मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

निवडणूक उमेद्वाराबाद्द्ल अपेक्षा

अत्रन्गि पाउस ·

जेपी 05/10/2014 - 18:54
वरील बाबीबद्दल आपल्याला कायबी आशेप नाय. *wink* उमेदवाराने एकतर नोटा द्याव्या नायतर आमी NOTA वापरु

In reply to by जेपी

नाव आडनाव 05/10/2014 - 21:53
"आशेप नाय." ओ पयले जेपी साहेब, अवो सायबाले / मॅडमले आवडत नाय वो असुद्द भासा. असं असुद्द लिवु नका, आन ते बी पयले असतांना :)

एक तरी भाषा शुद्ध बोलता लिहिता यावी म्हंजे ? मह्या डोक्यातनी त ह्या प्रेश्नानंच झाकट पल्डेल हाय भाऊ!!!, मले जरासक खुल्लं करुन सांगजा बरं बयाजवार थुमाले म्हानावचं का व्हय थे . :)

किमान पदविका /पदवी हा निकष लागु व्हायला हवा. हल्ली बहुतेक ज्यांना शिक्षणात गती नाही आणि घरी जमीन विकुन आलेला पैसा आहे ते लोकं स्कॉर्पियो उडवत राजकारणात उतरत आहेत. किमान राजकारणात जायचं म्ह्णुन तरी शिकतील.

सुधीर 06/10/2014 - 10:11
कुठल्याही गंभीर स्वरुपाचा गुन्हा नसावा. ही पहिली अट. वार्षिक उत्पन्न, व्यवसायाचे स्वरूप आणि स्तावर जंगम मालमत्तेत मेळ असावा. अशी माफक अपेक्षा. अशा माहितीचा अंदाज इथून घेता येऊ शकेल. http://103.23.150.139/VSAffidavits/VS2014.aspx

विजुभाऊ 06/10/2014 - 11:54
आणखी माफक अपेक्षा........ प्रचार करताना सेनेच्या उमेदवाराने " दळभद्री " हा शब्द वापरू नये भाजप च्या उमेदवाराने " जनादेश" हा शब्द वापरू नये राष्ट्र वादी च्या उमेदवाराने " सहकाराच्या माध्यमातून" हा शब्द वापरू नये कोग्रेस च्या उमेदवाराने " जातीयवादी शक्तिंना दूर ठेवण्यासाठी" हा शब्द वापरू नये मनसे च्या उमेदवाराने " परप्रान्तीय" हा शब्द वापरू नये

In reply to by विजुभाऊ

हे जरा जास्तच होतय बर का विजू. उमेद्वाराच्या भाषणात 'साहेब्,मॅडम्,गांधी,नेहरू,वाजपेयी,सम्राट' हे शब्द असू नयेत असे सुचवते.

आणखी महाराष्ट्र मागे- पुढे, करुन दाखविले-वरुन दाखविले, शिक्षण्-सम्रुद्धी, रस्ते, पाणी, वीज वगैरे पण नको.. वीट आलाय सगळ्याचा..

जेपी 05/10/2014 - 18:54
वरील बाबीबद्दल आपल्याला कायबी आशेप नाय. *wink* उमेदवाराने एकतर नोटा द्याव्या नायतर आमी NOTA वापरु

In reply to by जेपी

नाव आडनाव 05/10/2014 - 21:53
"आशेप नाय." ओ पयले जेपी साहेब, अवो सायबाले / मॅडमले आवडत नाय वो असुद्द भासा. असं असुद्द लिवु नका, आन ते बी पयले असतांना :)

एक तरी भाषा शुद्ध बोलता लिहिता यावी म्हंजे ? मह्या डोक्यातनी त ह्या प्रेश्नानंच झाकट पल्डेल हाय भाऊ!!!, मले जरासक खुल्लं करुन सांगजा बरं बयाजवार थुमाले म्हानावचं का व्हय थे . :)

किमान पदविका /पदवी हा निकष लागु व्हायला हवा. हल्ली बहुतेक ज्यांना शिक्षणात गती नाही आणि घरी जमीन विकुन आलेला पैसा आहे ते लोकं स्कॉर्पियो उडवत राजकारणात उतरत आहेत. किमान राजकारणात जायचं म्ह्णुन तरी शिकतील.

सुधीर 06/10/2014 - 10:11
कुठल्याही गंभीर स्वरुपाचा गुन्हा नसावा. ही पहिली अट. वार्षिक उत्पन्न, व्यवसायाचे स्वरूप आणि स्तावर जंगम मालमत्तेत मेळ असावा. अशी माफक अपेक्षा. अशा माहितीचा अंदाज इथून घेता येऊ शकेल. http://103.23.150.139/VSAffidavits/VS2014.aspx

विजुभाऊ 06/10/2014 - 11:54
आणखी माफक अपेक्षा........ प्रचार करताना सेनेच्या उमेदवाराने " दळभद्री " हा शब्द वापरू नये भाजप च्या उमेदवाराने " जनादेश" हा शब्द वापरू नये राष्ट्र वादी च्या उमेदवाराने " सहकाराच्या माध्यमातून" हा शब्द वापरू नये कोग्रेस च्या उमेदवाराने " जातीयवादी शक्तिंना दूर ठेवण्यासाठी" हा शब्द वापरू नये मनसे च्या उमेदवाराने " परप्रान्तीय" हा शब्द वापरू नये

In reply to by विजुभाऊ

हे जरा जास्तच होतय बर का विजू. उमेद्वाराच्या भाषणात 'साहेब्,मॅडम्,गांधी,नेहरू,वाजपेयी,सम्राट' हे शब्द असू नयेत असे सुचवते.

आणखी महाराष्ट्र मागे- पुढे, करुन दाखविले-वरुन दाखविले, शिक्षण्-सम्रुद्धी, रस्ते, पाणी, वीज वगैरे पण नको.. वीट आलाय सगळ्याचा..
१. त्याला किमान लिहिता वाचता यावे २. एक तरी भाषा शुद्ध बोलता लिहिता यावी. ३. एखादी तरी परभाषा निदान समजावी ४. रोजचे वर्तमानपत्र वाचत असावा असे किमान शंका यावी असे वर्तन असावे. ५. एक तरी फोटो टिळाविरहित, पांढरे कपडे नसलेला, शर्टाचे वरचे बटण उघडे नसणारा आणि त्यातून सोन्यःची चेन न दाखवणारा असावा ६. आजूबाजूचे समर्थक वरील बाबींशी किमान संबधित असावेत

माझ ब्राम्हण असण

पिंपातला उंदीर ·

जेपी 05/10/2014 - 17:35
पंखासाब पॉपकॉर्न आनलेत . पयल्या रांगेत बसुन आरामात खाऊ. बाकी धागाकर्त्याचे आणभव आमाला का येत नाय.

जेपी 05/10/2014 - 17:54
पंखा साब शमत आहे. उद्या बकरी ईद आहे.त्यामुळे धागा ओस पडु नये याची काळजी घेऊ.नंतर आहेच खंग्री चर्चा.

सर्वसाक्षी 05/10/2014 - 18:41
ब्राम्हण नव्हे, ब्राह्मण. जाता जाता: वरील प्रतिसादकांची सदस्यनावे माम्लेदारचा पन्खा जेपी उगा काहितरीच यावरुन आपण जात कशी काय ओळखता? कुणी मुक्तविहारी कुणा साक्षीला कट्ट्याला बोलावतो यात त्यांची जात कशी काय दिसते? मुळात तुम्हाला समोरच्याची जात शोधाविशी का वाटते?

In reply to by सर्वसाक्षी

मी अस कधी म्हंटलं ? मी मला माहित नसलेल्या मुद्द्यावर प्रश्न विचारले . पुन्हा quote करतो हा भेद आंतर जालावर पण पाळला जातो का ? इथले कंपू आणि होणारे कट्टे यात जमलेल्या लोकांमध्ये एका विशिष्ट जातीच्या लोकांच प्रमाण जास्त असत का ? हा खवचट पणा नाही तर genuine प्रश्न आहे .

In reply to by पिंपातला उंदीर

"इथले कंपू आणि होणारे कट्टे यात जमलेल्या लोकांमध्ये एका विशिष्ट जातीच्या लोकांच प्रमाण जास्त असत का?" तुम्ही आत्ता पर्यंत किती कट्टे केलेत? स्वत: अनुभवा आणि मग विचार करा.जमल्यास ह्या महिन्याच्या १८ ता. ते २९ ता. पर्यंत ३ कट्टे होणार आहेत.डोंबोली, ठाणे आणि पुणे. त्यापैकी कुठल्याही एका कट्ट्याला हजेरीपुरते तरी या आणि मग बघा. मी किंवा माझ्या बरोबरच्या कुठल्याही मिपाकराने कधीच आणि कधीही कुठल्याही कट्ट्यावर आलेल्या माणसाला जात विचारली नाही.वैयक्तिक माझ्या पुरते बोलायचे तर, मी फक्त २च जाती मानतो. बाह्मण किंवा अब्राह्मण. ब्राह्मण ====> जो सतत ज्ञान मिळवायच्या मागे असतो तो आणि अब्राह्मण =====> जो आहे त्या ज्ञानात समाधानी असतो किंवा मिळालेल्या ज्ञानाचा सदुपयोग करत नाही, तो. मला नाही वाटत की मिपावर कुणी अब्राह्मण असतील म्हणून. जन्माने मिळालेल्या जातीला आणि नावाला किंवा आडनावाला मी हिंग लावून विचारत नाही.

In reply to by मुक्त विहारि

ज्ञानव 06/10/2014 - 11:36
ब्राम्हण्याची व्याख्या आवडली

जन्माने मिळालेल्या जातीला आणि नावाला किंवा आडनावाला मी हिंग लावून विचारत नाही.

मी पण विचारत नाही. पण धागाकर्त्याच्या म्हणण्यात हि अर्थ आहेच मुवी शेवटी प्रत्येकाचे अनुभव आणि वेदनाच असे काही लिहिण्यास उद्युक्त करत असतात? १) "ब्राम्हणांनी पेशवाई घालवली" हे वाक्य किंवा हा पराक्रम आणि सगळे नॉन-वेज ब्राम्हणांनी महाग करून ठेवले हे ऐकताना होणारी वेदना बरयाच वेळा हमरीतुमरीवर गेली आहे. २) सरकारी नोकरीत ब्राम्हण सहकार्याने आधीच्या कर्मचार्याचा आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आणल्या नंतर जातीविषयक कायद्याचा बडगा उगारलेला पाहून येणारी हतबलता वेदना आजही त्रास देते आहे. ३) dipartmental परीक्षांमध्ये ब्राम्हणांना डावलून इतरेजनांना पास करून सिनिओरीटी घालवलेली पहिली तर वाईट वाटत आले आहे. आणि ब्राम्हणेतर सर्व एरवी भांडले तरी त्यांच्यातल्याच एकावर अन्याय झाला (कुणाकडूनही)तर ते एक होताना कोर्टात जाताना पाहिलेत पण ब्राम्हण कधीही एक होत नाहीत ते आप्ल्यातल्याच ज्याच्यावर अन्याय झालाय तो कसा मूर्ख आहे आणि मी किती शहाणा आहे त्याची फुशारकी मारतो हे हि उद्विग्न करते. ब्राम्हण्याची व्याख्या आवडली पण ती वैयक्तिक जो पर्यंत समोरचा फणा काढत नाही तोपर्यंत. माझे मित्र, क्लायंटस कलीग्स वेग वेगळ्या जातीतले आहेत पण मी त्यांची जात कधी लक्षात घेतली नाही तरी कधी विषय निघाला की ते मला "भटा" म्हणंत आले आहेत पण मी जातीविषयक कुठल्याही कायद्याची मदत घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत. मला ते हसण्यावारीच न्यावे लागते पण मी कुणाला कुठलेही जातीविषयक संबोधन वापरू शकतच नाही स्वभावानेही आणि कायद्यानेही. पण मग एखादा ब्राह्मण जर वरील प्रमाणे आपले मत मांडत असेल तर त्याला माझे नक्की अनुमोदन, पाठींबा आहेच आहे.

In reply to by टवाळ कार्टा

हाडक्या 06/10/2014 - 20:12
पुण्याच्या कट्ट्याचा पत्ताच नाहिये...
आम्हाला पुण्याच्या कट्ट्याची माहीती हवीये.. कुठे मिळेल. ?

पैसा 05/10/2014 - 18:46
ज्याचे त्याचे अनुभव आणि विचार. प्रत्येकालाच असे अनुभव असतील असे नव्हे. किंवा तुम्ही जी भीती/गंड याबद्दल बोलताय ते व्यक्तिगत पातळीवर असण्याची शक्यता जास्त वाटते आहे.

उदयन 05/10/2014 - 19:29
ब्राम्हण असण्याचे सर्व फायदे ओरपून घेतल्यावर आता त्यातून निर्माण होणारया ऐतिहासिक ओझ्यांपासून (जाती व्यवस्था निर्मिती , दलितांवर अत्याचार ) आता दूर जाता येईल का ? कारण अल्पसंख्य समाजाला (त्यांची आक्रमण , सक्तीची धर्मांतर ) हा अधिकार देशाच्या अनेक समस्याना जबाबदार धरताना त्यांनी कधीच नाकारला आहे .
असे लिहायला हिंमत लागते. आपले अभिनंदन

मी ब्राम्हण आहे म्हणजे मला वपु काळे आणि देशपांडे आवडलेच पाहिजेत , कुठेतरी कसलेतरी मंदिर बांधण्याच्या मोहिमेला माझा पाठींबा असलाच पाहिजे , एका विशिष्ट धार्मिक (सांस्कृतिक ?) संघटने बद्दल मला प्रेम वाटलेच पाहिजे , एका जहाल वैगेरे नेत्याला मी मुठी वळवून पाठींबा दिलाच पाहिजे आणि आरक्षण व अल्पसंख्यक लोकांबद्दल माझी अति जहाल मत असावीत अशा real आणि virtual आयुष्यात असणाऱ्या अपेक्षांचं काय करायचं हा खरा प्रश्न आहे हा माझ्यालेखी आपल्या लिखाणातला षट्कार आहे!!!!. मी शुद्ध इंग्रजीत विचारत असतो " व्हाय स्टीरियोटाईप ??" माझी तर केसच निराळी आजा अन त्याचे दोन भाऊ हिंसप्रसे चे सशस्त्र क्रांतिकारी होते, साक्षात चंद्रशेखर आझाद उर्फ पंडीतजी ह्यांनी क्रांतिदिक्षा दिलेले, मला माझा प्रत्येक ब्राह्मण मित्र काहीतरी वेगळ्या नजरेने पाहतो, अन बहुजन समाज "हा बामन" ह्या इंप्रेशन मधे असतो, आयडेंटीटी क्रायसिस होतो राव कधी कधी!!!

एका आव्हानात्मक विषयावर मोकळेपणाने व संयतपणे लिहिल्याबद्दल अभिनंदन. माझ्या सुदैवाने मला लहानपणापासून सर्व जातिधर्माच्या लोकांबरोबर राहायला मिळालं. वर्तमानपत्रं व मासिकांमधील बातम्यांमध्ये व वैचारिक लेखनांमध्ये जात्यंधपणाच्या बातम्या व उल्लेखांची प्रत्यक्षातली उदाहरणे मला स्वतःला फारच क्वचित दिसली. स्नातकोत्तर शिक्षणासाठी बारामतीला राहत असताना राज्याच्या इतर भागांतून आलेल्या काही सवंगड्यांच्या आचरणातून तीव्र जातीयात प्रथमच दिसली. इसकाळमध्ये अमेरिकेतील महाराष्ट्र / मराठी मंडळांच्या बातम्या प्रकाशित झाल्या की त्यावरच्या अनेक प्रतिसादकांचा रोख असतो की सदर सांस्कृतिक चळवळीवर ब्राह्मणांनी एकाधिकार निर्माण केला आहे. प्रत्यक्षात याविरुद्धची उदाहरणे नक्कीच पाहिली आहेत. मी स्वतः अनेक वर्षांपासून या चळवळींमधला स्वयंसेवक आहे. ना नफा ना तोटा या तत्वावर मंडळे चालत असल्याने जे अक्षरशः मजुरासारखे परिश्रम करतात ते चळवळीचा चेहरा बनतात. जे मंडळांच्या कार्यक्रमांना प्रेक्षक म्हणून येतात व परत जातात त्यांना कदाचित दूर ठेवले गेल्याची भावना होत असावी. बाकी आपल्याला पटो वा न पटो आपल्या समाजातली जातीयता हे कटू वास्तव आहे.

भाते 05/10/2014 - 20:36
ब्राम्हण असण्याचे सर्व फायदे ओरपून घेतल्यावर!!! काय फायदे मिळाले ब्राह्मण असल्याचे? मीसुध्दा ब्राह्मण आहे. च्यायला, दहावीनंतर त्या कुठल्यातरी 'अबक' जातीला ३८% मिळाले असताना महाविद्यालयात प्रवेश मिळतो आणि ५८% मिळालेल्याला केवळ (इतर/ब्राह्मण) जातीमुळे त्याच महाविद्यालयात प्रवेश नाकारला जातो! काय वय असतं दहावीला? जेमतेम १५-१६ वर्ष! तेव्हापासुन हा भेदभाव लक्षात आल्यावर पुढे त्याच्याकडुन काय अपेक्षा करणार? ७८% मिळालेल्याला ती जागा नाकारली गेली तर? काय करायची आहे ब्राह्मण जात! त्यापेक्षा 'अबक' जात लावली तर ३८% मिळवुनसुध्दा मिळतो ना त्याच महाविद्यालयात प्रवेश! मग कशाला करायचा वर्षभर अभ्यास रक्त अटवुन? अर्थात तो ३८% वाला अकरावीला चार विषयात नापास होतो. पण गेली/घालवली ना त्या ५८%/७८% मिळवलेल्याची जागा! दहावीला असताना मी हे अनुभवले आहे.

In reply to by भाते

उदयन 05/10/2014 - 21:06
७८% मिळालेल्याला ती जागा नाकारली गेली तर? काय करायची आहे ब्राह्मण जात! त्यापेक्षा 'अबक' जात लावली तर ३८% मिळवुनसुध्दा मिळतो ना त्याच महाविद्यालयात प्रवेश! मग कशाला करायचा वर्षभर अभ्यास रक्त अटवुन? ----------------- तुमचे म्हणने रास्त आहे. पण हे केवळ गेले ३०-४० वर्षापासुनच सुरु झाले. तरी तुम्हाला इतका राग. मग विचार करा वर्षानुवर्षे मार्क देणे तर दुर राहिले ज्यांना शिक्षणापासुन देखील वंचित ठेवलेले अशांचे विचार काय असतील ? १५-१६ तर लांबची गोष्ट आहे अजुन ही बर्याच ठिकाणी ५-६ वर्षाच्या मुलांना देखील दुय्यम स्वरुपाची वागणुक मिळते

In reply to by उदयन

ज्ञानव 06/10/2014 - 11:46
पण हा वंचितपणा ब्राम्हणांनी दिला का ? पूर्वीच्या सर्व अत्याचारांचे खापर फक्त ब्राह्मणांवर फोडणे कितपत योग्य आहे. राजकारण हे कायम क्षत्रियांच्या हातात होते त्यांनी का प्रयत्न केले नाहीत सर्वांना योग्य शिक्षण मिळवून देण्याचे ? भातेसाहेब म्हणतात तोच प्रश्न मला पडतो नक्की आम्ही काय फायदे

ओरपले?!!!!

In reply to by भाते

सुहास.. 06/10/2014 - 17:35
डिसक्लेमर : प्रतिसादात जाती-पातीचा उल्लेख केवळ रेफरन्स करिता होय सहानभुतीच !! सर्वच समाजासाठी ... धागा व्यापक असला तरी त्याबाबत अज्ञभिन्न असलेला गट मात्र त्यातील व्यापकता समजण्याकरता पूर्वग्रहाने येणार हे जरी ग्रहीत धरत असलो तरी, तुम्ही म्हणता तितकी अधोगती ( झाली तर काही अंशी का असेना प्रगतीच म्हणेन मी ) झालेली नाही. समाजात कोणीएके काळी असलेली कट्टरता मात्र काही अंशी कमी झाली असे ही याला जोडुन मी म्हणेन. अर्थात तुम्हाला...आय मीन लेखाला विवेकी बुध्दीने आणि समान नजरेने बघणारे कमी आहेत. ( हल्ली काय आहे ना ..लोक गीता देखील त्यात स्वःताचा अर्थ घालुन वाचतात..खरा अर्थ जो आहे तो त्या कृष्णदेवालाच ठाउक ! ) ही उदाहरणे आहेत , समाज दुभंगल्याची, माझ्याकडे उदाहरणे आहेत जिथे मी एकवटल्याचे पाहिले आहे, बेटी चा नसेल जास्त प्रमाणात व्यवहार पण रोटीचा व्यवहार आहे. माझ्या ओळखीच्या एका कडक वैष्णव ब्राम्हणाने, घरात कडाडुन विरोध असुन एका अनाथ मुली शी लग्न केल्याचे उदाहरण आहे ( या अनाथालयात फक्त वेश्यांच्याच मुली असतात ). आज कित्येक वर्षे सुखाचा संसार करतोय, असे दलीत-मुस्लीम-ब्राम्हण-मराठा एकत्र पार्टीला पाहिलेत ..माझा सांगतो अनुभव , पेग क्रमांक तीन, तो मराठा, त्याच्यासमोर बसलेला ब्राम्हण आहे , दलीत एका बाजुला , तिघांना एका प्लेटमध्ये 'प्लेन चीज ' खाताना पाहिलय, वाद चालु आहे " शहाण्णव कुळी म्हणजे काय आहे माहीत आहे का ? " समोरुन आवाज " परशुरामाने काय २१ की ५२ वेळा नि:क्षत्रीय केलीय " याच पार्टीत चौथा देशस्थ म्हणतो " ओ, चित्पावन, गप्प बसा आता " आणि सरते शेवटी सगळे मिळुन दाल-खिचडी खातात, बनविणाना मुस्लीम आहे की नाही याचा विचार न करता ? काय म्हणाल याला ? सावरकर जेवत नव्हते दलीतांच्या पंगतीत? मी स्वःता कितीतरी दलीत भक्त पाहिलेत सावरकरांचे ! आहेत काही ! पब्लीक जरा भयताड झालय ! सुरुवात मी मिपावरच्या एका उदाहरणाने देतो, एरवी वाचन-मात्र असलेला आयडी असे काही धागे दिसले की लगेच " काडीमात्र" होतात, ब्राम्हण्य आणी त्याच श्रेष्ठत्व टिकविण्याची त्या आयडी ची मरमर ( आधी कुत्तरओढ असा शब्द लिहीला होता ) पाहिली की अक्षरशः किळस येते , याचा अर्थ सोनवणींच्या ब्लॉग ची वा चेपुवर ते काय " संभाजी ब्रिगेड - भटांचा कर्दनकाळ " ची येत नाही असे काही नाही , मला त्याहुनी जास्त येते !! कोणीतरी वाघमारे म्हणुन आहेत ..ब्लॉक करुन टाकले मी शेवटी चेपुवर ...हे असे अनेक किस्से आहे ..जात लागते ती एकदा का निवड्णुका जाहीर झाल्या की ( काय च्या मारी ! पण मी आशावादी आहे, एक ना एक दिवस हे ही चित्र बदलेल ) थोडेसे आरक्षणाविषयी .. मी ब्राम्हण वर्गाचा राग समजु शकतो ..पण काही करु शकत नाही, खर तर ! सध्या कोणीच काही करु शकत नाही (अगदी समान नागरी कायदा ही ) आरक्षणाला लागुन एक कलम आहे , की दरवर्षी आरक्षितांच 'समाजातील' प्रमाण आणि शैक्षणिक पातळीवरच, सरकारी नौकर्‍यांमधल प्रमाण, सम ( सारखं ) झाल की मग ते लगेच रद्द होवु शकते. जातीनिहाय जणगणना होते ती यामुळेच !! आणि आरक्षणाच्या मुदतीची डेट पुढे ढकलावी ते ही याच मुळे !! फायदे-तोटे ही आहेत, आहे थोडी प्रगती आहे ! पण काय करणार समाज इतका जात-पात मानतो की विचारु नका, :( आधी राजस्थान राज्य सरकार ला गुज्जर समाज आरक्षित करता आला, आता कॉन्ग्रेस ने मराठा ला दिलं, हे मराठा समाजाच झाल असे की , त्या आधी मराठा- कुणबी समाज आरक्षित होता, आता हे कुणबी म्हणजेच ९६ कुळी म्हणणारे काही आणि ९६ कुळी च कुणबी म्हणनारे काही, त्यांचा टक्का बघीतला गेला आणि राज्य सरकार ने देवुन टाकल आरक्षण !! ) फायदा होईल की नाही माहीत नाही ( आपल्या राज्य सरकारकडे साध्या पोलीस भरत्या करायला वेळ नाही, उगा राजकारण तिज्यायला ! ) ब्राम्हण समाजाच हे असं होत, सामाजिक दृष्ट्या समाज दुर्बल दिसत नाही ( एकही किस्सा आठवेना मला ज्यामध्ये दलीत मुलीने ब्राम्ह्ण वा उच्चजातीतील मुलाशी प्रेम केले म्हणुन दलीतांनी ब्राम्हण/उच्चवर्णीयाची हत्या केली ती) , आर्थिक दृष्ट्या बघावं तर ( तुम्हाला इथलेच किती-तरी लोक्स परदेशात सेटल झालेले दाखवेल मी ) असेल एखादा दुसरं गंविनी लिहिल्याप्रमाण, मुळात लक्षात घेतला जातो ते टक्का ! अश्या कित्येक बाबी आरक्षणची डेट वाढविताना लक्षात घेण्यात येतात, वाजपेंयी नी एकदा असा अहवाल मागविला होता, वर्ष आठवत नाही , पण त्यांनी तो पाहिल्यावर ते थक्कच झाले होते , केवळ ४० % आरक्षितापर्यंत च आरक्षणाचे फायदे पोचले होते, त्यांना तो गुंडाळुन ठेवावा लागला आणि उलट ते प्रकरण हाताशी धरुन मायावती खाजगी क्षेत्रातही आरक्षण द्या ही मागणी पुढे ढकलली होती. आणि मला वाटते मागाहुन कॉन्ग्रेस कडुन प्रमोशन मध्येही आरक्षण मंजुर करून घेतले होते ! पण आता याचा अर्थ असा नाही की दलीत समाज आरक्षणाच्या विरुध्द नाही , एक खुप मोठा गट आहे, विषेशतः प्रकाश आबेंडकराना मानणारा, त्याच म्हणणे असे आहे की जात ही टीसी मधुनच काढुन टाका, मग ती कोणती का असेना, आणि क्लॅरिटी आणा ! सर्वच क्षेत्रात, मग ती शैक्षणिक असो वा सरकारी नौकर्‍या, पारदर्शकता आणा !! लायकी ही सिध्द होईल , पण यामुळे राजकारण्यांना एक सर्वात मोठा तोटा होवु शकतो ...असे केले सर्व समाज एकवटेल , मग यांना जाती-पातीची आणि मुळे मते कशी मिळतील ( आठवा , बापटअण्णांना तिकीट न मिळाल्याने आणि कुठला ब्राम्ह्ण उमेदवार नसल्याने " पुणे ब्राम्हण सभेने मतदानावर टाकलेला बहिष्कार, खर सांगा असे वांझोटे धंदे केल्यावर कसा एकवटणार समाज ) मी तर काही लोकांना तो एकवटु नये म्हणुन ही शर्थीचे प्रयत्न करताना पाहिले आहे ! ब्राम्हण मित्राच्या, नितीन आगेच्या ब्रुटल मर्डर विषयीच्या, निषेधात्मक पोस्ट वर, " अंथरुण पाहुन पाय पसरावे " अशी मराठा समाजाचे आडनाव असलेल्या ची कमेंट आल्यावर काय समजायचे मातंग समाजाच्या लोकांनी... इथल्या काही कमेंट वाचल्यावर तर मीही त्याविषयी लिहायचचं बंद केले . .. आहेत अश्या बर्‍याच थेरॉटिकल गोष्टी , ज्याचा मागमुस ही नसतो लोकांना . प्रॅक्टीकली होते असे की , ब्राम्हण ब्राम्हण संस्काराच्या चौकटीत जगतो , दलीत दलीत मध्ये , मुस्लीम मुस्लीम चौकटी मध्ये, मराठा मराठा मध्ये त्यामूळे माझ्या जातीतील मुल्ये श्रेष्ठ्च असे बिंबविले जाते मग मी श्रेष्ठ म्हटल आपोआप दुसरा कनिष्ठ होतो !! हे मनामध्ये हळु-हळु वाढत जाते ......खुप कमी लोक असतात जी ही चौकट मोडतात आणि तेच वर तुम्ही विचारलेल्या प्रश्नाच उत्तर आहे . धन्यवाद !

In reply to by सुहास..

मृत्युन्जय 07/10/2014 - 12:02
+ १ फक्त एका बाबतीत थोडासा विरोध आहे सुहास. लग्न आणि त्यातुन झालेल्या हत्यांबद्दल. उच्चवर्णीयांनी निम्न वर्णीय कुटुंबातील मुलांची आणि मुलींची (उच्चवर्णीय मुलांना अथवा मुलींना फूस लावली म्हणून) हत्या केल्याची कैक उदाहरणे मिळतील. तु म्हणतोस त्याप्रमाणे उलटे झाल्याचे दिसत नाही. उच्चवर्णीयांनी केलेल्या या हत्यांमध्ये ब्राह्मणांनी केलेल्या हत्या किती आढळतात आणि त्यातही महारष्ट्रीय ब्राह्मणांनी केलेल्या किती आढळतात? त्यामानाने इतर जातींनी केलेल्या आधिक आढळतील. खैरलांजी प्रकरण कशाचे द्योतक म्हणता येइल? तिथे उच्चवर्णीयांनी निम्नवर्णीयांची हत्या केली (लग्न संबंधात नाही). उच्चवर्णीय म्ह्णजे कुणबी. निम्नवर्णीय होते महार. लातुर मध्ये बरोबर उलटी घटना देखील दिसुन येते. महाराष्ट्रात बघितले तर जातीपातीवरौन उच्चवर्णीयांनी केलेल्या हत्यांमध्ये ब्राह्मणांनी केलेल्या हत्या फारच कमी प्रमाणात आढळतील. इतर जातींनी केलेल्या निम्नवर्णीयांच्या हत्या अधिक सापडतील. ब्राह्मणांनी केलेल्या निम्नवर्णीयांच्या हत्येचे प्रमाण उत्तर प्रदेशात अधिक आढळेल. हे सर्व सांगण्याचे कारण इतर कुठल्या जातीवर ठपका ठेवायचे नसुन फक्त हे सांगण्याचे आहे की महाराष्ट्रातीय ब्राह्मणवर्ग उर्वरीत भारतातल्या ब्राह्मणांपेक्षा बराच सुधारित आहे. त्यामुळेच अस्पृश्य निवारणाची चळवल सुरुही महाराष्ट्रात झाली आणि वाढलीही इथेच. महाराष्ट्रीयन समाजातच कर्वे, आगरकर, सावरकर आणि रानडे यांसारखे जातीभेदाविरुद्ध आवाज उठवणारे समाजधुरीण निर्माण होउ शकले. दुसरी दुर्दैवी गोष्ट अशी की अस्पृश्यता जणु ब्राह्मणांनी निर्माण केली आणी जातिभेद त्यांच्यामुळेच वाढला असे चित्र निर्माण केले जाते, तसे असेल तर मग आज खैरलांजीसारख्या घटना का होतात? इतर जातीतले लोक इतकी अस्पृश्यता आणि जातिभेद का पाळतात? थोडेसे आरक्षणाबद्दल. आरक्षण सुरु होउन ६० वर्षे उलटली. जेव्हा सुरु झाले तेव्हा मागस वर्ग निश्चित केला नव्हता का? केलाच होता ना? मग ६० वर्षात त्या मागास वर्गात कुणबी, गुज्जर, मराठा अशी भर कशी काय पडली? हे उलटे आरक्षण नक्की कशाचे द्योतक आहे? ब्राह्मण सोडुन सगळे आरक्षित का? मराठा समाजाला आरक्षणाची गरज नक्की का भासते? तो समाज पहिल्यापासुन सधन, शिक्षित आणि राज्यकर्ता नाही का? मग त्यांना आरक्षण का? आरक्षण हे गरज म्हणुन न वापरले जाता एक राजकीय साधन म्हणुन वापरले जाते हे खेदजनक आहे. आरक्षण वाटल्यास अजुन १०० वर्षे ठेवा पण त्यांच्यासाठी ज्यांना याची गरज आहे. आरक्षित समाजातील सनदी अधिकार्‍यांची मुले अजुनही आरक्षणाचा उपभोग का घेतात (फक्त सनदी अधिकारी असेच नाही तर मध्यमवर्गीय किंवा खाउन पिउन सुखी असलेले कनिष्ठ मध्यमवर्गीयांचेही उदाहरण घे). त्यांना अजुन किती काळ आरक्षण? ते लोक अजुनही उद्धारित नाही झालेले का? निम्नवर्णीय पण अजुनही आर्थिअक्दृष्ट्या दुर्बल असलेल्या लोकांना अजुनही आरक्षणाचा लाभ दिला तर एकवेळ समजु शकतो पण शिक्षित आणि सधन लोकांना का? एक नाही अनेक उदाहरणे देतो. माझ्या डोळ्यासमोर घडलेली. सधन बांधकामव्यावसिकाचा मुलगा, कॉर्पोरेट क्षेत्रातल्या एका बड्या अधिकार्‍याची मुलगी, एका सधन महाविद्यालयीन प्राध्यापकाची मुलगी असे अजुनही अनेक लोक पाहण्यात आले ज्यांनी महाविद्यालयातच नव्हे तर वैद्यकीय अभ्यासक्रमात आणि एमबीए च्या अभ्यासक्रमासाठीही आरक्षणाचा लाभ घेतला. त्यांना खरेच आरक्षणाची गरज होती का आणि आरक्षण त्यांचा अधिकार होता का? समजा काही शतके उच्चवर्णीयांनी निम्नवर्णीयांचे शोषण केले. मग आता कालचक्र उलटे फिरवायचे का? आणि ब्राह्मणांचे शोषण करायचे का? की जितकी शतके शोषण झाले तितकी शतके आरक्षण चालु ठेवायचे? आणि किती शतके मागे जायचे? आणि ठरवा एकदाचे की शोषण नक्की कोणाचे झाले. राज्यकर्त्या मराठा समाजाचे? सधन कुणबी आणी धनगर समाजाचे? असो. चर्चा करु तितकी कमीच आहे. उत्तरे कुणाकडेच नाहित. उगाच चिखलफेक करण्यात काही हशील नाही. अवांतरः प्रतिसाद जरी तुझ्या प्रतिसादाला उप प्रतिसाद म्हणून असेल तरी हा प्रतिसाद तुझा प्रतिसाद मान्य नाही म्हणुन दिलेला नाही तर त्या अनुषंगाने लिहावेसे वाटले म्हणुन दिलेला आहे. तुझा प्रतिसाद पटलेला आहेच.

In reply to by मृत्युन्जय

एस 07/10/2014 - 13:04
सधन बांधकामव्यावसिकाचा मुलगा, कॉर्पोरेट क्षेत्रातल्या एका बड्या अधिकार्‍याची मुलगी, एका सधन महाविद्यालयीन प्राध्यापकाची मुलगी असे अजुनही अनेक लोक पाहण्यात आले ज्यांनी महाविद्यालयातच नव्हे तर वैद्यकीय अभ्यासक्रमात आणि एमबीए च्या अभ्यासक्रमासाठीही आरक्षणाचा लाभ घेतला. त्यांना खरेच आरक्षणाची गरज होती का आणि आरक्षण त्यांचा अधिकार होता का?
फक्त एवढ्या एका मुद्द्याबद्दल बोलायचे झाले तर आरक्षण घेणे ही बर्‍याचदा सवलत लाटणे ह्या उद्देशाने नसून तसे ते घ्यावे लागते कारण खुल्या वर्गातून प्रवेश/नोकरी स्वीकारली तर पुढे आरक्षण म्हणा किंवा शिष्यवृत्ती म्हणा, अशा कुठल्याच बाबींचा लाभ होत नाही. ह्याची दुसरी बाजू अशी की पुरेसे मार्क असूनही जर खुल्या वर्गातून प्रवेश घेतला तरीही त्या वर्गातील एक सीट अडवल्याचाही दोष लागतो. त्यामुळे आरक्षण घेतले तर सवर्ण सहाध्यायांच्या नजरेतील 'सरकारी ब्राह्मण' अशी तुच्छता सोसणे आणि नाही घेतले तर आमची एक सीट अडवली म्हणून राग ओढवून घेणे अशा दुहेरी कात्रीत लोक सापडतात हो! मी माझ्यापुरतं जात-धर्म-वंश वगैरे संपवून टाकलं आहे, म्हणून समोरचा मला त्याच्या चष्म्यातून पाहणं थांबवत नाही ही खरी मेख आहे. जाऊ द्यात! या विषयावर अजून बोलायची इच्छा नाही.

In reply to by एस

सह्यमित्र 07/10/2014 - 15:03
हे तितकेसे पटत नाहि. बऱ्याचदा असे बघण्यात आले आहे कि आर्थिक दृष्ट्या अतिशय सधन असणार्यांच्या मुलाना पुरेसे मार्क नसताना केवळ आरक्षणा च्या लाभा मुळे प्रवेश मिळतो काही वेळेला फी मध्ये सवलत देखील आणि आर्थिक दृष्ट्या निम्न पण केवळ उच्चवर्णीय असल्या मुळे प्रवेश मिळत नाहि. अशीच उदाहरणे पाहण्यात जास्त आलि आहेत.

In reply to by एस

सुबोध खरे 07/10/2014 - 18:46
देवयानी खोब्रागडे यांचे वडील उच्च स्तरीय(प्रमुख सचिव) आय ए एस अधिकारी होते ना मग त्यांनी आपल्या वैद्यकीय प्रवेशासाठी आणी नंतरच्या विदेश सेवेसाठी त्यांनी आरक्षण वापरलेच. (शिवाय त्यांचा मुंबईत एक फ्लैट असताना आदर्श मध्ये त्यांना दुसरा फ्लैट मंजूर झाला आणी हे त्यांच्या वडिलांना "माहित" नव्हते). अशा उच्च स्तरीय अधिकार्याच्या अपत्यांना आरक्षण दिल्यामुळे त्याच कोट्यातील कोणा खरोखरीच गरज असलेल्या मागास वर्गीयावर अन्यायच होतो. वैद्यकीय महाविद्यालयाचे शिक्षण शुल्क सर्वाना एक लाख आहे तर मागास वर्गीयांना १० हजार आहे. ज्यांचे वडील अत्युच्च दर्जाचे शासकीय अधिकारी आहेत त्यांना हि फी ची सवलत म्हणजे अपात्री दान आहे. आरक्षण ठेवावे पण त्याला क्रिमी लेयर लागू करावा. सध्या तो फक्त इतर मागास वर्गाला लागू आहे तो सर्व आरक्षणाला लागू करावा म्हणजे जे त्या वर्गातील खरोखर गरजू आहेत त्यांना त्याचा लाभ मिळू शकेल. ( हा एक मोठा वादग्रस्त राजकीय निर्णय आहे आणि कोणीही नेता हा निखारा आपल्या अस्तनीत ठेवणार नाही हेही मला माहीत आहे ).

In reply to by सुबोध खरे

सुहास.. 07/10/2014 - 18:56
उच्च स्तरीय अधिकार्याच्या अपत्यांना आरक्षण दिल्यामुळे त्याच कोट्यातील कोणा खरोखरीच गरज असलेल्या मागास वर्गीयावर अन्यायच होतो. +१ आरक्षण ठेवावे पण त्याला क्रिमी लेयर लागू करावा. सध्या तो फक्त इतर मागास वर्गाला लागू आहे तो सर्व आरक्षणाला लागू करावा म्हणजे जे त्या वर्गातील खरोखर गरजू आहेत त्यांना त्याचा लाभ मिळू शकेल. >>> यावर मौनीबाबाचं सरकार विचार करत होते , अहवाल धुळ खात पडुन आहे असे सध्यातरी एकुन आहे !! कोणीतरी या विषयावर ' जनहित याचिका ' टाकायला हवी , माझा अभ्यास चालु आहे यावर ..खात्रीने सांगतो हा विषय खरोखरच चिंताजनक आहे !! नक्कीच कधी ना कधी हा विषय घेईल मी ...किमान याचिका दाखल करण्याबाबत तरी असो , बाकी सर्वांनी माझ्या प्रतिसादावर जी चर्चा आरंभली आहे त्यांचे धन्यवाद , आवडते ही आहे ...!! मी सविस्तर लिहेन वेळ मिळेल तसा ..

In reply to by सुबोध खरे

अजया 07/10/2014 - 19:13
हा अनुभव मी पण घेतलाय.नावाने मागासवर्गीय, सरकारी पदस्थांची अत्यंत कमी गुण मिळवुन आलेली धनाढ्य मुलं!! मात्र चार वर्ष पास होता होता नाकात दम आलेली!!

In reply to by सुबोध खरे

चिगो 08/10/2014 - 16:34
आरक्षण ठेवावे पण त्याला क्रिमी लेयर लागू करावा. सध्या तो फक्त इतर मागास वर्गाला लागू आहे तो सर्व आरक्षणाला लागू करावा म्हणजे जे त्या वर्गातील खरोखर गरजू आहेत त्यांना त्याचा लाभ मिळू शकेल.
ह्याच मुद्द्यावरुन सुमारे दोन वर्षांपुर्वी लिहीलेल्या लेखाची ही झैरात..

In reply to by मृत्युन्जय

सहमत. आरक्षण वाटल्यास अजुन १०० वर्षे ठेवा पण त्यांच्यासाठी ज्यांना याची गरज आहे. माझे तर म्हणणे आहे कांही टक्के आरक्षण ठेवण्या ऐवजी १०० टक्के आरक्षित महाविद्यालये सुरु करा. आधी आरक्षणाचा फायदा घेऊन जे उच्च शिक्षित झाले आहेत त्यांनी ह्या महाविद्यालयातून आपल्या बांधवांना ज्ञानदान करावं. तिथे कोणाही उच्चवर्णियांना प्रवेश नसावा. शिपाई ते मुख्याध्यापक सर्व फक्त मागास वर्गातूनच पुढे आलेले असावेत. सर्व मागास विद्यार्थ्यांना अशा महाविद्यालयातून प्रवेश मिळावा. बाकी सर्व महाविद्यालयामधून इतरांना (ओपन वर्ग) प्रवेश द्यावा. मागास विद्यार्थ्यांनाही अशा (ओपन) वर्गात प्रवेश हवा असेल तर गुणवत्तेवर देण्यात यावा. तिथे कुठलेही आरक्षण नसावे.

In reply to by प्रभाकर पेठकर

इरसाल 07/10/2014 - 15:00
आधी आरक्षणाचा फायदा घेऊन जे उच्च शिक्षित झाले आहेत त्यांनी ह्या महाविद्यालयातून आपल्या बांधवांना ज्ञानदान करावं. काका तुमचा डाव कळला हं मला, अस सांगा ना की तिथे अ‍ॅडमिशन घेणार्‍या मुलांना, तुम्हाला शिकुच द्यायचे नाही. ;)

In reply to by इरसाल

अस सांगा ना की तिथे अ‍ॅडमिशन घेणार्‍या मुलांना, तुम्हाला शिकुच द्यायचे नाही. का बरं? असं का वाटलं? मागास वर्गात आपल्या बांधवांना शिकवू शकतील असे ज्ञानी नाहीत की स्वतः शिकल्यावर ते समदु:खी बांधवांचा कैवार घेऊ इच्छित नाहीत? डॉ. आंबेडकरांपासून डॉ. नरेन्द्र जाधवांपर्यंत अनेक ज्ञानी पुरुष मागास वर्गात होऊन गेलेत आणि अजूनही आहेत. आपल्या ज्ञाती बांधवांना शिकवू शकतील असे कांही प्रोफेसर मिळू शकणार नाहीत? अशा व्यवस्थेत मागासांना शिक्षणही मिळेल आणि राजकार॑ण्यांना गलिच्छ राजकारण करायची संधी मिळणार नाही शिवाय पुढारलेले आणि मागास अशी दरीही उरणार नाही.

In reply to by सुहास..

राजाभाउ 07/10/2014 - 13:39
+१ अतिशय सुंदर प्रतिसाद. मला जवळपास असेच वाटते पण एतके व्यवस्थीत मांडता आले नसते. धन्यवाद सुहास

श्रीगुरुजी 05/10/2014 - 21:05
तुम्हाला जे अनुभव आले तसले अनुभव मला कधीही आलेले नाहीत. उलट ब्राह्मण हा विषय जास्त करून टिंगलीचा, उपहासाचा व मत्सराचा असल्याचे अनुभव आहेत. >>> ब्राम्हण असण्याचे सर्व फायदे ओरपून घेतल्यावर आता त्यातून निर्माण होणारया ऐतिहासिक ओझ्यांपासून (जाती व्यवस्था निर्मिती , दलितांवर अत्याचार ) आता दूर जाता येईल का ? खरं तर ब्राह्मण असण्याचे फायदे कमी व तोटे जास्त आहेत. आता तर मराठा व मुस्लिम राखीव जागांमुळे तोटे अजूनच वाढले आहेत. ब्राह्मण असण्याचे नक्की कोणते फायदे ब्राह्मण ओरपतात ते सांगता का जरा? म्हणजे लग्नकार्यात, सत्यनारायणाची पूजा वगैरे कार्यात भटजींना जी दक्षिणा मिळते तो फायदा तुम्हाला अपेक्षित आहे का?

ब्राम्हण असल्याचे फायदे असण्यापेक्षा तोटे जास्त आहेत हे खरं. पण एक गोष्ट सर्व जाती जमातीमधल्या लोकांनी लक्षात घ्यावी ही कळकळीची विनंती. आरक्षण झगडायची ताकद कमी करेल. आयतं किंवा कमी कष्टात मिळालेली गोष्ट फार का़ळं टिकत नाही. मे बी आज नाही, पण साधारण १००-२०० वर्षांनी जेव्हा सर्व आरक्षित लोकं आरक्षण टेकन फॉर ग्रँटेड घेतील त्यादिवशी स्वतःचा नाश ओढवुन घेतील. प्रॅक्टीकल जगामधे, कामामधे ब्राम्हण असो वा दुसरा कोणी, जर का कामाचा नसेल तर टिकु शकणार नाही. त्यामुळे झगडायचं विसरु नका, कष्टाला पर्याय नाही. सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट ह्या नियमात कोणीही तुम्हाला आरक्षण देणार नाहीये.

In reply to by सस्नेह

सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट हा नियम जगातल्या प्रत्येक सजीव आणि निर्जीव गोष्टीला लागु होतो. जी गोष्ट वापरात राहात नाही ती कालौघात नष्ट होते हा इतिहास आहे आणि राहील.

In reply to by सस्नेह

एका समाजाला वारंवार वापरण्याची संधी मिळाली..म्हणून वृद्धी दुसर्याला अनेक पिढ्या ती नाकारली गेली .., ~हास !
अगदी बरोबर. पण त्याबरोबर ही पण गोष्ट लक्षात घेतली पाहीजे की संधी नाकारणारे हा समाजाचा एक भाग होते आणि संपुर्ण समाज नव्हे. त्यामुळे सर्व समाजाचा द्वेश करणे योग्य नाही. मा़झ्याच ब्राम्हण समाजाच्या काही लोकांनी नाकारलेल्या लोकांना संधी उपलब्ध करुन देण्यामधे सिंहाचा वाटा उचलला ही गोष्ट सोयिस्करपणे विस्मरणात जाऊ नये म्हणुन हा लेखनप्रपंच.

दशानन 05/10/2014 - 22:18
बुरा जो देखन मैं चला, बुरा न मिलिया कोय। जो मन खोजा अपना, मुझ-सा बुरा न कोय।। - कबीर आजच कबीर वाचत होतो, त्यात हा मला आवडलेला दोहा मी नोट करून ठेवला होता. काही गोष्टी आपल्या हातात नसतात, जसा की आपला जन्म!

पैसा 05/10/2014 - 22:47
मी ब्राम्हण आहे म्हणजे मला वपु काळे आणि देशपांडे आवडलेच पाहिजेत , कुठेतरी कसलेतरी मंदिर बांधण्याच्या मोहिमेला माझा पाठींबा असलाच पाहिजे , एका विशिष्ट धार्मिक (सांस्कृतिक ?) संघटने बद्दल मला प्रेम वाटलेच पाहिजे , एका जहाल वैगेरे नेत्याला मी मुठी वळवून पाठींबा दिलाच पाहिजे आणि आरक्षण व अल्पसंख्यक लोकांबद्दल माझी अति जहाल मत असावीत अशा real आणि virtual आयुष्यात असणाऱ्या अपेक्षांचं काय करायचं हा खरा प्रश्न आहे .
हे फारच धाडसी वक्तव्य आहे. व पु काळे आणि देशपांडे ही नावेसुद्धा माहिती नसलेले कित्येक ब्राह्मण मला माहित आहेत. मला स्वतःला व पु काळे अजिबात आवडत नाहीत, पु ल काही ठिकाणी आवडतात. तसेच यातल्या इतर विधानांच्याबाबत माझं उत्तर नकारार्थीच असेल मात्र माझी जात कोणती हे असं तुमच्यासारख्या कोणीतरी लिहिल्यावरच लक्षात येतं. एरवी नाही. ब्राह्मण समाजातसुद्धा अज्ञान, दारिद्र्य, अंधश्रद्धा अजूनही किती प्रमाणात आहे हे माहिती करून घ्यायचं असेल तर ह.मो. मराठ्यांचं 'बालकांड' वाचा. उपरा किंवा बलुतं इतकाच दाहक आणि अस्वस्थ करणारा अनुभव मिळेल. तुमचं आतापर्यंतचं एकूण लिखाण प्रचंड प्रमाणात सरसकट म्हणावं असं असतं, किंवा मला माहिती आहे तेवढंच जग अशी तुमची भूमिका बरेचदा दिसते. हा लेखही त्याला अपवाद नाही. या लेखावर "वा वा काय छान लिहिलंय" असं मला म्हणून बाजूला रहाता आलं असतंच किंवा संपूर्ण दुर्लक्षही करता आलं असतं, पण तुम्ही लिहिली आहे तेवढी एकच बाजू या गोष्टीला नाही हे सांगण्यासाठी हा प्रतिसाद. याव्यतिरिक्त चर्चेला विनाकारण आरक्षण वगैरे वळणं लागणार असं दिसतंय. ते एक असोच. या संदर्भात मार्मिक गोडसे यांचा मिपावर हल्लीच आलेला लेख आठवला. असो. तेवढी मॅच्युरिटी सगळ्यांकडून अपेक्षित नाही.

In reply to by पैसा

रेवती 05/10/2014 - 23:05
सहमत आहेच पण हा विषय इतक्या जास्तवेळा चघळला जाऊनही तू प्रतिसादास टंकाळा केला नाहीस म्हणून धन्यवाद. मला भयंकर टंकाळा आलाय. ज्यांना यापलिकडे पाहणं जमतं ते या चर्चेत फारसे नसतात.

In reply to by पैसा

निश 06/10/2014 - 12:26
पैसा ताईशी १००% सहमत. ह मो मराठे ह्यांचे बालकांण्ड हे वाचताना खरच रडु येत.ब्राम्हण आहे म्हणुन त्याना कष्ट करावे लागत नाही अस मुळिच नाही. जेव्हा माणुस कष्ट करुन मोठा होतो समाजात नाव करतो त्याचा अभिमान खरच बाळगला पाहीजे मग तो कुठ्ल्याही जातीचाही का असेना. मी ब्राम्हण आहे पण अस असताना मला ही खंत व दु:ख नक्कीच आहे की माझ्या आधीच्या पिढी़कडुन दलित समाजावर अन्याय झाला आहे पण मी त्याना दलित न समजता माझ्यासारखीच माणुस म्हणुन समजतो व हे ही सांगतो की आज त्या समाजातले माझे मित्र फार खुप मोठया स्थानी आहेत. आणि मला त्याचा खुप अभिमान आहे. माणसाला संधी दिली की तो कोणीहि का असेना तो त्याच्या प्रयत्नानि त्या संधीचे सोन करतो हे मात्र खर.

In reply to by निश

vikramaditya 06/10/2014 - 16:23
चांगले लिहिलेत. पुर्वी अमानुष अत्याचार करण्यात आले ह्यात काही शंका नाही. तसेच
माणसाला संधी दिली की तो कोणीहि का असेना तो त्याच्या प्रयत्नानि त्या संधीचे सोन करतो हे मात्र खर.
हे वाक्य पटले.

In reply to by पैसा

एकूण लिखाण प्रचंड प्रमाणात सरसकट म्हणावं असं असतं, किंवा मला माहिती आहे तेवढंच जग अशी तुमची भूमिका बरेचदा दिसते. हा लेखही त्याला अपवाद नाही.
अगदी +१००. एकूणच काय की कोणत्याही माणसाचे जात-धर्म इत्यादी चष्म्यांमधून न बघता एक माणूस म्हणून मूल्यमापन व्हावे असे म्हणणारे लोकच त्याच चष्म्यांचा वापर करून ब्राह्मणांविरूध्द काहीतरी लिहितात ते बघून त्या दुटप्पीपणाचा भयंकर संताप येतो.या चष्म्यांचा वापर करून इतर जातींविषयी काही लिहिले की तो माणूस मोठा पुराणमतवादी पण ब्राह्मणांविषयी काही लिहिले की तो माणूस मात्र मोठा आधुनिक विचारांचा, पुरोगामी इत्यादी ठरतो. लेख आणि त्यातून होणारे सरसकटीकरण अजिबात आवडले नाही.विशेषतः कट्ट्यांवर एकाच जातीच्या लोकांचे वर्चस्व का असते यावर "तुम्ही आतापर्यंत किती कट्टे अटेंड केले आहेत" या प्रश्नावरील मौनच बरेच काही सांगून जाते.म्हणजे हे महाशय एकाही कट्ट्याला जाणार नाहीत आणि तरीही छातीठोक दावा करणार की कट्ट्यावर एका जातीच्या लोकांचे वर्चस्व असते!! याला उंटावरून शेळ्या हाकणे म्हणतात. बाकी काही नाही.

In reply to by पैसा

प्रदीप 06/10/2014 - 20:34
अत्यंत चपखल आहे, अतिशय आवडला. बालकांडचा* ह्या संदर्भातील उल्लेख सोडून, १०० % सहमत. * 'बालकांड' वाचल्यावर, मराठ्यांच्या वडिलांनी, स्वतःच्या विक्षीप्त स्वभावामुळे, स्वत:वर व स्वतःच्या कुटुंबावर दु:खे नाहक ओढवून घेतली, असे माझे मत झाले. म्हणून तेव्हढ्यापुरती सहमती नाही.

In reply to by प्रदीप

पैसा 06/10/2014 - 22:55
बालकांड च्या बाबतीत तुम्ही लिहिलंय ते १००% पटलं. ह.मो.मराठ्यांच्या वडिलांच्या विक्षिप्तपणामुळे त्यांना फार दु:खे सहन करावी लागली. मात्र ते कारण असलं तरी परिणाम जो झाला, (त्यांच्या आईच्या बाबतीत आजार असताना भूत लागलंय म्हणणे) तशा प्रकारचं दारिद्र्य आणि भुताखेतांनी झपाटलेले म्हणणे इ. अंधश्रद्धा मी लहान असताना सगळ्या जातींमधे, ब्राह्मणांमधेही पाहिल्या आहेत. त्यामुळे हे उदाहरण सहज आठवले ते इथे दिले. मात्र आठवायला बसलं तर श्री.ना.पेंडसे, दळवी आणि इतर कितीतरी लेखकांच्या लिखाणातून अशी उदाहरणे सहज देता येतील. या संदर्भात 'किरवंत' चीही आठवण झाली.

सस्नेह 05/10/2014 - 23:15
लेख छान आहे असे काही म्हणवत नाही. वैयक्तिक पातळीवर आलेले काही अनुभव तटस्थपणे मान्डण्यात लेखक यशस्वी झाला आहे एवढेच म्हणते. शेवटी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर कोणी देऊ शकेल असे वाटत नाही

भिंगरी 05/10/2014 - 23:25
मार्मिक गोडसे यांचा'आडनावाच्या आडून'या लेखातही अशाच प्रकारची माहिती दिसते.

खटपट्या 06/10/2014 - 00:36
मला माहित नाही कि हे अवांतर आहे कि नाही. आंतरजालावर शोध घेत असताना मला http://www.thebrahminsamaj.com/index.php या संकेतस्थळावर खालील विडिओ सापडला. http://www.youtube.com/watch?v=P7Xgc4ljHKM या विडिओवर काही ब्राह्मण जातीत जन्माला आलेले लोक झाडू मारणे किंवा साफसफाई करणे असली कामे नाईलाजास्तव करीत आहेत असे दिसते. आणि एकंदर सूर असा दिसला कि आम्ही ब्राह्मण असून आम्हाला अशी हलक्या दर्जाची कामे करावी लागत आहेत. झाडू मारणे, शौचालय साफ करणे ही ब्राह्मणाची कामे नाहीत, या मानसिकतेतून अजून कोणी बाहेर यायला तयार नाही. शारीरिक श्रमांची कामे करणे म्हणजे कमीपणा, असल्या मानसिकतेतून आपण बाहेर येणारच नाही आहोत का. जन्माने ब्राह्मण असलो म्हणजे आपण कोणीतरी उच्च आहोत आणि आपल्याला फक्त खुर्चीत बसायची कामे मिळणार, यातून बाहेर कधी पडणार. परदेशी सर्रास सर्व ब्राह्मण मुले उपहारगृहात कामे करतात. मग भारतातच काय होते?

In reply to by खटपट्या

"जन्माने ब्राह्मण असलो म्हणजे आपण कोणीतरी उच्च आहोत आणि आपल्याला फक्त खुर्चीत बसायची कामे मिळणार, यातून बाहेर कधी पडणार?" आमच्याच घरातील काही उदाहरणे. १. एका भावाला शिकण्याची आवड न्हवती.तो रिक्षा चालवायचा. २. दुसर्‍या भावाला पण शिकण्याची आवड न्हवती.तो टायपिंग शिकला आणि नौकरीला लागला. ३. तिसर्‍या भावाला व्यवहार ज्ञान भरपूर.तो आय.टी.आय. झाला.आज स्वतःचा व्यवसाय करतो. ४. चौथ्या भावाला व्यवहार ज्ञान प्रचंड. तो ११वी नापास. शिक्षणाचे सगळे कागद दहावीच्या मार्क-लिस्ट सकट बंबात टाकले.एका बिल्डरकडे १०रु.रोजावर सळ्या तोडायला लागला.थोडे वर्षांनी वायरिंगची कामे घ्यायला लागला. नंतर बरेच धंदे सुरू केले.आज वयाच्या ४७व्या वर्षी सगळे धंदे बंद करून मस्त मजेत जगत आहे. ५. पाचव्या भावाचे पुणे शहरात स्वतःचे गॅरेज आहे. ६. माझ्या एका मित्राचे वडील टाटा कं.त मोठ्या हुद्द्यावर होते.मुलगा जेमतेम बी.कॉम. झाला.पण आवड म्हणून गाड्या दुरुस्त करतो आणि आता त्यातच जम बसवून आहे. ७.ह्या भावाने स्वतःचे पैसे शेयर मध्ये गुंतवून रोज स्वतःपुरते कमावतो. ह्यातला एक टायपिंग करणारा सोडला तर इतर सगळे रस्त्यावरच धंदा करतात. असो... अजूनही खूप उदाहरणे देता येतील.

In reply to by मुक्त विहारि

खटपट्या 06/10/2014 - 04:35
सर, बरोबर आहे तुमचे म्हणणे, माझ्याही माहितीत बरेच जण आहेत. माझे विधान सरसकट नव्हते. पण विडिओ दुव्यावर ज्या प्रतिक्रिया होत्या त्या बहुतांशी माझ्या म्हणण्याला दुजोरा देणाऱ्या आहेत. माझे निरीक्षण असे आहे कि महाराष्ट्रातील ब्राह्मण समाज उत्तर भारतातील ब्राह्मण समाजापेक्षा खूपच पुरोगामी आहे.

