मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - ८

स्पार्टाकस ·

एस Tue, 09/30/2014 - 12:09
चला, मोहीम अखेर अमुंडसेनपर्यंत येऊन पोहोचली. आता लवकरच नॉर्थवेस्ट पॅसेज जहाजाक्रांत होणार! :-) तुमच्या लिखाण शैलीमुळे आम्हीच जणू नॉर्थवेस्ट पॅसेज शोधत आर्क्टिक महासागरातून जहाजे घेत भटकतो आहे, हिमखंडांतून मार्ग काढतो आहे असंच वाटतं. वाचकांनाही तो थरार अनुभवण्याची संधी देऊ शकणारे लेखन दुर्मिळच असते. त्यामुळे खास धन्यवाद!

एस Tue, 09/30/2014 - 12:09
चला, मोहीम अखेर अमुंडसेनपर्यंत येऊन पोहोचली. आता लवकरच नॉर्थवेस्ट पॅसेज जहाजाक्रांत होणार! :-) तुमच्या लिखाण शैलीमुळे आम्हीच जणू नॉर्थवेस्ट पॅसेज शोधत आर्क्टिक महासागरातून जहाजे घेत भटकतो आहे, हिमखंडांतून मार्ग काढतो आहे असंच वाटतं. वाचकांनाही तो थरार अनुभवण्याची संधी देऊ शकणारे लेखन दुर्मिळच असते. त्यामुळे खास धन्यवाद!
लेखनविषय:
लेखनप्रकार
अटलांटीक मधून उत्तर अमेरीकेच्या किनार्‍याने पॅसिफीक महासागर गाठणारा नॉर्थवेस्ट पॅसेज शोधण्याच्या बरोबरच अटलांटीकमधून पूर्वेच्या मार्गाने रशियाच्या उत्तर किनार्‍याजवळून जाणारा नॉर्थईस्ट पॅसेज शोधण्याचे प्रयत्नही १५२५ पासून सुरु होते. इंग्लिश, डच, नॉर्वेजियन आणि मुख्यतः रशियन दर्यावर्दींचा यात सहभाग होता. २२ जून १८७८ मध्ये फिनीश-स्वीडीश दर्यावर्दी अ‍ॅडॉल्फ नॉर्डेन्स्कीओल्ड याने वेगा या जहाजातून स्वीडनमधील कार्ल्सस्क्रोना बंदर सोडलं. रशियाच्या उत्तर किनार्‍याने बर्फाचा मुकाबला करत जात असताना सप्टेंबरच्या सुरवातीला बेरींग सामुद्रधुनीच्या पश्चिमेला त्याचं जहाज बर्फात अडकलं.

#मोदीइनअमेरीका

विकास ·

In reply to by मुक्त विहारि

काउबॉय Tue, 09/30/2014 - 00:49
माझ्या मते मोदिनी जेष्ठाना डोक्यावर बसवले नाही की समाज आपल्या बाजूने यायची वाट बघितली नाही अतिशय गहन विचार करून रणनीति आखली विकास साधला प्रतिस्पर्ध्याना पेचात जखडले आणि आज ऑलमोस्ट देशाच्या सर्वोच्य स्थानी पोचले. म्हनुनच आज ते हे अमेरिकेत घडवू शकले. मराठी माणसांनी मोदींकडून बरेच शिकण्यासारखे आहे.

In reply to by मुक्त विहारि

अमित खोजे Tue, 09/30/2014 - 02:45
न्यूयॉर्कमध्ये असून या कार्यक्रमाला न गेलेला माझ्या सारखा करंटा मीच :( पण तुम्हाला उपस्थितीबद्दल अभिनंदन! :)

प्रचेतस Tue, 09/30/2014 - 00:17
मस्त वृतांत. टिव्हीवर कालच हे भाषण पाहिले होते. पण तुमच्या 'आँखो देखा हाल' मुळे खुमारी वाढली.

प्यारे१ Tue, 09/30/2014 - 00:53
बढिया! बाकी स्टेडियमबाहेर काही घटना घडल्या म्हणे. त्या घटनांचं काय? (स्लोगन्स, नारेबाजी, धक्काबुक्की, टोप्या, पगड्या, बुरखे, काळे झेंडे आणि इ.इ.इ.)

In reply to by प्यारे१

नाखु Tue, 09/30/2014 - 08:25
http://deshgujarat.com/2014/09/29/rajdeep-sardesai-attacked-a-person-his-fellow-media-persons-attacked-truth/ आणि हो ही बातमी फक्त झी न्यज वर दखिवली ईंडीया टुडे ई नी २ ओळीची देखील बातमी दिली नाही.

In reply to by नाखु

वेल्लाभट Tue, 09/30/2014 - 10:29
त्याचा व्हिडियो सुद्धा आहे. बघितला असेल अनेकांनी. सरदेसाईंनी प्रथम आपण अँटी मोदी असल्याचं सिद्ध करत लोकांना उद्युक्त करणारे उद्विग्न करणारे प्रश्न विचारले, त्यांची यथोचित उत्तरं त्यांना मिळाली. त्यानंतर आटपतं घेताना त्यांनी एका व्यक्तीला 'अ‍ॅसहोल' असे संबोधले. व्हिडियोत स्पष्टपणे कळत आहे की ती व्यक्ती त्यास 'यू आर अ‍ॅन अ‍ॅसहोल टू' असं प्रत्युत्तर देते आणि नंतर सरदेसाई त्या व्यक्तीस धक्का देतात. इथेच उलट धक्काबुक्की होते. ट्विटर वरून जरी सरदेसाईंनी आपण स्वतः नामानिराळे होतो आणि लोकच कशी बेशिस्त, उद्दाम होती वगैरे भासवण्याचा प्रयत्न केला असला तरीही विडियोतून हेच अनुमान निघतं की दोष सरदेसाईंचाच होता, जो त्यांना भोवला. योग्य झालं. जाणकारांनी आणखी प्रकाश टाकावा यावर.

In reply to by वेल्लाभट

vikramaditya Tue, 09/30/2014 - 18:22
द फोर्थ एस्टेट म्हणवत सगळ्या जगाला आरोपीच्या पिंज-यात उभ्या करण्या-या आततायी मीडीया विषयी एक वेगळी चर्चा व्हावी असे वाटते. हा एक वेगळ्या प्रकारचा दहशतवादच म्हणायचा. ह्या सरदेसाईंना रा़ज ठाकरेंनी "धीस ईज इंटरव्ह्यु नॉट ईंटरॉगेशन' असे सांगीतले होते. समोरच्याला पूर्ण बोलु न देता, त्याच्या बोलण्याचा विकृत अर्थ काढणे आणि "ट्रायल बाय मीडीया" असले प्रकार हे लोक करतात. वर आपण हे देशाच्या नागरीकांसाठी करतो (टीआरपी साठी नव्हे) असा आव आणतात तो वेगळा.

रेवती Tue, 09/30/2014 - 01:13
अमेरीकन राज्यकर्ते केवळ व्हिसाच देण्यास उभे नव्हते तर स्वागतासाठी एका कम्यिनिटी इव्हेंटमधे हजेरी लावत होते! अगदी हेच वाटले, बर्‍याचजणांना असे वाटले असेल. वृत्तांत आवडला. मी मोदीभक्त नसले तरी त्यांचे काम एक पंतप्रधान म्हणून व्यवस्थित चालले असल्यास मोदी किंवा केजरीवाल असा फरक माझ्यासारख्या अतिसामान्य नागरिकाला पडत नाही.

भास्कर केन्डे Tue, 09/30/2014 - 03:31
त्या झेंड्यांमध्ये काठी/काडी नव्हती. का? तर सुरक्षा म्हणून! याची अंमळ गंमत वाटली! -- आमच्या एका मित्राने शक्कल लढवली आणि थंड पेयाची प्लास्तीकची नळी आम्ही सर्वांनी खें झेंड्याला वापरली. कर्यक्रम एकंदर जबरा झाला. भारतीय म्हणून अभिमानाने छती "५६ इंची" झाली. ;)

प्रभाकर पेठकर Tue, 09/30/2014 - 09:03
एकूणात परिस्थिती आपल्या समर्थनात बदलण्याची जी अनोखी क्षमता श्री नरेन्द्र मोदींनी दाखविली त्या बद्दल त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच होईल. एक जबरदस्त व्यक्तिमत्त्व म्हणून श्री मोदी पुढे आले आहेत. त्यामुळेच त्यांच्याकडून देशाच्या अपेक्षा अवाजवी पातळीपर्यंत उंचावल्या आहेत. येती ५ वर्षे ते भारतात काय काय बदल घडवितात त्यावर त्यांचे आणि भारतिय जनता पक्षाचे भवितव्य अवलंबून आहे. भारत अमेरिका संबंध तसेच भारत पाकिस्तान नाते एका वेगळ्या वळणावर उभे असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. श्री. नरेन्द्र मोदी आणि भारतिय जनता पक्षाला अनेकानेक शुभेच्छा.

In reply to by प्रभाकर पेठकर

विकास Tue, 09/30/2014 - 20:50
त्यामुळेच त्यांच्याकडून देशाच्या अपेक्षा अवाजवी पातळीपर्यंत उंचावल्या आहेत. येती ५ वर्षे ते भारतात काय काय बदल घडवितात त्यावर त्यांचे आणि भारतिय जनता पक्षाचे भवितव्य अवलंबून आहे. अगदी १००% वास्तव आहे हे! (जमले नाही तर भाजपाला विस्तव आहे! ;) ). एकंदरीत लोकांशी बोलताना काय जाणवते तर मोदींकडून अवाजवी अपेक्षा असल्यातरी कुठेतरी भान आहे. कोणी म्हणतो, "पुढच्या काही वर्षात स्वच्छता आली तरी खूप झाले" तर काहींचे म्हणणे (मोदींच्या राज्यात) "भ्रष्टाचार (बर्‍यापैकी) कमी झाला तरी बरेच काही होईल. गेल्या काही काळात काही काँग्रेसविरोधी आणि भ्रष्टाचारविरोधी असलेल्या काहींना मोदी या दोन्ही विरोधात काही ठोस करताना दिसत नाही म्हणून राग आला आहे. (त्यात काही मोदी समर्थकही आहेत). पण मला वाटते, मोदी सुडाचे राजकारण जे विशेष करून ७७ सालात जनता पार्टीने अवलंबीले ते न करायचा योग्य निर्णय घेतला आहे. त्यामुळे तो भ्रमनिरास जरी असला तरी योग्यच आहे.

In reply to by विकास

सध्याचे भारतीय राजकारणातील दिशाहीन नेतृत्व ज्यांचे पायांना अकार्यशामातेचा पोलियो झाला आहे , भ्रष्टाचाराच्या दुर्धर रोगाने ग्रासलेल्या विरोधकांच्या समोर ह्या सरकारने केवळ भ्रष्टाचार न करता देखील भारतीय सरकार ५ वर्ष तग धरू शकते एवढे सिद्ध केले तरी पुढील ५ वर्ष ह्या सरकारला एकतर जनता बहाल करेल, मोदी ह्यांनी चाणाक्षपणे जनतेला पुढील १० वर्ष मागितली आहेत. अनिवासी भारतीयांच्या दोन कार्डाचे एकत्रीकरण हि मनमोहन ह्यांच्या काळातील संकल्पना तसेस विसा ऑन अरायावल सारख्या पर्यटन शेत्राला सुगीचे दिवस आणणाऱ्या योजना कागदावर राहिल्या होत्या त्या ह्या सरकारने प्रत्यक्षात आणल्या. तरीही काही कर्म दरिद्री मोदी विरोधक अश्या प्रसंगी मोदी हे मनोहन ह्यांच्या कल्पना चोरत आहेत अशी चेपू वर आवई उठवतात. हे पाहून अमळ गंमत वाटते , त्यांच्या भाषणात गांधींचा एवढा उल्लेख झालेला पाहून त्यांचे विरोधक आता आपण कोणाचे नावावर राजकीय पोळ्या पिकवायाच्या ह्या चिंतेत असतील. मोदी ह्यांनी माफी मागितली नाही , आपली राजकीय भूमिका , मतांवर ठाम राहिले , मते बदलावी लागली ती प्रगत देशांना सुजाण भारतीय मतदारांच्या मुळे हे शक्य झाले मोदी ह्यांचे अमेरिकेत आगमन होणे हा भारतीय लोकशाहीचा विजय आहे. फरीद त्याला जेव्हा संधी मिळेल तेव्हा त्याच्या अमेरिकी मिडिया मध्ये अमेरिकेने मोदी ह्यांना विसा नाकारण्याच्या मागे असलेले कारण किती फसवे दुटप्पी आहे हे आवर्जून सांगत आहे.

vikramaditya Tue, 09/30/2014 - 09:51
"पण एक माणूस सर्व जग विरुद्ध असताना देखील त्या अंगावर येणार्‍या लाटेवर कसा स्वार होऊ शकतो याचे निरीक्षण करण्याचा हा मुद्दा आहे आणि त्यातून आपल्या सर्वांनाच आपापल्या ठिकाणी बरेच काही शिकण्यासारखे आणि स्फुर्ती घेण्यासारखे आहे!"
चुका कोण करत नाही? झालेल्या चुका उगाळत न बसता, प्रचंड चिंतन करुन त्यांनी एक मार्ग शोधला आणि त्याच मार्गावर अविरत चालुन ते आज इथवर पोहोचले. केवळ पैसा ओरबाडण्याच्या नादात हीच संधी मोदींच्या अनेक समकालीनांनी गमवली किंवा त्यांची तेवढी कुवतच नव्हती असे म्हणावे लागेल.

In reply to by vikramaditya

आजानुकर्ण Wed, 10/01/2014 - 18:14
चुका कोण करत नाही? झालेल्या चुका उगाळत न बसता, प्रचंड चिंतन करुन त्यांनी एक मार्ग शोधला
कोणत्या चुका?

ऋषिकेश Tue, 09/30/2014 - 09:59
भाषण ऐकायला मिळाले नाही - मात्र नंतर वाचले. छान झाले होते भाषण त्या भाषणापल्याड तिथल्या वातावरणाबद्द्ल, काही प्रसंग/संवादाबद्दल व इतर अनुभवांबद्दल वाचायला आवडेल.

ऋषिकेश Tue, 09/30/2014 - 10:02
बाकी मोदींनी गांधीजींची स्तुती केली आहे त्या भाषणात, त्यांच्यामुळेच भारताला स्वातंत्र्य मिळाले - त्यांनीच जनसामान्यांना चळवळीत ओढले - बाकीच्यांचे प्रयत्न एकेकट्याचे व लहान गटांपुरते मर्यादित होते असे विश्लेषण केले आहे. अर्थातच विश्लेषण योग्य आहे. मात्र मोदीसमर्थकांचे याबद्द्ल काय मत आहे हे जाणून घ्यायचे आहे!

In reply to by ऋषिकेश

आनन्दा Tue, 09/30/2014 - 10:29
याबद्दल अवांतर टाळणे योग्य ठरेल. पण मोदीसमर्थक असले म्हणजे गांधीविरोधक असलेच पाहिजेत असे काही नाही. आणि, गांधीसमर्थक आणि गांधीहत्यासमर्थक या वेगळ्या गोष्टी आहेत. एक माणूस एकाच वेळेस गांधीसमर्थक आणि गांधीहत्यासमर्थक असू शकतो. असो. अवांतर थांबवतो, नाहीतर या धाग्याचे काश्मीर होईल.

In reply to by ऋषिकेश

मृत्युन्जय Tue, 09/30/2014 - 12:38
मोदीसमर्थकांची मते जाणुन घ्यायची इच्छा का झाली याबद्दल उत्सुकता आहे. मोदी समर्थक म्हणजे पर्यायाने गांधीसमर्थक किंवा गांधी विरोधक अशी घाऊक समजुत तर नाही ना झालेली?

In reply to by मृत्युन्जय

ऋषिकेश Tue, 09/30/2014 - 13:44
नाही प्रत्येक मोदीसमर्थक यापैकी एका गटात येतो अशी समजुत नाही. मात्र मला भेटलेले अनेक समर्थक यापैकी एका गटात येतात.

In reply to by ऋषिकेश

मृत्युन्जय Tue, 09/30/2014 - 16:40
मी न्युट्रल आहे. काही बाबतीत गांधींना मानतो. काही बाबतीत त्यांच्या चुका देशाला प्रचंड भोवल्या असे मानतो. माझ्या माहितीतले ९०% मोदी समर्थक असेच आहेत.

In reply to by अनुप ढेरे

मृत्युन्जय Wed, 10/01/2014 - 18:23
अर्रे बापरे. गांधी चरित्रच उगाळावे लागेल. अगदी उदाहरणच द्यायचे तर असहकार चळवळ मागे घेतली त्याचे उदाहरण घ्या. अजुन बरीच आहेत त्यासाठी वेगळा धागा उघडावा लागेल (मी फाळणीबद्दल त्यांना दोषी धरत नाही. ती अपरिहार्यता होती हे इथे नमूद करु इच्छितो. तो मुद्दा अपेक्षित असेल तर माझा पास)

In reply to by मृत्युन्जय

श्रीगुरुजी Wed, 10/01/2014 - 21:03
अजून कितीतरी चुका आहेत. तुर्कस्तानमधील खिलाफत चळवळीला पाठिंबा, स्वामी श्रध्दानंदाचा खून करणार्‍या रशीदला "भाई रशीद" म्हणून आपुलकी दाखविणे, पाकड्यांना ५५ कोटी देण्यासाठी उपोषण करणे, पंतप्रधानपदासाठी नेहरूंना पाठिंबा देणे ... यादी खूप मोठी आहे.

In reply to by ऋषिकेश

श्रीगुरुजी Tue, 09/30/2014 - 20:56
>>> मात्र मोदीसमर्थकांचे याबद्द्ल काय मत आहे हे जाणून घ्यायचे आहे! मी मोदीसमर्थक असलो तरी मोदींचे प्रत्येक मत मला मान्य आहे असा याचा अर्थ नाही. मोदींनी गांधीजींची स्तुती केली म्हणून लगेच प्रत्येक मोदीसमर्थक त्यांच्या मताचे समर्थन करतीलच असे नाही.

In reply to by ऋषिकेश

विकास Tue, 09/30/2014 - 21:46
मोदी गांधीजींबद्दल प्रथमच बोललेले नाहीत. गांधीजींबद्दलचे निरीक्षण हे योग्यच आहे आणि त्याबद्दल या संस्थळावर मी देखील आधी लिहीलेले होते (अर्थात मी काही पंतप्रधान नसल्याने लोकं विसरली असतील! ;) ) काँग्रेस ही प्रथम रावसाहेबांसारख्या हुच्चभ्रूंसाठी होते. टिळकांनी प्रथम सामान्यांमधे जनसंपर्क कसा करावा ह्याचा परीपाठ घातला आणि गांधीजींनी ते निर्णायकपणे (आणि स्वतंत्रपणे) जनआंदोलन केले आणि ते चांगलेच झाले. गांधीजींबद्दल जर कोणी "हिंदूत्व", "संघिष्ट" वगैरे विशेषण लागलेल्या व्यक्तीकडून कौतूक झाले तर लगेच आश्चर्य वाटते. आता "मोदी समर्थक" / "मोदी भक्त" हे अजून एक विशेषण आहे. ;) कुणाचेच कुठलेच विचार पूर्ण पटू शकत नाहीत. काही निर्णय हे कालांतराने बघताना आधी बरोबर वाटले असले तर नंतर चुकीचे वाटू शकतात अथवा आधी चुकीचे वाटलेले पण बरोबर वाटू शकतात... पण जर एखाद्या व्यक्तीवर टिका करणे निषिद्धच ठरवले असले तर सगळे बिघडते. मग ते स्वतःस मोदीभक्त म्हणणारे असोत अथवा गांधीवादी म्हणणारे तथाकथीत गांधीवादी असोत. अशाच गांधीवाद्यांनी गांधीहत्येनंतर तमाम निष्पाप लोकांचे आणि कुटूंबांचे हत्याकांड केले होते अथवा ज्यांनी तसे केले त्यांच्याकडे दुर्लक्ष केले होते. (एकमेव अपवादः मोरारजी देसाई) आजही त्यांच्या नंतरच्या तिसर्‍या चौथ्या पिढीस जर का "हिंदूत्व" म्हणले अथवा तसे वाटले, तर जणू काही यांच्याच हातात बंदूक होती अशा थाटात आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले जाते. त्यात अजून भर म्हणजे "गांधी म्हणजे आमचेच" असे काँग्रेसजनांनी समजून आता गांधीजींचे नाव घेतले म्हणून मोदींवर टिका करणे... या असल्या कारणामुळे सामान्य जास्त गांधीविरोधात बोलतात. थोडक्यात विरोध हा गांधीजींपेक्षा भंपक गांधीवाद्यांना अथवा "गांधी के नाम" हिंसा अथवा भ्रष्टाचार करणार्‍यांच्या भोंदूगिरीस असतो. असो.

In reply to by विकास

स्पंदना Wed, 10/01/2014 - 06:35
त्यात अजून भर म्हणजे "गांधी म्हणजे आमचेच" असे काँग्रेसजनांनी समजून आता गांधीजींचे नाव घेतले म्हणून मोदींवर टिका करणे... या असल्या कारणामुळे सामान्य जास्त गांधीविरोधात बोलतात. थोडक्यात विरोध हा गांधीजींपेक्षा भंपक गांधीवाद्यांना अथवा "गांधी के नाम" हिंसा अथवा भ्रष्टाचार करणार्‍यांच्या भोंदूगिरीस असतो.
कार्यक्रम पहात असताना हेच वेचार मनात आले. अगदी काँग्रेसने गांधीजी ही त्यांची मोनोपॉली असल्याचा जो अविर्भाव आजवर आणला होता तो मोडीत निघाल्याच जाणवल. गांधीजी आदरणिय आहेत अन राहतील. त्यांच्या जश्या चुका चर्चिल्या जातात तशीच त्यांची मुल्ये सुद्धा चर्चेत राहतील.

In reply to by ऋतुराज चित्रे

विकास Tue, 09/30/2014 - 16:48
सरकारी भिंती आणि त्या भिंती समोरच्या टेबलाखालून दिल्या जाणार्‍या भारतीय चलनांच्या कागदावर त्यांच्या फोटो साठी जागा. असो. ह्या विषयावर चर्चा करायची असेल तर अवश्य वेगळा धागा काढूयात, येथे अवांतर ठरू शकेल.

In reply to by ऋतुराज चित्रे

विवेकपटाईत Tue, 09/30/2014 - 20:01
निश्चित आर एस एस आणि भाजपा वाल्यांनी नव्हत्या दिल्या.... एक खोटा प्रचार १९४७ होत आहे. खरे म्हणाल तर गांधीजींची स्वदेशी विचार धारा आर एस एस वाल्यांनी जिवंत ठेवली आहे.

