे बाकी सर्व गोष्टी फक्त दोन हजार रुपयाच्या?कंपनीला लिहायला पाहिजे कि आम्हाला एक डिस्प्ले नसलेला फोन २००० रुपयात द्या म्हणून हि गोष्ट सार्वजनिक न्यासावर लिहायला पाहिजे. म्हणजे लोकांना समजेल कि हे लोक फोन स्वस्तात विकतात आणि नंतर तुम्हाला लुबाडतात.

In reply to by सुबोध खरे

पैसा Wed, 10/08/2014 - 10:58
सर्व्हिस सेंटरचा अनुभव सगळ्याच फोनच्या बाबत वाईट आहे. मायक्रोमॅक्सचा एक हँडसेट पाण्यात पडून खराब झाला आणि त्याचा मदरबोर्ड गेला तर कंपनीच्या सर्व्हिस सेंटरला असाच एक महिना ठेवून घेतला आणि मग आता ते मॉडेल तयार होत नाही. स्पेअर्स मिळत नाहीत म्हणून परत दिला. म्हणजे एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब झाली तर तिची दुरुस्ती होत नाही. ती फेकून द्यायची का?

मदनबाण Wed, 10/08/2014 - 11:16
आमच्याकडे फार पूर्वी नेल्को ब्लू डायमंड चा रंगीत टिव्ही होता { महाभारत सिरीयलचा पहिला भाग याच टिव्हीवर पाहिला होता} या टिव्हीला १२ चॅनल होते, पण काही काळाने टिव्ही विचित्र वागायला लागला ! १२ चॅनलचा टिव्ही असुन सुद्धा १६ चॅनल दिसु लागले ! चॅनल रिमोट न वापरताही अपोआप चेंज होउ लागले. १२१ चॅनलच्या पुढचे चॅनल बदलले की मुंग्या दिसायला लागत म्हणुन वैतागुन १३-१४-१५-१६ असे चॅनल ट्युन करुन ठेवले म्हणजे चॅनल बदलला तरी मोठा आवाज होउन त्रास होणार नाही,अनेक वेळा कंपनीचा मेकॅनिक येउन गेला... गंमत अशी की तो आला की टिव्ही चाळे करायचा नाही पण तो गेला की काही वेळातच टिव्हीचा मंत्रचळ सुरु व्हायचा ! अनेकदा सोल्डरींग आणि तस्तम उपाय कंपनीच्या मेकॅनिकने करुन पाहिले पण फायदा झाला नाही ! या सर्व गोष्टींच्या फॉलअप आणि खर्चाची कागदपत्रे तिर्थरुपांनी नीट ठेवुन दिली होती...मग काही काळाने युरेका फोर्ब्सचा व्हॅक्युम क्लीनर घेतला, घेतल्यावर असे लक्षात आले की जी अ‍ॅटॅचमेंट्स ब्रोचर मधे दाखवण्यात आली होती ती दिली गेली नव्हती आणि व्हॅक्युम क्लिनरचा आवजही मोठा होता आणि त्यातुन स्पार्क सुद्धा यायचे... शेवटी तिर्थरुपांचा संयम सुटला त्यांनी सरळ रतन टाटा { नेल्को ब्लू डायमंड आणि युरेका फोर्ब्स ही दोन्ही टाटा ग्रुपची उत्पादने } ३५ पानी पत्र सगळ्या केलेल्या व्यव्हारांसकट पाठवले, आणि आश्चर्य कंपनीचे मॅनेजर्स आपच्या घरी प्रकट झाले, टिव्ही आणि व्हॅक्युम क्लिनर घेउन गेले आणि माफी सुद्धा मागितली.स्वतः रतन टाटांनी त्यांचे सही असलेले पत्र पाठवुन या गोष्टी व्यवस्थित दुरुस्त केल्या जातील याची खात्री दिली आणि तसे झाले देखील. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Hiring records 14% growth; IT/Telecom sector shines again: TimesJobs RecruiteX

In reply to by मदनबाण

पैसा Wed, 10/08/2014 - 11:40
मला पण बरेचदा वाटतं की टाटा इंडिकॉमच्या कॉल सेंटरवाल्यांविरुद्ध तक्रार करायला थेट रतन टाटांना पत्र लिहावं म्हणून!

In reply to by मदनबाण

पिलीयन रायडर Wed, 10/08/2014 - 12:04
माझ्या मित्रानेही नॅनोने उभ्या उभ्या पेट घेतला म्हणुन (बहुदा) सचिन वाघ (नॅनो प्रोजेक्ट्चे हेड) ह्यांनाच पत्र लिहीले.. तर फटाफट लोक येऊन दुरुस्त करुन गेले.. त्यात एक म्हणाला "साहब, आपने चिटी मारने के लिये तोफ इस्तमाल की है"

In reply to by मदनबाण

रेवती Wed, 10/08/2014 - 15:30
अगदी असेच नसले तरी माझ्या वडीलांनी टीव्ही कंपनीला कोर्टात खेचून धडा शिकवल्याचे आठवते. त्यांनी १० हजार रु. भरपाई दिली होती.

अभिनंदन आणि सलाम तुमच्या पिताजिंचे. जरी 5-10 टक्के लोकांनी असा लढा देण्याची तयारी ठेवली तर विमा कंपन्यांचा अरेरावीला पुरेसा पायबंद बसेल.

शिद Wed, 10/01/2014 - 21:44
धन्यवाद डॉ. खरे, हि माहीती पोहचवल्याबद्दल. तुमच्या वडीलांचे विशेष कौतुक त्यांनी ह्या वयात देखील चिकाटी व संयमाने सगळी परीस्थिती स्वतः हाताळून स्वतःचा हक्क मिळवून घेतला. अवांतरः कोणाकडे मुंबई/ठाणे येथील ग्राहकमंचाचे पत्ता व संपर्क क्रमांक आहेत का?

दशानन Wed, 10/01/2014 - 21:48
अभिनंदन! ग्राहक न्यायलयात न्याय मिळतोच, हे पुन्हा अधोरेखित झाले. मी स्वतः एअरटेल व व्होडाफोनवर केस केली होती व सर्व रितसर कागदपत्रे माझ्या हाती असल्यामुळे त्यांना दंड देखील झाला होता.