स्पंदना 06/10/2014 - 05:26
कोणाला कसला अभिमान असला तर तो स्वतःबद्दल असावा या मताची होउन राहिले आहे मी आता. त्यामुळे उगा उठुन कुणी स्वतःच्या अनुभवाबद्दल लिहीत असेल तर त्यात माझा अनुभव मिसळुन बे दुनी चार करण सोडुन दिलयं. जाती वरुन हीनवणे , मग ती उच्च असो वा हीन हे जितके इनह्युमन तितकेच जातीवरुन वागणुक देणे सुद्धा वाईटच. त्याही पलिकडे जाउन जेंव्हा एक स्त्री म्हणुन कनिष्ठ वागवल जात तेंव्हा तर जातसुद्धा गळुन पडते. एकून माणसांचे मुखवटे गळुन पडायला ना जातीच कारण पुरतं ना धर्माचं, नाही लिंग!

वेल्लाभट 06/10/2014 - 10:25
धाग्यातील विचार, पुढच्या प्रतिसादांतील अनुभव इत्यादी सर्व गोष्टी वास्तवाला धरूनच आहेत. मग वैयक्तिक पातळीवर असतील किंवा व्यापक पातळीवर. त्याबाबत भाष्य न करता एक प्रांजळ मत मांडू इच्छितो. आरक्षणाबाबत आणि त्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनाबाबत. एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे जो सतत ज्ञानार्जनास उत्सुक असतो तो ब्राह्मण. ही व्याख्या धरून पुढे म्हणावसं वाटतं, अशा ब्राह्मणाला त्याच्या ज्ञानाचा अभिमान असतो आणि तीच त्याची ताकद असते. आता, सर्वसाधारण अर्थाने किंवा जातीने जे अब्राह्मण असतात ते मूर्ख असतात का? मुळीच नाही. मग; आरक्षणाचा उपयोग करून शिक्षणसंस्थात प्रवेश मिळवणं त्यांना मोठेपणाचं का वाटतं? त्याची गरज त्यांना का लागते? 'आरक्षण' या गोष्टीकडे मी कुबड्यांसारखं बघेन. मला नीटपणे चालता येत असताना कुबड्या घेऊन चालण्याची आणि स्वतःला अपंग म्हणवून घेण्याची इच्छा मला होणार नाही. पण तसं समाजात होताना दिसत नाही. 'मला रिझर्वेशन आहे मित्रा! ओबीसी! ' हे अभिमानाने सांगणारे मित्र बघितलेले आहेत मी. त्यांनाही हा विचार सांगून बघितला, पण मिळतोय फायदा तर का न घ्या? ही त्यांची त्यावरची प्रतिक्रीया असायची. तेंव्हा जोवर हा विचार समाजमनातून नष्ट होत नाही (कठीण आहे ते) तोपर्यंत ७८-३८ चा फॉर्म्युला अबाधित आहे.

बाळ सप्रे 06/10/2014 - 11:09
लेख आवडला !! जन्माने जात असु नये हे तात्विक दृष्ट्या सर्व जण मान्य करतात.. पण व्यवहारात जात ही जन्मानेच ठरते हे सत्य आहे. काळाप्रमाणे लोकांचे व्यवसाय कामधंदे बदलले पण जाती त्याप्रमाणे बदलल्या नाहीत..

In reply to by बाळ सप्रे

असंका 06/10/2014 - 12:23
लेख आवडला असे म्हणून आपण लेखकाला शालजोडीतले देत आहात का? कारण ह्या वाक्यानं सरसकट सगळ्या लेखाचं कौतुक होत आहे. सरसकटीकरण हे तर लेखकाला मुळीच आवडत नाही. लेखातल्या या वाक्याबद्दल आपले काय मत आहे? तेही आपल्याला आवडले का? "हा घाबरून राहणारा , समाजाच्या इतर घटकांपासून गंड ग्रस्त असणारा , पटकन सरसकट करण करणारा ब्राम्हण समाज बघणे वेदनादायक आहे . त्याना कायम एक शत्रू लागतो . कधी तो बहुजन समाज असतो , कधी मुस्लिम तर कधी यु पी चा भैय्या" ब्राह्मण समाजाला बहुजन समाज हा आपला शत्रु म्हणून लागतो? मुस्लिम लोक शत्रु म्हणून लागतात? युपीचे भय्ये शत्रु म्हणून लागतात? ही कसली गरज म्हणायची ब्राह्मणांची? उत्तर देण्याचे बंधन नाही. मी हा प्रश्न पुन्हा लेखकालापण विचारणारच आहे.

खरं पाहता मी कांहीच प्रतिसाद ह्या धाग्यावर देणार नव्हतो. मुळात, एकदा पुढे जे लिखाणात येणार आहे ते संपूर्ण पणे माझ्या अनुभवांवर आधारित आहे आणि त्याला माझ्या वैयक्तिक Sample Survey चा आधार आहे . म्हणजे मी केलेली विधान चूक पण असू शकतात . असा डिस्क्लेमर सुरुवातीलाच टाकला की आपला कल्पनाविलास आपल्याला हव्या त्या दिशेने नेता येतो. कुठल्याही काल्पनिक गोष्टी 'मला आलेला अनुभव' ह्या नांवाखाली लिहून समाजातील कांही जाती वर्गाला भडकवायचं, वादविवाद घडवून आणायचे आणि मिटक्या मारत मजा बघत राहायची, ह्या विकृत उद्देशाव्यतिरिक्त ह्या धाग्यात मला तरी कांही दिसत नाही. ज्यांना भांडायचे असेल त्यांनी भांडावे, पण सूज्ञांनी विचारपूर्वक दूर राहावे असे मी आवाहन करेन.

In reply to by प्रभाकर पेठकर

पूर्णपणे सहमत आहे. एकद्याच्या वैयक्तिक अनुभवावर काय बोलणार ?? कुठेतरी काड्या लावायच्या आणि आग लागल्यावर गंमत पहात उभे रहायचे..

सूड 06/10/2014 - 15:20
तुमचे वैतक्तिक अनुभव म्हणून ठीकाय पण बर्‍याचदा चर्वितचर्वण झालेला विषय असल्याने आता प्रतिसाद द्यायचा उबग आलाय. तुमचा लेख आणि प्रतिसाद वाचले हेही नसे थोडके!! मिपाच्या कट्ट्यांबद्दल म्हणाल तर प्रश्न विचारण्यापेक्षा एकदा येऊन बघा तुमचं तुम्हालाच उत्तर मिळेल. ॥इति लेखनसीमा॥

विटेकर 06/10/2014 - 15:59
हीन दर्जाच्या लोकप्रियतेसाठी लिहिलेला लेख ! माझे बालपण ठार खेड्यात गेले. माझे आई- वडील शिक्षक होते त्याच शाळेत ,तरीही आमचे जाधव मास्तर सानुनासिक स्वरात " काका" म्हणून आम्हाला हाक मारायचे ! माझे वय तेव्हा फक्त ८ वर्षे होते. अश्या शालेतून मी चौथीची शिष्यवृत्ती मिळवल्यावर हा द्वेष आणखीनच वाढला ! शेवटी जंग जंग पछाडून वडिलांनी बदली करुन घेतली तालुकयाच्या गावाला !. (तालुक्याचा सभापती ९६ कुळी , तो कशाला बामणाचे काम करेल? पण एका मुसलमान शिक्षणाधिकार्‍याला दया आली.)तिथेही द्वेष होताच पण तुलनेने कमी .. त्याच गावांत मी कॉलेजला गेल्यावर मराठ्यांच्या पोरांना , " ए कुळवाड्या " म्हनून हाक मारुन बदला घेतल्याचे समाधान मिळवायचो ! आजही त्या खेड्यातील ब्राह्मण द्वेष तसाच आहे !!! गेल्या १० वर्षात तर तिथे आता नावाला देखील ब्राह्मण राहिला नाही. मग संघाच्या संपर्कात आलो, राजाभाऊ भोसले होते प्रचारक , त्यांनी समाजावून सांगितले आणि अंतर्बाह्य शुद्ध झालो. पुढे तर औरन्गाबादला असताना स्वरुपवर्धिनीचे काम करायला लागलो , बुद्धवंदना शिकलो. मनात कसलेही किल्मिष राहीले नाही. ब्राहमण असल्याचा मला काहीही फायदा झाला नाही, उलट बाल-मनावर अत्यन्त वाईट आघात झाले. माझे आई- वडील नीर-क्षीर विवेक करणारे होते, मला संघाचा परिस स्पर्श झाला म्ह्णून माझे किल्मिष जळून गेले. असे किती भाग्यवंत असतील? उदगीरकरांचा धागा निव्वळ राळ उडविण्यासाठी काढला आहे. ज्या बहुजन समाजाच्या नावाने ते गळा काढताहेत , त्यासाठी परिश्रम करणारे बहुतांशी उच्च समाजातील होते ,हे ते सोयिस्करपणे विसरत आहेत. पु. लं नी दलित साहित्याचे स्वागत आणि कौतुक दोन्ही केले.. असो अशी अनेक उदाहरणे देता येतील. पण लक्षात कोण घेतो ? खरे तर प्रतिसाद देणारच नव्हतो .. पण अगदीच राहवले नाही . म्हातारी मेल्याचे दु:ख नाही , काळ सोकावतो आहे.

ज्ञानव 06/10/2014 - 16:51
ज्या बहुजन समाजाच्या नावाने ते गळा काढताहेत , त्यासाठी परिश्रम करणारे बहुतांशी उच्च समाजातील होते ,हे ते सोयिस्करपणे विसरत आहेत. तो बहुजन समाजही किती लक्षात ठेऊन आहे? ब्राम्हणांनी माझा उद्धार (चांगल्या अर्थाने) केला / ब्राम्हणांची सांगत होती म्हणून माझ्यात अमुलाग्र बदल झाला हे कितीजण मान्य करतील ? दुर्दैव हेच आहे की ब्राम्हणाने काढलेला धागा त्यावर ब्राम्हणांनी दिलेले प्रतिसाद आणि ब्राम्हणेतरानी दिलेले प्रतिसाद किंवा "मला आहे अभिमान दलित असण्याचा " किंवा "आहे मी मराठा मग...?" असा एखादा धागा ब्राम्ह्णेतराने काढावा त्याला येणारे प्रतिसाद तपासावेत मगच कळेल काहीतरी. एक ब्राम्हण दुसर्या ब्राम्हणाच्या बाजूने उभा रहात नाही पण बाकी सगळ्या जातीतले लोक आपल्या जातीतल्या माणसामागे उभे राहतातच हा अनुभव आहे.

एस 06/10/2014 - 16:51
अशा विषयांवर उघडपणे काही लिहिण्याबोलण्याची सोय राहिलेली नाही. मग ते एका समाजातले असो वा दुसर्‍या. वेळ मिळाल्यास व्यनि/खवद्वारे चर्चा करण्याचा प्रयत्न केला जाईल.

समीरसूर 06/10/2014 - 17:19
ब्राह्मणांनी कुठले फायदे ओरपले ते कळले नाही. अजूनही दरिद्री ब्राह्मण खूप आहेत. ब्राह्मणांची शेती कुळकायद्यात गेली. आरक्षण नसल्याने ब्राह्मणांना शासकीय नोकर्‍यांची आणि शिक्षणाची शक्यता जवळ-जवळ संपुष्टात आलेली आहे. ब्राह्मण शेकडो एकर जमिनीचे मालक, जमीनदार, साखर कारखान्यांचे मालक, भव्य कॉलेजेसचे मालक, सहकारी सूत गिरण्यांचे प्रवर्तक वगैरे कधीच नव्हते. ते आधीपासूनच शिक्षणाच्या बळावर जगत आलेले आहेत. कधी काळी (६०-७० वर्षांपूर्वी) ब्राह्मणांनी पाळलेल्या अस्पृश्यतेपेक्षा कितीतरी पट जास्त अस्पृश्यता आणि पराकोटीचा आकस पाळणार्‍या जाती आजही महाराष्ट्रात आहेत. ब्राह्मण कुणालाही मदत करतांना जात विचारून कधीच मदत करत नाहीत. माझ्या बाबांनी गेल्या ४५ वर्षात कित्येक गरीब आणि ब्राह्मण (उच्चवर्णीय) नसणार्‍या गरीब मुलांना मोफत शिकवले आहे. त्यांनी कुणालाही मदत करतांना कधीच जात विचारात घेतलेली नाही. आणि अशी कित्येक उदाहरणे मला माहित आहेत. आपल्या स्वातंत्र्य लढ्यात (आणि इतर क्षेत्रातदेखील) कित्येक ब्राह्मणांनी कुठल्याही फायद्याची अपेक्षा न ठेवता आयुष्याचे प्रामाणिक समर्पण केले आहे. राजगुरु, सेनापती बापट, चाफेकर बंधू, वासुदेव बळवंत फडके, यांनी आयुष्य देशासाठी वेचले. साने गुरुजी, गोपाळ कृष्ण गोखले, आगरकर, टिळक, दादा धर्माधिकारी, र. धो. कर्वे, महर्षी धोंडो केशव कर्वे, बाबा आमटे अशा कित्येक थोर ब्राह्मणांनी समाजसुधारणेसाठी आयुष्य खर्ची घातले. ही यादी अजून बरीच मोठी होऊ शकेल. या लोकांनी फक्त ब्राह्मण लोकांचेच भले व्हावे म्हणून आयुष्य वेचले असेल असे वाटत नाही. संत ज्ञानेश्वरांनी जे अलौकिक साहित्य निर्माण केले त्यात कुठेही जातीपातीचा किंवा इतर जातींचा द्वेष करावा असे लिहिलेले नाही. काळाच्या पुढचे इतके सुंदर पद्धतीने लिहिणारे हे संत ब्राह्मणच होते. संत एकनाथांनी कधी जात-पात पाळली नाही. आजच्या युगातदेखील माधव गाडगीळांसारखे निस्वार्थ आणि निस्पृह व्यक्तिमत्व निसर्ग वाचावा म्हणून जीवाचे रान करत आहे. अंधश्रद्धेचे निर्मुलन व्हावे म्हणून झटणारे दाभोलकर असोत किंवा तर्कशुद्ध जगण्याची शिकवण देणारे डॉ. श्रीराम लागू असोत, ब्राह्मणांनी प्रत्येक क्षेत्रात प्रामाणिकपणे आणि जीव तोडून काम केलेले आहे. आजची परिस्थिती ब्राह्मणांसाठी उलट भयावह आहे. कुठलेच संरक्षण नाही. अकारण पसरविलेल्या गेलेल्या ब्राह्मणद्वेषाने आजचा ब्राह्मण हवालदिल झालेला आहे. जीव मुठीत धरून जगतो आहे. मी स्वत: कधीच जातपात मानली नाही आणि माझ्या आई-बाबांनी तसे मला कधीच चुकूनही शिकवले नाही. असा भेद करावा असे इतक्या वर्षात माझ्या मनालादेखील कधी शिवले नाही. आणि मी नेहमी तसेच वागत आलो. माझ्यासोबतचे कित्येक ब्राह्मण अगदी असेच वागतात हे मी अनुभवले आहे. माझ्या कित्येक चुलत-मावस बहिणींनी केलेले आंतरजातीय विवाह माझ्या नातेवाईकांनी आनंदाने स्वीकारले आहेत आणि त्या गेली कित्येक वर्षे सुखाने जगत आहेत. त्यावरून कधी हाणामारी, कापाकापी, सूडनाट्य वगैरे कधीच घडले नाही. माझ्या कमीत कमी ५ चुलत-आते-मावस भावांनी आंतरजातीय विवाह केले आहेत आणि ते देखील यशस्वी झालेले आहेत. मी ब्राह्मण असल्याचा मला अभिमान वगैरे नाही पण त्यामुळे ज्या चांगल्या गोष्टी, विचार, संस्कार वाट्याला आले त्यांचा अभिमान नक्कीच आहे. प्रत्येक जातीमध्ये, धर्मामध्ये, माणसामध्ये गुण-दोष असतातच. म्हणून ती जातच वाईट ठरत नाही. ब्राह्मणांविषयीचा हा अनाठायी द्वेष जेव्हा संपेल तो खरा सुदिन!

In reply to by समीरसूर

ज्ञानव 06/10/2014 - 18:12
दरिद्री + ब्राम्हण हीच मुळात द्विरुक्ती आहे. बाकी माझा एक मित्र नेहमी त्याच्या मोठ्या भावाबद्दल सांगतो "तसा आमचा णाणा म्हणजे ब्राम्हनच"

जेपी 05/10/2014 - 17:35
पंखासाब पॉपकॉर्न आनलेत . पयल्या रांगेत बसुन आरामात खाऊ. बाकी धागाकर्त्याचे आणभव आमाला का येत नाय.

जेपी 05/10/2014 - 17:54
पंखा साब शमत आहे. उद्या बकरी ईद आहे.त्यामुळे धागा ओस पडु नये याची काळजी घेऊ.नंतर आहेच खंग्री चर्चा.

सर्वसाक्षी 05/10/2014 - 18:41
ब्राम्हण नव्हे, ब्राह्मण. जाता जाता: वरील प्रतिसादकांची सदस्यनावे माम्लेदारचा पन्खा जेपी उगा काहितरीच यावरुन आपण जात कशी काय ओळखता? कुणी मुक्तविहारी कुणा साक्षीला कट्ट्याला बोलावतो यात त्यांची जात कशी काय दिसते? मुळात तुम्हाला समोरच्याची जात शोधाविशी का वाटते?

In reply to by सर्वसाक्षी

मी अस कधी म्हंटलं ? मी मला माहित नसलेल्या मुद्द्यावर प्रश्न विचारले . पुन्हा quote करतो हा भेद आंतर जालावर पण पाळला जातो का ? इथले कंपू आणि होणारे कट्टे यात जमलेल्या लोकांमध्ये एका विशिष्ट जातीच्या लोकांच प्रमाण जास्त असत का ? हा खवचट पणा नाही तर genuine प्रश्न आहे .

In reply to by पिंपातला उंदीर

"इथले कंपू आणि होणारे कट्टे यात जमलेल्या लोकांमध्ये एका विशिष्ट जातीच्या लोकांच प्रमाण जास्त असत का?" तुम्ही आत्ता पर्यंत किती कट्टे केलेत? स्वत: अनुभवा आणि मग विचार करा.जमल्यास ह्या महिन्याच्या १८ ता. ते २९ ता. पर्यंत ३ कट्टे होणार आहेत.डोंबोली, ठाणे आणि पुणे. त्यापैकी कुठल्याही एका कट्ट्याला हजेरीपुरते तरी या आणि मग बघा. मी किंवा माझ्या बरोबरच्या कुठल्याही मिपाकराने कधीच आणि कधीही कुठल्याही कट्ट्यावर आलेल्या माणसाला जात विचारली नाही.वैयक्तिक माझ्या पुरते बोलायचे तर, मी फक्त २च जाती मानतो. बाह्मण किंवा अब्राह्मण. ब्राह्मण ====> जो सतत ज्ञान मिळवायच्या मागे असतो तो आणि अब्राह्मण =====> जो आहे त्या ज्ञानात समाधानी असतो किंवा मिळालेल्या ज्ञानाचा सदुपयोग करत नाही, तो. मला नाही वाटत की मिपावर कुणी अब्राह्मण असतील म्हणून. जन्माने मिळालेल्या जातीला आणि नावाला किंवा आडनावाला मी हिंग लावून विचारत नाही.

In reply to by मुक्त विहारि

ज्ञानव 06/10/2014 - 11:36
ब्राम्हण्याची व्याख्या आवडली

जन्माने मिळालेल्या जातीला आणि नावाला किंवा आडनावाला मी हिंग लावून विचारत नाही.

मी पण विचारत नाही. पण धागाकर्त्याच्या म्हणण्यात हि अर्थ आहेच मुवी शेवटी प्रत्येकाचे अनुभव आणि वेदनाच असे काही लिहिण्यास उद्युक्त करत असतात? १) "ब्राम्हणांनी पेशवाई घालवली" हे वाक्य किंवा हा पराक्रम आणि सगळे नॉन-वेज ब्राम्हणांनी महाग करून ठेवले हे ऐकताना होणारी वेदना बरयाच वेळा हमरीतुमरीवर गेली आहे. २) सरकारी नोकरीत ब्राम्हण सहकार्याने आधीच्या कर्मचार्याचा आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आणल्या नंतर जातीविषयक कायद्याचा बडगा उगारलेला पाहून येणारी हतबलता वेदना आजही त्रास देते आहे. ३) dipartmental परीक्षांमध्ये ब्राम्हणांना डावलून इतरेजनांना पास करून सिनिओरीटी घालवलेली पहिली तर वाईट वाटत आले आहे. आणि ब्राम्हणेतर सर्व एरवी भांडले तरी त्यांच्यातल्याच एकावर अन्याय झाला (कुणाकडूनही)तर ते एक होताना कोर्टात जाताना पाहिलेत पण ब्राम्हण कधीही एक होत नाहीत ते आप्ल्यातल्याच ज्याच्यावर अन्याय झालाय तो कसा मूर्ख आहे आणि मी किती शहाणा आहे त्याची फुशारकी मारतो हे हि उद्विग्न करते. ब्राम्हण्याची व्याख्या आवडली पण ती वैयक्तिक जो पर्यंत समोरचा फणा काढत नाही तोपर्यंत. माझे मित्र, क्लायंटस कलीग्स वेग वेगळ्या जातीतले आहेत पण मी त्यांची जात कधी लक्षात घेतली नाही तरी कधी विषय निघाला की ते मला "भटा" म्हणंत आले आहेत पण मी जातीविषयक कुठल्याही कायद्याची मदत घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत. मला ते हसण्यावारीच न्यावे लागते पण मी कुणाला कुठलेही जातीविषयक संबोधन वापरू शकतच नाही स्वभावानेही आणि कायद्यानेही. पण मग एखादा ब्राह्मण जर वरील प्रमाणे आपले मत मांडत असेल तर त्याला माझे नक्की अनुमोदन, पाठींबा आहेच आहे.

In reply to by टवाळ कार्टा

हाडक्या 06/10/2014 - 20:12
पुण्याच्या कट्ट्याचा पत्ताच नाहिये...
आम्हाला पुण्याच्या कट्ट्याची माहीती हवीये.. कुठे मिळेल. ?

पैसा 05/10/2014 - 18:46
ज्याचे त्याचे अनुभव आणि विचार. प्रत्येकालाच असे अनुभव असतील असे नव्हे. किंवा तुम्ही जी भीती/गंड याबद्दल बोलताय ते व्यक्तिगत पातळीवर असण्याची शक्यता जास्त वाटते आहे.

उदयन 05/10/2014 - 19:29
ब्राम्हण असण्याचे सर्व फायदे ओरपून घेतल्यावर आता त्यातून निर्माण होणारया ऐतिहासिक ओझ्यांपासून (जाती व्यवस्था निर्मिती , दलितांवर अत्याचार ) आता दूर जाता येईल का ? कारण अल्पसंख्य समाजाला (त्यांची आक्रमण , सक्तीची धर्मांतर ) हा अधिकार देशाच्या अनेक समस्याना जबाबदार धरताना त्यांनी कधीच नाकारला आहे .
असे लिहायला हिंमत लागते. आपले अभिनंदन

मी ब्राम्हण आहे म्हणजे मला वपु काळे आणि देशपांडे आवडलेच पाहिजेत , कुठेतरी कसलेतरी मंदिर बांधण्याच्या मोहिमेला माझा पाठींबा असलाच पाहिजे , एका विशिष्ट धार्मिक (सांस्कृतिक ?) संघटने बद्दल मला प्रेम वाटलेच पाहिजे , एका जहाल वैगेरे नेत्याला मी मुठी वळवून पाठींबा दिलाच पाहिजे आणि आरक्षण व अल्पसंख्यक लोकांबद्दल माझी अति जहाल मत असावीत अशा real आणि virtual आयुष्यात असणाऱ्या अपेक्षांचं काय करायचं हा खरा प्रश्न आहे हा माझ्यालेखी आपल्या लिखाणातला षट्कार आहे!!!!. मी शुद्ध इंग्रजीत विचारत असतो " व्हाय स्टीरियोटाईप ??" माझी तर केसच निराळी आजा अन त्याचे दोन भाऊ हिंसप्रसे चे सशस्त्र क्रांतिकारी होते, साक्षात चंद्रशेखर आझाद उर्फ पंडीतजी ह्यांनी क्रांतिदिक्षा दिलेले, मला माझा प्रत्येक ब्राह्मण मित्र काहीतरी वेगळ्या नजरेने पाहतो, अन बहुजन समाज "हा बामन" ह्या इंप्रेशन मधे असतो, आयडेंटीटी क्रायसिस होतो राव कधी कधी!!!

एका आव्हानात्मक विषयावर मोकळेपणाने व संयतपणे लिहिल्याबद्दल अभिनंदन. माझ्या सुदैवाने मला लहानपणापासून सर्व जातिधर्माच्या लोकांबरोबर राहायला मिळालं. वर्तमानपत्रं व मासिकांमधील बातम्यांमध्ये व वैचारिक लेखनांमध्ये जात्यंधपणाच्या बातम्या व उल्लेखांची प्रत्यक्षातली उदाहरणे मला स्वतःला फारच क्वचित दिसली. स्नातकोत्तर शिक्षणासाठी बारामतीला राहत असताना राज्याच्या इतर भागांतून आलेल्या काही सवंगड्यांच्या आचरणातून तीव्र जातीयात प्रथमच दिसली. इसकाळमध्ये अमेरिकेतील महाराष्ट्र / मराठी मंडळांच्या बातम्या प्रकाशित झाल्या की त्यावरच्या अनेक प्रतिसादकांचा रोख असतो की सदर सांस्कृतिक चळवळीवर ब्राह्मणांनी एकाधिकार निर्माण केला आहे. प्रत्यक्षात याविरुद्धची उदाहरणे नक्कीच पाहिली आहेत. मी स्वतः अनेक वर्षांपासून या चळवळींमधला स्वयंसेवक आहे. ना नफा ना तोटा या तत्वावर मंडळे चालत असल्याने जे अक्षरशः मजुरासारखे परिश्रम करतात ते चळवळीचा चेहरा बनतात. जे मंडळांच्या कार्यक्रमांना प्रेक्षक म्हणून येतात व परत जातात त्यांना कदाचित दूर ठेवले गेल्याची भावना होत असावी. बाकी आपल्याला पटो वा न पटो आपल्या समाजातली जातीयता हे कटू वास्तव आहे.

भाते 05/10/2014 - 20:36
ब्राम्हण असण्याचे सर्व फायदे ओरपून घेतल्यावर!!! काय फायदे मिळाले ब्राह्मण असल्याचे? मीसुध्दा ब्राह्मण आहे. च्यायला, दहावीनंतर त्या कुठल्यातरी 'अबक' जातीला ३८% मिळाले असताना महाविद्यालयात प्रवेश मिळतो आणि ५८% मिळालेल्याला केवळ (इतर/ब्राह्मण) जातीमुळे त्याच महाविद्यालयात प्रवेश नाकारला जातो! काय वय असतं दहावीला? जेमतेम १५-१६ वर्ष! तेव्हापासुन हा भेदभाव लक्षात आल्यावर पुढे त्याच्याकडुन काय अपेक्षा करणार? ७८% मिळालेल्याला ती जागा नाकारली गेली तर? काय करायची आहे ब्राह्मण जात! त्यापेक्षा 'अबक' जात लावली तर ३८% मिळवुनसुध्दा मिळतो ना त्याच महाविद्यालयात प्रवेश! मग कशाला करायचा वर्षभर अभ्यास रक्त अटवुन? अर्थात तो ३८% वाला अकरावीला चार विषयात नापास होतो. पण गेली/घालवली ना त्या ५८%/७८% मिळवलेल्याची जागा! दहावीला असताना मी हे अनुभवले आहे.

In reply to by भाते

उदयन 05/10/2014 - 21:06
७८% मिळालेल्याला ती जागा नाकारली गेली तर? काय करायची आहे ब्राह्मण जात! त्यापेक्षा 'अबक' जात लावली तर ३८% मिळवुनसुध्दा मिळतो ना त्याच महाविद्यालयात प्रवेश! मग कशाला करायचा वर्षभर अभ्यास रक्त अटवुन? ----------------- तुमचे म्हणने रास्त आहे. पण हे केवळ गेले ३०-४० वर्षापासुनच सुरु झाले. तरी तुम्हाला इतका राग. मग विचार करा वर्षानुवर्षे मार्क देणे तर दुर राहिले ज्यांना शिक्षणापासुन देखील वंचित ठेवलेले अशांचे विचार काय असतील ? १५-१६ तर लांबची गोष्ट आहे अजुन ही बर्याच ठिकाणी ५-६ वर्षाच्या मुलांना देखील दुय्यम स्वरुपाची वागणुक मिळते

In reply to by उदयन

ज्ञानव 06/10/2014 - 11:46
पण हा वंचितपणा ब्राम्हणांनी दिला का ? पूर्वीच्या सर्व अत्याचारांचे खापर फक्त ब्राह्मणांवर फोडणे कितपत योग्य आहे. राजकारण हे कायम क्षत्रियांच्या हातात होते त्यांनी का प्रयत्न केले नाहीत सर्वांना योग्य शिक्षण मिळवून देण्याचे ? भातेसाहेब म्हणतात तोच प्रश्न मला पडतो नक्की आम्ही काय फायदे

ओरपले?!!!!

In reply to by भाते

सुहास.. 06/10/2014 - 17:35
डिसक्लेमर : प्रतिसादात जाती-पातीचा उल्लेख केवळ रेफरन्स करिता होय सहानभुतीच !! सर्वच समाजासाठी ... धागा व्यापक असला तरी त्याबाबत अज्ञभिन्न असलेला गट मात्र त्यातील व्यापकता समजण्याकरता पूर्वग्रहाने येणार हे जरी ग्रहीत धरत असलो तरी, तुम्ही म्हणता तितकी अधोगती ( झाली तर काही अंशी का असेना प्रगतीच म्हणेन मी ) झालेली नाही. समाजात कोणीएके काळी असलेली कट्टरता मात्र काही अंशी कमी झाली असे ही याला जोडुन मी म्हणेन. अर्थात तुम्हाला...आय मीन लेखाला विवेकी बुध्दीने आणि समान नजरेने बघणारे कमी आहेत. ( हल्ली काय आहे ना ..लोक गीता देखील त्यात स्वःताचा अर्थ घालुन वाचतात..खरा अर्थ जो आहे तो त्या कृष्णदेवालाच ठाउक ! ) ही उदाहरणे आहेत , समाज दुभंगल्याची, माझ्याकडे उदाहरणे आहेत जिथे मी एकवटल्याचे पाहिले आहे, बेटी चा नसेल जास्त प्रमाणात व्यवहार पण रोटीचा व्यवहार आहे. माझ्या ओळखीच्या एका कडक वैष्णव ब्राम्हणाने, घरात कडाडुन विरोध असुन एका अनाथ मुली शी लग्न केल्याचे उदाहरण आहे ( या अनाथालयात फक्त वेश्यांच्याच मुली असतात ). आज कित्येक वर्षे सुखाचा संसार करतोय, असे दलीत-मुस्लीम-ब्राम्हण-मराठा एकत्र पार्टीला पाहिलेत ..माझा सांगतो अनुभव , पेग क्रमांक तीन, तो मराठा, त्याच्यासमोर बसलेला ब्राम्हण आहे , दलीत एका बाजुला , तिघांना एका प्लेटमध्ये 'प्लेन चीज ' खाताना पाहिलय, वाद चालु आहे " शहाण्णव कुळी म्हणजे काय आहे माहीत आहे का ? " समोरुन आवाज " परशुरामाने काय २१ की ५२ वेळा नि:क्षत्रीय केलीय " याच पार्टीत चौथा देशस्थ म्हणतो " ओ, चित्पावन, गप्प बसा आता " आणि सरते शेवटी सगळे मिळुन दाल-खिचडी खातात, बनविणाना मुस्लीम आहे की नाही याचा विचार न करता ? काय म्हणाल याला ? सावरकर जेवत नव्हते दलीतांच्या पंगतीत? मी स्वःता कितीतरी दलीत भक्त पाहिलेत सावरकरांचे ! आहेत काही ! पब्लीक जरा भयताड झालय ! सुरुवात मी मिपावरच्या एका उदाहरणाने देतो, एरवी वाचन-मात्र असलेला आयडी असे काही धागे दिसले की लगेच " काडीमात्र" होतात, ब्राम्हण्य आणी त्याच श्रेष्ठत्व टिकविण्याची त्या आयडी ची मरमर ( आधी कुत्तरओढ असा शब्द लिहीला होता ) पाहिली की अक्षरशः किळस येते , याचा अर्थ सोनवणींच्या ब्लॉग ची वा चेपुवर ते काय " संभाजी ब्रिगेड - भटांचा कर्दनकाळ " ची येत नाही असे काही नाही , मला त्याहुनी जास्त येते !! कोणीतरी वाघमारे म्हणुन आहेत ..ब्लॉक करुन टाकले मी शेवटी चेपुवर ...हे असे अनेक किस्से आहे ..जात लागते ती एकदा का निवड्णुका जाहीर झाल्या की ( काय च्या मारी ! पण मी आशावादी आहे, एक ना एक दिवस हे ही चित्र बदलेल ) थोडेसे आरक्षणाविषयी .. मी ब्राम्हण वर्गाचा राग समजु शकतो ..पण काही करु शकत नाही, खर तर ! सध्या कोणीच काही करु शकत नाही (अगदी समान नागरी कायदा ही ) आरक्षणाला लागुन एक कलम आहे , की दरवर्षी आरक्षितांच 'समाजातील' प्रमाण आणि शैक्षणिक पातळीवरच, सरकारी नौकर्‍यांमधल प्रमाण, सम ( सारखं ) झाल की मग ते लगेच रद्द होवु शकते. जातीनिहाय जणगणना होते ती यामुळेच !! आणि आरक्षणाच्या मुदतीची डेट पुढे ढकलावी ते ही याच मुळे !! फायदे-तोटे ही आहेत, आहे थोडी प्रगती आहे ! पण काय करणार समाज इतका जात-पात मानतो की विचारु नका, :( आधी राजस्थान राज्य सरकार ला गुज्जर समाज आरक्षित करता आला, आता कॉन्ग्रेस ने मराठा ला दिलं, हे मराठा समाजाच झाल असे की , त्या आधी मराठा- कुणबी समाज आरक्षित होता, आता हे कुणबी म्हणजेच ९६ कुळी म्हणणारे काही आणि ९६ कुळी च कुणबी म्हणनारे काही, त्यांचा टक्का बघीतला गेला आणि राज्य सरकार ने देवुन टाकल आरक्षण !! ) फायदा होईल की नाही माहीत नाही ( आपल्या राज्य सरकारकडे साध्या पोलीस भरत्या करायला वेळ नाही, उगा राजकारण तिज्यायला ! ) ब्राम्हण समाजाच हे असं होत, सामाजिक दृष्ट्या समाज दुर्बल दिसत नाही ( एकही किस्सा आठवेना मला ज्यामध्ये दलीत मुलीने ब्राम्ह्ण वा उच्चजातीतील मुलाशी प्रेम केले म्हणुन दलीतांनी ब्राम्हण/उच्चवर्णीयाची हत्या केली ती) , आर्थिक दृष्ट्या बघावं तर ( तुम्हाला इथलेच किती-तरी लोक्स परदेशात सेटल झालेले दाखवेल मी ) असेल एखादा दुसरं गंविनी लिहिल्याप्रमाण, मुळात लक्षात घेतला जातो ते टक्का ! अश्या कित्येक बाबी आरक्षणची डेट वाढविताना लक्षात घेण्यात येतात, वाजपेंयी नी एकदा असा अहवाल मागविला होता, वर्ष आठवत नाही , पण त्यांनी तो पाहिल्यावर ते थक्कच झाले होते , केवळ ४० % आरक्षितापर्यंत च आरक्षणाचे फायदे पोचले होते, त्यांना तो गुंडाळुन ठेवावा लागला आणि उलट ते प्रकरण हाताशी धरुन मायावती खाजगी क्षेत्रातही आरक्षण द्या ही मागणी पुढे ढकलली होती. आणि मला वाटते मागाहुन कॉन्ग्रेस कडुन प्रमोशन मध्येही आरक्षण मंजुर करून घेतले होते ! पण आता याचा अर्थ असा नाही की दलीत समाज आरक्षणाच्या विरुध्द नाही , एक खुप मोठा गट आहे, विषेशतः प्रकाश आबेंडकराना मानणारा, त्याच म्हणणे असे आहे की जात ही टीसी मधुनच काढुन टाका, मग ती कोणती का असेना, आणि क्लॅरिटी आणा ! सर्वच क्षेत्रात, मग ती शैक्षणिक असो वा सरकारी नौकर्‍या, पारदर्शकता आणा !! लायकी ही सिध्द होईल , पण यामुळे राजकारण्यांना एक सर्वात मोठा तोटा होवु शकतो ...असे केले सर्व समाज एकवटेल , मग यांना जाती-पातीची आणि मुळे मते कशी मिळतील ( आठवा , बापटअण्णांना तिकीट न मिळाल्याने आणि कुठला ब्राम्ह्ण उमेदवार नसल्याने " पुणे ब्राम्हण सभेने मतदानावर टाकलेला बहिष्कार, खर सांगा असे वांझोटे धंदे केल्यावर कसा एकवटणार समाज ) मी तर काही लोकांना तो एकवटु नये म्हणुन ही शर्थीचे प्रयत्न करताना पाहिले आहे ! ब्राम्हण मित्राच्या, नितीन आगेच्या ब्रुटल मर्डर विषयीच्या, निषेधात्मक पोस्ट वर, " अंथरुण पाहुन पाय पसरावे " अशी मराठा समाजाचे आडनाव असलेल्या ची कमेंट आल्यावर काय समजायचे मातंग समाजाच्या लोकांनी... इथल्या काही कमेंट वाचल्यावर तर मीही त्याविषयी लिहायचचं बंद केले . .. आहेत अश्या बर्‍याच थेरॉटिकल गोष्टी , ज्याचा मागमुस ही नसतो लोकांना . प्रॅक्टीकली होते असे की , ब्राम्हण ब्राम्हण संस्काराच्या चौकटीत जगतो , दलीत दलीत मध्ये , मुस्लीम मुस्लीम चौकटी मध्ये, मराठा मराठा मध्ये त्यामूळे माझ्या जातीतील मुल्ये श्रेष्ठ्च असे बिंबविले जाते मग मी श्रेष्ठ म्हटल आपोआप दुसरा कनिष्ठ होतो !! हे मनामध्ये हळु-हळु वाढत जाते ......खुप कमी लोक असतात जी ही चौकट मोडतात आणि तेच वर तुम्ही विचारलेल्या प्रश्नाच उत्तर आहे . धन्यवाद !

In reply to by सुहास..

मृत्युन्जय 07/10/2014 - 12:02
+ १ फक्त एका बाबतीत थोडासा विरोध आहे सुहास. लग्न आणि त्यातुन झालेल्या हत्यांबद्दल. उच्चवर्णीयांनी निम्न वर्णीय कुटुंबातील मुलांची आणि मुलींची (उच्चवर्णीय मुलांना अथवा मुलींना फूस लावली म्हणून) हत्या केल्याची कैक उदाहरणे मिळतील. तु म्हणतोस त्याप्रमाणे उलटे झाल्याचे दिसत नाही. उच्चवर्णीयांनी केलेल्या या हत्यांमध्ये ब्राह्मणांनी केलेल्या हत्या किती आढळतात आणि त्यातही महारष्ट्रीय ब्राह्मणांनी केलेल्या किती आढळतात? त्यामानाने इतर जातींनी केलेल्या आधिक आढळतील. खैरलांजी प्रकरण कशाचे द्योतक म्हणता येइल? तिथे उच्चवर्णीयांनी निम्नवर्णीयांची हत्या केली (लग्न संबंधात नाही). उच्चवर्णीय म्ह्णजे कुणबी. निम्नवर्णीय होते महार. लातुर मध्ये बरोबर उलटी घटना देखील दिसुन येते. महाराष्ट्रात बघितले तर जातीपातीवरौन उच्चवर्णीयांनी केलेल्या हत्यांमध्ये ब्राह्मणांनी केलेल्या हत्या फारच कमी प्रमाणात आढळतील. इतर जातींनी केलेल्या निम्नवर्णीयांच्या हत्या अधिक सापडतील. ब्राह्मणांनी केलेल्या निम्नवर्णीयांच्या हत्येचे प्रमाण उत्तर प्रदेशात अधिक आढळेल. हे सर्व सांगण्याचे कारण इतर कुठल्या जातीवर ठपका ठेवायचे नसुन फक्त हे सांगण्याचे आहे की महाराष्ट्रातीय ब्राह्मणवर्ग उर्वरीत भारतातल्या ब्राह्मणांपेक्षा बराच सुधारित आहे. त्यामुळेच अस्पृश्य निवारणाची चळवल सुरुही महाराष्ट्रात झाली आणि वाढलीही इथेच. महाराष्ट्रीयन समाजातच कर्वे, आगरकर, सावरकर आणि रानडे यांसारखे जातीभेदाविरुद्ध आवाज उठवणारे समाजधुरीण निर्माण होउ शकले. दुसरी दुर्दैवी गोष्ट अशी की अस्पृश्यता जणु ब्राह्मणांनी निर्माण केली आणी जातिभेद त्यांच्यामुळेच वाढला असे चित्र निर्माण केले जाते, तसे असेल तर मग आज खैरलांजीसारख्या घटना का होतात? इतर जातीतले लोक इतकी अस्पृश्यता आणि जातिभेद का पाळतात? थोडेसे आरक्षणाबद्दल. आरक्षण सुरु होउन ६० वर्षे उलटली. जेव्हा सुरु झाले तेव्हा मागस वर्ग निश्चित केला नव्हता का? केलाच होता ना? मग ६० वर्षात त्या मागास वर्गात कुणबी, गुज्जर, मराठा अशी भर कशी काय पडली? हे उलटे आरक्षण नक्की कशाचे द्योतक आहे? ब्राह्मण सोडुन सगळे आरक्षित का? मराठा समाजाला आरक्षणाची गरज नक्की का भासते? तो समाज पहिल्यापासुन सधन, शिक्षित आणि राज्यकर्ता नाही का? मग त्यांना आरक्षण का? आरक्षण हे गरज म्हणुन न वापरले जाता एक राजकीय साधन म्हणुन वापरले जाते हे खेदजनक आहे. आरक्षण वाटल्यास अजुन १०० वर्षे ठेवा पण त्यांच्यासाठी ज्यांना याची गरज आहे. आरक्षित समाजातील सनदी अधिकार्‍यांची मुले अजुनही आरक्षणाचा उपभोग का घेतात (फक्त सनदी अधिकारी असेच नाही तर मध्यमवर्गीय किंवा खाउन पिउन सुखी असलेले कनिष्ठ मध्यमवर्गीयांचेही उदाहरण घे). त्यांना अजुन किती काळ आरक्षण? ते लोक अजुनही उद्धारित नाही झालेले का? निम्नवर्णीय पण अजुनही आर्थिअक्दृष्ट्या दुर्बल असलेल्या लोकांना अजुनही आरक्षणाचा लाभ दिला तर एकवेळ समजु शकतो पण शिक्षित आणि सधन लोकांना का? एक नाही अनेक उदाहरणे देतो. माझ्या डोळ्यासमोर घडलेली. सधन बांधकामव्यावसिकाचा मुलगा, कॉर्पोरेट क्षेत्रातल्या एका बड्या अधिकार्‍याची मुलगी, एका सधन महाविद्यालयीन प्राध्यापकाची मुलगी असे अजुनही अनेक लोक पाहण्यात आले ज्यांनी महाविद्यालयातच नव्हे तर वैद्यकीय अभ्यासक्रमात आणि एमबीए च्या अभ्यासक्रमासाठीही आरक्षणाचा लाभ घेतला. त्यांना खरेच आरक्षणाची गरज होती का आणि आरक्षण त्यांचा अधिकार होता का? समजा काही शतके उच्चवर्णीयांनी निम्नवर्णीयांचे शोषण केले. मग आता कालचक्र उलटे फिरवायचे का? आणि ब्राह्मणांचे शोषण करायचे का? की जितकी शतके शोषण झाले तितकी शतके आरक्षण चालु ठेवायचे? आणि किती शतके मागे जायचे? आणि ठरवा एकदाचे की शोषण नक्की कोणाचे झाले. राज्यकर्त्या मराठा समाजाचे? सधन कुणबी आणी धनगर समाजाचे? असो. चर्चा करु तितकी कमीच आहे. उत्तरे कुणाकडेच नाहित. उगाच चिखलफेक करण्यात काही हशील नाही. अवांतरः प्रतिसाद जरी तुझ्या प्रतिसादाला उप प्रतिसाद म्हणून असेल तरी हा प्रतिसाद तुझा प्रतिसाद मान्य नाही म्हणुन दिलेला नाही तर त्या अनुषंगाने लिहावेसे वाटले म्हणुन दिलेला आहे. तुझा प्रतिसाद पटलेला आहेच.

In reply to by मृत्युन्जय

एस 07/10/2014 - 13:04
सधन बांधकामव्यावसिकाचा मुलगा, कॉर्पोरेट क्षेत्रातल्या एका बड्या अधिकार्‍याची मुलगी, एका सधन महाविद्यालयीन प्राध्यापकाची मुलगी असे अजुनही अनेक लोक पाहण्यात आले ज्यांनी महाविद्यालयातच नव्हे तर वैद्यकीय अभ्यासक्रमात आणि एमबीए च्या अभ्यासक्रमासाठीही आरक्षणाचा लाभ घेतला. त्यांना खरेच आरक्षणाची गरज होती का आणि आरक्षण त्यांचा अधिकार होता का?
फक्त एवढ्या एका मुद्द्याबद्दल बोलायचे झाले तर आरक्षण घेणे ही बर्‍याचदा सवलत लाटणे ह्या उद्देशाने नसून तसे ते घ्यावे लागते कारण खुल्या वर्गातून प्रवेश/नोकरी स्वीकारली तर पुढे आरक्षण म्हणा किंवा शिष्यवृत्ती म्हणा, अशा कुठल्याच बाबींचा लाभ होत नाही. ह्याची दुसरी बाजू अशी की पुरेसे मार्क असूनही जर खुल्या वर्गातून प्रवेश घेतला तरीही त्या वर्गातील एक सीट अडवल्याचाही दोष लागतो. त्यामुळे आरक्षण घेतले तर सवर्ण सहाध्यायांच्या नजरेतील 'सरकारी ब्राह्मण' अशी तुच्छता सोसणे आणि नाही घेतले तर आमची एक सीट अडवली म्हणून राग ओढवून घेणे अशा दुहेरी कात्रीत लोक सापडतात हो! मी माझ्यापुरतं जात-धर्म-वंश वगैरे संपवून टाकलं आहे, म्हणून समोरचा मला त्याच्या चष्म्यातून पाहणं थांबवत नाही ही खरी मेख आहे. जाऊ द्यात! या विषयावर अजून बोलायची इच्छा नाही.

In reply to by एस

सह्यमित्र 07/10/2014 - 15:03
हे तितकेसे पटत नाहि. बऱ्याचदा असे बघण्यात आले आहे कि आर्थिक दृष्ट्या अतिशय सधन असणार्यांच्या मुलाना पुरेसे मार्क नसताना केवळ आरक्षणा च्या लाभा मुळे प्रवेश मिळतो काही वेळेला फी मध्ये सवलत देखील आणि आर्थिक दृष्ट्या निम्न पण केवळ उच्चवर्णीय असल्या मुळे प्रवेश मिळत नाहि. अशीच उदाहरणे पाहण्यात जास्त आलि आहेत.

In reply to by एस

सुबोध खरे 07/10/2014 - 18:46
देवयानी खोब्रागडे यांचे वडील उच्च स्तरीय(प्रमुख सचिव) आय ए एस अधिकारी होते ना मग त्यांनी आपल्या वैद्यकीय प्रवेशासाठी आणी नंतरच्या विदेश सेवेसाठी त्यांनी आरक्षण वापरलेच. (शिवाय त्यांचा मुंबईत एक फ्लैट असताना आदर्श मध्ये त्यांना दुसरा फ्लैट मंजूर झाला आणी हे त्यांच्या वडिलांना "माहित" नव्हते). अशा उच्च स्तरीय अधिकार्याच्या अपत्यांना आरक्षण दिल्यामुळे त्याच कोट्यातील कोणा खरोखरीच गरज असलेल्या मागास वर्गीयावर अन्यायच होतो. वैद्यकीय महाविद्यालयाचे शिक्षण शुल्क सर्वाना एक लाख आहे तर मागास वर्गीयांना १० हजार आहे. ज्यांचे वडील अत्युच्च दर्जाचे शासकीय अधिकारी आहेत त्यांना हि फी ची सवलत म्हणजे अपात्री दान आहे. आरक्षण ठेवावे पण त्याला क्रिमी लेयर लागू करावा. सध्या तो फक्त इतर मागास वर्गाला लागू आहे तो सर्व आरक्षणाला लागू करावा म्हणजे जे त्या वर्गातील खरोखर गरजू आहेत त्यांना त्याचा लाभ मिळू शकेल. ( हा एक मोठा वादग्रस्त राजकीय निर्णय आहे आणि कोणीही नेता हा निखारा आपल्या अस्तनीत ठेवणार नाही हेही मला माहीत आहे ).

In reply to by सुबोध खरे

सुहास.. 07/10/2014 - 18:56
उच्च स्तरीय अधिकार्याच्या अपत्यांना आरक्षण दिल्यामुळे त्याच कोट्यातील कोणा खरोखरीच गरज असलेल्या मागास वर्गीयावर अन्यायच होतो. +१ आरक्षण ठेवावे पण त्याला क्रिमी लेयर लागू करावा. सध्या तो फक्त इतर मागास वर्गाला लागू आहे तो सर्व आरक्षणाला लागू करावा म्हणजे जे त्या वर्गातील खरोखर गरजू आहेत त्यांना त्याचा लाभ मिळू शकेल. >>> यावर मौनीबाबाचं सरकार विचार करत होते , अहवाल धुळ खात पडुन आहे असे सध्यातरी एकुन आहे !! कोणीतरी या विषयावर ' जनहित याचिका ' टाकायला हवी , माझा अभ्यास चालु आहे यावर ..खात्रीने सांगतो हा विषय खरोखरच चिंताजनक आहे !! नक्कीच कधी ना कधी हा विषय घेईल मी ...किमान याचिका दाखल करण्याबाबत तरी असो , बाकी सर्वांनी माझ्या प्रतिसादावर जी चर्चा आरंभली आहे त्यांचे धन्यवाद , आवडते ही आहे ...!! मी सविस्तर लिहेन वेळ मिळेल तसा ..

In reply to by सुबोध खरे

अजया 07/10/2014 - 19:13
हा अनुभव मी पण घेतलाय.नावाने मागासवर्गीय, सरकारी पदस्थांची अत्यंत कमी गुण मिळवुन आलेली धनाढ्य मुलं!! मात्र चार वर्ष पास होता होता नाकात दम आलेली!!

In reply to by सुबोध खरे

चिगो 08/10/2014 - 16:34
आरक्षण ठेवावे पण त्याला क्रिमी लेयर लागू करावा. सध्या तो फक्त इतर मागास वर्गाला लागू आहे तो सर्व आरक्षणाला लागू करावा म्हणजे जे त्या वर्गातील खरोखर गरजू आहेत त्यांना त्याचा लाभ मिळू शकेल.
ह्याच मुद्द्यावरुन सुमारे दोन वर्षांपुर्वी लिहीलेल्या लेखाची ही झैरात..

In reply to by मृत्युन्जय

सहमत. आरक्षण वाटल्यास अजुन १०० वर्षे ठेवा पण त्यांच्यासाठी ज्यांना याची गरज आहे. माझे तर म्हणणे आहे कांही टक्के आरक्षण ठेवण्या ऐवजी १०० टक्के आरक्षित महाविद्यालये सुरु करा. आधी आरक्षणाचा फायदा घेऊन जे उच्च शिक्षित झाले आहेत त्यांनी ह्या महाविद्यालयातून आपल्या बांधवांना ज्ञानदान करावं. तिथे कोणाही उच्चवर्णियांना प्रवेश नसावा. शिपाई ते मुख्याध्यापक सर्व फक्त मागास वर्गातूनच पुढे आलेले असावेत. सर्व मागास विद्यार्थ्यांना अशा महाविद्यालयातून प्रवेश मिळावा. बाकी सर्व महाविद्यालयामधून इतरांना (ओपन वर्ग) प्रवेश द्यावा. मागास विद्यार्थ्यांनाही अशा (ओपन) वर्गात प्रवेश हवा असेल तर गुणवत्तेवर देण्यात यावा. तिथे कुठलेही आरक्षण नसावे.

In reply to by प्रभाकर पेठकर

इरसाल 07/10/2014 - 15:00
आधी आरक्षणाचा फायदा घेऊन जे उच्च शिक्षित झाले आहेत त्यांनी ह्या महाविद्यालयातून आपल्या बांधवांना ज्ञानदान करावं. काका तुमचा डाव कळला हं मला, अस सांगा ना की तिथे अ‍ॅडमिशन घेणार्‍या मुलांना, तुम्हाला शिकुच द्यायचे नाही. ;)

In reply to by इरसाल

अस सांगा ना की तिथे अ‍ॅडमिशन घेणार्‍या मुलांना, तुम्हाला शिकुच द्यायचे नाही. का बरं? असं का वाटलं? मागास वर्गात आपल्या बांधवांना शिकवू शकतील असे ज्ञानी नाहीत की स्वतः शिकल्यावर ते समदु:खी बांधवांचा कैवार घेऊ इच्छित नाहीत? डॉ. आंबेडकरांपासून डॉ. नरेन्द्र जाधवांपर्यंत अनेक ज्ञानी पुरुष मागास वर्गात होऊन गेलेत आणि अजूनही आहेत. आपल्या ज्ञाती बांधवांना शिकवू शकतील असे कांही प्रोफेसर मिळू शकणार नाहीत? अशा व्यवस्थेत मागासांना शिक्षणही मिळेल आणि राजकार॑ण्यांना गलिच्छ राजकारण करायची संधी मिळणार नाही शिवाय पुढारलेले आणि मागास अशी दरीही उरणार नाही.

In reply to by सुहास..

राजाभाउ 07/10/2014 - 13:39
+१ अतिशय सुंदर प्रतिसाद. मला जवळपास असेच वाटते पण एतके व्यवस्थीत मांडता आले नसते. धन्यवाद सुहास

श्रीगुरुजी 05/10/2014 - 21:05
तुम्हाला जे अनुभव आले तसले अनुभव मला कधीही आलेले नाहीत. उलट ब्राह्मण हा विषय जास्त करून टिंगलीचा, उपहासाचा व मत्सराचा असल्याचे अनुभव आहेत. >>> ब्राम्हण असण्याचे सर्व फायदे ओरपून घेतल्यावर आता त्यातून निर्माण होणारया ऐतिहासिक ओझ्यांपासून (जाती व्यवस्था निर्मिती , दलितांवर अत्याचार ) आता दूर जाता येईल का ? खरं तर ब्राह्मण असण्याचे फायदे कमी व तोटे जास्त आहेत. आता तर मराठा व मुस्लिम राखीव जागांमुळे तोटे अजूनच वाढले आहेत. ब्राह्मण असण्याचे नक्की कोणते फायदे ब्राह्मण ओरपतात ते सांगता का जरा? म्हणजे लग्नकार्यात, सत्यनारायणाची पूजा वगैरे कार्यात भटजींना जी दक्षिणा मिळते तो फायदा तुम्हाला अपेक्षित आहे का?

ब्राम्हण असल्याचे फायदे असण्यापेक्षा तोटे जास्त आहेत हे खरं. पण एक गोष्ट सर्व जाती जमातीमधल्या लोकांनी लक्षात घ्यावी ही कळकळीची विनंती. आरक्षण झगडायची ताकद कमी करेल. आयतं किंवा कमी कष्टात मिळालेली गोष्ट फार का़ळं टिकत नाही. मे बी आज नाही, पण साधारण १००-२०० वर्षांनी जेव्हा सर्व आरक्षित लोकं आरक्षण टेकन फॉर ग्रँटेड घेतील त्यादिवशी स्वतःचा नाश ओढवुन घेतील. प्रॅक्टीकल जगामधे, कामामधे ब्राम्हण असो वा दुसरा कोणी, जर का कामाचा नसेल तर टिकु शकणार नाही. त्यामुळे झगडायचं विसरु नका, कष्टाला पर्याय नाही. सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट ह्या नियमात कोणीही तुम्हाला आरक्षण देणार नाहीये.

In reply to by सस्नेह

सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट हा नियम जगातल्या प्रत्येक सजीव आणि निर्जीव गोष्टीला लागु होतो. जी गोष्ट वापरात राहात नाही ती कालौघात नष्ट होते हा इतिहास आहे आणि राहील.

In reply to by सस्नेह

एका समाजाला वारंवार वापरण्याची संधी मिळाली..म्हणून वृद्धी दुसर्याला अनेक पिढ्या ती नाकारली गेली .., ~हास !
अगदी बरोबर. पण त्याबरोबर ही पण गोष्ट लक्षात घेतली पाहीजे की संधी नाकारणारे हा समाजाचा एक भाग होते आणि संपुर्ण समाज नव्हे. त्यामुळे सर्व समाजाचा द्वेश करणे योग्य नाही. मा़झ्याच ब्राम्हण समाजाच्या काही लोकांनी नाकारलेल्या लोकांना संधी उपलब्ध करुन देण्यामधे सिंहाचा वाटा उचलला ही गोष्ट सोयिस्करपणे विस्मरणात जाऊ नये म्हणुन हा लेखनप्रपंच.

दशानन 05/10/2014 - 22:18
बुरा जो देखन मैं चला, बुरा न मिलिया कोय। जो मन खोजा अपना, मुझ-सा बुरा न कोय।। - कबीर आजच कबीर वाचत होतो, त्यात हा मला आवडलेला दोहा मी नोट करून ठेवला होता. काही गोष्टी आपल्या हातात नसतात, जसा की आपला जन्म!

पैसा 05/10/2014 - 22:47
मी ब्राम्हण आहे म्हणजे मला वपु काळे आणि देशपांडे आवडलेच पाहिजेत , कुठेतरी कसलेतरी मंदिर बांधण्याच्या मोहिमेला माझा पाठींबा असलाच पाहिजे , एका विशिष्ट धार्मिक (सांस्कृतिक ?) संघटने बद्दल मला प्रेम वाटलेच पाहिजे , एका जहाल वैगेरे नेत्याला मी मुठी वळवून पाठींबा दिलाच पाहिजे आणि आरक्षण व अल्पसंख्यक लोकांबद्दल माझी अति जहाल मत असावीत अशा real आणि virtual आयुष्यात असणाऱ्या अपेक्षांचं काय करायचं हा खरा प्रश्न आहे .
हे फारच धाडसी वक्तव्य आहे. व पु काळे आणि देशपांडे ही नावेसुद्धा माहिती नसलेले कित्येक ब्राह्मण मला माहित आहेत. मला स्वतःला व पु काळे अजिबात आवडत नाहीत, पु ल काही ठिकाणी आवडतात. तसेच यातल्या इतर विधानांच्याबाबत माझं उत्तर नकारार्थीच असेल मात्र माझी जात कोणती हे असं तुमच्यासारख्या कोणीतरी लिहिल्यावरच लक्षात येतं. एरवी नाही. ब्राह्मण समाजातसुद्धा अज्ञान, दारिद्र्य, अंधश्रद्धा अजूनही किती प्रमाणात आहे हे माहिती करून घ्यायचं असेल तर ह.मो. मराठ्यांचं 'बालकांड' वाचा. उपरा किंवा बलुतं इतकाच दाहक आणि अस्वस्थ करणारा अनुभव मिळेल. तुमचं आतापर्यंतचं एकूण लिखाण प्रचंड प्रमाणात सरसकट म्हणावं असं असतं, किंवा मला माहिती आहे तेवढंच जग अशी तुमची भूमिका बरेचदा दिसते. हा लेखही त्याला अपवाद नाही. या लेखावर "वा वा काय छान लिहिलंय" असं मला म्हणून बाजूला रहाता आलं असतंच किंवा संपूर्ण दुर्लक्षही करता आलं असतं, पण तुम्ही लिहिली आहे तेवढी एकच बाजू या गोष्टीला नाही हे सांगण्यासाठी हा प्रतिसाद. याव्यतिरिक्त चर्चेला विनाकारण आरक्षण वगैरे वळणं लागणार असं दिसतंय. ते एक असोच. या संदर्भात मार्मिक गोडसे यांचा मिपावर हल्लीच आलेला लेख आठवला. असो. तेवढी मॅच्युरिटी सगळ्यांकडून अपेक्षित नाही.