विनोद१८ Tue, 09/30/2014 - 13:55
श्री. विकास धन्यवाद व अभिनंदन या उत्तम वृतांकनाबद्दल.
हे केवळ "कालाय तस्मै नमः" आहे, का बारा वर्षे आतून बाहेरून सर्व निंदानालस्ती मुकाट्याने सहन करून, "अधिष्ठान, अहंकार, तशी विविध साधने, वेगळ्याला क्रिया नाना" आचरून, "पाचवे असलेले दैव" स्वकर्तुत्वाने मिळवले? हा एक चर्चचा मुद्दा होऊ शकतो. यात मोदी समर्थक अथवा विरोधक हा मुद्दा नाही. त्यांचे पंतप्रधान म्हणून कार्य जोखणे चालूच राहील आणि राहीले पाहीजे देखील! त्यांचे काही निर्णय आवडतील अथवा काही पटणार नाहीत... ते सर्व येणार काळ ठरवेल... पण एक माणूस सर्व जग विरुद्ध असताना देखील त्या अंगावर येणार्‍या लाटेवर कसा स्वार होऊ शकतो याचे निरीक्षण करण्याचा हा मुद्दा आहे आणि त्यातून आपल्या सर्वांनाच आपापल्या ठिकाणी बरेच काही शिकण्यासारखे आणि स्फुर्ती घेण्यासारखे आहे!
वरील अधोरेखित मुद्दा तर खचितच विचार करण्यायोग्य आहे. @....ऋषिकेश...."मात्र मोदीसमर्थकांचे याबद्द्ल काय मत आहे हे जाणून घ्यायचे आहे!" त्या पातळीवर मोदीसमर्थकांचे मत हे नेहमीच अनुकुल असेल, परंतु 'मोदीविरोधक किंवा कायम मोदीद्वेष्टे' यांचे प्रामाणिक मत जाणुन घेण्यात रस आहे.

In reply to by विनोद१८

ऋषिकेश Tue, 09/30/2014 - 14:22
परंतु 'मोदीविरोधक किंवा कायम मोदीद्वेष्टे' यांचे प्रामाणिक मत जाणुन घेण्यात रस आहे.
कशाबद्द्ल मत जाणून घेण्यात रस आहे? मी कायम मोदीद्वेष्टा नाही परंतु मला अयोग्य वाटेल तिथे अनेकदा मोदींच्या विरोधातील माझी मते मांडत असतो माझे मत चालणार असेल तर माझे भाषणाबद्दलचे मत वर दिले आहेच (की छान झाले भाषण). अर्थात माझे मत हे माझे आहे कोणत्याही गटाचे प्रतिनिधित्त्व करत नाही. बाकी, मला गांधींजी हे अत्यंत थोर लोकनेते वाटतात. एकेकट्याने काम करणार्‍या, अगदी प्रसंगी जीव ओवाळून टाकणार्‍या (राष्ट्रभक्ती नी स्वातंत्र्याची आस तीव्र असणार्‍या) क्रांतीकारकांपेक्षा गांधींनी देशातील अख्खे वातावरण- देशातील तळागातील व्यक्तीला - भारून टाकणे हे अधिक महत्त्वाचे कार्य होते अशासारखे मोदींचे म्हणणे माझ्या मताशी सुसंगतच असल्याने मला योग्य वाटते.

विनोद१८ Tue, 09/30/2014 - 15:01
.....झालेल्या सभेबद्दलच म्हणतोय मी. 'मोदीविरोधक किंवा कायम मोदीद्वेष्टे ( व्यावसायिक विरोधक )' यामध्ये तुम्ही येत नाहीत, जे विधायक टिका करतात त्यांच्याबद्द्ल नाही बोलत मी. ज्यांना मोदींचे कार्यात कधीच काही चांगले दिसत नाही, अगदी सुपारी घेउन आल्यासारखे विरोध करतात किंवा तसे सोंग तरी घेतात, कदाचित हा त्यांच्या रोजीरोटीचा उद्योग असु शकेल असे कित्येक इथले व मिपाबाहेरचे लोक्स. या अशा लोकांची त्या मेडीसन गार्डनच्या सभेबद्दलची मते जाणुन घेण्यात मला रस आहे.

In reply to by विनोद१८

नाखु Tue, 09/30/2014 - 15:37
मिपावरील थोर केतकर्-सरदेसाई-वागळेंचा (ज्यांना मोदींचे कार्यात कधीच काही चांगले दिसत नाही) अशा महाभागांची वाट पहाताय्.आपल्याला शुभेच्छा!

In reply to by नाखु

काळा पहाड Tue, 09/30/2014 - 19:46
यातल्या पहिल्या व्यक्तीला टोले बसलेले बघायची फार इच्छा आहे. फार विखारी जहरी फुत्कार असतात याचे. विनाकारण. बहुधा काँग्रेस कडून राज्यसभेची अपेक्षा असणार. कुठलीही चांगली राजकारणविरहीत चर्चा गढूळ करून टाकतो. आणि याच्या डोळ्यातच हिंदूत्वाबद्दल द्वेष दिसतो (जितका कदाचित सोनिया गांधीलाही नसेल). दुसर्‍याबद्द्ल काही कल्पना नाही कारण मी अर्णब गोस्वामी बघतो. तिसरा खरं सांगायचं तर पत्रकारच नाहिये. हा थोडासा मूर्ख कॅटेगिरी मध्ये येतो. आणि त्याला बहुधा आपण फार स्मार्ट प्रश्न विचारतो असं वाटंत असावं. कारण तसं त्याच्या चेहर्‍यावर दिसतं. लोकमत असेपर्यंत याचा आपला सवाल पहायचो कधी कधी. मी मराठी जॉईन केल्यापासून मी याला बघणं बंद केलं आहे.

In reply to by काळा पहाड

प्रसाद१९७१ Wed, 10/01/2014 - 09:28
दुसर्‍याला पुढची १२ वर्ष रोज जाहीर एकदा तोंडात मारायला पाहीजे. २००२ पासुन तो मोदींविरुद्ध खोटी गरळ ओकतो आहे. अगदीच हीन वृतीचा माणुस आहे तो.

In reply to by शिद

शिद Tue, 09/30/2014 - 16:04
मोदींचे भाषण एकदम जबरदस्त होतं. सभागृहातील वातावरण अगदी मोदीमय झालं होतं. मोदी एक चांगले नेता तर आहेतच पण चांगले वक्ता देखील.
पण एक माणूस सर्व जग विरुद्ध असताना देखील त्या अंगावर येणार्‍या लाटेवर कसा स्वार होऊ शकतो याचे निरीक्षण करण्याचा हा मुद्दा आहे आणि त्यातून आपल्या सर्वांनाच आपापल्या ठिकाणी बरेच काही शिकण्यासारखे आणि स्फुर्ती घेण्यासारखे आहे!
+१०००...सहमत. मोदींना पुढील वाटचाली साठी भरपूर शुभेच्छा. विकास, तुम्हाला तेथे प्रत्यक्ष हजर राहून भाषण ऐकण्याची संधी मिळाली त्याबद्दल अभिनंदन. लेख आवडला.

चतुरंग Tue, 09/30/2014 - 17:31
अमेरिकास्थित भारतीयांच्या मदतीने मोदींनी त्यांचा ब्रँड अगदी ताकदीने सादर केला. आजकालच्या मार्केटिंगच्या जमान्यात तुमचा छाप उमटेल अशा पद्धतीने तुम्ही सादरीकरण करणे गरजेचे झाले आहे त्याचे भान मोदींनी ठेवले. भाषण थोडेच ऐकले आणि ते बरेच प्रभावी झाले असावे असा एकूण सूर दिसला. आवर्जून हा धागा टाकल्याबद्दल धन्यवाद विकास! :)

In reply to by आतिवास

विकास Wed, 10/01/2014 - 02:06
या प्रसंगी लोकांचे प्रतिसाद, आपापसातील चर्चा याविषयी तुमचे अनुभव वाचायला आवडतील. वर चतुरंगने म्हणल्याप्रमाणे मी ज्यांच्याशी बोललो त्यांना भाषण प्रभावी वाटलेले दिसले, पण काही जणांना ते भारतातील भारतीयांना अधिक उद्देशून असल्यासारखे वाटले आणि अजून अनिवासी भारतीयांसाठी "अ‍ॅक्शन आयटम्स" असायला हवेत असे वाटले. थोडक्यात आपण काहीतरी भारतासाठी करावे असे जे आधी वाटत होते ते कदाचीत प्रत्यक्षात येऊ शकेल असे वाटताना दिसले. मला माहीत असलेले अनेक जण हे मोदी समर्थक काय भाजपाचे आधी मतदार पण नव्हते. पण यावेळेस काँग्रेस आणि म्हणून युपिएने नक्कीच कायमचे भ्रमनिरास केले. मोदी हे नक्कीच काम करण्यात स्वतःच पुढे रहात असल्याचे दिसल्याने या सर्वजणांचा आशावाद आणि उत्साह वाढलेला दिसला. (ऐकल्याप्रमाणे मोदी शुक्रवारी अमेरीकेत आल्यापासून प्रत्येक रात्री केवळ ४ तासच झोपले आहेत. बाकी वेळ काम आणि भेटीगाठी). काही ३०शीच्या आतील तरूणांशी बोललो त्याप्रमाणे त्यांना त्यांचा सेंट्रल पार्क मधील ग्लोबल सिटीझन्स फेस्टीवल मधील सहभाग पण खूप भावल्याचे जाणवले. अजून एक गोष्ट जाणवली: अनेकांसाठी मोदींचा हा कार्यक्रम म्हणजे जुन्या कडवटपणाला आलेले एक प्रकारचे closure होते. अमेरीकास्थित डाव्या विचारवंत आणि चळवळ्या व्यक्तींनी गुजरात दंगलीचा गैरवापर करून केवळ मोदींनाच बदनाम केले नव्हते तर इथल्या सामान्य जनतेला जे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हिंदू संघटनांशी संलग्न असतील त्यांना देखील बदनाम करण्याचा सातत्याने प्रयत्न केला होता (guilt by association). जर मोदींना व्हिसा न मिळणे हे ह्या (मूळच्या भारतीय) डाव्यांसाठी विजय होता तर मोदींचे जिंकणे, सन्मानाने इकडे येणे हे इथल्या तमाम भारतीय जनतेसाठी वर म्हणल्याप्रमाणे closure होते. विविध क्षेत्रातील आणि आचार-विचारांच्या भारतीयांच्या ४०८ संघटना जेंव्हा एकत्र येतात तेंव्हा आत्तापर्यंत फुटीचे समाजकारण करणार्‍या येथील (मूळच्या भारतीय) डाव्यांना मिळालेले सकारात्मक उत्तर होते. मोदींना डिप्लोमॅटीक व्हिसामुळे इथले कोर्ट समन्स बजावू शकत नव्हते. म्हणून जो कोणी त्यांच्या हातात ते ठेवेल त्याला $१०,००० चे बक्षिस इथल्या डाव्या जनतेने जाहीर केल्याचे ऐकले होते. पण ते किमान अजून तरी करू शकलेले नाहीत असे दिसतयं. असो.

In reply to by विकास

स्रुजा Wed, 10/01/2014 - 02:23
अजून एक गोष्ट जाणवली: अनेकांसाठी मोदींचा हा कार्यक्रम म्हणजे जुन्या कडवटपणाला आलेले एक प्रकारचे closure होते. अमेरीकास्थित डाव्या विचारवंत आणि चळवळ्या व्यक्तींनी गुजरात दंगलीचा गैरवापर करून केवळ मोदींनाच बदनाम केले नव्हते तर इथल्या सामान्य जनतेला जे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हिंदू संघटनांशी संलग्न असतील त्यांना देखील बदनाम करण्याचा सातत्याने प्रयत्न केला होता (guilt by association). जर मोदींना व्हिसा न मिळणे हे ह्या (मूळच्या भारतीय) डाव्यांसाठी विजय होता तर मोदींचे जिंकणे, सन्मानाने इकडे येणे हे इथल्या तमाम भारतीय जनतेसाठी वर म्हणल्याप्रमाणे closure होते. विविध क्षेत्रातील आणि आचार-विचारांच्या भारतीयांच्या ४०८ संघटना जेंव्हा एकत्र येतात तेंव्हा आत्तापर्यंत फुटीचे समाजकारण करणार्‍या येथील (मूळच्या भारतीय) डाव्यांना मिळालेले सकारात्मक उत्तर होते.
+१००

In reply to by विकास

प्रदीप Wed, 10/01/2014 - 08:22
"अमेरीकास्थित डाव्या विचारवंत आणि चळवळ्या व्यक्तींनी गुजरात दंगलीचा गैरवापर करून..." हे "अमेरीकास्थित डाव्या विचारवंत आणि चळवळ्या व्यक्तींनी गुजरात दंगलीचा गैरवापर करून..." असे असावे.

In reply to by चतुरंग

विकास Wed, 10/01/2014 - 01:50
अमेरिकास्थित भारतीयांच्या मदतीने मोदींनी त्यांचा ब्रँड अगदी ताकदीने सादर केला. आजकालच्या मार्केटिंगच्या जमान्यात तुमचा छाप उमटेल अशा पद्धतीने तुम्ही सादरीकरण करणे गरजेचे झाले आहे त्याचे भान मोदींनी ठेवले. जिथे स्वतःच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीत मोदींच्या व्हिसाकडे दुर्लक्ष करणारा ओबामापण, भले तोंड देखले असेल, पण स्वागत करताना मोदींना "केम छो" असे म्हणला तेथे मला नाही वाटत की, मोदींना ब्रँडींग आणि त्यात देखील अनिवासी भारतियांकडून करून घेण्याची गरज असावी. किंबहूना मोदींच्या राजकीय विरोधकांनी स्वतःचे इतके वाईट ब्रँडींग करून टाकले होते की मोदींचे काम सोपे झाले असावे! बाकी राजकीय ब्रँडींगची गरज ही कालातीत असावी असे रामदासांनी जेंव्हा संभाजीस पत्रामधून, "शिवरायाचे कैसे बोलणे । शिवरायाचे कैसे चालणे । शिवरायाचे सलगी देणे । कैसे असे । " असे समजावले, त्यातून समजते! :)

विवेकपटाईत Tue, 09/30/2014 - 20:02
मी ही भाषण दूरदर्शन वर बघितले होते. मोदींच्या भाषण मुळे दिल्लीच्या एका प्रसिद्ध रामलीला मैदान त्या दिवशी रिकामे राहिले. काही ठिकाणी रामलीला थांबवून मोदींचे भाषण दाखविले, आणि नंतर रामलीला. बाकी राजदीप सरदेसाई यांना पत्रकार म्हणावे कि नाही या बाबत अनेक शंका आहेत. त्यांच्या इतिहास बघा कसे ते पत्रकार बनले, सरकार दरबारात मान मिळविला. (....श्री ) पुरस्कार ही त्यांना मिळाला. खालेल्या मिठाला जगावेच लागेल न. आता मोदींचा दौरा फसला, हे दाखविणे शक्य नव्हते. मग मोदी प्रशंसक दुष्ट लोक आहेत, हे दाखविण्या साठी काही जुगाड करायचा होता. त्यांनी केला.

In reply to by विवेकपटाईत

नाखु Wed, 10/01/2014 - 08:42
पटाईत साहेब आणि ईतर.मान्यवरांस राजदीप सरदेसाई हे फड्तूस आणि पीत्+(भाडोत्री) पत्रकारिता करीत असले तरी त्यबद्दल मिपा-विचारवंत अवाक्षर काढणार नाहीत. याच राज्दीपची भलामण करणारा प्रतिसाद ब्लु प्रिंट धाग्यावर दिमाखात आहे यातच सारे काही आले.

विकास Tue, 09/30/2014 - 20:15
सर्व वाचक-प्रतिसादकांचे आभार. खाली काही समान गोष्टींसाठी एकत्रित प्रतिक्रीया देण्याचा प्रयत्न करतो. सर्व प्रथम, माझे अभिनंदन करण्यासारखे काहीच नाही! :) १८,००० तला मी एक होतो. आधी जाणे जर अवघड होते म्हणून जाणार नव्हतो पण नंतर कार्यक्रमाची उत्सुकता वाढत गेली म्हणून नाव नोंदवले आणि लॉटरी सिस्टीम मध्ये तिकीट मिळाले! वरती स्टेडीयमच्या बाहेर झालेल्या (का मुद्दामून घडवून आणलेल्या?) तमाशाबद्दल चर्चा आलेली आहे. ती होणे साहजीकच आहे. पण माझ्या लेखी त्याकडे दुर्लक्ष केलेले उत्तम. असो. :)

कंजूस Tue, 09/30/2014 - 20:46
मोदींनी भारत पूर्ण पाहिला आहे, वाचला आहे, अनुभवला आहे. बाळसेदार होण्यासाठी महागडे व्हेंटिलेटरात शिक्षण घेतलेले नाही. चायवाल्याशी टक्कर देण्यासाठी काहीजण आपापल्या पक्षात कोणी दूधवाला मिळतो का पाहताहेत त्यांची फारच कीव वाटते. लेखाच्या सुरवातीच्या काळ्या फळ्याचा उद्देश नाही कळला.

पैसा Tue, 09/30/2014 - 21:58
भाषण टीव्हीवर प्रत्यक्ष पाहिले. मोदी उत्तम वक्ते आहेत यात काही संशय नाहीच. इतर लोकांनी आता त्यांना शांतपणे काम करू द्यावे एवढीच अपेक्षा आहे.

कविता मॅडम चा आवाज आणि वाइयोलिन बरोबरची तथा-कथित जुगलबंदी ही टीवीवर अत्यंत भेसूर वाटत होती (त्या आवाजात जन गण मन इतक ऐकायला बेक्कार वाटत होत) बर "वैश्णव जनतो भजन" जे काही वाईट री-मिक्स केल यव रे यॅव , मॅडमचा आवाज सहन केला असता पण नवरा आणि मुलाला त्यात घुसवून एकंदरीतच गाल-बोट लावले

In reply to by माझीही शॅम्पेन

रेवती Tue, 09/30/2014 - 23:00
बाप रे! नवरा आणि मुलालाही घुसवले हे पाहिले नाही. संपूर्ण १ मिनिट कविताबाईंचे गाणे ऐकले. इतका वाईट आवाज ऐकवत नव्हता. बरे झाले पुढे पाहिले नाही.

In reply to by रेवती

मोदींचे राजकारण हे नव्या धाटणीचे आहेत , त्यांच्या सभा त्यांच्या समर्थकांची त्यांच्यासाठी केलेला निवडणुकीत आखीव रेखीव प्रचार हे आजवर भारतीयांनी प्रथमच अनुभवले. मनोरंजनाचे कार्यक्रम व मग भाषण हा फंडा आपल्या सर्वांसाठी नवीन आहे , व तो अनेकांना प्रथमदर्शनी आवडला नाही, मनोरंजनाच्या दर्जाबाबत अनेक तक्रारी भारतातून सुद्धा आल्या. माझ्यासाठी अमेरिकन अनिवासी भारतीयांनी त्यांच्या तर्फे प्रथमच एखाद्या भारतीय नेत्यासाठी जगाला थक्क करेल असे नितांत सुंदर आयोजन केले त्या बद्दल त्यांचे कौतुक वाटले , पुढच्या वेळीस अजून सुधारणेस नक्कीच वाव आहे. अमेरिकन महाराष्ट्र मंडळांचा ह्या कार्यक्रमात सहभाग होता का. तेथे काही वर्षापूर्वी गायन स्पर्धा त्यांच्या तर्फे घेण्यात आली होती पुढच्या खेपेस जेव्हा मोदी येतील तेव्हा स्थानिक अमेरिकन अनिवासी भारतीयांच्या कडून गाणे गायले गेले मोदींची हि अमेरिकन वारी खरे तर संयुक्त राष्ट्र संघात भाषण देण्यासाठी होती. ओबामा ह्यांनी त्यांच्याशी भेट घेण्याचे ठरवले व त्यास मोदी ह्यांनी रुकार दिला. जेव्हा काही वर्षाने मोदी फक्त अमेरिकेत पांढऱ्या घरात मुख्य अतिथी म्हणून येतील. तेव्हा अमेरिकन दोन्ही सभागृहात त्यांचे भाषण असेल तेव्हा त्यांचे अजून चांगल्या अनिवासी भारतीयांच्या सोबत कार्यक्रम करता येतील.

In reply to by रेवती

प्रदीप Wed, 10/01/2014 - 10:23
मला कविता कृष्णमूर्तींनी गायिलेले 'जन गण मन' अतिशय आवडले, त्यांजबरोबर श्री. सुब्रमण्यम ह्यांनी त्यांना केलेली साथही आवडली. एक नाविन्यपूर्ण व चांगला, जमून आलेला प्रयोग. जाता जाता, ती 'जुगलबंदी' आहे असे कशावरून ठरवले?

In reply to by प्रदीप

"जुगलबंदी" हा शब्द कदाचित चुकला असु शकतो , एखाद्या लाइव कार्यक्रमात जेव्हा गाण गातात त्या-वेळी सर्व सपोर्टिंग वाद्य-वादक हजर असतात , पण बाकी सर्व वाद्य-वादक हजर नसताना फक्त गायिका आणि वाइयोलिन वादक (मॅडमचे पती आणि मुलगा) वाजवित होते , ते जवळपास नुसतीच साथ न वाटता जुगलबंदी सारख भासले...

In reply to by माझीही शॅम्पेन

विकास Tue, 09/30/2014 - 23:25
अनेकांनी त्याबद्दल नापसंती दर्शवली. किंबहूना बहुतांशी लोकं हे केवळ मोदींना ऐकायला आलेले होते. त्यामुळे, मोठ्या रांगेतून आणि सुरक्षा व्यवस्थेतून आत गेल्यावर अचानक करमणुकीचे कार्यक्रम चालू असलेले बघून आवाक झाले होते. काहींना हा कार्यक्रम "मस्त झाला" असे देखील वाटले. ज्याची त्याची आवड, झालं! ;) माझ्यापुरते बोलाल तर मी एकूणच बाकीचे निरीक्षण करण्यात आणि लोकांशी बोलण्यात व्यस्त होतो. फक्त चित्रकाराचे चित्र काढणे चालू असताना मात्र पहावेसे वाटले.

In reply to by माझीही शॅम्पेन

आजानुकर्ण Wed, 10/01/2014 - 01:57
कविता कृष्णमूर्ती यांचे यजमान एल सुब्रमण्यम व्हायोलिनवादक हे कर्नाटक संगीतातील आदराने घेतले जाणारे नाव आहे. चित्रपटातील चार गाणी गाणाऱ्या कविताबैंच्या तुलनेत नक्कीच जास्त. http://en.wikipedia.org/wiki/L._Subramaniam बाकी चालू द्या.

In reply to by आजानुकर्ण

तुम्ही म्हणता ते 100% खर आहे अस मी मानूनही जे काही पॅकेज प्रेज़ेंट केले गेले (सादर केले गेले) ते अगदी कर्ण-कर्कश्य होत..

