मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जागावाटपाची अजून एक युक्ती : नो मॅन्स लँड

हाडक्या ·
जशा निवडणुका जाहीर झाल्यात तशा सगळ्याच युती आघाडीमध्ये गदारोळ सुरु झालाय. सगळ्यांनाच जास्त जागा हव्यात. अजून नवीन आलेल्या घटक पक्षांना द्यायला राज्यातल्या जागा कमी पडू लागल्यात. आता यावर तोडगा काही लवकर दिसत नाही आहे आणि जर स्वबळावर लढायचे तर सगळ्यांचीच गोची होणार आहे कारण तेवढी ताकद कोणाचीच नाही. आता चर्चेच्या फेर्‍या आणि त्याला कंटाळलेले सगळेच (छोटे घटक पक्ष, माध्यमे आणि त्यांच्यामुळे जनता) याला उपाय काय असे विचारू लागलेत. असाच एक सुचलेला हा उपाय: जर आपण युतीचा विचार केला तर त्यांच्याकडे २८८ जागा आहेत लढवायला आणि ते १८ जागा देणार आहेत छोट्या घटक पक्षांना. मग आता उरलेल्या २७० जागांच्याबद्दल घोळ चाललाय. भाजपाला पण अर्ध्या जागा (१३५) आणि शिवसेनेला पण अर्ध्या अर्ध्याहून अधिक जागा(उ.दा. १६०) पाहिजेत. आता यासाठीच जर युती तुटणार असेल तर दोघांना पण खूप नुकसान झेलावे लागेल मग त्यापेक्षा दोघांनी पण आपल्या कमीत कमी अनिश्चित जागांचा आकडा पुढे मांडावा. उ.दा. इथे भाजपाला १३५ हव्या आहेत म्हणजे उरल्या १३५. पण शिवसेनेला १६० हव्या आहेत म्हणजे भाजपासाठी उरल्या ११०. म्हणजे भाजपला २५ जागा अशा हव्या आहेत की ज्या शिवसेनेलापण हव्या आहेत आणि या कळीच्या वादाच्या जागा आहेत. मग यासाठी एवढा दंगा आणि एकमेकांची उणीदुणी काढण्यापेक्षा या जागा आणि त्यांची संख्या ठरवून दोघांनीपण त्यांना 'नो मॅन्स लँड' म्हणून जाहीर कराव्यात, म्हणजे युतीतील हे दोन पक्ष या जागा स्वबळावर लढवतील आणि जो जिंकेल त्याची ती जागा म्हणून आपोआपच शिक्का लागेल. जर दोघेही हरले तर प्रश्नच यायला नको. उरलेल्या निश्चित जागा जाहीर करून या 'नो मॅन्स लँड' जागांवर चर्चा करून ठरवाव्यात कोणत्या ते. हाच नियम आघाडीपण ठरवू शकते. म्हणजे मग युती आघाडी पण अबाधित आणि लोकांना स्वबळावर केलेली लढाई बघायला मिळाल्याचे पण समाधान. बाकी जय महाराष्ट्र..!! (अवांतर : या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर ते राज ठाकरेंचे गाडे कशात अडकले हे काही कळायला मार्ग नाही. उमेदवार सापडत नाहीत की काय कळायला मार्ग नाही.)

In reply to by नानासाहेब नेफळे

हाडक्या 22/09/2014 - 15:22
वा वा नानासाहेब, आमच्या पहिल्या वहिल्या धाग्याला तुमचे (हात) पाय लागले.. धागा धन्य झाला म्हणायचा. ;)

या मुद्द्यावरून जे चर्चेचे गुर्‍हाळ गेले अनेक दिवस सुरू आहे त्यामुळे दोन्ही पक्षांचे निवडणुकीत नुकसान होण्याची शक्यता वाढत चालली आहे. भाजप नेते म्हणत आहेत की आजवर सेनेने कधीच न जिंकलेल्या ५९ जागा व भाजपने कधीच न जिंकलेल्या १९ जागा यांच्याबद्दल पुनर्विचार केला पाहिजे. (केवळ अदलाबदल करून त्या जिंकल्या जातील या दाव्याचा अर्थ युतीमध्ये दोन्ही पक्ष एकदिलाने काम करीत नाहीत असे माझे मत आहेत). तर या ७८ जागांवर किंवा यापैकी जितक्यांवर दोन्ही पक्षांचे एकमत होईल (तोवर कदाचित उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस निघून गेलेला असेल) तेथे तुम्ही सुचवल्या प्रमाणे मैत्रिपूर्ण लढती करणे इष्ट राहील. यापूर्वी अनेक लोकसभा निवडणुकांमध्ये सेनेने महाराष्ट्राबाहेर भाजपविरुद्ध उमेदवार उभे करून मैत्रिपूर्ण लढती लढल्या आहेत. भाजपने हाच मुद्दा लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या वेळी काढला असता तर आता सेनेला त्यावर एवढा आक्षेप घेता आला नसता. अवांतर - ज्येष्ठ पत्रकार श्री भाऊ तोरसेकर यांनी या घडामोडींवर केलेले आवर्जून वाचण्यासारखे आहे.

या मुद्द्यावरून जे चर्चेचे गुर्‍हाळ गेले अनेक दिवस सुरू आहे त्यामुळे दोन्ही पक्षांचे निवडणुकीत नुकसान होण्याची शक्यता वाढत चालली आहे. भाजप नेते म्हणत आहेत की आजवर सेनेने कधीच न जिंकलेल्या ५९ जागा व भाजपने कधीच न जिंकलेल्या १९ जागा यांच्याबद्दल पुनर्विचार केला पाहिजे. (केवळ अदलाबदल करून त्या जिंकल्या जातील या दाव्याचा अर्थ युतीमध्ये दोन्ही पक्ष एकदिलाने काम करीत नाहीत असे माझे मत आहेत). तर या ७८ जागांवर किंवा यापैकी जितक्यांवर दोन्ही पक्षांचे एकमत होईल (तोवर कदाचित उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस निघून गेलेला असेल) तेथे तुम्ही सुचवल्या प्रमाणे मैत्रिपूर्ण लढती करणे इष्ट राहील. यापूर्वी अनेक लोकसभा निवडणुकांमध्ये सेनेने महाराष्ट्राबाहेर भाजपविरुद्ध उमेदवार उभे करून मैत्रिपूर्ण लढती लढल्या आहेत. भाजपने हाच मुद्दा लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या वेळी काढला असता तर आता सेनेला त्यावर एवढा आक्षेप घेता आला नसता. अवांतर - ज्येष्ठ पत्रकार श्री भाऊ तोरसेकर यांनी या घडामोडींवर केलेले आवर्जून वाचण्यासारखे आहे.

सत्तेच्या लोण्याचा गोळा मिळण्याआधीच या दोन बोक्यांची भांडणं सुरु झाली ,ह्यांच्याकडे म्हणे व्हिजन आहे. दहा पाच जागांसाठी भांडणारे स्वार्थी लोक काय राज्य सांभाळणार!

In reply to by नानासाहेब नेफळे

आघाडीचे बोके पण अशीचं नखं काढुन बसली आहेत. त्यावर नाना किंवा माईंचं मत ऐकायला आवडेल.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

अहो नखे काढून उपयोग काय. त्यांची सगळी भिस्त युतीच्या निर्णयावरच आहे. :-) वैयक्तीक रित्या मला तरी उद्धव मुख्यमंत्री म्हणून पटत नाहीत. तुलनेने फडणवीस झालेच तर तावडे बरे वाटतात.सेनेला याची नक्कि कल्पना असायला पाहीजे की लोकसभेचे मत सेनेला नाही मोदींना होते. मोदीं ऐवजी तिथे अडवाणी असते तर तिथे पण २००९ च झाले असते.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

हाडक्या 22/09/2014 - 17:08
(भाजप जरी सक्षम पर्याय वाटत असला तरी) महाराष्ट्रातील सर्वच पक्षांची ही गोची आहे की एकाकडेही प्रभावशील असे (मोदी सारखे म्हणू हवे तर) नेतृत्व नाही. त्यामुळे सगळाच खुजा नेत्यांचा सावळ गोंधळ माजलाय असे वाटतेय..

आशु जोग 22/09/2014 - 09:46
हाडक्यासाहेब उत्तम उपाय सुचवलात हा उपाय काही लोकांच्या ध्यानी आला होता पण युती तोडण्याची कार्यकर्त्यांची इच्छाच आहे. कारण कितीही छोटे असेल

In reply to by आशु जोग

आशु जोग 04/03/2015 - 14:48
हाडक्यासाहेब आम्ही आदरच राखला आहे...

या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर ते राज ठाकरेंचे गाडे कशात अडकले हे काही कळायला मार्ग नाही.
युती तुटते की नाही हे कळेपर्यंत गप्प बसण्यातच त्यांचा शहाणपणा आहे आणि तो ते निभावत आहेत... सध्या या पाचही पक्षांमध्ये सगळ्यात परिपक्व तेच वागत आहेत!!!!

In reply to by अस्वस्थामा

अजून उमेदवार पण निश्चित नाहीत आणि यात कुठली परिपक्वता ?
असं खरंच वाटतं तुम्हाला? मग अधिक चिंतन करा.... :)

In reply to by पिवळा डांबिस

राज ठाकरे या पाचही पक्षांमध्ये सगळ्यात परिपक्व वागत आहेत हा एक मोठा भ्रम आहे. पण गमतीची गोष्ट अशी की ते गेली ७ वर्षे असा भ्रम निर्माण करण्यात कायम यशस्वी झाले आहेत. लोकांना अजूनही वाटते की हा माणूस काहितरी करु शकेल. मात्र बोलबच्च्न देण्यापलीकडे अजून काही केलेले नाहीये हे ही तितकेच खरे.

In reply to by धर्मराजमुटके

विरोधी पक्ष हा बोलबच्चनपणा आणि आंदोलनेच करू शकतो. त्याच्या हातात सत्ता दिल्याशिवाय तो काही बदल घडवून आणू शकत नाही. एकीकडे त्याच्या सभांना विक्रमी गर्दी करायची आनि मतं मात्र दुसर्‍याला द्यायची हा दांभिकपणा महाराष्ट्रीय मतदारांनी सोडायला हवा. जर त्याला एकदा संधी देऊनही त्याच्या हातुन काही विकास घडला नाही तर त्याच्यावर टीका करणं ठीक आहे. परंतु ते न करता, आणि इतर चारही पक्ष हे नालायक आहेत हे माहित असता, त्याला निकालात काढणं हे बरोबर आहे काय?

In reply to by पिवळा डांबिस

शितावरुन भाताची परीक्षा करतात. महाराष्ट्रातल्या नाशिक मनपाची सत्ता दिली ना ? तिथे काय सुधारणा आहेत ? विकासाचा अहवाल विचारला की दुसर्‍यांना ६० वर्षे विचारला नाही तर मला अडीच वर्षात कसा विचारता असे उत्तर देणे योग्य आहे काय ? मान्य आहे की विकास दिसायला वेळ लागतो. पण तशी इच्छाशक्ती तरी दिसते काय ? किंवा विकासाच्या मार्गावर एक पाऊल पुढे पडते आहे असे वाटते काय ? असेल तर प्लीज सांगा.

In reply to by धर्मराजमुटके

महाराष्ट्रातल्या नाशिक मनपाची सत्ता दिली ना ? तिथे काय सुधारणा आहेत ?
मनसेनं सत्ता घेतली तेंव्हा नाशिक मनपा ला किति कर्ज होतं? आज किती कर्ज आहे? ते कर्ज कुणी फेडलं? आणि आता तिथे **खाऊ भाजपाने जे केलं त्याचं काय करायचं?
विकासाचा अहवाल विचारला की दुसर्‍यांना ६० वर्षे विचारला नाही तर मला अडीच वर्षात कसा विचारता असे उत्तर देणे योग्य आहे काय ?
पूर्ण योग्य आहे. त्यांना त्यांची टर्म पुरी करु द्या, मग विचारा... हेच त्यांचंही सांगणं आहे. त्यात काय चुकलं? महाराष्त्रात कॉन्ग्रेस- राष्ट्रवादीची आणि मुंबई पालिकेत शिवसेनेची अनेक दशके सत्ता असतांना फक्त मनसेलाच त्यांच्या उण्यापुर्‍या दोन-अडीच वर्षांच्या सत्तेनंतर हा प्रश्न विचारण्याचा अगोचरेपणा जर केला गेला तर दुसरं कोणंतं उत्तर अपेक्षित आहे?
मान्य आहे की विकास दिसायला वेळ लागतो.
धन्यवाद
पण तशी इच्छाशक्ती तरी दिसते काय ? किंवा विकासाच्या मार्गावर एक पाऊल पुढे पडते आहे असे वाटते काय ?
दिसतंय, नाशिकमध्ये तरी दिसतंय, एक उदा> गोदापार्क प्रकल्प.
असेल तर प्लीज सांगा.
वर सांगितलंच. राजचा प्रॉब्लेम हा आहे की आज त्याच्यापाशी आपल्या भूमिका, आपलं काम बोंबलून सांगणारं मटा, सामना किंवा सकाळसारखं मुखपत्र नाही. ज्यादिवशी त्याला हे पटेल आणि तो जर याविषयी काही उपाययोजना करेल तो सुदिन!!! पण त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या मतदारांनाही हे सांगण्म आहे की बाबांनो ही संधि आहे. यावेळेस जर तुम्ही मिडीयाच्या दिशाभूलीला बळी पडून जर या चार उर्वरीत पक्षांना मत दिलंत, देऊ शकता कारण ही लोकशाही आहे, पण मग राज्याचा विअकास होत नाही हे रडगाणं गायचा तुम्हाला काहीही हक्क नाही.... आमेन.

In reply to by पिवळा डांबिस

हाडक्या 23/09/2014 - 15:20
पिडां, तुमच्या भावनेशी सहमत.. पण राज ठाकरेंची बाजू घेताना त्यांच्या उणीवांकडेही दुर्लक्ष करता कामा नये.. या उणीवा किंवा चुकीचे निर्णयच त्यांच्या मार्गात अडसर बनणार आहेत असे वाटते. उ.दा. १. निल-प्रत अगदी अंतिम नाही तरी पण एक ड्राफ्ट म्हणून जाहीर केली असती तर तिचा असा जोक झाला नसता. ग्राहकाच्या दृष्टीने पाहिल्यास कोणी कधीच अंतिम निल-प्रत येईपर्यंत वाट पहायला तयार असतो. आधी ड्राफ्ट यावा, काम चाललेय हे कळावे, अजून मते यावीत आणि ब्लु-प्रिंट सुधारत जावी असा विचार का नाही होत ? २. राज ठाकरेंची एकाधिकारशाही आहे. दुसरा नेता नाही ना कोणत्या विभागात नवे नेतृत्व अथवा संघटना आहे. मग कशाच्या जीवावर लोकांनी अजून विश्वास टाकावा ? ३. बहुतेक ठिकठिकाणचे कार्यकर्ते, पदाधिकारी हे गावाला सोडलेले वळू, अगदी गुंड लोक आहेत. इथे सगळे पदाधिकारी कमरेला बंदूक आणि गळ्यात वजनदार अशा माळा घालून फिरत असतात. अशावेळी सामान्य पोरं पण मनसेच्या जवळ फिरकायला मागत नाहीत. बाकी मतदार तर राहुच द्यात. या प्रतिमेत बदल करणे राज ठाकरेंची जबाबदारी नाही का ? ४. इतर गोष्टी जसे की मुखपत्र वगैरे मान्य पण आजच्या काळात ते सोशल मिडिया वगैरे तर वापरु शकतात ना ? त्यांची वेब्साईट २०१० नंतर नीट अपडेट झालेली नाहीये. लोकांना मग उदासीनताच दिसते ना. ५. या वेळेस स्वतःचे धोरण खंबीरपणे आखून राजने त्याचा वेगळेपणा दाखवायची संधी गमावली. आता युती पण होणार, आघाडीपण होणार आणि त्या सगळ्या गोंधळात राज ठाकरे स्वतःला वेगळॅ म्हणून कसे दाखवता येईल. भाजपशी युती करण्याची वाट पाहणारा म्हणून बरेच जण या दिरंगाईला पहात आहेत. एकेकाळी राज ठाकरेंकडे एक सक्षम पर्याय म्हणून पहात होतो. आज त्याबाबत सध्यातरी सांशक आहे. बाकी उम्मीद पर तो दुनिया टिकी है.

In reply to by हाडक्या

सहमत. राज ठाकरेंनी बराच भ्रमनिरास केला आहे. त्यांच्याकडून खूप खूप अपेक्षा होत्या. ते जर कंबर कसून प्रामाणिकपणे कामाला लागले (इतरांच्या नकला सोडून ठोस, दिसेल असे कार्य सुरु केले) तर अजूनही मतदारांमध्ये नवे चैतन्य निर्माण करू शकतात. हि निवडणूक नाही जमली तरी भविष्यात ते कांही सकारात्मक बदल घडवू शकतील.

In reply to by हाडक्या

तुम्ही उल्लेखलेल्या काही उणीवा आणि काही चुकीचे निर्णय हे आहेत. त्याबद्दल दुर्लक्ष करू नयेच. याबद्दल सहमत आहे.

In reply to by हाडक्या

तुम्ही उल्लेखलेल्या काही उणीवा आणि काही चुकीचे निर्णय हे आहेत. त्याबद्दल दुर्लक्ष करू नयेच. याबद्दल सहमत आहे.

In reply to by धर्मराजमुटके

महाराष्ट्राचा विकासाच हवा असेलतर एकट्या पृथ्विराजाना सत्ता देवून बघा. तुम्हाला नक्कीच हे पटणार नाही पण राज्यात उरलेला एकमेव चांगला आणि उच्च शिक्षित नेता म्हणता येईल. कोणता का पक्ष असेल, आपला विकास झाल्याशी मतलब. मोदींना पण शिंगावर घेऊन शकेल एवढी हिम्मत आहे. अजित/शरद पवारांना सहज गार केलंय...गुंतवणूक इतरांपेक्षा जास्तच आणलीये...पटलं तर घ्या...तुम्ही सोडून देणार आहात हे माहीतच आहे

In reply to by पुतळाचैतन्याचा

हाडक्या 24/09/2014 - 17:25
या सगळ्या गोंधळात हे मान्य करायला हवे की (राणे वगळता) काँग्रेस आणि पृथ्वीराज चव्हाणांनी अजून तरी बर्‍यापैकी प्रगल्भता दाखवली आहे. कुठे आततायी वक्तव्ये नाहीत की जास्त आवाज नाही. संकटात असताना हीच 'प्रगल्भता' काँग्रेसला तारून नेत असावी बहुतेक. पृथ्वीराज चव्हाण यांना घरच्याच लोकांचा फार उपद्रव आहे असे वाटते.. आणि मग काम करून दंगा होण्यापेक्षा ते गप्प बसणे स्वीकारत असावेत. ;)
एकमेव चांगला आणि उच्च शिक्षित नेता म्हणता येईल.
अर्थात हे 'चांगला आणि उच्च शिक्षित' इथपतच मान्य. तसे इथे खूपजण आहेत. 'नेता' म्हणून त्यांना काही गुण देता येणार नाहीत. 'कार्यकर्ता' (म्हणजे कार्य करणारा) म्हणून देखील शून्यच मिळेल त्यांना. काँग्रेसचा नाईट वॉचमन आहेत ते. परत जर चुकून सत्ता आलीच तर सगळे सध्या डोके गाडून बसलेले काँग्रेसी साप आणि भलामोठ्ठा नारायणी अजगर आहेच मग.. ;)

In reply to by हाडक्या

नेता म्हणवून घ्यायला काय केले पाहिजे...ग्राम-पंचायती पासून लोकसभे पर्यंत जी निवडणूक लागेल तिथे सभा घेत सुटणे आणि केवळ निवडणुकीच्या राजकारणातून "जनाधार" मिळवणे का? नेता या गोष्टीचा संबंध नेतृत्व गुणांशी आहे असे मला वाटते... सभ्य लोकांना कोणी नेता म्हणेना झालाय...अशा प्रकारे पृथ्विराजना "अंडर-एस्टिमेट" करायची चूक करून अजित पवारांनी हात पोळून घेतले..तेव्हा ते नेते नाहीयेत अस मला तरी अजिबात वाटत नाही...अगदी खरे नेते हल्ली तसेही कमीच आहेत...त्या मानानी हे कमी नाहीत.नाईट वोचमन आहेत आणि ६ महिन्यात दिल्ली ला जातील असेल अनेकांना वाटले होते पण तसे झाले नाही.

In reply to by पुतळाचैतन्याचा

हाडक्या 24/09/2014 - 17:25
या सगळ्या गोंधळात हे मान्य करायला हवे की (राणे वगळता) काँग्रेस आणि पृथ्वीराज चव्हाणांनी अजून तरी बर्‍यापैकी प्रगल्भता दाखवली आहे. कुठे आततायी वक्तव्ये नाहीत की जास्त आवाज नाही. संकटात असताना हीच 'प्रगल्भता' काँग्रेसला तारून नेत असावी बहुतेक. पृथ्वीराज चव्हाण यांना घरच्याच लोकांचा फार उपद्रव आहे असे वाटते.. आणि मग काम करून दंगा होण्यापेक्षा ते गप्प बसणे स्वीकारत असावेत. ;)
एकमेव चांगला आणि उच्च शिक्षित नेता म्हणता येईल.
अर्थात हे 'चांगला आणि उच्च शिक्षित' इथपतच मान्य. तसे इथे खूपजण आहेत. 'नेता' म्हणून त्यांना काही गुण देता येणार नाहीत. 'कार्यकर्ता' (म्हणजे कार्य करणारा) म्हणून देखील शून्यच मिळेल त्यांना. काँग्रेसचा नाईट वॉचमन आहेत ते. परत जर चुकून सत्ता आलीच तर सगळे सध्या डोके गाडून बसलेले काँग्रेसी साप आणि भलामोठ्ठा नारायणी अजगर आहेच मग.. ;)

In reply to by पिवळा डांबिस

मृत्युन्जय 23/09/2014 - 10:49
पायलट बेसिस वर त्यांना नाशिक मध्ये सत्ता दिलीच होती की. तिथे इतकी घाण करुन ठेवली की लोकं शिव्या घालतात मनसेला. अश्या पक्षाच्या हातात आख्या राज्याच्या नाड्या कश्या द्यायच्या?

In reply to by टवाळ कार्टा

महाराष्ट्राच्या विकासाची ब्लू=प्रिंट आहे ना ती? मग महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांच्या आधी आल्याशी कारण, काय!!!

In reply to by पिवळा डांबिस

टवाळ कार्टा 23/09/2014 - 09:35
ती मागच्या वेळी येणार होती ना?? तेव्हा नविन होते म्हणुन १३ तरी निवडून आले...त्यांनी काय दिवे लावले?? आधी १३ ना घेउन काही करुन दाखवले असते तर कदाचीत अख्खा महाराष्ट्र देण्याच्याबाबत बोलले तर ठीक होते

In reply to by टवाळ कार्टा

ठीक आहे, तुमची इच्छा! मी तरी आणखी काय सांगणार? एकाद्या साध्या बिझनेसची ब्लू-प्रिंट तयार करायची तर किति परिश्रम आणि किती काळ जातो हे मला माहिती आहे... इथे तर एका प्रचंड राज्याच्या विकासाची ब्ल्यू-प्रिंट तयार करायची आहे... नसेल तुम्हाला धीर निघत तर द्या दुसर्‍यांना मत. उद्या ती ब्ल्यू-प्रिंट प्रकाशित केल्यावरही सगळी यच्चयावत मराठी जनता मनसेला एकगठ्ठा मतदान करणार आहे असं थोडीच आहे? प्रत्येकाचे हितसंबंध गुंतलेले असतात.... सगळा समस्त मराठी माणूस हा प्रचलित राज्यव्यवस्था मोडून विकासासाठी कंबर कसून उभा राहील हे मानणं देखील बालिशपणाचंच आहे की!!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

@पिवळा डांबिस,तुम्हाला खरच असे वाटते का कि ब्लु प्रिंटनुसार राज्यात कामे होतील? असे जर वाटत असेल तर आपण फारच भाबडे आहात. ज्याने टोलचे आंदोलन मध्येच सोडून दिले ,परप्रांतियांचा प्रश्न लावुन धरता आला नाही ,राज्यात ब्लुप्रिंटवर काम करत राहण्याऐवजी स्टँण्डप कॉमेडीत ज्याने वेळ घालवला, असे लोक ब्लुप्रिंटबरहुकुम काम करतील याची षष्प शक्यता नाही. आपल्या माहितीसाठी सांगतो ,पुण्याचा विकास आराखडा १९८६ ला मंजूर झाला ,त्याची अंमलबजावणी २०१३ला सुरु झाली. मुळ आराखड्यातल्या रिकाम्या जमीनी जिथे पार्क वगैरेचे आरक्षण आहे तिथे आता टोलेजंग इमारती आहेत ,आता बोला!

In reply to by नानासाहेब नेफळे

नानासाहेब नेफळे किंवा अन्य कुणी, आम्ही सामान्य तुम्हांला काय शहाणपण सांगणार? तेंव्हा,
नसेल तुम्हाला धीर निघत तर द्या दुसर्‍यांना मत. उद्या ती ब्ल्यू-प्रिंट प्रकाशित केल्यावरही सगळी यच्चयावत मराठी जनता मनसेला एकगठ्ठा मतदान करणार आहे असं थोडीच आहे? प्रत्येकाचे हितसंबंध गुंतलेले असतात.... सगळा समस्त मराठी माणूस हा प्रचलित राज्यव्यवस्था मोडून विकासासाठी कंबर कसून उभा राहील हे मानणं देखील बालिशपणाचंच आहे की!!!!
उद्या दादासाहेब पवार जरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तरी माझं व्यक्तिशः काहीच नुकसान होणार नाहिये. पण आपल्या मराठी लोकांसाठी आतडं तुटतं म्हणून हे सगळं पांढर्‍यावर काळं करायचं, इतकंच! जर महाराष्ट्राचा विकास साधायचा असेल तर फक्त महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्राचाच विचार करणारा, वरती हायकमांड नसणारा, स्वतःच्या कन्व्हिक्शनसाठी काकांचाही रोष ओढ्वुन घेणारा आणि हिंदुत्ववाद वगैरे महाराष्ट्रासाठी निरर्थक कल्पनांत न वावरणारा, केंद्रातल्या मोदींबरोबर विकासाची नस साधू शकणारा असा हा एकच नेता सध्या दिसतोय. दुसरा दिसला तर लगेच तुलना सुरू करीन. पण तोपर्यंत तरी यालाच पाठिंबा!! :)

In reply to by पिवळा डांबिस

तेच कि! गुजरातमध्ये जाऊन महाराष्ट्राची आणि मराठी लोकांची मापे काढून आला. शेजारच्या घरात पंचपक्वान्न शिजते म्हणून तिथे जाऊन" आमच्या घरात आम्हाला फक्त मीठ भाकरीच मिळते" असे रडगाणे गाणार्याने स्वाभिमान गहाण टाकलेला असतो.

In reply to by नानासाहेब नेफळे

तुम्ही म्हणा तुम्हाला काय अद्वातद्वा म्हणायचंय ते! बट आय अ‍ॅम नॉट टेकिंग दॅट बेट!!!! :)

In reply to by नानासाहेब नेफळे

विलासराव 23/09/2014 - 21:45
ज्याने टोलचे आंदोलन मध्येच सोडून दिले ,परप्रांतियांचा प्रश्न लावुन धरता आला नाही ,राज्यात ब्लुप्रिंटवर काम करत राहण्याऐवजी स्टँण्डप कॉमेडीत ज्याने वेळ घालवला, असे लोक ब्लुप्रिंटबरहुकुम काम करतील याची षष्प शक्यता नाही. व्होडाफोनचा मुंबई सोडली की रोमींग चार्ज सुरु होतो.अगदी अंबरनाथला सुद्धा. त्यावरही राजने आवाज उठवला होता. पण ते रोमींग चार्जेस आजही चालु आहेत बॉ. मलाही वाटायचे हा माणुन भारी आहे काय तरी काम करेल. मी मागच्याच आठवड्यात नाशीकला चक्कर मारली आहे. आपले मितभाषी आहेत ना त्यांच्याकडे. त्यांनी सांगीतले की पुढच्या कुंभमेळ्यासाठी नाशिकला बराच मोठा निधी मिळाला आहे. मला तर वाटते की राष्ट्रवादीला बरोबर घेतले ते ह्याच लोण्याच्या गोळ्यासाठी. असा माझा आपला अंदाज हा. माझं तर मत असं आहे की कोणीही भले करावे महाराष्ट्राचे आपले काहीही म्हणणे नाही. पण असं काही होईल याची मलातरी शक्यता वाट्त नाही. त्यामुळे जनतेने आपल्याला जमेल तेवढे आनी तसे स्वतःचे भले करावे. बाकी बाहेरचे माहीत नाही पण मुंबईत "नवा काळ" ने राजला बरेच उचलुन धरले होते सुरवातीला. पण नंतर त्यांचाही भरोसा नाही राहीला असे वाटते.

In reply to by विलासराव

विलासराव 23/09/2014 - 22:12
बाकी शिवसेनेबद्द्ल काय लिहावे. मी आनी आपले रामदासकाका बरोबर असताना एका परप्रांतीयाला रामदास काकांंनी त्याच्या चुकीबद्दल झाडला. तर तो दोन मिनीटात एका व्यक्तीला घेउन आला ज्याने आम्हाला जवळपास धमकावलेच. तो कुठलातरी शिवसेनेचा शाखाध्यक्ष होता.मग काकांनीही त्याला योग्य शब्दात समज दिल्यावर तो नॉर्मलवर आला. दुसरे मी गिरगावात रहात असताना एक व्यक्ती माझ्याच रुमच्या खीडकीतुन मी माझ्या भाचीबरोबर स्काईअपवरुन बोलत असताना पहात उभा राहीला . जवळपास २० मिनीटे राती १०:३० ला. मग त्याने माझ्या भावाला ओरडून सांगीतले की खिडकी बंद कर म्हणुन . माझी पाठ खिडकीकडे असल्याने मला हे माहीत नव्हते. तो ओरडल्यावर मी बाहेर जाउन विचारले की का रे बाबा का ओरडतोस? तर तो संगणकाकडे बोट दाखवुन संस्कृतीबद्दल बोलायला लागला. मग मी त्याला म्हणालो की रात्रीचे १०:४० झालेत , तू माझ्या घरात डोकावतो आहेस गेली २५ मिनिटे. तुझ्या तोंडाला अम्रुताचा वासही येतोय तेण्व्हा घरी जा शांतपणे झोप ,सकाळी उठुन आंघोळ कर, चहा नाश्टा घे ,पुजा करत असशील तर कर आन मग परत अम्रूत न पिता तुझे ओळखपत्र घेउन ये मग बघु संस्कृतीचे. त्यावर त्याने आवाज वाढवला, त्याला मदतनीसही येउन मिळाला. मग माझाही आवाज वाढला परीणामी आजुबाजुचे २-३ लोक दरवाजा उघडून बाहेर आले. मग त्यांनी पडती बाजु घेतली पण सगळ्यांना ऐकु जाईल अशा आवाजात म्हणाले ईथेच रहातोस ना? पाहुन घेउ. मग मीही त्याला तशाच आवाजात उत्तर दिले की आजपर्यंत परत कोणी आलेले नाही. पण जर तु कधी आलासच तर मग दरवाजा बंद असला चुकुन तर दरवाजा वाजव. तो उघडेल याची खात्री बाळग. पण तसाच परत जाउ नकोस. अर्थातच ते परत काही आले नाहीत. पण मला दुसर्या दिवशी सकाळी समजले की तो गिरगावचा सेनेचा शाखाध्यक्ष आहे. आनी नंतरच्या निवडणुकीत तो नगरसेवकही झालाय.

In reply to by शिद

ज्यांना मनसेची ब्लूप्रिंट वाचायची असेल त्याना ती खालील लिंकवर उपलब्ध आहे... http://mnsblueprint.org/index.html वाचावी, विचार करावा आणि मग आपलं मत बनवावं. बाकी आता धमाल येणारे!!!!!

In reply to by शिद

हाडक्या 26/09/2014 - 01:10
ब्लू प्रिंट पाहिली.. अगदी उत्तम मुद्देसूद आराखडा मांडला आहे. इतर पक्षांनी आदर्श घ्यावा असा सोपा साध्या शब्दात आहे. प्रश्न असा आहे की हे कागदावरचे प्रत्यक्षात आणायला काय करणार. ? एक साधा प्रश्न आहे की उ.दा. सातार्‍यातील एका मतदारसंघात या वेळेस एका खंडणीखोरास ति़किट दिले, आता तो पुढे जाऊन या आदर्श अशा लोकोपयोगी कामांवर काम करेल हे कसे मानावे ?

In reply to by हाडक्या

हाडक्याजी, ब्लूप्रिंट वाचलीत ना? मग जर पटली असेल तर मनसेचा प्रचार करायच्या कामाला लागा!!! पटली नसेल तर तुमचा लाडका जो पक्ष आहे त्याचा प्रचार सुरू करा... उगीच, "कागदावरचे प्रत्यक्ष आणायला काय करणार? अमक्याला तमक्याच मतदारसंघात का उभा करणार? उद्या जर निवडून आले तर ढमक्यालाच फलाणं खातं का देणार?" असला मक्षिकापात कशाला करावा? ज्यांनी ती इतकी सविस्तर ब्लूप्रिंट मांडली ते महाराष्ट्रासाठी काहीतरी चांगलं करतील असा विश्वास वाटत असेल तर या त्यांच्याबरोबर. अन्यथा द्या सोडून... काय? :)

In reply to by पिवळा डांबिस

विलासराव 26/09/2014 - 09:08
अन्यथा द्या सोडून... काय? Smile सोडुन दिलं. क्काय्य्य्य्य?? कारण दुसरे काही सध्यातरी करता येण्यासारखे नाही.

In reply to by पिवळा डांबिस

हाडक्या 26/09/2014 - 16:14
"कागदावरचे प्रत्यक्ष आणायला काय करणार? अमक्याला तमक्याच मतदारसंघात का उभा करणार? उद्या जर निवडून आले तर ढमक्यालाच फलाणं खातं का देणार?" असला मक्षिकापात कशाला करावा?
अहो राजे, मनसे बद्दल आपुलकी वाटते म्हणून हे टंकनश्रम चाललेत ना. (त्याने काही होणार नाही हे ठाऊक असलं तरी). ब्लु-प्रिंट बद्दल एक वेगळा धागा सुरु झालाय तरी पण. मी जो मुद्दा मांडलाय तो जी स्वप्ने दाखवली आहेत या ब्लू प्रिंट्मध्ये त्यात आणि वस्तुस्थितीच किती फरक आहे तो होता. जे लोक या ब्लु-प्रिंटला घेऊन मते मागायला येणार आहेत त्यांना ती काय आहे हे तरी कितपत समजत असेल ही शंकाच.
ज्यांनी ती इतकी सविस्तर ब्लूप्रिंट मांडली ते महाराष्ट्रासाठी काहीतरी चांगलं करतील असा विश्वास वाटत असेल तर या त्यांच्याबरोबर.
समजा मी तुम्ही म्हणताय तसे विचार केला आणि मत द्यायचे ठरवले तरी पण माझ्या पंचक्रोशीतले मनसेचे उमेदवार कोण आहेत? एक बंदूक घेऊन दिवसा ढवळ्या खंडणी वसूल करत फिरणारा, एक सुपारी घेऊन खून वगैरे करणारा, एक तडिपार (हे सगळे सातारा जिल्ह्यातले सांगतोय बाकी शितावरून भाताची परि़क्षा म्हणु हवं तर). आता मी यांना मत देऊ इच्छित नाही, मी यांचा प्रचार करु इच्छित नाही. मी माझ्या नातेवाईक,मित्रमंडळींनईक्य लोकांना मत द्या असे सांगू इच्छित नाही. अशा वेळी तुमचा शेवटचा सल्ला बरा..
अन्यथा द्या सोडून...
दिले सोडून.!! करा नवनिर्माण च्यायला..

पोटे 22/09/2014 - 10:53
काही ठिकाणी असे अलाउ केले तर बाकी ठिकाणीही बंडखोरी होईल.

In reply to by नानासाहेब नेफळे

हाडक्या 22/09/2014 - 15:22
वा वा नानासाहेब, आमच्या पहिल्या वहिल्या धाग्याला तुमचे (हात) पाय लागले.. धागा धन्य झाला म्हणायचा. ;)

या मुद्द्यावरून जे चर्चेचे गुर्‍हाळ गेले अनेक दिवस सुरू आहे त्यामुळे दोन्ही पक्षांचे निवडणुकीत नुकसान होण्याची शक्यता वाढत चालली आहे. भाजप नेते म्हणत आहेत की आजवर सेनेने कधीच न जिंकलेल्या ५९ जागा व भाजपने कधीच न जिंकलेल्या १९ जागा यांच्याबद्दल पुनर्विचार केला पाहिजे. (केवळ अदलाबदल करून त्या जिंकल्या जातील या दाव्याचा अर्थ युतीमध्ये दोन्ही पक्ष एकदिलाने काम करीत नाहीत असे माझे मत आहेत). तर या ७८ जागांवर किंवा यापैकी जितक्यांवर दोन्ही पक्षांचे एकमत होईल (तोवर कदाचित उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस निघून गेलेला असेल) तेथे तुम्ही सुचवल्या प्रमाणे मैत्रिपूर्ण लढती करणे इष्ट राहील. यापूर्वी अनेक लोकसभा निवडणुकांमध्ये सेनेने महाराष्ट्राबाहेर भाजपविरुद्ध उमेदवार उभे करून मैत्रिपूर्ण लढती लढल्या आहेत. भाजपने हाच मुद्दा लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या वेळी काढला असता तर आता सेनेला त्यावर एवढा आक्षेप घेता आला नसता. अवांतर - ज्येष्ठ पत्रकार श्री भाऊ तोरसेकर यांनी या घडामोडींवर केलेले आवर्जून वाचण्यासारखे आहे.

या मुद्द्यावरून जे चर्चेचे गुर्‍हाळ गेले अनेक दिवस सुरू आहे त्यामुळे दोन्ही पक्षांचे निवडणुकीत नुकसान होण्याची शक्यता वाढत चालली आहे. भाजप नेते म्हणत आहेत की आजवर सेनेने कधीच न जिंकलेल्या ५९ जागा व भाजपने कधीच न जिंकलेल्या १९ जागा यांच्याबद्दल पुनर्विचार केला पाहिजे. (केवळ अदलाबदल करून त्या जिंकल्या जातील या दाव्याचा अर्थ युतीमध्ये दोन्ही पक्ष एकदिलाने काम करीत नाहीत असे माझे मत आहेत). तर या ७८ जागांवर किंवा यापैकी जितक्यांवर दोन्ही पक्षांचे एकमत होईल (तोवर कदाचित उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस निघून गेलेला असेल) तेथे तुम्ही सुचवल्या प्रमाणे मैत्रिपूर्ण लढती करणे इष्ट राहील. यापूर्वी अनेक लोकसभा निवडणुकांमध्ये सेनेने महाराष्ट्राबाहेर भाजपविरुद्ध उमेदवार उभे करून मैत्रिपूर्ण लढती लढल्या आहेत. भाजपने हाच मुद्दा लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या वेळी काढला असता तर आता सेनेला त्यावर एवढा आक्षेप घेता आला नसता. अवांतर - ज्येष्ठ पत्रकार श्री भाऊ तोरसेकर यांनी या घडामोडींवर केलेले आवर्जून वाचण्यासारखे आहे.

सत्तेच्या लोण्याचा गोळा मिळण्याआधीच या दोन बोक्यांची भांडणं सुरु झाली ,ह्यांच्याकडे म्हणे व्हिजन आहे. दहा पाच जागांसाठी भांडणारे स्वार्थी लोक काय राज्य सांभाळणार!

In reply to by नानासाहेब नेफळे

आघाडीचे बोके पण अशीचं नखं काढुन बसली आहेत. त्यावर नाना किंवा माईंचं मत ऐकायला आवडेल.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

अहो नखे काढून उपयोग काय. त्यांची सगळी भिस्त युतीच्या निर्णयावरच आहे. :-) वैयक्तीक रित्या मला तरी उद्धव मुख्यमंत्री म्हणून पटत नाहीत. तुलनेने फडणवीस झालेच तर तावडे बरे वाटतात.सेनेला याची नक्कि कल्पना असायला पाहीजे की लोकसभेचे मत सेनेला नाही मोदींना होते. मोदीं ऐवजी तिथे अडवाणी असते तर तिथे पण २००९ च झाले असते.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

हाडक्या 22/09/2014 - 17:08
(भाजप जरी सक्षम पर्याय वाटत असला तरी) महाराष्ट्रातील सर्वच पक्षांची ही गोची आहे की एकाकडेही प्रभावशील असे (मोदी सारखे म्हणू हवे तर) नेतृत्व नाही. त्यामुळे सगळाच खुजा नेत्यांचा सावळ गोंधळ माजलाय असे वाटतेय..

आशु जोग 22/09/2014 - 09:46
हाडक्यासाहेब उत्तम उपाय सुचवलात हा उपाय काही लोकांच्या ध्यानी आला होता पण युती तोडण्याची कार्यकर्त्यांची इच्छाच आहे. कारण कितीही छोटे असेल

In reply to by आशु जोग

आशु जोग 04/03/2015 - 14:48
हाडक्यासाहेब आम्ही आदरच राखला आहे...

या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर ते राज ठाकरेंचे गाडे कशात अडकले हे काही कळायला मार्ग नाही.
युती तुटते की नाही हे कळेपर्यंत गप्प बसण्यातच त्यांचा शहाणपणा आहे आणि तो ते निभावत आहेत... सध्या या पाचही पक्षांमध्ये सगळ्यात परिपक्व तेच वागत आहेत!!!!

In reply to by अस्वस्थामा

अजून उमेदवार पण निश्चित नाहीत आणि यात कुठली परिपक्वता ?
असं खरंच वाटतं तुम्हाला? मग अधिक चिंतन करा.... :)

In reply to by पिवळा डांबिस

राज ठाकरे या पाचही पक्षांमध्ये सगळ्यात परिपक्व वागत आहेत हा एक मोठा भ्रम आहे. पण गमतीची गोष्ट अशी की ते गेली ७ वर्षे असा भ्रम निर्माण करण्यात कायम यशस्वी झाले आहेत. लोकांना अजूनही वाटते की हा माणूस काहितरी करु शकेल. मात्र बोलबच्च्न देण्यापलीकडे अजून काही केलेले नाहीये हे ही तितकेच खरे.

In reply to by धर्मराजमुटके

विरोधी पक्ष हा बोलबच्चनपणा आणि आंदोलनेच करू शकतो. त्याच्या हातात सत्ता दिल्याशिवाय तो काही बदल घडवून आणू शकत नाही. एकीकडे त्याच्या सभांना विक्रमी गर्दी करायची आनि मतं मात्र दुसर्‍याला द्यायची हा दांभिकपणा महाराष्ट्रीय मतदारांनी सोडायला हवा. जर त्याला एकदा संधी देऊनही त्याच्या हातुन काही विकास घडला नाही तर त्याच्यावर टीका करणं ठीक आहे. परंतु ते न करता, आणि इतर चारही पक्ष हे नालायक आहेत हे माहित असता, त्याला निकालात काढणं हे बरोबर आहे काय?

In reply to by पिवळा डांबिस

शितावरुन भाताची परीक्षा करतात. महाराष्ट्रातल्या नाशिक मनपाची सत्ता दिली ना ? तिथे काय सुधारणा आहेत ? विकासाचा अहवाल विचारला की दुसर्‍यांना ६० वर्षे विचारला नाही तर मला अडीच वर्षात कसा विचारता असे उत्तर देणे योग्य आहे काय ? मान्य आहे की विकास दिसायला वेळ लागतो. पण तशी इच्छाशक्ती तरी दिसते काय ? किंवा विकासाच्या मार्गावर एक पाऊल पुढे पडते आहे असे वाटते काय ? असेल तर प्लीज सांगा.

In reply to by धर्मराजमुटके

महाराष्ट्रातल्या नाशिक मनपाची सत्ता दिली ना ? तिथे काय सुधारणा आहेत ?
मनसेनं सत्ता घेतली तेंव्हा नाशिक मनपा ला किति कर्ज होतं? आज किती कर्ज आहे? ते कर्ज कुणी फेडलं? आणि आता तिथे **खाऊ भाजपाने जे केलं त्याचं काय करायचं?
विकासाचा अहवाल विचारला की दुसर्‍यांना ६० वर्षे विचारला नाही तर मला अडीच वर्षात कसा विचारता असे उत्तर देणे योग्य आहे काय ?
पूर्ण योग्य आहे. त्यांना त्यांची टर्म पुरी करु द्या, मग विचारा... हेच त्यांचंही सांगणं आहे. त्यात काय चुकलं? महाराष्त्रात कॉन्ग्रेस- राष्ट्रवादीची आणि मुंबई पालिकेत शिवसेनेची अनेक दशके सत्ता असतांना फक्त मनसेलाच त्यांच्या उण्यापुर्‍या दोन-अडीच वर्षांच्या सत्तेनंतर हा प्रश्न विचारण्याचा अगोचरेपणा जर केला गेला तर दुसरं कोणंतं उत्तर अपेक्षित आहे?
मान्य आहे की विकास दिसायला वेळ लागतो.
धन्यवाद
पण तशी इच्छाशक्ती तरी दिसते काय ? किंवा विकासाच्या मार्गावर एक पाऊल पुढे पडते आहे असे वाटते काय ?
दिसतंय, नाशिकमध्ये तरी दिसतंय, एक उदा> गोदापार्क प्रकल्प.
असेल तर प्लीज सांगा.
वर सांगितलंच. राजचा प्रॉब्लेम हा आहे की आज त्याच्यापाशी आपल्या भूमिका, आपलं काम बोंबलून सांगणारं मटा, सामना किंवा सकाळसारखं मुखपत्र नाही. ज्यादिवशी त्याला हे पटेल आणि तो जर याविषयी काही उपाययोजना करेल तो सुदिन!!! पण त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या मतदारांनाही हे सांगण्म आहे की बाबांनो ही संधि आहे. यावेळेस जर तुम्ही मिडीयाच्या दिशाभूलीला बळी पडून जर या चार उर्वरीत पक्षांना मत दिलंत, देऊ शकता कारण ही लोकशाही आहे, पण मग राज्याचा विअकास होत नाही हे रडगाणं गायचा तुम्हाला काहीही हक्क नाही.... आमेन.

In reply to by पिवळा डांबिस

हाडक्या 23/09/2014 - 15:20
पिडां, तुमच्या भावनेशी सहमत.. पण राज ठाकरेंची बाजू घेताना त्यांच्या उणीवांकडेही दुर्लक्ष करता कामा नये.. या उणीवा किंवा चुकीचे निर्णयच त्यांच्या मार्गात अडसर बनणार आहेत असे वाटते. उ.दा. १. निल-प्रत अगदी अंतिम नाही तरी पण एक ड्राफ्ट म्हणून जाहीर केली असती तर तिचा असा जोक झाला नसता. ग्राहकाच्या दृष्टीने पाहिल्यास कोणी कधीच अंतिम निल-प्रत येईपर्यंत वाट पहायला तयार असतो. आधी ड्राफ्ट यावा, काम चाललेय हे कळावे, अजून मते यावीत आणि ब्लु-प्रिंट सुधारत जावी असा विचार का नाही होत ? २. राज ठाकरेंची एकाधिकारशाही आहे. दुसरा नेता नाही ना कोणत्या विभागात नवे नेतृत्व अथवा संघटना आहे. मग कशाच्या जीवावर लोकांनी अजून विश्वास टाकावा ? ३. बहुतेक ठिकठिकाणचे कार्यकर्ते, पदाधिकारी हे गावाला सोडलेले वळू, अगदी गुंड लोक आहेत. इथे सगळे पदाधिकारी कमरेला बंदूक आणि गळ्यात वजनदार अशा माळा घालून फिरत असतात. अशावेळी सामान्य पोरं पण मनसेच्या जवळ फिरकायला मागत नाहीत. बाकी मतदार तर राहुच द्यात. या प्रतिमेत बदल करणे राज ठाकरेंची जबाबदारी नाही का ? ४. इतर गोष्टी जसे की मुखपत्र वगैरे मान्य पण आजच्या काळात ते सोशल मिडिया वगैरे तर वापरु शकतात ना ? त्यांची वेब्साईट २०१० नंतर नीट अपडेट झालेली नाहीये. लोकांना मग उदासीनताच दिसते ना. ५. या वेळेस स्वतःचे धोरण खंबीरपणे आखून राजने त्याचा वेगळेपणा दाखवायची संधी गमावली. आता युती पण होणार, आघाडीपण होणार आणि त्या सगळ्या गोंधळात राज ठाकरे स्वतःला वेगळॅ म्हणून कसे दाखवता येईल. भाजपशी युती करण्याची वाट पाहणारा म्हणून बरेच जण या दिरंगाईला पहात आहेत. एकेकाळी राज ठाकरेंकडे एक सक्षम पर्याय म्हणून पहात होतो. आज त्याबाबत सध्यातरी सांशक आहे. बाकी उम्मीद पर तो दुनिया टिकी है.

In reply to by हाडक्या

सहमत. राज ठाकरेंनी बराच भ्रमनिरास केला आहे. त्यांच्याकडून खूप खूप अपेक्षा होत्या. ते जर कंबर कसून प्रामाणिकपणे कामाला लागले (इतरांच्या नकला सोडून ठोस, दिसेल असे कार्य सुरु केले) तर अजूनही मतदारांमध्ये नवे चैतन्य निर्माण करू शकतात. हि निवडणूक नाही जमली तरी भविष्यात ते कांही सकारात्मक बदल घडवू शकतील.

In reply to by हाडक्या

तुम्ही उल्लेखलेल्या काही उणीवा आणि काही चुकीचे निर्णय हे आहेत. त्याबद्दल दुर्लक्ष करू नयेच. याबद्दल सहमत आहे.

In reply to by हाडक्या

तुम्ही उल्लेखलेल्या काही उणीवा आणि काही चुकीचे निर्णय हे आहेत. त्याबद्दल दुर्लक्ष करू नयेच. याबद्दल सहमत आहे.

In reply to by धर्मराजमुटके

महाराष्ट्राचा विकासाच हवा असेलतर एकट्या पृथ्विराजाना सत्ता देवून बघा. तुम्हाला नक्कीच हे पटणार नाही पण राज्यात उरलेला एकमेव चांगला आणि उच्च शिक्षित नेता म्हणता येईल. कोणता का पक्ष असेल, आपला विकास झाल्याशी मतलब. मोदींना पण शिंगावर घेऊन शकेल एवढी हिम्मत आहे. अजित/शरद पवारांना सहज गार केलंय...गुंतवणूक इतरांपेक्षा जास्तच आणलीये...पटलं तर घ्या...तुम्ही सोडून देणार आहात हे माहीतच आहे

In reply to by पुतळाचैतन्याचा

हाडक्या 24/09/2014 - 17:25
या सगळ्या गोंधळात हे मान्य करायला हवे की (राणे वगळता) काँग्रेस आणि पृथ्वीराज चव्हाणांनी अजून तरी बर्‍यापैकी प्रगल्भता दाखवली आहे. कुठे आततायी वक्तव्ये नाहीत की जास्त आवाज नाही. संकटात असताना हीच 'प्रगल्भता' काँग्रेसला तारून नेत असावी बहुतेक. पृथ्वीराज चव्हाण यांना घरच्याच लोकांचा फार उपद्रव आहे असे वाटते.. आणि मग काम करून दंगा होण्यापेक्षा ते गप्प बसणे स्वीकारत असावेत. ;)
एकमेव चांगला आणि उच्च शिक्षित नेता म्हणता येईल.
अर्थात हे 'चांगला आणि उच्च शिक्षित' इथपतच मान्य. तसे इथे खूपजण आहेत. 'नेता' म्हणून त्यांना काही गुण देता येणार नाहीत. 'कार्यकर्ता' (म्हणजे कार्य करणारा) म्हणून देखील शून्यच मिळेल त्यांना. काँग्रेसचा नाईट वॉचमन आहेत ते. परत जर चुकून सत्ता आलीच तर सगळे सध्या डोके गाडून बसलेले काँग्रेसी साप आणि भलामोठ्ठा नारायणी अजगर आहेच मग.. ;)

In reply to by हाडक्या

नेता म्हणवून घ्यायला काय केले पाहिजे...ग्राम-पंचायती पासून लोकसभे पर्यंत जी निवडणूक लागेल तिथे सभा घेत सुटणे आणि केवळ निवडणुकीच्या राजकारणातून "जनाधार" मिळवणे का? नेता या गोष्टीचा संबंध नेतृत्व गुणांशी आहे असे मला वाटते... सभ्य लोकांना कोणी नेता म्हणेना झालाय...अशा प्रकारे पृथ्विराजना "अंडर-एस्टिमेट" करायची चूक करून अजित पवारांनी हात पोळून घेतले..तेव्हा ते नेते नाहीयेत अस मला तरी अजिबात वाटत नाही...अगदी खरे नेते हल्ली तसेही कमीच आहेत...त्या मानानी हे कमी नाहीत.नाईट वोचमन आहेत आणि ६ महिन्यात दिल्ली ला जातील असेल अनेकांना वाटले होते पण तसे झाले नाही.

In reply to by पुतळाचैतन्याचा

हाडक्या 24/09/2014 - 17:25
या सगळ्या गोंधळात हे मान्य करायला हवे की (राणे वगळता) काँग्रेस आणि पृथ्वीराज चव्हाणांनी अजून तरी बर्‍यापैकी प्रगल्भता दाखवली आहे. कुठे आततायी वक्तव्ये नाहीत की जास्त आवाज नाही. संकटात असताना हीच 'प्रगल्भता' काँग्रेसला तारून नेत असावी बहुतेक. पृथ्वीराज चव्हाण यांना घरच्याच लोकांचा फार उपद्रव आहे असे वाटते.. आणि मग काम करून दंगा होण्यापेक्षा ते गप्प बसणे स्वीकारत असावेत. ;)
एकमेव चांगला आणि उच्च शिक्षित नेता म्हणता येईल.
अर्थात हे 'चांगला आणि उच्च शिक्षित' इथपतच मान्य. तसे इथे खूपजण आहेत. 'नेता' म्हणून त्यांना काही गुण देता येणार नाहीत. 'कार्यकर्ता' (म्हणजे कार्य करणारा) म्हणून देखील शून्यच मिळेल त्यांना. काँग्रेसचा नाईट वॉचमन आहेत ते. परत जर चुकून सत्ता आलीच तर सगळे सध्या डोके गाडून बसलेले काँग्रेसी साप आणि भलामोठ्ठा नारायणी अजगर आहेच मग.. ;)

In reply to by पिवळा डांबिस

मृत्युन्जय 23/09/2014 - 10:49
पायलट बेसिस वर त्यांना नाशिक मध्ये सत्ता दिलीच होती की. तिथे इतकी घाण करुन ठेवली की लोकं शिव्या घालतात मनसेला. अश्या पक्षाच्या हातात आख्या राज्याच्या नाड्या कश्या द्यायच्या?

In reply to by टवाळ कार्टा

महाराष्ट्राच्या विकासाची ब्लू=प्रिंट आहे ना ती? मग महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांच्या आधी आल्याशी कारण, काय!!!

In reply to by पिवळा डांबिस

टवाळ कार्टा 23/09/2014 - 09:35
ती मागच्या वेळी येणार होती ना?? तेव्हा नविन होते म्हणुन १३ तरी निवडून आले...त्यांनी काय दिवे लावले?? आधी १३ ना घेउन काही करुन दाखवले असते तर कदाचीत अख्खा महाराष्ट्र देण्याच्याबाबत बोलले तर ठीक होते

In reply to by टवाळ कार्टा

ठीक आहे, तुमची इच्छा! मी तरी आणखी काय सांगणार? एकाद्या साध्या बिझनेसची ब्लू-प्रिंट तयार करायची तर किति परिश्रम आणि किती काळ जातो हे मला माहिती आहे... इथे तर एका प्रचंड राज्याच्या विकासाची ब्ल्यू-प्रिंट तयार करायची आहे... नसेल तुम्हाला धीर निघत तर द्या दुसर्‍यांना मत. उद्या ती ब्ल्यू-प्रिंट प्रकाशित केल्यावरही सगळी यच्चयावत मराठी जनता मनसेला एकगठ्ठा मतदान करणार आहे असं थोडीच आहे? प्रत्येकाचे हितसंबंध गुंतलेले असतात.... सगळा समस्त मराठी माणूस हा प्रचलित राज्यव्यवस्था मोडून विकासासाठी कंबर कसून उभा राहील हे मानणं देखील बालिशपणाचंच आहे की!!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

@पिवळा डांबिस,तुम्हाला खरच असे वाटते का कि ब्लु प्रिंटनुसार राज्यात कामे होतील? असे जर वाटत असेल तर आपण फारच भाबडे आहात. ज्याने टोलचे आंदोलन मध्येच सोडून दिले ,परप्रांतियांचा प्रश्न लावुन धरता आला नाही ,राज्यात ब्लुप्रिंटवर काम करत राहण्याऐवजी स्टँण्डप कॉमेडीत ज्याने वेळ घालवला, असे लोक ब्लुप्रिंटबरहुकुम काम करतील याची षष्प शक्यता नाही. आपल्या माहितीसाठी सांगतो ,पुण्याचा विकास आराखडा १९८६ ला मंजूर झाला ,त्याची अंमलबजावणी २०१३ला सुरु झाली. मुळ आराखड्यातल्या रिकाम्या जमीनी जिथे पार्क वगैरेचे आरक्षण आहे तिथे आता टोलेजंग इमारती आहेत ,आता बोला!

In reply to by नानासाहेब नेफळे

नानासाहेब नेफळे किंवा अन्य कुणी, आम्ही सामान्य तुम्हांला काय शहाणपण सांगणार? तेंव्हा,
नसेल तुम्हाला धीर निघत तर द्या दुसर्‍यांना मत. उद्या ती ब्ल्यू-प्रिंट प्रकाशित केल्यावरही सगळी यच्चयावत मराठी जनता मनसेला एकगठ्ठा मतदान करणार आहे असं थोडीच आहे? प्रत्येकाचे हितसंबंध गुंतलेले असतात.... सगळा समस्त मराठी माणूस हा प्रचलित राज्यव्यवस्था मोडून विकासासाठी कंबर कसून उभा राहील हे मानणं देखील बालिशपणाचंच आहे की!!!!
उद्या दादासाहेब पवार जरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तरी माझं व्यक्तिशः काहीच नुकसान होणार नाहिये. पण आपल्या मराठी लोकांसाठी आतडं तुटतं म्हणून हे सगळं पांढर्‍यावर काळं करायचं, इतकंच! जर महाराष्ट्राचा विकास साधायचा असेल तर फक्त महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्राचाच विचार करणारा, वरती हायकमांड नसणारा, स्वतःच्या कन्व्हिक्शनसाठी काकांचाही रोष ओढ्वुन घेणारा आणि हिंदुत्ववाद वगैरे महाराष्ट्रासाठी निरर्थक कल्पनांत न वावरणारा, केंद्रातल्या मोदींबरोबर विकासाची नस साधू शकणारा असा हा एकच नेता सध्या दिसतोय. दुसरा दिसला तर लगेच तुलना सुरू करीन. पण तोपर्यंत तरी यालाच पाठिंबा!! :)

In reply to by पिवळा डांबिस

तेच कि! गुजरातमध्ये जाऊन महाराष्ट्राची आणि मराठी लोकांची मापे काढून आला. शेजारच्या घरात पंचपक्वान्न शिजते म्हणून तिथे जाऊन" आमच्या घरात आम्हाला फक्त मीठ भाकरीच मिळते" असे रडगाणे गाणार्याने स्वाभिमान गहाण टाकलेला असतो.

In reply to by नानासाहेब नेफळे

तुम्ही म्हणा तुम्हाला काय अद्वातद्वा म्हणायचंय ते! बट आय अ‍ॅम नॉट टेकिंग दॅट बेट!!!! :)

In reply to by नानासाहेब नेफळे

विलासराव 23/09/2014 - 21:45
ज्याने टोलचे आंदोलन मध्येच सोडून दिले ,परप्रांतियांचा प्रश्न लावुन धरता आला नाही ,राज्यात ब्लुप्रिंटवर काम करत राहण्याऐवजी स्टँण्डप कॉमेडीत ज्याने वेळ घालवला, असे लोक ब्लुप्रिंटबरहुकुम काम करतील याची षष्प शक्यता नाही. व्होडाफोनचा मुंबई सोडली की रोमींग चार्ज सुरु होतो.अगदी अंबरनाथला सुद्धा. त्यावरही राजने आवाज उठवला होता. पण ते रोमींग चार्जेस आजही चालु आहेत बॉ. मलाही वाटायचे हा माणुन भारी आहे काय तरी काम करेल. मी मागच्याच आठवड्यात नाशीकला चक्कर मारली आहे. आपले मितभाषी आहेत ना त्यांच्याकडे. त्यांनी सांगीतले की पुढच्या कुंभमेळ्यासाठी नाशिकला बराच मोठा निधी मिळाला आहे. मला तर वाटते की राष्ट्रवादीला बरोबर घेतले ते ह्याच लोण्याच्या गोळ्यासाठी. असा माझा आपला अंदाज हा. माझं तर मत असं आहे की कोणीही भले करावे महाराष्ट्राचे आपले काहीही म्हणणे नाही. पण असं काही होईल याची मलातरी शक्यता वाट्त नाही. त्यामुळे जनतेने आपल्याला जमेल तेवढे आनी तसे स्वतःचे भले करावे. बाकी बाहेरचे माहीत नाही पण मुंबईत "नवा काळ" ने राजला बरेच उचलुन धरले होते सुरवातीला. पण नंतर त्यांचाही भरोसा नाही राहीला असे वाटते.

In reply to by विलासराव

विलासराव 23/09/2014 - 22:12
बाकी शिवसेनेबद्द्ल काय लिहावे. मी आनी आपले रामदासकाका बरोबर असताना एका परप्रांतीयाला रामदास काकांंनी त्याच्या चुकीबद्दल झाडला. तर तो दोन मिनीटात एका व्यक्तीला घेउन आला ज्याने आम्हाला जवळपास धमकावलेच. तो कुठलातरी शिवसेनेचा शाखाध्यक्ष होता.मग काकांनीही त्याला योग्य शब्दात समज दिल्यावर तो नॉर्मलवर आला. दुसरे मी गिरगावात रहात असताना एक व्यक्ती माझ्याच रुमच्या खीडकीतुन मी माझ्या भाचीबरोबर स्काईअपवरुन बोलत असताना पहात उभा राहीला . जवळपास २० मिनीटे राती १०:३० ला. मग त्याने माझ्या भावाला ओरडून सांगीतले की खिडकी बंद कर म्हणुन . माझी पाठ खिडकीकडे असल्याने मला हे माहीत नव्हते. तो ओरडल्यावर मी बाहेर जाउन विचारले की का रे बाबा का ओरडतोस? तर तो संगणकाकडे बोट दाखवुन संस्कृतीबद्दल बोलायला लागला. मग मी त्याला म्हणालो की रात्रीचे १०:४० झालेत , तू माझ्या घरात डोकावतो आहेस गेली २५ मिनिटे. तुझ्या तोंडाला अम्रुताचा वासही येतोय तेण्व्हा घरी जा शांतपणे झोप ,सकाळी उठुन आंघोळ कर, चहा नाश्टा घे ,पुजा करत असशील तर कर आन मग परत अम्रूत न पिता तुझे ओळखपत्र घेउन ये मग बघु संस्कृतीचे. त्यावर त्याने आवाज वाढवला, त्याला मदतनीसही येउन मिळाला. मग माझाही आवाज वाढला परीणामी आजुबाजुचे २-३ लोक दरवाजा उघडून बाहेर आले. मग त्यांनी पडती बाजु घेतली पण सगळ्यांना ऐकु जाईल अशा आवाजात म्हणाले ईथेच रहातोस ना? पाहुन घेउ. मग मीही त्याला तशाच आवाजात उत्तर दिले की आजपर्यंत परत कोणी आलेले नाही. पण जर तु कधी आलासच तर मग दरवाजा बंद असला चुकुन तर दरवाजा वाजव. तो उघडेल याची खात्री बाळग. पण तसाच परत जाउ नकोस. अर्थातच ते परत काही आले नाहीत. पण मला दुसर्या दिवशी सकाळी समजले की तो गिरगावचा सेनेचा शाखाध्यक्ष आहे. आनी नंतरच्या निवडणुकीत तो नगरसेवकही झालाय.

In reply to by शिद

ज्यांना मनसेची ब्लूप्रिंट वाचायची असेल त्याना ती खालील लिंकवर उपलब्ध आहे... http://mnsblueprint.org/index.html वाचावी, विचार करावा आणि मग आपलं मत बनवावं. बाकी आता धमाल येणारे!!!!!

In reply to by शिद

हाडक्या 26/09/2014 - 01:10
ब्लू प्रिंट पाहिली.. अगदी उत्तम मुद्देसूद आराखडा मांडला आहे. इतर पक्षांनी आदर्श घ्यावा असा सोपा साध्या शब्दात आहे. प्रश्न असा आहे की हे कागदावरचे प्रत्यक्षात आणायला काय करणार. ? एक साधा प्रश्न आहे की उ.दा. सातार्‍यातील एका मतदारसंघात या वेळेस एका खंडणीखोरास ति़किट दिले, आता तो पुढे जाऊन या आदर्श अशा लोकोपयोगी कामांवर काम करेल हे कसे मानावे ?

In reply to by हाडक्या

हाडक्याजी, ब्लूप्रिंट वाचलीत ना? मग जर पटली असेल तर मनसेचा प्रचार करायच्या कामाला लागा!!! पटली नसेल तर तुमचा लाडका जो पक्ष आहे त्याचा प्रचार सुरू करा... उगीच, "कागदावरचे प्रत्यक्ष आणायला काय करणार? अमक्याला तमक्याच मतदारसंघात का उभा करणार? उद्या जर निवडून आले तर ढमक्यालाच फलाणं खातं का देणार?" असला मक्षिकापात कशाला करावा? ज्यांनी ती इतकी सविस्तर ब्लूप्रिंट मांडली ते महाराष्ट्रासाठी काहीतरी चांगलं करतील असा विश्वास वाटत असेल तर या त्यांच्याबरोबर. अन्यथा द्या सोडून... काय? :)

In reply to by पिवळा डांबिस

विलासराव 26/09/2014 - 09:08
अन्यथा द्या सोडून... काय? Smile सोडुन दिलं. क्काय्य्य्य्य?? कारण दुसरे काही सध्यातरी करता येण्यासारखे नाही.

In reply to by पिवळा डांबिस

हाडक्या 26/09/2014 - 16:14
"कागदावरचे प्रत्यक्ष आणायला काय करणार? अमक्याला तमक्याच मतदारसंघात का उभा करणार? उद्या जर निवडून आले तर ढमक्यालाच फलाणं खातं का देणार?" असला मक्षिकापात कशाला करावा?
अहो राजे, मनसे बद्दल आपुलकी वाटते म्हणून हे टंकनश्रम चाललेत ना. (त्याने काही होणार नाही हे ठाऊक असलं तरी). ब्लु-प्रिंट बद्दल एक वेगळा धागा सुरु झालाय तरी पण. मी जो मुद्दा मांडलाय तो जी स्वप्ने दाखवली आहेत या ब्लू प्रिंट्मध्ये त्यात आणि वस्तुस्थितीच किती फरक आहे तो होता. जे लोक या ब्लु-प्रिंटला घेऊन मते मागायला येणार आहेत त्यांना ती काय आहे हे तरी कितपत समजत असेल ही शंकाच.
ज्यांनी ती इतकी सविस्तर ब्लूप्रिंट मांडली ते महाराष्ट्रासाठी काहीतरी चांगलं करतील असा विश्वास वाटत असेल तर या त्यांच्याबरोबर.
समजा मी तुम्ही म्हणताय तसे विचार केला आणि मत द्यायचे ठरवले तरी पण माझ्या पंचक्रोशीतले मनसेचे उमेदवार कोण आहेत? एक बंदूक घेऊन दिवसा ढवळ्या खंडणी वसूल करत फिरणारा, एक सुपारी घेऊन खून वगैरे करणारा, एक तडिपार (हे सगळे सातारा जिल्ह्यातले सांगतोय बाकी शितावरून भाताची परि़क्षा म्हणु हवं तर). आता मी यांना मत देऊ इच्छित नाही, मी यांचा प्रचार करु इच्छित नाही. मी माझ्या नातेवाईक,मित्रमंडळींनईक्य लोकांना मत द्या असे सांगू इच्छित नाही. अशा वेळी तुमचा शेवटचा सल्ला बरा..
अन्यथा द्या सोडून...
दिले सोडून.!! करा नवनिर्माण च्यायला..

पोटे 22/09/2014 - 10:53
काही ठिकाणी असे अलाउ केले तर बाकी ठिकाणीही बंडखोरी होईल.

मि. इंडिया की लडकी का खून पाकिस्तानी?

हुप्प्या ·

मारवा 22/09/2014 - 06:28
सोनमताई अधर्मी आहेत या निष्कर्षा वर आपण कसे पोहोचलात हे जाणुन घ्यायची उत्सुकता आहे आपला धार्मिक मारवा

In reply to by मारवा

पोटे 22/09/2014 - 13:23
आजकाल , कोण संत आहे , कोण संत नाही , कोण देशप्रेमी आहे / नाही याची सर्टिफिकेटं वाटायची फ्याशन आलेली आहेत. सर्टिफिकेटं वाटणारे लोक कारणं सांगायला बांधील नसतात

हुप्प्या 22/09/2014 - 08:17
सोनमताई हिंदू असाव्यात असा कयास आहे. खालील बातमी पहा. http://www.ndtv.com/photos/entertainment/at-ganesha-s-doors-sonam-and-anil-kapoor-visit-lalbagh-18364 पेशावरच्या परिसरात बहुतांश ज्या मनोवृत्तीचे लोक रहातात त्यांच्या लेखी सदर कन्या ही अधर्मीच. काफीर, मूर्तीपूजा करणारी अन्य गैर इस्लामी थेरं करणारी कुठलीही व्यक्ती ह्या लोकांच्या मते पाखंडी, धर्मभ्रष्टच आहे. पेशावरमधे अशा लोकांचाच बुजबुजाट आहे. तेव्हा बाईंनी आपल्या पेशावरप्रेमाला थोडा आवर घालावा अशी अपेक्षा.

In reply to by हुप्प्या

पोटे 22/09/2014 - 09:49
म्हणजे उद्या तुमच्य गावातले ९० टक्के लोक चोर आहेत हे सिद्ध्ह झाले तर तुम्हीही तुमचे आजोबा त्या गावचे हा भिमान बाळगणार नाही नै का? माझ्या गावातले बाकीचे लोक कसे का असेनात मी त्या गावचा असेन तर त्या गावचा अभिमान मी बाळगणारच ना ?

ती कधी कधी थोडी तुमचा तो पाक क्रिकेटपटू ईम्रान खानसारखी दिसते असे हे मध्यंतरी म्हणाले होते. ८०च्या दशकात अनिल कपूर व दाऊदचे एकत्र मॅच बघतानाचे एक-दोन फोटोही आठवता आहेत.

आपले दोन्ही आजोबा पेशावर मध्ये वाढले म्हणुन (त्या वेळेस पाकीस्तान अस्तित्वात नसतांना) ते पाकिस्तानी होते असं सांगणं हे एक मूर्खपणाचं तितकंच कोण्या एक चित्रपटातली कायशिशी भूमिका केली म्हणून त्या नटाला मिस्टर इंडिया मानणं हे प्रेमिसही तितक्याच मूर्खपणाचं!!! सोनलच्या मुर्खपणातली मेथड कळू शकली, तिला तिचा चित्रपट आला असतांना काही ना काही प्रक्षोभक बोलून पैसा कमवायचाय... पण प्रस्तुत लेखनातल्या प्रेमिसच्या मूर्खपणाचा उद्देश्य कळला नाही... टीआरपी?

In reply to by पिवळा डांबिस

हुप्प्या 24/09/2014 - 10:23
अनिल कपूरला मि. इंडिया म्हटले म्हणजे काय गहजब झाला म्हणे? त्याने ती भूमिका केली म्हणून तसे म्हटले. अमजद खानला गब्बर सिंग वा अमरीश पुरीला मोगँबो म्हटले जाते की. त्यात मूर्खपणा काय आहे? सोनमताईंच्या मठ्ठ विधानाला उठाव यावा म्हणून मि. इंडियाचा उल्लेख केला त्याचा शब्दशः अर्थ घेऊन डोक्यात राख घालून घेणे हा आणखी आचरटपणा आहे असे माझे मत. असो.

In reply to by हुप्प्या

अनिल कपूरला मि. इंडिया म्हटले म्हणजे काय गहजब झाला म्हणे? त्याने ती भूमिका केली म्हणून तसे म्हटले....मि. इंडियाचा उल्लेख केला त्याचा शब्दशः अर्थ घेऊन डोक्यात राख घालून घेणे हा आणखी आचरटपणा आहे
व्हॉटेव्हर दॅट यू वॉन्ट टू मेक यूवरसेल्फ बिलिव्ह यू आर राईट!!!

माझे आजी-आजोबा १९४८ च्या गांधीहत्येनंतरच्या दंगलींनंतर 'अ' या ठिकाणाहून 'ब' या ठिकाणी स्थलांतरीत झाले.तिथे माझे वडिल नोकरी करत होते आणि माझा जन्मही तिथलाच.मी ८वीत असताना 'ब' या ठिकाणाहून आम्ही पुण्याला स्थलांतरीत झालो.इतक्या वर्षात माझे 'ब' या ठिकाणी कधीच जाणे झाले नाही.तरीही लहानपणच्या आठवणींमुळे 'ब' या ठिकाणाविषयी मनात ओलावा नक्कीच आहे. तसेच 'अ' या ठिकाणी माझे वडिल जाऊन आले पण मला ते ठिकाण कधीच बघायला मिळाले नाही.तरीही 'अ' हे ठिकाण नक्की कसे असेल याची उत्सुकता मला असतेच. शेवटी आमच्या अनेक पिढ्या तिथे राहिल्या होत्या. आता सोनम कपूरला पेशावरविषयी अशी आत्मियता असूच नये हे म्हणणे मला तरी पटत नाही. सोनम कपूरला स्वतःचा टि.आर.पी वाढवायचा आहे की नाही माहित नाही पण हे असले धागे काढून प्रस्तुत लेखकाला मात्र स्वतःचा टि.आर.पी जरूर वाढवायचा आहे असे नक्कीच वाटते.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

काळा पहाड 22/09/2014 - 12:58
अहो पण पुण्याचे वटवाघूळ, ती बया माझं रक्त पाकिस्तानी आहे अश्शी म्हणतीय. आता ज्याची गोष्ट ती त्याला परत द्यायला नको का? बॉडीत पाच लिटर रक्त असतं म्हणे. काढून देवून टाकू. हाकानाका.

In reply to by काळा पहाड

रक्त पाकिस्तानी आहे असे म्हटले म्हणजे ती पाकिस्तानला धार्जिणी झाली असे थोडीच आहे? आणि सदर लेखक म्हणत आहेत त्याप्रमाणे तिचे ज्ञान खरोखरच अगाध दिसते. फारतर तिच्यातले रक्त कपूर घराण्याचे (आणि तिची आई ज्या कुठच्या घराण्याची आहे त्या घराण्याचे) म्हणता येईल.पण रक्ताला अशी जागा असते का? तेव्हा असे काहीतरी म्हटले तर ती पाकिस्तानला धार्जिणी झाली अशी तर्कटे सदर लेखकच करू जाणे.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

हुप्प्या 24/09/2014 - 10:27
सोनमताईंचे विधान तर्कदुष्ट आणि मूर्खपणाचे आहे. त्यातून ती पाकिस्तानधार्जिणी आहे असे मी म्हटले आहे असा उफराटा निष्कर्ष एक वटवाघूळच काढू जाणे. असो. एक मनोरंजक, उथळ आणि सवंग विधान ह्या पलीकडे ह्या बोलण्याला फार काही अर्थ नाही.

In reply to by हुप्प्या

सोनमच्या वक्तव्यावरून पाकिस्तान--ज्याला भारतीय लोक शत्रूराष्ट्र म्हणून ओळखतात त्याच्या प्रेमाचा पान्हा सोनमला फुटला आहे हा अर्थ इतर कोणी नाही तर तुम्हीच काढला आहेत---"तसेच आज ज्या पेशावरच्या जोरावर पाकिस्तानप्रेमाचा पान्हा फुटला आहे त्या पेशावरची स्थिती काय आहे?" हे वाक्य कुणी लिहिले होते? ठिक आहे केवळ असा पान्हा फुटणे म्हणजेच धार्जिणे असल्याचे लक्षण नसले तरी धार्जिणे असायला असा पान्हा नक्कीच फुटावा लागेल, बरोबर?
एक मनोरंजक, उथळ आणि सवंग विधान ह्या पलीकडे ह्या बोलण्याला फार काही अर्थ नाही.
हेच तुमच्या याच नाही तर जवळपास सगळ्या काथ्याकूटाच्या नावाखाली जिलब्या पाडता ना त्याला अगदी हजार टक्के लागू पडते. फक्त तुमच्या जिलब्या मनोरंजक नकीच नसतात.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

हुप्प्या 28/09/2014 - 22:29
आपल्याकडे वाद करायला आता कुठला मुद्दा उरला नसल्यामुळे कुठलाही आक्रस्ताळी व्यक्ती करेल तसेच आपण वैयक्तिक चिखलफेकीवर उतरलात. आश्चर्य नाही. तर अशी अत्यंत हीन पातळीवर वैयक्तिक टीका करून झाली असेल तर आता कटा. जर माझे विषय आपणास त्याज्य असतील तर आनंदच आहे. अशा चर्चेपासून आपण दूर रहावे. उगाच शिव्या देण्यापुरते येण्याचीही गरज नाही.

In reply to by हुप्प्या

आनंदी गोपाळ 29/09/2014 - 08:59
एका अनोळखी स्त्रीविषयी असले धागे काढणे हे तुमच्या हुप्प सुसंस्कृत वागणूकीत बसते वाटतं? की हा धागा म्हणजे तिच्यावरील वैयक्तिक चिखलफेक नसून जाहीर स्तुती वगैरे आहे?

In reply to by आनंदी गोपाळ

अहो या हुप्पेश्वरशास्त्र्यांची मिसळपाववरची आजवरची वाटचाल बघता ही गोष्ट काही अनपेक्षित नाही.

In reply to by काळा पहाड

पोटे 22/09/2014 - 20:03
पाकिस्तानी शब्द लावला की वस्तू त्याज्य होते का ? मालदिवला असताना सिंधु नदीच् काठावरचा बासमती तांदूळच खातहोतो.. पाकिस्तान बासमती .

In reply to by टवाळ कार्टा

पोटे 23/09/2014 - 22:18
तुमचे आदर्श पांडव हस्तिनापुरची फाळणी करुन खांडववनात गेले तरी आपले आजोबा हस्तिनापुरचे हे अभिमानाने सांगायचे ना ?

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

एस 22/09/2014 - 13:06
यांचे विषय असेच फालतू असतात. कुठलीही मसाला-पोटेंशियल असलेली बातमी आली की मागे हुप्प्यांचा त्यावर धागा येणार हा प्रघातच पडला आहे!

In reply to by एस

हुप्प्या 24/09/2014 - 10:29
आपण केवळ प्रकांड, गहन, अथांग विषयांनाच हात घालत असाल तर ह्या सवंग बातमीच्या चिखलात पाय का घालू पहात आहात? अशा मसालेदार बातम्या व त्यावरील टिप्पणी ह्यापासून आपण अलिप्त राहू शकता की.

In reply to by दिपक.कुवेत

बॅटमॅन 22/09/2014 - 14:26
आहा....क्या बात बोली है!!!!! सहमत हेवेसांनल. तसा मी पाकिस्तानी रक्तवाल्या म्हैलांचा मोठ्ठा पंखा आहे. हीना रब्बानी हे सध्याचे एकदम ताजे उदा. एकूणच पाकिस्तानी, अफगाणी, इराणी, अरबी, तुर्की रक्तवाल्या स्त्रिया युरोपियन झक मारतील इतक्या सुंदर असतात राव.

In reply to by बॅटमॅन

टवाळ कार्टा 22/09/2014 - 14:39
पाकिस्तानी, अफगाणी, इराणी, अरबी, तुर्की रक्तवाल्या स्त्रिया युरोपियन झक मारतील इतक्या सुंदर असतात
तहे दिलसे सहमत...पर्शिया राहिला की रे...आणि ईराणी तर खासच ;) मुविकाका आले की जळवणार नुस्ते

In reply to by टवाळ कार्टा

मदनबाण 22/09/2014 - 15:03
पाकिस्तानी, अफगाणी, इराणी, अरबी, तुर्की रक्तवाल्या स्त्रिया युरोपियन झक मारतील इतक्या सुंदर असतात आहाहा... सौदर्याची नशा ! ;) मध्यंतरी मला वाटते... अशाच कुठल्या तरी देशातल्या युवतीचे नॄत्य पाहिल व्हत ! आधी त्यांच्या भाषेतल आणि मगं आपल्या बॉलिवुड मधलं गाणं... प्रचंड अदाकारीने आणि परफेक्ट टायमिंग असलेल ते नॄत्य मला आवडलं होत ! कधी तरी कुठल्या तरी धाग्यावर चिकटवीन मी ते { त्यातल एक टायमिंग तर भन्नाट साधल आहे.}

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राष्ट्रीयत्वाची मोदीप्रणीत पुनर्व्याख्या

In reply to by मदनबाण

बॅटमॅन 22/09/2014 - 15:13
अशाच कुठल्या तरी देशातल्या युवतीचे नॄत्य पाहिल व्हत
तुम्हांला उदरनृत्य म्हणावयाचे आहे का ओ मदनबाणजी ;)

In reply to by बॅटमॅन

मदनबाण 22/09/2014 - 15:24
नाही नॄत्यच आहे ते... उदरनॄत्या मधे Sadie चा १ ला नंबर लागतो. ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राष्ट्रीयत्वाची मोदीप्रणीत पुनर्व्याख्या

In reply to by मदनबाण

@पाकिस्तानी, अफगाणी, इराणी, अरबी, तुर्की रक्तवाल्या स्त्रिया युरोपियन झक मारतील इतक्या सुंदर असतात>>> य्या...य्या रे य्या य्या....! http://www.pic4ever.com/images/loveshower.gif त्यांच्यातली कोण वॅक्ट्रेस णाय का झाली अजुण!? http://www.pic4ever.com/images/14.gif

In reply to by खटपट्या

मधुबाला तिकडचीच होती का ?
ती पठाण होती इतकंच माहिती आहे....
जाणकारांनी भर टाकावी ?
कॉलिंग "व्यर्थेश कळबडवी"!!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

बॅटमॅन 28/09/2014 - 22:44
आम्ही जे कै विकीपांडित्य कमावले त्यावरून असे कळते की ती पठाण होती. काबूलमध्ये कै धंदापाणी धड चालेना म्हणून तिचे वडील सहकुटुंब मुंबैस येते झाले.

In reply to by टवाळ कार्टा

प्यारे१ 22/09/2014 - 15:56
@ बॅटमॅन, आमच्या अल्जिरियन पण जोडा ह्यात (फक्त 'दातं' घासून आणि आंघोळ करवून घ्यावी लागतील ;) )

In reply to by बॅटमॅन

दिपक.कुवेत 22/09/2014 - 15:46
कहिं अपने छूने से वो मैले ना हो जाए ईतपत नितळ गोर्‍या असतात. युरोपियन किंवा फॉर दॅट मॅटर अमेरीकन नुसत्याच पांढर्‍या पाली असतात.

In reply to by बॅटमॅन

टवाळ कार्टा 22/09/2014 - 15:58
+११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११

In reply to by दिपक.कुवेत

मलाही सोनम कपूर फार फार आवडते. :) प्रत्यक्षात आवडते की नाही हा प्रश्न गौण आहे. पण तुम्ही हा मुद्दा उपस्थित केलात म्हणून या हुप्पेश्वरशास्त्र्यांच्या फालतूच्या जिलबीयुक्त लेखाला जरा मनोरंजक वळण लागले याबद्दल तुमचे आभार मानावेत तितके थोडेच आहेत :) किप इट अप

आबा 22/09/2014 - 16:15
अहो लालू अडवानी सुद्धा जन्माने पाकिस्तानी असून सुद्धा त्यांना उपराष्ट्रपती केलं.. हीचे आजोबा पाकिस्तानी होते या हिशोबाने सोनम ताईंना किमान जिल्हा परिषद तरी मिळायला हवी...

आशु जोग 22/09/2014 - 16:33
मटा लोकसत्तामधल्या बातम्या चिकटवण्यासाठी वेगळी सोय हवी !