In reply to by पैसा

रेवती 05/10/2014 - 23:05
सहमत आहेच पण हा विषय इतक्या जास्तवेळा चघळला जाऊनही तू प्रतिसादास टंकाळा केला नाहीस म्हणून धन्यवाद. मला भयंकर टंकाळा आलाय. ज्यांना यापलिकडे पाहणं जमतं ते या चर्चेत फारसे नसतात.

In reply to by पैसा

निश 06/10/2014 - 12:26
पैसा ताईशी १००% सहमत. ह मो मराठे ह्यांचे बालकांण्ड हे वाचताना खरच रडु येत.ब्राम्हण आहे म्हणुन त्याना कष्ट करावे लागत नाही अस मुळिच नाही. जेव्हा माणुस कष्ट करुन मोठा होतो समाजात नाव करतो त्याचा अभिमान खरच बाळगला पाहीजे मग तो कुठ्ल्याही जातीचाही का असेना. मी ब्राम्हण आहे पण अस असताना मला ही खंत व दु:ख नक्कीच आहे की माझ्या आधीच्या पिढी़कडुन दलित समाजावर अन्याय झाला आहे पण मी त्याना दलित न समजता माझ्यासारखीच माणुस म्हणुन समजतो व हे ही सांगतो की आज त्या समाजातले माझे मित्र फार खुप मोठया स्थानी आहेत. आणि मला त्याचा खुप अभिमान आहे. माणसाला संधी दिली की तो कोणीहि का असेना तो त्याच्या प्रयत्नानि त्या संधीचे सोन करतो हे मात्र खर.

In reply to by निश

vikramaditya 06/10/2014 - 16:23
चांगले लिहिलेत. पुर्वी अमानुष अत्याचार करण्यात आले ह्यात काही शंका नाही. तसेच
माणसाला संधी दिली की तो कोणीहि का असेना तो त्याच्या प्रयत्नानि त्या संधीचे सोन करतो हे मात्र खर.
हे वाक्य पटले.

In reply to by पैसा

एकूण लिखाण प्रचंड प्रमाणात सरसकट म्हणावं असं असतं, किंवा मला माहिती आहे तेवढंच जग अशी तुमची भूमिका बरेचदा दिसते. हा लेखही त्याला अपवाद नाही.
अगदी +१००. एकूणच काय की कोणत्याही माणसाचे जात-धर्म इत्यादी चष्म्यांमधून न बघता एक माणूस म्हणून मूल्यमापन व्हावे असे म्हणणारे लोकच त्याच चष्म्यांचा वापर करून ब्राह्मणांविरूध्द काहीतरी लिहितात ते बघून त्या दुटप्पीपणाचा भयंकर संताप येतो.या चष्म्यांचा वापर करून इतर जातींविषयी काही लिहिले की तो माणूस मोठा पुराणमतवादी पण ब्राह्मणांविषयी काही लिहिले की तो माणूस मात्र मोठा आधुनिक विचारांचा, पुरोगामी इत्यादी ठरतो. लेख आणि त्यातून होणारे सरसकटीकरण अजिबात आवडले नाही.विशेषतः कट्ट्यांवर एकाच जातीच्या लोकांचे वर्चस्व का असते यावर "तुम्ही आतापर्यंत किती कट्टे अटेंड केले आहेत" या प्रश्नावरील मौनच बरेच काही सांगून जाते.म्हणजे हे महाशय एकाही कट्ट्याला जाणार नाहीत आणि तरीही छातीठोक दावा करणार की कट्ट्यावर एका जातीच्या लोकांचे वर्चस्व असते!! याला उंटावरून शेळ्या हाकणे म्हणतात. बाकी काही नाही.

In reply to by पैसा

प्रदीप 06/10/2014 - 20:34
अत्यंत चपखल आहे, अतिशय आवडला. बालकांडचा* ह्या संदर्भातील उल्लेख सोडून, १०० % सहमत. * 'बालकांड' वाचल्यावर, मराठ्यांच्या वडिलांनी, स्वतःच्या विक्षीप्त स्वभावामुळे, स्वत:वर व स्वतःच्या कुटुंबावर दु:खे नाहक ओढवून घेतली, असे माझे मत झाले. म्हणून तेव्हढ्यापुरती सहमती नाही.

In reply to by प्रदीप

पैसा 06/10/2014 - 22:55
बालकांड च्या बाबतीत तुम्ही लिहिलंय ते १००% पटलं. ह.मो.मराठ्यांच्या वडिलांच्या विक्षिप्तपणामुळे त्यांना फार दु:खे सहन करावी लागली. मात्र ते कारण असलं तरी परिणाम जो झाला, (त्यांच्या आईच्या बाबतीत आजार असताना भूत लागलंय म्हणणे) तशा प्रकारचं दारिद्र्य आणि भुताखेतांनी झपाटलेले म्हणणे इ. अंधश्रद्धा मी लहान असताना सगळ्या जातींमधे, ब्राह्मणांमधेही पाहिल्या आहेत. त्यामुळे हे उदाहरण सहज आठवले ते इथे दिले. मात्र आठवायला बसलं तर श्री.ना.पेंडसे, दळवी आणि इतर कितीतरी लेखकांच्या लिखाणातून अशी उदाहरणे सहज देता येतील. या संदर्भात 'किरवंत' चीही आठवण झाली.

सस्नेह 05/10/2014 - 23:15
लेख छान आहे असे काही म्हणवत नाही. वैयक्तिक पातळीवर आलेले काही अनुभव तटस्थपणे मान्डण्यात लेखक यशस्वी झाला आहे एवढेच म्हणते. शेवटी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर कोणी देऊ शकेल असे वाटत नाही

भिंगरी 05/10/2014 - 23:25
मार्मिक गोडसे यांचा'आडनावाच्या आडून'या लेखातही अशाच प्रकारची माहिती दिसते.

खटपट्या 06/10/2014 - 00:36
मला माहित नाही कि हे अवांतर आहे कि नाही. आंतरजालावर शोध घेत असताना मला http://www.thebrahminsamaj.com/index.php या संकेतस्थळावर खालील विडिओ सापडला. http://www.youtube.com/watch?v=P7Xgc4ljHKM या विडिओवर काही ब्राह्मण जातीत जन्माला आलेले लोक झाडू मारणे किंवा साफसफाई करणे असली कामे नाईलाजास्तव करीत आहेत असे दिसते. आणि एकंदर सूर असा दिसला कि आम्ही ब्राह्मण असून आम्हाला अशी हलक्या दर्जाची कामे करावी लागत आहेत. झाडू मारणे, शौचालय साफ करणे ही ब्राह्मणाची कामे नाहीत, या मानसिकतेतून अजून कोणी बाहेर यायला तयार नाही. शारीरिक श्रमांची कामे करणे म्हणजे कमीपणा, असल्या मानसिकतेतून आपण बाहेर येणारच नाही आहोत का. जन्माने ब्राह्मण असलो म्हणजे आपण कोणीतरी उच्च आहोत आणि आपल्याला फक्त खुर्चीत बसायची कामे मिळणार, यातून बाहेर कधी पडणार. परदेशी सर्रास सर्व ब्राह्मण मुले उपहारगृहात कामे करतात. मग भारतातच काय होते?

In reply to by खटपट्या

"जन्माने ब्राह्मण असलो म्हणजे आपण कोणीतरी उच्च आहोत आणि आपल्याला फक्त खुर्चीत बसायची कामे मिळणार, यातून बाहेर कधी पडणार?" आमच्याच घरातील काही उदाहरणे. १. एका भावाला शिकण्याची आवड न्हवती.तो रिक्षा चालवायचा. २. दुसर्‍या भावाला पण शिकण्याची आवड न्हवती.तो टायपिंग शिकला आणि नौकरीला लागला. ३. तिसर्‍या भावाला व्यवहार ज्ञान भरपूर.तो आय.टी.आय. झाला.आज स्वतःचा व्यवसाय करतो. ४. चौथ्या भावाला व्यवहार ज्ञान प्रचंड. तो ११वी नापास. शिक्षणाचे सगळे कागद दहावीच्या मार्क-लिस्ट सकट बंबात टाकले.एका बिल्डरकडे १०रु.रोजावर सळ्या तोडायला लागला.थोडे वर्षांनी वायरिंगची कामे घ्यायला लागला. नंतर बरेच धंदे सुरू केले.आज वयाच्या ४७व्या वर्षी सगळे धंदे बंद करून मस्त मजेत जगत आहे. ५. पाचव्या भावाचे पुणे शहरात स्वतःचे गॅरेज आहे. ६. माझ्या एका मित्राचे वडील टाटा कं.त मोठ्या हुद्द्यावर होते.मुलगा जेमतेम बी.कॉम. झाला.पण आवड म्हणून गाड्या दुरुस्त करतो आणि आता त्यातच जम बसवून आहे. ७.ह्या भावाने स्वतःचे पैसे शेयर मध्ये गुंतवून रोज स्वतःपुरते कमावतो. ह्यातला एक टायपिंग करणारा सोडला तर इतर सगळे रस्त्यावरच धंदा करतात. असो... अजूनही खूप उदाहरणे देता येतील.

In reply to by मुक्त विहारि

खटपट्या 06/10/2014 - 04:35
सर, बरोबर आहे तुमचे म्हणणे, माझ्याही माहितीत बरेच जण आहेत. माझे विधान सरसकट नव्हते. पण विडिओ दुव्यावर ज्या प्रतिक्रिया होत्या त्या बहुतांशी माझ्या म्हणण्याला दुजोरा देणाऱ्या आहेत. माझे निरीक्षण असे आहे कि महाराष्ट्रातील ब्राह्मण समाज उत्तर भारतातील ब्राह्मण समाजापेक्षा खूपच पुरोगामी आहे.

स्पंदना 06/10/2014 - 05:26
कोणाला कसला अभिमान असला तर तो स्वतःबद्दल असावा या मताची होउन राहिले आहे मी आता. त्यामुळे उगा उठुन कुणी स्वतःच्या अनुभवाबद्दल लिहीत असेल तर त्यात माझा अनुभव मिसळुन बे दुनी चार करण सोडुन दिलयं. जाती वरुन हीनवणे , मग ती उच्च असो वा हीन हे जितके इनह्युमन तितकेच जातीवरुन वागणुक देणे सुद्धा वाईटच. त्याही पलिकडे जाउन जेंव्हा एक स्त्री म्हणुन कनिष्ठ वागवल जात तेंव्हा तर जातसुद्धा गळुन पडते. एकून माणसांचे मुखवटे गळुन पडायला ना जातीच कारण पुरतं ना धर्माचं, नाही लिंग!

वेल्लाभट 06/10/2014 - 10:25
धाग्यातील विचार, पुढच्या प्रतिसादांतील अनुभव इत्यादी सर्व गोष्टी वास्तवाला धरूनच आहेत. मग वैयक्तिक पातळीवर असतील किंवा व्यापक पातळीवर. त्याबाबत भाष्य न करता एक प्रांजळ मत मांडू इच्छितो. आरक्षणाबाबत आणि त्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनाबाबत. एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे जो सतत ज्ञानार्जनास उत्सुक असतो तो ब्राह्मण. ही व्याख्या धरून पुढे म्हणावसं वाटतं, अशा ब्राह्मणाला त्याच्या ज्ञानाचा अभिमान असतो आणि तीच त्याची ताकद असते. आता, सर्वसाधारण अर्थाने किंवा जातीने जे अब्राह्मण असतात ते मूर्ख असतात का? मुळीच नाही. मग; आरक्षणाचा उपयोग करून शिक्षणसंस्थात प्रवेश मिळवणं त्यांना मोठेपणाचं का वाटतं? त्याची गरज त्यांना का लागते? 'आरक्षण' या गोष्टीकडे मी कुबड्यांसारखं बघेन. मला नीटपणे चालता येत असताना कुबड्या घेऊन चालण्याची आणि स्वतःला अपंग म्हणवून घेण्याची इच्छा मला होणार नाही. पण तसं समाजात होताना दिसत नाही. 'मला रिझर्वेशन आहे मित्रा! ओबीसी! ' हे अभिमानाने सांगणारे मित्र बघितलेले आहेत मी. त्यांनाही हा विचार सांगून बघितला, पण मिळतोय फायदा तर का न घ्या? ही त्यांची त्यावरची प्रतिक्रीया असायची. तेंव्हा जोवर हा विचार समाजमनातून नष्ट होत नाही (कठीण आहे ते) तोपर्यंत ७८-३८ चा फॉर्म्युला अबाधित आहे.

बाळ सप्रे 06/10/2014 - 11:09
लेख आवडला !! जन्माने जात असु नये हे तात्विक दृष्ट्या सर्व जण मान्य करतात.. पण व्यवहारात जात ही जन्मानेच ठरते हे सत्य आहे. काळाप्रमाणे लोकांचे व्यवसाय कामधंदे बदलले पण जाती त्याप्रमाणे बदलल्या नाहीत..

In reply to by बाळ सप्रे

असंका 06/10/2014 - 12:23
लेख आवडला असे म्हणून आपण लेखकाला शालजोडीतले देत आहात का? कारण ह्या वाक्यानं सरसकट सगळ्या लेखाचं कौतुक होत आहे. सरसकटीकरण हे तर लेखकाला मुळीच आवडत नाही. लेखातल्या या वाक्याबद्दल आपले काय मत आहे? तेही आपल्याला आवडले का? "हा घाबरून राहणारा , समाजाच्या इतर घटकांपासून गंड ग्रस्त असणारा , पटकन सरसकट करण करणारा ब्राम्हण समाज बघणे वेदनादायक आहे . त्याना कायम एक शत्रू लागतो . कधी तो बहुजन समाज असतो , कधी मुस्लिम तर कधी यु पी चा भैय्या" ब्राह्मण समाजाला बहुजन समाज हा आपला शत्रु म्हणून लागतो? मुस्लिम लोक शत्रु म्हणून लागतात? युपीचे भय्ये शत्रु म्हणून लागतात? ही कसली गरज म्हणायची ब्राह्मणांची? उत्तर देण्याचे बंधन नाही. मी हा प्रश्न पुन्हा लेखकालापण विचारणारच आहे.

खरं पाहता मी कांहीच प्रतिसाद ह्या धाग्यावर देणार नव्हतो. मुळात, एकदा पुढे जे लिखाणात येणार आहे ते संपूर्ण पणे माझ्या अनुभवांवर आधारित आहे आणि त्याला माझ्या वैयक्तिक Sample Survey चा आधार आहे . म्हणजे मी केलेली विधान चूक पण असू शकतात . असा डिस्क्लेमर सुरुवातीलाच टाकला की आपला कल्पनाविलास आपल्याला हव्या त्या दिशेने नेता येतो. कुठल्याही काल्पनिक गोष्टी 'मला आलेला अनुभव' ह्या नांवाखाली लिहून समाजातील कांही जाती वर्गाला भडकवायचं, वादविवाद घडवून आणायचे आणि मिटक्या मारत मजा बघत राहायची, ह्या विकृत उद्देशाव्यतिरिक्त ह्या धाग्यात मला तरी कांही दिसत नाही. ज्यांना भांडायचे असेल त्यांनी भांडावे, पण सूज्ञांनी विचारपूर्वक दूर राहावे असे मी आवाहन करेन.

In reply to by प्रभाकर पेठकर

पूर्णपणे सहमत आहे. एकद्याच्या वैयक्तिक अनुभवावर काय बोलणार ?? कुठेतरी काड्या लावायच्या आणि आग लागल्यावर गंमत पहात उभे रहायचे..

सूड 06/10/2014 - 15:20
तुमचे वैतक्तिक अनुभव म्हणून ठीकाय पण बर्‍याचदा चर्वितचर्वण झालेला विषय असल्याने आता प्रतिसाद द्यायचा उबग आलाय. तुमचा लेख आणि प्रतिसाद वाचले हेही नसे थोडके!! मिपाच्या कट्ट्यांबद्दल म्हणाल तर प्रश्न विचारण्यापेक्षा एकदा येऊन बघा तुमचं तुम्हालाच उत्तर मिळेल. ॥इति लेखनसीमा॥

विटेकर 06/10/2014 - 15:59
हीन दर्जाच्या लोकप्रियतेसाठी लिहिलेला लेख ! माझे बालपण ठार खेड्यात गेले. माझे आई- वडील शिक्षक होते त्याच शाळेत ,तरीही आमचे जाधव मास्तर सानुनासिक स्वरात " काका" म्हणून आम्हाला हाक मारायचे ! माझे वय तेव्हा फक्त ८ वर्षे होते. अश्या शालेतून मी चौथीची शिष्यवृत्ती मिळवल्यावर हा द्वेष आणखीनच वाढला ! शेवटी जंग जंग पछाडून वडिलांनी बदली करुन घेतली तालुकयाच्या गावाला !. (तालुक्याचा सभापती ९६ कुळी , तो कशाला बामणाचे काम करेल? पण एका मुसलमान शिक्षणाधिकार्‍याला दया आली.)तिथेही द्वेष होताच पण तुलनेने कमी .. त्याच गावांत मी कॉलेजला गेल्यावर मराठ्यांच्या पोरांना , " ए कुळवाड्या " म्हनून हाक मारुन बदला घेतल्याचे समाधान मिळवायचो ! आजही त्या खेड्यातील ब्राह्मण द्वेष तसाच आहे !!! गेल्या १० वर्षात तर तिथे आता नावाला देखील ब्राह्मण राहिला नाही. मग संघाच्या संपर्कात आलो, राजाभाऊ भोसले होते प्रचारक , त्यांनी समाजावून सांगितले आणि अंतर्बाह्य शुद्ध झालो. पुढे तर औरन्गाबादला असताना स्वरुपवर्धिनीचे काम करायला लागलो , बुद्धवंदना शिकलो. मनात कसलेही किल्मिष राहीले नाही. ब्राहमण असल्याचा मला काहीही फायदा झाला नाही, उलट बाल-मनावर अत्यन्त वाईट आघात झाले. माझे आई- वडील नीर-क्षीर विवेक करणारे होते, मला संघाचा परिस स्पर्श झाला म्ह्णून माझे किल्मिष जळून गेले. असे किती भाग्यवंत असतील? उदगीरकरांचा धागा निव्वळ राळ उडविण्यासाठी काढला आहे. ज्या बहुजन समाजाच्या नावाने ते गळा काढताहेत , त्यासाठी परिश्रम करणारे बहुतांशी उच्च समाजातील होते ,हे ते सोयिस्करपणे विसरत आहेत. पु. लं नी दलित साहित्याचे स्वागत आणि कौतुक दोन्ही केले.. असो अशी अनेक उदाहरणे देता येतील. पण लक्षात कोण घेतो ? खरे तर प्रतिसाद देणारच नव्हतो .. पण अगदीच राहवले नाही . म्हातारी मेल्याचे दु:ख नाही , काळ सोकावतो आहे.

ज्ञानव 06/10/2014 - 16:51
ज्या बहुजन समाजाच्या नावाने ते गळा काढताहेत , त्यासाठी परिश्रम करणारे बहुतांशी उच्च समाजातील होते ,हे ते सोयिस्करपणे विसरत आहेत. तो बहुजन समाजही किती लक्षात ठेऊन आहे? ब्राम्हणांनी माझा उद्धार (चांगल्या अर्थाने) केला / ब्राम्हणांची सांगत होती म्हणून माझ्यात अमुलाग्र बदल झाला हे कितीजण मान्य करतील ? दुर्दैव हेच आहे की ब्राम्हणाने काढलेला धागा त्यावर ब्राम्हणांनी दिलेले प्रतिसाद आणि ब्राम्हणेतरानी दिलेले प्रतिसाद किंवा "मला आहे अभिमान दलित असण्याचा " किंवा "आहे मी मराठा मग...?" असा एखादा धागा ब्राम्ह्णेतराने काढावा त्याला येणारे प्रतिसाद तपासावेत मगच कळेल काहीतरी. एक ब्राम्हण दुसर्या ब्राम्हणाच्या बाजूने उभा रहात नाही पण बाकी सगळ्या जातीतले लोक आपल्या जातीतल्या माणसामागे उभे राहतातच हा अनुभव आहे.

एस 06/10/2014 - 16:51
अशा विषयांवर उघडपणे काही लिहिण्याबोलण्याची सोय राहिलेली नाही. मग ते एका समाजातले असो वा दुसर्‍या. वेळ मिळाल्यास व्यनि/खवद्वारे चर्चा करण्याचा प्रयत्न केला जाईल.

समीरसूर 06/10/2014 - 17:19
ब्राह्मणांनी कुठले फायदे ओरपले ते कळले नाही. अजूनही दरिद्री ब्राह्मण खूप आहेत. ब्राह्मणांची शेती कुळकायद्यात गेली. आरक्षण नसल्याने ब्राह्मणांना शासकीय नोकर्‍यांची आणि शिक्षणाची शक्यता जवळ-जवळ संपुष्टात आलेली आहे. ब्राह्मण शेकडो एकर जमिनीचे मालक, जमीनदार, साखर कारखान्यांचे मालक, भव्य कॉलेजेसचे मालक, सहकारी सूत गिरण्यांचे प्रवर्तक वगैरे कधीच नव्हते. ते आधीपासूनच शिक्षणाच्या बळावर जगत आलेले आहेत. कधी काळी (६०-७० वर्षांपूर्वी) ब्राह्मणांनी पाळलेल्या अस्पृश्यतेपेक्षा कितीतरी पट जास्त अस्पृश्यता आणि पराकोटीचा आकस पाळणार्‍या जाती आजही महाराष्ट्रात आहेत. ब्राह्मण कुणालाही मदत करतांना जात विचारून कधीच मदत करत नाहीत. माझ्या बाबांनी गेल्या ४५ वर्षात कित्येक गरीब आणि ब्राह्मण (उच्चवर्णीय) नसणार्‍या गरीब मुलांना मोफत शिकवले आहे. त्यांनी कुणालाही मदत करतांना कधीच जात विचारात घेतलेली नाही. आणि अशी कित्येक उदाहरणे मला माहित आहेत. आपल्या स्वातंत्र्य लढ्यात (आणि इतर क्षेत्रातदेखील) कित्येक ब्राह्मणांनी कुठल्याही फायद्याची अपेक्षा न ठेवता आयुष्याचे प्रामाणिक समर्पण केले आहे. राजगुरु, सेनापती बापट, चाफेकर बंधू, वासुदेव बळवंत फडके, यांनी आयुष्य देशासाठी वेचले. साने गुरुजी, गोपाळ कृष्ण गोखले, आगरकर, टिळक, दादा धर्माधिकारी, र. धो. कर्वे, महर्षी धोंडो केशव कर्वे, बाबा आमटे अशा कित्येक थोर ब्राह्मणांनी समाजसुधारणेसाठी आयुष्य खर्ची घातले. ही यादी अजून बरीच मोठी होऊ शकेल. या लोकांनी फक्त ब्राह्मण लोकांचेच भले व्हावे म्हणून आयुष्य वेचले असेल असे वाटत नाही. संत ज्ञानेश्वरांनी जे अलौकिक साहित्य निर्माण केले त्यात कुठेही जातीपातीचा किंवा इतर जातींचा द्वेष करावा असे लिहिलेले नाही. काळाच्या पुढचे इतके सुंदर पद्धतीने लिहिणारे हे संत ब्राह्मणच होते. संत एकनाथांनी कधी जात-पात पाळली नाही. आजच्या युगातदेखील माधव गाडगीळांसारखे निस्वार्थ आणि निस्पृह व्यक्तिमत्व निसर्ग वाचावा म्हणून जीवाचे रान करत आहे. अंधश्रद्धेचे निर्मुलन व्हावे म्हणून झटणारे दाभोलकर असोत किंवा तर्कशुद्ध जगण्याची शिकवण देणारे डॉ. श्रीराम लागू असोत, ब्राह्मणांनी प्रत्येक क्षेत्रात प्रामाणिकपणे आणि जीव तोडून काम केलेले आहे. आजची परिस्थिती ब्राह्मणांसाठी उलट भयावह आहे. कुठलेच संरक्षण नाही. अकारण पसरविलेल्या गेलेल्या ब्राह्मणद्वेषाने आजचा ब्राह्मण हवालदिल झालेला आहे. जीव मुठीत धरून जगतो आहे. मी स्वत: कधीच जातपात मानली नाही आणि माझ्या आई-बाबांनी तसे मला कधीच चुकूनही शिकवले नाही. असा भेद करावा असे इतक्या वर्षात माझ्या मनालादेखील कधी शिवले नाही. आणि मी नेहमी तसेच वागत आलो. माझ्यासोबतचे कित्येक ब्राह्मण अगदी असेच वागतात हे मी अनुभवले आहे. माझ्या कित्येक चुलत-मावस बहिणींनी केलेले आंतरजातीय विवाह माझ्या नातेवाईकांनी आनंदाने स्वीकारले आहेत आणि त्या गेली कित्येक वर्षे सुखाने जगत आहेत. त्यावरून कधी हाणामारी, कापाकापी, सूडनाट्य वगैरे कधीच घडले नाही. माझ्या कमीत कमी ५ चुलत-आते-मावस भावांनी आंतरजातीय विवाह केले आहेत आणि ते देखील यशस्वी झालेले आहेत. मी ब्राह्मण असल्याचा मला अभिमान वगैरे नाही पण त्यामुळे ज्या चांगल्या गोष्टी, विचार, संस्कार वाट्याला आले त्यांचा अभिमान नक्कीच आहे. प्रत्येक जातीमध्ये, धर्मामध्ये, माणसामध्ये गुण-दोष असतातच. म्हणून ती जातच वाईट ठरत नाही. ब्राह्मणांविषयीचा हा अनाठायी द्वेष जेव्हा संपेल तो खरा सुदिन!

In reply to by समीरसूर

ज्ञानव 06/10/2014 - 18:12
दरिद्री + ब्राम्हण हीच मुळात द्विरुक्ती आहे. बाकी माझा एक मित्र नेहमी त्याच्या मोठ्या भावाबद्दल सांगतो "तसा आमचा णाणा म्हणजे ब्राम्हनच"
लेखनविषय:
लेखनप्रकार
सर्व प्रथम एक गोष्ट स्पष्ट करतो . ब्राम्हण म्हणून जन्माला आल्याचा मला काही अभिमान वैगेरे वाटत नाही आणि लाज तर मुळीच वाटत नाही . पुढे जे लिखाणात येणार आहे ते संपूर्ण पणे माझ्या अनुभवांवर आधारित आहे आणि त्याला माझ्या वैयक्तिक Sample Survey चा आधार आहे . म्हणजे मी केलेली विधान चूक पण असू शकतात . यात कुठलेही सरसकट करण नाहीये .

अश्वत्थामा-2

निलरंजन ·

विनोद१८ 05/10/2014 - 14:06
उत्तम मांडणी, हा भागसुद्धा पहिल्या भागासारखा रंजक व लहानसा वाटला. माझ्या मते हे दोन्ही भाग मिळुन एक भाग होउ शकेल अशी नम्र सुचना.

काउबॉय 06/10/2014 - 13:13
या व्यक्तिमत्वाबद्दल कधी विचार फारसा केला न्हवता. आता मनात काही प्रश्न निर्माण होत आहेत पण उत्तरे मीळतील असे वाटतय. बघुया. पुभाप्र.

कविता१९७८ 06/10/2014 - 15:09
खुपच छान माहीती, कुठल्या देशाचा राजा होता हे आताच माहीती पडले आधी वाचनात आले नव्हते किंवा आले असेल तरीही लक्षात राहीले नाही.

कविता१९७८ 06/10/2014 - 15:13
अश्वत्थामाची राहणी, त्याने केलेला राज्याचा विस्तार, त्याच्या कुटंबाबद्द्लची माहीती. अश्वत्थामा बरोबर त्याचा मामा कृपाचार्यही देखील चिरंजीवी आहे . गुगलुन पाहिले तर अश्वत्थामा कधी कधी कृपाचार्याना भेटायला ते हिमालयात जातो असे वाचले पण ते खरे नसेल कारण त्याला खुप कमी लोकांनी पाहिल्याचे ऐकले आहे.

निलरंजन 08/10/2014 - 06:34
काही घरगुती कारणांमुळे पुढचा भाग इच्छा असूनही लवकर लिहिता आला नाही पण येत्या दोन दिवसात नक्की भेटेन नवीन भागासहित आपला निलरंजन

आयुर्हित 08/10/2014 - 07:53
कृपाचार्य, अर्जुन व कर्णही त्याच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ नव्हते. नारायणास्त्राचा प्रयोग कसा करावा हे फक्त द्रोणाचार्यांना माहीत होते आणि ते ज्ञान त्यांनी अर्जुनालाही सांगितले नाही ते फक्त अश्वत्थामा लाच सांगितले असे असताना अश्वत्थामा युद्धात का हरतो?

In reply to by आयुर्हित

बॅटमॅन 08/10/2014 - 19:07
कारण अगोदरच सेटिंग केली होती- यतोधर्मस्ततो जयः अर्थात जिथे युधिष्ठिर तिथेच जय. अश्वत्थामा हे ऐकूनही साईड न बदलल्याने हरला ;)

In reply to by बॅटमॅन

आयुर्हित 09/10/2014 - 01:27
यत्र योगेश्र्वर: कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर:। तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम।।78।। नेमके खरे कोणते?

विनोद१८ 05/10/2014 - 14:06
उत्तम मांडणी, हा भागसुद्धा पहिल्या भागासारखा रंजक व लहानसा वाटला. माझ्या मते हे दोन्ही भाग मिळुन एक भाग होउ शकेल अशी नम्र सुचना.

काउबॉय 06/10/2014 - 13:13
या व्यक्तिमत्वाबद्दल कधी विचार फारसा केला न्हवता. आता मनात काही प्रश्न निर्माण होत आहेत पण उत्तरे मीळतील असे वाटतय. बघुया. पुभाप्र.

कविता१९७८ 06/10/2014 - 15:09
खुपच छान माहीती, कुठल्या देशाचा राजा होता हे आताच माहीती पडले आधी वाचनात आले नव्हते किंवा आले असेल तरीही लक्षात राहीले नाही.

कविता१९७८ 06/10/2014 - 15:13
अश्वत्थामाची राहणी, त्याने केलेला राज्याचा विस्तार, त्याच्या कुटंबाबद्द्लची माहीती. अश्वत्थामा बरोबर त्याचा मामा कृपाचार्यही देखील चिरंजीवी आहे . गुगलुन पाहिले तर अश्वत्थामा कधी कधी कृपाचार्याना भेटायला ते हिमालयात जातो असे वाचले पण ते खरे नसेल कारण त्याला खुप कमी लोकांनी पाहिल्याचे ऐकले आहे.

निलरंजन 08/10/2014 - 06:34
काही घरगुती कारणांमुळे पुढचा भाग इच्छा असूनही लवकर लिहिता आला नाही पण येत्या दोन दिवसात नक्की भेटेन नवीन भागासहित आपला निलरंजन

आयुर्हित 08/10/2014 - 07:53
कृपाचार्य, अर्जुन व कर्णही त्याच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ नव्हते. नारायणास्त्राचा प्रयोग कसा करावा हे फक्त द्रोणाचार्यांना माहीत होते आणि ते ज्ञान त्यांनी अर्जुनालाही सांगितले नाही ते फक्त अश्वत्थामा लाच सांगितले असे असताना अश्वत्थामा युद्धात का हरतो?

In reply to by आयुर्हित

बॅटमॅन 08/10/2014 - 19:07
कारण अगोदरच सेटिंग केली होती- यतोधर्मस्ततो जयः अर्थात जिथे युधिष्ठिर तिथेच जय. अश्वत्थामा हे ऐकूनही साईड न बदलल्याने हरला ;)

In reply to by बॅटमॅन

आयुर्हित 09/10/2014 - 01:27
यत्र योगेश्र्वर: कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर:। तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम।।78।। नेमके खरे कोणते?
लेखनप्रकार
अश्वत्थामाला घेऊन द्रोणाचार्य पांचाल राज्य सोडून हस्तिनापुरला आले तोपर्यंत पांडव माता कुंती सोबत वनवासातून राजमहालात पोहचले होते पंडुच्या अकस्मात निधनामुळे पितामह देवव्रत भीष्म पांडवाबद्दल जास्त प्रेमभाव बाळगून होते पण दुर्योधन आणि इतर भांवडे यामुळे पांडवाचा जास्त दुस्वास करू लागली होती त्यावेळी राजवाड्यातच कृपाचार्य सर्व राजपुत्रांना शिकवित असतं कृपाचार्यांनीच पितामह आणि द्रोणाचार्यांची भेट घडवून आणली द्रोणाचार्यांच्या विद्वत्तेवर प्रभावित होऊन त्यांना हस्तिनापुरच्या राजपुत्रांना शिकविण्याची विनंती केली द्रोणाचार्यांनी अट ठेवली की मी राजपुत्रांबरोबर अश्वत्थामालाही शिकवू इच्छितो आणि ती विनं

शालेय निबंध लेखन कसे करावे ?

माहितगार ·

In reply to by काउबॉय

माहितगार 05/10/2014 - 15:07
विकिपीडिया ज्ञानकोश आहे. निबंध हे ज्ञानकोशीय फॉर्मॅटला जवळ असले तरी संशोधनपर निबंधाचा अपवाद वगळता चित्ताकर्षक, लक्षवेधक, वर्णनात्मक, आलंकारीक, रंजक लेखनासाठी अथवा लालीत्यपूर्ण लेखनाचही स्वातंत्र्य जे ज्ञानकोशीय लेखनात नसते ते निबंध लेखनात खूप आधीक उपलब्ध असते. संशोधनपर निबंधाचा फॉर्मॅट ज्ञानकोशीय लेखनास सगळ्यात जवळचा मुख्य फरक म्हणजे इतर निबंधा प्रमाणेच संशोधनपर निबंधात व्यक्तीगत निष्कर्षांची/मतांची मांडणी करता येते. ज्ञानकोशीय लेखनात सहसा इतरांच्या लेखनाचे संदर्भ देत मांडणी करावयाची असते आणि स्वतःचे व्यक्तीगत मते अथवा व्यक्तीगत निष्कर्ष शक्यतोवर टाळायचे असतात. इंग्रजी माध्यमाची मुल इंग्रजी विकिपीडियातून बर्‍याचदा कॉपीपेस्ट मारतात आणि वेळ मारून नेतात; पण विकिपीडियाचा फॉर्मॅट खरे म्हणजे शालेल्य निबंध लेखनाच्या फॉर्मॅटशी पूर्णत्वाने जुळत नाही. शालेय निबंध लेखनात विचार आणि लेखन करण्याचे प्रशिक्षण घेण्याची सर्वोत्तम संधी असते मात्र का कोण जाणे बरेच विद्यार्थी ही संधी केवळ नकला मारून दवडतात असे वाटते. (यात माझ्या पाल्यांचाही समावेश आहे)

In reply to by माहितगार

माहितगार 05/10/2014 - 13:16
हॉटेलात १२ माणस होती त्यात्यल्या ५ जणांच्ये प्रतिसाद; म्हणजे लय भारी प्रतिसाद रेशो झाला की हा :) सर्वांना मनमोकळ्या प्रतिसादांसाठी धन्यवाद

In reply to by कंजूस

माहितगार 05/10/2014 - 15:20
विकिपीडियावर दिवसागणिक ह्या किंवा त्या निबंधाच्या मागण्या होत असतात तशा मिपावर अद्याप मी तरी पाहिल्या नाहीत. गूगल कुणाला कुठे पाठवेल काय सांगता येते. धागा लेखकाचा दृष्यकल्पनाविलास 'शालेय विद्यार्थी मिपाशेतात काही ज्ञानकण टिपण्यास आले आहेत' असा मूळीच नै. त्यांचे पालक मिपाशेतात पडीक असल्यास त्यांना त्यांच्या पाल्यांसाठी उपयूक्त उपक्रमात सहभागी करून घेणे हा मुख्य उद्देश.

पैसा 05/10/2014 - 16:20
म्हणजे ही मुलं तयार निबंध आंतरजालावर शोधत असतात की काय? असे कॉपी पेस्ट केलेले निबंध परीक्षेत कसे उपयोगी पडणार?

In reply to by पैसा

माहितगार 05/10/2014 - 17:31
हम्म... काय करणार ? माझ्या घरात समजा वैज्ञानिकांविषयी पुरेशी पुस्तक आहेत मुल ती पुस्तक वाचतात पण निबंध अथवा प्रॉजेक्टसाठी चक्क आंतरजालाचाच हट्ट असतो. टिचरला इम्प्रेस करण्यासाठी बाह्य डेकोरेशन प्रॉजेक्टला चमकी बॉर्डर हि कामे मन लावून होतात. ज्यांच्या घरी इंटरनेट नाय ती मूल इंटरनेट असलेल्या मित्र मैत्रिणींच साहाय्य बिनधास्त घेत असतात. अपवादानेच एखादा पालक पुस्तक वाचनाची सवय जोडण्यात यशस्वी होतो. अमुक तमूक विषयाबद्दल निंबंध हवेत हि मराठी विकिपीडियावर मागणी नित्य नेमाने येत असे असते एवढी वर्षे अशा मागण्याही इतर उत्पातांसोबत वगळल्या जात असं हि मागणी विद्यार्थ्यांकडून येते आहे. खास करून ऑगस्ट हा फेवराइट महिना असतो आणि मराठी विकिपीडियावरील निबंध या लेखास हे विद्यार्थी सर्वाधिक पोहोचतात दुर्दैवाने त्या लेखात इंग्रजी विकिपीडियातन डकवलेला एक इंग्रजी लेख आहे. एवढ्या वर्षात निबंध या विषयाच्या लेखास एवढ्या भेटी देऊन एकाही विद्यार्थ्याने लेखात एक वाक्यही लिहिण्याची किंवा लेखातील एखादे वाक्य अनुवादीत करण्याचे जराशी तसदी सुद्धा घेतली नाही.

In reply to by माहितगार

पैसा 05/10/2014 - 18:51
आईबापच मुलांना सगळे तयार आणून देण्यासाठी बरेचदा जबाबदार असतात. मुलांना वाचायची सवय लावणे किंवा विचार करायची सवय लावणे यापेक्षा परीक्षेसाठी तयार केले जाते. आंतरजालावर, मुख्यतः फेसबुक आणि ट्विटरवर, लिहिणार्‍या या मुलांचे इंग्रजी/मराठी शुद्धलेखन हा आणखीच मोठ्या चर्चेचा विषय होईल.

जेपी 05/10/2014 - 16:51
पैसाताई,आता इंग्रजी माध्यमातील मुल निंबंध आणी प्रोजेक्ट रिपोर्टसाठी हमखास गुगलतात किंवा विकीचा वापर करतात. कहर मंजे हे करण्यासाठी त्यांचे पालकच पुढाकार घेऊन मदत करतात.

जेपी 05/10/2014 - 19:04
लातुर पॅटर्न सध्या तरी संपलाय. आता क्लासेसचे पेव फुटलय.मागील पाचवर्षात पोर कालेजात जाण्यापेक्षा ट्युशन ला हजर राहतात. सकाळी 7 ते संध्या. 7 शिकवणीत जाणारे पोरपोरी जास्त आहेत.

कंजूस 05/10/2014 - 19:24
परीक्षा हे एक तंत्र आहे.तीन तासांत पंधरा गुणांसाठी एक निबंध अर्ध्या तासात लिहायचा असतो.विद्यार्थी दिलेल्या विषयावर विचार करत बसेल तर तो निबंध पूर्ण होणार नाही. काही संभाव्य विषयांची (१)अगोदर माहिती गोळा करून ठेवणे हाच पर्याय उरतो. नंतर ऐनवेळी विषयाचा रोख(२) पाहून त्याला मध्यवर्ती ठेवून आपल्याकडची माहिती सुसंगत(३) मांडत जायचे हे तंत्र आत्मसात करायचे. निबंधाचा आराखडा ही एक लेखनाची सर्वमान्य पध्दत स्विकारलेली असते आणि त्याचक्रमाने विदयार्थ्याँनी जावे अशी परिक्षकांची अपेक्षा असते. यात (अ)सुरुवात अथवा मूळ विषयाकडे वाचकाला नेणे.(ब) गाभा अथवा विषयाला धरून माहिती लिहिणे.कमीतकमी तीन मुद्दे असावेत.अगदी कालपरवाच्या एखाद्या घटनेचा उल्लेख करून जिवंतपणा आणावा आणि आपला चौकसपणा दाखवावा.(क)समारोपात पुढील संभाव्य आणि आशावादी मत देऊन इतरांना आवाहन करता येईल. शैली ही काही एका दिवसात येणारी लेखनकला नाही परंतू नाट्यमय मांडणी,विरोधाभास, उपरोधिक,उपहास,विनोदी,अलंकारिक,संवादात्मक विचार इत्यादी प्रकारांचा काही चांगला वापर करता आला तर करावा. आत्मप्रौढी मात्र टाळावी. शुध्दलेखन हवेच.

In reply to by कंजूस

पैसा 05/10/2014 - 19:29
एखादा नमुना इथे देऊ शकाल का? किंवा असे स्टॉक निबंध (मराठीत लिहिलेले) आंतरजालावर उपलब्ध आहेत का?

In reply to by पैसा

माहितगार 06/10/2014 - 00:26
श्री. कंजूसजी यांच्या साहाय्याने (खरेतर त्यांच्या उदार अंतःकरणानेच) अत्यंत चांगले काम तडीस जाते आहे. "...मराठीचे लेखन आंतरजालावर वाढले आहे. तिथेही तयार साहित्य असणारच. खरोखर हे उपयोगाचे आहे का? चांगले लेखकच इथे लिहितात असे समजू नये.ही माध्यमे ज्यांना जमली आहेत ते लिहितात असे म्हणता येईल. .......विद्यार्थ्याचे वय आणि विचार त्याच्या लेखनात दिसायला हवेत. तयार निबंधातून ठोकळेवजा बोजड लिखाण लिहिले जाण्याची शक्यता जास्त. पेपरांतून युवा सदर असते त्यातून चांगली माहिती संकलित करावी. तयार निबंध कधीही पाठ करून लिहू नयेत." हे श्री. कंजूसजी यांचे शब्द त्यांच्याच शब्दात मुलांना भावेल असे वाटते. त्यांचे हे शब्द मी कितीही बदल करून लिहिले तरीही ते असा परिणाम (विद्यार्थ्यांशी संवाद) साधू शकणार नाहीत आणि विकि संबंधीत धाग्यांखाली प्रताधिकार मुक्त होत आहेत हे लिहिण्याचा मुख्य उद्देश हा असा सफल होऊ शकतो.
विद्यार्थ्याचे वय आणि विचार त्याच्या लेखनात दिसायला हवेत.
या कसोटीवर आमच्या पाल्याचे अलिकडे काही मार्क शाळा शिक्षकांनी कापून आमचे या विषयाकडे लक्ष वेधले. अवांतर वाचन कमी पडत असावे हे एक कारण असू शकेल पण विद्यार्थ्याचे वय आणि विचार त्याच्या लेखनात दिसताहेत अथवा नाही हे पालकांना कसे ताडता येईल आणि पालक या संदर्भाने अधिक काय काय करू शकतील असेही मार्गदर्शन मिळाल्यास आनंद होईल. सोबतच पै ताई म्हणतात तसे अगदीच जसाच्या तसा निबंध तर स्वागत असेल, सोबतच मराठी संकेतस्थळे किंवा ब्लॉगवरील शालेय विद्यार्थ्यांनी निबंधांच्या दृष्टीने दखल घेण्या जोगे काही निबंध वजा लेखन आढळल्यास अशा दुव्यांकडेही लक्ष वेधता आल्यास आभारी असेन. विकिबुक्सवर श्री कंजूसजी यांच्या प्रतिसादाचा संदर्भ देऊन निबंध लेखन कसे करावे ? लेख चालू केला आहे. संदर्भ देताना सहसा लेखकाचे नाव/टोपण नाव ही नमूद करण्याची प्रथा असते पण विद्यार्थ्यांचे मुख्य विषयाकडून लक्ष विचलीत होण्याची शक्यता तूर्तास नको म्हणून तूर्तास आपले (कंजूसजींचे) टोपण नाव विकिबुक्सवरील संदर्भात नमूद करणे टाळत आहे. गैरसमज नसावा हि विनंती.

कंजूस 05/10/2014 - 21:37
लेखनसाहित्य आणि विस्तार.निबंध लिहिण्यासाठी काय हवे आहे त्या विषयी आता एकेक मुद्दा पाहू. पुस्तकांच्या दुकानांत निबंधांची वेगळी पुस्तके मिळतात काही निबंध 'गाइड'मध्येही असतात.मराठीचे लेखन आंतरजालावर वाढले आहे.तिथेही तयार साहित्य असणारच.खरोखर हे उपयोगाचे आहे का?चांगले लेखकच इथे लिहितात असे समजू नये.ही माध्यमे ज्यांना जमली आहेत ते लिहितात असे म्हणता येईल.प्रसार माध्यमांत वर्तमानपत्रांचा क्रमांक वरचा आहे.इथेच सापडतील निबंधांचे संभाव्य विषय आणि माहिती. १)आजचे खेळाचे स्वरूप, २)निवडणूका, ३)लैंगिक शिक्षण असावे का? ४)वाढता दहशतवाद, ५)पर्यावरणाची जबाबदारी, ६)प्रसारमाध्यमे आणि करमणूक, हे विषय दहावीसाठी असले तरी आठवीपर्यँत त्यांचा रोख बदलेल.माझा आवडता खेळ,चित्रपट,सण ,विस्मरणिय सहल,आमचे शहर इत्यादी. विद्यार्थ्याचे वय आणि विचार त्याच्या लेखनात दिसायला हवेत.तयार निबंधातून ठोकळेवजा बोजड लिखाण लिहिले जाण्याची शक्यता जास्त.पेपरांतून युवा सदर असते त्यातून चांगली माहिती संकलित करावी.तयार निबंध कधीही पाठ करून लिहू नयेत.

निबंधाच्या अनेकांनी अनेक व्याख्या केल्या आहेत. नि+बन्ध+ बांधणे असा अर्थ विचराला बांधणे आणि बंधन या अर्थाने वापरल जातो. निबंधात साधक-बाधक चर्चा असते, निबंध म्हण्जे नियमांनी बद्ध असणारा लेख, मोठा लेख, नीटपणे मांडलेला विचार, वेगवेगळ्या परिच्छदातून विविध बाजू निबंधात मांडलेला असतात. निबंध हा लिहिण्याचा प्रयत्न असतो तेव्हा व्यवस्थित सुरुवात प्रयत्नपूर्वक विषय मांडणे हाच निबंधाचा उद्देश असतो. निबंधाचे दोन प्रकार १) माह्तीवजा निबंध आणि २) प्रबोधनासाठी लिहिलेले निबंध. पहिल्या प्रकारातील निबंध शालेय पातळीवरचा माहितीवजा निबंध असतो तर दुस-या प्रकारचा निबंध हा शिक्षित व्यक्तींना बहुश्रुत करण्यासाठी लिहिला गेलेला निबंध असतो. निबंध या शब्दाचा अर्थ सांगतांना मो.रा.वाळंबे म्हणतात ''निबंध या शब्दाचा अर्थ बांधणे, गुंफणे, जुळविणे, असा आहे.निबंधात जी आपण जुळणी किंवा गुंफणी करतो ती आपल्याला सुचणार्‍या विचारांची. एखाद विषय निबंधलेखनाला दिला, की त्याच्याबद्दलचे अनेक विचार आपल्या मनात एकत्र गर्दी करतात, पण ते सारेच विचार दुसर्‍याला सांगण्यासारखे असतात असे नाही, शिवाय सुचणारे विचार खुप विस्कळीत असतात, हे असे सुचणारे विचार आपण एकत्रीत करतो.'' निबंधाचे स्थूलमानाने पाच प्रकार मानल्या जातात. १) वर्णनात्मक, २)कथनात्मक,३) चिंतनात्मक, ४)कल्पनात्मक, ५) चरित्रात्मक किंवा आत्मचरित्रात्मक. असो, सर्व प्रकारात मुलांना प्रत्येक निबंधात काय करायचं आहे ते सांगितलं पाहिजे. आकर्षक सुरुवात. व्यवस्थित मांडणी, भाषा, वाचकांना लावणारी उत्सुकता निबंधात असली पाहिजे, उत्तम सुरुवात, विषयाची मांडणी आणि योग्य समारोप तुमचा निबंध उत्तम ठरवतो. -दिलीप बिरुटे

बाबा पाटील 06/10/2014 - 12:55
तुम्ही आठवण करुन दिली राव ,मी १ ली ते १२ वी एकाही पेपरमध्ये शाळेत कधी निबंधच लिहिला नाही,साला पहिलाच पेपर मराठीचा लिहुन लिहुन हात इतका दुखायला सुरवात करायचा की परत २-३ पानांचा निबंध लिहिण्याचा विचारच करु शकलो नाही.हा तरी पण १२ वीला मराठीला ८५ मार्कांचे लिहुन ७२ पडले,अगदीच वाईट नव्हते. असो माझ्या लेकीही माझ्या पेक्षा अवली असल्याने त्याही शाळेत या विषयाच काय करतील हे फारस अपेक्षित नाही.

In reply to by बाबा पाटील

माहितगार 06/10/2014 - 14:30
पाटील साहेब आपल्या मनमोकळ्या प्रतिसादासाठी आभारी आहे. बिरुटे सर वगैरे शिक्षण क्षेत्रातच काम करणार्‍या व्यक्तींचा दृष्टीकोण माहीत नाही तो ते मांडतीलच. माझ्या दृष्टीने निबंध लेखन हि केवळ लेखन कौशल्याचीच परिक्षा नाही तर व्यक्तीच्या परिपक्वतेचा संबंध बहुश्रूततेशी असावा त्याचीही परिक्षा या निमीत्ताने होत असते. प्रत्यक्ष व्यक्तीगत कारकिर्द पारपाडताना खासकरून निर्णयक्षमतेचा वापरकरण्यासाठी बहुश्रूतता असंख्य क्षेत्रात अवश्यंभावी असते. प्रत्यक्ष नसला तरी करिअरच्या प्रगतीतील काही भागावर बहुश्रूतता असणे आणि नसणे याने, तसेच लेखन आणि संवाद, स्वतःस व्यक्त होण्यासाठी या कौशल्याने फरक पडतो. महाविद्यालयीन स्तरावर खास करून संशोधन करताना लागणार्‍या प्रबंध लेखनातही विद्यार्थी मागे पडावयास लागतात. मराठी संस्थळावर अनेक लोक व्यवस्थीत आपली मते वेळे मांडू शकत नाहीत वाचणार्‍यांच्या आणि लिहिणार्‍यांच्या संख्येत पडणार्‍या फरका मागे हे एक कारण शक्य आहे. त्या शिवाय समस्यांबद्दल आणि न पटलेल्या गोष्टींबाबत वेळीच सुविहीत पद्धतीने संवाद पार न पडल्यास केवळ लेखन कौशल्याच्या अभावाने राग मनात अधिक काळ खदखदतो आणि तो अभिप्रेत नसलेया पद्धतीनेही उद्रेकीत होताना दिसतो. त्यामुळे सामाजिक दृष्ट्याही लेखन कौशल्य मह्त्वाचे असे माझे व्यक्तीगत मत आहे. . काही अंशी काही कौशल्ये व्यक्तीत अंगभूत असतात पण सुयोग्य प्रशिक्षणाची साथ असेल तर ती निखरून उठू शकतात असे वाटते आणि म्हणून निबंध लेखनाच्या कौशल्याच्या विकासाबाबत दुर्लक्ष असो अथवा टाळा टाळ पुरेसे श्रेयस्कर वाटत नाही. मनमोकळ्या प्रतिसादासाठी पुनश्च धन्यवाद

In reply to by बाबा पाटील

माहितगार 06/10/2014 - 14:50
आंतरजाल चाळतोय राज्यसेवा मुख्य परिक्षेसाठी सुद्धा निबंध लेखन हा महत्वाचा भाग असावा असे दिसते. संदर्भ

In reply to by माहितगार

बाबा पाटील 06/10/2014 - 19:18
निबंध फार फार महत्वाचा आहे किंवा त्यावरच तुमची निवड अवंबुन असते,कारण येथे स्कोर केला की अर्धे काम होवुन जाते. इव्हन तुम्ही इतर ठिकाणी जेथे संभाषन कौशल्य अपेक्षित आहे तिथेही निबंधाचाच वैचारिक पाया गरजेचा असतो.अन्यथा त्या संभाषणाची पोपटपंची होते.

In reply to by बाबा पाटील

कंजूस 06/10/2014 - 20:51
ब्रिटिशकाळांत या अधिकारीवर्गाँस धोरण ठरवण्याचे आणि अमलात आणण्याचे पूर्ण समर्थ्य होते ते आता कुठे आहे ?यांनी निबंधात लिहिलेल्या मुद्यांचे निरूपण आणि स्पष्टीकरणाची मागणी मुलाखतीत कशाला करतात ?उदा० महाराष्ट्रपर्यटन खात्याचा चांगला आराखडा निबंधात मांडला आहे .प्रत्यक्षात तो परिक्षार्थी अधिकारी झाल्यावर यातली एकतरी गोष्ट स्वतंत्रपणे करू शकेल का?

कंजूस 06/10/2014 - 15:22
लेखनसाहित्य संकलन (पुढे) वर्तमानपत्रांत रोज एकातरी विषयावर लेख येत असतो तो उपयोगी वाटल्यास कात्रण ठेवा.१५ ऑगस्ट,२६ जानेवारी,निवडणुकांच्या निकाला नंतर,मंगळयान मोहीम,खेळांच्या वल्ड कप, फिफा इत्यादी मोठ्या स्पर्धा झाल्यावर खूप लेख येतात. या दिवशींची वर्तमानपत्रे जमवावीत या सर्वाँतून भरपूर लेखनसाहित्य जमा होईल.बऱ्याच शहरांत मेट्रो येणार आहे त्याबद्दल तरुणांच्या प्रतिक्रिया आल्या त्याही हव्यात.प्रसिध्द सिध्दहस्त लेखकांच्या पुस्तकांतील घोटीव लिखाणापेक्षाही ही कात्रणेच अधिक उपयोगी पडतील. तुम्हाला क्रिकेटची आवड असली तरी थोडीफार फुटबॉल आणि प्रोकबड्डीचीही माहिती हाताशी ठेवावी लागेल. 'आजच्या खेळाचे बदलते स्वरूप' असा विषय आला तर फक्त क्रिकेटवर लिहिल्यास विषयाचा रोख समजला नाही असे वाटेल.निवडणुकांविषयी लेख जमा कराल त्याचवेळी 'मी पंतप्रधान झालो तर' असा काल्पनिक वळणाच्या विषयाला उचित असेही साहित्य तयार ठेवा.आंतरजालावर मंगळयानाची संपूर्ण माहिती मिळेल परंतू 'विज्ञानाच्या प्रगतीवर भारत' यासाठी गावातला तरूण कुठे आहे हेसुध्दा लिहावे लागेल.थोडक्यात माहिती गोळा करण्यात व्यापकता हवी.

कंजूस 06/10/2014 - 18:50
सुसंगत मांडणी आता आपल्याकडे विषयानुरूप सर्व लेखनसाहित्य आहे आणि ते निबंधाच्या आराखड्यात वेळेत लिहून पूर्ण करायचे आहे.ते कसे ते पाहू.पंधरा गुणांसाठी पंचेचाळीस ओळी लिखाण अपेक्षित असेल.सात आठ ओळींचा परिच्छेद धरल्यास सुरुवातीचा आणि समारोपाचा एकेक सोडून मुख्य विषयाच्या विस्ताराकरता चार परिच्छेद होतील. सरावासाठी प्रथम प्रत्येक परिच्छेदांत काय लिहायचे ते मांडून घ्या.एकदा लिहिण्यास सुरुवात केल्यावर खाडाखोड करता येत नाही आणि क्रम चुकल्यास सुसंगतपणा जातो .पाचसहा निबंधांचा अगोदर सराव करावा. परिक्षेच्यावेळी उत्तरपत्रिकेवरच एका ठिकाणी पेन्सलने क्रम लिहून घ्या.निबंध पूर्ण झाल्यावर खोडून टाका.एकूण सहा प्रश्नांपैकी निबंधाला दुसरे अथवा पाचवे स्थान देणे योग्य ठरेल असे वाटते. निबंधलेखनाचे जे वैचारिक,विश्लेषणात्मक,वर्णन,काल्पनिक,माहितीपर वगैरे पाच सहा प्रकार आहेत त्यापैकी एक आपला प्रत्येकाचा सोपा आणि आवडीचा असतो तर इतर अवघड वाटतील.कधी निबंधाचा विस्तार करणे तर कधी तो आटोक्यात ठेवणे कठीण वाटेल.दोन्हीँचे तंत्र साध्य करायचे आहे.

हरकाम्या 06/10/2014 - 23:42
शालेय निबन्धात दोन बाबींचा अन्तर्भाव केला तर निबन्ध हमखास वाचनीय होतो व जास्त गूणही पदरात पडतात. निबन्धात एखादे " सुभाषित " किंवा " कवितेचे कडवे " टाकले तर निबन्ध हा उत्तम होतो.मी शाळेत असताना याच पध्दतीने निबन्ध लिहित असे . माझे निबन्ध शाळेच्या नोटीसबोर्डावर लावले जात.

कंजूस 08/10/2014 - 00:24
शीर्षक आणि प्रस्तावना. तुमच्या निबंधात तुम्ही कोणते विचार मांडणार आहात त्याची एक झलक दिसेल असे शिर्षक असावे.ते एखादे वाक्य अथवा प्रश्नार्थकही देऊ शकता.फार लांबलचक नको.अगदी लगेच वरच्या ओळीत ते पेन्सलने लिहा.निबंध पूर्ण लिहिल्यावर एखादे अधिक चांगले शीर्षक सुचल्यास ते बदलता येईल. प्रस्तावना: विषयाची तोंड ओळख अथवा परिचय वाचकास पहिल्या परिच्छेदातून करून द्यायचा आहे.पर्यावरणासाठीचा विषय असेल तर पहिल्या वाक्यापासूनच आकडेवारी देणे योग्य ठरणार नाही. रेल्वेतून प्रवासाला जात होतो.प्रवाशांनी चहाचे प्लास्टिकचे कप खिडकीतून बाहेर फेकलेले पाहिले आणि पर्यावरणाचे विचार सुचत गेले अशी सुरुवात करून पुढे निबंध वाढवता येईल. खेळाचा विषय असेल तर अमुक दिवशी वर्गात शिक्षक शिकवत होते पण त्यांच्या बोलण्याकडे तुमचे लक्ष लागत नव्हते कारण संध्याकाळी टिव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या वल्डकपचीच उत्सुकता होती.असे निरनिराळे प्रसंग अथवा घटनांचे वर्णन करून तुम्ही वाचकांस निबंधाच्या मूळ विषयाकडे वळवू शकता. मासिके,साप्ताहिके आणि शनिवार -रविवारच्या वर्तमानपत्रांच्या लेखांतून बरीच चांगली उदाहरणे मिळतील.

कंजूस 08/10/2014 - 00:31
निबंधाचा गाभा: इथे तुम्हाला चार परिच्छेदांत माहिती,वर्णन,मुद्दे मांडता येतात.निबंध कसा लिहावा आणि त्याहीपेक्षा कसा लिहू नये यासाठीच्या सर्वाधिक सूचना याच विभागासाठी असतात. तुमच्या भाषाविषयक ज्ञानाची खरी कसोटी इथे लागते.पाठ करून निबंध लिहिला असेल तर तो चांगला लिहिला गेलेला असतो परंतू परिक्षकाला एक गोष्ट लगेच जाणवते ती म्हणजे तुमच्या इतर उत्तरांत आणि निबंधात भाषा वेगळी वाटू लागते.ती तुमची वाटत नाही.एकूण उत्तरे यथातथाच असतील तर अशा निबंधासही चांगले गुण देण्याचा कल राहतो.परंतू तुमचे गुण ८५ च्या वर जात असतीलतर परिक्षक नकारात्मक विचार करून बारा गुण द्यावेसे वाटत असले तरीही काही चुका काढून अकराच देईल. अशा काही चुका टाळायच्या आहेत. लागोपाठच्या दोन वाक्यात एकाच शब्दाची पुनरावृत्ती होऊ न देता त्याच अर्थाचा दुसरा शब्द येऊ द्या.म्हणी आणि वाक् -प्रचारांचा अतिरेक नको.आक्षेपार्ह टीकाटिप्पणी नको.माहिती देतांना एकसूरीपणा टाळण्यासाठी उद्गारवाचक अथवा प्रश्नार्थक वाक्ये लिहा.इंग्रजी शब्दही टाळावेत अथवा संवादात वापरावेत.एखादा श्लोक,कवितेची ओळ उधृत करा.