स्रुजा Wed, 10/01/2014 - 00:44
वृत्तांत खूप आवडला. आम्ही पण सकाळपासून times now वर सगळा लाईव बघत होतो. जे टीव्ही वर बघायला नाही मिळालं ते तुमच्या वृत्तान्ता मुळे कळलं . उत्साह बघून च फार छान वाटत होतं . अचानक काही तरी खूप छान होतंय असं सगळ्यांनाच फिलिंग आलं होतं. फक्त राष्ट्रगीत चालू असताना देखील आपल्यासमोर कॅमेरा आलाय म्हणून काही लोक हात हलवत होते ते अजिबात नाही आवडलं . मोदींनी ज्या पद्धतीने आपल्या ताकदीचं प्रदर्शन केलं ते पण फार आवडलं. एका समर्थ आणि महत्त्वाच्या देशाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या माणसानी जसं वागायला, बोलायला हवं तसंच ते वागले बोलले. हसून खेळून यजमानांना त्यांच्याच पद्धतीचे (witty ) टोले लगावत आपल्या माणसांना "या आता परत" असं म्हणलं तर प्रत्यक्ष म्हणलं तर अप्रत्यक्षपणे सुचवून त्यांनी नांदी त च पुढच्या नाटकाची झलक दाखवली. भारताला आता किती गांभीर्याने बघायची गरज आहे हे या शक्ती प्रदर्शनातून फार छान मांडलं गेलं. आणि यात मोदींबरोबर आपल्या लोकांचं पण करावं तेवढं कौतुक कमी . भारतीय आपल्या देशाबद्दल किंवा राजकारणाबद्दल निरुत्साही असतात हा समज आपण खास करून अमेरिकेतल्या भारतीयांनी खोडून काढला. खुल्या दिलाने परत जायची पण तयारी दाखवली. यातले दहा टक्के पण कदाचित परत जाणार नाहीत पण ही उचंबळून येणारी भावना कमी महत्त्वाची नाही . आणि त्यांनी आपल्याबरोबर जो एक आखीव रेखीव कार्यक्रम बनवून आणलाय त्यात त्यांचं उद्दिष्ट सहज दिसून येतंय. CEO बरोबर भेटी गाठी , अनेक महत्त्वाच्या आणि काही अपारंपरिक फोरम्स चा जो काही सुरेख वापर करून घेतलाय त्या बद्दल त्यांचं , त्यांच्या PR टीम चं कौतुक च आहे ! आजच्या काळाच्या मागण्या आहेत या. आपल्या मेडिया चं पण काही अपवाद वगळता मला कौतुक वाटलं. आपल्याबद्दल असलेल्या उत्सुकतेचा आणि आपल्याला नकळत थर्ड वर्ल्ड म्हणून शेलक्या विशेषणात संबोधणार्या लोकांचा पण अत्यंत कौशल्याने वापर करून घेतला काही प्रोग्राम्स नी. त्या फोरम चा, त्यांच्याच मुद्द्यांचा वापर करून भारतातला नागरिक किती सजग आहे, आम्ही आमच्या साध्या आणि महत्त्वाच्या विषयांवर पण जागरूक पणे मत बाळगून आहोत आणि तुम्ही असाल अमेरिका पण बरोबरीने वागवणार असाल तर ठीक अन्यथा राम राम असा एकूण सूर प्रचंड भावला मला ! आज च्या आता व्हाईट हाउस मधल्या मीटिंग मध्ये अमेरिकेच्या अध्यक्षांनी मोदींना VIP च्या ही पलीकडची आणि नियमाबाहेर जाऊन आस्थेवाईक वागणूक दिली आहे . मार्टिन लुथर किंग मेमोरिअल मधली त्यांची क्लीप हे सरळ दाखवते आहे.

In reply to by स्रुजा

आजानुकर्ण Wed, 10/01/2014 - 01:59
आम्ही आमच्या साध्या आणि महत्त्वाच्या विषयांवर पण जागरूक पणे मत बाळगून आहोत आणि तुम्ही असाल अमेरिका पण बरोबरीने वागवणार असाल तर ठीक अन्यथा राम राम असा एकूण सूर प्रचंड भावला मला !
असेच.

In reply to by स्रुजा

स्पंदना Wed, 10/01/2014 - 06:47
सारा प्रतिसादच माझ्या मनातुनच आला आहे अस वाटल. आपण कोणासमोर उभे आहोत, त्यांचे ज्वलंत प्रश्न कोणते याची जाणिव, त्यांना तुम्ही स्वतःच्या पोटासाठी भटकताय अस न म्हणता, तुमच्यामुळे भारतिय ओळख वाढतेय अस सांगण. त्यांच्याकडुन सहकार्याची, सहभागाची अपेक्षा करण हे सगळच आपली भारतिय नाळ जपणार्‍या लोकांना भावणार होतं. लोकशाहीची भलावण करताना ते व्यवस्थीत स्पष्टीकरण देतात की ही लोक्जशाहीच आहे जिच्यामुळे मी एक महत्वाच स्थान मिळवु शकलो. भाषण आवडल नाही आवडल यापेक्षा या किंवा इतर कोणत्याही त्यांच्या भाषणाने किंवा इंटरव्ह्यु ने मनात काही आपल्याला झेपणारे विचार उमटत रहातात हे मला त्यांच यश वाटत.

In reply to by स्पंदना

स्रुजा Mon, 10/06/2014 - 23:02
भाषण आवडल नाही आवडल यापेक्षा या किंवा इतर कोणत्याही त्यांच्या भाषणाने किंवा इंटरव्ह्यु ने मनात काही आपल्याला झेपणारे विचार उमटत रहातात हे मला त्यांच यश वाटत
अगदी नेमकेपणाने मांडलंस !!

In reply to by स्रुजा

ऋषिकेश Wed, 10/01/2014 - 08:40
अमेरिकन राष्ट्रपती भारतात आल्यावर जशी मिडीयात हलचल असते तशीच व तितक्याच ताकदीची हलचल मोदींनी तिथे निर्माण केली ही बाब नक्कीच दुर्लक्षिण्यायोग्य नाही. त्याबद्द्ल त्यांचे कौतुक आहे!

In reply to by ऋषिकेश

विकास Wed, 10/01/2014 - 09:11
जरी मला सहमत असे म्हणायला आवडले असते ;) तरी देखील या संदर्भात तसे म्हणावेसे वाटत नाही. एकंदरीतच अमेरीकन माध्यमे बाहेरच्यांना डोक्यावर घेत नाहीत (अनलेस तो त्यांना डोकेदुखी असला तर! :) ). तरी देखील भारतीय माध्यमांइतके नसले तरी इतर परराष्ट्रीय नेत्यांना मिळणार्‍या (अमेरीकेतील) प्रसिद्धीच्या तुलनेत अधिक प्रतिसाद मिळाला असे नक्की वाटते. पण ओबामा-मोदी भेटीच्या बातम्या तितक्याशा ठळक दिसल्या नाहीत.

In reply to by विकास

ऋषिकेश Wed, 10/01/2014 - 10:33
ओबामा-मोदी भेटीच्या बातम्या तितक्याशा ठळक दिसल्या नाहीत.
त्या भारतातही नाहियेत कारण या भेटीत काहि विशेष वेगळे असे घडल्यासारखे वाटले नाही. नेहमीचेच प्रोटोकॉल्स, नेहमीची भाषा. बरेचसे "सरकरी सपक"! ;) मिडीयासाठी "केम छो" वगळता काही मसाला नव्हता ;)

In reply to by ऋषिकेश

माझ्यामते गेल्या दहा वर्षात दोन्ही देशात जी कटुता ,अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले होते ते दूर होणे गरजेचे होते म्हणूनच संयुक्त राष्ट्र संघात भाषण देण्यात येणाऱ्या समस्त देशाच्या नेत्यांच्या मधून ओबामाने मोदी ह्यांना भेटीस बोलावले. खरे सांगायचे तर बुश प्रशासनाची चूक सुधारण्याची ओबामा प्रशासनाला नितांत गरज वाटत होती, म्हणूनच जपान ,भूतान , नेपाल किंवा चीन शी जसे मोदी ह्यांनी द्विपक्षीय चर्चा केली तशी अमेरिकेशी करण्याचा धीर ओबामा ह्यांच्याकडे नव्हता कारण आधी चीन व अमेरिकेतून गेल्यावर भारतात पुतीन येणार आहेत. म्हणूनच अमेरिकेने ही चर्चा सुरु केली , त्यांचे प्रमुख मंत्री हे ह्या आधी भारतात येउन मोदी ह्यांच्याशी नक्कीच हवापाण्याच्या गोष्टी केल्या नाहीत व जगभरातील प्रमुख अमेरिकेन कंपन्यांच्या प्रमुखांची मोदींनी साडी डिप्लोमसी केली नाही , भारतात १०० दिवसात १० वर्षाचे खरकटे निस्तरणे कठीण आहे अनेक राज्यात जेथे उद्योग धंदे होऊ शकतात तेथे भ्रष्ट नेते राज्यकर्ते आहेत त्यांना त्यांच्या खर्या घरात पाठवणे व उद्योगासाठी पोषक वातावरण तयार करणे ह्या साठी थोडा अवधी हवा पण पेरणी करण्या अगोदर जशी जमिनीची मशागत जरुरी असते, त्या प्रमाणे आपण देशात करत असलेली मशागत ह्या निमित्ताने अमेरिकेत मोदी ह्यांनी सादर केली. सध्या भारतात एक मॉम मंगळावर गेली तर एक तुरुंगात आता स्वामी म्हणतात तशी अजून एक मॉम नाताळ पर्यंत तुरुंगात जाईल अशी आशा करण्यास हरकत नाही.

In reply to by निनाद मुक्काम …

मदनबाण Wed, 10/01/2014 - 16:35
सध्या भारतात एक मॉम मंगळावर गेली तर एक तुरुंगात आता स्वामी म्हणतात तशी अजून एक मॉम नाताळ पर्यंत तुरुंगात जाईल अशी आशा करण्यास हरकत नाही. मॉम ? हॅहॅहॅ... देश माता आहेत त्या ! ;) अधिक इकडे :- National Herald Case: HC to Hear Plea of Sonia, Rahul on November 3 The last gasp of National Herald, by Subramanian Swamy

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Mary Kom gives India first boxing gold at Asian Games

In reply to by स्रुजा

विटेकर Wed, 10/01/2014 - 12:47
फक्त राष्ट्रगीत चालू असताना देखील आपल्यासमोर कॅमेरा आलाय म्हणून काही लोक हात हलवत होते ते अजिबात नाही आवडलं . मला पण नाही आवडले , रादर , चीड आली . क्यामेर्‍यासमोर येण्याची ही कसली लाजिरवाणी हौस ? क्रिकेट्च्या म्याचच्यावेळी देखील लोक असेच करतात. अरे , तुम्हाला बघतोय का ? क्यामेरामन ने सहज क्यामेरा फिरवला त्यात तुमचे काय कर्तृत्व? मूर्खांनो हात कसले हालवताय ? कार्यक्रमाला तुम्ही आलात म्हणजे काय ग्रेट आहात का ? आणखी एक खटकलेली गोष्ट - सार्‍या जगात बॉलीवूड प्रचंड आवडते ! अश्या कार्यक्रमाच्यावेळी तथाकथित देशभक्तिपर गाणी त्या कार्यक्रमाच्या उंचीची नव्हती असे खेदाने म्हणावेसे वाटले. बॉलीवूड वाल्यांनी अपवादानेच देशभक्तीपर गाणी / संगीत बनविले आहे. त्या दिशेने काही जाणिव पूर्वक प्रयत्न व्हायला हवेत. ज्या पद्धतीचे चित्रपट आपण बनवतो ( ९९% लव्ह / सेक्स / गुन्हेगारी / आणि एकूणच भडकपणा ) ते काही भारतीय संस्कृतीचे खरे चित्रण नव्हे ! पूर्वी साप - गारुड्यांचा देश अशी ओळख होती , आता एखाद्याला भारतात लोक बागेत झाडांना आणि बायकांना मिठ्या मारतात किंवा एकमेकांना रक्तबंबाळ होईपर्यन्त मारतात .. असा गैरसमज झाला तर आश्चर्य वाटायला नको ! वास्तविक भारतीयांचा शृन्गार फार तरल आणि अतीव संवेदनाशील असतो, ते एक काव्य आहे. पण आ़ज बॉलीवूड मधले चित्रिकरण पाहीले तर त्रयस्थ माणसाचे काय मत होईल? असो खूपच विषयांतर झाले , कार्यक्रम फारच देखणा झाला , भारतीय म्हणून अभिमान वाटला.

In reply to by विटेकर

जर हॉलीवूड चे सिनेमे पाहून तुमची अमेरिकन समाजाविषयी अतिरंजित मत झाली असतील तर त्या न्यायाने तुमचे वरील विधान संयुक्तिक आहे, राजदीप सारखे अनिवासी भारतीयांच्या चुका काढण्यापेक्ष्या जरा मोठे व्हा , आज अमेरिकेत यहुदी समाजानंतर भारतीयांची मोठी लॉबी आहे.व भारत अमेरिका अणू करार असो किंवा इतर विषयात ह्या समाजाची मोठी भूमिका आहे. मोदी पर्वत अनिवासी व भारतामधील मुळात भक्कम असलेले संबंध एका नव्या उंचीवर जाणार आहेत. माझ्या मते युके ,मध्ये मोदी ह्यांचे असेच भव्य स्वागत तेथील अनिवासी समूहाकडे होईल ते भारतीयांच्या दृष्टीने एका वेगळ्या अर्थाने महत्त्वाचा आहे कारण भारतीय व पाकिस्तानी समाज राजकीय दृष्ट्या येथे अमेरिकेपेक्षाही जास्त सक्रिय आहे , विशेषतः अनेक पाकिस्तानी नेते व लष्करी अधिकारी ह्यांचे आर्थिक व इतर संबंध युके मध्ये आहेत तेथे मोदींचे भव्य स्वागत व तेवढाच प्रखर विरोध सुद्धा होईल थोडक्यात मस्त राडा होईल. पण मोदी ह्यांची युके व युरोप भेट नक्कीच महत्त्वाची आहे , त्यांची आतुरतेने वाट पाहत आहोत.

वृत्तांत आवडला. ह्या आधी कुठल्या पंतप्रधानाला असा अतिभव्य प्रतिसाद मिळाला नसेल्.असो. आता भारत्-अमेरिका संबंध अधिक व्रुद्धिंगत झालेले बघाय्ला आवडतील्.तुमचा तो एच्-वन का एल्-वन व्हिसा मान्य होत नाही अशी ओरड नॅसकॉमसारख्या संघ्टना करीत असतात. अमेरिकन कंपन्यांना येथे व्यापार करणे फायदेशीर वाटते पण आपल्या सरकारचे आर्थिक निर्बंध जरा जास्तच असतात असे त्यांचे म्हणणे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

आधी कुठल्या पंतप्रधानाला असा अतिभव्य प्रतिसाद मिळाला नसेल्.असो. वा माई क्या बात हे बाकी तुमचा मुद्दा योग्य आहे आपण आयटी चा तर अमेरिका डब्लू टी ओ चा मुद्दा काढणार. त्यांच्याकडे रिटेल चा भारतात प्रवेश व अण्वस्त्र करारारातील अमेरिकन कंपनींना दुर्घटनेची जबाबदारी स्वीकारण्याची हमी घेण्याची सक्ती जी भाजपने आग्रहाने यु पी ए ला करार करतांना घ्यायला लावली टी उठवणे अश्या अनेक मागण्या आहे , माझ्या मते जगभरात अशी हमी इतरत्र कुठल्याही कंपन्या घेत नाहीत मग अमेरिकन कंपन्यांच्या वर हा अन्याय का असे वाटते.

In reply to by निनाद मुक्काम …

कपिलमुनी Wed, 10/01/2014 - 17:22
भोपाळ दुर्घटनेच्या अनुभवामुळे असेल. हमी घेउन अपघात टाळता येणार नाहित पण सर्वोच्च काळजी घेण्याची हमी पाळली जाईल ( कारवाईच्या भितीने).

In reply to by कपिलमुनी

प्रसाद१९७१ Wed, 10/01/2014 - 17:28
भोपाळ दुर्घटने साठी कुठल्या भारतीयाला शिक्षा झाली सांगु शकाल का? युनियन कार्बाईड चे भारतीय पार्टनर पण होते आणि उच्च व्यवस्थापन पण भारतीय होते, एकाला तरी शिक्षा झाली का? एक अमेरिकन पळुन गेला, पण जर भारत भारतीयांनाच शिक्षा देवू शकत नसेल तर त्याच्या पळुन जाण्याबद्दल तक्रार करण्याला काय अर्थ आहे?

तिमा Wed, 10/01/2014 - 11:51
मोदींनी या देशाचे भले केले तर ते सर्वांना हवेच आहे. पण त्यांची प्रतिमा 'लार्जर दॅन लाईफ' होत चालली आहे असे वाटते. ते एक उत्कृष्ट वक्ते आहेत याच शंकाच नाही पण ते एक चांगले 'हिप्नॉटिस्ट' ही वाटतात.

श्रीगुरुजी Wed, 10/01/2014 - 13:03
विकास, सविस्तर वृत्तांताबद्दल धन्यवाद! तुम्हाला मोदींचे भाषण प्रत्यक्ष ऐकावयास व बघावयास मिळाले याचा हेवा वाटतो. मोदींनी गेल्या ४ महिन्यात खूपच आशादायक सुरूवात केली आहे. पंतप्रधान झाल्याच्या भरात किंवा ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी अजूनतरी कर्जमाफी, वीजबिल माफी, सवलती अशा कोणत्याही सवंग घोषणा केलेल्या नाहीत. ते एकंदरीत दीर्घकालीन फायदा होईल अशा योजना सुरू करण्याच्या मागे आहेत असं दिसतंय. त्यामुळे कोठे आहेत 'अच्छे दिन', 'महागाई कमी करणार होता त्याचं काय झालं?', लोकांना खोटी आश्वासने देऊन व स्वप्ने दाखवून मोदींनी फसविले अशा तर्‍हेची टीका विनाकारण विरोधी पक्ष करीत आहेत. मोदींच्या दुर्दैवाने यावर्षी पाऊस खूप उशीरा सुरू झाला (१५ जुलै नंतर). त्यामुळे तोपर्यंत बर्‍यापैकी भाव वाढले. एकदा वाढलेले भाव चटकन खाली येत नाहीत. तरीसुद्धा पेट्रोलचे भाव १६ मे नंतर जवळपास प्रतिलिटर रू. ६ ने कमी झाले आहेत. काश्मिरमध्ये आलेल्या अभूतपूर्व पूरपरिस्थितीत मोदींनी आपली 'आपत्ती व्यवस्थापन' या विषयातील कुशलता दाखवून दिली. परराष्ट्र धोरणात अमेरिका व जपान भेटीनंतर व चीनच्या भारत भेटीनंतर बराच सकारात्मक बदल झालेला दिसतोय. पाकिस्तानला मोदींनी आपल्या 'गाजर व काठी' या धोरणाने भानावर आणलेले दिसत आहे. अर्थव्यवस्था हलायला सुरूवात झाली आहे. एकंदरीत ४ महिन्यात खूपच आश्वासक सुरूवात झाली आहे. अर्थात या सर्व गोष्टींचे दृश्य परीणाम दिसण्यास २-३ वर्षे तरी लागतील. तोपर्यंत तरी जनतेने संयम बाळगावा अशी इच्छा व अपेक्षा आहे.

मदनबाण Wed, 10/01/2014 - 13:28
आपल्या अनुभवचा हा वॄत्तांत आवडला ! :) चित्रकाराने ते चित्र पहिल्यांदा उलटे काढुन नंतर सरळ करुन पूर्ण केले... :) अमेरिका स्थित हिंदूस्थानी नागरिकांचा आनंद,उत्साह तो सुद्धा आपल्या पंतप्रधानांसाठी आहे,व त्यांच्यासाठी ते इतकी गर्दी करु शकतात हे पाहुन मला स्वतःला फार आनंद वाटला. :) अमेरिका स्थित हिंदूस्थानी नागरिकांनी एका प्रकारे आपल्या पंतप्रधानांवर प्रेम आणि विश्वास प्रकट केला आणि त्यांच्या आपल्या पंतप्रधानांकडुन असलेल्या अपेक्षा पूर्ण केल्या जातील हा विश्वास देखील प्रकट केला. पंतप्रधानांनी देखील मोकळेपणाने लोकांशी बोलले आणि भेटले देखील ! हा अनुभव अमेरिकास्थित हिंदूस्थानी नागरिकांसाठी अविस्मरणिय ठरला आहे. :) देवयानी खोब्रागडे प्रकरण झाल्यावर ताणले गेलेले संबंध नीट करण्यास अमेरिका देखील तितकाच पुढाकार घेत आहे हे या भेटीतुन जाणवले. दोन्ही देशांनी आपापले मुद्दे स्पष्टपणे मांडले आणि आपल्या पंतप्रधानांनी हिंदूस्थानची बाजु आणि त्याची गरज स्पष्ट केली,मग ते न्युक्लीअर डील असो, डिफेन्स कॉलॅबरेशन असो वा फुड सिक्युरिटी. देशाचे पंतप्रधान {काम सुरु केल्यापासुन} झाल्या पासुन मी १५ मिनीटांचा सुद्धा वेकेशन घेतला नाही हे मोदींचे सांगणे अनेक तरुणांना भावले. :) मोदींकडुन देशातील आणि परदेशातील लोकांच्या किती अपेक्षा आहेत हे मोदींना ठावुक आहे आणि त्यांच्यावर त्या पूर्ण करण्याची जवाबदारी सुद्धा आहे.भुतानपासुन अमेरिके पर्यंत प्रवास करुन सातत्याने गुंतवणुकीचा ओघ आपल्या देशाकडे ओढुन आणण्यात ते नक्कीच यशस्वी झाले आहेत. गुंतवणुकीचे करार /मदत इं झाले असले तरी लगेच कोणी चेक फाडुन पैसे वाटणार नाही, तर त्या मदती बद्धल / गुंतवणुकी बद्धल फायदा देखील मिळेल हे अर्थातच पाहिले जाइल, पण या घटनांनमुळे आधीच्या गुंतवणुकींना आणि होणार्‍या गुंतवणुकांना चालना मात्र मिळेल येव्हढे मात्र निश्चित सांगता येइल. आपले प्रंतप्रधान सातत्याने सकारात्मक बोलत आहेत,आणि त्यांची आता पर्यंतची कार्यशैली सकारात्मकच दिसुन येते. हे आपल्या देशासाठी आणि नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचे आहे,कारण महागाई / भ्रष्टाचार आणि आर्थिक अस्थिरते मधे अडकलेल्या आपल्या देशाला आणि देशातल्या नागरिकांना नकारात्मक मानसिकेतुन आणि विचारातुन बाहेर पडण्यास नक्कीच प्रेरणा मिळेल. हिंदुस्थानी मिडीयाने या घटनेचे जे काही कव्हरेज केले आहे त्यासाठी त्यांचे कौतुकच करायला पाहिजे,आजच्या डिजिटल टेक्नॉलॉजीच्या युगात आपल्या देशाची बाजु आणि आपल्या पंतप्रधांची योग्य प्रतिमा उंचावण्याचे महत्वाचे काम त्यांनी केले आहे. टाईम्स नाउ च्या अर्णब गोस्वामीचे विशेष कव्हरेज मनाला भावणारे आणि या घटनेचा अनेक दॄष्टीकोनातुन विचार करण्यास उद्युक्त करणारे ठरले. आता वेगवेगळ्या गुंतवणुकीच्या बातम्या आणि प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी कशी केली जाते ते पाहणे आणि अनुभवणे रोचक ठरणार आहे, त्याची सुरुवात झाली आहे. Microsoft to set up 3 data centres in India by 2015 जाता जाता :- मोदींच्या भाषेतच सांगायच झालं तर... कोई चले या ना चले लैकिन देश चल पडा है ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Mary Kom gives India first boxing gold at Asian Games

In reply to by मुक्त विहारि

काउबॉय Tue, 09/30/2014 - 00:49
माझ्या मते मोदिनी जेष्ठाना डोक्यावर बसवले नाही की समाज आपल्या बाजूने यायची वाट बघितली नाही अतिशय गहन विचार करून रणनीति आखली विकास साधला प्रतिस्पर्ध्याना पेचात जखडले आणि आज ऑलमोस्ट देशाच्या सर्वोच्य स्थानी पोचले. म्हनुनच आज ते हे अमेरिकेत घडवू शकले. मराठी माणसांनी मोदींकडून बरेच शिकण्यासारखे आहे.

