मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अनुक्रमणिका - दिवाळी अंक २०२१

टर्मीनेटर ·
body {background-image: url("https://i.postimg.cc/52VQjg83/bg-main.jpg");} .navbar-fixed-top { background-color: #000011; border-bottom: 1px solid #111; } .node-info {background-color: #f5f5f5;padding:8px;} .page-header {background-color: #008080;color: #ffffff;text-align:center;border-bottom: 0px solid #111;box-sha

राघव Tue, 11/02/2021 - 18:42
छान दिसतोय अंक! सर्व लेखक/लेखिकांचे आणि दिवाळी अंकासाठी काम करणार्‍या पडद्यामागच्या मिपाच्या कलाकारांचे खूप खूप अभिनंदन! सावकाश आणि आस्वाद घेत वाचणार. :-)

किरण कुमार Tue, 11/02/2021 - 19:17
दिवाळीचा फराळ अजून गोड करून दिल्याबद्दल.... सर्व टीमचे दणकून अभिनंदन ..

मित्रहो Tue, 11/02/2021 - 19:55
भरगच्च अंक दिसतोय. २० ते २५ लेखाच्या दिवाळी अकापासून आता फक्त कथाच २० येत आहेत फार मोठा पल्ला मिसळपावच्य दिवाळी अंकानी गाठलेला आहे. मला क्रोम मधे अक तांत्रिक समस्या येत आहे. मुखपृष्ठ वर क्लिक केले तर Access Denied येत आहे आणि संपादकीय वर क्लिक केले तर काहीच येत नाही आहे.

कंजूस Tue, 11/02/2021 - 20:00
तर तो परत इथेच वाजला. मंडळाचे आणि लेखकांचे काम आवडले. टर्मिनेटरांशी एक मिनि कट्टा ( टीपीकेसह) डोंबोलीत झाला. संध्याकाळी पाच ते साडेदहा असा मोठा. त्यामुळे खूप गप्पा झाल्या पण टर्मिनेटर यांनी कोणताही गौप्यस्फोट न करता उत्साहात सूचीत केलं की काम फार आहे आणि जरा अधिकच चांगला माल आला आहे. बहुतेक दोन अंक निघतील एवढा. तर ते खरं आहे हे अंक पाहून समजलं. लेखकहो, दिवाळी अंक भारी आहे. लेख भा री. पण फराळासारखे हळूहळू संपवणार. ज्यांचे लेख वाचले नाहीत त्यांनी सबुरीने घ्यावं. तुमचेही वाचणार आहे.

इतकी कल्पक, देखणी आणि तरीही समजायला सोपी अनुक्रमणिका बनवल्या बद्दल टर्मिनेटर यांचे मनःपूर्वक अभिनंदन पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

तुषार काळभोर Sun, 11/07/2021 - 22:05
इतकी कल्पक, देखणी आणि तरीही समजायला सोपी अनुक्रमणिका बनवल्या बद्दल टर्मिनेटर यांचे मनःपूर्वक अभिनंदन पैलवानबुवा!

सौंदाळा Wed, 11/03/2021 - 18:36
खूपच कल्पक आणि नाविन्यपूर्ण अनुक्रमणिका. बघायला सुंदर आणि वापरायला सोप्पी. ऑनलाईन अंकामुळे लेखांबरोबरच अनुक्रमणिका सुद्धा सुंदर अनुभव देत आहे जो अन्यथा मिळाला नसता.

बिपीन सुरेश सांगळे गुरुवार, 11/04/2021 - 06:31
सर्व मिपाकरांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा ! नरक चतुर्दशी पहाट . संपादक , संपादक मंडळ , मुखपृष्ठ , अंक सजावट , मुद्रित शोधन , संकलक , सर्व लेखक , या साऱ्यांनी घेतलेल्या कष्टाचं प्रतिबिंब अंकात उमटलं आहे . अभिनंदन ! त्याची पोचपावती वाचक देतीलच . खूप सुरेख आणि भरगच्च अंक आहे . सुरेल ! वाचकांना एवढा मोठा अंक उपलब्ध होणं ही एक खूप मोठी गोष्ट आहे . अंक उत्कुष्ट या वर्गवारीत मोडतो . सध्याच्या एकूण अंधाऱ्या नकारात्मक वातावरणात एक आशादायी प्रकाश देणारा दीप , असं मी या अंकाचं वर्णन करिन . अन या अंकाची दखल, फक्त मुद्रित माध्यमाची दखल घेणारी सर्व प्रकारची, जाणती मंडळीही घेतील अन योग्य प्रकारे घेतील अशी आशा ! अंक सावकाशीने वाचावा लागणार . पुन्हा एकदा साऱ्यांचे खूप कौतुक अन आभार . शुभ दीपावली !

एक_वात्रट गुरुवार, 11/04/2021 - 13:56
अंक कमालीचा देखणा बनला आहे. दर्जा आणि लेखांची संख्या या दोन्ही बाबतीत अंक उजवा दिसतो. काही लेख चाळले, आवडले. अंक आता सवडीने वाचणार आहे. दिवाळीची हे मेजवानी आम्हाला दिल्याबद्दल लेखक, संपादक आणि तांत्रिक/सजावट बाजू सांभाळणा-या सा-यांचे आभार!

जेम्स वांड गुरुवार, 11/04/2021 - 14:42
काही लेख/ कथा वाचल्यात, काही वाचणे सुरू आहे पण सौंदर्यदृष्टीने अतिषयच उजवा अंक आहे, संजुभाऊ लैच मेहनत घेतलीत आपला अंक सजवायला, तुम्हाला खूप खूप आभार.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 11/04/2021 - 16:55
टर्मिनेटरसेठ, एकदम जबरा सजावट झाली अंकाची. तुमच्या मेहनतीला आपला सलाम आहे. लै कठीण काम असतं ते. नंबर एक. सर्वच टीमचं मनापासून अभिनंदन. ता.क. फक्त ते मुख्यपृष्ठ आणि संपादकीय या शब्दांचा रंग लाल दिसतोय. एकच रंगात पाहिजे असं वाटलं. की मलाच तसं दिसतेय काय माहिती. -दिलीप बिरुटे

जुइ Sat, 11/06/2021 - 22:47
विविधतापूर्ण देखणा अंक झाला आहे. सर्वांचे मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद!

कंजूस Mon, 11/08/2021 - 13:28
मोबाइलमध्ये लेख वाचतो. ब्राउजर अड्रेसबारमधली रीडिंग मोड पुस्तकाचे चिन्ह दाबल्यावर येणाऱ्या पेजमध्ये शेवटाला © 2021 Misalpav.com, All rights reserved. असे दिसते. पण मोबाइल पेज किंवा डेस्कटॅप पेजमध्ये लेखाच्या शेवटाला तसे दिसत नाही.

राघव Tue, 11/02/2021 - 18:42
छान दिसतोय अंक! सर्व लेखक/लेखिकांचे आणि दिवाळी अंकासाठी काम करणार्‍या पडद्यामागच्या मिपाच्या कलाकारांचे खूप खूप अभिनंदन! सावकाश आणि आस्वाद घेत वाचणार. :-)

किरण कुमार Tue, 11/02/2021 - 19:17
दिवाळीचा फराळ अजून गोड करून दिल्याबद्दल.... सर्व टीमचे दणकून अभिनंदन ..

मित्रहो Tue, 11/02/2021 - 19:55
भरगच्च अंक दिसतोय. २० ते २५ लेखाच्या दिवाळी अकापासून आता फक्त कथाच २० येत आहेत फार मोठा पल्ला मिसळपावच्य दिवाळी अंकानी गाठलेला आहे. मला क्रोम मधे अक तांत्रिक समस्या येत आहे. मुखपृष्ठ वर क्लिक केले तर Access Denied येत आहे आणि संपादकीय वर क्लिक केले तर काहीच येत नाही आहे.

कंजूस Tue, 11/02/2021 - 20:00
तर तो परत इथेच वाजला. मंडळाचे आणि लेखकांचे काम आवडले. टर्मिनेटरांशी एक मिनि कट्टा ( टीपीकेसह) डोंबोलीत झाला. संध्याकाळी पाच ते साडेदहा असा मोठा. त्यामुळे खूप गप्पा झाल्या पण टर्मिनेटर यांनी कोणताही गौप्यस्फोट न करता उत्साहात सूचीत केलं की काम फार आहे आणि जरा अधिकच चांगला माल आला आहे. बहुतेक दोन अंक निघतील एवढा. तर ते खरं आहे हे अंक पाहून समजलं. लेखकहो, दिवाळी अंक भारी आहे. लेख भा री. पण फराळासारखे हळूहळू संपवणार. ज्यांचे लेख वाचले नाहीत त्यांनी सबुरीने घ्यावं. तुमचेही वाचणार आहे.

इतकी कल्पक, देखणी आणि तरीही समजायला सोपी अनुक्रमणिका बनवल्या बद्दल टर्मिनेटर यांचे मनःपूर्वक अभिनंदन पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

तुषार काळभोर Sun, 11/07/2021 - 22:05
इतकी कल्पक, देखणी आणि तरीही समजायला सोपी अनुक्रमणिका बनवल्या बद्दल टर्मिनेटर यांचे मनःपूर्वक अभिनंदन पैलवानबुवा!

सौंदाळा Wed, 11/03/2021 - 18:36
खूपच कल्पक आणि नाविन्यपूर्ण अनुक्रमणिका. बघायला सुंदर आणि वापरायला सोप्पी. ऑनलाईन अंकामुळे लेखांबरोबरच अनुक्रमणिका सुद्धा सुंदर अनुभव देत आहे जो अन्यथा मिळाला नसता.

बिपीन सुरेश सांगळे गुरुवार, 11/04/2021 - 06:31
सर्व मिपाकरांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा ! नरक चतुर्दशी पहाट . संपादक , संपादक मंडळ , मुखपृष्ठ , अंक सजावट , मुद्रित शोधन , संकलक , सर्व लेखक , या साऱ्यांनी घेतलेल्या कष्टाचं प्रतिबिंब अंकात उमटलं आहे . अभिनंदन ! त्याची पोचपावती वाचक देतीलच . खूप सुरेख आणि भरगच्च अंक आहे . सुरेल ! वाचकांना एवढा मोठा अंक उपलब्ध होणं ही एक खूप मोठी गोष्ट आहे . अंक उत्कुष्ट या वर्गवारीत मोडतो . सध्याच्या एकूण अंधाऱ्या नकारात्मक वातावरणात एक आशादायी प्रकाश देणारा दीप , असं मी या अंकाचं वर्णन करिन . अन या अंकाची दखल, फक्त मुद्रित माध्यमाची दखल घेणारी सर्व प्रकारची, जाणती मंडळीही घेतील अन योग्य प्रकारे घेतील अशी आशा ! अंक सावकाशीने वाचावा लागणार . पुन्हा एकदा साऱ्यांचे खूप कौतुक अन आभार . शुभ दीपावली !

एक_वात्रट गुरुवार, 11/04/2021 - 13:56
अंक कमालीचा देखणा बनला आहे. दर्जा आणि लेखांची संख्या या दोन्ही बाबतीत अंक उजवा दिसतो. काही लेख चाळले, आवडले. अंक आता सवडीने वाचणार आहे. दिवाळीची हे मेजवानी आम्हाला दिल्याबद्दल लेखक, संपादक आणि तांत्रिक/सजावट बाजू सांभाळणा-या सा-यांचे आभार!

जेम्स वांड गुरुवार, 11/04/2021 - 14:42
काही लेख/ कथा वाचल्यात, काही वाचणे सुरू आहे पण सौंदर्यदृष्टीने अतिषयच उजवा अंक आहे, संजुभाऊ लैच मेहनत घेतलीत आपला अंक सजवायला, तुम्हाला खूप खूप आभार.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 11/04/2021 - 16:55
टर्मिनेटरसेठ, एकदम जबरा सजावट झाली अंकाची. तुमच्या मेहनतीला आपला सलाम आहे. लै कठीण काम असतं ते. नंबर एक. सर्वच टीमचं मनापासून अभिनंदन. ता.क. फक्त ते मुख्यपृष्ठ आणि संपादकीय या शब्दांचा रंग लाल दिसतोय. एकच रंगात पाहिजे असं वाटलं. की मलाच तसं दिसतेय काय माहिती. -दिलीप बिरुटे

जुइ Sat, 11/06/2021 - 22:47
विविधतापूर्ण देखणा अंक झाला आहे. सर्वांचे मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद!

कंजूस Mon, 11/08/2021 - 13:28
मोबाइलमध्ये लेख वाचतो. ब्राउजर अड्रेसबारमधली रीडिंग मोड पुस्तकाचे चिन्ह दाबल्यावर येणाऱ्या पेजमध्ये शेवटाला © 2021 Misalpav.com, All rights reserved. असे दिसते. पण मोबाइल पेज किंवा डेस्कटॅप पेजमध्ये लेखाच्या शेवटाला तसे दिसत नाही.

दिवाळी अंक २०१५: आवाहन

संपादक मंडळ ·

In reply to by अन्या दातार

गुरुजींना गुढगा पण हवाय का मानेबरोबर? =)) रच्याकने गुरुजींचं दिवाळीभावंविश्वं कधी येणार. ;)

In reply to by प्रचेतस

अन्या दातारने हे गाणे शिकवल मला. रुणुझुणु रुणुझुणे रे "भ्रम"रा!! चालुद्या तुमचं निरर्थक बिनबुडी अत्मरंजन. भ्रमवाद etc etc.

सौंदाळा Fri, 09/04/2015 - 15:00
दिवाळी अंकाची वाट पाहत आहे. लेखक व अंक (मुखपृष्ठ, बाकी फॉर्मटींग, एडीटींग) तयार करणार्‍या सर्व मिपाकरांना शुभेच्छा. किती मेहनत करावी लागत असेल याची कल्पना आहे.

जव्हेरगंज गुरुवार, 09/17/2015 - 10:27
इच्छुक... रच्याकने, - दिवाळी अंक या मिपावरच्या आयडीला व्यनिद्वारे पाठवा. कुठे भेटेल हा आयडी?

समीर_happy go lucky Sat, 10/03/2015 - 18:53
तो acceptance किंवा rejectance चा वेगळा हो पण फक्त मिळाल्याचा नसतो का?? [मी फक्त चौकशी कास्रतो आहे, का कोण जाणे पण मला वाटतंय कि तुम्ही "जाब" समजताय]

In reply to by समीर_happy go lucky

मी चौकशीचं उत्तर देतोय. जाब कशाला समजेन मी? जाब वाटला असता तर उत्तर द्यायच्या भानगडीत सुद्धा पडलो नसतो :). मेल आला असेल तर मेल चा अ‍ॅक्सेस असणारे लोक्स उत्तर देतील.

रेवती Sun, 10/04/2015 - 01:18
मला एक पाकृ पाठवायची आहे, फराळाची! दिवाळीआधी इतक्या लवकर कसं काय करून ठेवायचं? कृती आधी पाठवून फोटू नंतर पाठवायला हरकत नाही पण मग जरासे बदल असले तर करता येत नाहीत.

In reply to by सस्नेह

रेवती Sun, 10/04/2015 - 07:48
काय चेष्टा करता का तै! जर नियम असेल तर पदार्थ दोनदा करणार.......आधी दिवाळी अंकासाठी व नंतर फराळासाचा जिन्नस म्हणून. पण हा प्रश्न सगळ्या पाकृवाल्यांना येणार असे वाटते.

संपादक मंडळ गुरुवार, 10/15/2015 - 09:23
ता.क.: जास्तीत जास्त लोकांना सहभागी होता यावे म्हणून लिखाण पाठवण्याची मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवून देत आहोत. कृपया आपले लिखाण लवकरात लवकर पाठवावे ही विनंती. लिखाण स्वीकारले आहे की नाही याबद्दल ५ नोव्हेंबरपर्यंत कळवू. धन्यवाद!

माम्लेदारचा पन्खा गुरुवार, 10/15/2015 - 19:37
ता.क.: जास्तीत जास्त लोकांना सहभागी होता यावे म्हणून लिखाण पाठवण्याची मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवून देत आहोत. कृपया आपले लिखाण लवकरात लवकर पाठवावे ही विनंती. लिखाण स्वीकारले आहे की नाही याबद्दल ५ नोव्हेंबरपर्यंत कळवू. धन्यवाद!
दंडवत स्वीकारावा ___/\___ !!

In reply to by सूड

आपल्या रेशिपीमुळं मी थांबलोय. नै तर नीलकांतकडे फायनल ड्राफ्ट केव्हाच पाठवला असता. अजून आपल्यासारखे मिपाकरांचे लेखन बाकी आहे, ते मी विसरलो नाही. वाट पाहतोय. बाकी, मिपावर एकही व्यंगचित्रे काढणारा एक मिपाकर नै याचं वैट वाटलं. :( -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे Sat, 10/31/2015 - 12:42
मिपावर एकही व्यंगचित्रे काढणारा एक मिपाकर नै याचं वैट वाटलं. डॉक्टर साहेब आम्ही चित्र काढलं तर त्या माणसाला व्यंग आहे असंच दिसतं. अजून व्यंगचित्र काय काढणार?

हरीहर Sun, 11/01/2015 - 00:13
दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याची मुदत संपली (जर पुन्हा एकदा मुदतवाढ नसेल तर!) आता दिवाळी अंकाचे वेध लागले आहेत.. आमच्या सारख्या वाचनमात्र लोकांसाठी अंक प्रकाशीत होण्यापूर्वी या धाग्याव्र किंवा नवीन धाग्याच्या स्वरुपात या अंकाची वैशिस्ट्ये, लेख, लेखक यांचि माहिति दिलीत तर उत्सुकता आणखी वाढेल, येणा-या अंकासाठी वातावरण निर्मिती देखील होईल असे वाटते.

In reply to by हरीहर

मिपाचा "दिवाळी अंक २०१५" प्रसिद्ध झाला आहे... उजव्या बाजूच्या कॉलममध्ये "मिसळपाववर स्वागत"च्या खाली असलेल्या दुव्याने त्याला उघडू शकाल.

In reply to by अन्या दातार

गुरुजींना गुढगा पण हवाय का मानेबरोबर? =)) रच्याकने गुरुजींचं दिवाळीभावंविश्वं कधी येणार. ;)

In reply to by प्रचेतस

अन्या दातारने हे गाणे शिकवल मला. रुणुझुणु रुणुझुणे रे "भ्रम"रा!! चालुद्या तुमचं निरर्थक बिनबुडी अत्मरंजन. भ्रमवाद etc etc.

सौंदाळा Fri, 09/04/2015 - 15:00
दिवाळी अंकाची वाट पाहत आहे. लेखक व अंक (मुखपृष्ठ, बाकी फॉर्मटींग, एडीटींग) तयार करणार्‍या सर्व मिपाकरांना शुभेच्छा. किती मेहनत करावी लागत असेल याची कल्पना आहे.

जव्हेरगंज गुरुवार, 09/17/2015 - 10:27
इच्छुक... रच्याकने, - दिवाळी अंक या मिपावरच्या आयडीला व्यनिद्वारे पाठवा. कुठे भेटेल हा आयडी?

समीर_happy go lucky Sat, 10/03/2015 - 18:53
तो acceptance किंवा rejectance चा वेगळा हो पण फक्त मिळाल्याचा नसतो का?? [मी फक्त चौकशी कास्रतो आहे, का कोण जाणे पण मला वाटतंय कि तुम्ही "जाब" समजताय]

In reply to by समीर_happy go lucky

मी चौकशीचं उत्तर देतोय. जाब कशाला समजेन मी? जाब वाटला असता तर उत्तर द्यायच्या भानगडीत सुद्धा पडलो नसतो :). मेल आला असेल तर मेल चा अ‍ॅक्सेस असणारे लोक्स उत्तर देतील.

रेवती Sun, 10/04/2015 - 01:18
मला एक पाकृ पाठवायची आहे, फराळाची! दिवाळीआधी इतक्या लवकर कसं काय करून ठेवायचं? कृती आधी पाठवून फोटू नंतर पाठवायला हरकत नाही पण मग जरासे बदल असले तर करता येत नाहीत.

In reply to by सस्नेह

रेवती Sun, 10/04/2015 - 07:48
काय चेष्टा करता का तै! जर नियम असेल तर पदार्थ दोनदा करणार.......आधी दिवाळी अंकासाठी व नंतर फराळासाचा जिन्नस म्हणून. पण हा प्रश्न सगळ्या पाकृवाल्यांना येणार असे वाटते.

संपादक मंडळ गुरुवार, 10/15/2015 - 09:23
ता.क.: जास्तीत जास्त लोकांना सहभागी होता यावे म्हणून लिखाण पाठवण्याची मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवून देत आहोत. कृपया आपले लिखाण लवकरात लवकर पाठवावे ही विनंती. लिखाण स्वीकारले आहे की नाही याबद्दल ५ नोव्हेंबरपर्यंत कळवू. धन्यवाद!

माम्लेदारचा पन्खा गुरुवार, 10/15/2015 - 19:37
ता.क.: जास्तीत जास्त लोकांना सहभागी होता यावे म्हणून लिखाण पाठवण्याची मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवून देत आहोत. कृपया आपले लिखाण लवकरात लवकर पाठवावे ही विनंती. लिखाण स्वीकारले आहे की नाही याबद्दल ५ नोव्हेंबरपर्यंत कळवू. धन्यवाद!
दंडवत स्वीकारावा ___/\___ !!

In reply to by सूड

आपल्या रेशिपीमुळं मी थांबलोय. नै तर नीलकांतकडे फायनल ड्राफ्ट केव्हाच पाठवला असता. अजून आपल्यासारखे मिपाकरांचे लेखन बाकी आहे, ते मी विसरलो नाही. वाट पाहतोय. बाकी, मिपावर एकही व्यंगचित्रे काढणारा एक मिपाकर नै याचं वैट वाटलं. :( -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे Sat, 10/31/2015 - 12:42
मिपावर एकही व्यंगचित्रे काढणारा एक मिपाकर नै याचं वैट वाटलं. डॉक्टर साहेब आम्ही चित्र काढलं तर त्या माणसाला व्यंग आहे असंच दिसतं. अजून व्यंगचित्र काय काढणार?

हरीहर Sun, 11/01/2015 - 00:13
दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याची मुदत संपली (जर पुन्हा एकदा मुदतवाढ नसेल तर!) आता दिवाळी अंकाचे वेध लागले आहेत.. आमच्या सारख्या वाचनमात्र लोकांसाठी अंक प्रकाशीत होण्यापूर्वी या धाग्याव्र किंवा नवीन धाग्याच्या स्वरुपात या अंकाची वैशिस्ट्ये, लेख, लेखक यांचि माहिति दिलीत तर उत्सुकता आणखी वाढेल, येणा-या अंकासाठी वातावरण निर्मिती देखील होईल असे वाटते.

In reply to by हरीहर

मिपाचा "दिवाळी अंक २०१५" प्रसिद्ध झाला आहे... उजव्या बाजूच्या कॉलममध्ये "मिसळपाववर स्वागत"च्या खाली असलेल्या दुव्याने त्याला उघडू शकाल.
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार मिपाकर हो, गेल्या ३ वर्षातील यशस्वी दिवाळी अंकाप्रमाणे आपण याही वर्षी आपल्या मिपाचा दिवाळी अंक काढणार आहोत तेव्हा आपल्या कविता, व्यंगचित्र, कथा, दीर्घकथा, विडंबने, माहितीपूर्ण लेखन, मुलाखती, विनोदी लेखन, प्रवासवर्णने, पाककृती, इत्यादि सर्व प्रकारचे लेखन दिनांक १५/१०/२०१५ पर्यंत वर्ड फाईल असेल तर mipa.sampadak@gmail.com या स्वतंत्र ईमेल आयडीला ईमेलद्वार किंवा दिवाळी अंक या मिपावरच्या आयडीला व्यनिद्वारे पाठवा. जास्त चित्रे असतील तर शक्यतो gmail आयडीला पाठवावे ही विनंती.

असं खेळा ऑनलाइन बुद्धीबळ

बहुगुणी ·

प्रचेतस Sun, 12/28/2014 - 23:19
धन्यवाद बहुगुणी ह्या धाग्याबद्दल. आपण केलेल्या सूचनांनुसार आताच बिरुटे सर आणि माझी प्रायोगिक तत्वांवरील मॅच संपन्न झाली. खेळात जाम धमाल आली.

In reply to by प्रचेतस

बहुगुणी Sun, 12/28/2014 - 23:33
प्रेक्षक म्हणून मीही मॅच एंजॉय केली. (यापुढील प्रतिसाद बुद्धीबळ प्रेक्षक, समालोचक, प्रतिसादकर्ते या धाग्यात आले तर हा 'असं खेळा बुद्धीबळ' धागा केवळ सूचनांसाठी वाचनमात्र ठेवता येईल.)

प्रचेतस Sun, 12/28/2014 - 23:19
धन्यवाद बहुगुणी ह्या धाग्याबद्दल. आपण केलेल्या सूचनांनुसार आताच बिरुटे सर आणि माझी प्रायोगिक तत्वांवरील मॅच संपन्न झाली. खेळात जाम धमाल आली.

In reply to by प्रचेतस

बहुगुणी Sun, 12/28/2014 - 23:33
प्रेक्षक म्हणून मीही मॅच एंजॉय केली. (यापुढील प्रतिसाद बुद्धीबळ प्रेक्षक, समालोचक, प्रतिसादकर्ते या धाग्यात आले तर हा 'असं खेळा बुद्धीबळ' धागा केवळ सूचनांसाठी वाचनमात्र ठेवता येईल.)
लेखनविषय:
लेखनप्रकार
असं खेळा ऑनलाइन बुद्धीबळ

संपादकीय

पैसा ·
नमस्कार मंडळी! मिपाचा तिसरा दिवाळी अंक तुमच्या हातात देताना अर्थातच प्रचंड आनंद होतो आहे. गेल्या २ वर्षात चालू राहिलेली परंपरा अशीच पुढे चलू राहिली पाहिजे म्हणून या वर्षीही दिवाळी अंकाच्या कामाला सुरुवात केली, नेहमीपेक्षा जरा लौकरच! त्यातच छायाचित्रणकलेच्या १७५ वर्षाच्या वाढदिवसानिमित्त छायाचित्रांची स्पर्धा सुरू केली तिलाही उदंड प्रतिसाद मिळाला! आतापर्यंत ३ स्पर्धा यशस्वीरीत्या आयोजित केल्या त्यातल्या दुसर्‍या स्पर्धेतील विजेत्या चित्रांचा समावेश या दिवाळी अंकात केला आहे.

आयुर्हित Mon, 10/20/2014 - 22:22
ही दिवाळी आणि येणारे नवीन विक्रम संवत् २०७०-७१ सर्व लेखक वाचकांना सहकुटुंब, सहपरिवार आनंद, यश, सुखसमृद्धी, धनधान्यसंपत्ती आणि आरोग्याने परिपूर्ण तसेच उत्तमोत्तम लेखन-वाचनानंदाचे जावो, हीच हार्दिक शुभेच्छा!

In reply to by आयुर्हित

एस Tue, 10/21/2014 - 12:43
बाकी दिवाळी अंक छान झाला आहे. सवडीने एकेका लेखाचा फडशा पाडण्यात येईल.. ;-)

In reply to by एस

बहुगुणी Tue, 10/21/2014 - 16:18
सरळ-साधं, भीडणारं संपादकीय आवडलं. संपादकीयापासून सुरूवात केली आहे, आता सवडीने एकेका लेखाचा फडशा पाडणार. बाकी पैसाताई: ते "सर्वाँनाच" कसं काय टंकलं म्हणे? :-)

सविता००१ Tue, 10/21/2014 - 12:09
मस्त. यानिमित्ताने सर्व मिपाकरांना ही दीपावली व येणारे नवीन वर्ष सौख्याचे, भरभराटीचे जावो ही शुभेच्छा!

समीरसूर Tue, 10/21/2014 - 15:11
अंक उठावदार झाला आहे. सगळ्यांचे मनापासून अभिनंदन! सर्व मिपाकरांना दिवाळीच्या असंख्य शुभेच्छा! ही दिवाळी सगळ्यांनाच आनंदाची आणि समाधानाची जावो ही सदिच्छा! --समीर

सौंदाळा Tue, 10/21/2014 - 15:40
संपादकीय वाचले आता बाकी दिवाळी अंकाचा फडशा पाडतो २ दिवसात. सर्व मिपा सदस्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

प्रभाकर पेठकर Tue, 10/21/2014 - 15:57
संपादकिय उत्तम जमून आले आहे. दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठाने मात्र जरा अपेक्षाभंग केला. मुखपृष्ठ अजून आकर्षक (सचित्र) हवे होते असे वाटते. दिवाळी अंकाच्या टिमने, वैयक्तिक कामांचा रेटा असतानाही, अतिशय मेहनत घेतली आहे हे जाणवते आहेच. त्या सर्व अदृष्य मेहनती सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि खूप खूप कौतुक. पुढच्या वर्षीच्या 'अनाहिता' दिवाळी अंकाला अनेक शुभेच्छा..! आता वाचतो.

मृत्युन्जय Tue, 10/21/2014 - 17:53
दिवाळी अंक सुंदरच झाला आहे. पीडीएफ स्वरुपात डाउनलोडता आला तर बरे होइल. अजुन एक म्हणजे दिवाळी अंकातले लेख नविन लेखन खाली पण दिसले तर बरे होइल. तिथुन जास्त लोक वाचतात.

रेवती Tue, 10/21/2014 - 18:17
उत्तम संपादकीय. अंक पाहून आनंद झाला. आता वेळ मिळताच वाचनाचा धडाका उडवण्यात येईल. फराळाचे पदार्थ खात दिवाळी अंक वाचणे हे परमसूख असते.

मुक्त विहारि Tue, 10/21/2014 - 19:06
नेहमीप्रमाणेच उत्तम लेख ह्या दिवाळी अंकात असतील ह्या खात्रीत आहे. निदान ह्या वर्षी तरी मिपा जास्त काळ बंद पडायला नको.

दिवाळी अंक मस्त दिसतोय. संपादकीय खासच. सर्व संपादक आणि दिवाळी अंकास हातभार लावणार्‍यांचे विशेष आभार आणि मिपाकरांना दिवाळीच्या अनेक शुभेच्छा!!

ही दिवाळी आणि येणारे नवीन विक्रम संवत् २०७०-७१ तुम्हा सर्व लेखक वाचकांना सहकुटुंब, सहपरिवार आनंद, यश, सुखसमृद्धी, धनधान्यसंपत्ती आणि आरोग्याने परिपूर्ण तसेच उत्तमोत्तम लेखन-वाचनानंदाचे जावो, हीच हार्दिक शुभेच्छा! हेच म्हणतो...

अजया Wed, 10/22/2014 - 01:19
दिपावलीच्या शुभेच्छा! संपादकीयपासुन अंक वाचायला सुरुवात करते,हळूहळू वाचणारे नाहीतर दिवाळीच्या फराळासारखा फडशा पाडला एका दिवसात तर परत दुसरा अंक काढावा लागेल! या अंकात अनाहितांनी मिळुन कथा लिहिलीये,पुढच्या वर्षी अनाहिताचा स्वतंत्र दिवाळीअंक, मिपाच्या अंकाबरोबर येऊ दे हा या नव्या संवत्सराचा संकल्प सोडुया!

In reply to by अजया

एस Wed, 10/22/2014 - 12:09
अनाहिताचा स्वतंत्र दिवाळीअंक हा फक्त अनाहितांसाठीच ठेवणार की सर्वांना वाचायला खुला करणार? :-) काही असो, आगावू शुभेच्छा देऊन ठेवतो!

सुधीर Wed, 10/22/2014 - 08:10
अरे वा, उत्तम सुरुवात! दीपावलीच्या सर्व मिपाकरांना अनेकोत्तम शुभेच्छा!!

अनन्न्या Wed, 10/22/2014 - 10:43
या वर्षी प्रत्यक्ष सहभागी होता आले नाही. आता वाचायला सुरूवात! सर्व मिपाकरांना दिवाळीच्या खूप साय्रा शुभेच्छा!

नंदन Wed, 10/22/2014 - 12:34
नेटके संपादकीय आवडले. अंकातला पेठकरकाकांचा नर्मविनोदी शैलीतला लेख वाचला. मस्त जमून आला आहे. बाकीचेही निवांत वाचतो. सार्‍या मिपाकरांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

विकास Wed, 10/22/2014 - 20:01
दिवाळीच्या सर्व मिपाकर आणि त्यांच्या कुटूंबियांना शुभेच्छा! संपादकीय आवडले आणि त्यात घेतलेला आढावा देखील! :)

धर्मराजमुटके Wed, 10/22/2014 - 20:42
पलीकडच्या संस्थळावर केली तीच मागणी इथेही करतो. पीडीएफ आवृत्ती कधी देणार ? स्वतंत्र धाग्याप्रमाणे दिसणार्‍या दिवाळी अंकाच्या वाचनाची मजा येत नाही. जोपर्यंत पीडीएफ आवृत्ती येणार नाही तोपर्यंत वाचणार नाही.

गवि Mon, 10/27/2014 - 11:03
प्रतिसाद द्यायला उशीरच झाला. अंक उत्तम जमला आहे. भरपूर साहित्य आलं यावर्षी. पैसाताईने भरपूर कष्ट घेतले आणि नीलकांत, प्रशांत यांनी सतत या कामात भाग घेऊन सर्व तांत्रिक वायरी नटबोल्ट उत्तम हाताळले. सर्व संपादक आणि या कामात सहभागी सदस्यांचे अभिनंदन. हा उपक्रम असाच अखंड चालू राहील..

खुशि Tue, 11/04/2014 - 13:19
संपादकीय सुरेखच आहे दिवाळीत मी घरी नव्हते,महाराजपुर ते ऊकारेश्वर नर्मदातटाकीची पदयात्रा केली.७५० कि.मि.घराबाहेरील दिवाळी हा वेगळाच अनुभव होता.दिवाळीअंकातील लेख आता वाचेन.

सखी Wed, 11/05/2014 - 23:27
मुखपृष्ठाची जिओ मिपा रचना आधी लक्षातच आली नव्हती आज पीडीएफ लिंक उघडल्यावर पूर्ण रचना दिसली/कळली, अतिशय समर्पक आणि सुरेख झालयं मुखपृष्ठ. तसेच 'एकला चलो रे' ह्या शिषर्काखाली 'एक नाते – अनोखे' हा लेख परत दुस-यांदा आलाय वाटतं.

चौथा कोनाडा Sun, 11/09/2014 - 17:33
आटोपशीर, नेटके व सुरेख संपादकीय ! अंकासाठी झटणार्‍या 'कला'वंताची ओळख झाली ! या कलाकारांचे आम्हा दिवाळी अंक सहभागींतर्फे मनापसून आभार !

आयुर्हित Mon, 10/20/2014 - 22:22
ही दिवाळी आणि येणारे नवीन विक्रम संवत् २०७०-७१ सर्व लेखक वाचकांना सहकुटुंब, सहपरिवार आनंद, यश, सुखसमृद्धी, धनधान्यसंपत्ती आणि आरोग्याने परिपूर्ण तसेच उत्तमोत्तम लेखन-वाचनानंदाचे जावो, हीच हार्दिक शुभेच्छा!