कंजूस 08/10/2014 - 06:53
समारोप आपण मुख्य निबंधात तीन चार मुद्दे आणि एखाददुसरे विरोधी वैयक्तिक मत मांडून लिहिले आहे.वाचकास विषयाबद्दल आस्था उत्पन्न केली आहे.अजून काही घडणाऱ्या वाईट गोष्टींची खोच,खंत त्या दूर झाल्या तर बरे वाटेल ती इथे थोडा आशावादी दृष्टिकोन ठेवून व्यक्त करता येईल.क्रिकेटच्या खेळातले होणारे मैच-फिक्सिँग बंद होऊन त्यातला आनंद कसा वाढेल, फुटबॉलमधली मुख्य खेळाडूला होणारी धक्काबुक्की याविषयी लिहिता येईल. आणखी एक मुद्दा इथे आवर्जून येऊ शकतो तो म्हणजे वाचकास महत्त्व देऊन केलेले आवाहन.मी इथे लिहिलेले अंतिम नसून तुमच्याकडेही बरेच काही असल्याचा विश्वास व्यक्त करायचा,त्याला सहभागी करून घ्यायचे.यातून आपण एक साखळीक्रिया सुरू करायला चालना देतो.पर्यावरण,पर्यटन,स्त्रियांची सुरक्षितता,सार्वजनिक स्वच्छता,संस्कृतिची जपणूक यांविषयी वाचकास काही करता येण्यासारख्या गोष्टी इथे लिहिता येतील. निबंधलेखनाच्या दोनदिवसांतल्या घटनांची,उदाहरणार्थ एखाद्या अपघातातले मदतकार्य वगैरेची चर्चा करून तुम्ही तो ठोकळेबाज जड वाटणारा निबंधसुध्दा एका क्षणांत 'तुमचा' करू शकता आणि परिक्षकाला 'तुमचा'च निबंध हवा आहे.

पैसा 08/10/2014 - 10:16
कंजूस यांचे सर्व प्रतिसाद आवडले. शाळेत असेच शिकवले होते. आकर्षक सुरुवात, विषयाची योग्य मांडणी आणि चांगला समारोप. शुद्धलेखन महत्त्वाचे आहेच. शिवाय कल्पना विस्तार किती शब्दात करणे आवश्यक आहे याचाही अंदाज घेऊन लिहिले पाहिजे. पण तेव्हा भाषा विषयात ८०-८५ मार्क्स म्हणजे खूप वाटायचे. आता मुलांना मराठी आणि इंग्लिशमधेही ९०-९५ गुण सहज मिळताना पाहून आश्चर्य वाटते. माझ्या ओळखीच्या सेंट्रल बोर्डाच्या शाळेत शिकणार्‍या काही मुलांना अगदी १२ वीत गणित आणि शास्त्रात ६५-७० गुण असताना हिंदी इंग्लिशमधे ९५ गुण मिळालेले पाहिले त्यामुळे जरा जास्तच आश्चर्य वाटलं. आता पेपर पॅटर्न बदलले असतीलच. पण निबंध तपासताना जरा सैल हाताने गुण दिले जातात का?

कंजूस 08/10/2014 - 11:50
पूर्वी 'बोर्डात' मराठीत अधिक गुण मिळवणारी मुले दापोली अथवा वसईची असत. सविस्तर उत्तरे अपेक्षित असत. आता प्रश्नांची पध्दत कॉपी करण्यासाठी सुगम अशी करण्यात आली आहे. 'गाडी फलाटाला लावली' की दोन गुण द्यावेच लागतात. आणखी एक नमुना: एक न पाहिलेला 'वेचा' /उतारा असायचा. त्याखाली चांगलेच अवघड प्रश्न असायचे. चौफेर वाचन, समज, जाण आणि मराठी भाषेवर प्रभुत्व असल्याशिवाय इथे अर्धे गुण मिळवणेही दुरापास्त होते. अशी प्रश्नपत्रिका खिडकीतून बाहेर बसलेल्या 'तय्यार टीम'कडे पाठवली तरी वेळेत उत्तरे मिळणार नाहीत. पण आता 'मुलान्ला' 'त्रास' होतो म्हणून पाठ्यपुस्तकातलाच वेचा ? देतात. अशा संभाव्य वेच्यांची संभाव्य उत्तरे घेऊन टीम तयारच असते. जाऊ द्या. दिवाळी अंकानंतर यावर एक धागाच काढू. उडु द्या धुरळा बोर्डाच्या परीक्षेपर्यंत.

अनन्न्या 09/10/2014 - 17:05
मी दहावीची पालक असल्याने यातील माहितीचा खूप चांगला उपयोग होईल. निबंध लेखनाचे साधारणपणे विषय पाठ्यपुस्तकातील पाठांशी निगडीत असू शकतात, असे गृहित धरून त्या आधारे मी मुलाशी विषयाबद्दल चर्चा करते. प्रत्येक विषयाशी निगडीत एखादी ताजी घटना त्याला सांगते. अशा माहितीचा उपयोग करून आपला मुद्दा अधिक प्रभावीपणे मांडता येईल. वाचन कमी आहेच त्यामुळे शब्दांचा तुटवडा जाणवतो. पण अजून दोन-तीन महिने बाकी आहेत, या सुट्टीत मराठीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल.

In reply to by अनन्न्या

माहितगार 09/10/2014 - 17:48
सोबतच निबंध लेखन कसे करावे ? हा लेख मराठी विकिबुक्स वर सुद्धा पाहून घ्यावा असे सुचवावेसे वाटते. त्यात ऐसी अक्षरे मधील धाग्यातील सुद्धा ऊपयूक्त माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे. विशेषतः ऐसी वरील धनंजय यांनी निबंध सरावा साठी एक दोन उदाहरणे उपलब्ध केली आहेत त्यात मार्गदर्शक टिपा आहेत पण पूर्ण निबंध नाही. अजून एक चांगली गोष्ट मिपा आणि ऐसी दोन्हीवरील मार्गदर्शकांनी अजून काही शंका असल्यास त्यांच्या निरसनाची सुद्धा तयारी ठेवली आहे. अर्थात प्रयत्न करणे आणि शंका विचारणे पाल्यांचे काम.
वाचन कमी आहेच त्यामुळे शब्दांचा तुटवडा जाणवतो
सहमत हे सर्वत्र आहे

माहितगार 09/10/2014 - 17:52
मराठी संकेतस्थळांनी विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा घेतल्यास कितपत रिस्पॉन्स मिळेल असे वाटते ? खरे म्हणजे दहावीच्या ICT मध्ये मराठी युनिकोड टायपिंगची प्रात्यक्षीकाचे मार्क/किंवा ग्रेड सुद्धा आहेत त्यासाठी त्यांना जरासा फायदा ही होईल.

माहितगार 09/10/2014 - 19:44
गूगल ट्रेंड्सच्या साहाय्याने मागे औरंगाबद, चिंचवड आणि मुंबईच्या लोकांना शिकायचय मराठी ! या मिपा धाग्यात लोक Learn Marathi चा शोध घेताहेत आणि कुठून घेताहेत इत्यादीची चर्चा केली होती. आत्ता Marathi Essay हि टर्म गूगल ट्रेंड्सच्या साहाय्याने तपासली आणि त्याचेही रिझल्ट रोचक आहेत. संदर्भ: गूगल ट्रेंड्स १ एक तर गेली पाच वर्षे Marathi Essay शोध वाढतो आहे. खास करून जुलै, सप्टेंबर आणि फेब्रुवारी महिन्यात हा शोध वाढताना दिसतो. हा शोध जास्त करून उल्हासनगर, येथून सर्वाधिक त्या खालोखाल कोल्हापूर आणि औरंगाबाद त्या नंतर नागपूर चिंचवड मुंबई पुणे असा क्रम लागतो आहे. एकदम मायनर सर्च अहमदाबाद बेंगलोर दिल्ली येथूनही आहे. मुख्य म्हणजे महाराष्ट्रातल्या इतर शहरातून Marathi Essay चा शोध घेतला जाताना दिसत नाहीए. (इंग्रजी शाळा आणि मातृभाषा मराठी नसलेल्यांच्या टक्क्या नुसार हे शोध येत असतील ?) गूगल ट्रेंड्स २ पहा २०१३ म्हणजे मागच्या वर्षा पासून Marathi Essay चा शोध Learn Marathi च्या शोधा पेक्षा अधीक घेतला जातो आहे. गूगल ट्रेंड्स ३ पूर्ण भारतात मिळून English essay या टर्मचा शोध Marathi Essay च्या केवळ दुप्पट आहे आणि जगभरात मिळून English essay टर्मचा शोध Marathi Essay शोधाच्या केवळ पाचपट (अंदाजे) आहे

अनन्न्या 10/10/2014 - 12:27
सध्या परीक्षा चालू आहे पण नंतर लेकाला वाचायला सांगते. दहावीच्या वर्षी बेस्ट फाइव्ह अशी मार्क विभागणी असल्याने आधी मराठी विषय लेकाने बाजूलाच ठेवला होता, आता सहा महिन्यात चित्र बदललेय, त्याला मराठीची गोडी वाटू लागलीय आणि माझे प्रयत्न साध्य झाले. आपली मातृभाषा मुलांनी दूर सारू नये असे वाटते. शिकवणारे शिक्षक यात फार मोठी भुमिका बजावतात, शिक्षक जर विषयाची गोडी निर्माण करू शकले तर मुले स्वतःच प्रयत्न करतात. अजूनतरी रत्नागिरीला शाळा व्यवस्थित मेहनत करून घेतात, प्रायव्हेट क्लासेससाठी मुलांची फार दमछाक होत नाही.

कंजूस 10/10/2014 - 15:01
'अजूनतरी रत्नागिरीला--' खरं आहे. कोचिंग क्लासची तयार उत्तरे म्हणजे बांधलेली शिदोरी. लेखनसाहित्य जमवून ते समोर ठेवूनच त्यातून वेचक वाक्ये लिहून तंत्र जमले की आत्मविश्वास निर्माण होईल. कोणत्याही भाषेत सोपे लिहिणे सर्वात अवघड असते. शिवाय मराठी दुय्यम भाषा म्हणून निवडली असेल (हेच विद्यार्थी गुगल आणि विकिवर शोध घेत असावेत असा माझा कयास आहे) तर त्यांना केवळ निबंधाचे तंत्र सांगून उपयोगी नाही. त्यांच्यासाठी छान सोपी वाक्ये हाताशी असणे गरजेचे आहे. ही वर्तमानपत्रांतल्या युवा सदरांतून मिळणार आहेत.

अजया 10/10/2014 - 16:34
माझाही मुलगा दहावीला आहे पण त्याला पाच विषय असल्याने मराठी विषय नाही.हिंदी आणि इंग्रजी या मुख्य भाषा.पण वरच्या कंजुस काकांच्या प्रतिसादांचा आणि इतर लिंक्सचा या दोन भाषांसाठीही नक्की होईल.(आम्हीही बिगर क्लासवाले!घरी अभ्यास करणारे!!) छान मार्गदर्शन केलंय.धन्यवाद.

निबंध हा विषय अभ्यासण्याचा नाही, असा आपल्याकडे एक गैरसमज आहे. त्यातूनच copy-paste उद्भवलंय. निबंध लेखनाविषयी थोडसं मांडते (बरेचसे शब्द इंग्रजीत असतील, कृपया त्यासाठीचे मराठी शब्द सुचवावे) १. निबंध लिहिण्यापूर्वी brain-storming, free-writing, clustering असं करावं. त्यातून विषयाची मांडणी कशी करावी आणि कोणते मुद्दे महत्वाचे आहेत हे लक्षात येतं. २. निबंध लेखनापूर्वी मुळात परिच्छेद कसा लिहावा, ह्याचं शिक्षण द्यायला हवं. निबंधातले मधले परिच्छेद लिहिण्याचं एक तंत्र असत. सुरुवातीला topic sentence आणि नंतर supporting sentences असं सर्वसाधारणपणे स्वरूप असत. ३. पहिला आणि शेवटचा परिच्छेद लिहिण्यातही काही बाबी लक्षात घ्याव्या लागतात. पहिल्या परिच्छेदात निबंधाचा गाभा मांडणारं thesis statement असावंच लागतं. ४. निबंधाच्या प्रकारानुसार काही बदल होतात. प्रत्येक प्रकाराची इथे ओळख करून देणं शक्य नाही. अर्थात, आत्ता ह्यापैकी आपल्याकडे काय शिकवलं जातं, हे मला ठाऊक नाही. मी शाळेत असताना मोठा निबंध लिहिला, एकदोन सुविचार, म्हणी ह्यांचा वापर केला की छाप पडते, असा चुकीचा समज होता. परदेशात ह्या विषयावर शिकवू लागल्यावर मी शिकले. (नितीन प्रकाशनातर्फे प्रकाशित Improve Your English Writing ह्या माझ्या पुस्तकात मी ह्या विषयावर विस्तृत लिहिलं आहे.)

माहितगार 15/03/2015 - 19:09
अलिकडे गेल्या आठवड्याभरात काही बांग्लादेशी मंडळींनी मराठी विकिपीडियावर गूगल ट्रांसलेटरच्या मदतीने एका हिंदी टिव्ही अ‍ॅक्टर बद्दल स्वतःच लेख लिहिला होता आणि इतर बांग्लादेशी मंडळी त्यातील मजकुर काढण्याचे प्रयत्न करत होती. ते तसे मराठी विकिपीडियावर येऊन का करत आहेत हे समजले नाही पण सध्या त्यांच्या बंदोबस्तासाही बारीक नजर ठेऊन आहे. आत्ता मराठी विकिपीडियावरील संपादनांची रुटीन चेकींग करत होतो त्यातील एका संपादनाच्या आढाव्यात "if there would not be any mirror in world" असे वाक्य दिसले. प्रथम दर्शनी कुणातरी अमराठी संपादकाचा उपद्व्याप आहे असे समजून बंदोबस्ताची कारवाई करावी म्हणून संपादन तपासले. ते खालील चित्रातल्या प्रमाणे दिसले. maraathi wikipedia edit example संपादन करणार्‍या महाशयाने आमच्या आदरणीय बिरुटे सरांबद्दलच्या संदर्भाशी छेडछाड केली म्हणल्यावर नाह म्हटले तरी मनात नेहमि पेक्षा जास्तच खटकले. संपादन करणार्‍याला पुन्हा हे कसे करता येणार नाही याचा बंदोबस्त कसा सक्तीने केला पाहीजे वगैरे विचार मनात येऊन गेले, काही तयारीही केली. पण पुन्हा एकदा संपादनातील फरकाकडे लक्ष गेले 'मराठी' हा शब्द भाषा= शब्दा समोरुन कट करून 'शीर्षक = शालेय निबंध समोरील इतर मजकुर कट करून, शीर्षक = शालेय निबंध = मराठी असा लिहिलेला दिसला. बदलातील आढाव्यातील इंग्रजी वाक्या कडे आधी नीटसे लक्ष गेले नव्हते. ते वाक्य पुन्हा पाहीले. "if there would not be any mirror in world" मग हे प्रकरण अशा पद्धतीने काय करू पहात आहे हे जरासे लक्षात आले. महाशयांना "जगात आरसे नसतील तर" या विषयावरील मराठीतून तयार निबंध हवा असावा, पण मराठी टाईप करता येत नसल्याने अथवा इंग्रजी माध्यमाचा विद्यार्थी असल्याने त्याने विषय इंग्रजीत लिहिला. मराठी शब्द दुसर्‍या वाक्यातून कट करून शीर्षक = शालेय निबंध = मराठी असे मराठीतून निबंध हवा आहे हे कळवण्यासाठी करुन संपादन जतन केले. ज्या गोष्टीला मी फारच सिरीयसली घेतलं तो तर आपला मराठी टाईप न करता येणारा मराठी भाबडा मराठी विद्यार्थी मित्र आहे हे लक्षात आल्या नंतर माझच मला हसू आलं. या निमीत्ताने मराठी विकिपीडियाच्या निबंध लेखावरच्या हिट्सची संख्या तपासली ती बरोबर ३ मार्च पासून निम्म्याने घटली आहे. मला वाटते ३-४ मार्चच्या आसपास दहावी एसएससी बोर्डाच्या परिक्षा चालू झाल्या असाव्यात म्हणजे निबंध विषय शोधणारी निम्म्याच्या आसपास मंडळी दहावीची असावीत. मराठी विकिपीडियावर या अशा संपदनांचा बंदोबस्त करणे हि कठीण गोष्ट नाही. दहावीला इन्फरमेशन टेकनॉलॉजी विषयाच्या माध्यमातून मराठी टायपींगची माहिती दिली जाते पण विद्यार्थ्यांना निटसे प्रशिक्षण देण्यात शिक्षकांकडूनही हयगय होत असणार. दुसरे निबंधासारखी गोष्ट ऐन परिक्षेच्या कालावधीत आंतरजालावर पूर्ण आयती शोधणार्‍या मुलांना काय म्हणावे ? असा प्रश्न मनात येऊन गेला !

कोण छेडछाड़ करतय आमच्या निबंध या विश्याबद्द्ल. माहितगार मला नेहमी वाटलं आहे, शालेय आणि महाविद्यालयीन मुलांच्या साठी थेट विविध विषयावर निबंध लिहावेत म्हणून पण मुलं हल्ली परीक्षेत मोबाईल परीक्षा हॉल मधे आणतात आणि सर्च करून प्रश्नाची उत्तर मिळवितात सालं माझा उत्साहच मावळुन जातो. खुप दिवस झाले विकि वर काय लिहिलं नाही आज संध्याकाळी तासभर बसून काही उचक-पाचक नक्की. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 16/03/2015 - 23:21
परीक्षेत मोबाईल परीक्षा हॉल मधे आणतात
गरज ही शोधाची जननी असेल तर चोर नेहमीच नवीन तंत्रज्ञानाचे अभिनव उपयोग अमलात आणतील यात नवल नाही :) यावर नियंत्रण आणण खरच शक्य नसेल तर परिक्षा कालावधी तेवढाच ठेऊन प्रश्नांची संख्या वाढवणे, डिस्क्रीप्टीव प्रश्नांचे प्रमाण वाढवणे. सध्याच्या दहावी इंग्रजी माध्यमाचा इंग्रजीचा पेपर मधील कंसेप्ट चांगली आहे. पुस्तकातला उतारा चक्क प्रश्न पत्रिकेतच असत आणि विद्यार्थ्यांना तुमच स्वतःच ओपीनीयन किंवा रिस्पॉन्स द्या म्हणून सांगितल जात हि आयडीया बरी वाटली विद्यार्थ्याच्या स्वतःच्या भाषा आकलन सर्वच कौशल्याची कसोटी लागते. अजून एक मार्ग किमान विद्यापीठीय स्तरावर राबवता येऊ शकेल तो म्हणजे ऑनलाईन परिक्षेचा आंतर्भाव करणे ज्यात विद्यार्थ्यांना युनिकोडातून लिहावे लागेल. मजकुर युनिकोडात असेल तर तो आंतरजालावरून कोठूनही चोरला असल्यास आजकालच्या संगणक प्रणाली त्या सहज शोधून देऊ शकतील आणि अशा विद्यार्थ्यांना बाद करता येऊ शकेल असे वाटते.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 16/03/2015 - 23:32
शालेय आणि महाविद्यालयीन मुलांच्या साठी थेट विविध विषयावर निबंध लिहावेत
परिक्षा केंद्रात नियंत्रण कस आणायच अथवा अभिप्रेत नसलेल्या वर्तणूकीस नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तोंड कस द्यायचे आणि आपली इतर व्यावसायिकता हे स्वतंत्र मुद्दे आहेत. आंतरजालावर हिट्सची संख्या पाहून या विषयासाठी मार्केट चांगले आहे असे वाटते. या विषयाकडे सरळ व्यावसायिक भूमीकेतून बघून लेखन करावे असे सुचवावेसे वाटते. कदाचित निबंधासाठी मुद्दे, काव्य पंक्ती, वाक्पचार सुचवणारी अ‍ॅप डेव्हेलप केल्यास खासच मार्केट मिळेल. आणि अ‍ॅप बिनधास्त डेव्हेलप करा औरंगाबादच्या आयटीच्या मुलांना चांगला प्रॉजेक्ट केल्याचे समाधान मिळेल :)

पाल्यांस अवांतर वाचनाची सवय लावा (लॉंग टर्म इलाज) निबंध आपोआप उत्कृष्ट होतील अथवा विषय समजवुन द्या निबंध हा फोडल्यास १. विषय ओळख (इंट्रोडक्शन) २. मुख्य अंग (मेन बॉडी) ३. निष्कर्ष/स्वमत/इलाज इत्यादी शेवटी मांडा

माहितगार 17/03/2015 - 09:03
पाल्यांस अवांतर वाचनाची सवय लावा (लॉंग टर्म इलाज) निबंध आपोआप उत्कृष्ट होतील
बरोबर, पण प्रॅक्टीकली कस करणार ? खास करून मराठी पालकांची इंग्रजी माध्यमात जाणारी मुलं यांचा शब्दसंग्रह इंग्रजी आणि मराठी दोन्ही अवांतर वाचनासाठी कितपत पुरेसा असतो ? इंग्रजी शाळांमध्ये त्यावर्षीचे विशीष्ट विषय कव्हर करण्यासाठी लागणार्‍या सो कॉल्ड इंग्रजी हार्डवर्ड्स पलिकडे शब्द संग्रह वाढवण्यासाठी काय मेहनत घेतली जाते या बद्दल शंकाच आहे. दुसरे घरी पाल्यांचे शाळेतून येण्यासच लागणारा १ दिडतास उशीर नंतर एक अभ्यासाचा एक खेळाचा तास अवांतर वाचनाची क्षमता आणि वेळ कुठे उरतो. अलरेडी शाळेतून बाहेर पडलेली तरुण पिढी चार ओळींच्या पुढे काही वाचावे लागले तर लगेच वैतागते लेखन कुणाचही कितीही ग्रेट अथवा महत्वाच असू द्या. दुसरे वाचनालयांची उपलब्धता कमी होत चाललेली आहे. तर आंतरजाल हाताशी आले आहे पण छपील पुस्तकातील सर्व साहित्य आंतरजालावर आले आहे अशीही स्थिती नाही. खूपच गरज भासलीतर मुलं आंतरजालावर जाऊन गूगल वापरून कामा पुरता मामा करतात झाले. पालकांनी काय केल्यास मुलांना अवांतर वाचनाची आवड लागेल ? पालकांकडे काही टिप्स असतील तर अवश्य द्याव्यात.

In reply to by काउबॉय

माहितगार 05/10/2014 - 15:07
विकिपीडिया ज्ञानकोश आहे. निबंध हे ज्ञानकोशीय फॉर्मॅटला जवळ असले तरी संशोधनपर निबंधाचा अपवाद वगळता चित्ताकर्षक, लक्षवेधक, वर्णनात्मक, आलंकारीक, रंजक लेखनासाठी अथवा लालीत्यपूर्ण लेखनाचही स्वातंत्र्य जे ज्ञानकोशीय लेखनात नसते ते निबंध लेखनात खूप आधीक उपलब्ध असते. संशोधनपर निबंधाचा फॉर्मॅट ज्ञानकोशीय लेखनास सगळ्यात जवळचा मुख्य फरक म्हणजे इतर निबंधा प्रमाणेच संशोधनपर निबंधात व्यक्तीगत निष्कर्षांची/मतांची मांडणी करता येते. ज्ञानकोशीय लेखनात सहसा इतरांच्या लेखनाचे संदर्भ देत मांडणी करावयाची असते आणि स्वतःचे व्यक्तीगत मते अथवा व्यक्तीगत निष्कर्ष शक्यतोवर टाळायचे असतात. इंग्रजी माध्यमाची मुल इंग्रजी विकिपीडियातून बर्‍याचदा कॉपीपेस्ट मारतात आणि वेळ मारून नेतात; पण विकिपीडियाचा फॉर्मॅट खरे म्हणजे शालेल्य निबंध लेखनाच्या फॉर्मॅटशी पूर्णत्वाने जुळत नाही. शालेय निबंध लेखनात विचार आणि लेखन करण्याचे प्रशिक्षण घेण्याची सर्वोत्तम संधी असते मात्र का कोण जाणे बरेच विद्यार्थी ही संधी केवळ नकला मारून दवडतात असे वाटते. (यात माझ्या पाल्यांचाही समावेश आहे)

In reply to by माहितगार

माहितगार 05/10/2014 - 13:16
हॉटेलात १२ माणस होती त्यात्यल्या ५ जणांच्ये प्रतिसाद; म्हणजे लय भारी प्रतिसाद रेशो झाला की हा :) सर्वांना मनमोकळ्या प्रतिसादांसाठी धन्यवाद

In reply to by कंजूस

माहितगार 05/10/2014 - 15:20
विकिपीडियावर दिवसागणिक ह्या किंवा त्या निबंधाच्या मागण्या होत असतात तशा मिपावर अद्याप मी तरी पाहिल्या नाहीत. गूगल कुणाला कुठे पाठवेल काय सांगता येते. धागा लेखकाचा दृष्यकल्पनाविलास 'शालेय विद्यार्थी मिपाशेतात काही ज्ञानकण टिपण्यास आले आहेत' असा मूळीच नै. त्यांचे पालक मिपाशेतात पडीक असल्यास त्यांना त्यांच्या पाल्यांसाठी उपयूक्त उपक्रमात सहभागी करून घेणे हा मुख्य उद्देश.

पैसा 05/10/2014 - 16:20
म्हणजे ही मुलं तयार निबंध आंतरजालावर शोधत असतात की काय? असे कॉपी पेस्ट केलेले निबंध परीक्षेत कसे उपयोगी पडणार?

In reply to by पैसा

माहितगार 05/10/2014 - 17:31
हम्म... काय करणार ? माझ्या घरात समजा वैज्ञानिकांविषयी पुरेशी पुस्तक आहेत मुल ती पुस्तक वाचतात पण निबंध अथवा प्रॉजेक्टसाठी चक्क आंतरजालाचाच हट्ट असतो. टिचरला इम्प्रेस करण्यासाठी बाह्य डेकोरेशन प्रॉजेक्टला चमकी बॉर्डर हि कामे मन लावून होतात. ज्यांच्या घरी इंटरनेट नाय ती मूल इंटरनेट असलेल्या मित्र मैत्रिणींच साहाय्य बिनधास्त घेत असतात. अपवादानेच एखादा पालक पुस्तक वाचनाची सवय जोडण्यात यशस्वी होतो. अमुक तमूक विषयाबद्दल निंबंध हवेत हि मराठी विकिपीडियावर मागणी नित्य नेमाने येत असे असते एवढी वर्षे अशा मागण्याही इतर उत्पातांसोबत वगळल्या जात असं हि मागणी विद्यार्थ्यांकडून येते आहे. खास करून ऑगस्ट हा फेवराइट महिना असतो आणि मराठी विकिपीडियावरील निबंध या लेखास हे विद्यार्थी सर्वाधिक पोहोचतात दुर्दैवाने त्या लेखात इंग्रजी विकिपीडियातन डकवलेला एक इंग्रजी लेख आहे. एवढ्या वर्षात निबंध या विषयाच्या लेखास एवढ्या भेटी देऊन एकाही विद्यार्थ्याने लेखात एक वाक्यही लिहिण्याची किंवा लेखातील एखादे वाक्य अनुवादीत करण्याचे जराशी तसदी सुद्धा घेतली नाही.

In reply to by माहितगार

पैसा 05/10/2014 - 18:51
आईबापच मुलांना सगळे तयार आणून देण्यासाठी बरेचदा जबाबदार असतात. मुलांना वाचायची सवय लावणे किंवा विचार करायची सवय लावणे यापेक्षा परीक्षेसाठी तयार केले जाते. आंतरजालावर, मुख्यतः फेसबुक आणि ट्विटरवर, लिहिणार्‍या या मुलांचे इंग्रजी/मराठी शुद्धलेखन हा आणखीच मोठ्या चर्चेचा विषय होईल.

जेपी 05/10/2014 - 16:51
पैसाताई,आता इंग्रजी माध्यमातील मुल निंबंध आणी प्रोजेक्ट रिपोर्टसाठी हमखास गुगलतात किंवा विकीचा वापर करतात. कहर मंजे हे करण्यासाठी त्यांचे पालकच पुढाकार घेऊन मदत करतात.

जेपी 05/10/2014 - 19:04
लातुर पॅटर्न सध्या तरी संपलाय. आता क्लासेसचे पेव फुटलय.मागील पाचवर्षात पोर कालेजात जाण्यापेक्षा ट्युशन ला हजर राहतात. सकाळी 7 ते संध्या. 7 शिकवणीत जाणारे पोरपोरी जास्त आहेत.

कंजूस 05/10/2014 - 19:24
परीक्षा हे एक तंत्र आहे.तीन तासांत पंधरा गुणांसाठी एक निबंध अर्ध्या तासात लिहायचा असतो.विद्यार्थी दिलेल्या विषयावर विचार करत बसेल तर तो निबंध पूर्ण होणार नाही. काही संभाव्य विषयांची (१)अगोदर माहिती गोळा करून ठेवणे हाच पर्याय उरतो. नंतर ऐनवेळी विषयाचा रोख(२) पाहून त्याला मध्यवर्ती ठेवून आपल्याकडची माहिती सुसंगत(३) मांडत जायचे हे तंत्र आत्मसात करायचे. निबंधाचा आराखडा ही एक लेखनाची सर्वमान्य पध्दत स्विकारलेली असते आणि त्याचक्रमाने विदयार्थ्याँनी जावे अशी परिक्षकांची अपेक्षा असते. यात (अ)सुरुवात अथवा मूळ विषयाकडे वाचकाला नेणे.(ब) गाभा अथवा विषयाला धरून माहिती लिहिणे.कमीतकमी तीन मुद्दे असावेत.अगदी कालपरवाच्या एखाद्या घटनेचा उल्लेख करून जिवंतपणा आणावा आणि आपला चौकसपणा दाखवावा.(क)समारोपात पुढील संभाव्य आणि आशावादी मत देऊन इतरांना आवाहन करता येईल. शैली ही काही एका दिवसात येणारी लेखनकला नाही परंतू नाट्यमय मांडणी,विरोधाभास, उपरोधिक,उपहास,विनोदी,अलंकारिक,संवादात्मक विचार इत्यादी प्रकारांचा काही चांगला वापर करता आला तर करावा. आत्मप्रौढी मात्र टाळावी. शुध्दलेखन हवेच.

In reply to by कंजूस

पैसा 05/10/2014 - 19:29
एखादा नमुना इथे देऊ शकाल का? किंवा असे स्टॉक निबंध (मराठीत लिहिलेले) आंतरजालावर उपलब्ध आहेत का?

In reply to by पैसा

माहितगार 06/10/2014 - 00:26
श्री. कंजूसजी यांच्या साहाय्याने (खरेतर त्यांच्या उदार अंतःकरणानेच) अत्यंत चांगले काम तडीस जाते आहे. "...मराठीचे लेखन आंतरजालावर वाढले आहे. तिथेही तयार साहित्य असणारच. खरोखर हे उपयोगाचे आहे का? चांगले लेखकच इथे लिहितात असे समजू नये.ही माध्यमे ज्यांना जमली आहेत ते लिहितात असे म्हणता येईल. .......विद्यार्थ्याचे वय आणि विचार त्याच्या लेखनात दिसायला हवेत. तयार निबंधातून ठोकळेवजा बोजड लिखाण लिहिले जाण्याची शक्यता जास्त. पेपरांतून युवा सदर असते त्यातून चांगली माहिती संकलित करावी. तयार निबंध कधीही पाठ करून लिहू नयेत." हे श्री. कंजूसजी यांचे शब्द त्यांच्याच शब्दात मुलांना भावेल असे वाटते. त्यांचे हे शब्द मी कितीही बदल करून लिहिले तरीही ते असा परिणाम (विद्यार्थ्यांशी संवाद) साधू शकणार नाहीत आणि विकि संबंधीत धाग्यांखाली प्रताधिकार मुक्त होत आहेत हे लिहिण्याचा मुख्य उद्देश हा असा सफल होऊ शकतो.
विद्यार्थ्याचे वय आणि विचार त्याच्या लेखनात दिसायला हवेत.
या कसोटीवर आमच्या पाल्याचे अलिकडे काही मार्क शाळा शिक्षकांनी कापून आमचे या विषयाकडे लक्ष वेधले. अवांतर वाचन कमी पडत असावे हे एक कारण असू शकेल पण विद्यार्थ्याचे वय आणि विचार त्याच्या लेखनात दिसताहेत अथवा नाही हे पालकांना कसे ताडता येईल आणि पालक या संदर्भाने अधिक काय काय करू शकतील असेही मार्गदर्शन मिळाल्यास आनंद होईल. सोबतच पै ताई म्हणतात तसे अगदीच जसाच्या तसा निबंध तर स्वागत असेल, सोबतच मराठी संकेतस्थळे किंवा ब्लॉगवरील शालेय विद्यार्थ्यांनी निबंधांच्या दृष्टीने दखल घेण्या जोगे काही निबंध वजा लेखन आढळल्यास अशा दुव्यांकडेही लक्ष वेधता आल्यास आभारी असेन. विकिबुक्सवर श्री कंजूसजी यांच्या प्रतिसादाचा संदर्भ देऊन निबंध लेखन कसे करावे ? लेख चालू केला आहे. संदर्भ देताना सहसा लेखकाचे नाव/टोपण नाव ही नमूद करण्याची प्रथा असते पण विद्यार्थ्यांचे मुख्य विषयाकडून लक्ष विचलीत होण्याची शक्यता तूर्तास नको म्हणून तूर्तास आपले (कंजूसजींचे) टोपण नाव विकिबुक्सवरील संदर्भात नमूद करणे टाळत आहे. गैरसमज नसावा हि विनंती.

कंजूस 05/10/2014 - 21:37
लेखनसाहित्य आणि विस्तार.निबंध लिहिण्यासाठी काय हवे आहे त्या विषयी आता एकेक मुद्दा पाहू. पुस्तकांच्या दुकानांत निबंधांची वेगळी पुस्तके मिळतात काही निबंध 'गाइड'मध्येही असतात.मराठीचे लेखन आंतरजालावर वाढले आहे.तिथेही तयार साहित्य असणारच.खरोखर हे उपयोगाचे आहे का?चांगले लेखकच इथे लिहितात असे समजू नये.ही माध्यमे ज्यांना जमली आहेत ते लिहितात असे म्हणता येईल.प्रसार माध्यमांत वर्तमानपत्रांचा क्रमांक वरचा आहे.इथेच सापडतील निबंधांचे संभाव्य विषय आणि माहिती. १)आजचे खेळाचे स्वरूप, २)निवडणूका, ३)लैंगिक शिक्षण असावे का? ४)वाढता दहशतवाद, ५)पर्यावरणाची जबाबदारी, ६)प्रसारमाध्यमे आणि करमणूक, हे विषय दहावीसाठी असले तरी आठवीपर्यँत त्यांचा रोख बदलेल.माझा आवडता खेळ,चित्रपट,सण ,विस्मरणिय सहल,आमचे शहर इत्यादी. विद्यार्थ्याचे वय आणि विचार त्याच्या लेखनात दिसायला हवेत.तयार निबंधातून ठोकळेवजा बोजड लिखाण लिहिले जाण्याची शक्यता जास्त.पेपरांतून युवा सदर असते त्यातून चांगली माहिती संकलित करावी.तयार निबंध कधीही पाठ करून लिहू नयेत.

निबंधाच्या अनेकांनी अनेक व्याख्या केल्या आहेत. नि+बन्ध+ बांधणे असा अर्थ विचराला बांधणे आणि बंधन या अर्थाने वापरल जातो. निबंधात साधक-बाधक चर्चा असते, निबंध म्हण्जे नियमांनी बद्ध असणारा लेख, मोठा लेख, नीटपणे मांडलेला विचार, वेगवेगळ्या परिच्छदातून विविध बाजू निबंधात मांडलेला असतात. निबंध हा लिहिण्याचा प्रयत्न असतो तेव्हा व्यवस्थित सुरुवात प्रयत्नपूर्वक विषय मांडणे हाच निबंधाचा उद्देश असतो. निबंधाचे दोन प्रकार १) माह्तीवजा निबंध आणि २) प्रबोधनासाठी लिहिलेले निबंध. पहिल्या प्रकारातील निबंध शालेय पातळीवरचा माहितीवजा निबंध असतो तर दुस-या प्रकारचा निबंध हा शिक्षित व्यक्तींना बहुश्रुत करण्यासाठी लिहिला गेलेला निबंध असतो. निबंध या शब्दाचा अर्थ सांगतांना मो.रा.वाळंबे म्हणतात ''निबंध या शब्दाचा अर्थ बांधणे, गुंफणे, जुळविणे, असा आहे.निबंधात जी आपण जुळणी किंवा गुंफणी करतो ती आपल्याला सुचणार्‍या विचारांची. एखाद विषय निबंधलेखनाला दिला, की त्याच्याबद्दलचे अनेक विचार आपल्या मनात एकत्र गर्दी करतात, पण ते सारेच विचार दुसर्‍याला सांगण्यासारखे असतात असे नाही, शिवाय सुचणारे विचार खुप विस्कळीत असतात, हे असे सुचणारे विचार आपण एकत्रीत करतो.'' निबंधाचे स्थूलमानाने पाच प्रकार मानल्या जातात. १) वर्णनात्मक, २)कथनात्मक,३) चिंतनात्मक, ४)कल्पनात्मक, ५) चरित्रात्मक किंवा आत्मचरित्रात्मक. असो, सर्व प्रकारात मुलांना प्रत्येक निबंधात काय करायचं आहे ते सांगितलं पाहिजे. आकर्षक सुरुवात. व्यवस्थित मांडणी, भाषा, वाचकांना लावणारी उत्सुकता निबंधात असली पाहिजे, उत्तम सुरुवात, विषयाची मांडणी आणि योग्य समारोप तुमचा निबंध उत्तम ठरवतो. -दिलीप बिरुटे

बाबा पाटील 06/10/2014 - 12:55
तुम्ही आठवण करुन दिली राव ,मी १ ली ते १२ वी एकाही पेपरमध्ये शाळेत कधी निबंधच लिहिला नाही,साला पहिलाच पेपर मराठीचा लिहुन लिहुन हात इतका दुखायला सुरवात करायचा की परत २-३ पानांचा निबंध लिहिण्याचा विचारच करु शकलो नाही.हा तरी पण १२ वीला मराठीला ८५ मार्कांचे लिहुन ७२ पडले,अगदीच वाईट नव्हते. असो माझ्या लेकीही माझ्या पेक्षा अवली असल्याने त्याही शाळेत या विषयाच काय करतील हे फारस अपेक्षित नाही.

In reply to by बाबा पाटील

माहितगार 06/10/2014 - 14:30
पाटील साहेब आपल्या मनमोकळ्या प्रतिसादासाठी आभारी आहे. बिरुटे सर वगैरे शिक्षण क्षेत्रातच काम करणार्‍या व्यक्तींचा दृष्टीकोण माहीत नाही तो ते मांडतीलच. माझ्या दृष्टीने निबंध लेखन हि केवळ लेखन कौशल्याचीच परिक्षा नाही तर व्यक्तीच्या परिपक्वतेचा संबंध बहुश्रूततेशी असावा त्याचीही परिक्षा या निमीत्ताने होत असते. प्रत्यक्ष व्यक्तीगत कारकिर्द पारपाडताना खासकरून निर्णयक्षमतेचा वापरकरण्यासाठी बहुश्रूतता असंख्य क्षेत्रात अवश्यंभावी असते. प्रत्यक्ष नसला तरी करिअरच्या प्रगतीतील काही भागावर बहुश्रूतता असणे आणि नसणे याने, तसेच लेखन आणि संवाद, स्वतःस व्यक्त होण्यासाठी या कौशल्याने फरक पडतो. महाविद्यालयीन स्तरावर खास करून संशोधन करताना लागणार्‍या प्रबंध लेखनातही विद्यार्थी मागे पडावयास लागतात. मराठी संस्थळावर अनेक लोक व्यवस्थीत आपली मते वेळे मांडू शकत नाहीत वाचणार्‍यांच्या आणि लिहिणार्‍यांच्या संख्येत पडणार्‍या फरका मागे हे एक कारण शक्य आहे. त्या शिवाय समस्यांबद्दल आणि न पटलेल्या गोष्टींबाबत वेळीच सुविहीत पद्धतीने संवाद पार न पडल्यास केवळ लेखन कौशल्याच्या अभावाने राग मनात अधिक काळ खदखदतो आणि तो अभिप्रेत नसलेया पद्धतीनेही उद्रेकीत होताना दिसतो. त्यामुळे सामाजिक दृष्ट्याही लेखन कौशल्य मह्त्वाचे असे माझे व्यक्तीगत मत आहे. . काही अंशी काही कौशल्ये व्यक्तीत अंगभूत असतात पण सुयोग्य प्रशिक्षणाची साथ असेल तर ती निखरून उठू शकतात असे वाटते आणि म्हणून निबंध लेखनाच्या कौशल्याच्या विकासाबाबत दुर्लक्ष असो अथवा टाळा टाळ पुरेसे श्रेयस्कर वाटत नाही. मनमोकळ्या प्रतिसादासाठी पुनश्च धन्यवाद

In reply to by बाबा पाटील

माहितगार 06/10/2014 - 14:50
आंतरजाल चाळतोय राज्यसेवा मुख्य परिक्षेसाठी सुद्धा निबंध लेखन हा महत्वाचा भाग असावा असे दिसते. संदर्भ

In reply to by माहितगार

बाबा पाटील 06/10/2014 - 19:18
निबंध फार फार महत्वाचा आहे किंवा त्यावरच तुमची निवड अवंबुन असते,कारण येथे स्कोर केला की अर्धे काम होवुन जाते. इव्हन तुम्ही इतर ठिकाणी जेथे संभाषन कौशल्य अपेक्षित आहे तिथेही निबंधाचाच वैचारिक पाया गरजेचा असतो.अन्यथा त्या संभाषणाची पोपटपंची होते.

In reply to by बाबा पाटील

कंजूस 06/10/2014 - 20:51
ब्रिटिशकाळांत या अधिकारीवर्गाँस धोरण ठरवण्याचे आणि अमलात आणण्याचे पूर्ण समर्थ्य होते ते आता कुठे आहे ?यांनी निबंधात लिहिलेल्या मुद्यांचे निरूपण आणि स्पष्टीकरणाची मागणी मुलाखतीत कशाला करतात ?उदा० महाराष्ट्रपर्यटन खात्याचा चांगला आराखडा निबंधात मांडला आहे .प्रत्यक्षात तो परिक्षार्थी अधिकारी झाल्यावर यातली एकतरी गोष्ट स्वतंत्रपणे करू शकेल का?

कंजूस 06/10/2014 - 15:22
लेखनसाहित्य संकलन (पुढे) वर्तमानपत्रांत रोज एकातरी विषयावर लेख येत असतो तो उपयोगी वाटल्यास कात्रण ठेवा.१५ ऑगस्ट,२६ जानेवारी,निवडणुकांच्या निकाला नंतर,मंगळयान मोहीम,खेळांच्या वल्ड कप, फिफा इत्यादी मोठ्या स्पर्धा झाल्यावर खूप लेख येतात. या दिवशींची वर्तमानपत्रे जमवावीत या सर्वाँतून भरपूर लेखनसाहित्य जमा होईल.बऱ्याच शहरांत मेट्रो येणार आहे त्याबद्दल तरुणांच्या प्रतिक्रिया आल्या त्याही हव्यात.प्रसिध्द सिध्दहस्त लेखकांच्या पुस्तकांतील घोटीव लिखाणापेक्षाही ही कात्रणेच अधिक उपयोगी पडतील. तुम्हाला क्रिकेटची आवड असली तरी थोडीफार फुटबॉल आणि प्रोकबड्डीचीही माहिती हाताशी ठेवावी लागेल. 'आजच्या खेळाचे बदलते स्वरूप' असा विषय आला तर फक्त क्रिकेटवर लिहिल्यास विषयाचा रोख समजला नाही असे वाटेल.निवडणुकांविषयी लेख जमा कराल त्याचवेळी 'मी पंतप्रधान झालो तर' असा काल्पनिक वळणाच्या विषयाला उचित असेही साहित्य तयार ठेवा.आंतरजालावर मंगळयानाची संपूर्ण माहिती मिळेल परंतू 'विज्ञानाच्या प्रगतीवर भारत' यासाठी गावातला तरूण कुठे आहे हेसुध्दा लिहावे लागेल.थोडक्यात माहिती गोळा करण्यात व्यापकता हवी.

कंजूस 06/10/2014 - 18:50
सुसंगत मांडणी आता आपल्याकडे विषयानुरूप सर्व लेखनसाहित्य आहे आणि ते निबंधाच्या आराखड्यात वेळेत लिहून पूर्ण करायचे आहे.ते कसे ते पाहू.पंधरा गुणांसाठी पंचेचाळीस ओळी लिखाण अपेक्षित असेल.सात आठ ओळींचा परिच्छेद धरल्यास सुरुवातीचा आणि समारोपाचा एकेक सोडून मुख्य विषयाच्या विस्ताराकरता चार परिच्छेद होतील. सरावासाठी प्रथम प्रत्येक परिच्छेदांत काय लिहायचे ते मांडून घ्या.एकदा लिहिण्यास सुरुवात केल्यावर खाडाखोड करता येत नाही आणि क्रम चुकल्यास सुसंगतपणा जातो .पाचसहा निबंधांचा अगोदर सराव करावा. परिक्षेच्यावेळी उत्तरपत्रिकेवरच एका ठिकाणी पेन्सलने क्रम लिहून घ्या.निबंध पूर्ण झाल्यावर खोडून टाका.एकूण सहा प्रश्नांपैकी निबंधाला दुसरे अथवा पाचवे स्थान देणे योग्य ठरेल असे वाटते. निबंधलेखनाचे जे वैचारिक,विश्लेषणात्मक,वर्णन,काल्पनिक,माहितीपर वगैरे पाच सहा प्रकार आहेत त्यापैकी एक आपला प्रत्येकाचा सोपा आणि आवडीचा असतो तर इतर अवघड वाटतील.कधी निबंधाचा विस्तार करणे तर कधी तो आटोक्यात ठेवणे कठीण वाटेल.दोन्हीँचे तंत्र साध्य करायचे आहे.

हरकाम्या 06/10/2014 - 23:42
शालेय निबन्धात दोन बाबींचा अन्तर्भाव केला तर निबन्ध हमखास वाचनीय होतो व जास्त गूणही पदरात पडतात. निबन्धात एखादे " सुभाषित " किंवा " कवितेचे कडवे " टाकले तर निबन्ध हा उत्तम होतो.मी शाळेत असताना याच पध्दतीने निबन्ध लिहित असे . माझे निबन्ध शाळेच्या नोटीसबोर्डावर लावले जात.

कंजूस 08/10/2014 - 00:24
शीर्षक आणि प्रस्तावना. तुमच्या निबंधात तुम्ही कोणते विचार मांडणार आहात त्याची एक झलक दिसेल असे शिर्षक असावे.ते एखादे वाक्य अथवा प्रश्नार्थकही देऊ शकता.फार लांबलचक नको.अगदी लगेच वरच्या ओळीत ते पेन्सलने लिहा.निबंध पूर्ण लिहिल्यावर एखादे अधिक चांगले शीर्षक सुचल्यास ते बदलता येईल. प्रस्तावना: विषयाची तोंड ओळख अथवा परिचय वाचकास पहिल्या परिच्छेदातून करून द्यायचा आहे.पर्यावरणासाठीचा विषय असेल तर पहिल्या वाक्यापासूनच आकडेवारी देणे योग्य ठरणार नाही. रेल्वेतून प्रवासाला जात होतो.प्रवाशांनी चहाचे प्लास्टिकचे कप खिडकीतून बाहेर फेकलेले पाहिले आणि पर्यावरणाचे विचार सुचत गेले अशी सुरुवात करून पुढे निबंध वाढवता येईल. खेळाचा विषय असेल तर अमुक दिवशी वर्गात शिक्षक शिकवत होते पण त्यांच्या बोलण्याकडे तुमचे लक्ष लागत नव्हते कारण संध्याकाळी टिव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या वल्डकपचीच उत्सुकता होती.असे निरनिराळे प्रसंग अथवा घटनांचे वर्णन करून तुम्ही वाचकांस निबंधाच्या मूळ विषयाकडे वळवू शकता. मासिके,साप्ताहिके आणि शनिवार -रविवारच्या वर्तमानपत्रांच्या लेखांतून बरीच चांगली उदाहरणे मिळतील.

कंजूस 08/10/2014 - 00:31
निबंधाचा गाभा: इथे तुम्हाला चार परिच्छेदांत माहिती,वर्णन,मुद्दे मांडता येतात.निबंध कसा लिहावा आणि त्याहीपेक्षा कसा लिहू नये यासाठीच्या सर्वाधिक सूचना याच विभागासाठी असतात. तुमच्या भाषाविषयक ज्ञानाची खरी कसोटी इथे लागते.पाठ करून निबंध लिहिला असेल तर तो चांगला लिहिला गेलेला असतो परंतू परिक्षकाला एक गोष्ट लगेच जाणवते ती म्हणजे तुमच्या इतर उत्तरांत आणि निबंधात भाषा वेगळी वाटू लागते.ती तुमची वाटत नाही.एकूण उत्तरे यथातथाच असतील तर अशा निबंधासही चांगले गुण देण्याचा कल राहतो.परंतू तुमचे गुण ८५ च्या वर जात असतीलतर परिक्षक नकारात्मक विचार करून बारा गुण द्यावेसे वाटत असले तरीही काही चुका काढून अकराच देईल. अशा काही चुका टाळायच्या आहेत. लागोपाठच्या दोन वाक्यात एकाच शब्दाची पुनरावृत्ती होऊ न देता त्याच अर्थाचा दुसरा शब्द येऊ द्या.म्हणी आणि वाक् -प्रचारांचा अतिरेक नको.आक्षेपार्ह टीकाटिप्पणी नको.माहिती देतांना एकसूरीपणा टाळण्यासाठी उद्गारवाचक अथवा प्रश्नार्थक वाक्ये लिहा.इंग्रजी शब्दही टाळावेत अथवा संवादात वापरावेत.एखादा श्लोक,कवितेची ओळ उधृत करा.

कंजूस 08/10/2014 - 06:53
समारोप आपण मुख्य निबंधात तीन चार मुद्दे आणि एखाददुसरे विरोधी वैयक्तिक मत मांडून लिहिले आहे.वाचकास विषयाबद्दल आस्था उत्पन्न केली आहे.अजून काही घडणाऱ्या वाईट गोष्टींची खोच,खंत त्या दूर झाल्या तर बरे वाटेल ती इथे थोडा आशावादी दृष्टिकोन ठेवून व्यक्त करता येईल.क्रिकेटच्या खेळातले होणारे मैच-फिक्सिँग बंद होऊन त्यातला आनंद कसा वाढेल, फुटबॉलमधली मुख्य खेळाडूला होणारी धक्काबुक्की याविषयी लिहिता येईल. आणखी एक मुद्दा इथे आवर्जून येऊ शकतो तो म्हणजे वाचकास महत्त्व देऊन केलेले आवाहन.मी इथे लिहिलेले अंतिम नसून तुमच्याकडेही बरेच काही असल्याचा विश्वास व्यक्त करायचा,त्याला सहभागी करून घ्यायचे.यातून आपण एक साखळीक्रिया सुरू करायला चालना देतो.पर्यावरण,पर्यटन,स्त्रियांची सुरक्षितता,सार्वजनिक स्वच्छता,संस्कृतिची जपणूक यांविषयी वाचकास काही करता येण्यासारख्या गोष्टी इथे लिहिता येतील. निबंधलेखनाच्या दोनदिवसांतल्या घटनांची,उदाहरणार्थ एखाद्या अपघातातले मदतकार्य वगैरेची चर्चा करून तुम्ही तो ठोकळेबाज जड वाटणारा निबंधसुध्दा एका क्षणांत 'तुमचा' करू शकता आणि परिक्षकाला 'तुमचा'च निबंध हवा आहे.

पैसा 08/10/2014 - 10:16
कंजूस यांचे सर्व प्रतिसाद आवडले. शाळेत असेच शिकवले होते. आकर्षक सुरुवात, विषयाची योग्य मांडणी आणि चांगला समारोप. शुद्धलेखन महत्त्वाचे आहेच. शिवाय कल्पना विस्तार किती शब्दात करणे आवश्यक आहे याचाही अंदाज घेऊन लिहिले पाहिजे. पण तेव्हा भाषा विषयात ८०-८५ मार्क्स म्हणजे खूप वाटायचे. आता मुलांना मराठी आणि इंग्लिशमधेही ९०-९५ गुण सहज मिळताना पाहून आश्चर्य वाटते. माझ्या ओळखीच्या सेंट्रल बोर्डाच्या शाळेत शिकणार्‍या काही मुलांना अगदी १२ वीत गणित आणि शास्त्रात ६५-७० गुण असताना हिंदी इंग्लिशमधे ९५ गुण मिळालेले पाहिले त्यामुळे जरा जास्तच आश्चर्य वाटलं. आता पेपर पॅटर्न बदलले असतीलच. पण निबंध तपासताना जरा सैल हाताने गुण दिले जातात का?

कंजूस 08/10/2014 - 11:50
पूर्वी 'बोर्डात' मराठीत अधिक गुण मिळवणारी मुले दापोली अथवा वसईची असत. सविस्तर उत्तरे अपेक्षित असत. आता प्रश्नांची पध्दत कॉपी करण्यासाठी सुगम अशी करण्यात आली आहे. 'गाडी फलाटाला लावली' की दोन गुण द्यावेच लागतात. आणखी एक नमुना: एक न पाहिलेला 'वेचा' /उतारा असायचा. त्याखाली चांगलेच अवघड प्रश्न असायचे. चौफेर वाचन, समज, जाण आणि मराठी भाषेवर प्रभुत्व असल्याशिवाय इथे अर्धे गुण मिळवणेही दुरापास्त होते. अशी प्रश्नपत्रिका खिडकीतून बाहेर बसलेल्या 'तय्यार टीम'कडे पाठवली तरी वेळेत उत्तरे मिळणार नाहीत. पण आता 'मुलान्ला' 'त्रास' होतो म्हणून पाठ्यपुस्तकातलाच वेचा ? देतात. अशा संभाव्य वेच्यांची संभाव्य उत्तरे घेऊन टीम तयारच असते. जाऊ द्या. दिवाळी अंकानंतर यावर एक धागाच काढू. उडु द्या धुरळा बोर्डाच्या परीक्षेपर्यंत.

अनन्न्या 09/10/2014 - 17:05
मी दहावीची पालक असल्याने यातील माहितीचा खूप चांगला उपयोग होईल. निबंध लेखनाचे साधारणपणे विषय पाठ्यपुस्तकातील पाठांशी निगडीत असू शकतात, असे गृहित धरून त्या आधारे मी मुलाशी विषयाबद्दल चर्चा करते. प्रत्येक विषयाशी निगडीत एखादी ताजी घटना त्याला सांगते. अशा माहितीचा उपयोग करून आपला मुद्दा अधिक प्रभावीपणे मांडता येईल. वाचन कमी आहेच त्यामुळे शब्दांचा तुटवडा जाणवतो. पण अजून दोन-तीन महिने बाकी आहेत, या सुट्टीत मराठीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल.

In reply to by अनन्न्या

माहितगार 09/10/2014 - 17:48
सोबतच निबंध लेखन कसे करावे ? हा लेख मराठी विकिबुक्स वर सुद्धा पाहून घ्यावा असे सुचवावेसे वाटते. त्यात ऐसी अक्षरे मधील धाग्यातील सुद्धा ऊपयूक्त माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे. विशेषतः ऐसी वरील धनंजय यांनी निबंध सरावा साठी एक दोन उदाहरणे उपलब्ध केली आहेत त्यात मार्गदर्शक टिपा आहेत पण पूर्ण निबंध नाही. अजून एक चांगली गोष्ट मिपा आणि ऐसी दोन्हीवरील मार्गदर्शकांनी अजून काही शंका असल्यास त्यांच्या निरसनाची सुद्धा तयारी ठेवली आहे. अर्थात प्रयत्न करणे आणि शंका विचारणे पाल्यांचे काम.
वाचन कमी आहेच त्यामुळे शब्दांचा तुटवडा जाणवतो
सहमत हे सर्वत्र आहे

माहितगार 09/10/2014 - 17:52
मराठी संकेतस्थळांनी विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा घेतल्यास कितपत रिस्पॉन्स मिळेल असे वाटते ? खरे म्हणजे दहावीच्या ICT मध्ये मराठी युनिकोड टायपिंगची प्रात्यक्षीकाचे मार्क/किंवा ग्रेड सुद्धा आहेत त्यासाठी त्यांना जरासा फायदा ही होईल.

माहितगार 09/10/2014 - 19:44
गूगल ट्रेंड्सच्या साहाय्याने मागे औरंगाबद, चिंचवड आणि मुंबईच्या लोकांना शिकायचय मराठी ! या मिपा धाग्यात लोक Learn Marathi चा शोध घेताहेत आणि कुठून घेताहेत इत्यादीची चर्चा केली होती. आत्ता Marathi Essay हि टर्म गूगल ट्रेंड्सच्या साहाय्याने तपासली आणि त्याचेही रिझल्ट रोचक आहेत. संदर्भ: गूगल ट्रेंड्स १ एक तर गेली पाच वर्षे Marathi Essay शोध वाढतो आहे. खास करून जुलै, सप्टेंबर आणि फेब्रुवारी महिन्यात हा शोध वाढताना दिसतो. हा शोध जास्त करून उल्हासनगर, येथून सर्वाधिक त्या खालोखाल कोल्हापूर आणि औरंगाबाद त्या नंतर नागपूर चिंचवड मुंबई पुणे असा क्रम लागतो आहे. एकदम मायनर सर्च अहमदाबाद बेंगलोर दिल्ली येथूनही आहे. मुख्य म्हणजे महाराष्ट्रातल्या इतर शहरातून Marathi Essay चा शोध घेतला जाताना दिसत नाहीए. (इंग्रजी शाळा आणि मातृभाषा मराठी नसलेल्यांच्या टक्क्या नुसार हे शोध येत असतील ?) गूगल ट्रेंड्स २ पहा २०१३ म्हणजे मागच्या वर्षा पासून Marathi Essay चा शोध Learn Marathi च्या शोधा पेक्षा अधीक घेतला जातो आहे. गूगल ट्रेंड्स ३ पूर्ण भारतात मिळून English essay या टर्मचा शोध Marathi Essay च्या केवळ दुप्पट आहे आणि जगभरात मिळून English essay टर्मचा शोध Marathi Essay शोधाच्या केवळ पाचपट (अंदाजे) आहे

अनन्न्या 10/10/2014 - 12:27
सध्या परीक्षा चालू आहे पण नंतर लेकाला वाचायला सांगते. दहावीच्या वर्षी बेस्ट फाइव्ह अशी मार्क विभागणी असल्याने आधी मराठी विषय लेकाने बाजूलाच ठेवला होता, आता सहा महिन्यात चित्र बदललेय, त्याला मराठीची गोडी वाटू लागलीय आणि माझे प्रयत्न साध्य झाले. आपली मातृभाषा मुलांनी दूर सारू नये असे वाटते. शिकवणारे शिक्षक यात फार मोठी भुमिका बजावतात, शिक्षक जर विषयाची गोडी निर्माण करू शकले तर मुले स्वतःच प्रयत्न करतात. अजूनतरी रत्नागिरीला शाळा व्यवस्थित मेहनत करून घेतात, प्रायव्हेट क्लासेससाठी मुलांची फार दमछाक होत नाही.