मदनबाण 22/09/2014 - 20:48
पर्शिया म्हणजेच इराण हो. बॅट्या... तुझी ही प्रतिक्रिया वाचता क्षणीच मला हे गाणं आठवलं, कारण अप्सरा पर्शियन क्लासिक डान्स करण्यात माहिर आहे... खरं तर हा व्हिडीयो योगा-योगा ने सापडला... कुठे तरी एक ट्युन ऐकली होती, कुठे ते नक्की आठवत नाही, परंतु.... ती ट्युन ऐकताच माझ्या लक्षात आले की हे गाणे मी आधी कुठे तरी ऐकले, शेवटी तू-नळीवर शोध घेताना ते गाणं सापडलं ! तसेच मूळ गाणं शोधताना हे देखील सापडलं. :) गाणं होत, बंद कमरे में प्यार करेंगे. ;) मूळ गाण्याचा दुवा :- http://www.youtube.com/watch?v=KP5Bb43NsyA आता ते गाणं... गाण्याचा पहिला भाग कदाचीत रटाळही वाटु शकेल पण, ३:०२ पासुन बंद कमरे में प्यार करेंगे सुरु होत,आणि प्रचंड मेहनत घेतल्यावरच जे टायमिंग जमतं ते ४:४२ ते ४:४४ मधे कळुन येते. म्युझिकच्या येणार्‍या एका बीट वर योग्य वेळी अंग हलवणे हे वाटतं तितक सोप्प नाही ! अप्सरा नावा प्रमाणेच दिसायलाही सुंदर आहे, हे काही वेगळ्याने पटवुन द्यायची गरज नाही. नंतर कदाचित विसरुन जाईन म्हणुन आजच इथे पोस्टवुन टाकला !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राष्ट्रीयत्वाची मोदीप्रणीत पुनर्व्याख्या

रेवती 23/09/2014 - 22:30
हे पाकिस्तानप्रेम खरच आहे काहो हुप्प्यासाहेब? भारतात आणि भारताबाहेरून जिथून मिळेल तिथून ती मुल्गी तिची गुंतवणूक वसूल करायला बघतीये. तो व्य्वसायाचा भाग झाला.

In reply to by रेवती

प्यारे१ 23/09/2014 - 23:08
अहो काही नाही हो, खुबसूरत नावाचा सिनेमा होता ना रेखाचा तिचा रिमेक काढलाय. त्यात रेखाचा रोल ही करतेय. आणि तिच्या नवरा / बॉयफ्रेन्डच्या रोल मध्ये आहे एक पाकिस्तानी कलाकार. 'कवतुक' नको करायला???

In reply to by रेवती

हुप्प्या 24/09/2014 - 10:33
बाईसाहेब, माझा असा काही गैरसमज नाही. सदर बाईचे विधान हे उथळ आणि अविचारी आहे असे माझे मत. त्यावर दोन घटका करमणूक ह्यापलीकडे माझा काही उद्देश नाही. सोनमताईंना भारत वा पाकिस्तान दोन्ही देशांच्या राजकीय वा सामाजिक स्थितीत फार काही गम्य असेल असे मला वाटत नाही. ह्या गोष्टीशी मी १००% सहमत की हा निव्वळ प्रसिद्धीकरता केलेला उपद्व्याप आहे.

भृशुंडी 29/09/2014 - 01:12
१. सोनम कपूर (बिनमिशीचा अनिल कपूर भाग २) चा नवा चित्रपट खूबसूरत येतोय...आलाय. २. त्यात तिच्याबरोबर फवाद खान नामक पाकिस्तानी हिरो आहे. ३. येनकेनप्रकारे चित्रपटाला वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोचवून पहिल्या ३ दिवसांत पैसा वसूल करून घ्यायचा आहे. हे सगळं माहिती असूनही अशा वक्तव्याला किंमत देऊन त्यावर चर्चेची अपेक्षा आहे काय? everyone involved has to participate in the structured propaganda & PR. एवढं साधं आहे. पण कुठेही 'पाकिस्तान' म्हटलं की आपल्या आतल्या अँटीना जागृत होतात बहुतेक.

मारवा 22/09/2014 - 06:28
सोनमताई अधर्मी आहेत या निष्कर्षा वर आपण कसे पोहोचलात हे जाणुन घ्यायची उत्सुकता आहे आपला धार्मिक मारवा

In reply to by मारवा

पोटे 22/09/2014 - 13:23
आजकाल , कोण संत आहे , कोण संत नाही , कोण देशप्रेमी आहे / नाही याची सर्टिफिकेटं वाटायची फ्याशन आलेली आहेत. सर्टिफिकेटं वाटणारे लोक कारणं सांगायला बांधील नसतात

हुप्प्या 22/09/2014 - 08:17
सोनमताई हिंदू असाव्यात असा कयास आहे. खालील बातमी पहा. http://www.ndtv.com/photos/entertainment/at-ganesha-s-doors-sonam-and-anil-kapoor-visit-lalbagh-18364 पेशावरच्या परिसरात बहुतांश ज्या मनोवृत्तीचे लोक रहातात त्यांच्या लेखी सदर कन्या ही अधर्मीच. काफीर, मूर्तीपूजा करणारी अन्य गैर इस्लामी थेरं करणारी कुठलीही व्यक्ती ह्या लोकांच्या मते पाखंडी, धर्मभ्रष्टच आहे. पेशावरमधे अशा लोकांचाच बुजबुजाट आहे. तेव्हा बाईंनी आपल्या पेशावरप्रेमाला थोडा आवर घालावा अशी अपेक्षा.

In reply to by हुप्प्या

पोटे 22/09/2014 - 09:49
म्हणजे उद्या तुमच्य गावातले ९० टक्के लोक चोर आहेत हे सिद्ध्ह झाले तर तुम्हीही तुमचे आजोबा त्या गावचे हा भिमान बाळगणार नाही नै का? माझ्या गावातले बाकीचे लोक कसे का असेनात मी त्या गावचा असेन तर त्या गावचा अभिमान मी बाळगणारच ना ?

ती कधी कधी थोडी तुमचा तो पाक क्रिकेटपटू ईम्रान खानसारखी दिसते असे हे मध्यंतरी म्हणाले होते. ८०च्या दशकात अनिल कपूर व दाऊदचे एकत्र मॅच बघतानाचे एक-दोन फोटोही आठवता आहेत.

आपले दोन्ही आजोबा पेशावर मध्ये वाढले म्हणुन (त्या वेळेस पाकीस्तान अस्तित्वात नसतांना) ते पाकिस्तानी होते असं सांगणं हे एक मूर्खपणाचं तितकंच कोण्या एक चित्रपटातली कायशिशी भूमिका केली म्हणून त्या नटाला मिस्टर इंडिया मानणं हे प्रेमिसही तितक्याच मूर्खपणाचं!!! सोनलच्या मुर्खपणातली मेथड कळू शकली, तिला तिचा चित्रपट आला असतांना काही ना काही प्रक्षोभक बोलून पैसा कमवायचाय... पण प्रस्तुत लेखनातल्या प्रेमिसच्या मूर्खपणाचा उद्देश्य कळला नाही... टीआरपी?

In reply to by पिवळा डांबिस

हुप्प्या 24/09/2014 - 10:23
अनिल कपूरला मि. इंडिया म्हटले म्हणजे काय गहजब झाला म्हणे? त्याने ती भूमिका केली म्हणून तसे म्हटले. अमजद खानला गब्बर सिंग वा अमरीश पुरीला मोगँबो म्हटले जाते की. त्यात मूर्खपणा काय आहे? सोनमताईंच्या मठ्ठ विधानाला उठाव यावा म्हणून मि. इंडियाचा उल्लेख केला त्याचा शब्दशः अर्थ घेऊन डोक्यात राख घालून घेणे हा आणखी आचरटपणा आहे असे माझे मत. असो.

In reply to by हुप्प्या

अनिल कपूरला मि. इंडिया म्हटले म्हणजे काय गहजब झाला म्हणे? त्याने ती भूमिका केली म्हणून तसे म्हटले....मि. इंडियाचा उल्लेख केला त्याचा शब्दशः अर्थ घेऊन डोक्यात राख घालून घेणे हा आणखी आचरटपणा आहे
व्हॉटेव्हर दॅट यू वॉन्ट टू मेक यूवरसेल्फ बिलिव्ह यू आर राईट!!!

माझे आजी-आजोबा १९४८ च्या गांधीहत्येनंतरच्या दंगलींनंतर 'अ' या ठिकाणाहून 'ब' या ठिकाणी स्थलांतरीत झाले.तिथे माझे वडिल नोकरी करत होते आणि माझा जन्मही तिथलाच.मी ८वीत असताना 'ब' या ठिकाणाहून आम्ही पुण्याला स्थलांतरीत झालो.इतक्या वर्षात माझे 'ब' या ठिकाणी कधीच जाणे झाले नाही.तरीही लहानपणच्या आठवणींमुळे 'ब' या ठिकाणाविषयी मनात ओलावा नक्कीच आहे. तसेच 'अ' या ठिकाणी माझे वडिल जाऊन आले पण मला ते ठिकाण कधीच बघायला मिळाले नाही.तरीही 'अ' हे ठिकाण नक्की कसे असेल याची उत्सुकता मला असतेच. शेवटी आमच्या अनेक पिढ्या तिथे राहिल्या होत्या. आता सोनम कपूरला पेशावरविषयी अशी आत्मियता असूच नये हे म्हणणे मला तरी पटत नाही. सोनम कपूरला स्वतःचा टि.आर.पी वाढवायचा आहे की नाही माहित नाही पण हे असले धागे काढून प्रस्तुत लेखकाला मात्र स्वतःचा टि.आर.पी जरूर वाढवायचा आहे असे नक्कीच वाटते.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

काळा पहाड 22/09/2014 - 12:58
अहो पण पुण्याचे वटवाघूळ, ती बया माझं रक्त पाकिस्तानी आहे अश्शी म्हणतीय. आता ज्याची गोष्ट ती त्याला परत द्यायला नको का? बॉडीत पाच लिटर रक्त असतं म्हणे. काढून देवून टाकू. हाकानाका.

In reply to by काळा पहाड

रक्त पाकिस्तानी आहे असे म्हटले म्हणजे ती पाकिस्तानला धार्जिणी झाली असे थोडीच आहे? आणि सदर लेखक म्हणत आहेत त्याप्रमाणे तिचे ज्ञान खरोखरच अगाध दिसते. फारतर तिच्यातले रक्त कपूर घराण्याचे (आणि तिची आई ज्या कुठच्या घराण्याची आहे त्या घराण्याचे) म्हणता येईल.पण रक्ताला अशी जागा असते का? तेव्हा असे काहीतरी म्हटले तर ती पाकिस्तानला धार्जिणी झाली अशी तर्कटे सदर लेखकच करू जाणे.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

हुप्प्या 24/09/2014 - 10:27
सोनमताईंचे विधान तर्कदुष्ट आणि मूर्खपणाचे आहे. त्यातून ती पाकिस्तानधार्जिणी आहे असे मी म्हटले आहे असा उफराटा निष्कर्ष एक वटवाघूळच काढू जाणे. असो. एक मनोरंजक, उथळ आणि सवंग विधान ह्या पलीकडे ह्या बोलण्याला फार काही अर्थ नाही.

In reply to by हुप्प्या

सोनमच्या वक्तव्यावरून पाकिस्तान--ज्याला भारतीय लोक शत्रूराष्ट्र म्हणून ओळखतात त्याच्या प्रेमाचा पान्हा सोनमला फुटला आहे हा अर्थ इतर कोणी नाही तर तुम्हीच काढला आहेत---"तसेच आज ज्या पेशावरच्या जोरावर पाकिस्तानप्रेमाचा पान्हा फुटला आहे त्या पेशावरची स्थिती काय आहे?" हे वाक्य कुणी लिहिले होते? ठिक आहे केवळ असा पान्हा फुटणे म्हणजेच धार्जिणे असल्याचे लक्षण नसले तरी धार्जिणे असायला असा पान्हा नक्कीच फुटावा लागेल, बरोबर?
एक मनोरंजक, उथळ आणि सवंग विधान ह्या पलीकडे ह्या बोलण्याला फार काही अर्थ नाही.
हेच तुमच्या याच नाही तर जवळपास सगळ्या काथ्याकूटाच्या नावाखाली जिलब्या पाडता ना त्याला अगदी हजार टक्के लागू पडते. फक्त तुमच्या जिलब्या मनोरंजक नकीच नसतात.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

हुप्प्या 28/09/2014 - 22:29
आपल्याकडे वाद करायला आता कुठला मुद्दा उरला नसल्यामुळे कुठलाही आक्रस्ताळी व्यक्ती करेल तसेच आपण वैयक्तिक चिखलफेकीवर उतरलात. आश्चर्य नाही. तर अशी अत्यंत हीन पातळीवर वैयक्तिक टीका करून झाली असेल तर आता कटा. जर माझे विषय आपणास त्याज्य असतील तर आनंदच आहे. अशा चर्चेपासून आपण दूर रहावे. उगाच शिव्या देण्यापुरते येण्याचीही गरज नाही.

In reply to by हुप्प्या

आनंदी गोपाळ 29/09/2014 - 08:59
एका अनोळखी स्त्रीविषयी असले धागे काढणे हे तुमच्या हुप्प सुसंस्कृत वागणूकीत बसते वाटतं? की हा धागा म्हणजे तिच्यावरील वैयक्तिक चिखलफेक नसून जाहीर स्तुती वगैरे आहे?

In reply to by आनंदी गोपाळ

अहो या हुप्पेश्वरशास्त्र्यांची मिसळपाववरची आजवरची वाटचाल बघता ही गोष्ट काही अनपेक्षित नाही.

In reply to by काळा पहाड

पोटे 22/09/2014 - 20:03
पाकिस्तानी शब्द लावला की वस्तू त्याज्य होते का ? मालदिवला असताना सिंधु नदीच् काठावरचा बासमती तांदूळच खातहोतो.. पाकिस्तान बासमती .

In reply to by टवाळ कार्टा

पोटे 23/09/2014 - 22:18
तुमचे आदर्श पांडव हस्तिनापुरची फाळणी करुन खांडववनात गेले तरी आपले आजोबा हस्तिनापुरचे हे अभिमानाने सांगायचे ना ?

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

एस 22/09/2014 - 13:06
यांचे विषय असेच फालतू असतात. कुठलीही मसाला-पोटेंशियल असलेली बातमी आली की मागे हुप्प्यांचा त्यावर धागा येणार हा प्रघातच पडला आहे!

In reply to by एस

हुप्प्या 24/09/2014 - 10:29
आपण केवळ प्रकांड, गहन, अथांग विषयांनाच हात घालत असाल तर ह्या सवंग बातमीच्या चिखलात पाय का घालू पहात आहात? अशा मसालेदार बातम्या व त्यावरील टिप्पणी ह्यापासून आपण अलिप्त राहू शकता की.

In reply to by दिपक.कुवेत

बॅटमॅन 22/09/2014 - 14:26
आहा....क्या बात बोली है!!!!! सहमत हेवेसांनल. तसा मी पाकिस्तानी रक्तवाल्या म्हैलांचा मोठ्ठा पंखा आहे. हीना रब्बानी हे सध्याचे एकदम ताजे उदा. एकूणच पाकिस्तानी, अफगाणी, इराणी, अरबी, तुर्की रक्तवाल्या स्त्रिया युरोपियन झक मारतील इतक्या सुंदर असतात राव.

In reply to by बॅटमॅन

टवाळ कार्टा 22/09/2014 - 14:39
पाकिस्तानी, अफगाणी, इराणी, अरबी, तुर्की रक्तवाल्या स्त्रिया युरोपियन झक मारतील इतक्या सुंदर असतात
तहे दिलसे सहमत...पर्शिया राहिला की रे...आणि ईराणी तर खासच ;) मुविकाका आले की जळवणार नुस्ते

In reply to by टवाळ कार्टा

मदनबाण 22/09/2014 - 15:03
पाकिस्तानी, अफगाणी, इराणी, अरबी, तुर्की रक्तवाल्या स्त्रिया युरोपियन झक मारतील इतक्या सुंदर असतात आहाहा... सौदर्याची नशा ! ;) मध्यंतरी मला वाटते... अशाच कुठल्या तरी देशातल्या युवतीचे नॄत्य पाहिल व्हत ! आधी त्यांच्या भाषेतल आणि मगं आपल्या बॉलिवुड मधलं गाणं... प्रचंड अदाकारीने आणि परफेक्ट टायमिंग असलेल ते नॄत्य मला आवडलं होत ! कधी तरी कुठल्या तरी धाग्यावर चिकटवीन मी ते { त्यातल एक टायमिंग तर भन्नाट साधल आहे.}

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राष्ट्रीयत्वाची मोदीप्रणीत पुनर्व्याख्या

In reply to by मदनबाण

बॅटमॅन 22/09/2014 - 15:13
अशाच कुठल्या तरी देशातल्या युवतीचे नॄत्य पाहिल व्हत
तुम्हांला उदरनृत्य म्हणावयाचे आहे का ओ मदनबाणजी ;)

In reply to by बॅटमॅन

मदनबाण 22/09/2014 - 15:24
नाही नॄत्यच आहे ते... उदरनॄत्या मधे Sadie चा १ ला नंबर लागतो. ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राष्ट्रीयत्वाची मोदीप्रणीत पुनर्व्याख्या

In reply to by मदनबाण

@पाकिस्तानी, अफगाणी, इराणी, अरबी, तुर्की रक्तवाल्या स्त्रिया युरोपियन झक मारतील इतक्या सुंदर असतात>>> य्या...य्या रे य्या य्या....! http://www.pic4ever.com/images/loveshower.gif त्यांच्यातली कोण वॅक्ट्रेस णाय का झाली अजुण!? http://www.pic4ever.com/images/14.gif

In reply to by खटपट्या

मधुबाला तिकडचीच होती का ?
ती पठाण होती इतकंच माहिती आहे....
जाणकारांनी भर टाकावी ?
कॉलिंग "व्यर्थेश कळबडवी"!!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

बॅटमॅन 28/09/2014 - 22:44
आम्ही जे कै विकीपांडित्य कमावले त्यावरून असे कळते की ती पठाण होती. काबूलमध्ये कै धंदापाणी धड चालेना म्हणून तिचे वडील सहकुटुंब मुंबैस येते झाले.

In reply to by टवाळ कार्टा

प्यारे१ 22/09/2014 - 15:56
@ बॅटमॅन, आमच्या अल्जिरियन पण जोडा ह्यात (फक्त 'दातं' घासून आणि आंघोळ करवून घ्यावी लागतील ;) )

In reply to by बॅटमॅन

दिपक.कुवेत 22/09/2014 - 15:46
कहिं अपने छूने से वो मैले ना हो जाए ईतपत नितळ गोर्‍या असतात. युरोपियन किंवा फॉर दॅट मॅटर अमेरीकन नुसत्याच पांढर्‍या पाली असतात.

In reply to by बॅटमॅन

टवाळ कार्टा 22/09/2014 - 15:58
+११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११

In reply to by दिपक.कुवेत

मलाही सोनम कपूर फार फार आवडते. :) प्रत्यक्षात आवडते की नाही हा प्रश्न गौण आहे. पण तुम्ही हा मुद्दा उपस्थित केलात म्हणून या हुप्पेश्वरशास्त्र्यांच्या फालतूच्या जिलबीयुक्त लेखाला जरा मनोरंजक वळण लागले याबद्दल तुमचे आभार मानावेत तितके थोडेच आहेत :) किप इट अप

आबा 22/09/2014 - 16:15
अहो लालू अडवानी सुद्धा जन्माने पाकिस्तानी असून सुद्धा त्यांना उपराष्ट्रपती केलं.. हीचे आजोबा पाकिस्तानी होते या हिशोबाने सोनम ताईंना किमान जिल्हा परिषद तरी मिळायला हवी...

आशु जोग 22/09/2014 - 16:33
मटा लोकसत्तामधल्या बातम्या चिकटवण्यासाठी वेगळी सोय हवी !

मदनबाण 22/09/2014 - 20:48
पर्शिया म्हणजेच इराण हो. बॅट्या... तुझी ही प्रतिक्रिया वाचता क्षणीच मला हे गाणं आठवलं, कारण अप्सरा पर्शियन क्लासिक डान्स करण्यात माहिर आहे... खरं तर हा व्हिडीयो योगा-योगा ने सापडला... कुठे तरी एक ट्युन ऐकली होती, कुठे ते नक्की आठवत नाही, परंतु.... ती ट्युन ऐकताच माझ्या लक्षात आले की हे गाणे मी आधी कुठे तरी ऐकले, शेवटी तू-नळीवर शोध घेताना ते गाणं सापडलं ! तसेच मूळ गाणं शोधताना हे देखील सापडलं. :) गाणं होत, बंद कमरे में प्यार करेंगे. ;) मूळ गाण्याचा दुवा :- http://www.youtube.com/watch?v=KP5Bb43NsyA आता ते गाणं... गाण्याचा पहिला भाग कदाचीत रटाळही वाटु शकेल पण, ३:०२ पासुन बंद कमरे में प्यार करेंगे सुरु होत,आणि प्रचंड मेहनत घेतल्यावरच जे टायमिंग जमतं ते ४:४२ ते ४:४४ मधे कळुन येते. म्युझिकच्या येणार्‍या एका बीट वर योग्य वेळी अंग हलवणे हे वाटतं तितक सोप्प नाही ! अप्सरा नावा प्रमाणेच दिसायलाही सुंदर आहे, हे काही वेगळ्याने पटवुन द्यायची गरज नाही. नंतर कदाचित विसरुन जाईन म्हणुन आजच इथे पोस्टवुन टाकला !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राष्ट्रीयत्वाची मोदीप्रणीत पुनर्व्याख्या

रेवती 23/09/2014 - 22:30
हे पाकिस्तानप्रेम खरच आहे काहो हुप्प्यासाहेब? भारतात आणि भारताबाहेरून जिथून मिळेल तिथून ती मुल्गी तिची गुंतवणूक वसूल करायला बघतीये. तो व्य्वसायाचा भाग झाला.

In reply to by रेवती

प्यारे१ 23/09/2014 - 23:08
अहो काही नाही हो, खुबसूरत नावाचा सिनेमा होता ना रेखाचा तिचा रिमेक काढलाय. त्यात रेखाचा रोल ही करतेय. आणि तिच्या नवरा / बॉयफ्रेन्डच्या रोल मध्ये आहे एक पाकिस्तानी कलाकार. 'कवतुक' नको करायला???

In reply to by रेवती

हुप्प्या 24/09/2014 - 10:33
बाईसाहेब, माझा असा काही गैरसमज नाही. सदर बाईचे विधान हे उथळ आणि अविचारी आहे असे माझे मत. त्यावर दोन घटका करमणूक ह्यापलीकडे माझा काही उद्देश नाही. सोनमताईंना भारत वा पाकिस्तान दोन्ही देशांच्या राजकीय वा सामाजिक स्थितीत फार काही गम्य असेल असे मला वाटत नाही. ह्या गोष्टीशी मी १००% सहमत की हा निव्वळ प्रसिद्धीकरता केलेला उपद्व्याप आहे.

भृशुंडी 29/09/2014 - 01:12
१. सोनम कपूर (बिनमिशीचा अनिल कपूर भाग २) चा नवा चित्रपट खूबसूरत येतोय...आलाय. २. त्यात तिच्याबरोबर फवाद खान नामक पाकिस्तानी हिरो आहे. ३. येनकेनप्रकारे चित्रपटाला वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोचवून पहिल्या ३ दिवसांत पैसा वसूल करून घ्यायचा आहे. हे सगळं माहिती असूनही अशा वक्तव्याला किंमत देऊन त्यावर चर्चेची अपेक्षा आहे काय? everyone involved has to participate in the structured propaganda & PR. एवढं साधं आहे. पण कुठेही 'पाकिस्तान' म्हटलं की आपल्या आतल्या अँटीना जागृत होतात बहुतेक.
मिस्टर इंडियाची भूमिका गाजवणार्‍या अनिल कपूरसाहेबांच्या कन्यारत्न सोनम कपूरने असे विधान केले की माझे दोन्ही आजोबा पेशावरमधे वाढले म्हणून माझ्या शरीरात पाकिस्तानी रक्तच आहे. सोनमताईंचे इतिहासाचे आणि मानवी जीवशास्त्राचे ज्ञान अफाट असले पाहिजे. बाईंचे नाना आणि दादा कुठल्या कारणाने भारतात पळून आले हेही माहित करून घेतले असते तर बरे झाले असते. तसेच आज ज्या पेशावरच्या जोरावर पाकिस्तानप्रेमाचा पान्हा फुटला आहे त्या पेशावरची स्थिती काय आहे?

PLATONIC व्याभिचार- तोल सांभाळुन घसरण्यातला आनंद !

मारवा ·

In reply to by खटपट्या

दिपक.कुवेत 22/09/2014 - 11:10
नको हां खट्टु काका, ती जेनी आज्जी टपूनच बसलीये....लग्गेच विचारेल....."ओय होय काकूंना म्हातै का??"

चित्रगुप्त 22/09/2014 - 06:50
त्या मित्राला चरित्रहीन का म्हणावे? या विषयातला अनुभवी जाणकार आहे तो. त्याने केलेले विवेचन पटण्याजोगे आहेच. या विषयावर एक वेगळाच प्रकाशझोत टाकल्याबद्दल आभार. पु.भा.प्र.

In reply to by चित्रगुप्त

आनन्दा 22/09/2014 - 14:38
त्या मित्राला चरित्रहीन का म्हणावे?
+१००. ही टिपण्णी मला देखील पटली नाही. बाकी लेख आवडला. लेखाच्या गंभीर विषयाला ही टिपण्णी टाचणी लवते.

In reply to by चित्रगुप्त

मारवा 22/09/2014 - 17:10
केवळ लैंंगिक संबधां वर्तना पुरताच मर्यादीत धरतात. त्यांना उपरोधाने दिलेले हे उत्तर आहे इतकेच. मी ते डीरोगेटरी अर्थाने वापरत नाही.

विलासराव 22/09/2014 - 09:55
माहीत नाही स्त्री हा तसा गहन विषय आहे. मग हा उपद्व्याप हा? तुम्ही त्याची उकल पुर्णपणे कधी कधी करु शकत नाही. मग जेंव्हा कधी पुर्ण उकल झाली असेल ते आधी लिहा की राव

माहितगार 22/09/2014 - 09:56
धागा लेखातल पुरषी पात्र खरं असो वा काल्पनिक, फ्लर्टींग (मराठी शब्द ?) अथवा मोकळेपणाचे गैर अर्थ काढले जाऊन समोरची व्यक्ती (स्त्री) गृहीत धरली जात नाहीए हे पहाणे हि संबंधीत पुरषाची पहिली जबाबदारी आहे. समोरच्या व्यक्तीचा कोणत्याही पायरीवरून नाही म्हणण्याचा अथवा परत फिरण्याचा अधिकारातील परस्पर अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दलचा आदर हि दोन्ही बाजूंनी केले पाहीजे यात गल्लत होता कामा नये. मला या गोष्टीचा अनुभव नाही पण अर्थांचा खिस करताना अभिव्यक्ती स्वातंत्र्याच उल्लंघन होणार नाही गृहीत धरण्याची गल्लत होणार नाही हे महत्वाच. बाकी चालू द्यात.

In reply to by माहितगार

मराठीत "अनुनय " बाकी लेखातील काही वाक्ये जमली आहेत याबद्दल वादच नाही. "अनेक स्त्रीयांना एका जुन्या झालेल्या विवाहात सर्वात मोठी उणीव असते ती सौंदर्याच्या स्तुतीची (पुरुषा कडुन) कमतरता" "अनेक बहीरे झालेले जुनाट नवरे पुर्ण करुच शकत नाहीत" "मैत्रीची फ़्रेंडशिप ची आदिम गरज जितकी स्त्रीयांना असते ती ही जुन्या लग्नात पुर्ण होत नाही"

In reply to by माहितगार

मारवा 22/09/2014 - 17:18
नाही म्हणण्याचा अधिकार केव्हाही मान्य आहेच हो. पण अस बघा जेव्हा एखाद्या सार्वजनिक स्थळी जसे बस मध्ये ही चुकुन जरी पुरुषाचा धक्का लागला तरी ही ज्या कोणा स्त्री ला इंटरेस्ट नसेल तर ती तात्काळ दुर सरकेल एक सेंकंद ही स्पर्श सहन करणार नाही पुरुष ही तसाच वागेल. मात्र दहा मिनीट सलग स्पर्श आणि बोलणं ( दोन्ही सजेस्टीव्ह ) नर मादी या स्ट्रटेजीतुन केलेला हेतु उघड जाहीर करुन केलेला स्पर्श आणि संवाद दोन्ही काही काळ सहन करुन प्रतिसाद देउन मग अचानक नाकारणे ही एक वेगळी बाब आहे. याची माहीती असु द्यावी.

In reply to by नानासाहेब नेफळे

टवाळ कार्टा 22/09/2014 - 11:22
वा वा वा...आपलीच कमी होती ... जगातल्या सगळ्या बायकांनी येउन तुमच्या कानात सांगितले असेल ना?? तुम्ही शिक्षक आहात का? (साभार - चितळे मास्तर - पु.ल.)

In reply to by नानासाहेब नेफळे

मृत्युन्जय 22/09/2014 - 11:22
स्त्रीयांना थेट लैंगिक संबंधात इन्टरेस्ट नसतो तुम्हाला केवळ लैंगिक संबंधात इंटरेस्ट नसतो असे म्हणायचे आहे काय? काही काळापुर्वी (तुम्हाला वरीलप्रमाणे म्हणायचे असल्यास) हे विधान साधारणतः खपुन गेले असते. सध्या अशी परिस्थिती आहे असे वाटत नाही.. बादवे बर्‍याच पुरुषांनाही केवळ लैंगिक संबंधात इंटरेस्ट नसतो.

काउबॉय 22/09/2014 - 11:58
हा स्वभाव(प्लेटो व्याभिचार) निव्वळ स्त्रियांचा नसून अनेक पुरुषांचा देखील आहे असे वाटते. आपले मदन जी बाण यांचेच उदा. पहाना मर्यादा ओलांडली नाही त्यांनी.

बॅटमॅन 22/09/2014 - 12:33
शीर्षक पाहून मला तर आनलैन व्यभिचाराबद्दल धागा आहे की काय असं वाटून मोठ्या आशेने इ.इ. धागा उघडला, पण के एल पी डी अर्थात खास लम्हे पे धोका झालाच.

In reply to by बॅटमॅन

सौंदाळा 22/09/2014 - 13:42
के एल पी डी अर्थात खास लम्हे पे धोका झालाच.
के एल पी डी चा नविन सभ्य फुल फॉर्म (पण अर्थ मात्र तसाच)सांगितल्याबद्दल मंडळ आभारी आहे. B.H.M.B, HMT, A.B.C.D, JAPAN वगैरे अभ्यास केलेला डीग्रीबाज - सौंदाळा ;)

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

बॅटमॅन 22/09/2014 - 14:47
हेच्चेमटी आणि जपान म्ह. काय ते या पामरास व्यनि करून सांगणे. बाकी माहिती आहे ;)

विलासराव 22/09/2014 - 13:40
मुद्दलातच घोळ दिसतोय. आपण केला तर प्रेम/शिष्टाचार वगैरे समजावे. दुसर्याने केले तर भ्रष्टाचार्/व्याभीचार. आता झाले का सगळे सोपे?

आंबट चिंच 22/09/2014 - 14:32
गरजांची प्रामाणिक पुर्तता करुन वसुली साठी पुढे जसा सरकतो>>>>
ही ह्ही ह्ही खि क हायला माऊ प्रत्येक प्रतिसादाला
ब्र मगची
कॅसेट लावली आहेस. @ नाना ने:-
स्त्रीयांना थेट लैंगिक संबंधात इन्टरेस्ट नसतो.
. इथे थेट कोण करतंय? आम्ही नाय बा अम्ही तर ...... वापरतो.

मनीषा 22/09/2014 - 16:08
तुमच्या लेखात अगदीच तथ्यं नाही असे नाही. पण काहीसा एकाच बाजूने अथवा दृष्टीकोनातून लिहिलेलेला वाटला. स्त्रियांबद्दलची , तुमची विधाने फारच वरवरची आणि अवास्तव वाटली.

कवितानागेश 22/09/2014 - 18:52
तुमच्या मित्राला हे दाखवा. स्त्रीवाद ही ज्ञानशाखा सोडाच, एखाद्या व्यक्तीचा मूलभूत अधिकार नाकारला जातो आणि तरीही त्यात चूक त्या व्यक्तीचीही असते, हे म्हणण्यासाठी आधी लैंगिकता, उत्क्रांती, मानसशास्त्र, गुन्हेगारांचं मानसशास्त्र यांचा कोणी किती अभ्यास केला आहे? हे सगळं शिकायला, समजून घ्यायला खूप वेळ लागतो. तेवढा वेळ सगळ्यांनी घालवावा अशी अपेक्षाही नाही. पण ज्यांना थोडक्यात काहीतरी समजून घ्यायचं आहे त्यांनी हा चार्ट जरूर बघावा. हा प्रकाशित करण्याचं तत्कालिक कारण वेगळं होतं तरीही लैंगिकता, नकाराधिकार आणि व्यक्तिस्वातंत्र्य समजून घेण्यासाठी हा पुरेसा आहे - when does a woman owe you sex? मूळ स्रोत - When Does a Woman Owe You Sex? Check This Chart

In reply to by कवितानागेश

काउबॉय 22/09/2014 - 19:21
इथे हक्क न्हवे इच्छे बाबत चर्चा चालु आहे. स्त्रि ची अशी विटंबना होइल अशी वाक्य रचना टाळावी ही विनंती.

In reply to by कवितानागेश

मारवा 22/09/2014 - 20:01
तुम्ही दिलेली लिंक पुर्ण वाचली. मात्र आपला काहीतरी गैरसमज होत आहे. माझ्या मित्राने कुठलीही जबरदस्ती केली नाही आपण जे बोलत आहोत ते काही काही स्त्रीयांमध्ये ( जनरालाइज नाही ) एक दांभिकता असते त्याविषयी. त्यांना व्याभिचार तर करायचा असतो पण एका मर्यादेतच. किंबुहना व्याभिचार तर हवाहवासा वाटतो पण झोकुन देण्याचे धाडस नसते. मग त्या समोरच्या पुरुषाचा वापर केवळ चाळवण्यासाठी करतात. यामध्ये अर्थातच त्यांची कुचंबणा ही होत असते. त्या अस का वागतात याची ही जमेल तितकी चिकीत्सा करण्याचा प्रयत्न लेखात केलाय. चर्चा त्यांना असे का वागावे लागते त्या अस का वागतात. ? त्यामागील घटक कोणते ? त्याहुन मोठा प्रश्न माणुस असा दांभिक का होतो. ? या दिशेने चर्चा अपेक्षीत होती ती तशी न जाता नेहमीप्रमाणे चुकीच्या दिशेने वळलीय असे वाटते. सर्वच स्त्रीया अस वागतात असे म्हणायचे सुचवायचे नाही. स्त्री मनातील आंदोलने अशा वेळची टीपण्याचा प्रयत्न व्हावयास हवा अशी अपेक्षा आहे. आणि हा तर दोन जणांचा पुर्णपणे परस्पर संमतीचा च प्रश्न आहे. यात कुठलीही जबरदस्ती नाहीच मितवा या ग्रेस यांच्या ललित लेख संग्रहातील एक लेख आठवतो त्यात कवि ग्रेस यांना भेटायला एक विवाहीता आली माझे तुमच्यावर प्रेम आहे वगैरे म्हणाली तुमच्याच साठी आले इ. त्यावर ग्रेस यांनी विचारले मग घालाल का माझ्या गळ्यात गळा असे काहीसे ( लेख नीट आठवत नाही चुकभुल देणे घेणे पण ग्रेस यांचा रीअल लाइफ अनुभव मांडलाय ) तर त्या बाईंनी यावर कच खाल्ली माघार घेतली मग ग्रेस एक कवितेची ओळ देतात ( परत एकदा चुकभुल देणे घेणे वा मितवा वाचणे ) ढळतांना जे अडखळले ते फुल च असते सडले

In reply to by मारवा

कवितानागेश 22/09/2014 - 20:37
ती लिन्क इथे कही दिवसापूर्वी 'जबरदस्ती' बाबत दिली गेली असली, तरीही, मूळ चार्ट त्याबाबतीत नाही. प्रेमाची अभिव्यक्ती प्रत्येक वेळेस सेक्शुअल अ‍ॅक्टिव्हिटी करुनच होउ शकते असं नाही, असं मला वाटतं तुम्ही जो प्रसंग सांगताय तो का घडला किंवा अपेक्षाभंग का झाला , त्याला बरेच पैलू असू शकतात.

In reply to by मारवा

असंका 22/09/2014 - 23:46
स्त्री आणि पुरुषातील आकर्षण हे नैसर्गिक आहे. आता मर्यादा कुठे आखायची याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. स्त्रीचे ते स्खलन आणि पुरुषाचे ते (तो चरीत्रहीन असल्याने) प्रामाणिक ही वर्गवारी तशी माफक विनोदी आहे. आपला संपूर्ण लेखच अगोदर मी विनोदी म्हणून वाचला होता.पण आता परत आलो तर आपण वर कुणाशी तरी प्रतिवादही करत आहात? दोन्ही डगरीवर पाय नका हो ठेवू!

फुंटी 22/09/2014 - 20:06
या बाबतीत सरसकटीकरण करणे योग्य नाही.असो. स्त्रीयांचे चरीत्र ही अबाधित राहते व स्खलनातला आनंद ही पुर्ण उपभोगता येतो.>> कसकाय बुवा ?? काहीतरी अर्धवट राहणारच ना ..

चित्रगुप्त 22/09/2014 - 22:31
काही जणांमधे जर काही विशिष्ट गुण वा आवडी-निवडी असल्या, ज्यांचे घरच्या मंडळींकडून फारसे कौतुक होत नाही, वा त्यासाठी प्रोत्साहन मिळत नाही, तर असे कौतुक करणार्‍या लोकांविषयी एक आपुलकी वा ओढा निर्माण होत असतो. या लेखात दिलेल्या उदाहरणासारख्या बाबतीत अश्या प्रकारच्या ओढ्याचा भागही असू शकतो.

माहितगार 23/09/2014 - 08:54
या धागा लेखातली काही वाक्य उलट्या क्रमानी लावली तर धागा लेखक म्हणतो त्या पेक्षा चित्र जरास वेगळ दिसत का ? स्त्रीला परस्पर्ष केव्हा स्विकार्य वाटतात हा सरळ प्रश्न आहे का आधी
यामध्ये मग गरजु पुरुष मात्र एकमेव हेतुने वरील सर्व गरजांची प्रामाणिक पुर्तता करुन वसुली साठी पुढे जसा सरकतो
वसुली हा शब्द देण लागण्याशी असतो. लीमाउजेट यांनी देण = To owe च्या संबंधाने उपस्थित केलेला प्रश्न योग्य वाटत नाही का ? कोणत देण लागतात अस धागा लेखक अथवा त्यांच्या तथाकथित मित्राच मत आहे. या वाक्य ज्यावर दिलय तो आधीचा परिच्छेद पुन्हा खाली देतो
अनेक स्त्रीयांना एका जुन्या झालेल्या विवाहात सर्वात मोठी उणीव असते ती सौंदर्याच्या स्तुतीची (पुरुषा कडुन) कमतरता. वय वाढल्यानंतर हव्याहव्याश्या वाटणारय़ा रीअशुअर करणारया स्तुतीची गरज ही तहाने इतकी मुलभुत असते. त्याहुन मोठी गरज असते श्रोत्याची ( अथर्वशीर्षातील एक सुंदर ओळ म्हणते अव श्रोतारम ) ही गरज अनेक बहीरे झालेले जुनाट नवरे पुर्ण करुच शकत नाहीत. नंतर जो एक रोमॆंटीसीझम जो स्त्रीयांमध्ये अंगभुत असतो त्याला जुनाट नवरा अजिबात उपयोगी पडत नाही. या शिवाय जी एक मैत्रीची फ़्रेंडशिप ची आदिम गरज जितकी स्त्रीयांना असते ती ही जुन्या लग्नात पुर्ण होत नाही. शिवाय स्त्रीयांच्या पाचवीला पुजलेला सनातन एकटेपणा इ.इ. तर वरील सर्व गरजांची पुर्ती ही विवाहपश्चात व्याभिचारात होत असते.म्हणुन स्त्रीया मुळ वासनेपेक्षा ही अधिक फ़ोर्स असलेल्या वरील गरजांसाठी हा मार्ग चोखाळतात.
हि गरज वासनेची नाही भावनेची आहे हे जर धागा लेखकाच्या तथाकथित ज्ञानी मित्रास ठाऊक आहे तर ........ आता अजून एक आधीच वाक्य वाचा
तर झाले असे की त्याने नेहमीप्रमाणे एका स्त्री शी रीतसर सुत जुळवले......सर्व टप्पे ओलांडत तो आत्मविश्वासाने पुढे सरकु लागला. स्पर्श पायरीही गाठली.... आणि अचानक त्या स्त्री ने पुर्णपणे माघार घेतली आणि दहा मिनीटांचा सुचक स्पर्श सहन केल्यावर म्हणाली की तुम्ही जो स्पर्श केला ना खर तर तो मला अजिबात आवडला नाही.
गरज शारिरीक नव्हे मानसिक आहे याचं चारित्र्य(वान/हिन) गृहस्थास ज्ञान असूनही उपरोक्त वाक्यातला नेहमीप्रमाणे हा शब्द लगट करणे हा सवयीचा भाग असल्याचे सुचीत करत नाही का ? यात मोकळेपणाने बोलणारी अथवा फ्लर्टींग करणारी स्त्री अतृत्प असते हे पहिल गृहीत धरणं आहे; स्त्रीयांना पुरुषांनी पुढाकार घेऊन केलेला स्पर्ष आवडतो हे न लिहिलेल अध्याहृत गृहीत धरण हा यातला दुसरा भाग आहे. धागा लेखक अथवा त्यांचा मित्र स्त्रीयांना केव्हा आणि कोणते स्पर्ष स्विकार्य असतात हा प्रश्न लेखात विचारत नाहीत तर त्यांना ते हवं असत हे गृहीत धरताहेत किंवा कसं ? याला कायदे विषयक चिकित्सक नजरेनी पाहील तर आधी करून नंतर स्त्रीयांना हे हवच असत वाली सारवासारव आहे ? का व्हिक्टीम ब्लेमींग (मराठी शब्द ?) ?
तर चरीत्रहीन मित्राने सांगितले ते असे की काही स्त्रीयांचा हा छंद असतो. अशा स्त्रीया अगोदर स्वत:हुन पुढाकार घेतात, समोरच्याला पुर्ण पागल करतात काही पाउले ही त्याला पुढे टाकु देतात. आणि मग अचानक त्याला नकार देतात माघार घेतात, व स्वत:च्या वैवाहीक नैतिकतेची समोरच्या पुरुषाला जाणीव करुन देतात. आणि तो कस चुकीच करत आहे इ. इ. त्याला पटवुन देण्याचा प्रयत्न करतात. पुरुष नवखा असेल तर तो गोंधळुन जातो त्याला काहीच कळत नाही की अरे आता तर मला छान प्रतिसाद मिळत होता अचानक असे कसे झाले ?
इथे नेमकी कुणाची मानसिकता तपासण्याची गरज आहे आधी करून नंतर व्हिक्टीम ब्लेमींग करणार्‍यांची का स्त्रीयांची ? असे प्रश्न उपस्थित करणार्‍या बद्दल हे काय म्हणत असतील याची सध्या कल्पनाच करतो आहे
आणखी एक शब्द आहे प्लेटॉनिक टॉक म्हणजे कृतिहीन बोलणे याचा अर्थ नकारात्मक आहे जस कृतिहीन चर्चा (क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे) यावरील दोन शब्दावरुन मी एक नविन शब्द बनवला प्लेटॉनिक व्याभिचार
म्हणजे जी स्त्री यांच्या ज्ञानी मित्रांशी ते म्हणतात तसे केवळ भावनिक गरजे पोटी मोकळे पणाने बोलते ती एनकेन प्रकारेन व्याभिचारी या शिक्क्याची धनी आहे आणि त्यांच्या वसुली साठी देणं लागते, प्लेटॉनिक टॉक करणार्‍या बहुसंख्य स्त्रीया नकार देत असूनही अतृप्त स्त्रीयांना तृप्तता देण्याच महनीय समाज कार्य यांचा ज्ञानी मित्र पुन्हा पुन्हा करत राहतो , धागा लेखक इतर प्रतिसादकांना हे ही पटवून देऊ पाहतोय की हे आजीबात विनोदी नाहीए हे गंभीर आहे का विनोदी हे स्पष्ट करण धागा लेखकालाच शक्य आहे हे निश्चित धागा लेखातील एका परिच्छेदाकडे अनुषंगिक अवांतर चर्चेसाठी आपण पुन्हा येऊ
अनेक स्त्रीयांना एका जुन्या झालेल्या विवाहात सर्वात मोठी उणीव असते ती सौंदर्याच्या स्तुतीची (पुरुषा कडुन) कमतरता. वय वाढल्यानंतर हव्याहव्याश्या वाटणारय़ा रीअशुअर करणारया स्तुतीची गरज ही तहाने इतकी मुलभुत असते. त्याहुन मोठी गरज असते श्रोत्याची ( अथर्वशीर्षातील एक सुंदर ओळ म्हणते अव श्रोतारम ) ही गरज अनेक बहीरे झालेले जुनाट नवरे पुर्ण करुच शकत नाहीत. नंतर जो एक रोमॆंटीसीझम जो स्त्रीयांमध्ये अंगभुत असतो त्याला जुनाट नवरा अजिबात उपयोगी पडत नाही. या शिवाय जी एक मैत्रीची फ़्रेंडशिप ची आदिम गरज जितकी स्त्रीयांना असते ती ही जुन्या लग्नात पुर्ण होत नाही. शिवाय स्त्रीयांच्या पाचवीला पुजलेला सनातन एकटेपणा इ.इ. तर वरील सर्व गरजांची पुर्ती ही विवाहपश्चात व्याभिचारात होत असते.म्हणुन स्त्रीया मुळ वासनेपेक्षा ही अधिक फ़ोर्स असलेल्या वरील गरजांसाठी हा मार्ग चोखाळतात.
अशाच प्रकारच्या परिच्छेदात समकक्ष लेखन अमुक एका समुदायाच्या स्त्रीया अतृप्त असतात आणि त्यांना तृप्त करण्याची स्वाभाविक जबाबदारी तमुक समाजानी पार पाडली पाहीजे अशा स्वरूपाच लेखन करणारा कुणी समकालीन समाजोद्धारक या निमीत्ताने आठवतो का ? जस्टीफिकेशन काय तर अमुक समाजाच्या लोकांनी तमुक समाजाच्या बद्दल यापुर्वी अशीच कथा लिहिली ते लिहू शकतात तर आम्ही का नाही ? एकाने चूक केली म्हणून दुसर्‍याच्याही चुकीचे समर्थन होते आणि तेही असाहाय्य स्त्रीयांच्या शरीराचे बळी देऊन ? हा विशिष्ट प्रसंगही सोडून द्या हि एक्सक्युजेस (कि गद्धेगाळी ?) सर्वच प्रकारच्या समाजांच्या धर्मांच्या भाषेच्या प्रांताच्या लोकांकडून विवीध संघर्षात आपला अहंकार का सोय जपता येणारा सोपा स्त्रीयांना व्हिक्टीम बनवण्याचा मार्ग स्विकारून पुन्हा व्हिक्टीम ब्लेमींग करत असतात आणि पुन्हा उजळ माथ्याने समर्थनही केले जाते ? लीमाउजेटांनी उल्लेख केलेल्या चार्टात समुहसंघर्षातून स्त्रीया देणे लागतात का याचा अद्याप उल्लेख नसावा तसेही To owe आणि To own यातला फरक न समजणार्‍यांसाठी कुणीतरी तो चार्ट उपरोक्त भारतीय संदर्भांनी मराठीत बनवणे ऊपयूक्त ठरेल असे वाटते स्त्रीयांना स्पर्ष केव्हा स्विकार्य असतात या बद्दल चर्चा करा प्लॅटॉनिक गोष्टींबद्दल प्लॅटॉनिक चर्चा करण्याची भूक अवश्य भागवून घ्या. स्वयंनिर्णय घेण्यास पात्र दोन वयस्क व्यक्ति आपापसात परस्पर अभिव्यक्ती स्वांतंत्र्याचा आदर करून काय संबंध परस्पर स्थापित करतात हा त्यांचा त्यांचा प्रश्न आहे त्या बद्दल चर्चा करा ना नाही; परंतु हा विशीष्ट धागा लेख काही वेगळेच सुचीत तर करत नाही ना असे वाटल्याने चिकित्सा केली. कदाचित तसे नसेलही. धागा लेखक आणि इतर वाचक हो चु.भू दे.घे.

अजया 23/09/2014 - 09:42
माहितगार, एक स्त्री असूनही एवढा समर्पक प्रतिसाद लिहिता अाला नसता!धन्यवाद!!

सुबोध खरे 23/09/2014 - 10:53
आमच्या एका नौदलातील मित्राची बायको तोकडे कपडे घालून लग्न न झालेल्या( बँचलर) अधिकाऱ्यांच्या मेस च्या रस्त्यावर सकाळी धावायला जात असे. इतर वेळेसही ती पुरुषांशी( विशेषतः लग्न न झालेल्या) जरा "जास्तच मोकळे" पणाने बोलत असे किंवा बोलता बोलता त्याला स्पर्श करीत असे आणि मग एखादा पुरुषाने या स्पर्शाच्या पुढे जाण्याचा प्रयत्न केल्यास त त्याला फटकारत असे. यामुळे तिच्या बद्दल तेथे बरेच गैरसमज पसरले होते. तिचा नवरा हा अतिशय देखणा होता. नौदलात अभियंता म्हणून उच्च पदावर होता. परंतु तो आपल्या वयाप्रमाणे वागत असे (त्यांचा मुलगा तेंव्हा दहावीत होता) आणि त्याची बायको नवीन लग्न झाल्यासारखी वागत असे. तिचा आंतरजातीय प्रेमविवाह होता. नवरा बायकोचे व्यवस्थित प्रेम होते आणि त्यांच्यात कोणताही बेबनाव नव्हता. असे वागणे तिचे सर्वच पुरुषांशी नव्हते (कि ती जरा जास्तच मोकळी आहे म्हणून सोडून द्यावे). याची मनोवृत्ती थोडीशी लेखात वर्णन केल्या प्रमाणे होती. अनेक स्त्रीयांना एका जुन्या झालेल्या विवाहात सर्वात मोठी उणीव असते ती सौंदर्याच्या स्तुतीची (पुरुषा कडुन) कमतरता. वय वाढल्यानंतर हव्याहव्याश्या वाटणारय़ा रीअशुअर करणारया स्तुतीची गरज ही तहाने इतकी मुलभुत असते. त्याहुन मोठी गरज असते श्रोत्याची ( अथर्वशीर्षातील एक सुंदर ओळ म्हणते अव श्रोतारम ) ही गरज अनेक बहीरे झालेले जुनाट नवरे पुर्ण करुच शकत नाहीत. नंतर जो एक रोमॆंटीसीझम जो स्त्रीयांमध्ये अंगभुत असतो त्याला जुनाट नवरा अजिबात उपयोगी पडत नाही. या शिवाय जी एक मैत्रीची फ़्रेंडशिप ची आदिम गरज जितकी स्त्रीयांना असते ती ही जुन्या लग्नात पुर्ण होत नाही. याचे कारण त्या दोघांच्या कामवासनेत असलेला फरक असावा. तिने यासाठी मला आणि माझ्या बायकोला डॉक्टर म्हणून सल्ला सुद्धा विचारला होता. यामुळे वरील वर्णन हे अतिरंजीत आहे असे मला वाटत नाही. मुळात असा फरक (mismatched libido) हा थोड्या फार प्रमाणात १०० टक्के जोडप्यात असतो. आणि याला वाट करून देणे हे तितके सोपे नाही. बरेचसे पुरुष यासाठी पोर्नोग्रफिचा आधार घेतात.काही थोडे बाहेरख्यालीपणा वेश्यागमन इ इ करतात. पण तसा आधार स्त्रियांना सहज उपलब्ध नाही आणि समाजमान्य सुद्धा नाही. मग त्या असा कुठेतरी आधार शोधू पाहतात. अर्थात हि सर्व गृहीतके आहेत प्रत्येक प्रकरणी असेच असेल असेही नाही. स्त्रीला प्रत्येक वेळेस संभोगसुखच हवे असेल असे नाही तर साथीदार हवा असेल मानसिक आधार हवा असेल. आणि त्याचा सार्थ बरेच पुरुष तिला शरीरसुख हवे असा काढतात आणि म्हणून जेंव्हा ती स्त्री एका विशिष्ट पातळीच्या पुढे जाण्यास नकार देते तेंव्हा ते गोंधळून जातात. कारण त्यांच्या दृष्टीने एखादी स्त्री त्याचा हात हातात घेते याचा अर्थ ती शेवटपर्यंत जायची इच्छा ठेवते असा असतो. जात जाता एक किस्सा-- मी लष्कराच्या कोर्स साठी लखनौ ला गेलो असता तेथे आम्हाला एक आठवडा कॅम्प साठी एका माळरानावर पाठविले होते. त्यात एक दिवस पौर्णिमा होती. तेंव्हा माझ्या वर्गातील एका मुलीने मला रात्री फिरायला चल म्हणून विनंती केली. (तिचा प्रेमविवाह झालेला होता आणि तिचा नवरा आम्हाला चार वर्षे वरिष्ठ होता आणि लष्करातच होता.) आम्ही कॅम्प च्या बाजूला फिरायला गेलो असता मी तिला विचारले कि तू मला फिरायला चल असे का म्हणालीस.( आम्ही एम बी बी एस ची साडेचार वर्षे एकत्र होतो त्यामुळे तेवढा मोकळेपणा होता). त्यावर ती मला सरळ म्हणाली मला अजितची( तिच्या नवर्याची) आठवण येत होती आणि चांदण्यात पुरुषाबरोबर फिरावेसे वाटत होते. पण दुसर्या कुणाबरोबर जावे तर लोक वेगळा अर्थ काढतील. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे कि तू कोणताही गैरसमज करून घेणार नाहीस. ( मी मुंबईचा होतो त्यामुळे स्त्रीपुरुशात निकोप मैत्री असू शकते यावर माझा पूर्ण विश्वास आहेआणि उत्तर भारतिय पुरुषांसारखा संकुचित दृष्टीकोन नाही हे तिला साडेचार वर्षे एकत्र काढल्यामुळे माहित होते). आम्ही वीस पंचवीस मिनिटे फिरून परत आलो. याची आम्ही वाच्यता केली नाही कि त्याबद्दल कुठेही चर्चा झाली नाही.

In reply to by सुबोध खरे

स्त्रीयांना थेट शरीर संबंधात इंटरेस्ट नसतो वा फार कमी असतो ,या माझ्या विधानाला पुष्टी देणारी बरीच उदाहरणे याच धाग्यात आली आहेत. उपरोक्त उदाहरण याच प्रकारची पुष्टी देत आहे.

In reply to by नानासाहेब नेफळे

सुबोध खरे 23/09/2014 - 19:47
हे विधान अर्धसत्य आहे. स्त्रियांची कामवासना पुरुषांच्या इतकीच प्रगल्भ असते हे सिद्ध झालेले आहे. परंतु बालपणापासूनच "हे" वाईट असे कानी कपाळी ओरडून सांगितले जाते. स्त्री हि क्षणाची पत्नी आणि अनंत कालची माता अशा तर्हेच्या वाक्यांच्या प्रभावामुळे सुद्धा विवाहानंतर त्यांचे मत परिवर्तन होत राहते. अशा सामाजिक दबावामुळे त्यांचे मत सेक्स बद्दल कलुषित होत असते शिवाय वाढत्या वयात पुरुषांचे नको असलेले स्पर्श सहन करीतच त्यांचे आयुष्य पुढे जात असते त्यामुळे एक तर्हेचा पूर्वग्रह प्रस्थापित होत जातो. ज्या समाजात स्त्रियांना बरेच स्वातंत्र्य मिळते तेथे स्त्रिया शरीरसंबंधात पुढाकार घेताना दिसतात अर्थात संस्कृती रक्षक याला promiscuous(स्वैराचारी) म्हणतात. यानंतर विवाहानंतर जेंव्हा प्रत्यक्ष संभोग सुखाचा अनुभव मिळतो त्यात बर्याच वेळेस पुरुष स्त्रियांना गृहीत धरतात. तिला रतीनिष्पत्ती (ORGASM) होतो कि नाही या बद्दला बर्याच पुरुषांना काहीही घेणे देणे नसते. मुळात स्त्रीचा संभोग सुखाचा अनुभव हा दीड मिनिटात संपणाऱ्या पॉप संगीतासारखा नसून सावकाश फुलणाऱ्या रागदारी सारखा असतो त्यामुळे पुरुषाने स्त्रीला फुलविण्याचा प्रयत्न केलाच नाही तर विलंबित सुरु होताहोताच मैफिल संपल्याचा वैफल्यग्रस्त अनुभव तिला येतो. असा अनुभव वारंवार आला तर मुल जसे एखादा कॉम्पुटर गेम हरत असेल तर बंद करून टाकते आणी त्याला तो परत खेळावासा वाटत नाही. तद्वत स्त्रीला नुसते हवेत चढून खाली आपटण्यात रस राहत नाही. मग असा अनुभव घेण्य़ापेक्षा पुढाकार न घेणेच तिला सोयीस्कर वाट्त राहते. अर्थात केवळ एवढेच सत्य असेल असाही माझा दावा नाही. पूर्ण सत्य याहूनही बरेच सखोल आणी गहन असेल.

In reply to by सुबोध खरे

या धाग्यावर बोला!! स्त्री मुक्ती आंदोलन, झिंदाबाद!!! या अनुषंगानं भन्नाट चर्चा झाली होती. आणि नेमका हाच विचार त्यावेळी मी तिथे मांडला होता!

In reply to by सुबोध खरे

कवितानागेश 23/09/2014 - 21:57
हा एक खूपच महत्त्वाचा मुद्दा आहे, जो कसा मांडावा हे मला कळत नव्हतं... शिवाय वाढत्या वयात पुरुषांचे नको असलेले स्पर्श सहन करीतच त्यांचे आयुष्य पुढे जात असते त्यामुळे एक तर्हेचा पूर्वग्रह प्रस्थापित होत जातो.> हा केवळ पूर्वग्रह नसतो, तर तो trauma असतो. अगदी मोठं होउन लग्न झाल्यानन्तरही अश्या पूर्वीच्या भीषण अनुभवातून गेलेल्या स्त्रिया स्त्रीपुरुष संबंधात सुरुवातीला कचरतात. अजून खोलात जाउन विश्लेषण करायचं झालं तर स्पर्शात 'भोगा'ची भावना असेल तर कचरतात, आपलेपणा असेल, आदर असेल, तर मोकळ्या होण्याची शक्यता असते. त्याशिवाय chemistry हा भाग आहेच. असो.

In reply to by सुबोध खरे

प्रसाद१९७१ 24/09/2014 - 14:00
हे विधान अर्धसत्य आहे. स्त्रियांची कामवासना पुरुषांच्या इतकीच प्रगल्भ असते हे सिद्ध झालेले आहे.
प्रगल्भतेची व्याख्या ह्या बाबतीत माहीती नाही, पण माझ्या अनुभवा प्रमाणे पुरुष सेक्स चा जवळ जवळ सतत ( More frequently ) करत असतो, पण स्त्रियांना जरी कामवासना असली तरी त्या सतत त्याच्या बद्दल विचार करत नसतात.

In reply to by सुबोध खरे

मारवा 23/09/2014 - 21:41
तुमचा प्रतिसाद अतिशय आवडला अतिशय प्रामाणिक अनुभवावर आधारीत व त्यातील मिसमॅच्ड लिबीडो वर केलेले मत अतिशय मार्मिक आहेत. मात्र तुम्ही मुंबईचे आहात म्हणुन विशाल द्रुष्टीकोणाचे उत्तर भारतीय पुरुष संकुचित हे सरसकटीकरण धक्कादायक वाटलं, त्यासाठी तुमच्या मैत्रीणीच्या मानसिकतेचा मी निषेध करतो. मी खर म्हणजे वरील माझ्या लेखात अनेक मुद्दे नाइलाजाने टाळले त्यामुळे अनेक गैरसमज निर्माण झाले. माझ्या संकोचाचे कारण सेन्सॉर चे भय यामुळे होत काय की फार जपुन जपुन लिहाव लागत आणि त्यामुळे आणि सध्या एक नविन गोष्ट माझ्या ल़क्षात आली ती अशी की माझ्या शैली मुळे देखील गैरसमज होतात. माझ्या चरीत्रहीन मित्रा बरोबर झालेल्या चर्चा अजुन विस्ताराने मांडण्याचा मानस आहे. बघु या जमत का

In reply to by मारवा

मदनबाण 24/09/2014 - 12:17
विवाहानंतर जेंव्हा प्रत्यक्ष संभोग सुखाचा अनुभव मिळतो त्यात बर्याच वेळेस पुरुष स्त्रियांना गृहीत धरतात. तिला रतीनिष्पत्ती (ORGASM) होतो कि नाही या बद्दला बर्याच पुरुषांना काहीही घेणे देणे नसते. मुळात स्त्रीचा संभोग सुखाचा अनुभव हा दीड मिनिटात संपणाऱ्या पॉप संगीतासारखा नसून सावकाश फुलणाऱ्या रागदारी सारखा असतो त्यामुळे पुरुषाने स्त्रीला फुलविण्याचा प्रयत्न केलाच नाही तर विलंबित सुरु होताहोताच मैफिल संपल्याचा वैफल्यग्रस्त अनुभव तिला येतो. असा अनुभव वारंवार आला तर मुल जसे एखादा कॉम्पुटर गेम हरत असेल तर बंद करून टाकते आणी त्याला तो परत खेळावासा वाटत नाही. तद्वत स्त्रीला नुसते हवेत चढून खाली आपटण्यात रस राहत नाही. मग असा अनुभव घेण्य़ापेक्षा पुढाकार न घेणेच तिला सोयीस्कर वाट्त राहते. अर्थात केवळ एवढेच सत्य असेल असाही माझा दावा नाही. पूर्ण सत्य याहूनही बरेच सखोल आणी गहन असेल.strong> डॉकशी परत एकदा पूर्णपणे सहमत ! हा प्रतिसाद वाचुन उगाच २ वर्षा पूर्वी पाखरां बद्धलची एक चिंटुकली पिंटुकली चावट पाकॄ लिहल्याचे आठवले ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- ई निविदा घोटाळा प्रकरण : महापालिकेचे नऊ अभियंते निलंबित

In reply to by मदनबाण

टवाळ कार्टा 24/09/2014 - 12:46
हा प्रतिसाद वाचुन उगाच २ वर्षा पूर्वी पाखरां बद्धलची एक चिंटुकली पिंटुकली चावट पाकॄ लिहल्याचे आठवले !
हायला...काय सुसाट आहे पा.क्रु. (चायला तो "कॄ" कसा लिहितात कोणी सांगेल का?)

In reply to by सुबोध खरे

प्रसाद१९७१ 01/10/2014 - 09:25
खरे साहेब - माझे एक निरिक्षण. पटले नाही तर सोडुन द्या. तुमच्या मैत्रिणी बरोबरचा प्रसंग नक्कीच २०-२५ वर्ष जुना असेल. पण तुम्हाला तो आजही स्पष्ट आठवतो, हे काहीतरी सांगतय. :-) एखादी घडुन गेलेली गोष्ट जर मनात पुन्हा पुन्हा घोळली गेली नाही तर ती विस्मृतीत जाते. तुमच्या तो प्रसंग आठवणीत आहे म्हणजे तुमच्या मनात गेली २०-२५ वर्षे तो प्रसंग मधे मधे येतो आहे. ह्यातुन काय कळते तुमचे तुम्हालाच तुमच्या बद्दल. :-)

In reply to by प्रसाद१९७१

टवाळ कार्टा 01/10/2014 - 09:35
वरचा प्रतिसाद जर कोपरखळी नसेल तरच माझा हा प्रतिसाद वाचावा (नाहीतर ढुंकूनसुध्धा नका बघू :) ) यातून २ गोष्टी नक्कीच समजतात १ - डॉ. यांना तिक्ष्ण स्मरणशक्ती आहे २ - तुम्ही ४०शी पार केली पण अजून निखळ मैत्री काय असू शकते ते माहित नाही

In reply to by पैसा

प्रसाद१९७१ 01/10/2014 - 09:47
असे प्रसंग रोज रोज घडत नसतात. डॉक्टर विसरले असते तरच प्रॉब्लेम म्हणायला पाहिजे!
तेच तर म्हणतो मी. हा प्रसंग डॉकटरांसाठी "खास" बनुन राहीला इतके वर्ष. म्हणुन तर मुद्दाम विचारले.

In reply to by प्रसाद१९७१

सुबोध खरे 01/10/2014 - 10:04
प्रसाद साहेब, माझ्या मैत्रिणीचा नवरा (अजित) हा आम्हाला मेडिसिन शिकवायला होता.ते आमच्यापेक्षा चार वर्षे वरिष्ठ होते त्या शिकवण्याच्या काळात त्यांचे प्रेम जमले त्यामुळे ते आमच्या गटाकडे "जास्त" लक्ष देत असत .या बद्दल पण आम्ही त्याना चिडवत होतो. त्याना आमच्या ब्याचचा जावई म्हटले जात असे. मुळात तो शिक्षक म्हणून अतिशय चांगला होता आणि अतिशय सज्जन होता. पुढे त्याना ( अजितना ) मेंदूचा ट्युमर झाला. तेंव्हा ते उपचारासाठी कमांड हॉस्पिटल पुणे येथे होता. त्यानची शल्यक्रिया झाली त्यातून ते सुधारले. पण काही वर्षांनी ट्युमर परत उपटला आणि त्यात दुर्दैवाने त्यांचे देहावसान झाले. या सर्व कालावधीत मी पुण्यातच पोस्टेड होतो त्यामुळे मी या दुर्दैवी घटनांचा साक्षीदार होतो. आपण म्हणता तसा मला मैत्रिणीबद्दल "सोफ्ट कॉर्नर" मुळीच नव्हता. शिवाय दुर्दैवाने आमच्या वर्गातील एकही मुलगी मला "तशी" आवडली नव्हती. त्यामुळे उगाचच कोणत्याहि मुलीवर लाईन मारणे हे माझ्या स्वभावात नव्हते.(काही मुलीना मी आवडलो होतो पण उगाच स्टाइल मारण्यासाठी त्यांना मोटारसायकल वर फिरवणे माझ्या स्वभावात बसणारे नव्हते). त्यामुळे मी "इनोसंट" आहे असा माझ्या वर्गातील मुलींचा माझ्याबद्दल समज होता. गंमत म्हणजे असे त्यातील एका मुलीने माझ्या बायकोला नंतर बोलूनही दाखवले.

In reply to by सुबोध खरे

प्रसाद१९७१ 01/10/2014 - 10:41
डॉ साहेब, शीताफीने मूळ प्रश्नाला बगल दिलीत. मी विचारले होते की २५ वर्ष जुना असा एक छोटासा प्रसंग ( तो सुद्धा तुम्हाला सॉफ्ट किंवा कसलाच कॉर्नर नसलेल्या व्यक्तीच्या बाबतीत घडलेला ) अजुन स्पष्ट आठवतो आहे, ते कसे काय? इतकाच प्रश्न होता. ट.का. म्हणतोय तशी तुमची स्मरणशक्ती तीक्ष्ण आहे असे मानुन चालू.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

प्रसाद१९७१ 01/10/2014 - 14:55
नाही हो, काही नाही. मी डॉक्टर साहेबांचा फॅन आहे. त्यांचे मिपा वर लिखाण दिसले ( प्रतिसाद सुद्धा ) की लगेच वाचतो. त्यामुळे डॉक्टरांना त्रास द्यायचा हेतू अजिबात नाही. मी विचार करत होतो की माणुस काय गोष्टी स्मरणात ठेवतो आणि त्या का ठेवतो ह्या बद्दल.

In reply to by प्रसाद१९७१

सुबोध खरे 01/10/2014 - 19:37
प्रसाद साहेब माझी स्मरणशक्ती एकदम तीक्ष्ण आहे. सगळं कसं स्वच्छ आणि स्पष्टपणे आठवतं. फक्त मला तीनच गोष्टी आठवत नाहीत १) माणसांची नावे २) माणसांचे चेहेरे ३) तिसरं काय बरं ? आत्ता नेमकं आठवत नाहीये. *pleasantry* *db* :db:

In reply to by सुबोध खरे

एस 03/10/2014 - 11:25
माझी स्मरणशक्ती एकदम तीक्ष्ण आहे. सगळं कसं स्वच्छ आणि स्पष्टपणे आठवतं. फक्त मला तीनच गोष्टी आठवत नाहीत १) माणसांची नावे २) माणसांचे चेहेरे ३) तिसरं काय बरं ? आत्ता नेमकं आठवत नाहीये.
सेम पिंच डॉक्टर! मलाही नेमक्या कुठल्या तीन गोष्टी आठवत नाहीत हे आठवता आठवता तुमचा हा प्रतिसाद दिसला! म्हटलं विसरायच्या आत नोंद करून ठेऊ. ;-)

In reply to by प्रसाद१९७१

चित्रगुप्त 02/10/2014 - 20:18
स्मरणशक्ती बद्दल माझा अनुभव नमूद करू चाहतो: मला माझ्या बालपणातले आणि तरूणपणातले सर्व व्यवस्थित आठवते, परंतु मी काल काय खाल्ले, काय केले, गेल्या आठवड्यात वा महिन्यात काय काय घडले, वगैरे आठवायला फार त्रास होतो, खरेतर आठवतच नाही. असे काही वर्षांपासून झालेले आहे.

In reply to by टवाळ कार्टा

प्रसाद१९७१ 01/10/2014 - 09:46
अहो अनेक प्रसंगातुन ( ज्यात त्यांना वेगवेगळ्या मित्रांनी फिरायला बोलवले असेल ) डॉ साहेबांना हा २५ वर्ष लक्षात राहीला. काहीतरी उजळणी झालीच असेल ना मनात. बादवे, मला डॉ साहेबांच्या उत्तराची उत्सुकता आहे.

कवितानागेश 23/09/2014 - 11:09
क्लीयर थिन्किन्गः सरळ म्हणाली मला अजितची( तिच्या नवर्याची) आठवण येत होती आणि चांदण्यात पुरुषाबरोबर फिरावेसे वाटत होते. पण दुसर्या कुणाबरोबर जावे तर लोक वेगळा अर्थ काढतील. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे कि तू कोणताही गैरसमज करून घेणार नाहीस. > ही मॅच्युरिटी किंवा आपल्याला नक्की काय हवय हे प्रत्येक व्यक्तीला नेहमीच कळतं असं नाही. त्यातूनच गैरसमज होत रहातात. EQ चांगला असेल तर १ सेकंदात कळतं, की समोरच्या व्यक्तीला आपण केलीली गोष्ट आवडलेली नाही/ आवडली. मग पुढची complications होत नाहीत. :)

In reply to by कवितानागेश

माझ्या मते अनेक माणसांना आपल्या भावना आपल्या ताब्यात आहेत. विशेषतः समाजात आपली प्रतिमा निर्माण करतांना आपल्या लैंगिक भावना ह्या पूर्णपणे आपल्या कह्यात आहेत असे अनेकांना वाटते तसे खरच असते का.

In reply to by सस्नेह

टवाळ कार्टा 23/09/2014 - 13:05
..ताऱ्यांचा उगम जमिनीपासून दीड फुटावर झाला असल्याचे जाणवते.
घोर अन्याय...stereotype करण्याचा प्रयत्न...लेखात दिलेली वस्तुस्थीती असुच शकत नाही असे दाखवण्याचा प्रयत्न

In reply to by टवाळ कार्टा

सस्नेह 23/09/2014 - 13:23
लेखात दिलेली वस्तुस्थीती असुच शकत नाही असे दाखवण्याचा प्रयत्न
नाही. 'कल्पनेचे तारे ' असे म्हणण्याचे कारण असे की लेखकाने व्यक्त केलेली मते ही घडलेल्या घटनेचे प्रत्यक्ष वर्णन नसून लेखकाच्या मतानुसार केलेले विश्लेषण आहे. तसेच त्यांच्या मित्राने कथन केलेल्या गोष्टी म्हणजे घडलेल्या गोष्टीचे त्यांना वाटलेले सापेक्ष निवेदन आहे असे लेखावरून दिसत आहे.

In reply to by सस्नेह

विलासराव 23/09/2014 - 13:47
मीतर वाचलय की सॉक्रेटीस कुठले तरी पुस्तक ३०-३५ वर्शे लिहीत होता, सुधारणा करत होता. अचानक एकदा त्याच्या घराबाहेर गोंगाट झाला . तो बाहेर आला तर कोणीतरी कोणालातरी गोळी मारली होती आनी ती व्यक्ती ठार झाली होती. दिवसाढवळ्या ही घटना घडल्याने त्याने बर्याच जनांशी संवाद साधला आनी ईतकी वेगवेगळी उत्तरे त्याला मिळाली ही तो हैराण झाला. प्रत्यक्ष घटणेचे हे हाल तर मी माझे जीवनभरचे अनुभव्/घटना लिहीतोय त्यात काय तथ्य आहे असे वाटून त्याने ते लिहीलेले कागद जाळून टाकले. सोर्स: ओशोंचे कुठलेसे पुस्तक.

In reply to by प्यारे१

विलासराव 23/09/2014 - 18:20
गल्ली चुकलं की तुमचं ते! प्यारेकाका सार घ्या त्या कथेतुन. कशाने का मरेना.बाकी तुमची मर्जी. बाकीच्यांकडुन फार अपेक्षा नाहीतच पण प्यारेकाका तुम्हीसुद्धा????

In reply to by विलासराव

प्यारे१ 23/09/2014 - 18:49
मला 'परिपूर्ण एकटेपणा' धाग्यावरचा प्रतिसाद वाटलेला. माझंच गल्ली चुकलेलं दिसतंय. लोड नका घेऊ. होतंय कंदी कंदी!

In reply to by प्रसाद१९७१

प्रसाद भौ, त्यांनी गोळी मारली असे लिहले आहे, बंदुकीतुनच मारली असा त्यांचा दावा नाही . ब्रुसलीच्या एका चित्रपटात तो अंगठ्याखाली तर्जनी ठेऊन त्यामधे छर्रा पकडून एका व्हिलनला मारतो व त्याच्या कपाळात छर्रा घुसल्याने तो व्हिलन मरतो. साँक्रटीसच्या काळी एखादा ब्रुसली असेल.

In reply to by पैसा

सुबोध खरे 23/09/2014 - 19:58
तसेच त्यांच्या मित्राने कथन केलेल्या गोष्टी म्हणजे घडलेल्या गोष्टीचे त्यांना वाटलेले सापेक्ष निवेदन आहे असे लेखावरून दिसत आहे. या वरून मला असे वाटते

In reply to by पैसा

टवाळ कार्टा 23/09/2014 - 20:10
मग ते त्यांनाच सांगुदेकी...एका आणाहितेला काही विचारले की ती येते की नाही याऐवजी कोणी दुसरी येतेच...एकीचे बळ अगदी ठसठसून दिसते ;)

In reply to by टवाळ कार्टा

पैसा 23/09/2014 - 20:43
हां गैरसमज तुमच्याबद्दल असता तरी सांगितलं असतं हो! तिला डोक्टरना म्हणायचं असतं तर त्याना उपप्रतीसाद दिला असता नाही का! गैरसमज दूर होणं महत्त्वाचं.

In reply to by टवाळ कार्टा

सस्नेह 23/09/2014 - 21:27
मीटिन्गमधे अडकले होते ऑफिसात म्हणून देऊ शकले नाही उत्तर हो टवाळभौ. पण पैतैने दिलेय ना माझ्यावतीने !

In reply to by सुबोध खरे

सस्नेह 23/09/2014 - 21:24
माझा प्रतिसाद मूळ लेखावरच आहे हो सुबोधजी. तिरक्या होत गेलेल्या लेवलमुळे तुमच्या प्रतिसादाखाली आला की काय ?

vikramaditya 23/09/2014 - 22:21
अनेक गोष्टी आपल्याला ज्ञात नसतात किंवा आपल्याला त्याचा कधी अनुभव आलेला नसतो. (खरं म्हणजे 'सत्य हे आपल्या कल्पनेच्या फार पलिकडे असु शकते' असे म्हणणार होतो. पण परत तो 'सत्याचा' विषय नको.) त्यामुळे आपल्या माहिती/अनुभव विश्वापलीकडील एखाद्या प्रसंग वा घटनेविषयी 'असे होउच शकत नाही' असा दावा करणे अयोग्य वाटते. आपल्या लाडक्या मिपाच्या भाषेत ' बाकी चालु द्या.'

In reply to by धडपड्या

बॅटमॅन 24/09/2014 - 15:55
सर्व मुस्लिम समाजात नव्हे. फक्त काही देशांत, मुख्यतः आफ्रिकन देशांत. अन ही प्रथा इस्लामपूर्व काळापासून चालू आहे.

निमिष सोनार 26/09/2014 - 15:16
दहा मिनीटांचा सुचक स्पर्श सहन केल्यावर म्हणाली की तुम्ही जो स्पर्श केला ना खर तर तो मला अजिबात आवडला नाही. चरीत्रहीन मित्र अनुभवी असल्याने त्याने तात्काळ विषय संपवला. यामध्ये मग गरजु पुरुष मात्र एकमेव हेतुने वरील सर्व गरजांची प्रामाणिक पुर्तता करुन वसुली साठी पुढे जसा सरकतो तशा मग मात्र पुर्ण सावध असलेल्या चरीत्राची काच जपणारया स्त्रीया मग माघार घेतात. प्रियकर लहान असेल तर मग अशा स्त्रीया लगेच पेरेंटल मोड मध्ये जातात, व पालकाच्या भुमिकेतुन शिकवणी घेउ लागतात. यात मजा अशी असते की स्त्रीयांचे चरीत्र ही अबाधित राहते व स्खलनातला आनंद ही पुर्ण उपभोगता येतो वरील उदाहरणातील - यात स्खलनातला आनंद कुणाला उपभोगता येतो असे लेखकाला म्हणायचे आहे? मला वाटते "स्त्रीला"!! तसे जर असेल तर तीला दहा मिनिटांच्या "त्या" स्पर्शात "स्खलन" म्हणजे ओरगैजम सारखे सुख अनुभवता येते. पण पुरुष बिचारा, त्याचे काय ?? त्याने काही "अनुभवण्या" आधी त्याला माघार घ्यावी लागली. एनीवे, विषय खूप छान आणि वेगळा आहे. आणखी माझे मत सविस्तर मांडेन. आता वेळ नाही.... टीप: स्खलन म्हणजे ejaculation असा अर्थ मी घेतला आहे. चू. भू. द्या. घ्या.

In reply to by निमिष सोनार

ओ दादा, वीर्यस्खलन नाय हो स्खलन. शब्दश: अर्थ, बहुधा पडणे (अध:पतन या अर्थाने) च्यायला, दहा मिनिटांच्या सूचक स्पर्शाने orgams?? आणि तथाकथित संस्कृतीरक्षक विचारतात, लैंगिक शिक्षणाची गरज काय म्हणून.

चैदजा 28/09/2014 - 20:24
तिने स्पष्ट सांगितले की स्पर्श मला आवडला नाही. मग तिने स्खलनातला आनंद ही पुर्ण उपभोगला, हे तुम्ही कसे सांगु शकता ? तुम्ही म्हणता त्यप्रमाणे अशा स्त्रीया मानसिक पातळी वर च केवळ व्याभिचार करत असतात. तुम्ही कबुल करता, असे वागणे हा व्याभिचार आहे. काही स्त्रियांना हे १० मिनीटात समजते, काहींना तो १० वर्षांनी बावळटपणावाटतो. (या वाक्याला खरे साहेबांच्या लेखा वरील बाणाला बाण प्रतिसादांचा आधर आहे.)

कवितानागेश 28/09/2014 - 23:23
एक मानसिक पातळीवर सर्व काही अनुभवुन घेतात आणि द मोमेंट तो पुरुष पुढे सरकला की त्याला ब्रेक मारतात.>> हे गृहितकच फार गमतीदार आहे. जर का मानसिक पातळीवर असं सगळं अनुभवता येत असेल, तर कुणातरी व्यक्तीमध्ये प्रत्यक्ष वेळ कशाला वाया घालवायचा?? सगळ्या स्त्रिया आणि सगळे पुरुष एकटेच मजेत रहातील. तसेही उपरोक्त बाईनी 'आवडलं नाही' असं स्पष्ट साम्गितलं असताना 'तिला खरं तर आवडलं होत्तच्च मुळ्ळी!' असा हट्ट का धरलाय कळलं नाही.

In reply to by कवितानागेश

मारवा 29/09/2014 - 21:30
कारण अशा स्त्रीयांना मानसिक पातळीवर समाधान मानुन घ्यावे लागते ही त्यांची मजबुरी असते. दुधाची तहान ताकावर भागवणे म्हणतात असे. सगळच मानसिक पातळीवर अनुभवता येत पण ते पुर्ण आनंद जो केवळ क्रीयेने मिळतो त्याचा पर्याय होउ शकत नाही हे तर उघड सत्यच आहे ते कुठे अमान्य केलय ? पण त्यांना त्या क्रियेपर्यंत जाण्याचे धाडस नसते म्हणुन त्या ही मर्यादीत आनंदाची वाट निवडतात असे म्हटलेले आहे. त्यांनी आवडल नाही हे स्वतःचे मानसिक पातळीवर स्वतःच्या ठरवलेल्या मर्यादेत समाधान झाल्यावर पुढील स्टेप टाळण्यासाठी म्हटल होत त्या अगोदर चा अविरोध हा स्ट्रटेजीक होता. हा कनिंगनेस मात्र स्त्रीयांत असुच शकत नाही सर्व स्त्रीया या ब्रम्हकुमारीच असतात अश्या नसतात च मुळी आदि च डोक्यात घट्ट असतील तर मग मात्र अर्थातच वरील विवेचन अस्वस्थ करु शकते.

माहितगार 29/09/2014 - 08:32
तसेही उपरोक्त बाईनी 'आवडलं नाही' असं स्पष्ट साम्गितलं असताना 'तिला खरं तर आवडलं होत्तच्च मुळ्ळी!' असा हट्ट का धरलाय कळलं नाही.
" स्त्रीनी आवडलं नाही म्हटल तरी आवडलेल असत, पुढाकार पुरुषांनी घ्यावयाचा असतो आणि अशा पुढाकार घेण्यात पौरुषत्व आहे, जर लगेच विरोध केला नाही तर नक्कीच हवे होते " हि एक पसरवल्या जाणार्‍या विचीत्र गृहीतकांची मालिका आहे. या धागा लेखातील सभ्यता-दर्शक तोल सांभाळुन हे शब्द काढून घ्या मग हे अस पसरवले जाणारे अपसमज वेळीच खोडले न गेल्या मुळे (प्रॉपर ऑब्जेक्शन हँडलींग न झाल्याने) समाजात पसरत राहतात आणि अशा स्वरूपाचे अपसमज स्त्रीयांवरील अत्याचारांना कारणीभूत होऊ शकतात हे लक्षात घेतले पाहीजे असे वाटते. अशा पुरुषांना १२व्या मजल्यावरून उचलून खाली स्त्रीयांनी उचलून खाली फेकताना ते स्त्रीयांनी उचलून वर धरतानाचा स्पर्ष आणि अनुभव लगेच आवडला नाही म्हणण्यासाठी भितीने तोडातून शब्द बाहेर पडला नाही, तरी तो स्पर्ष आणि वर उचलले जाण्याचा अनुभव त्यांना आवडलेलाच असतो, आणून समजा चुकून तोंडातून शब्द बाहेरपडलाही आणि बाराव्या मजल्यावरून जमीनीवर खाली फेकून देणे आवडत नाहीए असे सांगितले तरी त्यांना ते मनातून आवडतच असते. असा अपसमज स्त्रीयांमध्येही बळावलेला असता रोजी दोनचार पुरुषांवर अत्याचार झाले असते तरीही पुरुषांनी अशा तर्कांचे आणि अपसमजांचे समर्थन केले असते का ? (सर्व उत्तरदायकत्वास नकारः हा केवळ युक्तीवाद आहे असे करण्याचे कुणासही प्रोत्साहन अथवा समर्थन नव्हे.) अनेक शक्यतांपैकी एकाच शक्यतेकडे निर्देश करणे आणि त्यावरून नियम बनवण्याचा प्रयत्न खरेच तर्कसुसंगत असतो का ? एखादी न आवडणारी गोष्ट अनपेक्षीत पणे घडत असेल तर लक्षात येऊन प्रतिरोध करण्याची नकार देण्याची पद्धत प्रत्येकवेळी प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत निरनिराळी असू शकते. तुम्ही पब्लिक प्लेस मध्ये आहात का एकटे आहात, सोबतची व्यक्ती परिचीत आहे का अपरिचीत, लगेच विरोध केला तर अपमान समजून पुन्हा अपमानाचा बदला म्हणून अधिक अत्याचारतर करणार नाहीना अशा प्रकारच्या भिती, किंवा जगातल्या बहुतांश लोकांना स्त्री असो वा पुरुषांना Patience (संयम- इथे समोरच्या व्यक्तीचा पाणउतारा करून विरोध करणे या अर्थाने) आणि Tolerate (सहन) करणे यातला फरकच मुळी माहीत नसतो. इंग्रजीत Don't tolerate but have patience अशा प्रकारची काही म्हण आहे. कि सहन करू नका पण मनाचा संयम ठेवा पण बहुतांश लोकांचे उलटे होते नको असलेल्या गोष्टी सहन करण्यात काही काळ जातो आणि मग नंतर लक्षात येते आपण विनाकारण सहन करतोय तो पर्यंत राग अनावर होऊन संयम सुटलेला असतो पण या संयम समजून शांतपणे सहन करण्याचा दुसरे लोक दुर्दैवाने वेगळा अर्थ काढत असतात, एखादी व्यक्ती सहन करतीए आणि विरोध नोंदवण्यास विलंब करते म्हणजे तो अत्याचार तिला हवाच असतो असे नव्हे हे समजून घेणे गरजेचे आहे असे वाटते.