In reply to by मुक्त विहारि

अमित खोजे Tue, 09/30/2014 - 02:45
न्यूयॉर्कमध्ये असून या कार्यक्रमाला न गेलेला माझ्या सारखा करंटा मीच :( पण तुम्हाला उपस्थितीबद्दल अभिनंदन! :)

प्रचेतस Tue, 09/30/2014 - 00:17
मस्त वृतांत. टिव्हीवर कालच हे भाषण पाहिले होते. पण तुमच्या 'आँखो देखा हाल' मुळे खुमारी वाढली.

प्यारे१ Tue, 09/30/2014 - 00:53
बढिया! बाकी स्टेडियमबाहेर काही घटना घडल्या म्हणे. त्या घटनांचं काय? (स्लोगन्स, नारेबाजी, धक्काबुक्की, टोप्या, पगड्या, बुरखे, काळे झेंडे आणि इ.इ.इ.)

In reply to by प्यारे१

नाखु Tue, 09/30/2014 - 08:25
http://deshgujarat.com/2014/09/29/rajdeep-sardesai-attacked-a-person-his-fellow-media-persons-attacked-truth/ आणि हो ही बातमी फक्त झी न्यज वर दखिवली ईंडीया टुडे ई नी २ ओळीची देखील बातमी दिली नाही.

In reply to by नाखु

वेल्लाभट Tue, 09/30/2014 - 10:29
त्याचा व्हिडियो सुद्धा आहे. बघितला असेल अनेकांनी. सरदेसाईंनी प्रथम आपण अँटी मोदी असल्याचं सिद्ध करत लोकांना उद्युक्त करणारे उद्विग्न करणारे प्रश्न विचारले, त्यांची यथोचित उत्तरं त्यांना मिळाली. त्यानंतर आटपतं घेताना त्यांनी एका व्यक्तीला 'अ‍ॅसहोल' असे संबोधले. व्हिडियोत स्पष्टपणे कळत आहे की ती व्यक्ती त्यास 'यू आर अ‍ॅन अ‍ॅसहोल टू' असं प्रत्युत्तर देते आणि नंतर सरदेसाई त्या व्यक्तीस धक्का देतात. इथेच उलट धक्काबुक्की होते. ट्विटर वरून जरी सरदेसाईंनी आपण स्वतः नामानिराळे होतो आणि लोकच कशी बेशिस्त, उद्दाम होती वगैरे भासवण्याचा प्रयत्न केला असला तरीही विडियोतून हेच अनुमान निघतं की दोष सरदेसाईंचाच होता, जो त्यांना भोवला. योग्य झालं. जाणकारांनी आणखी प्रकाश टाकावा यावर.

In reply to by वेल्लाभट

vikramaditya Tue, 09/30/2014 - 18:22
द फोर्थ एस्टेट म्हणवत सगळ्या जगाला आरोपीच्या पिंज-यात उभ्या करण्या-या आततायी मीडीया विषयी एक वेगळी चर्चा व्हावी असे वाटते. हा एक वेगळ्या प्रकारचा दहशतवादच म्हणायचा. ह्या सरदेसाईंना रा़ज ठाकरेंनी "धीस ईज इंटरव्ह्यु नॉट ईंटरॉगेशन' असे सांगीतले होते. समोरच्याला पूर्ण बोलु न देता, त्याच्या बोलण्याचा विकृत अर्थ काढणे आणि "ट्रायल बाय मीडीया" असले प्रकार हे लोक करतात. वर आपण हे देशाच्या नागरीकांसाठी करतो (टीआरपी साठी नव्हे) असा आव आणतात तो वेगळा.

रेवती Tue, 09/30/2014 - 01:13
अमेरीकन राज्यकर्ते केवळ व्हिसाच देण्यास उभे नव्हते तर स्वागतासाठी एका कम्यिनिटी इव्हेंटमधे हजेरी लावत होते! अगदी हेच वाटले, बर्‍याचजणांना असे वाटले असेल. वृत्तांत आवडला. मी मोदीभक्त नसले तरी त्यांचे काम एक पंतप्रधान म्हणून व्यवस्थित चालले असल्यास मोदी किंवा केजरीवाल असा फरक माझ्यासारख्या अतिसामान्य नागरिकाला पडत नाही.

भास्कर केन्डे Tue, 09/30/2014 - 03:31
त्या झेंड्यांमध्ये काठी/काडी नव्हती. का? तर सुरक्षा म्हणून! याची अंमळ गंमत वाटली! -- आमच्या एका मित्राने शक्कल लढवली आणि थंड पेयाची प्लास्तीकची नळी आम्ही सर्वांनी खें झेंड्याला वापरली. कर्यक्रम एकंदर जबरा झाला. भारतीय म्हणून अभिमानाने छती "५६ इंची" झाली. ;)

प्रभाकर पेठकर Tue, 09/30/2014 - 09:03
एकूणात परिस्थिती आपल्या समर्थनात बदलण्याची जी अनोखी क्षमता श्री नरेन्द्र मोदींनी दाखविली त्या बद्दल त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच होईल. एक जबरदस्त व्यक्तिमत्त्व म्हणून श्री मोदी पुढे आले आहेत. त्यामुळेच त्यांच्याकडून देशाच्या अपेक्षा अवाजवी पातळीपर्यंत उंचावल्या आहेत. येती ५ वर्षे ते भारतात काय काय बदल घडवितात त्यावर त्यांचे आणि भारतिय जनता पक्षाचे भवितव्य अवलंबून आहे. भारत अमेरिका संबंध तसेच भारत पाकिस्तान नाते एका वेगळ्या वळणावर उभे असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. श्री. नरेन्द्र मोदी आणि भारतिय जनता पक्षाला अनेकानेक शुभेच्छा.

In reply to by प्रभाकर पेठकर

विकास Tue, 09/30/2014 - 20:50
त्यामुळेच त्यांच्याकडून देशाच्या अपेक्षा अवाजवी पातळीपर्यंत उंचावल्या आहेत. येती ५ वर्षे ते भारतात काय काय बदल घडवितात त्यावर त्यांचे आणि भारतिय जनता पक्षाचे भवितव्य अवलंबून आहे. अगदी १००% वास्तव आहे हे! (जमले नाही तर भाजपाला विस्तव आहे! ;) ). एकंदरीत लोकांशी बोलताना काय जाणवते तर मोदींकडून अवाजवी अपेक्षा असल्यातरी कुठेतरी भान आहे. कोणी म्हणतो, "पुढच्या काही वर्षात स्वच्छता आली तरी खूप झाले" तर काहींचे म्हणणे (मोदींच्या राज्यात) "भ्रष्टाचार (बर्‍यापैकी) कमी झाला तरी बरेच काही होईल. गेल्या काही काळात काही काँग्रेसविरोधी आणि भ्रष्टाचारविरोधी असलेल्या काहींना मोदी या दोन्ही विरोधात काही ठोस करताना दिसत नाही म्हणून राग आला आहे. (त्यात काही मोदी समर्थकही आहेत). पण मला वाटते, मोदी सुडाचे राजकारण जे विशेष करून ७७ सालात जनता पार्टीने अवलंबीले ते न करायचा योग्य निर्णय घेतला आहे. त्यामुळे तो भ्रमनिरास जरी असला तरी योग्यच आहे.

In reply to by विकास

सध्याचे भारतीय राजकारणातील दिशाहीन नेतृत्व ज्यांचे पायांना अकार्यशामातेचा पोलियो झाला आहे , भ्रष्टाचाराच्या दुर्धर रोगाने ग्रासलेल्या विरोधकांच्या समोर ह्या सरकारने केवळ भ्रष्टाचार न करता देखील भारतीय सरकार ५ वर्ष तग धरू शकते एवढे सिद्ध केले तरी पुढील ५ वर्ष ह्या सरकारला एकतर जनता बहाल करेल, मोदी ह्यांनी चाणाक्षपणे जनतेला पुढील १० वर्ष मागितली आहेत. अनिवासी भारतीयांच्या दोन कार्डाचे एकत्रीकरण हि मनमोहन ह्यांच्या काळातील संकल्पना तसेस विसा ऑन अरायावल सारख्या पर्यटन शेत्राला सुगीचे दिवस आणणाऱ्या योजना कागदावर राहिल्या होत्या त्या ह्या सरकारने प्रत्यक्षात आणल्या. तरीही काही कर्म दरिद्री मोदी विरोधक अश्या प्रसंगी मोदी हे मनोहन ह्यांच्या कल्पना चोरत आहेत अशी चेपू वर आवई उठवतात. हे पाहून अमळ गंमत वाटते , त्यांच्या भाषणात गांधींचा एवढा उल्लेख झालेला पाहून त्यांचे विरोधक आता आपण कोणाचे नावावर राजकीय पोळ्या पिकवायाच्या ह्या चिंतेत असतील. मोदी ह्यांनी माफी मागितली नाही , आपली राजकीय भूमिका , मतांवर ठाम राहिले , मते बदलावी लागली ती प्रगत देशांना सुजाण भारतीय मतदारांच्या मुळे हे शक्य झाले मोदी ह्यांचे अमेरिकेत आगमन होणे हा भारतीय लोकशाहीचा विजय आहे. फरीद त्याला जेव्हा संधी मिळेल तेव्हा त्याच्या अमेरिकी मिडिया मध्ये अमेरिकेने मोदी ह्यांना विसा नाकारण्याच्या मागे असलेले कारण किती फसवे दुटप्पी आहे हे आवर्जून सांगत आहे.

vikramaditya Tue, 09/30/2014 - 09:51
"पण एक माणूस सर्व जग विरुद्ध असताना देखील त्या अंगावर येणार्‍या लाटेवर कसा स्वार होऊ शकतो याचे निरीक्षण करण्याचा हा मुद्दा आहे आणि त्यातून आपल्या सर्वांनाच आपापल्या ठिकाणी बरेच काही शिकण्यासारखे आणि स्फुर्ती घेण्यासारखे आहे!"
चुका कोण करत नाही? झालेल्या चुका उगाळत न बसता, प्रचंड चिंतन करुन त्यांनी एक मार्ग शोधला आणि त्याच मार्गावर अविरत चालुन ते आज इथवर पोहोचले. केवळ पैसा ओरबाडण्याच्या नादात हीच संधी मोदींच्या अनेक समकालीनांनी गमवली किंवा त्यांची तेवढी कुवतच नव्हती असे म्हणावे लागेल.

In reply to by vikramaditya

आजानुकर्ण Wed, 10/01/2014 - 18:14
चुका कोण करत नाही? झालेल्या चुका उगाळत न बसता, प्रचंड चिंतन करुन त्यांनी एक मार्ग शोधला
कोणत्या चुका?

ऋषिकेश Tue, 09/30/2014 - 09:59
भाषण ऐकायला मिळाले नाही - मात्र नंतर वाचले. छान झाले होते भाषण त्या भाषणापल्याड तिथल्या वातावरणाबद्द्ल, काही प्रसंग/संवादाबद्दल व इतर अनुभवांबद्दल वाचायला आवडेल.

ऋषिकेश Tue, 09/30/2014 - 10:02
बाकी मोदींनी गांधीजींची स्तुती केली आहे त्या भाषणात, त्यांच्यामुळेच भारताला स्वातंत्र्य मिळाले - त्यांनीच जनसामान्यांना चळवळीत ओढले - बाकीच्यांचे प्रयत्न एकेकट्याचे व लहान गटांपुरते मर्यादित होते असे विश्लेषण केले आहे. अर्थातच विश्लेषण योग्य आहे. मात्र मोदीसमर्थकांचे याबद्द्ल काय मत आहे हे जाणून घ्यायचे आहे!

In reply to by ऋषिकेश

आनन्दा Tue, 09/30/2014 - 10:29
याबद्दल अवांतर टाळणे योग्य ठरेल. पण मोदीसमर्थक असले म्हणजे गांधीविरोधक असलेच पाहिजेत असे काही नाही. आणि, गांधीसमर्थक आणि गांधीहत्यासमर्थक या वेगळ्या गोष्टी आहेत. एक माणूस एकाच वेळेस गांधीसमर्थक आणि गांधीहत्यासमर्थक असू शकतो. असो. अवांतर थांबवतो, नाहीतर या धाग्याचे काश्मीर होईल.

In reply to by ऋषिकेश

मृत्युन्जय Tue, 09/30/2014 - 12:38
मोदीसमर्थकांची मते जाणुन घ्यायची इच्छा का झाली याबद्दल उत्सुकता आहे. मोदी समर्थक म्हणजे पर्यायाने गांधीसमर्थक किंवा गांधी विरोधक अशी घाऊक समजुत तर नाही ना झालेली?

In reply to by मृत्युन्जय

ऋषिकेश Tue, 09/30/2014 - 13:44
नाही प्रत्येक मोदीसमर्थक यापैकी एका गटात येतो अशी समजुत नाही. मात्र मला भेटलेले अनेक समर्थक यापैकी एका गटात येतात.

In reply to by ऋषिकेश

मृत्युन्जय Tue, 09/30/2014 - 16:40
मी न्युट्रल आहे. काही बाबतीत गांधींना मानतो. काही बाबतीत त्यांच्या चुका देशाला प्रचंड भोवल्या असे मानतो. माझ्या माहितीतले ९०% मोदी समर्थक असेच आहेत.

In reply to by अनुप ढेरे

मृत्युन्जय Wed, 10/01/2014 - 18:23
अर्रे बापरे. गांधी चरित्रच उगाळावे लागेल. अगदी उदाहरणच द्यायचे तर असहकार चळवळ मागे घेतली त्याचे उदाहरण घ्या. अजुन बरीच आहेत त्यासाठी वेगळा धागा उघडावा लागेल (मी फाळणीबद्दल त्यांना दोषी धरत नाही. ती अपरिहार्यता होती हे इथे नमूद करु इच्छितो. तो मुद्दा अपेक्षित असेल तर माझा पास)

In reply to by मृत्युन्जय

श्रीगुरुजी Wed, 10/01/2014 - 21:03
अजून कितीतरी चुका आहेत. तुर्कस्तानमधील खिलाफत चळवळीला पाठिंबा, स्वामी श्रध्दानंदाचा खून करणार्‍या रशीदला "भाई रशीद" म्हणून आपुलकी दाखविणे, पाकड्यांना ५५ कोटी देण्यासाठी उपोषण करणे, पंतप्रधानपदासाठी नेहरूंना पाठिंबा देणे ... यादी खूप मोठी आहे.

In reply to by ऋषिकेश

श्रीगुरुजी Tue, 09/30/2014 - 20:56
>>> मात्र मोदीसमर्थकांचे याबद्द्ल काय मत आहे हे जाणून घ्यायचे आहे! मी मोदीसमर्थक असलो तरी मोदींचे प्रत्येक मत मला मान्य आहे असा याचा अर्थ नाही. मोदींनी गांधीजींची स्तुती केली म्हणून लगेच प्रत्येक मोदीसमर्थक त्यांच्या मताचे समर्थन करतीलच असे नाही.

In reply to by ऋषिकेश

विकास Tue, 09/30/2014 - 21:46
मोदी गांधीजींबद्दल प्रथमच बोललेले नाहीत. गांधीजींबद्दलचे निरीक्षण हे योग्यच आहे आणि त्याबद्दल या संस्थळावर मी देखील आधी लिहीलेले होते (अर्थात मी काही पंतप्रधान नसल्याने लोकं विसरली असतील! ;) ) काँग्रेस ही प्रथम रावसाहेबांसारख्या हुच्चभ्रूंसाठी होते. टिळकांनी प्रथम सामान्यांमधे जनसंपर्क कसा करावा ह्याचा परीपाठ घातला आणि गांधीजींनी ते निर्णायकपणे (आणि स्वतंत्रपणे) जनआंदोलन केले आणि ते चांगलेच झाले. गांधीजींबद्दल जर कोणी "हिंदूत्व", "संघिष्ट" वगैरे विशेषण लागलेल्या व्यक्तीकडून कौतूक झाले तर लगेच आश्चर्य वाटते. आता "मोदी समर्थक" / "मोदी भक्त" हे अजून एक विशेषण आहे. ;) कुणाचेच कुठलेच विचार पूर्ण पटू शकत नाहीत. काही निर्णय हे कालांतराने बघताना आधी बरोबर वाटले असले तर नंतर चुकीचे वाटू शकतात अथवा आधी चुकीचे वाटलेले पण बरोबर वाटू शकतात... पण जर एखाद्या व्यक्तीवर टिका करणे निषिद्धच ठरवले असले तर सगळे बिघडते. मग ते स्वतःस मोदीभक्त म्हणणारे असोत अथवा गांधीवादी म्हणणारे तथाकथीत गांधीवादी असोत. अशाच गांधीवाद्यांनी गांधीहत्येनंतर तमाम निष्पाप लोकांचे आणि कुटूंबांचे हत्याकांड केले होते अथवा ज्यांनी तसे केले त्यांच्याकडे दुर्लक्ष केले होते. (एकमेव अपवादः मोरारजी देसाई) आजही त्यांच्या नंतरच्या तिसर्‍या चौथ्या पिढीस जर का "हिंदूत्व" म्हणले अथवा तसे वाटले, तर जणू काही यांच्याच हातात बंदूक होती अशा थाटात आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले जाते. त्यात अजून भर म्हणजे "गांधी म्हणजे आमचेच" असे काँग्रेसजनांनी समजून आता गांधीजींचे नाव घेतले म्हणून मोदींवर टिका करणे... या असल्या कारणामुळे सामान्य जास्त गांधीविरोधात बोलतात. थोडक्यात विरोध हा गांधीजींपेक्षा भंपक गांधीवाद्यांना अथवा "गांधी के नाम" हिंसा अथवा भ्रष्टाचार करणार्‍यांच्या भोंदूगिरीस असतो. असो.

In reply to by विकास

स्पंदना Wed, 10/01/2014 - 06:35
त्यात अजून भर म्हणजे "गांधी म्हणजे आमचेच" असे काँग्रेसजनांनी समजून आता गांधीजींचे नाव घेतले म्हणून मोदींवर टिका करणे... या असल्या कारणामुळे सामान्य जास्त गांधीविरोधात बोलतात. थोडक्यात विरोध हा गांधीजींपेक्षा भंपक गांधीवाद्यांना अथवा "गांधी के नाम" हिंसा अथवा भ्रष्टाचार करणार्‍यांच्या भोंदूगिरीस असतो.
कार्यक्रम पहात असताना हेच वेचार मनात आले. अगदी काँग्रेसने गांधीजी ही त्यांची मोनोपॉली असल्याचा जो अविर्भाव आजवर आणला होता तो मोडीत निघाल्याच जाणवल. गांधीजी आदरणिय आहेत अन राहतील. त्यांच्या जश्या चुका चर्चिल्या जातात तशीच त्यांची मुल्ये सुद्धा चर्चेत राहतील.

In reply to by ऋतुराज चित्रे

विकास Tue, 09/30/2014 - 16:48
सरकारी भिंती आणि त्या भिंती समोरच्या टेबलाखालून दिल्या जाणार्‍या भारतीय चलनांच्या कागदावर त्यांच्या फोटो साठी जागा. असो. ह्या विषयावर चर्चा करायची असेल तर अवश्य वेगळा धागा काढूयात, येथे अवांतर ठरू शकेल.

In reply to by ऋतुराज चित्रे

विवेकपटाईत Tue, 09/30/2014 - 20:01
निश्चित आर एस एस आणि भाजपा वाल्यांनी नव्हत्या दिल्या.... एक खोटा प्रचार १९४७ होत आहे. खरे म्हणाल तर गांधीजींची स्वदेशी विचार धारा आर एस एस वाल्यांनी जिवंत ठेवली आहे.

विनोद१८ Tue, 09/30/2014 - 13:55
श्री. विकास धन्यवाद व अभिनंदन या उत्तम वृतांकनाबद्दल.
हे केवळ "कालाय तस्मै नमः" आहे, का बारा वर्षे आतून बाहेरून सर्व निंदानालस्ती मुकाट्याने सहन करून, "अधिष्ठान, अहंकार, तशी विविध साधने, वेगळ्याला क्रिया नाना" आचरून, "पाचवे असलेले दैव" स्वकर्तुत्वाने मिळवले? हा एक चर्चचा मुद्दा होऊ शकतो. यात मोदी समर्थक अथवा विरोधक हा मुद्दा नाही. त्यांचे पंतप्रधान म्हणून कार्य जोखणे चालूच राहील आणि राहीले पाहीजे देखील! त्यांचे काही निर्णय आवडतील अथवा काही पटणार नाहीत... ते सर्व येणार काळ ठरवेल... पण एक माणूस सर्व जग विरुद्ध असताना देखील त्या अंगावर येणार्‍या लाटेवर कसा स्वार होऊ शकतो याचे निरीक्षण करण्याचा हा मुद्दा आहे आणि त्यातून आपल्या सर्वांनाच आपापल्या ठिकाणी बरेच काही शिकण्यासारखे आणि स्फुर्ती घेण्यासारखे आहे!
वरील अधोरेखित मुद्दा तर खचितच विचार करण्यायोग्य आहे. @....ऋषिकेश...."मात्र मोदीसमर्थकांचे याबद्द्ल काय मत आहे हे जाणून घ्यायचे आहे!" त्या पातळीवर मोदीसमर्थकांचे मत हे नेहमीच अनुकुल असेल, परंतु 'मोदीविरोधक किंवा कायम मोदीद्वेष्टे' यांचे प्रामाणिक मत जाणुन घेण्यात रस आहे.

In reply to by विनोद१८

ऋषिकेश Tue, 09/30/2014 - 14:22
परंतु 'मोदीविरोधक किंवा कायम मोदीद्वेष्टे' यांचे प्रामाणिक मत जाणुन घेण्यात रस आहे.
कशाबद्द्ल मत जाणून घेण्यात रस आहे? मी कायम मोदीद्वेष्टा नाही परंतु मला अयोग्य वाटेल तिथे अनेकदा मोदींच्या विरोधातील माझी मते मांडत असतो माझे मत चालणार असेल तर माझे भाषणाबद्दलचे मत वर दिले आहेच (की छान झाले भाषण). अर्थात माझे मत हे माझे आहे कोणत्याही गटाचे प्रतिनिधित्त्व करत नाही. बाकी, मला गांधींजी हे अत्यंत थोर लोकनेते वाटतात. एकेकट्याने काम करणार्‍या, अगदी प्रसंगी जीव ओवाळून टाकणार्‍या (राष्ट्रभक्ती नी स्वातंत्र्याची आस तीव्र असणार्‍या) क्रांतीकारकांपेक्षा गांधींनी देशातील अख्खे वातावरण- देशातील तळागातील व्यक्तीला - भारून टाकणे हे अधिक महत्त्वाचे कार्य होते अशासारखे मोदींचे म्हणणे माझ्या मताशी सुसंगतच असल्याने मला योग्य वाटते.