In reply to by आयुर्हित

एस Tue, 10/21/2014 - 12:43
बाकी दिवाळी अंक छान झाला आहे. सवडीने एकेका लेखाचा फडशा पाडण्यात येईल.. ;-)

In reply to by एस

बहुगुणी Tue, 10/21/2014 - 16:18
सरळ-साधं, भीडणारं संपादकीय आवडलं. संपादकीयापासून सुरूवात केली आहे, आता सवडीने एकेका लेखाचा फडशा पाडणार. बाकी पैसाताई: ते "सर्वाँनाच" कसं काय टंकलं म्हणे? :-)

सविता००१ Tue, 10/21/2014 - 12:09
मस्त. यानिमित्ताने सर्व मिपाकरांना ही दीपावली व येणारे नवीन वर्ष सौख्याचे, भरभराटीचे जावो ही शुभेच्छा!

समीरसूर Tue, 10/21/2014 - 15:11
अंक उठावदार झाला आहे. सगळ्यांचे मनापासून अभिनंदन! सर्व मिपाकरांना दिवाळीच्या असंख्य शुभेच्छा! ही दिवाळी सगळ्यांनाच आनंदाची आणि समाधानाची जावो ही सदिच्छा! --समीर

सौंदाळा Tue, 10/21/2014 - 15:40
संपादकीय वाचले आता बाकी दिवाळी अंकाचा फडशा पाडतो २ दिवसात. सर्व मिपा सदस्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

प्रभाकर पेठकर Tue, 10/21/2014 - 15:57
संपादकिय उत्तम जमून आले आहे. दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठाने मात्र जरा अपेक्षाभंग केला. मुखपृष्ठ अजून आकर्षक (सचित्र) हवे होते असे वाटते. दिवाळी अंकाच्या टिमने, वैयक्तिक कामांचा रेटा असतानाही, अतिशय मेहनत घेतली आहे हे जाणवते आहेच. त्या सर्व अदृष्य मेहनती सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि खूप खूप कौतुक. पुढच्या वर्षीच्या 'अनाहिता' दिवाळी अंकाला अनेक शुभेच्छा..! आता वाचतो.

मृत्युन्जय Tue, 10/21/2014 - 17:53
दिवाळी अंक सुंदरच झाला आहे. पीडीएफ स्वरुपात डाउनलोडता आला तर बरे होइल. अजुन एक म्हणजे दिवाळी अंकातले लेख नविन लेखन खाली पण दिसले तर बरे होइल. तिथुन जास्त लोक वाचतात.

रेवती Tue, 10/21/2014 - 18:17
उत्तम संपादकीय. अंक पाहून आनंद झाला. आता वेळ मिळताच वाचनाचा धडाका उडवण्यात येईल. फराळाचे पदार्थ खात दिवाळी अंक वाचणे हे परमसूख असते.

मुक्त विहारि Tue, 10/21/2014 - 19:06
नेहमीप्रमाणेच उत्तम लेख ह्या दिवाळी अंकात असतील ह्या खात्रीत आहे. निदान ह्या वर्षी तरी मिपा जास्त काळ बंद पडायला नको.

दिवाळी अंक मस्त दिसतोय. संपादकीय खासच. सर्व संपादक आणि दिवाळी अंकास हातभार लावणार्‍यांचे विशेष आभार आणि मिपाकरांना दिवाळीच्या अनेक शुभेच्छा!!

ही दिवाळी आणि येणारे नवीन विक्रम संवत् २०७०-७१ तुम्हा सर्व लेखक वाचकांना सहकुटुंब, सहपरिवार आनंद, यश, सुखसमृद्धी, धनधान्यसंपत्ती आणि आरोग्याने परिपूर्ण तसेच उत्तमोत्तम लेखन-वाचनानंदाचे जावो, हीच हार्दिक शुभेच्छा! हेच म्हणतो...

अजया Wed, 10/22/2014 - 01:19
दिपावलीच्या शुभेच्छा! संपादकीयपासुन अंक वाचायला सुरुवात करते,हळूहळू वाचणारे नाहीतर दिवाळीच्या फराळासारखा फडशा पाडला एका दिवसात तर परत दुसरा अंक काढावा लागेल! या अंकात अनाहितांनी मिळुन कथा लिहिलीये,पुढच्या वर्षी अनाहिताचा स्वतंत्र दिवाळीअंक, मिपाच्या अंकाबरोबर येऊ दे हा या नव्या संवत्सराचा संकल्प सोडुया!

In reply to by अजया

एस Wed, 10/22/2014 - 12:09
अनाहिताचा स्वतंत्र दिवाळीअंक हा फक्त अनाहितांसाठीच ठेवणार की सर्वांना वाचायला खुला करणार? :-) काही असो, आगावू शुभेच्छा देऊन ठेवतो!

सुधीर Wed, 10/22/2014 - 08:10
अरे वा, उत्तम सुरुवात! दीपावलीच्या सर्व मिपाकरांना अनेकोत्तम शुभेच्छा!!

अनन्न्या Wed, 10/22/2014 - 10:43
या वर्षी प्रत्यक्ष सहभागी होता आले नाही. आता वाचायला सुरूवात! सर्व मिपाकरांना दिवाळीच्या खूप साय्रा शुभेच्छा!

नंदन Wed, 10/22/2014 - 12:34
नेटके संपादकीय आवडले. अंकातला पेठकरकाकांचा नर्मविनोदी शैलीतला लेख वाचला. मस्त जमून आला आहे. बाकीचेही निवांत वाचतो. सार्‍या मिपाकरांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

विकास Wed, 10/22/2014 - 20:01
दिवाळीच्या सर्व मिपाकर आणि त्यांच्या कुटूंबियांना शुभेच्छा! संपादकीय आवडले आणि त्यात घेतलेला आढावा देखील! :)

धर्मराजमुटके Wed, 10/22/2014 - 20:42
पलीकडच्या संस्थळावर केली तीच मागणी इथेही करतो. पीडीएफ आवृत्ती कधी देणार ? स्वतंत्र धाग्याप्रमाणे दिसणार्‍या दिवाळी अंकाच्या वाचनाची मजा येत नाही. जोपर्यंत पीडीएफ आवृत्ती येणार नाही तोपर्यंत वाचणार नाही.

गवि Mon, 10/27/2014 - 11:03
प्रतिसाद द्यायला उशीरच झाला. अंक उत्तम जमला आहे. भरपूर साहित्य आलं यावर्षी. पैसाताईने भरपूर कष्ट घेतले आणि नीलकांत, प्रशांत यांनी सतत या कामात भाग घेऊन सर्व तांत्रिक वायरी नटबोल्ट उत्तम हाताळले. सर्व संपादक आणि या कामात सहभागी सदस्यांचे अभिनंदन. हा उपक्रम असाच अखंड चालू राहील..

खुशि Tue, 11/04/2014 - 13:19
संपादकीय सुरेखच आहे दिवाळीत मी घरी नव्हते,महाराजपुर ते ऊकारेश्वर नर्मदातटाकीची पदयात्रा केली.७५० कि.मि.घराबाहेरील दिवाळी हा वेगळाच अनुभव होता.दिवाळीअंकातील लेख आता वाचेन.

सखी Wed, 11/05/2014 - 23:27
मुखपृष्ठाची जिओ मिपा रचना आधी लक्षातच आली नव्हती आज पीडीएफ लिंक उघडल्यावर पूर्ण रचना दिसली/कळली, अतिशय समर्पक आणि सुरेख झालयं मुखपृष्ठ. तसेच 'एकला चलो रे' ह्या शिषर्काखाली 'एक नाते – अनोखे' हा लेख परत दुस-यांदा आलाय वाटतं.

चौथा कोनाडा Sun, 11/09/2014 - 17:33
आटोपशीर, नेटके व सुरेख संपादकीय ! अंकासाठी झटणार्‍या 'कला'वंताची ओळख झाली ! या कलाकारांचे आम्हा दिवाळी अंक सहभागींतर्फे मनापसून आभार !

वाचता वाचता वाढे.....

पुस्तकमित्र ·

आतिवास Mon, 06/30/2014 - 22:21
कल्पना चांगली आहे. पण फक्त 'कादंबरी'पुरतं विश्व मर्यादित करण्याचा उद्देश समजला नाही. महिनाभरात जे काही वाचलं त्यावर लिहायचं असं ठरलं असतं तर जास्त सोपं झालं असतं लिहायला.

In reply to by आतिवास

पुस्तकमित्र Tue, 07/01/2014 - 09:44
ही फक्त सुरुवात आहे. साहित्यप्रकाराच्या विविध प्रकारांना स्पर्श करतच ही मालिका पुढे पुढे सरकत राहणार आहे. अर्थात आपणा सर्वांचे सहकार्य आवश्यक आहेच.

सुरुवात म्हणून कादंबरीचे नाव - आनंदी गोपाळ लेखक - श्री. ज. जोशी भारताबाहेर जाऊन पाश्चात्य वैद्यकशास्त्र शिकलेल्या डॉ. आनंदी बाई गोपाळ जोशी या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर. स्त्रियांनी शिक्षण घेणे हा सुद्धा जेव्हा गुन्हा समजला जात होता, त्या काळात नवऱ्याच्या हट्टामुळे प्राथमिक शिक्षणापासून ते पुढे वैद्यकीय पदवी मिळेपर्यंतचा प्रवास यात वाचायला मिळतो. गोपाळरावांच्या विक्षिप्तपणाचा त्यांना झालेला त्रास, तरीही जिद्दीने पूर्ण केलेले शिक्षण आणि दुर्दैवाने या सगळ्याला तोंड देताना ओढवलेला शेवट. पुस्तक वाचून आनंदी बाईंच्या प्रतीचा आदर अधिक दुणावतो. त्या काळातले स्त्रियांचे समाज जीवन, संघर्ष, गोपाळ रावांचे काळाच्या पुढचे विचार आणि तरीही अनेक बाबतीत दिसणारा दुराग्रहीपणा, सगळे काही सुन्न करून टाकते. मला आवडलेल्या पुस्तकांपैकी एक.

In reply to by पैसा

मस्त कलंदर गुरुवार, 07/03/2014 - 11:26
अगदीच काल्पनिक नसली तरी बरेचसे प्रसंग खोटे आहेत. अंजली कीर्तने यांनी त्यांच्या आनंदीबाई: काळ आणि कर्तृत्व या कादंबरीत ससंदर्भ लिहिले आहे.

In reply to by मस्त कलंदर

मधुरा देशपांडे गुरुवार, 07/03/2014 - 14:33
या कादंबरीविषयी माहिती नव्हती. आनंदीबाईंच्या व्यक्तिरेखेविषयी अजूनही वाचायला आवडेल. त्यामुळे कधी जमल्यास पुन्हा दोन्ही वाचेन. धन्यवाद.

शुचि Mon, 06/30/2014 - 23:23
"दॅट क्वेल रॉबर्ट" नावाचं १००-१५० पानी, छोटेखानी पण जबरदस्त पुस्तक वाचते आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महान असं पुस्तक आहे. अर्धे वाचून झाले आहे. डॉक्टर अन त्यांच्या पत्नी मिल्ड्रेड यांनी जंगलमय्/रानटी भागात घर घेतले. दोघांना पक्षी नीरीक्षणाची अतिशय आवड. एके दिवशी पहातात तो काय क्वेल मादी व क्वेल(quail) नर दोघे खुरडत खुरडत, जखमी असल्यासारखे चालले आहे. ताबडतोब त्यांच्या लक्षात आले की निसर्गातील पालकांच्या अतिव शौर्याचे उदाहरण ते पहात आहेत. आपल्या पिलांवर लक्ष जाऊ नये म्हणून हे दोघं क्वेल स्वतःकडे लक्ष वेधून घेत होते. मग डॉक्टर व मिल्ड्रेड सुरक्षित अंतरावर गेले अन क्वेल आई तिच्या १२ पिलांना घेऊन गेली. पण गंमत ही झाली की क्वेलच्या चिमुकल्या व व्यवस्थित लपवलेल्या घरट्यात त्यांना एक अंडे सापडले. ते अंडे त्यांनी दिव्याच्या ऊबेत्/प्रकाशात ठेवले असता ते ऊबले, फुटले व इवलसं ओलं बंबलबी च्या आकाराचं पिलू अंडं फोडून बाहेर आलं. १५ मिनीटात ते पटापट सुकलं अन आक्रोडाच्या आकाराचं दिसू लागलं. त्याचं नाव त्यांनी ठेवलं बॉबी व्हाईट. पण मग अजून भारदस्त नाव हवं म्हणून ते "रॉबर्ट" या नावात बदललं. मग या दांपत्याने रॉबर्ट्पाशी लहान वाटुलीत दाणा-पाणी ठेवले.आता कोणाला वाटेल की पिलाला जबरदस्तीने खायला घातलं असेल पण नाही हे पिलू ८ तासानंतर स्वतःचे स्वतः खाऊ-पीऊ लागले. फक्त एकदाच त्याला मदत लागली ती म्हणजे त्याची चोच पहील्यांदा पाण्यात बुडवायला. मग मात्र ते स्वावलंबी झाले. मग त्या पिलाचे स्वभाववैशिष्ट्य, गुणविशेष सगळे पुस्तकातून उलगडू लागतात अन एका क्वेलला किती अक्कल असते, माया असते, लळा असतो इतकेच काय आवडीनिवडी/ पसंत-नापसंत असते ते वाचून थक्क व्हायला होते. हळूहळू रॉबर्ट्ला सुंदर ठीपक्या ठीपक्यांची पिसे आली, तो वयात आला, वगैरे मोहक्/रोचक वर्णने येतात. पुस्तक अक्षरक्षः खाली ठेववत नाहीये. अ‍ॅमेझोनवर ६६ - ५ चांदण्या मिळालेले हे पुस्तक नशीबाने ग्रंथालयात "चकटफू" विभागात मिळाले. बसमध्ये, घरात, ऑफीसात लंच टाइम मध्ये वाचन सुरु आहे.

In reply to by आतिवास

एस Wed, 07/02/2014 - 19:42
फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमॅझॉन दोन्हींवर उपलब्ध आहे. फ्लिपकार्टवर महाग आहे. दुवे - http://www.flipkart.com/that-quail-robert/p/itmczyn6bphxd6xu?pid=9780060812461&otracker=from-search&srno=t_1&query=that+quail+robert&ref=ce523a93-e6e0-440c-bf35-4fa5130ff2cb http://www.amazon.in/That-Quail-Robert-Margaret-Stanger/dp/006081246X/ref=sr_1_1?ie=UTF8&qid=1404310224&sr=8-1&keywords=that+quail+robert

योगविवेक Tue, 07/01/2014 - 00:44
... वाचता वाचता वाढे... मित्रांनो, नुकतीच अंधार छाया कादंबरी वाचली.आवडली. लेखक - मिपाकरांच्या परिचयाचे. शशिकांत ओक. विषय - अर्थात ऑकल्ट सायन्सेस... ही छोटेखानी कादंबरी ईबुक म्हणून उपलब्ध. पाने फक्त ७०-७५. समर्पक मुखपृष्ठ संकल्पना... कादंबरीतील अंधार छायेला रेखाटणारी... कादंबरी सत्य घटनेवर आधारित असा लेखकाचा दावा. त्याला पूरक त्यातील पात्रे व व्यक्तिरेखा प्रत्यक्ष कशा आहेत त्यांचे फोटो व सध्याचे जीवनयापन या बाबी कादंबरी वाचकांना नाविन्यपुर्ण आहेत. बलस्थाने- १. बोली भाषेतील घरगुती संवाद, २. आत्मकथन शैलीमुळे व्यक्तीरेखेच्या मनातील संवादातून कथानक पुढे सरकवायची लेखकाची खुबी. ३. विचित्र घटनांचे आवेग, त्यातून फुलणारे नाट्यमय प्रसंग हाताळताना निर्माण भावनांचा कल्लोळ. ४. या अकल्पित घटनांमागील कार्यकारण भाव शोधणारी दादा व्यक्तिरेखा अनेक अंगांनी पुढे येते . ५. जपसाधना करणे ही फावल्या वेळातील म्हातारपणचा विरंगुळा नसून योग्य प्रकारे केल्यास अनाकलनीय शक्तींचा यशस्वी प्रतिकार करता येतो याची प्रचीती देणारे विचार व अनुभव श्रद्धा आणि सबूरीला बळकटी देतात. ६. लेखकाचे मनोगत बरेच काही व्यक्तिगत जीवना बद्दल सांगून जाते. दुर्बल स्थान - सुरवातीला संथपणा व पात्रांची ओळख गोंधळात टाकणारी. यावर तोड म्हणून लेखकाने पात्रांची ओळख मनोगत प्रस्तावनेत करून दिली आहे. रंजक व विचार करायला लावणारी वैशिष्ट्य पूर्ण कादंबरी...

अर्धवटराव Tue, 07/01/2014 - 10:06
गिरीश कुबेरांचं "युद्ध जीवांचे"... तसं बरच काहि सांगता येईल पुस्तकाबद्दल. एका वाक्यात सांगायचं तर बारुदच्या ढिगावर बसुन मक्याची कणसं भाजत बसणार्‍या आजच्या जगाची कहाणी आहे ति. जैवीक अस्त्रांचं संशोधन, गेल्या शतकभरातला त्यांचा वापर, अगदी गल्लीबोळातल्या दादा लोकांपर्यंत त्यांचा वापर, रासायनीक युद्धं व प्रदुषण... सर्वच एकदम खतरनाक.

आतिवास Tue, 07/01/2014 - 16:31
ही छोटेखानी (फक्त ६३ पानं) कादंबरी वाचून झाली. मूळ कादंबरी "नग्न रुख" (ओ.पी. शर्मा 'सारथि') डोगरी भाषेत आहे. इंग्रजी अनुवाद श्री. शिवनाथ यांनी केला आहे. या कादंबरीत रुढार्थाने पात्रं नाहीत आणि पारंपारिक शैलीतली वर्णनंही नाहीत. आहेत त्या एकामागोमाग घडणा-या घटना; त्या घटनांबद्दल प्रश्न निर्माण करणारा भारत (कादंबरीमधली व्यक्तिरेखा). जणू आपला सभोवताल आणि आपली जाणीव यांची ही दोन्ही प्रतीकं. काहीकाही आठवतं. वाचलेलं; पाहिलेलं; अनुभवलेलं; घुसमट करणारं; दंगली, बॉम्बस्फोट यांच्यातून तगताना हतबल करणारं – काहीतरी जे लिंपून टाकलंय आपण सगळ्यांनी, पण अविरत आपला हिस्सा असणारं! जे प्रश्न विचारतं राहतं... ते .. आपल्यामधलं एक आवर्तन.. विस्तारभयास्तव अधिक लिहित नाही. 'राग दरबारी' या माझ्या अत्यंत आवडत्या हिंदी कादंबरीबद्दल मी यापूर्वी इथं लिहिलं आहे. बाकी अजून सांगण्याजोगं पुष्कळ आहे - नंतर सांगते :-)

प्रचेतस Tue, 07/01/2014 - 16:41
जैत रे जैत.. गोनीदांच्या कर्नाळा किल्ल्याच्या पार्श्वभूमीवरील ही छोटेखानी पण तितकीच प्रभावी कादंबरी. चित्रपटापेक्षा तर कितीतरी सुंदर. ठाकरांच्या जीवनशैलीचे मनोज्ञ दर्शन गोनीदांनी आपल्या चित्रदर्शी शैलीत सादर केले आहे. नाग्या, चिंधी हे कथानायक्/नायिका तर अक्षरशः मनावर गारूड करून राहतात. ह्या कादंबरीतला एक सुंदर उतारा देतो. पावसकाळातल्या कर्नाळ्याचे बदललेल्या दर्शनाचे वर्णन करत असताना गोनीदा कसे आपल्या लेखणीचेही सौंदर्य प्रकट करतात ते पहा. हे दोन अडीच महिने डोंगराचं दर्शन होणे कठीण. महादेवाचं ध्यान सुरू आहे. तो डोळे मिटून चिंतना करतोय. सगळीकडे पाऊस पडला की नाही. सगळी रानं जोगवली की नाही. अवघी धरित्री भिजली की नाही. कुठं उणं राहिलं असेल, तर त्या अंगाला तो मेंघांना पाठवतो. त्याच्यापाशी लई मेघ. त्याच्या दाराशी हुकमाची वाट पाहात ते उभे असतात. त्याच्या ध्यानात पटदिशी येतं, का अमुक एका डोंगराच्या घळीत पाऊस झाला नाही. तिथले ओढेनाले वाहिले नाहीत. खाचरं पाण्यानं तुडुंब भरली नाहीत. त्या रानचे बेडूक बोलू लागले नाहीत. तिथं काजवे लुक्लुकू लागले नाहीत. तिथल्या कड्यांना गवतं वाढली नाहीत. कड्यांच्या पोटांशी भारंगीचे ठोंब उगवले नाहीत. चवेणीच्या कंदांना हिरवी पानं धरली नाहीत. त्या रानाला अजून भुईकमळं दिसू लागली नाहीत. मग महादेव ढगांचा ताफाच्या ताफाच तिकडे धाडतो. ढग तिकडे सरू लागतात. कधी घाईघाईनं. एकापाठोपाठ एक. कधी एकमेकांच्या अंगावर कोसळत. कधी सावकाश. चुकार कामकर्‍यासारखे. पण शेवटी ते तिथं पोचतात. बरसायला लागतात. न बरसून करतील काय? टंगळमंगळ केली तर महादेवाचा बिजलीचा चाबूक काडदिशी पाठीत बसतो. केवढा आवाज होतो. डोंगर गदगदा हलू लागतात. अशा रीतीनं चहू अंगांना पाऊस पडतो. मग महादेवाच्या ध्यानी येतं, की आता चहूकडे हिरवं झालं आहे. गाईगुजी जोगवू लागल्या आहेत. शेरडं चरू लागली आहेत. खाचरं जळानं तुडुंबलेली आहेत. भाताचे लोंबे जळाच्या साईवर डोकी उचलीत आश्चर्यानं चहूदिशांना बघू लागले आहेत. असं अवघं शांत झालं आहे. मग हळूहळू महादेव ध्यानातून बाहेर येतो. ध्यानाला बसला तेव्हा तो जख्ख म्हातारा होता. ध्यानातून बाहेर येतो तेव्हा तो जवान होऊन येतो. डुईवरचे केस पुन्हा हिरवेगार झालेले असतात. पापण्या पुन्हा ताज्यातवान्या झालेल्या असतात. तो आपल्या डुईत भुईकमळं खोचतो. रंगारंगाची. बहुधा सगळी गुलाबीतांबडी. पण महादेवाला पांढरा रंग आवडतो. म्हणून तो काही पांढरी भुईकमळं अंगावर वागवतो. असा तो कोवळा दरदरीत दिसू लागतो. त्याच्या अंगावरून गंगाबाई खाली उतरत असते. कुठं टंगळमंगळ करीत. कुठं धावत धडपडत. मग तो डुईवर एखाद दुसर्‍या ढगाची चिंधुकली वागवतो, तेवढंच. यापलीकडे मग बाकी ढगांना तो दूरच्या गंगनी धाडून देतो. पावसकाळाभर महादेवाच्या गळ्यातला मधमाशांच्या पोळ्यांचा हार गडचीप असतो. पावसकाळा उलटला, की मग त्यांचं गाणं सुरू होतं. ते गुंग गाणं काही फार मोठ्यानं ऐकू येत नाही. पण तरी हजारपाचशे माशी एक्या ठायी झाली, की मग चांगला घुमारा ऐकू येतो. कधी त्या गंगनात तिथल्या तिथं गाणं म्हणत घुमतात. कधी नाच करतात.

In reply to by प्रचेतस

सागर Mon, 07/07/2014 - 00:19
अतिशय सुंदर प्रकटन वल्ली मित्रा
तितकीच प्रभावी कादंबरी. चित्रपटापेक्षा तर कितीतरी सुंदर.
याबद्दल पूर्ण सहमत. आकार छोटा असूनही कादंबरी जे चित्र वाचकांसमोर उभे करते ते खरोखर अफलातून आहे. चित्रपटही सुंदर झाला आहे, पण वाचनानंद जास्त सुंदर आहे.

In reply to by सागर

कवितानागेश Mon, 07/07/2014 - 09:22
चित्रपटात फक्त स्मिता पाटील असल्यानी तो बघवतो, असं माझं टोकाचं मत आहे. ती बरोब्बर 'चिन्धी' दिसते. बाकीचे सगळे 'शहरी' दिसतात. आपण 'ठाकरं' बघतोय असं वाटत नाही. कादंबरी सुंदरच आहे. कधीही हातात घेउन कुठूनही वाचायला सुरुवात करता येते.

Gayatri Muley Wed, 07/02/2014 - 11:10
हर्षदा भुरे यांची अबोल नात ही एक अतिशय सुंदर मनोरमा प्रकाशनाची कादांबरी. 100-150 पानी च असेल, पण मनाला भावून टाकनारी...!!!! मी तर हातात घेतली अन् 5-6 तासात संपवून टाकली होती... तुम्हाला ही मिळाली तर नक्की वाचा....

In reply to by Gayatri Muley

आतिवास Wed, 07/02/2014 - 19:33
हं! मराठीतले नवे लेखक-लेखिका फारसे माहिती नसतात आजकाल मला. त्यामुळे हे नाव नवे आहे माझ्यासाठी!

विकास Wed, 07/02/2014 - 19:50
कादंबरी विषय असल्याने गंगाधर गाडगीळांनी लिहीलेली "दुर्दम्य" ही चरीत्रात्मक लोकमान्य टिळकांवरील कादंबरी आठवली. दोन-तिनदा तरी वाचलेली आहे. प्रभावी लेखन आणि संशोधन/अभ्यासावर आधारीत आहे. दोन खंडात आधि मिळायची. मध्यंतरी अमेरीकेत येताना नव्याने एकाच पुस्तकात, ते देखील हार्डकव्हर मधे मिळाल्याने घेऊन आलो. नंतर पाहीले तर मधली काही पाने कोरी! :( दुसरी कादंबरी: "यज्ञ" - भा.द.खेर आणि शैलजा राजे यांनी एकत्रित लिहीलेली सावरकरांवरील चरीत्रात्मक कादंबरी. आठवते त्या प्रमाणे, सावरकरांच्या अखेरच्या काही वर्षांमधे त्यांनी त्यांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यावर आधारीत "आत्मकथन" स्टाईल मधे लिहीलेली कादंबरी आहे. दोन्ही वास्तवाला धरून आहेत.

विकास Wed, 07/02/2014 - 20:06
गेल्या काही वर्षात वाचलेली एक कादंबरी म्हणजे, "हंगर गेम्स"! लेकीच्या आग्रह केला म्हणून वाचली. वयात येणार्‍या मुलांना थ्रिलर वाटावी अशी कहाणी ज्यावरचा चित्रपट कदाचीत तुम्ही पाहीला असेल. पण एकंदरीतच हिंसा अंमळ जास्तच आणि अतिरंजीत वाटली. पण विशेष अर्थ न काढता, कल्पनाविष्कार म्हणून चांगली आहे. विज्ञान कादंबरी मालीका म्हणून आयझॅक अ‍ॅसिमोव्हची "फाउंडेशन" पुस्तक सांगेन. सायको हिस्ट्री, रोबोटीक्स अशा संकल्पना मांडत मांडत शेवटी "आपण सगळे एक आहोत" (वसुधैव कुटुंबकम) मानणार्‍या "गया" नामक तत्वज्ञानापर्यंत जाणारी कथा वाचण्यासारखी आहे. या लेखात मिपावरच अधिक लिहीले होते. "violence is the last refuge of the incompetent" हे त्यातले एक रोचक वाक्य. (त्यावर आधारीत नंतर "intellectual violence is the last refuge of the intellectually incompetent" असे म्हणले गेले. ;) आर्थर सी क्लर्कचे २००१ ए स्पेस ओडीसी पण वाचले नसल्यास अवश्य वाचा. स्पेस एक्स्प्लोरेशनच्या आधीचे कल्पनाशक्तीवर केलेले स्पेस एक्स्प्लोरेशन, महासंगणक हॅल ("HAL") आणि शेवटी कुठेतरी जन्म - मृत्यूचे चक्र मानण्याकडे वळलेले तत्वज्ञान वाचताना एकाकीपण येते. चित्रपट पहाताना देखील असेच होते.

In reply to by आदूबाळ

विकास Wed, 07/02/2014 - 20:29
हिचहायकर्स गाईड टू द गॅलेक्सी हे अजून वाचायचे राहीले आहे. आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद! :) अर्थात त्याची आणि फाउंडेशनची तुलना करू इच्छित नाही.

In reply to by एस

एस गुरुवार, 07/10/2014 - 14:11
'द गॉड ऑफ् स्मॉल थिंग्ज्'

     अरूंधती रॉय यांची ही एकोणिसशे सत्त्याण्णव सालची मॅन बुकर पारितोषिक विजेती इंग्रजी कादंबरी.

TheGodofSmallThings     कादंबरीतील मुख्य घटना घडतात १९६९ साली. पण जेव्हा कादंबरीतील पात्रांमधील दोन जुळ्या भावंडांपैकी 'राहेल' वयाच्या एकतिसाव्या वर्षी 'अयमेनम हाउस' या तिच्या आजोळच्या घरी परत येते तेव्हा कादंबरीची सुरुवात होते. राहेल आणि तिचा अठरा मिनिटांनी मोठा असलेला जुळा भाऊ 'एस्था' यांच्याभोवती आणि त्यांच्या भावविश्वात घडत राहणार्‍या छोट्यामोठ्या गोष्टींची दोलायमान गुंफण लेखिका तिच्या वाचकांभोवती विणत राहते. त्या दोघांच्या आणि प्रामुख्याने राहेलच्या सात-वर्षे-वयाच्या संवेदनशील नजरेतून आपल्यासमोर कादंबरीचा पट उलगडत जातो.

     पण असे असले तरी या कथानकाचा कर्ता प्रथमपुरुषी नाही. लेखिका एखाद्या मनस्वी चित्रकाराप्रमाणे फ्लॅशबॅक, लांबलेली उपकथानके, लहान मुलांना असते तेवढी समज आणि त्यातून त्यांना त्यांच्या निरागस नजरेने दिसणारे कठोर जग, त्यातून त्यांनी आपल्या परीने स्वतःच शिकलेले शहाणपण, तथाकथित मोठ्यांचा तितकाच दांभिक व्यवहारीपणा, भारताचा जातिव्यवस्थेच्या, स्पृश्यास्पृश्यतेच्या कठोर सामाजिक वास्तवाची आणि राजकीय-आर्थिक बदलांची सरमिसळ, त्यात होरपळणारे निर्दोष समाजघटक, वसाहतवादी इतिहासातून स्वातंत्र्यात येताना अ‍ॅन्ग्लोफाइल उच्चभ्रू वर्गाला भेडसावणारा त्रिशंकू सिंड्रोम, निसर्गाची मुक्त अर्थव्यवस्थेत येताना झालेली वाताहत आणि कादंबरीतील पात्रांच्या जीवनाच्या अवमूल्यनाशी याचा दिसणारा समांतरपणा या सगळ्या कथाबीजांचा, पात्रांचा, पार्श्वभूमीचा आणि लेखनतंत्राचा वापर करून काळाच्या पटलावर पुढेमागे तिच्या लेखणीचे स्वैर फटकारे मारीत राहते...

     कादंबरीच्या केंद्रस्थानी आहेत ही दोन जुळी भावंडे. त्याबरोबर कादंबरीत येणारी विविध पात्रे त्यांच्या अनावृत्त वृत्ती-प्रवृत्तींसह आणि कथानकातील घटनांच्या त्यांच्यावरील परिणामांसकट वाचकाला पदोपदी भेटतात. एस्था आणि राहेल यांची घटस्फोटीत तरूण आई 'अम्मू', त्यांचे रागीट आजोबा व सहनशील आजी, त्यांचा ऑक्सफर्डवरून शिकून परत आलेला आणि आजीचा व्यवसाय सांभाळणारा मामा 'चाको', त्याची पूर्वाश्रमीची इंग्लिश पत्नी 'मार्गारेट' आणि गोरीपान मुलगी 'सोफी', अविवाहित राहिलेली आणि त्यांच्याशी फणकार्याने वागणारी त्यांच्या आईची आत्या 'बेबी कोचम्मा', पोलिस निरीक्षक आणि मार्क्सिस्ट नेता अशी माणसे आणि सर्वात महत्त्वाचा या सगळ्यात त्यांच्याशी प्रेमळपणे वागणारी एकमेव व्यक्ती अस्पृश्य कामगार 'वेलुथा'.

     दारुड्या नवर्‍याला सोडून परत आलेली अम्मू आपल्या दोन मुलांसकट तिच्या माहेरी रहायला येते. तिच्या रागीट बापाला आणि आत्याला ते आवडलेले नसते. याचा परिणाम म्हणून त्यांचे अयमेनम हाउसमधील स्थान नेहमीच दुय्यम राहणार असते. अम्मूची अविवाहित आत्या बेबी कोचम्मा हिने कधी काळी 'नन' बनण्याचा प्रयत्न केलेला, पण त्या निर्णयामागे देवाची भक्ती नसून तिला तेव्हा भेटलेला कुणी फादर मुलिगन आणि तरूण नवोमीचे त्याच्याकडे आकर्षित होणे असते. हा प्रेमभंग नंतर तिचे कठोर व्यक्तिमत्त्व बनण्यास आणि अम्मूच्या मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यास कारणीभूत ठरणार असतो का? की त्यांचा मामा चाको आणि त्याचा विक्षिप्त गर्विष्ठपणा? चाको ऑक्सफर्ड विद्यापीठात शिकतानाच एका इंग्लिश वेट्रेसच्या, मार्गारेटच्या प्रेमात पडलेला असतो. पण मार्गारेटच्या पालकांना तिने एका काळ्याशी, भारतीयाशी लग्न करावे हे आवडलेले नसते. पण हे लग्नही जास्त टिकत नाही. चाको आणि मार्गारेटच्या मुलीच्या - सोफीचा जन्मानंतर ते विभक्त होतात. मार्गारेट गरोदर असतानाच दुसर्‍याच्या प्रेमात पडलेली असते. वैवाहिक आणि शैक्षणिक अपयश पदरात घेऊन चाको भारतात परततो ते घरचा लोणची बनवण्याचा व्यवसाय सांभाळायला. आता तो एक श्रीमंत उद्योजक म्हणून आपल्याला भेटतो. इकडे इपे कुटुंबाचा परंपरागत वृद्ध नोकर वेल्ल्या पापेन आणि त्याचा तरूण मुलगा वेलुथा हे त्यांना जातिव्यवस्थेने मिळालेली अस्पृश्यता आणि सामाजिक-आर्थिक व्यवस्थेतील खालचे स्थान सांभाळत जगत असतात. वेलुथा काहीसा बंडखोर आहे. तो मार्क्सवादी असल्याचा बेबी कोचम्माला आणि इन्स्पेक्टरला संशय आहे. त्यामुळे बेबी कोचम्माला वेलुथाबद्दल अनामिक भीती वाटतेय. तीच भीती जी सामर्थ्यवान घटकाला दुर्बल घटकांबद्दल सतत वाटत राहते, दुर्बल पुढेमागे सबल होऊन त्यांची सत्ता उलटून देतील अशी भीती. हीच भीती पुढे वेलुथाला आणि तो प्रेम करत असलेल्या जुळ्या भावंडांना व त्यांच्या तरूण आईला उद्ध्वस्त करणार असते का?

