मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अवजारांप्रति कृतज्ञता

जागु ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
खालील लेख दिनांक ३ ऑक्टोबर २०१४ रोजी लोकसत्ता-वास्तुरंग पुरवणी मध्ये प्रकाशीत झाला आहे. http://www.loksatta.com/vasturang-news/dasra-1008880/ --------------------------------------------------------------------------------- दसरा म्हणजे मांगल्याचा दिवस. ह्या दिवशी विशेषकरून यंत्रे हत्यारांची पूजा केली जाते. अशीच पूजा शेतकरी कुटुंबे आपल्या शेतीच्या अवजारांची करतात. वर्षभर शेती-मळ्यांसाठी राबणार्‍या अवजारांना दसर्‍याच्या दिवशी घासून पुसून स्वच्छ केले जाते. संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळी रांगोळी काढून पाटावर अवजारे ठेवली जातात.

शेख चिल्ली !

माहितगार ·
कुणीही अजाणता अथवा बावळटपणे स्वतःच्याच हिताच्या विरूद्ध वागत असेल तर सहसा ज्या चित्राची पटकन आठवण येते त्यातील एक म्हणजे शेख चिल्ली झाडाच्या फांदीवर उलटा बसून झाडाची फांदी कापतोय, झाडाची फांदी कापून झाली की तो आपोआप झाडावरून फांदी सहीत खाली पडणार हे सुज्ञांच्या लक्षात येतच. या शेख चिल्लीच्या इतर बर्‍याच कथा असल्या तरीही या धाग्याचा उद्देश अजाणता अथवा अज्ञानातून स्वतःच्याच हिताच्या विरूद्ध वागणे, बोलणे, तर्क मांडणे या संदर्भाने आहे. स्वतःच्याच हिताच्या विरूद्ध वागणे, बोलणे, (उणीवयूक्त) तर्क मांडणे/अनुसरणे, अशी उदाहरणे आपण बर्‍याचदा अनुभवत असतो अशा उदाहरणांची दखल घेणे हा धाग्याचा उद्देश आहे.

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - ११

स्पार्टाकस ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
केप कॉलबॉर्न इथे पोहोचल्यावर अ‍ॅमंडसेनने सुटकेचा नि:श्वास टाकला! तो म्हणतो, "इथून पुढे जाताना सतत पाण्याची खोली मोजण्याची आवश्यकता नव्हती! आमच्या जहाजापेक्षा कितीतरी मोठी जहाजं इथपर्यंत येऊन परत गेली होती! जॉन रे, कॉलीन्सन, मॅक्क्युलर आणि इतरांच्या मेहनतीतून तयार झालेले अनेक नकाशे आता आम्हाला उपलब्ध होते! अज्ञात सागरातून मार्ग काढण्याची यापुढे आवश्यकता नव्हती!" शिडाच्या उपकरणाची दुरुस्ती केल्यावर उरलेला दिवसभर त्यांनी तिथे आराम केला.

बोटावर न मोजता येतील इतके दिवस असतात ..!!

प्रकाश१११ ·
लेखनविषय:
बोटावर मोजतां येतील इतकेच दिवस उरलेले दहावे बोट करंगळी ती मोडली की त्या रात्री त्याची पोर जाणार असते तिची चालू असते लगबग आणि वेगाने सुरु होते आवराआवरी . सगळ्याच ब्यागा भरून ठेवते नि उरते शेवटची छोटी ब्याग मोजके सामान ध्यानाची माळ काही पुस्तके .. ती डॉलरचा हिशेब करीत असते रुपयात नि घेत रहाते महाग महाग वस्तू नको तितक्या उदा.

अश्वत्थामा

निलरंजन ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
अश्वत्थामा ... अंगिरा गोत्रात उत्पन्न भारद्वाज ॠषिंचे पौत्र अर्थात नातू व द्रोणाचार्य या दिव्य अयोनिज ऋषिंचा पुञ द्रोणाचार्यांनी वडिलांच्या आदेशानुसार धर्मपारायण, सुशील ,तपस्वी अश्या कृपी या कृपाचार्यांच्या बहिणीशी विवाह केला, या दिव्य दांपत्याला शंकराच्या घोर तपश्चर्येच्या नंतर दिव्य तेजस्वी असा अश्वत्थामा हा पुञ झाला जो जन्माला आल्या आल्या होते उच्चस्वारात घोड्या समान किंचाळला त्याचा स्वर दिशदिशांत घुमला और संपूर्ण नभोमंडल व्यापले तेव्हाच आकाशवाणी झाली कि हया बालकाचे नाव अश्वत्थामा होईल - पुत्र जन्मानंतर द्रोणाचार्य प्रसन्न झाले आणि ब्राह्मणांना सहस्त्र गायी व धनदान केले द्रोणाचार्यांकडे

डॉ. झाकिर नाईक - माझी प्रतिक्रिया

उगा काहितरीच ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
(सदरील मुळ लेख ईंग्रजीत असुन भाषांतराच्या चुका असु शकतात) काल मित्राने डॉ. झाकिर नाईक व श्री श्री रविशंकर यांच्यात झालेल्या चर्चेचा विडीओ दिला. सदर कार्यक्रम पाहिल्यवर माझ्या मनात उठलेले विचार... कार्यक्रमाचा विषय होता: “the conecpt of god in Hinduism and Islam in the light of the sacred scriptures.” पहिली गोष्ट जी माझ्या मनात आली ती कोणत्याही व्यक्तीच्या मनात येईल ती म्हणजे डॉ. झाकिर नाईक यांची स्मरणशक्ती. कमाल आहे राव ! त्या टोपीखाली एवढा डेटा साठवन्याची. हे व्हिडीओ पहान्याच्या अगोदरच मी ठरवलं होत कि - शक्य तितकं नि:पक्षपाती राहुन व्हिडीओ पहायचे.