In reply to by माहितगार

मारवा 29/09/2014 - 21:20
माहीत गार मी जो प्रसंग लेखात दिलेला आहे तो सत्य प्रसंग आहे व जिवंत व्यक्ती त्यात इन्व्हॉल्व्ड आहेत. मी सेन्सॉर मुळे अनेक डीटेल्स जाणीवपुर्वक टाळतो. कारण मिपावर एक मर्यादा येते व्यक्त होण्यात. आता थोड उलगडुन सांगतो. ज्या स्त्री बरोबर वरील प्रसंग घडला तिच्या मांडीवर दहा मिनिट हात ठेवलेला होता. (तुमच वय व अनुभव स्त्री पुरुष संबंधाच्या संदर्भात ) मला माहीत नाही. पण नर मादीचे प्रणयाचे आदिम खेळ व त्याचे अलिखीत नियम माहीत नसतील तर सांगतो. की नर व मादी यांच्यात एक केमेस्ट्री क्रीएट होत असते एका विशिष्ट वेळी तिथे स्पर्शाची अत्यंत प्रभावी भाषा नजरेच्या सोबतीने वापरली जात असते. यात नराने मादीला दिलेला संदेश/ आवाहन अत्यंत सुस्पष्ट स्वच्छ असतो. भाषेपेक्षा कैक पट प्रभावी. तुम्ही कुठल्याही स्त्री कडे अगदी चोरटा अगदी निसटता कामुक कटाक्ष जरी टाकला तरी तिला तुमचा हेतु वा नियत अगदी निसंदीग्ध रीत्या कळतेच. आता त्यानंतर पुढील प्रतिसाद कसा द्यावा हा जिचा तिचा प्रश्न असतो. स्वीकार की नकार हा केस वाइज वेगवेगळा असतो. पण असे कधीच होत नाही की स्त्री ला कळलचं नाही की नराचा हेतु काय होता ? यावर अनेक शास्त्रीय संशोधन झालेल आहे पण सोप्या मराठीत सांगायच तर असे कधीच शक्य नाही की हेतुच कळला नाही ( वरील एकांतातील स्पर्श व संवाद (जो मी देउ शकत नाही ) व नजर जी दाखवता येत नाही. माझा मित्र थेअरीज नुसत्या जाणत नाही तर तो प्रत्यक्ष स्त्री पुरुष संबंधातील अनुभवी माणुस आहे. जे जे स्वेच्छेने संबध स्थापित होत असतात त्या मार्गातला तो आहे. त्याने रेप बळजबरी वा फसवणुक वा लपवाछपवी कधीही केलेली नाही त्या बाबतीत तो अतिशय प्रिन्सीपल्ड म्हणावा असा आहे. आता आपल्याअ नैतिकतेच्या कल्पनाच इतक्या तकलादु व बेगडी आहेत की त्यावर काय बोलणार ? आपले तथाकथित ९५ ट्क्के धार्मिक नितीनियम हे केवळ आणि केवळ सेक्स सेंटर्ड आहेत. यामागे अनेक अनेक कारणे आहेत पण एक लेख जरुर तुम्ही वाचावा अशी विनंती त्यावरुन कीमान नैतिकतेचा ढोबळ अर्थ तरी तुम्ही घेणार नाही अशी अपेक्षा http://www.misalpav.com/node/26124

In reply to by मारवा

माहितगार 29/09/2014 - 23:23
१) तुम्ही पूर्ण वर्णन लिहा अथवा न लिहा, ते तुमच्या तथाकथीत मित्रानी सांगीतलय म्हणजेच प्रत्यक्षदर्शी वर्णन नाही आहे. २) संबंधीत स्त्रीचा यात कुठेही जवाब येत नाही आहे ३) चर्चेत सहभागी होणार्‍या कुणालही संबंधीत व्यक्तींची उलटतपासणी घेता येणार नाही आहे. ४) जी काही तथाकथीत माहिती आपण देऊ इच्छिता ती वस्तुनिष्ठ असल्याची खात्री होणे शक्य नाही आहे. ५) आपल्या लिहिण्याच्या शैली वरून आपण दुसर्‍या व्यक्तीचे (संबंधीत स्त्रीचे) म्हणण्याची कोणतीही पडताळणी न करता कुणातरी अबकडला स्वतः डोळे झाकून प्रिन्सीपल्डनेसचे सर्टीफिकेट देत आहात आणि त्याच वेळी इतर सर्वांच्या नैतिकतेच्या कल्पनाच इतक्या तकलादु व बेगडी आहेत असा आक्षेप घेत आहात; हे जरासे एकतर्फी वाटते आहे. ५) आपल्या म्हणण्यावर विश्वास ठेवायचा म्हटल तरीही ती अनेक शक्यतांपैकी केवळ एक शक्यता उरते आहे, आणि माझा उपरोक्त प्रतिसादातील आक्षेप एका शक्यतेच्या बळावर सरसकट निष्कर्ष काढण्यावर आणि स्त्रीयांच्या अपेक्षांच्या बाबतीत अपसमजांची मालिका तयार होण्या बद्दल आणि अशा अपसमजाच्या मालिकांमुळे स्त्रीयां वर शक्य आत्याचारांबद्दल आहे. माझे आक्षेप व्यक्तीस्वातंत्र्यावर विश्वास ठेवणार्‍यांच्या बाजूने येत आहेत. जिथ पर्यंत माझ्या व्यक्तीगत मतांचा संबंध आहे मी अभिव्यक्ती स्वातंत्र्या बद्दल मत या धाग्यावर पुरेसे स्पष्ट केले आहे यात आपल्या शब्दातील तथाकथित 'तकलादु व बेगडी नैतिकतेच्या कल्पनांशी', माझ्या व्यक्तीस्वातंत्र्यावर आधारीत आक्षेपांचे काही एक देणे घेणे नाही, आणि तरीही ते आक्षेप स्वतःचे महत्वपूर्ण स्थान बाळगून असतील, हे सुस्पष्टपणे नमुद करत आहे. एनीवे स्त्रीयांना काय वाटंत या बद्दल पुरुष मंडळींना स्त्रीयापेक्षा अधिक माहिती असण्याचे दावे एकुण कौतुकास्पद (मनोरंजक) आहेत.

In reply to by माहितगार

मारवा 29/09/2014 - 23:43
माहीतगार महोदय काय म्हणताय तुम्ही अहो हे अंतरंग अनुभव आहेत. यात तपासणी जाबजवाब कस शक्य आहे ? अर्थात या निमीत्ताने मात्र एखाद्या अप्रिय अडचणीच्या सत्याकडे आपण कसे बघतो त्याच्यशी कसे डील करतो याचे एक विलक्षण दर्शन मला होत आहे. मी कुणा अबकडला प्रिन्सीपल्ड आहे असे म्हणत नाहीये माझा १५ वर्ष जुना असलेला मित्र व त्याच्या आयुष्याचा वागणुकीचा अगदी जवळुन अनुभव असलेला मित्र या नात्याने ग्वाही देत आहे. अर्थात तुम्ही ते मान्य करा असा आग्रह नाहीच. मी तर माझे अनुभव शेअर करीत आहे. पण मुळात असे होउच शकत नाही स्त्रीया असे करतच नाहीत व मी या स्त्री विषयी असे म्हणतोय म्हणजे सर्व स्त्रीया अशाच असतात असे माझे मत आहे कींवा याने स्त्रीयांविषयी अपसमजांची मालिकाच सुरु होईल अशी निष्कर्श का निघत आहेत ? आणि यात आश्चर्य ते काय की पुरुष स्त्री ला व स्त्री पुरुषाला अधिक चांगल ओळखु शकते कारण साध आहे अहो डीस्टन्स मेक्स अ डीफ्रंस

In reply to by मारवा

माहितगार 30/09/2014 - 01:10
सर्व स्त्रीया अशाच असतात असे माझे मत आहे कींवा याने स्त्रीयांविषयी अपसमजांची मालिकाच सुरु होईल अशी निष्कर्श का निघत आहेत ?
जाणता अजाणता जे काही सरसकटीकरण करणारी आपल्या धागालेखातली गृहीतके त्याचे विश्लेषण मागच्या प्रतिसादांतून केलेलेच आहे.

जेनी... 29/09/2014 - 09:40
मज्जा आली वाचुन ... मारु काका तुमच्या मित्राला चरित्रहिन का म्हणताय ?? ... काकुंनी स्पर्श आवडला नै म्हटल्यावर चरित्रहिन काका गुपचुप बसले होते ना.. मग चरित्रहिन कस्काय झाले ?? कि त्यांचे नावच चरित्रहिन काका आहे ?? काय आहे काय हे प्रकरण ??

In reply to by जेनी...

मारवा 29/09/2014 - 21:43
अस आहे बघ माझा मित्र हा चरीत्रहीन आहे याचा अर्थ तो पारंपारीक अर्थाने एका पेक्षा अनेक स्त्रीयांशी त्यातील काही विवाहीतांशी शरीरसंबंध प्रस्थापित करतो. असा पुरुष जो आपल्या धर्मपत्नी व्यतिरीक्त जिच्याशी त्याचे लग्न झालेले आहे. असे संबंध प्रस्थापित करतो अशा पुरुषाला रुढ प्रचलित भाषेत चरीत्रहीन असे संबोधन वापरतात. माझ्या मित्राचे नाव चरीत्रहीन असे नाही. ते एक विशेषण आहे. दुसर या केसमध्ये तो गप्प बसला होता कारण त्या संबंधातील त्या स्त्रीचा हेतु केवळ मानसिक व्याभिचारापुरताच आहे ती पुढील कृती करण्यास असमर्थ आहे असे त्याला कळुन चुकलेले होते. म्हणुन समजुतदारपणे त्याने विषय आवरता घेतला कारण त्याला अर्थातच पुढील कृतीत रस होता. आता त्याला चरीत्रहीन हे संबोधन हे या केस वर आधारीत नव्हते दिलेले. तर या केस आधी आणि या केस नंतर त्याचे विविध स्त्रीयांशी जे संबध प्रस्थापित त्याने केले त्यावरुन हे दिलेले आहे. आणि सर्वात महत्वाच म्हणजे इतकी साधी गोष्ट तुझ्या लक्षात कशी नाही आली. उदया मी एका चोराची गोष्ट सांगितली त्यात म्हणालो की अचानक कुत्री भुंकायला लागली म्हणुन तो चोर चोरी न करताच पळुन गेला तर तु काय म्हणशील अहो त्याने चोरी तर केलीच नाही मग तुम्ही त्याला चोर का म्हणालात ? यावर असे म्हणावे लागेल की अग अग जेने या केस मध्ये जमल नाही त्याला पण तो चोर च आहे. एनीवे ज्यो जेने याच्यावर लिहीलेले सार्त्र चे लेखन तु वाचलेले आहेस का ? नसल्यास जरुर वाच

ऋषिकेश 30/09/2014 - 10:13
उत्तम विषय. डॉ. खरे यांचे प्रतिसादही वाचनीय फक्त यात स्त्रियांविषयीच नाही तर ए पुरूषांबद्दलही सत्य आहे असे वाटते. "फ्लर्टिंग" या सीमेवरील प्रकारात उत्तम प्रकारचे फ्लर्टिंग करणारे अनेक वीर बघितले आहेत. चंप्रं देशपांडे यांचे "सेक्स" नावाचे नाटक केवळ याच विषयावरील उहापोहाला वाहिले आहे! (यावरच पुढे बहुदा बुद्धिबळ आणि झब्बु नाटक आले) यातील नायक नायिका फक्त सुचक "बोलुन" आनंद घेतात ;)

माहितगार 30/09/2014 - 12:25
डॉ. सुबोध खरे यांचा http://www.misalpav.com/comment/615154#comment-615154 हा प्रतिसाद बर्‍याच जणांना विशेषतः पुरुष मंडळींना आवडतो आहे असे दिसते. त्यांच्या त्या प्रतिसादातल्या दुसर्‍या ष्टोरी बद्दल फारसे काही म्हणण्यासारखे वाटत नाही. पण पहिल्या ष्टोरीत पूर्वग्रहांचा अल्पसा अंमल आहे असे वाटते.
...असे वागणे तिचे सर्वच पुरुषांशी नव्हते (कि ती जरा जास्तच मोकळी आहे म्हणून सोडून द्यावे)....
ह्या वाक्यात डॉ. सुबोध खरेंना काय म्हणायचय त्याची स्पष्ट कल्पना येत नसल्यामुळे असेल कदाचित, ष्टोरीतला हा भाग जरासा खटकतोय रिएक्झमाईन करण्याची गरज असावी असे वाटते

सुबोध खरे 30/09/2014 - 14:18
माहितगार साहेब, माझ्या वर्गात किंवा आपल्याला आपल्या आजूबाजूला अशा अनेक मुली स्त्रिया दिसतात ज्या एकदम मोकळ्या ढाकळ्या असतात. बोलताना एखाद्या पुरुषाला स्पर्श करणे किंवा परीचयातील अथवा नात्यातील असेल तर थाप मारणे हे सहज करताना दिसतात. त्यांच्याशी बोलताना हे जाणवते कि त्यांनी केलेल्या स्पर्शाचा हेतू "तसा" नाही, या स्त्रिया सर्व पुरुषांशी तसेच मोकळे वागताना आढळतात. मी वर्णन केलेली स्त्री तशा मोकळ्या स्क्भावाची नव्हती. ती काही पुरुषांच्या जास्त जवळ जाते असे आढळत असे यास्तव मी तसे लिहिलेले आहे.

In reply to by सुबोध खरे

माहितगार 30/09/2014 - 17:32
प्रथम तर प्रतिसादासाठी धन्यवाद. ओके तुम्हाला वागण्या बोलण्यातल्या स्वभावतः मोकळेपणा कडे लक्ष वेधायचे होते असे दिसते. आपल्या आधीच्या एका वाक्यात "जास्तच मोक्ळे" एका अर्थाने येऊन गेल्या नंतर "जास्तच मोक्ळी" वेगळ्या अर्थाने येतेय हे सहज लक्षात येत नाही. तुमच स्पष्टीकरण स्विकारून ष्टोरी क्र १च्या उर्वरीत समीक्षे साठी तुमच्या वतीने वाक्यात जरा बदल करतो आणि अभ्यासतो आहे.
आमच्या एका नौदलातील मित्राची बायको तोकडे कपडे घालून लग्न न झालेल्या( बँचलर) अधिकाऱ्यांच्या मेस च्या रस्त्यावर सकाळी धावायला जात असे. इतर वेळेसही ती पुरुषांशी( विशेषतः लग्न न झालेल्या) जरा "जास्तच मोकळे" पणाने बोलत असे किंवा बोलता बोलता त्याला स्पर्श करीत असे आणि मग एखादा पुरुषाने या स्पर्शाच्या पुढे जाण्याचा प्रयत्न केल्यास त त्याला फटकारत असे. यामुळे तिच्या बद्दल तेथे बरेच गैरसमज पसरले होते. तिचा नवरा हा अतिशय देखणा होता. नौदलात अभियंता म्हणून उच्च पदावर होता. परंतु तो आपल्या वयाप्रमाणे वागत असे (त्यांचा मुलगा तेंव्हा दहावीत होता) आणि त्याची बायको नवीन लग्न झाल्यासारखी वागत असे. तिचा आंतरजातीय प्रेमविवाह होता. नवरा बायकोचे व्यवस्थित प्रेम होते आणि त्यांच्यात कोणताही बेबनाव नव्हता. असे वागणे तिचे सर्वच पुरुषांशी नव्हते (कि ती जरा स्वभावतः मनमोकळी आहे म्हणून सोडून द्यावे). याची मनोवृत्ती थोडीशी लेखात वर्णन केल्या प्रमाणे होती. ....... संदर्भ: डो सुबोध खरे यांचा प्रतिसाद http://www.misalpav.com/comment/615154#comment-615154 (प्रतिसादअंश समिक्षणासाठी आयात केला कॉपीराईट डॉ. सुबोध खरे यांचे. उपप्रतिसादाच्या माध्यमातून समीक्षा करेन)

In reply to by माहितगार

माहितगार 30/09/2014 - 17:57
डॉ सुबोध यांच्या चर्चेतील परिच्छेदात ते म्हणतात तसे जरासा बदल केला तरीही जराशी सब्जेक्टीव्हिटी राहते असे प्रथमदर्शनी वाटते आहे. डॉ सुबोध व्यवसायाने डॉ. आहेत सब्जेक्टीव्हिटीच विश्लेषण करायच असल तरी त्यांचा आणि त्यांच्या पेशंट मधला नेमका संवाद विचारणे उचीत ठरत नाही म्हणून बेनीफीट ऑफ डाऊट देऊन डॉक्टरांचा त्या नंतरच्या परिच्छेदातील शक्यतेचा तर्क तात्पुरता स्विकारला असे जरी गृहीत धरले तरीही एक दोन गोष्टींकडे लक्ष वेधावस वाटत. डॉक्टर साहेबांच्या दुसर्‍या स्टोरीतील डॉक्टरांची मैत्रिण डॉक्टरांच्या शब्दात "तसल जास्तच मोकळी" वागली नसेल संयमाचा बांध असेल पण तिने तिच्या ज्याकाही भावना आहेत त्या मनमोकळे पणाने सांगून टाकल्या, पण इथेही ती सर्वांशी स्वाभाविक मनमोकळे पणाने वावरू शकली नाहीए केवळ डॉक्टर साहेबांशी विश्वासार्ह मित्र या नात्याने मोकळेपणाने बोलते आहे. पहिल्या ष्टोरीत स्त्रीही तीला विश्वासार्ह वाटलेल्या मर्यादीतच व्यक्तींशी (दुसर्‍या ष्टोरीतल्या मैत्रिणीपेक्षा कदाचित थोडे जास्त) मोकळेपणाने वागते आहे. दोन्हीही स्त्रीया मर्यादीत व्यक्तींवरच विश्वास ठेवताहेत पण डॉक्टरांचा दृष्टीकोण अल्पसा सब्जेक्टीव्ह होतो आहे पहिल्या ष्टोरीतली स्त्री म्हणजे तसली आहे आणि दुसर्‍या ष्टोरीतली स्त्री अहंकार सुखावून जाते म्हणून "तशी" नाही ? कदाचित माझे विश्लेषण चूकत असेल पण डॉ साहेब आहेतच सांगण्या साठी

In reply to by माहितगार

सुबोध खरे 30/09/2014 - 21:01
माहितगार साहेब आपली काहीतरी गल्लत होते आहे. पहिल्या गोष्टीतील स्त्री हि माझ्या मित्राची बायको आहे आणि ती बैचलर अधिकारी राहतात तेथे धावण्यास जात असे ( इतर रस्ते ओस पडलेले असताना). नौदलातील लग्न झालेल्या आणि न झालेल्या अधिकाऱ्यांची निवासस्थाने वेगवेगळ्या ठकाणी असतात. शिवाय ती दुकान्दारासारख्या माणसाशी सुद्धा जर जास्तच "मोकळे"पणाने बोलत असे आणि तो जेंव्हा लघळपणा करायला लागला तेंव्हा एकदम त्याच्या अंगावर आली. दुसर्या गोष्टीतील मुलगी माझी एम बी बी एस ची वर्ग मैत्रीण होती आणि आम्ही दिवसातील आठ तास एकत्र असे साडे पाच वर्षे एकत्र होतो. त्यामुळे तुम्ही एकमेकांबरोबर बरेच मोकळे होता. त्यांचे प्रेम प्रकरण( तिचे आणि तिच्या नवर्याचे) सुद्धा आमच्या समोरच झालेले होते. तामुळे आमच्यात तेवढा मोकळे पण नक्कीच होता. यात अहंकार सुखावण्याचा कोणताही भाग नाही. जहाजावरील मित्राची बायको आणि वर्गमैत्रीण यात खूप फरक आहे. यावर छिद्रान्वेषीपणा करून मुळ मुद्द्याला बगल मिळते आहे असे वाटते.

In reply to by सुबोध खरे

प्रसाद१९७१ 01/10/2014 - 09:23
दुसर्या गोष्टीतील मुलगी माझी एम बी बी एस ची वर्ग मैत्रीण होती आणि आम्ही दिवसातील आठ तास एकत्र असे साडे पाच वर्षे एकत्र होतो. त्यामुळे तुम्ही एकमेकांबरोबर बरेच मोकळे होता. त्यांचे प्रेम प्रकरण( तिचे आणि तिच्या नवर्याचे) सुद्धा आमच्या समोरच झालेले होते.
खरे साहेब - माझे एक निरिक्षण. पटले नाही तर सोडुन द्या. तुमच्या मैत्रिणी बरोबरचा प्रसंग नक्कीच २०-२५ वर्ष जुना असेल. पण तुम्हाला तो आजही स्पष्ट आठवतो, हे काहीतरी सांगतय. :-) एखादी घडुन गेलेली गोष्ट जर मनात पुन्हा पुन्हा घोळली गेली नाही तर ती विस्मृतीत जाते. तुमच्या तो प्रसंग आठवणीत आहे म्हणजे तुमच्या मनात गेली २०-२५ वर्षे तो प्रसंग मधे मधे येतो आहे. ह्यातुन काय कळते तुमचे तुम्हालाच तुमच्या बद्दल. :-)

In reply to by माहितगार

माहितगार 01/10/2014 - 14:20
ठिक आहे, घटकाभर असं धरू की डॉ सुबोध तटस्थपणे विचार करत आहेत तरी सुद्धा; डॉ.सुबोधांच्या मैत्रिणीने अगदीच सनातन स्त्रीयांपेक्षा लक्ष्मणरेषेच वर्तुळ किचीत मोठ केल, आणि त्यांच्या दुसर्‍या मित्राच्या पत्नीने अधिक बोल्डनेस दाखवतानाही लक्ष्मणरेषेच वर्तुळ ठेवलच पण डॉक्टरांच्या मैत्रिणीपेक्षा ह्या परिघाचा व्यास जरा अधिक मोठा होता. म्हणजे परिघाचा व्यास आणि परिमितीच स्ट्रक्चर बदलल की समाजाच्या दृष्टीकोणाची फुटपट्टी बदलते असे म्हणता येईल का ? डॉक्टरांची मैत्रिण डॉक्टरांसोबत फिरावयास गेली हे ही तिची लक्ष्मणरेषा इंटॅक्ट असूनही सनातनी बुरखा समर्थकांच्या फुटपट्टीत बसणार नाही, डॉक्टरांची फुटपट्टी जरा अधिक लिबरल आहे त्यामुळे त्या फुटपट्टीच्या मापात मैत्रिणीच वागण व्यवस्थीत बसतय, ह्याच मैत्रिणिने लक्ष्मणरेषेचा व्यास वाढवला असता तर ते डॉक्टरांना त्यांच्या फुटपट्टीत बसवण जड गेलं असत. तर मला मुख्य निर्देश करायचा आहे तो या फुटपट्ट्यांच्या वेगवेगळ्या मापांकडे म्हणून मी या फुटपट्ट्यांना सब्जेक्टीव्ह म्हणतो आहे. आणि या सब्जेक्टीव्ह फुटपट्ट्या समाजाने करावयाच्या लेबलींगला कारणीभूत होतात. (इथे अबकड पुरूष स्त्रीयांचे हॉस्टेल असलेल्या रस्त्यावर फिरावयास जात असे आणि अधिकच मोकळा वागत असे या पुरुषाला आणि असेच वागणार्‍या स्त्रीला वेगवेगळ्या फुटपट्ट्या लावाव्यात की नाही हा लिंगभाव अभ्यासाचा वेगळाच प्रश्न आहे.) पण इथे वैवाहीक जिवनात पुर्ण तृप्ती असलेले/दिलेले विवाहीत पुरूष इतर स्त्रीयांकडे बघतच नाहीत हे केवळ अपवादानेच सिद्ध होत असावे पण अशांच्या तृप्ततेचा अ‍ॅनालिसीस हा ह्या धाग्याचा विषय नाही. (डॉक्टर साहेबांनी छिंद्रान्वेशीपणा ह्या शब्दाची चांगली आठवण दिली आहे.) समाजमात्र स्त्रीच्या तृप्ततेची प्रमाणाबाहेर छिद्रान्वेषीपणे चिकीत्सा करू इच्छितो. हेही ठिक की एक स्त्री जास्तच मोकळेपणाने वागली छिद्रान्वेषी चिकित्सा करून समाजाने तीला अतृप्त आत्मा जाहीर केले तिच्या पतीवर अप्रत्यक्ष कॉमेंट केली. जर संबंधीत स्त्री बॅचलर्स होस्टेलच्या दिशेने न जाता जास्तच मोकळी वागली असती तर समाजाने त्या स्त्रीबद्दल तेथे बरेच गैरसमज पसरवले नसते असे काही आहे का ? स्त्रीच्या तृप्तीबद्दल उदात्त हेतूने चिकित्सा आणि विश्वासार्ह मदतीचा हात पुढे करणे यात गैर नाही, जो पर्यंत व्यक्ती स्वातंत्र्याचा आदर होतो आहे बाकी समाजाने त्यात हकनाक नाक खुपसून स्त्रीयांबद्दल गैरसमज पसरवणे खरेच किती सयूक्तीक असते ? लेडी माऊंट बॅटन पंडीत नेहरूंशी मोकळेपणाने वागल्या म्हणजे त्यांना माऊंट बॅटन साहेबांनी अतृप्तच ठेवले असले पाहीजे हा कोणता तर्क ? पंडीत नेहरूंनी लेडी माऊंट बॅटन यांच्याशी मोकळेपणाने वागूनही वैधानीक कर्तव्यात कसूर केली नसेल माऊंट बॅटन यांनी त्यांच्या वैधानीक कर्तव्यात कसूर केली नसेल तर त्यांच्या व्यक्तीगत जीवना बद्दलचे समज गैरसमज पसरवण्याचा त्यांच्या व्यक्तीगत जीवनात दखलंदाजी करण्याचा समाजाच्या इतर घटकांनी का विचार करावा ? पण दुर्दैवाने सर्व समाज पिढ्यांपिढ्या हे करत राहतात असे आढळून येते.

In reply to by माहितगार

माहितगार 30/09/2014 - 19:36
आमच्या एका नौदलातील मित्राची बायको तोकडे कपडे घालून लग्न न झालेल्या( बँचलर) अधिकाऱ्यांच्या मेस च्या रस्त्यावर सकाळी धावायला जात असे.
हेच वाक्य जरा शब्द बदलून पहा
एक स्त्री तोकडे कपडे घालून केवळ पुरुष असलेल्या रस्त्यावर सकाळी एकटीच फिरायला जात असे.
इथे दुसर्‍या वाक्यात मी तोकडे कपडे हा शब्द तसाच ठेवलाय, भारतात शंभर वर्षे मागच्या काळात जा तोकडे कपडे हा शब्दही काढून टाका हाती कोणता दृष्टीकोण लागतो ? आजही भारतीय ग्रामीण भागात जा आणि तोकडेच्या एवजी जीन्स करता तंग कपडे हा शब्द ठेऊन पहा हाती काय लागत ? भारतीय पेहराव पाहण्याची सवय नसलेले परकीय पुरूष साडी घातलेल्या भारतीय स्त्रीया बेंबी उघडी दाखवतात अशी टिका करतात तर काहींना नऊवारीतून पायाची उघडझाप दिसते. पोषाख हा मुद्दाही आत्तापर्यंत असंख्य वेळेस चघळून झाला आहे. स्त्रीयांच्या "त्या बाबतीत" माघार घेण्याबद्दल टिकाकरणारी या धाग्यावरील तथाकथीत सुधारणावादी मंडळीही कशा प्रकारचा दृष्टीकोण ठेवातात आणि कशा पद्धतीने चघळतात (यांच्यात आणि यांच्या टिकेचे लक्ष असलेल्या सनातनी वातावरणात काही खरेच फरक आहे का ?) की स्त्रीयांनी या लोकांना अपेक्षीत पुढाकार आणि मनमोकळेपणा दाखवावयास हवा. एखाद्या पुरुषांनी भरलेल्या पोलीसस्टेशन मध्ये एखादी स्त्री पोलीस आधीकारी तथाकथीत तंग कपडे घालून काम करत असू शकते किंवा आज डिफेन्स मध्येही स्त्रीयांनी जाण्या बद्दल चर्चा असते ते ही सोडून द्या इतरही अनेक क्षेत्रात स्त्रीया कार्यरत असू शकतात. स्वतःच्या आधाराच्या दृष्टीने असेल किंवा सुरक्षेच्या कारणानेही असेल स्त्रीया आपल्या भोवतालच्या सहकार्‍यांवर विश्वास ठेवतानाच काही जणांवर अधीक विश्वास ठेऊ शकतात किंवा हि मंडळी चवीने चघळत असलेली शक्यताही काही केस मध्ये असेल. चवीच्या विषयांवर चर्चा होऊ नये असे नाही पण मला सनातनता ते आधुनिकता पुरुष समाज सोईच्या अपेक्षा तशाच ठेवतो आहे आणि सोईच्या अपेक्षा बदलत आहे असे त्यांनाही मनातून अभिप्रेत नसावे पण एक अल्पशी साशंकता वाटते चर्चा निघालीच आहे तर हा ही मुद्दा नजरेतून सुटणार नाही आणि स्त्रीयांना अधिक विश्वासार्ह वातावरणार श्वास घेण्यात येथील लेखक आणि वाचक मदतच करतील असा विश्वास आहे.

सोडून द्या हो मारवा साहेब.. करायचाय काय असला मित्र? वैधानिक ईशारा: आपल्या घरी-बिरी घेऊन जात जाऊ नका त्याला. तसही A man is known by the company he keeps असं काहिसं म्हणतात...

In reply to by मारवा

पैसा 02/10/2014 - 15:39
मग
Charity begins at home
ये दोस्ती हम नहीं तोडेंगे
वगैरे असं म्हणून मित्राला कध्धी अंतर देऊ नका हो, दादा/भाऊ/ताई/माई/अक्का/काका/काकू/मामा/मामी/आजी/आजोबा/आत्या/मावशी जे कोण असाल ते. नाही म्हणजे मी कोणाशी बोलतेय हे माहित नसल्याने दुसर्‍यांना तुम्ही बाळा, चाइल्ड इ संबोधने वापरताय, तसं मी करणार नाही. किंवा तुम्हाला काय म्हणायचं ते सांगूनच टाका ना एकदा! म्हणजे आमचा गोंधळ व्हायला नको! :)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

पैसा 02/10/2014 - 21:20
मारवा यांना चारचौघांसारखे सल्ले दिले तर त्यांना आवडले नाहीत. सल्ले देणार्‍याला ते बाळा, चाइल्ड असली शेलकी विशेषणे लावताहेत. म्हणून मी त्या सल्ल्याच्या उलट बोलले. "Charity begins at home" हे आम्ही इयत्ता ५ वीत सुविचार म्हणून शिकलो. ते कोणाला सांगितले तर त्यात offensive काय?

In reply to by खटपट्या

दिपक.कुवेत 22/09/2014 - 11:10
नको हां खट्टु काका, ती जेनी आज्जी टपूनच बसलीये....लग्गेच विचारेल....."ओय होय काकूंना म्हातै का??"

चित्रगुप्त 22/09/2014 - 06:50
त्या मित्राला चरित्रहीन का म्हणावे? या विषयातला अनुभवी जाणकार आहे तो. त्याने केलेले विवेचन पटण्याजोगे आहेच. या विषयावर एक वेगळाच प्रकाशझोत टाकल्याबद्दल आभार. पु.भा.प्र.

In reply to by चित्रगुप्त

आनन्दा 22/09/2014 - 14:38
त्या मित्राला चरित्रहीन का म्हणावे?
+१००. ही टिपण्णी मला देखील पटली नाही. बाकी लेख आवडला. लेखाच्या गंभीर विषयाला ही टिपण्णी टाचणी लवते.

In reply to by चित्रगुप्त

मारवा 22/09/2014 - 17:10
केवळ लैंंगिक संबधां वर्तना पुरताच मर्यादीत धरतात. त्यांना उपरोधाने दिलेले हे उत्तर आहे इतकेच. मी ते डीरोगेटरी अर्थाने वापरत नाही.

विलासराव 22/09/2014 - 09:55
माहीत नाही स्त्री हा तसा गहन विषय आहे. मग हा उपद्व्याप हा? तुम्ही त्याची उकल पुर्णपणे कधी कधी करु शकत नाही. मग जेंव्हा कधी पुर्ण उकल झाली असेल ते आधी लिहा की राव

माहितगार 22/09/2014 - 09:56
धागा लेखातल पुरषी पात्र खरं असो वा काल्पनिक, फ्लर्टींग (मराठी शब्द ?) अथवा मोकळेपणाचे गैर अर्थ काढले जाऊन समोरची व्यक्ती (स्त्री) गृहीत धरली जात नाहीए हे पहाणे हि संबंधीत पुरषाची पहिली जबाबदारी आहे. समोरच्या व्यक्तीचा कोणत्याही पायरीवरून नाही म्हणण्याचा अथवा परत फिरण्याचा अधिकारातील परस्पर अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दलचा आदर हि दोन्ही बाजूंनी केले पाहीजे यात गल्लत होता कामा नये. मला या गोष्टीचा अनुभव नाही पण अर्थांचा खिस करताना अभिव्यक्ती स्वातंत्र्याच उल्लंघन होणार नाही गृहीत धरण्याची गल्लत होणार नाही हे महत्वाच. बाकी चालू द्यात.

In reply to by माहितगार

मराठीत "अनुनय " बाकी लेखातील काही वाक्ये जमली आहेत याबद्दल वादच नाही. "अनेक स्त्रीयांना एका जुन्या झालेल्या विवाहात सर्वात मोठी उणीव असते ती सौंदर्याच्या स्तुतीची (पुरुषा कडुन) कमतरता" "अनेक बहीरे झालेले जुनाट नवरे पुर्ण करुच शकत नाहीत" "मैत्रीची फ़्रेंडशिप ची आदिम गरज जितकी स्त्रीयांना असते ती ही जुन्या लग्नात पुर्ण होत नाही"

In reply to by माहितगार

मारवा 22/09/2014 - 17:18
नाही म्हणण्याचा अधिकार केव्हाही मान्य आहेच हो. पण अस बघा जेव्हा एखाद्या सार्वजनिक स्थळी जसे बस मध्ये ही चुकुन जरी पुरुषाचा धक्का लागला तरी ही ज्या कोणा स्त्री ला इंटरेस्ट नसेल तर ती तात्काळ दुर सरकेल एक सेंकंद ही स्पर्श सहन करणार नाही पुरुष ही तसाच वागेल. मात्र दहा मिनीट सलग स्पर्श आणि बोलणं ( दोन्ही सजेस्टीव्ह ) नर मादी या स्ट्रटेजीतुन केलेला हेतु उघड जाहीर करुन केलेला स्पर्श आणि संवाद दोन्ही काही काळ सहन करुन प्रतिसाद देउन मग अचानक नाकारणे ही एक वेगळी बाब आहे. याची माहीती असु द्यावी.

In reply to by नानासाहेब नेफळे

टवाळ कार्टा 22/09/2014 - 11:22
वा वा वा...आपलीच कमी होती ... जगातल्या सगळ्या बायकांनी येउन तुमच्या कानात सांगितले असेल ना?? तुम्ही शिक्षक आहात का? (साभार - चितळे मास्तर - पु.ल.)

In reply to by नानासाहेब नेफळे

मृत्युन्जय 22/09/2014 - 11:22
स्त्रीयांना थेट लैंगिक संबंधात इन्टरेस्ट नसतो तुम्हाला केवळ लैंगिक संबंधात इंटरेस्ट नसतो असे म्हणायचे आहे काय? काही काळापुर्वी (तुम्हाला वरीलप्रमाणे म्हणायचे असल्यास) हे विधान साधारणतः खपुन गेले असते. सध्या अशी परिस्थिती आहे असे वाटत नाही.. बादवे बर्‍याच पुरुषांनाही केवळ लैंगिक संबंधात इंटरेस्ट नसतो.

काउबॉय 22/09/2014 - 11:58
हा स्वभाव(प्लेटो व्याभिचार) निव्वळ स्त्रियांचा नसून अनेक पुरुषांचा देखील आहे असे वाटते. आपले मदन जी बाण यांचेच उदा. पहाना मर्यादा ओलांडली नाही त्यांनी.

बॅटमॅन 22/09/2014 - 12:33
शीर्षक पाहून मला तर आनलैन व्यभिचाराबद्दल धागा आहे की काय असं वाटून मोठ्या आशेने इ.इ. धागा उघडला, पण के एल पी डी अर्थात खास लम्हे पे धोका झालाच.

In reply to by बॅटमॅन

सौंदाळा 22/09/2014 - 13:42
के एल पी डी अर्थात खास लम्हे पे धोका झालाच.
के एल पी डी चा नविन सभ्य फुल फॉर्म (पण अर्थ मात्र तसाच)सांगितल्याबद्दल मंडळ आभारी आहे. B.H.M.B, HMT, A.B.C.D, JAPAN वगैरे अभ्यास केलेला डीग्रीबाज - सौंदाळा ;)

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

बॅटमॅन 22/09/2014 - 14:47
हेच्चेमटी आणि जपान म्ह. काय ते या पामरास व्यनि करून सांगणे. बाकी माहिती आहे ;)

विलासराव 22/09/2014 - 13:40
मुद्दलातच घोळ दिसतोय. आपण केला तर प्रेम/शिष्टाचार वगैरे समजावे. दुसर्याने केले तर भ्रष्टाचार्/व्याभीचार. आता झाले का सगळे सोपे?

आंबट चिंच 22/09/2014 - 14:32
गरजांची प्रामाणिक पुर्तता करुन वसुली साठी पुढे जसा सरकतो>>>>
ही ह्ही ह्ही खि क हायला माऊ प्रत्येक प्रतिसादाला
ब्र मगची
कॅसेट लावली आहेस. @ नाना ने:-
स्त्रीयांना थेट लैंगिक संबंधात इन्टरेस्ट नसतो.
. इथे थेट कोण करतंय? आम्ही नाय बा अम्ही तर ...... वापरतो.

मनीषा 22/09/2014 - 16:08
तुमच्या लेखात अगदीच तथ्यं नाही असे नाही. पण काहीसा एकाच बाजूने अथवा दृष्टीकोनातून लिहिलेलेला वाटला. स्त्रियांबद्दलची , तुमची विधाने फारच वरवरची आणि अवास्तव वाटली.

कवितानागेश 22/09/2014 - 18:52
तुमच्या मित्राला हे दाखवा. स्त्रीवाद ही ज्ञानशाखा सोडाच, एखाद्या व्यक्तीचा मूलभूत अधिकार नाकारला जातो आणि तरीही त्यात चूक त्या व्यक्तीचीही असते, हे म्हणण्यासाठी आधी लैंगिकता, उत्क्रांती, मानसशास्त्र, गुन्हेगारांचं मानसशास्त्र यांचा कोणी किती अभ्यास केला आहे? हे सगळं शिकायला, समजून घ्यायला खूप वेळ लागतो. तेवढा वेळ सगळ्यांनी घालवावा अशी अपेक्षाही नाही. पण ज्यांना थोडक्यात काहीतरी समजून घ्यायचं आहे त्यांनी हा चार्ट जरूर बघावा. हा प्रकाशित करण्याचं तत्कालिक कारण वेगळं होतं तरीही लैंगिकता, नकाराधिकार आणि व्यक्तिस्वातंत्र्य समजून घेण्यासाठी हा पुरेसा आहे - when does a woman owe you sex? मूळ स्रोत - When Does a Woman Owe You Sex? Check This Chart

In reply to by कवितानागेश

काउबॉय 22/09/2014 - 19:21
इथे हक्क न्हवे इच्छे बाबत चर्चा चालु आहे. स्त्रि ची अशी विटंबना होइल अशी वाक्य रचना टाळावी ही विनंती.

In reply to by कवितानागेश

मारवा 22/09/2014 - 20:01
तुम्ही दिलेली लिंक पुर्ण वाचली. मात्र आपला काहीतरी गैरसमज होत आहे. माझ्या मित्राने कुठलीही जबरदस्ती केली नाही आपण जे बोलत आहोत ते काही काही स्त्रीयांमध्ये ( जनरालाइज नाही ) एक दांभिकता असते त्याविषयी. त्यांना व्याभिचार तर करायचा असतो पण एका मर्यादेतच. किंबुहना व्याभिचार तर हवाहवासा वाटतो पण झोकुन देण्याचे धाडस नसते. मग त्या समोरच्या पुरुषाचा वापर केवळ चाळवण्यासाठी करतात. यामध्ये अर्थातच त्यांची कुचंबणा ही होत असते. त्या अस का वागतात याची ही जमेल तितकी चिकीत्सा करण्याचा प्रयत्न लेखात केलाय. चर्चा त्यांना असे का वागावे लागते त्या अस का वागतात. ? त्यामागील घटक कोणते ? त्याहुन मोठा प्रश्न माणुस असा दांभिक का होतो. ? या दिशेने चर्चा अपेक्षीत होती ती तशी न जाता नेहमीप्रमाणे चुकीच्या दिशेने वळलीय असे वाटते. सर्वच स्त्रीया अस वागतात असे म्हणायचे सुचवायचे नाही. स्त्री मनातील आंदोलने अशा वेळची टीपण्याचा प्रयत्न व्हावयास हवा अशी अपेक्षा आहे. आणि हा तर दोन जणांचा पुर्णपणे परस्पर संमतीचा च प्रश्न आहे. यात कुठलीही जबरदस्ती नाहीच मितवा या ग्रेस यांच्या ललित लेख संग्रहातील एक लेख आठवतो त्यात कवि ग्रेस यांना भेटायला एक विवाहीता आली माझे तुमच्यावर प्रेम आहे वगैरे म्हणाली तुमच्याच साठी आले इ. त्यावर ग्रेस यांनी विचारले मग घालाल का माझ्या गळ्यात गळा असे काहीसे ( लेख नीट आठवत नाही चुकभुल देणे घेणे पण ग्रेस यांचा रीअल लाइफ अनुभव मांडलाय ) तर त्या बाईंनी यावर कच खाल्ली माघार घेतली मग ग्रेस एक कवितेची ओळ देतात ( परत एकदा चुकभुल देणे घेणे वा मितवा वाचणे ) ढळतांना जे अडखळले ते फुल च असते सडले

In reply to by मारवा

कवितानागेश 22/09/2014 - 20:37
ती लिन्क इथे कही दिवसापूर्वी 'जबरदस्ती' बाबत दिली गेली असली, तरीही, मूळ चार्ट त्याबाबतीत नाही. प्रेमाची अभिव्यक्ती प्रत्येक वेळेस सेक्शुअल अ‍ॅक्टिव्हिटी करुनच होउ शकते असं नाही, असं मला वाटतं तुम्ही जो प्रसंग सांगताय तो का घडला किंवा अपेक्षाभंग का झाला , त्याला बरेच पैलू असू शकतात.

In reply to by मारवा

असंका 22/09/2014 - 23:46
स्त्री आणि पुरुषातील आकर्षण हे नैसर्गिक आहे. आता मर्यादा कुठे आखायची याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. स्त्रीचे ते स्खलन आणि पुरुषाचे ते (तो चरीत्रहीन असल्याने) प्रामाणिक ही वर्गवारी तशी माफक विनोदी आहे. आपला संपूर्ण लेखच अगोदर मी विनोदी म्हणून वाचला होता.पण आता परत आलो तर आपण वर कुणाशी तरी प्रतिवादही करत आहात? दोन्ही डगरीवर पाय नका हो ठेवू!

फुंटी 22/09/2014 - 20:06
या बाबतीत सरसकटीकरण करणे योग्य नाही.असो. स्त्रीयांचे चरीत्र ही अबाधित राहते व स्खलनातला आनंद ही पुर्ण उपभोगता येतो.>> कसकाय बुवा ?? काहीतरी अर्धवट राहणारच ना ..

चित्रगुप्त 22/09/2014 - 22:31
काही जणांमधे जर काही विशिष्ट गुण वा आवडी-निवडी असल्या, ज्यांचे घरच्या मंडळींकडून फारसे कौतुक होत नाही, वा त्यासाठी प्रोत्साहन मिळत नाही, तर असे कौतुक करणार्‍या लोकांविषयी एक आपुलकी वा ओढा निर्माण होत असतो. या लेखात दिलेल्या उदाहरणासारख्या बाबतीत अश्या प्रकारच्या ओढ्याचा भागही असू शकतो.

माहितगार 23/09/2014 - 08:54
या धागा लेखातली काही वाक्य उलट्या क्रमानी लावली तर धागा लेखक म्हणतो त्या पेक्षा चित्र जरास वेगळ दिसत का ? स्त्रीला परस्पर्ष केव्हा स्विकार्य वाटतात हा सरळ प्रश्न आहे का आधी
यामध्ये मग गरजु पुरुष मात्र एकमेव हेतुने वरील सर्व गरजांची प्रामाणिक पुर्तता करुन वसुली साठी पुढे जसा सरकतो
वसुली हा शब्द देण लागण्याशी असतो. लीमाउजेट यांनी देण = To owe च्या संबंधाने उपस्थित केलेला प्रश्न योग्य वाटत नाही का ? कोणत देण लागतात अस धागा लेखक अथवा त्यांच्या तथाकथित मित्राच मत आहे. या वाक्य ज्यावर दिलय तो आधीचा परिच्छेद पुन्हा खाली देतो
अनेक स्त्रीयांना एका जुन्या झालेल्या विवाहात सर्वात मोठी उणीव असते ती सौंदर्याच्या स्तुतीची (पुरुषा कडुन) कमतरता. वय वाढल्यानंतर हव्याहव्याश्या वाटणारय़ा रीअशुअर करणारया स्तुतीची गरज ही तहाने इतकी मुलभुत असते. त्याहुन मोठी गरज असते श्रोत्याची ( अथर्वशीर्षातील एक सुंदर ओळ म्हणते अव श्रोतारम ) ही गरज अनेक बहीरे झालेले जुनाट नवरे पुर्ण करुच शकत नाहीत. नंतर जो एक रोमॆंटीसीझम जो स्त्रीयांमध्ये अंगभुत असतो त्याला जुनाट नवरा अजिबात उपयोगी पडत नाही. या शिवाय जी एक मैत्रीची फ़्रेंडशिप ची आदिम गरज जितकी स्त्रीयांना असते ती ही जुन्या लग्नात पुर्ण होत नाही. शिवाय स्त्रीयांच्या पाचवीला पुजलेला सनातन एकटेपणा इ.इ. तर वरील सर्व गरजांची पुर्ती ही विवाहपश्चात व्याभिचारात होत असते.म्हणुन स्त्रीया मुळ वासनेपेक्षा ही अधिक फ़ोर्स असलेल्या वरील गरजांसाठी हा मार्ग चोखाळतात.
हि गरज वासनेची नाही भावनेची आहे हे जर धागा लेखकाच्या तथाकथित ज्ञानी मित्रास ठाऊक आहे तर ........ आता अजून एक आधीच वाक्य वाचा
तर झाले असे की त्याने नेहमीप्रमाणे एका स्त्री शी रीतसर सुत जुळवले......सर्व टप्पे ओलांडत तो आत्मविश्वासाने पुढे सरकु लागला. स्पर्श पायरीही गाठली.... आणि अचानक त्या स्त्री ने पुर्णपणे माघार घेतली आणि दहा मिनीटांचा सुचक स्पर्श सहन केल्यावर म्हणाली की तुम्ही जो स्पर्श केला ना खर तर तो मला अजिबात आवडला नाही.
गरज शारिरीक नव्हे मानसिक आहे याचं चारित्र्य(वान/हिन) गृहस्थास ज्ञान असूनही उपरोक्त वाक्यातला नेहमीप्रमाणे हा शब्द लगट करणे हा सवयीचा भाग असल्याचे सुचीत करत नाही का ? यात मोकळेपणाने बोलणारी अथवा फ्लर्टींग करणारी स्त्री अतृत्प असते हे पहिल गृहीत धरणं आहे; स्त्रीयांना पुरुषांनी पुढाकार घेऊन केलेला स्पर्ष आवडतो हे न लिहिलेल अध्याहृत गृहीत धरण हा यातला दुसरा भाग आहे. धागा लेखक अथवा त्यांचा मित्र स्त्रीयांना केव्हा आणि कोणते स्पर्ष स्विकार्य असतात हा प्रश्न लेखात विचारत नाहीत तर त्यांना ते हवं असत हे गृहीत धरताहेत किंवा कसं ? याला कायदे विषयक चिकित्सक नजरेनी पाहील तर आधी करून नंतर स्त्रीयांना हे हवच असत वाली सारवासारव आहे ? का व्हिक्टीम ब्लेमींग (मराठी शब्द ?) ?
तर चरीत्रहीन मित्राने सांगितले ते असे की काही स्त्रीयांचा हा छंद असतो. अशा स्त्रीया अगोदर स्वत:हुन पुढाकार घेतात, समोरच्याला पुर्ण पागल करतात काही पाउले ही त्याला पुढे टाकु देतात. आणि मग अचानक त्याला नकार देतात माघार घेतात, व स्वत:च्या वैवाहीक नैतिकतेची समोरच्या पुरुषाला जाणीव करुन देतात. आणि तो कस चुकीच करत आहे इ. इ. त्याला पटवुन देण्याचा प्रयत्न करतात. पुरुष नवखा असेल तर तो गोंधळुन जातो त्याला काहीच कळत नाही की अरे आता तर मला छान प्रतिसाद मिळत होता अचानक असे कसे झाले ?
इथे नेमकी कुणाची मानसिकता तपासण्याची गरज आहे आधी करून नंतर व्हिक्टीम ब्लेमींग करणार्‍यांची का स्त्रीयांची ? असे प्रश्न उपस्थित करणार्‍या बद्दल हे काय म्हणत असतील याची सध्या कल्पनाच करतो आहे
आणखी एक शब्द आहे प्लेटॉनिक टॉक म्हणजे कृतिहीन बोलणे याचा अर्थ नकारात्मक आहे जस कृतिहीन चर्चा (क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे) यावरील दोन शब्दावरुन मी एक नविन शब्द बनवला प्लेटॉनिक व्याभिचार
म्हणजे जी स्त्री यांच्या ज्ञानी मित्रांशी ते म्हणतात तसे केवळ भावनिक गरजे पोटी मोकळे पणाने बोलते ती एनकेन प्रकारेन व्याभिचारी या शिक्क्याची धनी आहे आणि त्यांच्या वसुली साठी देणं लागते, प्लेटॉनिक टॉक करणार्‍या बहुसंख्य स्त्रीया नकार देत असूनही अतृप्त स्त्रीयांना तृप्तता देण्याच महनीय समाज कार्य यांचा ज्ञानी मित्र पुन्हा पुन्हा करत राहतो , धागा लेखक इतर प्रतिसादकांना हे ही पटवून देऊ पाहतोय की हे आजीबात विनोदी नाहीए हे गंभीर आहे का विनोदी हे स्पष्ट करण धागा लेखकालाच शक्य आहे हे निश्चित धागा लेखातील एका परिच्छेदाकडे अनुषंगिक अवांतर चर्चेसाठी आपण पुन्हा येऊ
अनेक स्त्रीयांना एका जुन्या झालेल्या विवाहात सर्वात मोठी उणीव असते ती सौंदर्याच्या स्तुतीची (पुरुषा कडुन) कमतरता. वय वाढल्यानंतर हव्याहव्याश्या वाटणारय़ा रीअशुअर करणारया स्तुतीची गरज ही तहाने इतकी मुलभुत असते. त्याहुन मोठी गरज असते श्रोत्याची ( अथर्वशीर्षातील एक सुंदर ओळ म्हणते अव श्रोतारम ) ही गरज अनेक बहीरे झालेले जुनाट नवरे पुर्ण करुच शकत नाहीत. नंतर जो एक रोमॆंटीसीझम जो स्त्रीयांमध्ये अंगभुत असतो त्याला जुनाट नवरा अजिबात उपयोगी पडत नाही. या शिवाय जी एक मैत्रीची फ़्रेंडशिप ची आदिम गरज जितकी स्त्रीयांना असते ती ही जुन्या लग्नात पुर्ण होत नाही. शिवाय स्त्रीयांच्या पाचवीला पुजलेला सनातन एकटेपणा इ.इ. तर वरील सर्व गरजांची पुर्ती ही विवाहपश्चात व्याभिचारात होत असते.म्हणुन स्त्रीया मुळ वासनेपेक्षा ही अधिक फ़ोर्स असलेल्या वरील गरजांसाठी हा मार्ग चोखाळतात.
अशाच प्रकारच्या परिच्छेदात समकक्ष लेखन अमुक एका समुदायाच्या स्त्रीया अतृप्त असतात आणि त्यांना तृप्त करण्याची स्वाभाविक जबाबदारी तमुक समाजानी पार पाडली पाहीजे अशा स्वरूपाच लेखन करणारा कुणी समकालीन समाजोद्धारक या निमीत्ताने आठवतो का ? जस्टीफिकेशन काय तर अमुक समाजाच्या लोकांनी तमुक समाजाच्या बद्दल यापुर्वी अशीच कथा लिहिली ते लिहू शकतात तर आम्ही का नाही ? एकाने चूक केली म्हणून दुसर्‍याच्याही चुकीचे समर्थन होते आणि तेही असाहाय्य स्त्रीयांच्या शरीराचे बळी देऊन ? हा विशिष्ट प्रसंगही सोडून द्या हि एक्सक्युजेस (कि गद्धेगाळी ?) सर्वच प्रकारच्या समाजांच्या धर्मांच्या भाषेच्या प्रांताच्या लोकांकडून विवीध संघर्षात आपला अहंकार का सोय जपता येणारा सोपा स्त्रीयांना व्हिक्टीम बनवण्याचा मार्ग स्विकारून पुन्हा व्हिक्टीम ब्लेमींग करत असतात आणि पुन्हा उजळ माथ्याने समर्थनही केले जाते ? लीमाउजेटांनी उल्लेख केलेल्या चार्टात समुहसंघर्षातून स्त्रीया देणे लागतात का याचा अद्याप उल्लेख नसावा तसेही To owe आणि To own यातला फरक न समजणार्‍यांसाठी कुणीतरी तो चार्ट उपरोक्त भारतीय संदर्भांनी मराठीत बनवणे ऊपयूक्त ठरेल असे वाटते स्त्रीयांना स्पर्ष केव्हा स्विकार्य असतात या बद्दल चर्चा करा प्लॅटॉनिक गोष्टींबद्दल प्लॅटॉनिक चर्चा करण्याची भूक अवश्य भागवून घ्या. स्वयंनिर्णय घेण्यास पात्र दोन वयस्क व्यक्ति आपापसात परस्पर अभिव्यक्ती स्वांतंत्र्याचा आदर करून काय संबंध परस्पर स्थापित करतात हा त्यांचा त्यांचा प्रश्न आहे त्या बद्दल चर्चा करा ना नाही; परंतु हा विशीष्ट धागा लेख काही वेगळेच सुचीत तर करत नाही ना असे वाटल्याने चिकित्सा केली. कदाचित तसे नसेलही. धागा लेखक आणि इतर वाचक हो चु.भू दे.घे.

अजया 23/09/2014 - 09:42
माहितगार, एक स्त्री असूनही एवढा समर्पक प्रतिसाद लिहिता अाला नसता!धन्यवाद!!

सुबोध खरे 23/09/2014 - 10:53
आमच्या एका नौदलातील मित्राची बायको तोकडे कपडे घालून लग्न न झालेल्या( बँचलर) अधिकाऱ्यांच्या मेस च्या रस्त्यावर सकाळी धावायला जात असे. इतर वेळेसही ती पुरुषांशी( विशेषतः लग्न न झालेल्या) जरा "जास्तच मोकळे" पणाने बोलत असे किंवा बोलता बोलता त्याला स्पर्श करीत असे आणि मग एखादा पुरुषाने या स्पर्शाच्या पुढे जाण्याचा प्रयत्न केल्यास त त्याला फटकारत असे. यामुळे तिच्या बद्दल तेथे बरेच गैरसमज पसरले होते. तिचा नवरा हा अतिशय देखणा होता. नौदलात अभियंता म्हणून उच्च पदावर होता. परंतु तो आपल्या वयाप्रमाणे वागत असे (त्यांचा मुलगा तेंव्हा दहावीत होता) आणि त्याची बायको नवीन लग्न झाल्यासारखी वागत असे. तिचा आंतरजातीय प्रेमविवाह होता. नवरा बायकोचे व्यवस्थित प्रेम होते आणि त्यांच्यात कोणताही बेबनाव नव्हता. असे वागणे तिचे सर्वच पुरुषांशी नव्हते (कि ती जरा जास्तच मोकळी आहे म्हणून सोडून द्यावे). याची मनोवृत्ती थोडीशी लेखात वर्णन केल्या प्रमाणे होती. अनेक स्त्रीयांना एका जुन्या झालेल्या विवाहात सर्वात मोठी उणीव असते ती सौंदर्याच्या स्तुतीची (पुरुषा कडुन) कमतरता. वय वाढल्यानंतर हव्याहव्याश्या वाटणारय़ा रीअशुअर करणारया स्तुतीची गरज ही तहाने इतकी मुलभुत असते. त्याहुन मोठी गरज असते श्रोत्याची ( अथर्वशीर्षातील एक सुंदर ओळ म्हणते अव श्रोतारम ) ही गरज अनेक बहीरे झालेले जुनाट नवरे पुर्ण करुच शकत नाहीत. नंतर जो एक रोमॆंटीसीझम जो स्त्रीयांमध्ये अंगभुत असतो त्याला जुनाट नवरा अजिबात उपयोगी पडत नाही. या शिवाय जी एक मैत्रीची फ़्रेंडशिप ची आदिम गरज जितकी स्त्रीयांना असते ती ही जुन्या लग्नात पुर्ण होत नाही. याचे कारण त्या दोघांच्या कामवासनेत असलेला फरक असावा. तिने यासाठी मला आणि माझ्या बायकोला डॉक्टर म्हणून सल्ला सुद्धा विचारला होता. यामुळे वरील वर्णन हे अतिरंजीत आहे असे मला वाटत नाही. मुळात असा फरक (mismatched libido) हा थोड्या फार प्रमाणात १०० टक्के जोडप्यात असतो. आणि याला वाट करून देणे हे तितके सोपे नाही. बरेचसे पुरुष यासाठी पोर्नोग्रफिचा आधार घेतात.काही थोडे बाहेरख्यालीपणा वेश्यागमन इ इ करतात. पण तसा आधार स्त्रियांना सहज उपलब्ध नाही आणि समाजमान्य सुद्धा नाही. मग त्या असा कुठेतरी आधार शोधू पाहतात. अर्थात हि सर्व गृहीतके आहेत प्रत्येक प्रकरणी असेच असेल असेही नाही. स्त्रीला प्रत्येक वेळेस संभोगसुखच हवे असेल असे नाही तर साथीदार हवा असेल मानसिक आधार हवा असेल. आणि त्याचा सार्थ बरेच पुरुष तिला शरीरसुख हवे असा काढतात आणि म्हणून जेंव्हा ती स्त्री एका विशिष्ट पातळीच्या पुढे जाण्यास नकार देते तेंव्हा ते गोंधळून जातात. कारण त्यांच्या दृष्टीने एखादी स्त्री त्याचा हात हातात घेते याचा अर्थ ती शेवटपर्यंत जायची इच्छा ठेवते असा असतो. जात जाता एक किस्सा-- मी लष्कराच्या कोर्स साठी लखनौ ला गेलो असता तेथे आम्हाला एक आठवडा कॅम्प साठी एका माळरानावर पाठविले होते. त्यात एक दिवस पौर्णिमा होती. तेंव्हा माझ्या वर्गातील एका मुलीने मला रात्री फिरायला चल म्हणून विनंती केली. (तिचा प्रेमविवाह झालेला होता आणि तिचा नवरा आम्हाला चार वर्षे वरिष्ठ होता आणि लष्करातच होता.) आम्ही कॅम्प च्या बाजूला फिरायला गेलो असता मी तिला विचारले कि तू मला फिरायला चल असे का म्हणालीस.( आम्ही एम बी बी एस ची साडेचार वर्षे एकत्र होतो त्यामुळे तेवढा मोकळेपणा होता). त्यावर ती मला सरळ म्हणाली मला अजितची( तिच्या नवर्याची) आठवण येत होती आणि चांदण्यात पुरुषाबरोबर फिरावेसे वाटत होते. पण दुसर्या कुणाबरोबर जावे तर लोक वेगळा अर्थ काढतील. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे कि तू कोणताही गैरसमज करून घेणार नाहीस. ( मी मुंबईचा होतो त्यामुळे स्त्रीपुरुशात निकोप मैत्री असू शकते यावर माझा पूर्ण विश्वास आहेआणि उत्तर भारतिय पुरुषांसारखा संकुचित दृष्टीकोन नाही हे तिला साडेचार वर्षे एकत्र काढल्यामुळे माहित होते). आम्ही वीस पंचवीस मिनिटे फिरून परत आलो. याची आम्ही वाच्यता केली नाही कि त्याबद्दल कुठेही चर्चा झाली नाही.

In reply to by सुबोध खरे

स्त्रीयांना थेट शरीर संबंधात इंटरेस्ट नसतो वा फार कमी असतो ,या माझ्या विधानाला पुष्टी देणारी बरीच उदाहरणे याच धाग्यात आली आहेत. उपरोक्त उदाहरण याच प्रकारची पुष्टी देत आहे.

In reply to by नानासाहेब नेफळे

सुबोध खरे 23/09/2014 - 19:47
हे विधान अर्धसत्य आहे. स्त्रियांची कामवासना पुरुषांच्या इतकीच प्रगल्भ असते हे सिद्ध झालेले आहे. परंतु बालपणापासूनच "हे" वाईट असे कानी कपाळी ओरडून सांगितले जाते. स्त्री हि क्षणाची पत्नी आणि अनंत कालची माता अशा तर्हेच्या वाक्यांच्या प्रभावामुळे सुद्धा विवाहानंतर त्यांचे मत परिवर्तन होत राहते. अशा सामाजिक दबावामुळे त्यांचे मत सेक्स बद्दल कलुषित होत असते शिवाय वाढत्या वयात पुरुषांचे नको असलेले स्पर्श सहन करीतच त्यांचे आयुष्य पुढे जात असते त्यामुळे एक तर्हेचा पूर्वग्रह प्रस्थापित होत जातो. ज्या समाजात स्त्रियांना बरेच स्वातंत्र्य मिळते तेथे स्त्रिया शरीरसंबंधात पुढाकार घेताना दिसतात अर्थात संस्कृती रक्षक याला promiscuous(स्वैराचारी) म्हणतात. यानंतर विवाहानंतर जेंव्हा प्रत्यक्ष संभोग सुखाचा अनुभव मिळतो त्यात बर्याच वेळेस पुरुष स्त्रियांना गृहीत धरतात. तिला रतीनिष्पत्ती (ORGASM) होतो कि नाही या बद्दला बर्याच पुरुषांना काहीही घेणे देणे नसते. मुळात स्त्रीचा संभोग सुखाचा अनुभव हा दीड मिनिटात संपणाऱ्या पॉप संगीतासारखा नसून सावकाश फुलणाऱ्या रागदारी सारखा असतो त्यामुळे पुरुषाने स्त्रीला फुलविण्याचा प्रयत्न केलाच नाही तर विलंबित सुरु होताहोताच मैफिल संपल्याचा वैफल्यग्रस्त अनुभव तिला येतो. असा अनुभव वारंवार आला तर मुल जसे एखादा कॉम्पुटर गेम हरत असेल तर बंद करून टाकते आणी त्याला तो परत खेळावासा वाटत नाही. तद्वत स्त्रीला नुसते हवेत चढून खाली आपटण्यात रस राहत नाही. मग असा अनुभव घेण्य़ापेक्षा पुढाकार न घेणेच तिला सोयीस्कर वाट्त राहते. अर्थात केवळ एवढेच सत्य असेल असाही माझा दावा नाही. पूर्ण सत्य याहूनही बरेच सखोल आणी गहन असेल.

In reply to by सुबोध खरे

या धाग्यावर बोला!! स्त्री मुक्ती आंदोलन, झिंदाबाद!!! या अनुषंगानं भन्नाट चर्चा झाली होती. आणि नेमका हाच विचार त्यावेळी मी तिथे मांडला होता!

In reply to by सुबोध खरे

कवितानागेश 23/09/2014 - 21:57
हा एक खूपच महत्त्वाचा मुद्दा आहे, जो कसा मांडावा हे मला कळत नव्हतं... शिवाय वाढत्या वयात पुरुषांचे नको असलेले स्पर्श सहन करीतच त्यांचे आयुष्य पुढे जात असते त्यामुळे एक तर्हेचा पूर्वग्रह प्रस्थापित होत जातो.> हा केवळ पूर्वग्रह नसतो, तर तो trauma असतो. अगदी मोठं होउन लग्न झाल्यानन्तरही अश्या पूर्वीच्या भीषण अनुभवातून गेलेल्या स्त्रिया स्त्रीपुरुष संबंधात सुरुवातीला कचरतात. अजून खोलात जाउन विश्लेषण करायचं झालं तर स्पर्शात 'भोगा'ची भावना असेल तर कचरतात, आपलेपणा असेल, आदर असेल, तर मोकळ्या होण्याची शक्यता असते. त्याशिवाय chemistry हा भाग आहेच. असो.

In reply to by सुबोध खरे

प्रसाद१९७१ 24/09/2014 - 14:00
हे विधान अर्धसत्य आहे. स्त्रियांची कामवासना पुरुषांच्या इतकीच प्रगल्भ असते हे सिद्ध झालेले आहे.
प्रगल्भतेची व्याख्या ह्या बाबतीत माहीती नाही, पण माझ्या अनुभवा प्रमाणे पुरुष सेक्स चा जवळ जवळ सतत ( More frequently ) करत असतो, पण स्त्रियांना जरी कामवासना असली तरी त्या सतत त्याच्या बद्दल विचार करत नसतात.

In reply to by सुबोध खरे

मारवा 23/09/2014 - 21:41
तुमचा प्रतिसाद अतिशय आवडला अतिशय प्रामाणिक अनुभवावर आधारीत व त्यातील मिसमॅच्ड लिबीडो वर केलेले मत अतिशय मार्मिक आहेत. मात्र तुम्ही मुंबईचे आहात म्हणुन विशाल द्रुष्टीकोणाचे उत्तर भारतीय पुरुष संकुचित हे सरसकटीकरण धक्कादायक वाटलं, त्यासाठी तुमच्या मैत्रीणीच्या मानसिकतेचा मी निषेध करतो. मी खर म्हणजे वरील माझ्या लेखात अनेक मुद्दे नाइलाजाने टाळले त्यामुळे अनेक गैरसमज निर्माण झाले. माझ्या संकोचाचे कारण सेन्सॉर चे भय यामुळे होत काय की फार जपुन जपुन लिहाव लागत आणि त्यामुळे आणि सध्या एक नविन गोष्ट माझ्या ल़क्षात आली ती अशी की माझ्या शैली मुळे देखील गैरसमज होतात. माझ्या चरीत्रहीन मित्रा बरोबर झालेल्या चर्चा अजुन विस्ताराने मांडण्याचा मानस आहे. बघु या जमत का

In reply to by मारवा

मदनबाण 24/09/2014 - 12:17
विवाहानंतर जेंव्हा प्रत्यक्ष संभोग सुखाचा अनुभव मिळतो त्यात बर्याच वेळेस पुरुष स्त्रियांना गृहीत धरतात. तिला रतीनिष्पत्ती (ORGASM) होतो कि नाही या बद्दला बर्याच पुरुषांना काहीही घेणे देणे नसते. मुळात स्त्रीचा संभोग सुखाचा अनुभव हा दीड मिनिटात संपणाऱ्या पॉप संगीतासारखा नसून सावकाश फुलणाऱ्या रागदारी सारखा असतो त्यामुळे पुरुषाने स्त्रीला फुलविण्याचा प्रयत्न केलाच नाही तर विलंबित सुरु होताहोताच मैफिल संपल्याचा वैफल्यग्रस्त अनुभव तिला येतो. असा अनुभव वारंवार आला तर मुल जसे एखादा कॉम्पुटर गेम हरत असेल तर बंद करून टाकते आणी त्याला तो परत खेळावासा वाटत नाही. तद्वत स्त्रीला नुसते हवेत चढून खाली आपटण्यात रस राहत नाही. मग असा अनुभव घेण्य़ापेक्षा पुढाकार न घेणेच तिला सोयीस्कर वाट्त राहते. अर्थात केवळ एवढेच सत्य असेल असाही माझा दावा नाही. पूर्ण सत्य याहूनही बरेच सखोल आणी गहन असेल.strong> डॉकशी परत एकदा पूर्णपणे सहमत ! हा प्रतिसाद वाचुन उगाच २ वर्षा पूर्वी पाखरां बद्धलची एक चिंटुकली पिंटुकली चावट पाकॄ लिहल्याचे आठवले ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- ई निविदा घोटाळा प्रकरण : महापालिकेचे नऊ अभियंते निलंबित

In reply to by मदनबाण

टवाळ कार्टा 24/09/2014 - 12:46
हा प्रतिसाद वाचुन उगाच २ वर्षा पूर्वी पाखरां बद्धलची एक चिंटुकली पिंटुकली चावट पाकॄ लिहल्याचे आठवले !
हायला...काय सुसाट आहे पा.क्रु. (चायला तो "कॄ" कसा लिहितात कोणी सांगेल का?)

In reply to by सुबोध खरे

प्रसाद१९७१ 01/10/2014 - 09:25
खरे साहेब - माझे एक निरिक्षण. पटले नाही तर सोडुन द्या. तुमच्या मैत्रिणी बरोबरचा प्रसंग नक्कीच २०-२५ वर्ष जुना असेल. पण तुम्हाला तो आजही स्पष्ट आठवतो, हे काहीतरी सांगतय. :-) एखादी घडुन गेलेली गोष्ट जर मनात पुन्हा पुन्हा घोळली गेली नाही तर ती विस्मृतीत जाते. तुमच्या तो प्रसंग आठवणीत आहे म्हणजे तुमच्या मनात गेली २०-२५ वर्षे तो प्रसंग मधे मधे येतो आहे. ह्यातुन काय कळते तुमचे तुम्हालाच तुमच्या बद्दल. :-)

In reply to by प्रसाद१९७१

टवाळ कार्टा 01/10/2014 - 09:35
वरचा प्रतिसाद जर कोपरखळी नसेल तरच माझा हा प्रतिसाद वाचावा (नाहीतर ढुंकूनसुध्धा नका बघू :) ) यातून २ गोष्टी नक्कीच समजतात १ - डॉ. यांना तिक्ष्ण स्मरणशक्ती आहे २ - तुम्ही ४०शी पार केली पण अजून निखळ मैत्री काय असू शकते ते माहित नाही

In reply to by पैसा

प्रसाद१९७१ 01/10/2014 - 09:47
असे प्रसंग रोज रोज घडत नसतात. डॉक्टर विसरले असते तरच प्रॉब्लेम म्हणायला पाहिजे!
तेच तर म्हणतो मी. हा प्रसंग डॉकटरांसाठी "खास" बनुन राहीला इतके वर्ष. म्हणुन तर मुद्दाम विचारले.

In reply to by प्रसाद१९७१

सुबोध खरे 01/10/2014 - 10:04
प्रसाद साहेब, माझ्या मैत्रिणीचा नवरा (अजित) हा आम्हाला मेडिसिन शिकवायला होता.ते आमच्यापेक्षा चार वर्षे वरिष्ठ होते त्या शिकवण्याच्या काळात त्यांचे प्रेम जमले त्यामुळे ते आमच्या गटाकडे "जास्त" लक्ष देत असत .या बद्दल पण आम्ही त्याना चिडवत होतो. त्याना आमच्या ब्याचचा जावई म्हटले जात असे. मुळात तो शिक्षक म्हणून अतिशय चांगला होता आणि अतिशय सज्जन होता. पुढे त्याना ( अजितना ) मेंदूचा ट्युमर झाला. तेंव्हा ते उपचारासाठी कमांड हॉस्पिटल पुणे येथे होता. त्यानची शल्यक्रिया झाली त्यातून ते सुधारले. पण काही वर्षांनी ट्युमर परत उपटला आणि त्यात दुर्दैवाने त्यांचे देहावसान झाले. या सर्व कालावधीत मी पुण्यातच पोस्टेड होतो त्यामुळे मी या दुर्दैवी घटनांचा साक्षीदार होतो. आपण म्हणता तसा मला मैत्रिणीबद्दल "सोफ्ट कॉर्नर" मुळीच नव्हता. शिवाय दुर्दैवाने आमच्या वर्गातील एकही मुलगी मला "तशी" आवडली नव्हती. त्यामुळे उगाचच कोणत्याहि मुलीवर लाईन मारणे हे माझ्या स्वभावात नव्हते.(काही मुलीना मी आवडलो होतो पण उगाच स्टाइल मारण्यासाठी त्यांना मोटारसायकल वर फिरवणे माझ्या स्वभावात बसणारे नव्हते). त्यामुळे मी "इनोसंट" आहे असा माझ्या वर्गातील मुलींचा माझ्याबद्दल समज होता. गंमत म्हणजे असे त्यातील एका मुलीने माझ्या बायकोला नंतर बोलूनही दाखवले.

In reply to by सुबोध खरे

प्रसाद१९७१ 01/10/2014 - 10:41
डॉ साहेब, शीताफीने मूळ प्रश्नाला बगल दिलीत. मी विचारले होते की २५ वर्ष जुना असा एक छोटासा प्रसंग ( तो सुद्धा तुम्हाला सॉफ्ट किंवा कसलाच कॉर्नर नसलेल्या व्यक्तीच्या बाबतीत घडलेला ) अजुन स्पष्ट आठवतो आहे, ते कसे काय? इतकाच प्रश्न होता. ट.का. म्हणतोय तशी तुमची स्मरणशक्ती तीक्ष्ण आहे असे मानुन चालू.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

प्रसाद१९७१ 01/10/2014 - 14:55
नाही हो, काही नाही. मी डॉक्टर साहेबांचा फॅन आहे. त्यांचे मिपा वर लिखाण दिसले ( प्रतिसाद सुद्धा ) की लगेच वाचतो. त्यामुळे डॉक्टरांना त्रास द्यायचा हेतू अजिबात नाही. मी विचार करत होतो की माणुस काय गोष्टी स्मरणात ठेवतो आणि त्या का ठेवतो ह्या बद्दल.

In reply to by प्रसाद१९७१

सुबोध खरे 01/10/2014 - 19:37
प्रसाद साहेब माझी स्मरणशक्ती एकदम तीक्ष्ण आहे. सगळं कसं स्वच्छ आणि स्पष्टपणे आठवतं. फक्त मला तीनच गोष्टी आठवत नाहीत १) माणसांची नावे २) माणसांचे चेहेरे ३) तिसरं काय बरं ? आत्ता नेमकं आठवत नाहीये. *pleasantry* *db* :db:

In reply to by सुबोध खरे

एस 03/10/2014 - 11:25
माझी स्मरणशक्ती एकदम तीक्ष्ण आहे. सगळं कसं स्वच्छ आणि स्पष्टपणे आठवतं. फक्त मला तीनच गोष्टी आठवत नाहीत १) माणसांची नावे २) माणसांचे चेहेरे ३) तिसरं काय बरं ? आत्ता नेमकं आठवत नाहीये.
सेम पिंच डॉक्टर! मलाही नेमक्या कुठल्या तीन गोष्टी आठवत नाहीत हे आठवता आठवता तुमचा हा प्रतिसाद दिसला! म्हटलं विसरायच्या आत नोंद करून ठेऊ. ;-)

In reply to by प्रसाद१९७१

चित्रगुप्त 02/10/2014 - 20:18
स्मरणशक्ती बद्दल माझा अनुभव नमूद करू चाहतो: मला माझ्या बालपणातले आणि तरूणपणातले सर्व व्यवस्थित आठवते, परंतु मी काल काय खाल्ले, काय केले, गेल्या आठवड्यात वा महिन्यात काय काय घडले, वगैरे आठवायला फार त्रास होतो, खरेतर आठवतच नाही. असे काही वर्षांपासून झालेले आहे.

In reply to by टवाळ कार्टा

प्रसाद१९७१ 01/10/2014 - 09:46
अहो अनेक प्रसंगातुन ( ज्यात त्यांना वेगवेगळ्या मित्रांनी फिरायला बोलवले असेल ) डॉ साहेबांना हा २५ वर्ष लक्षात राहीला. काहीतरी उजळणी झालीच असेल ना मनात. बादवे, मला डॉ साहेबांच्या उत्तराची उत्सुकता आहे.

कवितानागेश 23/09/2014 - 11:09
क्लीयर थिन्किन्गः सरळ म्हणाली मला अजितची( तिच्या नवर्याची) आठवण येत होती आणि चांदण्यात पुरुषाबरोबर फिरावेसे वाटत होते. पण दुसर्या कुणाबरोबर जावे तर लोक वेगळा अर्थ काढतील. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे कि तू कोणताही गैरसमज करून घेणार नाहीस. > ही मॅच्युरिटी किंवा आपल्याला नक्की काय हवय हे प्रत्येक व्यक्तीला नेहमीच कळतं असं नाही. त्यातूनच गैरसमज होत रहातात. EQ चांगला असेल तर १ सेकंदात कळतं, की समोरच्या व्यक्तीला आपण केलीली गोष्ट आवडलेली नाही/ आवडली. मग पुढची complications होत नाहीत. :)

In reply to by कवितानागेश

माझ्या मते अनेक माणसांना आपल्या भावना आपल्या ताब्यात आहेत. विशेषतः समाजात आपली प्रतिमा निर्माण करतांना आपल्या लैंगिक भावना ह्या पूर्णपणे आपल्या कह्यात आहेत असे अनेकांना वाटते तसे खरच असते का.

In reply to by सस्नेह

टवाळ कार्टा 23/09/2014 - 13:05
..ताऱ्यांचा उगम जमिनीपासून दीड फुटावर झाला असल्याचे जाणवते.
घोर अन्याय...stereotype करण्याचा प्रयत्न...लेखात दिलेली वस्तुस्थीती असुच शकत नाही असे दाखवण्याचा प्रयत्न

In reply to by टवाळ कार्टा

सस्नेह 23/09/2014 - 13:23
लेखात दिलेली वस्तुस्थीती असुच शकत नाही असे दाखवण्याचा प्रयत्न
नाही. 'कल्पनेचे तारे ' असे म्हणण्याचे कारण असे की लेखकाने व्यक्त केलेली मते ही घडलेल्या घटनेचे प्रत्यक्ष वर्णन नसून लेखकाच्या मतानुसार केलेले विश्लेषण आहे. तसेच त्यांच्या मित्राने कथन केलेल्या गोष्टी म्हणजे घडलेल्या गोष्टीचे त्यांना वाटलेले सापेक्ष निवेदन आहे असे लेखावरून दिसत आहे.

In reply to by सस्नेह

विलासराव 23/09/2014 - 13:47
मीतर वाचलय की सॉक्रेटीस कुठले तरी पुस्तक ३०-३५ वर्शे लिहीत होता, सुधारणा करत होता. अचानक एकदा त्याच्या घराबाहेर गोंगाट झाला . तो बाहेर आला तर कोणीतरी कोणालातरी गोळी मारली होती आनी ती व्यक्ती ठार झाली होती. दिवसाढवळ्या ही घटना घडल्याने त्याने बर्याच जनांशी संवाद साधला आनी ईतकी वेगवेगळी उत्तरे त्याला मिळाली ही तो हैराण झाला. प्रत्यक्ष घटणेचे हे हाल तर मी माझे जीवनभरचे अनुभव्/घटना लिहीतोय त्यात काय तथ्य आहे असे वाटून त्याने ते लिहीलेले कागद जाळून टाकले. सोर्स: ओशोंचे कुठलेसे पुस्तक.

In reply to by प्यारे१

विलासराव 23/09/2014 - 18:20
गल्ली चुकलं की तुमचं ते! प्यारेकाका सार घ्या त्या कथेतुन. कशाने का मरेना.बाकी तुमची मर्जी. बाकीच्यांकडुन फार अपेक्षा नाहीतच पण प्यारेकाका तुम्हीसुद्धा????

In reply to by विलासराव

प्यारे१ 23/09/2014 - 18:49
मला 'परिपूर्ण एकटेपणा' धाग्यावरचा प्रतिसाद वाटलेला. माझंच गल्ली चुकलेलं दिसतंय. लोड नका घेऊ. होतंय कंदी कंदी!

In reply to by प्रसाद१९७१

प्रसाद भौ, त्यांनी गोळी मारली असे लिहले आहे, बंदुकीतुनच मारली असा त्यांचा दावा नाही . ब्रुसलीच्या एका चित्रपटात तो अंगठ्याखाली तर्जनी ठेऊन त्यामधे छर्रा पकडून एका व्हिलनला मारतो व त्याच्या कपाळात छर्रा घुसल्याने तो व्हिलन मरतो. साँक्रटीसच्या काळी एखादा ब्रुसली असेल.

In reply to by पैसा

सुबोध खरे 23/09/2014 - 19:58
तसेच त्यांच्या मित्राने कथन केलेल्या गोष्टी म्हणजे घडलेल्या गोष्टीचे त्यांना वाटलेले सापेक्ष निवेदन आहे असे लेखावरून दिसत आहे. या वरून मला असे वाटते

In reply to by पैसा

टवाळ कार्टा 23/09/2014 - 20:10
मग ते त्यांनाच सांगुदेकी...एका आणाहितेला काही विचारले की ती येते की नाही याऐवजी कोणी दुसरी येतेच...एकीचे बळ अगदी ठसठसून दिसते ;)

In reply to by टवाळ कार्टा

पैसा 23/09/2014 - 20:43
हां गैरसमज तुमच्याबद्दल असता तरी सांगितलं असतं हो! तिला डोक्टरना म्हणायचं असतं तर त्याना उपप्रतीसाद दिला असता नाही का! गैरसमज दूर होणं महत्त्वाचं.

In reply to by टवाळ कार्टा

सस्नेह 23/09/2014 - 21:27
मीटिन्गमधे अडकले होते ऑफिसात म्हणून देऊ शकले नाही उत्तर हो टवाळभौ. पण पैतैने दिलेय ना माझ्यावतीने !

In reply to by सुबोध खरे

सस्नेह 23/09/2014 - 21:24
माझा प्रतिसाद मूळ लेखावरच आहे हो सुबोधजी. तिरक्या होत गेलेल्या लेवलमुळे तुमच्या प्रतिसादाखाली आला की काय ?

vikramaditya 23/09/2014 - 22:21
अनेक गोष्टी आपल्याला ज्ञात नसतात किंवा आपल्याला त्याचा कधी अनुभव आलेला नसतो. (खरं म्हणजे 'सत्य हे आपल्या कल्पनेच्या फार पलिकडे असु शकते' असे म्हणणार होतो. पण परत तो 'सत्याचा' विषय नको.) त्यामुळे आपल्या माहिती/अनुभव विश्वापलीकडील एखाद्या प्रसंग वा घटनेविषयी 'असे होउच शकत नाही' असा दावा करणे अयोग्य वाटते. आपल्या लाडक्या मिपाच्या भाषेत ' बाकी चालु द्या.'

In reply to by धडपड्या

बॅटमॅन 24/09/2014 - 15:55
सर्व मुस्लिम समाजात नव्हे. फक्त काही देशांत, मुख्यतः आफ्रिकन देशांत. अन ही प्रथा इस्लामपूर्व काळापासून चालू आहे.

निमिष सोनार 26/09/2014 - 15:16
दहा मिनीटांचा सुचक स्पर्श सहन केल्यावर म्हणाली की तुम्ही जो स्पर्श केला ना खर तर तो मला अजिबात आवडला नाही. चरीत्रहीन मित्र अनुभवी असल्याने त्याने तात्काळ विषय संपवला. यामध्ये मग गरजु पुरुष मात्र एकमेव हेतुने वरील सर्व गरजांची प्रामाणिक पुर्तता करुन वसुली साठी पुढे जसा सरकतो तशा मग मात्र पुर्ण सावध असलेल्या चरीत्राची काच जपणारया स्त्रीया मग माघार घेतात. प्रियकर लहान असेल तर मग अशा स्त्रीया लगेच पेरेंटल मोड मध्ये जातात, व पालकाच्या भुमिकेतुन शिकवणी घेउ लागतात. यात मजा अशी असते की स्त्रीयांचे चरीत्र ही अबाधित राहते व स्खलनातला आनंद ही पुर्ण उपभोगता येतो वरील उदाहरणातील - यात स्खलनातला आनंद कुणाला उपभोगता येतो असे लेखकाला म्हणायचे आहे? मला वाटते "स्त्रीला"!! तसे जर असेल तर तीला दहा मिनिटांच्या "त्या" स्पर्शात "स्खलन" म्हणजे ओरगैजम सारखे सुख अनुभवता येते. पण पुरुष बिचारा, त्याचे काय ?? त्याने काही "अनुभवण्या" आधी त्याला माघार घ्यावी लागली. एनीवे, विषय खूप छान आणि वेगळा आहे. आणखी माझे मत सविस्तर मांडेन. आता वेळ नाही.... टीप: स्खलन म्हणजे ejaculation असा अर्थ मी घेतला आहे. चू. भू. द्या. घ्या.

In reply to by निमिष सोनार

ओ दादा, वीर्यस्खलन नाय हो स्खलन. शब्दश: अर्थ, बहुधा पडणे (अध:पतन या अर्थाने) च्यायला, दहा मिनिटांच्या सूचक स्पर्शाने orgams?? आणि तथाकथित संस्कृतीरक्षक विचारतात, लैंगिक शिक्षणाची गरज काय म्हणून.

