मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ग्राहक राजा

सुबोध खरे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
ग्राहक राजा हि आमच्या वडिलांनी ग्राहक न्यायालयात दिलेल्या लढ्याची छोटीशी कहाणी. आमच्या आईचा एक लाखाचा मेडिक्लेम १९९९ साली काढलेला होता. न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी कडे. २०१२ साली तिचे दोन्ही डोळ्यांच्या मोतीबिंदूची शस्त्रक्रिया ठाण्याच्या एका खाजगी रुग्णालयात झाली. ती पूर्ण बरी होउन घरी आली. आम्ही शस्त्रक्रियेच्या अगोदर विमा कंपनीला त्याबद्दल कळविले होते. जे जे सर्व कागदी सोपस्कार होते ते पूर्ण केलेले होते. शल्यक्रिया झाल्यावर त्याचे बिल रूपये ८८०००/- आम्ही कंपनीकडे पाठविले.

(डोसा इथला संपत नाही)

धन्या ·
लेखनविषय:
कविवर्य ग्रेस यांची क्षमा मागून... डोसा इथला संपत नाही, मज तुझी आठवण येते मी मानकरला जातो, तुझी गाडी पलीकडून जाते तो लोणी स्पंज डोसा, ती खोबर्‍याची हिरवी चटणी प्यायलो दुर्गाची कॉफी आपण, पचकन पाणी थुंकाया तो मिठा पान कलकत्त्याचा, तोंड रंगवूनी गेला मस्तानीच्या आरक्त गळ्याची, आठवण झाली मला पोथीत माणसे अवघी, सांगती कथा ती कुणाची हे संपता संपत नाही, गुर्‍हाळ त्या साधूवाण्याचे डोसा इथला संपत नाही, मज तुझी आठवण येते मी मानकरला जातो, तुझी गाडी पलीकडून जाते विशेष सुचना: शब्दबंबाळ लेख लिहून कवितेचे रसग्रहण करण्यास आमची हरकत नाही.

भारतीय संस्कृतीची नात्यांची विरोधाभासी शिकवण: टेबल सूत्र स्वरूपात!!

निमिष सोनार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
भारतीय संस्कृतीची नात्यांची शिकवण विरोधाभासी आणि नात्यापरत्वे, कालपरत्वे बदलत जाणारी आहे असे मला ठामपणे वाटते.

कांदा

विवेकपटाईत ·
लेखनविषय:
कांद्या उगविणारा शेतकरी असो, ग्राहक असो वा व्यापारी, सरकारच्या नित बदलत्या नितींमुळे, सर्वांनाच नुकसान होते शेतकऱ्याला रडवितो कांदा ग्राहकाला लुबाडीतो कांदा व्यापारीला फसवितो कांदा नेत्यांना मात्र हसवितो कांदा

अनवाणी .........

_मनश्री_ ·
नवरात्रात अनवाणी चालण्याविषयी चर्चा वाचली ,त्या अनुषंगाने लिहित आहे माझा असा अंदाज आहे कि नवरात्र सुरु होते तेव्हा नुकताच पावसाळा संपलेला असतो त्यामुळे सगळीकडे हिरवळ असते आणि हिरवळीवरून अनवाणी पायाने चालण्यामुळे भरपूर फायदे होतात रक्ताभिसरण सुधारते ,डोळ्यांचे आरोग्य सुधारते ,आणखी इतरही बरेच फायदे होतात हिरवळीवरून चालण्याने त्यामुळे आरोग्याचे हे सगळे लाभ किमान ९ दिवस तरी व्हावेत म्हणून हि नवरात्रात अनवाणी चालण्याची पद्धत निघाली असावी . तसही आपल्याकडे देवाधर्मासाठी करायचं म्हटलं कि लोक सगळ करतात म्हणून याला धार्मिक रूप दिल गेल असाव आताच्या काळात रस्ते इतके अस्वच्छ असतात कि अनवाणी चालण्

