तिसरे पानिपत युध्द स्मृतीदिन - ऑनलाईन व्याख्यान निमंत्रण
तिसरे पानिपत युध्द स्मृतीदिन
ऑनलाईन व्याख्यान निमंत्रण
रविवार, १६ जानेवारी २०२२ सायंकाळी ६ वाजता
Please click on the link of BISM YouTube channel for this programme.
तिसरे पानिपत युध्द स्मृतीदिन
ऑनलाईन व्याख्यान निमंत्रण
रविवार, १६ जानेवारी २०२२ सायंकाळी ६ वाजता
Please click on the link of BISM YouTube channel for this programme.
यळकोट यळकोट जय मल्हार
बाणाईच्या प्रेमाला भुलूनी देव अवतरले चंदनपुरी
राखूनी मेंढरं वाड्यावरी देव करीतो अशी चाकरी ॥धृ॥
व्हती मेंढरं खंडीभर
चराया नेली डोंगरावर
हिरवा पाला रानोमाळं
भवती गार गार वारं
आलं भरूनी आभाळं
काळ्या ढगांच झालं भार
पळात आलं धरणीवर
चकमक दावली विजेनं
कल्लोळ उठला त्या ठाणं
चमत्कार दावला देवानं
वर रोखूनी धरलं त्यानं
बाणाईच्या मेंढरासाठी खंडेरायानं करणी केली
राखूनी मेंढरं वाड्यावरी देव करीतो अशी चाकरी ॥१॥
करा बाई करा ग देवीची आरती
करा बाई करा ग मानाची आरती
आणा बाई आणा ग देवीला कुंकू
लवा बाई लावा ग देवीच्या कपाळा
भरा भाई भरा ग देवीचा मळवट
नेसवा बाई नेसवा ग देवीला नवूवारी
घाला बाई घाला ग देवीला नथनी
घाला बाई देवीला मंगळसुत्र
घाला बाई घाला देवीला कमरपट्टा
घाला बाई घाला ग देवीला तोडे
चाल बदलून
ए निरांजन दिवा ताटात आणा
हळद कुंकू घेवून धूप कापूर पेटवा
करा देवीची आरती
भक्त सारे ओवाळती
पहिली चाल
करा बाई करा ग देवीची आरती
करा बाई करा ग मानाची आरती
- पाभे
२९/१२/२०२१
समींदरा रे समींदरा,
तू जपून आण माझ्या घरधन्याला
लई दिवसांन परतून येईल घराला ||धृ||
नको उधाण आणू तुज्या पाण्याला
नको मस्ती करू देऊ वार्याला
काय नको होवू देऊ त्याचे होडीला
तू जपून आण माझ्या घरधन्याला ||२||
नारळ पौर्णिमेचा सण आता सरला
तुला सोन्याचा नारल वाढवला
नेल्या होड्या त्यानं मासेमारीला
तू जपून आण माझ्या घरधन्याला ||३||
मी कोलीण घरला एकली
सारं आवरून बाजारा निघाली
म्हावरं विकून येवूदे बरकतीला
तू जपून आण माझ्या घरधन्याला ||४||
९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक, ३/४/५ डिसेंबर २०२१, आणि १५ वे विद्रोही साहित्य संमेलन, नाशिक, ४/५ डिसेंबर २०२१ मधील छायाचित्रे
९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक, ३/४/५ डिसेंबर २०२१
विजय तेंडुलकरांच्या समग्र साहित्याचा आढावा घेणाऱ्या ‘अ-जून तेंडुलकर’ या पुस्तकाचा वाचकांना यापूर्वी इथे परिचय करून दिला आहे. त्या पुस्तकात सुमारे पंचवीस नामवंतांनी तेंडुलकरांच्या विपुल साहित्याचा परामर्श घेतला आहे. ‘तें’नी हाताळलेल्या अनेक साहित्यप्रकारांपैकी त्यांचे सदरलेखन हा एक महत्त्वाचा भाग आहे. त्या प्रकारच्या लेखनाचा मी चाहता आहे. अशा लेखनापैकी ‘कोवळी उन्हे’ हे पुस्तक माझे भलतेच आवडते आहे. याच धर्तीवर ‘तें’चे अजून एक पुस्तक म्हणजे ‘रातराणी’.