चैदजा 28/09/2014 - 20:24
तिने स्पष्ट सांगितले की स्पर्श मला आवडला नाही. मग तिने स्खलनातला आनंद ही पुर्ण उपभोगला, हे तुम्ही कसे सांगु शकता ? तुम्ही म्हणता त्यप्रमाणे अशा स्त्रीया मानसिक पातळी वर च केवळ व्याभिचार करत असतात. तुम्ही कबुल करता, असे वागणे हा व्याभिचार आहे. काही स्त्रियांना हे १० मिनीटात समजते, काहींना तो १० वर्षांनी बावळटपणावाटतो. (या वाक्याला खरे साहेबांच्या लेखा वरील बाणाला बाण प्रतिसादांचा आधर आहे.)

कवितानागेश 28/09/2014 - 23:23
एक मानसिक पातळीवर सर्व काही अनुभवुन घेतात आणि द मोमेंट तो पुरुष पुढे सरकला की त्याला ब्रेक मारतात.>> हे गृहितकच फार गमतीदार आहे. जर का मानसिक पातळीवर असं सगळं अनुभवता येत असेल, तर कुणातरी व्यक्तीमध्ये प्रत्यक्ष वेळ कशाला वाया घालवायचा?? सगळ्या स्त्रिया आणि सगळे पुरुष एकटेच मजेत रहातील. तसेही उपरोक्त बाईनी 'आवडलं नाही' असं स्पष्ट साम्गितलं असताना 'तिला खरं तर आवडलं होत्तच्च मुळ्ळी!' असा हट्ट का धरलाय कळलं नाही.

In reply to by कवितानागेश

मारवा 29/09/2014 - 21:30
कारण अशा स्त्रीयांना मानसिक पातळीवर समाधान मानुन घ्यावे लागते ही त्यांची मजबुरी असते. दुधाची तहान ताकावर भागवणे म्हणतात असे. सगळच मानसिक पातळीवर अनुभवता येत पण ते पुर्ण आनंद जो केवळ क्रीयेने मिळतो त्याचा पर्याय होउ शकत नाही हे तर उघड सत्यच आहे ते कुठे अमान्य केलय ? पण त्यांना त्या क्रियेपर्यंत जाण्याचे धाडस नसते म्हणुन त्या ही मर्यादीत आनंदाची वाट निवडतात असे म्हटलेले आहे. त्यांनी आवडल नाही हे स्वतःचे मानसिक पातळीवर स्वतःच्या ठरवलेल्या मर्यादेत समाधान झाल्यावर पुढील स्टेप टाळण्यासाठी म्हटल होत त्या अगोदर चा अविरोध हा स्ट्रटेजीक होता. हा कनिंगनेस मात्र स्त्रीयांत असुच शकत नाही सर्व स्त्रीया या ब्रम्हकुमारीच असतात अश्या नसतात च मुळी आदि च डोक्यात घट्ट असतील तर मग मात्र अर्थातच वरील विवेचन अस्वस्थ करु शकते.

माहितगार 29/09/2014 - 08:32
तसेही उपरोक्त बाईनी 'आवडलं नाही' असं स्पष्ट साम्गितलं असताना 'तिला खरं तर आवडलं होत्तच्च मुळ्ळी!' असा हट्ट का धरलाय कळलं नाही.
" स्त्रीनी आवडलं नाही म्हटल तरी आवडलेल असत, पुढाकार पुरुषांनी घ्यावयाचा असतो आणि अशा पुढाकार घेण्यात पौरुषत्व आहे, जर लगेच विरोध केला नाही तर नक्कीच हवे होते " हि एक पसरवल्या जाणार्‍या विचीत्र गृहीतकांची मालिका आहे. या धागा लेखातील सभ्यता-दर्शक तोल सांभाळुन हे शब्द काढून घ्या मग हे अस पसरवले जाणारे अपसमज वेळीच खोडले न गेल्या मुळे (प्रॉपर ऑब्जेक्शन हँडलींग न झाल्याने) समाजात पसरत राहतात आणि अशा स्वरूपाचे अपसमज स्त्रीयांवरील अत्याचारांना कारणीभूत होऊ शकतात हे लक्षात घेतले पाहीजे असे वाटते. अशा पुरुषांना १२व्या मजल्यावरून उचलून खाली स्त्रीयांनी उचलून खाली फेकताना ते स्त्रीयांनी उचलून वर धरतानाचा स्पर्ष आणि अनुभव लगेच आवडला नाही म्हणण्यासाठी भितीने तोडातून शब्द बाहेर पडला नाही, तरी तो स्पर्ष आणि वर उचलले जाण्याचा अनुभव त्यांना आवडलेलाच असतो, आणून समजा चुकून तोंडातून शब्द बाहेरपडलाही आणि बाराव्या मजल्यावरून जमीनीवर खाली फेकून देणे आवडत नाहीए असे सांगितले तरी त्यांना ते मनातून आवडतच असते. असा अपसमज स्त्रीयांमध्येही बळावलेला असता रोजी दोनचार पुरुषांवर अत्याचार झाले असते तरीही पुरुषांनी अशा तर्कांचे आणि अपसमजांचे समर्थन केले असते का ? (सर्व उत्तरदायकत्वास नकारः हा केवळ युक्तीवाद आहे असे करण्याचे कुणासही प्रोत्साहन अथवा समर्थन नव्हे.) अनेक शक्यतांपैकी एकाच शक्यतेकडे निर्देश करणे आणि त्यावरून नियम बनवण्याचा प्रयत्न खरेच तर्कसुसंगत असतो का ? एखादी न आवडणारी गोष्ट अनपेक्षीत पणे घडत असेल तर लक्षात येऊन प्रतिरोध करण्याची नकार देण्याची पद्धत प्रत्येकवेळी प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत निरनिराळी असू शकते. तुम्ही पब्लिक प्लेस मध्ये आहात का एकटे आहात, सोबतची व्यक्ती परिचीत आहे का अपरिचीत, लगेच विरोध केला तर अपमान समजून पुन्हा अपमानाचा बदला म्हणून अधिक अत्याचारतर करणार नाहीना अशा प्रकारच्या भिती, किंवा जगातल्या बहुतांश लोकांना स्त्री असो वा पुरुषांना Patience (संयम- इथे समोरच्या व्यक्तीचा पाणउतारा करून विरोध करणे या अर्थाने) आणि Tolerate (सहन) करणे यातला फरकच मुळी माहीत नसतो. इंग्रजीत Don't tolerate but have patience अशा प्रकारची काही म्हण आहे. कि सहन करू नका पण मनाचा संयम ठेवा पण बहुतांश लोकांचे उलटे होते नको असलेल्या गोष्टी सहन करण्यात काही काळ जातो आणि मग नंतर लक्षात येते आपण विनाकारण सहन करतोय तो पर्यंत राग अनावर होऊन संयम सुटलेला असतो पण या संयम समजून शांतपणे सहन करण्याचा दुसरे लोक दुर्दैवाने वेगळा अर्थ काढत असतात, एखादी व्यक्ती सहन करतीए आणि विरोध नोंदवण्यास विलंब करते म्हणजे तो अत्याचार तिला हवाच असतो असे नव्हे हे समजून घेणे गरजेचे आहे असे वाटते.

In reply to by माहितगार

मारवा 29/09/2014 - 21:20
माहीत गार मी जो प्रसंग लेखात दिलेला आहे तो सत्य प्रसंग आहे व जिवंत व्यक्ती त्यात इन्व्हॉल्व्ड आहेत. मी सेन्सॉर मुळे अनेक डीटेल्स जाणीवपुर्वक टाळतो. कारण मिपावर एक मर्यादा येते व्यक्त होण्यात. आता थोड उलगडुन सांगतो. ज्या स्त्री बरोबर वरील प्रसंग घडला तिच्या मांडीवर दहा मिनिट हात ठेवलेला होता. (तुमच वय व अनुभव स्त्री पुरुष संबंधाच्या संदर्भात ) मला माहीत नाही. पण नर मादीचे प्रणयाचे आदिम खेळ व त्याचे अलिखीत नियम माहीत नसतील तर सांगतो. की नर व मादी यांच्यात एक केमेस्ट्री क्रीएट होत असते एका विशिष्ट वेळी तिथे स्पर्शाची अत्यंत प्रभावी भाषा नजरेच्या सोबतीने वापरली जात असते. यात नराने मादीला दिलेला संदेश/ आवाहन अत्यंत सुस्पष्ट स्वच्छ असतो. भाषेपेक्षा कैक पट प्रभावी. तुम्ही कुठल्याही स्त्री कडे अगदी चोरटा अगदी निसटता कामुक कटाक्ष जरी टाकला तरी तिला तुमचा हेतु वा नियत अगदी निसंदीग्ध रीत्या कळतेच. आता त्यानंतर पुढील प्रतिसाद कसा द्यावा हा जिचा तिचा प्रश्न असतो. स्वीकार की नकार हा केस वाइज वेगवेगळा असतो. पण असे कधीच होत नाही की स्त्री ला कळलचं नाही की नराचा हेतु काय होता ? यावर अनेक शास्त्रीय संशोधन झालेल आहे पण सोप्या मराठीत सांगायच तर असे कधीच शक्य नाही की हेतुच कळला नाही ( वरील एकांतातील स्पर्श व संवाद (जो मी देउ शकत नाही ) व नजर जी दाखवता येत नाही. माझा मित्र थेअरीज नुसत्या जाणत नाही तर तो प्रत्यक्ष स्त्री पुरुष संबंधातील अनुभवी माणुस आहे. जे जे स्वेच्छेने संबध स्थापित होत असतात त्या मार्गातला तो आहे. त्याने रेप बळजबरी वा फसवणुक वा लपवाछपवी कधीही केलेली नाही त्या बाबतीत तो अतिशय प्रिन्सीपल्ड म्हणावा असा आहे. आता आपल्याअ नैतिकतेच्या कल्पनाच इतक्या तकलादु व बेगडी आहेत की त्यावर काय बोलणार ? आपले तथाकथित ९५ ट्क्के धार्मिक नितीनियम हे केवळ आणि केवळ सेक्स सेंटर्ड आहेत. यामागे अनेक अनेक कारणे आहेत पण एक लेख जरुर तुम्ही वाचावा अशी विनंती त्यावरुन कीमान नैतिकतेचा ढोबळ अर्थ तरी तुम्ही घेणार नाही अशी अपेक्षा http://www.misalpav.com/node/26124

In reply to by मारवा

माहितगार 29/09/2014 - 23:23
१) तुम्ही पूर्ण वर्णन लिहा अथवा न लिहा, ते तुमच्या तथाकथीत मित्रानी सांगीतलय म्हणजेच प्रत्यक्षदर्शी वर्णन नाही आहे. २) संबंधीत स्त्रीचा यात कुठेही जवाब येत नाही आहे ३) चर्चेत सहभागी होणार्‍या कुणालही संबंधीत व्यक्तींची उलटतपासणी घेता येणार नाही आहे. ४) जी काही तथाकथीत माहिती आपण देऊ इच्छिता ती वस्तुनिष्ठ असल्याची खात्री होणे शक्य नाही आहे. ५) आपल्या लिहिण्याच्या शैली वरून आपण दुसर्‍या व्यक्तीचे (संबंधीत स्त्रीचे) म्हणण्याची कोणतीही पडताळणी न करता कुणातरी अबकडला स्वतः डोळे झाकून प्रिन्सीपल्डनेसचे सर्टीफिकेट देत आहात आणि त्याच वेळी इतर सर्वांच्या नैतिकतेच्या कल्पनाच इतक्या तकलादु व बेगडी आहेत असा आक्षेप घेत आहात; हे जरासे एकतर्फी वाटते आहे. ५) आपल्या म्हणण्यावर विश्वास ठेवायचा म्हटल तरीही ती अनेक शक्यतांपैकी केवळ एक शक्यता उरते आहे, आणि माझा उपरोक्त प्रतिसादातील आक्षेप एका शक्यतेच्या बळावर सरसकट निष्कर्ष काढण्यावर आणि स्त्रीयांच्या अपेक्षांच्या बाबतीत अपसमजांची मालिका तयार होण्या बद्दल आणि अशा अपसमजाच्या मालिकांमुळे स्त्रीयां वर शक्य आत्याचारांबद्दल आहे. माझे आक्षेप व्यक्तीस्वातंत्र्यावर विश्वास ठेवणार्‍यांच्या बाजूने येत आहेत. जिथ पर्यंत माझ्या व्यक्तीगत मतांचा संबंध आहे मी अभिव्यक्ती स्वातंत्र्या बद्दल मत या धाग्यावर पुरेसे स्पष्ट केले आहे यात आपल्या शब्दातील तथाकथित 'तकलादु व बेगडी नैतिकतेच्या कल्पनांशी', माझ्या व्यक्तीस्वातंत्र्यावर आधारीत आक्षेपांचे काही एक देणे घेणे नाही, आणि तरीही ते आक्षेप स्वतःचे महत्वपूर्ण स्थान बाळगून असतील, हे सुस्पष्टपणे नमुद करत आहे. एनीवे स्त्रीयांना काय वाटंत या बद्दल पुरुष मंडळींना स्त्रीयापेक्षा अधिक माहिती असण्याचे दावे एकुण कौतुकास्पद (मनोरंजक) आहेत.

In reply to by माहितगार

मारवा 29/09/2014 - 23:43
माहीतगार महोदय काय म्हणताय तुम्ही अहो हे अंतरंग अनुभव आहेत. यात तपासणी जाबजवाब कस शक्य आहे ? अर्थात या निमीत्ताने मात्र एखाद्या अप्रिय अडचणीच्या सत्याकडे आपण कसे बघतो त्याच्यशी कसे डील करतो याचे एक विलक्षण दर्शन मला होत आहे. मी कुणा अबकडला प्रिन्सीपल्ड आहे असे म्हणत नाहीये माझा १५ वर्ष जुना असलेला मित्र व त्याच्या आयुष्याचा वागणुकीचा अगदी जवळुन अनुभव असलेला मित्र या नात्याने ग्वाही देत आहे. अर्थात तुम्ही ते मान्य करा असा आग्रह नाहीच. मी तर माझे अनुभव शेअर करीत आहे. पण मुळात असे होउच शकत नाही स्त्रीया असे करतच नाहीत व मी या स्त्री विषयी असे म्हणतोय म्हणजे सर्व स्त्रीया अशाच असतात असे माझे मत आहे कींवा याने स्त्रीयांविषयी अपसमजांची मालिकाच सुरु होईल अशी निष्कर्श का निघत आहेत ? आणि यात आश्चर्य ते काय की पुरुष स्त्री ला व स्त्री पुरुषाला अधिक चांगल ओळखु शकते कारण साध आहे अहो डीस्टन्स मेक्स अ डीफ्रंस

In reply to by मारवा

माहितगार 30/09/2014 - 01:10
सर्व स्त्रीया अशाच असतात असे माझे मत आहे कींवा याने स्त्रीयांविषयी अपसमजांची मालिकाच सुरु होईल अशी निष्कर्श का निघत आहेत ?
जाणता अजाणता जे काही सरसकटीकरण करणारी आपल्या धागालेखातली गृहीतके त्याचे विश्लेषण मागच्या प्रतिसादांतून केलेलेच आहे.

जेनी... 29/09/2014 - 09:40
मज्जा आली वाचुन ... मारु काका तुमच्या मित्राला चरित्रहिन का म्हणताय ?? ... काकुंनी स्पर्श आवडला नै म्हटल्यावर चरित्रहिन काका गुपचुप बसले होते ना.. मग चरित्रहिन कस्काय झाले ?? कि त्यांचे नावच चरित्रहिन काका आहे ?? काय आहे काय हे प्रकरण ??

In reply to by जेनी...

मारवा 29/09/2014 - 21:43
अस आहे बघ माझा मित्र हा चरीत्रहीन आहे याचा अर्थ तो पारंपारीक अर्थाने एका पेक्षा अनेक स्त्रीयांशी त्यातील काही विवाहीतांशी शरीरसंबंध प्रस्थापित करतो. असा पुरुष जो आपल्या धर्मपत्नी व्यतिरीक्त जिच्याशी त्याचे लग्न झालेले आहे. असे संबंध प्रस्थापित करतो अशा पुरुषाला रुढ प्रचलित भाषेत चरीत्रहीन असे संबोधन वापरतात. माझ्या मित्राचे नाव चरीत्रहीन असे नाही. ते एक विशेषण आहे. दुसर या केसमध्ये तो गप्प बसला होता कारण त्या संबंधातील त्या स्त्रीचा हेतु केवळ मानसिक व्याभिचारापुरताच आहे ती पुढील कृती करण्यास असमर्थ आहे असे त्याला कळुन चुकलेले होते. म्हणुन समजुतदारपणे त्याने विषय आवरता घेतला कारण त्याला अर्थातच पुढील कृतीत रस होता. आता त्याला चरीत्रहीन हे संबोधन हे या केस वर आधारीत नव्हते दिलेले. तर या केस आधी आणि या केस नंतर त्याचे विविध स्त्रीयांशी जे संबध प्रस्थापित त्याने केले त्यावरुन हे दिलेले आहे. आणि सर्वात महत्वाच म्हणजे इतकी साधी गोष्ट तुझ्या लक्षात कशी नाही आली. उदया मी एका चोराची गोष्ट सांगितली त्यात म्हणालो की अचानक कुत्री भुंकायला लागली म्हणुन तो चोर चोरी न करताच पळुन गेला तर तु काय म्हणशील अहो त्याने चोरी तर केलीच नाही मग तुम्ही त्याला चोर का म्हणालात ? यावर असे म्हणावे लागेल की अग अग जेने या केस मध्ये जमल नाही त्याला पण तो चोर च आहे. एनीवे ज्यो जेने याच्यावर लिहीलेले सार्त्र चे लेखन तु वाचलेले आहेस का ? नसल्यास जरुर वाच

ऋषिकेश 30/09/2014 - 10:13
उत्तम विषय. डॉ. खरे यांचे प्रतिसादही वाचनीय फक्त यात स्त्रियांविषयीच नाही तर ए पुरूषांबद्दलही सत्य आहे असे वाटते. "फ्लर्टिंग" या सीमेवरील प्रकारात उत्तम प्रकारचे फ्लर्टिंग करणारे अनेक वीर बघितले आहेत. चंप्रं देशपांडे यांचे "सेक्स" नावाचे नाटक केवळ याच विषयावरील उहापोहाला वाहिले आहे! (यावरच पुढे बहुदा बुद्धिबळ आणि झब्बु नाटक आले) यातील नायक नायिका फक्त सुचक "बोलुन" आनंद घेतात ;)

माहितगार 30/09/2014 - 12:25
डॉ. सुबोध खरे यांचा http://www.misalpav.com/comment/615154#comment-615154 हा प्रतिसाद बर्‍याच जणांना विशेषतः पुरुष मंडळींना आवडतो आहे असे दिसते. त्यांच्या त्या प्रतिसादातल्या दुसर्‍या ष्टोरी बद्दल फारसे काही म्हणण्यासारखे वाटत नाही. पण पहिल्या ष्टोरीत पूर्वग्रहांचा अल्पसा अंमल आहे असे वाटते.
...असे वागणे तिचे सर्वच पुरुषांशी नव्हते (कि ती जरा जास्तच मोकळी आहे म्हणून सोडून द्यावे)....
ह्या वाक्यात डॉ. सुबोध खरेंना काय म्हणायचय त्याची स्पष्ट कल्पना येत नसल्यामुळे असेल कदाचित, ष्टोरीतला हा भाग जरासा खटकतोय रिएक्झमाईन करण्याची गरज असावी असे वाटते

सुबोध खरे 30/09/2014 - 14:18
माहितगार साहेब, माझ्या वर्गात किंवा आपल्याला आपल्या आजूबाजूला अशा अनेक मुली स्त्रिया दिसतात ज्या एकदम मोकळ्या ढाकळ्या असतात. बोलताना एखाद्या पुरुषाला स्पर्श करणे किंवा परीचयातील अथवा नात्यातील असेल तर थाप मारणे हे सहज करताना दिसतात. त्यांच्याशी बोलताना हे जाणवते कि त्यांनी केलेल्या स्पर्शाचा हेतू "तसा" नाही, या स्त्रिया सर्व पुरुषांशी तसेच मोकळे वागताना आढळतात. मी वर्णन केलेली स्त्री तशा मोकळ्या स्क्भावाची नव्हती. ती काही पुरुषांच्या जास्त जवळ जाते असे आढळत असे यास्तव मी तसे लिहिलेले आहे.

In reply to by सुबोध खरे

माहितगार 30/09/2014 - 17:32
प्रथम तर प्रतिसादासाठी धन्यवाद. ओके तुम्हाला वागण्या बोलण्यातल्या स्वभावतः मोकळेपणा कडे लक्ष वेधायचे होते असे दिसते. आपल्या आधीच्या एका वाक्यात "जास्तच मोक्ळे" एका अर्थाने येऊन गेल्या नंतर "जास्तच मोक्ळी" वेगळ्या अर्थाने येतेय हे सहज लक्षात येत नाही. तुमच स्पष्टीकरण स्विकारून ष्टोरी क्र १च्या उर्वरीत समीक्षे साठी तुमच्या वतीने वाक्यात जरा बदल करतो आणि अभ्यासतो आहे.
आमच्या एका नौदलातील मित्राची बायको तोकडे कपडे घालून लग्न न झालेल्या( बँचलर) अधिकाऱ्यांच्या मेस च्या रस्त्यावर सकाळी धावायला जात असे. इतर वेळेसही ती पुरुषांशी( विशेषतः लग्न न झालेल्या) जरा "जास्तच मोकळे" पणाने बोलत असे किंवा बोलता बोलता त्याला स्पर्श करीत असे आणि मग एखादा पुरुषाने या स्पर्शाच्या पुढे जाण्याचा प्रयत्न केल्यास त त्याला फटकारत असे. यामुळे तिच्या बद्दल तेथे बरेच गैरसमज पसरले होते. तिचा नवरा हा अतिशय देखणा होता. नौदलात अभियंता म्हणून उच्च पदावर होता. परंतु तो आपल्या वयाप्रमाणे वागत असे (त्यांचा मुलगा तेंव्हा दहावीत होता) आणि त्याची बायको नवीन लग्न झाल्यासारखी वागत असे. तिचा आंतरजातीय प्रेमविवाह होता. नवरा बायकोचे व्यवस्थित प्रेम होते आणि त्यांच्यात कोणताही बेबनाव नव्हता. असे वागणे तिचे सर्वच पुरुषांशी नव्हते (कि ती जरा स्वभावतः मनमोकळी आहे म्हणून सोडून द्यावे). याची मनोवृत्ती थोडीशी लेखात वर्णन केल्या प्रमाणे होती. ....... संदर्भ: डो सुबोध खरे यांचा प्रतिसाद http://www.misalpav.com/comment/615154#comment-615154 (प्रतिसादअंश समिक्षणासाठी आयात केला कॉपीराईट डॉ. सुबोध खरे यांचे. उपप्रतिसादाच्या माध्यमातून समीक्षा करेन)

In reply to by माहितगार

माहितगार 30/09/2014 - 17:57
डॉ सुबोध यांच्या चर्चेतील परिच्छेदात ते म्हणतात तसे जरासा बदल केला तरीही जराशी सब्जेक्टीव्हिटी राहते असे प्रथमदर्शनी वाटते आहे. डॉ सुबोध व्यवसायाने डॉ. आहेत सब्जेक्टीव्हिटीच विश्लेषण करायच असल तरी त्यांचा आणि त्यांच्या पेशंट मधला नेमका संवाद विचारणे उचीत ठरत नाही म्हणून बेनीफीट ऑफ डाऊट देऊन डॉक्टरांचा त्या नंतरच्या परिच्छेदातील शक्यतेचा तर्क तात्पुरता स्विकारला असे जरी गृहीत धरले तरीही एक दोन गोष्टींकडे लक्ष वेधावस वाटत. डॉक्टर साहेबांच्या दुसर्‍या स्टोरीतील डॉक्टरांची मैत्रिण डॉक्टरांच्या शब्दात "तसल जास्तच मोकळी" वागली नसेल संयमाचा बांध असेल पण तिने तिच्या ज्याकाही भावना आहेत त्या मनमोकळे पणाने सांगून टाकल्या, पण इथेही ती सर्वांशी स्वाभाविक मनमोकळे पणाने वावरू शकली नाहीए केवळ डॉक्टर साहेबांशी विश्वासार्ह मित्र या नात्याने मोकळेपणाने बोलते आहे. पहिल्या ष्टोरीत स्त्रीही तीला विश्वासार्ह वाटलेल्या मर्यादीतच व्यक्तींशी (दुसर्‍या ष्टोरीतल्या मैत्रिणीपेक्षा कदाचित थोडे जास्त) मोकळेपणाने वागते आहे. दोन्हीही स्त्रीया मर्यादीत व्यक्तींवरच विश्वास ठेवताहेत पण डॉक्टरांचा दृष्टीकोण अल्पसा सब्जेक्टीव्ह होतो आहे पहिल्या ष्टोरीतली स्त्री म्हणजे तसली आहे आणि दुसर्‍या ष्टोरीतली स्त्री अहंकार सुखावून जाते म्हणून "तशी" नाही ? कदाचित माझे विश्लेषण चूकत असेल पण डॉ साहेब आहेतच सांगण्या साठी

In reply to by माहितगार

सुबोध खरे 30/09/2014 - 21:01
माहितगार साहेब आपली काहीतरी गल्लत होते आहे. पहिल्या गोष्टीतील स्त्री हि माझ्या मित्राची बायको आहे आणि ती बैचलर अधिकारी राहतात तेथे धावण्यास जात असे ( इतर रस्ते ओस पडलेले असताना). नौदलातील लग्न झालेल्या आणि न झालेल्या अधिकाऱ्यांची निवासस्थाने वेगवेगळ्या ठकाणी असतात. शिवाय ती दुकान्दारासारख्या माणसाशी सुद्धा जर जास्तच "मोकळे"पणाने बोलत असे आणि तो जेंव्हा लघळपणा करायला लागला तेंव्हा एकदम त्याच्या अंगावर आली. दुसर्या गोष्टीतील मुलगी माझी एम बी बी एस ची वर्ग मैत्रीण होती आणि आम्ही दिवसातील आठ तास एकत्र असे साडे पाच वर्षे एकत्र होतो. त्यामुळे तुम्ही एकमेकांबरोबर बरेच मोकळे होता. त्यांचे प्रेम प्रकरण( तिचे आणि तिच्या नवर्याचे) सुद्धा आमच्या समोरच झालेले होते. तामुळे आमच्यात तेवढा मोकळे पण नक्कीच होता. यात अहंकार सुखावण्याचा कोणताही भाग नाही. जहाजावरील मित्राची बायको आणि वर्गमैत्रीण यात खूप फरक आहे. यावर छिद्रान्वेषीपणा करून मुळ मुद्द्याला बगल मिळते आहे असे वाटते.

In reply to by सुबोध खरे

प्रसाद१९७१ 01/10/2014 - 09:23
दुसर्या गोष्टीतील मुलगी माझी एम बी बी एस ची वर्ग मैत्रीण होती आणि आम्ही दिवसातील आठ तास एकत्र असे साडे पाच वर्षे एकत्र होतो. त्यामुळे तुम्ही एकमेकांबरोबर बरेच मोकळे होता. त्यांचे प्रेम प्रकरण( तिचे आणि तिच्या नवर्याचे) सुद्धा आमच्या समोरच झालेले होते.
खरे साहेब - माझे एक निरिक्षण. पटले नाही तर सोडुन द्या. तुमच्या मैत्रिणी बरोबरचा प्रसंग नक्कीच २०-२५ वर्ष जुना असेल. पण तुम्हाला तो आजही स्पष्ट आठवतो, हे काहीतरी सांगतय. :-) एखादी घडुन गेलेली गोष्ट जर मनात पुन्हा पुन्हा घोळली गेली नाही तर ती विस्मृतीत जाते. तुमच्या तो प्रसंग आठवणीत आहे म्हणजे तुमच्या मनात गेली २०-२५ वर्षे तो प्रसंग मधे मधे येतो आहे. ह्यातुन काय कळते तुमचे तुम्हालाच तुमच्या बद्दल. :-)

In reply to by माहितगार

माहितगार 01/10/2014 - 14:20
ठिक आहे, घटकाभर असं धरू की डॉ सुबोध तटस्थपणे विचार करत आहेत तरी सुद्धा; डॉ.सुबोधांच्या मैत्रिणीने अगदीच सनातन स्त्रीयांपेक्षा लक्ष्मणरेषेच वर्तुळ किचीत मोठ केल, आणि त्यांच्या दुसर्‍या मित्राच्या पत्नीने अधिक बोल्डनेस दाखवतानाही लक्ष्मणरेषेच वर्तुळ ठेवलच पण डॉक्टरांच्या मैत्रिणीपेक्षा ह्या परिघाचा व्यास जरा अधिक मोठा होता. म्हणजे परिघाचा व्यास आणि परिमितीच स्ट्रक्चर बदलल की समाजाच्या दृष्टीकोणाची फुटपट्टी बदलते असे म्हणता येईल का ? डॉक्टरांची मैत्रिण डॉक्टरांसोबत फिरावयास गेली हे ही तिची लक्ष्मणरेषा इंटॅक्ट असूनही सनातनी बुरखा समर्थकांच्या फुटपट्टीत बसणार नाही, डॉक्टरांची फुटपट्टी जरा अधिक लिबरल आहे त्यामुळे त्या फुटपट्टीच्या मापात मैत्रिणीच वागण व्यवस्थीत बसतय, ह्याच मैत्रिणिने लक्ष्मणरेषेचा व्यास वाढवला असता तर ते डॉक्टरांना त्यांच्या फुटपट्टीत बसवण जड गेलं असत. तर मला मुख्य निर्देश करायचा आहे तो या फुटपट्ट्यांच्या वेगवेगळ्या मापांकडे म्हणून मी या फुटपट्ट्यांना सब्जेक्टीव्ह म्हणतो आहे. आणि या सब्जेक्टीव्ह फुटपट्ट्या समाजाने करावयाच्या लेबलींगला कारणीभूत होतात. (इथे अबकड पुरूष स्त्रीयांचे हॉस्टेल असलेल्या रस्त्यावर फिरावयास जात असे आणि अधिकच मोकळा वागत असे या पुरुषाला आणि असेच वागणार्‍या स्त्रीला वेगवेगळ्या फुटपट्ट्या लावाव्यात की नाही हा लिंगभाव अभ्यासाचा वेगळाच प्रश्न आहे.) पण इथे वैवाहीक जिवनात पुर्ण तृप्ती असलेले/दिलेले विवाहीत पुरूष इतर स्त्रीयांकडे बघतच नाहीत हे केवळ अपवादानेच सिद्ध होत असावे पण अशांच्या तृप्ततेचा अ‍ॅनालिसीस हा ह्या धाग्याचा विषय नाही. (डॉक्टर साहेबांनी छिंद्रान्वेशीपणा ह्या शब्दाची चांगली आठवण दिली आहे.) समाजमात्र स्त्रीच्या तृप्ततेची प्रमाणाबाहेर छिद्रान्वेषीपणे चिकीत्सा करू इच्छितो. हेही ठिक की एक स्त्री जास्तच मोकळेपणाने वागली छिद्रान्वेषी चिकित्सा करून समाजाने तीला अतृप्त आत्मा जाहीर केले तिच्या पतीवर अप्रत्यक्ष कॉमेंट केली. जर संबंधीत स्त्री बॅचलर्स होस्टेलच्या दिशेने न जाता जास्तच मोकळी वागली असती तर समाजाने त्या स्त्रीबद्दल तेथे बरेच गैरसमज पसरवले नसते असे काही आहे का ? स्त्रीच्या तृप्तीबद्दल उदात्त हेतूने चिकित्सा आणि विश्वासार्ह मदतीचा हात पुढे करणे यात गैर नाही, जो पर्यंत व्यक्ती स्वातंत्र्याचा आदर होतो आहे बाकी समाजाने त्यात हकनाक नाक खुपसून स्त्रीयांबद्दल गैरसमज पसरवणे खरेच किती सयूक्तीक असते ? लेडी माऊंट बॅटन पंडीत नेहरूंशी मोकळेपणाने वागल्या म्हणजे त्यांना माऊंट बॅटन साहेबांनी अतृप्तच ठेवले असले पाहीजे हा कोणता तर्क ? पंडीत नेहरूंनी लेडी माऊंट बॅटन यांच्याशी मोकळेपणाने वागूनही वैधानीक कर्तव्यात कसूर केली नसेल माऊंट बॅटन यांनी त्यांच्या वैधानीक कर्तव्यात कसूर केली नसेल तर त्यांच्या व्यक्तीगत जीवना बद्दलचे समज गैरसमज पसरवण्याचा त्यांच्या व्यक्तीगत जीवनात दखलंदाजी करण्याचा समाजाच्या इतर घटकांनी का विचार करावा ? पण दुर्दैवाने सर्व समाज पिढ्यांपिढ्या हे करत राहतात असे आढळून येते.

In reply to by माहितगार

माहितगार 30/09/2014 - 19:36
आमच्या एका नौदलातील मित्राची बायको तोकडे कपडे घालून लग्न न झालेल्या( बँचलर) अधिकाऱ्यांच्या मेस च्या रस्त्यावर सकाळी धावायला जात असे.
हेच वाक्य जरा शब्द बदलून पहा
एक स्त्री तोकडे कपडे घालून केवळ पुरुष असलेल्या रस्त्यावर सकाळी एकटीच फिरायला जात असे.
इथे दुसर्‍या वाक्यात मी तोकडे कपडे हा शब्द तसाच ठेवलाय, भारतात शंभर वर्षे मागच्या काळात जा तोकडे कपडे हा शब्दही काढून टाका हाती कोणता दृष्टीकोण लागतो ? आजही भारतीय ग्रामीण भागात जा आणि तोकडेच्या एवजी जीन्स करता तंग कपडे हा शब्द ठेऊन पहा हाती काय लागत ? भारतीय पेहराव पाहण्याची सवय नसलेले परकीय पुरूष साडी घातलेल्या भारतीय स्त्रीया बेंबी उघडी दाखवतात अशी टिका करतात तर काहींना नऊवारीतून पायाची उघडझाप दिसते. पोषाख हा मुद्दाही आत्तापर्यंत असंख्य वेळेस चघळून झाला आहे. स्त्रीयांच्या "त्या बाबतीत" माघार घेण्याबद्दल टिकाकरणारी या धाग्यावरील तथाकथीत सुधारणावादी मंडळीही कशा प्रकारचा दृष्टीकोण ठेवातात आणि कशा पद्धतीने चघळतात (यांच्यात आणि यांच्या टिकेचे लक्ष असलेल्या सनातनी वातावरणात काही खरेच फरक आहे का ?) की स्त्रीयांनी या लोकांना अपेक्षीत पुढाकार आणि मनमोकळेपणा दाखवावयास हवा. एखाद्या पुरुषांनी भरलेल्या पोलीसस्टेशन मध्ये एखादी स्त्री पोलीस आधीकारी तथाकथीत तंग कपडे घालून काम करत असू शकते किंवा आज डिफेन्स मध्येही स्त्रीयांनी जाण्या बद्दल चर्चा असते ते ही सोडून द्या इतरही अनेक क्षेत्रात स्त्रीया कार्यरत असू शकतात. स्वतःच्या आधाराच्या दृष्टीने असेल किंवा सुरक्षेच्या कारणानेही असेल स्त्रीया आपल्या भोवतालच्या सहकार्‍यांवर विश्वास ठेवतानाच काही जणांवर अधीक विश्वास ठेऊ शकतात किंवा हि मंडळी चवीने चघळत असलेली शक्यताही काही केस मध्ये असेल. चवीच्या विषयांवर चर्चा होऊ नये असे नाही पण मला सनातनता ते आधुनिकता पुरुष समाज सोईच्या अपेक्षा तशाच ठेवतो आहे आणि सोईच्या अपेक्षा बदलत आहे असे त्यांनाही मनातून अभिप्रेत नसावे पण एक अल्पशी साशंकता वाटते चर्चा निघालीच आहे तर हा ही मुद्दा नजरेतून सुटणार नाही आणि स्त्रीयांना अधिक विश्वासार्ह वातावरणार श्वास घेण्यात येथील लेखक आणि वाचक मदतच करतील असा विश्वास आहे.

सोडून द्या हो मारवा साहेब.. करायचाय काय असला मित्र? वैधानिक ईशारा: आपल्या घरी-बिरी घेऊन जात जाऊ नका त्याला. तसही A man is known by the company he keeps असं काहिसं म्हणतात...

In reply to by मारवा

पैसा 02/10/2014 - 15:39
मग
Charity begins at home
ये दोस्ती हम नहीं तोडेंगे
वगैरे असं म्हणून मित्राला कध्धी अंतर देऊ नका हो, दादा/भाऊ/ताई/माई/अक्का/काका/काकू/मामा/मामी/आजी/आजोबा/आत्या/मावशी जे कोण असाल ते. नाही म्हणजे मी कोणाशी बोलतेय हे माहित नसल्याने दुसर्‍यांना तुम्ही बाळा, चाइल्ड इ संबोधने वापरताय, तसं मी करणार नाही. किंवा तुम्हाला काय म्हणायचं ते सांगूनच टाका ना एकदा! म्हणजे आमचा गोंधळ व्हायला नको! :)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

पैसा 02/10/2014 - 21:20
मारवा यांना चारचौघांसारखे सल्ले दिले तर त्यांना आवडले नाहीत. सल्ले देणार्‍याला ते बाळा, चाइल्ड असली शेलकी विशेषणे लावताहेत. म्हणून मी त्या सल्ल्याच्या उलट बोलले. "Charity begins at home" हे आम्ही इयत्ता ५ वीत सुविचार म्हणून शिकलो. ते कोणाला सांगितले तर त्यात offensive काय?
माझा एक चरीत्रहीन मित्र आहे. त्याचा स्त्री विषयक अनुभव अतिशय सखोल असा आहे. परवाच्या आमच्या चर्चेतुन त्याने स्त्री स्वभावाचा एक वेगळाच पैलु उलगडुन दाखविला. तर झाले असे की त्याने नेहमीप्रमाणे एका स्त्री शी रीतसर सुत जुळवले......सर्व टप्पे ओलांडत तो आत्मविश्वासाने पुढे सरकु लागला. स्पर्श पायरीही गाठली.... आणि अचानक त्या स्त्री ने पुर्णपणे माघार घेतली आणि दहा मिनीटांचा सुचक स्पर्श सहन केल्यावर म्हणाली की तुम्ही जो स्पर्श केला ना खर तर तो मला अजिबात आवडला नाही. चरीत्रहीन मित्र अनुभवी असल्याने त्याने तात्काळ विषय संपवला.

स्त्रियांचा ड्रायव्हिंग सेन्स

काळा पहाड ·

शंभर टक्के बरोबर आहे .मनुष्याच्या उत्क्रांतीच्या काळात तो टोळीने राहयचा, शिकार करणे ,अन्न शोधणे, प्रतिस्पर्धी टोळीशी झगडा इत्यादी कामे बरेचदा पुरुष करायचे, साहजिक या कामांसाठी लागणारी नजर, चपळता, झटपट निर्णय घेण्याची क्षमता ,दणकट शरीर अंगे उत्क्रांतीत पुरुशांमध्ये विकसीत झाली वा एनहान्स झाली. या उलट स्त्रीयांची कामे बरीच पॅसिव्ह असायची ,मुल जन्माला घालणे, पालनपोषण ,अन्न शिजवणे वगैरे. त्यामुळे या क्षमता त्यांच्यात कमी विकसीत झाल्या आहेत, त्याच बरोबर पुरषांच्या तुलनेत त्यांची बुद्धीमत्ताही कमी असते. http://www.dailymail.co.uk/debate/article-1274952/Men-ARE-brainy-women-says-scientist-Professor-Richard-Lynn.html

In reply to by सस्नेह

यसवायजी 22/09/2014 - 21:51
तुम्हारे पिछे पाशवी शक्ती लगनेवाली हय >> आम्ही येडे नाही कुणालापण दगडं मारायला >> आँ? तुम्हीच होय पाशवी शक्ती? मी कालच्यान शोधतोय.. कोण बरं ती? :D

संदीप डांगे 22/09/2014 - 03:16
घरात, बाहेर, कार्यालयात भरपूर जाणवणारा स्त्रियांचा मल्टीटास्क स्वभाव नेमका व्हील मागे बसल्यावर अचानक लुप्त होतो. घरात प्रत्येकाच्या गरजांकडे बारकाईने लक्ष्य देणारी स्त्री रस्त्यावरच्या मोठ्या गाड्यांकडे नीट लक्ष देऊ शकत नाही हे एक कोडेच आहे. माझ्या मते "गाडी चालवणे हा पुरुषांचा प्रांत आहे, त्यासाठी खूप वेगळे कौशल्य लागते" अश्या पुळचट कल्पनांचा पगडा वर्षानुवर्षे बायकांच्या डोक्यावर बसवला जात आहे. गाडी जोरात चालवणे, ष्टयील मारणे, धोकादायक पद्धतीने चालवून उगाच इम्प्रेस करायचा प्रयत्न करणे ह्यामुळे एकूणच गाडी चालवणे हे पुरुषी काम आहे असा महिलांना न्यूनगंड होत असावा. त्यामुळे आपले बाइपन जपताना पुरुषांच्या प्रांतात घुस्खोती करताना तिची एकूणच भंबेरी उडत असेल. माझ्या निरीक्षणानुसार गाडी चालवणे स्त्रियांना अजिबात आवडत नाही असे मला आढळून आले आहे, त्या फक्त गैरसोय टाळावी, वेळ वाचवा, मजबुरी म्हणून गाड्या चालवतात. पुरुषांसारखी मस्ती त्यात नसते. मुळात गाडी हाकणे, प्रवासाची दिशा ठरवणे, नवे प्रांत आणि खाण्यापिण्याच्या सोयी शोधणे हि सर्व कामे पुरुषांची होती, त्यात आपली मर्दुमकी दाखवण्याची खुमखुमी प्राचीन काळापासून चालत आली आहे. दुसऱ्या पुरुषापेक्षा मी कसा श्रेष्ठ आहे ह्या नादात पुरुष कौशल्यपूर्ण व जीवावर बेतणारे प्रयोग करतात. स्त्रियांना ह्या सगळ्यांची काही सवयहि नाही आणि गरजहि. त्यामुळे खरेच एकतर स्त्रियांच्या मनातून न्यूनगंड काढून त्यांना गाडी चालवण्याचा खराखुरा आनंद मिळवून देणे आवश्यक आहे. आपसूकच सह्प्रवाश्यांबरोबर अनामिक आणि अघोषित सौम्य अशी जी स्पर्धा रस्त्यावर चालू असते त्याचा त्या एक भाग होऊन वाहतूक सुरळीत होईल

बर्‍याच महिला (खास करून पुण्यनगरीत) आरसे वापरत नाहीत, उजवी डावीकडचा इंडिकेटर देत नाहीत, हेल्मेट तर घालतच नाहीत.
मिसळपाववरचे एक लोकप्रिय, पुरुष सदस्यही अशा प्रकारे मोटरसायकल चालवत असत याची चांगलीच आठवण आहे. कुठेतरी एकत्र जाताना ते आमच्या पुढे चालवून आम्हाला रस्ता दाखणार होते. आणि उजवी-डावीकडचे इंडिकेटर्स त्यांच्या वाहनालाच नसल्यामुळे त्यांच्या मागे स्कूटर चालवणं फार कठीण झालं होतं. नंतर त्यांना त्याबद्दल टोकलं असता आरसे, इंडिकेटर, हेल्मेट वापरणे, या गोष्टी फार महत्त्वाच्या नाहीत असं त्यांचं मत माझ्यापर्यंत पोहोचलं, अशी पुण्यातली एक मनोहारी आठवण मला अजूनही आहे. अर्थात एक दोन उदाहरणं पाहून सरसकटीकरणं करण्याची सवय मला नसल्यामुळे ते प्रकरण एक मजेशीर किस्सा एवढंच मर्यादित ठेवण्याची मर्यादा माझ्यावर येते.
आपली मर्दुमकी दाखवण्याची खुमखुमी प्राचीन काळापासून चालत आली आहे. दुसऱ्या पुरुषापेक्षा मी कसा श्रेष्ठ आहे ह्या नादात पुरुष कौशल्यपूर्ण व जीवावर बेतणारे प्रयोग करतात. स्त्रियांना ह्या सगळ्यांची काही सवयहि नाही आणि गरजहि.
याबद्दल उत्क्रांतिजन्य मानसशास्त्रज्ञांनी विदा जमा करून अगदी हेच सिद्ध केलं आहे. पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया मुळात आक्रमक चालक नसतात, कदाचित थ्रीडी व्हिज्युअलायझेशनमध्ये स्त्रिया कमी पडत असल्यामुळे बारीक सारीक अपघात स्त्रियांकडून जास्त होत असावेत असा एक अंदाज आहे. सरसकटीकरण आणि चावूनचोथा झालेल्या पण मुळात दम नसलेल्या विषयात मला काही रस नाही. ज्यांना ही असली आगलावी सरसकटीकरणं मान्य नसतील त्यांनी वेळ असेल तेव्हा हे वाचा - Gender Based Insurance Premiums Analysis of accident rates by age, gender and time of day based on the 1990 nationwide personal transportation survey थोडक्यात, या लोकांच्या अभ्यासानुसार छोट्या अपघातांमध्ये स्त्रियांची आघाडी असली तर जीवघेणे अपघात करण्यात सगळ्या वयोगटांमध्ये पुरुष पुढे आहेत.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

शैलेन्द्र 22/09/2014 - 12:08
थोडक्यात, या लोकांच्या अभ्यासानुसार छोट्या अपघातांमध्ये स्त्रियांची आघाडी असली तर जीवघेणे अपघात करण्यात सगळ्या वयोगटांमध्ये पुरुष पुढे आहेत.
कारण जीवघेणे अपघात होण्यासाठी/करण्यासाठी जिथे आणी जसे ड्रायव्हींग करावे लागते तसे करणार्‍या महिलांची टक्केवारी अगदी कमी आहे.

भिंगरी 22/09/2014 - 10:28
मग बघा,झाडू लाटणे,पळी,कालथा आणि किल्लीफळा,उंदीर घेऊन कशा सज्ज होऊन येतील सार्‍याजणी. लढण्यासाठी तयार रहा लेखक महाशय.

मराठी_माणूस 22/09/2014 - 10:29
गाडी चालवताना मोबाईल वर बोलणारे सर्वात जास्त पुरुष पाहीले आहेत. नुसते बोलत नाहेत तर बर्‍याचद ते डाव्या हातात फोन धरुन त्यात काही पहातही असतात . असे चालक पाहीले की मि लगेच सावध होतो. त्यांच्या पासुन नेहमीपेक्षा जास्त सुरक्षीत अंतर ठेवतो. एक निरि़क्षण असे ही आहे की, एका खाजगी कं चा बस ड्रायव्हर हा एका हाताने मोबाइल धरुन बोलत होता आणि एका हाताने स्टीअरिंग व्हील धरले होते , गीअर बदलताना तो स्टीअरिंग व्हील ही सोडुन देत असे. त्या बस मधील किति तरी लोकांच्या जिवाशी तो खेळत होता. जितके फेटल अपघात झालेले आहेत त्यात चालक कोण होते महीला कि पुरुष ?

पुण्यनगरीत (आम्ही पण थट्टा करू शकतो म्हंटलं!!) चुकीचं ड्र्याव्हिंग करणारे अनेक पुरूष, मग ते टूव्हीलरवाले असोत की फोर व्हीलरवाले की खास करून रिक्षावाले असोत, अनेक पाहिले आहेत!!! बाकी पुण्यात (सॉरी, सॉरी, पुण्यनगरीत!!) सगळ्या टू व्हीलर्सवाल्यांना आणि त्यांच्यामागे बसणार्‍यांना हेल्मेट सक्तीचं करून त्यायोगे या फडकाधारी स्त्रियांचे फडके दूर करण्याचा कायदा करण्यास आमचा पूर्ण पाठिंबा आहे! हाय अल्ला, क्या नजाकत! क्या खूबसूरती!!! :) :)

मृत्युन्जय 22/09/2014 - 11:19
माझ्या मते तरी स्त्रिया फार सावधपुर्वक गाडी चालवतात. त्यामानाने पुरुष थोडे बेदरकरारपणे चालवतात. त्यामुळे तसे बघता पुरुष चालका जास्त धोकादायक असतात असे म्हणायला हवे. पण होते असे की स्त्रियांचा सावधपणा हा थोडा आत्मविश्वासाच्या अभावापायी येतो. असे घाबरुन गाडी चालवणारे लोक खुप बिनभरवश्याचे असतात. त्यामुळेच बायका कधीही कुठुनही गाडी वळवणे, मध्येच गाडी थांबवतात कारण आत्मविश्वासाच्या अभावापायी त्यांचे सर्व लक्ष्य केवळ स्वतःच्या गाडीकडे असते. रस्त्यावरच्या रहदारीचीही काळजी करायला पाहिजे हे गाडी चालवताना त्यांच्या गावीही नसते. अनुभव माझाही असाच आहे की मुलींना नेहमीच सहानूभूती मिळते. त्यात परत त्यांनी गळा काढला की झालेच. अवांतरः १. माझे मत साधारणपणे आलेल्या अनुभवांती बनलेले आहे. काही स्त्रिया मायकेल शूमाकरपेक्षा उत्कृष्ट वाहनचालक असू शकतील. त्यांची उदाहरणे घेउन वस्सकन अंगावर येऊ नये. २. शतकानुशतकांच्या शोषणामुळे आणि पुरुषी वर्चस्वामुळे स्य्त्रियांचे मानसिक खच्चीकरण झाले आहे आणी त्यामुळे काही बाबतीत स्त्रियांचा आत्मविश्वास कमी पडल्याने स्त्रियांचे ड्रायव्हिंग खराब असते आणि त्याला सर्वतः पुरुषच जबाबदार आहेत असा आपला युक्तिवाद असल्यास मी त्या वादात पडु इच्छित नाही हे कृपया लक्षात घ्यावे. ३. मी स्त्रियांचा (साधारणपणे) आदर करतो. त्यामुळे वरील विधान स्त्रीद्वेष्टे समजले जाऊ नये. ४. याऊपरही माझ्या वरील विधानाने स्त्रीमुक्ती, स्त्री स्वातंत्र्य आणि स्त्री सौजन्याला बाधा पोचत असल्यास मी आगाऊ माफी मागतो.

In reply to by मृत्युन्जय

टवाळ कार्टा 22/09/2014 - 11:37
३. मी स्त्रियांचा (साधारणपणे) आदर करतो. त्यामुळे वरील विधान स्त्रीद्वेष्टे समजले जाऊ नये. ४. याऊपरही माझ्या वरील विधानाने स्त्रीमुक्ती, स्त्री स्वातंत्र्य आणि स्त्री सौजन्याला बाधा पोचत असल्यास मी आगाऊ माफी मागतो.
हे लिहावे लागले यातच सगळे आले :)

मदनबाण 22/09/2014 - 11:31
४ चाकी आणि २ चाकी चालवणार्‍या असंख्य स्त्रिया पाहिल्या आहेत. दुचाकी मधे अगदी स्कुटी पासुन चेतक चालवणारी तर परवाच बुलेट चालवणारी स्त्री पाहिली आहे. ;) मध्यंतरी फ्लायओव्हर जवळपास ८० च्या स्पीड ने दुचाकी हाणणारी महिला देखील होती... ते दॄष्य अगदी गमतीशीर होत ! अर्धा रेनकोट हवेत उडत होता, साडी नेसुन हा प्रवास अगदी भन्नाट चालला होता ! ;) माझ्या माहिती प्रमाणे मुंबइतली आणि दिल्लीच्या मेट्रो ट्रेन्स सुद्धा महिला चालवतात. तर प्रिती कुमार या २०१० साली पश्चिम रेल्वेच्या महिला मोटरमन झाल्या होत्या. :) अंतराळात झेप घेणार्‍या कल्पना चावला बद्धल तर सगळ्या जगाला माहिती आहे... असो... जाता जाता :- स्त्रीयांचा मॅप रिडींग मधे घोळ होत असावा का ? ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राष्ट्रीयत्वाची मोदीप्रणीत पुनर्व्याख्या

In reply to by मदनबाण

टवाळ कार्टा 22/09/2014 - 11:38
जाता जाता :- स्त्रीयांचा मॅप रिडींग मधे घोळ होत असावा का ? Wink
हा हा हा...त्यासाठी वेगळा ३००+ काथ्या कुटावा लागेल

In reply to by मदनबाण

विजुभाऊ 22/09/2014 - 11:51
माझ्या माहिती प्रमाणे मुंबइतली आणि दिल्लीच्या मेट्रो ट्रेन्स सुद्धा महिला चालवतात. तर प्रिती कुमार या २०१० साली पश्चिम रेल्वेच्या महिला मोटरमन झाल्या होत्या. Smile अंतराळात झेप घेणार्‍या कल्पना चावला बद्धल तर सगळ्या जगाला माहिती आहे...
मेट्रो , पश्चिम रेल्वे किंवा अंतराळ या सर्व ठिकाणी डावे किंवा उजवे वळण घेण्याचे सिग्नल्स द्यावे लागत नाहीत. या शिवाय या सर्व ठिकाणी समोरुन येणारी किंवा डाव्या उजव्या बाजूने ओव्हरटेक करणारी वाहने असत नाहीत. या शक्यता मदनबाणकाकानी लक्षात घेतलेल्या दिसत नाहीत. असो. सध्या जागावाटपाचा विषय चर्चेत असल्याने या चुका पूर्ण अवधानाने केलेल्या असाव्यात या शंकेला वाव आहे. चेतक वगैरे म्हणाल तर ज्ञात इतिहासानुसार रायबाधन नामक स्त्री सरदार ही कारतलबखानाच्या नेतृवाखाली महाराष्ट्रात उंबरखिंडीच्या लढाईत घोडा या चार चाकी वाहनावरुन आलेली होती. त्या नंतरचे उदाहरण ताराराणी या कोल्हापूर नगरीतील तसेच झाशी येथील लक्ष्मिबाई या राण्यांचे येते. या दोघीही घोडा नामक वाहन चालवायच्या

In reply to by विजुभाऊ

मदनबाण 22/09/2014 - 13:01
मेट्रो , पश्चिम रेल्वे किंवा अंतराळ या सर्व ठिकाणी डावे किंवा उजवे वळण घेण्याचे सिग्नल्स द्यावे लागत नाहीत. या शिवाय या सर्व ठिकाणी समोरुन येणारी किंवा डाव्या उजव्या बाजूने ओव्हरटेक करणारी वाहने असत नाहीत. या शक्यता मदनबाणकाकानी लक्षात घेतलेल्या दिसत नाहीत. हॅहॅहॅ... स्त्रीया फक्त पुरुषांचीच मक्तेदारी असलेली {म्हणजे तसे समजली जाणारी}आणि तितकची जवाबदारीची आणि किचकट कामे सुद्धा करु शकतात हे दर्शवण्यासाठीच हे टंकनकष्ट घेतेले आहेत. काका हे बिरुद विनाकारण चिकटवल्या बद्धल आपले फक्त श्रीफळ देउन सत्कार करण्यात आला आहे, हे मोठ्या मनाने समजुन / मानुन घ्यावे. ;) सध्या जागावाटपाचा विषय चर्चेत असल्याने या चुका पूर्ण अवधानाने केलेल्या असाव्यात या शंकेला वाव आहे. आम्ही योग्य व्यक्तींनाच त्यांच्या विषयाच्या आकलन क्षमते नुसार जागावाटपात प्राधान्य देतो. आगाऊ आणि विक्षिप्त, वाय-झेड आणि डोक्यावर पडलेल्या नमुन्यानांच्या "जागां बाबतचा निर्णय" पूर्णपणे पक्षश्रेठींवर सोडुन देतो. ;) चेतक वगैरे म्हणाल तर ज्ञात इतिहासानुसार रायबाधन नामक स्त्री सरदार ही कारतलबखानाच्या नेतृवाखाली महाराष्ट्रात उंबरखिंडीच्या लढाईत घोडा या चार चाकी वाहनावरुन आलेली होती. त्या नंतरचे उदाहरण ताराराणी या कोल्हापूर नगरीतील तसेच झाशी येथील लक्ष्मिबाई या राण्यांचे येते. या दोघीही घोडा नामक वाहन चालवायच्या आपणास इनोद निर्मीती करता येते आज हे नव्याने कळले बरं का... ;) जाता जाता :- हल्ली खाणकाम बंद झाले आहे का ? ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राष्ट्रीयत्वाची मोदीप्रणीत पुनर्व्याख्या

In reply to by मदनबाण

विजुभाऊ 22/09/2014 - 13:15
आपणास इनोद निर्मीती करता येते आज हे नव्याने कळले बरं का...
यात काय विनोदलो मी? असो. टवळा आवडे विनोद ;) http://www.misalpav.com/sites/all/modules/smiley/packs/kolobok/wink.gif जाता जाता खाण काम बंद केले आहे. पुन्हा जेंव्हा टेन्डरे फुटतील तेंव्हा सुरू करेन. सध्यातरी गौणखनीज उकरणे प्रलंबीत ठेवले आहे. जागा वाटपानंतर पाहु.

In reply to by कवितानागेश

बॅटमॅन 22/09/2014 - 12:35
एकच एक टेम्प्लेट ठेवलीय का? हेच जर व्हाईस व्हर्सा असतं तर टेम्प्लेट बदलली असती असा एक रोचक विचार क्षणभर मनात तरळून गेला.

In reply to by विजुभाऊ

विलासराव 22/09/2014 - 13:37
आड जर आडबाजूला असेल तर काय करायचे? आड असो ,नसो, आडबाजुला असो, आपण निरंतर सावधानता/दक्षता बाळगावी. आता काय निरंतर सावधानता/दक्षता बाळगावी, हे उत्तर ज्याने-त्याने आपल्यापुरते शोधावे किंवा शोधु नये किंवा कसेही.

In reply to by गवि

यसवायजी 22/09/2014 - 22:00
आचार्‍याच्या जानव्याला किल्ली काय?? आचार्‍याची बायको वेडी काय? या 'पट्टीत' नाही बसलं गवी. स्त्रि यां चा ड्रा य व्हिं ग सेंSS न्स काSS य?? असं पाहिजे.

In reply to by दशानन

सरसकटीकरणाबद्दल तीव्र असहमती. समस्त बायकांची अक्कल काढण्याचे प्रयोजन कळाले नाही. स्त्रियांच्या ड्रायव्हिंगबद्दल गैरसमज आहेत, माझेही होते. पण बायकांना पुरेसी संधी मिळाली तर ते गैरसमज नक्कीच दुर होतील. एकूण (अभ्यासपूर्ण) प्रतिसादांचा अभ्यास केला तर मी ह्या निष्कर्षावर आलोय की रस्त्यावरील अपघात एकतर स्त्रियांच्या कमी आत्मविश्वासामुळे होतात किंवा पुरुषांच्या अती आत्मविश्वासामुळे (बेफीकीरीमुळे) होतात. एकूणातच अपघात होतात हे सत्य आहे. स्त्री आणि पुरुष (किंवा प्रत्येक वाहन चालवणार्‍या प्राण्यांनी) आपण नक्की कोठे चुकतो यावर विचार केला तर ही परिस्थीती टाळता येईल. साधारण ५ वर्षापुर्वी जागतीक महिला दिनाच्या दिवशी मी चेन्नई वरुन मुंबईला विमानाने येत होतो. जेव्हा ते विमान एक स्त्री पायलट चालविणार आहे अशी घोषणा झाली तेव्हा भीतीने माझ्या पोटात गोळा आला. या बायका रस्त्यावरुन चालताना नीट गाडी चालवत नाहीत तर विमान कशा चालवणार ? पण त्या पायलटने व्यवस्थित विमानाचे सारथ्य करुन सुखरुप मुंबईला पोहोचवून माझ्या शंका दुर केल्या. मी त्या पायलटला भेटून तिचे अभिनंदन केले.

In reply to by गवि

दूसर्‍या महायुद्धात हिटलरच्या फौजेने भरती केलेल्या कित्येक पायलटांना कार चालविता येत नव्हती असं कुठेसं वाचल्याचं स्मरतंय.

In reply to by धर्मराजमुटके

दशानन 24/09/2014 - 23:08
>>सरसकटीकरणाबद्दल तीव्र असहमती. असो, तुमची असहमती मान्य! पण माझे मत ठाम आहे, आणि हे उगाच टाईप करायचे म्हणून टाईप केले वाक्य नाही आहे.. बायकांना गाडी चालवण्याचा सेन्स नसतो. त्यांच्या हातून अपघात होतात. मोठे नसतील.. ज्यांची नोंद होईल पण लहान लहान शेकडो अपघात स्त्रियांच्या हातून वाहन चालवताना होतातच. >>समस्त बायकांची अक्कल काढण्याचे प्रयोजन कळाले नाही. कारण अनेक अपघात, जे अपघात होऊ शकले नसते.. असे अपघात बायकांच्या हातून झालेले मी असंख्यवेळा पाहिले आहे म्हणून. तुम्ही डोळे झाकून चालत असाल तर तो तुमचा प्रश्न ;)

In reply to by दशानन

काही पुरुषांनापण नसते ...पुण्यात एखादा बाईकस्वार पुरुष जर गाडी चालवताना उजवीकडे १० सेकंदापेक्षा जास्त मान वळवुन बघत असेल तर तो उजवीकडे वळणार असे गृहित धरावे (मागे बसलेला असेल तर थुंकणार असे गृहित धरावे).मग तो सिग्नल (गाडीचा किंवा हाताचा) देवो कि न देवो. एकुणच पुण्यात सिग्नल महत्वाचा नसुन चालवणार्‍याची बॉडी लँग्वेज ओळखता येणे महत्वाचे आहे. तरच तुम्ही गाडी चालवु शकता. एव्हढे करुनही समोरुन येउन कोणी स्वतःहुन गाडी ठोकण्याची शक्यता नाकारता येत नाहीच.

दशानन, रामपुरी यांच्याशी त्रिवार सहमत!! पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे ड्रायव्हींग सारख्या असंस्कृत पद्धती हिंदूं स्त्रियांमधे रूढ होत आहेत. आता कोणी म्हणतील की राणी लक्ष्मीबाई ई. घोडा चालवायच्या. पण खर म्हणजे ही तुलनाच चुक आहे. कारण घोडा 'चालवायला' लागत नाही तर तो स्वतःच चालतो. अहो, धुलाईयंत्रात (Washing Machine मध्ये) कपडे धुतल्यास तेही रज-तमात्मक होतात. मग एवढ्या मोठ्या गाडीत स्त्री बसल्यावर तीपण रज-तमात्मक होणार नाही का? स्त्र्यांकडून सतत होणार्‍या अपघातांमागे खरे म्हणजे हेच कारण आहे.

In reply to by काळा पहाड

काळापहाडभाऊ,मुंबई आणि नाशिकातले रस्ते फारच गुळगुळीत आणि खड्डेविरहीत असल्याने वाहनांना ट्रॅक्शन मिळत नसल्याने अपघात घडतात असा तुमचा गैरसमज आहे काय?

In reply to by स्वप्नांची राणी

पैसा 23/09/2014 - 10:29
स्वराबाई, आपल्या थोर संस्कृतीच्या रक्षणासाठी माझा तुम्हाला कंपूसह पाठिंबा आहे! घोडा चालवण्याबद्दलचा आक्षेप समजला. पण भगवान श्रीकृष्णाने सत्यभामेला रथाची सारथी करून संस्कृतीच्या र्‍हासाला सुरुवात केली, आणि त्याचमुळे घोर कलियुग सुरू झाले हो! प्राचीन काळात रथाचे सारथ्य करणार्‍या सत्यभामा, कैकेयी आदि नारींचाही यानिमित्ताने लकडी पुलावर सभा घेऊन निषेध करावा काय या विचारात आहे.

पुण्यनगरीत एकेठिकाणी honda activa चे प्रचंड धूड सांभाळत एक काष्ठांगातूर ललना वाहनांच्या गर्दीतून गाडी हाकत होती, माझी गाडी तिला समांतर जात होती, प्रत्येक वेळी ट्रॅफिक पूढे सरकल्यानंतर ललना वेगाने गाडी पूढे न्यायची व ट्रॅफिक पूढे जायचे थांबल्यास आपल्या काष्ठशिल्प शोभेल अशा एकाच बोटाने ब्रेक दाबत होती, बोटातला दम व गाडीचा दम याचे प्रमाण व्यस्त असल्याने पुढे थांबलेल्या अनेकांच्या गाड्यांच्या मडगार्डला चुंबनाचा (activaच्या) लाभ सहजरित्या होत होता, अनेकांना हा चुंबनवर्षाव लक्षातच आला नाही.ज्यांच्या लक्षात आला,त्यातले काही प्लॅटोनिक ड्रायवर होते ,त्यांनी मागे वळुण जळजळीत कटाक्ष टाकले, त्यांना काष्ठधारी ललने सॉरी हं! असे उत्तर प्रत्येकवेळी दिले. स्त्रीदाक्षिण्याचा खंदा पुरस्कर्ता असल्याने मी त्या ललनेस चारी बोटे वापरुन ब्रेक दाबा असा सल्ला दिला, त्यावर तुम्ही तुमचे बघा! असा सल्ला देऊन ती ललना काष्ठांगुलीचा खेळ करत निघून गेली.

In reply to by स्वप्नांची राणी

प्यारे१ 23/09/2014 - 18:59
मूळ प्रतिसाद बदलला आहे काय? उगाचच ग्रेग चॅपेल आणि विराट कोहली आपापल्या दुखर्‍या बोटांसकट आठवले. ;) आमच्याकडं खरंच एकाला 'ते' बोट वाकवता न आल्यानं बर्‍याचदा त्याचं नेमकं म्हणणं काय ते समजत नाही. (चेपु वर मित्र यादीमध्ये सुद्धा आहे. इच्छुकांनी व्यनि करावा)

मदनबाण 23/09/2014 - 11:05
कारण घोडा 'चालवायला' लागत नाही तर तो स्वतःच चालतो. जोक ऑफ द डे ! ;) घोडा जर "चालवायला" लागत नसेल तर मग त्याला "लगाम" आणि "झापडं" लावायची काय गरज ? ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- इस्रोनं रचला इतिहास, मंगळयानाच्या इंजिनची टेस्ट यशस्वी!

विटेकर 23/09/2014 - 11:51
स्त्रियांचा ड्रायव्हिंग सेन्स
म्हणजे "सशाचे शिंग " किन्वा " वंध्यापुत्र" (एवढे बोलून मी माझे टंकन कष्ट वाचवितो.) (आज सकाळी आठ वाजता चांद्णी चौकात एक बाला असंख्य चुंबने घेतलेल्या कारमध्ये ड्रायविंग करताना एका हाताने स्तेयरिंग आणि एका हातात मोबाईल खेळ्वत असताना या डोळ्यानी प्रतेक्श पाहिली... अजून त्या धक्क्यातून सावरतोय.).

In reply to by मृत्युन्जय

विटेकर 23/09/2014 - 15:50
चुंबने , कार आणि बाला या तिन गोष्टी परस्परांपासून समान अंतरावर आहेत , हा त्रिकोण नीट समजून घ्यावा. गल्लत करु नये ! तशी गल्लत तिथेच ( म्हणजे चांदणी चौकात ) पाहायला मिळू शकते , पण ते रात्री आठ वाजता ! . . . . पन खोटं कशाला बोला , आपुन काय पाय्लं नाय बाबा ! ( लोकं लगेच विचारतील , तुम्ही तिथे काय करीत होतात ? .... देणं ना घेणं फुकटच कंदील लावणं)

In reply to by विटेकर

मराठी_माणूस 23/09/2014 - 12:25
ड्रायविंग करताना एका हाताने स्तेयरिंग आणि एका हातात मोबाईल खेळ्वत असताना या डोळ्यानी प्रतेक्श पाहिली
आम्ही हे दृष्य रोज बर्‍याच वेळा पहातो, फरक एकच , महीलेच्या जागी पुरुष असतो

शंभर टक्के बरोबर आहे .मनुष्याच्या उत्क्रांतीच्या काळात तो टोळीने राहयचा, शिकार करणे ,अन्न शोधणे, प्रतिस्पर्धी टोळीशी झगडा इत्यादी कामे बरेचदा पुरुष करायचे, साहजिक या कामांसाठी लागणारी नजर, चपळता, झटपट निर्णय घेण्याची क्षमता ,दणकट शरीर अंगे उत्क्रांतीत पुरुशांमध्ये विकसीत झाली वा एनहान्स झाली. या उलट स्त्रीयांची कामे बरीच पॅसिव्ह असायची ,मुल जन्माला घालणे, पालनपोषण ,अन्न शिजवणे वगैरे. त्यामुळे या क्षमता त्यांच्यात कमी विकसीत झाल्या आहेत, त्याच बरोबर पुरषांच्या तुलनेत त्यांची बुद्धीमत्ताही कमी असते. http://www.dailymail.co.uk/debate/article-1274952/Men-ARE-brainy-women-says-scientist-Professor-Richard-Lynn.html

In reply to by सस्नेह

यसवायजी 22/09/2014 - 21:51
तुम्हारे पिछे पाशवी शक्ती लगनेवाली हय >> आम्ही येडे नाही कुणालापण दगडं मारायला >> आँ? तुम्हीच होय पाशवी शक्ती? मी कालच्यान शोधतोय.. कोण बरं ती? :D

संदीप डांगे 22/09/2014 - 03:16
घरात, बाहेर, कार्यालयात भरपूर जाणवणारा स्त्रियांचा मल्टीटास्क स्वभाव नेमका व्हील मागे बसल्यावर अचानक लुप्त होतो. घरात प्रत्येकाच्या गरजांकडे बारकाईने लक्ष्य देणारी स्त्री रस्त्यावरच्या मोठ्या गाड्यांकडे नीट लक्ष देऊ शकत नाही हे एक कोडेच आहे. माझ्या मते "गाडी चालवणे हा पुरुषांचा प्रांत आहे, त्यासाठी खूप वेगळे कौशल्य लागते" अश्या पुळचट कल्पनांचा पगडा वर्षानुवर्षे बायकांच्या डोक्यावर बसवला जात आहे. गाडी जोरात चालवणे, ष्टयील मारणे, धोकादायक पद्धतीने चालवून उगाच इम्प्रेस करायचा प्रयत्न करणे ह्यामुळे एकूणच गाडी चालवणे हे पुरुषी काम आहे असा महिलांना न्यूनगंड होत असावा. त्यामुळे आपले बाइपन जपताना पुरुषांच्या प्रांतात घुस्खोती करताना तिची एकूणच भंबेरी उडत असेल. माझ्या निरीक्षणानुसार गाडी चालवणे स्त्रियांना अजिबात आवडत नाही असे मला आढळून आले आहे, त्या फक्त गैरसोय टाळावी, वेळ वाचवा, मजबुरी म्हणून गाड्या चालवतात. पुरुषांसारखी मस्ती त्यात नसते. मुळात गाडी हाकणे, प्रवासाची दिशा ठरवणे, नवे प्रांत आणि खाण्यापिण्याच्या सोयी शोधणे हि सर्व कामे पुरुषांची होती, त्यात आपली मर्दुमकी दाखवण्याची खुमखुमी प्राचीन काळापासून चालत आली आहे. दुसऱ्या पुरुषापेक्षा मी कसा श्रेष्ठ आहे ह्या नादात पुरुष कौशल्यपूर्ण व जीवावर बेतणारे प्रयोग करतात. स्त्रियांना ह्या सगळ्यांची काही सवयहि नाही आणि गरजहि. त्यामुळे खरेच एकतर स्त्रियांच्या मनातून न्यूनगंड काढून त्यांना गाडी चालवण्याचा खराखुरा आनंद मिळवून देणे आवश्यक आहे. आपसूकच सह्प्रवाश्यांबरोबर अनामिक आणि अघोषित सौम्य अशी जी स्पर्धा रस्त्यावर चालू असते त्याचा त्या एक भाग होऊन वाहतूक सुरळीत होईल

बर्‍याच महिला (खास करून पुण्यनगरीत) आरसे वापरत नाहीत, उजवी डावीकडचा इंडिकेटर देत नाहीत, हेल्मेट तर घालतच नाहीत.
मिसळपाववरचे एक लोकप्रिय, पुरुष सदस्यही अशा प्रकारे मोटरसायकल चालवत असत याची चांगलीच आठवण आहे. कुठेतरी एकत्र जाताना ते आमच्या पुढे चालवून आम्हाला रस्ता दाखणार होते. आणि उजवी-डावीकडचे इंडिकेटर्स त्यांच्या वाहनालाच नसल्यामुळे त्यांच्या मागे स्कूटर चालवणं फार कठीण झालं होतं. नंतर त्यांना त्याबद्दल टोकलं असता आरसे, इंडिकेटर, हेल्मेट वापरणे, या गोष्टी फार महत्त्वाच्या नाहीत असं त्यांचं मत माझ्यापर्यंत पोहोचलं, अशी पुण्यातली एक मनोहारी आठवण मला अजूनही आहे. अर्थात एक दोन उदाहरणं पाहून सरसकटीकरणं करण्याची सवय मला नसल्यामुळे ते प्रकरण एक मजेशीर किस्सा एवढंच मर्यादित ठेवण्याची मर्यादा माझ्यावर येते.
आपली मर्दुमकी दाखवण्याची खुमखुमी प्राचीन काळापासून चालत आली आहे. दुसऱ्या पुरुषापेक्षा मी कसा श्रेष्ठ आहे ह्या नादात पुरुष कौशल्यपूर्ण व जीवावर बेतणारे प्रयोग करतात. स्त्रियांना ह्या सगळ्यांची काही सवयहि नाही आणि गरजहि.
याबद्दल उत्क्रांतिजन्य मानसशास्त्रज्ञांनी विदा जमा करून अगदी हेच सिद्ध केलं आहे. पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया मुळात आक्रमक चालक नसतात, कदाचित थ्रीडी व्हिज्युअलायझेशनमध्ये स्त्रिया कमी पडत असल्यामुळे बारीक सारीक अपघात स्त्रियांकडून जास्त होत असावेत असा एक अंदाज आहे. सरसकटीकरण आणि चावूनचोथा झालेल्या पण मुळात दम नसलेल्या विषयात मला काही रस नाही. ज्यांना ही असली आगलावी सरसकटीकरणं मान्य नसतील त्यांनी वेळ असेल तेव्हा हे वाचा - Gender Based Insurance Premiums Analysis of accident rates by age, gender and time of day based on the 1990 nationwide personal transportation survey थोडक्यात, या लोकांच्या अभ्यासानुसार छोट्या अपघातांमध्ये स्त्रियांची आघाडी असली तर जीवघेणे अपघात करण्यात सगळ्या वयोगटांमध्ये पुरुष पुढे आहेत.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

शैलेन्द्र 22/09/2014 - 12:08
थोडक्यात, या लोकांच्या अभ्यासानुसार छोट्या अपघातांमध्ये स्त्रियांची आघाडी असली तर जीवघेणे अपघात करण्यात सगळ्या वयोगटांमध्ये पुरुष पुढे आहेत.
कारण जीवघेणे अपघात होण्यासाठी/करण्यासाठी जिथे आणी जसे ड्रायव्हींग करावे लागते तसे करणार्‍या महिलांची टक्केवारी अगदी कमी आहे.

भिंगरी 22/09/2014 - 10:28
मग बघा,झाडू लाटणे,पळी,कालथा आणि किल्लीफळा,उंदीर घेऊन कशा सज्ज होऊन येतील सार्‍याजणी. लढण्यासाठी तयार रहा लेखक महाशय.

मराठी_माणूस 22/09/2014 - 10:29
गाडी चालवताना मोबाईल वर बोलणारे सर्वात जास्त पुरुष पाहीले आहेत. नुसते बोलत नाहेत तर बर्‍याचद ते डाव्या हातात फोन धरुन त्यात काही पहातही असतात . असे चालक पाहीले की मि लगेच सावध होतो. त्यांच्या पासुन नेहमीपेक्षा जास्त सुरक्षीत अंतर ठेवतो. एक निरि़क्षण असे ही आहे की, एका खाजगी कं चा बस ड्रायव्हर हा एका हाताने मोबाइल धरुन बोलत होता आणि एका हाताने स्टीअरिंग व्हील धरले होते , गीअर बदलताना तो स्टीअरिंग व्हील ही सोडुन देत असे. त्या बस मधील किति तरी लोकांच्या जिवाशी तो खेळत होता. जितके फेटल अपघात झालेले आहेत त्यात चालक कोण होते महीला कि पुरुष ?

पुण्यनगरीत (आम्ही पण थट्टा करू शकतो म्हंटलं!!) चुकीचं ड्र्याव्हिंग करणारे अनेक पुरूष, मग ते टूव्हीलरवाले असोत की फोर व्हीलरवाले की खास करून रिक्षावाले असोत, अनेक पाहिले आहेत!!! बाकी पुण्यात (सॉरी, सॉरी, पुण्यनगरीत!!) सगळ्या टू व्हीलर्सवाल्यांना आणि त्यांच्यामागे बसणार्‍यांना हेल्मेट सक्तीचं करून त्यायोगे या फडकाधारी स्त्रियांचे फडके दूर करण्याचा कायदा करण्यास आमचा पूर्ण पाठिंबा आहे! हाय अल्ला, क्या नजाकत! क्या खूबसूरती!!! :) :)

मृत्युन्जय 22/09/2014 - 11:19
माझ्या मते तरी स्त्रिया फार सावधपुर्वक गाडी चालवतात. त्यामानाने पुरुष थोडे बेदरकरारपणे चालवतात. त्यामुळे तसे बघता पुरुष चालका जास्त धोकादायक असतात असे म्हणायला हवे. पण होते असे की स्त्रियांचा सावधपणा हा थोडा आत्मविश्वासाच्या अभावापायी येतो. असे घाबरुन गाडी चालवणारे लोक खुप बिनभरवश्याचे असतात. त्यामुळेच बायका कधीही कुठुनही गाडी वळवणे, मध्येच गाडी थांबवतात कारण आत्मविश्वासाच्या अभावापायी त्यांचे सर्व लक्ष्य केवळ स्वतःच्या गाडीकडे असते. रस्त्यावरच्या रहदारीचीही काळजी करायला पाहिजे हे गाडी चालवताना त्यांच्या गावीही नसते. अनुभव माझाही असाच आहे की मुलींना नेहमीच सहानूभूती मिळते. त्यात परत त्यांनी गळा काढला की झालेच. अवांतरः १. माझे मत साधारणपणे आलेल्या अनुभवांती बनलेले आहे. काही स्त्रिया मायकेल शूमाकरपेक्षा उत्कृष्ट वाहनचालक असू शकतील. त्यांची उदाहरणे घेउन वस्सकन अंगावर येऊ नये. २. शतकानुशतकांच्या शोषणामुळे आणि पुरुषी वर्चस्वामुळे स्य्त्रियांचे मानसिक खच्चीकरण झाले आहे आणी त्यामुळे काही बाबतीत स्त्रियांचा आत्मविश्वास कमी पडल्याने स्त्रियांचे ड्रायव्हिंग खराब असते आणि त्याला सर्वतः पुरुषच जबाबदार आहेत असा आपला युक्तिवाद असल्यास मी त्या वादात पडु इच्छित नाही हे कृपया लक्षात घ्यावे. ३. मी स्त्रियांचा (साधारणपणे) आदर करतो. त्यामुळे वरील विधान स्त्रीद्वेष्टे समजले जाऊ नये. ४. याऊपरही माझ्या वरील विधानाने स्त्रीमुक्ती, स्त्री स्वातंत्र्य आणि स्त्री सौजन्याला बाधा पोचत असल्यास मी आगाऊ माफी मागतो.

In reply to by मृत्युन्जय

टवाळ कार्टा 22/09/2014 - 11:37
३. मी स्त्रियांचा (साधारणपणे) आदर करतो. त्यामुळे वरील विधान स्त्रीद्वेष्टे समजले जाऊ नये. ४. याऊपरही माझ्या वरील विधानाने स्त्रीमुक्ती, स्त्री स्वातंत्र्य आणि स्त्री सौजन्याला बाधा पोचत असल्यास मी आगाऊ माफी मागतो.
हे लिहावे लागले यातच सगळे आले :)

मदनबाण 22/09/2014 - 11:31
४ चाकी आणि २ चाकी चालवणार्‍या असंख्य स्त्रिया पाहिल्या आहेत. दुचाकी मधे अगदी स्कुटी पासुन चेतक चालवणारी तर परवाच बुलेट चालवणारी स्त्री पाहिली आहे. ;) मध्यंतरी फ्लायओव्हर जवळपास ८० च्या स्पीड ने दुचाकी हाणणारी महिला देखील होती... ते दॄष्य अगदी गमतीशीर होत ! अर्धा रेनकोट हवेत उडत होता, साडी नेसुन हा प्रवास अगदी भन्नाट चालला होता ! ;) माझ्या माहिती प्रमाणे मुंबइतली आणि दिल्लीच्या मेट्रो ट्रेन्स सुद्धा महिला चालवतात. तर प्रिती कुमार या २०१० साली पश्चिम रेल्वेच्या महिला मोटरमन झाल्या होत्या. :) अंतराळात झेप घेणार्‍या कल्पना चावला बद्धल तर सगळ्या जगाला माहिती आहे... असो... जाता जाता :- स्त्रीयांचा मॅप रिडींग मधे घोळ होत असावा का ? ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राष्ट्रीयत्वाची मोदीप्रणीत पुनर्व्याख्या

In reply to by मदनबाण

टवाळ कार्टा 22/09/2014 - 11:38
जाता जाता :- स्त्रीयांचा मॅप रिडींग मधे घोळ होत असावा का ? Wink
हा हा हा...त्यासाठी वेगळा ३००+ काथ्या कुटावा लागेल

In reply to by मदनबाण

विजुभाऊ 22/09/2014 - 11:51
माझ्या माहिती प्रमाणे मुंबइतली आणि दिल्लीच्या मेट्रो ट्रेन्स सुद्धा महिला चालवतात. तर प्रिती कुमार या २०१० साली पश्चिम रेल्वेच्या महिला मोटरमन झाल्या होत्या. Smile अंतराळात झेप घेणार्‍या कल्पना चावला बद्धल तर सगळ्या जगाला माहिती आहे...
मेट्रो , पश्चिम रेल्वे किंवा अंतराळ या सर्व ठिकाणी डावे किंवा उजवे वळण घेण्याचे सिग्नल्स द्यावे लागत नाहीत. या शिवाय या सर्व ठिकाणी समोरुन येणारी किंवा डाव्या उजव्या बाजूने ओव्हरटेक करणारी वाहने असत नाहीत. या शक्यता मदनबाणकाकानी लक्षात घेतलेल्या दिसत नाहीत. असो. सध्या जागावाटपाचा विषय चर्चेत असल्याने या चुका पूर्ण अवधानाने केलेल्या असाव्यात या शंकेला वाव आहे. चेतक वगैरे म्हणाल तर ज्ञात इतिहासानुसार रायबाधन नामक स्त्री सरदार ही कारतलबखानाच्या नेतृवाखाली महाराष्ट्रात उंबरखिंडीच्या लढाईत घोडा या चार चाकी वाहनावरुन आलेली होती. त्या नंतरचे उदाहरण ताराराणी या कोल्हापूर नगरीतील तसेच झाशी येथील लक्ष्मिबाई या राण्यांचे येते. या दोघीही घोडा नामक वाहन चालवायच्या

In reply to by विजुभाऊ

मदनबाण 22/09/2014 - 13:01
मेट्रो , पश्चिम रेल्वे किंवा अंतराळ या सर्व ठिकाणी डावे किंवा उजवे वळण घेण्याचे सिग्नल्स द्यावे लागत नाहीत. या शिवाय या सर्व ठिकाणी समोरुन येणारी किंवा डाव्या उजव्या बाजूने ओव्हरटेक करणारी वाहने असत नाहीत. या शक्यता मदनबाणकाकानी लक्षात घेतलेल्या दिसत नाहीत. हॅहॅहॅ... स्त्रीया फक्त पुरुषांचीच मक्तेदारी असलेली {म्हणजे तसे समजली जाणारी}आणि तितकची जवाबदारीची आणि किचकट कामे सुद्धा करु शकतात हे दर्शवण्यासाठीच हे टंकनकष्ट घेतेले आहेत. काका हे बिरुद विनाकारण चिकटवल्या बद्धल आपले फक्त श्रीफळ देउन सत्कार करण्यात आला आहे, हे मोठ्या मनाने समजुन / मानुन घ्यावे. ;) सध्या जागावाटपाचा विषय चर्चेत असल्याने या चुका पूर्ण अवधानाने केलेल्या असाव्यात या शंकेला वाव आहे. आम्ही योग्य व्यक्तींनाच त्यांच्या विषयाच्या आकलन क्षमते नुसार जागावाटपात प्राधान्य देतो. आगाऊ आणि विक्षिप्त, वाय-झेड आणि डोक्यावर पडलेल्या नमुन्यानांच्या "जागां बाबतचा निर्णय" पूर्णपणे पक्षश्रेठींवर सोडुन देतो. ;) चेतक वगैरे म्हणाल तर ज्ञात इतिहासानुसार रायबाधन नामक स्त्री सरदार ही कारतलबखानाच्या नेतृवाखाली महाराष्ट्रात उंबरखिंडीच्या लढाईत घोडा या चार चाकी वाहनावरुन आलेली होती. त्या नंतरचे उदाहरण ताराराणी या कोल्हापूर नगरीतील तसेच झाशी येथील लक्ष्मिबाई या राण्यांचे येते. या दोघीही घोडा नामक वाहन चालवायच्या आपणास इनोद निर्मीती करता येते आज हे नव्याने कळले बरं का... ;) जाता जाता :- हल्ली खाणकाम बंद झाले आहे का ? ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राष्ट्रीयत्वाची मोदीप्रणीत पुनर्व्याख्या

In reply to by मदनबाण

विजुभाऊ 22/09/2014 - 13:15
आपणास इनोद निर्मीती करता येते आज हे नव्याने कळले बरं का...
यात काय विनोदलो मी? असो. टवळा आवडे विनोद ;) http://www.misalpav.com/sites/all/modules/smiley/packs/kolobok/wink.gif जाता जाता खाण काम बंद केले आहे. पुन्हा जेंव्हा टेन्डरे फुटतील तेंव्हा सुरू करेन. सध्यातरी गौणखनीज उकरणे प्रलंबीत ठेवले आहे. जागा वाटपानंतर पाहु.