     त्या रात्री काय घडले? घुसमट आणि अन्याय यांपासून कुठले जीव पळू पाहत होते? कोणाच्या डोळ्यांनी अशी स्वप्ने पाहिण्याचे धाडस केले ज्या स्वप्नांना इतिहासाच्या नियमचौकटींची मान्यता नव्हती? कुठले चिमुकले हात त्या रात्री बोट उलटल्यावर अनोळखी पाण्यावर परत आले नव्हते? त्या अंधार्‍या झाडीत कोणाच्या डोळ्यांनी एक गुन्हा पाहिला होता ज्या गुन्ह्याचे साक्षीदार होण्याचे अपील परिस्थितीच्या न्यायव्यवस्थेने त्यांना झिडकारले होते? लहानग्या, शहाण्या एस्थाने उरलेल्या आयुष्यभर अबोलपणे वावरावे असे त्याला काय बोलायला लावले गेले साक्षीदाराच्या कठड्यात?

     गुन्हा काय होता? कोणी केला होता? कोणाला शिक्षा झाली आणि कोण मेले त्या रात्री?

 

     रॉय यांची लेखणी परंपरेने चालत आलेली लेखनाची चौकट नाकारते, उलटून लावते. त्यांची भाषा कधी अल्लड निरागसतेने कर्मठ वाचकांना त्रास देत व्याकरणाचे-शुद्धलेखनाचे नियम तोडते, तर कधी स्थितप्रज्ञाच्या गांभीर्याने इतिहासातून उतरलेले धागे विणत मानवी आयुष्याचा त्यासमोरचा क्षुद्रपणा दाखवत या नाट्यावर भाष्य करते. कादंबरीची पानेही पारंपारिक एकमार्गीपणा नाकारतात. यातील प्रत्येक भाग आणि प्रत्येक प्रसंग कालाच्या पटलावर एकसुरीपणे आपापली जागा घेत असला तरी कादंबरीत मात्र सर्व सोबतच येत राहते. मग तो त्र्याण्णव सालचा राहेल परत आल्यावर तिला दिसलेला अबोल एस्था असो वा एकोणसत्तरचा विमानतळावर सोफीमोल आणि मार्गारेटला आणायला जाणारा 'घरातील पुरुष' मुलगा एस्था असो. अभिलाष टॉकीजमध्ये साउंड ऑफ म्युजिक पाहताना ऑरेंजमॅन-लेमनमॅनकडून एस्थाचे होणारे लैंगिक शोषण किंवा वेलुथाला काहीही अपराध नसताना लाथाबुक्क्यांनी होणारी कोठडीतील मारहाण असो. या घटना आणि त्यानंतर येणारी मानवी आयुष्यांची वाताहत, उद्ध्वस्तता रॉय फ्लॅशबॅकमधून मागेपुढे रेखत जातात. त्यांच्या लेखणीत परिणाम आधी येतो आणि मग कारण. आणि जणू काही त्यांचा परस्परसंबंध अधोरेखित करत उरणारी अपरिहार्यता वाचकांच्या मनात सांडत जाते - लाइक टी फ्रॉम टीबॅग.

     अनेकांना हे पुस्तक आवडले नाही. कित्येकांना झेपलेही नाही. मलाही बर्‍याचदा वाचल्यानंतर आणि इतकी वर्षे डोक्यात घोळवल्यावर त्यावर चार शब्द लिहिता आलेत. अरूंधती रॉय यांची इतर मते व त्यांची वादग्रस्तता हा वेगळा विषय आहे. पण माझ्यापुरता माझ्या मनावर विलक्षण परिणाम करणारी ही मला सर्वात जास्त आवडणारी कादंबरी आहे.

In reply to by मितान

एस Fri, 07/11/2014 - 12:21
जितकं मनात होतं त्याच्या एक टक्काही नीट लिहिता आलं नाही! पण इतर कशासाठी नाही तर किमान यातील भाषेसाठीतरी 'द गॉड ऑफ् स्मॉल थिंग्ज्' नक्की वाचा.

बॅटमॅन गुरुवार, 07/03/2014 - 17:55
"द रिडल ऑफ लेबिरिंथ" नामक मार्गालिट फॉक्स या लेखिकेचे पुस्तक वाचले. लिनिअर बी या लिपीचा उलगडा करणार्‍या संशोधकांपैकी जॉन चॅडविकचे पुस्तक अगोदर वाचले होते, त्यानंतर त्याच विषयावरचे हे पुस्तक वाचले. बेशिक तेच तेच असले तरी अ‍ॅलिस कोबेर या भाषाशास्रज्ञ बाईंबद्दल पहिल्यांदा डीटेल माहिती यात मिळते. महायुद्धाच्या काळात कागद मिळेना म्हणताना लायब्ररीतील पुस्तकांच्या नेआणवाल्या स्लिपा, सिगरेटची पाकिटे, ग्रीटिंग कार्ड आणि वह्यांचे पुठ्ठे, इ.इ. जे काय मिळेल ते वापरून तिने जवळपास १,८०,००० छोटी नोंदकार्डे बनवली आणि लिनिअर बीचा जवळपास फडशाच पाडला. पण जॉन मायर्सची किरकीर, तसेच कॉलेजचा शिकवण्याचा लोड, इ.इ. लडतरींमुळे बिचारीला काही पुढं जाता आलं नाही. पण जे केलं त्याचा मायकेल व्हेंट्रिसला पुढं लै उपयोग झाला. अ‍ॅलिस कोबेरची नव्याने ओळख झाल्याचा लैच मोठा फायदा झाला या पुस्तकामुळे. आता नेक्ष्ट टार्गेट 'द मायसीनिअन वर्ल्ड' बाय जॉन चॅडविक. लिनिअर बीच्या जवळपास ६००० मृत्तिकालेखांतून आपल्याला काय काय माहिती मिळते त्याचा आढावा घेणारं पुस्तक आहे. अपोलो, पोसायडन, इ. देवांची नावे, ट्रॉयहून आणलेल्या गुलाम स्त्रिया, गुलामांना दिलेली अपमानजनक नावे, झालंच तर अकिलीसचे नाव कोरलेले मिळणे, इ.इ. बर्‍याच गंमतीजमती आहेत.

बॅटमॅन गुरुवार, 07/03/2014 - 18:01
"प्रिन्सेस-अ ट्रू स्टोरी बिहाईंड द व्हेल इन सौदी अरेबिया" हे जीन सॅसनचे पुस्तक मध्ये वाचले. सौदी राजघराण्यातल्या एका सुलताना नामक राजकन्येचे (नाव बदलून पण खर्रेखुर्रे) आत्मवृत्त आहे. काळ १९७० पासून पुढचा. नॉट विदौट माय डॉटर, सोन्याच्या धुराचे ठसके, मयादा, इ. पुस्तके वाचलेल्यांना काही नवीन नाही. पण राजघराण्यातील व्यक्तीच्या दृष्टिकोनातून तिथल्या स्त्रियांच्या पशुवत् स्थितीचे वर्णन कधी वाचले नव्हते ते या निमित्ताने वाचायला मिळाले. वर्णनशैली 'व्हिव्हिड" (मराठी?) आहे, खिळवून ठेवणारी आहे. बर्‍याच गोष्टींबद्दल आधी कुठेसे वाचले असले तरी इथे त्या एकदम अंगावर येतात. सौदी राजघराण्याची अगणित संपत्ती आणि शिवाय स्त्रियांवरच्या बंधनांमुळे येणार्‍या कंटाळ्याचे, रितेपणाचे वर्णन यथार्थ आहे. अशी वर्णने कैकदा डिसमिसिवली जातात, सुख टोचतंय इ.इ. म्हणून. पण त्यामुळे त्यांची सत्यता कमी होते असे मला तरी वाटत नाही. असो. सौदीमध्ये अलीकडे झालेले काही बदल त्या तुलनेने बरेच स्वागतार्ह आहेत. बाकी, जीन सॅसनबद्दल फ्रॉडचे आरोपही झालेत, तेव्हा किती खरेखोटे ते तो एक अल्लाच जाणे. पण पुस्तक रोचक आहे हे नक्की.

मधुरा देशपांडे गुरुवार, 07/03/2014 - 18:36
कदाचित अनेकांनी वाचली असेल तरीही अमृतवेल - वि. स. खांडेकर सगळ्यात पहिल्यांदा वाचली तेव्हा आवडली होती पण समजण्या एवढी कुवत नव्हती. पण तेव्हा आवडलेल्या ओळी, परिच्छेद हे एका वहीत किंवा डायरीत लिहून ठेवले जायचे. परत कधीतरी वहीतून हे संग्रहित साहित्य वाचून आनंद मिळायचा. अशीच एक वही वाचताना ही कादंबरी पुन्हा वाचावीशी वाटली. पुन्हा शोध घेऊन वाचली. तेव्हा ती अधिक समजली. आधी ज्या ओळी केवळ पुस्तकी किंवा आलंकारिक म्हणून जास्त आवडल्या होत्या, त्या नंतर वाचताना अधिक उमगल्या. वयानुसार आणि काळानुसार वेगळ्या दृष्टीने वाचली गेली. अनेक व्याख्या बदलल्या होत्या. पण तरीही आवडीच्या यादीत अजूनच फिट्ट बसली. त्यापैकीच काही निवडक देतेय…(आता ती वही राहिली नाही, ती लिहून ठेवायची सवयही नाही, तेव्हा आंतरजालावरून साभार) "भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही. मानवाचे मन केवळ भूतकाळाच्या साखळ दंडाने करकचून बांधून ठेवता येत नाही. त्याला भविष्याच्या गरुड पंखांचे वरदानही लाभले आहे. एखादं स्वप्न पाहणं, ते फुलविणं, ते सत्य सृष्टीत उतरावे म्हणून धडपडणे, त्या धडपडीतला आनंद लुटणे, आणि दुर्दैवाने ते स्वप्न भंग पावलं तरी त्याच्या तुकड्यांवरून रक्ताळ लेल्या पायानी दुसर्या स्वप्नामागे धावणे हा मानवी मनाचा धर्म आहे. मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो तो त्यामुळे." वि.स.

In reply to by मधुरा देशपांडे

सौंदाळा गुरुवार, 07/03/2014 - 18:45
अमृतवेल मधे तुम्ही वर दिल्याप्रमाणे अनेक सुंदर ओळी आहेत पण एक कथानक म्हणुन ती मला अगदीच सामान्य वाटली.

In reply to by मधुरा देशपांडे

यशोधरा गुरुवार, 07/03/2014 - 18:48
लहानपणी वाचली होती तेह्वा मलाही खूप आवडली होती अमृतवेल. आता कथानक वाचूही शकत नाही. पण त्यातील संवाद, भाषा सुरेख होती हे मात्र खरेच. आता अमृतवेल कथानकासाठी वाचवत नाही पण भाषेसाठी संग्रही ठेवली आहे. :)

In reply to by मधुरा देशपांडे

विकास गुरुवार, 07/03/2014 - 19:51
खांडेकर म्हणल्यावर दोन पुस्तके आठवली. एक म्हणजे "ययाती" - लहानपणी वाचले तेंव्हा खूप आवडले. जसे होते तसे एक कादंबरी म्हणून समजून घेतले. नंतर दुर्गाबाई भागवतांची त्यावरील टिका वाचली आणि त्यातील चुका समजल्या. दुसरे पुस्तक म्हणजे, "सोनेरी स्वप्न भंगलेली" - नीट आठवत नाही. पण गांधीवादी पिढीला आलेले स्वातंत्र्योत्तर नैराश्य (फोलपणा) ह्यावर आधारीत कथानक होते.

In reply to by प्रचेतस

विकास गुरुवार, 07/03/2014 - 21:20
मला आठवावे लागेल. मी नंतर पुस्तक शोधून अधिक संदर्भ देण्याचा प्रयत्न करेन. पण त्यांचा मुद्दा असा होता की पुराणातल्या कथेवर कथानक बसवताना खांडेकरांनी संस्कृतीचे मिश्रण केले होते. काही वेळेस त्यातले काही प्रसंग होते ते तर वास्तवीक ख्रिस्ती परंपरेतले होते, असेच अजूनही काही होते. येथे एक लक्षात ठेवावे बाईंच आक्षेप ख्रिस्ती धर्म वगैरे नव्हता तर सरमिसळ करत योग्य चित्र न उभारण्यात होता.

In reply to by विकास

प्रचेतस गुरुवार, 07/03/2014 - 21:49
धन्यवाद. 'ययाती' वाचण्याचा प्रयत्न एकदा करून पाहिला होता पण वाचवले गेले नव्हता. महाभारतातील मूळ यायातीचे उपाख्यान कितीतरी सरस आहे त्यापेक्षा. तसेही ऐतिहासिक अथवा पौराणिक कथानकांवर कादंबरी लिहिताना बरेचसे लेखक (मूळ कथानकच नाट्यमय असतानाही) प्रमाणाबाहेर लेखनस्वातंत्र्य घेतात आणि कादंबरीची अक्षरश: वाट लावतात. यात रणजीत देसाई, शिवाजी सावंत आदि मान्यवरही आले.

In reply to by प्रचेतस

कवितानागेश गुरुवार, 07/03/2014 - 22:19
ययाति केवळ कादंबरी म्हणून वाचताना खूपच सुंदर आहे. अर्थात मूळ कथेपेक्षा अधिक गोष्टी त्यात घातलेल्या आहेत हे लक्षात येतं, तरीही मला तरी ती हातातून ठेववत नव्हती. पण सरमिसळ केली तरीही मूळ कथेच्या गाभ्याला धक्का लावलाय असं वाटलं नाही. इतर कादंबर्‍यांबाबत सहमत.

प्रभाकर पेठकर गुरुवार, 07/03/2014 - 20:01
आमच्या घरात वाचनाची आवड आई आणि वडील दोघांनाही. आईला रोजच्या वर्तमानपत्रापलीकडे जास्त कांही वाचताना पाहिलं नाही. तिला तेवढा मोकळावेळही नसायचा. वडील कथा कादंबर्‍या वाचायचे. उन्हाळ्याच्या सुट्टीत माझ्या बाबतीत आईचा आग्रह असायचा की, 'बाहेर उडाणटप्पूपणा करण्यापेक्षा घरात बसून पुस्तकं वाच.' आमच्या गल्लीत आमचे समाजसेवी फॅमिली डॉक्टर (डॉ. भांडारकर) ह्यांनी एक मोफत वाचनालय चालविले होते. स्वतः पदरमोड करून ते वाचनालय चालवायचे. तिथे लहानपणी परोपकारी गोपाळ, गोट्या, फास्टर फेणे, कर्‍हेचे पाणी वगैरे पुस्तके आणि विज्ञानयुग, अमृत, फुलबाग, विचित्रविश्व वगैरे नियतकालीकं फुकट वाचायला मिळायची. ती तिथेच बसून अट असायची. पुस्तक घरी न्यायचे असेल तर एकदाच ५ रुपये अनामत रक्कम ठेवावी लागे. आईने आम्हा दोन्ही भावंडांच्या नांवे तशी रक्कम भरून पुस्तके घरी आणून वाचायची सुविधा आम्हाला पुरविली. पुढे गल्लीत मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची शाखा उघडली आणि अवघे साहित्यिक विश्व आमच्या दारी आले. तिथेही अनेक पुस्तके वाचली. पुढे नोकरीला लागल्यावर पुस्तके विकत घेऊन वाचायचे 'व्यसन' लागले. शाळेतून पुलंची ओळख होतीच. 'खोगीरभरती'तला धडा होता. मासिकांमधून वपुंची ओळख झाली. कॉलेजात 'गारंबीचा बापू' मुळे श्रीनांनी वेड लावले, नाटकांच्या आवडीतून 'गुतता हृदय' मुळे शन्ना आपलेसे वाटू लागले. आयुष्याच्या वाटेवर लहान आणि तरूणपणी अशा अनेक लेखक/लेखिका मला बोट धरून चालवलं. घरी आईवडील, शाळेत शिक्षक आणि पुस्तकरुपाने ह्या सर्व साहित्यिकांनी अनेक चांगले संस्कार घडविले. त्यांचे ऋण कधीच फेडता येणार नाही. ह्या साहित्य आकर्षणाच्या वटवृक्षाचं मूळ रोपटं आईने लावलं, आपल्या नजरेखाली वाढविलं. रोजची वर्तमानपत्र, दिवाळी अंक (तोही लोकसत्ता), आणि पुढे पुढे कालनिर्णयची पाठीमागची बाजू ह्याच्या बळावर वाचनाचं महत्त्व जाणून तिने आम्हाला (मला आणि माझ्या मोठ्या बहिणीला) वाचनाचं वेड लावलं. ह्या धाग्यावर माझ्याकडून एखाद्या (कदाचित जास्तच) पुस्तकाबद्दल लिहीण्याआधी, ही आवड जिने लावली त्या आईबद्दल आधी लिहीणं मला जास्त उचित वाटलं म्हणून लिहीलं. धाग्याच्या विषयाला सोडून आहे. पण एवढे खपवून घ्या. लवकरच माझ्या वाचनवेडा विषयी लिहीन.

सस्नेह गुरुवार, 07/03/2014 - 22:07
ले. शशी भागवत. कळत्या वयात या कादंबरीने वेड लावले होते अन अजुनी वाचताना मोहवते. प्राचीन काळातील वैभवशाली चित्रण, रहस्य, व्यक्तिवैचिध्य अन नर्म शृंगार यांची चित्तवेधक गुंफण म्हणजे मर्मभेद. शशी भागवतांच्या एका हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच कादंबर्‍या आहेत. त्यात सर्वात सरस मर्मभेद. अवश्य वाचा.

In reply to by सस्नेह

प्रसाद१९७१ Fri, 07/04/2014 - 10:47
मर्मभेद वाचले आहे. तुम्ही म्हणता तसे किशोर वयात वाचण्यासारखे आहे. चंद्रलेखा ला जशी प्रसिद्धी मिळाली तशी मर्मभेद ला मिळायला हवी होती.

In reply to by सस्नेह

कपिलमुनी Fri, 07/04/2014 - 20:41
मर्मभेद पेक्षा रक्तरेखा आणि रत्न प्रतिमा जास्त आवडल्या.. अजून एक कादंबरी अप्रकाशित आहे असे एकून आहे

अजया गुरुवार, 07/03/2014 - 22:12
प्रकाश नारायण संत माझे अत्यंत आवडते लेखक.त्यांची वनवास्,शारदासंगीत पंखा आणि झुंबर अशी चार(च) पुस्तकं आहेत.या चारही पुस्तकातून आपल्याला कथानायक लंपन भेटतो,आई वडिलांपासून दूर आजी आजोबांकडे राहाणारा.पौगंडावस्थेतले अवघड वय्,अतिशय संवेदनाशील स्वभाव असणारा.सुंदर पेटी वाजवणारा,सुमीकडे चोरुन बघणारा! सर्वच पुस्तकांमध्यली भाषा बेळ्गावी मराठी.ती वाचताना अगदी गोड वाटते.लंप्याचे मित्र त्याला काय करायलय लंप्या!असं बोलणारे.त्यांची नावही मस्तच! कणबर्गी गंग्या,सोंडृया,परळ्या,टुकण्या! मी माझ्या मुलाच्या मित्रांना ही नावं बहाल केली आहेत! या सर्वच कथांमध्ये लंपन बरोबरच तो परिसर ,ती भाषा,गुंडीमठ रस्ता,शारदासंगीत विद्यालय्,सुमीची सोनसाखळी,लंप्याचे मित्र्,त्यांची टारझनगीरी! अगदी नकादुचेण्या कपासके(केस कापण्याचे दुकान!!) असे सगळं मिळून या अनोख्या कथा जमून आल्या आहेत. लंपनच्या भाषेत अठ्ठाविसशे तीस वेळा जरी ही पुस्तकं वाचली तरी ताजंतवानं वाटतं हे खरं! या लंपनशी माझं एक छानसं नातं आहे. माझ्या प्रेग्नंन्सीच्या दिवसात वनवास माझ्या हातात पडलं.हे पुस्तक इतकं आवडलं की त्याची पारायणं झाली. त्यातल्या लंपनचेच गर्भसंस्कार झाल्यासरखा माझा मुलगाही तसाच शांत्,डोक्यात चक्र असणारा ,संवेदनशील आहे. इतका या पुस्तकाचा परिणाम!

In reply to by नंदन

प्यारे१ Sat, 07/05/2014 - 16:05
+२८३० एक्दम मॅड पुस्तकं! हुंब माणूस पण प्रेमात पडेल अशी.

प्रभाकर पेठकर Fri, 07/04/2014 - 01:53
शालेय इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांनी आमचं चिमुकलं मन केंव्हाच व्यापून टाकलं होतं. पुढे एका शिवजयंती कार्यक्रमात श्री. बाबासाहेब पुरंदरे ह्यांचं अफजलखान वधाचं आख्यान ऐकलं आणि तरूण मनावर रोमांच उभं राहिलं बाबासाहेबांची ओघवती भाषा, आवेश, आवाजातील चढ उतार आणि संपूर्ण प्रसंग जस्साच्यातस्सा डोळ्यासमोर उभा करण्याची बाबासाहेबांची हातोटी ह्या सर्वाचा माझ्या तरूण मराठी मनावर सकारात्मक परिणाम झाला. त्या नंतर आले बाबासाहेबांनी लिहीलेले राजा शिवछत्रपती हे पुस्तक. माझ्या एका मित्राच्या बायकोने ते मला वाचायला दिले. ते दोन दिवसात बाचून संपविले पण शिवचरीत्राने आलेले भारावलेपण संपता संपेना. पुन्हा एकदा बाबासाहेबांची भाषा, ते तारीखवार तपशिल, मराठी तिथी-तारखा आणि प्रसंगातले बारकावे वाखाणण्याजोगे आहेत. ह्या पुस्तकातील प्रसंगानुरुप काढलेली चित्रं अतिशय नेमकी आहेत. प्रत्येक प्रसंगात आपण स्वतः तिथे उपस्थित आहोत असाच भास होतो. मन पूर्णपणे इतिहासात रममाण होते. मोघलांविरुद्ध लढायांचे वर्णन वाचताना आपल्याही चेव येतो आणि मावळ्यांची स्वामीभक्ती पाहून आपल्याही मनांत शिवाजी महाराजांबद्दल आदरभावना निर्माण होते. पावनखिंड प्रसंग अंगावर काटा आणतो. नंतर प्रत्यक्ष पावनखिंडीला भेट दिली तेंव्हा राजा शिवछत्रपती कादंबरीतील बाजीप्रभू देशपांडे ह्याची एकाकी लढत आठवली आणि आदराने नतमस्तक झालो. सर्वच दृष्टीने पुस्तक वाचनिय आणि संग्रहणिय आहे. पुन्हा पुन्हा राजा शिवछत्रपती कादंबरीची अनेक पारायणं होतात. दरवेळी तोच आणि तेव्हढाच आनंद होतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

सखी Fri, 07/04/2014 - 03:05
पेठकर काका मलाही हीच पहिली कादंबरी आठवली जी शालेय जीवनात वाचुनही अजुनही भारावुन टाकते. जाणता राजा बघणं हाही एक आनंददायी सोहळा होता. बाबासाहेब पुरंदरे यांच शिवचरीत कथन जालावर आहे.

In reply to by सखी

प्रभाकर पेठकर Fri, 07/04/2014 - 10:27
'जाणता राजा' एक विस्मयकारक कलाकृती आहे. रंगमंचाची भव्यता, २००+ कलाकारांचा उत्साह, प्रकाश योजना, वेशभूषा, आतिशबाजी, घोडेस्वार, बैलगाडी सर्व सर्व अगदी नजरेचे पारणे फेडणारे आहे. विशेष म्हणजे संपूर्ण नाटक ध्वनीमुद्रित आहे आणि प्रत्यक्ष बोललेले संवाद नाहीत. त्यामुळे संवाद विसरण्याची, नाटक रेंगाळण्याची शक्यता उरत नाही. शिवचरीत्राचे चित्ररुप धावते आणि अद्भूत समालोचन म्हणता येईल. जाणता राजाच्या कार्यक्रमात, मध्यंतरात, रंगमंचाच्या मागे, बाबासाहेबांना भेटण्याचा प्रसंग आला होता. त्यानंतर गेल्या महिन्यात लंडन मध्ये एका पुस्तक प्रकाशन सोहळा आणि ५ दिवस लंडन दर्शन कार्यक्रमात बाबासाहेबांचा सहवास लाभला. ब्यांण्णव्यावर्षीही बाबासाहेबांची स्मरणशक्ती आणि वाचा कणखर आहे. आज दुर्दैवाने ते व्हिल चेअरवर असले तरीही उत्साह पन्नाशीतला आहे. अजूनही ते व्याख्यानाला तयार आहेत. मस्कतला त्यांना बोलावण्याचे घाटत आहे. निदान १ दिवस तरी हल्लीच्या पिढीला प्रत्यक्ष त्यांच्या तोंडून शिवचरीत्र ऐकवावे ह्या उद्देशाने त्यांना विनंती केली आणि त्यांनी ती मान्य केली. त्यांना आमच्याकडून....मानाचा मुजरा.

In reply to by प्रभाकर पेठकर

एसमाळी Fri, 07/04/2014 - 17:09
राजा शिवछत्रपती मध्ये काही चुका आहेत.ज्या आजतागायत सुधारल्या गेल्या नाहित.पुस्तक एकदा वाचल्यावर पुन्हा वाचावे असे नाही वाटले.

In reply to by आदूबाळ

बॅटमॅन Fri, 07/04/2014 - 17:44
प्रत्यक्ष शिवकालासंबंधी फॅक्च्युअल चुका नसाव्यात असे वाटते, मात्र देवगिरीवर अल्लाउद्दीन खिलजीने केलेली स्वारी, त्यानंतरची तथाकथित लूट, इ.इ. अतिरंजित वर्णने जुन्या तवारिखांतून आहेत तश्शीच्या तश्शी उचलली आहेत. प्रसिद्ध इतिहास संशोधक कै. ब्रह्मानंद देशपांडे यांनी 'देवगिरीचे यादव' नामक पुस्तक लिहिले आहे त्यात त्या वर्णनांतील अतिरंजितपणा सोदाहरण स्पष्ट केलेला आहे.

धन्या Fri, 07/04/2014 - 11:00
डॉ. रमा मराठे यांनी लिहिलेलं हे एक नितांत सुंदर पुस्तक आहे.
एक धागा सुखाचा शंभर धागे दु:खाचे जरतारी हे वस्त्र मानवा तुझिया आयुष्याचे ग. दि. माडगूळकरांचा हा संदेश वेगवेगळ्या ढंगाने लेखिकेने या पुस्तकात फुलवला आहे. आजचं जीवन धकाधकीचं बनलेलं आहे. अनेक समस्या, संघर्ष आणि ताणांनी माणसाचं आयुष्य व्यापून गेलं आहे. आणि म्हणूनच तो सुखाला पारखा झाला आहे असे त्याला वाटते, परंतु सुख ही एक मानसिक सवय आहे. माणसाचं जीवन अनुभवणं यातच खरं सुख आहे. हे जीवन अनुभवताना भावनांचे, विचारांचे वेगवेगळे पैलू दृसि पडतात. या पैलूतून सुखाचे वेगवेगळे रगं नजरेस पडतात. अनुभवायला मिळतात. फक्त हे रंग पाहण्याची दृष्टी, तसा चष्मा आपणास असला पाहिजे व अशी 'दृष्टी’ देण्याचे मार्गदर्शन या पुस्तकातून रमा मराठे यांनी केले आहे. नेहमीच आनंदी राहण्याचे मर्म सांगणारे सुखाच्या प्राप्तीचे मार्ग सांगणारे पुस्तक.
- रंग सुखाचे पुस्तकाची बुकगंगा डॉट कॉम वर दिलेली माहिती.

स्नेहल महेश Fri, 07/04/2014 - 11:52
मला वाचनाची आवड लहानपणापासून आहे आणि तशी बरीच पुस्तक वाचली आहेत पण मला सुधा मूर्ती या लेखिकेची पुस्तके खूप आवडतात मी वाचलेली काही पुस्तके Dollar Bahu Gently Falls the Bakula Wise & Otherwise THE DAY I STOPPED DRINKING MILK काही इतर पुस्तके (लेखक -आमिष त्रिपाठी ) मेलुहा चे मृतुंजय नागाचे रहस्य शपथ वयुपुत्राची

मनिष Fri, 07/04/2014 - 12:33
सध्या फारशा कादंबर्‍या किंवा फिक्शन वाचत नाही पण जवळपास २० वर्षे आधी वाचलेली रारंग ढांग आजही आवडते. हिमालयाच्या पार्श्वभुमीवरची, Border Roads Organisation बरोबर हिमालयात रस्ता बनवणार्‍या विस्वनाथची ही कथा. त्याचे ज्ञान, थोडा एककल्ली हेकटपणा, आदर्शवाद आणि त्याच्या जोडिला वैतागलेला नायर आणि जिंदादिल मिनू. सगळे मिळून एक भन्नाट रसायन झालेय. पुढे कधीतरी डॉ. दाढेंशी गप्पांमधे कर्नल आनंदराव (पहिल्या नावाविषयी खात्री नाही, पण बहुदा हेच) जाधव यांनी लिहिलेल्या 'जिंदादिल' ह्या आत्मचरित्रपर पुस्तकाशी असलेल्या ह्या कादंबरीच्या नात्याबरोबर कळले. खूप शोधुनही हे 'जिंदादिल' अजुनही मिळाले नाहीच. :( ह्याबद्दल अजून काय, काय लिहावं? मलाही अतिशय आवडणारी कादंबरी. मुळात पेंढारकर सिनेमावाले...त्यामुळे ही कादंबरी एखाद्या पटकथेसारखी चित्रदर्शी आणि रोचक. ऊंट मरणे वगैरे प्रसंग एकदम दिग्दर्शकाने घेतल्यासारखे सूचक. अशीच गुंतवून ठेवणारी शैली त्यांच्या "अरे संसार, संसार.." आणि "चक्रीवादळ" ह्या कादंबार्‍यातही दिसते. पण 'रारंग ढांग' ते रारंग ढांगच!!! ह्या इतक्या सुंदर कथेवर चित्रपट का नाही बनला हे खूप बर्षे माझ्यासाठी कोडेच होते. सुमित्रा भावे आणी सुनील सुकथनकर ह्यांच्याबरोबर एका "स्क्रिप्ट रायटींग' च्या कर्यशाळेत ह्याच्यावर उत्तर सापडले. सेन्सॉरने म्हणे (अमोल पालेकरांना) परवानगी नाकारली कारण पुस्तकामुळे संरक्षण दलांबद्दल फारच निगेटीव्ह प्रतिमा होते. मी कॉलेजात ११-१२ वीत असतांना आमच्या मित्रांपैकी कित्येकांना डिफेन्स मधे जायचे भूत होते.... पण NCC तील seniors चे बेताल आणि मुजोर वागणे, त्यातल्या अधिकार्‍यांचे असंवेदनशील वर्तन ह्याबरोबरच 'रारंग ढांग' हे मला NDA पासून दूर ठेवण्याचे एक प्रबळ कारण होते. मला मानव आणि निसर्गापेक्षाही हा माणूस आणि व्यवस्था ह्यांच्यातला संघर्ष वाटतो. शेवटी विश्वनाथला विचारलेला प्रश्न "तुला अपेक्षित्/अभिप्रेत असलेले स्वातंत्र्य तुला ह्या बाहेरच्या जगात तरी मिळेल का?" ह्या प्रश्नाने पुस्तकाच्या बाहेर अयुष्यातही खूप वेळा छळले आहे. मुळातील मनस्वी, स्वच्छंद स्वभावामुळे, "तुला जे मनापासून करायचे आहे, ते खरच करता येईल का?" हा प्रशन वेगवेगळ्या रुपात भेटतच राहतो! हिमालयातील उंचावरचे रस्ते बघतांना कुठेतरी 'रारंग ढांग' मनात घुटमळता राहिले... इथेच कुठेतरी विश्वनाथने 'ते' स्मारक बांधले असेल का असा वेडा विचारही मनात येऊन गेला! :) नंतर मग कधीतरी, कुठल्या ना कुठल्या कारणाने रारंग ढांग मधले मला भावलेले, कुठेतरी आत रुजलेल/रुतलेले प्रसंग मनात कळत-नकळत उमटत राहतात...कधी बोलतांना संदर्भ म्हणून (आणी समोरच्याने ते पुस्तकच वाचले नसेल तर मग एक अशक्य तगमग होते...) तर कधी एखाद्या ब्लॉग-पोस्टमधे माझीच अस्वस्थता व्यक्त करतांना. 'रारंग ढांग' मला आवडते ते मुलतः त्यातील विश्वनाथच्या अंतर्गत संघर्षामुळे...आणि कित्येक वेळा आयुष्यात प्रसंग/डिटेल्स वेगळे असले तरी प्रश्नांचा पॅटर्न बराचसा सारखा असतो असे वाटते. वेळ आल्यास, स्वतःला खरच योग्य वाटणार्‍या निर्णयामागे खंबीरपणे उभे रहाण्याची आंतरीक शक्ति मिळावी, किंबहुना ती मिळवावी अशी तीव्र इच्छा प्रत्येकवेळेस हे पुस्तक वाचतांना होते. तशी आंतरीक शक्ति माझ्याकडे आहे का? प्रामाणिकपणे सांगायचे तर ह्या प्रश्नाचे होकारार्थी उत्तर आजतरी माझ्याकडे नाही, पण ते तसे असावे ह्याची प्रेरणा देणार्‍या पुस्तकांत 'रारंग ढांग' चे स्थान खूपच वर आहे!
रारंग ढांग विषयी पुस्तकविश्व्वरील श्रावण मोडक यांचा लेख इथे वाचता येईल - http://www.pustakvishwa.com/content/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B9%E0%A5%83%E0%A4%A6-%E0%A5%A7

In reply to by मनिष

एस Fri, 07/04/2014 - 15:39
रारंग ढांगने झपाटून टाकले होते. तेव्हा काय वाटत होते हे तुम्ही आणि श्रामोंच्या पुस्तकविश्वाच्या लेखात त्यांनी छान सांगितले आहे.

In reply to by मनिष

सखी गुरुवार, 07/10/2014 - 15:25
मनिष हा प्रतिसाद रारंगढांगवरचा अतिशय आवडला, श्रामोंचा लेख वाचण्यात आला नव्हता, तोही खूप आवडला, इथे दुवा दिल्याबद्द्ल आभार. तसेच तुमचा व्लॉगवरचा लेखही निरुत्तर करणारा. मिपावरच डॉ. दाढेंचा हालेखही सापडला. यावरती येणारं सिनेमा, नाटक गुलदस्त्यातच राहीलं तरी अभिवाचन स्नॉवेलवर आलयं असं वाटतं. 'पुन्हा रारंग ढांग' कुणी वाचलय का? यावर दिवाळी अंकात कोणीतरी आव्हान दिल्याचे आठवते दुवा सापडला तर टाकते परत येऊन.

In reply to by सखी

सखी Sun, 07/13/2014 - 08:22
पुस्तकाचं नाव 'पुन्हा रारंग ढांग' नाही तर 'रारंग ढांग नंतर … ' असे आहे. श्रीकृष्ण सवदी यांनी लिहलेलं आहे. चंद्रकांत मासिकानं दिलेले हे आव्हान त्यांनी पेललं, असं पुस्तकाच्या शेवटच्या पानावर दिलं आहे, दुवा.