विनोद१८ Tue, 09/30/2014 - 15:01
.....झालेल्या सभेबद्दलच म्हणतोय मी. 'मोदीविरोधक किंवा कायम मोदीद्वेष्टे ( व्यावसायिक विरोधक )' यामध्ये तुम्ही येत नाहीत, जे विधायक टिका करतात त्यांच्याबद्द्ल नाही बोलत मी. ज्यांना मोदींचे कार्यात कधीच काही चांगले दिसत नाही, अगदी सुपारी घेउन आल्यासारखे विरोध करतात किंवा तसे सोंग तरी घेतात, कदाचित हा त्यांच्या रोजीरोटीचा उद्योग असु शकेल असे कित्येक इथले व मिपाबाहेरचे लोक्स. या अशा लोकांची त्या मेडीसन गार्डनच्या सभेबद्दलची मते जाणुन घेण्यात मला रस आहे.

In reply to by विनोद१८

नाखु Tue, 09/30/2014 - 15:37
मिपावरील थोर केतकर्-सरदेसाई-वागळेंचा (ज्यांना मोदींचे कार्यात कधीच काही चांगले दिसत नाही) अशा महाभागांची वाट पहाताय्.आपल्याला शुभेच्छा!

In reply to by नाखु

काळा पहाड Tue, 09/30/2014 - 19:46
यातल्या पहिल्या व्यक्तीला टोले बसलेले बघायची फार इच्छा आहे. फार विखारी जहरी फुत्कार असतात याचे. विनाकारण. बहुधा काँग्रेस कडून राज्यसभेची अपेक्षा असणार. कुठलीही चांगली राजकारणविरहीत चर्चा गढूळ करून टाकतो. आणि याच्या डोळ्यातच हिंदूत्वाबद्दल द्वेष दिसतो (जितका कदाचित सोनिया गांधीलाही नसेल). दुसर्‍याबद्द्ल काही कल्पना नाही कारण मी अर्णब गोस्वामी बघतो. तिसरा खरं सांगायचं तर पत्रकारच नाहिये. हा थोडासा मूर्ख कॅटेगिरी मध्ये येतो. आणि त्याला बहुधा आपण फार स्मार्ट प्रश्न विचारतो असं वाटंत असावं. कारण तसं त्याच्या चेहर्‍यावर दिसतं. लोकमत असेपर्यंत याचा आपला सवाल पहायचो कधी कधी. मी मराठी जॉईन केल्यापासून मी याला बघणं बंद केलं आहे.

In reply to by काळा पहाड

प्रसाद१९७१ Wed, 10/01/2014 - 09:28
दुसर्‍याला पुढची १२ वर्ष रोज जाहीर एकदा तोंडात मारायला पाहीजे. २००२ पासुन तो मोदींविरुद्ध खोटी गरळ ओकतो आहे. अगदीच हीन वृतीचा माणुस आहे तो.

In reply to by शिद

शिद Tue, 09/30/2014 - 16:04
मोदींचे भाषण एकदम जबरदस्त होतं. सभागृहातील वातावरण अगदी मोदीमय झालं होतं. मोदी एक चांगले नेता तर आहेतच पण चांगले वक्ता देखील.
पण एक माणूस सर्व जग विरुद्ध असताना देखील त्या अंगावर येणार्‍या लाटेवर कसा स्वार होऊ शकतो याचे निरीक्षण करण्याचा हा मुद्दा आहे आणि त्यातून आपल्या सर्वांनाच आपापल्या ठिकाणी बरेच काही शिकण्यासारखे आणि स्फुर्ती घेण्यासारखे आहे!
+१०००...सहमत. मोदींना पुढील वाटचाली साठी भरपूर शुभेच्छा. विकास, तुम्हाला तेथे प्रत्यक्ष हजर राहून भाषण ऐकण्याची संधी मिळाली त्याबद्दल अभिनंदन. लेख आवडला.

चतुरंग Tue, 09/30/2014 - 17:31
अमेरिकास्थित भारतीयांच्या मदतीने मोदींनी त्यांचा ब्रँड अगदी ताकदीने सादर केला. आजकालच्या मार्केटिंगच्या जमान्यात तुमचा छाप उमटेल अशा पद्धतीने तुम्ही सादरीकरण करणे गरजेचे झाले आहे त्याचे भान मोदींनी ठेवले. भाषण थोडेच ऐकले आणि ते बरेच प्रभावी झाले असावे असा एकूण सूर दिसला. आवर्जून हा धागा टाकल्याबद्दल धन्यवाद विकास! :)

In reply to by आतिवास

विकास Wed, 10/01/2014 - 02:06
या प्रसंगी लोकांचे प्रतिसाद, आपापसातील चर्चा याविषयी तुमचे अनुभव वाचायला आवडतील. वर चतुरंगने म्हणल्याप्रमाणे मी ज्यांच्याशी बोललो त्यांना भाषण प्रभावी वाटलेले दिसले, पण काही जणांना ते भारतातील भारतीयांना अधिक उद्देशून असल्यासारखे वाटले आणि अजून अनिवासी भारतीयांसाठी "अ‍ॅक्शन आयटम्स" असायला हवेत असे वाटले. थोडक्यात आपण काहीतरी भारतासाठी करावे असे जे आधी वाटत होते ते कदाचीत प्रत्यक्षात येऊ शकेल असे वाटताना दिसले. मला माहीत असलेले अनेक जण हे मोदी समर्थक काय भाजपाचे आधी मतदार पण नव्हते. पण यावेळेस काँग्रेस आणि म्हणून युपिएने नक्कीच कायमचे भ्रमनिरास केले. मोदी हे नक्कीच काम करण्यात स्वतःच पुढे रहात असल्याचे दिसल्याने या सर्वजणांचा आशावाद आणि उत्साह वाढलेला दिसला. (ऐकल्याप्रमाणे मोदी शुक्रवारी अमेरीकेत आल्यापासून प्रत्येक रात्री केवळ ४ तासच झोपले आहेत. बाकी वेळ काम आणि भेटीगाठी). काही ३०शीच्या आतील तरूणांशी बोललो त्याप्रमाणे त्यांना त्यांचा सेंट्रल पार्क मधील ग्लोबल सिटीझन्स फेस्टीवल मधील सहभाग पण खूप भावल्याचे जाणवले. अजून एक गोष्ट जाणवली: अनेकांसाठी मोदींचा हा कार्यक्रम म्हणजे जुन्या कडवटपणाला आलेले एक प्रकारचे closure होते. अमेरीकास्थित डाव्या विचारवंत आणि चळवळ्या व्यक्तींनी गुजरात दंगलीचा गैरवापर करून केवळ मोदींनाच बदनाम केले नव्हते तर इथल्या सामान्य जनतेला जे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हिंदू संघटनांशी संलग्न असतील त्यांना देखील बदनाम करण्याचा सातत्याने प्रयत्न केला होता (guilt by association). जर मोदींना व्हिसा न मिळणे हे ह्या (मूळच्या भारतीय) डाव्यांसाठी विजय होता तर मोदींचे जिंकणे, सन्मानाने इकडे येणे हे इथल्या तमाम भारतीय जनतेसाठी वर म्हणल्याप्रमाणे closure होते. विविध क्षेत्रातील आणि आचार-विचारांच्या भारतीयांच्या ४०८ संघटना जेंव्हा एकत्र येतात तेंव्हा आत्तापर्यंत फुटीचे समाजकारण करणार्‍या येथील (मूळच्या भारतीय) डाव्यांना मिळालेले सकारात्मक उत्तर होते. मोदींना डिप्लोमॅटीक व्हिसामुळे इथले कोर्ट समन्स बजावू शकत नव्हते. म्हणून जो कोणी त्यांच्या हातात ते ठेवेल त्याला $१०,००० चे बक्षिस इथल्या डाव्या जनतेने जाहीर केल्याचे ऐकले होते. पण ते किमान अजून तरी करू शकलेले नाहीत असे दिसतयं. असो.

In reply to by विकास

स्रुजा Wed, 10/01/2014 - 02:23
अजून एक गोष्ट जाणवली: अनेकांसाठी मोदींचा हा कार्यक्रम म्हणजे जुन्या कडवटपणाला आलेले एक प्रकारचे closure होते. अमेरीकास्थित डाव्या विचारवंत आणि चळवळ्या व्यक्तींनी गुजरात दंगलीचा गैरवापर करून केवळ मोदींनाच बदनाम केले नव्हते तर इथल्या सामान्य जनतेला जे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हिंदू संघटनांशी संलग्न असतील त्यांना देखील बदनाम करण्याचा सातत्याने प्रयत्न केला होता (guilt by association). जर मोदींना व्हिसा न मिळणे हे ह्या (मूळच्या भारतीय) डाव्यांसाठी विजय होता तर मोदींचे जिंकणे, सन्मानाने इकडे येणे हे इथल्या तमाम भारतीय जनतेसाठी वर म्हणल्याप्रमाणे closure होते. विविध क्षेत्रातील आणि आचार-विचारांच्या भारतीयांच्या ४०८ संघटना जेंव्हा एकत्र येतात तेंव्हा आत्तापर्यंत फुटीचे समाजकारण करणार्‍या येथील (मूळच्या भारतीय) डाव्यांना मिळालेले सकारात्मक उत्तर होते.
+१००

In reply to by विकास

प्रदीप Wed, 10/01/2014 - 08:22
"अमेरीकास्थित डाव्या विचारवंत आणि चळवळ्या व्यक्तींनी गुजरात दंगलीचा गैरवापर करून..." हे "अमेरीकास्थित डाव्या विचारवंत आणि चळवळ्या व्यक्तींनी गुजरात दंगलीचा गैरवापर करून..." असे असावे.

In reply to by चतुरंग

विकास Wed, 10/01/2014 - 01:50
अमेरिकास्थित भारतीयांच्या मदतीने मोदींनी त्यांचा ब्रँड अगदी ताकदीने सादर केला. आजकालच्या मार्केटिंगच्या जमान्यात तुमचा छाप उमटेल अशा पद्धतीने तुम्ही सादरीकरण करणे गरजेचे झाले आहे त्याचे भान मोदींनी ठेवले. जिथे स्वतःच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीत मोदींच्या व्हिसाकडे दुर्लक्ष करणारा ओबामापण, भले तोंड देखले असेल, पण स्वागत करताना मोदींना "केम छो" असे म्हणला तेथे मला नाही वाटत की, मोदींना ब्रँडींग आणि त्यात देखील अनिवासी भारतियांकडून करून घेण्याची गरज असावी. किंबहूना मोदींच्या राजकीय विरोधकांनी स्वतःचे इतके वाईट ब्रँडींग करून टाकले होते की मोदींचे काम सोपे झाले असावे! बाकी राजकीय ब्रँडींगची गरज ही कालातीत असावी असे रामदासांनी जेंव्हा संभाजीस पत्रामधून, "शिवरायाचे कैसे बोलणे । शिवरायाचे कैसे चालणे । शिवरायाचे सलगी देणे । कैसे असे । " असे समजावले, त्यातून समजते! :)

विवेकपटाईत Tue, 09/30/2014 - 20:02
मी ही भाषण दूरदर्शन वर बघितले होते. मोदींच्या भाषण मुळे दिल्लीच्या एका प्रसिद्ध रामलीला मैदान त्या दिवशी रिकामे राहिले. काही ठिकाणी रामलीला थांबवून मोदींचे भाषण दाखविले, आणि नंतर रामलीला. बाकी राजदीप सरदेसाई यांना पत्रकार म्हणावे कि नाही या बाबत अनेक शंका आहेत. त्यांच्या इतिहास बघा कसे ते पत्रकार बनले, सरकार दरबारात मान मिळविला. (....श्री ) पुरस्कार ही त्यांना मिळाला. खालेल्या मिठाला जगावेच लागेल न. आता मोदींचा दौरा फसला, हे दाखविणे शक्य नव्हते. मग मोदी प्रशंसक दुष्ट लोक आहेत, हे दाखविण्या साठी काही जुगाड करायचा होता. त्यांनी केला.

In reply to by विवेकपटाईत

नाखु Wed, 10/01/2014 - 08:42
पटाईत साहेब आणि ईतर.मान्यवरांस राजदीप सरदेसाई हे फड्तूस आणि पीत्+(भाडोत्री) पत्रकारिता करीत असले तरी त्यबद्दल मिपा-विचारवंत अवाक्षर काढणार नाहीत. याच राज्दीपची भलामण करणारा प्रतिसाद ब्लु प्रिंट धाग्यावर दिमाखात आहे यातच सारे काही आले.

विकास Tue, 09/30/2014 - 20:15
सर्व वाचक-प्रतिसादकांचे आभार. खाली काही समान गोष्टींसाठी एकत्रित प्रतिक्रीया देण्याचा प्रयत्न करतो. सर्व प्रथम, माझे अभिनंदन करण्यासारखे काहीच नाही! :) १८,००० तला मी एक होतो. आधी जाणे जर अवघड होते म्हणून जाणार नव्हतो पण नंतर कार्यक्रमाची उत्सुकता वाढत गेली म्हणून नाव नोंदवले आणि लॉटरी सिस्टीम मध्ये तिकीट मिळाले! वरती स्टेडीयमच्या बाहेर झालेल्या (का मुद्दामून घडवून आणलेल्या?) तमाशाबद्दल चर्चा आलेली आहे. ती होणे साहजीकच आहे. पण माझ्या लेखी त्याकडे दुर्लक्ष केलेले उत्तम. असो. :)

कंजूस Tue, 09/30/2014 - 20:46
मोदींनी भारत पूर्ण पाहिला आहे, वाचला आहे, अनुभवला आहे. बाळसेदार होण्यासाठी महागडे व्हेंटिलेटरात शिक्षण घेतलेले नाही. चायवाल्याशी टक्कर देण्यासाठी काहीजण आपापल्या पक्षात कोणी दूधवाला मिळतो का पाहताहेत त्यांची फारच कीव वाटते. लेखाच्या सुरवातीच्या काळ्या फळ्याचा उद्देश नाही कळला.

पैसा Tue, 09/30/2014 - 21:58
भाषण टीव्हीवर प्रत्यक्ष पाहिले. मोदी उत्तम वक्ते आहेत यात काही संशय नाहीच. इतर लोकांनी आता त्यांना शांतपणे काम करू द्यावे एवढीच अपेक्षा आहे.

कविता मॅडम चा आवाज आणि वाइयोलिन बरोबरची तथा-कथित जुगलबंदी ही टीवीवर अत्यंत भेसूर वाटत होती (त्या आवाजात जन गण मन इतक ऐकायला बेक्कार वाटत होत) बर "वैश्णव जनतो भजन" जे काही वाईट री-मिक्स केल यव रे यॅव , मॅडमचा आवाज सहन केला असता पण नवरा आणि मुलाला त्यात घुसवून एकंदरीतच गाल-बोट लावले

In reply to by माझीही शॅम्पेन

रेवती Tue, 09/30/2014 - 23:00
बाप रे! नवरा आणि मुलालाही घुसवले हे पाहिले नाही. संपूर्ण १ मिनिट कविताबाईंचे गाणे ऐकले. इतका वाईट आवाज ऐकवत नव्हता. बरे झाले पुढे पाहिले नाही.

In reply to by रेवती

मोदींचे राजकारण हे नव्या धाटणीचे आहेत , त्यांच्या सभा त्यांच्या समर्थकांची त्यांच्यासाठी केलेला निवडणुकीत आखीव रेखीव प्रचार हे आजवर भारतीयांनी प्रथमच अनुभवले. मनोरंजनाचे कार्यक्रम व मग भाषण हा फंडा आपल्या सर्वांसाठी नवीन आहे , व तो अनेकांना प्रथमदर्शनी आवडला नाही, मनोरंजनाच्या दर्जाबाबत अनेक तक्रारी भारतातून सुद्धा आल्या. माझ्यासाठी अमेरिकन अनिवासी भारतीयांनी त्यांच्या तर्फे प्रथमच एखाद्या भारतीय नेत्यासाठी जगाला थक्क करेल असे नितांत सुंदर आयोजन केले त्या बद्दल त्यांचे कौतुक वाटले , पुढच्या वेळीस अजून सुधारणेस नक्कीच वाव आहे. अमेरिकन महाराष्ट्र मंडळांचा ह्या कार्यक्रमात सहभाग होता का. तेथे काही वर्षापूर्वी गायन स्पर्धा त्यांच्या तर्फे घेण्यात आली होती पुढच्या खेपेस जेव्हा मोदी येतील तेव्हा स्थानिक अमेरिकन अनिवासी भारतीयांच्या कडून गाणे गायले गेले मोदींची हि अमेरिकन वारी खरे तर संयुक्त राष्ट्र संघात भाषण देण्यासाठी होती. ओबामा ह्यांनी त्यांच्याशी भेट घेण्याचे ठरवले व त्यास मोदी ह्यांनी रुकार दिला. जेव्हा काही वर्षाने मोदी फक्त अमेरिकेत पांढऱ्या घरात मुख्य अतिथी म्हणून येतील. तेव्हा अमेरिकन दोन्ही सभागृहात त्यांचे भाषण असेल तेव्हा त्यांचे अजून चांगल्या अनिवासी भारतीयांच्या सोबत कार्यक्रम करता येतील.

In reply to by रेवती

प्रदीप Wed, 10/01/2014 - 10:23
मला कविता कृष्णमूर्तींनी गायिलेले 'जन गण मन' अतिशय आवडले, त्यांजबरोबर श्री. सुब्रमण्यम ह्यांनी त्यांना केलेली साथही आवडली. एक नाविन्यपूर्ण व चांगला, जमून आलेला प्रयोग. जाता जाता, ती 'जुगलबंदी' आहे असे कशावरून ठरवले?

In reply to by प्रदीप

"जुगलबंदी" हा शब्द कदाचित चुकला असु शकतो , एखाद्या लाइव कार्यक्रमात जेव्हा गाण गातात त्या-वेळी सर्व सपोर्टिंग वाद्य-वादक हजर असतात , पण बाकी सर्व वाद्य-वादक हजर नसताना फक्त गायिका आणि वाइयोलिन वादक (मॅडमचे पती आणि मुलगा) वाजवित होते , ते जवळपास नुसतीच साथ न वाटता जुगलबंदी सारख भासले...

In reply to by माझीही शॅम्पेन

विकास Tue, 09/30/2014 - 23:25
अनेकांनी त्याबद्दल नापसंती दर्शवली. किंबहूना बहुतांशी लोकं हे केवळ मोदींना ऐकायला आलेले होते. त्यामुळे, मोठ्या रांगेतून आणि सुरक्षा व्यवस्थेतून आत गेल्यावर अचानक करमणुकीचे कार्यक्रम चालू असलेले बघून आवाक झाले होते. काहींना हा कार्यक्रम "मस्त झाला" असे देखील वाटले. ज्याची त्याची आवड, झालं! ;) माझ्यापुरते बोलाल तर मी एकूणच बाकीचे निरीक्षण करण्यात आणि लोकांशी बोलण्यात व्यस्त होतो. फक्त चित्रकाराचे चित्र काढणे चालू असताना मात्र पहावेसे वाटले.

In reply to by माझीही शॅम्पेन

आजानुकर्ण Wed, 10/01/2014 - 01:57
कविता कृष्णमूर्ती यांचे यजमान एल सुब्रमण्यम व्हायोलिनवादक हे कर्नाटक संगीतातील आदराने घेतले जाणारे नाव आहे. चित्रपटातील चार गाणी गाणाऱ्या कविताबैंच्या तुलनेत नक्कीच जास्त. http://en.wikipedia.org/wiki/L._Subramaniam बाकी चालू द्या.

In reply to by आजानुकर्ण

तुम्ही म्हणता ते 100% खर आहे अस मी मानूनही जे काही पॅकेज प्रेज़ेंट केले गेले (सादर केले गेले) ते अगदी कर्ण-कर्कश्य होत..

स्रुजा Wed, 10/01/2014 - 00:44
वृत्तांत खूप आवडला. आम्ही पण सकाळपासून times now वर सगळा लाईव बघत होतो. जे टीव्ही वर बघायला नाही मिळालं ते तुमच्या वृत्तान्ता मुळे कळलं . उत्साह बघून च फार छान वाटत होतं . अचानक काही तरी खूप छान होतंय असं सगळ्यांनाच फिलिंग आलं होतं. फक्त राष्ट्रगीत चालू असताना देखील आपल्यासमोर कॅमेरा आलाय म्हणून काही लोक हात हलवत होते ते अजिबात नाही आवडलं . मोदींनी ज्या पद्धतीने आपल्या ताकदीचं प्रदर्शन केलं ते पण फार आवडलं. एका समर्थ आणि महत्त्वाच्या देशाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या माणसानी जसं वागायला, बोलायला हवं तसंच ते वागले बोलले. हसून खेळून यजमानांना त्यांच्याच पद्धतीचे (witty ) टोले लगावत आपल्या माणसांना "या आता परत" असं म्हणलं तर प्रत्यक्ष म्हणलं तर अप्रत्यक्षपणे सुचवून त्यांनी नांदी त च पुढच्या नाटकाची झलक दाखवली. भारताला आता किती गांभीर्याने बघायची गरज आहे हे या शक्ती प्रदर्शनातून फार छान मांडलं गेलं. आणि यात मोदींबरोबर आपल्या लोकांचं पण करावं तेवढं कौतुक कमी . भारतीय आपल्या देशाबद्दल किंवा राजकारणाबद्दल निरुत्साही असतात हा समज आपण खास करून अमेरिकेतल्या भारतीयांनी खोडून काढला. खुल्या दिलाने परत जायची पण तयारी दाखवली. यातले दहा टक्के पण कदाचित परत जाणार नाहीत पण ही उचंबळून येणारी भावना कमी महत्त्वाची नाही . आणि त्यांनी आपल्याबरोबर जो एक आखीव रेखीव कार्यक्रम बनवून आणलाय त्यात त्यांचं उद्दिष्ट सहज दिसून येतंय. CEO बरोबर भेटी गाठी , अनेक महत्त्वाच्या आणि काही अपारंपरिक फोरम्स चा जो काही सुरेख वापर करून घेतलाय त्या बद्दल त्यांचं , त्यांच्या PR टीम चं कौतुक च आहे ! आजच्या काळाच्या मागण्या आहेत या. आपल्या मेडिया चं पण काही अपवाद वगळता मला कौतुक वाटलं. आपल्याबद्दल असलेल्या उत्सुकतेचा आणि आपल्याला नकळत थर्ड वर्ल्ड म्हणून शेलक्या विशेषणात संबोधणार्या लोकांचा पण अत्यंत कौशल्याने वापर करून घेतला काही प्रोग्राम्स नी. त्या फोरम चा, त्यांच्याच मुद्द्यांचा वापर करून भारतातला नागरिक किती सजग आहे, आम्ही आमच्या साध्या आणि महत्त्वाच्या विषयांवर पण जागरूक पणे मत बाळगून आहोत आणि तुम्ही असाल अमेरिका पण बरोबरीने वागवणार असाल तर ठीक अन्यथा राम राम असा एकूण सूर प्रचंड भावला मला ! आज च्या आता व्हाईट हाउस मधल्या मीटिंग मध्ये अमेरिकेच्या अध्यक्षांनी मोदींना VIP च्या ही पलीकडची आणि नियमाबाहेर जाऊन आस्थेवाईक वागणूक दिली आहे . मार्टिन लुथर किंग मेमोरिअल मधली त्यांची क्लीप हे सरळ दाखवते आहे.