AN ODE TO मिसळपाव ! द्वितीय पुष्प

माम्लेदारचा पन्खा ·
लेखनविषय:
काव्यरस
मिपा बोधिवृक्षकारांनो…वृक्षाची जोपासना करणार्यांनो …. सर्व स्वयंभू देवस्थानांनो ….खालसा आणि स्वायत्त संस्थानांनो …. अखंड धुनी पेट्व्यानो…त्यात अविरत तेल ओतणाऱ्यानो …. सतत खल करणार्यांनो …. अविश्रांत गूळ काढणार्यांनो… तळ्यात- मळ्यात खेळणाऱ्यानो… विरोधासाठी विरोध करणाऱ्यानो… खरडफळा भरणाऱ्यानो…कळफलक बडवणार्यांनो…दुर्गभ्रमंती करणार्यांनो… खाद्यचौकशी करणार्यांनो … अनुभवसमृद्ध काकांनो आणि सर्वगुणसंपन्न ताईन्नो…. फक्त किल्ली फिरवणार्यांनो…. सतत खिल्ली उडवणार्यांनो….

अभिनव विचार संग्रह - (१)

निमिष सोनार ·
लेखनप्रकार
(१) एकवेळ एकरंगी "शत्रू/विरोधक/परके-माणसं" चालतील पण सतत रंग बदलणारे "मित्र/समर्थक/आपले-माणसं" धोकादायक! (२) एखादी व्यक्ती जेव्हा आजारी असते तेव्हा कोणत्याही औषधापेक्षासुद्धा सहानुभूतीचे दोन शब्द आणि लवकर बरे होण्यासाठीच्या शुभेच्छा या जास्त परिणामकारक ठरतात. (3) आई वडील सर्व ब्रम्ह!! आई श्रेष्ठ देवा पेक्षा!! वडील श्रेष्ठ गुरु पेक्षा!! आई वडिलांना देवत्व आणि गुरुत्व देतांना त्यांचे माणूसपण विसरू नका. त्याना माणूस म्हणून समजून घेणे सुद्धा जास्त महत्वाचे आहे, नाही का? (४) पत्नी/सून ही गृहलक्ष्मी असते. मान्य!

भय इथले संपत नाही (दोन)

संजय क्षीरसागर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
http://www.misalpav.com/node/28987 -------------------------- भय आणि प्रणय या सजीवांच्या दोन आदिम प्रेरणा आहेत. खरं तर बाकी सगळ्या प्रेरणांचा त्या स्त्रोत आहेत. आणि आपलं मन या दोन प्रेरणांमधे अविरत दोलायमान आहे. भय केवळ मृत्यूचं नाही, तर जिथेजिथे आपण जोडलो गेलोत, जिथून आपल्याला आनंद मिळतो, जो आपला आधार आहे, तो तुटण्याचं भय आहे. मग तो सखीचा देह असो, आपला की कुणा जिवलगचा देह असो, त्याच्या विलयाचं भय. नाती, अनुबंध, किंवा मैत्री तुटण्याचं भय. आर्थिक विपन्नतेचं भय किंवा मग स्व-प्रतिमेला तडा जाण्याचं आणि सामाजाच्या अवहेलनचं भय. जोपर्यंत आपण देहात आहोत, तोपर्यंत भय आहे...

मेणाचा मृत्युंजय भावला

मारवा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
अरूण कोलटकर हे माझ्या मते मराठीतील महाकवीं पैकी एक आहेत. यांनी ज्या कविता मराठीत लिहीलेल्या आहेत तशा त्यांच्या अगोदर कोणी लिहील्या असतील असे वाटत नाही. त्यांच्या काही कवितांवर अतिशय सुंदर रसग्रहण पुर्वी मिपा वर आलेली आहेत. अनेक अर्थांनी अनोखा असा हा माणुस होता. यांचे कवितेतील अनुभव शैली इमानदारी सारेच काही विलक्षण होते. त्यांची एक विलक्षण कविता जी अतिशय अस्वस्थ करुन जाते तिच्यावीषयी त्याचा अर्थ जसा मला लागतोय तो सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यापुर्वी एक सांगावेसे वाटते की खालील कविते चे आकलन जर काही संदर्भ माहीत असतील तर सुगम होते. अन्यथा कविता क्लीष्ट वाटु शकते.