मनिष Fri, 07/04/2014 - 12:36
अरे हो! सांगायचे राहिलेच. उपक्रम खूप आवडला. कादंबरी सोडून नुसत्या आवडत्या पुस्तकांविषयी लिहायला सांगितले तर मग माझ्यासाठीच एक नवीन विभाग सुरू करावा लागेल, आणि अर्थातच कोणालातरी माझ्या पोटापाण्याची सोयही करावी लागेल. :P

स्पा Fri, 07/04/2014 - 13:07
मुळ लेखक : कॉरम्याक मकार्थी अनुवाद : अनिल किणीकर एक अचाट पुस्तक , वेगळाच प्लॉट . बेचिराख झालेले जग , कशाने, का माहित नाही कथानकाला भूतकाळ नाही , भविष्य नाही फक्त वर्तमान बेचिराख झालेल्या अमेरिकेतून जगण्याची धडपड करत वाट काढत दक्षिणेकडे समुद्र किनार्यावर जाणारा एक अनामिक बाप आणि त्याचा लहानसा मुलगा. जग बेचिराख झालेले , प्रचंड मनुष्यसंहार झालेला , निसर्गाची अवकृपा कि मानवी युद्ध माहित नाही , जगण्यासाठी उरलेल्या मानव प्राण्याची एकमेकात चालेलेली चढा ओढ . खायला प्यायला काही नाही, मरण निश्चित, फक्त ते किती लांबवता येतंय यावर सगळा खेळ. जवळ सामान म्हणजे स्वरक्षणासाठी असलेले एक छोटे पिस्तोल. अंगावरचे कपडे , इकडून तिकडून गोळा केलेल्या सामानाने भरलेली एक ढकलगाडी , एकमेकांशिवाय कोणी नाही . कादंबरीचा कालखंड , पात्रांची नवे शिवाय इतर विशेष पार्श्वभूमी न कळताहि हे पुस्तक पहिल्या पानापासून खिळवून ठेवते , बाप लेकातले नातेही सुंदर . शेवटी त्याच्न्या प्रवासाचे काय होते , तो कुठे संपतो यासाठी पुस्तक वाचणे आले २००७ सालातला पुलित्झर पुरस्कार या कादंबरीला मिळाला. २००९ साली यावर "द रोड" नावाने चित्रपट सुद्धा आलाय

स्पा Fri, 07/04/2014 - 13:08
भैरप्पांचा "पर्व"चा , (उमा कुलकर्णी यांनी केलेला) अनुवाद हातात आला , तेंव्हा महाभारतावरील अजून एक कादंबरी इतकेच त्याचे स्वरूप मनात होते.काहीतरी हटके असणार याची कल्पना आलेली होती. वाचायला सुरुवात केली आणि प्रस्तावनेतच भैरप्पानी पेललेल्या शिव धनुष्याची जाणीव झाली. आयुष्यातली जवळ जवळ १२ वर्ष एका कादंबरीसाठी खर्ची घालणे म्हणजे खरंच ग्रेट गोष्ट आहे.महाभारत घडलेल्या जागांचा शोध काढून तिथल्या निसर्गाचा,लोकांचा,संस्कृतीचा अभ्यास करून, मूळ महाभारतातल्या चमत्कारांचा, दंतकथांचा,शापांचा,वरदानांचा सुसंगत असा वैज्ञानिक, हल्लीच्या मानवी तर्कदृष्टीला पटेल असा निष्कर्ष काढून तो कादंबरीत आखणे.शिवाय त्यातली महाभारत आपल्या निवेदनातून उलगडणारी हटके पात्रनिवड. पर्व वर परीक्षण असे लिहायला घेतले तर कदाचित मूळ कादंबरी सारखाच एक जाडजूड ग्रंथ व्हायचा. इतके दिवस महाभारताबद्दल जे ग्ल्यामर इतक्या साहित्यिकांनी आपल्याभोवती निर्माण केले होतं, त्याचा चक्काचूर करण्याच काम "पर्व" व्यवस्थित पार पाडत, तेही वाचताना कुठेही "छे हे काही पटले नाही बुवा" असे वाटत नाही. अख्या पर्व कादंबरीत लेखक कुणा एकाची बाजू घेत नाही, कोणाला हिरो किंवा कुणाला खलनायक ठरवत नाही. जे घडलं असाव ते तो फक्त आपल्या समोर तर्कसंगत पणे मांडण्याचा प्रयत्न करतो, आणि माझ्या मते हेच या कादंबरीचे यश आहे. कुंतीला पंचतत्वांपासून पांडव झाले.. अशी कथा असताना , भैरप्पा प्राचीन भारतातही नियोग पद्धत (सरोगसी) अस्तित्वात होती हे ठामपणे मांडतात. कृष्णाने कालिया मर्दन केले असे न म्हणता , पूर्वी नाग नावाच्या लोकांची टोळी होती. त्यांना संपवले किंवा द्रौपदीला मिळवण्यासाठी पांडवान्मध्येच सुरु झालेली भांडणं, आणि भांडण मिटव्ण्यासाठी कुंतीनेच द्रौपदीला तुला समाधान द्यायला ५ ५ पुरुष असताना चिंता कसली असा दिलेला सल्ला !! एक ना अनेक , कादंबरीच्या प्रत्येक टप्प्यावर भैरप्पा आपल्या मनावर महाभारताविषयीच्या चढलेल्या चमत्काराचा बुरखा टराटरा फाडतात. आणि मग एकदम हि सगळी पात्र अगदी ( कृष्ण ,कर्णासकट)मानवी पातळीवर वावरायला लागतात. हि सगळी आपल्यासारखीच अनेक विकारांनी बनलेली असतात. त्यांच्यातही लैंगिक वासना, कट -कारस्थान , सत्तेसाठी काहीही करण्याची वृत्ती असते. कौरव वाईट किंवा पांडव सगुणाचे पुतळे हा भेद उरतच नाही. उरते ती फक्त सत्ता मिळवण्याची जीवघेणी स्पर्धा आणि त्यासाठी गाठलेली मानवी स्वभावाची नीचतम हद्द आणि कदाचित व्यासांना अभिप्रेत असलेल हेच ते "महाभारत". एक अप्रतिम महानाट्य. मानवी स्वभावाचे प्रत्येक पैलू .. किंवा माणूस कुठल्या थराला जाऊ शकतो याची मांडणी केलेलं एक प्राचीन काव्य . शेवटा कडच्या युद्धात तर मानवपातळी वरून हि पात्र पशुपातळीवर येतात. युद्ध संपेपर्यंत प्रचंड मानव संहार होतो.कौरवांचा दारूण पराभव होतो.पण पांडवांना हि जिंकल्याचे समाधान नसतेच , युद्ध काळात झालेली अपरिमित हानी, निर्वंश झालेले पांडव आणि उजाड झालेला परिसर, रिता झालेला खजिना आणि दोन वेळच्या जेवणाची पडलेली भ्रांत हीच त्यांना मिळालेली युद्ध जिंकल्याची भेट. ५००० वर्षा पूर्वीचा सुडाने रंगलेला खेळ या काळातही जुना वाटत नाही . मानवी प्रवृत्तीत काडीचाही फरक पडलेला नाही हेच खरे या कादंबरीवरही अनेक वाद विवाद झडले असतील , झडत राहतील.. पण भैरप्पानी दाखवलेली दिशा नक्कीच नाकारण्याजोगी नाही

In reply to by स्पा

Gayatri Muley Fri, 07/04/2014 - 14:37
महाभारत म्हणल कि फक्त शिवाजी सावंत चे तर्क खरे वाटतात मला... (अर्थातच ते चुकिचे आहे, पण लहानपणीच वाचलेले मृत्युंजय अन् युगांधर मनातून जातच नाहीत..) त्यातून पांडव अन् कौरव यांची बाजू कळली आता "तिसरी" बाजू कळण्यासाठी "पर्व" नक्की वाचेल...

बबन ताम्बे Fri, 07/04/2014 - 15:37
प्रदीप लोखंडे, पुणे १३- छान पुस्तक आहे. ओसामा बिन लादेन वर एक पुस्तक वाचले होते. एका अमेरीकन लेखिकेने ओसामाच्या मुलाचे आणि पत्नीचे आत्मकथन एकत्र करून पुस्तक लिहीले होते. त्याचा मराठी अनुवाद पण आहे. पण नाव आठवत नाही. पुस्तक मात्र जबर्दस्त आहे.

बबन ताम्बे Fri, 07/04/2014 - 15:41
शिकवीले ज्यांनी - लेखक अनिल अवचट खूप सुंदर पुस्तक आहे. पुण्यातील काही ज्ञानी व्यक्तींचे अतिशय सुंदर आणि माहीतीपुर्ण व्यक्तिचित्रण अनिल अवचटांनी केले आहे.

आतिवास Mon, 06/30/2014 - 22:21
कल्पना चांगली आहे. पण फक्त 'कादंबरी'पुरतं विश्व मर्यादित करण्याचा उद्देश समजला नाही. महिनाभरात जे काही वाचलं त्यावर लिहायचं असं ठरलं असतं तर जास्त सोपं झालं असतं लिहायला.

In reply to by आतिवास

पुस्तकमित्र Tue, 07/01/2014 - 09:44
ही फक्त सुरुवात आहे. साहित्यप्रकाराच्या विविध प्रकारांना स्पर्श करतच ही मालिका पुढे पुढे सरकत राहणार आहे. अर्थात आपणा सर्वांचे सहकार्य आवश्यक आहेच.

सुरुवात म्हणून कादंबरीचे नाव - आनंदी गोपाळ लेखक - श्री. ज. जोशी भारताबाहेर जाऊन पाश्चात्य वैद्यकशास्त्र शिकलेल्या डॉ. आनंदी बाई गोपाळ जोशी या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर. स्त्रियांनी शिक्षण घेणे हा सुद्धा जेव्हा गुन्हा समजला जात होता, त्या काळात नवऱ्याच्या हट्टामुळे प्राथमिक शिक्षणापासून ते पुढे वैद्यकीय पदवी मिळेपर्यंतचा प्रवास यात वाचायला मिळतो. गोपाळरावांच्या विक्षिप्तपणाचा त्यांना झालेला त्रास, तरीही जिद्दीने पूर्ण केलेले शिक्षण आणि दुर्दैवाने या सगळ्याला तोंड देताना ओढवलेला शेवट. पुस्तक वाचून आनंदी बाईंच्या प्रतीचा आदर अधिक दुणावतो. त्या काळातले स्त्रियांचे समाज जीवन, संघर्ष, गोपाळ रावांचे काळाच्या पुढचे विचार आणि तरीही अनेक बाबतीत दिसणारा दुराग्रहीपणा, सगळे काही सुन्न करून टाकते. मला आवडलेल्या पुस्तकांपैकी एक.

In reply to by पैसा

मस्त कलंदर गुरुवार, 07/03/2014 - 11:26
अगदीच काल्पनिक नसली तरी बरेचसे प्रसंग खोटे आहेत. अंजली कीर्तने यांनी त्यांच्या आनंदीबाई: काळ आणि कर्तृत्व या कादंबरीत ससंदर्भ लिहिले आहे.

In reply to by मस्त कलंदर

मधुरा देशपांडे गुरुवार, 07/03/2014 - 14:33
या कादंबरीविषयी माहिती नव्हती. आनंदीबाईंच्या व्यक्तिरेखेविषयी अजूनही वाचायला आवडेल. त्यामुळे कधी जमल्यास पुन्हा दोन्ही वाचेन. धन्यवाद.

शुचि Mon, 06/30/2014 - 23:23
"दॅट क्वेल रॉबर्ट" नावाचं १००-१५० पानी, छोटेखानी पण जबरदस्त पुस्तक वाचते आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महान असं पुस्तक आहे. अर्धे वाचून झाले आहे. डॉक्टर अन त्यांच्या पत्नी मिल्ड्रेड यांनी जंगलमय्/रानटी भागात घर घेतले. दोघांना पक्षी नीरीक्षणाची अतिशय आवड. एके दिवशी पहातात तो काय क्वेल मादी व क्वेल(quail) नर दोघे खुरडत खुरडत, जखमी असल्यासारखे चालले आहे. ताबडतोब त्यांच्या लक्षात आले की निसर्गातील पालकांच्या अतिव शौर्याचे उदाहरण ते पहात आहेत. आपल्या पिलांवर लक्ष जाऊ नये म्हणून हे दोघं क्वेल स्वतःकडे लक्ष वेधून घेत होते. मग डॉक्टर व मिल्ड्रेड सुरक्षित अंतरावर गेले अन क्वेल आई तिच्या १२ पिलांना घेऊन गेली. पण गंमत ही झाली की क्वेलच्या चिमुकल्या व व्यवस्थित लपवलेल्या घरट्यात त्यांना एक अंडे सापडले. ते अंडे त्यांनी दिव्याच्या ऊबेत्/प्रकाशात ठेवले असता ते ऊबले, फुटले व इवलसं ओलं बंबलबी च्या आकाराचं पिलू अंडं फोडून बाहेर आलं. १५ मिनीटात ते पटापट सुकलं अन आक्रोडाच्या आकाराचं दिसू लागलं. त्याचं नाव त्यांनी ठेवलं बॉबी व्हाईट. पण मग अजून भारदस्त नाव हवं म्हणून ते "रॉबर्ट" या नावात बदललं. मग या दांपत्याने रॉबर्ट्पाशी लहान वाटुलीत दाणा-पाणी ठेवले.आता कोणाला वाटेल की पिलाला जबरदस्तीने खायला घातलं असेल पण नाही हे पिलू ८ तासानंतर स्वतःचे स्वतः खाऊ-पीऊ लागले. फक्त एकदाच त्याला मदत लागली ती म्हणजे त्याची चोच पहील्यांदा पाण्यात बुडवायला. मग मात्र ते स्वावलंबी झाले. मग त्या पिलाचे स्वभाववैशिष्ट्य, गुणविशेष सगळे पुस्तकातून उलगडू लागतात अन एका क्वेलला किती अक्कल असते, माया असते, लळा असतो इतकेच काय आवडीनिवडी/ पसंत-नापसंत असते ते वाचून थक्क व्हायला होते. हळूहळू रॉबर्ट्ला सुंदर ठीपक्या ठीपक्यांची पिसे आली, तो वयात आला, वगैरे मोहक्/रोचक वर्णने येतात. पुस्तक अक्षरक्षः खाली ठेववत नाहीये. अ‍ॅमेझोनवर ६६ - ५ चांदण्या मिळालेले हे पुस्तक नशीबाने ग्रंथालयात "चकटफू" विभागात मिळाले. बसमध्ये, घरात, ऑफीसात लंच टाइम मध्ये वाचन सुरु आहे.

In reply to by आतिवास

एस Wed, 07/02/2014 - 19:42
फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमॅझॉन दोन्हींवर उपलब्ध आहे. फ्लिपकार्टवर महाग आहे. दुवे - http://www.flipkart.com/that-quail-robert/p/itmczyn6bphxd6xu?pid=9780060812461&otracker=from-search&srno=t_1&query=that+quail+robert&ref=ce523a93-e6e0-440c-bf35-4fa5130ff2cb http://www.amazon.in/That-Quail-Robert-Margaret-Stanger/dp/006081246X/ref=sr_1_1?ie=UTF8&qid=1404310224&sr=8-1&keywords=that+quail+robert

योगविवेक Tue, 07/01/2014 - 00:44
... वाचता वाचता वाढे... मित्रांनो, नुकतीच अंधार छाया कादंबरी वाचली.आवडली. लेखक - मिपाकरांच्या परिचयाचे. शशिकांत ओक. विषय - अर्थात ऑकल्ट सायन्सेस... ही छोटेखानी कादंबरी ईबुक म्हणून उपलब्ध. पाने फक्त ७०-७५. समर्पक मुखपृष्ठ संकल्पना... कादंबरीतील अंधार छायेला रेखाटणारी... कादंबरी सत्य घटनेवर आधारित असा लेखकाचा दावा. त्याला पूरक त्यातील पात्रे व व्यक्तिरेखा प्रत्यक्ष कशा आहेत त्यांचे फोटो व सध्याचे जीवनयापन या बाबी कादंबरी वाचकांना नाविन्यपुर्ण आहेत. बलस्थाने- १. बोली भाषेतील घरगुती संवाद, २. आत्मकथन शैलीमुळे व्यक्तीरेखेच्या मनातील संवादातून कथानक पुढे सरकवायची लेखकाची खुबी. ३. विचित्र घटनांचे आवेग, त्यातून फुलणारे नाट्यमय प्रसंग हाताळताना निर्माण भावनांचा कल्लोळ. ४. या अकल्पित घटनांमागील कार्यकारण भाव शोधणारी दादा व्यक्तिरेखा अनेक अंगांनी पुढे येते . ५. जपसाधना करणे ही फावल्या वेळातील म्हातारपणचा विरंगुळा नसून योग्य प्रकारे केल्यास अनाकलनीय शक्तींचा यशस्वी प्रतिकार करता येतो याची प्रचीती देणारे विचार व अनुभव श्रद्धा आणि सबूरीला बळकटी देतात. ६. लेखकाचे मनोगत बरेच काही व्यक्तिगत जीवना बद्दल सांगून जाते. दुर्बल स्थान - सुरवातीला संथपणा व पात्रांची ओळख गोंधळात टाकणारी. यावर तोड म्हणून लेखकाने पात्रांची ओळख मनोगत प्रस्तावनेत करून दिली आहे. रंजक व विचार करायला लावणारी वैशिष्ट्य पूर्ण कादंबरी...

अर्धवटराव Tue, 07/01/2014 - 10:06
गिरीश कुबेरांचं "युद्ध जीवांचे"... तसं बरच काहि सांगता येईल पुस्तकाबद्दल. एका वाक्यात सांगायचं तर बारुदच्या ढिगावर बसुन मक्याची कणसं भाजत बसणार्‍या आजच्या जगाची कहाणी आहे ति. जैवीक अस्त्रांचं संशोधन, गेल्या शतकभरातला त्यांचा वापर, अगदी गल्लीबोळातल्या दादा लोकांपर्यंत त्यांचा वापर, रासायनीक युद्धं व प्रदुषण... सर्वच एकदम खतरनाक.

आतिवास Tue, 07/01/2014 - 16:31
ही छोटेखानी (फक्त ६३ पानं) कादंबरी वाचून झाली. मूळ कादंबरी "नग्न रुख" (ओ.पी. शर्मा 'सारथि') डोगरी भाषेत आहे. इंग्रजी अनुवाद श्री. शिवनाथ यांनी केला आहे. या कादंबरीत रुढार्थाने पात्रं नाहीत आणि पारंपारिक शैलीतली वर्णनंही नाहीत. आहेत त्या एकामागोमाग घडणा-या घटना; त्या घटनांबद्दल प्रश्न निर्माण करणारा भारत (कादंबरीमधली व्यक्तिरेखा). जणू आपला सभोवताल आणि आपली जाणीव यांची ही दोन्ही प्रतीकं. काहीकाही आठवतं. वाचलेलं; पाहिलेलं; अनुभवलेलं; घुसमट करणारं; दंगली, बॉम्बस्फोट यांच्यातून तगताना हतबल करणारं – काहीतरी जे लिंपून टाकलंय आपण सगळ्यांनी, पण अविरत आपला हिस्सा असणारं! जे प्रश्न विचारतं राहतं... ते .. आपल्यामधलं एक आवर्तन.. विस्तारभयास्तव अधिक लिहित नाही. 'राग दरबारी' या माझ्या अत्यंत आवडत्या हिंदी कादंबरीबद्दल मी यापूर्वी इथं लिहिलं आहे. बाकी अजून सांगण्याजोगं पुष्कळ आहे - नंतर सांगते :-)

प्रचेतस Tue, 07/01/2014 - 16:41
जैत रे जैत.. गोनीदांच्या कर्नाळा किल्ल्याच्या पार्श्वभूमीवरील ही छोटेखानी पण तितकीच प्रभावी कादंबरी. चित्रपटापेक्षा तर कितीतरी सुंदर. ठाकरांच्या जीवनशैलीचे मनोज्ञ दर्शन गोनीदांनी आपल्या चित्रदर्शी शैलीत सादर केले आहे. नाग्या, चिंधी हे कथानायक्/नायिका तर अक्षरशः मनावर गारूड करून राहतात. ह्या कादंबरीतला एक सुंदर उतारा देतो. पावसकाळातल्या कर्नाळ्याचे बदललेल्या दर्शनाचे वर्णन करत असताना गोनीदा कसे आपल्या लेखणीचेही सौंदर्य प्रकट करतात ते पहा. हे दोन अडीच महिने डोंगराचं दर्शन होणे कठीण. महादेवाचं ध्यान सुरू आहे. तो डोळे मिटून चिंतना करतोय. सगळीकडे पाऊस पडला की नाही. सगळी रानं जोगवली की नाही. अवघी धरित्री भिजली की नाही. कुठं उणं राहिलं असेल, तर त्या अंगाला तो मेंघांना पाठवतो. त्याच्यापाशी लई मेघ. त्याच्या दाराशी हुकमाची वाट पाहात ते उभे असतात. त्याच्या ध्यानात पटदिशी येतं, का अमुक एका डोंगराच्या घळीत पाऊस झाला नाही. तिथले ओढेनाले वाहिले नाहीत. खाचरं पाण्यानं तुडुंब भरली नाहीत. त्या रानचे बेडूक बोलू लागले नाहीत. तिथं काजवे लुक्लुकू लागले नाहीत. तिथल्या कड्यांना गवतं वाढली नाहीत. कड्यांच्या पोटांशी भारंगीचे ठोंब उगवले नाहीत. चवेणीच्या कंदांना हिरवी पानं धरली नाहीत. त्या रानाला अजून भुईकमळं दिसू लागली नाहीत. मग महादेव ढगांचा ताफाच्या ताफाच तिकडे धाडतो. ढग तिकडे सरू लागतात. कधी घाईघाईनं. एकापाठोपाठ एक. कधी एकमेकांच्या अंगावर कोसळत. कधी सावकाश. चुकार कामकर्‍यासारखे. पण शेवटी ते तिथं पोचतात. बरसायला लागतात. न बरसून करतील काय? टंगळमंगळ केली तर महादेवाचा बिजलीचा चाबूक काडदिशी पाठीत बसतो. केवढा आवाज होतो. डोंगर गदगदा हलू लागतात. अशा रीतीनं चहू अंगांना पाऊस पडतो. मग महादेवाच्या ध्यानी येतं, की आता चहूकडे हिरवं झालं आहे. गाईगुजी जोगवू लागल्या आहेत. शेरडं चरू लागली आहेत. खाचरं जळानं तुडुंबलेली आहेत. भाताचे लोंबे जळाच्या साईवर डोकी उचलीत आश्चर्यानं चहूदिशांना बघू लागले आहेत. असं अवघं शांत झालं आहे. मग हळूहळू महादेव ध्यानातून बाहेर येतो. ध्यानाला बसला तेव्हा तो जख्ख म्हातारा होता. ध्यानातून बाहेर येतो तेव्हा तो जवान होऊन येतो. डुईवरचे केस पुन्हा हिरवेगार झालेले असतात. पापण्या पुन्हा ताज्यातवान्या झालेल्या असतात. तो आपल्या डुईत भुईकमळं खोचतो. रंगारंगाची. बहुधा सगळी गुलाबीतांबडी. पण महादेवाला पांढरा रंग आवडतो. म्हणून तो काही पांढरी भुईकमळं अंगावर वागवतो. असा तो कोवळा दरदरीत दिसू लागतो. त्याच्या अंगावरून गंगाबाई खाली उतरत असते. कुठं टंगळमंगळ करीत. कुठं धावत धडपडत. मग तो डुईवर एखाद दुसर्‍या ढगाची चिंधुकली वागवतो, तेवढंच. यापलीकडे मग बाकी ढगांना तो दूरच्या गंगनी धाडून देतो. पावसकाळाभर महादेवाच्या गळ्यातला मधमाशांच्या पोळ्यांचा हार गडचीप असतो. पावसकाळा उलटला, की मग त्यांचं गाणं सुरू होतं. ते गुंग गाणं काही फार मोठ्यानं ऐकू येत नाही. पण तरी हजारपाचशे माशी एक्या ठायी झाली, की मग चांगला घुमारा ऐकू येतो. कधी त्या गंगनात तिथल्या तिथं गाणं म्हणत घुमतात. कधी नाच करतात.

In reply to by प्रचेतस

सागर Mon, 07/07/2014 - 00:19
अतिशय सुंदर प्रकटन वल्ली मित्रा
तितकीच प्रभावी कादंबरी. चित्रपटापेक्षा तर कितीतरी सुंदर.
याबद्दल पूर्ण सहमत. आकार छोटा असूनही कादंबरी जे चित्र वाचकांसमोर उभे करते ते खरोखर अफलातून आहे. चित्रपटही सुंदर झाला आहे, पण वाचनानंद जास्त सुंदर आहे.

In reply to by सागर

कवितानागेश Mon, 07/07/2014 - 09:22
चित्रपटात फक्त स्मिता पाटील असल्यानी तो बघवतो, असं माझं टोकाचं मत आहे. ती बरोब्बर 'चिन्धी' दिसते. बाकीचे सगळे 'शहरी' दिसतात. आपण 'ठाकरं' बघतोय असं वाटत नाही. कादंबरी सुंदरच आहे. कधीही हातात घेउन कुठूनही वाचायला सुरुवात करता येते.

Gayatri Muley Wed, 07/02/2014 - 11:10
हर्षदा भुरे यांची अबोल नात ही एक अतिशय सुंदर मनोरमा प्रकाशनाची कादांबरी. 100-150 पानी च असेल, पण मनाला भावून टाकनारी...!!!! मी तर हातात घेतली अन् 5-6 तासात संपवून टाकली होती... तुम्हाला ही मिळाली तर नक्की वाचा....

In reply to by Gayatri Muley

आतिवास Wed, 07/02/2014 - 19:33
हं! मराठीतले नवे लेखक-लेखिका फारसे माहिती नसतात आजकाल मला. त्यामुळे हे नाव नवे आहे माझ्यासाठी!

विकास Wed, 07/02/2014 - 19:50
कादंबरी विषय असल्याने गंगाधर गाडगीळांनी लिहीलेली "दुर्दम्य" ही चरीत्रात्मक लोकमान्य टिळकांवरील कादंबरी आठवली. दोन-तिनदा तरी वाचलेली आहे. प्रभावी लेखन आणि संशोधन/अभ्यासावर आधारीत आहे. दोन खंडात आधि मिळायची. मध्यंतरी अमेरीकेत येताना नव्याने एकाच पुस्तकात, ते देखील हार्डकव्हर मधे मिळाल्याने घेऊन आलो. नंतर पाहीले तर मधली काही पाने कोरी! :( दुसरी कादंबरी: "यज्ञ" - भा.द.खेर आणि शैलजा राजे यांनी एकत्रित लिहीलेली सावरकरांवरील चरीत्रात्मक कादंबरी. आठवते त्या प्रमाणे, सावरकरांच्या अखेरच्या काही वर्षांमधे त्यांनी त्यांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यावर आधारीत "आत्मकथन" स्टाईल मधे लिहीलेली कादंबरी आहे. दोन्ही वास्तवाला धरून आहेत.

विकास Wed, 07/02/2014 - 20:06
गेल्या काही वर्षात वाचलेली एक कादंबरी म्हणजे, "हंगर गेम्स"! लेकीच्या आग्रह केला म्हणून वाचली. वयात येणार्‍या मुलांना थ्रिलर वाटावी अशी कहाणी ज्यावरचा चित्रपट कदाचीत तुम्ही पाहीला असेल. पण एकंदरीतच हिंसा अंमळ जास्तच आणि अतिरंजीत वाटली. पण विशेष अर्थ न काढता, कल्पनाविष्कार म्हणून चांगली आहे. विज्ञान कादंबरी मालीका म्हणून आयझॅक अ‍ॅसिमोव्हची "फाउंडेशन" पुस्तक सांगेन. सायको हिस्ट्री, रोबोटीक्स अशा संकल्पना मांडत मांडत शेवटी "आपण सगळे एक आहोत" (वसुधैव कुटुंबकम) मानणार्‍या "गया" नामक तत्वज्ञानापर्यंत जाणारी कथा वाचण्यासारखी आहे. या लेखात मिपावरच अधिक लिहीले होते. "violence is the last refuge of the incompetent" हे त्यातले एक रोचक वाक्य. (त्यावर आधारीत नंतर "intellectual violence is the last refuge of the intellectually incompetent" असे म्हणले गेले. ;) आर्थर सी क्लर्कचे २००१ ए स्पेस ओडीसी पण वाचले नसल्यास अवश्य वाचा. स्पेस एक्स्प्लोरेशनच्या आधीचे कल्पनाशक्तीवर केलेले स्पेस एक्स्प्लोरेशन, महासंगणक हॅल ("HAL") आणि शेवटी कुठेतरी जन्म - मृत्यूचे चक्र मानण्याकडे वळलेले तत्वज्ञान वाचताना एकाकीपण येते. चित्रपट पहाताना देखील असेच होते.

In reply to by आदूबाळ

विकास Wed, 07/02/2014 - 20:29
हिचहायकर्स गाईड टू द गॅलेक्सी हे अजून वाचायचे राहीले आहे. आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद! :) अर्थात त्याची आणि फाउंडेशनची तुलना करू इच्छित नाही.

In reply to by एस

एस गुरुवार, 07/10/2014 - 14:11
'द गॉड ऑफ् स्मॉल थिंग्ज्'

     अरूंधती रॉय यांची ही एकोणिसशे सत्त्याण्णव सालची मॅन बुकर पारितोषिक विजेती इंग्रजी कादंबरी.

TheGodofSmallThings     कादंबरीतील मुख्य घटना घडतात १९६९ साली. पण जेव्हा कादंबरीतील पात्रांमधील दोन जुळ्या भावंडांपैकी 'राहेल' वयाच्या एकतिसाव्या वर्षी 'अयमेनम हाउस' या तिच्या आजोळच्या घरी परत येते तेव्हा कादंबरीची सुरुवात होते. राहेल आणि तिचा अठरा मिनिटांनी मोठा असलेला जुळा भाऊ 'एस्था' यांच्याभोवती आणि त्यांच्या भावविश्वात घडत राहणार्‍या छोट्यामोठ्या गोष्टींची दोलायमान गुंफण लेखिका तिच्या वाचकांभोवती विणत राहते. त्या दोघांच्या आणि प्रामुख्याने राहेलच्या सात-वर्षे-वयाच्या संवेदनशील नजरेतून आपल्यासमोर कादंबरीचा पट उलगडत जातो.

     पण असे असले तरी या कथानकाचा कर्ता प्रथमपुरुषी नाही. लेखिका एखाद्या मनस्वी चित्रकाराप्रमाणे फ्लॅशबॅक, लांबलेली उपकथानके, लहान मुलांना असते तेवढी समज आणि त्यातून त्यांना त्यांच्या निरागस नजरेने दिसणारे कठोर जग, त्यातून त्यांनी आपल्या परीने स्वतःच शिकलेले शहाणपण, तथाकथित मोठ्यांचा तितकाच दांभिक व्यवहारीपणा, भारताचा जातिव्यवस्थेच्या, स्पृश्यास्पृश्यतेच्या कठोर सामाजिक वास्तवाची आणि राजकीय-आर्थिक बदलांची सरमिसळ, त्यात होरपळणारे निर्दोष समाजघटक, वसाहतवादी इतिहासातून स्वातंत्र्यात येताना अ‍ॅन्ग्लोफाइल उच्चभ्रू वर्गाला भेडसावणारा त्रिशंकू सिंड्रोम, निसर्गाची मुक्त अर्थव्यवस्थेत येताना झालेली वाताहत आणि कादंबरीतील पात्रांच्या जीवनाच्या अवमूल्यनाशी याचा दिसणारा समांतरपणा या सगळ्या कथाबीजांचा, पात्रांचा, पार्श्वभूमीचा आणि लेखनतंत्राचा वापर करून काळाच्या पटलावर पुढेमागे तिच्या लेखणीचे स्वैर फटकारे मारीत राहते...

     कादंबरीच्या केंद्रस्थानी आहेत ही दोन जुळी भावंडे. त्याबरोबर कादंबरीत येणारी विविध पात्रे त्यांच्या अनावृत्त वृत्ती-प्रवृत्तींसह आणि कथानकातील घटनांच्या त्यांच्यावरील परिणामांसकट वाचकाला पदोपदी भेटतात. एस्था आणि राहेल यांची घटस्फोटीत तरूण आई 'अम्मू', त्यांचे रागीट आजोबा व सहनशील आजी, त्यांचा ऑक्सफर्डवरून शिकून परत आलेला आणि आजीचा व्यवसाय सांभाळणारा मामा 'चाको', त्याची पूर्वाश्रमीची इंग्लिश पत्नी 'मार्गारेट' आणि गोरीपान मुलगी 'सोफी', अविवाहित राहिलेली आणि त्यांच्याशी फणकार्याने वागणारी त्यांच्या आईची आत्या 'बेबी कोचम्मा', पोलिस निरीक्षक आणि मार्क्सिस्ट नेता अशी माणसे आणि सर्वात महत्त्वाचा या सगळ्यात त्यांच्याशी प्रेमळपणे वागणारी एकमेव व्यक्ती अस्पृश्य कामगार 'वेलुथा'.

     दारुड्या नवर्‍याला सोडून परत आलेली अम्मू आपल्या दोन मुलांसकट तिच्या माहेरी रहायला येते. तिच्या रागीट बापाला आणि आत्याला ते आवडलेले नसते. याचा परिणाम म्हणून त्यांचे अयमेनम हाउसमधील स्थान नेहमीच दुय्यम राहणार असते. अम्मूची अविवाहित आत्या बेबी कोचम्मा हिने कधी काळी 'नन' बनण्याचा प्रयत्न केलेला, पण त्या निर्णयामागे देवाची भक्ती नसून तिला तेव्हा भेटलेला कुणी फादर मुलिगन आणि तरूण नवोमीचे त्याच्याकडे आकर्षित होणे असते. हा प्रेमभंग नंतर तिचे कठोर व्यक्तिमत्त्व बनण्यास आणि अम्मूच्या मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यास कारणीभूत ठरणार असतो का? की त्यांचा मामा चाको आणि त्याचा विक्षिप्त गर्विष्ठपणा? चाको ऑक्सफर्ड विद्यापीठात शिकतानाच एका इंग्लिश वेट्रेसच्या, मार्गारेटच्या प्रेमात पडलेला असतो. पण मार्गारेटच्या पालकांना तिने एका काळ्याशी, भारतीयाशी लग्न करावे हे आवडलेले नसते. पण हे लग्नही जास्त टिकत नाही. चाको आणि मार्गारेटच्या मुलीच्या - सोफीचा जन्मानंतर ते विभक्त होतात. मार्गारेट गरोदर असतानाच दुसर्‍याच्या प्रेमात पडलेली असते. वैवाहिक आणि शैक्षणिक अपयश पदरात घेऊन चाको भारतात परततो ते घरचा लोणची बनवण्याचा व्यवसाय सांभाळायला. आता तो एक श्रीमंत उद्योजक म्हणून आपल्याला भेटतो. इकडे इपे कुटुंबाचा परंपरागत वृद्ध नोकर वेल्ल्या पापेन आणि त्याचा तरूण मुलगा वेलुथा हे त्यांना जातिव्यवस्थेने मिळालेली अस्पृश्यता आणि सामाजिक-आर्थिक व्यवस्थेतील खालचे स्थान सांभाळत जगत असतात. वेलुथा काहीसा बंडखोर आहे. तो मार्क्सवादी असल्याचा बेबी कोचम्माला आणि इन्स्पेक्टरला संशय आहे. त्यामुळे बेबी कोचम्माला वेलुथाबद्दल अनामिक भीती वाटतेय. तीच भीती जी सामर्थ्यवान घटकाला दुर्बल घटकांबद्दल सतत वाटत राहते, दुर्बल पुढेमागे सबल होऊन त्यांची सत्ता उलटून देतील अशी भीती. हीच भीती पुढे वेलुथाला आणि तो प्रेम करत असलेल्या जुळ्या भावंडांना व त्यांच्या तरूण आईला उद्ध्वस्त करणार असते का?