कंजूस 10/10/2014 - 15:01
'अजूनतरी रत्नागिरीला--' खरं आहे. कोचिंग क्लासची तयार उत्तरे म्हणजे बांधलेली शिदोरी. लेखनसाहित्य जमवून ते समोर ठेवूनच त्यातून वेचक वाक्ये लिहून तंत्र जमले की आत्मविश्वास निर्माण होईल. कोणत्याही भाषेत सोपे लिहिणे सर्वात अवघड असते. शिवाय मराठी दुय्यम भाषा म्हणून निवडली असेल (हेच विद्यार्थी गुगल आणि विकिवर शोध घेत असावेत असा माझा कयास आहे) तर त्यांना केवळ निबंधाचे तंत्र सांगून उपयोगी नाही. त्यांच्यासाठी छान सोपी वाक्ये हाताशी असणे गरजेचे आहे. ही वर्तमानपत्रांतल्या युवा सदरांतून मिळणार आहेत.

अजया 10/10/2014 - 16:34
माझाही मुलगा दहावीला आहे पण त्याला पाच विषय असल्याने मराठी विषय नाही.हिंदी आणि इंग्रजी या मुख्य भाषा.पण वरच्या कंजुस काकांच्या प्रतिसादांचा आणि इतर लिंक्सचा या दोन भाषांसाठीही नक्की होईल.(आम्हीही बिगर क्लासवाले!घरी अभ्यास करणारे!!) छान मार्गदर्शन केलंय.धन्यवाद.

निबंध हा विषय अभ्यासण्याचा नाही, असा आपल्याकडे एक गैरसमज आहे. त्यातूनच copy-paste उद्भवलंय. निबंध लेखनाविषयी थोडसं मांडते (बरेचसे शब्द इंग्रजीत असतील, कृपया त्यासाठीचे मराठी शब्द सुचवावे) १. निबंध लिहिण्यापूर्वी brain-storming, free-writing, clustering असं करावं. त्यातून विषयाची मांडणी कशी करावी आणि कोणते मुद्दे महत्वाचे आहेत हे लक्षात येतं. २. निबंध लेखनापूर्वी मुळात परिच्छेद कसा लिहावा, ह्याचं शिक्षण द्यायला हवं. निबंधातले मधले परिच्छेद लिहिण्याचं एक तंत्र असत. सुरुवातीला topic sentence आणि नंतर supporting sentences असं सर्वसाधारणपणे स्वरूप असत. ३. पहिला आणि शेवटचा परिच्छेद लिहिण्यातही काही बाबी लक्षात घ्याव्या लागतात. पहिल्या परिच्छेदात निबंधाचा गाभा मांडणारं thesis statement असावंच लागतं. ४. निबंधाच्या प्रकारानुसार काही बदल होतात. प्रत्येक प्रकाराची इथे ओळख करून देणं शक्य नाही. अर्थात, आत्ता ह्यापैकी आपल्याकडे काय शिकवलं जातं, हे मला ठाऊक नाही. मी शाळेत असताना मोठा निबंध लिहिला, एकदोन सुविचार, म्हणी ह्यांचा वापर केला की छाप पडते, असा चुकीचा समज होता. परदेशात ह्या विषयावर शिकवू लागल्यावर मी शिकले. (नितीन प्रकाशनातर्फे प्रकाशित Improve Your English Writing ह्या माझ्या पुस्तकात मी ह्या विषयावर विस्तृत लिहिलं आहे.)

माहितगार 15/03/2015 - 19:09
अलिकडे गेल्या आठवड्याभरात काही बांग्लादेशी मंडळींनी मराठी विकिपीडियावर गूगल ट्रांसलेटरच्या मदतीने एका हिंदी टिव्ही अ‍ॅक्टर बद्दल स्वतःच लेख लिहिला होता आणि इतर बांग्लादेशी मंडळी त्यातील मजकुर काढण्याचे प्रयत्न करत होती. ते तसे मराठी विकिपीडियावर येऊन का करत आहेत हे समजले नाही पण सध्या त्यांच्या बंदोबस्तासाही बारीक नजर ठेऊन आहे. आत्ता मराठी विकिपीडियावरील संपादनांची रुटीन चेकींग करत होतो त्यातील एका संपादनाच्या आढाव्यात "if there would not be any mirror in world" असे वाक्य दिसले. प्रथम दर्शनी कुणातरी अमराठी संपादकाचा उपद्व्याप आहे असे समजून बंदोबस्ताची कारवाई करावी म्हणून संपादन तपासले. ते खालील चित्रातल्या प्रमाणे दिसले. maraathi wikipedia edit example संपादन करणार्‍या महाशयाने आमच्या आदरणीय बिरुटे सरांबद्दलच्या संदर्भाशी छेडछाड केली म्हणल्यावर नाह म्हटले तरी मनात नेहमि पेक्षा जास्तच खटकले. संपादन करणार्‍याला पुन्हा हे कसे करता येणार नाही याचा बंदोबस्त कसा सक्तीने केला पाहीजे वगैरे विचार मनात येऊन गेले, काही तयारीही केली. पण पुन्हा एकदा संपादनातील फरकाकडे लक्ष गेले 'मराठी' हा शब्द भाषा= शब्दा समोरुन कट करून 'शीर्षक = शालेय निबंध समोरील इतर मजकुर कट करून, शीर्षक = शालेय निबंध = मराठी असा लिहिलेला दिसला. बदलातील आढाव्यातील इंग्रजी वाक्या कडे आधी नीटसे लक्ष गेले नव्हते. ते वाक्य पुन्हा पाहीले. "if there would not be any mirror in world" मग हे प्रकरण अशा पद्धतीने काय करू पहात आहे हे जरासे लक्षात आले. महाशयांना "जगात आरसे नसतील तर" या विषयावरील मराठीतून तयार निबंध हवा असावा, पण मराठी टाईप करता येत नसल्याने अथवा इंग्रजी माध्यमाचा विद्यार्थी असल्याने त्याने विषय इंग्रजीत लिहिला. मराठी शब्द दुसर्‍या वाक्यातून कट करून शीर्षक = शालेय निबंध = मराठी असे मराठीतून निबंध हवा आहे हे कळवण्यासाठी करुन संपादन जतन केले. ज्या गोष्टीला मी फारच सिरीयसली घेतलं तो तर आपला मराठी टाईप न करता येणारा मराठी भाबडा मराठी विद्यार्थी मित्र आहे हे लक्षात आल्या नंतर माझच मला हसू आलं. या निमीत्ताने मराठी विकिपीडियाच्या निबंध लेखावरच्या हिट्सची संख्या तपासली ती बरोबर ३ मार्च पासून निम्म्याने घटली आहे. मला वाटते ३-४ मार्चच्या आसपास दहावी एसएससी बोर्डाच्या परिक्षा चालू झाल्या असाव्यात म्हणजे निबंध विषय शोधणारी निम्म्याच्या आसपास मंडळी दहावीची असावीत. मराठी विकिपीडियावर या अशा संपदनांचा बंदोबस्त करणे हि कठीण गोष्ट नाही. दहावीला इन्फरमेशन टेकनॉलॉजी विषयाच्या माध्यमातून मराठी टायपींगची माहिती दिली जाते पण विद्यार्थ्यांना निटसे प्रशिक्षण देण्यात शिक्षकांकडूनही हयगय होत असणार. दुसरे निबंधासारखी गोष्ट ऐन परिक्षेच्या कालावधीत आंतरजालावर पूर्ण आयती शोधणार्‍या मुलांना काय म्हणावे ? असा प्रश्न मनात येऊन गेला !

कोण छेडछाड़ करतय आमच्या निबंध या विश्याबद्द्ल. माहितगार मला नेहमी वाटलं आहे, शालेय आणि महाविद्यालयीन मुलांच्या साठी थेट विविध विषयावर निबंध लिहावेत म्हणून पण मुलं हल्ली परीक्षेत मोबाईल परीक्षा हॉल मधे आणतात आणि सर्च करून प्रश्नाची उत्तर मिळवितात सालं माझा उत्साहच मावळुन जातो. खुप दिवस झाले विकि वर काय लिहिलं नाही आज संध्याकाळी तासभर बसून काही उचक-पाचक नक्की. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 16/03/2015 - 23:21
परीक्षेत मोबाईल परीक्षा हॉल मधे आणतात
गरज ही शोधाची जननी असेल तर चोर नेहमीच नवीन तंत्रज्ञानाचे अभिनव उपयोग अमलात आणतील यात नवल नाही :) यावर नियंत्रण आणण खरच शक्य नसेल तर परिक्षा कालावधी तेवढाच ठेऊन प्रश्नांची संख्या वाढवणे, डिस्क्रीप्टीव प्रश्नांचे प्रमाण वाढवणे. सध्याच्या दहावी इंग्रजी माध्यमाचा इंग्रजीचा पेपर मधील कंसेप्ट चांगली आहे. पुस्तकातला उतारा चक्क प्रश्न पत्रिकेतच असत आणि विद्यार्थ्यांना तुमच स्वतःच ओपीनीयन किंवा रिस्पॉन्स द्या म्हणून सांगितल जात हि आयडीया बरी वाटली विद्यार्थ्याच्या स्वतःच्या भाषा आकलन सर्वच कौशल्याची कसोटी लागते. अजून एक मार्ग किमान विद्यापीठीय स्तरावर राबवता येऊ शकेल तो म्हणजे ऑनलाईन परिक्षेचा आंतर्भाव करणे ज्यात विद्यार्थ्यांना युनिकोडातून लिहावे लागेल. मजकुर युनिकोडात असेल तर तो आंतरजालावरून कोठूनही चोरला असल्यास आजकालच्या संगणक प्रणाली त्या सहज शोधून देऊ शकतील आणि अशा विद्यार्थ्यांना बाद करता येऊ शकेल असे वाटते.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 16/03/2015 - 23:32
शालेय आणि महाविद्यालयीन मुलांच्या साठी थेट विविध विषयावर निबंध लिहावेत
परिक्षा केंद्रात नियंत्रण कस आणायच अथवा अभिप्रेत नसलेल्या वर्तणूकीस नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तोंड कस द्यायचे आणि आपली इतर व्यावसायिकता हे स्वतंत्र मुद्दे आहेत. आंतरजालावर हिट्सची संख्या पाहून या विषयासाठी मार्केट चांगले आहे असे वाटते. या विषयाकडे सरळ व्यावसायिक भूमीकेतून बघून लेखन करावे असे सुचवावेसे वाटते. कदाचित निबंधासाठी मुद्दे, काव्य पंक्ती, वाक्पचार सुचवणारी अ‍ॅप डेव्हेलप केल्यास खासच मार्केट मिळेल. आणि अ‍ॅप बिनधास्त डेव्हेलप करा औरंगाबादच्या आयटीच्या मुलांना चांगला प्रॉजेक्ट केल्याचे समाधान मिळेल :)

पाल्यांस अवांतर वाचनाची सवय लावा (लॉंग टर्म इलाज) निबंध आपोआप उत्कृष्ट होतील अथवा विषय समजवुन द्या निबंध हा फोडल्यास १. विषय ओळख (इंट्रोडक्शन) २. मुख्य अंग (मेन बॉडी) ३. निष्कर्ष/स्वमत/इलाज इत्यादी शेवटी मांडा

माहितगार 17/03/2015 - 09:03
पाल्यांस अवांतर वाचनाची सवय लावा (लॉंग टर्म इलाज) निबंध आपोआप उत्कृष्ट होतील
बरोबर, पण प्रॅक्टीकली कस करणार ? खास करून मराठी पालकांची इंग्रजी माध्यमात जाणारी मुलं यांचा शब्दसंग्रह इंग्रजी आणि मराठी दोन्ही अवांतर वाचनासाठी कितपत पुरेसा असतो ? इंग्रजी शाळांमध्ये त्यावर्षीचे विशीष्ट विषय कव्हर करण्यासाठी लागणार्‍या सो कॉल्ड इंग्रजी हार्डवर्ड्स पलिकडे शब्द संग्रह वाढवण्यासाठी काय मेहनत घेतली जाते या बद्दल शंकाच आहे. दुसरे घरी पाल्यांचे शाळेतून येण्यासच लागणारा १ दिडतास उशीर नंतर एक अभ्यासाचा एक खेळाचा तास अवांतर वाचनाची क्षमता आणि वेळ कुठे उरतो. अलरेडी शाळेतून बाहेर पडलेली तरुण पिढी चार ओळींच्या पुढे काही वाचावे लागले तर लगेच वैतागते लेखन कुणाचही कितीही ग्रेट अथवा महत्वाच असू द्या. दुसरे वाचनालयांची उपलब्धता कमी होत चाललेली आहे. तर आंतरजाल हाताशी आले आहे पण छपील पुस्तकातील सर्व साहित्य आंतरजालावर आले आहे अशीही स्थिती नाही. खूपच गरज भासलीतर मुलं आंतरजालावर जाऊन गूगल वापरून कामा पुरता मामा करतात झाले. पालकांनी काय केल्यास मुलांना अवांतर वाचनाची आवड लागेल ? पालकांकडे काही टिप्स असतील तर अवश्य द्याव्यात.

देणाऱ्याने देत जावे.....

_मनश्री_ ·

सर्वसाक्षी 05/10/2014 - 18:45
आपल्या बिझी शेड्युल मधून थोडासा वेळ काढून तो आपल्या आई वडिलांसाठी देऊ शकतो
हे तर परमसुख! किमान कर्तव्य. यात दान कसले? मातापित्यांना आपल्या सहवासाचा लाभ देणे हा दानधर्म समजणारे जे कुणी असतील त्या समस्त दानशूर कर्णांना माझा प्रणाम.

In reply to by सर्वसाक्षी

_मनश्री_ 05/10/2014 - 18:56
अगदी बरोबर आई वडिलांसाठी वेळ काढण हे प्रत्येक अपत्याच परम आणि प्रथम कर्तव्य आहे . पण एका गावात रहात असून ६ महिने आई वडिलांकडे न फिरकणारे भरपूर दानशूर आजूबाजूला खूप बघितले आजारी वडिलांना मी येऊन काय होणार आहे मी काय डॉक्टर आहे का ? अस सांगणारे महाभाग सुद्धा पाहिले

अर्धवटराव 06/10/2014 - 05:23
चर्चील साहेबांनी देखील यावर कमेण्ट केली आहे होय. मला वाटायचं या माणसाला फक्त घेणं (ओरबाडणं)च ठाऊक होतं.

सर्वसाक्षी 05/10/2014 - 18:45
आपल्या बिझी शेड्युल मधून थोडासा वेळ काढून तो आपल्या आई वडिलांसाठी देऊ शकतो
हे तर परमसुख! किमान कर्तव्य. यात दान कसले? मातापित्यांना आपल्या सहवासाचा लाभ देणे हा दानधर्म समजणारे जे कुणी असतील त्या समस्त दानशूर कर्णांना माझा प्रणाम.

In reply to by सर्वसाक्षी

_मनश्री_ 05/10/2014 - 18:56
अगदी बरोबर आई वडिलांसाठी वेळ काढण हे प्रत्येक अपत्याच परम आणि प्रथम कर्तव्य आहे . पण एका गावात रहात असून ६ महिने आई वडिलांकडे न फिरकणारे भरपूर दानशूर आजूबाजूला खूप बघितले आजारी वडिलांना मी येऊन काय होणार आहे मी काय डॉक्टर आहे का ? अस सांगणारे महाभाग सुद्धा पाहिले

अर्धवटराव 06/10/2014 - 05:23
चर्चील साहेबांनी देखील यावर कमेण्ट केली आहे होय. मला वाटायचं या माणसाला फक्त घेणं (ओरबाडणं)च ठाऊक होतं.
लेखनविषय:
लेखनप्रकार
देणाऱ्याने देत घेणाऱ्याने घेत रहावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे . देण्याचा आनंद हा घेण्याच्या आनंदापेक्षा खूप मोठा असतो . २ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर हा आठवडा जगात joy of giving week म्हणून साजरा केला जातो . भारतात हा आठवडा 'दान उत्सव' या नावाने साजरा केला जातो . प्रत्येक जण यथाशक्ती सहभाग घेतो ... देण्याच्या वृत्तीचे अनमोल, दैवी मूल्य आहे. सर्व धर्मग्रंथ ह्या वृत्तीला, कृत्याला अव्वल दर्जा देतात. हा एक मोठ्यातला मोठा संस्कार जोपासला गेला पाहिजे. निसर्गाकडून हीच शिकवण आपल्याला मिळते. ही देण्याची वृत्ती मात्र सहजपणे आढळत नाही. देणं म्हणजे केवळ आर्थिक दान असा गैरसमज नसावा.

भाजपला मत देण्याअगोदर

सागरलहरी ·

रक्षा खडसे,पंकजा मुंडे? असो. दोन्ही सेना नेते वात्रटासारखे बरळत आहेत. त्यामानाने भाजपावाले बरे. राष्ट्रवादी आता पवारवादी झाले आहेत.शरद आपल्या कन्येचे व पुतण्याचे घोडे पुढे दामटतोय.'शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आदित्य ठाकरे....' अशी बातमी ह्यांनी कुठ्ल्या एका चॅनेलवर ऐकली व ह्यांना ताप भरला... तो बीट्स पिलानीवाला संगणकतज्ञ पृथ्वीराजच योग्य वाटतोय.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

vikramaditya 06/10/2014 - 17:08
सर्व नेत्यांना 'एकेरी' संबोधलेले बघुन भारी मौज वाटते. अर्थात तो तुमचा अधिकारच आहे म्हणा.

कंजूस 05/10/2014 - 06:57

केंद्रासारखेच येथे बहुमत मिळेल असे भाजपला वाटते आहे.

चौकटराजा 05/10/2014 - 08:27
कॉग्रेस हा भाजपाचा राजकीय गुरू असून. हळू हळू भाजपाचा ही बॅका, युनियन्स , कारखाने यात प्रवेश होत आहे. त्यानी ऑलरेडी म गांधी उचलले आहेतच .शिवाजी महाराज ही. काही दिवसानी ते इतरानाही राजकारणाच्या पाशात ओढतील. मुळात संघात काही काळ घातलेला माणूस किंवा सेवादलात असलेला माणूस काँग्रेसी नेत्यापेक्षा भाषणबाजीत अधिक तेज असतोच. व भाषणांचा राजकारणात फार मोठा रोल असतो. श्री शरद पवारांची भाषणे ऐकलीत तर त्यात काही दम नसतो. हे दिसून येईल. तात्पर्य- भाजपा ही एक वीट असून ती इतर दगडांपेक्षा मऊ आहे हे नक्की.

तुम्हीच प्रश्न विचारलेयत आणि तुम्हीच उत्तरं दिलियेत... त्यामुळे हा प्रचार धागा ठरून त्याचं मूल्य शून्य झालंय..... तरीही महाराष्ट्रापुरता भाजपाचा विचार करता.... मोदी नॅशनल नेते आहेत हे चांगलं आहे, पण जर ते भारताचं पंतप्रधानपद सोडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला तयार नसतील तर... महाराष्ट्रातलं विद्यमान भाजपा नेतेमंडळ अगदी म्हणजे अगदीच सुमार आहे!!!! खडसे एका विरोधी पक्षाचे नेते म्हणून ठीक आहेत पण त्यांच्यात मुख्यमंत्रीपद पेलण्याची क्षमता आहे असं वाटत नाही. तरी सर्वाधिक आदर खडसेंबद्दलच आहे. बाकीचे नेते काय वर्णावे? फडणवीस, हे गेल्या काही महिन्यांपूर्वी कोण होते, कुठे होते? तावडे, हे कोकणातले नेते असावेत. आधी कोकणातल्या एखाद्या मतदारसंघातून निवडून आले तरच यांचा विचार करूया. आणि रक्षा खडसे आणि पंकजा मुंडे? महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद म्हणजे काय भातुकली आहे का? (हाच प्रश्न आम्ही आदित्य ठाकरेंना करू इच्छितो, सबब आमच्यावर सेक्सिस्ट असा आरोप करू नये!!!)

In reply to by पिवळा डांबिस

रक्षा खडसे आणि पंकजा मुंडे? महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद म्हणजे काय भातुकली आहे का? ह्यांच्यापैकी कोणाला उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद देण्याचा मूर्खपणा, मला वाटतं, भाजपात कोणी करणार नाही. फक्त भविष्यातील महिला नेत्यांना पुढे आणण्यासाठी आत्तापासून 'हवा' निर्माण करण्याचे कार्य सुरु झाले आहे.

In reply to by पिवळा डांबिस

फडणवीस कोण होते हे शोधले तर सापडेल. वयाच्या २१व्या वर्षी स्वकर्तृत्वाने नागपूराचे महापौर फडणवीस झाले होते. भारतातले लहान वयात महापौर बनणारे दुसरे नेते होत. कायद्याची पदवी प्राप्त केलेले फडणवीस बर्लिनमधील कोणत्यातरी कायदेविषयक संस्थेचे पदवीधरही आहेत. आताच्या लेटेस्ट इलेक्शन मधे मुंडे, गडकरी गटांमधल्या साठमार्‍या थांबवण्याचे श्रेय फडणवीसांचेच. त्यांच्या अभ्यासपूर्ण मुलाखती पाहील्या असत्या तर हा प्रश्न कदाचित पडला नसता. पण भारताबाहेर कदाचित या बातम्यांचा रतीब नसावा म्हणून तुम्हाला त्या पहायला मिळाल्या नसतील असे असणे शक्य आहे. कारण भाजपाच नव्हे तर इतर विरोधकही देवेंद्र हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकतो म्हणून 'शेटजी भटजी' असा प्रचार करू लागले आहेत. तावडे कोण आहेत बरे? २००३-०४ मधे गीतरामायणाच्या ५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुंबईच्या शिवाजी पार्कावर गीत रामायाणाचा जंगी कार्यक्रम घडवून हे प्रकाशात आले. तेव्हा पासून ते भाजपाचा मराठा चेहरा म्हणून ओळखले जातात आशिष शेलार हे त्यांचे एक मोठे सहकारी. असो.

In reply to by उदयन

विजुभाऊ 07/10/2014 - 13:14
केंद्रीय मंत्री असणार्या शोभा फडणवीस या देवेंद्र फडणवीस यांच्या नातेवाईक आहेत का ?
हो त्याच त्या चणा डाल घोटाळा फेम शोभा फडणवीस या देवेंद्र यांच्या आई आहेत.

In reply to by विजुभाऊ

चणा डाळीत घोटाळा!!! निदान मसुर डाळीत तरी घोटाळा करायचा ,तेवढेच ,'भगव्याशी ईमान राखले' अशी पळवाट शोधता आली असती!!!! :lol:

In reply to by विजुभाऊ

होबासराव 07/10/2014 - 20:01
देवेंन्द्र फडणवीस आणि शोभा फडणवीस ह्यांच्यात फक्त आडणाव साध्यर्म आहे. भुमिकेचं बेअरिंग सांभाळा पण विरोध करायचा म्हणुन काहिहि बोलु नका...तुमच्यात आणि त्या माईसाहेब, नानासाहेब आणि आणखी काही अशी बरीच पात्रे एकाच वेळेस बजावणार्‍यात काहि फरक ठेवा..

In reply to by काउबॉय

विजुभाऊ 07/10/2014 - 13:56
21 वयात महापौर ? काउबॉय - Mon, 06/10/2014 - 16:34 इम्प्रेसिव. डोमिनेटिंग.हम्म ...!
त्यात नवल काही नाही. ते जेंव्हा महापौर झाली त्या काळात त्याम्च्या मातोश्री राज्यात मंत्री होत्या. भाजप ला तेथे घराणी शाही जाणवली नाही.

In reply to by उदयन

दुश्यन्त 07/10/2014 - 14:27
शोभा फडणवीस यांचा चणा डाळ घोटाळा गाजला होता. बाकी देवेंद्र यांचे पिता गंगाधर फडणवीस हे पण आमदार होते म्हणजे घराणेशाही इकडे पण आहेच.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

पण भारताबाहेर कदाचित या बातम्यांचा रतीब नसावा म्हणून तुम्हाला त्या पहायला मिळाल्या नसतील असे असणे शक्य आहे.
करेक्ट, तसंच झालं असावं. आणि तो रतीब घालण्याच्या निमित्ताने का होईना बर्‍याच दिवसांनी आमच्या प्रतिसादी पायधूळ झाडल्याबद्दल आपल्याला पेशल धन्यवाद!!! :)

In reply to by llपुण्याचे पेशवेll

ओके वकील आहेत, महापौर होते, ठीक आहे. पण श्री. फडणवीस यांना राज्यपातळीवर कितीसा अनुभव आहे? विरोधी पक्षात असल्याने त्यांना मंत्रीपदावरच्या कामाचा प्रत्यक्ष अनुभव नसावा पण ते गेली किती टर्म आमदार आहेत? एखाद्या खात्याचे मंत्री ते कदाचित होऊ शकत असतीलही, पण येकदम थेट मुख्यमंत्री? जर भाजपाच्या विजयाच्या शक्यतेचाच विचार केला तर त्यांच्यापेक्षा माझ्या मते श्री. खडसे कितीतरी जास्त योग्य आहेत मुख्यमंत्री व्हायला... पण तुम्हाला ते पटणार नाही याची जाणीव आहे!!!

In reply to by पिवळा डांबिस

देवेंद्र १९९९ पासून सलग आमदार आहेत. नाथाभाऊ अधिक अनुभवी आहेत परंतु त्यांची प्रकृती आजकाल साथ देत नाही अशा बातम्या मध्यंतरी आल्या होत्या.

In reply to by पिवळा डांबिस

अरे बाबा, शरद ३८व्या वर्षी मुख्यमंत्री झाला होता. तुझा तो राजीव ४०व्या वर्षी पंतप्रधान झाला होता. आणी तुझा तो ओबामा?

In reply to by पिवळा डांबिस

श्रीगुरुजी 07/10/2014 - 11:34
>>> जर भाजपाच्या विजयाच्या शक्यतेचाच विचार केला तर त्यांच्यापेक्षा माझ्या मते श्री. खडसे कितीतरी जास्त योग्य आहेत मुख्यमंत्री व्हायला... सहमत आहे. भाजपकडे मुख्यमंत्रीपदासाठी ४-५ नावे आहेत. त्यापैकी गडकरी हे रस्तेबांधणी मंत्री म्हणूनच जास्त योग्य आहेत. या कामातच त्यांचे कौशल्य दिसून येते. उगाच मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आली तर त्यांची कार्यक्षमता कमी होईल. विनोद तावडे अननुभवी आहेत. फडणवीस कितीही चांगले वाटत असले तरी त्यांचे आडनाव त्यांना कायम त्रासदायक ठरेल. त्यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय त्यांच्या आडनावाशी जोडला जाईल. त्या तुलनेत खडसे खूपच अनुभवी आहेत. ते फारश्या वादात सापडलेले दिसत नाहीत. सद्यपरिस्थितीत मुख्यमंत्रीपदासाठी तेच योग्य वाटतात.

In reply to by श्रीगुरुजी

रोडकरीला मुख्यमंत्री केले तर पाच वर्षे फक्त मुंबई पुणे एक्सप्रेस वे, पंच्चावण्ण उड्डाण पुल याचेच गणित सांगत बसेल. मागच्या पंधरा वर्शांत नव्वद किमीच्या एक्प्रेसवे च्या पुण्याईवर दुकान चालू आहे यांचे. बेरोजगारी ,शेतकी, महसुल, आरोग्य या विषयी यांचा अभ्यास शुन्य असावा. फडणवीस- नागपुरचे महापौर व तीथले आमदार असतानाचे एकही विधायक काम आजपर्यंत ऐकलेले नाही , तावडे- हाच एक मोठा विनोद आहे. खडसे- कालपर्यंत तोंड फाटोस्तोर ज्यांना भ्रष्टाचारी म्हणत होते, त्यांना आज भाजपात घेऊन खडसे त्याचे निर्लज्ज समर्थन करत आहे .कसा विश्वास ठेवायचा यांच्यावर? हा आघाडी सरकारचेच मंत्रीमंडळ राज्याला देईल, पाचपुते गावीत वगैरे. त्यापेक्षा ओरीजनल काँग्रेस काय वाईट आहे असाच लोक विचार करतील. पृथ्वीबाबा तसेही जनेत शिस्तप्रिय म्हणुन प्रसिद्ध आहेतच.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

दुश्यन्त 07/10/2014 - 13:10
खडसे तोडपाणीसाठी प्रसिद्ध आहेत. तावडे खरा विनोद आहेत. फडणवीस आधी अभ्यासू वाटायचे पण आता त्यांची वक्तव्ये बघून तेपण काही फार वेगळे वाटत नाहीत. मुंडेनंतर तेवढ्या ताकदीचा नेता राज्य भापाकडे नाहीच काही अंशी गडकरी आहेत जे मास लीडर नाहीत मात्र शहा- मोदिंपुढे उभे राहण्याची हिम्मत तरी दाखवू शकतील. भाजप आकड्यांचे गणित जमवू शकली तर गडकरीच तुलनेने बर वाटतात पण जीभेवर ताबा हवा. मात्र हे जर तरच्या गोष्टी आहेत. शिवसेनेच्या जास्त जागा येणार आणि मुख्यमंत्री सेनेचाच असेल हा आपला अंदाज आहे.

In reply to by दुश्यन्त

आनन्दा 07/10/2014 - 19:00
मुंडेनंतर तेवढ्या ताकदीचा नेता राज्य भापाकडे नाहीच
मुंडे जिवंत असते तर असे बोल्ला असतात का हो? का आपले उगीच मेल्या म्हशीला म्हणभर दूध? बाकी मुंडे गेल्यामुळे महाराश्ट्रात भाजपाचे खूप नुकसान झाले आहे याच्याशी मात्र सहमत.

बोका-ए-आझम 05/10/2014 - 10:08
गोपीनाथ मुंडे अकाली जातील असं कोणालाच वाटलं नव्हतं. ते गेल्यावर भाजपला समर्थ चेहरा नाही हे जरी खरं असलं तरी नवीन चेहरा या निवडणुकीत मिळेल असं समजायला हरकत नाही. शिवाय भाजपची अजून एक चांगली गोष्ट म्हणजे इथले नेते निवडणूक लढवून, जनाधार घेऊन विधिमंडळात जातात, अगदी पंतप्रधान सुद्धा.

In reply to by बोका-ए-आझम

गोपीनाथ मुंडे अकाली जातील असं कोणालाच वाटलं नव्हतं. ते गेल्यावर भाजपला समर्थ चेहरा नाही
सहमत
नवीन चेहरा या निवडणुकीत मिळेल असं समजायला हरकत नाही.
फक्त आपल्या मतदारसंघातून निवडणूक जिंकली की ती व्यक्ती मुख्यमंत्रई बनायला योग्य ठरते?
भाजपची अजून एक चांगली गोष्ट म्हणजे इथले नेते निवडणूक लढवून, जनाधार घेऊन विधिमंडळात जातात, अगदी पंतप्रधान सुद्धा
आणि अरूण जैटलींचं काय? विचार करावा हो लिहिण्यापूर्वी!!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

आणि अरूण जैटलींचं काय? विचार करावा हो लिहिण्यापूर्वी!!!!
भलत्यासलत्या अपेक्षा ठेवण्याबद्दल मी एका बाजूने पिवळा डांबिस यांची कीव करतो. दुसऱ्या बाजूने 'अमुक आचार करा' असे आदेश ऐकण्याची सवय असणारांना 'विचार करा' असा कन्फ्युजिंग सल्ला देण्याबद्ल निषेध.

In reply to by पिवळा डांबिस

उदयन 06/10/2014 - 16:29
निवडुन जनाधार घेउनच गेल्यात ना? तसेच ते जावडेकर देखील प्रचंड मताधिक्याने जिंकुन आलेले त्यांना देखील मोठ्ठा जनाधार मिळालेला बरोबर ना ?

उदयन 05/10/2014 - 11:34
भाजपाचा प्रचार चालु आहे का ? चालु द्या. असे ही खोटे बोलायची सवय आहेच ज्यांनी गुजरात मधे १०-१५ वर्षात मेट्रो जाउ द्या साधी लोकल ट्रेन आणली नाही ते मुंबईत येउन मेट्रोवर भाषणे ठोकत आहेत. या पेक्षा मोठ्ठा विनोद काय असेल

In reply to by अन्या दातार

आनि आमी तुमच्या दाराशी 'पर्तिसाद द्या!!' म्हनून आक्षत आनून धरलीया जनू!!!!! आता तुमी उद्या सकाळच्याला मिशरी लावल्यावर जर आमी "आता १४ दिवस धीर धरा!!" आसं म्हनलं तर भागेल काय? :)

दुश्यन्त 05/10/2014 - 15:20
मोदी गुजरातमधून बाहेर पडायला तयार नाहीत. महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातकडे वळवले जात आहेत. मुंडे गेल्यावर भाजपकडे राज्यव्यापी चेहरा नाही. आताचे जे नेते आहेत ते शहा- मोदींकडे पाहून निर्णय घेतील म्हणून पंतप्रधान आता जिल्हा-तालुका ठिकाणी जावून सभा घेत आहेत. मुंबई या आर्थिक केंद्रावर गुजरातींचा आधीपासून डोळा आहे. पृथ्वीराज जसे सोनिया दरबारी चकरा मारायचे तसाच प्रकार भाजपकडून होईल. राष्ट्रवादीतून भ्रष्ट नेते आयात करून भाजपला पक्ष वाढल्याचा भास होत आहे.लोकसभेचे चित्र वेगळे होते. तेव्हा मोदींनी अध्यक्षीय निवडणुकीसारखे चित्र बनवून फायदा घेतला. आता तसे चित्र नाही १०० दिवसातला कारभार बघून लोक पण जमिनीवर आले आहेत. विधानसभेत स्थानिक प्रश्न महत्वाचे असतात. मराठी जनतेला भाजप पेक्षा शिवसेना जवळचा पक्ष वाटत आला आहे.

उदयन 05/10/2014 - 15:36
लोकसभेत राहुल सारखा समोर उभा होता पण महाराष्ट्रात एकसेएक नग आहेत. मोदीच्या खोट्या आणि भंपकबाजीचे धिंडवडे काढणारे खोर्याने सापडतील. हरियाणा दरडोई उपन्नात ८ व्या स्थानावर आहे मोदी म्हणालेत तो शतकिय विनोद होता. खरतर लिस्ट काढणार्याने बघितले सुध्द्दा नाही की अल्फाबिटीक्ली नाव लिहिलेली आहेत त्यानुसार हरियाणा ८व्या क्रमांकावर आहे आणि उत्पन्नाने १-२ र्‍या क्रमांकावर आहे पण हे तथ्य अतिहुशारीत घाई केली आणि भाजपाच्या पंतप्रधानांचा भरसभेत विचका झाला. इतकी गंभीर चुक या पदावर बसणार्या व्यक्तीने केली नाही पाहिजे. एका सभेत ५ महिन्या अगोदर काय झाले हे आठवा म्हणणारे मोदी स्वतः एका महिन्या अगोदर काय झाले विसरुन गेलेत :)

In reply to by उदयन

एक महीन्यापुर्वा पोटनिवडणुकात हरले, तेव्हा भाजपचे लोक तिथे स्थानिक मुद्द्यावर मतदान झाले असे म्हणत होते. मग जर विधानसभेत स्थानिक मुद्दे महत्वाचे असतात तर मोदीला कशाला तालुका लेवलवर सभा घ्यायला लावतायत ?

दुश्यन्त 05/10/2014 - 15:46
लोकसभेत राहुल सारखा समोर उभा होता पण महाराष्ट्रात एकसेएक नग आहेत. मोदीच्या खोट्या आणि भंपकबाजीचे धिंडवडे काढणारे खोर्याने सापडतील. +१ हेच म्हणत होतो. लोकसभेत मोदी अध्यक्षीय निवडणुकीचे चित्र उभे करण्यात यशस्वी ठरले. महाराष्ट्रात तसे नाही. कॉंग्रेस राष्ट्रवादी बदनाम आहे पण नुसता नेतृत्वाचा चेहऱ्यावर निवडणूक लढवली तर देवेंद्र-तावडे- खडसे हे पृथ्वीराज/ उद्धव ठाकरे/ शरद पवार यांच्यासमोर कच्चे ठरतील. म्हणून मोदींना पोस्टरबॉय बनवत आहेत पण हे लोकसभा नाही विधानसभा नाही. राज्यात सेनेचे संघटन जास्त मजबूत आहे आणि उद्धव यांच्याकडे ओरभावी वक्तृत्व नाही पण सेनेचे ते एकमुखी नेतृत्व आहे. भाजपच्या नेत्यांची तोंडे विरुद्ध दिशेला आणि त्यांना चावी द्यायला मोदी आणि शहा.सेनेची साथ सोडून भाजपच्या उतावीळ नेत्यांनी चूक केली.

चैदजा 05/10/2014 - 18:19
जर बीजेपी सत्तेवर आली तर, मुख्यमंत्री मोदीच्या तालावर नाचणार. ईतर कोणी पक्ष निवडुन आला तर केंद्र सरकार त्यांच्या धोरणांना मदत करणार नाही. मह्णजे काय? कोणीही येवो महराष्ट्राची झोळी रिकामी होत रहाणार आणि गुजरातची झोळी भरत रहाणार. मला तर मोदीं फक्त गुजरातचे पंतप्रधान वाटतात.

उदयन 05/10/2014 - 19:27
नाशकात भुरभुर पाउस फक्त आहे तरी मुसळधार पाउस आहे बातमी फिरवुन सभा रद्द केली. लोकच जमली नाहीत सभेला म्हणुन तर रद्द केली नाही ना ;)

In reply to by llपुण्याचे पेशवेll

श्रीगुरुजी 06/10/2014 - 21:16
मोदींच्या सगळ्याच सभा फ्लॉप गेल्या. तासगावमधल्या सभेला तर आख्खे मैदान रिकामे होते. नाशकातही रिकामे राहणार हे ओळखून भाजपच्या लोकांनी मैदानात टँकरमधून पाणी आणून ओतले आणि चिखल करून ठेवला आणि नंतर पावसाचे कारण पुढे करून सभा रद्द केली.

In reply to by श्रीगुरुजी

अहो श्रीगुरूजी ज्यांना पुण्याच्या पेशव्यांनी प्रतिसाद दिला ते एक अत्यंत विद्वान महाशय आहेत-- साक्षात बृहस्पतींनी त्यांचे शिष्यत्व पत्करावे इतकी त्यांची योग्यता आहे हे तुम्हाला माहित नाही का? म्हणूनच त्यांना पंतप्रधानांनी केलेले विदेश दौरे आणि पिकनिक यात फरक जाणवत नाही. इतक्या ज्ञानी माणसाचा प्रतिवाद करायची आपल्यासारख्यांची लायकी आहे का?

विजुभाऊ 06/10/2014 - 11:41
भाजप इतका डोळे झाकून दूध पिणारा पक्ष दुसरा कोणता नसावा. त्यांच्या राजकीय झैराती म्हणजे मोठ्ठा विनोद आहेत. उदा : १) इथले उद्योग परप्रान्तात गेले आहेत. कूठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा : इथले उद्योग गुजराथ मधे गेले आहेत. तेथे भाजपचेच राज्य आहेत. २) टोल बाबतीतेल विधाने: हा तर अती मोठ्ठा विनोद आहे.: टोल सम्राट गडकरी हे भाजपचेच आहेत. पूर्ती कम्पनी ही गडकरींचीच आहे. टोल मुक्ती कशी देणार महाराष्ट्राला?

In reply to by विजुभाऊ

एक नंबर विभा, महाराष्ट्र हा गुजराथचा एकमेव प्रतिस्पर्धी आहे .एकदा महाराष्ट्र कंगाल केला कि मग तो गुजरातच्या तुलनेत बराच मागे पडेल ,हे मोदीचे धुर्त षडयंत्र आहे .राज्यातली लाखो कोटींची गुंतवणुक गुजरातकडे गेलीय ,जरा विचार करा. ठिकाय काँग्रेसविरोधी असाल तर इतर पक्षांचे पर्याय उपलब्ध आहेत ,त्यांना मत द्या हवेतर, पण या धुर्त भाजपाला नको.

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी 06/10/2014 - 15:36
>>> राज्यातली लाखो कोटींची गुंतवणुक गुजरातकडे गेलीय ,जरा विचार करा. काही पुरावे? आकडेवारी? का नेहमीप्रमाणे नुसत्याच तोंडच्या गप्पा?

In reply to by विजुभाऊ

आज मनसेचे लोक व सेनेचे लोक कोस्टल पोलिस संस्था ,JNPT बंदरातला व्यापार,RBI, पुण्यातली फोक्सवॅगनची फॅसलीटी गुजरातला गेल्यामुळे गळे काढत आहेत ,ते योग्यही आहेच .परंतु उपरोक्त संस्था ,JNPT वगैरे काँग्रेसने राज्याला दिल्यात असेच अप्रत्यक्ष त्यांच्या टीकेतून सिद्ध होत आहे. याचा अर्थ काँग्रेसने राज्याचा प्रगतीचा विचार केला होता असाच होतो व त्याला काँग्रेसचे विरोधी सेना मनसे अप्रत्यक्ष अनुमोदनच देत आहेत.

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी 06/10/2014 - 15:40
>>> आज मनसेचे लोक व सेनेचे लोक कोस्टल पोलिस संस्था ,JNPT बंदरातला व्यापार,RBI, पुण्यातली फोक्सवॅगनची फॅसलीटी गुजरातला गेल्यामुळे गळे काढत आहेत ,ते योग्यही आहेच . या संस्था गुजरातला गेल्यात हे सिद्ध करणारे काही पुरावे आहेत का? का आपली नेहमीचीच फेकाफेकी? >>> परंतु उपरोक्त संस्था ,JNPT वगैरे काँग्रेसने राज्याला दिल्यात असेच अप्रत्यक्ष त्यांच्या टीकेतून सिद्ध होत आहे. याचा अर्थ काँग्रेसने राज्याचा प्रगतीचा विचार केला होता असाच होतो व त्याला काँग्रेसचे विरोधी सेना मनसे अप्रत्यक्ष अनुमोदनच देत आहेत. बादवे, JNPT या महाराष्ट्रातील बंदराला नेहरूंचे नाव कोणी दिले हो? त्यासाठी महाराष्ट्रातील एकही महापुरूष सापडला नाही वाटतं? आणि २-३ वर्षांपूर्वी वरळी येथील सागरपुलाला राजीव गांधींचं नाव द्या अशी जाहीर सूचना कोणी केली होती ते आठवतं का? तेव्हासुद्धा एकही मराठी माणूस सापडला नाही?

In reply to by श्रीगुरुजी

अगदी खरे. पूर्वी मिशलिन कंपनी अर्थमूव्हर्सचे टायर बनवायचा प्लांट चाकणमधे करणार होते. प्रंप्रिय, प्रुगामी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ४९% स्टेक त्यांच्या गरीब कार्यकर्त्याच्या नावाने मागितल्या मुळे शेवटी तो प्लांट चेन्नै ला गेला. एमाअयडीसीतली धर्मनिरपेक्ष गुंडगिरी अनुभवली असेल तर उद्योगधंदे गुजराथला का जातात ते कळेल. जे एन पी टी च्या सुविधा सुमार असल्याने पुण्याच्या सँडविक कंपनी मधे येणारा माल देखील गुजरातेत अडाणीच्या बंदरात उतरतो आणि रस्त्याने पुण्यात येतो आणि जातो देखील. जे एन पी टी ची अवस्था का बरे दुर्दैवी झाली? मोदिंनी केली का?

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी 07/10/2014 - 12:18
>>> >>> आज मनसेचे लोक व सेनेचे लोक कोस्टल पोलिस संस्था ,JNPT बंदरातला व्यापार,RBI, पुण्यातली फोक्सवॅगनची फॅसलीटी गुजरातला गेल्यामुळे गळे काढत आहेत ,ते योग्यही आहेच . पुराव्यांची आतुरतेने वाट बघतोय नानासाहेब. पुरावे नसतील तर ही सगळी फेकाफेकी होती हे तरी मोठ्या मनाने कबूल करा.

In reply to by श्रीगुरुजी

http://www.dnaindia.com/mumbai/report-safer-coasts-maharashtra-sets-marine-police-academy-ball-rolling-1853223 http://www.timesofindia.com/city/ahmedabad/Gujarat-to-get-marine-police-academy/articleshow/40089431.cms या दोन बातम्या वाचा. २०१३ आणि २०१४च्या .आता बोला यावर..... कुणी पळवले मरीन ट्रेनिंग सेंटर? बाकीच्या दरोडेखोरीचे पुरावे देईनच, आधी याविषयी समाधानकारक उत्तर द्या.खोटे आरोप करुन पळुन जायला मी सोमय्या किंवा खडसे वाटलो की काय तुम्हाला?

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी 07/10/2014 - 16:21
नानासाहेब फेकडे, तुम्ही स्वतःच दिलेल्या लिंक्स नीट वाचा हो आणि नंतर फेकाफेकी करा. तुम्हीच दिलेल्या लिंकमधील ही खालील वाक्ये वाचा. In the terrorist attack on Mumbai in November 2008, boats belonging to Porbandar fishermen were used by the Pakistan-trained terrorists. It was after this incident that the Gujarat government proposed such an academy in the state. तत्कालीन गुजरात सरकारनेच या संस्थेच्या स्थापनेची मागणी केली होती. The Centre is believed to have granted approval to a proposal of the state government for a first-of-its-kind National Marine Training Academy in Gujarat that was rejected by the previous UPA regime. > तुमच्या युपीए सरकारने ही मागणी धुडकावून लावली होती कारण अर्थातच ती मोदींनी केली होती. देशाच्या सुरक्षेपेक्षा मोदींना त्याचे क्रेडीट मिळू नये म्हणून केवढी ही धडपड. आता मोदी पंतप्रधान झाल्यानंतरच ही मागणी मान्य झाली आहे. या संस्थेची मागणी तत्कालीन मुख्यमंत्री मोदींनी केली होती. मोदींना अपशकुन करण्यासाठी युपीएने ती धुडकावली होती आणि आता त्या संस्थेचे महत्त्व ओळखून मोदींनी मान्यता दिली आहे. या सगळ्यात महाराष्ट्राचा काय संबंध? पुन्हा एकदा माती खाल्लीत नाना!

In reply to by श्रीगुरुजी

गुरुजी ,मोदींनी मागणी केली असली तरी ती संस्था महाराष्ट्राला मिळाली होती, ती गुजरातला नेण्याचं काहीच कारण नव्हतं. हे मोदी' तुझं माझं' कधीपासुन करायला लागले बरं? गुजरातचे मुख्यमंत्री असताना तुझं माझं ठिक होतं.... कि आताही ते गुजरातचेच पंतप्रधान आहेत? हाच तर मुद्दा आहे ,देशाचा पंतप्रधान फक्त गुजरातचाच विचार करतोय, हेच तुमी कोट केलेल्या पॅसेजवरुन कळतेय.

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी 07/10/2014 - 22:28
>>> मोदींनी मागणी केली असली तरी ती संस्था महाराष्ट्राला मिळाली होती, ती गुजरातला नेण्याचं काहीच कारण नव्हतं. ही संस्था कधी महाराष्ट्राला मिळाली होती? किती तारखेला? म्हणजे युपीएच्या काळात की वाजपेयींच्या काळात की मोदींच्या काळात? समजा युपीए किंवा वाजपेयींच्या काळात असली तर ती संस्था आजतगायत का सुरू झाली नव्हती? मोदींनी युपीएने केवळ मोदीद्वेषामुळे परवानगी नाकारलेली संस्था सुरू करायला परवानगी दिली. यात महाराष्ट्राचा काहीही संबंध नाही. >>> हे मोदी' तुझं माझं' कधीपासुन करायला लागले बरं? गुजरातचे मुख्यमंत्री असताना तुझं माझं ठिक होतं.... कि आताही ते गुजरातचेच पंतप्रधान आहेत? त्यांनी कधी केलं तुझं माझं? ज्या राज्याने परवानगी मागितली त्याच राज्याला परवानगी दिली. महाराष्ट्राने परवानगी मागितली असती तर तिथे परवानगी मिळाली असती. २६/११/२००८ ते १६/५/२०१४ या साडेपाच वर्षात केंद्रात व राज्यात युपीएचे सरकार होते. या काळात महाराष्ट्र सरकारने परवानगी मागितली होती का? आणि असल्यास साडेपाच वर्षात परवानगी कोणी व का दिली नव्हती? >>> हाच तर मुद्दा आहे ,देशाचा पंतप्रधान फक्त गुजरातचाच विचार करतोय, हेच तुमी कोट केलेल्या पॅसेजवरुन कळतेय. तुमचा निव्वळ इतिहास-भूगोलच कच्चा नसून तुम्हाला इंग्लिशही कळत नाही असं दिसतंय. आपणच दिलेल्या लिंका जरा नीट वाचा आणि बाता मारणे बंद करा.

In reply to by नानासाहेब नेफळे

पुण्यातली वॉक्सवॅगन गुजरातला गेली? बाप रे....काय सांगता काय नेफळेबुवा? म्हैतीचं न्हवतं....आमच्या मित्राला भौतेक कंपनीनी नवा पत्ता दिला नसेल म्हणता का काय?

In reply to by नानासाहेब नेफळे

मृत्युन्जय 07/10/2014 - 14:32
RBI, पुण्यातली फोक्सवॅगनची फॅसलीटी गुजरातला गेल्यामुळे गळे काढत आहेत ,ते RBI गुजरातला गेल्याचा काही पुरावा आहे का नेफळे की उगा फुकाची बडबड?

In reply to by मृत्युन्जय

श्रीगुरुजी 07/10/2014 - 16:04
>>> RBI गुजरातला गेल्याचा काही पुरावा आहे का नेफळे की उगा फुकाची बडबड? नेफळे कशा पुड्या सोडतात आणि पुरावे मागितले कसे सोयिस्कर मौन पाळतात याची कल्पना आहे ना तुम्हाला? त्यांचं नाव नानासाहेब नेफळे ऐवजी नानासाहेब फेकडे असायला हवं होतं.

In reply to by श्रीगुरुजी

मृत्युन्जय 07/10/2014 - 16:21
ते फेकत आहेत ते माहिती आहे हो मला. पण मग विचार केला की माझ्याकडे नसलेली एखादी माहिती नानासाहेबांकडे असेल तर बघावे म्हणुन प्रश्न विचारला आपला. बाकी ते आता बर्‍याच कोलांट्या उड्या मारणार हे तर माहिती आहेच. पण त्यांनी आपल्या ज्ञानात भर घातली तर आपल्याला बरेच आहे की. आभारच मानेन मी त्यांचे मग.

In reply to by मृत्युन्जय

RBIचे महत्वाचे तीन डीव्हीजन मुंबईतून दिल्लीत हलवणार आहेत. http://www.ahmedabadmirror.com/news/business/RBI-to-shift-3-forex-divisions-to-Delhi-in-July/articleshow/38204660.cms

In reply to by नानासाहेब नेफळे

मृत्युन्जय 07/10/2014 - 18:07
एकुणात तुम्ही निखालस खोटी विधाने करत आहात हे मान्य करत आहात तर. तुम्ही म्हणालात की आख्खे मुख्यालय गुजरात मध्ये हलवले. इथे तर दिसते आहे की ३ डिव्हिजन्स दिल्लीला हलवली. तुमचा खोटारडेपणा इथेच सिद्ध होतो. तरीही तुम्हाला अजुन खोटा पाडतो: The divisions will continue to be part of Foreign Exchange Department, Central Office, Mumbai, RBI added अजुन ऐका: आरबीआयची एकुण २० -२५ डिपार्टेमेंट्स आहेत. फोरेन एक्स्चेंज हे त्यापैकी एक. फोरेन एक्स्चेंज डिपार्टमेंट मध्ये अनेको डिव्हिजन्स आहेत. त्यातील ३, केवळ ३ डिव्हिजन्स दिल्लीला हलवली आणि तुम्ही म्हणत आहात की "मुख्यालय गुजरातमध्ये हलवले". अजुन किती वेळा माती खाणार नेफळे?

In reply to by नानासाहेब नेफळे

मृत्युन्जय 07/10/2014 - 18:20
वादासाठी मान्य करु? म्हणजे काय? इतरवेळेस अमान्य करण्यासारखे आहेच काय त्यात? आधी तुम्ही अपप्रचार करता आहात हे मान्य करा. चला तुमच्या सोयीसाठी असे मान्य करा की तुमची माहिती निखालस चुकीची होती. ढळढळीत पुरावे दिले आहेत. मग पुढचे बोलु.

In reply to by नानासाहेब नेफळे

उदयन 07/10/2014 - 18:50
आंधळे भक्तांना काही दिसत नाही कुठे तुम्ही प्रकाश दाखवत आहेत. मराठी मत मिळावे म्हणुन मोदी म्हणत आहे मुंबई महाराष्ट्रापासुन वेगळी करणार नाही विदर्भ वेगळा होणार नाही. शिवसेनेच्या प्रचाराला "घाबरुन" शेवटी बोलावे लागले. नाहीतर आधी यांची भाषा वेगळी होती रंगबदलु लोकांचा काय भरोसा ठेवतात

In reply to by उदयन

काळा पहाड 07/10/2014 - 18:53
फुकट्या लोकांच्या हाती मुंबई असल्यापेक्षा ती वेगळी केलेली काय वाईट? बाकी विदर्भाला वेगळं व्हायचं असेल तर रोखणारे आम्ही कोण? त्यांचं काय भलं केलंय आतापर्यंतच्या सरकारांनी?

In reply to by काळा पहाड

उदयन 07/10/2014 - 18:57
विदर्भात जे प्रकल्प आहेत ते काय गुजरात ने उभे केले का? नागपुरातल्या काही लोकांनाच वेगळा विदर्भ हवा आहे कारण उभ्या महाराष्ट्रात डाळ शिजत नाही. मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न पडत आहेत त्यांना म्हणुन्च हे खेळ

In reply to by उदयन

काळा पहाड 07/10/2014 - 19:20
इथं गुजरातचा काय संदर्भ? बाकी तुम्ही म्हणता तसा विदर्भ सुजलाम सुफलाम असता तर त्यांना वेगळं राज्य मागायची काही गरजच नव्हती. बाकी तुमच्या म्हणण्यानुसार तुम्ही नागपूर मधल्या लोकांना मुख्यमंत्री बनू देत नाही तर. मग त्यांची मागणी वाईट कशी? की कायम पस्चिम महाराष्ट्रातल्याच लोकांनी मुख्यामंत्री व्हायचं?

In reply to by काळा पहाड

उदयन 07/10/2014 - 19:34
काय हास्यास्पद लिहिले आहे . जरा परत वाचुन बघा काय लिहिले ते. महाराष्ट्रातुन पंतप्रधान मिळाला नाही तर काय तुम्ही महाराष्ट्र देशच वेगळा मागणार आहेत का? ;) काहीही प्रतिवाद करायचा ?

In reply to by उदयन

दुश्यन्त 07/10/2014 - 20:02
मुख्यमंत्रीपद पश्चिम महाराष्ट्राकडे कायम कधी होते? विदर्भाचे वसंतराव नाईक (११ वर्षे सलग) आणि मारोतराव कन्नमवार (१ वर्षे) मुख्यमंत्री राहिले आहेत.मराठवाड्याचे पण शंकरराव चव्हाण, अशोक चव्हाण, विलासराव, निलंगेकर, शिवराज पाटील चाकूरकर असे मुख्यमंत्री झाले आहेत. उत्तर महाराष्ट्राला कधी मुख्यमंत्री पद मिळाले नाही.मात्र ते वेगळे राज्य मागत नाहीत.

In reply to by उदयन

प्रसाद१९७१ 07/10/2014 - 18:57
मुंबई आणि विदर्भ वेगळी झालीच पाहीजे महाराष्ट्रातुन, म्हणजे पुण्याचे, सातार्‍याचे, कोल्हापूर चे महत्व वाढेल

In reply to by मृत्युन्जय

सौंदाळा 07/10/2014 - 18:15
अरे मृत्युन्जया, श्रीगुरुजी गपा की रे जरा. किती छळता माझ्या नानाला. तो एकटा एका बाजुला अजुन आठ महिन्याचाच आहे आणि तु रे मृत्युन्जया साडेसहा वर्षाचा आहेस ना सांभाळुन घेत जा त्याला जरा आपला आप्पासाहेब फुरसुंगीकर

In reply to by विजुभाऊ

लोटीया_पठाण 06/10/2014 - 12:12
@ विजुभाऊ, १) इथले उद्योग गुजराथला गेले हा काय गुजराथ सरकारचा दोष आहे काय ?? पळवले नाहीत त्यांनी. कर्नाटकात पण जात आहेत इथले उद्योग. २) १५ वर्षे सत्तेत नसलेले गडकरी टोल सम्राट कसे काय?? नेफले भाऊ, RBI स्वायत्त संस्था आहे. अन फोक्सवॅगन खासगी … मनसेचे रेमेडोके सांगणार अन तुम्ही ऐकणार

In reply to by लोटीया_पठाण

@लोटीया पठाणजी, RBI स्वायत्तवगैरे सांगोवांगी असतं ,अर्थखात्याचाच अप्रत्यक्ष होल्ड असतो. आणि तुमचे लॉजिक लावले तर गॅस कंपन्या पेट्रोल डीझेल कंपण्यानाही बरीच स्वायत्तता आहेच की, मग दरवाढीविरोधात सरकारच्या नावे दहा वर्षे शिमगा का चालू होता? महाराष्ट्रात येऊन गुजरातच्या मुख्यमंत्री राज्यातल्या उद्योगांना गुजरातेत यायचे आमंत्रण देत आहेत, मोदी सरकारकडून अशा कंपन्यांना करसवलतीचे आमिष दाखवून महाराष्ट्राबाहेर पडायला उद्युक्त करत आहेत. मुंबई पुणे बुलेट ट्रेन कॅन्सल करुन अहमदाबादकडे नेली, कशासाठी? आजपर्यंत परदेशी पाहुणे दिल्लीत यायचे व नंतर मुंबईत, मोदीने दोन्हीला टांग देउन चीनच्या पंतप्रधानांना अहमदाबादेत कशाला नेले? तुंबड्या भरुन घेणारा धुर्त माणुस आहे मोदी, महाराष्ट्र अशांच्या ताब्यात अजिबात नको देऊयात.गुजरात्यांनी अखेर लायकी दाखवली.

In reply to by नानासाहेब नेफळे

प्रसाद१९७१ 06/10/2014 - 12:39
काही चांगल्या गोष्टी, कंपन्या, उद्योग गुजरात मधे गेले तर इथे लोक "पाकीस्तानात" गेल्या सारखे गळे काढत आहेत. इथल्या पि.चि. MIDC मधे छोटे, मध्यम उद्योग चालवणे ह्या गुंडांनी आणि खंडणीखोरांना कसे अशक्य करुन ठेवले आहे हे माहीती दिसत नाही. असे वातावरण असेल तर जाणारच कंपन्या गुजरात मधे. स्क्रॅप सुद्धा खंडणी दिल्या शिवाय विकता येत नाही पुणे परिसरात.

In reply to by नानासाहेब नेफळे

प्रसाद१९७१ 06/10/2014 - 14:02
मी मांडलेला मुद्दा पक्षीय नव्हता. मला म्हणायचे होते, जे राज्य चांगले व्यवसायिक वातावरण देइल तिथे उद्योग आणि इतर संस्था जातील. मोदी किंवा दुसरे कोणी असे जबरदस्तीने घेउन जाउ शकत नाही. जर नविन सरकारनी पिं.चि. मधली गुंडगीरी कमी केली नाही तर कोणाचेही सरकार असेल तरी उद्योग दुसरीकडे जातील.

In reply to by प्रसाद१९७१

विजुभाऊ 06/10/2014 - 13:10
@ प्रसाद : तुमचे म्हणणे मान्य आहे. कोंग्रेस असो की इतर कोणी स्थानीक पुढार्‍यानी इथल्या एम आय डी सी ची अक्षरशः वाट लावली आहे. सातारा वाई इथल्या एम आयडीसी पाहिल्या तर वाटते की उद्योजकानी केवळ मागील जन्माचे पाप फेडण्यासाठी उद्योग स्थापले आहेत. सातार्‍यात असलेले बरेच उद्योग तेथून स्थलांतरीत झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आधारीत उद्योग हे डबघाईस आलेले आहेत. सातार्‍यात पथेजा फोर्जींग्स , परांजपे ऑटोकास्ट , डोबर्ग ब्रूअरीज हे उद्योग गायब झालेत. महाराष्ट्र स्कूटर्स चा कारखाना गेले वीस एक वर्षे उत्पादन बंद अवस्थेत आहे. तेथे पर्यायी अनेक उत्पादने निर्मान होऊ शकतात. मात्र स्थानीक अडमुठे नेतृत्व आणि त्यांची जी हुजुरी करणारे यांचे प्राबल्य असणारे यांची चलती असल्यामुळे विकासाच्या नावाने ठणाणाच आहे. अर्थात हा कोंग्रेस चा दोष आहे असे नाही. तेथले खासदार एकदा भाजपच्या नावावर निवडून आले होते. त्यानंतर ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नावार निवडून येतात. आमदारानी नक्की काय केले हे त्याम्चे त्याना माहीत असेल तरीही खूप म्हणायचे. अर्थात मुख्य दोष आहे तो सातार्‍याच्या नागरीकांचा.