In reply to by कवितानागेश

बॅटमॅन 22/09/2014 - 12:35
एकच एक टेम्प्लेट ठेवलीय का? हेच जर व्हाईस व्हर्सा असतं तर टेम्प्लेट बदलली असती असा एक रोचक विचार क्षणभर मनात तरळून गेला.

In reply to by विजुभाऊ

विलासराव 22/09/2014 - 13:37
आड जर आडबाजूला असेल तर काय करायचे? आड असो ,नसो, आडबाजुला असो, आपण निरंतर सावधानता/दक्षता बाळगावी. आता काय निरंतर सावधानता/दक्षता बाळगावी, हे उत्तर ज्याने-त्याने आपल्यापुरते शोधावे किंवा शोधु नये किंवा कसेही.

In reply to by गवि

यसवायजी 22/09/2014 - 22:00
आचार्‍याच्या जानव्याला किल्ली काय?? आचार्‍याची बायको वेडी काय? या 'पट्टीत' नाही बसलं गवी. स्त्रि यां चा ड्रा य व्हिं ग सेंSS न्स काSS य?? असं पाहिजे.

In reply to by दशानन

सरसकटीकरणाबद्दल तीव्र असहमती. समस्त बायकांची अक्कल काढण्याचे प्रयोजन कळाले नाही. स्त्रियांच्या ड्रायव्हिंगबद्दल गैरसमज आहेत, माझेही होते. पण बायकांना पुरेसी संधी मिळाली तर ते गैरसमज नक्कीच दुर होतील. एकूण (अभ्यासपूर्ण) प्रतिसादांचा अभ्यास केला तर मी ह्या निष्कर्षावर आलोय की रस्त्यावरील अपघात एकतर स्त्रियांच्या कमी आत्मविश्वासामुळे होतात किंवा पुरुषांच्या अती आत्मविश्वासामुळे (बेफीकीरीमुळे) होतात. एकूणातच अपघात होतात हे सत्य आहे. स्त्री आणि पुरुष (किंवा प्रत्येक वाहन चालवणार्‍या प्राण्यांनी) आपण नक्की कोठे चुकतो यावर विचार केला तर ही परिस्थीती टाळता येईल. साधारण ५ वर्षापुर्वी जागतीक महिला दिनाच्या दिवशी मी चेन्नई वरुन मुंबईला विमानाने येत होतो. जेव्हा ते विमान एक स्त्री पायलट चालविणार आहे अशी घोषणा झाली तेव्हा भीतीने माझ्या पोटात गोळा आला. या बायका रस्त्यावरुन चालताना नीट गाडी चालवत नाहीत तर विमान कशा चालवणार ? पण त्या पायलटने व्यवस्थित विमानाचे सारथ्य करुन सुखरुप मुंबईला पोहोचवून माझ्या शंका दुर केल्या. मी त्या पायलटला भेटून तिचे अभिनंदन केले.

In reply to by गवि

दूसर्‍या महायुद्धात हिटलरच्या फौजेने भरती केलेल्या कित्येक पायलटांना कार चालविता येत नव्हती असं कुठेसं वाचल्याचं स्मरतंय.

In reply to by धर्मराजमुटके

दशानन 24/09/2014 - 23:08
>>सरसकटीकरणाबद्दल तीव्र असहमती. असो, तुमची असहमती मान्य! पण माझे मत ठाम आहे, आणि हे उगाच टाईप करायचे म्हणून टाईप केले वाक्य नाही आहे.. बायकांना गाडी चालवण्याचा सेन्स नसतो. त्यांच्या हातून अपघात होतात. मोठे नसतील.. ज्यांची नोंद होईल पण लहान लहान शेकडो अपघात स्त्रियांच्या हातून वाहन चालवताना होतातच. >>समस्त बायकांची अक्कल काढण्याचे प्रयोजन कळाले नाही. कारण अनेक अपघात, जे अपघात होऊ शकले नसते.. असे अपघात बायकांच्या हातून झालेले मी असंख्यवेळा पाहिले आहे म्हणून. तुम्ही डोळे झाकून चालत असाल तर तो तुमचा प्रश्न ;)

In reply to by दशानन

काही पुरुषांनापण नसते ...पुण्यात एखादा बाईकस्वार पुरुष जर गाडी चालवताना उजवीकडे १० सेकंदापेक्षा जास्त मान वळवुन बघत असेल तर तो उजवीकडे वळणार असे गृहित धरावे (मागे बसलेला असेल तर थुंकणार असे गृहित धरावे).मग तो सिग्नल (गाडीचा किंवा हाताचा) देवो कि न देवो. एकुणच पुण्यात सिग्नल महत्वाचा नसुन चालवणार्‍याची बॉडी लँग्वेज ओळखता येणे महत्वाचे आहे. तरच तुम्ही गाडी चालवु शकता. एव्हढे करुनही समोरुन येउन कोणी स्वतःहुन गाडी ठोकण्याची शक्यता नाकारता येत नाहीच.

दशानन, रामपुरी यांच्याशी त्रिवार सहमत!! पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे ड्रायव्हींग सारख्या असंस्कृत पद्धती हिंदूं स्त्रियांमधे रूढ होत आहेत. आता कोणी म्हणतील की राणी लक्ष्मीबाई ई. घोडा चालवायच्या. पण खर म्हणजे ही तुलनाच चुक आहे. कारण घोडा 'चालवायला' लागत नाही तर तो स्वतःच चालतो. अहो, धुलाईयंत्रात (Washing Machine मध्ये) कपडे धुतल्यास तेही रज-तमात्मक होतात. मग एवढ्या मोठ्या गाडीत स्त्री बसल्यावर तीपण रज-तमात्मक होणार नाही का? स्त्र्यांकडून सतत होणार्‍या अपघातांमागे खरे म्हणजे हेच कारण आहे.

In reply to by काळा पहाड

काळापहाडभाऊ,मुंबई आणि नाशिकातले रस्ते फारच गुळगुळीत आणि खड्डेविरहीत असल्याने वाहनांना ट्रॅक्शन मिळत नसल्याने अपघात घडतात असा तुमचा गैरसमज आहे काय?

In reply to by स्वप्नांची राणी

पैसा 23/09/2014 - 10:29
स्वराबाई, आपल्या थोर संस्कृतीच्या रक्षणासाठी माझा तुम्हाला कंपूसह पाठिंबा आहे! घोडा चालवण्याबद्दलचा आक्षेप समजला. पण भगवान श्रीकृष्णाने सत्यभामेला रथाची सारथी करून संस्कृतीच्या र्‍हासाला सुरुवात केली, आणि त्याचमुळे घोर कलियुग सुरू झाले हो! प्राचीन काळात रथाचे सारथ्य करणार्‍या सत्यभामा, कैकेयी आदि नारींचाही यानिमित्ताने लकडी पुलावर सभा घेऊन निषेध करावा काय या विचारात आहे.

पुण्यनगरीत एकेठिकाणी honda activa चे प्रचंड धूड सांभाळत एक काष्ठांगातूर ललना वाहनांच्या गर्दीतून गाडी हाकत होती, माझी गाडी तिला समांतर जात होती, प्रत्येक वेळी ट्रॅफिक पूढे सरकल्यानंतर ललना वेगाने गाडी पूढे न्यायची व ट्रॅफिक पूढे जायचे थांबल्यास आपल्या काष्ठशिल्प शोभेल अशा एकाच बोटाने ब्रेक दाबत होती, बोटातला दम व गाडीचा दम याचे प्रमाण व्यस्त असल्याने पुढे थांबलेल्या अनेकांच्या गाड्यांच्या मडगार्डला चुंबनाचा (activaच्या) लाभ सहजरित्या होत होता, अनेकांना हा चुंबनवर्षाव लक्षातच आला नाही.ज्यांच्या लक्षात आला,त्यातले काही प्लॅटोनिक ड्रायवर होते ,त्यांनी मागे वळुण जळजळीत कटाक्ष टाकले, त्यांना काष्ठधारी ललने सॉरी हं! असे उत्तर प्रत्येकवेळी दिले. स्त्रीदाक्षिण्याचा खंदा पुरस्कर्ता असल्याने मी त्या ललनेस चारी बोटे वापरुन ब्रेक दाबा असा सल्ला दिला, त्यावर तुम्ही तुमचे बघा! असा सल्ला देऊन ती ललना काष्ठांगुलीचा खेळ करत निघून गेली.

In reply to by स्वप्नांची राणी

प्यारे१ 23/09/2014 - 18:59
मूळ प्रतिसाद बदलला आहे काय? उगाचच ग्रेग चॅपेल आणि विराट कोहली आपापल्या दुखर्‍या बोटांसकट आठवले. ;) आमच्याकडं खरंच एकाला 'ते' बोट वाकवता न आल्यानं बर्‍याचदा त्याचं नेमकं म्हणणं काय ते समजत नाही. (चेपु वर मित्र यादीमध्ये सुद्धा आहे. इच्छुकांनी व्यनि करावा)

मदनबाण 23/09/2014 - 11:05
कारण घोडा 'चालवायला' लागत नाही तर तो स्वतःच चालतो. जोक ऑफ द डे ! ;) घोडा जर "चालवायला" लागत नसेल तर मग त्याला "लगाम" आणि "झापडं" लावायची काय गरज ? ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- इस्रोनं रचला इतिहास, मंगळयानाच्या इंजिनची टेस्ट यशस्वी!

विटेकर 23/09/2014 - 11:51
स्त्रियांचा ड्रायव्हिंग सेन्स
म्हणजे "सशाचे शिंग " किन्वा " वंध्यापुत्र" (एवढे बोलून मी माझे टंकन कष्ट वाचवितो.) (आज सकाळी आठ वाजता चांद्णी चौकात एक बाला असंख्य चुंबने घेतलेल्या कारमध्ये ड्रायविंग करताना एका हाताने स्तेयरिंग आणि एका हातात मोबाईल खेळ्वत असताना या डोळ्यानी प्रतेक्श पाहिली... अजून त्या धक्क्यातून सावरतोय.).

In reply to by मृत्युन्जय

विटेकर 23/09/2014 - 15:50
चुंबने , कार आणि बाला या तिन गोष्टी परस्परांपासून समान अंतरावर आहेत , हा त्रिकोण नीट समजून घ्यावा. गल्लत करु नये ! तशी गल्लत तिथेच ( म्हणजे चांदणी चौकात ) पाहायला मिळू शकते , पण ते रात्री आठ वाजता ! . . . . पन खोटं कशाला बोला , आपुन काय पाय्लं नाय बाबा ! ( लोकं लगेच विचारतील , तुम्ही तिथे काय करीत होतात ? .... देणं ना घेणं फुकटच कंदील लावणं)

In reply to by विटेकर

मराठी_माणूस 23/09/2014 - 12:25
ड्रायविंग करताना एका हाताने स्तेयरिंग आणि एका हातात मोबाईल खेळ्वत असताना या डोळ्यानी प्रतेक्श पाहिली
आम्ही हे दृष्य रोज बर्‍याच वेळा पहातो, फरक एकच , महीलेच्या जागी पुरुष असतो
या गोष्टीवर कदाचित भरपूर वेळा विनोदाच्या अंगानं लिहिलं गेलंय. प्रत्यक्षात डावीकडे सिग्नल देवून उजवीकडे वळणार्‍या स्त्रिया मी पाहिलेल्या आहेत. पण नुकत्याच घडलेल्या दोन प्रसंगांनी मला याबाबत गंभीर विचार करायला प्रवृत्त केलंय. दुसरा प्रसंग अति-गंभीर असून सुद्धा अपरिचित रहाण्याच्या मर्यादेमुळे तो न सांगता मी एक छोटा प्रसंग सांगतो. स्थळः चतु:शृंगी चौक, विद्यापीठाजवळ, पुण्यनगरी. उजवीकडे वळणारा रोड. त्याला डावीकडे फुटलेला छोटा फाटा. मी डावीकडच्या लेन मध्ये. माझ्या कारपाठून लगटून डावीकडून येणारी एक फडकंधारी मुलगी. मी कारचा डावीकडचा सिग्नल अंदाजे १० सेकंद दिला आणि १० च्या स्पीडने वळलो.

दर्पण, सर्पण, अर्पण, तर्पण, आकर्षण, प्रोक्षण, लवण, कर्तन

अत्रुप्त आत्मा ·

पैसा 22/09/2014 - 00:08
=)) =)) =)) तुम्ही एवढे खिलाडूपणाने घेता म्हणून तुम्हाला छळतात सगळे! जिल्बी मस्त झालीय एकदम, फर्मास!!

In reply to by प्रचेतस

धन्या 22/09/2014 - 15:54
त्य "भडजी" शब्दाचे उद्गाते आम्हीच असून केवळ सार्वजनिक मंचावर सांसदीय भाषा वापरण्याचा संकेत पाळावा म्हणून आम्ही त्या मुळ चारोळीला फाटा दिला. ईच्छुकांनी श्री होयंका* गुरुजींची भरडवही* पाहावी. * श्रेयः वल्ली ** श्रेय: खुद्द श्री. होयंका गुरुजी

वा वा वा, झकास. काव्य असावे तर असे.... :smile: . बादवे अनेक वर्षांपासून तुमच्या लेखनात हे 'दू..दू..' वाचत आलो आहे. त्याचा नेमका अर्थ काय हो?

In reply to by खटपट्या

@वर्षांपासून तुमच्या लेखनात हे 'दू..दू..' वाचत आलो >> दू...दू... मंजे दुष्ट..दुष्ट..! =============== @हे नक्की कोण ?>>> ज़रा वेळ थांबा,येइलच इतक्यात! :-D मग प्रतेक्षच दाखिवतो! ;-)

चित्रगुप्त 22/09/2014 - 06:33
दर्पण, सर्पण, अर्पण, तर्पण, आकर्षण ते लवणादी प्रोक्षण, बोडण करुनी या शब्दांचे सारे करुया जिल्बी भक्षण

मनीषा 22/09/2014 - 07:58
खूप सारे "ण" जमवले की तुम्ही . जिलबी छानच बरं ़ का! मिपावर गेले काही दिवस धर्मं, कर्म,मंत्र्, तंत्रं , साधना, परिक्र्मा, इतिहास-भूगोल-ना. शास्त्रं, चूक, बरोबर - असं जड जड वाचून वाचून दमायला झालं होतं अगदी. बरं वाटलं !

In reply to by प्रचेतस

@खाटुक म्यानी भाषाSभक्षी हळूच लपवलेले भांडे शोधी असं पायजे ना? >>> जिल्बीत हात-भार लाऊन स्वयं"सिद्ध असल्याचे जाहिर केल्या बद्दल धन्यवाद! =))

नाखु 22/09/2014 - 09:53
मी कशाला भांड्याला लपवू रे!मी कशाला तांब्याला थोपवू रे! मीच माझ्या जिल्बीचा स्वामी रे!!ध्रू!! दु.दु.भारी खट्याळ ! दिसे जरी मवाळ! हुर्यो करी असा !मी अडवू तरी कसा !! मी कशाला भांड्याला लपवू रे!मी कशाला तांब्याला थोपवू रे! मीच माझ्या जिल्बीचा स्वामी रे!!ध्रू!! बॅट्या-धन्या जोडीने बघतात (काडी) सारून माझ्याकडे कसा ! जीव हो वेडापीसा ! वाटे द्यावा ठोसा (स्माईलीचा) कसा देऊ रे!! मी कशाला भांड्याला लपवू रे!मी कशाला तांब्याला थोपवू रे! मीच माझ्या जिल्बीचा स्वामी रे!!ध्रू!! === अगोबाच्या मागे लपलेला ना.खु.खुड्बूड्कर

In reply to by किसन शिंदे

@आनन्दिता कवितेचा विषय कशावर बेतलाय?. कोण कोणाला त्रास देतं.. ? मला तर काहीही कळ्ळ्ळ्ल नै. संदर्भ समजवा.>>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-052.GIF हेच्च..हेच ते!!! सर्व माहित असूनंही.. =)) म्हणूनच नेहमी म्हणतो:- छळू आगोबा हत्तीची बहीण- दुत्त दुत्त आ...नन्दिता! =)) ================= @अगोबाच्या मागे लपलेला ना.खु.खुड्बूड्कर >>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-060.gif बरीच चांगली खुडबुड करिता वो टुंम्ही! http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-060.gif ================= @स्पा http://www.easyfreesmileys.com/smileys/free-fighting-smileys-546.gif अच्च जालं तर>>> :-/ तू गप रे हलकटा!!! =))

बॅटमॅन 22/09/2014 - 13:35
=)) =)) =)) =)) =)) सध्या काव्यबद्धकोष्ठ झालाय. तो मोकळा झाला की जिल्ब्या पाडायला हाजीर हायेच!!!!! आत्मूसची ही जिल्बी न्हेमीप्रमाणेच मस्त ;)

In reply to by प्यारे१

बॅटमॅन 22/09/2014 - 16:05
आयला. प्यारेगुर्जींनी पाडलेली जिल्बीसुद्धा चक्क आध्यात्मिक आरतीच्या चालीत म्हणता येते. धन्य _/\_

In reply to by प्यारे१

बॅटमॅन 22/09/2014 - 16:20
कुठलीही जण्रल आरती. तिची एक पेट्ट चाल असते. काही आरत्या विशेष फेमस इ. झाल्या की लोक चाल बदलतात तरी किंवा उगा लाडिक गायकी ढंगाची चाल तरी बशिवतात. पण अगोदरची बेशिक चाल तीच असते. उदा. च पायजे तर 'सुखकर्ता' ची नॉन गायकी वाली चाल- जी घरोघरी म्हटल्या जाते ती.

In reply to by बॅटमॅन

.................................एक आरती-खाटुक-म्यानी!!! आरती खाटुक म्याना तुझी नामे किती ना..ना आंम्ही केवळ शब्द'धारी नुसत्या डोलवितो माना॥धृ॥ संस्कृत असो कन्नड तामिळी,तिथे मेंदुत बसे गोळी अजब हा खाटुकम्यान,भाजतो कुठेही ती पोळी॥१॥ ..........आरती खाटुक म्याना॥धृ॥ व्याकरणाचे शिक्रण ते, केवळ ऐकू'लागे ग्वाड खाटुक हा पुढे तिथेही,आहे पक्का शब्द'द्वाडं॥२॥ ..........आरती खाटुक म्याना॥धृ॥ वृत्तातही परंफेक्टं हा,नाही अक्षरांशी-मोड आमचा मामला अर्थवाही,फक्त आशयाची जोड॥३॥ ..........आरती खाटुक म्याना॥धृ॥ मेंदूची हार्ड-डीस्स्स्स्स्स्स्कं...पाहू आहे किती ज..ड आम्ही लक्षात ठेऊ जाता,लावे आंम्हा मेली थ...ड :-/ ॥४॥ ..........आरती खाटुक म्याना॥धृ॥ करवावे सम-रूप, खाटुकम्याना - संस्कृतात पाहू आम्म्हा जिल्बि'कांना,किती मार्क पडतातhttp://www.pic4ever.com/images/2i1d1co.gif॥५॥ ..........आरती खाटुक म्याना॥धृ॥ ============================= http://www.pic4ever.com/images/Ghelyon.gif ....

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्यारे१ 22/09/2014 - 17:01
=)) बॅट्याला अम्मळ उंच स्थानी ठेवून बुवा त्याच्यासमोर ताट ओवाळत ही आरती म्हणत आहेत असे दृश्य डोळ्यापुढे आले.

In reply to by प्यारे१

@बुवा त्याच्यासमोर ताट ओवाळत ही आरती म्हणत आहेत असे दृश्य डोळ्यापुढे आले>>> आक्षी बराब्बर वळिकलं बगा तुमी! ;) फकस्त आरती'चा संकल्प तुमच्या णावाणी सोडिला होता...तुमाला ण सांगताच! =)) तेची पावती मिळाली तुमच्या परतीसादानी! :p

In reply to by अत्रुप्त आत्मा

बॅटमॅन 22/09/2014 - 18:27
अत्रुप्त आत्मा ऐसे लेवुनिया नाम संचारी त्रिलोकी आणिक चारी धाम ||धृ.|| कार्य करी, बोध सवे, करी खादाडी रांगोळीही काढी लेखनजिल्बी पाडी ||१|| पुण्यक्ष्रेत्री मार्गी गर्दी बसली बोकांडी अ‍ॅक्टिव्हावरि तरी स्थितप्रज्ञ मांडी ||२|| दु दु आगोबा, धन्या आणि सूड पेटविति सदा त्यामागे चूड ||३|| आणिक सदस्य ऐसे- उदा. हा स्पांडू, खोडी काढी, बुवा म्हणे मारिन हां दांडू ||४|| खोड्या काढुनिया लोक ते हसती आत्म्याची परी आगळी आहे महती ||५|| पौरोहित्य करी, परी पुरोगामी कैक गोष्टींत पुरता मूलगामी ||६|| पाहुनि आत्म्याची शीघ्ररचित आरती बॅटमॅन म्हणे, भेट तुजप्रती ||७|| देववाणी राहो, सध्या मायभाषा मानुनि घ्याल गोड हीच बहु आशा ||८||

In reply to by बॅटमॅन

प्यारे१ 22/09/2014 - 18:31
बुवाला अम्मळ उंच स्थानी ठेवून बॅटमॅन त्याच्यासमोर ताट ओवाळत ही आरती म्हणत आहे असे दृश्य डोळ्यापुढे आले. ;)

In reply to by बॅटमॅन

@पुण्यक्ष्रेत्री मार्गी गर्दी बसली बोकांडी अ‍ॅक्टिव्हावरि तरी स्थितप्रज्ञ मांडी ||२|>>> =)) अफा ....ट !!! __/\__ =))

In reply to by बॅटमॅन

आदूबाळ 22/09/2014 - 22:25
अ‍ॅक्टिव्हा? मागे बुवांनी एलिमिनेटर किंवा तत्सम रानटी वाहनावरचा पेप्रात झळकलेला फटू चिकटवला होता. @ब्याट - आरती फक्कड जमलीये!

In reply to by आदूबाळ

टवाळ कार्टा 22/09/2014 - 22:35
लिमिनेटर किंवा तत्सम रानटी वाहनावरचा
आमच्या हत्तीला रानटी म्हंटल्याबद्दल जोरदार निषेध

सूड 22/09/2014 - 15:44
कंपूबाजांनी कंपूबाजांसाठी केलेले काव्य !! >>फिरला तांब्या,जिल्बी झाली! अच्छा!! मला अजूनपर्यंत वाटत होतं की चकली बिघडली की कडबोळं करतात तसं काव्य बिघडलं की जिल्बी होते.

आजकाय शिघ्रकवितेचा व्हायरस जोरात पसरला आहे.... डेंगीला टक्कर देऊन आहे असे समजते ! =)) गुर्जी तुमाला पण चावला काय ? लय भारी कविता !

" अशी पाखरे येती, आणिक जिलबी पाडूनी जातीईईई, दोन टग्यांची भांडणे होता दोन टग्यांची भांडणे होता बघे खदखदुनी हसती, अशी पाखरे येती..... ||क्रमश:||

धन्या 23/09/2014 - 11:38
आरती आत्मूबुवा वाहन हे आक्टीवा घालूनिया हो मांडी कशी चालविता देवा आरती आत्मूबुवा || धृ || आम्ही सारे अडाणभोट काही कळेना हो आम्हा करुनिया तुमची सेवा देवा विनवितो तुम्हा आरती आत्मूबुवा || १ || तुमच्या साधूवाण्याची असे कथा हो वेगळी नौका ती न हो बुडता तया सद्बुद्धी ती झाली आरती आत्मूबुवा || २ || मिळता ती संधी तुम्हा करता प्रबोधन हो देवा आम्हा पुस्तक पंडितांना वाटतो तुमचा हो हेवा आरती आत्मूबुवा || ३ || म्हणती जन तुम्हा दांभिक परी अंतरी हो तुम्ही शुद्ध म्हणे धन्या हा यथामती ज्याने जाणले तो हो बुद्ध आरती आत्मूबुवा || ४ ||

In reply to by बॅटमॅन

धनाजीराव.... जबरीच हो! __/\__ आणि या सांगते'साठी विशेष आभार! http://www.sherv.net/cm/emo/happy/im-happy-smiley-emoticon.gif
म्हणती जन तुम्हा दांभिक परी अंतरी हो तुम्ही शुद्ध म्हणे धन्या हा यथामती ज्याने जाणले तो हो बुद्ध
=========================== @विडंबनशस्त्रावरची धूळ झटकली हे पाहून आनंद वाटला.>>> आणि खाटुकमॅनास +++१११

विजुभाऊ 23/09/2014 - 13:39
जयदेव जयदेव जय श्री ब्याट्यामामा तुमचा काय विचार वर्णावा नामा मुखे आणी फेस लिहोनी भाषा नाना संस्कृत उर्दू कन्नड काहीही म्हणाना. काडीसारुनी होता हळूच पळ काढाना वाढे स्मित वदनी मग पॉपकॉर्न खाताना जयदेव जयदेव जय श्री ब्याट्यामामा

चौकटराजा 23/09/2014 - 16:43
हरे आत्मा हरे आत्मा हरे हरे हरे आमची कॉमेंट येते तेंव्हा मुखी मूग भरे ..... कारे ब्याट्या कारे धन्या कारे कारे कारे ? बुवाचा असा छळ करता नाही हे बरे .... आता कोणाला जमेल तर मंत्र पुष्प येउन द्या ! नमो व्रात्यपतये आत्मू दादाय नमो नमः

In reply to by टवाळ कार्टा

प्यारे१ 23/09/2014 - 20:41
>>> दिवळी जुन्या घरांच्या जाड भिंतींमध्ये छोटे १.५ फुट बाय १.५ फूट आणि साधारण १ फुट खोल असा कप्पा असे. त्याला दिवळी म्हणत. बहुतेक संध्याकाळी/ रात्री दिवे/कंदिल/ चिमण्या ठेवण्यासाठी त्यांचा वापर होत असे. ते आठवलं.

निश 25/09/2014 - 17:38
गुरुजी आले परत घेऊनी तांब्या पाडी कविता फार सुंदर. गुरुजी तांब्या ब जिलबी उत्तम. बॅटमॅन साहेब व धन्यासाहेब तुमचया कविता फार उत्तम.

जेनी... 25/09/2014 - 23:04
वा वा गुर्जि ..वल्लि धन्या काका आणि सुड काका आणि ते खाटु़क कोण ते कळ्ळं नै .. पण .. ' रचता कवणे जिल्बी होइ अगोबा करी खाण्याची घाई काकाहि माझे जिल्बीवेडे जिल्ब्या जिल्ब्या जिल्ब्याच बाई =))

अजया 26/09/2014 - 07:46
अाता अारती पैैसाताईची!! ॥ अारती पैसाताईची ॥ जय देवी पैसाताई,मिपा संपादिनी भक्तांना पावसी ट्रोलांवर तू धावसी॥ अनाहिते पाठी उभी राहसी टवाळां धपाटे घालसी कर्तरी वापरोनी संपादना तू करिसी॥१॥ कधी विनोद साधण्या कि.ती.शहाणी तू होशी कधी सुबक भाषेत लिखाण करिशी कधी काड्या तू सारिशी कंपुबाजांसोबत कधी मौजा तू करिशी ॥२॥ जय देवी पैसा ताई..

पैसा 22/09/2014 - 00:08
=)) =)) =)) तुम्ही एवढे खिलाडूपणाने घेता म्हणून तुम्हाला छळतात सगळे! जिल्बी मस्त झालीय एकदम, फर्मास!!

In reply to by प्रचेतस

धन्या 22/09/2014 - 15:54
त्य "भडजी" शब्दाचे उद्गाते आम्हीच असून केवळ सार्वजनिक मंचावर सांसदीय भाषा वापरण्याचा संकेत पाळावा म्हणून आम्ही त्या मुळ चारोळीला फाटा दिला. ईच्छुकांनी श्री होयंका* गुरुजींची भरडवही* पाहावी. * श्रेयः वल्ली ** श्रेय: खुद्द श्री. होयंका गुरुजी

वा वा वा, झकास. काव्य असावे तर असे.... :smile: . बादवे अनेक वर्षांपासून तुमच्या लेखनात हे 'दू..दू..' वाचत आलो आहे. त्याचा नेमका अर्थ काय हो?

In reply to by खटपट्या

@वर्षांपासून तुमच्या लेखनात हे 'दू..दू..' वाचत आलो >> दू...दू... मंजे दुष्ट..दुष्ट..! =============== @हे नक्की कोण ?>>> ज़रा वेळ थांबा,येइलच इतक्यात! :-D मग प्रतेक्षच दाखिवतो! ;-)

चित्रगुप्त 22/09/2014 - 06:33
दर्पण, सर्पण, अर्पण, तर्पण, आकर्षण ते लवणादी प्रोक्षण, बोडण करुनी या शब्दांचे सारे करुया जिल्बी भक्षण

मनीषा 22/09/2014 - 07:58
खूप सारे "ण" जमवले की तुम्ही . जिलबी छानच बरं ़ का! मिपावर गेले काही दिवस धर्मं, कर्म,मंत्र्, तंत्रं , साधना, परिक्र्मा, इतिहास-भूगोल-ना. शास्त्रं, चूक, बरोबर - असं जड जड वाचून वाचून दमायला झालं होतं अगदी. बरं वाटलं !

In reply to by प्रचेतस

@खाटुक म्यानी भाषाSभक्षी हळूच लपवलेले भांडे शोधी असं पायजे ना? >>> जिल्बीत हात-भार लाऊन स्वयं"सिद्ध असल्याचे जाहिर केल्या बद्दल धन्यवाद! =))

नाखु 22/09/2014 - 09:53
मी कशाला भांड्याला लपवू रे!मी कशाला तांब्याला थोपवू रे! मीच माझ्या जिल्बीचा स्वामी रे!!ध्रू!! दु.दु.भारी खट्याळ ! दिसे जरी मवाळ! हुर्यो करी असा !मी अडवू तरी कसा !! मी कशाला भांड्याला लपवू रे!मी कशाला तांब्याला थोपवू रे! मीच माझ्या जिल्बीचा स्वामी रे!!ध्रू!! बॅट्या-धन्या जोडीने बघतात (काडी) सारून माझ्याकडे कसा ! जीव हो वेडापीसा ! वाटे द्यावा ठोसा (स्माईलीचा) कसा देऊ रे!! मी कशाला भांड्याला लपवू रे!मी कशाला तांब्याला थोपवू रे! मीच माझ्या जिल्बीचा स्वामी रे!!ध्रू!! === अगोबाच्या मागे लपलेला ना.खु.खुड्बूड्कर

In reply to by किसन शिंदे

@आनन्दिता कवितेचा विषय कशावर बेतलाय?. कोण कोणाला त्रास देतं.. ? मला तर काहीही कळ्ळ्ळ्ल नै. संदर्भ समजवा.>>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-052.GIF हेच्च..हेच ते!!! सर्व माहित असूनंही.. =)) म्हणूनच नेहमी म्हणतो:- छळू आगोबा हत्तीची बहीण- दुत्त दुत्त आ...नन्दिता! =)) ================= @अगोबाच्या मागे लपलेला ना.खु.खुड्बूड्कर >>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-060.gif बरीच चांगली खुडबुड करिता वो टुंम्ही! http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-060.gif ================= @स्पा http://www.easyfreesmileys.com/smileys/free-fighting-smileys-546.gif अच्च जालं तर>>> :-/ तू गप रे हलकटा!!! =))

बॅटमॅन 22/09/2014 - 13:35
=)) =)) =)) =)) =)) सध्या काव्यबद्धकोष्ठ झालाय. तो मोकळा झाला की जिल्ब्या पाडायला हाजीर हायेच!!!!! आत्मूसची ही जिल्बी न्हेमीप्रमाणेच मस्त ;)

In reply to by प्यारे१

बॅटमॅन 22/09/2014 - 16:05
आयला. प्यारेगुर्जींनी पाडलेली जिल्बीसुद्धा चक्क आध्यात्मिक आरतीच्या चालीत म्हणता येते. धन्य _/\_

In reply to by प्यारे१

बॅटमॅन 22/09/2014 - 16:20
कुठलीही जण्रल आरती. तिची एक पेट्ट चाल असते. काही आरत्या विशेष फेमस इ. झाल्या की लोक चाल बदलतात तरी किंवा उगा लाडिक गायकी ढंगाची चाल तरी बशिवतात. पण अगोदरची बेशिक चाल तीच असते. उदा. च पायजे तर 'सुखकर्ता' ची नॉन गायकी वाली चाल- जी घरोघरी म्हटल्या जाते ती.

In reply to by बॅटमॅन

.................................एक आरती-खाटुक-म्यानी!!! आरती खाटुक म्याना तुझी नामे किती ना..ना आंम्ही केवळ शब्द'धारी नुसत्या डोलवितो माना॥धृ॥ संस्कृत असो कन्नड तामिळी,तिथे मेंदुत बसे गोळी अजब हा खाटुकम्यान,भाजतो कुठेही ती पोळी॥१॥ ..........आरती खाटुक म्याना॥धृ॥ व्याकरणाचे शिक्रण ते, केवळ ऐकू'लागे ग्वाड खाटुक हा पुढे तिथेही,आहे पक्का शब्द'द्वाडं॥२॥ ..........आरती खाटुक म्याना॥धृ॥ वृत्तातही परंफेक्टं हा,नाही अक्षरांशी-मोड आमचा मामला अर्थवाही,फक्त आशयाची जोड॥३॥ ..........आरती खाटुक म्याना॥धृ॥ मेंदूची हार्ड-डीस्स्स्स्स्स्स्कं...पाहू आहे किती ज..ड आम्ही लक्षात ठेऊ जाता,लावे आंम्हा मेली थ...ड :-/ ॥४॥ ..........आरती खाटुक म्याना॥धृ॥ करवावे सम-रूप, खाटुकम्याना - संस्कृतात पाहू आम्म्हा जिल्बि'कांना,किती मार्क पडतातhttp://www.pic4ever.com/images/2i1d1co.gif॥५॥ ..........आरती खाटुक म्याना॥धृ॥ ============================= http://www.pic4ever.com/images/Ghelyon.gif ....

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्यारे१ 22/09/2014 - 17:01
=)) बॅट्याला अम्मळ उंच स्थानी ठेवून बुवा त्याच्यासमोर ताट ओवाळत ही आरती म्हणत आहेत असे दृश्य डोळ्यापुढे आले.

In reply to by प्यारे१

@बुवा त्याच्यासमोर ताट ओवाळत ही आरती म्हणत आहेत असे दृश्य डोळ्यापुढे आले>>> आक्षी बराब्बर वळिकलं बगा तुमी! ;) फकस्त आरती'चा संकल्प तुमच्या णावाणी सोडिला होता...तुमाला ण सांगताच! =)) तेची पावती मिळाली तुमच्या परतीसादानी! :p

In reply to by अत्रुप्त आत्मा

बॅटमॅन 22/09/2014 - 18:27
अत्रुप्त आत्मा ऐसे लेवुनिया नाम संचारी त्रिलोकी आणिक चारी धाम ||धृ.|| कार्य करी, बोध सवे, करी खादाडी रांगोळीही काढी लेखनजिल्बी पाडी ||१|| पुण्यक्ष्रेत्री मार्गी गर्दी बसली बोकांडी अ‍ॅक्टिव्हावरि तरी स्थितप्रज्ञ मांडी ||२|| दु दु आगोबा, धन्या आणि सूड पेटविति सदा त्यामागे चूड ||३|| आणिक सदस्य ऐसे- उदा. हा स्पांडू, खोडी काढी, बुवा म्हणे मारिन हां दांडू ||४|| खोड्या काढुनिया लोक ते हसती आत्म्याची परी आगळी आहे महती ||५|| पौरोहित्य करी, परी पुरोगामी कैक गोष्टींत पुरता मूलगामी ||६|| पाहुनि आत्म्याची शीघ्ररचित आरती बॅटमॅन म्हणे, भेट तुजप्रती ||७|| देववाणी राहो, सध्या मायभाषा मानुनि घ्याल गोड हीच बहु आशा ||८||

In reply to by बॅटमॅन

प्यारे१ 22/09/2014 - 18:31
बुवाला अम्मळ उंच स्थानी ठेवून बॅटमॅन त्याच्यासमोर ताट ओवाळत ही आरती म्हणत आहे असे दृश्य डोळ्यापुढे आले. ;)

In reply to by बॅटमॅन

@पुण्यक्ष्रेत्री मार्गी गर्दी बसली बोकांडी अ‍ॅक्टिव्हावरि तरी स्थितप्रज्ञ मांडी ||२|>>> =)) अफा ....ट !!! __/\__ =))

In reply to by बॅटमॅन

आदूबाळ 22/09/2014 - 22:25
अ‍ॅक्टिव्हा? मागे बुवांनी एलिमिनेटर किंवा तत्सम रानटी वाहनावरचा पेप्रात झळकलेला फटू चिकटवला होता. @ब्याट - आरती फक्कड जमलीये!

In reply to by आदूबाळ

टवाळ कार्टा 22/09/2014 - 22:35
लिमिनेटर किंवा तत्सम रानटी वाहनावरचा
आमच्या हत्तीला रानटी म्हंटल्याबद्दल जोरदार निषेध

सूड 22/09/2014 - 15:44
कंपूबाजांनी कंपूबाजांसाठी केलेले काव्य !! >>फिरला तांब्या,जिल्बी झाली! अच्छा!! मला अजूनपर्यंत वाटत होतं की चकली बिघडली की कडबोळं करतात तसं काव्य बिघडलं की जिल्बी होते.

आजकाय शिघ्रकवितेचा व्हायरस जोरात पसरला आहे.... डेंगीला टक्कर देऊन आहे असे समजते ! =)) गुर्जी तुमाला पण चावला काय ? लय भारी कविता !

" अशी पाखरे येती, आणिक जिलबी पाडूनी जातीईईई, दोन टग्यांची भांडणे होता दोन टग्यांची भांडणे होता बघे खदखदुनी हसती, अशी पाखरे येती..... ||क्रमश:||

धन्या 23/09/2014 - 11:38
आरती आत्मूबुवा वाहन हे आक्टीवा घालूनिया हो मांडी कशी चालविता देवा आरती आत्मूबुवा || धृ || आम्ही सारे अडाणभोट काही कळेना हो आम्हा करुनिया तुमची सेवा देवा विनवितो तुम्हा आरती आत्मूबुवा || १ || तुमच्या साधूवाण्याची असे कथा हो वेगळी नौका ती न हो बुडता तया सद्बुद्धी ती झाली आरती आत्मूबुवा || २ || मिळता ती संधी तुम्हा करता प्रबोधन हो देवा आम्हा पुस्तक पंडितांना वाटतो तुमचा हो हेवा आरती आत्मूबुवा || ३ || म्हणती जन तुम्हा दांभिक परी अंतरी हो तुम्ही शुद्ध म्हणे धन्या हा यथामती ज्याने जाणले तो हो बुद्ध आरती आत्मूबुवा || ४ ||

In reply to by बॅटमॅन

धनाजीराव.... जबरीच हो! __/\__ आणि या सांगते'साठी विशेष आभार! http://www.sherv.net/cm/emo/happy/im-happy-smiley-emoticon.gif
म्हणती जन तुम्हा दांभिक परी अंतरी हो तुम्ही शुद्ध म्हणे धन्या हा यथामती ज्याने जाणले तो हो बुद्ध
=========================== @विडंबनशस्त्रावरची धूळ झटकली हे पाहून आनंद वाटला.>>> आणि खाटुकमॅनास +++१११

विजुभाऊ 23/09/2014 - 13:39
जयदेव जयदेव जय श्री ब्याट्यामामा तुमचा काय विचार वर्णावा नामा मुखे आणी फेस लिहोनी भाषा नाना संस्कृत उर्दू कन्नड काहीही म्हणाना. काडीसारुनी होता हळूच पळ काढाना वाढे स्मित वदनी मग पॉपकॉर्न खाताना जयदेव जयदेव जय श्री ब्याट्यामामा

चौकटराजा 23/09/2014 - 16:43
हरे आत्मा हरे आत्मा हरे हरे हरे आमची कॉमेंट येते तेंव्हा मुखी मूग भरे ..... कारे ब्याट्या कारे धन्या कारे कारे कारे ? बुवाचा असा छळ करता नाही हे बरे .... आता कोणाला जमेल तर मंत्र पुष्प येउन द्या ! नमो व्रात्यपतये आत्मू दादाय नमो नमः

In reply to by टवाळ कार्टा

प्यारे१ 23/09/2014 - 20:41
>>> दिवळी जुन्या घरांच्या जाड भिंतींमध्ये छोटे १.५ फुट बाय १.५ फूट आणि साधारण १ फुट खोल असा कप्पा असे. त्याला दिवळी म्हणत. बहुतेक संध्याकाळी/ रात्री दिवे/कंदिल/ चिमण्या ठेवण्यासाठी त्यांचा वापर होत असे. ते आठवलं.

निश 25/09/2014 - 17:38
गुरुजी आले परत घेऊनी तांब्या पाडी कविता फार सुंदर. गुरुजी तांब्या ब जिलबी उत्तम. बॅटमॅन साहेब व धन्यासाहेब तुमचया कविता फार उत्तम.

जेनी... 25/09/2014 - 23:04
वा वा गुर्जि ..वल्लि धन्या काका आणि सुड काका आणि ते खाटु़क कोण ते कळ्ळं नै .. पण .. ' रचता कवणे जिल्बी होइ अगोबा करी खाण्याची घाई काकाहि माझे जिल्बीवेडे जिल्ब्या जिल्ब्या जिल्ब्याच बाई =))

अजया 26/09/2014 - 07:46
अाता अारती पैैसाताईची!! ॥ अारती पैसाताईची ॥ जय देवी पैसाताई,मिपा संपादिनी भक्तांना पावसी ट्रोलांवर तू धावसी॥ अनाहिते पाठी उभी राहसी टवाळां धपाटे घालसी कर्तरी वापरोनी संपादना तू करिसी॥१॥ कधी विनोद साधण्या कि.ती.शहाणी तू होशी कधी सुबक भाषेत लिखाण करिशी कधी काड्या तू सारिशी कंपुबाजांसोबत कधी मौजा तू करिशी ॥२॥ जय देवी पैसा ताई..
दर्पण, सर्पण, अर्पण, तर्पण, आकर्षण ते लवणादी प्रोक्षण, कर्तन करुनी या शब्दांचे सारे करुया जिल्बी भक्षण पैसा ताई फू...फुंकरुनी निखार्‍यास त्या हवाच देई (दुष्ष्ष्ट :-/ ) मम हाती तो तांब्या-कसला जिल्बी पडता जीवच घेई दुष्ट हत्ती तो काड्या लावी संधी कधिही सोडत नाही स्वतःच देतो तांब्या भरुनी आपण जिल्बी सोडत नाही (महा दू..दू.. :-/ ) धन्या वाकडू सामिल यांना हल्ली तो ही काड्या सारी धन्या वा कडू...

बासुंदीचे जेवण - गणेश दर्शन २०१४ भाग -१

विअर्ड विक्स ·

In reply to by दिपक.कुवेत

एस 22/09/2014 - 13:03
मलाही पिक्सेलेट झाल्यासारखे दिसताहेत. तसेच विश्वास मित्र मंडळाच्या लाकडी मखराचा वगैरे भाग खाली परत रिपीट झालाय. बाकी पुण्यासारखी श्रीमंती कुठल्याही शहरात नाही हे आवडले! :-)

सूड 22/09/2014 - 16:47
ते ठीकाय, आधी "दुर्गान्डूंची लाडकी गाडी." हे बदलून घ्या आणि अनुस्वार योग्य ठिकाणी देता येत नसेल तर तो शब्द वापरणं थांबवा. अर्थ बदलतोय!!

In reply to by सूड

आदूबाळ 22/09/2014 - 20:06
विक्सभौ, बाकी "दुर्गाडू" हा नेमका कोणत्या भाषेतला शब्द आहे, त्याचा अर्थ आणि व्युत्पत्ती हेही जाताजाता सांगितल्यास उपकार होतील.

कंजूस 22/09/2014 - 21:52
प्रसाद देणारे देव मला फारच आवडतात .सत्यनारायणाचा प्रसाद महात्म्य सर्वांना माहितच आहे त्यामुळे सर्व संकटे दूर होतात. थोडक्यात सांगायचे तर बासुंदी लवकर पाठवा.

In reply to by दिपक.कुवेत

एस 22/09/2014 - 13:03
मलाही पिक्सेलेट झाल्यासारखे दिसताहेत. तसेच विश्वास मित्र मंडळाच्या लाकडी मखराचा वगैरे भाग खाली परत रिपीट झालाय. बाकी पुण्यासारखी श्रीमंती कुठल्याही शहरात नाही हे आवडले! :-)

सूड 22/09/2014 - 16:47
ते ठीकाय, आधी "दुर्गान्डूंची लाडकी गाडी." हे बदलून घ्या आणि अनुस्वार योग्य ठिकाणी देता येत नसेल तर तो शब्द वापरणं थांबवा. अर्थ बदलतोय!!

In reply to by सूड

आदूबाळ 22/09/2014 - 20:06
विक्सभौ, बाकी "दुर्गाडू" हा नेमका कोणत्या भाषेतला शब्द आहे, त्याचा अर्थ आणि व्युत्पत्ती हेही जाताजाता सांगितल्यास उपकार होतील.

कंजूस 22/09/2014 - 21:52
प्रसाद देणारे देव मला फारच आवडतात .सत्यनारायणाचा प्रसाद महात्म्य सर्वांना माहितच आहे त्यामुळे सर्व संकटे दूर होतात. थोडक्यात सांगायचे तर बासुंदी लवकर पाठवा.
बासुंदीचे जेवण - गणेश दर्शन २०१४ लेख वाचण्यापूर्वी आगाऊ (पूर्वीच्या या अर्थाने ,तसा मी सरळ माणूस आहे) सूचना १. गणेशाचा मोदकाशी संबंध ,बासुंदी कुठून आली असे प्रश्न विचारू नये. २. शीर्षक पाहून पाककृती सदरातील लेख इथे का टाकला असा प्रश्न विचारला तर आपल्यास रुचेल असे उत्तर मिळेल अशी अपेक्षा ठेऊ नये. ३. हा लेख एका दुर्गाडू ने लिहिला असल्याने गणेश दर्शना व्यतिरिक्त अवांतर का लिहिले असा प्रश्न विचारण्याआधी आपण मिपावर किती अवांतर प्रतिसाद दिले आहेत याची उजळणी करावी. ४.

शिकार आणि पर्यावरणावरील प्रभाव

एस ·

हे छान केलेत. दुसर्‍या धाग्यावच्या प्रतिक्रियेपेक्षा ती वेगळा धागा म्हणून का टाकली नाही हाच विचार करत होतो. जेव्हापासून माणसाने फेकून मारण्याची आयुधे (भाल्याच्या आदीम प्रकारापासून सुरुवात झाली) शोधून काढली तेव्हापासून मॅमथने सुरुवात करून आतापर्यंत मोजायला कठीण पडेल इतक्या प्राण्यांचा स्वार्थासाठी (अन्न यात समाविष्ट नाही) आणि क्रिडेसाठी समूळ संहार केला आहे... यात अनेक मानवी समाजही समाविष्ट आहेत. "भूक लागलेली नसताना" आणि "अन्नासाठी उपयोगी नसलेलेही" प्राणी मारणारा माणूस हाच प्राणी पृथ्वीतलावर आहे !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सुबोध खरे 21/09/2014 - 23:17
+१०० फक्त "भूक लागलेली नसताना" आणि "अन्नासाठी उपयोगी नसलेलेही" प्राणी मारणारा माणूस हाच प्राणी पृथ्वीतलावर आहे ! असहमत. सिंह हे तरस चित्ता बिबळ्या किंवा त्यांची पिल्ले यांना मारून टाकतात ( न खाता). तसेच तरस सुद्धा संधी मिळेल तेंव्हा सिंहाच्या छाव्यांना मारून टाकतात. या मध्ये आपल्या अन्ना साठीची स्पर्धा कमी करणे हि अन्तः प्रेरणा (INSTINCT) असते. तसेच हत्ती किंवा रानरेडे हे सिंह वाघ बिबळे यांच्या छाव्यांना ठार मारतात कारण ती पिल्ले मोठी होऊन त्यांना / त्यांच्या शावकाना धोका निर्माण करू शकतात.

In reply to by सुबोध खरे

एस 22/09/2014 - 12:57
इएसाहेब आणि खरेसाहेब, तुमचे दोघांचेही बरोबर आहे. जीवसृष्टीच्या दोन मूलभूत प्रेरणा म्हणजे जिवंत राहणं आणि वंशसातत्य टिकवणं (सर्व्हायवल आणि रिप्रॉडक्शन). ह्यामध्ये जे प्राणी/घटक स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत त्यांच्यापुढे इतरांवर अवलंबून रहाण्यावाचून पर्याय नसतो. त्यामुळे हरित वनस्पती, त्यावर जगणारे तृणभक्षी आणि तृणभक्षकांवर जगणारे मांक्षभक्षी आणि या सर्वांच्या मृत्यूनंतर विघटनाचे काम करणारे सूक्ष्मजीव अशी अनेकस्तरीय आणि गुंतागुंतीची रचना उत्क्रांतीच्या माध्यमातून विकसित होत असते. यातला अन्न मिळवण्यासाठीचा एक हेतू सोडला तरी दुसर्‍यांना मारण्यामागे आपले वंशसातत्य टिकवणे ही नैसर्गिक प्रेरणाही तितकीच कारणीभूत असते. सिंह हे चित्त्यांनी किंवा बिबळ्यांनी केलेली शिकार हिसकावून घेतात. त्यामुळे उलट एखादा हुशार सिंह असता तर त्याने असे चित्ते आणि बिबटे मुद्दाम पाळले असते आणि आरामात बसून दिवस काढले असते. तरीही सिंह आपल्या प्रभावक्षेत्रात चित्त्यांना सहजासहजी राहू देत नाहीत. त्यांच्या पिल्लांवर हल्ला करून मारून टाकतात. ह्यामागे अन्न मिळवण्याची स्पर्धा कारणीभूत नसून चित्त्यांपासून स्वतःच्या बछड्यांचे संरक्षण करणे हे खरे कारण असते. सिंहच काय, बिबटे, चित्ते, तरस, रानकुत्री, लांडगे, हत्ती, गेंडे, गवे, असे सर्वच घटक हे इतरांचे वर्चस्व स्वतःच्या अस्तित्त्वाच्या आणि वंशसातत्याच्या आड येणार नाही ह्याचा जीवापाड प्रयत्न करतात. अजून एक भाग सिंहांच्या बाबतीत आढळतो किंवा बोकेपण की मादीच्या आधीच्या नर पिल्लांना नवा सिंह ठार मारून टाकतो, जेणेकरून मादी पुन्हा त्याच्याशी मीलनाला तयार होईल. ह्यामागे स्वतःचे वंशसातत्य टिकवणे, वाढवणे हीच मूलभूत प्रेरणा असते. माणसांच्या बाबत मात्र ह्या नैसर्गिक प्रेरणांपेक्षा हाव, लोभ, क्रौर्य इत्यादी भावनांमुळे इतर प्राण्यांची शिकार करण्याचा स्वभाव दिसतो.

In reply to by सुबोध खरे

तुमचे मुद्दे बरोबर आहेत, पण... १. तरस, चित्ता, बिबळ्या इत्यादी प्राणी पिल्ले मारतात त्याची मुख्यतः दोन कारणे आहेत : अ) दुसर्‍या नराचा वंश संपवणे : पहिला नर कमजोर होउन तो पराजीत झाल्यावरच हे शक्य असते. अर्थात कमजोर नराचा वंशच्छेद होतो. आ) स्वतःचा वंश वाढवणे : दुभती मादी जनन करायला असमर्थ असते. नविन नराने दुसर्‍या नराची पिल्ले मारल्यावर लवकरच ती जननक्षम होते आणि नविन, जास्त ताकदवान नराचा, वंश वाढवायला लायक होते. २. नवजात भावंडांमध्ये (सिबलिंग्ज) अन्नासाठीची स्पर्धा कमी करण्यासाठी हत्या होते. याचा एक महत्वाचा नैसर्गिक फायदा म्हणजे नविन पैदाशीतली निर्बल पिले नसल्याने मोजकेच असलेले सर्व अन्न सबल पिलांना मिळून पुढची पिढी बलवान राहते. वरील दोन्ही प्रकारचा संहार त्या प्राणीजमातीचा समूळ नाश करत नाही. उलट हे त्या जाती मानवी हस्तक्षेपाच्या अगोदर करोडो वर्षे तगून होत्या यावरून सिद्ध होते. किंबहुना हा संहार पुढची पिढी अधिक सबळ ठेवण्याच्या नैसर्गिक तरतूदीचे काम करते. या धाग्यात "प्राणीजमातीचा होत असलेला समूळ संहार" हा मुख्य मुद्दा असल्याने अवांतर टाळण्यासाठी मी येथे तेवढ्या खोलात गेलो नव्हतो.

प्यारे१ 21/09/2014 - 19:51
खूप छान माहितीपूर्ण लेख. स्वॅप्स ह्यांचं कौतुक आणि संपादक मंडळाचे प्रतिसादाला लेखरुपानं स्वतंत्रपणं प्रकाशित केल्याबद्दल आभार. अवांतरः बव्हंशी ;) शाकाहारी झाल्याबद्दल स्वतःचं अभिनंदन करुन घेतो.

विनोद१८ 21/09/2014 - 23:28
मानवी क्रुरतेचा हा असला बेजबाबदार व किळसवाणा खेळ पाहिल्यावर आपण स्वताला 'निसर्गातला सर्वात बुद्धिमान प्राणी' कसे काय म्हणवून घेउ शकतो ?? स्वताला तसे म्हणवून घेण्याचा नैतिक अधिकार माणसाला आहे का ?? गरज नसतानासुद्धा इतर प्राण्यांचा जगण्याचा नैसर्गिक हक्क हिरावून घेणे हे कुठल्या 'नैसर्गिक न्यायात' बसते याचा विचार व्हायलाच हवा. यावर अधिक चर्चा व्हावी. धन्यवाद स्वॅप्स, अप्रतिम लेख...!!

In reply to by विनोद१८

माणुस निसर्गातला सर्वात बुद्धीमान प्राणी आहे यात काहीही शंका नाही... मात्र तो त्याच्या बुद्धीचा उपयोग बहुतेक वेळी सारासार विवेकाने करण्याऐवजी अंध स्वार्थासाठी करतो हीच शोकांतिका आहे.

वीस हजारांहून अधिक सभासद असलेल्या मिपाकरांपैकी दोन-चार अपवाद सोडले (तेही निश्चित विदा नाही म्हणून) तर कोणी स्वतः शिकार करत असतील असं वाटत नाही... तर मग तुमचं प्रतिपादन तरी काय आहे?

In reply to by पिवळा डांबिस

छ्या, छ्या ! मिपावर लई "एकांडे" आणि "टोळीबाज (तेला हितं कंपू म्हंत्यात)" तरबेज शिकारी हैत... त्यात "कहीपे निगाहे कहीपे निशाना" स्टाईल विडबन्जिल्बीवाले कसलेले शिकारी ही तर मिपाची लैच खास (आणची आम्ची आव्डती) पेशालिटी हाय ! ;) :)

मदनबाण 22/09/2014 - 16:29
माणसा सारखा स्वार्थी आणि कॄतघ्न दुसरा प्राणी या भूतलावर शोधुनही सापडणार नाही ! पुढच्या पिढ्यांना फक्त फोटो आणि डिव्हीड उपलब्ध राहतील की काय अशी भिती वाटते! :( मनुष्य प्राण्याची प्रजा मात्र फारच वाढत चालली आहे, आपल देश सुद्धा या प्राण्यांच्या संख्येत पुढे आहे त्यामुळे या प्राण्याचे जीवन सुद्धा सध्याच्या काळात तणाव ग्रस्त झाले आहे. :( हल्ली या मोकाट सुटलेल्या प्राण्याच्या वागण्याचा मला तिटकारा येउ लागला आहे. :(

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राष्ट्रीयत्वाची मोदीप्रणीत पुनर्व्याख्या

एस 22/09/2014 - 16:39
इस्पीकचा एक्का, सुबोध खरे, प्यारे१, दशानन, विनोद१८, वल्ली, पिवळा डांबिस, मदनबाण आणि सर्व वाचकांना मनापासून धन्यवाद!

सस्नेह 22/09/2014 - 16:46
मानवाने पर्यावरणावर अमर्याद आक्रमण केले आहे आणि त्याची फळे ग्रीन हाउस इफेक्टच्या रूपाने तो भोगतो आहे. शिकारीबरोबरच औद्योगीकरण, जंगलांचे कमी होत जाणारे प्रमाण हेही दुर्मिळ जमाती नामशेष होण्याचे कारण आहे.

In reply to by सस्नेह

एस 22/09/2014 - 17:12
मानवी हस्तक्षेपाचा अगदी अजाणतेपणानेही कसा विपरीत परिणाम होऊ शकतो याचे उदाहरण म्हणजे ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड या बेटांवर जेव्हा युरोपियन वसाहतवाद्यांनी पहिले पाऊल ठेवले तेव्हा त्यांच्यासोबत त्यांनी आणलेल्या प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या प्रजातींमुळे तिथल्या मूळ पर्यावरणातील जैववैविध्याची प्रचंड हानी झाली. http://www.teara.govt.nz/en/human-effects-on-the-environment/page-3 तिथल्या नैसर्गिक वृक्षांच्या वनांची कत्तल करून पाईनवृक्षाची लागवड केली गेली. तळी आणि दलदलींच्या प्रदेशांवर भर घालून बुजवण्यात आली.
Coastal sand dune habitats have been altered dramatically, with native plants like pīngao (Desmoschoenus spiralis) being replaced by marram grass (Ammophila arenaria) and tree lupin (Lupinus arboreus). Herbaceous hawkweeds (Hieracium species) have taken over some grasslands, reducing them to wasteland, and are spreading into forests and along creeks.
न्यूझीलंड सी लायन आणि व्हेलसारख्या स्थानिक सस्तन प्रजातींची कत्तल तर झालीच, पण डुकरे, कुत्री आणि मांजरांसारख्या बाहेरून आणलेल्या प्राण्यांमुळे तिथल्या अपृष्ठवंशीय आणि सरपटणार्‍या प्राण्यांवर, पक्ष्यांवर भयानक परिणाम झाला.
Since the late 1700s, 54 more mammal species have been brought to New Zealand. Nineteen of these, including two devastating predators (the Indian grey mongoose and the North American raccoon) did not become established in the wild. However, 11 predators successfully became naturalised: three more rodents; three mustelids (ferrets, stoats and weasels); pigs, hedgehogs, possums, dogs and cats. These have had a massive impact on the remaining native birds, invertebrates and reptiles. Forty out of a total 91 land birds are now extinct, with many others in serious decline.
असेच एक उदाहरण म्हणजे मॉरिशस बेटावरील डोडो हा उडता न येणारा पक्षी. ह्याबद्दल वरच्या यादीत दुवा दिलाच आहे.

सस्नेह 22/09/2014 - 16:50
मानवाने पर्यावरणावर अमर्याद आक्रमण केले आहे आणि त्याची फळे ग्रीन हाउस इफेक्टच्या रूपाने तो भोगतो आहे. शिकारीबरोबरच औद्योगीकरण, जंगलांचे कमी होत जाणारे प्रमाण हेही दुर्मिळ जमाती नामशेष होण्याचे कारण आहे.

In reply to by सस्नेह

प्रसाद१९७१ 23/09/2014 - 14:31
शिकारीबरोबरच औद्योगीकरण, जंगलांचे कमी होत जाणारे प्रमाण हेही दुर्मिळ जमाती नामशेष होण्याचे कारण आहे.>>>>> एकतर हा अभिनवेश सोडुन द्या की मानवाचे अस्तित्व बाकीच्या प्रजाती नामशेष होऊ न देण्यासाठी आहे. एकुणच सर्व सजीव सृष्टीची निर्मीती ही कुठलाही हेतू समोर ठेवुन झालेली नाही. प्राणी तयार होयच्या आधी पण ही सॄष्टी होती आणि सर्व नष्ट झाले तरी ही सृष्टी असणारच आहे. अगदी साधी हत्यारे असणारा मानव सुद्धा गेल्या ४-५ हजार वर्षातला आहे. प्राण्यांच्या करोडो प्रजाती तयार झाल्या आणि करोडो नष्ट झाल्या. वाघ नष्ट झाले, साप नष्ट झाले तरी मानवाला काही फरक पडत नाही. गेल्या शंभर वर्षात वाघांची संख्या १% पण राहीली नाही, काय फरक पडला. हा फक्त स्मरण रंजन वाद आहे.

बॅटमॅन 22/09/2014 - 18:51
माहितीपूर्ण लेख. बहुत धन्यवाद. माणूस जे करतो तसेच करणार्‍या अजूनही काही प्राणीजाती असाव्यात. पण माणसाचा दिमाग लै पावरफुल पडल्याने त्याच्या प्रत्येक कृतीला लय धार आली. याला लिमिट योग्य वेळीच घातली नै गेली तर माणसाचेही अस्तित्व टिकणे अवघड आहे.

In reply to by बॅटमॅन

एस 22/09/2014 - 19:36
याला लिमिट योग्य वेळीच घातली नै गेली तर माणसाचेही अस्तित्व टिकणे अवघड आहे.
हेच तर आपल्यातल्या काही स्वार्थी लोकांना मान्य करायला जड जातेय.

प्रसाद१९७१ 23/09/2014 - 12:37
झाल्या काही प्रजाती नष्ट, मग काय नुकसान झाले. माणुस नव्हता तेंव्हा ही लाखो प्रजाती नष्ट झाल्या आणि नविन निर्माण झाल्या. नाही आता डोडो पक्षी दिसत, तर काय हरकत आहे. ह्या पर्यावरण वाद्यांचा कंटाळा आलाय

In reply to by प्रसाद१९७१

एस 23/09/2014 - 14:54
मोबाइलवर जास्त टंकू शकत नाही तरी अगदी थोडक्यात फक्त मुद्दे मांडतो. १. उत्क्रांतीच्या ओघात अनेक प्रजाती नष्ट झाल्या, पण त्यामागे नैसर्गिक कारणे होती. उदा. हिमयुग, उल्कावर्षाव, प्रबळ भक्षकांपुढे आणि खाद्य मिळवण्याच्या स्पर्धेत टिकाव धरता न येणे, बदलत्या परिस्थितीत स्वतःमध्ये बदल करता न येणे इ. २. ही प्रक्रिया अतिशय सावकाश घडते. मानवी हस्तक्षेपामुळे या प्रक्रियेचा वेग लाखोहजारो पटींने वाढला. ३. उत्क्रांतीचा फायदा असा की स्पर्धा एकांगी नसते. कमकुवत जीव नष्ट होतात तर सबल जीव टिकतात. ४. मानवाकडून इतर प्रजातींच्या होणार्‍या कत्तलीत सरसकटपणा असल्याने त्याचा मास अ‍ॅण्ड रॅपिड एक्स्टिंक्शनसारखा परिणाम होतो. ५. यामुळे पर्यावरणाचे कधीही भरून न येणारे नुकसान होते. ६. मानवाचे अस्तित्त्व पर्यावरणाच्या संतुलनाशी इतके अविभाज्यपणे जोडले गेले आहे की पर्यावरणाची थोडीशी हानीसुद्धा आपल्याच पायावर मारून घेतलेली कुर्‍हाड ठरते. ७. नुकसान करणारे थोडेचजण असतात. पण त्याची फळे सर्वांनाच भोगायला लागतात. सविस्तर प्रतिसाद नक्कीच लिहीन. तूर्तास इत्यलम...

In reply to by एस

प्रसाद१९७१ 23/09/2014 - 16:18
पर्यावरणाचे नुकसान होते म्हणजे तुमच्या डो़क्यात पर्यावरण म्हणजे जे आत्ता किंवा ५०-१०० वर्षा पूर्वी होते तेच खरे आणि बरोबर पर्यावरण आहे अशी काही कल्पना आहे. पर्यावरण पृथ्वी जन्माला आली तेंव्हा पण होते आणि जर पुढे आण्विक युद्ध झाले तरी असणार आहे. पर्यावरणाचे कशानीच नुकसान वगैरे होत नाही. पर्यावरण फक्त असते. प्रजाती नष्ट झाल्या म्ह्णुन माणसाला काही फरक पडत नाही. तुम्ही नॉस्टालजिक होऊन तुम्हाला आवडते तेच पर्यावरण चांगले असा हेकट स्टँड घेताय. खरेच तुम्हाला जसे आत्ता आहे असे पर्यावरण पाहीजे असेल तर मानवाची लोकसंख्या वाढ थांववावी लागेल आणि आहे त्याच्या ती १/४ तरी करावी लागेल. खर्‍या पर्यावरण प्रेमींनी त्याच्या कडे लक्ष द्यावे. पण ती गोष्ट ग्लॅमरस नसल्यानी त्यात कोणाला इंटरेस्ट नाही. एकीकडे माणसांची लोकसंख्या वाढत जाणार, मग त्याचा साईड इफेक्ट म्हणुन जंगले कमी होणारच.

In reply to by एस

प्रसाद१९७१ 23/09/2014 - 18:44
तुमचा लेख चुकीच्या प्रिमेस वर आहे हा मुख्य आक्षेप. त्याबद्दल मी लिहीलेच आहे. दुसरा आक्षेप - पर्यावरण वादी ( विषेश करुन भारतातले ) हे भोंगळ, स्वार्थी, प्रसिद्धीलोलुप, स्वताच्या तुमड्या भरणारे, स्वता: सर्व गोष्टी एंजॉय करुन दुसर्‍यांनी गिल्ट देणारे, सर्व गोष्टीत काड्या घालणारे, दुकान चालवणारे, चुकीचा डाटा देणारे, खोटा डाटा देणारे, बागुलबुवा दाखवणारे, कुठल्या तरी राजकीय पक्षाचे/कंपनीचे एजंट, सत्याचा विपर्यास करणारे , फुकटे असतात.

In reply to by प्रसाद१९७१

एस 23/09/2014 - 19:12
तुमचा लेख चुकीच्या प्रिमेस वर आहे हा मुख्य आक्षेप
माझा लेख नेमक्या कोणत्या गृहीतकावर आधारलेला आहे असे तुम्हांला वाटते?

In reply to by एस

प्रसाद१९७१ 23/09/2014 - 19:39
१. प्रजाती नष्ट होणे हा पर्यावरणाला धोका आहे. पर्यावरण म्हणजे तुम्हाला लहानपणी जे दिसले होते तेच असे नाही. पर्यावरण बदलत रहाते, रहाणार. मानवाला त्या बदलाशी Adjust होत रहावे लागेल. २. मानवानी शिकार केली काय, वाघानी केली काय आणि डायनासोअर नी केली काय. त्यात उच्च/नीच, चांगले/वाईट असे काही नाही. ३. पर्यावरणात प्रत्येक जातीची भुमीका ठरलेली असते.>>> पण ती प्रजात नष्ट झाली तर थोड्या बदला ने नविन साखळी/पिरॅमिड तयार होतो. आधीची साखळी/पिरॅमिड चांगला आणि नव्याने झालेला वाईट हे गृहितक चुक आहे. तुम्हाला जुन्याची सवय आहे म्हणुन ते तुम्हाला चांगले वाटते. वाघ आता जवळ्जवळ संपले आहेत, मानव आहेच आणि रहाणार. ४. जैवविविधता धोक्यात येते>>> ही सृष्टी तयार झाली ती काही जैवविविधता असावी म्हणुन नाही. जैवविविधता नसेल तर काहीच फरक पडत नाही. अगदी काही वर्षांनी फक्त मानव आणि काही लिमिटेड वनस्पतीसृष्टी राहीली तरी मानव जात राहु शकते. हे टोकाचे उदाहरण झाले. पॉईंट समजुन घ्या. ५. मानवाची लोकसंख्या वाढते आहे, त्यांना रहाण्या, खाण्यासाठी काय करणार. पर्यावरणवादी त्या बाबतीत काहीच का बोलत नाहीत. जर जंगले पाहीजे असतील तर लोकसंख्या कमी करा हा एक च उपाय आहे. ताकः मी शाकाहारी आहे, मला स्वताला प्राणी मारुन खाणे जमत नाही. पण हे प्रजाती नष्ट होणे वगैरे पटत नाही

In reply to by प्रसाद१९७१

एस 23/09/2014 - 20:45
मुळात मी हा लेख स्वतंत्र असा लिहिला नव्हता. तो दुसर्‍या एका लेखावर दिलेला प्रतिसाद होता. मला स्वतंत्र लेख लिहायचा असता तर तो काही भागांमध्ये आणि अतिशय विस्तृतपणे, सर्व संदर्भांसहीत लिहिला असता. तसे नसल्यामुळे ह्या लेखात काही त्रुटी राहिल्या आहेत ज्यामुळे तुमचा माझ्याबद्दल काहीसा पूर्वग्रह निर्माण झाला आहे. राहिलेल्या मुद्द्यांमध्ये महत्त्वाचा भाग म्हणजे माझे पर्यावरण वि. विकास ह्या मुद्द्यावर काय मत आहे. तसेच मी रॅशनल इकॉलॉजिस्ट आहे की नाही, दुसर्‍या शब्दांत माझा ह्या प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन डोळस आहे की नाही. लोकसंख्यावाढ हे फार गंभीर कारण आहे आणि त्याविषयी लेखात काहीच लिहिलेले नाही. ह्या आणि तुम्ही वर आजच्या पर्यावरणवाद्यांच्या दुटप्पीपणाच्या अनुभवावर जसे म्हणता आहात त्या काही कारणांनी कदाचित मीही काही मुद्दे मुद्दाम टाळत असेल आणि सोयीस्कर भूमिकाच तेवढी घेत असेल असा आपला माझ्याबद्दल ग्रह झाला असावा. ह्यातील सर्वच मुद्द्यांवर मला वेळेअभावी बोलता येणार नाही, पण आधी कृपया तो पूर्वग्रह मनातून काढून टाका अशी विनंती करतो. आता वरील प्रतिसादातील मुद्द्यांकडे वळूयात:
१. प्रजाती नष्ट होणे हा पर्यावरणाला धोका आहे. पर्यावरण म्हणजे तुम्हाला लहानपणी जे दिसले होते तेच असे नाही. पर्यावरण बदलत रहाते, रहाणार. मानवाला त्या बदलाशी Adjust होत रहावे लागेल.
>>>प्रजातींच्या परस्परसंबंधातील अचानक आणि फार मोठ्या प्रमाणावर आलेल्या बदलांमुळे पर्यावरणाचे नुकसान होते, उत्क्रांतीतील जो प्रजातींचा र्‍हास होत असतो त्याचा वेग अतिशय म्हणजे अतिशय, काही लाख-कोटी वर्षांच्या कालावधीत घडत असतो. मानवाने केलेल्या बेकायदा आणि अनिर्बंध शिकारीमुळे प्रजाती नष्ट होण्याचा कालखंड हा लाखो वर्षांवरून काही दशकांवर येऊन ठेपला आहे. इतक्या बेसुमार र्‍हासाची भरपाई नवीन प्रजातींच्या रूपाने पर्यावरण करू शकत नाही कारण उत्क्रांती हे एकमेव साधन त्यासाठी उपलब्ध आहे. मानव हा प्रजाती मारू शकतो, नव्याने निर्माण करण्याइतपत अजून त्याची प्रगती झालेली नाही. पर्यावरण नेहमीच बदलणार, पण त्यातला बदल करण्याचे अनिर्बंध स्वातंत्र्य मानवाने स्वतःच्या हाती घेऊ नये. शेदीडशे वर्षांपूर्वीचेच पर्यावरण मला हवे आहे असे म्हणणे प्रॅक्टीकली शक्य नाहीच. तसे माझे म्हणणेही नाही.
२. मानवानी शिकार केली काय, वाघानी केली काय आणि डायनासोअर नी केली काय. त्यात उच्च/नीच, चांगले/वाईट असे काही नाही.
>>>चूक. जोपर्यंत मानवाची लोकसंख्या अतिशय लहान होती आणि शेतीसारख्या उत्पादनक्रियेचा शोध लागलेला नव्हता तोपर्यंत अन्न मिळवण्याच्या हेतूने मानवाने केलेल्या शिकारीत आणि वाघ/डायनॅसोर आदींनी केलेल्या शिकारीत फरक नव्हता. मध्य भारतातील एका संस्थानिकाने गेल्या शतकाच्या सुरूवातीला तब्बल १४०० च्या आसपास वाघ केवळ शिकारीच्या हौसेखातर मारले. ह्याचे समर्थन तुम्ही कसे कराल?
३. पर्यावरणात प्रत्येक जातीची भुमीका ठरलेली असते.>>> पण ती प्रजात नष्ट झाली तर थोड्या बदला ने नविन साखळी/पिरॅमिड तयार होतो. आधीची साखळी/पिरॅमिड चांगला आणि नव्याने झालेला वाईट हे गृहितक चुक आहे. तुम्हाला जुन्याची सवय आहे म्हणुन ते तुम्हाला चांगले वाटते. वाघ आता जवळ्जवळ संपले आहेत, मानव आहेच आणि रहाणार.
पिरॅमिड नष्ट/निर्माण होण्याचा वेग हा निसर्गनियंत्रित जोपर्यंत आहे तोपर्यंत हा युक्तिवाद ठीक आहे. वरती म्हटल्याप्रमाणे नॅचरल सिलेक्शनचे तत्त्व ज्यात अंतर्भूत नाही अशा बेसुमार कृत्रिम कत्तलीतून केवळ सर्वंकष विनाशच मानवाच्याही वाट्याला येईल. मानव आहेच आणि राहणार हा दंभही अशाच गैरसमजुतीतून आलेला आहे. मानवाच्या जगण्याची सर्व साधने ही अंतिमतः निसर्गावरच अवलंबून आहेत. निसर्ग नसेल तर मानव कुठे जाणार?
४. जैवविविधता धोक्यात येते>>> ही सृष्टी तयार झाली ती काही जैवविविधता असावी म्हणुन नाही. जैवविविधता नसेल तर काहीच फरक पडत नाही. अगदी काही वर्षांनी फक्त मानव आणि काही लिमिटेड वनस्पतीसृष्टी राहीली तरी मानव जात राहु शकते. हे टोकाचे उदाहरण झाले. पॉईंट समजुन घ्या.
>>>जैवविविधतेचे काहीएक प्रयोजन नाही असे तुम्हांला थोडक्यात म्हणायचे आहे. हा समज चुकीचा आहे. जितकी जैवविविधता जास्त तितका नैसर्गिक निवडीला स्कोप जास्त असतो आणि एकूणच जीवसृष्टी तगून राहण्यासाठी जैवविविधता जितकी जास्त असेल तितकी ती शक्यता जास्त असते हे विविध सांख्यिकी आणि शास्त्रीय मॉडेलनी सिद्ध झालेले आहे.
५. मानवाची लोकसंख्या वाढते आहे, त्यांना रहाण्या, खाण्यासाठी काय करणार. पर्यावरणवादी त्या बाबतीत काहीच का बोलत नाहीत. जर जंगले पाहीजे असतील तर लोकसंख्या कमी करा हा एक च उपाय आहे.
दुर्दैवाने सहमत. एकीकडे वाढत्या लोकसंख्येसाठी लागणारी नैसर्गिक संसाधने अपुरी पडू लागलेली आहेत. त्याचबरोबर अर्थशास्त्राच्या दृष्टीने लोकसंख्यावाढीचा वेग अगदीच ऋणात्मक होणेही त्या प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेला हळूहळू मृत्युपंथावर नेते हा एक गुंतागुंतीचा पॅराडॉक्स आहे आणि ते गणित सोडवणे, योग्य मेळ घालणे तितके सहजसोपे नाही. गेली कित्येक वर्षे मी यावर विचारमंथन करतो आहे पण यावर कुठलाच रामबाण उपाय नाही अशा निष्कर्षापर्यंत मी आलेलो आहे. लोकसंख्या आहे त्यापेक्षा कमी करण्याला खूप सामाजिक-राजकीय-आर्थिक-पर्यावरणीय मर्यादा आहेत ज्यांची विस्तृत चर्चा इथे शक्य नाही. सध्यातरी आहे तो इकोबॅलन्स टिकवून ठेवणे इतकेच आपल्या हाती आहे.

In reply to by टवाळ कार्टा

एस 23/09/2014 - 23:22
मला नाही वाटत डोळ्यांवर झापडे बांधलेले हे मान्य करतील. अगदी सखोल, काटेकोर संशोधनातून पुढे आणलेल्या शास्त्रीय पुराव्यांनाही 'हे असं काही घडतच नसतं, तुम्ही अमुकतमुकचे हस्तक आहात, दुटप्पी आहात' वगैरे पद्धतींच्या दाव्यांनी नाकारण्याचा प्रयत्न केला जातो. असोत. गोबेल्सनीती. ...ठासून बोला!

In reply to by सनी स्॓आस

एस 23/09/2014 - 23:47
तुम्ही ह्याची काही उदाहरणे देऊ शकाल काय? सरसकट सर्वच पर्यावरणवाद्यांना महाचोर ठरवून मोकळे होणे योग्य तर नाहीच, तुम्ही बिनबुडाचे आरोप करताय असाही लोकांचा भ्रम होऊ शकेल.

प्रसाद१९७१ 23/09/2014 - 14:19
ज्या प्रजातींच्या संवर्धनासाठी आपण कार्य करत नाही त्यांची अन्नासाठी वा मनोरंजनासाठी हत्त्या करणे हा गुन्हा आहे>>>>>> हे विधान कुठल्या जोरावर. समजा जर कोणी तसे करतच असेल तर तो गुन्हा असे तुम्हीच ठरवणार. ही तर हुकुमशाही झाली.

प्रसाद१९७१ 23/09/2014 - 14:23
मानवांकडून केली जाणारी शिकार हा मनोरंजनाचा एक घृणास्पद, हिंसात्मक आणि भित्रेपणाचा असा एक प्रकार आहे >>>>>>> असे का हो? मग ह्याचे काय उत्तर १. मांजर उंदराला खेळवुन खेळवुन मारते. हा मनोरंजनाचा प्रकार नाही का? २. सिंह , वाघ किंवा सर्वच प्राणी स्वता पेक्षा दुबळ्या आणि संरक्षण करु न शकणार्‍या प्राण्यांना मारतात हे कसे काय चालते तुम्हाला? तुम्ही असे का नाही म्हणत, "वाघा तुला अन्नच पाहीजे असेल तर दुसर्‍या वाघालाच मारुन खा. हरिणाची पिल्ले मारुन खाणे हे घृणास्पद आहे."

In reply to by प्रसाद१९७१

एस 23/09/2014 - 20:47
वर दिलेला माझा हा प्रतिसाद वाचा. http://misalpav.com/comment/614715#comment-614715
ह्यामागे स्वतःचे वंशसातत्य टिकवणे, वाढवणे हीच मूलभूत प्रेरणा असते. माणसांच्या बाबत मात्र ह्या नैसर्गिक प्रेरणांपेक्षा हाव, लोभ, क्रौर्य इत्यादी भावनांमुळे इतर प्राण्यांची शिकार करण्याचा स्वभाव दिसतो.
मग कसा बरं फरक नाही?

प्रसाद१९७१ 23/09/2014 - 16:19
खरेच तुम्हाला जसे आत्ता आहे असे पर्यावरण पाहीजे असेल तर मानवाची लोकसंख्या वाढ थांववावी लागेल आणि आहे त्याच्या ती १/४ तरी करावी लागेल. खर्‍या पर्यावरण प्रेमींनी त्याच्या कडे लक्ष द्यावे. पण ती गोष्ट ग्लॅमरस नसल्यानी त्यात कोणाला इंटरेस्ट नाही. एकीकडे माणसांची लोकसंख्या वाढत जाणार, मग त्याचा साईड इफेक्ट म्हणुन जंगले कमी होणारच.

पैसा 23/09/2014 - 22:24
लेख आवडला. प्रतिसादाचा लेख केल्यामुळे काही मुद्दे राहिले आहेत हे खरे असले तरी आहेत तेही पुरेसे आहेत. दुर्दैवाने कोणतेही सरकार पर्यावरणाच्या बाबत संवेदनाशीलतेने वागत नाही. त्यांना फक्त तात्कालिक फायद्यासाठी खाणसम्राटांना लीज देण्यात रस असतो. जंगले आणि वाघांचां कोणाला काय पडलंय? कागदोपत्री शिकारीवर बंदी आहे, पण मध्यंतरी गोयात एक पट्टेरी वाघ मारला तो एका मोठ्या राजकीय पुढार्‍याच्या घरी नेल्याचे फोटो लोकानी मोबाईलवर काढले होते. :(

एस 25/09/2014 - 12:04
गोलाबारूद खतम हो गया क्या? धागा इतक्या लवकर थंड पडेल असं वाटलं नव्हतं. :-)

In reply to by एस

प्रसाद१९७१ 25/09/2014 - 14:27
तुमची मते काही बदलणार नाहीत. वाघ नाहीसे झाल्यामुळे मानव जातीचे नुकसान होणार/झाले आहे असल्या सिद्ध न झालेल्या गोष्टी तुम्ही बोलत रहाणार. मग मी काय बोलणार?

In reply to by प्रसाद१९७१

एस 25/09/2014 - 15:18
मी तुमच्या प्रतिसादाला दिलेल्या http://misalpav.com/comment/615484#comment-615484 ह्या उत्तरावर तुमचे काय म्हणणे आहे हे आधी सांगता का? वाघ नष्ट झाल्यामुळे मानवावर काय परिणाम होईल ह्याचे तुम्हांला हवेच असेल तर पुराव्यांसकट सविस्तर उत्तर देईन हवं तर. पण मग तुम्हांला तुमची मते बदलावी लागतील. आहे का तयारी?

In reply to by एस

प्रसाद१९७१ 25/09/2014 - 15:22
अहो वाघ कधीच नष्ट झाले. गेल्या ५०-७० वर्षात वाघाचा पर्यावरणावरचा आणि बाकी प्राणीजगतावरचा प्रभाव पूर्ण संपला आहे. मानवावर काही परीणाम झाला का? ह्याच ५० वर्षात भारतातल्या मानवाचे आयुष्यमान वाढले, रहाणीमान सुधारले. मानवजातीचे काय नुकसान झाले?

In reply to by एस

प्रसाद१९७१ 25/09/2014 - 15:29
वाघ नष्ट झाल्यामुळे मानवावर काय परिणाम होईल ह्याचे तुम्हांला हवेच असेल तर पुराव्यांसकट सविस्तर उत्तर देईन हवं तर. पण मग तुम्हांला तुमची मते बदलावी लागतील. आहे का तयारी?
नक्की बदलीन. पण तुम्ही जे काही वाईट परिणाम झाले ते वाघ नष्ट झाल्यामुळेच झाले हे सिद्ध करायला पाहीजे.

In reply to by प्रसाद१९७१

एस 25/09/2014 - 17:33
तुम्ही त्याच ठिकाणी त्याच पद्धतीने उत्तर दिलेत आणि मी मांडलेली कारणमीमांसा खोडून काढलीत तर माझा तसा समज होणार नाही पुन्हा.

In reply to by एस

प्रसाद१९७१ 25/09/2014 - 18:18
गेल्या १०० वर्षात वाघ आणि बाकी अनेक प्रजाती भारतातुन नष्ट झाल्या तरी अन्नधान्य उत्पन्न वाढले, आयुर्मयादा वाढली. हीच सिद्धता आहे की वाघ संपले तरी काही फरक पडत नाही.

In reply to by प्रसाद१९७१

एस 25/09/2014 - 18:25
ही तात्पुरती सूज आहे. पर्यावरण विनाशाचे दुष्परिणाम शेवटी मानवाच्याही अस्तित्त्वावर घाला घालणार हे निश्चित.

In reply to by एस

प्रसाद१९७१ 25/09/2014 - 18:31
घालू दे की काय घाला घालायचा तो १००० वर्षानी. म्हणुन आत्तच्या माणसांनी वाघांच्या हातुन मरायचे का? तसे ही जेंव्हा पर्यावरण जर जास्तच बिघडले ( मानवाच्या दृष्टीने )तर मानवाची लोकसंख्या कमी होउन, पुन्हा बॅलंस होइलच ना. पण मानव आता इतका प्रगत झाला आहे की अणुयुद्धा नी स्वताचा शेवट करु शकतो. पण प्रदुषणात सुद्धा मानवजात शिल्लक राहील.

In reply to by एस

प्रसाद१९७१ 26/09/2014 - 09:26
नक्की राहील. फारच प्रदुषण झाले तर आत्ताच्या ७०० कोटी ऐवजी १० कोटी शिल्लक रहातील पण मानवजात शिल्लक राहील हे नक्की. आणि लोकसंख्या १० कोटीच उरल्यामुळे पुन्हा जंगले होतील आणि प्रदुषण कमी होईल. की पुन्हा ७०० कोटी होतील.

In reply to by एस

प्रसाद१९७१ 25/09/2014 - 18:32
तिथे कुठे? काय राव चेष्टा करताय? माझे अन्न कुठुन येत हा तुमचा प्रश्न आहे का? कुठल्या तरी शेतातुन येते. कुठल्या हे माझ्यासाठी महत्वाचे नाही.