     त्या रात्री काय घडले? घुसमट आणि अन्याय यांपासून कुठले जीव पळू पाहत होते? कोणाच्या डोळ्यांनी अशी स्वप्ने पाहिण्याचे धाडस केले ज्या स्वप्नांना इतिहासाच्या नियमचौकटींची मान्यता नव्हती? कुठले चिमुकले हात त्या रात्री बोट उलटल्यावर अनोळखी पाण्यावर परत आले नव्हते? त्या अंधार्‍या झाडीत कोणाच्या डोळ्यांनी एक गुन्हा पाहिला होता ज्या गुन्ह्याचे साक्षीदार होण्याचे अपील परिस्थितीच्या न्यायव्यवस्थेने त्यांना झिडकारले होते? लहानग्या, शहाण्या एस्थाने उरलेल्या आयुष्यभर अबोलपणे वावरावे असे त्याला काय बोलायला लावले गेले साक्षीदाराच्या कठड्यात?

     गुन्हा काय होता? कोणी केला होता? कोणाला शिक्षा झाली आणि कोण मेले त्या रात्री?

 

     रॉय यांची लेखणी परंपरेने चालत आलेली लेखनाची चौकट नाकारते, उलटून लावते. त्यांची भाषा कधी अल्लड निरागसतेने कर्मठ वाचकांना त्रास देत व्याकरणाचे-शुद्धलेखनाचे नियम तोडते, तर कधी स्थितप्रज्ञाच्या गांभीर्याने इतिहासातून उतरलेले धागे विणत मानवी आयुष्याचा त्यासमोरचा क्षुद्रपणा दाखवत या नाट्यावर भाष्य करते. कादंबरीची पानेही पारंपारिक एकमार्गीपणा नाकारतात. यातील प्रत्येक भाग आणि प्रत्येक प्रसंग कालाच्या पटलावर एकसुरीपणे आपापली जागा घेत असला तरी कादंबरीत मात्र सर्व सोबतच येत राहते. मग तो त्र्याण्णव सालचा राहेल परत आल्यावर तिला दिसलेला अबोल एस्था असो वा एकोणसत्तरचा विमानतळावर सोफीमोल आणि मार्गारेटला आणायला जाणारा 'घरातील पुरुष' मुलगा एस्था असो. अभिलाष टॉकीजमध्ये साउंड ऑफ म्युजिक पाहताना ऑरेंजमॅन-लेमनमॅनकडून एस्थाचे होणारे लैंगिक शोषण किंवा वेलुथाला काहीही अपराध नसताना लाथाबुक्क्यांनी होणारी कोठडीतील मारहाण असो. या घटना आणि त्यानंतर येणारी मानवी आयुष्यांची वाताहत, उद्ध्वस्तता रॉय फ्लॅशबॅकमधून मागेपुढे रेखत जातात. त्यांच्या लेखणीत परिणाम आधी येतो आणि मग कारण. आणि जणू काही त्यांचा परस्परसंबंध अधोरेखित करत उरणारी अपरिहार्यता वाचकांच्या मनात सांडत जाते - लाइक टी फ्रॉम टीबॅग.

     अनेकांना हे पुस्तक आवडले नाही. कित्येकांना झेपलेही नाही. मलाही बर्‍याचदा वाचल्यानंतर आणि इतकी वर्षे डोक्यात घोळवल्यावर त्यावर चार शब्द लिहिता आलेत. अरूंधती रॉय यांची इतर मते व त्यांची वादग्रस्तता हा वेगळा विषय आहे. पण माझ्यापुरता माझ्या मनावर विलक्षण परिणाम करणारी ही मला सर्वात जास्त आवडणारी कादंबरी आहे.

In reply to by मितान

एस Fri, 07/11/2014 - 12:21
जितकं मनात होतं त्याच्या एक टक्काही नीट लिहिता आलं नाही! पण इतर कशासाठी नाही तर किमान यातील भाषेसाठीतरी 'द गॉड ऑफ् स्मॉल थिंग्ज्' नक्की वाचा.

बॅटमॅन गुरुवार, 07/03/2014 - 17:55
"द रिडल ऑफ लेबिरिंथ" नामक मार्गालिट फॉक्स या लेखिकेचे पुस्तक वाचले. लिनिअर बी या लिपीचा उलगडा करणार्‍या संशोधकांपैकी जॉन चॅडविकचे पुस्तक अगोदर वाचले होते, त्यानंतर त्याच विषयावरचे हे पुस्तक वाचले. बेशिक तेच तेच असले तरी अ‍ॅलिस कोबेर या भाषाशास्रज्ञ बाईंबद्दल पहिल्यांदा डीटेल माहिती यात मिळते. महायुद्धाच्या काळात कागद मिळेना म्हणताना लायब्ररीतील पुस्तकांच्या नेआणवाल्या स्लिपा, सिगरेटची पाकिटे, ग्रीटिंग कार्ड आणि वह्यांचे पुठ्ठे, इ.इ. जे काय मिळेल ते वापरून तिने जवळपास १,८०,००० छोटी नोंदकार्डे बनवली आणि लिनिअर बीचा जवळपास फडशाच पाडला. पण जॉन मायर्सची किरकीर, तसेच कॉलेजचा शिकवण्याचा लोड, इ.इ. लडतरींमुळे बिचारीला काही पुढं जाता आलं नाही. पण जे केलं त्याचा मायकेल व्हेंट्रिसला पुढं लै उपयोग झाला. अ‍ॅलिस कोबेरची नव्याने ओळख झाल्याचा लैच मोठा फायदा झाला या पुस्तकामुळे. आता नेक्ष्ट टार्गेट 'द मायसीनिअन वर्ल्ड' बाय जॉन चॅडविक. लिनिअर बीच्या जवळपास ६००० मृत्तिकालेखांतून आपल्याला काय काय माहिती मिळते त्याचा आढावा घेणारं पुस्तक आहे. अपोलो, पोसायडन, इ. देवांची नावे, ट्रॉयहून आणलेल्या गुलाम स्त्रिया, गुलामांना दिलेली अपमानजनक नावे, झालंच तर अकिलीसचे नाव कोरलेले मिळणे, इ.इ. बर्‍याच गंमतीजमती आहेत.

बॅटमॅन गुरुवार, 07/03/2014 - 18:01
"प्रिन्सेस-अ ट्रू स्टोरी बिहाईंड द व्हेल इन सौदी अरेबिया" हे जीन सॅसनचे पुस्तक मध्ये वाचले. सौदी राजघराण्यातल्या एका सुलताना नामक राजकन्येचे (नाव बदलून पण खर्रेखुर्रे) आत्मवृत्त आहे. काळ १९७० पासून पुढचा. नॉट विदौट माय डॉटर, सोन्याच्या धुराचे ठसके, मयादा, इ. पुस्तके वाचलेल्यांना काही नवीन नाही. पण राजघराण्यातील व्यक्तीच्या दृष्टिकोनातून तिथल्या स्त्रियांच्या पशुवत् स्थितीचे वर्णन कधी वाचले नव्हते ते या निमित्ताने वाचायला मिळाले. वर्णनशैली 'व्हिव्हिड" (मराठी?) आहे, खिळवून ठेवणारी आहे. बर्‍याच गोष्टींबद्दल आधी कुठेसे वाचले असले तरी इथे त्या एकदम अंगावर येतात. सौदी राजघराण्याची अगणित संपत्ती आणि शिवाय स्त्रियांवरच्या बंधनांमुळे येणार्‍या कंटाळ्याचे, रितेपणाचे वर्णन यथार्थ आहे. अशी वर्णने कैकदा डिसमिसिवली जातात, सुख टोचतंय इ.इ. म्हणून. पण त्यामुळे त्यांची सत्यता कमी होते असे मला तरी वाटत नाही. असो. सौदीमध्ये अलीकडे झालेले काही बदल त्या तुलनेने बरेच स्वागतार्ह आहेत. बाकी, जीन सॅसनबद्दल फ्रॉडचे आरोपही झालेत, तेव्हा किती खरेखोटे ते तो एक अल्लाच जाणे. पण पुस्तक रोचक आहे हे नक्की.

मधुरा देशपांडे गुरुवार, 07/03/2014 - 18:36
कदाचित अनेकांनी वाचली असेल तरीही अमृतवेल - वि. स. खांडेकर सगळ्यात पहिल्यांदा वाचली तेव्हा आवडली होती पण समजण्या एवढी कुवत नव्हती. पण तेव्हा आवडलेल्या ओळी, परिच्छेद हे एका वहीत किंवा डायरीत लिहून ठेवले जायचे. परत कधीतरी वहीतून हे संग्रहित साहित्य वाचून आनंद मिळायचा. अशीच एक वही वाचताना ही कादंबरी पुन्हा वाचावीशी वाटली. पुन्हा शोध घेऊन वाचली. तेव्हा ती अधिक समजली. आधी ज्या ओळी केवळ पुस्तकी किंवा आलंकारिक म्हणून जास्त आवडल्या होत्या, त्या नंतर वाचताना अधिक उमगल्या. वयानुसार आणि काळानुसार वेगळ्या दृष्टीने वाचली गेली. अनेक व्याख्या बदलल्या होत्या. पण तरीही आवडीच्या यादीत अजूनच फिट्ट बसली. त्यापैकीच काही निवडक देतेय…(आता ती वही राहिली नाही, ती लिहून ठेवायची सवयही नाही, तेव्हा आंतरजालावरून साभार) "भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही. मानवाचे मन केवळ भूतकाळाच्या साखळ दंडाने करकचून बांधून ठेवता येत नाही. त्याला भविष्याच्या गरुड पंखांचे वरदानही लाभले आहे. एखादं स्वप्न पाहणं, ते फुलविणं, ते सत्य सृष्टीत उतरावे म्हणून धडपडणे, त्या धडपडीतला आनंद लुटणे, आणि दुर्दैवाने ते स्वप्न भंग पावलं तरी त्याच्या तुकड्यांवरून रक्ताळ लेल्या पायानी दुसर्या स्वप्नामागे धावणे हा मानवी मनाचा धर्म आहे. मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो तो त्यामुळे." वि.स.

In reply to by मधुरा देशपांडे

सौंदाळा गुरुवार, 07/03/2014 - 18:45
अमृतवेल मधे तुम्ही वर दिल्याप्रमाणे अनेक सुंदर ओळी आहेत पण एक कथानक म्हणुन ती मला अगदीच सामान्य वाटली.

In reply to by मधुरा देशपांडे

यशोधरा गुरुवार, 07/03/2014 - 18:48
लहानपणी वाचली होती तेह्वा मलाही खूप आवडली होती अमृतवेल. आता कथानक वाचूही शकत नाही. पण त्यातील संवाद, भाषा सुरेख होती हे मात्र खरेच. आता अमृतवेल कथानकासाठी वाचवत नाही पण भाषेसाठी संग्रही ठेवली आहे. :)

In reply to by मधुरा देशपांडे

विकास गुरुवार, 07/03/2014 - 19:51
खांडेकर म्हणल्यावर दोन पुस्तके आठवली. एक म्हणजे "ययाती" - लहानपणी वाचले तेंव्हा खूप आवडले. जसे होते तसे एक कादंबरी म्हणून समजून घेतले. नंतर दुर्गाबाई भागवतांची त्यावरील टिका वाचली आणि त्यातील चुका समजल्या. दुसरे पुस्तक म्हणजे, "सोनेरी स्वप्न भंगलेली" - नीट आठवत नाही. पण गांधीवादी पिढीला आलेले स्वातंत्र्योत्तर नैराश्य (फोलपणा) ह्यावर आधारीत कथानक होते.

In reply to by प्रचेतस

विकास गुरुवार, 07/03/2014 - 21:20
मला आठवावे लागेल. मी नंतर पुस्तक शोधून अधिक संदर्भ देण्याचा प्रयत्न करेन. पण त्यांचा मुद्दा असा होता की पुराणातल्या कथेवर कथानक बसवताना खांडेकरांनी संस्कृतीचे मिश्रण केले होते. काही वेळेस त्यातले काही प्रसंग होते ते तर वास्तवीक ख्रिस्ती परंपरेतले होते, असेच अजूनही काही होते. येथे एक लक्षात ठेवावे बाईंच आक्षेप ख्रिस्ती धर्म वगैरे नव्हता तर सरमिसळ करत योग्य चित्र न उभारण्यात होता.

In reply to by विकास

प्रचेतस गुरुवार, 07/03/2014 - 21:49
धन्यवाद. 'ययाती' वाचण्याचा प्रयत्न एकदा करून पाहिला होता पण वाचवले गेले नव्हता. महाभारतातील मूळ यायातीचे उपाख्यान कितीतरी सरस आहे त्यापेक्षा. तसेही ऐतिहासिक अथवा पौराणिक कथानकांवर कादंबरी लिहिताना बरेचसे लेखक (मूळ कथानकच नाट्यमय असतानाही) प्रमाणाबाहेर लेखनस्वातंत्र्य घेतात आणि कादंबरीची अक्षरश: वाट लावतात. यात रणजीत देसाई, शिवाजी सावंत आदि मान्यवरही आले.

In reply to by प्रचेतस

कवितानागेश गुरुवार, 07/03/2014 - 22:19
ययाति केवळ कादंबरी म्हणून वाचताना खूपच सुंदर आहे. अर्थात मूळ कथेपेक्षा अधिक गोष्टी त्यात घातलेल्या आहेत हे लक्षात येतं, तरीही मला तरी ती हातातून ठेववत नव्हती. पण सरमिसळ केली तरीही मूळ कथेच्या गाभ्याला धक्का लावलाय असं वाटलं नाही. इतर कादंबर्‍यांबाबत सहमत.

प्रभाकर पेठकर गुरुवार, 07/03/2014 - 20:01
आमच्या घरात वाचनाची आवड आई आणि वडील दोघांनाही. आईला रोजच्या वर्तमानपत्रापलीकडे जास्त कांही वाचताना पाहिलं नाही. तिला तेवढा मोकळावेळही नसायचा. वडील कथा कादंबर्‍या वाचायचे. उन्हाळ्याच्या सुट्टीत माझ्या बाबतीत आईचा आग्रह असायचा की, 'बाहेर उडाणटप्पूपणा करण्यापेक्षा घरात बसून पुस्तकं वाच.' आमच्या गल्लीत आमचे समाजसेवी फॅमिली डॉक्टर (डॉ. भांडारकर) ह्यांनी एक मोफत वाचनालय चालविले होते. स्वतः पदरमोड करून ते वाचनालय चालवायचे. तिथे लहानपणी परोपकारी गोपाळ, गोट्या, फास्टर फेणे, कर्‍हेचे पाणी वगैरे पुस्तके आणि विज्ञानयुग, अमृत, फुलबाग, विचित्रविश्व वगैरे नियतकालीकं फुकट वाचायला मिळायची. ती तिथेच बसून अट असायची. पुस्तक घरी न्यायचे असेल तर एकदाच ५ रुपये अनामत रक्कम ठेवावी लागे. आईने आम्हा दोन्ही भावंडांच्या नांवे तशी रक्कम भरून पुस्तके घरी आणून वाचायची सुविधा आम्हाला पुरविली. पुढे गल्लीत मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची शाखा उघडली आणि अवघे साहित्यिक विश्व आमच्या दारी आले. तिथेही अनेक पुस्तके वाचली. पुढे नोकरीला लागल्यावर पुस्तके विकत घेऊन वाचायचे 'व्यसन' लागले. शाळेतून पुलंची ओळख होतीच. 'खोगीरभरती'तला धडा होता. मासिकांमधून वपुंची ओळख झाली. कॉलेजात 'गारंबीचा बापू' मुळे श्रीनांनी वेड लावले, नाटकांच्या आवडीतून 'गुतता हृदय' मुळे शन्ना आपलेसे वाटू लागले. आयुष्याच्या वाटेवर लहान आणि तरूणपणी अशा अनेक लेखक/लेखिका मला बोट धरून चालवलं. घरी आईवडील, शाळेत शिक्षक आणि पुस्तकरुपाने ह्या सर्व साहित्यिकांनी अनेक चांगले संस्कार घडविले. त्यांचे ऋण कधीच फेडता येणार नाही. ह्या साहित्य आकर्षणाच्या वटवृक्षाचं मूळ रोपटं आईने लावलं, आपल्या नजरेखाली वाढविलं. रोजची वर्तमानपत्र, दिवाळी अंक (तोही लोकसत्ता), आणि पुढे पुढे कालनिर्णयची पाठीमागची बाजू ह्याच्या बळावर वाचनाचं महत्त्व जाणून तिने आम्हाला (मला आणि माझ्या मोठ्या बहिणीला) वाचनाचं वेड लावलं. ह्या धाग्यावर माझ्याकडून एखाद्या (कदाचित जास्तच) पुस्तकाबद्दल लिहीण्याआधी, ही आवड जिने लावली त्या आईबद्दल आधी लिहीणं मला जास्त उचित वाटलं म्हणून लिहीलं. धाग्याच्या विषयाला सोडून आहे. पण एवढे खपवून घ्या. लवकरच माझ्या वाचनवेडा विषयी लिहीन.

सस्नेह गुरुवार, 07/03/2014 - 22:07
ले. शशी भागवत. कळत्या वयात या कादंबरीने वेड लावले होते अन अजुनी वाचताना मोहवते. प्राचीन काळातील वैभवशाली चित्रण, रहस्य, व्यक्तिवैचिध्य अन नर्म शृंगार यांची चित्तवेधक गुंफण म्हणजे मर्मभेद. शशी भागवतांच्या एका हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच कादंबर्‍या आहेत. त्यात सर्वात सरस मर्मभेद. अवश्य वाचा.

In reply to by सस्नेह

प्रसाद१९७१ Fri, 07/04/2014 - 10:47
मर्मभेद वाचले आहे. तुम्ही म्हणता तसे किशोर वयात वाचण्यासारखे आहे. चंद्रलेखा ला जशी प्रसिद्धी मिळाली तशी मर्मभेद ला मिळायला हवी होती.

In reply to by सस्नेह

कपिलमुनी Fri, 07/04/2014 - 20:41
मर्मभेद पेक्षा रक्तरेखा आणि रत्न प्रतिमा जास्त आवडल्या.. अजून एक कादंबरी अप्रकाशित आहे असे एकून आहे

अजया गुरुवार, 07/03/2014 - 22:12
प्रकाश नारायण संत माझे अत्यंत आवडते लेखक.त्यांची वनवास्,शारदासंगीत पंखा आणि झुंबर अशी चार(च) पुस्तकं आहेत.या चारही पुस्तकातून आपल्याला कथानायक लंपन भेटतो,आई वडिलांपासून दूर आजी आजोबांकडे राहाणारा.पौगंडावस्थेतले अवघड वय्,अतिशय संवेदनाशील स्वभाव असणारा.सुंदर पेटी वाजवणारा,सुमीकडे चोरुन बघणारा! सर्वच पुस्तकांमध्यली भाषा बेळ्गावी मराठी.ती वाचताना अगदी गोड वाटते.लंप्याचे मित्र त्याला काय करायलय लंप्या!असं बोलणारे.त्यांची नावही मस्तच! कणबर्गी गंग्या,सोंडृया,परळ्या,टुकण्या! मी माझ्या मुलाच्या मित्रांना ही नावं बहाल केली आहेत! या सर्वच कथांमध्ये लंपन बरोबरच तो परिसर ,ती भाषा,गुंडीमठ रस्ता,शारदासंगीत विद्यालय्,सुमीची सोनसाखळी,लंप्याचे मित्र्,त्यांची टारझनगीरी! अगदी नकादुचेण्या कपासके(केस कापण्याचे दुकान!!) असे सगळं मिळून या अनोख्या कथा जमून आल्या आहेत. लंपनच्या भाषेत अठ्ठाविसशे तीस वेळा जरी ही पुस्तकं वाचली तरी ताजंतवानं वाटतं हे खरं! या लंपनशी माझं एक छानसं नातं आहे. माझ्या प्रेग्नंन्सीच्या दिवसात वनवास माझ्या हातात पडलं.हे पुस्तक इतकं आवडलं की त्याची पारायणं झाली. त्यातल्या लंपनचेच गर्भसंस्कार झाल्यासरखा माझा मुलगाही तसाच शांत्,डोक्यात चक्र असणारा ,संवेदनशील आहे. इतका या पुस्तकाचा परिणाम!

In reply to by नंदन

प्यारे१ Sat, 07/05/2014 - 16:05
+२८३० एक्दम मॅड पुस्तकं! हुंब माणूस पण प्रेमात पडेल अशी.

प्रभाकर पेठकर Fri, 07/04/2014 - 01:53
शालेय इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांनी आमचं चिमुकलं मन केंव्हाच व्यापून टाकलं होतं. पुढे एका शिवजयंती कार्यक्रमात श्री. बाबासाहेब पुरंदरे ह्यांचं अफजलखान वधाचं आख्यान ऐकलं आणि तरूण मनावर रोमांच उभं राहिलं बाबासाहेबांची ओघवती भाषा, आवेश, आवाजातील चढ उतार आणि संपूर्ण प्रसंग जस्साच्यातस्सा डोळ्यासमोर उभा करण्याची बाबासाहेबांची हातोटी ह्या सर्वाचा माझ्या तरूण मराठी मनावर सकारात्मक परिणाम झाला. त्या नंतर आले बाबासाहेबांनी लिहीलेले राजा शिवछत्रपती हे पुस्तक. माझ्या एका मित्राच्या बायकोने ते मला वाचायला दिले. ते दोन दिवसात बाचून संपविले पण शिवचरीत्राने आलेले भारावलेपण संपता संपेना. पुन्हा एकदा बाबासाहेबांची भाषा, ते तारीखवार तपशिल, मराठी तिथी-तारखा आणि प्रसंगातले बारकावे वाखाणण्याजोगे आहेत. ह्या पुस्तकातील प्रसंगानुरुप काढलेली चित्रं अतिशय नेमकी आहेत. प्रत्येक प्रसंगात आपण स्वतः तिथे उपस्थित आहोत असाच भास होतो. मन पूर्णपणे इतिहासात रममाण होते. मोघलांविरुद्ध लढायांचे वर्णन वाचताना आपल्याही चेव येतो आणि मावळ्यांची स्वामीभक्ती पाहून आपल्याही मनांत शिवाजी महाराजांबद्दल आदरभावना निर्माण होते. पावनखिंड प्रसंग अंगावर काटा आणतो. नंतर प्रत्यक्ष पावनखिंडीला भेट दिली तेंव्हा राजा शिवछत्रपती कादंबरीतील बाजीप्रभू देशपांडे ह्याची एकाकी लढत आठवली आणि आदराने नतमस्तक झालो. सर्वच दृष्टीने पुस्तक वाचनिय आणि संग्रहणिय आहे. पुन्हा पुन्हा राजा शिवछत्रपती कादंबरीची अनेक पारायणं होतात. दरवेळी तोच आणि तेव्हढाच आनंद होतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

सखी Fri, 07/04/2014 - 03:05
पेठकर काका मलाही हीच पहिली कादंबरी आठवली जी शालेय जीवनात वाचुनही अजुनही भारावुन टाकते. जाणता राजा बघणं हाही एक आनंददायी सोहळा होता. बाबासाहेब पुरंदरे यांच शिवचरीत कथन जालावर आहे.

In reply to by सखी

प्रभाकर पेठकर Fri, 07/04/2014 - 10:27
'जाणता राजा' एक विस्मयकारक कलाकृती आहे. रंगमंचाची भव्यता, २००+ कलाकारांचा उत्साह, प्रकाश योजना, वेशभूषा, आतिशबाजी, घोडेस्वार, बैलगाडी सर्व सर्व अगदी नजरेचे पारणे फेडणारे आहे. विशेष म्हणजे संपूर्ण नाटक ध्वनीमुद्रित आहे आणि प्रत्यक्ष बोललेले संवाद नाहीत. त्यामुळे संवाद विसरण्याची, नाटक रेंगाळण्याची शक्यता उरत नाही. शिवचरीत्राचे चित्ररुप धावते आणि अद्भूत समालोचन म्हणता येईल. जाणता राजाच्या कार्यक्रमात, मध्यंतरात, रंगमंचाच्या मागे, बाबासाहेबांना भेटण्याचा प्रसंग आला होता. त्यानंतर गेल्या महिन्यात लंडन मध्ये एका पुस्तक प्रकाशन सोहळा आणि ५ दिवस लंडन दर्शन कार्यक्रमात बाबासाहेबांचा सहवास लाभला. ब्यांण्णव्यावर्षीही बाबासाहेबांची स्मरणशक्ती आणि वाचा कणखर आहे. आज दुर्दैवाने ते व्हिल चेअरवर असले तरीही उत्साह पन्नाशीतला आहे. अजूनही ते व्याख्यानाला तयार आहेत. मस्कतला त्यांना बोलावण्याचे घाटत आहे. निदान १ दिवस तरी हल्लीच्या पिढीला प्रत्यक्ष त्यांच्या तोंडून शिवचरीत्र ऐकवावे ह्या उद्देशाने त्यांना विनंती केली आणि त्यांनी ती मान्य केली. त्यांना आमच्याकडून....मानाचा मुजरा.

In reply to by प्रभाकर पेठकर

एसमाळी Fri, 07/04/2014 - 17:09
राजा शिवछत्रपती मध्ये काही चुका आहेत.ज्या आजतागायत सुधारल्या गेल्या नाहित.पुस्तक एकदा वाचल्यावर पुन्हा वाचावे असे नाही वाटले.

In reply to by आदूबाळ

बॅटमॅन Fri, 07/04/2014 - 17:44
प्रत्यक्ष शिवकालासंबंधी फॅक्च्युअल चुका नसाव्यात असे वाटते, मात्र देवगिरीवर अल्लाउद्दीन खिलजीने केलेली स्वारी, त्यानंतरची तथाकथित लूट, इ.इ. अतिरंजित वर्णने जुन्या तवारिखांतून आहेत तश्शीच्या तश्शी उचलली आहेत. प्रसिद्ध इतिहास संशोधक कै. ब्रह्मानंद देशपांडे यांनी 'देवगिरीचे यादव' नामक पुस्तक लिहिले आहे त्यात त्या वर्णनांतील अतिरंजितपणा सोदाहरण स्पष्ट केलेला आहे.

धन्या Fri, 07/04/2014 - 11:00
डॉ. रमा मराठे यांनी लिहिलेलं हे एक नितांत सुंदर पुस्तक आहे.
एक धागा सुखाचा शंभर धागे दु:खाचे जरतारी हे वस्त्र मानवा तुझिया आयुष्याचे ग. दि. माडगूळकरांचा हा संदेश वेगवेगळ्या ढंगाने लेखिकेने या पुस्तकात फुलवला आहे. आजचं जीवन धकाधकीचं बनलेलं आहे. अनेक समस्या, संघर्ष आणि ताणांनी माणसाचं आयुष्य व्यापून गेलं आहे. आणि म्हणूनच तो सुखाला पारखा झाला आहे असे त्याला वाटते, परंतु सुख ही एक मानसिक सवय आहे. माणसाचं जीवन अनुभवणं यातच खरं सुख आहे. हे जीवन अनुभवताना भावनांचे, विचारांचे वेगवेगळे पैलू दृसि पडतात. या पैलूतून सुखाचे वेगवेगळे रगं नजरेस पडतात. अनुभवायला मिळतात. फक्त हे रंग पाहण्याची दृष्टी, तसा चष्मा आपणास असला पाहिजे व अशी 'दृष्टी’ देण्याचे मार्गदर्शन या पुस्तकातून रमा मराठे यांनी केले आहे. नेहमीच आनंदी राहण्याचे मर्म सांगणारे सुखाच्या प्राप्तीचे मार्ग सांगणारे पुस्तक.
- रंग सुखाचे पुस्तकाची बुकगंगा डॉट कॉम वर दिलेली माहिती.

स्नेहल महेश Fri, 07/04/2014 - 11:52
मला वाचनाची आवड लहानपणापासून आहे आणि तशी बरीच पुस्तक वाचली आहेत पण मला सुधा मूर्ती या लेखिकेची पुस्तके खूप आवडतात मी वाचलेली काही पुस्तके Dollar Bahu Gently Falls the Bakula Wise & Otherwise THE DAY I STOPPED DRINKING MILK काही इतर पुस्तके (लेखक -आमिष त्रिपाठी ) मेलुहा चे मृतुंजय नागाचे रहस्य शपथ वयुपुत्राची

मनिष Fri, 07/04/2014 - 12:33
सध्या फारशा कादंबर्‍या किंवा फिक्शन वाचत नाही पण जवळपास २० वर्षे आधी वाचलेली रारंग ढांग आजही आवडते. हिमालयाच्या पार्श्वभुमीवरची, Border Roads Organisation बरोबर हिमालयात रस्ता बनवणार्‍या विस्वनाथची ही कथा. त्याचे ज्ञान, थोडा एककल्ली हेकटपणा, आदर्शवाद आणि त्याच्या जोडिला वैतागलेला नायर आणि जिंदादिल मिनू. सगळे मिळून एक भन्नाट रसायन झालेय. पुढे कधीतरी डॉ. दाढेंशी गप्पांमधे कर्नल आनंदराव (पहिल्या नावाविषयी खात्री नाही, पण बहुदा हेच) जाधव यांनी लिहिलेल्या 'जिंदादिल' ह्या आत्मचरित्रपर पुस्तकाशी असलेल्या ह्या कादंबरीच्या नात्याबरोबर कळले. खूप शोधुनही हे 'जिंदादिल' अजुनही मिळाले नाहीच. :( ह्याबद्दल अजून काय, काय लिहावं? मलाही अतिशय आवडणारी कादंबरी. मुळात पेंढारकर सिनेमावाले...त्यामुळे ही कादंबरी एखाद्या पटकथेसारखी चित्रदर्शी आणि रोचक. ऊंट मरणे वगैरे प्रसंग एकदम दिग्दर्शकाने घेतल्यासारखे सूचक. अशीच गुंतवून ठेवणारी शैली त्यांच्या "अरे संसार, संसार.." आणि "चक्रीवादळ" ह्या कादंबार्‍यातही दिसते. पण 'रारंग ढांग' ते रारंग ढांगच!!! ह्या इतक्या सुंदर कथेवर चित्रपट का नाही बनला हे खूप बर्षे माझ्यासाठी कोडेच होते. सुमित्रा भावे आणी सुनील सुकथनकर ह्यांच्याबरोबर एका "स्क्रिप्ट रायटींग' च्या कर्यशाळेत ह्याच्यावर उत्तर सापडले. सेन्सॉरने म्हणे (अमोल पालेकरांना) परवानगी नाकारली कारण पुस्तकामुळे संरक्षण दलांबद्दल फारच निगेटीव्ह प्रतिमा होते. मी कॉलेजात ११-१२ वीत असतांना आमच्या मित्रांपैकी कित्येकांना डिफेन्स मधे जायचे भूत होते.... पण NCC तील seniors चे बेताल आणि मुजोर वागणे, त्यातल्या अधिकार्‍यांचे असंवेदनशील वर्तन ह्याबरोबरच 'रारंग ढांग' हे मला NDA पासून दूर ठेवण्याचे एक प्रबळ कारण होते. मला मानव आणि निसर्गापेक्षाही हा माणूस आणि व्यवस्था ह्यांच्यातला संघर्ष वाटतो. शेवटी विश्वनाथला विचारलेला प्रश्न "तुला अपेक्षित्/अभिप्रेत असलेले स्वातंत्र्य तुला ह्या बाहेरच्या जगात तरी मिळेल का?" ह्या प्रश्नाने पुस्तकाच्या बाहेर अयुष्यातही खूप वेळा छळले आहे. मुळातील मनस्वी, स्वच्छंद स्वभावामुळे, "तुला जे मनापासून करायचे आहे, ते खरच करता येईल का?" हा प्रशन वेगवेगळ्या रुपात भेटतच राहतो! हिमालयातील उंचावरचे रस्ते बघतांना कुठेतरी 'रारंग ढांग' मनात घुटमळता राहिले... इथेच कुठेतरी विश्वनाथने 'ते' स्मारक बांधले असेल का असा वेडा विचारही मनात येऊन गेला! :) नंतर मग कधीतरी, कुठल्या ना कुठल्या कारणाने रारंग ढांग मधले मला भावलेले, कुठेतरी आत रुजलेल/रुतलेले प्रसंग मनात कळत-नकळत उमटत राहतात...कधी बोलतांना संदर्भ म्हणून (आणी समोरच्याने ते पुस्तकच वाचले नसेल तर मग एक अशक्य तगमग होते...) तर कधी एखाद्या ब्लॉग-पोस्टमधे माझीच अस्वस्थता व्यक्त करतांना. 'रारंग ढांग' मला आवडते ते मुलतः त्यातील विश्वनाथच्या अंतर्गत संघर्षामुळे...आणि कित्येक वेळा आयुष्यात प्रसंग/डिटेल्स वेगळे असले तरी प्रश्नांचा पॅटर्न बराचसा सारखा असतो असे वाटते. वेळ आल्यास, स्वतःला खरच योग्य वाटणार्‍या निर्णयामागे खंबीरपणे उभे रहाण्याची आंतरीक शक्ति मिळावी, किंबहुना ती मिळवावी अशी तीव्र इच्छा प्रत्येकवेळेस हे पुस्तक वाचतांना होते. तशी आंतरीक शक्ति माझ्याकडे आहे का? प्रामाणिकपणे सांगायचे तर ह्या प्रश्नाचे होकारार्थी उत्तर आजतरी माझ्याकडे नाही, पण ते तसे असावे ह्याची प्रेरणा देणार्‍या पुस्तकांत 'रारंग ढांग' चे स्थान खूपच वर आहे!
रारंग ढांग विषयी पुस्तकविश्व्वरील श्रावण मोडक यांचा लेख इथे वाचता येईल - http://www.pustakvishwa.com/content/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B9%E0%A5%83%E0%A4%A6-%E0%A5%A7

In reply to by मनिष

एस Fri, 07/04/2014 - 15:39
रारंग ढांगने झपाटून टाकले होते. तेव्हा काय वाटत होते हे तुम्ही आणि श्रामोंच्या पुस्तकविश्वाच्या लेखात त्यांनी छान सांगितले आहे.

In reply to by मनिष

सखी गुरुवार, 07/10/2014 - 15:25
मनिष हा प्रतिसाद रारंगढांगवरचा अतिशय आवडला, श्रामोंचा लेख वाचण्यात आला नव्हता, तोही खूप आवडला, इथे दुवा दिल्याबद्द्ल आभार. तसेच तुमचा व्लॉगवरचा लेखही निरुत्तर करणारा. मिपावरच डॉ. दाढेंचा हालेखही सापडला. यावरती येणारं सिनेमा, नाटक गुलदस्त्यातच राहीलं तरी अभिवाचन स्नॉवेलवर आलयं असं वाटतं. 'पुन्हा रारंग ढांग' कुणी वाचलय का? यावर दिवाळी अंकात कोणीतरी आव्हान दिल्याचे आठवते दुवा सापडला तर टाकते परत येऊन.

In reply to by सखी

सखी Sun, 07/13/2014 - 08:22
पुस्तकाचं नाव 'पुन्हा रारंग ढांग' नाही तर 'रारंग ढांग नंतर … ' असे आहे. श्रीकृष्ण सवदी यांनी लिहलेलं आहे. चंद्रकांत मासिकानं दिलेले हे आव्हान त्यांनी पेललं, असं पुस्तकाच्या शेवटच्या पानावर दिलं आहे, दुवा.