In reply to by विजुभाऊ

प्रसाद१९७१ 06/10/2014 - 14:06
@विजुभाऊ - तसे बघायला गेले तर देशाच्या सर्वच प्रॉब्लेम साठी सर्व नागरीकच जबाबदार आहेत. तेच तर प्रत्येकवेळेला सरकार निवडुन देतात. माझ्या मते अति लोकशाही करण झाले आहे. काही चमत्कार झाला तरच ह्या देशाला भवितव्य आहे. आत्ता तरी मोदी हाच एक आशेचा कीरण आहे.

In reply to by नानासाहेब नेफळे

हाडक्या 07/10/2014 - 14:47
नाना, सातारच्या लोकांबद्दल सरसकटीकरण करण्याची ही तुमची दुसरी वेळ.. आता ह्या साताराबाहेरच्या व्यक्तीने लिहिलेल्या लेखावरची 'सातारच्या' लोकांच्या (म्हणजे आमच्यापण) प्रतिक्रिया वाचा. मग बोला. कुठल्याही बाबतीत सरसकटीकरण वाईटच. आणि मुजरे/दंडवत/चपला उचलणे अशी लाळघोटी कामे (आपल्या देशात तरी) पक्षनिरपेक्ष व स्थल-काल निरपेक्ष चालू असतात. सातारकरांना या बाबतीत 'निर्लज्ज' आणि 'बसा बोंबलत' म्हणायची गरज नाही आणि तुमची लायकीही नाही.

In reply to by नानासाहेब नेफळे

एम.आय.डी.सी. सारख्या ठिकाणी व्यवसाय करायला महाराष्ट्र सगळ्यात नालायक राज्य आहे. अरे उद्योजकाला किती नाडतात स्थानिक गुंड ते एकदा फिरुन बघा. साध्या भंगाराच्या कंत्राटावरुन पार खुन पडायच्या वेळा येतात.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

जर इतकी गुंडगिरी आहे तर या कंपन्या आल्याच कशा राज्यात ?एखाद्या ठिकाणी घडत असेलही प्रत्येक ठिकाणी नाही.

In reply to by नानासाहेब नेफळे

सौंदाळा 07/10/2014 - 11:31
कंपन्या आधीपासुनच होत्या हो. पण PCMC बद्दल बोलायचे झाले तर सलग ३०+ वर्षे शरद पवार / एनसीपीचे वर्चस्व आहे या भागावर. मागच्या १० वर्षात जनरल मोटर्स, वोक्सवॅगन, जेसीबी वगैरे कंपन्या आल्यामुळे त्यांना पुरवठा करणार्‍या लघु-उद्योगांची गरज वाढली. कित्येक नविन वर्कशॉप्स उभे राहीले, जुने वर्क्शॉप्स अजुन वाढले. आधीपासुन सत्तेत असलेल्या एनसीपीने (त्यांचे नगरसेवक, कार्यकर्ते) युनियन बनवल्या. उद्या वर्कशॉप चालु करायचे तर सुरक्षारक्षक, सफाई कामगार यांचे घ्यायचे, ट्रान्स्पोर्टेशन ट्रक, क्रेन, ट्रेलर वगैरे यांचेच वापरायचे, भंगार हे सांगतील तिकडेच विकायचे. या सगळ्यात यांचे कमिशन. एखादी मोठी ऑर्डर आली तर सरळ टक्केवारीत कमिशन द्यायचे. या दादागिरीतुन जुने, मोठे वर्कशॉप्स टिकले मात्र ज्यांनी ७/८ वर्षापुर्वी मोठ्या हिम्मतीने आधीची नोकरी सोडुन नविन वर्कशॉप टाकले त्यातले बहुतांश बंद पडले. माझ्या ओळखीत दोन उदाहरणे आहेत. १०-१२ वर्षाची नोकरी झाली होती त्याची बचत धंद्यात टाकली सुरुवातीला बरा चालला पण नंतर या दादागिरीमुळे पैसे सुटेनासे झाले तरी आज्-उद्या ठीकठाक होईल म्हणुन १.५-२ वर्षे काढली मात्र शेवटी धंदा बंद करावा लागला, नविन नोकरीची मारामार आता दुसर्‍या वर्कशॉपमधे सुपरवायजरची कामे करतायत.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

हे कल्चर पवारने माजवले आहे, त्याचा काँग्रेसशी संबंध नाही. थोरली पाति काँग्रेसमध्ये असताना वरुन दट्ट्या आल्यानंतर सरळ व्हायची, आता पवार प्रा लि कंपनी असल्याने कोण बोलणार तिकडे? मुंबईतही जय भवानी जय शिवाजी टाक खंडणी 'वाले बंधुद्वयी प्रायवेट लीमीटेडच आहेत. यासाठीच राष्ट्रीय पक्षांना निवडून द्यायचे असते ,तिथे शिस्त असते.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

वर्कशॉप चालु करायचे तर सुरक्षारक्षक, सफाई कामगार यांचे घ्यायचे, ट्रान्स्पोर्टेशन ट्रक, क्रेन, ट्रेलर वगैरे यांचेच वापरायचे, भंगार हे सांगतील तिकडेच विकायचे. या सगळ्यात यांचे कमिशन. एखादी मोठी ऑर्डर आली तर सरळ टक्केवारीत कमिशन द्यायचे. ह्यात नक्कीच तथ्य असावे. माझ्या मित्राने नविन मुंबईत त्याचे स्वतःचे घर दुरुस्तीला काढले तर लोकल गुंडांनी त्याला हव्या असलेल्या कंत्राटदारास काम देण्यास, त्याला हवे असलेल्या ठिकाणाहून दुरुस्तीला आवश्यक सामान आणण्यास बळजबरी करून विरोध केला. प्रकरण मारामारी पर्यंत पोहोचलं. शेवटी मित्राला स्नायूबलापुढे नमतं घ्याव लागलं. भरपूर पैसे गेले आणि निकृष्ट काम गळ्यात आलं. अजूनही अश्रू ढाळतोय बिचारा.

In reply to by प्रभाकर पेठकर

काळा पहाड 07/10/2014 - 18:48
मुंडे उपमुख्यमंत्री असताना त्यांनी गुंडांवर एन्काऊंटर्ची कारवाई केलेली माहिती आहे. दुर्दैवाने ते आता नाहीत. या काँग्रेसच्या (रा.काँ. ही काँ. तर आहे!) किंवा शिवसेनेच्या गुंडांना संपवून टाकायची गरज निर्माण झाली आहे.

In reply to by काळा पहाड

काय धडधडीतखोटं सांगत आहात, ९३च्या बॉम्बब्लास्टनंतर शरद पवारांना काँग्रेसने मुख्यमंत्रीपदी पाठवले, शरद पवारांनी मुंबई पोलिस कमिशनर रिबेरो यांना सर्वाधिकार देऊन अंडरवर्ल्डचा कणा मोडला होता.

In reply to by नानासाहेब नेफळे

काळा पहाड 07/10/2014 - 19:05
नेफळेसाहेब, काही दुवे देतोय आंतर्जालावरचे. १) The BJP-Shiv Sena government saw its credibility slipping as the 40,000-strong Mumbai Police watched helplessly. The then home minister Gopinath Munde gave the police a virtual carte blanche to eliminate the gangsters. In 1999, the police department recruited officers for their newlyformed CIU. Hard-nosed policemen with an extensive network of informants and a track record showing they were unafraid to pull the trigger were picked up. The CIUs eliminated gangsters in cold, extra-judicial killings. Select policemen were armed with sweeping powers, allowed to tap phones, given secret service funds to pay informants and rewarded with cash bounties ranging from Rs.1-15 lakh. Gangsters were abducted, detained and then shot in cold blood. Weapons were planted on their bodies. http://indiatoday.intoday.in/story/mumbai-encounter-specialists-killers-in-khaki/1/176211.html २) When he assumed office, among the first priorities was to improve the law and order scenario – and the department cracked the underworld's backbone. “There were several encounters in which criminals of various gangs – Dawood Ibrahim, Chhota Rajan, Arun Gawli and their splinter groups were killed and several arrested,” said an officer, who served in the Mumbai Police during that period. “There were allegations of human rights violations, but he always stood by the teams,” the officer added. http://www.sakaaltimes.com/NewsDetails.aspx?NewsId=5509317610950310437&SectionId=5351696313519115080&SectionName=State&NewsDate=20140603&NewsTitle=Munde,%20%20initiator%20of%20drive%20to%20finish%20off%20underworld ३) As the then State Home Minister, Munde contributed in a big way in controlling organised crime in Mumbai. At a time when the metropolis came under the iron grip of the underworld, who thrived on handing extortion threats to moneyed people from different walks of life and killing those who failed to oblige them, Munde gave a free hand to “encounter-specialists” of the Mumbai police, who went virtually for the kill, eliminated scores of gangsters and broke the very back of the once-powerful underworld. http://www.dailypioneer.com/print.php?printFOR=storydetail&story_url_key=bjp-loses-its-maha-soldier&section_url_key=todays-newspaper

In reply to by नानासाहेब नेफळे

उदयन 07/10/2014 - 22:35
मोदींना हिशोब काय मागितला इतकी मिर्ची लागली की सगळी कडे तेच सांगत फिरत आहे मात्र हिशोब देत नाही काय जबरदस्त मिर्ची झोंबली

दुश्यन्त 06/10/2014 - 12:42
कॉंग्रेसचे राज्यसभेतील उपनेते आनंद शर्मा यांनी केलेली टीका पहा. टीका कोण करताय यापेक्षा काय करत आहे या बाजूने पहा. '..पंतप्रधान मंत्रिमंडळाला गौण समजतात. केंद्रीय मंत्री नामधारी बनले आहेत. इतिहासात प्रथमच देशाला पूर्णवेळ संरक्षणमंत्री नाही. अर्थमंत्र्यांना संरक्षण मंत्रालयाची हंगामी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मोदींनी आजवर एकदाही देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावलेली नाही.' मोदींना आम्ही पण लोकसभेत मत दिले होते मात्र गेल्या ४-५ महिन्यात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. मोदींची मनोवृत्ती ही एकाधिकारशाहीची आहे. गुजरातमध्ये ते चालून गेले. राष्ट्रीय स्तरावर असेच करत राहिल्यास त्यांना अडचणी येतील. महाराष्ट्रात मोदी २५ सभा घेणार आहेत अगदी तासगाव, तुळजापूर अश्या तालुका ठिकाणी ते जाणार आहेत. एवढी अगतिकता कश्यासाठी तर नक्कीच मुंबई हे आर्थिक केंद्र आपल्या ताब्यात असावे. मुंबईत बसणारा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आपल्या ऐकण्यातला असावा हेच असू शकते.राज ठाकरे म्हणतात तसे राज्य भाजपचा एकही नेता उद्या मुख्यमंत्री झाल्यास मोदींना उलट प्रश्न विचारू शकणार नाही. मोदी- शहांसमोर बोलण्याची तावडे/ खडसे /देवेंद्र यांची छाती होईल का? मुंडे असते तर गोष्ट वेगळी होती. उद्या महाराष्ट्रावर अन्याय होत असता ते उठून बोलले असते आता तशी स्थिती नाही.अशोक चव्हाण, पृथ्वीराज यांना महामंडल नियुक्त्या, राज्यमंत्री नेमणे यासाठी दिल्लीत ४-४ चक्र माराव्या लागायच्या. सत्ता परिवर्तन होवूनही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिल्लीश्वरांच्या हातचे बाहुले ही परिस्थिती राहायला नको. महाराष्ट्रात लोक विधानसभेला स्थानिक मुद्दे पाहूनच मत देतात. आघाडी नको तर लोकांना शिवसेना तर काही ठिकाणी मनसे हा पर्याय जास्त जवळच वाटू शकतो.

उदयन 06/10/2014 - 12:55
भाजपाच्या गृहमंत्र्यांनी मुक्ताफळे उधळली आहेत. पाकिस्तानाला दम देताना बोलले की

"पांढरे निशाण फडकवायला"

आधीचे सरकार नाही. आता पांढरे निशान म्हणजे शरणागती. भारताने कधी पाकिस्तानापुढे शरणागती पत्करली ??? अरे राजनाथासाहेब याच काँग्रेस ने पाकिस्तानाचे दोन तुकडे केले होते. हे विसरतात का ? तुमच्यासारखे अतिरेक्यांना सोडुन नाही आले होते. उपमा द्यायला पण येत नाही म्हणे हे गृहमंत्री

In reply to by उदयन

संपुर्ण कॅबिनेट मोदींच्या दहशतीखाली आहे, अगदी राजनाथसुद्धा. इतका स्वार्थी पंतप्रधान देशाने पाहिला नव्हता.

In reply to by नानासाहेब नेफळे

अगदी अगदी खर्र्र्र बोल्लात....अगदी शु ला जायचं असलं तरी सोडत नाहीत म्हणे मोदीगुर्जी....कमीत कमी दरारा असणारा तरी पी.एम. आहे आमच्याकडे. कळसुत्री नाही.

उदयन 06/10/2014 - 13:57
मै "हरियाणा" को नंबर १ बनाउंगा ...!! मै "महाराष्ट्र" को नंबर १ बनाउंगा ...!!
कधी दोन राज्य एकाच नंबरवर असु शकतात का ?

In reply to by उदयन

मोदी म्हणणार की नंबर एक पोझिशनवरुन हरीयाणा व महाराष्ट्रात भांडण नको, त्यापेक्षा मध्यममार्ग म्हणुन मी गुजरातचा विकास करतो.

दुश्यन्त 06/10/2014 - 14:17
अर्थमंत्री अरुण जेटली आजारी असल्याच्या बातम्या गेले काही दिवस येत आहेत. आपल्याकडचा संरक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त भार हंगामी असून लवकरच नवीन संरक्षण मंत्री नेमला जाइल असे ते ४ महिन्यापूर्वी म्हणाले होते मात्र अजून कुणाची नेमणूक झाली नाही. अर्थ, गृह, संरक्षण आणि परराष्ट्र व्यवहार ही अति महत्वाची खाती असतात. कॅबिनेट कोर कमिटीमध्ये या चार खात्याचे मंत्री असतात.आपल्या ऐकण्यातला संरक्षण मंत्रीपदाचा दावेदार मिळत नसल्याने मोदी पूर्ण वेळ संरक्षण मंत्री नेमत नाहीत असे दिसतेय. पण अशी परिस्थिती चांगली नक्कीच नाही. पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष पण आपल्या ऐकण्यातलाच हवा यासाठी अमित शहांची पार्श्वभूमी, सध्या प्रलंबित असलेले गुन्हे याकडे पण डोळे झाक केली आहे. सत्ताधारी पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष हा त्याच्याच गुजरातमधून तडीपार केलेला आहे.सगळ्या महत्वाच्या पदावर आपले पित्तू बसवण्याचा हा मोदींचा अट्टाहास चांगला नाही.'सबका साथ सबका विकास' वगैरे नुसत्या गप्पा आहेत.

विजुभाऊ 06/10/2014 - 14:24
भाजपने काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व मनसेतून आयात उमेदवार केलेले आहेत काँग्रेसचे १६, राष्ट्रवादीचे २०, शिवसेनेचे ९, मनसेचे २, शेतकरी संघटनेचा १, अपक्ष २ व समता परिषदेच्या एकाचा समावेश आहे. गेली १५ वर्षे महाराष्ट्र खड्ड्यात घालणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनाच भाजपने प्रवेश देऊन तत्काळ उमेदवारी का दिली भाजपचे स्वतःचे असे काय उरले आहे आता. त्याना सगळ्या ठिकाणी उभे करायला स्वतःचे असे उमेदवार देखील मिळत नाहीत. भाजपच्या आयात उमेदवारांची यादी उमेदवार मतदारसंघ आधीचा पक्ष मनोहर बडने धुळे ग्रामीण काँग्रेस सुनील देशमुख अमरावती काँग्रेस समीर मेघे हिंगणा काँग्रेस माधवराव किन्हाळकर भोकर काँग्रेस आनंद भरोसे परभणी काँग्रेस शिवाजीराव नाईक शिराळा काँग्रेस अजित घोरपडे तासगाव काँग्रेस प्रशांत ठाकूर पनवेल काँग्रेस राजन तेली सावंतवाडी काँग्रेस संजय दुधगावकर उस्मानाबाद काँग्रेस शैलेश लाहोटी लातूर काँग्रेस माणिकराव कोकाटे सिन्नर काँग्रेस बाळासाहेब मुरकुटे नेवासा काँग्रेस भाऊसाहेब वाकचौरे श्रीरामपूर काँग्रेस विलासराव खरात घनसावंगी काँग्रेस अमोल महाडिक कोल्हापूर दक्षिण काँग्रेस अभय नगरकर नगर राष्ट्रवादी विजयकुमार गावित नंदुरबार राष्ट्रवादी संजय सावकारे भुसावळ राष्ट्रवादी योगेंद्र गोडे बुलढाणा राष्ट्रवादी किसन कथोरे मुरबाड राष्ट्रवादी मंदा म्हात्रे बेलापूर राष्ट्रवादी लक्ष्मण जगताप चिंचवड राष्ट्रवादी बबन पाचपुते श्रीगोंदा राष्ट्रवादी शरद बुट्टे पाटील खेड राष्ट्रवादी राहुल कुल दौंड राष्ट्रवादी प्रताप चिखलीकर कंधार राष्ट्रवादी स्नेहलता कोल्हे कोपरगाव राष्ट्रवादी भीमराव धोंडे आष्टी राष्ट्रवादी मोनिका राजळे पाथर्डी राष्ट्रवादी जगदीश वळवी चोपडा राष्ट्रवादी शिवाजी कर्डिले राहुरी राष्ट्रवादी राजेंद्र पिपाडा राहाता राष्ट्रवादी अद्वय हिरे नांदगाव राष्ट्रवादी अरविंद चव्हाण जालना राष्ट्रवादी रामदास सदाफुले देवळाली राष्ट्रवादी भगवान बोरस्ते निफाड शिवसेना किशनचंद तनवाणी औरंगाबाद मध्य शिवसेना बाबासाहेब तांबे पारनेर शिवसेना विनायक हिवाळे पैठण शिवसेना शरद ढमाले भोर शिवसेना नेताजी डोके जुन्नर शिवसेना जयसिंग एरंडे आंबेगाव शिवसेना चंद्रकांत खाडे इगतपुरी शिवसेना दिलीप कुंदकर्ते नांदेड दक्षिण शिवसेना संगीता राजे निंबाळकर पुरंदर मनसे राम कदम घाटकोपर पश्चिम मनसे संजय गव्हाणे कन्नड समता परिषद प्रशांत बंब गंगापूर अपक्ष अनिल गोटे धुळे शेतकरी संघटना शिवाजी मानकर येवला मागील वेळी अपक्ष उमेदवार

In reply to by विजुभाऊ

श्रीगुरुजी 06/10/2014 - 21:21
>>> भाजपने काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व मनसेतून आयात उमेदवार केलेले आहेत जो पक्ष निवडून यायची सर्वात जास्त शक्यता तिकडेच आयात होणार ना? बादवे, इतर पक्षाने आयात केलेल्यांची सुद्धा नावे दिलीत तर बरे होईल. उदा. पुण्यात कसब्यातून राकाँचा उमेदवार दीपक मानकर आहे. तो कुठून आयात केला. पर्वतीत शिवसेनेने सचिन तावरेला कोठून आयात केले? कोकणात दीपक केसरकरला शिवसेनेने कोठून आयात केले?

नित्य नुतन 06/10/2014 - 16:05
पंकजा मुंढे ला एका मुलाखतीत बघितले होते ... तोंडात च्विंगम चघळत एखाद्या भाईच्या आवेशात उत्तरं देत होती ... पोकळ अतिआत्मविश्वास ठासून दिसत होता .. असले नेते मुख्यमंत्रीपदाचे दावेदार ??? अर्रे कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा ???

दुश्यन्त 06/10/2014 - 16:09
मुळात याआधी भक्तजन गुजरातचे जे आकडे द्यायचे तेच फुगवून सांगितलेले असायचे हे एव्हाना सिद्ध झाले आहे. गुजरातपेक्षा महाराष्ट्र, तामिळनाडू ही राज्ये बर्याच (चांगल्या) बाबतीत पुढे आहे.

In reply to by दुश्यन्त

श्रीगुरुजी 06/10/2014 - 21:19
>>> मुळात याआधी भक्तजन गुजरातचे जे आकडे द्यायचे तेच फुगवून सांगितलेले असायचे हे एव्हाना सिद्ध झाले आहे. हे कधी सिद्ध झाले?

भाते 06/10/2014 - 16:24
इतर राजकीय पक्षांनी किमान त्यांचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तरी घोषित केले आहेत. भाजपावाल्यांचे काय? जसे लोकसभा निवडणुकीच्या वेळी मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणुन आधीच घोषित केले होते तसे महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार निवडणुकीअगोदर घोषित करायला का घाबरत आहेत हे भाजपावाले? त्यांच्यातच एकमत नाही आहे. मुंडे यांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्राचे नेतृत्व करू शकणारा कोणीही नेताच भाजपाकडे नाही आहे. म्हणुन तर विधानसभा निवडणुक प्रचारासाठी देशाच्या पंतप्रधानाला यायची गरज वाटते. दिल्लीमधुन केंद्रीय नेतृत्व सांगेल त्याला/तिला मुख्यमंत्री बनवणार हा कुठला न्याय? आधीचा मुख्यमंत्री दिल्लीमधुन पाठवलेला होता. यावेळीही भाजपाचा दिल्लीमध्ये ठरलेला उमेदवार मुख्यमंत्री म्हणुन आला तर गेल्यावेळी प्रमाणे तो/ती प्रत्येक लहानसहान गोष्टीसाठी दिल्लीच्या वाऱ्या करणार. दिल्लीमधुन आलेल्याला जर प्रत्येक गोष्टीसाठी तिकडे धाव घ्यायला लागत असेल तर काय करायचा आहे तो दिल्लीतला मुख्यमंत्री? मग काय बदल झाला महाराष्टात?

In reply to by श्रीगुरुजी

उदयन 07/10/2014 - 13:53
वृत्ती गेली नाही अजुन ? भाजपाचा विचारला तर आधी उत्तर द्या मग प्रश्न विचारा. उत्तर न देताच प्रश्न विचारुन पळुन काय जातात

In reply to by उदयन

मृत्युन्जय 07/10/2014 - 13:58
अर्रे. बाकीच्यांनी जाहीर केला पण भाजपाने नाही केला म्हणून गळा काढता आहात ना? मग द्या की उत्तर, कोणी कोणी जाहीर केला काँग्रेसशिवाय?

In reply to by उदयन

मृत्युन्जय 07/10/2014 - 22:46
अर्रे डिफरंट आहे म्हणुन केवळ त्यांनीच उमेद्वार जाहीर करायचा? पार्टी विथ डिफ्रन्स म्हणजे काय हेच तुम्हाला कळालेले नाही हाच मुख्य लोच्या आहे. असो. अभ्यास वाढवा.

In reply to by मृत्युन्जय

उदयन 07/10/2014 - 23:21
नीरो च्या पार्टी बद्दल काय समजायचे आहे तिथे भारतीयांवर गोळीबार होत आहे आणि हे प्रचार करत आहे ना काळजी ना खंत.... निर्लज्जपणा तो हाच आहे

In reply to by उदयन

प्रदीप 08/10/2014 - 07:54
तुम्ही प्रथम लिहीलेतः "तिथे भारतीयांवर गोळीबार होत आहे आणि हे प्रचार करत आहे ना काळजी ना खंत.... निर्लज्जपणा तो हाच आहे" आता ह्या दुव्यांवरून असे दिसते की भारतही चोख प्रतिसाद देत आहे. विशेषतः हे पहा: "The Narendra Modi government on Tuesday directed the Border Security Force (BSF) and the Indian Army not to seek a flag meeting with Pakistan on the international border that has witnessed heavy firing in the last two days." एका विशीष्ट पातळीपलिकडील निर्णय सरकार घेते, आर्मी नव्हे. ते इथे घेतले गेलेले दिसतात. अगोदरची सरकारे काय करत होती, हा प्रश्न नाही, तुमचा आरोप सध्याचे मोदी सरकार ह्या बाबतीत काहीही करत नाही, असा आहे. आता अर्थात, moving goalposts च्या न्यायाने, तुम्ही मोदींनी स्वतःच सीमेवर जावयास पाहिजे होते, असे म्हटलेत, तर pass!

In reply to by प्रदीप

उदयन 08/10/2014 - 08:41
लोकसभेच्या प्रचारात 56 इंचची छाती दाखवून पाकिस्तान ला ललकारणारे आता प्रचारात एक अक्षर बोलत नाही यावरून दिसते कि लोकसभेत मारलेल्या फुशारक्या होत्या काँग्रेसच्या 10 वर्षात जितके उल्लंघन केले असेल तितके या 6 महिन्यांतच झाले म्हणे भारताचा डंका बाजवला ;) आताचा प्रधानसेवक फक्त बोलूच शकतो करू काहीच शकत नाही हे जगाला कळले

In reply to by उदयन

प्रदीप 08/10/2014 - 09:13
म्हणजे सरकारने प्रत्यक्ष कृती केली, ते पुरेसे नाही. आता, तुमची (सरकलेली) अपेक्षा ही की मोदींनी त्यांच्या महाराष्ट्र व हरीयाणा येथील विधानसभांच्या निवडणूकांच्या प्रचारधुमाळीच्या दरम्यान ह्या मुद्द्यावरून डरकाळ्या फोडल्या पाहिजेत! ते इथे कमी पडले हे खरे :) बाकी, त्यांनी प्रत्यक्ष तिथे जाऊन रणधुमाळीत भाग घेतला पाहिजे, असे (सध्यातरी) न म्हटल्याबद्दल (सध्यातरी) तुमचे कौतुकच केले पाहिजे!

In reply to by प्रदीप

मृत्युन्जय 08/10/2014 - 11:08
नाही सरकारने स्वतः जाउन त्यात मोदींनी स्वतः बंदूक हातात घेउन सीमेवर जाउन लढावे आणि लाहोर, कराची, इस्लामाबाद आणि पेशावर मध्ये स्वतः जाउन गाढ्वाचा नांगर फिरवावा आणि भुट्टॉ आणि शरीफला बैलगाडीला जुंपुन दिल्लीला घेउन यावे अशी अपेक्षा आहे,

In reply to by मृत्युन्जय

श्रीगुरुजी 08/10/2014 - 14:08
बंदूक? कुठल्या काळात वावरताय? मोदींनी वाघनखे घेऊन पाकड्यांचा कोथळा बाहेर काढावा, पाकड्यांना मातीत गाडावे, गेलाबाजार त्यांची बोटे तरी तोडावी, निदान त्यांच्या मस्तवाल जिभा तरी छाटाव्यात ... मोदींनी पाकड्यांवर अशा तर्‍हेची २१ व्या शतकातील कारवाई करावी. बंदूक वापरणे म्हणजे १७ व्या शतकात वावरण्यासारखे आहे. जरा २१ व्या शतकात या हो.

In reply to by श्रीगुरुजी

खरंय !बंदुकीच्या कॅलिबरऐवजी व फायरींग रेट ऐवजी पहाडी छाती ,५६ इंच अशा गप्पा देखिल माराव्यात.

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी 08/10/2014 - 14:27
बरोबर. पण कोणी अशा गप्पा माराव्यात. त्यांच्या छातीच्या घेराची इतरांनाच जास्त काळजी लागलेली दिसतेय.

In reply to by मृत्युन्जय

श्रीगुरुजी 08/10/2014 - 14:19
प्रतिकारवाई सुरू झालेली दिसतेय. http://maharashtratimes.indiatimes.com/nation/pakistan-targets-bsf-posts-villages-india-hits-back-with-heavy-fire/articleshow/44687154.cms पंतप्रधान मोदींची मैत्री झिडकारुन वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारतीय नागरिक आणि सैनिकांना लक्ष्य गोळीबार करणा-या पाकिस्तानच्या बंदुका आणि तोफांचा आवाज बंद करण्याचा निर्णय केंद्रातल्या मोदी सरकारने घेतला आहे. पाकिस्तानचा गोळीबार पूर्णपणे थांबेपर्यंत प्रत्युत्तर देण्याचे स्पष्ट आदेश भारतीय सैन्याला देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे पाकिस्तानच्या हल्ल्याला कोणत्या भागात किती प्रमाणात प्रत्युत्तर द्यायचे याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य सैन्याला देण्यात आले आहे. केंद्र सरकारकडून हिरवा कंदिल मिळताच भारतीय सैन्याने पाकचे कंबरडे मोडण्यास सुरुवात केली आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करणा-या पाकने रविवारपासून गोळीबाराचे प्रमाण एकदम वाढवले आहे. मागील बारा वर्षात झाला नाही एवढा गोळीबार आणि मॉर्टरचा मारा पाकने सुरू केला आहे. पाकच्या या हल्ल्याला मंगळवारी रात्री भारताने तीव्र प्रत्युत्तर दिले. भारताने पाकच्या ३७ चौक्या आणि आसपासच्या भागात गोळीबार केला. भारताने दिलेल्या प्रत्युत्तरामुळे पाकिस्तानमध्ये सियालकोट भागात १५ जण ठार आणि ३० जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. याआधी पाकिस्तानच्या रेंजरनी सीमा सुरक्षा दलाच्या ६३ चौक्या आणि २५ गावांना थेट लक्ष्य करुन गोळीबार केला तसेच मॉर्टरचा मारा सुरू केला. पाकच्या हल्ल्यात सतरा नागरिक आणि सीमा सुरक्षा दलाचे तीन सैनिक जखमी झाले तसेच ५५ वर्षाच्या एका महिलेचा मृत्यू झाला. याआधी भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओ (लष्कराचे महासंचालक) पातळीवर तब्बल आठ मिनिटे चर्चा झाली पण तोडगा निघाला. या चर्चेत दोन्ही डीजीएमओंनी परस्परांवर गंभीर आरोप केले. अखेर पाकच्या कारवाया बंद होईपर्यंत गोळीबार करा, असा स्पष्ट आदेश केंद्राकडून सैन्य दलांना आला आणि त्याचे लगेच पालन करण्यात आले.

In reply to by श्रीगुरुजी

हेच मोदी तीन महीन्यापुर्वी नवाज शरीफच्या आईला साडी पाठवत होते, कालपर्यंत पाकिस्तानला मिठाई पाठवत होते. यांच्या हे लक्षातही आले नाही कि आपला शेजारी किती घातक मनसुबे रचतोय! हे म्हणे कणखर देश बनवणार आहेत, इतका बाळबोध पंतप्रधान देशाने आजपर्यँत पाहिला नव्हता. मनमोहन सिंग यांनी या पाकड्यांशी लाळघोटेपणा कधीच केला नव्हता, अतिरेकी कारवाया थांबवा चर्चा करतो असे ठणकावले होते.

In reply to by नानासाहेब नेफळे

मृत्युन्जय 08/10/2014 - 15:02
खिक्क. आणि २०, ५०, १०० ची यादी आणि निषेध खलिते पाठव्ले होते. आणि ते ही काम इतके धेडगुजरीपणाने केले होते की त्यातले काही लोक नंतर बर्‍याच काळापासुन भारतीय तुरुंगातच सापडले. मनमोहन सिंगांनी कोणाला ठणकावले तरी ते मजा करताहेत असे वाटत असेल. त्यांना काय डोंबलाचे ठणकावले? बादवे हिंदी पाकी भाई भाई असे नारे तर नाही ना दिले मोदींनी. नवाझ शरीफांना एनडीएत नेउन स्वतःची तयारी किती तोकडी आहे हे तरी नाही ना सांगितले?

In reply to by मृत्युन्जय

खरंय! बहुधा ५६ इंच छातीवाले पाकड्यांना मिठाया पाठवुन त्यांना डायबेटीक करणार, मग ते पाकडे डायबेटीसने मरणार!!! काय जबरी प्लान आहे! ५६ इंच छातीच्यावरती यांना डोकेही आहे तर! इतका कुटनितीने वागणारा पीएम देशाने कधीच पाहिला नव्हता. :lol:

In reply to by नानासाहेब नेफळे

मृत्युन्जय 08/10/2014 - 16:13
मिठाई वाटणे ही लष्कराची परंपरा आहे. त्यासाठी ते सरकारची परवानगी घेत नाहित. बाकी छाती च्या वरच्या भागावर डोके असणारा पंतप्रधाना आहे हे बरे आहे. गुडघ्यात असणारा नाही हे उत्तम.

In reply to by उदयन

मृत्युन्जय 08/10/2014 - 16:43
लोकसभेच्या प्रचारात 56 इंचची छाती दाखवून पाकिस्तान ला ललकारणारे आता प्रचारात एक अक्षर बोलत नाही उदयना दादा लोकसभे आणि विधासभा यातला फरक कळतो का तुम्हाला? तो केंद्राच्या निवडणुकांचा प्रचार होता. तिथे राष्ट्रीय पातळीवरचे मुद्दे चर्चिले जातात. हा महाराष्ट्राचा प्रचार आहे. इथे स्थानिक पातळीवरचे मुद्दे चर्चिले जातात. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत पुण्याचे विषय चर्चिले जातील. तिथे काश्मीरच्या रस्त्यांची दुरावस्था या विषयावर व्याख्यान झोडुन काय उपयोग. असो. आजचा तुमचा गृहपाठ: केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महानगरपालिका यांच्या कार्यक्षेत्राचा अभ्यास करणे आणि दहा वेळ पाटीवर लिहुन काढणे. अवांतरः नानासाहेबांची मदत घेउ नका. ते खोटे बोलतात. ते तुम्हाला कदाचित सांगतील की मोदींनी सग्ळ्या शाळा गुजरातेत नेल्या.

In reply to by उदयन

मृत्युन्जय 08/10/2014 - 16:38
मग त्यांनी बंदुका घेउन सीमेवर जावे की काय? चोख प्रत्त्युत्तर द्यायला सांगितले आहे सेनेला आणि लागणारा सगळा सपोर्ट देत आहेत. नुसतेच निषेध खलिते नाही पाठवलेले.

मोग्याम्बो 06/10/2014 - 16:27
महारष्ट्रात आघाडी ची १५ वर्षे सत्ता होती आणि गुजरात मध्ये बीजेपी ची होती, जर गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी उद्योग्धन्द्यांना आमंत्रण दिल्यावर ते जर तिकडे जात असतील तर ह्यामध्ये महाराष्ट्रातल्या सरकारचा दोष आहे. उद्योगपती काय गुजरातला फिरायला चालले आहेत का ? मुख्यामात्र्यांचे आमंत्रण आले आहे. जाऊन येतो गुजरातला. असे थोडीच चालले आहे. गुजरात मध्ये उद्योग सुरु करण्याची processs सोपी आहे. आणि त्याना करांमध्ये खूप सवलत दिली गेली आहे. महाराष्ट्रामध्ये आघाडीची १५ वर्षे सत्ता असून त्यांनी ह्या गोष्टींमध्ये खूप बदल नाहीत केले. त्यामुळे इथून उद्योगधंदे गुजरात मध्ये चालले आहेत ह्यात आपल्या राजकारण्याचा दोष आहे

In reply to by मोग्याम्बो

उदयन 06/10/2014 - 16:35
पण इथे येणार्या उद्द्योगधंध्यांना विरोध कोण करते ? प्रकल्पांना जमिनी देताना गावकर्यांना चुकिची माहीती सांगुन विरोधात कोण उभे करते. ? जेव्हा महाराष्ट्राला वीजेची आवश्यकता होती तेव्हा एनरॉन प्रकल्प अरबी समुद्रात कोणी बुडवलेला ? नंतर तीच वीज महाग दराने कोणी घेतली ? जैतापुर प्रकल्पाला विरोध कोण करत आहे ? सरकार उद्योगधंद्यांना राज्यात आणते परंतु विरोधी पक्षात असणार्यांना राज्याची प्रगती झालेली पाहवली जात नाही म्हणुन प्रत्येक प्रकल्पांना विरोध करायचे चुकिचा प्रचार करायचे आनि प्रकल्पांना त्रास द्यायचा आनि दुसर्या बाजुने गुजरात मधुन त्याच प्रकल्पांना मदतीचा हात द्यायचा मग तो उद्योग जातो गुजरात मधे. हेच चालु आहे गेले १० वर्ष. राज्यातील प्रकल्प उद्योगधंदे कसे बाहेर जातील हेच विरोधी पक्षाचे काम होते.

In reply to by उदयन

मृत्युन्जय 07/10/2014 - 14:27
हेच चालु आहे गेले १० वर्ष. गेली १० वर्षे (गेली सहा महिने सोडुन) राज्यात आणि केंद्रात सत्ता काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या हातात आहे. प्रकल्पांना मंजुरी देणे आणि धडाडीने ते सुरु करणे / करवणे याची जबाबदारी सरकारची असते. विरोधक विरोध करत असतील तरीही जे योग्य असेल त्यावर निर्णय घेउन कारवाई करण्यापासुन सरकारला कोणीही थांबवु शकत नाही. खासकरुन सरकार अल्पमतात नसताना तर नक्कीच नाही. जर सरकार योग्य ती पावले उचलत नसतील तर प्रकल्प दुसर्‍या राज्यात जाणारच. प्रकल्प फक्त महाराष्ट्रातुनच दुसर्‍या राज्यात जातात तिकडून इकडे येत नाहित तुमच्याकडे केंद्रात आणि राज्यात सत्ता असुनही हे तुमच्या आळशीपणाचे आणि अकार्यक्षमतेचे लक्षण आहे. गुजरातमधले कित्येक पॉवर प्लांट्स केंद्रीय पर्यावरण खात्याच्या लालफितीत अडकल्याचे सर्वज्ञात आहे. तरीही हे प्रकल्प दुसर्‍या राज्यात गेले नाहित कारण मोदी सरकारने वेळोवेळी त्यांना योग्य ते सहकार्य दिले. हे गुजरातमधल्या मोदी सरकारचे यश. महाराष्ट्रातले प्रकल्प फक्त गुजरातमध्ये जातात हा अजुन एक अपप्रचार. ते कर्नाटक, तामिळनाडु आणी आंध्रातही जातात / गेले आहेत. गुजरातमध्ये फक्त महाराष्ट्रातलेच प्रकल्प येतात हा अजुन एक अपप्रचार. सगळ्या अकार्यक्षम राज्यांतुन मोदींनी प्रकल्प ओढुन आणले. टाटांनी तर मोदींच्या कार्यक्षमतेचे जाहीर कौतुक केले आणि प. बंगाल सरकारवर जाहीर टीका. मागच्या वर्षी गुजरातमधल्या एका बड्या कंपनीत मोठ्या प्रमाणावर कामगार कपात झाली. त्यावर एका आठवड्यात मोदींनी स्वतः कंपनीच्या प्रवर्तकाला फोन करुन त्याचा जाब विचारला आणि राज्यात इतर रोजगार सुरु करण्याची विनंती केली. राज्याचा मुख्यमंत्री जेव्हा एवढा कर्तव्यदक्ष असतो तेव्हा उद्योजकांच्या मनात देखील विश्वास निर्माण होतो. उद्योजक नफा कमाविण्यासाठी धंदा करत असतो. त्याला जर जेएनपीटीत माल उतरवुन घेणे आधिक फायदेशीर असेल तर तो तसेच करेल आणी गुजरातमध्ये फायदेशीर ठरत असेल तर तिथेच उतरवुन घेइल. कोणीही स्वतःच्या पदराला खार लावुन जे एन पीटी डुबवण्यासाठी मोदींना साथ देणार नाही. जर गुजरात सरकार काही इंसेंटिव्हस देत असेल तर महाराष्ट्र सरकारचेही हात कोणी धरुन ठेवलेले नाहित. पण इथला धंदा बसल्यावरच तुम्ही जागे होणार असाल तर त्यासाठी मोदींना कशाला दोष देता? तुमचे सरकार तरावे म्हणुन गुजरात सरकारने त्यांच्या राज्याचा विकास करु नये की काय? तुमची अकार्यक्षमता विरोधी पक्षांनी झाकावी ही भलतीच अपेक्षा झाली महाराजा. बाकी एन्रॉणसारख्या भ्रष्ट कंपनीला भारतात आवताण दिलेच कशाला ते कळत नाही.

In reply to by मृत्युन्जय

उदयन 07/10/2014 - 19:10
इतके कळले असते तर आज महाराष्ट्रात लोडशेडींग झाली असती का ? आधी विरोध मग सत्तेवर आल्यावर स्वतः काहीच काहीच करायचे नाही हेच तर चालु आहे युतीचे तु गोंधळ घाल मी प्रकल्प पळवतो

दुश्यन्त 06/10/2014 - 16:36
दिल्लीमधुन केंद्रीय नेतृत्व सांगेल त्याला/तिला मुख्यमंत्री बनवणार हा कुठला न्याय? आधीचा मुख्यमंत्री दिल्लीमधुन पाठवलेला होता. यावेळीही भाजपाचा दिल्लीमध्ये ठरलेला उमेदवार मुख्यमंत्री म्हणुन आला तर गेल्यावेळी प्रमाणे तो/ती प्रत्येक लहानसहान गोष्टीसाठी दिल्लीच्या वाऱ्या करणार. दिल्लीमधुन आलेल्याला जर प्रत्येक गोष्टीसाठी तिकडे धाव घ्यायला लागत असेल तर काय करायचा आहे तो दिल्लीतला मुख्यमंत्री? मग काय बदल झाला महाराष्टात? +१ मोदी स्वतः मान्य करतात कि मुंडे असते तर मला प्रचाराला यायची गरज नव्हती.उद्या सत्ता आलीच आणि फडणवीस/खडसे/तावडे/ मूनगुन्तीवर यापैकी कुणाला मुख्यमंत्री केलेच तर तो मोदी-शहांचा पित्तू म्हणूनच काम करेल.

थोड्या वेळापूर्वीच निखिल्च्या आय.बी.एन. लोकमतवर राज ठाकरेंची मुलाखत पाहिली. हा मनुष्य नक्की कोणासाठी काम करतोय काही कळत नाही.उद्योगधंदे गुजरातमध्ये चालले आहेत म्हणून सारखे रडगाणे चालू होते,मोदींवर टिका करत होता पण गेल्या १५ वर्षातल्या राज्यातल्या परिस्थितीबद्दल,भ्रष्टाचाराबद्दल चकार शब्दही नाही.

उदयन 07/10/2014 - 13:55
स्वतंत्र विदर्भ करणार आहेत की नाही.. तिथे मोदी मी दिल्लीत असेल पर्यंत अखंड महाराष्ट्र राहिल म्हणुन वचने देत फिरत आहे आणि फडणवीस हे स्वतंत्र विदर्भ होणारच म्हणुन ओरडत फिरत आहे ( उगाच आरडाओरडा करणे ही त्यांची फॅशन आहे ) पक्षातच विरोधाभास आहे तर राज्य देश काय चालवणार हे

रक्षा खडसे,पंकजा मुंडे? असो. दोन्ही सेना नेते वात्रटासारखे बरळत आहेत. त्यामानाने भाजपावाले बरे. राष्ट्रवादी आता पवारवादी झाले आहेत.शरद आपल्या कन्येचे व पुतण्याचे घोडे पुढे दामटतोय.'शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आदित्य ठाकरे....' अशी बातमी ह्यांनी कुठ्ल्या एका चॅनेलवर ऐकली व ह्यांना ताप भरला... तो बीट्स पिलानीवाला संगणकतज्ञ पृथ्वीराजच योग्य वाटतोय.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

vikramaditya 06/10/2014 - 17:08
सर्व नेत्यांना 'एकेरी' संबोधलेले बघुन भारी मौज वाटते. अर्थात तो तुमचा अधिकारच आहे म्हणा.

कंजूस 05/10/2014 - 06:57

केंद्रासारखेच येथे बहुमत मिळेल असे भाजपला वाटते आहे.

चौकटराजा 05/10/2014 - 08:27
कॉग्रेस हा भाजपाचा राजकीय गुरू असून. हळू हळू भाजपाचा ही बॅका, युनियन्स , कारखाने यात प्रवेश होत आहे. त्यानी ऑलरेडी म गांधी उचलले आहेतच .शिवाजी महाराज ही. काही दिवसानी ते इतरानाही राजकारणाच्या पाशात ओढतील. मुळात संघात काही काळ घातलेला माणूस किंवा सेवादलात असलेला माणूस काँग्रेसी नेत्यापेक्षा भाषणबाजीत अधिक तेज असतोच. व भाषणांचा राजकारणात फार मोठा रोल असतो. श्री शरद पवारांची भाषणे ऐकलीत तर त्यात काही दम नसतो. हे दिसून येईल. तात्पर्य- भाजपा ही एक वीट असून ती इतर दगडांपेक्षा मऊ आहे हे नक्की.

तुम्हीच प्रश्न विचारलेयत आणि तुम्हीच उत्तरं दिलियेत... त्यामुळे हा प्रचार धागा ठरून त्याचं मूल्य शून्य झालंय..... तरीही महाराष्ट्रापुरता भाजपाचा विचार करता.... मोदी नॅशनल नेते आहेत हे चांगलं आहे, पण जर ते भारताचं पंतप्रधानपद सोडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला तयार नसतील तर... महाराष्ट्रातलं विद्यमान भाजपा नेतेमंडळ अगदी म्हणजे अगदीच सुमार आहे!!!! खडसे एका विरोधी पक्षाचे नेते म्हणून ठीक आहेत पण त्यांच्यात मुख्यमंत्रीपद पेलण्याची क्षमता आहे असं वाटत नाही. तरी सर्वाधिक आदर खडसेंबद्दलच आहे. बाकीचे नेते काय वर्णावे? फडणवीस, हे गेल्या काही महिन्यांपूर्वी कोण होते, कुठे होते? तावडे, हे कोकणातले नेते असावेत. आधी कोकणातल्या एखाद्या मतदारसंघातून निवडून आले तरच यांचा विचार करूया. आणि रक्षा खडसे आणि पंकजा मुंडे? महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद म्हणजे काय भातुकली आहे का? (हाच प्रश्न आम्ही आदित्य ठाकरेंना करू इच्छितो, सबब आमच्यावर सेक्सिस्ट असा आरोप करू नये!!!)

In reply to by पिवळा डांबिस

रक्षा खडसे आणि पंकजा मुंडे? महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद म्हणजे काय भातुकली आहे का? ह्यांच्यापैकी कोणाला उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद देण्याचा मूर्खपणा, मला वाटतं, भाजपात कोणी करणार नाही. फक्त भविष्यातील महिला नेत्यांना पुढे आणण्यासाठी आत्तापासून 'हवा' निर्माण करण्याचे कार्य सुरु झाले आहे.

In reply to by पिवळा डांबिस

फडणवीस कोण होते हे शोधले तर सापडेल. वयाच्या २१व्या वर्षी स्वकर्तृत्वाने नागपूराचे महापौर फडणवीस झाले होते. भारतातले लहान वयात महापौर बनणारे दुसरे नेते होत. कायद्याची पदवी प्राप्त केलेले फडणवीस बर्लिनमधील कोणत्यातरी कायदेविषयक संस्थेचे पदवीधरही आहेत. आताच्या लेटेस्ट इलेक्शन मधे मुंडे, गडकरी गटांमधल्या साठमार्‍या थांबवण्याचे श्रेय फडणवीसांचेच. त्यांच्या अभ्यासपूर्ण मुलाखती पाहील्या असत्या तर हा प्रश्न कदाचित पडला नसता. पण भारताबाहेर कदाचित या बातम्यांचा रतीब नसावा म्हणून तुम्हाला त्या पहायला मिळाल्या नसतील असे असणे शक्य आहे. कारण भाजपाच नव्हे तर इतर विरोधकही देवेंद्र हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकतो म्हणून 'शेटजी भटजी' असा प्रचार करू लागले आहेत. तावडे कोण आहेत बरे? २००३-०४ मधे गीतरामायणाच्या ५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुंबईच्या शिवाजी पार्कावर गीत रामायाणाचा जंगी कार्यक्रम घडवून हे प्रकाशात आले. तेव्हा पासून ते भाजपाचा मराठा चेहरा म्हणून ओळखले जातात आशिष शेलार हे त्यांचे एक मोठे सहकारी. असो.

In reply to by उदयन

विजुभाऊ 07/10/2014 - 13:14
केंद्रीय मंत्री असणार्या शोभा फडणवीस या देवेंद्र फडणवीस यांच्या नातेवाईक आहेत का ?
हो त्याच त्या चणा डाल घोटाळा फेम शोभा फडणवीस या देवेंद्र यांच्या आई आहेत.

In reply to by विजुभाऊ

चणा डाळीत घोटाळा!!! निदान मसुर डाळीत तरी घोटाळा करायचा ,तेवढेच ,'भगव्याशी ईमान राखले' अशी पळवाट शोधता आली असती!!!! :lol:

In reply to by विजुभाऊ

होबासराव 07/10/2014 - 20:01
देवेंन्द्र फडणवीस आणि शोभा फडणवीस ह्यांच्यात फक्त आडणाव साध्यर्म आहे. भुमिकेचं बेअरिंग सांभाळा पण विरोध करायचा म्हणुन काहिहि बोलु नका...तुमच्यात आणि त्या माईसाहेब, नानासाहेब आणि आणखी काही अशी बरीच पात्रे एकाच वेळेस बजावणार्‍यात काहि फरक ठेवा..

In reply to by काउबॉय

विजुभाऊ 07/10/2014 - 13:56
21 वयात महापौर ? काउबॉय - Mon, 06/10/2014 - 16:34 इम्प्रेसिव. डोमिनेटिंग.हम्म ...!
त्यात नवल काही नाही. ते जेंव्हा महापौर झाली त्या काळात त्याम्च्या मातोश्री राज्यात मंत्री होत्या. भाजप ला तेथे घराणी शाही जाणवली नाही.

In reply to by उदयन

दुश्यन्त 07/10/2014 - 14:27
शोभा फडणवीस यांचा चणा डाळ घोटाळा गाजला होता. बाकी देवेंद्र यांचे पिता गंगाधर फडणवीस हे पण आमदार होते म्हणजे घराणेशाही इकडे पण आहेच.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

पण भारताबाहेर कदाचित या बातम्यांचा रतीब नसावा म्हणून तुम्हाला त्या पहायला मिळाल्या नसतील असे असणे शक्य आहे.
करेक्ट, तसंच झालं असावं. आणि तो रतीब घालण्याच्या निमित्ताने का होईना बर्‍याच दिवसांनी आमच्या प्रतिसादी पायधूळ झाडल्याबद्दल आपल्याला पेशल धन्यवाद!!! :)

In reply to by llपुण्याचे पेशवेll

ओके वकील आहेत, महापौर होते, ठीक आहे. पण श्री. फडणवीस यांना राज्यपातळीवर कितीसा अनुभव आहे? विरोधी पक्षात असल्याने त्यांना मंत्रीपदावरच्या कामाचा प्रत्यक्ष अनुभव नसावा पण ते गेली किती टर्म आमदार आहेत? एखाद्या खात्याचे मंत्री ते कदाचित होऊ शकत असतीलही, पण येकदम थेट मुख्यमंत्री? जर भाजपाच्या विजयाच्या शक्यतेचाच विचार केला तर त्यांच्यापेक्षा माझ्या मते श्री. खडसे कितीतरी जास्त योग्य आहेत मुख्यमंत्री व्हायला... पण तुम्हाला ते पटणार नाही याची जाणीव आहे!!!

In reply to by पिवळा डांबिस

देवेंद्र १९९९ पासून सलग आमदार आहेत. नाथाभाऊ अधिक अनुभवी आहेत परंतु त्यांची प्रकृती आजकाल साथ देत नाही अशा बातम्या मध्यंतरी आल्या होत्या.

In reply to by पिवळा डांबिस

अरे बाबा, शरद ३८व्या वर्षी मुख्यमंत्री झाला होता. तुझा तो राजीव ४०व्या वर्षी पंतप्रधान झाला होता. आणी तुझा तो ओबामा?

In reply to by पिवळा डांबिस

श्रीगुरुजी 07/10/2014 - 11:34
>>> जर भाजपाच्या विजयाच्या शक्यतेचाच विचार केला तर त्यांच्यापेक्षा माझ्या मते श्री. खडसे कितीतरी जास्त योग्य आहेत मुख्यमंत्री व्हायला... सहमत आहे. भाजपकडे मुख्यमंत्रीपदासाठी ४-५ नावे आहेत. त्यापैकी गडकरी हे रस्तेबांधणी मंत्री म्हणूनच जास्त योग्य आहेत. या कामातच त्यांचे कौशल्य दिसून येते. उगाच मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आली तर त्यांची कार्यक्षमता कमी होईल. विनोद तावडे अननुभवी आहेत. फडणवीस कितीही चांगले वाटत असले तरी त्यांचे आडनाव त्यांना कायम त्रासदायक ठरेल. त्यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय त्यांच्या आडनावाशी जोडला जाईल. त्या तुलनेत खडसे खूपच अनुभवी आहेत. ते फारश्या वादात सापडलेले दिसत नाहीत. सद्यपरिस्थितीत मुख्यमंत्रीपदासाठी तेच योग्य वाटतात.

In reply to by श्रीगुरुजी

रोडकरीला मुख्यमंत्री केले तर पाच वर्षे फक्त मुंबई पुणे एक्सप्रेस वे, पंच्चावण्ण उड्डाण पुल याचेच गणित सांगत बसेल. मागच्या पंधरा वर्शांत नव्वद किमीच्या एक्प्रेसवे च्या पुण्याईवर दुकान चालू आहे यांचे. बेरोजगारी ,शेतकी, महसुल, आरोग्य या विषयी यांचा अभ्यास शुन्य असावा. फडणवीस- नागपुरचे महापौर व तीथले आमदार असतानाचे एकही विधायक काम आजपर्यंत ऐकलेले नाही , तावडे- हाच एक मोठा विनोद आहे. खडसे- कालपर्यंत तोंड फाटोस्तोर ज्यांना भ्रष्टाचारी म्हणत होते, त्यांना आज भाजपात घेऊन खडसे त्याचे निर्लज्ज समर्थन करत आहे .कसा विश्वास ठेवायचा यांच्यावर? हा आघाडी सरकारचेच मंत्रीमंडळ राज्याला देईल, पाचपुते गावीत वगैरे. त्यापेक्षा ओरीजनल काँग्रेस काय वाईट आहे असाच लोक विचार करतील. पृथ्वीबाबा तसेही जनेत शिस्तप्रिय म्हणुन प्रसिद्ध आहेतच.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

दुश्यन्त 07/10/2014 - 13:10
खडसे तोडपाणीसाठी प्रसिद्ध आहेत. तावडे खरा विनोद आहेत. फडणवीस आधी अभ्यासू वाटायचे पण आता त्यांची वक्तव्ये बघून तेपण काही फार वेगळे वाटत नाहीत. मुंडेनंतर तेवढ्या ताकदीचा नेता राज्य भापाकडे नाहीच काही अंशी गडकरी आहेत जे मास लीडर नाहीत मात्र शहा- मोदिंपुढे उभे राहण्याची हिम्मत तरी दाखवू शकतील. भाजप आकड्यांचे गणित जमवू शकली तर गडकरीच तुलनेने बर वाटतात पण जीभेवर ताबा हवा. मात्र हे जर तरच्या गोष्टी आहेत. शिवसेनेच्या जास्त जागा येणार आणि मुख्यमंत्री सेनेचाच असेल हा आपला अंदाज आहे.

In reply to by दुश्यन्त

आनन्दा 07/10/2014 - 19:00
मुंडेनंतर तेवढ्या ताकदीचा नेता राज्य भापाकडे नाहीच
मुंडे जिवंत असते तर असे बोल्ला असतात का हो? का आपले उगीच मेल्या म्हशीला म्हणभर दूध? बाकी मुंडे गेल्यामुळे महाराश्ट्रात भाजपाचे खूप नुकसान झाले आहे याच्याशी मात्र सहमत.

बोका-ए-आझम 05/10/2014 - 10:08
गोपीनाथ मुंडे अकाली जातील असं कोणालाच वाटलं नव्हतं. ते गेल्यावर भाजपला समर्थ चेहरा नाही हे जरी खरं असलं तरी नवीन चेहरा या निवडणुकीत मिळेल असं समजायला हरकत नाही. शिवाय भाजपची अजून एक चांगली गोष्ट म्हणजे इथले नेते निवडणूक लढवून, जनाधार घेऊन विधिमंडळात जातात, अगदी पंतप्रधान सुद्धा.

In reply to by बोका-ए-आझम

गोपीनाथ मुंडे अकाली जातील असं कोणालाच वाटलं नव्हतं. ते गेल्यावर भाजपला समर्थ चेहरा नाही
सहमत
नवीन चेहरा या निवडणुकीत मिळेल असं समजायला हरकत नाही.
फक्त आपल्या मतदारसंघातून निवडणूक जिंकली की ती व्यक्ती मुख्यमंत्रई बनायला योग्य ठरते?
भाजपची अजून एक चांगली गोष्ट म्हणजे इथले नेते निवडणूक लढवून, जनाधार घेऊन विधिमंडळात जातात, अगदी पंतप्रधान सुद्धा
आणि अरूण जैटलींचं काय? विचार करावा हो लिहिण्यापूर्वी!!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

आणि अरूण जैटलींचं काय? विचार करावा हो लिहिण्यापूर्वी!!!!
भलत्यासलत्या अपेक्षा ठेवण्याबद्दल मी एका बाजूने पिवळा डांबिस यांची कीव करतो. दुसऱ्या बाजूने 'अमुक आचार करा' असे आदेश ऐकण्याची सवय असणारांना 'विचार करा' असा कन्फ्युजिंग सल्ला देण्याबद्ल निषेध.

In reply to by पिवळा डांबिस

उदयन 06/10/2014 - 16:29
निवडुन जनाधार घेउनच गेल्यात ना? तसेच ते जावडेकर देखील प्रचंड मताधिक्याने जिंकुन आलेले त्यांना देखील मोठ्ठा जनाधार मिळालेला बरोबर ना ?

उदयन 05/10/2014 - 11:34
भाजपाचा प्रचार चालु आहे का ? चालु द्या. असे ही खोटे बोलायची सवय आहेच ज्यांनी गुजरात मधे १०-१५ वर्षात मेट्रो जाउ द्या साधी लोकल ट्रेन आणली नाही ते मुंबईत येउन मेट्रोवर भाषणे ठोकत आहेत. या पेक्षा मोठ्ठा विनोद काय असेल

In reply to by अन्या दातार

आनि आमी तुमच्या दाराशी 'पर्तिसाद द्या!!' म्हनून आक्षत आनून धरलीया जनू!!!!! आता तुमी उद्या सकाळच्याला मिशरी लावल्यावर जर आमी "आता १४ दिवस धीर धरा!!" आसं म्हनलं तर भागेल काय? :)

दुश्यन्त 05/10/2014 - 15:20
मोदी गुजरातमधून बाहेर पडायला तयार नाहीत. महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातकडे वळवले जात आहेत. मुंडे गेल्यावर भाजपकडे राज्यव्यापी चेहरा नाही. आताचे जे नेते आहेत ते शहा- मोदींकडे पाहून निर्णय घेतील म्हणून पंतप्रधान आता जिल्हा-तालुका ठिकाणी जावून सभा घेत आहेत. मुंबई या आर्थिक केंद्रावर गुजरातींचा आधीपासून डोळा आहे. पृथ्वीराज जसे सोनिया दरबारी चकरा मारायचे तसाच प्रकार भाजपकडून होईल. राष्ट्रवादीतून भ्रष्ट नेते आयात करून भाजपला पक्ष वाढल्याचा भास होत आहे.लोकसभेचे चित्र वेगळे होते. तेव्हा मोदींनी अध्यक्षीय निवडणुकीसारखे चित्र बनवून फायदा घेतला. आता तसे चित्र नाही १०० दिवसातला कारभार बघून लोक पण जमिनीवर आले आहेत. विधानसभेत स्थानिक प्रश्न महत्वाचे असतात. मराठी जनतेला भाजप पेक्षा शिवसेना जवळचा पक्ष वाटत आला आहे.

