Skip to main content

देर न हो जाये

Published on शनीवार, 20/09/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
खालील घटना पुर्णपणे काल्पनिक असुन तो कुणाशी खरच साधर्म राखत असेल तर फक्त मनातले मनात हसुन घ्यावे, खालील लेखन निव्वळ मनोरंजनासाठी लिहिला गेला आहे. त्यात लेखिकेला कोणताही मानसिक आजार झालेला नाही यांची कृपया नोंद घ्यावी. स्थळ : इंजिनीअरिंग कॉलेज होस्टेल. वेळ : सकाळची . संख्यने जास्त असलेल्या आणि सुविधा कमी असलेल्या होस्टेल मधला काल्पनिक प्रसंग. नीरु : ए वश्या बाहेर ये, इथे आतल्या चिकनची पुरण व्हायची वेळ आली आहे. अभी : अरे तो कसला येतोय लवकर, आता महाआवाहन करा त्याला.

शिकार

लेखक कल्पतरू
Published on शनीवार, 20/09/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
कधीतरी असाच एक योग येतो चार चौघांची चांडाळ चौकडी जमा होते आणि शिकारीला जायचा बेत ठरतो. आता कोकणात शिकारीला फार महत्व. जन्माला आलेल्या प्रत्येकाने एकदा तरी शिकारीला गेलंच पाहिजे हा इथला अलिखित नियम. लहानाचा मोठा झालो तो या गोष्टी ऐकतच. अगदी मला आठवतंय म्हणजे पहिली दुसरीत असताना दर आठवड्याला शिकारीच्या गोष्टी हमखास कानी पडायच्या. कधी तर सशाच्या, तर कधी लांडोर तर कधी भेकर , रानडुकराची शिकार म्हणजे सगळ्यात मोठी शिकार. याची शिकार जो करायचा तो आठवडाभर गावात त्याची छाती चार इंच फुगवून चालायचा.

भोलेबाबा अमरनाथ दर्शन २००१

लेखक खुशि
Published on शनीवार, 20/09/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
सकाळी अमरनाथसाठी निघालो, श्रीनगर शहरात रस्त्यावर मोठमोठे चिनारचे व्रुक्ष आहेत.रस्त्याच्या मधोमध असले तरी रस्ता रुंदीकरणासाठी त्यांची कत्तल केलेली नाही तर जागोजाग रस्त्यालाच वळण दिलेले आहे.गन्दरबल येथे माताश्री खिरभवानीच्या दर्शनासाठी गेलो.निसर्गरम्य ठिकाण आहे.छोटीसी स्वच्छ वाहत्या पाण्याची नदी आहे घाट आहे,सरोवरात खिरभवानी मातेचे छोटेसे मन्दीर आहे.५१शक्तिपीठा पैकी एक आहे.येथे साबुदाण्याच्या खिरीचा प्रसाद मिळतो.प्रसादालयाच्या जवळ एका ठिकाणी उभे राहुन वर आकाशाकडे पाहिले असता झाडांच्या फांद्यांमधुन भारताचा नकाशा दिसतो.घनदाट व्रुक्षराजी आहे.भरपुर कावळे आहेत पण ते पिवळ्या चोचीचे आणि गोड आवाजाचे आहेत

हापिस-हापिस

लेखक सस्नेह
Published on शनीवार, 20/09/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
शतशब्दकथा ( आतिवासताईना गुरु करून) ‘अरे आज ऑफिसला नाही का जायचे ?’ ‘अलीकडे मला ऑफिसला जावेसेच वाटत नाही बघ ! काही मजा नाही राहिली !’ ‘ते का ?’ ‘अरे, तिथे मी कुणाला आवडत नाही. सगळे मला टाळतात... ...माझ्याबरोबर कुणी बसत नाहीत. मी बोलावल्याशिवाय कुणी माझ्याकडं येत नाहीत. आले तरी कामापुरतं येतात. अन लगेच जातात. कामापुरतंच बोलतात. मी ऑफिसात आलो की हसणे खिदळणे बंद करतात अन गंभीर चेहेरे करून फायलीत खुपसतात. चहाला जाताना मला दिसू नये अशी दक्षता घेतात. ....मी एकटाच डबा खातो. सिगारेट ओढतो. अन परत कामाला लागतो.’ ‘अरे पण पूर्वी तू किती उत्साहानं ऑफिसला जायचास !’ ‘हम्म..

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - २

Published on शनीवार, 20/09/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
९ मे १६१९ ला जेन्स मंक हा डेन्मार्कचा दर्यावर्दी युनिकॉर्न आणि लॅम्प्रे या दोन जहाजांसह नॉर्थवेस्ट पॅसेजच्या मोहीमेवर निघाला. नॉर्थवेस्ट पॅसेजमधून चीन आणि भारताचा किनारा गाठण्याचा त्याचा बेत होता. डेव्हीसच्या सामुद्रधुनीतून उत्तरेच्या दिशेने मार्गक्रमणा करत त्याने ६९ अंश उत्तर अक्षवृत्त गाठलं. फ्रॉबीशरच्या उपसागरातून त्याने हडसनच्या सामुद्र्धुनीत प्रवेश केला. मात्रं या सामुद्रधुनीतून वाट काढण्यास त्याला तब्बल एक महिना लागला. सतत बिघडणारं हवामान आणि जोरदार आर्क्टीक वार्‍यांमुळे त्याच्या जहाजांची दयनीय अवस्था झाली होती.