In reply to by स्रुजा

आजानुकर्ण Wed, 10/01/2014 - 01:59
आम्ही आमच्या साध्या आणि महत्त्वाच्या विषयांवर पण जागरूक पणे मत बाळगून आहोत आणि तुम्ही असाल अमेरिका पण बरोबरीने वागवणार असाल तर ठीक अन्यथा राम राम असा एकूण सूर प्रचंड भावला मला !
असेच.

In reply to by स्रुजा

स्पंदना Wed, 10/01/2014 - 06:47
सारा प्रतिसादच माझ्या मनातुनच आला आहे अस वाटल. आपण कोणासमोर उभे आहोत, त्यांचे ज्वलंत प्रश्न कोणते याची जाणिव, त्यांना तुम्ही स्वतःच्या पोटासाठी भटकताय अस न म्हणता, तुमच्यामुळे भारतिय ओळख वाढतेय अस सांगण. त्यांच्याकडुन सहकार्याची, सहभागाची अपेक्षा करण हे सगळच आपली भारतिय नाळ जपणार्‍या लोकांना भावणार होतं. लोकशाहीची भलावण करताना ते व्यवस्थीत स्पष्टीकरण देतात की ही लोक्जशाहीच आहे जिच्यामुळे मी एक महत्वाच स्थान मिळवु शकलो. भाषण आवडल नाही आवडल यापेक्षा या किंवा इतर कोणत्याही त्यांच्या भाषणाने किंवा इंटरव्ह्यु ने मनात काही आपल्याला झेपणारे विचार उमटत रहातात हे मला त्यांच यश वाटत.

In reply to by स्पंदना

स्रुजा Mon, 10/06/2014 - 23:02
भाषण आवडल नाही आवडल यापेक्षा या किंवा इतर कोणत्याही त्यांच्या भाषणाने किंवा इंटरव्ह्यु ने मनात काही आपल्याला झेपणारे विचार उमटत रहातात हे मला त्यांच यश वाटत
अगदी नेमकेपणाने मांडलंस !!

In reply to by स्रुजा

ऋषिकेश Wed, 10/01/2014 - 08:40
अमेरिकन राष्ट्रपती भारतात आल्यावर जशी मिडीयात हलचल असते तशीच व तितक्याच ताकदीची हलचल मोदींनी तिथे निर्माण केली ही बाब नक्कीच दुर्लक्षिण्यायोग्य नाही. त्याबद्द्ल त्यांचे कौतुक आहे!

In reply to by ऋषिकेश

विकास Wed, 10/01/2014 - 09:11
जरी मला सहमत असे म्हणायला आवडले असते ;) तरी देखील या संदर्भात तसे म्हणावेसे वाटत नाही. एकंदरीतच अमेरीकन माध्यमे बाहेरच्यांना डोक्यावर घेत नाहीत (अनलेस तो त्यांना डोकेदुखी असला तर! :) ). तरी देखील भारतीय माध्यमांइतके नसले तरी इतर परराष्ट्रीय नेत्यांना मिळणार्‍या (अमेरीकेतील) प्रसिद्धीच्या तुलनेत अधिक प्रतिसाद मिळाला असे नक्की वाटते. पण ओबामा-मोदी भेटीच्या बातम्या तितक्याशा ठळक दिसल्या नाहीत.

In reply to by विकास

ऋषिकेश Wed, 10/01/2014 - 10:33
ओबामा-मोदी भेटीच्या बातम्या तितक्याशा ठळक दिसल्या नाहीत.
त्या भारतातही नाहियेत कारण या भेटीत काहि विशेष वेगळे असे घडल्यासारखे वाटले नाही. नेहमीचेच प्रोटोकॉल्स, नेहमीची भाषा. बरेचसे "सरकरी सपक"! ;) मिडीयासाठी "केम छो" वगळता काही मसाला नव्हता ;)

In reply to by ऋषिकेश

माझ्यामते गेल्या दहा वर्षात दोन्ही देशात जी कटुता ,अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले होते ते दूर होणे गरजेचे होते म्हणूनच संयुक्त राष्ट्र संघात भाषण देण्यात येणाऱ्या समस्त देशाच्या नेत्यांच्या मधून ओबामाने मोदी ह्यांना भेटीस बोलावले. खरे सांगायचे तर बुश प्रशासनाची चूक सुधारण्याची ओबामा प्रशासनाला नितांत गरज वाटत होती, म्हणूनच जपान ,भूतान , नेपाल किंवा चीन शी जसे मोदी ह्यांनी द्विपक्षीय चर्चा केली तशी अमेरिकेशी करण्याचा धीर ओबामा ह्यांच्याकडे नव्हता कारण आधी चीन व अमेरिकेतून गेल्यावर भारतात पुतीन येणार आहेत. म्हणूनच अमेरिकेने ही चर्चा सुरु केली , त्यांचे प्रमुख मंत्री हे ह्या आधी भारतात येउन मोदी ह्यांच्याशी नक्कीच हवापाण्याच्या गोष्टी केल्या नाहीत व जगभरातील प्रमुख अमेरिकेन कंपन्यांच्या प्रमुखांची मोदींनी साडी डिप्लोमसी केली नाही , भारतात १०० दिवसात १० वर्षाचे खरकटे निस्तरणे कठीण आहे अनेक राज्यात जेथे उद्योग धंदे होऊ शकतात तेथे भ्रष्ट नेते राज्यकर्ते आहेत त्यांना त्यांच्या खर्या घरात पाठवणे व उद्योगासाठी पोषक वातावरण तयार करणे ह्या साठी थोडा अवधी हवा पण पेरणी करण्या अगोदर जशी जमिनीची मशागत जरुरी असते, त्या प्रमाणे आपण देशात करत असलेली मशागत ह्या निमित्ताने अमेरिकेत मोदी ह्यांनी सादर केली. सध्या भारतात एक मॉम मंगळावर गेली तर एक तुरुंगात आता स्वामी म्हणतात तशी अजून एक मॉम नाताळ पर्यंत तुरुंगात जाईल अशी आशा करण्यास हरकत नाही.

In reply to by निनाद मुक्काम …

मदनबाण Wed, 10/01/2014 - 16:35
सध्या भारतात एक मॉम मंगळावर गेली तर एक तुरुंगात आता स्वामी म्हणतात तशी अजून एक मॉम नाताळ पर्यंत तुरुंगात जाईल अशी आशा करण्यास हरकत नाही. मॉम ? हॅहॅहॅ... देश माता आहेत त्या ! ;) अधिक इकडे :- National Herald Case: HC to Hear Plea of Sonia, Rahul on November 3 The last gasp of National Herald, by Subramanian Swamy

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Mary Kom gives India first boxing gold at Asian Games

In reply to by स्रुजा

विटेकर Wed, 10/01/2014 - 12:47
फक्त राष्ट्रगीत चालू असताना देखील आपल्यासमोर कॅमेरा आलाय म्हणून काही लोक हात हलवत होते ते अजिबात नाही आवडलं . मला पण नाही आवडले , रादर , चीड आली . क्यामेर्‍यासमोर येण्याची ही कसली लाजिरवाणी हौस ? क्रिकेट्च्या म्याचच्यावेळी देखील लोक असेच करतात. अरे , तुम्हाला बघतोय का ? क्यामेरामन ने सहज क्यामेरा फिरवला त्यात तुमचे काय कर्तृत्व? मूर्खांनो हात कसले हालवताय ? कार्यक्रमाला तुम्ही आलात म्हणजे काय ग्रेट आहात का ? आणखी एक खटकलेली गोष्ट - सार्‍या जगात बॉलीवूड प्रचंड आवडते ! अश्या कार्यक्रमाच्यावेळी तथाकथित देशभक्तिपर गाणी त्या कार्यक्रमाच्या उंचीची नव्हती असे खेदाने म्हणावेसे वाटले. बॉलीवूड वाल्यांनी अपवादानेच देशभक्तीपर गाणी / संगीत बनविले आहे. त्या दिशेने काही जाणिव पूर्वक प्रयत्न व्हायला हवेत. ज्या पद्धतीचे चित्रपट आपण बनवतो ( ९९% लव्ह / सेक्स / गुन्हेगारी / आणि एकूणच भडकपणा ) ते काही भारतीय संस्कृतीचे खरे चित्रण नव्हे ! पूर्वी साप - गारुड्यांचा देश अशी ओळख होती , आता एखाद्याला भारतात लोक बागेत झाडांना आणि बायकांना मिठ्या मारतात किंवा एकमेकांना रक्तबंबाळ होईपर्यन्त मारतात .. असा गैरसमज झाला तर आश्चर्य वाटायला नको ! वास्तविक भारतीयांचा शृन्गार फार तरल आणि अतीव संवेदनाशील असतो, ते एक काव्य आहे. पण आ़ज बॉलीवूड मधले चित्रिकरण पाहीले तर त्रयस्थ माणसाचे काय मत होईल? असो खूपच विषयांतर झाले , कार्यक्रम फारच देखणा झाला , भारतीय म्हणून अभिमान वाटला.

In reply to by विटेकर

जर हॉलीवूड चे सिनेमे पाहून तुमची अमेरिकन समाजाविषयी अतिरंजित मत झाली असतील तर त्या न्यायाने तुमचे वरील विधान संयुक्तिक आहे, राजदीप सारखे अनिवासी भारतीयांच्या चुका काढण्यापेक्ष्या जरा मोठे व्हा , आज अमेरिकेत यहुदी समाजानंतर भारतीयांची मोठी लॉबी आहे.व भारत अमेरिका अणू करार असो किंवा इतर विषयात ह्या समाजाची मोठी भूमिका आहे. मोदी पर्वत अनिवासी व भारतामधील मुळात भक्कम असलेले संबंध एका नव्या उंचीवर जाणार आहेत. माझ्या मते युके ,मध्ये मोदी ह्यांचे असेच भव्य स्वागत तेथील अनिवासी समूहाकडे होईल ते भारतीयांच्या दृष्टीने एका वेगळ्या अर्थाने महत्त्वाचा आहे कारण भारतीय व पाकिस्तानी समाज राजकीय दृष्ट्या येथे अमेरिकेपेक्षाही जास्त सक्रिय आहे , विशेषतः अनेक पाकिस्तानी नेते व लष्करी अधिकारी ह्यांचे आर्थिक व इतर संबंध युके मध्ये आहेत तेथे मोदींचे भव्य स्वागत व तेवढाच प्रखर विरोध सुद्धा होईल थोडक्यात मस्त राडा होईल. पण मोदी ह्यांची युके व युरोप भेट नक्कीच महत्त्वाची आहे , त्यांची आतुरतेने वाट पाहत आहोत.

वृत्तांत आवडला. ह्या आधी कुठल्या पंतप्रधानाला असा अतिभव्य प्रतिसाद मिळाला नसेल्.असो. आता भारत्-अमेरिका संबंध अधिक व्रुद्धिंगत झालेले बघाय्ला आवडतील्.तुमचा तो एच्-वन का एल्-वन व्हिसा मान्य होत नाही अशी ओरड नॅसकॉमसारख्या संघ्टना करीत असतात. अमेरिकन कंपन्यांना येथे व्यापार करणे फायदेशीर वाटते पण आपल्या सरकारचे आर्थिक निर्बंध जरा जास्तच असतात असे त्यांचे म्हणणे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

आधी कुठल्या पंतप्रधानाला असा अतिभव्य प्रतिसाद मिळाला नसेल्.असो. वा माई क्या बात हे बाकी तुमचा मुद्दा योग्य आहे आपण आयटी चा तर अमेरिका डब्लू टी ओ चा मुद्दा काढणार. त्यांच्याकडे रिटेल चा भारतात प्रवेश व अण्वस्त्र करारारातील अमेरिकन कंपनींना दुर्घटनेची जबाबदारी स्वीकारण्याची हमी घेण्याची सक्ती जी भाजपने आग्रहाने यु पी ए ला करार करतांना घ्यायला लावली टी उठवणे अश्या अनेक मागण्या आहे , माझ्या मते जगभरात अशी हमी इतरत्र कुठल्याही कंपन्या घेत नाहीत मग अमेरिकन कंपन्यांच्या वर हा अन्याय का असे वाटते.

In reply to by निनाद मुक्काम …

कपिलमुनी Wed, 10/01/2014 - 17:22
भोपाळ दुर्घटनेच्या अनुभवामुळे असेल. हमी घेउन अपघात टाळता येणार नाहित पण सर्वोच्च काळजी घेण्याची हमी पाळली जाईल ( कारवाईच्या भितीने).

In reply to by कपिलमुनी

प्रसाद१९७१ Wed, 10/01/2014 - 17:28
भोपाळ दुर्घटने साठी कुठल्या भारतीयाला शिक्षा झाली सांगु शकाल का? युनियन कार्बाईड चे भारतीय पार्टनर पण होते आणि उच्च व्यवस्थापन पण भारतीय होते, एकाला तरी शिक्षा झाली का? एक अमेरिकन पळुन गेला, पण जर भारत भारतीयांनाच शिक्षा देवू शकत नसेल तर त्याच्या पळुन जाण्याबद्दल तक्रार करण्याला काय अर्थ आहे?

तिमा Wed, 10/01/2014 - 11:51
मोदींनी या देशाचे भले केले तर ते सर्वांना हवेच आहे. पण त्यांची प्रतिमा 'लार्जर दॅन लाईफ' होत चालली आहे असे वाटते. ते एक उत्कृष्ट वक्ते आहेत याच शंकाच नाही पण ते एक चांगले 'हिप्नॉटिस्ट' ही वाटतात.

श्रीगुरुजी Wed, 10/01/2014 - 13:03
विकास, सविस्तर वृत्तांताबद्दल धन्यवाद! तुम्हाला मोदींचे भाषण प्रत्यक्ष ऐकावयास व बघावयास मिळाले याचा हेवा वाटतो. मोदींनी गेल्या ४ महिन्यात खूपच आशादायक सुरूवात केली आहे. पंतप्रधान झाल्याच्या भरात किंवा ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी अजूनतरी कर्जमाफी, वीजबिल माफी, सवलती अशा कोणत्याही सवंग घोषणा केलेल्या नाहीत. ते एकंदरीत दीर्घकालीन फायदा होईल अशा योजना सुरू करण्याच्या मागे आहेत असं दिसतंय. त्यामुळे कोठे आहेत 'अच्छे दिन', 'महागाई कमी करणार होता त्याचं काय झालं?', लोकांना खोटी आश्वासने देऊन व स्वप्ने दाखवून मोदींनी फसविले अशा तर्‍हेची टीका विनाकारण विरोधी पक्ष करीत आहेत. मोदींच्या दुर्दैवाने यावर्षी पाऊस खूप उशीरा सुरू झाला (१५ जुलै नंतर). त्यामुळे तोपर्यंत बर्‍यापैकी भाव वाढले. एकदा वाढलेले भाव चटकन खाली येत नाहीत. तरीसुद्धा पेट्रोलचे भाव १६ मे नंतर जवळपास प्रतिलिटर रू. ६ ने कमी झाले आहेत. काश्मिरमध्ये आलेल्या अभूतपूर्व पूरपरिस्थितीत मोदींनी आपली 'आपत्ती व्यवस्थापन' या विषयातील कुशलता दाखवून दिली. परराष्ट्र धोरणात अमेरिका व जपान भेटीनंतर व चीनच्या भारत भेटीनंतर बराच सकारात्मक बदल झालेला दिसतोय. पाकिस्तानला मोदींनी आपल्या 'गाजर व काठी' या धोरणाने भानावर आणलेले दिसत आहे. अर्थव्यवस्था हलायला सुरूवात झाली आहे. एकंदरीत ४ महिन्यात खूपच आश्वासक सुरूवात झाली आहे. अर्थात या सर्व गोष्टींचे दृश्य परीणाम दिसण्यास २-३ वर्षे तरी लागतील. तोपर्यंत तरी जनतेने संयम बाळगावा अशी इच्छा व अपेक्षा आहे.

मदनबाण Wed, 10/01/2014 - 13:28
आपल्या अनुभवचा हा वॄत्तांत आवडला ! :) चित्रकाराने ते चित्र पहिल्यांदा उलटे काढुन नंतर सरळ करुन पूर्ण केले... :) अमेरिका स्थित हिंदूस्थानी नागरिकांचा आनंद,उत्साह तो सुद्धा आपल्या पंतप्रधानांसाठी आहे,व त्यांच्यासाठी ते इतकी गर्दी करु शकतात हे पाहुन मला स्वतःला फार आनंद वाटला. :) अमेरिका स्थित हिंदूस्थानी नागरिकांनी एका प्रकारे आपल्या पंतप्रधानांवर प्रेम आणि विश्वास प्रकट केला आणि त्यांच्या आपल्या पंतप्रधानांकडुन असलेल्या अपेक्षा पूर्ण केल्या जातील हा विश्वास देखील प्रकट केला. पंतप्रधानांनी देखील मोकळेपणाने लोकांशी बोलले आणि भेटले देखील ! हा अनुभव अमेरिकास्थित हिंदूस्थानी नागरिकांसाठी अविस्मरणिय ठरला आहे. :) देवयानी खोब्रागडे प्रकरण झाल्यावर ताणले गेलेले संबंध नीट करण्यास अमेरिका देखील तितकाच पुढाकार घेत आहे हे या भेटीतुन जाणवले. दोन्ही देशांनी आपापले मुद्दे स्पष्टपणे मांडले आणि आपल्या पंतप्रधानांनी हिंदूस्थानची बाजु आणि त्याची गरज स्पष्ट केली,मग ते न्युक्लीअर डील असो, डिफेन्स कॉलॅबरेशन असो वा फुड सिक्युरिटी. देशाचे पंतप्रधान {काम सुरु केल्यापासुन} झाल्या पासुन मी १५ मिनीटांचा सुद्धा वेकेशन घेतला नाही हे मोदींचे सांगणे अनेक तरुणांना भावले. :) मोदींकडुन देशातील आणि परदेशातील लोकांच्या किती अपेक्षा आहेत हे मोदींना ठावुक आहे आणि त्यांच्यावर त्या पूर्ण करण्याची जवाबदारी सुद्धा आहे.भुतानपासुन अमेरिके पर्यंत प्रवास करुन सातत्याने गुंतवणुकीचा ओघ आपल्या देशाकडे ओढुन आणण्यात ते नक्कीच यशस्वी झाले आहेत. गुंतवणुकीचे करार /मदत इं झाले असले तरी लगेच कोणी चेक फाडुन पैसे वाटणार नाही, तर त्या मदती बद्धल / गुंतवणुकी बद्धल फायदा देखील मिळेल हे अर्थातच पाहिले जाइल, पण या घटनांनमुळे आधीच्या गुंतवणुकींना आणि होणार्‍या गुंतवणुकांना चालना मात्र मिळेल येव्हढे मात्र निश्चित सांगता येइल. आपले प्रंतप्रधान सातत्याने सकारात्मक बोलत आहेत,आणि त्यांची आता पर्यंतची कार्यशैली सकारात्मकच दिसुन येते. हे आपल्या देशासाठी आणि नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचे आहे,कारण महागाई / भ्रष्टाचार आणि आर्थिक अस्थिरते मधे अडकलेल्या आपल्या देशाला आणि देशातल्या नागरिकांना नकारात्मक मानसिकेतुन आणि विचारातुन बाहेर पडण्यास नक्कीच प्रेरणा मिळेल. हिंदुस्थानी मिडीयाने या घटनेचे जे काही कव्हरेज केले आहे त्यासाठी त्यांचे कौतुकच करायला पाहिजे,आजच्या डिजिटल टेक्नॉलॉजीच्या युगात आपल्या देशाची बाजु आणि आपल्या पंतप्रधांची योग्य प्रतिमा उंचावण्याचे महत्वाचे काम त्यांनी केले आहे. टाईम्स नाउ च्या अर्णब गोस्वामीचे विशेष कव्हरेज मनाला भावणारे आणि या घटनेचा अनेक दॄष्टीकोनातुन विचार करण्यास उद्युक्त करणारे ठरले. आता वेगवेगळ्या गुंतवणुकीच्या बातम्या आणि प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी कशी केली जाते ते पाहणे आणि अनुभवणे रोचक ठरणार आहे, त्याची सुरुवात झाली आहे. Microsoft to set up 3 data centres in India by 2015 जाता जाता :- मोदींच्या भाषेतच सांगायच झालं तर... कोई चले या ना चले लैकिन देश चल पडा है ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Mary Kom gives India first boxing gold at Asian Games
लेखनविषय:
Modi in America सा रम्या नगरी महान्सनृपतिः सामन्तचक्रं च तत् । पार्श्वे तस्य च सा विदग्धपरिषत्ताश्चन्द्रबिम्बाननाः ॥ उद्वृत्तः स च राजपुत्रनिवहस्ते बन्दिनस्ताः कथाः ....

अस्तित्व नसलेला माणूस (दिर्घकथा) भाग - २

दशानन ·

In reply to by दशानन

उगा काहितरीच Mon, 09/29/2014 - 21:38
स्टाईल बोलतोय हो. कुठली एखादी कथा नाही . मस्त. (संपादक मंडळाला विनंती : एका पेक्षा जास्त वेळेस प्रकाशीत झालेले प्रतिसाद अप्रकाशीत करावेत. ) जाता जाता मी पयला.

शिद Mon, 09/29/2014 - 21:32
मस्त झालाय हा भाग...एकदम सस्पेंस. पण, लिंक लागली असतानाच लेख आटोपला. कृपया पुढचा भाग थोडा मोठा टाका ही आग्रहाची विनंती.

In reply to by पैसा

दशानन Wed, 10/01/2014 - 21:36
पैसा ताई, "अस्तित्व नसलेला माणूस (दिर्घकथा)" चे भाग वाचून मला एकाने विचारले "तुम्ही खरच खून केले आहेत का हो?" असे मला फेबुवर विचारले =))

In reply to by दशानन

पैसा Wed, 10/01/2014 - 22:02
दशानन आयडी आहे म्हणून उद्या कोणी सीतेला पळवलस का असं विचारायचा! =)) मस्तच लिहिलंस पण! या लॉजिकने बाबूराव अर्नाळकर वगैरे मंडळी किती मोठे गुन्हेगार असतील नै! =))

In reply to by दशानन

उगा काहितरीच Mon, 09/29/2014 - 21:38
स्टाईल बोलतोय हो. कुठली एखादी कथा नाही . मस्त. (संपादक मंडळाला विनंती : एका पेक्षा जास्त वेळेस प्रकाशीत झालेले प्रतिसाद अप्रकाशीत करावेत. ) जाता जाता मी पयला.

शिद Mon, 09/29/2014 - 21:32
मस्त झालाय हा भाग...एकदम सस्पेंस. पण, लिंक लागली असतानाच लेख आटोपला. कृपया पुढचा भाग थोडा मोठा टाका ही आग्रहाची विनंती.