उदयन 05/10/2014 - 15:36
लोकसभेत राहुल सारखा समोर उभा होता पण महाराष्ट्रात एकसेएक नग आहेत. मोदीच्या खोट्या आणि भंपकबाजीचे धिंडवडे काढणारे खोर्याने सापडतील. हरियाणा दरडोई उपन्नात ८ व्या स्थानावर आहे मोदी म्हणालेत तो शतकिय विनोद होता. खरतर लिस्ट काढणार्याने बघितले सुध्द्दा नाही की अल्फाबिटीक्ली नाव लिहिलेली आहेत त्यानुसार हरियाणा ८व्या क्रमांकावर आहे आणि उत्पन्नाने १-२ र्‍या क्रमांकावर आहे पण हे तथ्य अतिहुशारीत घाई केली आणि भाजपाच्या पंतप्रधानांचा भरसभेत विचका झाला. इतकी गंभीर चुक या पदावर बसणार्या व्यक्तीने केली नाही पाहिजे. एका सभेत ५ महिन्या अगोदर काय झाले हे आठवा म्हणणारे मोदी स्वतः एका महिन्या अगोदर काय झाले विसरुन गेलेत :)

In reply to by उदयन

एक महीन्यापुर्वा पोटनिवडणुकात हरले, तेव्हा भाजपचे लोक तिथे स्थानिक मुद्द्यावर मतदान झाले असे म्हणत होते. मग जर विधानसभेत स्थानिक मुद्दे महत्वाचे असतात तर मोदीला कशाला तालुका लेवलवर सभा घ्यायला लावतायत ?

दुश्यन्त 05/10/2014 - 15:46
लोकसभेत राहुल सारखा समोर उभा होता पण महाराष्ट्रात एकसेएक नग आहेत. मोदीच्या खोट्या आणि भंपकबाजीचे धिंडवडे काढणारे खोर्याने सापडतील. +१ हेच म्हणत होतो. लोकसभेत मोदी अध्यक्षीय निवडणुकीचे चित्र उभे करण्यात यशस्वी ठरले. महाराष्ट्रात तसे नाही. कॉंग्रेस राष्ट्रवादी बदनाम आहे पण नुसता नेतृत्वाचा चेहऱ्यावर निवडणूक लढवली तर देवेंद्र-तावडे- खडसे हे पृथ्वीराज/ उद्धव ठाकरे/ शरद पवार यांच्यासमोर कच्चे ठरतील. म्हणून मोदींना पोस्टरबॉय बनवत आहेत पण हे लोकसभा नाही विधानसभा नाही. राज्यात सेनेचे संघटन जास्त मजबूत आहे आणि उद्धव यांच्याकडे ओरभावी वक्तृत्व नाही पण सेनेचे ते एकमुखी नेतृत्व आहे. भाजपच्या नेत्यांची तोंडे विरुद्ध दिशेला आणि त्यांना चावी द्यायला मोदी आणि शहा.सेनेची साथ सोडून भाजपच्या उतावीळ नेत्यांनी चूक केली.

चैदजा 05/10/2014 - 18:19
जर बीजेपी सत्तेवर आली तर, मुख्यमंत्री मोदीच्या तालावर नाचणार. ईतर कोणी पक्ष निवडुन आला तर केंद्र सरकार त्यांच्या धोरणांना मदत करणार नाही. मह्णजे काय? कोणीही येवो महराष्ट्राची झोळी रिकामी होत रहाणार आणि गुजरातची झोळी भरत रहाणार. मला तर मोदीं फक्त गुजरातचे पंतप्रधान वाटतात.

उदयन 05/10/2014 - 19:27
नाशकात भुरभुर पाउस फक्त आहे तरी मुसळधार पाउस आहे बातमी फिरवुन सभा रद्द केली. लोकच जमली नाहीत सभेला म्हणुन तर रद्द केली नाही ना ;)

In reply to by llपुण्याचे पेशवेll

श्रीगुरुजी 06/10/2014 - 21:16
मोदींच्या सगळ्याच सभा फ्लॉप गेल्या. तासगावमधल्या सभेला तर आख्खे मैदान रिकामे होते. नाशकातही रिकामे राहणार हे ओळखून भाजपच्या लोकांनी मैदानात टँकरमधून पाणी आणून ओतले आणि चिखल करून ठेवला आणि नंतर पावसाचे कारण पुढे करून सभा रद्द केली.

In reply to by श्रीगुरुजी

अहो श्रीगुरूजी ज्यांना पुण्याच्या पेशव्यांनी प्रतिसाद दिला ते एक अत्यंत विद्वान महाशय आहेत-- साक्षात बृहस्पतींनी त्यांचे शिष्यत्व पत्करावे इतकी त्यांची योग्यता आहे हे तुम्हाला माहित नाही का? म्हणूनच त्यांना पंतप्रधानांनी केलेले विदेश दौरे आणि पिकनिक यात फरक जाणवत नाही. इतक्या ज्ञानी माणसाचा प्रतिवाद करायची आपल्यासारख्यांची लायकी आहे का?

विजुभाऊ 06/10/2014 - 11:41
भाजप इतका डोळे झाकून दूध पिणारा पक्ष दुसरा कोणता नसावा. त्यांच्या राजकीय झैराती म्हणजे मोठ्ठा विनोद आहेत. उदा : १) इथले उद्योग परप्रान्तात गेले आहेत. कूठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा : इथले उद्योग गुजराथ मधे गेले आहेत. तेथे भाजपचेच राज्य आहेत. २) टोल बाबतीतेल विधाने: हा तर अती मोठ्ठा विनोद आहे.: टोल सम्राट गडकरी हे भाजपचेच आहेत. पूर्ती कम्पनी ही गडकरींचीच आहे. टोल मुक्ती कशी देणार महाराष्ट्राला?

In reply to by विजुभाऊ

एक नंबर विभा, महाराष्ट्र हा गुजराथचा एकमेव प्रतिस्पर्धी आहे .एकदा महाराष्ट्र कंगाल केला कि मग तो गुजरातच्या तुलनेत बराच मागे पडेल ,हे मोदीचे धुर्त षडयंत्र आहे .राज्यातली लाखो कोटींची गुंतवणुक गुजरातकडे गेलीय ,जरा विचार करा. ठिकाय काँग्रेसविरोधी असाल तर इतर पक्षांचे पर्याय उपलब्ध आहेत ,त्यांना मत द्या हवेतर, पण या धुर्त भाजपाला नको.

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी 06/10/2014 - 15:36
>>> राज्यातली लाखो कोटींची गुंतवणुक गुजरातकडे गेलीय ,जरा विचार करा. काही पुरावे? आकडेवारी? का नेहमीप्रमाणे नुसत्याच तोंडच्या गप्पा?

In reply to by विजुभाऊ

आज मनसेचे लोक व सेनेचे लोक कोस्टल पोलिस संस्था ,JNPT बंदरातला व्यापार,RBI, पुण्यातली फोक्सवॅगनची फॅसलीटी गुजरातला गेल्यामुळे गळे काढत आहेत ,ते योग्यही आहेच .परंतु उपरोक्त संस्था ,JNPT वगैरे काँग्रेसने राज्याला दिल्यात असेच अप्रत्यक्ष त्यांच्या टीकेतून सिद्ध होत आहे. याचा अर्थ काँग्रेसने राज्याचा प्रगतीचा विचार केला होता असाच होतो व त्याला काँग्रेसचे विरोधी सेना मनसे अप्रत्यक्ष अनुमोदनच देत आहेत.

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी 06/10/2014 - 15:40
>>> आज मनसेचे लोक व सेनेचे लोक कोस्टल पोलिस संस्था ,JNPT बंदरातला व्यापार,RBI, पुण्यातली फोक्सवॅगनची फॅसलीटी गुजरातला गेल्यामुळे गळे काढत आहेत ,ते योग्यही आहेच . या संस्था गुजरातला गेल्यात हे सिद्ध करणारे काही पुरावे आहेत का? का आपली नेहमीचीच फेकाफेकी? >>> परंतु उपरोक्त संस्था ,JNPT वगैरे काँग्रेसने राज्याला दिल्यात असेच अप्रत्यक्ष त्यांच्या टीकेतून सिद्ध होत आहे. याचा अर्थ काँग्रेसने राज्याचा प्रगतीचा विचार केला होता असाच होतो व त्याला काँग्रेसचे विरोधी सेना मनसे अप्रत्यक्ष अनुमोदनच देत आहेत. बादवे, JNPT या महाराष्ट्रातील बंदराला नेहरूंचे नाव कोणी दिले हो? त्यासाठी महाराष्ट्रातील एकही महापुरूष सापडला नाही वाटतं? आणि २-३ वर्षांपूर्वी वरळी येथील सागरपुलाला राजीव गांधींचं नाव द्या अशी जाहीर सूचना कोणी केली होती ते आठवतं का? तेव्हासुद्धा एकही मराठी माणूस सापडला नाही?

In reply to by श्रीगुरुजी

अगदी खरे. पूर्वी मिशलिन कंपनी अर्थमूव्हर्सचे टायर बनवायचा प्लांट चाकणमधे करणार होते. प्रंप्रिय, प्रुगामी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ४९% स्टेक त्यांच्या गरीब कार्यकर्त्याच्या नावाने मागितल्या मुळे शेवटी तो प्लांट चेन्नै ला गेला. एमाअयडीसीतली धर्मनिरपेक्ष गुंडगिरी अनुभवली असेल तर उद्योगधंदे गुजराथला का जातात ते कळेल. जे एन पी टी च्या सुविधा सुमार असल्याने पुण्याच्या सँडविक कंपनी मधे येणारा माल देखील गुजरातेत अडाणीच्या बंदरात उतरतो आणि रस्त्याने पुण्यात येतो आणि जातो देखील. जे एन पी टी ची अवस्था का बरे दुर्दैवी झाली? मोदिंनी केली का?

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी 07/10/2014 - 12:18
>>> >>> आज मनसेचे लोक व सेनेचे लोक कोस्टल पोलिस संस्था ,JNPT बंदरातला व्यापार,RBI, पुण्यातली फोक्सवॅगनची फॅसलीटी गुजरातला गेल्यामुळे गळे काढत आहेत ,ते योग्यही आहेच . पुराव्यांची आतुरतेने वाट बघतोय नानासाहेब. पुरावे नसतील तर ही सगळी फेकाफेकी होती हे तरी मोठ्या मनाने कबूल करा.

In reply to by श्रीगुरुजी

http://www.dnaindia.com/mumbai/report-safer-coasts-maharashtra-sets-marine-police-academy-ball-rolling-1853223 http://www.timesofindia.com/city/ahmedabad/Gujarat-to-get-marine-police-academy/articleshow/40089431.cms या दोन बातम्या वाचा. २०१३ आणि २०१४च्या .आता बोला यावर..... कुणी पळवले मरीन ट्रेनिंग सेंटर? बाकीच्या दरोडेखोरीचे पुरावे देईनच, आधी याविषयी समाधानकारक उत्तर द्या.खोटे आरोप करुन पळुन जायला मी सोमय्या किंवा खडसे वाटलो की काय तुम्हाला?

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी 07/10/2014 - 16:21
नानासाहेब फेकडे, तुम्ही स्वतःच दिलेल्या लिंक्स नीट वाचा हो आणि नंतर फेकाफेकी करा. तुम्हीच दिलेल्या लिंकमधील ही खालील वाक्ये वाचा. In the terrorist attack on Mumbai in November 2008, boats belonging to Porbandar fishermen were used by the Pakistan-trained terrorists. It was after this incident that the Gujarat government proposed such an academy in the state. तत्कालीन गुजरात सरकारनेच या संस्थेच्या स्थापनेची मागणी केली होती. The Centre is believed to have granted approval to a proposal of the state government for a first-of-its-kind National Marine Training Academy in Gujarat that was rejected by the previous UPA regime. > तुमच्या युपीए सरकारने ही मागणी धुडकावून लावली होती कारण अर्थातच ती मोदींनी केली होती. देशाच्या सुरक्षेपेक्षा मोदींना त्याचे क्रेडीट मिळू नये म्हणून केवढी ही धडपड. आता मोदी पंतप्रधान झाल्यानंतरच ही मागणी मान्य झाली आहे. या संस्थेची मागणी तत्कालीन मुख्यमंत्री मोदींनी केली होती. मोदींना अपशकुन करण्यासाठी युपीएने ती धुडकावली होती आणि आता त्या संस्थेचे महत्त्व ओळखून मोदींनी मान्यता दिली आहे. या सगळ्यात महाराष्ट्राचा काय संबंध? पुन्हा एकदा माती खाल्लीत नाना!

In reply to by श्रीगुरुजी

गुरुजी ,मोदींनी मागणी केली असली तरी ती संस्था महाराष्ट्राला मिळाली होती, ती गुजरातला नेण्याचं काहीच कारण नव्हतं. हे मोदी' तुझं माझं' कधीपासुन करायला लागले बरं? गुजरातचे मुख्यमंत्री असताना तुझं माझं ठिक होतं.... कि आताही ते गुजरातचेच पंतप्रधान आहेत? हाच तर मुद्दा आहे ,देशाचा पंतप्रधान फक्त गुजरातचाच विचार करतोय, हेच तुमी कोट केलेल्या पॅसेजवरुन कळतेय.

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी 07/10/2014 - 22:28
>>> मोदींनी मागणी केली असली तरी ती संस्था महाराष्ट्राला मिळाली होती, ती गुजरातला नेण्याचं काहीच कारण नव्हतं. ही संस्था कधी महाराष्ट्राला मिळाली होती? किती तारखेला? म्हणजे युपीएच्या काळात की वाजपेयींच्या काळात की मोदींच्या काळात? समजा युपीए किंवा वाजपेयींच्या काळात असली तर ती संस्था आजतगायत का सुरू झाली नव्हती? मोदींनी युपीएने केवळ मोदीद्वेषामुळे परवानगी नाकारलेली संस्था सुरू करायला परवानगी दिली. यात महाराष्ट्राचा काहीही संबंध नाही. >>> हे मोदी' तुझं माझं' कधीपासुन करायला लागले बरं? गुजरातचे मुख्यमंत्री असताना तुझं माझं ठिक होतं.... कि आताही ते गुजरातचेच पंतप्रधान आहेत? त्यांनी कधी केलं तुझं माझं? ज्या राज्याने परवानगी मागितली त्याच राज्याला परवानगी दिली. महाराष्ट्राने परवानगी मागितली असती तर तिथे परवानगी मिळाली असती. २६/११/२००८ ते १६/५/२०१४ या साडेपाच वर्षात केंद्रात व राज्यात युपीएचे सरकार होते. या काळात महाराष्ट्र सरकारने परवानगी मागितली होती का? आणि असल्यास साडेपाच वर्षात परवानगी कोणी व का दिली नव्हती? >>> हाच तर मुद्दा आहे ,देशाचा पंतप्रधान फक्त गुजरातचाच विचार करतोय, हेच तुमी कोट केलेल्या पॅसेजवरुन कळतेय. तुमचा निव्वळ इतिहास-भूगोलच कच्चा नसून तुम्हाला इंग्लिशही कळत नाही असं दिसतंय. आपणच दिलेल्या लिंका जरा नीट वाचा आणि बाता मारणे बंद करा.

In reply to by नानासाहेब नेफळे

पुण्यातली वॉक्सवॅगन गुजरातला गेली? बाप रे....काय सांगता काय नेफळेबुवा? म्हैतीचं न्हवतं....आमच्या मित्राला भौतेक कंपनीनी नवा पत्ता दिला नसेल म्हणता का काय?

In reply to by नानासाहेब नेफळे

मृत्युन्जय 07/10/2014 - 14:32
RBI, पुण्यातली फोक्सवॅगनची फॅसलीटी गुजरातला गेल्यामुळे गळे काढत आहेत ,ते RBI गुजरातला गेल्याचा काही पुरावा आहे का नेफळे की उगा फुकाची बडबड?

In reply to by मृत्युन्जय

श्रीगुरुजी 07/10/2014 - 16:04
>>> RBI गुजरातला गेल्याचा काही पुरावा आहे का नेफळे की उगा फुकाची बडबड? नेफळे कशा पुड्या सोडतात आणि पुरावे मागितले कसे सोयिस्कर मौन पाळतात याची कल्पना आहे ना तुम्हाला? त्यांचं नाव नानासाहेब नेफळे ऐवजी नानासाहेब फेकडे असायला हवं होतं.

In reply to by श्रीगुरुजी

मृत्युन्जय 07/10/2014 - 16:21
ते फेकत आहेत ते माहिती आहे हो मला. पण मग विचार केला की माझ्याकडे नसलेली एखादी माहिती नानासाहेबांकडे असेल तर बघावे म्हणुन प्रश्न विचारला आपला. बाकी ते आता बर्‍याच कोलांट्या उड्या मारणार हे तर माहिती आहेच. पण त्यांनी आपल्या ज्ञानात भर घातली तर आपल्याला बरेच आहे की. आभारच मानेन मी त्यांचे मग.

In reply to by मृत्युन्जय

RBIचे महत्वाचे तीन डीव्हीजन मुंबईतून दिल्लीत हलवणार आहेत. http://www.ahmedabadmirror.com/news/business/RBI-to-shift-3-forex-divisions-to-Delhi-in-July/articleshow/38204660.cms

In reply to by नानासाहेब नेफळे

मृत्युन्जय 07/10/2014 - 18:07
एकुणात तुम्ही निखालस खोटी विधाने करत आहात हे मान्य करत आहात तर. तुम्ही म्हणालात की आख्खे मुख्यालय गुजरात मध्ये हलवले. इथे तर दिसते आहे की ३ डिव्हिजन्स दिल्लीला हलवली. तुमचा खोटारडेपणा इथेच सिद्ध होतो. तरीही तुम्हाला अजुन खोटा पाडतो: The divisions will continue to be part of Foreign Exchange Department, Central Office, Mumbai, RBI added अजुन ऐका: आरबीआयची एकुण २० -२५ डिपार्टेमेंट्स आहेत. फोरेन एक्स्चेंज हे त्यापैकी एक. फोरेन एक्स्चेंज डिपार्टमेंट मध्ये अनेको डिव्हिजन्स आहेत. त्यातील ३, केवळ ३ डिव्हिजन्स दिल्लीला हलवली आणि तुम्ही म्हणत आहात की "मुख्यालय गुजरातमध्ये हलवले". अजुन किती वेळा माती खाणार नेफळे?

In reply to by नानासाहेब नेफळे

मृत्युन्जय 07/10/2014 - 18:20
वादासाठी मान्य करु? म्हणजे काय? इतरवेळेस अमान्य करण्यासारखे आहेच काय त्यात? आधी तुम्ही अपप्रचार करता आहात हे मान्य करा. चला तुमच्या सोयीसाठी असे मान्य करा की तुमची माहिती निखालस चुकीची होती. ढळढळीत पुरावे दिले आहेत. मग पुढचे बोलु.

In reply to by नानासाहेब नेफळे

उदयन 07/10/2014 - 18:50
आंधळे भक्तांना काही दिसत नाही कुठे तुम्ही प्रकाश दाखवत आहेत. मराठी मत मिळावे म्हणुन मोदी म्हणत आहे मुंबई महाराष्ट्रापासुन वेगळी करणार नाही विदर्भ वेगळा होणार नाही. शिवसेनेच्या प्रचाराला "घाबरुन" शेवटी बोलावे लागले. नाहीतर आधी यांची भाषा वेगळी होती रंगबदलु लोकांचा काय भरोसा ठेवतात

In reply to by उदयन

काळा पहाड 07/10/2014 - 18:53
फुकट्या लोकांच्या हाती मुंबई असल्यापेक्षा ती वेगळी केलेली काय वाईट? बाकी विदर्भाला वेगळं व्हायचं असेल तर रोखणारे आम्ही कोण? त्यांचं काय भलं केलंय आतापर्यंतच्या सरकारांनी?

In reply to by काळा पहाड

उदयन 07/10/2014 - 18:57
विदर्भात जे प्रकल्प आहेत ते काय गुजरात ने उभे केले का? नागपुरातल्या काही लोकांनाच वेगळा विदर्भ हवा आहे कारण उभ्या महाराष्ट्रात डाळ शिजत नाही. मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न पडत आहेत त्यांना म्हणुन्च हे खेळ

In reply to by उदयन

काळा पहाड 07/10/2014 - 19:20
इथं गुजरातचा काय संदर्भ? बाकी तुम्ही म्हणता तसा विदर्भ सुजलाम सुफलाम असता तर त्यांना वेगळं राज्य मागायची काही गरजच नव्हती. बाकी तुमच्या म्हणण्यानुसार तुम्ही नागपूर मधल्या लोकांना मुख्यमंत्री बनू देत नाही तर. मग त्यांची मागणी वाईट कशी? की कायम पस्चिम महाराष्ट्रातल्याच लोकांनी मुख्यामंत्री व्हायचं?

In reply to by काळा पहाड

उदयन 07/10/2014 - 19:34
काय हास्यास्पद लिहिले आहे . जरा परत वाचुन बघा काय लिहिले ते. महाराष्ट्रातुन पंतप्रधान मिळाला नाही तर काय तुम्ही महाराष्ट्र देशच वेगळा मागणार आहेत का? ;) काहीही प्रतिवाद करायचा ?

In reply to by उदयन

दुश्यन्त 07/10/2014 - 20:02
मुख्यमंत्रीपद पश्चिम महाराष्ट्राकडे कायम कधी होते? विदर्भाचे वसंतराव नाईक (११ वर्षे सलग) आणि मारोतराव कन्नमवार (१ वर्षे) मुख्यमंत्री राहिले आहेत.मराठवाड्याचे पण शंकरराव चव्हाण, अशोक चव्हाण, विलासराव, निलंगेकर, शिवराज पाटील चाकूरकर असे मुख्यमंत्री झाले आहेत. उत्तर महाराष्ट्राला कधी मुख्यमंत्री पद मिळाले नाही.मात्र ते वेगळे राज्य मागत नाहीत.

In reply to by उदयन

प्रसाद१९७१ 07/10/2014 - 18:57
मुंबई आणि विदर्भ वेगळी झालीच पाहीजे महाराष्ट्रातुन, म्हणजे पुण्याचे, सातार्‍याचे, कोल्हापूर चे महत्व वाढेल

In reply to by मृत्युन्जय

सौंदाळा 07/10/2014 - 18:15
अरे मृत्युन्जया, श्रीगुरुजी गपा की रे जरा. किती छळता माझ्या नानाला. तो एकटा एका बाजुला अजुन आठ महिन्याचाच आहे आणि तु रे मृत्युन्जया साडेसहा वर्षाचा आहेस ना सांभाळुन घेत जा त्याला जरा आपला आप्पासाहेब फुरसुंगीकर

In reply to by विजुभाऊ

लोटीया_पठाण 06/10/2014 - 12:12
@ विजुभाऊ, १) इथले उद्योग गुजराथला गेले हा काय गुजराथ सरकारचा दोष आहे काय ?? पळवले नाहीत त्यांनी. कर्नाटकात पण जात आहेत इथले उद्योग. २) १५ वर्षे सत्तेत नसलेले गडकरी टोल सम्राट कसे काय?? नेफले भाऊ, RBI स्वायत्त संस्था आहे. अन फोक्सवॅगन खासगी … मनसेचे रेमेडोके सांगणार अन तुम्ही ऐकणार

In reply to by लोटीया_पठाण

@लोटीया पठाणजी, RBI स्वायत्तवगैरे सांगोवांगी असतं ,अर्थखात्याचाच अप्रत्यक्ष होल्ड असतो. आणि तुमचे लॉजिक लावले तर गॅस कंपन्या पेट्रोल डीझेल कंपण्यानाही बरीच स्वायत्तता आहेच की, मग दरवाढीविरोधात सरकारच्या नावे दहा वर्षे शिमगा का चालू होता? महाराष्ट्रात येऊन गुजरातच्या मुख्यमंत्री राज्यातल्या उद्योगांना गुजरातेत यायचे आमंत्रण देत आहेत, मोदी सरकारकडून अशा कंपन्यांना करसवलतीचे आमिष दाखवून महाराष्ट्राबाहेर पडायला उद्युक्त करत आहेत. मुंबई पुणे बुलेट ट्रेन कॅन्सल करुन अहमदाबादकडे नेली, कशासाठी? आजपर्यंत परदेशी पाहुणे दिल्लीत यायचे व नंतर मुंबईत, मोदीने दोन्हीला टांग देउन चीनच्या पंतप्रधानांना अहमदाबादेत कशाला नेले? तुंबड्या भरुन घेणारा धुर्त माणुस आहे मोदी, महाराष्ट्र अशांच्या ताब्यात अजिबात नको देऊयात.गुजरात्यांनी अखेर लायकी दाखवली.

In reply to by नानासाहेब नेफळे

प्रसाद१९७१ 06/10/2014 - 12:39
काही चांगल्या गोष्टी, कंपन्या, उद्योग गुजरात मधे गेले तर इथे लोक "पाकीस्तानात" गेल्या सारखे गळे काढत आहेत. इथल्या पि.चि. MIDC मधे छोटे, मध्यम उद्योग चालवणे ह्या गुंडांनी आणि खंडणीखोरांना कसे अशक्य करुन ठेवले आहे हे माहीती दिसत नाही. असे वातावरण असेल तर जाणारच कंपन्या गुजरात मधे. स्क्रॅप सुद्धा खंडणी दिल्या शिवाय विकता येत नाही पुणे परिसरात.

In reply to by नानासाहेब नेफळे

प्रसाद१९७१ 06/10/2014 - 14:02
मी मांडलेला मुद्दा पक्षीय नव्हता. मला म्हणायचे होते, जे राज्य चांगले व्यवसायिक वातावरण देइल तिथे उद्योग आणि इतर संस्था जातील. मोदी किंवा दुसरे कोणी असे जबरदस्तीने घेउन जाउ शकत नाही. जर नविन सरकारनी पिं.चि. मधली गुंडगीरी कमी केली नाही तर कोणाचेही सरकार असेल तरी उद्योग दुसरीकडे जातील.

In reply to by प्रसाद१९७१

विजुभाऊ 06/10/2014 - 13:10
@ प्रसाद : तुमचे म्हणणे मान्य आहे. कोंग्रेस असो की इतर कोणी स्थानीक पुढार्‍यानी इथल्या एम आय डी सी ची अक्षरशः वाट लावली आहे. सातारा वाई इथल्या एम आयडीसी पाहिल्या तर वाटते की उद्योजकानी केवळ मागील जन्माचे पाप फेडण्यासाठी उद्योग स्थापले आहेत. सातार्‍यात असलेले बरेच उद्योग तेथून स्थलांतरीत झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आधारीत उद्योग हे डबघाईस आलेले आहेत. सातार्‍यात पथेजा फोर्जींग्स , परांजपे ऑटोकास्ट , डोबर्ग ब्रूअरीज हे उद्योग गायब झालेत. महाराष्ट्र स्कूटर्स चा कारखाना गेले वीस एक वर्षे उत्पादन बंद अवस्थेत आहे. तेथे पर्यायी अनेक उत्पादने निर्मान होऊ शकतात. मात्र स्थानीक अडमुठे नेतृत्व आणि त्यांची जी हुजुरी करणारे यांचे प्राबल्य असणारे यांची चलती असल्यामुळे विकासाच्या नावाने ठणाणाच आहे. अर्थात हा कोंग्रेस चा दोष आहे असे नाही. तेथले खासदार एकदा भाजपच्या नावावर निवडून आले होते. त्यानंतर ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नावार निवडून येतात. आमदारानी नक्की काय केले हे त्याम्चे त्याना माहीत असेल तरीही खूप म्हणायचे. अर्थात मुख्य दोष आहे तो सातार्‍याच्या नागरीकांचा.

In reply to by विजुभाऊ

प्रसाद१९७१ 06/10/2014 - 14:06
@विजुभाऊ - तसे बघायला गेले तर देशाच्या सर्वच प्रॉब्लेम साठी सर्व नागरीकच जबाबदार आहेत. तेच तर प्रत्येकवेळेला सरकार निवडुन देतात. माझ्या मते अति लोकशाही करण झाले आहे. काही चमत्कार झाला तरच ह्या देशाला भवितव्य आहे. आत्ता तरी मोदी हाच एक आशेचा कीरण आहे.

In reply to by नानासाहेब नेफळे

हाडक्या 07/10/2014 - 14:47
नाना, सातारच्या लोकांबद्दल सरसकटीकरण करण्याची ही तुमची दुसरी वेळ.. आता ह्या साताराबाहेरच्या व्यक्तीने लिहिलेल्या लेखावरची 'सातारच्या' लोकांच्या (म्हणजे आमच्यापण) प्रतिक्रिया वाचा. मग बोला. कुठल्याही बाबतीत सरसकटीकरण वाईटच. आणि मुजरे/दंडवत/चपला उचलणे अशी लाळघोटी कामे (आपल्या देशात तरी) पक्षनिरपेक्ष व स्थल-काल निरपेक्ष चालू असतात. सातारकरांना या बाबतीत 'निर्लज्ज' आणि 'बसा बोंबलत' म्हणायची गरज नाही आणि तुमची लायकीही नाही.

In reply to by नानासाहेब नेफळे

एम.आय.डी.सी. सारख्या ठिकाणी व्यवसाय करायला महाराष्ट्र सगळ्यात नालायक राज्य आहे. अरे उद्योजकाला किती नाडतात स्थानिक गुंड ते एकदा फिरुन बघा. साध्या भंगाराच्या कंत्राटावरुन पार खुन पडायच्या वेळा येतात.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

जर इतकी गुंडगिरी आहे तर या कंपन्या आल्याच कशा राज्यात ?एखाद्या ठिकाणी घडत असेलही प्रत्येक ठिकाणी नाही.

In reply to by नानासाहेब नेफळे

सौंदाळा 07/10/2014 - 11:31
कंपन्या आधीपासुनच होत्या हो. पण PCMC बद्दल बोलायचे झाले तर सलग ३०+ वर्षे शरद पवार / एनसीपीचे वर्चस्व आहे या भागावर. मागच्या १० वर्षात जनरल मोटर्स, वोक्सवॅगन, जेसीबी वगैरे कंपन्या आल्यामुळे त्यांना पुरवठा करणार्‍या लघु-उद्योगांची गरज वाढली. कित्येक नविन वर्कशॉप्स उभे राहीले, जुने वर्क्शॉप्स अजुन वाढले. आधीपासुन सत्तेत असलेल्या एनसीपीने (त्यांचे नगरसेवक, कार्यकर्ते) युनियन बनवल्या. उद्या वर्कशॉप चालु करायचे तर सुरक्षारक्षक, सफाई कामगार यांचे घ्यायचे, ट्रान्स्पोर्टेशन ट्रक, क्रेन, ट्रेलर वगैरे यांचेच वापरायचे, भंगार हे सांगतील तिकडेच विकायचे. या सगळ्यात यांचे कमिशन. एखादी मोठी ऑर्डर आली तर सरळ टक्केवारीत कमिशन द्यायचे. या दादागिरीतुन जुने, मोठे वर्कशॉप्स टिकले मात्र ज्यांनी ७/८ वर्षापुर्वी मोठ्या हिम्मतीने आधीची नोकरी सोडुन नविन वर्कशॉप टाकले त्यातले बहुतांश बंद पडले. माझ्या ओळखीत दोन उदाहरणे आहेत. १०-१२ वर्षाची नोकरी झाली होती त्याची बचत धंद्यात टाकली सुरुवातीला बरा चालला पण नंतर या दादागिरीमुळे पैसे सुटेनासे झाले तरी आज्-उद्या ठीकठाक होईल म्हणुन १.५-२ वर्षे काढली मात्र शेवटी धंदा बंद करावा लागला, नविन नोकरीची मारामार आता दुसर्‍या वर्कशॉपमधे सुपरवायजरची कामे करतायत.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

हे कल्चर पवारने माजवले आहे, त्याचा काँग्रेसशी संबंध नाही. थोरली पाति काँग्रेसमध्ये असताना वरुन दट्ट्या आल्यानंतर सरळ व्हायची, आता पवार प्रा लि कंपनी असल्याने कोण बोलणार तिकडे? मुंबईतही जय भवानी जय शिवाजी टाक खंडणी 'वाले बंधुद्वयी प्रायवेट लीमीटेडच आहेत. यासाठीच राष्ट्रीय पक्षांना निवडून द्यायचे असते ,तिथे शिस्त असते.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

वर्कशॉप चालु करायचे तर सुरक्षारक्षक, सफाई कामगार यांचे घ्यायचे, ट्रान्स्पोर्टेशन ट्रक, क्रेन, ट्रेलर वगैरे यांचेच वापरायचे, भंगार हे सांगतील तिकडेच विकायचे. या सगळ्यात यांचे कमिशन. एखादी मोठी ऑर्डर आली तर सरळ टक्केवारीत कमिशन द्यायचे. ह्यात नक्कीच तथ्य असावे. माझ्या मित्राने नविन मुंबईत त्याचे स्वतःचे घर दुरुस्तीला काढले तर लोकल गुंडांनी त्याला हव्या असलेल्या कंत्राटदारास काम देण्यास, त्याला हवे असलेल्या ठिकाणाहून दुरुस्तीला आवश्यक सामान आणण्यास बळजबरी करून विरोध केला. प्रकरण मारामारी पर्यंत पोहोचलं. शेवटी मित्राला स्नायूबलापुढे नमतं घ्याव लागलं. भरपूर पैसे गेले आणि निकृष्ट काम गळ्यात आलं. अजूनही अश्रू ढाळतोय बिचारा.

In reply to by प्रभाकर पेठकर

काळा पहाड 07/10/2014 - 18:48
मुंडे उपमुख्यमंत्री असताना त्यांनी गुंडांवर एन्काऊंटर्ची कारवाई केलेली माहिती आहे. दुर्दैवाने ते आता नाहीत. या काँग्रेसच्या (रा.काँ. ही काँ. तर आहे!) किंवा शिवसेनेच्या गुंडांना संपवून टाकायची गरज निर्माण झाली आहे.

In reply to by काळा पहाड

काय धडधडीतखोटं सांगत आहात, ९३च्या बॉम्बब्लास्टनंतर शरद पवारांना काँग्रेसने मुख्यमंत्रीपदी पाठवले, शरद पवारांनी मुंबई पोलिस कमिशनर रिबेरो यांना सर्वाधिकार देऊन अंडरवर्ल्डचा कणा मोडला होता.

In reply to by नानासाहेब नेफळे

काळा पहाड 07/10/2014 - 19:05
नेफळेसाहेब, काही दुवे देतोय आंतर्जालावरचे. १) The BJP-Shiv Sena government saw its credibility slipping as the 40,000-strong Mumbai Police watched helplessly. The then home minister Gopinath Munde gave the police a virtual carte blanche to eliminate the gangsters. In 1999, the police department recruited officers for their newlyformed CIU. Hard-nosed policemen with an extensive network of informants and a track record showing they were unafraid to pull the trigger were picked up. The CIUs eliminated gangsters in cold, extra-judicial killings. Select policemen were armed with sweeping powers, allowed to tap phones, given secret service funds to pay informants and rewarded with cash bounties ranging from Rs.1-15 lakh. Gangsters were abducted, detained and then shot in cold blood. Weapons were planted on their bodies. http://indiatoday.intoday.in/story/mumbai-encounter-specialists-killers-in-khaki/1/176211.html २) When he assumed office, among the first priorities was to improve the law and order scenario – and the department cracked the underworld's backbone. “There were several encounters in which criminals of various gangs – Dawood Ibrahim, Chhota Rajan, Arun Gawli and their splinter groups were killed and several arrested,” said an officer, who served in the Mumbai Police during that period. “There were allegations of human rights violations, but he always stood by the teams,” the officer added. http://www.sakaaltimes.com/NewsDetails.aspx?NewsId=5509317610950310437&SectionId=5351696313519115080&SectionName=State&NewsDate=20140603&NewsTitle=Munde,%20%20initiator%20of%20drive%20to%20finish%20off%20underworld ३) As the then State Home Minister, Munde contributed in a big way in controlling organised crime in Mumbai. At a time when the metropolis came under the iron grip of the underworld, who thrived on handing extortion threats to moneyed people from different walks of life and killing those who failed to oblige them, Munde gave a free hand to “encounter-specialists” of the Mumbai police, who went virtually for the kill, eliminated scores of gangsters and broke the very back of the once-powerful underworld. http://www.dailypioneer.com/print.php?printFOR=storydetail&story_url_key=bjp-loses-its-maha-soldier&section_url_key=todays-newspaper

In reply to by नानासाहेब नेफळे

उदयन 07/10/2014 - 22:35
मोदींना हिशोब काय मागितला इतकी मिर्ची लागली की सगळी कडे तेच सांगत फिरत आहे मात्र हिशोब देत नाही काय जबरदस्त मिर्ची झोंबली

दुश्यन्त 06/10/2014 - 12:42
कॉंग्रेसचे राज्यसभेतील उपनेते आनंद शर्मा यांनी केलेली टीका पहा. टीका कोण करताय यापेक्षा काय करत आहे या बाजूने पहा. '..पंतप्रधान मंत्रिमंडळाला गौण समजतात. केंद्रीय मंत्री नामधारी बनले आहेत. इतिहासात प्रथमच देशाला पूर्णवेळ संरक्षणमंत्री नाही. अर्थमंत्र्यांना संरक्षण मंत्रालयाची हंगामी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मोदींनी आजवर एकदाही देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावलेली नाही.' मोदींना आम्ही पण लोकसभेत मत दिले होते मात्र गेल्या ४-५ महिन्यात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. मोदींची मनोवृत्ती ही एकाधिकारशाहीची आहे. गुजरातमध्ये ते चालून गेले. राष्ट्रीय स्तरावर असेच करत राहिल्यास त्यांना अडचणी येतील. महाराष्ट्रात मोदी २५ सभा घेणार आहेत अगदी तासगाव, तुळजापूर अश्या तालुका ठिकाणी ते जाणार आहेत. एवढी अगतिकता कश्यासाठी तर नक्कीच मुंबई हे आर्थिक केंद्र आपल्या ताब्यात असावे. मुंबईत बसणारा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आपल्या ऐकण्यातला असावा हेच असू शकते.राज ठाकरे म्हणतात तसे राज्य भाजपचा एकही नेता उद्या मुख्यमंत्री झाल्यास मोदींना उलट प्रश्न विचारू शकणार नाही. मोदी- शहांसमोर बोलण्याची तावडे/ खडसे /देवेंद्र यांची छाती होईल का? मुंडे असते तर गोष्ट वेगळी होती. उद्या महाराष्ट्रावर अन्याय होत असता ते उठून बोलले असते आता तशी स्थिती नाही.अशोक चव्हाण, पृथ्वीराज यांना महामंडल नियुक्त्या, राज्यमंत्री नेमणे यासाठी दिल्लीत ४-४ चक्र माराव्या लागायच्या. सत्ता परिवर्तन होवूनही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिल्लीश्वरांच्या हातचे बाहुले ही परिस्थिती राहायला नको. महाराष्ट्रात लोक विधानसभेला स्थानिक मुद्दे पाहूनच मत देतात. आघाडी नको तर लोकांना शिवसेना तर काही ठिकाणी मनसे हा पर्याय जास्त जवळच वाटू शकतो.

उदयन 06/10/2014 - 12:55
भाजपाच्या गृहमंत्र्यांनी मुक्ताफळे उधळली आहेत. पाकिस्तानाला दम देताना बोलले की

"पांढरे निशाण फडकवायला"

आधीचे सरकार नाही. आता पांढरे निशान म्हणजे शरणागती. भारताने कधी पाकिस्तानापुढे शरणागती पत्करली ??? अरे राजनाथासाहेब याच काँग्रेस ने पाकिस्तानाचे दोन तुकडे केले होते. हे विसरतात का ? तुमच्यासारखे अतिरेक्यांना सोडुन नाही आले होते. उपमा द्यायला पण येत नाही म्हणे हे गृहमंत्री

In reply to by उदयन

संपुर्ण कॅबिनेट मोदींच्या दहशतीखाली आहे, अगदी राजनाथसुद्धा. इतका स्वार्थी पंतप्रधान देशाने पाहिला नव्हता.

In reply to by नानासाहेब नेफळे

अगदी अगदी खर्र्र्र बोल्लात....अगदी शु ला जायचं असलं तरी सोडत नाहीत म्हणे मोदीगुर्जी....कमीत कमी दरारा असणारा तरी पी.एम. आहे आमच्याकडे. कळसुत्री नाही.

उदयन 06/10/2014 - 13:57
मै "हरियाणा" को नंबर १ बनाउंगा ...!! मै "महाराष्ट्र" को नंबर १ बनाउंगा ...!!
कधी दोन राज्य एकाच नंबरवर असु शकतात का ?

In reply to by उदयन

मोदी म्हणणार की नंबर एक पोझिशनवरुन हरीयाणा व महाराष्ट्रात भांडण नको, त्यापेक्षा मध्यममार्ग म्हणुन मी गुजरातचा विकास करतो.

दुश्यन्त 06/10/2014 - 14:17
अर्थमंत्री अरुण जेटली आजारी असल्याच्या बातम्या गेले काही दिवस येत आहेत. आपल्याकडचा संरक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त भार हंगामी असून लवकरच नवीन संरक्षण मंत्री नेमला जाइल असे ते ४ महिन्यापूर्वी म्हणाले होते मात्र अजून कुणाची नेमणूक झाली नाही. अर्थ, गृह, संरक्षण आणि परराष्ट्र व्यवहार ही अति महत्वाची खाती असतात. कॅबिनेट कोर कमिटीमध्ये या चार खात्याचे मंत्री असतात.आपल्या ऐकण्यातला संरक्षण मंत्रीपदाचा दावेदार मिळत नसल्याने मोदी पूर्ण वेळ संरक्षण मंत्री नेमत नाहीत असे दिसतेय. पण अशी परिस्थिती चांगली नक्कीच नाही. पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष पण आपल्या ऐकण्यातलाच हवा यासाठी अमित शहांची पार्श्वभूमी, सध्या प्रलंबित असलेले गुन्हे याकडे पण डोळे झाक केली आहे. सत्ताधारी पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष हा त्याच्याच गुजरातमधून तडीपार केलेला आहे.सगळ्या महत्वाच्या पदावर आपले पित्तू बसवण्याचा हा मोदींचा अट्टाहास चांगला नाही.'सबका साथ सबका विकास' वगैरे नुसत्या गप्पा आहेत.

विजुभाऊ 06/10/2014 - 14:24
भाजपने काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व मनसेतून आयात उमेदवार केलेले आहेत काँग्रेसचे १६, राष्ट्रवादीचे २०, शिवसेनेचे ९, मनसेचे २, शेतकरी संघटनेचा १, अपक्ष २ व समता परिषदेच्या एकाचा समावेश आहे. गेली १५ वर्षे महाराष्ट्र खड्ड्यात घालणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनाच भाजपने प्रवेश देऊन तत्काळ उमेदवारी का दिली भाजपचे स्वतःचे असे काय उरले आहे आता. त्याना सगळ्या ठिकाणी उभे करायला स्वतःचे असे उमेदवार देखील मिळत नाहीत. भाजपच्या आयात उमेदवारांची यादी उमेदवार मतदारसंघ आधीचा पक्ष मनोहर बडने धुळे ग्रामीण काँग्रेस सुनील देशमुख अमरावती काँग्रेस समीर मेघे हिंगणा काँग्रेस माधवराव किन्हाळकर भोकर काँग्रेस आनंद भरोसे परभणी काँग्रेस शिवाजीराव नाईक शिराळा काँग्रेस अजित घोरपडे तासगाव काँग्रेस प्रशांत ठाकूर पनवेल काँग्रेस राजन तेली सावंतवाडी काँग्रेस संजय दुधगावकर उस्मानाबाद काँग्रेस शैलेश लाहोटी लातूर काँग्रेस माणिकराव कोकाटे सिन्नर काँग्रेस बाळासाहेब मुरकुटे नेवासा काँग्रेस भाऊसाहेब वाकचौरे श्रीरामपूर काँग्रेस विलासराव खरात घनसावंगी काँग्रेस अमोल महाडिक कोल्हापूर दक्षिण काँग्रेस अभय नगरकर नगर राष्ट्रवादी विजयकुमार गावित नंदुरबार राष्ट्रवादी संजय सावकारे भुसावळ राष्ट्रवादी योगेंद्र गोडे बुलढाणा राष्ट्रवादी किसन कथोरे मुरबाड राष्ट्रवादी मंदा म्हात्रे बेलापूर राष्ट्रवादी लक्ष्मण जगताप चिंचवड राष्ट्रवादी बबन पाचपुते श्रीगोंदा राष्ट्रवादी शरद बुट्टे पाटील खेड राष्ट्रवादी राहुल कुल दौंड राष्ट्रवादी प्रताप चिखलीकर कंधार राष्ट्रवादी स्नेहलता कोल्हे कोपरगाव राष्ट्रवादी भीमराव धोंडे आष्टी राष्ट्रवादी मोनिका राजळे पाथर्डी राष्ट्रवादी जगदीश वळवी चोपडा राष्ट्रवादी शिवाजी कर्डिले राहुरी राष्ट्रवादी राजेंद्र पिपाडा राहाता राष्ट्रवादी अद्वय हिरे नांदगाव राष्ट्रवादी अरविंद चव्हाण जालना राष्ट्रवादी रामदास सदाफुले देवळाली राष्ट्रवादी भगवान बोरस्ते निफाड शिवसेना किशनचंद तनवाणी औरंगाबाद मध्य शिवसेना बाबासाहेब तांबे पारनेर शिवसेना विनायक हिवाळे पैठण शिवसेना शरद ढमाले भोर शिवसेना नेताजी डोके जुन्नर शिवसेना जयसिंग एरंडे आंबेगाव शिवसेना चंद्रकांत खाडे इगतपुरी शिवसेना दिलीप कुंदकर्ते नांदेड दक्षिण शिवसेना संगीता राजे निंबाळकर पुरंदर मनसे राम कदम घाटकोपर पश्चिम मनसे संजय गव्हाणे कन्नड समता परिषद प्रशांत बंब गंगापूर अपक्ष अनिल गोटे धुळे शेतकरी संघटना शिवाजी मानकर येवला मागील वेळी अपक्ष उमेदवार

In reply to by विजुभाऊ

श्रीगुरुजी 06/10/2014 - 21:21
>>> भाजपने काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व मनसेतून आयात उमेदवार केलेले आहेत जो पक्ष निवडून यायची सर्वात जास्त शक्यता तिकडेच आयात होणार ना? बादवे, इतर पक्षाने आयात केलेल्यांची सुद्धा नावे दिलीत तर बरे होईल. उदा. पुण्यात कसब्यातून राकाँचा उमेदवार दीपक मानकर आहे. तो कुठून आयात केला. पर्वतीत शिवसेनेने सचिन तावरेला कोठून आयात केले? कोकणात दीपक केसरकरला शिवसेनेने कोठून आयात केले?

नित्य नुतन 06/10/2014 - 16:05
पंकजा मुंढे ला एका मुलाखतीत बघितले होते ... तोंडात च्विंगम चघळत एखाद्या भाईच्या आवेशात उत्तरं देत होती ... पोकळ अतिआत्मविश्वास ठासून दिसत होता .. असले नेते मुख्यमंत्रीपदाचे दावेदार ??? अर्रे कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा ???

दुश्यन्त 06/10/2014 - 16:09
मुळात याआधी भक्तजन गुजरातचे जे आकडे द्यायचे तेच फुगवून सांगितलेले असायचे हे एव्हाना सिद्ध झाले आहे. गुजरातपेक्षा महाराष्ट्र, तामिळनाडू ही राज्ये बर्याच (चांगल्या) बाबतीत पुढे आहे.

In reply to by दुश्यन्त

श्रीगुरुजी 06/10/2014 - 21:19
>>> मुळात याआधी भक्तजन गुजरातचे जे आकडे द्यायचे तेच फुगवून सांगितलेले असायचे हे एव्हाना सिद्ध झाले आहे. हे कधी सिद्ध झाले?

भाते 06/10/2014 - 16:24
इतर राजकीय पक्षांनी किमान त्यांचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तरी घोषित केले आहेत. भाजपावाल्यांचे काय? जसे लोकसभा निवडणुकीच्या वेळी मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणुन आधीच घोषित केले होते तसे महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार निवडणुकीअगोदर घोषित करायला का घाबरत आहेत हे भाजपावाले? त्यांच्यातच एकमत नाही आहे. मुंडे यांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्राचे नेतृत्व करू शकणारा कोणीही नेताच भाजपाकडे नाही आहे. म्हणुन तर विधानसभा निवडणुक प्रचारासाठी देशाच्या पंतप्रधानाला यायची गरज वाटते. दिल्लीमधुन केंद्रीय नेतृत्व सांगेल त्याला/तिला मुख्यमंत्री बनवणार हा कुठला न्याय? आधीचा मुख्यमंत्री दिल्लीमधुन पाठवलेला होता. यावेळीही भाजपाचा दिल्लीमध्ये ठरलेला उमेदवार मुख्यमंत्री म्हणुन आला तर गेल्यावेळी प्रमाणे तो/ती प्रत्येक लहानसहान गोष्टीसाठी दिल्लीच्या वाऱ्या करणार. दिल्लीमधुन आलेल्याला जर प्रत्येक गोष्टीसाठी तिकडे धाव घ्यायला लागत असेल तर काय करायचा आहे तो दिल्लीतला मुख्यमंत्री? मग काय बदल झाला महाराष्टात?

In reply to by श्रीगुरुजी

उदयन 07/10/2014 - 13:53
वृत्ती गेली नाही अजुन ? भाजपाचा विचारला तर आधी उत्तर द्या मग प्रश्न विचारा. उत्तर न देताच प्रश्न विचारुन पळुन काय जातात

In reply to by उदयन

मृत्युन्जय 07/10/2014 - 13:58
अर्रे. बाकीच्यांनी जाहीर केला पण भाजपाने नाही केला म्हणून गळा काढता आहात ना? मग द्या की उत्तर, कोणी कोणी जाहीर केला काँग्रेसशिवाय?

In reply to by उदयन

मृत्युन्जय 07/10/2014 - 22:46
अर्रे डिफरंट आहे म्हणुन केवळ त्यांनीच उमेद्वार जाहीर करायचा? पार्टी विथ डिफ्रन्स म्हणजे काय हेच तुम्हाला कळालेले नाही हाच मुख्य लोच्या आहे. असो. अभ्यास वाढवा.

In reply to by मृत्युन्जय

उदयन 07/10/2014 - 23:21
नीरो च्या पार्टी बद्दल काय समजायचे आहे तिथे भारतीयांवर गोळीबार होत आहे आणि हे प्रचार करत आहे ना काळजी ना खंत.... निर्लज्जपणा तो हाच आहे

In reply to by उदयन

प्रदीप 08/10/2014 - 07:54
तुम्ही प्रथम लिहीलेतः "तिथे भारतीयांवर गोळीबार होत आहे आणि हे प्रचार करत आहे ना काळजी ना खंत.... निर्लज्जपणा तो हाच आहे" आता ह्या दुव्यांवरून असे दिसते की भारतही चोख प्रतिसाद देत आहे. विशेषतः हे पहा: "The Narendra Modi government on Tuesday directed the Border Security Force (BSF) and the Indian Army not to seek a flag meeting with Pakistan on the international border that has witnessed heavy firing in the last two days." एका विशीष्ट पातळीपलिकडील निर्णय सरकार घेते, आर्मी नव्हे. ते इथे घेतले गेलेले दिसतात. अगोदरची सरकारे काय करत होती, हा प्रश्न नाही, तुमचा आरोप सध्याचे मोदी सरकार ह्या बाबतीत काहीही करत नाही, असा आहे. आता अर्थात, moving goalposts च्या न्यायाने, तुम्ही मोदींनी स्वतःच सीमेवर जावयास पाहिजे होते, असे म्हटलेत, तर pass!

In reply to by प्रदीप

उदयन 08/10/2014 - 08:41
लोकसभेच्या प्रचारात 56 इंचची छाती दाखवून पाकिस्तान ला ललकारणारे आता प्रचारात एक अक्षर बोलत नाही यावरून दिसते कि लोकसभेत मारलेल्या फुशारक्या होत्या काँग्रेसच्या 10 वर्षात जितके उल्लंघन केले असेल तितके या 6 महिन्यांतच झाले म्हणे भारताचा डंका बाजवला ;) आताचा प्रधानसेवक फक्त बोलूच शकतो करू काहीच शकत नाही हे जगाला कळले

In reply to by उदयन

प्रदीप 08/10/2014 - 09:13
म्हणजे सरकारने प्रत्यक्ष कृती केली, ते पुरेसे नाही. आता, तुमची (सरकलेली) अपेक्षा ही की मोदींनी त्यांच्या महाराष्ट्र व हरीयाणा येथील विधानसभांच्या निवडणूकांच्या प्रचारधुमाळीच्या दरम्यान ह्या मुद्द्यावरून डरकाळ्या फोडल्या पाहिजेत! ते इथे कमी पडले हे खरे :) बाकी, त्यांनी प्रत्यक्ष तिथे जाऊन रणधुमाळीत भाग घेतला पाहिजे, असे (सध्यातरी) न म्हटल्याबद्दल (सध्यातरी) तुमचे कौतुकच केले पाहिजे!

In reply to by प्रदीप

मृत्युन्जय 08/10/2014 - 11:08
नाही सरकारने स्वतः जाउन त्यात मोदींनी स्वतः बंदूक हातात घेउन सीमेवर जाउन लढावे आणि लाहोर, कराची, इस्लामाबाद आणि पेशावर मध्ये स्वतः जाउन गाढ्वाचा नांगर फिरवावा आणि भुट्टॉ आणि शरीफला बैलगाडीला जुंपुन दिल्लीला घेउन यावे अशी अपेक्षा आहे,

In reply to by मृत्युन्जय

श्रीगुरुजी 08/10/2014 - 14:08
बंदूक? कुठल्या काळात वावरताय? मोदींनी वाघनखे घेऊन पाकड्यांचा कोथळा बाहेर काढावा, पाकड्यांना मातीत गाडावे, गेलाबाजार त्यांची बोटे तरी तोडावी, निदान त्यांच्या मस्तवाल जिभा तरी छाटाव्यात ... मोदींनी पाकड्यांवर अशा तर्‍हेची २१ व्या शतकातील कारवाई करावी. बंदूक वापरणे म्हणजे १७ व्या शतकात वावरण्यासारखे आहे. जरा २१ व्या शतकात या हो.

In reply to by श्रीगुरुजी

खरंय !बंदुकीच्या कॅलिबरऐवजी व फायरींग रेट ऐवजी पहाडी छाती ,५६ इंच अशा गप्पा देखिल माराव्यात.

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी 08/10/2014 - 14:27
बरोबर. पण कोणी अशा गप्पा माराव्यात. त्यांच्या छातीच्या घेराची इतरांनाच जास्त काळजी लागलेली दिसतेय.

In reply to by मृत्युन्जय

श्रीगुरुजी 08/10/2014 - 14:19
प्रतिकारवाई सुरू झालेली दिसतेय. http://maharashtratimes.indiatimes.com/nation/pakistan-targets-bsf-posts-villages-india-hits-back-with-heavy-fire/articleshow/44687154.cms पंतप्रधान मोदींची मैत्री झिडकारुन वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारतीय नागरिक आणि सैनिकांना लक्ष्य गोळीबार करणा-या पाकिस्तानच्या बंदुका आणि तोफांचा आवाज बंद करण्याचा निर्णय केंद्रातल्या मोदी सरकारने घेतला आहे. पाकिस्तानचा गोळीबार पूर्णपणे थांबेपर्यंत प्रत्युत्तर देण्याचे स्पष्ट आदेश भारतीय सैन्याला देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे पाकिस्तानच्या हल्ल्याला कोणत्या भागात किती प्रमाणात प्रत्युत्तर द्यायचे याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य सैन्याला देण्यात आले आहे. केंद्र सरकारकडून हिरवा कंदिल मिळताच भारतीय सैन्याने पाकचे कंबरडे मोडण्यास सुरुवात केली आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करणा-या पाकने रविवारपासून गोळीबाराचे प्रमाण एकदम वाढवले आहे. मागील बारा वर्षात झाला नाही एवढा गोळीबार आणि मॉर्टरचा मारा पाकने सुरू केला आहे. पाकच्या या हल्ल्याला मंगळवारी रात्री भारताने तीव्र प्रत्युत्तर दिले. भारताने पाकच्या ३७ चौक्या आणि आसपासच्या भागात गोळीबार केला. भारताने दिलेल्या प्रत्युत्तरामुळे पाकिस्तानमध्ये सियालकोट भागात १५ जण ठार आणि ३० जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. याआधी पाकिस्तानच्या रेंजरनी सीमा सुरक्षा दलाच्या ६३ चौक्या आणि २५ गावांना थेट लक्ष्य करुन गोळीबार केला तसेच मॉर्टरचा मारा सुरू केला. पाकच्या हल्ल्यात सतरा नागरिक आणि सीमा सुरक्षा दलाचे तीन सैनिक जखमी झाले तसेच ५५ वर्षाच्या एका महिलेचा मृत्यू झाला. याआधी भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओ (लष्कराचे महासंचालक) पातळीवर तब्बल आठ मिनिटे चर्चा झाली पण तोडगा निघाला. या चर्चेत दोन्ही डीजीएमओंनी परस्परांवर गंभीर आरोप केले. अखेर पाकच्या कारवाया बंद होईपर्यंत गोळीबार करा, असा स्पष्ट आदेश केंद्राकडून सैन्य दलांना आला आणि त्याचे लगेच पालन करण्यात आले.

In reply to by श्रीगुरुजी

हेच मोदी तीन महीन्यापुर्वी नवाज शरीफच्या आईला साडी पाठवत होते, कालपर्यंत पाकिस्तानला मिठाई पाठवत होते. यांच्या हे लक्षातही आले नाही कि आपला शेजारी किती घातक मनसुबे रचतोय! हे म्हणे कणखर देश बनवणार आहेत, इतका बाळबोध पंतप्रधान देशाने आजपर्यँत पाहिला नव्हता. मनमोहन सिंग यांनी या पाकड्यांशी लाळघोटेपणा कधीच केला नव्हता, अतिरेकी कारवाया थांबवा चर्चा करतो असे ठणकावले होते.

In reply to by नानासाहेब नेफळे

मृत्युन्जय 08/10/2014 - 15:02
खिक्क. आणि २०, ५०, १०० ची यादी आणि निषेध खलिते पाठव्ले होते. आणि ते ही काम इतके धेडगुजरीपणाने केले होते की त्यातले काही लोक नंतर बर्‍याच काळापासुन भारतीय तुरुंगातच सापडले. मनमोहन सिंगांनी कोणाला ठणकावले तरी ते मजा करताहेत असे वाटत असेल. त्यांना काय डोंबलाचे ठणकावले? बादवे हिंदी पाकी भाई भाई असे नारे तर नाही ना दिले मोदींनी. नवाझ शरीफांना एनडीएत नेउन स्वतःची तयारी किती तोकडी आहे हे तरी नाही ना सांगितले?

In reply to by मृत्युन्जय

खरंय! बहुधा ५६ इंच छातीवाले पाकड्यांना मिठाया पाठवुन त्यांना डायबेटीक करणार, मग ते पाकडे डायबेटीसने मरणार!!! काय जबरी प्लान आहे! ५६ इंच छातीच्यावरती यांना डोकेही आहे तर! इतका कुटनितीने वागणारा पीएम देशाने कधीच पाहिला नव्हता. :lol:

In reply to by नानासाहेब नेफळे

मृत्युन्जय 08/10/2014 - 16:13
मिठाई वाटणे ही लष्कराची परंपरा आहे. त्यासाठी ते सरकारची परवानगी घेत नाहित. बाकी छाती च्या वरच्या भागावर डोके असणारा पंतप्रधाना आहे हे बरे आहे. गुडघ्यात असणारा नाही हे उत्तम.