मनिष Fri, 07/04/2014 - 12:36
अरे हो! सांगायचे राहिलेच. उपक्रम खूप आवडला. कादंबरी सोडून नुसत्या आवडत्या पुस्तकांविषयी लिहायला सांगितले तर मग माझ्यासाठीच एक नवीन विभाग सुरू करावा लागेल, आणि अर्थातच कोणालातरी माझ्या पोटापाण्याची सोयही करावी लागेल. :P

स्पा Fri, 07/04/2014 - 13:07
मुळ लेखक : कॉरम्याक मकार्थी अनुवाद : अनिल किणीकर एक अचाट पुस्तक , वेगळाच प्लॉट . बेचिराख झालेले जग , कशाने, का माहित नाही कथानकाला भूतकाळ नाही , भविष्य नाही फक्त वर्तमान बेचिराख झालेल्या अमेरिकेतून जगण्याची धडपड करत वाट काढत दक्षिणेकडे समुद्र किनार्यावर जाणारा एक अनामिक बाप आणि त्याचा लहानसा मुलगा. जग बेचिराख झालेले , प्रचंड मनुष्यसंहार झालेला , निसर्गाची अवकृपा कि मानवी युद्ध माहित नाही , जगण्यासाठी उरलेल्या मानव प्राण्याची एकमेकात चालेलेली चढा ओढ . खायला प्यायला काही नाही, मरण निश्चित, फक्त ते किती लांबवता येतंय यावर सगळा खेळ. जवळ सामान म्हणजे स्वरक्षणासाठी असलेले एक छोटे पिस्तोल. अंगावरचे कपडे , इकडून तिकडून गोळा केलेल्या सामानाने भरलेली एक ढकलगाडी , एकमेकांशिवाय कोणी नाही . कादंबरीचा कालखंड , पात्रांची नवे शिवाय इतर विशेष पार्श्वभूमी न कळताहि हे पुस्तक पहिल्या पानापासून खिळवून ठेवते , बाप लेकातले नातेही सुंदर . शेवटी त्याच्न्या प्रवासाचे काय होते , तो कुठे संपतो यासाठी पुस्तक वाचणे आले २००७ सालातला पुलित्झर पुरस्कार या कादंबरीला मिळाला. २००९ साली यावर "द रोड" नावाने चित्रपट सुद्धा आलाय

स्पा Fri, 07/04/2014 - 13:08
भैरप्पांचा "पर्व"चा , (उमा कुलकर्णी यांनी केलेला) अनुवाद हातात आला , तेंव्हा महाभारतावरील अजून एक कादंबरी इतकेच त्याचे स्वरूप मनात होते.काहीतरी हटके असणार याची कल्पना आलेली होती. वाचायला सुरुवात केली आणि प्रस्तावनेतच भैरप्पानी पेललेल्या शिव धनुष्याची जाणीव झाली. आयुष्यातली जवळ जवळ १२ वर्ष एका कादंबरीसाठी खर्ची घालणे म्हणजे खरंच ग्रेट गोष्ट आहे.महाभारत घडलेल्या जागांचा शोध काढून तिथल्या निसर्गाचा,लोकांचा,संस्कृतीचा अभ्यास करून, मूळ महाभारतातल्या चमत्कारांचा, दंतकथांचा,शापांचा,वरदानांचा सुसंगत असा वैज्ञानिक, हल्लीच्या मानवी तर्कदृष्टीला पटेल असा निष्कर्ष काढून तो कादंबरीत आखणे.शिवाय त्यातली महाभारत आपल्या निवेदनातून उलगडणारी हटके पात्रनिवड. पर्व वर परीक्षण असे लिहायला घेतले तर कदाचित मूळ कादंबरी सारखाच एक जाडजूड ग्रंथ व्हायचा. इतके दिवस महाभारताबद्दल जे ग्ल्यामर इतक्या साहित्यिकांनी आपल्याभोवती निर्माण केले होतं, त्याचा चक्काचूर करण्याच काम "पर्व" व्यवस्थित पार पाडत, तेही वाचताना कुठेही "छे हे काही पटले नाही बुवा" असे वाटत नाही. अख्या पर्व कादंबरीत लेखक कुणा एकाची बाजू घेत नाही, कोणाला हिरो किंवा कुणाला खलनायक ठरवत नाही. जे घडलं असाव ते तो फक्त आपल्या समोर तर्कसंगत पणे मांडण्याचा प्रयत्न करतो, आणि माझ्या मते हेच या कादंबरीचे यश आहे. कुंतीला पंचतत्वांपासून पांडव झाले.. अशी कथा असताना , भैरप्पा प्राचीन भारतातही नियोग पद्धत (सरोगसी) अस्तित्वात होती हे ठामपणे मांडतात. कृष्णाने कालिया मर्दन केले असे न म्हणता , पूर्वी नाग नावाच्या लोकांची टोळी होती. त्यांना संपवले किंवा द्रौपदीला मिळवण्यासाठी पांडवान्मध्येच सुरु झालेली भांडणं, आणि भांडण मिटव्ण्यासाठी कुंतीनेच द्रौपदीला तुला समाधान द्यायला ५ ५ पुरुष असताना चिंता कसली असा दिलेला सल्ला !! एक ना अनेक , कादंबरीच्या प्रत्येक टप्प्यावर भैरप्पा आपल्या मनावर महाभारताविषयीच्या चढलेल्या चमत्काराचा बुरखा टराटरा फाडतात. आणि मग एकदम हि सगळी पात्र अगदी ( कृष्ण ,कर्णासकट)मानवी पातळीवर वावरायला लागतात. हि सगळी आपल्यासारखीच अनेक विकारांनी बनलेली असतात. त्यांच्यातही लैंगिक वासना, कट -कारस्थान , सत्तेसाठी काहीही करण्याची वृत्ती असते. कौरव वाईट किंवा पांडव सगुणाचे पुतळे हा भेद उरतच नाही. उरते ती फक्त सत्ता मिळवण्याची जीवघेणी स्पर्धा आणि त्यासाठी गाठलेली मानवी स्वभावाची नीचतम हद्द आणि कदाचित व्यासांना अभिप्रेत असलेल हेच ते "महाभारत". एक अप्रतिम महानाट्य. मानवी स्वभावाचे प्रत्येक पैलू .. किंवा माणूस कुठल्या थराला जाऊ शकतो याची मांडणी केलेलं एक प्राचीन काव्य . शेवटा कडच्या युद्धात तर मानवपातळी वरून हि पात्र पशुपातळीवर येतात. युद्ध संपेपर्यंत प्रचंड मानव संहार होतो.कौरवांचा दारूण पराभव होतो.पण पांडवांना हि जिंकल्याचे समाधान नसतेच , युद्ध काळात झालेली अपरिमित हानी, निर्वंश झालेले पांडव आणि उजाड झालेला परिसर, रिता झालेला खजिना आणि दोन वेळच्या जेवणाची पडलेली भ्रांत हीच त्यांना मिळालेली युद्ध जिंकल्याची भेट. ५००० वर्षा पूर्वीचा सुडाने रंगलेला खेळ या काळातही जुना वाटत नाही . मानवी प्रवृत्तीत काडीचाही फरक पडलेला नाही हेच खरे या कादंबरीवरही अनेक वाद विवाद झडले असतील , झडत राहतील.. पण भैरप्पानी दाखवलेली दिशा नक्कीच नाकारण्याजोगी नाही

In reply to by स्पा

Gayatri Muley Fri, 07/04/2014 - 14:37
महाभारत म्हणल कि फक्त शिवाजी सावंत चे तर्क खरे वाटतात मला... (अर्थातच ते चुकिचे आहे, पण लहानपणीच वाचलेले मृत्युंजय अन् युगांधर मनातून जातच नाहीत..) त्यातून पांडव अन् कौरव यांची बाजू कळली आता "तिसरी" बाजू कळण्यासाठी "पर्व" नक्की वाचेल...

बबन ताम्बे Fri, 07/04/2014 - 15:37
प्रदीप लोखंडे, पुणे १३- छान पुस्तक आहे. ओसामा बिन लादेन वर एक पुस्तक वाचले होते. एका अमेरीकन लेखिकेने ओसामाच्या मुलाचे आणि पत्नीचे आत्मकथन एकत्र करून पुस्तक लिहीले होते. त्याचा मराठी अनुवाद पण आहे. पण नाव आठवत नाही. पुस्तक मात्र जबर्दस्त आहे.

बबन ताम्बे Fri, 07/04/2014 - 15:41
शिकवीले ज्यांनी - लेखक अनिल अवचट खूप सुंदर पुस्तक आहे. पुण्यातील काही ज्ञानी व्यक्तींचे अतिशय सुंदर आणि माहीतीपुर्ण व्यक्तिचित्रण अनिल अवचटांनी केले आहे.
लेखनविषय:
a

मिपा रांगोळी स्पर्धा २०१३

संपादक मंडळ ·

मदनबाण Sun, 11/03/2013 - 00:55
स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपण किंवा आपल्या नजिकच्या नातेवाईकांनी काढलेल्या रांगोळीचे छायाचित्र मिपावर या धाग्याच्या प्रतिक्रियांमधे चिकटवावे. कलाकाराचे नाव द्यावे. स्पर्धेतील रांगोळ्या या शेजार्‍यांनी काढलेल्या नकोत हा धागा आत्ता पाहिला ! पण या अटींमुळे तसेही मला या स्पर्धेत भाग घेता आले नसते.

ही म्हणतेय, रांगोळी कोणती काढू ? जरा लिंका द्या राव रांगोळीच्या. पाचबोटाची बिटाची चालेल. आता सुरु झाली म्हणजे सायंकाळपर्यंत होईल आमचीही रांगोळी. :) -दिलीप बिरुटे (रांगोळीची आवड असलेला)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पैसा Sun, 11/03/2013 - 18:38
कोणताही प्रकार चालेल की! पारंपारिक, फुलांची, पाण्यावरची, गालिचा, संस्कार भारती काही चालेल की!

In reply to by पाषाणभेद

पाषाणभेद Sun, 11/03/2013 - 21:29
नाही म्हणजे "प्रिण्ट आउट जमिनीवर चीकटवतो. हातानेच काढतो" वैगेरेपण आहे म्हणून विचारले हो. बाकी काही नाही. मजेत.

In reply to by अभ्या..

पैसा Mon, 11/04/2013 - 09:17
परीक्षक मिपाकर असल्याने याचे उत्तर पण त्यानी द्यावे. एक सामान्य सदस्य म्हणून माझे मत असे की रांगोळी डिझाईन डिजिटल असायला हरकत नै पण त्यात रांगोळीचे रंग/धान्य्/फुले असे काहीतरी भरून मगच ती खरी रांगोळी होईल. नाहीतर साधे चित्र्/स्टिकर राहील.

In reply to by पैसा

अभ्या.. Mon, 11/04/2013 - 15:05
एक अतिसामान्य सदस्य या नात्याने माझ्यापण शंका आहेत हो. ;) नुसती रांगोळी (दगडाची पूड, पांढरी वा रंगीत) हे माध्यम म्हणून धरले तर धान्य, फुले हे कशाला? मग कागदाचे तुकडे पण वापरता येईल किंवा अजून काही पण. नुसते पारंपारिक आकार वा परंपरा म्हणले तर मग रांगोळी प्रदर्शनातले ९९ टक्के प्रवेशिका बाद होतील. जमीनीवर पसरलेले डिझाइन म्हणले तर गालिचा सुध्दा चालेल. सुताची रांगोळी म्हणून. मग आम्ही कम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन मध्ये काढून तिचा प्रींटाऊट जमिनीवर ठेवला तर काय बिघडले? कला बघणार का तंत्र की परंपरा की केवळ चान चान इमेज चढवलीय इथे ते पाहणार?

In reply to by अभ्या..

पैसा Mon, 11/04/2013 - 15:22
रंगांऐवजी धान्य, फुलं हे पूर्वीपासून वापरतात. खरे तर बटन्स, टिकल्या अशा बारीक वस्तू पण वापरतात. पण बेसिक हे की आऊटलाईन शिरगोळ्याच्या रांगोळीची आणि त्यात भरलेले माध्यम. जमिनीवर पसरलेले डिझाईन म्हणून कास्मिरी गालिचा चालणार नाही. पण जमिनीवर रांगोळीने डिझाईन काढून सुताचे धागे त्यात भरले तरी ती रांगोळी ठरेल.

In reply to by पैसा

पाषाणभेद Tue, 11/05/2013 - 05:46
हस्तकला व यंत्रधिष्ठीत कला हा कला सादरीकरणाच्या दोन प्रचलित पद्धती मानल्या गेलेल्या आहेत. गायन (मौखिक कला सादरीकरण) कलेत साथसंगत करणारा आपले वाद्यवादन कोठे थांबवायचे हे गायक कलाकाराच्या इशार्‍यावर समजू शकतो. तसा तुमचा आवाजाची साथ देणारा कॉम्पुटर किंवा इलेक्टृऑनीक वाद्य (थोडक्यात कुणा ऑपरेटरवीना वाजणारे वाद्य) थांबू शकणार नाही. रांगोळी रेखाटणे हे पुर्णपणे त्या त्या व्यक्तीच्या शारिरीक, मानसिक क्रियेद्वारे घडणारी प्रक्रिया असते. कुणी म्हणेल की हेच आम्ही कॉम्पुटरवरही शारिरीक, मानसिक क्रियेद्वारेच करतो. पण यात यंत्र हे सादरीकरणाचे एक माध्यम आहे. त्या यंत्राशिवाय तुम्ही हवेत रंगांचे, चिमटीतील रांगोळीचे प्रोग्राम फेकू शकत नाही किंवा हवेत फोटोशॉप उघडू शकत नाही किंवा कागदावर छपाई करू शकत नाही. बस बाकी काही नाही. मजेत.

मृत्युन्जय Sun, 11/03/2013 - 21:26
कुणी किती रांगोळ्या स्पर्धेसाठी पाठवाव्यात याचा काही नियम दिसत नाही आहे. त्यामुळे खालील धाग्यावरच्या आईच्या सगळ्याच रांगोळ्या स्पर्धेसाठी पाठवाव्यात असा विचार होता. ;) http://misalpav.com/node/14927 पण मग विचार बदलुन या दिवाळीसाठी मातोश्रींनी काढलेल्या एका रांगोळीचे ३ फोटो आणि अर्धांगाने काढलेल्या एका रांगोळीचे फोटो डकवतो आहे :) आईने काढलेली रांगोळी laxmi1 Laxmi 2 Laxmi 3 अर्धांगाने काढलेली रांगोळी diwali

माशा Sun, 11/03/2013 - 23:39
मदत पान बघितले.त्यात जी सुचना लिहिली आहे - >> मिपावर येऊन प्रतिसादाच्या Insert/ edit Image या बटणावर क्लिकुन तेथे URL चा पत्ता पेस्टवावा. हवी असलेली साईझ द्यावी. >> Insert/ edit Image कुठेच दिसत नाहीये.कृपया मदत करा.

In reply to by माशा

पैसा Sun, 11/03/2013 - 23:52
प्रतिसाद द्या विषयः Comment * यानंतर एका ओळीत छोटे छोटे १४ चौकोन आहेत, त्यात ९ वा चौकोन आहे, त्यावर क्लिक केले की Insert picture ची छोटी विंडो दिसेल.

माशा Mon, 11/04/2013 - 00:44
आजच लक्ष्मीसमोर ही रांगोळी काढली आहे.स्पर्धेसाठी पहिल्यांदाच रांगोळी पाठवत आहे.पुर्वी शाळा कॉलेजात असताना खूप रांगोळ्या काढल्या.दुर्दैवाने त्याचे फोटोच काढले गेले नाहीत.१५,२० वर्षांच्या गॅपने मोठी रांगोळी काढत होते. त्यामुळे मनात धाकधुक होती. मिपाकारांना कशी वाटते याची उत्सुकता आहे. आज या स्पर्धेच्या निमित्ताने जुन्या आठवणी जाग्या झाल्या. मिपा ला धन्यवाद. Madhavi's

In reply to by पैसा

सांगून पाहतो. मला वाटतं ही रांगोळी आज काही पुसल्या जाणार नाही. येता जाता मलाच कै तरी आयड्या करावी लागेल. :) -दिलीप बिरुटॅ

In reply to by सानिकास्वप्निल

आय माय सॉरी पण लाकडी जमिनीवर रांगोळी म्हणजे केळीच्या पानावरून पाटावर साग्रसंगित पंगतीत पीझझा आणि हक्का न्यूडल खाण्यात येत आहे अस दृष्य डोळ्या समोर तरळूंन मॉनिटर हळवा झाला !!! :) कृ ह घ्या !!

In reply to by माझीही शॅम्पेन

तुमचा मॉनिटर जरा जास्तंच हळवा आहे... जमिनीवर रांगोळी काढली हे महत्वाचे (मग ती लाकडी, दगडी किंवा ग्रेनाईट फ्लोरींग असो). इथे परदेशात बिल्डिंगच्या कॉरीडोअरमध्ये गालिचा असतो गेरु सारवून रांगोळी काढता येत नाही त्यामुळे घरातचं जमेल तशी रांगोळी काढावी लागते. असो तुम्ही पण कृ ह घ्या !!!!

In reply to by माझीही शॅम्पेन

केदार-मिसळपाव Tue, 11/05/2013 - 21:45
हा हा हा, आता काय त्या लाकडी जमिनी शेणाने सारवुन त्यावर रांगोळी काढावी कि काय ह्या माउल्यांनी?

In reply to by केदार-मिसळपाव

हा हा हा ... तस नाही , आम्हाला डोक्यनुसार आम्ही एक उपाय केला होता आसमदिकाण्नी एक 1M X 1M चा लाकडाचा प्लाइ गेरु सारख्या रंगात रंगवीला होता , माझी आई घरात (हिटर गरम हवे मध्ये) बसून रांगोळी काढत असे , मग ती आम्ही बाहेर थंडीत ठेवायचो ... :) आणि तोच फन्डा आता भारतात वापरतो फक्त बदल म्हणून आई A/Cत रांगोळी काढते :) असो तुमच्या पा-कृ प्रमाणेच रांगोळ्या छानच आहेत

किलमाऊस्की Tue, 11/05/2013 - 02:41
मला खूप आवडतं रांगोळी काढायला. भारताबाहेर असल्याने यावर्षी कार्ड्बोर्ड्वर साधी 'कोलम' काढलीय. :-( या रांगोळ्या नियमात बसत नसल्याने स्पर्धेसाठी नाहीत. --------------------------------------------------------------------------------------------- हि यावर्षी कार्डबोर्ड्वर काढलेली 'कोलम' https://lh5.googleusercontent.com/-w3w9OyYWCGk/UngLeQRW0uI/AAAAAAAABpk/GJN0pX2K-bA/w611-h505-no/IMG_20131103_180800.jpg या दोन वर्षापूर्वी काढलेल्या : https://lh4.googleusercontent.com/QTNYN8SEPTL56u8Dpb0L49lDIATYFRx6z3ncBCUMWM0=w518-h505-no https://lh4.googleusercontent.com/-d7sW0_3ijLs/UngLYkaqV8I/AAAAAAAABpE/3dl55PLjau4/w960-h500-no/rang2.jpg

In reply to by ह भ प

किलमाऊस्की गुरुवार, 11/07/2013 - 03:02
कार्डबोर्ड्वरच्या 'कोलम' बद्दल जमल्यास विस्तृतपणे सांगा..
विशेष काही नाही केलंय. घरात कार्पेट आणि पॅतियोमधे रांगोळी काढायची तर बाहेर धो-धो पाऊस आणि सोसाट्याचा वारा. त्यातून आमच्या भागात फारसे भारतीय नसल्याने रांगोळी सहज उपलब्ध नाही. यावर उपाय म्हणून मातीच्या रंगाचा कार्ड्बोर्ड पेपर आणला. साधा क्राफ्ट पेपरही चालेल. आणि त्यावर दक्षिण भारतीय 'कोलम' प्रकारतली रांगोळी काढतात तशी पांढर्‍या क्राफ्ट पेनने साधीशीच रांगोळी काढली. आम्ही रोज संध्याकाळी कार्ड्बोर्ड बाहेर ठेवतो. आणि त्यावर पणत्या. :-) अधिक माहीतीसाठी ही लिंक बघा. अवांतर - जाता जाता हा घरी बनवलेला कंदील : https://lh3.googleusercontent.com/-85mNYeWvnto/Unq1H2HDl3I/AAAAAAAABp8/kY3zt6WxblU/w379-h505-no/IMG_20131102_205924.jpg

In reply to by केदार-मिसळपाव

जेनी... Fri, 11/08/2013 - 23:46
क्या ब्बात है केदार काका ! सुप्पर्लाइक रांगोळी रंग भरणार्याचे नाव कळेल का ?? अगदीच सुरेख भर्लेत रंग चिमटीतुन बोटांच्या सुटत असते रांगोळी रंगबिरंगि रंगांनी सजत असते रांगोळी !!! अंगणातल्या दिव्याभोवती फिरत असते रांगोळी मनातल्या उत्साहाला फुलवत असते रांगोळी !!!

Mrunalini Wed, 11/06/2013 - 16:20
वा काय मस्त रांगोळ्या काढल्या आहेत सगळ्यांनी... माझ्याकडे इथे रांगोळी आणि रंग काहिच नाही... पण अत्ताच वरती वाचले.. मिठ वापरुन काढलेली रांगोळी... आयडियाची भन्नाट कल्पना आवडली. :)

मदनबाण Sun, 11/03/2013 - 00:55
स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपण किंवा आपल्या नजिकच्या नातेवाईकांनी काढलेल्या रांगोळीचे छायाचित्र मिपावर या धाग्याच्या प्रतिक्रियांमधे चिकटवावे. कलाकाराचे नाव द्यावे. स्पर्धेतील रांगोळ्या या शेजार्‍यांनी काढलेल्या नकोत हा धागा आत्ता पाहिला ! पण या अटींमुळे तसेही मला या स्पर्धेत भाग घेता आले नसते.

ही म्हणतेय, रांगोळी कोणती काढू ? जरा लिंका द्या राव रांगोळीच्या. पाचबोटाची बिटाची चालेल. आता सुरु झाली म्हणजे सायंकाळपर्यंत होईल आमचीही रांगोळी. :) -दिलीप बिरुटे (रांगोळीची आवड असलेला)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पैसा Sun, 11/03/2013 - 18:38
कोणताही प्रकार चालेल की! पारंपारिक, फुलांची, पाण्यावरची, गालिचा, संस्कार भारती काही चालेल की!

In reply to by पाषाणभेद

पाषाणभेद Sun, 11/03/2013 - 21:29
नाही म्हणजे "प्रिण्ट आउट जमिनीवर चीकटवतो. हातानेच काढतो" वैगेरेपण आहे म्हणून विचारले हो. बाकी काही नाही. मजेत.

In reply to by अभ्या..

पैसा Mon, 11/04/2013 - 09:17
परीक्षक मिपाकर असल्याने याचे उत्तर पण त्यानी द्यावे. एक सामान्य सदस्य म्हणून माझे मत असे की रांगोळी डिझाईन डिजिटल असायला हरकत नै पण त्यात रांगोळीचे रंग/धान्य्/फुले असे काहीतरी भरून मगच ती खरी रांगोळी होईल. नाहीतर साधे चित्र्/स्टिकर राहील.

In reply to by पैसा

अभ्या.. Mon, 11/04/2013 - 15:05
एक अतिसामान्य सदस्य या नात्याने माझ्यापण शंका आहेत हो. ;) नुसती रांगोळी (दगडाची पूड, पांढरी वा रंगीत) हे माध्यम म्हणून धरले तर धान्य, फुले हे कशाला? मग कागदाचे तुकडे पण वापरता येईल किंवा अजून काही पण. नुसते पारंपारिक आकार वा परंपरा म्हणले तर मग रांगोळी प्रदर्शनातले ९९ टक्के प्रवेशिका बाद होतील. जमीनीवर पसरलेले डिझाइन म्हणले तर गालिचा सुध्दा चालेल. सुताची रांगोळी म्हणून. मग आम्ही कम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन मध्ये काढून तिचा प्रींटाऊट जमिनीवर ठेवला तर काय बिघडले? कला बघणार का तंत्र की परंपरा की केवळ चान चान इमेज चढवलीय इथे ते पाहणार?

In reply to by अभ्या..

पैसा Mon, 11/04/2013 - 15:22
रंगांऐवजी धान्य, फुलं हे पूर्वीपासून वापरतात. खरे तर बटन्स, टिकल्या अशा बारीक वस्तू पण वापरतात. पण बेसिक हे की आऊटलाईन शिरगोळ्याच्या रांगोळीची आणि त्यात भरलेले माध्यम. जमिनीवर पसरलेले डिझाईन म्हणून कास्मिरी गालिचा चालणार नाही. पण जमिनीवर रांगोळीने डिझाईन काढून सुताचे धागे त्यात भरले तरी ती रांगोळी ठरेल.

In reply to by पैसा

पाषाणभेद Tue, 11/05/2013 - 05:46
हस्तकला व यंत्रधिष्ठीत कला हा कला सादरीकरणाच्या दोन प्रचलित पद्धती मानल्या गेलेल्या आहेत. गायन (मौखिक कला सादरीकरण) कलेत साथसंगत करणारा आपले वाद्यवादन कोठे थांबवायचे हे गायक कलाकाराच्या इशार्‍यावर समजू शकतो. तसा तुमचा आवाजाची साथ देणारा कॉम्पुटर किंवा इलेक्टृऑनीक वाद्य (थोडक्यात कुणा ऑपरेटरवीना वाजणारे वाद्य) थांबू शकणार नाही. रांगोळी रेखाटणे हे पुर्णपणे त्या त्या व्यक्तीच्या शारिरीक, मानसिक क्रियेद्वारे घडणारी प्रक्रिया असते. कुणी म्हणेल की हेच आम्ही कॉम्पुटरवरही शारिरीक, मानसिक क्रियेद्वारेच करतो. पण यात यंत्र हे सादरीकरणाचे एक माध्यम आहे. त्या यंत्राशिवाय तुम्ही हवेत रंगांचे, चिमटीतील रांगोळीचे प्रोग्राम फेकू शकत नाही किंवा हवेत फोटोशॉप उघडू शकत नाही किंवा कागदावर छपाई करू शकत नाही. बस बाकी काही नाही. मजेत.

मृत्युन्जय Sun, 11/03/2013 - 21:26
कुणी किती रांगोळ्या स्पर्धेसाठी पाठवाव्यात याचा काही नियम दिसत नाही आहे. त्यामुळे खालील धाग्यावरच्या आईच्या सगळ्याच रांगोळ्या स्पर्धेसाठी पाठवाव्यात असा विचार होता. ;) http://misalpav.com/node/14927 पण मग विचार बदलुन या दिवाळीसाठी मातोश्रींनी काढलेल्या एका रांगोळीचे ३ फोटो आणि अर्धांगाने काढलेल्या एका रांगोळीचे फोटो डकवतो आहे :) आईने काढलेली रांगोळी laxmi1 Laxmi 2 Laxmi 3 अर्धांगाने काढलेली रांगोळी diwali

माशा Sun, 11/03/2013 - 23:39
मदत पान बघितले.त्यात जी सुचना लिहिली आहे - >> मिपावर येऊन प्रतिसादाच्या Insert/ edit Image या बटणावर क्लिकुन तेथे URL चा पत्ता पेस्टवावा. हवी असलेली साईझ द्यावी. >> Insert/ edit Image कुठेच दिसत नाहीये.कृपया मदत करा.

In reply to by माशा

पैसा Sun, 11/03/2013 - 23:52
प्रतिसाद द्या विषयः Comment * यानंतर एका ओळीत छोटे छोटे १४ चौकोन आहेत, त्यात ९ वा चौकोन आहे, त्यावर क्लिक केले की Insert picture ची छोटी विंडो दिसेल.

माशा Mon, 11/04/2013 - 00:44
आजच लक्ष्मीसमोर ही रांगोळी काढली आहे.स्पर्धेसाठी पहिल्यांदाच रांगोळी पाठवत आहे.पुर्वी शाळा कॉलेजात असताना खूप रांगोळ्या काढल्या.दुर्दैवाने त्याचे फोटोच काढले गेले नाहीत.१५,२० वर्षांच्या गॅपने मोठी रांगोळी काढत होते. त्यामुळे मनात धाकधुक होती. मिपाकारांना कशी वाटते याची उत्सुकता आहे. आज या स्पर्धेच्या निमित्ताने जुन्या आठवणी जाग्या झाल्या. मिपा ला धन्यवाद. Madhavi's

In reply to by पैसा

सांगून पाहतो. मला वाटतं ही रांगोळी आज काही पुसल्या जाणार नाही. येता जाता मलाच कै तरी आयड्या करावी लागेल. :) -दिलीप बिरुटॅ

In reply to by सानिकास्वप्निल

आय माय सॉरी पण लाकडी जमिनीवर रांगोळी म्हणजे केळीच्या पानावरून पाटावर साग्रसंगित पंगतीत पीझझा आणि हक्का न्यूडल खाण्यात येत आहे अस दृष्य डोळ्या समोर तरळूंन मॉनिटर हळवा झाला !!! :) कृ ह घ्या !!

In reply to by माझीही शॅम्पेन

तुमचा मॉनिटर जरा जास्तंच हळवा आहे... जमिनीवर रांगोळी काढली हे महत्वाचे (मग ती लाकडी, दगडी किंवा ग्रेनाईट फ्लोरींग असो). इथे परदेशात बिल्डिंगच्या कॉरीडोअरमध्ये गालिचा असतो गेरु सारवून रांगोळी काढता येत नाही त्यामुळे घरातचं जमेल तशी रांगोळी काढावी लागते. असो तुम्ही पण कृ ह घ्या !!!!

In reply to by माझीही शॅम्पेन

केदार-मिसळपाव Tue, 11/05/2013 - 21:45
हा हा हा, आता काय त्या लाकडी जमिनी शेणाने सारवुन त्यावर रांगोळी काढावी कि काय ह्या माउल्यांनी?

In reply to by केदार-मिसळपाव

हा हा हा ... तस नाही , आम्हाला डोक्यनुसार आम्ही एक उपाय केला होता आसमदिकाण्नी एक 1M X 1M चा लाकडाचा प्लाइ गेरु सारख्या रंगात रंगवीला होता , माझी आई घरात (हिटर गरम हवे मध्ये) बसून रांगोळी काढत असे , मग ती आम्ही बाहेर थंडीत ठेवायचो ... :) आणि तोच फन्डा आता भारतात वापरतो फक्त बदल म्हणून आई A/Cत रांगोळी काढते :) असो तुमच्या पा-कृ प्रमाणेच रांगोळ्या छानच आहेत

किलमाऊस्की Tue, 11/05/2013 - 02:41
मला खूप आवडतं रांगोळी काढायला. भारताबाहेर असल्याने यावर्षी कार्ड्बोर्ड्वर साधी 'कोलम' काढलीय. :-( या रांगोळ्या नियमात बसत नसल्याने स्पर्धेसाठी नाहीत. --------------------------------------------------------------------------------------------- हि यावर्षी कार्डबोर्ड्वर काढलेली 'कोलम' https://lh5.googleusercontent.com/-w3w9OyYWCGk/UngLeQRW0uI/AAAAAAAABpk/GJN0pX2K-bA/w611-h505-no/IMG_20131103_180800.jpg या दोन वर्षापूर्वी काढलेल्या : https://lh4.googleusercontent.com/QTNYN8SEPTL56u8Dpb0L49lDIATYFRx6z3ncBCUMWM0=w518-h505-no https://lh4.googleusercontent.com/-d7sW0_3ijLs/UngLYkaqV8I/AAAAAAAABpE/3dl55PLjau4/w960-h500-no/rang2.jpg

In reply to by ह भ प

किलमाऊस्की गुरुवार, 11/07/2013 - 03:02
कार्डबोर्ड्वरच्या 'कोलम' बद्दल जमल्यास विस्तृतपणे सांगा..
विशेष काही नाही केलंय. घरात कार्पेट आणि पॅतियोमधे रांगोळी काढायची तर बाहेर धो-धो पाऊस आणि सोसाट्याचा वारा. त्यातून आमच्या भागात फारसे भारतीय नसल्याने रांगोळी सहज उपलब्ध नाही. यावर उपाय म्हणून मातीच्या रंगाचा कार्ड्बोर्ड पेपर आणला. साधा क्राफ्ट पेपरही चालेल. आणि त्यावर दक्षिण भारतीय 'कोलम' प्रकारतली रांगोळी काढतात तशी पांढर्‍या क्राफ्ट पेनने साधीशीच रांगोळी काढली. आम्ही रोज संध्याकाळी कार्ड्बोर्ड बाहेर ठेवतो. आणि त्यावर पणत्या. :-) अधिक माहीतीसाठी ही लिंक बघा. अवांतर - जाता जाता हा घरी बनवलेला कंदील : https://lh3.googleusercontent.com/-85mNYeWvnto/Unq1H2HDl3I/AAAAAAAABp8/kY3zt6WxblU/w379-h505-no/IMG_20131102_205924.jpg

In reply to by केदार-मिसळपाव

जेनी... Fri, 11/08/2013 - 23:46
क्या ब्बात है केदार काका ! सुप्पर्लाइक रांगोळी रंग भरणार्याचे नाव कळेल का ?? अगदीच सुरेख भर्लेत रंग चिमटीतुन बोटांच्या सुटत असते रांगोळी रंगबिरंगि रंगांनी सजत असते रांगोळी !!! अंगणातल्या दिव्याभोवती फिरत असते रांगोळी मनातल्या उत्साहाला फुलवत असते रांगोळी !!!

Mrunalini Wed, 11/06/2013 - 16:20
वा काय मस्त रांगोळ्या काढल्या आहेत सगळ्यांनी... माझ्याकडे इथे रांगोळी आणि रंग काहिच नाही... पण अत्ताच वरती वाचले.. मिठ वापरुन काढलेली रांगोळी... आयडियाची भन्नाट कल्पना आवडली. :)
मंडळी, दिवाळी आणि रांगोळीचं अगदी जीवाभावाचं नातं आहे. लहानपणी रांगोळ्या काढण्यापासूनच सार्वजनिक चित्रकलेला सुरुवात होते. रोजच्या रोज तुळशीपाशी एखादं स्वस्तिक, दाराच्या उंबरठ्यावर गोपद्म, लक्ष्मीची पाऊले असे आईने काढताना आपण बघत आलोय तरी खरी गंमत दिवाळीला असते. त्यावेळी आपल्या चित्रकारीत खरेखुरे रंग भरता येतात. लहानपणी पोपट, मांजर, फुले काढण्यापासून सुरुवात होते. मोठे झाल्यावर ठिपक्यांची रांगोळी जमवण्यासाठी धडपड असते. समांतर ठिपके कोणत्याही फूटपट्टीशिवाय काढण्याचं कसब अंगी हवं, नाहीतर ठिपक्यांचे कागद ती सोय करतात. मग रांगोळीची रेघ नाजूक हवी, रंगसंगती उठावदार हवी असे सल्ले मिळतात.