अपडेट : भरघोस प्रतिसादासाठी सर्व लेखकांचे मनःपूर्वक आभार. दिवाळी अंकात निवडी विषयीचा निरोप सर्व लेखकांना २७ ऑक्टोबरपर्यंत कळवला जाईल
काही सदस्यांनी साहित्य संपादक तसेच ईमेल आयडीवर मुदत वाढवण्यासंदर्भात विचारणा केल्याने मुदत येत्या रविवार पर्यंत वाढवत आहोत.
आजपर्यंत प्राप्त झालेल्या लेखनावर निर्णयप्रक्रिया + मुद्रितशोधन सुरू आहे. लेख दिवाळी अंकासाठी स्वीकारला गेला अथवा नाही, हे लेखकांना २७ ऑक्टोबरपर्यंत कळवण्यात येईल.
-दिवाळी अंक समिती
नमस्कार मिपाकरहो...
गौरी/ महालक्ष्मी चा सण येताहेत..
महाराष्ट्रात याचे फार महत्त्व.स्त्रीयांसाठी विशेष.
हा एक प्रकारचा कुलाचार, कुलधर्म. तीन दिवसाचा.
पहिल्या दिवशी संध्याकाळी गौरी/महालक्ष्मी चे
आगमन व प्रतिष्ठापना असते.दुसरेदिवशी मुख्य पूजा व महा नैवेद्य .तिसरे व शेवटचे दिवशी निर्गमन. पुन्हा पुढील वर्षी येण्यासाठी.
भारतीय संस्कृती मधे बहुतेक सणामागील हेतू मानवाचे निसर्गाशी असलेले नाते दृढ व्हावे,त्याची कृपा सदैव आपल्या वर राहावी,'त्याच्या' प्रति कृतज्ञता व्यक्त करावी हाच आहे असे म्हटले जाते.
गणेश उत्सव म्हटलं की प्लॅस्टरऑफ पॅरिसच्या मुर्ती आणि पाणीप्रदुषणाची चर्चा सुरु होतेच. पर्यावरणवादी प्रदूषणाच्या नावाने बोंब सुरु करतात आणि त्याला तेव्हढेच जोरदार समर्थन उत्सववादी सुरु करतात. मागील कोरोनावर्ष सोडले हा शिमगा दरवर्षी सुरु असतो. काही स्वयंसेवी संघटनांनी मुर्तीदान चळवळ राबवली आणि पाण्याच्या प्रदुषणाचा काही प्रमाणात अटकाव केला. काही लोकांनी शाडूमातीच्या मूर्ती वापर करून पर्यावरणाला आधारच दिला.
नमस्कार.
'पुस्तकगप्पा' या नव्या उपक्रमाची ओळख करून देण्यासाठी हे टिपण.
लायब्रऱ्या, कागदी पुस्तकांची दुकानं, वर्तमानपत्रातली मराठी पुस्तकांची जागा आक्रसत जात असताना, मराठीतल्या महत्त्वाच्या, लोकप्रिय, रंजक, अनवट, नव्याजुन्या पुस्तकांवर गप्पाटप्पा करण्यासाठी या कार्यक्रमाची कल्पना सुचली. प्रत्यक्ष भेटणं दुरापास्त होण्याचं एक सकारात्मक फलित म्हणजे कार्यक्रम करण्यासाठी जागा आणि तिथवर सदेह पोचण्यातल्या अडचणी हे दोन्ही प्रश्न रद्दबातल होणं. ते पथ्यावर पडल्यानं ही कल्पना ऑनलाईन राबवायची ठरवली.