In reply to by उदयन

मृत्युन्जय 08/10/2014 - 16:43
लोकसभेच्या प्रचारात 56 इंचची छाती दाखवून पाकिस्तान ला ललकारणारे आता प्रचारात एक अक्षर बोलत नाही उदयना दादा लोकसभे आणि विधासभा यातला फरक कळतो का तुम्हाला? तो केंद्राच्या निवडणुकांचा प्रचार होता. तिथे राष्ट्रीय पातळीवरचे मुद्दे चर्चिले जातात. हा महाराष्ट्राचा प्रचार आहे. इथे स्थानिक पातळीवरचे मुद्दे चर्चिले जातात. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत पुण्याचे विषय चर्चिले जातील. तिथे काश्मीरच्या रस्त्यांची दुरावस्था या विषयावर व्याख्यान झोडुन काय उपयोग. असो. आजचा तुमचा गृहपाठ: केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महानगरपालिका यांच्या कार्यक्षेत्राचा अभ्यास करणे आणि दहा वेळ पाटीवर लिहुन काढणे. अवांतरः नानासाहेबांची मदत घेउ नका. ते खोटे बोलतात. ते तुम्हाला कदाचित सांगतील की मोदींनी सग्ळ्या शाळा गुजरातेत नेल्या.

In reply to by उदयन

मृत्युन्जय 08/10/2014 - 16:38
मग त्यांनी बंदुका घेउन सीमेवर जावे की काय? चोख प्रत्त्युत्तर द्यायला सांगितले आहे सेनेला आणि लागणारा सगळा सपोर्ट देत आहेत. नुसतेच निषेध खलिते नाही पाठवलेले.

मोग्याम्बो 06/10/2014 - 16:27
महारष्ट्रात आघाडी ची १५ वर्षे सत्ता होती आणि गुजरात मध्ये बीजेपी ची होती, जर गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी उद्योग्धन्द्यांना आमंत्रण दिल्यावर ते जर तिकडे जात असतील तर ह्यामध्ये महाराष्ट्रातल्या सरकारचा दोष आहे. उद्योगपती काय गुजरातला फिरायला चालले आहेत का ? मुख्यामात्र्यांचे आमंत्रण आले आहे. जाऊन येतो गुजरातला. असे थोडीच चालले आहे. गुजरात मध्ये उद्योग सुरु करण्याची processs सोपी आहे. आणि त्याना करांमध्ये खूप सवलत दिली गेली आहे. महाराष्ट्रामध्ये आघाडीची १५ वर्षे सत्ता असून त्यांनी ह्या गोष्टींमध्ये खूप बदल नाहीत केले. त्यामुळे इथून उद्योगधंदे गुजरात मध्ये चालले आहेत ह्यात आपल्या राजकारण्याचा दोष आहे

In reply to by मोग्याम्बो

उदयन 06/10/2014 - 16:35
पण इथे येणार्या उद्द्योगधंध्यांना विरोध कोण करते ? प्रकल्पांना जमिनी देताना गावकर्यांना चुकिची माहीती सांगुन विरोधात कोण उभे करते. ? जेव्हा महाराष्ट्राला वीजेची आवश्यकता होती तेव्हा एनरॉन प्रकल्प अरबी समुद्रात कोणी बुडवलेला ? नंतर तीच वीज महाग दराने कोणी घेतली ? जैतापुर प्रकल्पाला विरोध कोण करत आहे ? सरकार उद्योगधंद्यांना राज्यात आणते परंतु विरोधी पक्षात असणार्यांना राज्याची प्रगती झालेली पाहवली जात नाही म्हणुन प्रत्येक प्रकल्पांना विरोध करायचे चुकिचा प्रचार करायचे आनि प्रकल्पांना त्रास द्यायचा आनि दुसर्या बाजुने गुजरात मधुन त्याच प्रकल्पांना मदतीचा हात द्यायचा मग तो उद्योग जातो गुजरात मधे. हेच चालु आहे गेले १० वर्ष. राज्यातील प्रकल्प उद्योगधंदे कसे बाहेर जातील हेच विरोधी पक्षाचे काम होते.

In reply to by उदयन

मृत्युन्जय 07/10/2014 - 14:27
हेच चालु आहे गेले १० वर्ष. गेली १० वर्षे (गेली सहा महिने सोडुन) राज्यात आणि केंद्रात सत्ता काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या हातात आहे. प्रकल्पांना मंजुरी देणे आणि धडाडीने ते सुरु करणे / करवणे याची जबाबदारी सरकारची असते. विरोधक विरोध करत असतील तरीही जे योग्य असेल त्यावर निर्णय घेउन कारवाई करण्यापासुन सरकारला कोणीही थांबवु शकत नाही. खासकरुन सरकार अल्पमतात नसताना तर नक्कीच नाही. जर सरकार योग्य ती पावले उचलत नसतील तर प्रकल्प दुसर्‍या राज्यात जाणारच. प्रकल्प फक्त महाराष्ट्रातुनच दुसर्‍या राज्यात जातात तिकडून इकडे येत नाहित तुमच्याकडे केंद्रात आणि राज्यात सत्ता असुनही हे तुमच्या आळशीपणाचे आणि अकार्यक्षमतेचे लक्षण आहे. गुजरातमधले कित्येक पॉवर प्लांट्स केंद्रीय पर्यावरण खात्याच्या लालफितीत अडकल्याचे सर्वज्ञात आहे. तरीही हे प्रकल्प दुसर्‍या राज्यात गेले नाहित कारण मोदी सरकारने वेळोवेळी त्यांना योग्य ते सहकार्य दिले. हे गुजरातमधल्या मोदी सरकारचे यश. महाराष्ट्रातले प्रकल्प फक्त गुजरातमध्ये जातात हा अजुन एक अपप्रचार. ते कर्नाटक, तामिळनाडु आणी आंध्रातही जातात / गेले आहेत. गुजरातमध्ये फक्त महाराष्ट्रातलेच प्रकल्प येतात हा अजुन एक अपप्रचार. सगळ्या अकार्यक्षम राज्यांतुन मोदींनी प्रकल्प ओढुन आणले. टाटांनी तर मोदींच्या कार्यक्षमतेचे जाहीर कौतुक केले आणि प. बंगाल सरकारवर जाहीर टीका. मागच्या वर्षी गुजरातमधल्या एका बड्या कंपनीत मोठ्या प्रमाणावर कामगार कपात झाली. त्यावर एका आठवड्यात मोदींनी स्वतः कंपनीच्या प्रवर्तकाला फोन करुन त्याचा जाब विचारला आणि राज्यात इतर रोजगार सुरु करण्याची विनंती केली. राज्याचा मुख्यमंत्री जेव्हा एवढा कर्तव्यदक्ष असतो तेव्हा उद्योजकांच्या मनात देखील विश्वास निर्माण होतो. उद्योजक नफा कमाविण्यासाठी धंदा करत असतो. त्याला जर जेएनपीटीत माल उतरवुन घेणे आधिक फायदेशीर असेल तर तो तसेच करेल आणी गुजरातमध्ये फायदेशीर ठरत असेल तर तिथेच उतरवुन घेइल. कोणीही स्वतःच्या पदराला खार लावुन जे एन पीटी डुबवण्यासाठी मोदींना साथ देणार नाही. जर गुजरात सरकार काही इंसेंटिव्हस देत असेल तर महाराष्ट्र सरकारचेही हात कोणी धरुन ठेवलेले नाहित. पण इथला धंदा बसल्यावरच तुम्ही जागे होणार असाल तर त्यासाठी मोदींना कशाला दोष देता? तुमचे सरकार तरावे म्हणुन गुजरात सरकारने त्यांच्या राज्याचा विकास करु नये की काय? तुमची अकार्यक्षमता विरोधी पक्षांनी झाकावी ही भलतीच अपेक्षा झाली महाराजा. बाकी एन्रॉणसारख्या भ्रष्ट कंपनीला भारतात आवताण दिलेच कशाला ते कळत नाही.

In reply to by मृत्युन्जय

उदयन 07/10/2014 - 19:10
इतके कळले असते तर आज महाराष्ट्रात लोडशेडींग झाली असती का ? आधी विरोध मग सत्तेवर आल्यावर स्वतः काहीच काहीच करायचे नाही हेच तर चालु आहे युतीचे तु गोंधळ घाल मी प्रकल्प पळवतो

दुश्यन्त 06/10/2014 - 16:36
दिल्लीमधुन केंद्रीय नेतृत्व सांगेल त्याला/तिला मुख्यमंत्री बनवणार हा कुठला न्याय? आधीचा मुख्यमंत्री दिल्लीमधुन पाठवलेला होता. यावेळीही भाजपाचा दिल्लीमध्ये ठरलेला उमेदवार मुख्यमंत्री म्हणुन आला तर गेल्यावेळी प्रमाणे तो/ती प्रत्येक लहानसहान गोष्टीसाठी दिल्लीच्या वाऱ्या करणार. दिल्लीमधुन आलेल्याला जर प्रत्येक गोष्टीसाठी तिकडे धाव घ्यायला लागत असेल तर काय करायचा आहे तो दिल्लीतला मुख्यमंत्री? मग काय बदल झाला महाराष्टात? +१ मोदी स्वतः मान्य करतात कि मुंडे असते तर मला प्रचाराला यायची गरज नव्हती.उद्या सत्ता आलीच आणि फडणवीस/खडसे/तावडे/ मूनगुन्तीवर यापैकी कुणाला मुख्यमंत्री केलेच तर तो मोदी-शहांचा पित्तू म्हणूनच काम करेल.

थोड्या वेळापूर्वीच निखिल्च्या आय.बी.एन. लोकमतवर राज ठाकरेंची मुलाखत पाहिली. हा मनुष्य नक्की कोणासाठी काम करतोय काही कळत नाही.उद्योगधंदे गुजरातमध्ये चालले आहेत म्हणून सारखे रडगाणे चालू होते,मोदींवर टिका करत होता पण गेल्या १५ वर्षातल्या राज्यातल्या परिस्थितीबद्दल,भ्रष्टाचाराबद्दल चकार शब्दही नाही.

उदयन 07/10/2014 - 13:55
स्वतंत्र विदर्भ करणार आहेत की नाही.. तिथे मोदी मी दिल्लीत असेल पर्यंत अखंड महाराष्ट्र राहिल म्हणुन वचने देत फिरत आहे आणि फडणवीस हे स्वतंत्र विदर्भ होणारच म्हणुन ओरडत फिरत आहे ( उगाच आरडाओरडा करणे ही त्यांची फॅशन आहे ) पक्षातच विरोधाभास आहे तर राज्य देश काय चालवणार हे
भाजपला मत देण्याअगोदर या प्रश्नाची उत्तरे भाजपाने, त्यांच्या समर्थकांनी अथवा कोणीही द्यावीत ..?? वरील पैकी मी कोणीही या सदरात येतो व कोणीही उत्तरे दिल्यास हवीत म्हणून मी माझ्या अल्प बुद्धी प्रमाणे ती देत आहे. १) महाराष्ट्रात सुद्धा मोदींच्या नावेच मते का मागता .. >> मोदी हे देशव्यापी नेतृत्व आहे. राज्य भाजपा ही अखिल भारतीय स्तरावरील पक्षाची शाखा आहे. न चालणारा माल दुसरीकडून कच्च्या ब्रांड खाली विकायला काढलेली स्वतंत्र सिस्टर कन्सर्न नव्हे.

शाकाहारी थाळी

जेपी ·

पैसा 04/10/2014 - 16:31
जेपी, मस्तच! थाळीचे फोटो आणि डिट्टेल पाककृती खूप आवडल्या!

जेपी 04/10/2014 - 18:55
1)मागील 3 वर्ष आमच्यातील बल्लव जरा कोमात होता.त्याला काल दसर्यानिमीत्त जागे केले आणी किचन मध्ये घुसुन जे तयार केल ते आपल्या पुढे मांडल आहे. 2)प्रथमच मिपाच ऑनलाईन गमभन वापरुन हा लेख पुर्ण केला आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

जेपी 05/10/2014 - 10:21
काळे तिखट म्हणजे काय? @ पेठकर काका- काळे तिखट मंजे आपण जे मसाले जेवणात वापरतो, ते सर्व मसाले आणी लाल मिरची तेलात भाजुन एकत्र कुटुन तयार करतात. भाजल्यामुळे तिखट काळे दिसते. आधी घरी बनवायचे पण आता बाजारात विकत मिळते. फोटो देतो बघा काही अंदाज येतो का ? black

In reply to by जेपी

ह्म्म्म! धन्यवाद जेपी. भारताबाहेर पडल्याला आता ३४ वर्षे झाली, तसा रजेवर येत असतोच अधूनमधून पण, लागतील ते ते मसाले (शक्यतो) घरीच बनवायच्या हौसेपायी कधी पाहण्यात आले नाही. आता रजेवर आल्यावर पुण्यात कुठे मिळते ते पाहून वापरून पाहिन.

वावा. मस्त. सगळ्याच पाकृ आवडल्या. पंचामृत कित्येक दिवसात खाल्ले नाही. खूप आवडीचा प्रकार. आमच्याकडे यात खोबर्‍याचे काप पण घालतात.

जेपी.... तुम्ही जर स्वतः पुरणपोळी करत असलात.... तर दंडवत.... आमच्या पोळ्यांना कुत्र पण तोंड लावत नाही, पुरणपोळी तर फार्र दूरची गोष्ट...

In reply to by मुक्त विहारि

एस 16/10/2014 - 17:54
असेच म्हणतो. आम्हांला फक्त बटाटेवडे बनवता येताहेत. हळूहळू पुरणपोळीपर्यंतचा टप्पा नक्की पार करू! ;-)

सविता००१ 04/10/2014 - 23:31
छानच दिसते आहे थाळी. आणि तुम्ही सगळं स्वतः केलंत म्हणजे कमाल आहे

आयुर्हित 05/10/2014 - 01:20
लातूरच्या म्हणजे आमच्यासाठी एका नवीन ठिकाणच्या थाळीची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. वाटीभर साजूक तूप पाहून अगदी प्रसन्न वाटले! आपला आहार शास्त्रीय पद्धती प्रमाणेच "आदर्श चौरस आहार" असण्याचे प्रमाणपत्रच. तेही मेकॉले पद्धतीच्या शाळेत न जाणाऱ्या पीढी दर पीढीच्या पूर्वापार चालत आलेल्या अगाध ज्ञानाचा ठेवा आपल्यापर्यंत आपल्या पूर्वजांनी पोचवला हे केवढे महान भाग्य आपले. (पण आपण भारतीयांनी कधी याचे पेटंट घेण्याचा प्रयत्न केलेला दिसत नाही.) "दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा" अगदी खरे ठरवलं आपण!

प्यारे१ 05/10/2014 - 02:17
जेपी, सुंदरच थाळी हो! पुरण बाहेर न आलेली पु. पो. आणि कटाची आमटी व्यवस्थित बनवू शकणारी व्यक्ती आमच्यासाठी सुगरण आहे. :)

जेपी - तोडंलस मित्रा. टांगा पल्टी घोडे फरार. :-) . तपशीलवार वर्णन आणि सादरीकरण आवडले. अवांतर - टाइल्सवर मांडलेल्या ताटाचा वरील फटु पाहून पत्रावळींवरील जेवणाची आठवण झाली.

नाव आडनाव 05/10/2014 - 11:57
तुमचा पहिलाच प्रयत्न आहे, पण चांगलं जमलंय (असं फोटूत वाटतंय). मी कधीच प्रयत्न केला नाही, पण तुमची पाक कॄती वाचून मला पण वाटायला लागलंय मी पण एक प्रयत्न करुन बघायला पाहिजे (आणी जमलं तर शिकायला कंटीन्यू केलं पाहिजे). अर्थात मी एव्हढी अवघड पाक कॄती नाही ट्राय करणार, सुरवातीला थोडी सोपी (कच्चा लिंबू म्ह्णून सूट :) ).

जेपी 05/10/2014 - 16:58
आदूदादु ,त्याच काय झाल आधी पुर्णब्रम्ह सदरात टाकणार होतो.तिथे आधीच एक शाकाहारी थाळी होती.मनुन नं 2 टाकला.पण पुर्णब्रम्ह सदरात टाकता आल नाही आणी पाकक्रुती विभागात टाकताना नाव बदलायचे राहिले.

दिपक.कुवेत 05/10/2014 - 20:42
छान जमलेत सगळे प्रकार. पण फोटो एवढ्या दुरुन का काढलाय? अजुन एक पुरणाच्या पोळीबाबत. पुरण सेम असलं तरी काहि ठिकाणी ते कणकेच्या पारीत का भरतात? आय मीन जनरली मैद्याच्या पारीतली पुरणपोळी खाल्ली / बघीतली आहे. तशी ह्या कणकेच्या पारीतलीहि खाल्ली आहे. मस्त खमंग लागते. माझ्या मते कणकेची पारी मैद्या पेक्षा लाटायला सोपी जात असेल. काहि ठिकाणी मैदा + कणीकहि घेतात का?

In reply to by दिपक.कुवेत

रेवती 06/10/2014 - 05:38
दिपकराव, मैद्याची पुपो लाटायला सोपी जाते. पुरण बाहेर येत नाही. पण पोळी गार होताहोता तडतडीत होते. तरीही घाईगडबडीच्यावेळी कणकेत चमचाभर मैदा घालून पोळी करता येते. मूळ पद्धतीत कणकेत तेल मीठ घालून नेहमीप्रमाणे भिजवायचॆ. थोड्यावेळाने थोडे पाणी व भरपूर तेल घालून घालायचे तिंबत रहायची..कणकेत सगळे तेल मुरते. मग पुन्हा तेल असे करत तार आली की सगळी कणिक तेलात बुडेल इतक्या तेलात झाकून ठेवायचॆ. अशा कणकेत पुरण भरून तांदळाच्या पिठीवर पोळी लाटायची किंवा नुसत्या तेलावरही लाटता येते. जरा कौशल्याचे काम आहे पण चवीला चांगली लागते. आपापली सोय आहे. चांगली वाईट असे काही म्हणायचे नाही.

भाते 05/10/2014 - 20:48
नक्की तुझा व्यवसाय काय आहे रे बाबा? हा धागा बघितल्यावर लातुरमध्ये (किंवा इतरत्र) तुझे स्वत:चे उपहारगृह आहे किंवा तसे काढायची इच्छा आहे आणि त्यासाठी तु भागीदार/मदतनीस शोधतो आहेस असे वाटते! अप्रतिम! केवळ अप्रतिम! मी (झाकण मारून) पोळी करण्याचा प्रयत्न केला तरी कुठल्यातरी देशाचा नकाशा तयार होतो! नंतर प्रत्येक पदार्थ वाचुन (हा पदार्थ करायला मला जमेल का? याचा विचार करून) सविस्तर प्रतिसाद देईन! :)

जर मी केली थाळी

तर त्यात काय काय असेल? @करंट टमॅटो सार, फ्लॉवर/गाजर/पनीर(मॅरिनेटेड)बिर्याणी, तीनपदरी चपाती, डाळींब/केळी/ओलंखोबरं=कोशिंबीर, दुधीभोपळा(अंगूरी)खीर, आख्खीहळदमिर्चीफ्राय, ठेचमुळा-तवाफ्राय.. इत्यादी...इत्यादी! @आणि नंतर मला स्वतःला तयार करता येणारी पानं:- १)मसाला ड्रायफ्रुट >>> हे हल्ली फेमस झालेल्या चॉकलेट पानाला मात देणारं पान आहे. २)साधामिठा(गावरान) >>> यात गुलकंद/खुशबू/चटणी असले पदार्थ न वापरताही हे पान खायला लागल्यावर २मिनिटानी अस्सं गोडीत चढतं की क्या केहेने! ३)फूलचंदकेसरीचांदी >>> पारंपारिकच.. पण फक्त फूलचंदचा हल्ली जो घमघमाट करण्यावर भर दिला जातो,ते टाळून त्याचा तोंडात जायका निर्माण करणारं असं हे राजसपान आहे. ४)साधापत्तातंबाखू(गावरान) >>> हे तर शुद्ध मराठी(घाटी) पान आहे. पन १२०/३०० चा जमाना आल्यापासून विस्मरणात गेलेलं आहे. याची मजा अशी..की मनमुराद जेवणानंतर हे पान - लावलं- की किमान अर्धातास आपला मनोदेह फ्लाईंगबलून सारखा हळूहळू..हळूहळू..तरंगत..तरंगत..परब्रम्हाला भेटायला जातो! ५)फूलचंदकेसरीचांदी१६०(तंबाखू) >>> हे मात्र जरा शाहीपान आहे. आणि हल्ली किवाम/तंबाखुच्या (भडकलेल्या :-/ ) भावामुळे बरच महागडंही आहे. पण तरिही पान-लावल्यावर पहिली ५ मिनिटं तोंडात एका बाजुला निपचीत ठेऊन दिलं,आणि नंतर हळूहळू..हळूहळू..चावायला सुरवात केली,की गावठी बाणासारखं जरावेळ जमिनीवर थयथयाट करून एकदम-----------------आकाशात नेऊन सोडतं! अर्थात नंतर लगेचच दहा मिनिटात जमिनीवर पण आणतं. पण तरी त्यातनं उतरायची इच्छा होत नै आपल्याला..( :D ) असं ओढ लावणारं हे पान आहे. ============================ फक्स्त ह्यो थाळी/पान योग जमवून आणायला मला परत एकदा "घरचे स्वयंपाकघर" या विभागात किमान १ महिना कंपल्सरी शिरावं लागेल. कारण तिथे माझा वियोग होऊन साधारण १० वर्ष होत आलियेत. ============================

जेपी 16/10/2014 - 17:27
गुर्जी पान म्हणाल तर, तिन पानी, कात चुना लावुन आणी कच्ची पक्की सुपारी गावरान तंबाकु ,थोडास 300 चा शिडकावा आणी आणखीन चुना अलगसे. ब्रम्हानंदी टाळी.

In reply to by जेपी

@तिन पानी, कात चुना लावुन आणी कच्ची पक्की सुपारी गावरान तंबाकु ,थोडास 300 चा शिडकावा आणी आणखीन चुना अलगसे. ब्रम्हानंदी टाळी.>>> धण्यवाद्स.... लै जंबारडिंग वाटतया ऐकून..आज रातच्याला ह्येच पाण ट्राय करनेत येइल.

In reply to by प्रचेतस

@व्यसनांबद्दलच्या >>> आणि आपल्याला खादाडीच्या रम्य चर्चांच व्यसन आहे..ते विसरला हा आगोबा! :-/ थाळी कल्पनेबद्दल अक्षरंही न काढलेल्या आगोबाचा टीव्र णिसेध...! :-/ llllllllllllllllllluuuuuuuuuu :-/

In reply to by प्रचेतस

@थाळीचा प्रतिसाद एक आणि पानाचे पाचपाच त्यामुळे >>> :-/ हेच्च..हेच्च..हाच तो निरर्र्थकपणा! :-/ थाळीतले पदार्थ किती आहेत??? हे मोजायची बुद्धी का बरं नै झाली? :-/ . . . समांतरः- अजुन तरी कळेल कि नै कोण जाणे?

In reply to by प्रचेतस

@अजुन तरी कळेल कि नै कोण जाणे? >>> झालं की नै खरं!? =)) @ पाच प्रकारच्या पानात किती विविध पदार्थ भरलेत तुम्हीच बघा.>>> :-/ आपण ऑब्जेकटिव्ह बोल्लो की जाणूनबजुन सबजेकटिव्ह होणार हा आगोबा! :-/

उडन खटोला 03/01/2015 - 19:17
कल्पना करा बरं... की तुम्ही सहकुटुंब एखाद्या हॉटेलात गेला आहात... आणि ऑर्डर केली आहे की आम्हाला सुरुवातीला दोन सोलकढी, एक मुगाचे कळण - दोघांत एक, सोबत एक प्लेट कोथिंबीर वडी, एक प्लेट अळूवडी द्या. नंतर जेवणासाठी एक प्लेट अळूची पातळ भाजी, एक प्लेट डाळींब्यांची उसळ, चार घडीच्या पोळ्या, मसाले भात, दोन बाजरीच्या भाकर्‍या आणि एक वांग्याचे भरीत द्या. सर्वात शेवटी आंबा पियुष व रस शेवई दोघांमध्ये चार द्या ! तिथला स्टिवर्ड तुम्हाला सुचवतोय की कधीतरी त्यांच्याकडच्या कोळाचे पोहे, केळ्याची तिखटगोड भजी, शहाळ्याची भाजी, मुगाची सावजी उसळ, कुळथाचं पिठलं, पाकातल्या पुर्‍या, रताळ्याचा कीस अशा 'मेतकूट खास' पदार्थांचाही तुम्ही आस्वाद घ्यावा... तुम्ही म्हणाल, काय राव..... आज भंकस करायला दुसरं कोणी भेटलं नाही का? आहो... ही आता कल्पनेतली गोष्ट नाही. ठाण्यात सुरु झाले आहे. मराठी आहारसंस्कृतीचे खाद्यपीठ ! कोकण, कोल्हापूर, मराठवाडा, विदर्भ, नाशिक अशा ठिकठिकाणचे पारंपरिक खाद्यपदार्थ आता मिळतील ... ‘मेतकूट’™ - Culinary Heritage of Maharashtra मध्ये. नवीन वर्षात १ जानेवारी रोजी शुभारंभ होत असलेल्या या नवीन खानपानगृहास आवर्जून सहकुटुंब, सहपरिवार भेट द्या. आपल्या सोसायटीमधील, कार्यालयातील खन्ना, गिडवानी, अय्यर, चटर्जी यांनाही घेऊन जा. त्यांनाही कळूदे अस्सल चव महाराष्ट्राची ! पत्ता - १,२, वाटीका सोसायटी, घंटाळी देवी पथ, नौपाडा, ठाणे (प) संपर्क - ०२२२५४१०८२१ किरण भिडे यांनी हे हाॅटेल सुरु केलं आहे. ही कल्पना आवडल्यास इतरांकडे हे मेसेज पाठवा. आवर्जून 'मेतकूट'ला भेट द्या. C/P-Suruchi Gurjar

पैसा 04/10/2014 - 16:31
जेपी, मस्तच! थाळीचे फोटो आणि डिट्टेल पाककृती खूप आवडल्या!

जेपी 04/10/2014 - 18:55
1)मागील 3 वर्ष आमच्यातील बल्लव जरा कोमात होता.त्याला काल दसर्यानिमीत्त जागे केले आणी किचन मध्ये घुसुन जे तयार केल ते आपल्या पुढे मांडल आहे. 2)प्रथमच मिपाच ऑनलाईन गमभन वापरुन हा लेख पुर्ण केला आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

जेपी 05/10/2014 - 10:21
काळे तिखट म्हणजे काय? @ पेठकर काका- काळे तिखट मंजे आपण जे मसाले जेवणात वापरतो, ते सर्व मसाले आणी लाल मिरची तेलात भाजुन एकत्र कुटुन तयार करतात. भाजल्यामुळे तिखट काळे दिसते. आधी घरी बनवायचे पण आता बाजारात विकत मिळते. फोटो देतो बघा काही अंदाज येतो का ? black

In reply to by जेपी

ह्म्म्म! धन्यवाद जेपी. भारताबाहेर पडल्याला आता ३४ वर्षे झाली, तसा रजेवर येत असतोच अधूनमधून पण, लागतील ते ते मसाले (शक्यतो) घरीच बनवायच्या हौसेपायी कधी पाहण्यात आले नाही. आता रजेवर आल्यावर पुण्यात कुठे मिळते ते पाहून वापरून पाहिन.

वावा. मस्त. सगळ्याच पाकृ आवडल्या. पंचामृत कित्येक दिवसात खाल्ले नाही. खूप आवडीचा प्रकार. आमच्याकडे यात खोबर्‍याचे काप पण घालतात.

जेपी.... तुम्ही जर स्वतः पुरणपोळी करत असलात.... तर दंडवत.... आमच्या पोळ्यांना कुत्र पण तोंड लावत नाही, पुरणपोळी तर फार्र दूरची गोष्ट...

In reply to by मुक्त विहारि

एस 16/10/2014 - 17:54
असेच म्हणतो. आम्हांला फक्त बटाटेवडे बनवता येताहेत. हळूहळू पुरणपोळीपर्यंतचा टप्पा नक्की पार करू! ;-)

सविता००१ 04/10/2014 - 23:31
छानच दिसते आहे थाळी. आणि तुम्ही सगळं स्वतः केलंत म्हणजे कमाल आहे

आयुर्हित 05/10/2014 - 01:20
लातूरच्या म्हणजे आमच्यासाठी एका नवीन ठिकाणच्या थाळीची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. वाटीभर साजूक तूप पाहून अगदी प्रसन्न वाटले! आपला आहार शास्त्रीय पद्धती प्रमाणेच "आदर्श चौरस आहार" असण्याचे प्रमाणपत्रच. तेही मेकॉले पद्धतीच्या शाळेत न जाणाऱ्या पीढी दर पीढीच्या पूर्वापार चालत आलेल्या अगाध ज्ञानाचा ठेवा आपल्यापर्यंत आपल्या पूर्वजांनी पोचवला हे केवढे महान भाग्य आपले. (पण आपण भारतीयांनी कधी याचे पेटंट घेण्याचा प्रयत्न केलेला दिसत नाही.) "दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा" अगदी खरे ठरवलं आपण!

प्यारे१ 05/10/2014 - 02:17
जेपी, सुंदरच थाळी हो! पुरण बाहेर न आलेली पु. पो. आणि कटाची आमटी व्यवस्थित बनवू शकणारी व्यक्ती आमच्यासाठी सुगरण आहे. :)

जेपी - तोडंलस मित्रा. टांगा पल्टी घोडे फरार. :-) . तपशीलवार वर्णन आणि सादरीकरण आवडले. अवांतर - टाइल्सवर मांडलेल्या ताटाचा वरील फटु पाहून पत्रावळींवरील जेवणाची आठवण झाली.

नाव आडनाव 05/10/2014 - 11:57
तुमचा पहिलाच प्रयत्न आहे, पण चांगलं जमलंय (असं फोटूत वाटतंय). मी कधीच प्रयत्न केला नाही, पण तुमची पाक कॄती वाचून मला पण वाटायला लागलंय मी पण एक प्रयत्न करुन बघायला पाहिजे (आणी जमलं तर शिकायला कंटीन्यू केलं पाहिजे). अर्थात मी एव्हढी अवघड पाक कॄती नाही ट्राय करणार, सुरवातीला थोडी सोपी (कच्चा लिंबू म्ह्णून सूट :) ).

जेपी 05/10/2014 - 16:58
आदूदादु ,त्याच काय झाल आधी पुर्णब्रम्ह सदरात टाकणार होतो.तिथे आधीच एक शाकाहारी थाळी होती.मनुन नं 2 टाकला.पण पुर्णब्रम्ह सदरात टाकता आल नाही आणी पाकक्रुती विभागात टाकताना नाव बदलायचे राहिले.

दिपक.कुवेत 05/10/2014 - 20:42
छान जमलेत सगळे प्रकार. पण फोटो एवढ्या दुरुन का काढलाय? अजुन एक पुरणाच्या पोळीबाबत. पुरण सेम असलं तरी काहि ठिकाणी ते कणकेच्या पारीत का भरतात? आय मीन जनरली मैद्याच्या पारीतली पुरणपोळी खाल्ली / बघीतली आहे. तशी ह्या कणकेच्या पारीतलीहि खाल्ली आहे. मस्त खमंग लागते. माझ्या मते कणकेची पारी मैद्या पेक्षा लाटायला सोपी जात असेल. काहि ठिकाणी मैदा + कणीकहि घेतात का?

In reply to by दिपक.कुवेत

रेवती 06/10/2014 - 05:38
दिपकराव, मैद्याची पुपो लाटायला सोपी जाते. पुरण बाहेर येत नाही. पण पोळी गार होताहोता तडतडीत होते. तरीही घाईगडबडीच्यावेळी कणकेत चमचाभर मैदा घालून पोळी करता येते. मूळ पद्धतीत कणकेत तेल मीठ घालून नेहमीप्रमाणे भिजवायचॆ. थोड्यावेळाने थोडे पाणी व भरपूर तेल घालून घालायचे तिंबत रहायची..कणकेत सगळे तेल मुरते. मग पुन्हा तेल असे करत तार आली की सगळी कणिक तेलात बुडेल इतक्या तेलात झाकून ठेवायचॆ. अशा कणकेत पुरण भरून तांदळाच्या पिठीवर पोळी लाटायची किंवा नुसत्या तेलावरही लाटता येते. जरा कौशल्याचे काम आहे पण चवीला चांगली लागते. आपापली सोय आहे. चांगली वाईट असे काही म्हणायचे नाही.

भाते 05/10/2014 - 20:48
नक्की तुझा व्यवसाय काय आहे रे बाबा? हा धागा बघितल्यावर लातुरमध्ये (किंवा इतरत्र) तुझे स्वत:चे उपहारगृह आहे किंवा तसे काढायची इच्छा आहे आणि त्यासाठी तु भागीदार/मदतनीस शोधतो आहेस असे वाटते! अप्रतिम! केवळ अप्रतिम! मी (झाकण मारून) पोळी करण्याचा प्रयत्न केला तरी कुठल्यातरी देशाचा नकाशा तयार होतो! नंतर प्रत्येक पदार्थ वाचुन (हा पदार्थ करायला मला जमेल का? याचा विचार करून) सविस्तर प्रतिसाद देईन! :)

जर मी केली थाळी

तर त्यात काय काय असेल? @करंट टमॅटो सार, फ्लॉवर/गाजर/पनीर(मॅरिनेटेड)बिर्याणी, तीनपदरी चपाती, डाळींब/केळी/ओलंखोबरं=कोशिंबीर, दुधीभोपळा(अंगूरी)खीर, आख्खीहळदमिर्चीफ्राय, ठेचमुळा-तवाफ्राय.. इत्यादी...इत्यादी! @आणि नंतर मला स्वतःला तयार करता येणारी पानं:- १)मसाला ड्रायफ्रुट >>> हे हल्ली फेमस झालेल्या चॉकलेट पानाला मात देणारं पान आहे. २)साधामिठा(गावरान) >>> यात गुलकंद/खुशबू/चटणी असले पदार्थ न वापरताही हे पान खायला लागल्यावर २मिनिटानी अस्सं गोडीत चढतं की क्या केहेने! ३)फूलचंदकेसरीचांदी >>> पारंपारिकच.. पण फक्त फूलचंदचा हल्ली जो घमघमाट करण्यावर भर दिला जातो,ते टाळून त्याचा तोंडात जायका निर्माण करणारं असं हे राजसपान आहे. ४)साधापत्तातंबाखू(गावरान) >>> हे तर शुद्ध मराठी(घाटी) पान आहे. पन १२०/३०० चा जमाना आल्यापासून विस्मरणात गेलेलं आहे. याची मजा अशी..की मनमुराद जेवणानंतर हे पान - लावलं- की किमान अर्धातास आपला मनोदेह फ्लाईंगबलून सारखा हळूहळू..हळूहळू..तरंगत..तरंगत..परब्रम्हाला भेटायला जातो! ५)फूलचंदकेसरीचांदी१६०(तंबाखू) >>> हे मात्र जरा शाहीपान आहे. आणि हल्ली किवाम/तंबाखुच्या (भडकलेल्या :-/ ) भावामुळे बरच महागडंही आहे. पण तरिही पान-लावल्यावर पहिली ५ मिनिटं तोंडात एका बाजुला निपचीत ठेऊन दिलं,आणि नंतर हळूहळू..हळूहळू..चावायला सुरवात केली,की गावठी बाणासारखं जरावेळ जमिनीवर थयथयाट करून एकदम-----------------आकाशात नेऊन सोडतं! अर्थात नंतर लगेचच दहा मिनिटात जमिनीवर पण आणतं. पण तरी त्यातनं उतरायची इच्छा होत नै आपल्याला..( :D ) असं ओढ लावणारं हे पान आहे. ============================ फक्स्त ह्यो थाळी/पान योग जमवून आणायला मला परत एकदा "घरचे स्वयंपाकघर" या विभागात किमान १ महिना कंपल्सरी शिरावं लागेल. कारण तिथे माझा वियोग होऊन साधारण १० वर्ष होत आलियेत. ============================

जेपी 16/10/2014 - 17:27
गुर्जी पान म्हणाल तर, तिन पानी, कात चुना लावुन आणी कच्ची पक्की सुपारी गावरान तंबाकु ,थोडास 300 चा शिडकावा आणी आणखीन चुना अलगसे. ब्रम्हानंदी टाळी.

In reply to by जेपी

@तिन पानी, कात चुना लावुन आणी कच्ची पक्की सुपारी गावरान तंबाकु ,थोडास 300 चा शिडकावा आणी आणखीन चुना अलगसे. ब्रम्हानंदी टाळी.>>> धण्यवाद्स.... लै जंबारडिंग वाटतया ऐकून..आज रातच्याला ह्येच पाण ट्राय करनेत येइल.

In reply to by प्रचेतस

@व्यसनांबद्दलच्या >>> आणि आपल्याला खादाडीच्या रम्य चर्चांच व्यसन आहे..ते विसरला हा आगोबा! :-/ थाळी कल्पनेबद्दल अक्षरंही न काढलेल्या आगोबाचा टीव्र णिसेध...! :-/ llllllllllllllllllluuuuuuuuuu :-/

In reply to by प्रचेतस

@थाळीचा प्रतिसाद एक आणि पानाचे पाचपाच त्यामुळे >>> :-/ हेच्च..हेच्च..हाच तो निरर्र्थकपणा! :-/ थाळीतले पदार्थ किती आहेत??? हे मोजायची बुद्धी का बरं नै झाली? :-/ . . . समांतरः- अजुन तरी कळेल कि नै कोण जाणे?

In reply to by प्रचेतस

@अजुन तरी कळेल कि नै कोण जाणे? >>> झालं की नै खरं!? =)) @ पाच प्रकारच्या पानात किती विविध पदार्थ भरलेत तुम्हीच बघा.>>> :-/ आपण ऑब्जेकटिव्ह बोल्लो की जाणूनबजुन सबजेकटिव्ह होणार हा आगोबा! :-/

उडन खटोला 03/01/2015 - 19:17
कल्पना करा बरं... की तुम्ही सहकुटुंब एखाद्या हॉटेलात गेला आहात... आणि ऑर्डर केली आहे की आम्हाला सुरुवातीला दोन सोलकढी, एक मुगाचे कळण - दोघांत एक, सोबत एक प्लेट कोथिंबीर वडी, एक प्लेट अळूवडी द्या. नंतर जेवणासाठी एक प्लेट अळूची पातळ भाजी, एक प्लेट डाळींब्यांची उसळ, चार घडीच्या पोळ्या, मसाले भात, दोन बाजरीच्या भाकर्‍या आणि एक वांग्याचे भरीत द्या. सर्वात शेवटी आंबा पियुष व रस शेवई दोघांमध्ये चार द्या ! तिथला स्टिवर्ड तुम्हाला सुचवतोय की कधीतरी त्यांच्याकडच्या कोळाचे पोहे, केळ्याची तिखटगोड भजी, शहाळ्याची भाजी, मुगाची सावजी उसळ, कुळथाचं पिठलं, पाकातल्या पुर्‍या, रताळ्याचा कीस अशा 'मेतकूट खास' पदार्थांचाही तुम्ही आस्वाद घ्यावा... तुम्ही म्हणाल, काय राव..... आज भंकस करायला दुसरं कोणी भेटलं नाही का? आहो... ही आता कल्पनेतली गोष्ट नाही. ठाण्यात सुरु झाले आहे. मराठी आहारसंस्कृतीचे खाद्यपीठ ! कोकण, कोल्हापूर, मराठवाडा, विदर्भ, नाशिक अशा ठिकठिकाणचे पारंपरिक खाद्यपदार्थ आता मिळतील ... ‘मेतकूट’™ - Culinary Heritage of Maharashtra मध्ये. नवीन वर्षात १ जानेवारी रोजी शुभारंभ होत असलेल्या या नवीन खानपानगृहास आवर्जून सहकुटुंब, सहपरिवार भेट द्या. आपल्या सोसायटीमधील, कार्यालयातील खन्ना, गिडवानी, अय्यर, चटर्जी यांनाही घेऊन जा. त्यांनाही कळूदे अस्सल चव महाराष्ट्राची ! पत्ता - १,२, वाटीका सोसायटी, घंटाळी देवी पथ, नौपाडा, ठाणे (प) संपर्क - ०२२२५४१०८२१ किरण भिडे यांनी हे हाॅटेल सुरु केलं आहे. ही कल्पना आवडल्यास इतरांकडे हे मेसेज पाठवा. आवर्जून 'मेतकूट'ला भेट द्या. C/P-Suruchi Gurjar
सादर करीत आहे एक शाकाहारी थाळी thaaLI thaali डाव्याबाजुला

प्रवाही

आतिवास ·

यशोधरा 05/10/2014 - 19:29
तरी पाखरे सुरेल गाती जगणे होता पुरे प्रवाही! जगणे होता पुरे प्रवाही!... क्या बात है! :)

एस 14/10/2014 - 13:09
बर्‍याचदा वाचली. खूप आवडली हे सांगायला नको. प्रतिसाद द्यायचा राहून गेला होता तो आत्ता देतोय. कवितेमागील context बद्दल नंतर कधीतरी...

यशोधरा 05/10/2014 - 19:29
तरी पाखरे सुरेल गाती जगणे होता पुरे प्रवाही! जगणे होता पुरे प्रवाही!... क्या बात है! :)

एस 14/10/2014 - 13:09
बर्‍याचदा वाचली. खूप आवडली हे सांगायला नको. प्रतिसाद द्यायचा राहून गेला होता तो आत्ता देतोय. कवितेमागील context बद्दल नंतर कधीतरी...
लेखनविषय:
पानगळीचा रेटा सोसून काही मागे उभेच आहे; पाचोळ्यातून हलके हलके जीवनरसही वहात आहे; जे झाले, ते गेले आता, मागे वळून पाहता काही नाही; तरी पाखरे सुरेल गाती जगणे होता पुरे प्रवाही!

अवजारांप्रति कृतज्ञता

जागु ·

In reply to by चित्रगुप्त

काउबॉय 07/10/2014 - 16:15
अन ही हुरहुर जर अजुन दाट करायची असेल तर लोकसंस्कृतीच्या पाउलखुणा पुस्तक अवश्य वाचा... मास्टर पिस आहे.

अनन्न्या 04/10/2014 - 16:22
माझ्याकडे ही दरवर्षी शस्त्रपूजा आणि नव्याची पौर्णिमा आठवणीने साजरी करते. आता घरचे धान्य येत नाही, त्यामुळे नव्याची तोरणे विकत आणावी लागतात.

एस 07/10/2014 - 14:41
पिकावला इकडे टिकाव असेही म्हणतात. तसेच पार किंवा पारईला पहार म्हणतात. तुम्ही टाकलेल्या छायाचित्रात डावीकडून अनुक्रमे पहिले व दुसरे अवजार. अर्थात हा किंचित भाषाभेद झाला. तुमची शेतीबद्दलची आपुलकी आधीच्या लेखांतूनही जाणवत राहते. तसाच हाही एक अतिशय नॉस्टॅल्जिक करणारा सुंदर लेख..! धन्यवाद! अशाच लिहीत रहा!

तिमा 07/10/2014 - 18:07
शेतकर्‍यांनी वा अन्य कष्टकर्‍यांनी केलेली शस्त्रपूजा खटकत नाही. पण संगणकावर स्वस्तिक काढून त्याची अथवा शास्त्रीय प्रयोगशाळेतील अत्याधुनिक यंत्रांची पूजा करणे हास्यास्पद वाटते.

सुहास.. 09/10/2014 - 14:48
मस्त लेख जागु !! ( तु हल्ली मिपाकराच्या रोल मधुन जराशी सुटत चालली आहेस असे वाटते आहे, इकड लिहायला विषय नाहीयेत का ? ) जागुचा पंखा सुहास

In reply to by चित्रगुप्त

काउबॉय 07/10/2014 - 16:15
अन ही हुरहुर जर अजुन दाट करायची असेल तर लोकसंस्कृतीच्या पाउलखुणा पुस्तक अवश्य वाचा... मास्टर पिस आहे.

अनन्न्या 04/10/2014 - 16:22
माझ्याकडे ही दरवर्षी शस्त्रपूजा आणि नव्याची पौर्णिमा आठवणीने साजरी करते. आता घरचे धान्य येत नाही, त्यामुळे नव्याची तोरणे विकत आणावी लागतात.

एस 07/10/2014 - 14:41
पिकावला इकडे टिकाव असेही म्हणतात. तसेच पार किंवा पारईला पहार म्हणतात. तुम्ही टाकलेल्या छायाचित्रात डावीकडून अनुक्रमे पहिले व दुसरे अवजार. अर्थात हा किंचित भाषाभेद झाला. तुमची शेतीबद्दलची आपुलकी आधीच्या लेखांतूनही जाणवत राहते. तसाच हाही एक अतिशय नॉस्टॅल्जिक करणारा सुंदर लेख..! धन्यवाद! अशाच लिहीत रहा!

तिमा 07/10/2014 - 18:07
शेतकर्‍यांनी वा अन्य कष्टकर्‍यांनी केलेली शस्त्रपूजा खटकत नाही. पण संगणकावर स्वस्तिक काढून त्याची अथवा शास्त्रीय प्रयोगशाळेतील अत्याधुनिक यंत्रांची पूजा करणे हास्यास्पद वाटते.

सुहास.. 09/10/2014 - 14:48
मस्त लेख जागु !! ( तु हल्ली मिपाकराच्या रोल मधुन जराशी सुटत चालली आहेस असे वाटते आहे, इकड लिहायला विषय नाहीयेत का ? ) जागुचा पंखा सुहास
लेखनविषय:
लेखनप्रकार
खालील लेख दिनांक ३ ऑक्टोबर २०१४ रोजी लोकसत्ता-वास्तुरंग पुरवणी मध्ये प्रकाशीत झाला आहे. http://www.loksatta.com/vasturang-news/dasra-1008880/ --------------------------------------------------------------------------------- दसरा म्हणजे मांगल्याचा दिवस. ह्या दिवशी विशेषकरून यंत्रे हत्यारांची पूजा केली जाते. अशीच पूजा शेतकरी कुटुंबे आपल्या शेतीच्या अवजारांची करतात. वर्षभर शेती-मळ्यांसाठी राबणार्‍या अवजारांना दसर्‍याच्या दिवशी घासून पुसून स्वच्छ केले जाते. संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळी रांगोळी काढून पाटावर अवजारे ठेवली जातात.

शेख चिल्ली !

माहितगार ·

श्रीगुरुजी 05/10/2014 - 21:12
अलिकडच्या काळातील नितीशकुमार व केजरीवाल हे शेख चिल्ली आहेत. पूर्वी क्रिकेटमध्ये संदीप पाटील व नंतर विनोद कांबळी हे शेख चिल्ली होते. अलिकडे श्रीशांत हा नवीन शेख चिल्ली आहे. महाराष्ट्रात उधोजी शेख चिल्ली होण्याची शक्यता आहे. तात्पर्य, शेख चिल्ली पूर्वीही होते, आताही आहेत आणि पुढेही असतील.

In reply to by खटपट्या

माहितगार 11/10/2014 - 08:21
असे काही चालेल का ?
चित्र एकदम मस्त, हातात कुर्‍हाड घेऊन फांदी तोडतानाची अ‍ॅक्शन आणि फांदीही तुटावयास आली आहे हे सहजच जाणवते. जरासं कार्टून टाईपच अपेक्षीत असल्यामुळे हे चित्र अगदी धावेलच. काही मायनर फिनीशींग असल्यास करून https://commons.wikimedia.org/wiki/Special:UploadWizard या दुव्यावर चढवल्यास मला मराठी विकिच नव्हेतर हिंदी इंग्रजी विकिपीडियावरही जोडता येईल. commons.wikimedia.org वर टाकलेली छायाचित्रे आपण मिपा वगैरेवर सुद्धा वापरू शकताच. चित्रासाठी पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद

In reply to by खटपट्या

खेडूत 11/10/2014 - 11:37
उत्तम जमलंय ! असंच चित्र डोक्यात होतं पण कागदावर उतरवायला जमलं नाही. कारण शेखचिल्लीचा धडा हिंदी मध्ये पाचवी सहावीत होता त्यात सेम असं चित्र होतं. ऐशीच्या दशकांतली हिंदी बालभारती पुस्तके शोधल्यास मिळू शकेल. गोष्ट पण मजेशीर होती. आतां पूर्ण आठवत नाही.

In reply to by खेडूत

माहितगार 11/10/2014 - 12:29
शेख चिल्लीचे एखाद दुसरे चित्र आंतरजालावरही असावे पण कॉपीराईटमुळे विकिपीडियावर आणि अर्थात इतरत्रही वापरता येत नाही म्हणून हे चित्र पुन्हा काढून चढवणे महत्वाचे.

माहितगार 11/10/2014 - 12:26
ज्या माणसाने शेख चिल्लीला शहाणपण सांगायचा प्रयत्न केला तोही घ्या की चित्रात..?
कोण तो ? -अनभिज्ञ माहितगार अवांतरः
आणि मुसलमानी पेहराव घालता आला तर बघा...टोपी, लांब डगला, वगैरे...?
-अजूनही बरेच मुस्लीम तथाकथीत मुसलमानी पेहराव वापरत असतीलही, तसे चित्रात दाखवण्यास हरकतही नाही. विवीधतेतून एकतेचा आदर करूनही कोणत्याही समुदायाने एकुण समाजा पासून दूर राहण्यास, स्टिरीओ टायपींग कारणीभूत ठरू असे पोषाख काय लिपी काय टाळता आल्यास पहावे असे वाटते. आणि इतर समाजानेही ह्या स्टिरिओ टायपींग लादत नाही आहोत ना हे पहावे असे वाटते. मग विवक्षीत समुदाय कोणते का असेनात. - विचारात पडलेला माहितगार

In reply to by माहितगार

बॅटमॅन 11/10/2014 - 17:03
नै म्हटले तरी शेख चिल्ली हे जुने क्यारेक्टर. मग मुसलमानी पोषाख दाखवण्यात हरकत काय? तसे तर मग शिवाजी महाराजांनाही उद्या शर्टपँट घालूनच दाखवा म्हणतील लोक.

In reply to by माहितगार

असंका 11/10/2014 - 18:00
शेख चिल्ली ज्या फांदीवर बसला होता, तीच तोडायला बघत होता. बाजुने जाणार्या एका भल्या माणसाने ते बघून शेख चिल्ली ला सावध करायचा प्रयत्न केला- अरे ही फांदी पडल्यावर तुही खाली पडशील!! शेख चिल्ली ने त्याला उडवून लावले. पण मग लवकरच ती फांदी तुटली आणि फांदीवर बसलेला शेख चिल्ली पण. शेख चिल्ली आश्चर्य चकीत होउन विचार करायला लागला....तो भला माणूस म्हणजे नक्की एखादा महान भविष्य सांगणारा असणार!! फांदी तिथेच टाकून शेखचिल्ली त्या महान भविष्यवेत्त्याच्या शोधात निघाला.

In reply to by असंका

माहितगार 11/10/2014 - 19:17
छान. शेखी चिल्लीचे पात्र आणि सारांश लक्षात होते, कथा पूर्ण लक्षात नव्हती. माहितीपूर्ण प्रतिसादासाठी आभार.

In reply to by असंका

अर्धवटराव 11/10/2014 - 21:22
शेखचिल्लीने भविष्य सांगण्याचा खुप हट्ट केला व तो कॉमनसेन्स समजु शकत नाहि म्हटल्यावर नाइलाजाने त्या 'भविष्यवेत्त्याने' शेखचिल्लीच्या दंडावर एक दोरा बांधला व दोरा तुटल्यास शेखचिल्ली मरेल असं खोटच सांगितलं. दोरा तुटला तसं शेखचिल्लीला वाटलं आपण मेलो. तो स्मशानात एका कबरीत जाऊन झोपला. तिकडुन एक हवालदार तुपाच्या डब्यांचं ओझं वाहायला एखादा हमाल शोधत होता. शेखचिल्लीने झोपल्या झोपल्याच ओरडुन सांगीतलं कि जर तो जीवंत असता तर नक्कीच हमाली केली असती. हवालदाराने दटावुन त्याला उठवलं व ओझं वाहायला सांगीतलं. डोक्यावर ते ओझं घेऊन शेखचिल्ली निघाला व वाटेत आपण हमालीच्या पैशाचे काय करु याचे स्वप्न बघायला लागला. अंडे घ्यावे, त्यातुन कोंबड्या येतील, मग परत अंडे-कोंबड्या असं करत करत आपण श्रीमंत होऊ. मग लग्न करु. मुलंबाळं होतील. त्यांच्याशी खेळता खेळता बायको विचारेल, बच्चे कहां है. तो मै बोलुंगा उंहु मै नहि बताउंगा. असं म्हणत त्याने मान हलवली व तुपाचे डबे खाली पडले. सगळं तुप वाया गेलं. चिडुन हवालदाराने शेखचिल्लीला चांगला चोप दिला. अशी ति गोष्ट :)

श्रीगुरुजी 05/10/2014 - 21:12
अलिकडच्या काळातील नितीशकुमार व केजरीवाल हे शेख चिल्ली आहेत. पूर्वी क्रिकेटमध्ये संदीप पाटील व नंतर विनोद कांबळी हे शेख चिल्ली होते. अलिकडे श्रीशांत हा नवीन शेख चिल्ली आहे. महाराष्ट्रात उधोजी शेख चिल्ली होण्याची शक्यता आहे. तात्पर्य, शेख चिल्ली पूर्वीही होते, आताही आहेत आणि पुढेही असतील.

In reply to by खटपट्या

माहितगार 11/10/2014 - 08:21
असे काही चालेल का ?
चित्र एकदम मस्त, हातात कुर्‍हाड घेऊन फांदी तोडतानाची अ‍ॅक्शन आणि फांदीही तुटावयास आली आहे हे सहजच जाणवते. जरासं कार्टून टाईपच अपेक्षीत असल्यामुळे हे चित्र अगदी धावेलच. काही मायनर फिनीशींग असल्यास करून https://commons.wikimedia.org/wiki/Special:UploadWizard या दुव्यावर चढवल्यास मला मराठी विकिच नव्हेतर हिंदी इंग्रजी विकिपीडियावरही जोडता येईल. commons.wikimedia.org वर टाकलेली छायाचित्रे आपण मिपा वगैरेवर सुद्धा वापरू शकताच. चित्रासाठी पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद

In reply to by खटपट्या

खेडूत 11/10/2014 - 11:37
उत्तम जमलंय ! असंच चित्र डोक्यात होतं पण कागदावर उतरवायला जमलं नाही. कारण शेखचिल्लीचा धडा हिंदी मध्ये पाचवी सहावीत होता त्यात सेम असं चित्र होतं. ऐशीच्या दशकांतली हिंदी बालभारती पुस्तके शोधल्यास मिळू शकेल. गोष्ट पण मजेशीर होती. आतां पूर्ण आठवत नाही.

In reply to by खेडूत

माहितगार 11/10/2014 - 12:29
शेख चिल्लीचे एखाद दुसरे चित्र आंतरजालावरही असावे पण कॉपीराईटमुळे विकिपीडियावर आणि अर्थात इतरत्रही वापरता येत नाही म्हणून हे चित्र पुन्हा काढून चढवणे महत्वाचे.

माहितगार 11/10/2014 - 12:26
ज्या माणसाने शेख चिल्लीला शहाणपण सांगायचा प्रयत्न केला तोही घ्या की चित्रात..?
कोण तो ? -अनभिज्ञ माहितगार अवांतरः
आणि मुसलमानी पेहराव घालता आला तर बघा...टोपी, लांब डगला, वगैरे...?
-अजूनही बरेच मुस्लीम तथाकथीत मुसलमानी पेहराव वापरत असतीलही, तसे चित्रात दाखवण्यास हरकतही नाही. विवीधतेतून एकतेचा आदर करूनही कोणत्याही समुदायाने एकुण समाजा पासून दूर राहण्यास, स्टिरीओ टायपींग कारणीभूत ठरू असे पोषाख काय लिपी काय टाळता आल्यास पहावे असे वाटते. आणि इतर समाजानेही ह्या स्टिरिओ टायपींग लादत नाही आहोत ना हे पहावे असे वाटते. मग विवक्षीत समुदाय कोणते का असेनात. - विचारात पडलेला माहितगार

In reply to by माहितगार

बॅटमॅन 11/10/2014 - 17:03
नै म्हटले तरी शेख चिल्ली हे जुने क्यारेक्टर. मग मुसलमानी पोषाख दाखवण्यात हरकत काय? तसे तर मग शिवाजी महाराजांनाही उद्या शर्टपँट घालूनच दाखवा म्हणतील लोक.

In reply to by माहितगार

असंका 11/10/2014 - 18:00
शेख चिल्ली ज्या फांदीवर बसला होता, तीच तोडायला बघत होता. बाजुने जाणार्या एका भल्या माणसाने ते बघून शेख चिल्ली ला सावध करायचा प्रयत्न केला- अरे ही फांदी पडल्यावर तुही खाली पडशील!! शेख चिल्ली ने त्याला उडवून लावले. पण मग लवकरच ती फांदी तुटली आणि फांदीवर बसलेला शेख चिल्ली पण. शेख चिल्ली आश्चर्य चकीत होउन विचार करायला लागला....तो भला माणूस म्हणजे नक्की एखादा महान भविष्य सांगणारा असणार!! फांदी तिथेच टाकून शेखचिल्ली त्या महान भविष्यवेत्त्याच्या शोधात निघाला.

In reply to by असंका

माहितगार 11/10/2014 - 19:17
छान. शेखी चिल्लीचे पात्र आणि सारांश लक्षात होते, कथा पूर्ण लक्षात नव्हती. माहितीपूर्ण प्रतिसादासाठी आभार.

In reply to by असंका

अर्धवटराव 11/10/2014 - 21:22
शेखचिल्लीने भविष्य सांगण्याचा खुप हट्ट केला व तो कॉमनसेन्स समजु शकत नाहि म्हटल्यावर नाइलाजाने त्या 'भविष्यवेत्त्याने' शेखचिल्लीच्या दंडावर एक दोरा बांधला व दोरा तुटल्यास शेखचिल्ली मरेल असं खोटच सांगितलं. दोरा तुटला तसं शेखचिल्लीला वाटलं आपण मेलो. तो स्मशानात एका कबरीत जाऊन झोपला. तिकडुन एक हवालदार तुपाच्या डब्यांचं ओझं वाहायला एखादा हमाल शोधत होता. शेखचिल्लीने झोपल्या झोपल्याच ओरडुन सांगीतलं कि जर तो जीवंत असता तर नक्कीच हमाली केली असती. हवालदाराने दटावुन त्याला उठवलं व ओझं वाहायला सांगीतलं. डोक्यावर ते ओझं घेऊन शेखचिल्ली निघाला व वाटेत आपण हमालीच्या पैशाचे काय करु याचे स्वप्न बघायला लागला. अंडे घ्यावे, त्यातुन कोंबड्या येतील, मग परत अंडे-कोंबड्या असं करत करत आपण श्रीमंत होऊ. मग लग्न करु. मुलंबाळं होतील. त्यांच्याशी खेळता खेळता बायको विचारेल, बच्चे कहां है. तो मै बोलुंगा उंहु मै नहि बताउंगा. असं म्हणत त्याने मान हलवली व तुपाचे डबे खाली पडले. सगळं तुप वाया गेलं. चिडुन हवालदाराने शेखचिल्लीला चांगला चोप दिला. अशी ति गोष्ट :)
कुणीही अजाणता अथवा बावळटपणे स्वतःच्याच हिताच्या विरूद्ध वागत असेल तर सहसा ज्या चित्राची पटकन आठवण येते त्यातील एक म्हणजे शेख चिल्ली झाडाच्या फांदीवर उलटा बसून झाडाची फांदी कापतोय, झाडाची फांदी कापून झाली की तो आपोआप झाडावरून फांदी सहीत खाली पडणार हे सुज्ञांच्या लक्षात येतच. या शेख चिल्लीच्या इतर बर्‍याच कथा असल्या तरीही या धाग्याचा उद्देश अजाणता अथवा अज्ञानातून स्वतःच्याच हिताच्या विरूद्ध वागणे, बोलणे, तर्क मांडणे या संदर्भाने आहे. स्वतःच्याच हिताच्या विरूद्ध वागणे, बोलणे, (उणीवयूक्त) तर्क मांडणे/अनुसरणे, अशी उदाहरणे आपण बर्‍याचदा अनुभवत असतो अशा उदाहरणांची दखल घेणे हा धाग्याचा उद्देश आहे.