माझी दिवाळी

संपादक मंडळ ·

रेवती Sat, 11/02/2013 - 00:19
मी फुलबाज्या आणि भुईनळा की झाड असे काहीतरी म्हणायचे ते मिस करतीये. बाकी ते आवाजी फटाके आवडायचे नाहीत. एक दोनदा माझ्या नव्या कपड्यांना पेटत्या उदबत्तीने भोके पडली होती. दिवाळीचा फराळ दिवाळीत खायला फारशी मजा येत नसे. दिवाळी संपल्यानंतर जी उरलेली सुट्टी असेल त्यात लायब्ररीतून आणलेले (बाल)साहित्य वाचताना करंज्या, चिरोटे खाणे, त्यातले सारण, पिठीसाखर सांडल्यावर ते सगळे साफसूफ करणे हे आठवत आहे. ;) चिवड्यावर दही घालून खाणे, चकलीबरोबर दही, लोणी. असे करीत असे. चार घरचा आलेला फराळ कसा संपवावा हा प्रश्न पडायचा. मग सकाळी दूध पिताना आई आम्हाला सक्तीने मूठ मूठ शंकरपाळे संपवायला भाग पाडायची. आत्याकडे दिवाळीनंतर मिसळ करून त्यात शेव चिवडे घालून ते संपवण्याचा चंग बांधला जायचा (तरी ते उरायचेच). आता बहुतेक उरलेला फराळ संपवण्याच्या युक्त्या असा धागा सुरु करावा लागेल.

In reply to by रेवती

पैसा Sat, 11/02/2013 - 01:27
मी भलत्याच विवंचनेत आहे. कामवाली पोरगी गावी जाणार, मग ती तेलातुपाची भांडी कोण घासणार म्हणून यावर्षी मी फराळ ४ दिवस आधीच तयार केला पण लहान किचनमधे लपवणे शक्य झाले नाही. आणि आताच डब्यांचा तळ दिसू लागला आहे. उद्या सकाळी आमच्यापुरता फराळ आहे पण आणखी कोणी आले तर पोहे देऊन भागवावे लागेल अशी लक्षणे आहेत!

In reply to by पैसा

रेवती Sat, 11/02/2013 - 04:48
हा हा हा. हो मीही तेच करणार आहे. आतापरेंत तीन चार जणींचे फोन येऊन गेलेत. त्यांच्याकडे दिवाळी म्हणजे फक्त लक्षुमी पूजन असते. मग महाराष्ट्रीय फराळाला कधी बोलावतेस म्हणून! आता काय सांगू? म्हटले नंतर बोलावते. सगळे मिळून पाच डबे त्यांचे माझ्याकडे आहेत. त्याच डब्यात घालून दिलास फराळ तरी चालेल म्हणतायत. म्हटलं नको, तुम्ही येऊन जा आणि डबे रिकामेच न्या आता!

दिवाळी म्हटले की आवाजाचे फटाके, नवीन कपडे , दिवाळी पहाट आमचा तरुणाई ने ओथंबलेला डोंबिवलीचा फडके रोड तेथे यथेच्च भटकून झाले की मित्रांकडे फराळ अनेक सांस्कृतिक कार्यक्रम , सुंगधी उटणे, मोती साबण दिवाळी अंक अश्या अनेक आठवणी मनात पिंगा घालतात , शाळा सोडून कॉलेजात गेलो तरी नियमितपणे आमचा १० अ चा बहुतेक सर्व वर्ग फड्केवर भेटायचा. आता अर्ध्याहून जास्त जगातील विविध खंडात विखुरले गेले आहोत तेव्हा एखादा वर्ग मित्र न चुकता आजही फड्केवर येतो चतुर भ्रमणध्वनीवर त्याच्याशी गप्पा मारतात मग फडकेवरील आखो देखा हाल पाहता येतो. अनिवासी असल्याने भारताशी ,आपल्या आप्त स्वकीय , मित्रांची , जाम आठवण येते , मग मी मिपावर येतो , आभसी जगतातील माझ्या मिपाकरांना भेटतो , मग जरा बरे वाटते.

अनन्न्या Sun, 11/03/2013 - 19:51
लहानपणी आम्ही जवळपासची सारी मुले दिवाळीच्या आदल्या रात्री पत्ते कुटत असू. खेडेगाव असल्याने आजूबाजूला भरपूर मोकळी जागा होती. आमच्या घराशेजारी एका काकांचे घर होते, ते भिक्षुकी करायचे. आणि त्यांना संक्रातीला मिळालेली सुगडे ते बाहेर झाडाखाली रचून ठेवायचे. रात्री आम्ही मुले ती सुगडे पळवून आणत असू. दोन वाजले की त्यात ठेवून त्यांच्याच घराबाहेर मोठे बॉम्ब वाजवत असू. त्यांचा मुलगाही यात सामिल असे. ते उठून बाहेर येऊन, कोण रे तो? असे विचारे पर्यंत आम्ही पत्ते पुन्हा सुरू करत असू. हे दरवर्षी करत असूनही त्यानी कधी सुगडांची जागा बदलली नाही, किंवा फटाके लावणारे शोधले नाहीत. रात्रभर हे सगळे उद्योग करून चार वाजता आपापल्या घरी जायचे. आंघोळी आटोपून, रांगोळ्या काढून, फराळ करायचा आणि जे गुडूप झोपायचे ते थेट दुपारच्या चहाला उठायचे. दिवाळीच्या दिवशी सकाळी नारळाच्या दुधात उटणे कालवले जायचे. नवीन कपडे दर दिवाळीला मिळायचे नाहीत, पण तांब्यात निखारे भरून त्याने असलेल्या त्यातल्या त्यात बय्रा ड्रेसला इस्त्री करून घालतानाही खूप मजा वाटे. फराळात जास्त पदार्थ नव्ह्ते. घरचे पोहे, करंजी, कडबोळी, रव्याचे लाडू आणि कणकेचे शंकरपाळे! दिवाळीच्या दिवशी गूळ पातळ करून त्यात ओले खोबरे घालून त्यात घरचे जाड पोहे भिजवून ते मिक्स करायचे. एक वाफ काढून हे गरमागरम पोहे केळीच्या पानावर साजूक तूप घालून खाणे म्हणजे अहाहा!!! फटाके मोजूनच असायचे. ते तुळशीच्या लग्नापर्यंत पुरवावे लागत. तुळशीच्या लग्नाला तुळशी वृंदावन चुना, हळद आणि पिंजरीच्या ठिपक्यांनी सजवायचे. सकाळी आई तिला पिवळे कापड गुडाळायची, हिरव्या बांगड्या घालायची. ऊस मामा म्हणून उभा करायचा. करा-दिवा मात्र आम्ही बहिणी घेऊन उभ्या रहात असू. बाबा एकटेच मुलाकडचे! लग्नानंतर सगळ्यांना फराळ दिला जायचा. मस्त होती ती दिवाळी!!

In reply to by अनन्न्या

पैसा Sun, 11/03/2013 - 21:38
दिवाळीची सुटी ही निव्वळ पत्ते खेळण्यासाठीच असायची. त्यात तो गृहपाठ नावाचा छळ असायचा पण कोणाला फिकीर होती त्याची!

पाषाणभेद Sun, 11/03/2013 - 21:53
मला माझ्या लहाणपणाची दिवाळी अजूनही आठवते. मी हिंदू, माझी आई पारशी, वडील मुस्लीम, बहीण क्रिस्चन, भाऊ बंगाली, चुलत भावंड काश्मिरी- पंजाबी असल्याने लहाणपणाच्या दिवाळीसणात सर्व भारत आमच्या घरी जमला असे वाटत असे. मिठाई, फटाके यांची रेलचेल असायची. आताशा दिवाळीत मी घरी नसते. गेल्या दोन दिवाळींच्या वेळी मी सिंगापूर अन स्वित्सर्लंड येथे शाहिद अन रनबीर सोबत शुटींगमध्ये बिझी होते. येत्या दिवाळीत माझा 'Blind Game - ऐ सनम तुझपे मेरे दिल आ गया' हा चित्रपट रिलीज होतो आहे. माझ्यासाठी ते दिवाळी गिफ्टच आहे. सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या शुभेच्छा! - करूना कर्पूर (शब्दांकन - पाषाणभेद)

रेवती Sat, 11/02/2013 - 00:19
मी फुलबाज्या आणि भुईनळा की झाड असे काहीतरी म्हणायचे ते मिस करतीये. बाकी ते आवाजी फटाके आवडायचे नाहीत. एक दोनदा माझ्या नव्या कपड्यांना पेटत्या उदबत्तीने भोके पडली होती. दिवाळीचा फराळ दिवाळीत खायला फारशी मजा येत नसे. दिवाळी संपल्यानंतर जी उरलेली सुट्टी असेल त्यात लायब्ररीतून आणलेले (बाल)साहित्य वाचताना करंज्या, चिरोटे खाणे, त्यातले सारण, पिठीसाखर सांडल्यावर ते सगळे साफसूफ करणे हे आठवत आहे. ;) चिवड्यावर दही घालून खाणे, चकलीबरोबर दही, लोणी. असे करीत असे. चार घरचा आलेला फराळ कसा संपवावा हा प्रश्न पडायचा. मग सकाळी दूध पिताना आई आम्हाला सक्तीने मूठ मूठ शंकरपाळे संपवायला भाग पाडायची. आत्याकडे दिवाळीनंतर मिसळ करून त्यात शेव चिवडे घालून ते संपवण्याचा चंग बांधला जायचा (तरी ते उरायचेच). आता बहुतेक उरलेला फराळ संपवण्याच्या युक्त्या असा धागा सुरु करावा लागेल.

In reply to by रेवती

पैसा Sat, 11/02/2013 - 01:27
मी भलत्याच विवंचनेत आहे. कामवाली पोरगी गावी जाणार, मग ती तेलातुपाची भांडी कोण घासणार म्हणून यावर्षी मी फराळ ४ दिवस आधीच तयार केला पण लहान किचनमधे लपवणे शक्य झाले नाही. आणि आताच डब्यांचा तळ दिसू लागला आहे. उद्या सकाळी आमच्यापुरता फराळ आहे पण आणखी कोणी आले तर पोहे देऊन भागवावे लागेल अशी लक्षणे आहेत!

In reply to by पैसा

रेवती Sat, 11/02/2013 - 04:48
हा हा हा. हो मीही तेच करणार आहे. आतापरेंत तीन चार जणींचे फोन येऊन गेलेत. त्यांच्याकडे दिवाळी म्हणजे फक्त लक्षुमी पूजन असते. मग महाराष्ट्रीय फराळाला कधी बोलावतेस म्हणून! आता काय सांगू? म्हटले नंतर बोलावते. सगळे मिळून पाच डबे त्यांचे माझ्याकडे आहेत. त्याच डब्यात घालून दिलास फराळ तरी चालेल म्हणतायत. म्हटलं नको, तुम्ही येऊन जा आणि डबे रिकामेच न्या आता!

दिवाळी म्हटले की आवाजाचे फटाके, नवीन कपडे , दिवाळी पहाट आमचा तरुणाई ने ओथंबलेला डोंबिवलीचा फडके रोड तेथे यथेच्च भटकून झाले की मित्रांकडे फराळ अनेक सांस्कृतिक कार्यक्रम , सुंगधी उटणे, मोती साबण दिवाळी अंक अश्या अनेक आठवणी मनात पिंगा घालतात , शाळा सोडून कॉलेजात गेलो तरी नियमितपणे आमचा १० अ चा बहुतेक सर्व वर्ग फड्केवर भेटायचा. आता अर्ध्याहून जास्त जगातील विविध खंडात विखुरले गेले आहोत तेव्हा एखादा वर्ग मित्र न चुकता आजही फड्केवर येतो चतुर भ्रमणध्वनीवर त्याच्याशी गप्पा मारतात मग फडकेवरील आखो देखा हाल पाहता येतो. अनिवासी असल्याने भारताशी ,आपल्या आप्त स्वकीय , मित्रांची , जाम आठवण येते , मग मी मिपावर येतो , आभसी जगतातील माझ्या मिपाकरांना भेटतो , मग जरा बरे वाटते.

अनन्न्या Sun, 11/03/2013 - 19:51
लहानपणी आम्ही जवळपासची सारी मुले दिवाळीच्या आदल्या रात्री पत्ते कुटत असू. खेडेगाव असल्याने आजूबाजूला भरपूर मोकळी जागा होती. आमच्या घराशेजारी एका काकांचे घर होते, ते भिक्षुकी करायचे. आणि त्यांना संक्रातीला मिळालेली सुगडे ते बाहेर झाडाखाली रचून ठेवायचे. रात्री आम्ही मुले ती सुगडे पळवून आणत असू. दोन वाजले की त्यात ठेवून त्यांच्याच घराबाहेर मोठे बॉम्ब वाजवत असू. त्यांचा मुलगाही यात सामिल असे. ते उठून बाहेर येऊन, कोण रे तो? असे विचारे पर्यंत आम्ही पत्ते पुन्हा सुरू करत असू. हे दरवर्षी करत असूनही त्यानी कधी सुगडांची जागा बदलली नाही, किंवा फटाके लावणारे शोधले नाहीत. रात्रभर हे सगळे उद्योग करून चार वाजता आपापल्या घरी जायचे. आंघोळी आटोपून, रांगोळ्या काढून, फराळ करायचा आणि जे गुडूप झोपायचे ते थेट दुपारच्या चहाला उठायचे. दिवाळीच्या दिवशी सकाळी नारळाच्या दुधात उटणे कालवले जायचे. नवीन कपडे दर दिवाळीला मिळायचे नाहीत, पण तांब्यात निखारे भरून त्याने असलेल्या त्यातल्या त्यात बय्रा ड्रेसला इस्त्री करून घालतानाही खूप मजा वाटे. फराळात जास्त पदार्थ नव्ह्ते. घरचे पोहे, करंजी, कडबोळी, रव्याचे लाडू आणि कणकेचे शंकरपाळे! दिवाळीच्या दिवशी गूळ पातळ करून त्यात ओले खोबरे घालून त्यात घरचे जाड पोहे भिजवून ते मिक्स करायचे. एक वाफ काढून हे गरमागरम पोहे केळीच्या पानावर साजूक तूप घालून खाणे म्हणजे अहाहा!!! फटाके मोजूनच असायचे. ते तुळशीच्या लग्नापर्यंत पुरवावे लागत. तुळशीच्या लग्नाला तुळशी वृंदावन चुना, हळद आणि पिंजरीच्या ठिपक्यांनी सजवायचे. सकाळी आई तिला पिवळे कापड गुडाळायची, हिरव्या बांगड्या घालायची. ऊस मामा म्हणून उभा करायचा. करा-दिवा मात्र आम्ही बहिणी घेऊन उभ्या रहात असू. बाबा एकटेच मुलाकडचे! लग्नानंतर सगळ्यांना फराळ दिला जायचा. मस्त होती ती दिवाळी!!

In reply to by अनन्न्या

पैसा Sun, 11/03/2013 - 21:38
दिवाळीची सुटी ही निव्वळ पत्ते खेळण्यासाठीच असायची. त्यात तो गृहपाठ नावाचा छळ असायचा पण कोणाला फिकीर होती त्याची!

पाषाणभेद Sun, 11/03/2013 - 21:53
मला माझ्या लहाणपणाची दिवाळी अजूनही आठवते. मी हिंदू, माझी आई पारशी, वडील मुस्लीम, बहीण क्रिस्चन, भाऊ बंगाली, चुलत भावंड काश्मिरी- पंजाबी असल्याने लहाणपणाच्या दिवाळीसणात सर्व भारत आमच्या घरी जमला असे वाटत असे. मिठाई, फटाके यांची रेलचेल असायची. आताशा दिवाळीत मी घरी नसते. गेल्या दोन दिवाळींच्या वेळी मी सिंगापूर अन स्वित्सर्लंड येथे शाहिद अन रनबीर सोबत शुटींगमध्ये बिझी होते. येत्या दिवाळीत माझा 'Blind Game - ऐ सनम तुझपे मेरे दिल आ गया' हा चित्रपट रिलीज होतो आहे. माझ्यासाठी ते दिवाळी गिफ्टच आहे. सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या शुभेच्छा! - करूना कर्पूर (शब्दांकन - पाषाणभेद)
नमस्कार मिपाकरहो, दिपावली अभिष्टचिंतन! कोणताही सण आला की आपण तो साजरा करताना आई काय करत असे किंवा आज्जी कसे करत असे ते आठवून, त्यांना विचारून, पुस्तकात वाचून त्या पद्धती आचरणात आणायचा प्रयत्न करतो. काहीवेळा सगळे साग्रसंगीत करायला जमते तर कधी गोष्टी शास्त्रापुरत्या कराव्या लागतात. दिवाळी हा आपल्यकडील मोठा सण समजला जातो. चार दिवस आपापले वैशिष्ठ्य टिकवून असतात. वाईट वृत्तीचा नाश करण्यापासून ते लक्ष्मीच्या पुजेपर्यंत तर सासरच्या नातेवाईकांपासून माहेरच्या नातेवाईकांची भेट घडवत हा सण आठवणींच्या सुखाची उबदार शाल मनावर अलगदपणे सोडून पुढील वर्षाची वाट पहायला लावतो.

दिवाळी अंक २०१३

संपादक मंडळ ·

यशोधरा Sun, 10/06/2013 - 10:52
मिपाच्या ह्या दुस-या दिवाळी अंकासाठी खूप शुभेच्छा. दर्जेदार दिअं वाचायला मिळेल ह्याबद्दल शंका नाही :)

विजुभाऊ Wed, 10/09/2013 - 13:30
दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठा साठी फोटो / चित्रे यासाठी एखादी स्पर्धा ठेवावी. तसेच त्या स्पर्धच्या निमित्ताने आलेले फोटो अंकात सहभागी करावेत् ही विनन्ती.

In reply to by विजुभाऊ

अभ्या.. Wed, 10/09/2013 - 14:47
दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठा साठी फोटो / चित्रे यासाठी एखादी स्पर्धा ठेवावी.
सहमत. . पण आधी निकष सांगून. किंवा नंतर रसग्रहण तरी, नुसते एकतर्फी नको.

चाफा गुरुवार, 10/10/2013 - 02:27
सणाच्या दृष्टीने अप्रिय, किळसवाणे, मृत्यूशी संबंधित, थेट ट्रॅजेडीने भरलेले असे प्रकार कृपया न पाठवल्यास बरे.
भयकथा बाद का ?? *DONT_KNOW*

In reply to by चाफा

स्पंदना गुरुवार, 10/10/2013 - 03:38
भयकथा चालतील असे वाटतेय, कारण त्यात कुणाचा मृत्यु होत नाही पण मेलेली व्यक्ती पुन्हा जीवंत होते. :)

स्पंदना गुरुवार, 10/10/2013 - 03:43
खरतर हे सांगायचे गरज नव्हती कारण पुर्वप्रकाशित साहित्य दिवाळी अंकात पुन्हा प्रकाशित करण्यात काहीच अर्थ नाही. तरीही मुद्दा वर धाग्यात उल्लेखला नाही म्हणुन

दिवाळी अंकासाठी पाठवलेले साहित्य पुर्वप्रकाशित असु नये. निदान मिपावर या आधी प्रकाशित झालेले साहित्य पुन्हा प्रकाशित करता येणार नाही, कृपया संबंधितांनी याची नोंद घ्यावी.

In reply to by चाफा

स्पंदना गुरुवार, 10/10/2013 - 03:49
तो त्या कथेचा परिणाम असेल चाफाभाऊ! कथा उत्कंठा वाढवत नेत असेल, मनात भय उत्पन्न करुन वाचायला उद्युक्त करत असेल, तर तो प्रकार किळसवाणा ठरत नाही. ही एक फार पातळ अन नाजुक रेषा ठरु शकते ठरवण्यासाठी, पण बिभस्त नसेल, मन गुंगवुन ठेवणारी असेल तर चालु शकेल. मागच्यावेळी मीच लिहीलेली सवाष्ण शेवटी थोडी ट्रॅजीक होत गेली, पण कथेच्या अनुषंगाने जाणारा मृत्यु वेगळा. एकूण या वेळी सणासमारंभात मन उल्हसित असावा असा काहीसा सूर आहे, तरीही अपवाद असतातच. त्यामुळे चांगल्या दर्जाच्या लेखनाला कोणीही नाही म्हणु शकणार नाही.

In reply to by स्पंदना

गवि गुरुवार, 10/10/2013 - 07:31
कॅन्सरची कथा आणि अखेर मरण. शी शू वातनिस्सारण उलटी आदिंची वास्तवपूर्ण वर्णने किंवा त्यावर बेतलेले विनोद. इत्यादि शक्यतो टाळावे. मरणाचा उल्लेखही नको असे नव्हे.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

बॅटमॅन गुरुवार, 10/10/2013 - 18:35
त्यातल्या "स्स" मुळे विसिष्ट फील येतो त्यामुळे ते वाचूनच निर्वाण पावल्या जाते.

In reply to by आदूबाळ

बॅटमॅन Fri, 10/11/2013 - 12:15
त्यावरून आठवलं, लहानपणी कथा वाचायचो त्यात "अमुक शहरात/ठिकाणी तमुक तमुक वास करून असतो/असते" हे वाक्यही तसेच वाटायचे.

In reply to by बॅटमॅन

सौंदाळा Fri, 10/11/2013 - 16:02
म्हणजे आट्पाट नगरात उत्तानपाद राज वास करायचा. त्याला २ राण्या होत्या... वगैरे वगैरे असच ना ;)

In reply to by बॅटमॅन

दादा कोंडके Sat, 10/12/2013 - 11:43
आणि लाइफबॉयच्या मराठी जाहिरातीत देखिल, "लाइफबॉय हे जहां, तंदुरुस्ती है वहां" याचं भाषांतर, 'लाइफबॉय जेथे, आरोग्य वास करते तेथे' असं केलेलं असायचं. :)

In reply to by दादा कोंडके

आदूबाळ Sat, 10/12/2013 - 14:18
नाही नाही लाईफबॉय ज्याचे घरी आरोग्य तेथे वास मारी असं आहे :))

kalpana joshi गुरुवार, 10/10/2013 - 13:06
दिवाळी अंकासाठी सुभेच्छा . अंध-श्रद्धा ,कर्म कांड , कला ,प्रवास वर्णन ,इत्यादी चालेल का?

In reply to by kalpana joshi

पैसा गुरुवार, 10/10/2013 - 23:11
तुम्हाला जे काही पाठवावंसं वाटेल ते पाठवा. प्रकाशित करण्याबद्दल अंतिम निर्णय दिवाळी अंक संपादकांचा असेल.

हसरी गुरुवार, 10/10/2013 - 15:52
चोप्य पस्ते >>> लेखन आवाहन लिहून झाल्यावर पुन्हा एकदा वाचून पाहिले नाही काय?

सोत्रि गुरुवार, 10/10/2013 - 21:47
पाकॄ नको
त्यांना बहुदा 'जिलबी' नको असे म्ह्णायचे असावे. :) - (जिलबीसारखा गोलगोल) सोकाजी

In reply to by सोत्रि

अर्धवटराव Fri, 10/11/2013 - 01:16
तुमच्याकडे काहि खास दिवाळी कॉकटेल वगैरे असेलच ना... नक्की पाठवा. शिवाय अभ्यंगस्नान आटोपल्यानंतर चावडीवर गप्पा मारायला घारुअण्णा गँग देखील आली पाहिजे यंदा.

In reply to by अर्धवटराव

बॅटमॅन Fri, 10/11/2013 - 12:16
लै दिवस झाले ग्यांग सुट्टीवर गेलीये. आणा आता लौकर. अन हो, चहासोबत अजून काहीतरी मागवले तरी चालेल. वाचकांनाही तेवढाच रुचिपालट.

चाफा Sat, 10/12/2013 - 08:17
माझ्या जिवाचे मधल्यामधे हाल झाले, मी मारे खून बिन करून मोकळा झालेलो, नियमावली वाचायचे कष्ट घेतले नाहीत हे काही वेगळे सांगायला नको ;) , आता परत हाणामारी करतोय, एखादा खून माफ कराल ना हो संपादक ;)

In reply to by चाफा

स्पंदना Sat, 10/12/2013 - 10:12
अहो,अहो तुम्ही लेखक मंडळी, आसा जीवाबीवाच हाल नका करुन घेऊ. निवांत हाना मारा चाफाभाऊ. काय लय लागल बिगल कुनाला तर देउ चिरीमीरी. तुमी सुरु ठेवा.

In reply to by स्पंदना

चला चाफासाहेब आता तुम्हाला सगळे खून माफ... खुद्द मिपासंमंकडून पाठिंबा म्हणजे काय ! लागा तलवारीना धार करायला आणि बंदूका साफ करायला... ठरवल्यापेक्षा दोनचार जास्त आत्मे मुक्त झाले तरी आता नो वरीज आणि नाचणीज ;)

मिपाच्या दिवाळी अंकांचे विशेष म्हणजे सर्व सामन्यांच्या लेखणीतून उतरलेले असामान्य लेखन त्यात उगाच उच्चभ्रू पणाचा लवलेश नाही.

भाते Sun, 10/13/2013 - 13:24
सर्व मिपाकर आगाऊ लेखकांना शुभेच्छा. दिवाळी अंकाची आतुरतेने वाट पहात आहे.

भाते Sun, 10/13/2013 - 15:53
कृपया वरील वाक्य "सर्व मिपाकर लेखकांना आगाऊ शुभेच्छा" असे वाचावे. लिहिताना कळफलक गंडला आणि प्रकाशित करायच्या आधी वाक्य वाचलेच नाही. मालक/संमं, कृपया स्वसंपादनाची सोय ऊपलब्ध करून द्यावी ही विनंती.

प्रभाकर पेठकर गुरुवार, 10/24/2013 - 12:04
दुर्दैवाने, दिवाळी अंकासाठी लेखन देण्यासाठीची तारीख, व्यवसाय व्यस्ततेत, उलटून गेली. मस्कत लेखमालीकेतील पहिला लेख लिहून तयार आहे. तसेच एखाद दूसरी पाककृतीही देण्याचा मानस आहे. २ दिवस वाढवून मिळतील का?

In reply to by माझीही शॅम्पेन

स्पंदना गुरुवार, 10/24/2013 - 15:12
पेठकर काका, ननि अन माशॅ चालेल जरा दोन दिवसांनी दिला तर, पण फक्त जरा व्याकरण व्यवस्थीत करुन अन मग फाईल न पाठवता डायरेक्ट जीमेल मध्ये चोप्य पेस्त करा. काही फोटोज असतील तर प्लिज त्यांच्या लिक्स पण द्या.सगळेच फोटोज जरा त्रास देताहेत. या मुळे लेख ताबडतोब अपलोड करता येइल. धन्यवाद.

In reply to by स्पंदना

प्रभाकर पेठकर गुरुवार, 10/24/2013 - 20:44
सहमत आणि धन्यवाद. व्याकरण तपासून आणि लेखातच छायाचित्रांच्या पुढे जोडण्या (लिंक्स) देतो. आज रात्री लेख पाठवतो. उद्या पाककृती देईन.

यशोधरा Sun, 10/06/2013 - 10:52
मिपाच्या ह्या दुस-या दिवाळी अंकासाठी खूप शुभेच्छा. दर्जेदार दिअं वाचायला मिळेल ह्याबद्दल शंका नाही :)

विजुभाऊ Wed, 10/09/2013 - 13:30
दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठा साठी फोटो / चित्रे यासाठी एखादी स्पर्धा ठेवावी. तसेच त्या स्पर्धच्या निमित्ताने आलेले फोटो अंकात सहभागी करावेत् ही विनन्ती.

In reply to by विजुभाऊ

अभ्या.. Wed, 10/09/2013 - 14:47
दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठा साठी फोटो / चित्रे यासाठी एखादी स्पर्धा ठेवावी.
सहमत. . पण आधी निकष सांगून. किंवा नंतर रसग्रहण तरी, नुसते एकतर्फी नको.

चाफा गुरुवार, 10/10/2013 - 02:27
सणाच्या दृष्टीने अप्रिय, किळसवाणे, मृत्यूशी संबंधित, थेट ट्रॅजेडीने भरलेले असे प्रकार कृपया न पाठवल्यास बरे.
भयकथा बाद का ?? *DONT_KNOW*

In reply to by चाफा

स्पंदना गुरुवार, 10/10/2013 - 03:38
भयकथा चालतील असे वाटतेय, कारण त्यात कुणाचा मृत्यु होत नाही पण मेलेली व्यक्ती पुन्हा जीवंत होते. :)

स्पंदना गुरुवार, 10/10/2013 - 03:43
खरतर हे सांगायचे गरज नव्हती कारण पुर्वप्रकाशित साहित्य दिवाळी अंकात पुन्हा प्रकाशित करण्यात काहीच अर्थ नाही. तरीही मुद्दा वर धाग्यात उल्लेखला नाही म्हणुन

दिवाळी अंकासाठी पाठवलेले साहित्य पुर्वप्रकाशित असु नये. निदान मिपावर या आधी प्रकाशित झालेले साहित्य पुन्हा प्रकाशित करता येणार नाही, कृपया संबंधितांनी याची नोंद घ्यावी.

In reply to by चाफा

स्पंदना गुरुवार, 10/10/2013 - 03:49
तो त्या कथेचा परिणाम असेल चाफाभाऊ! कथा उत्कंठा वाढवत नेत असेल, मनात भय उत्पन्न करुन वाचायला उद्युक्त करत असेल, तर तो प्रकार किळसवाणा ठरत नाही. ही एक फार पातळ अन नाजुक रेषा ठरु शकते ठरवण्यासाठी, पण बिभस्त नसेल, मन गुंगवुन ठेवणारी असेल तर चालु शकेल. मागच्यावेळी मीच लिहीलेली सवाष्ण शेवटी थोडी ट्रॅजीक होत गेली, पण कथेच्या अनुषंगाने जाणारा मृत्यु वेगळा. एकूण या वेळी सणासमारंभात मन उल्हसित असावा असा काहीसा सूर आहे, तरीही अपवाद असतातच. त्यामुळे चांगल्या दर्जाच्या लेखनाला कोणीही नाही म्हणु शकणार नाही.

In reply to by स्पंदना

गवि गुरुवार, 10/10/2013 - 07:31
कॅन्सरची कथा आणि अखेर मरण. शी शू वातनिस्सारण उलटी आदिंची वास्तवपूर्ण वर्णने किंवा त्यावर बेतलेले विनोद. इत्यादि शक्यतो टाळावे. मरणाचा उल्लेखही नको असे नव्हे.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

बॅटमॅन गुरुवार, 10/10/2013 - 18:35
त्यातल्या "स्स" मुळे विसिष्ट फील येतो त्यामुळे ते वाचूनच निर्वाण पावल्या जाते.

In reply to by आदूबाळ

बॅटमॅन Fri, 10/11/2013 - 12:15
त्यावरून आठवलं, लहानपणी कथा वाचायचो त्यात "अमुक शहरात/ठिकाणी तमुक तमुक वास करून असतो/असते" हे वाक्यही तसेच वाटायचे.

In reply to by बॅटमॅन

सौंदाळा Fri, 10/11/2013 - 16:02
म्हणजे आट्पाट नगरात उत्तानपाद राज वास करायचा. त्याला २ राण्या होत्या... वगैरे वगैरे असच ना ;)

In reply to by बॅटमॅन

दादा कोंडके Sat, 10/12/2013 - 11:43
आणि लाइफबॉयच्या मराठी जाहिरातीत देखिल, "लाइफबॉय हे जहां, तंदुरुस्ती है वहां" याचं भाषांतर, 'लाइफबॉय जेथे, आरोग्य वास करते तेथे' असं केलेलं असायचं. :)

In reply to by दादा कोंडके

आदूबाळ Sat, 10/12/2013 - 14:18
नाही नाही लाईफबॉय ज्याचे घरी आरोग्य तेथे वास मारी असं आहे :))

kalpana joshi गुरुवार, 10/10/2013 - 13:06
दिवाळी अंकासाठी सुभेच्छा . अंध-श्रद्धा ,कर्म कांड , कला ,प्रवास वर्णन ,इत्यादी चालेल का?

In reply to by kalpana joshi

पैसा गुरुवार, 10/10/2013 - 23:11
तुम्हाला जे काही पाठवावंसं वाटेल ते पाठवा. प्रकाशित करण्याबद्दल अंतिम निर्णय दिवाळी अंक संपादकांचा असेल.

हसरी गुरुवार, 10/10/2013 - 15:52
चोप्य पस्ते >>> लेखन आवाहन लिहून झाल्यावर पुन्हा एकदा वाचून पाहिले नाही काय?

सोत्रि गुरुवार, 10/10/2013 - 21:47
पाकॄ नको
त्यांना बहुदा 'जिलबी' नको असे म्ह्णायचे असावे. :) - (जिलबीसारखा गोलगोल) सोकाजी

In reply to by सोत्रि

अर्धवटराव Fri, 10/11/2013 - 01:16
तुमच्याकडे काहि खास दिवाळी कॉकटेल वगैरे असेलच ना... नक्की पाठवा. शिवाय अभ्यंगस्नान आटोपल्यानंतर चावडीवर गप्पा मारायला घारुअण्णा गँग देखील आली पाहिजे यंदा.

In reply to by अर्धवटराव

बॅटमॅन Fri, 10/11/2013 - 12:16
लै दिवस झाले ग्यांग सुट्टीवर गेलीये. आणा आता लौकर. अन हो, चहासोबत अजून काहीतरी मागवले तरी चालेल. वाचकांनाही तेवढाच रुचिपालट.

चाफा Sat, 10/12/2013 - 08:17
माझ्या जिवाचे मधल्यामधे हाल झाले, मी मारे खून बिन करून मोकळा झालेलो, नियमावली वाचायचे कष्ट घेतले नाहीत हे काही वेगळे सांगायला नको ;) , आता परत हाणामारी करतोय, एखादा खून माफ कराल ना हो संपादक ;)

In reply to by चाफा

स्पंदना Sat, 10/12/2013 - 10:12
अहो,अहो तुम्ही लेखक मंडळी, आसा जीवाबीवाच हाल नका करुन घेऊ. निवांत हाना मारा चाफाभाऊ. काय लय लागल बिगल कुनाला तर देउ चिरीमीरी. तुमी सुरु ठेवा.

In reply to by स्पंदना

चला चाफासाहेब आता तुम्हाला सगळे खून माफ... खुद्द मिपासंमंकडून पाठिंबा म्हणजे काय ! लागा तलवारीना धार करायला आणि बंदूका साफ करायला... ठरवल्यापेक्षा दोनचार जास्त आत्मे मुक्त झाले तरी आता नो वरीज आणि नाचणीज ;)

मिपाच्या दिवाळी अंकांचे विशेष म्हणजे सर्व सामन्यांच्या लेखणीतून उतरलेले असामान्य लेखन त्यात उगाच उच्चभ्रू पणाचा लवलेश नाही.

भाते Sun, 10/13/2013 - 13:24
सर्व मिपाकर आगाऊ लेखकांना शुभेच्छा. दिवाळी अंकाची आतुरतेने वाट पहात आहे.

भाते Sun, 10/13/2013 - 15:53
कृपया वरील वाक्य "सर्व मिपाकर लेखकांना आगाऊ शुभेच्छा" असे वाचावे. लिहिताना कळफलक गंडला आणि प्रकाशित करायच्या आधी वाक्य वाचलेच नाही. मालक/संमं, कृपया स्वसंपादनाची सोय ऊपलब्ध करून द्यावी ही विनंती.

प्रभाकर पेठकर गुरुवार, 10/24/2013 - 12:04
दुर्दैवाने, दिवाळी अंकासाठी लेखन देण्यासाठीची तारीख, व्यवसाय व्यस्ततेत, उलटून गेली. मस्कत लेखमालीकेतील पहिला लेख लिहून तयार आहे. तसेच एखाद दूसरी पाककृतीही देण्याचा मानस आहे. २ दिवस वाढवून मिळतील का?