In reply to by पैसा

दशानन Wed, 10/01/2014 - 21:36
पैसा ताई, "अस्तित्व नसलेला माणूस (दिर्घकथा)" चे भाग वाचून मला एकाने विचारले "तुम्ही खरच खून केले आहेत का हो?" असे मला फेबुवर विचारले =))

In reply to by दशानन

पैसा Wed, 10/01/2014 - 22:02
दशानन आयडी आहे म्हणून उद्या कोणी सीतेला पळवलस का असं विचारायचा! =)) मस्तच लिहिलंस पण! या लॉजिकने बाबूराव अर्नाळकर वगैरे मंडळी किती मोठे गुन्हेगार असतील नै! =))
लेखनविषय:
लेखनप्रकार
“ह्म्म्म, सूर्यवंशीसाहेब, त्याचा कबुलीजबाब तुम्ही जो नोंदवून घेत होता. तो आहे की मागवावा लागेल तुमच्या ऑफिसमधून? “ असे म्हणत डॉ. प्रमोद यांनी पुन्हा ती फाईल हातात घेतली. डॉ. अनंत यांनी आपला टेबलाच्या डाव्या खणातून अजून एक फाईल काढली व त्यातील ४-५ पेपर काढत ते डॉ. प्रमोद यांच्या हातात देत म्हणाले “हा त्याचा कबुलीजबाब! म्हणजे त्यांने स्वत: सांगितलेला... कच्चा मसुदा” डॉ. प्रमोद यांनी तो कबुलीजबाब वाचायला सुरवात केली...

AN ODE TO मिसळपाव ! प्रथम पुष्प

मारवा ·

एस Mon, 09/29/2014 - 17:16
मारवांनो आणि भैरवांनो राहिलं का? मी पयल्यांनो अन् मी दुसर्‍यांनो... पुढच्या भागात घ्या.

सुहास.. Mon, 09/29/2014 - 17:20
लयच ! विकीपिडीत प्रतिसादकांनो राहिलयं रे मारवा

मारवा Mon, 09/29/2014 - 17:20
नक्कीच वापर करतो पुढील भागात खर म्हणजे अजुन बरच इनसर्ट करायच होत पण विचार करत बसलो असतो तर उत्स्फुर्तता गेली असती. म्हणुन शिल्लक साठी पुढील भागाची पाचर मारुन ठेवली.

नाखु Mon, 09/29/2014 - 17:42
मारलेले* (अचूक) ट्टे** (किमान शब्दात कमाल आशय) वाचतोय का(कोणी) या जंत्रावळीमधून

इनिगोय Mon, 09/29/2014 - 18:16
जब-याच! आवडलं.. पुढच्या भागासाठी कच्चा माल.>> धन्स, बाडिस, रच्याकने अशा शब्द जन्माला घालणा-यांनो!

माझी थोडी भर : आयडीपरत्वे प्रतिसाद कुंथणार्यांनो...नवीन सभासदत्व मिळवलेल्या इनोसंटांनो... येता जाता दुसर्यांना इनो पाजणार्यांनो...रोज संगतीत राहून वाण नाही पण गुण लागलेल्या ढवळ्यापवळ्यांनो..अर्ध्या हळकुंडाने रंगलेल्या पिवळ्यांनो...पाकृ टाकणार्या पाप्यांनो... ती पाहून तोंडाला पाणी सोडणार्या पाणक्यांनो... रोज रतीब घालणार्यांनो...उत्साहाने विरजण लावणार्यानो...सर्वात शेवटी ......मिपाच्या क्षितिजावर नित्यनेमाने आपले सप्तरंग उधळणार्या कलंदरांनो... !!

In reply to by माम्लेदारचा पन्खा

नाखु Tue, 09/30/2014 - 11:36
कुंपणावर बसणर्यानो...कुंपणा अलिकडच्यांनो..कुंपणा पलिकडच्यांनो..जिकडं गुळ-खोबर तिकड धावण्यार्यांनो..गुळ-खोबरं उधळायच्या आधिच खिशात घालाणार्यांनो..जी भाऊच्या कथा पंख्यानो..संख्यानो..अस्वादकांनो..चिरफाड्करांनो..डोक्याची मंडई करणार्यांनो..मंडईतच डोके ठेवणार्यांनो..सतत कावीळ ग्रस्तांनो ...(कधी मोदी-कावीळ कधी धर्माची)समस्त रतीब्करांनो..!!

मारवा Mon, 09/29/2014 - 23:30
पुढील पुष्प आपण गुंफावे अशी विनंती कारण माझा स्टॉक संपलाय व जो राह्यलाय त्यात दम वाटत नाही. सो सर तुम्ही सर्व मिळुन दुसरे पुष्प गुंफावे ही विनंती !

एस Mon, 09/29/2014 - 17:16
मारवांनो आणि भैरवांनो राहिलं का? मी पयल्यांनो अन् मी दुसर्‍यांनो... पुढच्या भागात घ्या.

सुहास.. Mon, 09/29/2014 - 17:20
लयच ! विकीपिडीत प्रतिसादकांनो राहिलयं रे मारवा

मारवा Mon, 09/29/2014 - 17:20
नक्कीच वापर करतो पुढील भागात खर म्हणजे अजुन बरच इनसर्ट करायच होत पण विचार करत बसलो असतो तर उत्स्फुर्तता गेली असती. म्हणुन शिल्लक साठी पुढील भागाची पाचर मारुन ठेवली.

नाखु Mon, 09/29/2014 - 17:42
मारलेले* (अचूक) ट्टे** (किमान शब्दात कमाल आशय) वाचतोय का(कोणी) या जंत्रावळीमधून

इनिगोय Mon, 09/29/2014 - 18:16
जब-याच! आवडलं.. पुढच्या भागासाठी कच्चा माल.>> धन्स, बाडिस, रच्याकने अशा शब्द जन्माला घालणा-यांनो!

माझी थोडी भर : आयडीपरत्वे प्रतिसाद कुंथणार्यांनो...नवीन सभासदत्व मिळवलेल्या इनोसंटांनो... येता जाता दुसर्यांना इनो पाजणार्यांनो...रोज संगतीत राहून वाण नाही पण गुण लागलेल्या ढवळ्यापवळ्यांनो..अर्ध्या हळकुंडाने रंगलेल्या पिवळ्यांनो...पाकृ टाकणार्या पाप्यांनो... ती पाहून तोंडाला पाणी सोडणार्या पाणक्यांनो... रोज रतीब घालणार्यांनो...उत्साहाने विरजण लावणार्यानो...सर्वात शेवटी ......मिपाच्या क्षितिजावर नित्यनेमाने आपले सप्तरंग उधळणार्या कलंदरांनो... !!

In reply to by माम्लेदारचा पन्खा

नाखु Tue, 09/30/2014 - 11:36
कुंपणावर बसणर्यानो...कुंपणा अलिकडच्यांनो..कुंपणा पलिकडच्यांनो..जिकडं गुळ-खोबर तिकड धावण्यार्यांनो..गुळ-खोबरं उधळायच्या आधिच खिशात घालाणार्यांनो..जी भाऊच्या कथा पंख्यानो..संख्यानो..अस्वादकांनो..चिरफाड्करांनो..डोक्याची मंडई करणार्यांनो..मंडईतच डोके ठेवणार्यांनो..सतत कावीळ ग्रस्तांनो ...(कधी मोदी-कावीळ कधी धर्माची)समस्त रतीब्करांनो..!!

मारवा Mon, 09/29/2014 - 23:30
पुढील पुष्प आपण गुंफावे अशी विनंती कारण माझा स्टॉक संपलाय व जो राह्यलाय त्यात दम वाटत नाही. सो सर तुम्ही सर्व मिळुन दुसरे पुष्प गुंफावे ही विनंती !
लेखनविषय:
काव्यरस
मिसळप्रेमींनो !मनोगतींनो ! उपक्रमींनो ! वातानुकुलीत अक्षरींनो ! सर्वसंस्थळसंचारी आंतरजालीय फ़ुलपाखरांनो ! साक्षेपी सात्विक सेन्सॉरी कर्तरीकर्म कुशल संपादकांनो ! किंचीत पक्षपाती आयडीवलयांकीत-स्तिमीत संपादकांनो ! खरया खुरया खोट्या नाट्या भल्या बुरया आयडींनो त्यांच्या डुआयडींनो ! त्यामागील दुर्देवी देवराई निवासींनो ! माहीती जमवुन जमवुन घोळुन रंगवुन माहीतीच्या महामार्गावर माहीतीचा उच्छाद मांडणारया माहीतगारांनो ! स्व-रचित ललित मुग्ध “पुल”कीत गोड गोड लयीत “ललित” लिहत लिहत लेखणी लाल करणारया ललित लेखकांनो!

वाहनविश्व : भाग १ प्रस्तावना

कॅप्टन जॅक स्पॅरो ·
आजच्या धावपळीच्या युगामधे वेळेत अपेक्षित ठिकाणी पोचण्यासाठी आपण वाहनाच्या कुठल्याना कुठल्या प्रकारावर सतत अवलंबुन असतो. नोकरीला ३०-४० कि.मी. जायचं असु दे किंवा शेजारच्या चौकातुन कोंथिंबिरीची गड्डी आणायची असु दे. ऐन पावसाळ्यात महत्त्वाच्या पिलिअन रायडर (मि.पा. वरच्या नाही) बरोबरची सहल असु देत. गाडीवर (मोदकरावांसारखे उत्साही लोकं आजही सायकलवर :) ) टांग टाकली की निघालं असा प्रकार असतो. आपल्या पे.रु.चा.पा.पा. एवढ्याच महत्त्वाच्या असणार्‍या गाडीच्या काम करायच्या पद्धतीविषयी मात्र बहुतांश लोकं उदासिन असतात.

शिद Mon, 09/29/2014 - 15:53
चांगला उपक्रम. बरीच नवीन माहीती मिळेल असं वाटतंय त्यामूळे पुढील लेखांची वाट पाहत आहे.

आदूबाळ Mon, 09/29/2014 - 15:54
वाट पहातो आहे. खेडूत हेही या क्षेत्रातले जाणकार आहेत. त्यांच्या प्रतिसादांची प्रतीक्षा असेल.

रोचक विषय आणि सुंदर सुरुवात ! फोटोवरून चारचाकीने सुरुवात होईल असे वाटते. सर्वच वाहनांबद्दल लिहिल्यास वर अनेकजणांनी म्हटल्याप्रमाणे चारचाकी आणि दोनचाकी वेगळ्या विभागांत ठेवल्यास बरे... अर्थात हा विचार तुम्ही केला असणारच म्हणा.

खेडूत Mon, 09/29/2014 - 18:23
चांगला उपक्रम. पु भा प्र. वाहन विषयक कितीही माहिती मिळवली तरी कमीच! तुमचा टंकनोत्साह पहाता रोचक मालिका वाचायला मिळेल याची खात्री आहे.

शिद Mon, 09/29/2014 - 15:53
चांगला उपक्रम. बरीच नवीन माहीती मिळेल असं वाटतंय त्यामूळे पुढील लेखांची वाट पाहत आहे.

आदूबाळ Mon, 09/29/2014 - 15:54
वाट पहातो आहे. खेडूत हेही या क्षेत्रातले जाणकार आहेत. त्यांच्या प्रतिसादांची प्रतीक्षा असेल.

रोचक विषय आणि सुंदर सुरुवात ! फोटोवरून चारचाकीने सुरुवात होईल असे वाटते. सर्वच वाहनांबद्दल लिहिल्यास वर अनेकजणांनी म्हटल्याप्रमाणे चारचाकी आणि दोनचाकी वेगळ्या विभागांत ठेवल्यास बरे... अर्थात हा विचार तुम्ही केला असणारच म्हणा.

खेडूत Mon, 09/29/2014 - 18:23
चांगला उपक्रम. पु भा प्र. वाहन विषयक कितीही माहिती मिळवली तरी कमीच! तुमचा टंकनोत्साह पहाता रोचक मालिका वाचायला मिळेल याची खात्री आहे.

नवीन संपादक

नीलकांत ·

कपिलमुनी Mon, 09/29/2014 - 14:25
नवसंपादकांचे अभिनंदन ! कात्रीपूर्वक शुभेच्छा ! बादवे मिपावर संपादकीय निवडणुका ठेवाव्यात काय ? ;)

In reply to by कपिलमुनी

काउबॉय Mon, 09/29/2014 - 23:11
प्रत्येकाने blue print जाहिर करावी त्यानुशंगाने निवड व्हावी :) म्हणजे संपादकीय निर्णयाची कार्यपध्दति व पारदर्शकता अबाधित राहील.

स्पा Mon, 09/29/2014 - 14:29
वा सर्व नवीन संपादकांचे कचकून अभिनंदन :)

सौंदाळा Mon, 09/29/2014 - 14:37
सर्व संपादकांचे अभिनंदन आणि संपादकांना लिहीते राहण्याची विनंती. संपादक झाल्यावर बरेचजण लिहायचे बंद / खुपच कमी झाले असे निरिक्षण आहे.

आदूबाळ Mon, 09/29/2014 - 14:39
हे य्य बात! संपादकीय ड्युट्यांमुळे लेखनातले सातत्य सोडू नये अशी विनंती.

सवंगडी Mon, 09/29/2014 - 14:49
अभिनंदन ! आणि संपादक कोण आहेत सांगितल्याबद्दल धन्यवाद ! आता संपादक मंडळाच्या कॉमेंट वर सावध प्रतिक्रिया द्यायला हे बरे !

भाते Mon, 09/29/2014 - 15:12
अरे वा! मध्यवर्ती डोंबिवलीकर संमंमध्ये! :) चला! डोंबिवलीत आणखी एक कट्टा करायला नविन कारण मिळाले. एक्का काका, आता तुम्ही संपादकीय कामकाजाबरोबर तुमचे लिखाणसुध्दा पहिल्यासारखे चालू ठेवा हि नम्र विनंती.

In reply to by भाते

सूड Mon, 09/29/2014 - 18:13
>>अरे वा! मध्यवर्ती डोंबिवलीकर संमंमध्ये! हायला म्हणजे काही दिवसांपूर्वी एका संपादकाशी पंगा घेतला तर!! प्रतिसादांना पंख लावून घेण्यास तयार राहावे आता. ;)

http://www.sherv.net/cm/emoticons/yes/yellow-okay-hand-smiley-emoticon.gif http://www.sherv.net/cm/emoticons/yes/yellow-okay-hand-smiley-emoticon.gif http://www.sherv.net/cm/emoticons/yes/yellow-okay-hand-smiley-emoticon.gif ================ १) इस्पीकचा एक्का २) स्नेहांकिता ३) अजया अनाहिता संपादक १) मितान ============= http://www.sherv.net/cm/emoticons/hand-gestures/hand-clapping-smiley-emoticon.gif सर्व नवीन संपादकांचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभकामना.

सर्वांचे मनापासून आभार !!! तुमच्या सर्वांच्या अपेक्षांना उतरण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल... ( अरे, कुठे गेली ती कात्री ?! :) ;) )

श्रीरंग_जोशी Mon, 09/29/2014 - 17:44
इस्पिकचा एक्का, स्नेहांकिता, अजया व मितान यांचे हार्दिक अभिनंदन व मनःपूर्वक शुभेच्छा!! या निमित्ताने अनेक वर्षांपासून अविरत सेवा देणार्‍या विद्यमान संपादकांचे अभार मानतो. नव्या सवंगड्यांमुळे त्यांच्यावरील कामाचा व जबाबदारीचा भार कमी होईल असा विश्वास आहे.

प्रभाकर पेठकर Mon, 09/29/2014 - 19:57
हॉट सीटवर बसल्याबसल्या हार्दिक अभिनंदनाचा वर्षाव स्विकार व्हावा. सर्व नवसंपादकांचे अभिनंदन आणि संपादकिय वाटचालीसाठी शुभेच्छा.

सस्नेह Mon, 09/29/2014 - 21:28
आणि संपादन करण्यालायक काही लिहू नये ही विनंती. लेखन जे मिपाची शान वाढवेल आणि मान उन्चावेल असे आमच्या कारकिर्दीत बहरावे.

कपिलमुनी Mon, 09/29/2014 - 14:25
नवसंपादकांचे अभिनंदन ! कात्रीपूर्वक शुभेच्छा ! बादवे मिपावर संपादकीय निवडणुका ठेवाव्यात काय ? ;)

In reply to by कपिलमुनी

काउबॉय Mon, 09/29/2014 - 23:11
प्रत्येकाने blue print जाहिर करावी त्यानुशंगाने निवड व्हावी :) म्हणजे संपादकीय निर्णयाची कार्यपध्दति व पारदर्शकता अबाधित राहील.

स्पा Mon, 09/29/2014 - 14:29
वा सर्व नवीन संपादकांचे कचकून अभिनंदन :)

सौंदाळा Mon, 09/29/2014 - 14:37
सर्व संपादकांचे अभिनंदन आणि संपादकांना लिहीते राहण्याची विनंती. संपादक झाल्यावर बरेचजण लिहायचे बंद / खुपच कमी झाले असे निरिक्षण आहे.

आदूबाळ Mon, 09/29/2014 - 14:39
हे य्य बात! संपादकीय ड्युट्यांमुळे लेखनातले सातत्य सोडू नये अशी विनंती.

सवंगडी Mon, 09/29/2014 - 14:49
अभिनंदन ! आणि संपादक कोण आहेत सांगितल्याबद्दल धन्यवाद ! आता संपादक मंडळाच्या कॉमेंट वर सावध प्रतिक्रिया द्यायला हे बरे !

भाते Mon, 09/29/2014 - 15:12
अरे वा! मध्यवर्ती डोंबिवलीकर संमंमध्ये! :) चला! डोंबिवलीत आणखी एक कट्टा करायला नविन कारण मिळाले. एक्का काका, आता तुम्ही संपादकीय कामकाजाबरोबर तुमचे लिखाणसुध्दा पहिल्यासारखे चालू ठेवा हि नम्र विनंती.

In reply to by भाते

सूड Mon, 09/29/2014 - 18:13
>>अरे वा! मध्यवर्ती डोंबिवलीकर संमंमध्ये! हायला म्हणजे काही दिवसांपूर्वी एका संपादकाशी पंगा घेतला तर!! प्रतिसादांना पंख लावून घेण्यास तयार राहावे आता. ;)

http://www.sherv.net/cm/emoticons/yes/yellow-okay-hand-smiley-emoticon.gif http://www.sherv.net/cm/emoticons/yes/yellow-okay-hand-smiley-emoticon.gif http://www.sherv.net/cm/emoticons/yes/yellow-okay-hand-smiley-emoticon.gif ================ १) इस्पीकचा एक्का २) स्नेहांकिता ३) अजया अनाहिता संपादक १) मितान ============= http://www.sherv.net/cm/emoticons/hand-gestures/hand-clapping-smiley-emoticon.gif सर्व नवीन संपादकांचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभकामना.

सर्वांचे मनापासून आभार !!! तुमच्या सर्वांच्या अपेक्षांना उतरण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल... ( अरे, कुठे गेली ती कात्री ?! :) ;) )

श्रीरंग_जोशी Mon, 09/29/2014 - 17:44
इस्पिकचा एक्का, स्नेहांकिता, अजया व मितान यांचे हार्दिक अभिनंदन व मनःपूर्वक शुभेच्छा!! या निमित्ताने अनेक वर्षांपासून अविरत सेवा देणार्‍या विद्यमान संपादकांचे अभार मानतो. नव्या सवंगड्यांमुळे त्यांच्यावरील कामाचा व जबाबदारीचा भार कमी होईल असा विश्वास आहे.

प्रभाकर पेठकर Mon, 09/29/2014 - 19:57
हॉट सीटवर बसल्याबसल्या हार्दिक अभिनंदनाचा वर्षाव स्विकार व्हावा. सर्व नवसंपादकांचे अभिनंदन आणि संपादकिय वाटचालीसाठी शुभेच्छा.

सस्नेह Mon, 09/29/2014 - 21:28
आणि संपादन करण्यालायक काही लिहू नये ही विनंती. लेखन जे मिपाची शान वाढवेल आणि मान उन्चावेल असे आमच्या कारकिर्दीत बहरावे.
नमस्कार, आज पासून मिसळपाव.कॉम च्या संपादक मंडळात तीन नवीन संपादक सहभागी झाले आहेत. तसेच मिसळपावच्या महिला दालनात एक नवीन संपादक सहभागी होत आहे. येत्या सहा महिण्यांसाठी ह्या नेमणुका असतील. त्यापुढे आवश्यकता भासल्यास नवीन घोषणा करता येईल. नवीन संपादकांची नावे १) इस्पीकचा एक्का २) स्नेहांकिता ३) अजया अनाहिता संपादक १) मितान सर्व नवीन संपादकांचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभकामना.

दसरा

लाडू ·
काव्यरस
काल राती आकाशात, चांद दिसला हासरा कानी सांगून तो गेला,आला दसरा दसरा घरोघरी लाडू शिरा, गोडाधोडाचा पसारा परि तोंडहि आवरा, ठेवा नियम आहारा, आला दसरा दसरा परिक्षा आली तोंडावर, करा अभ्यासाचा जोर त्यात मास ऑक्टोबर, दगा देईल सत्वर पण अभ्यास विसरा, एक दिनच विसरा, आला दसरा दसरा गोष्ट आहे पुरातन, मोठा दसर्‍याचा मान, देती सोन्याचेहि पान! नाहि राहिलि ती शान, वर किंमत महान, देती आपट्याचे पान, देती फुकाचाच मान! येई दसरा दसरा, जाई दसरा दसरा, सर्वां करुनि हासरा, सणांच्याही या सणाला, करु मानाचा मुजरा! आला दसरा दसरा

अंधारक्षण - प्रास्ताविक

बोका-ए-आझम ·

ती युद्धाला जवाबदार नसणार्‍यांची कहाणी आहे. ज्यांच्या लेखी जेते `प्रामाणिक' आहेत त्यांना हे सांगा :
इतिहास म्हणला की इतिहासकार निर्णय घेणा-यांना जास्त महत्त्व देतात. सामान्य माणूस - ज्याच्यावर या निर्णयांचा परिणाम होतो - त्याचा विचार क्वचितच केला जातो. रीजच्या कामाचं हेच तर वैशिष्ट्य आहे. त्याने मुलाखत घेतलेले हे लोक राज्यकर्ते नाहीत, अधिकारी नाहीत किंवा सेनानीही नाहीत. युद्ध सुरु करण्यात त्यांचा काहीही हात नाही. काही जण तर केवळ चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी होते, काही जणांना तर केवळ एखाद्या देशात किंवा वंशात जन्माला आल्यामुळे अनेक अत्याचार सहन करावे लागले.

एस Mon, 09/29/2014 - 13:09
तुम्ही पुस्तकाचे नाव सांगू शकाल का? मिळाल्यास अवश्य वाचलं जाईल.

In reply to by आदूबाळ

एस Mon, 09/29/2014 - 15:04
Laurence Rees असे लेखकाचे नाव आहे. त्याचा उच्चार रीज असा केल्यामुळे गोंधळ झाला. बाकी पुस्तक जरा महागच वाटल्यामुळे वाचण्याचा बेत जरा पुढे ढकलावा लागतोय! तोपर्यंत लेखमालिका वाचत राहू. ;-)

प्रसाद१९७१ Mon, 09/29/2014 - 18:30
मला पण अंध्-आरक्षण वाटले होते, म्हणले नेहमीचे यशस्वी विषय आहेत, आपण दूर च राहू. पण नशिबाने काहीतरी नविन आहे. येउन देत पुढचे भाग लवकर. संपादक ( मल्लीका-ए-मांजर ) असा अनुवाद करायची परवानगी लागत नाही का?