मदनबाण 25/09/2014 - 12:25
काही दिवसांपूर्वी मी काही बातम्या वाचल्या होत्या, त्या इथे देतो :- Evidence Suggests World’s Largest Solar Farm Burns Birds That Fly over It Solar Farms Threaten Birds California’s new solar power plant is actually a death ray that’s incinerating birds mid-flight

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!

In reply to by प्रसाद१९७१

मदनबाण 25/09/2014 - 14:44
तुमचे काय म्हणणे आहे? तो पॉवर फार्म बंद करायचा? प़क्षी कसे वाचवले जातील त्यावर अधिक भर द्यावा... बाकी इतर प्राणी खपले तरी चालेल पण माणसाला मात्र त्याला हवे तसे वागण्याची मुभा असावी असे आपले मत आहे काय ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!

In reply to by मदनबाण

प्रसाद१९७१ 25/09/2014 - 14:47
समजा मेले ते पक्षी तर काय फरक पडतो. तुम्हाला ही बातमी वाचुन वाईट वाटणे सहाजीक च आहे. पण ५० वर्षानी ते पक्षी किंवा त्यांची पूर्ण प्रजाती नष्ट झाली असेल तर तुमच्या मुला नातवंडांना काय फरक पडणार आहे?

In reply to by प्रसाद१९७१

प्यारे१ 25/09/2014 - 14:51
माणूस जमात संपणं जास्त श्रेयस्कर आहे असं नाही वाटत त्यापेक्षा? हे 'मंद' पशु पक्षी जसं जमेल तसं राहतील तरी. जायच्या वेळी जातीलच.

In reply to by प्यारे१

बॅटमॅन 25/09/2014 - 15:20
असहमत. प्राणी पक्षी काय नि माणूस काय, कुणीही संपणे कमीजास्त श्रेयस्कर नाही - जर तत्त्वतः पाहिले तर. पण मी माणूस असल्याने माझ्या स्वार्थासाठी मला मानवजात टिकलेली हवी आहे. संपला विषय.

In reply to by बॅटमॅन

प्रसाद१९७१ 25/09/2014 - 15:25
प्रश्नच नाही. मी माणुस आहे म्हणुन मी माणसांचा विचार करतोय आणि करणार. १०००० वर्षापूर्वी मानवाकडे काही हत्यारे नव्हती तेंव्हा मानवाची लोकसंख्या १ कोटी पण पार करत नव्हती. जर हत्यारांचा शोध वेळीच लागला नसता तर मानवजात कदाचित लुप्त झाली असती डोडो सारखी. काय माहीती, ह्या आधीपण लाखो वर्षापूर्वी मानव सदृष प्राणी तयार ही झाला असेल पण तो विकसीत होयच्या आधी ह्या वाघ, डायनासोअर नी संपवला असेल

In reply to by प्रसाद१९७१

हाडक्या 25/09/2014 - 16:33
हम्म्म..
काय माहीती, ह्या आधीपण लाखो वर्षापूर्वी मानव सदृष प्राणी तयार ही झाला असेल पण तो विकसीत होयच्या आधी ह्या वाघ, डायनासोअर नी संपवला असेल
असा कधी आधी विचार केला नव्हता.. रोचकच.. :) (शिकारीचे समर्थन नाहीच पण हा मुद्दा रोचक आहे.) माणूस विचार करु शकतो म्हणून कदाचित हे एवढे चर्चासत्र सुरु आहे. वाघ कमी होत असताना वाघांनी स्वतःहून काही प्रयत्न केलेले दिसत नाहीत स्वतःची प्रजा वाचवायला. वरून एक वाघ दूसर्‍या नरापासून झालेली म्हणून वाघिणीची इतर पिल्ले जेव्हा मारत सुटतो तेव्हा तो वाघ पण वाघांची संख्या कमी व्हायला तेवढाच दोषीच नाही का?

In reply to by हाडक्या

एस 25/09/2014 - 17:16
इएसाहेबांनी दिलेला हा प्रतिसाद वाचा. http://misalpav.com/comment/614904#comment-614904 त्यातूनही बोध नाही झाला तर बोलूच.

In reply to by प्रसाद१९७१

काय माहीती, ह्या आधीपण लाखो वर्षापूर्वी मानव सदृष प्राणी तयार ही झाला असेल पण तो विकसीत होयच्या आधी ह्या वाघ, डायनासोअर नी संपवला असेल झालेले आहेत आणि संपलेले आहेत. त्यांची यादी इथे सापडेल. पण "होमो सॅपियन सॅपियन" म्हणजे आधुनिक मानवाने (म्हणजे आपण हो !) नवनविन आयुधे (टुल्स) शोधून काढून जो प्राणीसंहार आणि पर्यावरणसंहार केला आहे / करत आहे त्याला या पृथ्वीच्या इतिहासात तोड नाही !

In reply to by बॅटमॅन

प्यारे१ 25/09/2014 - 17:45
@ बॅटमॅन, अहो माणूसच निसर्गव्यवस्था त्याला हवी तशी वाकवतोय ना? इतर कुठले पशु पक्षी अशी ढवळाढवळ करत आहेत का? बरं केली तर मग बोंबा मारण्यापेक्षा तुलनेनं माणूस जमात संपलेली बरी असं म्हणतो आहे. एनीवेज धिस इज ऑल अबाऊट इफ्स अ‍ॅण्ड बट्स. >>> पण मी माणूस असल्याने माझ्या स्वार्थासाठी मला मानवजात टिकलेली हवी आहे. संपला विषय. संपला विषय. हे बरोबरच आहे. :)

In reply to by बॅटमॅन

मी माणूस असल्याने माझ्या स्वार्थासाठी मला मानवजात टिकलेली हवी आहे. मुख्य मुद्दा हाच आहे ! केवळ पर्यावरणासाठी पर्यावरण असा नाही आणि नकोच. कारण, तसे म्हणणार्‍यांकडून आणि तशी समजूत ठेवणार्‍यांकडून खरे तर मूळ मुद्द्याचा विपर्यास होतो. माणूस या पृथ्वीवर एकांडा जगू शकणार नाही, हे सत्यही जाणून घेणे आवश्यक आहे. करोडो वर्षांच्या निसर्गाच्या क्रिया-प्रतिक्रियेतून जो परिणाम साधला गेला आहे त्याचा मानवाला मानव बनवण्यात मोठा सहभाग आहे. त्या परिणामात मानवाच्या मेंदूच्या ताकदीने तयार झालेल्या साधनांचा उपयोग सुरू होण्याअगोदर आणि विषेशतः खनिज तेलाचा शोध लागण्यापूर्वीचा मानवाचा सहभाग बराचसा नैसर्गिकरित्या नियंत्रित होता. त्यामुळे "संहार आणि पुर्निर्माण" या चक्रात निसर्गाला सावरायला पुरेसा वेळ मिळत होता. भाल्याच्या उपयोगाने मानवाने मॅमथ संपवले. त्यातले बहुतेक मांसापेक्षा त्याचे दात आणि हाडांसाठी मारलेले असावेत अशी शंका घ्यायला जागा आहे. एका बंदूकीने एक माणूस जेव्हा डझनावारी प्रजननक्षम प्राणी काही दिवसांत मारतो तेव्हा कोणत्याही प्राण्याची नैसर्गिक क्षमता तेवढ्या वेळात तेवढ्या संख्येने नविन प्राण्यांना जन्म देउन त्यांना प्रजननक्षम बनवण्याइतकी प्रबळ नसल्याने ती प्राणीजात संहाराच्या दिशेने जाते. हेच समीकरण जंगलतोडीला लागू पडते. तयार व्हायला शेकडो-हजारो वर्षे लागलेले जंगल आधुनीक साधने वापरून मानव काही वर्षांत / दशकांत ऊजाड करू शकतो / करत आला आहे... बहुतेक सर्व प्राचीन संस्कृतींची ठिकाणे आज वाळवंटे आहेत, याचे केवळ "निसर्गात आपोआप झालेला बदल" हेच कारण नसून मानवाने केलेल्या अतीरेकी वनसंहाराच्या कृतीने झालेला निसर्गातील बदल हे कारण असण्याचे पुरावे सापडत आहेत. मानवाच्या आगमनापूर्वी बहुतांश पर्जन्यारण्य असलेले ऑस्ट्रेलिया खंड आता बहुतांश वाळवंट का आहे आणि तेथे मुख्यतः निलगिरी सारखी सहजासहजी आग्नीच्या भक्षस्थानी न पडणारी झाडेच का आहेत याबाबत जे पुरावे समोर आले आहेत / येत आहेत तेही रोचक ठरावे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

प्रसाद१९७१ 26/09/2014 - 09:33
माणूस या पृथ्वीवर एकांडा जगू शकणार नाही, हे सत्यही जाणून घेणे आवश्यक आहे
मी कुठे म्हणतोय की एकांडा जगु शकेल. आत्ता १० लाख प्रजाती असतील. समजा त्यातल्या १ लाख शिल्लक राहील्या तर मानव एकटा कुठे रहाणार आहे.
बहुतेक सर्व प्राचीन संस्कृतींची ठिकाणे आज वाळवंटे आहेत, याचे केवळ "निसर्गात आपोआप झालेला बदल" हेच कारण नसून मानवाने केलेल्या अतीरेकी वनसंहाराच्या कृतीने झालेला निसर्गातील बदल हे कारण असण्याचे पुरावे सापडत आहेत.
असे काय पुरावे सापडले आहेत? तुम्हाला काय म्हणायचे की थर चे वाळवंट जंगल तोडीमुळे तयार झाले?
मानवाच्या आगमनापूर्वी बहुतांश पर्जन्यारण्य असलेले ऑस्ट्रेलिया खंड आता बहुतांश वाळवंट का आहे
ह्याचे काही पुरावे आहेत का? ऑस्ट्रेलिया मधे १७ व्या शतका पर्यंत काही लाखांची पण लोक वस्ती नव्हती. त्या लोकांनी सगले जंगल तोडले असे तुम्हाला म्हणायचे आहे काय? मग टास्मानियात इतके प्रचंड जंगल कसे शिल्लक राहीले?

In reply to by प्रसाद१९७१

थोडे वाचन वाढवा. सगळेच पुरावे तुमच्यासाठी शोधून आणायला (आणि त्यातली खुसपटे परत नीट करायला) वेळ नाही... पण अगदी आंतरजालावरही ते सर्व आहेत, तेव्हा स्वतः खात्री करून घेऊ शकाल. वेळ आणि श्रम करावे लागतील, पण त्याशिवाय नविन ज्ञान आणि विचार मिळत नाही... निदान मिळालेले बहुदा पटत नाही :) शिवाय केवळ एक मुद्दा पकडून त्याची केवळ स्वतःच्या समजूतीने साल काढण्याऐवजी कोणत्याही प्रश्नाचा त्याबद्दल जगात इतर काय पुरावे आहेत ते सारासार विवेकाने पडताळून मगच मत लिहीले तर जास्त फायद्याचे होईल असे वाटते. असो, जगातल्या सर्वांचे मत बदलणे हा माझ्या जीवनाच उद्देश नाही. मी काही मुद्दे दिले आहेत... त्याचा उपयोग करून स्वसंशोधन करु शकता किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करू शकता. कारण पर्यावरणाचे अतीसमर्थक जितके एकांगी विचार करतात तेवढाच एकांगी विचार त्याचे अतीविरोधकही करतात असा अनुभव आहे. माझ्या मते... "कोणतीही किंंमत देऊन पर्यावरणासाठी पर्यावरण वाचवा" हे योग्य नाही तर "माणसाच्या भल्यासाठी आवश्यक तेवढे पर्यावरण योग्य किंमत देऊन वाचवा" हे जास्त योग्य आहे. पण, हा दुसरा पर्यायही नैसर्गिकपणे आपोआप होणारी घटना नाही... कारण माणसाचा पर्यावरणातील सद्याचा हस्तक्षेप ही आपोआप होणारी नैसर्गिक घटना नाही. असो.

मदनबाण 25/09/2014 - 14:56
पण ५० वर्षानी ते पक्षी किंवा त्यांची पूर्ण प्रजाती नष्ट झाली असेल तर तुमच्या मुला नातवंडांना काय फरक पडणार आहे? त्यांना काय वाटेल आणि फरक पडेल ते तेव्हाच कळेल आता कसे कळणार ? बाकी तुम्ही तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मात्र दिले नाहीत ? ते आधी द्या पाहु.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!

In reply to by मदनबाण

प्रसाद१९७१ 25/09/2014 - 15:09
त्यांना काय वाटेल आणि फरक पडेल ते तेव्हाच कळेल आता कसे कळणार ?
असे कसे, तुमच्या खापर पणजोबांच्या वेळी हजारो वाघ होते, आता ते नाहीत. तुम्हाला ( तुमच्या पिढीला ) काय फरक पडला? आता डोडो नाही, मॅमथ नाही तुम्हा/आम्हाला काय फरक पडला?

प्रसाद१९७१ 25/09/2014 - 15:07
बाकी इतर प्राणी खपले तरी चालेल पण माणसाला मात्र त्याला हवे तसे वागण्याची मुभा असावी असे आपले मत आहे काय
हो जर त्या बाकीच्या प्राण्यांना जपत बसल्या मुळे मानवाला त्रास होस असेल तर त्या प्राण्यांना जपणे ही प्रार्थमिकता होत नाही ( माझ्या मते ). जर लागले तर इतर प्राणी खपवावेत. पुन्हा माझे पहीलेच मत. जे आपण आपल्या आयुष्यात बघितले आहे तसेच पर्यावरण कायम पाहीजे हा अट्टाहास आहे. जैवविविधता ही बकवास आहे. मानवाला जगण्यासाठी अन्न, वस्त्र, औषधे, निवारा, बाकी रॉ मटेरिअल पुरवणार्‍या काही वनस्पतींच्या प्रजाती शिल्लक राहील्या तरी पुरेसे आहे. साप , सरडे, पाली हे प्राणी मला आवडत नसल्या मुळे ते तर ह्या पृथ्वीवरुन लगेच नष्ट व्हावेत अशी माझी मनापासुन इच्छा आहे.

In reply to by प्रसाद१९७१

एस 25/09/2014 - 15:22
हो जर त्या बाकीच्या प्राण्यांना जपत बसल्या मुळे मानवाला त्रास होस असेल तर त्या प्राण्यांना जपणे ही प्रार्थमिकता होत नाही ( माझ्या मते ). जर लागले तर इतर प्राणी खपवावेत. पुन्हा माझे पहीलेच मत. जे आपण आपल्या आयुष्यात बघितले आहे तसेच पर्यावरण कायम पाहीजे हा अट्टाहास आहे. जैवविविधता ही बकवास आहे. मानवाला जगण्यासाठी अन्न, वस्त्र, औषधे, निवारा, बाकी रॉ मटेरिअल पुरवणार्‍या काही वनस्पतींच्या प्रजाती शिल्लक राहील्या तरी पुरेसे आहे. साप , सरडे, पाली हे प्राणी मला आवडत नसल्या मुळे ते तर ह्या पृथ्वीवरुन लगेच नष्ट व्हावेत अशी माझी मनापासुन इच्छा आहे.
वर मला कुणीतरी हेकट म्हणालं होतं. तुम्हीच होतातना?

In reply to by एस

प्रसाद१९७१ 25/09/2014 - 17:18
कुठला त्रास हो, काहीतरीच. काही त्रास वगैरे होत नाहीये सृष्टीला. तुमच्या मनात जे सृष्टीचे चित्र असेल त्याला होत असेल त्रास पण सृष्टी ही पृथ्वी जन्माला आली तेंव्हा पण होती आणि पृथ्वी सूर्य गिळंकृत करेल तो पर्यंत असेल. त्यात कधी जीवन असते कधी नसते.

हे छान केलेत. दुसर्‍या धाग्यावच्या प्रतिक्रियेपेक्षा ती वेगळा धागा म्हणून का टाकली नाही हाच विचार करत होतो. जेव्हापासून माणसाने फेकून मारण्याची आयुधे (भाल्याच्या आदीम प्रकारापासून सुरुवात झाली) शोधून काढली तेव्हापासून मॅमथने सुरुवात करून आतापर्यंत मोजायला कठीण पडेल इतक्या प्राण्यांचा स्वार्थासाठी (अन्न यात समाविष्ट नाही) आणि क्रिडेसाठी समूळ संहार केला आहे... यात अनेक मानवी समाजही समाविष्ट आहेत. "भूक लागलेली नसताना" आणि "अन्नासाठी उपयोगी नसलेलेही" प्राणी मारणारा माणूस हाच प्राणी पृथ्वीतलावर आहे !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सुबोध खरे 21/09/2014 - 23:17
+१०० फक्त "भूक लागलेली नसताना" आणि "अन्नासाठी उपयोगी नसलेलेही" प्राणी मारणारा माणूस हाच प्राणी पृथ्वीतलावर आहे ! असहमत. सिंह हे तरस चित्ता बिबळ्या किंवा त्यांची पिल्ले यांना मारून टाकतात ( न खाता). तसेच तरस सुद्धा संधी मिळेल तेंव्हा सिंहाच्या छाव्यांना मारून टाकतात. या मध्ये आपल्या अन्ना साठीची स्पर्धा कमी करणे हि अन्तः प्रेरणा (INSTINCT) असते. तसेच हत्ती किंवा रानरेडे हे सिंह वाघ बिबळे यांच्या छाव्यांना ठार मारतात कारण ती पिल्ले मोठी होऊन त्यांना / त्यांच्या शावकाना धोका निर्माण करू शकतात.

In reply to by सुबोध खरे

एस 22/09/2014 - 12:57
इएसाहेब आणि खरेसाहेब, तुमचे दोघांचेही बरोबर आहे. जीवसृष्टीच्या दोन मूलभूत प्रेरणा म्हणजे जिवंत राहणं आणि वंशसातत्य टिकवणं (सर्व्हायवल आणि रिप्रॉडक्शन). ह्यामध्ये जे प्राणी/घटक स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत त्यांच्यापुढे इतरांवर अवलंबून रहाण्यावाचून पर्याय नसतो. त्यामुळे हरित वनस्पती, त्यावर जगणारे तृणभक्षी आणि तृणभक्षकांवर जगणारे मांक्षभक्षी आणि या सर्वांच्या मृत्यूनंतर विघटनाचे काम करणारे सूक्ष्मजीव अशी अनेकस्तरीय आणि गुंतागुंतीची रचना उत्क्रांतीच्या माध्यमातून विकसित होत असते. यातला अन्न मिळवण्यासाठीचा एक हेतू सोडला तरी दुसर्‍यांना मारण्यामागे आपले वंशसातत्य टिकवणे ही नैसर्गिक प्रेरणाही तितकीच कारणीभूत असते. सिंह हे चित्त्यांनी किंवा बिबळ्यांनी केलेली शिकार हिसकावून घेतात. त्यामुळे उलट एखादा हुशार सिंह असता तर त्याने असे चित्ते आणि बिबटे मुद्दाम पाळले असते आणि आरामात बसून दिवस काढले असते. तरीही सिंह आपल्या प्रभावक्षेत्रात चित्त्यांना सहजासहजी राहू देत नाहीत. त्यांच्या पिल्लांवर हल्ला करून मारून टाकतात. ह्यामागे अन्न मिळवण्याची स्पर्धा कारणीभूत नसून चित्त्यांपासून स्वतःच्या बछड्यांचे संरक्षण करणे हे खरे कारण असते. सिंहच काय, बिबटे, चित्ते, तरस, रानकुत्री, लांडगे, हत्ती, गेंडे, गवे, असे सर्वच घटक हे इतरांचे वर्चस्व स्वतःच्या अस्तित्त्वाच्या आणि वंशसातत्याच्या आड येणार नाही ह्याचा जीवापाड प्रयत्न करतात. अजून एक भाग सिंहांच्या बाबतीत आढळतो किंवा बोकेपण की मादीच्या आधीच्या नर पिल्लांना नवा सिंह ठार मारून टाकतो, जेणेकरून मादी पुन्हा त्याच्याशी मीलनाला तयार होईल. ह्यामागे स्वतःचे वंशसातत्य टिकवणे, वाढवणे हीच मूलभूत प्रेरणा असते. माणसांच्या बाबत मात्र ह्या नैसर्गिक प्रेरणांपेक्षा हाव, लोभ, क्रौर्य इत्यादी भावनांमुळे इतर प्राण्यांची शिकार करण्याचा स्वभाव दिसतो.

In reply to by सुबोध खरे

तुमचे मुद्दे बरोबर आहेत, पण... १. तरस, चित्ता, बिबळ्या इत्यादी प्राणी पिल्ले मारतात त्याची मुख्यतः दोन कारणे आहेत : अ) दुसर्‍या नराचा वंश संपवणे : पहिला नर कमजोर होउन तो पराजीत झाल्यावरच हे शक्य असते. अर्थात कमजोर नराचा वंशच्छेद होतो. आ) स्वतःचा वंश वाढवणे : दुभती मादी जनन करायला असमर्थ असते. नविन नराने दुसर्‍या नराची पिल्ले मारल्यावर लवकरच ती जननक्षम होते आणि नविन, जास्त ताकदवान नराचा, वंश वाढवायला लायक होते. २. नवजात भावंडांमध्ये (सिबलिंग्ज) अन्नासाठीची स्पर्धा कमी करण्यासाठी हत्या होते. याचा एक महत्वाचा नैसर्गिक फायदा म्हणजे नविन पैदाशीतली निर्बल पिले नसल्याने मोजकेच असलेले सर्व अन्न सबल पिलांना मिळून पुढची पिढी बलवान राहते. वरील दोन्ही प्रकारचा संहार त्या प्राणीजमातीचा समूळ नाश करत नाही. उलट हे त्या जाती मानवी हस्तक्षेपाच्या अगोदर करोडो वर्षे तगून होत्या यावरून सिद्ध होते. किंबहुना हा संहार पुढची पिढी अधिक सबळ ठेवण्याच्या नैसर्गिक तरतूदीचे काम करते. या धाग्यात "प्राणीजमातीचा होत असलेला समूळ संहार" हा मुख्य मुद्दा असल्याने अवांतर टाळण्यासाठी मी येथे तेवढ्या खोलात गेलो नव्हतो.

प्यारे१ 21/09/2014 - 19:51
खूप छान माहितीपूर्ण लेख. स्वॅप्स ह्यांचं कौतुक आणि संपादक मंडळाचे प्रतिसादाला लेखरुपानं स्वतंत्रपणं प्रकाशित केल्याबद्दल आभार. अवांतरः बव्हंशी ;) शाकाहारी झाल्याबद्दल स्वतःचं अभिनंदन करुन घेतो.

विनोद१८ 21/09/2014 - 23:28
मानवी क्रुरतेचा हा असला बेजबाबदार व किळसवाणा खेळ पाहिल्यावर आपण स्वताला 'निसर्गातला सर्वात बुद्धिमान प्राणी' कसे काय म्हणवून घेउ शकतो ?? स्वताला तसे म्हणवून घेण्याचा नैतिक अधिकार माणसाला आहे का ?? गरज नसतानासुद्धा इतर प्राण्यांचा जगण्याचा नैसर्गिक हक्क हिरावून घेणे हे कुठल्या 'नैसर्गिक न्यायात' बसते याचा विचार व्हायलाच हवा. यावर अधिक चर्चा व्हावी. धन्यवाद स्वॅप्स, अप्रतिम लेख...!!

In reply to by विनोद१८

माणुस निसर्गातला सर्वात बुद्धीमान प्राणी आहे यात काहीही शंका नाही... मात्र तो त्याच्या बुद्धीचा उपयोग बहुतेक वेळी सारासार विवेकाने करण्याऐवजी अंध स्वार्थासाठी करतो हीच शोकांतिका आहे.

वीस हजारांहून अधिक सभासद असलेल्या मिपाकरांपैकी दोन-चार अपवाद सोडले (तेही निश्चित विदा नाही म्हणून) तर कोणी स्वतः शिकार करत असतील असं वाटत नाही... तर मग तुमचं प्रतिपादन तरी काय आहे?

In reply to by पिवळा डांबिस

छ्या, छ्या ! मिपावर लई "एकांडे" आणि "टोळीबाज (तेला हितं कंपू म्हंत्यात)" तरबेज शिकारी हैत... त्यात "कहीपे निगाहे कहीपे निशाना" स्टाईल विडबन्जिल्बीवाले कसलेले शिकारी ही तर मिपाची लैच खास (आणची आम्ची आव्डती) पेशालिटी हाय ! ;) :)

मदनबाण 22/09/2014 - 16:29
माणसा सारखा स्वार्थी आणि कॄतघ्न दुसरा प्राणी या भूतलावर शोधुनही सापडणार नाही ! पुढच्या पिढ्यांना फक्त फोटो आणि डिव्हीड उपलब्ध राहतील की काय अशी भिती वाटते! :( मनुष्य प्राण्याची प्रजा मात्र फारच वाढत चालली आहे, आपल देश सुद्धा या प्राण्यांच्या संख्येत पुढे आहे त्यामुळे या प्राण्याचे जीवन सुद्धा सध्याच्या काळात तणाव ग्रस्त झाले आहे. :( हल्ली या मोकाट सुटलेल्या प्राण्याच्या वागण्याचा मला तिटकारा येउ लागला आहे. :(

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राष्ट्रीयत्वाची मोदीप्रणीत पुनर्व्याख्या

एस 22/09/2014 - 16:39
इस्पीकचा एक्का, सुबोध खरे, प्यारे१, दशानन, विनोद१८, वल्ली, पिवळा डांबिस, मदनबाण आणि सर्व वाचकांना मनापासून धन्यवाद!

सस्नेह 22/09/2014 - 16:46
मानवाने पर्यावरणावर अमर्याद आक्रमण केले आहे आणि त्याची फळे ग्रीन हाउस इफेक्टच्या रूपाने तो भोगतो आहे. शिकारीबरोबरच औद्योगीकरण, जंगलांचे कमी होत जाणारे प्रमाण हेही दुर्मिळ जमाती नामशेष होण्याचे कारण आहे.

In reply to by सस्नेह

एस 22/09/2014 - 17:12
मानवी हस्तक्षेपाचा अगदी अजाणतेपणानेही कसा विपरीत परिणाम होऊ शकतो याचे उदाहरण म्हणजे ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड या बेटांवर जेव्हा युरोपियन वसाहतवाद्यांनी पहिले पाऊल ठेवले तेव्हा त्यांच्यासोबत त्यांनी आणलेल्या प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या प्रजातींमुळे तिथल्या मूळ पर्यावरणातील जैववैविध्याची प्रचंड हानी झाली. http://www.teara.govt.nz/en/human-effects-on-the-environment/page-3 तिथल्या नैसर्गिक वृक्षांच्या वनांची कत्तल करून पाईनवृक्षाची लागवड केली गेली. तळी आणि दलदलींच्या प्रदेशांवर भर घालून बुजवण्यात आली.
Coastal sand dune habitats have been altered dramatically, with native plants like pīngao (Desmoschoenus spiralis) being replaced by marram grass (Ammophila arenaria) and tree lupin (Lupinus arboreus). Herbaceous hawkweeds (Hieracium species) have taken over some grasslands, reducing them to wasteland, and are spreading into forests and along creeks.
न्यूझीलंड सी लायन आणि व्हेलसारख्या स्थानिक सस्तन प्रजातींची कत्तल तर झालीच, पण डुकरे, कुत्री आणि मांजरांसारख्या बाहेरून आणलेल्या प्राण्यांमुळे तिथल्या अपृष्ठवंशीय आणि सरपटणार्‍या प्राण्यांवर, पक्ष्यांवर भयानक परिणाम झाला.
Since the late 1700s, 54 more mammal species have been brought to New Zealand. Nineteen of these, including two devastating predators (the Indian grey mongoose and the North American raccoon) did not become established in the wild. However, 11 predators successfully became naturalised: three more rodents; three mustelids (ferrets, stoats and weasels); pigs, hedgehogs, possums, dogs and cats. These have had a massive impact on the remaining native birds, invertebrates and reptiles. Forty out of a total 91 land birds are now extinct, with many others in serious decline.
असेच एक उदाहरण म्हणजे मॉरिशस बेटावरील डोडो हा उडता न येणारा पक्षी. ह्याबद्दल वरच्या यादीत दुवा दिलाच आहे.

सस्नेह 22/09/2014 - 16:50
मानवाने पर्यावरणावर अमर्याद आक्रमण केले आहे आणि त्याची फळे ग्रीन हाउस इफेक्टच्या रूपाने तो भोगतो आहे. शिकारीबरोबरच औद्योगीकरण, जंगलांचे कमी होत जाणारे प्रमाण हेही दुर्मिळ जमाती नामशेष होण्याचे कारण आहे.

In reply to by सस्नेह

प्रसाद१९७१ 23/09/2014 - 14:31
शिकारीबरोबरच औद्योगीकरण, जंगलांचे कमी होत जाणारे प्रमाण हेही दुर्मिळ जमाती नामशेष होण्याचे कारण आहे.>>>>> एकतर हा अभिनवेश सोडुन द्या की मानवाचे अस्तित्व बाकीच्या प्रजाती नामशेष होऊ न देण्यासाठी आहे. एकुणच सर्व सजीव सृष्टीची निर्मीती ही कुठलाही हेतू समोर ठेवुन झालेली नाही. प्राणी तयार होयच्या आधी पण ही सॄष्टी होती आणि सर्व नष्ट झाले तरी ही सृष्टी असणारच आहे. अगदी साधी हत्यारे असणारा मानव सुद्धा गेल्या ४-५ हजार वर्षातला आहे. प्राण्यांच्या करोडो प्रजाती तयार झाल्या आणि करोडो नष्ट झाल्या. वाघ नष्ट झाले, साप नष्ट झाले तरी मानवाला काही फरक पडत नाही. गेल्या शंभर वर्षात वाघांची संख्या १% पण राहीली नाही, काय फरक पडला. हा फक्त स्मरण रंजन वाद आहे.

बॅटमॅन 22/09/2014 - 18:51
माहितीपूर्ण लेख. बहुत धन्यवाद. माणूस जे करतो तसेच करणार्‍या अजूनही काही प्राणीजाती असाव्यात. पण माणसाचा दिमाग लै पावरफुल पडल्याने त्याच्या प्रत्येक कृतीला लय धार आली. याला लिमिट योग्य वेळीच घातली नै गेली तर माणसाचेही अस्तित्व टिकणे अवघड आहे.

In reply to by बॅटमॅन

एस 22/09/2014 - 19:36
याला लिमिट योग्य वेळीच घातली नै गेली तर माणसाचेही अस्तित्व टिकणे अवघड आहे.
हेच तर आपल्यातल्या काही स्वार्थी लोकांना मान्य करायला जड जातेय.

प्रसाद१९७१ 23/09/2014 - 12:37
झाल्या काही प्रजाती नष्ट, मग काय नुकसान झाले. माणुस नव्हता तेंव्हा ही लाखो प्रजाती नष्ट झाल्या आणि नविन निर्माण झाल्या. नाही आता डोडो पक्षी दिसत, तर काय हरकत आहे. ह्या पर्यावरण वाद्यांचा कंटाळा आलाय

In reply to by प्रसाद१९७१

एस 23/09/2014 - 14:54
मोबाइलवर जास्त टंकू शकत नाही तरी अगदी थोडक्यात फक्त मुद्दे मांडतो. १. उत्क्रांतीच्या ओघात अनेक प्रजाती नष्ट झाल्या, पण त्यामागे नैसर्गिक कारणे होती. उदा. हिमयुग, उल्कावर्षाव, प्रबळ भक्षकांपुढे आणि खाद्य मिळवण्याच्या स्पर्धेत टिकाव धरता न येणे, बदलत्या परिस्थितीत स्वतःमध्ये बदल करता न येणे इ. २. ही प्रक्रिया अतिशय सावकाश घडते. मानवी हस्तक्षेपामुळे या प्रक्रियेचा वेग लाखोहजारो पटींने वाढला. ३. उत्क्रांतीचा फायदा असा की स्पर्धा एकांगी नसते. कमकुवत जीव नष्ट होतात तर सबल जीव टिकतात. ४. मानवाकडून इतर प्रजातींच्या होणार्‍या कत्तलीत सरसकटपणा असल्याने त्याचा मास अ‍ॅण्ड रॅपिड एक्स्टिंक्शनसारखा परिणाम होतो. ५. यामुळे पर्यावरणाचे कधीही भरून न येणारे नुकसान होते. ६. मानवाचे अस्तित्त्व पर्यावरणाच्या संतुलनाशी इतके अविभाज्यपणे जोडले गेले आहे की पर्यावरणाची थोडीशी हानीसुद्धा आपल्याच पायावर मारून घेतलेली कुर्‍हाड ठरते. ७. नुकसान करणारे थोडेचजण असतात. पण त्याची फळे सर्वांनाच भोगायला लागतात. सविस्तर प्रतिसाद नक्कीच लिहीन. तूर्तास इत्यलम...

In reply to by एस

प्रसाद१९७१ 23/09/2014 - 16:18
पर्यावरणाचे नुकसान होते म्हणजे तुमच्या डो़क्यात पर्यावरण म्हणजे जे आत्ता किंवा ५०-१०० वर्षा पूर्वी होते तेच खरे आणि बरोबर पर्यावरण आहे अशी काही कल्पना आहे. पर्यावरण पृथ्वी जन्माला आली तेंव्हा पण होते आणि जर पुढे आण्विक युद्ध झाले तरी असणार आहे. पर्यावरणाचे कशानीच नुकसान वगैरे होत नाही. पर्यावरण फक्त असते. प्रजाती नष्ट झाल्या म्ह्णुन माणसाला काही फरक पडत नाही. तुम्ही नॉस्टालजिक होऊन तुम्हाला आवडते तेच पर्यावरण चांगले असा हेकट स्टँड घेताय. खरेच तुम्हाला जसे आत्ता आहे असे पर्यावरण पाहीजे असेल तर मानवाची लोकसंख्या वाढ थांववावी लागेल आणि आहे त्याच्या ती १/४ तरी करावी लागेल. खर्‍या पर्यावरण प्रेमींनी त्याच्या कडे लक्ष द्यावे. पण ती गोष्ट ग्लॅमरस नसल्यानी त्यात कोणाला इंटरेस्ट नाही. एकीकडे माणसांची लोकसंख्या वाढत जाणार, मग त्याचा साईड इफेक्ट म्हणुन जंगले कमी होणारच.

In reply to by एस

प्रसाद१९७१ 23/09/2014 - 18:44
तुमचा लेख चुकीच्या प्रिमेस वर आहे हा मुख्य आक्षेप. त्याबद्दल मी लिहीलेच आहे. दुसरा आक्षेप - पर्यावरण वादी ( विषेश करुन भारतातले ) हे भोंगळ, स्वार्थी, प्रसिद्धीलोलुप, स्वताच्या तुमड्या भरणारे, स्वता: सर्व गोष्टी एंजॉय करुन दुसर्‍यांनी गिल्ट देणारे, सर्व गोष्टीत काड्या घालणारे, दुकान चालवणारे, चुकीचा डाटा देणारे, खोटा डाटा देणारे, बागुलबुवा दाखवणारे, कुठल्या तरी राजकीय पक्षाचे/कंपनीचे एजंट, सत्याचा विपर्यास करणारे , फुकटे असतात.

In reply to by प्रसाद१९७१

एस 23/09/2014 - 19:12
तुमचा लेख चुकीच्या प्रिमेस वर आहे हा मुख्य आक्षेप
माझा लेख नेमक्या कोणत्या गृहीतकावर आधारलेला आहे असे तुम्हांला वाटते?

In reply to by एस

प्रसाद१९७१ 23/09/2014 - 19:39
१. प्रजाती नष्ट होणे हा पर्यावरणाला धोका आहे. पर्यावरण म्हणजे तुम्हाला लहानपणी जे दिसले होते तेच असे नाही. पर्यावरण बदलत रहाते, रहाणार. मानवाला त्या बदलाशी Adjust होत रहावे लागेल. २. मानवानी शिकार केली काय, वाघानी केली काय आणि डायनासोअर नी केली काय. त्यात उच्च/नीच, चांगले/वाईट असे काही नाही. ३. पर्यावरणात प्रत्येक जातीची भुमीका ठरलेली असते.>>> पण ती प्रजात नष्ट झाली तर थोड्या बदला ने नविन साखळी/पिरॅमिड तयार होतो. आधीची साखळी/पिरॅमिड चांगला आणि नव्याने झालेला वाईट हे गृहितक चुक आहे. तुम्हाला जुन्याची सवय आहे म्हणुन ते तुम्हाला चांगले वाटते. वाघ आता जवळ्जवळ संपले आहेत, मानव आहेच आणि रहाणार. ४. जैवविविधता धोक्यात येते>>> ही सृष्टी तयार झाली ती काही जैवविविधता असावी म्हणुन नाही. जैवविविधता नसेल तर काहीच फरक पडत नाही. अगदी काही वर्षांनी फक्त मानव आणि काही लिमिटेड वनस्पतीसृष्टी राहीली तरी मानव जात राहु शकते. हे टोकाचे उदाहरण झाले. पॉईंट समजुन घ्या. ५. मानवाची लोकसंख्या वाढते आहे, त्यांना रहाण्या, खाण्यासाठी काय करणार. पर्यावरणवादी त्या बाबतीत काहीच का बोलत नाहीत. जर जंगले पाहीजे असतील तर लोकसंख्या कमी करा हा एक च उपाय आहे. ताकः मी शाकाहारी आहे, मला स्वताला प्राणी मारुन खाणे जमत नाही. पण हे प्रजाती नष्ट होणे वगैरे पटत नाही

In reply to by प्रसाद१९७१

एस 23/09/2014 - 20:45
मुळात मी हा लेख स्वतंत्र असा लिहिला नव्हता. तो दुसर्‍या एका लेखावर दिलेला प्रतिसाद होता. मला स्वतंत्र लेख लिहायचा असता तर तो काही भागांमध्ये आणि अतिशय विस्तृतपणे, सर्व संदर्भांसहीत लिहिला असता. तसे नसल्यामुळे ह्या लेखात काही त्रुटी राहिल्या आहेत ज्यामुळे तुमचा माझ्याबद्दल काहीसा पूर्वग्रह निर्माण झाला आहे. राहिलेल्या मुद्द्यांमध्ये महत्त्वाचा भाग म्हणजे माझे पर्यावरण वि. विकास ह्या मुद्द्यावर काय मत आहे. तसेच मी रॅशनल इकॉलॉजिस्ट आहे की नाही, दुसर्‍या शब्दांत माझा ह्या प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन डोळस आहे की नाही. लोकसंख्यावाढ हे फार गंभीर कारण आहे आणि त्याविषयी लेखात काहीच लिहिलेले नाही. ह्या आणि तुम्ही वर आजच्या पर्यावरणवाद्यांच्या दुटप्पीपणाच्या अनुभवावर जसे म्हणता आहात त्या काही कारणांनी कदाचित मीही काही मुद्दे मुद्दाम टाळत असेल आणि सोयीस्कर भूमिकाच तेवढी घेत असेल असा आपला माझ्याबद्दल ग्रह झाला असावा. ह्यातील सर्वच मुद्द्यांवर मला वेळेअभावी बोलता येणार नाही, पण आधी कृपया तो पूर्वग्रह मनातून काढून टाका अशी विनंती करतो. आता वरील प्रतिसादातील मुद्द्यांकडे वळूयात:
१. प्रजाती नष्ट होणे हा पर्यावरणाला धोका आहे. पर्यावरण म्हणजे तुम्हाला लहानपणी जे दिसले होते तेच असे नाही. पर्यावरण बदलत रहाते, रहाणार. मानवाला त्या बदलाशी Adjust होत रहावे लागेल.
>>>प्रजातींच्या परस्परसंबंधातील अचानक आणि फार मोठ्या प्रमाणावर आलेल्या बदलांमुळे पर्यावरणाचे नुकसान होते, उत्क्रांतीतील जो प्रजातींचा र्‍हास होत असतो त्याचा वेग अतिशय म्हणजे अतिशय, काही लाख-कोटी वर्षांच्या कालावधीत घडत असतो. मानवाने केलेल्या बेकायदा आणि अनिर्बंध शिकारीमुळे प्रजाती नष्ट होण्याचा कालखंड हा लाखो वर्षांवरून काही दशकांवर येऊन ठेपला आहे. इतक्या बेसुमार र्‍हासाची भरपाई नवीन प्रजातींच्या रूपाने पर्यावरण करू शकत नाही कारण उत्क्रांती हे एकमेव साधन त्यासाठी उपलब्ध आहे. मानव हा प्रजाती मारू शकतो, नव्याने निर्माण करण्याइतपत अजून त्याची प्रगती झालेली नाही. पर्यावरण नेहमीच बदलणार, पण त्यातला बदल करण्याचे अनिर्बंध स्वातंत्र्य मानवाने स्वतःच्या हाती घेऊ नये. शेदीडशे वर्षांपूर्वीचेच पर्यावरण मला हवे आहे असे म्हणणे प्रॅक्टीकली शक्य नाहीच. तसे माझे म्हणणेही नाही.
२. मानवानी शिकार केली काय, वाघानी केली काय आणि डायनासोअर नी केली काय. त्यात उच्च/नीच, चांगले/वाईट असे काही नाही.
>>>चूक. जोपर्यंत मानवाची लोकसंख्या अतिशय लहान होती आणि शेतीसारख्या उत्पादनक्रियेचा शोध लागलेला नव्हता तोपर्यंत अन्न मिळवण्याच्या हेतूने मानवाने केलेल्या शिकारीत आणि वाघ/डायनॅसोर आदींनी केलेल्या शिकारीत फरक नव्हता. मध्य भारतातील एका संस्थानिकाने गेल्या शतकाच्या सुरूवातीला तब्बल १४०० च्या आसपास वाघ केवळ शिकारीच्या हौसेखातर मारले. ह्याचे समर्थन तुम्ही कसे कराल?
३. पर्यावरणात प्रत्येक जातीची भुमीका ठरलेली असते.>>> पण ती प्रजात नष्ट झाली तर थोड्या बदला ने नविन साखळी/पिरॅमिड तयार होतो. आधीची साखळी/पिरॅमिड चांगला आणि नव्याने झालेला वाईट हे गृहितक चुक आहे. तुम्हाला जुन्याची सवय आहे म्हणुन ते तुम्हाला चांगले वाटते. वाघ आता जवळ्जवळ संपले आहेत, मानव आहेच आणि रहाणार.
पिरॅमिड नष्ट/निर्माण होण्याचा वेग हा निसर्गनियंत्रित जोपर्यंत आहे तोपर्यंत हा युक्तिवाद ठीक आहे. वरती म्हटल्याप्रमाणे नॅचरल सिलेक्शनचे तत्त्व ज्यात अंतर्भूत नाही अशा बेसुमार कृत्रिम कत्तलीतून केवळ सर्वंकष विनाशच मानवाच्याही वाट्याला येईल. मानव आहेच आणि राहणार हा दंभही अशाच गैरसमजुतीतून आलेला आहे. मानवाच्या जगण्याची सर्व साधने ही अंतिमतः निसर्गावरच अवलंबून आहेत. निसर्ग नसेल तर मानव कुठे जाणार?
४. जैवविविधता धोक्यात येते>>> ही सृष्टी तयार झाली ती काही जैवविविधता असावी म्हणुन नाही. जैवविविधता नसेल तर काहीच फरक पडत नाही. अगदी काही वर्षांनी फक्त मानव आणि काही लिमिटेड वनस्पतीसृष्टी राहीली तरी मानव जात राहु शकते. हे टोकाचे उदाहरण झाले. पॉईंट समजुन घ्या.
>>>जैवविविधतेचे काहीएक प्रयोजन नाही असे तुम्हांला थोडक्यात म्हणायचे आहे. हा समज चुकीचा आहे. जितकी जैवविविधता जास्त तितका नैसर्गिक निवडीला स्कोप जास्त असतो आणि एकूणच जीवसृष्टी तगून राहण्यासाठी जैवविविधता जितकी जास्त असेल तितकी ती शक्यता जास्त असते हे विविध सांख्यिकी आणि शास्त्रीय मॉडेलनी सिद्ध झालेले आहे.
५. मानवाची लोकसंख्या वाढते आहे, त्यांना रहाण्या, खाण्यासाठी काय करणार. पर्यावरणवादी त्या बाबतीत काहीच का बोलत नाहीत. जर जंगले पाहीजे असतील तर लोकसंख्या कमी करा हा एक च उपाय आहे.
दुर्दैवाने सहमत. एकीकडे वाढत्या लोकसंख्येसाठी लागणारी नैसर्गिक संसाधने अपुरी पडू लागलेली आहेत. त्याचबरोबर अर्थशास्त्राच्या दृष्टीने लोकसंख्यावाढीचा वेग अगदीच ऋणात्मक होणेही त्या प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेला हळूहळू मृत्युपंथावर नेते हा एक गुंतागुंतीचा पॅराडॉक्स आहे आणि ते गणित सोडवणे, योग्य मेळ घालणे तितके सहजसोपे नाही. गेली कित्येक वर्षे मी यावर विचारमंथन करतो आहे पण यावर कुठलाच रामबाण उपाय नाही अशा निष्कर्षापर्यंत मी आलेलो आहे. लोकसंख्या आहे त्यापेक्षा कमी करण्याला खूप सामाजिक-राजकीय-आर्थिक-पर्यावरणीय मर्यादा आहेत ज्यांची विस्तृत चर्चा इथे शक्य नाही. सध्यातरी आहे तो इकोबॅलन्स टिकवून ठेवणे इतकेच आपल्या हाती आहे.

In reply to by टवाळ कार्टा

एस 23/09/2014 - 23:22
मला नाही वाटत डोळ्यांवर झापडे बांधलेले हे मान्य करतील. अगदी सखोल, काटेकोर संशोधनातून पुढे आणलेल्या शास्त्रीय पुराव्यांनाही 'हे असं काही घडतच नसतं, तुम्ही अमुकतमुकचे हस्तक आहात, दुटप्पी आहात' वगैरे पद्धतींच्या दाव्यांनी नाकारण्याचा प्रयत्न केला जातो. असोत. गोबेल्सनीती. ...ठासून बोला!

In reply to by सनी स्॓आस

एस 23/09/2014 - 23:47
तुम्ही ह्याची काही उदाहरणे देऊ शकाल काय? सरसकट सर्वच पर्यावरणवाद्यांना महाचोर ठरवून मोकळे होणे योग्य तर नाहीच, तुम्ही बिनबुडाचे आरोप करताय असाही लोकांचा भ्रम होऊ शकेल.

प्रसाद१९७१ 23/09/2014 - 14:19
ज्या प्रजातींच्या संवर्धनासाठी आपण कार्य करत नाही त्यांची अन्नासाठी वा मनोरंजनासाठी हत्त्या करणे हा गुन्हा आहे>>>>>> हे विधान कुठल्या जोरावर. समजा जर कोणी तसे करतच असेल तर तो गुन्हा असे तुम्हीच ठरवणार. ही तर हुकुमशाही झाली.

प्रसाद१९७१ 23/09/2014 - 14:23
मानवांकडून केली जाणारी शिकार हा मनोरंजनाचा एक घृणास्पद, हिंसात्मक आणि भित्रेपणाचा असा एक प्रकार आहे >>>>>>> असे का हो? मग ह्याचे काय उत्तर १. मांजर उंदराला खेळवुन खेळवुन मारते. हा मनोरंजनाचा प्रकार नाही का? २. सिंह , वाघ किंवा सर्वच प्राणी स्वता पेक्षा दुबळ्या आणि संरक्षण करु न शकणार्‍या प्राण्यांना मारतात हे कसे काय चालते तुम्हाला? तुम्ही असे का नाही म्हणत, "वाघा तुला अन्नच पाहीजे असेल तर दुसर्‍या वाघालाच मारुन खा. हरिणाची पिल्ले मारुन खाणे हे घृणास्पद आहे."

In reply to by प्रसाद१९७१

एस 23/09/2014 - 20:47
वर दिलेला माझा हा प्रतिसाद वाचा. http://misalpav.com/comment/614715#comment-614715
ह्यामागे स्वतःचे वंशसातत्य टिकवणे, वाढवणे हीच मूलभूत प्रेरणा असते. माणसांच्या बाबत मात्र ह्या नैसर्गिक प्रेरणांपेक्षा हाव, लोभ, क्रौर्य इत्यादी भावनांमुळे इतर प्राण्यांची शिकार करण्याचा स्वभाव दिसतो.
मग कसा बरं फरक नाही?

प्रसाद१९७१ 23/09/2014 - 16:19
खरेच तुम्हाला जसे आत्ता आहे असे पर्यावरण पाहीजे असेल तर मानवाची लोकसंख्या वाढ थांववावी लागेल आणि आहे त्याच्या ती १/४ तरी करावी लागेल. खर्‍या पर्यावरण प्रेमींनी त्याच्या कडे लक्ष द्यावे. पण ती गोष्ट ग्लॅमरस नसल्यानी त्यात कोणाला इंटरेस्ट नाही. एकीकडे माणसांची लोकसंख्या वाढत जाणार, मग त्याचा साईड इफेक्ट म्हणुन जंगले कमी होणारच.

पैसा 23/09/2014 - 22:24
लेख आवडला. प्रतिसादाचा लेख केल्यामुळे काही मुद्दे राहिले आहेत हे खरे असले तरी आहेत तेही पुरेसे आहेत. दुर्दैवाने कोणतेही सरकार पर्यावरणाच्या बाबत संवेदनाशीलतेने वागत नाही. त्यांना फक्त तात्कालिक फायद्यासाठी खाणसम्राटांना लीज देण्यात रस असतो. जंगले आणि वाघांचां कोणाला काय पडलंय? कागदोपत्री शिकारीवर बंदी आहे, पण मध्यंतरी गोयात एक पट्टेरी वाघ मारला तो एका मोठ्या राजकीय पुढार्‍याच्या घरी नेल्याचे फोटो लोकानी मोबाईलवर काढले होते. :(

एस 25/09/2014 - 12:04
गोलाबारूद खतम हो गया क्या? धागा इतक्या लवकर थंड पडेल असं वाटलं नव्हतं. :-)

In reply to by एस

प्रसाद१९७१ 25/09/2014 - 14:27
तुमची मते काही बदलणार नाहीत. वाघ नाहीसे झाल्यामुळे मानव जातीचे नुकसान होणार/झाले आहे असल्या सिद्ध न झालेल्या गोष्टी तुम्ही बोलत रहाणार. मग मी काय बोलणार?

In reply to by प्रसाद१९७१

एस 25/09/2014 - 15:18
मी तुमच्या प्रतिसादाला दिलेल्या http://misalpav.com/comment/615484#comment-615484 ह्या उत्तरावर तुमचे काय म्हणणे आहे हे आधी सांगता का? वाघ नष्ट झाल्यामुळे मानवावर काय परिणाम होईल ह्याचे तुम्हांला हवेच असेल तर पुराव्यांसकट सविस्तर उत्तर देईन हवं तर. पण मग तुम्हांला तुमची मते बदलावी लागतील. आहे का तयारी?

In reply to by एस

प्रसाद१९७१ 25/09/2014 - 15:22
अहो वाघ कधीच नष्ट झाले. गेल्या ५०-७० वर्षात वाघाचा पर्यावरणावरचा आणि बाकी प्राणीजगतावरचा प्रभाव पूर्ण संपला आहे. मानवावर काही परीणाम झाला का? ह्याच ५० वर्षात भारतातल्या मानवाचे आयुष्यमान वाढले, रहाणीमान सुधारले. मानवजातीचे काय नुकसान झाले?

In reply to by एस

प्रसाद१९७१ 25/09/2014 - 15:29
वाघ नष्ट झाल्यामुळे मानवावर काय परिणाम होईल ह्याचे तुम्हांला हवेच असेल तर पुराव्यांसकट सविस्तर उत्तर देईन हवं तर. पण मग तुम्हांला तुमची मते बदलावी लागतील. आहे का तयारी?
नक्की बदलीन. पण तुम्ही जे काही वाईट परिणाम झाले ते वाघ नष्ट झाल्यामुळेच झाले हे सिद्ध करायला पाहीजे.

In reply to by प्रसाद१९७१

एस 25/09/2014 - 17:33
तुम्ही त्याच ठिकाणी त्याच पद्धतीने उत्तर दिलेत आणि मी मांडलेली कारणमीमांसा खोडून काढलीत तर माझा तसा समज होणार नाही पुन्हा.

In reply to by एस

प्रसाद१९७१ 25/09/2014 - 18:18
गेल्या १०० वर्षात वाघ आणि बाकी अनेक प्रजाती भारतातुन नष्ट झाल्या तरी अन्नधान्य उत्पन्न वाढले, आयुर्मयादा वाढली. हीच सिद्धता आहे की वाघ संपले तरी काही फरक पडत नाही.

In reply to by प्रसाद१९७१

एस 25/09/2014 - 18:25
ही तात्पुरती सूज आहे. पर्यावरण विनाशाचे दुष्परिणाम शेवटी मानवाच्याही अस्तित्त्वावर घाला घालणार हे निश्चित.

In reply to by एस

प्रसाद१९७१ 25/09/2014 - 18:31
घालू दे की काय घाला घालायचा तो १००० वर्षानी. म्हणुन आत्तच्या माणसांनी वाघांच्या हातुन मरायचे का? तसे ही जेंव्हा पर्यावरण जर जास्तच बिघडले ( मानवाच्या दृष्टीने )तर मानवाची लोकसंख्या कमी होउन, पुन्हा बॅलंस होइलच ना. पण मानव आता इतका प्रगत झाला आहे की अणुयुद्धा नी स्वताचा शेवट करु शकतो. पण प्रदुषणात सुद्धा मानवजात शिल्लक राहील.

In reply to by एस

प्रसाद१९७१ 26/09/2014 - 09:26
नक्की राहील. फारच प्रदुषण झाले तर आत्ताच्या ७०० कोटी ऐवजी १० कोटी शिल्लक रहातील पण मानवजात शिल्लक राहील हे नक्की. आणि लोकसंख्या १० कोटीच उरल्यामुळे पुन्हा जंगले होतील आणि प्रदुषण कमी होईल. की पुन्हा ७०० कोटी होतील.

In reply to by एस

प्रसाद१९७१ 25/09/2014 - 18:32
तिथे कुठे? काय राव चेष्टा करताय? माझे अन्न कुठुन येत हा तुमचा प्रश्न आहे का? कुठल्या तरी शेतातुन येते. कुठल्या हे माझ्यासाठी महत्वाचे नाही.

मदनबाण 25/09/2014 - 12:25
काही दिवसांपूर्वी मी काही बातम्या वाचल्या होत्या, त्या इथे देतो :- Evidence Suggests World’s Largest Solar Farm Burns Birds That Fly over It Solar Farms Threaten Birds California’s new solar power plant is actually a death ray that’s incinerating birds mid-flight

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!

In reply to by प्रसाद१९७१

मदनबाण 25/09/2014 - 14:44
तुमचे काय म्हणणे आहे? तो पॉवर फार्म बंद करायचा? प़क्षी कसे वाचवले जातील त्यावर अधिक भर द्यावा... बाकी इतर प्राणी खपले तरी चालेल पण माणसाला मात्र त्याला हवे तसे वागण्याची मुभा असावी असे आपले मत आहे काय ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!

In reply to by मदनबाण

प्रसाद१९७१ 25/09/2014 - 14:47
समजा मेले ते पक्षी तर काय फरक पडतो. तुम्हाला ही बातमी वाचुन वाईट वाटणे सहाजीक च आहे. पण ५० वर्षानी ते पक्षी किंवा त्यांची पूर्ण प्रजाती नष्ट झाली असेल तर तुमच्या मुला नातवंडांना काय फरक पडणार आहे?

In reply to by प्रसाद१९७१

प्यारे१ 25/09/2014 - 14:51
माणूस जमात संपणं जास्त श्रेयस्कर आहे असं नाही वाटत त्यापेक्षा? हे 'मंद' पशु पक्षी जसं जमेल तसं राहतील तरी. जायच्या वेळी जातीलच.

In reply to by प्यारे१

बॅटमॅन 25/09/2014 - 15:20
असहमत. प्राणी पक्षी काय नि माणूस काय, कुणीही संपणे कमीजास्त श्रेयस्कर नाही - जर तत्त्वतः पाहिले तर. पण मी माणूस असल्याने माझ्या स्वार्थासाठी मला मानवजात टिकलेली हवी आहे. संपला विषय.

In reply to by बॅटमॅन

प्रसाद१९७१ 25/09/2014 - 15:25
प्रश्नच नाही. मी माणुस आहे म्हणुन मी माणसांचा विचार करतोय आणि करणार. १०००० वर्षापूर्वी मानवाकडे काही हत्यारे नव्हती तेंव्हा मानवाची लोकसंख्या १ कोटी पण पार करत नव्हती. जर हत्यारांचा शोध वेळीच लागला नसता तर मानवजात कदाचित लुप्त झाली असती डोडो सारखी. काय माहीती, ह्या आधीपण लाखो वर्षापूर्वी मानव सदृष प्राणी तयार ही झाला असेल पण तो विकसीत होयच्या आधी ह्या वाघ, डायनासोअर नी संपवला असेल

In reply to by प्रसाद१९७१

हाडक्या 25/09/2014 - 16:33
हम्म्म..
काय माहीती, ह्या आधीपण लाखो वर्षापूर्वी मानव सदृष प्राणी तयार ही झाला असेल पण तो विकसीत होयच्या आधी ह्या वाघ, डायनासोअर नी संपवला असेल
असा कधी आधी विचार केला नव्हता.. रोचकच.. :) (शिकारीचे समर्थन नाहीच पण हा मुद्दा रोचक आहे.) माणूस विचार करु शकतो म्हणून कदाचित हे एवढे चर्चासत्र सुरु आहे. वाघ कमी होत असताना वाघांनी स्वतःहून काही प्रयत्न केलेले दिसत नाहीत स्वतःची प्रजा वाचवायला. वरून एक वाघ दूसर्‍या नरापासून झालेली म्हणून वाघिणीची इतर पिल्ले जेव्हा मारत सुटतो तेव्हा तो वाघ पण वाघांची संख्या कमी व्हायला तेवढाच दोषीच नाही का?

In reply to by हाडक्या

एस 25/09/2014 - 17:16
इएसाहेबांनी दिलेला हा प्रतिसाद वाचा. http://misalpav.com/comment/614904#comment-614904 त्यातूनही बोध नाही झाला तर बोलूच.

In reply to by प्रसाद१९७१

काय माहीती, ह्या आधीपण लाखो वर्षापूर्वी मानव सदृष प्राणी तयार ही झाला असेल पण तो विकसीत होयच्या आधी ह्या वाघ, डायनासोअर नी संपवला असेल झालेले आहेत आणि संपलेले आहेत. त्यांची यादी इथे सापडेल. पण "होमो सॅपियन सॅपियन" म्हणजे आधुनिक मानवाने (म्हणजे आपण हो !) नवनविन आयुधे (टुल्स) शोधून काढून जो प्राणीसंहार आणि पर्यावरणसंहार केला आहे / करत आहे त्याला या पृथ्वीच्या इतिहासात तोड नाही !

In reply to by बॅटमॅन

प्यारे१ 25/09/2014 - 17:45
@ बॅटमॅन, अहो माणूसच निसर्गव्यवस्था त्याला हवी तशी वाकवतोय ना? इतर कुठले पशु पक्षी अशी ढवळाढवळ करत आहेत का? बरं केली तर मग बोंबा मारण्यापेक्षा तुलनेनं माणूस जमात संपलेली बरी असं म्हणतो आहे. एनीवेज धिस इज ऑल अबाऊट इफ्स अ‍ॅण्ड बट्स. >>> पण मी माणूस असल्याने माझ्या स्वार्थासाठी मला मानवजात टिकलेली हवी आहे. संपला विषय. संपला विषय. हे बरोबरच आहे. :)

In reply to by बॅटमॅन

मी माणूस असल्याने माझ्या स्वार्थासाठी मला मानवजात टिकलेली हवी आहे. मुख्य मुद्दा हाच आहे ! केवळ पर्यावरणासाठी पर्यावरण असा नाही आणि नकोच. कारण, तसे म्हणणार्‍यांकडून आणि तशी समजूत ठेवणार्‍यांकडून खरे तर मूळ मुद्द्याचा विपर्यास होतो. माणूस या पृथ्वीवर एकांडा जगू शकणार नाही, हे सत्यही जाणून घेणे आवश्यक आहे. करोडो वर्षांच्या निसर्गाच्या क्रिया-प्रतिक्रियेतून जो परिणाम साधला गेला आहे त्याचा मानवाला मानव बनवण्यात मोठा सहभाग आहे. त्या परिणामात मानवाच्या मेंदूच्या ताकदीने तयार झालेल्या साधनांचा उपयोग सुरू होण्याअगोदर आणि विषेशतः खनिज तेलाचा शोध लागण्यापूर्वीचा मानवाचा सहभाग बराचसा नैसर्गिकरित्या नियंत्रित होता. त्यामुळे "संहार आणि पुर्निर्माण" या चक्रात निसर्गाला सावरायला पुरेसा वेळ मिळत होता. भाल्याच्या उपयोगाने मानवाने मॅमथ संपवले. त्यातले बहुतेक मांसापेक्षा त्याचे दात आणि हाडांसाठी मारलेले असावेत अशी शंका घ्यायला जागा आहे. एका बंदूकीने एक माणूस जेव्हा डझनावारी प्रजननक्षम प्राणी काही दिवसांत मारतो तेव्हा कोणत्याही प्राण्याची नैसर्गिक क्षमता तेवढ्या वेळात तेवढ्या संख्येने नविन प्राण्यांना जन्म देउन त्यांना प्रजननक्षम बनवण्याइतकी प्रबळ नसल्याने ती प्राणीजात संहाराच्या दिशेने जाते. हेच समीकरण जंगलतोडीला लागू पडते. तयार व्हायला शेकडो-हजारो वर्षे लागलेले जंगल आधुनीक साधने वापरून मानव काही वर्षांत / दशकांत ऊजाड करू शकतो / करत आला आहे... बहुतेक सर्व प्राचीन संस्कृतींची ठिकाणे आज वाळवंटे आहेत, याचे केवळ "निसर्गात आपोआप झालेला बदल" हेच कारण नसून मानवाने केलेल्या अतीरेकी वनसंहाराच्या कृतीने झालेला निसर्गातील बदल हे कारण असण्याचे पुरावे सापडत आहेत. मानवाच्या आगमनापूर्वी बहुतांश पर्जन्यारण्य असलेले ऑस्ट्रेलिया खंड आता बहुतांश वाळवंट का आहे आणि तेथे मुख्यतः निलगिरी सारखी सहजासहजी आग्नीच्या भक्षस्थानी न पडणारी झाडेच का आहेत याबाबत जे पुरावे समोर आले आहेत / येत आहेत तेही रोचक ठरावे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

प्रसाद१९७१ 26/09/2014 - 09:33
माणूस या पृथ्वीवर एकांडा जगू शकणार नाही, हे सत्यही जाणून घेणे आवश्यक आहे
मी कुठे म्हणतोय की एकांडा जगु शकेल. आत्ता १० लाख प्रजाती असतील. समजा त्यातल्या १ लाख शिल्लक राहील्या तर मानव एकटा कुठे रहाणार आहे.
बहुतेक सर्व प्राचीन संस्कृतींची ठिकाणे आज वाळवंटे आहेत, याचे केवळ "निसर्गात आपोआप झालेला बदल" हेच कारण नसून मानवाने केलेल्या अतीरेकी वनसंहाराच्या कृतीने झालेला निसर्गातील बदल हे कारण असण्याचे पुरावे सापडत आहेत.
असे काय पुरावे सापडले आहेत? तुम्हाला काय म्हणायचे की थर चे वाळवंट जंगल तोडीमुळे तयार झाले?
मानवाच्या आगमनापूर्वी बहुतांश पर्जन्यारण्य असलेले ऑस्ट्रेलिया खंड आता बहुतांश वाळवंट का आहे
ह्याचे काही पुरावे आहेत का? ऑस्ट्रेलिया मधे १७ व्या शतका पर्यंत काही लाखांची पण लोक वस्ती नव्हती. त्या लोकांनी सगले जंगल तोडले असे तुम्हाला म्हणायचे आहे काय? मग टास्मानियात इतके प्रचंड जंगल कसे शिल्लक राहीले?

In reply to by प्रसाद१९७१

थोडे वाचन वाढवा. सगळेच पुरावे तुमच्यासाठी शोधून आणायला (आणि त्यातली खुसपटे परत नीट करायला) वेळ नाही... पण अगदी आंतरजालावरही ते सर्व आहेत, तेव्हा स्वतः खात्री करून घेऊ शकाल. वेळ आणि श्रम करावे लागतील, पण त्याशिवाय नविन ज्ञान आणि विचार मिळत नाही... निदान मिळालेले बहुदा पटत नाही :) शिवाय केवळ एक मुद्दा पकडून त्याची केवळ स्वतःच्या समजूतीने साल काढण्याऐवजी कोणत्याही प्रश्नाचा त्याबद्दल जगात इतर काय पुरावे आहेत ते सारासार विवेकाने पडताळून मगच मत लिहीले तर जास्त फायद्याचे होईल असे वाटते. असो, जगातल्या सर्वांचे मत बदलणे हा माझ्या जीवनाच उद्देश नाही. मी काही मुद्दे दिले आहेत... त्याचा उपयोग करून स्वसंशोधन करु शकता किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करू शकता. कारण पर्यावरणाचे अतीसमर्थक जितके एकांगी विचार करतात तेवढाच एकांगी विचार त्याचे अतीविरोधकही करतात असा अनुभव आहे. माझ्या मते... "कोणतीही किंंमत देऊन पर्यावरणासाठी पर्यावरण वाचवा" हे योग्य नाही तर "माणसाच्या भल्यासाठी आवश्यक तेवढे पर्यावरण योग्य किंमत देऊन वाचवा" हे जास्त योग्य आहे. पण, हा दुसरा पर्यायही नैसर्गिकपणे आपोआप होणारी घटना नाही... कारण माणसाचा पर्यावरणातील सद्याचा हस्तक्षेप ही आपोआप होणारी नैसर्गिक घटना नाही. असो.

मदनबाण 25/09/2014 - 14:56
पण ५० वर्षानी ते पक्षी किंवा त्यांची पूर्ण प्रजाती नष्ट झाली असेल तर तुमच्या मुला नातवंडांना काय फरक पडणार आहे? त्यांना काय वाटेल आणि फरक पडेल ते तेव्हाच कळेल आता कसे कळणार ? बाकी तुम्ही तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मात्र दिले नाहीत ? ते आधी द्या पाहु.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!

In reply to by मदनबाण

प्रसाद१९७१ 25/09/2014 - 15:09
त्यांना काय वाटेल आणि फरक पडेल ते तेव्हाच कळेल आता कसे कळणार ?
असे कसे, तुमच्या खापर पणजोबांच्या वेळी हजारो वाघ होते, आता ते नाहीत. तुम्हाला ( तुमच्या पिढीला ) काय फरक पडला? आता डोडो नाही, मॅमथ नाही तुम्हा/आम्हाला काय फरक पडला?

प्रसाद१९७१ 25/09/2014 - 15:07
बाकी इतर प्राणी खपले तरी चालेल पण माणसाला मात्र त्याला हवे तसे वागण्याची मुभा असावी असे आपले मत आहे काय
हो जर त्या बाकीच्या प्राण्यांना जपत बसल्या मुळे मानवाला त्रास होस असेल तर त्या प्राण्यांना जपणे ही प्रार्थमिकता होत नाही ( माझ्या मते ). जर लागले तर इतर प्राणी खपवावेत. पुन्हा माझे पहीलेच मत. जे आपण आपल्या आयुष्यात बघितले आहे तसेच पर्यावरण कायम पाहीजे हा अट्टाहास आहे. जैवविविधता ही बकवास आहे. मानवाला जगण्यासाठी अन्न, वस्त्र, औषधे, निवारा, बाकी रॉ मटेरिअल पुरवणार्‍या काही वनस्पतींच्या प्रजाती शिल्लक राहील्या तरी पुरेसे आहे. साप , सरडे, पाली हे प्राणी मला आवडत नसल्या मुळे ते तर ह्या पृथ्वीवरुन लगेच नष्ट व्हावेत अशी माझी मनापासुन इच्छा आहे.

In reply to by प्रसाद१९७१

एस 25/09/2014 - 15:22
हो जर त्या बाकीच्या प्राण्यांना जपत बसल्या मुळे मानवाला त्रास होस असेल तर त्या प्राण्यांना जपणे ही प्रार्थमिकता होत नाही ( माझ्या मते ). जर लागले तर इतर प्राणी खपवावेत. पुन्हा माझे पहीलेच मत. जे आपण आपल्या आयुष्यात बघितले आहे तसेच पर्यावरण कायम पाहीजे हा अट्टाहास आहे. जैवविविधता ही बकवास आहे. मानवाला जगण्यासाठी अन्न, वस्त्र, औषधे, निवारा, बाकी रॉ मटेरिअल पुरवणार्‍या काही वनस्पतींच्या प्रजाती शिल्लक राहील्या तरी पुरेसे आहे. साप , सरडे, पाली हे प्राणी मला आवडत नसल्या मुळे ते तर ह्या पृथ्वीवरुन लगेच नष्ट व्हावेत अशी माझी मनापासुन इच्छा आहे.
वर मला कुणीतरी हेकट म्हणालं होतं. तुम्हीच होतातना?

In reply to by एस

प्रसाद१९७१ 25/09/2014 - 17:18
कुठला त्रास हो, काहीतरीच. काही त्रास वगैरे होत नाहीये सृष्टीला. तुमच्या मनात जे सृष्टीचे चित्र असेल त्याला होत असेल त्रास पण सृष्टी ही पृथ्वी जन्माला आली तेंव्हा पण होती आणि पृथ्वी सूर्य गिळंकृत करेल तो पर्यंत असेल. त्यात कधी जीवन असते कधी नसते.
शिकार आणि पर्यावरणावरील प्रभाव शिकार करणे किंवा शिकार होणे हा प्राणिमात्रांच्या रोजच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग असतो. अगदी प्रागैतिहासिक काळी जेव्हा उत्पादनाची शेतीसारखी साधने मानवाला ज्ञात नव्हती तेव्हा मानवाचा अस्तित्त्वसंघर्ष हा प्रामुख्याने दोन कौशल्यांवर आधारीत होता - हंटिंग आणि गॅदरिंग. म्हणजेच शिकार आणि (कंदमुळे वगैरे) गोळा करणे. निसर्गातील इतर प्राण्यांच्या शिकार करण्याच्या हेतूत आणि मानवाच्या हेतूत एक मोठा फरक हा होता की प्राण्यांसाठी शिकार हे अन्न मिळवण्याचे साधन होते, तर मानवासाठी शिकार अन्नप्राप्तीबरोबरच मनोरंजनासाठी केला जाणारा खेळही होता.

कृष्ण की राधा?

भिंगरी ·

तिमा 21/09/2014 - 16:39
जुळं होऊन एकाच वेळी जन्माला आले तर सख्ख्या बहिण-भावाला राधा आणि कृष्ण म्हणावे लागू नये, म्हणून असेल कदाचित!

कवितानागेश 21/09/2014 - 22:30
बरोबर लिहिलं आहेत भिंगरीताई. जोपर्यंत 'राधे'ला जपणं आणि आणि तिला सासरी पाठवताना हुंडा देणं हे प्रकार सुरु आहेत, तोपर्यंत तिला समान वागणून मिळणं कठीण आहे. गरीब वर्गात अजून एक पाहिलेली कटू गोष्ट म्हणजे मुलगा कमावता होउन 'हाताशी' येतो, पण मुलीला मात्र दुसर्‍याकडे पाठवायचय, तिचा काय उपयोग? उलट तिच्यावर खर्चच जास्त होणार, असा अविचार दिसतो. हे बघून खरंच खूप वाईट वाटतं. ज्यांचा प्रत्यक्ष हॉस्पिटल्स, दॉक्टर्स यांच्याशी संबंध येतोय, त्यांना या प्रश्नाची धार निश्चितच कळू शकेल.

भिंगरी 09/12/2014 - 18:58
सर्व मिपाकरांना कळवण्यात येत आहे की आमच्याकडे राधा आली. कोल्हापूरात घुगर्‍या जिलेबी वाटून धूमधडाक्यात बारसे झाले. मिपाकरांसठी स्पेशल जिलेबी पाडत आहे. येणार येणार म्हणता राधेचे आगमन झाले, "पालवी" असे नामकरण झाले.

गणेशा 09/12/2014 - 20:08
अभिनंदन ! आमच्याकड पण मुलगीच. आणि तीच हवी होती. लेख आपण टाकलाय बरका.. पण आजकाल मला वाटते मुलगा मुलगी भेद खुप कमी झाला आहे. उलट मला तर वयक्तीक रीत्या मुलगीच चांगली वाटते. आमच्याकडं मुलगी झाल्यावर तिच्य नावापासुन पुढील बर्याच गोष्टी मीच ठरवणार असे ठरले होते. मुलगा झाल्यावर आमची ही .. सांगण्याचा उद्देश मी बाळ होण्या अगोदर खुप (सगळॅए मुलींचीच) नावे निवडली होती. त्यात "पालवी" पण होते. पण गणेश नावाला सुटेबल आराध्या च वाटल्याने ते ठेवले नाव. आणि एक मुलगी असण्याचा अभिमान आहे मला.

भिंगरी 09/12/2014 - 22:58
गणेशराव, अभिनंदन आपलेही. आणि आराध्याला खुप खुप आशीर्वाद!

विवेकपटाईत 10/12/2014 - 15:59
भिंगरी ताई, घरात लक्ष्मी आली, अभिनंदन. मला ही पहिली मुलगीच होती, आता ती सासरी गेली, हे वेगळ. डोळ्यांत अश्रू , मनात आनंद आईच्या हृदयी फुटला आता मायेचा पाझर. उबेच्या कुशीत, असा सुरु झाला चिमुकल्या चिमणीचा संसार.

भिंगरी 10/12/2014 - 16:27
भिंगरी ताई, घरात लक्ष्मी आली, अभिनंदन. धन्यवाद!विवेकजी. पण ज्या दिवशी मला नात झाल्याचे निरोप सगळ्यांना गेले,त्यावेळेसच्या प्रतिक्रिया भिन्न भिन्न होत्या. माझ्याकडचे म्हणजे दोनही मुलगे,जावा,दिर,पुतण्या सगळे खुश होते.मला तर मुलगीच होउ दे अशी इच्छा होती ती पुर्ण झाली. शेजारी पण खुश झाले. सूनबाईच्या माहेरच्यांचा आवाज थोडा नरम होता. पण आमचा उत्साह पाहुण त्यांची नाराजी पळाली. समोरची मंदिरातल्या पंडीतची बायको तोंडावर निराशेचे भाव आणून वदली,लडकीही हुई क्या? बारशाला आलेली एक महिला म्हणाली आमच्याकडे म्हणतात्,पाप केलेले असेल तर मुलगी होते. आता बोला!!!!!! कुठे नेऊन ठेवतात हे लोक 'समाज आपला'.

In reply to by भिंगरी

टवाळ कार्टा 10/12/2014 - 16:36
ज्या दिवशी मला नात झाल्याचे निरोप सगळ्यांना गेले,त्यावेळेसच्या प्रतिक्रिया भिन्न भिन्न होत्या
आपण खूश असलो की झाले...दुनीया गेली तेल लावत
बारशाला आलेली एक महिला म्हणाली आमच्याकडे म्हणतात्,पाप केलेले असेल तर मुलगी होते.
लगेच विचारायचे...तुमच्या पालकांनी काय पाप केलेले ;)

In reply to by टवाळ कार्टा

भिंगरी 10/12/2014 - 16:52
आपण खूश असलो की झाले...दुनीया गेली तेल लावत>>>... हे तंत्र मी कायम वापरते. पाप केलेले असेल तर मुलगी होते. असले विचार करणार्‍या स्त्रियाच असतात बहुदा,म्हणूनच एक स्त्री असूनही मला अशा स्त्रियांचा राग येतॉ.

भिंगरी 12/12/2014 - 17:47
पापाचा स्त्री जन्माशी संबंध असेल तर, जगात इतक्या महान स्त्रिया जन्माला आल्या त्यांच्या पालकांनी काय केले असेल? पाप की पुण्य? >>>>>>

आनन्दा 12/12/2014 - 19:18
मला मुलगी झाली तेव्हा मी न्युट्रल होतो.. मला मुलगा हवा - मुलगी हवी असे काही नव्हते. पण ते नवजात बाळ पाहिले आणि म्हणले गेले सगळे खड्ड्यात - हे बाळ आपले आहे हे महत्वाचे. मुलगा की मुलगी हा विचार करण्यात काय अर्थ?

अर्धवटराव 13/12/2014 - 01:03
आमच्या चिंरजीवांच्या आगमनावेळी आमची परिस्थिती मोठी विचित्र होती. मुलगा झाला तर आनंद, मुलगी झाली तर अत्यानंद. मुलीकरता आमचा कल जास्त होता. पण च्यायला, आमच्याच (म्हणजे माझ्या) टारगटपणाने पुनर्जन्म घेतला :D मुलगी दत्तक घ्यावी म्हणुन बराच प्रयत्न केला... पण आपल्याक्डे दत्तक प्रोसेस पालकांना डिस्करेज करायला बनवली आहे कि काय कोण जाणे :(

In reply to by अर्धवटराव

....पालकांना डिस्करेज करायला बनवली आहे कि काय कोण जाणे? सहमत आहे... पण बर्‍याच वेळा काही वेगळ्या कारणांमुळे पण कुणी दत्तक मुले-मुली घेत असतील तर? कदाचित तसे होवू नये म्हणूनच ती "दत्तक" प्रक्रिया किचकट करून ठेवली असावी. ह्या "दत्तक प्रक्रियेशी" कुणी संबंधीत मिपाकर असेल तर तो जास्त माहिती देवू शकतो.

In reply to by मुक्त विहारि

सखी 13/12/2014 - 01:20
हो मुलं योग्य घरी जावीत, मधल्यामधे भलतीकडे जाऊ नयेत म्ह्णुन ब्-याच देशात नियम गेल्या काही दशकांमध्ये कडक केले आहेत, पण मुलांच्या भविष्याचा विचार करता ते आवश्यक आहेत असेच वाटते. अभिजित यांची ही मालिका जरुर वाचा दत्तकविधान-१, बहुगुणींनी पहिल्याच भागाच्या प्रतिसादात पुढच्या सगळ्या भागांच्या लिंक्स दिल्या आहेत.

भिंगरी 13/12/2014 - 12:13
धन्यवाद!!!!!!!!!! अर्धवटराव आणि मु.वि. मला मुलींची हौस आहे,ती मी ४ पुतण्यांमध्ये भागवली.आता त्या लग्न होउन एक एक मुलांच्या आई झाल्या आहेत मग मी माझी हौ आमच्या सोसायटीतील गुरख्याच्या मुलीला कपडे, खेळणी देउन भागवत होते.तीही आता मोठी होत चालली आहे. पण आता माझ्याकडे हक्काची नात आली आहे.ती आल्यावर माझे मिपा मिपा खेळ खेळणे कमी होईल.

आम्हाला तर मुलगी होणार याची इतकी खात्री होती, की मुलीचं नाव पण ठरवून ठेवलं होतं...मुलगा झाल्यावर काय नाव ठेवायचं याचा विचारही केला नव्ह्ता!! . . . ३ महिने नावनोंदणी पण केली नाही, नाव ठरलं नसल्याने..

असंका 15/12/2014 - 12:00
कोल्हापूरच्या होय आपण? आम्ही पण.... मला पण एक लेक आहे आणि गंमत म्हणजे तिचे नाव राधा या अर्थी अनया असे ठेवले आहे. तिचा जन्मच गोकुळाष्टमीचा. त्यामुळे.

तिमा 21/09/2014 - 16:39
जुळं होऊन एकाच वेळी जन्माला आले तर सख्ख्या बहिण-भावाला राधा आणि कृष्ण म्हणावे लागू नये, म्हणून असेल कदाचित!

कवितानागेश 21/09/2014 - 22:30
बरोबर लिहिलं आहेत भिंगरीताई. जोपर्यंत 'राधे'ला जपणं आणि आणि तिला सासरी पाठवताना हुंडा देणं हे प्रकार सुरु आहेत, तोपर्यंत तिला समान वागणून मिळणं कठीण आहे. गरीब वर्गात अजून एक पाहिलेली कटू गोष्ट म्हणजे मुलगा कमावता होउन 'हाताशी' येतो, पण मुलीला मात्र दुसर्‍याकडे पाठवायचय, तिचा काय उपयोग? उलट तिच्यावर खर्चच जास्त होणार, असा अविचार दिसतो. हे बघून खरंच खूप वाईट वाटतं. ज्यांचा प्रत्यक्ष हॉस्पिटल्स, दॉक्टर्स यांच्याशी संबंध येतोय, त्यांना या प्रश्नाची धार निश्चितच कळू शकेल.

भिंगरी 09/12/2014 - 18:58
सर्व मिपाकरांना कळवण्यात येत आहे की आमच्याकडे राधा आली. कोल्हापूरात घुगर्‍या जिलेबी वाटून धूमधडाक्यात बारसे झाले. मिपाकरांसठी स्पेशल जिलेबी पाडत आहे. येणार येणार म्हणता राधेचे आगमन झाले, "पालवी" असे नामकरण झाले.

गणेशा 09/12/2014 - 20:08
अभिनंदन ! आमच्याकड पण मुलगीच. आणि तीच हवी होती. लेख आपण टाकलाय बरका.. पण आजकाल मला वाटते मुलगा मुलगी भेद खुप कमी झाला आहे. उलट मला तर वयक्तीक रीत्या मुलगीच चांगली वाटते. आमच्याकडं मुलगी झाल्यावर तिच्य नावापासुन पुढील बर्याच गोष्टी मीच ठरवणार असे ठरले होते. मुलगा झाल्यावर आमची ही .. सांगण्याचा उद्देश मी बाळ होण्या अगोदर खुप (सगळॅए मुलींचीच) नावे निवडली होती. त्यात "पालवी" पण होते. पण गणेश नावाला सुटेबल आराध्या च वाटल्याने ते ठेवले नाव. आणि एक मुलगी असण्याचा अभिमान आहे मला.

भिंगरी 09/12/2014 - 22:58
गणेशराव, अभिनंदन आपलेही. आणि आराध्याला खुप खुप आशीर्वाद!

विवेकपटाईत 10/12/2014 - 15:59
भिंगरी ताई, घरात लक्ष्मी आली, अभिनंदन. मला ही पहिली मुलगीच होती, आता ती सासरी गेली, हे वेगळ. डोळ्यांत अश्रू , मनात आनंद आईच्या हृदयी फुटला आता मायेचा पाझर. उबेच्या कुशीत, असा सुरु झाला चिमुकल्या चिमणीचा संसार.

भिंगरी 10/12/2014 - 16:27
भिंगरी ताई, घरात लक्ष्मी आली, अभिनंदन. धन्यवाद!विवेकजी. पण ज्या दिवशी मला नात झाल्याचे निरोप सगळ्यांना गेले,त्यावेळेसच्या प्रतिक्रिया भिन्न भिन्न होत्या. माझ्याकडचे म्हणजे दोनही मुलगे,जावा,दिर,पुतण्या सगळे खुश होते.मला तर मुलगीच होउ दे अशी इच्छा होती ती पुर्ण झाली. शेजारी पण खुश झाले. सूनबाईच्या माहेरच्यांचा आवाज थोडा नरम होता. पण आमचा उत्साह पाहुण त्यांची नाराजी पळाली. समोरची मंदिरातल्या पंडीतची बायको तोंडावर निराशेचे भाव आणून वदली,लडकीही हुई क्या? बारशाला आलेली एक महिला म्हणाली आमच्याकडे म्हणतात्,पाप केलेले असेल तर मुलगी होते. आता बोला!!!!!! कुठे नेऊन ठेवतात हे लोक 'समाज आपला'.

In reply to by भिंगरी

टवाळ कार्टा 10/12/2014 - 16:36
ज्या दिवशी मला नात झाल्याचे निरोप सगळ्यांना गेले,त्यावेळेसच्या प्रतिक्रिया भिन्न भिन्न होत्या
आपण खूश असलो की झाले...दुनीया गेली तेल लावत
बारशाला आलेली एक महिला म्हणाली आमच्याकडे म्हणतात्,पाप केलेले असेल तर मुलगी होते.
लगेच विचारायचे...तुमच्या पालकांनी काय पाप केलेले ;)

In reply to by टवाळ कार्टा

भिंगरी 10/12/2014 - 16:52
आपण खूश असलो की झाले...दुनीया गेली तेल लावत>>>... हे तंत्र मी कायम वापरते. पाप केलेले असेल तर मुलगी होते. असले विचार करणार्‍या स्त्रियाच असतात बहुदा,म्हणूनच एक स्त्री असूनही मला अशा स्त्रियांचा राग येतॉ.

भिंगरी 12/12/2014 - 17:47
पापाचा स्त्री जन्माशी संबंध असेल तर, जगात इतक्या महान स्त्रिया जन्माला आल्या त्यांच्या पालकांनी काय केले असेल? पाप की पुण्य? >>>>>>

आनन्दा 12/12/2014 - 19:18
मला मुलगी झाली तेव्हा मी न्युट्रल होतो.. मला मुलगा हवा - मुलगी हवी असे काही नव्हते. पण ते नवजात बाळ पाहिले आणि म्हणले गेले सगळे खड्ड्यात - हे बाळ आपले आहे हे महत्वाचे. मुलगा की मुलगी हा विचार करण्यात काय अर्थ?