In reply to by दशानन

सुबोध खरे Wed, 10/01/2014 - 22:44
दशानन साहेब आपण सुद्धा आपल्या खटल्या बद्दल सविस्तर लिहावे अशी आपल्याला विनंती आहे कारण मोबाइल कंपन्या बद्दल बर्याच लोकांच्या तक्रारी आहेत त्यांना काही मार्गदर्शन होईल

In reply to by सुबोध खरे

दशानन Wed, 10/01/2014 - 22:49
नक्कीच, एअरटेल ने ४G सुरु केले होते व पहिल्या काही ग्राहकांमध्ये मी देखील होतो. सविस्तर एक लेख लिहतो यावर, आपली / ग्राहकांची नेमकी काय फसवणूक ही लोक करतात.

धर्मराजमुटके Wed, 10/01/2014 - 22:38
अभिनंदन ! तुमच्या वडीलांचे आणि तुमचेदेखील. विशेषतः निकालाच्या प्रतीचा दुवा इथे उपलब्ध करुन दिल्याबद्दल. (मला न्यायालयीन कामकाजाच्या / लिखीत भाषेबद्दल अंमळ जास्तच कौतूक आहे.) मात्र ग्राहक राजा नाहीये हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. तो जर खरोखरच राजा असता तर त्याला न्याय मागायची वेळ आली नसती.

In reply to by धर्मराजमुटके

धर्मराजमुटके Wed, 10/01/2014 - 22:51
जेव्हा जेव्हा मला न्यायालयीन कामकाजात शब्दांच्या / व्याकरणाच्या / शुद्धलेखनाच्या / वाक्यरचनेच्या चुका आढळतात तेव्हा का कोण जाणे पण मला आनंद होतो. न्यायालयीन भाषा म्हणजे शब्दांचा एक प्रकारचा खेळ असतो. आपली वाक्यरचना चुकू नये म्हणून सगळ्या बाजूची मंडळी तोलूनमापून बोलत / लिहित असतात. उदाहरणार्थ खालील वाक्य पहा.
The Complainant has therefore, alleged that in spite of correspondence with the Opposite Parties the Opposite Parties did not pay or reimburse the remaining amount of Rs.40,520/- the copies of which are filed alongwith the complaint at Exh.‘6’ & ‘7’.
चुक शोधा आणि शाबासकी मिळवा. :) सुचना : जर दुव्यावर उपलब्ध करुन दिलेली प्रत न्यायालयाने दिलेलीच मुळ प्रत किंवा तिची डिजीटल ( मराठी ? ) प्रत नसेल तर मी माझे शब्द मागे घेत आहे.

In reply to by धर्मराजमुटके

सुबोध खरे Wed, 10/01/2014 - 22:56
Rs.40,520/-(**) the copies of which are filed alongwith the complaint at Exh.‘6’ & ‘7’. ( ** ) या ठिकाणी पूर्ण विराम हवा होता. कारण पुढचे वाक्य न्यायालयाचे आहे

In reply to by सुबोध खरे

दशानन Wed, 10/01/2014 - 22:51
बळीराजाची अवस्था तर अजून बिकट हो, पण ग्राहक जरा व्यवस्थितपणे वागला तर १००% निकाल त्यांच्या बाजूने लागू शकतात. पण ग्राहक चुका कुठे करतो? पक्के बील घेत नाही, केलेल्या पाठ-पुराव्याचे मुद्देसूद (वेळ, काळ, दिनांक, महिना) माहिती आपल्या जवळ ठेवत नाही व सर्वात महत्वाचे.. किरकोळ रक्कम आहे का भांडा म्हणून विषय सोडून देणे.. :(

भाते Wed, 10/01/2014 - 22:55
आंजावर शोध घेतल्यावर हि माहिती मिळाली. अर्थात हि माहिती अपुर्ण/जुनी असण्याची शक्यता आहे. खरेसाहेब, तुमच्या वडिलांच्या चिकाटीला सलाम आणि हि माहिती इथे दिल्यापध्दल धन्यवाद.

आयुर्हित Wed, 10/01/2014 - 23:13
मानले आपल्या वडिलांना व आपल्यालाही. पैशासाठी नव्हे तर "लोकांना आपल्या हक्काची जाणीव करून देणे" हाच मूळ महान उद्देश असल्यामुळे आपल्या वडिलांचे त्रिवार अभिनंदन व साष्टांग दंडवत. एक आदर्श उदाहरण त्यांनी सर्वांपुढे मांडले आहे. व हे मिपावर सर्वापुढे आणल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.

In reply to by रेवती

एस गुरुवार, 10/02/2014 - 12:56
आपल्या वडिलांनी या वयात इतक्या चिवटपणे लढा देऊन पुढच्या पिढीला आदर्श घालून दिलाय.
अगदी असेच म्हणतो. तुमच्या वडिलांना सलाम!

काउबॉय गुरुवार, 10/02/2014 - 00:48
पण निकाल बाजूने लागल्यामुळे मात्र आनंद व उत्साह निर्माण झाला. ग्राहक न्यायालये हक्कांचे रक्षण करण्यास सक्षम आहेत असाच मला अनुभव आहे. थोड़ा संयम हवा.

प्रभाकर पेठकर गुरुवार, 10/02/2014 - 01:22
वा! न्यायालयीन लढ्याविषयी माहिती दिल्यामुळे मनाला एक प्रकारचा हुरुप आला आहे. येऊ नये, पण दुर्दैवाने असा एखादा प्रसंग आयुष्यात आलाच तर, हा धागा लक्षात ठेवून आरपारचा लढा देईन.

चौकटराजा गुरुवार, 10/02/2014 - 06:07
खुल्या अर्थव्यवस्थेचा कणा जसा " नफ्याचे स्वातंत्र्य" हा आहे तसाच ग्राहकाना सर्रास गंडविण्याचे स्वातंत्र्य हा देखील आहे. आपण सर्वानी ही अर्थव्यवस्था नेस्तनाबूत केली पाहिजे .....आर्र्र पण मग आपला रशिया होईल. आपण सर्वानीच " रोश विरूद्ध अ‍ॅडम्स " हे पुस्तक जरूर वाचा.