In reply to by ऋषिकेश

एस Tue, 09/30/2014 - 18:09
२००८ साली प्रकाशित झालंय आणि लेखकही प्रख्यात व हयात आहेत. बहुतेक स्वामित्वाधिकाराचा मुद्दा उपस्थित होईलच. तस्मात् मूळ लेखकाची परवानगी घेतलीत तर बरं होईल असे सुचवतो.

ती युद्धाला जवाबदार नसणार्‍यांची कहाणी आहे. ज्यांच्या लेखी जेते `प्रामाणिक' आहेत त्यांना हे सांगा :
इतिहास म्हणला की इतिहासकार निर्णय घेणा-यांना जास्त महत्त्व देतात. सामान्य माणूस - ज्याच्यावर या निर्णयांचा परिणाम होतो - त्याचा विचार क्वचितच केला जातो. रीजच्या कामाचं हेच तर वैशिष्ट्य आहे. त्याने मुलाखत घेतलेले हे लोक राज्यकर्ते नाहीत, अधिकारी नाहीत किंवा सेनानीही नाहीत. युद्ध सुरु करण्यात त्यांचा काहीही हात नाही. काही जण तर केवळ चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी होते, काही जणांना तर केवळ एखाद्या देशात किंवा वंशात जन्माला आल्यामुळे अनेक अत्याचार सहन करावे लागले.

एस Mon, 09/29/2014 - 13:09
तुम्ही पुस्तकाचे नाव सांगू शकाल का? मिळाल्यास अवश्य वाचलं जाईल.

In reply to by आदूबाळ

एस Mon, 09/29/2014 - 15:04
Laurence Rees असे लेखकाचे नाव आहे. त्याचा उच्चार रीज असा केल्यामुळे गोंधळ झाला. बाकी पुस्तक जरा महागच वाटल्यामुळे वाचण्याचा बेत जरा पुढे ढकलावा लागतोय! तोपर्यंत लेखमालिका वाचत राहू. ;-)

प्रसाद१९७१ Mon, 09/29/2014 - 18:30
मला पण अंध्-आरक्षण वाटले होते, म्हणले नेहमीचे यशस्वी विषय आहेत, आपण दूर च राहू. पण नशिबाने काहीतरी नविन आहे. येउन देत पुढचे भाग लवकर. संपादक ( मल्लीका-ए-मांजर ) असा अनुवाद करायची परवानगी लागत नाही का?

In reply to by ऋषिकेश

एस Tue, 09/30/2014 - 18:09
२००८ साली प्रकाशित झालंय आणि लेखकही प्रख्यात व हयात आहेत. बहुतेक स्वामित्वाधिकाराचा मुद्दा उपस्थित होईलच. तस्मात् मूळ लेखकाची परवानगी घेतलीत तर बरं होईल असे सुचवतो.
लेखनविषय:
लेखनप्रकार
अंधारक्षण - प्रास्ताविक देव आणि सैतान खरोखरच अस्तित्वात आहेत किंवा नाहीत यावर विचारवंतांनी हजारो वर्षे खर्च केली आहेत.  जवळपास प्रत्येक धर्मामध्ये या संकल्पना आहेत. आणि एका बाबतीत एकमतही आहे - प्रत्येक माणसामध्ये देवाचा आणि सैतानाचाही अंश असतो, जो त्याच्या कृतीमध्ये दिसतो - आणि जेव्हा एखाद्या माणसासमोर टोकाची, यापूर्वी कधीही न आलेली, संपूर्ण आयुष्य बदलवून टाकणारी परिस्थिती येते - तेव्हा तो काय करतो, त्यावरून त्याचं खरं रुप इतरांसमोर आणि कधी कधी खुद्द त्या  माणसासमोरही येतं. दुस-या महायुद्धाने अशीच वेळ आणि असे प्रसंग असंख्य लोकांवर आणले.

आगामी निवडणूकीत तुम्ही कोणाला मत देणार?

आनन्दा ·

In reply to by पिवळा डांबिस

जेनी... Mon, 09/29/2014 - 10:19
थेंक्स हं पिंडाकाका ... आता सासुबै जिक्नार ... लै मज्जा येणार :D पण जिक्ल्यावर आपल्या मिपाला विस्रायचं नै हं सासुबै :-/

In reply to by पिवळा डांबिस

जेनी... Mon, 09/29/2014 - 10:25
इश्श्यं ... पिंडा काका .. सासुबैन्ना सुभानल्ला म्हणताय ..??? मामंजींनी वाचलं तं चक्करच येवुन पडतिल ़कि ते :P :D

In reply to by प्रसाद१९७१

आनन्दा Mon, 09/29/2014 - 10:39
प्रसाद साहेब, यातील सारेच पर्याय कोणत्यातरी पक्षाची खूण आहेत. अर्थात आपल्यादृष्टीने नव्हे, तर त्यांच्या दृष्टीने. आणि आपल्यासमोर फारसे पर्याय आहेतच कुठे? आहेत त्यातलेच कोणतेतरी पर्याय प्रायॉरटाइझ करावे लागणार आहेत यावेळेस. कोणताच पक्ष यातले सारे देऊ शकणार नाहीये असे आता म्हाणावे लागणार आहे.

In reply to by आनन्दा

प्रसाद१९७१ Mon, 09/29/2014 - 10:45
कोणताच पक्ष यातले सारे देऊ शकणार नाहीये असे आता म्हाणावे लागणार आहे.
सार्‍याची अपेक्षाच नाही हो. एक सुद्धा देऊ शकणार नाहीत. आणि द्यायची इच्छा पण नाहीये. त्यापेक्षा अम्मा आणि करुणानिधी बरे आहेत. सत्तेवर आले की दुसर्‍याला चांगले छळतात. महाराष्ट्रात मात्र, सत्ताधीश बदलले तरी आधीच्या भ्रष्टाचार्‍यांना शिक्षा सोडा नुस्ती चौकशी पण होत नाही. "सारे मिळेनी खाऊ" हेच एक ब्रीदवाक्य.

जेपी Mon, 09/29/2014 - 10:52
यावेळेस आपला NOTA. लातुर मतदारसंघात देशमुख मुंडे मैत्री सर्वश्रुत होतीच. पुढील पिढीनेही तोच वारसा चालवायच ठरवल आहे.त्यामुळे लातुर शहर अमित देशमुखच येणार. NOTA वापरुन टाकतो . या निवडणुकीत रस नाही.

आमच्या नेहेमीच्या पक्षानी जर का भ्रष्टवादीमधुन आयात केलेल्या उमेदवाराला उमेदवारी दिली तर यंदा त्यांना बाण मारायला लागणार असं दिसतय. यंदा कुठला माणुस कुठे गेलाय त्याची टोटलचं लागत नाहीये, ते पक्षांतरबंदी कायद्याचं काय लफडं असतं कोणी सांगेल का?

In reply to by प्रसाद१९७१

काउबॉय Mon, 09/29/2014 - 12:16
आप कड़े निवडणुक लढवायला पैसा उरला आहे ? नक्कीच नाही. आणि जो राजकीय मुर्खपणा पक्ष म्हणून दाखवला आहे त्याला आता कोणी पैसा पुरवेल असेही वाटत नाही. अतिशय चांगली माणसे अक्षरश: कुजवली :(

मार्मिक गोडसे Mon, 09/29/2014 - 12:08
कृपाशंकरला ... आजुबाजुच्या दुसर्‍यांच्या जमिनी नावावर करुन घ्याव्या म्हनतो, वडिलोपार्जीत जमिन नावावर करायला फार त्रास होतोय.

शिवसेना व भाजपा ह्या दोन्ही पक्षांनी कमरेचे सोडून डोक्याला कसे गुंडाळायचे ते आपल्याला गेल्या आठवड्यात दाखवून दिले. मनसे व राज ठाकरे हे बंडलबाज वाटतात आम्हा दोघांनाही. सुसंस्कृत शिकलेले पृथ्वीराजच मुख्यमंत्री म्हणून योग्य वाटतात.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

प्यारे१ Mon, 09/29/2014 - 13:15
>>> सुसंस्कृत शिकलेले पृथ्वीराजच मुख्यमंत्री म्हणून योग्य वाटतात. बाबांना संस्कृत येतं? कमाल आहे! कधी दिसले नाहीत बोलताना. बाकी बाबांच्या सुसंस्कृतपणाबाबत उदयसिंहराजे उंडाळकर पाटलांना विचारलं का कधी?

In reply to by प्यारे१

बाबा रे प्यारे१, मला तुझ्या त्या उदय्सिंहाबद्दल माहित नाही.तूच सांग बरे इकडे.हुल्लडबाजीची परंपरा ज्यांना आहे असे (मन)सेना नेते खरोखरच चांगल्या प्रकारे राज्य संभाळू शक्तील का रे? ह्याचा अर्थ कॉन्ग्रेस पक्षात मोठे विद्वान आहेत असे नव्हे पण तो १९९५-९९ चा युतीवाल्यांचा काळ आठवलास तर कॉन्ग्रेसवाले म्हणजे दगडापेक्षा वीट मऊ म्हणता येईल.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

काळा पहाड Mon, 09/29/2014 - 22:43
तो १९९५-९९ चा युतीवाल्यांचा काळ आठवलास
हो ना.. फुकट खाणार्‍यांचे वांधेच झाले होते तेव्हा.. खरंय.

In reply to by काळा पहाड

ते खरे आहे.अनेक दिवस उपाशी राहिलेल्या माणसाला आमरस-पुरी,मसाले भात दिसल्यावर जे होईल तसे आपल्या सेना-भाजपा नेत्यांचे झाले होते.आता जर सत्ता मिळाली तर तसे होवू नये अशी अपेक्षा करते.

भाते Mon, 09/29/2014 - 12:52
NOTA आपल्या पक्षाचे तिकिट मिळाले नाही म्हणुन (केवळ पद टिकवण्यासाठी) आयत्या वेळी पक्ष बदलणारे उमेदवार पाहुन संताप येतो. सगळेचं xx एका माळेचे मणी आहेत.

In reply to by प्रभाकर पेठकर

काउबॉय Tue, 09/30/2014 - 00:39
हे पक्ष, उमेदवाराचे नाव घेऊन विचारणे अयोग्य आहे,
हे पहिल्या ओळीतच स्पष्ट केले आहे, लेख नवे सरकार कसे हवे या धाट्नीचा वाटतो.

चौकटराजा Tue, 09/30/2014 - 09:32
माझे मत या राजकारणाच्या उकीरड्याला कंटाळून त्यादिवशी मतदानाला मस्तपैकी दांडी मारून खडकवासला , लवासा, पानशेत झालंच तर सिंव्हगड ई ई पेट जागी जाउन " लावून" बसणार्‍याना ! आता मला त्यांच्या व्ह्यू पटायला लागला आहे !

In reply to by ऋषिकेश

पिलीयन रायडर Tue, 09/30/2014 - 10:05
एक प्रश्न.. NOTA ला मत दिलं तर, उरलेल्या मतांमध्ये ज्याला सर्वात जास्त मतं मिळाली आहेत तो निवडुन येतो ना? म्हणजे NOTA ला ४०%, आणि मग ३०%, २०% आणि १०% असे पहिले ३ उमेदवार असतील तर ३०% वाला निवडुन येतो ना? मग NOTA चा उपयोग काय?

In reply to by पिवळा डांबिस

जेनी... Mon, 09/29/2014 - 10:19
थेंक्स हं पिंडाकाका ... आता सासुबै जिक्नार ... लै मज्जा येणार :D पण जिक्ल्यावर आपल्या मिपाला विस्रायचं नै हं सासुबै :-/

In reply to by पिवळा डांबिस

जेनी... Mon, 09/29/2014 - 10:25
इश्श्यं ... पिंडा काका .. सासुबैन्ना सुभानल्ला म्हणताय ..??? मामंजींनी वाचलं तं चक्करच येवुन पडतिल ़कि ते :P :D

In reply to by प्रसाद१९७१

आनन्दा Mon, 09/29/2014 - 10:39
प्रसाद साहेब, यातील सारेच पर्याय कोणत्यातरी पक्षाची खूण आहेत. अर्थात आपल्यादृष्टीने नव्हे, तर त्यांच्या दृष्टीने. आणि आपल्यासमोर फारसे पर्याय आहेतच कुठे? आहेत त्यातलेच कोणतेतरी पर्याय प्रायॉरटाइझ करावे लागणार आहेत यावेळेस. कोणताच पक्ष यातले सारे देऊ शकणार नाहीये असे आता म्हाणावे लागणार आहे.

In reply to by आनन्दा

प्रसाद१९७१ Mon, 09/29/2014 - 10:45
कोणताच पक्ष यातले सारे देऊ शकणार नाहीये असे आता म्हाणावे लागणार आहे.
सार्‍याची अपेक्षाच नाही हो. एक सुद्धा देऊ शकणार नाहीत. आणि द्यायची इच्छा पण नाहीये. त्यापेक्षा अम्मा आणि करुणानिधी बरे आहेत. सत्तेवर आले की दुसर्‍याला चांगले छळतात. महाराष्ट्रात मात्र, सत्ताधीश बदलले तरी आधीच्या भ्रष्टाचार्‍यांना शिक्षा सोडा नुस्ती चौकशी पण होत नाही. "सारे मिळेनी खाऊ" हेच एक ब्रीदवाक्य.

जेपी Mon, 09/29/2014 - 10:52
यावेळेस आपला NOTA. लातुर मतदारसंघात देशमुख मुंडे मैत्री सर्वश्रुत होतीच. पुढील पिढीनेही तोच वारसा चालवायच ठरवल आहे.त्यामुळे लातुर शहर अमित देशमुखच येणार. NOTA वापरुन टाकतो . या निवडणुकीत रस नाही.

आमच्या नेहेमीच्या पक्षानी जर का भ्रष्टवादीमधुन आयात केलेल्या उमेदवाराला उमेदवारी दिली तर यंदा त्यांना बाण मारायला लागणार असं दिसतय. यंदा कुठला माणुस कुठे गेलाय त्याची टोटलचं लागत नाहीये, ते पक्षांतरबंदी कायद्याचं काय लफडं असतं कोणी सांगेल का?

In reply to by प्रसाद१९७१

काउबॉय Mon, 09/29/2014 - 12:16
आप कड़े निवडणुक लढवायला पैसा उरला आहे ? नक्कीच नाही. आणि जो राजकीय मुर्खपणा पक्ष म्हणून दाखवला आहे त्याला आता कोणी पैसा पुरवेल असेही वाटत नाही. अतिशय चांगली माणसे अक्षरश: कुजवली :(

मार्मिक गोडसे Mon, 09/29/2014 - 12:08
कृपाशंकरला ... आजुबाजुच्या दुसर्‍यांच्या जमिनी नावावर करुन घ्याव्या म्हनतो, वडिलोपार्जीत जमिन नावावर करायला फार त्रास होतोय.

शिवसेना व भाजपा ह्या दोन्ही पक्षांनी कमरेचे सोडून डोक्याला कसे गुंडाळायचे ते आपल्याला गेल्या आठवड्यात दाखवून दिले. मनसे व राज ठाकरे हे बंडलबाज वाटतात आम्हा दोघांनाही. सुसंस्कृत शिकलेले पृथ्वीराजच मुख्यमंत्री म्हणून योग्य वाटतात.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

प्यारे१ Mon, 09/29/2014 - 13:15
>>> सुसंस्कृत शिकलेले पृथ्वीराजच मुख्यमंत्री म्हणून योग्य वाटतात. बाबांना संस्कृत येतं? कमाल आहे! कधी दिसले नाहीत बोलताना. बाकी बाबांच्या सुसंस्कृतपणाबाबत उदयसिंहराजे उंडाळकर पाटलांना विचारलं का कधी?

In reply to by प्यारे१

बाबा रे प्यारे१, मला तुझ्या त्या उदय्सिंहाबद्दल माहित नाही.तूच सांग बरे इकडे.हुल्लडबाजीची परंपरा ज्यांना आहे असे (मन)सेना नेते खरोखरच चांगल्या प्रकारे राज्य संभाळू शक्तील का रे? ह्याचा अर्थ कॉन्ग्रेस पक्षात मोठे विद्वान आहेत असे नव्हे पण तो १९९५-९९ चा युतीवाल्यांचा काळ आठवलास तर कॉन्ग्रेसवाले म्हणजे दगडापेक्षा वीट मऊ म्हणता येईल.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

काळा पहाड Mon, 09/29/2014 - 22:43
तो १९९५-९९ चा युतीवाल्यांचा काळ आठवलास
हो ना.. फुकट खाणार्‍यांचे वांधेच झाले होते तेव्हा.. खरंय.

In reply to by काळा पहाड

ते खरे आहे.अनेक दिवस उपाशी राहिलेल्या माणसाला आमरस-पुरी,मसाले भात दिसल्यावर जे होईल तसे आपल्या सेना-भाजपा नेत्यांचे झाले होते.आता जर सत्ता मिळाली तर तसे होवू नये अशी अपेक्षा करते.

भाते Mon, 09/29/2014 - 12:52
NOTA आपल्या पक्षाचे तिकिट मिळाले नाही म्हणुन (केवळ पद टिकवण्यासाठी) आयत्या वेळी पक्ष बदलणारे उमेदवार पाहुन संताप येतो. सगळेचं xx एका माळेचे मणी आहेत.

In reply to by प्रभाकर पेठकर

काउबॉय Tue, 09/30/2014 - 00:39
हे पक्ष, उमेदवाराचे नाव घेऊन विचारणे अयोग्य आहे,
हे पहिल्या ओळीतच स्पष्ट केले आहे, लेख नवे सरकार कसे हवे या धाट्नीचा वाटतो.

चौकटराजा Tue, 09/30/2014 - 09:32
माझे मत या राजकारणाच्या उकीरड्याला कंटाळून त्यादिवशी मतदानाला मस्तपैकी दांडी मारून खडकवासला , लवासा, पानशेत झालंच तर सिंव्हगड ई ई पेट जागी जाउन " लावून" बसणार्‍याना ! आता मला त्यांच्या व्ह्यू पटायला लागला आहे !

In reply to by ऋषिकेश

पिलीयन रायडर Tue, 09/30/2014 - 10:05
एक प्रश्न.. NOTA ला मत दिलं तर, उरलेल्या मतांमध्ये ज्याला सर्वात जास्त मतं मिळाली आहेत तो निवडुन येतो ना? म्हणजे NOTA ला ४०%, आणि मग ३०%, २०% आणि १०% असे पहिले ३ उमेदवार असतील तर ३०% वाला निवडुन येतो ना? मग NOTA चा उपयोग काय?
तुम्ही कोणाला मत देणार हे पक्ष, उमेदवाराचे नाव घेऊन विचारणे अयोग्य आहे, म्हणून मी खालील पर्याय समोर र्ठेवत आहे. बाकी इतर पर्याय वाढवण्यासही माझी हरकत नाही, हे काही प्रातिधिनिक पर्याय आहेत. १. माझे मत विकासाला २. मझे मत स्थिर सरकारला ३. माझे मत निष्ठेला ४. माझे मत प्रामाणिकपणाला ५. माझे मत संरक्षणाला. ६. माझे मत संस्क्रुतीला ७. माझे मत पैशाला ८. माझे मत प्रशासनाला इत्यादी इत्यादी. तुम्ही यापैकी एकाहून अधिक पर्याय देखील निवडू शकता. पण त्यावेळेस तुम्हाला प्राधान्यक्रम द्यावा लागेल. बघूया तर.

उपवासाचा पौष्टिक चिवडा

मीराताई ·

मुक्त विहारि Mon, 09/29/2014 - 00:17
पौष्टिक पाकक्रुतीत अजून एका पदार्थाची भर पडली.. पण साबूदाणे न घालता, डिंकाचा वापर केला तर उत्तम...

स्मिता चौगुले Tue, 09/30/2014 - 12:22
लहानपणी आमच्या सोलापुरात हा चिवडा स्वीट मार्ट, किराणा दुकानात मिळायचा.(आताही मिळत असेल)प्रामुख्याने याची चव गोड होती आणि त्यात मिरचीचे तुकडे तळून टाकलेले असत.कित्येकदा हा चिवडा खाण्यासाठी उपवास केल्याचे आठ्वते. नंतर हा चिवडा घरी बनवण्याचे फ्याड निघाले आणि महिन्याच्या किराणा यादीत तो नायलॉन साबू दिसू लागला.

मदनबाण Fri, 10/03/2014 - 20:57
मस्त ! अवांतर :- च्यामारी... मी सांगतो तुम्हाला हल्ली काय काय वाचायला नाय मिळत ? हे साबुदाणा हा शाकाहारी पदार्थ नाही अशी वर्ता व्हॉट्सअ‍ॅप जगतात अधुन मधुन फिरत असते ! खरचं साबुदाणा बनवण्याची पद्धत इतकी घाणेरडी आहे ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Junction Lo... ;) Aagadu {Waiting for Original 1080P}

मुक्त विहारि Mon, 09/29/2014 - 00:17
पौष्टिक पाकक्रुतीत अजून एका पदार्थाची भर पडली.. पण साबूदाणे न घालता, डिंकाचा वापर केला तर उत्तम...

स्मिता चौगुले Tue, 09/30/2014 - 12:22
लहानपणी आमच्या सोलापुरात हा चिवडा स्वीट मार्ट, किराणा दुकानात मिळायचा.(आताही मिळत असेल)प्रामुख्याने याची चव गोड होती आणि त्यात मिरचीचे तुकडे तळून टाकलेले असत.कित्येकदा हा चिवडा खाण्यासाठी उपवास केल्याचे आठ्वते. नंतर हा चिवडा घरी बनवण्याचे फ्याड निघाले आणि महिन्याच्या किराणा यादीत तो नायलॉन साबू दिसू लागला.

मदनबाण Fri, 10/03/2014 - 20:57
मस्त ! अवांतर :- च्यामारी... मी सांगतो तुम्हाला हल्ली काय काय वाचायला नाय मिळत ? हे साबुदाणा हा शाकाहारी पदार्थ नाही अशी वर्ता व्हॉट्सअ‍ॅप जगतात अधुन मधुन फिरत असते ! खरचं साबुदाणा बनवण्याची पद्धत इतकी घाणेरडी आहे ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Junction Lo... ;) Aagadu {Waiting for Original 1080P}
उपवासाचा पौष्टिक चिवडा 1 साहित्यः नायलॉन साबूदाणा डिंक शेंगदाणे सुक्या खोबर्‍याचे काप काजू-बेदाणे बटाट्याचा खिस (वाळवलेला) (वरील सर्व एक-एक वाटी) तळण्यासाठी तूप किंवा रिफाईन्ड तेल जिरे, मीठ, साखर, तिखट (चवीप्रमाणे) 2 कृती: तेल/ तूप कढईत गरम करावे. आधी साबूदाणा तळून घ्यावा. पाठोपाठ एक एक करुन डिन्क, शेंगदाणे, खोबरे, बटाट्याचा खिस, काजू, बेदाणे, जिरे तळून घ्यावेत.