खूप दिवसांपासून तुला पत्र लिहायचं ठरवत होतो...
आधी विषय सुचत नव्हता
मग वेळ मिळत नव्हता
शिवाय 'न लिहिण्याची' झालेली सवय
आणि आळस-
अशा एक ना अनेक सबबी...
पूर्वी पत्रांना गंध असायचा
आणि अक्षरांत ओलावा
न लिहिलेला मजकूरही दिसायचा
लिहिणार्याचा चेहरा
आणि बोलण्याचा आवाज
वाचता-वाचता उमटायचा...
इतकंच कशाला;
ते आलेलं पाकीट उत्सुकतेने फोडायचं
वाचलेलं पत्र पुनः पाकिटात आणि पाकीट वही, पुस्तक किंवा डायरीत ठेवून
वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या मूडमधे वाचायचं
पत्रांची साठवण- एक खजिनाच असायचा...
खरं आहे; पत्र लिहिणं आता 'सोयिस्कर' नाही राहिलं
वेळ, कागद, पेन काढणं
स्वतःच्या अक्षराबद्दल चडफडणं
आणि खाडाखोड झाल्याव