अजया गुरुवार, 10/02/2014 - 08:08
डाॅक्टर तुमच्या वडिलांना दंडवत सांगा.न्यायालयीन कारवाई त्रासदायक होईल म्हणून माझ्या आईच्या अॅापरेशन संदर्भातली काहीशी अशीच केस, पैसे अक्कलखाती जमा करुन सोडुन दिलेले त्याची अाठवण झाली.

नाखु गुरुवार, 10/02/2014 - 08:51
जिद्द आणि चिकाटी बद्दल.
वर्तमानात नुसते साक्षर होणे पुरेसे नाही "सुशिक्षीत" होणे अनिवार्य आहे.

कंजूस गुरुवार, 10/02/2014 - 10:15
तुमचे अनुभव मांडलेत, धन्यवाद. धडा घेतला. माझाही न्यु इंडिआचा हेल्थ इंन्शु० २००१ पासून आहे मोतीबिंदूच्या भरपाईबद्दल काय अटी आहेत ते वाचायला हवे.

सर्वसाक्षी गुरुवार, 10/02/2014 - 12:32
अभिनंदन आणि आपल्या वडीलांना सादर वंदन. माझ्या बहिणीने व तिच्या पतीने अशाच निग्रहाने न्यायाल्याचा हुकुम धाब्यावर बसविणार्‍या एका मुजोर सरकारी अधिकार्‍याविरुद्ध 'न्यायालयाच्या अवमानाचा' दावा मुंबई उच्च न्यायालयात दाखल केला. न्या. अधिकारी व न्या. पटेल यांच्या न्यायालयात सुनावणीच्या वेळी त्या अधिकार्‍यावर संतप्त झालेल्या मा.न्यायाधिशांनी परखडपणे सुनावले की स्वतःला कायद्याहून मोठे आहोत असे समजणार्‍यांना सहा आकडी दंड का करु नये? दंडाची रक्क्म त्या विभागाकडुन नव्हे तर व्यक्तिशः त्या उन्मत्त अधिकार्‍याकडुनच वसूल केली जावी अशी शिफारस करणार असल्याचे मा. न्यायमूर्तींनी हा दावा योग्य असून तो दाखल करुन घेतला जात आहे असा निकाल देताना म्हटले.

In reply to by स्पा

जबरदस्त चिकाटी लागते न्यायालयात जाउन न्याय मिळवण्या साठी. विशेषतः एखाद्या सरकारी किंवा बड्या कंपनी विरुध्द लढताना. निकाल काय लागतो याची खटला लढवणार्‍या कर्मचार्‍यांना काहीच फिकीर नसते. खरे अजोबांना या सगळ्या प्रतिक्रीया नक्की वाचायला द्या. या निमीत्त मी रिलायन्स मोबाईल कंपनी विरुध्द लोकअदालतीपर्यंत केलेले भांडण आठवले. त्यांची अशीच जिरवली होती मी कोणत्याही वकीलाची मदत न घेता. पैजारबुवा,

पैसा Sun, 10/05/2014 - 16:13
तुमच्या वडिलांचे अभिनंदन! आम्ही लोक सहसा एवढी चिकाटी दाखवत नाही, त्यामुळे सतत अन्याय सहन करत असतो. अन्यायाला न्यायात कसे बदलून घ्यायचे याचे हे उत्तम उदाहरण घालून दिले आहे!

चिगो Sun, 10/05/2014 - 17:12
सलाम.. तुमच्या वडीलांच्या चिकाटीला, जिद्दीला..

पैसा Tue, 10/07/2014 - 22:38
माझ्या मुलीच्या मोटोरोला ई चा डिस्प्ले फुटला. ऑथोराईज्ड सर्व्हिस सेंटरला २३ ऑगस्टला दुरुस्तीसाठी दिला, तेव्हा त्यांनी मोटोरोला कंपनीकडे चौकशी करून १८०० रुपये एस्टिमेट लिहून दिले आणि २० दिवसांत फोन मिळेल म्हणून सांगितले. मी एक महिना वाट बघून फोन केला तर म्हणतात की डिस्प्लेची किंमत आता ४००० झाली. तेवढे पैसे भरा नाहीतर फोन परत घेऊन जावा. बरं म्हटलं आणि मोटोरोलाच्या चॅट सपोर्टला विचारले की किंमत कधी वाढली. ते म्हणाले की २० सप्टेंबरला. म्हटल्यावर माझं डोकं सटकलं. कंपनीला सगळे डिटेल्स ईमेल केले आणि उत्तराची अजून वाट बघत आहे. दरम्यान ८ दिवसांपूर्वी सर्व्हिस सेंटरचा फोन आला की तुम्ही अजून फोन नेला नाहीत. त्याला म्हटले, की मी फोन देऊन एक महिना झाला तरी तुम्ही काय झोपा काढत होता का? मी अ‍ॅडव्हान्स पैसे देत होते ते तुम्ही घेतले नाहीत. आता मला २३ ऑगस्टच्या रेटने डिस्प्ले दुरुस्त करून द्या नाहीतर मी कन्झ्युमर कोर्टात जाते. आणखी काही वाद न घालता तो बुवा म्हणाला, वरिष्ठांशी बोलतो. काल सकाळी त्याचा फोन आला की पुढच्या आठवड्यात फोन तयार होईल. दुरुस्तीसाठी फक्त १८०० रुपये द्या. काम झालं. कन्झ्युमर कोर्टाचं नाव घेतलं म्हणून हे चॅप्टर लोक सुतासारखे सरळ झाले. नाहीतर १८०० च्या डिस्प्लेचे माझ्याकडून ४००० काढून मधले खिशात घातले असते. सरळच आहे ना. ऑर्डर २४ ऑगस्टला दिली म्हणतात मग दर २० सप्टेंबरचा हा कोणता न्याय झाला? पण चेपलं तर चेपलं अशीच वृत्ती दिसते बरेचदा.