अर्धवटराव 13/12/2014 - 01:03
आमच्या चिंरजीवांच्या आगमनावेळी आमची परिस्थिती मोठी विचित्र होती. मुलगा झाला तर आनंद, मुलगी झाली तर अत्यानंद. मुलीकरता आमचा कल जास्त होता. पण च्यायला, आमच्याच (म्हणजे माझ्या) टारगटपणाने पुनर्जन्म घेतला :D मुलगी दत्तक घ्यावी म्हणुन बराच प्रयत्न केला... पण आपल्याक्डे दत्तक प्रोसेस पालकांना डिस्करेज करायला बनवली आहे कि काय कोण जाणे :(

In reply to by अर्धवटराव

....पालकांना डिस्करेज करायला बनवली आहे कि काय कोण जाणे? सहमत आहे... पण बर्‍याच वेळा काही वेगळ्या कारणांमुळे पण कुणी दत्तक मुले-मुली घेत असतील तर? कदाचित तसे होवू नये म्हणूनच ती "दत्तक" प्रक्रिया किचकट करून ठेवली असावी. ह्या "दत्तक प्रक्रियेशी" कुणी संबंधीत मिपाकर असेल तर तो जास्त माहिती देवू शकतो.

In reply to by मुक्त विहारि

सखी 13/12/2014 - 01:20
हो मुलं योग्य घरी जावीत, मधल्यामधे भलतीकडे जाऊ नयेत म्ह्णुन ब्-याच देशात नियम गेल्या काही दशकांमध्ये कडक केले आहेत, पण मुलांच्या भविष्याचा विचार करता ते आवश्यक आहेत असेच वाटते. अभिजित यांची ही मालिका जरुर वाचा दत्तकविधान-१, बहुगुणींनी पहिल्याच भागाच्या प्रतिसादात पुढच्या सगळ्या भागांच्या लिंक्स दिल्या आहेत.

भिंगरी 13/12/2014 - 12:13
धन्यवाद!!!!!!!!!! अर्धवटराव आणि मु.वि. मला मुलींची हौस आहे,ती मी ४ पुतण्यांमध्ये भागवली.आता त्या लग्न होउन एक एक मुलांच्या आई झाल्या आहेत मग मी माझी हौ आमच्या सोसायटीतील गुरख्याच्या मुलीला कपडे, खेळणी देउन भागवत होते.तीही आता मोठी होत चालली आहे. पण आता माझ्याकडे हक्काची नात आली आहे.ती आल्यावर माझे मिपा मिपा खेळ खेळणे कमी होईल.

आम्हाला तर मुलगी होणार याची इतकी खात्री होती, की मुलीचं नाव पण ठरवून ठेवलं होतं...मुलगा झाल्यावर काय नाव ठेवायचं याचा विचारही केला नव्ह्ता!! . . . ३ महिने नावनोंदणी पण केली नाही, नाव ठरलं नसल्याने..

असंका 15/12/2014 - 12:00
कोल्हापूरच्या होय आपण? आम्ही पण.... मला पण एक लेक आहे आणि गंमत म्हणजे तिचे नाव राधा या अर्थी अनया असे ठेवले आहे. तिचा जन्मच गोकुळाष्टमीचा. त्यामुळे.
आजकाल स्त्री भृणहत्या हा विषय चांगलाच चर्चेत आहे.स्त्रीला समाजात सन्माननीय स्थान मिळावे या साठी सगळ्यांचीच खटपट चालली आहे. एका बाजूला आपण पाहत आहोत हल्ली एक मुलगी असलेले पालक सुद्धा दुसऱ्या अपत्याची वाट न पाहता मुलीला उच्च शिक्षण मिळावे म्हणून धडपडत असतात, (समाजातील हा बदल नक्कीच लक्षवेधक आहे.) तर दुसऱ्या बाजूला पाहतो मुलगा होण्याची वाट पाहण्यात, संगोपन करण्याची आर्थिक परिस्थिती नसतानाही मुली जन्माला घातल्या जातात.(शेवटास मुलगा होतो कि नाही देव जाणे.) जास्त मुली असणाऱ्या मातेला उगाच अपराधी वाटत असे.

आत्महत्येच्या निर्लज्जपणाची चोरी - भाग १

संदीप डांगे ·

संदीप, आपण अगदी मनमोकळ्या शब्दात तुमची परिस्थिती जशीच्या तशी मांडल्याने अक्षरशः अंगावर काटा आला. आपल्या झालेल्या चुका मोठ्या मनाने मान्य करणे, इतरांसमोर मांडणे ह्याला खूप धैर्य लागते. पुढील भाग लवकर वाचायला मिळावा.

धन्या 21/09/2014 - 15:44
तुमच्या त्या धाग्यावर मी काही लिहिले नाही. कारण अशा प्रसंगात काय बोलायचे, काय निर्णय घ्यायचे हे मलाही कळत नाही. बाकी मिपाकरांनी तुम्हाला चांगले सल्ले दिले. त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे तुम्हाला याक्षणी आवश्यक असणारा भावनिक आधार दिला. मनात असाही प्रश्न उभा राहीला होता की संदीपनी हे सारे मिपावर सांगणे म्हणजे चौकात उभे राहून बोलण्यासारखे नाही का. मात्र असा आधार मिळवणे ही तुमची आताची गरज आहे. त्या धाग्यावर काहींनी समुपदेशकाकडे जाण्याचा सल्ला दिला होता. त्याचाही तुम्ही विचार करावा. ते लोक अशा प्रसंगांमध्ये काय बोलावं याविषयी प्रशिक्षित असतात. अशाच नसल्या तरी अंतिम निष्कर्ष असाच निघणार्‍या अशा दहा प्रकारच्या परिस्थीतीतून जाणार्‍या लोकांना त्यांना धीर दिलेला असतो. असो. तुमचा हा लेख वाचणार्‍या प्रत्येकाला काही ना काही या लेखातून शिकण्यासारखं आहे. पुढच्यास ठेच मागचा शहाणा म्हणतात. तसा हा तुमचा लेख अनेकांना मार्गदर्शक ठरेल.

फक्त एकच गोष्ट माणसाला सार्‍या आयुष्यात आणि कोणत्याही प्रसंगात तारु शकते ती म्हणजे प्रामाणिकपणा! जर तुम्ही कुणाला फसवलं नसेल तर दैवाचे फासे कसेही पडोत, त्याचा दोष आपल्याला लागत नाही. मग आत्महत्त्येचा विचारच मनला शिवत नाही कारण आपण स्वतःशी एकनिष्ठ असतो. असा एकसंध माणूस स्वतःला कशाला संपवेल? फक्त एकच गोष्ट सांगतो, पैसा माझा व्यावसाय आहे आणि जितके कफल्लक मी पाहिलेत त्यांची एकच कहाणी आहे, त्यांना मोह नडलायं. कुणावर कधी काय प्रसंग येईल (जसा तुझ्या पत्नीचा placenta previa, किंवा अपघात), आणि काय आपत्ती ओढवेल ते सांगता येत नाही. पण जबरदस्त आर्थिक फटका बसण्याचं नेमकं कारण मोह हेच आहे. असो, तुझा बायोडेटा माझ्या पर्सनल मेल आयडीवर पाठव, नाशिकला माझा एक प्रथितयश मित्र आहे त्याच्याशी बोलतो. त्यानं जर मनावर घेतलं तर तो तुझं आयुष्य बदलून टाकेल.

पाषाणभेद 21/09/2014 - 16:13
३. लग्नाचे प्रमाणपत्र नाही म्हणून कुटुंबाचा वैद्यकीय विमा नाही हे कळाले नाही. माझ्या मते जॉईंट विमा पॉलीसी किंवा मेडीक्लेमलाही असला प्रश्न उपस्थीत होत नाही. बाकी आपल्या पुढील आयुष्याला शुभेच्छा.

In reply to by संदीप डांगे

पाषाणभेद 21/09/2014 - 17:44
भाऊ जॉईंट विमा पॉलीसी (हजबंड अँन्ड वाईफ) किंवा मेडीक्लेमलाही (पुर्ण कुटूंब) यासाठी मॅरीज सर्टीफीकीट लागत नाही. पॅन कार्ड चालते. फक्त जॉईंट विमा पॉलीसी काढतांना सौ.चे माहेरचे डिटेल्स द्यावे लागतात. (म्या पन नाशकात र्‍हातो. आयटी आन बाकीच्या सगळ्याच क्षेत्रात नाशकात चांगला नोकरवर्ग मिळू शकतो. आपल्याला चांगला नोकर मिळू शकले नाहीत हा दुर्दैवाचा भाग असावा. आपल्या लिखाणात तसा उल्लेख आल्याने इतरांचा नाशिकमधील नोकरवर्गाबाबात गैरसमज होवू नये म्हणून असे लिहीत आहे. नाशिकमधील नोकरवर्गाबाबत इतर शहरवासीयांनी गैरसमज करू नये. उडदामाजी काळेगोरे सगळीकडेच असतात. नाशिकबाबात दुराग्रह बाळगू नये. जय नाशिक.)

In reply to by पाषाणभेद

संदीप डांगे 21/09/2014 - 18:39
मला वाटतं नाशिककर नोकरदारांना मी कुठेही जनरलाइज केलेलं नाही. संपूर्ण परिच्छेद पुन्हा वाचावा. माझ्या अपेक्षा ते पूर्ण करू शकले नाहीत एवढेच म्हटले आहे. आता यात किती तरी अर्थ निघू शकतात जसे कि माझ्या अपेक्षाच अवास्तव होत्या. घाई घाई मध्ये मुलाखती नीट झाल्या नसतील, त्यांना मला नक्की काय हवे हे समजले नसेल, मुंबई नाशिक च्या संस्कृतीत मुलभूत फरक तो आहेच, निदान मला तरी जाणवला. नाशिककर नोकरदारांना सरसकट दोषी अजिबात धरलेले नाही. मुळात नाशिक ला शिफ्ट होण्याचा व ऑफिस सुरु करण्याचा निर्णय घेण्यामागे हि तुम्ही सांगितलेली आणि ऐकून असलेली कीर्ती होती. नशिबाचे फासे उलटे पडले त्यात कोण काय करणार?

संदीपभाऊ तुम्हाला तुमच्या प्रामाणिक पणाबद्दल अनेक सलाम.! हे सर्व वाचल्यावर एक गोष्ट मात्र कळुन आली. तुम्हाला काम मिळते आहे आणि तुमची कामे करण्याची क्षमता अजुनही अबाधित आहे + मार्केटमध्ये तुम्ही करत असलेल्या कामाला मागणी आहे आणि हीच फार महत्वाची गोष्ट आहे. विचार करा जे स्किलसेट तुमच्याकडे आहेत त्यांचीच जर मार्केटमध्ये आवश्यकता उरली नसती तर आलेला प्रसंग हा फार भयानक असला असता.थोडक्यात एका दिवसातच तुम्ही Obsolete होऊ शकला असता.एकुण परिस्थितीला असलेली ही एक चंदेरी किनारच आहे. ह्या गोष्टीवर विचार अवश्य करावा.

पैसा 21/09/2014 - 17:45
प्रांजळपणे तुमची आत्मकथा इथे शेअर केल्याबद्दल अभिनंदन तसेच धन्यवाद! संपादक मंदळाने इशारा दिला त्याला पूर्वीचे काही अनुभव कारण आहेत. तुमची हकीकत खरी असली तरी मिपाच्या माध्यमातून कोणतेही आर्थिक व्यवहार होऊ नयेत हीच अधिकृत भूमिका आहे त्यामुळे असा इशारा देणे भाग होते. इथे अनेकांनी तुम्हाला नोकरीसाठी हात देऊ केला आहे. त्याबद्दलही लवकर निर्णय घ्या. स्वतःच्या चुका तुम्हाला कळत आहेत, याचाच अर्थ त्यांचे पुनरावृत्ती होण्याची शक्यता कमी दिसते. २/३ वेळा तुम्ही थोडीफार माघार घेऊन परत जम बसवला आहे असं दिसतं. जरी धंदाच नेटाने करायचा असेल तरी सध्या घर, सोनेनाणे, धंद्यासाठी आवश्यक मशिनरी फर्निचर जे काही असेल ते, यावर तारण कर्ज कोणत्याही बँकेकडून मिळू शकेल. धंद्यासाठी भांडवली आणि चालू असे दोन प्रकारचे खर्च असतात, त्यासाठी दीर्घ मुदतीची कर्ज आणि कॅश क्रेडिट असे २ प्रकारची कर्ज आवश्यक असतात. पैकी दीर्घ मुदतीचे कर्ज हे दर महिना थोडे थोडे करून भराय्चे असाते. तर कॅश क्रेडिट रोजच्या खर्चासाठी लागते. मात्र तुम्ही ओणत्याही बँकेचे कर्ज न घेता सगळी खाजगी कर्जं घेतलीत, (अर्थात इन्कम टॅक्स रिटर्न भरले नव्हते हे कारण आहे) त्यामुळेच आजची परिस्थिती आली आहे. आता आधीची रिटर्न्स भरायला गेलात तर बहुधा टॅक्स्+दंड भरावा लागेल. पण रिटर्न्स भरत नाही तोपर्यंत बँक कर्ज मिळणे अशक्य आहे. महिना एक लाख उत्पन्न असताना रिटर्न्स भरणे आवश्यक होते असे वाटते. निदान यापुढे तरी हिशेब व्यवस्थित ठेवत जा ही विनंती. आणि हे कर्ज आज ना उद्या फिटेलच, पण यापुढे अशी खाजगी कर्जे अगदी जवळच्या नातेवाईकांचीही घेऊ नका. आत्ता या क्षणी पत्नीचे दागिने, गाडी जे असेल ते डिस्पोज ऑफ करून बर्‍याच कर्जातून मोकळे होता येईल असे वाटते. तुम्ही एवढे प्रांजलपणे लिहिले आहे म्हणूनच हे सर्व लिहीत आहे. तुम्हाला दुखवायचा हेतू नाही. तुमच्या हातात कला आहे, तर या परिस्थितीतून नक्की बाहेर पडाल.

तुमचे अनुभव वाचून एव्हढे लक्षात आले की खुपशा गोष्टी, तुम्ही सुद्धा, परिस्थितीचे विश्लेषण करून, स्विकारल्या आहेतच. मला माझ्या अनुभवावरून वाटते त्या नुसार तुमच्या अनुभवांच विश्लेषण मी खालील प्रमाणे करीनः लाथ मारीन तिथे पाणी काढीन असा स्वभाव आधीपासूनच होता. जे जे पाहिजे ते ते हट्टाने कष्ट करून मिळवले. हा स्वभाव वाईट नाही. मात्र स्वतःचे मुल्यमापन स्वतःच सतत करत राहावे लागते. इतरांच्या सांगण्यावर लगेच अम्मल नाही केला तरी इतरांचे नक्कीच ऐकून घ्यावे. मनातल्या मनात त्यावर स्वतःशीच प्रामाणिक चर्चा करावी आणि आपला बंदा रुपया खणखणीत आहे की नाही हे सतत तपासत राहावे. अमुक एक गोष्ट होणारच असे मनात धरले कि ती झाली नाहीतर काय हा विचार केलाच नाही. नकारात्मक घटनेचा आधी विचार करून ठेवावा. 'प्लॅन बी' नेहमी तयार ठेवावा. धाडसीपणे पुढे टाकलेले पाऊल गरज भासल्यास मागे घेण्यात कसालाच कमीपणा नसतो. तो व्यवहार आहे. धंद्यात भावनेपेक्षा व्यवहार अधिक महत्वाचा असतो. बायको नेहमी सांगायची जे हातात आहे त्याचा विचार करूनच नियोजन करायचे आश्वासन द्यायची. बायकोचे (किंवा कुणाचेही) ऐकायचे की नाही हे ती (बायको किंवा दूसरी व्यक्ती) किती व्यवहारी आहे आणि मनाने विचार करणारी आहे की बुद्धीने ह्यावर अवलंबून असते. बायकोचे सर्वच ऐकणारे आणि कांहीच न ऐकणारे दोघेही खड्ड्यात जाऊ शकतात. त्यामुळे काय ऐकायचे काय नाही हे अनुभवावरून ठरवावे. हे पैसे येतील. तिथून काम येईल ह्या बेभरवश्यच्या नियोजनाला काही अर्थ नसतो. हे बाकी खरं आहे. तुमच्या सौंनी योग्य तोच सल्ला दिला आहे. पण तिचे कधी ऐकले नाही. कारण मागचे "अनुभव". मागचे "अनुभव" नाही. मागच्या घटनांमधून जे 'नशिबाने' यश मिळालं होतं त्याने एक प्रकारचा 'इगो' मनांत निर्माण झाला होता आणि हा इगोच दुसर्‍यांच्या सल्यांवर विचारही करायला परवानगी देत नाही. हे म्हणजे सगळे सिग्नल हिरवे असतील तरच मी गाडी चालवणार. सिग्नल लाल असताना गाडी दामटणं हे जितकं कायद्याला धरून गैर आहे तितकेच नितिमत्तेला धरून गैर आहे आणि अपघातांना आपणच आमंत्रण देण्यासारखे आहे. असे वागणे धंद्यातच काय पण रोजच्या जीवनातही टाळलेच पाहिजे. त्यामुळे रिस्क घेणे कमी झाले. त्यामुळे आर्थिक प्रगती खुंटली. रिस्क घेण्याने आर्थिक प्रगती खुंटत नाही. आंधळी रिस्क घेण्याने माणूस खड्ड्यात जातो किंवा भिंतीवर आपटतो. धंद्यात जोखिम उचलताना नुसते डोळेच नाही तर कान आणि मन सुद्धा उघडे ठेवावे. तसेच जोखीमीची तीव्रता (इंटेन्सिटी) तपासून बाजी उलटल्यास होणार्‍या नुकसानाबरोबर तोलून पाहावे. ते नुकसान क्षुल्लक किंवा कमी पातळीचे असेल तरच जोखिम उचलावी, मध्यम किंवा उच्च पातळीचे असेल तर उचलू नये. (जोरदार सेटबॅक बसू शकतो). त्यातच मुलगा ५ महिन्याचा असताना अंगावर गरम दुध सांडून ५०% भाजला. त्याचे शरीर भाजले आणि आमच्या दोघांची मने. फार दुर्दैवी घटना. अशा घटनांवर आपलं कांही नियंत्रण नसतं. विमा असता तर फारात फार आर्थिक बाजूची काळजी घेतली गेली असती पण आपल्या पोटच्या मुलाला होणार्‍या यातना आपल्या मनाचे, आत्मविश्वासाचे खच्चीकरण करतो. त्यात तुमचा कांही दोष नाही. हा नशिबाचा/दुर्दैवाचा भाग आहे. आमचा संसार दृष्ट लागण्यासार्खाच आहे. त्यामुळे आपल्या सोबत काही चांगले होईल तर त्याचीच भीती वाटू लागली. कारण त्या चांगल्याला कुणाची तरी नजर हमखास लागतेच लागते असा वाईट अनुभव. स्वतःचा व्यवसाय करा किंवा नका करू पण ह्या मानसिकतेतुन शक्य तितक्या लवकर बाहेर पडा. भन्नाट आत्मविश्वास ते शुन्य आत्मविश्वास असा प्रवास फार झपाट्याने झाला. ..... आपण हे करू शकणार नाही असा न्यूनगंड आला. तो बराच काळ होता. 'भन्नाट आत्मविश्वास' ह्यात स्वकर्तृत्त्वाचा भाग किती आणि नशिबाचा भाग किती हे तपासून पाहावे. खुप वेळा आपल्या नशिबाने (यशासाठी लागणार्‍या इतर सर्व बाबी आयत्याच जुळून येणे) मिळालेल्या यशालाच आपण आपलं कर्तृत्व समजतो. कित्येकदा ज्याला आपण आत्मविश्वास समजतो तो आपल्या मनावरचा सोनेरी मुलामा असतो. कांही कारणाने तो मुलामा खरवडला गेला तर आपल्याला समजतं आपण सुद्धा आतून, मुळात, इतरांसारखेच आहोत. किंचिंत घाबरट आणि mediocreच आहोत. ह्याचा स्विकार करणं बरंच कठीण जातं. पण लवकरात लवकर हे सत्य स्विकारल्याने पुढील वाटचाल सुरक्षित होते. सरळ राजीनामा दिला. त्या आधी एक २ लाखाचे लोन घेतले. दूसरा मार्ग स्पष्ट दिसण्याआधीच, लांबचा असला तरी सुरक्षित असा मुख्य रस्ता सोडून, काट्याकुट्यांच्या जंगलात (दोन लाखांचे कर्ज) शॉर्ट्कट सापडेल ह्या आशेने नविन वाट शोधण्यात शहाणपणा नाही. नोकरी सोडल्यावर दुसर्याच महिन्यात बायकोची एक आणि मुलाची एक अश्या दोन शस्त्रक्रिया यात बराच खर्च झाला. त्याच्या दुसर्या महिन्यात गाडीचा एक क्षुल्लक अपघात होऊन त्यात ४० हजार खर्च झाले. विम्याचे महत्व लक्षात आले असेलच. जी गंगाजळी ९ महिन्यासाठी प्लान केली होती ती ३ महिन्यात साफ झाली. आजारपणं, अपघात ह्यांचा विचारच न केल्याने ९ महिन्यांचे प्लानिंग केले. ९ महिन्यांना पुरेल इतकेच पैसे जवळ असताना ३ महिन्यांचेच प्लानिंग करायला पाहिजे. अर्थात, असे सल्ले नंतर देणं सोपं असतं. तरीपण ह्या अनुभवाचा भविष्यात उपयोग करून घ्यायला पाहिजे होता. नशिबाने पुढे साथ दिली आणि कामाचा ओघ सुरु झाला. एप्रिल २०१२ ते एप्रिल २०१३ फारच मजेत गेले. एव्हढे नकारात्मक अनुभव आल्यानंतर जे कांही पैसे हाती आले त्यात 'फार मजा' न करता भविष्यासाठी विमा किंवा इतर काय तजविज केली? तेंव्हा एका ग्राहकाने पार्टनरशिप चा प्रस्ताव ठेवला. त्याचे पैसे आणि माझी मेहनत व ज्ञान असा तो एकंदर मामला होता. मी स्वतःचा व्यवसाय सुरु केला तेंव्हा मला एका गुजराथी व्यावसायिकाने सल्ला दिला होता. लहानात लहान धंद्याने सुरुवात कर पण स्वतःचा कर. पार्टनर घेऊ नकोस. सख्ख्या भावालाही, मार्केट दरापेक्षा जास्त दराने पगार देऊन मॅनेजर म्हणून ठेव, पण पार्टनर करून घेऊ नकोस. पार्टनरशिप वाईटच असते असे नाही पण ती सांभाळायला अंगात जास्त हुशारी आणि व्यवसायाचा अनुभव असावा लागतो. पार्टनरशिप यशस्वी झाल्यास 'माझ्यामुळे' आणि नुकसान झाल्यास 'त्याच्यामुळे' अशी दोन्ही भागिदारांची भूमिका असते. दोन्ही परिस्थितीत संवेदनशील व्यक्तीच्या वाट्यास मनःस्तापाव्यतिरिक्त कांही येत नाही. सुमारे १० ते १५ लाख गुंतवणूक होती. ह्या भांडवलात तुमची जमा पुंजी किती होती आणि कर्ज किती होते? जर सर्व गुंतवणूक भागिदार करणार असेल तर तो सतत तुमच्यावर दबाब ठेवणार ह्याची कल्पना असायला हवी होती. एव्हढी रक्कम गुंतविणारा भागिदार स्वस्थ बसून आपल्याला आपल्या मर्जी नुसार धंदा करू देईल असं समजणं हा भाबडेपणा आहे. पार्टनर एक मोठा बिल्डर होता. भागिदार कितीही पैसे गुंतवित असला तरी तो आपल्या तोलामोलाचा असावा. आपल्याला डोईजड होईल असा नसावा. आर्थिकदृष्ट्याही नाही, सामाजिकदृष्ट्याही नाही आणि मसलपॉवरच्या दृष्टीनेही नाही. त्याने त्याची काही माणसे ह्या सगळ्यावर देखरेख व संयोजना साठी दिली. ईथेच घात झाला. वर म्हंटल्याप्रमाणेच, जो १५ लाख गुंतवितो तो स्वस्थ बसणार नाही. तुमच्या प्रत्येक हालचालीवर 'लक्ष' ठेवेल आणि तुम्ही किती वेळा श्वास घेतला आणि सोडला ह्यावरही 'लक्ष' ठेवेल. तुमचे स्वातंत्र्य संपुष्टात येते. म्हणाले मी तुला पैसे देतो. बुडाले तरी हरकत नाही. (हा आशीर्वाद असल्यावर धंदा चालेल तर काय बिशाद) देणार्‍याने असे म्हंटले तरी 'घेणार्‍याने' हे कर्ज आहे आणि आपल्याला हे लवकरात लवकर फेडून आपला हात दगडाखालून मोकळा करून घ्यायचा आहे हे कधीच विसरता कामा नये. तुमचा ह्या मदतीकडे बघायचा दृष्टीकोनच चुकीचा आहे. आता शब्द बदलायची बाबांची वेळ होती. त्यांनी पुढचे पैसे द्यायला स्पष्ट नकार दिला. वरून माझीच खरडपट्टी काढायला लागले. बाबांनीही पैसे दिले होते तेंव्हा त्यांचेही लक्ष असणारच तुमच्या व्यवसायावर. तुमचं व्यवसाय करणं (किंवा वागणं) जर बेदरकार असेल तर त्यांनाही व्यवसायाच्या यशाबद्दल साशंकता वाटणारच. त्यामुळे २ लाखांवर पाणी सोडून बाकीचे पैसे वाचविण्याचा त्यांनी पवित्रा घेतला असण्याची शक्यता आहे. शिवाय तुमची तुमच्या व्यवसायाकडे पाहण्याची दृष्टी, त्यातील खाचाखोचा माहित असल्याने आणि व्यावसायिकतेची ओढ असल्याने त्या दोन लाखाच्या सुरक्षिततेकडे किंवा परताव्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टीकोण आणि तुमच्या वडिलांचा (वरील सर्व गुणांच्या अभावामुळे) दृष्टीकोण ह्यात फरक हा असणारच. त्यातून हे घडले असावे. शिवाय पैसे दिल्यापासून 'ह्या पुढे मी पैसे देणार नाही' ह्या भूमिकेत शिरण्यापूर्वी होत गेलेला परिस्थिती बदल कळण्यास मार्ग नाही त्यामुळे ह्या परिस्थितीस जबाबदार कोण?, तुम्ही की तुमचे वडिल हे ठरविणे कठीण आहे. एक ग्राहक खूप काम घेऊन आला. नवीन होता त्यामुळे मला काही अंदाज येत नव्हता. नाशिकचा होता आणि नाशिकच्या घ्रहाकांचा मला काहीच अनुभव नव्हता. भविष्यात भरपूर काम येईल या आशेने( हि आशा त्यानेच लावली) आणि प्रथमदर्शनी त्यात काही चूकही नव्हते. पुन्हा तुमच्या सौंचा सल्ला स्विकारला असतात तर अशा बेभरवशाच्या अनोळखी ग्राहकाकडून येणार्‍या पैशावर विसंबून राहिला नसतात. आपण ग्राहक असताना विक्रेत्याच्या आणि विक्रेता असताना ग्राहकांच्या 'गोडगोड' बोलण्याला फसायचं नसतं. माझ्याकडेही गिर्‍हाईके येतात. ५-६ माणसांचे जेवण हवे असते. किती खर्च येईल सांगितल्यावर घासघिस सुरु होते. मी शांत राहतो. मग ते हुकमी एक्का बाहेर काढतात अमुक अमुक फंक्शन ३०० माणसं जेवायला येणार आहे. तुम्हालाच ऑर्डर देऊ वगैरे वगैरे आश्वासनं देतात. मी सांगतो 'ह्या ऑर्डरचा हा रेट आहे. ती ऑर्डर येईल तेंव्हा 'त्या' ऑर्डरवर नक्कीच डिस्काउंट देईन.' असो. केलेल्या कामाचे पैसे मिळाले, पण ते दिलेल्या वेळेच्या प्रमाणात नव्हते. चोराच्या हातची लंगोटी असे म्हणून किंवा 'अमुल्य' अनुभवाची फी असे समजून सोडून द्यायचे. पुढे चलायचे. खेदाने असे म्हणावे लागेल, धंदा बुडायला चांगले डिझायनर न मिळणे हे एक मोठे कारण आहे. डिझायनरला निवडताना नीट पारखून 'ट्रेड टेस्ट' घेऊन निवडायचे. त्यांच्या बोलण्यावर जायचे नाही. त्यांना नोकरी हवी असते त्यामुळे ते 'हां सर्व कांही करतो. मला सर्व येतं. मागे हे हे काम केलेले आहे.' अशा थापा ठोकतातच. शक्य असेल तर सॅलरी + कमिशन (ह्यात सॅलरी कमी पण दोन्ही मिळून साईजेबल रक्कम होईल) असे आमिष दाखवायचे. त्याचे डिझाईन गिर्‍हाईकाकडून पास झाले तरच पूर्ण रक्कम त्याला मिळेल. अर्थात माझा कुंपणावरून दिलेला सल्ला आहे तुम्हाला तुमच्या व्यवसायाची जास्त चांगली कल्पना आहेच. हिम्मत हरु नका. पण अनुभवांच्या जखमा कुरुवाळत बसण्याऐवजी त्यातून धंद्याच्या क्लुप्त्या शिकून घ्या आणि संयमाने यशाच्या मार्गावर पोहोचा. अनुभवासारखा गुरु नाही. फक्त तो आधी शिक्षा करतो आणि नंतर ज्ञान देतो.

In reply to by एस

प्यारे१ 21/09/2014 - 19:36
+२ काय चुका झाल्या हे आत कुठंतरी पक्कं नोट डाऊन करुन त्यावर जास्त वेळ घालवण्यापेक्षा (प्राधान्यानं) सध्या त्या निस्तरण्याकडं जास्त लक्ष दिलं गेलं पाहिजे. ह्या सगळ्यातून बाहेर पडून नंतर काय ते ठरवता येईल. (ठरवावं लागेलच) आणि हो, कमीअधिक प्रमाणात सगळ्यांच्याच आयुष्यात काही ना काही समस्या आहेत. 'समस्या असणं' हे तत्त्व सारखंच आहे. त्या 'समस्यांचं रुप' हे तपशील आणि तपशीलाचे भाग वेगवेगळे आहेत/असतात. त्यामुळं आपण सगळेच एकाच धारेचे प्रवासी आहोत. काहींच्या बोटी थोड्या कणखर, काहींची वल्हवण्याची क्षमता जास्त, वारं येईल तसं शिडाला दिशा देण्याचं कसब उत्तम, त्यानंतर टीम मेंबर्स नि ट्युनिंग आणि शेवटी अंशतः नशीबाचा हातभार असं सगळं गणित जुळून येणं भाग असतं. बाकी त्रास होतोच. तो एकदाच काय तो करुन घेऊन नंतर मात्र अजिबात न उगाळता पुढं जाणं आवश्यक आहे. शुभेच्छा आहेतच.

In reply to by प्रभाकर पेठकर

संदीप डांगे 21/09/2014 - 19:06
छान विश्लेषण केले आहे. पण यश हे नशिबाने मिळते आणि नुकसान हे आपल्या मुर्खपणामुळे होते असा काहीसा अर्थ आपल्या विश्लेषणावरून लागतो आहे. अर्थातच "भाग्य कि कर्म" हा सनातन लढा आहेच. असो. मी फक्त एवढेच म्हणेन कि माझे अनुभव घटनेनुसार मांडले आहेत. त्यात बरेच निर्णय हे त्या काळातली उपलब्ध तत्कालीन परिस्थिती पाहून घेतले आहेत. त्या परिस्थिती चे सर्वच कंगोरे इथे मांडणे शक्य नाही. उद. बिग पिच्चर दाखवणारे सगळ्याच धंद्यात भेटतात. त्यामुळे अशा लोकांना मी पूर्वीपासूनच ओळखून आहे. प्रस्तुत ग्राहक हा बिग पिच्चर दाखवत नव्हता. कारण आता हे दोन लेबल कर नंतर १०० लेबल ची कामे देतो अशी काही गोष्ट नव्हती. एकदमच १० लेबेल चे त्याने रोख पेमेंट केले होते व नंतरच्या ४ मोठ्या ऑर्डर चे हि रीतसर पेमेंट केले. त्यांचा खरोखरच मोठा झोल झाला. कारण ३ महिन्यात मी त्यांच्या मुळापर्यंत जाऊन खबरबात काढली होती. काहीतरी कारण झाले आणि त्यांना कच्चा माल पुरवणाऱ्या कंपनीशी त्यांचा काहीतरी वाद झाला. नंतर ती कच्चा मालवली कंपनी मला लेबलची ऑर्डर देत होती पण माझे रेट त्यांना परवडले नाही. ह्यात फार गुंतागुंत आहे. आणि ती सगळीच इथे सांगता येत नाही. असे प्रत्येक घटनेत झाले आहे. तात्पर्य: आपण घटना रोखू शकत नाही. पण त्याच चुका परत करू नये एवढे शिकावे. यशाने हुरळून जाऊ नये किंवा अपयशाने खचून जाऊ नये एवढा संदेश मी आपल्या प्रतिसादातून घेत आहे.

In reply to by संदीप डांगे

>>>> पण यश हे नशिबाने मिळते आणि नुकसान हे आपल्या मुर्खपणामुळे होते असा काहीसा अर्थ आपल्या विश्लेषणावरून लागतो आहे. असं मी माझ्या प्रतिसादात कुठे म्हंटले आहे? माझे म्हणणे आहे यशाचे आणि अपयशाचे, दोन्हीचे, डोळे, कान आणि मन उघडे ठेवून विश्लेषण करा. नशिबाने मिळालेल्या यशाला आपल्या कर्तृत्त्वाने मिळविले असे समजू नका. ह्याचा अर्थ यश नशिबाने मिळते आणि अपयश आपल्या मूर्खपणामुळे होते असा चुकीचा अर्थ आपण काढलेला दिसतो आहे. मूर्खपणाचे निर्णय केंव्हाही महागातच पडतात. आंधळी जोखिम उचलू नका. डोळे, कान आणि मन उघडे ठेवून परिस्थितीचा सर्व बाजूंनी विचार करून काय तो निर्णय घ्या. अशा सवयीतून जेंव्हा यशाची चढती कमान सुरु होईल आणि अपयशाचे प्रसंग आले तरी ते सहजतेने हाताळण्याइतके सौम्य असतील अशा परिस्थितीतिल ते यश हे तुमच्या कर्तृत्त्वाचे आणि नशिबाचे प्रतिबिंब असेल. मूर्खपणा सोडून दिल्यामुळे, उध्वस्त होण्यासारखे, अपयश दृष्टीक्षेपातही नसेल.

In reply to by प्रभाकर पेठकर

संदीप डांगे 21/09/2014 - 21:51
पेठकर काका, >>>मागचे "अनुभव" नाही. मागच्या घटनांमधून जे 'नशिबाने' यश मिळालं होतं त्याने एक प्रकारचा 'इगो' मनांत निर्माण झाला होता आपल्या ह्या वाक्यावरूनच मला असं वाटले. बहुतेक आपण "लाथ मारीन तिथे पाणी काढीन" ह्या माझ्या वाक्यावरून असा अंदाज बांधला असावा. तो माझा दुर्दम्य आशावाद होता. अहंकार नाही. आपण खरच उत्कृष्ट विश्लेषण आणि मार्गदर्शन केले आहे यात काहीच वाद नाही. परंतु सदरहू लेख माझ्याच अनुभवांवर आधारित असल्याने वाचकांचे कुठलेच गैरसमज होऊ नये म्हणू हा प्रपंच. मी स्वताला सर्वज्ञ मानत नाही. अजूनही शिकत आहे, समजून घेत आहे. वेगवेगळ्या अनुभवांनी वेगवेगळे मत बनत जाते. परंतु कर्तुत्वानेच नशीब सिद्ध होते असे आत्तातरी मला वाटते. त्यामुळेच मिळणाऱ्या यशात किंवा अपयशात नशीब किती आणि कर्तुत्व किती याचा तुलनात्मक अभ्यास कसा करणार? अतिशय विपरीत परिस्थितीत मराठा साम्राज्य स्थापन करणारे शिवाजी महाराज असोत कि रिलायंस चे धीरूभाई असोत, यांच्या यशात नशिबाचा भाग किती? त्यांनी यश अपयशाचे कितीसे हिशोब कुठलेही काम हाती घेण्याआधी केले असतील. "मला अमुक एक काम करायचे आहे, त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा आणि बुद्धीचा कस लावूया" असेच विचार त्यांनी कुठेलेही काम हाती घेतानी त्यांच्या मनात असतील. त्यांच्या इतिहासावरून तरी असेच दिसते कि त्यांनी केलेल्या बऱ्याच गोष्टी जगात त्यांनीच प्रथम केल्या असतील. यशाचा कुठलाही फुलप्रूफ फोर्मुला नसतो. माझ्या मते वांगी कापल्यावरच कळते किडलेले आहे कि नाही ते. मी कापीन ती वांगी चांगलीच निघतील हा वृथा "इगो". शक्यतो न किडलेली वांगी घेऊ नये म्हणजे कापल्यावर किडलेले निघण्याचा धोका टळतो असे कधी शक्य नसते. पण कुठली वांगी किडलेली असू शकतात वा चांगली असू शकतात हा अंदाज अनुभवानेच येतो. कुणीही जन्मताच एक्स्पर्ट नसतो. पण तेवढे हुशार होण्यासाठी त्याला वांगी कापण्याचे "कर्तृत्व" करावेच लागते. याठिकाणी उद. म्हणून नारळ, आंबा, ग्राहक, नोकर काहीही असू शकते. परंतु कर्तुत्वाने मिळवलेल्या यशाचा कैफ चढून मनुष्य नादान चुका करू शकतो. मी कधीच चुकत नाही आणि चुकणारही नाही हा अहंकार भल्याभल्यांना बुडवतो. मला तरी तसा रोग कधी झाला नाही. तसे असते तर वरचा माझा लेख फक्त इतरांवर चिखलफेक करणारा असता. दुसरे म्हणजे आपण माझ्या दोन वाक्यांचा परस्पर वेगळाच अर्थ घेतला आहे. १. त्यामुळे रिस्क घेणे कमी झाले. त्यामुळे आर्थिक प्रगती खुंटली. >>>रिस्क घेण्याने आर्थिक प्रगती खुंटत नाही >माझे समीकरण सरळ आहे: रिस्क कमी = आर्थिक मोबदला कमी , रिस्क जास्त आर्थिक मोबदला जास्त. रिस्क न घेतल्याने आर्थिक प्रगती खुंटली असे मी म्हटले आहे. रिस्क घेण्याने आर्थिक प्रगती खुंटली असे नाही. २. हे म्हणजे सगळे सिग्नल हिरवे असतील तरच मी गाडी चालवणार. >>>सिग्नल लाल असताना गाडी दामटणं हे जितकं कायद्याला धरून गैर आहे तितकेच नितिमत्तेला धरून गैर आहे आणि अपघातांना आपणच आमंत्रण देण्यासारखे आहे. >तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. रेड सिग्नल असतानी गाडी चालवावी असा त्याचा अर्थ नाही. अपघात होणार नसेल तरच मी गाडी चालवणार अश्या अर्थाचे ते वाक्य आहे. माझाच त्या वाक्यावर प्रतिवाद आहे कि आयुष्य हे कधीच शेवटच्या क्षणापर्यंत प्लान करता येत नाही. कधी थांबावे लागेल, कधी पळावे लागेल हि कुणीही आधीच जाहीर करू शकत नाही. गाडी बाहेर काढल्यावर अमुक एका चौकात सिग्नल हिरवाच असेल असे कुणीही सांगू शकत नाही. म्हणजे मला कुठेही अडथळा असेल तर मी गाडी काढणारच नाही असे होत नाही. फारतर कुठे कुठे सिग्नल आहेत त्याचा विचार प्रवास चालू करायचा आधी करू शकतो. म्हणजेच व्यवहारात धोके असणारच म्हणून ते करायचेच नाही असे अजिबात नाही. पण तुम्ही म्हटल्या प्रमाणे कान, डोळे, मेंदू उघडा ठेऊन सगळीकडे बघावे लागते. ते शंभर टक्के खरे आहे. सगळी काळजी घेऊन कुणीतरी येउन तुम्हाला ठोकतोच तेव्हा ते "नशीब". म्हणून गाडी घरातून काढली हाच माझा मूर्खपणा असे कुणी म्हणत नाही. बाकी आपल्या अमुल्य मार्गदर्शनाबद्दल खरच आभारी आहे. कुठे गल्लत होत असेल तर जरूर सांगा. तुमचा हक्क आहे.

In reply to by संदीप डांगे

संदिप डांगे, माझ्या प्रतिसादातील दुसर्‍याच वाक्यात मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. ते वाक्य म्हणजे, मला माझ्या अनुभवावरून वाटते त्या नुसार तुमच्या अनुभवांच विश्लेषण मी खालील प्रमाणे करीनः हा 'इगो'चा अनुभवही मी घेतला आहे. तोच माझ्या प्रतिसादात मी मांडला आहे. आपण अपयशाचं विश्लेषण करतो पण यशाचं कधी करीत नाही. ते आपल्या हुशारीनेच मिळाले असे आपण गृहीत धरतो. मीही सुरुवातीला हिच चुक केली होती पण स्वतःच्याच यशापयशाचं मुल्यमापन करताना माझी चुक माझ्या लक्षात आली की सुरुवातीच्या यशात माझे श्रेय विशेष नव्हते पण ते माझ्या हुशारीनेच मिळाले होते असा 'इगो' माझ्यात निर्माण होऊन पुढे जरा सेट बॅक बसला होता. (माझी ४ उपहारगृह नुकसान होऊन बसली.) यशाचं मुल्यमापनही करणं गरजेचं असतं. असो. तुमच्या बाबतीत तसे झाले नसेल तर आनंदच आहे. >>>>त्यामुळेच मिळणाऱ्या यशात किंवा अपयशात नशीब किती आणि कर्तुत्व किती याचा तुलनात्मक अभ्यास कसा करणार? मी १९९० साली मस्कत मध्ये पावभाजी, बटाटेवडे, वडापाव वगैरे पदार्थ विक्रीसाठी कॅफेटेरिया सुरु केला. सुरुवातीच्या ४ महिन्यात गिर्‍हाईकांचा ओघ वाढला. गुजराथी मुख्य गिर्‍हाईके. तेंव्हा माझ्या कॅफेटेरीयात इथल्या स्थानिकांसाठी चिकन, अंड्याचे सँडविच, बर्गर हे सुद्धा होते. स्थानिक आणि गुजराथी, मराठी सर्व गिर्‍हाईकांना संतुष्ट करून व्यवसाय भरभराटीस न्यायचा माझा विचार होता. व्यवसायाचा अनुभव शून्य होता. सुरुवातीला भरमसाठ गिर्‍हाईके आली. ह्याला मी माझी हुशारी समजत होतो. पण त्यात नशिबाचा भाग होता. इथे तेंव्हा पावभाजी, वडापाव इत्यादी विकणारी उपहारगृह नव्हती. मी मार्केटचा तसा अभ्यासही केला नव्हता. पण परिस्थिती अशी होती की कोणीही तेंव्हा असा कॅफेटेरीया सुरु केला असता तर यशस्वी झाला असता. कारण त्या काळी ती त्या मार्केटची गरज होती. माझी हुशारी नाही. हा झाला नशिबाचा भाग. मला गुजराथी भाषा येते. त्यामुळे येण्यार्‍या गुजराथी गिर्‍हाईकांशी मी गुजराथीत बोलायचो, मराठी गिर्‍हाईकांशी मराठीत बोलायचो, अरबी गिर्‍हाईकांशी अरबी भाषेत बोलायचो, दक्षिण भारतियांशी हिन्दी आणि इंग्रजीत बोलायचो. बहुसंख्य गिर्‍हाईके ही गुजराथी आणि मद्रासी होती जी शुद्ध शाकाहारी होती. त्यांच्याशी संभाषणातून त्यांचा माझ्या कॅफेटेरियातील मांसाहारी पदार्थ विक्री बद्दल असलेला रोष माझ्या लक्षात आला. आणि मी तडकाफडकी मांसाहारी पदार्थ बंद करून टाकले. कारण एक तर मांसाहाराचा आग्रही समाज हा अरबी होता आणि टक्केवारीत फार कमी होता. कुठल्याही उपहारगृहात हिन्दी आणि अरबी गिर्‍हाईके एकत्र कमीच दिसतात. (त्या काळच्या गोष्टी आहेत ह्या, १९९०) मांसाहारी गिर्‍हाईकांसाठी मी माझा मोठा शाकाहारी वर्ग हातचा सोडू इच्छित नव्हतो. त्यामुळे तो निर्णय निरिक्षणातून, मार्केटचा अभ्यास करून आणि गिर्‍हाईकांशी संभाषण करून मिळविलेल्या माहितीवर होता. ती माझी हुशारी होती (असं मी मानतो) त्यात नशिबाचा भाग नव्हता. मांसाहारी पदार्थ बंद केल्यावर रोजच्या गिर्‍हाईकांने तो विषय काढला किंवा नाही काढला तरी मी आवर्जून 'मांसाहारी पदार्थ बंद केले आहेत आणि आता हा कॅफेटेरिया शुद्ध शाकाहारी आहे' असे सांगायचो. ती माझी जाहिरातबाजी होती ज्याचा गुजराथी आणि मद्रासी गिर्‍हाईके वाढण्यात मला फायदा झाला. मराठी लोकांना (शाकाहारी वर्ग सोडल्यास) विशेष आक्षेप नव्हता पण त्यांनाही कॅफेटेरियाचे बदललेले रुप आवडले आणि एक 'उत्कृष्ट शाकाहारी उपहारगृह' अशी माझ्या कॅफेटेरियाची ओळख वाढत गेली. सोबत धंदा. हा परिणाम मी माझ्या तथाकथित हुशारीने घडविला होता. इथे हुशारीमुळे आपण कुठलेही उपहारगृह नफ्यात आणू शकतो असा माझ्या मनात अहंगड (इगो) निर्माण झाला आणि ह्या नंतरची ४ उपहारगृहे रांगेत खाली बसली. आत्मपरिक्षण केले. मार्केटचा अभ्यास वाढविला. आणि एकुलत्या एक उपहारगृहावर (जे यशस्वी होते) लक्ष केंद्रित केले. इथे-तिथे उड्यामारण्यापेक्षा आहे तो धंदा सांभाळणे/वाढविणे ह्यावर भर दिला. कित्येक वर्षे नविन उपहारगृहात हात घातला नाही. ह्या देशाची खाली गेलेली इकॉनॉमी (अपयशाच्या अनेक कारणातील एक कारण) हळू हळू सावरली गेली पुन्हा भारतियांची ह्या देशात वर्दळ वाढली आणि दुसर्‍या कॅफेटेरियाची गरज निर्माण झाली. ती ओळखून मी दूसरे उपहारगृह सुरु केले तेही चांगले चालले आहे. हा झाला नशिब आणि हुशारीतील फरक, अहंगंडाचा परिणाम आणि धंद्यात सावरण्यासाठी डोळे, कान आणि मन उघडे ठेवून टाकलेली पाऊले. >>>>रिस्क न घेतल्याने आर्थिक प्रगती खुंटली असे मी म्हटले आहे. रिस्क घेण्याने आर्थिक प्रगती खुंटली असे नाही. ती माझी टंकनचुक होती. मलाही तेच म्हणायचे होते 'रिस्क घेण्याने आर्थिक प्रगती खुंटली नाही' आंधळ्या जोखिमीने नुकसान होऊ शकतं. तुम्ही दिलेलं सिग्नलचं उदाहरण चुकीचं आहे त्यामुळे पुढचा माझा प्रतिसाद गंडल्यासारखा तुम्हाला भासतो आहे. गाडीचा प्रवास फक्त सिग्नलाच खुंटतो असे नाही तर रहदारीत अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कधी कुठे अचानक कोणी मधे येतं (आपल्याला ब्रेक मारावा लागतो), कुठे सिग्नल लाल असतो (थांबावं लागतं), कुठे ट्रॅफिक जॅम असतो (रहदारी संथ गतीने जात असते) धंद्याचेही असेच असते कधी धंदा जोरात असतो (मोकळा रस्ता) कधी मधे कोणी कडमडतो (धंदा कमी होण्याची कांही तात्कालीक कारणं) तर कधी नुकसान नाही पण धंदा मंदीत असतो (जसा इथला रमझानचा महिना, शाळांच्या सुट्यांमुळे भारतियांचे स्वदेशी सुट्टीवर प्रयाण वगैरे) ह्या सर्व अडचणींमधून पार पडताना नितीमत्ता, कायदेशीर बाजू सोडायच्या नाहीत जास्त नफ्यासाठी चुकीची रिस्क घ्यायची नाही, नाहीतर मोठे नुकसान, आर्थिक सेट बॅक अशा 'अपघातांना' आपणच आमंत्रण दिल्यासारखे होते. माझे आणि तुमचे अनुभव वेगवेगळे असू शकतात. पण एकंदरीत धंद्यात वापरायची सावधगिती बहुतेक सर्व धंद्यात सारखीच असते. तुम्हाला मी धंदा 'शिकवत' नाहीये फक्त आंधळी जोखिम घेऊ नका, अपयशा प्रमाणेच यशाचेही विश्लेषण करा आणि स्वतःबद्दल चुकीच्या धारणा न बाळगता (म्हणजे तुम्ही बाळगता आहात असे मला म्हणायचे नाहिए.) प्रगती करा. यशस्वी व्हाल.

In reply to by प्रभाकर पेठकर

संदीप डांगे 22/09/2014 - 02:39
खरच पटले. बाकी काही खाजगी गोष्टी चव्हाट्यावर आल्यावर जरा समज गैरसमज होणारच. (जसे आम्हा बाप-लेकाचे नाते व इतर अनेक गोष्टी.) पण एकदा मिपा ला आपले मानल्यावर मन मोकळ करायचे ठरवल्यावर अस काही होईल याची अपेक्षा होतीच, त्यामुळे दुख: नाही. प्रत्येकाचे आपले एक अनुभवसिद्ध तत्वज्ञान असते. त्या त्या अनुभवातून तावून सुलाखून ते मिळालेले असते. त्याचा यथायोग्य आदर आहेच. तुमचे अनुभव ऐकून मस्त वाटले. त्यामुळे तुमचे म्हणणे अजूनच पटले.

In reply to by प्रभाकर पेठकर

वरच्या इतका उत्तम व्यवहारी सल्ला मिळणे कठीण आहे. प्रत्येक शब्द लक्षात ठेवण्याजोगा आहे ! यात अजून फक्त थोडीशी भर : १. कुठलाही महत्वाचा निर्णय घेताना (मग तो नोकरीसंबद्धी, व्यवसायासंबद्धी अथवा त्यातल्या एखाद्या महत्वाच्या प्रोजेक्टसंबंद्धी असो) सर्वप्रथम तो निर्णय फसला वाईटात वाईट काय होईल आणि यशस्वी झाला तर काय चांगले होईल याचे सद्यस्थितीवर अवलंबून (स्वप्नाळूपणे नाही) विश्लेषण करायला पाहिजे. याला "वर्स्ट केस - बेस्ट केस सिनॅरिओ" असे नाव आहे. यातला सर्वात महत्वाचा असतो "वाईटात वाईटाचा विचार करणारा वर्स्ट केस सिनॅरिओ"... त्याला पुढे जाण्याची तयारी असली आणि त्यासाठी आवश्यक (मॅन-मनी-मटेरिएल) बंदोबस्त केलेला असला तर एखादे अपयश तुमच्या मनाच्या उभारीवर आणि व्यवसायाच्या दीर्घकालीन प्रगतीवर मोठा परिणाम करू शकणार नाही. वर्स्ट केस - बेस्ट केस सिनॅरिओ तुमच्या प्रोजेक्ट रिपोर्टचा अविभाज्य भाग असल्यास तुम्हाला अर्थसहाय्य पुरवणार्‍या संस्थेला/माणसाला तुमच्याबद्दल जास्त भरवसा वाटेल. २. अर्थसहाय्य बँक अथवा नॉन-बँकींग फिनान्शियल इन्स्टिट्युशन्स मधूनच घ्यावे हे माझे स्वतःचे मत आहे. त्याची काही अगदी साधी कारणे आहेत... अ) अर्थसहाय देण्याअगोदर वरील संस्था प्रोजेक्ट रिपोर्टचा आग्रह धरतील आणि तो संस्थेचे ठोकताळे वापरून संस्थेमधले विशेषज्ञ पडताळून पाहतील... त्यामुळे व्यवसायाच्या सफलतेसाठी अत्यंत आवश्यक असलेला एक पाया आपोआप तयार होईल. (मात्र कर्जासाठी "सोईस्कर प्रोजेक्ट रिपोर्ट बनवणे/बनवून घेणे" धोक्याचे आहे, तेव्हा ते टाळा.) आ) तुम्ही कितीही फायदा कमावलात तरी वरील संस्था केवळ करारात अगोदर लिहीलेले आहे तेवढेच व्याज आकारतात. किंबहुना तुम्ही यशस्वी उद्योजक झालात आणि कर्जाचे हप्ते वेळेवर / वेळेअगोदर दिलेले असले तर पुढचे कर्ज अधिक सुलभतेने आणि अधिक चांगल्या दराने मिळू शकते. भागीदारांच्या अथवा व्यक्तीगत अर्थसहाय्यकाच्या परताव्याच्या अपेक्षा सर्वसामान्यपणे व्यवसायाच्या सफलतेच्या अनेक पटींनी जास्त वाढतात. इ) व्यवसायातला एखादा धक्का बँक जास्त समजूतीने घेईल, कारण व्यवसायातल्या अश्या चढउतारांची माहिती असणे हा बँकिंग व्यवसायाचा भाग असते. भागीदार अथवा व्यक्तीगत अर्थसहाय्यक अशी अपेक्षा ठेवणे सर्वसाधारणपणे महागात पडते... शिवाय ती व्यक्ती नातेवाईकांपैकी असली तर नातेसंबंधातही कडवटपणा येतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

संदीप डांगे 21/09/2014 - 22:32
>>>पैसे दिल्यापासून 'ह्या पुढे मी पैसे देणार नाही' ह्या भूमिकेत शिरण्यापूर्वी होत गेलेला परिस्थिती बदल कळण्यास मार्ग नाही त्यामुळे ह्या परिस्थितीस जबाबदार कोण?, तुम्ही की तुमचे वडिल हे ठरविणे कठीण आहे. मी आधीच म्हटल्या प्रमाणे प्रत्येक घटनेची विस्तृत कारणमीमांसा शक्य नाही, परंतु आपल्या विश्लेषणाचा रोख लक्षात घेता थोडे लिहितोच. यात वडील चूक कि मी असे काहीही नाही. त्यांना प्राप्त परिस्थितीत त्यांनी निर्णय बदलला त्याचा फटका मला बसला एवढेच . मीच त्यांना "हे मी कर्ज म्हणूनच घेत आहे" असे सांगितले. आणि त्याचे बाजारभावाप्रमाणे व्याज हि देणार असे हि काबुल केले होते. त्यामुळे हे पैसे नाही दिले तर चालतील असा काही माझा विचार कधीच नव्हता. त्यामुळेच पैसे देण्यास ते तयार झाले. त्यांच्या मते पार्टनर आहे त्याला तू हिस्सा देशील त्यापेक्षा मला दे. आपला पैसा आपल्याच घरात राहील. मी म्हटले :ओके: माझ्या कर्तृत्वात मला कुणाचेच उपकार नकोत अगदी सख्या बापाचेही. कर्ज घेणे मी निषिद्ध मानत नाही. परत करायची प्रामाणिक इच्छा आणि मनगटात ताकत असेल तरच कर्ज घ्यावीत. जोपर्यंत ते कमवू शकतात तोपर्यंत त्यांना माझा आधार नको आहे. परंतु पुढे त्यांच्या व्यवसायात मंदी आली आणि ते असुरक्षित फील करू लागले. म्हणून त्यांनी शब्द फिरवले. (मी दोन लाख आणि बाबांनी एक लाख असे मिळून २००९ मध्ये आम्ही एक घर घेतले त्याची किंमत आज २५ लाख आहे. पण त्या घराचा मी अजिबात विचार करत नाही आणि करणार हि नाही कारण ते आई आणि बाबांसाठी घेतले आहे. आणि ते त्यांच्याच नावावर आहे.)

In reply to by प्रभाकर पेठकर

काळा पहाड 21/09/2014 - 23:09
नकारात्मक घटनेचा आधी विचार करून ठेवावा. 'प्लॅन बी' नेहमी तयार ठेवावा.
प्लान बी हा नॉर्मली वर्स्ट केस सिनारियो नसतो. प्लान फॉर द बेस्ट अ‍ॅन्ड प्रिपेयर फॉर द वर्स्ट या तत्वा नुसार प्लान सी, डी आणि ई सुद्धा हवेत.

विजय_आंग्रे 21/09/2014 - 18:53
प्रभाकर पेठकर सर तुमची संपुर्ण पोस्ट अप्रतिम आहे.
अनुभवासारखा गुरु नाही. फक्त तो आधी शिक्षा करतो आणि नंतर ज्ञान देतो.
__/\__

आनन्दा 21/09/2014 - 18:57
पेठकरकाकांशी सहमत. बाकी एव्हढेच सांगेन, एखाद्या मोठ्या सहकारी बॅंकेकडून कर्ज मिळवता येते का ते पहा. त्यांच्या मॅनेजरला या सार्‍या गोष्टींची कल्पना द्या, तुमच्या कामाचे रेफेरेन्सेस दाखवा, आणि कदाचित तुम्हाला काहीतरी कर्ज मिळेल. सहकारी बँकांचे नियम थोडे वाकवणेबल असतात असे ऐकून आहे, आणि व्याजदर पण थोडे चढे असतात. पण सध्याच्या स्थितीत तुम्हाला ते देखील परवडेल. आणि बाकी इन जनरल, आम्हाला शाळेत एक श्लोक होता, पुस्तकस्था तु या विद्या परहस्तगतं धनं, कार्यकाले समुत्पन्ने न सा विद्या न तद् धनं. आणि कोर्पोरेट भाषेत सांगायचे झाले तर, ही सारे लर्निंग आहे, फक्त अ‍ॅट कॉस्ट.

@ संदीप डांगे, प्रथमतः तुमचे अभिनंदन, कारणे २ १. स्वतःची चूक कबूल करायला धाडस लागते.ते तुम्ही केलेत. २. मिपाची खरी किंमत तुमच्या ह्या धाग्यांमुळे आम्हाला समजली. आणि प्रभाकर दादा, संक्षी, प्यारे१ आणि इ.ए. ह्यांच्या सल्ल्यांमुळे तुम्हाला नक्कीच धैर्य आले असेल.

विजुभाऊ 21/09/2014 - 22:12
पेठकर काकांशी सहमत. सन्दीप्भौ तुमच्या सारख्या अनुभवातून मी देखील थोडाफार गेलो आहे. अशावेळेस सल्ले देणारे भेटतात तसेच विश्वास ठेवून पैसे देणारे सुद्धा भेटतात. हे लोक आपले भले व्हावे असेच इच्छतात. अशा वेळेस घाईघाईने निर्णय न घेता परिस्थीतीकडे थोड्या त्रयस्थ नजरेने बघावे. काहीवेळेस थोड्या वेगळ्या नजरेने पाहिले तर आपल्या चुका काय झाल्या ते कळते तसेच आपल्यात काय चांगले आहे ते देखील समजत. मला वाटते की तुम्ही तुमच्यातील चाम्गल्या गुणांचे अ‍ॅनालिसीस केलेलेच नाहिय्ये. तुम्हाला सहानभुती दाखवणार्‍या लोकांपेक्षा सल्ले देणारांपेक्षा अगदी अनोळखी ज्याना तुमचे बॅग्राऊंड माहीत नाही अशा लोकांशी व्यवहार करून बघा. नाशीक हे एक मोठे शहर आहे तेथे तुम्हाला ओळखणार्‍या लोकाम्पेक्षा न ओळखणारे लोक अनेक पटीने जास्त आहेत. अवांतर : मराठीत "मसाला "नावाचा चित्रपट अशाच एका धडपड्या माणसाच्या कथेवर बेतलेला आहे तो बघा शक्य झाले तर.

कवितानागेश 21/09/2014 - 23:29
खूपच महत्त्वाचे आणि अनुभवी सल्ले मिळत आहेत इथे. कागदपत्रे नीट न ठेवल्यानी आणि धंद्यात स्वतःकडंचच किंवा जवळच्यांकडून घेउन बरंच भांडवल घातल्यानी झालेलं नुकसान अगदी जवळच्या नातेवाईंकाच पाहिलेलं आहे. तुमच्या परिस्थितीची पूर्ण कल्पना येतेय. पण पुन्हा नोकरी बघण्याचं आणि नवीन कौशल्य शिकून घेण्याचं धाडस दाखवून ते पुन्हा सगळी फेडून उभे आहेत. तुम्ही यापुढे सगळ्या प्रकारची काळजी घ्याल आणि यशस्वीही व्हाल याबद्दल खात्री आहे. :)

माहितगार 22/09/2014 - 01:10
संदिप, आपला धागा लेख आणि प्रतिसाद वाचतो आहे. संस्थळाच्या अ‍ॅड्मिनिस्ट्रेटीव्ह जबाबदारीचा भाग म्हणून मिपा संपादकांनी त्यांची जबाबदारी योग्यच पार पाडली. प्रतिसाद बर्‍या पैकी जबाबदारीने येताहेत आणि प्रतिसादांना तुमचा प्रतिसाद सुद्धा चांगला येतो आहे तेव्हा त्या बद्दल अभिनंदनच. चर्चा वाचणार्‍या इतर व्यावसायिकांसाठी म्हणून अडचणींची चर्चा जेवढी लवकर केली तेवढे बरे गूंतागूंत तेवढीच कमी असते. १) इंपल्स (मराठी शब्द ?) आणि विश्वास ठेऊन रिस्क घेण हा उद्योजकतेचा गूण आहे पण सोबतीला इंपल्स मध्ये न अडकणारी, पुन्हा एकदा विचार करून खात्री करून घेण्याचे सांगणारी रिस्क दाखवून देऊ शकणारी व्यक्ती चर्चेसाठी सोबत हवी. २) अंतीम निर्णय आपलेच राहतील एवढ स्वातंत्र्य/अधिकार जतन केलाच पाहीजे पण त्याच वेळी कोणत्याही निगोशिएशन मध्ये आपण स्वतः अंतीम निर्णय घेणारे आहोत हे सांगू नये. इतरांना सांगण्यासाठी एक खरा किंवा इमॅजनरी बॉस नेहमी ठेवावा ( जसे माझ्या डायरेक्टरांना विचारून सांगतो भले डायरेक्टर तुम्ही स्वतःच असा) म्हणजे ऐन निगोशीएशन मध्ये विचारून सांगतो असे म्हणणे आणि अंतीम चर्चा करणे सोपे जाते. (अननुभवी इंपल्सीव लोकांकडून हि डिप्लोमॅटीक स्टेप राहून गेलेली असण्याची आणि नाही तेव्हा गोत्यात जाण्याची शक्यता निर्माण होऊ शकते)
एक ग्राहक खूप काम घेऊन आला. नवीन होता त्यामुळे मला काही अंदाज येत नव्हता. नाशिकचा होता आणि नाशिकच्या घ्रहाकांचा मला काहीच अनुभव नव्हता. भविष्यात भरपूर काम येईल या आशेने( हि आशा त्यानेच लावली) आणि प्रथमदर्शनी त्यात काही चूकही नव्हते... केलेल्या कामाचे पैसे मिळाले, पण ते दिलेल्या वेळेच्या प्रमाणात नव्हते.
३) वर्कींग कॅपिटल बद्दल आधीच्या काही जणांनी प्रतिसादातून मार्गदर्शन केलच आहे पण हि जागा नेमकी खेळत भांडवल जपण्यासाठी लागणार्‍या शिस्तीची असते. किमान जेवढी देणी (जसे ऑफीसचे भाडे कर्मचार्‍यांचे पगार) कॅश मध्ये जायची तेवढा रोखीचा कस्टमरशी रोखीचा व्यवहार झालाच पाहीजे . उधारीच ग्राहक मोठ असल तरी तो मोह बाजूला ठेऊन रोखीचे ग्राहक आधी करावयास हवेत. ४) इन एनी केस तुमचा मॅनपॉवर टर्न ओव्हर व्यावसायिक यशासाठी स्विकार्य स्तराचा नव्हे. मॅन पॉवर टर्न ओव्हर कमी असलेल्या व्यक्तींच्या संपर्कात राहून माणस कशी जपायची हे माहित करून घेतलच पाहीजे, पण त्या पूर्वी माणूस निवडण्या पुर्वीच माणूस पारखण्यासाठी मुलाखतीं घेण्यासाठी अधिक वेळ मोजला पाहीजे. न आवडलेला माणूस पहिल्या ४८ तासात काढून टाकावा जास्तीत जास्त सात दिवस छोट्या व्यावसायिकांनी या पेक्षा अधिक कालापव्यय माणूस काढून टाकताना करू नये. माणूस केव्हाही सोडून जाऊ शकतो किंवा काढावा लागू शकतो या तयारीत आधीच राहून मुलाखती घेऊन काही जणांना पाईप लाईन मध्ये ठेवावयास हवे. ५) कस्टमरशी प्राईस निगोशीएशन आणि पैसे मागण्याची स्किल्स चांगली हवीत तुम्ही चांगल प्राईस निगोशीएट करू शकले नाही आणि पुरेसे पैसे रोखीत मिळवू शकले नाही तरीही तुम्हाला चांगल मॅनपॉवर मिळणार नाही आणि टिकणार नाही. पैसे मागण्याची स्किल किमान पाच वर्षे सेल्सचा अनुभव असलेल्या व्यक्ती कडून घ्यावीत आणि प्राईस निगोशिएशन स्कील हाय व्हॅल्यू प्रिमीयम प्रॉडक्ट सेलींग करणार्‍या व्यक्तींं कडून घ्यावीत. ६) तुम्हाला चांगला डिझायनर मिळाला नाही तरी दुसर्‍या फ्रिलान्स डिझायन्रर्सना शोधून वापरण्याचा पर्याय कितपत उपयूक्त होता माहित नाही पण तो तुमच्या धागा लेखात दिसला नाही. अर्थात हे सर्व सल्ले सर्वसाधारण स्वरूपाचे आहेत, जी गोष्ट स्वतः पाहिली नाही त्याबद्दलचे सल्ले कितपत प्रॅक्टीकल आणि नेमके असतील हे सांगता येत नाही. पण मला प्रथम दर्शनी महत्वाच्या वाटलेल्या गोष्टी टंकल्या एवढेच.

In reply to by माहितगार

संदीप डांगे 22/09/2014 - 02:27
सर्वोत्तम प्रतिसादांपैकी एक. अश्याच मुलभूत आणि नेमक्या सल्ल्याची अपेक्षा होती, ती आपण पूर्ण केलीत. तुम्ही सांगितलेल्या ह्या सर्व बाबी माझ्यासाठी खरच नवीन आणि उद्बोधक आहेत. विशेषत: इमजिनरि बॉस आणि निगोशिअशन स्किल्स कुणाकडून घ्यावीत. अजूनही अश्या मौलिक माहिती किंवा प्रशिक्षणाची काही खबर असल्यास जरूर कळवणे. मी हुशार, मी धंदा करतो म्हणून मला फार कळते, दुसर्यांनी मला काय शिकवू नये असा माझा अजिबात पिंड नाही. स्वतंत्र व्यवसाय सुरु करून मला उणीपुरी ३ वर्षे झाली आहेत. या दरम्यान चांगल्या वाईट अनुभवांनी बरेच शिकवले. तुम्ही सांगितलेले पाचही मुद्दे मला भरपूर मार्गदर्शक आहेत. अजून शिकायची इच्छा आहे. फ्रीलान्स डिझायनर सोबत काम करणे जरा महागात पडते. त्यांच्या अपेक्षा आणि उत्पादकता यात बरीच तफावत असते. म्हणजे कुणी मध्यस्थ असेल तर त्याची बरीच फरफट होते. या प्रकारात माझ्या अनुभवाप्रमाणे कुणीतरी एक म्हणजे ग्राहक किंवा डिझायनर मध्यस्थाच्या जवळचा अथवा खास पाहिजे. जेणेकरून कामाचा दर्जा व मोबदला यांच्यात अविश्वासाने काही गोंधळ होणार नाही. माझे एक दोन जुने मित्र आणि समव्यवसायी ह्यांच्यासोबत व्यवहारात आहे. परंतु फ्रीलान्स आणि डेडीकेटेड स्टाफ यांच्यात आपापले सामर्थ्य व उणीवा असतात. वेळप्रसंग बघून आयुधे वापरावी लागतात. सांप्रत मला असा अनुभव आहे कि माणूस बिझनेसमन असला कि लोकांचा (विशेषत: नोकरदारांचा) त्याच्याकडे बघण्याचा पूर्वग्रहदुषित दृष्टीकोन काहीसा असा असतो. १. चिक्कार पैसे कमावतात २. नोकरांचे शोषण करतात ३. ग्राहकास लुबाडतात ४. पार पोचलेले असतात ५. प्रचंड हुशार आणि धूर्त असतात ६. माणसे ओळखण्यात पटाईत असतात ७. आपले काम दुसर्यांकडून करून घेण्यात वाकबगार असतात ८. "तुम्ही बिझनेस करता म्हणजे तुम्हाला हे (…. )माहितीच पाहिजे… " अश्या अर्थाचे उद्गार. ९. हमखास कर बुडवतात १०. बिझनेस भरपूर पैसा गाठीशी आहे किंवा अवाजवी नफा मिळतो म्हणूनच करतात ११. फक्त आणि फक्त पैश्याकडे बघतात. म्हणजे एकंदर व्यापारी आणि लुटारू यांच्यात फक्त एक फरक तो म्हणजे एक गोड बोलतो दुसरा धारदार बोलतो. हे पण मी स्वत: बिझनेसमन झाल्यावर शिकलो. अर्थात बिझनेसमन होणे हे डॉक्टर किंवा इंजिनिअर होण्यासारखे नसते. मिळाली पदवी कि झाला बिझनेसमन. तोही चुकू शकतो. धंदा करणाराने सदैव जागृत आणि तत्पर राहिले पाहिजे, त्याच्याकडून चूक होऊच नये. तसे होत असेल तर कशाला करतो धंदा? गुमान नोकरी कर आणि शांत बस असे सल्ले येतात. (हे वैयक्तिक अनुभवले आहे. मला नोकरीसाठी तळमळीने मदत देऊ केलेल्या मिपाकरांसाठी हे नाही. त्यांच्या प्रामाणिक तळमळीबद्दल मला कुठलाही पूर्वग्रह नाही.)

In reply to by संदीप डांगे

माहितगार 22/09/2014 - 09:14
उत्कृष्ट दर्जा देणार्‍या स्वतःच्या व्यावसायिक कौशल्या सोबत व्यवसाय मिळवणे (खास करून बर्‍याच महाराष्ट्रीय व्यावसायिकांसाठी ओळखीच्या परिघा बाहेरचा व्यवसाय मिळवण्याकडे दुर्लक्ष होत अथवा किंमत पाडून मिळवण्याचा प्रयत्न होताना दिसतो- जे अ‍ॅप्लिकेबल नसेल ते सोडून द्यावे) आणि विवीध स्टेक होल्डर्सशी व्यावसायिक संबंध टिकवणे ओघाने येतेच. हे एवढ्या साठी नमुद करतो आहे की डिझायनींगची चांगली कला पण केवळ कला असलेल्या इतर व्यक्तीत आणि तुमच्यातला हा फरक समजून घेतला की कौशल्याधारित सुयोग्य मोबदला देऊन माणसे वापरून घेणे सोपे जाते. जो पर्यंत तुम्ही आणि मोबदला घेऊन काम करून देणारा यांचे संबंध चांगले आहेत तो पर्यंत बाकी जग काय म्हणते ते खूप महत्वाचे नाही. प्रचंड हुशार आणि चतूर- हा योग्य शब्द (धूर्त) असतात; . माणसे ओळखण्यात पटाईत असतात, . आपले काम दुसर्यांकडून करून घेण्यात वाकबगार असतात (हाणून पाडण्यासाठी नकारात्मक टोन मधल्या नसतील तर) अशी इमेज पैसे उभे करताना उपयोगीच पडू शकेल असे वाटते. पण तुमचा व्यवसाय हाणून पाडण्यासाठी ग्राहक सोडून कुणी कॉमेंट मारत असेल तर त्याला तुमचा नकारात्मक स्वभाव असलेला स्पर्धक गृहीत धरा. तुमच्या स्टेक होल्डर समोर तुम्ही केलेल्या दहा सकारात्मक गोष्टी स्पर्धकाच्या वाक्यांचा उल्लेख न करता दाखवून द्या. नोकरांचे शोषण करतात, ग्राहकास लुबाडतात, अशी इमेज मात्र निर्माण होणार नाही याची अधिकाधीक दक्षता घेतलेली व्यवसायाच्या यशाच्या दृष्टीने चांगली. बाकीच्या आणि बाकीच्यांच्या कमेंटांकडे दुर्लक्ष करणे चांगले, व्यवसाय यशस्वी झाल्या नंतर तिच मंडळी आपापली कामे करून घेण्यासाठी बदलतील. चांगल्या दर्जा, सेवेच सातत्य आणि ग्राहक समाधानाच्या आधारावर इतर स्पर्धकांपेक्षा ५ टक्के ते ३० टक्के प्रिमियमवर सेल करूनही ग्राहक टिकवणे वाढवणे जमले पाहीजे. आणि ह्यात बहुधा सेवा उद्योगाचं मर्म असाव (चुभूदेघे)

In reply to by माहितगार

>>>>चांगल्या दर्जा, सेवेच सातत्य आणि ग्राहक समाधानाच्या आधारावर इतर स्पर्धकांपेक्षा ५ टक्के ते ३० टक्के प्रिमियमवर सेल करूनही ग्राहक टिकवणे वाढवणे जमले पाहीजे. आणि ह्यात बहुधा सेवा उद्योगाचं मर्म असाव लाख मोलाचं विधान. ह्याच पायाभूत विचारांवर विश्वास ठेवून, २४ वर्षे सेवाउद्योगात टिकून आहे.

इनिगोय 22/09/2014 - 06:45
हे लिहून काढत आहात हे अतिशय उत्तम. यातून तुम्ही (खरंतर कोणत्याही उद्योजकाने) काय टाळायला हवं आणि कोणती खबरदारी घ्यायला हवी या सगळ्याचं डॉक्युमेंटेशन होतं आहे. पेठकरकाका, इस्पिकचा एक्का आणि इतरही काही प्रतिसाद खूप मुद्देसूद आहेत. माझ्याकडून एक लहानशी सुचवणी.. रश्मी बन्सल यांचं 'कनेक्ट द डॉटस्' हे पुस्तक मिळवून वाचा. कोणत्याही औपचारिक शिक्षणाविना स्वतःचा व्यवसाय यशस्वीपणे केलेल्या २० उद्योजकांबद्दल लिहिलेले लेख आहेत. त्यातूनही तुमच्या उपयोगाचे बरेच काही मिळेल, हे नक्की. उदा. वर उल्लेख केल्याप्रमाणे स्वतःच्या, नातेवाईकांच्या कमाईचे सारे पैसे व्यवसायात न गुंतवता बँकेकडून कर्ज घेतल्याने नेमके काय साध्य होते, त्यासाठीचे डॉक्युमेंटेशन कसे करावे, इ. आपल्याच सारख्या परिस्थितीतून वाटचाल केलेल्यांचे अनुभव वाचल्याने दृष्टीकोनात खूपच सकारात्मक बदल घडून येऊ शकतो. बाकी व्यक्तिगत निरोप धाडला आहे, तो पाहा.

विलासराव 22/09/2014 - 11:33
औपचारिक शिक्षणाविना स्वतःचा व्यवसाय यशस्वीपणे केलेल्या २० उद्योजकांबद्दल लिहिलेले लेख आहेत. माझं नाव आहे का हो त्यात. मी बीई ईलेक्ट्रॉनीक्स झालो १९९४ मधे. नंतर मुंबईला आलो. ९ वर्षे नोकरी केली सर्व्हीस ईंजीनीयर म्हनुन. २००३ ला नोकरी सोडली तेव्हा कर्जबाजारी झालो होतो. मग नोकरीत कर्ज फिटणे अशक्यप्राय झाल्याने व्यवसाय सुरु केला. घर भाडयाचे, डोक्यावर कर्ज आनी दारात देणेकरी अशात माझा व्यवसाय सुरु झाला. घरच्यांनी तर लांब रहाणेच पसंद केले कारण त्यांना वाटले याची सटकली. कारण आमच्या खाणदाणीत व्यवसायात पाउल टाकणारा मी बहुधा पहीलाच. आता नवीन व्यवसाय असल्याने लगेच रोज काम नसायचे. मग मी पुस्तक वाचत दिवस दिवस घरीच पडीक असायचो. घरातले सगळे यावर आपापसात चिंता व्यक्त करायचे. लवकरच मला पहीली ऑर्डर मिळाली. त्याची माझी खरेदी होती ५००० रुपये. विकायचे होते ७००० रुपयांना. यात २००० मार्जीन होते खरे पण १ वर्ष सर्व्हीसही होती. घरातुनच अर्थात मदत मिळाली नाही. बरेच प्रयास करावे लागले त्या पाच हजारासाठी. पण त्याच पार्टीने काम वेळेत करुनही पेमेंट चार महीने लटकवले. मग त्या पाच हजार दिलेल्या लोकांनी आधीच पत नसलेल्या मला काळ्या यादीतच टाकले. मग सगळ्या मित्रमंडळात खबर गेली. सगळे रस्ते जवळपास बंद. मग मी नवीन ऑर्डर मिळवण्याचे प्रतत्न कमी करुन मेंटेनन्स कॉण्ट्रॅक्ट किंवा कॉलबेसीसवर ब्रेक्डाउन कॉल्सला जोर लावला.थोडेसे पैसे जमा झाल्यावर हळूहळू विक्री परत चालु केली. पण खास वाढ होत नव्ह्ती. प्रयत्न तर अथक चालु होते.मी सकाळी स्वैपाक करुन डबा बरोबर घेउन ६ वाजता अंबरनाथवरुन घर सोडायचा ते व्हीटीला माझ्या ऑफीसला यायचो. मग रात्री ११ ची शेवटची फास्ट लोकल पकडायची तेव्हा घरात पोहोचायला पाउन वाजायचा. असो. एवढं करुन पोटपाणी चालत होते पण कर्जदारांचे काय? मला आधार(सहानुभुती) फक्त माझ्या व्यसनाची होती. फक्त बारमधे न जाता मी घरीच पण नियमीत घ्यायचो फक्त रात्री. मग मला एक अभिनव उपाय सुचला. मागाल ते मीळेल वाला. मग मी रोज सकाली त्या अज्ञात शक्तीची तळमळीणे करुणा भाकायला लागलो की मला स्वतःसाठी काय नको पण मला ते देणेकरी दारात नकोत बाबा. आनी कुठल्याही परिस्थीतीत मला बेईमानी करण्याची वेळ येउ देउ नकोस म्हणुन. त्याआधी मी कधीही कोणाकडेही प्रार्थना केलेली नव्ह्ती. कारण हेच लाथ मारेण तिथे पानी काढेण,पण निघत नव्ह्तंना. मग मी हळुच प्रार्थनेत एक ओळ वाढवली की जर मला देणेकरी मिटवुन माझ्याकडे १० लाख आले तर मी कायमची निव्रुत्ती घेईल म्हणौन. आनी साधारनपणे ८-९ महीन्यांनी माझी माझ्या मेहुण्यांच्या ओळखीने एका आयटीआयच्या अधीकार्याशी ओळख झाली. त्यांनी माझी कहानी ऐकुन मला मदत केली. संपुर्ण महाराष्ट्राच्या आयटीआयचे काम मला मिळाले तेही स्वतःचा पैसा न लावता. पैसा कंपनीचा ओळख माझी आनी सर्व्हीसही कंपनीची. मग तीनच वर्षात मला १६ लाख त्यातुन मिळाले. चार लाख कर्जदारांचे दिले. १० लाख शेअरबाजारात लावले. दोन लाख पिणे -खाणे आनी भटकंती यात लावुन भारतभर फिरलो. बरेच आश्रमही पालथे घातले. मी ३५ व्या वर्षी रिटायर झालो. माझा मॅनेजर होता माझा चुलतभाउ जो आठवी पास आहे तीही गावची. त्याच्या गळ्यात व्यवसाय घातला, अट एकच संध्याकाळी प्यायला अन मटन-मच्छी खायला पाहीजे मला बस्स. बाकी तुझे. त्याने बेट्याने जोमाने धंदा वाढवला, आज तीनचार घरे आहेत, पैसा गाठीशी आहे, मार्केटला पत आहे, नातेवाई॑कात(दाखवण्याची का होईना) इज्ज्त आहे. नंतर मी विपश्यनेला गेलो. दारु आनी अभक्ष भक्षण ही बंद झाले. आनी आता वेगळ्याच मारगावर स्थिर झालो जो कधीही मी अनुसरेल असे मला कधीच वाटले नव्हते. यात मी लग्न केले नव्हते ही बर्याच जनांना जमेची बाजु वाटते पण त्यापेक्षा मला माझ्या घरच्यांची अनेकपटींनी जबाबदारी होती, आजही आहे. आमच्या घरात आजही मीच न कमावताही कमावता आहे, आईला पेंन्शन आहे. माझा भाउ आजही काहीच कमावत नाही त्यामुळे आईची पेंशन त्याला मिळते व आइला पेंशन मला द्यावी लागते. पण आजही मला असे वातत नाही की मी यांना पोसतो. ते त्यांच्या कर्माचे फळ आहे.असो. प्रयन्त न सोडता प्रार्थना करौन पहा कोणीही हा अनुभव घ्यावा. कुणाला वाटेल ही अंधश्रद्धा आहे पण नाही होते काय. खरोखर निर्मळ( हे मनाने हे आपले आपल्याला चांगले समजते. आनी अहंकार बराच कमी झाल्याशिवाय मन नर्मळ होत नाही हे ध्यानात च्या) मनाने प्रार्थना केल्यावर होते काय की. तुम्ही त्या वेवज जगामधे प्रक्षेपीत करता, आनी त्याच्याशी जुळणारे लोक हळुहलू तुमच्या संपर्कात येतात किंवा तुम्ही त्यांच्या संपर्कात येता. मनुश्याला मनुश्य म्हणतात कारण वो अपने ही मानस(मनोव्यापार) का पुत्र/संतान है. हा सगळा माझा अनुभव आहे. जे वाइट वागले त्यांच्याबद्दलही सद्भावना बाळगा. आपले मन कुठल्याही परिस्थीतीत दुषीत होउ देउ नका. जे पटेल ते घ्या ,न पटलेले अर्थातच माझ्याकडेच राहील.

डॉ. गोल्डरॅट म्हणतो की बर्‍याच वेळा आपण निर्णय घेतो व त्यानंतर तो चुकला की पश्चत्ताप करत बसतो. निर्णय घ्यायची प्रक्रिया ही आपण जी गृहितके जमेस धरतो त्यावर बरीच अवलंबून असते. निर्णय घेण्या अगोदर जर ही गृहितके (Assumptions) नीट तपासली तर आपले निर्णय चुकिची ठरण्याची शक्यता बरीच कमी होते. या थॉट प्रोसेसवर त्याची पुस्तकेही उपलब्ध आहेत. सगळ्याचे मूळ हे आपल्या विचार करण्याच्या पद्धतीत असल्यामुळे ते अत्यंत महत्वाचे ठरते. कधी कधी हे का ते असेही प्रसंग उदभवतात त्यावेळी तर त्याची थेअरी अत्यंत उपयोगी पडते....असो...आपल्याला पुढील वाटचालीसाठे शुभेच्छा...खात्री आहे आपण अजून एका वर्षात मी या परिस्थितीवर कशी मात केली यावर उद्भोदक लेख लिहाल.....

संदीप डांगे 22/09/2014 - 16:41
सगळ्या घटनांचा सुसूत्र विचार करत होतो, तेंव्हा लिहावेसे वाटले, पहिल्या भागातच भूतकाळ संपला आहे. त्यावर काथ्याकुट करणे म्हणजे वेळेचा आणि बुद्धीचा अपव्यय आहे. त्याचबरोबर घटनेकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोन बदलणे हे अशक्य आणि अनावश्यकही आहे. इथून पुढे नेमके काय करत आहे आणि नेमक्या काय मदतीची अपेक्षा आहे ह्या बद्दल लिहिणार आहे. पहिल्या भागावर प्रतिक्रिया थांबवता येतील असे काही करता येईल का? कारण त्या भागावर मला चर्चेची आवश्यकता वाटत नाही. घडून गेलेल्या घटनांचा उहापोह काहीच उपयोगाचा नाही. मी फार तटस्थपणे मांडण्याचा प्रयत्न केला पण चिरफाड होण्यामध्ये तो तटस्थपणा राहणार नाही. चिरफाड होईल अशी अटकळ होतीच. घटनेचे गांभीर्य त्यातले बारीकसारीक तपशील कळले कि कमी होतेच. साधारणपणे परिस्थितीने गांजलेला माणूस आणि स्वताच्या चुकांनी गांजलेला माणूस ह्या दोहोंकडे बघण्याचा दृष्टीकोन एकदम वेगवेगळा होतोच. त्यामुळेच पहिल्या भागावर काही प्रतिसाद दयायचे मी स्वत: थांबवले आहे. आता हातात असलेली कामे करत आहे. भविष्यात काय करेन ह्याचा पूर्ण विचार झाल्यावरच पुढचा भाग लिहिणार आहे. ३ भागात हि मालिका संपणार आहे. तसही माझी कर्मकहाणी चावडीवरची चर्चा व्हावी अशी इच्छा नाही. कुठेतरी जबाबदार ठिकाणी या माझ्या भावनांची नोंद व्हावी अशी अपेक्षा मिपावरच टाकण्यामागे होती

In reply to by संदीप डांगे

एस 22/09/2014 - 17:45
तुमच्या भावनेशी सहमत आहे. संमंने पहिला आणि हाही धागा वाचनमात्र केल्यास पुढील भागांवरील फोकस कायम राहील आणि उगाच जास्त चर्वितचर्वण टळेल असे मलाही वाटते. आत्तापर्यंत झालेली चर्चा समर्पक असली तरी झाली तेवढी पुरेशी आहे.