भोले बाबा अमरनाथ दर्शन २००१

लेखक खुशि
Published on शुक्रवार, 19/09/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
आमचा मित्र श्री.गिरीश वडनेरकर १९९६ पासुन दरवर्षी अमरनाथ यात्रेला जातो बरोबर काही लोकानाही नेतो{ना नफा ना तोटा या तत्वावर} हे माहित होते,गेल्यावर्षी शेजारचे रावेरकर जाऊन आल्यावर त्यानी केलेले सुंदर काश्मीरचे वर्णन ऐकून आम्हाला कधी आपणही जाऊ असे झाले होते आणि यावर्षी भोलेबाबानी आम्हाला बोलावले. मंगळवार ३जुलै २००१ संध्याकाळी ७-१५च्या सेवाग्राम एक्सप्रेसने प्रस्थान ठेवले.मनमाडस्टेशनवर सर्वसहयात्रीशी ओळखदेख झाली.रात्री ११-३०च्या झेलमएक्सप्रेसने जम्मूसाठी प्रयाण केले.

आयुष्य म्हणजे....

लेखक चेतन677
Published on शुक्रवार, 19/09/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
"आयुष्य म्हणजे काय असते, आयुष्य म्हणजे असतो एक संघर्ष... जन्मापासुन ते जन्माच्या शेवट पर्यंतचा, आयुष्यातलं ध्येय गाठताना बरीच माणसे भेटतात, काहीजण आपल्याला या प्रवासात एकटेच सोडुन निघुन जातात, काहीजण शेवटपर्यंत साथ देतात... आयुष्यातली खरी मजा आपले ध्येय गाठल्यावर नसते, तर त्या प्रवासात असते...... तसे तर जन्माला अनेकजण येतात आणि मरतातही, पण खरे जीवन तेच जगतात जे संघर्षात जगतात....."

ह्रुदया मध्ये घर बांधु या,अशा घराला दार कशाला?

लेखक खुशि
Published on शुक्रवार, 19/09/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
जन्म कसा आणि कुठे घ्यायचा, हातामध्ये नसे आपुल्या, ह्रुदयामध्ये घर बाम्धु या, अशा घराला दार कशाला? कोण धर्म आणि जात कोणती, हाती काहीच नसे आपुल्या, ह्रुदयामध्ये घर बांधु या, अशा घराला दार कशाला? जातिभेद अन धर्म विसरुया, साथ देउ या सुखदुखःला, ह्रुदयामध्ये घर बांधु या, अशा घराला दार कशाला? जिव्हाळ्याचा गाव असावा, राग आणि रोष कशाला, ह्रुदयामध्ये घर बांधु या, अशा घराला दार कशाला? परस्पराना समजुन घेऊ, वाद आणि तक्रार कशाला, ह्रुदयामध्ये घर बांधु या, अशा घराला दार

क्षितीज चांदणी......

Published on शुक्रवार, 19/09/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
फिरुनी उगवली पुन्हा लाजरी चांदणी ती क्षितीजावरी … डोळे तिचे भिरभिर अवघे शोधी साजणा दूर नभी …. सैरभैर निळ्या नयनी तिच्या तो येण्याचे भास खेळती …. क्षणात हसरी क्षणात बावरी तिच्या चेहर्याचे रंग बदलती …. हळूच लपलेला ढगा आडूनी चांद हासला खट्याळ परी …. लपंडाव प्रीतीचा अबोल आभास गोड अंतरंगी …. चंद्राच्या चांदण्यात मग अवघी रात्र न्हाऊन निघाली …. थरथरनाऱ्या ओठांपरी चांदणीही शहारून गेली …. प्रेमात आकंठ बुडुनी रात्र मग अवघा रंग निळा झाला …. चंदेरी झालर स्वप्नांची लेऊन गंध श्वासात मिसळूनी गेला ….

"अखेर सेना-भाजप युती तुटली?" .........

Published on शुक्रवार, 19/09/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
"अखेर सेना-भाजप युती तुटली?" अश्या आशयाची बातमी मटा च्या वेबसाईट झळकली आहे, थोडक्यात खालीलप्रमाणे मजकूर आहे. "शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांनी सुमारे २५ वर्षांपूर्वी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ज्या युतीची मुहूर्तमेढ रोवली होती, ती शिवसेना-भाजप युती तुटल्याचं विश्वसनीय सूत्रांकडून समजतं. पुढच्या महिन्यात होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या महासंग्रामात हे दोन्ही पक्ष स्वबळावर रणांगणात उतरणार आहेत.