सुबोध खरे Wed, 10/08/2014 - 10:43
मोटोरोला ई चा डिस्प्ले चार हजार रुपयाचा आहे याला अर्थच नाही कारण तो फोनच ६००० चा आहे म्हणजे बाकी सर्व गोष्टी फक्त दोन हजार रुपयाच्या?कंपनीला लिहायला पाहिजे कि आम्हाला एक डिस्प्ले नसलेला फोन २००० रुपयात द्या म्हणून हि गोष्ट सार्वजनिक न्यासावर लिहायला पाहिजे. म्हणजे लोकांना समजेल कि हे लोक फोन स्वस्तात विकतात आणि नंतर तुम्हाला लुबाडतात.

In reply to by सुबोध खरे

पैसा Wed, 10/08/2014 - 10:58
सर्व्हिस सेंटरचा अनुभव सगळ्याच फोनच्या बाबत वाईट आहे. मायक्रोमॅक्सचा एक हँडसेट पाण्यात पडून खराब झाला आणि त्याचा मदरबोर्ड गेला तर कंपनीच्या सर्व्हिस सेंटरला असाच एक महिना ठेवून घेतला आणि मग आता ते मॉडेल तयार होत नाही. स्पेअर्स मिळत नाहीत म्हणून परत दिला. म्हणजे एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब झाली तर तिची दुरुस्ती होत नाही. ती फेकून द्यायची का?

मदनबाण Wed, 10/08/2014 - 11:16
आमच्याकडे फार पूर्वी नेल्को ब्लू डायमंड चा रंगीत टिव्ही होता { महाभारत सिरीयलचा पहिला भाग याच टिव्हीवर पाहिला होता} या टिव्हीला १२ चॅनल होते, पण काही काळाने टिव्ही विचित्र वागायला लागला ! १२ चॅनलचा टिव्ही असुन सुद्धा १६ चॅनल दिसु लागले ! चॅनल रिमोट न वापरताही अपोआप चेंज होउ लागले. १२१ चॅनलच्या पुढचे चॅनल बदलले की मुंग्या दिसायला लागत म्हणुन वैतागुन १३-१४-१५-१६ असे चॅनल ट्युन करुन ठेवले म्हणजे चॅनल बदलला तरी मोठा आवाज होउन त्रास होणार नाही,अनेक वेळा कंपनीचा मेकॅनिक येउन गेला... गंमत अशी की तो आला की टिव्ही चाळे करायचा नाही पण तो गेला की काही वेळातच टिव्हीचा मंत्रचळ सुरु व्हायचा ! अनेकदा सोल्डरींग आणि तस्तम उपाय कंपनीच्या मेकॅनिकने करुन पाहिले पण फायदा झाला नाही ! या सर्व गोष्टींच्या फॉलअप आणि खर्चाची कागदपत्रे तिर्थरुपांनी नीट ठेवुन दिली होती...मग काही काळाने युरेका फोर्ब्सचा व्हॅक्युम क्लीनर घेतला, घेतल्यावर असे लक्षात आले की जी अ‍ॅटॅचमेंट्स ब्रोचर मधे दाखवण्यात आली होती ती दिली गेली नव्हती आणि व्हॅक्युम क्लिनरचा आवजही मोठा होता आणि त्यातुन स्पार्क सुद्धा यायचे... शेवटी तिर्थरुपांचा संयम सुटला त्यांनी सरळ रतन टाटा { नेल्को ब्लू डायमंड आणि युरेका फोर्ब्स ही दोन्ही टाटा ग्रुपची उत्पादने } ३५ पानी पत्र सगळ्या केलेल्या व्यव्हारांसकट पाठवले, आणि आश्चर्य कंपनीचे मॅनेजर्स आपच्या घरी प्रकट झाले, टिव्ही आणि व्हॅक्युम क्लिनर घेउन गेले आणि माफी सुद्धा मागितली.स्वतः रतन टाटांनी त्यांचे सही असलेले पत्र पाठवुन या गोष्टी व्यवस्थित दुरुस्त केल्या जातील याची खात्री दिली आणि तसे झाले देखील. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Hiring records 14% growth; IT/Telecom sector shines again: TimesJobs RecruiteX

In reply to by मदनबाण

पैसा Wed, 10/08/2014 - 11:40
मला पण बरेचदा वाटतं की टाटा इंडिकॉमच्या कॉल सेंटरवाल्यांविरुद्ध तक्रार करायला थेट रतन टाटांना पत्र लिहावं म्हणून!

In reply to by मदनबाण

पिलीयन रायडर Wed, 10/08/2014 - 12:04
माझ्या मित्रानेही नॅनोने उभ्या उभ्या पेट घेतला म्हणुन (बहुदा) सचिन वाघ (नॅनो प्रोजेक्ट्चे हेड) ह्यांनाच पत्र लिहीले.. तर फटाफट लोक येऊन दुरुस्त करुन गेले.. त्यात एक म्हणाला "साहब, आपने चिटी मारने के लिये तोफ इस्तमाल की है"

In reply to by मदनबाण

रेवती Wed, 10/08/2014 - 15:30
अगदी असेच नसले तरी माझ्या वडीलांनी टीव्ही कंपनीला कोर्टात खेचून धडा शिकवल्याचे आठवते. त्यांनी १० हजार रु. भरपाई दिली होती.
लेखनविषय:
लेखनप्रकार
ग्राहक राजा हि आमच्या वडिलांनी ग्राहक न्यायालयात दिलेल्या लढ्याची छोटीशी कहाणी. आमच्या आईचा एक लाखाचा मेडिक्लेम १९९९ साली काढलेला होता. न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी कडे. २०१२ साली तिचे दोन्ही डोळ्यांच्या मोतीबिंदूची शस्त्रक्रिया ठाण्याच्या एका खाजगी रुग्णालयात झाली. ती पूर्ण बरी होउन घरी आली. आम्ही शस्त्रक्रियेच्या अगोदर विमा कंपनीला त्याबद्दल कळविले होते. जे जे सर्व कागदी सोपस्कार होते ते पूर्ण केलेले होते. शल्यक्रिया झाल्यावर त्याचे बिल रूपये ८८०००/- आम्ही कंपनीकडे पाठविले.