सस्नेह 22/09/2014 - 17:35
तटस्थ शब्दात उघड व्यक्त केल्याबद्दल संदीप भाऊंचे अभिनंदन !

संदीप, आपण अगदी मनमोकळ्या शब्दात तुमची परिस्थिती जशीच्या तशी मांडल्याने अक्षरशः अंगावर काटा आला. आपल्या झालेल्या चुका मोठ्या मनाने मान्य करणे, इतरांसमोर मांडणे ह्याला खूप धैर्य लागते. पुढील भाग लवकर वाचायला मिळावा.

धन्या 21/09/2014 - 15:44
तुमच्या त्या धाग्यावर मी काही लिहिले नाही. कारण अशा प्रसंगात काय बोलायचे, काय निर्णय घ्यायचे हे मलाही कळत नाही. बाकी मिपाकरांनी तुम्हाला चांगले सल्ले दिले. त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे तुम्हाला याक्षणी आवश्यक असणारा भावनिक आधार दिला. मनात असाही प्रश्न उभा राहीला होता की संदीपनी हे सारे मिपावर सांगणे म्हणजे चौकात उभे राहून बोलण्यासारखे नाही का. मात्र असा आधार मिळवणे ही तुमची आताची गरज आहे. त्या धाग्यावर काहींनी समुपदेशकाकडे जाण्याचा सल्ला दिला होता. त्याचाही तुम्ही विचार करावा. ते लोक अशा प्रसंगांमध्ये काय बोलावं याविषयी प्रशिक्षित असतात. अशाच नसल्या तरी अंतिम निष्कर्ष असाच निघणार्‍या अशा दहा प्रकारच्या परिस्थीतीतून जाणार्‍या लोकांना त्यांना धीर दिलेला असतो. असो. तुमचा हा लेख वाचणार्‍या प्रत्येकाला काही ना काही या लेखातून शिकण्यासारखं आहे. पुढच्यास ठेच मागचा शहाणा म्हणतात. तसा हा तुमचा लेख अनेकांना मार्गदर्शक ठरेल.

फक्त एकच गोष्ट माणसाला सार्‍या आयुष्यात आणि कोणत्याही प्रसंगात तारु शकते ती म्हणजे प्रामाणिकपणा! जर तुम्ही कुणाला फसवलं नसेल तर दैवाचे फासे कसेही पडोत, त्याचा दोष आपल्याला लागत नाही. मग आत्महत्त्येचा विचारच मनला शिवत नाही कारण आपण स्वतःशी एकनिष्ठ असतो. असा एकसंध माणूस स्वतःला कशाला संपवेल? फक्त एकच गोष्ट सांगतो, पैसा माझा व्यावसाय आहे आणि जितके कफल्लक मी पाहिलेत त्यांची एकच कहाणी आहे, त्यांना मोह नडलायं. कुणावर कधी काय प्रसंग येईल (जसा तुझ्या पत्नीचा placenta previa, किंवा अपघात), आणि काय आपत्ती ओढवेल ते सांगता येत नाही. पण जबरदस्त आर्थिक फटका बसण्याचं नेमकं कारण मोह हेच आहे. असो, तुझा बायोडेटा माझ्या पर्सनल मेल आयडीवर पाठव, नाशिकला माझा एक प्रथितयश मित्र आहे त्याच्याशी बोलतो. त्यानं जर मनावर घेतलं तर तो तुझं आयुष्य बदलून टाकेल.

पाषाणभेद 21/09/2014 - 16:13
३. लग्नाचे प्रमाणपत्र नाही म्हणून कुटुंबाचा वैद्यकीय विमा नाही हे कळाले नाही. माझ्या मते जॉईंट विमा पॉलीसी किंवा मेडीक्लेमलाही असला प्रश्न उपस्थीत होत नाही. बाकी आपल्या पुढील आयुष्याला शुभेच्छा.

In reply to by संदीप डांगे

पाषाणभेद 21/09/2014 - 17:44
भाऊ जॉईंट विमा पॉलीसी (हजबंड अँन्ड वाईफ) किंवा मेडीक्लेमलाही (पुर्ण कुटूंब) यासाठी मॅरीज सर्टीफीकीट लागत नाही. पॅन कार्ड चालते. फक्त जॉईंट विमा पॉलीसी काढतांना सौ.चे माहेरचे डिटेल्स द्यावे लागतात. (म्या पन नाशकात र्‍हातो. आयटी आन बाकीच्या सगळ्याच क्षेत्रात नाशकात चांगला नोकरवर्ग मिळू शकतो. आपल्याला चांगला नोकर मिळू शकले नाहीत हा दुर्दैवाचा भाग असावा. आपल्या लिखाणात तसा उल्लेख आल्याने इतरांचा नाशिकमधील नोकरवर्गाबाबात गैरसमज होवू नये म्हणून असे लिहीत आहे. नाशिकमधील नोकरवर्गाबाबत इतर शहरवासीयांनी गैरसमज करू नये. उडदामाजी काळेगोरे सगळीकडेच असतात. नाशिकबाबात दुराग्रह बाळगू नये. जय नाशिक.)

In reply to by पाषाणभेद

संदीप डांगे 21/09/2014 - 18:39
मला वाटतं नाशिककर नोकरदारांना मी कुठेही जनरलाइज केलेलं नाही. संपूर्ण परिच्छेद पुन्हा वाचावा. माझ्या अपेक्षा ते पूर्ण करू शकले नाहीत एवढेच म्हटले आहे. आता यात किती तरी अर्थ निघू शकतात जसे कि माझ्या अपेक्षाच अवास्तव होत्या. घाई घाई मध्ये मुलाखती नीट झाल्या नसतील, त्यांना मला नक्की काय हवे हे समजले नसेल, मुंबई नाशिक च्या संस्कृतीत मुलभूत फरक तो आहेच, निदान मला तरी जाणवला. नाशिककर नोकरदारांना सरसकट दोषी अजिबात धरलेले नाही. मुळात नाशिक ला शिफ्ट होण्याचा व ऑफिस सुरु करण्याचा निर्णय घेण्यामागे हि तुम्ही सांगितलेली आणि ऐकून असलेली कीर्ती होती. नशिबाचे फासे उलटे पडले त्यात कोण काय करणार?

संदीपभाऊ तुम्हाला तुमच्या प्रामाणिक पणाबद्दल अनेक सलाम.! हे सर्व वाचल्यावर एक गोष्ट मात्र कळुन आली. तुम्हाला काम मिळते आहे आणि तुमची कामे करण्याची क्षमता अजुनही अबाधित आहे + मार्केटमध्ये तुम्ही करत असलेल्या कामाला मागणी आहे आणि हीच फार महत्वाची गोष्ट आहे. विचार करा जे स्किलसेट तुमच्याकडे आहेत त्यांचीच जर मार्केटमध्ये आवश्यकता उरली नसती तर आलेला प्रसंग हा फार भयानक असला असता.थोडक्यात एका दिवसातच तुम्ही Obsolete होऊ शकला असता.एकुण परिस्थितीला असलेली ही एक चंदेरी किनारच आहे. ह्या गोष्टीवर विचार अवश्य करावा.

पैसा 21/09/2014 - 17:45
प्रांजळपणे तुमची आत्मकथा इथे शेअर केल्याबद्दल अभिनंदन तसेच धन्यवाद! संपादक मंदळाने इशारा दिला त्याला पूर्वीचे काही अनुभव कारण आहेत. तुमची हकीकत खरी असली तरी मिपाच्या माध्यमातून कोणतेही आर्थिक व्यवहार होऊ नयेत हीच अधिकृत भूमिका आहे त्यामुळे असा इशारा देणे भाग होते. इथे अनेकांनी तुम्हाला नोकरीसाठी हात देऊ केला आहे. त्याबद्दलही लवकर निर्णय घ्या. स्वतःच्या चुका तुम्हाला कळत आहेत, याचाच अर्थ त्यांचे पुनरावृत्ती होण्याची शक्यता कमी दिसते. २/३ वेळा तुम्ही थोडीफार माघार घेऊन परत जम बसवला आहे असं दिसतं. जरी धंदाच नेटाने करायचा असेल तरी सध्या घर, सोनेनाणे, धंद्यासाठी आवश्यक मशिनरी फर्निचर जे काही असेल ते, यावर तारण कर्ज कोणत्याही बँकेकडून मिळू शकेल. धंद्यासाठी भांडवली आणि चालू असे दोन प्रकारचे खर्च असतात, त्यासाठी दीर्घ मुदतीची कर्ज आणि कॅश क्रेडिट असे २ प्रकारची कर्ज आवश्यक असतात. पैकी दीर्घ मुदतीचे कर्ज हे दर महिना थोडे थोडे करून भराय्चे असाते. तर कॅश क्रेडिट रोजच्या खर्चासाठी लागते. मात्र तुम्ही ओणत्याही बँकेचे कर्ज न घेता सगळी खाजगी कर्जं घेतलीत, (अर्थात इन्कम टॅक्स रिटर्न भरले नव्हते हे कारण आहे) त्यामुळेच आजची परिस्थिती आली आहे. आता आधीची रिटर्न्स भरायला गेलात तर बहुधा टॅक्स्+दंड भरावा लागेल. पण रिटर्न्स भरत नाही तोपर्यंत बँक कर्ज मिळणे अशक्य आहे. महिना एक लाख उत्पन्न असताना रिटर्न्स भरणे आवश्यक होते असे वाटते. निदान यापुढे तरी हिशेब व्यवस्थित ठेवत जा ही विनंती. आणि हे कर्ज आज ना उद्या फिटेलच, पण यापुढे अशी खाजगी कर्जे अगदी जवळच्या नातेवाईकांचीही घेऊ नका. आत्ता या क्षणी पत्नीचे दागिने, गाडी जे असेल ते डिस्पोज ऑफ करून बर्‍याच कर्जातून मोकळे होता येईल असे वाटते. तुम्ही एवढे प्रांजलपणे लिहिले आहे म्हणूनच हे सर्व लिहीत आहे. तुम्हाला दुखवायचा हेतू नाही. तुमच्या हातात कला आहे, तर या परिस्थितीतून नक्की बाहेर पडाल.

तुमचे अनुभव वाचून एव्हढे लक्षात आले की खुपशा गोष्टी, तुम्ही सुद्धा, परिस्थितीचे विश्लेषण करून, स्विकारल्या आहेतच. मला माझ्या अनुभवावरून वाटते त्या नुसार तुमच्या अनुभवांच विश्लेषण मी खालील प्रमाणे करीनः लाथ मारीन तिथे पाणी काढीन असा स्वभाव आधीपासूनच होता. जे जे पाहिजे ते ते हट्टाने कष्ट करून मिळवले. हा स्वभाव वाईट नाही. मात्र स्वतःचे मुल्यमापन स्वतःच सतत करत राहावे लागते. इतरांच्या सांगण्यावर लगेच अम्मल नाही केला तरी इतरांचे नक्कीच ऐकून घ्यावे. मनातल्या मनात त्यावर स्वतःशीच प्रामाणिक चर्चा करावी आणि आपला बंदा रुपया खणखणीत आहे की नाही हे सतत तपासत राहावे. अमुक एक गोष्ट होणारच असे मनात धरले कि ती झाली नाहीतर काय हा विचार केलाच नाही. नकारात्मक घटनेचा आधी विचार करून ठेवावा. 'प्लॅन बी' नेहमी तयार ठेवावा. धाडसीपणे पुढे टाकलेले पाऊल गरज भासल्यास मागे घेण्यात कसालाच कमीपणा नसतो. तो व्यवहार आहे. धंद्यात भावनेपेक्षा व्यवहार अधिक महत्वाचा असतो. बायको नेहमी सांगायची जे हातात आहे त्याचा विचार करूनच नियोजन करायचे आश्वासन द्यायची. बायकोचे (किंवा कुणाचेही) ऐकायचे की नाही हे ती (बायको किंवा दूसरी व्यक्ती) किती व्यवहारी आहे आणि मनाने विचार करणारी आहे की बुद्धीने ह्यावर अवलंबून असते. बायकोचे सर्वच ऐकणारे आणि कांहीच न ऐकणारे दोघेही खड्ड्यात जाऊ शकतात. त्यामुळे काय ऐकायचे काय नाही हे अनुभवावरून ठरवावे. हे पैसे येतील. तिथून काम येईल ह्या बेभरवश्यच्या नियोजनाला काही अर्थ नसतो. हे बाकी खरं आहे. तुमच्या सौंनी योग्य तोच सल्ला दिला आहे. पण तिचे कधी ऐकले नाही. कारण मागचे "अनुभव". मागचे "अनुभव" नाही. मागच्या घटनांमधून जे 'नशिबाने' यश मिळालं होतं त्याने एक प्रकारचा 'इगो' मनांत निर्माण झाला होता आणि हा इगोच दुसर्‍यांच्या सल्यांवर विचारही करायला परवानगी देत नाही. हे म्हणजे सगळे सिग्नल हिरवे असतील तरच मी गाडी चालवणार. सिग्नल लाल असताना गाडी दामटणं हे जितकं कायद्याला धरून गैर आहे तितकेच नितिमत्तेला धरून गैर आहे आणि अपघातांना आपणच आमंत्रण देण्यासारखे आहे. असे वागणे धंद्यातच काय पण रोजच्या जीवनातही टाळलेच पाहिजे. त्यामुळे रिस्क घेणे कमी झाले. त्यामुळे आर्थिक प्रगती खुंटली. रिस्क घेण्याने आर्थिक प्रगती खुंटत नाही. आंधळी रिस्क घेण्याने माणूस खड्ड्यात जातो किंवा भिंतीवर आपटतो. धंद्यात जोखिम उचलताना नुसते डोळेच नाही तर कान आणि मन सुद्धा उघडे ठेवावे. तसेच जोखीमीची तीव्रता (इंटेन्सिटी) तपासून बाजी उलटल्यास होणार्‍या नुकसानाबरोबर तोलून पाहावे. ते नुकसान क्षुल्लक किंवा कमी पातळीचे असेल तरच जोखिम उचलावी, मध्यम किंवा उच्च पातळीचे असेल तर उचलू नये. (जोरदार सेटबॅक बसू शकतो). त्यातच मुलगा ५ महिन्याचा असताना अंगावर गरम दुध सांडून ५०% भाजला. त्याचे शरीर भाजले आणि आमच्या दोघांची मने. फार दुर्दैवी घटना. अशा घटनांवर आपलं कांही नियंत्रण नसतं. विमा असता तर फारात फार आर्थिक बाजूची काळजी घेतली गेली असती पण आपल्या पोटच्या मुलाला होणार्‍या यातना आपल्या मनाचे, आत्मविश्वासाचे खच्चीकरण करतो. त्यात तुमचा कांही दोष नाही. हा नशिबाचा/दुर्दैवाचा भाग आहे. आमचा संसार दृष्ट लागण्यासार्खाच आहे. त्यामुळे आपल्या सोबत काही चांगले होईल तर त्याचीच भीती वाटू लागली. कारण त्या चांगल्याला कुणाची तरी नजर हमखास लागतेच लागते असा वाईट अनुभव. स्वतःचा व्यवसाय करा किंवा नका करू पण ह्या मानसिकतेतुन शक्य तितक्या लवकर बाहेर पडा. भन्नाट आत्मविश्वास ते शुन्य आत्मविश्वास असा प्रवास फार झपाट्याने झाला. ..... आपण हे करू शकणार नाही असा न्यूनगंड आला. तो बराच काळ होता. 'भन्नाट आत्मविश्वास' ह्यात स्वकर्तृत्त्वाचा भाग किती आणि नशिबाचा भाग किती हे तपासून पाहावे. खुप वेळा आपल्या नशिबाने (यशासाठी लागणार्‍या इतर सर्व बाबी आयत्याच जुळून येणे) मिळालेल्या यशालाच आपण आपलं कर्तृत्व समजतो. कित्येकदा ज्याला आपण आत्मविश्वास समजतो तो आपल्या मनावरचा सोनेरी मुलामा असतो. कांही कारणाने तो मुलामा खरवडला गेला तर आपल्याला समजतं आपण सुद्धा आतून, मुळात, इतरांसारखेच आहोत. किंचिंत घाबरट आणि mediocreच आहोत. ह्याचा स्विकार करणं बरंच कठीण जातं. पण लवकरात लवकर हे सत्य स्विकारल्याने पुढील वाटचाल सुरक्षित होते. सरळ राजीनामा दिला. त्या आधी एक २ लाखाचे लोन घेतले. दूसरा मार्ग स्पष्ट दिसण्याआधीच, लांबचा असला तरी सुरक्षित असा मुख्य रस्ता सोडून, काट्याकुट्यांच्या जंगलात (दोन लाखांचे कर्ज) शॉर्ट्कट सापडेल ह्या आशेने नविन वाट शोधण्यात शहाणपणा नाही. नोकरी सोडल्यावर दुसर्याच महिन्यात बायकोची एक आणि मुलाची एक अश्या दोन शस्त्रक्रिया यात बराच खर्च झाला. त्याच्या दुसर्या महिन्यात गाडीचा एक क्षुल्लक अपघात होऊन त्यात ४० हजार खर्च झाले. विम्याचे महत्व लक्षात आले असेलच. जी गंगाजळी ९ महिन्यासाठी प्लान केली होती ती ३ महिन्यात साफ झाली. आजारपणं, अपघात ह्यांचा विचारच न केल्याने ९ महिन्यांचे प्लानिंग केले. ९ महिन्यांना पुरेल इतकेच पैसे जवळ असताना ३ महिन्यांचेच प्लानिंग करायला पाहिजे. अर्थात, असे सल्ले नंतर देणं सोपं असतं. तरीपण ह्या अनुभवाचा भविष्यात उपयोग करून घ्यायला पाहिजे होता. नशिबाने पुढे साथ दिली आणि कामाचा ओघ सुरु झाला. एप्रिल २०१२ ते एप्रिल २०१३ फारच मजेत गेले. एव्हढे नकारात्मक अनुभव आल्यानंतर जे कांही पैसे हाती आले त्यात 'फार मजा' न करता भविष्यासाठी विमा किंवा इतर काय तजविज केली? तेंव्हा एका ग्राहकाने पार्टनरशिप चा प्रस्ताव ठेवला. त्याचे पैसे आणि माझी मेहनत व ज्ञान असा तो एकंदर मामला होता. मी स्वतःचा व्यवसाय सुरु केला तेंव्हा मला एका गुजराथी व्यावसायिकाने सल्ला दिला होता. लहानात लहान धंद्याने सुरुवात कर पण स्वतःचा कर. पार्टनर घेऊ नकोस. सख्ख्या भावालाही, मार्केट दरापेक्षा जास्त दराने पगार देऊन मॅनेजर म्हणून ठेव, पण पार्टनर करून घेऊ नकोस. पार्टनरशिप वाईटच असते असे नाही पण ती सांभाळायला अंगात जास्त हुशारी आणि व्यवसायाचा अनुभव असावा लागतो. पार्टनरशिप यशस्वी झाल्यास 'माझ्यामुळे' आणि नुकसान झाल्यास 'त्याच्यामुळे' अशी दोन्ही भागिदारांची भूमिका असते. दोन्ही परिस्थितीत संवेदनशील व्यक्तीच्या वाट्यास मनःस्तापाव्यतिरिक्त कांही येत नाही. सुमारे १० ते १५ लाख गुंतवणूक होती. ह्या भांडवलात तुमची जमा पुंजी किती होती आणि कर्ज किती होते? जर सर्व गुंतवणूक भागिदार करणार असेल तर तो सतत तुमच्यावर दबाब ठेवणार ह्याची कल्पना असायला हवी होती. एव्हढी रक्कम गुंतविणारा भागिदार स्वस्थ बसून आपल्याला आपल्या मर्जी नुसार धंदा करू देईल असं समजणं हा भाबडेपणा आहे. पार्टनर एक मोठा बिल्डर होता. भागिदार कितीही पैसे गुंतवित असला तरी तो आपल्या तोलामोलाचा असावा. आपल्याला डोईजड होईल असा नसावा. आर्थिकदृष्ट्याही नाही, सामाजिकदृष्ट्याही नाही आणि मसलपॉवरच्या दृष्टीनेही नाही. त्याने त्याची काही माणसे ह्या सगळ्यावर देखरेख व संयोजना साठी दिली. ईथेच घात झाला. वर म्हंटल्याप्रमाणेच, जो १५ लाख गुंतवितो तो स्वस्थ बसणार नाही. तुमच्या प्रत्येक हालचालीवर 'लक्ष' ठेवेल आणि तुम्ही किती वेळा श्वास घेतला आणि सोडला ह्यावरही 'लक्ष' ठेवेल. तुमचे स्वातंत्र्य संपुष्टात येते. म्हणाले मी तुला पैसे देतो. बुडाले तरी हरकत नाही. (हा आशीर्वाद असल्यावर धंदा चालेल तर काय बिशाद) देणार्‍याने असे म्हंटले तरी 'घेणार्‍याने' हे कर्ज आहे आणि आपल्याला हे लवकरात लवकर फेडून आपला हात दगडाखालून मोकळा करून घ्यायचा आहे हे कधीच विसरता कामा नये. तुमचा ह्या मदतीकडे बघायचा दृष्टीकोनच चुकीचा आहे. आता शब्द बदलायची बाबांची वेळ होती. त्यांनी पुढचे पैसे द्यायला स्पष्ट नकार दिला. वरून माझीच खरडपट्टी काढायला लागले. बाबांनीही पैसे दिले होते तेंव्हा त्यांचेही लक्ष असणारच तुमच्या व्यवसायावर. तुमचं व्यवसाय करणं (किंवा वागणं) जर बेदरकार असेल तर त्यांनाही व्यवसायाच्या यशाबद्दल साशंकता वाटणारच. त्यामुळे २ लाखांवर पाणी सोडून बाकीचे पैसे वाचविण्याचा त्यांनी पवित्रा घेतला असण्याची शक्यता आहे. शिवाय तुमची तुमच्या व्यवसायाकडे पाहण्याची दृष्टी, त्यातील खाचाखोचा माहित असल्याने आणि व्यावसायिकतेची ओढ असल्याने त्या दोन लाखाच्या सुरक्षिततेकडे किंवा परताव्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टीकोण आणि तुमच्या वडिलांचा (वरील सर्व गुणांच्या अभावामुळे) दृष्टीकोण ह्यात फरक हा असणारच. त्यातून हे घडले असावे. शिवाय पैसे दिल्यापासून 'ह्या पुढे मी पैसे देणार नाही' ह्या भूमिकेत शिरण्यापूर्वी होत गेलेला परिस्थिती बदल कळण्यास मार्ग नाही त्यामुळे ह्या परिस्थितीस जबाबदार कोण?, तुम्ही की तुमचे वडिल हे ठरविणे कठीण आहे. एक ग्राहक खूप काम घेऊन आला. नवीन होता त्यामुळे मला काही अंदाज येत नव्हता. नाशिकचा होता आणि नाशिकच्या घ्रहाकांचा मला काहीच अनुभव नव्हता. भविष्यात भरपूर काम येईल या आशेने( हि आशा त्यानेच लावली) आणि प्रथमदर्शनी त्यात काही चूकही नव्हते. पुन्हा तुमच्या सौंचा सल्ला स्विकारला असतात तर अशा बेभरवशाच्या अनोळखी ग्राहकाकडून येणार्‍या पैशावर विसंबून राहिला नसतात. आपण ग्राहक असताना विक्रेत्याच्या आणि विक्रेता असताना ग्राहकांच्या 'गोडगोड' बोलण्याला फसायचं नसतं. माझ्याकडेही गिर्‍हाईके येतात. ५-६ माणसांचे जेवण हवे असते. किती खर्च येईल सांगितल्यावर घासघिस सुरु होते. मी शांत राहतो. मग ते हुकमी एक्का बाहेर काढतात अमुक अमुक फंक्शन ३०० माणसं जेवायला येणार आहे. तुम्हालाच ऑर्डर देऊ वगैरे वगैरे आश्वासनं देतात. मी सांगतो 'ह्या ऑर्डरचा हा रेट आहे. ती ऑर्डर येईल तेंव्हा 'त्या' ऑर्डरवर नक्कीच डिस्काउंट देईन.' असो. केलेल्या कामाचे पैसे मिळाले, पण ते दिलेल्या वेळेच्या प्रमाणात नव्हते. चोराच्या हातची लंगोटी असे म्हणून किंवा 'अमुल्य' अनुभवाची फी असे समजून सोडून द्यायचे. पुढे चलायचे. खेदाने असे म्हणावे लागेल, धंदा बुडायला चांगले डिझायनर न मिळणे हे एक मोठे कारण आहे. डिझायनरला निवडताना नीट पारखून 'ट्रेड टेस्ट' घेऊन निवडायचे. त्यांच्या बोलण्यावर जायचे नाही. त्यांना नोकरी हवी असते त्यामुळे ते 'हां सर्व कांही करतो. मला सर्व येतं. मागे हे हे काम केलेले आहे.' अशा थापा ठोकतातच. शक्य असेल तर सॅलरी + कमिशन (ह्यात सॅलरी कमी पण दोन्ही मिळून साईजेबल रक्कम होईल) असे आमिष दाखवायचे. त्याचे डिझाईन गिर्‍हाईकाकडून पास झाले तरच पूर्ण रक्कम त्याला मिळेल. अर्थात माझा कुंपणावरून दिलेला सल्ला आहे तुम्हाला तुमच्या व्यवसायाची जास्त चांगली कल्पना आहेच. हिम्मत हरु नका. पण अनुभवांच्या जखमा कुरुवाळत बसण्याऐवजी त्यातून धंद्याच्या क्लुप्त्या शिकून घ्या आणि संयमाने यशाच्या मार्गावर पोहोचा. अनुभवासारखा गुरु नाही. फक्त तो आधी शिक्षा करतो आणि नंतर ज्ञान देतो.

In reply to by एस

प्यारे१ 21/09/2014 - 19:36
+२ काय चुका झाल्या हे आत कुठंतरी पक्कं नोट डाऊन करुन त्यावर जास्त वेळ घालवण्यापेक्षा (प्राधान्यानं) सध्या त्या निस्तरण्याकडं जास्त लक्ष दिलं गेलं पाहिजे. ह्या सगळ्यातून बाहेर पडून नंतर काय ते ठरवता येईल. (ठरवावं लागेलच) आणि हो, कमीअधिक प्रमाणात सगळ्यांच्याच आयुष्यात काही ना काही समस्या आहेत. 'समस्या असणं' हे तत्त्व सारखंच आहे. त्या 'समस्यांचं रुप' हे तपशील आणि तपशीलाचे भाग वेगवेगळे आहेत/असतात. त्यामुळं आपण सगळेच एकाच धारेचे प्रवासी आहोत. काहींच्या बोटी थोड्या कणखर, काहींची वल्हवण्याची क्षमता जास्त, वारं येईल तसं शिडाला दिशा देण्याचं कसब उत्तम, त्यानंतर टीम मेंबर्स नि ट्युनिंग आणि शेवटी अंशतः नशीबाचा हातभार असं सगळं गणित जुळून येणं भाग असतं. बाकी त्रास होतोच. तो एकदाच काय तो करुन घेऊन नंतर मात्र अजिबात न उगाळता पुढं जाणं आवश्यक आहे. शुभेच्छा आहेतच.

In reply to by प्रभाकर पेठकर

संदीप डांगे 21/09/2014 - 19:06
छान विश्लेषण केले आहे. पण यश हे नशिबाने मिळते आणि नुकसान हे आपल्या मुर्खपणामुळे होते असा काहीसा अर्थ आपल्या विश्लेषणावरून लागतो आहे. अर्थातच "भाग्य कि कर्म" हा सनातन लढा आहेच. असो. मी फक्त एवढेच म्हणेन कि माझे अनुभव घटनेनुसार मांडले आहेत. त्यात बरेच निर्णय हे त्या काळातली उपलब्ध तत्कालीन परिस्थिती पाहून घेतले आहेत. त्या परिस्थिती चे सर्वच कंगोरे इथे मांडणे शक्य नाही. उद. बिग पिच्चर दाखवणारे सगळ्याच धंद्यात भेटतात. त्यामुळे अशा लोकांना मी पूर्वीपासूनच ओळखून आहे. प्रस्तुत ग्राहक हा बिग पिच्चर दाखवत नव्हता. कारण आता हे दोन लेबल कर नंतर १०० लेबल ची कामे देतो अशी काही गोष्ट नव्हती. एकदमच १० लेबेल चे त्याने रोख पेमेंट केले होते व नंतरच्या ४ मोठ्या ऑर्डर चे हि रीतसर पेमेंट केले. त्यांचा खरोखरच मोठा झोल झाला. कारण ३ महिन्यात मी त्यांच्या मुळापर्यंत जाऊन खबरबात काढली होती. काहीतरी कारण झाले आणि त्यांना कच्चा माल पुरवणाऱ्या कंपनीशी त्यांचा काहीतरी वाद झाला. नंतर ती कच्चा मालवली कंपनी मला लेबलची ऑर्डर देत होती पण माझे रेट त्यांना परवडले नाही. ह्यात फार गुंतागुंत आहे. आणि ती सगळीच इथे सांगता येत नाही. असे प्रत्येक घटनेत झाले आहे. तात्पर्य: आपण घटना रोखू शकत नाही. पण त्याच चुका परत करू नये एवढे शिकावे. यशाने हुरळून जाऊ नये किंवा अपयशाने खचून जाऊ नये एवढा संदेश मी आपल्या प्रतिसादातून घेत आहे.

In reply to by संदीप डांगे

>>>> पण यश हे नशिबाने मिळते आणि नुकसान हे आपल्या मुर्खपणामुळे होते असा काहीसा अर्थ आपल्या विश्लेषणावरून लागतो आहे. असं मी माझ्या प्रतिसादात कुठे म्हंटले आहे? माझे म्हणणे आहे यशाचे आणि अपयशाचे, दोन्हीचे, डोळे, कान आणि मन उघडे ठेवून विश्लेषण करा. नशिबाने मिळालेल्या यशाला आपल्या कर्तृत्त्वाने मिळविले असे समजू नका. ह्याचा अर्थ यश नशिबाने मिळते आणि अपयश आपल्या मूर्खपणामुळे होते असा चुकीचा अर्थ आपण काढलेला दिसतो आहे. मूर्खपणाचे निर्णय केंव्हाही महागातच पडतात. आंधळी जोखिम उचलू नका. डोळे, कान आणि मन उघडे ठेवून परिस्थितीचा सर्व बाजूंनी विचार करून काय तो निर्णय घ्या. अशा सवयीतून जेंव्हा यशाची चढती कमान सुरु होईल आणि अपयशाचे प्रसंग आले तरी ते सहजतेने हाताळण्याइतके सौम्य असतील अशा परिस्थितीतिल ते यश हे तुमच्या कर्तृत्त्वाचे आणि नशिबाचे प्रतिबिंब असेल. मूर्खपणा सोडून दिल्यामुळे, उध्वस्त होण्यासारखे, अपयश दृष्टीक्षेपातही नसेल.

In reply to by प्रभाकर पेठकर

संदीप डांगे 21/09/2014 - 21:51
पेठकर काका, >>>मागचे "अनुभव" नाही. मागच्या घटनांमधून जे 'नशिबाने' यश मिळालं होतं त्याने एक प्रकारचा 'इगो' मनांत निर्माण झाला होता आपल्या ह्या वाक्यावरूनच मला असं वाटले. बहुतेक आपण "लाथ मारीन तिथे पाणी काढीन" ह्या माझ्या वाक्यावरून असा अंदाज बांधला असावा. तो माझा दुर्दम्य आशावाद होता. अहंकार नाही. आपण खरच उत्कृष्ट विश्लेषण आणि मार्गदर्शन केले आहे यात काहीच वाद नाही. परंतु सदरहू लेख माझ्याच अनुभवांवर आधारित असल्याने वाचकांचे कुठलेच गैरसमज होऊ नये म्हणू हा प्रपंच. मी स्वताला सर्वज्ञ मानत नाही. अजूनही शिकत आहे, समजून घेत आहे. वेगवेगळ्या अनुभवांनी वेगवेगळे मत बनत जाते. परंतु कर्तुत्वानेच नशीब सिद्ध होते असे आत्तातरी मला वाटते. त्यामुळेच मिळणाऱ्या यशात किंवा अपयशात नशीब किती आणि कर्तुत्व किती याचा तुलनात्मक अभ्यास कसा करणार? अतिशय विपरीत परिस्थितीत मराठा साम्राज्य स्थापन करणारे शिवाजी महाराज असोत कि रिलायंस चे धीरूभाई असोत, यांच्या यशात नशिबाचा भाग किती? त्यांनी यश अपयशाचे कितीसे हिशोब कुठलेही काम हाती घेण्याआधी केले असतील. "मला अमुक एक काम करायचे आहे, त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा आणि बुद्धीचा कस लावूया" असेच विचार त्यांनी कुठेलेही काम हाती घेतानी त्यांच्या मनात असतील. त्यांच्या इतिहासावरून तरी असेच दिसते कि त्यांनी केलेल्या बऱ्याच गोष्टी जगात त्यांनीच प्रथम केल्या असतील. यशाचा कुठलाही फुलप्रूफ फोर्मुला नसतो. माझ्या मते वांगी कापल्यावरच कळते किडलेले आहे कि नाही ते. मी कापीन ती वांगी चांगलीच निघतील हा वृथा "इगो". शक्यतो न किडलेली वांगी घेऊ नये म्हणजे कापल्यावर किडलेले निघण्याचा धोका टळतो असे कधी शक्य नसते. पण कुठली वांगी किडलेली असू शकतात वा चांगली असू शकतात हा अंदाज अनुभवानेच येतो. कुणीही जन्मताच एक्स्पर्ट नसतो. पण तेवढे हुशार होण्यासाठी त्याला वांगी कापण्याचे "कर्तृत्व" करावेच लागते. याठिकाणी उद. म्हणून नारळ, आंबा, ग्राहक, नोकर काहीही असू शकते. परंतु कर्तुत्वाने मिळवलेल्या यशाचा कैफ चढून मनुष्य नादान चुका करू शकतो. मी कधीच चुकत नाही आणि चुकणारही नाही हा अहंकार भल्याभल्यांना बुडवतो. मला तरी तसा रोग कधी झाला नाही. तसे असते तर वरचा माझा लेख फक्त इतरांवर चिखलफेक करणारा असता. दुसरे म्हणजे आपण माझ्या दोन वाक्यांचा परस्पर वेगळाच अर्थ घेतला आहे. १. त्यामुळे रिस्क घेणे कमी झाले. त्यामुळे आर्थिक प्रगती खुंटली. >>>रिस्क घेण्याने आर्थिक प्रगती खुंटत नाही >माझे समीकरण सरळ आहे: रिस्क कमी = आर्थिक मोबदला कमी , रिस्क जास्त आर्थिक मोबदला जास्त. रिस्क न घेतल्याने आर्थिक प्रगती खुंटली असे मी म्हटले आहे. रिस्क घेण्याने आर्थिक प्रगती खुंटली असे नाही. २. हे म्हणजे सगळे सिग्नल हिरवे असतील तरच मी गाडी चालवणार. >>>सिग्नल लाल असताना गाडी दामटणं हे जितकं कायद्याला धरून गैर आहे तितकेच नितिमत्तेला धरून गैर आहे आणि अपघातांना आपणच आमंत्रण देण्यासारखे आहे. >तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. रेड सिग्नल असतानी गाडी चालवावी असा त्याचा अर्थ नाही. अपघात होणार नसेल तरच मी गाडी चालवणार अश्या अर्थाचे ते वाक्य आहे. माझाच त्या वाक्यावर प्रतिवाद आहे कि आयुष्य हे कधीच शेवटच्या क्षणापर्यंत प्लान करता येत नाही. कधी थांबावे लागेल, कधी पळावे लागेल हि कुणीही आधीच जाहीर करू शकत नाही. गाडी बाहेर काढल्यावर अमुक एका चौकात सिग्नल हिरवाच असेल असे कुणीही सांगू शकत नाही. म्हणजे मला कुठेही अडथळा असेल तर मी गाडी काढणारच नाही असे होत नाही. फारतर कुठे कुठे सिग्नल आहेत त्याचा विचार प्रवास चालू करायचा आधी करू शकतो. म्हणजेच व्यवहारात धोके असणारच म्हणून ते करायचेच नाही असे अजिबात नाही. पण तुम्ही म्हटल्या प्रमाणे कान, डोळे, मेंदू उघडा ठेऊन सगळीकडे बघावे लागते. ते शंभर टक्के खरे आहे. सगळी काळजी घेऊन कुणीतरी येउन तुम्हाला ठोकतोच तेव्हा ते "नशीब". म्हणून गाडी घरातून काढली हाच माझा मूर्खपणा असे कुणी म्हणत नाही. बाकी आपल्या अमुल्य मार्गदर्शनाबद्दल खरच आभारी आहे. कुठे गल्लत होत असेल तर जरूर सांगा. तुमचा हक्क आहे.

In reply to by संदीप डांगे

संदिप डांगे, माझ्या प्रतिसादातील दुसर्‍याच वाक्यात मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. ते वाक्य म्हणजे, मला माझ्या अनुभवावरून वाटते त्या नुसार तुमच्या अनुभवांच विश्लेषण मी खालील प्रमाणे करीनः हा 'इगो'चा अनुभवही मी घेतला आहे. तोच माझ्या प्रतिसादात मी मांडला आहे. आपण अपयशाचं विश्लेषण करतो पण यशाचं कधी करीत नाही. ते आपल्या हुशारीनेच मिळाले असे आपण गृहीत धरतो. मीही सुरुवातीला हिच चुक केली होती पण स्वतःच्याच यशापयशाचं मुल्यमापन करताना माझी चुक माझ्या लक्षात आली की सुरुवातीच्या यशात माझे श्रेय विशेष नव्हते पण ते माझ्या हुशारीनेच मिळाले होते असा 'इगो' माझ्यात निर्माण होऊन पुढे जरा सेट बॅक बसला होता. (माझी ४ उपहारगृह नुकसान होऊन बसली.) यशाचं मुल्यमापनही करणं गरजेचं असतं. असो. तुमच्या बाबतीत तसे झाले नसेल तर आनंदच आहे. >>>>त्यामुळेच मिळणाऱ्या यशात किंवा अपयशात नशीब किती आणि कर्तुत्व किती याचा तुलनात्मक अभ्यास कसा करणार? मी १९९० साली मस्कत मध्ये पावभाजी, बटाटेवडे, वडापाव वगैरे पदार्थ विक्रीसाठी कॅफेटेरिया सुरु केला. सुरुवातीच्या ४ महिन्यात गिर्‍हाईकांचा ओघ वाढला. गुजराथी मुख्य गिर्‍हाईके. तेंव्हा माझ्या कॅफेटेरीयात इथल्या स्थानिकांसाठी चिकन, अंड्याचे सँडविच, बर्गर हे सुद्धा होते. स्थानिक आणि गुजराथी, मराठी सर्व गिर्‍हाईकांना संतुष्ट करून व्यवसाय भरभराटीस न्यायचा माझा विचार होता. व्यवसायाचा अनुभव शून्य होता. सुरुवातीला भरमसाठ गिर्‍हाईके आली. ह्याला मी माझी हुशारी समजत होतो. पण त्यात नशिबाचा भाग होता. इथे तेंव्हा पावभाजी, वडापाव इत्यादी विकणारी उपहारगृह नव्हती. मी मार्केटचा तसा अभ्यासही केला नव्हता. पण परिस्थिती अशी होती की कोणीही तेंव्हा असा कॅफेटेरीया सुरु केला असता तर यशस्वी झाला असता. कारण त्या काळी ती त्या मार्केटची गरज होती. माझी हुशारी नाही. हा झाला नशिबाचा भाग. मला गुजराथी भाषा येते. त्यामुळे येण्यार्‍या गुजराथी गिर्‍हाईकांशी मी गुजराथीत बोलायचो, मराठी गिर्‍हाईकांशी मराठीत बोलायचो, अरबी गिर्‍हाईकांशी अरबी भाषेत बोलायचो, दक्षिण भारतियांशी हिन्दी आणि इंग्रजीत बोलायचो. बहुसंख्य गिर्‍हाईके ही गुजराथी आणि मद्रासी होती जी शुद्ध शाकाहारी होती. त्यांच्याशी संभाषणातून त्यांचा माझ्या कॅफेटेरियातील मांसाहारी पदार्थ विक्री बद्दल असलेला रोष माझ्या लक्षात आला. आणि मी तडकाफडकी मांसाहारी पदार्थ बंद करून टाकले. कारण एक तर मांसाहाराचा आग्रही समाज हा अरबी होता आणि टक्केवारीत फार कमी होता. कुठल्याही उपहारगृहात हिन्दी आणि अरबी गिर्‍हाईके एकत्र कमीच दिसतात. (त्या काळच्या गोष्टी आहेत ह्या, १९९०) मांसाहारी गिर्‍हाईकांसाठी मी माझा मोठा शाकाहारी वर्ग हातचा सोडू इच्छित नव्हतो. त्यामुळे तो निर्णय निरिक्षणातून, मार्केटचा अभ्यास करून आणि गिर्‍हाईकांशी संभाषण करून मिळविलेल्या माहितीवर होता. ती माझी हुशारी होती (असं मी मानतो) त्यात नशिबाचा भाग नव्हता. मांसाहारी पदार्थ बंद केल्यावर रोजच्या गिर्‍हाईकांने तो विषय काढला किंवा नाही काढला तरी मी आवर्जून 'मांसाहारी पदार्थ बंद केले आहेत आणि आता हा कॅफेटेरिया शुद्ध शाकाहारी आहे' असे सांगायचो. ती माझी जाहिरातबाजी होती ज्याचा गुजराथी आणि मद्रासी गिर्‍हाईके वाढण्यात मला फायदा झाला. मराठी लोकांना (शाकाहारी वर्ग सोडल्यास) विशेष आक्षेप नव्हता पण त्यांनाही कॅफेटेरियाचे बदललेले रुप आवडले आणि एक 'उत्कृष्ट शाकाहारी उपहारगृह' अशी माझ्या कॅफेटेरियाची ओळख वाढत गेली. सोबत धंदा. हा परिणाम मी माझ्या तथाकथित हुशारीने घडविला होता. इथे हुशारीमुळे आपण कुठलेही उपहारगृह नफ्यात आणू शकतो असा माझ्या मनात अहंगड (इगो) निर्माण झाला आणि ह्या नंतरची ४ उपहारगृहे रांगेत खाली बसली. आत्मपरिक्षण केले. मार्केटचा अभ्यास वाढविला. आणि एकुलत्या एक उपहारगृहावर (जे यशस्वी होते) लक्ष केंद्रित केले. इथे-तिथे उड्यामारण्यापेक्षा आहे तो धंदा सांभाळणे/वाढविणे ह्यावर भर दिला. कित्येक वर्षे नविन उपहारगृहात हात घातला नाही. ह्या देशाची खाली गेलेली इकॉनॉमी (अपयशाच्या अनेक कारणातील एक कारण) हळू हळू सावरली गेली पुन्हा भारतियांची ह्या देशात वर्दळ वाढली आणि दुसर्‍या कॅफेटेरियाची गरज निर्माण झाली. ती ओळखून मी दूसरे उपहारगृह सुरु केले तेही चांगले चालले आहे. हा झाला नशिब आणि हुशारीतील फरक, अहंगंडाचा परिणाम आणि धंद्यात सावरण्यासाठी डोळे, कान आणि मन उघडे ठेवून टाकलेली पाऊले. >>>>रिस्क न घेतल्याने आर्थिक प्रगती खुंटली असे मी म्हटले आहे. रिस्क घेण्याने आर्थिक प्रगती खुंटली असे नाही. ती माझी टंकनचुक होती. मलाही तेच म्हणायचे होते 'रिस्क घेण्याने आर्थिक प्रगती खुंटली नाही' आंधळ्या जोखिमीने नुकसान होऊ शकतं. तुम्ही दिलेलं सिग्नलचं उदाहरण चुकीचं आहे त्यामुळे पुढचा माझा प्रतिसाद गंडल्यासारखा तुम्हाला भासतो आहे. गाडीचा प्रवास फक्त सिग्नलाच खुंटतो असे नाही तर रहदारीत अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कधी कुठे अचानक कोणी मधे येतं (आपल्याला ब्रेक मारावा लागतो), कुठे सिग्नल लाल असतो (थांबावं लागतं), कुठे ट्रॅफिक जॅम असतो (रहदारी संथ गतीने जात असते) धंद्याचेही असेच असते कधी धंदा जोरात असतो (मोकळा रस्ता) कधी मधे कोणी कडमडतो (धंदा कमी होण्याची कांही तात्कालीक कारणं) तर कधी नुकसान नाही पण धंदा मंदीत असतो (जसा इथला रमझानचा महिना, शाळांच्या सुट्यांमुळे भारतियांचे स्वदेशी सुट्टीवर प्रयाण वगैरे) ह्या सर्व अडचणींमधून पार पडताना नितीमत्ता, कायदेशीर बाजू सोडायच्या नाहीत जास्त नफ्यासाठी चुकीची रिस्क घ्यायची नाही, नाहीतर मोठे नुकसान, आर्थिक सेट बॅक अशा 'अपघातांना' आपणच आमंत्रण दिल्यासारखे होते. माझे आणि तुमचे अनुभव वेगवेगळे असू शकतात. पण एकंदरीत धंद्यात वापरायची सावधगिती बहुतेक सर्व धंद्यात सारखीच असते. तुम्हाला मी धंदा 'शिकवत' नाहीये फक्त आंधळी जोखिम घेऊ नका, अपयशा प्रमाणेच यशाचेही विश्लेषण करा आणि स्वतःबद्दल चुकीच्या धारणा न बाळगता (म्हणजे तुम्ही बाळगता आहात असे मला म्हणायचे नाहिए.) प्रगती करा. यशस्वी व्हाल.

In reply to by प्रभाकर पेठकर

संदीप डांगे 22/09/2014 - 02:39
खरच पटले. बाकी काही खाजगी गोष्टी चव्हाट्यावर आल्यावर जरा समज गैरसमज होणारच. (जसे आम्हा बाप-लेकाचे नाते व इतर अनेक गोष्टी.) पण एकदा मिपा ला आपले मानल्यावर मन मोकळ करायचे ठरवल्यावर अस काही होईल याची अपेक्षा होतीच, त्यामुळे दुख: नाही. प्रत्येकाचे आपले एक अनुभवसिद्ध तत्वज्ञान असते. त्या त्या अनुभवातून तावून सुलाखून ते मिळालेले असते. त्याचा यथायोग्य आदर आहेच. तुमचे अनुभव ऐकून मस्त वाटले. त्यामुळे तुमचे म्हणणे अजूनच पटले.

In reply to by प्रभाकर पेठकर

वरच्या इतका उत्तम व्यवहारी सल्ला मिळणे कठीण आहे. प्रत्येक शब्द लक्षात ठेवण्याजोगा आहे ! यात अजून फक्त थोडीशी भर : १. कुठलाही महत्वाचा निर्णय घेताना (मग तो नोकरीसंबद्धी, व्यवसायासंबद्धी अथवा त्यातल्या एखाद्या महत्वाच्या प्रोजेक्टसंबंद्धी असो) सर्वप्रथम तो निर्णय फसला वाईटात वाईट काय होईल आणि यशस्वी झाला तर काय चांगले होईल याचे सद्यस्थितीवर अवलंबून (स्वप्नाळूपणे नाही) विश्लेषण करायला पाहिजे. याला "वर्स्ट केस - बेस्ट केस सिनॅरिओ" असे नाव आहे. यातला सर्वात महत्वाचा असतो "वाईटात वाईटाचा विचार करणारा वर्स्ट केस सिनॅरिओ"... त्याला पुढे जाण्याची तयारी असली आणि त्यासाठी आवश्यक (मॅन-मनी-मटेरिएल) बंदोबस्त केलेला असला तर एखादे अपयश तुमच्या मनाच्या उभारीवर आणि व्यवसायाच्या दीर्घकालीन प्रगतीवर मोठा परिणाम करू शकणार नाही. वर्स्ट केस - बेस्ट केस सिनॅरिओ तुमच्या प्रोजेक्ट रिपोर्टचा अविभाज्य भाग असल्यास तुम्हाला अर्थसहाय्य पुरवणार्‍या संस्थेला/माणसाला तुमच्याबद्दल जास्त भरवसा वाटेल. २. अर्थसहाय्य बँक अथवा नॉन-बँकींग फिनान्शियल इन्स्टिट्युशन्स मधूनच घ्यावे हे माझे स्वतःचे मत आहे. त्याची काही अगदी साधी कारणे आहेत... अ) अर्थसहाय देण्याअगोदर वरील संस्था प्रोजेक्ट रिपोर्टचा आग्रह धरतील आणि तो संस्थेचे ठोकताळे वापरून संस्थेमधले विशेषज्ञ पडताळून पाहतील... त्यामुळे व्यवसायाच्या सफलतेसाठी अत्यंत आवश्यक असलेला एक पाया आपोआप तयार होईल. (मात्र कर्जासाठी "सोईस्कर प्रोजेक्ट रिपोर्ट बनवणे/बनवून घेणे" धोक्याचे आहे, तेव्हा ते टाळा.) आ) तुम्ही कितीही फायदा कमावलात तरी वरील संस्था केवळ करारात अगोदर लिहीलेले आहे तेवढेच व्याज आकारतात. किंबहुना तुम्ही यशस्वी उद्योजक झालात आणि कर्जाचे हप्ते वेळेवर / वेळेअगोदर दिलेले असले तर पुढचे कर्ज अधिक सुलभतेने आणि अधिक चांगल्या दराने मिळू शकते. भागीदारांच्या अथवा व्यक्तीगत अर्थसहाय्यकाच्या परताव्याच्या अपेक्षा सर्वसामान्यपणे व्यवसायाच्या सफलतेच्या अनेक पटींनी जास्त वाढतात. इ) व्यवसायातला एखादा धक्का बँक जास्त समजूतीने घेईल, कारण व्यवसायातल्या अश्या चढउतारांची माहिती असणे हा बँकिंग व्यवसायाचा भाग असते. भागीदार अथवा व्यक्तीगत अर्थसहाय्यक अशी अपेक्षा ठेवणे सर्वसाधारणपणे महागात पडते... शिवाय ती व्यक्ती नातेवाईकांपैकी असली तर नातेसंबंधातही कडवटपणा येतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

संदीप डांगे 21/09/2014 - 22:32
>>>पैसे दिल्यापासून 'ह्या पुढे मी पैसे देणार नाही' ह्या भूमिकेत शिरण्यापूर्वी होत गेलेला परिस्थिती बदल कळण्यास मार्ग नाही त्यामुळे ह्या परिस्थितीस जबाबदार कोण?, तुम्ही की तुमचे वडिल हे ठरविणे कठीण आहे. मी आधीच म्हटल्या प्रमाणे प्रत्येक घटनेची विस्तृत कारणमीमांसा शक्य नाही, परंतु आपल्या विश्लेषणाचा रोख लक्षात घेता थोडे लिहितोच. यात वडील चूक कि मी असे काहीही नाही. त्यांना प्राप्त परिस्थितीत त्यांनी निर्णय बदलला त्याचा फटका मला बसला एवढेच . मीच त्यांना "हे मी कर्ज म्हणूनच घेत आहे" असे सांगितले. आणि त्याचे बाजारभावाप्रमाणे व्याज हि देणार असे हि काबुल केले होते. त्यामुळे हे पैसे नाही दिले तर चालतील असा काही माझा विचार कधीच नव्हता. त्यामुळेच पैसे देण्यास ते तयार झाले. त्यांच्या मते पार्टनर आहे त्याला तू हिस्सा देशील त्यापेक्षा मला दे. आपला पैसा आपल्याच घरात राहील. मी म्हटले :ओके: माझ्या कर्तृत्वात मला कुणाचेच उपकार नकोत अगदी सख्या बापाचेही. कर्ज घेणे मी निषिद्ध मानत नाही. परत करायची प्रामाणिक इच्छा आणि मनगटात ताकत असेल तरच कर्ज घ्यावीत. जोपर्यंत ते कमवू शकतात तोपर्यंत त्यांना माझा आधार नको आहे. परंतु पुढे त्यांच्या व्यवसायात मंदी आली आणि ते असुरक्षित फील करू लागले. म्हणून त्यांनी शब्द फिरवले. (मी दोन लाख आणि बाबांनी एक लाख असे मिळून २००९ मध्ये आम्ही एक घर घेतले त्याची किंमत आज २५ लाख आहे. पण त्या घराचा मी अजिबात विचार करत नाही आणि करणार हि नाही कारण ते आई आणि बाबांसाठी घेतले आहे. आणि ते त्यांच्याच नावावर आहे.)

In reply to by प्रभाकर पेठकर

काळा पहाड 21/09/2014 - 23:09
नकारात्मक घटनेचा आधी विचार करून ठेवावा. 'प्लॅन बी' नेहमी तयार ठेवावा.
प्लान बी हा नॉर्मली वर्स्ट केस सिनारियो नसतो. प्लान फॉर द बेस्ट अ‍ॅन्ड प्रिपेयर फॉर द वर्स्ट या तत्वा नुसार प्लान सी, डी आणि ई सुद्धा हवेत.

विजय_आंग्रे 21/09/2014 - 18:53
प्रभाकर पेठकर सर तुमची संपुर्ण पोस्ट अप्रतिम आहे.
अनुभवासारखा गुरु नाही. फक्त तो आधी शिक्षा करतो आणि नंतर ज्ञान देतो.
__/\__

आनन्दा 21/09/2014 - 18:57
पेठकरकाकांशी सहमत. बाकी एव्हढेच सांगेन, एखाद्या मोठ्या सहकारी बॅंकेकडून कर्ज मिळवता येते का ते पहा. त्यांच्या मॅनेजरला या सार्‍या गोष्टींची कल्पना द्या, तुमच्या कामाचे रेफेरेन्सेस दाखवा, आणि कदाचित तुम्हाला काहीतरी कर्ज मिळेल. सहकारी बँकांचे नियम थोडे वाकवणेबल असतात असे ऐकून आहे, आणि व्याजदर पण थोडे चढे असतात. पण सध्याच्या स्थितीत तुम्हाला ते देखील परवडेल. आणि बाकी इन जनरल, आम्हाला शाळेत एक श्लोक होता, पुस्तकस्था तु या विद्या परहस्तगतं धनं, कार्यकाले समुत्पन्ने न सा विद्या न तद् धनं. आणि कोर्पोरेट भाषेत सांगायचे झाले तर, ही सारे लर्निंग आहे, फक्त अ‍ॅट कॉस्ट.

@ संदीप डांगे, प्रथमतः तुमचे अभिनंदन, कारणे २ १. स्वतःची चूक कबूल करायला धाडस लागते.ते तुम्ही केलेत. २. मिपाची खरी किंमत तुमच्या ह्या धाग्यांमुळे आम्हाला समजली. आणि प्रभाकर दादा, संक्षी, प्यारे१ आणि इ.ए. ह्यांच्या सल्ल्यांमुळे तुम्हाला नक्कीच धैर्य आले असेल.

विजुभाऊ 21/09/2014 - 22:12
पेठकर काकांशी सहमत. सन्दीप्भौ तुमच्या सारख्या अनुभवातून मी देखील थोडाफार गेलो आहे. अशावेळेस सल्ले देणारे भेटतात तसेच विश्वास ठेवून पैसे देणारे सुद्धा भेटतात. हे लोक आपले भले व्हावे असेच इच्छतात. अशा वेळेस घाईघाईने निर्णय न घेता परिस्थीतीकडे थोड्या त्रयस्थ नजरेने बघावे. काहीवेळेस थोड्या वेगळ्या नजरेने पाहिले तर आपल्या चुका काय झाल्या ते कळते तसेच आपल्यात काय चांगले आहे ते देखील समजत. मला वाटते की तुम्ही तुमच्यातील चाम्गल्या गुणांचे अ‍ॅनालिसीस केलेलेच नाहिय्ये. तुम्हाला सहानभुती दाखवणार्‍या लोकांपेक्षा सल्ले देणारांपेक्षा अगदी अनोळखी ज्याना तुमचे बॅग्राऊंड माहीत नाही अशा लोकांशी व्यवहार करून बघा. नाशीक हे एक मोठे शहर आहे तेथे तुम्हाला ओळखणार्‍या लोकाम्पेक्षा न ओळखणारे लोक अनेक पटीने जास्त आहेत. अवांतर : मराठीत "मसाला "नावाचा चित्रपट अशाच एका धडपड्या माणसाच्या कथेवर बेतलेला आहे तो बघा शक्य झाले तर.

कवितानागेश 21/09/2014 - 23:29
खूपच महत्त्वाचे आणि अनुभवी सल्ले मिळत आहेत इथे. कागदपत्रे नीट न ठेवल्यानी आणि धंद्यात स्वतःकडंचच किंवा जवळच्यांकडून घेउन बरंच भांडवल घातल्यानी झालेलं नुकसान अगदी जवळच्या नातेवाईंकाच पाहिलेलं आहे. तुमच्या परिस्थितीची पूर्ण कल्पना येतेय. पण पुन्हा नोकरी बघण्याचं आणि नवीन कौशल्य शिकून घेण्याचं धाडस दाखवून ते पुन्हा सगळी फेडून उभे आहेत. तुम्ही यापुढे सगळ्या प्रकारची काळजी घ्याल आणि यशस्वीही व्हाल याबद्दल खात्री आहे. :)

माहितगार 22/09/2014 - 01:10
संदिप, आपला धागा लेख आणि प्रतिसाद वाचतो आहे. संस्थळाच्या अ‍ॅड्मिनिस्ट्रेटीव्ह जबाबदारीचा भाग म्हणून मिपा संपादकांनी त्यांची जबाबदारी योग्यच पार पाडली. प्रतिसाद बर्‍या पैकी जबाबदारीने येताहेत आणि प्रतिसादांना तुमचा प्रतिसाद सुद्धा चांगला येतो आहे तेव्हा त्या बद्दल अभिनंदनच. चर्चा वाचणार्‍या इतर व्यावसायिकांसाठी म्हणून अडचणींची चर्चा जेवढी लवकर केली तेवढे बरे गूंतागूंत तेवढीच कमी असते. १) इंपल्स (मराठी शब्द ?) आणि विश्वास ठेऊन रिस्क घेण हा उद्योजकतेचा गूण आहे पण सोबतीला इंपल्स मध्ये न अडकणारी, पुन्हा एकदा विचार करून खात्री करून घेण्याचे सांगणारी रिस्क दाखवून देऊ शकणारी व्यक्ती चर्चेसाठी सोबत हवी. २) अंतीम निर्णय आपलेच राहतील एवढ स्वातंत्र्य/अधिकार जतन केलाच पाहीजे पण त्याच वेळी कोणत्याही निगोशिएशन मध्ये आपण स्वतः अंतीम निर्णय घेणारे आहोत हे सांगू नये. इतरांना सांगण्यासाठी एक खरा किंवा इमॅजनरी बॉस नेहमी ठेवावा ( जसे माझ्या डायरेक्टरांना विचारून सांगतो भले डायरेक्टर तुम्ही स्वतःच असा) म्हणजे ऐन निगोशीएशन मध्ये विचारून सांगतो असे म्हणणे आणि अंतीम चर्चा करणे सोपे जाते. (अननुभवी इंपल्सीव लोकांकडून हि डिप्लोमॅटीक स्टेप राहून गेलेली असण्याची आणि नाही तेव्हा गोत्यात जाण्याची शक्यता निर्माण होऊ शकते)
एक ग्राहक खूप काम घेऊन आला. नवीन होता त्यामुळे मला काही अंदाज येत नव्हता. नाशिकचा होता आणि नाशिकच्या घ्रहाकांचा मला काहीच अनुभव नव्हता. भविष्यात भरपूर काम येईल या आशेने( हि आशा त्यानेच लावली) आणि प्रथमदर्शनी त्यात काही चूकही नव्हते... केलेल्या कामाचे पैसे मिळाले, पण ते दिलेल्या वेळेच्या प्रमाणात नव्हते.
३) वर्कींग कॅपिटल बद्दल आधीच्या काही जणांनी प्रतिसादातून मार्गदर्शन केलच आहे पण हि जागा नेमकी खेळत भांडवल जपण्यासाठी लागणार्‍या शिस्तीची असते. किमान जेवढी देणी (जसे ऑफीसचे भाडे कर्मचार्‍यांचे पगार) कॅश मध्ये जायची तेवढा रोखीचा कस्टमरशी रोखीचा व्यवहार झालाच पाहीजे . उधारीच ग्राहक मोठ असल तरी तो मोह बाजूला ठेऊन रोखीचे ग्राहक आधी करावयास हवेत. ४) इन एनी केस तुमचा मॅनपॉवर टर्न ओव्हर व्यावसायिक यशासाठी स्विकार्य स्तराचा नव्हे. मॅन पॉवर टर्न ओव्हर कमी असलेल्या व्यक्तींच्या संपर्कात राहून माणस कशी जपायची हे माहित करून घेतलच पाहीजे, पण त्या पूर्वी माणूस निवडण्या पुर्वीच माणूस पारखण्यासाठी मुलाखतीं घेण्यासाठी अधिक वेळ मोजला पाहीजे. न आवडलेला माणूस पहिल्या ४८ तासात काढून टाकावा जास्तीत जास्त सात दिवस छोट्या व्यावसायिकांनी या पेक्षा अधिक कालापव्यय माणूस काढून टाकताना करू नये. माणूस केव्हाही सोडून जाऊ शकतो किंवा काढावा लागू शकतो या तयारीत आधीच राहून मुलाखती घेऊन काही जणांना पाईप लाईन मध्ये ठेवावयास हवे. ५) कस्टमरशी प्राईस निगोशीएशन आणि पैसे मागण्याची स्किल्स चांगली हवीत तुम्ही चांगल प्राईस निगोशीएट करू शकले नाही आणि पुरेसे पैसे रोखीत मिळवू शकले नाही तरीही तुम्हाला चांगल मॅनपॉवर मिळणार नाही आणि टिकणार नाही. पैसे मागण्याची स्किल किमान पाच वर्षे सेल्सचा अनुभव असलेल्या व्यक्ती कडून घ्यावीत आणि प्राईस निगोशिएशन स्कील हाय व्हॅल्यू प्रिमीयम प्रॉडक्ट सेलींग करणार्‍या व्यक्तींं कडून घ्यावीत. ६) तुम्हाला चांगला डिझायनर मिळाला नाही तरी दुसर्‍या फ्रिलान्स डिझायन्रर्सना शोधून वापरण्याचा पर्याय कितपत उपयूक्त होता माहित नाही पण तो तुमच्या धागा लेखात दिसला नाही. अर्थात हे सर्व सल्ले सर्वसाधारण स्वरूपाचे आहेत, जी गोष्ट स्वतः पाहिली नाही त्याबद्दलचे सल्ले कितपत प्रॅक्टीकल आणि नेमके असतील हे सांगता येत नाही. पण मला प्रथम दर्शनी महत्वाच्या वाटलेल्या गोष्टी टंकल्या एवढेच.

In reply to by माहितगार

संदीप डांगे 22/09/2014 - 02:27
सर्वोत्तम प्रतिसादांपैकी एक. अश्याच मुलभूत आणि नेमक्या सल्ल्याची अपेक्षा होती, ती आपण पूर्ण केलीत. तुम्ही सांगितलेल्या ह्या सर्व बाबी माझ्यासाठी खरच नवीन आणि उद्बोधक आहेत. विशेषत: इमजिनरि बॉस आणि निगोशिअशन स्किल्स कुणाकडून घ्यावीत. अजूनही अश्या मौलिक माहिती किंवा प्रशिक्षणाची काही खबर असल्यास जरूर कळवणे. मी हुशार, मी धंदा करतो म्हणून मला फार कळते, दुसर्यांनी मला काय शिकवू नये असा माझा अजिबात पिंड नाही. स्वतंत्र व्यवसाय सुरु करून मला उणीपुरी ३ वर्षे झाली आहेत. या दरम्यान चांगल्या वाईट अनुभवांनी बरेच शिकवले. तुम्ही सांगितलेले पाचही मुद्दे मला भरपूर मार्गदर्शक आहेत. अजून शिकायची इच्छा आहे. फ्रीलान्स डिझायनर सोबत काम करणे जरा महागात पडते. त्यांच्या अपेक्षा आणि उत्पादकता यात बरीच तफावत असते. म्हणजे कुणी मध्यस्थ असेल तर त्याची बरीच फरफट होते. या प्रकारात माझ्या अनुभवाप्रमाणे कुणीतरी एक म्हणजे ग्राहक किंवा डिझायनर मध्यस्थाच्या जवळचा अथवा खास पाहिजे. जेणेकरून कामाचा दर्जा व मोबदला यांच्यात अविश्वासाने काही गोंधळ होणार नाही. माझे एक दोन जुने मित्र आणि समव्यवसायी ह्यांच्यासोबत व्यवहारात आहे. परंतु फ्रीलान्स आणि डेडीकेटेड स्टाफ यांच्यात आपापले सामर्थ्य व उणीवा असतात. वेळप्रसंग बघून आयुधे वापरावी लागतात. सांप्रत मला असा अनुभव आहे कि माणूस बिझनेसमन असला कि लोकांचा (विशेषत: नोकरदारांचा) त्याच्याकडे बघण्याचा पूर्वग्रहदुषित दृष्टीकोन काहीसा असा असतो. १. चिक्कार पैसे कमावतात २. नोकरांचे शोषण करतात ३. ग्राहकास लुबाडतात ४. पार पोचलेले असतात ५. प्रचंड हुशार आणि धूर्त असतात ६. माणसे ओळखण्यात पटाईत असतात ७. आपले काम दुसर्यांकडून करून घेण्यात वाकबगार असतात ८. "तुम्ही बिझनेस करता म्हणजे तुम्हाला हे (…. )माहितीच पाहिजे… " अश्या अर्थाचे उद्गार. ९. हमखास कर बुडवतात १०. बिझनेस भरपूर पैसा गाठीशी आहे किंवा अवाजवी नफा मिळतो म्हणूनच करतात ११. फक्त आणि फक्त पैश्याकडे बघतात. म्हणजे एकंदर व्यापारी आणि लुटारू यांच्यात फक्त एक फरक तो म्हणजे एक गोड बोलतो दुसरा धारदार बोलतो. हे पण मी स्वत: बिझनेसमन झाल्यावर शिकलो. अर्थात बिझनेसमन होणे हे डॉक्टर किंवा इंजिनिअर होण्यासारखे नसते. मिळाली पदवी कि झाला बिझनेसमन. तोही चुकू शकतो. धंदा करणाराने सदैव जागृत आणि तत्पर राहिले पाहिजे, त्याच्याकडून चूक होऊच नये. तसे होत असेल तर कशाला करतो धंदा? गुमान नोकरी कर आणि शांत बस असे सल्ले येतात. (हे वैयक्तिक अनुभवले आहे. मला नोकरीसाठी तळमळीने मदत देऊ केलेल्या मिपाकरांसाठी हे नाही. त्यांच्या प्रामाणिक तळमळीबद्दल मला कुठलाही पूर्वग्रह नाही.)

In reply to by संदीप डांगे

माहितगार 22/09/2014 - 09:14
उत्कृष्ट दर्जा देणार्‍या स्वतःच्या व्यावसायिक कौशल्या सोबत व्यवसाय मिळवणे (खास करून बर्‍याच महाराष्ट्रीय व्यावसायिकांसाठी ओळखीच्या परिघा बाहेरचा व्यवसाय मिळवण्याकडे दुर्लक्ष होत अथवा किंमत पाडून मिळवण्याचा प्रयत्न होताना दिसतो- जे अ‍ॅप्लिकेबल नसेल ते सोडून द्यावे) आणि विवीध स्टेक होल्डर्सशी व्यावसायिक संबंध टिकवणे ओघाने येतेच. हे एवढ्या साठी नमुद करतो आहे की डिझायनींगची चांगली कला पण केवळ कला असलेल्या इतर व्यक्तीत आणि तुमच्यातला हा फरक समजून घेतला की कौशल्याधारित सुयोग्य मोबदला देऊन माणसे वापरून घेणे सोपे जाते. जो पर्यंत तुम्ही आणि मोबदला घेऊन काम करून देणारा यांचे संबंध चांगले आहेत तो पर्यंत बाकी जग काय म्हणते ते खूप महत्वाचे नाही. प्रचंड हुशार आणि चतूर- हा योग्य शब्द (धूर्त) असतात; . माणसे ओळखण्यात पटाईत असतात, . आपले काम दुसर्यांकडून करून घेण्यात वाकबगार असतात (हाणून पाडण्यासाठी नकारात्मक टोन मधल्या नसतील तर) अशी इमेज पैसे उभे करताना उपयोगीच पडू शकेल असे वाटते. पण तुमचा व्यवसाय हाणून पाडण्यासाठी ग्राहक सोडून कुणी कॉमेंट मारत असेल तर त्याला तुमचा नकारात्मक स्वभाव असलेला स्पर्धक गृहीत धरा. तुमच्या स्टेक होल्डर समोर तुम्ही केलेल्या दहा सकारात्मक गोष्टी स्पर्धकाच्या वाक्यांचा उल्लेख न करता दाखवून द्या. नोकरांचे शोषण करतात, ग्राहकास लुबाडतात, अशी इमेज मात्र निर्माण होणार नाही याची अधिकाधीक दक्षता घेतलेली व्यवसायाच्या यशाच्या दृष्टीने चांगली. बाकीच्या आणि बाकीच्यांच्या कमेंटांकडे दुर्लक्ष करणे चांगले, व्यवसाय यशस्वी झाल्या नंतर तिच मंडळी आपापली कामे करून घेण्यासाठी बदलतील. चांगल्या दर्जा, सेवेच सातत्य आणि ग्राहक समाधानाच्या आधारावर इतर स्पर्धकांपेक्षा ५ टक्के ते ३० टक्के प्रिमियमवर सेल करूनही ग्राहक टिकवणे वाढवणे जमले पाहीजे. आणि ह्यात बहुधा सेवा उद्योगाचं मर्म असाव (चुभूदेघे)

In reply to by माहितगार

>>>>चांगल्या दर्जा, सेवेच सातत्य आणि ग्राहक समाधानाच्या आधारावर इतर स्पर्धकांपेक्षा ५ टक्के ते ३० टक्के प्रिमियमवर सेल करूनही ग्राहक टिकवणे वाढवणे जमले पाहीजे. आणि ह्यात बहुधा सेवा उद्योगाचं मर्म असाव लाख मोलाचं विधान. ह्याच पायाभूत विचारांवर विश्वास ठेवून, २४ वर्षे सेवाउद्योगात टिकून आहे.

इनिगोय 22/09/2014 - 06:45
हे लिहून काढत आहात हे अतिशय उत्तम. यातून तुम्ही (खरंतर कोणत्याही उद्योजकाने) काय टाळायला हवं आणि कोणती खबरदारी घ्यायला हवी या सगळ्याचं डॉक्युमेंटेशन होतं आहे. पेठकरकाका, इस्पिकचा एक्का आणि इतरही काही प्रतिसाद खूप मुद्देसूद आहेत. माझ्याकडून एक लहानशी सुचवणी.. रश्मी बन्सल यांचं 'कनेक्ट द डॉटस्' हे पुस्तक मिळवून वाचा. कोणत्याही औपचारिक शिक्षणाविना स्वतःचा व्यवसाय यशस्वीपणे केलेल्या २० उद्योजकांबद्दल लिहिलेले लेख आहेत. त्यातूनही तुमच्या उपयोगाचे बरेच काही मिळेल, हे नक्की. उदा. वर उल्लेख केल्याप्रमाणे स्वतःच्या, नातेवाईकांच्या कमाईचे सारे पैसे व्यवसायात न गुंतवता बँकेकडून कर्ज घेतल्याने नेमके काय साध्य होते, त्यासाठीचे डॉक्युमेंटेशन कसे करावे, इ. आपल्याच सारख्या परिस्थितीतून वाटचाल केलेल्यांचे अनुभव वाचल्याने दृष्टीकोनात खूपच सकारात्मक बदल घडून येऊ शकतो. बाकी व्यक्तिगत निरोप धाडला आहे, तो पाहा.

विलासराव 22/09/2014 - 11:33
औपचारिक शिक्षणाविना स्वतःचा व्यवसाय यशस्वीपणे केलेल्या २० उद्योजकांबद्दल लिहिलेले लेख आहेत. माझं नाव आहे का हो त्यात. मी बीई ईलेक्ट्रॉनीक्स झालो १९९४ मधे. नंतर मुंबईला आलो. ९ वर्षे नोकरी केली सर्व्हीस ईंजीनीयर म्हनुन. २००३ ला नोकरी सोडली तेव्हा कर्जबाजारी झालो होतो. मग नोकरीत कर्ज फिटणे अशक्यप्राय झाल्याने व्यवसाय सुरु केला. घर भाडयाचे, डोक्यावर कर्ज आनी दारात देणेकरी अशात माझा व्यवसाय सुरु झाला. घरच्यांनी तर लांब रहाणेच पसंद केले कारण त्यांना वाटले याची सटकली. कारण आमच्या खाणदाणीत व्यवसायात पाउल टाकणारा मी बहुधा पहीलाच. आता नवीन व्यवसाय असल्याने लगेच रोज काम नसायचे. मग मी पुस्तक वाचत दिवस दिवस घरीच पडीक असायचो. घरातले सगळे यावर आपापसात चिंता व्यक्त करायचे. लवकरच मला पहीली ऑर्डर मिळाली. त्याची माझी खरेदी होती ५००० रुपये. विकायचे होते ७००० रुपयांना. यात २००० मार्जीन होते खरे पण १ वर्ष सर्व्हीसही होती. घरातुनच अर्थात मदत मिळाली नाही. बरेच प्रयास करावे लागले त्या पाच हजारासाठी. पण त्याच पार्टीने काम वेळेत करुनही पेमेंट चार महीने लटकवले. मग त्या पाच हजार दिलेल्या लोकांनी आधीच पत नसलेल्या मला काळ्या यादीतच टाकले. मग सगळ्या मित्रमंडळात खबर गेली. सगळे रस्ते जवळपास बंद. मग मी नवीन ऑर्डर मिळवण्याचे प्रतत्न कमी करुन मेंटेनन्स कॉण्ट्रॅक्ट किंवा कॉलबेसीसवर ब्रेक्डाउन कॉल्सला जोर लावला.थोडेसे पैसे जमा झाल्यावर हळूहळू विक्री परत चालु केली. पण खास वाढ होत नव्ह्ती. प्रयत्न तर अथक चालु होते.मी सकाळी स्वैपाक करुन डबा बरोबर घेउन ६ वाजता अंबरनाथवरुन घर सोडायचा ते व्हीटीला माझ्या ऑफीसला यायचो. मग रात्री ११ ची शेवटची फास्ट लोकल पकडायची तेव्हा घरात पोहोचायला पाउन वाजायचा. असो. एवढं करुन पोटपाणी चालत होते पण कर्जदारांचे काय? मला आधार(सहानुभुती) फक्त माझ्या व्यसनाची होती. फक्त बारमधे न जाता मी घरीच पण नियमीत घ्यायचो फक्त रात्री. मग मला एक अभिनव उपाय सुचला. मागाल ते मीळेल वाला. मग मी रोज सकाली त्या अज्ञात शक्तीची तळमळीणे करुणा भाकायला लागलो की मला स्वतःसाठी काय नको पण मला ते देणेकरी दारात नकोत बाबा. आनी कुठल्याही परिस्थीतीत मला बेईमानी करण्याची वेळ येउ देउ नकोस म्हणुन. त्याआधी मी कधीही कोणाकडेही प्रार्थना केलेली नव्ह्ती. कारण हेच लाथ मारेण तिथे पानी काढेण,पण निघत नव्ह्तंना. मग मी हळुच प्रार्थनेत एक ओळ वाढवली की जर मला देणेकरी मिटवुन माझ्याकडे १० लाख आले तर मी कायमची निव्रुत्ती घेईल म्हणौन. आनी साधारनपणे ८-९ महीन्यांनी माझी माझ्या मेहुण्यांच्या ओळखीने एका आयटीआयच्या अधीकार्याशी ओळख झाली. त्यांनी माझी कहानी ऐकुन मला मदत केली. संपुर्ण महाराष्ट्राच्या आयटीआयचे काम मला मिळाले तेही स्वतःचा पैसा न लावता. पैसा कंपनीचा ओळख माझी आनी सर्व्हीसही कंपनीची. मग तीनच वर्षात मला १६ लाख त्यातुन मिळाले. चार लाख कर्जदारांचे दिले. १० लाख शेअरबाजारात लावले. दोन लाख पिणे -खाणे आनी भटकंती यात लावुन भारतभर फिरलो. बरेच आश्रमही पालथे घातले. मी ३५ व्या वर्षी रिटायर झालो. माझा मॅनेजर होता माझा चुलतभाउ जो आठवी पास आहे तीही गावची. त्याच्या गळ्यात व्यवसाय घातला, अट एकच संध्याकाळी प्यायला अन मटन-मच्छी खायला पाहीजे मला बस्स. बाकी तुझे. त्याने बेट्याने जोमाने धंदा वाढवला, आज तीनचार घरे आहेत, पैसा गाठीशी आहे, मार्केटला पत आहे, नातेवाई॑कात(दाखवण्याची का होईना) इज्ज्त आहे. नंतर मी विपश्यनेला गेलो. दारु आनी अभक्ष भक्षण ही बंद झाले. आनी आता वेगळ्याच मारगावर स्थिर झालो जो कधीही मी अनुसरेल असे मला कधीच वाटले नव्हते. यात मी लग्न केले नव्हते ही बर्याच जनांना जमेची बाजु वाटते पण त्यापेक्षा मला माझ्या घरच्यांची अनेकपटींनी जबाबदारी होती, आजही आहे. आमच्या घरात आजही मीच न कमावताही कमावता आहे, आईला पेंन्शन आहे. माझा भाउ आजही काहीच कमावत नाही त्यामुळे आईची पेंशन त्याला मिळते व आइला पेंशन मला द्यावी लागते. पण आजही मला असे वातत नाही की मी यांना पोसतो. ते त्यांच्या कर्माचे फळ आहे.असो. प्रयन्त न सोडता प्रार्थना करौन पहा कोणीही हा अनुभव घ्यावा. कुणाला वाटेल ही अंधश्रद्धा आहे पण नाही होते काय. खरोखर निर्मळ( हे मनाने हे आपले आपल्याला चांगले समजते. आनी अहंकार बराच कमी झाल्याशिवाय मन नर्मळ होत नाही हे ध्यानात च्या) मनाने प्रार्थना केल्यावर होते काय की. तुम्ही त्या वेवज जगामधे प्रक्षेपीत करता, आनी त्याच्याशी जुळणारे लोक हळुहलू तुमच्या संपर्कात येतात किंवा तुम्ही त्यांच्या संपर्कात येता. मनुश्याला मनुश्य म्हणतात कारण वो अपने ही मानस(मनोव्यापार) का पुत्र/संतान है. हा सगळा माझा अनुभव आहे. जे वाइट वागले त्यांच्याबद्दलही सद्भावना बाळगा. आपले मन कुठल्याही परिस्थीतीत दुषीत होउ देउ नका. जे पटेल ते घ्या ,न पटलेले अर्थातच माझ्याकडेच राहील.

डॉ. गोल्डरॅट म्हणतो की बर्‍याच वेळा आपण निर्णय घेतो व त्यानंतर तो चुकला की पश्चत्ताप करत बसतो. निर्णय घ्यायची प्रक्रिया ही आपण जी गृहितके जमेस धरतो त्यावर बरीच अवलंबून असते. निर्णय घेण्या अगोदर जर ही गृहितके (Assumptions) नीट तपासली तर आपले निर्णय चुकिची ठरण्याची शक्यता बरीच कमी होते. या थॉट प्रोसेसवर त्याची पुस्तकेही उपलब्ध आहेत. सगळ्याचे मूळ हे आपल्या विचार करण्याच्या पद्धतीत असल्यामुळे ते अत्यंत महत्वाचे ठरते. कधी कधी हे का ते असेही प्रसंग उदभवतात त्यावेळी तर त्याची थेअरी अत्यंत उपयोगी पडते....असो...आपल्याला पुढील वाटचालीसाठे शुभेच्छा...खात्री आहे आपण अजून एका वर्षात मी या परिस्थितीवर कशी मात केली यावर उद्भोदक लेख लिहाल.....

संदीप डांगे 22/09/2014 - 16:41
सगळ्या घटनांचा सुसूत्र विचार करत होतो, तेंव्हा लिहावेसे वाटले, पहिल्या भागातच भूतकाळ संपला आहे. त्यावर काथ्याकुट करणे म्हणजे वेळेचा आणि बुद्धीचा अपव्यय आहे. त्याचबरोबर घटनेकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोन बदलणे हे अशक्य आणि अनावश्यकही आहे. इथून पुढे नेमके काय करत आहे आणि नेमक्या काय मदतीची अपेक्षा आहे ह्या बद्दल लिहिणार आहे. पहिल्या भागावर प्रतिक्रिया थांबवता येतील असे काही करता येईल का? कारण त्या भागावर मला चर्चेची आवश्यकता वाटत नाही. घडून गेलेल्या घटनांचा उहापोह काहीच उपयोगाचा नाही. मी फार तटस्थपणे मांडण्याचा प्रयत्न केला पण चिरफाड होण्यामध्ये तो तटस्थपणा राहणार नाही. चिरफाड होईल अशी अटकळ होतीच. घटनेचे गांभीर्य त्यातले बारीकसारीक तपशील कळले कि कमी होतेच. साधारणपणे परिस्थितीने गांजलेला माणूस आणि स्वताच्या चुकांनी गांजलेला माणूस ह्या दोहोंकडे बघण्याचा दृष्टीकोन एकदम वेगवेगळा होतोच. त्यामुळेच पहिल्या भागावर काही प्रतिसाद दयायचे मी स्वत: थांबवले आहे. आता हातात असलेली कामे करत आहे. भविष्यात काय करेन ह्याचा पूर्ण विचार झाल्यावरच पुढचा भाग लिहिणार आहे. ३ भागात हि मालिका संपणार आहे. तसही माझी कर्मकहाणी चावडीवरची चर्चा व्हावी अशी इच्छा नाही. कुठेतरी जबाबदार ठिकाणी या माझ्या भावनांची नोंद व्हावी अशी अपेक्षा मिपावरच टाकण्यामागे होती

In reply to by संदीप डांगे

एस 22/09/2014 - 17:45
तुमच्या भावनेशी सहमत आहे. संमंने पहिला आणि हाही धागा वाचनमात्र केल्यास पुढील भागांवरील फोकस कायम राहील आणि उगाच जास्त चर्वितचर्वण टळेल असे मलाही वाटते. आत्तापर्यंत झालेली चर्चा समर्पक असली तरी झाली तेवढी पुरेशी आहे.

सस्नेह 22/09/2014 - 17:35
तटस्थ शब्दात उघड व्यक्त केल्याबद्दल संदीप भाऊंचे अभिनंदन !
सर्व प्रतिसाद दात्या मिपाकारांन कोटीकोटी धन्यवाद. माननीय संपादकांनी आरंभीच इशारा देऊन संभाव्य धोक्याची हवाच काढून टाकली. आपली दर्दभरी कहाणी सांगून लोकांना मानसिकरीत्या छळणे आणि काहीतरी आर्थिक मदत मिळवणे हा माझा उद्देश नव्हताच मुळात. या लेख मालेत माझ्यावर हा प्रसंग का ओढवला, त्यात माझ्या चुका, नशिबाचा भाग ह्याची पूर्ण पार्श्वभूमी, सद्यस्थिती आणि भविष्यातली वाटचाल लिहिणार आहे. त्याचबरोबर सर्व मिपाकर मंडळींनी जो उस्फुर्त आणि भरभरून प्रतिसाद व सल्ले दिले, काही प्रश्न टाकले त्याबद्दल पण लिहिणार आहे.

"हमें तुमसे प्यार कितना.."

अन्नू ·
सकाळ-सकाळच्या कोवळ्या उन्हाची तिरिप सॅमन्थाच्या तोंडावर पडली आणि नापसंतीदर्शक हुंकार भरत तिने तशीच आपली मान बाजुला कलती केली. रात्रीच्या झोपेची ती धुंदी अजुनही तिच्या डोळ्यांवरुन गेलेली दिसत नव्हती. त्या गोड झोपेच्या तंद्रीतच तिने पुन्हा एकदा आपली कुस बदलली. डावा हात पुढे टाकला. अन्.. नकळतच तिच्या चेहर्‍यावर मंद हसू उमटून गेले! आपल्या जडावलेल्या पापण्या हळूवाSरपणे उघडत तिने त्याच्याकडे एक दृष्टीक्षेप टाकला. तो तिच्या जवळच होता- मॅक.. तिचा मॅक! आणि ती आता त्याच्याच अंगावर हात टाकून स्वस्थ झोपली होती. हलकेसे स्मित करत तिने कौतुकभरल्या नजरेने त्याला न्याहाळले.