मेक इन इंडिया...

बाबा पाटील ·
मा.पंतप्रधानांनी एक चांगली घोषणा केली आहे,मेक इन इंडिया,खर तर हे घडायलाच हव,किंवा आपण जर दैनंदिन वापराच्या गोष्टी घेतल्या तर त्यातल्या किती गोष्टी या भारतात बनलेल्या असतात्,किंवा परदेशातील उत्पादित आहेत. बर्‍याचदा हे कळतच नाही की आपण वापरत असलेली वस्तु देशांतर्गत उत्पादित आहे की परदेशात बनलेली आहे. जागतिक आणी देशस्थ अर्थकारणाचा विचार करता,मेक इन इंडिया वस्तु वापरण कधीच चांगलेच ठरेल,परंतु दर्जा राखलेल्या उत्तम अश्या वस्तु ज्या देशांतर्गत बाजारपेठेत उत्पादित केल्या आहेत्,त्या कुठल्या कुठल्या हे जाणकार सांगु शकतील का ?

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - १०

स्पार्टाकस ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सप्टेंबरच्या अखेरीस आणि ऑक्टोबरच्या पहिल्या दोन आठवड्यात अ‍ॅमंडसेन, रिझवेल्ट आणि हॅन्सन जोडगोळीने ग्जो हेवनच्या आसपास पंचवीस मैलांच्या परिसरात शिकारीसाठी तीन मोहीमा केल्या. या सर्व मोहीमांत अनेक रेनडीयर आणि क्वचित पक्षी त्यांच्या हाती लागले. मागे राहीलेले चार एस्कीमो या सर्व मोहीमांत त्यांच्याबरोबर गेलेले होते! ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात अ‍ॅमंडसेन आणि हेल्मर हॅन्सन यांनी एका मोठ्या एस्कीमो तळाला भेट दिली आणि त्यांच्याकडून माशांचा भरपूर मोठा साठा विकत घेतला! २० नोव्हेंबरच्या सकाळी अ‍ॅमंडसेन आणि त्याचे सहकारी ग्जो वर ब्रेकफास्टच्या तयारीत असतानाच एक एस्कीमो त्यांच्या भेटीला आला.

बँग बँग

श्रीरंग ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
हल्लीच्या काळात, हिंदी चित्रपट हे डोकं घरी ठेवून बघायला जाण्याची गोष्ट आहे, व तत्सम कावा, डोकं वापरून चित्रपट बनवण्याची स्वतःची कुवत नसलेल्या बर्याच चित्रपटकर्त्यांकडून उघडपणे केला जाऊ लागला आहे. त्यांनी हाताशी धरलेल्या समिक्षकांनीपण "करमणूकप्रधान मसालापट" वगैरे विशेषणं लावून या निर्बुध्दपटांना उचलून धरण्याची केविलवाणी कसरत सुरू केली आहे. आजच प्रदर्शित झालेला बँग बँग हा प्रचंड खर्च करून बनवलेला चित्रपट याच मालिकेतील एक. असो.. आधी चित्रपटातील काही चांगल्या गोष्टी : १. हा चित्रपट "किक" इतका वाईट नाही. बस्स. यापलिकडे चांगलं म्हणावसं असं यात खरच काहीच सापडत नाही.

महाराष्ट्र/हरयाना विधानसभा निवडणुक (२०१४)

श्रीगुरुजी ·
१५ ऑक्टोबर २०१४ या दिवशी महाराष्ट्र व हरयाना राज्यांच्या विधानसभेची निवडणुक आहे. निकाल १९ ऑक्टोबरला जाहीर होतील. हरयानात विधानसभेच्या एकूण ९० जागा आहेत. गेली १० वर्षे काँग्रेस सत्तेत असून भूपेंद्रसिंग हूडा सलग १० वर्षे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याविरूद्ध जोरदार अँटीइनक्युम्बंसीचे वातावरण आहे. गेली ३-४ दशके हरयानाचे राजकारण देवीलाल, भजनलाल व बन्सीलाल या ३ लालांभोवती केंद्रीत झाले आहे. भजनलाल व बन्सीलाल कधी काँग्रेसमध्ये असायचे तर कधी काँग्रेसबाहेर पडून स्वतंत्र पक्ष स्थापून काँग्रेसविरोधात लढायचे. देवीलाल कायमच काँग्रेसविरोधात असायचे. तिघेही अनेकवेळा मुख्यमंत्री झाले होते.