(डोसा इथला संपत नाही)

धन्या ·

पैसा Wed, 10/01/2014 - 18:55
मानकर डोसा खाणार्‍या एका जिल्बीप्रेमीच्या आठवणीने ड्वाले पाणावले! =)) बादवे ती गाडी अ‍ॅक्टिव्हा होती काय रे किंवा अल्टो? :D

In reply to by खटपट्या

श्रीरंग_जोशी गुरुवार, 10/02/2014 - 07:29
१९९१ साली श्री एस. व्ही. ब्रह्मे यांनी गणेशखिंड रस्त्यावर केलेली लुनायात्रा जितकी ऐतिहासिक आहे तितकीच २०१३ साली एका मिपाकराने सिंहगड रस्त्यावर केलेली मांडीयात्रा ऐतिहासिक आहे. तो ऐतिहासिक क्षण दुसर्‍या एका मिपाकराने अलगदपणे चतुरभ्रमणध्वनीत टिपला अन आज तुमच्या कुंचल्यातून उतरला. या कामगिरीकरीता दंडवत स्वीकारा.

In reply to by खटपट्या

बॅटमॅन Tue, 10/07/2014 - 16:59
हे म्हणजे 'मास्तर उग्वे' गुरुजी कुंगफू आणि ताई-ची इ. च्या कोर्सला चाललेतसं दिस्तंय. तोंड पर्फेक्ट मास्तर ऊग्वेच!!!

सूड Wed, 10/01/2014 - 19:08
>> मात्र कवितेत साहित्यिक मुल्य शोधण्याचा तसेच मीटर लावण्याचा प्रयत्न करु नये. पदरी निराशा येईल. हे विशेष आवडलं. 'स्कुटीवर बैसोनि दुडदुडा येसि आणिक चटणीडोसे मान्करला खासि' अशी आरती मध्यंतरी लिहायची लहर आली होती. ;) पण काही कारणास्त्व ते जमलं नाही.

विटेकर Wed, 10/01/2014 - 19:26
अभिजात मराठी साहित्यात या कवितेने जो भारदस्तपणा आणला आहे त्याला तोड नाही . मराठी सारस्वताच्या गेल्या साडे आठशे वर्षांच्या इतिहासात इतके ठाशिव आणि रेखीव कोणी लिहिले नव्हते. एकाच वेळी भडभुन्जे रसिक आणि पळपुटे समिक्शक यांना कुंपणावरच रेटल्याचे वास्तववादी भान या काव्याने निर्माण केले आहे.

In reply to by जेनी...

धन्या Wed, 10/01/2014 - 19:52
सुहास दोन डॉट आणि जेनी तीन डॉट, कविता डोसा या पदार्थावर आहे याची बेशर्त स्विकृती व्हायला हवी तुमच्याकडून. मी कवितेच्या विशेष सुचनेत "शब्दबंबाळ लेख लिहून कवितेचे रसग्रहण करण्यास आमची हरकत नाही" असं म्हटलं आहे. कवितेची "यात इडली का नाही, मेदु वडा का नाही" अशी समिक्षा करा असं म्हटलेलं नाही.

In reply to by धन्या

सूड Wed, 10/01/2014 - 19:54
छ्या राव!! नदीपलिकडे असलात म्हणून काय झालं, पुण्यात राहता हे जाणवण्याइतपत तरी धारदार होऊ देत शब्द!! ;)

In reply to by सूड

धन्या Wed, 10/01/2014 - 20:00
पुण्याची हद्द कुठे संपते हे एकदा आमच्या त्या मधल्या आळीतल्या मध्याला विचारायला हवं. तो म्हणे पूर्वी पेठेत राहायचा. ;)

In reply to by जेपी

धन्या Wed, 10/01/2014 - 19:57
याचे उत्तर मी वरच्या एका प्रतिसादात आधीच दिले आहे.
मी कवितेच्या विशेष सुचनेत "शब्दबंबाळ लेख लिहून कवितेचे रसग्रहण करण्यास आमची हरकत नाही" असं म्हटलं आहे. कवितेची "यात इडली का नाही, मेदु वडा का नाही" अशी समिक्षा करा असं म्हटलेलं नाही.
तुमचा बटाटा वडा सुद्धा अ‍ॅड करा माझ्या वरच्या प्रतिसादात. कोटमधील वाक्ये पिवळी कशी करायची हे कुणी सांगेल का? :(

In reply to by धन्या

सुहास.. Wed, 10/01/2014 - 20:48
कोटमधील वाक्ये पिवळी कशी करायची हे कुणी सांगेल का? >> विशेष पिवळा : शब्दपिवळा लेख लिहून कवितेचे रसपिवळे करण्यास आमची पिवळी नाही. मात्र कवितेत पिवळे मुल्य शोधण्याचा तसेच मीटर पिवळ्ण्याचा प्रयत्न करु नये. पिवळी निराशा येईल. येव्हढे पिवळे बस का ;)

विवेकपटाईत Wed, 10/01/2014 - 21:11
प्रियकराला तिची आठवण आली आणि डोस्या सारखा स्वादिष्ट पदार्थ ही गळया खालील उतरला नाही. किती प्रेम आहे त्याचे तिच्यावर. तिची गाडी पलीकडून जाते अर्थात या जन्मी तरी मिलन होणार नाही, हे जरी खरे असले तरी कदाचित पलीकडे जाणार्या गाडीच्या खिडकीतून तिचे ओझरते दर्शन झाले असेल. तेच स्मरण करत आयुष्य कंठ्णारा हा प्रियकर जगा वेगळा आहेच. तिच्या प्रेमात बुडालेला हा उपाशी राहून तिच्यासाठी प्राणाचाही त्याग करणार. या वेगळे प्रेमाचे काय उदात्त चित्रण काय असेल. माझ्या जवळ शब्द नाही एखादा खंदा समीक्षकच या कवितेचे योग्य मूल्यमापन करू शकेल.

प्रचेतस Wed, 10/01/2014 - 22:03
=)) दिवसभर अक्षीचे गधेगाळ शोधत हिंडत असल्याने तुझा डोसा आता पाहिला. बाकी ह्या निमित्ताने 'टाकला होता डोसा, आमलेट कस्सं बाहेर आलं' अशा ओळी असलेल्या एका अजरामर काव्याची आठवण आली.