In reply to by माझीही शॅम्पेन

स्पंदना गुरुवार, 10/24/2013 - 15:12
पेठकर काका, ननि अन माशॅ चालेल जरा दोन दिवसांनी दिला तर, पण फक्त जरा व्याकरण व्यवस्थीत करुन अन मग फाईल न पाठवता डायरेक्ट जीमेल मध्ये चोप्य पेस्त करा. काही फोटोज असतील तर प्लिज त्यांच्या लिक्स पण द्या.सगळेच फोटोज जरा त्रास देताहेत. या मुळे लेख ताबडतोब अपलोड करता येइल. धन्यवाद.

In reply to by स्पंदना

प्रभाकर पेठकर गुरुवार, 10/24/2013 - 20:44
सहमत आणि धन्यवाद. व्याकरण तपासून आणि लेखातच छायाचित्रांच्या पुढे जोडण्या (लिंक्स) देतो. आज रात्री लेख पाठवतो. उद्या पाककृती देईन.
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार मिपाकर हो, कळविण्यास आनंद वाटतो की गेल्या वर्षीच्या यशस्वी दिवाळी अंकानंतर आपण याही वर्षी आपल्या मिपाचा दिवाळी अंक काढणार आहोत तेव्हा आपल्या कविता, व्यंगचित्र, कथा, माहितीपूर्ण लेखन, चुटकुले, विनोदी लेखन, अशा सर्व प्रकारचे लेखन दिनांक २३/१०/२०१३ पर्यंत वर्ड फाईल असेल तर mipa.sampadak@gmail.com या स्वतंत्र ईमेल आयडीला ईमेलद्वार किंवा दिवाळी अंक या मिपावरच्या आयडीला व्यनिद्वारे पाठवा. जास्त चित्रे असतील तर शक्यतो gmail आयडीला पाठवावे ही विनंती. कारण व्यनिद्वारे आलेली फाईल अंकात समाविष्ट करणे जरा जिकिरीचे काम आहे.

मिपा - घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा २०१३

संपादक मंडळ ·

garava Mon, 09/09/2013 - 18:04
अ‍ॅड्मिन, 'मि.पा वर फोटो कसे टाकावेत' चा धागा टाकाना वर हेडर मधे. म्हणजे कोणाला अडचण आल्यास आधी ते इथे बघतील आणि नाहीच जमल तर तुम्ही आहातच.

In reply to by संजय क्षीरसागर

पैसा Tue, 09/10/2013 - 10:43
त्या फोटोला बक्षीस मिळालंच तर पुस्तक पाठवण्यासाठी त्या सदस्याने आपलं नाव पत्ता संपादक मंडळापैकी कोणालातरी कळवावं लागेल. बक्षीस न मिळाल्यास प्रश्नच येणार नाही. सदस्यांच्या प्रामाणिकपणावर आम्ही विश्वास ठेवत आहोत. यासाठी सुरुवातीला फोटो देताना नाव द्यावे अशी कल्पना आली होती पण सदस्यांची प्रायव्हसी जपण्यासाठी ती अट काढून टाकली. घरातली सजावट आणि एखाद्या मंडळातली सजावट यात फरक नक्कीच असतो आणि एखाद्या मंडळाच्या गणपतीचा फोटो कोणी आपल्या घरचा म्हणून दिला तर नक्कीच लक्षात येईल. कोणाची समजा २ घरे असतील आणि दोन्हीकडे गणपती आणत असाल तर म्हणून प्रत्येकाला २ फोटो देण्याची मुभा दिली आहे. ते असो. तुमच्या घरचे फोटो कुठे आहेत?

In reply to by पैसा

अभ्या.. Tue, 09/10/2013 - 11:44
आमच्या घरी सोवळ्यातला बाप्पा असतो. देवघरात असल्याने सजावटीला वाव नाही. माझ्या कलेला ही :( . आमच्या नशीबी दिवाळीत तुळशीवॄंदावनावर श्री राधा दामोदर प्रसन्न एवढेच लिहिणे. :( मी ती हौस मित्राच्या घरी सजावट करुन भागवतो. तेथील फोटो दिले तर चालतील काय ? ;)

मीनल Tue, 09/10/2013 - 19:26
गेल्या उन्हाळाच्या सुट्टीत भारत भेट धावती झाली. त्या कमी वेळात ही माहिम बस डेपो जवळ असलेल्या जब्बर भाईंच्या लाकडी कोरीवकामाच्या वस्तूंच्या दुकानातून हा लाकडी देव्हारा बनवून घेतला. ह्या भाद्रपद चतुर्थीला त्याचे उदघाटन करण्याचे ठरवले. मुंबईतल्या दादरच्या किर्तीकर मार्केटमधून मोत्यांच्या माळा आणल्या होत्या. (अविश्वासनीय वाटेल म्हणून आई शपथ घेऊन सांगते- एकूण ६ माळा, प्रत्येकी लांबी ६ ईंच, भारतीय रुपये ३०/- फक्त) प्लास्टिक मोत्यांचा दर्जा अतिनिम्न असला तरी अश्या सजावटीसाठी अतिउत्तम आहे. दादरच्या रानडे रोड येथिल सौभाग्य वस्तू भांडार मधून श्री मूर्तीच्या वर लावायला एक छोटी छत्री आणि नैवेद्याच्या ताटाभोवती लावायला मोत्याच्या दोन महिरपीही घेतल्या होत्या. इथे घरात ही हस्तकलेच्या वापरातले लहान /मोठे आणि शुभ्र पांढ-या ते गडद पिवळ्या रंगाच्या मधल्या विविध छटांचे बरेच मोती होते. ह्य सर्व मोत्यांचा वापर करून सजावट करण्याची कल्पना हाती घेतली. आधी छ्त्रीला धाग्याने मोती शिवून काढले. श्री गणरायांसाठी बारीक मोत्याचे दागिने ही तयार केले. ते काम जरा नाजूक वाटत होते. ते जमल्यावर इतर सर्व मोत्यांचा वापर करून देव्हारा सजवला. त्या समोर मोती लावलेल्या हळद, कुंडाच्या वाट्या ठेवल्या. समई, निरांजन वगैरे इतर मांडणी केली. त्या सजावटीचा फोटो- !! श्री गणेश !! आणि हा आहे पूजा,आरती,नैवेद्यार्पण झाल्यानंतरचा फोटो - पूजा  झाल्यानंतर खिर,पुरण,चटणी, कोशिंबीर, साधे वरण, भात, दहीभात, आमटी, पोळी, बटाटा भाजी आणि कलाकंद बर्फी (सर्व घरी केलेला) असा नैवेद्य आमच्या बाप्पाला आवडला असेल अशी आशा वाटते. तो सुख कर्ता, दु:ख हर्ता असाच पाठीशी राहो आणि आमची सेवा मान्य करून घेवो ही त्याच्या चरणी प्रार्थना. मंगलमूर्ती मोरया.

In reply to by मीनल

विटेकर Wed, 09/11/2013 - 15:51
साधी पण मनोहारी सजावट आहे ,, मला ही अशीच साधी सजावट आवडते उगाच् लायटींग केले की बाप्पा लांअब जाऊन बसलेत असे वाटते.

पैसा Tue, 09/10/2013 - 20:06
बुवांची रांगोळी आणि आतापर्यंत आलेले सगळे गणपतीबाप्पा मस्तच! मीनल, गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीच्या सजावटीबद्दल एक खास धागा वाचायला आवडेल!

In reply to by मुक्त विहारि

मीनल Tue, 09/10/2013 - 20:53
सजावटी मुळे घरात उत्सवाचे वातावरण निश्चितच तयार होते. सुपारीची आरास कशी करणार? पण सजावटीची हौस असते. म्हणून आम्ही ही एकरंगी मूर्ती दरवर्षी केवळ दर्शनीय रूप म्हणून ठेवतो. तिथेच सजावट करतो. समोर सुपारी मांडून तोच गणपती मानून त्याची यथासांग पूजा करतो. आता पर्यंत विसर्जन ही केवळ सुपारीचे करत होतो. परंतु आता जवळच्या वाहत्या नदीत विसर्जन कठिण होत आहे. सतत पहारा करणारी पोलिसांची गाडी, आजूबाजूचे कॅमेरा आणि कायदा भंगाच्या दंडाच्या सूचना या मुळे ह्या वर्षी पासून बादलीतील पाण्यात सुपारीचे विसर्जन होईल. आणि मग ती सुपारी तुळशीच्या कुंडीत ठेऊ.

In reply to by मीनल

रेवती Wed, 09/11/2013 - 02:59
हेच म्हणते मीनलताई, मीही बादलीतील पाण्यात विसर्जन करणार आहे. आमच्याकडे दीड दिवसांचे गणपती असतात. लगेच बादलीत ठेवायला वाईट वाटत असल्याने जागेवरून थोडे हलवून तसेच ठेवलेत. मनाची तयारी झाल्यावर विसर्जन करणार.

In reply to by रेवती

केदार-मिसळपाव Wed, 09/11/2013 - 18:13
आम्ही दर वर्षी लाकडी गणेश मुर्ती ची प्रतिष्ठापना करतो त्यामुळे पाण्यात विसर्जनाचा प्रश्णच येत नाही. विसर्जन करायचे म्हणजे गणपती आसनावरुन उचलुन त्याच्या नेहमीच्या जागी (एक छोटे मंदिर केले आहे) नेउन ठेवायचा...पुढ्च्या वर्षापर्यंत.

तुमचा अभिषेक Tue, 09/10/2013 - 21:39
आतापर्यंतचे सारेच बाप्पा छान.. :) थर्माकोलच्या मकरापेक्षा फुलाफुलांची सजावट नेहमीच भावते.. हे वैयक्तिक मत, अन्यथा आमच्याकडेही जेव्हा बाप्पा असायचे तेव्हा बरेचदा थर्माकोलचे जोडलेले तुकडेच असायचे.. बाकी आता या स्पर्धेसाठी एलिजिबल नाही याचे खूप वाईट वाटतेय.. :(

sneharani Wed, 09/11/2013 - 15:08
आमच्या घरचा खराखुरा मातीचा गणपती अन त्याची साधीशी त्याला साजेल अशी सजावट ga1 ga2

अभ्या.. Wed, 09/11/2013 - 15:23
मला एक शंकाय. परीक्षक कोण आहेत? म्हणजे निकष काय आहेत सजावट सुन्दर म्हणायला? इको फ्रेंडली की फ़क्त बाजारु चान चान? की फ़क्त फोटोजेनिक? कुणाला नावे ठेवण्याचा उद्देश नाही पण स्पर्धा आहे म्हणून इचारले ;-)

In reply to by अभ्या..

किसन शिंदे गुरुवार, 09/12/2013 - 12:07
अभ्या, स्पर्धेसाठीचे निकष हे फक्त तू सजावट कशी केलीयेस याच्यावर आहेत, मग ती इकोफ्रेंडली असो किंवा आणखी वेगळ्या तर्‍हेची. गणपतीभोवती कलात्मकतेने केलेल्या सजावटी बरोबर घरी बनवलेल्या सुंदर आणि कलात्मक मखरांचाही या स्पर्धेसाठी विचार केलाही जाईल. परिक्षणाची जबाबदारी काही जेष्ठ मिपाकर पाहत आहेत.

चौकटराजा Wed, 09/11/2013 - 18:55
. . यावर्षी देशाची आर्थिक घसरण होत असल्याने काटकसरीचा मेसेज आमच्या पुढच्या पिढीला देण्यासाठी वरील प्रकारे सजावट केलीय. मखरासाठी जुन्या लग्न पत्रिकांचा वापर केला आहे. मागचा गुलाबी पडदा हा जुन्या तलम ओढणीतून विरळ झालेला भाग बाजूला करून उरलेला भाग वापरलेला आहे. तो ज्याच्यात अडकविला आहे ती धातूची नळी जुन्या वाकलेल्या अ‍ॅल्युमिनियमच्या हँगर पासून बनविली आहे. बाप्पाचा मुकुट त्यावरील चमकते खडे सर्व जुन्या वापरलेल्या वस्तूंपासून मिळवले आहेत.लोडात दोरा संपलेली रिळे टाकून त्यावर कापूस गुंडाळला आहे. व जुन्या जॅकॉर्ड साडीचा तुकडा खोळीसाठी वापरला आहे. बाप्पाचा प्रसाद मात्र ताज्या मालापासून बनविला आहे.

मदनबाण Wed, 09/11/2013 - 20:42
सर्वच स्पर्धकांचे फोटो आवडले ! :) @आत्माराव :- रांगोळी लयं भारी ! @मृत्युन्जय :- मोराची आणि कोयरीची नक्षी सुरेख आहे. :) @जय - गणेश :- काळ्या पार्श्वभुमीवर फिरणारे रंग सुंदर दिसत आहेत. @केदार-मिसळपाव :- अशी समई पहिल्यांदाच पाहिली. @अनन्न्या@:- दुसरा फोटो आवडला,बाप्पा आणि मखर दोन्ही गोड. @मीनल :- देव्हार्‍याची नाजुक सजावट आवडली. बाप्पा समोरची उदबत्ती "मसाला" श्रेणीतली वाटते. मला स्वतःला मसला उदबत्तीच आवडते,आणि सेंटेड मी कधीच घेत नाही. उदबत्यांमधे मला म्हैसुर किंग आणि वुड्स फार आवडते. @आश :- जबराट ! :) @gaikiakash :- मस्त. @sneharani :- फुलचामधला छोटासा बाप्पा आवडला. :) चौकटराजा :- खरयं ! मंदीचा परिणाम जाणवण्या इतपत वातवरण आहे खरे. बाप्पाची मूर्ती आवडली.

प्यारे१ गुरुवार, 09/12/2013 - 03:40
छान उपक्रम. सग्गळेच 'गणपती' आवडले, सजावटींसकट! (आशचा गणपती डाएटवर नि स्नेहाराणी चा गणपती फुलांनी झाकला गेला असल्याने 'गुप्त' दिसतोय. उसेन बोल्टला सोंड नसल्यानं त्याला गणपती मानत नाहीये. ;) सग्गळ्या फोटोंचा विचार केल्या गेला आहे. :) )

दीपा माने गुरुवार, 09/12/2013 - 04:09
सर्वच गणपती सुंदर आणि सजीव वाटतात. आपल्या मनातल्या भावाप्रमाणे ते आपल्याला दिसतात. माझ्यामते सर्वच स्पर्धक विजयी आहेत.

जोशी 'ले' गुरुवार, 09/12/2013 - 09:40
माझा बाप्पा... a a a a थर्माकोल वापरुन हि बाप्पा ची सजावट केलीय व मेटॅलीक पेस्टल कलर्स वापरलेत :-) बाप्पा मात्र इकोफ्रेंडली आहेत :-)

In reply to by जोशी 'ले'

केदार-मिसळपाव गुरुवार, 09/12/2013 - 13:08
छान आकार दिलाय..प्रत्यक्ष बघतांना अधिक सुंदर दिसत असेल फोटोत दिसतोय त्याच्यापेक्षा हे मात्र नक्की सांगु शकतो.

सुमीत भातखंडे गुरुवार, 09/12/2013 - 09:52
आहेत सजावटी. सर्व स्पर्धकांना शुभेच्छा! गणपती बाप्पा मोरया!!!

विटेकर गुरुवार, 09/12/2013 - 15:31
Sajaavat 2013 Varad Murti सारी सजावट घरीच केली आहे. मगचे मोर थर्माकोलचे विकत आणले आहेत. माझ्यापेक्षा सहधर्मचारिणीचा सहभाग जास्त आहे.. माझा आपला खारिचा वाटा !

दादा कोंडके गुरुवार, 09/12/2013 - 16:22
असल्या अंधश्रद्धांना खतपाणी घालणार्‍या संपादक मंडळाचा निषेध!

In reply to by दादा कोंडके

पैसा गुरुवार, 09/12/2013 - 19:56
गणपतीबाप्पा मोरया!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विकास गुरुवार, 09/12/2013 - 19:20
१००% सहमत! खुपच सुंदर! सर्वांचेच (त्यात असे उत्साही भक्त मिळाले म्हणून बाप्पा पण आले :) ) अभिनंदन!

In reply to by मानस्

मानस् गुरुवार, 09/12/2013 - 19:26
या वर्षी घरी काही बनवायला वेळच नाही झाला. मग बाहेरून तयार मखर आणले. गणपती बाप्पा सधिभोळी भक्ती मानून घेओत ही प्रार्थना.

अजया गुरुवार, 09/12/2013 - 22:53
आमच्याकडे मखर करण्याची पद्धत नाही. त्यामुळे साधीशीच सजावट आणि लायटींग केले जाते!.

नानबा Fri, 09/13/2013 - 09:53
आमचे बाप्पा, गौरी आणि त्यांची सजावट संपूर्णपणे इको फ्रेंडली असते. बाप्पांची मूर्ती संगमरवरी असल्यामुळे विसर्जन केलं जात नाही. उत्तरपूजेनंतर स्वच्छ करून झाकून ठेवली जाते आणि पुढच्या वर्षीच बाहेर निघते. गौरींच्या बाबतीत तेच. पितळी मुखवटे आणि मातीची सुगडं यापैकी कशाचंही विसर्जन होत नाही. प्लॅस्टीक आणि थर्माकोलचा सजावटीत वापर शून्य. या दिवसांत जमा होणारं निर्माल्य एकत्र करून घरातल्याच एका मोठ्या कुंडीत मातीत दाबून टाकतो. काही महिन्यांत त्याचं खत बनतं जे गॅलरीतल्या झाडांमध्ये टाकतो... पर्यावरणाचा कमीत कमी र्‍हास होईल याची काळजी घेतली जाते.. :)

In reply to by किसन शिंदे

अभ्या.. Sat, 09/14/2013 - 01:38
आभारी आहे किसना. नेट चा थोड़ा प्रॉब्लम असल्यान इमेज अपलोड करता येत नव्हती. :-( हे फ्लेक्स प्रिंट्स मधील वेस्ट वापरून केले आहे. श्री अम्बाबाई चे चित्र नसून त्रिमीत आहे. मूर्तीच्या चित्राला दागिने व् साडी नेसवली आहे. मागील प्रभावल अशाच एका फ्लेक्स मधील तुकडा वापरून केली आहे. बॉक्स आहेत ते रद्दी कंटेनर वापरून त्यावर जादा झालेली फ्लेक्सची इंक रंग म्हणून वापरली आहे. आवश्यक तिथे प्रिंट मतेरिअलचा वापर केलाय जे मला सहज उपलब्ध असते.

garava Mon, 09/09/2013 - 18:04
अ‍ॅड्मिन, 'मि.पा वर फोटो कसे टाकावेत' चा धागा टाकाना वर हेडर मधे. म्हणजे कोणाला अडचण आल्यास आधी ते इथे बघतील आणि नाहीच जमल तर तुम्ही आहातच.

In reply to by संजय क्षीरसागर

पैसा Tue, 09/10/2013 - 10:43
त्या फोटोला बक्षीस मिळालंच तर पुस्तक पाठवण्यासाठी त्या सदस्याने आपलं नाव पत्ता संपादक मंडळापैकी कोणालातरी कळवावं लागेल. बक्षीस न मिळाल्यास प्रश्नच येणार नाही. सदस्यांच्या प्रामाणिकपणावर आम्ही विश्वास ठेवत आहोत. यासाठी सुरुवातीला फोटो देताना नाव द्यावे अशी कल्पना आली होती पण सदस्यांची प्रायव्हसी जपण्यासाठी ती अट काढून टाकली. घरातली सजावट आणि एखाद्या मंडळातली सजावट यात फरक नक्कीच असतो आणि एखाद्या मंडळाच्या गणपतीचा फोटो कोणी आपल्या घरचा म्हणून दिला तर नक्कीच लक्षात येईल. कोणाची समजा २ घरे असतील आणि दोन्हीकडे गणपती आणत असाल तर म्हणून प्रत्येकाला २ फोटो देण्याची मुभा दिली आहे. ते असो. तुमच्या घरचे फोटो कुठे आहेत?

In reply to by पैसा

अभ्या.. Tue, 09/10/2013 - 11:44
आमच्या घरी सोवळ्यातला बाप्पा असतो. देवघरात असल्याने सजावटीला वाव नाही. माझ्या कलेला ही :( . आमच्या नशीबी दिवाळीत तुळशीवॄंदावनावर श्री राधा दामोदर प्रसन्न एवढेच लिहिणे. :( मी ती हौस मित्राच्या घरी सजावट करुन भागवतो. तेथील फोटो दिले तर चालतील काय ? ;)

मीनल Tue, 09/10/2013 - 19:26
गेल्या उन्हाळाच्या सुट्टीत भारत भेट धावती झाली. त्या कमी वेळात ही माहिम बस डेपो जवळ असलेल्या जब्बर भाईंच्या लाकडी कोरीवकामाच्या वस्तूंच्या दुकानातून हा लाकडी देव्हारा बनवून घेतला. ह्या भाद्रपद चतुर्थीला त्याचे उदघाटन करण्याचे ठरवले. मुंबईतल्या दादरच्या किर्तीकर मार्केटमधून मोत्यांच्या माळा आणल्या होत्या. (अविश्वासनीय वाटेल म्हणून आई शपथ घेऊन सांगते- एकूण ६ माळा, प्रत्येकी लांबी ६ ईंच, भारतीय रुपये ३०/- फक्त) प्लास्टिक मोत्यांचा दर्जा अतिनिम्न असला तरी अश्या सजावटीसाठी अतिउत्तम आहे. दादरच्या रानडे रोड येथिल सौभाग्य वस्तू भांडार मधून श्री मूर्तीच्या वर लावायला एक छोटी छत्री आणि नैवेद्याच्या ताटाभोवती लावायला मोत्याच्या दोन महिरपीही घेतल्या होत्या. इथे घरात ही हस्तकलेच्या वापरातले लहान /मोठे आणि शुभ्र पांढ-या ते गडद पिवळ्या रंगाच्या मधल्या विविध छटांचे बरेच मोती होते. ह्य सर्व मोत्यांचा वापर करून सजावट करण्याची कल्पना हाती घेतली. आधी छ्त्रीला धाग्याने मोती शिवून काढले. श्री गणरायांसाठी बारीक मोत्याचे दागिने ही तयार केले. ते काम जरा नाजूक वाटत होते. ते जमल्यावर इतर सर्व मोत्यांचा वापर करून देव्हारा सजवला. त्या समोर मोती लावलेल्या हळद, कुंडाच्या वाट्या ठेवल्या. समई, निरांजन वगैरे इतर मांडणी केली. त्या सजावटीचा फोटो- !! श्री गणेश !! आणि हा आहे पूजा,आरती,नैवेद्यार्पण झाल्यानंतरचा फोटो - पूजा  झाल्यानंतर खिर,पुरण,चटणी, कोशिंबीर, साधे वरण, भात, दहीभात, आमटी, पोळी, बटाटा भाजी आणि कलाकंद बर्फी (सर्व घरी केलेला) असा नैवेद्य आमच्या बाप्पाला आवडला असेल अशी आशा वाटते. तो सुख कर्ता, दु:ख हर्ता असाच पाठीशी राहो आणि आमची सेवा मान्य करून घेवो ही त्याच्या चरणी प्रार्थना. मंगलमूर्ती मोरया.

In reply to by मीनल

विटेकर Wed, 09/11/2013 - 15:51
साधी पण मनोहारी सजावट आहे ,, मला ही अशीच साधी सजावट आवडते उगाच् लायटींग केले की बाप्पा लांअब जाऊन बसलेत असे वाटते.

पैसा Tue, 09/10/2013 - 20:06
बुवांची रांगोळी आणि आतापर्यंत आलेले सगळे गणपतीबाप्पा मस्तच! मीनल, गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीच्या सजावटीबद्दल एक खास धागा वाचायला आवडेल!

In reply to by मुक्त विहारि

मीनल Tue, 09/10/2013 - 20:53
सजावटी मुळे घरात उत्सवाचे वातावरण निश्चितच तयार होते. सुपारीची आरास कशी करणार? पण सजावटीची हौस असते. म्हणून आम्ही ही एकरंगी मूर्ती दरवर्षी केवळ दर्शनीय रूप म्हणून ठेवतो. तिथेच सजावट करतो. समोर सुपारी मांडून तोच गणपती मानून त्याची यथासांग पूजा करतो. आता पर्यंत विसर्जन ही केवळ सुपारीचे करत होतो. परंतु आता जवळच्या वाहत्या नदीत विसर्जन कठिण होत आहे. सतत पहारा करणारी पोलिसांची गाडी, आजूबाजूचे कॅमेरा आणि कायदा भंगाच्या दंडाच्या सूचना या मुळे ह्या वर्षी पासून बादलीतील पाण्यात सुपारीचे विसर्जन होईल. आणि मग ती सुपारी तुळशीच्या कुंडीत ठेऊ.

In reply to by मीनल

रेवती Wed, 09/11/2013 - 02:59
हेच म्हणते मीनलताई, मीही बादलीतील पाण्यात विसर्जन करणार आहे. आमच्याकडे दीड दिवसांचे गणपती असतात. लगेच बादलीत ठेवायला वाईट वाटत असल्याने जागेवरून थोडे हलवून तसेच ठेवलेत. मनाची तयारी झाल्यावर विसर्जन करणार.

In reply to by रेवती

केदार-मिसळपाव Wed, 09/11/2013 - 18:13
आम्ही दर वर्षी लाकडी गणेश मुर्ती ची प्रतिष्ठापना करतो त्यामुळे पाण्यात विसर्जनाचा प्रश्णच येत नाही. विसर्जन करायचे म्हणजे गणपती आसनावरुन उचलुन त्याच्या नेहमीच्या जागी (एक छोटे मंदिर केले आहे) नेउन ठेवायचा...पुढ्च्या वर्षापर्यंत.

तुमचा अभिषेक Tue, 09/10/2013 - 21:39
आतापर्यंतचे सारेच बाप्पा छान.. :) थर्माकोलच्या मकरापेक्षा फुलाफुलांची सजावट नेहमीच भावते.. हे वैयक्तिक मत, अन्यथा आमच्याकडेही जेव्हा बाप्पा असायचे तेव्हा बरेचदा थर्माकोलचे जोडलेले तुकडेच असायचे.. बाकी आता या स्पर्धेसाठी एलिजिबल नाही याचे खूप वाईट वाटतेय.. :(

sneharani Wed, 09/11/2013 - 15:08
आमच्या घरचा खराखुरा मातीचा गणपती अन त्याची साधीशी त्याला साजेल अशी सजावट ga1 ga2

अभ्या.. Wed, 09/11/2013 - 15:23
मला एक शंकाय. परीक्षक कोण आहेत? म्हणजे निकष काय आहेत सजावट सुन्दर म्हणायला? इको फ्रेंडली की फ़क्त बाजारु चान चान? की फ़क्त फोटोजेनिक? कुणाला नावे ठेवण्याचा उद्देश नाही पण स्पर्धा आहे म्हणून इचारले ;-)

In reply to by अभ्या..

किसन शिंदे गुरुवार, 09/12/2013 - 12:07
अभ्या, स्पर्धेसाठीचे निकष हे फक्त तू सजावट कशी केलीयेस याच्यावर आहेत, मग ती इकोफ्रेंडली असो किंवा आणखी वेगळ्या तर्‍हेची. गणपतीभोवती कलात्मकतेने केलेल्या सजावटी बरोबर घरी बनवलेल्या सुंदर आणि कलात्मक मखरांचाही या स्पर्धेसाठी विचार केलाही जाईल. परिक्षणाची जबाबदारी काही जेष्ठ मिपाकर पाहत आहेत.

चौकटराजा Wed, 09/11/2013 - 18:55
. . यावर्षी देशाची आर्थिक घसरण होत असल्याने काटकसरीचा मेसेज आमच्या पुढच्या पिढीला देण्यासाठी वरील प्रकारे सजावट केलीय. मखरासाठी जुन्या लग्न पत्रिकांचा वापर केला आहे. मागचा गुलाबी पडदा हा जुन्या तलम ओढणीतून विरळ झालेला भाग बाजूला करून उरलेला भाग वापरलेला आहे. तो ज्याच्यात अडकविला आहे ती धातूची नळी जुन्या वाकलेल्या अ‍ॅल्युमिनियमच्या हँगर पासून बनविली आहे. बाप्पाचा मुकुट त्यावरील चमकते खडे सर्व जुन्या वापरलेल्या वस्तूंपासून मिळवले आहेत.लोडात दोरा संपलेली रिळे टाकून त्यावर कापूस गुंडाळला आहे. व जुन्या जॅकॉर्ड साडीचा तुकडा खोळीसाठी वापरला आहे. बाप्पाचा प्रसाद मात्र ताज्या मालापासून बनविला आहे.

मदनबाण Wed, 09/11/2013 - 20:42
सर्वच स्पर्धकांचे फोटो आवडले ! :) @आत्माराव :- रांगोळी लयं भारी ! @मृत्युन्जय :- मोराची आणि कोयरीची नक्षी सुरेख आहे. :) @जय - गणेश :- काळ्या पार्श्वभुमीवर फिरणारे रंग सुंदर दिसत आहेत. @केदार-मिसळपाव :- अशी समई पहिल्यांदाच पाहिली. @अनन्न्या@:- दुसरा फोटो आवडला,बाप्पा आणि मखर दोन्ही गोड. @मीनल :- देव्हार्‍याची नाजुक सजावट आवडली. बाप्पा समोरची उदबत्ती "मसाला" श्रेणीतली वाटते. मला स्वतःला मसला उदबत्तीच आवडते,आणि सेंटेड मी कधीच घेत नाही. उदबत्यांमधे मला म्हैसुर किंग आणि वुड्स फार आवडते. @आश :- जबराट ! :) @gaikiakash :- मस्त. @sneharani :- फुलचामधला छोटासा बाप्पा आवडला. :) चौकटराजा :- खरयं ! मंदीचा परिणाम जाणवण्या इतपत वातवरण आहे खरे. बाप्पाची मूर्ती आवडली.

प्यारे१ गुरुवार, 09/12/2013 - 03:40
छान उपक्रम. सग्गळेच 'गणपती' आवडले, सजावटींसकट! (आशचा गणपती डाएटवर नि स्नेहाराणी चा गणपती फुलांनी झाकला गेला असल्याने 'गुप्त' दिसतोय. उसेन बोल्टला सोंड नसल्यानं त्याला गणपती मानत नाहीये. ;) सग्गळ्या फोटोंचा विचार केल्या गेला आहे. :) )

दीपा माने गुरुवार, 09/12/2013 - 04:09
सर्वच गणपती सुंदर आणि सजीव वाटतात. आपल्या मनातल्या भावाप्रमाणे ते आपल्याला दिसतात. माझ्यामते सर्वच स्पर्धक विजयी आहेत.

जोशी 'ले' गुरुवार, 09/12/2013 - 09:40
माझा बाप्पा... a a a a थर्माकोल वापरुन हि बाप्पा ची सजावट केलीय व मेटॅलीक पेस्टल कलर्स वापरलेत :-) बाप्पा मात्र इकोफ्रेंडली आहेत :-)

In reply to by जोशी 'ले'

केदार-मिसळपाव गुरुवार, 09/12/2013 - 13:08
छान आकार दिलाय..प्रत्यक्ष बघतांना अधिक सुंदर दिसत असेल फोटोत दिसतोय त्याच्यापेक्षा हे मात्र नक्की सांगु शकतो.

सुमीत भातखंडे गुरुवार, 09/12/2013 - 09:52
आहेत सजावटी. सर्व स्पर्धकांना शुभेच्छा! गणपती बाप्पा मोरया!!!

विटेकर गुरुवार, 09/12/2013 - 15:31
Sajaavat 2013 Varad Murti सारी सजावट घरीच केली आहे. मगचे मोर थर्माकोलचे विकत आणले आहेत. माझ्यापेक्षा सहधर्मचारिणीचा सहभाग जास्त आहे.. माझा आपला खारिचा वाटा !

दादा कोंडके गुरुवार, 09/12/2013 - 16:22
असल्या अंधश्रद्धांना खतपाणी घालणार्‍या संपादक मंडळाचा निषेध!

In reply to by दादा कोंडके

पैसा गुरुवार, 09/12/2013 - 19:56
गणपतीबाप्पा मोरया!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विकास गुरुवार, 09/12/2013 - 19:20
१००% सहमत! खुपच सुंदर! सर्वांचेच (त्यात असे उत्साही भक्त मिळाले म्हणून बाप्पा पण आले :) ) अभिनंदन!

In reply to by मानस्

मानस् गुरुवार, 09/12/2013 - 19:26
या वर्षी घरी काही बनवायला वेळच नाही झाला. मग बाहेरून तयार मखर आणले. गणपती बाप्पा सधिभोळी भक्ती मानून घेओत ही प्रार्थना.

अजया गुरुवार, 09/12/2013 - 22:53
आमच्याकडे मखर करण्याची पद्धत नाही. त्यामुळे साधीशीच सजावट आणि लायटींग केले जाते!.

नानबा Fri, 09/13/2013 - 09:53
आमचे बाप्पा, गौरी आणि त्यांची सजावट संपूर्णपणे इको फ्रेंडली असते. बाप्पांची मूर्ती संगमरवरी असल्यामुळे विसर्जन केलं जात नाही. उत्तरपूजेनंतर स्वच्छ करून झाकून ठेवली जाते आणि पुढच्या वर्षीच बाहेर निघते. गौरींच्या बाबतीत तेच. पितळी मुखवटे आणि मातीची सुगडं यापैकी कशाचंही विसर्जन होत नाही. प्लॅस्टीक आणि थर्माकोलचा सजावटीत वापर शून्य. या दिवसांत जमा होणारं निर्माल्य एकत्र करून घरातल्याच एका मोठ्या कुंडीत मातीत दाबून टाकतो. काही महिन्यांत त्याचं खत बनतं जे गॅलरीतल्या झाडांमध्ये टाकतो... पर्यावरणाचा कमीत कमी र्‍हास होईल याची काळजी घेतली जाते.. :)

In reply to by किसन शिंदे

अभ्या.. Sat, 09/14/2013 - 01:38
आभारी आहे किसना. नेट चा थोड़ा प्रॉब्लम असल्यान इमेज अपलोड करता येत नव्हती. :-( हे फ्लेक्स प्रिंट्स मधील वेस्ट वापरून केले आहे. श्री अम्बाबाई चे चित्र नसून त्रिमीत आहे. मूर्तीच्या चित्राला दागिने व् साडी नेसवली आहे. मागील प्रभावल अशाच एका फ्लेक्स मधील तुकडा वापरून केली आहे. बॉक्स आहेत ते रद्दी कंटेनर वापरून त्यावर जादा झालेली फ्लेक्सची इंक रंग म्हणून वापरली आहे. आवश्यक तिथे प्रिंट मतेरिअलचा वापर केलाय जे मला सहज उपलब्ध असते.
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार मंडळी, गणपती हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि गणेशोत्सव म्हणजे मराठी माणसाच्या मनाचा एक हळवा कोपरा! अंत्यत श्रध्देने आणि मोठ्या भक्तीभावाने हा सण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. सार्वजनिक गणेशोत्सवांच्या बरोबरीने महाराष्ट्रात घरोघरही जवळपास १२ ते १५ लाख बाप्पांची प्रतिष्ठापना केली जाते. त्यांच्या आगमनापुर्वीच घरात लगबग सुरू झालेली असते. प्रत्येकजण आपापल्या परीने गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज झालेला असतो, मग ते दिव्यांची आरास असो वा फुलांची तोरणे, थर्माकॉलचे आकर्षक मखर असो वा गणेशाची सुंदर मुर्ती! हि सजावट अगदी मनोभावे आणि जोरदार केली जाते.