In reply to by मुक्त विहारि

धन्या Wed, 10/01/2014 - 23:35
"मानकर डोसा" म्हणून पुण्यात डोसा केंद्रे आहेत "चितळेंची बाकरवडी" टाईपची. चांगल्या चवीचे डोश्याचे विविध प्रकार मिळतात त्यांच्याकडे.

चौकटराजा गुरुवार, 10/02/2014 - 05:59
जिलबी इथली संपत नाही , एक्का, तुमची आठवण येते मी मिपावरती येतो तुमचे विमान ओमान ला जाते

कंजूस गुरुवार, 10/02/2014 - 06:36
कोटातली अक्षरे पिवळी करून जिलबित पाक मुरवायचा खटाटोप करण्यापेक्षा पिठ जरा जास्तीआंबवा.

श्रीरंग_जोशी गुरुवार, 10/02/2014 - 06:50
विडंबन छान जमले आहे. बाकी यामुळे एका नव्या दभाउ साखळी बद्दल ठाऊक झाले - http://mankardosacentre.com/.

पैसा Wed, 10/01/2014 - 18:55
मानकर डोसा खाणार्‍या एका जिल्बीप्रेमीच्या आठवणीने ड्वाले पाणावले! =)) बादवे ती गाडी अ‍ॅक्टिव्हा होती काय रे किंवा अल्टो? :D

In reply to by खटपट्या

श्रीरंग_जोशी गुरुवार, 10/02/2014 - 07:29
१९९१ साली श्री एस. व्ही. ब्रह्मे यांनी गणेशखिंड रस्त्यावर केलेली लुनायात्रा जितकी ऐतिहासिक आहे तितकीच २०१३ साली एका मिपाकराने सिंहगड रस्त्यावर केलेली मांडीयात्रा ऐतिहासिक आहे. तो ऐतिहासिक क्षण दुसर्‍या एका मिपाकराने अलगदपणे चतुरभ्रमणध्वनीत टिपला अन आज तुमच्या कुंचल्यातून उतरला. या कामगिरीकरीता दंडवत स्वीकारा.

In reply to by खटपट्या

बॅटमॅन Tue, 10/07/2014 - 16:59
हे म्हणजे 'मास्तर उग्वे' गुरुजी कुंगफू आणि ताई-ची इ. च्या कोर्सला चाललेतसं दिस्तंय. तोंड पर्फेक्ट मास्तर ऊग्वेच!!!

सूड Wed, 10/01/2014 - 19:08
>> मात्र कवितेत साहित्यिक मुल्य शोधण्याचा तसेच मीटर लावण्याचा प्रयत्न करु नये. पदरी निराशा येईल. हे विशेष आवडलं. 'स्कुटीवर बैसोनि दुडदुडा येसि आणिक चटणीडोसे मान्करला खासि' अशी आरती मध्यंतरी लिहायची लहर आली होती. ;) पण काही कारणास्त्व ते जमलं नाही.

विटेकर Wed, 10/01/2014 - 19:26
अभिजात मराठी साहित्यात या कवितेने जो भारदस्तपणा आणला आहे त्याला तोड नाही . मराठी सारस्वताच्या गेल्या साडे आठशे वर्षांच्या इतिहासात इतके ठाशिव आणि रेखीव कोणी लिहिले नव्हते. एकाच वेळी भडभुन्जे रसिक आणि पळपुटे समिक्शक यांना कुंपणावरच रेटल्याचे वास्तववादी भान या काव्याने निर्माण केले आहे.

In reply to by जेनी...

धन्या Wed, 10/01/2014 - 19:52
सुहास दोन डॉट आणि जेनी तीन डॉट, कविता डोसा या पदार्थावर आहे याची बेशर्त स्विकृती व्हायला हवी तुमच्याकडून. मी कवितेच्या विशेष सुचनेत "शब्दबंबाळ लेख लिहून कवितेचे रसग्रहण करण्यास आमची हरकत नाही" असं म्हटलं आहे. कवितेची "यात इडली का नाही, मेदु वडा का नाही" अशी समिक्षा करा असं म्हटलेलं नाही.

In reply to by धन्या

सूड Wed, 10/01/2014 - 19:54
छ्या राव!! नदीपलिकडे असलात म्हणून काय झालं, पुण्यात राहता हे जाणवण्याइतपत तरी धारदार होऊ देत शब्द!! ;)

In reply to by सूड

धन्या Wed, 10/01/2014 - 20:00
पुण्याची हद्द कुठे संपते हे एकदा आमच्या त्या मधल्या आळीतल्या मध्याला विचारायला हवं. तो म्हणे पूर्वी पेठेत राहायचा. ;)

In reply to by जेपी

धन्या Wed, 10/01/2014 - 19:57
याचे उत्तर मी वरच्या एका प्रतिसादात आधीच दिले आहे.
मी कवितेच्या विशेष सुचनेत "शब्दबंबाळ लेख लिहून कवितेचे रसग्रहण करण्यास आमची हरकत नाही" असं म्हटलं आहे. कवितेची "यात इडली का नाही, मेदु वडा का नाही" अशी समिक्षा करा असं म्हटलेलं नाही.
तुमचा बटाटा वडा सुद्धा अ‍ॅड करा माझ्या वरच्या प्रतिसादात. कोटमधील वाक्ये पिवळी कशी करायची हे कुणी सांगेल का? :(

In reply to by धन्या

सुहास.. Wed, 10/01/2014 - 20:48
कोटमधील वाक्ये पिवळी कशी करायची हे कुणी सांगेल का? >> विशेष पिवळा : शब्दपिवळा लेख लिहून कवितेचे रसपिवळे करण्यास आमची पिवळी नाही. मात्र कवितेत पिवळे मुल्य शोधण्याचा तसेच मीटर पिवळ्ण्याचा प्रयत्न करु नये. पिवळी निराशा येईल. येव्हढे पिवळे बस का ;)

विवेकपटाईत Wed, 10/01/2014 - 21:11
प्रियकराला तिची आठवण आली आणि डोस्या सारखा स्वादिष्ट पदार्थ ही गळया खालील उतरला नाही. किती प्रेम आहे त्याचे तिच्यावर. तिची गाडी पलीकडून जाते अर्थात या जन्मी तरी मिलन होणार नाही, हे जरी खरे असले तरी कदाचित पलीकडे जाणार्या गाडीच्या खिडकीतून तिचे ओझरते दर्शन झाले असेल. तेच स्मरण करत आयुष्य कंठ्णारा हा प्रियकर जगा वेगळा आहेच. तिच्या प्रेमात बुडालेला हा उपाशी राहून तिच्यासाठी प्राणाचाही त्याग करणार. या वेगळे प्रेमाचे काय उदात्त चित्रण काय असेल. माझ्या जवळ शब्द नाही एखादा खंदा समीक्षकच या कवितेचे योग्य मूल्यमापन करू शकेल.

प्रचेतस Wed, 10/01/2014 - 22:03
=)) दिवसभर अक्षीचे गधेगाळ शोधत हिंडत असल्याने तुझा डोसा आता पाहिला. बाकी ह्या निमित्ताने 'टाकला होता डोसा, आमलेट कस्सं बाहेर आलं' अशा ओळी असलेल्या एका अजरामर काव्याची आठवण आली.

In reply to by मुक्त विहारि

धन्या Wed, 10/01/2014 - 23:35
"मानकर डोसा" म्हणून पुण्यात डोसा केंद्रे आहेत "चितळेंची बाकरवडी" टाईपची. चांगल्या चवीचे डोश्याचे विविध प्रकार मिळतात त्यांच्याकडे.

चौकटराजा गुरुवार, 10/02/2014 - 05:59
जिलबी इथली संपत नाही , एक्का, तुमची आठवण येते मी मिपावरती येतो तुमचे विमान ओमान ला जाते

कंजूस गुरुवार, 10/02/2014 - 06:36
कोटातली अक्षरे पिवळी करून जिलबित पाक मुरवायचा खटाटोप करण्यापेक्षा पिठ जरा जास्तीआंबवा.

श्रीरंग_जोशी गुरुवार, 10/02/2014 - 06:50
विडंबन छान जमले आहे. बाकी यामुळे एका नव्या दभाउ साखळी बद्दल ठाऊक झाले - http://mankardosacentre.com/.
लेखनविषय:
कविवर्य ग्रेस यांची क्षमा मागून... डोसा इथला संपत नाही, मज तुझी आठवण येते मी मानकरला जातो, तुझी गाडी पलीकडून जाते तो लोणी स्पंज डोसा, ती खोबर्‍याची हिरवी चटणी प्यायलो दुर्गाची कॉफी आपण, पचकन पाणी थुंकाया तो मिठा पान कलकत्त्याचा, तोंड रंगवूनी गेला मस्तानीच्या आरक्त गळ्याची, आठवण झाली मला पोथीत माणसे अवघी, सांगती कथा ती कुणाची हे संपता संपत नाही, गुर्‍हाळ त्या साधूवाण्याचे डोसा इथला संपत नाही, मज तुझी आठवण येते मी मानकरला जातो, तुझी गाडी पलीकडून जाते विशेष सुचना: शब्दबंबाळ लेख लिहून कवितेचे रसग्रहण करण्यास आमची हरकत नाही.

भारतीय संस्कृतीची नात्यांची विरोधाभासी शिकवण: टेबल सूत्र स्वरूपात!!

निमिष सोनार ·

विजुभाऊ Wed, 10/01/2014 - 18:34
भारतीय संस्कृती फारच सोयीस्कर आणि भोंगळ आहे. सर्व नाती ही फायद्याच्या दृष्टीनेच पाहिली जातात. त्यामुळे ज्येष्ठ / कनिष्ठ मानले जाते.

अनिवासि Wed, 10/01/2014 - 21:14
आज कितीतरी दिवसानी मनमोकळेपणने, खदखदुन आणि मोठ्याने हसलो !! आधिच लठठ -------- निमिष् राव -- असेच धागे येउद्यात. तेवढाच विरगुळा.

विनोद१८ गुरुवार, 10/02/2014 - 23:51
माझे दोन प्रश्ण :- 'आध्यात्मिक पातळी' म्हणजे काय असते ते ??? 'तमोलहरींचा प्रभाव' म्हणजे काय असते ?? तो प्रभाव कशाने व कसा मोजतात ??? मला अज्ञाला समजावुन देशील का ??

विजुभाऊ Wed, 10/01/2014 - 18:34
भारतीय संस्कृती फारच सोयीस्कर आणि भोंगळ आहे. सर्व नाती ही फायद्याच्या दृष्टीनेच पाहिली जातात. त्यामुळे ज्येष्ठ / कनिष्ठ मानले जाते.

अनिवासि Wed, 10/01/2014 - 21:14
आज कितीतरी दिवसानी मनमोकळेपणने, खदखदुन आणि मोठ्याने हसलो !! आधिच लठठ -------- निमिष् राव -- असेच धागे येउद्यात. तेवढाच विरगुळा.

विनोद१८ गुरुवार, 10/02/2014 - 23:51
माझे दोन प्रश्ण :- 'आध्यात्मिक पातळी' म्हणजे काय असते ते ??? 'तमोलहरींचा प्रभाव' म्हणजे काय असते ?? तो प्रभाव कशाने व कसा मोजतात ??? मला अज्ञाला समजावुन देशील का ??
लेखनविषय:
लेखनप्रकार
भारतीय संस्कृतीची नात्यांची शिकवण विरोधाभासी आणि नात्यापरत्वे, कालपरत्वे बदलत जाणारी आहे असे मला ठामपणे वाटते.

कांदा

विवेकपटाईत ·

आनन्दिता Wed, 10/01/2014 - 23:16
मस्त पाकृ. मी बटाटा घालुन करुन बघितली. बरी झाली होती. शेतकऱ्याला रडवितो बटाटा ग्राहकाला लुबाडीतो बटाटा व्यापारीला फसवितो बटाटा नेत्यांना मात्र हसवितो बटाटा!! =))

आयुर्हित गुरुवार, 10/02/2014 - 00:34
विवेकपटाईतजी, अत्यंत गंभीर धागा काढल्याबद्दल धन्यवाद. मला यावरून काय वाटले ते लिहितो: विट्यामीन क पुरवितो कांदा बीटा क्यारोटीन पुरवितो कांदा एडीनोसीन पुरवितो कांदा रक्तदाब नियमित करतो कांदा हार्ट अटॅक थांबवितो कांदा तोंडात येणारे फोड थांबवतो कांदा उष्णतेचा त्रास कमी करतो कांदा लघवीची जळजळ कमी करतो कांदा प्रखर उन्हाचा त्रास दुर करतो कांदा उन्हात फिरताना खिशात ठेवा कांदा फुफुसाचा कॅन्सरचा धोका कमी करतो कांदा ताकद व पौरुषत्व वाढवितो कांदा टॉपिंग पिझ्झाची लज्जत वाढवितो कांदा ८ छोट्या तुकड्याची किंमत असते ४०रुपये अशा या कांदयाची किंमत करायला शिका शेतकऱ्यांनी पिकवलाच नाहि तर प्रसंग येईल बाका

जेनी... गुरुवार, 10/02/2014 - 10:33
मीपण .. मीपण .. तोंडाला वास येतो खाल्ल्यावर कांदा ओयाक शी: घाण किती खाता कांदा कच्चाच खातात काहिजण कांदा कचाकचा चावुन गचागचा खातात कांदा .. कसं वाटलं ..??

In reply to by कवितानागेश

मुक्त विहारि Fri, 10/03/2014 - 16:34
कांदा-लसूण खावू नये. चातुर्मासात बरीच व्रते-वैकल्ये असल्याने, पुर्वी पुजा सांगणारी मंडळी यजमानाच्या घरी जायचे असेल तर कांदा-लसूण खात नसत.पुढे मग हीच प्रथा पडली. असो, आपल्याला काय? जे ताटात असेल ते खायचे.

In reply to by मुक्त विहारि

प्रभाकर पेठकर Sun, 10/05/2014 - 09:17
मुवी, चातुर्मासात पावसाळी हवामानामुळे पचनक्रिया मंदावते म्हणून जडान्न जसे मांस इ. वर्ज्य आहे. कांदा (कच्चा), लसूणाने ह्या कालावधीत वात बळावतो त्यामुळे ते खाऊ नये अशी प्रथा आहे. आयुर्वेदीक डॉक्टर ह्यावर प्रकाश टाकू शकतील. ऋतुमानानुसार बदलते आहार आरोग्यास हितकर असल्याने वरील प्रथा पडली आहे.

जागु Sat, 10/04/2014 - 14:44
कांदा पोह्यात कांदा कोशिंबीरीत कांदा, भाजीत कांदा, मटणात कांदा नसेल घरात तर होतो वांदा. (कैच्याकै ... हा.हा.हा..)

आनन्दिता Wed, 10/01/2014 - 23:16
मस्त पाकृ. मी बटाटा घालुन करुन बघितली. बरी झाली होती. शेतकऱ्याला रडवितो बटाटा ग्राहकाला लुबाडीतो बटाटा व्यापारीला फसवितो बटाटा नेत्यांना मात्र हसवितो बटाटा!! =))

आयुर्हित गुरुवार, 10/02/2014 - 00:34
विवेकपटाईतजी, अत्यंत गंभीर धागा काढल्याबद्दल धन्यवाद. मला यावरून काय वाटले ते लिहितो: विट्यामीन क पुरवितो कांदा बीटा क्यारोटीन पुरवितो कांदा एडीनोसीन पुरवितो कांदा रक्तदाब नियमित करतो कांदा हार्ट अटॅक थांबवितो कांदा तोंडात येणारे फोड थांबवतो कांदा उष्णतेचा त्रास कमी करतो कांदा लघवीची जळजळ कमी करतो कांदा प्रखर उन्हाचा त्रास दुर करतो कांदा उन्हात फिरताना खिशात ठेवा कांदा फुफुसाचा कॅन्सरचा धोका कमी करतो कांदा ताकद व पौरुषत्व वाढवितो कांदा टॉपिंग पिझ्झाची लज्जत वाढवितो कांदा ८ छोट्या तुकड्याची किंमत असते ४०रुपये अशा या कांदयाची किंमत करायला शिका शेतकऱ्यांनी पिकवलाच नाहि तर प्रसंग येईल बाका

जेनी... गुरुवार, 10/02/2014 - 10:33
मीपण .. मीपण .. तोंडाला वास येतो खाल्ल्यावर कांदा ओयाक शी: घाण किती खाता कांदा कच्चाच खातात काहिजण कांदा कचाकचा चावुन गचागचा खातात कांदा .. कसं वाटलं ..??

In reply to by कवितानागेश

मुक्त विहारि Fri, 10/03/2014 - 16:34
कांदा-लसूण खावू नये. चातुर्मासात बरीच व्रते-वैकल्ये असल्याने, पुर्वी पुजा सांगणारी मंडळी यजमानाच्या घरी जायचे असेल तर कांदा-लसूण खात नसत.पुढे मग हीच प्रथा पडली. असो, आपल्याला काय? जे ताटात असेल ते खायचे.

In reply to by मुक्त विहारि

प्रभाकर पेठकर Sun, 10/05/2014 - 09:17
मुवी, चातुर्मासात पावसाळी हवामानामुळे पचनक्रिया मंदावते म्हणून जडान्न जसे मांस इ. वर्ज्य आहे. कांदा (कच्चा), लसूणाने ह्या कालावधीत वात बळावतो त्यामुळे ते खाऊ नये अशी प्रथा आहे. आयुर्वेदीक डॉक्टर ह्यावर प्रकाश टाकू शकतील. ऋतुमानानुसार बदलते आहार आरोग्यास हितकर असल्याने वरील प्रथा पडली आहे.

जागु Sat, 10/04/2014 - 14:44
कांदा पोह्यात कांदा कोशिंबीरीत कांदा, भाजीत कांदा, मटणात कांदा नसेल घरात तर होतो वांदा. (कैच्याकै ... हा.हा.हा..)
लेखनविषय:
कांद्या उगविणारा शेतकरी असो, ग्राहक असो वा व्यापारी, सरकारच्या नित बदलत्या नितींमुळे, सर्वांनाच नुकसान होते शेतकऱ्याला रडवितो कांदा ग्राहकाला लुबाडीतो कांदा व्यापारीला फसवितो कांदा नेत्यांना मात्र हसवितो कांदा